ProfileImage
880

Post

6

Followers

3

Following

PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

दिल्ली विधानसभा निवडणूक: अरविंद केजरीवाल अन् मनिष सिसोदियांना पराभवाचा धक्का


Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (Atishi Marlena) विजयी झाल्या आहेत. 

 

 

 

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय. 

 

मनीष सिसोदियांचा पराभव

तर, जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाने माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून तरविंदर सिंग मारवाह (Tarvinder Singh Marwah) आणि काँग्रेसकडून फरहाद सुरी निवडणूक रिंगणात उतरले होते. मनीष सिसोदिया हे पहिल्यांदाच जंगपुरा येथून मैदानात उतरले होते. याआधी ते पटपडगंजमधून निवडणूक लढवत होते. यावेळी पक्षाने शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांना पटपडगंजमधून उमेदवारी दिली होती. जंगपुरा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. या जागेवर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी 1844 मतांनी विजय मिळवला आहे.  

 

 

भाजपची वाटचाल बहुमताच्या दिशेने

दरम्यान, सध्याच्या कलानुसार भाजपने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आये . आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्लीत भाजप 48, आप 22 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. त्यामुळे दिल्लीत आपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

लग्न झालेल्या वहिनीला घेऊन पळाला पण...


Crime News : अनैतिक संबंधांचे प्रकार अलीकडे खूप घडू लागले आहेत. हे प्रकार समाजस्वास्थ्य बिघडल्याचं लक्षण आहे. तसंच, त्यातून कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला 28 वर्षांची असून, तिचे पतीशी संबंध बिघडले. त्यानंतर ती नितनवास गावात राहणाऱ्या रामराज केवट याच्या संपर्कात आली. रामराज तिला आपल्याबरोबर तमिळनाडू राज्यात कोईमतूरमध्ये घेऊन गेला. तिथे ते दोघं जण बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले; मात्र त्यानंतर तो अचानक तिला तिथेच ठेवून आपल्या घरी परतला. येताना तो तिचा मोबाइल फोनही आपल्याबरोबर घेऊन आला. पीडित महिलाही नंतर त्याला शोधत त्याच्या घरी आली. तेव्हा त्याच्या घरच्यांनी तिला पकडून ठेवलं. मध्य प्रदेशातल्या श्योपूर इथल्या वीरपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली. त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी या घटनेबद्दल माहिती दिली.

 

आरोपी रामराज याची पत्नी आणि त्याच्या अन्य कुटुंबीयांनी पीडित महिलेला पकडून ठेवलं. तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला मारून टाकण्याचं नियोजनही ते करू लागले. नशिबाने तेवढ्यात त्या महिलेच्या मुलाने प्रसंगावधान राखून 100 नंबर डायल केला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला आरोपींच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर चौघांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. त्या पीडित महिलेने असा आरोप केला आहे, की आरोपी तिला मारून तिचा मृतदेह चंबळ नदीत फेकण्याचं प्लॅनिंग करत होते.

 

 

 

पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची केस दाखल केली नाही; मात्र त्याच्या कुटुंबातल्या तीन महिलांसह चौघांवर केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं, की आरोपीच्या कुटुंबातल्या महिलांनी पीडितेला मारहाण केली आहे. तसंच, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मारहाणीचा एक व्हिडिओही मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपींवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असून, अधिक तपास सुरू आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

सहायक पोलीस निरीक्षकाने केली २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी


नागपूर : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रार अर्जावर गैरअर्जदारावर गुन्हा दाखल न करणे आणि प्रकरण मिटवून देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. परमानंद दादाराव कात्रे असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कवठा गावातील जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुनंदा ठाकरे यांनी केला होता. त्या जमिनीचा संयुक्त मालक असलेल्या गैरअर्जदाराने जमिनीच्या विक्रीपत्रात फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या संदर्भात सुनंदा ठाकरे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तो तक्रार अर्ज कोराडी ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे यांच्याकडे आला होता. त्यांनी त्यांच्या लेखनिकाला अर्ज निकाली काढण्यासाठी गैरअर्जदाराला पोलीस ठाण्यात बोलविण्यास सांगितले होते.

 

 

आठवडाभरापूर्वी तो युवक पोलीस ठाण्यात आला. सहायक निरीक्षक (एपीआय) प्रेमानंद कात्रे यांनी ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल न करणे आणि तपासात सहकार्य करणे तसेच गुन्हा दाखल करण्याऐजवी तक्रार करणाऱ्या सुनंदा ठाकरे यांचीच समजूत घालून तक्रार अर्ज मागे घेण्यास लावण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी केली. त्या युवकाने लाचेची रक्कम देण्यास नकार दिला. तसेच प्रकरण आपसातील असून आम्ही गावातच सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने सोडवितो, असे सांगितले. त्यामुळे एपीआय प्रेमानंद हे त्या युवकावर चिडले. त्याला गुन्हा दाखल करुन लगेच अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

 

 

 

कोराडी पोलीस ठाण्यातच अटक

सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे हे कोराडी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहेत. त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार युवकाने एसीबी कार्यालयात तक्रार केली. बुधवारी दुपारी कोराडी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार युवकाकडून एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी दोन लाख रुपये स्विकारताच एसीबीने त्यांना अटक केली. लाचेची रक्कम जप्त करुन कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीबीने एपीआय कात्रे यांना कोराडी पोलीस ठाण्याच्याच कोठडीत डांबले. त्यांच्या घरी झडीत घेऊन काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न


गडचिरोली : दारुच्या आहारी गेलेल्या पतीने विद्युत खांबावर आकडा टाकून घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नी वाचली. चामोर्शी तालुक्याच्या नागपूर (चक) या गावात ५ फेब्रुवारीला हा थरार घडला. याप्रकरणी चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला असून पती फरार आहे. आशा माणिक सोयाम (४०) असे त्या होमगार्ड महिलेचे नाव आहे. त्या माहेरी नागपूर (चक) येथे वास्तव्यास आहेत.

 

पती संतोष मारोती शेडमाके (४५,रा. धानापूर ता. गोंडपिपरी जि.चंद्रपूर) हा मजुरी काम करतो. गेल्या काही दिवसांपासून तो दारुच्या आहारी गेलेला आहे. यातून तो आशा सोयाम यांच्याशी सतत वाद घालायचा.

 

दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्या घरी झोपलेल्या होत्या. पहाटे दोन वाजता संतोष शेडमाके हा घराच्या छतावर चढला. त्याने विद्युत खांबावरुन आकडा टाकून वीज घेतली व लाकडी काडीच्या सहाय्याने कवेलू बाजूला सारुन आशा यांना शॉक दिला. त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले असता कवेलून संतोष डोकावल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता त्याने धूम ठोकली. आरोपी पती संतोष हा सतत दारूच्या नशेत असतो. यातूनच दोघात खटके उडायचे. यापूर्वीही त्याने अशाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.

 

 

याबाबत आशा सोयाम यांनी फिर्याद दिली. त्यावरुन चामोर्शी ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०९, ३५१ (२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार असून तपास उपनिरीक्षक सुमेध बनसोडे करत आहेत.

 

यापूर्वीही केला प्रयत्न

२९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष शेडमाके याने घराच्या समोरील चाफ्याच्या झाडाला डिझेल टाकून आग लावली, यावेळी आशा सोयाम यांनी आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. याबाबत त्यांनी तेव्हाच पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आशा सोयाम यांच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले, तर संतोष शेडमाके याने पत्नीशी फारकत घेतली. २०१५ पासून या दोघांनी पुनर्विवाह केला व एकत्रित राहू लागले. मात्र, नंतर संतोषला व्यसन जडले व त्यातून दोघांत खटके उडू लागले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

गडचिरोली सीमेवर आला 'बर्ड फ्लू'


 

गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली गावातील गावठी कोंबड्यांना बर्ड फ्लू या आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. बर्ड फ्लूचा जिल्ह्यातही शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

तीन वर्षापूर्वी गडचिरोली शहरात बर्ड फ्लू या आजाराने शिरकाव केला होता. त्यावेळी आरोग्य यंत्रणा व पशुसंवर्धन विभागाची चांगलीच धावपळ झाली होती. गडचिरोली शहरातील अनेकांच्या घरी असलेले पाळीव पक्षी मारून टाकण्यात आले होते. तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

ब्रह्मपुरी तालुक्यातूनच कोंबड्यांचा पुरवठा

गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील फार्मवरून बॉयलर व कॉकलेर कोंबड्यांचा पुरवठा होतो. मांगली हे गाव ब्रह्मपुरी तालुक्यातच आहे. या रोगाचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

लागण झालेल्या पक्ष्यांमध्ये दिसतात ही लक्षणे

 

अंडी उत्पादन कमी होणे, शिंकणे व खोकणे, डोळ्यातून पाणी येणे, डोक्यावर सूज येणे, पंख नसलेला भाग निळसर पडणे, भूक मंदावणे, उदासीनता आदी लक्षणे लागण झालेल्या पक्ष्याला दिसून येतात. तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

 

असा होतो संसर्ग

 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बर्ड फ्लू हा कुक्कुट पक्ष्यांना विषाणूमुळे होणारा रोग असून, संसर्गजन्य आहे. यात सर्वात संसर्गजन्य 'स्ट्रेन एच ५ एन १' आहे. बर्ड फ्लू विषाणूचा प्रसार एका कुक्कुट पक्ष्यातून दुसऱ्या कुक्कुट पक्ष्यांमध्ये मुख्यतः हवेतून पसरतो.

 

 

बर्ड फ्लूबाबत पशुधन विकास अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. नागरिकांनी सुध्दा सहकार्य करावे.

अजय ठवरे,जिल्हा पशुधन विकास अधिकारी

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

आंबेशिवणी शेतशिवारातील कारवाई जखमी जी-18 वाघाचा केला सुरक्षित रेस्क्यू


 

गडचिरोली, ब्युरो. गडचिरोलीवनविभागात मागील अनेक महिन्यांपासून दहशत माजविणारा जी-18 नावाचा वाघ जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच, शुक्रवारी (दि.7) सकाळच्या सुमारास वनविभाग व आरआरटी पथकाने घटनास्थळ गाठित वाघाचा सुरक्षित रेस्कू केला. जखमी अवस्थेतील वाघाला उपचारार्थ चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले आहे. सदर यशस्वी रेस्कू आंबेशिवणी शेतशिवारात करण्यात आला. अमिर्झा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या आंबेशविणी शेतशिवारात जी-18 आष जखमी अवस्थेत फिरत असल्याचा माहिती वनकर्मचाऱ्यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार या जखमी वाघाच्या हालचालीवर वनकर्मचाऱ्यांनी करडी नजर ठेवली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास वनविभाग व आरआरटी पथकाने संबंधित घटनास्थळ गाठित जखमी वाघास सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात कैद केले. जखमी वाघाची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे तपासणी करुन पुढील उपचारार्थ चंद्रपूरला रवाना करण्यात आले. वाघ जखमी होण्याचे निश्चित कारण वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी टिटीटी चंद्रपूर यांच्या अंतिम अहवालानंतरच वाघाच्या जखमीचे कारण स्पष्ट होणार असल्याचीमाहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीणा, सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनात चातगाव वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांचेसह आरआरटी पथकाने पार पाडली.

 

गडचिरोली वनविभागात घेतले चौघांचे बळी?

 

आंबेशिवणी शेत परिसरात जखमी अवस्थेत रेस्क्यू करण्यात आलेल्या जी-18 या वाधाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केले असता, या जंगल परिसरात 3 ते 4 नागरीकांचे बळी घेणारा हाच तो वाघ असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षक शर्मा यांना विचारणा केली असता, नागरीकांचे बळी घेणारा तो हाच वाघ असावा अशी शंका आहे. मात्र खात्रिशीर सांगता येणार नसल्याचे सांगितले.

 

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

हातभट्टीवर पोलिसांची धाड; हजारोंचा माल जप्त


 

 

अलोणी शेतशिवारात डीबी पथकाची कारवाई

गडचिरोली, ब्युरो, गडचिरोली पोलीस ठाणे हद्दीतील अलोणी गावातील शेतशिवारात, मोहफुलाची दारूची भट्टी बेकायदेशीरपणे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच डीबी पथकाने गुरुवारी (दि.6) धाड टाकून दारुभट्टी उच्वस्त करीत 36 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी अरविंद यशवंत मडावी रा. अलोणी याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलोणी गावातील शेत शिवारालगत असलेल्या नाल्याजवळ मोहफुलाची दारु काढल्या जात असल्याची माहिती गडचिरोली शहर पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने सदर शेतशिवारात धडक दिली. यावेळी एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत निदर्शनास आली. अधिक तपासणी केली असता याच आवारात दारूची भट्टी आढळून आली. सदर दारुभट्टी उध्वस्त करीत पोलिसांनी घटनास्थळावरुन सात ड्रममध्ये भरलेला 350 किलो अंदाजे किंमत 24 हजार रुपये किंमतीचा मोहफुल सडवा, 12 हजार रुपये किमतीची 40 लिटर मोहाची दारू, असा एकूण 36 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी अरविंद मडावी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, वृषाली चव्हाण यांनी पार पाडली.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday

PostImage

भरधाव बोलेरोच्या धडकेत दुचाकीवरील शिक्षक ठार


 

गडचिरोली, ब्युरो. भरधाव वेगात असलेल्या बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील शिक्षक ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.6) रात्री 8 वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ घडली. सदानंद मष्णाजी अब्दागिरे (41) मुळ गाव जि. नांदेड (हल्ली मु. हनुमान वार्ड, चामोर्शी) असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक शिक्षक सदानंद अब्दागिरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील गेवरा बु. येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास एम. एच. 26 ए. एल. 0710 क्रमांकाच्या

 

दुचाकीने गडचिरोली येथून चामोर्शीकडे जात होते. दरम्यान गडचिरोली चामोशी मार्गावरील टोल नाक्याजवळ भरधाव वेगात येत असलेल्या एम. एच. 40 एसी 8140 बोलेरोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. अपघात प्रकरणी बोलेरो वाहन चालक राजकी रोशन शेख (37) रा. गणेश कॉलनी, गडचिरोली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बंडू मारबोनवार करीत आहेत.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 6, 2025

PostImage

ट्रॅक्टर उलटून 1 ठार; 5 जखमी


 

• गडचिरोली, ब्युरो. मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवित असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पुलाखाली कोसळल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर पाचजण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 2) सायंकाळच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावालगत घडली. पवन वनकर (35, रा. उडेरा) असे मृताचे नाव आहे. सदर ट्रॅक्टर एका शिक्षकाची असून, घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटूनही संबंधित ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा नोंद न झाल्याने प्रकरण दडपडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

 

एटापल्ली येथे शिक्षकी पेशात कार्यरत एक शिक्षक विविध व्यवसाय करीत आहे. याच शिक्षकाच्या मालकीचे ट्रॅक्टर घेऊन मद्यधुंद अवस्थेत असलेला ट्रॅक्टर चालक रविवारी सायंकाळच्या सुमारास उडेरा गावाकडे जात होता. यावेळी

 

ट्रॅक्टरमध्ये उराडी येथीलच पवन वनकर व इतर पाच बालके बसली होती. दरम्यान ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उडेरा गावालगतच्या पुलाखालून सदर ट्रॅक्टर उलटल्या गेले. ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. यात पवन वनकर याचा मृत्यू झाला. तर जखमी पाच बालकांना तत्काळ हेडरीच्या रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र यातील दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. तर तीन जखमींवर एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. एटापल्ली पोलिसांनी घटनस्थळ गाठित पंचनामा करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर जखमींची नावे कळू शकले नाही. विशेष म्हणजे अद्यापही ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद न झाल्याने प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 6, 2025

PostImage

माझ्याशी बोलली नाही, तर बघ तुझे हाल करतो' युवतीला आधी मेसेज, नंतर मारहाण, विनयभंगाचा गुन्हा


 

गडचिरोली : माझ्याशी बोलली नाहीस,तर बघ तुझे काय हाल करतो, तुला चपलेले मारहाण करीन, मारून टाकीन, असे मेसेज धाडून धमकी देणाऱ्या तरुणाने युवतीला मैदानावर गाठून मोबाइल हिसकावून नेला. मोबाइल आणण्यासाठी ती त्याच्या खोलीवर गेली असता, त्याने तिला बेदम मारहाण केली. शहरातील रामनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी फेब्रुवारीला गडचिरोली ठाण्यात विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

 

पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची या तरुणाशी चार वर्षापासून ओळख असून, दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. मात्र, अनेकदा तरुण तिच्याशी वाद घालायचा. १ फेब्रुवारी रोजी युवतीने त्याचा क्रमाक ब्लॉक केला, त्यानंतर त्याने वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला. शिवाय टेक्स्ट मेसेज पाठवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ४ फेब्रुवारी रोजी युवती नित्याप्रमाणे सकाळी सहा वाजता जिल्हा क्रीडा संकुलावर सरावासाठी गेली असता, तेथे येऊन त्याने तिचा मोबाइल हिसकावून नेला. उपनिरीक्षक माधुरी मिसाळ तपास करीत आहेत.

 

 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय युवती व आरोपी ३३ वर्षीय तरुण हे दोघेही कोरची तालुक्यातील असून, नातेवाईक आहेत.

 

● युवती शहरातील लांझेडा रोडवरील आदिवासी वसतिगृहात राहून एका खासगी महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेते व पोलिस भरतीचीही तयारी करते, तर आरोपी देखील पोलिस भरतीची तयारी करतो.

 

कोवेंनी दिला धीर

 

पीडित युवती मानसिक तणावात होती. माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या डॉ. सोनल कोवे यांनी वसतिगृहात धाव घेतली. पीडितेला उपचारासाठी साहाय्य केले. डॉ. सोनल व डॉ. चेतन कोवे यांनी तिला धीर दिला. पो. नि. रेवचंद सिंगनजुडे यांनी पीडितेचे समुपदेशन करून संवेदनशीलपणे प्रकरण हाताळले.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 5, 2025

PostImage

वैरागड येथे सट्टाचालक जेरबंद, 1 जण पसार ,आरमोरी पोलिसांनी केली कारवाई


 

आरमोरी, (ता.प्र). आरमोरी तालुक्यातील वैरागडमध्ये खुलेआम ऑनलाइन सट्टा सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी छापा टाकून सट्टेबाजी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली, तर दुसरा आरोपी पळूनजाण्यात यशस्वी झाला. सदर कारवाई सोमवारी (दि.3) सायंकाळच्या सुमारास पार पडली आहे. यात 12 हजारांचा मद्देमाल जप्तकरण्यात आला. अंकित माधव पिठाले (24) रा. वैरागड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून शरद मेश्राम (40) रा. काळागोटा असे फरार आरोपीचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील वैरागड येथे अवैधरित्या ऑनलाईन सट्टा सुरु असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. 

 

या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सोमवारी, सायंकाळच्या सुमारास मच्छीमार सोसायटीमागील खुल्या परिसरात चालणाऱ्या ऑनलाईन सट्ट्यावर धडक कारवाई केली. यावेळी पथकाने अंकित पिठाले यास अटक केली. त्याच्याजवळून रोख रक्कम, मोबाइलसह अन्य साहित्य असा एकूण 12 हजार 78 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्य एक आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई आरमोरी पोलिस करीत आहेत.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 5, 2025

PostImage

गडचिरोली - रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज . प्रा. मुनिश्वर बोरकर


आरमोरी: रिपब्लिकन चळवळीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी साबुत ठेवणे काळाची गरज आहे. यापूर्वी रिपाईचा दबदबा होता आताच्या रिपब्लिकन चळवळीच्या अनेक गटातटामुळे रिपाई नष्ठ होणार काय ? अशी भिती वाटू लागली आहे. रिपाईला संपविण्याचे काम भाजप कांग्रेसवाले करीत आहेत. दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत . रिपाई कडून फक्त मताचा जोगवा मागतात व नंतर रिपाईला दुय्यम वागणुक देतात तेव्हा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टीला बळ देऊन रिपाई मजबुत करण्याचा प्रयत्न करूया तेव्हा तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्तांनी एकजुटीने रिपब्लिकन पक्ष बाचविणे काळाची गरज आहे असे आपल्या मार्गदर्शनात प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले . 

 

 

आरमोरी तालुक्यातील डॉ आंबेडकर भवन येथे पार पडलेल्या रिपाई मेळाव्याचे अध्यक्ष रिपाईचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली रिपाई जिल्हाध्यक्षगोपाल रायपूरे चंद्रपूर , नासीर ज्जुमन शेख , पक्ष प्रवक्ता अशोक शामकुळे , रिपाई महिला आघाडीच्या नेत्या अँड. प्रियंका चव्हाण बल्लारसा,उपाध्यक्ष सोनू साखरे ,महासचिव परशराम बांबोळे , उपाध्यक्ष मारोती भैसारे ' कुरखेडा तालुकाध्यक्ष सुनिल सहारे, मोहनदास मेश्राम ,सचिन किरणापूरे , टि. एम . खोब्रागडे,आरमोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे ' देवेंद्र बोदेले ' शामराव सहारे ,गडचिरोली तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम ' आदिची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी गोपाल रायपूरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जोमाने रेटून रिपाईची ताकद वाढविण्याचे काम सर्वांनी एकजुटीने केले पाहिजे तेव्हा रिपाईला जुने दिवस दिसतील असे गोपाल रायपूरे यांनी सांगितले. याप्रसंगी ॲड . चव्हाण मॅडम नासिर शेख यांचेही समायोचित भाषणे झालीत.

 

 याप्रसंगी मुरलीधर भानारकर यांनी पक्ष कार्यकर्ता जास्त समाजकारण व बाकी राजकारण करीत गोरगरीबांच्या समस्या जाणुन घेऊन त्याचे प्रश्न सोडविण्यास नेहमीच आम्ही तत्पर असतो.कार्यक्रमाचे संचलन विजय शेंन्डे तर आभार शामराव सहारे यांनी मानले. कार्यक्रमास ' हर्ष साखरे , दिनेश वनकर ' युवराज धंदरे ' किशोर टिचकुले ,' बाळू ढेभुर्ण , राजाराम लोखंडे , जर्नाधन राऊत , सुरेश बोरकर, हेमंत डोंगरे , मनोहर अंबादे ' आबाजी शेन्डे ' टिकाराम ढेभुर्ण . हिरामण इंदुरकर , चोखोबा ढवळे , सतिश ढेभुर्ण ' डाकराम ठेभुर्णे ,निर्मला रामटेके , वर्षा ठवरे ' सुनिता इंदुरकर , भाग्यश्री चौधरी , ताराबाई भानारकर , वंदना चव्हाण ,आदि सहीत आरमोरी तालुका परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थिती होते.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 1, 2025

PostImage

मोदी सरकारची नक्षलवाद्यावर सर्जिकल स्ट्राइक.....8 नक्षली ठार


रायपूर:

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात शनिवारी मोठी चकमक झडली आहे. विजापूरच्या तोडका भागात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. अजूनही चकमक सुरूच असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील ही गेल्या काही दिवसातील मोठी कारवाई आहे. या कारवाईत आतापर्यंत 8 नक्षली ठार झाले आहेत. त्यांचा हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.  

 

 

तोडका परिसर हा विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. जिथे ही चकमक सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शिवाय आठ नक्षलवाद्यांचे मृतदेही जवानांनी ताब्यात घेतले आहेत. या हल्लावेळी नक्षलवाद्यांनी अधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने जवानांवर हल्ला केला होती. ही शस्त्रेही आता ताब्यात घेण्यात आली आहेत. 

 

 

 

ही चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यातील ही जवानांची नक्षलवाद्यां विरोधातील मोठी कारवाई आहे. छत्तीसगडमध्ये नक्षली कारवायाही वाढल्या होत्या. त्यानंतर जवानांनी त्यांना पायबंद घालण्यात यश मिळवलं होतं. काही नक्षलींनी गेल्या काही दिवसात आत्मसमर्पण ही केलं आहे. ज्यांनी केले नाही त्यांना जवानांनी यमसदनी धाडलं आहे. दरम्यान या कारवाईत आणखी नक्षली ठार झाले असावेत असा अंदाज आहे. 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 31, 2025

PostImage

मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी हे काम करा


ज्यांना मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी दारू प्यावीशी वाटते त्या वेळेस दोन-तीन कागदी लिंबाचा केवळ रस, साखर, पाणी किंवा मीठ न मिसळता प्यावा. मग खुशाल दारू प्यावयास घ्यावी. बहुधा दारू घशाखाली उतरत नाही. कारण दारू व आंबट लिंबू रस यांचा परस्परविरोध आहे. ज्यांना असे करावयाचे नाही त्यांच्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींनी या दारुड्या माणसाच्या जेवणात कोशिंबीर, चटणी, रायते, भाज्यांत सायट्रिक अ‍ॅसिड किंवा लिंबूक्षार नावाचे साखरेच्या कणासारखे केमिकल मिसळतात, ते चार-पाच कण टाकावेत. ते फार आंबट असतात. त्याची किंमत नाममात्र असते. कोणत्याही केमिस्टकडे किंवा आयुर्वेदीय औषधी उत्पादकांकडे मिळतात. मी विनामूल्य देतो.

 

 

तूप खा आणि या रोगांना दूर ठेवा

भूक लागत नाही, पचन होत नाही म्हणून सबब सांगून जे मद्यापान करू इच्छितात त्यांना कुमारीआसव, द्राक्षारिष्ट, पिप्ललादि काढा, पंचकोलासव असे काढे करून पहावे. फायदा निश्चित होतो. जी मंडळी झोपेकरिता किंवा चिंता दूर व्हावी म्हणून किंवा दु:ख विसरण्याकरिता मद्यप्राशन करू इच्छितात त्यांनी शतधौत घृत झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना जिरवावे; नाकात दोन थेंब टाकावेत. स्वत:च्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणताही विषय किंवा वर्तमानपत्रातील बातमी डोळ्यांसमोर आणावी, चटकन झोप लागते. गरज पडली तर निद्राकर वटी सहा गोळ्या झोपताना घ्याव्यात. शांत झोपेकरिता आणखी दोन उपाय म्हणजे सायंकाळी लवकर व कमी जेवण घ्यावे. जेवणानंतर किमान वीस ते तीस मिनिटे फिरून यावे.

 

‘एकच प्याला’ नाटक लिहिणारे महान मराठी साहित्यिक श्रीराम गणेश गडकरी, महात्मा गांधी, संत विनोबा, संत गाडगेमहाराज यांना प्रणाम!


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 31, 2025

PostImage

मालेवाडा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन आमदार रामदास मसंराम यांच्या हस्ते


 

दिनांक,३०/०१/२०२५

📍तालुका,कुरखेडा

 

एजाज पठाण प्रतिनिधि 

कुरखेडा तालुक्यातील मौजा कसारी येथे ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेवाडा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) महाविद्यालय स्तरीय सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले*. या शिबिराच्या उद्घाटन *आमदार रामदास मसराम सर* यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या शिबिरात महाविद्यालयातील NSS स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध उपक्रम राबवले. यामध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, ग्रामसाफाई आणि जनजागृती* कार्यक्रमांचा समावेश होणार आहे .

 

उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास मसराम सर* यांनी युवकांनी समाजासाठी योगदान देण्याच्या संधीचा उपयोग करावा असे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्याचा अनुभव जीवन घडवण्यास मदत करतो, असेही सांगितले.

 

या कार्यक्रमाला संस्थे चे अध्यक्ष रेखाताई बनपुरकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. कांबळी सर, विशेष अतिथी प्रा. डॉ. खालसा सर व महाविद्यालयाचे प्राध्यापक, NSS कार्यक्रम अधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 30, 2025

PostImage

शेतातून विद्युत पंप चोरणारे आरोपी जेरबंद


 

कुरखेडा : तालूक्यातीलशिरपूर येथील ओमप्रकाश तूळशीराम सहारे यांच्या शेतशिवारातून विद्युत पंप चोरणाऱ्या आरोपींना कुरखेडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. विलास सहारे (४१) रा. शिरपूर, विनोद पोवळे (३५) रा.भगवानपूर अशी आरोपींची नावे आहेत.

 

गावातीलच एका इसमाने सदर पंप पळवून नेत नजीकच्या गावातील एका इसमाच्या मदतीने विकण्याचा तयारीत असल्याची कूणकूण पोलीस व गावकऱ्यांना लागली होती. ही बाब लक्षात घेत पोलिसांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे पोलीस पाटील विश्वनाथ रामटेके यानी पंप विकत घेण्याची बतावणी केली व आरोपी सोबत खोटा ग्राहक बनून चर्चा सूरू केली. नजीकच्या भगवानपूर या गावात दडवून ठेवण्यात आलेला पंप विकण्याचा उद्देशाने शनिवार रोजी गावी एका शेतात आणताच शेतातच दडून असलेले गावकरी व फीर्यादीने धाव घेत दोन्ही आरोपींना चोरीच्या मोटारपंपा सहीत रंगेहाथ पकडले व पोलिसांना सुचना केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पूढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस उपनिरीक्षक कूसन हलामी करीत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 30, 2025

PostImage

ग्रामसभा अध्यक्षाचा मारहाण करून खून


 

 

धानोरा : जेवणकरून घरूननिघालेल्या बाजारासाठी दुचाकीनेआठवडी मोतीरामचा मृतदेह दुसऱ्या दिवशी भर जंगलात मिळाला. त्याची हत्या करण्यात आल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

 

 

 

मोतीराम सोनू पदा (४५) रा. पदाबोरिया असे मृताचे नाव आहे. मोतीराम हा पदा बोरिया ग्रामसभेचा अध्यक्ष होता. २६ जानेवारी रोजी तो गावापासून पाच किमी अंतरावरील गोडलवाही येथे सीजी १९ बीयू १८४५ या क्रमांकाच्या दुचाकीने आठवडी बाजारासाठी गेला होता. मात्र सायंकाळ होऊनही परतला नाही. त्याला कधी कधी दारू पिण्याची सवय होती. तो दारू पिऊन शेतात झोपला असावा म्हणून शेतात शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. २७ जानेवारी रोजी त्याचा मृतदेह गोडलवाही मार्गाच्या बाजूला जंगलात आढळून आला. त्याच्या शरीरावर काठीचे मार होते. दुचाकी अद्याप गायब आहे. अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद आहे. पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 30, 2025

PostImage

दारू विक्री करत असताना आम्हाला फोन करा, आम्ही ताबडतोब येऊन त्या विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करू- पोनि गवते आरमोरी


 

 

आरमोरी, (ता.प्र). 1 एप्रिल 1993 पासून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी करण्यात आली. मात्र ही दारूबंदी कायद्याने जरी बंद असली तरी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या दारू आणून तसेच शेतशिवारात, जंगलात मोहफुलाची दारू काढून काही लोकांमार्फत दारूचा व्यवसाय सुरू आहे. दारु विक्रेत्यांच्या मुजोरीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या विरोधात आता स्थानिक जनता रस्त्यावर उतरली असून सोमवारी (दि.27) रात्री 9 वाजताच्या सुमारास आरमोरी येथील टिळक चौकातील नागरिकांनी दुर्गा मंदिर चौकात एकत्र येऊन दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून 'आक्रोश'

 

आस्मा केला शहरात दारू विक्रेत्यांची वाढलेली भाईगिरी हे आता नागरिकांच्या डोक्याच्या पार झाली आहे. त्याचा रोष आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. मुख्यतः दारू विक्रेत्यांची बोलीभाषा व अरेरावी ही आता स्थानिकांसाठी मोठी अडचण होत आहे. त्यातच तरूण मोठ्या प्रमाणात दारुच्याआहारी गेल्याने आता पालकांमध्येही रोष व्यक्त होत आहे. आरमोरी शहरातील दारू विक्रेत्यांवर पोलिस प्रशासनाने कडककारवाई करून शहरातील दारू विक्रेत्यांचा अवैध व्यवसाय संपुष्टात आणावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

माहिती द्या, तत्काळ कारवाई : ठाणेदार गवते

 

आरमोरी येथील टिळक चौकात जनता दारू व्यवसायिकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याने राकाँचे कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी पोलिस निरीक्षक कैलास गवते यांना बोलावले. आरमोरी शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना संपुष्टात आणण्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे. आपल्या वॉर्डात विक्रेते दारू विक्री करत असताना आम्हाला फोन करा, आम्ही ताबडतोब येऊन त्या विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोनि गवते यांनी दिले. त्यासाठी त्यांनी आपला व आपल्या कर्मचाऱ्यांचा मोबाइल नंबर देऊन दारू विक्रेत्यांची माहिती द्या, असे आवाहन केले.

 

दारुसह इतरही अवैध व्यवसायावर कारवाई करा

 

आरमोरी शहरातील टिळक चौक, दुर्गा मंदिर परिसरात एकत्र आलेल्या नागरिकांनी पोलिस निरीक्षक कैलास गवते यांना आरमोरी शहरात सुरू असलेल्या दारू व्यवसायासोबतच सर्रास सुरू असलेली सट्टापट्टी, सुगंधी तंबाखूचा व्यवसाय सुद्धा बंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शहरात अवैध व्यवसायांना उत आला आहे. याची दखल ठाणेदार गवते यांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

 

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 30, 2025

PostImage

गडचिरोली अँथलेटिक संघटने तर्फे २ फेब्रु. ला सब जुनियर जिल्हास्तरीय स्पर्धा.


 

गडचिरोली:- महाराष्ट्र राज्य अँथलेटिक संघटनेद्वारे आयोजित वार्षिक सबज्युनिअर क्रीडा स्पर्धेचे आयोजन पंढरपूर येथे केलेले आहे सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील संघाची निवड चाचणी २ फेब्रुवारी २०२५ रविवार ला सकाळी ७:०० वाजता पासून एम.आय.डी.सी. ग्राउंड कोटगल रोड ,गडचिरोली येथे आयोजित केलेली आहे सदर स्पर्धेत वय वर्ष ८,१०,१२,१४ वर्षा आतील मुले व मुली सहभागी होऊ शकतात खेळाडूंकरिता विविध वयोगटात ५० मिटर,६०मिटर,८० मिटर,३००मिटर धावणे, लांबउडी, गोळाफेक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात सदर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग होण्याची संधी मिळणार आहे तरी या स्पर्धेत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना सहभाग घेण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा अँथलेटिक्स संघटनेचे सचिव आशिष नंदनवार सर यांनी केलेले आहे .


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 29, 2025

PostImage

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत 30 ठार....


उत्तर प्रदेश: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. अमृत स्नानाच्या मौनी अमावस्येच्या आधी ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या घटनेमध्ये 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

 

नेमकं काय घडलं?

 

मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री 2 वाजता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरेकेडींग तुटले आणि चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. तसेच 30 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 29, 2025

PostImage

अॅग्रिस्टॅक' योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी – जिल्हाधिकारीअविश्यांत पंडा यांचे शेतकऱ्यांना आवाहन


 

गडचिरोली, 29 जानेवारी :– शासनाच्या विविध कृषीसंलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रावर (सिएससी सेंटर) नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

  गडचिरोली जिल्ह्यात 20 जानेवारीपासून ‘अॅग्रिस्टॅक’ (Agristack) डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेद्वारे शेतकरी माहिती संच तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) दिला जाणार आहे. जिल्ह्यात एक लाख ७८ हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १४ हजार ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

 

फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) का आवश्यक आहे?

अॅग्रिस्टॅक योजनेत नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान सन्मान निधी आणि विविध सरकारी अनुदान योजनांचा लाभ सहज मिळू शकतो. या आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरण (C-KYC) करण्याची गरज राहणार नाही.

 

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड, आधारशी व बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा किंवा नमुना 8

 

नोंदणी प्रक्रिया:

शेतकऱ्यांनी वरील आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे जाऊन नोंदणी करावी.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 29, 2025

PostImage

समाजकल्याण वसतिगृह प्रवेशप्रक्रियेत भ्रष्टाचार, प्रवेशासाठी प्रवेशार्थ्यांकडून लाच | गृहपाल गावडेस बडतर्फ करा- आजाद समाज पार्टी 


 

गडचिरोली:नवेगाव वसतिगृहात आजाद समाज पार्टीची धडक दिली असता पिण्याच्या पाण्याची tank मध्ये दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणात शेवाळ आढळून आले. कित्येक दिवसापासून टॅंक साफ करण्यात आली नव्हती तसेच वॉटर फिल्टर बंद अवस्थेत असल्याने तेच पाणी मुलांना प्यावे लागते.

 

 जिल्ह्यातील अनेक वसतिगृह प्रक्रियेत कर्मचारी भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्याने आजाद समाज पार्टीच्या वतीने गडचिरोली येथील नवेगाव स्थित समाजकल्याण मुलांचे वसतिगृहात स्टिंग ऑपेरेशन करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात आले, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी मुलांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करणे आवश्यक असताना ती जाहीर न करता विद्यार्थ्यांनी विचारले असता विद्यार्थ्यांना तुमचा नंबर लागला नाही अस सांगून नंबर लावायचं असल्यास पैशाची मागणी करण्यात आली, असा दावा आजाद समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व विनोद मडावी यांनी केला. 

हा प्रकार मुलांच्या शिक्षण हक्काशी खेळ करणारा अत्यंत निंदनीय आहे. मागासवर्गीय मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलीना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. परंतु या ठिकाणी योजना राबविणारेच रक्षक हे भक्षक बनल्याचा आरोप आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला असून संबंधित गृहपाल महेश गाडवे व सहभागी कर्मचारी यांना बडतर्फ करण्याची मागणी आजाद समाज पार्टी ने सहाय्यक आयुक्ताकडे केली.

 

वसतिगृह प्रवेशाकरिता दुसरा पर्याय नसल्या कारणाने पर्यायाने अनेक मुलांनी कॅश स्वरुपात व ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी वॉर्डन महेश गावडे यांच्या अकॉउंट ला पैसे टाकले असल्याची पुराव्यानिशी माहिती आमच्याकडे असून अनेक विद्यार्थी भीती पोटी ही गोष्ट बाहेर सांगायला घाबरत आहेत. विद्यार्थ्यांनी जर आवाज उठविला तर प्रवेश रद्द करू अशी धमकी त्यांना दिली असल्याने विद्यार्थी गप्प आहेत. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याचे Bank statement, व phone pay details चेक करण्यात यावे. असेही निवेदनात मागणी केल्या गेली.

 

गोर गरीब, शेतकरी कामगारांचे मुले शिकली पाहिजेत, पैशा अभावी शिक्षण थांबू नये या उद्देशाने शासन अशी योजना राबवित असतो पण आपले कर्मचारी पगारी असून प्रवेशासाठी गोर गरीब मुलांकडून पैसे वसूल करून मुलांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. 

 

यामध्ये कुठल्याही प्रकारची गय न करता तात्काळ अशा प्रकारच्या भ्रष्टाचार करणाऱ्या महेश गाढवे व त्यांच्यासोबत सहभागी कर्मचाऱ्यांना नौकरीतून बडतर्फ करण्यात यावे अशी सक्त मागणी आजाद समाज पार्टी च्या वतीने करण्यात आली.. तात्काळ कारवाई न झाल्यास या विरोधात समाजकल्याण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे.

यावेळी आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, विधानसभा प्रभारी धनराज दामले, मिडिया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते 

--------------------

पुढील 3 महिन्यात जिल्ह्यातील सर्व हॉस्टेल च्या स्वच्छतेचे काम व पाणी टॅंक तथा पेंटिंग होणार असून भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करू असे आश्वासन दिले.

-------------------

 

राज बन्सोड 

जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी 

गडचिरोली 

8806757873


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 27, 2025

PostImage

सर्पदंशाने महिलेचा झाला मृत्यू


 

चामोर्शी. (ता. प्र.). तालुक्यातीलभेंडाळा येथील शेतामध्ये शेंगा तोडत असताना विषारी सापाने दंश केला. उपचारादरम्यान सदर महिलेचा शुक्रवारी, (दि.24) सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. रोहिणी गणेश वासेकर (38) रा. भेंडाळा असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रोहिणी वासेकर या गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेल्या.

 

 

 

शेतात शेंगा तोडित असतांना दुपारच्या सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केला. लागलीच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने वासेकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 27, 2025

PostImage

अन् मृतक गुराख्याला वाघ तोंडात पकडून फरफटत नेले....


चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात वाघाने गुराख्याला ठार केल्याची घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) रा. विहीरगाव असे मृत्तकाचे नाव आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) हा काही गुराख्यांसोबत जनावरे चारायला घेवून गेला होता. दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केले. काही अंतरावर असलेल्या गुराख्यांना मृतक गुराख्याला वाघ तोंडात पकडून फरफटत नेत असल्याचे आढळून आले. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन प्रचंड आरडा- ओरड करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. लगेच मोबाईलव्दारे गावात व विभागाला माहिती देण्यात आली. नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लगेच गुराख्याचे शोध मोहीम सुरू केली. काही अंतरावर मृतदेह मिळाला.

 

    सदर परिसरात काही महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. अनेक जनावरांचा फडशा पाडला आह. नागरिकांना दर्शन होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत आहे. वनाधिकाऱ्यांनी मृत्तदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. या वेळी, वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्रम,अमोल कवासे वनपाल,वनपाल विनोद किलनाके, निखूरे, वनरक्षक नागलोत, मेश्राम, खारडे, जिवतोडे, जरारे, गेडाम, दुधे, ठाकरे, पोलीस निरीक्षक संतोष बाकल सह पोलीस कर्मचारी वनविभागाचे कर्मचारी हजर होते.मृत्तकाच्या कुटुंबास वनविभागाच्या पन्नास हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 25, 2025

PostImage

नॉन काँग्रेस -नॉन भाजप तत्वावर आघाडी,आंबेडकरी ऐक्याची दुसरी बैठक संपन्न


 5 फेब्रुवारी ला निर्णायक बैठक 

 

गडचिरोली : आंबेडकरी पक्ष गटातटात विभागल्याने मतविभाजन होऊन चळवळीचे राजकीय अस्तित्व लयास गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबेडकरी पक्ष व संघटना एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका घेऊन स्थानिक विश्रामगृहात बहुजन - आंबेडकरी पक्षांची दुसरी बैठक संपन्न झाली. 

 

आजच्या बैठकीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, राज्य उपाध्यक्ष प्रकाश दुधे, आजाद समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मंगलदास चापले, बिआरएसपी जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश सचिव प्रमोद बांबोळे, जिल्हाध्यक्ष अमर खंडारे, बिआयएस च्या उज्वला शेंडे, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव वासनिक, शेकाफे चे पंडित मेश्राम, रिपाई कडून चोखोबा ढवळे इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.

 

आजाद समाज पार्टी, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपाई इत्यादी पक्षांनी एकत्रित येण्या संदर्भात पूर्णतः तयारी दर्शविली असून बसपा आणि बिआरएसपी या दोन पक्षांनी वरिष्ठ्य नेते आणि प्रोटोकॉल च्या अडचणी सांगत पुढील 5 फेब्रुवारीच्या बैठकीत अंतिम निर्णय देण्याचे आश्वासन दिले. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ व जे येणार नाही त्यांना बाजूला ठेवू असा नारा देत उपस्थित आंबेडकरी समूहाने कोणत्याही परिस्थिती मध्ये एकीकरण व्हावे नाहीतर समाज त्यांना धडा शिकविणार असा इशारा यावेळी दिला.

 

पुढील बैठक निर्णयात्मक असून 5 फेब्रुवारी ला दुपारी 1 वाजता विश्रामगृहात ठेवलेली आहे. त्यामध्ये जे एकत्रिकरणास तयार आहेत त्यांची कोअर कमिटी बनवून प्रेस कॉन्फरेन्स घेण्यात येईल आणि घोषणा करण्यात येईल असे यावेळी सर्व पक्षीय निर्णय झाला. 

संचालन पुरुषोत्तम रामटेके तर आभार धनराज दामले यांनी मानले. सदर बैठकीला दिवाकर फुलझेले, नागसेन खोब्रागडे, प्रल्हाद रायपुरे, हंसराज उराडे, सुधीर वालदे, विवेक खोब्रागडे, अरविंद वाळके, नितेश वेस्कडे, केशव सामृतवार, शांतीलाल लाडे, शेषराव तुरे, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, लोमेश अलोणे, नरेश महाडोळे, विलास गोवर्धन गडचिरोली शहरातील व परिसरातील बहुसंख्य नागरिक तथा सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_________________

24 जाने 2025

-----------

राज बन्सोड,

आंबेडकरी ऐक्य समिती 

गडचिरोली


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 24, 2025

PostImage

तरुणीच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी वाटली नाही लाज ! पण लग्न करण्यासाठी आडवी आली जात


 

सिंदेवाही :: प्रेम दोन जीवांना एकत्र आपुलकी न बांधून ठेवते ते असत प्रेम, पण आजच्या काळात जर बदनाम असेल ते सुद्धा प्रेमच आहे, कारण या प्रेमाला काही वासनेने पछाडलेले शारीरिक सुखासाठी प्रेमाचे नाटक करून तरुणी सोबत तिच्या संपूर्ण कुटुंबाच जीवन उद्धवस्त करीत असतात, प्रेमाच्या नावाखाली फक्त वासानेने शरीराचे लचके तोडण्यासाठी खोट्या शपथ

 

घेऊन विश्वास देतात, आणि आपली शारीरिक भूक भागवत असतात, शारीरिक सुख घेताना जरी मज्जा बाटतं असली तरी पण मुलीकडून जेव्हा लग्नाचा दबाव येतो तर तो "मी नव्हेच" म्हणून आपल्या जबाबदारी पासून पळ काढण्याच्या प्रयत्न करीत असतो, इथं आवर्जून जबाबदारी ने नमूद कराव वाटतं कि टाळी एका हाथाने वाजता नाही, मुलगा कितीही गोड बोलून जर शारीरिक सुखाची मागणी केली तरी कुठेतरी मुली सुद्धा आपलं बोट देतात त्या मुळे समोरचा माणूस पदर पकडतो, जेव्हा पदर पकण्यात यश आले कि मग त्या प्रेमाचं रूपांतर वासनेत होतो,

 

निव्वळ खेळल्या जातो शारीरिक सुखासाठी वासनेचा खेळ, काय प्रकरण आहे ते आमच्या गोपनीय सूत्र व पोलीस प्रशासन सिंदेवाही कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम मांडत आहोत, सिंदेवाही तालुक्यातील मौजा पळसगावं जाट मधील एका युवतीचे अंतरगाव मधील नितीन हरिहर कामडी या युवकांशी प्रेम संबंध जुडले, मग दोघेही प्रेमा मध्ये इतके बुडाले कि दोघांनीही आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाही, एकमेकांच्या शपथ खात शरीर संबंध प्रस्थापित केले, त्यांचे प्रेम संबंध मागील 7 वर्षांपासून सुरु होते, आज

 

किंवा उद्या आपल्याशी लग्न करेल अशी आशा या तरुणीला होती, पण नितीन कामडी ला या तरुणीसोबत शारीरिक संबंध करून तिच्या शरीराचे लचके तोडून आपली वासना तृप्त करणे होते पण तिला आपली बायको म्हणून स्वीकारणे अजिबात कबूल नव्हते, लग्नासाठी टाळाटाळ करणाऱ्या नितीन कामडी च्या घरी सदर युवती जाऊन सुद्धा राहिली पण तू जातीची नाहिस या साठी सदर युवतीला घरून हाकलण्यात आलं असं आमच्या सूत्र कडून माहिती मिळाली, नितीन कामडी ची शारीरिक भूक भागल्यानंतर सदर युवती सोबत लग्न करण्यास

 

टाळाटाळ करीत होता, कारण त्याच्या घराचे लोक सदर युवतीस जाती ची नाही म्हणून स्वीकार करीत नव्हते, सदर नितीन ला या युक्ती सोबत झोपायला लाज वाटतं नव्हती पण लग्न करण्यास आडवी जात येत होती, एकंदर परिस्थिती साठी जेवढा युवक जबाबदार आहे तेवढीच ती युवती सुद्धा अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे, नेहमी लग्नासाठी टाळाटाळ करणाऱ्या नितीन कामडी च्या विरोधात दिनांक 17/01/ 2025 रोजी सिंदेवाही पोलीस स्टेशनला आपली पौडित मुलीने रिपोर्ट दिली, तिच्या रिपोर्ट च्या आधारे सिंदेवाही पोलीस प्रशासनाणे

 

नितीन हरिहर कामडी यांच्या वर अप. क्रे 17/25 कलम 376,504, 506 सह ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करून त्याला न्यायालय कोठडीत पाठविले आहे, पण नेमका एक प्रश्न तर सर्वांनाच पडेल भलेही टाळी एका हाताने वाजली नसेल पण एका मुलीचा उपभोग करून तिला केवळ जातीच्या नावाखाली न स्वीकारता नितीन कामडी ला तुरुंगात पाठविणे पसंत केले, आजच्या स्थिती मध्ये दोघांचेही जीवन बरबाद तर झाले पण मानसिक जातीवाद चे विकृत चेहरा सुद्धा समोर आला.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 24, 2025

PostImage

ॐ नमः शिवाय! सनीला सोडा त्याला कशात गुंतवू नका; वाल्मिक आणि बीड पोलिसांची Audio क्लिप व्हायरल


 

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बीड : वाल्मिक कराड आणि बीडमधल पोलिस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणात आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या ऑडिओ क्लिपमधून वाल्मिक कराड बीड जिल्हा पोलीस दलात हस्तक्षेप कशा पद्धतीने होता हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाआहे. या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कराड आणि पोलिसांमधील संवाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा ऑडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.

कोण आहेत पोलिस अधिकारी?

वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय. या मोबाईल कॉलमध्ये गुन्हेगार सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका. त्याला कशात गुंतवू नका. तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश आणि त्याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे, असा संवाद व्हायरल झाला आहे.

 

पोलिस अधिकारी काय म्हणाले?

सनी हा सराईत गुन्हेगार आहे. आणि त्याच्या संबंधी वाल्मीक कराड आणि पोलीस निरीक्षक शितकुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर क्लिप खोटी आहे. क्लिपमधील संवाद माझा नाही. सनी आठवले हा गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. सनी आठवले सध्या फरार आहे. यातील आवाज माझा नाही. याप्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 24, 2025

PostImage

वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर!


 

Walmik Karad | बीड (Beed) मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी वाल्मिक कराडने अनेक पोलिसांना (Police) नव्या कोऱ्या बुलेट (Bullet) आणि आयफोन (iPhone) वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Walmik Karad )

 

“पोलीस (Police) वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) ताटाखालचे मांजर”

भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करत हा खळबळजनक आरोप केला आहे. “आज या क्षणापर्यंत बीड (Beed) व परळीतील (Parli) पोलीस प्रशासन हे मुंडे (Munde) व कराड (Karad) यांच्या ताब्यात आहे. गेल्यावर्षी वाल्मिकने अनेक पोलिसांना (Police) नव्या कोऱ्या बुलेट (Bullet) परळीतून (Parli) दिल्या. त्याच बुलेट घेऊन आज हे पोलीस (Police) गुन्हेगारांच्या (Criminals) इशाऱ्यावर नाचत आहेत. तसेच बुलेटसोबत नवीन आयफोन (iPhone) सुद्धा बऱ्याच पोलिसांना (Police) वाल्मिकने दिले आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.

पीआय पाटीललाही (PI Patil) बुलेट (Bullet) आणि आयफोन? (iPhone)

“काल सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) वाल्मिकसमोर गोंडा घोळणारा पीआय पाटील (PI Patil) याला सुद्धा नवी कोरी बुलेट (Bullet) व आयफोन (iPhone) वाल्मिकने (Walmik Karad ) दिलेला,” असा खळबळजनक दावाही भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी केला आहे.

 

“गुन्हेगारांना फाशी द्या, पोलिसांना बडतर्फ करा”

“बीडमध्ये (Beed) एखादा मर्डर (Murder) करायचा असेल तर हे गुन्हेगार (Criminals) पोलिसांना (Police) सोबत घेऊन मर्डरचे कृत्य करतात. त्यामुळे पीआय महाजन (PI Mahajan) व पीआय पाटील (PI Patil) यांना सहआरोपी करायला हवे,” अशी मागणी करत, “जातीच्या नावाने गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत. आमची मागणी आहे या गुन्ह्यात पीआय पाटील (PI Patil) व पीआय महाजन (PI Mahajan) यांचा सहभाग आहे, हे नीच आमच्या जातीचे असो किंवा कोणत्याही जातीचे असो, यांना फाशी द्या. बाकी परळीतून (Parli) ज्या पोलिसांना (Police) बुलेट (Bullet) दिल्यात, आयफोन (iPhone) दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून द्या किंवा हे वाल्मिकचे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा,” अशी संतप्त मागणी भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी केली आहे.

आरोपांमुळे खळबळ

दरम्यान, वाल्मिक कराड , सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि प्रतीक घुले (Pratik Ghule) हे तिघे आवादा कंपनीकडे (Aavada Company) खंडणी (Extortion) मागितल्याच्या दिवशीचे, म्हणजे २९ नोव्हेंबर २०२४ चे, सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे. या फुटेजमध्ये ते एकाच ठिकाणी दिसत आहेत. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय (Close Aide) असल्याचे बोलले जाते. त्यामुळे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा (Extortion Case) पोलीस तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी विरोधक (Opposition) धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची (Resignation) मागणी करत आहेत. त्यातच आता भैया पाटील (Bhaiya Patil) यांच्या या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली असून, प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 23, 2025

PostImage

काटली येथील बेजबाबदार ग्रामसेवकास निलंबित करा- आजाद समाज पार्टीचीं मागणी 


 

गडचिरोली : तालुक्यातील मौजा काटली येथील ग्रामसेवक यांची प्रशासकीय कारकीर्द अत्यंत बेजबाबदार असून ते आपल्या पदाच्या कार्यात हयगय करत असतात. अनेकदा ते आपल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाही. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे ते देत असतात. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत मध्ये हिशोबाची सहामाही ग्रामसभेला ते उपस्थित राहत नव्हते तसेच मासिक सभेला सुद्धा उपस्थित नव्हते. सदर बाब गंभीर असून जनतेसह हि प्रशासनाची सुद्धा दिशाभूल आहे असा आरोप करत ग्रामसेवकास चौकशी करून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली.

 

अनेकदा कार्यालयीन वेळेत ते नशेत असल्याचे सुद्धा असतात. त्याच प्रमाणे आमच्या कार्यकत्यांनी काही महत्वाची माहिती मागितली असता त्यांनी माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन सुद्धा केले. असे ही निवेदनात म्हटलं आहे.

 

  सदर प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून सदर ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे असे निवेदन जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, काटली ग्रामपंचायत सदस्य देवा भोयर, रेवनात मेश्राम यांनी केली.

 

👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽

*राज बन्सोड*

जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी गडचिरोली


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 23, 2025

PostImage

पोलिसांकडून रेतीमाफियांना दे दणका, महसूल विभागाची मात्र डोळ्यावर पट्टी !


 

खरपुंडी, बोदली, साखरा घाटावरून वारेमाप उपसा

 

गडचिरोली : बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये सध्या रेतीमाफियांचा धुडगूस सुरू आहे. त्यामुळे नदीपात्र बकाल होत असल्याचे चित्र आहे. गडचिरोली तालुक्यात एकीकडे पोलिसांनी माफियांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडलेली असताना महसूल विभागाने आळीमिळी, गुपचिळीचे धोरण घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

रेतीच्या लिलावाला होत असलेल्या विलंबाचा फायदा घेत माफियांनी रेती घाट वाढून घेतले आहेत. गडचिरोली ठाण्याच्या पोलिसांनी कोटगल-विसापूर मार्गावर दोन टिप्पर पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कनेरी येथे (ता. गडचिरोली) रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले.

 

'रेटकार्ड'ने खळबळ, तहसीलदारांविरुद्ध तक्रारी

अवैध रेती तस्करांविरुद्ध कारवाईऐवजी पाठराखण केल्याचा आरोप करत गडचिरोलीचे तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्याविरुद्ध प्रफुल्ल सिडाम यांनी तक्रार केली. कटाणी नदीतील खरपुंडी, बोदली, जेप्रा, बाह्मणी, वैनगंगा नदीतील मुडझा, कनेरी, कोटगल, साखरा, काटली, पोर्ला या घाटांवरून अवैध रेती उपसा असल्याचा त्यांचा आरोप आहे.

 

यासाठी ५० हजार ते एक लाखांपर्यंतचे दर ठरलेले असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यासोबतच अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन समिती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनीही अवैध वाळू उपशाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

 

रेटकार्डची चर्चा, तक्रारी आल्याने तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. घरकुल योजनेसाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याच्या नावाखाली माफियांकडून सर्रास उपसा होत असल्याचे चित्र आहे.

 

 

महसूल प्रशासनाचे पथक सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. यापूर्वी कारवायादेखील केलेल्या आहेत. पोलिस व महसूलच्या कारवायांची तुलना करता येणार नाही. मात्र, अवैध रेती उपसा करणाऱ्यांची अजितबात गय केली जात नाही.

- संतोष आष्टीकर, तहसीलदार, गडचिरोली

 

बेदरकार वाहनांमुळे अपघातसत्र सुरू

गडचिरोली शहाराजवळील गुरवळा घाटावर रेती तस्करी करणाऱ्या वाहनाचा धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात दिवसांपूर्वी गोगाव फाट्यावर मध्यरात्री एका वाळूतस्कराच्या आलिशान वाहनाने दुचाकीला उडविल्याने दोन तरुणांचा हकनाक जीव गेला. बेदरकार वाहने सामान्यांच्या जिवावर उठलेले असताना महसूल विभागाची बोटचेपी भूमिका कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 23, 2025

PostImage

कोंबड्यांची झुंज, जिल्हाभर पसरले जाळे : दारूविक्रीसह जुगारही जोमात


 

गडचिरोली दारूविक्री बंदीच्या जिल्ह्यात राजरोस दारूविक्री काही नवीन बाब नाही. आता तर या अवैध धंद्याची व्याप्ती आणखी वाढलेली आहे. जिल्ह्यात राजरोसपणे कोंबड्यांच्या झुंजी लावून मोठ्या प्रमाणात पैशांची पैज लावली जाते. चक्रीसारखा जुगारही खेळला जातो. दारूविक्रीसह कोंबड्यांच्या जीवघेण्या झुंजी खेळविल्या जात असल्याने शांतता व सुव्यवस्था बिघडलेली आहे.

 

पाळीव प्राण्यांचा कोणत्याही प्रकारचा छळ करणे, त्यांना अमानुष वागणूक देणे व जिवे मारणे हे प्राणीक्लेश कायद्यानुसार अपराध आहे. यात कोंबड्यांच्या झुंजींचाही समावेश आहे. जिल्हा मुख्यालयापासून १७ किमी अंतरावर असलेल्या चित्तेकन्हार तसेच गुजनवाडी गावात तर राजरोसपणे कोंबड्यांच्या जीवघेण्या झुंजी लावून प्राणीक्लेश कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

 

जंगलाचा आश्रय घेऊन कोंबड्यांच्या झुंजीसाठी जागा तयार केली जाते किंवा गावापासून दूर अंतरावर शेतात किंवा मोकळ्या जागेत कोबडचांच्या झुंजीचा बाजार भरविला जातो.

 

हा बाजार भरविण्यात गावातीलच काही प्रमुख लोकांचा पुढाकार असतो. यासाठी ते पोलिसांना मॅनेज करतात. झुंजीसाठी तयार केलेले कोंबडेसुद्धा पोलिसांच्या जेवणाच्या मेजवाणीत पोहोचविले जातात, अशी माहिती आहे. या संदर्भात कठोर कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

 

झुंजताना कोंबड्याचा जातो जीव, हा कसला आनंद ?

 

जिल्ह्यात विजयादशमी सणानंतर कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जातात. रंगपंचमी सणापर्यंत या झुंजीना भर असतो. या झुंजींना 'कौबड़ा बाजार' असे गोंडस नाव देऊन अवैध व तेवढाच जीवघेणा खेळ रक्ताच्या थारोळ्यात खेळविला जातो. झुंजता झुंजता कोंबड्यांचा जीव कसा जातो, हे पाहणारे तेथे आबालवृद्धसुद्धा असतात.

 

मद्यविक्री, जुगार, पैजेचाही बोलबाला

 

कोंबड्यांच्या झुंजी लावताना प्रत्येक जोडीवर पैज लावली जाते. जो कोंबडा जिंकेल त्या कोंबड्यावर पैसे लावणारा मालामाल होतो. याशिवाय चक्री (जुगार) त्याच ठिकाणी लावला जातो. नऊ घरांपैकी एकाच घरावर पैसे लावणारा यात जिंकतो. याशिवाय झंडीमुंडीसुद्धा लावली जाते. यात अनेकांना दारूचे व्यसनही जडले आहे.

 

म्हणे, मी सगळ्यांना 'मॅनेज' करतो !

 

गडचिरोली तालुक्यातील चितेकन्हार गावात दर मंगळवारी, जडेगाव येथे बुधवारी तसेच बेनोली परिसरातही कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जातात, चित्तेकन्हार येथे बाजार भरविणारा तर विरोध करणाऱ्यांनाच थेट आव्हान देतो. तो म्हणतो, मी सर्वांनाच म्हणतो मॅनेज करतो. येथे पोटेगाव पोलिसांच्या वरदहस्तामुळे हा प्रकार सर्रास सुरू आहे.

 

याबाबत पोटेगावचे प्रभारी पोलिस अधिकारी भास्कर कांबळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, या गावात असा काही प्रकार होत असेल तर माहिती घेण्यात येईल. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

 

पोटेगाव बनले अवैध धंद्यांचे केंद्र

 

तालुक्यातील पोटेगाव हे गडचिरोलीसह चामोर्शी, एटापल्ली आदी तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागाचे मध्यवर्ती केंद्र आहे; परंतु अलीकडे हा परिसर अवैध धंद्याचे केंद्र बनलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जाते. गोवंशाची तस्करीसुद्धा येथून होते. मात्र येथील पोलिसांची कारवाई शून्य आहे

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 23, 2025

PostImage

प्यार किया तो डरना क्या’ असे म्हणत कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रियकर-प्रेयसी पळून जाऊन लग्न करतात


नागपूर : ‘प्यार किया तो डरना क्या’ असे म्हणत कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रियकर-प्रेयसी पळून जाऊन लग्न करतात. मात्र, प्रियकर-प्रेयसीचे पती-पत्नीच्या नात्यात रुपांतर झाल्यानंतर काही दिवसांतच खटके उडायला लागतात. कौटुंबिक वादातून संसार विस्कळीत होण्याच्या काठावर येतो. गेल्या आठ वर्षांत ४ हजार ९४७ प्रेमविवाह करणाऱ्यांच्या संसारात विघ्न आले आहे. त्या दाम्पत्यांनी भरोसा सेलमध्ये धाव घेतली. लग्नाच्या काही महिन्यांतच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे आणि ‘इगो’ दुखावणे हे प्रमुख दोन कारण प्रेमविवाहात आड येत असल्याचे निदर्शनात आले आहे.

 

गेल्या काही वर्षांत प्रेमविवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा समावेश आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. प्रेमसंबंध प्रस्थापित झाले आणि प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतल्याची अनेक प्रकरणे आहेत. तसेच सोबत नोकरी करीत असताना ओळख झालेले किंवा एकाच वस्तीत राहणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसींनी प्रेमविवाह केल्याच्याही घटनांचा समावेश आहे. काही महिने किंवा वर्षभर प्रेमप्रकरण झाल्यानंतर लगेच प्रेमविवाह करण्याचा निर्णय तरुण-तरुणी घेतात. अनेकदा दोघांपैकी एकाच्याही हाताला काम नसते, बेरोजगार असतानाही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. लग्नापूर्वी चित्रपटातील कथानकाप्रमाणे मोठमोठी स्वप्ने रंगवतात. मात्र, लग्न झाल्यानंतर प्रियकर-प्रेयसी या नात्याला फाटा मिळून पत्नी-पत्नी हे नवे नाते निर्माण होते. नव्याने संसार थाटल्यानंतर पती हाताला काम शोधतो. दिवसभर राबतो आणि सायंकाळी घरी येतो. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच ‘तू पहिल्यासारखा नाही राहिलास…मला वेळ देत नाही’ अशी कुरकुर प्रेयसीची पत्नी झालेल्या तरुणीची असते. तसेच दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत अविश्वास दर्शवतात. अशा तक्रारीतूनच प्रेमविवाह तुटण्याच्या काठावर असतात. एकमेकांपासून घटस्फोट घेईपर्यंत प्रकरण पोहचते. अशाच प्रकारचे तब्बल ४ हजार ९४७ प्रेमविवाह करणारे तरुण-तरुणींनी गेल्या आठ वर्षांत भरोसा सेलमध्ये तक्रारी नोंदविल्या आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 22, 2025

PostImage

इन्स्टाग्रावरील मित्राने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार


मुंबईः इन्स्टाग्रावरील मित्राने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील छायाचित्र काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडित मुलीला धमकावून तिचे अश्लील छायाचित्र परिचीत व्यक्तींना पाठवले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे.

 

पीडित मुलगी १७ वर्षांची असून २०२२ मध्ये तिची ओळख इन्स्टाग्राम या समाज माध्यमावरून २३ वर्षीय आरोपीशी झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिला स्वतःच्या व मित्राच्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या नकळत आरोपीने त्यांचे चित्रीकरण केले. पीडित मुलीने शारिरीक संबंध ठेवण्यास आरोपीला नकार दिल्यानंतर त्याने पीडित मुलीचे छायाचित्र तिचे नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. तसेच इन्स्टाग्रावरही पीडित मुलीचे छायाचित्र अपलोड केले. या संपूर्ण प्रकारामुळे मुलगी तणावाखाली होती. अखेर तिला एका परिचीत व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार तिने दहिसर पोलिसांकडे तक्रार केली.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 22, 2025

PostImage

पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती


नागपूर : महिलांच्या किटी पार्टीत आयोजक महिलांनी काही ‘जिगोलो’ युवकांना बोलावले. तेथून संपर्कात आलेल्या एका जिगोलोला एक महिला वारंवार नागपुरात बोलवत होती. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले. हॉटेलमध्ये जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत पत्नी आढळून आली. या घटनेची पोलिसांत जरी तक्रार नसली तरी शहरभर मोठी चर्चा आहे. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहतूकदार असलेल्या युवकाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्यातून त्याला सुबत्ता आली. त्याने स्वत:साठी आणि पत्नीसाठी स्वतंत्र कार घेतल्या. उच्चशिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत आणि मैत्रिणींनी आयोजित केलेल्या पार्टीत वारंवार जाण्याची सवय होती. दुसरीकडे पती सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कामात व्यस्त राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्या महिलेच्या मैत्रिणींनी वर्धा रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये किटी पार्टी आणि स्नेहमिलन आयोजित केले. रात्रभर चालणाऱ्या पार्टीत ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ पुरविणाऱ्या कंपनीकडून काही ‘जिगोलो’ (पुरुष वेश्या) बोलावण्यात आले होते. पार्टी संपल्यानंतर दिल्लीतील एका ‘जिगोलो’ युवकाचा मोबाईल क्रमांक महिलेने घेतला. काही दिवसांनंतर तिने त्याला फोन केला. ‘स्पेशल सर्व्हिस’ म्हणून विमानाचे तिकिट आणि मोबदला म्हणून १ लाख रुपये त्या युवकाने मागितले. महिलेने सर्व अटी मान्य करीत पैसेही दिले. तेव्हापासून ही महिला त्या युवकाला पैसे देऊन दिल्लीवरुन नागपुरात बोलवित होती. अनेकदा तो युवक नागपुरात येऊन गेला. दोघेही रात्रभर महागड्या हॉटेलमध्ये वेळ घालवत होते. पहाटेच्या सुमारास महिला घरी परत येत होती.

 

 

पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या

दर महिन्याला त्या युवकासोबत रात्र घालविता यावी, यासाठी महिला पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या देत होती. तो झोपल्यानंतर बाहेरुन दार लावून ती कारने वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये जात होती. तेथे त्या युवकासोबत रात्र घालवायची. पहाटे घरी परत येत होती. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु होता.

 

 

 

असा झाला उलगडा

 काही दिवसांपासून पत्नीच्या वागण्यावर पतीला संशय आला. त्याने पत्नी कुठे कुठे जाते, याची माहिती घेण्यासाठी कारमध्ये जीपीसी प्रणाली लावली. महिलेने दिल्लीवरुन ‘जिगोलो’ युवकाला बोलावले. रात्री पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मुलीला बाजुच्या रुममध्ये झोपवले. कारने थेट हॉटेल गाठले. मुलीची प्रकृती बिघडल्याने ती रात्री एक वाजता उठली. आई न दिसल्यामुळे तिने वडिलांना उठवले. पत्नी बेपत्ता असल्यामुळे त्याने कारचे लोकेशन तपासले. कार एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळाली. तो भावाला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेला. तेथे पत्नीच्या नावाने बुक असलेली खोली उघडायला लावली असता पत्नी एका युवकासोबत नको त्या अवस्थेत आढळून आली. त्याने दोघांनीही तेथे मारहाण केली. प्रकरण पोलिसांत गेले. मात्र, बदनामीच्या भीतीने पतीने तक्रार केली नाही. त्याने पत्नीला लगेच माहेरी पाठविले आणि तिच्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची सध्या शहरभर चर्चा आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 21, 2025

PostImage

बीजेपी सरकारचा नक्षलवाद्यावर जोरदार प्रहार ,चकमकीत 20 नक्षलवादी ठार


छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्‍ह्यात झालेल्‍या चकमकीत 20 नक्षलवादी ठार आहेत. अद्‍याप चकमक सुरु आहे, असे वृत्त ANIने दिले आहे. दरम्‍यान, १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादीही या चकमकीत ठार झाल्‍याचे छत्तीसगड पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

 

छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जवानांनी 20 नक्षलवाद्यांना ठार केले. मोठा शस्‍त्र साठाही जप्‍त करण्‍यात आले आहे. कुल्हाडी घाटावरील भालू डिग्गी जंगलात चकमक सुरुच आहे. सुरक्षा दलांचे सुमारे एक हजार जवानांनी या मोहिमेत सहभागी आहेत.

 

ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलींची चकमक झाली. संयुक्त आंतरराज्यीय कारवाई रात्री उशिरापासून सुरु हाेती," असे ओडिशा पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील कुलारीघाट राखीव जंगलात संयुक्त कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 20 झाली आहे. "माओवाद्यांच्या मृतांची संख्या वाढू शकते. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे," असेही पोलिसांनी आपल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे.

 

1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलीचा खात्‍मा

मृत 20 नक्षलींमध्‍ये सोमवारी ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या चकमकीत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्‍या नक्षलवादीही ठार झाला आहे, अशी माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली. तसेच कोब्रा युनिटचा एका जवान जखमी झाला आहे. ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, "गुप्तचर विभागाने दिलेल्‍या माहितीच्या आधारे, ओडिशा पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सोमवारी (२० जानेवारी) रात्री नवापारा आणि छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या सीमेवर शोध मोहिम राबवली. ही कारवाई ओडिशा आमच्या सीमेपासून सुमारे 5 किमी अंतरावर गरियाबंद येथे करण्यात आली. पहाटेच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, आयईडी जप्त करण्यात आले आहेत. परिसरात अजूनही शोध मोहिम सुरु आहे."


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 21, 2025

PostImage

ब्रम्हपुरी - देसाईगंज मार्गावर अपघात, दुचाकीस्वार गंभीर


 

देसाईगंज : ब्रम्हपुरी वरून देसाईगंजला मोटारसायकलनेयेत असताना नदीच्या पुलाच्या समोर स्मशान घाटाच्या बाजूला दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. जगन मलगाम रा.फरी असे जखमीचे नांव आहे.

 

अपघात एवढा गंभीर होता की मोटारसायकल उंच रस्त्याच्या खाली पडली व जगन मलगाम हे गंभीर जखमी होऊन झाडीमध्ये अडकून पडले होते.

 

बाजूलाच स्मशान घाटात प्रेतावर अंत्यसंस्कार सुरु होते. सर्व लोकं झाडीत अडकलेल्या जखमी मोटारसायकल स्वाराकडे बघत होते. पण त्याला त्या झाडीमधून काढण्यासाठी कुणाचीही हिम्मत झाली नाही. तेवढ्यात देसाईगंज येथील देवदूत

 

म्हणून परिचित असलेले जसपालसिंग चावला यांना सदर अपघाताबद्दल माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब ना करता घटनास्तरावर धाव घेतली व विक्रम माखरे यांच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेतील जगन मलगाम यांना त्या झाडीतून काढले व स्वतः च्या मोटारसायकलवर देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात भरती केले.

 

अगदी वेळेवर जखमी अपघातग्रस्ताला भरती केल्यामुळे जगन मलगाम यांचे प्राण वाचवणारे जसपालसिंग चावला यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 20, 2025

PostImage

अमिर्झाच्या बँकेत अपमानास्पद वागणूक!


 

गडचिरोली : तालुक्याच्या अमिर्झा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची शाखा आहे. या बँकेत परिसराच्या दहा गावांतील नागरिकांची बँक खाती आहेत; येथे व्यवहार करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापकाकडून हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.

 

अमिर्झा येथे चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब, मुरमाडी, भिकारमौशी, आंबेटोला, आंबेशिवणी, जेप्रा, राजगाटा, धुंडेशिवणी, कळमटोला, पिपरटोला, बोथेडा आदी गावांतील ग्राहक बँकेतून पैसे काढणे व जमा करण्याकरिता येतात. माहिती विचारल्यानंतर त्यांना योग्य व सन्मानजनक वागणूक देणे गरजेचे आहे; परंतु येथील बैंक व्यवस्थापकासह येथील कर्मचारीसुद्धा ग्राहकांना उद्धट वागणूक देतात. व्यवस्थापकाची सध्या मनमानी सुरू आहे.

 

नवीन खाती काढण्यासाठी कुणी गेले असता, कशासाठी खाते काढता, असे उलट बोलतात, असा आरोप अमिर्झासह चांभार्डा येथील ग्राहकांचा आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 19, 2025

PostImage

नक्सली बोले- 12 नहीं 18 माओवादियों की हुई थी मौत


सुरक्षाबलों ने हाल ही में छत्तीसगढ़ के बीजापुर में तेलंगाना सीमा पर नक्सलियों के खिलाफ बड़ी कार्रवाई को अंजाम दिया था। इस दौरान 16 जनवरी को हुई मुठभेड़ में 12 हार्डकोर माओवादियों को ढेर कर दिया था। जिसमें से 5 महिला और 7 पुरुष नक्सली थे। यह मुठभेड़ करीब 13 घंटों तक चली थी और इस ऑपरेशन को 3 हजार से ज्यादा जवानों ने अंजाम दिया था। अब नक्सलियों ने इस मुठभेड़ को लेकर एक नया खुलासा किया है।

दरअसल पुलिस ने इस मुठभेड़ में 12 नक्सलियों के मारे जाने का दावा किया था। लेकिन हाल ही में माओवादियों ने एक प्रेस नोट जारी कर इसमें 18 नक्सलियों के मारे जाने की बात कही है। नक्सलियों की ओर से जारी प्रेस नोट में कहा गया है कि इस मुठभेड़ में मोस्ट वांटेड नक्सली दामोदर उर्फ चोखा राव भी मारा गया है, जो कि कमांडर स्टेट कमेटी मेम्बर और तेलंगाना स्टेट कमेटी का चीफ था। साथ ही उस पर 50 लाख रुपए का इनाम भी घोषित था। इसके अलावा PPCM हुंगी, देवे, जोगा और नरसिंह राव भी मारे गए हैं।

 

 

बता दें कि इस मुठभेड़ में जवानों ने 12 नक्सलियों के शव बरामद किए थे, लेकिन नक्सलियों ने 18 माओवादियों के मारे जाने की जानकारी प्रेस नोट में दी है। मुठभेड़ के बाद सुरक्षाबलों ने मौके से आधुनिक हथियार, राकेट लॉन्चर, वायरलेस सेट और विस्फोट भी बरामद किए थे, जिनका उपयोग नक्सली हमेशा बड़े हमलों की तैयारी के लिए करते थे।

 

बस्तर के आईजी पी. सुन्दरराज ने बताया था कि यह मुठभेड़ पामेड़, बासागुड़ा और उसूर क्षेत्र के जंगलों में हुई थी। यह इलाका माओवादी गतिविधियों का गढ़ माना जाता है। सुरक्षाबलों को मुखबिर से सूचना मिली कि जंगल में नक्सलियों की मौजूदगी है। इसके बाद तीन जिलों सुकमा, बीजापुर और दंतेवाड़ा के हजारों जवानों ने इलाके को चारों ओर से घेर लिया था। ऑपरेशन में डीआरजी सुकमा, डीआरजी बीजापुर, डीआरजी दंतेवाड़ा और एसटीएफ कोबरा की 204, 205, 206, 208, 210 और CRPF की 229 बटालियन शामिल थीं।

 

शव और भारी मात्रा में हथियार हुए थे बरामद

मुठभेड़ के बाद मारे गए नक्सलियों के शवों को जिला मुख्यालय लाया गया था, इन नक्सलियों में PLGA बटालियन नंबर 1 और सेंट्रल रीजनल कमेटी (CRC) के सदस्य शामिल थे। सुरक्षाबलों ने नक्सलियों के शवों के पास से अत्याधुनिक हथियार और हथियार बनाने के उपकरण भी जब्त किए। जवानों को सूचना मिली थी कि मारुड़बाका और पुजारीकांकेर के जंगलों में भारी संख्या में हथियारबंद नक्सली छिपे हैं। सुरक्षाबलों ने इलाके की घेराबंदी कर ज्वाइंट ऑपरेशन को अंजाम दिया।


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 18, 2025

PostImage

Armori news: क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ ट्रकचालकावर गुन्हा दाखल


 

आरमोरी, (ता.प्र). शहरातील ब्रह्मपूरी मार्गावरील जीवानी राईसमिल समोर वास्तव्याने राहत असलेल्या एका व्यक्तीच्या घरासमोरील रस्त्यावर ट्रक उभे केल्याप्रकरणी संबंधिताने विचारणा केली असता ट्रक मालकाने शिवीगाळ केल्या प्रकरणी बुधवारी (दि.15) आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रोहित नामदेव नाणे (28, रा.आरमोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

 

शहरातील ब्रह्मपूरी मार्गावरील जिवानी राईस मिलसमोर वास्तव्याने राहत असलेले सेवानिवृत्त पोस्ट मास्तर जगदीश गंगाधर निमजे (70) घरासमोर रोहित नाणे यांनी ट्रक उभा केला. यामुळे त्यांना आवागमनास त्रास होत असल्याने याबाबत त्यांनी नाणे यास जाब विचारला. यावर आरोपीने फिर्यादीच्या घराच्या संरक्षण भिंतीजवळ येत त्यांना शिवीगाळ करून तू

 

 

घराबाहेर निघ, तुला चिरून काढतो, अशी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यादरम्यान फिर्यादीच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही शिवीगाळ केली. याप्रकरणी जगदीश निमजे यांनी थेट आरमोरी पोलिस ठाणे गाठून आरोपी नाणे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावरून आरमोरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार नीलकंठ कोकडे करीत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 18, 2025

PostImage

प्रेमीयुगुलांना हटकल्याने युवकांचा कुटुंबावर हल्ला


 

 अमरावती, ब्युरो. शहरातील पत्रकार कॉलनीतील ग्रीन जीममध्ये बसलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र या अल्पवयीन मुलाने काही तरुणांनासोबत घेऊन एका कुटुंबासह इतर नागरिकांना मारहाण केली. या घटनेनंतर प्रचंड गोंधळ उडाला होता. अखेर परिसरातील रहिवाशांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. 15) तक्रार दिली. - बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास - पत्रकार कॉलनीतील ग्रीन जीमजवळ एक - मुलगा आणि दोन मुली बसले होते. दरम्यान काही वेळाने एक मुलगा व मुलगी तेथे - पोहोचले. त्यांचे अंधाराचा फायदा घेत - अश्लील कृत्य केले. हा प्रकार त्या परिसरात - राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. - त्यावेळी त्यांनी या मुला-मुलींना हटकले. त्यानंतर या परिसरातील काही महिला रात्रीचे

 

जेवण आटोपून बाहेर फिरत होत्या. शाळेच्या ड्रेसवर असलेल्या मुली महिलांना दिसल्या. त्यावेळी त्यांनीही या मुला-मुलींना हटकले. त्यामुळे अल्पवयीन मुलगा संतापला आणि तो तेथून निघून गेला. परंतु त्याने काही वेळातच त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना लाठ्या-काठ्या घेऊन बोलावून घेतले. दरम्यान, त्याने या परिसरातील अनंता मस्करे हेमंत मस्करे, वसंता मस्करे आणि त्यांच्या मुली पलक आणि अभिजित सव्वालाखे यांना मारहाण केली. त्यामुळे ते जखमी झाले. दरम्यान, त्यांनी आवारात उभ्या असलेल्या कारवर दगडफेक केली. हा गोंधळ पाहून परिसरातील नागरिक गोळा झाले. या हल्ल्याने संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर काही तरुणांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 18, 2025

PostImage

निकृष्ट रस्त्यांसाठी अभियंते, ठेकेदारांना तुरुंगात टाकावे केंद्रीय मंत्री गडकरींचे मत


. दिल्ली,  निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा. रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना अपघातांसाठी जबाबदार धरून तुरुंगात पाठवले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सदोष रस्ते बांधकाम हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा आणि रस्ते कंत्राटदार, सवलतीधारक आणि अभियंत्यांना अपघातांसाठी जबाबदार धरून तुरुंगात पाठवावे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे 2030 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये

 

देशात पाच लाख रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 1,72,000 लोकांचा मृत्यू झाला. गडकरी म्हणाले, यापैकी 66.4 टक्के किंवा 1,14,000 लोक 18-45 वयोगटातील होते, तर 10,000 मुले होती. हेल्मेट न घातल्यामुळे 55,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सीट बेल्ट न घातल्यामुळे 30,000 लोकांचा मृत्यू झाला. महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट्स (अपघात प्रवण ठिकाणे) दुरुस्त करण्यासाठी महामार्ग मंत्रालय 40,000 कोटी रुपये खर्च करत असल्याचेही गडकरी म्हणाले. देशात चालकांची तीव्र कमतरता दूर करण्यासाठी प्रशिक्षण आणि फिटनेस सेंटर्स स्थापन करण्यासाठी उद्योग आणि इतर संबंधित संस्थांना सरकारसोबत भागीदारी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 17, 2025

PostImage

पुतण्यासोबत राहतो म्हणून आरमोरी येथे तरुणास मारहाण


 

आरमोरीः येथे क्षुल्लक कारणावरुन एका तरुणास मारहाण केली. याबाबत पिता-पुत्रांसह तिघांवर गुन्हा नोंद झाला. ही घटना येथे १४ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

 

संदीप परसराम दुमाने (३४, रा. दुर्गा माता मंदिराजवळ, आरमोरी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन ते १४ रोजी मित्रांसमवेत रात्री दुर्गा माता मंदिराजवळ उभे होते. यावेळी सुदाम पांडुरंग कांबळे याचा पुतण्या वैभव कांबळे आला. त्यो संदीपला र्खरा सांग, असे म्हटले. यावर समोर सुदाम कांबळे होता. त्याने संदीप दुमाने यांना माझ्या पुतण्यासोबत राहू नको, असे म्हणत मारहाण केली.

 

भर चौकात घडली घटना

 

सौरव सुदाम कांबळे व संयम सुदाम कांबळे यांनीही संदीप दुमाने यांना मारहाण करुन धमकावले. त्यानंतर दुमाने यांच्या मित्रांनी सोडवा सोडव केली व त्यांना दवाखान्यात नेले. आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंदविला. गजबजलेल्या चौकात घटना घडल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 17, 2025

PostImage

भीषण चकमकीत 12 नक्षली ठार


 

 

छत्तीसगडमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

 

 

 

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ही माहिती पोलिसांनी दिली. या जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जंगलात सुरक्षा दलाने केलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईदरम्यान ही घटना घडली. जानेवारी महिन्यात सुरक्षा दलांबरोबरच्या विविध चकमकीत आतापर्यंत २६ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

 

या कारवाईत जिल्हा राखीव दलाचे तीन जिल्ह्यांतील जवान, सीआरपीएफच्या कोब्रा विंगच्या पाच बटालियन तसेच २२९व्या बटालियनचे जवान सहभागी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती हाती आली आहे. त्या भागात नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी भागात सुरू असलेली मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. चकमकीमध्ये सुरक्षा दलाची कोणतीही हानी झालेली नाही. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (वृत्तसंस्था)

 

गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी २१० नक्षलवादी टिपले

 

गेल्या १२ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. त्यात दोन महिलांचा समावेश होता. गेल्यावर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी चकमकींत २१० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

 

दोन जवान जखमी

 

बस्तरचे आयजी सुंदरराज पी. यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. विजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोब्राच्या वेगवेगळ्या बटालियन आणि सुमारे १२०० ते १५०० सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. काही बडे नक्षलवादी नेते जंगलात आहेत. विजापूरमध्येच आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 17, 2025

PostImage

देसाईगंज : गेला होता शिकवणीला, पोहोचला बल्लारशहाला ,गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचा संशय


 

देसाईगंजः सहावीत शिकणारा एक मुलगा शिकवणीसाठी घराबाहेर पडला, पण तो थेट चंद्रपूरच्या बल्लारशहा येथे आढळला. गुंगीचे औषध देऊन त्याचे अपहरण केले असावे, असा अंदाज आहे. १६ रोजी ही घटना घडली, त्यामुळे शहर हादरुन गेले आहे.

 

श्रेयश चंद्रकुमार दुबे (१२) असे त्या विद्यार्थाचे नाव आहे. तो १६ रोजी दुपारी ४ वाजता शिकवणीला जातो म्हणून घराबाहेर पडला. मात्र, त्यास वाटेत कोणी तरी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर रेल्वेतून त्याचे अपहरण केले. बल्लारशहा येथे पोहोचल्यावर तो शुध्दीवर आला. रेल्वेत खाऊ विकणाऱ्यास त्याने आपबिती सांगितल्यावर अपहरणकर्ते गायब झाले.

या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

 

खाऊ विक्रेत्याची सतर्कता

 

खाऊ विक्रेत्याने श्रेयशला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी करुन देसाईगंज पोलिसांना संपर्क केला.

पोलिसांच्या मदतीने नातेवाईक श्रेयशला घेण्यासाठी बल्लारशहाला खाना झाले.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 16, 2025

PostImage

वाळू माफियांना महसूलमधील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा


गडचिरोली : विधानसभा निवडणुकानंतरही जिल्ह्यात वाळूचा गोंधळ संपला नसल्याने सर्वत्र वाळू तस्करीला उत आला आहे. यामुळे मध्यरात्री अवैधपणे वाळू घेऊन भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या वाळू माफियांना महसूलमधील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा असून यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

 

नद्यांचा जिल्हा अशी ओळख असतानाही लिलाव प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे सर्वसामान्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे वाळू माफियानी महसूलमधील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेत सर्रास तस्करी सुरु केल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोली शहाराजवळील गुरवळा घाटावर वाळू तस्करी करणाऱ्या वाहनाचा धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी गोगाव फाट्यावर मध्यरात्री एका वाळू तस्कराचा वाहनाने दुचाकीला उडविल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील कन्हेरी, गुरवळा, कठानी, आंबेशिवनी, चामोर्शी माल, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी वांगेपल्ली, भामरागड आदी भागातील नदी घाटावरून सर्रास वाळू तस्करी सुरु आहे.

 

 

 

जेसीबी, पोकलँडच्या माध्यमातून घाटातून उपसा करण्यात येत आहे. महसूलचे अधिकारी मात्र यावर कारवाई करण्याचे सोडून घरकुलासाठी वाळू नेणाऱ्या नागरिकांना त्रास देत असल्याचे चित्र. वाळू तस्करीतून मिळणाऱ्या नफ्यामुळे अनेक तरुण वाळू तस्करीकडे वळले असून काहींनी यासाठी टिप्पर आणि ट्रॅक्टर देखील खरेदी केले आहे. यतीलच एका तरुणाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वाळू तस्करी करण्यासाठी एका ट्रॅक्टरमागे ४० तर टिप्परमागे ६० हजार रुपये महसूलच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. रात्रीच्या सुमारास या घाटांवर वसुलीसाठी महसूलच्या अधिकाऱ्यांनी काही कर्मचारीही ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाच्याच संरक्षणात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरु असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

 

 

 

खनिकर्म विभागात ‘वाळू माफियां’चा वावर

विविध कारणांनी कायम वादग्रस्त ठरलेला खनिकर्म विभाग वाळू तस्करीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. या विभागाकडे केव्हाही फेरफटका मारल्यास तस्करांची टोळी बसलेली असते. खनिकर्म अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते उत्तर देत नाहीत. उलट रात्रीच्या सुमारास रेती घाट परिसरात ‘पिंटू’ नावाची व्यक्ती खनिकर्म अधिकाऱ्याच्या नावावर वसुलीसाठी फिरते, अशी माहिती आहे. याही संदर्भात विचारणा केळी असता खनिकर्म अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेमके कुणाचे राज्य सुरु आहे. अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

 

मी नुकताच जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला आहे. त्यामुळे या संदर्भात माहिती घेत आहे. महसूल विभागात जर असा प्रकार सुरु असेल तर खापवून घेतल्या जाणार नाही. लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. -अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 16, 2025

PostImage

वैरागड येथे संक्राती पाडव्याच्या दिवशी तलवारी चालल्या.... 



  • - भाजीपाला विक्रेता गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी.  
  •  
  • वैरागड : गावात संक्रात सणानिमित्त तिळगुळ वाटून गोड-गोड बोलण्याचे सण साजरा करीत असताना आज दि. १५ जानेवारी रोजी माळी मोहल्ल्यातील अवैध व्यावसायिक संजय पात्रीकर किरकोळ वादातून भाजीपाला विक्रेता अमोल पात्रीकर याला तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आणि अडवणूक करणारे दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. 
  • येथील माळी मोहल्ल्यात राहणारा अमोल केशव पात्रीकर (वय ३६ वर्षे) हा सकाळी माळी मोहल्ल्यातील उपरे किराणा दुकानासमोर डग्गातून भाजीपाला विक्री करीत असताना अवैध्य दारू विक्रेता संजय श्रीरंग पात्रीकर (वय 37 वर्ष) यांचे दोघात पैशाच्या वादातून बाचाबाची झाली.
  •  
  • दोघात वाद वाढल्याने गुन्हेगार संजय पात्रीकर यांने घरून तलवार आणून अमोल पात्रीकर यांच्यावर वार केला यात अमोल पात्रीकर याच्या डाव्या डोक्या जवळील कानाजवळ जबर जखम झाली तर उजव्या हाताच्या बोटाला जखमा झाल्या. हल्ला होताच अमोल पात्रीकर यांचे वडील केशव पात्रीकर आणि प्रकाश बनकर अडवणूक करण्यास गेले असता तलवारीने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला जबर मार लागले. जखमी अवस्थेत अमोल पात्रीकर याला वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी विजय धुमाळे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता आरमोरी उप जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. 
    घटनेची माहिती मिळतात आरमोरी ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलीस विभागाचे कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक चलाख, हवालदार किशोर मेश्राम, बीट जमादार राकेश टेकाम आणि पोलीस शिपाई लकी मामुलकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून नालीत असलेली तलवार जप्त केली आणि गुन्हेगार संजय पात्रीकर याला जेरबंद करून आरमोरी पोलीस स्टेशन येथे नेऊन पुढील तपास करीत आहेत. गुन्हेगार हा अवैद्य व्यवसाय करीत असून त्याची गावात दहशत निर्माण झाली आहे. खुले आम तलवार घेऊन नागरिकांवर वार करीत असल्याने पोलीस विभागाने त्याला हद्दपार करून त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 16, 2025

PostImage

सिंधीची अवैध विक्री; 55 हजारांचा मुद्देमाल जप्त,आरमोरी पोलिसांची कारवाई


 

आरमोरी, (ता. प्र.). मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांचे पथक आरमोरी-गडचिरोली मार्गावर सापळा रचून असताना एका संशयित दुचाकीस्वाराला थांबवून चौकशी केली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी अवैध सिंधी आढळून आली. पोलिसांनी सिंधी व दुचाकी असा एकूण 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 15) केली. याप्रकरणी सतीश याडय्या पोडीचेट्टी (29, रा. कंटगगुर, जि. नालगुंडा तेंलगणा, ह.मु. अरसोडा आरमोरी) याला ताब्यात घेतले.

 

आरमोरी पोलिसांचे पथक आरमोरी गडचिरोली मार्गावर गस्त घालताना, टीएस-05 इजी-5610 क्रमांकाचीदुचाकी संशयितरित्या येताना दिसून आली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवून चौकशी केली असता, 84 प्लास्टिक बॉटलमध्ये 8 हजार 400 रुपये किंमतीची 84 लीटर सिंधी, प्लास्टिक कॅनमध्ये 1 हजार 500 रुपये किंमतीची 15 लीटर सिंधी, सिंधीच्या वाहतु‌कीसाठी वापरलेली 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी, 40 लीटर क्षमतेच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरलेली 3 हजार रुपये किंमतीची सिंधी, प्लास्टिक कॅनमध्ये 6 हजार किंमतीची 60 लीटर सिंधी, प्लास्टिक बॉटलमध्ये भरलेली 1300 रुपये किंमतीची सिंधी असा एकूण 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सतीश पोडीचेट्टी याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोनि कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात पोहवा रणजित पिल्लेवान, पोशि हंसराज दास यांनी केली. अधिक तपास सफौ नीलकंठ कोकोडे करीत आहे.

तसेच आरमोरी तालुक्यांतील वैरागड येथे सुद्धा मोठया प्रमाणात नकली सिंधी विकली जाात आहे याकडे पोलीसांनी लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांची मागणी आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

गडचिरोली न्यूज: कारच्या धडकेत 2 दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू


 

दि. १५ जानेवारी गडचिरोली शहरापासून ५ किमी अंतरावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवारी रात्री १० वाजता चे सुमारास एका कारने मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला आहे. मयुर विलास भुरसे (२५) रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, विकास मधुकर धुडसे, (२५) रा. डोगरसावंगी, ता. आरमोरी अशी मृतकांची नावे आहेत.

 

प्राप्त माहितीनुसार मृतक मयुर विलास भुरसे हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३३ वाय २५१३ ने गडचिरोली वरुन ठाणेगाव कडे १० वाजताचे दरम्यान त्याचा मित्र विकास मधुकर धुळसे सह जात असतांना एक पांढऱ्या रंगाच्या रेनाल्ड कॉप्टर वाहन क्रमांक एम. एच. ३३ व्ही ४३३३ चा चालक आशीष माणीक एंचिलवार, रा. देऊळगाव, ता. आरमोरी याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन हयगयीने व भरधाव वेगाने व रस्त्याच्या परीस्थीतीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालवुन वाहनास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही मोटरसायकल स्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे नातेवाईक कार्तीक श्रीकृष्ण कुनघाडकर वय २० वर्ष, रा. तळोधी मोकासा ता. चामोर्शी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते प्रकरणाची चौकशी करीत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

उपसरपंचाला शिवीगाळ करून पेचकसने भोसकले


 

 गोंदिया, ब्युरो. शिवीगाळ करीत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला तू शिवीगाळ कशाला करतोस, असे हटकले असता उपसरपंचाला शिवीगाळ करून पेचकसने भोसकले. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभी येथे रविवारी (दि. 12) घडली.

 

उपसरपंच नेपाल देवनाथ शेंडे (45, रा. कोरंभी) यांचे गावात मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास दुकान बंद करून ते गावातीलच आंबेडकर चौकात बसून होते. यावेळी अशोक गुलाब मेश्राम (50) हा रस्त्याने शिवीगाळ करीत जात होता. दरम्यान नेपाल यांनी त्याला विनाकारण शिवीगाळ कशाला करतोस,

 

असे म्हणत हटकले. दरम्यान अशोकने अश्लील शब्दात शिवीगाळ करून नेपालच्या पाठीवर पेचकसने वार केला. त्यानंतर विलास केवळराम मेश्राम (35) हादेखील तेथे आला. त्यानेही शिवीगाळ करून ढकलून मारहाण केली. यात नेपाल शेंडे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्राप्त तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

वाघाच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू पण वाघ हा मृतदेहाजवळच बसून होता


 

बल्लारपूर, (ता.प्र.) वाघाच्या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी 10 वाजताच्या सुमारास बल्हारशाह वनपरिक्षेत्रात घडली. लालसिंग बरेलाल मडावी (57 रा. मणिकपूर माल (बेहराटोला) त. बिछाया जि. मंडला रा. मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे.

 

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर व वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह आपल्या अधिनस्त वनकर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाघ हा मृतदेहाजवळच बसून होता. वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता वाघाने वनकर्मचाऱ्यांच्या दिशेने धूम ठोकली. दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास अति शिघ्र दलाला पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डॉट मारुन सदर वाघाला बेशुध्द केले.

 

त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला. तसेच मृत व्यक्तीचे नातेवाईकास सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील गाडे, क्षेत्र सहाययक के.एन. घुगलोत, व्हि.पी. रामटेके, वनरक्षक सुधीर बोकडे, अनिल चौधरी, धर्मेंद्र मेश्राम, तानाजी कामले, वर्षा पिपरे, उषा घोडवे, वैशाली जेनेकर, माया पवार, पुजा टोंगे आजी कर्मचाऱ्यांनी केली.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

गोड गोड बोलून अल्पवयीन मुलीस् फूस लावून पळविले


 गडचिरोली, ब्युरो. घरी एकटीच असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे घडली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रेगडी पोलिस मदत केंद्रात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्नजीत उर्फ नाटो भवरंजन दत्त रा. विकासपल्ली ता. चामोर्शी असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे वडील नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात कामाला गेले होते. पीडित मुलीची आई घरी होती. दरम्यान, प्रसन्नजित याने पीडितेचे घर गाठले. पीडितेच्या आई वडिलांची कोणतीही परवानगी न घेता

 

तसेच पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानासुद्धा जाणूनबुजून त्याने तिला फुस लावून पळून नेले. यासंदर्भात पीडितेच्या आईने रेगडी पोलिस मदत केंद्रात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक राहुल बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माधुरी शेलार करीत आहेत.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


 

 

चंद्रपूर : वेकोलिच्या एकतानगर चारगाव वसाहतीमधील एका विवाहित महिलेने स्वतःच्याच गळफास घरी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रुबी पवन राय (३२) मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतकाचे वडील आणि भावाने केला आहे.

 

पवन राय हे वेकोलित नोकरीला आहेत. रुबी यांच्यासोबत त्यांचा १२ वर्षापूर्वी विवाह झाला. त्यांना दोन मुली आहेत. वेकोलिच्या एकतानगर वसाहतीत पत्नी, दोन मुली व आईसह राहतात. सोमवारी पती व सासू बाहेर गेली असता, पत्नी रुबी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

प्रवेशद्वार कोसळले, एक विद्यार्थिनी गंभीर जखमी


 

कोरची : तालुका मुख्यालयापासून सहाकिलोमीटर अंतरावर येत असलेल्या सोहले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्य प्रवेशद्वार व सिमेंटचे पिलर कोसळून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. १३ रोजी ही घटना घडली.

 

पूर्वशी मदन उंदिरवाडे (वय ६, रा. सोहले) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास शाळेच्या वेळेत पूर्वशी शाळेच्या मुख्य द्वाराजवळ खेळत होती. तेव्हा अचानक तिच्या अंगावर शाळेचा लोखंडी प्रवेशद्वार व पिलर कोसळले.

 

यात तिचा डावा पाय तुटला व डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव झाला. त्यानंतर कोरची ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार देऊन दुखापत गंभीर असल्यामुळे तिला रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

 

 

 

रुग्णवाहिकेला विलंब, विद्यार्थिनी ताटकळत

 

१०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे बराच वेळपर्यंत विद्यार्थिनीला ताटकळत राहावे लागले. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तेव्हा ग्रामीण रुग्णालयातील १०२ रुग्णवाहिका होती; परंतु येथील वाहनचालक रवी बावणे हे उपस्थित नव्हते. तिच्यावर ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

लग्नाच्या आमिषाने चक्क २५ महिलांना लुटले


 

कोल्हापूर : एकीकडे मुली मिळत नसल्याने लग्न रखडलेल्या तरुणांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकाने २५ हून जास्त महिलांना गंडा घातला आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लखोबा लोखंडे फिरोज निजाम शेख (वय ३२, सध्या रा. कोंढवा, पुणे, मूळ रा. गंगावळण, कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी पुण्यातून अटक केली. त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

 

 

घटस्फोटित विधवा महिलांना लक्ष्य

 

शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी डॉट  कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाइल नंबर मिळवून फिरोज शेख नावाच्या तरुणाने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले.

 

त्यानंतर ओळख वाढवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिने उकळले.

 

लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर  झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने १० जानेवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

 

● कोल्हापूरच्या पोलिस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.

 

२५ महिलांना लुबाडले

 

शेख याने २५ महिलांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, काही ठिकाणी तक्रार अर्ज आहेत.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 15, 2025

PostImage

नायलॉन मांजा गळ्यात अडकून उपप्राचार्य जखमी


 

गडचिरोली : सध्या मकरसंक्रांतीच्यापर्वावर पतंगबाजीला चांगलेच उधाण आले आहे. शहरातील रस्त्यांवर लहान मुलांसह तरुणही पतंग उडवताना दिसत आहेत. दरम्यान शाळेतून घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार नायलॉन मांजाने जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी ४.३० वाजता शहरातील धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरात घडली. शैलेश आकरे (३५) असे जखमीचे नाव असून ते स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

 

नुकताच गडचिरोली शहर पोलिसांनी २० हजार रुपये किंमतीचाबंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी दुपारी ४.३० वाजता शाळा सुटल्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर्सचे उपप्राचार्य शैलेश आकरे हे दुचाकीने घराकडे जात होते.

 

दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी नुकतीच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. नगर पालिकेनेही या संदर्भात जनजागृती केली होती. मात्र, यानंतरचही नायलॉन मांजाचीही विक्री झाल्याचे समोर आले आहे. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 14, 2025

PostImage

तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची वाट बघण्याचे ठरविले अन् झालं भलतचं


नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वर्गमैत्रिणीसह प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकराने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पीयूषा वेळकर (२६, नवीन कामठी) असे मृत युवतीचे नाव आहे. तर सागर राजू करडे (३०, कन्हान) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूषा ही नवीन कामठीत आईवडील आणि भावासह राहते. तिचे वडील व्यवसाय करतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख वर्गमित्र सागर करडे याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असताना सागरने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकर दिला. दोघांनीही कुटुंबियांची परवानगी घेऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही कुटुंबियांशी प्रेमविवाहाबाबत विचारणा करण्याचे ठरविले. दोघांचेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्न केल्यानंतर जगायचे कसे? असा प्रश्न करीत नोकरी लागल्यावर कुटुंबियांशी चर्चा करुन लग्न ठरवू, असे सांगून पीयूषाची समजूत घातली. पीयूषा एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली तर सागर मुंबईला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागला.

 

 

 

लग्नाचा तगादा आणि प्रियकराची टाळाटाळ

पीयूषा आणि सागर दोघेही नोकरी करीत असल्यामुळे आता लग्नाला कुणी विरोध करणार नाही, अशी धारणा ठेवून सागरकडे लग्नाचा तगदा लावत होती. मात्र, सागर वेगवेगळी कारणे देऊन लग्नास टाळाटाळ करीत होता. प्रियकराची लग्नास टाळाटाळ बघता पीयूषा नैराश्यात गेली. तिने नोकरी सोडून दिली आणि घरी राहायला लागली. यादरम्यान, तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची वाट बघण्याचे ठरविले.

 

 

प्रियकराचा नकार अन् प्रेयसीची आत्महत्या

१० डिसेंबरला पीयूषाने सागरला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी सागरने तिला थेट लग्न करण्यास नकार देऊन चांगला मुलगा बघून लग्न करण्याचा सल्ला दिला. कुटुंबियांनी लग्न करण्यास नकार दिल्याचा बहाणा सागरने करीत पुन्हा लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीयूषा आणखी नैराश्यात गेली. ती अबोल झाली. तिने ‌वडिलांकडे सागरबाबत सांगून त्याच्या आईवडिलांना लग्नाबाबत विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, सागरने लग्न करण्यास नकार देऊन संबंध संपल्याचे सांगितले. त्यामुळे पीयूषाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. सागरने प्रेमात दगा दिल्यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे तिने आईकडे बोलून दाखवले होते. आईने तिला धीर देऊन सांत्वन केले होते. मात्र, पीयूषाने २९ डिसेंबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी सागरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 14, 2025

PostImage

आमदार रामदास मसराम यांची जिल्हाधिकारी यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा


हर्ष साखरे विदर्भ फायर न्यूज संपादक 9518913059

आज दिनांक 14 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रामदास मसराम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

या चर्चेमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:

 

ग्रामीण भागातील नागरिकांना जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट सोलर तार फेंसिंग देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली

 

घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या रेतीपुरवठ्यावर चालू असलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी केली. यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण करता येईल.

 

जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

 

या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील प्रशासनाने सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.

 

आमदार रामदास मसराम यांनी या चर्चेतून जिल्ह्यातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 14, 2025

PostImage

आपसी समन्वयातून विकास कामे मार्गी लावा - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा


 

गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले. 

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध विभागांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा मॅराथॉन बैठकीतून घेतला. त्यांनी विभाग प्रमुखांना दायित्व रक्कमेची अगोदर मागणी करून नंतर नवीन कामांची नोंदणी आयपास प्रणालीवर प्राधाण्याने करण्याचे आणि प्राप्त निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नियोजन विभागानेही प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा निधी प्राप्त निधीच्या प्रमाणात संबंधीत विभागांना तातडीने बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्याचे सांगितले.

येत्या काळात जिल्ह्यातील खाणकाम रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने कौशल्य विकास विभागाने खाणकामाशी संबंधित प्रशिक्षण सुरू करावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष नियोजन करावे, जिल्हा ग्रंथालयाने सुसज्ज आणि आधुनिक ग्रंथालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले. विकासनिधी मंजूर असलेल्या सर्व कार्यालयांनी निधी खर्चासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. यासंदर्भात निधी उपलब्धता, प्रशसकीय मान्यता अथवा इतर कोणत्याही अडचणी असल्यास संबंधीत विभागाने आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याच्या सूचनाही त्यांनी यसाप्रसंगी दिल्या.

बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 14, 2025

PostImage

देसाईगंज: अन् भल्या मोठ्या वाघाने मागेहून हल्ला चढवला


 

देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या जुनी वडसा येथील शेतकऱ्यास ऐन मकरसंक्रांती सणाच्या दिवशी म्हणजेच आज, मंगळवारी १४ जानेवारीला सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान वाघाने हल्ला चढविल्याची घटना जुनी वडसा येथील शेतशिवारात घडली. गणपत केशव नखाते वय ४६ वर्षे, रा. जुनी वडसा, ता. देसाईगंज असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी गणपत नखाते हे आज सकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर गेले होते. अशातच शेतावर कामे करीत असतांना गणपत यांचेवर अचानकपणे भल्या मोठ्या वाघाने मागेहून हल्ला चढवला. हल्ला चढवताच त्यांनी आरडा ओरड केली. आरडा ओरड करताच परिसरातील शेतकरी तसेच मकरसंक्रांती सणा निमित्त नदी तीरावर जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धावघेतली

घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाल्याने वाघाने जुनी वडसा शेतशिवारातून कुरुड गाव परिसराकडे धूम ठोकली. घटनास्थळावर काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. जखमी शेतकऱ्यास नागरिकांनी तात्काळ देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वाघाने मागेहून हल्ला चढवत गणपत नखाते यांच्या पाठी मागील खालील भागावर पंजा मारून जखमी केले आहे. सदर घटनेची माहिती देसाईगंज वन विभागास देण्यात आली. त्यानुसार वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी धोंडणे, वनक्षेत्र सहाय्यक के. वाय. कऱ्हाडे सह वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचेकडून वाघावर पाळत ठेवण्यात येत आहे.

 

ऐन मकरसंक्राती सणाच्या दिवशीच वाघाने हल्ला चढवून शेतकऱ्यास जखमी केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाघाचा बंदोबस्त करून जखमी शेतकऱ्यास वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी केली जात


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 14, 2025

PostImage

प्रेमीयुगुल विवाहबद्ध


कुरखेडा : दुर्गम गावातून उच्च शिक्षण घेण्यासह पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता गडचिरोली गाठले. दोघेही वेगवेगळ्या गावचे; पण ध्येय एकच होते. जवळपास भाड्याच्या खोलीत राहत असल्याने ओळख झाली. सततच्या संपर्कामुळे आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. एकमेकांशिवाय जगणे अशक्य वाटू लागले. अंगावर खाकी वर्दी चढवू पाहणारे हे प्रेमीयुगुल अखेर ११ जानेवारी रोजी गेवर्धा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने बोहोल्यावर चढून विवाहबद्ध झाले.

 

अनिल सुधाकर पोर्तेट (24) एम.पो. जिमलगट्टा ता.अहेरी व अनिता सुक्रम कोरामी (२६) मु, कसुरवाहीपो. जारावंडी ता. एटापल्ली अशी विवाहबद्ध झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. अनिल व अनिता हे गडचिरोली येथे उच्च शिक्षण घेण्यासह पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता गडचिरोली येथे आले होते. गडचिरोली शहरातील एका वॉर्डात ते परिसरातच राहून अभ्यास करीत असत. सोबतच पोलिस भरतीची तयारी करीत होते. यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत, त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम एवढे दृढ झाले की, त्यांनी प्रेमविवाह करण्याचे ठरविले; परंतु आपल्या प्रेमाला कुटुंबीयांकडून विरोध होऊ शकतो, अशी शंका त्यांच्या मनात होती. अखेर गेवर्धा येथे तंमुसच्या पुढाकाराने विवाह सोहळा पार पाडण्यात आला. याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, तंटामुक्त गाव समिती

 

मित्र बनला दुवा

 

गडचिरोलीतसुद्धा कोणीच ओळखीचे नव्हते. तेव्हा त्यांच्या परिसरातच राहून शिक्षण घेणारे गेवर्धा येथील मित्र लोमेश्वर कुळमेथे यांच्यासमोर त्यांनी प्रेमविवाहाची इच्छा बोलून दाखविली. कुळमेथे यांनीही यातून मार्ग शोधत गेवर्धा येथे तंमुसच्या पुढाकारातून प्रेमविवाह करण्याचा सल्ला दिला व त्यांना गेवर्धा येथे विवाह झाला.

 

अध्यक्ष राजू बारई, पोलिस पाटील भाग्यरेखा वझाडे, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, आशिष टेंभुर्णे, राजेंद्र कुमरे, सुरेश पुसाम, सुधीर बाळबुद्धे, मडावी, योगेश नखाते, प्रभाकर कुळमेथे, संदीप कुमरे, माधुरी शेंडे, हीना पठाण, मनीषा कुळमेथे, डाकराम कुमरे, कृष्णा मस्के, दिनेश कावळे, पीयूष कुळमेथे, राहुल नखाते, विनोद गावळे व नागरिक उपस्थित होते.

 

 

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 14, 2025

PostImage

उद्घाटन करून येताना अपघाती मृत्यू


 

 एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन करून एकरा गावाहून परतताना दुचाकीला अपघात झाला. यात एटापल्लीचे माजी उपसरपंच अभय उर्फ पापा वसंतराव पुण्यमूर्तीवार (५४) यांचा मृत्यू झाला. ही घटना १२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता एकरा गावाजवळ घडली.

 

एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर एकरा गावात होत आहे. याचेउद्घाटन १२ रोजी करण्यात आले. अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांना निमंत्रण होते. उद्घाटन कार्यक्रम आटोपून ते दुचाकीवरून एटापल्लीला परतत होते.

 

अपघातानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला हलविले, पण पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात.

 

वडिलांनंतर मुलाचाही महिनाभरात मृत्यू •

 

अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे महिनाभरापूर्वीच वृध्दापकाळाने निधन झाले होते. पाठोपाठ मुलाचाही अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुसरा आघात झाला. त्यांच्यावर १३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मोठी कन्या त्रतू हिने अग्निडाग दिला.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 13, 2025

PostImage

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी


 

चंद्रपूर, ब्युरो. नागभीड वनपरिक्षेत्रातील रण (परसोडी) परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना पारडी (थावरे) गावातील कोसंबी बीट येथील मिंडाळा सर्कलमध्ये शुक्रवारी (दि.10) दुपारच्या सुमारास घडली. गुरुदेव पुरुषोत्तम सराय (42) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

 

शुक्रवारी दुपारच्या सुमारास गुरूदेव सराय हे शेतात काम करीत असताना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ ब्रह्मपुरी येथील

 

खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 13, 2025

PostImage

दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला


 

गडचिरोली : तालुक्यातील गोगाव व गुरवळा येथे दोन वेगवेगळे अपघात घडले. या अपघातांमध्ये दोघे जागीच ठार झाले, तर एकटा जखमी झाला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम अतिशय गतीने सुरू आहे. रेल्वेमार्गासाठी लागणारे साहित्य गोगाव येथे ठेवले जातात. त्यानंतर ते आवश्यकतेप्रमाणे नेले जाते. शुक्रवारी रात्री ८ वाजता कठाणी नदीकडे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने लोखंडी सळाखी नेल्या जात होत्या.

 

दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अगदी रस्त्याच्या बाजूला उलटला. यात ट्रॅक्टरचालक

तारीकुल अशरफपुल हक (१९, रा. पश्चिम बंगाल) हा जागीच ठार झाला, तर ट्रॅक्टरवर बसलेला कबीर उल इसाइत अली (२३, रा. पश्चिम बंगाल) हा जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 

दुसरा अपघात गडचिरोलीपासून चार किमी अंतरावर गुरवळा मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजता घडला.

 

अपघातात झाली वाढ

 

२०२४ डिसेंबरअखेर तसेच २०२५ च्या जानेवारी महिन्यात गडचिरोली शहर परिसरात अपघाताची मालिका सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले. तर काही जणांचा बळी गेला. नियम मोडल्याने अपघात होतात.

 

गुरवळा येथील विनोद मुखरू तुनकलवार (४०) हे दुचाकीने गडचिरोली येथे येत होते. दरम्यान विरुद्ध दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने विनोद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत विनोद हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 13, 2025

PostImage

पतीविरोधात खोटी तक्रार म्हणजे क्रूरताच : हायकोर्ट


 

मुंबई :

पतीची वागणूक सुधारण्यासाठी त्याच्याविरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल करणे, या पत्नीच्या वागणुकीला विवाहित जोडप्याच्या सौहार्दपूर्ण नातेसंबंधात स्थान मिळू शकत नाही. अशी तक्रार करणे म्हणजे क्रूरताच आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

 

न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. कुटुंब न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करताना म्हटले की, पत्नीने पतीचे वर्तन सुधारण्यासाठी त्याच्याविरोधात खोटी पोलिस तक्रार केली. त्याचा त्रास पतीला आणि त्याच्या घरच्यांना झाला.

 

'पतीचे वर्तन सुधारण्यासाठी पोलिसांकडे खोटी तक्रार केल्याने पतीला व त्याच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. एकमेकांवर विश्वास, आदर असलेल्या सौहार्दपूर्ण वैवाहिक नात्यात पत्नीच्या या वागण्याला स्थान नाही. तसेच जोडीदाराविरुद्ध खोट्या खटल्याने

 

पत्नीचे कृत्य घटस्फोट मंजूर करण्यास पुरेसे खोटी पोलिस तक्रार करून विवाहटिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना तडा गेला आहे, त्यामुळे पत्नीची वागणूक ही एक प्रकारची क्रूरता आहे आणि हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कल १३(१) (आय-ए) अंतर्गत घटस्फोट मंजूर करण्याचा आधारही आहे. पत्नीचे हे कृत्य पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्यास पुरेसे कारण आहे, असे म्हणत न्यायालयाने कुटुंब न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

 

दुसऱ्या जोडीदाराचे मन दुखावले आहे. विवाहाचे गांभीर्य राखण्यासाठी जोडीदाराने सर्व विश्वासार्हता गमावली आहे, असे न्यायालयाने म्हटले.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 13, 2025

PostImage

अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म


 

कोरची : तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, अत्याचारग्रस्त अल्पवयीन पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर सदर घटना उघडकीस आली आहे. यानंतर पीडितेनी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनंतर आरोपी फरार झाला आहे. विशेष म्हणजे, पंधरवड्यात कोरची तालुक्यातील ही दूसरी घटना असून तालुक्यातील एकाच गावातील दोन पीडित आहेत.

 

प्रवीण महेश मडावी (२०) रा. कोटरा, तालुका कोरची असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीशी ओळख करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली. तिला ग्रामीण रुग्णालय चिचगड भरती करण्यात आले. येथे तिने एका निरागस बाळाला जन्म दिला आहे असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मुलगी गोंदियाजिल्ह्यातील चिचगड रुग्णालयात प्रसूत झाल्यामुळे चिचगड पोलिस ठाण्यात कलम ३७६ (१) सहकलम ४, ६ पोस्को अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सध्या पसार आहे. कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार हे पुढील तपास करीत आहेत.

 

गोंदिया येथे उपचार सुरू

 

अत्याचार झाला त्यावेळी मुलगी १७ वर्षांची होती. आता मात्र, १८ वर्ष पूर्ण झाले आहेत. अत्याचाराच्या वेळी वय कमी असल्याने पोलिसांनी पोक्सो दाखल केला आहे.

 

 

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 11, 2025

PostImage

महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीतील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी केला गून्हा दाखल


अमरावती : जात पंचायतीचा आदेश न पाळल्‍याने पती-पत्नीसह दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्‍याची धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीतील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दीपक पांडुरंग पवार, सुधाकर पवार, देवेंद्र सूर्यवंशी, धनराज पवार, शैलेश पवार, मनीष सूर्यवंशी सर्व रा. विलासनगर, अमरावती, किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार, खेमराज सोळंके तिघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा व देवा पवार रा. तिवसा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

सविता (काल्‍पनिक नाव) या तक्रारदार महिलेचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. महिलेला दुसरा मुलगा झाला, तेव्हा सविता माहेरी आईकडे होती. त्यावेळी करूणा (काल्‍पनिक नाव) त्यांच्याकडे आली. मी तुझ्या नवऱ्यापासून गर्भवती आहे. मला तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचे आहे, आता तर तुझ्या नवऱ्याला मला घरात घ्यावेच लागेल, असे करूणा तिला म्हणाली.

 

 

करूणा हिने दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारावर पोलिसांनी सविता हिच्‍या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत सविताने आपल्या पतीला विचारपूस केली. आपले लग्नापूर्वी करूणासोबत प्रेमसंबंध होते. त्यावेळी तिला लग्नाबाबत विचारले होते. मात्र, तिने लग्न केले नाही, असे सविताच्‍या पतीने तिला सांगितले. दरम्यान, करूणा हिने विलासनगर येथील संबंधित जात पंचायतीमध्‍ये सविताच्‍या पतीविरुद्ध तक्रार केली. त्यावर पंचायतने सविता व तिच्‍या पतीला बोलावून घेतले. करूणासोबत लग्न कर, असा आदेश यावेळी सविताच्‍या पतीला देण्यात आला. त्यावर त्यांनी नकार दिला. त्यामुळे जात पंचायतमध्ये असलेल्या संबंधित दहा जणांनी सविता, त्यांचे पती व त्यांच्या दोन मुलांना समाजामधून बाहेर काढल्याचा निर्णय दिला. समाजातील कुणी व्यक्ती सविता किंवा त्यांच्या कुटुंबाशी बोलल्याचे आढळल्यास त्यांनासुद्धा समाजाबाहेर काढून टाकले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तेव्हापासून आपल्यासह पती व दोन मुलांवर समाजासह नातेवाइकांनीसुद्धा बहिष्कार टाकल्याची तक्रार सविताने गाडगेनगर ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जातपंचायतींच्या दहशतीमुळे अनेक कुटुंबांना वाळीत टाकण्याचे घडणारे प्रकार माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. आदेश न पाळल्‍याने नागरिकांचा जातपंचायतींकडून पद्धतशीर छळ केला जातो. असाच हा प्रकार आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 11, 2025

PostImage

मित्रांना बायकोवर बलात्कार करायला सांगायचा, नवरा लाईव्ह व्हिडिओ बघायचा


उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथील एक महिला तिच्या पती आणि मित्रांच्या क्रुरतेची बळी ठरली आहे. पती त्याच्या मित्रांना लैंगिक अत्याचार करायला सांगायचा. या मोबादल्यात मित्रांकडून पती पैसे घ्यायचा. हा किळसवाणा प्रकाराला कंटाळून अखेर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्याय मिळावा अशी मागणी केली.

 

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले, '२०१० साली बुलंदशहरच्या गुलावठी येथील एका पुरूषासोबत लग्न झाले. लग्नानंतर २ मुलगा आणि २ मुलगी असे ४ मुले आहेत. पती कामानिमित्त सौदी अरेबियात राहतो आणि तिथे मेकॅनिक आहे. तो वर्षातून २ वेळा घरी येतो. महिलेने आरोप केला की, ४ मुले असूनही एक महिन्यांची गर्भवती आहे. कारण पतीचे मित्र घरी येतात आणि लैंगिक अत्याचार करतात. गेल्या ३ वर्षांपासून हा किळसवाणा प्रकार सुरू आहे, आणि पती सौदी अरेबियातून हे सगळं लाईव्हद्वारे पाहतो. मुलांसाठी गप्प राहिली होती. पण आता हद्द झाली आहे.'

 

 

मिंत्राकडून लैंगिक अत्याचार आणि मोबदल्यात पैसे

 

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले, ३ वर्षांपूर्वी तिचा पती दोन मित्रांसह घरी आला होता. नंतर पतीने पत्नीला दोन मित्रांच्या स्वाधीन केलं. पैसे घेऊन पती निघून गेला. मात्र त्यानंतर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. दोघेही बुलंदशहरचे रहिवासी असून, पती सध्या परदेशात आहे. दोघे मित्र घरी कधीही येतात आणि अत्याचार करतात. अत्याचार करत असताना, मित्र पतीला लाईव्ह व्हिडिओ दाखवतात. जर विरोध केला, तर मित्र मारहाण करतात.

 

महिलेने पतीला जाब विचारले असता, पैसे देत असल्याचं सांगत तिला गप्प बसण्यास सांगितले. काही कारवाई केल्यास घटस्फोट देईन, अशी पतीने धमकी दिली. मात्र, याच जाचाला कंटाळून तिने तिच्या पालकांसह बुलंदशहरचे एसपी यांची भेट घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला असून, या प्रकरणाबाबत पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 11, 2025

PostImage

मोहटोलात गावठी दारूअड्डा उद्ध्वस्त


 

आरमोरी : तालुक्यातील मोहटोला येथेगावठी दारुअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ९ जानेवारीला केली.

 

राजेंद्र संपत कुमरे (३६, रा. मोहटोला ता. आरमोरी) याने शेतात मोहफुलांची दारू बनविण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या पाच ड्रममध्ये सडवा टाकला होता. याबाबत आरमोरी पोलिसांना माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकला. एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र कुमरे यास ताब्यात घेतले.

 

अंमलदार जयपाल बांबोळे यांच्या फिर्यादीवरून आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास हवालदार राकेश टेकाम करत आहेत. या कारवाईने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 10, 2025

PostImage

मुख्याध्यापक तथा शिक्षक अक्षरशः दारुच्या अड्ड्यावर दारु पित आढळले


 

एटापल्ली: तालुक्यातीलएका केंद्रस्तरीय शाळेत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान दारुच्या अड्ड्यावर मुख्याध्यापकासह शिक्षक अक्षरशः दारुमध्ये तर्रर्र झाल्याचे आढळून आल्याने शिक्षण विभागासह तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. या संदर्भात फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

 

 

शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभरात केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतीक महोत्सवाची धुम सुरु आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार शिक्षकही या क्रीडा स्पर्धेसह सांस्कृतीक कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांची तयारी करीत आहेत. अशातच

 

तालुक्यातील एका केंद्र शाळेत तालुका क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्या असतांना विविध शाळेतील काही मुख्याध्यापक तथा शिक्षक अक्षरशः दारुच्या अड्ड्यावर दारु पित असतांना आढळून आले. यासंदर्भातचे समाजमाध्यमावर फोटो व्हायरलझाल्याने एकच खळबळ निर्माण झाली.

 

 

एकीकडे विद्यार्थ्यांना आदर्शवत नागरीक घडविण्याचे ज्ञान देणारे शिक्षक वृंदच दारुच्या नशेत तर्रर्र असल्याने या शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना काय शिकवण मिळणार असा, प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. दारुच्या अड्यावर शिक्षक दारु

 

पित असतांनाचे छायाचित्र समाजमाध्यमातून सर्वत्र प्रसारित झाले आहे. दरम्यान शिक्षण विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेया शिक्षकांवर शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी कोणती कार्यवाही करतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांसह पालकांचे लक्ष लागले आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025

PostImage

जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीत आमदार रामदास मसराम यांची भेट, आरोग्य सेवांवर चर्चा


 

गडचिरोली: जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन रुग्णांची पाहणी केली. आरोग्य सेवांच्या दर्जात सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध उपाययोजनांवर भर दिला. कोरची, कुरखेडा, आरमोरी आणि वडसा या ठिकाणी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, जेणेकरून गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतील.

 

तशेच अपंग प्रमाणपत्रांसाठी योग्य असेसमेंट प्रक्रिया राबविण्यावरही भर दिला, ज्यामुळे अपंग व्यक्तींना वेळेत प्रमाणपत्रे मिळतील. तसेच, रक्तपेढीच्या सुविधांबाबत त्यांनी ब्लड स्टोरेज कुरखेडा आणि वडसा येथे सुरू करण्याची गरज व्यक्त केली.

 

आरोग्याशी संबंधित इतर समस्यांवर आमदारांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आमदार मसराम यांच्या या भेटीमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025

PostImage

घरगुती वाद विकोपाला, पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला


 

 

कोरची : तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील दोडके येथे पतीने घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. महिलेवर उपचार सुरू आहेत.

 

संतारोबाई कोरेटी (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. आशू कोरेटी (५०, रा. दोडके) हा ६ रोजी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. यावेळी घरगुती कारणावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आशू

कोरेटी याने रागाच्या भरात कुन्हाडीने पत्नीवर हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी संतारोबाई यांना त्यांच्या भावाने कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025

PostImage

छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी- जिल्हाधिकारी यांना निवेदन 


 

गडचिरोली:  जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा. गडचिरोली - NDTV व बस्तर जॅक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशिची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्हयात रेती , मुरूम माफीया , दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात. मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये .महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदि मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांना मागण्याचे निवेदन यांच्या मार्फतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदया , पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा ,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री छत्तीसगड , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

 

 

सदर मोर्च्यात पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर , व्येंकटेश दुडमवार , लोकमत पत्रकार संजय टिपाले , सुरेश पद्मशाली , मुकुंद जोशी , उदय धक्काते , हेमंत डोर्लीकर , प्रल्हाद म्हशाखेत्री ,प्रकाश ताकसांडे , प्रकाश दुबे 'जगदिश कन्नाके , मारोती भैसारे ' विलास ढोरे , सुरज हजारे 'राजरतन मेश्राम , प्रा. दिलीप कवरके , नाशिर जुम्मनशेख , हेमंत दुनेदार ' महेश सचदेव ,कैलास शर्मा 'दिनेश बनकर , कृष्णा वाघाडे,हस्ते भगत , नशिर शेख , भाविकदास कळमकर , मुकेश हजारे , संदिप कांबळे , विनोद कुळवे , किशोर खेवले , सोमनाथ उईके ' निलेश सातपुते , श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे ,जयंत निमगडे ' हर्ष साखरे , कबिर निकुरे , प्रमोद राऊत , विजय शेडमाके , टावर मडावी , उमेश ग जलपल्लीवार , पुंडलिक भांडेकर ,अनुप मेश्राम , श्रावण वाकोडे , कालिदास बुरांडे , धनराज वासेकर , विलास वाळके. 'गोर्वधन गोटाफोटे , रवि मंडावार , राजेश खोब्रागडे 'चोखोबा ढवळे 'सतिस ढेभुर्णे 'गेडाम , धम्मपाल दुधे ' नाजुक भैसारे , रेखाताई वंजारी , विजयाताई इंगळे , तिलोतमा हाजरा आदि साहित जिल्हयातील 150 पत्रकार उपस्थित होते.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025

PostImage

आमदार मसराम यांचा एक कॉल आणि समस्या दूर


कुरखेडा तालुक्यातील घरकुल बांधकामासाठी रेती वितरणाचा कालावधी वाढवला

 

कुरखेडा तालुक्यात घरकुल बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेतीचे वितरण तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते. मात्र, या वितरणासाठी सुरुवातीला केवळ तीन दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेत रेती मिळविणे अवघड झाले होते.

 

दरम्यान, या संदर्भात आलेल्या तक्रारींवरून गडचिरोली जिल्ह्याचे आमदार रामदास मसराम यांनी तत्काळ लक्ष घातले. त्यांनी तहसीलदार कार्यालयाशी थेट संवाद साधत रेती वितरणाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. आमदारांच्या हस्तक्षेपामुळे आता रेती वितरणाचा कालावधी तीन दिवसांवरून सर्व घरकुलधारकांना वितरण होण्यापर्यंत वाढविण्यात आला आहे.

 

रेती वितरणाचा कालावधी वाढल्यामुळे घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव कालावधीत जास्तीत जास्त गरजूंना रेती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांनी आमदार मसराम यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाचे कौतुक केले आहे.

 

याआधी कमी कालावधीत वितरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती, आणि लाभार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता व्यवस्थापनासाठी अधिक चांगली योजना आखण्यात येणार आहे. तहसीलदारांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवत लाभार्थ्यांसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

कुरखेडा तालुक्यातील या सकारात्मक घडामोडीमुळे इतर गावांमधील गरजूंनाही याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025

PostImage

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले


 

आरमोरी - मोहझरी येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पात्र यादीमध्ये नावे समाविष्ट करून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धार्थ साखरे, प्रज्ञा निमगडे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, कपिल प्रधान चेतन निमगडे,उपस्थित होते.

        सन 2023 -24 च्या जुलै ऑगस्ट महिन्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा सर्वेक्षण कृषी सहाय्यक यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष चौकशी न करता स्वतःच्या मर्जीतील लोकांची नावे समाविष्ट करून थातूरमातूर यादी तयार करण्यात आली असा आरोप पूरग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे. 

          मोहझरी , शिवणी खुर्द येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे कृषी सहाय्यक मडकाम यांच्याकडे देऊन सुद्धा शेतकऱ्यांची नावे समाविष्ट झालेली नाही. पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आली नाही. असा आरोप पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केलेला आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025

PostImage

सरपंचासह चौघांनी केली वडधमच्या घनदाट जंगलात चितळाची शिकार


 

सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार केल्याची घटना ८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. वनविभागाने यातील आरोपींचा शोध घेतला असता या घटनेत वडधमच्या सरपंच व अन्य दोघांचा समावेश आहे. तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सरपंच फरार आहे.

 

समय्या किष्टय्या सिंगनेनी (सरपंच पोचमपल्ली), सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी, राजेश्वर सवेश्वर आकुला (सर्व रा. वडधम) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेश्वर, सवेश्वर व राकेश यांना अटक करण्यात आली आहे. तर सरपंच समय्या हा फरार आहे. ८ मार्च रोजी

वनविभागाचे पथक गस्तीवर असताना वडधम गावात विद्युत लाइन ट्रीप झाल्याचे लक्षात आले तेव्हा अनुचित घटनेचा संशय आला. वर्धम गावात चौकशी केली असता जंगलात वन्यप्राण्यांची विद्युत तारेचा स्पर्श लावून शिकार केल्याची माहिती मिळाली. वनकर्मचारी शिकार झालेल्या ठिकाणाचा शोध घेत

 

असताना राजेश्वर सवेश्वर आकुला हा दिसून आला. त्याचवेळी राजेश्वरच्या भ्रमणध्वणीवर शिकारसंदर्भात फोन आला. तेव्हा त्याला अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले की गोदावरी नदीपात्रापासून अंदाजे ३०० मीटर अंतरावरील जंगलात शिकार झाली. त्याला सोबत घेऊन शिकारीचा शोध घेत असताना वाटेत चितळाचे शिर मिळून आले. समोर काही इसम दिसून आले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. सुरपाम करीत आहेत. ही कारवाई वनपाल डी. बी. आत्राम, वनरक्षक आर. वाय. तलांडी, डी. यु. गिते, एस.एस. चौधरी, व्ही. ए. काटींगल, आर. के. आत्राम यांनी केली.

 

नदीपात्र ओलांडून आरोपींना केली अटक

 वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत गोदावरी नदीपात्र ओलांडून सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी यांना ताब्यात घेतले. समय्या किष्टय्या सिंगनेनी फरार होण्यात यशस्वी झाला. त्याचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आला नाही.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025

PostImage

दहावीतील मुलीला तेलंगणात पळवून नेण्याचा डाव ग्रामस्थांनी उधळला


 

 

पांढरकवडा (यवतमाळ):  दहाव्या वर्गातील एका १६ वर्षीय मुलीस फूस लावून तेलंगणामध्ये पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांचा बेत नागरिकांच्या सतर्कतेने उधळला. याबाबत पोलिसांनी तीन: जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

 

आरोपींमध्ये एका मुलीसह एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. आदिलाबाद येथील रणदिवसनगरमधील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा, अजय गंगाधर आडे (३०), वीणा मारोती किनाके (२३, रा. पाटणबोरी) अशी आरोपींची नावे आहेत. ७ डिसेंबरला सायंकाळच्या दरम्यान पाटणबोरी येथील एका शाळेतील दहाव्या

 

वर्गातील १६ वर्षीय मुलीस तिच्या ओळखीच्या गावातीलच वीणा मारोती किनाके (२३) हिने शाळेतून घरी नेले व त्यानंतर ती तिला इतर दोन आरोपीसोबत अदिलाबाद येथे घेऊन जात होती. यावेळी त्या अल्पवयीन मुलीच्या मामाच्या मित्रास ती मुलगी दिसून आल्याने त्याने मुलीच्या मामाला याची माहिती दिली. तेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या मामासह गावातील इतर नागरिक पाटणबोरी येथील अदिलाबाद मार्गावर आले. त्यांनी तिनही आरोपींना मुलीस कुठे नेत आहे याची विचारणा केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. नागरिकांनी त्या सर्वांना पाटणबोरी आऊटपोस्टमध्ये नेले. पोलिसांनी विचारपूस केली असता, या मुलीस फूस लावून अदिलाबाद येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 8, 2025

PostImage

ट्रकच्या धडकेत मोहझरी येथील नीलकंठ सोनुले गंभीर जखमी


मोहझरी: प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोहझरी येथील नीलकंठ सोनुले अंदाजे वय 45 हे कढोली येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने गेले होते .

 

आज सायंकाळी अंदाजे पाच वाजता सुमारास कढोलीवरून वैरागड मार्गे येत असताना कढोली जवळ असलेल्या पूलाच्या जवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्या धडकेमध्ये त्यांचा पाय मोडल्याचे घटनास्थळी दिसत आहे. 

 

सदर अपघात ट्रकच्या धडकेमुळे झाल्याचे माहिती मिळालेली आहे .कारण या मार्गावर सतत ट्रकची वर्दळ असते त्यामुळे ट्रकमुळेच अपघात सांगितले जात आहे .या घटनेची माहिती तात्काळ नागरिकांना मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती.

 

नीलकंठ सोनुले यांना कुरखेडा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते पण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा वरून त्यांना पुढील उपचाराकरीता गडचिरोली येथील शासकीय रुग्णात हलविण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे अशा अपघात करणाऱ्या ट्रक चालकावर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 7, 2025

PostImage

सहा भावांचे सहा बहिणींशी लग्न


Pakistan marriage news: लग्न सोहळा म्हटलं की भरमसाठ खर्च आला. लग्नाचा सोहळा दिवसेंदिवस खर्चिक होत चालला आहे. यासाठी सामूहिक विवाह सोहळे, नोंदणी पद्धतीने लग्न करण्याच्या काही नव्या पद्धती समोर येत आहेत. पाकिस्तानमध्येही सहा भावांनी लग्न सोहळ्याचा खर्च कमी करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले. सहा भावांचे एकत्र लग्न व्हावे, यासाठी ते वर्षभर थांबले. कारण सहाव्या भावाच्या वयाची १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी बाकी होता. पाकिस्तानच्या खामा प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, पंजाब प्रांतात हे अनोख्या पद्धतीचे लग्न झाले असून लग्नाला १०० पाहुणे जमले होते.

 

लग्न झालेल्यापैकी एका मुलीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, अतिशय साधेपणाने लग्न करावे, असे इस्लाममध्ये सांगितले आहे. संपत्तीचे जाहीर प्रदर्शन करून लग्न खर्च करणे योग्य नाही. मोठ्या भावाने सांगितले की, लग्नाचा खर्च भागवण्यासाठी काही लोक जमीन विकतात. पण साधेपणानेही लग्न होऊ शकते आणि त्यावर कोणतीही बंधने नाहीत, हे आम्हाला दाखवून द्यायचे होते

 

या सामूहिक लग्न सोहळ्यात कुणीही हुंडा घेतला किंवा दिला नाही. सहा भावांची ही कृती समाजात हुंडा बंदीचा संदेश देण्यास कारणीभूत ठरेल, असे बोलले जाते. या आगळ्यावेगळ्या लग्नामुळे लग्नाचा अर्थ प्रेम आणि आपुलकी असून श्रीमंतीचे प्रदर्शन नाही, हा संदेश देत आहोत, असे भावांनी सांगितले. माध्यमात आलेल्या बातम्यानुसार या संपूर्ण सोहळ्यासाठी केवळ ३० हजार रुपये इतका खर्च आला.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 7, 2025

PostImage

प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच केले कृत्य


छ्त्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. 17 वर्षीय मुलीची 200 फूट डोंगवरून खाली ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच हे कृत्य केल्याचं तपासात उघड झालं आहे. आरोपीला ताब्यात घेतलं असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

 

नम्रता शेरकर असं मृत मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश शेरकर (25 वर्ष) असं भावाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता अंबड तालुक्यातील शहागड येथील घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती. 

 

चिडलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी घरच्यांनी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. काकाचा मुलगा ऋषिकेश याने नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर नेले आणि तेथून ढकलून दिले. उंच डोंगरावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सर्वांना वाटलं. याप्रकरणी पोलिसांकडू सविस्तर तपास सुरु आहे. 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 6, 2025

PostImage

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांचे वाहन स्फोटाने उडवले, 9 जवान शहीद तर अनेकजण मृत्यूमुखी


 

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला असून त्यामध्ये 7 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग पेरलं होतं. या भूसुरुंगाच्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केल्याची माहिती आहे. 

 

 

 

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कुत्रु ते बेद्रे मार्गावर करकेलीजवळ नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाचा स्फोट केला आहे. नक्षल ऑपरेशन्सचे एडीजी विवेकानंद सिन्हा यांनी या हल्ल्यात आतापर्यंत 9 जवान शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. शहिदांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जवान जखमीही झाले आहेत. 

 

 

आगोदरच भूसुरुंग पेरलं होतं

 

पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेवरून छावणीकडे परतत असलेल्या वाहनात 15 हून अधिक जवान होते. सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी अगोदरच भूसुरुंग पेरलं होतं. त्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच त्याचा मोठा स्पोट झाला. यामध्ये 9 जवानांना आपले प्राण गमवावे लागले

 

 

दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरमधील संयुक्त कारवाईनंतर सैनिक परतत होते. सोमवारी दुपारी 2.15 च्या सुमारास, विजापूरच्या कुत्रु पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ अज्ञात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाचे वाहन उडवले. 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 6, 2025

PostImage

धानोरा: आदिवासी विविध विकास संस्था त्वरित सुरू करण्यात यावे


 

         धानोरा :    शासन धान खरेदी साठी दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 ते 31 जानेवारी 2025 ही कालावधी नीचित केलेली आहे 

       परंतु अजून पर्यंत धानोरातालुक्यातील मौजा, मुरुमगाव, आणि मोहली धान खरेदी सेंटर चालू झालेली नाहीत 

त्यामुळे या भागातील धान उत्पादक शेतकरी सभ्रमात आहेत आता मकर संक्रात येत आहे परंतु अजून पर्यंत धान खरेदी सेंटर चालू झालेली नाहीत

 

 

 

 

 

     त्यामुळे नाही लाजास प्रती क्विंटल सरासरी 300 रुपयाचा लास करून धानाची विक्री करावी लागत आहे व्यापारी वर्ग कडून लूट होत आहे 

         तेव्हा शासन हे आदिवासी विकास महमंडळामार्फत त्वरित चालू करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 5, 2025

PostImage

रस्त्यावरच मांडले ठाण; फरीच्या जंगलात चार वाघ


 

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा जंगलात वाघांचा संचार आहे. काही दिवसांपूर्वी तीन नर वाघांसह एक मादी वाघ ट्रॅप कॅमेराबद्ध झालेला होता. त्यानंतर वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क करण्यात आलेले होते. यापैकीच एक वाघ शुक्रवार, ३ जानेवारी रोजी दुपारी फरी गावाच्या कक्ष क्रमांक ८५३ मध्ये तलावालगतच्या रस्त्यावर दिसून आला. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

 

वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवराजपूर ते फरीदरम्यान कक्ष क्रमांक ८५३ मध्ये कुरुड फाटा ते किन्हाळा मुख्य मार्गाला फरी गावाला लागून असलेल्या ह्या कक्षात हा वाघ रस्त्याच्या कडेला बसून असल्याचे नागरिकांनी शुक्रवारी पाहिले. कोंढाळा जंगल परिसरात तीन वाघ व एक मादी वाघ वनविभागाने लावलेल्या टॅपकॅमेरात कैद झाले होते. उसेगाव जंगल परिसरात अनेकदा हा वाघ आढळून आला होता. मात्र, शुक्रवारी सदर वाघ शिवराजपूर ते फरी रस्त्यावर दिसून आल्याने भीती निर्माण झाली आहे

 

वनविभागाचे आवाहन, एकटे जंगलात जाऊ नका

 

फरी परिसरातील कक्ष क्रमांक ८५३ मध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आहे. वाघाच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष आहे. फरी, शिवराजपूर, कोकडी आदी गावांमध्ये दवंडी दिलेली आहे. नागरिकांनी शेतशिवारात, जंगलात एकटे जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 5, 2025

PostImage

आईवडील कर्नाटकात; मुलीवर बलात्कार


 

 

कोरची

मजुरीसाठी आईवडील कर्नाटकात गेल्यामुळे मावशीकडे राहणाऱ्या अल्पवयीन १४ वर्षीय मुलीवर एकाने अत्याचार केला. ही घटना ४ जानेवारीला उघडकीस आली. याबाबत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. मनीष भोयर (२१, रा. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीचे आईवडील मुलीला मावशीच्या घरी ठेवून कर्नाटकच्या विजयवाडा येथील खासगी कंपनीत कामासाठी गेले आहेत. बुधवारी रात्री मावशी शौचासाठी गेली. याचा फायदा घेऊन मनीष भोयर याने पीडित मुलीला 'तुझा काका घराकडे आला आहे. तुला बोलावत आहे', असे खोटे बोलून तिला घराकडे नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

 

घरी परतल्यानंतर पीडितेचे कपडे रक्ताने माखलेले असल्याने मावशीने विचारणा केली तेव्हा तिने आपबिती सांगितली. कोरची ठाण्याचे पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी पीडितेला धीर देत जबाब नोंदवला. त्यानंतर गुन्हा नोंदवून आरोपी मनीष भोयर यास जेरबंद करण्यात आले.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 5, 2025

PostImage

4 नक्षलवादी ठार, AK 47, SLR सारखी शस्त्रे जप्त... छत्तीसगडच्या 4 जिल्ह्यांमध्ये 1000 जवानांची मोठी कारवाई


छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमदच्या जंगलात शनिवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३ जानेवारीला नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त पथके अबुझमद भागासाठी रवाना झाली होती. 4 जानेवारीच्या संध्याकाळी अबुझमदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी मधूनमधून गोळीबार सुरू आहे.

 

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, जंगलात शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत 4 गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडून एके ४७ आणि एसएलआर सारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दंतेवाडा डीआरजी जवान हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाले. सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि बस्तर जिल्ह्यातील 1 हजार DRG आणि STF जवानांनी शनिवारी नक्षलवाद्यांच्या मुख्य भागाला वेढा घातला होता. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. जवान अजूनही घटनास्थळी हजर आहेत.

 

गेल्या दीड वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कालावधीत 300 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत, सुमारे 1000 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 837 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल, असा दावा केला होता. छत्तीसगड पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि शौर्याचे कौतुक केले.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, 'मी छत्तीसगडच्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे आणि आम्ही सर्वजण 2026 पर्यंत राज्यातून नक्षलवाद संपवण्यासाठी कटिबद्ध आहोत. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की छत्तीसगड पोलीस हे देशातील सर्वात धाडसी पोलीस दलांपैकी एक आहे. छत्तीसगडने स्थापनेच्या 25 व्या वर्षात प्रवेश केल्यामुळे, राज्य पोलिसांना राष्ट्रपतींच्या रंगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सैनिकांचे परिश्रम, समर्पण, शौर्य आणि लोकांवरील त्यांच्या प्रेमाचा हा दाखला आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 4, 2025

PostImage

पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री विष्णू देव साई 


विजापूर : मुकेश चंद्राकर या छत्तीसगडमधील तरुण पत्रकाराच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुकेशचा मृतदेह एका कंत्राटदाराच्या घराच्या सेप्टिक टॅंकमध्ये ३ जानेवारी रोजी सापडला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. सेप्टिक टॅंक पूर्णपणे काँक्रीटने झाकलेली होती, ज्यावरून पत्रकाराचा मृतदेह लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

 

 

पोलिसांकडून तपास सुरू होता

पत्रकार बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनीही मुकेशला लवकरात लवकर शोधण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी सतत मुकेशचा शोध घेत होती. अखेर मुकेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या घराजवळ सापडले. यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये मुकेशचा मृतदेह आढळून आला.

 

कंत्राटदार यापूर्वी एसपीओ होता

मुकेशच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक तरुणा मुकेशला घरातून बोलवत आपल्यासोबत घेऊन गेला होता. आणि तेव्हापासून मुकेशचा मोबाईल बंद होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेशला घेऊन गेलेला तरुण सध्या दिल्लीत आहे. मुकेश आणि कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्यात रस्ता बांधकामातील भ्रष्टाचारावरून खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मुकेश यांनी कंत्राटदाराच्या विरोधात भ्रष्टाचाराचे वृत्त प्रसिद्ध केले होते, ज्यामुळे ठेकेदार त्याच्यावर नाराज झाला होता. सुरेश चंद्राकर हे यापूर्वी एसपीओ होते. शिवाय लग्नाची मिरवणूक हेलिकॉप्टरने नेल्यानेही ते चर्चेत होते.

 

कंत्राटदारावर खुनाचा संशय

पूर्व वैमनस्यातून कंत्राटदार सुरेश चंद्राकर याने मुकेशची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कंत्राटदार सुरेश चंद्राकर सध्या संपूर्ण कुटुंबासह फरार आहे. त्याचा धाकटा भाऊ रितेश चंद्राकर दिल्लीला पळून गेला आहे. त्यांची कार रायपूर विमानतळावर उभी असलेली आढळून आली. मात्र, पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांच्या धाकट्या भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांनाही ताब्यात घेतल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

 

मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री विष्णू देव साई 

 

विष्णू देव साई म्हणाले, विजापूर येथील तरुण आणि पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता जगताची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी मृत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवारास बळ देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 

 

 

पोलिसांकडून 12 हून अधिक जणांची चौकशी 

 

पत्रकार मुकेश चंद्राकर 1 जानेवारीपासून बेपत्ता होते, दरम्यान, आता त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. चंद्राकर यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आला. एनडीटीव्हीसाठी काम करणारे स्वतंत्र पत्रकार मुकेश चंद्राकर हे भ्रष्टाचार उघड करणाऱ्या वृत्तांसाठी प्रसिद्ध होते. मुकेश चंद्राकर यांच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनजवळ असलेल्या एका बंदिस्थपणे बांधलेल्या सेप्टिक टाकीत मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलीस या प्रकरणातील बाराहून अधिक संशयितांची चौकशी करत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 3, 2025

PostImage

धक्कादायक ! थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर युवकाने संपविले आयुष्य


 

 

 

सोनापूर शिवारातील घटना : दुचाकीमुळे घटना उघडकीस

 

पोंभूर्णा : तालुक्यातील सोनापूर येथील एका युवकाने मित्रांसोबत थर्टी फर्स्टची पार्टी केल्यानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. १) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विकास परशुराम वडस्कर (२७) असे मृतकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मित्रांनी सोनापूर येथे पार्टी आयोजन केली होती. या पार्टीत विकास वडस्कर हा युवक सहभागी झाला. पार्टी आटोपल्यानंतर स्वतःच्या घरी आला. कुणालाही न सांगता एम. एच. ३४ बि. के. ६७७१ दुचाकी घेऊन घराबाहेर निघाला. विकास सकाळी घरी न आल्याने वडिलाने मित्रांकडे चौकशी केली. नातेवाइकांनाही कळविले. मात्र, विकासचा कुठेही पत्ता लागला नाही.

 

दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास काही व्यक्तींना गावातीलच शरद ठेंगणे यांच्या शेतातील विहिरीजवळ दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. विहिरीत चप्पल तरंगताना दिसत होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत गळ टाकला असता विकासचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला. आत्महत्याचे कारण कळू शकले नाही.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 3, 2025

PostImage

वजन कमी करण्याची गोळी येणार


 

नव्या वर्षात आरोग्यसेवांचा होणार विस्तार; नागरिकांमध्ये उत्सुकता

 

 

मुंबई : नवे वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी कलाटणी देणारे ठरणार आहे. खासगी रुग्णालयांबरोबरच महापालिका आणि शासनाच्या अखत्यारीतील बहुसंख्य रुग्णालयांत पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, खासगी फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन अधिकृतरीत्या बाजारात आणणार आहेत. या औषधांबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबाचा विकार, हृदयविकार, गुडघेदुखी यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नव्या वर्षात फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणिइंजेक्शन्स बाजारात आणणार आहे.

 

 

 

रोबोट करणार शस्त्रक्रिया

 

रोबोटिक सर्जरी हा खर्चीक प्रकार आहे. सामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. परंतु, या शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परवडाव्यात, यासाठी आता जे. जे. मध्ये त्यांची सुरुवात नवीन वर्षात केली जाणार आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने रोबोही घेतला आहे. त्यासाठी ३२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

 

जे. जे. होणार सुपरस्पेशालिटी

 

जे. जे. रुग्णालय परिसरात सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यातील काही भाग नव्या वर्षात सुरू होणार आहेत. दोन मजली तळघरासह, तळमजला अधिक दहा मजले, अशी ही इमारत असेल. प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटांचा आहे. इमारतीला ए, बी, सी, डी अशा चार विंग असतील. त्यापैकी दोन विंग नव्या वर्षात कार्यान्वित होतील. त्यामुळे रुग्णालयातील बेडची संख्या २,३५० इतकी होणार आहे.

 

डिजिटल निदान

 

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील २५ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत रुग्णांची माहिती हाताने लिहिली जाते. कॉलेजना कॉम्प्युटर दिले, मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले लोकल एरिया नेटवर्क, इंटरनेट आणि डेटा ऑपरेटर नसल्याने रुग्णालयांतील डिजिटल रुग्ण नोंदणी दूरच आहे. ती नव्या वर्षात सुरू होणार असल्याचे विभागाने सांगितले.

 

आयव्हीएफ सेंटर

 

खासगी रुग्णालयांत आयव्हीएफ उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. हा खर्च आता काही हजारांच्या घरात येईल. महापालिकेच्या अखत्यारीतील सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारण्यात आले असून, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ते सुरू होणार आहे. कामा रुग्णालयातही याच वर्षी आयव्हीएफ उपचार सुरू होणार आहेत.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 3, 2025

PostImage

आणखी एका पत्नीपीडिताची आत्महत्या ,मृत्यूपूर्वी व्हिडीओ व्हायरल


 

दिल्ली, वृत्तसंस्था. बंगळुरूनंतर उत्तर पश्चिम दिल्लीतही अतुल सुभाषसारखे प्रकरण समोर आले आहे. पुनीत खुराना नावाच्या तरुणाने राजधानीच्या मॉडेल टाऊनमधील कल्याण विहारमध्ये असलेल्या घरात 59 मिनिटांचा व्हिडीओ बनवून आपले जीवन संपवले. पुनीतने

 

गळफास लावून आत्महत्या केली. तो कॅफेचा मालक होता. तो पत्नी मनिका पाहवा आणि सासरच्या मंडळींवर नाराज असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दोघांनी 8 वर्षांपूर्वी 2016 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवसातच वाद होऊ लागल्याने घटस्फोटाचा खटला सुरू होता.

 

पत्नीनेच मरणासाठी भडकवले

 

पुनीतच्या आईने सांगितले की, दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून भांडण झाले होते. पुनीतच्या पत्नीने पुन्हा एकदा माझ्या मुलाचा एवढा छळ केला की त्याने एवढे कठोर पाऊल उचलले. मला माझ्या मुलाला न्याय हवा आहे. त्याचवेळी आरोपी महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा आरोप मृताच्या बहिणीने केला आहे. पोलिसांनी खुराणा यांचा फोन जप्त केला असून त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 3, 2025

PostImage

मजुरांचा तेलंगणात अपघात, एक महिला ठार


 

अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील काही मजूर कामासाठी तेलंगणात गेलेले आहेत. तेथे त्यांच्या जीपला अपघात झाला. यात एक महिला ठार झाली, तर १५ जण जखमी झाले. १ जानेवारीला तेलंगणातील सिरसिल्लाजवळ हा अपघात झाला.

 

कांताबाई सूर्यभान मराठे (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. नववर्षानिमित्त देवदर्शनासाठी मजूर वेमूलवाडा येथे जीपने जात होते. सिरसिल्लाजवळ जीपचा अपघात झाला. यात कांताबाई मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.

 

आनंदराव मराठे, गंगुबाई मराठे, कविता पालोजवार, रेखा गाताडे, लक्ष्मी मंडरे, वनिता सातारे, भिकू सातारे, उषा मराठे, सुनंदा राऊत, माया मराठे, ज्योती मराठे, विमल मराठे, निर्मलामंडरे, सुधाकर गदेकर, सुरेखा गदेकर यांचा जखमींत समावेश आहे.सर्व जखमींना करीमनगर दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.

 

नातेवाईकांना मदतीचा हात

 

दरम्यान, कांताबाई मराठे यांच्या नातेवाईकांना तेलंगणाला जाण्यासाठी पैशांची अडचण होती. याबाबत माहिती मिळाल्यावर जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नातेवाईकांना प्रवास खर्च तसेच उपचारासाठी आर्थिक साहाय्य केले. नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज