ProfileImage
568

Post

6

Followers

0

Following

PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्ती व वाघांचा बंदोबस्त करा - खा. डॉ.नामदेव किरसान


पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्ती व वाघांचा बंदोबस्त करा - खा. डॉ.नामदेव किरसान


पोर्ला:- वनपरिक्षेत्रात रानटी हत्ती व वाघांचा बंदोबस्त करा अशी सूचना मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना खासदार डॉ किरसान यांनी केली आहे 
वडसा वनविभाग वडसा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पोर्ला ता. जि.गडचिरोली येथे रानटी हत्ती यांनी घातलेला हौदोस व वाघांमुळे शेतकरी , सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती मिळताच गडचिरोली-चिमूर 
लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान सोबत जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा करून भ्रमणध्वनी द्वारे मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांच्याशी चर्चा केली.तसेच पोर्ला क्षेत्रातील जनतेला जलावू लाकडांची व्यवस्था पोर्ला प्रादेशिक कार्यालय येथे करण्याच्या सूचनाअधिकाऱ्यांना दिल्या.
 यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत पाटील राऊत, सरपंच सौ. निवृत्तीताई फरांडे, मनोहर नवघडे,  देविदास भोयर, अशोक बोहरे, भोयर , प्यारमंहन शेख, विजय येवले, उमेश खरवडे, विनोद आजवले, लाकडे , उमेश आछाडे, जितू पोटे, देविदास चापले, बंडू हजारे, सौ. उज्वला खरवडे, देवराव कोलते, डंबाजी झोडगे,  बंडू बावणे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

शेतकऱ्यांची वीज जोडणी करा अन्यथा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालणार -खा.प्रतिभा धानोरकर


शेतकऱ्यांची वीज जोडणी करा अन्यथा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालणार -खा.प्रतिभा धानोरकर 

 

चंद्रपूर:-
खासदार प्रतिभा धानोरकर ह्या  सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या प्रश्नावर त्या आक्रमक झाल्या असून विज द्या अथवा 2018 पासून जमा केलेल्या सुरक्षा रकमेवर व्याज द्या अन्यथा महावितरण च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नागरीकांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असून सध्या त्यांनी 2018 पासून जिल्ह्यातील 1590 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विज  मिळवून देण्याकरीता सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर शेतकऱ्यांनी वीज जोडणी करीता सुरक्षा ठेव देखील जमा केलेली आहे

या विषयासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र लिहून शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. उशीर झाल्यास सामान्य नागरीकांकडून विज बिलावर व्याज घेणारे महावितरण 2018 पासून शेतकऱ्यांना विज जोडणी देण्यास असमर्थ ठरले आहे.
घेराव करणार

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांना विज किंवा शेतकऱ्यांनी महावितरण कडे सुरक्षा ठेव स्वरुपात भरलेल्या पैशावर व्याज न दिल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार  असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

ट्राक्टरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू


ट्राक्टरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

 

 

कुरखेडा, दि. 15 : तालुक्यातील गोठणगाव येथील युवक मयूर देवराव घुगुसकर (22) हा आपल्या दुचाकी वाहनाने देसाईगंज वडसा वरून परत आपल्या गावी गोठणगाव येथे  येत असताना वडसा - कुरखेडा रोडवरील नांन्ही फाट्याजवळ ट्रॅक्टर अपघातात त्याच्या हाताला पायाला व छातीला गंभीर मार लागून गंभीरित्या जखमी झाल्याने त्याला 12 फेब्रुवारीला प्राथमिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. कुरखेडा येथून प्राथमिक उपचार करुन त्याला ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्याला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता शनिवार 15 फेब्रुवारी 2025 रोजी रोजी उपचारादरम्यान  त्या युवकाची दुपारी 12:30 साडेबारा वाजता  प्राणज्योत मालवली.

मयूर घुगुसकर या युवकाचा अपघात हा शेतातून चिखल करीत परत जाणाऱ्या कॅचबिल लावलेल्या ट्रॅक्टरची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी समोरा समोर धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावर नान्ही फाट्याजवळ घडली होती. नान्ही परीसरात असलेल्या शेतात चिखलचे काम निपटवत रुपेश बोधनकार वैरागड असा नाव लिहलेला MH 33 V 6585 क्रमांकाचा ट्रॅक्टर देसाईगंजचा दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली. यावेळी दुचाकीस्वार मयूर देवराव घुगुसकर (वय 22) रा. गोठणगांव हा युवक गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टरचा लोखंडी कॅचबिलचा मार लागल्याने युवकाचा एक पाय व हात निकामी झाला होता. याला गंभीर अवस्थेत 108 क्रमांकाचा

रुग्णवाहिकेने प्रथम येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारा करीता ब्रम्हपुरी व नंतर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मयूर घुगुसकर हा युवक आपल्या वडिलाला मशीन बोरवेलच्या कामात मदत करून कुटुंबात आर्थिक मदत करत होता. मयुरच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचे  डोंगर कोसळले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न


येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न

 गडचिरोली: विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने आयोजित गडचिरोली जिल्हा अधिवेशन इंदिरा गांधी विद्यालय व उच्च महाविद्यालय, येणापूर येथे संपन्न झाले. या प्रसंगी आमदार रामदासजी मसराम  सत्कारमूर्ती व  प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. आमदार रामदासजी मसराम  यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

त्या प्रसंगी  आमदार  सुधाकरजी अडबाले , सचिव,गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ,येनापुर जयंतजी येलमुले, अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ अरविंद देशमुख,जिल्हा कार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ जिल्हा भंडारा,राजेश धुर्वे, सचिव,यंग टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ डॉ. विवेक गोर्लावार, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा गडचिरोली. गुरुदेव नवघडे, अध्यक्ष विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन गडचिरोली प्रा. विजय कुत्तरमारे, अध्यक्ष,अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना  सतीश पवार, आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना प्रमुख प्रकल्प अहेरी, सुरेंद्र अडबाले कार्यवाह चंद्रपूर शहर.सुरेंद्र शेळके अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा,दीपक धोपटे,  अजय लोंढे ,अजय वर्धरवार , रवींद्र नैताम, नरेंद्र भोयर,  शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 15, 2025

PostImage

एका महिन्यात दुप्पट  पैसे असे आमिष दाखवून घातला लाखो रुपयांचा गंडा


एका महिन्यात दुप्पट  पैसे असे आमिष दाखवून घातला लाखो रुपयांचा गंडा

 

 मुंबई :-

 प्रभादेवीतील पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सी मध्ये एका महिन्यात  पैसे दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांकडून लाखोंची गुंतवणूक स्वीकारून पळ काढल्याचा प्रकार दादरमध्ये समोर आला आहे. सुनील गुप्ता असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी दादर पोलिस अधिक तपास करत आहेत.

माहीममधील रहिवासी असलेले ५८ वर्षीय तक्रारदार हे बेस्टमधून अधिकारी पदावरून डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले. बेस्टमध्ये काम करत असताना एका सहकाऱ्याने त्यांना पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास  एका महिन्यात पैसे दुप्पट परतावा मिळत असल्याचे सांगितले 

..त्यानुसार, त्यांनीही सहकाऱ्यासोबत गुप्ता याच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली. गुंतवणुकीसाठी आलेल्या लोकांची गर्दी बघून तक्रारदार यांना देखील दामदुप्पट विश्वास बसला. त्यांनी भेट घेताच, गुप्ताने ३० दिवसांत दुप्पट परतावा ही योजना बंद झाली असून ४५ दिवसांत दुप्पट अशी आकर्षक योजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

 

गुप्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने १ लाख ८० हजारांची गुंतवणूक केली. आणखीन काही जणांनी सात लाख रुपये गुंतवले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा देण्याची तारीख उलटून गेली. मात्र परतावा न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मागितली. तोपर्यंत गुप्ता पसार झाला होता.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 15, 2025

PostImage

वनविभागाचे अधिकारी गस्त करीत असतांना जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेले ईसम जेरबंद


वनविभागाचे अधिकारी गस्त करीत असतांना जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेले ईसम जेरबंद 

 

वरोरा:-

तालुक्यातील जवळच असलेल्या महालगाव (खु.) कक्ष क्र. २ राखीव वनामध्ये दिनांक १३ फेब्रुवारी रोजी रात्री ०९.३० वाजताचे दरम्यान वनकर्मचारी एस. के. शेंडे व.प.अ. वरोरा, डि. बी.चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, ब्रम्हणाथ वनरक्षक रामपुर, रोजनदारी वनमजुर व पि.आर.टी. टिम गस्त करीत असतांना आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल सर्व राहणार हिरापुर पो. कोसरसार ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर व संदिप बालीकचंद्र शेरकुरे रा. धोपटाळा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर हे कक्ष क्र. २ राखीव वनामध्ये संक्षयास्पद अवस्थेत आढळुन आले. त्यांची विचारणा केली असता ते वन्यप्राण्याची शिकार करण्याकरीता आल्याचे सांगितले.

त्यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य वाघुर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन, मोबाईल जप्त करण्यात आलेले असुन त्यांचावरभारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, २ (१६) व ५१ अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपींना त्याब्यात घेऊन कोर्ट विद्यमान प्रथम न्यायलय वरोरा येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हजर करण्यात आले. पुढील चौकशी व्हि. तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा डि. बी. चांभारे क्षे.स. जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्हि. वेदांती वनरक्षक महालगाव, करकाडे, केजकर, ब्रम्हनाथ वनरक्षक करीत आहे..


PostImage

Vaingangavarta19

Feb. 14, 2025

PostImage

पुलखल ग्रामसभेत ग्रामस्थांनी विमानतळास जमीन देण्यास केला विरोध 


पुलखल ग्रामसभेत ग्रामस्थांनी विमानतळास जमीन देण्यास केला विरोध 

 

 


गडचिरोली : शेती हेच गावातील नागरिकांचे उपजिविकेचे एकमेव साधन असून विमानतळामुळे गावातील तलाव, बोळी, नाले, गुरे चराईचे झुडपी जंगल आणि शेतीक्षेत्र नष्ट होणार असल्याने कोटगल उपसा जलसिंचनाचे लाभक्षेत्र असलेल्या सूपीक शेतजमिनी विमानतळाकरीता भूसंपादीत करण्यासाठी ग्रामसभेची शिफारस देणार नाही, असा ठराव पारीत करत पुलखल ग्रामसभेने गावाच्या हद्दीतील भूसंपादनास विरोध केला आहे.

अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पुलखल ग्रामसभेने बुधवारला ग्रामसभा घेवून सदरचा ठराव पारीत केला. या ठरावात ग्रामसभेने म्हटले आहे की, प्रस्तावित विमानतळ गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता मोलाचे योगदान देणारे ठरणार आहे.

मात्र सदर विमानतळा करिता प्रास्तावित ठिकाण हे आमच्या पुलखल गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील सुपीक जमिनीचे असून याच शेतजमिनींवर गावातील शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. पुलखल गावाच्या हद्दीतील तलाव, बोळी व झुडपी जंगलाची काही जमीन यात समाविष्ट असल्याने गावातील उर्वरित शेत जमिनीचे व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नष्ट होणार आहे.

गडचिरोली - चंद्रपूर या महामार्गाला जोडणारा पुलखल गावाचा मुख्य रस्ताही कायमचा बंद होणार आहे. गावाचे पारंपारिक देवस्थान एक बोटी माऊली व इतर श्रद्धास्थाने ही नष्ट होणार आहेत. तसेच मुरखळा गावाच्या हद्दीतून पुलखल - मुडझा गावाच्या सीमेवरून असलेल्या नाल्याला वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची दाब (बॅकवॉटर) मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या राहते. विमानतळामुळे सदर नाला (वगर) बुजविल्या जाणार असल्याने पुलखल - मुडझा रस्त्याला व शेतीला पुराचा मोठा फटका बसणार आहे.

त्यामुळे विमानतळाकरिता पुलखल गावाच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, तलाव, बोळी, झुडपी जंगल, नाला (वगर) व इतर जमीन भूसंपादित करणे हे पुलखल गावातील शेतकरी व इतर नागरिकांवर भविष्यातील उपासमारी आणणारे, शेत जमिनींचे क्षेत्र कमी करणारे, जमिनीच्या मालकी हक्क आणि गावाच्या सामूहिक मालमत्तांच्या मालकी हक्क हिरावणारे ठरणार असल्याचे म्हटले आहे.

पुलखल गावाच्या संबंधात अनुसूची क्षेत्रातील कायदे व नियमा अन्वये प्राप्त अधिकारानुसार विमानतळा करिता पुलखल गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गावाच्या सामूहिक साधन संपत्ती असलेल्या बोडी, तलाव, नाला व झुडपी जंगलाच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येऊ नये व त्या संबंधातील ग्रामसभेची शिफारस शासनाकडे करण्यात येऊ नये, तसेच जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामसभेकडे मागणी करण्यात आलेली भूसंपादनाची शिफारस आमच्या आजच्या ग्रामसभेने नाकारावी असा ठराव पारित करण्यात येत असल्याचेही ग्रामसभेने आपल्या ठरावात म्हटले आहे.

तथापि सदर विमानतळाकरिता कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनी, गावाच्या सामूहिक मालमत्ता असलेल्या बोडी, तलाव, नाले, झुडपी जंगल अशा जमिनींचे भूसंपादन करून अनुसूची क्षेत्रातील नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्या ऐवजी चामोर्शी रोड वरील सेमाना देवस्थान समोरील व गडचिरोली शहराला लागून असलेल्या जंगलाच्या जागेत सदर विमानतळ प्रस्तावित करण्यात यावा, अशी सूचना पुलखल ग्रामसभेने शासनाकडे केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 14, 2025

PostImage

मंथन मोहिते यांची महसूल सहाय्यकपदी निवड


मंथन मोहिते यांची महसूल सहाय्यकपदी निवड

डोंगरगाव :-मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावचे सुपुत्र मंथन अण्णासाहेब मोहिते यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यपदी निवड झाली आहे.त्यांनी अत्यंत जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करून आपली वर्णी लावली आहे.त्यांनी 1 ली ते 4 थी प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथ. शाळा कचरेवाडी, 5 वी ते 10 वी चे शिक्षण  इंग्लिश स्कूल मंगळवेढा, उच्च माध्यमिक शिक्षण दामाजी कॉलेज मंगळवेढा, सिव्हिल इंजिनिअर प्रशिक्षण नांदेड येथे पूर्ण केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल आ. समाधान आवताडे, युटोपियन शुगरचे सर्वेसर्वा उमेश परिचारक, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते,कचरेवाडीचे माजी सरपंच बाळदादा काळुंगे, दादा जाधव, डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे, दैनिक अचूक निदानचे संपादक डी. के. साखरे,  वैनगंगा वार्ता न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक अशोक खंडारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मस्के यांच्यासह मंगळवेढा पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 13, 2025

PostImage

नक्षलवाद विरोधी अभियान राबविताना गडचिरोली पोलीस दलातील पुन्हा एका जवानाचा मृत्यू 


नक्षलवाद विरोधी अभियान राबविताना गडचिरोली पोलीस दलातील पुन्हा एका जवानाचा मृत्यू 

गडचिरोली
                   भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील फुलणार च्या जंगलात पोलिस - नक्षल चकमकीत एक जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच. नक्षलविरोधी अभियान राबविताना पुन्हा एका जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे. भामरागड तालुक्यातील कोठी - हलवेर भागात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना C 60 पथकातील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना आज दिनांक 13 डिसेंबर गुरूवारी सकाळच्या सुमारास घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  
  रवी मधू मटके रा.गोकुळ नगर ताजी गडचिरोली असे असे त्या. मृत जवानाचे नाव आहे.


     नक्षलवाद विरोधी पथकातील दोन दिवसांच्या आड दोन जवानाना गमवावे लागल्याची वेळ गडचिरोली पोलिसावर आल्यामुळे शोकाकळा पसरली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2025

PostImage

नामदेवची आत्महत्या नसून खून केल्याची कबुली दिली आरोपींनी एक वर्षानंतर


नामदेवची आत्महत्या नसून खून केल्याची कबुली दिली आरोपींनी एक वर्षानंतर 


वणी : राजूर कॉलरी येथे एका विहिरीत सापडलेल्या इसमाच्या मृतदेहाचे रहस्य तब्बल एक वर्षानंतर उघड झाले. याप्रकरणी तिन संशयित आरोपीला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ती आत्महत्या नसून हत्याच केल्याचं नामदेव च्या मारेकऱ्यांनी कबुली दिली.

नामदेव शेनूरवार चा मृतदेह मागील वर्षी मार्च 2024 मध्ये रंगपंचमी च्या दिवशी रेल्वे सायंडींग परिसरातील एका पडक्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दिनांक 25/03/2024 रोजी पोलीस स्टेशन वणी येथे तक्रार नोंद केली होती. मात्र, हा खून अनैतिक संबंधातून आता झाल्याचे उघड झाले आहे. सिद्धार्थ मारुती शनुरवार (वय 34), दिवाकर शंकर गाडेकर (वय 28) व पिंटू उर्फ प्रवीण वामन मेश्राम (वय 39) तिन्ही रा. राजूर कॉलरी असे अटक आरोपीचे नाव आहे. या तिघांनी मिळून प्लॅन केला आणि मृतक नामदेव ला दारू पाजून गावाच्या निर्जनस्थळी नेवून तिथे लाथाबुक्क्यानी मारहाण केली, त्यानंतर त्याला विहिरीत फेकून दिले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार नामदेव शेनूरवार याच्या नात्यातच असलेल्या आरोपींनी कट रचून त्याला ठार केले. जवळपास एक वर्षानंतर नामदेवची हत्या करणारे तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे. नामदेव शेनूरवार याचा खून करून मृतदेह विहिरीत फेकणाऱ्या तीनही आरोपींवरपोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला गुन्ह्याचा साक्षीदार बनविल्याचे सांगण्यात येत आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात सपोनि निलेश अपसुंदे, अविनाश बनकर, अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी, रितेश भोयर यांनी केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2025

PostImage

सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषेचाच वापर करावा महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय


सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषेचाच वापर करावा महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य; राज्य सरकारचा मोठा निर्णय; मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई 


मुंबई-
 मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. मराठा भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

मराठी भाषेला अलिकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेचे महत्व टीकविण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचे संवधर्न करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावण्याचे बंधन करण्यात येणार आहे.

मराठी भाषा बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावावा लागणार आहे. शासकीय कार्यालयांतील संगणकावरील कळफलक देखील मराठी भाषेतच असणार आहे. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अनुसार  सर्व शासकीय कार्यालयांतील मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन मराठीतच असतील आणि  कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे आणि संकेतस्थळे मराठीत असतील याची काळजी घेण्याचे आदेश राज्य सरकारने पारित केले आहे.  मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2025

PostImage

भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकारी अविशांत पांडा


भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकारी अविशांत पांडा 

 

 

गडचिरोली दि. १२: सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.

आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन आढावा सभा पार पडली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता भ्रष्टाचाराला सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, काही अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे सांगून भ्रष्टाचाराला सहकार्य करतात, असे खोटे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भ्रष्टाचाराच्या घटनांवर स्वायत्तपणे कारवाई करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कठोर मोहिम राबवावी आणि भ्रष्टाचाराच्या घटनांवर आक्रमक कारवाई करावी 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याचे सांगताच प्राप्त तक्रारींवर वेळीच कारवाई करून दोषींना कायदेशीर शिक्षा द्यावी, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रभावी कारवाईसाठी सापळे रचून भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडावे आणि त्यांच्यावर कठोर पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ठोस पावले

या बैठकीत जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, प्रशासन भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. नागरिकांनी भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने प्रशासनाची भूमिका ठाम असून, कोणालाही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी पंडा यांनी या बैठकीत दिला.

बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड परिसरात पोलिस नक्षल चकमकीत एक जवान शहीद


गडचिरोली जिल्ह्यात भामरागड परिसरात पोलिस नक्षल चकमकीत एक जवान शहीद 

गडचिरोली:-
भामरागड तालुक्यात पोलिस नक्षल चकमक उडाली असुन यात एक पोलिस जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.

भामरागड तालुक्यातील जंगल परिसरातील दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे, काल दिनांक 10/02/2025 रोजी अपर पोलिस अधीक्षक प्रशासन आणि अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वाखाली १८ सी ६० चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटी चे 2 पथक रवाना करण्यात आले होते.

सदर ठिकाणी आज सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली असता दिवसभरात नक्षलवादी आणि पोलीस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून नक्षल साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत.

सदर कारवाईदरम्यान सी ६० पथकाच्या एका जवानाला गोळी लागून दुखापत झाली असून सदर जवानास तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्या जवानाचा मृत्यू झाला सदर अंमलदार महेश नागुलवार रा.अधखोडा ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे त्यांचे नाव असून  उघा दि.१२/०२ २५ ला शासकीय इतमामात अनखोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे महेश यांचे पच्शात आई, पत्नी व दोन मुली आहेत त्यांना विरमरण आल्याची माहिती मिळताच अनखोडा गाव शोकमग्न झाले आहे व त्यांच्या परिवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला ओढणीने गळा आवळून खून केला व गुन्हा लपविण्यासाठी तीला टाकले जाळून


 प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला ओढणीने गळा आवळून खून केला व गुन्हा लपविण्यासाठी तीला टाकले जाळून

 

अवघ्या काही तिसातच पोलीसांनी केली आरोपीस अटक

 

गोंदिया : प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला जाळून तिची हत्या केल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील मसगाव ग्रामपंचायत हद्दीतील देऊ तुला शिवारात दि. 10/02/2025 रोज सोमवार ला सकाळी 8:00 वा. दरम्यान उघडकीस आली.

पोर्णिमा विनोद नागवंशी वय, 18 वर्ष रा. मानेकसा (कालीमाती) पो. ठाना ता. आमगाव असे मृत्तक युवतीचे नाव आहे. सविस्तर असे की, गोरेगाव शहरापासून काही अंतरावर देऊटोला हे गाव असून शेतमालक दिसेल पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना पळसाच्या झाडाखाली युतीचा मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली.

ठाणेदार अजय भुसारी यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथे पाठविण्यात आला, विशेष म्हणजे, घटनास्थळाशेजारी दुसऱ्या बांधातील तणसाचा ढीग जाळण्यात आला. स्वानपथकाला पाचारण करण्यात आले असता, काहीही साध्य झाले नाही.

यातच पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडाने यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तपासाचे चक्र फिरवीत काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले.

खून अनैतिक संबंधातून आरोपी अटकेत : -पोलिसांनी तपास चक्र फिरवत काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून गरोदर झाल्यामुळे तिच्या ओढणीने गळा आवळून खून केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. शकील मुस्तफा सिद्दिकी वय, 38 रा. मामा चौक गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

मृत तरुणीची ओळख पटली असून ती आरोपीच्या वीट भट्टीवर काम करीत होती. दरम्यान आरोपीने तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती होती. तिने आरोपी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली असता, आरोपीला ते मान्य नव्हते. तेव्हा तिच्यापासून सुटका करण्याकरिता बबई देऊटोला शिवारात आणून ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलीस तपासात कबूल केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

 अल्पवयीन मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार,आरोपीची बालसुधारगृहात रवानगी


 अल्पवयीन मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार,आरोपीची बालसुधारगृहात रवानगी 

चंद्रपूर : जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्यांतर्गत पडोली-घुग्घुस मार्गावर असलेल्या चिंचाडा गावाजवळच्या एका वीटाभट्टीवर काम करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घृणित कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीचे आई-वडील चिंचाडा गावाजवळच्या एका वीटभट्टीमध्ये काम करतात. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आई-वडील त्यांच्या मुलीला झोपडीत झोपवून कामावर गेले होते, तेव्हा तिथे काम करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलीला एकटे पाहून तिच्यावर बलात्कार केला.

मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई-वडील तातडीने झोपडीत पोहोचले आणि अल्पवयीन मुलाला पकडले. मुलीच्या आई-वडिलांनी पडोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला पकडून बाल सुधारगृहात पाठवले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (अ) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

कब्बडी स्पर्धा पाहायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा गावाजवळील शेतशिवारात संशयास्पद मृत्यू


 कब्बडी स्पर्धा पाहायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा गावाजवळील शेतशिवारात संशयास्पद मृत्यू 

 

  मृत्यूचे कारण अस्पष्ट 

 

   आष्टी -
   आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जैरामपूर येथे 25 वर्षीय अविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिनांक 10 फेब्रुवारीला सोमवारी उघडकीस आली.

   सुभाष मारोती गेडाम वय 25 वर्ष रा. जैरामपुर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतक तरुणाचे नाव आहे.
  
  मृतक सुभाष मारोती गेडाम  कब्बडी पाहण्यासाठी बाहेर गावी जात आहे असे सांगून राहत्या घरातून रवीवारी  घराबाहेर पडला मात्र रात्री उशिरापर्यंत सुभाष घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली.10 फेब्रुवारी सोमवारी सकाळच्या सुमारास सुभाष याचा मृतदेह गावालगत असलेल्या शेताच्या पाळीवर आढळून आला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा करून त्याचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात  शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्प्रयात आला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे आष्टी  पोलीस या मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करीत असुन शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.मृतक सुभाष हा शेतीची कामे करायचा. या घटनेमुळे जैरामपूर परीसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. अधिक तपास आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करित आहेत 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

आपल्या शेतजमीनीत खुरपण करीत असताना विषारी सापाने केला दंश, उपचारासाठी नेत असताना वाटेतच महिलेचा मृत्यू


 आपल्या शेतजमीनीत खुरपण करीत असताना विषारी सापाने केला दंश, उपचारासाठी नेत असताना वाटेतच महिलेचा मृत्यू 

आष्टी -
   आपल्या शेतजमिनी मध्ये खुरपणाचे काम करीत असताना विषारी सापाने दंश केल्याने शेतकरी महीलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना अनखोडा येथे 8 फेब्रुवारी शनिवारी घडली.

   शेवंता सुरेश घ्यार वय 51 वर्ष रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे.

     सविस्तर वृत्त असे की,शेवंता घ्यार आपल्या शेतात काम करीत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला.नातलग शेजारी यांनी त्यांची प्रकृती बिघडताच त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच अनखोडा गावात शोककळा पसरली. मृतक शेवंता यांच्या पश्चात पती एक मुलगा व मुलगी असा आप्त परिवार असुन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

जिवापाड प्रेम करणारा मीत्र ह्याने केले मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार,त्याच्याच मित्रांनी व्हिडिओ काढून केले व्हायरल हे करणाऱ्या जोडप्यालाही केली अटक


जिवापाड प्रेम करणारा मीत्र ह्याने केले मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार,त्याच्याच मित्रांनी व्हिडिओ काढून केले व्हायरल
हे करणाऱ्या जोडप्यालाही केली अटक


भिवंडी:-
भिवंडीत २२ वर्षीय तरुणानं आपल्या १९ वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दुसऱ्या मित्रासह मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे 
 भिवंडी शहरातील कामतघर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रानं कट रचून अत्याचार केल्याची धक्कादायक घडली. अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार करणाऱ्या मित्रासह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मित्राला आणि मैत्रिणीला बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.

काय आहे घटना? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "२९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मित्र हा पीडित मुलीला फिरण्याच्या बहाण्यानं बाहेर घेऊन गेला. त्यानंतर एका लॉजमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे, अत्याचार करतानाचा अश्लील व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. या कटात त्याला साथ देणाऱ्या दुसऱ्या मित्राला आमि मैत्रिणीला बेड्या ठोकल्या आहेत."
आरोपीला १२ फ्रेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी : अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि या घटनेच्या एक महिन्यानंतर पीडितेनं भिवंडी शहर पोलिसांकडं तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी, त्याचा मित्र आणि मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता "या प्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. आरोपींना १२ फ्रेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे," अशी माहिती त्यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2025

PostImage

महीला पोलीस उपनिरीक्षक यांना  30 हजार रुपये लाच घेताना  पकडले रंगेहाथ


महीला पोलीस उपनिरीक्षक यांना  30 हजार रुपये लाच घेताना  पकडले रंगेहाथ 


नागपूर:- पोलीस दलात लाचखोरीच्या मोठ्या प्रमाणात उत आले आहे. येथे मागील 24 तासांत पोलिस अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या दोन घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. त्यात महीला पोलीस पण मागे नसल्याचे दिसून येत आहे.

चोरीच्या गुन्ह्यातील आरोप टाळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका महिला पोलिस अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. ज्योत्स्ना प्रभू गिरी असे या लाचखोर महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्या नागपूर जिल्हातील बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्त आहे.

लाचखोर आरोपी महिला पोलिस अधिकारी बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे आणि ती गुन्हे शोध पथकाची प्रमुख आहे. एक 26 वर्षीय तक्रारदार तरुण बुटीबोरी परिसरात राहतो. एमआयडीसी बोरी पोलिसांनी त्याच्या मित्राला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी ज्योत्स्ना गिरी यांच्यावर होती. पोलिसांना तक्रारदाराचा मोबाईल नंबर त्याच्या मित्राच्या मोबाईल फोनवर सापडला. म्हणून ज्योत्स्नाने तक्रारदाराला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते.

यावेळी पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला. त्याला चोरीच्या आरोपात अडकवण्याची धमकी देण्यात आली. त्याच्यावर खोटे आरोप दाखल करून त्याला तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू झाली. यामुळे तक्रार करणारा तरुण घाबरला. गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ज्योत्स्नाने तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोड झाल्यानंतर, तिने 30 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तर तरुणाने ज्योत्स्ना विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

तरूणाने दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्यानंतर, ज्योत्स्नाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. गुरुवारी संध्याकाळच्या सुमासर ज्योत्स्नाने तक्रारदार तरूना कडून तिच्या खोलीत 30 हजार रुपयांची लाच घेताच, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले. आता पुढील चौकशी असू असल्याची माहिती समोर आली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2025

PostImage

 वनपालाने  घेतली 83 हजारांची लाच. अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात


 वनपालाने  घेतली 83 हजारांची लाच. अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात

 

आलापल्ली:-

घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन कार्रवाई टाळण्यासाठी 83 हजारांची लाच घेताना आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कार्यरत वनपाल लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असुन मारोती गायकवाड असे त्या लाचखोर वनपालाचे नाव आहे. ही कारवाई 8 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.वन विकास महामंडळ प्रकल्प आलापल्लीतील आलापल्ली वनपरिक्षेत्रात समाविष्ट आपापल्ली उप क्षेत्रातील ताणबोडी बीटातून फिर्यादी घरकुल बांधकाम करण्यासाठी माती वाहतूक करत होता सहा फेब्रुवारी रोजी एफडीसीएमच्या आल्लापल्ली कार्यालयातील वनपाल मारुती गायकवाड आणि वनमजुरांनी सदर ट्रॅक्टर पकडून दुसऱ्या दिवशी तडजोडी साठी कार्यालयात बोलावले मारुती गायकवाड यांनी फिर्यादीला तब्बल एक लाख दहा हजाराची मागणी केली तडजोड अंती एक लाख देण्याचे ठरले 17000 दंड पकडुन त्यांनी 83 हजार परस्पर रक्कम स्वीकारले मात्र फिर्यादीला लाभ देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या पथकाकडे याची आधीच तक्रार केली होती एसीबीच्या पथकाने आठ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मारुती गायकवाड यांना लाच स्वीकारताना आ ल्लापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात रंगेहात पकडून ताब्यात घेतले

     ही कारवाई गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2025

PostImage

गडचिरोली - छतिसगढ सीमेवर पोलिस नक्षलवादी चकमक ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद


गडचिरोली - छतिसगढ सीमेवर पोलिस नक्षलवादी चकमक ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद 

 

विजापूर:-
 गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगढ राज्यामध्ये मध्ये रविवारी (दि.९) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात झालेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. तर दोन जवान शहीद झाले व दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

        छत्तीसगडमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या आधी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये  मोठी चकमक झाली. डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर सैनिकांनी चकमकीत ३१  नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. बिजापूर जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील राष्ट्रीय उद्यान परिसरात सकाळपासून ही चकमक सुरू आहे. बस्तर पोलिसांनी चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. सध्या इतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बस्तर पोलिसांनी सांगितले की, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. शोध मोहीम सुरू आहे.

या कारवाईत सुरक्षा दलांनी अनेक स्वयंचलित शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा देखील जप्त केला आहे. या चकमकीत अनेक वरिष्ठ नक्षलवादी कमांडरही सामील असल्याचे मानले जात आहे, ज्यांना घेरण्यात आले आहे.

    बिजापूरच्या या भागात पंचायत निवडणुकीपूर्वी सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. सुरक्षा दलांना आधीच संशय होता की नक्षलवादी मोठी घटना घडवण्याचा कट रचत आहेत, म्हणून कारवाई तीव्र करण्यात आली. या चकमकीनंतर पोलिस प्रशासनाने आजूबाजूच्या भागात गस्त वाढवली आहे आणि सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 8, 2025

PostImage

एका इसमाने बलात्कार करून महिलेचा गळा दाबून केला खुन


एका इसमाने बलात्कार करून महिलेचा गळा दाबून केला खुन

नागपूर:-

 एका इसमाने बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३३ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. सध्या महिलेच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्या पुरूषाने महिलेसोबत दारू प्यायली होती. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला.

हुडकेश्वर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. परंतु जीएमसीएचमधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपासणी केली आणि असे आढळून आले की महिलेच्या मानेवर गळा दाबण्याच्या खुणा होत्या आणि त्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता.

सदर  महिलेचे अनेक लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला काही वर्षांपूर्वी तिच्या पती आणि मुलीसह नागपूरला आली होती. नागपूरला आल्यानंतर त्यांचे अनेक लोकांशी संबंध निर्माण झाले होते. आतापर्यंतच्या तपासात किमान दोन नावे समोर आली आहेत. पतीव्यतिरिक्त, पोलिसांना इतर अनेक लोकांवरही संशय आहे.

आरोपी महिलेच्या घरी वारंवार येत असे तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की आरोपी अनेकदा महिलेच्या घरी येत असे. दोघेही तिथे एकत्र दारू प्यायचे. तो त्या महिलेला काही पैसे देऊन निघून जायचा. हत्येच्या दिवशी महिलेने आणखी पैशांची मागणी केली. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने रागाच्या भरात महिलेचा गळा दाबून खून केला.
अधिक तपास पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला दगडावर धडकली दुचाकी , दुचाकीस्वार जागीच ठार


दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला दगडावर धडकली दुचाकी , दुचाकीस्वार जागीच ठार 

 

 पुसदः शहरासह तालुक्यात अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे. दर एक दिवसाच्या अंतराने कुठे ना कुठे अपघात घटना घडत आहे. दोन दिवसा अगोदर काटखेडा व कासोळा येथे भीषण अपघात घडले या घटनेला ४८ तास उलटले असताना आज निंबी जवळील भवानी टेकडी जवळ एका अपघातात हिवाळी (त) येथील दुचाकीस्वाराचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव मनोज बळीराम आडे वय ३६ वर्ष रा. हिवळनी (त) ता. पुसद जि. यवतमाळ असे आहे.याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, आज दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:०० वाजण्सुयाच्या सुमारास हिवळणी येथील रहिवासी असलेले माजी सरपंच मनोज बळीराम आडे वय ३६वर्ष हा मुलांच्या शिक्षणासाठी पुसद येथे राहत होता. तो सकाळी पुसद वरून हिवाळी येथे आपल्या होंडा यूनिकॉर्न दुचाकी क्रमांक एम एच २९सिजी १७७०गावी जात असताना शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी जवळील भवानी माता मंदिर टेकडीच्या समोरच्या वळणाच्या रस्त्यावर या दुचाकीस्वराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली. व दुचाकीस्वार दगडावर जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिक प्रथम दर्शनीनी वसंत नगर पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नालमवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. असता या अपघातात मृत्युमखी पडलेल्या इसमाची ओळख पटवली व मृतदेह शासकीय उपजिल्हा पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्यामार्फत रस्त्याच्या सुरक्षा भिंत किंवा कठडे लावले असते, तर हा अपघात एवढा भीषण झाला नसता. हे सुद्धा तेवढेच सत्य. घटनेचा उर्वरित तपास वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

जन्मदातेनेच विष देऊन आपल्या मुलाची केली हत्या 


जन्मदातेनेच विष देऊन आपल्या मुलाची केली हत्या 

 

 गुजरात : गुजरातमधील अहमदाबादमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाला पाण्यात विष मिसळून पाजलं. या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर ४७ वर्षीय आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आरोपी पित्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

अहमदाबादमध्ये एका पित्याने १० वर्षांच्या मुलाला सोडियम नायट्रेट नावाचे विषारी द्रव्य पाजून त्याची हत्या केली. अहमदाबादच्या बापूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कल्पेश गोहेल याने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्याने तसे केले नाही.

मंगळवारी झालेल्या घटनेनंतर गोहेलला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कृत्य करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी उलट्या थांबवण्यासाठी मुलगा ओम आणि १५ वर्षांची जियाला औषध प्यायला दिले होते. यानंतर वडिलांनी सोडियम नायट्रेटयुक्त पाणी ओमला प्यायला दिले.

आरोपीने आपल्या मुलांना विष देऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु आपल्या मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून तो घाबरला आणि घरातून पळून गेला. पाणी प्यायल्यानंतर लगेचच मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यानंतर मुलाला मृत घोषित केले. कल्पेश गोहेल हा त्याची दोन मुले, पत्नी आणि आई-वडिलांसह राहत होता. कल्पेश गोहेलने आधी आपल्या दोन मुलांना औषध दिले आणि नंतर पत्नी बाहेर असताना त्याने आपल्या मुलाला विषयुक्त पाणी प्यायला लावले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

 मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश


 


 मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

गडचिरोली, दि. 6: महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, निवास, विशेषत: स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेसंबंधी सर्व आवश्यक उपाययोजना भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या यात्रेच्या पूर्वनियोजना आढावा जिल्हाधिकारी यांनी आज मार्कंडा येथील धर्मशाळेत घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप, तहसिलदार प्रशांत गोरूडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच सरपंच आणि मार्कंडा व चपराळा येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सोयी सुविधा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. यात्रेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, तसेच धर्मशाळांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वैद्यकीय सुविधांसाठी औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, भाविकांसाठी अधिकच्या बसेसची व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पथदिवे, मोबाइल शौचालयांची व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष सोय
महाशिवरात्री यात्रेला हजारो भाविक येतात, त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगांमध्ये स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच उन्हापासून बचावासाठी शेड आणि जागोजागी पाणपोई उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दर्शनाची वेळ वाढविण्याची मागणी
बैठकीत मार्कंडेश्वर मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनाची सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ वाढवून २४ तास सुरू ठेवावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. यावर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांसोबत चर्चा करून वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश

सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून यात्रेच्या तयारीत कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

अतीवेगात  तिहेरी दुचाकीस्वारने दिली उड्डाणपूलाच्या संरक्षक कठड्यास धडक ,एक जागीच ठार तर दोन गंभीर


अतीवेगात  तिहेरी दुचाकीस्वारने दिली उड्डाणपूलाच्या संरक्षक कठड्यास धडक ,एक जागीच ठार तर दोन गंभीर 

 

 


भद्रावती(दि.6 फेब्रुवारी) :- तिघेजन बसून भरधाव दुचाकी उडान पुलाच्या कठड्यास जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा घटनास्थळीत मृत्यू झाला. असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना दि.५ बुधवार ला रात्री ११ वाजता शहरातील हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. जखमी दोन्ही युवकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अमोल भिंगारदिवे वय २२, सुजल बहादे व लहू धोटे हे तीन युवक नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने शहरातील पंचशील नगरातून हायवे कडे भरधाव वेगाने जात असताना सदर दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला आदळली.या अपघातात अमोल भिंगारदिवे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुजल बहादे व लहू धोटे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले, मृतक ला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे, शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

अल्पवयीन मलीचे एका तरुणाने केले अपहरण मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या 


अल्पवयीन मलीचे एका तरुणाने केले अपहरण मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

 

 राहुरी:-

कोणीही आपल्या मुला, मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये- पो. नि. ठेंगे.काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलिस पथकाने या घटनेचा तपास करुन अपहरण करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. 

राहुरी तालुक्यातील मोकळा येथील विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ या आरोपी तरुणाने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटने संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीवर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.स दरील गुन्ह्यातील आरोपी विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ, वय २४ वर्षे, रा. मोकळ मोहोळ, ता. राहुरी, याला राहुरी पोलिस पथकाने दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांड घेण्याची तजवीज चालू आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.

अशा घटना टाळण्यासाठी राहुरी पोलिसांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की, कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे , गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखार सय्यद, सचिन ताजने आदि पोलिस पथकाने केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

घरात का घुसता म्हणून विचारले असता सासू व सुनेला दोघा इसमाने केली मारहाण, पोलीसांनी केला दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल


घरात का घुसता म्हणून विचारले असता सासू व सुनेला दोघा इसमाने केली मारहाण, पोलीसांनी केला दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल 

राहुरी:-
तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत, असे म्हणालेचा राग आल्याने आरोपींनी सासू व सुनेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली. अनिता विजय बोरकर, वय ३० वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी १०.४५ वा. चे सुमारास अनिता बोरकर व त्यांची सासु उषा अण्णासाहेब बोरकर अशा दोघीजणी त्यांच्या घरात स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी बोरकर यांच्या घरात घुसले व म्हणाले की, तुझा नवरा कोठे आहे, असे म्हणुन ते शिवीगाळ करु लागले. त्यावेळी अनिता बोरकर यांची सासु उषा त्यांना म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत. असे म्हणालेचा त्या दोघांना राग आला. त्यांनी दोघींना शिवीगाळ दमदाटी करत हाथाच्या चापटीने मारहाण केली.
 अनिता बोरकर यांच्या गळयातील मनीमंगळसुत्र ओढुन नुकसान केले. तसेच सासु उषा यांच्या गळयातील मणीमंगळसुत्र झटापटीत तुटुन गहाळ झाले आहे. त्यानंतर पुन्हा आमचे नादी लागलातर एका एकाला जिवे ठार मारुन टाकु, अशी आरोपींनी धमकी दिली. अनिता विजय बोरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब जनार्धन शेळके व राहुल जर्नाधन शेळके, दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. ७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३ (५), ३२४ (४), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर


आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर

 


प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची हमी आणि गाव तेथे रस्त्याचे नियोजन करा- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके 

 

गडचिरोली, दि. ६: आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४८२ कोटी ३६ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रारूप आराखड्याची मागणी शासनाकडे सादर केली आहे. हा आराखडा जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

निधीवाढीसह प्रस्ताव सादर
गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर्वी १९७ कोटी ९६ लाख रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील कार्यान्वयन यंत्रणेकडून २८४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आल्याने एकूण ४८२ कोटी ३६ लाखांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

गाव तेथे रस्ता – आदिवासी विकास मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील प्रत्येक गाव रस्त्याने जोडला जावा, यावर भर देण्याचे व ‘गाव तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रस्तावित करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बैठकीत दिले.

शिक्षणाला प्राधान्य – प्रत्येक विद्यार्थ्याला संधी

शाळा तसेच वसतीगृहांमध्ये प्रवेशाच्या सुविधा अधिक सुटसुटीत आणि सर्वसमावेशक करून आदिवासी समाजातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळण्यासाठी  पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास यावर भर देवून महत्त्वाकांक्षी योजना आखण्याची गरज असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. 


या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (एटापल्ली) तसेच विविध कार्यकारी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदिवासी वार्षिक उपयोजनेचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम


पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम  

सुंदरनगर:-
पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवनात पुढे जान्याचा मार्ग मीळतो असे मनोगत शाळेच्या क्रीडा व  सांस्कृतीक कार्यक्रम समारोपप्रसंगी  डॉ.लुबना हकीम  यांनी व्यक्त केले
 नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सुंदरनगर येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सत्र 2024-2025 मध्ये शिक्षण विभागातर्फे राबवलेले विविध उपक्रम तसेच विद्यालयातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव (ता. अहेरी) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, राणी दुर्गावती विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक लोनबले, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य पाल, प्रा. रॉय, स्वर्णकार , वांढरे , तसेच प्राचार्य निखुले उपस्थित होते.
डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवत शिक्षणासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा जीवनात महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की,"केवळ पुस्तकांचे ज्ञानच नव्हे, तर कला, नाट्य, संगीत आणि खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडते.       ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत, ते त्यांची मेहनत, समर्पण आणि जिद्द यामुळे मिळवत आहेत. परंतु प्रत्येक सहभाग देखील महत्त्वाचा असतो, कारण विजयापेक्षा मोठे असते, ते म्हणजे शिकण्याची वृत्ती आणि सातत्याने प्रगती करण्याची जिद्द."त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा दाखला देत विद्यार्थ्यांना "मेहनत करा, सातत्य ठेवा आणि यश निश्चितच मिळेल" असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनाचे उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

कोयत्याने केला वार,  तरुण गंभीर सिगारेट न दिल्याचा कारण


कोयत्याने केला वार,  तरुण गंभीर सिगारेट न दिल्याचा कारण

 

पुणे : सिगारेट न दिल्याने तरुणानेएका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी ४ फेब्रुवारी च्या रात्री साडेसात वाजता सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे घडली.रंगनाथ जगदेश गुत्तेदार (४०) रा. पिंपळे गुरव यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष धुळे जाधव (२८) रा. पिंपळे गुरव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंगनाथ हे सृष्टी चौकात सिगारेट ओढत थांबले होते.

त्यावेळी संशयित संतोष तिथे आला. त्याने रंगनाथ यांच्याकडे सिगारेट मागितली. सिगारेट देण्यास रंगनाथ यांनी नकार दिला. त्या कारणावरून संतोष याने कोयता काढून रंगनाथ यांच्यावर वार करत त्यांना जखमी केले.

लागलीच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली व आरोपीस अटक केली व तपास सुरू आहे 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

कोकणात लपून बसला तरीही मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पोलीसांनी लावला छळा 


कोकणात लपून बसला तरीही मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पोलीसांनी लावला छळा 


पातूर - 

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील पिडीतेच्या वडिलांनी काही दिवसा अगोदर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. की त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पडून नेले सदर बाबत पोलीस स्टेशनला अज्ञान आरोपी विरुद्ध अप क्र. 396/24 कलम 137 (2) भा न्या संहिता अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी पिडीतेच्या वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणारा इसम हा बलराज संतोष सरकटे वय 20 वर्ष रा. नवेगाव हा इसम असून त्याला त्यांचे वडील संतोष भीमराव सरकटे यांनी पळवून नेण्यास मदत केली आहे.

अशा फिर्यादी यांचे बयानावरून गुन्ह्यात कलम 96 भा.न्या संहिता वाढ करून पिडीतेस फूस लावून पळवून नेण्यास मदत करणारा आरोपींचा वडील संतोष सरकटे यांस ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास करण्यात आला.गुन्ह्याचे तपासा दरम्यान चान्नी पोलिसांनी गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पीडिता व आरोपी बलराज संतोष सरकटे रा. नवेगाव यांचा शोध घेतला असता पिडीता व आरोपी हे चिपळूण रत्नागिरी येथे असल्याचे समजल्याने चान्नी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्या परवानगी घेऊन तपास पथक नेमले व तपास पथकाने कोकणात जाऊन चिपळूण जि. रत्नागिरी येथून पिडीता व आरोपी बलराम संतोष सरकटे यांना रितसर ताब्यात घेऊन दि. 4 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन चान्नी येथे आणले पिडीतेचे पालकासंक्षम तिने बयान नोंदविण्यात आले असून पीडीतेच्या बयानावरून गुन्ह्यात कलम 64 (2) एम भा .न्या.स. सहकलम 3.4.5. (एल) 6.8.1.2. पोक्सो वाढ करण्यात आली असून आरोपी बलराम सरकटे यांस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी बाळापुर गजानन पडघन, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र लांडे, संजय कोहळे, पो. अंमलदार उमेश सांगळे, अनिल सोळंके, सुधाकर करवते , पो. अंमलदार राजनर्दिनी निधी पुंडगे, हर्षदा मोरे यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरिक्षक संजय कोहळे करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

 धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे  शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे : आम. सुधीर मुनगंटीवार


 धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे  शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे : आम. सुधीर मुनगंटीवार

6 फेब्रुवारीला संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार : पणन महासंघाच्या पवार यांचे आश्वासन


चंद्रपूर जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याबाबतची मागणी माजी मंत्री आम. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याकडे केली आहे. धान खरेदीचे सदर थकीत पैसे 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन हनुमंत पवार यांनी आम. मुनगंटीवार यांना दिले आहे.या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याशी देखील चर्चा केली. 

 चंद्रपूर जिल्हयातील एकुण १६,६६९ धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे रुपये ९३ कोटी ९० लाख रक्कम थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आम. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांची कैफियत मांडली. आम. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याशी त्वरित संपर्क साधला व चर्चा केली. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळे याविषयी संवेदनशील रित्या कार्यवाही करावी असे आ. मुनगंटीवार म्हणाले. हनुमंत पवार यांनी 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

उभ्या असलेल्या रेल्वेत झोपलेल्या महीलेवर नराधमाने संधी साधून केला बलात्कार


उभ्या असलेल्या रेल्वेत झोपलेल्या महीलेवर नराधमाने संधी साधून केला बलात्कार


मुंबई :-

 येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात एका मोकळ्या ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेवर हमाली काम करणाऱ्या एका नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. एका महिलेवर अशा प्रकारे रेल्वेत अत्याचार झाल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा प्लॅटफॉर्मवरील सुरक्षादल कुठे गेले होते? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

एक 55 वर्षीय महिला ट्रेननं हरिद्वार या ठिकाणाहून मुंबईत आपल्या एका नातेवाईकासोबत फिरायला आली होती. यावेळी ती रेल्वेत झोपली असताना हमालाने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधम हमालाला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 55 वर्ष पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासह मुंबई फिरायला आली होती. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दोघांनी वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला दोघंही प्लॅटफॉर्मवर झोपले होते. त्यानंतर पीडित महिलेचा नातेवाईक काही कामासाठी तिथून बाहेर गेला. तेव्हा प्लॅटफॉर्मवर एकटीच महिला झोपली होती.

त्यानंतर महिलेला जास्त झोप येत असल्याने तिने बाजुलाच उभ्या असलेल्या मोकळ्या ट्रेनमध्ये झोपायला गेली. तेव्हा ट्रेनमध्ये तिथे कुणीच नव्हतं. दरम्यान, टर्मिनसवरील आरोपी हमालाने महिलेला ट्रेनमध्ये घुसताना पाहिलं. महिलेला डोळा लागताच आरोपी हमालही ट्रेनमध्ये घुसला. तिला एकटीला पाहून आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

थोड्या वेळानंतर पीडित महिलेचा नातेवाईक घटनास्थळी आला, तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकाला सांगितला. यानंतर दोघांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला, महिलेसोबत घडलेली आपबिती सांगितली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे तपासून नराधम हमाल आरोपीची ओळख पटवली आणि त्याला तत्काळ अटक केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या गुन्ह्यात इतरही कुणाचा सहभाग आहे का? त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल पासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल पासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 


 मुंबई : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत २५ कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील डासांमध्ये कीटकनाशक प्रतिरोधकता निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मलेरियावर नियंत्रण मिळवणे ही अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आहे. गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यासह २०१७ मध्ये विविध निर्णय घेण्यात आले होते. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मलेरिया निर्मूलन टास्क फोर्स सुरू करण्यात आला होता. त्यानुसार, टास्क फोर्सने राष्ट्रीय आणि जागतिक तज्ञांच्या शिफारशींचा समावेश करून गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. गडचिरोलीत येत्या १ एप्रिल २०२५ पासून या आराखड्यातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्हा लवकरच मलेरियामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेट्स फाउंडेशन आणि सन फार्माचेही सहकार्य गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणाच्या या कामासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यामार्फतही महत्त्वपूर्ण मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सन फार्मा/एफडीईसी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. सन फार्मा कंपनीच्या FDEC ने मलेरिया निर्मूलनासाठी मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात काम केले आहे. मलेरिया दूर करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गांचे मॉडेल विकसित केले आहे. मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे, फील्ड प्रोग्रामचे निरीक्षण करणे, तांत्रिक पुनरावलोकन यासारख्या विविध गोष्टींमध्ये सन फार्मा कंपनीमार्फत मदत करण्यात येणार आहे. गेट्स फाउंडेशन आणि सन फार्मा यांच्या योगदानामुळे गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण मटत मिल शक्तेल असे मख्यमंत्री फटाणतीस यांनी सांगितले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

 चिमुकला भाचा व बहीण यांची भेट ठरली भावासाठी अखेरची, मालवाहू ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास


 चिमुकला भाचा व बहीण यांची भेट ठरली भावासाठी अखेरची, मालवाहू ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास 

 

 

मारेगाव :  बहीण वरोरा येथे वास्तव्यात असतांना तीला चिमुकल्या भाचा यांची भेट घेऊन भाऊ दुचाकीने मारेगावकडे निघाला.मात्र वाटेतच त्याचेवर क्रूर नियतीने डाव साधला. ट्रकने त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक देऊन चिरडून करून अंत झाला. एकुलता एक असलेल्या भावाच्या अकाली मृत्यूने मारेगावात शोककळा पसरली आहे.

गणेश हरिदास बदकी (27) रा. मारेगाव असे ट्रक धडकेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.

बहिणीची प्रसूती झाल्याने तीला बघण्यासाठी तो गेला होता.आज बुधवारला सकाळी वरोरा येथून दुचाकीने निघाला.वरोरा वणी मार्गांवरील संविधान चौकात मालवाहू ट्रकने गणेश बदकीच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत तो जागीच गतप्राण झाला. अपघात होताच ट्रक चालकाने वणी पोलिसात आत्मसमर्पण केले.

या घटनेने लाडक्या बहिणीची व तिच्या गोंडस बाळाची भेट भावासाठी अखेरची ठरली. गणेशच्या अचानक दुर्देवी घटनेने मारेगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा - खासदार डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी 


प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा - खासदार डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी 

गडचिरोली :: केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून, राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेत गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले.
यावेळी खासदार डॉ. किरसान यांनी, वाढत असलेली महागाई, सिमेंट, गिट्टी, रेती, लोहा सारख्या विविध वस्तूचे वाढते दर लक्ष्यात घेऊन, केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यात ग्रामीण भागात किमान 3 लक्ष रुपये पर्यत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली. या सोबतच केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून, अजूनही बऱ्याच गावात नळ पोहचले नाही ज्या गावात नळ पोहचले त्या ठिकाणी पाणी नाही आणि पाणी पोहचले त्या ठिकाणी अशुद्ध पाणी मिळत असून नारिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर योजनेच्या अमलबजावणीत सरकारने जातीने लक्ष घालून प्रत्येक नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल याकरिता प्रयत्न करण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी संसदेत केली. याचबरोबर गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र असून आदिवासी चे जल जंगल आणि जमिनीवरचे हक्क अबाधित राहण्याकरीता पेसा कायदा तयार करण्यात आले, मात्र प्रशासनाकडून यामध्ये ढवळा ढवळ केले जाते हे योग्य नसल्याचे खासदार डॉ. किरसान यांनी भावना व्यक्त केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

घरफोड्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


घरफोड्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

चंद्रपुर :-दिनांक ०३/०२/२०२५ रोजी पोउपनि विनोद भुरले व पोलीस स्टाफ अरो पोलीस स्टेशन, रामनगर ह‌द्दीत पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, तिन इसम हे घरफोडी केली असुन संशईतरित्या रयतवारी कॉलरी, चंद्रपुर येथे फिरत आहे अशा खबर वरून आरोपी नामे १) राकेश सुब्रहमण्यम सानिपती, वय-३४ वर्ष, धंदा-मजुरी, रा. तेलगु शाळेजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, २) विश्वजीत बिमल सिकदर, वय-३२ वर्ष, धंदा-मजुरी, रा. बंगाली कॉम्प, पाण्याचे टाकीजवळ, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, ३) दिपक राजु भोले, वय-२१ वर्ष, धंदा-मजुरी, रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी पोलीस स्टेशन, भद्रावती तसेच पोलीस स्टेशन, रामनगर येथे घरफोडी केल्याचे सांगितले.त्यावरून नमुद आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी घरफोड्या करून चोरी केलेले सोन्याचे दागीने हे सराफा सोनार नामे मनोज पवार, रा. सराफा लाईन, चंद्रपुर यास विक्री केले असे सांगितले वरून नमुद सराफा दुकानदार यांचेकडुन व इतर आरोपींकडुन सोन्याचे व चांदीचे दागीने असा एकुण ३,७१,३००/- रूपयाचा माल जप्त केला आहे. सदर आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापुर, चंद्रपुर शहर येथे चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपीताना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोहवा. सतिश अवयरे, नापोशि/संतोष येलपुलवार,, पोशि/गोपीनाथ नरोटे, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/गोपाल आतकुलवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

कुरुड येथे ६ फेब्रुवारी एका रात्री  नऊ नाटकांची मेजवानी


कुरुड येथे ६ फेब्रुवारी एका रात्री  नऊ नाटकांची मेजवानी 

नाट्यनिष्ठा व सांस्कृतिक अस्मिता जोपासणारे गाव 


गडचिरोली :पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही जनसामान्य रसिक प्रेक्षकांच्या आश्रयावर आधारलेली नाट्यप्रयोगाच्या लक्षणीय संख्येमुळे लोकप्रिय आहे. दिवाळी ते होळी दरम्यान चालणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीतील विविध सामाजिक, कौटुंबिक, समस्याप्रधान नाटकातून रंजन व प्रबोधन केले जाते. एकाच रात्री अनेक नाटकांचे प्रयोग हाउसफुल चालणारी  अनेक गावे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असण्याच्या मल्टिमीडियाच्या काळातही  झाडीपट्टीमध्ये प्रकर्षाने आहेत. कुरुड ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली येथे सहा फेब्रुवारीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  शंकरपट व मंडईचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने झुरे मोहल्यात प्रल्हाद नाट्य रंगभूमीचे दत्तप्रसाद एक नाट्य समाज झुरे मोहल्ला आयोजित प्रल्हाद मेश्राम लिखित संगीत ' पेटलेल्या चुली 'श्रीराम मंदिर देवस्थान कमेटी सुभाष वार्ड जय दुर्गा नाट्य मंडळाचे  , कसे तोडू मी मंगळसूत्र' हे नाटक श्री दत्त  प्रासादिक नाट्य समाज पारधी मोहल्ला येथे रंगतरंग नाट्य रंगभूमीचे ' अंधारलेल्या वाटा ',हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ पाटीलपुरा आयोजित  शिवचंद्र नाट्य कला रंगभूमीचे संगीत 'अंधारातील लाल दिवा ', हे नाटक नूतन शेतकरी नाट्य संपदा कांबळी मोहल्ला येथे युवा रंगमंचचे ' लाडका ' हे नाटक ,कस्तुरबा समाज मंदिर ढीवर मोहल्ला येथे स्थानिक मंडळाचे' सौदा सुहासिनीचा' हे नाटक ,पंचशील नाट्य कला मंडळचे गुरुदेव रंगभूमीचे 'आहुती  '९   हे नाटक अशा प्रकारे ग्रामपंचायत असलेल्या कुरुड या गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये एकाच रात्री नऊ नाटकाचे विविध मोहल्यात आयोजन करण्यात आलेले आहे. झाडीपट्टीतील समृद्धता दर्शविणारे एकाच रात्री विविध मोहल्यात एकापेक्षा अनेक म्हणजेच नऊ नाटकाचे आयोजन  करणारे देशातील हे एकमेव गाव असावे. झाडीपट्टीतील नाट्य रसिकता व  नाटक विषयक सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविणारे हे उत्तम उदाहरण आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

चितळ शिकार करणाऱ्या एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी तर एक आरोपी फरार


चितळ शिकार करणाऱ्या एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी तर एक आरोपी फरार

मार्कंडा (कंसोबा) वनपरिक्षेत्रातील घटना

आष्टी:-

उपवनसंरक्षक आलापल्ली राहुलसिंग तोलिया व मा. सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली आझाद यांच्या मार्गदर्शनात वनविभाग आलापल्ली, वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा (कंसोबा) अंतर्गत गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजनगर गावाजवळील जंगलात विद्युत प्रवाह सोडून चितळ वन्यप्राण्याची शिकार प्रकरणी एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, एक फरार आहे. रामरतन बकिम मंडल रा विजयनगर तालुका मुलचेरा असे   आरोपीचे नाव असून, तन्मय बुधदेव बाडाई रा विजयनगर तालुका मुलचेरा फरार आरोपीचे नाव आहे. सदर घटना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. 
मार्कंडा (कंसोबा) वनपरिक्षेत्राकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी रामरतन मंडल व सोबती तन्मय बुधदेव हे दोघे चितळ वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजयनगर जवळील जंगलात १ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास विद्युत प्रवाह सोडला होता. २ फेब्रुवारी रोजी चीतळाची शिकार केल्याची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यानी आरोपी रामरतन मंडल यांचे घर गाठले असता चीतळाचे मास शिजवताना आढळून आले. रात्री ७.३० ते ८ च्या दरम्यान क्षेत्र सहाय्यक आर एल बानोत यांनी गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेतले तर सोबती तन्मय बाडाई हा फरार झाला. आरोपी रामरतन मंडल यास ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६) ९३९४४ (ब) ४९ ( ब ) व ५१ अन्वये ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी पर्यंत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी इनवते यांच्या  मार्गदर्शनात गुंडापल्ली उपक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आर. एल. बानोत करीत आहेत. मार्कंडा कंसोबा परिक्षेत्रात गस्त घालण्यासाठी वनरक्षक जी एम आखाडे, वनरक्षक एस जी राठोड, किशोर आलम, निरंजन मंडल, क्षेत्र सहाय्यक विवेकानंद चांदेकर, अक्षय राऊत, धानोरकर सहकार्य करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

एका चिमुकल्याची चिता जळाली, अन दुसऱ्या भावाच्या मरणाची बातमी कळाली ! त्यांच्या वेदनांचा अतिरेक झाला. अन् अख्खा गाव झाला शोकमग्न


एका चिमुकल्याची चिता जळाली, अन दुसऱ्या भावाच्या मरणाची बातमी कळाली ! त्यांच्या वेदनांचा अतिरेक झाला. अन् अख्खा गाव झाला शोकमग्न 

 


गोंडपिपरी :- महाराष्ट्र तेलंगाना येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धाबा येथील कोंडय्या महाराज देवस्थान येथे यात्रा भरते. माञ हीच यात्रा घडोली येथील चौधरी कुटुंबीयांसाठी कर्दनकाळ ठरली. दुचाकी वर बसून यात्रा पाहायला गेलेल्या दुचाकीचा अपघात झाला.

अन् त्यात दोन चिमुकल्याचा दुर्दैवी अंत तर आई वडिलांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सदर घटना दि.३१ जानेवारी दुपारी ३:३० वाजता घडली. कोण गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील रहिवासी सुधीर चौधरी आपल्या कुटुंबासह धाबा येथे सुरू असलेल्या कोंडय्या महाराज संस्थान धाबा येथे जत्रा पाहण्यासाठी जात असताना सोमणपल्ली गाव पार करताच रस्त्यात त्यांचा अपघात झाला.

अपघातात संपूर्ण कुटुंबीयाला जबर मार लागला. त्यात सुधीर चौधरी (वय ३४ वर्ष) त्यांची पत्नी शिवानी (वय ३० वर्ष) आणि मुलगा धीरज (४ वर्ष ) आणि लहान मुलगा विरज (वय २ वर्ष) गंभीर जखमी झालीत. लगेच त्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथं उपचार करणे शक्य नव्हते म्हणून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा १ फरवरीला लहान मुलाने दम सोडला. तर दुसऱ्या मुलाला सावंगी येथे भरती करण्यात आल्यानंतर लहान मुलावर घडोली येते अंत्यसंस्कार पार पडतातच लगेच सावंगी रुग्णालयात हलविण्यात आलेल्या मोठ्या मुलाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्याच्यावरही २ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार पार पडले. दोन्हीही मुलांचे प्राण गेले असल्याची माहिती आई वडिलांना नसून त्यांची ही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून ते अजूनही पूर्णता शुद्धीवर आलेले नाही. एवढा भयानक प्रसंग चौधरी कुटुंबावर आला. एवढा भयानक प्रसंग होता ज्यात संपूर्ण कुटुंबाचा जीव टांगणीवर लागला. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार


गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार...


गडचिरोली, ०४ फेब्रुवारी, २०२५::-

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, या जिल्ह्याबाबत वेगळ्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

यासोबतच यंत्रणेने रोजगाराला चालना देणाऱ्या व शाश्वत विकास साध्य करणाऱ्या योजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 चा प्रारुप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यादूरदृष्यप्रणालीद्वारे आज घेण्यात आले.या बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल तसेच गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, आ. डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 अंतर्गतगाभा क्षेत्रासाठी 212 कोटी, बिगर गाभा क्षेत्रासाठी 106 कोटी, आकांक्षित जिल्ह्यासाठी 25 टक्के अतिरिक्त निधील रुपये 83.69 कोटी आणि नाविन्यपूर्ण व इतर योजनांसाठी मिळून एकूण 418.45 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला आहे.तथापि, कार्यान्वयन यंत्रणेकडून 823 कोटी रुपयांची निधी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीत 404.56 कोटींची वाढीव मागणीसादर करण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गडचिरोली हा विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टावर भर देत विविध योजनांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रादेशिक विकास आराखड्याखेरीज मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर, पर्यटन आणि रोजगार निर्मितीस चालना देणाऱ्या योजनांवर भर, तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन लोकसहभागातून विकास आराखडा राबवावा, असेही ते म्हणाले. 2024-25 मध्ये मंजूर झालेला निधी अद्याप का खर्चझाला नाही, काय अडचण आहे,याबाबत विचारणा करून त्यांनी सदर निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारणी, शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली बसविणे आणि योजनेंतर्गत खरेदी साहित्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे यासारख्या सूचनाही त्यांनी केल्या.

भौगोलिक आव्हाने आणि विकास निधीची गरज - सहपालकमंत्री जयस्वाल.राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्ह्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र तसेच या जिल्ह्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल लक्षात घेता रस्ते, आरोग्य, शिक्षण व पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्याची मागणी केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि ग्रामीण दुर्गम भागातील रस्त्यांची अत्यंत खराब परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष निधी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कोणत्या विभागाला किती निधीची मागणी आहे आणि त्यातून कोणती विकासकामे केली जाणार आहेत याची सविस्तर माहिती सादर केली.

बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ सचिव आणि जिल्हा कार्यकारी यंत्रणांचेअधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

सेवा निवृत्तीचा सन्मान करणे शिक्षण  संस्थेचे कर्तव्य - शाहीन ताई हकीम 


सेवा निवृत्तीचा सन्मान करणे शिक्षण  संस्थेचे कर्तव्य - शाहीन ताई हकीम 

 

अहेरी:-

आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. सी. व्ही. रमण सायन्स कॉलेज आणि भगतराव कला महाविद्यालय, सिरोंचा मध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण व्यक्ती – प्राध्यापक  ए. व्ही. कांताराव आणि वरिष्ठ लिपिक  एफ. एम. शेख यांच्या सेवानिवृत्तीचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. बबलू भैया हकीम यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मनोगतात प्रकट केले की, सेवानिवृत्तीचा प्रत्येक क्षण साधारणत: एक नवीन अध्याय सुरू करतो. शिक्षक व कर्मचारी यांच्या समर्पणाची आणि त्यांच्याद्वारे केलेल्या योगदानाची नेहमीच कदर करायला हवी. त्यांच्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात शिक्षणाचा प्रभाव यावर देखील त्यांनी भाष्य केले
शाहीन ताई हकीम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. त्या वेळी, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक संदेश दिला की, शिक्षक व कर्मचारी आपल्या जीवनातील आदर्श असतात आणि त्यांचा आदर्श जीवनभर पाठलाग करणे आवश्यक आहे असे भाष्य केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उरकुडे सर यांनी केले. त्यात, त्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या कामगिरीचा उल्लेख केला
यावेळी त्यांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितली की, "शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांच्या जीवनात केवळ शाळेतील शिक्षण पुरवणे नाही, तर त्यांचा मानसिक, सामाजिक आणि आचारधर्मात्मक विकास होण्यासाठी मार्गदर्शन करणे हेसुद्धा आहे
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक जक्कु सर यांनी केले. त्यामध्ये, त्यांनी सर्व उपस्थितांचा, विशेषतः बबलू भैया हकीम, शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांचे आभार मानले व उपस्थितांचे आभार मानले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 3, 2025

PostImage

आष्टी परिसरात जळाऊ बिट उपलब्ध करून द्या,माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांची मागणी


आष्टी परिसरात जळाऊ बिट उपलब्ध करून द्या,माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांची मागणी 

आष्टी,

 चामोर्शी  तालुक्यातील आष्टी शहरासह परिसरातील मार्कंडा कंन्सोबा,ईल्लूर,कुनघाडा,ठाकरी,रामनगट्टा,अनखोडा,चंदनखेडी खर्डी इत्यादी गावे चपराळा व वन्यजीव अभयारण्य जंगलाला लागून असल्याने या वन्यजीव अभयारण्यातील जंगलात जाण्यास बंदी आहे. गॅसचे दर परवडत नसल्याने आंघोळीसाठी पाणी गरम करणे, स्वयंपाक इत्यादी दैनंदिन जीवनात वापर करावा लागतो त्याकरिता दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व गॅसवर करणे गरीबांना परवडत नसल्याने आष्टी परिसरातील अभयारण्य जंगलाला लागून असलेल्या गावांना वनविभागाने जळाऊ राशन कार्डावर बिट उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. हिंदू धर्म रिवाजनुसार मयत ही जाळण्यात येते तसेच आष्टी शहर हे जंगलशेजारीच आहे कोणी मयत झाल्यास त्या कुटूंबियांना धावफळ करावी लागत असून मयत साठी इकडून तिकडून लाकडे आणावी लागत असून आर्थिक भुर्दंड गोरगरीब सामान्य जनतेला पडत आहे. करीता आष्टी शहराजवळील मार्कंडा (कंन्सोबा) येथे वनविभाग (प्रादेशिक) कार्यालय, वनविकास महामंडळ कार्यालय, चपराळा वन्यजीव अभयारण्याचे वनपाल कार्यालय असे तीन वनविभागाचे कार्यालय आहेत. परंतू एकाही ठिकाणी जळाऊ लाकूड उपलब्ध नाही करीता गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या समस्यांसंदर्भात लक्ष देऊन आष्टी परिसरातील अभयारण्य जंगलाला लागून असलेल्या गावांना जळाऊ बिट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करुन जळाऊ बिट उपलब्ध करून देण्यात यावे अशीही मागणी भास्कर फरकडे यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र विरोधी, फक्त बिहार निवडणूक समोर ठेवला 


केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र विरोधी, फक्त बिहार निवडणूक समोर ठेवला 

नागपूर:-

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचे आज स्पष्ट दिसले. हे बजेट भारताचे नसून येत्या काळात निवडणूक असणाऱ्या बिहार राज्याचे आहे.

आजच्या अर्थसंकलपात बिहार राज्यासाठी विविध घोषणांचा वर्षाव करण्यात आला. तिथून सरकारला टेकू मिळत असल्याने आणि येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने बिहारला झुकते माप मिळाले. पण यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्र हे राज्य केंद्र सरकारला सगळ्यात जास्त कर देत असताना महाराष्ट्रावर वारंवार अन्याय करण्यात येत आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. पण यातून शेतकरी, तरुण ,महिला, सामान्य नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यासाठी शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पण असा कोणताही दिलासा आज मिळाला नाही. शेतकऱ्यांना लागणारी खते, बी बियाणे, पीकविमा याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट आहे. 
तसेच आज देशात रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असताना रोजगारासाठी, तरुणांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने मांडले नाही.

महाराष्ट्रात मेट्रो , रेल्वे साठी निधी दिला असे सत्ताधारी सांगत असतील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस तरतूद या अर्थसंकलपात करण्यात आलेली नाही. मध्यमवर्गीय टॅक्स मुळे त्रासले होते, केंद्र सरकारची लोकप्रियता घसरत चालली आहे त्यासाठी टॅक्स मध्ये सूट देण्यात आली. त्यामुळे हे बनवा बनवी बजेट असल्याची भावना आज जनतेत आहे. 

मेक इन इंडियाची नुसती घोषणा झाली पण त्यातून हाती काही लागले नाही त्यामुळे नॅशनल मॅन्यूफॅक्चरींग हे नवीन मिशन आणले आहे,म्हणजे नवीन बाटलीत जुनेच औषध पुन्हा देण्यात येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
 
आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटिल हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दि. २८ ते ३० जानेवारी २०२५ रोजी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार तर कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, मा. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी  यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून लेझीम पथक व परेडद्वारे पाहुण्यांना पाचारण केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते महात्म्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्याध्यापक श्री. कृष्णामूर्ती गादे यांनी विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थी नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होतात. दरवर्षी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के असून मागील वर्षी दहावीतून शिवम पोलोजीवार हा विद्यार्थी आष्टी केंद्रातून प्रथम आला. तसेच गोळाफेक या स्पर्धेत इयत्ता आठवीतील तन्मय फुलझेले हा विद्यार्थी शारीरिक शिक्षक नितेश पुंगाटी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच जिल्हास्तरावर विविध खेळात विद्यालयातील विद्यार्थी प्राविण्य पटकाविले. असे बोलून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सहकार्य केल्याबद्दल सर्व पालकवर्गाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रथमत: लेझीम व परेड द्वारे केलेल्या पाहुण्यांच्या स्वागताविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात अभ्यासाबरोबर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे. 
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल आल्लूरवार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, विद्यालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना मिळणाऱ्या पारितोषिकच्या रुपाने आवडत्या क्षेत्राची निवड त्याविषयी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची वाढ व्हावी, आणि त्यांच्या असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा, स्टेज डेअरिंग निर्माण होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगता यावे तसेच शालेय जीवनात आवश्यक मूलभूत बाबी च्या माध्यमातून व विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात आपले स्थान निश्चित करता यावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार, आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. दिलीप बारसागडे केंद्र प्रमुख आष्टी,  मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, संस्थेच्या सहसचिव सौ. दिपा आल्लूरवार, सदस्या सौ. भवानी निलम, सौ. सरिता गादे, तसेच शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र पाल, सदस्या सौ. सपना पांडे, सदस्य श्री. जितेंद्र निमसरकार, म.ज्यो. फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरडे, श्री. कपिल मसराम, शारी. शिक्षक सावित्रीबाई फुले विद्यालय आष्टी, कु. श्वेता कोवे राष्ट्रीय धनुर्विद्या खेडाळू, श्री. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी, श्री. प्रमथ मंडल मुख्याध्यापक शिशु मंदिर पब्लिक स्कूल आष्टी, डॉ. ओ. पी. सिंग प्राध्यापक महिला महाविद्यालय आष्टी, डॉ. पी. के. सिंग सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी, श्री. शरद कोदेट्टीवार, श्री. अनिल बोमकंटीवार, श्री. गणेश सिंगाडे पत्रकार आष्टी, तसेच पालकवर्ग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

आता भोग आपल्या कर्माची फळे,महिला पोलीस शिपाई यांचे केले पोलीस निरीक्षक यांनी विनयभंग 


 

आता भोग आपल्या कर्माची फळे,महिला पोलीस शिपाई यांचे केले पोलीस निरीक्षक यांनी विनयभंग

 

 

यवतमाळ:- दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये एक घटना समोर आली असून, एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची छेड काढणाऱ्या ठाणेदाराच्या रायटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा पोलिस स्टेशन येथे कार्यरत एका महिला कॉन्स्टेबलची पोलिस स्टेशन मधिलच ठाणेदाराच्या रायटर ने छेड काढल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी सुरेश काशिराम राठोड हा त्याच ठाण्यात कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पीडित महिलेला वारंवार त्रास देत होता. त्याने अश्लील शेरेबाजी, विनयभंगासारखी कृत्ये केली आणि पीडितेच्या इच्छेविरुद्ध वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित महिलेने प्रथम सहकाऱ्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. मात्र, आरोपीने आपल्या वर्तनात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे अखेर तिने थेट कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून आरोपी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कलम ३५४ (महिलेला विनयभंग करण्याचा प्रयत्न), ५०९ (महिलेला अपमानित करणारे कृत्य किंवा शब्द), अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली असून, आरोपीला तडकाफडकी निलंबित करण्याची शक्यता आहे. तसेच, विभागीय चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या घटनेमुळे पोलिस दलात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतच अशा घटना घडत असतील तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आधी सुद्धा या पोलिस कर्मचार्यावर याच दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल असुन या आधी सुद्धा पोलिस स्टेशनमधील अनेक महिला कर्मचार्यांना मानसिक त्रास देत असुन बदनामी व दबाव पोटी कोणी तक्रार केली नसल्याचे कळते. तालुक्यासह शहरातील अवैध धंद्याच्या वसुलीतही हा पोलिस कर्मचारी माहिर आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

पंचायत समिती माजी सभापती  यांची केली नक्षलवाद्यांनी हत्या 


पंचायत समिती माजी सभापती  यांची केली नक्षलवाद्यांनी हत्या 

 

 

भामरागड;- तालुक्यात नक्षल्यानी पंचायत समिती माजी सभापती याची हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे, सदर पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या कियेर या गावात झाली असून हत्या केल्या नंतर नक्षल्यानी पत्रके देखील टाकले आहे. त्या पत्रकात नक्षल्यानी उल्लेख केला आहे

(सदर हे लिखाण नक्षली पत्रकाचे असून यात काही बदल केले गेले नाही)

जन दोही और पार्टी द्रोही सुखराम मडाडी (माजी सभापत्ती) जिला गड़चिरोली, तहासील भामरागढ़, केयेर, गांव निवासी को पीएलजीए मौत को सजा दिया !

जन द्रोही सुखराम मडावी भामरागढ़, डोडाराज, और गड़चिरोली जिला, पोलिस प्रसशान के सांठ घांठ होकर लाखों पैसों का लालच में फसकर मुखबीर काम कर रहा था!

नेलगुंड़ा, कउंड़े, पेनगुंड़ा, आलदंडी, पोयोरकोटी, मीडंगुरवेचा, ऐसे कैयों गांव के हमारा जन संगठन कार्यकर्ताओं को पकड़वना जेल ठूंसने का कारण सुखराम मडावी का हाथ हैं!

और सुखराम मड़ावी ग्राम सभा पेसा कानून का विरोध में पेनगुंड़ा गांव में नया पोलिस कैंप बैंठने का और अलग-अगल खदान कोलने के लिए जनता का लाखों करोड़ सम्पत्ती को घरानों कारपोरेट कंपनीयों को सोंपवना, इस कारण से जन द्रोही सुखराम मड़ावी को पीएलजीए ने मौत का सजा दिया गया!और कुछ लोग भी सुखराम से मिल कर दुश्मन से सांठ घांठ होकर लाखों पैसा के लालच में फसकर जन द्रोही मुखबीर काम कर रहा है। और पोलिस कैंप, खदान कोलने में भी हाथ हैं। ऐसे गलत काम नही चोंड़ने से उनको भी सुखराम जैसा सजा दिया जाएगा

माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या १

फेब्रुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नक्षल्यानी गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राउंड जवळ बेदम मारहाण करून केली. कियेर हे गाव कोठी मदतकेंद्राअंतर्गत येते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण – काम बंद आंदोलनाची तयारी


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण – काम बंद आंदोलनाची तयारी


“मे. स्मार्ट सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” कंपनीला ठेका मिळाल्यापासून कामगारांच्या पगार आणि पीएफमध्ये ( PF ) गडबड कायम….


चंद्रपूर  :- चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी कामगारांना “मे. स्मार्ट सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत आहे. कंपनीला ठेका मिळाल्यापासून कामगारांच्या पगार आणि पीएफमध्ये गडबड सुरू असून, जुन्या स्थायी कामगारांना कमी करण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
कंपनीने सुरुवातीला काही सुपरवायझर पाठवले होते, ज्यांनी जुन्या कामगारांना कमी करण्यासाठी तडजोड केली आणि नवीन कामगारांची भरती करण्यासाठी 50,000 ते 1 लाख रुपयांची मागणी केली होती. या धोरणामुळे जुन्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. शिक्षणाच्या अपुऱ्या अटी, डॉक्युमेंट्सची अपूर्णता, वयाची अट अशा कारणांसह त्यांना काढून टाकले जात होते. काही कामगारांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला, त्यानंतर थोडा दबाव आल्यानंतर जुन्या कामगारांना त्यांच्या स्थानावर ठेवण्यात आले, मात्र कंपनीने मोठ्या प्रमाणावर नवीन कामगारांची भरती केली, ज्यामुळे कंपनीचे नफा वाढले.

परंतु आता, कंपनी कंत्राटी कामगारांना पगार देण्यास सक्षम नाही. अनेक कामगारांना मागील तीन ते चार महिन्यांपासून पगार नाही मिळाल्याचे समोर आले आहे. मागील महिन्यात काही कामगारांना केवळ 7,000 ते 15,000 रुपयांच्या भेदभावात्मक पगाराची रक्कम मिळाली, यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

तसेच, पीएफमध्ये देखील गंभीर भेदभाव दिसून येत आहे. काही कामगारांचे पीएफ 400 रुपयांपर्यंत आहे, तर काहींचे 4000 रुपयांपर्यंत जमा झाले आहेत, ज्यामुळे कामगारांचा हक्क व मेहनतीचे योग्य मोबदला मिळवण्याचे अधिकार संकटात आले आहेत.

या सर्व समस्यांवर शासकीय अधिकारी गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रपूरातील कंत्राटी कामगारांची समस्या आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. सरकार आणि संबंधित अधिकारी यावर त्वरित कारवाई करतील का? यावरच कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.

कामगारांचा संघर्ष आता एक पाऊल पुढे जाऊन काम बंद आंदोलनच्या रूपात उभा आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होण्याच्या तयारीत आहे. सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लवकर कारवाई न केली, तर कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरावे लागेल.

चंद्रपूरमधील कंत्राटी कामगारांचा संघर्ष आता आणखी गंभीर होतोय. काम बंद आंदोलनाच्या इशाऱ्यावर सरकारने योग्य कारवाई केली नाही, तर परिस्थिती आणखी ताणली जाऊ शक


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे कडक कारवाईचे आदेश


अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे कडक कारवाईचे आदेश

 


अवैध वाहतूक आढळल्यास तात्काळ कारवाई आणि वाहन जप्तीचे आदेश

संयुक्त पथकाचे गठण

अनुपस्थित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

दररोज अहवाल सादर करणे बंधनकारक.

गडचिरोली दि. 31: जिल्ह्यातील अवैध गौण खनिज

उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थायी चेकपोस्ट आणि कडक उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश एका आदेशान्वये आज यंत्रणेला दिले आहेत.

यानुसार जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागांमध्ये स्थायी चेकपोस्ट (FRB कॅबीन) स्थापन करून ते त्वरित कार्यान्वित करण्याचे आणि या चेकपोस्टवर मंडळ अधिकारी यांना नियंत्रण अधिकारी आणि नायब तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून8:51 PM | 2.8KB/s

234

जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

चेकपोस्टवर दररोज 24 तास (24×7) कर्मचारी आणि पोलिस तैनात करण्याचे आदेश असून, महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र आदेश काढावेत व प्रत्येक वाहनाची ईटीपी तपासणी करून त्याची वैधता निश्चित करण्यासही निर्देश दिले आहेत.

गौण खनिज वाहतूक तपासणी आणि कारवाई*

अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांनी प्रत्येक वाहनाची ईटिपी (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) तपासून ती वैध आहे का, याची खात्री करावी. नियमबाह्य उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास, वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत.

या मोहिमेअंतर्गत महसूल, पोलिस आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करून अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल त्यासबधाचा माहिता जिल्हाधिकारा कायालयात गुगल शिटवर अद्ययावत करायचे आहेत.

चेकपोस्टवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी नियमावली*

सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कोणीही विनापरवानगी अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

तसेच, वाहन चालक किंवा मालकाकडून गैरवर्तन आढळल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 221 अंतर्गत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईसाठी जप्त केलेली वाहने संबंधित तहसील कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात पुढील आदेशापर्यंत ताब्यात ठेवण्याचे निर्देश आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संयुक्त पथकाने आपसी सहकार्याने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक पूर्णतः रोखण्यासाठी प्रयत्नकरण्याचे आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भात कठोर कारवाई करून अवैध उत्खननाला आळा घालावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन

 

अहेरी:-

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनाच्या वतीने देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अशा गटप्रवर्तक यांच्या विषयी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात याव्या अशा मागणीची निवेदन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनातून आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा तसेच सामाजिक सुरक्षा लागू करावी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

विधवा महिलेचा असाहयतेचा फायदा घेत ग्रामपंचायत ऑपरेटरने केला विनयभंग


 विधवा महिलेचा असाहयतेचा फायदा घेत ग्रामपंचायत ऑपरेटरने केला विनयभंग

मुल : चार महिन्यापूर्वी पतीचे निधन झाल्याने दोन मुलींसह राहत असलेल्या विधवा महिलेचा खुशाल पाल (३१) याने घरात घुसून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. २२) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार आहे.

मूल पोलिस ठाणे अंतर्गत बेंबाळ दूरक्षेत्राच्या हद्दीतील फुटाणा येथील महिलेच्या पतीचे सप्टेंबर-२०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे आपल्या मुलींसहमिळेल ती रोजी करून ती कुटुंबाचा गाडा हाकत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मृत्यू दाखला व शासकीय योजनेच्या लाभासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी ग्रामपंचायतचा ऑपरेटर असलेला आरोपी खुशाल पाल याच्याकडे गेली. तेव्हा आरोपींनी महिलेचा मोबाइल नंबर घेऊन दाखले पाठवून देतो असे सांगितले.

बुधवारी रात्री महिला आपल्या घरी असताना आरोपी घरात घुसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर तिने पोलिसात तक्रार दिली.

घटनेची तक्रार मूल पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी कलम ७४, ७५(२), ३३२ (क), ३५१ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

घराला कुलूप लावल्याचे पाहुण चोरट्यांनी केली १.७७ लाख रुपयांची रोकड लंपास 


घराला कुलूप लावल्याचे पाहुण चोरट्यांनी केली १.७७ लाख रुपयांची रोकड लंपास 

भद्रावती:-
सरस्वती नगर येथील एका घराला कुलूप लावल्याचे पाहुण अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची २९ जानेवारी रोजी घरमालक घरी पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे 

माहितीनुसार, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे एजंट संतोष देविदास उंबरकर (५७) हे पत्नी चंदा, मुलगा रोशन आणि सून वैदेही यांच्यासह राहतात. २८ जानेवारी रोजी त्यांच्या सुनेला प्रसूतीसाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतोष उंबरकर यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्या सोबत होते. सायंकाळी संतोष शहरातील पतसंस्थेसाठी पैसे गोळा करत असताना ६.३० वाजता त्यांची पत्नी चंदा हिने फोन करून आपला नातू अशक्त असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला बालरोगतज्ञांकडे दाखल करावे लागेल. हे ऐकून त्यांनी वसुलीची रक्कम घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटात ठेवली. त्यांनी पत्नीला चंद्रपूर येथील रुग्णालयात पोहोचवून अर्भकाला (नातू) बालरोगतज्ञांकडे दाखल केले आणि चंद्रपुरात त्यांच्या सोबत रात्रभर मुक्काम केला. २९ जानेवारी रोजी ते भद्रावती येथील घरी परतले असता त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यावर कपाटात कपडे इकडे तिकडे विखुरलेले दिसले असता कलेक्शनमधील पैसे गायब असल्याचे दिसले. त्यावरून तो चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ भद्रावती पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली. या आधारे भद्रावती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

शिक्षिकेच्या अपघातास कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा


शिक्षिकेच्या अपघातास कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनी पोलीस प्रशासनाद्वारे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली येथे उपस्थित राहण्याची नोटीस बजाविल्याने गोंधळलेल्या पोलिस जवानासोबत दाबंरंचा कडून गडचिरोलीला जात  असताना झालेल्या अपघातात दामरंचा जि. प. शाळेतील शिक्षिका पौर्णिमा कुकुकडर गंभीर जखमी झाल्या. अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित बेजबबादार अधिकाऱ्याविरोधात कडक कारवाई करून गंभीर जखमी शिक्षिकेच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च पोलीस प्रशासनाने करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संविधान फॉउंडेशन, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदनातून दिला आहे.
अहेरी तालुक्यातील दामरंचा जि. प. शाळेतील मुख्याध्यापक नियमित शाळेत येत नसल्याने सहाय्यक शिक्षिका पौर्णिमा कुकुडकर यांच्याकडे मुख्याध्यापकाचा प्रभार देण्यात आला होता. दरम्यान संजय चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी कविता संजय चांदेकर यांनी शिक्षण विभागाकडे त्यांना मिळणाऱ्या देय रक्कमेत तत्कालीन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य व लिपिक मृणाल मेश्राम यांनी अफरातफर केल्याचा आरोप करीत त्यांचविरुद्ध कारवाई करावी असे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. यावर काहीच कारवाई न झाल्याने चांदेकर यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे प्रांगणात दोन मुलांसह आत्मदहन करण्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासन व पोलीस विभागाला दिले होते. या पत्राचा संदर्भ देत प्रभारी अधिकारी उपपोलिस ठाणे दामरंचा यांनी शिक्षिका पौर्णिमा कुकुडकर यांना प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद गडचिरोली येथे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजाविली. सदर नोटीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापूर्वी मिळाल्याने शिक्षिका कुकूडकर गोंधळून गेल्या. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक असताना पोलीस प्रशासन दामरंचा यांनी एका पोलिसासह रात्रोच्या सुमारास दुचाकीने गडचिरोलीला पाठविले. दरम्यान चामोर्शीपासून काही अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे दुचाकी चालक पोलिस सांगत असले तरीही दुसऱ्या दुचाकीने मागे जबरदस्त धडक दिली असेल तर धडक देनाऱ्या दुचाकीस्वार याला कहीच मार लागला नाही असे होऊ शकते काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलिस जवानासह शिक्षका पौर्णिमा कुकुडकर हे दुचाकीवरून कोसळून यांचा अपघात झाला. त्यामुळे या प्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संविधान फॉउंडेशन गडचिरोली, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन, भारतीय बौद्ध महासभा आदी पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून दिला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचेशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

अवैध रेती तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा केला प्रयत्न, तलाठी बालबाल बचावले 


अवैध रेती तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा केला प्रयत्न, तलाठी बालबाल बचावले 

 


भद्रावती:-
 सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाने सर्व विभागांना 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच अधिका-यांनासुध्दा फिल्ड व्हीजीट करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

याबाबत अधिकारी वर्ग प्रत्येक गावाना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. तर एकीकडे भद्रावती तालुक्यातील शेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तलाठी गीते यांनी तक्रार दिली आहे.महसूल उत्पन्न वाढीत क्रमांक एक वर असलेल्या जिल्ह्यात सध्या वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू आहे, प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आर्थिक हित जोपासत हा व्यवसाय सध्या चांगला सुरू आहे.

 30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास कारेगाव येथे तलाठी अनंत गीते व सहायक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे रेतीने भरलेला ट्रॅक्टर अडवीत परवाण्याबाबत विचारपूस केली, परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर हा भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टर चालकाला तलाठ्यांच्या अंगावर वाहन चालविण्यास सांगितले. 

चालकाने वाहन तलाठ्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला, तलाठी गीते वाहनसमोरून न हटल्याने त्या 2 व्यक्तींनी तलाठी गीते सोबत धक्काबुक्की करीत त्यांना बाजूला सारले. त्यांनतर ट्रॅक्टर चालकाने वाहनसहित तिथून पळ काढला.या सर्व प्रकाराची माहिती गीते यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिली, ट्रॅक्टर चालक व त्या दोन इस्माविरुद्ध गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या घटनेचा पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजूरकर यांनी निषेध करीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तीव्र करणार-सरपंच रेखाताई पिसे


पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तीव्र करणार-सरपंच रेखाताई पिसे

 

नेरी (दि. ३० जानेवारी):- चिमुर तालुक्यातील नेरी येथील पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहीमची प्रभावीपणे अंमलबजावणी करत राबविण्यात आली असुन अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तिव्र करण्यात येणार आहे.गावाचा विकास करण्यासाठी ग्राम कमेटी मागे हटणार नाही, एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायतने अनेक विकासाची कामे केली आहेत. ७० हजार वर्षांपूर्वीपासून येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात नेरी ग्रामपंचायतला यश मिळविले आहे तसेच घोडाझरी धरनातुन गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. ही योजना ग्रामपंचायतने आणली आहे, जल जिवन मिशन अंतर्गत युद्ध स्तरावर काम सुरू आहे. असे अनेक विकासात्मक कामे नेरी ग्रामपंचायत ने हाती घेतले आहेसरपंच रेखा पिसे पुढे म्हणाल्या, गावातील अनेकांनी दुकानदारांनी त्यांना निर्धारित केलेल्या जागे व्यतीरिक्त सिमा निर्धारित केलेल्या असुन मर्यादित जागेवर धंदा करावा, पुढे पुढे सरकु नये व रस्ते वाहतुकीस मोकडे असावेत वाहतुकीस अडथळे निर्माण होईल असे क्रुत्य करु नये. अन्यथा अतिक्रमण हटविताना कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत कमेटीने दिला आहे. शासनाच्या अधिनस्त राहुन शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटाविण्यात येत असुन गावाचा विकास व्हावा, विकासाच्या शासकीय योजना राबविण्याचा नेरी ग्रामपंचायत प्रयत्न करत असतांनाच या अतिक्रमणाचा सामना करावा लागतो. अनेक शासनाच्या योजना राबवताना अतिक्रमण केलेले आड येत असते, विकास कामाला खिड बसते, परिणामी गावकऱ्यांनाही ग्राम विकासाचा फटका बसतो. शासनाच्या वतीने महाराष्ट्र भर अतिक्रमण हटाव मोहिम तिव्र करण्यात आली आहे.अतिक्रमण निर्मूलन करतांना गावकऱ्यांच्या तोंडुन ग्रामपंचायतची स्तुती करताना दिसुन येत आहे. अतिक्रमण हटविताना ज्यांना स्वतःच्या मालकीची घरे आहेत, त्यांनी घरी जावे ग्रामपंचायतच्या शासकीय कामात अडथळे आनु नये. अतिक्रमण हटाव मोहिमेत राजकीय रंग देवु नये, "आपला गाव-आपला विकास, "आपली माती आपली नाती" असे समजून गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नेरी ग्रामपंचायत सरपंच रेखाताई पिसे यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

अवघ्या २४ तासात उभारले नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन


 अवघ्या २४ तासात उभारले नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन

 

 

गडचिरोली:-
1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे 
विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान)  संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र  अंकित गोयल, पोलीस अधीक्षक. नीलोत्पल, 113 बटा. सिआरपीएफचे कमांडण्ट  जसवीर सिंग, 09 बटा. चे कमांडण्ट  शंभु कुमार, 37 बटा. चे कमांडण्ट  दाओ इंजीरकान कींडो व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले

 
मागील वर्षी 14 जून रोजी नेलगुंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली होती.

नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल पोलीस अधीक्षक  नीलोत्पल
माओवाददृष्ट अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 30/01/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन 2024 या वर्षाअखेर दिनांक 11/12/2024 रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. भामरागड पासून 20 किमी., धोडराज पासुन 14 किमी., पोमकें पेनगुंडा पासुन 04 कि.मी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 600 मीटर अंतरावर असलेल्या अति-दुर्गम नेलगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन नेलगुंडा मैलाचा दगड ठरेल.

सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 19 ट्रेलर, 04 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 19 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 04 अधिकारी व 49 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 10, सोलापूरचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 113 बटा. डी कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 69 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 06 पथक (150 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.

सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान)  संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र  अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस बल, गडचिरोली  अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक. नीलोत्पल, कमांडण्ट 113 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  जसवीर सिंग, कमांडण्ट 09 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  शंभु कुमार, कमांडण्ट 37 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड  अमर मोहिते व पोलीस स्टेशन नेलगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. अमोल सोळुंके, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

सुट्या पैशांवरून एसटी बसच्या वाहकाला केली मारहाण


सुट्या पैशांवरून एसटी बसच्या वाहकाला केली मारहाण


अमरावती : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सुटे पैसेबाबत झालेल्या वादातून बसच्या वाहकाला मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर घडली. एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवाशी व वाहक यांच्यात झालेल्या सुट्या पैशांवरून दररोज बाचाबाची होत असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर कामगिरी बजावणाऱ्या वाहकाला मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

भाडेवाढ झाल्यानंतर पाच दिवसात अनेक ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या घटना सोशल मीडियावर फिरत असून यातून पुढे काही अनर्थ घडू नये यासाठी खबरदारी म्हणून भाडेवाढ सूत्रात तात्काळ बदल होण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने या पूर्वीच पाठवला असताना त्याला प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली व आर्थिक नुकसान होण्याचे कारण देत अनपेक्षितपणे बदल करून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला असून सध्या चलनात सुट्या पैशाचे व्यवहार जवळ जवळ बंद झाले आहेत.ए.टी. एम. मधून सुद्धा शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा निधत असल्याने कोणताही प्रवाशी सुटे पैसे मागितल्यावर देत नाही. तरीही भाडेवाढ करतांना प्राधिकरणाकडून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली गेली व एसटीला तोटा होण्याची भीती दाखऊन अनपेक्षितपणे प्राधिकरणाकडून हा निर्णय लादला गेला असल्याची टीकाही बरगे यांनी केली आहे. या घटनेनंतर एसटी प्रशासन या घटना टाळण्यासाठी काय उपाय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एसटी प्रशासनाने पुन्हा पत्र द्यावे
भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहे. १६ जून २०१८ रोजी व २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी जी भाडेवाढ करण्यात आली आहे. ती पाचच्या पटीत करण्यात आली असून त्याच सूत्रानुसार भाडेवाढ पाचच्या पटीत करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना सांगायला हवे.सुट्या पैशाची अडचण येत असल्याचे पुरावे देऊन त्याच प्रमाणे वाहकांकडून आलेल्या तक्रारी व पोलिसात दाखल झालेले गुन्हे याचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा प्रस्ताव एसटीकडून पाठवला जावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा


गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

 

गडचिरोली : जिल्ह्यातील लोह उद्योगात वाढ होत असल्याने येत्या काळात लोह उत्पादनावर आधारित पूरक उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक लोह आधारित पूरक उद्योग निर्मितीसाठी उद्योग मित्रांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार समन्वय समिती, जिल्हा आजारी उद्योग पुनर्वसन समिती आणि जिल्हा स्थानिक लोकांना रोजगार सनियंत्रण समितीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.

जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कंपन्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी, तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाने युवकांना अधिकाधिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सभेत उद्योजकांच्या अडचणी, औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांसह जिल्हा उद्योग केंद्र,  जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, खादी ग्रामोद्योग, नगररचना, विज महावितरण कंपनी, एम.आय.डी.सी., कामगार विभाग, खनिकर्म विभाग इत्यादी विभागांचे प्रतिनिधी आणि गडचिरोली जिल्हयातील उद्योग संघटना आणि इतर उद्योजक हजर होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश


मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

 

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 

 

गडचिरोली, दि.३० – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा. कुलकर्णी यांनी केले.
गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक ३०६ मध्ये दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्या. कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी. रघुवंशी, सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले. प्रा. डॉ. नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध, श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला. मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे. शेंडे यांनी परिश्रम घेतले. सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला पक्ष प्रवेश


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला पक्ष प्रवेश

 

 माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

गड़चिरोली:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात शरदचंद्र पवार पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार, 27 जानेवारीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालय गड़चिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश करतांना अमोल कुळमेथे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कार्यप्रणाली आणि गडचिरोली जिल्ह्यात आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अनेक विकासकार्य केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांच्यामध्ये समाजातील मागास घटकांपर्यत पोहचून विकास घडवून आणण्याची क्षमता असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू, असे मत अमोल कुळमेथे यांनी व्यक्त केले. पक्ष प्रवेश करतांना माझी नगरसेवक खूमेश कुळमेथे, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रसाद पवार, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमाताई येवले, महिला शहराध्यक्ष प्रीती कोवे, युवक शहराध्यक्ष अजय कुकडकर, जेष्ठ नेत्या उमा बन्सोड, चामोर्शी निरीक्षक आरती कोल्हे, महिला शहर उपाध्यक्ष नईमा हुसैन, महिला शहर सरचिटणीस मीना मावळनकर, आशा मुळेवार,  सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम कुळमेथे, सेवानिवृत्त वनपाल बळवंत येवले, माजी जिल्हा परिषद कर्मचारी प्रदीप वडेट्टीवार, खुशाल तरोने, संजय भोयर, साहित्यिक व आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुसराम, अजय कोवे, धनु गेडाम, रुपेश गेडाम, रुपेश सलामे, रेणू कुळमेथे, अंजू कुळमेथे, किरण मंगरे, कविता चिचघरे, तेजस लाकडे, सुरेश चिकराम, स्वप्निल येडलावार, रोशनी पुडो, विक्की केळझरकर, मयूर सूर्यवंशी, डिंपल सहारे, आबिद शेख, मोना बोरकर, सोनू कुळमेथे, सोनाली राईंचवार, अस्मिता खोब्रागडे, महेश निमगडे आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश महासचिव युनूस शेख, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक


 महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक


रग्गड पैसा कमवता येतो असे दाखवित होता आमीश

 

मुंबई : पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला भांडुप पोलिसांनी अटक केली. आरोपीला अटक करतानाच पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.भांडुपमधील सह्याद्री नगर परिसरात राहणारा शिरीशकुमार शेंडगे वय, 42 वर्ष काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने आरोपीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी तो वास्तव्यास असलेल्या भांडुपमधील सह्याद्री नगरमध्ये मंगळवारी छापा घातला.

पोलिसांनी तेथून आरोपीसह दोन महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आणि दोन्ही महिलांची सुटका केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा - जिल्हाधिकारी


गडचिरोली जिल्ह्यात विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा - जिल्हाधिकारी 


गडचिरोली दि.३०: विविध योजनेंतर्गत निधी खर्च करतांना त्याद्वारे जिल्ह्यात शाश्वत विकासाची कोणती कामे पूर्ण होणार आहेत, याची माहिती देणे यंत्रणांना बंधनकारक आहे. विकास निधीची मागणी करतांना जिल्हा कोणत्या निर्देशांकात जिल्हा मागे आहे, याचे विश्लेषण करून सुधारित विकास निधी मागणी प्रस्ताव तसेच अतिरिक्त मागणी प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे तसेच निधीच्या प्रभावी वापरावर भर देण्याच्या सूचना गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत  पंडा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आकांक्षित जिल्हा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त मागणी व कार्यक्रम अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल नियोजन भवन येथे घेतला. बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एस. रमेश, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पूनम पाटे, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, श्रीमती मानसी, कुशल जैन, नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी ७७ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असताना त्यांचा गैरवापर प्रवासी वाहतुकीसाठी होत असल्याचे जिल्हाधिकारी यांचे निदर्शनात आणून देताच त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले तसेच जिल्हा परिषदेने यासाठी तपासणी पथक नेमण्याच्या सूचनाही दिल्या. यातील ५५ जुन्या बसेस बदलून नव्या बसेस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुका स्पेसिफीक योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. यातून रोजगार निर्मितीसाठी मानव विकासाशी संलग्न कामे पूर्ण करण्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध विकास कामांसाठी निधी खर्च करण्यात येतो मात्र त्यातून अपेक्षित उद्देश साध्य होतोय का, लाभार्थ्यांच्या गरजा ओळखून साहित्य खरेदी केली जाते का, खरेदी केलेले साहित्य संबंधीतांपर्यंत पोहचले का याची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

2025-26 च्या वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त निधी मागणी करणाऱ्या यंत्रणांनी त्या मागणीचे ठोस कारणे स्पष्ट करावी. तसेच जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षांच्या विकास आराखड्यानुसार आणि पुढील एक वर्षात आवश्यक बाबींची प्राथमिकता निश्चित करून नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीला कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंधारण, वन, महसूल, पशुसंवर्धन यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

 तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन तर ठाणेदाराची तडकाफडकी बदली


 तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन तर ठाणेदाराची तडकाफडकी बदली 


 वर्धा:- पोलीस दलातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्वी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची तडकाफडकी मुख्यालय ठिकाणी बदली करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

आर्वी येथील अजय कदम यांच्या मालकीच्या जागेवर इतरांनी जबरदस्तीने ताबा घेतल्या त्यामुळे अजय कदम यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याबाबत पोलिसांना विनंती केली होती. पण या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर ठाणेदार यांना तडकाफडकी मुख्यालय ठिकाणी बदली केली आहे.

पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेवून येणाऱ्याची तक्रार घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असून त्यानंतर तपास करुन गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. पण, स्टेशन डायरीवरील कर्मचारी गजानन मरस्कोल्हे व अंमलदार सतिश नंदागवळी यांनी पोलीस निर8क्षक यांच्या आदेशाशिवाय तक्रार घेतली जाणार नाही, असे अजय कदम सांगितले. त्यानंतर बराच वेळ त्यांना पोलीस स्टेशन मध्येच बसवून ठेवले होते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली होती.

पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याने हे प्रकरण थेट पोलिस महानिरीक्षक यांच्या पर्यंत गेले. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ, वर्धा जिल्हाचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वर्धा डॉ. सागर कावडे आर्वीत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची पोलीस मुख्यालयी बदली करण्यात आली. तर मरस्कोल्हे व नंदागवळी या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने, जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी


अमृतसर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

 


शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने, जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी 

 


समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी

 


नगर - प्रजासत्ताक दिनी पंजाब मधील अमृतसर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन सदरील समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. वारंवार बाबासाहेबांचा पुतळा व संविधानाच्या विटंबनेवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी अमृतसर मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शिडीच्या सहाय्याने चढून एका समाजकंटकाने हातोड्याचे साहाय्याने सदर पुतळा फोडण्याचे कृत्य केले. सदर आरोपीला पोलिसांनी पकडले असून, त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे कायदा करुन देशातील महापुरुषांचा अवमान व विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतुद केल्यास अशा प्रवृत्तींना लगाम लागणार आहे.  देशात सातत्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाची विटंबना होत आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हेतू हा राजकीय भाग असल्याचे आंबेडकरी समाजाला जाणवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी परभणीत सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा मोठी दंगल झाली. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेला, अद्यापि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वारंवार बाबासाहेबांच्या पुतळ्याची व संविधानाच्या विटंबनेच्या मागील मास्टरमाइंड शोधण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अमृतसर येथे घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. बाबासाहेब एका जाती धर्माचे नसून, सर्व धर्मीयांचे व समाजाचे आहे. संविधान देशातील सर्व समाजासाठी आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना होत असताना कोणताच राजकीय पुढारी पुढे येऊन निषेध नोंदवत नाही, तर ज्या समाजाला त्यांच्यामुळे आरक्षण मिळाले ते समाज देखील गप्प आहेत. इतर देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले जातात, मात्र आपल्या देशातील त्यांचे पुतळे असुरक्षित आहेत. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर देखील जातीयता संपलेली नसल्याची भावना आंबेडकरी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी सदर घटनेच्या चौकशीसाठी कमिटी नेमून अमृतसर व परभणी येथील घटनेच्या मागे कोण मास्टर मार्इंड आहे? याचा तपास करावा, महापुरुषांच्या पुतळ्याचे विटंबन करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.......................


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

30 जानेवारी रोजी खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांचे चिमूरमध्ये स्वागत - आझाद संघरामगिरीत संबोधित करणार


30 जानेवारी रोजी खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांचे चिमूरमध्ये स्वागत - आझाद संघरामगिरीत संबोधित करणार


 चंद्रपूर - चिमूर तहसीलच्या संघरामगिरी येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेअंतर्गत आयोजित महापरित्राण पथात आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद उपस्थित राहणार आहेत. बौद्ध धम्माच्या अनुयायांसाठी दरवर्षी 30 आणि 31 जानेवारी रोजी संघराम गिरी (रामदेगी) येथे धम्म संमेलन आयोजित केले जाते. यामध्ये हजारो भाविक सहभागी होऊन धम्मदेसनाचा लाभ घेतात. या काळात महापरित्राण पथाचेही आयोजन केले जाते. या परिषदेला संबोधित करण्यासाठी आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद यांची नियुक्ती करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आझाद समाज पक्षाने अमित भीमटे यांच्या रूपाने आपला उमेदवार उभा केला होता. त्यांना मतदानात चौथा क्रमांक मिळाला. आझाद चिमूर मतदारांचे कृतज्ञता व धम्मदेसना स्वीकारून तथागत बुद्धांना नमन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी चिमूर शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. चिमूर शहरातील हजारे पेट्रोल पंप चौकात आयोजित स्वागत कार्यक्रमात पक्षाचे कार्यकर्ते व आंबेडकरी मिशनरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आझाद समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित भीमटे यांनी दिली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मनीष साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर


गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

 

 

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

वासुदेव शेडमाके जिल्हाप्रमुख , रामकृष्ण मडावी जिल्हा समन्वयक, विजय पवार सहसंपर्कप्रमुख , राजू अंबानी जिल्हा संघटक, अरविंद कात्रटवार उपजिल्हाप्रमुख , घनशाम कोलते (तालुकाप्रमुख - गडचिरोली ), कुणाल कोवे (तालुकाप्रमुख - गडचिरोली ग्रामीण), अब्दुल शेख (शहरप्रमुख - गडचिरोली शहर), कृष्णा वाघाडे (उपशहरप्रमुख - गडचिरोली शहर), ज्ञानेश्वर वाघमारे (तालुका संघटक-गडचिरोली तालुका), गजानन नैताम (तालुका समन्वयक - गडचिरोली तालुका), मनोज पोरटे (तालुकाप्रमुख - चामोर्शी शहर), दीपक दुधबावरे (तालुकाप्रमुख - चामोर्शी ग्रामीण), बंडू नैताम (शहरप्रमुख- चामोर्शी शहर), अंकिम साबनवार (तालुका संघटक- चामोर्शी तालुका), सुभाष करणे (तालुका समन्वयक- चामोर्शी तालुका), दिलीप सुरपाम (उपजिल्हाप्रमुख - अहेरी विधानसभा), प्रफुल्ल येरने (तालुकाप्रमुख- अहेरी विधानसभा), टिल्लू मुखर्जी (तालुकाप्रमुख मुलचेरा तालुका), अक्षय पुंगाटी (तालुकाप्रमुख-इटापल्ली तालुका), राजेंद्र लानजेकर (सल्लागार-गडचिरोली जिल्हा). आदि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजन ची बैठक ऑनलाईन का? काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सवाल


पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजन ची बैठक ऑनलाईन का? काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सवाल

 

 

गडचिरोली :: कधी नव्हे तर जिल्ह्याच्या इतिहासात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवून नवा इतिहास रचला, मात्र या सोबतच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांच्या भुवया उंचावल्या, जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतील येथील नागरिकांशी संवाद साधतील अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना मदत म्हूणन जिल्ह्याला सह पालकमंत्री सुद्धा देण्यात आले, मात्र विधानसभा निवडणूकी नंत्तर गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक 31 जानेवारी रोजी, सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातुन पार पडणार असून, जिल्ह्याला ऐक नव्हे तर दोन - दोन पालकमंत्री असताना देखील नियोजन समितीची बैठक ऑनलाईन का असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमटी चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे.  इतकेच नाही तर बैठक ऑनलाईन असतांना देखील मुख्यमंत्री फडणवीस हे बैठीकस राहु शकत नाही हे देखील मोठी शोकांतिका असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले का?  कीं फक्त आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा करून, देण्यासाठी पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवले असाही प्रश्न महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील असंख्य नागरिक विविध समस्यांना घेऊन मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे, अनेक शेतकऱ्याचे धानाचे चुकारे अजून मिळाले नाही, घरकुल धारकांच्या अनेक समस्या आहेत, जिल्ह्यातील रानटी जनावरांचे बंदोबस्त संदर्भातील समस्या आहेत, जिल्ह्यातील रस्ते, दवाखाने सारख्या विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी झालेली असताना देखील निधी उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे अनेक कंत्राट दारावर उपास मारीची वेळ आलेली आहे असे अनेक समस्या असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यासाठी वेळ देत नसतील तर जिल्ह्यातील नागरिकांना पाकमंत्री हटाओ गडचिरोली जिल्हा बचाओ अशी मोहीम राबविण्याची वेळ येईल का असेही मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली बस तिकीट दरवाढीचा निषेध व चक्का जाम


शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली बस तिकीट दरवाढीचा निषेध व चक्का जाम

 

गडचिरोली:-

  आज दिनांक 29/01/2025 ला शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली विजय  श्रुंगारपवार सह संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्ह्या यांच्या उपस्थितीत स्थानिक बस स्थानक गडचिरोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. नुकताच राज्य शासनाने बस तिकिट दरवाढीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लाडकी बहिण योजना अंमलात आणल्या पासून राज्यात जिवनावशक वस्तूंची कमालीची दरवाढ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सपाटाच लावला असुन याचाच एक भाग बस तिकीट दर वाढ निर्णय घेतला असून या निर्णया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी नंदुभाऊ कुमरे, सुनील पोरेड्डिवार, राजेंद्र लांजेकर, किरण शेडमाके, पवन गेडाम, संदिप वाघरे, गोविंदा बाबनवाडे, प्रशिक झाडे, हिंमत भुरसे, रामगिरवार , विजय पत्तीवार.आणि बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

गुराख्याचा वाघाने पाडला फडशा, दुसऱ्या दिवशी मिळाले अवयव 


गुराख्याचा वाघाने पाडला फडशा, दुसऱ्या दिवशी मिळाले अवयव 

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बंडू कोल्हे वय ५५ वर्ष रा. रामपुरी हा इसम बकऱ्या गुरं चारण्या साठी चिचोली च्या जंगलात नेहमी प्रमाणे गेला असता अंदाजे ४. ००वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला केला असावा अशी शंका आहे.. वनविभागाने गावकऱ्यांच्या  मदतीने  शोध मोहीम चालवली होती. रात्री ९.०० वाजे पर्यंत इसम मिळाला नव्हता. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती,ती सकाळी पुन्हा सुरू करुन शोध घेतला जाणार होता.

आज सकाळी वन विभागाच्या पथकाने पुन्हा शोध मोहीम सुरू केली त्यात काटवण येथील कक्ष क्रमांक ७५६ काटवण नियत क्षेत्रात मृतदेहाचे काही अवयव आढळले त्यापैकी काही उर्वरित अवशेष रुग्णालयात आणण्यात आले यावेळी चंद्रपूर येथील वन उपसंचालक बफर जगताप मॅडम, वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर, क्षेत्रपाल वरगंटीवार, वनरक्षक भास्कर परचाके उपस्थित होते.मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ २०,००० रुपये मदत देण्यात आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागात  वाघ बिबट्या यांचा वावर असून सतत वाघाचे हल्ले  होत असतात त्यामुळे वन विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे.  वन विभागाचे याकडे विशेष लक्ष नाही त्यामुळे  गावात नागरिकांमध्ये अत्यंत घबराटीचे वातावरण असून वन विभागाच्या कार्यप्रणाली वर शंका निर्माण झाली असून शासनाच्या विरोधात जनता रोष व्यक्त करीत आहे. वाघाचे हल्ले वाढतच असून मानवाचे प्रिआण जातच आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

रेल्वे लाईन च्या कामास साखरा ग्रामस्थांनी रोखले तरीही प्रशासशाचे दुर्लक्ष 


रेल्वे लाईन च्या कामास साखरा ग्रामस्थांनी रोखले तरीही प्रशासशाचे दुर्लक्ष 

 

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे द्वार बनविणार अशी भूलथापा देणाऱ्या राज्यसरकार ने तथा सरकारी अधिकाऱ्यांनी, साखरा गावातील काही ग्रामवासियांनी रेल्वेचे काम थांबविण्याच्या घटने कडे चार महिन्यांपासून मुद्दाम दुर्लक्ष केल्याची लाजिरवाणी बाब उघडकीस आली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता साखरा येथील गावकऱ्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून ठरलेल्या दरा प्रमाणे आपल्या जमिनीचे विक्री पत्र रेल्वे प्रशासनाला करून दिले होते.
त्या जागेचे विक्री पत्र झाल्यावर संबंधित जागेचे फेरफार होऊन ती जागा आज रेल्वे प्रशासनाच्या नावाने नोंद करण्यात आलेली आहे,तरी सुध्दा अशा प्रकारे गावकरी रेल्वेचे काम थांबविण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला प्रशासन दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील लाखो लोकांमध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे.


एकीकडे राज्याचा पहिला जिल्हा आहे म्हणून बोलायचे आणि दुसरीकडे रेल्वेच्याच कामाकडे दुर्लक्ष करणे, अशी प्रशासनाची ही भूमिका आता संशयित वाटू लागली आहे.
या बद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की साखरा गावातील लोकांनी रेल्वेचे काम थांबविल्याची माहिती, गडचिरोली चे जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी तथा भू संपादन अधिकारी यांना तीन वेळा लिखित पत्र देण्यात आले आहे,पण कोणत्याही शासकीय यंत्रणेने होणाऱ्या कामाला सुरक्षा पुरविली नाही अशी धक्कादायक बाब आमच्या प्रतिनिधी कडे सांगितली .

सदर चे काम थांबविल्या ची माहिती माजी खासदार अशोक नेते यांना सांगितली असता, त्यांनी सुध्दा प्रशासनाच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करून रेल्वे कामांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब याची दखल घेण्याची सूचना केली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

लिटील हर्टस विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न


लिटील हर्टस विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

विज्येत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण

आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी येथे तीन दिवसीय (दि. २८ ते ३० जाने.) वार्षिक स्नेहसंमेलन समारोहाचे आयोजन करण्यात आले असून प्रथम दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव  रमेश आरे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी शालेय जीवनात घडतो त्यांच्या आत असलेले सुप्तगुण प्रदर्शित करण्याची त्यांना प्राप्त व्हावी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत इयत्ता नर्सरी ते दहावीतील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक अश्या चार गटात १५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असून विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून प्रदर्शन केले. 
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन सादर करीत पूर्व प्राथमिक गटातून प्रथम मास्ट. द्विज अलोणे, द्वितीय कु. अगस्त्या आभारे, तृतीय कु. परी खामनकर, प्राथमिक गटात कु. तमना कडते, द्वितीय मास्ट. श्रीहीत आरे, तृतीय कु. वंशिका बामनकर, उच्च प्राथमिक गटात कु. लिजा हलदार, कु. अंजली वेलादी, तृतीय मास्ट. निवृत्ती नागरगोजे तर माध्यमिक गटात कु. अर्नवी रोहनकर, द्वितीय कु. तनवी मंडल, तृतीय मास्ट. आर्यन मुद्रिकवार अश्याप्रकारे क्रमांक पटकाविला विज्येत्या विद्यार्थ्यांना उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळीच्या शुभहस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला साईराम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष  अनिल आल्लूरवार, सचिव  रमेश आरे, सदस्या भवानी आरे, सरिता गादे, मुध्याध्यापक  कृष्णमूर्थी गादे तसेच या स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून  रोशनी अवथरे,  सपना पांडे, सुहासिनी बोरकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमची शोभा वाढविली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

ईल्लूर गावा जवळील वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक, तिघेही जखमी 


ईल्लूर गावा जवळील वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक, तिघेही जखमी 

 

आष्टी  (प्रतिनिधि) ## दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसली यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन  वाजताच्या सुमारास ईल्लुर गावा जवळील वळणावर घडली .                                    जखमी युवकाचे नाव संदिप टेकूलवार , वय २७ ,  संतोष गोर्लावार , वय ३४ रा. दोघेही कुनघाडा (माल) व स्वप्निल मोहूर्ले, वय २८ , रा . दरुर असे आहे.     
   कुनघाडा येथून दुचाकीवर संदीप टेकुलवार , व संतोष गोर्लावार  हे दोघे आष्टीकडे येत असताना व आष्टी कडून  स्वप्नील मोहुर्ले हा इलुर कडे जात असताना इल्लूर येथील वळणावर दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक बसली. यात दुचाकीवरील तिघेही जण गंभीर जखमी झाले. या तिघांनाही आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील संदिप टेकुलवार व संतोष गोर्लावार यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2025

PostImage

दुचाकीची अनखोडा वळणावरील कठड्याला धडक,कोनसरीचा दुचाकीस्वार ठार 


दुचाकीची अनखोडा वळणावरील कठड्याला धडक,कोनसरीचा दुचाकीस्वार ठार 

 


आष्टी (प्रतिनिधि) ##  आष्टी येथून कोनसरीकडे दुचाकीने जात असताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अनखोडा वळणावर असलेल्या  लोखंडी कठड्याला दुचकीची बसली धडक यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली.
मयत दुचाकीस्वाराचे नाव आशिष कुळमेथे , वय २५ वर्षे , रा. कोनसरी असे आहे.
मयत आशिष हा दुचाकी क्रं. एम.एच.३३  , ए बी ९५९८ ने आष्टी कडून आपल्या कोनसरी गावाकडे दुपारी निघाला होता. दरम्यान अनखोडा नाल्याजवळील वळणावर त्याचे गडीवरचे नियंत्रण सुटले व गाडी लोखंडी कठड्यावर आदळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करुन प्रेत शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविले.पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2025

PostImage

 डॉ लुबना हकीम यांच्या हस्ते भव्य क्रिकेट सामन्याचे  उद्घाटन



 डॉ लुबना हकीम यांच्या हस्ते भव्य क्रिकेट सामन्याचे  उद्घाटन

 

अहेरी:-

अहेरी तालुक्यातील मौजा  वेलगूर येथे स्वर्गीय चाचमा अब्दुल हकीम  यांच्या स्मृतिप्रित्यर्थ  जय भवानी क्रिकेट  क्लब वेलगुर  आयोजित   भव्य रात्र कालीन खुले क्रिकेट सामने  स्पर्धेचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लुबना  हकीम यांच्या हस्ते संपन्न झाले-
. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भावनांचा आणि कृतज्ञतेचा उल्लेख केला. त्यांनी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांचे, तसेच उपस्थित सर्व लोकांचे आभार मानले. त्यांना असे कार्यक्रम गावातील एकजूट आणि एकमेकांच्या सहाय्याने अधिक कार्यक्षम होऊ शकतात, असे सांगितले. त्यांच्या मनोगतात त्या गावच्या सामाजिक एकतेची महत्त्वता आणि क्रीडा क्षेत्रातील सकारात्मक योगदानावर जोर दिला
यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशी,  माजी सरपंच आशांना दुधी,  आदिल पठाण, वामन मडावी ,इंजिनीयर नितीन देवनाथ , मनोहर चालूरकर ,बापू निकोडे, दिलीप राऊत, मुक्तेश्वर गदेकर , रोहित  गलबले,  डॉ .सपन हलदर ,अरुण टाकरे, वासुदेव मळावी, संतोष गुरलुले ,शंकर सोनुले, राजू निकोडे ,ईश्वर गुरलुले क्रिकेट स्पर्धक व ग्रामस्थ  बांधव महिला भगिनी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2025

PostImage

गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त


गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त

 

अमरावती:-
अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची आई मशीनवर शिलाई काम करते. कुमारी पल्लवी ही अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी चपराशी पुरा या स्लम एरियामध्ये राहते. बिच्छू टेकडीतून पाहणाऱ्या नाल्याच्या काठावर तिचे घर आहे. एवढ्या आधुनिक काळातही तिच्या घराला जायला अद्यापही रस्ता नाही.

ती जेव्हा सातव्या वर्गात होती तेव्हा मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी  तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी ती गेली होती. तिचे वडील तिला या कार्यशाळेला घेऊन गेले होते. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्यामुळे तिचे वडील तिला दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली.  काठोळे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थी यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके सप्रेम भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा  तुकाराम मुंढे यांच्यापासून तसेच त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन कुमारी पल्लवीने मी आयएएस अधिकारी होणारच असा निर्णय पक्का केला व त्या दृष्टिकोनातून तिने सातव्या वर्गापासूनच परीक्षेला तयारीला सुरुवात केली. तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवला आहे. ती ज्या भागात राहते त्या भागात अगोदर रान वन होते. त्या भागात विंचू जास्त निघायचे म्हणून त्या भागाला आजही बिच्छू टेकडी या नावाने ओळखले जाते. या टेकडी जवळच वडाळी नावाचा तलाव आहे. परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला.पल्लवीच्या घरासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. या मार्गावरून सतत ट्रकची येजा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करताना सतत व्यत्यय येत असतो. पण अशा विपरीत परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले वडील देवीदासजी चिंचखेडे यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. तिला तुकाराम मुंढे यांचे शब्द आठवत होते. मी आयएएस अधिकारी होणारच, व अखेर तीने यशोशिखरावर गाठलेच.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

 कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 


 कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 


 चंद्रपूर:-

जिल्ह्यात कार आणि ऑटोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील येन्सा इथं ही घटना घडली आहे. जखमींवर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरु आहेत.  
रामपूर येथे काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोऱ्याला जात होते. यावेळी चंद्रपूरकडे जाणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक  दिली. या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) यांचा मृत्यू झाला आहे.  तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून एका गंभीर जखमी झालेल्या महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मजूर वरोरा येथील रहात असून मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते. परतिच्या प्यारवासाचे वेळी वेळी ही घटना घडली. जखमी मजुरांचे नावे कळू शकलेली नाहीत 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

महावितरणच्या अधीकाऱ्यासोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची बैठक ;  विद्युत विभागातील प्रलंबित समस्यांना  तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश


महावितरणच्या अधीकाऱ्यासोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची बैठक ;  विद्युत विभागातील प्रलंबित समस्यांना  तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

गडचिरोली - :

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा संसदीय ऊर्जा कमिटीचे सदस्य डॉ. नामदेव किरसान यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील विदुय्यत विभागातील स्थानिक पातळीवर सुटू शकणाऱ्या विविध समस्या तातडीने मार्गी लावण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 
           सदर बैठकीत महावितरण चे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता संजय डोंगरवार, सह सर्व अधिकारी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते,  जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, श्रेयस बेहरे उपस्थित होते.
अनेक वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषीपंपा करीता विद्युत मीटर उपलब्ध करून देणे किंवा सोलर पंप बसविण्यास इच्छुक शेतकऱ्यास तातडीने सोलर पंप उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमीत व सुरळीत करण्यात यावे, अतिरिक्त लोडशेडींग करू नये, शासन स्तरावून राबविण्यात येणाऱ्या योजनाचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देणे या सारख्या अनेक विषयावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेस (श प) विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी दिले नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद


राष्ट्रवादी काँग्रेस (श प) विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी दिले नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद 


अहेरी:-
सुंदरनगर ता.मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील सहायक शिक्षक कांती मंडल यांच्या स्वागत समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता सदर समारंभ एक उत्साह पुणं आनंददायी प्रसंग होता त्यांच्या संसाराच्या गाडीची नवी सुरुवात होती या समासरंभास राष्ट्रवादी काँग्रेस (श प) गटाच्या विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम,वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर हकीम (बबलूभैया) व प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले 
हा समारंभ उपस्थितांच्या हृदयात एक सुखद छाप सोडून गेला 
यावेळी प्राचार्य लोनबले, प्राचार्य निखुले, वरिष्ठ लिपिक मुक्तदीर भैय्या व बहुसंख्य कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे डॉ.लुबना हकीम यांनी केले ध्वजारोहण 


भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे डॉ.लुबना हकीम यांनी केले ध्वजारोहण 

अहेरी:-

आज 76 व्या गणराज्य दिनाच्या शुभ पर्वावर  इदाराम येथील  भगवंतराव हायस्कुल  येथे डॉ लुबना हकीम  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  अजयभाऊ ककडालवार  मुख्याध्यापक मामीडलवार आरोग्य  उपकेंद्र इंदाराम  सीएचओ सुरभी शिल्पकर, एएनएम सी.सी. मडावी आणि अंगणवाडी सेविका,व सह ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
सर्व शिक्षक-शिक्षिकांनी, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी यथासांग एकत्र येऊन हा दिवस साजरा केला. डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांची आणि भारतीय संविधानाची महत्ता सांगितली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता, सामाजिक जबाबदारी आणि देशाभिमान यांचे महत्त्व पटवून दिले. या खास प्रसंगी शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले, ज्यामुळे सर्व उपस्थितांना मनोरंजन आणि प्रेरणा मिळाली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदारदिनी निदर्शने व पत्रकार परिषद


इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदारदिनी निदर्शने व पत्रकार परिषद

 

 

गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीविरोधात तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, इंदिरा गांधी चौक येथे २५ जानेवारी २०२५, निदर्शन आंदोलन करून पत्रकार परिषद घेण्यात आली.
या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांसह व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळावी, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी खासदार डॉ. नामदेवजी किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर,  तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमाद भगत, प्रशांत कोराम, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर,   नेताजी गावतुरे, काशिनाथ भडके, हरबाजी मोरे, दिवाकर निसार,  संजय चन्ने, घनश्याम वाढई, दत्तात्र्य खरवडे, अजय भांडेकर,रवी मेश्राम, सुभाष धाईत, उत्तम ठाकरे, बंडोपंत चिटमलवार, रुपेश टिकले, दीपक रामने, सुरेश भांडेकर, अनिल भांडेकर, विनोद लेनगुरे, भैयाजी मुद्दमवार, आशा मेश्राम, प्रति बारसागडे, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, गणेश कोवे, जावेद खान, स्वप्नील बेहरे सह सर्व सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.


सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.

आमरण उपोषणकर्ते रमेश काळबाँधे यांच्यासह रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व इतरांनी मुंडन करुन केला निषेध.

चंद्रपूर :-

सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट व बोगस नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं जे आमरण उपोषण सुरु आहे त्याचा आज दहावा दिवस असून आमरण उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिडीसीसी बैंकेच्या बोगस नोकर भरतीचा निषेध करण्यासाठी समितीचे सदस्य व आमरण उपोषणकर्ते रमेश काळबांधे यांनी आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी स्वतः मुंडन करुन निषेध केला आहे व त्यांनी सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष संचालकांना इशारा दिला आहे की आज आम्ही केवळ मुंडन केलं आहे जर भरती रद्द केली नाही तर तुम्हची प्रतिकात्मक शवयात्रा काढू, दरम्यान यावेळी रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या अनेक सदस्यांनी आरक्षण डावलून भ्रष्ट मार्गाने केलेल्या नोकर भरतीचा निषेध केला आहे. यावेळी समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, राजेश बेले, आशिष ताजने, महेश वासलवार, सुनील गुढे, विजय तूरक्याल, पियुष धुपे, स्वप्नील देव व इतर समिती सदस्यांची उपस्थिती होती.

राज्यात सद्या सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरतीचा मुद्दा गाजत असून मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नोकर भरतीत डावलल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन आणि 16 जानेवारी पासून समितीचे मनोज पोतराजे आणि 21 जानेवारी पासून रमेश काळाबाँधे आमरण उपोषण करत आहे, परंतु खासकरून सहकार विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे, दुर्दैवाची बाब ही आहे की ज्या जिल्ह्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे आंदोलनकर्त्यानी निवेदन देऊन मागणी केली की सिडीसीसी बैंकेने आरक्षण डावलून नियमबाह्य नोकर भरती केली त्यावर स्थगिती आणा पण ओबीसीच्या हक्काच्या लढाई लढतो म्हणणाऱ्या हंसराज अहिर जे स्वतःला ओबीसी समजतात ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या लढाईला न्याय मिळवून देण्याचं काम नाही ही खरी चंद्रपूर जिल्ह्याची शोकांतिका आहे. केवळ माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्याच्या मागणीला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी जखमी 


स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी जखमी 

 

 

यवतमाळ:-

जिल्ह्यात स्कुल बस चा अपघात होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील उमरखेडमध्ये स्कूल बसला अपघात झाला आहे. यात अपघातात एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थिनीचे नाव महिमा आप्पाराव सरकटे असं नाव आहे. ती दिवटीपिंपरी येथे राहात होती. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान ही घटना घडली आहे. उमरखेडच्या दिवटीपिंपरीवरून ही स्कूल बस दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. यावेळी हा अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्वरित वैद्यकीय सेवा बोलवून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेतली. मुलांच्या गाडीचा झालेला अपघात पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लहान मुलांचा आक्रोश अंगावर काटे आणणारा होता. यात एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

एकुलता एक मुलगा पोलीस होइल असे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडीलांना त्याचा मृतदेह मिळाला पहायला


एकुलता एक मुलगा पोलीस होइल असे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडीलांना त्याचा मृतदेह मिळाला पहायला 

 

 

कुरखेडा  : बीएससी द्वितीय वर्षात शिकणारा एकुलत्या एक मुलाला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न गरीब आई- वडिलांनी पाहिले होते, पण दुर्दैवाने त्याचा मृतदेह आढळून आला. हृदय पिळवटणारी सदर घटना २५ जानेवारीला सकाळी कुरखेडा येथे उघडकीस आली.


माहितीनुसार, रोहित राजेंद्र तुलावी (२०) रा. जैतपूरटोला ता. कुरखेडा असे मयताचे नाव आहे. घरी आई- वडील, वृध्द आजी व बहीण असा हा परिवार. शेतीसह मजुरीकाम करुन गुजराण करणाऱ्या रोहितची पोलिस बनण्याची इच्छा होती. कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयात तो बीएससी द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. यासोबतच पोलिस भरतीचीही तयारी करायचा. त्यासाठी रोज पहाटे उठून तो धावायला व व्यायामाला जात असे. २४ रोजी रात्री नित्याप्रमाणे जेवण करुन झोपी गेला. त्यानंतर पहाटे तो गायब होता. नित्याप्रमाणे फिरायला गेला असावा असे समजून कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह  कुंभीटोला मार्गावरील सतीनदीपात्रात आढळल्याची बातमी आली अन् कुटुंबाला धक्काच बसला. नदीपात्रात  पाणी नव्हते. रेतीमध्ये तो निपचित पडलेला आढळला. बनियान, शर्ट व स्वेटर बाजूला काढून ठेवलेले होते, तर अंगावर केवळ पँट होती.

दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रोहित तुलावी याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब शहरात कळवली. त्यानंतर सतीनदीपात्रात मोठी गर्दी झाली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे वातावरण शोकमग्न झाले होते. रोहितचा मृत्यू नेमका कसा झाला, तो कोणासोबत व्यायामाला गेला होता, हे पोलिसांच्या चौकशीतच समोर येणार आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण  नाहीत, त्यामुळे मृत्यूमागचे गूढ वाढले आहे.

कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील खरे कारण उजेडात येईल, असे पो.नि. महेंद्र वाघ यांनी सांगितले. सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे ते म्हणाले


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

२० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी वनपाल सापडला एसीबीच्या जाळ्यात


 


२० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी वनपाल सापडला एसीबीच्या जाळ्यात

 

 

कुरखेडा, दि. 24: तक्रारदार हा आपल्या ट्रॅक्टरने घरकुलासाठी लागणाऱ्या रेतीची वाहतूक करीत असताना त्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी 25 हजारांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारताना वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालय पुराडा, उपक्षेत्र कोहका येथील वनपाल नरेंद्र सिताराम तोकलवार यास लाच स्वीकारताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 24 जानेवारी 2025 रोजी रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदाराकडे ट्रॅक्टर असून घरकुलासाठी लागणारी रेती ट्रॅक्टरने वाहतूक करीत असताना वनपाल नरेंद्र तोकलवार याने त्यास थांबवून ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यास सदर लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे 23 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी दरम्यान नरेंद्र सिताराम तोकलवार याने तक्रारदारास ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवार 24 जानेवारी रोजी ला.प्र.वी गडचिरोली