PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या …


धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी


विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी 10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन

गडचिरोली/नागपूर दि. 25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती
श्रीमती बिदरी यांनी दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या

सूचना दिल्या आहेत. धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून

त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर

जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या
योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक
आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन


सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन 


नंदुरबार:-आपल्या गावातील शाळा दुरुस्ती करीता चक्क सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे 
खांडबारा गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेची इमारत ही जीर्ण अवस्थेत पोहचली असल्याने सरपंच अविनाश गावीत यांनी जिल्हा परिषद कडे शाळा दुरुस्ती करीता वारंवार पाठपुरावा केला मात्र या बाबतीत शासन उदासीन असल्याचे दिसून येत होते 
ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी मला निवडून दिले मात्र मी लोकांना काय उत्तर देणार म्हणून त्यांनी अनोखे आंदोलन करण्याचे ठरविले व काही ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्याचा हात पुढे केला 
तेव्हा त्यानी जिल्हा परिषदेच्या पुढे अर्धनग्न आंदोलन सुरू केले 
 भारतीय लोकशाहीमध्ये गावाचा सरपंच हा तळागाळातील लोकांचा लोकसेवक असतो.

आपल्या गावातील शाळेच्या दुरुस्ती कडे शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी असे सरपंचास अर्धनग्न आंदोलन करावे लागते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल 

सरपंचांना आपल्या गावातील लेकरांचा शिक्षणासाठी उत्तम सोय व्हावी म्हणून पहिल्यांदाच सरपंच कपडे काढताना पाहिला असल्याचे बोलले जात आहे सरपंच अविनाश गावित खरंच आपलं पाऊल गावाचा हितासाठी पुढे आहे आपणास शुभेच्छा आपली व खांडबारा ग्रामस्थांच्या लढाईला यश मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे 

ही चमकोगिरी नाही तर वास्तव आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024   

PostImage

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल


 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 


धुळे:-
जिल्ह्यातील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा येथील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण झाली असून उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 
विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना आजार होत आहेत त्यामुळे सदर शाळेच्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधिक्षक,व ईतर बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक शाखा (साक्री) धुळे चे गणेश गावीत, तानाजी बहीरम यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे यांना निवेदन देऊन केली आहे 
 प्रत्यक्ष अनुदानित आश्रम शाळा कुसुंबा ता. जि.धुळे या शाळेला भेट दिली असता अजून 45 ते 47 विद्यार्थी बाधित आहेत.या घटने नंतर साफ सफाई करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यापासून एकदा ही पाणी परीक्षण करण्यात आले नाही. स्वयंपाक चुलीवर बनवला जातो गॅसचे अनुदान लाटले जाते मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही.जे विद्यार्थी तक्रार करतात त्यांना बोर्डाच्या परीक्षेत टार्गेट केले जाते.म्हणून विद्यार्थी बोलत नाही.वरून संस्था एका भाजप पक्षाच्या राजकीय नेत्याची शाळा असून या शाळेत असा गंभीर प्रकार घडला आहे.यांच्यावर सरकार कायदेशीर कार्यवाही करणार का ? कुसुंबा येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे भयानक हाल व अपेष्टा होत आहेत 
दि.20/7/2024रोजी  कुसुंबा आदिवासी आश्रम शाळेतील दुषित पाणी पिल्याने उलट्या,ताप संडास  विद्यार्थ्यांना व्हायला लागले.दि.17/7/2024 रोजी विहीरीतील पाणी आटल्याने बाहेरून पाण्याचे टँकर मागितले असेही सांगण्यात येत आहे.एकीकडे विहीरीत संडासाचे पाणी जमिनीत मुरते असे ही शाळेतील विद्यार्थी सांगत आहे.खर तर विद्यार्थाचे निवासी इमारत आहे.त्या इमारतीला लागून विहीर व संडासाचे कुंड्या ही विहीर जवळ आहे. असे दुषित पाणी पिल्याने शाळेतील विद्यार्थी उलट्या, संडास करतांना शिक्षकांना दिसून आल्या नंतर लगेच धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले तरी काही मुले ,मुली अजून ही शुद्धीवर नव्हत्या यात लहान मुले जास्त होते.त्याच दिवशी पुन्हा दुपारी आणि संध्याकाळी तीन मुले एम्बुलंस  मध्ये जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचारासाठी आणले . धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळा कुसुंबा येथील ज्या धडगाव शहादा तळोदा अक्कलकुवा या तालुक्यातील पालकांचे विद्यार्थी कुसुंबा आश्रम शाळेत असतील त्या पालकांना आपल्या मुलांना बघण्यासाठी यावे कारण की लहान लहान लेकरू या ठिकाणी राहतात ते कसे राहतात हे पाहणं गरजेचं आहे.अनुदानाच्या पायी लहान जीवाशी खेळलं जात आहे.मी स्वतः त्रास करताना बघितले आहे. तरी या शाळेतील या विद्यार्थ्यांना कशामुळे आजारी पडले याकडेही आपलं लक्ष दिलं पाहिजे प्रत्यक्षपणे आपल्या मुलांना विचारा कोणते पाणी पिले आणि ते पाणी कसे होते तेही विचारा आणि पुढील कारवाई आपल्या पालकांनीही करावी . 25 लोकांना करणे दाखवा नोटीस एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बजावली आहे.तसेच झालेल्या घटनेची चौकशी तीन अधिका-या मार्फत केली जाणार आहे.संबधित संस्थाचालक व इतर लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल का?असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.


PostImage

Sanket dhoke

July 21, 2024   

PostImage

Chandrapur News :- २२ जुलै रोजी चंद्रपूर जिल्यातील शाळा महविद्यालयांना …


Chandrapur News :- दिनांक १९ व २० जुलै  पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि. २२ जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

 या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये २२ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात १९ व २० जुलै रोजी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत.

 हवामान खात्याने २१ व २२ जुलै रोजी Chandrapur जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर  कोणत्याही प्रकारे समस्या होऊ नये, याकरिता Chandrapur जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना २२ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या काळात सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. 

तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

अधिक वाचा :- विक्की कौशल ने खुलासा किया कि पर काम करते समय रेत माफिया ने उन्हें लगभग पीटा था

अधिक वाचा :- आंबोली धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा मृत्यू, बाईक घसरली अन् क्षणात सगळं संपलं

ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?

आज का राशिफल :- Today Horoscope :- २१ जुलै २०२४ ; किसी महत्वपूर्ण व्यक्ति से मुलाकात होगी 

अधिक वाचा :- Gadchiroli News : सॅल्यूट... हातातून गोळी आरपार गेली, तरीही ६ तास लढला

अधिक वाचा :- Chandrapur News :-  चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर सुरूच, दोघे जण गेले वाहून 

अधिक वाचा  :- माइक्रोसॉफ्ट के सर्वर डाउन होने से दुनिया भर में अफरा-तफरी मच गई; क्या सच हुई बाबा वेंगा की भविष्यवाणी?

अधिक वाचा :- रक्ताने भरलेले हात घेऊन पोलीसांना म्हणतो मी माझ्या ‘पत्नीला आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय’

अधिक वाचा :- Gadchiroli News :- जनता वाऱ्यावर, पालकंत्र्यांना फ्कत उधोग्यासाठी वेळ

अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा 

अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

         ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा 

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना 22 जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर


 गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना  22 जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर 

गडचिरोली:-
अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे प्रादेशिक हवामान विभागाने सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील त्या त्या भागाचा आढावा घेऊन त्या स्थानीक क्षेत्रात शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत 
गेल्या तीन दिवसांपासून ढगफुटी सुरू असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा , गोदावरी, प्राणहिता,बांडीया,इंद्रावती इत्यादी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नदी नाल्यांना पुर आल्याने ३७ मार्ग बंद आहेत शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरू असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देने आवश्यक आहे 
त्यामुळे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था अशा सर्व शाळांना २२ जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर केली आहे 
सदर माहिती सर्व विभागांना पाठविण्यात आली आहे 
 पुन्हा २४ तास पाऊस संततधार कोसळण्याची चिन्हे असल्याने बाहेर गावाहून आवागमन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे


PostImage

Avinash Kumare

July 20, 2024   

PostImage

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा …


महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024
 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास !
 सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा

 

● My khabar 24: भारतीय टपाल विभागाअंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मराष्ट्रातील सर्व उमेदवार आतापर्यंत या भरतीची वाट बघत होते. पण, आता वाट बघण्याची काही एक गरज नाही. कारण, पोस्ट अफिस विभागात 
 एकूण "४४२२८" रिक्त जागा आहेत आणि ते भरण्यासाठी त्या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यापैकी महाराष्ट्रात ३०८३+ ८७ = ३१७० एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 
५ ऑगष्ट २०२४ आहे. ग्रामीण डाक सेवक 
या पदासांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार  अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवारांना स्थनिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे. तर वय आहे १८ ते ४० वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अगदी आरामात अर्ज करू शकतात.  

 

 

Guru Purnima 2024: जानिए गुरु पूर्णिमा की ये 5 खास बातें 

आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये 

 

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता●

 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.  ही मूलभूत पात्रता उमेदवारांना भूमिकेसाठी आवश्यक मूलभूत ज्ञान असल्याची खात्री करते.


पदांचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) (GDS)●

 शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे 

 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही 

वेतन श्रेणी : दरमहा 10,000 – 29,380/- रुपये 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 

Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

नोंदणी शुल्क●

सामान्य आणि अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी GDS भरतीसाठी नोंदणी शुल्क ₹100 आहे.  तथापि, SC/ST, PWD आणि महिला यांसारख्या इतर श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 आवश्यक कागदपत्रे लिस्ट

• दहावीचे मार्कशीट 

• आधार कार्ड 

• कास्ट सर्टिफिकेट 

• पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र 

• EWS प्रमाणपत्र 

• ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र 

• जन्म प्रमाणपत्र 

• कॅम्पुटर सर्टिफिकेट

 

● भारतीय डाक सेवक भरतीचा काही महत्वाच्या लिंक 
https://shorturl.at/tuCN4 

● ऑनलाईन अर्ज इथे करा https://shorturl.at/JHGhg 

● अधिकृत वेबसाईट 
https://www.indiapost.gov.in/

 

अशीच नवं नवीन भरतीची अपडेट्स अन्य भरतीची माहिती मिळण्यासाठी आणि अगदी विस्तृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या सरकारी माहिती ग्रुप च्या लिंक ला क्लिक करून ज्वाईन व्हा......!

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 

 

 

 

 

 

 


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024   

PostImage

उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना …


उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे केले वाटप 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आक्सापूर:- येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करुन एक नवा पायंडा पाडला आहे 
आजच्या युगात लोक आपल्या वाढदिवसाला वारे माप पैसे खर्च करतात पण काही लोक पैशाचा उपयोग गोरगरीब, होतकरू  विद्यार्थ्यांना होउन त्याचा सदुपयोग व्हावा याकरिता प्रयत्न करीत असतात 
असाच आक्सापुर येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख असलेले दर्शन वासेकर यांनी जिल्हा परिषद शाळा आक्सापुर येथील 105 विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप केले
वाढदिवसाच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या दर्शन वासेकर हे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद शाळेत नोटबुकचे वाटप करीत असतात तसेच गावातील शिवाजी चौकात वृक्ष लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे 
नोटबुक वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल तालुका काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष महेंद्र कुनघाटकर, ग्रामपंचायत सदस्य नितेश मेश्राम, अनिकेत बुरांडे काँग्रेस शाखाप्रमुख आक्सापुर, विकी शाहू, व बराच मित्रपरिवार उपस्थित होता 
   सदर कार्यक्रमात  मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दर्शन वासेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यानंतर सर्व शिक्षक वृदांनी दर्शन वासेकर याच्या कार्याचा कौतुक करुन अभिनंदन केले  बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024   

PostImage

डी.टी. एड. बी.एड.बेरोजगारांना वगळून निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल त्या शाळांना …


डी.टी. एड. बी.एड.बेरोजगारांना वगळून निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल त्या शाळांना टाळे ठोकणार - आजाद समाज पार्टीचा इशारा 

गडचिरोली : दि. १५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमीत शिक्षकांची भरती होई पर्यंत अनुसूचित जमातीतील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती करण्याचे सूचना सर्व जिल्हा परिषद सीईओ ना देण्यात आल्या आहेत तसातर हा आदेश म्हणजे सरकारी शाळांचे व शिक्षकांचे भविष्यात खाजगीकरण करण्याचा डावच आहे यावर वेगळ्या स्वरुपात राज्यव्यापी आंदोलन करूच तथापि सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती करताना संदर्भीय आदेशात क्रमांक १ मध्ये "नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करावी," हि सूचना  आजाद समाज पार्टी कदापी मान्य करणार नाही. ज्याअर्थी जिल्ह्यात अनुसूचित जमातीतील स्थानिक बेरोजगारांची एका बाजूला प्रचंड मरमर होत असताना आणि जिल्ह्यात हजारोच्या संख्येने डी टी एड, बी एड ,एम एड पदवीधारक शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवार बेरोजगार असताना प्रशासन जर ५८ वर्षापर्यंत नौकरी करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करून बेरोजगारांशी खेड मांडत असेल तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.
 सदर निवेदनाची तातडीने दखल घेऊन शासनाच्या आदेशातील निवृत्त शिक्षकांना रिक्त पदावर नियुक्त करण्याची क्रमांक १ ची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले अशा शाळांना टाळे ठोकून आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. तसेच जिल्ह्यात ८४ सरकारी शाळा शिक्षकाविना आहेत त्या ठिकाणी सुद्धा तातडीने शिक्षक नेमणूक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी आजाद समाज पार्टीचे  गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, अंकुश कोकोडे, आशिष गेडाम, सतीश दुर्गमवार, घनश्याम खोब्रागडे, महेंद्र गेडाम आदी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 17, 2024   

PostImage

शासकीय आदिवासी मुले व मुलीच्या वस्तीगृहात बि.एड व एम.ए च्या …


 

अहेरी :- शासकीय आदिवासी मुले व मुलीच्या वस्तीगृहात बि.एड व एम.ए च्या विद्यार्थी व विद्यार्थीना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी मा. डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत  निवेदनातून केली आहे.

 एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प अहेरी अंतर्गत येत असलेल्या शा आश्राम शाळेतील मुले मुलीचे वस्तीगृह अहेरी आलापल्ली हे मुलचेरा सिरोंचा, भामरागड, एटापल्ली अहेरी या मार्गाच्या मध्यभागी असून उच्च शिक्षण घेण्यातील
पाचही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी येथे येत असतात. 
परंतू शा. आदिवासी वस्तीगृह इयत्ता ८ ते १२ वी पर्यंत वस्तीगृह उर्वरित ५०% जागेसाठी बि.ए बि.कॉम बि.एस.सी २ ते ३ एम.ए. साठी प्रवेश देवून ५०% कोटा पूर्ण करतात.
बि.एड व एम.ए. साठी सर्वाधिक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशित असून सुद्धा वस्तीगृहाला प्रवेश मिळत नाही तसेच आदिवासी विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या शासकीय आश्रमशाळा अनुदाणित आश्रम शाळा एकलव्य आश्रम शाळा नामांकीत शाळा १ ते १२ पर्यंत असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्रवेश देवून उच्च शिक्षण घेण्याच्या बि.ए., बि.कॉम, बि.एस.सी. एम.ए. बि.एड शिक्षण घेण्या-या विद्यार्थाना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे.
 या पाचही तालुक्यामध्ये अहेरीला एकमेव बि.एड महाविद्यालय असून १० ते १५ वर्षात एकही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाही.

 तसे दिनदयाल उपाध्यय स्वयम योजना तालुक्याच्या ठिकाणी लागु होत नाही म्हणून लाभ देत नसल्याने या भागातील नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त, डोंगर-दऱ्यात राहणारे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित विकासापासून कोसो दूर जात आहेत.
 त्यामुळे या भागातील आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ८ ते १२ च्या विद्यार्थाच्या प्रवेश प्रक्रिया राबवून किंवा वस्तीगृहात प्रवेश क्षमता वाढवून बि.ए. बि.कॉम, बि.एस.सी, एम.ए. बि.एड करण्या-या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकिया पूर्ण करून तात्काळ प्रवेश देण्यात यावी अन्यथा प्रकल्प कार्यालय अहेरी समोर धरणे आंदोलण करण्यात येईल.
असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.


PostImage

Vaingangavarta19

July 16, 2024   

PostImage

मार्कंडा (कं) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर


मार्कंडा (कं) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर

संरक्षण भिंत व प्रवेशद्वाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कंन्सोबा) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराची संरक्षण भिंत गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात कोसळली परंतू अजूनही त्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घोट या मार्गाला लागून असणाऱ्या मार्कंडा कंन्सोबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी जिल्हा परिषद ही शाळा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेच्या आवारात अंगणवाडी केंद्र आहे या अंगणवाडी केंद्रात लहान- लहान मुले येतात व शाळेच्या समोर घोट मार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खेळण्याची सुट्टी जेव्हा होत असते तेव्हा विद्यार्थी खेळताना सुसाट रोडपर्यंत धावत सुटतात त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही शाळा सुटण्याच्या वेळेला सर्व विद्यार्थी या मार्गावर येत असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अपघाता होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने सकारात्मक विचार करून या शाळेला लवकरात लवकर संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. 

मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचा वनश्री चापले यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही 

शाळेच्या प्रवेशद्वाराची भिंत बांधण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत तसा प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाकडे पाठविला आहे - बि. टि. घोडाम मुख्याध्यापक


PostImage

Sanket dhoke

July 16, 2024   

PostImage

Police Bharti :- ७००० पदांसाठी राज्यात पुन्हा पोलीस भरती


नागपूर :- राज्यभरात पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई), विभागातील चालकपदासाठी १९ जूनपासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

 हजारातील संख्येने असलेल्या पदांच्या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२४ च्या काळाती अंदाजे ७००० पोलिसांची Police Bharti होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे.

अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे.

 या पार्श्वभूमीवर ज्या शहर-जिल्ह्यामध्ये नवीन Police ठाण्यांची गरज आहे,  क्राईम ब्रॅंच, वाहतूक शाखा, पोलिस शिपाई अशी पदांची कमतरता आहेत, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावेत. त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

राज्याचे गृहमंत्री Devendra Fadnavis  यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनदा पोलिस भरती Police Bharti पार पडली आहे. त्यांच्याच कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतीबंध बदलून नवीन तयार केला आहे.

 वाढत्या गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि Police ठाण्यांची गरज लक्षात घेता त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार मागील अडीच-तीन वर्षात ३० हजार police Bharti झाली आहे. 

राज्यातील १० Police प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे.


तत्पूर्वी, १ सप्टेंबरपर्यंत सध्याची १४ हजार ४७१ पदांची Police Bharti पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आतापर्यंत २५ जिल्ह्यात पोलिस शिपाई, ८ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन Police Bharti ला सुरवात होणार आहे.


रिक्तपदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव

सध्याच्या १७ हजार ४७१ पोलिस पदांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापूर्वी देखील १३ लाख उमेदवारांनी Police भरतीसाठी अर्ज केले होते. 

सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या Police भरतीला सुरवात होवू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा :- Warora News :- वरोरा मध्ये पुन्हा एकदा झाला अपघात

अधिक वाचा :- Warora News :- शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम राबविण्यात आली

अधिक वाचा :- Today Horoscope :- १६ जुलै २०२४ ; मित्रांच्या भेटीगाठी होतील, हा एक छोटा प्रवास संभवतो

अधिक वाचा  :- "भगवान जगन्नाथ ने एहसान चुकाया": ट्रम्प को भगवान जगन्नाथ का आशीर्वाद प्राप्त है।

अधिक वाचा  :- Religious News :- ४६ साल पहले जब पुरी में जगन्‍नाथ मंदिर के कपाट खुले तो क्‍या मिला?

अधिक वाचा :- Chandrapur News :-  रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीलाची धडक २ जनचा जगीच मृत्यु 

अधिक वाचा :- Today Horoscope :- १५ जुलै २०२४ ; एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडेल 

अधिक वाचा :- Entertainment News :- संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याने राधिका-अनंत अंबानींचा लग्नाचा मंडपही गाजवला

अधिक वाचा :- Entertainment News :- अनंत अंबानींनी मित्रांना दिले करोडोंच्या भेटवस्तू, किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

         ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

RK News 24

July 16, 2024   

PostImage

Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत मुलींना मिळणार मोफत उच्च …


Sarkari Yojana 2024: मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. पालकांचे 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि राज्यातील वाणिज्यबरोबरच कला, विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींच्या शुल्काचा 100% टक्के परतावा राज्य सरकार करणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.

 

Sarkari Yojana 2024:  इथे मिळेल लाभ 

ज्या संस्था व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच आहेत, अशा शासकीय महाविद्यालय, श अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशत: अनुदानित व कायम विना अनुदानित, तंत्रनिकेतन विद्यापीठ व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील अभ्यासक्रमामधील मुलींना लाभ मिळेल.

हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशनकार्डधारकांना आता मिळणार 5 लाखाचे मोफत उपचार

 

Sarkari Yojana 2024: यासाठी मिळेल मोफत प्रवेश

उच्च शिक्षण विभागांतर्गत तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय असे अभ्यासक्रम असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत मुलींना मोफत प्रवेश मिळेल.

 

 

Sarkari Yojana 2024: वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी

हे देखील वाचा : Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा घरच्या घरी फक्त एका मिनिटात

ज्या विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे. मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे.

 

Sarkari Yojana 2024: यापूर्वी होती 50% टक्के सवलत

यापूर्वी विद्यार्थिनींना शासनाच्या विविध सवलतीच्या माध्यमातून केवळ 50% टक्केच सवलत देण्यात येत होती. आता मात्र 100% टक्के सवलत देण्याचा निर्णय. घेण्यात आला आहे. त्यामुळे मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे देखील वाचा : Mudra yojana 2024 : जिले में ₹2,494 करोड़ के कर्ज वितरित

 

Sarkari Yojana 2024: आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील विद्यार्थिनीची होणार स्वप्नपूर्ती

मुलींचे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना लाभ मिळणार आहे, अशा विद्यार्थिनींची उच्चशिक्षणाची स्वप्नपूर्ती होणार असल्याची भावना शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Sanket dhoke

July 16, 2024   

PostImage

Warora News :- शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम राबविण्यात …


वरोरा :- शासन निर्देशाप्रमाणे आपल्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात ५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम अंतर्गत दिनांक १३ जुलै २०२४ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन भाऊ मत्ते व त्यांचे मा.सहकारी यांच्या सहकार्याने व त्यांच्या सन्माननीय सहकाऱ्यांसोबत आनंदवन चौक Warora परिसरात सायंकाळी ५ ते ९ सायंकाळी या वेळेत शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम राबविण्यात आली.


यात मोहिमे मध्ये सहा ते चौदा वयोगटातील भटकंती व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले.

त्यांच्या पालकांना सदर बालकांना च्या शाळेत दाखल करणे बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते व मा. त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे केळी देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

परंतु सदर बालकांचे पालक त्यांच्या पाल्यास शाळेत दाखल करण्यास उदासीनता दाखवत होते.


बरेच प्रयत्न करून आणि आरटीई कायद्यानुसार पालकांना आपल्या पाल्यास शाळेत दाखल करणे अनिवार्य आहे, या बाबत कल्पना देऊन सुद्धा सदर बालकांचे पालक त्यांच्या पाल्यांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यास तयार होत नव्हते.

शेवटी न राहवुन पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. लागलीच लगेचच तेवढ्याच तत्परतेने आणि आत्मीयतेने वरोरा ठाण्याचे ठाणेदार साहेब आपल्या ताफ्यानीशी सदर ठिकाणी हजर झाले.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते, माननीय ठाणेदार साहेब Warora व त्यांचे मा. सहकारी ,मा. गटशिक्षणाधिकारी श्री ज्ञानेश्वर चहारे साहेब साहेब, पं.स.वरोरा ,मा.से.नि. शिविअ श्री नामदेव राऊत साहेब,मा.मु.अ.आश्रम शाळा सुमाठाना,मा.स.शि. श्री अजय मुडपल्लीवार सर,साधनव्यक्ती श्री खुशाल गटसाधन केंद्र Warora 

तसेच वरोरा येथील नागरिक यांच्या उपस्थितीत सदर बालकांच्या पालकांना शाळेत दाखल करणे बंधनकारक आहे व कायद्याने किती बंधनकारक आहे याबाबत आपुलकीने मार्गदर्शन करण्यात आले.

शेवटी सर्वांच्या उपस्थितीत सदर बालकांचे पालक आपल्या पालकांना नजीकच्या दाखल करण्यास तयार झाले.
जवळपास सायंकाळी साडेनऊच्या सुमारास उपरोक्त सर्वांच्या उपस्थितीत सदर बालकांना आश्रम शाळा सुमठाणा येथे दाखल करण्यात आले.

अधिक वाचा :- Today Horoscope :- १६ जुलै २०२४ ; मित्रांच्या भेटीगाठी होतील, हा एक छोटा प्रवास संभवतो

अधिक वाचा  :- "भगवान जगन्नाथ ने एहसान चुकाया": ट्रम्प को भगवान जगन्नाथ का आशीर्वाद प्राप्त है।

अधिक वाचा  :- Religious News :- ४६ साल पहले जब पुरी में जगन्‍नाथ मंदिर के कपाट खुले तो क्‍या मिला?

अधिक वाचा :- Chandrapur News :-  रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीलाची धडक २ जनचा जगीच मृत्यु 

अधिक वाचा :- Today Horoscope :- १५ जुलै २०२४ ; एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडेल 

अधिक वाचा :- Entertainment News :- संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याने राधिका-अनंत अंबानींचा लग्नाचा मंडपही गाजवला

अधिक वाचा :- Entertainment News :- अनंत अंबानींनी मित्रांना दिले करोडोंच्या भेटवस्तू, किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

         ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Vaingangavarta19

July 15, 2024   

PostImage

शाळेची वाट झाली बिकट ,वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत नागेपल्लीचा दुर्लक्ष


शाळेची वाट झाली बिकट ,वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत नागेपल्लीचा दुर्लक्ष

आलापल्ली-ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. शाळे समोरील रस्त्यावर केरकचरा,असून पावसामुळे नाल्या तुंबून रस्त्यावर पाण्याचे डबके तसेच केरकचरा रस्त्यावर आला आहे. आणि सर्वत्र चिखल झाला आहे. या चिखलातून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना मात्र कसरत करावी लागत आहे.

नाली व गटारी पावसाच्या पाण्यानी भरल्याने त्यातील दुर्गंधी युक्त व घाण पाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्यात मिश्रित होत आहे. सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. आता कुठे त्या पूर्ववत व नियमित सुरू झाल्या आहेत.महिन्याभरापूर्वी बऱ्याच कालावधीनंतर शाळेची घंटा वाजली. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत, पण चिखलाचा रस्ता आडवा येतोय. या रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते.

शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून नागरिकांना त्याचप्रमाणे खास करून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.


PostImage

Chandrawar Media Service

July 14, 2024   

PostImage

मध्यप्रदेश के 55 पीएम कॉलेज ऑफ एक्सीलेंस में एक महाविद्यालय …


कॉलेज को वाणिज्य व प्राणिशास्त्र विषय में रिसर्च की मिली स्वीकृति

सांसद श्रीमती भारती पारधी ने किया पीएम कॉलेज ऑफ एक्सीलेंस शासकीय जटाशंकर त्रिवेदी स्नातकोत्तर महाविद्यालय का उद्घाटन

देश के गृह मंत्री श्री अमित शाह ने रविवार को इंदौर से प्रदेश के 55 पीएम कॉलेज ऑफ एक्सीलेंस का उद्घाटन किया है। इन 55 महाविद्यालयों में बालाघाट के शासकीय जटाशंकर त्रिवेदी स्नातकोत्तर महाविद्यालय को भी पीएम कॉलेज ऑफ एक्सीलेंस में अपग्रेड करते हुए सौगात मिली है। बालाघाट में पीएम कॉलेज ऑफ एक्सीलेंस शासकीय जटाशंकर त्रिवेदी स्नातकोत्तर महाविद्यालय व कॉलेज के लिए बस सेवा, भारतीय ज्ञान परम्परा एवं विद्या वन प्रकोष्ठ तथा मप्र ग्रंथ अकादमी का उद्घाटन सांसद श्रीमति भारती पारधी ने किया। इस दौरान सांसद श्रीमती पारधी ने विद्यार्थियों को आशीर्वचन के रूप में सम्बोधित करते हुए कहा कि विषय में योग्यता विकसित करेंगे तो आगे विकास की राह पर कदम बढ़ेंगे। भगवान ने किसी भी सफल व्यक्ति को अलग नहीं बनाया, सब एक जैसे है। फर्क सिर्फ लक्ष्य निर्धारण और उनको पूरा करने के प्रति उनकी लगन का है। साथ ही उन्होंने कहा कि प्रदेश में विकास के लिए कई प्रयोग हुए है। जो सफल भी है। उनमें से एक प्रयोग सीएम राइज स्कूल का था। जो आज बहुत सफल है। खासकर बालाघाट के सीएम राइज स्कूल की बात की जाए तो यह प्रदेश के मॉडल स्कूल के रूप में है।

सबके जीवन उतार चढ़ाव और संघर्ष से भरे हैं

महाविद्यालय के उद्घाटन कार्यक्रम की मुख्य अतिथि श्रीमती पारधी ने कहा कि इस हॉल व बाहर पूरी दुनिया में जो भी लोग है। उन सभी का जीवन उतार चढ़ाव और संघर्ष से भरें है। उनके लक्ष्य के प्रति साधना ने उन्हें सफलता के मुकाम तक पहुँचाया है। उन्होंने जिले के विकास के सम्बंध में कहा कि विकास में सबके सहयोग की आवश्यकता होगी। सबके सहयोग से निरंतर विकास की ओर बढ़ेगी।

विधायकों ने भी दी शुभकामनाएँ

कार्यक्रम के दौरान मौजूद जिले के विधायकों ने भी महाविद्यालय के पीएम कॉलेज और एक्सीलेंस में  चयन होने पर शुभकामनाएं दी। बालाघाट विधायक श्रीमति अनुभा मुंजारे ने विद्यार्थीयो से कहा कि आप सबको शिक्षा के प्रति आकर्षित होना होगा। जीवन में कुछ पाने के लिए अपने-अपने लक्ष्य के साथ ही शिक्षा को अपने अंदर उतारना होगा। लांजी विधायक श्री राजकुमार कार्रहे ने अपने महाविद्यालयीन दिनों को याद करते हुए लक्ष्य के प्रति उनकी ललकता के उदारहण प्रस्तुत किये। उन्होंने वर्ष 2012 में बनाये गए विजिटिंग कार्ड एक विद्यार्थी से पढ़ाकर सबको लक्ष्य के प्रति रोमांचित किया।

विद्यार्थियों के लिए प्रोजेक्ट व फंडिंग की व्यवस्था कटंगी विधायक करेंगे

कार्यक्रम के दौरान कटंगी विधायक श्री गौरव पारधी ने सम्बोधन में विद्यार्थियों से कहा कि अब पीएम कॉलेज ऑफ एक्सीलेंस शासकीय जटाशंकर त्रिवेदी स्नातकोत्तर महाविद्यालय में वाणिज्य व प्राणिशास्त्र विषय मे रिसर्च शुरू होंगे। इसके लिए ऐसे विद्यार्थियों के लिए उनके पास प्रोजेक्ट भी है। साथ ही प्रोजेक्ट पूरा करवाने के लिए फंडिंग की भी व्यवस्था स्वयं करेंगे। कार्यक्रम के दौरान नपा अध्यक्ष श्रीमती भारती ठाकुर ने भी सम्बोधित किया। साथ ही जनभागीदारी समिति की अध्यक्ष श्रीमती मौसम हरिनखेड़े ने भी सम्बोधित किया। साथ ही उद्योगपति व महाविद्यालय की भूमि दान करने वाले श्री जटाशंकर त्रिवेदी के पौत्र श्री किरनभाई त्रिवेदी ने भी सम्बोधित कर सबको पीएम कॉलेज ऑफ एक्सीलेंस बनने की बधाई दी। उन्होंने इस क्षण को परिवार और जिले के लिए गौरव का दिन बताया। कार्यक्रम का स्वागत सम्बोधन प्राचार्य श्री पीआर चन्देलकर ने दिया। कार्यक्रम में अपर कलेक्टर श्री जीएस धुर्वे, एसडीएम श्री गोपाल सोनी, जिला परिवहन अधिकारी श्री अनिमेष गढ़पाले व कॉलेज का स्टॉफ एवं बड़ी संख्या में विद्यार्थी मौजूद रहें।


PostImage

Sanket dhoke

July 14, 2024   

PostImage

Warora News :- वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील येजा करणाऱ्या विद्यार्थांच्या …


Warora :- वरोरा व भद्रावती तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवेत होणाऱ्या समस्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने  १२ जुलै रोज शुक्रवारला वरोरा Warora बस आगर प्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना सतावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.

भद्रावती व वरोरा येथे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून दररोज येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बससाठी बरेच ताटकळत राहावे लागते. तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबले जातात.

 यासारख्या समस्येबाबत बस आगर प्रमुखांना निवेदन देऊन सुद्धा समस्यांचे निराकरण होत नसल्याने भाजपचे प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष व वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने येथील बस आगर प्रमुख पुण्यवर्धन वर्धेकर यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्येबद्दल विस्तृत चर्चा केली.

ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरता बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने आगार प्रमुखांना केली.

गावात शिक्षणाची पुरेशी सोय नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागते.मात्र त्यांना बसने प्रवास करत असताना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. 

काही गावात बसच जात नसल्याने विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करत मोठी कसरत करावी लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही तर बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबणे आदी समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांची सोय करण्याची विनंती शिष्टमंडळाने आगार प्रमुखांना करत विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.

सध्या वरोरा बस आगारात ३५ बसेस असून त्यापैकी नऊ बसेस पंढरपूर यात्रेसाठी देण्यात देण्यात आल्याने समस्या निर्माण निर्माण झाली आहे. २१ जुलै नंतर यावर आपण योग्य नियोजन करून तोडगा काढण्याची माहिती यावेळी बस आगर प्रमुख पुण्यवर्धन वर्धेकर यांनी शिष्टमंडळाला दिले दिली.

भाजप प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळात वरोरा Warora येथील आशिष ठाकरे, खुशाल बावणे, बाबू शेख, आतिश बोरा,कादर शेख तर भद्रावतीचे रवी पवार, अरुण मेदमवार, मनोज शेंडे, सुरेंद्र घुगल, शैलेंद्र मेश्राम, रोहित पाराशर आदींचा समावेश होता.

 

अधिक वाचा :- Warora News :- वरोरा पोलीस ठाण्यातील शिपायाने केले विष प्राशन

अधिक वाचा :- Chandrapur News :- माता महाकाली मंदिराचा विकास होणार, आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश

अधिक वाचा :- Today Horoscope :- १४ जुलै २०२४ ; विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात लाभ, शुभ दिवस आहे

अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहरात चोरीचे सत्र सुरूच, लखोचे सोने चांदी आणि रोख रक्कम केली लंपास 

अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित ! नोटीस येताच कार्यवाही 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

         ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.