ProfileImage
314

Post

5

Followers

0

Following

PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ


आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ

 

गडचिरोलीःनक्षलविद्यांनी एका आत्मसमर्पीत नक्षलवाद्याची र्गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, तालुका भामरागड असे त्याचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार जयराम कोमटी गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करीत होते 25 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे.

नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तोच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली.

विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात मात्र सप्ताहाच्या पूर्वीच भामरागड तालुका मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले 


नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले 


 गडचिरोली - : गडचिरोली जिल्ह्यातील लागुनच असलेल्या नवरगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून जात असलेल्या तीन इसमास गावकऱ्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करीत वाचविल्याची घटना २५ जुलै रोजी घडली 

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे चारही बाजुला पुराचा वेढा आहे. त्यामुळे चारही मार्ग बंद आहेत . अश्यातच  चुरचुरा- नवरगांव मार्गावरून नवरगाव च्या पुर्वीच येणारा पुल त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पुर आलेला होता नवरगाव ला जाण्यासाठी नागपूर वरून येणारे तिन पाहुणे एक महिला, मुलगा व भाचा बाईक वरून नवरगांव पुलावरून पाणी असतांना सुद्धा पुलावर थोडे पाणी आहे आपण सहज पुल ओलांडू शकतो या हेतुने ते तिघेही नवरगाव फुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज चुकला व ते पुढे न जाता पुलाच्या खाली बाईक पडली तर दोघे जुझपाचा आधार घेवुन लटकले तर एकजन पुलावरच मध्यतरी थांबुन कढल्यांला धरून होते.  त्या ठिकाणी चुरचुरा गावकरी पोहचले असता भयावह स्थिती पाहून गडचिरोली पोलिसांना माहीती दिली गडचिरोली पोलीस त्या ठिकाणी पोहचले परंतु हतबल होवून  त्यांना आल्या पावली परत जावे लागले
 आता आप्पती व्यवस्थापन  DDRF पथक जाईल बोट च्या मदतीने त्या तिघांना काढण्याचा प्रयत्न होईल असे वाटत होते. 

मात्र सांयकाळचे ७ वाजले तरीही  काहीच हालचाली दिसत नव्हत्या तेव्हा चुरचुरा येथील अनिल गेडाम व वासुदेव गेडाम यांनी दोरांच्या सहाय्याने सदर स्थळी जावून त्यां निघांना  सुखरूप बाहेर काढले चुरचुरा व नवरगांव चे अख्खे गावकरी त्या ठिकाणी पोहचले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले 
आता सरकारी यंत्रणा चुरचुरा येथे त्यांना नेवून त्यांची चौकशी करीत आहेत. त्या तिघाचे नाव अजुनही कळले नाहीत


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी - महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर


आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी - महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

 

नवी मुंबई:-

नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना फाशीच व्हायला हवी. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या. आज पीडित महिलेच्या कुटुंबाची त्यांनी नवी मुंबईतील घरी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. आयोगाने लगेच दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आरोपींची अटक, तपास यादरम्यान चाकणकर पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या.

चाकणकर यांनी गुरुवारी (दि.२५) पीडित कुटुंबाची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. आई-वडील, बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाची पार्श्वभूमी समजून घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत कुटुंबियांना माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करावे अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आरोपीवर कठोर कलमे लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी असेही पोलिसांना सांगितले आहे. या भेटीच्या वेळी सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगितली

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. ही महिला सासरच्या छळाला सामोरे जात होती. त्यांच्यावर देखील योग्य त्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. पीडित महिलेच्या कुटुंबाला, तिच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठी ही आयोग प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्दैवाने एखाद्या महिलेला घराबाहेर पडावे लागले; तर नजीकचे पोलीस स्टेशन, वन स्टॉप सेंटर यांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. अश्या महिलांना मदत मिळू शकते, असा विश्वास देण्याची गरज आहे. माध्यमांनी जनजागृतीसाठी पुढाकार करावा, असेही त्यांनी माध्यमांशी झालेल्या संवादात सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून खड्डे बुजविणार


मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून खड्डे बुजविणार

 सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार यांची नगर पंचायत अहेरी च्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनातुन मागणी


अहेरी:- अहेरी नगर पंचायत हद्दीत व अहेरी शहरातील रस्त्यावर खड्डेच- खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर खड्डे पाण्याने भरून आहेत.खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा असल्याचे अंदाज येत नसल्याने अहेरी शहरात नागरिकांची व वाहनांची वर्दळ नेहमीच असते म्हणून पाणी भरलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची  शक्यता नाकारता येत नाही म्हणून अहेरी शहरातील व प्रभागातील खड्डे बुजवा अन्यथा अहेरी शहरात सामाजिक कार्यकर्ते वर्गणी गोळा करून सदर खड्डे बुजवण्याचे प्रावधान हाती घेतील  असे अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी व ईशारा दिला आहे.

अहेरी शहरात व्यापार व आठवडी बाजार आणि शासकीय कामे, रुग्णालयात उपचारासाठी, विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात असे विविध कामे घेऊन सामान्य जनता व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे मोठी  वर्दळ निर्माण होते
अहेरीतील रस्त्यावर खड्डे पाण्याने भरून आहेत भरलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचे दाट शक्यता आहे आणि ये-जा करणाऱ्या नागरीकांना व वाहन धारकांना वाहतुकीस कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.करिता खड्डे बुजवणे आवश्यक आहे.नगर पंचायत ने या समस्येचा गंभीरतेने विचार करून  सदर खड्डे बुजवा अन्यथा अहेरीत वर्गणी करून खड्डे बुजवणार  मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी व ईशारा देण्यात आले आहे. 

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार, सचिन येरोजवार युवक मंडळी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


अंगावर शहारे आणणारा योगायोग 

 

चंद्रपूर:- "वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता" याच म्हणी प्रमाणे वाघ अचानक समोर उभा झाल्याने एका शेतकऱ्यास जीव मुठीत धरून त्याचेकडे पहात राहावे लागत होते 
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप सुटतो  आणि तो अचानक समोर आला तर भीतीने  बोबळी वळून बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा राहिला.
सध्या सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. पाऊस असूनही शेतकरी आपल्या शेतात रोपे लावण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नावाचे शेतकरी मंगरूड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलवरून गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून ते सायकलवरून गोविंदपूर या गावी परतत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर अचानक वाघ जंगलातून बाहेर येऊन रस्त्यावर आला. दोघेही समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या मागे किंवा पुढे कोणीच नव्हते. शेतकऱ्याने समोर वाघ पाहून तो अवाक होऊन आता आपले काही खरे नाही असे त्याला मनोमन  वाटत होते
तेवढ्यात मंगरुड कडून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस तेथे पोहोचली. बस चालकाने तात्काळ बस थांबवून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी  वेळ वाया न घालवता एसटी बसमध्ये बसवून त्याची सायकलही बसमध्ये ठेवून एसटी बस रवाना केली तेव्हा वाघ ताबडतोब जंगलाच्या दिशेने निघून गेला 'वेळ आली होती, पण काळ आला नव्हता' या म्हणीच्या धर्तीवर शेतकऱ्याचा जीव वाचला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला. यावेळी वाघ यांना समोर पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितल्याने वाघ व शेतकऱ्याच्या समोरासमोर उभे टाकल्याच्या घटनेची गावात खमंग जोरदार चर्चा झाली.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी


धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी


विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी 10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन

गडचिरोली/नागपूर दि. 25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती
श्रीमती बिदरी यांनी दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या

सूचना दिल्या आहेत. धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून

त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर

जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या
योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक
आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप 


गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप 


मुलचेरा:-
मुलचेरा तालुक्यातील गोमणी पासून तर विवेकानंदपूर पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने आता पावसाळ्यात त्या खड्डयांना तलावाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर मुलचेरा तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी शेकडो विध्यार्थी दररोज ये-जा करतात. विविध कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील तितकीच आहे. एवढेच नव्हेतर कर्मचारी आणि अधिकारी देखील याच रस्त्याने ये-जा करतात. या सर्वांना याचा जबर फटका बसत आहे.


मागील एक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने परिणामी खड्डयांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सदर रस्त्यावर दुचाकी चालविणे कठीण झाले असून एसटी बस आणि इतर खाजगी वाहनधारक कसा प्रवास करत असतील याचा विचार न केलेला बरा.

गेल्या पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नुकतेच चार दिवसांपूर्वी आंबटपल्ली आणि खुद्दीरामपल्ली दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला होता. पूर ओसरला असला तरी पुराच्या पाण्याने पुलावर साचलेला गाळ आणि कचरा साफ करण्यात आला नाही. एकीकडे कचरा साचला तर दुसरीकडे खड्यात पाणी साचला आहे. त्यामुळे या पुलावर देखील अपघाताची शक्यता बळावली आहे. मागील चार दिवसांपासून पुलावर कचरा पडून आहे मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही.

आलापल्ली ते आष्टी मार्गावर खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने खाजगी वाहनधारक मागील दोन वर्षांपासून आलापल्ली ते मुलचेरा याच मार्गाचा अवलंब करत आहेत. सध्या आलापल्ली ते आष्टी रस्त्यावरील दीना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने हाच एक पर्यायी मार्ग वापरण्यात आला. अश्या परिस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू 


सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू 


वरोरा:-
 वरोरा तालुक्यातील टेमृर्डा येथून जवळपास सात लाखाची चोरी करणाऱ्या चोरांना अवघ्या 24 तासात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सहा आरोपींना जेरबंद केले आहे 
मिळालेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शरद सीताराम गुघाणे वय 53 वर्ष हे टेभूर्डा येथे आपल्या पत्नीसह चहाचे दुकान चालवतात 17 जुलै रोजी ते व त्यांची पत्नी उघडे शटर असलेल्या चहाच्या दुकानात झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरांनी चहाच्या दुकानातून सोन्याचे दागिने, रोख एक लाख रुपये, कोको कंपनीचा मोबाईल असा एकूण 7, 80, 500 रुपयाचा माल चोरून नेला. यासंबंधीची तक्रार शरद गुधाने यांनी वरोरा पोलीस ठाण्यात करताच वरोरा येथील गुन्हे शाखा तसेच  चंद्रपूर व कोरपणा पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे शिताफिने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे प्रदीप संजय शिरकुरे, आकाश नारायण शिरकुरे, चिंतामण संजय शिरकुरे, हरिणा प्रदीप शिरकुरे, माया देवगडे सर्व राहणार पारधी गुडा धोपटाळा तालुका कोरपणा यांचे सह विकास काळे राहणार चिनोरा यांना अटक केली व त्यांचे जवळून आठ सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चार बांगड्या, एक चपला कंठी, सोन्याचे कानातले दागीने, सोन्याची पोत व सोन्याचा गोफ या दागिन्यासह दोन मोबाईल व चोरी करण्यासाठी वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्रमांक एम एच 34 ए ए 3324 व एक्टिवा क्रमांक एम एच
31 ईव्ही 9188 असा एकूण 6,85000 रुपयाचा माल जप्त केला. या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचे जवळून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम,  चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोन्डावार, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, सपोनि मनोज गदादे, सपोनि विकास गायकवाड, पो.स्टे. कोरपना व पोलीस स्टेशन वरोरा येथील गुन्हे शाखा पथकातील पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं. संदिप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद, राजु लोधी, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. कोरपना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे सिरोंचात भाजप सरकारच्या विरोधात निदर्शनं


राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे सिरोंचात भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

 


सिरोंचा :- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही व निधी वाटपात सुद्धा काहीच दिले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सिरोंचा निषेध आंदोलन करण्यात आले 
 देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशातच आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.या अर्थसंकल्पात आज पासून सुरू होणाऱ्या जाहिरात बाजीसाठी विविध योजना आहेत, पण आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्याप्रमाणे थोडेफार जरी दिले असते तर समाधान मानले असते. परंतु लोकसभा निवडणुकीत एन. डी. ए. सरकारला आलेल्या कमी जागा मुळे महाराष्ट्रातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागले अशी भाजपची प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे.आंध्र प्रदेश, बिहार व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राला अर्थसंकल्पात- २०२४ मधून काहीही मिळालेले नाही.हे त्रिवार सत्य आहे.
महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय कदापीही सहन करणार नाही. राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आपण या आंदोलना द्वारे मांडून भाजप पक्षाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे, याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिरोंचा मुख्यालयात बस स्टँड चौक येथे "अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्रात रोष, महाराष्ट्रात रोष" असे नारेबाजी करत आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे,
        त्यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चोक्कामवार, तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला, सचिव - विनोद नायडू,शहर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - राजू मूलकला, उदय मूलकला, गणेश संड्रा, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण


गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण

 


गडचिरोली, दि. 24 : गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल नक्षल्याने पोलीसासमोर आत्मसमर्पण केले आहे 
 शासनाने 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 24 जूलै 2024 रोजी जिल्ह्यात मुसाधर पाऊस असतानाही गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, (वय 45), रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली असे त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार लच्चु ताडो 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून नक्षल्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, नक्षल्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षल्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल नक्षल्यांना माहिती देणे तसेच नक्षल्यांचे पत्रके जनतेपर्यंत पोहचविणे व इतर काम तो करीत होता. 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत. त्याचा 2022 मध्ये ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच 2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्यशासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर नक्षल्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप- महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले रुग्णालयात 


गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले रुग्णालयात 


रानमुल - माडेमुल पोटफोडी नदीच्या पुरामुळे ६ दिवसापासून आवागमन बंद 

 गडचिरोली:-
गंभीर आजारी (साप चावल्याचा संशय) महीलेस आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप रुग्णालयात पोहचवून उपचारासाठी दाखल केले आहेत 
गडचिरोली  मुख्यालयाला पासून अवघ्या १५ कि.मी अंतरावर अतिदुर्गम भाग रानमुल ते माडेमुल असून पोटफोडी नादीला संततधार पावसामुळे पुर आल्याने गेल्या आठ दिवसापासून त्या गावांच संपर्क  तुटला आहे माडेमुल वरुन रानमुल ते गडचिरोली येणे जाणे अजुनही बंदच आहे.

दि.२४ चे रात्रौ माडेमुल येथील कल्पना परसे हि गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे तिला महिला रुग्णालय गडचिरोली येथे आणावयाचे होते. तेव्हा माडेमुल येथील गावकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक( SD RF)
यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी बोटीच्या सहाय्याने  कल्पना हिला गडचिरोली रुग्णालयात पोहचविण्यात आले. मालेमुल ते गडचिरोली संर्पक अजुनही तुटला असुन आता मात्र आप्पती व्यवस्थापन व गावकरी सहकार्य करीत आहेत.

पोटफोडी नदी पुरामुळे आजुबाजुच्या शेतात पुराचे पाणी घुसले असुन शेतकऱ्यांचे धानपिक धोक्यात आले आहेत तेव्हा शासनाने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर  हल्ला करून जागीच केले ठार


शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर  हल्ला करून जागीच केले ठार

नागभीड : -
 आपल्या स्वतःच्या शेतात धान रोवणी करीत असताना एका शेतकऱ्यावर वाघोबाने हल्ला करून शेतकऱ्यास जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मींडाळा येथील कंपार्टमेंट नं ४२०/ ७५६ मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.  मृतक दोडकू झिंगर शेंदरे  वय(६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू होता. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला.  काही बांद्यामधील रोवलेले धान वाहून गेले होते त्या ठिकाणी  दोडकू धान रोवणी करीत होता. त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. ठार केल्यानंतर त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळपास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले. त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली. गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करुन  त्याचे शव
उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
त्वरित त्या गरीब शेतकऱ्याच्या परीवारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन 


सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन 


नंदुरबार:-आपल्या गावातील शाळा दुरुस्ती करीता चक्क सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे 
खांडबारा गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेची इमारत ही जीर्ण अवस्थेत पोहचली असल्याने सरपंच अविनाश गावीत यांनी जिल्हा परिषद कडे शाळा दुरुस्ती करीता वारंवार पाठपुरावा केला मात्र या बाबतीत शासन उदासीन असल्याचे दिसून येत होते 
ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी मला निवडून दिले मात्र मी लोकांना काय उत्तर देणार म्हणून त्यांनी अनोखे आंदोलन करण्याचे ठरविले व काही ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्याचा हात पुढे केला 
तेव्हा त्यानी जिल्हा परिषदेच्या पुढे अर्धनग्न आंदोलन सुरू केले 
 भारतीय लोकशाहीमध्ये गावाचा सरपंच हा तळागाळातील लोकांचा लोकसेवक असतो.

आपल्या गावातील शाळेच्या दुरुस्ती कडे शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी असे सरपंचास अर्धनग्न आंदोलन करावे लागते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल 

सरपंचांना आपल्या गावातील लेकरांचा शिक्षणासाठी उत्तम सोय व्हावी म्हणून पहिल्यांदाच सरपंच कपडे काढताना पाहिला असल्याचे बोलले जात आहे सरपंच अविनाश गावित खरंच आपलं पाऊल गावाचा हितासाठी पुढे आहे आपणास शुभेच्छा आपली व खांडबारा ग्रामस्थांच्या लढाईला यश मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे 

ही चमकोगिरी नाही तर वास्तव आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024

PostImage

शेतात जात असताना पती- पत्नीवर केला जंगली वराहाने हमला,पती पत्नी दोघेही जखमी


शेतात जात असताना पती- पत्नीवर केला जंगली वराहाने हमला,पती पत्नी दोघेही जखमी

चामोर्शी तालुक्यातील कढोली येथील घटना

कार्यकारी संपादक/ प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता १९

चामोर्शी:-
तालुक्यातील कढोली (अनखोडा) या गावातील पती पत्नी मिळून आपल्या शेतशीवाराकडे जात असताना अचानक जंगली वराहाने हमला करुन जखमी केल्याची घटना 23/07/2024 ला सकाळी घडली आहे 

प्रफुल ताराचंद सिडाम वय 38 वर्ष कविता प्रफुल सिडाम वय 35 वर्ष रा. कढोली ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली असे जंगली वराहांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पती पत्नीचे नावे आहेत

प्रफुल व त्याची पत्नी कविता दोघेही आपल्या शेतशिवाराकडे जाताना जंगली वराहांनी त्यांच्यावर हल्ला केला व फरफटत नेले त्या दोघांनी जंगली वराहांविरूद्ध भरपूर प्रमाणात प्रतिकार केला व त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटले जशी गावात ही घटना माहिती झाली ते त्यांना जखमी अवस्थेत आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व लागलीच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत कढोली गावात जंगली डुकरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असून शेतीची नुकसान तर करतातच परंतू आता मानवावर सुद्धा हल्ले सुरू झाले असल्याने या हल्ल्यात जखमीना वनविभागाकडून त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024

PostImage

मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ


मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

वैरागड :-
 आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावामध्ये दारुबंदी असली तरी बहुतेक गावामध्ये दारुचा महापूर वाहत आहे. मेंढेबोडी आणि मोहटोला जवळील बहुतेक गांवात दारुबंदी असल्याने दारु पिण्यासाठी मेंढबोडी आणि मोहोला या गावात दररोज संध्याकाठी तळीरामांची गर्दी असल्याने महिलांचे जगणे कठीन होत असून याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हयात दारुबंदी कायद्याने बंदी असली तरी संपूर्ण जिल्हयात
दारुचा महापूर वाहत आहे गडचिरोली लगतच्या चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह‌यातून जिल्ह्यात दररोज देशी विदेशी दारुचा पुरवठा होत असतो. तर काही गावात गावठी मोहफुलाची अवैध्य दारू विक्री सुरु आहे असाच प्रकार आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतेक गोव्यामध्ये सर्रासपणे दारुविक्री सुरु असल्याचे दिसून येतेय. काही गांवात महिलाच्या व बचतगटाच्या पुढाकाराने दारुबंदी केल्याचे दिसून येते परंतु आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढेबोडी आणि मोहटोला येथे मुबलक दाऊ विक्री केली जाते. मोहझरी,सुकाळा,शिवणी या गावात दारुबंदी असल्याने नजीकच्या मेंढेबोडी  येथे दारु पिणाऱ्या तळीरामांची सायंकाळच्या सुमारास गर्दी दिसून येते तर कोजबी, लोहारा, करपडा, विहीरगांव येथे दारुबंदी असल्याने न‌‌जीकच्या मोहटोला येथे दारु पिणा-यांची वर्दळ असते त्यामूळे मेंढेबोडी आणि मोहटोला ही दोन्ही गावे तडीरामासाठी आवडीचे ठिकाण असल्याचे दिसून येत आहे 

प्रतिक्रिया,
" दाऊ विक्रेत्यांचा शोध घेणे सुरु असून दाऊ विक्रने विक्री करतांना आढवल्यास त्याचे वर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल"

सागर बिट अमलदार वैरागड.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024

PostImage

जन्मदात्या बापाचा मुलाने  दगड मारुन  केला खून


जन्मदात्या बापाचा मुलाने  दगड मारुन  केला खून.


उपसंपादक/ प्रमोद झरकर 


सिंदेवाही : दिनांक २२/०७/२०२४ रोजी सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील श्री देवेंद्र तलांडे यांनी फोन वरून श्री तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही यांना माहिती दिली की,आंबेडकर चौक वॉर्ड क्र.२ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा.वासेरा यांनी आपल्या वडीलाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

 

या माहिती नुसार सपोनी तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही  तात्काळ पोलीस ठाण्याचे सपोनि स्थूल,पोउपनी सागर महल्ले,पोहवा विनोद बावणे,पोलीस अंमलदार रणधीर मदारे यांचेसह वासेरा गावासाठी रवाना झाले.परंतु प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट घोषित केला होता.अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वासेरा गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद होते.त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी आव्हान होते.

 

शेवटी अथक परिश्रम व पोलीस मित्र तसेच आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने वाकल ते जामसाळ्या मध्ये असलेल्या शेतातील नाल्यातिल कमरेच्या वर पाण्यातुन ट्रॅक्टरने मार्ग काढत जामसाळ्या पर्यँत पोहचुन पुढील प्रवास ट्रक्टरच्या मुंडीवर बसून घटनास्थळ गाठले.

 

पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्या नंतर जखमी अवस्थेत असलेले अशोक आबाजी रामटेके यांना पोलीस पथक व वासेरा गावातील युवक व त्यांचे नातेवाईक यांचे मदतीने आल्या मार्गानेच परत सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

सदर घटनेसंबंधाने मृतक याची पत्नी अर्चना अशोक रामटेके यांनी सिंदेवाही पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की,मृतक हा उसनवार घेतलेले पैसे परत करावयाचे आहेत.तुझे कानातील सोन्याचे रिंग मला दे असे म्हटल्याने मृतकाच्या पत्नीने त्याला ५०० रुपये दिले व ज्याचे घेतले त्याला दे म्हणून सांगितले.

 

मृतकाने त्यातील ४०० रुपये देऊन १०० रुपये स्वतःकडे ठेवून घेतले.त्याबाबत मृतक व त्याचा चुलत भाऊ कैकाडू रामटेके याचे सोबत मृतकाच्या पत्नीसोबत बोलचाल करीत असतांना यातील आरोपी हा येऊन मृतकास तू दारू पिण्यासाठी घरी पैसे का मांगतोस ? तुला दारू प्यायची सवय आहे तर दारू पिऊन चुपचाप झोपस का नाही ? असे म्हटल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला.झगडा भांडण होऊन आरोपीने मृतकास लाथाबुक्क्यानी मारहाण करून खाली पाडले.

 

त्यानंतर मृतक उठून मनोज रामटेके यांच्या घराकडे चालत चालत जात असतांना आरोपीने मृतकास जिवाने मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील दगड मृतकास फेकून मारल्याने कानाचे मागील बाजूस  डोक्यावर लागून मृतक गंभीर जखमी झाला.

 

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे डॉक्टरांनी तपासनिअंती मृत घोषित केले.मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा अमित अशोक रामटेके वय २४ रा.वासेरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार,तुषार चव्हाण करीत आहेत.

 

सदर कामगिरी  मुम्मका सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,रिना जनबंधु अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार तुषार चव्हाण सिंदेवाही यांचे नेतृत्वात सपोनि अतुल स्थूल,पोउपनी सागर महल्ले,अनिल चांदोरे,विनोद बावणे,रणधीर मदारे,सुहास करमकर,मोहीत मेश्राम यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

 शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतील मृतकाचे वारसांना १२ लाखाची  मदत वितरित


 शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतील मृतकाचे वारसांना १२ लाखाची  मदत वितरित

गडचिरोली दि.२२ : नैसर्गिक आपत्तीने वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. 

 याच महिन्यात दिनांक ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील  दोलू लुला तीम्मा यांना, २ जुलै रोजी मौजा जीवनगट्टा येथील  चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते, त्याचे वारस  पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना  तसेच मौजा मरपल्ली येथील  अंकुश  पांडू कुळयेटी हे दिनांक ८ जुलै  २०२४ रोजी  मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते. त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी भाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली

यावेळी  आदित्य  आंधळे  गटविकास अधिकारी , सचिन  कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी ,  पी. एन . उसेंडी तलाठी एटपल्ली ,. पी . डी. आत्राम तलाठी तोडसा  , देवाजी गावडे कोतवाल , सुरेश दुर्गे कोतवाल ,  सचिन गेडाम कोतवाल उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 


 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 


धुळे:-
जिल्ह्यातील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा येथील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण झाली असून उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 
विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना आजार होत आहेत त्यामुळे सदर शाळेच्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधिक्षक,व ईतर बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक शाखा (साक्री) धुळे चे गणेश गावीत, तानाजी बहीरम यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे यांना निवेदन देऊन केली आहे 
 प्रत्यक्ष अनुदानित आश्रम शाळा कुसुंबा ता. जि.धुळे या शाळेला भेट दिली असता अजून 45 ते 47 विद्यार्थी बाधित आहेत.या घटने नंतर साफ सफाई करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यापासून एकदा ही पाणी परीक्षण करण्यात आले नाही. स्वयंपाक चुलीवर बनवला जातो गॅसचे अनुदान लाटले जाते मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही.जे विद्यार्थी तक्रार करतात त्यांना बोर्डाच्या परीक्षेत टार्गेट केले जाते.म्हणून विद्यार्थी बोलत नाही.वरून संस्था एका भाजप पक्षाच्या राजकीय नेत्याची शाळा असून या शाळेत असा गंभीर प्रकार घडला आहे.यांच्यावर सरकार कायदेशीर कार्यवाही करणार का ? कुसुंबा येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे भयानक हाल व अपेष्टा होत आहेत 
दि.20/7/2024रोजी  कुसुंबा आदिवासी आश्रम शाळेतील दुषित पाणी पिल्याने उलट्या,ताप संडास  विद्यार्थ्यांना व्हायला लागले.दि.17/7/2024 रोजी विहीरीतील पाणी आटल्याने बाहेरून पाण्याचे टँकर मागितले असेही सांगण्यात येत आहे.एकीकडे विहीरीत संडासाचे पाणी जमिनीत मुरते असे ही शाळेतील विद्यार्थी सांगत आहे.खर तर विद्यार्थाचे निवासी इमारत आहे.त्या इमारतीला लागून विहीर व संडासाचे कुंड्या ही विहीर जवळ आहे. असे दुषित पाणी पिल्याने शाळेतील विद्यार्थी उलट्या, संडास करतांना शिक्षकांना दिसून आल्या नंतर लगेच धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले तरी काही मुले ,मुली अजून ही शुद्धीवर नव्हत्या यात लहान मुले जास्त होते.त्याच दिवशी पुन्हा दुपारी आणि संध्याकाळी तीन मुले एम्बुलंस  मध्ये जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचारासाठी आणले . धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळा कुसुंबा येथील ज्या धडगाव शहादा तळोदा अक्कलकुवा या तालुक्यातील पालकांचे विद्यार्थी कुसुंबा आश्रम शाळेत असतील त्या पालकांना आपल्या मुलांना बघण्यासाठी यावे कारण की लहान लहान लेकरू या ठिकाणी राहतात ते कसे राहतात हे पाहणं गरजेचं आहे.अनुदानाच्या पायी लहान जीवाशी खेळलं जात आहे.मी स्वतः त्रास करताना बघितले आहे. तरी या शाळेतील या विद्यार्थ्यांना कशामुळे आजारी पडले याकडेही आपलं लक्ष दिलं पाहिजे प्रत्यक्षपणे आपल्या मुलांना विचारा कोणते पाणी पिले आणि ते पाणी कसे होते तेही विचारा आणि पुढील कारवाई आपल्या पालकांनीही करावी . 25 लोकांना करणे दाखवा नोटीस एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बजावली आहे.तसेच झालेल्या घटनेची चौकशी तीन अधिका-या मार्फत केली जाणार आहे.संबधित संस्थाचालक व इतर लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल का?असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव किरसान 


कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव किरसान 

कुरखेडा:-
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पूल कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहून गेला आहे असा सनसनाटी आरोप गडचिरोली - चिमुर निर्वाचन क्षेत्राचे खा. डॉ.नामदेव किरसान यांनी केला आहे 
प्रत्यक्षात सती नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाची  पाहणी करताना खासदार गडचिरोली-चीमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी  यावेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की शाळेंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची व्यवस्था करण्यात यावी व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी  नदीच्या पलीकडे टेन्ट उभारून डॉक्टरची टीम व ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी.
  यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना सुरेंद्रभाऊ चंदेल, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पाटील नाट, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयंत पाटील हरडे, नीताराम कुमरे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुका अध्यक्ष कुरखेडा आम आदमी पार्टी ईश्वर ठाकरे, नाशिर हासमि, मुनेश्वर बोरकर, मुजफ्फर शेख, गिरधर तीतराम, प्रभाकर तुलावी, छगन शेडमाके, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार पिकु बावणे, मोहित अत्रे, लीलाधर भरे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

मानवी सांगाडा सापडला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत 


मानवी सांगाडा सापडला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत 

विठ्ठलवाडा येथील घटना 

आष्टी:-
गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी सांगाडा कुणाचा याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

चंद्रपूर अहेरी राष्ट्रीय महामार्गावर
विठ्ठलवाडा बसस्थानकापासून अवघ्या काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत आहे. मागील बऱ्याच वर्षापासून कुणीही या इमारतीत वास्तव्य करीत नसल्याने दुरावस्था झालेली आहे. आजू बाजूला हिरवे गवत यासह छोटे मोठे झाडे झुडपे वाढलेली आहेत. अश्यातच गोंडपिंपरी तालुक्यात मागील दोन तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. दि. २१ जुलै रविवारला सकाळ पासूनच पावसाला सुरवात झाली.


दुपारच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतल्याने गावातील एक इसम बकऱ्या चारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात गेले. बकऱ्या चारत असतानाच अचानक जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढळल्याने सदर इसम चक्रावला. लागलीच सदरची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेची महिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा असल्याची माहिती गोंडपीपरी पोलीसाना देण्यात आली. गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. पाहणी केली असता जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा दिसला. यात सदर अज्ञाताची डोक्याची कवटी शरीरापासून वेगळी झालेली दिसली. शरीराचा काही भागाचा सापळाही

दिसून आला. मानवी सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलविन्यात आले. रात्री सात वाजे पर्यंत चौकशी सुरू होती. तपासणीअंती मानवी सांगाडाचे काही नमुने घेण्यात आले असून पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले.

एखादा वेडसर इसम तिथे वास्तव्यास राहिला अन् तिथेच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर इसमाचा सांगाडा एका पिशवीत भरून विठ्ठलवाडा येथील स्मशानभूमीत पुरविण्यात आला आहे. यावेळी गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सदस्य शुभम पिंपळकर, पोलीस पाटील शारदा पिंपळकर, टीकाराम डाहुलेसह गावातील नागरिक हजर होते.

अगदी गावाला लागूनच सार्वजनिक बांधकाम विभागाची जीर्ण इमारत आहे. हाकेच्या अंतरावरच खाद्य पदार्थाची दुकाने यासह इतर दुकाने आहेत. उन्हाळ्याचे दिवसात याच इमारतीच्या परिसरात तरुण मंडळी क्रिकेट खेळत असतात. लघुशंका आली की अनेकजण याच इमारत परीसराचा आधार घेतात. असे असतानाही मृतदेहाची दुर्गंधी का आली नाही असा प्रश्न अनेकांना पडला. अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा सापडल्याने नागरिकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ तर धापेवाडाचे ५ गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू 


अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ तर धापेवाडाचे ५ गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू 


प्रतिनिधी / भंडारा : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खोलगट भागात अनेक तास पाणी पाणी साचून राहील्याने हाहाकार उडाला.

वाहतूक प्रभावीत झाली. घरादारात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. व्यापारी प्रतिष्ठानांतील तळभागात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. अतिवृष्टीमुळे गोसे खुर्द धरणाचे ३० गेट अर्धा मिटरने तर ३ गेट एक मिटरने उघडण्यात आली असून ३९८७.७५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडाची ५ गेट ०.७५ मिटरने उघडण्यात आली असून ३६३.१५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भंडारा शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला. दुपारी १२.३० पर्यंत ९५.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४० मंडळापैकी २३ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. सर्वाधिक ३४१.५ मिमी पाऊस लाखांदूर तालुक्यातील बारव्हा मंडळात नोंदविण्यात आला. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक मार्ग अवरूद्ध झाले. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील नाली, गटारे ओसंडून वाहीले. नाली व गटारातून पाणी परिसरात पसरल्याने सगळीकडे प्लास्टीक व कचऱ्यांचा खच पहावयास मिळाला. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुट पाणी शिरल्याचे चित्र पहावयास मिळाले. प्रशासनाच्यावतीने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. सायंकाळपर्यंत नुकसानीत वाढ होण्याचा अंदाज आहे.

या भागात शिरले पावसाचे पाणी -

शहरातील ग्रामसेवक कॉलोनी परिसर, भोजापूर व शिक्षक कॉलोनी महामार्ग परिसर, शिवाजी नगर नागपूर नाका भाग, भंडारा-वरठी महामार्गावरील डीमार्ट परिसरातील खोलगट भाग, आयटीआय परिसर, खात रोड आनंद मंगल कार्यालय परिसर, जुना साई मंदिर कारधा रोड परिसर, मेंढा परिसरातील सखल भाग पावसामुळे प्रभावीत झाले. खोलगट भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा सामान्य रूग्णालयातील खोलगट भागातही अर्धा फुटापर्यंत पाणी साचून होते. नागरिकांनी पाण्यातून मार्गक्रमण केले. शहराचा बाहेरील भाग अतिवृष्टीने सर्वाधिक प्रभावीत झाला.

नगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन मदतीला -

शहरात अतिवृष्टीमुळे नाली व गटारे अवरूद्ध झाली. परिस्थिती सामान्य करण्यासाठी सकाळपासून नगरपालिका कर्मचारी हाती टिकास, फावडे व अन्य साहित्यांसह गटारांची स्वच्छता करताना दिसून आले. नाल्यांतील केरकचरा बाजूला सारून पाणी वाहते करण्याची कामे प्राधान्याने करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली -

शहरातून जाणाऱ्या भंडारा-साकोली महामार्गावरील जूना कारधा टोल नाका शेजारील डोंगराची दरड कोसळल्याने काही काळासाठी वाहतूक प्रभावीत झाली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेत वाहतूकीचा मार्ग प्रशस्त केला.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

 गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना  22 जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर 


 गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना  22 जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर 

गडचिरोली:-
अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे प्रादेशिक हवामान विभागाने सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील त्या त्या भागाचा आढावा घेऊन त्या स्थानीक क्षेत्रात शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत 
गेल्या तीन दिवसांपासून ढगफुटी सुरू असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा , गोदावरी, प्राणहिता,बांडीया,इंद्रावती इत्यादी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नदी नाल्यांना पुर आल्याने ३७ मार्ग बंद आहेत शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरू असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देने आवश्यक आहे 
त्यामुळे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था अशा सर्व शाळांना २२ जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर केली आहे 
सदर माहिती सर्व विभागांना पाठविण्यात आली आहे 
 पुन्हा २४ तास पाऊस संततधार कोसळण्याची चिन्हे असल्याने बाहेर गावाहून आवागमन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा मुख्यालयाशी तुटला संपर्क 


अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा मुख्यालयाशी तुटला संपर्क 

गडचिरोली:-
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे 
जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगफुटी झाली असल्याचे चित्र दिसूत येत आहे आणि संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहेत जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा,वडसा (देसाईगंज), आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली,अहेरी, भामरागड, सिरोंचा आदी तालूक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची अपरिमीत हाणी झाली आहे . शेतकऱ्यांचे सर्व पीके पाण्याखाली तीन दिवसांपासून असल्याने पीके सडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन पुढे काय होणार या विवंचनेत सापडला आहे 
जिल्ह्यातील ३० ते ३५ मार्ग नदीनाल्याच्या पुरामुळे बंद झाले आहेत तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यांनी सुद्धा संपर्क तुटला आहे  अशा परिस्थितीत एखाद्या अति आजारी रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास संभवतो आहे 
शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणं सुद्धा शक्य नाही त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शासन देणार काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सम्पन्न


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सम्पन्न


गडचिरोली :-
राज्यात विधानसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारी करीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक, आमदार अभिजीत भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान,  माजी खासदार मारोतराव कोवासे,  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम.  पेंटारामजी तलांडी उपस्थित होते. तसेच माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी,  शहराध्यक्ष  सतीश विधाते, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष  वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, डॉ. अब्दुल हकीम, सतीश जवाजी,  दत्तात्रय खरवडे,  दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार,  वामनराव सावसाकडे, राजेश ठाकूर, कल्पनाताई नंदेश्वर, सोनलताई कोवे, रजनीकांत मोटघरे, राकेश रत्नावार, लालाजी सातपुते, अनिल कोठारे, शँकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, केसरी पा. उसेंडी मंगलाताई कोवे, पुष्पलताताई कुमरे, पुष्पाताई कुमरे, रिताताई गोवर्धन, यशवंत हलामी, संदेशाताई, विद्याताई दुग्गा, वैशालीताई कोमलकर, मंजूताई आत्राम, आशाताई वेलादि, मालताताई पुढो, प्रीती बारसागडे,आचल चलकलवार, रजनी नन्नेवार, रवींद्र चलाख, शिवराम कुंभरे, वसंत चलाख,स्वप्निल बेहरे, नीलकंठ गोहने, विनोद कुंभरे, मोहन मस्के, अनिल किरमे, खुशाल कुकुडे, हर्ष भांडेकर, रमेश कोठारे, दिवाकर निसार, ढीवरू मेश्राम, नेताजी गावतुरे, नीलकंठ निखाडे, मनोज बोरकर, मोरे साहेब, सुभाष कोठारे, राजाराम ठाकरे, मिलिंद बारसागडे, पुरुषोत्तम सिडाम, जीवनदास मेश्राम, सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

दोन दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी 


दोन दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी 


 देसाईगंज:- 
दोन दुचाकींच्या आमोरासमोरच्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना कोंढाळा गावाजवळ आज सकाळी १०.३० वाजताचे सुमारास घडली 


प्राप्त माहितीनुसार एक तरुण आपली दुचाकी क्रं.MH40BU8293 ने देसाईगंज कडे जात होता तर विरुद्ध दिशेने आरमोरी कडे एक वयस्क इसम आपल्या स्कुटी क्रं.MH 34 BT8541 ने येत असताना कोंढाळा जवळील धोंडीनाला येथे दोन्ही दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक झाली त्यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले 
 ४० वर्षीय ब्रम्हपुरी येथील वयस्क इसमाचे पाय मोडले असून निलज येथील २९ वर्षीय तरुनही गंभीर जखमी झाला आहे 
सदर घटनेबाबत गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी  झाली होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते हितेश तुपाट यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वृत्त लिहिपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाहीत.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

चिचपल्ली येथील  मामा तलाव फुटल्याने ३०० घरात घुसले पाणी ,नागरिकांचे बेहाल  नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा-पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


चिचपल्ली येथील  मामा तलाव फुटल्याने ३०० घरात घुसले पाणी ,नागरिकांचे बेहाल

 नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा-पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर, दि.२१- संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. अश्यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे ६.३० वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,’ असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे आणि महानगर उपाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राकेश बोमनवार यांनी देखील प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

मासे पकडण्याचा नाद बितला जीवावर,वर्षीय बालकाचा तलावात बुडून झाला मृत्यू.


मासे पकडण्याचा नाद बितला जीवावर,वर्षीय बालकाचा तलावात बुडून झाला मृत्यू.


देसाईगंज:

देसाईगंज तालुक्यापासून जवळच असलेल्या कोंडाळा येथे गाव तलावांमध्ये बुडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंश विजय भुते वय आठ वर्षे असे मृतक बालकाचे नाव आहे सदर घटना 20 जुलै रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकिस. आली  कोंडाळा येथील वंश भुते व घराशेजारील दोन ते तीन मुले शनिवारला दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते मात्र काही वेळानंतर सोबत असलेली मुले आपापल्या घरी आले मात्र वंश हा घरी आला नाही एकटाच तलावाजवळ राहिला गावातील काही नागरिक सतत पाणी येत असल्याने तलाव पाण्याने किती भरला म्हणून बघण्याकरिता गेले असता त्यांना तलावातील पाण्यावर एक मुलगा तरंगताना त्यांना दिसला आणि त्या मुलाचे शालेय कपडे सुद्धा तलावाच्या पाळीवर दिसले असता लगेच तलाव बघण्याकरिता गेलेल्या लोकांनी गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतक मुलाला पाण्यातून बाहेर काढले आणि घटनेच्या पंचनामा करून मृतक बालकाचे शव शवविच्छेदनाकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथे पाठवीले. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

नाबालीक मूलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एका यूवकाला अटक


नाबालीक मूलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एका यूवकाला अटक

 


कूरखेडा-
   शहरातीलच एका नाबालीक मूलीला फूस लावत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपा वरून येथील आझाद वार्ड निवासी शूभम सूरेश जौसीया वय २७ या यूवकाला आज कुरखेडा पोलीसांनी अटक केली आहे 
 नाबालीक मूलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हा यूवक अल्पवयीन मूलीचे मागील काही महिण्यापासून लैंगिक शोषण करीत होता  सदर बाब तिचा कूटूंबियाना समजताच त्यानी त्या यूवका विरोधात पोलीस स्टेशन कूरखेडा येथे तक्रार दाखल केली तक्रारीवरून आरोपी शूभम यांच्या विरोधात भारतिय न्याय संहिता ६४(१) ६४(२) एम.आय.,६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपीला गून्हा दाखल झाल्याची कूणकूण लागताच तो फरार झाला होता यावेळी पोलीसानी तत्परता दाखवत दोन दिवसातच गोपनीय सूत्रांच्या माहीतीवरून त्याला अटक केली.घटनेचा पूढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

नाल्याचे पुर पाहण्यासाठी गेलेल्या दोघांना गमवावा लागला जीव 


नाल्याचे पुर पाहण्यासाठी गेलेल्या दोघांना गमवावा लागला जीव 

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना,  एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू

 

नागभीड:-
  तालुक्यात पुर पाहण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्यात त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याची शोधमोहीम सुरू आहे.  या दोन घटना वेगवेगळ्या गावातील असल्या तरी एकाच नाल्यावरील आहेत.

पहिली घटना विलम येथे घडली. विलम येथील ऋणाल प्रमोद बावणे (११) हा मुलगा सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा या नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने हा मुलगाही नाला पार करीत असताना पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला.

दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

खा.डॉ.नामदेव किरसान यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांची घेतली भेट 


खा.डॉ.नामदेव किरसान यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांची घेतली भेट 


गडचिरोली ::  जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व कामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुसी सिंग, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, नदीम नाथानी योगेंद्र झंजाळ उपस्थित होते. 
बैठकी दरम्यान आस्टी -सिरोंचा महामार्गाचे काम जलद गतीने करने, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता नियमित बससेवा पूरविणे 
या सारख्या इतर विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणि मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापण च्या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सुविधा तातकाळ पूरविण्याच्या सूचना केल्या.


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

 शेतातरोवणीच्या कामात व्यस्त असतांना अचानक कोसळली विज एक महिला ठार तर तीन जखमी


 शेतातरोवणीच्या कामात व्यस्त असतांना अचानक कोसळली विज एक महिला ठार तर तीन जखमी

 

 भंडारा : तुमसर तालुक्यातील मांगली शेत शिवारात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. यावेळी वीज कोसळल्याने रोवणीच्या कामावर असलेल्या एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन महिला मजूर जखमी झाल्या. अन्य २ पुरुष मजूर थोडक्यात बचावले.

अंतकला हिरामण नेवारे (६०) रा. मांगली असे मृत महिला मजुराचे नाव आहे. तसेच निला नीलकंठ करंडे (६२), शशिकला साहेबलाल शरणागत (५५), विजया मुन्नालाल शरणागत (५७, सर्व रा. मांगली अशी जखमी महिला मजुरांची नावे आहेत. जखमी महिलांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच देवसर्रा गावात आलेल्या वादळाने अनेक घरांचे छत उडाले आहे. शेतकऱ्यांचे सौर ऊर्जेवरील पॅनलचे नुकसान झाले आहे.

वीज कोसळून महिला मजूर आणि शतेकरी दगावण्याची ही याच आठवड्यातील सलग तिसरी घटना आहे. जिल्ह्यात सध्या रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

कर्णकर्कश बुलेट दुचाकीच्या सायलेन्सवर पोलीसांनी चालविला बुलडोझर


कर्णकर्कश बुलेट दुचाकीच्या सायलेन्सवर पोलीसांनी चालविला बुलडोझर

 

अहेरी :-
अहेरी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्या बुलेट दुचाकीच्या सायलेन्सवर बुलडोझर चालविले आहे त्याचबरोबर कागदपत्र नसलेल्या वाहनांच्या विरोधात तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या विरोधामध्ये धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान कालपासून तब्बल 06 बुलेटवर फटाके फूटण्याचा आवाजाचे सायलेन्सर बसवल्या कारणाने कारवाईचा बडगा अहेरी पोलिसांतर्फे उगारण्यात आला आहे. त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर व कागदपत्र नसलेल्या वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्याकडून करण्यात येत आहे.
मागील काही दिवसापासून अहेरी व आलापल्ली शहरात बुलेटचा सायलेन्सर बदलवून कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना माहिती दिली. तेंव्हापासून अहेरी पोलिसांनी अशा टवाळखोर तरुणावर नजर ठेवली होती. अखेर एक-एक करत तब्बल सहा बुलेट धारकांवर त्यांनी कारवाई केली. एवढेच नव्हे तर सहा बुलेटचे सायलेन्सर काढून त्याच्यावर बुलडोजर चालविला आणि त्या सहा बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे अहेरी व अल्लापल्ली शहरातील त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
   अहेरी पोलिस विभागाच्या या धडक कारवाईमुळे बेजबाबदारपणे चालविणाऱ्या दुचाकी धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 
त्यामुळे बुलेट धारकांनी आपल्या बुलेटला कंपनीकडून मिळालेले साधेच सायलेन्सर बसवावे जेणेकरून कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना याचा त्रास होणार नाही. व पोलिसांच्या कारवाईला देखील त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दखल घेण्याचे आवाहन अहेरी पोलिसांच्या वतीने वतीने दुचाकी धारकांना करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

मोठी बातमी  मुसळधार पावसामुळे रपटा गेला वाहून, गर्भवतीला जेसीबीच्या बकेटमधून करावा लागला नाला पार


मोठी बातमी 
मुसळधार पावसामुळे रपटा गेला वाहून, गर्भवतीला जेसीबीच्या बकेटमधून करावा लागला नाला पार

 


भामरागड:-
तालुक्यातील (१०३) या मुख्य मार्गाचे काम सुरू असून नाल्यांची पुलीयांची कामे सुरू असल्याने तात्पूरत्या रपट्याची व्यवस्था करण्यात आली मात्र काल दि.१८ जुलै ला मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याच्या नाल्यावरील रपटा वाहून गेला,अवजड वाहनांची वर्दळ आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आधीच दयनीय अवस्था झालेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची आता मुसळधार पावसामुळे पुरती 'वाट' लागली आहे. या रस्त्याच्या वाईट अवस्थेचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह गरोदर मातांनाही सोसावा लागत आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील एका नाल्याचा रपटा वाहून गेल्याने प्रसूतीसाठी जाणाऱ्या एका गरोदर महिलेवर चक्क जेबीसीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडण्याची धोकादायक वेळ ओढवली.
मात्र रुग्णालयात पोहोचल्याचे त्या महिलेला समाधान मीळाले


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

मुलचेरा तालुक्यातील मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली आर्थिक मदत.


मुलचेरा तालुक्यातील मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली आर्थिक मदत.


मुलचेरा:-  तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील उपचारासाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली.आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा दिले.

यावेळी समस्त पेंदाम कुटूंबाने राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे नेहमी आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपघात ग्रस्त,आजाराने पीडित तसेच अडी-अडचणीत असलेल्या प्रत्येक गरजूला मदत करीत असतात.यावेळी नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिलीप आत्राम, भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, इंदारशाह पेंदाम हे उपस्थित होते.!


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

मार्कडेश्र्वर मंदिर जिर्णोद्धार अद्याप पूर्ण झाले नाही यांची खंत  शिवसेना(ऊबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खांडवे


मार्कडेश्र्वर मंदिर जिर्णोद्धार अद्याप पूर्ण झाले नाही यांची खंत 
शिवसेना(ऊबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खांडवे

 


चांमोर्शी -: 
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील मार्कडा देव येथे वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कंडेश्र्वर मंदिराचे जिर्णोद्धार काम गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळत आहे ते पूर्ण करण्यास भारतीय पुरातत्व विभाग व लोकप्रतिनिधी दखल घेतली याची खंत शिवसेने ( उबाठां) चे संपर्क प्रमुख शिवाजी खोंडवे यांनी मंदिर स्थळाला भेट दिली त्यावेळी व्यक्त केले 
     गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड व मुलचेरा तालुक्याचे शिवसेना ( उबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खोंडवे हे १६ व १७ जुलै या दोन दिवशीय जिल्हा दौऱ्यावर आले असता ते १७ जुलै रोजी मार्कडेश्र्वर मंदिराला भेट दिली त्यावेळी दत्ता पवार उपस्थित होते. शिवाजी खोंडवे हे १६ जुलै रोजी अहेरी, भामरागड व मुलचरा येथे शिवसेना कार्यकर्ते , पदाधिकारी व इतर नागरिकांशी संवाद साधत आगामी विधान सभा निवडणुकी संबंधी मत जाणून घेतले दरम्यान कालच हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आंबटे यांच्याशी ही संवाद साधला असून यावेळी अहेरी व गडचिरोली विधान सभा निवडणुकी साठी संभाव्य उमेदवार बाबत तालुका प्रमुख, व  अरुण कुमार धूर्वे, दिलीप सुरपाम, आदी सोबत चर्चा केली यावेळी  जिल्हा संघटक विलास ठोंबरे, दत्ता पवार आदी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे केले वाटप 


उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे केले वाटप 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आक्सापूर:- येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करुन एक नवा पायंडा पाडला आहे 
आजच्या युगात लोक आपल्या वाढदिवसाला वारे माप पैसे खर्च करतात पण काही लोक पैशाचा उपयोग गोरगरीब, होतकरू  विद्यार्थ्यांना होउन त्याचा सदुपयोग व्हावा याकरिता प्रयत्न करीत असतात 
असाच आक्सापुर येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख असलेले दर्शन वासेकर यांनी जिल्हा परिषद शाळा आक्सापुर येथील 105 विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप केले
वाढदिवसाच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या दर्शन वासेकर हे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद शाळेत नोटबुकचे वाटप करीत असतात तसेच गावातील शिवाजी चौकात वृक्ष लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे 
नोटबुक वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल तालुका काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष महेंद्र कुनघाटकर, ग्रामपंचायत सदस्य नितेश मेश्राम, अनिकेत बुरांडे काँग्रेस शाखाप्रमुख आक्सापुर, विकी शाहू, व बराच मित्रपरिवार उपस्थित होता 
   सदर कार्यक्रमात  मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दर्शन वासेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यानंतर सर्व शिक्षक वृदांनी दर्शन वासेकर याच्या कार्याचा कौतुक करुन अभिनंदन केले  बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाने भुमीअभीलेख अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन


 

काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाने भुमीअभीलेख अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन 

 

देसाईगंज-
     देसाईगंज शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी या मागणीला घेऊन काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात शहराच्या कुरखेडा टी-पाईन्टवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले असता भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांनी येत्या तीन महिण्याच्या आत सर्व्हेक्षण करून नागरीकांना सनद व आखिव पत्रीका देण्यात येणार असल्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाचे हे फलित असुन सर्व्हेक्षणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
      देसाईगंज शहर सिटी सर्व्हेच्या कामासाठी देसाईगंज नगर पालिकेच्या वतीने सन २०१८ मध्ये जवळपास ८० टक्के रक्कम शासना जमा केली आहे.मात्र भुमिअभिलेख कार्यालयाच्या वतिने सिटी सर्व्हेचे काम किमान जमा करण्यात आलेल्या रकमेच्या प्रमाणात करण्यात आलेले नाही.या संदर्भात दि.९ जुलै २०२४ रोजी उपविभागीय कार्यलयास निवेदन सादर करून यथाशिघ्र आखिव पत्रिका देण्यासंदर्भात कळविले होते.मात्र देसाईगंज शहराचा सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्याच्या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आली नसल्याने दि.१८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्टवर चक्का जाम आंदोलन करण्याचे नियोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात देसाईगंज शहरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असता भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांने पुढाकार घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला आहे.
     लेखी आश्वासनाचे पत्र देतेवेळी जिल्हा अधिक्षक  भुमी अभिलेख गडचिरोलीच्या नंदा आंबेकर,देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रभारी उपअधीक्षक एस.एन. पवार,चौकशी अधिकारी पी. एल.कुरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.आंदोलनात युवा नेते पिंकु बावणे,लिलाधर भर्रे, काँग्रेस ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, महादेव कुंमरे,भुमेश्वर शिंगाडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पुष्पा कोहपरे,रजनी आत्राम, मालता गेडाम,विमल मेश्राम, वैष्णवी आकरे,गीता नाकाडे, पुजा ढवळे,प्रमोद दोनाडकर, नितीन घुले,भुमित मोगरे, सुनिल चिंचोळकर,अमन गुप्ता,शुभम शिवुरकर,संदीप प्रधान,मनिष मेश्राम,सरस्वती मराठे,शालुबाई कोराम,प्रेमिला लिचडे आदी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये करीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

डी.टी. एड. बी.एड.बेरोजगारांना वगळून निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल त्या शाळांना टाळे ठोकणार - आजाद समाज पार्टीचा इशारा 


डी.टी. एड. बी.एड.बेरोजगारांना वगळून निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल त्या शाळांना टाळे ठोकणार - आजाद समाज पार्टीचा इशारा 

गडचिरोली : दि. १५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमीत शिक्षकांची भरती होई पर्यंत अनुसूचित जमातीतील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती करण्याचे सूचना सर्व जिल्हा परिषद सीईओ ना देण्यात आल्या आहेत तसातर हा आदेश म्हणजे सरकारी शाळांचे व शिक्षकांचे भविष्यात खाजगीकरण करण्याचा डावच आहे यावर वेगळ्या स्वरुपात राज्यव्यापी आंदोलन करूच तथापि सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती करताना संदर्भीय आदेशात क्रमांक १ मध्ये "नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करावी," हि सूचना  आजाद समाज पार्टी कदापी मान्य करणार नाही. ज्याअर्थी जिल्ह्यात अनुसूचित जमातीतील स्थानिक बेरोजगारांची एका बाजूला प्रचंड मरमर होत असताना आणि जिल्ह्यात हजारोच्या संख्येने डी टी एड, बी एड ,एम एड पदवीधारक शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवार बेरोजगार असताना प्रशासन जर ५८ वर्षापर्यंत नौकरी करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करून बेरोजगारांशी खेड मांडत असेल तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.
 सदर निवेदनाची तातडीने दखल घेऊन शासनाच्या आदेशातील निवृत्त शिक्षकांना रिक्त पदावर नियुक्त करण्याची क्रमांक १ ची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले अशा शाळांना टाळे ठोकून आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. तसेच जिल्ह्यात ८४ सरकारी शाळा शिक्षकाविना आहेत त्या ठिकाणी सुद्धा तातडीने शिक्षक नेमणूक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी आजाद समाज पार्टीचे  गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, अंकुश कोकोडे, आशिष गेडाम, सतीश दुर्गमवार, घनश्याम खोब्रागडे, महेंद्र गेडाम आदी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या


चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या


 पत्नीची हत्या करुन मृतदेहाजवळ  बसून राहिला पती

 

अहेरी: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करीत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे. ही घटना गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुक्यात १७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केला आहे. रत्ना सदशिव नैताम (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर सदाशिव लखमा नैताम (४५ रा. मांड्रा ता.अहेरी) असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, सदाशिव लखमा नैताम हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. बुधवारी १७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास दोघांत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी पतीने पत्नीच्या तोंडावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप दोन वार केले अन् ती रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळली. त्यांनतर आरोपी पती देखील रक्ताच्या थारोळ्यात तिच्याच बाजूला बसून  राहिला.
 सदाशिव नैताम याचा १८ वर्षीय मुलगा चिरंजीव नैताम हा आपल्या शेतात काम करीत असताना घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने हत्या केली. त्याला रक्ताने माखलेल्या कपड्यावर आणि रत्नाला रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याचे पाहून चिरंजीवचा चुलत भाऊ राहुल हनमंतू नैतामने शेतात धाव घेऊन चिरंजीवला माहिती दिली. मुलगा चिरंजीव घरी येऊन पाहताच त्याने एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
चिरंजीवने आपल्या आजी आजोबा आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या वडिलांना बांधून ठेवले व घटनेची माहिती दामरंचा पोलिसांना दिली. त्यांनतर लगेच रत्नाला चारचाकी वाहनाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रत्ना सदाशिव नैताम यांना मृत घोषित केले. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रयावरून व फिर्यादी मुलगा चिरंजीव सदाशिव नैताम याच्या बयानावरून गुन्हा नोंद करून अहेरी पोलिसांनी तपासात घेतला आहे.या घटनेचा पुढील तपास जिमलगट्टा उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनात दामरंचा उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 17, 2024

PostImage

वैद्यकीय अधिकारीच झाले पॉझिटिव्ह तरीही हाताला सलाईन लावून करीत आहेत रुग्णसेवा


वैद्यकीय अधिकारीच झाले पॉझिटिव्ह तरीही हाताला सलाईन लावून करीत आहेत रुग्णसेवा

 

गडचिरोली: वैद्यकीय अधिकारी मलेरिया पॉझीटीव्ह झाल्याने हाताला सलाईन लावून रुग्णसेवा करीत आहेत 
 भामरागड तालुक्यातील लाहेरी हे राज्याच्या शेवटचा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लाहेरी पलीकडे जंगल परिसरात अनेक खेड्यापाड्यांचा समावेश आहे. नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्र असून १० हजार ३४६ एवढी लोकसंख्या असलेल्या ४२ अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गावांचा या आरोग्य केंद्रात समावेश आहे. सध्या या परिसरात मलेरियाने डोकं वर काढले असून जुलै महिन्यात एका लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल अडीचशेच्या वर मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णांवर उपचार करता करता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे हे स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. या भागात दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांसोबत इतर रुग्ण वाढत असल्याने त्यांना हाताला सलाईन लावून रुग्णांवर उपचार करावा लागत आहे. लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी (गट अ) म्हणून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील डॉ. संभाजी भोकरे हे नोव्हेंबर २०१८ पासून अत्यंत खडतर परिस्थितीत सेवा देत आहेत. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी गट ब, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका आदी स्टाफ देखील कार्यरत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाहेरी परिसरातील ४२ गावांतील आणि लगतच्या छत्तीसगड राज्यातील विविध आजाराचे रुग्ण आणि महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे येथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. दोन दिवसांपासून प्रकृती बरं वाटत नसल्याने डॉ संभाजी भोकरे यांनी स्वतःचे रक्त नमुने तपासून बघितले. RDK आणि BS दोन्ही मध्ये ते Positive आढळले. सध्या दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यासोबत इतर रुग्णांवर उपचार करणे आणि ओपीडी सांभाळणे एका गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना शक्य नसल्याने त्यांना हाताला सलाईन लावून उपचार घेत बाह्यरुग्ण विभाग सांभाळावे लागत आहे. एकीकडे अचानक काही अनुचित प्रकार घडल्यास आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यावर खापर फोडले जाते. मात्र, स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाल्यावरही रजेवर न जाता स्वतःच्या हाताला सलाईन लावून उपचार घेत ओपीडी सांभाळणाऱ्या डॉ. संभाजी भोकरे यांचा करावा तेवढा कौतुक कमीच.

अश्याप्रकारे सुरू आहे उपाययोजना व रुग्णांवर उपचार
सध्या मलेरिया नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून "टार्गेट मलेरिया" विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हिवताप प्रवण क्षेत्रात कीटकनाशक फवारणी करणे, मच्छरदाणी वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे, आरोग्य विषयी जनजागृती करणे आणि गावात जाऊन रक्ताचे नमुने घेऊन दूषित आढळल्यास तात्काळ आरोग्य सेवक आणि आशा ताई रुग्णांना फर्स्ट डोस देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवतात. ओरल ट्रीटमेंट मध्ये जर ताप कमी होत नसेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करतात. मात्र, ० ते १५ वयोगटाच्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येत असल्याची माहिती डॉ संभाजी भोकरे यांनी दिली.


PostImage

Vaingangavarta19

July 16, 2024

PostImage

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचेकडून सुरेखा येरोजवार यांना आर्थिक मदत.


माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचेकडून सुरेखा येरोजवार यांना आर्थिक मदत.

अहेरी:-

महागाव बूज. येथील सुरेखा येरोजवार ही महिला मागील पुष्कळ दिवसांपासून गाठीच्या कँन्सरने ग्रासलेली होती.गेल्या आठवड्यामध्ये या महिलेच्या गाठीच्या कँन्सरचा ऑपरेशन चंद्रपूर येथील रूग्णालयात करण्यात आले. सुरेखा येरोजवार यांची घरची परिस्थिती फार हलाखिची ( गरिब ) आहे.त्यांना औषधी वगैरे घेण्यासाठी पैशाची फारच चणचण होत आहे. हि बाब जेव्हा राजे अम्ब्रीशराव महाराज यांना कार्यकर्त्यां द्वारे कळाली तेव्हा त्यांनी सुरेखा येरोजवार यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत ( दहा हजार रू. ) महागाव बूज येथील उपसरपंच संजय अलोने यांच्या मार्फत पाठवले. व पुढे कोणतीही मदत लागल्यास आपण करू असेसुद्धा म्हटलेले आहे.यावेळी येरोजवार कुटुंबियांनी राजे साहेबांचे आभार मानले.या वेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 16, 2024

PostImage

मार्कंडा (कं) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर


मार्कंडा (कं) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर

संरक्षण भिंत व प्रवेशद्वाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कंन्सोबा) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराची संरक्षण भिंत गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात कोसळली परंतू अजूनही त्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घोट या मार्गाला लागून असणाऱ्या मार्कंडा कंन्सोबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी जिल्हा परिषद ही शाळा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेच्या आवारात अंगणवाडी केंद्र आहे या अंगणवाडी केंद्रात लहान- लहान मुले येतात व शाळेच्या समोर घोट मार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खेळण्याची सुट्टी जेव्हा होत असते तेव्हा विद्यार्थी खेळताना सुसाट रोडपर्यंत धावत सुटतात त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही शाळा सुटण्याच्या वेळेला सर्व विद्यार्थी या मार्गावर येत असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अपघाता होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने सकारात्मक विचार करून या शाळेला लवकरात लवकर संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. 

मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचा वनश्री चापले यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही 

शाळेच्या प्रवेशद्वाराची भिंत बांधण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत तसा प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाकडे पाठविला आहे - बि. टि. घोडाम मुख्याध्यापक


PostImage

Vaingangavarta19

July 15, 2024

PostImage

शाळेची वाट झाली बिकट ,वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत नागेपल्लीचा दुर्लक्ष


शाळेची वाट झाली बिकट ,वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत नागेपल्लीचा दुर्लक्ष

आलापल्ली-ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. शाळे समोरील रस्त्यावर केरकचरा,असून पावसामुळे नाल्या तुंबून रस्त्यावर पाण्याचे डबके तसेच केरकचरा रस्त्यावर आला आहे. आणि सर्वत्र चिखल झाला आहे. या चिखलातून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना मात्र कसरत करावी लागत आहे.

नाली व गटारी पावसाच्या पाण्यानी भरल्याने त्यातील दुर्गंधी युक्त व घाण पाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्यात मिश्रित होत आहे. सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. आता कुठे त्या पूर्ववत व नियमित सुरू झाल्या आहेत.महिन्याभरापूर्वी बऱ्याच कालावधीनंतर शाळेची घंटा वाजली. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत, पण चिखलाचा रस्ता आडवा येतोय. या रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते.

शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून नागरिकांना त्याचप्रमाणे खास करून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 15, 2024

PostImage

नवरगाव जंगलात निलगाईची शिकार,10 आरोपींना अटक,दोन आरोपी फरार


नवरगाव जंगलात निलगाईची शिकार,10 आरोपींना अटक,दोन आरोपी फरार

 

अशोक वासुदेव खंडारे /मुख्य संपादक 

गडचिरोली : जंगलात निलगाईची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना ताब्यात घेतले आहे तर दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना दि .१३ जूलैला  नवरगाव येथे घडली. आरोपींकडून नीलगाईचे शिर, पाय, मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे
खुदकम रघुनाथ गेडाम वय 25 रा. कुऱ्हाडी, अक्षय प्रभाकर सेलोटे वय 22  रा. नवरगाव, रोशन दामोधर भोयर वय 22 रा. नवरगाव, निखिल गिरिधर ठाकरे वय 30 रा. चुरचुरा, सौरभ सुरेश आवारी वय 20 रा. नवरगाव, विक्रांत प्रकाश बोरकुटे  23 वर्ष, रा. गोगाव, संकल्प संजय उंदीरवाडे वय 24  रा. नवरगाव, संदीप कानिफ चुधरी रा. नवरगाव, आकाश प्रभाकर सेलोटे रा. नवरगाव, जगदीश देवराव थोराक रा. नवरगाव यांना अटक करण्यात आली आहे.
समीर रवींद्र मडावी (रा. कुऱ्हाडी) व ओमराज विजय राजगडे (रा. चुरचुरा) हे दोन आरोपी फरार आहेत.
त्यांना रविवारला गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी चुरचुरा चे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम, मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ, पोर्ला चे वनरक्षक विकास शिवणकर, दिभना चे वनरक्षक, गणेश काबेवार, किटाळीचे, वनरक्षक संदीप लामकासे, वनरक्षक नितीन भोयर, वाहनचालक देवीदास चापले, वनमजूर विजय म्हशाखेत्री, गिरिधर बांबोळे, छत्रपती डहाले, दुर्योधन मेश्राम, सोनू खोब्रागडे, रवि डहाले, रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली.


PostImage

Vaingangavarta19

July 15, 2024

PostImage

मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी केला पुरातून जीवघेणा प्रवास 


मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी केला पुरातून जीवघेणा प्रवास 

भामरागड:- मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी  पुरातून जीवघेणा प्रवास करत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे 
राज्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेड्यापाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचे काम केले जात आहे. याठिकाणी विविध विकास कामांना गती मिळाली असली तरी कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे अजूनही बरेच ठिकाणी मुख्य रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात दुर्गम भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नुकतेच १३ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील बंगाडी गावात ३ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून लेकीला खांद्यावर घेत तुडुंब भरलेले दोन नाले ओलांडत प्रवास केला होता आणि तिला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे छत्तीसगड सीमेवर वसलेला भामरागड तालुका जंगल, नदी-नाल्यांचा प्रदेश असल्याने हा तालुका 'इंडोमिक झोन' मध्ये मोडतो. त्यामुळे येथे नेहमीच मलेरियाचे रुग्ण आढळून येतात. लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंगाडी गावातील रविना पांडू जेट्टी हिला ताप येत असल्याने सकाळच्या सुमारास तिच्या वडिलांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर तिला मलेरिया असल्याचे कळले. त्यामुळे तिला भरती करून तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते, तसा सल्ला देखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र भरती राहून उपचार घेण्यासाठी पांडू जेट्टी तयार नव्हता. अखेर त्याने दवाखान्यातून पळ काढला. भामरागड तालुक्यात आजही अशीच परिस्थिती आहे.

मात्र उपचाराअभावी रविना जेट्टी हिच्या जीवाला धोका संभवला होता. त्यामुळे येथील आरोग्य विभागातील अधिकारी आणि तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मीकांत गोगामी आणि ग्रामपंचायतचे संगणक परिचालक ज्ञानेश्वर भांडेकर यांनी लाहेरी वरून ६ किलोमीटर अंतरावर असलेले बंगाडी गाव गाठून पांडू जेट्टीची समजूत घालून चिमुकलीला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यासाठी विनवणी केली.

त्यांनतर त्या मुलीच्या वडिलांनी होकार देताच बाप लेकीला घेऊन तुडुंब भरलेल्या दोन नाले ओलांडत सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी लाहेरी गाठले. अखेर रविना जेट्टी या चिमुकलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे यांनी दिली आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील प्राथमिक आरोग्य केंद्र
भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड सीमेवर असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्रातील जवळपास ४४ अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. गोरगरिबांना याचा मोठा त्रास संभवतो आहे


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

भरधाव दुचाकीस्वाराने उडविले बकऱ्या राखणाऱ्या इसमास


भरधाव दुचाकीस्वाराने उडविले बकऱ्या राखणाऱ्या इसमास

देसाईगंज:-
चोप - शंकरपूर मार्गावर भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने चोप येथील श्यामराव मोतीराम पर्वते वय 63 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला 
सदर इसम हा चोप गावाजवळील आग्याबोवा मंदिराच्या शेजारी शेळ्या राखत असताना दुचाकी स्वार स्वप्निल सत्यवान लांजेवार राहणार चोप हा आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून दुचावरील नियंत्रण सुटल्याने शामराव मोतीराम पर्वते यांना धडक दिली व धडक एवढी जबरदस्त होती की मृतक हा 50 ते 60 फूटापर्यंत दुचाकी बरोबर फळकटत गेला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे उपचारासाठी दाखल केले  असता डॉक्टराणी मृत घोषित केले तसेच दुचाकी स्वार हा सुद्धा गंभीर जखमी झालेला होता तेव्हा सदर रस्त्यावरून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे कोरेगाव चे कार्यक्रम आटपून वडसाकडे जात असताना दुचाकी स्वार गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला  रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे पाहून मानुसकिचा परिचय देत स्वतःच्या  गाडीत टाकून रुग्णालयापर्यंत पोहोचवून भरती केले
 सदर घटनेचा तपास देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  जगताप  यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चौधरी , ज्ञानेश्वर धनगर तसेच पोलीस हवालदार पाडी व कुमोटी हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी दिले जीवदान 


कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी दिले जीवदान 

१४ जनावरे मिळून ५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

आष्टी:-
कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी जीवदान दिले असल्याची घटना  दि.१२ जूलै रोजी घडली आहे 
गोपनीय माहितीनुसार वैनगंगा नदी पुलाजवळ  नाकाबंदी करीत असताना एक पांढऱ्या रंगाची ट्रक क्रं टी एस ०८ यु जी ७७०३ ला पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये १४ नग गोवंश दाटीवाटीने, निर्दयपणे बांधून नेत असल्याचे दिसून आले 
ट्रक चालक शेख इरफान मोहम्मद अली शेख वय २० रा.ता.जैनूर जि आदिलाबाद यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर वाहन तेलंगणा येथे नेत असल्याचे सांगितले सदर वाहनात १४ गोवंश किंमत एक लाख तीन हजार रुपये व ट्रक किंमत चार लाख रुपये असा एकूण ५ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासकामी अटक करण्यात  आली आहे 
हि कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक  एम रमेश , उपविभागीय पोलिस अधिकारी  कोकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मानकर,पोहवा  मडावी ,करमे,पोशी  डोंगरे,राजुरकर,मेदाळे, रायशिडाम, नागुलवार,राउत यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

अनखोडा येथील पांदण रस्त्याची झाली चाळण,  प्रशासनाचे दुर्लक्ष 


अनखोडा येथील पांदण रस्त्याची झाली चाळण,  प्रशासनाचे दुर्लक्ष 


आष्टी,

 चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे मात्र देखभालीअभावी या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. या पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून काही प्रमाणात मातीकाम झाले असल्याचे गावकरी सांगतात. तर काही शेतकरी रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हा रस्ता पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत. या पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अनखोडा येथील बस्टापपासून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने पाळीव पशू चारण्यासाठी जंगलात नेण्यासाठी अडचण होत असल्याने गुराखी चराईसाठी नेत नसल्याने घरीच पुर्ण पाळीव पशू ठेवून चाऱ्याअभावी ठेवले जात होते. हि समस्या सोडविण्यासाठी गावातील सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडे मांडली असता सरपंच, पोलिस पाटील यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन पांदण रस्त्याची पाहणी करून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना समजावून तात्पुरता समस्या सोडवून दिले.तर ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर छोटा पुल  फुटलेला आहे. जागोजागी रस्त्यावर पाणी जमा होऊन आहे व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना बैलबंडी नेण्यास त्रास सहन करावा लागत आहे. येथे मुरूम टाकून नुतनीकरण करावे व कायमचं अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

ट्रकने दिली दुचाकीला धडक भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी


ट्रकने दिली दुचाकीला धडक भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी


गडचिरोली:-
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज रात्रौ 7:30 च्या दरम्यान हिरापूर येथे एका दुचाकी ला ट्रकने उडविल्याने त्यात 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये 3 वर्षाचा बालकाचा समावेश आहे तर दुसरा हा युवा आहे. मृतक हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील फराळा येथील असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
अपघात झाल्या बरोबर या अपघाताची माहिती हिरापुर येथील सामजिक कार्यकर्ते रवी झरकर यांना मिळताच सावली पोलीसांना अपघाताची माहिती दिली व जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे. शेवंता कावळे 65 वर्ष, नवेगाव, हरिदास बापुजी बोरुले 30 वर्ष हे जखमी आहेत. 

.पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत असून नेमका अपघात कसा झाला याची माहिती हे वृत्त लिहे पर्यंत कळू शकली नाही.


PostImage

Vaingangavarta19

July 13, 2024

PostImage

आधार कार्ड  अपडेट करण्यासाठी लाडक्या बहिणींची आधार कार्ड सेंटर वर तूफान गर्दी.


आधार कार्ड  अपडेट करण्यासाठी लाडक्या बहिणींची
आधार कार्ड सेंटर वर तूफान गर्दी.


चामोर्शी: आधार सेंटर चामोर्शी येथील आधार कार्ड मध्ये  मोबाईल नंबर जोडणी करण्यासाठी तसेच नाव  चूक भूल ऑन लाइन करण्याच्या प्रक्रिये करीता भल्ली मोठी गर्दी दररोज होतांना दिसत आहे, संथ गतिने होत असलेले काम, आणि कागदाचा बंच हातात घेऊन नंबर लावण्याकरिता महीलांची चांगलीच गर्दी उसळली असल्याचे चित्र दिसून येते आहे 

या प्रतिक्षेत् नागरिक चांगलेच वैतागले आहेत. सदर बाब अशी की आधार कार्ड अपडेट व नावात चूक समाविष्ट करण्यासाठी तालुका परिसरातील शेकडो नागरिक आधार सेंटरवर जात  आहेत, त्यात नव्याने लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्यांच्या कड़े जुने आधार कार्ड आहेत ते अपडेट करावे लागते आहे


PostImage

Vaingangavarta19

July 13, 2024

PostImage

जिल्हा परिषद शाळेला आले दारु अड्डयाचे स्वरूप


जिल्हा परिषद शाळेला आले दारु अड्डयाचे स्वरूप 

धाबा:-
धाबा येथील जिल्हा परिषद ची शाळा दारुडे व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे 
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा सन 1888 मध्ये धाबा गावात उघडल्या गेली. एका इंग्रज अधिकाऱ्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेने अनेक अधिकारी घडविले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी या शाळेत शिकलेले विद्यार्थी एकत्र येतात. शाळेच्या इमारती समोर नतमस्तक होतात. आता मात्र या शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. कधी शिक्षणाचे माहेरघर असलेली ही शाळा आता दारुड्यांच्या आणि जुवारीचा अड्डा बनली आहे. शाळा परिसरात दारूचा रिकामा बाटलांच्या अक्षरस सडा पडलेला. ठीक ठिकाणी शौच केलेलं. शाळा सुरू व्हायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर इथं जुआरी एकत्र येतात. दारूंच्या घोटासोबतच पत्त्यांची अदलाबदली करतात. या शाळेतील शिक्षक चंद्रपूर येथून धाबा गावाला येतात.वेळेवर शिक्षक कधीच हजर होत नाही अशी पालकांची तक्रार. शिक्षक वेळेवर येत नाहीत. आलेच तर मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. शाळेला लागूनच  लहान नाला आहे. या नाल्यात विद्यार्थी खेळायला जातात. त्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? या शाळेत गरिबांची मुलं शिकतात. त्यामुळे पालकांनी तक्रार केली, ओरड केली तरीही शिक्षण विभाग त्याकडे लक्ष देतच नाही असा अनुभव पालकांना आलेला आहे. ज्या शाळेला दैवत मानल्या जाते त्या शाळेची ही दयनीय अवस्था बघून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

आदिवासी महिला सरपंचाची बनावट सही करुन बॅंकेतून काढले उपसरपंचानी पैसे 


आदिवासी महिला सरपंचाची बनावट सही करुन बॅंकेतून काढले उपसरपंचानी पैसे 

उमरखेड (दि. 10 जुलै) पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येत असलेल्या सुकळी (जं) येथील महिला सरपंच प्रणाली मस्के यांच्या नावाने असलेली डिजिटल सिग्रेचर (डीएसी) उपसरपंच शिवाजी रावते यांनी स्वतःच्या मोबाईलला जोडून ग्रामपंचायतीला येथील कार्यरत ग्रामसेवक दीपक भगत यांच्यासोबत संगणमत करून व सरपंच महिलेची बनावट सही करून बँकेतून पैसे काढले असल्याबाचतची तक्रार उमरखेड पोलिसात सरपंच महिलेकडून दाखल करण्यात आली असून या तक्रारीमुळे उमरखेड तालुक्यात - एकच खळबळ उडाली आहे.तालुक्यातील येथील 2023 सुकळी (ज) 2024 या वर्षात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एसटी प्रवर्गातून थेट महिला सरपंच म्हणून मस्के या निवडून आल्या व त्यांनी सरपंच म्हणून पदभार देखील स्वीकारला पदभार स्वीकारल्या नंतर ग्रामपंचायतीच्या आर्थीक व्यवहाराच्या खात्यात नियमानुसार बदल झाला.

ग्रामविकासासाठी आलेला निधी उपसरपंच शिवाजी रावते याने स्वतःच्या मोबाईलवर ओटीपी घेऊन काढून घेतला तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या फाईलवर सरपंच यांच्या बनावट सहह्या मारल्या व तसेच महात्मा गांधी ग्रामीन रोजगार हमी योजनेमध्ये सरपंचाच्या बनावट सह्या करुन भ्रष्टाचार केला.

हा सर्व प्रकार सुकळी ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर कनचाले, अरबिंद बडेराव, राहुल चानखेडे, यांनी सरपंच यांच्या निदर्शनास आणून दिला त्यामुळे सुकळी (ज.) वेथील सरपंच प्रणाली मस्के यांनी याबाबत वरिष्ठांना लेखी निवेदन देऊन कळविले तसेच बनावट सह्या करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

केल्यामुळे शासनाची

फसवणूक झाली असून याबाबतीत सखोल चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करण्यात याची यासाठी दिनांक 1 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), यवतमाळ उपजिल्हाधिकारी मनरेगा यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या तसेच उपसरपंच शिवाजी रावते यांची पत्नी रंजना रावते यांच्या नावे घरकुल योजनेचा लाभ माझ्या बनावट सहीने घेऊन त्या पोटी संगणमताने दोन हप्ते उचलले ही हप्त्याची रकम उचलण्यासाठी जिओ ट्रेकिंग अधिकारी व इतर अधिकारी यांना हाताशी धरून बनावट सह्यांचे आधारे शासन निधी हडपविला असून संगणमताने झालेल्या या प्रकारामुळे सुकळी (जं) येथील सरपंचाने थेट उमरखेड पोलिसात उपसरपंच शिवाजी रावते ग्रामसेवक दीपक भगत व उपसरपंच यांच्या पत्नी रंजना रावते, यांच्या विरोधात

उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

दोन दुचाकीच्या धडकेत एक युवक ठार, दोन गंभीर


दोन दुचाकीच्या धडकेत एक युवक ठार, दोन गंभीर,

एटापल्ली; तालुक्यातील तोडसा फाट्याच्या वळणावर दोन दुचाकीच्या सामोरासमोर झालेल्या जबर धडकेत रावजी मेस्सो गावडे, (वय २६ वर्ष) रा तोडसा, जागीच ठार झाला असून उलगे तिम्मा (वय ४५ वर्ष) रा जवेली (खुर्द) व शिवाजी कोत्तु वेळदा (वय ४१ वर्ष) रा तोडसा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांत दोन युवकांचा मृत्यू झाल्याने तोडसा गावात शोककळा परतली आहे.
रावजी गावडे, शिवाजी वेळदा व अन्य एक असे तिघे (ता.०९ जुलै) मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान तोडसा येथून एम एच ३३ आर २४०८ क्रमांकाच्या दुचाकीवरून एटापल्लीच्या दिशेने येत होते, त्याच वेळी उलगे तिम्मा व अन्य एक असे दोघे विरुद्ध दिशेने एटापल्लीवरून एम एच ३३ यु २९२५ क्रमांकाच्या दुचाकीवरून जवेली गावाकडे जात होते, यावेळी तोडसा फाट्यावरील वळणावर या दोन्ही दुचाकीत समोरासमोर भीषण धडक झाली, यात रावजी गावडे याच्या छातीला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर उलगे तिम्मा व शिवाजी वेळदा या दोघांनाही पायाला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात

हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी (ता.१० जुलै) बुधवारी दुपारी बारा वाजता घटनेचा पंचनामा केला असून मृतक रावजी गावडे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात केली जाणार आहे, रुग्णालयात एकाच वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याने जखमींवर वेळीच उपचार करण्यात व मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीवर वरिष्ठ पातळीवरून कारवाही करून वैद्यकीय सेवा सक्षम करण्याची मागणी तालुका भाजप अध्यक्ष तथा तोडसाचे उपसरपंच प्रशांत आत्राम व नागरिकांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू , नदीवर पूल असता तर वाचला असता जीव 


सर्पदंशाने युवकाचा मृत्यू , नदीवर पूल असता तर वाचला असता जीव 


- पर्यायी मार्गाचा गंभीर रुग्णांनाही फटका
 
ता. प्र / कुरखेडा  दि. ०९ : तालुक्यातील सावरगांव (येगंलखेडा) येथे शेतात काम करतांना सर्पदंश झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. करण संजय उईके (वय २२) रा.बोरटोला भरनोलि ता. अर्जुनी मोर जि.गोंदिया असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण हा कुरखेडा तालुक्यातील सावरगाव (येंगलखेडा) येथे शेती कामानिमित्त आला होता. दरम्यान सोमवार ८ जुलै रोजी शेतात काम करतांना त्याला सर्पदंश झाला. लागलीच त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याला मृत्युने कवटाळले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करत काही क्षणांपूर्वी पोहचले असते तर रुग्ण दगावला नसता असे सांगितले. युवा शेतकऱ्याचा अशा मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नदीवर पूल असता तर वाचला असता जीव

करन ल सर्पदंश झाल्याने रुग्णवाहिका बोलावण्यात आली मात्र पुलाभावी ते पोहचण्यास अधिक विलंब लागणार असे सांगतात आल्याचे कळते. त्यामुळे सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता खासगी वाहनाने कुरखेडा येथे हलविले मात्र पर्यायी मार्गाचा अधिकचा अंतर आणि लागणारा वेळ यामुळे रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाला आणि करन चां मृत्यू झाला, नदीवर पूल असता तर जीव वाचला असता असे बोलण्यात येत आहे.
कुरखेडा येथील सती नदीवरील जुना पूल पडून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान शेजारीच नदीतून रपटा तयार करण्यात आला होता मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने ४ जुलै रोजी वाहून गेला. त्यामुळे आता कुरखेडा तालुका मुख्यालय गाठण्यासाठी आंधळी - वाघेडा - मालदुगी - गोठणगाव फाटा असा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र हे अंतर आता अधिक असल्याने या मार्गाने तालुका गाठण्यासाठी अधिकचा वेळ लागत असल्याने याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे. वेळेवर रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही अशी ओरड नागरिकांची आहे


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

ट्रक- कारच्या भीषण अपघातात २ जण ठार, तिघे जखमी


ट्रक- कारच्या भीषण अपघातात २ जण ठार, तिघे जखमी

गडचिरोली : नागपूरहून लग्न समारंभ आटोपून परत येत असताना ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने दोन जण ठार, तर तिघे जखमी झाले. ही घटना आज 10  जुलै ला
 पहाटे पाचच्या सुमारास नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ घडली.

मृतांची आणि जखमींची नावे :
दिलीप परसवाणी (वय ५५) व महेक जितेंद्र परसवाणी (वय ४२, दोघेही. रा. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात जितेंद्र परसवाणी (वय ४५) आणि त्यांची दोन मुले गौरव परसवाणी (वय १७) व उदय परसवाणी (वय १०) हे जखमी झाले आहेत.

जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर
देसाईगंज येथील पत्रकार जितेंद्र परसवाणी हे पत्नी महेक, दोन मुले गौरव व उदय आणि नातेवाईक दिलीप परसवाणी यांच्यासह नागपूरला नातेवाईकाच्या विवाहासाठी गेले होते. विवाह समारंभ आटोपून मध्यरात्री परत येत असताना नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ त्यांची कार आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली. यात दिलीप परसवाणी आणि महेक जितेंद्र परसवाणी हे जागीच ठार झाले, तर जितेंद्र परसवाणी, गौरव परसवाणी व उदय परसवाणी हे जखमी झाले. तिघांनाही ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आज दुपारी नागपूरला हलविण्यात आले. या घटनेमुळे देसाईगंज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 9, 2024

PostImage

माकडाने मारली भिंतीवर उडी,एका तरुणाचा भिंत कोसळून गेला बळी!


माकडाने मारली भिंतीवर उडी,एका तरुणाचा भिंत कोसळून गेला बळी!


भंडारा :- पावसामुळे घराची भिंत ओली होती.त्यातच अचानकपणे शेतशिवारातून आलेल्या माकडांच्या कळपातील एका माकडाने भिंतीवरून उडी मारली. यात भिंत कोसळून मलब्याखाली दबून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. योगेश खुशाल देशमुख, रा. कन्हांडला, ता. लाखांदूर असे मृताचे नाव असून ही घटना, रविवार ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली.

शौचालय व राहत्या घराच्या मधात असलेल्या मोकळ्या जागेत ही भिंत कोसळली. मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांतील मातीने बनविलेल्या बहुतांश घरांचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. रविवारी योगेश स्वतःच्या राहत्या घराच्या घरगुती उपयोगातील शौचालय व मोठ्या भावाच्या मातीने बनविलेल्या घराच्या मध्यात असलेल्या मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त पडलेल्या विटा व दगड निवडत होता. यावेळी अचानक शेतशिवारातून गावात प्रवेश केलेल्या माकडाने योगेशच्या मोठ्या भावाच्या राहत्या घरावर उडी घेतली.

माकडाने उडी घेताच योगेशच्या अंगावर भिंत पडली. या घटनेत योगेश गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती योगेशच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या लक्षात येताच भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्या योगेशला बाहेर काढत घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

सह भागिदारांची फसवणूक केल्याने बहीण व भावास अटक


सह भागिदारांची फसवणूक केल्याने बहीण व भावास अटक


गडचिरोली, 8 जुलै
येथील सोनापूर शिवारातील सर्व्हे क्र. 18/1 मधील शेतजमीन आपल्या सहभागीदारांना अंधारात ठेवून त्या जमिनीला अकृषक करुन परस्पर विक्री केल्याप्रकरणी जयश्री चंद्रिकापुरे (निकोसे) व विशाल निकोसे या दोन भावंडांना आज, 8 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. 
प्राप्त माहितीनुसार, जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या भावंडासह येथील कंत्राटदार नागनाथ (राजू) भुसारे आणि मनोज सुचक यांनी सामूहिकरित्या मौजा सोनापूर शिवारातील सर्वे क्र. 18/1 मधील 0.51.59 हेक्टर आर शेतजमीन जमीनमालक सुरेश नैताम यांच्याकडून खरेदी केली. आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगून जमीन खरेदीसाठी निकोसे भावंडांनी भुसारे यांच्याकडून 24 लाख व सूचक यांच्याकडून 24 लाख 13 हजार असे एकूण 48 लाख 13 हजार रुपये घेऊन जमीन मालकाला दिले व जमीन चारही सहभागीदारांच्या नावाने रजिस्ट्री करुन घेतली. जमीनीची खरेदी झाल्यानंतर नागनाथ भुसारे व मनोज सूचक यांना कुठल्याही प्रकारची भनक लागू न देता जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या दोन भावंडांनी सहभागीदार भुसारे आणि सूचक यांच्या खोट्या सह्या करुन त्यांच्या संमतीचे संमतीपत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे 8 डिसेंबर 2022 रोजी सादर केले व सदरची जमिन अकृषक करुन घेतली. त्यानंतर या जमिनीचे प्लॉट पाडून सहभागीदारांच्या परवानगीशिवाय जयश्री चंंद्रिकापूरे व विशाल निकोसे यांनी सदर जमीनीतील प्लॉट शितल राहुल ठवरे, डॉ. राहुल रमेश ठवरे, मंगला राजेश भट्टलवार व राहुल मधुकरराव निलमवार या चार जणांच्या नावाने करारनामा करुन त्यांच्याकडून प्रती प्लॉट 40 लाख रुपयेप्रमाणे विक्री केली. 
यासंदर्भात सहभागीदार भुसारे व सुचक यांना आपली फसवणूक करुन परस्पर निकोसे भावंडांनी जमीन विकल्याचे माहित झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याशिवाय त्यांच्याविरोधात न्यायालयातही धाव घेतली. याप्रकरणी आज, गडचिरोली पोलिसांनी निकोसे भावंडांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. 
यासंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्याशी संपर्क साधला असता, निकोसे भावंडांविरोधात चार दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला असून आज त्यांना अटक करण्यात आली असून, उद्या 9 जुलै रोजी त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
--------------


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

पोस्टात खाता उघडण्याचे  प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक  यांचे लाडक्या बहिणींना आवाहन


पोस्टात खाता उघडण्याचे  प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक  यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

सिरोंचा :-
संपूर्ण महाराष्टात चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महा एक हजार पाचसे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यात पोस्ट ऑफिस जवळ येऊन महिला मोठया संख्येने  कागदपत्रे तयार करून बँक खाते आवश्यक असल्याने सिरोंचा पोस्ट ऑफिसमध्ये महिलांचे मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
प्रत्येक तालुक्यात राबविले जात असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत वय २१ते ६५ वयोगटातील महिलांना शासनाच्या माध्यमातून दर महा १५०० रुपये दिले जाणार आहे.या योजनेचे अंमलबजावणी १जुलै २०२४पासून सुरु करण्यात आली आहे.
त्या नुसार विवाहित,अविवाहित घटस्फोटीत, विधवा,परितक्यता, निराधार, महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने पोस्ट कार्यालयातून खातेही उघळले जात असल्याने पोस्ट खात्यातील कर्मचारी.समिती, कलाम शेख, वाणी कोठारी, सुधाकर गडपल्लीवार, वकील चव्हाण,  बादेश,अल्ताब शेख, अंजल तल्ला व प्रवर डाक अधीक्षक यांनी जास्तीत जास्त पोस्ट खात्यातील I PPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक )खाता उघळून महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक सुभाष जावळे यांनी आवाहन केले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

शालेय पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या इसमाने केला ९ वर्षीय बालीकेचा शाळेतच विनयभंग


शालेय पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या इसमाने केला ९ वर्षीय बालीकेचा शाळेतच विनयभंग 

अकोला:-

एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या मदतनीसाने एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाइकांनी सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर ५० वर्षीय आरोपीविरूध्द विनयभंगासह पोस्को अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिल्हा परिषद शाळेत इयता चौथ्या वर्गामध्ये नऊ वर्षीय चिमुकली शिकते. विनयभंग करणारा आरोपी व त्याची पत्नी शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेत खिचडी तयार करुन वाटप करतात. ४ जुलैला दुपारी आरोपी चंद्रमणी चव्हाण पिडित चिमुकलीला खिचडी तयार करण्याच्या खोलीत घेऊन गेला व तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. हा प्रकार चिमुकलीने तिच्या घरी नातेवाईकांना सांगितल्यानंतर या प्रकरणाची तक्रार सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार सिव्हील पोलिसांनी ५ जुलै ला आरोपी चंद्रमणी चव्हाण याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४,७५ व सहकलम ७,८ पोस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

गुन्ह्याचा पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे करीत आहेत.

चिमुकली म्हणाली शाळेत जात नाही आरोपीने मुलीचा विनयभंग केल्यामुळे ती भयभित झाली होती. दोन दिवस झाले ती शाळेत का जात नाही, असे आइने विचारले असता तीने घटनेचा उलगडा केला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली.

मुख्याध्यापकाने पाठवला अहवाल शाळेत घडलेल्या प्रकारामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने तातडीने शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेत आरोपीचे काम बंद करुन त्याच्यावर कारवाइचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती आहे


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात" एक पेड मा के नाम"अंतर्गत वृक्षरोपण


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात" एक पेड मा के नाम"अंतर्गत वृक्षरोपण

 

आष्टी,
 भारत देश व जगभरातील सर्व नागरिकांना मातृत्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "एक पेड मा के नाम" हा उपक्रम सुरू केला आहे त्यानिमित्ताने आष्टी येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे परिसरात जांभूळ, आवळा, साग, नीम, जाम अशा विविध प्रजातीच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांचे वृक्षारोपण प्राचार्य डॉ.पी के सिंग, डॉ.अपर्णा मार्गोनवार, रासेयो प्रमुख प्रा.सुबोध साखरे, प्राध्यापिका पल्लवी शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
 या आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, तर रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा. सुबोध साखरे, डॉक्टर अपर्णा मारगोनवार, डॉक्टर एम पी सिंग,डॉक्टर प्रदीप कश्यप, डॉक्टर दीपक नागापुरे, डॉक्टर सोनाली ढवस, डॉ. प्रकाश राठोड, प्रा. महेश सीलमवार,प्रा.पल्लवी शहा, शुभांगी डोंगरे, विजुभाऊ खोब्रागडे, पोर्णिमा गोहणे, उषाबाई माहूरपवार, रमेश वागदरकर व रा. से. यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 7, 2024

PostImage

स्व.लक्ष्मीबाई कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 च्या सभेचे आयोजन.


स्व.लक्ष्मीबाई कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 च्या सभेचे आयोजन.

आलापल्ली:-

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्व महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) लागू करण्यासंदर्भात दिनांक 6 जुलै 2024 ला दुपारी 3 वाजता  स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय, आलापल्ली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

 संस्थाध्यक्ष, प्राचार्य आणि प्राध्यापक वृन्दात, नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करताना अनेक समस्या भेडसावत होत्या.  त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदरणीय कुलगुरू महोदय यांच्या अध्यक्षतेखाली, प्र-कुलगुरू यांच्या प्रमुख उपस्थित सभा झाली 
या सभेला मार्गदर्शन करतांना भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये झालेले बदल , नवनवीन धोरण लागू करून त्यांची केलेली अंमलबजावणी आणि आता पूर्णपणे नव्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) लागू करतांना विद्यार्थी एडमिशन, प्राध्यापक वर्कलोड, अतिरिक्त प्राध्यापक झाले तर होणाऱ्या समस्या यावर प्रश्नोत्तर चर्चा घेऊन त्यांचे निराकरण प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या कडून करण्यात आले. 

या सभेचे अध्यक्ष दीपक दादा आत्राम  हे होते तर, प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , बबलूभैया हकीम, सिनेट सदस्य डॉ बूटे, प्राचार्य डॉ. मंडल  विचार मंचावर उपस्थित होते.  प्राचार्य डॉ. मनोरंजन  मंडल ,  प्राचार्य डॉ. टिपले ,  प्राचार्य डॉ. बूटे प्राचार्य डॉ. लाड , प्राचार्य डॉ. सोनकुवर  हेही उपस्थित होते.

 या सभेचे सूत्रसंचालन प्रा . राजेश गर्गम, प्रास्ताविक भाषण सिनेट सदस्य डॉ बुटे  यांनी केलेत तर आभार प्रा अजय बरसागडे  यांनी मानले. 
या सभेच्या यशस्वीतेसाठी स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय. आलापल्लीचे संस्थाध्यक्ष दिपक दादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अमित कोहपरे  यांच्या नेतृत्वात सर्व प्राध्यापक वृन्द आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


PostImage

Vaingangavarta19

July 6, 2024

PostImage

संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच उज्वल भविष्यातील यशाचा मार्ग सुकर .-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच उज्वल भविष्यातील यशाचा मार्ग सुकर .-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 

 ब्रम्हपूरी :-
ज्ञानातुन मिळणारे सामर्थ्य हे चिरकाल टिकते. मिळालेले हे सामर्थ्य अंगिकारून समाजातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती व विद्यार्थी यांनी संघर्षातुनच उज्ज्वल भविष्य घडविल्याचा इतिहास आहे. यशाचे शिखर गाठण्यासाठी परिस्थिती नाही तर उत्तम मनस्थिती, दृढ आत्मविश्वास, प्रगल्भ इच्छाशक्ती यांची नितांत गरज आहे. आपणा सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभे असुन संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या यशाचा मार्ग सुकर करावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ब्रम्हपूरी मतदारसंघातील ब्रम्हपूरी, सावली , सिंदेवाही येथील १०वी व १२वी च्या परिक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, मोटीव्हेशनल स्पीकर सचिन बुरघाटे हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजीत वंजारी, काॅंग्रेस नेते देविदास जगनाडे, ने.ही. महाविद्यालय माजी प्राचार्य डॉ नामदेव कोकोडे, ॲड. गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प.माजी सभापती विलास विखार, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सतीश डांगे, सुरज मेश्राम यांनी प्रास्ताविक डॉ राजेश कांबळे तर आभार खेमराज तिडके यांनी मानले


PostImage

Vaingangavarta19

July 6, 2024

PostImage

कोडपे ग्रामस्थांनी केला नक्षल गावबंदीचा ठराव ,व चार भरमार बंदुका पोलीसांच्या केल्या स्वाधीन 


कोडपे ग्रामस्थांनी केला नक्षल गावबंदीचा ठराव ,व चार भरमार बंदुका पोलीसांच्या केल्या स्वाधीन 

अहेरी:-
नारगुंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोडपे ग्रामस्थांनी नक्षल गावबंदीचा ठराव संमत करून चार भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत 
दि.५ जुलै  ला गावातील लोकांना एकत्र करून बैठक घेण्यात आली आणि नक्षल गावबंदीचा ठराव मांडला तेव्हा सर्व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ठराव मंजूर केला.यापुढे नक्षलवाद्यांना कोणतेही सहकार्य करायचे नाही, त्यांच्या प्रलोभनाला बळी पडायचे नाही आणि गावात येऊच द्यायचे नाही असा संकल्प करुन गावातील चार भरमार बंदुका पोलीसांच्या ताब्यात दिल्या.
गावात नक्षल बंदीचा ठराव केल्याने पोलीस स्टेशन नारगुंडाचे प्रभारी अधिकारी सतिश बेले यांनी कोडपे ग्रामस्थांचे आभार मानले आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 6, 2024

PostImage

खळबळजनक: पिता पुत्रानी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करून केला खून


खळबळजनक: पिता पुत्रानी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करून केला खून 

मूल (चंद्रपूर) :- मूल तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी गावामध्ये आज, शनिवार दिनांक- ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास भयावह घटना घडली. घराशेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर राजू बोदलकर यांनी पिपरे यांना केबल बाजूला करा असे सांगितले, मात्र केबल बाजूला कर असे का म्हटले म्हणून पिता-पुत्रांनी राजू यांच्यावर हल्ला केला. गुरुदास पिपरे व त्यांचा २१ वर्षीय मुलगा सूरज गुरुदास पिपरे यांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय राजू शेषराव बोदलकर यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला. या हल्ल्यात बोदलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांचा राग अनावर झाल्याने ते आरोपींना पकडण्यासाठी जमले. यावेळी आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागले असते तर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार गावात घडला असता. मात्र मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी बाप-लेकाला ताब्यात घेतले


PostImage

Vaingangavarta19

July 5, 2024

PostImage

घोट- मार्कंडा (कं) रोडवरील खड्यांने घेतला दुचाकीस्वाराचा जीव 


घोट- मार्कंडा (कं) रोडवरील खड्यांने घेतला दुचाकीस्वाराचा जीव 

खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार

आष्टीः खड्डा चुकवितांना नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल झाडावर आदळून एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना मार्कंडा कंन्सोबा- घोट मार्गावरील बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दिनांक ५ जूलै रोजी सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली. मानवेंद्र नरेंद्रनाथ रॉय वय (३८) रा. गांधीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मानवेंद्र नरेंद्रनाथ रॉय हे आपल्या  दुचाकी क्रमांक (एम.एच. ३३ एल ५७५१) ने दिनांक ५ जूलै रोजी सकाळी ७:४५ वाजताच्या दरम्यान गांधीनगर येथून घरून आपल्या मुलास  गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथील कारमेल ॲकाडमीला सोडून परत गावाकडे जात असताना बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने सरळ मोटारसायकल झाडाला आदळून मानवेंद्र हे जागीच ठार झाले.

 १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा त्यांच्या पश्चात आप्तपरिवार आहे
सदर रोडवरील खड्डे किती जीव गेल्यानंतर शासनास जाग येणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

गावकऱ्यांनी केला रेतीतस्करांवर जिवघेणा हल्ला , एक ठार तर दोन गंभीर 


गावकऱ्यांनी केला रेतीतस्करांवर जिवघेणा हल्ला , एक ठार तर दोन गंभीर 


 चंद्रपूर : -
राजुरा तालुक्यातील
धोपटाळा येथे गावकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे रेती तस्करी करणाऱ्यांवर अचानक हल्ला चढविला. दरम्यान दगडफेक केली. यामध्ये ट्रॅक्टरवरील एक जण ठार झाला तर अन्य चारपैकी दोन जण जखमी झाले.

रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी गुरुवारी सकाळी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. मोहम्मद शहादत खान (५२) असे मृतकाचे नाव आहे. जखमींमध्ये ट्रॅक्टर मालक देविदास येवले (४७) व मजूर कैलास कुळसंगे (३०) यांचा समावेश आहे. तर रोशन बावणे (२८), बंडू कुकर्डे (४०) हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

प्राप्त माहितीनुसार, राजुरा येथून पाच जण ट्रॅक्टरने सास्तीजवळील धोपटाळा नाल्यावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास रेती तस्करीसाठी गेले होते. ही बाब हेरून आधीच गावकऱ्यांनी त्यांना पकडून आणण्याचा बेत आखला होता. ट्रॅक्टर रेती घाटावर पोहचली. यानंतर गावकऱ्यांनी अचानक त्यांच्यावर धावा केला. ट्रॅक्टरमध्ये सुमारे दोन ते तीन घमेले रेती टाकण्यात आली होती. यानंतर गावकऱ्यांनी ट्रॅक्टरसह सर्वांना धोपटाळा येथील चौकात आणले. नंतर आमच्या गावातून रेती चोरता असे म्हणत अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

यामध्ये एक जण छातीवर दगड लागल्याने खाली कोसळला. ट्रॅक्टरमधील इतर दोन जण जखमी झाले होते. जखमी व इतर दोघांनी जमिनीवर कोसळलेल्या मजुराला ट्रॅक्टरमध्ये टाकून राजुरा ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने रेती तस्करांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा रेती तस्करीचा विषय ऐरणीवर आला आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार,आरोपी फरार


मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार,आरोपी फरार

चंद्रपूर :-
शहरातील माध्यभागी असणाऱ्या आझाद बगीचा जवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये जुन्या वैमनशातून मनसेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर जवळपास दुपारी 2.00 च्या दरम्यान अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली असून गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनं ची चमू घटनास्थळी दाखल झाली व अमन अंदेवार यांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर नागपूर ला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणाने शहरात दहशत पसरली आहे.

मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर झालेल्या गोळीवर प्रकरणाला मागील सन 2020 मध्ये बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरीया याची भरदिवसा भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्या घटनेशी जोडले जातं आहे, बहुरिया हत्त्या प्रकरणात अमन अंदेवार यांच्यासह त्यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार, आल्फ्रेड उर्फ बंटी लॉजिस्ट अँथोनी, प्रणय राजू सैगल, बादल वसंत हरणे, अविनाश उमाशंकर बोबडे सर्व राहणार बल्लारपूर यांचा समावेश होता, या हत्येला दारुतस्करी आणि कोळसा तस्करीचे कारण असल्याचे म्हटल्या जातं होते. दरम्यान हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अमन अंदेवार याने व्हाट्सएप स्टेटसवर ‘जंगल जंगल ही रहेगा, मगर शेर बदल जायेगा’ अशी पोस्ट टाकली होती त्यामुळे सुरज बहुरिया यांचा सुनियोजित कट होता हे स्पष्ट होते, या घटनेनंतर सुरज बहुरिया गैगने अमन अंदेवार यांना ठार करण्याचा मन्सूबा जाहीर करून खुलं आव्हान केलं होतं, हा वचपा काढण्यासाठी मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी याचं सुरज बहुरिया समर्थकांनी अमन अंदेवार यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार यांच्यावर याचं रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये गोळीबार केला होता आणि आता त्याची पुन्हा पुनरवृत्ती झाली असून आता अमन अंदेवार यांच्यावर त्याचं प्रकरणातून गोळीबार झाला की आणखी कुठले कारण आहे हे पोलीस तपासात समोर येईल मात्र या गोळीबाराने शहरात दहशतीचे वातावरण आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

अशिक्षित महीलांसह सरसकट मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा - माजी जि.प.सदस्या रुपाली पंदिलवार


अशिक्षित महीलांसह सरसकट मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा - माजी जि.प.सदस्या रुपाली पंदिलवार 

आष्टी:-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली मात्र कागदपत्रे ज्या महिलांकडे आहेत अश्या महीलांना त्याचा लाभ मिळणार परंतू ज्या महीला अशिक्षित आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट दिसत आहे 
सदर योजना एक जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली असून मतदान करताना १८ वर्षे व लाभ देण्यासाठी २१ वर्षे का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे
६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार परंतू गाव खेड्यातील या वयाच्या महीला मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहेत आणि हेच वास्तव आहे 
 अशिक्षित महीलांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत मग त्या महीला लाभापासून वंचित राहतील तेव्हा तेव्हा गोरगरीब, निराधार, अश्या महीलांना सरसकट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रुपाली पंदिलवार यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

सती नदीवरील रपटा खचला ,पर्यायी मार्ग क्रमन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन 


सती नदीवरील रपटा खचला ,पर्यायी मार्ग क्रमन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन 


कुरखेडा :- येथील कोरची मार्गावर असलेल्या सती नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. सदर काम सुरू असतांना या मार्गावरील वाहतुक नदीमधून तात्पुरत्या स्वरूपात बाधंण्याता आलेल्या वळण मार्गावरून करण्यात आले होते. मात्र सदर वळती मार्ग हा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने आता खचला आहे. सदर मार्गाची वाहतुक इतर मार्गाने वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी २२ जून रोजी पारित केले होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ वरील कुरखेडा-कोरची मार्गावरील सती नदीवरील जुना पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर मार्गावर वाहतुक सुरळीत असावी यासाठी नदीमधून रपटा तयार करून वाहतुक सुरू होती. मात्र सदर नवीन पुलाचे बांधकाम वेळेत पुर्ण होऊ न शकल्याने व सदर तयार करण्यात आलेला रपटा हा पुराच्या पाण्याने वाहुन जाण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २२ जून रोजी आदेश निर्गमित केले होते. सदर मार्गावरील वाहतुक २९ जून पासून बंद करून इतर पर्यायी मार्गाने वळती करण्याचे सांगितले होते. दरम्यान सदर रपटा हा नदीमधील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने ४ जुलै रोजी काही प्रमाणात खचला आहे. सदर मार्गावरून पुर्णतः वाहतुक आता बंद पडली असुन पर्यायी मार्गाचा वापर करून तालुकास्थळ नागरिकांना गाठावे लागणार आहे.
‘असा’ असेल पर्यायी मार्ग
हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा
जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र. ३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना' बहिणी खूष पण भाऊजी नाराज ?


महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना' बहिणी खूष पण भाऊजी नाराज ?

चामोर्शी  : अर्थमंत्री अजित पवार  यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत फार्म भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे तर एकमेकींना महिला  तू लाडकी बहिणचा फार्म भरली का ? असे विचारत आहेत तर आष्टी शहरात व परिसरात सलून दुकानात, पानटपरीवर पुरुषांमध्ये वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. पुरुष वर्ग एकमेकांना म्हणतात की सरकार लाडकी बहिण योजना चांगली काढली आहे माझी बायको तर मला सरकार माझा भाऊ मला महिन्याला १५०० रुपये देणार आहे म्हणून मस्त खुष आहे म्हणून सांगतो आहे तर दुसरा पुरुष म्हणतो की सरकार भाऊ बहिणीसाठी चांगली योजना काढली पण आम्हाला  (भाऊजी) म्हणून एक योजना काढायला पाहिजे अशी खमंग चर्चा सुरू आहे या होणाऱ्या चर्चेवरून सरकारच्या बहीण सरकार भाऊ वर खुष आहेत आणि भाऊजी मात्र नाराज आहेत यावरून असे दिसून येत आहे
आता तर दाखल्यांचे अटी सुद्धा कमी करण्यात आल्याचे ना.अजीत पवार यांनी विधिमंडळात सांगितले आहे व कोणताही अधिकारी या कामात कुचराई केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व सदर योजनेचा फार्म भरण्यासाठी मुद्दत वाढविण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

शाळेतून स्वगावी जात असलेल्या बालकास ट्रकने चिरडले


शाळेतून स्वगावी जात असलेल्या बालकास ट्रकने चिरडले 

एकुलता एक मुलावर काळाचा घाला,अख्खे गाव गहिवरले 

 गडचिरोली, 

 शाळेतून सुटी झाल्यानंतर सायकलने परी जाणाऱ्या विद्यार्थ्यांला ट्रकने चिरडल्याची घटना काल, 3 जुलै रोजी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला-बसा मार्गावर बुधवारी (दि. 3) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. ऋतुराज प्रशांत शिवणकर (वय 11, रा. वसा) असे मृतक विद्यायांचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, ऋतुराज शिवणकर हा पोला येथील शिवाजी हायस्कूल शाळेत पाचव्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे तो बुधवारी (दि. 3) सकाळी वसा येथून

सायकलने पोर्ला येथे शाळेत गेला, सायंकाळी 5 वाजता सुटी झाल्यानंतर तो आपल्या वर्गमित्रांसह सायकलने स्वगावी वसा येथे जात दरम्यान, गडचिरोलीवरून होता. आरमोरीकडे जात असलेल्या टीएस 09/ युई 4590 क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने वसा बसस्थानकानजीक त्याच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ऋतुराजचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रकच्या मागील चाकात सापडला. यात

त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून तो जागीच ठार झाला. तर दुसरा वर्गमित्र किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वसा व पोलों येथील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प पडली होती. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक व चालकास ताब्यात घेतले. अपघातामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास आरमोरी पोलिस करीत


PostImage

Vaingangavarta19

July 3, 2024

PostImage

संभाजी भिडे तोंड आवरा, नाहीतर मीश्या सावरा - विद्या लोलगे 


संभाजी भिडे तोंड आवरा, नाहीतर मीश्या सावरा - विद्या लोलगे 

सोलापूर:-
 संभाजी भिडे आपल्या तोंडाला आवरा अन्यथा स्वतःच्या मिश्या सावरा असा इशारा सोलापूर विधवा संघटना अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्या विद्या लोलगे यांनी दिला आहे 
वटपौर्णिमेच्या दिवशी नटया आणि ड्रेस घातलेल्या स्त्रियांनी पुजेला जाऊ नये, असे विधान शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. भिडे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून महिलांनी भिडे गुरुजींना सज्जड दम दिला असून 'भिडे तोंड आवरा, नाहीतर मिशाही कापू' असाही इशारा दिला आहे.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांवरून अनेक वेळा वादाचे प्रसंग ओढवत आहेत. अशातच त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. मात्र या वेळी भिडे यांच्या वक्तव्याचा सोलापूर शहरातील विधवा संघटनेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे यांनी निषेध करीत महिलांच्या वतीने त्यांना सज्जड दम दिला आहे. विधवा महिलांसाठी वर्ल्ड ऑफ वुमेन्स संघटनेच्या स्थापनेची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भिडेंना इशारा दिला. भिडे यांनी यापुढे महिलांबद्दल वादग्रस्त विधान करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापून टाकतील, असे म्हटले आहे.

भिडे गुरुजी म्हणाले...

"वटसाकित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनीही जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं," असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. तसेच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे, असेही संभाजी भिडे म्हणाले आहेत. मात्र संभाजी भिडे यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 3, 2024

PostImage

कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल केले लंपास- सायबर सेलकडे तक्रार दाखल


कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल केले लंपास- सायबर सेलकडे तक्रार दाखल

 मोबाईल परत करावे अन्यथा खावी लागेल जेलची हवा.


मुख्य संपादक/अशोक खंडारे 

कोंढाळा (देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल एका अज्ञात चोरट्याने ग्रामपंचायत कार्यालयातून चोरून नेले असल्याची घटना काल, मंगळवार दिनांक-२ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने अज्ञात चोरट्या विरुद्ध देसाईगंज पोलीस पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत तक्रार दाखल केली असून त्वरित सायबर सेलकडे प्रकरण वलती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण
योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता गावातील नागरिकांची झुंबड
रहिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र व इतर कागद
पत्रांसाठी कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयात सकाळ पासून ते सायंकाळपर्यंत दिसून येत आहे. अशातच काल, मंगळवारी कार्यालयातील कर्मचारी कामात व्यस्त असतांना टेबलावर ठेवलेला ग्रामपंचायतीचा अँड्रॉइड मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. सदर मोबाईल हा मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात खरेदी करण्यात आला होता. एखादा प्रमाणपत्र काढण्यासाठी मोबाईलवर ओटीपी जात असतो. त्यामध्ये ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असून इतरांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार गेली असल्याने 'तो' मोबाईल चोरटा कोण? हे लवकरच कळणार आहे. ज्या व्यक्तीने मोबाईल चोरून नेला असेल, त्यांनी कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयात आणून देण्याचे करावे; अन्यथा ग्रामपंचायत आवारातील लावण्यात आलेल्या सिसीटिव्ही कॅमेरा च्या माध्यमातून शोध घेऊन संबंधित चोरट्याला जेलची हवा खावी लागेल; अशी माहिती ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांनी दिली


PostImage

Vaingangavarta19

July 2, 2024

PostImage

शुल्लक वादातून आई आणि मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या


शुल्लक वादातून आई आणि मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या

 नागपूर :
 आई आणि मोठ्या
भावासोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालून घरातील साहित्याची तोडफोड करणाऱ्या युवकाला शांत करताना गळा आवळल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २८ जूनला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आई आणि भावाला अटक केली आहे.

प्रयाग उर्फ बंटी श्रीराम गौर (३४) रा. कुशीनगर जरीपटका असे या भांडणात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो रागीट स्वभावाचा होता. तो मोबाईल शॉपीत काम करायचा. तर प्रभात श्रीराम गौर (३६) आणि मीरा श्रीराम गौर (६०) दोघे रा. कुशीनगर जरीपटका अशी आरोपी आई आणि भावाची नावे आहेत. जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक प्रयागचा लहान भाऊ सुशांतचे दोन मित्र आणि त्यांच्या पत्नी घरी आल्या होत्या. बोलताना प्रयागचा सुशांतसोबत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात प्रयागने मोठ्या भावाला लग्नात मिळालेली आलमारी फोडली.

यावरून त्याच्या आईने प्रयागला विचारना केली असता त्याने रागाच्या भरात रिमोट टीव्हीला फेकून मारला. तो घरातील साहित्याची तोडफोड करीत असल्याचे पाहून त्याच्या आईने प्रयागचे पाय धरले आणि मोठा भाऊ प्रभातने त्याच्या गळा पकडला असता त्याचा गळा आवळल्या गेल्याने तो जागेवरच निपचित पडला. या प्रकरणी प्रयागचा भाऊ सुशांत श्रीराम गौर (३२) याने दिलेल्या सुचनेवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी आई आणि भावाविरुद्ध कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 29, 2024

PostImage

आईलाही नाही आली नव महीण्याच्या बाळाची कीव,बाळाला विष पाजून स्वतःचे संपविले जीवन


आईलाही नाही आली नव महीण्याच्या बाळाची कीव,बाळाला विष पाजून स्वतःचे संपविले जीवन 

 

चंद्रपूर 

ज्या जीवाला पोटात 9 महिने आनंदाने वाढवलं त्याला जन्म दिल्यानंतर 9 महिन्यांनी पोटच्या गोळ्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ९ महिन्यांच्या बाळाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला.इतकंच नाही तर वैतागलेल्या आईनं स्वतः विष प्राशन करुन आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे.
ही धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील शेगाव इथे घडली आहे. देश इतका पुढे गेला मात्र अजूनही घरातल्या लक्ष्मीला हुड्यांसाठी किंवा घरातल्या कामावरुन छळण्याचे प्रकार कमी झाले नाहीत. हे धक्कादायक वास्तव आहे चंद्रपुरातलं. पल्लवी पारोधे असं मृत 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. तिने कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं.

पल्लवीने कौटुंबिक वादातून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आपल्यानंतर बाळाचं कसं होणार या विचाराने तिने आपल्या 9 महिन्यांच्या मुलालाही विष पाजलं. मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या दुर्घटनेत आईचा मृत्यू झाला. मुलाच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेच्या आईनं पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन हुंडाबळीची तक्रार दाखल झाली आहे. नवरा आणि दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हुंड्यासाठी पल्लवीचा छळ होत होता अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस तपास करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 28, 2024

PostImage

उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांमुळेच पतसंस्थेची प्रगती- अनिल पाटील म्हशाखेत्री


उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांमुळेच पतसंस्थेची प्रगती- अनिल पाटील म्हशाखेत्री

पतसंस्थेच्या वतीने उत्कृष्ट ग्राहकांचा सत्कार


 गडचिरोली:-
 ज्या पतसंस्थेत समाधानी ग्राहकांची संख्या जितकी जास्त, तितकी त्या संस्थेला दीर्घकालीन व शाश्वत यश मिळण्याची संधी जास्त असते. दी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला सुरुवातीपासूनच उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांची साथ लाभल्यामुळे तिची उत्तरोत्तर प्रगती होत गेल्याचे गौरवोद्गार  दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हाशाखेत्री  यांनी  पतसंस्थेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून काढले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्थेच्या मानद सचिव श्रीमती सुलोचनाताई वाघरे, ज्येष्ठ संचालक पंडित पुडके  उपस्थित  होते.
  अनिल पाटील पुढे म्हणाले , दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 28 जून 1993 रोजी झाली असून  संस्थापक अध्यक्ष स्व . चुडाराम मुनघाटे,संस्थापक मानद सचिव  स्व. खुशालराव वाघरे विद्यमान  संचालक मंडळ व सेवक वर्ग यांच्या  अथक परिश्रमातून ही पतसंस्था अगदी कमी कालावधीत नावारूपास आली.  आज या पतसंस्थेच्या जिल्ह्यात ९ शाखा असून सर्व शाखा सीबीएस प्रणालीने जोडल्या आहेत. ग्राहक सेवेचा दर्जा पाहून संस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001-2015 हे मानांकन सुद्धा प्राप्त झाले आहे.
   मागील पाच वर्षाच्या काळात ( २०१७-१८ ते २०२३-२४ ) संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 2 कोटी वरून 5.39 कोटी वर गेले. एकूण ठेवी 49.62 कोटीवरून 117.85 कोटीवर पोहोचल्या, एकूण गुंतवणूक 33.33 कोटीवरून 56.42कोटीवर पोहोचली. कर्ज वाटप 31.30, कोटीवरून 100.18 कोटीवर पोहोचले. संस्थेचा स्वनिधी 12.04 कोटी वरून 25 कोटीवर पोहोचला आहे. वरील  आकडेवारीवरून संस्थेचा आर्थिक पाया अत्यंत भक्कम असून, संस्थेची आर्थिक भरभराट झालेली दिसून येते.
 संस्थेच्या उत्तरोत्तर आर्थिक वाटचालीबद्दल संस्थेला सलग दोनदा 2022 व  2023 चा बँको पतसंस्था  ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन लिमिटेड   अमरावती तर्फे " गडचिरोली जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने" वेळोवेळी सन्मानित केले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. 
     यावेळी अनिल पाटील यांचा 62 वा वाढदिवस  केक कापून साजरा करण्यात आला. तसेच   शाल  व श्रीफळ देऊन संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार  करण्यात आला.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा शेषराव येलेकर, संचालन शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर  तर उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक  दिलीप  उरकुडे यांनी मानले. 
   


PostImage

Vaingangavarta19

June 28, 2024

PostImage

गडचिरोली' जिल्ह्यातील तीन शाळा अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन 


‘गडचिरोली' जिल्ह्यातील तीन शाळा अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन 

आष्टी येथील एका शाळेचा समावेश,पण शहरात अनाधिकृत शाळा असल्याचे फलक नाही 


गडचिरोली :-

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळा शासन मान्यताप्राप्त असणे अनिवार्य आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात काही शाळा अधिकृतपणे शासनाची मान्यता न घेताच सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्या शाळांवर द्रव्यदंडाच्या शिक्षेसह कायदेशीर कारवाई होईल. पण अशा कोणत्याही अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अनधिकृत असलेल्या शाळांमध्ये धानोरा तालुक्यातील पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल स्कूल मोहगांव, गडचिरोली तालुक्यातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टी या शाळांचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाने कळविले. याव्यतिरीक्त इतर काही अनधिकृत शाळा सुरु झाल्या असल्यास अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेवू नये. पालकांनी पाल्याचे प्रवेश घेतेवेळी शासनाची मान्यता आहे किंवा नाही याची खात्री करावी, तसेच गडचिरोली जिल्हाात अशा अनाधिकृत शाळा निर्दशनास आल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली यांना लगेच लेखी स्वरुपात माहिती द्यावी असे आवाहन शिक्षणााधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब पवार व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी केले आहे
जिल्ह्यातील ज्या शाळा अनाधिकृत आहेत तशा शाळांचे फलक लावण्याचे जिल्हा प्रशासनाने गटशिक्षणाधिकाऱ्या कळविले आहे पण आष्टी शहरात मुख्य ठिकाणी शाळा अनाधिकृत असल्याचे फलक लावण्यात आले नाही फलक लावले असतेतर या अनाधिकृत शाळेबद्दल पालकांना माहिती मिळाली असती असे पालकवर्गातून बोलले जात आहे


PostImage

Vaingangavarta19

June 27, 2024

PostImage

श्री सद्गुरु साई बाबा विज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन


श्री सद्गुरु साई बाबा विज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन


 आष्टी :-

येथील स्थानिक श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  राजश्री शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, मुख्य मार्गदर्शक  म्हणून रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. सुबोध साखरे, डॉ.अपर्णा मारगोणवार, डॉ. एम पी सिंग, डॉ.कश्यप, डॉ. सोनाली ढवस, डॉ.प्रकाश राठोड, डॉ. दीपक नागापुरे, प्रा. महेश कुमार सिलमवार, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. राहुल आवारी उपस्थित होते. मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक प्रा. सुबोध साखरे यांनी शाहू महाराज यांचे आरक्षणाविषयी धोरण व त्यांच्या सामाजिक कार्यांच्या उल्लेख प्रबोधनातून केला. राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार हे आपल्या समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार वाचणे,समजणे व त्यानुसार विद्यार्थ्यांनी कृती करणे हे खरे अर्थाने काळाची गरज आहे असे विचार प्राचार्य डॉ.पी के सिंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश कुमार सिलमवार तर आभार प्राध्यापिका जया रोकडे यांनी मानले. यावेळी मार्गदर्शक प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

June 27, 2024

PostImage

पोलीसांनी टाकली घरात धाड,मिळाला ७७ हजारांचा अवैध मुद्देमाल


पोलीसांनी टाकली घरात धाड,मिळाला ७७ हजारांचा अवैध मुद्देमाल 

आलापल्ली:-
पोलीसांनी एका अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या घरात धाड टाकली असता त्यांच्या घरामध्ये ७७ हजारांचा अवैध मुद्देमाल मिळून आला 
मौजा आल्लापल्ली येथील सचिन लक्ष्मण मिसाळ हे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहेरी पोलीसांनी धाड टाकली असता त्यांच्या घरामध्ये २१६ नग बिअर किंमत ५४ हजार रुपये ,२५० निपा देशी दारू किंमत २० हजार रुपये,१० बंपर काचेचे बिअर किंमत ३ हजार रुपये असा एकूण ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला व आरोपी विरुद्ध कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल केला आहे 
अहेरी पोलीसांनी सदर कारवाई केली असल्याने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 21, 2024

PostImage

दोन ट्रकच्या भीषण अपघातात ,एक ट्रक चालक जागीच ठार 


दोन ट्रकच्या भीषण अपघातात ,एक ट्रक चालक जागीच ठार 

आष्टी:-
येथून जवळच असलेल्या कोनसरी व सोमनपल्ली गावांच्या मधोमध दोन ट्रकच्या भिषण अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाले  ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे 
गडचिरोली कडून ट्रक क्रं.CG 04 NJ 4834 हा आष्टी कडे येत असताना सुरजागड चे मेटल घेउन जाणारा ट्रक क्रं एम एच ४० सी एम ५६८५ ह्याने जोरदारपणे धडक दिल्याने समोरच्या गाडीतील चालक जागीच ठार झाला  समोरच्या ट्रक चा क्याबीन पुर्णपणे विस्कळीत झालेला आहे 
जखमी असलेल्या ईसमांचा अजूनही पत्ता लागलेला नाही मृतकाचे नाव विकास कुमार बिंद वय २४ रा.अलाहबाद असे आहे
सदर घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशन ला मीळताच पोलीस निरीक्षक विशाल काळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले व मृतकास आष्टी रुग्णालयात पाठविलें शवविच्छेदन करण्यात आल्या नंतर मृतदेह त्याच्या नातलगांना देण्यात येणार आहे


PostImage

Vaingangavarta19

June 20, 2024

PostImage

गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी : जिल्हा प्रशासनाचे आवाहन


गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी :
जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चिचडोहचे ३८ दरवाजे आज खुले करणार 

गडचिरोली,दि.19(जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे सर्व 38 दरवाजातून 190.23 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे या नदीकाठाने राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
गोसीखुर्द धरणातून 40 घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने दिनांक 29 जून 2024 पर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा 179.800 मी. पर्यंत वाढेल, त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
    वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी 691 मीटर असून त्यावर 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. चिचडोह बॅरेजमध्ये दिनांक 18 जून 2024 रोजी पाणी पातळी 178.90 मी. व पाणीसाठा 11.285 द.ल.घ.मी. इतका आहे. 
*या गावांनी आहे धोका* : गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपूरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनकोडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी,साखरा, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा,विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ.
वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.  
0000


PostImage

Vaingangavarta19

June 19, 2024

PostImage

तीन असाह्य अल्पवयीन भगीनींचा घेतला नराधमांनी फायदा,एक  मुलगी गर्भवती झाल्याने फुटले बींग


तीन असाह्य अल्पवयीन भगीनींचा घेतला नराधमांनी फायदा,एक  मुलगी गर्भवती झाल्याने फुटले बींग


 मुंबईः- नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे 3 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 1 वर्षापासून वेगवेगळे नराधम आरोपी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. वडील व्यसनाधीन असल्याने या 3 अल्पवयीन मुलींबाबत ही शोकांतिका आली.

या मुलीचे वडील पिढीत मुलींच्या आईला मारहाण करत होते, त्यामुळे त्यांची आई या मुलींना सोडून गेली. मुलींनाही त्यांचे वडील मारहाण करत होते. त्यामुळे गेल्या वर्षी 17 वर्षाची मुलगी घरातून निघून गेली. याच काळात दत्ता क्षीरसागर वय 35 वर्ष या नराधम आरोपीने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला आसरा दिला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला भेटण्यासाठी तिच्या दोन लहान बहिणी तिच्याकडे येत होत्या. या काळात नराधम दत्ता क्षीरसागर याने एका बहिणीवर अत्याचार केला. त्याचे दोन साथीदार निशाद खान वय 19 वर्ष आणि सय्यद अशा दोन व अन्य आरोपींनीदेखील मुलींवर अत्याचार केले. मागील वर्षापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे एक मुलगी गर्भवती राहिली.


अखेर या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. यातील दत्ता क्षीरसागर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांत सुमारे 400 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.

यावेळी पोलिसांनी नराधम आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 19, 2024

PostImage

विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडसा दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार : आ.कृष्णा गजभे


विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडसा दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार : आ.कृष्णा गजभे 


गडचिरोली - :
विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार असे प्रतिपादन आ.कृष्णा गजभे यांनी केले आहे 

त्यांनी नुकताच (देसाईगंज) वडसा येथे दिक्षा भुमीच्या सौदर्यीकरण पायाभरणी कामाचे भूमिपूजन केले  आरमोरी विद्यानसभेचे आमदार कृष्णा गजभे यांनी सदर दिक्षाभुमी च्या कामांकरिता लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला  देसाईगंज वडसा येथील दिक्षाभुमीचा विकास मोठ्या झपाटयाने झाला पाहीजे कारण की विश्वरत्न भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही भुमी पावण झालेली आहे  त्यामुळे या स्थळांना विशेष महत्व प्राप्त करून देण्याकरीता मी स्वतः विशेष लक्ष देणार आहे. असे आमदार कृष्णा गजभे यांनी सांगीतले. सौदर्गीकरणाच्या उदघाटनाप्रसंगी मंडळाच्या सचिव ममता जांभुळकर अध्यक्षा कविता मेश्राम सदस्य शामला राऊत, सरिता बारसागडे, मारोती जांभुळकर, प्रकाश बारसागडे ' संजय नंदेश्वर, पुरुषोत्तम बडोले आदि सहीत उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

June 19, 2024

PostImage

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना १ जुलैपासून लागू होणार : राज्य सरकारचा निर्णय


महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना १ जुलैपासून लागू होणार : राज्य सरकारचा निर्णय


वृत्तसंस्था / मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने या योजनेचा वार्षिक प्रीमियम ६० टक्क्यांनी वाढवून तो ३ हजार कोटी रुपयांहून अधिक केला आहे. नवी योजना १ जुलैपासून लागू होणार आहे.

नव्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळेल. २०१२ मध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी या योजनेत इतका मोठा बदल करण्यात आला. या योजनेसाठी राज्य सरकारने नुकतीच निविदा प्रक्रिया निकाली काढली आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शूरन्सची निवड करण्यात आली आहे. राज्यातील १२.३ कोटी कुटुंबांसाठी सरकार प्रतिकुटुंब १ हजार ३०० रुपये प्रीमियम भरणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये ५.७ लाख कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला.

दरम्यान, मागील वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील विमा रक्कम १.५ लाख रुपयांनी वाढवून ५ लाखांची घोषणा केली होती, पण हे लागू करण्यात आले नव्हते. आता विधानसभा निवडणुकांआधी महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाला ही योजना लागू करण्यासाठी पत्र लिहून परवानगी मागितली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर सरकारने ही योजना अंतिम टप्प्यात आणली. मिळालेल्या महितीनुसार आता ही योजना १ जुलैपासून नव्या स्वरुपात पुन्हा लाँच होणार आहे.

नवी योजना लागू होण्याआधी विमाधारकांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि एक लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने हे कागदपत्र जमा करणे गरजेचे नसून सर्व नागरिकांसाठी समान योजना लागू करण्याचे सांगितले आहे. आता उत्पन्नांचीही कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत १ हजार रुग्णालये होती. मात्र, आता वाढवून ती १ हजार ९०० करण्यात आली आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 18, 2024

PostImage

एका वृद्धाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला सांगाडा


एका वृद्धाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला सांगाडा


भद्रावती - :
शहरापासून एका वृद्धाचा  हाडाचा सांगाडा पिपर बोडी येथील जंगलात गळफास घेतला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. कपडे व गळ्यातील माळ यावरून मृतदेहाची ओळख पटली. ही घटना दिनांक १५ रोज शनिवारला उघडकीस आली. प्रभाकर दादाजी नक्षीने वय ७२ वर्ष राहणार हनुमान नगर असे मृतकाचे नाव आहे.
 प्रभाकर हे दिनांक २६ मार्च पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुंटूबियानी इतर शोधाशोध केली परंतु ते मिळाले नाही. त्यानंतर त्यांची बेपत्ता असल्याबाबतची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली गेल्या तीन दिवसांपूर्वी भद्रावती येथील काही नागरिक पिपर बोडीच्या जंगलात लटकलेल्या अवस्थेत सांगाडा असल्याची चर्चा करत होते ही माहिती ठाणेदार बिपिन इंगळे यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांनी पिपर बोडी गावापासून सहा किमी अंतरापर्यंत जंगल शोधून काढले असता त्यांना एका झाडावर अंगावर कपडे असलेला सांगाडा दिसला अंगात असलेले कपडे, गळ्यातील माळ व चप्पल यावरून बेपत्ता असलेल्या तक्रारीचा शोध घेण्यात आला. सचिन नक्षीने याचे वडील असल्याची माहिती मिळाली गळ्याला दोर बांधून  गकफास घेतल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. ही घटना तीन महिन्यापूर्वी असल्याने शरीरावरील संपूर्ण मास गळून पडले होते. वृद्धाचा सांगाडा हा फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासीसाठी पाठविला असून आत्महत्या की घातपात याचा शोध भद्रावती पोलीस घेत आहेत


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

खरचं होणार काय अवैध मुरूम  उत्खनन प्रकरणी २३५ कोटी रुपयांचा दंड 


खरचं होणार काय अवैध मुरूम  उत्खनन प्रकरणी २३५ कोटी रुपयांचा दंड 

 

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

 गडचिरोली दि.१७ :  वडसा (देसाईगंज) या रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात मागील तीन दिवसापासून  मोठ्या क्षेत्राची तांत्रिक मोजणीची कार्यवाही  सुरू होती. आज ती पूर्ण झाली असून  संबंधित जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस  तब्बल २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध उत्खननाकरिता २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम का आकारणी करू नये, याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख   तहसीलदार संजय पवार यांच्या निगराणीखाली ही कारवाई केली गेली. तहसिलदार हेमंत मोहरे यांनी दंड आकारणीच्या नोटीसा बजावल्या . सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय भांडारकर, कनिष्ठ अभियंता श्री इंदुरकर, शाखा अभियंता अभिजीत शिनगारे, भूमी अभिलेखचे अभिलेखापाल व्हि. एल. सांगळे व त्यांच्या चमूने अवैध उत्खननाची तांत्रिक मोजणी करून तहसीलदार  गडचिरोली यांच्याकडे  अहवाल सादर केला त्यानुसार पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे.

अहवालानुसार खरपुंडी येथे सर्व्हे क्रमांक ५३/२/अ आणि ५४ मध्ये १३ हजार २५७ ब्रास मुरूम उत्खननाकरिता ११ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये,  लांजेडा स.क्र. १४/२६ आणि २४० मध्ये ९ हजार ६९९ ब्रास करिता ८ कोटी ३४ लाख११ हजार ४०० रुपये, माडेतुकूम स.क्र.१८ मध्ये १८ हजार ३५८ ब्रास करिता १५ कोटी ७८लाख ७८ हजार ८०० रुपये, गोगाव स.क्र.१८ मध्ये २० हजार ७७५ ब्रास करिता १७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये, अडपल्ली स.क्र.१८ मध्ये ५० हजार १७६ ब्रास करिता ४३ कोटी १५ लाख१३ हजार ६०० रुपये, काटली स.क्र. १४५ आणि २७९मध्ये ५४ हजार ५७५ ब्रास करिता ४६ कोटी ९३ लाख ४५ हजार रुपये, मोहझरी स.क्र. २५, ३२,२१,९व १५ मध्ये ६२ हजार ६१७ ब्रास करिता ५३ कोटी ८५ लाख ६ हजार २०० रुपये आणि साखरा येथे स.क्र. १०२ व १५२ मध्ये ४३ हजार ८९४ ब्रास करिता ३७ कोटी ७४ लाख ८८ हजार ४०० रुपये असे एकूण २ लाख ७३ हजार ३५१  ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची गणना करण्यात आली आहे.  याविषयी  तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
 
000


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

आष्टी पोलीसांनी अवैध दारूसह बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त 


आष्टी पोलीसांनी अवैध दारूसह बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त 

दोन आरोपी ताब्यात 

आष्टी:-
येथील पोलीसांनी अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी ताब्यात घेतले आहे 
चंद्रपूर जिल्ह्यातून आलापल्ली कडे जात असलेल्या आयशर ट्रक क्रं.एम एच ४० व्हाय १९०५ ला नाकाबंदी करून चेक केले असता सदर वाहनांमध्ये १५००० निपा  देशी दारू किंमत १२००००० लाख रुपये व ट्रक किंमत दहा लाख रुपये असा एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे 
ट्रक चालक राजेश फुलनसिंग यादव वय २७ रा जीमलगट्टा ता.अहेरी व अमोल बाजीराव मैस्कर वय ३५ रा. आलापल्ली ता अहेरी यांना ताब्यात घेण्यात आले व कलम ६५,(अ),९८(२),८३ मदाका नुसार कारवाई करण्यात आली आहे 
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक  मानकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक वनवे,पोहवा मडावी,करमे ,नापो शडमेक,पोशी डोंगरे,तोडासे,राजुरकर,मेदाळे, रायशिडाम  आदिंनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

आता ३०२, ३०७ सह अनेक कलमा होणार इतिहास जमा  १ जुलै पासून प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये आईपीसी ऐवजी बीएनएस लागू


आता ३०२, ३०७ सह अनेक कलमा होणार इतिहास जमा 
१ जुलै पासून प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये आईपीसी ऐवजी बीएनएस लागू

 

 

अमरावती : -
 हत्येकरिता ३०२, प्राणघातक हल्ल्याकरिता ३०७, बलात्काराकरिता ३७६ अशा फौजदारी कलमा अगदी जनसामान्यांनाही पाठ झाल्या होत्या, हे तीन अक्षरी आकडे भुवया उंचाविणारे होते. मात्र आता या भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसी च्या या कलमा इतिहास जमा होणार आहेत. सर्व पोलिस स्टेशनमध्ये १ जुलैपासून भारतीय न्याय संहिता म्हणजेच बीएसएस लागू होवून वेगळ्या कलमा दाखल कराव्या लागणार आहे. त्यामूळे पोलिसांनाही आरोपीविरुध्द गुन्हे दाखल करताना वारंवार उजळणी करावी लागेल.

केंद्रीय गृह मंत्रालयाने १ जुलै ही तारीख अधिसूचित केली, जेव्हा भारतीय दंड संहिता आयपीसी, फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा अस्तित्वात नाहीसे होईल आणि फौजदारी गुन्ह्यांचे सर्व प्रथम माहिती अहवाल एफआयआर नोंदवले जातील. भारतीय न्याय संहिता बीएनएस अंतर्गत अभियोग आणि खटला अंतर्गत नोंदवलेल्या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय नागरी संरक्षण संहिता बीएनएसएस द्वारे विहित केलेल्या वेळेनुसार पुढे जाईल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड भारतीय पुरावा कायद्या अंतर्गत कायदेशीररित्या स्वीकार्य पुरावे बनतील.

महत्त्वाचे म्हणजे, बिएनएसएसमध्ये सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यातील घटनास्थळाची अनिवार्य फॉरेन्सिक तपासणी करण्याची तरतूद केली आहे, परंतु १ जुलै २०२४ पासून देशभरात एकसमान अंमलबजावणी होणार नाही. बिएनएसएस च्या कलम १७६ (३) मध्ये ज्या राज्यांनी त्यांची संबंधित फॉरेन्सिक क्षमता अद्याप विकसित केलेली नाही, त्यांच्यासाठी पाच वर्षाच्या वाढीव कालावधीची तरतूद केली आहे.

पुर्वीची आयपीसी कलम -

३०२, ३०४ (अ), ३०४(ब), ३०६, ३०७, ३०९, २८६, २९४, ५०९, ३२३, ३२४, ३२६, आरडब्ल्यू ३४, आरडब्ल्यू १४९, ३२५, ३५३, ३३६, ३३७, ३३८, ३४१,५४, ३५४ अ, ३५४ (ब), ३५४ (सी)

आता झालेली बीएनएस -

१०३, १०६, ८०, १०८, १०९, २२६, २८७, २९६, ७९, ११५, ११८(१), ११८(३), ३(५), १९०, ११८(२), १२१, १२५, १२६, ७४, ७५, ७६, ७७

गुन्हा (थोडक्यात) -

हत्या करणे, निष्काळजीपणामुळे इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले, घरगुती हिंसेतून विवाहितेचा मृत्यु, आत्महत्येकरिता कारणीभूत ठरणे, हत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, घातपाताकरिता स्फोटक लावणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तवणूक करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून लैंगिक छळ, मारहाण करुन जखमी करणे, शस्त्राने जखमी करणे, घातक शस्त्राने जखमी करणे, दोन पेक्षा अधिक व्यक्ती गुन्ह्यात सामील असणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गुन्हा करणे, स्वतहून दुसऱ्याला गंभीर जखमी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, एखाद्याची वाट रोखणे महिलेचा विनयभंग करणे महिलेकडे वाईट नजरेने पाहणे, महिलेवर हल्ला चढवून तिला निवस्त्र करणे, एखाद्या महिलेला तिचे खासगी कार्य करताना.


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर अवैद्य जनावर तस्करी व दारूचा साठा जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर अवैद्य जनावर तस्करी व दारूचा साठा जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुर यांची बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर अवैद्य जनावर तस्करी व अवैधरीत्या दारूचा साठा करणाऱ्या विरुध्द धडक कारवाई करत ३१ लाख ७९ हजार ५०० रुपये चा मुद्देमाल जप्त केले.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले. त्या अनूशंगाने पो. नी. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी पथक नेमूण त्यांना अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले १६ जून २०२४ संपूर्ण चंद्रपूर जिल्हा परीसरात अवैद्य धंद्यावर रेड व पेट्रोलींग करित असताना माहीती मिळाली की गोवंश जनावराना कत्तलीसाठी निर्देयतेने कोंबून वाहना मध्ये भरून त्यांना चंद्रपूर मार्गे घेवून जाणार आहे.

अशा माहिती वरून मौजा लोहारा ते चंद्रपूर रोडवरील हनुमान मंदीरा जवळ पंचासह नाकाबंदी केली असता एक अशोक लेयलैंड कपंणीचा दोस्त प्लस वाहना भरधाव वेगाने येत असताना दिसला त्यास ईशारा करून थांबविले असता सदर वाहनाची पंचासमक्ष पहाणी केली असता सदर वाहना मध्ये निर्दयतेने कोंबलेले व त्यांचे पाय, मान दोरी ने बांधून चारा पाण्याची कसलीच व्यवस्था नसलेले एकूण ०७ जिवंत गोवंशीय गाय जनावरे किमंत ७० हजार रू. व एक जूना वापरता अशोक लेयलेंड कपंणीचा दोस्त प्लस कं. एम एच ३४ बि झेड ०१०४ किमंत ५ लाख ५० हजार रू. असा एकुण ६ लाख २० हजार चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आला.

तसेच अवैद्य धंद्यावर रेड व पेट्रोलींग करित असताना माहीती मिळाली की, मौजा सावली येथुन गडचीरोली जिल्हयात तीन वेगवेगळया वाहनामध्ये देशी विदेशी दारूचा साठा अवैधरित्या बाळगुन वाहतूक करित आहे अशा बातमी वरून मौजा पारडी ते सावली रोडवरील रुद्रापूर फाट्या जवळ नाकाबंदी केली असता दोन ईसम ज्युपीटर मो. सा. ने पायलेटींग करित असता मिळून आले व मुखबिरने सांगीतले प्रमाणे तिन वेगवेगळया वाहना मध्ये एकुण ५९ पेटी देशी विदेशी दारूचा मुदेमाल एकुण किमंत २ लाख १४ हजार ५०० रू. व दारू वाहतूकी करिता वापरलेले तिन चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहन किमंत २३ लाख ४५ हजार रू असा एकुण २५ लाख ५९ हजार ५०० रू. चा माल एकुण सात आरोपी संगणमत करून वाहतूक करित मिळूण आल्याने त्यांचे कडुन जप्त करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन सावली यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु. शा. चे सपोनि मनोज गदादे, पोहवा दिपक डोंगरे, पोशि गोपीनाथ नरोटे, अमोल सावे स्थागुशा चंद्रपूर यांनी केले.


PostImage

Vaingangavarta19

June 12, 2024

PostImage

राजीरप्पा धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी ,नववधू झाली अवघ्या चार दिवसांत विधवा


राजीरप्पा धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी ,नववधू झाली अवघ्या चार दिवसांत विधवा 


अहेरी:-
 गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील प्रसिद्ध बिनागुंडाचा राजीरप्पा धबधब्याच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली  
 भामरागड तालुक्यातील सुप्रसिद्ध बिनागुंडा येथील राजीरप्पा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ११ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. नवनीत धात्रक (२८) रा.चंद्रपूर आणि बादल हेमके (३९) रा.आरमोरी हल्ली मुक्काम भामरागड असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नाव आहेत
अबूझमाड परिसरात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवर बाराही महिने वाहणारा राजिरप्पा धबधबा या भागाचा वैभव आहे. त्यामुळे या मोसमात निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. लाहेरी वरून पुढे १८ किलोमीटर खडतर प्रवास असून देखील बरेच पर्यटक दुचाकी आणि स्थानिक पातळीवरील चारचाकी भाड्याने घेऊन धबधबा पाहण्यासाठी जातात.
भामरागड तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नवनीत धात्रक पत्नी मयुरी धात्रक,ताई नेहा बादल हेमके व मुलगी तसेच त्याचा मित्र नानू साळवे त्याची पत्नी आणि छोटासा मुलगा असे ७ जण १० जून रोजी भामरागडात दाखल झाले. सायंकाळच्या सुमारास तालुका मुख्यालयातील पर्यटन स्थळांना भेट देऊन रात्री नवनीत धात्रक याचा भाटवा बादल हेमके यांच्याकडे मुक्काम करून सकाळी बादल हेमके,पत्नी नेहा आणि मुलगी, मेवणा नवनीत धात्रक, पत्नी मयुरी धात्रक आणि मित्र नानु साळवे,त्याची पत्नी आणि मुलगी असे ८ जण ताडगाव येथील चारचाकी वाहन भाड्याने घेऊन बिनागुंडा गाठले.
धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करताना नवनीत धात्रक खोल पाण्यात बुडत असल्याचे दिसताच बादल हेमके त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. लगेच हेमके आणि साळवे यांच्या पत्नीनी लाहेरी गाठून आपबीती सांगितल्यावर येथील काही नागरिकांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याबाबतची शून्य तक्रार लाहेरी पोलीस मदत केंद्रात दाखल करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र,रात्रीची वेळ असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही.
नवनीत धात्रक याचे चार दिवसांपूर्वी झालं लग्न
बादल हेमके यांचा मूळ गाव आरमोरी असून ते मागील तीन वर्षापासून भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतचे सचिव या पदावर कार्यरत आहेत. त्या अगोदर ते चामोर्शी तालुक्यात कार्यरत होते. त्यांची पत्नी नेहा बादल हेमके ह्या चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात वीज वितरण विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर साळा नवनीत धात्रक हा देखील चंद्रपूर येथील रहिवासी असून त्याची पत्नी मयुरी कापकर (धात्रक) ही गडचिरोली जिल्हा मुख्यालयात महिला व बाल रुग्णालयात अधिक परिचारिका या पदावर कार्यरत आहे. विशेष म्हणजे नवनीत धात्रक आणि मयुरी कापकर (धात्रक) यांचा ७ जून रोजी म्हणजे चार दिवसांपूर्वी लग्न झाला होता


PostImage

Vaingangavarta19

June 11, 2024

PostImage

भुमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे 75 वर्षीय वृद्ध शेतकरी करणार उपोषण 


भुमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे 75 वर्षीय वृद्ध शेतकरी करणार उपोषण 

गडचिरोली:-

येथील आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा. गडचिरोली यांच्या नावे गडचिरोली येथील जुना
सर्वे नंबर 548/2,549/2 (0.60) हेक्टर आर ही शेती 1995 पासून आहे. त्यांना फेरफार क्रमांक 912,913 असून शेतीवर न विचारता व साधा पत्रही न देता भूमी अभिलेख कार्यालयाने पुनर मोजणी च्या नावाखाली नवीन सातबारा नंबर 513/1 (0.36) व 528/1 (0.24) मुळ मालकाच्या नावाने बनवले. त्यामुळे अजूनही त्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.सदर शेतकऱ्याला कार्यालयाचे कुठलेही हेलपाटे न मारता त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता माजी खासदार अशोक नेते यांनी दोन पत्र कार्यलयाला पाठवले त्याचप्रमाणे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी तीन पत्र दिले परंतु अधिकारी त्यांच्या पत्राकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून आले आहे.

सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आली व काही त्रुटी पूर्ण करुन 8 दिवसात प्रकरण सादर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली ला उपविभागीय कार्यालयाने अवगत केले मात्र कार्यालयाने अजूनही कुठलीही त्रुटी पूर्ण न करता प्रकरण सादर केला. सातबारा दुरुस्ती च्या नावाखाली होणाऱ्या विलंबास जबाबदार कोण ? व माझ्या नावे नवीन सातबारा केव्हा तयार करून देणार ? या मागणीसाठी त्रस्त वृद्ध शेतकरी आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा.

गडचिरोली हे नाइलाजास्तव 24 जून 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याची माहिती उपोषणाच्या पत्रातून दिली आहे. तसेच जो पर्यंत माझा सातबारा भूमी अभिलेख कार्यालयातून सुधारणा होऊन येत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम राहणार आहे व माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास सर्व जिम्मेदारी भूमी अभिलेख कार्यालयाची राहील असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर गंभीर प्रकरणाकडे प्रशासन काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागले असून 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला केवळ सातबारा साठी उपोषणाला बसावे लागत असल्याची वेळ आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. सातबारा साठी वृद्ध शेतकरी उपोषणाला बसणार असल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष्यही लागले आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 10, 2024

PostImage

दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षल्यानी केले गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण 


दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षल्यानी केले गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण 

गडचिरोली, ता. १०: अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या एका नक्षल्याने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके (३७) असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून, तो भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

किशोर कन्नाके यांनी केंद्रीय राखीव दलाच्या अधिकाऱ्यांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. किशोर हा २०१४ मध्ये भामरागड दलममध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून सहभागी झाला. २०१५ मध्ये दंडकारण्य किसान मजदूर संघटेचा अध्यक्ष आणि पुढे २०१८ मध्ये नक्षल्यांच्या क्रांतिकारी जनता समितीचा सदस्य म्हणून २०२२ पर्यंत तो कार्यरत होता.

३ चकमकी, ४ खून आणि जाळपोळीच्या ४ घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. २०१७ मध्ये दरबा पहाडावर, २०२१ मध्ये कोपर्शी आणि २०२२ मध्ये पेनगुंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. २०१५ मध्ये मल्लमपोडूर तलावाजवळच्या रस्त्यावर एका नागरिकाचा झालेला खून, २०१८ मध्ये गोंगवाडा टी पॉईंटजवळ झालेला एका महिलेचा खून, २०१९ मध्ये जुव्वी नाल्याजवळ झालेली एका इसमाची हत्या आणि २०२३ मध्ये पेनगुंडा-गोंडवाडा रस्त्यावर झालेल्या एका नागरिकाच्या हत्येत त्याचा सहभाग होता.

शिवाय २०२१ मध्ये मरकनार-मुरुमभुशी मार्गावर, २०२२ मध्ये बोटनफुंडी-विसामुंडी, तसेच पेनगुंडा आणि २०२३ मध्ये हिदूर गावाजवळच्या जंगलात झालेली बांधकामावरील यंत्रे आणि वाहनांच्या जाळपोळीत किशोर कन्नाकेचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. किशोरला केंद्र व राज्य शासनाकडून एकूण साडेचार लाख रुपये मिळणार आहेत.

२०२२ पासून आतापर्यंत १५, तर आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६६३ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक जगदीश मीणा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनचे कमांडंट एम.एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात आत्मसमर्पणाची प्रक्रिया पार पडली.


PostImage

Vaingangavarta19

June 10, 2024

PostImage

तक्रार नोंदवन्यासाठी गेलेल्या तरुणीला उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी केली शरीर सुखाची मागणी


तक्रार नोंदवन्यासाठी गेलेल्या तरुणीला उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी केली शरीर सुखाची मागणी 

उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

 


भंडारा : -
प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूनासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली. त्यावेळी त्याने तिला स्पष्ट नकार दिला. खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरोधत तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. या प्रकारामुळे खचून गेलेल्या तरुणीने या बाबतची माहिती सामाजिक संघटनेला दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले. चौकशीअंती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात 354 अ,509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 9, 2024

PostImage

सासऱ्याची हत्या घडवून आणणाऱ्या गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांना अटक


सासऱ्याची हत्या घडवून आणणाऱ्या गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांना अटक

 

गडचिरोली,
 नागपूर येथील वडीलोपार्जित
सुमारे 300 कोटींच्या संपत्तीच्या वादातुन स्वतः च्या सासऱ्याची कट रचुन हत्या केल्या प्रकरणी गडचिरोली येथील नगररचनाकार अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिच्यासह इतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

नागपूर येथील शुभमनगर परिसरात राहणारे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेल मृत्यू झाला होता. त्यांची सुमारे 300 कोटींची वडिलोपार्जित संपत्ती असुन त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सुन अर्चना पुट्टेवार व मुलगी आहे. दरम्यान पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या पत्नी शकुंतलाचे ऑपरेशन झाल्याने ते दवाखान्यातून मुलीच्या घरी जात असतांना कारच्या धडकेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. सदर अपघाताबाबत पुरुषोत्तम यांच्या चुलत भावाला संशय आल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली व तपासाला वेग आला. तपासाअंती त्यांच्या घरातील कारचालक सार्थक बागडे यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने चौकशी केली असता सचिन धार्मीक व नीरज निमजे उर्फ नायटी यांना पोलीसांनी चौकशीअंती ताब्यात घेतले असता त्यांनी पुरुषोत्तम यांची हत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या प्रकरणात आरापींनी दिलेल्या बयाणानुसार पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सुन व डॉ. मनीष यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी चालकाला पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली. त्यामुळे पोलीसांनी अर्चना पुट्टेवार हिला अटक केली आहे. 
मालमत्तेचा मोह नडला

अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हया गडचिरोली येथे नगररचन सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या सासऱ्याच्या वडिलोपार्जित सुमारे 300 कोटींची संपत्ती असल्याने अर्चना पोर्लेवार यांनी त्या मालमत्तेच्या मोहात सासऱ्याच्या हत्येचा कट रचुन सुपारी देवून हत्या केली. मात्र हाच संपत्तीचा मोह आता त्यांना नडला असुन सासऱ्याच्या हत्ये प्रकरणी अर्चना पार्लेवार यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान अर्चना पार्लेवार हया गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली नगररचना विभागात नगररचना सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहे. तिच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचाही प्रभार आहे. आपल्या कार्यकाळात नगरक्षेत्रातील विकास आराखडा मंजूर करतांना मोठा घोळ केल्याची चर्चाही रंगू लागली आहे. तर गडचिरोली शहरालगत अवैधरित्या अकृषक केल्याच्या तक्रारी असल्याचे समजते. तर तिच्या अवैध संपत्ती बाबत चौकशी केल्यास मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता असुन तिच्या अटेकेने आता गडचिरोली शहरातील भूमाफियांमध्ये खळबळ उडाल्याचे बोलल्या जात असुन अर्चना पार्लेवार यांच्याकडून पदभार काढून इतरांकडे देण्यात यावे असेही बोलल्या जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 8, 2024

PostImage

स्वतः हच्या जन्मदातत्याला जीवानीशी ठार करुन, दुकानात लपवला मृतदेह


स्वतः हच्या जन्मदातत्याला जीवानीशी ठार करुन, दुकानात लपवला मृतदेह


गोंदीया:-
 जन्मदात्याला ठार करुन आपल्या दुकानात प्रेत ठेऊन शोधण्याचा बनाव करणारा मुलगा शेवटी पोलीसांनी शोधला 

वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात. हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे (४८) यांना दारू पिण्याची सवय होती.

मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं.

या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे याने आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला. यानंतर दुकान बंद करून निघून गेला. यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली, त्यावेळी राकेशवर संशय आला आणि स्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला
पोलीसांनी मुलाला अटक केली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

गौण खनिज अवैध उत्खननात कंत्राटदाराला मदत करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी वाघाडे यांचा ठिया आंदोलन


गौण खनिज अवैध उत्खननात कंत्राटदाराला मदत करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी वाघाडे यांचा ठिया आंदोलन 


गडचिरोल्ली;- जिल्ह्यातील एटापल्ली तालुका हा
वनसंपदा असलेला तालुका आहे. या तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. विकासकामे करतांना कंत्राटदार त्याला लागत असलेला अवैध मुरुम, माती, गिट्टी ही वनपरिक्षेत्रातून उत्खनन करून वाहतूक करुन कामासाठी वापरत असतात. यामध्ये त्या वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने हे काम केले जाते. मेंढरी- गर्देवाडा रा.मा. या कामासाठी कंत्राटदाराने खूप मोठ्या प्रमाणात मुरूम, गिट्टी अवैधरीत्या उत्खनन केले आहे. तसेच रेक्कलमट्टा ते रेंगाटोला या रस्ता बांधकामा दरम्यान सुद्धा गट्टा व एटापल्ली वनपरिक्षेत्रातून खूप मोठ्याप्रमाणात अवैध प्रमाणात मुरूम उत्खनन केला गेला आहे याबाबत श्रीकृष्णा वाघाडे यांनी मागील ३ महिन्यापासून तक्रार करूनसुद्धा यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे आजपासून मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जेव्हा पर्यंत वनपरीक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत नाही व कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात येत नाही तेव्हा पर्यंत सदर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील.

सदर ठिय्या आंदोलनास श्रीकृष्णा वाघाडे, रविंद्र सेलोटे बसलेले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

एस टी महामंडळाच्या बस मध्ये वाढले चोरीचे प्रमाण,याला आळा घालणार कोण


एस टी महामंडळाच्या बस मध्ये वाढले चोरीचे प्रमाण,याला आळा घालणार कोण?

गडचिरोली:-
महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून याला आळा घालणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे 
गडचिरोली आगाराची बस गडचिरोली मौशीखाब २ वाजता जाणारी एस.टी. तत्बल साडेतिन वाजता उशिरा सुटली त्यामुळे सदर बसमधे जाणाऱ्यांची तोबा गर्दी झाली. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी दोन व्यक्तींच्या पैसाची चोरी केली. हि घटना आबेशिवणी येण्यापूर्वीच घडली परतु ज्यांची चोरी झाली त्यांना मौशिखाब उतरल्यावर माहीती झाली. गर्दीमधे चोर सापडला नाही. दि. ६ जुन ला गडचिरोली आगारांची बस उशिरा मौशीखाब कडे निघाली त्यामुळे बसमधे प्रचंड गर्दी झाली व या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लालाजी मेश्राम मौशीखाब यांच्या खिश्यातुन साडेनव हजार रुपयावर डल्ला मारला. लालाजी मेश्राम हा  तेंदूपत्ता बोद भरतीवरून गावाकडे मौशीखाबला जात होता.त्याची पुर्ण कमाई चोरीस गेली. जिजाबाई मसराम गोगाव हि लग्नाला जात होती. तिचीही 3 हजार रुपयाची चोरी झाली. सदर बाब बस कंडक्टर यांना सांगीतले परतु चोराला रंगेहाथ कुणीही पकडू शकले नाही त्यामुळे चोरट्याचे फावले. अश्या घटना अनेकदा घडल्या असल्याचे प्रवासांनी सांगीतले. खेडेगावातही
जाणाऱ्या बसमधे चोरी होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

विनापरवाना अवैध सावकारी करणाऱ्यांवर सावकारी कायद्यानुसार कार्यवाही करा


विनापरवाना अवैध सावकारी करणाऱ्यांवर सावकारी कायद्यानुसार कार्यवाही करा

शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांची पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहाय्यक निबंधक व पोलिस अधिक्षकांना निवेदनाद्वारे मागणी.

चंद्रपुर:- जिल्ह्यातील विनापरवाना व अवैध सावकारी करणाऱ्या बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सावकारी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना आदेश देवुन सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकरी, मजूर व शेतमजूऱ्यांचे होणारी आर्थिक पिळवणूकीला आळा घालून मानसिक व शाररिक शोषणाला जबाबदार सावकारांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यासंदर्भात शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांची पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहाय्यक निबंधक व पोलिस अधिक्षकांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
चंद्रपुर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून त्याचबरोबर शेती व्यवसाय करुन शेतकरी व शेतमजूऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. बळीराजाचा हंगामा सुरु झाल्याने नाइलाजस्तव शेतकऱ्यांना पिक व शेतीसाठी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत असल्यामुळे याच संधी फायदा घेत चंद्रपुर जिल्ह्यातील विनापरवाना व अवैध सावकारी करणारे वर्षानुवर्षे अव्याढव्य व्याज वसूल करुन शेतकरी, मजूर व शेतमजूऱ्यांचे आर्थिक पिळवणूक करुन मानसिक व शाररीक शोषण देखील केले जात असल्याचे निदर्शात येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या सावकारी कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना आदेश देवुन जबाबदार सावकारांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी.

बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 कायद्यानुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद असताना देखील बेकायदेशीर व अवैध सावकारीला लगाम बसविण्यात प्रशासन असमर्थ ठरत असून अपरिहार्य कारणास्तव सावकारांकडून कर्ज घेणारे शेतकरी, मजूर व शेतमजूऱ्याची आर्थिक पिळवणूक होत असल्याने निदर्शात येत आहे.

परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना पिकासाठी व शेतीसाठी कर्ज देताना स्थावर मालमत्ता तारण घेता न येणे, कर्जाच्या मुद्दलापेक्षा जास्त व्याज न घेणे, कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे, कोरी कागदपत्रे न घेणे, हिशेब पुस्तके, नोंदवह्या ठेवणे, व्याजावर व्याज न लावणे, शासनाने निश्चित केलेले व्याजदर आकारणे बंधनकारक आहे. तसेच कर्जदाराला कर्जखाते उतारा सावकाराने देणे, दर तीन महिन्याला पावती देणे बंधनकारक, दंड व शिक्षेची तरतूद, असून दरवर्षी सावकारी परवान्याचे नुतनीकरण बंधनकारक केले असतांना देखील अपरिहार्य कारणास्तव कर्ज घेणाऱ्या कर्जदारांस मिळणाऱ्या संरक्षणाचे हनन केल्या जात आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन बेकायदेशीर सावकारीला चाप लावण्यासाठी आणि परवानाधारक सावकारांवर बंधनासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश-2014 ह्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना देवुन परवानाधारक सावकारांचे सर्व आवश्यक अभिलेख तपासून या तरतुदींचे पालन न करणाऱ्यांवर कार्यवाही करुन बेकायदेशीर सावकारीपासून कर्जदाराला होत असलेल्या मानसिक व आर्थिक पिळवणूकीला आळा घालण्यास उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करता वेळेस शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, उपतालुका प्रमुख गुरुदेव मेश्राम, उपमहानगर प्रमुख विश्वास खैरे, पत्रु भोयर, विठ्ठल लोनबले, शंकर आस्वले, संदीप शिवणकर आदींची उपस्थिती होती.


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

गडचिरोली पोलिसांनी केले छत्तीसगढ नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त 


गडचिरोली पोलिसांनी केले  छत्तीसगढ नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त 

गडचिरोली:-
 छत्तीसगड राज्याच्या
सीमावर्ती भागात कोरची तालुक्यातील भिमनखोजी गावानजीकच्या जंगलात शुक्रवारी (दि.७) गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्वस्त केले भिमनखोजी जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षली एकत्र आले होते. ही माहिती मिळताच गुरुवारी संध्याकाळी अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-६० पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविले. पोलिसांचा दवाब पाहून नक्षली पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन पिट्टू, औषध, पुस्तके आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले, याची पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली असून पुढील कारवाई करण्यात तत्पर राहावे असे मार्गदर्शन केले आहे


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून नवनिर्वाचित खा.डॉ. किरसान यांचा सत्कार 


अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून नवनिर्वाचित खा.डॉ. किरसान यांचा सत्कार 

गडचिरोली- :
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले काँग्रेस महाविकास आघाडीचे खासदार डॉ नामदेव किरसान यांचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला. 
   रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉ किरसान यांच्या कार्यालयात भेट घेऊन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे हस्ते शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ किरसान यांचा सत्कार केला. यावेळी पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनीही नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 
   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश सचिव केशवराव समृतवर, विधान सभा प्रभारी प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय  सचिव अशोक खोब्रागडे, युवा अध्यक्ष नरेंद्र रायपुरे , पुण्यवान सोरते,  शहर अध्यक्ष अनिल बारसागडे , तालुका सचिव विजय देवतळे, कैलास रामटेके,  महिला आघाडीच्या कल्पना रामटेके, कविता वैद्य व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 
   काँग्रेसचे पदाधिकारी सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले हे सुद्धा उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

अखेर प्रादेशिक विकास महामंडळ धान खरेदी अपहारातील व्येंकटी बुर्ले व गजानन कोटलावार या आरोपींना ठोकल्या बेड्या 


अखेर प्रादेशिक विकास महामंडळ धान खरेदी अपहारातील व्येंकटी बुर्ले व गजानन कोटलावार या आरोपींना ठोकल्या बेड्या 

सहा कोटी दोन लाख त्र्यानंव हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचा केला अपहार 

गडचिरोली:-

  गडचिरोली जिल्ह्यातील    शेतक­ऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असतात. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतक­ऱ्यांनी पिकविलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते. खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने नेमलेल्या मिलर्सकडुन बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण केले जातात. जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स व खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यासह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात. मिलर्स उचल केलेल्या धानाची भरडाई करुन तयार होणार तांदुळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अधिनस्त गोदामात जमा करण्यात येतो. जमा केलेल्या तांदळाच्या स्विकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात येतात. परंतू, काही अधिकारी/कर्मचारी यात गैरप्रकार करुन आपले आर्थिक हितसंबंध साधतात. 

    गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2022-2023 या दरम्यान अपहार झाल्याच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. सदर चौकशित मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2022-2023 या दरम्यान एकुण 59947.60 Ïक्वटल धान खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 31532.58 Ïक्वटल धान जावक झालेला आहे. परंतु मिलर्सना दिलेल्या एकुण वितरण आदेशापैकी 28415.02 Ïक्वटल धान प्रति Ïक्वटल 2040/- रुपये प्रमाणे 5,79,66,640/- रुपयांचा मिलर्सना प्राप्त झाला नाही, तसेच गोदामात देखील शिल्लक नाही. त्याचप्रमाणे, महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकुण बारदाण्यापैकी 71038 नग, प्रति नग 32.76/- रुपये प्रमाणे 23,27,204/- रुपयांच्या बारदाण्यांचा असा एकुण 6,02,93,845/- रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. याकरीता, तत्कालीन केंद्रप्रमुख, मार्कंडा (कं),आष्टी व्येकटी अंकलू बुर्ले, विपनन निरीक्षक आर.एस.मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए.कुंभार, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आ.वि.महा. गडचिरोली जी.आर.कोटलावार असे जबाबदार असल्याचे, प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या. गडचिरोली यांच्या लेखी फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन आष्टी येथे कलम – 420, 409, 465, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाची गती तीव्र करुन आरोपी नामे (1) व्यंकटी अंकलु बुर्ले, वय 46 वर्षे, व्यवसाय - नोकरी (कनिष्ठ सहाय्यक आदिवासी विकास महामंडळ व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी) रा. आष्टी  ता. चामोर्शी, जि. गडचिरोली (2) गजानन रमेश कोटलावार, वय 36 वर्षे, व्यवसाय - नोकरी (निलंबित प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, यवतमाळ व तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली) रा. कुंदलवाडी ता. बिलोली जि. नांदेड यांना गडचिरोली पोलीसांनी अटक केले असुन त्यांना मा. न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांचेसमक्ष हजर केले असता, त्यांची दिनांक 15/06/2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर गुन्ह्राचे तपासात राकेश सहदेव मडावी, वय 34 वर्षे, व्यवसाय – नोकरी (प्रतवारीकार आ.वि.म.घोट) यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्ह्रासंबंधाने त्याचेकडे विचारपुस सुरु आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 6, 2024

PostImage

चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघे ठार, दोघे  गंभीर जखमी


चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघे ठार, दोघे  गंभीर जखमी

 

गडचिरोली:

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुरूवारी (दि ६) सायंकाळी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. गुरुदास मनिराम गेडाम (वय ४२, रा. गोवर्धन) आणि वैभव देवेंद्र चौधरी (वय २१, रा. शंकरपूर हेटी) अशी मृतांची नावे असून नीळकंठ भोयर (रा. तळोधी, मोकासा) व लेकाजी नैताम (रा. मारोडा) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चामोर्शी तालुक्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळ आले. त्यानंतर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. याच सुमारास गोवर्धन येथील गुरुदास गेडाम हे वैनगंगा नदीच्या काठावर लाकडी नाव बनवत होते. एवढ्यात त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले. दुसऱ्या घटनेत शंकरपूर (हेटी) येथील वैभव चौधरी या युवकावरही वीज कोसळली. त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आणखी एका घटनेत तळोधी येथील नीळकंठ भोयर आणि लेकाजी नैताम हे वीज पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुनघाडा व तळोधी परिसरात वादळ आणि त्यानंतर जोरदार पाऊस आल्याने अनेकांच्या घरांवरील छताचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 6, 2024

PostImage

ग्रामपंचायत प्रशासना विरोधात ग्रामस्थांचे बेमुदत  आंदोलन


 ग्रामपंचायत प्रशासना विरोधात ग्रामस्थांचे बेमुदत  आंदोलन.

 

 

गडचिरोली:-:-

जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोनपूर येथे बाहेर गावातील व्यक्तींनी आबादी जागेवरती अतिक्रमण केल्याने येणाऱ्या काळात त्या गावातील लोकांसाठी एकही जागा शिल्लक नसल्याने या अतिक्रमणाच्या विरोधात व इतर मागण्यांसाठी पेसा समिती व सोनपूर येथील सर्व नागरिकांच्या वतीने दिनांक 6 जून 2024 पासून कोजबी ग्रामपंचायत कार्यालय समोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू केले असून
यापूर्वी हे अतिक्रमण काढण्यासाठी सोनपूर पेसा समिती व गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय तथा वरिष्ठ कार्यालयांना पत्र व्यवहार केला परंतु या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्याने शेवटी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला असून जोपर्यंत सोनपुर येथील अतिक्रमण पेसा समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करणे,ग्रामपंचायत प्रशासनाने गाव नमुना 8 अ वर बाहेरील व्यक्तींची व जागेची गरज नसलेल्या व्यक्तींची नोंद करू नये, बाहेरील व्यक्तींचे सुरू असलेले घर बांधकाम बंद करावे,रस्त्यालगत असलेले खताचे खड्डे हटविणे,पाणी टंचाईवर उपाय योजना करणे व इतर मागण्यांसाठी सोनपुर पेसा समिती व गावकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले असून मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.आंदोलनामध्ये रामदास डोंगरवार सुरेश तुमरेटी माजी सरपंच वैशाली डोंगरवार दर्शना वाकडे पुंडलिक सिडाम रसिका कुमरे गीता मडावी प्रीती रणदिवे रवींद्र डोंगरवार सुरेखा तूमरेटी पुष्पा गावडे सविता तुमरेटी संदीप कुंमरे देवराव चुधरी अशोक डोंगरवार रेखा डोंगरवार आकाश रणदिवे अरुण मडावी खुशाल ठाकूर उर्मिला डोंगरवार शांता ठाकूर संगीता डोंगरवार सीता डोंगरवार ज्ञानेश्वर शेंडे कुसुम बावणे दशरथ डोंगरवार अरुण डोंगरवार श्रीरंग ठाकूर लोमेश वाकडे विश्वनाथ तुमरेटी गोपाल डोंगरवार सुरज गावडे धिरज बडोले रमेश डोंगरवार व गावकरी आंदोलनात सहभागी आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 5, 2024

PostImage

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक


जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक 

 

वाशीम:-
वाशीम जिल्हात लाच घेणाऱ्यांचा कर्दनकाळ असणारे ACBचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी आज पुन्हा दबंग कारवाई केली आहे. त्यांच्यासह टीम ने सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. सचिन शिवाजीराव बांगर वय ३९ वर्ष असे लाच घेणाऱ्या अधिकार्याचे नाव असून वाशीम सामान्य रुग्णालयातील वर्ग ३ चे अधिकारी होते. आरोपी विरुद्ध पोस्टे वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय तक्रारदार यांचे पत्नीचे वैदकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून सही शिक्का घेण्या करिता आलोसे यांनी दि. 05/06/2024 रोजी पडताळणी करवाई दरम्यान 3000/-रु मागणी करून तडजोडी अंती 2500/-रु स्वीकारण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान 2500/-रु पंचासमक्ष स्वीकारले. आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 2, 2024

PostImage

उन्हाच्या काहलीत थंडीचा आनंद घेण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू


उन्हाच्या काहलीत थंडीचा आनंद घेण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू


वनविभागाने खड्डा केल्यानंतर सुद्धा कुंपण न केल्याने युवकाचा अंत. नुकसान भरपाई देण्याची मागणी.


चंद्रपूर :-
दुर्गापूर येथील तनवीर शेख वय 19 वर्ष हा लालपेठ कॉलरी क्रमांक 2 मध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला असता त्या भागात वेकोली व वनविभागाच्या जागेत खोदलेल्या एका 40-30 चौरस फूट आराजी असलेल्या खड्ड्यात उष्णतेच्या तीव्रतेने थंडीचा आंनद घेण्यासाठी मित्रांसोबत पोहायला गेला असता त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी 1 ते 1.30 ची असून मृतदेह शोधण्यासाठी चंद्रपूर मनापाच्या रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या बोटीच्या साहाय्याने तब्बल तीन तासानंतर मृतदेह हाती लागला. या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त होतं आहे, मात्र एवढा मोठा खड्डा खोदताना वनविभागाने त्या खड्ड्याच्या सभोंवताला कुंपण घातले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे वन विभागाकडून मृतक च्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी होतं आहे.

शहरातील लालपेठ कॉलरी नंबर दोन मध्ये खुली जागा असून तिथे वनविभागाने वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत जवळपास एक हेक्टर जागेवर झाडे लावण्याचे काम हातात घेऊन भूमिगत कोळसा खान बुजाविण्याच्या कार्यात रेती व माती जी टाकल्या जाते त्यात पाणी पण सोडल्या जाते ते पाणी साठवणूक करून त्या पाण्याच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी मोठा खड्डा खोदला होता त्या खड्ड्यात पाणी असल्याने दुर्गापूर येथील काही युवक जे लालपेठ कॉलरी येथे आले होते त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी पाण्यात उडया मारल्या दरम्यान काही युवक बाहेर आले पण एक युवक तनवीर शेख हा खड्ड्यात बुडाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे


PostImage

Vaingangavarta19

June 2, 2024

PostImage

अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर दोन गंभीर 


अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर दोन गंभीर 

गडचिरोली,
  जिल्ह्यातील कोरची शहरातील बायपास महामार्गावरील नवरगावच्या फाट्यापुढे कुरखेडा वरून छत्तीसगडकडे निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारास एका बाजूनं धडक दिल्यामुळे दुचाकी चालक रस्याच्या कडेला जाऊन पडले यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू  झाला तर मागे बसलेली दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता दरम्यान घडली आहे. अज्ञात मालवाहू ट्रकने दुचाकी क्रमांक MH 33 AB 8324 ला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेला आहे.
         मृतक रुपेश गांगसाय नैताम वय २७ वर्ष रा. चांदागोटा तालुका कोरची असे युवकाचा नाव आहे. तर मिनाबाई नीलाराम कल्लो वय ५० वर्षे व महेश निलाराम कल्लो वय २५ वर्ष रा. नवरगाव तालुका कोरची हे दोघेही नात्यात माय-लेक असून गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मिनाबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत असून महेशच्या उजव्या पायाला मार लागल्यामुळे दोघांना सुरुवातीला कोरची ग्रामीण रुग्णालयात  १०८ रुग्णवाहिकेनी नेण्यात आले येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष विटणकर यांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे या दोघांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
    नातेवाईकांना याची माहिती झाली ते घटनास्थळी उपस्थित झाले त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं मृतक रुपेश नैताम याला ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी  रुग्णवाहिका पाठवा म्हणून फोनवरून कोरची ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरला विनंती केली परंतु येथील डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षक यांनी तीन तास लोटून सुद्धा १०२ रुग्णवाहिका पाठविली नाही रुग्णवाहिका का पाठवली नाही याचे कारण डॉक्टरला विचारले असता त्यांनी सांगितले की रुग्णवाहिकेचा वाहनचालक उपस्थित नव्हता आणि उपस्थित झाला तेव्हा जाण्यास तयार नव्हता माझ्याशीच अरे रावी केली असल्याचे डॉ आशिष विटनकर यांनी सांगितले त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचू शकली नाही आणि अपघातात मृत्यू पावलेल्या रुपेशची बॉडी रस्त्यावरच तीन तास पडून होती.
         यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी कोरची येथील माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांना घटनेची माहिती दिली तेव्हा माजी नगराध्यक्ष यांनी नगरपंचायतची स्वर्गरथ बोलावून त्यामध्ये मृतक रुपेश नैताम याला टाकून ग्रामीण रुग्णालय येथे आनले. मृतकांच्या नातेवाईकांनी वेळेवर रुग्णवाहिका पोहोचली नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात ग्रामीण रुग्णालयात रोष व्यक्त केला. अधिक तपास कोरची पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

June 2, 2024

PostImage

सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने चिरडले


सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने चिरडले

 

गडचिरोली:-
सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या  विद्यार्थीनीला अज्ञात वाहनाने चिरडून टाकले ही घटना आज दि १ जून ला सकाळी घडली
मृतक विद्यार्थीनीचे नाव शर्वरी पद्माकर बनकर वय १४ रा देसाईगंज असे असून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक आंबेडकर वॉर्ड देसाईगंज येथील पांच सहा मैत्रिणी आरमोरी रोडवर सकाळी पाच वाजता फिरायला गेल्या असता रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी बसलेल्या शर्वरी पद्माकर बनकर या विद्यार्थिनीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने ती जागीच मरण पावली.
       सदर विद्यार्थिनी ही स्थानिक प. पू.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय देसाईगंज (वडसा) येथे आठव्या वर्गात शिकत होती. घटनेची माहिती होताच तिला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज (वडसा) येथे सकाळी दाखल करण्यात आले व लगेच शवविच्छेदन  करण्यात आले.
शर्वरी पद्माकर बनकर ही तिच्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील उदरनिर्वाहासाठी पुणे येथे कंपनीमध्ये काम करतात. मुलीचे कुटुंब फारच गरीब आहेत. आज दुपारी 2.00 वाजता  वैनगंगा नदी घाटावर तिच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले आहे


PostImage

Vaingangavarta19

May 24, 2024

PostImage

तहसीलदारांवर  अज्ञात इसमांनी चढवला हल्ला, गाडीच्या लोखंडी रॉडने फोडल्या काचा


तहसीलदारांवर  अज्ञात इसमांनी चढवला हल्ला, गाडीच्या लोखंडी रॉडने फोडल्या काचा

 


इंदापूर (पुणे) :-
 इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत
पाटील यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात हा प्रकार घडला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज दि २४ मे शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला चढवला.

सोबतच खाल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती; ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये शासकीय गाडीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुका परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
सदर हल्ला का करण्यात आला याचा शोधही पोलीसांनी सुरू केला आहे


PostImage

Vaingangavarta19

May 24, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी मात्र पकडले तेलंगाणा वनविभागाने


गडचिरोली जिल्ह्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी मात्र पकडले तेलंगाणा वनविभागाने


गडचिरोली:-

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा वाळू, गांजा, दारु, तांदूळ , सागवान तस्करीमुळे सतत चर्चेत असते. आता त्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीची भर पडली आहे. 20 मे रोजी सिरोंचा वनविभागाचा तपासणी नाका ओलांडून दोन दुचाकीवरून बिनबोभाटपणे बिबट्याच्या कातडीसह तेलंगाणात प्रवेश केला. मात्र, तेलंगाणा वनविभागाच्या  सतर्कतेमुळे ते पकडले गेले. पवन (31) रा. वरदल्ली, बरेगुडा, भूपालपट्टणम, छत्तीसगड आणि बाबर खान (42) रा. लिंगापूर (वि), बरेगुडा, भूपालपट्टणम, छत्तीसगड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, दोन दुचाकी व दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील वनउपज तेलंगाणात जाऊ नये, यासाठी प्राणहिता व गोदावरी या प्रमुख नद्यांवर सिरोंचा वनविभागातर्फे दोन वननाके सुरु आहेत. 20 मे रोजी सिरोंचातून दोन दुचाकीवरून दोघे बिबट्याची कातडी घेऊन प्राणहिता नदीपुलावरुन तेलंगाणात पोहोचले. या पुलावर सिरोंचा वनविभागाचा नाका आहे; पण कर्मचाऱ्यांनी दोन्ही दुचाकी तपासल्या नाहीत. तेलंगाणातील मंचेरियल जिल्ह्यातील रापनपल्ली चेकपोस्टवर मात्र ते दोघे पकडले.

सिरोंचाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दुर्गम, अतिदुर्गम भागातील रस्ते, पुलाची कामे वनकायद्याचा दंडुका दाखवत रोखली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन समिती बैठकीत त्यांना यावरुन सुनावले होते. वनकायद्याचा धाक दाखवून विकासकामे रोखणाऱ्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या अखत्यारित आंतरराज्य सीमेवरील पुलावरुन वनउपज्ञाची तस्करी कशी काय होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 22, 2024

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टीचा निकाल पैकीच्या पैकी 


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टीचा निकाल पैकीच्या पैकी 

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय या शाळेचा इयत्ता बारावी चा निकाल १००% लागला आहे
या महाविद्यालयात १२९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते ते पैकीच्या पैकी पास झाले आहेत
त्यामधील हर्ष हुलके ७७.१७%,चिराग दयालवार ७२%, वैष्णवी अम्मावार ७०.५०% यांनी घवघवीत यश संपादन केले आहे
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी संस्था अध्यक्ष, प्र प्राचार्य पी.के सिंग, प्राध्यापक, व सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत


PostImage

Vaingangavarta19

May 22, 2024

PostImage

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घुसले घरात एका महीलेचा मृत्यू 


चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घुसले घरात एका महीलेचा मृत्यू 

प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

गोंदिया : आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथे मद्यपी ट्रॅक्टर चालकाच्या लापरवाहीने एका महिलेचा जीव गेला. अनियंत्रित ट्रॅक्टर थेट घरात शिरला. या घटनेत कापड धुत असलेली महिला ट्रॅक्टरमध्ये सापडल्याने ठार झाली तर घरातील इतर दोन मुली थोडक्यात बचावल्या. ही घटना किंडगीपार येथील आहे. किसनाबाई बुधराम चोरवाडे (५८) असे मृत महिलेचे नाव आहे.


माहितीनुसार, आमगाव नगर परिषद क्षेत्रातंर्गत येणाऱ्या किंडगीपार येथे किसनाबाई बुधराम चोरवाडे यांचे घर आहे.
घराला लागून रस्ता आहे. किसनाबाई बुधराम चोरवाडे ह्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे घरातील अंगणात कापड धुत होत्या. तर दोन मुली नात घरात खेळत होती. त्यातच मद्यधुंदीत असलेला संदीप कोरे हा शेत कामे आटोपून ट्रॅक्टर क्रं एमएच-३५/जी-१६३७ घेवून जात होता. किसनाबाई चोरवाडे यांच्या घराजवळ येताच ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. चालकाचा नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर थेट घरात शिरला.

या घटनेत ट्रॅक्टरखाली आल्याने किसनाबाई चोरवाडे यांचा मृत्यू झाला. तर घरात खेळत असलेल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या. प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरूवात केली. तसेच घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.  आरोपीसह ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

उल्लेखनिय असे की, ट्रॅक्टरची ट्रॉली ही विनानंबर असलेली होती. तर चालक मद्यधुंदीत असल्याचे बोलले जात आहे. आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपासकार्याला सुरूवात केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 22, 2024

PostImage

मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे सापडले एसीबीच्या जाळ्यात ज


मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे सापडले एसीबीच्या जाळ्यात 

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
तहसिल कार्यालय मुलचेरा  जिल्हा गडचिरोली येथील पुरवठा निरीक्षक राहूल भाउजी डोंगरे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे

  राहुल भाऊजी डोंगरे वय ४०  वर्षे रा. आष्टी हे मुलचेरा तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यानी आपल्या पदाचा फायदा घेण्यासाठी राशन कार्ड धारकांना नेहमीच सतावून लाचेची मागणी करीत होते व महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ५०० रुपये खर्च येतो ते तुम्ही द्या नाहीतर तुमचे काम होणार नाही असे सांगून हात झटकून टाकीत होते 
त्यामुळे त्रस्त झालेल्या वर्षा गुरुदास गेडाम यांनी एसीबीच्या अधिकारी यांना माहिती दिली त्यावरून प्रत्यक्ष शाहनिशा करुन मुलचेरा तहसील कार्यालयात सापळा रचला असता राहुल भाऊजी डोंगरे ५०० रुपये लाच घेताना साक्षीदार यांच्या समक्ष मिळूण आले 
 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मु. मुखडी टोला पो. गोविंदपुर ता. मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराची आई नामे जिवनकला गेडाम हिचे नावे असलेला शिधापत्रिका मध्ये वडील, मजवा भाऊ, वहीणी व भावाची मुलगी यांची नावे होती. तक्रारदार यांचे मजवा भाऊ गुरुदास यांच्या कुंटूबाचे नविन शिधापत्रिका वहीनी नामे वर्षा गुरुदास गेडाम यांचे नावे दि. ३०/०१/२०२४ रोजी तयार करण्यात आले. परंतू स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडे थम मशीनवर नाव न आल्याने शासनाच्या योजनेचे राशन मिळत नसल्याचे वहीनी वर्षा यांनी सांगीतले. तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे यांना माहिती दिली तेव्हा महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता ५००/-रू. लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली कॅम्प मुलचेरा येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली.

पोलीस उपअधीक्षक, श्रीमती अनामिका मिर्झापुरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळ कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने, महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता आरोपी राहूल भाऊजी डोंगरे, पद-पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली यांनी ५००/- रूपयाची पंच साक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी करून ५००/- रू. लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे. मुलचेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी डोंगरे यांचे आष्टी येथील निवासस्थानाची ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चम्मु कडुन झडती घेण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, श्री राहुल माकणीकर, ॲन्टी करप्शन ब्युरो, नागपूर,  सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो. नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जोंजारकर, पोष्टि संदिप उडाण, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 19, 2024

PostImage

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट


जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट

हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी मांडल्या अनेक समस्या 

आष्टी: -
येथून जवळच असलेल्या हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिराला जिल्हाधिकारी सैजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले  व मंदिर परिसरात पाहणी केली यावेळी मंदिराचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले 
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक १७ मे रोजी आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले आणि चौडमपल्ली, चपराळा मार्गावर असलेल्या जिर्ण झालेल्या पुलीयाची पाहणी केली
 कुनघाडा ते चपराळा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, प्राणहिता, वैनगंगा, व वर्धा नदीच्या संगमावर भाविक भक्तांना नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या कामाची व मंदिरातील समस्या देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या यावेळी चामोर्शी चे तहसीलदार गोन्नाडे, तलाठी महीन्द्रे,उपसरपंच कोकेरवार,, तमुस अध्यक्ष साईनाथ गुरनुले, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव चौडमपल्ली, उपसरपंच रामचंद्र बामणकर  ईलूर,नायर,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

May 18, 2024

PostImage

कंटनेरची ट्रॅव्हल्स ला धडक दोन्ही वाहन चालक गंभीर तर दहा जखमी 


कंटनेरची ट्रॅव्हल्स ला धडक दोन्ही वाहन चालक गंभीर तर दहा जखमी 

 

★ २ दोघे गंभीर जखमींवर नागपूर तर १० जखमींवर नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता 19


नागभीड : भरधाव कंटेनरने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान नागभीड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कानपाजवळ घडली
.यात दोनही वाहनचालक गंभीर जखमी झाल्याने नागपूरला हलविण्यात आले,तर उर्वरित १० जखमींवर नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम.एच.४० बीजी- ६८१८) नागभीडकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एम.एच.४० सीडी ९६५६ कानपा जवळ साहेब नाल्यावर ट्रॅव्हल्सला जबर धडक दिली. 
या धडकेत ट्रॅव्हल्समधील १० प्रवासी जखमी झाले. कंटेनरचालक अनितकुमार पटेल वय,२९ वर्ष मध्य प्रदेश व विजय राऊत वय,४६ वर्ष टॅव्हल्स चालक,रा.मूल हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आले. 
गीता कायरकर वय,५४ वर्ष मेंडकी,आशा चिलबुले वय,३८ वर्ष,सचिन चिलबुले वय,४३ वर्ष, साची चिलबुले वय,१४ वर्ष,ताराबाई जांभुळे वय,६०वर्ष, धर्मदास राकडे वय,७० वर्ष,ज्योती चिलबुले वय,५१ वर्ष शोभा चिलबुले वय,४० वर्ष सर्व रा .नागभीड, लीला कामडी वय,६० वर्ष नवरगाव,रघुनाथ जिभकाटे वय,७२ वर्ष, ब्रह्मपुरी आदींवर नागभीड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 17, 2024

PostImage

८० लाख रुपयांची चोरबीटी  जप्त करून प्रशासनाने केली मोठी कारवाई 


८० लाख रुपयांची चोरबीटी  जप्त करून प्रशासनाने केली मोठी कारवाई 

चोर बीटी तस्करात माजली मोठी खळबळ
गोंडपिपरी:-
चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाने मोठी कारवाई करीत तब्बल ८० लाख रुपयाची चोरबीटी जप्त केली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी येथे भरारी पथकाने काल शेतात असलेल्या पक्क्या घरातून अनधिकृत बियाणांचा साठा हस्तगत केला. प्रशासनाच्या या कारवाईने चोरबीटी तस्करात एकच खळबळ माजली आहे. गेल्या काळातील हि सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी येथील नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील पक्क्या घरात चोरबीटी चा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली. यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, वीरेंद्र राजपूत कृषी विकास अधिकारी, चंद्रकांत ठाकरे कृषी उपसंचालक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर कोल्हे, तंत्र अधिकारी गुणनियंत्रण, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, नागपूर , लकेश कटरे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्रावण बोढे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, चंद्रपूर, महेंद्र डाखरे कृषी अधिकारी,. विवेक उमरे, चंद्रकांत निमोड, नितीन ढवस, काटेखाये, कोसरे, जुमनाके, श्री. आत्राम व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोंभुर्णा व चमू यांनी भिमनी येथील नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील पक्क्या घरात तपासणी केली असता याठिकाणी ३९.८८ क्विंटल संशयास्पद अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.७६.57 लक्ष रुपयाचे हे बियाणे असून प्रशासनाने हा माल ताब्यात घेतला आहे. सदरहू अनधिकृत संशयित कापूस बियाण्याचा साठा इतरत्र परिसरात कुठेही विक्री केली आहे काय याचा तपास कृषी विभाग व पोलीस विभाग करीत आहेत.

शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. याची तयारी म्हणून चोरबीटी तस्कराचे मोठे जाळे सर्वत्र पसरले आहेत. अशात प्रशासनाने केलेल्या या मोठ्या कारवाईने तस्करात चांगलीच खळबळ माजली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 17, 2024

PostImage

आठ महिन्याच्या गर्भवती महिलेची रुग्णवाहीकेतच झाली प्रसुती 


आठ महिन्याच्या गर्भवती महिलेची रुग्णवाहीकेतच झाली प्रसुती 

 

कोरची :-
कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रेफर केलेल्या डिलीवरी च्या पेशंटला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन येत असतांना बेतकाठी ते पांढरीगोटा च्या दरम्यान असलेल्या डोंगरावर, खाचखळगे असलेल्या रस्त्याने येत असतांना जशी 108 ची गाडी खड्यात गेली तशीच महीलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. 

सविस्तर वृत्त असे आहे की, दि, १७ एप्रिल ला 11.30 च्या दरम्यान कोरची तालुक्यातील देऊळभट्टी ( पाटील टोला) येथील रहिवासी सौ. लता मुकेश कोरेटी (29) हिला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या 8 महीन्याचा बाळ पोटात होता. त्यामुळे प्रसुतीला वेळ आहे म्हणून घरची लोक बिनधास्त होती. 
अचानक कळा आल्याने तिथून 2 किमी अंतरावर असलेल्या कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लागलीच घेऊन आले. 

तेथील डॉ. चौधरी आणि महिला डॉ. नाकाडे यांनी तपासणी केली आणि महीला रुग्णांना तात्काळ गडचिरोली च्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रेफर स्लीप क्रमांक 1120 दि. 15/5/2024 वेळ दुपारी 1.00.
गडचिरोली ला पेशन्टला घेऊन जाण्यासाठी  108 क्रमांकाच्या  गाडीला बोलाविण्यात आले.गाडी सोबत महिला डॉक्टर किंवा नर्स किंवा आशा वर्कर राहणे अत्यंत आवश्यक असतांना डॉ. चौधरी आणि डॉ. नाकाडे यांनी कुणालाही सोबत पाठविले नाही. 

108 च्या गाडीत डॉ. आतीश सरकार होते. सोबत लताचा पती मुकेश, तिचे नातेवाईक गिरजा कोरेटी ( माजी सरपंच)  ईलेश्वरी नैताम होते. 

पेशन्टची अवस्था पाहता,कोटगुल वरून गडचिरोली ला पेशन्टला न नेता डॉ.सरकारने पेशन्टला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे ठरविले. कारण कोटगुल ते गडचिरोली हा अंतर 140 किमी असून कोटगुल ते कोरची हा अंतर 25 किमी आहे.
कोटगुल वरून येत असतांना कोरची वरून 8 किमी अंतरावर, बेतकाठी ते पांढरीगोटा दरम्यान असलेल्या डोंगरावर जशी गाडी खड्यात गेली तशीच चालत्या गाडीतच बाईची डिलीवरी झाली. सोबत असलेल्या नातेवाईकांना शंका आली त्यामुळे त्यांनी गाडी थांबविली व बाईच्या पोटाला हात लावून तपासणी केली तेव्हा डिलीवरी झाली होती. बाळ बाईच्या साडीतच होता त्यामुळे त्यांना दिसला नाही. 

तिथे असलेले डॉ. सरकार यांनी प्राथमिक उपचार करून लगेच गाडी कोरची ला घेऊन आले. कोरची येथील
ग्रामीण रुग्णालयात बाळ व आईला भरती करण्यात आले. येथे बाळ व आई सुखरूप असून बाळ 8 महीन्याचे आहे व वजन 2.00 किलो आहे.नशीब बलवत्तर होते म्हणून पहिल्या खेपेतील बाळंत नार्मल झाले. परंतु आरोग्य विभागाच्या खेळखंडोबा मुळे बाळ व आई दोघांनाही धोका होता. 
गावात परीचारीका नियुक्त असूनसुद्धा कधीच उपलब्ध राहत नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

May 17, 2024

PostImage

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


 गडचिरोली:-
कुरखेडा तालुका सीमे लगत असलेल्या कसारी फाटा नजीक भीषण अपघात होऊन दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना 17 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली
  कैलास मधुकर नाकाडे वय 45 रा .बोळधा  तालुका देसाईगंज असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे कसारी फाटा रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि कैलास हे पडलेले काही नागरिकांना दिसले  तेव्हा पोलिसांना माहिती दिली या घटनेचा तपास देसाईगंजपोलीस स्टेशन करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

May 16, 2024

PostImage

विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना मिळणार अनुदानित महाविद्यालयात बदली


विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना मिळणार अनुदानित महाविद्यालयात बदली 

मुबंई : राज्यात एखाद्या शैक्षणिक संस्थेची काही अनुदानित
आणि काही विनाअनुदानित महाविद्यालये असतील, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्याच संस्थेच्या अनुदाणीत महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासनाने दि. 8 जून 2020 रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती विनियमन अधिनियम 1977 मधील नियम 41 अ मध्ये सुधारणा करून विनाअनुदानित विभागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या त्याच व्यवस्थापनाच्या अनुदानित विभागात बदल्या करण्याची तरतूद केली होती. या बदल्या करण्याबाबत दि. 1 एप्रिल 2021 रोजी शासननिर्णय काढण्यात आलेला होता. त्यानुसार 1 डिसेंबर 2022 पर्यंत बदल्या करण्यात येत होत्या. परंतु, अशा प्रकारच्या बदल्यांना मान्यता देताना शिक्षणाधिकारी कार्यालयात अनियमितता होत असल्याने आणि यासंदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे कारण सांगून शासनाने संबंधित बदल्या स्थगित केल्या होत्या. यामुळे अनुदानित विभागात बदलीला शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता देण्यात येत नव्हती. यामुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बदली होऊनही वेतनापासून वंचित राहिले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या प्रीतम शिंदे विरुद्ध महाराष्ट्र शासन या रिट याचिकेत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी नागपूर खंडपीठाच्या दि.1/12/2022 चा शासननिर्णय रद्द केलेल्या निर्णयाची दखल घेतलेली नाही, असे याचिकाकर्त्यांचे वकील के. डी. ढमाले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि उच्च न्यायालयाने याबाबत शासनाला बदल्या सुरू करण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी युक्तिवाद करताना केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे शासनाने तातडीने परिपत्रक काढून अनुदानित महाविद्यालयाकडे होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगिती शासन उठवत असल्याचे जाहीर केले. सदर प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये याच्या खंडपीठासमोर घेण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 16, 2024

PostImage

पिता-पुत्राने मिळून पाठविले एका तरुणास यमसदनी


पिता-पुत्राने मिळून पाठविले एका तरुणास यमसदनी

मला खर्रा का?  दिला नाही याचा राग धरुन केली मारझोड 


नागपूर :- 
मला  खर्रा का दिला नाही या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाचा पिता - पुत्राने चाकुने भोकसुन खुन केल्याचे उघडकीस आले आहे
.हत्येची ही घटना वाठोडा येथील संघर्ष नगर झोपडपट्टीत मंगळवारी सायंकाळी घडली. देवी नगर गल्लीत राहणारा ३५ वर्षीय जितेंद्र गुर्जर असे मृतकाचे नाव आहे. आरोपींमध्ये ६० वर्षीय आनंदराव बावनकर आणि त्यांचा मुलगा दिनेश बावनकर (२६) यांचा समावेश आहे. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.

 मंगळवारी सायंकाळी आरोपी आनंदराव हा खर्रा घेण्यासाठी घराजवळील पान टपरी येथे गेला होता. त्यावेळी मृतक जितेंद्रही तेथे पोहोचला होता. दोघेही दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या वेळी जितेंद्रने पान टपरीवरुन खर्रा विकत घेतला होता त्यावेळी आनंदराव यांनी जितेंद्रला खर्रा खायला मागितला  मात्र जितेंद्रने खर्रा देण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात जितेंद्रने आनंदराव यांना मारहाण केली. मात्र या घटनेनंतर आनंदराव यांनी  घरी जाऊन हा घडलेला प्रकार त्यांचा मुलगा दिनेश याला सांगितला. यानंतर दिनेश त्याचे वडील आनंदराव यांच्यासह जितेंद्रच्या शोधात बाहेर पडले. घरापासून काही अंतरावर त्यांनी जितेंद्रला मद्यधुंद अवस्थेत पाहिलं. दिनेश याने जितेंद्रला आपल्या वडिलांना का मारलं? याचा जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि आरोपी पिता- पुत्राने जितेंद्रवर चाकूने हल्ला करुन जितेंद्रला जखमी केले आणि तेथून पळ काढला.

जितेंद्र गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला पाहून परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या जितेंद्रला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले. मात्र, नंतर दोघे पिता-पुत्र परिसरात फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 15, 2024

PostImage

अजून किती बळी घेतल्यानंतर गडचिरोली वनविभागाला येणार जाग


अजून किती बळी घेतल्यानंतर गडचिरोली वनविभागाला येणार जाग

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १८
गडचिरोली:  जिल्ह्यातील ज़ंगलात स्वापदानांमुळे आजपर्यंत बरेचसे बळी गेले असुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली नसल्याचे चित्र दिसत आहे कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी येथील तेंदू पत्ता मजूर नतीराम तुळशीराम नरेटी हा इसम आज दिनांक १५ सकाळी 8.30 वाजता जंगलामध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेला आणि तेंदूपत्ता संकलन करीत असताना अचानक जंगली डुकराने त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात वरील इसम गंभीर जखमी झाला असून त्याला 
उचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, दिनांक १३ मे रोजी झालेल्या आंबेशिवणी येथील पार्वता बालाजी पाल वय वर्षे ६४ यापूर्वी चार दिवसाअगोदर वाघाने हल्ला करून जागीच पडशा पाडला ,अहेरी तालुक्यात अशीच एका महिलेवर जंगलात तेंदुपत्ता संकलन करीत असताना रानटी डूक्कराने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आणि ती महिला आजही रुग्णालयात उपचार घेत आहे पुन्हा काल दिनांक १४ मे रोजी गडचिरोली तालुक्यातील सावरगाव येथे एका महिलेला तेंदू संकलन करीत असताना झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्या महिलेवर हल्ला करून नरडीच्या घोट घेतला तद्वतच कुरखेडा तालुक्यातील घाटी (गांगोली) येथे तेंदूपत्त्याचा शिजन सुरू झाल्याने घाटी येथील तिनशे ते साडेतीनशे मजूर एकत्रितपणे गाव शेजारी असलेल्या जंगलात पहाटे तेंदूपत्ता संकलनासाठी गेले सदर मजूर तेंदूपत्ता संकलन करीत असताना अचानकपणे जंगली हत्तीने आक्रोश करीत त्या मजूरावर हमला केला तेव्हा सदर मजूर भितीच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळून गेले मात्र इश्वर नामक मजूर एका झाडावर चढला तरीही रानटी हत्तीचा हैदोस कमी झाला नाही त्या हतींचा एवढा आक्रोश होता की मजूर चढलेल्या झाडाला खाली कोसळवले त्या झाडावर चढून बसलेला मजूर झाडासह खाली कोसळवला परंतु त्याचे नशीब बलवंत्तर म्हणून झाडासोबत खाली पडल्यानंतरही आपला जीव वाचवण्यासाठी उठून त्याने पळ काढला त्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवू शकला लगेचच वनविभागाला देण्यात आली तेंव्हा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावात आले असता गावकऱ्यांनी घेराव घालून जर आमच्या जंगलात रानटी हत्ती आले होते तर आम्हाला गावामध्ये मुनारी का देण्यात आली नाही सर्वश्री जवाबदारी वनविभागाची आहे असा हेका गावकऱ्यांनी धरला होता गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता सिझन सूरू झाल्यापासून जंगली स्वापदाचे हमले हे मनुष्य प्राण्यावर होत असून नाहक गोरगरीबांचे बळी जात आहेत तेव्हा तेंदूपत्ता संकलन हा सिजन गोरगरीब मजूरांसाठी पोटपाण्याची भाकर आहे अशा परिस्थितीत त्यांची भाकर हिरावल्या जात असेल तर वनविभागाचे काम काय  ? आणि गडचिरोली जिल्ह्यात एकमेव  अभयारण्य सोडता जिल्ह्यात एवढे मोठे स्वापद आले कुठून आणि वनविभागाने ते आणले असतील तर का माहिती दिली नाही असा  प्रश्न जनता करित आहे अजून वनविभाग गडचिरोली जिल्ह्यातील स्वापदामार्फत किती बळी घेतल्यानंतर लक्ष देणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे


PostImage

Vaingangavarta19

May 14, 2024

PostImage

तेंदुपत्ता हंगामात वाघांनी घातले विघ्न,तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात  गेली महिला वाघाने हल्ला करून केले ठार.


तेंदुपत्ता हंगामात वाघांनी घातले विघ्न,तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात  गेली महिला वाघाने हल्ला करून केले ठार.

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

गडचिरोली : -
गडचिरोली मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक 411 मध्ये आज वाघाने केलेल्या हल्ल्यात 64 वर्षीय महिला ठार झाल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर महिला हि तेंदूपत्ता तोडणी करिता पहाटेला जंगलामध्ये गेली होती जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढवला व तिला ठार केले. 

मृतक महिलेचे नाव पार्वता बालाजी पाल वय,64 वर्ष रा. आंबेशिवणी आहे.


सदर घटनेची माहिती गडचिरोली वन विभागाला देण्यात आलेली असून वन विभागाची टीम आंबेशिवणी येथील बामणी बीट मध्ये दाखल होऊन पंचनामा व पुढील कारवाई करत आहे.


 या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे सदर प्रकरणाची दखल घेत वन विभागाने मृतकाच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे.

 या परिसरात वावरत असणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा याप्रसंगी नागरिकांनी केलेली आहे.

सदर मृतक महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 14, 2024

PostImage

 10 वी CBSE परीक्षेत  सौम्या गायकवाड ने मिळविले नेत्रदीपक यश


 10 वी CBSE परीक्षेत  सौम्या गायकवाड ने मिळविले नेत्रदीपक यश

 अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

पिंपरी चिंचवड:-

वर्ग १० सिबिएससी बोर्डाने नुकताच निकाल जाहीर केला असून 2023-24 मध्ये झालेल्या CBCE  10 वीच्या परीक्षेत कु . सौम्या गायकवाड हिने घवघवीत यश संपादन केले आहे

सौम्या शशिकांत गायकवाड ही ब्लासम पब्लिक स्कूल ताथवडे पिंपरी चिंचवडची विध्यार्थीनी आहे व तिने ९४.०२ टक्के मिळवित आपल्या शाळेचे व आई -वडीलांचे नाव रोशन केले आहे 


सौम्या गायकवाड हिने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे,पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे दैनिक अचूक निदान चे संपादक प्रा डी . के . साखरे भाजप ओ बी सी मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे ,भीम बाबा संस्था सोलापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद मोरे ,  ब्लॉसम शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  तसेच आई वडील , आजी-आजोबा यांनी तीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 


PostImage

Vaingangavarta19

May 13, 2024

PostImage

कतरंगट्टा येथील पोलीस – नक्षल चकमकीत दोन महिला नक्षल्यांसह तिघांना कंठस्नान


कतरंगट्टा येथील पोलीस – नक्षल चकमकीत दोन महिला नक्षल्यांसह तिघांना कंठस्नान

वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली, दि. 13 : जिल्ह्यातील दक्षिणेच्या जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत दोन महिला नक्षलींसह तिघांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. या घटनेने नक्षली संघटनेला मोठा हादरा बसल्याचेही बोलल्या जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल्यांच्या टीसीओसी कालावधी दरम्यान पेरमीली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात लपून बले असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली असता गडचिरोली पोलिस दलाचे सी-60 जवानांची तुकडी शोधमोहीम रबविण्याकरिता रवाना करण्यात आली. दरम्यान जवानांची तुकडी सदर परिसरात पोहचली असता नक्षल्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. काही काळ चाललेल्या या चकमकीत जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलाचा फायदा घेत पसार झाले. चकमकीनंतर परिसराची झडती घेतली असता एक पुरुष व दोन महिला नक्षालींचे मृतदेह आढळून आले. दरम्यान मृतकामध्ये पेरिमिली दलमछा प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांड वासू अशी ओळख पटली असून इतर दोन महिला नक्षल्यांची ओळख पटलेली नाही अशी माहिती आहे.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य व स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली असून नक्षल्यांच्या मोठा घातपात करण्याछा डाव होता असेही बोलल्या जात आहे. दरम्यान परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 13, 2024

PostImage

सांस्कृतिक भवन परिसरात टाकाऊ कचऱ्याने सुटली दुर्गंधी


सांस्कृतिक भवन परिसरात टाकाऊ कचऱ्याने सुटली दुर्गंधी

परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात,पिंकु बावणेचा आंदोलनाचा इशारा

 

 

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

देसाईगंज-
      शहराच्या नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत नागरीकांच्या कराच्या उत्पन्नातुन कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.सदर सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतांनाच परिसरात टाकलेल्या टाकाऊ कचऱ्याने दुर्गंधी सुटली असुन यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील टाकाऊ कचरा यथाशिघ्र उचलुन विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी प्रशासनाला दिला असल्याने नगर पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
      देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्य सोपस्कार पार पाडता यावेत करीता शहराच्या सर्व्हे नं. २४/५ मध्ये ८ एकरात कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते.कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात.मात्र अलिकडे हे सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु ठरू लागले असुन परिसरात तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्ती अभावी नामशेष झाला आहे.
     दरम्यान कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलुन डंपिंग यार्ड मध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार यंत्रणा कार्यरत असताना टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरातच टाकण्यात येत असल्याने कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून उग्र वास लगतच्या परिसरात  पसरला आहे.हा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे की यामुळे अनेकांना परिसरात वास्तव्य करणे कठिण होऊ लागले आहे.अनेकांना मळमळ, पोटाचे आजार अशा विविध समस्या जाणवू लागल्या आहेत.ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील कचऱ्याची यथाशिघ्र विल्हेवाट लावण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी केली असुन समस्या मार्गी लावण्यात न आल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत नगर प्रशासन काय कारवाई करते याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 12, 2024

PostImage

सिनेस्टाईलने पकडले आष्टी पोलीसांनी अवैध दारू तस्करी करणारे वाहण


सिनेस्टाईलने पकडले आष्टी पोलीसांनी अवैध दारू तस्करी करणारे वाहण

१९ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी पोलीसांनी सिनेस्टाईलने अवैध दारू तस्करांची गाडी पकडून मोठी कारवाई केली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एका स्कार्पीओ वाहनातून अवैध दारू तस्करी होत असल्याचे माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी नाकाबंदी केली असता महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय समोरील रोडवर वाहनांची तपासणी करीत असताना एम एच ३२ एक एच ५५५६ ह्या वाहनास पोलीसांनी थांबविण्यास प्रयत्न केला तेव्हा सदर वाहन चालकाने पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला व तात्काळ वाहन मागे वळविला व आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चामोर्शी रोडकडे कुच केली
आष्टी पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला व चामोर्शी. पोलीसांना कळविले त्यानुसार दारु तस्कर वाहन भरधाव वेगाने पळून जात असताना  शासकीय बांधकाम विभाग चामोर्शी येथे पकडले व वाहंनाची चौकशी केली असता आय बी कंपनी चे ४८ बॉटली किंमत ९६००० रुपये,देशी दारू ४०  बॉक्स किंमत ३२००० रुपये व वाहण किंमत पंधरा लाख रुपये वापराती माल असा विस लाख रुपयांचा मुद्देमाल  पोलीसांनी जप्त केला आहे
आरोपी निखील राजू क्षिरसागर
वय २१ रा. गवराळा ता. भद्रावती ,  नितेश वशिष्ठ चंदनखेडे वय ३४ रा. भद्रावती याचे विरुद्ध कलम ३०७ ,३४भादवी सहकलम ६५(अ),८३ मदाका,१८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
सदरची  कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दयाल मंडल,अतुल तराडे, देविदास मानकर, पोलीस शिपाई अतुल तोडासे,संतोश नागुलवार,मुनेश रायशिडाम,पराग राजुरकर,मेदाळे यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 12, 2024

PostImage

नदी पात्रात रेती उपसा करताना महसुल विभागाच्या पथकाने पकडले चार ट्रॅक्टर


नदी पात्रात रेती उपसा करताना महसुल विभागाच्या पथकाने पकडले चार ट्रॅक्टर 

 

प्रमोद झरकर - उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

 

मुल : 
तालुक्यातील मारोडा- पेटगांव मार्गावरील उश्राळा गावालगत असलेल्या उमानदीच्या पात्रातच रेती उपसा करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार ट्रॉक्टर पकडून मोठी कारवाई केली आहे 
मिळालेल्या माहितीच्या आधारे रेती उपसा करणा-यांवर आळा घालण्यासाठी नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे यांचे नेतृत्वात भरारी पथक तयार करण्यांत आले.तयार करण्यात आलेल्या भरारी पथकातील मंडल अधिकारी,संजय कानकाटे, दिपक गोहणे,तलाठी,शंकर पिदुरकर आणि महेश पेंदोर यांनी आज पहाटे 4 वाजता पासून उश्राळा रेती घाटालगत पाळत ठेवली. 
पाळतीवर असतांना चार ट्रॅक्टर सदर रेती घाटावर रेतीचा उपसा करण्यासाठी आले.दरम्यान 8.40 वा.चे दरम्यान भरारी पथकाने धाड मारत रेतीने भरलेले तीन आणि रेती भरण्याचे उद्देशाने उभा असलेला एक असे चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
 ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेतली असता सदर ट्रॅक्टर मारोडा येथील सचिन गुरनूले,विकास चौधरी,बाळु मंडलवार आणि श्रीकोंडावार यांच्या मालकीचे असल्याचे समजले. भरारी पथकाने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात आणले असून नियमानुसार कारवाई करण्यांत येत आहे.
ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर पैकी दोन ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नसुन बांधकाम पुर्ण करण्यासाठी अनेकांना रेतीची आवश्यकता असल्याची संधी साधुन तालुक्यातील अनेक मंडळी रेतीचा अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत.
रेतीचा अवैद्य उपसा करतांना तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले, महसुल विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईने रेती व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहेत


PostImage

Vaingangavarta19

May 11, 2024

PostImage

चेरपल्लीच्या महिलेवर तेंदू संकलन करताना रानडुकराचा हल्ला 


चेरपल्लीच्या महिलेवर तेंदू संकलन करताना रानडुकराचा हल्ला 

अहेरी 
जवळील  चेरपल्ली येथील एका महिलेवर तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना रानडुकराने हल्ला करून जखमी केले आहे

 राजेश्वर बुचम रामटेके यांची पत्नी अंजली राजेश्वर रामटेके हे दिनांक 11 मे रोजी सकाळी तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर रान डूकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यामधे ती गंभीर जखमी झाली आहे सदर घटना आज दि ११ मे ला सकाळी सुमारे 8.30 ते 9 वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 
      सध्या अहेरी तालुक्यातील खेळेगावांमध्ये तेंदुपत्ता तोडण्याचा सिजन सुरू झाला असून सामान्यांपासून ते गोर गरीब परिवारातील नागरिक या कामासाठी पहाटेला जंगलात जात असतात मात्र त्यांना जंगली जनावरांचा सामना करावा लागेल याची कल्पना नसते त्यामुळे असे गंभीर अपघात होत असतात. त्यामुळे नागरिकांनी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जातांना सावधान असणे आवश्यक आहे. जेणेकरून जंगली जनावरांच्या हल्ल्यापासून बचावता येईल.


PostImage

Vaingangavarta19

May 10, 2024

PostImage

भाडेकरूच्या घरात घरमालकाच्या मुलगी - जावयाने केली चोरी


भाडेकरूच्या घरात घरमालकाच्या मुलगी - जावयाने केली चोरी

मुलगी पोलीसांच्या ताब्यात तर जावई फरार 

भद्रावती:-
शहरातील गोविंद लेआउट येथे राहणाऱ्या घरातून १५ तोळे सोनं व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना दिनांक 4 मे रोजी घडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या तपासात घरमालकाची मुलगी व जावईच या घरपोडीचे चोर निघाल्याने आज गुरुवारला मुलीला अटक करण्यात आली असून जावई फरार आहे.

सविस्तर वृत्त असे की, वैशाली सतीश कारेकर वय २८ वर्ष, सतीश कारेकर वय ३८ वर्ष राहणार वणी हल्ली मुक्काम भद्रावती असे आरोपीचे नाव असुन फिर्यादी महेश माशीरकर हे मंदा वरखडे राहणार गोविंद लेआऊट यांच्या घरी भाडयाने राहतात घटनेच्या दिवशी महेश यांचे आई- वडील बाहेर गावी गेले होते व महेश हा काही कामानिमित्त घरातील दरवाज्याला कुलुप न लावता काही वेळासाठी बाहेर गेला. ही संधी साधुन आरोपींनी किरायेदराच्या घरात प्रवेश  करून कपाटातून 15 तोळे सोनं व रोख रक्कम ७ हजार लंपास केले.

महेश घरी आल्यावर त्याला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरी शोधाशोध करून तसेच शेजारी चौकशी करूनही चोरीचा सुगावा न लागल्याने त्याने दिनांक 5 मे रोजी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार बिपिन इंगळे यांनी तपास सुरू करून घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज बघितले मात्र घटनेच्या वेळी बाहेरील कोणी व्यक्ती घरात प्रवेश करताना किंवा जाताना दिसला नाही त्यानंतर पोलिसांना घरमालकावर संशय आल्याने त्यांनी चौकशी केली अखेरीस वैशालीला पोलिसी हिसका दाखवताच तिने चोरीची कबुली दिली.

वैशालीला अटक करण्यात आली असून तिचे कडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील दुसरा आरोपी सतीश फरार आहे. सदर कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी विरेंद्र केदार, गजानन तुपकर, अनुप आष्टूनकर, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुधरी, जगदीश झाडे, योगेश घाटोळे यांनी केली.


PostImage

Vaingangavarta19

May 10, 2024

PostImage

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या आषीशला वाघाने केले ठार


तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या आशिषला वाघाने केले ठार

 

प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

मुल :-
तालुका अंतर्गत पदजारी -रत्नापूर जंगलामधील कक्ष क्र.३२४मध्ये गावातील चार ते पाच लोक तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यासाठी गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने आशिष सुरेश सोनुले वय ३४ याचेवर हमला करुन ठार केले 
मुल तालुक्यातील जंगलव्याप्त ग्रामीण भागात उन्हाळ्यात काम नसल्याने मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात साठी जातात. रत्नपुरा पडझरी परीषदेचे काही सदस्य पहाटे गावाजवळील जंगलात तेदुपत्ता तोडणी साठी गेले होते. नेहमीप्रमाणे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी पाने तोडत असताना झुडपात बसलेल्या पट्टेरी वाघाने आशिष सोनुले यांच्यावर हल्ला करून काही अंतरापर्यंत खेचत नेले. वाघाने आशिषवर हल्ला केल्याचे शेजारी उपस्थित असलेल्या मित्रांना समजताच  आरडाओरडा केल्याने वाघ जंगलात पळून गेला 

 आज घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त करत काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली वाघांच्या बंदोबस्ताची मागणी लावून धरली. आज वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आशिष सुरेश सोनुले यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र सहायक पकेवार, वनरक्षक एस.जी. पकडले, वनरक्षक ज्योती दावेवार यांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर क्षेत्र सहाय्यक पकेवार यांनी मृताच्या पत्नीला 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले व शासकिय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही सांगितले


PostImage

Vaingangavarta19

May 9, 2024

PostImage

अवैध रेती वाहतुक करणा-या रेती तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखाने आवळल्या मुस्क्या 


अवैध रेती वाहतुक करणा-या रेती तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखाने आवळल्या मुस्क्या 

चंद्रपुर :-पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे एक पथक पो.स्टे. शेगाव येथे पेट्रोलिंग करीत असता दि. 09.05.2024 गोपनिय बातमीदारा कडुन मिळाली की, काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या बोथली नदी घाटातुन ट्रॅक्टरनी अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतुक करुन सावरी, गिरोला व आबमक्ता परीसरात करणार आहेत अश्या गुप्त माहिती वरून पहाटे 07.30 वा. दरम्यान सावरी ते गिरोला रोडवर कर्मविर शाळेजवळ सापळा रचुन तिन वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्यांच्या दिशेने येताना दिसले. तेव्हा त्या तिन्ही ट्रॅक्टरला थांबवुन वरील तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचासमक्ष पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तिन ब्रास रेती मिळुन आली. वर नमुद तिन्ही ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती बोथली नदीघाट येथुन चोरुन आणुन मौजा सावरी, गिरोला परीसरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले. सदरच्या कारवाईत एकुण 03 ब्रास रेती किं. 15,000/- रु. व 03 ट्रॅक्टर किं. 18,00,000/- असा एकुण 18,15,000/-रु. (अठरा लाख पंधरा हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करुन चालक नामे चालक नामे 1) सुनिल शालीक गायकवाड वय 30 वर्षे रा. खानगाव ता.चिमुर जि. चंद्रपुर 2) रविंद्र अंबादास काळसर्पे वय 35 वर्षे रा. बेंबडा ता. वरोरा 3) नितेश नथ्थुजी झाडे वय 33 वर्षे रा. अमरपुरी ता. चिमुर व मालक नामे 4) प्रविण शंकर मोहारे वय 35 वर्षे रा. गिरोला ता. वरोरा 5) दामोघर ताराचंद शेंडे वय 51 वर्षे रा. गुजगव्हाण ता. चिमुर पाहीजे आरोपी नामे 6) प्रशांत उर्फ माकोडा जनार्धन शामकुळे वय 40 वर्षे रा. खडसंगी ता. चिमुर यांचेविरुध्द पो.स्टे. शेगाव येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. शेगाव यांचे ताब्यात देण्यात आले.


PostImage

Vaingangavarta19

May 9, 2024

PostImage

शेताची पाहणी करीत असताना  सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू 


शेताची पाहणी करीत असताना 
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू 

गडचिरोली:-
 कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा जवळील फरी येथील  एका शेतकऱ्याला  शेतीची पाहणी करीत असताना त्याला विषारी सापाने दंश केल्याने  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 धान कापनीचा मोसम सुरु झाला आहे परंतू मागील एक दोन दिवसांपुर्वी परिसरात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचून ओलावा झाला आहे. शेतातील साचलेल्या पाण्यामुळे धान कापनी करता येईल का हे बघण्यासाठी फरी येथील शेतकरी देवानंद सदानंद मडावी वय ३८ वर्षे शेतात गेला असता, शेतातच त्याला  विषारी सापाने दंश केला प्रथमोपचार करिता त्याला मालेवाडा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तेथुन पुढील उपचारासाठी कुरखेडा उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.


PostImage

Vaingangavarta19

May 9, 2024

PostImage

दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, गोंडपिपरी येथील घटना 


दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, गोंडपिपरी येथील घटना 


गोंडपिपरी, ता. ८ : नेहमी आपल्या घराजवळ खेळणारे काही चिमुकले न्यायालयाच्या बाजूला असलेल्या तलाव परिसरात गेले. यापैकी दोघे जण पोहायला तलावात उतरले अन् बुडाले. रात्री उशिरापर्यंत मुले घरी आले नाही. यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. शेवटी तलावाच्या जवळ दोघांचे कपडे आढळून आले. पोलिसांना बुधवार (ता. ८) सकाळी त्यांचे मृतदेह सापडले.

मंगळवारी दुपारी गोंडपिपरीत घडलेली ही घटना रात्री समोर आली. दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गोंडपिपरीकरांना हेलावून सोडले. गौरव विलास ठाकूर (वय १४), शौर्य भास्कर पिंपळशेंडे (वय १५) अशी मृतांची नावे आहेत. ते येथील शिवाजी चौकातील रहिवासी होते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने व उन्हाचा पारा जास्त असल्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास शिवाजी वार्डातील काही मुले फिरण्यासाठी गेले. त्यानंतर न्यायालयाजवळ असलेल्या परसबोडी तलावात त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चिमुकले पोहण्यासाठी तलावात उतरले. काही वेळाने तेथील काही मुले घरी परतले. मात्र, बऱ्याच वेळेपर्यंत गौरव व शौर्य हे घरी परतले नाही. आई वडिलांनी त्यांना शोधण्यास सुरवात केली. जवळच असलेल्या तलावाजवळ ते पोचले. तिथे आपल्या मुलांचे कपडे बघून त्यांना शंका आली. लगेच आई वडिलांनी पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर हजर झाले. मृतदेह शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र रात्र बरीच झाल्याने पथक पोहचू शकले नाही. दरम्यान तलावाजवळ रात्रभर पोलिसांनी पहारा दिला. सकाळी पोलिसांनी तलावातून दोन मृतदेह बाहेर काढले. आपल्या चिमुकल्या मुलाचे शव पाहता आई वडिलांनी हंबरडा फोडला.


PostImage

Vaingangavarta19

May 6, 2024

PostImage

विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट


विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट.

गडचिरोली:-
विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यानी पुरुण ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी उध्वस्त केले आहे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  2024 दरम्यान आय.ई.डी. हल्ले करण्याच्या योजनेत माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवली असल्याबाबतची विश्वासार्ह माहिती प्राप्त झाल्याने कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 साठी त्या भागात क्षेत्राचे शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलांची जोरदार तैनाती करण्यात आली होती, ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स / स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे काल टिपागड परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकीस आले जिथे डोंगरावर ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आले होते.
  पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 02 बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी - 60 चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविणेकामी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आले होते.  आज सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले 03 क्लेमोर पाईप्स देखील सापडले.  उर्वरित 3 क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते.  पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले.  एकुण 9 आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले.
तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. पोलीस मदत केंद्रामध्ये आल्यानंतर गुन्हा नोदविण्याची तजवीज ठेवली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 5, 2024

PostImage

सिंगणपल्ली गावाकडे लोकप्रतिनिधीनी फिरवीली पाठ


सिंगणपल्ली गावाकडे लोकप्रतिनिधीनी फिरवीली पाठ

 रस्त्याचा प्रश्न केव्हा सुटणार, ग्रामस्थांचा सवाल 

लोकप्रतिनिधी फक्त मत मागायला येतात त्यानंतर ते गावात कधी फिरकतच नाहीत 

आष्टी: -
चामोर्शी तालुक्यातील सिंगणपल्ली या गावाला एकमेव पोचमार्ग असून तो पूर्णपणे उखडून गेला असल्याने गावकर्‍यांना ये - जा करण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सिंगणपल्ली हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येत असल्यामुळे रस्ता बनविण्यास अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे पण हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्यात असले तरी ये - जा करण्याकरिता पक्का  नको काय? असा प्रश्न येथील ग्रामस्थ करीत आहेत 
चौडमपल्लीपासून 4 कि.मी.अंतरावर असलेल्या सिंगणपल्ली या गावाला जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्याची अशी चाळण झाली आहे की पादचाऱ्यांना काटकसर करावी लागते आहे. 
शाळकरी विद्यार्थ्यांचे जाणे येणे, वैद्यकीय सुविधा, अशा अनेक मूलभूत गरजांसाठी  गावकर्‍यांना मोठी कसरत करावी लागते आहे
 या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी या गावाच्या गोरगरीब जनतेचा मुलभूत गरजांचा विचार करून कमितकमी ह्या रस्त्याकडे  लक्ष देतील काय? याकडे गावकरी आस लावून बसले आहेत. निवडणूकीच्यावेळी लोकप्रतिनिधी गावात येऊन मोठ मोठे आश्वासन देतात आणि निवडणूक झाली की विसरून जातात आमची जाण्यायेण्याची अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करून रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे


PostImage

Vaingangavarta19

May 5, 2024

PostImage

सप्तशृंगी गडावरुन खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीची आत्महत्या


सप्तशृंगी गडावरुन खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वणी:- आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावरील शीतकड्यावरून सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सप्तशृंगी गडावर मंगेश राजाराम शिंदे वय 24 वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक व अल्पवयीन मुलगी हे मोटर सायकल क्र. Мн 15 HJ 5915 ने वडनेर भैरव ता. दिंडोरी जि. नाशिक येथुन दि. 28/04/2024 रोजी वणी सप्तश्रृंगी गड येथे आले होते.
सप्तशृंगी गडावर अज्ञात कारणाने या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे येवून सुमारे चारशे ते पाचशे फुट खोल दरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. शीतकड्यावरून उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह हा झाडाला अडकलेला तर मुलाचा मृतदेह दरीत कोसळलेला आढळला. घटनेस साधारण सहा दिवस होवून गेलेले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.

याबाबत भातोडे, ता. दिंडोरी चे पोलिस पाटील विजय चव्हाण यांना गुराख्यांनी माहिती दिल्यानंतर वणी पोलिसांत खबर देण्यात आली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड अशा दरी पार करीत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर युवक व युवतीचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहीती असून याबाबत  वनी पोलिस अधिक चौकशी करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 5, 2024

PostImage

कत्तलखान्याकडे नेत असलेल्या जनावरांना पोलीसांनी दिले जीवदान


कत्तलखान्याकडे नेत असलेल्या जनावरांना पोलीसांनी दिले जीवदान

२२,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागभीड:-
कत्तलखान्याकडे नेत असलेल्या तिन वाहनांना रेल्वे क्रॉसिंग जवळ नागभीड पोलीसांनी तिन पिक अप मधील १२ बैलांना जीवदान दिले आहे
गुप्त माहिती वरून दि ५ में ला नाकेबंदी केली तेव्हा एम एच ३४ बी झेड १४४१ ,एम एच ३६ एए २८११ ,एम एच ३६ एए २८८४ या तिन वाहनांना थांबवून चौकशी केली असता प्रत्येक वाहनात ४ बैल असे १२ बैल मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अक्सर सय्यद अली सय्यद वय ४२ रा.ब्रम्हपूरी देवदास गोमा नेवारे वय ४० रा.सुकडी जिल्हा भंडारा, धनराज बडवाईक ४०, तौशीफ आशीफ पठाण वय २२ दोन्ही रा.पापडा जिल्हा भंडारा या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
तीन पिक अप वाहन किंमत २१ लाख रुपये व १२ बैल एक लाख विस हजार रुपये असा एकूण बाविस लाख विस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड,सपोनी पोटभरे, पोलीस अंमलदार अजीत, रोहीत, चापोशी गजानन यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 4, 2024

PostImage

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार


तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार

प्रमोद झरकर/उपसंपादक वैनगंगा वार्ता १८

सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील  पेटगाव-खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल )येथील ४ मे २०२४ ला सकाळी अंदाजे ८:३० वाजता तेंदूपत्ता गोळा  करण्यासाठी जंगलात गेलेल्या सौ. दीपा दिलीप गेडाम (३५) वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले सदर घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस स्टेशन चे ठाणेदार तुषार चव्हाण आणि त्यांची चमु, वनविभाग मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, क्षेत्र सहायक प्रधान शिवनी, वन रक्षक मडावी,  कोवे, शेख, भारत मडावी, सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर व पि आर टी सदस्य हजर होते.


PostImage

Vaingangavarta19

May 4, 2024

PostImage

आष्टी परिसरात अपघाताची मालीका सुरुच,उभ्या ट्रकला ट्रकने दिली धडक, ट्रकचालक जखमी 


आष्टी परिसरात अपघाताची मालीका सुरुच,उभ्या ट्रकला ट्रकने दिली धडक, ट्रकचालक जखमी 

आष्टी येथील महाकाली पेट्रोल पंपा जवळील घटना

आष्टी :- शहरापासून गडचिरोली  जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी शहराजवळील महाकाली पेट्रोल‌ पंपाजवळ सि .जी. ०७ बि. के. ४५१५ या क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. सि. जी. ०४ एल.पि.४४२९ या क्रमांकाच्या ट्रकने मागून धडक दिली हि घटना दिनांक ०४ मे रोजी दुपारी ०३ वाजता दरम्यान घडली रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली, या धडकेत ट्रकची कॅबिन चकनाचूर झाली असून सुभाष मेश्राम रा. डोंगरगाव ता. अर्जुनी जिल्हा गोंदिया असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. मागून धडक देणारा ट्रक चालक हा दारू पिऊन असल्याने क्लिनर बालू पुरषोत्तम उके,वय वर्षे १८ हा गाडी चालवित होता हा सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे 
मात्र दारुच्या नशेत असलेल्या चालकाचे प्राण बालंबाल बचावले आहेत 

चारचाकी वाहन असो की ट्रक याला साधा बेल्ट नसला की आरटीओ तसेच पोलीस विभाग तात्काळ चालान मारतात मात्र सध्या अवजड वाहने व नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई ही नाममात्र होत आहे. आष्टी शहराजवळील महाकाली पेट्रोल पंपाजवळ व आलापल्ली मार्गावरील कोहळे यांच्या पेट्रोल पंपाजवळ नेहमी ट्रकांच्या रांगा लागल्या असतात या दोन्ही पेट्रोल पंपाजवळ सुरजागड लोहप्रकल्पाचे सुरक्षा रक्षक नेहमी गस्तीवर असतात तरी या ट्रकांच्या रांगा कशा लागतात मग सुरक्षा रक्षकांचा काम काय? या वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी रस्त्याच्या कडेला ट्रकस उभेच करू दिले नसते तर हा अपघात घडला नसता अशी चर्चा आष्टी शहरासह परिसरात आहे. या वर्दळीच्या ठिकाणी नियम बाहेर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ट्रकवर कुणाचा आशीर्वाद अशा चर्चांना उधान आले आहे. या जिवघेण्या सुरजागड लोहखप्रकल्पा मुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे
या बाबतीत कोन लक्ष घालणार असा यक्ष प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

May 4, 2024

PostImage

दिड लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल समर्थकास  पोलिसांनी  केली अटक


दिड लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल समर्थकास  पोलिसांनी  केली अटक


सिरोंचा : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी
असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. शंकर वंगा कुडयामी वय, ३४ वर्ष, असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव असून, तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कांडलापार्ती येथील रहिवासी आहे.

सिरोंचा येथील पोलीस आणि विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याला सिरोंचा कालेश्वरम मार्गावर लावलेल्या नाकेबंदी दरम्यान अटक केली. शंकर हा कट्टर नक्षल समर्थक होता. नक्षल्यांना राशन पुरविणे, नक्षल्यांचे बॅनर लावणे, गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे अशी कामे तो करीत होता. २०१५ पासून तो नॅशनल एरिया कमिटीत भरती झाला.

चार चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. २०२२ मध्ये छत्तीसगडमधील मोरमेड चिंतलपल्ली आणि २०२३ मध्ये बडा काकलेर व डम्मूर-बारेगुडा जंगलात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेलया चकमकीत तो सहभागी होता. शिवाय यंदा गडचिरोली जिल्ह्यातील लिंगमपल्ली-मोदुमडगू जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता, ज्यात चार नक्षली ठार झाले होते. २०२४ मध्ये कोरंजेड, कचलेर आणि छत्तीसगडमधील भोपालपट्टनम येथील प्रत्येकी एक अशा तीन निरपराध नागरिकांच्या हत्येत त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७९ नक्षल्यांना अटक केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

पिकअपला वाहनाला सुरजागडच्या मालवाहू ट्रकने दिली धडक, तीन जखमी,


पिकअपला वाहनाला सुरजागडच्या मालवाहू ट्रकने दिली धडक, तीन जखमी,


सुरजागडच्या मालवाहू वाहनाची अपघातांची मालिका सुरूच

आष्टी : ३ मे  :-  गडचिरोलीतल्या जीवघेण्या सुरजागड प्रकल्पामुळे आणखी एक अपघात झाला आहे. सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पिकअपला धडक दिली या धडकेत तीन इसम गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना दिनांक ३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 
पिक अप वाहन हे अहेरी कडे जात होते समोरुन येणाऱ्या सुरजागडच्या मालवाहू ट्रकने जब्बर धडक दिल्याने सागर चुक्कावार पिकअपचा वाहनचालक गंभीर असून चंदा राजन्ना कडरला, राजन्ना कडरला श्रीनिवास जखमी आहेत या जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल  करण्यात आले आहे 
आष्टी – आल्लापली महामार्गावरील महाकाली मंदिराच्या वळणाच्या समोर हा अपघात  घडला. दिनांक २ मे रोजी आष्टी जवळील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाजवळ एका इसमाने आपली दुचाकी सोडून दिल्याने त्या इसमाचा जीव वाचला त्या इसमाची दुचाकी ट्रकमध्ये घुसल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेला आणि नागरिकांच्या संतापाचे कारण असलेला गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील सुरजागड  या प्रकल्पामुळे रोजच काहीना काही दुर्घटना घडत असतात.
सुरजागड लोह प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर नेहमीच अपघात होत असून सामान्य नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. शिवाय प्रचंड धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. यामुळे या सर्व बाबीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अपघाताचे निमित्त मिळताच सुरजागड प्रकल्पाला असलेल्या विरोधाचा उद्रेक होताना दिसून येत आहे


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार, तीन जखमी 


दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार,
तीन जखमी 

आष्टी येथील को - आपरेटिव्ह बॅंक समोरील घटना
आष्टी:-
दोन दुचाकींची आमोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 3 मे शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली.

अमोल रोहणकर वय 28 वर्ष रा. किष्टापुर ता. चामोर्शी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

मृत अमोल रोहणकर हा लग्न समारंभात राळापेठ येथे गेला होता कार्यक्रम आटोपून आपली दुचाकी क्र एम एच ३३झेड १०२८ ने तो परत किष्ठापूर आपल्या स्वगावाकडे जात असताना आष्टी - चामोर्शी मार्गावरील को -ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर अनखोडा येथुन येत असलेल्या दुचाकी क्र एम एच ३३झेड ००३४ या दुचाकीस्वाराला समोरासमोर जबर धडक दिली यात अमोल रोहणकर याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये सागर दुर्गे वय २३ रा. अनखोडा , गुलचंद दुर्गे वय १४, वंश दुर्गे वय १२ दोन्ही रा. छल्लेवाडा ता अहेरी असे नावे आहेत
घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटना स्थळी दाखल झाले व मृतकाला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

जादुटोण्याच्या संशयावरुन तिघांना जाळले जिवंत, पोलीसांनी १४ जणांना केली अटक


जादुटोण्याच्या संशयावरुन तिघांना जाळले जिवंत, पोलीसांनी १४ जणांना केली अटक

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील घटना 

गडचिरोली, ता. ३ः पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा होत असताना जादुटोण्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जीवंत जाळल्याची घटना १ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. याप्रकरणी १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मृतकाचे नाव  जमनी तेलामी हिचा पती देवाजी तेलामी (६०) आणि मुलगा दिवाकर तेलामी (२८) यांचा समावेश आहे.
जननी आणि देवू हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले, तरी ते पुजारी म्हणून काम करीत होते. त्यामुळे ते जादुटोणा करतात, असा काही जणांना संशय होता. अशातच जीवनगट्टा-चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिनाभरापूर्वी एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील एका दीड वर्षीय मुलीचा १ मे रोजी मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू जननी तैलामी आणि देवू आतलामी यांनी जादुटोणा केल्यामुळे झाला, असा त्या कुटुंबीयांचा संशय होता. त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन १ मे रोजी रात्री जननी आणि देवूच्या घरी गेले, त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळले. याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १४ जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली. घटनेनंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाच महिन्यातील दुसरी घटना

जादुटोण्याच्या संशयावरुन हत्या केल्याची गडचिरोली जिल्ह्यातील पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. ७ डिसेंबर २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध पती, पत्नी आणि त्यांच्या नातीची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातही मृतांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली होती. हे गावसुद्धा एटापल्ली तालुक्याच्या सीमेवर आहे. या घटनेनंतर आता बारसेवाडा येथे हत्याकांड झाल्याने जिल्हा हादरला आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी,  नवरगावच्या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी


रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी,  नवरगावच्या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी.

 


गडचिरोली  / अशोक खंडारे 

 गडचिरोली वरून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगांव (पोर्ला) येथे रात्रौ चे सुमारास गडचिरोली जिल्हयात फिरत असलेले रानटी हत्ती नवरगाव शेत शिवारात आले
व कास्तकारांच्या उभ्या पिकाचे लाखोचे नुकसान केले. दि. २ मे चे रात्रौ जंगली हत्तीचा कळप नवरगाव जंगलातून दशरथ धाकडे व भगवंत चुधरी यांच्या शेतात घुसुन उन्हाळी धान पिकाचे नुकसान केले एवढेच नव्हे सदर शेतकऱ्याचे मोटार पॅम्प व पाईप लाईन ची तोडफोड केल्यामुळे सदर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई वनविभागाने त्वरीत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी   केलेली आहे.तेंदू पत्ता सिझन चा हंगाम व कास्तकारांचे उन्हाळी पिक आहे. आता शेतात व जंगलात कसे जायंचे या विवेचनात नवरगांव गावकरी आहेत. वन विभाग पोर्ला चे RFO मडावी अजुनही आपल्या ताफ्यासहीत पाहणी करण्याकरीता पोहचले नाही असी माहिती प्राप्त झाली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 2, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात खरचं दारुबंदी आहे काय? बंदी असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध कशी?


गडचिरोली जिल्ह्यात खरचं दारुबंदी आहे काय? बंदी असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध कशी?


आष्टी परिसरात अवैध दारू विक्री ,कुनाच्या आशिर्वादाने?

जिल्ह्यात दारूबंदी असताना रस्त्यावर दिसतात दारूच्या खाली बाटल्या 

आष्टी -:
 गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असुन सुद्धा देशी, विदेशी, बिअर च्या बाटला येतात कुठुन ? हे एक पोलीसांना आव्हानच आहे. बिअरच्या बाटल्या चोरट्या मार्गाने आणणे कठीण काम आहे. तरीही अवैध दारू तस्करांनी आपले मार्ग वेगळे शोधले काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे
एकतर बिअरच्या व इंग्रजी दारुच्या दोन लिटच्या बाटल्या मोठ्या असतात बिअर आणुन त्या फ्रिजमधे थंड कराव्या लागतात एवढे कठीण काम अवैध बिअर विक्रेत्यांना करावे लागतात. यावरून गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदिपार करून चोरट्या मार्गाने इंग्लीस व देशी दारू किती प्रमाणात येत असेल यांची कल्पना न केलेली बरी. निवडणुकीच्या काळात पोलीसाची नाकेबंदी होती तरीही एवढा दारुचा पुरवठा गडचिरोली जिल्ह्यात झाला कसा असाही प्रश्न उपस्थित होतो आहे
चामोर्शी तालुक्यातील 
आष्टी परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे तरीसुद्धा पोलीस नेहमी गस्तीवर असताना पुरवठा कसा होतो आहे की,याला जबाबदार पोलीसच आहेत अशी परिसरातील सुज्ञ नागरिकात चर्चा सुरू आहे
 आष्टी परिसरातील आष्टी,चंदनखेडी (वन), ठाकरी ,कोनसरी  जैरामपूर,मुधोली, चितरंजनपूर अनखोडा,येनापूर , रामक्रिष्णपूर,राममोहनपूर, व बऱ्याच गावात अवैध देशी दारूचे विक्रेते बिनबोभाट पणे दारू विक्री करीत आहेत मात्र पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शांत झोपले आहेत असेच दिसून येते आहे त्यामुळे "तेरी भी चूप व मेरी चुप" असाच प्रकार सुरू आहे हे दिसून येते आहे  व यात पोलीसांचे चांगभले होत आहे काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे 

सदर बाबीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक लक्ष देतील काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यावरून जिल्ह्यात  खरचं दारू बंदी आहे की काय ? की बंदीच्या नावाखाली मात्तबरा़चे घर भरण्याच्या धंदा सुरू आहे?
असा विचारात्मक प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील सूजान नागरिकाना पडला आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 1, 2024

PostImage

आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला


आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला 

मात्र कारवाई न करता पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आला 


आष्टी:- 
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा चालू असून बुधवारी ता. १ मे रोजी सकाळी महसूल विभागाची गस्त चालू असताना आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडला आहे. सदर ट्रॅक्टरला नंबर नसून पोलिस स्टेशन आष्टी येथे ठेवण्यात आला आहे 
तहसीलदार चामोर्शी यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता आमच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडला आहे व पंचनामा करून पोलिस स्टेशन आष्टी ठेवण्यात आला आज सुट्टी असल्याने कारवाई होऊ शकली नाही आणि कारवाई नक्कीच केल्या जाईल असे सांगितले सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव विचारले असता माझ्याकडे अजून कारवाईचे कागदपत्रे आले नसल्यामुळे सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव व ट्रॅक्टर क्रमांक माहीत नाही अशी माहिती तहसीलदारांनी दिली.

 तालुक्यातील वैनगंगा पट्ट्यामध्ये सध्या वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात उपसा करून कहर  केला आहे. प्रशासनाकडून अधून मधून होणाऱ्या कारवाईने माफियांना वचक बसवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी होणाऱ्या कारवाईचा वाळू माफियांना फरक पडत नसल्याचे दिसत आहे. बुधवार एक मे रोजी सकाळच्या  सुमारास महसूल विभागाच्या नायब तहसीलदार यांनी तालुक्यातील आष्टी परिसरात पथका सोबत आले असताना मुख्य रस्त्यावर एक ट्रॅक्टर अवैध वाळू सह त्यांच्या निदर्शनास आला.
यावेळी सदरील ट्रॅक्टर जप्त करत पुढील कारवाईसाठी पोलिस स्टेशन आष्टी येथे  आणून लावण्यात आला आहे . पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्याचा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे यावेळी महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे .

दरम्यान इल्लूर , ठाकरी,कुनघाडा, कढोली, इत्यादी ठिकाणी वैनगंगा नदी पात्रामधून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू असुन प्रशासनाने कारवाई करत अवैध उत्खनन थांबवावे अशी मागणी होत आहे
विना नंबर चा ट्रॅक्टर कुनाच्या मालकीचा आहे हा कुतुहलाचा विषय आहे त्या मालकावर खरच कारवाई करण्यात येणार काय असा प्रश्न उपस्थित होतो ऊ


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सुगंधीत तंबाखू व अवैध दारू तस्करांनवर केली कारवाई


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सुगंधीत तंबाखू व अवैध दारू तस्करांनवर केली कारवाई

 १०,१९,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त 


चंद्रपुर :-
 पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले त्याअनुषगाने पो. नि. महेश कोडावार, स्थागुशा, चंद्रपुर पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दि.२९/०४/२०२४ गोपनिय बातमिदाराकडुन पोलीस स्टेशन, मुल हद्दीतील मौजा राजगड फाटा ता. मुल, जि. चंद्रपुर येथुन एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ मध्ये अवेधरित्या दारूचा साठ वाहतुक करून गडचिरोली जिल्हयामध्ये जात आहे अशा खबरे वरून मौजा राजगड फाटा येथे नाकेबंदी करून नमुद वाहनाला थांबवुन त्यामध्ये गाडीचा चालक १) आदिल पठाण, रा. दसरा चौक, सिंदेवाही, जि. चंद्रपुर, व त्याचे सहकारी २) पलाश बांबोळे, रा. राम मंदिर जवळ, सिंदेवाही, जि. चंद्रपुर यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ३० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग रॉकेत संत्रा ९० एम. एल. देशी दारूनी भरलेली असे एकुण ३,००० नग प्रत्येकी नग ३५/- रू. प्रमाणे १,०५,०००/- रूपये चा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ किमंत ७,००,०००/- रूपये असा एकुण ८,०५,०००/- रूपये असे जप्त करून आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, मुल यांचे ताब्यात देण्यात आले.
तसेच दिनांक २९/०४/२०२४ रोजी रात्रौ दरम्यान पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग दरम्यान मुखबिरचे खबरे वरून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी. एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचे घराची तसेच त्यांने किरायाने घेतलेल्या खोलीची पंचा समक्ष झडती घेतली असता, सदर दोन्ही ठिकाणी ईगल हुक्का सुगंधीत तंबाखू, होला हुक्का सुगंधीत तंबाखू तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाखू असा एकुण २,१४,२२०/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी.एम. बंगल्या मार्गे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास जप्त सुगंधीत तंबाखू बाबत विचारणा केली असता त्यांनी जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह जि. चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगरचे ताब्यात देण्यात आले.

वरील दोन्ही कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकुण १०,१९,२२०/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

स्कुटी व ट्रॅक्टर च्या अपघातात पुतनी जागीच ठार तर काका गंभीर


स्कुटी व ट्रॅक्टर च्या अपघातात पुतनी जागीच ठार तर काका गंभीर

आष्टी:-
स्कुटीला ट्रॉक्टर ने धडक दिल्याने एक मुलगी जागीच ठार झाली तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज दि ३० एप्रिल ला सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली
मृतक मुलीचे नाव सोनाली समरेश मिस्त्री वय 10 वर्षे रा.राममोहनपुर  तर गंभीर जखमीचे नाव अमुल्य प्रभात मिस्त्री वय २६ रा.राममोहनपूर असे असून अमुल्य हा आपल्या पुतनीला सोबत घेऊन स्कुटी क्र एम एच ३३ एक जी १३५८ ने आष्टी कडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॉक्टर क्र एम एच ३३ व्ही ६१३७ ने जब्बर धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही खाली कोसळले तेव्हा सोनाली हिचे डोक्यावरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने तीचा जागीच करुन अंत झाला तर तीचा काका हा गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना आनंदग्राम ते अडपल्ली चे मुख्य मार्गावर घडली 
अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला तर सदर ट्राक्टर महेश मृणाल साणा सुभाषग्राम यांच्या मालकिची असल्याचे सांगितले जाते आहे 
घटनेची माहिती मिळताच 
आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला
तर गंभीर जखमीला उपचारासाठी नागपूर ला हलविण्यात आले आहे
अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी, पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चंद्रप्रकाश निमसरकार हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्या लगत पोलीस नक्षल चकमकीत सात नक्षली ठार 


BIG Breking

गडचिरोली जिल्ह्या लगत पोलीस नक्षल चकमकीत सात नक्षली ठार 

नारायणपूर, दि. 30 : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नारायणपूरच्या अबुझमाड परिसरात आज मंगळवार 30 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये 22 महिला नक्षलींचा समावेश आहे. घटनास्थळावरुन एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली असून चकमकीनंतर परिसरात शोध सुरु असल्याचे कळते.

अबुझमाडच्या तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षली उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे सोमवारी रात्री उशिरा जवान शोधमोहीम करिता निघाले असता मंगळवारी सकाळी जवान या भागात पोहोचले असता नक्षल्यांनी जवानांवर अंधधुंद गोळीबार केला. जवानांनी मोर्चा सांभाळत प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 7 नक्षली ठार झाले त्यात दोन महिलांचा समावेश आहे  सदर चकमक महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा सीमेलगत असलेल्या परिसरात घडली असून. पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

आष्टी शहरात सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा पडला विसर


आष्टी शहरात सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा पडला विसर

आष्टी - दि. १० (प्रतिनिधी) – वर्षभर विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्याचा डांगोरा पेटवणारे आणि आपल्या नावाच्या पुढे सामाजिक कार्यकर्ते लिहिणारे तथाकथित समाजसेवक यांना यंदाचा उन्हाळा सुरू झाला तरी गोरगरीब,पादचारी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आष्टी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आदी भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक - भगिनी मोठ्या प्रमाणावर येऊन या पाणपोईचा वापर करीत असतात . परंतू उन्हाळा सुरू झाला आहे तरीसुद्धा एकही सामाजिक कार्यकर्ता किंवा सेवाभावी संस्थेला पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी, याचे भान राहिले नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कामात मशगूल आहेत. वेळीच या पाणपोई सुरू झाल्या की त्याचा निश्चितच फायदा ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणि शहरातील पायी चालणारे नागरीक यांना उपयोगी पडणार आहे.

ग्रामपंचायत प्रशासनालाही पडला विसर 

आष्टी शहर हे चामोर्शी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जात असून ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांची बसद्वारे येथे वर्दळ असते. बस स्टॅण्डवर उतरल्यानंतर पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बसस्टापर या पुर्वी आष्टी ग्रामपंचायत कडून १४ एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन करुण पाणपोई  सुरू करण्यात येत होती  पण यावर्षी उन्हाळा सुरू होऊनही पाणपोई सुरू करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाला विसर पडला का? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे

 गोरगरिबांचे, पादचारी लोकांचे, आशीर्वाद आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद जर मिळवून घ्यायचे असतील तर या ठिकाणी पाणपोई त्वरित सुरू करणे हे सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर मतांसाठी गावोगाव फिरून मताचा जोगवा मागणारे तथाकथित पुढारीसुद्धा या पाणपोई पासून दूर आहेत. त्यांनीही पाणपोई सुरू करून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

पोलिस स्टेशन आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


पोलिस स्टेशन आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 

आष्टी दि-२९ :- ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तात्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची दखल घेत गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून  दिनांक १ मे रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे सकाळी  ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना भविष्यात रुग्णालयात रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले तसेच आष्टी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवावा असे आवाहनही पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आष्टी पोलिसांशी संपर्क साधून रक्तदात्यांनी आपले नाव नोंदणी करून घेण्याचे पोलिस स्टेशन आष्टी कडून आवाहन करण्यात आले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

समोरच्याला वाचविण्याच्या नादात गमवावा लागला दुचाकीस्वार महिलेला स्वतःचा जीव


समोरच्याला वाचविण्याच्या नादात गमवावा लागला दुचाकीस्वार महिलेला स्वतःचा जीव 

मुलीसह भाचा जखमी

गडचिरोली : आपल्या मुलीला व भाचाला शाळेत सोडण्यासाठी स्कुटीने जात असलेल्या महिलेच्या समोर अचानक एक मुलगा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रित होवून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर मुलगी व भाचा जखमी झाल्याची घटना शनिवारला सकाळी शहरातील धानोरा मार्गावर घडली. मेघा भरडकर, स्नेहनगर गडचिरोली असे मृतक महिलेचे तर जॉयश्री भरडकर (14) असे जखमी मुलीचे व रेहांश कोलते (5) असे भाचाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, स्नेहनगर येथील रहिवासी मेघा भरडकर यांची 14 वर्षीय मुलगी जॉयश्री व तिच्या भावाचा 5 वर्षीय मुलगा रेहांश हे धानोरा मार्गावरील कारमेल शाळेत शिक्षण घेतात. रोजच्या प्रमाणे त्या शनिवारला दोघांनाही शाळेत सोडून देण्यासाठी स्कुटीने घरून निघाल्या. दरम्यान, धानोरा मार्गावरील भंगार विक्रेत्याचा मुलगा अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मेघा भरडकर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर मुलगी व भाचा जखमी झाले. गंभीर मेघाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने शहरात दररोज लहान-मोठे अपघात घडत असतात. मेघा भरडकर यांचा सुद्धा मृत्यू अतिक्रमणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. नगर परिषदेने अतिक्रमणाच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

दमनमरका गावातील घरे केली रानटी हत्तीने उध्वस्त


दमनमरका गावातील घरे केली रानटी हत्तीने उध्वस्त

मध्यरात्रीच त्या गावातील नागरिकांना सोडावे लागले गाव

प्रा.अजय बारसागडे , आलापल्ली प्रतिनिधी 

आलापल्ली:-
दमनमरका गावातील घरे रानटी हत्तीने उध्वस्त केले हि घटना २७ एप्रिल ला मध्यरात्री चे सुमारास घडली व त्याचवेळी त्या ग्रामस्थांनी आपले गाव सोडून दुसऱ्या गावात आश्रय घेतला 
 काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या रानटी हत्तीचा कळप पुन्हा दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात परतला असून भामरागड तालुक्यातील दमनमरका गावात रविवारी मध्यरात्री हत्तीने धुमाकूळ घातला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे या गावातील गावकऱ्यांना आपले गाव सोडून जाण्यास भाग पडले आहे .
    या गावात तीन घरांची वस्ती असून येथील मजूर व शेतकरी अत्यंत काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात. दहशत माजविणाऱ्या हत्तीने अचानक शनिवारी रात्री गावात प्रवेश करून तीन घरावर हल्ला चढवला त्यामुळे त्यांच्या घराचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  झाले आहे. गावकऱ्यांनी हत्तीच्या दहशतीमुळे स्वतःच्या कुटुंबीयांचे जीव वाचवण्यासाठी आपले घरदार सोडले सदर तिनही घरातील कुटुंबीयांनी बाजूच्या फोडेवाला गावात आश्रय घेतला आहे.
सदर रानटी हत्तिंचा शासनाने तातडीने बंदोबस्त करावा जेणेकरून नाहक बळी जानार नाहीत  शेतकरी व गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडणार नाहीत 
तेव्हा वनविभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या बाबतीत उदासीन न राहता लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने शेतमजुरास गमवावा लागला जीव


आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने शेतमजुरास गमवावा लागला जीव

विकासाच्या नावाखाली सर्वकाही थोडांत

गोंडपिपरी:- प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधी ता.गोंडपिपरी येथील डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याने एका अपघातग्रस्त शेतमजूरास जीव गमवावा लागला ही घटना काल दि.२८ एप्रिलला घडली 
मृतक शेतमजुराचे नाव साईनाथ सुरकर वय ४० रा.भ़गारपेठ ता.गोडपिपरी जिल्हा चंद्रपूर असे आहे 
घरी शेतीचा लहानसा तुकडा त्यात काही भागत नाही म्हणून मिळेल ते काम करायचे अनं कसाबसा आपल्या कुटुंबियांचा रहाटगाडा चालवायचा. आपल्या वाटयाला आलेल्या वेदनांचे ओझे निमुटपणे पेलायचे. पण काल त्याचा काळ ठरला. काहीही चुक नसतांना एका दुचाकीस्वाराने मागून धडक दिली व तो रोडवर कोसळला त्याला खुप भयंकर दुखापत झाली तेव्हा घटनास्थळी जमलेल्या लोकांनी शंभर मिटरवर असलेल्या तळोधी आरोग्य उपकेंद्रात भरती केले पण तिथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. उपचाराअभावी कन्हत असलेल्या साईनाथ ला अखेर गोडपिपरी कडे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली

शासनाने मोठमोठया इमारती बांधून विकासाचे चित्र रंगविणा-या या व्यवस्थेचा तो बळी ठरला. साईनाथ सुरकर वय 40 गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ येथील रहिवाशी. पत्नी वैशाली व अथर्व अनं अनमोल असा त्याचा लहानसा संसार आपल्या वाटयाला आलेल्या शेतीचा लहानसा तुकडयात काही भागत नाही म्हणून शेतमजूरी करण्याव्यतिरीक्त त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. आपल्या वाटयाला येत असलेल्या हालअपेष्टा आपल्या मुलांच्या पदरी येउ नयेत म्हणून रात्रदिवस एक करणा-या साईनाथसाठी कालची सायंकाळ मात्र काळच ठरली. दिवसभर रोजीरोटी करून बाजार करण्यासाठी आपल्या मार्गाने पायदळ निघालेल्या साईनाथला मागून येणा-या दुचाकिने धडक दिली. अनं होत्याच नव्हत झालं.

दरम्यान यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निकीलेश नाकतोडे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेउन प्रतिक्रीया देउ असे ते म्हणाले.एकीकडे विकासाच्या बाता झाडल्या जात आहेत. मोठमोठया इमारती तयार केल्या जात आहेत. पण त्यात विकासाचा मात्र पत्ताच नाही. भंगाराम तळोधी येथे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी करोडो रूपये खर्चुन प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी इमारत तयार करण्यात आली. उपचारासाठी येथे दोन डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली. पण डॉक्टरच उपलब्ध राहत नाही. परिणामी साईनाथसारख्या निष्पापांना आपला जिव गमवावा लागत आहे. उदासिन लोकप्रतिनीधी, असंवेदनशिलतेच कळस गाठणारी प्रशासकिय व्यवस्था असली कि असे गरीबांचे नाहक बळी घेतले जाणार अशी संतप्त प्रतिक्रीया आता सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे 

यांना कोणी देणार का मदतीचा हात
 साईनाथ सुरकर या शेतमजूराचा गेलेला बळी प्रशासकिय व्यवस्थेची पुरती पोल खोलणारा ठरला आहे. त्याच्या पश्चात अथर्व व अनमोल या दोन चिमुकल्याचं आता कस होणार हाच विचार करित पत्नी वैशाली आसवांच्या गर्गेत बुडालेली आहे. त्यांना प्रशासन मदत करून आपल्या अनास्थेची भरपाई करणाार का हा खरा प्रश्न आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

एसटी बस महिला वाहकाने केली एका शिक्षकाची  पोलीसात तक्रार


एसटी बस महिला वाहकाने केली एका शिक्षकाची  पोलीसात तक्रार

सदर शिक्षक करतो नेहमीच हुज्जतबाजी,याला आवर घालणार कोन?


 हिंगणघाटः-
दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हिंगणघाट उमरेड या मार्गावर जाणाऱ्या बस वर महिला वाहक म्हणून सौ सुवर्णा साठोणे या कर्तव्यावर होत्या त्या वेळी बसमध्ये कही प्रवाशी प्रवास करीत होते. त्या दरम्यान हिंगणघाट येथून सिर्सी करीता एक शिक्षक नामे मोहन तिनगासे रा. हिंगणघाट हे सिर्सी या गावी जान्या करिता प्रवास करीत होते. त्यावेळी महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांनी तिकीट देण्याकरिता त्यांचे कडे गेली असता त्यांनी सिर्सी येथील तिकीट घेण्याकरिता दोनशे रुपयाची नोट महिला वाहकाला दिली. प्रवाशी संख्या कमी व पहिलीच सकाळची फेरी असल्यामुळे महिला वाहका जवळ सुटे पैसे नसल्यामुळे ६० रुपये तिकीटचे कापून १०० रुपये परत केले व उर्वरित ४० रुपये कर्तव्यप्रमाणे तिकीटच्या मागील बाजूस लिहून दिले व समोरील प्रवाशांना टिकट देण्यास निघून गेले असता मोहन तीनगासे या शिक्षकाने महिला वाहकाला अपमानस्पद शब्द वापरायला  सुरुवात केली  जेव्हा जेव्हा ती वाहक तिकिटे देत होती तेव्हा तेव्हा तो शिक्षक हुज्जतबाजी घालीत असल्याचे त्या महिला वाहकाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

शेवटी सिर्सी येथे उतरल्यानंतर महिला वाहकाने त्यांना उर्वरित ४० रुपये देण्याचा प्रयत्न केला असता मी तुला बघून घेईल, तू चोर आहेस, तू चोर आहेस असे मोठमोठ्याने ओरडून जणमाणसात त्या महिला वाहकाची बदनामी केली. आपल्या शिक्षकी पेश्याला काळिमा फसण्याचा प्रकार या शिक्षकाने केला. व पैसे नं घेता निघून गेला.परत आल्यानंतर त्या ४० रुपये लिहून असलेल्या तिकटावर एक शून्य वाढवून ४०० रुपये करून त्या महिला वाहकाची आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांचे कडे खोटी तक्रार केली. शिक्षकाला आपल्या शाळेच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना तो शिक्षक नेहमी ४० किलोमीटर हिंगणघाट वरून जाणे येणे करतो आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाहकाशी चालकांशी वाद घालतो अशी चर्चा बस स्थानकावर सुरु होती.

मोहन तिनगासे त्याची वागणूक त्या महिला वाहकाला सहन नं झाल्याने माझी कुठलीही चुकी नसताना व मला सर्व प्रवशासमोर बदनाम केले असल्याने त्याची तक्रार  हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे दाखल केली व त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी बस आगारातील कामगार यांनी केली.यावेळी मोहन तीनगासे यांनी पण बसची महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांच्यावर गंभीर आरोप लावला असून त्याची तक्रार हिंगणघाट बस डेपो अधिकाऱ्याला केली आहे. आता या प्रकरणी पोलीस आणि बस डेपो अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

आय.पी.एल. टी २० - २० क्रिकेट सट्टेबाज अहेरी पोलिसांच्या जाळ्यात


आय.पी.एल. टी २० - २० क्रिकेट सट्टेबाज अहेरी पोलिसांच्या जाळ्यात

 

गडचिरोली  :- 
सध्या देशात आयपीएलचा टि २०-२० क्रिकेट सीजन सुरु असुन ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या सट्टेबाजांचे रॅकेट अहेरी पोलिसांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस  येथे 27 एप्रिल रोजी पोलिसांनी छापा मारून सदर कारवाई केली. यावेळी सट्टेबाज हे बनावटी अँप (fake app) nice. 7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल सट्टा घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन निखील दुर्गे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व रोख 9 हजार 420 रुपये जप्त केले.या दोन्ही आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता नामे इरफान ईकबाल शेख रा. अहेरी याचे अप्पर लाईनला संदिप गुंडपवार रा. आलापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असुन सदर बेकायदेशिर ऑनलाईन (online) आय.पी.एल २०-२० क्रिकेट वर सट्टयाचा जुगार चालविणारे निखील दुर्गे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात. त्यांचे (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आय. पी. एल. सट्टयामध्ये एजंट चे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली गुन्हयातील आरोपी नामे 1) निखील मल्लया दुर्गे, 2) आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम गोगीवार, 4) निखील गुंडावार, 5) प्रणित श्रीरामवार, 6) अक्षय गनमुकलवार, 7) फरमान शेख, 8) फरदिन पठाण, 9) इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, 10) संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी (Police Station Aheri) येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलोप्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक पोस्टे दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी यांनी पार पाडली.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

वसुधा नाईक यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर


वसुधा नाईक यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

साकुरी -

ओम साई प्रतिष्ठान आणि बी. सी. सी. फिल्म प्रोडक्शन तर्फे दिला जाणारा 2024चा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार पुणे येथील अरण्येश्वर विद्यामंदिर या प्रशालेच्या शिक्षिका सौ. वसुधा वैभव नाईक यांना जाहीर झाला असून त्याचे  वितरण शुक्रवार दि.03.05.2024 रोजी सायं.06 ते 10 यावेळेत शिर्डीपासून जवळच असलेल्या शिर्डी अहमदनगर रोडवरील सिद्ध संकल्प लॉन साकुरी शिर्डी येथे होत आहे.सदरचा पुरस्कार अतिशय भव्य दिव्य असून गेल्या 35 वर्षांपासून वसुधा नाईक ह्या वर नमूद विद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत.वसुधा नाईक ह्या सेवाभावी वृत्तीच्या असून स्टार ऍपवर त्यांची जवळजवळ 3000 गाणी प्रसिद्ध आहेत.नवनिर्मिती करणे व स्वहस्ते शैक्षणिक साधने बनवून नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यावर त्यांचा भर असून विविध प्रकल्पांची निर्मिती करून विविध क्षेत्रात त्यांनी आपला सहभाग हिरीरीने नोंदविला आहे.त्यांना यापूर्वी अनेक छोटेमोठे पुरस्कार मिळाले असून एक कृतिशील शिक्षिका म्हणून त्यांचा नाव लौकिक असुन महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये  लेखन करून त्यांनी आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवीला आहे.तसेच 'रमाची पाटी ' हा तत्यांचा लघुपट यू ट्यूब वर खूप गाजत आहे.यालाही त्यांना 60 च्या वर पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 28, 2024

PostImage

कोलपल्ली येथील रा.कॉ. (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश


कोलपल्ली येथील रा.कॉ. (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश

अहेरी : तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोलपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक व गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रावादी  काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते असलेल्या सडमेक, वेंकटेश चालूरकर, विजय शंकर चालूरकर, रंगू चालूरकर, भीमराव पुल्लिंवार, सिद्धार्थ सोयाम, अनेक वेलादी, चंद्र कोरेत, नयन कोरेत, विशाल, अश्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करीत काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला 
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा शाल व पक्षाचा दुप्पटा टाकून पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी अहेरी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम, देवलमरी ग्रामपंचायतचे सदस्य महेश लेकूर, श्रीनिवास राऊत, पुरषोत्तम आईलवार, दिवाकर गावडे, संजय गोंडे, कोमल सडमेक, शंकर बोरकूटे सह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

April 26, 2024

PostImage

स्वयंपाक खोलीत आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहीत महिला


स्वयंपाक खोलीत आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहीत महिला 


कुरखेडा :
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालूक्यातील बांधगाव येथे एका ३० वर्षीय विवाहित महीलेचे स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
. सदर घटणा आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली असून मृतक महिलेचे नाव प्रतिभा गिरीधर राणे आहे कौटूंबिक कलहाला कंटाळत तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृतदेह आज सकाळी स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. परंतु तीच्या माहेरच्यानी आमच्या मुलीची हत्या करण्यात आली, असा आरोप सासरच्या मंडळीवर केला आहे. घटनेची माहीती मिळताच पूराडा पोलीस स्टेशनच्या चमूने घटणास्थळ गाठत पंचनामा केला, शव उत्तरीय तपासणी करीता  उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा  सेंटरला पाठविण्यात आला आहे. मृतकाचे मागे पती व २ अपत्य आहेत. यासंदर्भात पूराडा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आले आहे. पूढील तपास पूराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांचा मार्गदर्शनात सूरू करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 26, 2024

PostImage

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद 


गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद 


अहमदनगर:-
दि.२५/०४/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला गावठी कटटा (अग्नीशस्त्र) लावुन बु-हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ संशयास्पदरीत्या फिरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जावून स्वताची सुरक्षितता बाळगून प्राप्त माहिती आधारे सदर ठिकाणी दोन प्रतिष्ठीत पंचांना घेवुन जावून खात्री करुन व काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावून दमडी मशिदजवळ  पाहणी केली असता तेथे एक इसम संशयास्पद फिरतांना दिसून आल्याने पंचांची व पोलीसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोचलेला एक २५२००- रु किं चा लोखंडी पिस्टल मॅगजिन गावठी बनावटीचा कटटा (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुस असे आरोपी जाबीर सादिक सय्यद वय-३४ वर्षे रा. घर नं.-६ शहा कॉलनी, गोविंदपुरा, अहमदनगर याच्या कब्जात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पोकों/ संदिप थोरात यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ४४३/२०२४ आर्म ॲक्ट ३/२५ सह महा.पो.का.क.: (१) (३) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

April 25, 2024

PostImage

फक्त पाच हजार रुपयाची लाच पडली महागात ,पोलीस उपअधीक्षक एसीबीच्या जाळ्यात


फक्त पाच हजार रुपयाची लाच पडली महागात ,पोलीस उपअधीक्षक एसीबीच्या जाळ्यात 


धुळे :-
 नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असणाऱ्या पाच महिलांकडून प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रूपये लाच घेताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकरांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथे राहत्या घरी केली.

तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांच्या सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर हे 14 व 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर होते. त्यामुळे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावून गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकड़न प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रुपये जमा करून आणून द्या, नाहीतर सर्वांना बिनपगारी करेल, असे तक्रारदारांना सांगितले होते. तक्रारदार यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केले. मात्र, लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.
  एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यावेळी येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. एसीबीच्या पथकाने सापळा रचल्याचे समजताच पारसकर यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली असता त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार, लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 24, 2024

PostImage

ट्रक ने चिरडले दुचाकीस्वारास, आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी 


ट्रक ने चिरडले दुचाकीस्वारास, आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी 


सुरक्षा रक्षकांची बघ्याची भूमिका 

आष्टी:-
एका दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना मार्कंडा (कं) क्रासींगवर आज दि.२४ एप्रिल ला ४.३० वाजताचे सुमारास घडली
एम एच ३४ बि जी ४२२४ हा ट्रक आष्टी कडून मार्कंडा (कं)कडे भरधाव वेगाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्र एम एच ३३ के २१४५ ला जब्बर धडक दिल्याने दुचाकी समोरील चाकात फसली दुचाकीवरील आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी जखमी झाले आहेत गंभीर इसमाचे नाव प्रभाकर लोणारे वय ५२ वर्षं  रा.मार्कंडा (कं) तर जखमी नातवंडाची नावे रिदांश कैलास लोणारे वय ७ वर्ष,सिदांश कैलास लोणारे वय ५ वर्ष असे आहेत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, प्रभाकर लोणारे ची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे दोन नातवंडावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत 
मार्कंडा (कं) च्या क्रासींगवर सुरजागड लोह प्रकल्पाचे तीन सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत मात्र ते एकाच ठिकाणी बसून बघ्याची भूमिका घेत आहेत असे असेल त्या सुरक्षारक्षकांचे काम तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे
या ठिकाणी क्रासींग असल्याने मार्कंडा (कं) कडून येणाऱ्या वाहनांना आष्टी कडून येणारे वाहन दिसून येत नाहीत तेव्हा सदर सुरक्षा रक्षकांनी त्याच वळणावर दोन्ही बाजूला तत्परतेने नजर ठेवल्यास असे अपघात टाळण्यासाठी मदत होते यावर संबंधीतांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे


PostImage

Vaingangavarta19

April 23, 2024

PostImage

अतीभारी ट्रकला लागली आग,  ट्रक जळून खाक


अतीभारी ट्रकला लागली आग,  ट्रक जळून खाक


कोरपना:-
कोरपना तालुक्यातील आसन गावाजवळ अतीभारी गिट्टी भरलेल्या एका धावत्या हायवा ट्रकला अचानकपणे आग लागून ट्रक जळून खाक झाल्याची घटना आज 22 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास घडली.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून ट्रक मात्र पुर्णपणे जळाला.यवतमाळ जिल्ह्यातील मोहदावरून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना मागच्या टायरने अचानक पेट घेतला.टायर पेटत असल्याची माहिती रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी चालकास दिली असता तो वाहन थांबवून लगेच खाली उतरला.वाहनात कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने तो आग विझवण्यात अपयशी ठरला आणि पाहता पाहता आगीने भीषण रौद्ररूप  धारण केले. 
   राजुरा,गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मार्गाच्या कामावर असलेल्या पाणी टँकरच्या पाईपने सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न झाला.मात्र,आग नियंत्रणात आली नाही.दरम्यान घटनेच्या अर्धा तासानंतर गडचांदूर नगर परिषद व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन आले व आगीवर नियंत्रण मिळवले.तोवर हायवा ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला होता.आगीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व वाटसरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 23, 2024

PostImage

नान्ही येथे आदिवासी कंवर समाजाचे २९ जोडपी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध


नान्ही येथे आदिवासी कंवर समाजाचे २९ जोडपी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध

 

मागील २५ वर्षापासून सुरु आहे सामुहिक विवाह सोहळा आयोजनाची परंपरा

कुरखेडा:-
 कुरखेडा तालूक्यातील नान्ही येथे आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समीती नान्ही यांच्या वतीने दि .२२ एप्रिल सोमवार रोजी आदिवासी कंवर समाज आदर्श विवाह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंवर समाजाचे महाराष्ट्र व छत्तीसगढ़ या दोन राज्यातील २९ वर-वधू जोडपी विवाहबद्ध झाली. खाजगी विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळता यावा, समाज व वधु पक्ष कर्ज बाजारी होऊ नये याकरीता आदिवासी कंवर समाजाचा वतीने नान्ही येथे मागील सलग २५ वर्षापासून सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. आज आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे उदघाटन स्थानिक  आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी कंवर समाज राजनांदगांव (छत्तीसगढ़) चे अध्यक्ष बिंदुलाल फुलकूवंर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतभाऊ दूधनांग, कंवर समाज संघटनेचे मार्गदर्शक डॉ. प्रा. मेघराज कपूर, माजी प. स. सभापती परसराम टिकले, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन नाट, गोंदिया जि. प. सदस्य श्रीकांत घाटबांधे, आदिवासी समाज कार्यकर्ते रामदास मसराम,सूनेर सोनटापर, ब्रिजलाल बागडेरीया,चंन्द्रभान हूंडरा,देवरी पंचायत समिति सभापती अंबिका बंजार,माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, माजी प.स .सभापती गिरीधर तितराम,गणपत सोनकूसरे,पत्रकार  सिराज पठान, चंपाबाई सोनकूकरा आदि मान्यवर उपस्थित होते.  यावेळी प्रास्ताविकातून डॉ.मेघराज कपूर यानी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह करीत शासकीय स्तरावरून आदिवासी कंवर समाजाचा समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आमदार कृष्णा गजबे यानी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यां जाणून घेण्याकरीता समाजाची बैठक  आयोजन करीत त्या मार्गी लावण्याकरीता शासन स्तरावर पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिले.  कार्यक्रमाचे संचालन सोनू कपूर व गणेश सोनकलंगी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक कृष्ण चन्द्रमा यानी केले कार्यक्रमात महाराष्ट्र व छत्तीसगढ़ राज्यातील कंवर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थिती होते


PostImage

Vaingangavarta19

April 23, 2024

PostImage

अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची शिक्षकानी केली मागणी


अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची शिक्षकानी केली मागणी


 नागपूरः- 
येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम शिक्षकाने 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची मागणी केली. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला आहे.

वर्गात एकटीच अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थिनीला पाहून वासनांध शिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षका विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अमोल पाटील वय 40 वर्ष रा. येरखेडा, कामठी, असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. अमोल विरुद्ध यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी शिक्षक अमोल हा कोराडीतील एका खासगी शाळेत शिक्षक असून शिकवणी वर्गही घेतो. शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी पीडित अल्पवयीन 15 वर्षीय विद्यार्थिनी त्याच्याच वर्गात शिकते. तसेच तिने त्याच्याकडे शिकवणी वर्गही लावला आहे. गत 15 एप्रिल रोजी सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी त्याच्याकडे शिकवणीला गेली होती. इतर विद्यार्थी यायचेच असल्याने ती वर्गात एकटी बसून अभ्यास करीत होती. दरम्यान आरोपी तिच्याजवळ आला. तिला एकटी पाहून त्याने तिच्याशी अश्लील बोलण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला असता अमोलने तिच्याशी अश्लील चाळे केले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. संबंध ठेवल्यास परीक्षेत पास होण्यासाठी मदत करण्याचे आमिषही शिक्षकाने दिले. मात्र, विद्यार्थिनीने त्याला वारंवार प्रतिकार केला. त्याला अनेकदा दूर लोटण्याचा प्रयत्न केला. ती चिडल्यामुळे शिक्षकाने माघार घेतली.

शिक्षकाने तिला कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर आईकडे रडायला सुरुवात केली. या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर शांतीनगर पोलिसात अमोल विरुद्ध तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवून घटनेचा तपास सुरू केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने  मांडले थैमान


गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने  मांडले थैमान

 


घरांच्या छतासह शेतातील रब्बी व भाजीपाला पिकाचं प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल 

 

गडचिरोली ता. २२:-
 
गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवार व सोमवारला (ता.२१/२२) झालेल्या विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे तर चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे विज कोसळल्याने एक मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे
आणि काही ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्याने  घरांवरील छत उडाले आहेत 
 रविवारी दिनांक (२१) ला तालुक्यातील कढोली येथे  आपल्या घराच्या दारात उभी असताना त्यांच्याच नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने एका १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.
 या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व विज कोसळून जखमी झालेल्या मुलीला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांनी केली आहे 
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. यातच रविवारी सकाळपासूनच शहर व ग्रामीण भागासह जिल्हाभरात ढग दाटून आले. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.आष्टी परिसरातील व तालुक्यातील परिसरात शेतकऱ्यांचे रब्बी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. या भागामध्ये गारांचा पाऊस देखील झाला आहे.
जिल्ह्यातच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला या पिकांबरोबरच आंबा, फळबागा व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय कढोली येथे वीज पडून १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटनाही घडली आहे. काही दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेकडो क्षेत्रावरील शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्याबद्दल माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असतानाच त्यातच २१, २२ एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान क्षेत्रात आता वाढ झाली आहे. त्यामुळे याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी केली अटक


देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी केली अटक

 महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस.

 

गडचिरोली; देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 21/04/2024 रोजी अटक करण्यात आली आहे 

काल दिनांक 21/04/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळून आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम वय 34 वर्षे रा. नेलगंडा, तह. भामरागड जि. गडचिरोली असे असून तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 22/03/2023 रोजी नेलगंडा
जंगल परिसरात 01 क्लेमोर व 02 कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सह कलम 4,5 भास्फोका, वाढीवकलम कलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष
सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/04/2024 रोजी सदर गुन्हात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता

शासनाने जाहिर केलेले बक्षीस. महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी, एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच  पोलीस अधीक्षक नीलोत्पल  यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

आंनंदनगरी चा राडा पोहचला  सरकारी दवाखान्यात व तिथेच तुफान हाणामारी, 16 लोकांवर गंभीर गुन्हे दाखल


आंनंदनगरी चा राडा पोहचला  सरकारी दवाखान्यात व तिथेच तुफान हाणामारी, 16 लोकांवर गंभीर गुन्हे दाखल 


आंबेजोगाई:-
शहरातील रस्त्यावर दोन गटात तुतू-मिमी झाली. याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. मार लागला म्हणून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात गेल्यानंतर विरुद्ध पार्टी तेथे आले असता रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये दोन्ही पार्ट्यांची तुंबळ हाणामारी होऊन सोळा लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुण्यासह इतर गुन्हे दाखल झाले आहेत शासकीय रुग्णालयात झालेल्या या हाणामारीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रुग्णालयामध्ये तरी हाणामारी करू नये असाच सूर शहरात सध्या उमटत आहे.

 आंबेजोगाई मंडी बाजार भागामध्ये पाटील चौक येथे आनंद नगरी म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद होण्यासाठी बाहेरगावाहून आनंद नगरी खेळणीचे साहित्य, विविध प्रकारचे वस्तू विक्री, झोके असे प्रकार असलेली आनंद नगरी गेल्या चार दिवसापासून सुरू झाली. या आनंदनगरी च्या समोर पार्किंग मध्ये मोटरसायकल लावण्यावरून दोन गटात कुरबुर झाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले गंभीर मार लागल्यामुळे यातील चार पाच जणांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागामध्ये उपचार चालू असताना तेथे दुसऱ्या गटातील पंचवीस ते तीस लोकांचा जमाव चालून गेल्यामुळे व तिथं परत बाचाबाची आणि तुफान हाणामारी चालू झाली याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन दंगे करणाऱ्या दोन्ही गटातील गुन्हेगारांना पोलिसांनी व रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी काट्याने बेदम चोप दिल्यानंतर हे दंगेखोर पळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णालयात अतिदक्षता लावण्याचे कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, काठी, दगड, लोखंडी एक किलो वजणाचे माप मारूण गंभिर दुखापत केली व लाथाबुक्याने मारहान करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून साकीब जहीर पठाण, जहांगीर मीर पठाण,दौलत मीर पठाण,साहील पठाण,सोहल नाजखन मिरखान पठाण,साकेब पठाण, आफताब अखीब शेख,
 मुशरफ माजीद शेख , पठाण फरद्यीम मिरखान , कलीम नियामत पठाण ,मार्ज पठाण, फेरोज पठाण, इफाजत मिरखान पठाण, नदीम जलील शेख , शारुख मिरखान पठाण , अख्तरखान पठाण सर्व रा. सदर बाजार अंबाजोगाई यांच्या विरोधात गुन्हा 174/2024 कलम 307,326,324,323,504,506, 143, 147, 148, 149 भादवी 135 मपोका. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

वीज कोसळली मात्र नशीब बलवत्तर म्हणून नंदिनीला मिळाले जीवदान आष्टी:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे दि २१ ला सायंकाळी ७ वाजता विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू


कढोली येथे वीज कोसळली,  नशीब बलवत्तर म्हणून नंदिनीला मिळाले जीवदान 

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील 
चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे दि २१ ला सायंकाळी  ७ वाजता विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि  क्षणार्धात विज कोसळली, ती विज नारळाच्या झाडावर पडली तेव्हा अंगनात असलेल्या नंदिनी ला शाक बसला व ती खाली कोसळली तेव्हा तीला त्वरीत ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले
मात्र नारळाच्या झाडाला आग लागली असल्याने चामोर्शी येथील अग्निशमन बोलाविण्यात आले व आग विझविण्यात आली व मोठा अनर्थ टळला आहे 

 नंदिनी भारत घ्यार वय १५ रा. कढोली हिच्या शेजारीच विज कोसळल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तीला ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असता प्रसंगावधान राखत  डॉक्टरांनी योग्य उपचार करुन तिचे प्राण वाचवले आहे 
सदर घटनेची माहिती होताच चामोर्शी तहसीलदार प्रशांत घोरुडे हे तातडीने ग्रामीण रुग्णालयात पोहचले व कुटुंबीयांना धिर दिला
नंदिनी ही नवव्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे आयुष्य मोठे असल्याने तीचा जीव वाचला आहे
 नारळाच्या झाडावर विज कोसळली व त्याने पेट घेतला त्यामुळे गावातील घरांना आग लागेल या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले होते मात्र अग्निशमन दलाचे वेळीच आग आटोक्यात आणली त्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला 

झाली. नंदिनी ही आपल्या घरासमोरील अंगणात असताना तिथे असलेल्या नारळाच्या झाडावर विज कोसळली. ती झाडाच्या अगदी जवळच असल्याने विजेच्या धक्क्याने ती खाली कोसळली तीला त्वरित आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली व या घटनेची माहिती चामोर्शी चे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना कळविताच क्षणाचाही विलंब न लावता तहसीलदार प्रशांत घोरुडे तातडीने आष्टी येथील रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन तातडीने कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दीले. व कुटुंबीयांना धीर दिला. नंदिनी ही नवव्या वर्गात शिकत असून नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. विज कोसळल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. त्यामुळे वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला मात्र लवकरच हि आग आटोक्यात आल्याने धोका टळला.


PostImage

Vaingangavarta19

April 21, 2024

PostImage

 अंतीम आकडेवारीग गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 71.88 %


 

 अंतीम आकडेवारीग

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 71.88 %

गडचिरोली, दि. 21 :12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 19 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदान पक्रियेत एकूण 71.88 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आमगाव विधानसभा मतदार संघात 69.25 टक्के, आरमोरी 73.69 टक्के, गडचिरोली 71.42 टक्के, अहेरी 66.93 टक्के, ब्रम्हपुरी 75.10 टक्के तर चिमुर विधानसभा मतदारसंघात 74.41 टक्के मतदान झाले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लक्ष 17 हजार 702 मतदार आहे. यात 8 लक्ष 14 हजार 763 पुरुष मतदार, 8 लक्ष 2 हजार 434 स्त्री मतदार तर 10 इतर मतदार आहेत. यापैकी 5 लक्ष 95 हजार 272 पुरुष मतदारांनी (73.06 टक्के), 5 लक्ष 67 हजार 157 स्त्री मतदारांनी (70.68 टक्के) तर 5 इतर नागरिक असे 11 लक्ष 62 हजार 434 (71.88 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 21, 2024

PostImage

नाबालीक मुलीचे लग्न समारंभातून अपहरण करून केला बलात्कार व दगडाने ठेचून केली हत्या


नाबालीक मुलीचे लग्न समारंभातून अपहरण करून केला बलात्कार व दगडाने ठेचून केली हत्या

 

गोंदिया :-
 कुटुंबासह गावातीलच लग्न समारंभात गेलेल्या १२ वर्षाच्या नाबालीक मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमाने तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. सदर घटना १९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्याच्या ककोडी परसिरातील वटेकसा येथील जंगलात घडली. काजल (१२) (बदललेले नाव) रा. गोठणपार असे मृत मुलीचे नाव आहे.

ककोडी परसरातील ग्रामपंचायत गोठणपार येथे १९ एप्रिल रोजी लग्नकार्यात घरातील सर्व मंडळी गेले. त्या लग्नाला काजल १२ ही देखील गेली. लग्न समारंभात ती असतांना अज्ञात आरोपीने तिचे अपहरण करून रात्री ८ वाजताच्या सुमारास वटेकसा येथील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांतर तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे अवघा गोंदिया जिल्हा हादरला आहे.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.गोठनपार येथे लग्न समारोह होता. या लग्नसमारंभासाठी पिडीत मुलगी आपल्या कुटुंबियासह आली होती. परंतु नराधमाने संधीचा फायदा पाहून तिचे अपहरण करून त्या चिमुकलीवर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. या घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी तिच्या वडीलाच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३०२, ३७६, ३६३ सहकलम ४, ६ बाललैंगीक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासासाठी चमू रवाना -


दोषींना अटक करून फाशी द्या -

निरागस मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमाणूस कृत्य करीत तिचा जीव घेणाऱ्या नराधमाला त्वरीत अटक करा, या प्रकरणातील दोषीला फाशी देण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

लोकशाहीच्या आनंदावर लगेच पडले विरजन -

लोकशाही मजबूत करण्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान करण्यात आले. उमेद्वारांनी महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेचे वचन देत मत मागितले. परंतु मतदानाचे कार्य होताच १२ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्याचे अमाणूस कृत्य करण्यात आले. या संतापजनक घटनेमुळे गोंदिया जिल्हा हादरला आहे. मुलीच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 21, 2024

PostImage

लॉयड्स कालिअम्मल हॉस्पिटल हेडरी येथे रक्तदान शिबीर


लॉयड्स कालिअम्मल हॉस्पिटल हेडरी येथे रक्तदान शिबीर

संचालक बि. प्रभाकरन यांच्या सह  50 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग 

    अशोक खंडारे  /मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९                                                एटापल्ली:-
लॉयड्स कालीअम्मल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड द्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आज दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी  आयोजन करण्यात आले असुन सर्व प्रथम लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक  बि. प्रभाकरन यांनी शिबिरात रक्तदान केले. लॉयड्स कंपनीचे 50 अधिकारी आणि कर्मचारी यांनीसुद्धा रक्तदान केले. सर्व समुहातील सदस्यांनी दर महिन्याला किमान 50 युनिट रक्त देण्याचे आश्वासन दिले आणि ते आजारी व्यक्तीला उपयोगात पडेल असा उद्देश ठेवला असून लॉयड्स टीम ही मोलाची कामगिरी करीत  आहे.

 अति दुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागात उच्च दर्जेचा मोफत आरोग्य सुविधा 

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी नक्षल प्रभावीत सुरजागड परिसरात मुलभूत आरोग्य सुविधा मिळणे ही कठीण होते पण परिसरातील आदिवासीना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याकरिता लॉयड्स मेटल्स कंपनीचे पुढाकाराने हेडरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे काली अम्मल हॉस्पिटल सुरू केले आहे. अण या परिसरातील आदिवासी गरीब व गरजूंना मोठा आधार झालंय. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी 24/7 तास रुग्ण सेवा देत आहेत.
   लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल 8 नोव्हेंबर 2023 ला सामान्यांच्या सेवेत कार्यन्वीत झाले. या ठिकाणी दहा तज्ज्ञ डॉक्टर 40 हुन अधिक आरोग्यं कर्मचारी परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत. या हॉस्पिटल मधे सुरजागड, हेडरी, गट्टा, जांभिया एटापल्ली, भामरागड तालुका  आलापल्ली, अहेरी सह गडचिरोली जिह्यातील दररोज शेकडो रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतांना दिसत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 19, 2024

PostImage

लोकसभा गडचिरोली-चिमुर मतदारसंघात  ६५.१९ %मतदान


लोकसभा गडचिरोली-चिमुर मतदारसंघात  ६५.१९ %मतदान

 


लोकसभा क्षेत्रात उत्स्फुर्त प्रतिसाद
 

गडचिरोली दि, 19 - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 65.19 टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी दुर्गम भागातील पथके परत आल्यावर स्पष्ट होणार आहे.

मतदार संघात आज सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. शहरी व ग्रामीण भागत मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर  प्रशासनामार्फत मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे निवडणूक प्रक्रियेवर चोख लक्ष होते. त्यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देवून मतदारांकडून मतदान सुविधेबाबत प्रतिक्रीया जाणून घेतल्या. रांगेत असलेल्या महिलांना मतदानासाठी प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केंद्राध्यक्ष यांना दिल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1891 मतदान केंद्रावर मतदान प्रकिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव विधानसभा मतदारसंघात 64.60 टक्के, आरमोरी 65.23 टक्के, गडचिरोली 66.10 टक्के, अहेरी 63.40 टक्के, ब्रम्हपुरी 67.02 टक्के आणि चिमुर 64.49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असल्याची अंदाजीत आकडेवारी निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. दुर्गम भागातील मतदान पथके परत आल्यावर तेथील आकडेवारी उशीरापर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून मतदाराना प्रोत्साहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते.  दैने यांचे वडीलांचे 15 एप्रिल रोजी दुःखद निधन झाल्यावर त्यांचे अंतिम संस्कार कार्य उरकून श्री दैने 17 एप्रिल रोजी तातडीने निवडणूकिच्या राष्ट्रीय कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांनी आज गडचिरोली येथे मतदान करून मतदानाचे कर्तव्य पार पाडून वडिलांना श्रद्धांजली वाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनीही मतदारांना निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांनीही आज सहपरिवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपालिकेच्या शाळेत मतदान केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गोंडी भाषेतुन आवाहन करत ग्रामिण मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला होता. त्यांनी शहरातील पंचायत समिती येथील महिला संचालित पिंक मतदान केंद्रावर भेट देवून महिला मतदारांचा उत्साह वाढविला. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील मतदारांशी संवाद साधला.


PostImage

Vaingangavarta19

April 19, 2024

PostImage

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी बजावला मतदानाचा हक्क


महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी बजावला मतदानाचा हक्क

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
अहेरी:-
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी आपला मतदानाचा हक्क आज लोकसभा निवडणुकीत बजावला
भारताची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्व विदर्भात आज दि.१९ एप्रिल ला मतदान घेण्यात आले .चिमुर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राकरीता  अहेरी  विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा दिना चेरपल्ली मतदान केंद्रावर राज्याचे मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी मतदान केले व क्षेत्रातील सर्व मतदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मतांचा अधिकाराचा प्रत्येक व्यक्तींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले 
मतदान केंद्रावर खूप प्रमाणात गर्दी असल्याने सर्व मतदारांनी शांततेत मतदान करावे अश्या ही सुचना केल्या व पोलीसांनी सुद्धा सहकार्य करावे असेही मंत्रीमहोदय यांनी आवर्जून सांगितले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 19, 2024

PostImage

अज्ञात मारेकऱ्यांनी युवकाचा  केला खून व  फेकला  शेतशिवारात 


अज्ञात मारेकऱ्यांनी युवकाचा  केला खून व  फेकला  शेतशिवारात 


आरमोरी तालुक्यातील बोडदा येथील घटना

 

आरमोरी :-
तालुक्यातील  पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोडदा येथील नामे प्रशांत रामदास उरकुडे वय 24 वर्ष रा. बोडदा त. आरमोरी जिल्हा गडचिरोली हा युवक दिनांक 17-4-2024 ला रात्रीच्या दरम्यान सौचास खेमराज राऊत यांच्या शेताकडे गेला असता कुणीतरी अज्ञात दोन ते तीन व्यक्तींनी प्रशांत वरील रागामुळे  दोरीने  गळफास देऊन त्याला जीवानीशी ठार मारून त्याचा मृतदेह जवळच असलेल्या विजय राऊत यांच्या शेतामध्ये फेकून दिला दिनांक 18-4-2024 ला सकाळी या घटनेची वार्ता गावामध्ये पसरताच मृतकाचा भाऊ सुधीर रामदास उरकुडे यांनी घटनास्थळ गाठले आणि गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने आरमोरी पोलीस ठाणे गाठून अज्ञात मारेकरी विरुद्ध दिनांक 18-4-2024 ला पोलीस ठाणे आरमोरी येथे अज्ञात मारेकऱ्यां विरुद्ध फिर्याद नोंदविले लागलीच आरमोरी पोलीस घटनास्थळावर जाऊन मृतकाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता आरमोरी येथे पाठविले घटनेची मोका पंचनामा करून आरमोरी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध अपराध क्रमांक व कलम 118, 2024 कलम ३०२, २०१,३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 
घटनेच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक आरमोरी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस स्टेशन आरमोरी हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 18, 2024

PostImage

आलापल्ली येथील भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सम्पन्न


आलापल्ली येथील भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सम्पन्न 

 

आलापल्ली:-
श्रीरामनवमी निमित्ताने दि  १७ ला संध्याकाळी आलापल्ली शहरात श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली, माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांची ह्या शोभायात्रेत विशेष उपस्थिती होती, ह्यावेळी राजेंनी श्रीरामाचे विधिवत पूजन व आरती करीत दर्शन घेतले तसेच ह्या भव्य शोभायात्रेत सामील झाले.

अहेरी विधानसभा क्षेत्रात आलापल्ली हे शहर मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. याठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे केले जातात. रामनवमी निमित्त रामभक्तांनी कालपासूनच शहरात भव्य तयारी केली होती.सकाळपासून विविध कार्यक्रम घेत सायंकाळच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढली. हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक, युवती तसेच परिसरातील नागरिक या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यकर्त्याच्या विशेष आग्रहाने राजेंनी बेंजोच्या तालावर ठेका सुद्धा धरला तसेच यावेळी रामक्तांनी राजेंना खांद्यांवर घेऊन डान्स केला.
  

ठिकठिकाणी आलापल्लीकरांनी या भव्य रॅली व शोभायात्रेचे स्वागत केले. श्रीराम मंदिरातून निघालेली शोभायात्रा विर बाबूराव चौक, बस स्टँड चौक, श्रीराम चौक आणि वि.दा. सावरकर चौक परत तिथेच समापन झाले. यावेळी डिजे व बेंजोच्या तालावर महिला, पुरुष, युवक, युवती एकच जल्लोष केले तर चिमुकल्यांनी सुद्धा लेझिम डान्सद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे आलापल्ली शहरात हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा पार पडली. यावेळी संपूर्ण शहर राममय तथा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते


PostImage

Vaingangavarta19

April 10, 2024

PostImage

उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली


उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली 

आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  आष्टी - आलापल्ली महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी येथील चौकातून येत असलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हि घटना आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही ट्रक चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे 
ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ३६८३ हा  आष्टी येथील चौकातून आलापल्ली कडे जात होता व ट्रक क्रमांक एम एच ३४बी झेड ३९७३ हा ट्रक सूरजागड येथून लोहखनिजाचा कच्च्या माल घेऊन येत होता  या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे आष्टी कडून येणाऱ्या ट्रक चालकाने त्या वाहनाचा सुसाट वेग पाहून आपले वाहन उभे ठेवले तरी या उभा ठेवलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे 
या घटनेची आष्टी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या महामार्गावर सूरजागड लोहखनिजाची कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रका मोठ्या सुसाट वेगाने धावत असतात या महामार्गावर तर दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या महामार्गावर नेहमी अपघात होतच असतात आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत तरी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे ट्रक चालक हे कोणाच्याच बापाला घाबरत नाही आहेत असे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर एका सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे तरी याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आष्टी शहरात होणार धुमधडाक्यात साजरा


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आष्टी शहरात होणार धुमधडाक्यात साजरा

 


आष्टी : -
येथील धम्मदिप बौध्द समाज मंडळाचे वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.  भारत सरकार सुद्धा राष्ट्रीय सन म्हणून साजरा करीत असतो
 यानिमित्ताने चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात धम्मदीप बौद्ध समाज मंडळाच्या वतीने दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ०९:०० वाजता बाईक रॅली व सायंकाळी ०६:०० वाजता  मुला - मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत आणि दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ०९:०० वाजता मानवंदना व दुपारी १२:०० जुन्या ग्रामीण रुग्णालयाजवळ भोजनदान देण्यात येणार असून सायंकाळी ०६:०० वाजता भव्यदिव्य समाजबांधवांची मिरवणूक काढण्यात येणार आहे करीता आष्टी शहरातील सर्व उपासक तथा उपासीकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धम्मदीप बौद्ध समाज मंडळ आष्टी चे अध्यक्ष अमित नगराळे, आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे आहे


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस ठार


स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस ठार


अहेरी:-
जवळील गेर्रा महागाव रोडवर एका स्कॉर्पीओने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाल्याची घटना दि. ९ एप्रिल ला दुपारी १२.३० वा.चे दरम्यान घडली
 पोलीस शिपाई चिन्ना विडपी वय ४० रा.अहेरी असे मृतकाचे नाव असून  चिन्ना हे वांगेपल्ली कडून आपल्या दुचाकीने येत असतांना अहेरी कडून महागाव कडे जात असलेल्या एम एच ३२ ए एच  ४०५४ स्कॉर्पिओ ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाले 
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चिन्ना विडपी यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
चिन्ना विडपी यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई,वडील असा परिवार आहे
त्यांच्या अकाली निधनाने मित्र मंडळ व परीवारात शोककळा पसरली आहे
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

लग्न सोहळ्यात वाढतोय वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर


लग्न सोहळ्यात वाढतोय वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर

ग्रामीण भागांतही लग्नात होतोय वारेमाप खर्च, सामूहिक विवाहाचा सोहळा काळाची गरज

 

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू असून शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही खर्चिक लग्न सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. अलीकडे लग्नसाहित्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर महागाईचे सावट आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुलांमुलीच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात. परंतु, दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील लग्नसोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते. परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटमाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे.
     प्रत्येकाला वाटते, लग्न एकच वेळा होते त्यामुळे लग्नासोहळ्यात मेंहदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागतसमारंभ,भेटवस्तू, बॅन्डबाजा, डीजे, लाईटटिंग, मोठी एलएडी स्क्रीन शेवटी मांडव-वाढवणी झाल्याशिवाय पाहुणे जात नाही अशी कार्यक्रमासह खर्चाची यादी वाढली आहे. शिवाय व्हीडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा सुटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जाते. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदीत वाजतगाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आत्ताच्या तरुणपिढींचा आग्रह घरच्यानसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न ग्रामीण भागात व्हायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र शेती व्यवसाय हा कधी अवकाळी गारपीठ पाऊस, अतिवृष्टी, महापूर, इतर रोगामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो. त्यामुळे या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न नाहीच्या बरोबर असले तरी सध्या सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात सर्वच दोन ते तीन दिवसांत लाखो रुपयांचा खर्च होत असतो. वेळप्रसंगी लग्न थाटामाटात करण्याचा हट्ट वधू किंवा वर पक्षाकडून घातला जात असल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.


सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज
समाजात गरीब श्रीमंत अशा सर्वच घटकातील मुला मुलींचे हे सामुहिक विवाह सोहळ्यात करणे काळाची गरज आहे. अलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाहाचे आयोजन करतात. या माध्यमातून सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यात बचत तर होतेच व सामाजिक संस्थांकडून लग्न जोडप्यांना घरघुती संसाराकरिता आवश्यक सामान सुद्धा दिल्या जाते. गोरगरीब शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाहामुळे मोठी मदत होते. कर्जबाजारी होण्यापासून वाचता येते. लग्नसोहळयात अमाप खर्च केला जातो. त्यामुळे आर्थिक, कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी कमी खर्चात तसेच सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

का उचलले टोकाचे पाऊल ? मित्राला फोन करून लगेच केली गळफास घेऊन आत्महत्या 


का उचलले टोकाचे पाऊल ? मित्राला फोन करून लगेच केली गळफास घेऊन आत्महत्या 


आपल्या मित्राला दुरध्वनी ने केला फोन आणि सांगीतले की मी आत्महत्या करतोय

 


अजय बारसागडे प्रतिनिधी आलापल्ली 
 आलापल्ली:+
 असे काय झाले की, त्याला  टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करावी लागली हे कोडे आता पोलीसच उलगडणार असे चित्र दिसत आहे
मी आत्महत्या करत आहे, असा कॉल मित्रांना करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ एप्रिल रोजी रात्री येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन मोहुर्ले  वय ३०, रा.रंगयापल्ली असे मृताचे नाव आहे. अहेरी येथील त्याची सासुरवाडी आहे. त्यामुळे तो अहेरीतच भाड्याने खोली घेऊन  पत्नीसह राहत होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. दरम्यान, कौटुंबिक कारणावरून मोहन मोहुर्ले
त्याचा पत्नीशी वाद होत असे. ७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता तो घराबाहेर पडला. गावालगतच्या शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळील एका झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

तत्पूर्वी त्याने एका मित्राला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला व तु कुठे आहेस असे विचारले असता मात्र त्याचे म्हणने न ऐकताच फोन कट केला   मित्रांनी रात्री सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच आढळला नाही व आठ एप्रिल ला सकाळी महाविद्यालय जवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले 
मोहन मोहुर्ले याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.

 आत्महत्येची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2024

PostImage

आष्टी ते गोंडपिपरी वैनगंगेच्या पुलावरील खड्डे अजूनही जैसे थे, खासदार व आमदार यांची बघ्याची भूमिका


आष्टी ते गोंडपिपरी वैनगंगेच्या पुलावरील खड्डे अजूनही जैसे थे, खासदार व आमदार यांची बघ्याची भूमिका

जनतेला करावा लागतोय जीवघेणा प्रवास 

पावसाळ्यात चिखलाचा मारा आणि उन्हाळ्यात धुरीचा मारा 

आष्टी  : -
आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मागील अनेक दिवसांपासून खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी आष्टी शहरातील नागरिकांसह आमदार डॉ. देवराव होळी यांनीही केली होती. तेव्हा अवघ्या आठ दिवसांत वैनगंगा नदी पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले मात्र पावसाळा संपला आणि आता उन्हाळा सुरू झाला तरीसुद्धा अवस्था जैसे थे आहे

   पुलावरील खड्डे 'जैसे थे' असल्याने शासन  जीव गेल्यावरच खड्डे बुजविणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 वैनगंगा नदी पुलावर मागील अनेक दिवसांपासून जीवघेणे खड्डे पडले असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी विघार्जनाकरीता आष्टी येथील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत व ते विद्यार्थी,विद्यार्थीनी सायकलने प्रवास करुन शिक्षण घेत आहेत तसेच आष्टी येथील गोडपिपरी तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या  शाळेत शेकडो विद्यार्थी जात आहेत. सायकलस्वार विद्यार्थ्यांना पुलावरील खड्डयांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकही विविध कामांसाठी तसेच रुग्णालयात आष्टी येथे येत असतात. त्यांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने पावसाळ्यात चिखलाचा मारा आणि  आता उन्हाळ्यात धुळीचा मारा सहन करावा लागत आहे. त्या खड्ड्यांमुळे एखादे वाहन नदीपात्रात कोसळण्याचा धोका असतो. खड्ड्यांमुळे पुलावर अपघात होऊन जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
 सदर खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुलाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते परंतू त्यांनी या बाबींवर लक्ष दिले नाही त्यानंतर  आष्टी येथील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी नदीपुलावरच रास्तारोको आंदोलन केले होते  तेव्हा थातुरमातुर काही खड्डे  बुजविण्यात आले होते ते  अवजड वाहतुकीने काही दिवसातच अवस्था जैसे थे झाली गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव खासदार  यांनी या बाबतीत शासकिय अधिकारी यांना कधी सुचीत तर केलेच नाही व स्वतः लक्ष घालून पाहिले सुद्धा नाही अशी मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे व पुलावरील त्या खड्ड्यांची स्थिती 'जैसे थे'राहीली
सदरच्या खड्ड्यांमुळे वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनक्यांचे ,कमरेचे आजार होत असल्याचे दिसून येते आहे 
 पुन्हा यावर्षीही पावसाळ्यात चिखलाचा मारा खाण्याची वेळ वाहन चालकांवर येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2024

PostImage

खरंच केला काय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात पक्षप्रवेश 


खरंच केला काय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात पक्षप्रवेश 


चंद्रपूर :-

खरंच केला काय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा)पक्षात पक्षप्रवेश असा प्रश्न मतदारांना मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे 
 ऐन लोकसभा निवडणुकीचा धुरळा आता सुरु झाला असतांनाच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातून इनकमिंग, आऊटगोइंग चे सत्र सुरु झालेले आहेत अशातच नुकतीच एक मोठी बातमी हाती आली आहे.एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जाहीररीत्या पक्षप्रवेश केला आहे

आता तुम्हालाही धक्का बसेल पण हि बातमी खरी आहे. शिंदे यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील घाटकुळ येथे एका अतिशय सामान्य कार्यक्रमात शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करीत अनेकांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर आता एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. उबाठात प्रवेश करणारे एकनाथ शिंदे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नसून ते चंद्रपूरातील घाटकुळ या गावातील रहिवासी आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. अनेक आमदाराना हाताशी घेत त्यांनी भाजपशी हातमिळविनी केली. भाजपने त्यांना “रिटर्न गिफ्ट”दिलय. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता.यानंतर राज्यात खोके, गद्दार, मिंधे अशा विविध उपमांच राजकारण सुरु झालं. शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह गेलं.आमदार गेले, चिन्हही गेलं. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेन आता चांगलाच बदला घेतला आहे.
होय आज रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचा उबाठात सार्वजनिक रित्या प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रपूरातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ यां गावात हा कार्यक्रम संपन्न झाला. पण उबाठात प्रवेश घेणारे हे एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री नसून ते घाटकुळ येथील रहिवासी आहेत. एकनाथ रावजी शिंदे असे त्यांचे पूर्ण नाव आहे आज यां एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना उबाठात प्रवेश घेतला. या शिंदेच्या प्रवेशाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.संदीप गिऱ्हे, सुरज माडुरवार, आशिष कावटवार यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2024

PostImage

पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला


 पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला 


आष्टी: -

एक महिन्यापूर्वी पासून पथदिवे बंद असल्याने पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे 
चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरातील पथदिवे एक महिन्यापूर्वी पासून बंद आहेत. याकडे विज वितरण कंपनी व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आष्टी ग्रामपंचायतीकडून शहरातील विविध मार्गावर दुतर्फा पथदिवे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी शिकवणी वर्गाला जाणाऱ्या लहान मुलांना वनागरिकांना अंधारात चाचपडत जावे लागू नये, असाच त्या मागचा उद्देश आहे परंतु गत एक महिन्यापूर्वी पासून शहरातील काही भागातील पथदिवे बंद आहेत. यामध्ये गावातील मुख्य मार्ग ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग, तसेच अनेक प्रभागातील परिसरातील काही पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे परिसरात काळोख असतो. या अंधाराचा फायदा चोरटे सुद्धा घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रात्रीच्या वेळी नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतरही भागातील काही पथदिवेसुद्धा काही दिवसांपासून बंद आहेत. विज वितरण कंपनी आणि ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देऊन शहरातील बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरू करावे, अशी मागणी आष्टी येथील नागरिकांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2024

PostImage

आमच्या शेतजमीनीचे भूसंपादन झाले तेव्हा खासदार कुठे होते, संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे 'बॅनर' लावण्यास मनाई


आमच्या शेतजमीनीचे भूसंपादन झाले तेव्हा खासदार कुठे होते, संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे 'बॅनर' लावण्यास मनाई 

 प्रचारार्थ गेलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी केला विरोध,खासदार अशोक नेते यांच्या अडचणीत वाढ 

गडचिरोली : 
चामोर्शी तालुक्यातील १० गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत उभे असलेले भाजप चे उमेदवार खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ लावण्यात येणारे बॅनर लावण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला आहे
जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी अधिसूचना काढली आहे. यावरून जवळपास १० गावातील नागरिकांमध्ये असंतोष असून ऐन लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हाकलून लावले असून प्रचाराचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई केल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना शेवटच्या क्षणी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. मात्र, प्रचारादरम्यान त्यांना व कार्यकर्त्यांना ग्रामस्थां कडून फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यात अधिक भर पडली असून चामोर्शी तालुक्यातील जवळपास १० गावातील नागरिक भूसंपादनावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. दरम्यान, मुधोलीचक क्र. १ आणि जयरामपूर येथे भाजपचे काही नेते व कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी हाकलून लावले. इतक्यावरच न थांबता त्यांना गावात बॅनर लावण्यास मनाई केली आहे. भूसंपादनावरून बहुतांश गावातील नागरीकांमध्ये रोष बघायला मिळत असून याविरोधात वर्षभरापासून आंदोलन करण्यात येत असताना खासदार कुठे होते. आता निवडणुका आल्या की ते आमच्याकडे येत आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एक-दोन दिवसात सर्व प्रभावित क्षेत्रातील गावकरी एकत्र बैठक घेणार असून त्यानंतर पुढची भूमिका एकत्रितपणे ते जाहीर करणार आहेत.

 


गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, मुधोली चक क्र.१, सोमनपल्ली, जयरामपूर, मुधोलीचक क्र.२, पारडी देव यांच्यासह जवळपास १० गावातील ९६३.०५२२ हेक्टर जमीन शासनाने संपादित करण्याचे ठरवले आहे. परंतु या भूसंपादनाला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यांनी याविरोधात दोन वेळा मोर्चा देखील काढला होता. त्यावेळेस कोणत्याच लोकप्रतिनिधींनी साथ दिली नाही. यामुळे त्यांचा खासदारांवर रोष आहे


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2024

PostImage

आष्टीत भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा


आष्टीत भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा


आष्टी : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस शनिवारी (ता. ६) रोजी आष्टी येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश प्रकाश कुकूडकर यांच्या शुभ हस्ते आष्टी येथील जनसंपर्क कार्यालयावर पक्ष ध्वज फडकविण्यात आला.भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० साली झाली.आज भाजप पक्षाला ४३ वर्ष पूर्ण झाली असून जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

या प्रसंगी आष्टी शहरातील भाजपचे नेते संजय पंदिलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, विठ्ठल आवारी, प्रकाश बोबाटे, प्रभुदास खोब्रागडे, राजनाथ कुशवाह  आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2024

PostImage

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पांढरकवडा येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहाव्या लागल्या रिकाम्या खुर्च्या 


सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पांढरकवडा येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहाव्या लागल्या रिकाम्या खुर्च्या 

ओबिसीला उमेदवारी नाकारल्याने भाजपला पडणार काय महागात ?

 

पांढरकवडा :- १३ व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पहिली टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा मतदार संघात निवडणूक संपन्न होत आहे. यातील महायुती व भाजपचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पांढरकवडा येथे केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन केले असता या सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे गडकरी यांच्या सभेचा शो फ्लॉप झाल्याने भाजपच्या गोठ्यात कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपा कडून ओबीसी समाजाला उमेदवारी नाकारल्याने याचे परिणाम या प्रचार सभेतून निदर्शनास येत आहे. सुरवातीला थोडी फार गर्दी दिसून आली असली तरी नेत्यांच्या भाषणावेळी मात्र गर्दी ओसरू लागली होती

येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका संपन्न होत आहेत. यातील चंद्रपूर आर्णी वणी लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार हे ओबीसी समाजाचे असून त्यांच्या सोबतीला एस. सी. एस. टी. विजेएनटी व मुस्लिम समाज मतदार जवळपास १२ ते १४ लाखाच्या वर संख्या आहे. असे असताना देखील भाजपाकडून ओबिसी समाजाच्या नेतृत्वाला डावलून केवळ २ ते ३ हजार मतदान असलेल्या आर्य वैश्य कोमटी (सावकार) समजला उमेदवारी दिल्याने ओबीसी समाजात मोठी नाराजी पसरली आहे. या नाराजीचा परिणाम आता भाजप नेत्यांच्या प्रचार सभेत दिसून येत आहे. आयोजकांनी आयोजित केलेल्या प्रचार सभेतील शेकडो खुर्ध्या रिकाम्या दिसून आल्याने उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे
महागाई व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचे धोरण ठरविण्यात भाजप पुर्णतः फेल झाल्याने सर्व सामान्य नागरिक मात्र चांगलेच नाराज आहे. त्यामुळे भाजपच्या सभेला देखील जाण्यास निरुत्साही असल्याचे दिसून आले आहे. पांढरकवडा येथील सभेत भाजपचे आमदार व अनेक पदाधिकारी उपस्थित असले तरी मतदारांची अनुपस्थिती बघून मात्र नेते मंडळींचा चांगलाच हिरमोड झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 6, 2024

PostImage

चिचडोह बॅरेजच्या पुलावरून होत होती अवैध दारु तस्करी म्हणून चारचाकी वाहनांचा झाला प्रवेश बंद


चिचडोह बॅरेजच्या पुलावरून होत होती अवैध दारु तस्करी म्हणून चारचाकी वाहनांचा झाला प्रवेश बंद

एलसीबी ने पकडली बारा लाख रुपयांची अवैध तस्करीतील दारु 

गडचिरोली - चिचडोह बॅरेज, लोढोंली घाटावर दोन सुमोत भरलेली १२ लाखाची दारू LCB गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी पाठलॉग करून पकडली असता दारू तस्करांनी जिवाची पर्वा न करता चिचडोह बॅरेजच्या पुलावरुन पाण्यात उडी मारली असता त्याचा पायच फॉक्चर झाला. सदर घटनेमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल व पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी सदर पुलावरील रहदारीच बंद केली. दि. ५ एप्रिलच्या पहाटेला दारू तस्करांनी दोन सुमो गाड्यात दारूच्या पेट्या भरून लोंढोली वरून चामोर्शी मार्ग चिचडोह बरेंज वरून दारू तस्करी करीत असल्याचा सुगावा गडचिरोली LCB अधिकारी व कर्मचारी यांना लागताच त्यांनी दोन्ही गाड्याचा पाठलाग करून व चामोर्शी पोलीसांना माहीती देऊन चामोर्शी पोलीसांनी चामोर्शी कडील गेट बंद केला त्यामुळे दारू तस्करीच्या दोन्ही गाड्या चौकीदारांना न जुमानता सुसाट वेगाने जावून पुलाच्या मंध्यतरीच थांबल्या. त्यातील दारू तस्करीचा मोरक्या पुलावरून चक्क पाण्यात उडी घेतली तो पाण्याच्या खाली पडला. पाणी कमी होते परंतु अंदर खडक असल्यामुळे दारू तस्कराचा पाय मोडला त्यामुळे त्याला पळता आले नाही. सापडलेल्या दोन्ही गाड्यांत १२ लाखाची दारू सापडली. पोलीसांनी ती हस्तगत करून पाय मोडलेल्या दारू तस्कराला चामोर्शी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली व पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी गेट समोर प्रवेश बंदचा बोर्ड  लावल्यामुळे आता रहद्दारीच बंद पडली. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीच्या गाड्या लग्नसराईतच बंद पडल्या आता त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर पुलावरून आवागमन करणाऱ्या सर्वच गाड्या दारूची तस्करी करणाऱ्या नसतात. लग्नसराईत जाणाऱ्या व दवाखाणात जाणाऱ्याना आता त्रास सहन करावा लागतो आहे. तेव्हा
जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दोन्ही बाजुला पोलीस चौकी बसवावी परंतु रहदारी बंद करू नये तसेच रात्रौ गेट बंद करणाच्या वेळेत ७ ऐवजी रात्रौ १० वाजता पर्यंत गेट सुरु ठेवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष गोपाल रायपूरे व रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी निवेदनाद्वारे आवागमन करणाऱ्या प्रवाशांना त्रास देऊ नये असेही निवेदनात म्हटले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 4, 2024

PostImage

देसाईगंज पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक


देसाईगंज पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक

 

वडसा (देसाईगंज):-
पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांनी ०१ एप्रिल २०२४ रोजी माहिती दिली की, मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी येथे दोन इसमांचे मोबाईल व पैसे जबरीे हिसकावुन चोरुन नेले. अशा मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारावर सपोनि. आगरकर व पोस्टे स्टाफ यांचे एक पथक तात्काळ महादेव पहाडी पळसगांव येथे गेले असता, तिथे फिर्यादी नामे जय सहदेव दोनाडकर रा. बरडकीन्ही तह. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांनी सांगीतले की, जय व त्याचा मित्र हर्षल पहाडी चढत असतांना हर्षल यास दम आल्याने तो थोडा वेळ थांबला असता, हर्षलजवळ दोन अनोळखी पगडी बांधुन असलेले सरदार त्यांचेजवळ येतांना दिसुन आल्याने फिर्यादी जय हा हर्षलजवळ आले असता, पगडी बांधून असलेल्या दोन्ही इसमांनी त्यांना मारण्याची धमकी देऊन तुमच्याकडे असलेले पैस आम्हाला द्या असे धमकावल्याने फिर्यादी जय याने नकार दर्शविल्याने त्यापैकी एक मजबूत बांधा असलेल्या इसमाने फिर्यादी जय यांचे कॉलर पकडुन तुला मारुन टाकीन असे म्हणुन खिशात हात टाकुन खिशातील पॉकीटमध्ये असलेले ९५० रु. हिसकावुन घेतले. तसेच हर्षलकडे असलेले एक रिअल मी ७-१ कंपनीचे मोबाईल किंमत अंदाजे १३ हजार ५०० रु. हिसकावुन घेतले. त्यानंतर तिथे लोकं मदतीला येत असतांना पाहून, ते दोन्ही इसम पैसे व मोबाईल घेऊन पहाडीवर पळून गेले.


असे फिर्यादीने सांगितल्याने, सपोनि. आगरकर व त्यांच्या पोलीस स्टाफ यांनी फिर्यादीस सोबत घेऊन महादेव पहाडी वरील झुडपी जंगलात शोध घेतला असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना पाहताच पळ काढला. सदर पळुन जाणाऱ्या दोन अनोळखी इसमांना पोलीस पथकांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, सदर संशयित इसमांची नावे १) बादलसिंग नैतरसिंग टाक (३२) व २) अनमोलसिंग निर्मलसिंग टाक (२८) दोघेही रा. अर्जुनी मोरगाव सिंगलटोली वार्ड नं. २, तह. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया असे असून फिर्यादी व इतर प्रथमदर्शी साक्षीदार यांचेकडे प्राथमिक तपास करुन तसेच आरोपीतांकडुन गुन्ह्रात जबरीने चोरुन नेलेला एकुण १४ हजार ४५० रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोस्टे देसाईगंज येथे अप क्र. १०८/२०२४ कलम ३९२, ३४ भादंवि अन्यये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. आगरकर करीत असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप, सपोनि. संदिप आगरकर, पोअं/५५३८ विलेश ढोके, पोअं/३७५५ शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

एलसीबीच्या अधिकाऱ्यांनीच मागीतली लाच मात्र सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


एलसीबीच्या अधिकाऱ्यांनीच मागीतली लाच मात्र सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक

धुळे : -
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. धुळे येथे झालेल्या कारवाईने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे (सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड) व पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने (रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे) व पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील (प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे

तक्रारदाराने 1 एप्रिल रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावून लाच पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. तक्रारदाराने दोन्ही कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी तडजोडीअंती दिड लाखांची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व सोमवारी सायंकाळी दोंडाईचा येथील धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळ्या जागेत लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशी निष्पन्न झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक शिंदे यांना अटक करण्यात आली.
कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

Beed Braking News रामपुरी येथे पहाटेच्या सुमारास लागली घराला भिषण आग


Beed Braking News

रामपुरी येथे पहाटेच्या सुमारास लागली घराला भिषण आग 
 

बिड:-
 रामपूरी येथील पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घराला भीषण आग लागली असून, यामध्ये साडेतीनशे क्विंटल कापूस आणि संसार उपयोगी साहीत्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे
 तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने संपूर्ण घराची राखरांगोळी झाली आहे 
गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे पहाटेच्या दरम्यान घराला भीषण आग लागली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंकुश जगदीश मस्के असे त्या घरमालकाचे नाव आहे. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर शेतकरी बागायतदार असून घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस असल्याचे सांगण्यात आले. सदर घटना घडताच तात्काळ गेवराई येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सदर आग आज बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान लागली. यामध्ये सदर शेतकऱ्याचा साडेतीनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. सदर घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून, मात्र घरात साठवून ठेवलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील संसार उपयोगी साहीत्य जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

आलेरे बावा जंगली हत्ती चामोर्शी तालुक्यातील विकासपल्लीत


आलेरे बावा जंगली हत्ती चामोर्शी तालुक्यातील विकासपल्लीत


 चार शेतकऱ्यांच्या मक्का पिकांचे केले नुकसान

चामोर्शी:-
 तालुक्यातील घोट वनपरीक्षेत्रा अतर्गत येत असलेल्या विकासपल्ली येथे दोन हत्ती आल्याची माहिती रात्रो 7:30 च्या दरम्यान उजेडात आली असून चामोर्शी तालुक्याच्या शेवटच्या टोक असेलल्या विकासपल्ली येथे आता हत्ती शिरल्याची माहिती असून दोन शेतकरी शेतीची राखण करीत असतांना हत्ती पासून जीव वाचविण्यासाठी झाडावर चढून जीव वाच्यविण्याच्या प्रयत्न केला.

याबाबत घोटच्या वनपरीक्षेत्र अधिकारी निलेश वाडीघरे यांना माहीती देण्यात आली असून हत्तीने विकासपल्ली गावालगत असलेल्या गौतम गौरचंद मंडल, गौरग सिदाम सरकार, निशिकांत दुर्गाचरण गाईन व नरेश नारायण मिस्त्री या चार शेतकऱ्यांचे मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे घटनेचे माहिती मिळताच घोट वन विभागाचे पथक रात्रो व आज सकाळी विकासपल्ली रवाना झाले आहे तसेच ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हत्ती या परिसरात असल्याची माहिती मिळताच हुल्ला टिम सुद्धा या परिसरात दाखल झाली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

 

आष्टी:-
 श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आष्टी च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मतदारांचा सहभाग व मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशानुसार  मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
       या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत मतदान करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे, मतदान जनजागृती च्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही अधिक मजबूत करावी असे आव्हान डॉ. रमेश सोनटक्के यांनी केले. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती घोषणा फलक देऊन विद्यार्थ्यांनी ' आपल्या अमूल्य मताचे दान, आहे लोकशाहीची शान', 'मतदान करा, देश वाचवा' अशा प्रकारच्या विविध घोषणा देत मतदारांना जागृती करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्रांगणातून घोषणा देत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, ही रॅली आष्टी या गावातून फिरून  रॅलीच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मतदान करून व मतदारांमध्ये जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

Breaking news आपचे खासदार संजय सिंह यांचा जामीन मंजूर, तुरुंगातून निघाले बाहेर


Breaking news
आपचे खासदार संजय सिंह यांचा जामीन मंजूर, तुरुंगातून निघाले बाहेर


नवी दिल्ली : -
आपचे खासदार संजय सिंह यांचा जामीन मंजूर झाला असून तुरुंगातून ते बाहेर पडले आहेत 
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्यामध्ये तुरुंगात गेले आहेत. केजरीवाल यांना २१ मार्चला ईडीने अटक केली होती, सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. अशातच गेल्या सहा महिन्यांपासून दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामिन मिळाला आहे.

यामुळे संजय सिंह राजकीय घडामोडींमध्ये, आपच्या प्रचारामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने संजय सिंह यांच्या जामिन अर्जावर सुनावणी घेतली होती. यामध्ये संजय सिंह यांना आतादेखील तुरुंगात ठेवण्याची गरज का आहे, असा सवाल खंडपीठाने ईडीला विचारला होता. यावर सिंह यांच्या वकिलांनी पैशांच्या अफरातफरीचे काहीच सिद्ध करू शकले नाहीत, तसेच मनी ट्रेलही दाखवू शकले नाहीत, असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.
संजय सिंह यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक आणि रिमांडविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. यामध्ये खंडपीठाने सिंह यांच्याकडून कोणतेही पैसे जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच त्यांच्यावरील दोन कोटींची लाच घेतल्याच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते, असे नमूद केले. ईडीच्या वकिलांनी आपण त्यांना सूट देऊ शकतो असे म्हटले होते.

संजय सिंह यांना गेल्या वर्षी ४ ऑक्टोबरला ईडीने अटक केली होती. हायकोर्टात ईडीने सिंह यांच्या जमिन अर्जाला विरोध केला होता. यानंतर तीन महिन्यांनी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी मी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात आहे, परंतु आजवर मला गुन्हा काय आहे आणि माझी त्यात भुमिका काय आहे, हे देखील सांगितले गेल नाहीय, असे म्हटले होते


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

९ नक्षल्यांचा पोलीसांनी केला खात्मा


९ नक्षल्यांचा पोलीसांनी केला खात्मा

बीजापूर, दि. 02 : जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्रा जंगल परिसरात आज 2 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दुपारपर्यंत 4 नक्षली ठार झाल्याची माहिती समोर आली होती व ठार नक्षलींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती दरम्यान दुपारनंतर आणखी 5 नक्षलीचे मृतदेह आढळून आल्याची माहिती पुढे येत असून ठार झालेल्या नक्षलींचा आकडा आता नऊ (9) वर पोहचला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई असल्याचे समजते.

बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्रा जंगल परिसरात गांगलूर एरिया कमिटीचे नक्षली मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ, कोबरा व सीआरपीएफ चे जवान संयुक्त कारवाई करण्यास निघाले असता चकमक उडाली. या चकमकीत नऊ नक्षल्यांचा खात्मा जवानांनी केला आहे.

घटनास्थळावरून नऊ नक्षल्यांचे मृतदेह, 01 LMG स्वयंचलित शस्त्र / BGL launchers, मोठ्या प्रमाणात साहित्य, स्फोटके व दैनंदिन साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान या चकमकीत आणखी काही नक्षली जखमी व ठार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

बेलोरो वाहनातून अवैध दारू तस्करी तरीही सापडले पोलीसांच्या जाळ्यात


बेलोरो वाहनातून अवैध दारू तस्करी तरीही सापडले पोलीसांच्या जाळ्यात

आष्टी पोलीसांनी तिन लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त


आष्टी:-
दारू तस्करांनी वेगवेगळ्या शक्कली लढवून अवैध दारू तस्करी करीत आहेत परंतू पोलीस सुद्धा अलर्ट झाले असल्याने ते पोलीसांच्या जाळ्यात अडकणारच आहेत हे सर्वश्रुत आहे 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी दारुचा सुद्धा प्रयोग केला जातो म्हणून आष्टी पोलीस रात्रीची गस्त करीत असताना  येणापूर ते जैरामपूर मार्ग क्रमण करीत असताना मुधोली चक १ येथे एक बोलेरो  एम.एच.३४ एक.व्ही २१३६ हे वाहन संशयास्पद दिसले असता  पंचासमक्ष तपासणी केली तेव्हा सदर वाहनात ९० एम एल च्या  देशी दारूचे बाक्स किंमत ९६००० हजार रुपये व वाहनाची किंमत तिन लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे  व कलम ६५ (अ) ८३ मुदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे 
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंडल, महिला पोलिस उपनिरीक्षक जगताप, पोलीस शिपाई राउत,मेंदाळे, चापोशी  येनगंटीवार यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिरात यावर्षी रामनवमी उत्सव साजरा होणार


श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिरात यावर्षी रामनवमी उत्सव साजरा होणार 

देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी: चामोर्शी तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. येथे कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. त्याला लागून साईबाबा, शंकर, मारोती इत्यादीचे मंदिर व शिवलिंग आहे. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. हनुमान जयंतीला येथे काला व भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.मंदिरापासून जवळच वर्धा-वैनगंगा नदीचा संगम आहे. यालाच प्रशांत धाम असे म्हणतात. नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यांचे दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोरून आजु-बाजुला घनदाट सागवानाची झाडे व काही चंदनाचे वृक्ष आहेत. या मंदिराच्या परिसरात जंगल असल्यामुळे भाविकांना व पर्यटकांना वृक्ष छायेचा आश्रय घेऊन थांबण्यास अधिक मौज वाटते यावर्षी श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिरात रामनवमी उत्सव व पालखी पदयात्रा कार्यक्रम बाबत श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा मंदिर समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली आष्टी परिसरात श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळाच्या वतीने पालखी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती श्री हनुमान मंदीर देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी दिली


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

पाणी द्या हो पाणी द्याहो, गडचिरोलीतील लक्ष्मी नगर महिलांचा टाहो!


पाणी द्या हो पाणी द्याहो, गडचिरोलीतील लक्ष्मी नगर महिलांचा टाहो!

तिन महिन्यांपूर्वी पासून पाणीपुरवठा योजना बंद आहे 

गडचिरोली:-
 अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा नळ योजना तीन महिन्यापासून ठप्प पडली असून आरमोरी रोड,लक्ष्मी नगर मध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने लक्ष्मी नगर च्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . तीन महिन्यापासून लक्ष्मी नगर शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही नगर प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते आहे 
असे असूनही मात्र पाणी कर सुरुच आहे तिन महिन्यात पाणीपुरवठा करण्यात आला नाही तर पाणीकर का द्यावे असे प्रश्न लक्ष्मी नगरवासीयांना पडले आहे
 गडचिरोली शहरातील प्रशासन सुज्ञ असूनही या बाबतीत उदासीन का आहे हाही प्रश्न अनुत्तरित आहे 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी लक्ष्मी नगर शहरवासीयांना इतरत्र धाव घ्यावी लागत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ लक्ष्मीनगर शहरवासीयांवर आलेली आहे.
गडचिरोली शहराला ईतर वार्डात नियमित पाणीपुरवठा होतो आहे मात्र लक्ष्मी नगर मध्ये का होईना ?
 
तिन महिन्यापासून  पाणी पुरवठा ठप्प झाला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे.

कठाणी नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीपुरवठा ठप्प असेल तर शहरात पाण्याअभावी आणीबाणी होवू नये म्हणून नगर परिषद प्रशासनातर्फे नदीपात्रातील पाण्याच्या विहीरीतील गाळ उपसा करण्याची गरज आहे असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे  मात्र या बाबी कडे नगर परिषदेच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना कुणीही लक्ष देईना झाले आहेत अशीच स्थिती दिसून येते आहे
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लक्ष्मी नगर येथील ग्रामस्थांना  इतरत्र भटकावे लागत आहे

गडचिरोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही लक्ष देईना झाले आहेत 
आता प्रश्न असा  पडतो आहे की, ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी पुरवठा बंद झाल्याने लक्ष्मी नगर वासीयांची ससेहोळपड होते आहे तरीसुद्धा नगर परिषद प्रशासन याबाबत उदासीन आहे असेच दिसते आहे
तात्काळ पाणी समस्या दुर करावी अशी मागणी आरमोरी रोड लक्ष्मी नगर येथील महिलांसह  पवन आखाडे,शंकर रनदीवे, विनोद खोब्रागडे ,नितीन तारवेकर,वैभव कहुरके,दिवाकर ठेंगरे,अवी झीलपे,पराये,दिलीप मानुसमारे,पडीशालवार,अशोक सुत्रपवार आदींसह लक्ष्मी नगर वासीयांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल


अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल


कूरखेडा-:
 शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़  केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षका विरोधात विनयभंग, पोक्सो व विविध कलमान्वये आज सांयकाळी कूरखेडा पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आला आहे 
 आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू सरदारे वय ४७ असे असून तो तालूक्यातीलच एका जि प उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक आहे शाळेतीलच एका अल्पवयीन मूलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिचा शरीराचा मूका घेणे,चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत आज मूलीचे पालकानी मूलगी व गावकऱ्यासह कूरखेडा पोलीस स्टेशन येथे पोहचत तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि ३५४(अ) ८,१०,१२ पोस्को अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती आहे प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजूडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

काँग्रेस चे लोकसभा उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या गडचिरोली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन


काँग्रेस चे लोकसभा उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या गडचिरोली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

गडचिरोली:-
गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात इ़डीया आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या गडचिरोली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इंडीया आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र चंदेल,  मल्लेलवार, माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राउत, हसन गिलाणी, महिला कांग्रेस जिल्हाध्यक्ष कविता माहोरकर,व जिल्ह्यातील इंडीया आघाडीचे सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार


आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार

    आष्टी :-  
   भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल आयोजक कवी तथा गझलकार विजय वडवेराव यांनी नुकताचं जाहीर झाला असून  या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक येथील युवा कवी,लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला होता,या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक 31 मार्च 2024 ला महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह पुणे येथे नुकतेच पार पडले त्या कार्यक्रमात कवी,लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांना उपस्थित मान्यवर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्रा.डॉ.संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कार्यक्रमाध्यक्ष विजय वडवेराव, व्यंकनबाई चनलवाड जेष्ठ कवयित्री परभणी, कवी विशाल बोरे वृ.प्र.मुंबई दूरदर्शन, एम.डी.कदम संचालक शालेय शिक्षण भारती विद्यापिठ, दादासाहेब सोनवणे माझी संघ प्रमुख दलित स्वयंसेवक संघ, म.भा.चव्हाण जेष्ठ गझलकार, अहिल्या कांबळे राज्यसमन्वयक भिडेवाडा मुक्ती राज्यस्तरीय स्त्री शिक्षिका मोर्चा, गझलकार अनिल कांबळे अध्यक्ष गझलमंत्रण संस्था यांच्या समक्ष सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, हजार रुपये रोख रक्कम, मानाचा पट्टा, विजय वडवेराव लिखित काव्यसंग्रह बाभळीचा काटा, देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराबद्दल उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी, गावकरी मंडळी या सर्वांकडून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

जनक्रांती दलित पँथर सोलापूर लोकसभेची निवडणूक लढणार--गोविंद चुबुकनारायण


जनक्रांती दलित पँथर सोलापूर लोकसभेची निवडणूक लढणार--गोविंद चुबुकनारायण

 मंगळवेढा -दि.07. मे 2024 रोजी होणारी सोलापूर लोकसभेची निवडणूक जनक्रांती दलित पँथर सर्व शक्तिनीशी लढवणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष गोविंद चुबुकनारायण यांनी दिली. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
   पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून प्रणिती शिंदे व राम सातपुते हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत आहेत. हे दोन्हीही पक्ष प्रस्थापित असून त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणे घेणे नाही.
 सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवणार असून सोलापूरची विमानसेवा तसेच मराठा आरक्षण हे आपल्या प्रचारातील प्रमुख मुद्दे असून याबाबतची पुढील रणनीती अखण्यात येत असल्याचे सुतोवाच चुबुकनारायण यांनी केले.
 यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजान पटेल, जिल्हा सचिव जहागीरदार काझी, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ मेटकरी व जिल्हा संघटक महादेव माने आदि उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 31, 2024

PostImage

ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास , जागीच झाला गतप्राण 


ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास , जागीच झाला गतप्राण 

कूरखेडा:-
 एका दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना कुरखेडा वडसा  राष्ट्रीय महामार्गावरी  नान्ही हद्दीतील एच पी पेट्रोल पंप समोर आज दि.३१ मार्च ला ११.०० वाजता घडली
 
मृतक दुचाकीस्वार यशवंत गहाणे अंगारा सालई खुर्द येथील आहे 
  दिपक ट्रान्सपोर्ट नागपूर येथील ट्रक क्रं.MH-31CB-8635 वडसा वरुन कुरखेडा येथे ट्रान्सपोर्ट सामान खाली करण्या करीता येत असताना नान्ही गावा लगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील एच पी पेट्रोल पंप समोर ट्रक मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटार सायकल क्र.MH-33-Z-6124(हीरो-सीडी डिलक्स) मोटार सायकलस्वार ट्रकच्या समोरच्या चाकात आल्याने जागेवरच गतप्राण झाला.
अपघात होताच ट्रक चालक घटना स्थळावरुन भिती पोटी फरार झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस विभागाला माहिती होताच त्वरित घटनास्थळी पोहोचून परीस्थिती आटोक्यात आणली. मृतकाचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले व शवविच्छेदन झाल्यावर मृतकाचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
अधीक तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 30, 2024

PostImage

आष्टी शहरातील नळ योजना एक महिन्यापूर्वी पासून बंद, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची इलूर कडे धाव


आष्टी शहरातील नळ योजना एक महिन्यापूर्वी पासून बंद, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची इलूर कडे धाव 

 

आष्टी : अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी शहरातील पाणीपुरवठा नळ योजना एक महिन्यापासून ठप्प पडली आहे पाणी पुरवठा होत नसल्याने  शहरातील नागरिकांना ईल्लूरकडे पिण्याच्या पाण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. दोन महिन्यापासून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
आष्टी शहरातील ग्रामपंचायतीमध्ये पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असलेली ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात ओळख आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना ईल्लूरकडे धाव घ्यावी लागत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ आष्टी शहरवासीयांवर आलेली आहे. आष्टी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रातून पाणी पुरवठा केला जातो आणि या शहरात तीन पाण्याच्या टाक्या आहेत  याच दरम्यान वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे दोन महिन्यापासून  शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे असे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात पण नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे तर तेथील पाण्याच्या टाक्यातील गाळ उपसा करायला पाहिजे असे शहरवासियांची बोंब आहे.
दोन महिन्यापासून  पाणी पुरवठा ठप्प झाला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे.
वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीपुरवठा ठप्प असेल तर शहरात पाण्याअभावी आणीबाणी होवू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नदीपात्रातील पाण्याच्या विहीरीतील गाळ उपसा करण्याची गरज आहे असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे  मात्र या बाबी कडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना कुणीही लक्ष देईना झाले आहेत अशीच स्थिती दिसून येते आहे
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आष्टी येथील ग्रामस्थांनी इलूर पेपरमील समोरील नळ हा चोविस तास सुरू राहत असल्याने त्या नळाचे पाणी आपल्या घरात पिण्यासाठी आणण्यास लगबग सुरू आहे असे दिसून येते आहे 

आष्टी शहरातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशिल डोर्लीकर यांना शहरातील पाणी पुरवठा एक महिन्यापासून ठप्प का पडला आहे असे विचारले असता त्यांनी वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली असल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प पडला आहे असे सांगितले 
आता प्रश्न असा  पडतो आहे की, ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी पुरवठा बंद झाल्याने गावकऱ्यांनी ससेहोळपड होते आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीन आहे असेच दिसते आहे
तात्काळ पाणी समस्या दुर करावी अशी मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2024

PostImage

अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद


अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद


देसाईगंज (वडसा) पोलीसांची अट्टल गुन्हेगारावर कारवाई 

देसाईगंज (गडचिरोली) :-
 अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी अटक केली आहे देसाईगंज (वडसा )पोलीस प्रशासनाने गस्ती दरम्यान देसाईगंज ब्रम्हपुरी रोड वरील विर्षी वार्ड जवळ एका संशयित इसमास विचारपूस करून ताब्यात घेतले; विचारपूस करित असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावरून संशय अधिक बळकट झाल्याने त्याचा पाठलाग करुन सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अधिक विचारपूस केली असता, सदर इसम हा अनेक घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे कळले. सदर आरोपीचे नाव व्यंकटी रामा घोडमारे वय ३८ वर्ष राहणार विर्षी वार्ड देसाईगंज असे आरोपीचे नाव आहे.

सदर आरोपी हा नुकताच दोन महिन्याआधी जळगाव जेल मधून सुटला असल्याची माहिती आरोपीने दिली. सदर आरोपी वर जळगाव, भुसावळ, चंद्रपूर, भंडारा, नाशिक, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यात घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत. तसेच नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घरफोडी चा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला देसाईगंज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन देसाईगंज येथील अनेक घरफोडी संदर्भात विचारपूस करण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. सदर तपास देसाईगंज पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केली एका इसमाची हत्या


गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केली एका इसमाची हत्या


 भामरागड :-
ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर लक्षवाद्यांनी आपले डोके वर काढले असून भामरागड 
तालुक्यातील ताडगाव येथे काल दि .२८ मार्च ला रात्रोच्या सुमारास नक्षल्यांनी एका इसमाची हत्या करून मृतदेह मुख्य रस्त्यावर फेकून दिले आहे. सदर इसमाचे नाव अशोक तलांडी असून तो दामरंचा येथील रहिवासी आहे. त्याला पोलीस खबरी असल्याचे सांगून त्याची हत्या केल्याची नक्षल्यांनी मृतदेह शेजारी पत्रक टाकून कळविले आहे. पुढील तपास भामरागड पोलीस विभाग करीत आहे


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2024

PostImage

पोलीस नक्षल चकमकीत सहा नक्षली ठार तर अनेक नक्षली जखमी झाल्याची शक्यता


पोलीस नक्षल चकमकीत सहा नक्षली ठार तर अनेक नक्षली जखमी झाल्याची शक्यता

 

बीजापूर:-
 दि. 27 :  बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील चिप्पूरभट्टी परिसरात तालपेरु नदीजवळ सकाळच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत सहा (6) नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत असून त्यात दोन महिला नक्षलीसह डेप्युटी कमांडरचा सहभाग आहे. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. दरम्यान बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुरभट्टी आणि पुसाबका गावांच्या जंगलात चकमक झाली. या कारवाईमध्ये डीआरजी, सीआरपीएफ 229, कोब्रा टीमचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, चकमकीनंतर घटनास्थळावरून दोन महिला व चार पुरुष नक्षल्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या नक्षल्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस होते. तर या चकमकीत अनेक नक्षली जखमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घटनास्थळाची झडती घेतली असता सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त केल्या आहेत. अद्यापही जवान परिसरात शोध घेत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 26, 2024

PostImage

रंगपंचमीच्या दिवशी चामोर्शी पोलिसांनी 28,40,000/- रुपयाचा मोहसडवा केला नष्ट


रंगपंचमीच्या दिवशी चामोर्शी पोलिसांनी 28,40,000/- रुपयाचा मोहसडवा केला नष्ट 
 

चामोर्शी:- 
चामोर्शी पोलिसांनी २८४०००० रुपयाचा मोहसडवा केला नष्ट 
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 24/03/2024 रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी 1) जुगल लखन दास, 2) देवदास किसन मंडल, 3) सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सळवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत आहेत, अशी गोपनिय बातमीदारंाकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले.

पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.त्यानंतर सदर जागेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन पोस्टे चामोर्शी येथे आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांचे नेतृत्वात मपोउपनि. राधिका शिंदे, पोहवा/व्यंकटेश येलल्ला, पोअं/संदिप भिवणकर, मपोअं/मनिषा चिताडे, मपोअं/शिल्पा पोटे, चापोअं/सिंधराम यांनी केलेली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2024

PostImage

नाली उपस्याकडे मार्कंडा (कं) ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लेक्ष


नाली उपस्याकडे मार्कंडा (कं) ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लेक्ष

ग्राम निधीचे करताय तरी काय? ग्रामस्थांनचा सवाल


आष्टी - चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मार्कंडा कंन्सोबा येथील वार्ड क्र २ मधील बेघर वसाहतीतील भागात गेल्या कित्तेक वर्षापासून नालीची सफाई करण्यात आली नसल्याने नालीमध्ये सांडपाणी, मातीचे थर प्लास्टिक पिशव्या काडी कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने पुर्णतः नाली ब्लॉक झाल्यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या घराजवळ सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले असून या कडे ग्रामपंचायत प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे. वर्षभर नाली सफाई करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. बुजलेल्या नाल्या, मातीचे व कचऱ्याचे थर जमा होऊन खराब सांडपाणी जागीच अडून दुर्गंधी पसरु लागली आहे. सध्या स्थितीत नालीची अवस्था बिकट स्वरूपाची झाली आहे. नालीच्या उपसा अभावी खराब सांडपाणी एकाच ठिकाणी जमा होऊन डास, किडे व जंत तयार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी वेगळीच परिस्तिथी निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून स्वच्छतेवर नाही तर गलिच्छतेवर भर दिसतो. त्वरित नालीचा उपसा करून साफसफाई करण्यात यावी अशी मागणी बेघर वसाहतीत राहणाऱ्या ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून विजकर, पाणीकर, आरोग्य कर,गृहकर घेतले जाते पण स्वच्छतेवर लक्ष देत नाही असाही सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2024

PostImage

भंगार गोळा करणाऱ्या महिलांना मोटारपंप चोरी प्रकरणी अटक


भंगार गोळा करणाऱ्या महिलांना मोटारपंप चोरी प्रकरणी अटक

अहेरी:-
शांतीग्राम डांबरप्लान्ट येथील  मोटारपंप चोरी प्रकरणी सहा भंगार गोळा करणाऱ्या महिलांना  अहेरी पोलीसांनी २२ मार्चला अटक केली आहे 
डांबरप्लांट  मधील मोटारपंप ची चोरी झाल्याची तक्रार  चौकीदार याने दिली असता अहेरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता पोलिसांना भंगार गोळा करणाऱ्या महिलांनवर संशय आल्याने मीरा खंडेलवार,बालनागी खंडेलवार,मनिषा जगन्नाथ, कविता जगन्नाथ, मिनाक्षी जगन्नाथ,वच्छला कुंभारे सर्व रा.शासकिय विज्ञान महाविद्यालय समोरील झोपडपट्टी गडचिरोली यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या सर्व महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली 
सदर महिला आरोपींकडून ८० हजार रुपये किंमतीची मोटारपंप जप्त करण्यात आली.याबाबतीत अहेरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करुन सहाही महिलांना अटक करण्यात आली ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक रोहन जावळे, पोलीस शिपाई पुंगाटी, महिला पोलिस शिपाई गोटामी यांनी केली


PostImage

Vaingangavarta19

March 23, 2024

PostImage

महसूल अधिकारी आले रे आले, ट्रॅक्टर घेऊन पळा या नादात तरुण गेला जिवानिशी


महसूल अधिकारी आले रे आले, ट्रॅक्टर घेऊन पळा या नादात तरुण गेला जिवानिशी 

 अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॉक्टर चालकाचे गाडीवरील सुटले नियंत्रण 

ब्रह्मपुरी;- 
तालुक्यातील बेलगाव देऊळगाव येथील वैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास अवैद्य रेती उपसा करीत असताना अचानक महसूल अधिकारी आले रे आले ट्रॅक्टर घेऊन पळा असे आवाज येताच ट्रॅक्टर घेऊन पळत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो खाली कोसळला व त्यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर गेल्याने त्याचा मृत्यू झाला
अवैध रेतीचे उत्खनन सुरू असताना पळापळीच्या नादात कुटुंबातील एकुलता एक मुलाला त्याचा जीव गमवावा लागला त्यामुळे गावावर व कुटुंबावर शोक कला पसरली आहे बेलगाव येथे घाटावरील रेती चोरीला आळा घालण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अनिल जिटावार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कावळे आत्राम यांनी पंचनामा करून युवकाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आला
 मृतक युवकाचे नाव गोलू उर्फ प्रणय गुरुदेव धोटे वय २० वर्षे रा. देऊळगाव असे आहे मागील वर्षी ब्रह्मपुरी तील काही रेती घाटाचा लिलाव झालेला होता बेलगाव देऊळगाव येथील रेती घाटाचा लिलाव झाला होता मुदतीत रेती साठ्याची विक्री न झाल्याने रेतीसाठा शिल्लक होता एका राजकीय पुढाऱ्याने रेतीसाठ्याची विक्री करण्याचे परवानगी प्राप्त केली ठेकेदाराने नदीपात्रामधून दिनांक 14 मार्च च्या रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर नी रेती उपसा करण्याचे काम सुरू केले असल्याचे घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले अशातच अधिकारी येत असल्याची चाहूल लागल्याने घाटावरील दिवाणजी यांनी सर्व ट्रॅक्टर वाल्यांना ट्रॅक्टर लपविण्याकरिता सतर्क केले ट्रॅक्टर हा देऊळगाव येथील तलमले यांच्या मालकीचा असल्याने ट्रॅक्टर वर चालक प्रणय गुरुदेव धोटे यांनी ट्रॅक्टर लपविण्याच्या नादात घाटाच्या जवळ असलेल्या शेतामध्ये जोराने वाहन नेल्याने त्यांचे नियंत्रण सुटले व तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला ही घटना पहाटेच्या सुमारास घडली


PostImage

Vaingangavarta19

March 22, 2024

PostImage

वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू, घातपात की अपघातच चर्चेला उधाण 


वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू, घातपात की अपघातच चर्चेला उधाण 


गोंडपिपरी:- दि .२१ मार्चला विस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून घातपात की अपघातच अश्या चर्चेला गावात उधाण आले आहे 
गोंडपिपरी तालुक्यातील दरुर येथे ग्रामपंचायत समोर किरमिरी मुख्य मार्गावर गावातील युवक शाहीर अनिल आऊतकर वय २० वर्षे याचा मृतदेह आढळला. शाहीर याचे आई- वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले तो एकटाच असून आजी-आजोबांकडे राहून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मृतदेह असल्याच्या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी गोंडपिपरी पोलीसांना दिली. दि २२ शुक्रवारी सकाळी ८ वाजता घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोगरे, हवालदार शांताराम पाल, मत्ते, सुरपाम घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीला पाठविले आहे. एकीकडे पोलीस अपघात असल्याचे जाहीर करीत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठीविले असून गावात मात्र त्या युवकाचा  घातपात झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे. बेदम मारहान करून हत्या करून दुचाकीला बांधून ओढत मृतदेह गावाबाहेर मुख्य मार्गावर नेऊन ठेवल्याची चर्चा जोर धरत आहे. हत्या की अपघात प्रश्न अनुत्तरीत असून पुढील तपास पोलिस निरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 21, 2024

PostImage

एक लाख विस हजारांचा मोह सडवा आष्टी पोलीसांनी केला जप्त


एक लाख विस हजारांचा मोह सडवा आष्टी पोलीसांनी केला जप्त

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वसंतपूर येथील गुळामोहाचा सडवा पोलीसांनी केला जप्त व दोन आरोपींना जेरबंद केले आहे 

माहे एप्रिल २०२४ मध्ये आगामी काळात देशात  लोकसभा निवडणुक जाहिर झाल्या असल्याने सदर निवडनूका शांततामय वातावरनात पार पडाव्या व प्रत्येक नागरीकास आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा या उद्देशाने पोलीस अधिक्षक  गडचिरोली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अहेरी तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांनी अवैद्य धंदयांवर वेळो वेळी धाडी टाकुन त्यांचे विरुध्द कारवाई करण्याबाबत सुचना दिल्याने, दि. २०/०३/२०२४ रोजी पोस्टे आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे व त्यांची टिम पोस्टे परिसरात अवैद्य दारू विक्रेत्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने फिरत असतांना गोपणीय सुत्रांच्या माहिती आधारे  मौजा वसंतपूर येथील इंद्रजित शितल मंडल व परितोष प्रफुल मिस्त्री दोन्ही रा. वसंतपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली हे हातभट्टी गुळामोहाची दारू गाळण्या करीता वसंतपुर जंगल परीसरात मोठया प्रमाणात गुळा मोहाचा सडवा तयार करून ठेवला आहे. अशा खात्रीशीर माहिती  वरून मौजा वसंतपूर जंगल परीसरात शोधमोहीम राबविण्यात आली असता आरोपींच्या ताब्यात ०६ नग २०० लिटर क्षमतेच्या प्लॉस्टिक ड्रम मध्ये एकुन १२०० लिटर हातभट्टी गुळामोहाचा सडवा किंमत १,२०,०००/- रू चा माल मिळुन आला. तसेच एक होंडा शाईन कंपनिची दुचाकी वाहन किंमत अंदाजे ४०,००० रू व ०६ प्लॉस्टिक ड्रम असा एकुन १,६३,०००/- रू चा  मुद्देमाल अवैद्यरित्या मिळून आल्याने  आरोपीतां विरूध्द पोस्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला पोस्टे आष्टी येथे सदरचा गुन्हयाचा तपास पोहवा  चंद्रप्रकाश निमसरकार हे उप विभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे  व पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 20, 2024

PostImage

आत्महत्येचा केला बनाव मात्र, पोलीसांनी अवघ्या ४८ तासात खुणाचा केला उलगडा


आत्महत्येचा केला बनाव मात्र, पोलीसांनी अवघ्या ४८ तासात खुणाचा केला उलगडा 

उसणे घेतलेले पैसे परत करीत नाही म्हणून हत्या करुन मृतदेह झाडाला लटकावला : एटापल्ली तालुक्यातील घटना

 

एटापल्ली:-
 उसने घेतलेले २६ हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला मात्र अवघ्या ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. १९ मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत 

 प्राप्त माहितीनुसार, संपत लुला दुर्वा (३२) रा. पेठा ता. एटापल्ली असे मयताचे नाव आहे. आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी सर्व रा. पेठा यांचा आरोपींत समावेश आहे. तिघेही ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करीत होता. १७ मार्चला तो काही कामानिमित्य पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता, पण सायंकाळी घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला होता. त्यामुळे घातपाताचा अंदाज होता. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीसांनी तपासचक्रे फिरवली. पो.नि. नीळकंठ कुकडे, उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे, शुभम म्हेत्रे, रोहिणी गिरवलकर, हवालदार हिरामण मारटकर, कालेश पुपरेडीवार, पोलिस शिपाई प्रभाकर नाईक, मोहन शिंदे, पोलीस शिपाई, पंडीत मुंडे, श्रीकांत दुर्गे, कविता एलमुले, प्रकाश गडकर, जोगी मडावी, प्रियंका तुलावी यांच्या पथकाने ४८ तासांत गुन्ह्याची उकल केली.

तिघांचे मिळून २६ हजार उसने

मयत संपत दुर्वा याच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजू तपासल्या. यात त्याच्याकडे गावातीलच तिघांचे पैसे उसणे होते, अशी माहिती समोर आली. यातून त्यांच्यात वाद झाल्याची माहितीही मिळाली. हा धागा पकडून पोलिसांनी १९ मार्च रोजी तिघांना ताब्यात घेतले. आशिष कोरामी व सुखदेव मडावी यांचे प्रत्येकी सात हजार रुपये तर संजय कोरामी याचे १२ हजार रुपये उसणे होते. पैसे परत देत नसल्याने त्यांनी संपत दुर्वाला कट रचून संपविल्याचे निष्पन्न झाले.

 


PostImage

Vaingangavarta19

March 20, 2024

PostImage

वादळ-गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या  आमदार कृष्णा गजबे यांची मागणी


वादळ-गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

 आमदार कृष्णा गजबे यांची मागणी

देसाईगंज:-

गडचिरोली जिल्ह्यामध्ये आकस्मिक  गारपीटी सह आलेल्या वादळी पावसामुळे माझ्या आरमोरी मतदारसंघातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, कोरची तालुक्यातील उभे असलेले मक्याचे अन्य  पीक पूर्णतः उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेत पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रशासनाला केली आहे.

मक्याचे पीक झालेले असताना अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे  तोंडात आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार गजबे यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 20, 2024

PostImage

ट्राक्टरची शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक,चालक जागीच ठार


ट्राक्टरची शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक,चालक जागीच ठार

अवैध रेती तस्करी बितली जीवावर 

देसाईगंज
  तालुक्यातील मोहटोला येथे
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना दि.२० मार्चला पहाटे ५.०० वाजताच्या सुमारास घडली

प्राप्त माहितीनुसार, चिखली येथील अवैध रेती तस्कर योगेश शेंद्रे हा ट्रॅक्टरने रेतीची अवैध रित्या तस्करी करीत असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने मोहटोला येथील जि.प.शाळेच्या भिंतीला जबर धडक दिली. या अपघातात चालक राकेश गजबे रा. पोटगांव ता. देसाईगंज याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला नंबरप्लेट नव्हते. तर सदर प्रकरण  सावरण्याकरीता अवैध रेती तस्करांने हालचाली सुरु केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशिर्वादाने मोहटोला घाटातून दररोज अवैध रेती तस्करी केल्या जाते परंतू चिरीमिरी मिळत असल्याने अधिकारी वर्ग सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत तर परिसरातील गावांमध्ये OBC साठी आताच 15 दिवसापूर्वी प्रत्येक गावात जवळपास 25 ते 30 घरकुल मंजूर झाल्याने त्यांना अद्यापही शासनाने रेतीची पूर्तता केली नाही त्यामुळे त्यांना चोरीची रेती घेतल्या शिवाय पर्याय नाही. अश्यानांही शासनाने रेती दिली असती तर तसेच अधिकाऱ्यांनी तस्करांच्या मुस्क्या आवळल्या असत्या तर सदर अपघात घडलच नसता अशी मोहटोला व परिसरात चर्चा सुरू आहे


PostImage

Vaingangavarta19

March 19, 2024

PostImage

BIG BREAKING   चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी केले चकमकीत ठार


BIG BREAKING 
 चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी केले चकमकीत ठार 


  गडचिरोली :- 
जिल्ह्यातील अहेरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल १८ मार्चला रात्री भीषण चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी ठार केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी सर्चिंग ॲापरेशन सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूएटीची अनेक पथक यासच अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरात शोधमोहीम सुरु आहे.
 
 
पुढेआलेल्या माहितीनुसार, परिसरात असलेल्या कोलामार्का येथे आज पहाटे सर्च ऑपरेशन सुरु असताना सी-60 दलांच्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतरपरिसराची झडती घेतली असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. naxalites killed in Repanpalli गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मागटू, पलटन सदस्य कुरसंग राजू आणि  ⁠पलटन सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. या नक्षल्यांवर ३६ लाखांचंबक्षीस होतं. या चकमक आणि कारवाई विषयी आज पोलीस अधीक्षक संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 11, 2024

PostImage

स्मार्टफोन मुळे अंगणवाडीतील रजिस्टर होणार हद्दपार -मंत्री धर्मराव बाबा आत्राम


स्मार्टफोन मुळे अंगणवाडीतील रजिस्टर होणार हद्दपार -मंत्री धर्मराव बाबा आत्राम

अंगणवाडी सेविकांना २३८ मोबाईल वाटप

अहेरी: अंगणवाडी केंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. त्यांचे वजन,उंची त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना विविध रजिस्टर मध्ये लिहून ठेवावा लागत होता.मात्र, शासनाकडून आता अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिल्याने अंगणवाडीतील विविध रजिस्टर आता हद्दपार होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी बाल विकास प्रकल्प कार्यालय,अहेरी द्वारा आयोजित अंगणवाडी सेविकांचा सन्मान व मोबाईल वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे भाग्यश्री ताई आत्राम,प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, तहसीलदार हमीद सय्यद,गटविकास अधिकारी राहुल वरठे,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अंगणवाडी सेविकांचे विविध प्रश्न प्रलंबित होते.काही प्रश्न सोडविण्यात आले असून उर्वरित प्रश्न देखील मंत्रिमंडळात सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकानी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान बाल विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत कार्यरत तब्बल २३८ अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिकांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते स्मार्ट फोन वाटप करण्यात आले.त्यामुळे अंगणवाडी केंद्रांची ही आता डिजिटल कडे वाटचाल सुरू झालेली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांना मोलाचे मार्गदर्शन केले.तर बाल विकास प्रकल्प कार्यालय कडून पाहुण्यांचे शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 11, 2024

PostImage

त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,जारावंडीत आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन


त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,जारावंडीत आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन 

पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर


गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली  तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ आज (साेमवार) ला जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज जारावंडीकरांनी आक्रोश मोर्चा  काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता. 

या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच जारावंडीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठान व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.


आजच्या माेर्चात महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदविला. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करत जारावंडी सह  परिसर दणाणून साेडला.
दरम्यान महामहीम राष्ट्रपती,मुख्यमंत्री ,राज्यपाल, महाराष्ट्र शासन गृहमंत्री ,पोलीस महासंचालक ,पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक याना निवेदन देऊन कठोर शिक्षेची मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 10, 2024

PostImage

चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार


चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार

 _जारावंडी येथील घटना,परिसरात हळहळ व्यक्त_ 

गडचिरोली:-

जिल्ह्यातील चारवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद व मन हेलावून टाकणारी घटना जारावंडी येथे घडली आहे ,या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिसांनी दिली. संतोष  नागोबा कोंढेकर  वय ५० असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.

सविस्तर वृत्त असे की आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य  पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची,
यात आरोपी शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान  बालिकेला आपल्या वसाहत येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला,अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली दरम्यान पीडित बालिकेला गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने नागपूरला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत  असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे

 या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे.आरोपी वयस्क असून त्यास दोन मुलेही आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 10, 2024

PostImage

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर


कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर 

१०८ वर प्रतिसाद न मीळाल्याने दूचाकीवरच न्यावे लागले रूग्णालयात

कूरखेडा-
  चांदागड वरून कूरखेडा कडे दूचाकीने येत असताना गोठणगांव नाक्यावरील चौरस्त्यावर दूचाकीची कारला धडक बसल्याने दूचाकीस्वार क्रीष्णा भजने वय ४० हा गंभीर झाला हा अपघात आज दि १० रोजी सकाळी १० वाजेताच्या सूमारास घडला
  दूचाकी कारला धडकताच दूचाकीस्वार क्रीष्णा भजने हा रस्त्यावर पडला यावेळी तो गंभीर जखमी असल्याने लगेच नाक्यावरील यूवकानी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेकरीता टोल फ्री क्रंमांकावर काल केला यावेळी रूग्णवाहीका बाहेर असल्याचे थोडा वेळ लागेल असे सांगण्यात आले अर्धा तास वाट बघूनही रूग्णवाहीका न पोहचल्याने अखेर गोठणगांव नाक्यावरील येथील  सोहम कावळे,पवन शिडाम,मोहीद शेख व अन्य यूवकानी दूचाकीनेच जखमी इसमाला दोन किलोमीटर अंतर असलेल्या उपजिल्हा रूग्णालयात पोहचविले जखमीला रूग्णालयात पोहचविण्यात आले यावेळी १०८ क्रमांकाची रूग्णवाहीका ही येथील उपजिल्हा रूग्णालयातच उभी होती याची चित्रफीत सूद्धा यूवकानी काढलेली आहे त्यामूळे १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेवरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणीबाणीच्या प्रसंगीच १०८ क्रमांकाची रूग्णवाहीका उपलब्ध होत नाही त्यामूळे येथील त्यांचा कार्यप्रणालीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरीकानी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 9, 2024

PostImage

 महाशिवरात्रीच्या कुलथा यात्रा महोत्सवात  एका तरुणाला जलसमाधी 


 महाशिवरात्रीच्या कुलथा यात्रा महोत्सवात  एका तरुणाला जलसमाधी 

    
गोंडपिपरी:-

तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. कुलथा येथे दोन नद्यांचा संगम असून मोठ्या प्रमाणात नदीवर आंघोळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते अशातच आज दि ९ शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. 
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा हनुमान मंदिर येथे सर्व धर्म समभावाचे दर्शन पाहायला मिळते.हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन घेणारे हजारो भक्त शिवरात्री,आषाढी एकादशीनिमित्त कुलथा यात्रा महोत्सवाला येतात हजारो भक्त दर्शनासाठी धार्मिक भावनेतून रांग लावतात.यावेळी हनुमानजीची मूर्ती त्यांचे दुःख दूर करतात हा तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा आत्मविश्वास आहे.
कुलथा हे गाव गोंडपिपरी - मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर आहे.अंधारी व वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेले कुलथा गाव आहे.
महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते. दि.७ गुरुवार पासून यात्रा महोत्सवाला सूरवात झाली असून ही यात्रा १२ तारखेपर्यंत असते तालुक्यातील धानापुर येथील आकाश अशोक शेडमाके वय २३ याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुळुन मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनास्थळी गोंडपिंपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे दाखल होऊन पंचनामा करत प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविले आहे


PostImage

Vaingangavarta19

March 8, 2024

PostImage

कत्तलखान्याकडे गौवंश तस्करी करणाऱ्या  ट्रकांना उपविभागीय अधिकाऱ्यानी केले जेरबंद


कत्तलखान्याकडे गौवंश तस्करी करणाऱ्या  ट्रकांना उपविभागीय अधिकाऱ्यानी केले जेरबंद


 
तेलंगणा मध्ये नेणाऱ्या पाच ट्रक मधील १४३ गोधन केले जप्त

 गडचिरोली:-
कत्तलखान्याकडे नेत असलेले गोधन उपविभागीय अधिकारी कुरखेडा यांनी जप्त करुन जीवंत गोधन गोशाळे सुखरुप पाठविले आहे 
कोरची मार्गावर अवैध पणे गौवंशाची तस्करी करण्यात येत असल्याच्या माहीती वरून बूधवार रोजी रात्री गोठणगांव नाक्यावर पोलीसानी सापळा रचला होता मात्र तस्कराना याची पूर्वीच कूणकूण लागल्याने ते आड मार्गाने तेलंगाना कडे पळून‌ जाण्याचा प्रयत्नात असताना पोलीसानी त्यांचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्याना अटकाव केला यावेळी तस्करानी सर्व ट्रकचे वायर तोडत ट्रक तिथेच ठेवत पळ‌ काढला त्यामूळे घटणास्थळावरून ट्रक पोलीस स्टेशन पर्यंत आणने अडचणीचे असल्याने  ट्रकना ट्रैक्टरने ओढत आणत कूरखेडा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. ट्रक मध्ये अमानूषपणे सर्व जनावरांचे पाय बांधत त्याना एकावर एक ठेवण्यात आले होते यावेळी १४३ पैकी ४ जनावरे दगावली होती तर मोठ्या संख्येत जनावरे मरनासन्न होती. लगेच जनावराना गौ शाळेत पाठविण्याकरीता पवनी जिल्हा भंडारा येथील गौ शाळा व्यवस्थापकांशी संपर्क करीत त्यांचाच वाहनाने जिवंत असलेले सर्व जनावराना तिथे पाठविण्यात आले मात्र यावेळी पाठविण्यात आलेले अनेक जनावरे ही सूद्धा मरनासन्न अवस्थेत असल्याने गौ शाळेत पोहचे पर्यंत सूद्धा अनेक जनावरे दगावली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यानी दिली आहे.
        गौवंशाना अमानुष पणे वाहतूक करीत त्यांचा मृत्यूला कारणीभूत असणारे गौ तस्कराविरोधात कठोर कार्यवाही करीत त्याना अद्दल घडविण्याकरीता त्यांचा विरोधात कूरखेडा पोलीस स्टेशन येथे कलम २७९,४२९ भा द वि ५,५(अ),५(ब), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११(१),ड,ई,फ प्राण्याचा छळ अधिनियम सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम १८४ अन्वये अद्यात आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे या गून्ह्यात एकूण ५ ट्रक सह ५७ लाख ३९ हजाराचा मूद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींचा शोध सूरू असून लवकरच त्याना अटक करण्यात येईल अशी माहिती सूद्धा यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कूरखेडा रविन्द्र भोसले यानी दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 8, 2024

PostImage

महाशिवरात्रीच्या यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू


महाशिवरात्रीच्या यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू


आष्टी: -
चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरीता बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची घटना दिनांक आठ मार्च ला सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.

भैय्याजी पत्रू नैताम वय 52 वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरअल्ली ता. मुलचेरा असे मृत  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले.आठ मार्च ला चार वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी कोपरअल्ली येथे पाठविण्यात आले आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा  मोठा आप्त परिवार आहे


PostImage

Vaingangavarta19

March 7, 2024

PostImage

संतोष किराणा स्टोअर्स अनखोडा कडून महाशिवरात्री भक्तगणांना लाख- लाख शुभेच्छा!


संतोष किराणा स्टोअर्स अनखोडा कडून महाशिवरात्री भक्तगणांना लाख- लाख शुभेच्छा!

        🔹 शुभेच्छूक 🔹

मा.संतोष तिमाडे व परिवार अनखोडा ता.चामोर्शी जि.गडचिरोली 
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔


PostImage

Vaingangavarta19

March 7, 2024

PostImage

मंडळ अधिकारी कार्यालय आष्टी ता.चामोर्शी जि.गडचिरोली तर्फे महाशिवरात्री निमित्त समस्त जिल्हावासियांना अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा!


मंडळ अधिकारी कार्यालय आष्टी ता.चामोर्शी जि.गडचिरोली तर्फे महाशिवरात्री निमित्त समस्त जिल्हावासियांना अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा!


        🔸 शुभेच्छूक 🔸

 मा. विनोद ढोरे मंडळ अधिकारी आष्टी.
मा.सचिन गुरनुले, तलाठी आष्टी
मा. चंदन महीन्द्रे, तलाठी कुनघाडा
मा.  सी.डी. नाईक ,तलाठी अनखोडा
मा.अरुण नागरगोजे,तलाठी गुंडापल्ली
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


PostImage

Vaingangavarta19

March 7, 2024

PostImage

प्रशांत धाम, श्री हनुमान मंदिर संचालक मंडळ चपराळा ता.चामोर्शी जि.गडचिरोली  कडून महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!


प्रशांत धाम, श्री हनुमान मंदिर संचालक मंडळ चपराळा ता.चामोर्शी जि.गडचिरोली  कडून महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!


         शुभेच्छूक
मा. संजयराव  नानाजी पंदिलवार
अध्यक्ष श्री हनुमान मंदिर चपराळा


PostImage

Vaingangavarta19

March 5, 2024

PostImage

"ईव्हीएम हटवा देश वाचवा " याकरिता गोंडपिपरीत विविध पक्षांचे हजारो नागरिक रस्त्यावर


"ईव्हीएम हटवा देश वाचवा "
याकरिता गोंडपिपरीत विविध पक्षांचे हजारो नागरिक रस्त्यावर

गोंडपिपरी:-  "ईव्हीएम हटवा देश वाचवा " या मागणीसाठी गोंडपिपरी येथील विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आंदोलन केले आहे 
ईव्हीएम मशीनचा सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करीत गोंडपिपरी तालुक्यातील जनतेकडून याचा तीव्र विरोध सुरू आहे.यादरम्यान विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून सोमवारी तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.

ओबीसी कृती समिती,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),वंचित बहुजन आघाडी,गोंडवाना गणतंत्र पार्टी,सीआयटियु,एआयटियु,भारतीय बौद्ध महासभा,निवृत्त कर्मचारी संघटना,शिक्षण रोजगार बचाव समिती,शासकीय कंत्राटी कर्मचारी संघ यांच्यासह अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी शासकीय धोरणाचा निषेध केला.ईव्हीएम हटाव,जि.प.शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा,स्वामिनाथन आयोग लागू करा,क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी,जबरानजोत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे,जातनिहाय जनगणना व्हावी अशा अनेक मागण्या घेऊन येथील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत शहरात जनआक्रोश मोर्चा काढला.ईव्हीएममुळे निवडणुका पक्षपाती होत आहेत.जगातील विकसित राष्ट्र या प्रणालीचा वापर करीत नाही.त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून ईव्हीएमचा आग्रह का केला जातोय,असा प्रश्न यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोर्चाला संबोधित करतांना केला.सभेनंतर तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.मोर्चात हजारो युवक,महिला,शाळकरी मुलांचा सहभाग होता.यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार के.डी.मेश्राम,संवर्ग विकास अधिकारी शालिकराव माऊलीकर,ओबीसी कृती संघर्ष समितीचे मोरेश्वर सुरकर,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे, वंचित बहुजन पार्टी तालुका अध्यक्ष प्रकाश तोहोगावकर,ओबीसी नेते शंकर पाल,नगराध्यक्ष सविता कुळमेथे,उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक वनिता देवगडे,रियाज कुरेशी,तुकाराम सातपुते,गौरव घुबडे,पंकजसिंह डांगी,दर्शन वासेकर,अशपाक कुरेशी,शुभम ढपकस,शैलेशसिंह बैस,संदीप लाटकर,नबात सोनटक्के,प्रशांत खेडेकर,सरपंच देविदास सातपुते,गौतम झाडे,सारनाथ बक्षी,अशोक कुडे,सुनील फलके,अड.चैताली फुलझले,काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष सोनी दिवसे,रेखा रामटेके,नितेश मेश्राम यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता.


PostImage

Vaingangavarta19

March 5, 2024

PostImage

लॉर्ड्स मेटल ऄड एनर्जी लिमिटेड प्रकल्प कोनसरीतील उद्योगाकरिता शेतजमिनीची दलाली करणाऱ्यांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ व गुलाल उधळून दिला चोप


लॉर्ड्स मेटल ऄड एनर्जी लिमिटेड प्रकल्प कोनसरीतील
उद्योगाकरिता शेतजमिनीची दलाली करणाऱ्यांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ व गुलाल उधळून दिला चोप 

उद्योगाकरिता शेतजमिनी  देण्यास  शेतकऱ्यांचा नकार

गडचिरोली :   लॉर्ड्स मेटल ॲड एनर्जी लिमिटेड कंपनी कोनसरीतील  उद्योगाकरिता शेतकऱ्यांना जमिनी देण्यास परावृत्त करण्यासाठी आलेल्या दलालांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला असल्याचे उघडकीस आले आहे 
चामोर्शी तालुक्यातील लोहखनिज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन अधिग्रहित करुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी याअगोदर रिकाम्या हाताने पाठवले आहे 
उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे  विकासाला आमचा विरोध नाही. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे. परंतु यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे, व जगायचे कसे असा प्रश्न चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या परिसरात उद्योगाकरिता’ प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.


एकेकाळी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यामुळे मोठमोठे उद्यागपती अब्जो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग निर्मितीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील कोनसरीलगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल ९६३ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाने परिसरातील मुधोली (चक) २, जयरामपूर, पारडी (देव), सोमनपल्ली, कोनसरी, मुधोली (तुकुम) या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, शेजारी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे सुपीक असलेली शेतजमीन देण्यास येथील शेतकरी तयार नाहीत. याविरोधात एकत्र येत या गावातील शेतकऱ्यांनी दोनवेळा मोठे आंदोलन केले होते.गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या महसुलच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जयरामपूर, मुधोली (चक) नं २, सोमनपल्ली या गावात तर जमिनीच्या संदर्भात कुणीही गावात येऊ नये असे फलक लावण्यात आले आहेत वर्षातून तीनदा उत्पन्न घेणारे सधन शेतकरी या भागात आहेत. त्यामुळे शेतजमिनी उद्योगासाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे व जगायचं कसं असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. गावकऱ्यांचे असे मत असताना लायड्स मेटल ॲड एनर्जी कंपनीचे काही दलाल शेतकऱ्यांना भुलथापा देउन जमीन देण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे वास्तव  अखेर आज समोर आले असून तालुक्यातील सोमनपल्ली या गावी जमीनीची दलाली करणाऱ्या चाणाक्ष डोनुजी संदुकवार आलापल्ली, आंबोलीचे सेवानिवृत्त ग्रामसेवक अरुण विठ्ठल उंदिरवाडे,शिवराम नारायण बारसागडे चामोर्शी यांना पकडून चांगलाच चोप दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे आणि समज देऊन सोडून देण्यात आले आहे अशीही माहिती पुढे आली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 4, 2024

PostImage

ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर


ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर

सोनापूर क्रांसिंग जवळ  झाला अपघात 

चामोर्शी :- 

एका ट्रकने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एका ईसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चामोर्शी जवळील सोनापूर फाट्यावर घडली चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला असून,  सुरेश महादेव दुधबावरे, रा - सोनापूर हे आपल्या काही कामा निमित्य MH33 Z 6877 या दुचाकीने चामोर्शीला गेले होते  वापस येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७,BG५५९७ ने बाईकला जब्बर  धडक दिली हा अपघात एवढा भयानक होता की इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला . तर लुकेश रामभाऊ दुधबावरे हे गंभीर जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 4, 2024

PostImage

जन्मदात्याने 2  तरुण मुलीसह, पत्नीची झोपेत असताना कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या


जन्मदात्याने 2  तरुण मुलीसह, पत्नीची झोपेत असताना कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या

 

नागभीड--:
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशी (बाळापूर )येथील वडील अंबादास लक्ष्मण तलमले वय 50 वर्षे याने स्वतःची पत्नी सह 2 तरुण मुलीची हत्या केली असल्याचा प्रकार आज दिनांक 3 मार्च 2024 सकाळी 6=00 वाजता उघडकीस आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वडील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
मौशी येथील अंबादास, पत्नी अल्का वय 40 वर्ष मुली  तेजस्विनी वय 20 वर्ष, प्रणाली वय वर्ष 17  व 
अनिकेत वय 15 असे चार व्यक्ती घरी राहत होते   मोठ्या एका मुलीचे लग्न झाले होते,  वडील अंबादास हा व्यसनाधीन असल्याने नेहमी पत्नीला पैसे मागायचा आणि दारू प्यायचा. घटनेच्या दिवशी वडील यांने हत्या करून सकाळी 5=00 वाजता बाहेर गेला आणि 6 वाजता बाहेरून आला असता आरोपीचा मुलगा  अनिकेत हा वर्ग 10 वीत असल्याने अभ्यास  करुण बाहेर  फिरण्यास गेलेला  होता, घरी आल्यावर हा प्रकार दिसला ,यांने काका नामदेव तलमले याला झालेला प्रकार सांगितला. लगेच आरोपीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी न झाल्याने गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पत्नी व  2 मुली यात एक  12 वी ची परीक्षा देत असल्याचे कळते तर मुलगा 10 वी परीक्षा देत आहे. पत्नी व मुली यांचे घटना स्थळावर पंचनामे करून शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले असून घटना स्थळाला पोलीस अधीक्षक सुदर्शन, अप्पर पो अधीक्षक रीना जनबंधू, उप विभागीय पो अधिकारी  दिनेश ठोसरे , पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी भेट दिली असून आरोपीस अटक करून अपराधक्र 75 /2024 अन्वये गुन्हा दाखल करून कलम 302 भा, द वी प्रमाणे अटक करून पुढील तपास ठाणेदार विजय राठोड करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 3, 2024

PostImage

शासनाच्या स्पर्धेत तुळशी येथिल शिवाजी विद्यालय तिन लाख रुपयांची मानकरी


शासनाच्या स्पर्धेत तुळशी येथिल शिवाजी विद्यालय तिन लाख रुपयांची मानकरी

गडचिरोली:-
 मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधून तुळशी येथिल शिवाजी विद्यालयाने व जिल्हा परिषद व शासकीय शाळा व्यवस्थापनामधून कोंढाळा येथिल जि.प.वरिष्ठ  प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांनी वेगवेगळ्या गटातून  तालुकास्तरावर  प्रथम क्रमांक पटकावला असून सदर शाळा प्रत्येकी तीन लाखांच्या तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ  सुंदर शाळा स्पर्धा जिल्हा परिषद शाळां /शासकीय शाळा  तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळां अशा दोन स्वतंत्र गटात ही  स्पर्धा होती. या स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील सहभागी सर्व शाळांचे केंद्र व तालुका स्तरावर नियुक्त समितीकडून निकषांनुसार मूल्यमापन करण्यात आले होते. तालुक्यातून प्रथम आलेल्या शाळांचे जिल्हा मूल्यांकन समितीने भेट देऊन तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
 विद्यार्थिकेंदित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यावर एकूण ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यावर एकूण ४० गुण अशा १०० गुणांच्या आधारे या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यात शाळा व परिसराचे साैंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग,शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदीं मुद्दे तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने तपासणी करुन गुणदान करण्यात आले.
  तुळशी येथिल शिवाजी विद्यालयात सध्या शाळेत विद्यादानाचे व अध्यापनाचे कार्य करत असलेले शाळेचे मुख्याध्यापक विष्णू दुनेदार , शिक्षक कैलाश गजापूरे, दुर्गाप्रसाद चुलपार, नाशीक शेंडे हे चारही शिक्षक ,कर्मचारी कु.आरती दाते, कु.प्रियंका पोवळे, निलकंठ मारबते, संदीप शेंडे,  मिलींद मेश्राम शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी  प्रयत्नशील आहेत. तुळशी ग्रामपंचायतचे सरपंच चक्रधर नाकाडे ,उपसरपंच सुरेश तोंडफोडे, ग्रामपंचायत पदाधिकारी , देसाईगंज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे , आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आनंदराव गुरनुले, गटसमन्वयक संजय कसबे, कुरुड केंद्राचे केंद्रप्रमुख मेघराज बुराडे,विसोरा केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ पिलारे तसेच गट संसाधन केंद्राचे अरविंद घुटके,जितेंद्र पटले ,रामकृष्ण राहंगडाले यांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे


PostImage

Vaingangavarta19

March 3, 2024

PostImage

देवलमारी येथील मंचर्ला परिवारातील तीन घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान, शासनाने करावी तात्काळ मदत


देवलमारी येथील मंचर्ला परिवारातील तीन घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान, शासनाने करावी तात्काळ मदत 
          
अहेरी  :-
 मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमारी येथील शेखर मुत्तय्या मंचर्ला,संतोष मुत्तय्या मंचर्ला,मुत्तय्या मंचर्ला या तिघांचे घरे व घरातील संपूर्ण साहित्य, कपडे,खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू  अचानकपणे आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले
यात लाखो रुपयाचे वस्तू जळून खाक झाली आहेत.3 मार्चला रात्री सुमारे तीन सव्वातीन वाजताच्या सुमारास घराला आग लागली त्यावेळी घरातील कुटुंबातील लोक गाढ झोपेत होते आग लागल्याचे लक्षात येताच सर्व कुटुंब घराबाहेर निघाले व गावात आरडा ओरडा केले तेव्हा गावातील नागरिकांनाही धाव घेतलीआणि आग नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू केले.

"ह्या"घटनेची माहिती नागरिकांन कडून आविसं - काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगताच अजयभाऊंनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिली.अधिकाऱ्यांनी लगेच अग्निशमन वाहन तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठवून आग आटोक्यात आणली.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन.घटनेची माहिती जाणून घेतले आहे.दूरध्वनी वरून घटनेची माहिती उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून मंचर्ला कुटूंबाला शासना कडून मदत करण्यात यावी अशी मागणी केली त्या पिडीत तीन कुटुंबियांना प्रथम अत्यंत घरच्या अत्यावश्यक गरजू वस्तूसाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

जगात आपली बौद्ध म्हणून ओळख व्हावी- राजरत्न आंबेडकर


जगात आपली बौद्ध म्हणून ओळख व्हावी- राजरत्न आंबेडकर 

देसाईगंज:-
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस  1956  ला बुद्धाच्या धम्माची धम्मदीक्षा दिल्यानंतर आजही आपण जुन्या जातीच्या नावाने दलीत या शब्दात गुरफटून न राहता आता आपली जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.
     ते दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया ग्रामशाखा कोंढाळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन संस्था बौद्ध समाज कोंढाळा यांचे वतीने आयोजीत धम्म प्रबोधन कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपूरी येथील सामाजीक विचारवंत प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी देखिल उद्घाटनपर मार्गदर्शन केले.
       याप्रसंगी अतिथी म्हणून भन्ते सचित्त बोधी, दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड, उपाध्यक्ष अशोक इंदूरकर, महिला महासचिव यशोधरा नंदेश्वर, महिला प्रतिनिधी दर्शना शेंडे, विभागीय संघटक प्रा.सुरेंद्र तावाडे, इंजि. नरेश मेश्राम, गांवच्या सरपंच अपर्णा राउत,  नितीन राऊत, देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे, सल्लागार  अशोक बोदेले, डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम, उद्धवराव खोब्रागडे, बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्हा मुख्य सचिव हंसराज लांडगे, काका गडकरी, राधा नांदगाये, अनिल सोरते,आनंद मेश्राम, रोहीणी सहारे, रमेश रंगारी, नागसेन खोब्रागडे, किशोर साखरे, प्रा.एस.टी.मेश्राम, सुधीर रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ते जे.बी.लांडगे, मुकुंदा मेश्राम यांनी विचारमंचावर स्थान भूषविले.
     कार्यक्रमाचा प्रारंभ तथागत बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करण्यात आले. उपस्थित सर्वांचे सुमधूर स्वागत गीताने महिला व मुलींनी केले. पिवळा पितांबर - त्यात लोकशाहीची जळ... या लेझीम नृत्याने उपस्थितांचे मन आनंदाने भरून गेले. या कार्यक्रमाचे संचलन बुद्धिस्ट सोसायटीच्या विभा उमरे, सुकेशिनी ऊके यांनी, प्रास्ताविक बोद्ध समाजाचे कार्याध्यक्ष नागोराव ऊके तर आभार प्रबोधन संस्थेचे राजेंद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता शेंडे, मंगला शेंडे, तुषार ऊके, प्रशांत मंडपे , रोशन शेंडे, पल्लवी घुटके, प्रज्ञा शेंडे , उत्तरा मेश्राम व बौद्ध समाजाच्या सर्वांनी परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तीं सोबत उभे रहा - रिपब्लिकन पक्षाचे आवाहन


संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तीं सोबत उभे रहा - रिपब्लिकन पक्षाचे आवाहन

गडचिरोली- आज देशाचे संविधान,लोकशाही व धर्म निरपेक्ष स्वरूप धोक्यात आले असून ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुकी मध्ये पुरोगामी व समविचारी लोकांसोबत सर्वांनी ताकतीने उभे राहावे असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केले आहे. 
   पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत  चांदेकर भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी हे आवाहन करण्यात आले.
    रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रदेश सचीव  प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवर, गडचिरोली विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, आरमोरी विधान सभा प्रमुख कृष्णा चौधरी, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. 
   या सभेत देशातील सध्याची परिस्थिती आणि जिल्यातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय तथा अल्पसंखांक लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. बेरोजगारी, महागाई सोबतच शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न जटील झाले आहेत परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. गडचिरोली जिल्यातील मौल्यवान वन व खनिज संपत्ती लुटल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगाच्या नावावर बळकावल्या जात आहेत याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले आणि या सर्व प्रश्नांवर व्यापक जनलढा उभारण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष पद्धतीने लढविण्यासाठी ईव्हीएम त्वरित बंद करण्यात याव्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 
   संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण हि आजची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.  त्यासाठी आज देशभर मोठे आंदोलन सुरु असून याकामी पुढाकार घेणाऱ्या सर्व संगठना व नेत्यांना  बैठकीत पूर्ण समर्थन जाहीर करण्यात आले. 
   या सभेला साईनाथ गोडबोले,दादाजी धाकडे, अरुण भैसारे, हेमाजीं सहारे, कविता वैद्य यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

 विश्चसुंदरीने दिला चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ व्याघ्र संवर्धनाचा संदेश


 विश्चसुंदरीने दिला चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ व्याघ्र संवर्धनाचा संदेश

वनमंत्री ना.सुधीर मुंनगंटीवार यांच्या पुढाकारातून तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
 

चंद्रपूर :
 ‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरातील ताडोबाच्या चांगल्याच मोहात पडल्या. चंद्रपुरातील व्याघ्र संवर्धनाचा मूलमंत्र आपापल्या देशात घेऊन जाण्याचा निर्धार करीत पुन्हा एकदा ताडोबाला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकारातून तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन्यजीव सद्भावना दूत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रविना टंडन, विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते. 

ज्युलिया मॉर्ले म्हणाल्या, ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अतिशय सुदंर वाघ आहेत. वाघांना वाचविले तरच आपण आपले पर्यावरण आणि सृष्टीचे भविष्य सुरक्षित करू शकतो.’ वनमंत्री ना .सुधीर मुनगंटीवार यांनी आमंत्रित केल्याबद्दल मॉर्ले यांनी आभार मानले. जमील अजमल सैद्दी म्हणाले, ‘वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहण्याचे सौभाग्य लाभले. ताडोबा एक वरदान आहे. त्यामुळे प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वन हेच जीवन आहे, असे मानून आपले भविष्य सुरक्षित करा.’ 
2015 मधील ‘मिस इंडीया’ नवीनी देशमुख म्हणाल्या, ‘वाघ हे दुर्गामातेचे वाहन आहे. वाघ धैर्याचे प्रतिक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष झाले म्हणून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. विश्वसुंदरी स्पर्धेतील कॅरोलिना व्हेरिस्का म्हणाल्या, ‘वाघांचे संरक्षण या प्रकल्पाबद्दल ऐकून खूप आनंद झाला. येथे कुटुंबासह वाघ बघण्याचा योग आला. वाघ हा सृष्टीच्या जीवनचक्राचा महत्वाचा भाग आहे. सन 2021 आणि 2022 मधील मिस इंडिया सिनी शेट्टी म्हणाल्या, चंद्रपुरात येऊन आज अतिशय आनंद झाला. वाघांचे संरक्षण या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.’ ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टिन लाइज यांनी ‘सेव्ह द टायगर प्रोजेक्ट’ ही अतिशय महत्वाची आणि तेवढीच सुंदर संकल्पना असल्याचे म्हटले. इंग्लडच्या जेसिका म्हणाल्या, ‘येथे येऊन स्वत:ला भाग्यशाली समजत आहे. या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग बनू शकलो, याचा आनंद आहे. स्पेनच्या पोला म्हणाल्या, वाघ हे धैर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे. जैवविविधतेसाठी वाघ महत्वाचा घटक असून अशा उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण होईल.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

एस.टी.ने घेतला पेट मात्र गाडीत अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने विझविली आग


एस.टी.ने घेतला पेट मात्र गाडीत अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने विझविली आग

 

आष्टी :-
एस टी ने घेतला पेट मात्र अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने आग विझविली हि घटना मुलचेरा - घोट मार्गावर भर जंगलात घडली प्रसंगावधान राखून प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.
गडचिरोली  जिल्हयात अगोदरच एसटी महामंडळाच्या भंगार बस सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आणखी एक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास घोट जवळील निकतवाडा गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाश्यांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली.त्यानंतर वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले होते.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची एसटी बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्रो मुक्कामाणे असते ती बस दररोज पहाटे ६ वाजता मुलचेरा वरून घोट-चामोर्शी भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जाते.शुक्रवार (१ मार्च) रोजी एम एच- ०७ सी-९३१६ क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे पहाटे ६ वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती.घोट पासून 3 किलोमीटर जंगलात अचानक बसने पेट घेतल्याने या बस मध्ये असलेले प्रवासी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तातळीने बसमधून खाली उतरले. जवळपास ८ प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती समोर येत असून सर्वजण सुखरूप आहेत.

एसटी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटऱ्यामध्ये शार्ट सर्कीटने आग लागत असल्याने प्रसंगावधान साधून चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाश्यांना खाली उतावरले आणि स्वतःही आपला सामानसुमान घेऊन खाली उतरले.त्यानंतर लगेच बसने पेट घेतला.या बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे झाले.तर चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसवर दारमदार असल्याने बस मध्ये तांत्रिक बिघाड होणे,भर रस्त्यावर बस बंद पडणे,आग लागणे अश्या घटना हे नित्याचेच झाले आहे.शुक्रवारी सकाळच्या सुमारास तर बसने पेट घेतल्याने प्रवासी चांगलेच भयभीत होऊन धाव घेतली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापक राखडे यांना विचारले असता बसमध्ये असलेल्या बॅटऱ्या जळाले असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 1, 2024

PostImage

कर्दूळ येथील पोलिस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना  सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांचेकडून गोळा भेट


कर्दूळ येथील पोलिस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना 

सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांचेकडून गोळा भेट

 

 

घोट:- कर्दूळ या गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रशिक्षणाकरीता मदत व्हावी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांनी गोळा भेट देण्यात आला 

 पोलीस मदत केंद्र घोट येथील प्रभारी अधिकारी हे नेहमीच परिसरातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी , समस्या समजून घेऊन विद्यार्थ्यांकरिता विविध रचनात्मक उपक्रम, मार्गदर्शन कार्यक्रम राबवत असतात. 

 काही दिवसापूर्वी कर्दूळ या गावातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विध्यार्थ्यानी पोलीस मदत केंद्र घोट चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांना भेटुन पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी गोळा नसल्याबाबत अडचण मांडली तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना पाहिजे असलेला गोळा गडचिरोली येथून विकत मागितला व काल दिनांक 26/02/2024 रोजी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराकरिता 01 गोळा भेट म्हणून देण्यात आला व गोळा फेक मैदान सुद्धा तयार करून देण्यात आले.

 कर्दूळ गावातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या उमेदवार यांना पोमके घोट कडून गोळा व गोलाफेक मैदान तयार करून दिल्याने तेथील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच गडचिरोली पोलीस दलाचे व प्रभारी अधिकारी सपोनि नितेश गोहणे यांचे मनापासून आभार मानले व वेळोवेळी अशीच मदत व मार्गदर्शन करावे असे उपस्थित विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2024

PostImage

अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी, सतर्क पोलिसांनी दाखविला इंगा


अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी, सतर्क पोलिसांनी दाखविला इंगा

तिन बैलब़डी व अवैध विदेशी दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त 


गडचिरोली:- अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी मात्र सतर्क पोलिसांनी दाखविला आपला इ़गा व बैलगाडी सह अवैध दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलबंडीांचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन  आले आहे  दिनांक 27/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले. 
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणा­ऱ्या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणा­ऱ्या तीन बैलबंडी व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलबंडी मध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.  सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने 50 बॉक्समधील 2,52,000/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाडी व ईतर साहित्य 1,70,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 4,22,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलीस स्टेशन बामणी येथे आरोपी नामे संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे 
सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2024

PostImage

धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत आयोध्या दर्शनडचिरोलीतून 400 भाविक रवाना


धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत आयोध्या दर्शनडचिरोलीतून 400 भाविक रवाना

गडचिरोली, 28 फेब्रुवारी
रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर ठिकठिकाणाहून भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरीता आयोध्येत दाखल होत आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविकांना इच्छा असूनही आयोध्येत जाता आले नाही. या भाविकांसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत अयोध्या दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 400 भाविक आज अयोध्येकडे रवाना झाले असून ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी या भाविकांसाठी 10 बसेसची मोफत व्यवस्था केली. आज सकाळी या बसेस भाविकांना घेऊन अयोध्येकडे निघाले आहेत. भाविकांसाठी मोफत बसेसची व्यवस्था केल्याने त्यांनी यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांचे आभारही व्यक्त केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगीतल्या जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2024

PostImage

उद्योगाकरिता शेतजमिनी देण्यास चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा नकार


उद्योगाकरिता शेतजमिनी देण्यास चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा नकार

शेतजमिनी मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी पाठवले वापस

गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लोहखनिज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन हस्तगत करुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी रिकाम्या हाताने पाठवले आहे 
उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे  विकासाला आमचा विरोध नाही. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे. परंतु यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे,असा प्रश्न चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या परिसरात उद्योगाकरिता’ प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
एकेकाळी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यामुळे मोठमोठे उद्यागपती लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग निर्मितीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील कोनसरीलगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल ९६३ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाने परिसरातील मुधोली (चक) २, जयरामपूर, पारडी (देव), सोमनपल्ली, कोनसरी, मुधोली (तुकुम) या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, शेजारी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे सुपीक असलेली शेतजमीन देण्यास येथील शेतकरी तयार नाहीत. याविरोधात एकत्र येत या गावातील शेतकऱ्यांनी दोनवेळा मोठे आंदोलन केले होते.
गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या महसुलच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जयरामपूर, मुधोली (चक) नं २ गावात तर जमिनीच्या संदर्भात कुणीही गावात येऊ नये असे फलक लावण्यात आले आहेत वर्षातून तीनदा उत्पन्न घेणारे सधन शेतकरी या भागात आहेत. त्यामुळे शेतजमिनी उद्योगासाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे व जगायचं कसं असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती उद्योगासाठी अधिग्रहित करण्यात येत आहे त्यामुळे  परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता वेदराज पिंपळकर आणि सुनील गौरकार म्हणाले की, आमच्या दोन पिढ्या या शेतीवर मोठ्या झाल्या. मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ ,घर सांभाळून पुन्हा शेतीकरिता मिळकत शिल्लक ठेवणे हे सगळे या शेतीच्या बळावर झाले. सिंचनाच्या सोयीमुळे येथील शेतजमीन सुपीक आहे. त्यामुळे आम्ही शेतीतून १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न काढत असतो कंम्पणीला जमिनी दिल्या तर नाममात्र वेतनावर काम करीत राहावे लागते

सूरजागड टेकडीवर उत्खनन करणाऱ्या लॉयडस मेटल्स कंपनीचा कारखाना कोनसरी येथे उभा उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले आहे. सोबतच जिंदाल, मित्तल, सूरजागड इस्पात सारख्या कंपन्यांनी १ लाख कोटीहून अधिक गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पण यासाठी जमीन कुठून आणणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात ७५ टक्के जंगल आहे. खासगी भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. एवढेच गरजेचे असेल तर शासनाने कायद्यात बदल करून वनजमिन उद्योगांसाठी द्यावी असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2024

PostImage

एस टी बसेस चा तुटवडा असलेल्या आगारातून  पंतप्रधानाच्या सभेसाठी पाठविल्या एस टी .बसेस


एस टी बसेस चा तुटवडा असलेल्या आगारातून 
पंतप्रधानाच्या सभेसाठी पाठविल्या एस टी .बसेस

 

प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे 

गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध आगारातून बसेस पाठविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून देखील तब्बल १० बसेस पाठविण्यात आल्याने बसेसचा तुटवडा निर्माण झाला. वेळेवर बस सेवा नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तासंतास ताटकळत प्रतिक्षा करावी लागत आहे. अगोदरच अहेरी आगारात नियमित बससेवा नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशात मोदींच्या कार्यक्रमासाठी येथील १० बसेस यवतमाळला पाठविल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

अहेरी आगारात मागील अनेक वर्षापासून नवीन बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. या भागातील रस्ते अन् भर रस्त्यावर बसेसमध्ये होणारी बिघाड यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. अहेरी ते सिरोंचा १०७ किलोमीटरचा अंतर असलेल्या या मार्गावर मागील काही वर्षापासून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे अन् एसटी महामंडळात असलेल्या बसची कमतरता यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशात मंगळावर (२७ फेब्रुवारी) रोजी अहेरी आगारातून सिरोंचा साठी सकाळच्या सुमारास केवळ एक बस सोडण्यात आली.

जवळपास ८ वाजेपासून सिरोंचासाठी एकही बस नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना जवळपास ५ तास ताटकळत प्रतिक्षा करावी लागली. अखेर दुपारी १ वाजताच्या सुमारास अहेरी - सिरोंचा बस आलापल्ली बस स्थानकात दाखल झाली. मात्र ती बस अगोदरच फुल्ल भरून आल्याने येथील प्रवाशांना नाईलाजास्तव भरगच्च भरलेल्या बसमधून उभ्यानेच प्रवास करावा लागला. उन्हाळ्याचे दिवस असून वयोवृद्ध, लहान मुलांना याचा चांगलाच फटका बसला होता. अगोदरच तब्बल ५ तास प्रतिक्षा केल्यावर येथील प्रवाशांना पुन्हा तब्बल ४ ते ५ तास उभ्याने प्रवास करण्याची नामुष्की ओढवली होती.

विशेष म्हणजे वाहकाला तिकीट देण्यासाठी जागा नव्हती. वाहक चक्क प्रवाशांच्या डोक्यावरून बसमध्ये ये-जा करत उभं असलेल्या प्रवाशांना मागे करत होता. यावरून भर उन्हाळ्यात प्रवाशांचे काय हाल सुरू आहे, याची प्रचिती येते. प्राप्त माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यवतमाळ - नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांसाठी गावातच बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रत्येक आगारातून मोठ्या प्रमाणात बसेस पाठविण्यात आले असून अहेरी आगारातून देखील १० बस पाठविल्या आहेत. एकीकडे नेत्यांचा कार्यक्रमासाठी तामजाम केली जात आहे तर दुसरीकडे बसेस अभावी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभर विविध मार्गावरील प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसला होता. तर सिरोंचा मार्गावरील सर्वात जास्त प्रवासी बस स्थानक परिसरात आढळून आले. एसटी महामंडळाविषयी प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2024

PostImage

जिल्ह्यातील महाशिवरात्री भरणाऱ्या यात्रेत भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध करा - जिल्हाधिकारी संजय मीणा


जिल्ह्यातील महाशिवरात्री भरणाऱ्या यात्रेत भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध करा - जिल्हाधिकारी संजय मीणा

 


गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी निर्देश दिले आहेत महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आज दिल्या.

जिल्ह्यात मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र, चपराळा देवस्थान, महादेव डोंगरी यासह विविध ठिकाणी महाशिवरात्री निमित्त 8 मार्चपासून यात्रा प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजना संदर्भात श्री संजय मीणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी ओंकार पवार, विवेक सांळुके, उत्तम तोडसाम, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार तसेच मार्कडा, चपराळा व पळसगाव येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यात्रेच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, धर्मशाळेची दुरुस्ती, औषधाचा पुरेसा साठा व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता, पथदिवे, अखंडित विद्युत पुरवठा, मोबाईल शौचालयाची व्यवस्था, भाविकांसाठी पुरेशा बसेस, अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका आदी आवश्यक सोयी सुविधा भाविकांसाठी सुसज्ज ठेवण्याचे व संबंधित विभागाला नेमून दिलेले कामे व्यवस्थितपणे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मीणा यांनी दिले. तसेच यात्रेदरम्याने दुर्घटना घडू नये यासाठी संबंधीतांना गॅस सिलेंडर वापरण्यास मनाई करण्याच्या सूचना देण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून यात्रेसाठी अतिरिक्त सुविधेच्या आवश्यकतेबाबत विचारणा करून माहिती जाणून घेतली. चपराळा येथे पाण्याची मोटर, मार्कंडा येथे पोलिस बचाव पथकाला बोट व आवश्यक तेथे दुरुस्ती व डागडुजी आदी बाबींसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2024

PostImage

महाराष्ट्र शासनाच्या सहा लाख बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक


महाराष्ट्र शासनाच्या सहा लाख बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

गडचिरोली:- महाराष्ट्र शासनाच्या सहा लाख रुपये बक्षीस असणाऱ्या माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने जेरबंद केले आहे 
माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल दिनांक 25/02/2024 रोजी अटक केले.

काल दिनांक 25/02/2024 रोजी मागील वर्षी माहे एप्रिल 2023 मध्ये

मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 37/2023 कलम 307, 353, 143, 147, 148, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25, 5/28, 8/27 भाहका, 3, 4 भास्फोका, 13, 16, 18 (अ), 20 बे. कृ. प्र. अधिनियम मधील आरोपी जहाल महिला माओवादी नामे राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, वय 30 वर्षे, रा. बडा काकलेर, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) हिला गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून अटक केली.

अधिक तपासात असे दिसून आले की, दिनांक 30/04/2023 रोजी

मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता ज्यामध्ये 03 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. तसेच पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग असून तिला सदर चकमकीच्या अनुषंगाने दाखल पोस्टे तोयनार येथे दाखल अप. क्र. 05/2018 कलम 307, 147, 148, 149, भादंवि. सहकलम 25, 27 भाहका मध्ये सन 2019 मध्ये अटक करण्यात आली होती.

△ अटक जहाल महिला माओवाद्याबाबत माहिती नामे राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा * दलममधील कार्यकाळ

सन 2006 साली चेतना नाट मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली. सन 2010-11 साली चेतना नाट मंचामध्ये उप-कमांडर या पदावर

पदोन्नती झाली.

सन 2016 साली फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.

सन 2019 साली पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.

सन 2020 मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.

A8 कार्यकाळात केलेले गुन्हे

* चकमक 04

* सन 2016 मध्ये मौजा करेंमर्का, फरसेगड (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* सन 2016 मध्ये मौजा मरेवाडा, भोपालपट्टनम (छ.ग.) जंगल

परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* सन 2018 मध्ये मौजा कचलाराम, बीजापूर (छ.ग.) जंगल परिसरात

पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* सन 2023 मध्ये मौजा केडमारा, (भामरागड, जि. गडचिरोली) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

8 महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 73 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल ,अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता ,अपर पोलीस अधीक्षक अहेरी  एम. रमेश  यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2024

PostImage

देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा 


देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा 
    
 आजपासून मागण्या मंजुर होईपर्यत श्याम मस्के  पाटलांचे उपोषण सुरु 

देसाईगंज:- येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आक्रोश मोर्चा काढला व आपल्या मागण्यांचे निवेदन रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले तद्वतच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्याम म्हस्के पाटलांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे 
 मागिल १५ दिवसांपुर्वी शेतकऱ्यांना रब्बी पिकाला सुरळित पाणिपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्राच्या उर्जामंञ्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे १२ तास कृषी पंपांना विजपुरवठ्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे ते पुर्ण करावे यासाठी देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपधारकांनी आंदोलन उभारले होते तेव्हा स्थानिक आमदारांनी चर्चा करुन ३ दिवसात आरमोरी विधानसभा क्षेञासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरळित विज पुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली परंतू तब्बल १५ दिवस उलटुनही विजपुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने पिक धोक्यात आल्याने शेकडो भुमिपुञांनी रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज च्या  उपविभागिय कार्यालयावर मोर्चा च्या माध्यमातून धडक दिली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाची सुरुवात कोरेगांव चे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी केली              निसर्गाशी नेहमीच दोन हात करित शेतकरी शेतात पिक उभारत असतो आपल्या कुटुंबाच्या पोटाची खडगी भागविण्यासाठी कधी तुडतुडा, कधी रानटी जनावरांच्या हैदोषांवर मात करीत शेतकरी शेतात पिक उभे करतो  कालव्याच्या सिंचनाची सोय नसलेले शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातुन रब्बी पिकाची लागवड करतात मागिल दोन वर्षापासुन देसाईगंज तालुक्यात कृषिपंपांना विजपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झाला असून सुरळित पाणिपुरवठा होत नसल्याने धान पिक धोक्यात येवुन करपण्याच्या मार्गावर लागले आहे या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी १५ दिवसापुर्वी रामदास मसराम यांनी शेकडो शेतकऱ्याना सोबत घेवुन देसाईगंज च्या विद्युत विभागाच्या कार्यालयाला घेराव केल्याने शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन स्थानिक आमदार कृष्णा गजबे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तथा उर्जामंञी देवेंन्द्र फडणविस यांच्याशी चर्चा करुन तिन दिवसात संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातिल कृषीपंपधारक शेतकऱ्यांना १२ तास सुरळित विजपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली माञ १५ दिवस उलटुनही विद्युत विभागाकडुन कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही सद्या रब्बी पिकांच्या रोवणी चे काम जोरात सुरु असुन कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या शेतात माञ भेगा पडल्या असुन धान पिक धोक्यात आल्याने भुमिपुञ असलेल्या रामदास मसराम यांच्या नेतृत्वात चोप कोरेगांव बोडधा, शंकरपुर, विहिरगांव, किन्हाळा, मोहटोला आणि देसाईगंज तालुक्यातिल सर्वच कृषिपंपधारक शेकडो  शेतकऱ्यानी उपविभागिय कार्यालयावर मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन उभारले एवढेच नव्हे तर कोरेगांव चे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी कार्यालयाच्या सामोर शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्याचे शासनासमोर आव्हान उभे करुन आजपासुनच आमरण उपोषनाला सुरुवात केली   

    निवेदन सादर करतांना रामदास मसराम म्हणाले की  उर्जा मंञ्यांनी दिलेल्या १२ तास कृषी पंपांना सुरळित विद्युत पुरवठ्याच्या आश्वासना नुसारच शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली १५ दिवस उलटुनही शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर शासन व प्रशासन गांभिर्याने विचार करत नाही पिक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल होईल  आत्महत्येचे प्रमाण वाढतिल शेतकऱ्यांना आर्थिक अडचणिंचा सामना करावा लागेल यासाठी उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना २४ तास विजपुरवठ्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी शासकिय धान खरेदी केन्द्रावर हेक्टरी ५० क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात यावा आधारभूत धान खरेदी ३५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे करण्यात यावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामिण भागात विज पुरवठा करणाऱ्या शंकरपुर पॉवर ट्रान्सफार्मर वर ५ एमव्हिए ऐवजी १५ एमव्हिए चा ट्रान्सफार्मर लावण्यात यावा या सर्व मागण्या पुर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कोरेगांव चे श्याम मस्के पाटिल यांनी आमरण उपोषण सुरु केले असुन शासन व प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा शेतकऱ्यांच्या संयमाचा सत्ताधाऱ्यांनी अंत पाहु नये असा सज्जड इशारा या प्रसंगी रामदास मसराम यांनी दिला आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2024

PostImage

अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम 1 मार्च पासून पूर्ववत सुरु होणार


अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम 1 मार्च पासून पूर्ववत सुरु होणार

 प्रशासनाच्या लेखी आश्वासना नंतर  उपोषणाची सांगता


गडचिरोली:-
अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने  मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम १ मार्च पासून सुरू होणार असून मुर्लीधर महाराज याचे उपोषण वडेट्टीवार यांनी निंबुपाणी पाजून मागे घेण्यास भाग पाडले आहे 
गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराची पुनर्बांधणीच्या नावावर तेथील दगडांची उकल करण्यात आली होती. याला एक दशकाचा काळ उलटला असतानाही प्रशासन व पुरातन विभागाने काना डोळा केला. या मंदिराचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याची मागणी घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी गडचिरोली येथे मोठे जण आंदोलन करून मार्कंडा येथे  उपोषण सुरू केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाच्या या दुर्लक्षित धोरणाविरुद्ध मंदिराच्या दुरावस्थेला जबाबदार लोकप्रतिनिधी प्रशासन व पुरातत्व विभागाला खडे बोल सुनावले होते. आज उपोषणाच्या नवव्या दिवशी पुरातत्त्व विभागाने महसूल प्रशासन करवी येत्या 1 मार्चपासून मंदिराचे पूर्ववत बांधकाम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणकर्ते संत मुरलीधर महाराज व प्रशासन यांच्या मध्यस्थी करून उपोषणाची सांगता केली.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे गेल्या हजारो वर्षांपूर्वी चे पुरातन काळातील हेमाडपंथी शिव मंदिर आहे. जशी काशी येथे गंगा नदी उत्तर वाहिनी होते तशीच मार्कंडा देव येथे वैनगंगा नदी ही उत्तर वाहिनी होते. यामुळे या सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने येथे प्रचंड मोठी अशी यात्राही भरते. मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी सदर पुरातन हेमाडपंथी मंदिराची पुनर्बांधणी करणे नियोजनार्थं स्थानिक लोकप्रतिनिधी व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मोठा गाजावाजा करून या मंदिराची दगडे उकलून अडगळीत पाडून ठेवत अर्धवट काम केल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. भाविकांची प्रचंड श्रद्धा असलेल्या शिव मंदिराच्या पुनर्बांधणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी शिव मंदिराच्या अर्धवट बांधकाम संदर्भात दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी गडचिरोली येथे जन आंदोलन करून मार्कंडा देवस्थान येथे  उपोषण सुरू केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंदिराच्या दुरावस्याथे बाबत गंभीर दखल घेऊन प्रशासनाला व पुरातत्त्व विभागाला प्रसिद्धी मध्यामातून सज्जड इशारा दिला होता.तर आज उपोषणाच्या नवव्या दिवशी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता स्थानिक तहसीलदार प्रशांत घरुडे, पोलीस निरीक्षक चामोर्शी, जन आंदोलन व उपोषण समितीचे पदाधिकारी  यांच्याकडून परिस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी गडचिरोली व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून उपोषणाची गांभीर्य पटवून दिले व मंदिराच्या दुरवस्थेबाबत कळवून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे सांगितले. विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांच्या मध्यस्थीनंतर यावर पुरातत्व विभागाने महसूल विभागा करवी उपोषण कर्ते मुरलीधर महाराज यांना लेखी पत्र देऊन येत्या एक मार्चपासून मंदिराचे पूर्ववत बांधकाम सुरू होईल असे पत्र देताच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते निंबुपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनु. जमाती प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा अध्यक्ष हसन गिलानी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकड्यालवार, नंदाताई कोडवते, कवडूजी कुंदावार , सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते, उपोषण समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

 आश्वासन पाळा... अन्यथा मोठे आंदोलन

मंदिराची पुनर्बांधणीचा गाजावाजा करत मार्कंडेश्वर मंदिराची दुरावस्था करण्यात आली.याला एक दशकाचा काळ लोटला असून एका संताला मंदिराच्या दुरुस्तीसाठी उपोषणाला बसावे लागले.ही फार मोठी खेदाची बाब आहे.तर देशाच्या ईतर मंदिरासाठी कोट्यावधींचा खर्च करणाऱ्या सरकारने या मार्कंडेश्वर मंदिराला निधी दिला पाहिजे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी हे या सर्वस्वी जबाबदार आहेत.तर आज पुरातत्त्व विभागाच्या वतीने महसूल प्रशासन हातून लेखी आश्वासन देत येत्या 1 मार्च पासून मंदिराचे बांधकाम पूर्ण करणे बाबत आश्वासन दिले. तर दिलेल्या तारखेस काम सुरू न झाल्यास मुरलीधर महाराज यांच्या सोबत,प्रचंड भाविक व नागरिकांच्या उपस्थितीत विशाल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.

 तर मंदिरात उपोषणास बसणार.

प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. यामुळे आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शब्दावर मी अन्नत्याग उपोषण मागे घेत आहे. प्रशासनाने मंदिर बांधकामास दिरंगाई केल्यास चक्क मंदिरातच उपोषणास बसणार असे संत मुरलीधर महाराज यांनी यावेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2024

PostImage

शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे ् -प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले


शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे
् -प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले 


चामोर्शी :-
 शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात  विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाकरिता शिक्षकांनी सदैव आपले ज्ञान वृद्धिंगत करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावलेल्या आहेत .विद्यार्थी हा व्यावसायिक झाला पाहिजे .त्यासाठी विद्यार्थ्यांच्या विचारांचा अभ्यास करुन शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पडावे असे प्रतिपादन  प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर्फे चामोर्शी येथील गटसाधन केंद्रामध्ये आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून गट समनवयक चांगदेव सोरते , संजय कुनघाडकर , राकेश इनकते , हेमंत पेटकर , शिवराम मोगरकर , प्रमोद भांडारकर , अशोक गजभिये , विवेक केमेकर आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चांगदेव सोरते म्हणाले अध्यापन करतांना विविध साधनांचा वापर करा.विद्यार्थी हा कृतिशील असला पाहिजे.मुलांमध्ये  आत्मविश्वास निर्माण करा.आणि मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील असावे असे मत व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आठवी ते बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे  सर्वसमावेशक प्रशिक्षण गटसाधन केंद्र चामोर्शी येथे २२ ते २४ फेब्रुवारी पर्यंत आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला चामोर्शी तालुक्यातील सरकारी व खाजगी शाळेतील एकूण ८० शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थी  मुख्याध्यापक पालांदूरकर , सुधीर फरकाडे , रुचिता बंडावार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन तज्ञ मार्गदर्शक हेमंत पेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना नेरकर यांनी केले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2024

PostImage

तरुणांमध्ये संस्कार,गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे: राजे अम्ब्रिशराव आत्राम


तरुणांमध्ये संस्कार,गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे: राजे अम्ब्रिशराव आत्राम

 

आलदंडी येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

 

अहेरी:- देशाची भावी पिढी अर्थात आजचे तरुण ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.ते आलदंडी येथे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी सहउद्घाटक म्हणून युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,तर प्रमुख पाहुणे प्रशांत ढोंगे,कारे आत्राम गाव पाटील,मासू गावडे,पेडू गावडे,शंकर कुंभारे,सुनील कांबडे,संजय सडमेक,रागेंद्र इष्टाम ग्रा.पं.सदस्य पेरिमिली ,सुधाकर दुर्गे ग्रा.पं.सदस्य पेरिमिली, महेश मडावी,राजेंद्र मडावी,तिरुपती कोसरे,सुरज मलिक,महेश हजारे,उमेश चांदेकर,सचिन सिद्धमशेट्टीवार, पंकज एगलोपवार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना युवक हे देशाचे आधारस्तंभ असून युवक सुदृढ राहण्यासाठी आरोग्य हे फार महत्वाचे आहे. त्यासाठी दैनंदिन व्यायाम आणि विविध खेळ खेळणे महत्त्वाचे आहे.पूर्वी तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जायचे.तिथे ग्रामीण भागातील मोजके खेळाडूंना संधी मिळायची.मात्र,आता प्रत्येक खेड्यापाड्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.त्यामुळे प्रत्येक गरीब तरुणांना देखील आपल्या मधील क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे,ही आनंदाची बाब आहे. आलदंडी सारख्या दुर्गम भागात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घेतला. असाच प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.त्यासाठी वाटेल ती मदत देण्यासाठी मी तत्पर असल्याचे देखील त्यांनी ग्वाही दिली.

दरम्यान पाहुण्यांचा गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी मंडळाचे सदस्य,परिसरातील नागरिक व कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2024

PostImage

पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापक यांना निरोप तथा सत्कार समारंभ 


पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापक यांना निरोप तथा सत्कार समारंभ 

लगाम:-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम मुख्याध्यापक दिलीप बारसागडे , उच्च श्रेणी मुख्याध्यापक कोसे  बोंदागुडम यांची पद्दोन्नती झाल्याने निरोप  तथा सत्कार समारंभ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम येथे शाळा व्यवस्थापन समिती लगाम व ग्राम पंचायत लगाम, जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेदिकाताई गणलावार ,प्रमुख अतिथी म्हणून  गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे मुलचेरा हे होते, यावेळी सत्कार मुर्तीचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रम प्रसंगीं  गटशिक्षणाधिकारी मुलचेरा यांनी सत्कार मुर्तीच्या कामाचे कौतुक केले व पुढील काळात उत्कृष्ट कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या, कार्यक्रम प्रसंगीं लगाम केंद्राचे केंद्रप्रमुख  कोमरेवार, लगाम शाळेचे मुख्याध्यापक  समुद्रालवार , लगाम ग्रामपंचायत चे सरपंच  दिपक मडावी, उपसरपंच  मधुकर  गेडाम  व सचीव राकेश दुर्गे , यांनी आपले मते प्रकट केली अतिथी म्हणून  श्रीकोंडावार  गटसमन्वयक मुलचेरा फुलोरा समन्वयक महेश मडावी, दिवाकर मादेशी, तंटामुक्ती समिती लगाम चे अध्यक्ष  क्रिष्णा गावडे व पो. पा. गिरमा मडावी आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचलन  किशोर कोंडावार  तर आभार प्रदर्शन नागपुरवार यांनी केले. 
कार्यक्रमचे यशस्वीतेसाठी अशोक दुर्गे  व  सौ.दाहगावकर , बंडावार, सुरेश मडावी , अशोक दुर्गे ,  शिवराम मडावी  यांनी परिश्रम घेतले  या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती लगाम चे सर्व सदस्य, , ग्रामपंचायत चे सदस्य व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2024

PostImage

इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल सुभाषग्राम येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप


 इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल सुभाषग्राम येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे सावित्री च्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले
इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुभाषग्राम येथे सत्र २०२३-२४ करिता मानव विकास मिशन अंतर्गत शालेय शिक्षणासाठी बाहेर गावावरुन ये - जा  करणाऱ्या विद्यार्थीनी करिता वेळेवर ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत उपस्थित होता यावे यासाठी इयत्ता ८ वी ते १२ च्या २७ विद्यार्थींना नुकतेच सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती आकुलीताई बिस्वास,माजी सरपंच सतीश रॉय, प्राचार्य बेपारी ,शाळा समिती उपाध्यक्ष निताई विश्वास,पालक संघ सदस्य कालिदास दास आदिंसह शाळेचे शिक्षक वृंद  शिक्षकेतर कर्मचारी , व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

 "भिडे वाडा बोलला" राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन


 

 "भिडे वाडा बोलला" राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन

 देश विदेशातील कवींचा असणार सहभाग

पुणे, दि. २२ (प्रतिनिधी) पुण्यातील भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान, स्त्री मुक्ती चळवळीचा जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे. हा विषय घेऊन 'भिडे वाडा बोलला' या सुप्रसिद्ध कवितेचे कवी  प्राथमिक शिक्षक विजय वडवेराव यांनी भिडे वाडा बोलला या राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत भारतातीलच नव्हे तर विदेशातील कवी देखील सहभागी होणार आहेत. विदेशातून आतापासूनच कवितांचा ओघ सुरू झाला आहे.
     महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८ साली पुण्यात बुधवार पेठ येथील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत शिकवायला फातिमाबी शेख या सुध्दा सावित्रीबाईंसोबत सहकारी स्त्री शिक्षिका होत्या. आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांनी या शाळेसाठी महात्मा फुले यांना संरक्षण पुरवले होते. अशा स्त्री शिक्षणाच्या उगम स्थानाची, बहुजनांच्या ऐतिहासिक प्रेरणा स्थळाची जी इतकी वर्षे दुरावस्था होती,
तेव्हापासून ते आता भिडे वाड्याचे होऊ घातलेले भव्य राष्ट्रीय स्मारक इथवर भिडे वाड्याचा आत्मकथनपर प्रवास या रचनेत अपेक्षित आहे.
भिडे वाडा ( देशातील मुलींची पहिली शाळा) स्त्री शिक्षणाचे उगमस्थान , स्त्री मुक्ती चळवळीचा आशय केंद्रबिंदू असलेली रचना असावी.
स्पर्धेसाठी कसल्याही प्रकारचे प्रवेश मूल्य नसल्याचे आयोजकांनी सांगितले.
अक्षरछंद, वृत्तबद्ध कविता, गजल, पोवाडा, भारुड, मुक्तछंद अशा कोणत्याही काव्य प्रकारात ही रचना लिहिता येऊ शकेल. कवितेसाठी ५० ओळींची मर्यादा दिलेली आहे. संपूर्ण भारतातून (भारता  बाहेरीलही) कोणत्याही वयोगटाची व्यक्ती या राष्ट्रीय काव्य स्पर्धेत भाग घेऊ शकते. फक्त रचना स्वरचित असावी.
स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम तारीख १ मार्च २०२४ अशी आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाला पाच हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. तर द्वितीय क्रमांकाला तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक तर तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके १० आहेत. प्रत्येकी एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह , शाल, पुस्तक असे बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दि.३१ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रोड, पुणे येथे सायं. ५ वाजता होणार आहे.
भिडे वाड्या सारख्या देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान असलेल्या, स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्र बिंदू असलेल्या ऐतिहासिक वास्तूबद्दल , महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी शेख , वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल लोकांनी माहिती शोधावी, वाचन करावे, अभ्यास करावा व आशयघन लेखन करावे या एकमेव उद्देशाने या राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केल्याचे
आयोजक विजय वडवेराव  यांनी सांगितले.
सुरुवातीला ही काव्य लेखन स्पर्धा राज्यस्तरीय ठेवली होती पण महाराष्ट्राबाहेरील गोवा, कर्नाटक, गुजरात, या राज्यातून, सिल्वासा येथून कवींनी संपर्क साधून काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवून या स्पर्धेसाठी आपल्या रचना पाठवल्याने या स्पर्धेचे स्वरूप आपोआपच राष्ट्रीय झाले. स्पर्धेसाठी भारताबाहेरील इतर देशांतूनही कविता येण्याची शक्यता असल्याने ही काव्य लेखन स्पर्धा आंतरराष्ट्रीय होऊ शकते 
स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम मुदत १ मार्च २०२४ पर्यंत आहे.
 आलेल्या कवितांमधून काही निवडक कवितांचा *भिडे वाडा बोलला* या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात  समावेश करणार असल्याचे काव्य संग्रहाचे संपादक व स्पर्धेचे आयोजक प्राथमिक शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी आपली रचना विजय वडवेराव यांच्या 9021097448 या व्हॉट्सॲप नंबरवर किंवा vijaywadverao@gmail.com या मेल आयडीवर
दि. १ मार्च २०२४ पर्यंत पाठवावी, असे आवाहन आयोजक कवी विजय वडवेराव यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

युवा पिढीने शिवरायांचे विचार आत्मसात करावेत:- माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


युवा पिढीने शिवरायांचे विचार आत्मसात करावेत:- माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

गडचिरोली:- 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील राज्यकारभारामध्ये भारतीय लोकशाहीची बीजे रोवली होती. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच होती. निष्पक्ष, निरपेक्ष राज्यपद्धतीतून त्यांनी राज्यकारभार केला असल्याचे सांगत आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत,अशी अपेक्षा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व्यक्त केली.

गुरुवार (२२ फेब्रुवारी) रोजी शिवजन्मोत्सव समिती टायगर ग्रुप देसाईगंज (वडसा) तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य जाहीर व्याख्यान कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी आमदार कृष्णा गजबे,पद्मश्री डॉ परशुराम खुणे, युवानेते अवधेशराव आत्राम,सुप्रसिद्ध युवा व्याख्याते,समाज प्रबोधनकार सोपान कानेरकर महाराज,डॉ.नामदेव किरसान,आकाश अग्रवाल,गणेश फाफट,रामदास मसराम,विक्की बाबू रामाणी,शालू दंडवते,प्रिन्स अरोरा, मोहन वैद्य आणि अतुल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश पुढे चालला आहे.येणाऱ्या काळात भारत देश इतर देशांच्या तुलनेत बरोबरी करणार अशी आशा आहे. मात्र,त्यासाठी युवा पिढीला सुद्धा पुढाकार घ्यावा लागणार आहे. देशाचे भविष्य हे युवा पिढीच्या खांद्यावर आहे.त्यामुळे तुम्ही शिवरायांनी सांगितलेल्या मार्गावर चला असे आवाहन देखील त्यांनी केले. टायगर ग्रुपच्या या कार्यक्रमामुळे वडसा शहरात परत एकदा येण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.यापुढे देखील प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. दरम्यान शहरात आगमन होताच टायगर ग्रुप तर्फे त्यांचे जंगी स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमात आमदार कृष्णा गजबेसह इतर मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.तर युवा व्याख्याते,समाज प्रबोधनकार सोपान दादा कानेरकर आपल्या प्रबोधनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व युवा व्याख्याते सोपान कानेरकर महाराज सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते हे विशेष.त्यामुळे हजारो नागरिकांची उपस्थिती होती.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

शासनाकडून पुरवठा न होताही अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप झालेच कसे


शासनाकडून पुरवठा न होताही अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप झालेच कसे?


जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी पुरवठा निरीक्षक व  गोदाम व्यवस्थापक यांना बजावले कारणे दाखवा नोटीस

गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मार्फत शासकीय योजना अंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात येणार होते परंतू गडचिरोली जिल्ह्यात पुरवठा न होताच  अहेरी तालुक्यात साड्या वाटप केल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी पुरवठा निरीक्षक आडेपवार व गोदाम व्यवस्थापक ताकवाले यांना तहसीलदार अहेरी यांच्या मार्फत २०/०२/२०२४ ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

कॅप्टिव्ह  मार्केट योजने अंतर्गत  अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी साडीचे वाटप करण्यात यावे यासाठी  यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्त  करण्यात आली असून जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील एका महिला सदस्यांना साडी चे नियतन मंजूर झालेले आहे 
मात्र या जिल्ह्याकरीता साड्यांचा पुरवठा करण्यातच आलेला नाही
तरीसुद्धा अहेरी तालुक्यातील  कार्डधारकांना AePDS ऑनलाईन प्रणालीवर  ५६३ साड्यांचे वाटप केल्याचे दिसून येते आहे 
गडचिरोली जिल्ह्यात साड्यांचा पुरवठा झलेला नसताना  अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी साड्यांचे वाटप कुठून केले  व साड्याचा ऑनलाईन स्टाक कसाकाय उपलब्ध करून देण्यात आला आहे  आपल्या स्तरावरुन साड्यांचे वाटप झालेच कसे व साड्यांची रक्कम वसुल करण्याचे शासनाचे  निर्देश प्राप्त झाल्यास  आपणाकडून ५६३ साड्यांचे पैसे वसूल का करण्यात येऊ नये  या करिता नोटीस मिळाल्यानंतर २४ तासाचे आत खुलासा करावा  अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम १९७९  चे तरतुदीनुसार  यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरुन  आपणा विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई चे प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल असे पत्रात नमूद केले असून अशा अधिकाऱ्यांनर खरोखर कारवाई होणार का औसुख्याचा विषय जनतेसमोर उभा ठाकला आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ वरघंटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन


 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ वरघंटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन 

 

चामोर्शी,

चामोर्शी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी पहाटे 5.35 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे निधन झाले. भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याची ही अकाली एक्झिट धक्कादायक ठरली आहे. खासदार अशोक नेते यांचे ते खूप खंबीर सहकारी होते.

वरघंटे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच खा. अशोक नेते यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना यांना योग्य उपचार मिळण्यासंबंधी सूचना करून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. परंतु हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा पहाटे ५-३५ लाच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. एकदा उमदा, निष्ठावंत, गोरगरिबांच्या मदतीस धावणारा, पक्षाला बळकट करणारा, सहकारी गमावला, सर्वत्र कडून स्व. स्वप्नील वरघंटे यांना आपुलकीची भावना व्यक्त करत श्रद्धांजली देत पूर्ण चामोर्शी शहर दुःख व्यक्त करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

भरधाव दुचाकीची झाडाला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार


भरधाव दुचाकीची झाडाला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

धानोरा :-
गोडलवाही येथून दुचाकी ने स्वगावी परत येत असताना भरधाव दुचाकीची झाडाला धडक लागून दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना 21 फेब्रुवारी  ला रात्री सात वाजताच्या सुमारास घडली
 देवाजी दसरू कोडाप 48 रा. कनारटोला ता. धानोरा जि . गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा 21 फेब्रुवारीला गोडलवाही येथे एकटाच कामानिमित्त नातेवाईकांकडे गेला होता काम आटोपून दुचाकीने परत येत असताना गोडलवाही पासून दीड किमी अंतरावर असलेल्या वळणावर त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसली यामध्ये त्याचे डोक्याला जबर मार लागल्याने व वेळेवर उपचार न मिळाल्याने तो जागीच ठार झाला घरी त्याची पत्नी व मुले तो येणार म्हणून वाट पाहत होती परंतु रात्र होऊनही पती घरी न पोहोचल्याने पत्नीने गोडलवही येथे त्यांचे नातेवाईकांना फोन करून विचारले असता तो त्यांचे घरून दुचाकीने गेला असल्याचे समजले तेव्हाच नातेवाईक त्याला पाहण्यासाठी गेले असता तो रस्त्याचे कडेला पडून असल्याचे दिसले घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली तेव्हा त्याला रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतू डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

वांगेपल्ली येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वतीने चक्काजाम आंदोलन


वांगेपल्ली येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वतीने चक्काजाम आंदोलन 

अहेरी:-
विदर्भ राज्य आंदोलन समिति गडचिरोली द्वारा विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे तसेच अहेरी जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी  तेलंगाना राज्याच्या बार्डर वरती अहेरी वांगेपल्ली वैनगंगा नदीच्या तिरावर चक्का जाम आंदोलन करीत,आम्हचा जिल्हा अहेरी जिल्हा,आम्हचे राज्य विदर्भ राज्य
अशा प्रकारचे फलक लावण्यात आले.याआंदोलना करीता विदर्भ राज्य आंदोलन समितिचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, अहेरी जिल्हाकृती समितिचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विदर्भ आं.स.तालुका अध्यक्ष विलास रापत्तिवार, नागसेन मेश्राम, मोतीराम लाडेलवार, अरुण शेडमाके, महादेव करमकार असे विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वरील प्रकारचे आंदोलने विदर्भात अनेक ठीकाणी होत आहेत.
लवकरच सिरोंचा बार्डर वरती माजी आ. वामणराव चटप यांच्या नेत्रुत्वात खुप मोठे जन आंदोलन करण्यात येणार आहे .
हे आंदोलन विदर्भ राज्य घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.असे अशोक पोरेड्डीवार यांचे ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनात  मत व्यक्त केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

तालुका काँग्रेस कमिटीचा बुथ पदाधिकारी मेळावा सम्पन्न


तालुका काँग्रेस कमिटीचा बुथ पदाधिकारी मेळावा सम्पन्न

अहेरी:-
 गडचिरोली जिल्ह्यातील"अहेरी तालुका काँग्रेस कमिटी"  बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न झाला, यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून बूथ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
  आगामी लोकसभा - विधानसभा निवडून जिंकून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात एकहाती सत्ता आणण्याकरिता नियोजनबद्द व एक दिलाने कार्य करण्याच्या  सूचना  गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
   यावेळी बैठीकस माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. पेंटारामजी तलांडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, काँग्रेस नेत्या सगुणाताई तलांडी नगराध्यक्ष रोजा करपेत, मुस्ताक हकीम, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंत मडावी, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ. अब्दुल (पप्पू) हकीम, निताताई तलांडी,  रज्जाक पठाण, बबलू शडमेक, अजय नैताम, अरुण बेज्जलवार, प्रमोद आत्राम सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे यावे- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे यावे- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

मूलचेरा :-

 अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवकांमध्ये क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत भरपूर गुणवत्ता आणि अनेक गावात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी आपण युवकांना सहकार्य करत असतो.क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपले युवक पुढे जावे आणि आपले भविष्य उज्वल करून या क्षेत्राच नावलौकिक करावा,तसेच युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे यावे असे मत कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते तर अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम,प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,महामंत्री सुभाष गणपती,शहराध्यक्ष दिलिप आत्राम,तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मल्लिक,माजी सरपंच रविभाऊ झाडे,अनु.जाती आघाडी अध्यक्ष प्रफुल दुर्गे,उपाध्यक्ष स्वरूप पोद्दार,बंगाली आघाडी अध्यक्ष मोंटु सरकार,सामाजिक कार्यकर्ते बंडू कुमरे हे होते.

त्यावेळी सर्व मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.लहान मुलींनी सामूहिक नृत्याच सुंदर सादरीकरण केल.
यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग,युवा वर्ग आणि स्थानिक गावकरी,भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकारातून आरमोरीत दिव्यांग शिबिर


सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकारातून आरमोरीत दिव्यांग शिबिर.

 

शिबिरात २६१ दिव्यांगाची झाली तपासणी
 

आरमोरी:-

 तालुका प्रशासनाचे वतीने उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दिव्याग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात आले.सदर शिबिरात तालुक्यातील ग्रामीण भागांतील २६१ दिव्यांग बांधवांनी शिबिरात सहभागी होऊन तपासणी करूण घेतली

भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय  परिविक्षाधीन अधिकारी ओमकार पवार हे आरमोरी येथे रूजू होताच त्यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे.  तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक दिव्यांग आहेत. मात्र त्यांच्याकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या आर्थिक लाभापासून ते वंचित आहेत. हि बाब भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओमकार पवार यांच्या लक्षात आल्याने त्यानीं प्रत्येक गावागावात महसूल विभागाच्या वतीने तलाठी यांचे मार्फत सर्व्हे करूण तालुक्यातील दिव्यागं बांधवाची माहिती गोळा केली . जे दिव्यांग् असूनही ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही व जे शासनाच्या लाभापासून वंचित आहेत अशा गरीब गरजु दिव्यांगासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले.

दिव्यांग तपासणी  शिबिरात  कान नाक घसा तपासणी २८, अस्थिव्यंगरोग ८६, मानसिक रोग ४३, फिजीसियन तपासणी.. ३५, बालरोग १६, नेत्र तपासणी,३५, इतर रुग्ण १८ अशा एकुण २६१ दिव्यंगाची नोंदणी करूण तपासणी करण्यात आली व ५४ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.


 सदर शिबिरात गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टराना बोलवण्यात आले. शिबिरात तालुक्यातील दिवांग बांधवाना महसूल प्रशासनाने शिबिरस्थळी आणून त्यांची तपासणी करून घेतली.
तपासणी केलेल्या दिव्यांगणा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. गरजू व गरीब दिव्यांगाना त्यांचे आवश्यक असलेले कागदपत्र महसूल प्रशासनाच्या वतीने काढून त्यांना शासनाच्या दिव्यांग योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

 शिबिराला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, नायब तहसीलदार ललित लाडे, डी.एम वाकुलकर, मंडळ अधिकारी जि. एम. कुमरे, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ. नागदेवते, डॉ. मनोज मस्के, डॉ. प्रतीक चकोले डॉ. छाया उईके तसेच दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रमुख अनुप्रिया आत्राम व त्यांची वैद्यकीय चमू तसेच तालुक्यांतील तलाठी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी कोतवाल उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम 


 अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम 

 

अहेरी:-

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे कमलापूर दौऱ्यावर असताना आलापल्ली ते पुसूकपल्ली दरम्यान सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कळताच त्यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. एवढेच नव्हे तर अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी आपल्या ताफ्यातील एक वाहन सुद्धा दिला

प्राप्त माहितीनुसार गुडडीगुडम येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षिका शाळा सुटल्यावर दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसून आलापल्लीकडे परत येताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे नियंत्रण सुटून त्या दुचाकीचा अपघात झाला.मागे बसलेल्या त्या शिक्षिकेच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.हे दृश्य माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी आपला ताफा थांबवून विचारपूस करत तात्काळ उपचार मिळावा यासाठी स्वतःचं वाहन दिले.

अपघातग्रस्तांना मदत करा असे शासन आणि प्रशासनाकडून नेहमीच आवाहन करण्यात येते.राजे अम्ब्रीशराव आत्राम सारखे व्यक्तिमत्व स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात सामान्य नागरिकांसमोर एक उदाहरण घालून दिले आहे.


पुन्हा एकदा राजेंनी दिली माणुसकीची दर्शन

दानशूर म्हणून ओळख असलेले राजे अम्ब्रीशराव आत्राम हे नेहमीच सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात.त्यांच्या दारावर गेलेले कुणीही आजपर्यंत खाली हात परत आले नाहीत.स्वतः उपस्थित नसले तरी त्यांच्यातर्फे आर्थिक मदत दिली जाते.हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे.आज तर रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहन मदतीला देऊन त्यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा परिचय  दिला आहे 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ' चामोर्शी तालुक्यातील एका युवकाने बॅनरबाजी करुन मोदी सरकारचा केला निषेध 


'मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ' चामोर्शी तालुक्यातील एका युवकाने बॅनरबाजी करुन मोदी सरकारचा केला निषेध 

गडचिरोली,

 केंद्राची कुठलीही योजना ही करदात्याच्या पैशाने राबविली जाते. त्यामुळे ती भारत सरकारची हमी अशी असायला हवी. मात्र असे न होता ती 'मोदी सरकारची हमी' अशा नावाने भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी असे प्रश्न बऱ्याच तरुणांना पडले आहेत त्याच अनुषंगाने चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावातील संतोष तिमाडे या युवकाने गावातील आपल्या एका छोट्याशा दुकानासमोर मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ व इव्हिएम हटाव देश बचाओ अशाप्रकारे बॅनर लावण्यात आले असल्याने आष्टी परिसरात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सदर बॅनर हे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या गावात हे बॅनर लावण्यात आले आहे भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. असे काही पोस्टर्स भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर या बॅनर्सवर भारत सरकार व्दारा राबविलेल्या जाणाऱ्या योजनांविषयी अतिशय नगण्य माहिती आहे. सोबतच शासकीय योजना ह्या मोदी सरकारची हमी असा उल्लेख त्यावर केला केलेला आहे.या योजना कोणासाठी? याचे निकष काय? लाभासाठी कोणाला संपर्क साधायचा? अशी कोणतीही कामाची माहिती या बॅनर्समध्ये नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही.
भारत लोकशाही राष्ट्र असून देशाचा कारभार हा पंतप्रधान मार्फत चालविल्या जातो. मात्र, शासनाच्या जाहीरातीत व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख कधीच केल्याचे पाहण्यात आले नाही परंतु  शासनाच्या योजना या भारत सरकारच्या योजना असतांना मोदी सरकारच्या योजना असा उल्लेख करणे उचित नाही. त्‍यामुळे मोदी सरकारची हमी असा उल्लेख असलेले बॅनर्स लावून भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर लावून गावोगावी मोदी सरकारची हमी अशे या बॅनर मधून दाखविले जात आहे मग मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी हे कळायला मार्ग नसल्याने मोदी सरकार होऊ नये म्हणून मी भारत सरकार वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ असे माझ्या दुकानासमोर लावले मी कोणत्या राजकीय पक्षांच्या वतीने लावले नसून संविधान वाचविण्यासाठी हे बॅनर लावले असल्याचे संतोष तिमाडे यांनी सांगितले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

आलापल्ली परिसरातील शालेय मुलींचा प्रवास झाला सुकर, मुलींच्या चेहऱ्यावर झळकला आनंद


आलापल्ली परिसरातील शालेय मुलींचा प्रवास झाला सुकर,
मुलींच्या चेहऱ्यावर झळकला आनंद


आलापल्ली:-
येथील धर्मराव हॉयस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय,आलापल्ली येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीचे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज व कोषाध्यक्ष कुमार अवधेशराव  बाबा यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले.बाहेर गावावरून विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्याकरिता मोठी अडचण निर्माण होत होती
शालेय शिक्षण घेण्यासाठी त्यांना पाच किमी अंतर पायी जावे लागत होते त्यामुळे शाळेच्या उपस्थितीवर परिणाम होत होता. मानव विकास मिशन अंतर्गत ५८ सायकलचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे प्राचार्य  कोडेलवार, पर्यवेक्षक खोब्रागडे, सहाय्यक शिक्षक वैद्य, खनगन, मामीडपल्लीवार, खरवडे,  राऊत , सौ. किरंगे, बांबोडे ,टिपले , झिलकलवार, ताजने, उपलवर  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 20, 2024

PostImage

विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करा अहेरी पोलीस निरीक्षक यांना महिलांचे साकडे


विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करा अहेरी पोलीस निरीक्षक यांना महिलांचे साकडे 

अहेरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील  अवघ्या दोन तीन कि. मी. अंतरावर असलेले भूंजगंरावपेठा व वांगेपल्ली येथील महिलांनी अहेरी पोलीस निरीक्षक काळबांधे यांना विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी साकडे घालून निवेदनातून  अवगत करून देण्यात आले 
सदर गावातील आबालवृद्ध  तरूण व्यक्ती दारूच्या व्यसनात मग्न झाले आहेत दररोज दिवसात चार पाच वेळा जावून वांगेपल्ली येथील दारू पित असतात विक्रेते हे आवक वाढत असल्यामूळे लवकर दारू चे उत्पादन वाढावे  म्हणून गावठी दारू मध्ये पटकी, नवसागर , अमोनिया, व अनेक झाडांचे साली चे वापर करतात त्यामूळे मूबलक दारू झपाट्याने निघत असल्यामूळे पिण्याऱ्याचे जथ्थे परत जाऊनये  म्हणून असे गैरप्रकार करीत असताना दिसत आहेत. त्यामूळे कित्येक गावातील तरूणांना जीव गमवावे लागले कित्येक जन आजाराने ग्रस्त झालेले आहेत. त्यामूळे कित्येक महीलाना तारूण्यातच विधवांचे जिवन व्यथीत करावे लागत आहे . त्यामूळे गावातील महिला मंडळी एकत्रीत येवून अहेरी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवून निवेदन देवून लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विंनती करण्यात आली आहे.अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे निवेदन स्विकाराताना पोलीस निरिक्षक  काळबांधे व पोलीस उपनिरीक्षक जावळे  व हवालदार तोरे  ,मडावी  उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 20, 2024

PostImage

आष्टी येथे शिव छत्रपती जन्मोत्सव थाटामाटात साजरा


आष्टी येथे शिव छत्रपती जन्मोत्सव थाटामाटात साजरा

आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्त श्री छत्रपती शिवस्वराज्य सेव संस्था आष्टी यांच्या सौजण्याने 18 फेब्रू. रोजी भव्य रांगोळी स्पर्धा तसेच छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर आधारित झाकी ( थीम ) व मराठी संस्कृती दर्शन तसेच वारकरी संप्रदाय कीर्तन व संपुर्ण गाव जेवण ठेवण्यात आले. आणि 19 फेब्रु. रोजी सकाळी 11वाजता भव्य बाईक रॅली व सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित झाकी (थीम) चे व रांगोळी स्पर्धेचे उदघाटक म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम व अध्यक्ष स्थानी आष्टी ग्रामपंचायत सरपंच सौ.बेबीताई बुरांडे उपस्थित होत्या सोबतच बाईक रॅली चे उद्घाटक आ. डॉ.देवराव होळी  व शोभा यात्रेचे उद्घाटक माननीय खासदार अशोक नेते  यांच्या हस्ते करण्यात आले झालेल्या दोन दिवशीय कार्यक्रमात श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी 
अध्यक्ष.पवन रामगिरकर उपाध्यक्ष .संदीप लोड्डेलीवार सचिव संदीप तिवाडे व सर्व सदस्य तथा गावकरी मंडळी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा आष्टी, लिटिल हार्ट कॉन्व्हेंट आष्टी राजे धर्मराव हायस्कूल आष्टी तसेच खूप मोठ्या प्रमाणात आष्टी वासीय सहभागी होऊन सुरळीतपणे दोन दिवसीय शिव जन्मोत्सव सोहळा पार पाडला. .


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट


घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट


गडचिरोली,
 घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट 
 जिल्ह्यातील उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन कोटगुल पासुन 500 मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकांला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले होते.

गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा हा घातपाताचा डाव उधळून लावत प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले स्फोटक नष्ट केल्याची कारवाई आज 19 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली.

गडचिरोली जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताहात तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलीस दलाने आज 19 फेब्रुवारी रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे कोटगुल पासुन 500 मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोडरी जंगल परिसराकडे जाणाया पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकांला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे
अशी गोपनिय खात्रीशीर माहिती प्रभारी अधिकारी कोटगुल धनंजय कुलकर्णी यांना मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली त्यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी बीडीडीएस पथकाला बोलविण्यात आले. बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिग करत असतांना, एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिड ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले प्रेशर कुकर मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे 02 किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरचं नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात पोस्टे कोटगुलचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी अधिकारी मयुर पवार, पोहवा पंकज हुलके, पोहवा अनंतराव सोयाम, पोअं संचिन लांजेवार व चापोअं तिम्मा गुरनुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मियांचे राजे होते- सारिका खिलारे


छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मियांचे राजे होते- सारिका खिलारे

डोंगरगाव (ता.मंगळवेढा)-

छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या विशिष्ट जातीधर्माचे राजे नव्हते तर ते सर्वधर्मियांचे राजे होते असे प्रतिपादन डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त डोंगरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित केलेल्या शिवजयंत्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
         सर्वप्रथम सार्वजनिक जयंत्ती मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात संगम विद्यालय डोंगरगाव या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक नलवडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे तत्वनिष्ठ राजे होते. त्यांच्या राज्यात शेतकरी, व महिलांचा  सन्मान केला जायचा, त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. राजांचे विचार आचरणात आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून मंडळ राबवित असलेले विविध  कार्यक्रम व उपक्रमाबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले.
        यावेळी सरपंच सारिका खिलारे, माजी सरपंच भीमराव मोरे, मंडळाचे अध्यक्ष आण्णासो जाधव, सहदेव मोरे, मधुकर मोरे, दत्तात्रय भूसे, तुकाराम कारंडे, अमोल मेटकरी, पंकज मस्के, दादा खिलारे, मोरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया कांबळे, अंगणवाडी सेविका सुशीला गवळी,गणिम पठाण, ज्योतीराम क्षीरसागर, तानाजी मिसाळ. ग्रामसेवक सुशांत कसबे, श्रेयश पाटील, मोरेवाडी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष निसार पठाण, तात्या खिलारे, पंडित साखरे, सखू साखरे, बिभीषण लोहार, नामदेव लटके, अमोल लटके , विजय भूसे, जगन्नाथ मिसाळ, म्हाळप्पा खरात, संजय माळी यांच्यासहमोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

दानशूरचा राजा गणेश मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे फळवाटप


दानशूरचा राजा गणेश मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे फळवाटप

अहेरी:-
आज अहेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून व सामाजिक उपक्रम राबवत संपन्न झाली. यावेळी उपजिल्हा रुग्णालया अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप व इतर कार्यक्रम दानशूर गणेश मंडळ तर्फे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले 

यावेळी दानशूरचा राजा गणेश मंडळाचे साईकुमार जिल्लेवार,राजू रामगीरवार,राजू जंगमवार,प्रसाद मूडपल्लीवार,कपिल येमुलवार,अजय पुल्लूरवार,आदित्य इप्पावार,राहुल येमुलवार,अभिषेक येमुलवार,अभिषेक मुन्नूरवार,विनीत पुल्लीवार,तरुण येमुलवार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

शिवजयंतीच्या निमित्ताने काटली येथे स्वच्छता अभियान


शिवजयंतीच्या निमित्ताने काटली येथे स्वच्छता अभियान

अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील व तालुक्यातील काटली येथे शिवजयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 
 यावेळी सरपंच अरुण उंदिरवाडे, उपसरपंच पार्वताबाई खेडेकर,  ग्रामपंचायत सदस्य विद्या मुन्घाटे, वनिता गेडाम,रजनी उंदिरवाडे,सुरेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश उंदिरवाडे, गौतम खंडारे, काशिनाथ ठाकरे,मनोज डोईजड, कृष्णकांत मुन्घाटे, सुनिल डोईजड, नामदेव मानकर, अमित जेट्टीवार, पांडुरंग धारणे, राजेंद्र ठाकरे,रवी मेश्राम आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
सर्व ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सहकार्य केले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

जिवती तालुक्यात खनिज संपत्तीचे उद्योग उभारावे - शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 


जिवती तालुक्यात खनिज संपत्तीचे उद्योग उभारावे - शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 
 
चंद्रपूर:-
 चंद्रपूर जिल्ह्या हा ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखली जाते.हा जिल्हा खनिज संपत्तीने संपन्न आहे.याच चंद्रपूर जिल्हयाचे अगदी टोकावर तेलंगणा राज्याच्या सिमावर्ती भागालगत जिवती तालुका बसलेला असुन हा तालुका नक्षल प्रभावित आणि सुख सुविधांचा अभाव असलेला अतिमागास व अतिदुर्गम तालुका म्हणून  परिचित आहे.

या तालुक्याच्या शेजारील तालुक्यात मोठ मोठे उद्योग निर्माण झाले आहेत.त्यामुळे तेथील दळणवळण आणि  रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने आर्थिक बाजू बळकट झाली. परंतु जिवती तालुक्याची स्थिती जैसे थे आहे.या तालुक्याचा विकास खुंटला असल्याने सरकारी पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर विकास होणे अपेक्षित असून त्या करिता प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. जिवती तालुक्यातील बेरोजगार युवकांना तसेच स्थानिक लोकांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी जिवती तालुक्यात मोठे उद्योग धंदे उभारणे आवश्यक आहे. तालुक्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी जिवती तालुक्यात खालील उद्योग व्यवसाय उभे केल्यास जिवती तालुका राज्याला रोजगार देणारा तालुका ठरु शकतो.

 जिवती तालुक्यात लोह खनिज चा साठा मोठ्या प्रमाणात आढळत असून, हया ठिकाणी
सुरजागड प्रकल्पासारखे प्रकल्प उभे करता येते.त्याचप्रमाणे या तालुक्यात सिमेंटचे उत्पादन करण्याकरीता वापरण्यात येणारे दगडाचे मोठे साठे आहेत.त्याला अनुसरून  सिमेंट कारखाने उभे करता येते.तसेच शासनाने पुढाकार घेतल्यास येथे एम.आय.डी.सी. देखील स्थापन करता येऊ शकते .करिता शासनाने आणि प्रशासनाने या बाबीकडे लक्ष वेधून तालुक्यातील बेरोजगर युवकांच्या आणि स्थानिक लोकांच्या हितार्थ  उद्योगधंदे उभारून जिवती  तालुक्याचा विकास साधण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख भारत बिरादार 
 यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आणि रोजगाराची मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

 माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी घरीच केली शिवजयंती  साजरी 


 माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी घरीच केली शिवजयंती  साजरी 
    
चामोर्शी:-

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे आपल्या घरात थाटामाटात साजरा करण्याची परंपरा तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे  राहणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी जोपासली आहे. यंदा घरीच त्यांनी शिवजयंती साजरी केली.

'शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात' ही संकल्पना गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील घराघरांत रूजते आहे. याच धर्तीवर आपणही राजांची जयंती दणक्यात साजरी करावी या हेतूने  भास्करने पाच वर्षांपूर्वी तिथीनुसार आपल्या घरीच शिवजयंती सोहळा आयोजित केला. यंदा या सोहळ्याचे सहावे वर्ष होते. ही संकल्पना ह‌ळूहळू महाराष्ट्रातील प्रत्येक घरात उत्साहाने साजरी व्हावी यासाठी हा एक छोटा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भास्कर फरकडे यांनी दिली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 17, 2024

PostImage

श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचा कार्यक्रम ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार


श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचा कार्यक्रम ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार

आष्टी:-

आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या शिवजयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून ही स्पर्धा ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत सम्पन्न होत आहे
दि १८ फेब्रुवारी ला सायंकाळी ५.०० वाजता महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली महीला अध्यक्ष शाईन हकीम, उपाध्यक्ष पुष्पा व्यंकटी बुर्ले, आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष संतोष सोयाम, विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणय बुर्ले जिल्हा उपाध्यक्ष नोमेश जुवारे जिल्हा संघटक हेमंत भाकरे,गोलू पोटवार, जिल्हा उपाध्यक्ष नेमाजी घोगरे,शहर अध्यक्ष राहुल डांगे, जिल्हा सरचिटणीस हरिश मंगाम,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तरी परिसरातील समस्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी च्या वतीने करण्यात आले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 13, 2024

PostImage

घराला लागली आग , क्षणार्धात पाच लाखांचे साहित्य स्वाहा


घराला लागली आग , क्षणार्धात पाच लाखांचे साहित्य स्वाहा

 


सिरोंचा :-
 तालुक्यातील नरसिंहापल्ली येथील एका घराला मध्यरात्री आग लागून पाच लाखांचे साहित्य जळून खाक झल्याची घटना दहा फेब्रुवारी ला घडली
रविंद्र शंकर चेनूरी असे आग लागून घर व साहित्य जळालेल्या इसमाचे नाव असून घटनेच्या दिवशी संपुर्ण कुटुंब गाढ झोपेत होते तेव्हा अचानक घराला आग लागली. झोपडीच्या घराला आगीने काही क्षणातच कवेत घेतले. यात घरातील 30 क्विंटल कापूस व जीवनाउपयोगी साहित्य जळून खाक झाले
 घराला आग लागल्याचे लक्षात येताच संपुर्ण कुटुंब घराबाहेर पडले म्हणून सुदैवाने कुटुंब थोडक्यात बचावले
 .रवींद्र शंकर चेनुरी रा. नसिंहापल्ली हे झोपडीवजा घरात वास्तव्यास रहात होते. 10 फेब्रुवारी रोजी चेत्रुरी कुटूंब नित्याप्रमाणे जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता संपूर्ण घरात आग पसरली. यात शेतातील पिकवलेला तीस क्विंटल कापूस साठा करून ठेवला होता तो 30 क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाला. संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराची आगीत राखरांगोळी झाली. यात अडीच लाखांचा कापूस व इतर साहित्य, असे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा दावा रवींद्र चेनुरी यांनी केला आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे नेमके कारण समोर आलेले नाही. आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

वर्षभर केलेली मेहनत क्षणात गेली वाया

दरम्यान, चेनुरी यांना दोन एकर शेती आहे. दुसऱ्याची तीन एकर शेती त्यांनी कसायला घेतली होती. पाच एकर शेतीत मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला होता. कापसाचे दर सध्या गडगडले असल्याने दर वाढेल या आशेने त्यांनी त्यांनी कापूस विकला नव्हता. मात्र, आगीने घात केला व वर्षभर केलेली मेहनत क्षणात वाया गेली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2024

PostImage

देसाईगंज सिटी सर्व्हेच्या कामाला सुरुवात


देसाईगंज सिटी सर्व्हेच्या कामाला सुरुवात

देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष पिंकु बावणेंच्या उपोषणाचे फलित

देसाईगंज-
       शहराच्या सिटी सर्व्हेचा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ९ एप्रिल २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला होता.दरम्यान आवश्यक प्रमाणात रक्कम भरुनही भुमिअभिलेख कार्यालयाच्या गतिहीन भुमिके विरोधात देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष यांनी भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करताच धास्तावलेल्या संबंधित कार्यालयीन अधिकाऱ्यांनी धसका घेत काम सुरु करण्याची हमी भरत अखेर सिटी सर्व्हेच्या कामास सुरुवात केली असल्याने हे बावणे यांच्या आमरण उपोषणाचे फलित असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
     देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेसाठी येथील भुमिअभिलेख कार्यालयाच्या मागणीनुसार नगर परिषदेच्या वतिने जवळपास ८० टक्के रक्कम २०१८ मध्येच शासन जमा करण्यात आली होती. मात्र तब्बल पाच वर्षाचा कालावधी लोटुनही शहराचा सिटी सर्व्हे करून आखिव पत्रीका देण्यात न आल्याने येथील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
      गरजु व पात्र लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देता यावेत करीता शासकीय स्तरावरुन प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना यासह विविध योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ गरजु लाभार्थ्यांना देता यावा करीता नगर प्रशासनाने शहराचे सिटी सर्व्हे करून अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्या संदर्भात देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या मागणीपत्रानुसार भुमापन कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपये शासन जमा केले आहेत. ही रक्कम एकुण मागणीपत्राच्या ८० टक्के असली तरी भुमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कामचुकारपणाचा कळस गाठत विविध कारणे उपस्थित करत सिटी सर्व्हेचे काम तब्बल पाच वर्षापासून थंडबस्त्यात ठेवले होते.
      देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरीकांना पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असतांना शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सिमा निश्चित केल्या नसल्याने शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडत चालली होती.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष पिंकु बावणे यांनी भुमिअभिलेख कार्यालयाला याबाबत वारंवार निवेदन देऊन समस्या अवगत करून देण्यासह आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.परंतु दिलेल्या इशाऱ्यालाही जुमानत नसल्याचे पाहू जाता २४ जानेवारी २०२४ रोजी भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असता भुमिअभिलेख कार्यालयाच्या हादरलेल्या यंत्रणेणे त्याच दिवशी उपोषण मंडपास भेट देऊन येत्या सहा महिन्यांत सिटी सर्व्हेचे काम पुर्ण करण्याची हमी भरली होती.त्या अनुषंगाने अखेर प्रत्यक्ष सिटी सर्व्हेच्या कामास सुरुवात केली असल्याने शहरवाशियांतुन बावणेंचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे  विजयी


नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे  विजयी

 

गडचिरोली :- 
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता" हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे सहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  गडचिरोली येथील नवोदित कवी पुरुषोत्तम लेनगुरे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  "रमाई' या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       पुरुषोत्तम लेनगुरे हे झाडीपट्टीतील नवोदित  कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रानगर्भ फुलत आहे ' मध्ये त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या सहाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  संगीता रामटेके, पुरुषोत्तम लेनगुरे, कृष्णा कुंभारे, तुळशीराम उंदीरवाडे, सुनील मंगर, प्रतिभा सुर्याराव,  मनिषा हिडको, संजय बन्सल, चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के,  वंदना मडावी,  सुजाता अवचट , प्रब्रम्हानंद मडावी, उपेंद्र रोहनकर,  प्रेमिला अलोने, ज्योत्स्ना बन्सोड , बाबाजी हुले,  प्रभाकर दुर्गे, दिनेश देशमुख, मधुकर दुफारे, अनुराग मुळे,  प्रशांत गणवीर, राजरत्न पेटकर , मुर्लीधर खोटेले , खुशाल म्हशाखेत्री, प्रमोद बोरसरे ,मिलिंद खोब्रागडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
        या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत भामरागड तालुक्याचा ऐतिहासिक विजय


जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत भामरागड तालुक्याचा ऐतिहासिक विजय

गडचिरोली :

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची दि.१० च्या रात्री सांगता झाली. या चार दिवसीय महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांमध्ये धानोरा पंचायत समिती सर्वसाधारण विजेता,तर गडचिरोली पंचायत समितीचे कर्मचारी उपविजेता ठरले.शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमध्ये भामरागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री स्वप्नील मगदूम यांच्या आणि गटशिक्षणाधिकारी श्री जनार्दन वडलाकोंडा यांच्या नेतृत्वात शालेय क्रीडा संमेलनात सर्वाधिक स्पर्धामध्ये आघाडीवर राहून जिल्हाभरात भामरागड तालुका प्रथम स्थान पटकाऊन ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे सर्व स्थरावरून कौतुक केल्या जात आहे तर प्राथमिक विभागात धानोरा आणि माध्यमिक विभागात चामोर्शी पंचायत समितीने द्वितीय स्थान पटकावले.शनिवारी रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांसह बक्षीस वितरण सुरू होते.जिल्हा परिदेच्या प्रांगणात संध्याकाळी समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी ओमकार पवार (भाप्रसे), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार (सा.प्र.), फरेंद्र कुतीरकर (जलजीवन मिशन),चेतन हिवंत (पंचायत), अर्चना इंगोले (महिला व बालकल्याण), अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सतीशकुमार साळुंके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावल साळवे,कार्यकारी अभियंता (बांधकाम) विजय दोरखंडे यांच्यासह जि.प.चे सर्व खातेप्रमुख आणि जिल्हाभरातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी एकल व समुह नृत्य सादर केले. यादरम्यान अधिकाऱ्याच्या हस्ते प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या चारही दिवसांच्या कार्यक्रमांची संपूर्ण व्यवस्था लिलाधर भरडकर आणि त्यांच्या चमुने चोखपणे सांभाळली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

काटली येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन


काटली येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन

अशोक खंडारे/ मुख्य संपादक

गडचिरोली:-
जिल्ह्यातील काटली येथे  डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वतीने  शांतीचे अग्रदूत  तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक अरुण पाटील मुन्घाटे, दिप प्रज्वलन ॲड.एम.डी.सहारे, पोलीस पाटील  के.पी.मुन्घाटे, अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक वाळके,सह अध्यक्ष सरपंच अरुण उंदिरवाडे प्रमुख अतिथी म्हणून  मुन्घाटे शाळेचे शिक्षक राउत, उपसरपंच पार्वतीबाई खेडेकार, तमुस अध्यक्ष गोविंदा नेवारे,माजी नगर सेवक सहारे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोयर काटली,मंडळ अधिकारी एस डी शिंपी, प्रभाकर सावकार डोईजड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार पि एन खंडारे, दादाजी उंदिरवाडे, चुडाराम खंडारे, ओमप्रकाश उंदिरवाडे, काशिनाथ खंडारे, नरेश उंदिरवाडे, कैलाश शिंपी, अमर उंदिरवाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधीवत पूजन करून कुदळ मारुन उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन  व आभार प्रेमदास उंदिरवाडे यांनी केले , बहुसंख्य ग्रामस्थ, तथा बौध्द उपासक व उपासीका उपस्थित होते 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

येनापूर येथे बस थांब्यावर शेडअभावी प्रवासी त्रस्त


येनापूर येथे बस थांब्यावर शेडअभावी प्रवासी त्रस्त


निवारा शेड उभारण्यासाठी  लोकप्रतिनिधीं लक्ष देणार काय?

आष्टी - :
येणापूर  येथे बस थांब्यावर शेड अभावी प्रवासी त्रस्त झाले असून महामार्गाचे काम होऊनही प्रवासी निवारा बांधण्यात आलेला नाही त्यामुळे प्रवाशांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात गडचिरोली ते आष्टी महामार्गावरील येनापूर हे गाव महत्वाचा मानला जातो.  चामोर्शी तालुक्यातील मध्यभागी असलेल्या येनापूर येथे लक्ष्मणपूर, वायगाव आष्टी, चामोर्शी  जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना येथूनच जावे लागते. पंरतु महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत येनापूर येथे वाहनांची वाट बघणार्‍या प्रवाशांना प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वारा ,पाऊस, उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. वास्तविक पाहता महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ते शेड उभारून द्यायला पाहिजे होते परंतू असे झालेले नाही त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात तसेच सद्यपरिस्थितीत भंयकर अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशी वर्गाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या उन्हामध्ये वाहनांची वाट बघत राहणार्‍या अनेक प्रवाशांमध्ये चक्कर येऊन पडण्याची संख्या देखिल वाढलेली आहे. त्यामुळे येनापूर येथे प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर उमटत आहेत. त्यामुळे येनापूर येथील बसथांब्यावर प्रवासी निवारा बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे म्हणून परिसरातील जनतेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

स्वःताच्या विकास कामावर विश्वास नसल्याने ७० वर्षांपूर्वीच्या विकास पर्वावर टिका - आ.अभिजीत वंजारी


स्वःताच्या विकास कामावर विश्वास नसल्याने ७० वर्षांपूर्वीच्या विकास पर्वावर टिका - आ.अभिजीत वंजारी 


कूरखेडा- :
  भारताचा स्वातंत्र्यानंतर प्रथम पंधरा वर्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा नेतृत्वात विकासाचा ढाचा उभा करण्यात आला यावेळी दर्जेदार शैक्षणिक, आर्थिक केंद्र तसेच सिंचन सूविधा निर्माण करीत देशाचा विकासाला दिशा देण्यात आली मात्र या तोडीचे कार्य मागील १० वर्षात भाजपा प्रणीत केंद्र शासनाला करता न आल्याने व त्याना स्वतःचाच विकास कार्यावर विश्वास नसल्याने ७० वर्षापूर्वी झालेल्या विकास पर्वावर आज संसदेत टिका करण्यात येत आहे असा घणाघात विधान परिषद सदस्य आ. अभिजीत वंजारी यानी केला
            गडचिरोली जिल्हा कांग्रेस पक्षाच्या वतीने येथील किसान मंगल सभागृहात तालुका बूथ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी मेळाव्याचे उदघाटन म्हणून मार्गदर्शन करताना आ. अभिजीत वंजारी बोलत होते कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव डॉ. नामदेव कीरसान कांग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ ,डॉ .नामदेव उसेंडी माजी आमदार आनंदराव गेडाम प्रदेश सरचिटणीस डॉ. नितीन कोडवते महीला कांग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. चंदा कोडवते किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष वामनराव सावसाकडे,माजी जिल्हा अध्यक्ष हसनअली गिलानी,लता पेदापल्ली,माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक निताराम कूमरे, रामदास मसराम माजी जि प सदस्य तथा आविसचे सरसेनापती नंदू नरोटे तालूका यूवक कांग्रेसचे अध्यक्ष गिरीधर तितराम महिला तालूका अध्यक्ष आशाताई तुलावी नगरसेवीका प्राचीताई धोंडणे नगरसेवीका कूंदा तितीरमारे नगरसेवीका हेमलता नंदेश्वर,माजी जि प सदस्य आशाताई कूमरे,माजी प स उपसभापति श्रीराम दूगा, कपील पेंदाम, राजकुमार बावनथळे तथा मोठ्या संख्येत कांग्रेस कार्यकर्ते हजर होते यावेळी नामदेव किरसान यानी मार्गदर्शन करताना सांगीतले की निवडणूक ही व्यक्ति किंवा नेता जिंकत नाही तर निवडणूक जिंकण्याकरीता बूथ स्तरावरील कार्यकर्तांची फळी मजबूत असणे गरजेचे असल्याचे सांगीतले यावेळी‌ डॉ नामदेव उसेंडी माजी आ गेडाम यानी सूद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालूका कांग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट संचालन जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे तर आभार प्रदर्शन माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी यानी केले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

जन्मदात्या बापानेच केला  पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार


जन्मदात्या बापानेच केला  पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार


भद्रावती :-
जन्मदात्या बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे 
सतत तीन वर्षांपासून आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 55 वर्षीय नराधम बापास भद्रावती पोलिसांनी दिनांक ९.२.२०२४ रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजता पोस्को कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकाराने बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भद्रावती शहरात उघडकीस आली आहे

शहरातील एका भागात राहणाऱ्या या आरोपीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहते. मात्र मुलगी ही बापाजवळ राहत होती. सदर नराधम बाप हा आपल्या पोटच्या मुलीवर 2021 पासून लैंगिक अत्याचार करीत होता. या प्रकाराची माहिती सदर मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने सदर मुलीसह भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर आईच्या समक्ष मुलीने भद्रावती पोलिसात या घटनेची तक्रार केली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

म.ज्यो.फुले हॉयस्कूल आष्टी येधे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप


म.ज्यो.फुले हॉयस्कूल आष्टी येधे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप

 

 आष्टी :-

 महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी सावित्रींच्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले. मानव विकास मिशन योजनेअंतर्गत या विद्यार्थिनींना बाहेरगाव वरून ये-जा करण्याकरिता सुविधा उपलब्ध व्हावी व त्यांचे शिक्षण सुकर व्हावे या उदात्त हेतुने महाराष्ट्र राज्य मानव विकास योजना अंतर्गत विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी वन वैभव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बबलूभैया हकीम , नागपूर विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षा शाहीनभाभी हकीम,आष्टी येथील सरपंच बेबीताई बुरांडे, मार्कंडा (कंसोबा) येथील सरपंच वनश्री चापले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य शैलेंद्र खराती, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले,पर्यवेक्षक किशोरसिंह बैस, पालक तथा कला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी एकूण 124 सायकली विद्यार्थिनींना वाटण्यात आल्या. सायकल मिळाल्याचा आनंद विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॉक्टर व चार ट्रकवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई


अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॉक्टर व चार ट्रकवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई 

तुमसर:-
10 फेब्रुवारी : भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. त्यामुळे या वाळूला मोठीं मागणी आहे. वाळू माफिया मिळेल त्या मार्गाने वाळूची अवैध वाहतूक करत आहेत. तुमसर तालुक्यातील तामसवाडी घाटातून वाळू चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर नव्याने रुजू झालेले तहसीलदार मोहन टिकले व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

तर प्रभारी उपविभागीय अधिकारी अनय नवंदर यांनी रॉयल्टी नसताना वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई केली. आयएएस असलेले प्रभारी उपविभागीय अधिकारी अनय नवंदर यांनी तुमसर तालुक्याचा दौरा केला. दरम्यान, तुमसर शहराबाहेरील सिहोरा रस्त्यावर चार वाळूचे टिप्पर त्यांना आढळले. त्यांनी सदर टिप्पर थांबवून रॉयल्टीची विचारणा केली. परंतु टिप्पर चालकाजवळ रॉयल्टी नव्हती. त्यामुळे चार ट्रकवर कारवाई केली. या कारवाई मुळे वाळू माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

मोबाईल रेंज अभावी मजुरांची हजेरी लावणे ग्रामरोजगार सेवकांना कठीण


मोबाईल रेंज अभावी मजुरांची हजेरी लावणे ग्रामरोजगार सेवकांना कठीण 


नागभीड-:
-मनरेगाची कामे सुरळीत होतील असे उद्देश ठेऊन ग्रामीण भागात असलेल्या अनेक लोकांना काम मिळावे यासाठी पेपर हजेरी न लावता ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये हजेरी घेण्यासाठी रोजगार सेवक यांच्या हस्ते करण्यात आली.परंतु थोडिजरी रेंज भटकली तर मस्टर ओपन होत नाही.त्यामुळे त्या कामावरील मजुरांच्या हजेरी लागत नाही. सकाळची हजेरी न लागल्यामुळे दुपारचे फोटो घेत नाही.परिणामतः मजुरांची मजुरी मिळत नाही.परत दुसऱ्या दिवशी पुन्हा परिस्थिती तीच राहिली तर ज्या ठिकाणावरून जिओ टॅग केलं आहे तिथंच सर्व मजुरांना हजेरी घेण्यासाठी यावे लागते.
काम परिसरात कोठेही असूद्या.  नवीन नियमानुसार १० मीटर अंतर हे निश्चित झाले आहे.पण वेळ अल्प आहे. टाईम आऊट लवकर होत असल्याने हजेरी घेणाऱ्या रोजगार सेवकांना पुन्हा ॲप सुरु करून मस्टर ओपन करावे लागते.तेव्हा ग्रामीण भागात कवरेज राहत नसल्याने जास्त अडचण निर्माण होत आहे.दिवसभर साईट वर राहावे लागते .तेव्हा ग्रामीण भागाचा विकास आराखडा तयार करतांना यामध्ये प्रामुख्याने सुधारणा करावी.अशी ग्रामरोजगार सेवक संघटनेची मागणी आहे.असे संघटनेचे सचिव यशवंत निकुरें  यांनी कळविले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

दहा दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या इसमाचा विहीरीत सापडला मृतदेह 


दहा दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या इसमाचा विहीरीत सापडला मृतदेह 

सोपानदेव म्हशाखेत्री 
धानोरा:- 
गेल्या दहा दिवसापासून चातगाव मधून बेपत्ता असलेल्या योगेश बारीकराव पेंदाम वय  39 वर्ष याचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळला. सदर इसम 29. 1 .2024 ला रात्री एक वाजून पाच मिनिटांनी घरून कोणाला काही न सांगता निघून गेला असल्याची माहिती त्याच्या पत्नीने सौ. कीर्तना पेंदामं यांनी पोलीस स्टेशनला दिनांक 30.1.2024 ला सायंकाळी साडेसहा वाजता तक्रार दिली. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू केला पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस विभागाने शोध मोहीम सुरू केली .गावात दवंडी देऊन शोधमोहीम सुरू केली . पण कोठेही पत्ता लागला नाही गावकऱ्यांनी सुद्धा चातगाव येथे गावात दवंडी दिली होती .शेवटी त्याचे मृतदेह चातगाव येथीलच सुधाकर मारोती मडावी  यांचे शेत शिवाराला लागून असलेल्या विहिरीमध्ये दिसून आल्याची माहिती  पोलीस स्टेशन चातगाव ला देण्यात आली. चातगाव पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला व त्याचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी मृत्यूचे कारण अजूनही कळलेले नसल्याचे  सांगितले. चातगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यात माता रमाई यांचे मोलाचे सहकार्य


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यात माता रमाई यांचे मोलाचे सहकार्य.

वैरागड - :
माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खंबीर साथीच्या बळावर बहुजन उध्दाराची चळवळ चालवली तसेच धारवाडच्या उपाशी विद्यार्थ्यांना जेवणाची सोय व्हावी हणून सोन्याच्या बांगड्या विकल्या  त्यामुळे त्यांना रमाई नाव पडले. त्यांच्या कार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यात माता रमाई यांचे मोलाचे सहकार्य झाल्याचे प्रतिपादन वैरागड येथील सरपंचा संगीता पेंदाम यांनी केले.

वैरागड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात ९ फेब्रुवारी रोजी बौध्द समाज आणि तक्षशिला महिला मंडलच्या वतीने माता रमाई यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सरपंचा संगीता पेंदाम बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्या मनीषा खरवडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष मिलिंद भोयर, सचिव मनोज खोब्रागडे, बौध्द समाज अध्यक्ष संजय भैसारे, तक्षशिला महिला मंडळ अध्यक्ष उर्मिला मेश्राम, ताराबाई वासनिक, स्मिता वासनिक, जासुंदा भानारकर, अस्मिता वासनिक उपस्थित होते. 

 बौध्द समाज, तक्षशिला महिला मंडळ आणि युवक मंडळा मार्फत माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि सह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्थे भगवान गौतम बुध्द, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा प्रतिमेला पुष्पहार आणि द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.  सांस्कृतिक कार्यक्रमात भीम व रमाईच्या भगिनी ,लेकरांनी अप्रतिम नृत्य सादर केले. 

झालेल्या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार दिपाली वासनिक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तक्षशिला महिला मंडळ सचिव तक्षशिला प्रलय सहारे, शिंदू सरदारे, बबिता टेंभूर्णे, कल्पना बरडे, इंदुबाई खोब्रागडे, प्रेमिला बरडे, बळीराम तागडे, राजू खोब्रागडे, लक्ष्मण भानाराकर, धर्मराव वासनिक, अनुज सहारे, शुभम मेश्राम, प्रशांत सहारे, गोलू बरडे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावातील तसेच परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

संजो कॉन्व्हेंटच्या  शिक्षकाने एका विद्यार्थीनीकडून लुटले सहा तोडे सोने 


संजो कॉन्व्हेंटच्या  शिक्षकाने एका विद्यार्थीनीकडून लुटले सहा तोडे सोने 

 फसवून केल्या प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

गोंडपिपरी:-
येथील संजो कॅन्व्हेंटचे शिक्षक अखिल रोहनकर याने एका विद्यार्थीनी कडून सहा तोडे सोने लुटले असून पालकाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
गोंडपिपरी शहरातील संजो कॉन्व्हेंट मध्ये  कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने मावशीची तब्येत बरी नसल्याने उपचारासाठी पैशाची नितातं गरज असल्याचे  सांगून त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासह पालकांकडून पैसे  मागितले. एका विद्यार्थीनीने तब्बल सहा तोळे सोने शिक्षकाला दिले.
 काही दिवसांनी दिलेले सोने परत मागितले असता शिक्षकाने सोने देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक  झाल्याचे लक्ष्यात येताच विद्यार्थींनीने पालकाच्या सोबतीने गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीचे नाव अखिल रोहणकर रा.वडसा असे आहे.


गोंडपिपरी येथील 
संजो कॉन्व्हेंट ही सिबीएससी पॅटर्नची शाळा आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलांच्या उज्जल भविष्यासाठी  शहरातील मोठे अधिकारी , विविध विभागातील कर्मचारी , लहान-मोठे व्यावसायिक यासह सधन शेतकऱ्यांची मुले या कॉन्व्हेंट मधून शिक्षण घेत आहेत . वडसा येथील अखिल  रोहणकर यांची संगीत शिक्षक म्हणून संजो कॉन्व्हेंट मध्ये नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह पालकात सुद्धा चांगली ओळख झाली. नामांकित शाळेत शिक्षक असल्याचा फायदा घेत रोहनकर  यांनी मावशीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने पैशाची नितांत गरज असल्याचे एका विद्यार्थीनिला सांगीतले . घरच्यांना काहीही न सांगता  तब्बल सहा तोटे सोने विद्यार्थीनीने शिक्षकाकडे आणून दिले.  दरम्यान लवकरच सोने परत करणार असल्याचा विश्वास  शिक्षकाने दाखविला. काही दिवसांनी विद्यार्थीनीने शिक्षकाला दिलेले सोने परत मागितले असता सोने देण्यास शिक्षकाने टाळाटाळ   केली.  आपली फसवणूक झाल्याचे समजून येताच विद्यार्थिनीने सदर बाब आई वडिलांना सांगितली. लागलीच गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून शिक्षका विरोधात फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. तात्काळ गोंडपीपरी पोलिसांनी आरोपीस अटक केली. सदर बाब गोंडपीपरी शहरात पसरताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही दिवसापूर्वी  असेच  कारण पुढे करीत सदर शिक्षकाने अनेक पालकांच्या घरी जाऊन पैसे मागितले.
 अडचणीत एकमेकांना मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक पालकांनी आपल्या क्षमतेनुसार  पाच हजार, दहा हजार, विस हजार तर काहींनी ५० हजार पर्यंतची रक्कम त्या शिक्षकाला दिल्याचे चर्चतून समोर आले आहे. फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी
गोंडपिपरी पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर  करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांकडून ओरोपीची कसून चौकशी व्हावी करीता न्यायालयाने एक दिवसासाठी  पीसीआर  (पोलीस कस्टडी रिमांड) दिला आहे. 
पुढील तपास गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगरे करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

पाली भाषा प्रचार परीक्षेत धम्म बांधवांनी सहभाग नोंदवावा- सोपानदेव मशाखेत्री


पाली भाषा प्रचार परीक्षेत धम्म बांधवांनी सहभाग नोंदवावा- सोपानदेव मशाखेत्री

 

. धानोरा:-

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध कालीन पाली भाषेचे ज्ञान अवगत व्हावे, पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, आणि पाली भाषेचे अनुवाद करणे सोयीचे व्हावे, पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी धम्म बांधवांनी पाली भाषा प्रचार परीक्षेत सहभाग नोंदवावा ,असे आवाहन धानोरा तालुका पाली भाषा परीक्षा  नियंत्रक सोपानदेव मशाखेत्री  यांनी केले. ते धानोरा येथील प्रकाश बौद्ध महिला मंडळ च्या वतीने आयोजित माता रमाई जयंती दिनी कार्यक्रमात परीक्षार्थींना पाली भाषा प्रचार परीक्षा चे प्रमाणपत्र पाहुण्यांचे  हस्ते वाटप करताना मार्गदर्शन करीत होते. सम्राट बुद्ध विहार येथे डिसेंबर 23 मध्ये पहिली, दुसरी, तिसरी, व चौथी पाली भाषेची परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थी नितेश मशाखेत्री  प्रथम श्रेणीत, अस्मिता घोडेस्वार दुसऱ्या श्रेणीत ,वेणू मशाखेत्री, प्रथम श्रेणीत ,प्रीती मशाखेत्री , प्रथम श्रेणीत, मृगल गव्हर्न प्रथम श्रेणीत, पायल बोरकर प्रथम श्रेणीत, मयुरी उंदीरवाडे प्रथम श्रेणीत, गुंजन मशाखेत्री प्रथम श्रेणीत, हेमलता सहारे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले .तर दुसऱ्या परीक्षेतील परीक्षर्थी मृगाल  गवरणा याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.  या कार्यक्रमात पाहुण्यांचे हस्ते त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येऊन त्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अलका मशाखेत्री नगरसेविका नगरपंचायत धानोरा, उद्घाटक स्थानी सीमा थूल  नगरसेविका ,प्रमुख अतिथी पौर्णिमा सयाम नगराध्यक्ष नगरपंचायत धानोरा, माजी नगराध्यक्ष वर्षाताई चिमूरकर, प्रतिष्ठित महिला नेत्राताई साळवे, प्रतिमा मोहरले ,देवांगणी चौधरी नगरसेविका, कल्याणी गुरूनुले नगरसेविका ,किरणताई सोनुले माळी समाज अध्यक्ष , भुमाला पराचाके  आदिवासी समाज अध्यक्ष ,प्रकाश बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी मशाकेत्री, सचिव वेणू मशाखेत्री,रसिकाताई मार्गिया पर्यवेक्षिका महिला बचत गट, प्रतिभा शिंपी इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या. यावेळी जेष्ठ महिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जास्वंदा सहारे थी बुद्धीस्त  सोसायटी ऑफ इंडिया धानोरा तालुका महिला अध्यक्ष यांनी केले .प्रास्ताविक वेणू मशाखेत्री सचिव प्रकाश बौद्ध महिला मंडळ यांनी केले, तर आभार निशा मशाखेत्री यांनी मानले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तिघे भावंडं जागीच ठार


हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तिघे भावंडं जागीच ठार

बीड:-

वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहीण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.८) सकाळी ९.४५ च्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर घडली. हे तिघेही मूळचे जिंतूर तालुक्यातील आहेत. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिली.

झाल्टा फाट्याकडून तिघेही भावंडे बाळापूर परिसरातून सातारा-देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते.

सकाळीच वनविभागाच्या परिक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते. परतत असताना बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक खडीकच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता. मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडांच्या दुचाकीला धडकला.

दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस दाखल झाले.

घटनास्थळी वनविभागाच्या परिक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडलेले होते. त्यावरून पोलिसांना मृत भावंड्यांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला. मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजू येथे राहायला होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती
 संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिकलठाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील जखमी वाघावर प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे होणार उपचार


गडचिरोली जिल्ह्यातील जखमी वाघावर प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे होणार उपचार

गडचिरोली:-
दिनांक ०५/०२/२०२४ रोजी रात्रो ९.०० वाजेदरम्यान एम. एन. चव्हान, सहाय्यक वनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांना भ्रम्हणध्वनीव्दारे एक वाघ जखमी असल्याचा माहीती मिळाल्या नंतर वनपरिक्षेत्र अधिकरी वडसा व सहाय्यक वनसंरक्षक वडसा यांनी रात्रो शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यावर जावुन पहाणी केली असता वडसा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवराजपुरचे कक्ष. क्रमांक. ९३ मधे वनक्षेत्रात रस्ता क्रास करूण एक जखमी वाघ लंगडत शिवराजपुर लगतचे शेतशिवारात गेल्याचे माहीती मिळाली तसेच सदर वाघ रस्ता ओलांडत असत्यांनाचा व्हिडिओ ची पाहणी केली असता एक जखमी वाघ ज्याच्या समोरच्या उजव्या पायाला जखम असुन लंगडत चालत असल्याचे दिसुन आले त्यानुसार रात्रो ११.३० वाजता ड्रोन कॉमेरा बोलावुन पहाणी केली असता ड्रोनमध्ये शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यापासुन अंदाजे २०० मीटर अंतरावर शेतात झोपलेल्या अवस्थेत दिसुन आला. तेव्हा रात्रोभर सदर वाघावर क्षेत्रीय कर्मचा-या कडुन पाळत ठेवण्यात आली. व जवळील गांवाना सर्तक करण्यात आले.

दिनांक ०६/०२/२०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता ड्रोन व्दारे शेतशिवारात पहाणी केली असता सदर वाघ मिळाला नाही. तेव्हा वडसा, आरमोरी व कुरखेडा येथील वनकर्मचारी मिळुन पाई संयुक्त गस्त केली असता सदर वाघ शिवराजपुर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ९३ मधील मिश्र रोपवनात १५.०० हेक्टर चे पश्चिम दिशेला चेनलिंग फेनसिंगचे आतमध्ये २० मीटर अंतरावर पडलेल्या अवस्थेत दिसला. प्रथमदर्शनी पाहता सदर वाघाचे उजव्या पायाला जखम असल्याचे दिसून आले.

दिनांक ०६.०२.२०२४ ते दिनांक ०८.०२.२०२४ पर्यत सदर वाघ त्याच परिसरात होता व तो कोणत्याही प्रकारची शिकार करण्यांस असर्मथ असल्यामुळे दिनांक ०८.०२.२०२४ रोजी सायंकाळी ३.४७ वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख,  अजय मराठे शुटर RRT TATR व त्यांची RRT TATR चमु यांनी सदर वाघास बेशुध्दीचे इंजेक्शन देवुन त्यास पकडले. सदर जखमी वाघास डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता त्याला मा. बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक (प्रा) वडसा, यांचे मार्गदर्शनाखाली  पवनकुमार जोंग (भा.व.से.) परिविक्षाधिन अधिकारी,  मनोज चव्हाण उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा,  विजय धांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा, यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी  कराडे,  तिजारे क्षेत्रसहाय्यक व  गजभिये, वनरक्षक तसेच RRT TATR सदस्य योगेश लाकडे, वसीम शेख, प्रफुल वाडगुरे, गुरुनानक ढोरे, विकास ताजणे, दिपेश टेंभुर्णे, वाहन चालक (RRT), श्री अक्षय दांडेकर,  अमोल कोरपे, वाहन चालक मनन शेख, वाहन चालक, वडसा वनविभाग वडसा यांचे सहकार्याने पार पडली


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

सुमो वाहनाच्या अपघातात चार महिला ठार तर तेरा जन गंभीर


सुमो वाहनाच्या अपघातात चार महिला ठार तर तेरा जन गंभीर

 

ब्रम्हपुरी:-

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील मौजा माहेर येथून वर्धा जिल्ह्यात चना कापायला गेलेल्या 17 महिला काम आटोपून सुमो या वाहनाने परत येत असताना आज दिनाक 8 ला सायंकाळी 7.30 दरम्यान उमरेड तालुक्यातील सिर्सी जवळ वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महीलांचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मारन पावली वाहनाच्या चालकासह 13 महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ब्रम्हपुरी शहराजवळील माहेर येथील 17 महिला या मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चना कापणीच्या कामाला जात होत्या. एक सुमो रोज त्यांना चना कापणी करता घेऊन जात असे व सायंकाळी परत वापस माहेर येथे आणून देत असे रात्रौ चालक वाहनं सोबत माहेर येथे मुक्कामी राहत होता.

मागील काही दिवसा प्रमाणे माहेर येथील 17 महिला आज दिनाक 8 ला पहाटे सुमो या वाहनात बसून पिंपरी या गावी चना कापणीला गेल्या होत्या. सायंकाळी 7.30 वाजता परत येत असताना उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ त्यांच्या वाहनं पलटून गंभीर अपघात झाला. वृत्त लिहे पर्यंत प्राप्त माहिती नुसार अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सोनाबाई सिद्दुके ही नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली जखमी तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत अडकिने, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे
मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजुरकर यांना होताच यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुगणवाहिकेतून तीन महीलाचे शव उमरेड येथे पाठवण्यात आले. उर्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुरकर जखमी सोबत नागपूरला गेले असून सर्व घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. घटनेची माहिती माहेर येथे होताच सर्व गावात शोककळा पसरली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

विक्रमपुर ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार पाय उतार 


 विक्रमपुर ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार पाय उतार 


पत्रकार परिषदेतून सुमित सरकार, उपसरपंच प्रभाष सरकार यांच्यासह ग्रा.प. पदाधिकाऱ्यानी दिली माहिती

गडचिरोली/

 प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झाल्याने (कायद्यान्वये) प्रशासनाने अपात्र घोषित केले. चामोर्शी तालुक्यातील विक्रमपुर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घरकुल मंजूर करण्याच्या नावाखाली पैसाची मागणी करुन गैरव्यवहार केल्याने कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये, पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याने प्रशासनाने, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई यांचे शासन परिपत्रक दिनांक १८/०६/२०११ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे

कलम ३९(१) नुसार सरपंच व सदस्य पदापासून अपात्र घोषित केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले असल्याची माहिती सुमित सरकार, विक्रमपुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभास सरकार सह ग्रा.प.सदस्यांनी पत्रकार परिषदेतुन दिलेली आहे. सविस्तर वृत्त असे की, सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नवग्राम येथील तरुण तारीनी खॉ यांच्या कडून दहा हजार रुपयांची मागणी केली असता, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील कार्यालयात तक्रार दाखल करुन तडजोडी अंती ९००० रुपये दिनांक ०१/०९/२०२२ ला सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घेतले असता संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हिच बाब लक्षात घेऊन, विक्रमपुर ग्रामपंचायतीचे सुमित सुभाष सरकार यांनी अपर आयुक्त नागपूर विभाग, नागपूर. येथे तक्रार दाखल करून सरपंच्यानी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना पदापासून दुर करण्यात यावे व त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. तेव्हा संबंधित विभागाने दिनांक २९/०१/२०२४ ला अंतिम सुनावणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचा दिनांक १०/११/२०२३ रोजी चा चौकशी अहवाल व अभिप्रायाचे अवलोकन करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांना पुढील कालावधीकरिता सरपंच व सदस्य या पदापासून अपात्र घोषित करण्यात येत आहे. असा आदेश अपर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांनी दिनांक

०१/०२/२०२४ ला दिलेला असल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. या पत्रकार परिषदेला सुमित सुभाष सरकार, उपसरपंच प्रभास सरकार,तरुण तारीनी खॉ, ग्रा.प.सदस्य दिपकदास, मंजु मिस्त्री, हिरामती गाईन उपस्थित होते.

याबाबत विक्रमपुरचे सरपंच श्रीकांत
ओल्लालवार यांची प्रतिक्रिया,,
प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना संबंधित
प्रशासनाने कोनत्याही प्रकारे माझे
म्हणणे ऐकून न घेता,लोकप्रतिनिधींच्या
दबावामुळे मला दोषी ठरवून अपात्र
करण्यात आले. त्यामुळे माझ्यावर
करण्यात आलेले आरोप सुडभावनेने
चुकीचे आणि निरर्थक असुन राजकीय
द्वेषापोटी करण्यात आलेले आहेत. याबाबत मी संबंधितांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा


मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा
 
शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात यावी 

गडचिरोली:-
 जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील  विविध भागात अपुरी बससेवा, प्रवासी निवाऱ्याचा अभाव, बससेवेअभावी दररोजची पायपीट यामुळे विद्यार्थी,
विद्यार्थिनींची गैरसोय सुरूच आहे. ठिकठिकाणच्या रस्त्यावर उन्हाचे चटके,  पाउस,वारा झेलत कितीतरी तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने आता लालपरीवर  शालेय विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील फाट्यावर  बसच्या प्रतीक्षेत शालेय विद्यार्थिनींना कितीतरी तास थांबावे लागत आहे. त्यात निवारा नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो आहे  तर मार्कंडा कंन्सोबा येथील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आष्टी येथे बसच्या प्रतीक्षेत कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी  लागत आहे.

तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा परिषद शाळा खाजगी संस्थेचे विद्यालये व महाविद्यालय डी .एड, बी एड कॉलेज असल्याने परिसरातील १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील जवळपास २० गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे विद्यार्जन करण्यासाठी येतात. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली,चंदनखेडी, मार्कंडा कंन्सोबा, लगाम सिंगनपल्ली  या गावातील विद्यार्थ्यांना आष्टी येथे जावे लागते.

आष्टी मधून परत स्वगृही परत जाण्यासाठी बाजूला निवारा आहे, तोही मोडकळीस आलेला आहे व अखेरची घटका मोजत आहे परंतु आष्टी येथून परत जात असताना आष्टी या शहरात  विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेमध्ये तासभराहून अधिक काळ थांबावे लागत आहे, त्या बाजूला विद्यार्थिनींना बसण्याच्या निवारा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी बसण्यासाठी निवारा व्हावा,अशी शालेय विद्यार्थिनींच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांच्याकडून मागणी  केली जात आहे
सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे.  मागील काही काळात प्रवासी निवारा मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बांधण्यात आला आहे परंतु त्या प्रवासी निवाऱ्याची संपूर्ण दुर्दशा झाली असून बसण्यायोग्यही नाही  उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाळ्यात पावसापासून व उन्हाळ्यात उन्हापासून बचाव होण्यासाठी आजूबाजूच्या झाडांचा प्रवाशांना आश्रय घेऊन एसटीची प्रतीक्षा करावी लागत असे. एसटी आली की प्रवासी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत एसटी तेथून निघून गेलेली असते. उन्हाळ्यात, तर प्रवाशांना व विध्यार्थांना उन्हापासून बचाव करण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एक तर मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर तीनही बाजूंनी वाहने आली की मोठ्या प्रमाणावर धुरळा उडतो. नाका-तोंडात धुळीकण जात असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी  शेड उभारण्यात यावा अशीही मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार भास्कर फरकडे यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 7, 2024

PostImage

महसूल विभागाच्या मुख्य लिपीकास लाच घेतांना रंगेहाथ पकडले  कूरखेडा:- 


महसूल विभागाच्या मुख्य लिपीकास लाच घेतांना रंगेहाथ पकडले

 कूरखेडा:- 
 मुख्य लिपिक उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाच घेणारा मुख्य लिपिक नागसेन प्रेमदास वैद्य वय ४६ उपविभागीय कार्यालय कुरखेडा असे असून यांनी १३०००/- हजार रुपयाची लाच स्वरूपात नगद रक्कम स्वीकारतांना एन्टी करप्शन ब्यूरो च्या पथकाने दी.०५/०२/२०२४ ला रंगेहाथ पकडले
तक्ररदार यास आदिवासी ते आदिवासी जमीन विक्री करण्याकरिता परवानगी आदेश तयार करुण दिल्याचा मोबादला म्हणून आरोपी वैद्य यांनी तक्रारदार यांच्या कड़े मागणी केली होती मात्र लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गड़चिरोली येथे भेटून तक्रार नोंदविली 
 पोलिस अधीक्षक श्रीमती अनामीका मिर्झापुरे ला.लू.वी. गड़चिरोली यांच्या पर्यवेक्षनात पो.नि. श्रीधर भोसले यांनी तक्रार गोपनीय ठेवत सहानीशा करित कार्यवाही करिता सापळा कार्यवाहीचे आयोजन केले, आरोपी कारकुन ने तक्रार कर्त्याला १५०००/- रुपायाची मागणी केली असता, तक्रार कर्त्याने १३०००/-  रुपये  देण्याची सहमती दर्शवित व दोघांत तडजोड झाल्यावर लाचेची उप विभागीय  कार्यालय येथील  स्वःताच्या कक्षात लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ मिळून आल्याने आरोपी वैद्य त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन कूरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या नंतर आरोपी नागसेन वैद्य यांच्या निवास स्थान वडसा येथे A.C.B च्या अधिकाऱ्यांनी आपल्या चमुसह झड़ती घेतली
या सर्व प्रकरणाची कार्यवाही पोलिस अधीक्षक  राहुल माकनिकर. एन्टी करप्शन ब्यूरो नागपुर,  सचिन कदम पोलिस अधीक्षक ला. प्र.वि. नागपुर, संजय पुरन्दरे अप्पर पोलिस अधीक्षक ला. प्र. वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलिस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पदमगीरीवार, संदीप उडाल, प्रफुल डोर्लीकर, लाच लुचपत प्रतिबंध विभाग गड़चिरोली यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 3, 2024

PostImage

हुंड्यासाठी केला जाच म्हणून  महिलेने लावला गळफास


हुंड्यासाठी केला जाच म्हणून  महिलेने लावला गळफास

 पती व सासु-सासऱ्याला अटक

पिंपरी :-
 नवीन फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहुन लाखो रुपये आणाण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक केला जाच म्हणून सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सांगवी पोलिसांनी पती व सासु-सासऱ्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पिंपळे निलख येथील पंचशिलनगर येथे घडली. 

गायत्री किरण माने (वय-26 रा. मुद्रा हाईट्स, पंचशिलनगर, पिंपळे निलख) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत गायत्री यांचे वडिल खंडु उत्तम जाधव (वय-49 रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सासु, सासरे परशुराम दिनकर माने, पती किरण परशुराम माने, नणंद यांच्यावर आयपीसी 306, 498 (अ), 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती, सासू-सासऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 26 वर्षीय मुलीचे आरोपी किरण याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन गायत्री हिने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख आणावेत यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित केले. तसेच तिला क्रुरपणे व हिनतेची वागणूक दिली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गुरुवारी (दि.1) राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासु-सासऱ्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 3, 2024

PostImage

आशा स्वयंसेविका यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार   -ना. धर्मराव बाबा आत्राम


आशा स्वयंसेविका यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार   -ना. धर्मराव बाबा आत्राम

चामोर्शी:-
  चामोर्शी येथील पंचायत समितीमध्ये आयोजित शासकीय आढावा बैठकी दरम्यान पुष्पा वेंकटी बुर्ले महिला जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड. ,डॉ.नोमेश जुवारे जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड.,डॉ.हेमंत भाकरे जिल्हा संघटन सचिव रा.काँ.पा गड. ,प्रणय बुर्ले विधानसभा अध्यक्ष रा.यु.काँ. गडचिरोली यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांच्या राज्य भर सुरु असलेल्या वेतनवाढ आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले व चर्चा सुद्धा घडवून आणण्यात आली त्यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सोबत बैठक घेऊन वेतनाचा प्रश्न  लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.
त्यावेळी तालुक्यातिल संपूर्ण अधिकाऱ्यांसोबत पक्षाचे वैद्यकिय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.मिथुन रायसिडाम,सेवादलचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,बंडू मेश्राम,सागर जांपलवार व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

शेतात ट्रॅक्टर  झाला पलटी चालक जागीच ठार


शेतात ट्रॅक्टर  झाला पलटी चालक जागीच ठार

आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेत शिवारातील घटना.

आरमोरी:-
शेतीकाम करण्यास जात असलेला ट्रॅक्टर शेतात चिखलात फसल्याने, फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या नादात ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात घडली. सूरेश दुधराम लट्ठे (वय ५० वर्षे) रा. ठाणेगाव असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक सुरेश लट्ठे हा दुपारच्या सुमारास ठाणेगाव शेतशिवारातील शेतीकाम करण्यासाठी जात होता दरम्यान ऋषिजी नैताम रा. ठाणेगाव यांच्या शेतात अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर फसला. त्यावेळी मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरखाली चिखलात दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळी जात पोलिसांना घटनेची माहिती दिली. या माहितीवरून आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल होत इंजिनखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला विच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला.

घटनेचा अधिक तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

भरधाव पिकअपच्या धडकेत एका ईसमाचा जागीच मृत्यू 


भरधाव पिकअपच्या धडकेत एका ईसमाचा जागीच मृत्यू 


आष्टी :-
  आष्टी- आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत 60 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.

महादेव मडावी वय 60 वर्ष रा. चौडमपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृत ईसमाचे नाव आहे.

शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास आष्टीकडून आलापल्ली कडे जाणाऱ्या पिक अप वाहनाने चौडमपल्ली येथे पायी रस्त्याने जात असलेल्या महादेव मडावी यांना जबर धडक दिली. यात महादेव मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पिक अप चालक वाहन घेऊन पसार झाला असून घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी पोहोचले. व मृतकाला शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचा पुढील  तपास आष्टी पोलिस करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

नवीन शैक्षणिक धोरणासाठी तयार राहावे --प्रा.डॉ.रुपेंद्र कुमार गौर      


नवीन शैक्षणिक धोरणासाठी तयार राहावे --प्रा.डॉ.रुपेंद्र कुमार गौर      

आष्टी:-

  विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाकरिता तयार राहावे आणि त्यानुसारच येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्याला अभ्यासासोबतच त्याच्या कला कौशल्य   याला वाव असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास या शैक्षणिक धोरणात आहे असे मार्गदर्शन प्रा. डॉ. रुपेंद्र कुमार गौर फुले- आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली यांनी महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील नवीन शैक्षणिक धोरण यावरील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. रूपेंद्र कुमार गौर यांनी विविध विषयाला हाताळून विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंका- प्रश्न याचे समाधान संवाद साधून केले.  जसे की एकाच वेळी तीन शाखेतील विषय घेतल्यास कोणती पदवी मिळेल, विषय कसे निवडायचे, ऑनलाईन कोर्स कसे करायचे असे एक नाही तर अनेक प्रश्न- संवाद यावेळी विद्यार्थ्यांनी केले आणि त्यांचे समाधान देखील डॉ.रूपेंद्र कुमार गौर यांनी विविध उदाहरणे देऊन समाधान केले. महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले याचा मार्गदर्शना खाली नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय,राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, श्री सद्गुरू साईबाबा महाविद्यालय, एस चंद्रा महाविद्यालय या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा  डॉ  भारत पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. केशब बैरागी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्राचार्य डॉ. पी.के.,प्रा.नंदकिशोर पडोळे प्रा.डॉ.प्रदीप कश्यप, डॉ. एम. के. सिंग,प्रा. ओ. पी. सिंग, प्रा. इंगोले, प्रा. टिकले, प्रा. घोगडे, प्रा. पी. एम. झाडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळेला डॉ. केशब बैरागी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी देखील विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांचे समाधान केले व नवीन शैक्षणिक धोरण कसे युवा पिढीला हिताचे आहे याविषयी उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रा. डॉ. भारत पांडे यांनी देखील   विद्यार्थ्यांच्या स्थानिक उदाहरणे देऊन कला कौशल्याला कसा वाव आहे नवीन पिढी शिकल्यानंतर बेरोजगार राहणार नाही आणि ही संधी या नवीन शैक्षणिक धोरणात आहे याविषयी मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ.गणेश खुणे यांनी तर प्रस्ताविक प्रा. डॉ. रवी शास्त्रकार यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रा.रवी गजभिये यांनी केले त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. राज मुसणे,प्रा.ज्योती बोभाटे,प्रा. बल्की,प्रा.नाशिका गबणे यांनी केले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम -         माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार


सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम -         माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार


आष्टी (प्रतिनिधी)##
 प्रतिकूल परिस्थितीत शाळेचा विकास घडवून शाळेला नावलौकिक प्राप्त झाला .स्नेहसंमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.शाळा हे सुसंकृत पिढी घडविण्याचे माध्यम आहे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांनी केले.                                    राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.      अध्यक्षस्थानी आष्टी च्या सरपंच बेबीताई बुरांडे या होत्या तर
 तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य अर्जुन दाते ,सेवानिवृत्त प्राचार्य महादेव उरकुडे ,माजी पोलीस पाटील शंकर मारशेट्टीवार , माजी उपसरपंच सुंदरदास उंदिरवाडे , प्राचार्य एन.एस.बोरकुटे , मुख्याध्यापक केशव खेवले , प्राचार्य डी.डी.रॉय  , प्रभारी प्राचार्य रमण पडिशालवार , गोसावी गोंगले आदी मान्यवर उपस्थित होते.  
सुरवातीला धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज ,स्व.राजे सत्यवानराव महाराज , माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
पुढे बोलतांना प्राचार्य दोंतुलवार म्हणाले या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर , इंजिनिअर झाले आहेत.विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन यश प्राप्त करावे.        प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी प्राचार्य दाते म्हणाले नागरिकांनी इंग्रजी शाळेच्या मागे न लागता मराठी शाळेतूनच मुलांना शिक्षण द्यावे .या शाळेतील बरेच विद्यार्थी उच्च पदावर पोहचले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी प्राचार्य उरकुडे म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेऊन चांगला विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा. सांस्कृतिक कार्यक्रमात आपली छाप उमटवून  व शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर पोहचून शाळेचा  नावलौकिक करावे. 
याप्रसंगी वर्षभर शाळेमध्ये राबविलेल्या स्पर्धेतील  वाचन स्पर्धा , वर्ग सजावट , भाषण स्पर्धा , निबंध स्पर्धा , प्रश्नमंजुषा स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , आदर्श वर्ग स्पर्धा , आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.डी.रॉय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिता नलोडे व प्रा.नारायण सालूरकर यांनी केले 
तर आभार प्रदर्शन सुधीर फरकाडे यांनी केले.
कार्यक्रमाला पालक ,गावातील नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक अरुण नागुलवार ,  शिक्षक कृष्णाजी पारखी , शिक्षिका छाया नागुलवार , शिक्षक बाबुराव कत्रोजवार , किशोर गोविंदवार , शिक्षक मंडल , लिपिक बंडोपंत मलेलवार , लिपिक गेडाम , शिपाई बंडोपंत अमलपुरीवार यांचा सत्कार करण्यात आला


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2024

PostImage

पैठणीचा जिंकू मान,हळदी कुंकवाचे लुटू वाण  ! असा कार्यक्रम अहेरी नगरीत प्रथमच


पैठणीचा जिंकू मान,हळदी कुंकवाचे लुटू वाण  ! असा कार्यक्रम अहेरी नगरीत प्रथमच


अहेरी :-
 अहेरी नगरीत प्रथमच महिलांच्या सन्मानार्थ पैठणीचा जिंकू मान, हळदी कुंकवाचे लुटू वाण हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या  भाग्यश्री हलगेकर (आत्राम) यांच्या नेतृत्वात आज  30 जानेवारी ला एक आगळावेगळा कार्यक्रम  घेण्यात आला सदर कार्यक्रमात पैठणीचा जिंकू मान, हळदी कुंकवाचे लुटू वाण ,महिला भगिनींचा करू सन्मान आनंदाला येई उधान" या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवून लकी ड्रॉ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम   इंडियन पॅलेस फंक्शन हॉल अहेरी येथे आयोजित करण्यात आला.यात 24 महिलांना प्रत्येकी एक पैठणी तर प्रथम विजेत्या महिलेला एक सोन्याची नथ व एक नाशिक येवला येथील पैठणी बक्षीसाच्या स्वरूपात देण्यात आली व  इतर उपस्थित जवळपास 1000 महिलांना एक साडी वाण म्हणून देण्यात आले व यात विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांचा स्वांत्वन देखील करण्यात आले ज्यात शहीद जवानांच्या पत्नी सुद्धा उपस्थित झाल्या होत्या सदर कार्यक्रमाला गानली समाज संघटना अहेरी यांनी सुद्धा   सच्छिदा  भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली  सदर कार्यक्रमला सौ सारिका गटपल्लीवार अहेरी तालुका महिला अध्यक्ष, ज्ञान कुमारी कौशी, गीताताई दुर्गे,  स्मिता निमसरकार, मायाताई सुनतकर, जयश्री चिदलवार, लईझा   तालुरकर , पोटदुखे मॅडम, पडालवार ताई, रमा गट्टूवार, सुवर्णाताई  पुसालवार, पुष्पाताई अलोने,  सुवर्णाताई सडमेक, पद्मीनीताई आत्राम, सुचीताताई खोब्रागडे, पूर्वा डोंतुलवार या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तसेच संपूर्ण तालुकाध्यक्ष तसेच इतर महिला भगिनी  मोठ्या संख्येने  उपस्थित झाल्या.  सौ. सारिका ताई गडपल्ली वार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी यांनी सर्वांचे आभार मानले


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2024

PostImage

कोरंबी ग्रामस्थांनी वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण कामाचे केले उद्घाटन


कोरंबी ग्रामस्थांनी वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण कामाचे केले उद्घाटन


                         

नागभीड --:
सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा  कोरंबी ता. नागभीड च्या वतीने सामूहिक वनहक्क क्षेत्रात वृक्षारोपण कामाचा शुभारंभ तसेच सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे कार्यालयाचे उद्घाटन दिनांक २९जानेवारी २०२४ रोजी दिलीप गोडे आणि डॉ  किशोर मोघेयांचे हस्ते समन्न झाला आहे.
वनहक्क कायदा 2006 अंतर्गत समूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना 30 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णय नुसार रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता मिळाली आहे. सदर शासन निर्णयान्वये ग्रामसभा कोरंबी ला वनहक्का क्षेत्रात वृक्षारोपण  कामासाठी रु. ४६७८३४८रुपयांची निधीस तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी प्रशासकीय मान्यता नुकतीच दिली आहे. या वृक्षारोपण कामाला सुरुवात करण्याचे हेतूने वृक्षारोपण शुभारंभ कार्यकामाचे आयोजन समूहिक वनहक्क समिती कोरंबी च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी हनुमान मंदिर पासून एक पालखी तयार करून वृक्ष दिंडी,लेझीम,भजन व बँड पथकासह पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.  तसेच  पुष्पगुश्चाने दिलीपजी गोडे, कार्यकारी संचालक विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर , डॉ किशोरजी मोघे ,संस्थापक ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ, गुणवंत वैद्य, रुपचंदजी दखने कुरखेडा यांचा सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी केशव जांभुळे , अध्यक्ष सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती कोरंबी, डॅनिअल देशमुख, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कोरंबी,यशवंत मेश्राम, सरपंच मांगरूड,  रिवॉर्ड्स संस्थेचे समन्वयक भोजराज नवघडे, कैलास नन्नावरे, , ग्रुप ऑफ ग्रामसभा नागभीड चे सचिव मनोहर मगरे, कोरंबी ग्रामसभेचे सल्लागार केशव खंडाते, प्रफुल मसराम,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर चे कार्यकारी संचालक दिलीप गोडे आणि  किशोरजी मोघे ,संस्थापक ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ यांच्या हस्ते वृक्ष रोपण व कार्यालयाचे उद्घाटन करून सुभारंभ करण्यात  आले. प्रमुख ग्रामस्थांना   प्रमुख अतिथीची समयोचित मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत गीत जिहा परिषद शाळा कोरंबी यांनी सादर केले,  संचालन शंकर नन्नावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॅनिअल देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समूहिक वनहक्क समितीचे सर्व पदाधिकारी, महिला प्रतिनिधींनी तसेच सर्व कोरंबी वासियानी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2024

PostImage

माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार


माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार

गडचिरोली:-

माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे 
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली मार्फत आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कुरुडचे उपक्रमशील मुख्याध्यापक वकील शेख यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.वकील शेख यांनी जिल्हास्तरावर सादर केलेल्या 'माझी तंबाखूमुक्त आदर्श शाळा' या नव उपक्रमास माध्यमिक गटातून जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.वकील शेख यांनी आपल्या शाळेत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर दखल घेतली जात आहे.
     जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या सभागृह मध्ये प्राचार्य  धनंजय चाफले यांच्या हस्ते आणि अधिव्याख्याता  डाॅ.विनीत मत्ते,अधिव्याख्याता  पुनित मातकर,अधिव्याख्याता वैशाली येग्लोपवार ,विषय सहाय्यक  डाॅ.विजय रामटेके यांच्या‌ प्रमुख उपस्थित पुरस्कार‌ सोहळा पार पडला.मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे अधिव्याख्याता तथा आदर्श शाळेचे जिल्हा समन्वय  गुलाबराव राठोड,व्यवसाय समुपदेशक डाॅ. प्रभाकर साखरे आणि शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वकील शेख यांचे अभिनंदन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2024

PostImage

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी धम्माची चळवळ अधिक गतिमान करावी-  सोपानदेव मशाखेत्री. 


विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी धम्माची चळवळ अधिक गतिमान करावी-  सोपानदेव मशाखेत्री. 

अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक

भारत बौद्धमय करीन, या  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी समस्त बौद्ध बांधवांनी धम्माची चळवळ अधिक गतिमान करून धम्म अनुसरण करावे असे मौलिक  विचार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोलीचे विभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री यांनी केले .येणापूर येथील पंचशील बुद्ध विहारात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोली जिल्ह्याचे वतीने चामोर्शी  तालुका कार्यकारिणी गठीत कमिटीच्या सभेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते .सभेचे अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त नायब तहसीलदार आर.डी. राऊत होते. तर प्रमुख अतिथी काका गडकरी जिल्हा संस्कर प्रमुख, राधाताई नांदगाये जिल्हा महिला प्रमुख, खेमराज  सोरते गडचिरोली तालुका सचिव उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमांन समोर दीप प्रज्वलित करून बुद्ध वंदना घेण्यात आली .व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांचे सहमतीने चामोर्शी तालुका दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून वसंत  रामटेके, उपाध्यक्ष ॲड. दिनेश राऊत, महिलांच्या उपाध्यक्ष प्रतिभा कोरडे, कार्याध्यक्ष ईश्वर झाडे, सचिव विजय मेश्राम, कोषाध्यक्ष हेमंत पेटकर, सहसचिव प्रदीप सोरते, संस्कार प्रमुख छत्रपती चूनारकर ,संघटक दिलीप खोब्रागडे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली .सभेला बहुसंख्य उपासक आणि उपासिका हजर होते . धम्माचे महत्त्व व उपासकांचे कर्तव्य यावर  काका गडकरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच राधाताई नांदगाये यांनी  धम्मोपदेशाची महती विशद केली. सभेचे संचालन अंकुश निमसरकार यांनी केले. आणि आभार ईश्वर झाडे यांनी मानले. यावेळी महिला तालुकाध्यक्ष सारिका गोंगले यांची सुद्धा निवड करण्यात आली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

हृदयद्रावक स्वतःच्या पोटच्या मुलाला शितपेयात विष देऊन बापाने घेतला जीव 


हृदयद्रावक
स्वतःच्या पोटच्या मुलाला शितपेयात विष देऊन बापाने घेतला जीव 

सोलापूर :-
जन्मदात्या बापानेच मुलाला शितपेयात विष देऊन जीव घेतला असल्याची घटना घडली आहे सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एका लहान मुलगा पडून असल्याचे दिसून आले होते. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होत. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वय- १४ वर्षे, राहणार भवानी पेठ सोलापूर अशी पटली.

आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनस्थळ पर्यंतचे सिसी टीव्ही फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की, मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांसोबत सतत खोड्या करायचा व त्याचे शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरुन वरील वेळी व ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मोटार सायकलवर घेवून जावुन त्यास शितपेयात सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजुन जिवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोलिस निरीक्षक जगताप हे करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

घोट पोलीस स्टेशनच्या वतीने तीन आदिवासी आश्रमशाळेत विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सम्पन्न


घोट पोलीस स्टेशनच्या वतीने तीन आदिवासी आश्रमशाळेत विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सम्पन्न


अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक 

आष्टी:-
 जिल्हा पोलीस प्रशासना अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक  निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक  कुमार चिंता ,अप्पर पोलीस अधीक्षक  यतीश देशमुख  व  उपविभागीय पोलीस अधिकारी  मयूर भुजबळ  गडचिरोली यांचे मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र घोट अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाडबडी, स्वर्गवासी वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळा रेखेगाव, स्वर्गवासी सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा रेखेगाव येथे   प्रयास उपक्रमा अंतर्गत वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा  परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
  सदर स्पर्धा परीक्षेला मौजा भाडबडी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता  पाचवी ते दहावीचे 218 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच स्वर्गवासी वसंतराव नाईक व स्वर्गवासी सूरजमल चव्हाण प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा रेखेगाव येथील 117 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 
  गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रयास उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञानावर आधारित  दररोज दहा प्रश्न  दिले जातात व त्याच प्रश्नांवर आधारित तिमाही स्पर्धा परीक्षा घेतली जात असते. व आज रोजी आयोजित वीर बाबुराव शेडमाके सामान्यज्ञान स्पर्धेकरिता पोलीस मदत केंद्र घोट हद्दीतील 02 आश्रम शाळेतील  एकूण 335 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन परीक्षेला चांगला प्रतिसाद दिला.
    सदर परीक्षा ही पोलीस मदत केंद्र घोट चे प्रभारी अधिकारी सपोनि नितेश गोहने व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाडभीडीचे मुख्याध्यापक  मैंद तसेच शाळेतील शिक्षक वृंद, व पोलीस स्टाफ यांचे उपस्थितीत शांततेत पार पडली.
 परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले की, प्रयास उपक्रम हा खूप सुंदर उपक्रम असून विद्यार्थ्यांची ज्ञान क्षमता वाढवण्याचे हे एक उत्तम साधन असून यानंतर सुद्धा असेच उपक्रम राबवावे व  परीक्षेचे आयोजन करावे असे मनोगत व्यक्त करून  विद्यार्थ्यांनी  गडचिरोली पोलीस दलाचे व पोलीस मदत केंद्र घोट चे आभार मानले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी केली नागपूर येथील खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद


गडचिरोली पोलीसांनी केली नागपूर येथील खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद 

 

 गडचिरोली : -
 येथील एका शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिल्याने फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावून त्यांच्याकडुन पैशाची मागणी केली.  तसेच घटनाक्रमाचे दरम्यान आरोपी सुशील गवई (पोलीस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास 28,000/- रुपये तसेच 2 ते 3 लाख रुपये नगदी पेड केले असल्याचे भासविले असता, सर्व आरोपीतांनी संगणमताने बेकायेदेशिरित्या गुन्हेगारी स्वरुपाचा कट कारस्थान रचुन फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोधर राहीली आहे असा खोटा आरोप लावुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालुन हे प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपये पैशांची मागणी करुन पैसे देण्यास फिर्यादीवर जबरदस्ती केली असल्याच्या तोंडी रिपोर्ट वरुन अप क्र. 60/2024 कलम 384, 389, 120 (ब) भादवि अन्वये पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला. 
सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले असता, गुन्हा दाखल होऊन अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने गोपनिय सुत्रधारांकडुन खात्रीशिर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन गुन्ह्रातील आरोपी नामे 1) सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, 2) रवीकांत कांबळे रा. नागपूर, 3) रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर 4) ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाईस्तव पोलीस स्टेशन गडचिरोली यांचे ताब्यात दिले.  तसेच एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे.  वरील सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली आहे.  सदर गुन्ह्राचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे हे करत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

संत्रानगरी नागपूर येथे युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार


संत्रानगरी नागपूर येथे युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार


आष्टी:-
संत्रानगरी नागपूर येथे युवा कवी लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला 
मैत्रिकट्टा कवी मनाचा साहित्य समूह संभाजीनगर द्वारा आयोजित दुसरे मैत्रिकट्टा साहित्य संमेलन २०२४ नागपूर येथे दिनांक २८.०१.२०२४ रोजी पुस्तक प्रकाशन सोहळा, पुरस्कार सोहळा अशा विविध सत्रात राज्यभरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.   त्यात गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या खेळेगावचे युवा कवी, लेखक. प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील साहित्यसंमेलनात सहभाग होता. त्यांनी आपली स्वलिखित "विचार केलास का कधी...?" प्रेमीयुगलांना हेलावून सोडणारी हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्व मान्यवर, कवी, कवयित्री व जमलेल्या संपूर्ण रसिक वर्गाच्या टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकून घेतली.
 त्यांचा असा साहित्यक्षेत्रातील प्रवास पाहुन उपस्थित मान्यवर कवी संमेलनाध्यक्ष मा. वैभव धर्माधिकारी पुणे (व्याख्याते तथा सदस्य साहित्य विचारपीठ मुंबई), संमेलनाध्यक्ष मा. अशोक कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक नागपूर) व विशेष अतिथी म्हणून लाभलेले प्रसिद्ध कवी, राज्य साथरोग शास्त्रज्ञ, फँड्री चित्रपटातील कलाकार, नागराज मंजुळे यांचे जिवलग मित्र मा. डॉ. प्रदिप आयटे सर यांच्या हातुन सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल त्यांचे आप्तजन, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी व गाववासीयांत आनंदाचा, आपुलकीचा, गर्वाचा गंध दरवळत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2024

PostImage

दत्तक घेतले खासदारानी गाव मात्र विकासापासून कोसो दूर आहे  - महेंद्र ब्राह्मणवाडे


दत्तक घेतले खासदारानी गाव मात्र विकासापासून कोसो दूर आहे  - महेंद्र ब्राह्मणवाडे

 

गडचिरोली :-
 मागील दहा वर्षापासून केंद्रात भाजपची सत्ता आहे, जिल्ह्यातील विद्यमान खासदार अशोक नेते हे भाजपचे आहे खासदारानी दत्तक ग्राम योजने अंतर्गत तालुक्यातील येवली गाव दत्तक घेतले. त्याअर्थी  गावातील युवक, महिला शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या खासदाराचे गाव असल्याने गावाचा विकास होईल, गावात विकासाची गंगा वाहू लागेल, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील असे वाटतं होते मात्र मागील 10 वर्षात या उलट झाले, ना गावाला कोणतीही विशिष्ट ओळख मिळाली नाही कोणत्या तरुणाना रोजगार मिळाले नाही खासदार अशोक नेते तर साधे गावात भेटी सुद्धा दिल्या की नाही याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शंका उपस्थिती केली आहे.
ओबीसी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या  मतांसाठी भाजप राजकारण करीत आहे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे असा आरोपही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केला, जय सियाराम कबड्डी क्लब येवली च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनिय सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चंने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जितेंद्र मुनघाटे, ग्रा.प. शिवनीचे सरपंच किरण ताटपल्लीवार , ग्रा.प.सदस्य चोखाजी बांबोळे, चोखाजी भांडेकर, मोरेश्वर भांडेकर,  जितेंद्र मुनघाटे, नितेश राठोड, ग्रा.प.सदस्य प्रकाश गेडाम, विजय सोमनकर, से.निवृत्त पोलीस मेश्रामजी, भीमराव मेश्राम, सेमसर, गेडाम, मंडळाचे अध्यक्ष विजय भोयर, प्रमोद पिपरे, संदीप ठाकरे, राहुल काळे, ज्ञानदीप कुद्रपवार, राकेश भोयर, सुशील शर्मा, हर्षद गोहणे, मयूर भोयर, विजय भोयर, स्वप्नील भांडेकर, सुरेश पेडपल्लीवार, निखिल पुण्यप्रेडीवार, सुरज मेश्राम, वृषभ धात्रक, वृषभ भोयर, आदी बहुसंख्येने गावातील नागरिक , खेळाडू उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2024

PostImage

बहुजनवादी राजकारण हाच सक्षम पर्याय - ॲड. सुरेश माने


 

बहुजनवादी राजकारण हाच सक्षम पर्याय - ॲड. सुरेश माने 

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी जनविरोधी धोरणांना शह देण्यासाठी बहुजनवादी राजकारण करणे हाच सक्षम पर्याय आहे. त्यामुळे स्पष्ट वैचारीक भूमिका असणाऱ्या पक्षांची आघाडी असणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे मत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केले. 

बिआरएसपीच्या कार्यकर्ता बैठकीनिमित्य ॲड. सुरेश माने गडचिरोलीत आले होते. त्यानिमित्त त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यादरम्यान चर्चा करतांना ते म्हणाले की, देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी अजेंड्याला सामान्य जनता कंटाळली आहे. अशावेळी प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेसने सर्वांना एकत्र घेवून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. तसे झाले नाही तर किमान प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील बहुजनवादी विचारांच्या पक्षांनी स्पष्ट भूमिका घेवून निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरील बांधणीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते यांनी ॲड.सुरेश माने यांचे शेकापच्या वतीने स्वागत केले. यावेळी बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष ॲड. विशेष फुटाणे, प्रदेश सचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, दिक्षा रामटेके, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2024

PostImage

पत्त्यांचा जुगार खेळणे पडले महागात,अडकले पोलीसांच्या जाळ्यात


पत्त्यांचा जुगार खेळणे पडले महागात,अडकले पोलीसांच्या जाळ्यात

भद्रावती :-
तालुक्यातील तांडा गावामागील जंगलात सुरू असलेल्या एका जुगारावर भद्रावती पोलिसांनी धाड टाकीत जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती भद्रावती पोलिसां तर्फे देण्यात आली. सदर कारवाई 26 जानेवारीला तांडा गावाजवळील जंगलात करण्यात आली. सदर घटनेत चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गोपनीय माहिती द्वारे तांडा गावाच्या मागच्या भागातील जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक कारवाईसाठी घटनास्थळी रवाना केले. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांपैकी काही जुगारी जंगलात पळून गेले तर आठ जुगारी पोलिसांच्या हाती लागले. या कारवाई जुगारातील पैसे व आठ मोटरसायकली असा चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. सदर आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे, कोल्हे तथा इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2024

PostImage

गणपूर नाव दुर्घटनेतील तिन महिलांचे मृतदेह शोधण्यात आष्टी पोलीसांना आले यश


गणपूर नाव दुर्घटनेतील तिन महिलांचे मृतदेह शोधण्यात आष्टी पोलीसांना आले यश

शुक्रवारी मायाबाई राऊत हिचा मृतदेह लागला हाती

 

आष्टी:- दिनांक:-26/01/2024 तालुक्यातील गणपूर येथिल सहा महिलांचा 23 जानेवारी मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून दुर्दैवी मृत्यू झाला. नावेने चंद्रपुर जिह्यातील गावात मिर्ची तोडण्यासाठी या शेतमजूर महीला जात होत्या. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सहा पैकी दोन महिलांचा मृतदेह 23 जाने ला संध्याकाळी शोधून काढण्यात यश आले तर तिसरा मृतदेह 24 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास मिळाला. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने इतर तीन मृतदेह शोधून काढण्याचे शोधपथकासमोर फार मोठे आवाहन होते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने हे मृतदेह जैरामपूर, रामपूर लगतच्या नदीपात्रात वाहून आल्याची शक्यता लक्षात घेऊन आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण व पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह नदीपात्रात शोधपथकासोबत सकाळपासूनच मोहीम राबविली व अथक परिश्रम घेतले दिनांक 25 जानेवारी गुरुवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सुषमा राउत व साडेतिन वाजताच्या सुमारास बुधाबाई राऊत या दोन महीलांचे मृतदेह शोधून काढण्यात यश आलें. रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली आज दिनांक 26 जा नेवारी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम राबविली गेली सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण अणि पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले हे आपल्या पथकासह वैनगंगा नदीच्या पाण्यात पोहून नदीपात्रात शोधमोहीम राबविली असता शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास मायाबाई अशोक राऊत हिचा मृतदेह जैरामपुर
नदीघाटावर शोधण्यात यश आले.

आष्टी ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जैरामपुर नदीघाटात तीन महिलांच्या मृतदेहांचा शोध लावण्यासाठी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्या मार्गदर्शनात श्री वाकुडकर, प्रशांत चुदरी, व विश्वनाथ पोतराजे या पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2024

PostImage

महसूल विभागातील*अव्वल कारकून व मंडळ अधिकारी बणनार नायब तहसिलदार


*महसूल विभागातील*अव्वल कारकून व मंडळ अधिकारी बणनार नायब तहसिलदार*

 *३०६ जणांना पदोन्नतीने पदस्थापना*

 

मुंबई,
 एकीकडे राज्याच्या महसूल विभागात आधुनिकता आणत असताना विभागातील अधिकाऱ्यांनाही पदोन्नतीने पदस्थापना देत  सुंदर मेळ साधला आहे.  आज महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे., अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

राज्याच्या कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपुर या महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. 
छत्रपती संभाजीनगर विभागात (छत्रपती संभाजीनगर 8, जालना 5, परभणी16, हिंगोली4 , बीड 5, लातूर 5  , धाराशिव 8, नांदेड 8) एकूण 59.
अमरावती विभागात (अमरावती 14, अकोला 10, बुलडाणा 14, वाशिम 7, यवतमाळ 6) एकूण 52
नागपुर विभागात (नागपुर 12, भंडारा 4, गोंदिया 6, चंद्रपुर 18, गडचिरोली 13, वर्धा 4) एकूण 57
नाशिक विभागात(नाशिक 9, अहमदनगर 10, जळगाव.9, धुळे 4, नंदुरबार4) एकूण 36
कोकण विभागात (मुंबई शहर 13, मुंबई उपनगर 22, ठाणे 17, पालघर 9, रायगड 19, रत्नागिरी 13, सिंधुदुर्ग  6, विभागीय आयुक्त कोंकण यांचे कार्यालय 2, राज्य निवडणूक आयोग 1) एकूण 102
०००००
*जनसंपर्क विभाग (महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई)*


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

आता सचिन कसे सांभाळणार  दिड वर्ष व नऊ महिन्याच्या चिमुकल्यांना


आता सचिन कसे सांभाळणार  दिड वर्ष व नऊ महिन्याच्या चिमुकल्यांना

आई व आजीचे सुद्धा एकाच वेळी निधन 

आष्टी 
चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील सात महीला मिर्ची तोडण्यासाठी शेजारी चंद्रपूर जिल्ह्यातील गावात जाण्यासाठी दिनांक 23 जानेवारी मंगळवारी सकाळी वैनगंगा नदीतून नावेने जाण्यासाठी निघाल्या. मात्र नावेत क्षमतेपेक्षा जास्त जण झाल्याने नाव नदीत उलटली यात सहा महिलांना जलसमाधी मिळाली तर एका महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. नावाडी मात्र सुखरूप बाहेर आला. या घटनेने गणपुर गावावर शोककळा पसरली असुन तिन महिलांचे मृतदेह हाती लागले असून तीन महिलांचा शोध घेणे सूरू आहे.

या दुर्दैवी घटनेत गणपुर येथिल राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सासू मायाबाई राऊत वय 45 वर्ष सून सुषमा राऊत वय 25 वर्ष या दोघींचाही करुण अंत झाला. माया राउत या सुखरूप बचावल्या होत्या मात्र सुनेला वाचविण्यासाठी हात देत असतानाच पाण्याच्या प्रवाहात त्याही वाहून गेल्या. सचिन राऊत यांच्यावर आई आणि पत्नी यांच्या निधनानं दुहेरी संकट कोसळले असुन सुषमा हीला नऊ महिन्यांचा व दीड वर्षाचा अशी दोन मुल आहे. आता ही लहानगी मुले आजी आणि आईच्या प्रेमाला पोरखी झाली आहेत. या घटनेची माहिती कळताच सचिन हा सैरभर होवुन नदीच्या दिशेने सुसाट निघाला पण आई अणि पत्नीला वैनगंगेने आपल्या कुशीत घेतल्याने त्याच्या दुःखाला पारावार उरला नाही. नदीकिनाऱ्यावरील शोकमग्न वातावरण पाहून उपस्थितांची मन गहिवरून आली होती. गाव शोकसागरात बुडाले तर नातेवाईकांनी गणपुरच्या दिशेने धाव घेतली. आतापर्यंत जिजाबाई राऊत, पुष्पा झाडे, आणि रेवांता झाडे या तीन महिलांचे मृतदेह हाती लागले अन्य तीन महिलांच्या शोधासाठी पोलिसांनी नावेच्या सहायाने शोधमोहीम युद्धपातळीवर राबवित असुन मृतकांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडल्याने सारे गाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर  पोलिसांची कारवाई


अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर  पोलिसांची कारवाई

विस लाख विस हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह मजूर पोलीसांच्या ताब्यात 


भद्रावती:-
 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावाच्या नजीक असलेल्या नाल्यामधून रेतीची ट्रॉक्टरने तस्करी करीत असताना पोलिसांनी पकडले व कारवाई करण्यात आली आहे

मांगली नाल्यात भरपुर मोठ्या प्रमाणावर नैसर्गीक रेतीचा साठा असल्याने त्या नाल्यामधून रात्रीदरम्यान रेती तस्करांकडुन अवैद्यरित्या रेतीची सतत चोरी होत असल्याची माहीती दिनांक २४/०१/२०२४ चे रात्रौदरम्यान 'भद्रावती पोलीसांना प्राप्त झाली होती 

त्या अनुशंगाने भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी रेती तस्करांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन भद्रावती येथील सपोनि राहुल एस किटे  पोहवा धर्मराज मुंडे ,चालक पो. हवा. जगदिप, नापोअ जगदिश झाडे, नापोअ निकेष बेंगे, ना.पो.अ. विष्वनाथ चुदरी यांचे पथक तयार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यावरून दिनांक २४/०१/२४ रोजी मांगली येथील नाल्याजवळ रात्रौदरम्यान पंचासह सापळा रचुन मांगली नाल्यामधुन एकापाठोपाठ एक असे एकुण चार ट्रॅक्टर येत असतांना दिसल्याने त्यांना नाल्यामध्येच थांबवुन पंचासमक्ष ट्रॅक्टरची पाहणी केल असता त्यामध्ये प्रत्येकी १ ब्रास प्रमाणे एकुण ४ ट्रॅक्टरमध्ये ४ ब्रास रेती अवैद्यरित्या चोरी करून घेवुन जात असतांना मिळुन आले

 त्यावरुन विना क्रमांचा एक महिंद्रा ट्रॉक्टर, MH 29 V1713, 
 MH 32 B 1177 व लाल रंगाची ट्रॉली MH 34 L 9081, MH 36L2151, असे चार वाहन व आरोपी १) प्रजीत सुभाष खामनकर वय २६ वर्ष  २) समीर बंडू चौधरी वय २१ वर्ष  ३) आशिक नामदेव कोटनाके वय २८ वर्ष , ४) विकास भिमराव कोटनाके वय ३० वर्ष ५) महेन्द्र महादेव बोढेकर, वय २४ वर्ष,  व मजूर रितीक अजाब पाटील, वय २१ वर्ष, सनी कमलाकर कुमरे, वय २४ वर्ष , मनोहर चिंदु
कोटनाके, वय ४० वर्ष , अमोल परशुराम कोटनाके, वय ३० वर्ष ,  तुकाराम अशोक बोढेकर, वय २९ वर्ष, गणेश वसंता डेंगळे, वय ३० वर्ष, सर्व रा.मांगली  व पाहीजे असलेले ट्रॅक्टर मालक आरोपी नामे राकेश कामटकर रा. सुमठाना भद्रावती ,रूपेश उरकुडे रा. सुमठाना भद्रावती , श्रीकृष्ण जिवतोडे रा. गवराळा भद्रावती , भारत बोढेकर रा. मांगली ता. भद्रावती त्यांचेवर कलम ३७९,३४. भा.दं. वि. प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो


धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो

लिंक फेल चे कारण दाखवून आँनलाईन ची सुविधा केली बंद

गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांना महामंडळात धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो पहायला दिसून येते आहे व लिंक फेल आहे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथील कार्यालयात त्यांनी आपला कर्मचारी ठेवने बंद केले आहे
गडचिरोली तालुक्यातील दोन ते तीन हजार शेतकरी अजूनही सातबारा आँनलाईन करण्यापासून वंचित ठेवले आहेत मात्र दि १६ जानेवारी पासून ते शासनाने ३१ जानेवारी ही मुदत वाढवून देण्यात आली असली तरी फेडरेशन ने १६ जानेवारी पासून ते २३ जानेवारी पर्यंत एकही सातबारा आँनलाईन केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे 
दररोज नित्य नेमाने शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथील कार्यालयात येतात व दिवसभर भुकेताहनेने थांबून सायंकाळी आल्या पावली परत जाताना दिसून येते आहे
शासनाने या बाबीची दखल घेउन तात्काळ लिंक सुरू करुन द्यावी किंवा ती सुरुच असेलच तर फेडरेशन ला ते करवून घेतले पाहिजे तसे होत नसल्यास ऑफलाईन फार्म स्विकारून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार


पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार

 

 

 

 बीड:- 

एका लालची काकुने आपल्याच दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेनंतर बीड गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या असून 20 दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. तनूजा वय 2 वर्ष किशोर अमोल भावले वय 13 महिने अशी मृत बालकांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असं आरोपी काकूचे नाव आहे.

 

 

प्राप्त माहितीनुसार, ही खळबळजनक घटना 29 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या दोन भांवडाची पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे समोर आले आहे. 29 डिसेंबरच्या दुपारी अचानक उलट्या सुरु झाल्यानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. किशोरला बीडच्या रुग्णालयात तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

 

या प्रकरणात सुरुवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काही दिवसांनी ही घटना हत्येची असल्याचे समोर आले. पोलिसांनी घरात चौकशी सुरु केली आणि तपास करीत असताना त्यांना आरोपींचा शोध लागला

 काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही म्हणून तिने बदला घेण्याचा चंग बांधला होता. त्यांनी बदला घेण्यासाठी सुखदेव ची सुन स्वाती हिला चार लाख रुपयांचे व त्या घरची मालकीण होण्याचे स्वप्न दाखविले तुने तुझ्या पुतण्यांना ठार केल्यास कुनालाही संशय येणार नाही असीही खात्री दिली त्यामुळे सखुबाई च्या आमिश्याला बळी पडून स्वातीने आपल्या दोन लहान चिमुकल्या पुतण्यांना उंदिर मारण्याचे औषध चाटविले

 असे पोलीस चौकशीतून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

 

 सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर मारण्याच्या व्यूबमधील औषध स्वाती हिने बोटाने काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले, त्यानंतर त्यांना उलव्या झाल्या आणि उपचारा सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. अशी तक्रार मयत मुलांचे वडिल अमोल सुखदेव भावले यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून सखुबाई भावले, स्वाती उमाजी भावले यांच्याविरूध्द कलम 302, 102-ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.