ProfileImage
435

Post

4

Followers

2

Following

PostImage

सुपर फास्ट बातमी

Today

PostImage

Armori news : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार


 गडचिरोली, ब्यूरो. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण आरमोरी येथे समोर आले आहे. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून लगतच्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.

यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल

मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणाभाकासुद्धा खाल्ल्या. मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा लावली.

 

 

मात्र, शुभमचा लग्नाला विरोध कायम होता. पीडित तरुणीने 24 जुलैला आरमोरी पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी शुभम सोरते याच्या विरोधात भादंवी कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून, आरमोरी पोलिसांद्वारे त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार विनोद रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता मसराम करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 24, 2024

PostImage

वैनगंगा नदीपात्रात गडचिरोली जिल्ह्यातील एका युवकाने घेतली उडी


 

 

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची सीमा असलेल्या वैनगंगा नदीच्या व्याहड बुज च्या मोठ्या पुलावरून नदीपात्रात गडचिरोली जिल्ह्यातील एका युवकाने उडी घेतल्याची माहिती सावली पोलिसांना प्राप्त होताच सावली चे ठाणेदार राजगुरु यांनी स्वतः घटनास्थळी जावून आपली यंत्रणा कामी लावली आहे.

 

तसेच बोट सुद्धा आणण्यात आलेली आहे. मात्र संततधर सुरु असलेल्या पावसामुळे व्यत्यय येत असून वैनगंगा नदी ही दुधळी भरून वाहत आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या शोधकार्यात अडथळा येत आहे. तरी नदी काठावर असलेल्या भागातील गावात सावली पोलिसांनी माहिती पोहचविली असल्याचे कळते. बातमी लिहेपर्यंत शोधकार्य जोमात सुरु आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 24, 2024

PostImage

धान रोवत असताना वाघाचा हल्ला,हल्ल्यात शेतकरी ठार


 

नागभीड : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा येथील कंपार्टमेंट नं ४२०/ ७५६ मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. दोडकू झिंगर शेंदरे (६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

 

नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू होती. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला. वाहून गेलेल्या धान्याच्या ठिकाणी दोडकू धान रोवत होता. त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. ठार केल्यानंतर

त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळ शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले. त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली. गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करण्यात आल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024

PostImage

शेळीच्या पिलामागे धावला अन् नाल्यात वाहून गेला


 

हर्ष साखरे सुपर फास्ट बातमी संपादक 9518913059

कुलकुलीतील घटना : मृतदेह आढळला

आरमोरी: नाल्याच्या पाण्यात वाहून जात असलेल्या शेळीच्या पिलाला वाचविण्याच्या प्रयत्नात शेळीपालक वाहून गेल्याची घटना आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथे बुधवारी सायंकाळी घडली. विठ्ठल हणमंत गेडाम (५४) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल कुलकुली येथील विठ्ठल गेडाम यांच्याकडे तीस ते पस्तीस शेळ्या आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याच्या पलीकडे शेतालगतच्या जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. बुधवारी कुलकुली परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नाल्याला अचानक पूर आला. पाणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने शेळ्यांना सोबत घेऊन घराकडची वाट धरली. नाल्याजवळ आल्यानंतर शेळीचे पिल्लू अचानक नाल्यात उतरले. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना विठ्ठल हा सुद्धा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला.

 

सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. गुरुवारी पुन्हा सकाळी शोधमोहीम राबविली असता सकाळी ७ वाजताच्या सुमारास नाल्यातील रेतीत अर्धवट झाकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे. मृतक विठ्ठल गेडाम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा आहे. मालेवाडा पोलिस तपास करीत आहेत.

 

 

 

नाला ओलांडताना काळी घ्या

 

बऱ्याच नागरिकांची शेतजमिन नाल्याच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यात नाल्यांना पूर येते. बऱ्याचवेळा नाल्यातील पाण्याचा अंदाज शेतकऱ्यांना येत नाही. त्यामुळे नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना यापूर्वी सुध्दा घडल्या आहेत. नाल्यात जर जास्त पाणी असेल तर विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024

PostImage

वारकऱ्यांची जीप विहीरीत कोसळली; ७ जण ठार


 

राजूर/जालना: भोकरदन तालुक्यातील राजूर येथून जवळच असलेल्या वसंतनगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत जालना येथून येणाऱ्या काळी पिवळी जीप मोटारसायकल स्वरास वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायवरचा ताबा सुटून कोसळली त्यात सात जण मृत्यूमुखी पडले.

 

ही घटना जालना-राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्यावरील खडेश्वरी बाबाजी यांच्या शिवशक्ती आश्रम असलेल्या बाजूच्या विहिरीजवळ गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. अपघातातील मृत हे पंढरपूर

 

यात्रेवरून गावाकडे परत येत असताना हा भीषण अपघात घडला. मृतामध्ये चनेगाव व तपोवन येथील नागरिकांचा समावेश होता. गाडीत एकूण १३ जण होते पैकी ५ जणांना वाचवण्यात गाडी ड्राइव्हर बाबुराव हिवाळे व वसंतनगर येथील स्थानिकांना यश मिळाले. तर ७ मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतामध्ये प्रल्हाद उत्तम महाजन (वय ६५), ताराबाई मालुसरे, नंदा बाळू तायडे (वय ३५), प्रल्हाद आनंद बिटले, नारायण किसण निहाळ (वय ४५), चंद्रभागा अंबादास घुगे (वय ४८) व एक महिला जिची ओळख पटली नाही यांचा समावेश आहे.

 

३ जण सुखरूप असून दोन जणांना शासकीय रुग्णालय जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दोन अग्निशमक पथकाने भेट देऊन बचावकार्य केल.

 

५ भाविकांना वाचविण्यात यश

 

घटनास्थळी क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. आणखी काही मृतदेह विहिरीत असण्याची शक्यता आणखी शोध सुरु आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024

PostImage

प्रियकराकडून दोन बहिणी अन् वडिलांचा खून, परिसरात खळबळ


 

पाटणा: बिहारमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका विचलित असलेल्या प्रियकराने दोन अल्पवयीन मुली आणि त्यांच्या वडिलांची निघृणपणे हत्या केली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकरानेही हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. तर पोलिसांनी गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना त्वरित अटक केली आहे.

 

बिहारच्या सारण जिल्ह्यातील रसूलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यातील सारेच हादरले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचेही मृतदेह तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी छपरा रुग्णालयात पाठवले. 

 

तर या जीवघेण्या हल्ल्यात मुलींची आई थोडक्यात बचावली आहे. तिच्यावरही सध्या छपरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेत जीव गमावलेल्या मुलींचे नाव चांदनी कुमारी, १७ वर्षे आणि आभा कुमारी १५ वर्षे असून त्यांच्या वडिलांचे नाव तारेश्वर सिंह आहे. पीडित मुलींची आई शोभादेवी यांनी घटनेबद्दल सांगितले की, हल्लेखोर पहाटे २ च्या सुमारास धारदार शस्त्रांसह त्यांच्या घरात घुसल आणि त्यांनी माझ्यासह मूली आणि नवऱ्यावर हल्ला केला.

 मी त्यातून बचावली आणि मी तेथून पळ काढला आणि गावामध्ये जाऊन आरडाओरड केली. जेणेकरुन गावकरी पोलिसांना घटनेबद्दल कळवतील. याप्रकरणी अधिक माहिती देत शोभादेवी पुढे म्हणाल्या, माझी मुलगी चांदनी कुमारी हिचे खूप दिवसांपूर्वी आरोपी सुधांशू कुमार याच्याशी बोलणे झाले होते. पण नुकताच तिने हे बोलणे थांबवले होते. तसेच त्याने माझ्या मुलीला धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी या घटनेत तातडीने तपासाची चक्र फिरवत सुधांशू कुमार उर्फ रोशन आणि त्याचा साथीदार अंकित कुमार याला अटक केली आहे. तर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024

PostImage

बेरोजगारीला कंटाळून तरुण संपवतात जीवन


 

 

■ काँग्रेसचे 'एक्स'वरून मोदी सरकारवर टीकास्त्र..!

 

दर तासाला दोन बेरोजगारांच्या आत्महत्या

 

 

 

नवी दिल्ली: विविध प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या एनडीए सरकारला काँग्रेसने आरसा दाखवला आहे. देशातील बेरोजगारीचा दर तब्बल ९.२ टक्क्यांनी वाढला असून बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक सत्य काँग्रेसने एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये अधोरेखित केले आहे. रोजगार मिळत नसल्याने तरुण, तरुणी प्रचंड चिंताग्रस्त आहेत, परंतु मोदींना त्यांचे दुःख दिसत नाही. ते उलटसुलट आकडे पसरवण्यात व्यस्त आहेत. आम्ही रोजगार देण्यात गेल्या ४ ते ५ वर्षांचा विक्रमही मोडला आहे, असे धडधडीत असत्य मोदी

 

उघडपणे मांडत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर जळजळीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान उद्योगांना उद्ध‌वस्त केले. रोजगाराच्या संधी संपवल्या. मोदी सरकारच्या धोरणांमुळे तरुण बेरोजगारीच्या दलदलीत ढकलला गेला. परंतु, नरेंद्र मोदी यांना तरुणांना जे भोगावे लागत आहे त्याचे काहीच वाटत नाही, त्यांना काहीच फरक पडत नाही. मोदी आपल्याच दुनियेत मरत आहेत. आपल्या मित्रांना श्रीमंत बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. नरेंद्र मोदी यांनी तरुणांना डेरोजगार करून देशाला उद्ध‌वस्त केले, हेच सत्य आहे. असे टीकास्त्र काँग्रेसने एक्सवरून मोदींवर सोडले आहे.

 

८३ टक्के तरुण बेरोजगार

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मांडत आहेत ते सत्य नाही. उलट देशात तब्बल ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.

 

३० लाख सरकारी पदे रिक्त असून २० ते २४ वर्षांच्या तरुणांचा बेरोजगारीचा दर ४४.४९ टक्क्के इतका

 

आहे. भारतातील तरुणांना नोकऱ्या मिळवण्यासाठी रशिया आणि इस्रायलला जाणे भाग पडत आहे. अशा

 

अनेक बाबी काँग्रेसने एक्स'वरून मांडल्या आहेत. मेक इन इंडिया आणि स्टार्टअपचा डंका वाजवणारे मोदी

 

सरकार भारतातील तरुणांना रोजगार देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि

 

इन्स्टिट्युट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024

PostImage

पत्नीने पतीची केली निर्घृण हत्या, दारुड्या पतीचा कोंबड्याच्या कातीने चिरला गळा


 

विसापूर (चंद्रपूर) : पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे घर बर्बाद होऊ लागले. यामुळे पतीपत्नीत वाद होत होता. उभयतात नेहमी कडक्याचे भांडण होत होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून पत्नीने टोकाचा निर्णय घेतला. धारदार शस्त्राने तिने पतीचा गळा चिरला. पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची हृदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोड़े) येथे बुधवार (दि. १७) रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. हत्या झालेल्या पतीचे नात अमोल मंगल पोडे ( व्य ३८ ) रा. नांदगाव (पोहे)

 

ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे आहे. घटनेतील आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे । बय - ३५) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. बल्लारपूर तालुक्यात नांदगाव (पोड़े) गात ५ हजारावर लोकसंख्येचे आहे. या गावात पतिपत्निच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आज गुरुवारी सकाळी ७ वाजता उघडीला आल्यावर घटनास्थळी गावाकऱ्यांनी एकच गर्दी केली.

 

मृतक अमोल हा पत्नी लक्ष्मी ता दोन मुले देवांश अमोल पोडे (११) आणि सारंग अमोल पोडे (८) सोबत राहत होते. मात्र अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले. यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता. दारूच्या व्यसनावरून पत्नीची व दोन लहान मुलांची आभाळ होत होती. यामुळे पत्नी लक्ष्मी ग्रस्त होती. नेहमी प्रमाणे काल बुधवारी अमोल घरी मध्यधुंद अवस्थेत आला. घरी आल्यावर त्याने पत्नी लक्ष्मी सोबत वाद घातला. उभयतात कडाक्याचे भांडण झाले. तिने सततच्या जाचाला कंटाळून पती अमोललासंपविण्याच्या कट केला. दोन्ही मुले व लक्ष्मीची आई झोपी गेले. ही संधी साधून लक्ष्मीने कडक लक्ष्मीचा अवतार धारण केला. कोंबड्याच्या कातीने, धारदार शस्त्राने अमोलचा गळा चिरून त्याला यमसदणी धाडले. रक्ताच्या थरोळ्यात तो मृतझाला. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना देण्यात आली. विशेष म्हणजे पतीच्या निघून हत्येची माहिती स्वता लक्ष्मीने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. अमोलचे शव शवविच्छेदनासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यातिय महाविद्यालयात पाठविण्यात आले.

 

मुलांचे भविष्य आले संकटात

 

अमोल व लक्ष्मी पोडे यांच्या संसार वेलीवर दोन गोंडस मुले आली. तिच पत्ती पत्नीचा आधार होती. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनाने सुखी संसार उध्वस्त झाला. अमोल व लक्ष्मीचे मुले देवांश पोडे व सारंग पोडे कॉन्हेंटमध्ये शिक्षण घेत होती. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनामुळे खर्च परवडत नव्हता. त्यामुळे अमोलने ६ दिवसांपूर्वी नांदगाव । (पोडे) वेथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत देवांशला ८ ल्या, तर सारंगला तिसऱ्या वर्गात प्रवेश घेतला. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी लक्ष्मीने कडक लक्ष्मी बनून पतीला यमसदनी पाठविले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024

PostImage

पंतप्रधानांचा नोकर २८४ कोटी घेऊन फरार


 

 

ढाकाः बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा नोकर जहांगीर आलम याच्याकडे २८४ कोटी रुपयांची संपत्ती आढळली आहे. आलमकडे एक खासगी हेलिकॉप्टरसुद्धा आहे. जहांगीर हा शेख हसीना यांच्या घरात पाहुण्यांना पाणी देण्याचे काम करत होता. जहांगीरने हसीना यांच्या कार्यालयात आणि घरात काम करत असल्याचे सांगून अनेक लोकांकडून लाच घेतली होती. काम करून देण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून पैसे उकळायचा. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान हसीना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

 

परंतु हे प्रकरण समोर येण्याआधीच जहांगीर परदेशात पळून गेला आहे. बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधानांच्या नोकराचेही नाव या यादीत आहे. जानेवारीमध्ये पंतप्रधान हसीना चौथ्यांदा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने नुकतीच देशाच्या माजी राष्ट्रीय पोलीस प्रमुख बेनझीर अहमद यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024

PostImage

पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार !


 

 

 

बजेटमध्ये घोषणेची शक्यता

 

नवी दिल्लीः पुढच्या आठवड्यात २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या बजेटमधून केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या रकमेत वाढ केली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आले आहे. मात्र, हे सरकार आघाडीचं सरकार आहे. त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटण्याची शक्यता आहे.

 

त्याशिवाय चालू वर्षात महाराष्ट्रासह इतर काही महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील विविध घटकांना आर्थिक दिलासा दिला जाईल, अशी एक अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातत्यानं विविध क्षेत्रांशी संबंधित लोकांना भेटत आहेत. त्यांच्या अपेक्षा जाणून घेत आहेत. त्यामुळं विविध क्षेत्रांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घघेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पीएम किसान सन्मान निधीमध्ये सरकार २ हजार रुपयांची वाढ करू शकते असे बोलले जाते. सध्या या योजनेअंतर्गत तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये मिळतात. ही रक्कम ८ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असा दावा प्रसारमाध्यमांतील काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळतो.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024

PostImage

पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात 'एमबीबीएस' तरुणीची आत्महत्या


 

अनेकांनी काढला व्हिडीओ : आत्महत्येचे कारण अस्पष्ट

 

 ब्रह्मपुरी : येथील एका 'एमबीबीएस' पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली. पाणी कमी असल्याने ती बचावली, मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. ईशा घनश्याम बिंजवे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 

ब्रह्मपुरी येथील रहिवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी ईशा घनश्याम बिंजवे ही मंगळवारी (दि.१६) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अॅक्टिवाने (क्रमांक एमएच- ४९, झेड- ४१७६) वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर आली. पुलावर दुचाकी उभी केली. त्या गाडीवर आपल्या चप्पल ठेवल्या. त्यानंतर नदीच्या पुलावरून उडी घेतली. नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र, आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही. या घटनेचा पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या काहींनी व्हिडीओ काढला. मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. घटनेनंतर पोलिसांनी तिचाशोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता. बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही.

 

 

वाचविण्यासाठी नागरिक धावले असले तर...

 

वैनगंगा नदीच्या पुलावर ईशाने आपली दुचाकी उभी केली. त्यानंतर तिने आत्महत्या केली. या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ, तर काहींनी फोटो काढले. मात्र, तिला वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024

PostImage

चक्क बापानेच लादले मुलीवर मातृत्व


 

 आश्रम शाळेला सुटी लागल्याने आली होती गावी

 

 नागभीड पत्नीच्या गैरहजेरीचा फायदा घेत स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी कुकर्म करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम बापास नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना नागभीड तालुक्यातील एका गावात घडली. विशेष म्हणजे, आश्रम शाळेला सुटी लागल्याने मुलगी आपल्या गावी आली होती.

 

पती, पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब तालुक्यातील एका गावात राहत होते. एप्रिल महिन्यात आरोपीची पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या राज्यात मजुरीसाठी गेली होती. याचवेळी तालुक्यातीलच एका आश्रम शाळेत आठव्या वर्गात शिकत असलेली १३ वर्षीय ही अभागी मुलगी शाळेला सुट्या लागल्याने गावी आली.

 

पत्नी घरी नसल्याने मुलीला पाहून आरोपीच्या अंगातील सैतान जागा झाला. त्याने पोटच्या मुलीशीच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरू केले. मुलीने विरोध केला. पण धमकावून तो तिला चूप ठेवत होता. भलेही आरोपी मुलीस चूप राहण्यास भाग पाडत होता. मात्र शरीरधर्म त्याचे कर्तव्य बजावत होता. अशातच शाळा सुरू झाली आणि मुलगी परत शाळेत गेली. शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले आणि शाळा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.

 

शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024

PostImage

दुचाकीस्वाराला ठार करून चारचाकीचालक पळाला


 

कुरखेडा : कुरखेडा-कढोली मार्गावर गोठणगाव नाका ते मालदुगीदरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडला. रघुनाथ तुलावी (५५, रा. मालदुगी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रघुनाथ तुलावी हे कामानिमित्त

 

गोठणगाव नाक्यावर आले होते. परत मालदुगीकडे जात असताना त्यांचा दुचाकीला एका ढाब्याजवळ चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. यात रघुनाथ तुलावी यांचा जागीच मृत्यू झाला. तुलावी हे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोठणगाव येथे संचालकपदी कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024

PostImage

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक


 

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई, दि. १७: महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.  

 

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६०पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ १२-१५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याचे त्यांना माहिती मिळाली होती. या कारवाई दरम्यान गोळीबार सुमारे ६ तासांहून अधिक काळ सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. यावेळी तीन एके ४७,२ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

 

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री

 

"ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

पोलिस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार असल्याची त्यांनी म्हटले आहे.

 

जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस

 

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 17, 2024

PostImage

आरमोरी: टेम्पोच्या धडकेने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू


 आरमोरी : चालकाची निष्काळजी व क्लिनरच्या चुकीमुळे टेम्पोखाली सापडलेल्या दोन महिलांपैकी एकीचा उपचारादरम्यान १५ जुलै रोजी रात्री सव्वा आठ वाजता मृत्यू झाला.

 

आरमोरी येथे १८ जून रोजी गडचिरोलीहून नागपूरकडे दूध वाहतूक करणारा टेम्पो (एमएच ४०-सीटी १७१६) जात होता. आरमोरीत रात्री साडेआठ वाजता रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून चालक नाश्ता करण्यासाठी गेला.

 

क्लिनर मात्र केबिनमध्येच बसून होता. गाणी ऐकण्यासाठी त्याने वाहन सुरू केले. ते गीअरमध्ये असल्यानेसमोर जात शतपावली करताना गप्पा मारत थांबलेल्या कल्पना अरुण गोवर्धन (४५) व कवळाबाई लोकमित्र मेश्राम (७२) या दोघींच्या अंगावर टेम्पो आला. पाठीमागून टेम्पाने धडक दिल्याने दोघीही जखमी झाल्या.

 

 

नागपूर येथे खासगी दवाखान्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर कल्पना गोवर्धन यांची अखेर १५ जुलै रोजी प्राणज्योत मालवली. कवळाबाई मेश्राम यांच्यावर नागपूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 16, 2024

PostImage

पत्नीच्या विरहात पोलिस शिपायाने घेतला गळफास


 

बल्लारपूर : येथील ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाने वसाहतीमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहुर्ले (४०) असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. पत्नी विरहात आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पोलिस शिपाई अजय मोहुर्ले हे वस्ती विभागातील पोलिस वसाहतीत राहत होते.

 

चंद्रपुरातील त्यांचे मामा हरिचंद्र निकुरे हे सोमवारी त्यांना भेटण्यासाठी पोलिस वसाहतीत आले. पण आतून दरवाजा बंद दिसला आणि दुर्गंधी येत होती. त्यांनी लगेच शेजारचे कर्मचारी व पोलिसांना माहिती दिली. दरवाजा उघडून बघितले असता अजय मोहुर्ले यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

 

मृतदेहाची अवस्था बघून दिवसांपूर्वी दोन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पंचनामा करून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. अजयला दारूचे व्यसन असल्याने पत्नी सोबत वाद होत असे. त्यामुळे ती सहा दिवसांपूर्वी सात वर्षांच्या मुलाला घेऊन नातेवाइकांकडे गेली. त्यामुळे पत्नी विरहात आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, पोलिस निरीक्षक आसिफ राजा बी. शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, खंडेराव माने करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 16, 2024

PostImage

दारूच्या नशेत शाळेत शिक्षक झिंगाट; निलंबनाचा दणका अन् फौजदारीही!


 

 गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर या अतिदुर्गम गावातील जि. प. शाळेत १३ जुलै रोजी चक्क शिक्षक दारूच्या नशेत आला. याबाबत शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जि. प. सीईओ आयुषी सिंह यांनी तडकाफडकी निलंबित करून त्या शिक्षकावर फौजदारी कारवाई केली.

 

जीवनदास गेमा आत्राम असे शिक्षकाचे नाव आहे. कसनसूर जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेत १४ जुलै रोजी ते दारूच्या नशेत आले. यानंतर शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत आत्राम यांना जाब विचारला. मात्र, ते काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळेपदाधिकाऱ्यांनी थेट जि. प. सीईओ आयुषी सिंह यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेत पाठवून खातरजमा केली. यावेळी जीवनदास आत्राम यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्याविरुद्ध कसनसूर ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५५ नुसार गुन्हा नोंदविण्यात शिक्षणाधिकाऱ्यांकडून आला. अहवाल मागविला. त्यावरून शिक्षक जीवनदास आत्राम यांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले.

 

बेशिस्तीला योग्य 'धडा'

 

काही शिक्षक शाळेत नियमित जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर जि.प. सीईओ आयुषी सिंह यांनी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली. मद्यपान करून शाळेत गेलेल्या शिक्षकाला निलंबित करून त्यांनी बेशिस्तीला योग्य 'धडा' दिल्याची चर्चा आहे.

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 16, 2024

PostImage

मेंढेबोडीत महसूलच्या जमिनीवर अतिक्रमण


 

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील मेंढेबोठी चक, हिरापूर चक, डोंगरतमाशी बस स्टॉपच्या मागच्या बाजूला येथील महसूल विभागाच्या जागेत मोठया प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ते हटवून रोपवन लागवड करून देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १५ जुलैला तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 

मेंढेबोडी चक, हिरापूर चक येथील महसूल विभागाच्या जंगल जागेवर गावातील अनेक नागरिकांनी अनधिकृत अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. यामुळे जंगलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दिवसेंदिवस जंगलतोड करून

 

करण्यात येत असलेल्या अतिक्रमणामुळे भविष्यात जंगल राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता महसूल विभागाच्या जंगलाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण यथाशीघ्र काढून या जागेवर रोपवन लागवड करून देण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राकेश गेडाम, सत्यभामा अलोने, प्रभू गेडाम, ईश्वर कांबळे, राजेश्वर गेडाम, पांडुरंग कांबळे, कृष्णकुमार कोटांगले, कालिदास गेडाम, संदीप मेश्राम, आदी उपस्थित होते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024

PostImage

तीन पुजाऱ्यांनी मंदिरात केला आळीपाळीने बलात्कार



         ठाणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना... पीडित महिला ही बेलापूर इथं राहाणारी असून घरात कौटुंबिक वाद सुरु असल्याने मन:शांतीसाठी ती 6 जुलै रोजी शिळ फाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आली. 

 


दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना त्या चहामध्ये त्याने भांगेची गोळी मिसळून दिली. चहा प्यायला नंतर महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर रात्रीच्या वेळी मंदिरातील श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर  तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आपलं बिंग फुटेल या भितीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं, यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला.

 

दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भाविकाला डोंगरावर जंगलात पडलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर मंदिरातील पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी  संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोघांना अटक केली. मात्र तिसरा आरोपी श्यामसुंदर शर्मा हा तिथून फरार झाला. पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला ट्रॉम्बे इथळ्या चिता कॅम्प परिसरातून अटक केली. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीनही आरोपींना अटक करण्यात आलीय... सदर घटनेचा जाहिर निषेध... आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे...


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024

PostImage

तीन महिने उलटूनही रोहयो कामाची मजुरी थकली शेतकरी शेतमजूर आर्थिक अडचणीत


 

आरमोरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली, मात्र केलेल्या कामाची मजुरी मिळाली नसल्याने हजारो शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

 

आरमोरी तालुक्यात कोणताच मोठा उद्योग नसल्यामुळे ग्रामीण भागांतील शेतकरी शेतमजुरांच्या रिकाम्या हातांना काही प्रमाणात रोहयोच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असते. ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या माध्यमातून तालुक्यात मजगी, पाणंद रस्ते, बोडी, तलाव खोलीकरण, वनतलाव बांधकाम करणे, नैसर्गिक रोपांचे एकेरीकरण, मिश्र रोपवाटिका तयार करणे आदी विविध कामे करण्यात आली. मात्र केलेल्या कामाची मजुरी दोन ते तीन महिने होऊनही मजुराच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. सध्या तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. मात्र केलेल्या कामाची मजुरी थकल्याने खत, रोवणी मजुरांची मजुरी कुठून करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. केलेल्या कामाची मजुरी अजूनपर्यंत मिळाली नसल्यामुळे मजुरांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

 

मजुरांचा कामावर येण्यास नकार

 

आदिवासी भागातील ग्रामसभांना अनेक गावांत मिश्र रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू करावयाचे आहे. मात्र मजुरी थकल्याने मजूर कामावर येण्यासाठी नकार देत आहेत, त्यामुळे रोहयोंतर्गत केलेल्या कामाची मजुरी देण्यात यावी. प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामसभा येंगाडाचे ग्रामरोजगार सेवक मुन्नासिंग चंदेल यांनी केली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024

PostImage

पतीच्या आत्महत्येनंतर ११ महिन्यांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल


 

• मुंबई, (वा.) आत्महत्येच्या अकरा महिन्यांनंतर MHB पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरी उर्फ आयुषी चेतन मुसले असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पती चेतनवर मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप आहे. चेतनच्या डायरीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस लवकरच गौरीचा जबाब नोंदवणार आहेत.

 

वास्तविक, २९ ऑगस्ट २०२३ रोजी चेतनने बोरिवली पश्चिम येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यादरम्यान कौटुंबिक वादातून नैराश्येतून आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल केला होता.

 

मात्र नुकतीच मृत चेतनच्या आईला एक डायरी सापडली. ज्यामध्ये चेतनने पत्नी गौरी उर्फ आयुषीबद्दल लिहिले होते. ती त्याचा मानसिक छळ करत असल्याचे डायरीत लिहिले होते. याला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला गौरी उर्फ आयुषी जबाबदार असल्याचे डायरीत लिहिले होते. त्यामुळे मृताच्या आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गौरीविरुद्ध पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन त्या महिलाचे अजून कोणी साथीदार आहेत ते तपासून पाहणार असल्याचे सुत्रांकडून समजते

 

.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024

PostImage

निलगायीची शिकार; दहा आरोपी अटकेत


 

नवरगावच्या जंगलातील घटना : वनविभागाची कारवाई; पाच दिवसांची कोठडी

 

 गडचिरोली : जंगलात नीलगायीची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना जेरबंद केले. दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना शनिवारी नवरगाव येथे घडली. आरोपींकडून नीलगायीचे शिर, पाय, मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

 

पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (दक्षिण) नियत क्षेत्रामध्ये दि. १३ जुलै रोजी निलगायीची शिकार करण्यात आली. शिकारीनंतर निलगायीच्या मांसाची गावात विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून दहा आरोपींना अटक केली. त्यांना रविवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी,चुरचुराचे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम, मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ, पोर्लाचे वनरक्षक विकास शिवणकर, दिभनाचे वनरक्षक गणेश काबेवार, किटाळीचे वनरक्षक संदीप लामकासे, देलोडाचे

 

वनरक्षक नितीन भोयर, वाहनचालक देवीदास चापले, वनमजूर विजय म्हशाखेत्री, गिरिधर बांबोळे, छत्रपती डहाले, दुर्योधन मेश्राम, सोनू खोब्रागडे, रवि डहाले, रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली.

 

हे आहेत अटक झालेले आरोपी

खुदकम रघुनाथ गेडाम वय (२५, रा. कुहाडी), अक्षय प्रभाकर सेलोटे (२२, रा. नवरगाव), रोशन दामोधर भोयर (२२, रा. नवरगाव), निखिल गिरिधर ठाकरे (३०, रा. चुरचुरा), सौरभ सुरेश आवारी (२०, रा. नवरगाव), विक्रांत प्रकाश बोरकुटे (२३, रा. गोगाव), संकल्प संजय उंदीरवाडे (२४, रा. नवरगाव), संदीप कानिफ चुधरी (रा. नवरगाव), आकाश प्रभाकर सेलोटे (रा. नवरगाव), जगदीश देवराव थोराक (रा. नवरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. समीर रवींद्र मडावी (रा. कुहाडी) व ओमराज विजय राजगडे (रा. चुरचुरा) हे दोन आरोपी फरार आहेत.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024

PostImage

ट्रकला दुचाकी धडकली, ४ वर्षीय बाळासह तरुण ठार, चंद्रपूर मार्गावरील हिरापूर येथील घटना


 सावली रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवरील चार वर्षीय बालक व एक इसम जागीच ठार झाले. तर दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर गावाजवळ घडली. वरुण हरिदास बोरुले (४), उमेश श्रीरंग गुरनुले (वय २७, दोघेही रा. फराळा, ता चार्मोशी, जि. गडचिरोली) असे मृतकांची नावे आहेत. तर शेवंता रामदास कावळे (६५, रा. नवेगाव), हरिदास बापूजी बोरुले (४०, रा. फराळा, ता. चार्मोशी) अशी जखमींची नावे आहेत.

 

उमेश गुरनुले हा दुचाकीने (क्रमांक एमएच ३३-एई १८३७) शेवंता, वरुण, हरिदास यांना घेऊन फराळा येथे जात होता. दरम्यान, हिरापूर

 

बसस्थानकाजवळ धोकादायक स्थितीत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेला ट्रकला (क्रमांक सीजी ०८- एएक्स ६१७१) जोरदार धडक दिली. यात वरुण व उमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर हरिदास व शेवंता हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. याबाबतची माहिती सावली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच फरार ट्रक चालकाला पकडण्यासाठी शोधमोहीम राबविली. दरम्यान, ट्रक चालकावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यान्वये १०६ (०१), १२५ (ए), १२५ (बी), २८५ सहकलम १२२, १३४ ए, १३४ (ब) वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला ट्रकसह खेडी फाट्याजवळ अटक केली. जखमींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024

PostImage

दुचाकीच्या धडकेत वृध्द ठार


 देसाईगंज तालुक्यातील चोप-शंकरपूर मार्गावर गावानजीक आग्याबोवा मंदिराशेजारी रोडच्या बाजूला उभा असलेल्या शेळ्या राखत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने शामराव मोतीराम पर्वते (रा. चोप) यांना धडक दिल्याने शामराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक स्वप्निल सत्यवान लांजेवार हा गंभीर जखमी झाला.

 

शामराव मोतीराम पर्वते (वय ६३) हे स्वतःच्या घरच्या शेळ्या राखत होता.

दुचाकी (एमएच ३३ एस १७३२) ने स्वप्निल सत्यवान लांजेवार हा शंकरपूरकडे जात होता. त्यात शामरावला स्वप्निलच्या दुचाकीने धडक दिली. दुचाकी एवढ्या जोरात होती की शामराव ५० ते ६० फुटांपर्यंत फरपडत नेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात देसाईगंज येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी शामरावला मृत घोषित केले. दुचाकीस्वार स्वप्निल लांजेवार हा जखमी अवस्थेत असताना आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांना मदत केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 2, 2024

PostImage

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे नोटबुक वितरण


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मरेगाव केंद्र- अमिर्झा पं.स./ जि. गडचिरोली

नुकत्याच विदर्भातील शाळांना सुरुवात झालेली असून वि‌द्यार्थ्यांच्या अध्ययन कार्यास सुरुवात होत आहे. वि‌द्यार्थ्यांना पुस्तकांसोबत नोटबुकची अत्यंत गरज भासत आहे. ग्रामीण भागातील बहुतेक मुले शेतकरी, मजूर व गरीबाची असतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीत नोटबुकांच्या वाढलेल्या किंमती पाहता विकत घेताना पालकांना अडचणीचे जाते. हिच अडचण लक्षात घेवून आरमोरी येथे स्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धार्थ साखरे यांनी जि प उ प्रा शाळा मरेगाव केंद्र अमिर्झा पं स गडचिरोली येथील सर्व वि‌द्यार्थ्यांना स्वतः नोटबुक वितरण करून सामाजिक दायित्व राखण्याचा प्रयत्न केला. तसेच पर्यावरण संवर्धन रक्षण संदेश विद्यार्थ्यापर्यत पोहचावा याकरिता शाळेला झाडे भेट दिली.

या छोट्याशा कार्यक्रमाता शाळेतील वि‌द्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गुणवंत हेडाऊ यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धार्थ साखरे यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 2, 2024

PostImage

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन , नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज           


 गडचिरोली दि. 2 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी 15 जुलै पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

             ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला टप्प्यात १ ते १५ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी पात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर होतील. तसेच, ज्या महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे.

 

योजनेचा उद्देश : 1) महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2) त्यांचे आर्थिक - सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

 

लाभार्थी पात्रता : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

 

अपात्रता : 1) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, 2) सरकारी नोकरी, 3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, 6) चार चाकी गाडी असणारे.

 

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल. लाभार्थ्याला स्वत: ‘नारी शक्ती दूत’ हे ॲपवर अर्ज करता येईल. 

 

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

 

 अडचणी असल्यास येथे करा संपर्क : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे. 

०००००


PostImage

सुपर फास्ट बातमी

June 24, 2024

PostImage

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय 


 

गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि तयारी संबंधात शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषदेचे गठन, हर हर जोडो अभियान, बुथ रचना आणि व्यापक जनसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आणि जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. युवक, बेरोजगार, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांना घेवून शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरणार असून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करण्यासाठी पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ऑगस्ट पासून संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

 

जिल्हा समीतीच्या या बैठकीला जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, महिला नेत्या व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार जयश्रीताई जराते, जिल्हा समीतीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, डंबाजी भोयर, एकनाथ मेश्राम, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

June 24, 2024

PostImage

दि. 23/7/24 रविवारला फुले दाम्पत्य प्रतिष्ठाण,गड येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न


 

 

गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार मा.भिमराज पात्रिकर यांनी उपस्थितांना गुणवंत ज्ञानवंत सत्यशोधक होवुन सर्व समस्याचे निराकरण स्वता करण्यास तयार रहावे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभलेले मा.धर्मानंद मेश्राम, सेनि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी 12वी नंतर प्रवेश घेता येणा-या सर्व फॅकल्टीजची माहिती दिली व यवतमाळ येथील सत्यशोधक विज्ञापीठात जीवन बदलविणा-या प्रशिक्षणात भाग घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर खालील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

*विविध शासकीय विभागात नौकरीवर निवड
वैभव गुरनुले, भाग्यश्री मदनकर, मंगेश मोहुर्ले, सुरज मोहुर्ले, सागर गावतुरे, भाग्यश्री भेंडारे

12वी गुणवंत
87.40 आदित्य मोहुर्ले, 80.83 सानिका गुरनुले, 78.50 मंगेश भेंडारे, 78.16 गायत्री गुरनुले, 77 योगेंद्र कावळे व भुषण कोकोडे, 76 थामदेव निकुरे

10वी गुणवंत
93.20 आस्था वाडगुरे, 91.80 हिमांगी गुरनुले, 89.20 मानशी सोनुले व सुजय मोहुर्ले व तेजस गावतुरे, 88.20 जान्हवी मांदाडे, 87.60 सायली मोहुर्ले व वैभवी सोनुले, 88.60 हर्षाली मांदाडे, 85.40 तनुश्री जेंगटे, 84.80 चंदना निकोडे, 84 जिज्ञासा जेंगठे, 83.60 चैतन्या कोटरंगे, 83.40 सोनी आदे, 83.00 जान्हवी रस्से व गौरव मोहुर्ले, 82.80 किशोर ढोले, 82.40 कुमुदिनी मोहुर्ले, 81.20 आस्था लेनगुरे, 80.20 धिरज पेटकुले, 81.60 प्रतिक जेंगठे

    कार्यक्रमाचे अध्यक्ष फुलचंद गुरनुले, ग.जि.मा.स.सं.चे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे संजय लेनगुरे, गुरुदास बोरुले, पुरण पेटकुले होते. प्रस्तावना अशोक मांदाडे संचालन गिरीष लेनगुरे व आभार उमेश जेंगठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमेश जेंगठे, योगेश सोनुले, नरेंद्र निकोडे, किसन सोनुले, संतोष मोहुर्ले, शंकर चौधरी, लक्ष्मण मोहुर्ले,भाष्कर गुरनुले, इतर सर्वांनी मदत केली. कार्यक्रमास विद्यार्थी-पालक व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


PostImage

सुपर फास्ट बातमी

May 3, 2024

PostImage

मालवाहूच्या धडकेत नवरदेवाची आई ठार


 

एक जखमी : कारगिल चौकातील घटना

 

गडचिरोली : नादुरुस्त ट्रॅक्टर-ट्रॉलीपिकअपला बांधून नेत असताना पिकअप वाहनाने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार, तर एक युवक गंभरी जखमी झाल्याची घटना २ मे रोजी गुरुवारी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील मुल मार्गावर कारगिल चौकात घडली. विशेष आपल्या लहान मुलाचे लग्न आटोपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

रेखा नामदेव राऊत (वय ४४) रा. सावली, जि. चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव आहे, तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७) रा. सावली हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दोनही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, रक्तबंबाळ झालेल्या रेखा राऊत या महिलेचा मृत्यू झाला,तर जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.सावली येथील नामदेव राऊत यांच्या दोन मुलांचे लग्न होते. अमित राऊत नामक मोठ्या मुलाचे लग्न १ मे बुधवारी सावली येथे पार पडले, तर २ मे रोजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे होते. हे लग्नकार्य आटोपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीवरून गडचिरोलीमार्गे सावलीकडे जात होती. दरम्यान, कारगिल चौकात पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिली.

 

अपघाताची पुनरावृत्ती.... विशेष म्हणजे मागील वर्षी १ मे

 

२०२३ रोजी याच कारगिल चौकात एका युवकाला ट्रकने जागीच चिरडले होते. एक वर्षानंतर परत याच ठिकाणी याच तारखेला अपघात झाला. शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचा दुर्लक्षितपणा जीवघेणा ठरत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

May 3, 2024

PostImage

अपघातात जखमी 'त्या' अभियंत्याचा मृत्यू


 

डोंगरगावजवळ चारचाकी वाहनाने चिरडले

 

वैरागड : कोनसरी येथील लॉयड्स मेटल कंपनीत काम करणारे कनिष्ठ अभियंता युवराज अरविंद लाकडे यांचा आरमोरी-गडचिरोली मार्गावरील डोंगरगावजवळ भीषण अपघात झाला होता. त्यांच्यावर सुरुवातीला आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार केल्यानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते कोमात गेले होते. दरम्यान ३० एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

 

मूळचे वैरागड येथील रहिवासी युवराज अरविंद लाकडे हे काही दिवसांपासून कोनसरी येथील लॉयड्समेटल कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होते. २६ एप्रिल रोजी वैरागडला लग्न समारंभासाठी आले होते. २८ एप्रिल रोजी कंपनीत महत्त्वाचे काम निघाले. त्यामुळे ते सकाळच्या सुमारास कर्तव्यावर निघाले. गडचिरोली येथे पोहोचल्यानंतर त्यांना वरिष्ठ अधिकारी हे कार्यालयात हजर नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. तेव्हा ते पुन्हा वैरागडकडे जेवणासाठी निघाले. दरम्यान डोंगरगावजवळ एकामागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 30, 2024

PostImage

पुन्हा 7 नक्षली ठार


नारायणपूर, दि. 30 : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नारायणपूरच्या अबुझमाड परिसरात आज मंगळवार 30 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये 22 महिला नक्षलींचा समावेश आहे. घटनास्थळावरुन एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली असून चकमकीनंतर परिसरात शोध सुरु असल्याचे कळते.

 

अबुझमाडच्या तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षली उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे सोमवारी रात्री उशिरा जवान शोधमोहीम करिता निघाले असता मंगळवारी सकाळी जवान या भागात पोहोचले असता नक्षल्यांनी जवानांवर अंधधुंद गोळीबार केला. जवानांनी मोर्चा सांभाळत प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 7 नक्षली ठार झाले त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

 

सदर चकमक महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा सीमेलगत असलेल्या परिसरात घडली असून. पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 25, 2024

PostImage

बांधगाव(सोनसरी) येथे विवाहीतेचे गळफास घेतलेला मॄतदेह आढळले



कुरखेडा (Gadchiroli) : तालूक्यातील बांधगाव येथे एका ३० वर्षीय विवाहित महीलेचे (Woman Suicide) स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला मॄतदेह आढळून आले. सदर घटणा आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव प्रतिभा गिरीधर राणे असे असून कौटूंबिक कलहाला कंटाळत तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिचा (Woman Suicide) मृतदेह आज सकाळी स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला. परंतु तीच्या माहेरच्यानी आमच्या मुलीची हत्या करण्यात आली, असा आरोप सासरच्या मंडळी वर केला आहे.

घटनेची माहीती मीळताच‌‌ पूराडा पोलीस स्टेशनचा चमूने घटणास्थळ गाठत पंचनामा केला, शवउत्तरीय तपासणी करीता (Kurkheda Hospital) उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा अंतर्गत शवविच्छेदन सेंटरला पाठविण्यात आले. मृतकाला पती व २ अपत्य आहेत .यासंदर्भात (Kurkheda Police) पूराडा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आले आहे. पूढील तपास (Kurkheda Police) पूराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांचा मार्गदर्शनात सूरू करण्यात आला आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 24, 2024

PostImage

पोलिस भरतीचा सराव करतानाच युवकाला अटॅक


 

गडचिरोली:  येथे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाला अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी येथे जिल्हा क्रीडा संकुल परिसरात घडली. सूरज सुरेश निकुरे (२४) रा. भिकारमौशी असे मृतक युवकाचे नाव आहे.

 

पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी सूरज हा गडचिरोली येथे खोली करून राहत होता. सकाळी ६ वाजता तो जिल्हा क्रीडांगणावर पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी गेला होता. काही अंतर धावल्यानंतर त्याच्या

 

छातीत दुखण्यास सुरुवात त्यानंतर झाली. तो मित्रांसोबत शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये औषधी घेण्यासाठी गेला. मात्र, त्याच ठिकाणी तो चक्कर येऊन पडला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

 

डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सूरजच्या मृत्यूमुळे गावात भिकारमौशी गावात शोककळा पसरली असून कुटुंबियाने एकच टाहो फोडला.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 22, 2024

PostImage

आंबेशिवणी येथील शेतामध्ये जंगली हत्तीचा धुमाकूळ


 

 

प्राप्त माहितीनुसार आंबेशिवणी येथील शेतकरी प्रेमिला पुंडलिक म्हस्के आणि पुंडलिक तुळशिराम म्हस्के यांनी उन्हाळी रब्बी फसल सहा एकर मध्ये धान शेतीची लागवड केली आहे, काल दिनांक २१ एप्रिलच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास जंगली हत्तीचा कळप आंबेशिवणी येथील प्रेमिला पुंडलिक म्हस्के आणि पुंडलिक तुळशिराम म्हस्के यांच्या शेतामध्ये सर्वे अनुक्रमांक १४१/३, १४८/२, १४८/३ मध्ये शेतकुंपण तोडुन शिरले आणि दोन ते तीन एकर क्षेत्रामध्ये अक्षरशः हौदोस घातला, यामध्ये शेतातील पाईपाची तोडफोड केली, धान्य पिक पायांनी तुडवुन पिकाची खुप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे,अशातच शेतक-यांच्या हाती आलेले पिक आता भुईसपाट झाल्यामुळे शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि शेतक-याच्या कुंटुबांवर खुप मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे, त्यामुळे वनविभागाने तात्काळ शेतक-यांच्या पिकाचे पंचनामे करुन त्वरीत आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे, आणि वनविभागाने जंगली हत्तीचे त्वरीत बंदोबस्त करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहेत.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 20, 2024

PostImage

विजय वडेट्टीवारांचा 'ईव्हीएम'वर आक्षेप


 

 

ब्रह्मपुरी :  देलनवाडी येथील ८ व्या क्रमांकाच्या केंद्रांवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सकाळी ९:३० वाजता सहकुटुंब दाखल झाले. दरम्यान, मतदान केल्यानंतर स्लिप कटून खाली पडते. पण, त्यावेळी लाइट डार्क होतो. त्यामुळे मत कुणाला पहले हे ओळखता येत नाही', अशी तक्रार काहींनी वडेट्टीवारांकडे केली, 'स्वतः मतदान करतो आणि त्यानंतर सांगतो', असे आश्वस्त करून केंद्रात गेले. मतदानानंतर वडेट्टीवारांनीही उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्याकडे आक्षेप नोंदविला. 'मतदान केल्यानंतर जेव्हा लाइट ऑफ होतो तेव्हा मतदान झाले आहे. केवळ स्लिप कट होताना दिसत नाही, असे स्पष्टीकरण उपविभागीय अधिकारी भस्के यांनी दिल्यानंतर वडेट्टीवारांचे समाधान झाले. नंतर आक्षेपाचे कारण नसल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.

 

यंत्रांतील बिघाड; मतदार ताटकळले

 

काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांत अचानक बिघाड झाल्याने उशिरा मतदान सुरू झाले. जिवती तालुक्यातील येल्लारपूर केंद्रात तयारी पूर्ण झाल्यानंतरही यंत्र इनव्हॅलिड दाखविल्याने सकाळी ८ पर्यंत मतदार ताटकळले होते. ८:२० वाजेपासून मतदान सुरू झाले. चिमूर तालुक्यातील पळसगाव केंद्रात सकाळी ७:२० वाजता यंत्र बंद पडले. यंत्र बदलल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली.

 

चर्चा तामिळनाडूच्या जवानांची

 

चिमूर तालुक्यातील शंकरपूर केंद्रात तामिळनाडूतील २५ सीआरपीएफ बंदूकधारी जवानांची तुकडी तैनात करण्यात आली. आतापर्यंतच्या निवडणुकांत येथील केंद्रावर सीआरपीएफ जवान तैनात झाले नव्हते. पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू व ठाणेदार तुषार चव्हाण यांनी वासेरा येथील केंद्राला भेट दिली.

 

मिळाले नाही पिण्याचे पाणी

 

भारी जि. प. शाळेतील केंद्रात पाण्याची व्यवस्था न केल्याने मतदारांना समस्याचा सामना करावा लागला. दीड हजारांपेक्षा अधिक मतदार असतानाच एकच केंद्र ठेवल्याने ज्येष्ठ मतदारांची मोठी गैरसोय झाली. राजुरा, रामपूर येथे उन्हात उभे राहावे लागले.

 

शाळा बांधकामाने घोसरीत खोळंबा

 

घोसरी येथे प्रत्येक निवडणुकीत दोन केंद्रे दिली जातात. पण, जि.प. शाळेचे बांधकाम सुरु असल्याने यावेळी एकच मतदान केंद्र देण्यात आले. या केंद्रावर १ हजार ३४७ मतदार आहेत. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच मतदान करता यावे म्हणून गर्दी झाली. मात्र, एकच केंद्र असल्याने मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 20, 2024

PostImage

कुरुडमध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांत किरकोळ बाचाबाची


 

 

आरमोरी तालुक्यातील कुरुड येथे भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यात किरकोळ बाचाबाची झाली. मतदान करण्यासाठी निघालेल्या मतदारांना अमूक उमेदवाराला मतदान करा, असा आग्रह केल्याने वादाची ठिणगी पडली. पोलिसांनी हस्तक्षेप करताच दोन्ही गटाचे कार्यकर्ते शांत झाले.

 

पोर्ला केंद्रावर मद्यपीची पोलिसांशी अरेरावी

 

पोर्ला येथे जि. प. शाळेमधील केंद्रावर एक मद्यपी आला. त्याने रांगेत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इतरांनी त्यास रोखले. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने अरेरावी केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 20, 2024

PostImage

गडकरी यांच्या फोटोसह कमळाचे चिन्ह स्लिपवरून भाजप-काँग्रेस 'आमनेसामने' भाजपकडून प्रचाराचा काँग्रेसचा आरोप: बूथवरून जप्त केले प्रिंटर


 

नागपूर : मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या भाजपच्या बूथवर मिनी प्रिंटरच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या फोटोसह कमळाचे चिन्ह छापलेली स्लिप मिनी प्रिंटरच्या माध्यमातून मतदारांना दिली जात होती. यावर ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. काही ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करीत मिनी प्रिंटर जप्त केले व तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला.

 

सकाळी ११ च्या सुमारास बांगलादेश नाईक तलाव परिसरातील संत कबीर अप्पर प्रायमरी स्कूलच्या समोरील भाजपच्या बूथवर मतदाराच्या चिठ्ठीवर कमळाचे चिन्ह छापून येत असल्याच्या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपचे नेते व कार्यकर्ते समारोसमोर आले. यामुळे सुमारे ५० मिनिटे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लगतच्या चौकीतील पोलिसांनी लहान चार प्रिंटर ताब्यात

 

घेताच भाजपचे कार्यकर्ते पोलिसांकडे प्रिंटर परत करण्याची मागणी करू लागले. अखेर आ. प्रवीण दटके यांनी मध्यस्थी करून प्रिंटर परत घेतले. त्यानंतर या बूथवर संबंधित प्रिंटर दिसले नाहीत.

 

झिंगाबाई टाकळी परिसरातील आशीर्वाद शाळेसमोरील भाजपच्या बूथवरही अशाच स्लीप दिल्या जातहोत्या. त्यावर काँग्रेस कार्यकर्ते बंडू ठाकरे यांनी आक्षेप घेतला. यावेळी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर प्रिंटर हटविण्यात आले. फ्रेंड्स कॉलनी परिसरातील बूथवरही असाच तणाव झाला.

 

काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

 

भाजपच्या बूथवर आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. प्रचारबंदी असताना मतदारांचे नंबर घेऊन त्यांना व्हॉट्सअॅप आणि मॅसेज पाठविण्यात येत होते. अनेक मतदान केंद्राबाहेर भाजपने आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले पेंडॉलही उभारले होते. हा सर्व प्रकार सुरू असताना मतदान केंद्राबाहेरील पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत हे सर्व बघत होते, अशी तक्रार काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 20, 2024

PostImage

सिरोंचा, कुरखेडा, कढोलीत तांत्रिक बिघाड


गडचिरोली, ब्युरो.

सिरोंचा, कुरखेडा तालुकास्थळासह कढोली येथील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मतदारांनाही प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा येथील तीन केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्वरीत अहेरी येथील हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नवीन मशीनबोलवाव्या लागल्या. तर कुरखेडा शहरातील एका केंद्रावर ईव्हीएम मशीनबंद पडल्या तब्बल दोन मशिन बदलविण्याची पाळी आली. यामुळे जवळपास दोन तास मतदार रांगेत ताटकळत उभे राहिले. तसेच याच तालुक्यातील कढोली येथील वा) र्ड क्र. 1 व 2 येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास काही कारणास्तव मशिनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल अर्धा तास उशिरा म्हणजे सकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 20, 2024

PostImage

कर्मचाऱ्याने भाजपाला मत देण्याचा केला आग्रह देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा मतदान केंद्रावरील घटना


 

देसाईगंज : गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी आज १९ एप्रिल रोजी मतदानास प्रारंभ झाल्यानंतर देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील बुथ क्रमांक १९४ वर मतदान करताना कार्यरत कर्मचारी दिपक नाकाडे यांनी मतदारांना फुलावर मतदान करायला सांगुन मतदान प्रभावित करीत असल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

 

 

दरम्यान कोंढाळा येथील जागृत नागरीकांनी उपविभागीय अधिकारी मानसी यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नाकाडे यांना तत्काळ निवडणूक कार्यक्रमातुन हटविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. कर्तव्यावरील कर्मचाऱ्याच्या या वर्तणुकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 17, 2024

PostImage

हातावरची मेहंदी पुसण्याआधी विवाहितेने संपविले जीवन,


 

 

 

 

आरमोरी: लग्नानंतर अकराव्या दिवशीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिवणी (बुज) येथे मंगळवारी घडली. मोनाली जगदीश ढोरे (वय २२ वर्षे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

 

 

शिवणी येथील जगदीश ढोरे यांचा विवाह भंडारा जिल्ह्यातील गौराळायेथील मोनाली संजय शहारे हिच्याशी ५ एप्रिलला झाला होता. शिवणी येथे जगदीशच्याच घरी दोघांनी आप्त स्वकियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. विवाह समारंभ आटोपल्यानंतर मोनाली ही माहेरवरून सासरी शिवणी येथे नांदायला आली.

 

सुखी संसाराचे स्वप्न रंगवून दोघांनीही आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. मात्र, १६ रोजी पहाटे मोनाली हिने घरातील आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण कळू शकले नाही.

 

आरमोरी पोलिसांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 16, 2024

PostImage

पोलीस नक्षल चकमकीत तब्बल 18 नक्षली ठार


कांकेर, दि. 16 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे

 

या दरम्यान नक्षली डोके वर काढतांना दिसत आहे. अशातच आज 16 एप्रिल ला पोलीस नक्षल चकमकीत तब्बल 18 नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील कांकेरच्या छोटेबेठिया ठाण्याअंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांसोबत चकमक उडाली. सुमारे एक तास चाललेल्या या चकमकीत तब्बल 18 नक्षली ठार तर 3 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. चकमकीनंतर घटनस्थळावरून Ak47 व इतर स्वयंचलित हत्यार जप्त करण्यात आले आहे. आतातापर्यंतची ही मोठी कारवाई मानल्या जात आहे. तसेच ठार नक्षल्यांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 7, 2024

PostImage

आयात 116 नेते भाजपाचे उमेदवार


 

पक्षांतर करून आलेल्या नेत्यांवर भिस्त

 

दिल्ली, लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाने आतापर्यंत 400 हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. चारशे पार जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच पक्षाने 116 आयात नेत्यांना तिकीट दिलेले आहेत. भाजपाचे तब्बल 28 टक्के उमेदवार दुसऱ्या पक्षांतून आलेले आहेत. आतापर्यंत भाजपाने 417 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी एकूण 116 उमेदवार दुसऱ्या पक्षांतून भाजपामध्ये दाखल झालेले आहेत. देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. तेथे आतापर्यंत 64 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यातील 20 जागांवर निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ या राज्यातच नाही तर तामिळनाडूत 11, पश्चिम बंगाल व ओडिशात प्रत्येकी आठ व महाराष्ट्रात सात आयाराम-गयारामांना भाजपाने तिकीट दिले आहे.

 

21 राज्यांत पक्षांतर करून

 

आलेल्यांना देण्यात आले तिकीट भाजपाने 18 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत

 

अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. पक्षाच्या 417 उमेदवारांपैकी 116 जणांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केला आहे.

 

■ तब्बल 27.82 टक्के उमेदवार मूळ भाजपाचे

 

नाहीत. पुद्दुचेरीत पक्षाचा एकमेव उमेदवार दुसऱ्या पक्षाचा आहे.

 

त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात पक्षाचे 6 पैकी 5

 

उमेदवार पक्षांतर करून आलेले आहेत. तेलंगणात

 

भाजपाने 17 उमेदवार उभे केले असून, त्यापैकी 12

 

जण दुसऱ्या पक्षातून भाजपामध्ये आलेले आहेत.

 

सहा राज्यांत 50 टक्के

 

आयात उमेदवार सहा राज्यांत भाजपा पक्षांतर करून आलेल्या

 

नेत्यांवर अवलंबून आहे. आंध्र प्रदेशात 83 टक्के,

 

दादरा आणि नगर हवेली, हरयाणात 60 टक्के,

 

पुद्दुचेरीत 100 टक्के, तेलंगणात 70.59 टक्के आणि

 

पंजाबमधील 66 टक्के उमेदवार निवडणुकीपूर्वी अन्य

 

पक्षातून भाजपामध्ये आलेले आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 3, 2024

PostImage

जबरजस्तीने लैंगिक संबंध करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेसह इसमावर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


आरमोरी: एका महिलेने आपल्या अल्पवयीन मैत्रीणीस फूस लावून जोर जबरजस्ती करून एका इसमासह जबरजस्तीने लैंगिक संबंध करण्यास भागा पाडून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन त्या महिलेसह इसमावर आरमोरी पोलीस ठाण्यात पोस्को व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची घटना 2 एप्रिल रोजी घडली. यातील आरोपी महिलेसह एकास अटक करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 27 वर्षे महिलेने अल्पवयीन पिडीत बालीका मैत्रीणीस तूझे लग्न लावुन देतो असे म्हटले. यासाठी पीडितेचा विरोध असतांना देखील जबरदस्तीने गडचिरोली येथे नेवुन तिथे आरोपी इसमासोबत तुझे लग्न लावुन दिले आहे असे सांगुन जबरदस्तीने सदर आरोपी इसमासोबत शारीरीक संबध करण्यास भाग पाडले. दरम्यान सदर बाबत पिडीत बालीकेच्या आईने यास विरोधा केला असता तिच्या विरोधाला न जुमानता आरोपीत महिलेने पिडीत बालीकेस फुस लावुन तसेच जबरदस्तीने गडचिरोली येथे नेवुन तिथे तिला किरायाने रूम करून देवुन पिडीत बालीकेस यातील आरोपीसोबत शारीरीक संबध करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरुन 2 एप्रिल 2024 रोजी आरमोरी पोलीस ठाण्यात कलम 366 (अ), 376, POSCO, 4, 6, 8 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी महिला व व इसमास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 3, 2024

PostImage

निवडणुकीपूर्वी ऑपरेशन; १२ नक्षलवाद्यांचा खात्मा


छत्तीसगडमध्ये चकमकीत १०, मध्य प्रदेशात २ नक्षली टिपले

 

रायपूर : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यामध्ये तसेच मध्य प्रदेशमधील बालाघाट येथे सुरक्षा दलांशी झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींमध्ये १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांविरोधात अधिक व्यापक मोहीम उघडण्यात आली. छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता सुरक्षा दलाशी चकमक होऊन नक्षलवाद्यांना मोठा दणका देण्यात आला.

 

छत्तीसगडमध्ये बस्तर लोकसभा मतदारसंघात विजापूरचा भाग येतो. या मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. गंगळूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लेंद्रा गावानजीकच्या जंगलामध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता नक्षलवादी व सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली असताना ही घटना घडल्याचे बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.

 

छत्तीसगडमध्ये डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्क फोर्स, केंद्रीय राखील पोलीस दल, कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना पकडण्यास संयुक्त मोहिम हाती घेतली. मार्च ते जून या कालावधीत नक्षलींकडून जास्त हल्ले होतात.

 

महाराष्ट्र पोलिसांना हवे असलेले दोघे ठार

मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून एके-४७ रायफल, १२ बोअरची रायफल व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. केराझारी भागामध्ये सोमवारी रात्री ९ ते १०च्या दरम्यान ही चकमक झाली. त्यात सजांती उर्फ क्रांती ही महिला व रघू उर्फ शेरसिंग या दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अनेक गुन्ह्यांप्रकरणी हे दोन नक्षलवादी पोलिसांना हवे होते. त्यांना पकडून देण्यास सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसांची एकूण रक्कम ४३ लाख रुपये आहे.

 

नक्षलवाद्यांकडे आहेत आधुनिक शस्त्रास्त्रे

छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडे विदेशी शस्त्रे आढळून आली आहेत. याआधीही नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाने एके रायफली जप्त केल्या आहेत. या नक्षलवाद्यांकडे चिनी बनावटीची शस्त्रेही आढळून आली आहेत.

 

ग्रेनेड लाँचरही होते नक्षलवाद्यांकडे

■ चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.

 

■ त्यांच्याकडून मशीनगन, बॅरेल ग्रेनेड लाँचर अशी शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा सुरक्षा दलाने जप्त केला आहे.

 

■ घनदाट जंगलात शोध घेतला असता आणखी ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 3, 2024

PostImage

सरकारच्या भूमिकेमुळे ईडी, आयकरची अडचण सर्वोच्च न्यायालयात दोन प्रकरणांमध्ये बदललेल्या दृष्टिकोनामुळे सर्वांना आश्चर्य


 दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि - विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का? ही चिंता आता सरकारलाही सतावत आहे काय? गेल्या ४८ तासांत सरकारच्या भूमिकेत झालेल्या बदलामुळे ईडी आणि आयकर विभागाचे वरिष्ठअधिकारी आश्चर्यचकित झाले. 

 

केंद्र सरकारने कठोर भूमिकाघेतली नसती तर आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक नोटीस पाठवून कारवाई केली नसती. सोमवार हा सर्वोच्च न्यायालयातील संस्मरणीय दिवस असेल. कारण, काँग्रेस पक्षाला पाठवलेल्या ३,५६७ कोटी रुपयांच्या आयकर नोटीसच्यासुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष आहे. आयकर नोटीसवरील सुनावणी निवडणुकीनंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी.

आयकर विभागही आता कोणतीही कारवाई करणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे वकील आणि नेते अभिषेक मनु सिंघवी यांना सर्वाधिक आश्चर्य वाटले. सिंघवी तर म्हणाले की, ते निःशब्द आहेत.

 

संजय सिंह प्रकरणातही विरोध नाही

आपचे खासदार संजय सिंह यांच्या प्रकरणात ईडीने सुप्रीम कोर्टात संजय सिंह यांच्या जामिनाला साधा विरोधही केला नाही. त्यामुळे संजय सिंह यांना सहज जामीन मिळाला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना ईडीला विचारत राहिले की त्यांना संजय सिंह यांना आणखी कोठडीत ठेवायचे आहे का? पण ईडीच्या वकिलांनी एका शब्दानेही आक्षेप घेतला नाही.

 

 

 

सरकारच्या भूमिकेत बदल?

हे सर्व केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार होत असल्याची चर्चा आहे. कारण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता किंवा ईडीचे वकील सरकारच्या सूचनेशिवाय एवढा मोठा निर्णय स्वतः घेऊ शकले नसते. सरकारच्या भूमिकेत बदल झाला असेल तर त्याचे परिणाम आणखीही दिसून येऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 3, 2024

PostImage

'आप' नेते संजय सिंह यांना अखेर जामीन


 

 

मद्य धोरण प्रकरण : ईडीने सर्वोच्च न्यायालयात जामिनाला केला नाही विरोध 

 

नवी दिल्ली: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील नेते खा. संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे संजय सिंह यांच्या जामिनाला कोणताही विरोध नसल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. संजय सिंह यांना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जामीन मिळाल्याने चहूबाजूंनी संकटात घेरलेल्या 'आप'ला उसंत मिळणार असून विरोधी 'इंडिया' आघाडीचेही मनोधैर्य उंचावले आहे.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी तिहार तुरुंगात दाखल होताच २४ तासांच्या आत संजय सिंह यांना जामीन मिळाला.

 

संजय सिंह यांना अटक का?

ईडी, सीबीआयचा माफीचा साक्षीदार बनलेला व्यावसायिक दिनेश अरोराच्या विधानाच्या आधारे संजय सिंह यांना अटक झाली. अरोराने दोनदा संजय सिंह यांना २ कोटी रुपये नेऊन दिले व त्याचे डिजिटल पुरावे असल्याचा दावा ईडीने केला आहे.

 

 

सिसोदिया यांचे काय?

'आप'च्या तीन सर्वोच्च नेत्यांना अटक झालेल्या मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनाही दिलासा मिळणार काय, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, केजरीवाल व सिसोदिया मद्य धोरण निर्धारित करण्यात सहभागी असल्यामुळे त्यांचे प्रकरण संजय सिंह यांच्या प्रकरणापेक्षा काहीसे वेगळे असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.

 

आपली राजकीय कारकीर्द वाचवायची आणि आणखी वाढवायची असेल तर तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा महिन्याभरात ईडीकडून अटक केली जाईल, असा निरोप भाजपने आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून पाठवला आहे.

- अतिशी सिंग, नेत्या, 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

नागपूर : आठवडी बाजारातून अपहरण केलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार केला


नागपूर : आठवडी बाजारातून अपहरण केलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार केला. वैद्यकीय तपासणीतून अशी धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपीविरूध्द अपहरण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. सुरेंद्र पराये (२९) रा. अजनी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २ एप्रिल पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली. आरोपी सुरेंद्र हा मुळचा बिडीपेठ येथील रहिवासी आहे. त्याला आई-वडिल आणि एक भाऊ आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मात्र, पत्नी मुलांसह वेगळी राहते. तो दारू पिण्याच्या सवयीचा आहे. दारूच्या नशेत सात महिण्यापूर्वी त्याचा अपघात झाला होता. सध्या तो अजनी परिसरात राहात असून नुडल्स बनविण्याचे काम करतो. कामाला जाताच अ‍ॅडव्हॉन्स घेतो नंतर परत येत नाही.

 

घटनेच्या दिवशी तो दुचाकीने भटकत भटकत गुलशननगरातील आठवडी बाजारात गेला. पसंत केलेल्या कपड्याचे पैसे देतो अशी बतावणी करून चिमुकलीचे अपहरण केले. दुचाकीवर बसवून तिला जवळपासच्या जंगलात घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर तो अजनी परिसरात आला. त्याने दारू पिण्यासाठी एका मित्राला बोलाविले. दोघांनी दारू ढोसली. दरम्यान त्याच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. तो दुचाकी ढकलत असताना चिमुकली रडत होती. दरम्यान पोलीस कर्मचारी चंदू ठाकरे हे घरी जात असताना सक्करदरा मार्गावर त्यांना हे दृष्य दिसले. तत्पूर्वी एका चिमुकलीचे अपहरण झाल्याचा संदेश वायलेसवर आला होता. ठाकूर यांनी सतर्कता दाखवित त्याची विचारपूस केली. संशय येताच पोलिसांना फोन केला. सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अपहरण उघडकीस आले.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

Chandrapur news: दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देऊ


चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर ” गाव तिथे बियर बार ” सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे.

 

चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात एकूण १५ उमेदवार आहेत. यात काँग्रेस, भाजप, वंचित अश्या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनते समोर उभे होतात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, असे आश्वासन त्या देत आहेत.

 

 

खासदार झाले तर खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे मतदार किती आकर्षित होतात हे बघणे उस्तुकतेचे ठरणार आहे. वनिता राऊत ह्या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा निवडणुक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूचे दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी केली होती.

 

 

गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण त्यांचे आहे.समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्या म्हणतात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारुसाठी प्रसिद्ध आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी ही महिला उमेदवार थेट बिअर बारचा परवाना देणार आहे, असे आश्वासन देत फिरत असल्याने मतदारांमध्ये या महिला उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

शाहरुख खान याच्या मुलाची शाळेची फी किती? फी कार्ड तुफान व्हायरल


 

शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखने तगडी कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, लाखो चाहत्यांच्या हृदयात वसलेल्या शाहरूखचे नेटवर्थ 5000 कोटी रुपये आहे.

 

1991 साली शाहरुखने त्याची गर्लफ्रेंडन गौरी खानशी लग्नं केलं. 1997 मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचा आर्यनचा तर 2000 साली त्यांची लाडकी लेक सुहानाचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर तब्बल 13 वर्षांनी शाहरुख खान आणि गौरी पुन्हा आई-वडील बनले. तिसऱ्यांदा सरोगसीद्वारे जन्मलेल्या अबरामचे त्यांनी खान कुटुंबात जल्लोषात स्वागत केले.

 

मुलासाठी तगडी फी भरतो शाहरुख खान

 

अनेक उद्योगपती, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी यांच्याप्रमाणे शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम हासुद्धा भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये शिकतो. अबराम हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे. आत्तापर्यंत त्याने शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. त्यांच्या शाळेच्या ॲन्युअल फंक्शनमधील अबरामने सहभाग घेतल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी किड्सही या शाळेत शिकतात. मात्र स्टार किड्सच्या या शाळेची फी ऐकून तर लोकांचे डोळेच विस्फारतील.

 

किती आहे धीरूभाई अंबानी स्कूलची फी ?

 

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी प्रत्येक इयत्तेनुसार बदलते. रिपोर्ट्सनुसार, एलकेजी ते इयत्ता 7 वी पर्यंतचे मासिक शुल्क सुमारे 1.70 लाख रुपये आहे. आणि 8 वी ते 10 वी पर्यंतची दर महिन्याची फी ही 4.48 लाख रुपये आहे. तर 11वी आणि 12वी फी सुमारे 9.65 लाख रुपये आहे. शाळेच्या फी रचनेनुसार, अब्रामची वार्षिक फी सुमारे 20.40 लाख रुपये आहे.

 

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची भारतातील सर्वोच्च शाळांमधील एक अशी गणना केली जाते. 2003 साली मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी स्थापन केली होती. तेव्हापासून ते आयबी वर्ल्ड स्कूल आहे. 1,30,000 चौरस फुटांवर पसरलेल्या या शाळेत आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण शिक्षण सुविधा आहेत. शाळेची इमारत ७ मजली आहे ज्यामध्ये अनेक वर्ग, सुंदर खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, टेरेस गार्डन, छतावरील बाग, टेनिस कोर्टही आहे, असे समजते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

'पार्सल'च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे


 

 निवडणूकीच्या निमित्ताने कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे होण्याची चर्चा झिरपल्यामुळे विविध यंत्रणांनी रेल्वेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या पार्सल विभागावर नजर रोखली आहे.

 

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

 

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसा सर्वत्र मुक्त हस्ते पैसा उधळला जातो. खास करून मोठ्या प्रमाणात काळा पैसा (ब्लॅक मनी) मोठ्या प्रमाणात बाहेर काढला जातो. या पैशाचा वापर दारू, खाणे-पिणे, वाहने तसेच अन्य सोयी सुविधा खरेदीसाठी केला जातो. ते लक्षात घेता मतदान प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालणाऱ्या ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणांसह पोलिसांनी प्रत्येक नाके आणि शहराला जोडणाऱ्या दुसऱ्या गावांच्या सिमांवर विविध वाहनांची तपासणी चालविली आहे. खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी मोठी रोकडही पकडण्यात आली आहे. पुढच्या काही तासात बसेसचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व लक्षात घेऊन मोठ्या रकमेची हेर-फेर करणाऱ्यांनी रेल्वेकडे नजर वळविली आहे.

 

विशेष म्हणजे, नागपुरात अशा प्रकारे कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर केल्या जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. कुरियर मॅन म्हणून काम करणारांच्या हातात मोठ्या रकमेचे पार्सल देऊन ते रेल्वे किंवा बसने पाहिजे त्या ठिकाणी पाठविण्यात येते. अनेकदा रेल्वेने वेगवेगळ्या बॉक्समध्ये, पिंपामध्येही लाखोंची रोकड भरूनही ती ईकडून तिकडे पाठविली जाते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या माणसांपर्यंत अशाच प्रकारे रक्कम पाठविण्यात येत असल्याची कुणकुण लागल्याने रेल्वे पोलिसांसह सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी नागपूर स्थानकावरील पार्सल विभागाची पाहणीही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना, आदेश देण्यात आले आहे.

 

अशीही क्लृप्ती !

रोकड पकडली जाऊ नये, फारशी तपासणी होऊ नये म्हणून संबंधितांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. मिठाईचे किंवा चॉकलेटचे बॉक्समध्ये लाखोंची रोकड घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविली जाते. आता मात्र औषधांच्या बॉक्समध्ये रोकड घालून ती संबंधितांपर्यंत पोहचविण्याची क्लृप्ती संबंधितांनी अवलंबिली असल्याची चर्चा वजा माहिती आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

लोकांनी पूर्ण जोर लावून मतदान केलं नाही, तर हे मॅच फिक्सिंगमध्ये यशस्वी होतील. ज्यादिवशी यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल, त्यादिवशी आपलं संविधान नष्ट होईल- राहुल गांधी म्


"लोकांनी पूर्ण जोर लावून मतदान केलं नाही, तर हे मॅच फिक्सिंगमध्ये यशस्वी होतील. ज्यादिवशी यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल, त्यादिवशी आपलं संविधान नष्ट होईल," असं राहुल गांधी म्हणाले.

 

"ज्या दिवशी संविधान संपुष्टात आलं, त्यादिवशी आपल्यावर फार मोठा आघात होईल," असंही ते म्हणाले.

 

"ही काही एखादी साधी निवडणूक नाही. ही संविधान वाचवण्यासाठीची, देश वाचवण्यासाठीची, वंचित आणि गरिबांचा हक्क वाचवण्यासाठीची निवडणूक आहे. या निवडणुकीत स्पष्टपणे मॅच फिक्सिंग दिसत असल्याचं भाजपचेच लोक म्हणत आहेत."

 

"मोदींनी निवडणूक आयोगात त्यांचे लोक भरले. देशातील दोन मुख्यमंत्री राहिलेल्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं," असा आरोपही राहुल गांधींनी केला.

 

"त्यांनी आमचं बँक अकाऊंटही बंद केलं. त्यांना हे करायचं होतं तर सहा महिन्यांपूर्वी किंवा सहा महिन्यांनंतरही करता आलं असतं. पण हे सर्व काही निवडणुकीमुळं करण्यात आलं."


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

देशातील मांस उत्पादन वाढणार; 7 लाख टनांनी होणार वाढ


 

 

नवी दिल्लीः यावर्षी देशात मांस उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. यंदा देशात मांस उत्पादनात ७ लाख टनांनी वाढ होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मांस उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळं यंदा देशातून मोठ्या प्रमाणात मांस निर्यात केलं जाणार आहे. मांसाची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादनाताही वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार २०२३-२४ मध्ये देशातील मांस उत्पादन १४ दशलक्ष मांस खाणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ टनांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

 

देशात मांस उत्पादनात पोल्ट्रीचा वाटा सर्वात जास्त आहे, तर म्हशीचे मांस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर शेळ्या-मेंढ्या याचा क्रमांक लागतो. देशातून शेळ्या-मेंढ्याच्या मांसासह म्हशीच्या मांसाची देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मागील दोन वर्षाचा विचार केला तर देशात मांस उत्पादन सात लाख टनांनी वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

नोटाबंदी काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचे मत


 

 २०१६ मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या नोटाबंदीच्या विरोधात मी मत मांडले होते. नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा ८६ टक्के होत्या. मात्र, नोटाबंदी झाल्यानंतर ९८ टक्के नोटा जमा झाल्या.

 

त्यामुळे नोटाबंदी ही काळे पैसे पांढरे करण्याचा एक मार्ग होता, असे माझे मत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी संविधानानुसार कर्तव्य न बजावणाऱ्या राज्यपालांवर टीकेचे आसूड ओढले.

 

नलसर विधि विद्यापीठात आयोजित संविधान परिषदेच्या उद्घाटन सत्रात न्यायमूर्ती नागरत्ना बोलत होत्या. भारत सरकारने ऑक्टोबर २०१६ मध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व काळा पैसा बँकेत परत आला. सामान्य माणसाला होत असलेल्या त्रासामुळे माझे मन हेलावून गेले होते. त्यामुळे मी नोटाबंदीच्या विरोधात मत दिले, असे न्यायमूर्ती म्हणाल्या.

 

महाराष्ट्राचे उदाहरण...

राज्यपालांच्या अतिरेकीपणाचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या प्रकरणाबद्दल त्यांनी सांगितले. 'एखाद्या राज्याच्या राज्यपालाची कृती न्यायालयांसमोर विचारार्थ आणणे ही राज्यघटनेनुसार निरोगी प्रवृत्ती नाही,' असे त्यांनी म्हटले.

 

राज्यपालांना सांगावे लागणे खूप लाजिरवाणे

- मला वाटते की, राज्यपालांच्या पदाला जरी 'गव्हर्नर' म्हटले जात असले, तरी ते एक गंभीर घटनात्मक पद आहे. राज्यपालांनी संविधानानुसार त्यांची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, जेणेकरून राज्यपालांविरुद्धच्या अशा प्रकारच्या खटल्यांना आळा बसेल.

- राज्यपालांना एखादी गोष्ट करण्यास किंवा करू नये, असे सांगणे खूप लाजिरवाणे आहे, परंतु आता अशी वेळ आली आहे की, त्यांना आता संविधानानुसार कर्तव्य बजावण्यास सांगितले जाईल, असे त्या म्हणाल्या.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

नक्षल्यांकडून ईसमाची हत्या; घटनास्थळी नक्षल्यांनी टाकली पत्रके


 

गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका ईसमाची हत्या केल्याची घटना आज शुक्रवार २९ मार्च रोजी अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास उघडकीस

 

आली. अशोक तलांडे असे मृतकाचे नाव आहे. ताडगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर अशोक तलांडेचा मृतदेह आढळून आला.

 

घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकले असून, अशोक तलांडे पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे

 

त्यात म्हटले आहे. अशोक तलांडे हा मागील काही दिवसांपासून ताडगाव येथे वास्तव्य करीत होता. मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, नक्षल्यांनी आज त्याची हत्या केली. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना ही हत्या झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी मृतक ईसम पोलीस खबऱ्या नसल्याचे सांगितले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

*‘पेडन्यूज’ वर आहे लक्ष* *सोशल मिडियाचा वापर करा दक्षतेने


 

गडचिरोली दि. 31 : निवडणूक काळात वृत्त देतांना माध्यमांनी ते वस्तुनिष्ठ, प्रामाणिक व तटस्थ भूमिकेतून द्यावे अशा प्रेस कौन्सील ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. तर ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने ‘पेडन्यूजची’ व्याख्या केली आहे. सदर व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्विकारली असून निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रसारीत होणाऱ्या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

निवडणूक कालावधीत माध्यमात प्रसारित होणारे वृत्त ही उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असतील, अशी शंका समितीला आल्यास अथवा तशी समितीकडे कोणी तक्रार केल्यास त्या वृत्तासंबंधी संबंधित उमेदवाराला एम.सी.एम.सी समिती खुलाशाची विचारणा करू शकते. समितीला 48 तासात खुलासा मिळणे अपेक्षीत आहे. जर समितीला संबंधितांचा खुलासा मान्य झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य न झाल्यास अथवा मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहे, असे गृहीत धरून तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जातो.

जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमदेवारास मान्य नसल्यास उमेदवाराला राज्यस्तरीय समितीकडे 48 तासाच्या आत अपील करता येते. राज्यस्तरीय समिती 96 तासाच्या आत तक्रारीचा निपटारा करून तसा निर्णय उमेदवार आणि जिल्हास्तरीय समितीला कळवितात. या निर्णयाविरूध्द उमेदवार आदेश मिळाल्यानंतर 48 तसांच्या आत भारत निवडणूक आयोगाकडे अपील करू शकतो. आयोगाचा निर्णय अंतिम असतो.

*संशयीत पेडन्यूजची उदाहरणे* : प्रेस कौन्सिल ऑफ इंडीयाने संशयित पेडन्यूजसंदर्भात काही उदाहरणे दिली आहेत. यात साधारण एकाचवेळी निरनिराळ्या लेखकांच्या बायलाईन नमुद करून स्पर्धा असलेल्या प्रकाशनामध्ये छापून येणारे छायाचित्र व ठळक मथळे दिलेले समान लेख. निवडणूक जिंकण्याची शक्यता असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांची स्तुती करणारे लेख. उमेदवाराला समाजाच्या प्रत्येक समुहाचा पाठिंबा मिळत आहे व तो मतदारसंघातील निवडणूक जिंकेल, असे नमुद करणारे वृत्त. उमेदवाराला वारंवार अनुकूल असणारे वृत्त प्रकाशित करणे. उमेदवाराची अधिक प्रसिद्धी करणे आणि विरोधकांच्या बातम्या न घेणे. अशा प्रकारचे वृत्त पेडन्यूज मध्ये गणल्या जाते.

*समाज माध्यमांवरही लक्ष* : निवडणूक मोहिमेशी संबंधीत असलेल्या कायदेशीर तरतुदी या इतर माध्यमांप्रमाणेच सोशल मिडियालाही लागू होतात. त्यामुळे ऑनलाईन काहीही पोस्ट करण्याआधी नीट विचार करावा. व्हाट्सॲपवर आलेली माहिती किंवा संदेश पुढे पाठवण्याआधी बातम्यांचे अधिकृत स्रोतबाबत खातरजमा करावी. निवडणूक संबंधातील खोट्या बातम्या अफवा, प्रक्षोभक मजकूर व ग्राफीक यापासून सतर्क रहा. इंटरनेट ॲण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया यांनी निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यासाठी 2019 मध्ये स्वैच्छिक आचारसंहिता जारी केली आहे, त्याचे पालन करावे. समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत सायबर कक्ष कार्यान्वित आहे. 

 

उमेदवार अथवा नोंदणीकृत पक्षांनी आपल्या प्रचारासाठी कोणत्याही अधिकृत माध्यम प्रकारांचा उपयोग करण्यात काहीच गैर नाही. मात्र, हे करत असताना या माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या मजकूराचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. या जाहिरात मजकूराच्या माध्यमातून कोणाचेही चारित्र्य हनन होऊ नये, समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये, नैतिकता, सभ्यता यांचा भंग होऊ नये, शत्रूत्व-तिरस्काराची भावना निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेमध्ये या सर्व बाबींचा समावेश आहे. 

०००००


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

निवडणुक निरीक्षक पराशर यांचेकडून निवडणूक व्यवस्थेची पाहणी* *स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केंद्रांना भेट*


 

गडचिरोली दि. 01 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आज येथील स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केद्रांना भेट दिली. 

12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने श्री पराशर यांनी कृषी महाविद्यालय येथील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे व इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

निवडणुक निरीक्षक श्री पराशर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. तसेच विद्युत शॉर्ट सर्कीटमुळे मतदानयंत्रांना हानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या कक्षातील व गॅलरीतील तसेच लगतच्या इतर कक्षातील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेल्या कृषी महाविद्यालयाचा परिसर त्रिस्तरीय बॅरिकेट लावून सुरक्षीत करण्याचे त्यांनी सांगितले. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इव्हीएम साठवणूक कक्षाला श्री पराशर यांनी भेट देवून तेथील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. याठिकाणी सिसिटीव्ही, सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा व पुरेसे विद्युत दिवे आहेत का याबाबत पाहणी केली. तसेच इव्हीम साठवणूक कक्षाला भेट देणाऱ्यांच्या नोंदी अभ्यागत नोंदवहीत नोंदविल्या जातात का याबाबत विचारणा करून नोंदवहीची तपासणीही केली.

श्री पराशर यांनी एलआयसी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा, पंचायत समिती परिसर व रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याच्या पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील खर्च निरीक्षण कक्षालाही त्यांनी भेट देवून तेथील नोंदवह्यांची पाहणी केली.  

सहायक निवडणूक अधिकारी श्री मीना यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

०००००००


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

पेट्रोल पंप समोर भरधाव ट्रकने दूचाकी स्वाराला चिरडले


ता. प्र / कुरखेडा, दि. 01 : येथील देसाईगंज मार्गावर एच.पी पेट्रोल पंप समोर भरधाव ट्रकने दूचाकी स्वाराला चिरडल्याची घटना 31 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता कि मृतक दुचाकीस्वाराचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते. यशवंत नामदेव गहाणे (वय 58) रा. अंगारा असे मृतकाचे नाव आहे.

 

दिपक ट्रान्सपोर्ट चा ट्रक नागपुर - कूरखेडा या मार्गावर नियमीत माल वाहतूक करतो. दरम्यान मृतक हा एम एच 33 झेड 6124 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने अंगारा येथून मुलीच्या गावी ताडगांव येथे जाण्याकरीता सकाळी निघाला होता. कुरखेडा- देसाईगंज मार्गावर असलेल्या एच.पी पेट्रोल पंप मधून त्याने वाहनात पेट्रोल भरले व कुरखेडा-देसाईगंज या मुख्यमार्गावर निघताच देसाईगंज कडून कुरखेडाकडे येणारा एम.एच 31 सि. बी 8635 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली यावेळी दुचाकी हि ट्रकच्यासमोरील चाकात तर दुचाकीस्वार मागील चाकात सापडल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी घटणास्थळावर पोहचत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठविले तसेच ट्रक जप्त करीत पोलीस स्टेशन कुरखेडा येथे जमा केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

Kurkheda news: शिक्षकाने शाळेतील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची केली छेडछाड


 

 

ता.प्र / कुरखेडा, दि. 01 : विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडछाड केल्याप्रकरणी त्या शिक्षकावर कुरखेडा पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सोच्या विविध कलमान्वये आज सांयकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेने शिक्षण विभागासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

घनश्याम मंगरु सरदारे (वय 47) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो कुरखेडा तालुक्यातील एका जि.प. उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिच्या शरीराचा मुका घेणे, चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत आज मुलीच्या पालकांनी मुलगी व गावकऱ्यासह कुरखेडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि 354 (अ) 8,10,12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती असून प्रकरणाचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "ईडी, सीबीआय, पीएमएलए कायदा या गोष्टी काय आमच्या सरकारनं आणल्या का?"


गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेल्या वेगवेगळ्या नेत्यांची उदाहरणंही दिली जात आहेत. नुकत्याच उघड झालेल्या इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माहितीच्या आधारेही यासंदर्भात टीका केली जात असून उद्योगपतींना ईडी-सीबीआयचा धाक दाखवून भाजपाने त्यांच्याकडून देणगी स्वरूपात खंडणी घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर हा मुद्दा प्रचंड तापलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात त्यांची भूमिका मांडली आहे.

 

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

तमिळनाडूतील एका वृत्तवाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना मोदींनी ईडी-सीबीआयच्या कारवाईतून मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त केल्याचा दावा केला.

 

“ईडीकडे आत्ता किमान ७ हजार प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यात राजकीय व्यक्तींशी संबंधित प्रकरणं ३ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. जेव्हा त्यांचा कार्यकाळ होता, तेव्हा १० वर्षांत त्यांनी फक्त ३५ लाख इतकी रोख रक्कम पकडली. आम्ही तब्बल २२०० कोटी रुपये इतकी रक्कम पकडली आहे. नोटांचा ढीग पकडला जातोय. वॉशिंग-मशीनमध्येही नोटा सापडत आहेत. काँग्रेसच्या खासदाराकडून ३०० कोटी मिळाले. बंगालमध्ये मंत्र्यांच्या घरातून मोठी रोकड मिळाली. हे जेव्हा दिसतं, तेव्हा देशातली जनता हे सगळं सहन करायला तयार आहे का? जनता म्हणते हा आजार जायला हवा”, असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवरच प्रतिहल्ला केला.

 

“ईडी काय आमचं सरकार आल्यावर अस्तित्वात आलं का?”

ईडी, पीएमएलए कायदा भाजपा सरकार केंद्रात आल्यानंतर अस्तित्वात आले का? असा उलट प्रश्न मोदींनी विरोधकांना केला आहे. “हे सर्व आधीपासून होतं. ईडीनं नेमकं काय केलं? ईडी ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. ती स्वतंत्रपणे काम करते. आम्ही ना त्यांना अडवतो, ना त्यांना पाठवतो. त्यांना स्वतंत्रपणे काम करावं लागतं. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई योग्य ठरावी लागेल. आमचा यात काही संबंध यायलाच नको”, असं मोदी ठामपणे म्हणाले.

 

 

 

“आता मी कायदेशीर सल्ला घेतोय की ज्यांचे हे पैसे आहेत, त्यांना परत देता येतील का. याआधी आम्ही जेवढे ताब्यात घेतले आहेत, त्यातले १७ हजार कोटी रुपये आम्ही परत दिले आहेत”, असा दावाही मोदींनी केला.

 

भाजपा नेत्यांविरोधात कारवाई का नाही?

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न विचारला असता मोदींनी ईडीनं सत्ताधारी नेत्यांविरोधातील बंद केलेली प्रकरणं दाखवून देण्याचं आव्हान दिलं. “ज्या राजकीय व्यक्तीचं प्रकरण असेल, ते चालणार. मला तुम्ही एक प्रकरण सांगा की ते ईडीनं बंद केलं. ईडी स्वत: कोणता गुन्हा दाखल करू शकत नाही. देशातील वेगवेगळ्या संस्था जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत ईडी काही करू शकत नाही”, असं मोदी म्हणाले.

 

 

“न्यायालयांना शस्त्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे”

दरम्यान, यावेळी मोदींनी देशातील न्यायालयांचाही उल्लेख केला. “ईडीनं काम करू नये यासाठी न्यायालयांना हत्यार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण त्यांना माहिती आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधातील माझा लढा थांबणार नाही. त्यामुळे त्यांना वाटतंय की या संस्थांचा दबावच संपवून टाका जेणेकरून देशात कुणी भ्रष्टाचाराबाबत बोलू शकणार नाही”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

पंतप्रधान मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी - तेजस्वी यादव


इंडिया आघाडीच्यावतीने ३१ मार्च रोजी दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून देशभरातून जवळपास २८ पक्षांनी एकत्र येत भाजपावर हल्लाबोल केला. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या सभेत बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी असल्याचा टोला लगावला आहे.

 

तेजस्वी यादव नेमके काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदींची गॅरंटी’ अशा स्वरूपाचा नारा दिला आहे. यानंतर ‘मोदींची गॅरंटी’ अशी एक मोहीम भाजपाकडून चालू करण्यात आली. या मोहिमेवर आता तेजस्वी यादव यांनी टीका केली. यादव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी आहे. जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत मोदींची गॅरंटी आहे. मात्र, निवडणुका संपल्यानंतर काही नाही. त्यामुळे मोदींची गॅरंटी ही फक्त निवडणुकीपर्यंत टिकेल”, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

 

 

भाजपाला सत्तेतून बाहेर खेचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. यावरूनच तेजस्वी यादव यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “भाजपावाल्यांनी निवडणुकीच्या आधीच ४०० पारचा नारा दिल्यामुळे आधीच मॅच फिक्सिंग झाल्यासारखे वाटते आहे. मात्र, भाजपाचे नेते काही म्हणाले तरी जनता हीच देशाची मालक असते. त्यामुळे जनता जे ठरवेल तेच दिल्लीत सरकारमध्ये बसतील. काही झाले तरी या भाजपाला सत्तेतून बाहेर खेचा”, असे तेजस्वी यादव म्हणाले.

 

ईडी, सीबीआय भाजपाचे सेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकीवेळी काही आश्वासने दिले होते. त्यावर बोलताना तेजस्वी यादव यांनी तरुणांना भाजपाच्या खोट्या आश्वासनांना आणि खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले. “देशात बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे दुश्मन आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही कोणतीही नोकरी दिली नाही. सर्वच्या सर्व खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे भाजपाचे सेल झाले आहेत”, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024

PostImage

लग्न झाल्यानंतर महिला किंवा पुरुषांनी स्वेच्छेने ठेवलेले विवाहबाह्य शरीर संबंध हा कायदेशीर गुन्हा नाही- राजस्थान उच्च न्यायालय


लग्न झाल्यानंतर महिला किंवा पुरुषांनी स्वेच्छेने ठेवलेले विवाहबाह्य शरीर संबंध हा कायदेशीर गुन्हा नाही. असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती बीरेंद्र कुमार यांनी असं म्हटलं आहे की भारतीय दंड संहिता कलम ४९७ नुसार विवाहबाह्य संबंध व्याभिचाराचा गुन्हा या कक्षेत येत होते. मात्र २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवत ही बाब रद्द केली आहे.

 

काय म्हटलं आहे न्यायालयाने?

“विवाह झालेली व्यक्ती स्वेच्छेने विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर तो कुठलाही गुन्हा नाही. व्याभिचाराचा गुन्हा आधीच रद्द करण्यात आला आहे.” एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे.

 

काय आहे प्रकरण?

राजस्थान उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरु होती. यामध्ये याचिकाकर्त्याने भारतीय दंड संहिता कलम ३६६ (अपहरण किंवा महिलेला लग्नासाठी भाग पाडणं) या प्रकरणावरची ही सुनावणी होती. माझ्या पत्नीला तीन जणांनी पळवून नेलं असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. याचिकाकर्ता या प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहू शकला नाही कारण तो तुरुंगात आहे. मात्र त्याची पत्नी न्यायालयात आली. तिने हे सांगितलं की ज्याच्यावर आरोप लावला गेला आहे त्या आरोपीसह मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये दिलेले निर्णय तपासण्यात आले. सहमतीने विवाहबाह्य संबंध ठेवणं हे अपराध नाहीत हा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला.

 

याचिकाकर्त्यांचे वकील अंकित खंडेलवाल यांनी असा युक्तिवाद केला की माझ्या अशीलाच्या पत्नीने हे मान्य केलं आहे की तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे कलम ४९४ (पती किंवा पत्नी जिवंत असताना लग्न करणं) आणि कलम ४९७ (व्याभिचाराचा गुन्हा) या अन्वये कारवाई केली जावी. मात्र त्यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट केलं की विवाहबाह्य संबंध हे व्याभिचाराच्या गुन्ह्याच्या कक्षेत येत नाहीत.Bar & Bench ने हे वृत्त दिलं आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 30, 2024

PostImage

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवारांमध्ये लढत दोन उमेदवारांची माघार


 

 

 

गडचिरोली दि. 30 (जि.मा.का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली. 

 

*हे उमेदवार आहेत रिंगणात :* 

  नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.  

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती).

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).

इतर उमेदवार : करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी, अपक्ष ( अंगठी)

00000


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 30, 2024

PostImage

दारू विकाल तर आता विवाह, अंत्यसंस्कारात लोक सहभागी होणार नाही


डोंगरगाववासींचा निर्णय : तंबी देऊनही गावात विकायचे दारू

 

गडचिरोली : तालुक्याच्या डोंगरगाव येथील दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी नागरिकांनी गुरुवारी एकत्र येऊन दारू बंदीचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद न केल्यास विक्रेत्याची दारू नष्ट करणे, पोलिस कारवाई करणे, दारू विक्रेत्याच्या कुटुंबातील विवाह सोहळा, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कार्यक्रम व इतर कार्यक्रमात सहभागी न होणे, यासह विविध समारंभाला न जाण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

 

डोंगरगाव येथे अनेक वर्षांपासून दारूविक्री बंद होती; परंतु मागील ३ ते ४ वर्षांपासून दारूविक्री पुन्हा सुरू झाली. परिणामी, लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने, युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. दारूविक्री बंदीसाठी गाव संघटना गठित करून दारू बंदीचा प्रयत्न केला; परंतु काही दारू विक्रेते मुजोर असल्याने दारू विक्री सुरू राहिली. यावर निर्णय घेण्यासाठी मुक्तिपथ व गाव संघटनेची बैठक पार पडली.

 

 

ग्रामपंचायतीकडून दाखलेही मिळणार नाहीत

डोंगरगाव येथे दारूविक्री सुरूच ठेवल्यास विक्रेत्यांच्या शेती कामावर न जाणे, दारू विक्री बंद न केल्यास ग्रामपंचायतीकडून मिळणारे कागदपत्र न देणे, असे कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांनतर रॅली काढून व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करीत कारवाईची तंबी सुद्धा दिली.

 

सीमावर्ती भागातून दारूची वाहतूक

 डोंगरगावला लागूनच वैनगंगा नदी आहे. नदीपलीकडे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. येथे देशी- विदेशी दारू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे नदीतून चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक केली जाते. या चोरट्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 29, 2024

PostImage

मोहझरी येथील जिओ टॉवरचा नेटवर्क गायब, नागरिक संतप्त


मोहझरी: आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील  जिओचा टावरमधे गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे मोहझरी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना एकमेकांना संवाद साधण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे .याबाबत जिओ कंपनीच्या ऑपरेटरला फोन करून ही समस्या कळविण्यात आली परंतु अजून पर्यंत त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे सतत नेटवर्क गायब होत असल्यामुळे हि समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली जात आहे.

 

मोहझरी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय मध्ये  सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होत असतात तसेच या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळा ,महाविद्यालय असल्यामुळे अशा ठिकाणी मोबाईल नेटवर्कची अत्यंत आवश्यकता असते परंतु गेल्या काही दिवसापासून दिवसातून बरेचदा मोबाइल नेटवर्क गायब होत असल्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत. प्रति महिना 300 रू 500 रू रुपयाचा jio रिचार्ज प्रत्येक नागरिक करीत असतो परंतु दररोज नेटवर्क गायब होत असल्यामुळे मोबाईल खेळाचे वस्तू बनल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

कुटुंबातील आपल्या मित्र मंडळीला मोबाईल वरून फोन लावल्यास कधीही नेटवर्क गायब होत असल्यामुळे फोन कट होत असतो किंवा अत्यंत महत्त्वाचे बोलणे होत नाही त्यामुळे मोहझरी आणि परिसरातील नागरीक  जिओ कंपनीच्या अशा भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

आज सर्व कामे शासकीय कामे ऑनलाईन पद्धतीने होत असतात परंतु मोहझरी येथील जिओ  टावरचा मोबाईल नेटवर्क गायब होत असल्यामुळे शासकीय कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. जिओ कंपनी सर्वात वेगवान इंटरनेट डाटा कस्टमरला पूरवित असल्याचा कांगवा करीत असते देशाने त्याच उद्देशाने अनेक नागरिकांनी जिओची सिम घेतलेली आहे परंतु त्यांचा मारलेला रिचार्ज वाया जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मोहझरी येथील जिओ टावर तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी मोहझरी  आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे अन्यथा आंदोलन करू असा इशारा जिओ कंपनीला नागरिकांनी दिला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 29, 2024

PostImage

अखेर शेतकऱ्यांना मिळणार धान बोनसची रक्कम


गडचिरोली जिल्ह्यासाठी 85 कोटी मंजूर; ई - पीक नोंदणी आवश्यक

गडचिरोली, ब्युरो. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 85 कोटी 35 लाख 47 हजार 780 रुपये एवढी बोनसची रक्कम खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर करण्याबाबत राशीची रक्कम शासनाने 26अदा मार्चला परिपत्रक काढले आहे.

 

 त्यानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रतिहेक्टरी रुपये 20 हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत राहून प्रोत्साहन राशी बोनस अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 31 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील धान

 

उत्पादक दहा जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ई-पीक वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच आदिवासी खरेदी संस्था किंवा महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत चालवण्या जाणाऱ्या खरेदी संस्थांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 28, 2024

PostImage

अल्पवयीन मुलीचा पाठलाग आरोपीची कारागृहात केली रवानगी


 

 चंद्रपूर, ब्युरो. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली. ही सुनावणी बुधवारी (दि.27) करण्यात आली. आरोपी आदित्य बिगनशहा सोनी राहणार गुरुदेव चौक याला सिंदेवाही पोलिस ठाण्याचे पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा विधी सेवा

 

प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे वतीने आरोपीला मोफत विधी सेवा व सहाय्य पुरविण्यात आले. लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे यांनी आरोपीच्या वतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. त्याप्रमाणे आरोपीची न्यायालयीन कोठडीची मागणी मंजूर करण्यात येऊन आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 28, 2024

PostImage

वॉशिंग मशीनमध्ये लपविल्या नोटा


 

१८०० कोटींचा घोटाळा: शिपिंग कंपनी संचालकाच्या घरी ईडीचा छापा

 

 मुंबई: काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठविल्याचा आरोप असलेल्या मुंबईस्थित एका शिपिंग उद्योगातील कंपनीवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे ही छापेमारी झाली आहे. मात्र, दक्षिण मुंबईत झालेल्या छापेमारीदरम्यान लाखो रुपयांची रोख रक्कम वॉशिंग मशीनमध्ये आढळली.

 

 या प्रकरणी संबंधित कंपनीची एकूण ४७ बैंक खाती गोठवण्यात आली आहेत.

 

मुंबईस्थित कॅप्रिकॉर्नियन शिपिंग अँड लॉजिस्टिक या कंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठवल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.

 

या प्रकरणी ईडीने परदेशी चलन विनिमय कायद्यांतर्गत (फेमा) तपास सुरू केला आहे. या छापेमारीदरम्यान कॅप्रिकॉर्नियन कंपनीशी संबंधित अन्य पाच कंपन्यांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. हे पैसे या लोकांनी सिंगापूरस्थित कंपनीला पाठविल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 28, 2024

PostImage

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार


 

 

 

 ब्रह्मपुरी : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या टोल नाक्यापासून काही अंतरावर अन्नपूर्णा ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) रात्री घडली.

 

मनोरथा शांताराम बावनकुळे (५५, रा. खरबी) मृत महिलेचे नाव आहे. अन्नपूर्णा ढाब्याजवळ विजेचे दिवे नसल्याने या मार्गावर अंधार असतो. बुधवारी रात्री खरबी येथील मनोरथा बावनकुळे ही रात्रीच्या सुमारासरस्त्यावरून जात होती. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत ती जागीच ठार झाली.

 

 

 

ही महिला मतिमंद होती. त्यामुळे कोणत्याही वेळेला रात्री-अपरात्री घराबाहेर निघत असायची, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. या मार्गावर भरधाव वेगाने वाहने दामटली जातात. त्यामुळे यापूर्वी देखील अपघात झाला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 24, 2024

PostImage

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस २६ ला गडचिरोलीत. खासदार अशोक नेते यांच्या आशा पल्लवीत होणार की काय ?


 गडचिरोली - मुनिश्वर बोरकर गडचिरोली - चिमुर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची जागा कुणाला मिळणार यांची उत्सुकता सिगेला पोहचली आहे. सदर जागेवर राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार तथा अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सुरवातीपासुनच दावा ठोकला आहे. तर भाजपाचे दोनदा खासदार राहीलेले खासदार अशोक नेतेही प्रबळ दावेदार आहेत . तसेच नव्याने डॉ. मिलिंद नरोटे , नुकत्याच भाजपात प्रवेश करणाऱ्या डॉ. नितिन कोडवते आमदार डॉ. देवराव होळी आदि नावाची चर्चा असताना राष्ट्रवादी कांग्रेसचे राजे धर्मराव बाबा आत्राम यांचे पारडे महायुतीत जड होत होते. परंतु वरिष्ठ भाजपा नेते,उमेदवाराची निवड करतांना सर्व शक्यता पडताडूनच पाहिल्या नंतरच भाजपा की राष्ट्रवादी यांचा योग्य विचार करूनच उमेदवारांची निवड करणार असल्याचे कळते. अन्यता सदर जागा हातुन जायची व ४०० पार म्हणता म्हणता आकडा २०० वर यायचा म्हणुन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढावे अशी भाजपाकडून गुगली टाकण्यात आली परंतु राष्ट्रवादीचे सर्वासर्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते नाकारली व चिमुर लोकसभेसाठी उमेदवार राष्ट्रवादीचाच असे ठणकावुन सांगीतल्या चे कळते . म्हणुनच महायुतीत उमेदवारावरून ताणाताणी सुरच आहे. त्यामुळे महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जावून गृहमंत्री अमीत शहा यांची भेट घेतली. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अंतर्गत कलह निर्माण करून विधमान खासदार अशोक नेते यांना तिकीट देऊ नये नवख्या माणसाला संधि घ्यावी असे वरिष्ठांना सांगुन जनू दिशाभुल केल्याचे बोलल्या जात होते. अश्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २६ ला गडचिरोली येत असुन भाजपाच्या स्थानिक मुख्य कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीसी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचा संदेश देण्याकरीता येत असल्याचे कळते . व याच दिवशी महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन भरतेवेळी त्यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांचे गडचिरोली येणे भाजपाला बळ देण्यासाठी ठरणार कि राष्ट्रवादीला हे अजुनही गुलदस्त्यातच आहे. भाजपाला एकेक सिट चे महत्व आहे म्हणुन भाजपाचे नेते फुकुन पाणी पित आहेत . महायुतीत सदर जागा भाजपाकडे कायम राहील्यास खासदार अशोक नेते शिवाय पर्याय नाही कारण इडिआ आघाडीने डॉ. नामदेव किरसान च्या रुपाने तगडा उमेदवार दिलेलाआहे. याचेही भान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार डॉ. गजभे यांनी १ लाख ११ हजार मते घेतली होती. हिच मते त्यावेळेस कांग्रेसला मिळाली असती तर कांग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडीस निवडुन आले असते यात शंकाच नव्हती .अश्या अनेक बाबीचा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस योग्य निर्णय घेणार असल्याचे भाजप गोठात बोलल्या जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 21, 2024

PostImage

नेते दिल्लीत, संभ्रम गल्लीत ! महाविकास आघाडीकडून नामदेव किरसान यांना संधी?


 

गडचिरोली गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. काही जण मुंबईत, काही दिल्लीत तळ ठोकून आहेत. बुधवारी रात्री उशीरा काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

 

लोकसभा निवडणुकीसाठी २० मार्च रोजी अधिसूचना जारी झाली व लगेचच नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकृतीलाही सुरुवात केली. पहिल्या दिवशी एकही नामदनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. चौघांनी एकूण १४ नामनिर्देशनपत्रांची खरेदी केली, पण अर्ज दाखल करण्यास कोणीही पुढे आले नाही.

 

मतदारसंघातील उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच कायम आहे. महायुतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच आहे, तर महाविकास आघाडीत मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला असून नामदेव उसेंडी व नामदेव किरसान यांच्यामध्ये चुरस होती. पक्षश्रेष्ठींनी किरसान यांच्या नावाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

काँग्रेसचे सर्व इच्छुक व प्रमुख पदाधिकारी हे दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. अधिकृत घोषणा गुरूवारी अपेक्षीत आहे.

 

नेते, धर्मरावबाबांकडून दबावतंत्राचा वापर

 १९ मार्च रोजी गडचिरोलीत खासदार अशोक नेते यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपलाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी लावून धरली होती. यावेळी राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर सायंकाळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत दावेदारी प्रबळ केली. त्यामुळे महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे.

 

निवडणूक खर्च निरीक्षकांकडून आढावा

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात २० मार्च रोजी निवडणूक खर्च निरीक्षक एस. वेणुगोपाल यांनी विविध ठिकाणी भेटी देत कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली तसेच सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. आरमोरी, गडचिरोली, चिमूर व ब्रह्मपुरी या विधानसभा मतदार संघांना एस. वेणुगोपाल यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, ओमकार पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके उपस्थित होते. सर्वसामान्य मतदार, निवडणूक लढणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी निवडणूक खर्चविषयक तक्रारी एस. वेणुगोपाल यांच्याकडे किंवा निवडणूक विभागाच्या सी-व्हिजील या मोबाइल अॅपवर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 21, 2024

PostImage

सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात वडेट्टीवारांच्या नावाची चर्चा


 

काँग्रेसची नवी खेळी : चंद्रपूरच्या उमेदवारीवरून दिल्लीत खलबते

 

 

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच मैदानात उतरविणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आली. काही वेळानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव पुढे आले. काँग्रेस नेमकी धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करते वा वडेट्टीवारांना मैदानात उतरवून नवी खेळी करते, याकडे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

 

चंद्रपुरात भाजपने सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने दमदार उमेदवार रिंगणात उतरविला आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते, यावरून खलबते सुरू होती. एकीकडे आमदार प्रतिभा धानोरकर तर दुसरीकडे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. चंद्रपुरात सुरू झालेला उमेदवारीचा तिढा मुंबईमार्गे दिल्लीत पोहोचला. मागील काही दिवसांपासून

 

 

धानोरकर आणि वडेट्टीवार गट दिल्लीत ठाण मांडून आहे. दोन्ही गट आपापल्या दावेदारीवर ठाम असल्याने काँग्रेसला ही उमेदवारी जाहीर करताना संभाव्य धोके विचारात घेणे गरजेचे असल्याची चर्चा होती. अखेर बुधवारी दिल्लीत हायकमांडने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची वार्ता चंद्रपुरात पोहोचली. मात्र, काही वेळातच शिवानी वडेट्टीवार याचे नाव मागे पडून त्याऐवजी विजय वडेट्टीवार यांचे नाव अचानक पुढे आल्याने नवीन समीकरणे पुढे येण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. वडेट्टीवारांना उमेदवारी मिळाली तर दोन वारांमध्ये लोकसभेचा महासंग्राम होईल, असे दिसते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 13, 2024

PostImage

सरपंचाने केली ग्रामसेवकास मारहाण


गोंदिया - सालेकसा तालुक्यातील दरबडा येथील सरपंचाने ग्रामसेवकास केलेल्या मारहाणीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युुनीयन गोंदिया संघटनेच्यावतीने तहसिलदार,पोलीस निरिक्षकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन सरपंचाविरुध्द तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरबडा येथील ग्रामसेवक अरुण सिरसाम हे सालेकसा तहसिल कार्यालयात कार्यालयीन कामाकरीता आले असता त्यांना बाहेर बोलावून सरपंच तमिल टेंभरे यांनी माझ्या मर्जीतील लोकांची नावे अतिवृष्टी नुकसान यादीत वाढविण्याची मागणी केली.त्यावर ग्रामसेवक सिरसाम यांनी यादी प्रशासनाकडे सादर झाल्यामुळे नाव वाढविणे शक्य नसल्याचे सांगितले.नाव वाढविण्याच्या मुद्याला घेऊन सरपंच व सचिव हे तहसिलदार सालेकसा यांच्याकडे आले असता तहसिलदारानीही नाव वाढविता येणार नसल्याचे सांगतिले.त्यामुळे कार्यालयाबाहेर येताच ग्रामसेवकासोबत वाद घालून सरपंचाने आपल्या साथीदारासह मारहाण केल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच देवरी येथील निवडणुक प्रशिक्षण कार्यक्रमाला सुद्दा जाऊ दिले नसल्याचे म्हटले आहे.संविधानिक पदावर असताना सरपंचानी केलेले कार्य चुकीचे असून ग्रामसेवक संघटना या घटनेचा निषेध नोंदवित असून तात्काळ याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावे,अशी मागणी निवेदनातून केली आहे.तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल करुन अटक केली जात नाही,तोपर्यंत ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्ह्यात कामबंद आंदोलन करतील अशा इशारा दिला आहे.निवेदन सादर करतेवेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,रामेश्वर जमईवार,कुलदिप कापगते,सालेकसा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 11, 2024

PostImage

कार-दुचाकीची धडक; एक गंभीर, पाच किरकोळ जखमी


कोरची : भरधाव वेगाने कोरचीकडे येणाऱ्या कारने मोटरसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर कार उलटल्याने तेथील पाचजण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवार १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बोडेना फाट्याजवळ घडली.

 

कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार प्रताप मडावी (४०) रा. दोडके हे गंभीर जखमी झाले असून यांचा उजवा पाय तुटला. वाहनांची धडक एवढी जोरदार होती, की कार रस्त्याच्या डाव्या बाजूच्या खड्यात उलटून पुन्हा सरळ झाली. कोरचीकडे भरधाव वेगाने एम.एच. ४९, एफ. ०८२९ क्रमांकाची कार येत होती. बोडेना फाट्यावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. तेव्हा कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दरम्यान, मोटारसायकल क्षतिग्रस्त झाली असून कारचे टायर फुटून बरेच नुकसान झाले.

 

दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. सायंकाळी घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधल्यानंतर सदर रुग्णवाहिका एकतास उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उशिरापर्यंत जखमींना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

 

चांदागडचा इसम जखमी

कुरखेडा: चांदागडवरून कुरखेडाकडे दुचाकीने येत असताना गोठणगाव नाक्यावरील चौरस्त्यावर दुचाकीची कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार क्रिष्णा भजने (रा. चांदागड ४०) हा गंभीर झाला. हा अपघात १० मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. अपघातानंतर दुचाकीस्वार क्रिष्णा भजने हा रस्त्यावर पडला. यावेळी तो गंभीर जखमी असल्याने लगेच नाक्यावरील युवकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकरिता टोल फ्री क्रमांकावर फोन केला. यावेळी रुग्णवाहिका बाहेर असल्याने थोडा वेळ लागेल असे सांगण्यात आले. अर्धा तास वाट बघूनही रुग्णवाहिका न पोहचल्याने सोहम कावळे, पवन शिडाम, मोहीद शेख व अन्य युवकांनी दुचाकीनेच जखमी इसमाला दोन किलोमीटर अंतर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात पोहचविले. जखमीला रुग्णालयात पोहचविण्यात आले.यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयातच उभी होती, असा आरोप युवकांनी केला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 11, 2024

PostImage

जिल्हा हादरला ! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म


 

एटापल्ली तालुक्यातील घटना : डॉक्टर गैरहजर, पीडितेची हेळसांड

 

एटापल्ली : दारासमोरखेळत असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. ९ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास पीडित मुलगी स्वतःच्या घरासमोर खेळत होती. शेजारी आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासी वसाहत आहे.

संतोष कोंडेकर हा तिथे एकटाचराहतो. त्याने मुलीला जवळ बोलावले व घरात नेऊन तिच्याशी कुकर्म केले. हा प्रकार एका मुलीने पाहिला व घरी जाऊन सांगितला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले; पण तिथे वैद्यकीय अधिकारीगैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले.

 

मुलीला १० मार्चला सकाळी अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. उपचारांत झालेल्या हलगर्जीवरून सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. पीडितेच्या आईच्या जबाबावरून गडचिरोली ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी प्रकरण एटापल्ली तालुक्यातील संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारात हलगर्जी झाली असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले

 

आरोपी फरार, शोध सुरु

या घटनेनंतर आरोपी संतोष कोंडेकर फरार झाला आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करणारा संतोष दोन वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई पदावर नियुक्त आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी  सांगितले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024

PostImage

संतप्त शेतकऱ्यांचा कुरखेडा वीज कार्यालयाला घेराव; प्रशासन नमले


कुरखेडा : वारंवार बंद होणारा कृषिपंपाचा आणि घरगुती विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीला घेऊन सोनसरी, बांधगाव व परिसरातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारला कुरखेडा विद्युत कार्यालयाला चार तास घेराव घातला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, तालुकाप्रमुख आशिष काळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कुरखेडाच्या वीज कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांना कार्यालयाबाहेर बोलावून शेकडो शेतकऱ्यांचा उपस्थित घेराव करण्यात आला. शेतीपंपाचा विद्युत पुरवठा वारंवार बंद का होतो? असा सवाल उपस्थित करण्यात आला. ८ तासांपैकी

 

शेतीला फक्त २ तासच विद्युत पुरवठा मिळतो. बाकी ६ तास वीजपुरवठा बंद असतो. शेती पिकवायची कशी, असा प्रतिप्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी केला. घरगुती वीजपुरवठा सायंकाळी बंद होतो. रात्रीही बंद होतो, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर उपस्थित आंदोलकांनी कार्यकारी अभियंता मुरकुटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. वारंवार शेतीला मिळणारा आणि घरगुती विद्युत पुरवठा बंद राहणार नाही. २४ तासांपैकी चार- चार तास ब्रेक करून विद्युत पुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासन मुरकुटे यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024

PostImage

नागाळाच्या लाचखोर महिला तलाठीला अटक


चंद्रपूर : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शेतीच्या फेरफार प्रकरणात शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच घेणाऱ्या नागाळा येथील महिला तलाठीला नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. ७) रंगेहात अटक केली. प्रणाली अनिलकुमार तुंडुरवार असे अटकेतील महिला तलाठीचे नाव आहे.

 

चंद्रपूर तालुक्यातील सिदूर येथील एक शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीचे पत्नी व मुलाच्या नावाने बक्षिसपत्र केले होते. या जमिनीचा फेरफार झाला नव्हता. तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत नागाळा येथील साजा क्रमांक चारच्या

 

महिला तलाठी प्रणाली तुंडूरवार यांची भेट घेऊन संबंधित कागदपत्रे सादर केली. मात्र, तलाठीने शेतकऱ्याकडे ५ हजारांची मागणी केली. अखेर ४ हजार रूपये देण्याबाबत तडजोड झाली, मात्र, ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, ४ हजारांची लाच घेताना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या नेतृत्वात अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील व जितेंद्र गुरनुले आदींच्या पथकाने केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024

PostImage

मोहझरी,शिवणी ,सुकाळा, नागरवाही, देलनवाडी, मानापुर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते लोडशेडिंग


आरमोरी: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे उखाडा निर्माण झाला आहे परंतु विजेचा लपंडाव मागील काही दिवसापासून मोहझरी,शिवणी ,सुकाळा, नागरवाही, देलनवाडी, मानापुर, अंगारा , मालेवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग सुरू केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली आहे त्या धान्याला पाणी देण्याकरिता विजेची अत्यंत आवश्यकता असते परंतु लोडशेडिंगच्या नावाखाली काही तासाकरिता विज बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक हातात येतात की नाही अशी शंका या विजमुळे निर्माण झालेली आहे. 

 

 उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरीक घरोघरी पंखे लावून आराम करत असतात परंतु विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता संपूर्ण आरमोरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने लोडशेडिंगच्या विरोधामध्ये एक निवेदन सादर करून महावितरणकडे देण्याचे करावे जेणेकरून हा विजेचा लपंडाव बंद होईल याकरिता सर्व ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.

 

 आपल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होत असून सुद्धा स्थानिक पातळीवर  विजेची कमतरता दाखवून वेळोवेळी लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे. म्हणजे आपल्या विदर्भात वीज तयार होऊन सुद्धा येथील लोकांना अंधारामध्ये जीवन काढावे लागत आहे ही एक मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विजेच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभे करून महावितरणला वीज सुरू ठेवण्याकरिता आग्रहाची भूमिका घ्यावी .

 

वरील बाबीचा गंभीरपणे महावितरणने विचार करून आरमोरी तालुक्यातील सर्व गावाला वीज 24 घंटे विज पुरवठा करावा अशी मागणी आरमोरी तालुक्यातील सर्व नागरिकांची प्रमुख मागणी आहे. अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024

PostImage

कलहामुळे पत्नी माहेरी, - निराश पतीची आत्महत्या कुरखेडा तालुक्याच्या आंधळीतील घटना


कुरखेडा:  कुटुंबात कलह वाढल्याने पत्नी महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली. त्यामुळे वाढलेल्या भांडणतंट्यांमुळे पतीच्या मनातही नैराश्य आले. पत्नी माहेरी निघून गेल्याचे व कौटुंबिक कलहाचे दुःख चे दुःख सोसवेना झाल्याने पतीने चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार ६ मार्च रोजी सकाळी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे उघडकीस आली. किरपाल रामजी भोंडे (३१) रा. आंधळी,

 

असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित इसमाचे नाव आहे. भोंडे यांच्या कुटुंबात सततची भांडणे होत होती. याच कौटुंबिक कलहामुळे महिनाभरापूर्वी किरपालची पत्नी घर सोडून माहेरी गेली. तेव्हापासून किरपाल हा नैराश्यात होता. दरम्यान, बुधवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी गावालगतच्या चिंचेच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत किरपाल यांचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024

PostImage

कुरूड येथील खून प्रकरणातील आरोपीस ११ पर्यंत पोलीस कोठडी


 

२६ दिवसानंतर आरोपीस केली होती अटक

देसाईगंज - तालुक्यातील कुरूड येथील प्रदीप ऊर्फ पंड्या विजय घोडेस्वार (३०) याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विकास जनार्दन बोरकर (५०) रा. कुरुड याला न्यायालयाने ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. विशेष म्हणजे घटनेच्या २६ दिवसानंतर देसाईगंज पोलिसांनी आरोपीस नाट्यमयरित्या अटक केली होती.

 

यात्रेतील भांडणातून तसेच पूर्ववैमनस्यातून त्याने डोक्यात कवेलू मारून तरुणास संपविल्याचे समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले यांच्या फिर्यादीनुसार, ८ फेब्रुवारीला रात्री

 

कुरुड येथे यात्रोत्सवानिमित्त नाटक आले होते. नाटक पाहण्यासाठी गेलेल्या प्रदीप घोडेस्वार याचा मृतदेह स्वतःच्या थारोळ्यात घरासमोर आढळला रक्ताच्या होता. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

 

वैद्यकीय अहवालानंतर २८ फेब्रुवारीला उपनिरीक्षक संजय गोंगले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, प्रतीकचा खून झाला तेव्हा अंधार होता, शिवाय सीसीटीव्ही नव्हते, यात्रेमुळे गावात गर्दी होती. त्यामुळे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर प्रदीपबद्दल पोलिसांनी सखोल

 

माहिती जाणून घेतली असता त्याचे विकास बोरकरशी नेहमी भांडण होत असे, हा क्ल्यू मिळाला. त्याआधारे पोलिसांनी विकासकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, खाक्या दाखविताच तो वठणीवर आला.

 

त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान, पो. नि. अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर यांनी ६ मार्चला विकास बोरकरला अटक केली. त्याला न्यायालयायापुढे उभे केले असता ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

 

(T.P.)


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 6, 2024

PostImage

वासाळाचे प्रा.डॉ. नोमेश मेश्राम यांचा कवितासंग्रहास १२ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित


 

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली _ विदर्भातील प्रसिद्ध कवी व गझलकार प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम यांच्या राजहंस प्रकाशन पुणे या महाराष्ट्रातील मातब्बर प्रकाशन संस्थेतर्फे जुलै २०२३ मध्ये प्रकाशित 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांकडून आजपावेतो उत्कृष्ट साहित्यकृती अंतर्गत १२ राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

       ब्रम्हपुरी येथे वास्तव्यास असलेले प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम हे आरमोरीच्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्या 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला शेगाव येथील स्व.बाबुराव पेटकर काव्य सन्मान,नागपूर येथील साहित्यविहार संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,मुक्ताईनगर जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार,आर्वी येथील देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठ जुन्नर, अॅग्रोन्यूज साहित्य संस्था फलटण,साहित्य प्रज्ञा मंच पुणे, कृतिशील शिक्षक संघटना ठाणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई,सूर्योदय साहित्य पुरस्कार जळगाव, डॉ.शिवाजीराव चव्हाण ग्रंथमित्र राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार हे महाराष्ट्रातील विविध भागातील प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्याबद्दल त्यांचे राजहंस प्रकाशन पुणे,मित्रपरिवार व अनेक साहित्यिकांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 6, 2024

PostImage

बिआरएसपी विविध ठिकाणी सभांचे आयोजन करणार : जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय 


 

गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी थाॅमस शेडमाके.

गडचिरोली : जिल्ह्यातील राजकारणात आंबेडकरी पक्षांचे महत्त्व ठळकपणे असते. मात्र प्रस्थापित पक्ष आंबेडकरी पक्षांना दुय्यम वागणूक देतात. अशा परिस्थितीत राजकीय स्तरावर बहुजन - आंबेडकरी चळवळीचे राजकारण ताकदीने उभे व्हावे व निवडणूकांमध्ये यश मिळवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्हा प्रभारी राज बन्सोड व जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केले.

 

स्थानिक सर्किट हाऊस येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, मुख्य मार्गदर्शक जिल्हा प्रभारी राज बन्सोड, तर विशेष अतिथी म्हणून प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बिआरएसपीमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. महिला आघाडीच्या गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी सविता बांबोळे, तालुका उपाध्यक्ष पदी पौर्णिमा मेश्राम, गडचिरोली महिला शहराध्यक्ष पदी विद्या कांबळे, शहर सचिव म्हणून प्रतिमा करमे, उपाध्यक्ष म्हणून रेखा कुंभारे, कोषाध्यक्ष पदी सोनाशी लभाने, संघटक पदी आवळती वाळके तसेच गडचिरोली बिआरएसपी तालुकाध्यक्ष पदी 'थामस शेडमाके' व तालुका सचिव पदी 'चंद्रकांत रायपुरे', शहराध्यक्ष पदी प्रतीक डांगे, सचिव पदी नागसेन खोब्रागडे, उपाध्यक्ष पदी मिलिंद खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली.

 

बैठकीत पक्षाची पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १५ मार्च रोजी कांशीरामजी जयंती निमित्त नागपूर येथे होणाऱ्या चुनावी महारॅली करीता जिल्ह्यातून ३ हजार कार्यकर्ते सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले. व २२ मार्च रोजी 'बिआरएसपी महिला मेळावा' गडचिरोलीत आयोजित करण्याबाबतही या बैठकीत नियोजन करण्यात आले. वडसा, आरमोरी, मुरमाडी, पोटेगाव, पारडी सह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाच्या सभा विविध ठिकाणी आयोजित होणार असल्याची माहिती राज बन्सोड यांनी या बैठकीत दिली.

 

या बैठकीला पक्षाचे जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष अरविंद वाळके, सचिव जितेंद्र बांबोळे, युवा आघाडी उपाध्यक्ष प्रफुल रायपुरे, घनश्याम खोब्रागडे, करुणा खोब्रागडे, निर्मला बोरकर, शोभा खोब्रागडे, वंदना खेवले, गोकुळ ढवळे, सुनील बांबोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

दि. ०५ मार्च २०२४

_________________

राज बन्सोड 

जिल्हाप्रभारी BRSP

गडचिरोली

8806757873


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 6, 2024

PostImage

रेती चोरीची माहिती दिल्याच्या संशयावरून जीवघेणा हल्ला


चंद्रपूर, ब्युरो. वरोरा येथून जवळच असलेल्या माढेळी येथील अशोक चौधरी (वय 62 रा. गिरसावली) यांच्यावर एका हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी 7 वाजता जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले.

 

माढेळी येथील काँग्रेसचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल व सोबतच्या तीन सहकाऱ्यांनी अशोक चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती गंभीर अवस्थेत असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

 

चार दिवसापूर्वी वेणा नदीच्या घाटातून अवैध रेतीचे उत्खनन करीत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी साटम यांनी विशाल बदखल व इतर तिघांवर कारवाई केली असून 2 हायवा, 1 जेसीबी

 

व ट्रॅक्टर रेतीसह जप्त केली होती. संबंधित पोलिसांना माहिती देणारा अशोक चौधरी हाच व्यक्ती असल्याचा संशय बदखल यांना आल्याने चौधरी हे हॉटेलमध्ये बसले असते बदखल यांनी रॉडने जबर मारहाण केली. एस.डी.पी.ओ साटम यांच्या नेतृत्वात आरोपीचा शोध घेतला असता पीएसआय अमोल काचोरे यांनी विशाल बदखल (वय 45 वर्ष), राहणार माढेळी, लंकेश बदखल, राहणार येवती, संजय चिंचोलकर, यवती, मंगेश सोनटक्के यांना रात्रीच अटक केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास सुरू आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 6, 2024

PostImage

ईव्हीएमविरोधात गोंडपिपरीत उतरले हजारो नागरिक रस्त्यावर


 

 

गोंडपिपरी : ईव्हीएम हटाव, देश बचाव म्हणत सोमवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी गोंडपिपरीमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर करू नये, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

गोंडपिपरी तालुक्यातील ओबीसी कृती समिती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना

 

गणतंत्र पार्टी, सीआयटीयू, एआयटीयू, भारतीय बौद्ध महासभा, निवृत्त कर्मचारी संघटना, शिक्षण रोजगार बचाव समिती, शासकीय कंत्राटी कर्मचारी संघ यांच्यासह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी या मोर्चासाठी पुढाकार घेतला. ईव्हीएम हटाव, जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, क्रीमिलेअरची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 6, 2024

PostImage

विहिरीत उडी घेऊन वृद्धाची आत्महत्या


 

नागभीड : शहरातील एका वृद्धाने बोथली रस्त्यावरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ८ वाजता उघडकीस आली. महादेव धोंडूजी वाकडे (८२) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना बोथली मार्गावरील नाग मंदिराजवळील विहिरीत इसमाचा प्रेत दिसून आला. चौकशी केली असता नागभीड येथील महादेव वाकडे यांचा असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 6, 2024

PostImage

आष्टी ठाणेदारानी तीन गावागुंडाना घेतले ताब्यात


येणापूर,आंबोली येथील कायदा दणक्याचा या न्युज पोर्टलचे सं पादक संतोष मेश्राम. यांच्या घरावर तीन गावागुंडानी प्राणघातक हला करून,त्यांच्या बहिणीला,व आईला मारझोड करून त्यांच्या घराची मोडतोड सुधा केलेली आहे.

तसेच त्यांच्या सम्पूर्ण कुटूंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन गावागुंडाणा आष्टी पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलेलेअसून. त्यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हेगारांनावर भा. द. वी. 294.323.506.34 अन्वये गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाही सुधा केलेली आहे.

 हे तिनही गावगुंड चामोर्शी तालुक्यातील बल्लूचक येथील असल्याचे सांगितले जात आहे

सदर घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार काळे करीत आहेत.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024

PostImage

प्रेमाला नकार, तिघींवर अॅसिड हल्ला


 

 

एकीची प्रकृती चिंताजनक, हल्लेखोरास अटक

 

मंगळुरू (ए). कर्नाटकातील मंगळुरू येथे तीन विद्यार्थिनींवर अॅसिड फेकण्यात आले. या विद्यार्थिनी त्यांच्या दुसऱ्या पीयूसी (प्री-युनिव्हर्सिटी एज्युकेशन) परीक्षेसाठी शाळेच्या हॉलमध्ये प्रवेश करत असताना ही घटना घडली. सर्व माध्यमिक पीयूसीच्या विद्यार्थिनी असलेल्या विद्यार्थिनी शाळेच्या बाल्कनीत बसून परीक्षेची तयारी करत असताना मास्क आणि टोपी घातलेल्या आरोपीने परीक्षा हॉलच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर अॅसिड फेकले. आरोपीचे नाव अबीन असे असून तो केरळमधील 23 वर्षीय एमबीएचा विद्यार्थी

 

आहे. त्याला कडबा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पीडितांपैकी एका विद्यार्थिनीवर ते एकतर्फी प्रेम असल्याची कबुली दिली. तथापि, विद्यार्थिनीच्या नकारानंतर त्याने अॅसिड हल्ला केल्याची कबुली दिली. तिन्ही विद्यार्थिनींवर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांना पुढील उपचारासाठी मंगळुरूला हलवण्याची तयारी आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024

PostImage

कामावरून घरी परतताना मिस्त्रीवर काळाचा घाला


चामोर्शी : मालवाहू वाहनाच्या धडकेत कामावरून घरी परतणाऱ्या मिस्त्रीचा मृत्यू झाला. ही घटना ४ मार्चला सायंकाळी सोनापूरजवळ घडली.

 

सुरेश महादेव दुधबावरे (५५, रा. सोनापूर) असे मयताचे नावच आहे. बांधकामावरील काम आटोपून ४ मार्चला दुचाकीवरून (एमएच ३३ झेड- ६८७७) ते चामोर्शीहून सोनापूरला स्वगावी जात होते. गावाजवळ

 

वळणावर आष्टीकडे जाणाऱ्या ट्रेलरने (सीजी ०७ बीजी- ५५९७) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात सुरेश दुधबावरे हे जागीच ठार झाले.

 

पोलिस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024

PostImage

हातावरील मेहंदी पुसण्याआधीच मृत्यूने गाठले; प्रेमविवाहाची अधुरी एक कहाणी


 

 

गडचिरोली : प्रियकराला दिलेले वचन निभावण्यासाठी तिने आई-वडिलांचा विरोध असतानाही प्रेमविवाह केला, मनाचा जोडीदार मिळाल्याने आयुष्यभर सुखाने संसार करण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र हे स्वप्न अधुरेच राहले. प्रेमविवाहानंतर अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत अपघातात पतीचा मृत्यू झाला. काळीज हेलावून टाकणारी ही घटना तालुक्यातील पोर्ला येथे शनिवारी सायंकाळी घडली.

 

समीर बोंडकूजी भानारकर (२५) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबतच बंटी श्यामराव म्हस्के (२३) रा. पोर्ला हा युवकसुद्धा ठार झाला. समीर हा कुरखेडा येथे सेतूकेंद्र चालवत होता. दरम्यान तेथीलच एका युवतीशी त्याचेप्रेमसंबंध जुळून आले. दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले. दोघांनीही लग्नाचा प्रस्ताव आई-वडिलांकडे ठेवला. लग्नाला समीरकडील मंडळी तयार झाली, मात्र आंतरजातीय विवाह असल्याने मुलीकडच्या नातेवाइकांनी लग्नाला विरोध दर्शवला. त्यामुळे मुलीने समीर सोबत पोर्ला येथे पळून येऊन १७ मार्च रोजी एका विहारात विवाह केला. काही दिवसांनी विवाहाचा मोठा समारंभ करण्याचा मानससमीरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. मात्र हा सर्व आनंद कदाचित नियतीला मान्य नसावा.

 

समीर हा त्याचा मित्र बंटीसोबत पोर्लाजवळील मोहझरी येथे शनिवारी काही कामानिमित्त दुचाकीने गेला होता. काम आटोपून परत येत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार समीर व बंटी हे दोघेही जागीच ठार झाले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

 

पोर्लात शोककळा

गावातील दोन युवक एकाच दिवशी एकाच अपघातात ठार झाल्याचे लक्षात येताच पोर्ला गावात शोककळा पसरली. रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024

PostImage

जिल्हाधिकाऱ्यांविरुध्द केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार


 गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करावी, अशी मागणी काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी ३ मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.

 

दुर्गम भागातील वेंगपूर, सुरगाव, अळंगेपल्ली तसेच पडकाटोला या चार गावांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, कथित धान घोटाळ्यात दोषींना पाठिशी घातल्याचे प्रकरण, उद्योगांच्या नावाखाली जमीन संपादन करताना दडपशाही यामुळे जिल्हाधिकारी मीणा हे वादात सापडले असल्याचा दावा करत शेडमाके यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील म्हणून ते ओळखले जातात, त्यामुळे लोकसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी त्यांची बदली गरजेची असल्याचे शेडमाके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

प्रकरणे प्रलंबित

अतिक्रमणासह इतर प्रकरणे प्रलंबित असून जिल्हा प्रशासन वेळकाढू भूमिका घेत आहे. याचा देखील तक्रारीत उल्लेख आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024

PostImage

अजित पवारांच्या लोकांकडून धमक्या


CM-DCM कडे हर्षवर्धन यांची कैफियत

पुणे, . जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे राजकीय वातावरणही तापले आहे. एकीकडे महायुतीत जागावाटपावरून पेच निर्माण झाला असतानाच भाजपा नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला जात आहे. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी हा आरोप केला असून त्यांना इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याची धमकी देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. यावरून पाटील यांनी यासंदर्भातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडली आहे. दरम्यान, पाटील यांची कन्या अंकितापाटील यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला गंभीर इशारा दिला आहे.

 

जीवाला धोका

इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. मला माझ्या सुरक्षिततेची चिता वाटत आहे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.

 हर्षवर्धन पाटील, नेते, भाजपा

 

वडिलांना धमक्या द्याल तर खबरदार...

माझ्या वडिलांबाबत असं एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुकाध्यक्ष आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते. ही आपली संस्कृती नाही. मला त्यांना एकच सांगायचं आहे, पातळी सांभाळून बोला.

- अंकिता पाटील

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024

PostImage

सासूला सांभाळण्याची जबाबदारी सुनेचीच , हायकोर्टाचा निर्णय, दरमहा दहा हजार देखभाल खर्चही द्यावा


 

मुंबई, . सासू- सासरे आणि मुलगा यांचा भागीदारीमध्ये प्रिंटिंग व्यवसाय होता. आधी मुलगा वारला तर 2023 मध्ये वडील वारले. सासूबाईला मात्र सुनेकडून छळ सोसावा लागला. सुनेने मालमत्तेवर हक्क सांगितला. परंतु, उच्च न्यायालयाने हा हक्क नाकारला आणि सुनेनेच आता सासूला सांभाळले पाहिजे. तसेच दरमहा देखभाल खर्च दहा हजार रुपये दिलाच पाहिजे, असा निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप वी मारणे यांच्या न्यायालयाने दिलेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाने सासू- सासऱ्यांनी मुलाच्या नावे केलेले गिफ्ट पुन्हा सासू-सासऱ्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. वसंत होळकर हे वडील आणि वैशाली वसंत होळकर असे सासू सासऱ्याचे नाव आहे. आई-वडिलांनी मुलगा समीर होळकर यांच्या नावे गिफ्ट डीड केले होते. त्या गिफ्ट डीडवर प्राधिकरणाने मुलगा आणि सुनेचा अधिकार असल्याचा निर्णय दिला होता. मात्र, या प्रकरणात उच्च न्यायालयाने हा

 

निर्णय रद्द केला आणि सुनेनेच सासूला सांभाळले पाहिजे. तसेच गिफ्ट डीड हे पुन्हा सासू- सासरे यांच्या नावे केले. तसेच दर महिनाकाठी सून प्रिया समीर होळकर हिने सासू वैशाली होळकर यांना दहा हजार रुपये देखभाल खर्च दिला पाहिजे, असा न्यायमूर्ती संदीप वी मारणे यांनी हा निकाल दिला. 4 मार्च रोजी न्यायालयाने हा निकाल जाहीर केलेला आहे. मालमत्तेवर सून हक्क सांगू शकत नाही: जेव्हा वडील हयात होते तेव्हा मुलाने आणि सुनेने आई-वडिलांच्या नावे असलेल्या भागीदारीच्या फॉर्ममधून जे उत्पन्न मिळाले त्यातून अनेक मालमत्ता खरेदी केल्या. त्या आधारावर त्याने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले; परंतु 2015 मध्ये मुलगा समीर होळकर याचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्जाच्या थकबाकीकरिता बँकेकडून तगादा लावण्यात आला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 4, 2024

PostImage

ट्रक व ट्रॅक्टर अपघातात एकाचा मृत्यू


 

चिमूर : चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील शेडेगाव जवळ ट्रक व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरवर बसून असलेला मजूर जागीच गतप्राण झाला आहे. हा अपघात शनिवार २ मार्चच्या मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे

 

ट्रक क्रमांक सीजी ०८४ आर ९५३५ हा वरोराकडून चिमूरकडे येत असताना त्याच वेळी रेती भरून असलेला ट्रॅक्टर नंबर एम.एच.३४ एपी २९२६ चिमूरवरून खडसंगीकडे जात असताना ट्रक व ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली त्यावेळी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या मजूराचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव सचिन रामदास सोनवाने

 

(२५) रा. बंदर असून २ वर्षांपासून चिमूर ट्रॅक्टरवर कामावर येथील होता. हा व्यक्ती घरात एकटाच कमविणारा असून त्याच्या मागे आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

 

मध्यरात्री घटनेची माहिती मिळताच पोलिस सहायक चवरे, मानकर, अवधूत, पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करून अधिक तपास चिमूर पोलीस करीत आहेत. तालुक्यात सध्या अवैधवाहतुकीचा कहर झाला असून महसूल प्रशासनाने आर्थिक गणित डोळ्यासमोर ठेवत सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. चिमूर तालुक्यातील उमा नदीवरुन रात्री चोरी च्या मार्गाने रेती तालुक्यातील गावागावांत व ठेकेदारांच्या साईटवर टाकली जाते. अवैध वाळू वाहतूक करत असताना मोठ मोठे अपघात होत आहेत.

 

राष्ट्रीय महामार्गावरील काम अपघाताचे आमंत्रण

चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या सहा ते सात वर्षांपासून काम सुरू आहे तालुक्यातुन अनेक शासकीय कामात जिल्हाच्या ठिकाणी ये-जा करताना प्रवाशाना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे मोठ मोठे अपघात होत आहेत या वर्षात अपघातांची मालिका सुरूच आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 4, 2024

PostImage

भाजपा च्या दलित / बौद्ध दलालांना प्रचारातून हाकलून लावा. पॅन्थर डॉ. राजन माकणीकर


 

*मुंबई दि (प्रतिनिधी) निवडणुका येऊ घातल्या आहेत. अश्यावेळी आरक्षणावर जे पोट भरत आहेत अश्या गद्दार दलित व बौद्धांना प्रचार करण्यास आपल्या वस्तीत आल्यास त्यांच्या ढुंगणाचे वाभाडे काढा. असे आवाहन विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.*

 

शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रात मनुवादी शक्ती तोंड वर काढत आहे. वेगवेगळ्या उक्तीने प्रलोभने देऊन सत्तेत बसत आहे. भारतीय संविधानाची लक्तरे तोडली जातं आहेत. लोकशाही संपवत आहेत, अश्यावेळी कोणीच माईचा लाल विरोध करत नाही. कारण या लोकांनी विरोधक पण संपवला आहे

 

मनुवादी पिलावळ सत्तेच गाजर दाखवून गुलाम बनवून दलित व बौद्धाना विविध कार्यक्रमाचे अमिश देऊन. बौद्ध परिषदा व जयंत्या साजऱ्या करून बनावट बौद्ध धम्मगुरूंना हाताशी धरून मतांचे राजकारण करत आहेत. यामध्ये दलित / बौद्ध समाजाचे दारूडे कार्यकर्ते तर काहीना पैशे देऊन विकत घेतले आहे. अश्या गद्दारांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे.

 

भाजपाच्या वाटेवर किंवा त्यांच्यात सामील झालेल्या किंवा हजेरीवर पैसे घेऊन प्रचार करणाऱ्या मित्र आपटेष्ठा चे मत परिवर्तन करून आंबेडकरी चळवळीशी गद्दारी करु देऊ नका आणि जर आंबेडकरी चळवळीतून राजगृहाला बेईमान होऊन मनुवादी विचार पेरण्यास त्यांना सत्तेत आणण्यास मदत करत असेल तर अश्या दांभीक वृत्ती आणि प्रवृत्तीना जागीच ठेचून काढण्याचे आवाहन विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकनिकर यांनी केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 4, 2024

PostImage

शिखर बँक घोटाळा, अजित पवार अडचणीत ! ईओडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध


 मुंबई, . शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी कायम आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (ईओडब्ल्यू) शाखेने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. पण या रिपोर्टला सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) विरोध असल्याचे समजते. या प्रकरणी हस्तक्षेप याचिका दाख करण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपासोबत गेलेल्या अजित पवारांच्या अडचणी कायम आहेत. गेल्या

 

वर्षी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 40 आमदार भाजपसोबत गेले आणि सत्तेत सहभागी झाले. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीच्या भूमिकेनं अजित पवारांच्या समस्या वाढवल्या आहेत.

 

याचिका दाखल करण्याची परवानगी

ईडीला या प्रकरणात याचिका दाखल करायची आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे परवानगी मिळाली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 मार्चला होईल. त्यावेळी ईडीला याप्रकरणी परवानगी मिळाली तर ईडीकडून याप्रकरणी युक्तिवाद केला जाऊ शकतो. 25 हजार कोटी घोटाळ्याचा आरोप आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 4, 2024

PostImage

अतिक्रमण काढल्याचा राग; पोलिस शिपायास मारहाण


 

चंद्रपूर : पोलिसांच्या सहाय्याने मनपाने अतिक्रमण हटवले. या कारवाईने दुखावलेल्या एका मटन विक्रेत्याने रात्री वासेकर पेट्रोल पंपासमोर पोलिसांना शिवागाळ करू लागला. दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला टोकले असता, त्याने पोलिस शिपायास धक्काबुक्की करून मारहाण केली. ही खळबळजनक घटना २७ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता घडली. याप्रकरणी पोलिस शिपाई विशाल बगडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात शैलेश पारधी याच्यावर कलम ३५३, २९४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला. तो फरार असून रामनगर

 

पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस व मनपातर्फे २७ फेब्रुवारीला रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी हजारे मेडिकल समोरील दवा बाजार परिसरातील मटन विक्रेत्यांचीसुद्धा दुकाने हटविण्यात आली होती. यावेळी शैलेश पारधी याचेही दुकान हटविले. याचाच राग मनात घेऊन वासेकर पेट्रोल पंपासमोरील हजारे मेडिकल चौकात तो पोलिसांना शिवीगाड करत होता. दरम्यान, पोलिस शिपाई विशाल बगडे तेथे गेला. त्याने त्याला कशाला शिवीगाळ करतो म्हणून टोकले. यावेळी त्याने बगडे याला धक्काबुक्की करून मारहाण केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 4, 2024

PostImage

EVMमध्ये छेडछाड करून जिंकू शकतात,मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


• मुंबई, . पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्याच्या उद्देशाने भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे. शनिवारी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे सत्ताधारी पुन्हा सत्तेवर येणार नाही. मात्र जनादेशाच्या विरोधात ईव्हीएममध्ये छेडछाड करून भाजपा जिंकू शकतो. तसे झाल्यास देशात प्रचंड असंतोष निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

 

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरू केलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ खुला संवाद अभियानाच्या समारोपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, उद्योजक, शेतकरीआणि कामगारांमध्ये असंतोष आहे. लोकांमध्ये सरकारबद्दल अविश्वास आहे. 'फोडाफाडी करा आणि राज्य करा' हे फार काळ टिकणार नाही. ते कितीही मोठे हुकूमशहा असले तरी ती जनतेसमोर चालणार नाही. जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.

 

 

'जुमला'चे नाव आता 'गॅरंटी'

भाजपाला भारतीय जुमला पक्षसंबोधत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजपाने ज्याप्रमाणे रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि शहरांची नावे बदलली, त्याचप्रमाणे आता 'जुमला'चे नाव बदलून 'गॅरंटी' ठेवले आहे, असा टोलाही त्यांनी हाणला

 

 

 

ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना उमेदवारी

भाजपाच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे नाव नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आणि अमित शहा यांना कोणी ओळखत नव्हते तेव्हापासून नितीन गडकरी यांचे नाव आपण ऐकत आहोत. बाळासाहेबांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे महामार्ग त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला. घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध करणाऱ्या भाजपाच्या यादीतील 34 नेत्यांच्या वंशजांना तिकीट देण्यात आले. तसेच ज्यांच्यावर आरोप केले, असे नेते भाजपाच्या कुशीत बसताच त्यांनाही उमेदवारी देण्यात आली. हिच मोदींची हमी आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 4, 2024

PostImage

छत्तीसगडमध्ये चकमक; जवान शहीद, नक्षली ठार


रायपूर. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत बस्तर फायटरचा आरक्षक शहीद झाला तर याच चकमकीत एक नक्षली ठार झाला. रमेश कुरेठी असे शहीद जवानाचे नाव आहे. कांकेर जिल्ह्यातील (छत्तीसगड) छोटेबेठिया पोलिस स्टेशन अंतर्गत हिदूर गावाजवळील संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली. हिदूर जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात सुरू आली होती. 

 

दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत जंगलात चकमक सुरूच होती. चकमकीच्या घटनास्थळावरून एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. छत्तीसगडच्या बस्तर भागातील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान, विशेष कमांडो बटालियन रिझोल्युट फॉर ऍक्शनमधील दोन जवान शहीद झाले होते. यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर ही घटना घडली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

वय 40 होईल तरी चालेल पण मुलगा पाहिजे नोकरी वाला


गडचिरोली : पूर्वीच्या काळी १९ ते २२ व्या वर्षी मुला-मुलींची सर्रास लग्न व्हायची. परंतु आता मात्र लग्नाचे वय ३० ते ३८ च्या घरात जाऊन पोहचले आहे. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरीवर असलेलाच जावई पाहिजे असल्याची मानसिकता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लग्नाची समस्या जटील होत चालली असून, गावा-गावांत विवाह इच्छुक मुलांची संख्या वाढत आहे.

 

मागील काही दशकात ग्रामीण समाजव्यवस्था झपाट्याने बदलली. आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृती, सुख-सोई ह्या गोष्टींची महिती वाढली आहे. परिणामी लोकांच्या मानसिकतेतही बदल दिसू लागले. मुलगी जरी कमी शिकलेली असली तरीही मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारी नोकरी किंवा शहरात गलेलठ्ठ नोकरी असलेला जावई हवा असल्याची मानसिकता वाढली आहे. काही काही कुटुंबातील तरुण दहा ते पंधरा हजार रुपयांसाठी कंपनीमध्ये जातात परंतु त्याच घरच्या मुलींना जावई मात्र पाहिजे साठ हजाराचा असे विचारसरणी सगळीकडे झाली आहे .जणू काही व्यापारी, सर्वसामान्य मुलगा संसार करू शकत नाही असा भ्रम तरुणींच्या आई-वडिलांना झाल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

मुलीचे लग्नाचे वय निघून गेल्यानंतर त्यांच्याकडे समाजामध्ये वेगळ्या दृष्टिकोन बघायला मिळते आणि मग मुली एखाद्या तरुणाला घेऊन पळून जातात त्यामुळे अशा लग्न विषयाकडे मुलींनी कुठलाही हट्ट , संस्कारी चांगली वर्तणूक असणाऱ्या कष्टाळू तरूणासोबत लग्न करण्यासोबत काही हरकत नाही

 

 

झपाट्याने काळ बदलला आणि समाजात चौकसपणा वाढला, अनेकांच्या आयुष्यात सुख, सोई-सुविधा आल्या. शिक्षणाचे प्रमाण वाढले. मोबाईलच्या युगात सोशल मीडियामुळे बरेच बदल झाले. करिअरचा विचार करून उत्पन्नाचा प्रश्न आणि भविष्याचा विचार महत्वाचा वाटू लागला. या सर्व चक्रव्युहात विवाहयोग्य मुला-मुलींचे वय मात्र वाढत चालले आहे. तरुणाईचे रूपांतर प्रौढात होत असून विवाहाचे वय आणि शारीरिक अवस्था देखील निघून जात असल्याची विदारक स्थिती सर्वत्र दिसून येत आहे. समाजातील या गंभीर समस्येला नेमकं जबाबदार कोण? हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 

प्रत्येक गावात विवाह इच्छुक मुलांची संख्या वाढतेय!

ग्रामीण भागात सध्या विवाहाची समस्या वडीलधाऱ्या मंडळींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मुलाचे विवाहाचे वय होऊनही कुणी मुलगी दाखवण्यास तयार नसल्यामुळे मुले सुद्धा निराशेच्या गर्तेत जात आहेत. परिणामी, प्रत्येक गावात किमान ४० ते ५० च्यावर विवाहयोग्य तरुण असल्याचे दिसून येत आहे.

कित्येक मुले तीस-पस्तीस असताना सुद्धा कुठलाही व्यसन न करता आपले कामे करत आहेत परंतु शासकीय कर्मचारी कशा प्रकारचा असला तरी योग्य वर्तणूक नाही ,शंशाही, दारुडा अशा शासकीय कर्मचाऱ्याला मुली दिल्या जातात म्हणजे सर्व मुलीच्या आई वडिलांना असं वाटते की आपली मुलगी शासकीय कर्मचाऱ्याला जावई करून आपला सर्वांनी विकास करावा.

 

ज्या तरुण पोरींचे आई-वडील कष्ट करून आपला घर संसार चालवीत असतात अशा तरुनींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत .त्यामुळे कधी कधी त्यांच्या कुटुंबामध्ये भांडण सुद्धा होत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु संसार करण्यामध्ये सामंजसपणामध्ये कुठली भूमिका घेतल्यास संसार योग्य दिशेने उत्तम दिशादर्शक ठरू शकते ज्याचा भान ठेवून तरुण-तरुणीने चिंतन मनन करून आपला जोडीदार निवडावा हीच अपेक्षा आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तीं सोबत उभे रहा - रिपब्लिकन पक्षाचे आवाहन


 

गडचिरोली- आज देशाचे संविधान,लोकशाही व धर्म निरपेक्ष स्वरूप धोक्यात आले असून ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुकी मध्ये पुरोगामी व समविचारी लोकांसोबत सर्वांनी ताकतीने उभे राहावे असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केले आहे. 

   पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत चांदेकर भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी हे आवाहन करण्यात आले.

    रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रदेश सचीव प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवर, गडचिरोली विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, आरमोरी विधान सभा प्रमुख कृष्णा चौधरी, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

   या सभेत देशातील सध्याची परिस्थिती आणि जिल्यातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय तथा अल्पसंखांक लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. बेरोजगारी, महागाई सोबतच शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न जटील झाले आहेत परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. गडचिरोली जिल्यातील मौल्यवान वन व खनिज संपत्ती लुटल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगाच्या नावावर बळकावल्या जात आहेत याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले आणि या सर्व प्रश्नांवर व्यापक जनलढा उभारण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष पद्धतीने लढविण्यासाठी ईव्हीएम त्वरित बंद करण्यात याव्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

   संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण हि आजची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. त्यासाठी आज देशभर मोठे आंदोलन सुरु असून याकामी पुढाकार घेणाऱ्या सर्व संगठना व नेत्यांना बैठकीत पूर्ण समर्थन जाहीर करण्यात आले. 

   या सभेला साईनाथ गोडबोले,दादाजी धाकडे, अरुण भैसारे, हेमाजीं सहारे, कविता वैद्य यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

संधिवाताच्या रुग्णांनी आहारात या पदार्थांचा समावेश करावा


 

 बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण शहरी लोकं अनेक आजारांना बळी पडतो. यापैकी एक आजार म्हणजे संधिवात. हा आजार आधी वयाने मोठे असल्यानं होत असे. पण आजकाल हा आजार सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो.

 

संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांना हाडे आणि सांधेदुखीचा सामना करावा लागतो. या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. नाही तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. संधिवात जागरूकता दिवस दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी लोकांना या आजाराविषयी जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. आज आपण जाणून घेऊयात की संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

 

ड्राय फ्रुट्स

 

ड्राय फ्रुट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट पुरेशा प्रमाणात असतात. ज्यामुळे सांध्यांची सूज कमी होण्यास मदत होते. संधिवाताचे रुग्ण त्यांच्या आहारात बदाम, पिस्ता, अक्रोड इत्यादींचा समावेश करू शकतात.

 

हळद

 

हळद किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहीतच आहे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. हळद तुम्ही दुधात मिक्स करून सेवन करू शकता.

 

धान्य खा

 

तुम्हालाही ही समस्या असल्यास आहारात संपूर्ण धान्य समाविष्ट करू शकता. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे.

 

या गोष्टी खाणे टाळा

 

> तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

 

> मीठ जास्त प्रमाणात सेवन करू नका.

 

> गोड पदार्थ खाणे टाळावे.

 

> दारूचे सेवन करू नका.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

लोकसभा : भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढणार


 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

 

भाजपच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवारांचं नाव घोषित करण्यात आलं नाहीय.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.

 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे, तर गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

 

केरळमधून काँग्रेस नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा करताना, पत्रकार परिषदेत म्हटलं की, "प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं आमच्याकडे आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत तिथल्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली."

 

29 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 195 जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडूणक लढतील, अशी माहिती तावडेंनी दिली.

 

तसंच, या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावं या यादीत आहेत. लोकसभा अध्यक्षांचं नावही या यादीत आहे, असं विनोद तावडेंनी सांगितलं.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण तसंच सबक साथ, सबका विकास यांचं उदाहरण गेल्या दशकभरात जगभरात प्रस्थापित केलं आहे.

 

“अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले. यावेळी एनडीए चारसौ पारचं उद्दिष्ट घेऊन पुढे जाण्याचं लक्ष्य पंतप्रधानांनी समोर ठेवलं आहे. जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने गेल्या दोन वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल हा विश्वास आम्हाला आहे.”

 

भाजपच्या पहिल्या यादीतील मोठी नावं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.

 

मध्य प्रदेशमधील गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे.

 

राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देब यांनाही लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

 

मथुरेच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

 

लखीमपूर खिरीमधून अजय मिश्रा टेनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी देण्यात आलीय, तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पुन्हा एकदा अमेठीतून संधी दिली गेलीये.

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

संध्याकाळ झाल्यावर घरात डास येतात? 8 टिप्स वापरा, कानाकोपऱ्यातले डास पळून जातील


 

घरात एखादा डास जरी दिसला तरी तो रात्रभर छळतो आणि मग झोप लागत नाही. सतत तो कानाजवळ येऊन त्रास देतो. झोपमोड तर होतेच पण घरात आपल्या नकळतही खूप ठिकाणी डासांची पैदास होत असते. आता काही बिनतोड उपाय केले तर घरातल्या कानाकोपऱ्यातले डास तुम्ही सहज घालवू शकता.

 

 

बदलत्या हवामानानुसार आता डासांचं संकट घोंगावणार आहे आणि लवकरच डेंग्यूच्या तापाच्या बातम्या कानावर येतील. या परिस्थितीत साध्या घरगुती उपायांनी आपण डासांपासून दूर राहू शकतो. निसर्गोपचार किंवा घरगुती उपचारांवर जर तुमचा विश्वास असेल तर हे काही उपाय केल्यास तुमच्या घरात खरंच डास येणार नाहीत.

 

घरातल्या डासांना कसं पळवाल?

 

१. लिंबू आणि मोहरीचं तेल

 

एक पिकलेलं लिंबू घ्या. आता सुरीनं ते अर्धं चिरून घ्या. त्यातला चोथा काढून घ्या. मग यात एक चमचा मोहरीचं तेल घाला आणि मग त्यात लवंग, कापूर घालून एक वात लावा आणि ती पेटवून ठेवा. यामुळे सगळे डासे पळून जातील.

 

२. कापूर

 

डासांवर बिनतोड उपाय म्हणजे कापूर. यामुळे घरात छान सुगंधही येतो आणि डासही पळून जातात. कापराच्या काही वड्यांचा चुरा कोणत्याही तेलात मिसळा. डासांना घालवण्यासाठी या तेलाचा दिवा लावा. यामुळे डास घरापासून लांबच राहतील.

 

३. तुळस

 

डासांना घरातून बाहेर काढण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती तुळस. घरात डास येण्यापासूनच रोखायचं असेल तर घराच्या खिडक्या आणि दरवाजाच्या आसपास तुळशीची काही पानं पसरून ठेवा.

 

४. लसूण

 

लसणाच्या उग्र वासाचा एखादा स्प्रे डासांना मारण्यासाठी तयार करून ठेवता येईल.

 

५. कडूनिंब

 

कडूनिंबाच्या पानातला कडवटपणा सगळ्या प्रकारच्या कीटकांना आणि विषाणूंवर गुणकारी असतो. डासांना घरापासून लांब ठेवण्यासाठी तुम्ही या पानांचं तेल त्वचेवर लावू शकता किंवा दिव्यामध्येही याच्या तेलाचा वापर करून तो दिवा घरात लावू शकता.

 

६. लिंबू आणि लवंग

 

जर तुम्ही लिंबाच्या काही फोडींमध्ये लवंग लावून त्याला घरातल्या कोपऱ्यांमध्ये ठेवलंत तर यामुळे होणारा परिणाम नक्कीच बघा.

 

७. नीलगिरी तेल

 

जेव्हा नैसर्गिक पद्धतीनं घरातल्या डासांवर उपाय करायचा असेल तेव्हा नीलगिरी तेल खूप महत्त्वाचं आहे. हे तेल तुम्ही त्वचेवर लावू शकता. यामुळे डास आजिबात चावणार नाहीत.

 

८. पुदिन्याचं तेल

 

पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून ते मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. तसंच हे त्वचेवर लावूनही घरगुती उपाय करता येईल. यामुळं डास जवळ येणार नाहीत आणि त्वचेचा ताजंतवानं वाटेल यातून पुदिन्याचा छान सुगंधही येईल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

वैरागड येथे अभिनेत्री सोनाली -कुलकर्णी येणार


 

 गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाअभिषेक व भजनस्पर्धेसाठी - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येणार आहे.

वैरागड येथे भोलू सोमनानी व मित्रपरिवाराच्या पुढाकाराने महाशिवरात्री महोत्सव होत आहे.  भजन स्पर्धेत पाच विजेत्यांना दोन हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. सकाळी ९ वाजता भंडारेश्वर मंदिरात महाअभिषेक केला जाणार आहे. दुपारी हवन, सायंकाळी गोपाळकाला व सायंकाळी सहा वाजेनंतर भोजनदान करण्यात येईल 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

पळसगाव शेतशिवारात हत्तींचा पुन्हा हैदोस


 

मका, उन्हाळी धान पिकाचे नुकसान

 

गडचिरोली, ब्युरो. देसाईगंज वनविभागाअंतर्गत येणाऱ्या आरमोरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव उपवनक्षेत्रातील शेतशिवारात शुक्रवारी रात्री जंगली हत्तींनी पुन्हा एकदा हैदोस माजविला. हत्तींच्या कळपाने शेतात लावलेले मका व उन्हाळी धानपीक पूर्णपणे उद्धवस्त केले. या घटनेमुळे पळसगाव येथील 5 ते 6 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात हत्तींचा कळप शिरल्याने शेतकऱ्यांचे दररोज नुकसान होत आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र आता ही पिके जंगली हत्तींनी उद्धवस्त केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 3 वर्षांपूर्वी ओरिसा राज्यातील जंगली हत्तींचा कळप गडचिरोलीत दाखल झाला होता. तेव्हापासून या हत्तींकडून जिल्ह्यातील विविध भागात नुकसान केले जात आहे. देसाईगंज वनविभाग अंतर्गत येणाऱ्या आरमोरी, कुरखेडा व देसाईगंज

 

वनपरिक्षेत्रातील जंगलात गेल्या दीड महिन्यांपासून हत्तींचा कळप धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी रात्री हा कळप पळसगावला लागून असलेल्या शेतात शिरला. हत्तींनी गावातील 5 ते 6 शेतकऱ्यांच्या शेतात शिरून मका व भातपीक तुडवले. शेतात सर्वत्र हत्तींच्या पावलांचे ठसे दिसून येत आहेत. शनिवारी वनविभागाच्या पथकाने संबंधित शेतात पोहोचून नुकसानीचा पंचनामा केला. सततच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

पोर्ला गावाजवळ झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार


 

 

गडचिरोली, ब्युरो. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास पोर्ला गावाजवळ घडली. समीर बोंडकू भानारकर (23) आणि प्रशांत मनोहर म्हस्के (26) रा. पोर्ला, अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, समीर आणि प्रशांत काही कामानिमित्त शनिवारला गडचिरोली जिल्हा मुख्यालयात आले होते. काम आटोपून ते सायंकाळच्या सुमारास दुचाकीने स्वगावी पोर्लाकडे जात होते. दरम्यान, पोर्ला नजीकच्या ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांची मोठी गर्दी जमली. घटनेबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024

PostImage

लग्नास उशीर केल्याने मारहाण


 

 

लखनौ, रात्रीच्या वेळी लग्न लावण्यास उशीर होत असल्यान नवरदेवाने मंडपातच भटजीला जोरदार मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार, मेरठ येथील रहिवास सोनू सिंह हा जाटव ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्याचा विवाह गुरुवारी रात्री निगोहा गावातील तरुणीशी करण्यात येत होता. भटर्ज विवेक शुक्ला यांच्याकडून रात्री 1 वाजता लग्नविधी सुरू झाले होते उशीर होत असल्याने सोनूने भटजीला लवकर लग्न लावण्यास सांगितले. परंतु, लग्नात सप्तपदी घेताना अनेक नियम आणि मंत्रोच्चा- असल्याचे सांगताच दोघांत जोरदार भांडण झाले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकाला अटक


 

भद्रावती : : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकानेच अत्याचार करून चार महिन्यांची गर्भवती केल्याने पोलिसांनी गुरुवारी आरोपीला अटक केली. पवन नागोसे (१९, रा. मारेगाव, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

 

आरोपी पवन हा नातेवाईकाकडे राहून मोलमजुरीची कामे करायचा. दरम्यान, तो फूस लावून अल्पवयीन मुलीवर आठ महिन्यांपासून अत्याचार करत होता. 

 

मुलीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी आरोपी पवन नागोसे याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल किटे करत आहेत.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

भारत सरकार - एक कोटी घरांमध्ये छतांवर मोफत सौर पॅनल बसवण्याच्या योजनेला मंजुरी 


 

 

 1 कोटी कुटुंबांना दर महिना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 75,021 कोटी रुपये खर्चाच्या पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे.

 

पंतप्रधानांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना सुरू केली होती.

 

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

 

घरगुती सौर पॅनल साठी केंद्रीय आर्थिक सहाय्य

 

या योजनेअंतर्गत 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40% केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. सध्याच्या प्रमाणित किंमतीनुसार, 1 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 30,000 रुपयांचे अनुदान, 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 60,000 रुपयांचे अनुदान,3 kW आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी 78,000 रुपयांचे अनुदान, दिले जाईल.

सर्व कुटुंबाना राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज करता येईल आणि छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य विक्रेत्याची निवड करता येईल. हे राष्ट्रीय पोर्टल कुटुंबाना योग्य प्रणालीचे आकारमान, लाभाचा अंदाज, विक्रेत्याचे मानांकन इत्यादींविषयी समर्पक माहिती देऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना सहाय्य करेल.

कुटुंबांना त्यांच्या छतांवर सध्या 3 kW पर्यंतच्या सौर पॅनल सिस्टीमच्या स्थापनेसाठी सुमारे 7% इतक्या तारण-मुक्त कमी व्याजदर असलेल्या कर्जाचा लाभ घेता येईल.

योजनेची इतर वैशिष्ट्ये

 

देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात एकआदर्श सौर ग्राम विकसित केले जाईल. हे गाव ग्रामीण भाग, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांमध्ये त्यांच्या भागात छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल

शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांना त्यांच्या क्षेत्रात छतावर सौर पॅनेल बसवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनांचा फायदा होईल.

ही योजना नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी (RESCO) वर आधारित मॉडेल्ससाठी देयक सुरक्षिततेसाठी तसेच आर टी एस मधील नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी निधी प्रदान करते.

फलनिष्पत्ती आणि परिणाम

 

या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाना आपल्या वीज बिलात बचत करता येईल तसेच वितरण कंपन्यांना अतिरिक्त विजेची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. 3 kW क्षमतेच्या प्रणाली द्वारे एका कुटुंबाला दरमहा सरासरी 300 युनिट्स विजेची निर्मिती करता येईल.

 

या प्रस्तावित योजनेमुळे निवासी क्षेत्रात छतांवरील सौर पॅनेलद्वारे 30 GW सौर क्षमतेच्या व्यतिरिक्त, 1000 BUs वीज निर्मिती होऊ शकेल आणि परिणामी रूफटॉप व्यवस्थेच्या 25 वर्षांच्या कार्यकाळात 720 दशलक्ष टन इतके कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईल.या योजनेमुळे दळणवळण, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना, संचालन आणि देखभाल आणि इतर क्षेत्रात मिळून सुमारे 17 लाख थेट रोजगार उपलब्ध होतील असा अंदाज आहे.

 

पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेचे लाभ मिळवणे

 

केंद्र सरकारने या योजनेच्या उदघाटनानंतर लगेचच जनजागृती करण्यासाठी आणि इच्छूक कुटुंबाना अर्ज सादर करता यावेत या उद्देशाने मोठी मोहीम सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब https://pmsuryaghar.gov.in वर स्वतःची नोंदणी करू शकतात.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

नागपुरकर 'डॉली चहावाला'सोबत चक्क बिल गेट्स यांची 'चाय पे चर्चा'


 

 बिल गेट्स या नावाला वेगळ्या ओळखीची काहीच गरज नाही. आपल्या सामाजिक कार्यांसाठीदेखील ते जगभर फिरत असतात आणि सगळ्या सुखसुविधा त्यांच्या पायाशी लोळण घेत असतात. असे असतानादेखील अब्जाधीश बिल गेट्स यांना चक्क नागपुरातील चहाविक्रेत्याच्या चहाने भुरळ घातली.

 

त्यांनी चक्क त्या चहाविक्रेत्याला आमंत्रित करून डोळ्यासमोर चहा बनवताना पाहिले आणि त्याच्यासोबत 'चाय पे चर्चा' करत त्याच्या कौशल्याबाबत कौतुकोद्गारदेखील काढले. खुद्द गेट्स यांनी 'इन्स्टाग्राम'वर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून अशा अनेक 'मिनी चाय पे चर्चा' भविष्यात दिसतील असे संकेतच यातून त्यांनी दिले आहे.

 

नागपुरातील सदर परिसरातील 'डॉली चहावाला' हा मागील अनेक काळापासून 'सोशल मीडिया'वर प्रसिद्ध आहे. त्याचे मोठे फॅन फॉलोईंग असून चहा बनविण्याच्या त्याच्या हटके स्टाईलमुळे त्याचे व्हिडीओ व रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गेट्स यांना सोशल माध्यमांतूनच त्याच्याबाबत कळाले व त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

PM किसानचा 16 हा हप्ता मिळाला नाही? शेतकऱ्यांनी काय करावं? 'हा' नंबर डायल करा, समस्या सोडवा


 

PM Kisan samman Nidhi Yojana :

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan samman Nidhi Yojana)

योजनेचा 16 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते यवतमाळमधून या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे.

 

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा 16 वा हप्ता जमा झाला नाही. तो नेमका का पोहोचला नाही. आता नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात.

PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांना ही भेट दिली. या वर्षातील हा पहिला आणि 16 वा हप्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. पंतप्रधान किसान योजनेचे पैसे आल्याने करोडो शेतकरी आनंदी आहेत, तर काही शेतकरी असेही आहेत ज्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली नाही. असे शेतकरी नाराज आहेत. त्यांच्या खात्यात 2,000 रुपये का पोहोचले नाहीत हे समजू शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, ज्याद्वारे ते त्यांच्या समस्यांवर मात करू शकतात.

 

पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात न पोहोचण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये ई-केवायसी, तुमचे बँक खाते आधारशी लिंक न होणे आणि नाव किंवा कागदपत्रांमधील तफावत यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही सर्वकाही योग्यरित्या भरले असेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. सर्वप्रथम, तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन तुमची स्थिती तपासू शकता, तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत याचे कारण येथे तुम्हाला कळेल.

 

या क्रमांकावर तुमची समस्या मांडा

 

जर तुमची स्थिती पूर्णपणे ठीक असेल आणि तरीही तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल, तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर मेल पाठवून मदत मागू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकता - 155261 आणि 1800115526, 011-23381092. येथे तुम्हाला मदत मिळेल आणि योजनेचे अडकलेले पैसे कसे मिळवायचे ते सांगितले जाईल.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 वा हप्ता जारी केला. यामध्ये 21 हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 16 वा हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यापूर्वी, 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला होता. तो देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच वितरीत करण्यात आला होता.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

बॅरिकेड्सला धडकून दुचाकीस्वार गंभीर


 

चामोर्शी, (ता. प्र.). दुचाकीने स्वगावी जात असताना रस्त्यावर लावलेल्या बॅरिके ला धडकून दुचाकीस्वार गंभीर घटना चामोर्शी- आष्टी मार्गावरील येनापूर गावाजवळ बुधवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घडली. प्रवीण आत्राम (30) रा. राजगोपालपूर ता. चामोर्शी, असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रवीण हा आपल्या दुचाकीने आष्टीवरून राजगोपालपूरकडे बुधवारी रात्रीच्या सुमारास जात होता. दरम्यान येनापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून मुख्य रस्त्यावर लावलेल्या आलेल्या बॅरिके ला दुचाकीची धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाला. अपघात घडताच नागरिकांनी धाव घेत त्याला येणापूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिके मुळे अनेक अपघात घडत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील बॅरिके हटविण्यात यावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

दुचाकीची ट्रकला धडक; तरुण ठार


येरकड-सिंदेसूर मार्गावरील घटना 

गडचिरोली, ब्युरो. धानोरा तालुक्यातील सिंदेसूरवरून येरडकडे जात असलेल्या दुचाकीचालकाची ट्रकला जबर धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. देवनाथ काटेंगे (32) रा. अर्जुनी ता. धानोरा, असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार देवनाथ काटेंगे हे काही कामानिमित्य धानोरा तालुकास्थळी होते. 

 

दरम्यान सायंकाळी काम आटोपून ते स्वगावी अर्जुनी येथे जात असताना सिंदेसूर-येरकड मार्गावरील वळणावर एकाएक ट्रक समोर आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकीवरून पडून ते थेट ट्रकखाली चिरडल्या गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच येरकड पोलिस मदत केंद्रातील जवानांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

प्रेयसीसाठी घरापुढे लावला बॉम्ब


वर्धेतील घटनेने खळबळ; परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

 

 आर्वी (जि. वर्धा) : येथील विठ्ठल वॉर्डातील एका घरासमोरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तू अडकविल्याचे दिसून आल्याने पहाटेपासून परिसरात दहशत होती. संबंधित वस्तूच्या वायर कापून पोलिसांनी ती निकामी केली व दुर्घटना टळली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले.

 

येथील वंदना ज्ञानेश्वर कारमोरे (५७) यांच्या घराबाहेरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तूची पिशवी अडकविल्याचे दिसले. साफसफाईला उठलेल्या अनुप चोपकर हिला हा प्रकार दिसला

 

तिने आजी वंदना यांना सांगितले. पिशवीत बॅटरी व टायमर अशी बॉम्बसदृश वस्तू होती. एक आत आणि एक बाहेर अशा दोन चिठ्ठया होत्या. एका चिठ्ठीत 'हात लावू नका, अन्यथा मोठा स्फोट होईल', असे लिहिले होते. पिशवीतील बॉम्बसदृश वस्तूला टायमर होते. त्यावर ७:२९ अशी वेळ होती. त्याला लागूनच बॅटरीही होती. त्यामध्ये विविध रसायनांचे मिश्रण, तसेच आगडबीतील काड्यांवरील गुलाचा वापर केल्याचे दिसून आले.

 

घरातील मुलाचा साखरपुडा...

 

ज्ञानेश्वर कारमोरे यांचा मुलगा नवोदय विद्यालय अमरावती येथे प्राध्यापक आहे. त्याचा साखरपुडा एका मुलीशी झाला.त्यामुळे या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे पोलिस सांगतात, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांनी साखरपुडा झालेल्या मुलासह त्याच्या कुटुंबाची चौकशी करून माहिती घेतली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

सरकारी पैशांसाठी मेहुणीसोबत भाऊजींनी घेतले ७ फेरे अन्...


 

उत्तर प्रदेशच्या बालियामध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत मोठा घोटाळा झालेला असताना झाशीमध्येही असाच नवा घोटाळा समोर आला आहे.

 

येथे विवाह सोहळ्यात पैसे मिळवण्यासाठी भाऊजीसोबतच लग्न लावून देण्यात आले. लग्नात सप्तपदी सुरू असतानाच वधूने सिंदूर पुसला असता हा प्रकार समोर आला.

 

विवाह सोहळ्यात एक जोडपे संशयास्पद वागत होते. त्यांची चौकशी केली असता झाशीच्या बामोर येथील रहिवासी असलेल्या खुशीचे लग्न मध्य प्रदेश छतरपूरच्या ब्रिषभानसोबत निश्चित झाले होते. वधूचा भाऊजी आणि कथित वराने सांगितले की, तो अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून वरांच्या रांगेत बसला

 

मी ब्रिषभान नसून, माझे नाव दिनेश आहे. माझे आधीच लग्न झाले असून, खुशीचा मी भाऊजी असल्याचे त्याने सांगितले. सरकारने दिलेला पैसा हडप करण्यासाठी हा सगळा खेळ केल्याचे त्याने सांगितले.

 

समाजकल्याण अधिकारी ललिता यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासात दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

शेतात मचानी समोरच वाघाने फोडली डरकाळी


शेतकरी भयभीत : शेतकऱ्यांपुढे वाघाचे संकट

 बल्लारपूर (ता.प्र.). रब्बी हंगाम सुरू असून, आता अनेक पिके मळणीस तयार झाली आहेत. हाता-तोंडांशी आलेला घास हिंस्र प्राण्यांमुळे हिरावणार म्हणून पळसगाव येथील पंढरी उपरे हे शेतकरी तूर पिकासाठी नियमितप्रमाणे जागली करायला गेले. पण, मचानीपर्यंत जाताच अचानक वाघाने डरकाळी फोडली. आपला बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने मचानीचाच आधार घेतला.

 

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील संपूर्ण शेतकरी हे रोज हरभरा, तूर, मूग, ज्वारी, गहू आदी पिकांचे रक्षण करण्याकरिता जागल करतात. जेणेकरून शेतातील पीक सुखरूप घरी यावे, रानटी डुकरांमुळे पीक उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी जागली केली जाते. पंढरी उपरे यांचे शेत पळसगाव येथील शेतशिवारात असून, त्यात तूर पिकाची लागवड केली आहे. त्यासाठी रोज शेतात मचानीवरच जागल करतात. परंतु, रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास पंढरी उपरे शेतात जागलीसाठी गेले असता त्यांना वाघाच्याडरकाळीचा आवाज आला. त्यांनी अचानक वाघाचा आवाज ऐकून मचानीवर धाव घेतली. मचानीवर बसल्यावर वाघ हा अगदी 50 फुटावरच समोर येऊन बसला. त्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांना फोन करून बोलावले. वाघ मचानीसमोरून निघून जाईपर्यंत तिथेच बसले. थोड्या वेळातच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. संपूर्ण शेत आरडाओरड करत एकमेकांच्या साहाय्याने पालथे घातले.

 

 

बल्हारशाह, कोठारी वन अधिकारी मोक्यावर वाघ 

पळसगावातील शेतकऱ्यांच्यामचानीजवळ आल्याची घटना माहिती होताच, बल्लारशाह आणि कोठारी वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी बी.टी. पुरी व एस. ननावरे हे तत्काळ शेतशिवारात पोहोचले. संपूर्ण परिसरात गस्त घालून रात्री 2 वाजतापर्यंत शेतशिवारातच उपस्थित होते. त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा देखील लावण्यात आला आहे. वन विभागाने समस्त शेतकऱ्यांना सतर्कराहण्याच्या सूचना केल्या आहेत, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

...अन् वाहकाला प्रवाशांच्या सीटवर ठेवावे लागले पाय


सिरोंचा : पंतप्रधानांच्या यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त अहेरीआगारातून तब्बल १० बसेस पाठविण्यात आल्याने अहेरी आगारात बसेसेचा तुटवडा निर्माण झाला. सिरोंचासाठी तब्बल पाच तासांनी बस सोडण्यात आली. त्यामुळे बसमध्ये गर्दी एवढी झाली की, बसच्या मागच्या बाजुला गेलेल्या बस वाहकाला त्याच्या सीटकडे येण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सीटवर पाय ठेवत वाहकाने आपली सीट गाठली, त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

अहेरी ते सिरोंचा १०७ किलोमीटरच्या या मार्गावर मागील काही वर्षांपासून जीवघेणा प्रवास सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे अन् एसटी महामंडळात असलेल्या बसची कमतरता यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी ८:०० वाजेपासून सिरोंचासाठी एकही बस नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना पाच तास ताटकळत राहावे लागले. अखेर दुपारी १:०० वाजताच्या सुमारास अहेरी आगारातून सिरोंचासाठी आलापल्ली येथे बस लागली. मात्र, ती बस अगोदरच फुल्ल भरून आल्याने येथील प्रवाशांना नाइलाजास्तव भरगच्च भरलेल्या बसमधून उभ्यानेच प्रवास करावा लागला. बस अगोदरच भरली होती. त्यातच नवीन प्रवाशांना बसवणे आवश्यक होते. उभे असलेले प्रवाशी बसच्या मागच्या बाजूस सरकत नसल्याने नवीन प्रवाशांना जागा होत नव्हती. त्यामुळे वाहकाने प्रवाशांना मागे सरकवले. त्यानंतर वाहकाला आपल्या सीटवर येण्यास जागाच राहिली नाही. परिणामी त्याने प्रवाशांच्या सीटवर पाय ठेवत आपली सीट गाठली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 1, 2024

PostImage

सभा मोदींची, खुर्च्छा मात्र राहुल गांधींच्या फोटोच्या


यवतमाळ : मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी जाहीर शहरालगत भारी येथे सभा पार पडली या सभेसाठी अत्यंत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मागील दोन आठवड्यापासून प्रशासनाची खुप धावपळ सुरू होती. मात्र बुधवारी सकाळी या सभेच्या सुरुवातीलाच उपस्थितांसाठी लावण्यात आलेल्या खुर्त्यांवर राहुल गांधी यांचे स्टीकर लावण्यात आलेले होते. या गोष्टींमुळे विविध चर्चानां उधाण आले होते मात्र ही गोष्ट लक्षात येताच या खुर्थ्यांवरील स्टीकर्स काढण्यात आले. सभास्थळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे स्टीकर खुर्चीवर असल्याने नेमकी आज सभा कुणाची असा

सवाल उपस्थित केला गेला घडलेल्या या घटनेमुळे चर्चेला एकच उधाण आले आहे होते. आमचा लढा १३८ वर्षांचा असं या खुर्य्यावर लिहिण्यात आले होते. खासदार राहुल यांची नागपूर येथे सभा झाली. त्याचं ठिकाणीहून यवतमाळ मध्ये या खुर्ध्या पुरविण्यात आल्या होत्या आणि त्यावरील पोस्टर न काढता नजरचूकीने या खुर्ध्या पाठवण्यात आल्या होत्या.

 

 

पण या घटनेमुळे मात्र चर्चेचे पेव फुटले होते मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथे नुकताच काँग्रेसची सभा झाली. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधींचे फोटो खुर्त्यांवर चिकटवले होते. मात्र, ज्यांनी या खुर्च्छा काँग्रेसच्या मेळाव्याला पुरवल्या, त्याच खुर्च्य भाजपच्या कार्यक्रमाला पाठवल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलबंडीचा दारु तस्करीकरीता वापर


गडचिरोली:- अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी मात्र सतर्क पोलिसांनी दाखविला आपला इ़गा व बैलगाडी सह अवैध दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलबंडीांचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन  आले आहे  दिनांक 27/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले.  

या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणा­ऱ्या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणा­ऱ्या तीन बैलबंडी व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलबंडी मध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.  सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने 50 बॉक्समधील 2,52,000/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाडी व ईतर साहित्य 1,70,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 4,22,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलीस स्टेशन बामणी येथे आरोपी नामे संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे 
सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

आक्षेपार्ह हावभावामुळे रोनाल्डो अडचणीत


 

 

रियाध, वृत्तसंस्था. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी प्रो लीगमध्ये प्रेक्षकांना आक्षेपार्ह हावभाव केल्याचा आरोपामुळे अडचणीत सापडला आहे. अहवालानुसार त्याच्या वर्तनाची चौकशी केली जात आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत रोनाल्डोने आपले कान धरलेले आणि वारंवार हात त्याच्या श्रोणीजवळ फिरवताना दिसत आहे. असे आक्षेपार्ह हावभाव करून रोनाल्डो आपल्या संघ अल नासरचा प्रतिस्पर्धी संघ अल शबाबच्या समर्थकांना चिडवत असल्याचे दिसते. रविवारच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली ज्यात अल नासरने अल शबाबचा 3-2 असा पराभव केला. व्हिडिओत प्रेक्षकांना 'मेस्सी eep

मेस्सी' म्हणताना ऐकू येत आहे. अर्जेटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी हा अनेक दिवसांपासून पोर्तुगीज खेळाडू रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी आहे. ही घटना टेलिव्हिजन कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी 39 वर्षीय रोनाल्डोवर जोरदार टीका होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशन या घटनेची चौकशी करत आहे. रोनाल्डोवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. अल नासरचा पुढील सामना गुरुवारी होणार आहे. रोनाल्डो डिसेंबर 2022 मध्ये या सौदी अरेबियाच्या क्लबमध्ये सामील झाला. त्याने आतापर्यंत लीगमध्ये सर्वाधिक 22 गोल केले आहेत. यामध्ये अल शबाबविरुद्ध पहिल्या हाफमध्ये पेनल्टीवर केलेल्या गोलचाही समावेश आहे 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

पगारात वाढ अन् बोनसही मिळणार ,कसोटीपटू होणार मालामाल


 

दिल्ली,. भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली आहे. कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट न खेळता काही खेळाडूंचा आयपीएलवर जास्त फोकस असतो. भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर वारंवार हा आरोप केला जातो. आता कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सुत्रानुसार, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याबाबात बीसीसीआय विचार करत आहे. त्याशिवाय कसोटी मालिकेचा भाग असणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. सुत्रानुसार, अनेक खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे बीसीसीआय हा निर्णय घेणार आहे. नुकताच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वादंग निर्माण झाला. याची क्रीडा वर्तुळात चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन याला बीसीसीआयने स्पष्ट शब्दात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना दिली होती. तरीही ईशान किशनने झारखंडकडून एकही सामना खेळला नाही. दुसरीकडे श्रेयसअय्यरनेही रणजी चषकातील क्वार्टर फायनल सामन्यातून माघार घेतली.

 

 

मिळतात 15 लाख रुपये बीसीसीकडून

 

एका कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना 15 लाख रुपये दिले जातात. 2016 मध्ये कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार दुप्पट केला होता. दुसरीकडे बीसीसीआयकडून एका वनडे सामन्यासाठी सहा लाख रुपये दिले जातात. तर एका टी 20 सामन्यासाठी 3 लाख रुपयांचे मानधन दिले जाते. भारतीय खेळाडूंना ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो. खेळाडूंचा बीसीसीआय बोर्डासोबत करार असतो. सुत्रानुसार, आयपीएल 2024 नंतर भारतीय खेळाडूंच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

दुचाकी धडकली; पती जागीच ठार, पत्नी जखमी


वरोरा : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने मागून जबर धडक दिल्याने पती जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दि. २५ रात्री ९:३० वाजेच्या सुमारास नागपूर चंद्रपूर मार्गावरील चिनोरा येथे घडली. सुनील नारायण हरिहर (५५, रा. वरोरा) असे मृत पतीचे नाव आहे. पत्नी सविता सुनील हरिहर (४८) हिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

वरोरा येथील दत्त मंदिर वार्डातील रहिवासी सुनील हरिहर व सविता हे दाम्पत्य एम. एच. ३४ डब्ल्यू ८९०४ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाट येथून वरोराकडे येत होते. दरम्यान, चिनोरा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम. एच. ३३ एफ ३३८४ क्रमांकाचे ट्रॅक्टर उभा होता.

 

अंधारामुळे या दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात पती सुनीलचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सविता गंभीर जखमी झाला. जखमीवर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावाला लागूनच काही शेतकरी बैल- बंडी, व ट्रॅक्टर उभे ठेवतात. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या सुमारास अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

व्हिडीओ बघून अल्पवयीनांनी ठेवले संबंध; मुलगी गरोदर


 

यवतमाळ : एका घरात राहणाऱ्या समवयस्कर अल्पवयीन मुला- मुलीने व्हिडीओ पाहून संबंध ठेवले. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. कुटुंबातील कोणालाच साधा संशय आला नाही. मात्र, अचानक मुलीचे पोट दुखू लागले. सोनोग्राफी केली तेव्हा धक्कादायक प्रकार पुढे आला. मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हे रिपोर्ट पाहून संपूर्ण कुटुंबच हादरून गेले. 

 

शिक्षणासाठी आत्याकडेच मामे भाऊ राहत होता. त्याच्यासोबतच आत्याची मुलगी नेहमी खेळत बागडत असे. दररोज शाळेत जाणे घरी आल्यानंतर अभ्यास करणे, असा नित्यक्रम सुरू होता. अचानक मुलीला उलट्या-मळमळ होऊ लागली. हा त्रास वाढत गेल्याने अखेर सोनोग्राफी केली असता मुलगी गरोदर असल्याचे पुढे आले. मुलीला आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या तक्रारीवरून अल्पवयीन मामे भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

शेकोटीवर गेला तोल, वृद्धाचा मृत्यू


 

धानोरा : पाय अडखळल्याने तोल जाऊन पेटत्या शेकोटीवर पडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना धानोरा तालुक्याच्या जपतलाई येथे २७ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.

 

रावजी कोदू करंगामी (९५) रा. जपतलाई असे मृत वृद्धाचे नाव आहे. रावजी हे निपुत्रिक होते. ते आपल्या पुतण्याच्या घरी राहत होते. थंडीचे दिवस असल्याने ते घराबाहेरच्या अंगणात शेकोटीजवळ झोपत होते. २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ते लघवी करण्यासाठी झोपेतून जागे झाले. अंगणात जात असताना त्यांचा पाय अडखळला. यातच त्यांचा तोल गेला व ते शेकोटीवर पडले. त्याच क्षणी त्यांच्या अंगावरील चादराने पेट घेतला. ते आगीत होरपळू लागले. कुटुंबियांनी वेळीच धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले; परंतु तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

अंगावर वाघिणीची झेप, दांडक्याने वाचला जीव


शंकरपूर : गतवर्षी वन्यप्राणी गणना करत असताना ताडोबा क्षेत्रात एका महिला वनरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. सुदैवाने समयसूचकता दाखविल्याने या घटनेची पुनरावृत्ती टळली. अंगावर धावून आलेल्या वाघिणीला हातातील दंडुका दाखवून आरडाओरडा करून वनरक्षकाने स्वतःचा व सोबतच्या वनजुराचा जीव वाचविल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (दि. २६) उघडकीस आली.

 

महाराष्ट्रात वन विभागाकडून २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ट्रांसिक लाइनवर वन्यप्राण्याचे गणना सुरू आहे. ही गणना सुरू असताना रविवार, दि. २५ चिमूर वनपरिक्षेत्राअंतर्गत डोमा बीटाचे वनरक्षक विशाल सोनोने आणि वनमजूर जग्गू लांजेवार हे कक्ष क्रमांक ४०० मध्ये ट्रांजिक लाइनवर वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठी फिरत होते. ही ट्रांजेक्शन लाइन दोन किलोमीटर आहे. हे काम जवळपास पूर्ण होत असताना अचानकपणे वाघिणीचा एक बछडा या ट्रांजेक्शन लाइनवर दिसून आला. त्यामुळे हे दोघे जागेवरच थबकले. दरम्यान, नाल्यातबसून असलेल्या वाघिणीने अचानक वायुवेगाने धाव घेतली. सुमारे दहा फुटावर ती वाघीण असतानाच वनरक्षक विशाल सोनोने यांनी समयसूचकता दाखवत हातातील काठी फिरवून जोराने ओरडाओरडा केली. त्यामुळे ही वाघीण तिथून निघून गेल्याने मोठी दुर्घटना टळली.

 

ट्रांजेक्शन लाइनवर

वाघिणीचा एक बछड़ा दिसून आला. त्यामुळे आम्ही जागेवरच थांबलो; परंतु अचानकपणे दुसऱ्या मागनि वाघीण धावत आमच्याकडे आली. दोघांच्याही हातात दंडुका होता. तो वेगाने फिरवून जोराने ओरडलो, त्यामुळे वाघिणीने जंगलात धूम ठोकली -विशाल सोनुने, वन रक्षक डोमा वनक्षेत्र

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

आज पी. एम. किसान सन्मान निधीचे पंतप्रधानांच्याहस्ते होणार वितरण , शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ६ हजार रूपये


 

गडचिरोली : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत २००० रूपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून ४००० असा एकुण ६००० रूपयांचा लाभ २८ फेब्रुवारी, २०२४ च्या समारंभात गडचिरोली जिल्ह्यासत राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

पाईप वाहुन नेणाऱ्या ट्रकची झाडाला धडक


चालक जखमी कोरची- भिमपूर मार्गावरील

कोरची - बंगलोर येथुन पाईप वाहुन नेणाऱ्या ट्रकने झाडाला धडक दिल्याने चालक जखमी झाल्याची घटना आज २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कोरची पासुन १ कि.मी अंतरावर वनश्री कला महाविद्यालय समोर घडली.

 

सी.जी.०४ एम.जी. ६७२३ क्रमांकाचा ट्रक बंगलोर वरून पाईप घेऊन रायपुरला जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने विद्युत खांबास धडक देऊन १०० मी अंतरावर असलेल्या झाडाला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा पुर्णतः चेंदामेंदा झाला. विद्युत खांब खाली कोसळल्याने विद्युत लाईन खंडित झाली. ट्रक चालक जसंवत पटेल रा. सेवरागांव ता. जबलपुर हा ट्रक मध्ये फसला होता. त्यांना आवागमन करणाऱ्या लोकांनी बाहेर काढून कोरची ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती केले. त्याच्या डाव्या हाताला व पायाला जबर मार लागला आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले


 एएचटीयूने मध्यप्रदेशातून केली आरोपींना अटक

 

नागपूर : शहरातील निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामावर आलेल्या दोन तरुणांनी मित्राच्या दोन्ही बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरी कुणी नसताना दोघींनाही मध्यप्रदेशात पळवून नेले. 

 

लग्न करून संसार थाटण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे शाखेने चौघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देवा चेतराम गोस्वामी (२४) आणि राजू बल्लू गोस्वामी (२०) अशी आरोपींची नावे आहेत.

 

पीडित १७ आणि १९ वर्षीय तरुणी एकमेकींच्या चुलत बहिणी आहेत. त्यांचा भाऊ नागपुरातील निर्माणाधीन इमारतीवर मजुरी करतो. महिन्याभरापूर्वी दोघीही बहिणी भावाकडे राहायला आल्या होत्या.

भावाच्या सोबत बांधकामावर काम करणारे भावाचे मित्र राजू आणि देवा हे घरी येत होते. यादरम्यान दोन्ही बहिणीवर त्यांची नजर गेली. दोघांनीही त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे ठरविले. त्यामुळे मित्र घरी नसतानाही राजू आणि देवा घरी येऊन त्या तरुणींशी गप्पा करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते. महिन्याभरात दोन्ही बहिणी देवा आणि राजूच्या प्रेमात आकंठ बुडाल्या. चौघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. २१ फेब्रुवारीला मध्यप्रदेश-शिवनीमध्ये पळून जाऊन लग्न करण्याचे ठरले. नियोजनाप्रमाणे दोघीही बहिणी औषधी आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या. त्यांना पळून जाण्यासाठी मोहन चेतराम गोस्वामी (२०), मोंन्टी बल्लू गोस्वामी (२०) या दोघांनी मदत केली. दोन्हीं मुलींना राजू आणि देवाने पळवून शिवनी शहरात नेले. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024

PostImage

पोलिसांशी चकमकीत 3 नक्षली ठार


 

रायपूर, . छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत तीन नक्षली ठार झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी चकमक स्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलिस आणि डीआरजीच्या पथकाने शोधमोहीम चालवली होती. कोयलीबेडाच्या दक्षिण भागामध्ये ही चकमक झाली. याच जंगलांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. कांकेरचे एसपी आय.के. एलेसेला यांनी

 

या चकमकीच्या घटनेला दुजोरा दिला. आहे. जिल्हा राखीव गार्ड आणि सीमा सुरक्षा नक्षलविरोधी दलाच्या नेतृत्वाखाली मोहिमेदरम्यान कोयालीबेडा येथील जंगल परिसरात ही चकमक झाली. अंतागढमधील हुरतरईच्या जंगलात दोन तास ही चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांना तीन नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. ही कारवाई बीएसएफ आणि जिल्हा पोलिस पथकाने केली. दरम्यान, तीनही नक्षल्यांची ओळख पटली नव्हती.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 27, 2024

PostImage

धान विका किंवा नका विकू फक्त ऑनलाईन केला तरी धानाचा बोनस मिळणार


 

Gadchiroli: शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस देण्याचे परीपत्रक आज २६ फेब्रुवारी रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने काढण्यात आले आहे. या परीपत्रकानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ईपीक पाहणीद्वारे-खातर जमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील. शेतकऱ्यांना धान विक्री केली असो वा नसो धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी २० हजार प्रमाणे प्रोत्साहनपर राशी केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातूनच वाटप करण्यात यावी.

 

धान उत्पादक शेतकरी हा मार्कटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरु केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रांवर नोंदणीकृत असला पाहीजे. प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही. शेतकऱ्याने सादर केलेला ७/१२ चा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमीनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी. यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा. एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थाकडे नोंदणीकृत असल्यास, त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्यास प्रोत्साहनपर राशी देय राहील असेही परीपत्रकात नमुद केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 26, 2024

PostImage

यावर्षी मिळणार दुप्पट तेंदूपत्ता बोनस


२४ युनिटची विक्री : ७ कोटी १२ लाख रुपयांची वन विभागाला मिळणार रॉयल्टी

गडचिरोली : तेंदूपत्ता विक्रीतून प्राप्त होणारी संपूर्ण रॉयल्टीची रक्कम मजुरांना बोनसच्या स्वरूपात वनविभागामार्फत वितरित केली जाते. २४ तेंदूपत्ता युनिटचा लिलाव नुकताच पार पडला आहे. त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट रॉयल्टी मिळणार आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याचे संकलन करणाऱ्या मजुरांनाही यावर्षी दुप्पट रक्कम मिळेल.

 

पूर्वी जिल्हाभरातील तेंदूपत्ता वनविभागामार्फत संकलित केला जात होता. मात्र पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. जे जंगल पेसा अंतर्गत येत नाही. केवळ वैथालाच तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार वनविभागाला आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाचे आता २५ युनिट आहेत. त्यापैकी २१ युनिटचा लिलाव १४ फेब्रुवारी रोजी झाला, तर तीन युनिटचा लिलाव २१ फेब्रुवारीला झाला. या सर्व युनिटच्या विक्रीतून वनविभागाकडे सुमारे ७ कोटी १२ लाख रुपयांची रॉयल्टी जमा होणार आहे. मागील वर्षी या २४ युनिटच्या विक्रीतून केवळ ४ कोटी रुपयांची रॉयल्टी मिळाली होता. यावर्षी रॉयल्टी दुप्पट झाल्याने बोनसही दुप्पट मिळणार आहे. पेसा अंतर्गतही तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. मात्र, ग्रामसभांची अनेक कंत्राटदारांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे मजूर आता वन विभागाच्या मार्फत तेंदूपत्ता संकलनाकडे वळत आहेत.

 

३६ हजार ९०० बॅगचे उद्दिष्ट

विक्री झालेल्या २४ युनिटमधून ३६ हजार ९०० स्टैंडर्ड बैंग तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा वनविभागाचा अंदाज असतो. त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कमीअधिक संकलन होऊ शकते.

 

मजुरी ३ हजार ९०० रुपये

प्रती स्टैंडर्ड बॅग (एक हजार तेंदूपत्त्यासाठी) किमान ३ हजार ९०० रुपये मजुरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटदार यापेक्षा अधिक मजुरी देऊ शकते. मात्र त्यापेक्षा कमी मजुरी देऊ शकत नाही, अन्यथा संबधित कंत्राटदारावर कारवाई केली जाते.

जानेवारीत होणार बोनसचे वितरण

रॉयल्टीची रक्कम कंत्राटदार सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करतात. त्यानंतर लगेच वनविभाग बोनसची रक्कम वितरण करण्यास सुरुवात करते. जवळपास डिसेंबर महिन्यापासून बोनसचे वितरण होईल.

 

वाघाच्या भीतीने एक युनिट विक्री लांबली

वडसा युनिटमध्ये वाघ व हत्तींची दहशत आहे. परिणामी या युनिटची  मागील वर्षी विकी  झाली नव्हती. यावर्षीही अजूनपर्यंत विक्री झाली नाही. आता २८ फेब्रुवारी रोजी लिलाव ठेवला आहे.

 

या दिवशी तरी हा युनिट विकला जाणार की नाही, २ याकडे वनविभागाचे लक्ष लागले आहे. वाघाच्यादहशतीमुळे या जंगलातून तेंदूपत्ता संकलन करण्यास मजूर तयार होत नाही. त्यामुळे कंत्राटदार सदर युनिट खरेदी करीत नाही.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 26, 2024

PostImage

मासेमारी करताना नाव उलटून युवक ठार


 

 

 

 

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून पाच किमी अंतरावरील कोटगल बॅरेजमध्ये मासेमारी करताना नाव उलटल्याने युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

 

विनोद बाबुराव भोयर (३६) रा. कोटगल असे मृतक युवकाचे नाव आहे. नावेच्या मदतीने विनोद हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत कोटगल बॅरेजच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी रात्री ३ वाजता गेला होता. दरम्यान सकाळी ९ वाजता अचानक नाव उलटली.

 

विनोदच्या सहकाऱ्याला पोहता येत असल्याने तो पोहत बाहेर पडला. मात्र विनोदला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. ही माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विनोदचा शोध सुरू केला.

 

दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. विनोदचा अचानक मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 25, 2024

PostImage

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी गजाआड


 

ब्रम्हपुरी : तालुक्यातील लाडज येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला ब्रम्हपुरी पोोलिसांनी राजस्थान मधून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. जितेश रामबाबू जागा रा. जयपूर. राजस्थान असे आरोपीचे नाव आहे. लाडज येथील एका अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून कुटूबियांना न सागता पळवून नेल्याची तक्रार कुटूबियांनी ब्रम्हपुरी पोलिसात दाखल केली होती. 

 

त्यावरून ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनेचे गांर्भीय लक्षात घेता आरोपीला त्वरीत शोध लावून मुलीला तिच्या कुटूबियांच्या स्वाधीन करून आरोपीवर गुन्हा दाखल केला.

 

सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी दिनकरठोसरे, पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात पो उपनि निशांत जुनोनकर, सोबत पोलिस हवालदार योगेश, पोलिस शिपाई संदेश, पिएन विजय, मुकेश, प्रमोद, शिल्पा यांच्या पथकाने केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 25, 2024

PostImage

रेतीमाफियांची तलाठ्याला धक्काबुक्की


डुग्गीपार पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल

 

 गोंदिया, ब्युरो.आमगाव तालुक्यात नायब तहसीलदार आणि वन कर्मचाऱ्याला रेती माफियांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता सडक अर्जुनी तालुक्यात बुधवारी रेतीमाफियांनी तलाठ्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली.

 

सडक अर्जुनी तालुक्यातील तलाठी किशोर ऋषी सांगोडे (वय 51) हे बुधवारी घाटबोरी तेली परिसरात गस्तीवर होते. दरम्यान एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये चुलबंद नदीपात्रातून रेती भरून जात असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून जप्तीचा पंचनामा करीत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. दरम्यान आरोपी किशोर दामोधर शिवणकर (वय 36, रा. परसोडी) याने रस्त्यातच हायड्रोलिकने ट्रॉली वर उचलून रेती रिकामी केली. 

 

त्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करून तलाठ्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून पसार झाला. काही वेळाने ट्रॅक्टर मालक टिकेश अशोक फुंडे हा दुचाकीने आला आणि पेचकसने ट्रॅक्टर चालू करीत असताना तलाठ्याने ट्रॅक्टर नेऊ नको, असे म्हटले. त्यावर आरोपी टिकेशने तलाठी किशोर सांगोडे यांना तुम्ही मधात याचचे नाही, नाही तर माझ्या हाताने काहीही होऊन जाईल, असे म्हणत ठार मारण्याची धमकी देत ट्रॅक्टरसह निघून गेला. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश सरोटे करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 25, 2024

PostImage

मद्यधुंद महिला पोलिसाचा धुमाकूळ


गाडीच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी

वर्धा, . लोकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये यासाठी जनजागरण करणारे पोलिसच दारू पिऊन तसे करत असतील तर काय म्हणावे? दारूबंदी असलेल्या वर्धेत एका मद्यधुंद महिला पोलिस शिपायाने हैदोस घातला आहे. खासगी कार चालवीत जाणाऱ्या महिला पोलिस शिपायाने एका दुचाकीस्वारास उडविले. त्यात ऋतिक कडू व पवन आदमने हे दोघे जखमी झाले. त्यांना त्याच अवस्थेत सोडून देण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री उशिरा याबाबत रामनगर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी, या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

 

कडू व आदमने हे आपल्या दुचाकीने आर्वी नाक्याकडे निघाले होते. त्याच वेळी मागून येणाऱ्या कारने त्यांनाधडक दिली. दोघेही जखमी झाले. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तिथे धाव घेतली. तेव्हा स्टेअरिंग सीटवर महिला पोलिस दिसून आली.

 

सोबतचा पुरुष पोलिसही नशेत

लोकांनी हटकले तेव्हा महिला पोलिस नशेत असल्याचे आढळले. सोबतच कारच्या मागच्या सीटवर एक पोलिस अंमलदार नशेत निपचित पडून होता. दोघांना नागरिकांनी जाब विचारणे सुरू केले तेव्हा या दोघांनी पोलिसी तोऱ्यात रुबाब झाडत व हुज्जत घालत तेथून पळ काढला.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 21, 2024

PostImage

ब्रम्हपुरी: सुरबोडी येथील इसमाने रेल्वे रुळावर केली आत्महत्या


ब्रम्हपुरी: सुरबोडी येथील भोजराज मेश्राम (वय अंदाजे ५५) यांनी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास गावाजवळील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. पोलिसांनी तात्काळ घटनेवर नियंत्रण मिळवून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

या अपघातामुळे सुराबोडी मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भोजराज मेश्राम यांच्या निधनाने समाजात शोककळा पसरली आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये दुःख आहे. भोजराजचे कुटुंबीयही या दु:खाच्या गर्तेत बुडाले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे, ज्यामुळे त्यांना खूप दुःख होत आहे. भोजराजच्या मृत्यूने गावाला मोठा धक्का बसला असून सर्वांचे मनोधैर्य खचले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 18, 2024

PostImage

लाचेत शेतकऱ्याकडून मागितले २० किलो तांदूळ, महावितरणच्या वीज तंत्रज्ञाला अटक


चंद्रपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १६) दोन लाचखोरांना दोन वेगवेगळ्या कारवायांत अटक केली. आश्चर्य म्हणजे, एका लाच प्रकरणात वीज कंपनीच्या तंत्रज्ञाने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्याकडून चक्क २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. शालेंद्र देवराव चांदेकर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. लाचखोर हा महावितरण राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत होता.

 

राजुरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने कृषिपंपासाठी थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र चांदेकर याच्याकडे केली. त्यासाठी रीतसर कागदपत्रेही जमा केली. मात्र, वीजपुरवठा हवा असेल तर २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये असे एकूण ७ हजार ५०० रुपये द्या, असा तगादा लावला होता. अखेर ५ हजार रुपये देण्याबाबत तडतोड झाली. पण, पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर पथकाकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी वीज कार्यालय परिसरात ५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शालेंद्र चांदेकर याला रंगेहाथ अटक केली. आरोपीविरुद्धबल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभूळकर, रोशन चांदेकर, मेघा मोहूले, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे आदींनी केली.

 

झिलबोडीचा लाचखोर ग्रामसेवकही जाळ्यात

बांधकामाची देयके मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून १० हजारांची लाच मागताना शुक्रवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील ग्रामसेवक जाळ्यात अडकला. पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्णे (४८) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कंत्राटदाराने जि. प.अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून २०२१ ते २०२२ दरम्यान जि. प. शाळेचे शौचालय, मुतारी, अंगणवाडी, किचन शेडचे बांधकाम केले होते. या कामाचे ३ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक पुरुषोत्तम टेंभुर्णे याने १५ हजारांची लाच मागितली. अखेर १० हजार रुपयांवर तडजोड झाली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाल्याने ग्रामसेवक टेंभुर्णे याला अटक करण्यात आली.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 18, 2024

PostImage

शंभरचा बाँड, घेतात ११० ते १२० रुपये!


 

सिंदेवाहीतील नागरिकांचा आरोप 

सिंदेवाही : शासकीय कामासाठी आवश्यक असलेल्या मुद्रांकासाठी अतिरिक्त शुल्क वसूल केला जात असून, १०० रुपयांच्या मुद्रांकाला ११० ते १२० रुपये मोजावे लागत आहे, असा आरोप नागरिकांना केला आहे.

 

शासकीय, न्यायालयीन कामकाज व बँकेकडून कर्ज व जमीन व्यवहाराशी संबंधित कामांसाठी ग्रामीण भागातून दररोज शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येतात. मुद्रांक घेण्यासाठी कार्यालयात रांग लागते. त्यामुळे कृत्रिम तुटवडा भासवून चढ्या दरात विक्री केली जाते.

 

मुद्रांक मिळविण्यासाठी एजंटही सक्रिय झाल्याची चर्चा आहे. कोर्ट फी, स्टॅम्प मुद्रांकासाठी जादा रक्कम घेऊन गरीब नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याची ओरड आहे. यापूर्वीही असे प्रकार तहसील कार्यालयाच्या परिसरात घडले. पण, यावर थातूमातूर कारवाई झाली होती. आता पुन्हा मुद्रांकासाठी अतिरिक्त शुल्क घेण्याचा प्रकार वाढला, असा आरोप नागरिक करीत आहेत.

 

 

मुद्रांकाचे अतिरिक्त शुल्क आकारणे चुकीचे आहे. तहसील कार्यालयात परिसरात असा प्रकार घडत असल्यास तक्रारीनुसार चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, मुद्रांक विक्रेत्यांनी शासकीय शुल्कापेक्षा जादा रक्कम घेऊ नये. -कृष्णा राऊत, दुय्यम निबंधक अधिकारी, सिंदेवाही

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 17, 2024

PostImage

इकडच्या मुली भाव खातात म्हणून त्याने केली ऑस्ट्रिया देशातील युवतीशी प्रेमविवाह


चंद्रपूर : सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील उच्चशिक्षित युवकाचा युरोपातील ऑस्ट्रिया देशातील युवतीशी प्रेमविवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. युवतीला थेट गावात आणून बैलबंडीतून वरात काढत अतिशय साध्या पद्धतीने विवाह केला. या अनोख्या प्रेमविवाह सोहळ्याची जिल्ह्यातभरात होत असून चित्रफिती समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्याला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट सहभागी झाले होते.

 

आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सुकरू पाटील आभारे यांचा एकुलता एक मुलगा हेमंत उच्च शिक्षित असून विदेशातील एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याचे ऑस्ट्रिया देशातील युडीश हरमायनी प्रित्झ, रा. बियेना ऑस्ट्रिया या युवतीशी प्रेमसंबंध जुळून आले. दरम्यान, दोघांनीही लग्न करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी थेट आपले गाव गाठले. आईवडिलांच्या परवानगीनंतर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. मात्र, गावात समारंभ युक्त सभागृह नसल्याने थेट स्वतःच्या शेतातच लग्न करण्याचे ठरले. कोणताही मंडप किंवा बडेजावपणा न करता शेतातील एका झाडाखाली लग्नविधी सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडण्यात आला. आधुनिक युगात नावीन्यपूर्ण आणि दिखाऊपणाचा बाज न आणता जुन्या पद्धतीच्या बैलबंडीने वाजतगाजत वरात काढण्यात आली होती. या समारंभाला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट उपस्थित होते.

 

 

बैलबंडीने निघालेल्या वरातीत विदेशातून दाखल झालेल्या पाहुण्यांनी डिजे, बॅन्डच्या तालावर नृत्यृ, डान्स केला. चंद्रपूरच्या सावलीतील युवकांने थेट युरोपातील आस्ट्रिया येथील विवाह केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून या विवाह सोहळ्याच्या चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली आहे. जागतिक प्रेमदिनाच्या दोन दिवस पूर्वीच हा विवाह सोहळा अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. लग्नपत्रिकेपासून तर मंगलाष्टके, हळद, संगीत व विवाह समारंभातील सर्व आवश्यक कार्यक्रम भारतीय पध्दतीने येथे पार पडले. विदेशी पाहुणे भारतीय पध्दतीने साजरे होणारे लग्न बघून आनंदीत झाले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 17, 2024

PostImage

नाटक बघायला गेला अन्.... झाला


 

देसाईगंज : मुलगा दहा वर्षांचाअसताना पतीचे निधन झाले. मात्र, माउलीने एकटीने संसार सावरला. मोठ्या कष्टाने एकुलत्या एक मुलाला लहानाचे मोठे केले. राबराब राबून रापलेल्या या मायमाउलीसाठी लेकच आयुष्याच्या सायंकाळी आधाराची काठी होता, पण नियतीने ही काठी हिरावून घेतली. कुरुड येथील प्रतीक विजय घोडेस्वार (३०) हा तरुण नाटक पाहण्यासाठी म्हणून घरातून गेला व सकाळी स्वतःच्याच घराच्या दारात

 

रक्ताच्या थारोळ्यात आढळला. उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. या रहस्यमय घटनेने तालुका हादरून गेला आहे. प्रतीक हा मजुरीकाम करायचा. कुरुड येथे ८ फेब्रुवारी रोजी रात्री यात्रोत्सवानिमित्त गावात नाटक आले होते.

 

 ते पाहण्यासाठी तो आई मंदाबाई (५०) यांना सांगून सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडला. पहाटे तीन वाजेपर्यंत शामियानात तो नाटकाचा आनंद घेत असल्याने काही जणांनी पाहिले होते. मात्र, नंतर तो गायब झाला व सकाळी साडेसहा वाजता स्वतःच्या घरासमोर दारात रक्ताच्या थारोळ्यात गंभीररीत्या जखमी स्थितीत आढळला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 17, 2024

PostImage

शंकरनगर परिसरात जंगली हत्तींनी पुन्हा घातला धुमाकूळ


तत्काळ नुकसानभरपाईची मागणी

 

मक्यासह कारले पीक उद्ध्वस्त

 

 

 

 देसाईगंज, (ता. प्र.). मागील दोन महिन्यांपासून जंगली हत्तींनी तालुक्यात ठाण मांडले आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यातील कोंढाळा, शिवराजपूर परिसरात पिकांची नासधूस केल्यानंतर बुधवारी रात्रीच्या सुमारास याच भागातील शंकरनगर परिसरात जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून उभ्या मक्याच्या पिकासह कारल्याचे प्रचंड नुकसान केले  आहे.

 

22 च्या संख्येत असलेल्या जंगली - हत्तींनी मागील दोन महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील घनदाट जंगलात ठाण मांडले आहे. हत्तींनी डोंगरगाव, चिखली, रिठ, शिवराजपूर, कोंढाळा - परिसरात फिरुन शेतकऱ्यांचे अतोनात - नुकसान केले. 11 फेब्रुवारी रोजी हत्तींनी - उसेगाव जंगल परिसरात मोर्चा वळविला - होता. मंगळवारी हत्ती कक्ष क्रं. 91 मध्ये आढळून आले होते. यावेळी इंटियाडोह - धरच्या पाण्यावर रोवणी झालेल्या धानात हत्तींनी धुडगूस घालून मोठ्या प्रमाणातनुकसान केले होते. 

 

तर बुधवारच्या रात्री शंकरनगर गाव परिसराकडे हत्तींनी मोर्चा वळविला. निरंजन महिंद्र हलदार, रविन बाला, सुजय विश्वास, बिधान मंडल, निर्मल मिस्त्री, गौरंग मिस्त्री, कृष्णा माझी, समीर विश्वास या शेतकऱ्यांच्या कारले, मक्याच्या पिकांमध्ये कळप शिरला. या हत्तींनी पिक फस्त करण्यासोबत पायदळी तुडवल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

20 ते 22 हत्तींचा कळप रात्रीच्या वेळी शेतात शिरतात. यापूर्वीसुद्धा डिसेंबर 2023 मध्ये हत्तींनी शंकरनगर येथे एका महिलेला ठार केले होते. त्यामुळे हत्तींच्या वाट्याला जाण्याची हिंमत शेतकरी करताना दिसत नाहीत. मात्र हत्तींमुळे झालेल्या नुकसानाची तत्काळ भरपाई देऊन हत्तींना पिटाळून लावण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 17, 2024

PostImage

वडधा परिसरात देशी-विदेशी, मोह दारू विक्रीला कोणाचा आशीर्वाद?


 

 

 

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात: कारवाई केव्हा होणार?

 

 वडधा : गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असला तरी मात्र जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूसह मोह फुलाची दारू सर्रासपणे विकली जात आहे. मात्र, या खुलेआम दारू विक्रीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरात देशी-विदेशी, मोह दारू विक्रीला कोणाचा आशीर्वाद? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक कुटुंबे दारूच्या आहारी जाऊन कित्येक नागरिकांनाविषारी दारू पिऊन जीवसुद्धा गमवावे लागले आहेत. अशी स्थिती आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरामध्ये सुरू असून वडधा हे गाव ग्रामीण भागामध्ये केंद्रस्थान असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दारू शौकीन आपली शौक भागविण्यासाठी येत असतात

 

वडधात देशी-विदेशी तसेच मोह फुलाची दारू खुलेआम मिळत असल्याने कायदा शांतता व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून दारूमुळे सुजाण नागरिकांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या खुलेआम दारू विक्रीला कोणाचे पाठबळ आहे, असा सवाल आहे. पाठबळ नसेल तर दारू विक्रेत्यांना एवढी मुजोरी येथे कुठून? बरेचसे नागरिक दारूच्या आहारी गेल्याने अतिशौकीन रोडलासुद्धा पडून असतात. वडधा परिसरात वाघाची दहशत असून रोडला पडून असलेल्या व्यक्तीच्या जिवाला धोका आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

महिलांना सावध करा ,केरळ मध्ये 32000 मुली बेपत्ता झाल्या, महाराष्ट्रात पण खूप प्रमाण वाढलं आहे


महिलांना सावध करा

केरळ मध्ये 32000 मुली बेपत्ता झाल्या, महाराष्ट्रात पण खूप प्रमाण वाढलं आहे त्यात हा प्रकार देखील असू शकतो, अवश्य वाचा आणि शक्य तितके व्हायरल करा

 

         --विश्वास नांगरे पाटील, IPS, महाराष्ट्र पोलीस.

 

      एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली, बस आली, दोघी बसमध्ये चढल्या, एकाच सीटवर शेजारी बसल्या, बस थोडी पुढे गेली, बाईने दोन चाॅकलेट काढल्या, एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले, कोणतीही शंका न येता तिने खाल्ले, काही वेळात चक्कर यायला लागली, ही बाई घाबरली ?

      कंडक्टर गाडी थांबवा. हिला दवाखान्यात न्यायचेय. गाडी थांबली, ती बेशुद्ध होती, बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या.

      बस निघून गेली आणि मागून एक फोर व्हिलर आली, आतून तीन तरूण उतरले, बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले, त्या बाईला २० हजार दिले, गाडी निघून गेली,

      या नंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते, आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले, या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला, घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली,

      पण व्यर्थ, ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते, मग काय करावे ?  

      ही जिवंत ठेवणे फायद्याची नाही, पण हिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातुन पैसा मिळवू. आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी, रक्त आणि इतर अवयव काढून घेतले, यातच तिचा मृत्यू झाला.

 

एक निष्पाप जीव गेला...

    शिक्षा मात्र कुणाला ? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा

 

      बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका, समाजात विकृत लोक भरपुर आहेत, आपण सावध रहा.

 

      आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादा साठी, वेश्याव्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते. 

 

           महाराष्ट्र पोलीस

============================

 

महिलांना सावध करा, कृपया हा मॅसेज सर्व जवळच्यांना पाठवा, ज्यांना आई-बहीण आणि मैत्रीण आहे.

 

आपला एक मेसेज आपल्या-

🙎आईचा...

🙆 बायकोचा...

👧 मुलीचा...

👭 बहिणीचा...

🙋 प्रेमीकेचा...

 

जीव वाचवू शकतो...

 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

स्मार्टफोनमध्ये मिळणार 'एअरबॅग'


हॉनर कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन हॉनर एक्स१बी लॉन्च करणार आहे. अल्ट्रा-बाऊंसिंग डिस्प्ले 'एअरबॅग' तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला हा भारतातील पहिला फोन असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. हे स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि दीर्घ बॅटरी आयुष्यासह येईल. कंपनी म्हणते की यात अल्ट्रा बाउन्स 360 अँटी-ड्रॉप रेझिस्टन्स असेल, जे अत्याधुनिक कुशनिंग तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. हा अल्ट्रा बाउन्स अँटी ड्रॉप डिस्प्ले शॉक शोषून घेणारी रचना समायोजित करून अधिक संरक्षण प्रदान करण्याचे वचन देतो. यामध्ये वक्र AMOLED डिस्प्ले असेल असा कंपनीचा दावा आहे. हे सर्व 6 फेस आणि 4 कॉर्नरवर 1.5 मीटरपर्यंत ड्रॉप रेझिस्टन्स प्रदान करते, म्हणजेच फोन कोणत्याही प्रकारे पडला तरी तो तुटणार नाही.

 

सर्कॅडियन नाईट डिस्प्ले

यात 120 Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रिझोल्यूशनसह मोठा 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे. डोळ्यांच्या संरक्षणासाठी नैसर्गिक प्रकाशाच्या तालासाठी डायनॅमिक डिमिंग आणि रात्रीच्या वेळी वापरताना निळा प्रकाश फिल्टर करण्यासाठी सर्केडियन नाईट डिस्प्ले आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह लॉन्च केला जाईल. यात 8GB व्हर्चुअल रॅमचा सपोर्ट असेल. प्राथमिक लेन्स 108 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅको लेन्स असणे अपेक्षित आहे. सेल्फीसाठी, यात 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळू श शकतो. यात 35W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि टाइप-सी पोर्टसह 5800 mAh बॅटरी असेल.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

अपयश लपविण्यासाठी ते धर्म आणि रामाच्या नावाचा बिगुल वाजवत आहेत- स्वामीप्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल


मनोज पांडे हा भाजपचा एजंट आहे

स्वामीप्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल

लखनौ, . सोने की चिडिया संबोधल्या जाणाऱ्या भारताला धर्माच्या ठेकेदारांनी गरीब आणि लाचार केले असल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी केली. अपयश लपविण्यासाठी ते धर्म आणि रामाच्या नावाचा बिगुल वाजवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणाही साधला तसेच मनोज पांडेय हे भाजपाचे एजंट असल्याचा दावादेखील त्यांनी केला. या देशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांवर अत्याचार करणे, अत्याचार करणे हा आपला हक्क मानणारे, आपल्यासाठी प्राण्यांपेक्षाही वाईट जगण्याची परिस्थिती निर्माण करणारे आपले गुणगान कसे करू शकतात ? असा सवालही त्यांनी केला. रामचरितमानसच्या चौपईचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ढोल, रानटी, शूद्र, पशु स्त्री, घोर शिक्षेचे अधिकारी या आधारावर तुम्ही जर सावध राहिले नाही तर तुनचे शोषण सुरूच राहील.

 

अयोध्येत हजारो वर्षांपासून रामाची पूजा केली जाते. भाजप त्याचे मार्केटिंग करत आहे. तरुण बेरोजगार आहेत, पण त्यांच्या नोकरीचा प्रश्नच नाही. ईडीच्या माध्यमातून सरकार विरोधी नेत्यांना त्रास देत आहे. लोकशाहीप्रधान देशात लोकशाही गिळंकृत करण्याची तयारी सुरू आहे.

 - स्वामीप्रसाद मौर्य, नेते सपा

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

सोशल मीडियावर केवळ वायफळ चर्चा : तरुणाई तर चॅटिंगमध्येच व्यस्त


सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा; पाणी आले काय अन् न आले काय?

 

चंद्रपूर : सद्य:स्थितीत सोशल मीडिया हे प्रभावी व्यासपीठ म्हणून समोर येत आहे. मात्र, आजची तरुणाई सोशल मीडियावर केवळ वायफळ चर्चा अन् चॅटिंग करण्यात गुंग दिसून येते. केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा, मॅरिज अनिवर्रसरीच्या शुभेच्छा देण्यातच तरुणाई धन्यता मानत आहे. याउलट देशातील, शहरातील समस्यांवर चर्चाच होताना दिसून येत नाही.

 

द्विटर, व्हॉटसअॅप यावर एखादी समस्या टाकली तर बऱ्याचदा तिची सोडवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, अनेक जागरूक नागरिक शहरातील विविध समस्यांचे फोटो टाकून त्यावर चर्चा करताना दिसतात. बऱ्याचदा तर राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींवरसुद्धा चर्चा केली जाते. सर्वांत मोठ्या प्रमाणातसोशल मीडियाचा वापर तरुणाईच करीत असतानासुद्धा या चर्चेमध्ये आजचा तरुण सहभागी झालेला दिसूनयेत नाही. केवळ आपल्या मित्र- मैत्रिणीसोबतच चॅटिंग करणे, एकमेकांच्या वाढदिवसासंदर्भात स्टेटस ठेवणे, इन्स्टावर रिल्स बनविणे यामध्ये हे तरुण गुंतले असल्याचे दिसून येत आहे.मात्र, ही अत्यंत गंभीर अन् चिंतेची बाब असल्याचे सुज्ञ व्यक्तींचे म्हणणे आहे.

 

या प्रश्नांवर सोशल मीडियावर आवाज कुठे?

 

*शहरातील पाणी समस्या :

चंद्रपूर शहरात अद्यापही बऱ्याच भागात अमृत योजनेचा पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. मात्र त्याची चर्चाच होताना दिसून येत नाही.

 

*वाढलेली बेरोजगारी :

जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ना नोकरी, ना उद्योगासाठी भांडवल तरीही तरुण सोशल मीडियावर शांतच आहे.

 

*शेतमालाला भाव नाही:

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान, कापूस, सोयाबीनला अत्यल्प भाव आहे. तरीही त्याबाबत चर्चा होताना दिसून येत नाही.

 

तलाठी भरतीसंदर्भात किती ओरड झाली. आंदोलने निवेदन दिले काय फलित झाले, शासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याने चर्चा करून फायदाच काय?

- प्रतिश नागोसे, तरुण

 

शुभेच्छा अन् चॅटिंगसाठीच वापर

सोशल मीडियाचा वापर आता लहान थोरांपासून ज्येष्ठ नागरिकसुद्धा करताना दिसून येत आहेत. मात्र, यात आवश्यक विषयावर बगल देऊन आजकाल वाढदिवस, मॅरिज अनिवर्रसरीच्या शुभेच्छा किंवा मित्र मैत्रिणीसोबत चॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

 

■ बऱ्याचदा राज्यापासून देश-विदेशांतील प्रश्नांवर, राजकारणावर सोशल मीडियात पोटतिडकीने मते माडली जातात. पण, स्थानिक प्रश्नाविषयी गांभीर्य दिसून येत नाही.

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

एकुलत्या मुलाने केली आत्महत्या


 

अनहेरनवरगाव : ब्रहपुरी तालुकातील अन्हेरनवरगाव येथील आईवडिलांचा एकुलता एक असलेल्या एका युवकाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. अंकित राजू लोखंडे (२४) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

 

अंकितने रविवारी सायंकाळी राहत्या घराच्या छताच्या हुकाला गळफास घेतला. यासंदर्भात कुटुंबीयांना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून पार्थिव शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. युवकाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

व्हॉट्सॲपला ठेवले स्टेटस : जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात जवानाची गोळी झाडून आत्महत्या


माणूस मरतो, आत्मा जिवंत राहतो

गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांच्यायेथील शासकीयशिखरदीप बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या सुरक्षारक्षक जवानाने माणूस मरतो, आत्मा जिवंत राहतो... असे स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेने एकच खळबळ उडाली. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. श्रीरामे यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाहझाला होता. राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्र. १ मध्ये सेवा बजावत होते. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते. कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे शिखरदीप नावाचे शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानी उत्तम श्रीरामे हे सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडून घेतली

 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

 

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनास्थळी सुसाईड नोट आढळली नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्यावर कामाचा ताणही नव्हता, त्यांनी आत्महत्या का केली, हे स्पष्ट झालेले नसून अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

महिला स्वतःच्या इच्छेने वेगळी राहात असेल तर तिला तिच्या पतीकडून देखभाल भत्ता घेण्याचा अधिकार नाही - न्यायालय


 

जबलपूर, : जर एखादी महिला स्वतःच्या इच्छेने वेगळी राहात असेल तर तिला तिच्या पतीकडून देखभाल भत्ता घेण्याचा अधिकार नाही, असे जबलपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. असे म्हणत न्यायालयाने पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेची याचिका फेटाळून लावली.

 न्यायालयाने म्हटले की, महिलेने स्वतःच तिच्या पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला असल्याने तिला भरणपोषण मागण्याचा अधिकार नाही. कोर्टात महिलेच्या अर्जावर सुनावणी सुरू असताना तिच्या पतीने सांगितले की, दोघेही 15 डिसेंबर 2020 पासून वेगळे झाले आहेत. पतीने सांगितले की, त्यावेळी पत्नी स्वतः विभक्त झाली होती. त्यानंतर पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १ अंतर्गत मिळालेले वैवाहिक हक्क बहाल करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

जनता महागाईच्या ओझ्याखाली दबली,जनतेवर आर्थिक अन्याय; राहुलचा आरोप


 कोरबा, वृत्तसंस्था. भाजपा सरकारने नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले. प्रत्येक क्षेत्र काही लोकांमध्ये विभागले जात आहे. सत्ता, संरक्षण, आरोग्य, रिटेल, विमानतळ... देशातील कोणत्याही उद्योगात निवडक लोक असतात, याचा अर्थ संपूर्ण यंत्रणा तीन-चार लोकांसाठी चालवली जात आहे. बाकीची जनता महागाई खाली दबली गेली आहे. हा आर्थिक अन्याय असल्याची टीका काँग्रेस नेते राहु गांधी यांनी केली. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते छत्तीसगडमधील कोरबा येथे आले असताना एका सभेला संबोधित करीत होते.

 

केंद्र सरकारवर घणाघात मागासलेले लोक, दलित आणि आदिवासी हे देशातील 74 टक्के आहेत, परंतु या समुदायातीलएकही व्यक्ती भारतातील सर्वोच्च 200 कंपन्यांचा मालक नाही किंवा ज्यांना देशाचा पैसा दिला जात आहे त्यांच्या व्यवस्थापनात सहभागी नाही. ते म्हणाले की, भाजपा याला हिंदु राष्ट्र म्हणतो पण देशातील 74 टक्के लोकसंख्या आणि सर्वसामान्य गरिबांना काहीच मिळत नाही. ते फक्त ताट वाजवायला, बेल वाजवण्यासाठी, मोबाईल दाखवायला आणि उपाशी मरण्यासाठी आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

 

लोकांच्या कष्टाचा सर्व पैसा भांडवलदारांच्या कंपन्यांमध्ये जात आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये दलित आणि मागासलेले लोक नाहीत. देशातील विविध क्षेत्रात दलित आणि मागासवर्गीयांचा सहभाग नाही. भाजपा हिंदू राष्ट्राबाबत बोलते, मात्र मागास, दलित, आदिवासी वर्गाला काहीच मिळत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळीही एकही गरीब-मजूर शेतकरी दिसला नाही.

- राहुल गांधी, नेते, काँग्रेस

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

धान खरेदी केंद्राविरुद पोलिस ठाण्यात तक्रार


 

गडचिरोली : राजाराम येथील धान खरेदी केंद्रावर मापात पाप केले जात असल्याचा दावा करुन १२ फेब्रुवारीला मन्नेराजाराम पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या प्रकरणात खरेदी केंद्रावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली.

 

पोलिसांत केलेल्या तक्रारीत ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन मार्फत शेतकऱ्याकडून धान खरेदी करण्यात येते. सध्या आदिवासी विकास महामंडळाचे ९३ आणि मार्केटिंग फेडरेशनचे २१ असे

 

साधारणतः ११४ खरेदी केंद्रांवर ही धान खरेदी सुरु असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली जात येत आहे. शासन नियमा प्रमाणे खरेतर एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनापेक्षा अधिक धानाची खरेदी करता येत नाही. मात्र जिल्हाभरातील सर्व धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी (पोते) वजनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

राजाराम येथील खरेदी केंद्रावरही हा प्रकार होत असून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली. सरपंच शारदा कोरेत, पोलिस पाटील इंदरशाह मडावी, कृष्णा सेडम उपस्थित होते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

मुलाने उठवले; आई उठलीच नाही, पतीच्या मारहाणीत मृत्यू! पतीला अटक : मालडोंगरी येथील घटना


 

ब्रह्मपुरी : पत्नीने शिवीगाळ केली या क्षुल्लक कारणावरून झालेल्याभांडणातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना ब्रहापुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे सोमवार, दि. १२ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. हिरकण्या जयदेव पिल्लेवान (५०), रा. मालडोंगरी, असे मृत महिलेचे नाव आहे. जयदेव पिल्लेवान (५५), रा. मालडोंगरी असे आरोपीचे नाव आहे.

 

मागील तीन दिवसांपासून हिरकण्या पिल्लेवान व तिच्या पतीमध्ये भांडण सुरू होते. रविवारी रात्रीसुद्धा पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे त्यांच्या मुलाला दिसले. परंतु नेहमीच भांडण आहे, म्हणून त्याने लक्ष दिले नाही. सोमवारी सकाळी झोपुन उठल्यानंतर मुलाला त्याची आई झोपून असलेली दिसली. 

 

तिला हलवून बघितले असता तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने ब्रह्मपुरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ब्रहापुरी पोलिसांनी आरोपी जयदेव पिल्लेवान याला ताब्यात घेतले.

 

आरोपीने पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला मार लागला. यातच तिचा मृत्यू झाला. असे मृतक महिलेच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नागलोत करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

तुम्ही फोन पाहता, ते पैसे कमावतात! ,खिशावर पडतोय दरोडा : राहुल गांधी


 

कोरबा (छत्तीसगड) : मोबाइल वापरणे हे एक प्रकारचे व्यसन असून, ते तुमच्यावर लादले जात आहे. जेणेकरून उद्योगपती अधिकाधिक पैसे कमावू शकतील. तुम्ही तुमचा मोबाइल जितका जास्त वापरता तितके ते (उद्योगपती) जास्त पैसे कमावतात, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे म्हटले.

 

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजकाल लोक आणि विद्यार्थी सुमारे ८-१० तास मोबाइलवर असतात. हे सर्वांत धोकादायक व्यसन आहे. उद्योगपती दिवसातून फक्त १०-१५ मिनिटे मोबाइल वापरतात. कारण त्यांचे लक्ष पैसे कमावण्यावर असते. ते २४ तास पैसे कमावतात. हे पैसे तुमच्या खिशातून जात आहेत. मी सतत हे सांगतोय; पण तुम्हाला ते समजत नाही. तुमचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. फोन असो किंवा मीडिया, कधी ते अक्षय कुमारला नाचताना दाखवतील तर कधी ऐश्वर्या रायला आणि तुमचे पैसे जात राहतील. तुम्ही मोबाइल पाहा, सकाळी, दुपारच्या जेवणात आणि रात्री स्वतःला एकच प्रश्न जरूर विचारा की, तुम्हाला भारताच्या तिजोरीतून दररोज किती पैसे मिळतात. ज्या दिवशी १० लाख लोक हा प्रश्न विचारू लागतीलतेव्हा संपूर्ण देश हादरून जाईल.

तुम्हाला हे (मुद्दे) समजत नाही असे म्हणणे मला आवडत नाही; मात्र प्रत्यक्षात दिशाभूल करून तुमच्या खिशावर दरोडा टाकला जातोय, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

 

 

परीक्षेमुळे यात्रेचा

कालावधी घटवला

■ 'भारत जोडो न्याय यात्रे'चा उत्तर प्रदेश (यूपी) टप्प्याचा कालावधी कमी करण्यात आला असून, आता ही यात्रा ११ दिवसांऐवजी फक्त सहा दिवसच उत्तर प्रदेशात राहणार आहे.

 

■ १०, १२ वीच्या परीक्षांमुळे हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली. पूर्वनियोजित रापत्रकानुसार ही यात्रा १६ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत उत्तर प्रदेशात भ्रमंती करणार होती;

 

■ परंतु राज्यात २२ फेब्रुवारीपासून दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने आता २१ फेब्रुवारीपर्यंतच ही यात्रा या राज्यात राहणार आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024

PostImage

दिल्लीचे लक्ष्य आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी फोडण्याकडे


मुंबई : पश्चिम बंगाल, पंजाब बिहारमध्ये सुद्धा भाजपच्या मनासारख्या घटना घडून इंडिया आघाडीची शकले पडत असताना आता दिल्लीचे लक्ष्य महाराष्ट्राकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उध्दव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी फोडण्याचे डावपेच आखले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणांना हाताशी धरून उध्दव आणि पवारांच्या शिल्लक आमदारांना सुद्धा भाजपमध्ये आणायचे आणि नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बडे नेते गळाला लावून उरल्या सुरल्या आघाडीला सुरुंग लावण्याची तयारी सुरू आहे.

 

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी वेगळी चूल मांडल्याने भाजपमध्ये सध्या खुशीचे वातावरण आहे. राममंदिर आणि कलम ३७० मुळे २०२४ मध्ये आमचा विजय निश्चित झाला असून आम्हाला आता वेध लागले आहेत ते २०२९ असा भाजपचा सध्या प्रचार प्रसार सुरू आहे. मात्र भाजप हा देशात असा एकमेव पक्ष आहे जो वर्षाचे ३६५ दिवस फक्त राजकारण करतो. आपल्या विरोधकांना किंचितही मोकळीक राहता कामा नये, असा विचार करत असतो.याच मुळे आता त्यांनी महाराष्ट्रात आघाडीची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे मिशन यशस्वी होताना दिसत नसल्याने भाजप पक्षश्रेष्ठी अस्वस्थ आहेत. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांचा तसेच भाजप आणि खासगी यंत्रणांचा अहवाल हा भाजपचे मिशन यशस्वी होत नसल्याचे सांगत आहे. महाविकास आघाडी ४८ पैकी किमान २५ ते ३० जागा मिळवतील, असा अंदाज सांगितला जात आहे. उध्दव ठाकरे यांची सहानभुती कायम असून शरद पवार आपले सारे कसब पणाला लावत आहेत. काँग्रेस सुद्धा अजून डळमळीत झालेली नसल्याने भाजपचे निवडणूक रणनीतिकार नवीन चाल खेळण्याचे डावपेच आखत आहेत. उध्दव ठाकरे यांना यापुढे कुठल्याही प्रकारची सहानुभूती मिळवू द्यायची नाही आणि यासाठी भाजप नेते तसेच प्रवक्ते यांनी मातोश्रीवर आधी सडकून टीका करणे बंद करावी, असे आदेश निघाले आहेत. यामुळे गेले काही महिने सतत टीकेचा आसूड घेऊन उभे असलेले नारायण राणे आणि त्यांची दोन चिरंजीव निलेश आणि नितेश राणे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना सध्या थोडे शांत बसण्यास सांगण्यात आल्याचे कळते. यामुळे गेले काही  महाराष्ट्रातील.. उध्दव आणि आदित्य यांच्यावर होणारी टीका आता कमी झाली आहे. याबरोबर किरीट सोमय्या सुद्धा शांतचित्त झाल्याचे दिसत आहे.

 

टीकेच्या आघाडीवर एक पाऊल मागे घेताना तपास यंत्रणा मात्र आघाडीची कोंडी करताना दिसत आहेत. आमदार रवींद्र वायकर आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून अनिल परब, संजय राऊत यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना अटक झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांना दिशा सालियनप्रकरणी चौकशीला बोलावले जाऊ शकते. आदित्य यांना अटक केली तर राज्यात मातोश्रीला निवडणुकीत आणखी फायदा होईल, या शक्यतेने फक्त चौकशीचा फास फेकण्याचा विचार केला जात आहे, असे समजते.

 

दुसऱ्या बाजुला रोहित पवार यांची चौकशी झाल्यानंतर आता पवारांचे आणखी कोण नेते चौकशीच्या रडारवर आणता येतील आणि कोण फुटू शकतील, याचा सुद्धा भाजपकडून विचार केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा भाजपने आशा सोडलेली नाही. हे कमी म्हणून की काय काँग्रेसचे नेते आपल्या बाजूने वळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्यासयासह निवडणुकीच्या तोंडावर काही महत्वाचे काँग्रेस नेते आपल्याकडे येतील, यासाठी भाजपडावपेच आखत असल्याचे कळते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात दारू सुरु होणार का?


 

दारूबंदीवर जनमत चाचणीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

 

गडचिरोली : आदिवासीबहुल व मागास गडचिरोलीतील दारूबंदीबाबत पुनर्विचार करावा व बनावट दारूमुळे जात असलेले बळी रोखावेत. त्याकरिता जनमत चाचणी घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र आदिवासी व मागासवर्गीय कृती समितीचे समन्वयक डॉ. प्रमोद साळवे यांनी १० फेब्रुवारीला येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

 

जिल्ह्यातील दारूबंदीचे विदारक चित्र सर्वांसमोर आहे. असे असताना केवळ काही लोकांच्या हट्टापायी बंदी कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे. दारूबंदीमुळे मोहफुलांची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. अनेक युवक तस्करीच्या धंद्यात अडकले असून यातून त्यांचे आयुष्य उ‌द्ध्वस्थ होत आहे. काही जणांना बनावट दारूमुळे जीव गमवावा लागलेला आहे. 

 

बंदी असतानाही चढ्य दराने खुलेआम दारूविक्री होत असेल तर ही आदिवासींची लूट नाही का, असा प्रश्न डॉ. साळवे यांनी केला. यासंदर्भात तातडीने जनमत चाचणी घ्यावी म्हणजे सामान्यांच्या भावना लक्षात येतील, असे त्यांनी सांगितले. यांसदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई, राज्यपाल, प्रधान सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे. अॅड. संजय गुरू, संतोष ताटीकोंडावार, अनिल मेश्राम, भूषण सहारे, स्वप्निल पवार, रोशनी पवार, अन्वर हुसेन उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

टीचर ने छात्र को 6 तोले सोने की अंगूठी दी , शिक्षक गिरफ्तार;


गोंडपिपरी पुलिस की कार्रवाई

 

 चंद्रपुर, ब्यूरो। शनिवार को, गोंडपिपरी शहर में एक संगीत शिक्षक ने उसी स्कूल के 10 वीं कक्षा के एक छात्र से छह तोला सोना चुरा लिया, यह दावा करते हुए कि उसकी चाची ठीक नहीं थी और उसके इलाज के लिए पैसे की जरूरत थी। गोंडपिपरी पुलिस ने आरोपी को चंद्रपुर से गिरफ्तार कर लिया है. अखिल रोहनकर  आरोपी का नाम गोंडपिपरी है.

 

गोंडपिपरी में एक सीबीएसई स्कूल है। इस स्कूल में अधिकारियों, कर्मचारियों और पेशेवरों के बच्चे पढ़ते हैं। अखिल रोहनकर को संगीत शिक्षक के रूप में नियुक्त किया गया था। कुछ ही समय में उन्होंने छात्रों का दिल जीत लिया। 

 

माता - पिता के साथ अच्छा परिचय दिया. इसका फायदा उठाते हुए रोहनकर ने 10वीं कक्षा की छात्रा से पैसे की मांग की, जिसने कहा कि उसे अपनी चाची के स्वास्थ्य के लिए पैसे की सख्त जरूरत है। छात्रा ने अपने परिवार को बताए बिना आरोपी को छह तोला सोना दे दिया। कुछ दिन बाद जब सोना वापस मांगा गया तो वह टालमटोल करने लगा। आखिरकार अपने माता-पिता को यह बताने के बाद कि उसके साथ धोखा हुआ है, उसने गुरुवार को शिकायत दर्ज कराई। पुलिस ने अखिल रोहनकर को चंद्रपुर से गिरफ्तार किया है. बताया जाता है कि आरोपी शिक्षक ने कई अभिभावकों के घर जाकर अलग-अलग बहाने से हजारों रुपये वसूले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

Elephant rampage in Viheergaon


 

 Gadchiroli : Bureau, The wild elephants that have entered Gadchiroli district from the state of Odisha show no signs of abating. Every day crops are being damaged by wild elephants in some areas. Wild elephants have been on the rampage in Desaiganj taluka for the past few days. On Saturday night, elephants entered the paddy field in Vihirgaon sub-area under Desaiganj forest area.

 

And Carly Peek was literally trampled. Due to this, farmers have to face losses again. Farmers are shocked to see the scene of damage. According to information received, a herd of wild elephants has been roaming in the village area of Armori and Desaiganj forest area for more than one month. But these crops are being targeted by wild elephants.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

Youth dies after being touched by electric wire


 Neri, (Va.). A young man from Vadsi near Neri in Chimur taluka learned line repair work in Nagpur and came to the village Vadsi to construct a house a month ago. On Sunday, he was killed when his friend and he touched a high voltage power line while he and he were in the village repairing the line due to a fault in the line at Khatoda Shetshiwar. The name of the dead youth is Vinod Shivdas Dadmal (27 years resident of Vadsi Dist. Chimur). This incident happened on Sunday February 11 at 10 am.

 

Vinod was always doing the repair work of the small and big lines of the village on the public pole of the village. But today, Vinod suddenly got electrocuted when he touched a live star, in which he died on the spot. Meanwhile, the dead body was taken to Upazila Rogunalya Chimur for autopsy. Police Patil from Chaware, Khatoda Vadsi attended the spot. Chimur Police is conducting further investigation.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

प्रेमात कोण देतेय धोका?


 

प्रेम निःस्वार्थपणे केले जाते. त्याला ना वयाचे बंधन असते ना समाजाचे. मात्र, पाश्चात्य संस्कृती, पैशांचा लोभ आणि इंटरनेटवरील अश्लीलता यामुळे प्रेमात विष कालविले जात आहे. ते इतके घातक ठरत आहे की, अनेक वर्षे सुखाने संसार केल्यानंतरही पती-पत्नी जोडीदाराला धोका देतात, तरुणांमध्येही हे प्रमाण वाढले आहे. प्रेमात नेमके कोण धोका देते ते जाणून घेऊ...

 

लोक आपल्या २३% जोडीदाराला धोका देत आहेत.

 

 

लोकांनी जोडीदाराला१४% धोका दिल्याचे मान्य केले आहे.

 

जण धोका दिल्यावर १७% जोडीदाराकडून पकडले जातात.

 

लोक आपल्या २५% जोडीदाराला धोका देत आहेत.

 

लोक धोका दिलेल्या ४९% जोडीदाराला स्वीकारत नाहीत.

 

भारतीय जोडीदाराला ५५% एकदा सुधारण्याची संधी देतात.

 

प्रेमप्रकरणे जवळचा ६०% मित्र किवा सहकारी यांच्यासी असतात.

 

कोणतं वय धोक्याचं?

 

• भारतात १९ ते २९ वर्षे वयोगटातील महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक धोका देण्याच्या तयारीत असतात.

 

 या वयात ४० टक्के महिला जोडीदाराला धोका देण्याच्या तयारीत असतात.

 

• पुरुषामध्ये हे प्रमाण २१ टक्के आहे. या वयात मेदू आणि शरीरात अनेक बदल होतात,यामुळे ते असे पाऊल उचलतात.

 

(स्रोत: ग्लीडन डेटिंग वेबसाइट)

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द


मुंबई : एका महिला न्यायिक अधिकाऱ्याने तिच्या पती व सासरच्याविरोधात क्रूरता व अन्य दाखल केलेले गुन्हे शुक्रवारी रद्द केले. अधिकारी महिलेने वैवाहिक वादातून गुन्हा दाखल केल्याचे म्हणत न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

 

संबंधित अधिकारी महिलेने गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. तसेच वर्णन केलेल्या घटना आणि दाखल केलेला गुन्ह्याचा ताळमेळ नाही. सासरच्यांनी गुन्हा दाखल केला म्हणून अधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली, असे निरीक्षण न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्याखंडपीठाने नोंदविले.

 

 गुन्हा रद्द करण्यासाठी अधिकारी महिलेचा पती व सासरच्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित महिलेचा २०१८ मध्ये विवाह झाला. मॅट्रिमोनिअल साईटवरून त्यांचा विवाह जुळला. पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका अद्याप प्रलंबित आहे.

 

न्यायिक अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती आणि दीर जबरदस्तीने त्यांच्या चेंबरमध्ये घुसले आणि समझोत्याने घटस्फोट घेत आहोत, असे नमूद केलेल्या घटस्फोट याचिकेवर जबरदस्तीने सही घेतली. तेच कृत्य सासरच्या अन्य मंडळींनी त्याच दिवशी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पतीसह सासरच्या अन्य मंडळींवर आयपीएसच्या काही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी पतीसह सासरच्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

 

सकाळच्या सत्रात तक्रारदाराला त्यांचे 3 कर्तव्य पार पाडण्यास त्यांचे पती व दीर याने अडथळा निर्माण केल्याचे दर्शविणारे ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत.

 

सासरचे चेंबरबाहेर वाट 3 पाहात होते आणि तक्रारदार स्वतःहून चेंबरच्या बाहेर आल्या. त्यामुळे त्यांना कर्तव्य पार पाडण्यास सासरच्यांनी अडथळा निर्माण केला, हा गुन्हा दाखल करू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने पती व सासरच्या मंडळींवरील गुन्हा रद्द केला.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

अखेर 'त्या' बेपत्ता इसमाचा विहीरीत सापडला मृतदेह


गडचिरोली - गेल्या दहा दिवसापासून चातगाव मधून बेपत्ता असलेल्या योगेश बारीकराव पेंदाम (३९) याचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळला. सदर इसम २९ जानेवारी २०२४ ला रात्री १ वाजून ५ मिनिटांनी घरून कोणाला काही न सांगता निघून गेला असल्याची माहिती

 

त्याच्या पत्नी कीर्तना पेंदाम यांनी पोलीस ठाण्यात दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता केलेल्या तक्रारीतून दिली होती. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू केला. पोलीस ठाणे हद्दीत पोलीस विभागाने शोध मोहीम सुरू केली. गावात दवंडी देऊन शोधमोहीम सुरू केली. 

 

पण कोठेही पत्ता लागला नाही. गावकऱ्यांनी सुद्धा चातगाव येथे गावात दवंडी दिली होती शेवटी त्याचा मृतदेह चातगाव येथीलच सुधाकर मारोती मडावी यांच्या शेत शिवाराला लागून असलेल्या विहिरीमध्ये दिसून आल्याची माहिती चातगांव पोलीस ठाण्यात देण्यात आली. 

 

चातगाव पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला व त्याचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी मृत्यूचे कारण अजूनही कळलेले नसल्याचे सांगितले. चातगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

मारो सालो को, खतम करो म्हणत पोलिसांवर प्राणघातक हल्ला, 10 तुरुंगात


 

 

 

 

सत्र न्यायालयाचा निर्णय : एकूण ६५ हजार रुपये दंडही ठोठावला

 

नागपूर : कोंढाळी पोलिसांवर घातक हल्ला करणाऱ्या सर्व दहा आरोपींना गुरुवारी दोन वर्षे सहा महिने कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली व एकूण ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला.

 

आरोपींमध्ये शेख शरीफ शेख अझीझ, सरफराज शेख जब्बार शेख, शेख इकबाल शेख सत्तार, शेख जाहीद शेख समदानी, मो. सईद शेख अझीझ, शेख राशीद शेख अझीझ, शेख मुख्तार शेख सत्तार, सलमान शेख गफार शेख, सूरज ऊर्फ भोदू रमेश राऊत व शेख गफार शेख भुरू यांचा समावेश आहे. वर्धा रोडवरील सायखोड वस्तीमध्ये अवैध दारूचा साठा असल्याची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळाली

 

होती. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पवन भांबुरकर व त्यांचे सहकारी १६ मे २०१८ रोजी शहानिशा करण्यासाठी सायखोड वस्तीमध्ये गेले असता आरोपींनी त्यांना घेरून लाठ्या व दगडांनी घातक हल्ला केला. दरम्यान, आरोपी मारो सालो को, खतम करो, असे ओरडत होते. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहीरकर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. एल. बी. शेंदरे यांनी कामकाज पाहिले.

 

अशी आहे पूर्ण शिक्षा

 

• प्रत्येकाला भादंवि कलम १४३ अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास.

 

• कलम 147 अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड.

 

• कलम १४८ अंतर्गत एक वर्ष सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड.

 

• कलम ३५३ अंतर्गत दोन वर्षे सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंड.

 

• कलम ३२३ अंतर्गत सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड.

 

• कलम ३३२ अंतर्गत एक वर्ष सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड,

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

काम होत नाही, करा ऑनलाइन तक्रार; सर्वाधिक तक्रारी पंचायत समितीच्या !


तक्रार निवारण प्रणाली' पोर्टल : २१ दिवसांत तक्रारींचे निवारण करणे अनिवार्य

 

गडचिरोली: नागरिक विविध कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये जातात, परंतु, त्यांचे काम वेळीच होत नाही. अनेकदा अधिकारी किंवा कर्मचारी कामे अडवून ठेवतात. अशावेळी काय करावे, असा प्रश्न संबंधित नागरिकाला पडतो. परंतु, यावर आता पर्याय उपलब्ध झाला आहे. काम अडलेल्या विभागाविरोधात 'तक्रार निवारण प्रणाली' या पोर्टलवर तक्रार नोंदवता येते.

 

शासकीय विभागातील कार्यप्रणाली ऑनलाइन झाल्याने नागरिकांना विविध सेवा ऑनलाइन स्वरुपातच प्राप्त कराव्या लागतात. ऑनलाइन अर्ज सादर करून दाखले, प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. गेल्या वर्षभरात पंचायत समित्यांमधील कामांबाबत सर्वाधिक तक्रारी या पोर्टलवर आल्या.

 

* काम वेळेत होत नसल्यास करा पोर्टलवर तक्रार

शासकीय कार्यालयात नागरिकाचे काम अडले असल्यास त्यांना तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलवर तक्रार सादर करता येते. तक्रारीच्या माध्यमातून त्याला आपले म्हणणे मांडता येते.

 कामासाठी अर्ज केव्हा केला, किती अवधीत काम होणे आवश्यक होते. यासह विविध बाबींचा अंतर्भाव करावा लागतो. संबंधित विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीविषयी पडताळणी केली जाते.

 

*तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाईन

तक्रार निवारण प्रणाली पोर्टलवर तांत्रिक अडचण आल्यास किंवा या प्रणालीबाबत अधिकची माहिती हवी असल्यास कॉल सेंटर प्रतिनिधींशी केव्हाही संपर्क साधून आपली अडचण सांगता येते. यासाठी१८००१२०८०४० हा टोल फ्री क्रमांक तक्रार निवारण प्रणालीवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकाचा वापर नागरिक अडचणीच्या काळात करू शकतात

 

*किती तक्रारींचे झाले निराकरण

विविध विभागात कामे अडल्याबाबत जिल्ह्यात २००वर तक्रारी पोर्टलवर प्राप्त झाल्या, यापैकी १००हून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे थांबण्यास मदत झाली.

 

*वर्षभरात २००वर तक्रारी

जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध विभागातील काम अडल्याबाबत जवळपास २००वर तक्रारी पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निवारण संबंधित विभागाकडून करण्याची कार्यवाही काही प्रमाणात करण्यात आली.

 

*महसूल विभागाबाबतही अनेकजणांच्या तक्रारी

महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र तसेच शेतीविषयक दाखले व प्रमाणपत्र वितरित केली जातात. सदर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. याबाबत अनेकांनी ऑनलाइन तक्रारी करून लक्ष वेधले.

 

*सर्वच तक्रारींचे निवारण होते का?

 तक्रार निवारण प्रणाली पोर्टलवर तक्रार सादर केल्यानंतर सर्वच तक्रारींचे निवारण केले जात नाही. ५० ते ६० टक्केच तक्रारींचे निवारण होते. अनेकदा संबंधित विभागातील अधिकारीसुद्धा दुर्लक्ष करतात, तर काही लाभार्थीसुद्धा त्रास वाढल्याचे कारण दाखवून माघार घेत असल्याची प्रकरणे आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

पोलीस ठाण्यात नागरिकांना भीती नाही तर न्याय मिळावा


 

नाशिक : नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उ‌द्घाटन फीत कापून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भूसे उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस ठाण्यात नागरिकांना भीती नाही तर न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

 

 

देवेंद्र फडणवीसांनी पोलीस ठाण्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यातील खुर्चीवर बसत 'मी अपेक्षा करतो हे पोलीस ठाणे जनसामान्यांना न्याय देण्याचे काम करेल, असे लिहीत पोलीस दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. पोलीस ठाण्याच्या आकृतीबंधासाठी नवीन नियम,

 

पोलीस स्टेशनही वाढवण्यात येतील. सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून सर्व कामकाज ऑनलाईन झाले आहे. कोणालाही एफआयआरमध्ये बदल करता येत नाही. नुसती चांगली बिल्डिंग करून फायदा नाही, पीआयला सांगतो ईथे कामही चांगल व्हायला पाहिजे. कामही सुंदर केले पाहिजे. नाशिकचे सीपी चांगले काम करतायत, गुंड गुंडगिरी करणार नाही, यासाठी ते काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

लहान भावाच्या पायावर कुन्हाडीने हल्ला


 

गोंदिया, ब्युरो. रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडलेल्या लहान भावावर मोठ्या भावाने कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव मुंडीपार येथे घडली.

 

घटेगाव मुंडीपार येथील हिंमत उमराव शेंडे (वय 43) हा गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास भोजन करून घराजवळील किराणा दुकानात खर्रा घेण्यासाठी जात होता. दरम्यान त्याच्याच घराशेजारी राहणारा मोठा भाऊ लालचंद उमराव शेंडे (वय 45) याने मागून येऊन हिंमतवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात त्याला कमरेखाली गंभीर जखम झाली. दरम्यान त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गोंदिया येथे हलविण्यात आले. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

कर्तव्यात हयगय, सीईओंनी केले बीईओला निलंबित


 

मुलचेरा : केंद्र व तालुकास्तरीय मुले क्रीडा स्पर्धेच्या नियोजनात हयगय तसेच शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी मुलचेराचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम यांना निलंबित केले. त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेआहेत

मुलचेरा पंचायत समितीचेगटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शिक्षण विस्तारअधिकारी नेताजी मेश्राम यांच्याकडे गट साधन केंद्राचा प्रभार आला. गटशिक्षणाधिकारी पदावर ते महिनाभरापासून कार्यरत होते.दरम्यान केंद्रस्तरीय, तालुकास्तरीयक्रीडा स्पर्धेचे योग्य नियोजन केले नाही तसेच प्रत्यक्षात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले नाहीत.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसुद्धा केली नाही, कार्यालयात गैरहजेरी असा ठपका ठेवत मेश्राम यांच्यावर सीईओ आयुषी सिंह यांनी निलंबनाची कारवाई केली

पंधरा दिवसांपासून कार्यालयाला दांडी

 नेताजी मेश्राम यांनी कर्तव्यात कसूर तर केलीच, शिवाय ते मागील १५ दिवसांपासून गटसाधन केंद्राच्या कार्यालयात गैरहजर राहत होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सीईओ आयुषी सिंह यांनी मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणामुळे कारवाई झाल्याने अन्य अधिकाऱ्यांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे.

 

.

 

 

 

 

 

 

 

 

.

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

कॅन्सर कायमचा जाणार; पहिला रुग्ण बरा झाला


 

सीएआर-टी सेल थेरपीचे उपचार ठरले यशस्वी

नवी दिल्ली : भारतातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय औषध कर्करोगावर प्रभावी ठरले आहे. पहिल्या रुग्णाला सीएआर-टी सेल थेरपीने कर्करोगातून मुक्त केले आहे. ही थेरपी आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलने विकसित केली आहे. ही थेरपी १५ रुग्णांना देण्यात आली होती, त्यापैकी ३ रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे.

 

कायमेरिक अँटिजन रिसेप्टर सीएआर-टी सेल थेरपीद्वारे, रुग्णाच्या टी-लिम्फोसाइट्स किंवा टी-सेल्सला कर्करोगाच्या उपचारांसाठी मशीन वापरून तयार केल्या जातात. उपचारादरम्यान, रुग्णाच्या रक्तातून पांढऱ्या पेशी किंवा टी पेशी घेतल्या जातात. 

 

भारतीय उपचार पद्धतीने 3 रुग्ण कॅन्सरमुक्त, उपचाराचा 90% खर्चही वाचला; CAR-T म्हणजे नेमकं काय?

CAR-T cell therapy: आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्याद्वार खास थेरेपी विकसीत करण्यात आलेली आहे. 'इम्यूनोएक्ट' असं या थेरेपीचं नाव आहे. ही थेरेपी भारतातील 15 रूग्णांना देण्यात आलेली आहे.

 

इंडियन एक्सप्रेस मध्ये दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 3 रूग्णांची कॅन्सरपासून मुक्ती झाली आहे. काही महिन्यांपूर्वी, भारतातील औषध नियामक 'सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन' (CDSCO) ने CAR-T सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिलीये. या थेरपी अंतर्गत, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अनुवांशिकरित्या री-प्रोगाम केली जाते.

 

कॅन्सरमुक्त घोषित करण्यात आलेले पहिले व्यावसायिक रुग्ण डॉ. गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कर्नल गुप्ता यांच्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. टाटा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नल गुप्ता आता कॅन्सरपासून मुक्त आहेत. थेरपी घेतल्यानंतर कर्करोगमुक्त झालेला ते पहिले रुग्ण आहेत. वर्षभरापूर्वीपर्यंत कर्नल गुप्ता बरे होण्याचे स्वप्न पाहत होते, पण आता ते कर्करोगमुक्त झाले आहे.

 

या थेरेपीला किती प्रमाणात खर्च येतो?

 

दिल्लीस्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कर्नल व्हीके गुप्ता यांच्यासह अनेक रुग्णांसाठी ही थेरपी जीवनदायी ठरल्याचं समोर आलंय. डॉ.व्ही.के.गुप्ता हे 28 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत आहेत. 42 लाख रुपये खर्चून त्यांनी ही थेरपी घेतली आहे. परदेशात या थेरेपीची किंमत जवळपास 4 कोटी रूपये इतकी आहे.

 

भारतात कोण-कोणत्या ठिकाणी दिली जाते ही थेरेपी?

 

ही नवी थेरेपी NexCAR 19, ImmunoACT थेरेपी आहे. जो IITB, IIT-B रूग्णालयात स्थापित आहे. ही थेरेपी बी-सेल कॅन्सर सारखी ल्यूकेमिका, लिम्फोमा यांसारख्या आजारांवर फोकस करते. CDSCO ने ऑक्टोबर 2023 रोजी याच्या व्यावसायिक वापराला मंजूरी दिली आहे. सध्या ही थेरेपी भारताच्या 10 शहरांमधील 30 रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. 15 वर्षांच्या वरील रूग्ण या थेरेपीचा वापर करू शकतात.

 

काय आहे CAR-T सेल थेरेपी?

 

काइमरिक अँटीजेन रिसेप्टर CAR-T सेल थेरपीद्वारे ब्लड कॅन्सरवर उपचार केला जातो. रक्ताच्या कर्करोगाव्यतिरिक्त, लिम्फोसाइटिक ल्युकेमिया आणि बी-सेल लिम्फोमा यांसारख्या गंभीर कर्करोगांवर या थेरपीद्वारे उपचार केले जातात. या थेरपीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींच्या टी-सेल्स काढून टाकल्या जातात. यानंतर, टी पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी वेगवेगळ्या प्रकारे शरीरात सोडल्या जातात. एकदा का ही थेरेपी पूर्ण झाली की, टी पेशी कॅन्सरशी लढण्याचं काम करतात.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

वाघाने केली बैलाची शिकार


चिमुर : भिसी येथील आखर चौकापासून पाचशे मीटर अंतरावरील दसरा मैदानाच्या जवळ, निर्जन स्थळी असलेल्या शामराव मुंगले यांच्या गोठ्याबाहेर बांधून असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. बैलाला ठार केल्याची घटना ९ फेब्रुवारी शुक्रवारला पहाटे चार वाजताच्या दरम्यान घडली.

 

शामराव मुंगले यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाला सकाळी नऊ वाजता घटनेची माहिती मिळताच भिसीचे उपवन परिक्षेत्र अधिकारी संतोष

 

औतकर घटनास्थळी गेले. घटनास्थळी त्यांना वाघाचे पदचिन्ह आढळून आले. सदर भागात वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असून वन कर्मचाऱ्यांना गस्त वाढविण्याची सूचना संतोष औतकर यांनी दिली आहे. जंगललगत असलेल्या भिसी व परिसरातील जवळपास १५ गावातील शेतकरी, पशुपालक नागरिकांना वाघ व बिबट यांचा त्रास असल्याचे वृत्त दै. देशोन्नतीने वांरवार आधीच प्रसिद्ध केले होते. वाढोना येथे आठ दिवसाआधी एक बैल ठार केला . दिवसेंदिवस वाघ व बिबट यांचे हल्ले वाढतच चालले आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

लाच घेणारा कारकून कारागृहात


गडचिरोली : जमीन विक्रीकरता संमती देण्याचे आदेश पारित करण्यासाठी १५ हजारांची लाच मागणी करून १३ हजार रुपये स्वीकारताना कुरखेडा उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून नागसेन प्रेमसाद वैद्य यास सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्याची ९ फेब्रुवारीला चंद्रपूर कारागृहात रवानगी झाली.

 

चार दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास ९ रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडीत रवानगीनंतर त्यास चंद्रपूर पाठविण्यात आले. 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

तळ्याच्या पाळीवरुन ट्रॅक्टर उलटून चालक ठार


शेतातून ट्रॅक्टर घरी घेवून जाताना घडली घटना

 

नवेगावबांध:  शेतातील ट्रॅक्टर घरी घेऊन जात असताना तलावाच्या पाळीवरून उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावराटोला येथे घडली. दुर्योधन चारमल सोनवाने (२९) रा. सावरटोला असे मृतकचालकाचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार सावरटोला येथील शेतकरी किशोर तरोणे यांच्या मालकीचा नवीन ट्रॅक्टर चालक दुर्योधन सोनवाने हा शेतातून घरी घेवून जात होता. शेतातून पांदण रस्त्याने ट्रॅक्टर काढून, सरळ तलावाच्या पाळीने घराच्या दिशेने निघाला. परंतु ट्रॅक्टरचे संतुलन बिघडून ट्रॅक्टर तलावाच्या पाळीवरून शेतात कोसळला. यातच दुर्योधनचा मृत्यु झाला.

 

अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पाठविला. मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणाचा तपास अर्जुनी मोरगाव पोलिस करीत आहे.

 

 

सोनवाने कुटुंबीयांवर कोसळले संकट

 

सावराटोला येथील चारमल सोनवाने यांचा दुर्योधन हा एकुलता एक मुलगा या दुर्दैवी अपघातात शुक्रवारी ठार झाला. त्यामुळे सोनवाने कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. दुर्योधनच्या मृत्यूने सावरटोला गावावर शोककळा पसरली होती. दुर्योधनच्या पश्चात आई-वडील व २ बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. .


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024

PostImage

बसमध्ये चोरी; ठाण्यात सर्वच प्रवाशांची झडती, महिलेच्या पर्समधून ७० हजार लंपास


गडचिरोली : चामोर्शी ते गडचिरोली या प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या मागणीनुसार ब्रस थेट गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली. पोलिसांनी बसमधील ५३ प्रवाशांची झडती घेतली. मात्र कोणाकडेही पैसे आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांना सोडण्यात आले.

 

गोंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ येथील पौर्णिमा राजू राऊत यांचे गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील माहेर आहे. माहेरी येण्यासाठी सर्वप्रथम त्या आष्टी येथून चामोर्शी येथे पोहोचल्या. नंतर चामोर्शी येथून अहेरी ब्रह्मपुरी या बसमध्ये बसल्या. त्यांच्यासोबत त्यांची दोन लहान मुले होती. बसमध्ये गर्दी असल्याने त्या सर्वात मागच्या सिटरवर जाऊन बसल्या. दरम्यान, येवली येथे बस आल्यानंतर पर्स बघितले असता पर्समध्ये पैसे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. वैशाली यांनी ही बाब बसचे वाहक पौर्णिमा टेंभुर्णे यांच्या लक्षात आणून दिली. बस गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली. यावेळी बसमध्ये ५३ प्रवासी होते. सर्व प्रवाशांची पोलिसांनी झडती घेतली. मात्र एकाही प्रवाशाकडे पैसे आढळले नाही. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.

 

दोघे तळोधीत, नऊ जण कुनघाडात उतरले

 

 याबाबत वैशाली राऊत यांनी सांगितले की, त्यांनी चामोर्शीत पर्स तपासली तेव्हा पर्समध्ये पैसे होते. त्यामुळे पैसे चामोर्शीनंतरच्या प्रवासादरम्यान चोरीला गेले असण्याची शक्यता आहे. • दोन प्रवासी तळोधीत तर नऊ प्रवासी कुनघाडात उतरले. त्यांच्यापैकीच काही जणांनी पैसे लंपास केले असण्याची शक्यता वैशाली यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 11, 2024

PostImage

श्रीराम म्हणून हल्ला केल्यास श्रीराम माफ करतो काय ? 


 

ज्येष्ठ पत्रकारनिखिल वागळे हल्याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी10 आरोपींना अटक केली आहे. पर्वती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

वागळे हल्ल्यातील 10 आरोपींची नावे

 

दीपक पोटे

गणेश घोष

गणेश शेरला

राघवेंद्र मानकर

स्वप्नील नाईक

प्रतिक देसरडा

दुष्यंत मोहोळ

दत्ता सागरे

गिरीश मानकर

राहुल पायगुडे

काय आहे प्रकरण?

 

पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत "लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. कार्यक्रमस्थळी जात असताना वागळेंच्या गाडीवर हा हल्ला झाला.

 

जय श्रीरामच्या घोषणा

 

हल्ला करणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला. हल्ला करताना निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. तसेच कार्यक्रमदेखील उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला.

 

काय म्हणाले वागळे?

आजवर माझ्यावर 7 वेळा हल्ले झाले. मरण माझ्या डोळ्यासमोर होतं. मी सर्व हल्लेखोरांना माफ केलंय. जिवंत आहोत तोपर्यंत संघर्ष करणार असल्याची प्रतिक्रिया निखिल वागळे यांनी दिली. मी अहिंसावादी माणूस आहे. मला मारलं तरी हजारो वागळे तयार होतील असे ते म्हणाले.

 

मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..या सगळ्यांचा मी ऋणी असल्याचे ट्विट वागळे यांनी केले आहे.

 

शरद पवारांवर एवढी टीका होते पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता आजवर पाहिला नाही, असं म्हणत वागळे यांनी भाजपला टोले लगावले आहेत. आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 9, 2024

PostImage

महाराष्ट्र में चार चरण में होगा लोकसभा चुनाव


 

प्रथम चरण-11 अप्रैल:(7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम

 

दूसरा चरण-18 अप्रैल:(10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर

 

तीसरा चरण-23 अप्रैल:(14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले

 

चौथा चरण- 29 अप्रैल: (17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य और मुंबई दक्षिण।


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 9, 2024

PostImage

Bramhapuri news : सुमो गाडी अनियंत्रित होऊन उलटून ब्रह्मपुरी तालुक्यातील चार महीलाचा जागीच मृत्यू


 

चणा कटाईसाठी आलेल्या मजुरांची वाहतूक करणारी टाटा सुमो उलटली : सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ अपघात

 

नांद/बेसूर : चणा कटाईसाठी आलेल्या महिला मजूर परतीच्या वाटेला असताना त्यांना घेऊन जाणारी टाटा सुमो गाडी अनियंत्रित होऊन उलटली.

 

यात तिघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालकासह १३ महिला जखमी झाल्या आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिसर्ती चौकी हद्दीतील सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला, रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बामळे तिघीही रा. खरबी (माहेर) ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर अशी मृत महिलांची नावे आहेत.

 

तर सोनाबाई सिद्दुके ही नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली. जखमी तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,

 

संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत अडकिने, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.

 

सध्या उमरेड-भिवापूर तालुक्यात चणा कटाईचे काम सुरू आहे. मजुरांच्या अभावामुळे बाहेर

जिल्ह्यातील मजुरांची स्थानिक शेतकरी रोज ने-आण करीत असतात, पोटाची खळगी भरण्यासाठी रोज शंभर ते दोनशे किलोमीटरचा जीवघेणा प्रवास हे मजूर करतात.

 

अशातच गुरुवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी (माहेर) जि. चंद्रपूर येवून चणा कटाईसाठी वायगाव (गाँड)ता. उमरेड येथील शुभम राऊत यांच्या शेतात एम. एब.३३-ए-१९४७ टाटा सुमो गाडीमध्ये चालक पकडून एकूण १७ महिला मजूर आल्या होत्या. 

 

 

जखमींना नागपुरात हलविले

अपघात झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना प्राथमिक उपचारासाठी सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमीना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची

 

 माहिती मिळताच चंद्रपूर जि.प. चे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनीही घटनास्थळी दाखल होत महिलांच्या प्रकृतीची कृतीची माहिती घेतली. सदर अपघाताची नोंद बेला पोलिसांनी घेतली आहे.

 

 

अपघाताचा तपास उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, बेला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव बाडगीरकर, कुणाल ठाकूर, चाबा नेवारे करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 6, 2024

PostImage

धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना लुटले : लुटारुंवर फौजदारी गुन्हे दाखल करा


शेतकरी कामगार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

 

गडचिरोली : ४० किलो ६०० ग्रॅम प्रती गोणी वजनाप्रमाणे धान खरेदी करण्याचे शासनाचे धोरण असतांना ओलाव्याच्या नावाखाली ४२ ते ४३ किलोची खरेदी करून जिल्हाभरातील खरेदी केंद्रांवर ८ कोटी रुपयांपेक्षा अधिकची लुट शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांविरोधात शहानिशा करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केली आहे.

 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन मार्फत शेतकऱ्याकडून धान खरेदी करण्यात येते. सध्या आदिवासी विकास महामंडळाचे ९३ आणि मार्केटिंग फेडरेशनचे २१ असे साधारणतः ११४ खरेदी केंद्रांवर ही धान खरेदी सुरु असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुन लुट करण्यात येत आहे. शासन नियमा प्रमाणे खरेतर एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनापेक्षा अधिक धानाची खरेदी करता येत नाही. मात्र जिल्हाभरातील सर्व धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी (पोते) वजनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सदरच्या प्रकाराबद्दल शेतकरी जेव्हा विचारणा करतात तेव्हा, हे अधिकचे वजन ओलाव्याचे म्हणून घेण्यात येत आहेत असे उत्तर दिले जात आहेत. मात्र एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनातून शासन खरेदी केंद्र किंवा अभिकर्ता संस्थांकडून ओलाव्याची तुट गृहित धरुन ३८ किलो ५०० ग्रॅम वजन धानाचीच उचल करीत असल्याने शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी (पोते) वजनाने केली जात असलेली खरेदी ही शुध्द लुट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० लाख क्विंटलपेक्षा अधिकची धान खरेदी करण्यात आलेली असून यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ८ कोटीपेक्षा जास्त रुपयांची खरेदी केंद्रांवर अधिकचा धान प्रति पोत्यामागे घेवून लुट करण्यात आलेली आहे. 

 

त्यामुळे प्रत्येक खरेदी केंद्रांवर आपली खास पथके पाठवून व पोत्यांमध्ये खरेदी केलेल्या धानाच्या वजनाची तपासणी केली जावून या महालुटीची शहानिशा करण्यात यावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येवून अधिकच्या खरेदीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यावी अशी मागणीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 4, 2024

PostImage

धानोरा येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त


 

धानोरा : तालुक्याच्या सोडे मार्गाने धानोरा शहरात वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने ३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता फुले चौकात पकडले.

 

धानोरा तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जात आहे. याबाबत महसूल प्रशासनाला तक्रारी प्राप्त होत होत्या. याच तक्रारींच्या अनुषंगाने सोडे परिसरातून वाळूची अवैध तस्करी करणारे एम.एच. ३३ व्ही. ०९६६ क्रमांकाचे ट्रॅक्टर धानोरा येथील फुले चौकात जप्त करून तहसीलकार्यालयात जमा केले.

 

 ही कारवाई धानोराचे तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार डी. के. वाळके, तलाठी अविनाश कोडापे, कोतवाल जीवन आतला आदींनी केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 4, 2024

PostImage

Armori news:फसलेले ट्रॅक्टर चालकाच्याच अंगावर उलटले


 

 आरमोरी : शेतात कापणी केलेल्या तुरी घरी आणण्यासाठी जात असताना बांध्यांमध्ये ट्रॅक्टर फसले. चिखलातून ते बाहेर काढताना ट्रॅक्टर उलटले. चारही चाके वर झाल्याने यात दबून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आरमोरी तालुक्याच्या ठाणेगाव येथील शेतशिवारात शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.

 

सुरेश दुधराम लट्ठे (५०), रा. ठाणेगाव असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. सुरेश लट्ठे हे रोजंदारीने ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होते. शुक्रवारी ते ठाणेगाव येथील मंगेश जुवारे यांच्या सासऱ्यांच्यामालकीचे ट्रॅक्टर चालविण्यासाठी व ऋषी नैताम यांच्या शेतातील तुरी आणण्यासाठी गेले असता ट्रॅक्टर व ट्रॉली चिखलात फसली. दुसऱ्या ट्रॅक्टरमुळे कशीतरी ट्रॉली निघाली. परंतु, इंजिन फसले. सदर रोवणी हंगामसुरू असल्याने चाकांना आधीच कॅजव्हील लावले होते. कॅजव्हीलमध्ये लाकडी फाटे टाकून ती बाहेर काढत असतानाच नियंत्रण सुटले व दुर्दैवाने सुरेश लट्ठे हे त्यात दबले. त्याचा जागीच मृत्यू झाला

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 4, 2024

PostImage

Brmhapuri: बिअर बार उद्घाटनप्रसंगी बारमालकाकडून मारहाण


ब्रह्मपुरीतील घटना : घरमालकाच्या सांगण्यावर विद्यार्थी गेले जेवायला

ब्रह्मपुरी : शहरातील एका बिअरबारच्या उ‌द्घाटन कार्यक्रमात घरमालकाच्या सांगण्यावरून हजर झालेल्या दोन विद्यार्थ्यांना बारमालकाने भोजनप्रसंगी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. ३) उघडकीस आली. या घटनेत एक जखमी झाला. विद्यार्थी शिकत असल्याने त्यांनी या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदविण्याचे टाळल्याचे समजते. मात्र या प्रकाराची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

 

ब्रह्मपुरी शहरात बुधवारी (दि. ३१) सायंकाळी जयस्वाल बार अँड रेस्टॉरंट या बिअर बारच्या उ‌द्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारमालकाने यासाठी शहरातील अनेकांना निमंत्रित केले. बिअर बार परिसराच्या मागे राहत असलेले स्थानिक रहिवासी मनोहर तायडे यांनाही मालकाने बोलावले होते.

तायडे यांच्या घरी काही विद्यार्थी भाड्याने राहून मेसमध्ये जेवण करतात. ते शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत आहेत. घरमालकाने त्या दोघांनाही माझ्यासोबत कार्यक्रमाला चला, असे सांगितल्याने निमंत्रणावरून घरमालक बिअर बार उ‌द्घाटनाच्या कार्यक्रम हजर झाले.

 

दरम्यान, भोजन सुरू असताना बारमालकाने विद्यार्थ्यांची विचारपूस न करता मारहाण केली. यात एक विद्यार्थी जखमी झाला. ही माहिती परिसरातील युवकांना मिळाल्याने त्यांनी बिअर बारसमोर गर्दी केली. काही युवकांनी बारमालकाला जाबही विचारला. मात्र, शिवीगाळ करून युवकांना हाकलल्याची चर्चा परिसरात पसरताच काही वेळाने देलनवाडी वॉर्डातील काही संतप्त नागरिक बिअर बारसमोर एकत्र आले. हे दृश्य पाहिल्यानंतर उ‌द्घाटनाचा कार्यक्रम आटोपता घेतला.

 

वॉर्डातील नागरिकांच्या संतापाने गुरुवारी (दि. १) बार बंद ठेवण्यात आले होते. या प्रकाराची चर्चा ब्रह्मपुरी शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.

 

बिअर बारच्या उ‌द्घाटनाप्रसंगी सहा-सात विद्याथीं हे आमच्या समाजाच्या पाहुण्यांसोबत मिळून जेवण करत दिसून आले. त्यामुळे माझ्याकडून चुकीचा प्रकार घडला. माझी चूक लक्षात आली. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

- अश्विन ऊर्फ चिंटू जयस्वाल, जयस्वाल बार अँड रेस्टॉरंट, ब्रह्मपुरी


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 2, 2024

PostImage

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार कठाणी नदीपुलालगत रात्रीची घटना


 

गडचिरोली : शहरात रोजंदारीचे काम करून गावाकडे परत जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. युवक दुचाकीवरून वर उसळला. त्यानंतर वाहनाच्या डाव्या बाजूच्या संरक्षक अँगलमध्ये युवकाची मान अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीलगत बुधवारी रात्री ८:३० वाजता घडली.

 

शुभम राजेंद्र बेहरे (वय २८, रा. गोगाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम हा गडचिरोली येथील एका झेरॉक्स दुकानात रोजंदारीने काम करीत होता. दररोज सकाळी तो गोगाव येथून गडचिरोली येथे दुचाकीने यायचा. सायंकाळी पुन्हा तो गावाकडे परत जातअसे.

 

 बुधवारी काम आटोपून तो दुचाकीने गावाकडे निघाला. दरम्यान, रात्री ८:३० वाजता आरमोरी मार्गाने मालवाहू वाहन येत होते. एका वाहनाला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने शुभमला उडविले. धडक देणारे मालवाहू वाहन चंद्रपूर येथे जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

 

कुटुंबाचा आधार हिरावला वाहनांच्या हेड लाइटच्या प्रकाशामुळे शुभम गांगरला व मालवाहू वाहनाची त्याच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरून शुभम हा उंच उसळला. त्यानंतर मालवाहू वाहनाच्या संरक्षक अँगलमध्ये शुभमची मान अडकली. गळफास घेतल्याची स्थिती यावेळी उद्भवली. शिवाय जोरदार धडक बसल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बेहरे कुटुंबाचा एकुलता आधार हिरावला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 1, 2024

PostImage

देसाईगंज तालुक्यात पुन्हा हत्तीचा धुमाकूळ सुरू...


दोन हत्ती कळपातून भरकटले अन् रोवणीचे पन्हें तुडविले !

 

शेतकरी दहशतीत : देसाईगंज तालुक्यात पुन्हा धुमाकूळ सुरू

 

देसाईगंज : रानटी हत्तींच्या कळपाचा देसाईगंज तालुक्यातील वडसा वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून वावर आहे. हा कळप अधूनमधून कधी जंगलात तर कधी शेतशिवारात येत असतो. दरम्यान रविवार व सोमवारी हत्तींनी रोवणीला आलेले धानाचे पन्हे तुडविले. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये पुन्हा हत्तीविषयी दहशत निर्माण झाली आहे.

 

वडसा वनपरिक्षेत्रात हत्तींचा वावर महिनाभरापासून आहे. रविवारी रात्री कळपातील दोन हत्ती भरकटले. हे हत्ती चिखली गाव परिसरात दाखल झाले व त्यांनी रोवणीला आलेले पीक पायाखाली तुडविले. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळी दोन हत्ती दिसल्याने चिखलीसह परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. रानटी हत्तींचा कळप वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव येथील एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक ८०, ८१, ८२ ते वन उपविभागाच्या ८४, ८५ जंगलात वावरत आहे. हत्तींच्या ह्या कळपाने चिखली परिसरात एन्ट्री करून धान पन्हे तुडविले. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सोमवारी वनविभागाच्या पथकाने नुकसानीचा पंचनामा केला.

 

 

गोंगाटामुळे हत्ती बिथरले?

 

वडसा वनपरिक्षेत्रातील काही कक्ष हे एफडीसीएमच्या अधिकार कक्षेत येतात. ह्या ठिकाणी लाकडाचे बीट आहेत. व त्याची वाहतूक ही अवजड वाहनांमार्फत केली जाते. याच परिसरात हत्तींचा वावर आहे. वाहनांचा कर्कश आवाज व मजुरांचे आवागमन आदी कारणांमुळे हत्ती बिथरत आहेत. यावर वडसा वनविभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, वाढोणा येथे हत्तिणीच्या मृत्यूनंतर हत्तींचा कळप शांत झाला होता.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 1, 2024

PostImage

वळणावर झाला घात; पित्यासह लेक ठार !


गट्टा परिसरातील मंदिराच्या वळणावर अपघातात ट्रॅक्टर उलटले.

 

 एटापल्ली : स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता व लेकीचा दुचाकी ट्रॅक्टरच्या समोरासमोर धडकेत मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली-गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. राजू झुरू आत्राम (वय ४८) व करिश्मा झुरू आत्राम (२१, रा. देवपहाडी) असे अपघातात ठार झालेले वडील व लेकीचे नाव आहे. 

 

तालुका मुख्यालयापासून २० कि.मी. अंतरावरील देवपहाडी येथून राजू आत्राम हे आपल्या लेकीसह मोटारसायकलने एटापल्लीला येत होते. दरम्यान, एटापल्लीवरून सिमेंट बॅग व स्टील (लोखंड) घेऊन ट्रॅक्टर एटापल्लीवरून गट्टामार्गे जात होता. दोन्ही वाहनांची महादेव मंदिराच्या वळणावर समोरासमोर धडक झाली. यात मोटार सायकलचालक राजू आत्राम हे जागीच ठार झाले; तर मुलगी करिश्मा ही गंभीर जखमी झाली. तिला गडचिरोली येथे आणत असताना चार्मोर्शीजवळ वाटेत मृत्यू झाला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 1, 2024

PostImage

Gadchiroli news: तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या


गडचिरोली: शहरातीलबाजाराजवळील तलावात एका ४७ वर्षीय इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दिलीप कवडू पेटकुले (रा. गोकुलनगर) असेआत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. 

 

दिलीप हा मंगळवारपासून गायब होता. त्याच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सायंकाळी तो बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. बुधवारी सायंकाळी तलाव परिसरात काम करणाऱ्यांना एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दिलीपच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी दिलीपचा मृतदेह ओळखला. दिलीपने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली. हे कळू शकले नाही. गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 1, 2024

PostImage

Armori news: घरी काहीही न सांगता अकरावीतील मुलगी गायब आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


आरमोरी : कुटुंबियांना काहीही न सांगता घरातून निघून गेलेली १६ वर्षीय मुलगी सायंकाळी परतली नाही. सर्वत्र शोधाशोध व नातेवाइकांकडे चौकशी करूनही मुलगी सापडली नाही, त्यामुळे तिच्या वडिलांनी थेट आरमोरी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली.

 

आरमोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील इयत्ता अकरावीला शिकणारी अल्पवयीन मुलगी २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान घरच्यांना काहीही न सांगता घरातून निघून गेली. ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडील व नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती सापडली नाही. घरी परत येईल, या आशेवर कुटुंबियांनी चार दिवस प्रतीक्षा केली. मात्र मुलीचा शोध न लागल्याने अखेर वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फूस लाऊन पळवून नेले असल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलगी व अज्ञात आरोपी कुणाला सापडल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आरमोरी पोलिसांनी केले आहे.

 

तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी २८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

 

गावालगतचा मुलगाही गायब?

गायब झालेली अल्पवयीन मुलगी ही अकरावीला शिकत असून ती गावानजीकच्या शाळेत जाते. तिच्या गावालगतच्या एका गावातील मुलासोबत तिचे सूत जुळले होते, सदर प्रेमप्रकरणातून दोघेही गायब असल्याची खमंग चर्चा परिसरात आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

छगन भुजबळ: ओबीसी समाजाला फसविण्याचे काम सुरू, शपथपत्र देऊन जात बदलता येत नाही


मुम्बई: सरकारने शनिवारी (27 जानेवारी) अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आमच्या ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात आहे त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

 

बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, असंही भुजबळ यांनी म्हटलं.

 

सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मुंबई येथील 'सिद्धगड' या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुध्द राज्यातील सर्व ओबीसी समाजाचे आणि संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते.

 

या बैठकीला छगन भुजबळ यांच्यासह, माजी मंत्री राम शिंदे, गोपीचंद पडळकर, नारायण मुंडे, आगरी समाजाचे राजाराम पाटील, मुस्लीम ओबीसी नेते शब्बिर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, दौलतराव शितोळे, सत्संग मुंडे, कल्याण दळे, दशरथ पाटील, सुभाष राऊत, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, ईश्वर बाळबुद्धे, बाळासाहेब कर्डक यांच्यासह विविध संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते

छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना म्हटलं, "ओबीसी समाजाला फसविण्याचं काम सुरू आहे. सगेसोयरे याची स्पष्ट व्याख्या असताना त्यात बेकायदेशीर बदल का केले जात आहे. या देशात शपथपत्र देऊन जात बदलता येत नाही. ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घेऊन ओबीसींना आरक्षणाच्या बाहेरच ढकलण्याचे काम सुरू आहे."

 

येत्या 1 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलने केली जाणार आहेत.

 

त्याचबरोबर मराठवाड्यातून सुरवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

या बैठकीत सध्या चालू असलेल्या आरक्षणाच्या परिस्थितीवर काही ठराव देखील मंजूर करण्यात आले.

 

1. आरक्षणासंबंधीच्या राजपत्राचा मसुदा रद्द करावा

 

महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब 26 जानेवारी 2024 नुसार मसूदा काढला आहे. यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2024 ची अधिसूचना रद्द करण्यात यावी.

 

2. कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती द्यावी

 

महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंवैधानिक असून, मागासवर्ग आयोग नसताना मराठा - कुणबी / कुणबी - मराठा जात नोंदींचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगाने (राज्य किंवा राष्ट्रीय आयोग) मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे.

 

मराठा - कुणबी / कुणबी – मराठा प्रमाणपत्रांच्या या वितरणाला स्थगिती देण्यात यावी.

 

3. राज्य मागासवर्ग आयोग आणि शिंदे समिती रद्द केली जावी

 

भारतीय संविधानातील कलम 338 (ब) प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले (CONFLICT OF INTEREST) सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना माजी न्यायमूर्ती सुनील सुक्रे, ओमप्रकाश जाधव, अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागासवर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या.

 

त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा साहनी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावेत असे अपेक्षित असताना मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमुर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी.

 

हे तीन ठराव बैठकीत मंजूर करण्यात आले.

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

नक्षली विचारधारा हद्दपार- जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे प्रतिपादन


गडचिरोली ब्युरो. आत्तापर्यंत जिल्ह्यात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. नक्षली विचारधारांना आता जिल्ह्यातून हद्दपार केले जात आहे.

 

दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि शासनाला अंगीकारले आहे. त्यामुळेच जिल्ह्याची वाटचाल आता विकासाकडे होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.

 

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हावासियांना उद्देशून ते बोलत होते. पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहन करून संपन्न झाला. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिसअधीक्षक यतीश देशमुख, अति. जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणार

भारतमाला प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातून 82.15 किमीचा मार्ग जाणार असून जिल्ह्यात समृध्दी महामार्ग राज्य शासनाकडून प्रस्तावित आहे.

 

■ तसेच 1888 कोटी रुपये खर्च करून वडसा-गडचिरोली या 52.68 किमी ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची कार्यवाही सुरू आहे.

 

• जिल्हा मुख्यालयापासून 4 कि.मी. अंतरावर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे.

 

• तसेच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र पुढील वर्षापासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

 

 

 

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीचा गौरव

 

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यात गोंडवानाविद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, प्रशांत शिरके, महेंद्र गणवीर, संदिप कराडे, निलेशतेलतुंबडे, अजय बोडने, पोलिस विभागातील मुंशी मासा मडावी, मोहन लच्चु उसेंडी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मोहित बोदेले, जयंत राऊत, आर्या ठवरे, दिक्षा वाळके, सचिन रोहनकर, अनिकेत भुरसे, संजना येलेकर, प्रतिक रामटेके, उमा सहारे, हिमांद्री गायन, आरोग्य विभाग धन्वंतरी हॉस्पीटल अॅन्ड मल्टीस्पेशालीटी सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आदींचा समावेश होता.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

चुलत भावाने केला चाकूने हल्ला


गोंदिया : गोंदिया : शेतीच्या वादातून चुलत भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम खैरीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली, आरोपी उमेश भगवान पुराम (२४) या तरुणाने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरीटोला येथील वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना आरोपी चुलतभाऊ उमेश भगवान पुराम (२४) हा मोटारसायकल घेऊन बिरसा मुंडा पुतळ्याजवळ आला. हातात तलवार घेऊन तो लालचंद बळीराम पुराम (३८) यांच्या दिशेने धावला. मात्र, तलवार विश्वास शिवकुमार तुमसरे याने हिसकावली असता तो पुन्हा २० मिनिटांनी चाकू घेऊन आला आणि लालचंद यांच्यावर मागून हल्ला केला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू


नागभीड • पोलीस स्टेशन अंतर्गत नवखळा येथील शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. सायत्रा वामन नारनवरे (६३) रा. नवखळा असे मृतक महिलेचे नाव आहे. सायत्रा आपल्या पतीसोबत रविवारी सकाळी शेतावर तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेली असता दुपारच्या सुमारास जेवण करण्यासाठी दाम्पत्य

 

शेतातच बसले होते. अचानक तिथेच असलेल्या विषारी सापाने डंक मारला ही बाब महिलेच्या पतीला कळताच गावातील इतरांना बोलावून नागभिड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार दरम्यान सायत्राबाईचा मृत्यू झाला. मृतकाला पती व दोन मुली आहेत.

 

तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरु असून यामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

वाघ, बिबट, रानहल्ला, अस्वल व इतर वन्यप्राण्यांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर असतो. तसेच शेतीत काम करतांना विषारी सापांचीही भिती असते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

निद्रानाशाचा त्रास, रेल्वेपुढे मोहनलालची आत्महत्या


मालगाडीसमोर घेतली उडी : गुदमा येथील घटना

 

 गोंदिया : निद्रानाशाच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीने मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. गोंदिया ते गुदमादरम्यान असलेल्या डाऊन रेल्वे लाइनवर शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी ६:०५ वाजता दरम्यान ही घटना घडली. मृताचे नाव मोहनलाल हेमराज हेमणे (५६, रा. दत्तोरा) असे आहे.

 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहनलाल यांना मागील तीन वर्षांपासून त्यांना झोप येत नव्हती. यासाठी त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतला. तरीही देखील त्यांना झोप येत नसल्यामुळे त्यांनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता

 

त्यांनी गोंदिया ते गुदमादरम्यान असलेल्या डाऊन रेल्वे लाइनवरील मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली. निखिल मोहनलाल हेमने (२४, रा. दत्तोरा) यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार बोहरे करीत आहेत.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

प्रभू रामाने कोट्यवधी लोकांना एकत्र आणले 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन


 नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याने कोट्यवधी लोकांना एकत्र आणले.

 

कार्यक्रमाच्या वेळी देशाची सामूहिक शक्ती दिसून आली. प्रभू रामाचे सुशासन संविधान निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत होते आणि म्हणूनच २२ जानेवारीला अयोध्येत मी 'देव ते देश' आणि 'राम ते राष्ट्र' बद्दल बोललो होतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

 

या वर्षीच्या पहिल्या 'मन की बात' प्रक्षेपणात ते बोलत होते केले. अयोध्येतील अभिषेक सोहळ्याबाबत प्रत्येकाची भावना सारखीच आहे, या काळात अनेकांनी राम भजने गायली. तर २२ जानेवारीच्या संध्याकाळी देशाने 'राम ज्योती' पेटवून दिवाळी साजरी केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महिला शक्त्ती प्रदर्शनाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, २० तुकड्यांपैकी ११ तुकड्या पूर्णपणे महिलांच्या होत्या. २१व्या शतकातील भारत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मंत्र घेऊन पुढे जात आहे. या वेळी १३ महिला खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.प

 

द्म पुरस्कारांची प्रक्रिया बदलली

 

"पद्म पुरस्काराने सन्मानित झालेले अनेक मान्यवर असे आहेत ज्यांनी तळागाळात काम केले आणि मोठे बदल घडवून आणले. मला खूप आनंद आहे की गेल्या दशकात पद्म पुरस्कार प्रदान करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. आता ती लोकांची पद्मा झाली आहे. आता लोकांनाही स्वतःला उमेदवारी देण्याची संधी मिळते. पद्म पुरस्कारांसाठी यंदाची नामांकने २०१४ पेक्षा २८ पट अधिक होती, असे पंतप्रधान मोदीनी या वेळी सांगितले.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

भरधाव दुचाकीची धडक युवक गंभीर जखमी


चंद्रपूर:  भरधाव वेगाने मोपेड ची धडक बसून एक गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२६ जानेवारी रोजी घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार रमाबाई चौक, विद्या नगर येथील युवक संकेत धीरज चांदेकर हा पायी रस्त्याने जात असता समोरून मुदस्सिर शेख रा. महाराणा प्रताप वार्ड हा मोपेड क्र. एम.एच. ३४ टी. २३८९ ने भरधाव वेगाने येत संकेत यास धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागले असून त्याला चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय येथे अतीदक्षता विभागात भरती केले आहे. तसेच मोपेड चालक मुदस्सिर शेख याचा पायाला व डोक्याला मार लागले आहे. पोलिसांनी मोपेड चालक मुदस्सिर अब्दुल वहाब शेखयाचा वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

सध्या युवकांमध्ये वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली असून यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

दलित सरपंचाला ध्वजारोहणापासून रोखणारा कर्मचारी निलंबित


काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या आरोपानंतर कारवाई

 

 भोपाळ, . मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दलित सरपंचाला तिरंगा ध्वज फडकवण्यास नकार देणाऱ्या पंचायत कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर समिती चौकशी करत होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिओरा तहसीलच्या तरणा ग्रामपंचायतीत शुक्रवारी ही कथित घटना घडली, त्यानंतर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी सरपंचावर दलित असल्यामुळे

 

भेदभाव केल्याचा आरोप केला होता. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अक्षय टेमरवाल यांनी शनिवारी रात्री सांगितले की, तरेणा ग्रामपंचायतीचे रोजगार सहाय्यक लखन सिंग सोंधिया यांनी प्रजासत्ताक दिनी गावाच्या सरपंचाऐवजी अन्य कोणीतरी ध्वजारोहण केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

विश्वासाने मित्रांना मदत केली, त्यांनीच ६२ लाख रुपये हडपले


 मुंबई : व्यापाऱ्याच्या ६२ लाखांवर पैशावर विश्वासू मित्रानेच डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

 

अंधेरीतील व्यावसायिक सुरेश पटेल यांचा रेडीमेड कपड्यांचा होलसेल व रिटेलचा व्यवसाय आहे. व्यावसायिक मित्रांनी त्यांच्याकडून १५ दिवसांपूर्वी वैयक्तिक कामासाठी ४०

 

लाख रुपये कर्ज म्हणून घेतले. तसेच आणखी एक मित्राकडे वैयक्तिक महत्त्वाच्या कामासाठी २२ लाख ५० हजार रुपये दिले होते. काही दिवसांनी त्यांनी दोघांकडे पैसे परत मागितले. दोघांनी विश्वासू मित्र असलेल्या विनोद पटेलकडे पैसे देत तक्रारदार यांना देण्यास सांगितले. मात्र, काही वेळाने विनोदचा फोन बंद लागला. तो ६२ लाख रुपये घेऊन पसार झाल्याची खात्री पटताच पोलिसांत धाव घेतली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

बहुजनवादी राजकारण हाच सक्षम पर्याय ,ॲड. सुरेश माने यांची शेकाप कार्यालयाला भेट


गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी जनविरोधी धोरणांना शह देण्यासाठी बहुजनवादी राजकारण करणे हाच सक्षम पर्याय आहे. त्यामुळे स्पष्ट वैचारीक भूमिका असणाऱ्या पक्षांची आघाडी असणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे मत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केले. 

बिआरएसपीच्या कार्यकर्ता बैठकीनिमित्य ॲड. सुरेश माने गडचिरोलीत आले होते. त्यानिमित्त त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यादरम्यान चर्चा करतांना ते म्हणाले की, देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी अजेंड्याला सामान्य जनता कंटाळली आहे. अशावेळी प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेसने सर्वांना एकत्र घेवून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. तसे झाले नाही तर किमान प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील बहुजनवादी विचारांच्या पक्षांनी स्पष्ट भूमिका घेवून निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरील बांधणीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते यांनी ॲड.सुरेश माने यांचे शेकापच्या वतीने स्वागत केले. यावेळी बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष ॲड. विशेष फुटाणे, प्रदेश सचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, दिक्षा रामटेके, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024

PostImage

राजकीय अस्तित्वासाठी आंबेडकरी समूहाने कामाला लागा* - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने


गडचिरोली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर पक्ष संघटन आणि जनहिताच्या मुद्द्यावर संघर्ष उभा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ.सुरेश माने यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

 

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक प्रतिनिधी, फुले - आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. उज्वला शेंडे, तारका भडके, युवा नेते विनोद मडावी, कुणाल कोवे, बीआरएसपी चे महासचिव भास्कर बांबोळे, संजय मगर, महिला सहसंयोजिका पूनमताई घोनमोडे उपस्थित होते.

   

       सध्याच्या राजकारणात देशात आणि राज्यात रिपब्लिकन - बहुजन राजकारणाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी जनतेने अतिशय गंभीर होऊन सामाजिकच नव्हे तर राजकीय स्तरावर आंबेडकरी ताकद उभी करुन मताच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आंबेडकरी जनतेने काम करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून याकरिता गडचिरोली मध्ये बीआरएसपीच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी आंबेडकरी कार्यकर्ता महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्धार डॉ. सुरेश माने यांनी जाहीर केला. 

 

          देशातील वातावरण सध्या संविधान विरोधी आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याने देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्यांनी राजकारणात उतरण्याची गरज असल्याचे तारका भडके यांनी सांगितले.

 

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रभारी राज बन्सोड, संचालन प्रतीक डांगे तर आभार जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम रामटेके, अरविंद वाळके, जितेंद्र बांबोळे, सतीश दुर्गमवार, संगरक्षित बांबोळे, हेमंत रामटेके, प्रफुल रायपुरे, उर्मिला वाळके, विद्या कांबळे, सविता बांबोळे, प्रीती इंगळे, प्रफुल रायपुरे, देवा वनकर, हेमंत नैताम, कमलेश रामटेके, पियुष वाकडे, सचिन बनसोड, धम्मदीप बारसागडे, चंद्रकांत रायपुरे, प्रकाश बन्सोड, पुरुषोत्तम बांबोळे आदीनी सहकार्य केले.

-------------------

*राज बन्सोड* 

जिल्हाप्रभारी

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, गडचिरोली

8806757873


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 28, 2024

PostImage

प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवरही त्याची नजर फिरली अन्


नागपूर : एका हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने पॅरोलवर बाहेर येताच विवाहित प्रेयसी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवरही त्याची नजर फिरली. प्रेयसीला घराबाहेर काढून तिच्या मुलीवर बलात्कार केला. प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. कुणाल भारत गोस्वामी (३३) रा. जरीपटका, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

 

कुणाल गोस्वामी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. २०१४ मध्ये कुणाल आणि त्याच्या साथीदारांनी पप्पू काळे नावाच्या गुडांचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणात न्यायालयाने कुणाल आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पीडित महिला आणि कुणाल शेजारी होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना कुणाल महिलेशी शारीरिक संबंध ठेवत होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कुणाल पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला. तो प्रेयसीला भेटाण्यास तिच्या घरी गेला.

 

यावेळी जबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेच्या गैरहजेरीतही तो तिच्या घरी जात होता. या दरम्यान त्याची प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्या आईशी असलेले प्रेमसंबंध वडिलाला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव मुलीने होकार दिल्याने त्याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. कुणालच्या गुंड प्रवृत्तीमुळे पीडित मुलगी गप्पच राहिली. जानेवारी २०२४ ला तो पुन्हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर त्याने मुलीलाही संबंधाची मागणी केली. विरोध केला असता तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि धमकावून निघून गेला. मुलीने आईला घटनेची माहिती दिली. कुणालने यापूर्वीही जबरीने अत्याचार केल्याचे सांगितले. महिलेने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी आरोपी कुणालवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. कुणाल विरुद्ध घरफोडी, लोकांना धमकावणे, खून व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याने कोणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करीत नव्हते. यामुळे त्याची हिंमत वाढली होती. पॅरोलवर सुटल्यानंतर तो सतत महिलेचे लैंगिक शोषण करीत होता. मात्र मुलीचेही लैंगिक शोषण करीत असल्याचे समजल्याने महिलेने हिंमत करून पोलिसात तक्रार केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 28, 2024

PostImage

मुलीने अर्धनग्नावस्थेत जंगलातून काढला पळ… बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक


नागपूर : एका १० वर्षीय मुलीला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने युवकाने जंगलात नेले. तिचे कपडे काढून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने शौचास जाण्याचा बहाणा करून थेट पळ काढला. मुख्य रस्त्यावर पोहचून दोन दुचाकीचालकाला मदत मागितली. त्या दोघांनी तिला पोलीस ठाण्यात पोहचवले. देवदुताप्रमाणे आलेल्या दोन सुरक्षारक्षकामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता एमआयडीसीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.

 

सोनू उर्फ मोहम्मद सरफराज जहागीर आलम (२२) असे आरोपीचे नाव असून तो एमआयडीसी परिसरातील एका झोपडपट्टीत राहतो. त्याच्या वस्तीत १० वर्षीय पीडित मुलगी राहते. दोघांची तोंडओळख आहे. शुक्रवारी गणराज्यदिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना दुपारी चार वाजता जेवण करायला कार्यक्रमात गेली होती. तिथे आरोपी सोनूने तिच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेतला. तिला चॉकलेट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने सायकलवर बसवले. तो ओळखीचा असल्याने ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. तासभर आरोपीने तिला सायकलवर परिसरात फिरवले. त्यानंतर डिंगडोह परिसरात डंपिंग यार्डपासून काही अंतरावर असलेल्या निर्मनुष्य परिसरात घेऊन गेला. तिथे जबरदस्तीने तिला अंगावरील कपडे काढायला लावले. प्रसंगावधान राखून मुलीने हुशारी दाखवून शौचास जायचे असल्यास सांगितले. आरोपी तयार झाला. शौचाच्या बहाण्याने ती मुलगी थोडी लांब गेली आणि आरोपी थोडा बेसावध असल्याचे पाहून तेथून पळ काढला. त्यानंतर पळत ती मुख्य रस्त्यावर आली आणि मदतीसाठी ओरडू लागली.

 

 

 

दरम्यान त्या रस्त्यावर तिला एका शाळेचे दोन सुरक्षारक्षक जाताना दिसले. त्यांना थांबवून तिने सर्व प्रकार सांगितला.त्यांनी तिला चादरीने झाकले व एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळ गाठले. जंगलातून पळत येताना काही ठिकाणी ती अनेक ठिकाणी पडल्याने जखमीही झाली होती. पोलिसांनी प्राथमिक उपचार करून तिला घेऊन तिला तिच्या घरी आणून सोडले. हा प्रकार ऐकून तिच्या आईला धक्का बसला. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार केले आणि घटनेच्या काही तासातच आरोपीला परिसरातून ताब्यात घेतले. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने जंगलात नेल्याची कबुली दिली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

GAdchiroli: गडचिरोली येथे होणार विमानतळ


Gadchiroli news: राज्यात एकूण 32 विमानतळे आहेत. यापैकी बर्‍याच विमानतळांची विकास कामे सुरू आहेत. अशा विमानतळांवरील विकासकामे कालबद्धरीत्या पूर्ण करावी, असा निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत, गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

 

  सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, पुरंदर, गोंदिया, गडचिरोलीसह अन्य विमानतळ विकासकामांचा समग‘ आढावा फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर येथील बोरामनी विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्देश देत फडणवीस म्हणाले की, भारतीय विमानतळ प्राधिकरण व राज्य शासन यांच्यात विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करावा. होटगी विमानतळ विकासाकरिता प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा. पुरंदर विमानतळाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन एकदाच करावे. पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडू नये. त्यासाठी अधिग्रा‘हणाचा योग्य आराखडा तयार करावा.

 

अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेऊन या कामाला गती द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात मोरवी विमानतळाच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे. या ठिकाणी धावपट्टी वाढविण्याला वाव असून, त्यानुसार धावपट्टी वाढविण्यात यावी, असे ते म्हणाले. यावेळी जळगाव, गोंदिया, बारामती, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, लातूर, चीपी, शिर्डी येथील विमानतळ कामांचाही आढावा घेण्यात आला.

      


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

बापरे चोरट्यांनी चक्क 'देवा'लाच चोरले !


गोंडपिपरी : तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील महादेव मंदिरातील रेणुका माता व विठ्ठल रुखमाईची मूर्ती चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर तणाव निवळला.

 

भंगाराम तळोधी येथील महादेव मंदिरात एक भाविक गुरुवारी सकाळी दर्शनासाठी गेला होता. पूजा करीत असताना मंदिरातील रेणुका माता व विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीची चोरी झाल्याचे दिसून आले. त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली.

 

काही वेळातच मंदिर परिसरात संपूर्ण गाव एकत्र झाले. नागरिकांकडून तर्कवितर्क लावून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मनोहर मोगरे हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

जाणार होते हनिमूनला, नेले अयोध्येला; मागितला घटस्फोट


भोपाळ : हनिमूनसाठी गोव्याला नेण्याचे आश्वासन देऊन अयोध्येला नेल्यामुळे एका महिलेने चक्क घटस्फोटासाठी अर्ज केल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये समोर आला आहे.

 

महिलेने घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात सादर केला असून, येथे या जोडप्याचे समुपदेशन करण्यात येत आहे.

 

काउंसिलर शैल अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांचे लग्न झाले होते. पत्नीला हनिमूनसाठी परदेशात नेण्याचे आश्वासन त्याने दिले होते. मात्र त्याच्या वृद्ध आई-वडिलांना मंदिरात जाण्याची इच्छा असल्याने त्यांनी घरगुती धार्मिक स्थळाला भेट द्यावी, असा आग्रह धरला. अखेर याजोडप्याने हनिमूनसाठी गोव्याला जायचे मान्य केले.

 

महिलेने आरोप केला की, हनिमूनला जाण्यासाठीची सर्व तयारी झाली होती. मात्र पतीने प्रवासाच्या एक दिवस आधी आपण आईच्या इच्छेनुसार अयोध्या आणि वाराणसीला जात आहेत, असे सांगितले होते.

विश्वास तोडला

महिलेने अखेर त्याच्यासोबत अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र माघारी परतल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यामुळे महिलेने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, पतीने विश्वास तोडल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

वैरागड वासियांची ग्रामपंचायतीवर धडक


वैरागड:  मेंढेबोडी, पाठणवाडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वैरागड ग्रामपंचायतीमध्ये भरमसाठ वाढीव घरकर करण्यात आले. वाढीव घरकर कमी करण्यासाठी शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायतीवर धडक देऊन वैरागड ग्रामपंचायतीमध्ये निवेदन सादर केले.

सुरवातीला ग्रामपंचायत मार्फत १०० रुपये घरकर होता. सन- २०२२-२३ मध्ये कर वाढवून १५०० रुपये करण्यात आला. महानगर पालिका मुंबई येथील घरकर पेक्षा वैरागड येथील घरकर अवाढव्य वाढविण्यात आलेला आहे. घरकर समविचारपूर्वक नागरिक देऊ शकेल असा लावावा अशी मागणी वैरागड येथील नागरीकांनी केली.

 ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्राम सभेत किंव्हा गावात कोणतीही माहिती न देता अवाढव्य घरकर वाढविले आहे

 

नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहून घराची योग्य चौकशी करून घरकर आकारणी करण्यात यावी अशी मागणी वैरागड, मेंढेबोडी आणि पाठणवाडा येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

१.३७ कोटीच्या धानाचा अपहार; पाच जणांवर गुन्हा संस्थेचा अध्यक्ष, सचिव, निरीक्षक आरोपी


 एटापल्ली : तालुक्यातील हेडरी येथीलआदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत पणन हंगाम २०२२-२३ मध्ये धान खरेदी केलेल्या व्यवहारात तब्बल १ कोटी ३७ लाख रुपयांच्या धानाची तफावत आढळली, याप्रकरणी सखोल चौकशी झाल्यानंतर आविका संस्थेचे अध्यक्ष, सचिव, तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यासह एकूण पाच जणांवर २५ जानेवारी रोजी आलदंडी पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

धानाच्या अफरातफर प्रकरणी १२ जानेवारी २०२४ रोजी आदिवासी विकास महामंडळ अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक (उच्च श्रेणी) बी. एस. बरकमकर यांनी आलदंडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर सुकू पंगाटी,सचिव किशोर पदा, केंद्र प्रमुख सुरेश पुंगाटी, मदतनीस प्रदीप दुर्गे, तसेच आदिवासी विकास महामंडळ कार्यालय अहेरीच्या प्रभारी विपणन निरीक्षक सोनाली पेंदाम यांच्याविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पाचही आरोपीविरोधात भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ अन्वये २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अशी आढळली तफावत खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये हेडरी धान खरेदी केंद्रावर ६७१५.३३ क्चिंटल म्हणजेच १२ हजार ९९८ पोती धानाचा साठा कमी आढळला, २०४० रुपये प्रतिक्विंटल दराने १ कोटी ३६ लाख ९९ हजार १७३ रुपये २० पैसे, तसेच बारदान्याचे ४ लाख २५ हजार ८१४ रुपये ४८ पैसे असे एकूण १ कोटी ४१ लाख २५ हजार ८७ रुपये ६८ पैसे एवढी तफावत आढळली.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

दारू देत नाही म्हणून घरात शिरून मारहाण


गोंदिया : दारू देत नाही या कारणावरून घरात शिरून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम डांगोर्ली येथे २३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता दरम्यान घडली.

 

फिर्यादी गजानन अनंतराम मेश्राम (४१, रा. डांगोर्ली) हे पत्नी व मुलासह जेवण करीत असताना आरोपी मदन रंगलाल पाचे (४०, रा. डांगोर्ली) हा त्यांच्या घरात शिरला. त्याने मला दारू देत नाही यावरून घरातील सामान फेकफाक करून गजानन मेश्राम यांना धक्काबुक्की केली व गालावर थापड मारली. तसेच शिवीगाळ करून मला दारू दिली नाही तर ४-५ लोकांना बोलावून तुम्हाला मारून टाकील अशी धमकी दिली. पोलिसांनी प्रकरणी भादंवि कलम ४५२, ३२३, ४२७, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यावर मुलाने त्याच्या मैत्रीणीवर केला वारंवार बलात्कार


नागपूर : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यावर नागपूरमधील एका मुलाने त्याच्या मैत्रीणीवर वारंवार बलात्कार केला. नागपूरच्या सत्र न्यायालयाने फेसबुक फ्रेंडला कठोर शिक्षा सुनावण्यात दहा वर्षाचा सश्रम कारावास भोगण्याची शिक्षा दिली. आरोपी मुलावर तीन हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम जमा न केल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला.

 

आकाश गजानन टाले (२७) असे आरोपीचे नाव असून, तो मानवसेवानगर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १७ वर्षे ७ महिने वयाची होती. ती ब्यूटी पार्लरचे काम करीत होती. २०१८ मध्ये तिची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ते फुटाळा तलावाजवळ एकमेकांना भेटले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीवर प्रेम व्यक्त करून तिला लग्न करण्याचे वचन दिले.

 

 

 

काही दिवसांनी आरोपीने पीडित मुलीला मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. पुढे आरोपीने २०१९ पर्यंत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने मुलीसोबतचे संबंध तोडले. तिच्यासोबत बोलणे बंद केले. परिणामी, मुलीने १८ मे २०१९ रोजी आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच केले लैंगिक शोषण


अमरावती : मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणीनंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पीडित मुलीच्या शाळेला २२ जानेवारी रोजी सुटी होती. ती गावातील एका कार्यक्रमात जेवण करण्यासाठी गेली होती. परत येत असताना रस्त्यात तिला तिची मामी भेटली. त्यामुळे ती मामीसोबत त्यांच्याकडे गेली. मामी बाहेर गेल्‍यानंतर पीडित मुलगी व तिचा मामा हे दोघे घरी होते. त्याने तिचे लैंगिक शोषण केले. सदर घटनेनंतर पीडित मुलगी ही कशीबशी घरी पोहोचली. तिने घडलेला प्रसंग आईला सांगितला.

 

 

दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला वरूड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचा जबाब नोंदविला. त्या आधारावर कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण मध्यप्रदेशातील संबंधित ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024

PostImage

आपल्याकडे आलेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे - संस्थाध्यक्ष अरविंद पोटे


 

 

*मंदार कृषी तंत्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

 

*प्रतिनिधी : दिलीप अहिनवे*

 

मुरबाड, दि. २६ : मुरबाड तालुक्यातील कोळींब गावातील मंदार कृषी तंत्र विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

          कार्यक्रमाला पाहुणे म्हणून श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोटे, संस्थेच्या उपाध्यक्षा विजयाताई पोटे, कल्याण मधील डॉ. अभिजीत शिंदे, स्थानिक उपसरपंच संकेश पाठारे, प्राचार्या निलाक्षी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भुषण गायकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी जाधव, शिवसेना कार्यकर्त्या राजलक्ष्मी अंगारखे, माजी सरपंच कृष्णा राऊत, उद्योजक मोहन राऊत, विद्यार्थी व सर्व शिक्षक हे उपस्थित होते.

         

संस्थेचे अध्यक्ष अरविंद पोटे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बासरी व बिगुल वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षकांनी चांगल्याप्रकारे शिकवले व विद्यार्थ्यांची इच्छा असली तर रिझल्ट काय असतो हे उत्तम बासरी वाजवुन विद्यार्थिनींनी आम्हाला दाखवुन दिले. आपले हे ॲग्रीकल्चर कॉलेज आहे. मुले दहावी पास झाली की, त्यांना शेती करण्यास कमीपणा वाटतो. शेती मालाला बाजारभाव कमी मिळाला की, शेतकरी नाराज होतात. परंतु शेतीत प्रगती केली तर भविष्य चांगले आहे. सध्या परदेशात व आपल्या देशात शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करत आहेत. भातशेती करायला येथील शेतकरी तयार नसतात. खर्च भरपुर परंतु त्यामानाने उत्पन्न कमीच मिळते. 

          कल्याण मधील एका संस्थेने मागील वर्षी आपल्या कॉलेजमधील १८ विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर काम केले. सन २०१२ च्या बॅचमधील चंद्रकांत पष्टे हा विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. आपल्याकडे आलेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. करता येण्याजोगे चांगले व्यवसाय भरपुर असतात ते करताना आपल्याकडे इच्छा हवी. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यात काही तरी चांगले करायचे आहे असा निश्चय करुया. आपण यशस्वी व्हायचे आहे. आपल्या जोडीदाराला देखील सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे.

         कल्याण मधील डॉ अभिजीत शिंदे यांनी सांगितले की, आज आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आपल्या संविधानात न्याय, समता, एकता व बंधुता या चार घटकांचा समावेश होतो. ही चतु:सूत्री अंमलात आणण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक म्हणजे असे राज्य की, जेथे लोकांचा प्रतिनिधी लोकांमधुन जातो आणि तो लोकांसाठी सेवा तसेच कार्य करतो. म्हणून भारत हा प्रजासत्ताक देश आहे. भारतात आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. भारताची आणि आपल्या प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याची संधी त्याला मिळते. आजच्या दिवशी आपण एक निश्चय करुया की, ही चतु:सुत्री अंमलात आणु. या चतु:सुत्रीचा कोठेही अवमान होऊ देणार नाही याची निश्चित स्वरुपाची काळजी घेऊ. एकमेकांच्या सहाय्याने आमच्या राष्ट्राचे कल्याण कसे होईल याचा विचार करु. तुम्ही आज छान पद्धतीने संविधानाचे वाचन केले आहे. आपण प्रत्येकाने संविधान आत्मसात करावे अशी आशा व्यक्त करतो.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

एसटीची कार, ट्रॅक्टरला धडक, सहा जण ठार


अपघातग्रस्तांना मदत करताना काळाचा घाला

 

अहमदनगर : अपघातग्रस्त ट्रॅक्टरला मदत करणाऱ्यांना एसटीने दिलेल्या धडकेत सहा जणांवर काळाने घाला घातला, एसटीने कार, अपघातग्रस्त ट्रॅक्टरला दिलेली धडक इतकी जोरदार होती की पाच जण जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले. एका गंभीर जखमीचा अहमदनगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास अहमदनगर- कल्याण महामार्गावरील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाट्याजवळील भनगडे वस्ती शिवारात घडली.

 

जयवंत रामभाऊ पारथी (वय ४५), संतोष लक्ष्मण पारधी (वय ३५), अशोक चिमा केदार (वय ३५, तिघेही रा. जांबूत, ता. संगमनेर), नीलेशरावसाहेब भोर (वय २५, रा. देसवडे, ता. पारनेर), प्रकाश रावसाहेब थोरात (वय २४, रा. वारणवाडी, ता. पारनेर), सचिन कांतीलाल मंडलेचा (वय ४०, रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) अशी मृतांची नावे आहेत.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

शेतकरी संघटनांकडून १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक


बेरोजगारी, पेन्शन, अग्निवीर, एमएसपी मुद्यांवरून संप

 

नवी दिल्लीः भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. त्यांनी शेतकरी आणि दुकानदारांनाही या भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. एमएसपी, नोकरी, अग्निवीर, पेन्शनच्या मुद्यांवरून भारत बंद पुकारण्यात आला आहे.

 

राकेश टिकैत यांनी सांगितले की, १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटना सामील झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी शेतात काम करू नये. अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात काम करत नाहीत. त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजी अमवास्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये. दुकानेही बंद ठेवण्याची विनंती आहे. यामध्ये एमएसपी, नोकरी, अग्निवीर, पेन्शन आदी मुद्दे मांडले जाणार आहेत. देशात कृषी संप झाला तर मोठा संदेश जाईल.

बेरोजगारी,पेन्शनअग्निवीर, एमएसपी आदी मुद्यांवरून देशभर संप पुकारण्यात आला आहे. या संपात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, तसेच देशभरातील शेतकरी आणि वाहतूकदारांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 यापूर्वी कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी निवेदन जारी करून १६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केली होती. या संघटनांनी एमएसपीवर पीक खरेदीची हमी द्यावी, अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, लहान आणि मध्यम शेतकरी कुटुंबांची कर्जमाफी आणि कामगारांना किमान २६ हजार रुपये प्रति महिना वेतन मिळावे अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

पळा पळा पोलीस आले कोंबडे धरून पळा... पण


कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

चंद्रपूर, ब्युरो. पायली गावालगतच्या झुडपी जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर बुधवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गापूर पोलिसांनी छापा मारून 6 आरोपींना अटक केली आहे. यात कोंबडे, दुचाकी व रोख रकमेसह 8 लाख 17 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कोंबड्यांना लढवून त्या आड सर्रास जुगार खेळला जातो. असाच जुगार पायली लगतच्या झुडपी जंगलात सुरू होता. याबाबत दुर्गापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी सहकार्यासमवेत छापा मारला. यात सहाआरोपी त्यांच्या हाती लागले. 

घटना स्थळावरून पळून जाणाऱ्यांच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. याशिवाय चार जिवंत, दोन जखमी व दोन मृत असे आठ कोंबडे जप्त केले. यासह एकूण 8 लाख 17 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल दुर्गापूर पोलिसांनी जप्त केला आहे. यातील आरोपींवर कलम 12 ब महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कारवाई दुर्गापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मोहतुरे गुप्तहेर शाखेचे योगेश शार्दुल, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला केलं संबोधित; राम मंदिर आणि कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख


 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी श्रीराम मंदिराचा उल्लेख केला आणि कर्पूरी ठाकूर यांनाही श्रद्धांजली वाहिली.

 

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या प्रजासत्ताकाचे ७५ वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आपला देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे आणि अमृत कालच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जात आहे. हा कालखंडातील परिवर्तनाचा काळ आहे.

"प्रजासत्ताक दिन हा आपली मूलभूत मूल्ये आणि तत्त्वे लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. सह-अस्तित्वाची भावना भूगोलाद्वारे लादलेली नाही. १४० कोटींहून अधिक भारतीय एक कुटुंब म्हणून राहतात, आपल्या प्रजासत्ताकाच्या मूळ भावनेने एकत्र राहतात. जगातील या सर्वात मोठ्या कुटुंबासाठी, सहअस्तित्वाची भावना भूगोलाने लादलेले ओझे नाही, तर सामूहिक आनंदाचा नैसर्गिक स्रोत आहे, जो आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवातून व्यक्त होतो, असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

 

भाषणात श्रीराम मंदिराचा उल्लेख

 

यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात राम मंदिराचा उल्लेख केला. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, अयोध्येतील भगवान श्री राम जन्मस्थानी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात स्थापन झालेल्या मूर्तीच्या अभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा आपण सर्वांनी पाहिला आहे, भविष्यात या घटनेला व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिले जाईल, तेव्हा इतिहासकारांना भारताची आठवण होईल.

 

यावेळी राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात बिहारचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचाही उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्या की, सामाजिक न्यायासाठी अविरत लढा देणाऱ्या कर्पूरी ठाकूरजींची जन्मशताब्दी काल पूर्ण झाली, हे मला नमूद करायचे आहे. कर्पुरीजी हे मागासवर्गीयांचे एक महान वकील होते, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचे जीवन एक संदेश होते. कर्पूरीजींना त्यांच्या योगदानाने सार्वजनिक जीवन समृद्ध केल्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश परकीय राजवटीपासून मुक्त झाला. पण, त्या काळीही देशात सुशासनासाठी आणि देशवासीयांच्या अंगभूत क्षमता आणि कलागुणांना मुक्तपणे वाव देण्यासाठी योग्य मूलभूत तत्त्वे आणि प्रक्रिया तयार करण्याचे काम सुरू होते. संविधान सभेने सुशासनाच्या सर्व पैलूंवर सुमारे तीन वर्षे तपशीलवार चर्चा केली आणि आपल्या राष्ट्राचा, भारताच्या संविधानाचा महान पायाभूत मजकूर तयार केला. या दिवशी, आपण सर्व देशवासी त्या दूरदर्शी सार्वजनिक नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे कृतज्ञतेने स्मरण करतो ज्यांनी आपल्या भव्य आणि प्रेरणादायी संविधानाच्या निर्मितीमध्ये अमूल्य योगदान दिले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

हा देश बगर जातीचा कवा होईल? - बच्चू कडू


 बच्चू कडू यांचा संतप्त सवाल; महाप्रज्ञा बुद्ध विहारात ध्यान कक्ष व ई-लर्निंग सेंटरचे उद्घाटन

 

 गोंदिया, ब्युरो. राजकीय नेत्यांनी परिस्थिती अधिकच बेकार करून टाकली. मनगटात जोर नसते. कुवत आणि विचारही नसताना नेते लोकांच्या हातात झेंडे देतात. लोकंही झेंडे घेऊन एवढे फिदा होतात की, विचारही सोडून देतात. हिंदू असेल तर भगवा, बौद्ध असेल तर निळा आणि मुस्लिम असेल तर हिरवा झेंडा घेतो. जातींच्या या स्पर्धेचा आता वीट आला असून हा देश बगर जातींचा कवा होईल? असा संतप्त सवाल दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपस्थित केला. महाप्रज्ञा बुद्ध विहारात रविवारी नवनिर्मित संबोधी ध्यान कक्ष आणि मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू स्मृती ई-लर्निंग सेंटरचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भजनदास वैद्ये तर मंचावर महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये, प्रहारचे संपर्कप्रमुख रमेश कारेमोरे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, माजी जि. प. सदस्य मनोज डोंगरे, महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे उपाध्यक्ष टी. एम. वैद्य, सचिवतेजराम मेश्राम, कोषाध्यक्ष आर. बी. नंदागवळी, सहसचिव पंचशिला रामटेके, सहकोषाध्यक्ष प्रदीपकुमार रंगारी, शशिकला मेश्राम उपस्थित होत्या.

 

जातीव्यवस्थेवर प्रहार करताना बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी चारदा आमदार झालो. निवडणुकीत मला कुठल्या नेत्याची, जातीची आणि धर्माची गरज पडली नाही. ज्या दिवशी जात आणि धर्म सांगायची गरज पडेल, त्यादिवशी निवडणूकच लढणार नाही. महात्मा फुले यांच्या विचारांचा दाखला देत, त्यांनी प्रशासनाला 'कलमकसाई' संबोधिले. तुरीचे भाव वाढू नये, म्हणून केंद्र सरकारने एका महिन्यात तीन निर्णय घेतले. या निर्णयांमुळे बारा हजार रुपये क्विंटलची तूर सहा हजारांच्या दराने विकावी लागली. 

कलमकसायांनी शेतकऱ्यांच्या छाताडावर तलवार चालविली. अशी कलम चालविल्यास शेतकरी मरतात. मात्र, बाबासाहेबांनी जनकल्याणासाठी कलम वापरली. छत्रपतींनी रयतेच्या हिताचे राज्य निर्माण बाबासाहेबानी राज्यघटना लिहिताना छत्रपतींचे स्वराज्य पुढे ठेवले होते. आम्ही महापुरुषांना जातीत बांधून ठेवले. हे महापुरुष जातीच्या बंधनातून कसे बाहेर काढू ? यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

Pm Modi news: आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील गोपाल भांडेकर आणि स्नेहलता गोपाल भांडेकर हे दाम्पत्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सोबत जेवण करणार...


दिल्लीतील ध्वजारोहणाला उपस्थित राहणार भांडेकर दाम्पत्य

 

 आरमोरी (ता. प्र.). तालुक्यातील ठाणेगाव येथील गोपाल भांडेकर आणि स्नेहलता गोपाल भांडेकर या जोडप्यांना 26 जानेवारीनिमित्त लालकिल्ल्यावर - ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे.

 

- सुधा गॅस एजन्सीच्या - माध्यमातून उज्ज्वला गॅसचे ग्राहक गोपाल भांडेकर व त्यांच्या पत्नी स्नेहलता - भांडेकर यांना यावर्षी 26 जानेवारी 2024 - ला दिल्ली येथील लालकिल्ल्यावर - ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मान गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमतः मिळालेला आहे. 

यासोबतच सायंकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यासोबतच सायंकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भोजनाचा सुद्धा आस्वाद घेणार आहेत. अतिशय ग्रामीण भागातील उज्ज्वला गॅसचे हे ग्राहक आहेत. या दोघांनाही दिल्लीला रवाना होण्यासाठीचे निमंत्रण पत्र मिळालेले आहे. त्यानुसार 24 जानेवारी 2024 रोजी हे जोडपे दिल्लीला रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील ठाणेगाव येथील भांडेकर दाम्पत्याला मिळालेल्या या बहुमानाबद्दल सुधा गॅस एजन्सीचे संचालक सुधा चंदनखेडे, प्रदीप हजारे, विनोद हजारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ठाणेगाव येथील व परिसरातील जनतेने भांडेकर दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

भरधाव ट्रॅक्टर बोडीत पडल्याने चालक ठार


कोहळीटोला येथील घटना

 

 गोंदिया, ब्युरो. भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून गावाशेजारी असलेल्या पाण्याच्या बोडीत शिरला. त्यात चालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथे घडली. किशोर मनोहर लंजे (वय 32) असे मृतकाचे नाव आहे.

 

सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथील उमाकांत लंजे यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. मंगळवारी त्यांचा मोठा भाऊ किशोर लंजे घरून रात्री 10 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन गेला होता. तो रात्री परतलाच नाही. बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाण्याच्या बोडीत ट्रॅक्टर आढळून आला. शोधाशोध केल्यानंतर किशोर लंजे याचा मृतदेहही

 

आढळून आला. किशोरचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पाण्यात शिरल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार राऊत करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

मला आत्ताच दारू दे, अन्यथा तुला ठार मारतो, असे म्हणत एकाला मारहाण


गोंदिया, ब्युरो. मला आत्ताच दारू दे, अन्यथा तुला ठार मारतो, असे म्हणत गालावर मारले. ही घटना तालुक्यातील डांगोर्ली येथे मंगळवारी रात्री 8 वाजता घडली. तक्रारीवरून आरोपी मदन रंगलाल पाचे (वय 40) याच्याविरोधात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तालुक्यातील डांगोर्ली येथील गजानन अनंतराम मेश्राम (वय 41) हे मंगळवारी रात्री 8 वाजता आपल्या घरी पत्नी, मुलाबाळांसह जेवण करीत होते. या दरम्यान गावातील आरोपी मदन रंगलाल पाचे तिथे आला व दारूची मागणी केली. यावर गजानन मेश्रामने माझ्याकडे दारू नाही, असे म्हटले. 

 

यावरून आरोपी मदननेआणि गजानन मेश्राम यांच्या घरातील साहित्य फेकून आरडाओरड केली. दारू देत नसल्याच्या कारणावरून गजानन मेश्रामच्या गालावर मारले. तसेच शिवीगाळ करीत तुम्हाला ठार मारतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी गजानन मेश्राम यांनी आरोपी मदन पाचे विरोधात रावणवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार बघेले करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

Gadchiroli news: सासऱ्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी जावयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला ५ वर्षाचा कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा


गडचिरोली - सासऱ्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी जावयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षाचा कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा आज २५ जानेवारी रोजी ठोठावली आहे. वैभव सखाराम गावडे रा. सिदेसुर, पो. येरकड, ता. धानोरा असे आरोपीचे नांव आहे.

 

चुडीयाल येथील हिरामण ताडाम (५५) यांची मुलगी वैभव गावडे याला दिली आहे. तो व्यसनी असल्याने हिरामण ताडाम यांनी आपल्या मुलीस माहेरी आणले. १२ सप्टेंबर २०२० रोजी ताडाम आपल्या कुटुंबासह झोपी गेलेअसता रात्री ९.३० वा. दरम्यान आरोपी दारुच्या नशेत येवुन मुलीला झोपेतून उठवुन व त्यांना मौजा सिंदेसुर येथे घेवून जातो असे म्हणत असतांना ताडाम यांनी अटकाव केला असता आरोपीने त्यांच्यावर चाकुने वार करण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून पळ काढला. या संदर्भात धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता आरोपीस अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले.

 

या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष नि. करमरकर यांनी आरोपीस कलम ३०७ भा.द.वी. मध्ये दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा व ५००० रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास ६ महिने वाढीव शिक्षा सुनावली आहे.

 

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

Gadchiroli news: 75 लाखांच्या दारूवर चालविला बुलडोजर ,आरमोरी पोलिसांची धडक कारवाई, तरी वाहतो गावोगावी दारूचा महापूर!


गडचिरोली : . 2018 ते 2023 या कालावधीतील आरमोरी पोलिस ठाण्याअंतर्गत एकूण 247 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले तब्बल 75 लाखांवर किंमतीची दारुवर पोलिसांनी बुलडोजर फिरवून नष्ट करण्यात आली.

 

आरमोरी पोलिस ठाणे येथे मागील 5 वर्षात दारु विक्री, तस्करी प्रकरणातील 247 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल प्रलंबित होता. 

 

आरमोरी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या दारुचा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाले. याअंतर्गत राज्य उत्पादक शुल्क विभाग गडचिरोली यांच्या मार्फतीने तब्बल 75 लाख 93 हजार 720 रुपये किंमतीच्या देशी, विदेशी दारुच्या बॉटलावर रोडरोलर फिरवून बाटला खड्ड्यामध्ये बुजवून देण्यात आल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वात रघुनाथ तलांडे यांच्यासह अंमलदारांनी पार पाडली.

संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे तरी गावोगावी वाहतो दारूचा महापूर ? याला जबाबदार कोण आहेत ? कोणाच्या आशीर्वादाने खुलेआम चालतो दारूचा व्यवसाय जणु काही हप्ता घेऊन खुलेआमपणें दारू विक्रीला सुट दिली असते. दारु पिऊन एखादी व्यक्ती मरण पावला तर याला दोषी कोन आहेत? पोलीस विभाग की पिणारा व्यक्ती , विकणारा व्यक्ति? ? त्यामुळे पोलीस विभागाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून अश्या दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाही करावी अन्यथा एक दिवस हे दारू विक्रेते पोलीस विभागवार वरचढ ठरू शकतात यात काही शंका नाही.

आज हल्ली मिष्यावर रेष नाहि तरी तसे मुले दारूच्या आहारी गेली आहेत. मग दारू पिऊन गावात, सार्वजनिक ठिकाणी झगडे करतात. सार्वजनिक ठिकाणी झगडे करणे गून्हा आहे तरी त्याची तमा न बाळगता भांडण, तंटे करतात.

अश्या दारू पिणाऱ्याच्या अंगात जेव्हां दारू असते तेंव्हा मोठी हिंमत करून, छाती फुगवूण कोनाहीसोबत अरेरावी, भांडण करतात  पण जेव्हा अंगातून दारू उतरते तेव्हा मात्र त्याच्यात एक शब्द ब्र काढण्याची हिंमत नसते. म्हणूनच अश्या दारू पिऊन असणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल ने व्हिडियो शुटींग करुण जेव्हां तो भानावर असतो तेव्हा दाखवावे जेणे करून दारूच्या तालात काय बोललो यांची त्याला लाज लागेल. असे अनेक प्रसंग समाजात दिसत असतात. याचा मनस्ताप सर्वात जास्त महिलांना सहन करावा लागतो.

त्यामुळे पोलीस विभागाने आपल्या कर्तव्याची (अधिकार )जाण ठेऊन अश्या दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाही करावी अशी मागणी जिल्हा वाशियानी जिल्हा अधीक्षक यांच्याकडे केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024

PostImage

व्यंकय्या नायडू पद्मविभूषण, तर मिथुन चक्रवर्ती, राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार


 

 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पाच जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

केंद्र सरकारकडून पाच व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषणने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व्यतिरिक्त, त्यात ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला, प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, चिरंजीवी आणि बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्रातील कोणाला मिळाले पुरस्कार?

 

श्री होर्मुसजी एन कामा - पद्मभूषण पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता

श्री अश्विन बालचंद मेहता - पद्मभूषण पुरस्कार - वैद्यकीय

श्री राम नाईक - पद्मभूषण पुरस्कार - सामाजिक कार्य

श्री दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त - पद्मभूषण पुरस्कार - कला

श्री कुंदन व्यास - पद्मभूषण पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता

श्री उदय विश्वनाथ देशपांडे - पद्मश्री पुरस्कार - क्रिडा

श्री मनोहर कृष्णा डोळे - पद्मश्री पुरस्कार - वैद्यकीय

श्री जहिर काझी - पद्मश्री पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण

श्री चंद्रशेखर महादेवराव मेश्राम - पद्मश्री पुरस्कार - वैद्यकीय

कल्पना मोरपरिया - पद्मश्री पुरस्कार - व्यापार आणि उद्योग

श्री शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर - पद्मश्री पुरस्कार - सामाजिक कार्य


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024

PostImage

पतीचे महिला मैत्रिणींशी अवैध संबंध असल्याचा पत्नीचा बिनबुडाचा आरोप, उच्च न्यायालयाची घटस्फोट घेण्यास मंजुरी


 नवी दिल्ली : पत्नीच्या 'असमंजस वृत्ती'मुळे मानसिक क्रौर्याचा सामना करत असलेल्या पतीला अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली.

 

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पतीच्या याचिकेवर घटस्फोट नाकारणारा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करत घटस्फोटाला परवानगी दिली. आपल्यामुळे जोडीदाराला जर शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल तर चुकीचे वागणे ही एक मानसिक क्रूरताच आहे, असे कोटनि यावेळी म्हटले.

 

पतीने कोणत्या ना कोणत्या मार्गाने संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पतीचे महिला मैत्रिणींशी अवैध संबंध असल्याचा पत्नीचा बिनबुडाचा आरोप होता. या आरोपामुळे पतीच्या मनावर विपरित परिणाम झाला. हे एक मानसिक क्रौर्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

 

१६ वर्षे एकत्र राहिले

या जोडप्याने २००१ मध्ये लग्न केले आणि १६ वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले. पतीने वकील रावी बिरबल यांच्यामार्फत पत्नीवर क्रूरतेचा आरोप केला, तर पत्नीने हुंडा मागितल्याचा दावा केला. खंडपीठाने म्हटले की, या जोडप्यामध्ये वैवाहिक नात्यात जो आपलेपणा आहे ते नाही. जर याला व्यापकपणे पाहिले तर हा पतीवर करण्यात येत असलेला अत्याचार, क्रूरता होती.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024

PostImage

2 मते पडली, 4 स्लिप निघाल्या


दिग्विजय सिंह यांनी दाखवला 'हॅकिंग डेमो'

 

भोपाळ, . मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ईव्हीएमबाबत मोठा आरोप केला आहे. त्यांनी व्हीव्हीपॅटमध्ये छेडछाड, केल्याचा आरोप केला आहे. तसेच दिग्विजय सिंह आणि त्यांच्या टीमने डेमो देऊन मशीनमध्ये छेडछाड कशी शक्य आहे हे दाखवून दिले आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, हे लोक सर्वत्र असे करत नाहीत कारण लोकांना संशय येऊ लागतो. काही जागांवर ते ईव्हीएमशी खेळतात. आमचा पक्ष आमच्या भूमिकेसोबत उभा राहील, असे दिग्विजय सिंह म्हणाले

 

आता आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे. सिव्हिल सोसायटी याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाईल, असेही दिग्गी म्हणाले. दिग्विजय म्हणाले की, आम्ही 2003 पासून हा मुद्दा मांडत आहोत. यापूर्वी आमच्या पक्षाचा यावर विश्वास नव्हता. आता पक्षाची खात्री पटली आहे.

 

दिग्विजय सिंह म्हणाले की,व्हीव्हीपॅटवरून जारी केलेली स्लिप मतदारांना देण्यात यावी. तुमच्या मतांमध्ये कशी फेरफार केली जाते, हे आम्ही राज्यातील जनतेला दाखवू, असे दिग्विजय सिंह म्हणाले. नागरी समाजाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 31 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

सॉफ्टवेअर कंपन्यांकडून होते छेडछाड

त्याचवेळी दिग्विजय म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी करतो की. व्हीव्हीपॅट वरून जारी केलेली स्लिप मतदाराला देण्यात यावी. हा एक मार्ग असू शकतो. डेमो दरम्यान, डिझायनर टीम सदस्यांनी दाखवले की एका निवडणूक चिन्हाला चार मते मिळतात आणि दुसऱ्या चिन्हाला सात मते मिळतात. मतदान झाल्यानंतर यंत्रातील लाईट सात सेकंदांसाठी विझतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या वेळी दुसरी स्लिप पडते. निवडणूक आयोग आणि रिटर्निंग ऑफिसर हे करत नाहीत. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणाऱ्या कंपन्यांकडून केले जाते. आता या देशात सरकार फक्त सॉफ्टवेअर कंपन्या तयार करत आहे.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024

PostImage

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग कामाला वेग


गडचिरोली, ब्यूरो. बहुप्रतिक्षित वडसा ते गडचिरोली या 52 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अशोक नेते यांनी या कामाला बुधवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेल्वे अभियंत्यांनी त्यांना झालेल्या कामाची माहिती दिली.

 

वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजिवांची वर्दळ राहत असल्यामुळे या मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत 1096 कोटी वरून 1888 कोटी रुपये झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी 50 टक्के वाट्यातून उभारल्या जात असलेल्या या रेल्वेमार्गाच्या पहिल्या

 

टप्यात 322 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या 20 किमी रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. वडसा रेल्वे स्थानकापासून गडचिरोलीच्या दिशेने या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. खासदार अशोक नेते यांनी या कामाची गती पाहून समाधान व्यक्त केले. काम लवकरात लवकर पूर्ण होऊन गडचिरोली आणि पुढे छत्तीसगड, तेलंगणापर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024

PostImage

अपघातात 2 वनकर्मचारी ठार....


रामटेक-तुमसर बायपास मार्गावरील घटना दोघे गंभीर जखमी 

 

भंडारा, ब्युरो. रामटेक तुमसर बायपास मार्गावर कार व पिकअप वाहनात झालेल्या अपघातात पवनीत कार्यरत असलेले 2 वन कर्मचारी ठार झाले. ही घटना 23 जानेवारीच्या रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. यात एका कर्मचाऱ्याचा घटनास्थळी तर एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील जाधव (35) आणि मनोज इनवाते (35) असे मृतकाचे नाव आहे. तर दोन अन्य कर्मचारी हे गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात आले आहे.

 

पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव हे सहकाऱ्यांसह मित्राच्या लग्न सभारंभासाठी कार क्रमांक एम. एच. 33 ए 4932 ने गोंदिया येथे गेले होते. लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमपी 28 जी 4771 क्रमांकाच्या पिकअपने त्यांच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भागाचा चुराडा होऊन पिकअपचा मागील भाग वेगळा झाला. 

 

अपघात जवळपास रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या अपघातात पवनी वनविभागात कार्यरत क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव (35) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर मनोज इनवाते (35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रदीप सूर्यवंशी (35) व निकेश कुंभलकर (30) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपूर मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात आले आहे. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाल्याची माहिती आहे. फिर्यादी चंद्रभान बाजीराव परतेती यांच्या तक्रारीवरून पिकअप चालकाविरुद्ध रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024

PostImage

आमच्या बाजूने चुकीचा निर्णय दिला, असे म्हणत चिडलेल्या क्रिकेट खेळाडूने चक्क अम्पायरलाच बॅटने केली मारहाण


 गोंदिया, ब्युरो. आमच्या बाजूने चुकीचा निर्णय दिला, असे म्हणत चिडलेल्या क्रिकेट खेळाडूने चक्क अम्पायरलाच बॅटने मारहाण केली. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भीवखिडकी येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

 

सध्या सर्वत्र क्रिकेटचे सामने आयोजित केले जात आहेत. प्रत्येकच गावात क्रिकेट चषकांचे आयोजन करण्यात येत आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भीवखिडकी येथेही क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले. न्यू डायमंड क्रिकेट क्लब, भीवखिडकी आणि

 

सालईच्या संघात मंगळवारी सामना सुरू होता. दरम्यान मुकेश सुरेश ठवरे (वय 27, रा. भीवखिडकी) हा अम्पायर म्हणून काम बघत होता. आरोपी सुजीत गौतम मेश्राम (वय 24, रा. सालई) याने तू चुकीचा निर्णय दिला, असे म्हणत मुकेश ठवरे याच्याशी हुज्जत घातली. शिवीगाळ करून बॅटिंग करीत असलेल्या अमन बोरकरच्या हातातील बॅट हिसकावून मुकेश ठवरे याला मारहाण केली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस नायक जितेंद्र कटरे करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024

PostImage

तहसीलच्या कर्मचाऱ्याने वनरक्षकास केली बेदम मारहाण


चिमूर : - दिनांक.२४/०१/२०२४ ला ऋषी वानोसा हजारे, वनरक्षक नियतक्षेत्र गदगाव हे सहका-यासह रात्रों १० वाजताचे दरम्यान गस्तीवर असतांना गदगाव - उरकुडपार रस्त्यावर वनक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गाजवळ रात्रो १०:३० वाजता सोनु धाडसे, रा. तिरखुरा व राकेश झिरे बाबु गोंडपीपरी तहसील चे कर्मचारी रा. चिमुर या दोघांनी मिळून आमचे रेतीचे ट्रॅक्टर जंगलातील नाल्यावर का चालू देत नाही ? असे म्हणत अश्लील शब्दात शिविगाळ करीत कॉलर पकडून रोडवरुन शेतातील बांदीमध्ये मारत व ढकलत नेले तसेच खाली पाडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली. माझ्या सोबत असलेले जर्नाधन रामचंद्र सातपुते, रा. गदगाव यांनी मला सोडविले त्यानंत्तर ते दोघेही त्या ठिकाणाहून मोटार सायकल घेवून निघून गेले. त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमुर यांना दिली. असता थोड्याच वेळात के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकरी (प्रादेशिक) चिमुर, यु. बी. लोखंडे, क्षेत्र सहाय्यक, मुरपार आर. डी. नैताम, वनपाल (स.व.अ.नि.) खडसंगी (चिमुर) अक्षय मधुकर मेश्राम, वनरक्षक नियतक्षेत्र चिमुर, व अमर प्रभुदास पोटे, वनरक्षक (स.व.अ.नि.) खडसंगी (चिमुर) हे घटनास्थळी हजर झाले त्यानंत्तर मी त्यांचे सोबत पोलीस स्टेशन चिमुर येथे जाऊन तक्रार दिली.FIR क्र.००४१ दिनांक २५/०१/२०२४ ला भा. द. वी. कलम ३५३, २९४ ,५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार असल्याने पोलीसांची तपास मोहीम सुरू आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 25, 2024

PostImage

पुन्हा वाघाचा हल्ला, हल्ल्यात एक जण ठार


वरोरा: तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या अंतरावर कक्ष क्रमांक 59 मध्ये निमडला गावातील रामभाऊ रामचंद्र हनवते वय वर्ष 52 हा वाघाच्या हमल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे..

 

खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक 59 लगत बफर झोन रामदेगी निमडला पर्यटक गेटवर सकाळच्या सुमारास रोजंदारी सफाई कामगार रामचंद्र हनवते काम असताना कुठीच्या समोर देवबाबरीत असलेल्या वाघाने हमला करून ठार केले. हि तीन महिन्यात दूसरी घटना घडली आहे.(रामदेगी) बफर झोन क्षेत्रात सध्या भानुसखिंडी तिचे बच्चे मटकासूर, बबली असे वाघांचे पर्यटकांना दर्शन होत आहे.. सफाई कामगार यांना ठार करणारा वाघ हे भानुसखिंडीचा बच्चा असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे. हे बच्चे मोठ्या प्रमाणात अग्रेसिव असून नेहमीच रामदेगी मध्ये येत असलेल्या भाविकांवर आक्रमक पवित्रा घेत असल्याचेही सांगीतले जातेय.

 

सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली असून वन विभागाची टिम, शेगाव पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाले आहे. समोरील घटनेचा पंचनामा चौकशी बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात केले जात आहे....


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

अश्लील चित्रफीत व्हायरलची धमकी; वर्धेच्या दाम्पत्याला अटक


नागभीड : एका युवतीला शारीरिक संबंध प्रस्थापित करून अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या दाम्पत्याला नागभीड पोलिसांनी मंगळवारी (दि. २३) अटक केली. गोविंद फुलवाणी (३८) आणि चांदणी गोविंद फुलवाणी (३५, रा. दोघेही बोरगाव मेघे, वर्धा), अशी आरोपींची नावे आहेत.

 

आरोपी गोविंद फुलवाणी हा कुरकुरे विक्रीचा व्यवसाय करतो. एक २५ वर्षीय युवती आरोपींकडे कुरकुरे पाकीट भरण्याच्या कामाला जात होती. तेव्हा आरोपीने 'तू वर्धेला ये तुला चांगले काम देतो' असे आमिष दाखवून नेले व बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने विरोध 

 

केला असता धाक दाखवून चित्रफीतही तयार केल्या. दरम्यान, या तरुणीला 'वर्धा येथे पुन्हा आली नाही तर चित्रफीत व्हायरल करू' अशा धमक्या देणे सुरू केले. धमक्यांना कंटाळून युवतीने नागभीड पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

पोलिसांनी वर्धा येथून आरोपी गोविंद आणि त्याची पत्नी चांदणीविरुद्ध कलम ३७६ (डी), ३७६ (२) एन, ३७७, ३२३,५०६ भादंवि ३ (१), अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा व ६७ आयटीअन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

भ्रष्ट सरपंचांना थेट तुरुंगवारी....


 गडचिरोली ब्युरो. गाव कारभार चालविताना ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, मालमत्ता अथवा निधीचा अपहार करणा ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या, बनावट कागदपत्रांचा समावेश करणे, असे प्रकार करणाऱ्या सरपंचांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. भ्रष्ट सरपंच, ग्रामसेवक तसेच उपसरपंचाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीला दिला आहे.

 

गावो-गावी ग्रामपंचायतद्वारे शासकीय योजना राबवत असताना भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस येतात. असे प्रकार गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने आता फौजदारी कारवाई बरोबरच अपहार केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यात जबाबदारअसणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यापैकी कोणीही अथवा सर्वजण चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात नमूद आहे.

राज्य शासनाचा विविध प्रकारचा निधी आता थेट ग्रामपंचायतींना येत आहे. यात प्रामुख्याने वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतला सर्वाधिक मिळत आहे. निधीचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी ग्रामविकास खात्याकडे प्राप्त झाल्याने या प्रकारालाआळा घालण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता सरपंच, उपसरपंच, ग्रापं सदस्य, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना गाव विकासाच्या दृष्टीने भ्रष्टाचार न करतान कामे करावी, अन्यथा भ्रष्टाचार केल्यास तुरुंगवारीला सामोरे जावे लागणार ऐवढे मात्र निश्चित.

 

महाठगांच्या भ्रष्टाचाराला लागणार ब्रेक

 

• सरपंच आणि ग्रामसेवक या कर्तव्यदक्ष अधिकारी-पदाधिका-यांच्या संगनमतानेअनेक गावांची वाट लागल्याच्या तक्रारीशासन दरबारी दाखल झाल्या आहेत

विरोधकांनी त्यांचे कितीही भ्रष्टाचार बाहेर काढले असले, तरीही कारवाई होत नसल्याने अशा महाठगांचे फावले आहे.आता त्याला ब्रेक लावणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महिन्याभरात चौकशी पूर्ण करा

 

अपहाराच्या रकमेत विभागीय चौकशींमध्ये गुन्हा घडल्याबाबत निष्कर्ष काढण्यात आल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ज्या प्रकरणांमध्ये कोणतीही चौकशी झालेली नाही. अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी करावी, चौकशी एका महिन्यांमध्ये पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

हिस्सेवाटनीवरून मारहाण


गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत बिरसी येथे घराच्या हिस्स्यावाट्यावरून तीन आरोपींनी फिर्यादीला काठीने मारून जखमी केल्याची घटना २० जानेवारी रोजीची आहे. फिर्यादी राजकुमार बारिकराम चौधरी (३८) रा. बिरसी याला आरोपीने तुझ्या घरकुलाचे बांधकाम पुर्ण झाले आहे, त्यामुळे माझ्या घराच्या हिस्स्याच्या ठिकाणी तुला कॉलम टाकू देणार नाही, यावरून वाद निर्माण केला तसेच तीन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केले. तसेच काठीने मारून जखमी केले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

Armori news: धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकले


आरमोरी - तालुक्यातीलशेतकऱ्यांनी महामंडळाकडे धानाची विक्री केली. मात्र त्यांचे चुकारे थकले असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे तातडीने चुकारे देण्याची मागणी माजी आ.ड आनंदराव गेडाम यांनी केली आहे.

 

मकर संक्रांत सण होवुन ही शासनाने धार पिकाचे चुकारे अजून पर्यंत न दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 

आता उन्हाळी हंगामासाठी धान बिजाई घेण्याची लगबग सुरू झाली आहे. परंतु पैशा अभावी बिजाई, औषधी, खत घेणे शक्य नाही व काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे बँकेचे कर्ज भरणे शिल्लक आहे. अशा परिस्थितीत शासकीय आधारभूत केंद्रावर धान विकुणही आज शेतकऱ्यांना पैशासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ धानाचे चुकारे देण्यात यावे अशी मागणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातुन माजी आ. गेडाम यांनी केली आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

Korchi news: डॉक्टरला मारहाण करणारा तुरुंगात


 कोरची : तालुक्यातील मसेली येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून त्यांच्यावर हात उचलणे एका युवकाला चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

पुरुषोत्तम माधव हलामी (२९, रा. बोदालदंड, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. डॉ. नरेंद्र खोबा (३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २० जानेवारी रोजी ते कर्तव्यावर असताना दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रस्ता अपघातातील जखमी ऋत्विक श्रीराम सयाम (२३, रा. मसेली) याला त्याच्या मित्रांनी दवाखान्यात आणले होते.

 

 डॉ. नरेंद्र खोबा यांनी रुग्णाची गंभीर दुखापत बघून रुग्णास रेफर करण्याची कागदपत्रे तयार केली आणि रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णास वाहनात बसवण्यास सांगितले. पुरुषोत्तम हलामी याने रुग्णास रेफर करण्याची कार्यवाही बघून डॉ. नरेंद्र खोबा यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


धानोरा : ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. २३ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता धानोरा- वांगी रस्त्यावरील सोडेजवळील वळणावर ही घटना घडली.

 

विकी कुमारशा किरंगे (२४ रा. सोडे) असे मृताचे नाव आहे. तो दुचाकीवरुन (एमएच ३३ एएफ-३०६८) धानोराहून सोडेकडे जात होते. समोरून ट्रॅक्टर येत होता. ताबा सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर दुचाकीवर आदळले. यात विकी किरंगे

 

हा जागीच ठार झाला. मृतक ह एकुलता एक मुलगा होता. धानोर ग्रामीण रुग्णालयात डॉ. देवेंद्र सावसागडे यांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

पत्रकारांचे संरक्षण झालेच पाहिजे : उच्च न्यायालय


 

कोलकाता : पत्रकारांना आपले काम धाडसाने करण्याचे सर्व प्रयत्न करण्यासाठी त्यांचे संरक्षण झालेच पाहिजे. पत्रकार आणि माध्यमांचे स्वातंत्र्य लोकशाहीसाठी अपरिहार्य आहे, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

 

रणजीत दास ऊर्फ मोहन दास हे एबीपी आनंदा टीव्ही चॅनलचे पत्रकार आहेत. त्यांनी अवैध गौण खनिज उत्खननाची व्हिडीओग्राफी केली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एकामागून एक गुन्हे दाखल होत आहेत. खोट्या गुन्ह्यांत गुंतवून त्यांना अडकवले जातआहे म्हणत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला.सरकारी वकिलांनी जामीन देण्यास विरोध करताना रणजित दास हे परिसरातील वेगवेगळ्या व्यक्तींकडून पैसे उकळत आहेत, असा युक्तिवाद केला. कोर्टाने जामीन मंजूर करताना पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

 

पत्रकारांना धाक दाखवून वृत्तपत्रस्वातंत्र्य राखले जाऊ शकत नाही. पत्रकार हा माध्यमाचाच भाग असतो आणि पत्रकारितेचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे.

 

- देबांगसू बसाक आणि मो. शब्बर रशिदी, न्यायमूर्ती

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024

PostImage

कुटुंबियांचा विरोध पत्करून प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्यानंतर तरुणीचे माहेर तुटते


नागपूर : एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडणारे प्रियकर-प्रेयसी कुटुंबीयांच्या विरोधासह अन्य अडचणींचा सामना करीत प्रेमविवाह करतात. सात जन्म एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात. मात्र, दोघांचे पती-पत्नीत रुपांतर झाल्यानंतर संसारात शेकडो अडचणी आल्याने थेट घटस्फोटाकडे कल वाढत चालला आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल ३ हजार ६० प्रेमविवाह करणाऱ्यांनी भरोसा सेलमध्ये मदतीसाठी धाव घेतली आहे.

 

फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरून एकमेकांच्या प्रेमात पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच वर्गमित्र किंवा मैत्रीतून युवक-युवती एकमेकांच्या प्रेमात पडल्याचेही प्रमाण वाढत आहे. दोघेही सुरुवातीला प्रेमात बुडाल्यानंतर एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची भाषा करतात. काही दिवसांच्याच प्रेमसंबंधात दोघांचाही एकमेकांवर विश्वास बसून थेट प्रेम विवाहापर्यंत मजल जाते. प्रेमविवाहास युवकाच्या कुटुंबियांमध्ये फारसा विरोध दिसत नाही. परंतु, युवतीच्या कुटुंबियांतून प्रेमविवाहास नेहमी विरोध असतो. समाजात असलेली प्रतिष्ठा आणि नातेवाईकांमध्ये होणारी बदनामी याची भीती असते. परंतु, प्रेमविवाहास सर्वाधिक उत्सूकता तरुणीकडूनच दाखवल्या जाते.

 

 

 

अनेक प्रकरणांमध्ये प्रियकर प्रेमविवाहास टाळाटाळ करतो तर युवती थेट घरातून पळून जाऊन लग्न करण्याची तयारी दर्शवते. भविष्यात सुखी संसाराची स्वप्ने रंगविल्या जातात. प्रत्येक अडचणींवर मात करून संसार यशस्वी करण्याचा दोघांचाही मानस असतो. त्यामुळे भविष्याचा कोणताही विचार न करता कुटुंबियांचा विरोध पत्करून अनेक प्रेमविवाह पार पडतात. दोघांचा वेगळा संसार सुरु होता. दोघांवरही पती-पत्नी म्हणून जबाबदारी येते. दोघांच्याही भूमिका बदलतात आणि संसारात खटके उडायला सुरुवात होते. ‘तुझे पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही किंवा तू मला वेळ देत नाही,’ अशी तक्रार पत्नीची असते तर काम शोधण्यापासून तर घराचे भाडे देण्यापर्यंतचा विचार पती करीत असतो. याच कारणामुळे घरात पती-पत्नीत वाद वाढायला लागतात. त्यामुळे संसार तुटण्याच्या काठावर येतो. नागपुरात असे शेकडो प्रेमविवाह सध्या मोडकळीस आलेले दिसतात. गेल्या पाच वर्षांत ३ हजार ६० जणांनी प्रेमविवाह केल्यानंतर वाद झाल्यानंतर भरोसा सेलकडे धाव घेतली आहे.

 

तरुणींना सर्वाधिक अडचणी

कुटुंबियांचा विरोध पत्करून प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्यानंतर तरुणीचे माहेर तुटते. माहेरकडील कुणीही तिला साथ देत नाही किंवा थेट संबंध तोडतात. प्रेमविवाहानंतर दोघांतील वाद मिटवायला कुणी नातेवाईकही तयार नसतात. एकाकी पडलेल्या तरुणीची बाजू ऐकुनही घ्यायला कुणी तयार नसते. कठिण परिस्थितीत तरुणींना जीवन कंठावे लागते.

 

“प्रेमविवाह केल्यानंतर नव्या संसारात खटके उडण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रेमविवाहानंतर अगदी काही महिन्यांतच दोघांत वाद झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. मात्र, भरोसा सेलमध्ये तक्रार आल्यानंतर दोघांनाही बोलवून संसार आणि वैवाहिक आयुष्याबाबत समूपदेशन केल्या जाते. अनेकांचे संसार नव्याने थाटण्यात भरोसा सेलला यश आले आहे.” – सीमा सूर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 23, 2024

PostImage

वैनगंगा नदीत मजुरांचा घेऊन जाणारी नाव उलटली,एका महिलेचा मृतदेह आढळून आला


गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथील वैनगंगा नदीत मजुरांचा घेऊन जाणारी नाव उलटली, यात सहा महिला वाहून गेल्या, त्यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला, पण पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. ही हृदयद्रावक घटना २३ जानेवारी रोेजी सकाळी ११ वाजता घडली.

 

गणपूर रै व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये- जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव पैलतिरी जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या. यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला, त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. शेवटी तिचे प्रेत आढळले. ते पाण्याबाहेर काढले असून उर्वरित पाच महिलांना शोधण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावपथकालाही पाचारण केले आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 23, 2024

PostImage

क्रांतिसूत्र ( THE REVOLUTION FORMULA) लघुपट होणार अलगद प्रॉडक्शन्स या यूट्यूब चॅनल वरती २५ जानेवारी ला प्रदर्शित.


 

या लघुपटाचे चित्रीकरण गेल्या आठवड्यात जुनी वडसा आणि कुरखेडा तालुक्यातील गुरनुली या गावी पुर्ण झाले. या लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रतिक देवाजी लाडे असून यांनी व यांच्या संपूर्ण टीमने २६ नोव्हेंबर संविधान दिना निमित्त "अधिकाराचा लढा" हे लघुपट तयार करून यूट्यूब वरती प्रदर्शित केले होते व प्रेक्षकांचा त्यांना खूप छान प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. 

आता प्रदर्शित होत असलेल्या "क्रांतिसूत्र" या लघुपटात मोहित राऊत, मयंक मेश्राम, विक्की राऊत, स्विटी टेंभुरणे, रोहित जनबंधू, तुषार राहाटे, पल्लवी चौधरी आणि आतिश राहाटे हे कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत.  

आजची युवा पिढी शिक्षणाकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष करीत आहे आणि सोशल मीडिया कडे ज्यास्त प्रमाणात आकर्षित होऊन आपला बराच वेळ वाया घालवत आहेत. तसेच आपले समाजसुधारक व क्रांतिकारी महापुरुषांना विसरून जात आहेत. आजच्या युवा पिढी द्वारे एक क्रांतीची मशाल नेहमी पेटत राहावी. आणि हे फक्त शिक्षणा मुळे आणि आपल्या महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्यावरच होऊ शकते. हे या लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्याचं प्रयत्न केलेला आहे असे प्रतिक लाडे यांनी सांगितले आहे. 

तरी येत्या २५ जानेवारी ला हा लघुपट बघून सर्व रसिक प्रेक्षकांनी देसाईगंज तालुक्यांतील या युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 23, 2024

PostImage

बारशाचा कार्यक्रम आटोपून परताना काळाचा घाला, एक ठार तर दोघे जखमी


सावली : येथील आर. एस. बिअरबारसमोर झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. २२) रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात शोभा नामदेव धारणे (५५) या दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर निखिल युवराज गायकवाड (२३) व धर्मराज पांडुरंग गायकवाड (४५) तिघेही रा. विहीरगाव, ता. सावली हे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता गडचिरोलीला हलविण्यात आले. चारचाकी वाहन चालक बाबुराव खैरे रा. चंद्रपूर याला सावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विहीरगाव येथील निखिल

 

गायकवाड, धर्मराज गायकवाड व शोभा धारणे हे राजगड येथून बारशाचा कार्यक्रम आटोपून सावलीमार्गे विहीरगाव या स्वगावी निघाले होते. दरम्यान, सावली येथील आर. एस. बारसमोर मागाहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्र. एमएच ३३ जे १४९४) जबर

 

धडक दिली. यामध्ये दुचाकीला सुमारे काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात शोभा नामदेव धारणे यांचा जागीच मृत्यू झाला तर निखिल व धर्मराज हे गंभीर जखमी झाले.

 

घटनेची माहिती पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून जखमी व मृतक महिलेला सावलीचे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पुढील उपचाराकरिता गंभीर जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील तपास सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू, मोहन दासरवार, दिलीप मोहले, विशाल दुर्योधन हे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 23, 2024

PostImage

आसाम: मंदिरात जाताना अडवलं, राहुल गांधींचं धरणं आंदोलन; राजकीय संघर्ष का पेटलाय?


 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममधून जात असताना गेल्या दोन दिवसांपासून आसाममध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

 

राहुल गांधी सोमवारी, 22 जानेवारीला नागाव जिल्ह्यातील बताद्रवा येथील श्री श्री शंकरदेव सत्ता (मठ) मंदिरात जाणार होते, परंतु स्थानिक प्रशासनातर्फे त्यांना 17 किलोमीटर अलीकडे हैबोरगाव येथे रोखण्यात आलं.

 

आसामी समाजातील प्रतिष्ठित वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी असलेल्या बताद्रवा सत्र मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर संतप्त झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हैबरगाव येथेच धरणं आंदेलन सुरू केलं.

त्यापूर्वीच्या एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी गाडीतून खाली उतरून पोलिसांना यात्रा थांबवण्यामागचं कारण विचारताना दिसले होते.

 

धरणे आंदोलनावर बसण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अधिकाऱ्यांवर टीका केली आणि प्रसारमाध्यमांना म्हणाले, “असं दिसतंय की आज फक्त एकाच व्यक्तीला मंदिरात जाण्याची परवानगी आहे. मंदिरात कुणी जायचं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार का?”

 

ते पुढे म्हणाले, "आम्हाला 11 जानेवारी रोजी शंकरदेव जन्मस्थळाला भेट देण्याचं निमंत्रण मिळालेलं, परंतु रविवारी आम्हाला सांगण्यात आलं की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूप नाजूक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नाजूक असताना गौरव गोगोई आणि इतर सर्वजण वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी जाऊ शकतात, पण फक्त राहुल गांधी जाऊ शकत नाहीत.''

राहुल गांधी ज्या ठिकाणी धरणं आंदोलनाला बसले होते, त्या ठिकाणी त्यांचे समर्थक ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ भजन गाताना दिसले.

 

काँग्रेस समर्थकही शंकराचं कीर्तन गाताना दिसले.

 

त्यानंतर स्थानिक खासदार आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली.

 

राहुल गांधीऐंवजी आपल्याला श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी दर्शन घेतल्यानंतर सांगितलं.

 

गौरव गोगोई यांनी एक फोटो शेअर करत सांगितलं की, "श्री श्री शंकरदेव मठ पूर्णपणे रिकामी होता. तिथे अजिबात गर्दी नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा खोट्या अफवा पसरवण्यात आलेल्या. मुख्यमंत्र्यांमुळे आजचा दिवस हा बताद्रवा आणि श्री शेंकरदेव यांच्या इतिहासात एक काळा दिवस ठरला आहे."

 

.

पुरकायस्थ म्हणतात, "सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राहुल गांधी यांच्या न जाण्याने भाजप त्यांना भविष्यात ज्याप्रकारे राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल, त्याला उत्तर म्हणून श्रीमंत शंकरदेव यांच्या दर्शनाकडे पाहिलं जातंय."

 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 22 जानेवारी रोजी बताद्रवा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान भेट न देण्याचा सल्ला दिला होता.

 

"सोमवारी होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी बताद्रवा येथे न जाण्याची आम्ही राहुल गांधींना विनंती करतोय कारण त्यामुळे आसामबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होईल," असं मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

 

ते म्हणाले होते की, प्रभू राम आणि राज्यात एक आदर्श म्हणून ओळखले जाणारे मध्ययुगीन वैष्णव संत यांच्यात कोणतीही स्पर्धा असू शकत नाही.

 

याशिवाय काँग्रेसने सोमवारसाठी मोरीगाव, जगीरोड आणि नेल्ली या ‘संवेदनशील भागातून’ जाणारा जो मार्ग निवडलाय तो टाळता आला असता, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

ते म्हणाले, "हा भाग संवेदनशील आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही आणि म्हणूनच 22 जानेवारी रोजी राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान अल्पसंख्याक बहुल भागातील संवेदनशील मार्गांवर कमांडो तैनात करण्यात आले आहेत."

 

दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये भाजपमध्ये सामिल झाल्यापासून राहुल गांधींवर टीका करत आले आहेत.

 

राहुल गांधी आणि हिमंता यांच्यातील शाब्दिक युद्ध

मणिपूर येथून 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा गेल्या गुरुवारी आसाममध्ये पोहोचल्यापासून राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यात शाब्दिक युद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एका सभेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून वर्णन केलं होतं आणि असंही म्हटलेलं की ते "भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचे धडे देऊ शकतात."

 

प्रत्युत्तरादाखल सरमा यांनी गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब असल्याचं म्हटलेलं.

 

त्यानंतर राहुल गांधींची यात्रा जोरहाट शहरातून जात असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गाचं उल्लंघन केल्याप्रकरणी यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

यादरम्यान उत्तर लखीमपूरमध्ये काँग्रेसच्या अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आणि परिसरात लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर आणि बॅनर फाडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

 

या संदर्भात काँग्रेसने लखीमपूरमध्ये एक गुन्हा दाखल केला. यानंतर रविवारी ही यात्रा अरुणाचल प्रदेशातून आसाममध्ये परतत असताना आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेन बोरा यांच्यावर भाजप समर्थकांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले.

 

मात्र, या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री सरमा यांनी पोलीस महासंचालकांना गुन्हा नोंदवून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024

PostImage

रामायण' फेम बिभीषणाचा भयानक झाला अंत; रेल्वेसमोर उडी देत संपवलेलं आयुष्य


 सध्या संपूर्ण देशाला फक्त एकाच दिवसाची प्रतिक्षा आहे तो म्हणजे २२ जानेवारी. या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येच्या राममंदिरात थाटामाटात प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.

 

रामायण हा आपला इतिहास असला तरी ते घराघरात पोहचवण्याचं काम करण्यात दूरदर्शनच्या एका मालिकेचा मोठा हातभार होता. ही मालिका म्हणजे रामानंद सागर दिग्दर्शित 'रामायण'. या मालिकेचं कोरोना लॉकडाउनदरम्यान पुनः प्रसारण करण्यात आलं, तेव्हाही रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांनी ही मालिका पहिली. यातील कलाकारांची अजूनही तेवढीच क्रेझ आहे. आज यातील मुख्य भूमिका राम, लक्ष्मण सनी सीता हे कलाकार आजही चाहत्यांच्या संपर्कात असतात. पण आज आम्ही तुम्हाला या मालिकेत बिभीषण ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगणार आहोत.

 

रामानंद सागर निर्मित 'रामायण' ही टीव्ही सीरियल लोकप्रियच नाही, तर नेहमी स्मरणात राहणारी आहे. या टीव्ही सीरियलमध्ये भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान, रावण आणि विभीषण आदी भूमिका साकारणारे कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आज आपण या टीव्ही सीरियलमधील बिभीषणची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मुकेश याचं 2016 मध्ये निधन झालं. पण आज आपण मुकेश यांना बिभीषणाची भूमिका कशी मिळाली आणि त्यांचा मृत्यू कसा झाला,याविषयी जाणून घेऊया.

 

अभिनेते मुकेश रावल हे बराच काळ रंगभूमीशी निगडीत होते. त्यांची अभिनयक्षेत्रातील सुरुवात याच मंचावर झाली. याचवेळी एका नाटकादरम्यान रामानंद सागर यांची नजर त्यांच्यावर पडली. मुकेश यांनी मेघनादसोबत बिभीषण या भूमिकेसाठीही ऑडिशन दिली होती. मात्र, नंतर त्यांना बिभीषणाची भूमिका ऑफर करण्यात आली. या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला. त्यामुळेच आजही ही भूमिका अनेकांच्या स्मरणात आहे. पण मुकेश यांचा मृत्यू त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होता.

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकेश रावल यांनी 2016 मध्ये आत्महत्या करत आयुष्य संपवलं. 2016 मुंबईतील कांदिवली स्टेशनजवळील रुळांवर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी असं का केलं? याचं कारणही नंतर सांगितलं गेलं होतं. मुकेश यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते प्रचंड नैराश्यात होते, असं सांगितलं जातं. खरं तर मुकेश यांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलीचं त्यांनी लग्न करून दिलं होतं. पण त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला.

 

मुलीच्या लग्नानंतर मुकेश पूर्णपणे एकटे पडले होते. ते मुलाच्या आठवणीनं नैराश्यात गेले होते, असं सांगितलं जातं. दरम्यान, याच नैराश्यातून त्यांनी एकेदिवशी रेल्वे रूळांवर झोपून आत्महत्या केली होती.दरम्यान, रामायण सीरियलमधील बहुतांश कलाकारांचा मृत्यू झाला असला तरी ते त्यांनी केलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या स्मरणात कायम आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024

PostImage

Gadchiroli news: देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करताना सापडले


गडचिरोली: दिनांक 21/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे गोपनिय माहिती मिळाली कीे, पोलीस स्टेशन, गडचिरोली हद्यीतील दारु तस्कर गोपाल बावणे, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय विश्राम भवन, गडचिरोली जवळ दिनांक 22/01/2023 रोजीच्या रात्रो दरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता, मिळालेल्या गोपनिय माहितीतील संशयीत पांढ-या रंंगाचे मारोती सुझुकी कंपनीचे अल्टो वाहन हे येताना दिसले असता पोलीसांनी त्यास थंाबविण्याकरीता ईशारा दिला.

 परंतू वाहन चालकानी पोलीसांच्या इशा-यास न जुमानता वाहनासह पळ काढला. त्यानंतर पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्यांचे ताब्यातील वाहन गडचिरोली शहराच्या दिशेने नेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर वाहनास अडवीले असता वाहन चालक व त्याचा साथीदार अनुक्रमे नामे 1) प्रफुल टिंगुसले, रा. गोकुळनगर, गडचिरोली व 2) गणेश टिंगुसले, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचाही पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरच्या दारुच्या अवैध वाहतुकीत सहभागी असलेला ईसम नामे गोपाल बावणे हा ही कार्यवाही सुरु असतांना अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी वाहनाने फरार झाला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024

PostImage

स्त्रीयांच्या बाबतीत भगवान बुद्धांची वचने


बुध्द,धम्म आणि संघ ह्या त्रिरत्नांच्या प्रती अनेक लोकांमध्ये बरेच समज - गैरसमज आहेत, त्यांच्यापैकीच एक म्हणजे अनेक स्त्री - वादी लोक भगवान बुध्दांना भारतीय स्त्रियांच्या अवनतीचे कारण मानतात,त्यांच्या मते भगवान बुद्धांनी आपल्या संघातील भिक्खुणींसाठी जे काही नियम केले होते,त्याने भारतीय स्त्रीया ह्या गुलामगिरी मध्ये तर ढकलल्या गेल्याच,पण त्यातून बुद्धांची स्त्री विषयक मान्यता समजते ती म्हणजे,भगवान बुद्धांना स्त्री - पुरुष समानतेचा गंध मुळीच नव्हता,यावर स्त्री जन्म वाईट असतो,स्त्रीया पुरुषांच्या गुलाम असतात, वास्तवात धम्म कसल्याही प्रकारची विषमता शिकवीत नाही, मग ती जाति - आधारित असो किंवा लिंग - आधारित,स्त्रीचा जन्म वाईट असतो किंवा स्त्रीया पुरुषांची गुलाम असतात असे त्रिपिटकात बुध्दांचे एकही वचन नाही, याउलट स्त्री जन्माची बुध्द स्तुती करतात, स्त्रीया ह्या श्रेष्ठ असतात,असे सांगणारी अनेक बुध्दवचने आहेत...,

 

१. मुलीच्या जन्माने उदास होऊ नका,एखादी स्त्री देखील पुरुषा पेक्षा श्रेष्ठ असते,( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथ वग्ग,कोसल संयुत्त - मल्लिका सुत्त )

 

२. धम्म महत्त्वाचा,स्त्रीत्व अथवा पुरुषत्व नव्हे,स्त्री असो किंवा पुरुष असो,ज्या व्यक्तीकडे धम्माच्या स्वरुपातील यान असते, ती व्यक्ती या यानाद्वारे निर्वानाजवळ पोहोचते,( संदर्भ : संयुक्त निकाय,देवता संयुक्त, आदित्तवग्ग,अच्छरासुत्त)

 

३. पत्नी हि सखी आहे,दासी नाही,( संदर्भ : संयुक्त निकाय, देवता संयुक्त,जरावग्ग,वत्थुसुत्त )

 

 ४. गुणसंपन्न,बहुश्रुत,धम्मधर भिक्खुनी व उपासिका म्हणजे संघाची शोभा,( संदर्भ : अंगुत्तर निकाय,चतुक्कनिपात,भंडगाम वग्ग,सोभन सुत्त )

 

५. निर्वाण मार्गावर चालत असतांना माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय ... ? माराचा नाश करण्यासाठी माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय..? ( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथवग्ग,भिक्षुनी संयुक्त / थेरीगाथा..)

 

६. धम्मामुळे आत्मविश्वास वाढला,समाजामध्ये इतरांकडुन घाबरविल्या जाणाऱ्या स्त्रीयांनी, समाजाला घाबरविणाऱ्या मारालाच घाबरविले,( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथवग्ग, भिक्षुनी संयुक्त / थेरीगाथा )

 

७. शुक्रा नावाची भिक्षुनी मोठ्या धम्मपरिषदेमध्ये हजारो भिक्षु - भिक्षुनीं समोर धम्माचा उपदेश करीत होती,तो उपदेश अमृतासारखा आहे,( संदर्भ : यक्षसंयुत्त,पठमसुक्का सुत्त )

 

८. खेमा भिक्षुणी बद्दल,'ती अत्यंत विद्वान,सुस्पष्ट भुमिका असलेली,बहुश्रुत,उत्तम वक्तृत्व असलेली आणि समंजस आहे, अशी तिची कीर्ती आहे, महाराजांनी तिच्या सेवेत उपस्थित रहावे.' ( संदर्भ : संयुक्त निकाय,अव्याकृत संयुत्त,खेमा सुत्त )

 

९. "कंजगलिका भिक्षुणी उपासकांना उपदेश करते..." तथागत म्हणाले,साधु,साधु,साधु, गृहपतींनो,भिक्षुणी कंजगलिका अत्यंत विद्वान आहे,महाप्रज्ञावान आहे,तुम्ही माझ्याकडे येऊन मला विचारले असते तरी मी सुध्दा हेच सांगीतले असते,( संदर्भ : अंगुत्तर निकाय,दस्सक निपात,महावग्ग, दुतिय महापञ्हा सुत्त )

 

१०. प्रतिष्ठित लिच्छवींसाठी आम्रपालीचे भोजन नाकारले नाही,त्यांनी आम्रपाली गणिकेच्या जीवनाला स्वर्ग बनविले,भगवानांनी तिच्यासाठी किती अमुल्य कार्य केले हे तिच्या थेरीगाथां शिवाय कसे समजणार ... ? ( संदर्भ : दिघनिकाय,महापरिनिब्बाण सुत्त/ थेरीगाथा )

 

११. भगवानांनी गणिकेला परिव्राजिका बनविले,तर विरोधकांनी परिव्राजिकांना गणिका बनविले,तथागतांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी कारस्थाने केली गेली,( उदा. - चिंचा आणि सुंदरी परिव्राजीका, धम्मपद अट्ठकथा, १३- लोकवग्ग, गाथा क्रं. १७६ ) ( उदानपाळी,मेघिय वग्ग,सुंदरी सुत्त...)

 

१२. पापी मार : जे स्थान ऋषींना सुध्दा प्राप्त करता आले नाही,जे इतरांच्याद्वारे प्राप्त करण्यास अत्यंत कठीण आहे,ते तुझ्यासाखी दोन बोटांएवढे प्रज्ञा असणारी स्त्री कसे प्राप्त करेल..?

सोमा भिक्षुणी : चित्त सुस्थीतीत असतांना,ज्ञान उपस्थित झाले असतांना,धर्माची सम्यक विपश्यना घडली असतांना,माझे स्त्रीत्व काय करेल..? भगवान बुध्दांनी भिक्षुणींमध्ये निर्माण केलेल्या आत्मविश्वासामुळे सोमा भिक्षुणी पापी माराला असे बोलु शकली,( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथवग्ग,सोमासुत्त )

 

१३. भगवान बुध्द धम्मदिनेची स्तुती करतात,( संदर्भ : मज्झीम निकाय ४४ )

 

 वरील बुद्ध वचनांवरून ठरवा भगवान बुध्दांचा धम्म हा स्त्रीयांच्या विकासासाठी कारणीभुत ठरला की,त्यांच्या खच्चीकरणासाठी ? 

 

बुध्दांच्या धम्मामुळे तत्कालीन भारतीय समाजामध्ये स्त्रीया ह्या गुलामगिरीत ढकलल्या गेल्या असे तुम्हाला वाटते का..?

 

वास्तवात,स्त्री पुरुष समतेचा आधुनिकतेला तरी गंध आहे का..? आजच्या आधुनिक युगापेक्षा बुध्दकाळ हा भारतभुमीचा स्वर्गकाळ होता,तो काळ आजच्या पेक्षा किती तरी पुरोगामी आणि श्रेष्ठ होता,त्यांच्या काळात बुध्दांनी एका वेश्येला आपल्या संघात मानाचे स्थान दिले,या काळात तो मिळतो का..? 

 

🙏🌹 *नमो बुद्धाय* 🌹🙏


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024

PostImage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र च्या वतीने मिलींद बी. खोब्रागडे ह्यांचा राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्काराने दादर, मुंबई येथे सन्मान.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र च्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय पुरस्कार सोहळा, स्नेह भेट व कविसंमेलन नुकतेच १४/०१/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे मोठया उत्साहाने पार पडला. ह्या सोहळ्यात मान. मिलींद बी. खोब्रागडे, रा. गडचिरोली ह्यांना "राज्यस्तरीय काव्यलेखन गौरव पुरस्कार" देऊन सन्मानीत करण्यात आले.

          संमेलनाचे उद्धघाटक सन्माननीय भीमराव यशवंत आंबेडकर (धम्म सम्राट) यांच्या उपस्थितीत "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चैत्य भूमीत" हा सोहळा दिनांक १४/०१/२०२४ रोजी संपन्न झाला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय किर्तीचे जेष्ठ साहित्यिक ह्यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे मार्गदर्शक मान. विनोद जाधव सर, अध्यक्ष नरेंद्र पवार सर, उपाध्यक्षा मान. सौ. मालाताई मेश्राम मॅडम, सचिव मान. अनिल सावंत सर, व संमेलनाध्यक्ष बबन सरवदे सर तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला. 

           संमेलनाला उपस्थित मान.राजीव खंडारे सर, मान. मधुकर दिवेकर सर, मान. सुभाष मानवटकर सर (क्रांतिज्योती सावित्रीमाई विचारमंच छ.संभाजीनगर महाराष्ट्र), मान.अर्चनाताई चव्हाण,मान. मालाताई मेश्राम, मान. प्रितीबालाताई बोरकर (रमाई साहित्यिक विचारमंच नागपूर महाराष्ट्र), मान. कल्पनाताई टेंभुर्णीकर, मान. नानाजी रामटेके सर, मान. हरिछंद्र धिवार सर (साहित्य दर्पण कला मंच नागपूर) चे सर्व कार्यकारी समिती तसेच मान. वैशालीताई खंडाळे, कांचनताई लांजेवार यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सर्व पदाधिकारी, ह्याचे खुप सुंदर रित्या संकलन केले. 

             सर्व अनेक राज्यभरातून आलेले नवकवी, ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी मिलिंद बी. खोब्रागडे, गडचिरोली यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024

PostImage

झेलम परांजपे यांनी त्यांची शाळा राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय का घेतला?


सध्या संपूर्ण भारतात राम मंदिराच्या उद्घाटनाचं वातावरण आहे. त्यानिमित्ताने देशातल्या सहा राज्यांनी सुटीही जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही राज्य शासनाने सुटी जाहीर केली आहे.

 

दिल्लीतील एम्स रुग्णालयाने सुद्धा ओपीडी दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

 

मात्र ओड़िसी नृत्यांगना आणि साने गुरुजी विद्या मंदिर शाळेच्या संचालिका यांनी मात्र त्यांची शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या शाळेच्या मुलींचा फोटो फेसबुकवर त्यांनी हा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला.

 

त्या म्हणतात, “आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं.....सरकारी GR शेवटच्या क्षणी येतो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुध्दा खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर.... आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार...”

त्यांच्या या निर्णयावर फेसबुकवर जोरदार टीका झाली. त्याबद्दलही त्यांनी भूमिका पुन्हा एक फेसबुक पोस्ट लिहून जाहीर केली आहे.

 

त्या म्हणतात, “माझ्या दोन दिवसा पूर्वीच्या पोस्ट मुळे थोडा गैरसमज झाला आहे तो मी दूर करू इच्छिते. शाळा चालू राहणार हा निर्णय आमचा आहे, मुलींचा स्वतःचा नाही.”

 

काही प्रसारमाध्यमांमध्ये मुलींनी स्वत:हून शाळेत न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या.

 

त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

तसंच त्यांनी ट्रोल्सना देखील उत्तर दिलं आहे.

 

त्या म्हणतात, “ज्या लोकांनी troll केले आहे, त्यांची गैरसमजूत दूर करण्यास त्यांना सांगू इच्छिते...,माझं रामाशी काहीही वावगं, वाकडं नाही ..राम मंदिर होतंय, supreme court निर्णय आहे, या घटनेशी देखील माझं काही वावगं नाही.

 

गीत रामायण सारखे आणि तुलसी रामायण सारखे अतिउत्तम काव्यावर आम्ही नृत्य सादर केले आहे. लोकांना ते भावले आहे.

 

तसेच, आम्ही वसंत बापट यांच्या "देह मंदिर चित्त मंदिर" आणि साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" या गीतांवर देखील नृत्य सादर केली आहेत. आणि ते ही लोकांना भावले आहे.

 

हा निर्णय म्हणजे कुठल्या एका पक्षाने कुठल्या दुसऱ्या पक्षाला विरोध नाही केलेला.

 

सांगण्याचा मुद्दा असा की जे पटत नाही त्याचा विरोध करावा.

 

शेवटच्या क्षणी सुट्टी जाहीर करणे पटले नाही, विरोध केला, troll झाले.

 

१९७५ साली आणीबाणी जाहीर झाली, पटलं नाही, विरोध केला, तुरुंगात गेले.

 

बास्स एवढेच....”

या प्रकरणी बीबीसी मराठीनेही त्यांच्याशी संवाद साधला.

 

त्या म्हणाल्या, “ हा जीआर अगदी वेळेवर आला. आमच्या शाळेतील दहावीच्या मुलांची परीक्षा सुरू आहे. अशा परिस्थितीत सुटी देणं योग्य नाही असं आमचं मत झालं. हा निर्णय सर्वसहमतीने घेण्यात आला आहे. याच दिवशी नाही तर इतरही सार्वजनिक सुटीच्या दिवशी आम्ही शाळेत येतो. उदा. गांधी जयंती. त्या दिवशी मुद्दाम शाळेत येतो. जेणेकरून मुलांना गांधीजींबद्दल नीट माहिती मिळेले.

 

त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी वेगळा नाही. मी कोणत्याही देवाच्या विरोधात नाही हे मी पुन्हा सांगते असं त्या म्हणाल्या. हा संपूर्णपणे प्रशासकीय कारणासाठी घेतलेला निर्णय आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

 

झेलम परांजपे कोण आहेत?

झेलम परांजपे या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना आहेत. माजी मंत्री सदानंद वर्दे आणि राष्ट्र सेवा दलाच्या नेत्या सुधा वर्दे हे त्यांचे आई-वडील होत.

 

वसंत बापट आणि रमेश पुरव यांच्या मार्गदर्शनात झेलम परांजपेंनी राष्ट्र सेवा दलातील नृत्यनाटिकांमध्ये काम केलं होतं. पुढे गुरू शंकर बहेरा यांच्याकडून त्यांनी ओडीशी नृत्याचे धडे गिरवले.

 

अनेक मानद महोत्सवांमध्ये त्यांनी ओडिसी नृत्याचं सादरीकरण केलं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे. नृत्य क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय.

राज्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याखाली सुटी देण्यात आली आहे. या कायद्याच्या कलम 26 नुसार विशेष प्रसंगांना राज्य सरकारला सुटी देण्याचा अधिकार आहे.

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024

PostImage

Armori news: युवतीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरास अटक


Armori news: आरमोरी - तालुक्यातील रामपूर येथील पूजा ठाकरे या युवतीने स्वतःच्या घरीच गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक १९ जानेवारीला दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास घडली होती. सदर प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रियकरास बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश प्रकाश चौधरी (२८) रा. रामपूर चक असे आरोपीचे नांव आहे.

मृतक युवतीच्या आई वडिलांनी आरमोरी पोलिस ठाण्यात जाऊन माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना दिली. तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी रामपूर चक येथील मंगेश प्रकाश चौधरी यास अटक केली. त्याला बोलते केले असता त्याने सांगितले की, मागील दोन वर्षापासून आपले गावातीलच पूजा ठाकरे या मुलीसोबत आपले प्रेम संबंध होते.

आरोपी मंगेश चौधरी याचे पूजा ठाकरे या मुलीशी प्रेम संबंध असताना, पूजाला न सांगता आपले लग्न दुसऱ्या गावातील मुलीशी जोडले व साक्षगंधाची तारीख सुद्धा दिनांक २१ जानेवारी ही ठरली होती. या घटनेची कुणकुण मृतक पूजा हिला लागताच तिने आरोपी मंगेश यास 'माझ्याशी लग्न कर' असे सांगितले असता आरोपीने  यालग्नास नकार दिला. यामुळे तिने आत्महत्या केली.

 परंतु तिच्या आई- वडिलांनी तक्रार दाखल करून सत्य निदर्शनास आणून दिल्याने दिनांक २० जानेवारीला आरमोरी पोलिसांनी आत्महत्या करण्यास जबाबदार असलेल्या आरोपीस अटक करून त्याच्यावर भांदवी कलम ३०६ अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला. आज आरोपी मंगेश चौधरी यास न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

लग्नात आहेराच्या साड्यांवर नका करू जास्त खर्च, इथं मिळतात २५ रू ला एक साडी


 लग्न ठरल्यापासून सगळ्या गोष्टींच्या खरेदीला सुरूवात होते. मानपान, मुलीचा संसार सेट, रूखवत, कपडे आणि आहेराच्या साड्या. यात प्रामुख्यात जास्त पैसा खर्च होतो तो आहेराला देण्यात येणाऱ्या कपड्यांवर. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका मार्केटबद्दलची माहिती देणार आहोत, जिथे या साड्या तुम्हाला केवळ २५ रूपयात मिळणार आहेत. २५ रूपयांपासून सुरू झालेल्या या साड्या तुम्हाला हजारों रूपयांच्या व्हरायटीही इथे पहायला मिळणार आहेत.

 

 *गणपती मिल, केशवनगर पुणे* 

पुण्यातीलच केशवनगर, मुंढवा, जी मॉल येथे गणपती साडी डेपो हे दुकान आहे. इथे सिंपल पण रेखीव प्रिंट असलेली साडी तुम्हाला फक्त *२५* रूपयात मिळणार असून तुम्ही हव्या त्या रंगांच्या हव्या तितक्या साड्या केवळ २५ रूपयात घेऊ शकता. तुम्हाला होलसेल खरेदी करायची नसेल तर १ किंवा २ साड्या जरी घेतल्या तरी तुम्हाला सहज २५ रूपयात मिळू शकतात.

 

 *इटालियन सिल्क ३२० ची साडी १२५* 

इटालियन सिल्कचे नाव तुम्ही अनेक वर्षांपासून ऐकले असेल. या सूताची अनेक वर्षांपासून महिलांमध्ये क्रेझ आहे. हलक्या-फुलक्या कशाही वापरता येतात त्यामुळेच महिलांची पसंती या सिल्क साडीला मिळते. ही साडी तुम्हाला या दुकानात १२५ रूपयांना मिळणार आहे. या साडीची इतर ठिकाणी किंमत ३०० ते ४०० रूपयांपर्यंत आहे. आहेराच्या साड्यांचा विचार केला तर या साड्या कमी किंमतीत आणि जास्त टिकावू अशा इटालियन सिल्कच्या फक्त १२५ मध्ये मिळतात.

 

 *लायक्रा सिल्क २५० ची साडी १३० रूपयांत* 

आहेराच्या साड्या अगदीच हलक्या क्वालिटीच्या नको असतील. तर तुम्ही नक्कीच लायक्रा सिल्क कापडाचा विचार करू शकता. दिसायलाही आकर्षक अन् बाहेर एखाद्या कार्यक्रमालाही नेसता येईल अशी ही साडी आहे. ही साडी बाहेर तुम्हाला २५० पासून ५०० रूपयापर्यंत मिळते. पण इथे ही साडी केवळ १३० रूपयात मिळते.

 

 *मलई सिल्क अन् कॉटन साडी १९९ मध्ये* 

साड्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या क्वालिटी आहेत. त्यातच अगदी सॉफ्ट कापड म्हटलं तर मलई सिल्कच्या साड्या महिलांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तर दुसरीकडे कॉटन साड्यांचीही क्रेझ कमी झालेली नाही. तुम्ही अशा साड्यांचा विचार आहेरासाठी करत असाल तर या दोन्ही साड्या तुम्हाला १९९ मध्ये मिळतात.ज्यांची बाहेरील किंमत ५०० रूपये आहे.

 

 *पाहुण्यांना देण्यासाठीच्या साड्या* 

लेकीच्या सासवा, वहिन्या, नणंदबाई यांच्यासाठी तुम्ही अगदीच हलक्या साड्या घेऊ शकत नाही. त्यांना भारीतल्याच साड्या लागतातय तर त्याचीही काळजी करू नका. तुम्हाला केवळ २९९ मध्ये भारीतल्या साड्याही इथे मिळतील.

 

 कॉटन ऑर्ग्रेंझा साडी, सिल्क मटेरियल, लीनन कॉटन, लेहरा पॅटर्न अशा अनेक व्हरायटीच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील. ज्यांची किंमत *२९९ पासून ४९९* इतकीच आहे. ज्यांची क्वालिटी बघून कोणीही म्हणणार नाही की या इतक्या कमी किंमतीच्या साड्या आहेत.

 

 लग्नात या अशा साड्या घेऊन तुम्ही पाहुण्यांचे मन राखू शकता. ज्यामुळे त्यांना मानपान केला. म्हणून तुम्हाला समाधान आणि पाहुण्यांनी भारीतली साडी घेतली म्हणून पाहुणेही खूश.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

राहुलच्या रॅलीवर भाजपाचा हल्ला


युवक काँग्रेसच्या वाहनांची तोडफोड

 

गुवाहाटी, . काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये आहे. या यात्रेच्या सातव्या दिवशी शनिवारी सकाळी राहुलगांधी यांनी लखीमपूर येथील दुर्गा मातेच्या मंदिरात दर्शन घेतले आणि पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

 

 यादरम्यान, आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रे' वर हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लखीमपूर येथे यात्रेच्या ताफ्यावर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केला. यावेळी भारत जोडो न्याय यात्रेचे पोस्टर, बॅनर फाडले आणि गाड्यांची तोडफोड केली, अशी माहिती काँग्रेसने ट्वीटरवरून दिली. भाजपा सरकार भारत जोडो न्याय यात्रेला मिळणारे प्रेम आणि समर्थन पाहून घाबरलेले आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

3 वर्षात देशातील नक्षलवाद संपवणार गृहमंत्री अमित शहांची ग्वाही


 तेजपूर, गत 9 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सीएपीएफच्या सुविधांसाठी अनेक पावले उचलली आहेत, मग ती सीआरपीएफ असो किंवा सीमेवर तैनात असलेल्या इतर सर्व संघटना. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील 3 वर्षात नक्षलवादापासून मुक्त होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ते शनिवारी आसाममध्ये कार्यक्रमाला संबोधित करत होते. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तेजपूर येथील एसएसबी कॅम्पसमध्ये सशस्त्र सीमा बलच्या 60 व्या स्थापना दिनाला हजेरी लावली.

 

शाह पुढे म्हणाले, भारत-चीन युद्धानंतर एसएसबीची स्थापना 1963 मध्ये झाली आणि जेव्हा अटलजींनी 'एक सीमा एक बल' धोरण लागू केले तेव्हा 2001 पासून एसएसबी फोर्स कार्यरत आहे. भारत- नेपाळ सीमा आणि भारत-भूतान 2004 पासून सीमेचे कर्तव्यदक्ष रक्षण करत आहेत नक्षलवादाविरुद्धच्यालढ्यात एसएसबीच्या शौर्याचे कौतुककरताना शाह म्हणाले, सीआरपीएफ आणि बीएसएफसह एसएसबीने नक्षलवादी चळवळ संपवली आहे. 

 

एसएसबीने नेपाळ आणि भूतान या मित्र देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासोबतच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध लढा दिला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील एसएसबीने सीआरपीएफ, बीएसएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करासह दहशतवाद्यांविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे. टपाल तिकीट जारी : सरकारने एसएसबीच्या 60 व्या स्थापना दिनानिमित्त टपाल तिकीट जारी केले आहे. यामुळे देशातील जनतेसमोर एसएसबीचे कर्तव्याचे समर्पण नेहमीच जिवंत राहील. शाह पुढे म्हणाले, भारत आता संपूण जगात मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे. आपला देश 2047 मध्ये संपूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून समोर येईल. असेही त्यांनी सांगितले

 

.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

ED news: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात 'ईडी, सीबीआय' एक्स्प्रेस 'सुसाट


मुंबईः देशातील विरोधी पक्षातील सरकार तसेच नेत्यांविरोधात ईडी, सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अचानक दोन्ही तपास संस्था सक्रिय झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्र हे मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची आत्तापासून नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे का? अशी शंका यावी इतक्या वेगाने ही कारवाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया अचानक वाढल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष्य ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील नेते आहेत.

 

विरोधी ठाकरे अन् शरद पवार गट टार्गेट !

 

किशोरी पेडणेकर आणि रोहित पवारांना एकाच दिवशी नोटीस अजित पवार सत्तेत सामील होण्यापूर्वी त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार तसेच चौकशी सुरु असताना त्या चौकशीचे आणि होणऱ्या गंभीर आरोपांचे काय झाले? हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच आता शरद पवार गटातील आणि ठाकरे गटातील उर्वरित नेत्यांवर ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू झाला आहे. आज एकाच दिवसात ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांना सुद्धा बारामती अॅग्रो प्रकरणात ईडीवरून समन्स बजावण्यात आले आहे. एकाच दिवशी विरोधी पक्षातील दोन नेत्यांना -नागपूर/अमरावती विभाग वर ईडीकडून नोटीस आल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

Kurkheda news: वर पोहे, खाली सुगंधित तंबाखू


वर पोहे, खाली सुगंधित तंबाखू.. छत्तीसगडच्या तस्करांची शक्कल

२३ लाखांचा मुद्देमाल जप्तः गोठणगाव नाक्यावर पोलिसांची कारवाई

कुरखेडा : वर पोहे व खाली सुगंधिततंबाखू टाकून छत्तीसगडहून आलेला टेम्पो तालुक्यातील गोठणगाव येथे पोलिसांनी पकडला. यावेळी चालकास ताब्यात घेतले असून सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १९ जानेवारीला रात्री आठ वाजता करण्यात आली.

ललितकुमार खेमचंद टंडण (वय २५, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) असे आरोपीचे नाव आहे. तो टेम्पोतून (सीजी ०८ एके-४२३८) छत्तीसगडहून गडचिरोलीमार्गे चंद्रपूरला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून उपाधीक्षक साहील झरकर यांनी गोठणगाव नाक्यावर सापळा लावला. टेम्पो आल्यावर झडती घेतली असता,त्यातील पोत्यात वर पोहे व खाली सुगंधित तंबाखू आढळून आली.

सुमारे ८ लाख ९ हजार २८० रुपयांची तंबाखू, ३ लाख ८५ हजारांचे पोहे, मोबाइल, टेम्पो असा सुमारे २३ लाख ५० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चालक ललितकुमारखेमचंद ठंडण (२५, रा राजनांदगाव, छत्तीसगड) याला अटक करण्यात आली.याप्रकरणी कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक दयानंद भोंबे हे तपास करत आहेत.

रॅकेट उघडकीस येणार का ?

दरम्यान, जिल्ह्यातील गांजा, सुगंधित तंबाखू तस्करीचे छत्तीसगड कनेक्शन यापूर्वीही अनेकदा उघडकीस आलेले आहे. मात्र, पाळेमुळे खणून काढण्यात पोलिसांना यश येत नाही. या कारवाईनंतर रॅकेट उघडकीस येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे  २८ जानेवारी ला सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेच्या राज्यस्तरीय निवड चाचणी.


 

गडचिरोली :- आजच्या संगणक युगात लहान वयातच मुले  संगणकावरील व मोबाईल गेम्स तास न तास खेळत असतात त्यामुळे शारीरिक व्यायाम होत नाही त्यामुळे लहान मुलांचे शारीरिक व मानसिक विकास मंदावतो परिणामी वातावरणात बदल झाले की मुले नेहमी आजारी पडतात लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व लहान वयातच विद्यार्थी खेळांच्या  प्रवाहात येऊन  मजबुत व्हावे यासाठी दरवर्षी महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होत असते ज्यामध्ये ८ वर्षांपासून ते १२ वर्षापर्यंतच्या 

विद्यार्थ्यांना अँथलेटिक्स क्रीडाप्रकारातील रनिंग,लांबउडी ,गोळाफेक या खेळात आवळ निर्माण होऊन आणि त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या देशाचे भावी स्टार खेळाडू बनावे ही बाब ओळखुन  अँथलेटिक्स सारख्या

खेळात तालुका, जिल्हा, राज्य व  देशाचे प्रतिनिधित्व करून आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण  करावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत दि.९ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला सांगली येथे राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेची निवड चाचणी दि.२८ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स क्षेत्रातील सेमाना बायपास रोड  स्थित संजीवनी ग्राउंड येथे रिपोर्टिंग वेळ सकाळी ६:३० वाजता  गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे आयोजित केलेली आहे 

या  राज्यस्तरीय सबज्युनिअर निवड चाचणीत ८ वर्षाआतील मुलांचे व मुलींचे जन्म तारीख (११ / २/ २०१६ ते १०/२/२०१८ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर रनिंग ,१०० मीटर रनिंग , स्टँडिंग ब्रॉड जम्प व बॉल थ्रो

तर १० वर्षाआतील मुलांचे व  मुलींचे जन्मतारीख ( ११/२/२०१४ ते १०/२/२०१६ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ६० मीटर रनिंग ,१०० मीटर रनिंग , स्टँडिंग ब्रॉड जम्प ,गोळाफेक तर १२ वर्षाआतील मुलांचे व  मुलींचे जन्मतारीख ( ११/२/२०१२ ते १०/२/२०१४ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 

६० मीटर रनिंग , ३०० मीटर रनिंग ,लांबउडी , उंचउडी , गोळाफेक या इव्हेंट मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  सहभाग घ्यावे असे आवाहन  गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांनी केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

Gadchiroli news: पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार


 

गडचिरोली - आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मार्कंडा (कं) वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यातआणखी एकजण ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बापूजी नानाजी आत्राम (४५) रा. लोहारा, ता. मुलचेरा असे मृतकाचे नाव असून रेंगेवाही उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक २९३ मध्ये त्याचा मृतदेह १८ जानेवारी रोजी आढळून आला आहे.

 

मागील पाच महिन्यापासून मुलचेरा तालुक्यात वाघिणीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सुरुवातीला त्या वाघिणीने पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार केले. त्यानंतर विश्वनाथनगर आणि कोठारी येथील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले. तर ७ जानेवारी रोजी चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल आणि १५ जानेवारी रोजी कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या दोन महिलांचा बळी घेतला. या घटनांमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. वन विभागाने आरआरटी ला पाचारणकरून १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास वाघिणीला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, वाघिणीला जेरबंदकेलेल्या त्याच परिसरात जवळपास दोनशे मीटर अंतरावर पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

वनाधिकाऱ्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष भोवले

 

बापूजी नानाजी आत्राम हा बेपत्ता असल्याने गावकऱ्यांनी शोधमोहीम राबविली असता त्याचा मृतदेह खंड क्रमांक २९३ मध्ये आढळून आला. विशेष म्हणजे शरीरापासून डोके गायब असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वाघिणीने जेरबंद होण्यापुर्वीच त्याला हल्ला करून ठार केल्याच्या बाबीस वनाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. वाघीणीस जेरबंद करण्याची मोहीम सुरू असतांना सदर ईसम दारू पिऊन जात होता. त्याला प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात आली असतांनाही त्याने वनाधिकाऱ्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले. वाघीणीचीशोधमोहीम सुरू असतांनाच वाघिणीने त्याला ठार केले. त्याच्या कुटूंबियांना ५० हजारांची मदत करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

दुचाकी अपघातात १ ठार, १ गंभीर


नेरी : चिमूर तालुक्यातील पिपर्डा गावातील माणिक चूनारकर (५३) हा जागीच ठार तर मोरेश्वर चुनारकर (३२) गंभीर जखमी झाले आहे.

 

प्राप्त माहीती नुसार, माणीक चुनारकर व मोरेश्वर चुनारकर हे नात्याने काका - पुतणे आहेत. चिमूर मध्ये प्लाटच्या विक्रीच्या कामासाठी गेले होते. परत गावाला जात असताना शुक्रवार दि.१९ जानेवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास विहीरगांव फाट्याजवळ जंगलीडुकराच्या सरीने दुचाकी गाडीला धडक दिली.

 

माणिक चुनारकर हे जागीच गतप्राण झाले तर मोरेश्वर चुनारकर गंभीर जखमी असून या मार्गानी येणाऱ्या नागरीकांनी पोलीसांना फोन वर माहीती दिली असता पोलिस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिरनकर, झिलपे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासनी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. या अपघाती घटनेमुळे चुनारकर परिवारात व गावात शोकाकूल वातावरण आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

Mulchera news: अत्याचार प्रकरण; शिक्षकाची रवानगी पोलिस कोठडीत


मूलचेरा : अकरावीच्या वर्गातशिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली जेरबंद असलेल्या शिक्षकाची २० जानेवारीला पोलिस कोठडीत रवानगी झाली. त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

मूलचेरा येथे विश्वजित मिस्त्री (३८, रा. कालीनगर, ह. मु. विवेकानंदपूर, ता. मूलचेरा) या शिक्षकावर १९ जानेवारीला बाललैंगिक अत्याचार व बलात्कारप्रकरणी गुन्हा नोंद झाला. पीडित १७ वर्षीय मुलगी शिकत असलेल्या महाविद्यालयात विश्वजित मिस्त्री हा शिक्षक आहे.

 

वर्गशिक्षक असल्याने त्याचा पीडितेशी नेहमी संपर्क असे. याचाच फायदा घेत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यातओढले.

 

 त्यानंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, शिक्षकाच्या पत्नीने मोबाइल तपासला, तेव्हा या मुलीसोबतची चॅटिंग उघडकीस आली. यानंतर अत्याचाराला वाचा फुटली. पोलिसांनी १९ रोजी शिक्षक विश्वजित मिस्त्री यास जेरबंद केले होते. त्यास २० रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

Gadchiroli news: टेम्पो धडकली दुभाजकावर


गडचिरोली -शहरातील चंद्रपर महामार्गावरील शासकीय विश्रामगृहानजीक कन्हाळगाव येथे देवाच्या दर्शनासाठी जात असलेला टेम्पो दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात रस्ता दुभाजकावर धडकुन टेम्पो पलटल्याची घटना आज २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. 

 

एमएच ३३ टी २२४३ या क्रमांकाच्या टेम्पोने क्रमांकाने १० भाविक कन्हाळगाव येथे दर्शनासाठी देवाच्या जात असतांना एका पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी मध्ये आल्याने दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पो दुभाजकास धडकला.

 

 या अपघातामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी टेम्पोमध्ये असलेले प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

या संदर्भात ठाणेदार फेगडे यांना विचारणा केली असता याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल केला नसुन प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

Dhanora news: झाडाला धडकून जीप उलटली


धानोरा : तालुक्यातील येरकड-मालेवाडा मार्गावरील काळी पहाडीजवळ झाडाला धडकून जीप उलटली. शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. मात्र, दिवसभर या वाहनाजवळ कुणीही न फिरकल्याने संबंधित घटनेचे गूढ कायम आहे.

 

जीप (एम एच ३५ बीएच ०९४२) झाडाला धडक देऊन उलटल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सकाळी दोन युवक वाहनाजवळ आढळून आले. मात्र, नंतर ते गायब झाले. त्यानंतर दुपारी व सायंकाळी कोणीच या वाहनाकडे फिरकले नाही. सायंकाळपर्यंत सदर वाहन घटनास्थळावरच होते. येरकड पोलिस मदत केंद्रात संपर्क केला असता माहिती मिळू शकली नाही.

 

 

मालवाहू रिक्षा उलटून चार जखमी

 

गडचिरोलीतील सर्किट हाऊसजवळ मालवाहू राहू रिक्षा रिक्षा उलटूनही र चार जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उशिरापर्यंत गडचिरोली ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती. त्यामुळे अधिक तपशील मिळू शकला नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024

PostImage

Armori news: आरमोरी तालुक्यातील रामपूर येथील एका युवतीने स्वतःच्या घरीच गळफास लावून घेऊन केली आत्महत्या


आरमोरी - तालुक्यातील रामपूर येथील एका युवतीने स्वतःच्या घरीच गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक १९ जानेवारीला दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

 

पूजा चंद्रशेखर ठाकरे ( १९) रा. रामपूर ता. आरमोरी असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती बी.ए.प्रथम वर्षात शिकत होती.

 माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सदर आत्महत्या करणाऱ्या युवतीचे आई-वडील हे आरमोरी येथे बाजार करण्यासाठी गेले होते. तर तिचा भाऊ शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला होता. घरी कुणीच नसल्याचे पाहून सदर युवतीने दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. 

 

 आई- वडील घरी येताच ती गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आली. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तिचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. आरमोरी पोलिसांनी प्रथमदर्शनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास आरमोरी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Gadchiroli news: एका बेपत्ता असलेल्या इसमाचा धडावेगळा मृतदेह आढळला


गडचिरोली, दि. 20 : जिल्ह्यातील रेंगेवाही उपक्षेत्रातील जंगल परिसरात एका बेपत्ता असलेल्या इसमाचा धडावेगळा मृतदेह आढळल्याची घटना 20 जानेवारी रोजी उघडकीस आली. सदर घटनेने खळबळ उडाली असून घातपात की वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. बापूजी नानाजी आत्राम (45) रा. लोहारा ता. मूलचेरा असे मृतकाचे नाव असल्याचे कळते.

 

मृतक हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता असे कळते. जिल्ह्यात व्याघ्र हल्ले वाढले असून सदर घटनेच्या परिसरातून दोन दिवसापूर्वीच महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आले. तर याच जंगल परिसरात आत्राम यांचा मृतदेह धडावेगळा आढळून आला आहे. घटनास्थळी घड आहे तर शीर नाही अशी माहिती असून या घटनेमागे घातपात की व्याघ्र हल्ला असे विविध तर्क लावण्यात येत असून पोलिसांच्या तापसानंतरच ते कळणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Gadchiroli news: तरुणाने “मोदी सरकार की भारत सरकार” यावरून चांगलेच खडे बोल सुनावले


गडचिरोली : विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना एका तरुणाने “मोदी सरकार की भारत सरकार” यावरून चांगलेच खडे बोल सुनावले. चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावात आलेल्या वाहनावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख असल्याने संतापलेल्या युवकाने अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. या घटनेचा व्हिडीओ जिल्हाभरात ‘व्हायरल’ झाला आहे.

लिंक खालील प्रकारे

👇👇👇👇👇👇

https://twitter.com/LoksattaLive/status/1747963156721541260?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1747963156721541260%7Ctwgr%5Ee1642911dbdfb01c6eeea193aa4b5df7f8d6849e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftwitter.com%2F

भारत सरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नागरिकांना विविध लाभ देण्यासाठी गावागावात प्रशासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त गावात आलेल्या वाहनांवर मोदी सरकार असा उल्लेख होता. यामुळे संतापलेल्या युवकाने कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातला.

 

यासंदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्याने नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यात एक युवक उपस्थित अधिकाऱ्यांना यात्रा असल्याचे एक दिवस आधी का कळविण्यात आले नाही, असा प्रश्न करताना दिसून येतोय. सोबतच हे मोदी सरकार आहे की भारत सरकार असेही विचारताना दिसत आहे. युवकाने विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. अखेर गोंधळातच कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. सद्या या व्हिडिओची जिल्ह्याच चर्चा आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

वैरागड येथील इंदिरा गांधी चौकात अतिक्रमण करणाऱ्यांची चौकशी


वैरागड - येथील ग्रामपंचायत जवळील इंधिरा गांधी चौकात होत असलेल्या अतिक्रमण करणाऱ्यांची तलाठी कार्यालय मार्फत चौकशी करण्यात आली.

येथील मच्छिपालन सहकारी संस्था जवळील इंदिरा गांधी चौकात होत असलेल्या अतिक्रमण बाबत भंडारेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डोनू कांबळे यांनी सत्यदास आत्राम, गिरीश बोधनकार, प्रवीण आणि रुपमांगण कांबळे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.

या अनुषंगाने वैरागड तलाठी कार्यालय मार्फत मोका चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान सत्यदास आत्राम यांचे आपल्याच जागेवर गाव नमुना ८ मालमत्ता क्रं. ७०३ अन्वये नवीन घर बांधकाम होत आहे. प्रवीण आणि रुखमांगण कांबळे यांच्या घराचे अतिक्रमण त्याचप्रमाणे गिरीश बोधनकारयांचा १० वर्षापासून शांताबाई पदा यांच्या घरी धान खरेदी विक्री व्यवसाय सुरू आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवून समोरची कार्यवाही करण्यात येईल असे तलाठी रासेकर यांनी सांगितले.

मंडळ अधिकारी कुमरे, तलाठी एस. एस. रासेकर, कोतवाल जितेंद्र कांबळे यांनी मोका चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, पोलिस पाटील गोरखनाथ भानारकर, मच्छीपालन सहकारी संस्थेचे सचिव गजानन धनकर, जनार्दन बोधनकार, मारोती मुंगिकोल्हे, जनार्दन मेहरे, डोनु कांबळे, सत्यदास आत्राम, गिरीश बोधनकार, रुपमांगण कांबळे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Gadchiroli news: 'ती' नरभक्षी वाघीण अखेर जेरबंद


आष्टी - मागील काही महिन्यांपासून मूलचेरा व अहेरी तालुक्यात धुमाकुळ घालून दोघांचा बळी घेणाऱ्या व कित्येकांना जखमी करणाऱ्या नरभक्षी वाघीणीस अखेर काल दिनांक १८ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या रेंगेवाही नियत क्षेत्र क्रमांक २७० मध्ये पिंजऱ्यात जेरबंदकरण्यास वनविभागास यश प्राप्त झाले आहे. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चमुने ही कामगिरी केली.

या नरभक्षी वाघीणीने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरे मारली होती. तसेच दोन मनुष्यांना गंभिर जखमी केले तर दोन महिलांना ठार मारले होते, यामुळे मूलचेरा व अहेरी तालुक्यात या वाघीणीची प्रचंड दहशत होती. वाघामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला होता.

दिनांक १६ जानेवारी २०२४ पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील चमु, मार्कडा (कं), पेडीगुडम, चामोर्शी, घोट, वन्यजीवचपराळा, गस्ती पथक आलापल्ली या वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी यांनी सदर वाघीणीवर पाळत ठेवली होती. मानव जिवास धोका ठरलेल्या वाघीणीस जेरबंद करण्यासाठी रितसर परवानीगी घेवुन मार्कंडा वनपरिक्षेत्रातील रेगेवाही उपक्षेत्रांतर्गत रेंगेबाही नियतक्षेत्रातील महाराष्ट्र वनविकास महामंडळास हस्तांतरीत केलेल्या वनखंड क्र. २७० मध्ये रात्री १० वाजताच्या सुमारास ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी डांट करुन वाघीणीस बेशुद्ध केले. यानंतर यशस्वीरित्या तिला पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश प्राप्त झाले.

या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली कामगिरी फत्ते

नरभक्षक मादी वाघीणीस जेरबंद करण्यासाठी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे परुावैद्यकीय अधिकारी तथा रॅपीड रेस्क्यु टिम प्रमुख डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर अजय मराठे, रॅपीड रेस्क्यू टीमचे सदस्य दिपेश डी. टेंभुर्णे, योगेश डी. लाकडे, गुरुनानक वी. ढोरे, वसीम शेख, विकास एस. ताजने, प्रफुल एन. वाटगुरे, ए.डी. कोरपे, ए. एम. दांडेकर त्याच प्रमाणे आलापल्लीचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी पी. डी डी. बुधनवार, आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी आर. एस. डेगरे, मार्कंडा कं. च्या वनपरीक्षेत्र अधिकारी भारती राऊत, रेगेवाही उपक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक मांडावकर, वनरक्षक शेरकी, बागडे, परसवार, निमगडे, कोकनरे, हजारे, गोवर्धन, दंडिकवार, लिपटे, बारशिंगे, आये, मेश्राम, क्षेत्र सहाय्यक भंडारवार, क्षेत्र सहयक आर. एस. आत्राम, क्षेत्रीय कर्मचारी, वनमजुर तसेच अहेरी, चामोर्शी, घोट, चपराळा वन्यजीव, चौडमपल्ली (वन्यजीव) या वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांनी कामगिरी फत्ते केली.

आतापर्यंत 60 पार केली आहे

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे परुावैद्यकीय अधिकारी तथा रॅपीड रेस्क्यु टिमप्रमुख डॉ. आर. एस. खोब्रागडे व त्यांच्या चमुने आतापर्यंत गडचिरोली, चंद्रपूर व अन्य जिल्ह्यातील तब्बल ६२ वाघांना सुरक्षितरित्या जेरबंद करण्याची कामगिरी पार पाडली आहे. याबद्दल चमुचे कौतुक केले जात आहे.

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Gadchiroli news: १३ कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई


गडचिरोली : शेतकऱ्यांना बियाणे, खते  व कीटकनाशके आदी निविष्ठांची पूर्ती कृषी सेवा केंद्रांमार्फत केली जाते; परंतु त्यांच्याकडून शेतकऱ्यांना अनेकदा योग्य सेवा दिली जात नाही. यामुळे कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त होतात. शिवाय कृषी विभागाने केलेल्या तपासणीत सदोष आढळलेल्या जिल्ह्यातील एकूण १३ कृषी केंद्रांवर मागील खरीप हंगामात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

जिल्ह्यात खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन, मका, व अन्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामातील लागवड क्षेत्र अधिक असल्याने कृषी विभागसुद्धा बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीवर लक्ष ठेवून असतो. मागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची विशेष नजर होती. साठा पुस्तक न बाळगणे, पॉस मशीनवर विक्री न करणे, रेकॉर्ड न ठेवणे, तक्रारी आदी कारणांमुळे १३ कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी मागील खरीप हंगामात निलंबित केले होते. गुणनियंत्रक कक्षाच्या पथकाद्वारे ठिकठिकाणच्या कृषी केंद्रांवर धाड टाकून नमुने गोळा केले होते.

 

कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. खरीप हंगामात पथकाने धडक कारवाई करून तपासणी केली तसेच आवश्यक प्रकरणात कोर्ट केस व अन्य कार्यवाही केली. कृषी केंद्रांकडून फसवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नक्कीच तक्रार करावी.

 

- संजय मेश्राम, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

जेल समजून उंदीर मारण्याचे औषध खाल्ले, मुलीचा मृत्यू


भंडारा. जेल समजून उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील विद्यानगरात घडली. श्रीमयी प्रेम शेंडे (वय 2) असे या मुलीचे नाव आहे. श्रीमयी घरात खेळत होती त्यावेळी घरात उंदीर मारण्यासाठी औषध टाकून ठेवण्यातआले होते. 

 

खेळता खेळता श्रीमयीने जेल समजून ते औषध चाटून बघितले. तिची प्रकृती खालावल्याने नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दोन वर्षे वयाची चिमुकली धड बोलूही शकत नव्हती त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Nagpur news: घराला भीषण आग; 2 चिमुकले जिवंत जळाले


बहीण थोडक्यात बचावली, परिसरात खळबळ

नागपूर. घराला आग लागल्याने दोन चिमुकले जिवंत जळाले. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत घडली. घटनेच्या वेळी मुलांची मोठी बहीणही तेथे होती, मात्र तिने वेळीच घरातून बाहेर पळ काढल्याने थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह गिट्टीखदान पोलिस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. दोन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत दोन्ही चिमुक्ल्यांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. देवांश रंजीत उईके (7) आणि प्रभास रंजीत उईके (2) रा. गौरखेडे कॉम्प्लेक्ससमोर, सेमिनरी हिल्स, अशी होरपळलेल्या मुलांची नावे आहेत. आमदार विकास ठाकरे आणि कमलेश चौधरी यांनीही घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती मिळाली आहे.

 

रंजीत आणि दीपाली उईके तीन मुलांसह सेमिनरी हिल्स परिसरात गौरखेडे कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. त्यांना देवांश आणि प्रभास अशी मुले आणि एक 11 वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास तिन्ही मुले घरात खेळत होती. वडील कामावरून परतायचे होते, तर आई शेजारच्या घरी गेली होती. देवांश आणि प्रभास आतल्या खोलीत कुत्र्यासोबत खेळत होते तर मुलगी बाहेरच्या खोलीत होती. या दरम्यान अचानक घराला आग लागली. मुलीने आरडा-ओरड करीत बाहेर पळ काढला. मात्र दोन्ही मुले आतल्या खोलीत असल्याने अडकून पडली. त्यांना निघताच आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

 

आगीचे कारण अस्पष्ट

 या घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश सागडे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी घटनेची सूचना अग्निशमन विभागाला दिली. विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दोन्ही मुलांचे जळून खाक झालेले मृतदेहच बाहेर काढण्यात आले. या आगीत कुत्र्याचाही होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून परिसरात कुणी सिलिंडर लिकेज तर कुणी शेकोटीमुळे आग लागल्याचे सांगत होते.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Nagpur news: भरधाव टँकरने बहीण-भावाला चिरडले,भाऊ जागीच ठार, बहीण गंभीर


 बुटीबोरी, . मोटर सायकलने गावी जात असलेल्या बहीण भावाला टँकर चालकाने आपले ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून जोरदार धडक दिली. यात भावाचा जागीच मृत्यू झाला तर बहीण गंभीर जखमी झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील जलसा धाब्यासमोर नागपूर-चंद्रपूर मार्गावर बुधवारी दुपारी 4.30 चे सुमारास बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. शुभम अरविंद शेंडे (25) राहणार हमदापुर, ता. सेलू, जिल्हा वर्धा असे घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून वैष्णवी अरविंद शेंडे (23) असे गंभीर जखमीअसलेल्या तरुणीचे नाव आहे. 

 

प्राप्त माहितीनुसार शुभम आणि वैष्णवी हे दोघे बहीण भाऊ घटनादिनी नागपूर वरून आपले गावी मोटरसायकल क्र. एम एच 32 ए वी 0877 ने जात होते. दरम्यान घटनावेळी नागपूर-चंद्रपूर मार्गावरील जलसा धाब्यासमोर पोहचताच मागून येत असलेल्या भरधाव टँकर क्र.जी जे 12 बीडब्ल्यू 2283 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून रस्ता दुभाजकाच्या कट आउट वरून वळण घेतले. यामध्ये मोटरसायकल ही टैंकरला मागच्या बाजूला धडकली आणि शुभमचे त्यावरून संतुलन बिघडून तो टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर वैष्णवी ही गंभीर जखमी झाली. 

 

घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना मिळताच ठाण्यातील सपोनि सतीश मेश्राम आणि पोहवा आशिष टेकाम हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचून वैष्णवीला उपचारार्थ रवाना करून घटनेचा पंचनामा केला. शुभमचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता रवाना करून घटनेची नोंद घेत आरोपी टैंकर चालकाविरुद्ध कलम 279,338,304 अ, भादवी सहकलम 184,134 अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनावेळी आरोपी चालक हा घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिस त्यांचा शोध घेत असून पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

धानाचे पोते चोरणाऱ्या दोघांना अटक


मूल : घरात कुणी नसल्याची संधी साधून चिंचाळा येथून धानाचे आठ पोते चोरणाऱ्या दोघांना मूल पोलिसांनी गुरुवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता मुद्देमालासह अटक केली. राकेश कोकाटे (३५) व दिनेश सोनटक्के (३५, दोघेही रा. चिंचाळा) अशी आरोपींची नावे आहेत. चिंचाळा येथील शेतकरी पांडुरंग गुरनुले यांनी आपल्या घरात धानाचे पोते ठेवले होते. शनिवारी (दि. १३) गुरनुले यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरी परत आल्यानंतर धानाचे आठ पोते चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी काही व्यक्तींवर संशयही व्यक्त केला होता. पोलिसांनी राकेश कोकाटे व दिनेश सोनटक्के या दोघांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अटक केली. आरोपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींकडून १२ हजार रुपये किमतीचे धान जप्त केले. पुढील तपास हवालदार राष्ट्रपाल कातकर करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

विहिरीला मिळत आहे 4 लाख रुपयांचे अनुदान!! प्रत्येक गावात किमान १५ विहिरी खोदणार; विहिरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज..!


 

 शेतकऱ्यांना नव्या विहीर खोदाईसाठी शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देता येते. अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदाई मात्र पुरेशी होत नाही. त्यामुळे आता प्रत्येक ग्रामपंचायतीने खोदाईचे किमान १५ प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या असून ग्रामविकास विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदा राज्यात दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल विहीर खोदाईकडे राहील. त्यामुळे 'प्रत्येक शेताला पाणी' ही संकल्पना राज्यात हाती घेण्यात आली आहे. 

 

 त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला विहीर खोदाईसाठी अनुदान द्यावे, असे धोरण शासनाने ठेवलेले असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान १५ विहिरींचे बांधकाम सुचवावे. अर्थात, कमाल कितीही विहिरी सुचवता येतील. परंतु त्यासाठी निश्‍चित केलेल्या नियमांचे पालन बंधनकारक असेल," असे सूत्रांनी स्पष्ट केले.

 

💸 *तीन टप्प्यांत मिळते अनुदान* 

1️⃣ खोदाईपूर्वी  

2️⃣ खोदाई ३० ते ६० टक्के झालेली असताना 

3️⃣ खोदाई पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळते. 

 

📌 गैरव्यवहार टाळण्यासाठी या टप्प्यांचे *'जिओ टॅगिंग'* करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

 

🤳🏻 *विहिरीसाठी शेतातूनच करा ऑनलाइन अर्ज* 

विहीर खोदाई अनुदानासाठी शेतकऱ्यांना आधी केवळ ग्रामपंचायतीकडे संपर्क करण्याचा पर्याय दिलेला होता. परंतु आता राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने 'गुगल प्ले स्टोअर'मध्ये *'MAHA-EGS Horticulture/Well App'* भ्रमणध्वनी उपयोजन (ॲप्लिकेशन) उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विहिरीसाठी शेतकरी शिवारातूनच ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतो.

 

🔗 *ॲप्लिकेशनची लिंक 👉🏻* https://shorturl.at/NPT89

 

📃 *असे मिळते अनुदान..!* 

● मोबाईल ॲप्लिकेशनमधून ऑनलाइन अर्ज करावा किंवा ग्रामसेवकाशी संपर्क साधून विहीर अनुदानाची मागणी नोंदवावी.

● शेतकऱ्याची मागणी ग्रामसेवकाकडून तालुका पंचायत समितीमधील तांत्रिक सहायकाला कळवली जाते.

● प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ग्रामरोजगार सेवकय (मनरेगा) व ग्रामसेवकांकडून विहीर खोदाई प्रस्तावांचा पाठपुरावा केला जातो.

● खोदाईचा कार्यारंभ आदेश मिळविण्यासाठी शेतकरी आपला सातबारा, आठ-अ, जॉबकार्ड थेट अपलोड करू शकतात किंवा ग्रामपंचायतीत जमा करू शकतात.

● विहिरीच्या नियोजित जागेची 'अ' लघू पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता किंवा उपअभियंत्याकडून पाहणी होते व तांत्रिक मान्यता दिली जाते.

● त्यानंतर पंचायत समितीचा गटविकास अधिकारी या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देतो. त्यानंतरच विहीर खोदाईचा कार्यारंभ आदेश काढला जातो.

 

📌 *लक्षात ठेवा..!* कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वी विहीर खोदू नये. यामुळे अनुदान नामंजूर होण्याची शक्यता असते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

'या' नागरिकांना मिळणार घर बांधायला पैसे; ही आहे मोदी सरकारची जबरदस्त योजना...


 प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा 2015 मध्ये ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही अशा लोकांसाठी सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश गरिबांना परवडणारी घरे प्रदान करणे आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील देशातील घरांची कमतरता दूर करणे आहे. सध्या केंद्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी डिसेंबर 2024 पर्यंत वाढवला आहे.

 

पीएम आवास योजना ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी गरीबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी चालवली जाते. प्रधानमंत्री आवास योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि खालच्या वर्गातील लोकांना घरे बांधण्यासाठी सहाय्य म्हणून 1.20 लाख रुपये दिले जातात.

 

 *घर कोणाला मिळणार नाही?*

ज्यांच्याकडे स्वतःचे कायमस्वरूपी घर नाही अशा लोकांनाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी करत असेल आणि तरीही त्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नसेल, तर अशा परिस्थितीतही तुम्हाला घर मिळणार नाही.

 *घर कोणाला मिळणार?*

● अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. त्याच्या स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर कोणतेही कायमस्वरूपी घर नसावे. 

● आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील (EWS) लोकांचे उत्पन्न वर्षाला 3 लाख रुपयांपर्यंत असावे.

● कमी उत्पन्न गटातील (LIG) लोकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये असावे.

● मध्यम उत्पन्न गटातील (एमआयजी-१) लोकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख ते १२ लाख रुपये असावे.

● मध्यम उत्पन्न गटातील (MIG-2) लोकांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख ते 18 लाख रुपये असावे.

 

🖨️ *पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा*

● प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://pmaymis.gov.in/ ला भेट द्या. 

● येथे तुम्हाला मेनू टॅबवर क्लिक करावे लागेल

● त्यानंतर Citizen Assessment पर्यायावर क्लिक करा.

● यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.

● यानंतर तुम्ही थेट ॲप्लिकेशन पेजवर पोहोचाल. येथे विचारलेली माहिती भरा.

● माहितीची पुष्टी केल्यानंतर पुढे जा, येथे तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. यानंतर अर्जही डाउनलोड करा.

● आवश्यक कागदपत्रांसह हा अर्ज घेऊन तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.

● आपण कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज देखील सबमिट करू शकता.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

तुम्ही कितीही छापे मारा आम्ही दारू विकणारच अन्.... सापडले


दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली -तालुक्यातील विहिरगाव येथील दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून २० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केल्याची कारवाई गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने केली आहे.

 

विहिरगाव येथील दारू विक्रेत्यांना गाव संघटनेच्या माध्यमातून वारंवार इशारा देऊनही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यानंतर मुक्तीपथ व पोलिस विभागाच्या सहकार्याने जंगल परिसरात शोधमोहीम राबवून मोहफुलांचा सडवा व साहित्य नष्ट केले.

 

तरीही विक्रेत्यांनी न जुमानता आपला अवैद्य व्यवसाय सुरूच ठेवला. अशातच गावातील दोन दारू विक्रेते दारू विक्री करीत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी अरविंद रायपूरे व सुनील चुधरी या दोघांच्या घरावर धाड टाकून २० हजार १०० रुपयांची मोहफुलाची दारू व साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात नंदकुमार शिंब्रे, धनंजय चौधरी यांनी केली. यावेळी गाव संघटना व मुक्तीपथ चमु उपस्थित होती.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

वृध्दाने गळा चिरुन केली आत्महत्या


बल्लारपूर : एका वृद्धाने स्वतःचाच गळा चिरून आत्महत्या केले असल्याची दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील किल्ला वॉर्डात बुधवार, १७ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. महादेव वारलू गेडाम (७२) असे मृतकाचे नाव आहे. महादेव वारलू यांना दीर्घ आजाराने पछाडले होते. अशातच ते घरात एकटेच राहात असल्याने नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

महादेव गेडाम हे अविवाहित होते. घरात ते एकटेच राहात होते. मागील वर्षांपासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. आजार आणि एकटेपणा याला ते कंटाळले होते. त्यांची मानसिक स्थितीही खालावली होती. काही दिवसांपासून ते आत्महत्येचा विचार बोलून दाखवित असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. मंगळवारी रात्री झोपी गेल्यानंतर सकाळी त्यांच्या घरातून कोणतीही हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत होता.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

गावकरी झाले त्रस्त अन् रेती तस्कर झाले मस्त...


देसाईगंज : तालुक्यातील कुरुड येथून  दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटातील बोडेगाव वैनगंगा घाटातून रेती तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढले जात आहे. अशातच देसाईगंज महसूल विभाग गाढ झोपेत असल्याने शासनास लाखो रुपयांचा चुना आहे. नदी पात्रात मोठे खड्डे तयार झाले आहे.

 

रेती तस्करांची दिवसेंदिवस ताकद वाढत चालली असल्याने रात्रीबरोबरच दिवसाढवळ्या व सकाळच्या सुमारासही खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. गावातील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नहराच्या मार्गाने तसेच गावामधून ट्रॅक्टर वा इतर साधनांद्वारे नदी रेती घाटातून रेतीतस्करी केली जात आहे

 

रेती तस्करांमुळे 'गावकरी झाले त्रस्त अन् रेती तस्कर मस्त' असे हल्ली दिसून येत आहे. काही रेती तस्करांचा म्होरक्या कोण कुठून येत आहे, याची माहिती पुरविण्याचे काम करतो. काही रेती तस्करांनी नवनवीन ट्रॅक्टरसुद्धा खरेदी केले आहेत. रेती तस्करांची एवढी हिंमत, ताकद वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आहे.

 

याबाबत देसाईगंजचे तहसीलदार प्रीती डुडुलकर यांना विचारणा केली असता, रेती तस्करी थांबविण्यासाठी दोन पथके तयार केले आहेत. सदर पथके गस्त घालत आहेत. तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

*22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय..


 अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत असून प्रभू राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी राज्य सरकारकडून 22 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून श्रीराम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

 

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

 

 त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिल लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

 *२२ जानेवारीला राज्यातील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.* 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन


 

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे.

 

यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत आहेत.

 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्यांना एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी 11 दिवस 'यम नियम'चे पालन करणार असून, धर्मग्रंथात दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

'यम नियम' योग, ध्यान आणि विविध पैलूंमध्ये शिस्त यासह अनेक कठोर उपाय सुचवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीपासूनच यातील अनेक नियमांचं पालन करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सूर्योदयापूर्वीच्या शुभ काळात उठणे, ध्यान करणं आणि 'सात्विक' अन्न सेवन करणं अशा अनेक सवयी मोदींनी आधीपासूनच अवलंबल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवस कठोर तपश्चर्येसह उपवास करण्याचा निर्णयही घेतला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शास्त्रात अभिषेक करण्यापूर्वी उपवास करण्याच्या नियमांसाठी मार्गदर्शक तत्त्वं देण्यात आली आहेत.

 

22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी बुधवारी रात्री अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली, अशी माहिती श्रीराम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. गुरुवारी गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना होणं अपेक्षित आहे.

 

22 जानेवारीसाठी सध्या जय्यत तयारी सुरु आहे. प्राणप्रतिष्ठेआधी अनेक विधी केले जात असून, ते कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येपर्यंत चालू राहतील. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, ज्यात अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटनही होणार आहे. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या सोहळ्याला राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योगपती, संतांसह 7000 हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस होणार बंद, शिक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर


 

: देशभरात १६ वर्षांखालील मुलांचे कोचिंग (शिकवणी वर्ग) बंद होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांत कोचिंग संस्थांना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

 

एवढेच नाही, तर त्यांना आता चांगले गुण किंवा रँकच्या हमीची आश्वासनेही देता येणार नाहीत. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यास व नियमनासाठी एका कायदेशीर चौकटीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (वृत्तसंस्था)

 

समुपदेशन आवश्यक

कठीण स्पर्धा आणि शैक्षणिक ताणतणावापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी कोचिंग संस्थांनी समुपदेशन प्रणाली विकसित करावी. त्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. संस्थांकडे एक वेबसाइट असावी. त्यात शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम, तो पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृह सुविधा आणि शुल्क यांचा तपशील असेल.

दंड किंवा मान्यता रद्द

मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्दची सूचना केंद्राने केली.

 

ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे..

 

कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही.

कोचिंग संस्था चांगले गुण वा रँकची आश्वासने देऊ शकत नाहीत.

१६ वर्षांखालील विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही.

कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच केली जावी.

गुणवत्ता, सुविधा किंवा निकालांबद्दल कोणताही दावा करणारी जाहिरात स्वत: प्रकाशित करू शकत नाहीत किंवा अशा प्रकाशनात भाग घेऊ शकत नाहीत.

कोचिंग संस्थांना नैतिक अध:पतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविलेल्या व्यक्तींना शिक्षक

किंवा अन्य पदांवर नियुक्ती करता येणार नाही.

विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक आणि तर्कसंगत असावे, शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात.

विद्यार्थ्याने मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Nagpur news: स्पा मसाज पार्लरच्या नावाने चक्क देहविक्रीचं नंगानाच सुरु


Nagpur news: सर्वांची परिस्थिती सारखी नसती. आयुष्य जगणं फार कठीण आहे. जीवन जगण्यासाठी आज पैशांची आवश्यकता आहे, हे खरंच सत्य आहे. पण हे पैसे कमविण्यासाठी आपली मेहनत करण्याची तयारी असायला हवी. चांगल्या मार्गाने मेहनत करुन पैसे कमवावे, त्यातून आपला उदरनिर्वाह भागावयला हवा. पण काहीजण कळत-नकळत चुकीच्या व्यक्तींची संगत पकडतात आणि अराजकतेच्या माध्यमातून शॉर्टकट पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. जे वाईट आहे ते वाईटच आहे. त्यामुळे त्यातून मिळणार फळ हे चांगलं असूच शकत नाही. चुकीच्या कामांमधून मिळवलेले जास्तीचे पैसे हे क्षणिक सुख असतं. त्यामुळे याची जाणीव आपल्याला असायला हवी. अन्यथा त्याचे दुष्पपरिणाम भोगावे लागू शकतात. नागपूरमध्ये असेच दुष्परिणाम भोगायची वेळ काही जणांवर आली आहे. कारण आरोपी हे स्पा मसाज पार्लरच्या नावाने चक्क देहविक्रीचं रॅकेट चालवत होते. पोलिसांनी संबंधित स्पा मसाज पार्लवर धाड टाकत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

 

संबंधित घटना ही नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेंद्र उके, सरोज वर्मा, मनीषा फरकाडे असं तीनही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या मसाज पार्लरवर धाड टाकून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांनी या कारवाईतून 4 पीडित मुलींची सुटका केली आहे.

 

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पीडित मुलींच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेण्यात येत होतो. आरोपींकडून मुलींना पैशाचं आमिष देण्यात आलं होतं. मुलींच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आरोपींकडून हा देहविक्रीचा व्यापार केला जात होता. या कारवाईबाबत राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांनी सविस्तर माहिती दिली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

मुंबईत अनेक रेडे मोकाट, मीडियासमोर बोलतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका


कऱ्हाड (जि. सातारा) देशातील सर्वांत मोठा बैल इथं आला आहे आणि त्याबरोबर यांत्रिक बैलही आले आहेत; पण, आमच्याकडे मुंबईत रेडे मोकाट झाले आहेत. मीडियासमोर दररोज येऊन काहीही बोलत राहतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काही तंत्रज्ञान असेल तर आम्हाला सांगा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

 

कन्हाड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उ‌द्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. 

 

अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे उपस्थिती होते. फडणवीस म्हणाले, 'केमिकल खतांचा होणारा भरमसाठ वापर हा भविष्य काळात परवडणारा नाही. म्हणून आम्हाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा विचार करावा लागेल.'

 

'अलीकडच्या काळात काही पैलवान इंजेक्शन घेऊन मोठे होतात; पण ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याप्रमाणेच उत्पादनवाढीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून वाढवलेली पिकेसुद्धा आता फार काळ चालणार नाहीत. आम्हाला विषमुक्त शेतीचाच विचार करावा लागेल. पुन्हा एकदा शेतीचे विज्ञान नव्याने मांडावे लागेल,' असेही फडणवीस म्हणाले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

डॉक्टरांसह कर्मचारीही मारतात दांडी..


 मालेगाव/वाशीम, (ता.प्र). तालुक्यातील आदिवासीबहुल भागात नव्यानेच सुरू झालेल्या मुसळवाडी आरोग्यवर्धिनी केंद्रातून दुपारी 3 वाजताच सर्व कर्तव्यावरील डॉक्टर व कर्मचारी आरोग्यवर्धिनीला कुलूप ठोकून दांडी मारत असल्याचे दिसून आले. उपस्थित ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर आरोग्यवर्धिनी केंद्रावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आरोग्यवर्धिनीमध्ये येण्या-जाण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसून सकाळी 9.30 वाजेपासून एक-एक कर्मचाऱ्यांचे आगमन सुरू होते. 10 वाजतानंतर आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.पी.डी. चालू होत असून 2 वाजताओ.पी.डी. बंद करण्यात येते.

 

आरोग्यवर्धीनी केंद्र सुरू झाल्यापासून संध्याकाळी 4 वाजता एकदाही ओपीडी घेण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. दुपारची ओ.पी.डी. घेण्यात येत नसल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी सकाळीओ.पी.डी. करून आरोग्यवर्धिनी केंद्रातून दांडी मारत असल्याचे दिसून येत आहे. 

 

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता आता दोन्ही वेळेस ओ.पी.डी. चालू असून कर्मचारी केंद्रात उपस्थित असल्याचा बनाव करीत आहेत.

 

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. या भागातून मोठ्या  प्रमाणात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी किन्हीराजा, मालेगाव, जऊळका, येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचार घेण्यासाठी महिलांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुसळवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात सकाळ व संध्याकाळच्या दोन्ही ओ.पी.डी. सुरू करून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ केंद्रात उपस्थित राहण्याची सक्ती करण्याची मागणी रुग्णांसह ग्रामस्थांकडून होत आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

गोसेखुर्द कालव्यात रानगवा पडला


वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन तीन तासानंतर सुटका

तळोधी, (बा.). नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर परिसरातील गोसेखुर्द कालव्यात रानगवा पडल्याची घटना गुरूवारी सकाळी उजेडात आली. त्याच्या बचावासाठी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन रावविले. तीन तासाच्या प्रयत्नाने त्यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. धावपळीमध्ये काही नागरिक जखमी झाले.

 

रात्रीच हा रानगवा ओपन कालव्यात पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही बाब सकाळी उघडकीस आली. याची माहिती मिळताच वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 9 वाजता पासून रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली.

 

दोराचे साहाय्याने तीन तासानंतर सुखरुप बाहेर काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळीवनपरिक्षेत्रधिकारी हजारे, स्बाब संस्थाचे यश कायरकर, वनरक्षक गुरूदेव नवघडे,व नागरिक उपस्थित होते.

 

धावपळीत नागरिकांना दुखापत 

कालव्यात पडलेला रानगवा वनविभाग, स्वाब संस्था, तथा स्थानिक नागरिकांचे सहकार्याने नहरा बाहेर काढल्यानंतर दोराने बांधलेला रानगवा पिसाळलेल्या अवस्थेत झाला. परिनामी उपस्थित नागरिकांची एकच धावपळ उडाली. आणि या धावपळीत रानगवा हल्ला करेल म्हणून सैरावैरा नागरिक पळू लागले त्यात ज्ञानेश्वर पडोळे यांचा पायाला गंभीर दुखापत झाली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

प्रेयसीला उधारी पैसे देणे पडले महागात, तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला


भंडारा:  प्रेमसंबंधात प्रेयसीला पैसे दिल्यानंतर संबंधात दूरावा निर्माण झाल्याने दिलेले पैसे मागणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. दुसऱ्या प्रेमीकेच्या आरोपी भावाने त्याचेवर चाकुने प्राणघातक हल्ला चढवून जखमी केले. सदर घटना भंडारा येथे दि.१५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजतादरम्यान उघडकीस आली. समीर भुरे (२३) रा. काझीनगर असे जखमीचे तर अभिषेक उर्फ आबु गभणे (२३) रा. काझीनगर असे आरोपीचे नाव आहे.

 

शहरातील काझीनगरातील समीर भुरे नामक तरुणाचे एका तरुणीशी दिड वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. तेव्हा समीर याने आपल्या प्रेयसीला शिक्षणाकरीता व फिजिओथेरेपी दवाखाना लावण्याकरीता पैसे दिले होते. मधल्या काळात दोघांच्या संबंधात दूरावा निर्माण होऊन आरोपी अभिषेक गभणे याचा भाऊ पराग गभणे या तरुणाशी तिने प्रेम संबंध प्रस्तापित करुन त्याचेशी लग्न करीत असल्याचे समीर याला माहित होताच त्यांने दिलेले पैसे मागीतले. तरुणीला 'माझे पैसे कधी परत करशील' असे हटकले याच कारणावरुन आरोपी अभिषेक याने त्याचेशी भांडण करुन चाकुने वार करुन जखमी केले. शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली. जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ


गडचिरोली - खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी केली जात आहे. यासाठी ऑनलाइन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता १५ जानेवारी ही अंतिम मुदत होती; परंतु २० ते २५ टक्के शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण नोंदणीसाठी विभागाने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली.

 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय हमीभावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वी नोंदणी करावी लागते.

 

नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना आपले धान आधारभूत खरेदी केंद्रांवर विक्री करता येतो. जिल्ह्यात मागील वर्षी 9 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली. सुरुवातीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. त्यानंतर एक महिन्याची म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही नोंदणी न झाल्याने १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाली. तरीसुद्धा नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळली. त्यामुळे १५ जानेवारी रोजी शासनाने पत्र काढून ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024

PostImage

Gadchiroli news: लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन्


Gadchiroli news: अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गशिक्षकानेच अत्याचार केला. १९ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. पतीची संशयास्पद वागणूक पाहून पत्नीने गुपचूप मोबाइल तपासला, तेव्हा भंडाफोड झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून शिक्षकास अटक केली.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, विश्वजित मिस्त्री (३८,रा. कालीनगर, ह.मु. विवेकानंदपूर ता. मुलचेरा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी मुलचेरा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. विश्वजित मिस्त्री हा तिचा वर्गशिक्षक आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले.

दरम्यान, पतीचे वागणे संशयास्पद वाटल्याने पत्नीने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले, तसेच मोबाइल तपासला तेव्हा या मुलीसोबतची चॅटींग उघडकीस आली. यानंतर तिने पतीला जाब विचारला असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरुन शिक्षक विश्वजित मिस्त्रीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी लागलीच त्यास ताब्यात घेतले. पो.नि. अशोक भापकर हे अधिक तपास करत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 19, 2024

PostImage

२० विद्यार्थिनींसोबत केले अश्लील वर्तन


नाशिक : जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रसूत झाल्याची घटना ताजी असतानाच आदिवासी विकास विभागाच्या आणखी एका एकलव्य निवासी शाळेतील इयत्ता सातवीतील १५ ते २० विद्यार्थिनींशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विभागाने घेतली असून, संबंधित शिक्षकास तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर दोन शिक्षिकांची नियुक्तीदेखील रद्द करण्यात आली.

 

जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत होता. त्याच्याकडून असे प्रकार वारंवार सुरू होते. सुरुवातीला या मुलींनी फारसे लक्ष दिले नाही; परंतु काही मुलींनी धाडस करून पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 19, 2024

PostImage

Gadchiroli accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात शिक्षकाची उलटली कार...


Gadchiroli news: गडचिरोली : एकामागे एक धावतअसणाऱ्या तीन ट्रकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भर रस्त्यावरच उलटली, मात्र कारमध्ये बसलेले पती-पत्नी दोघेही बालंबाल बचावले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात आरमोरी मार्गावर शिवपार्वती मंदिराजवळ घडली.

 

युवराज श्रावण लंजे (५४) हे मुलचेरा तालुक्यातील गुंडापल्ली येथे शिक्षक आहेत. ते एमएच ३३ व्ही ७३४५ क्रमांकाच्या कारने अर्जुनी मोरगाव येथून गडचिरोली मार्गे गुंडापल्ली येथे जात होते

सोबत त्यांची पत्नी होती. आरमोरी मार्गावर एकामागे एक तीन ट्रक इंदिरा गांधी चौकाकडे जात होते. दरम्यान पुरेशी जागा नसतानाही चालक युवराज लंजे यांनी या तिन्ही ट्रकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान ट्रकला धडक बसण्याची शक्यता असल्याने चालकाने कारचे एकदम ब्रेक दाबले. यात कार उलटून युवराज लंजे व त्यांच्या पत्नी कारमध्ये सापडल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने दोघांनाही कोणतीही इजा झाली नाही, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 18, 2024

PostImage

Ramayan: एका रामायणात सीता रामाला शिव्या देते', भालचंद्र नेमाडे यांचं वक्तव्य


'

प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण अशा वातावरणात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण आणि प्रभू रामांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“अनेक रामायणांमध्ये राम वेगळा आहे. एका रामायणात तर चक्क राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. वाल्मिकीचा राम कशामुळे खरा म्हणायचा? वाल्मिकी हा श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसं आवडलं तसं रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं. तसेच राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? ते खोलात जावून शोधलं पाहिजे. एका रामायणात तर सीता ही रामाला अक्कल नाही, अशा शिव्या देते”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले आहेत. जळगावातील भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

“खोट्याला किंमत नाही. लेखकाने जे सत्य आहे ते नीट तपासून पाहावं. त्याचेही दोन प्रकार असतात. दिसणारं सत्य आणि न दिसणारं सत्य. लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे. हे खोटं बोलत आहेत, राम मांसाहारी होता की शाकाहारी होता? आता हे वाचूनच लक्षात येतं ना, कशाकरता त्याची चर्चा करायची? त्यामुळे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खोदून पाहा, मग कळेल खरं काय आहे ते. नुसतंच टीव्ही, भाषणं, चर्चा वगैरे भानगडीतून सत्य सापडणार नाही. प्रत्यक्ष जावून शोधणं महत्तावचं आहे की, हे खरोखरंच आहे का? त्यात पुन्हा एकच रामायण आहे का? आमचे मित्र रामानुंज यांनी टू हन्डरेड रामायण हे पुस्तक लिहिलं आहे. ते बंद पाडलं. कशामुळे?”, असा सवाल भालचंद्र नेमाडे यांनी केला.

 

‘काही ठिकाणी राम आणि सीता हे बहिणी-बहिणी’

 

“चंगनिश खान होता, त्याला रामायण अत्यंत आवडतं होतं. ते मी ब्रिटियश म्युझियममध्ये एकदा पाहिलं, तर त्यातला राम वेगळाच आहे. नंतर इकडे कंबोर्डियातला राम वेगळाच आहे. जैन रामायणातला राम वेगळा आहे. काही ठिकाणी राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. सीता ही रावणाची मुलगी आहे”, असा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला.

 

‘वाल्मिकी श्रृंग घराण्याचा दरबारी कवी, श्रृंगांनी बौद्ध धर्माचा नाश केला’

 

“राम म्हणजे 60 हजार वर्षांपूर्वीचा धनुष्यबाण युद्धस्थानाचा तो नायक. त्याचं अनेक युगांपासून बदलत बदलत वाल्मिकीच्या काळात आता आपल्याला माहिती आहे की नाही, वाल्मिकी श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. श्रृंगांना आवडेल तसं त्याने रामायण लिहिलं. श्रृंगांनी बौद्ध धर्माचा नाश केला. बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातील सर्वात जुने, सर्वात सामाजिक, अहिंसक असे धर्म, त्यांचा नाश करणारे हे श्रृंग आणि आपल्याकडचे शालिवान. त्यांनी नाश केला आणि ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला”, असं नेमाडे म्हणाले.

 

‘आसामच्या रामायणात सीता रामाला शिव्या देते’

 

“आता अशी परिस्थिती होते की, खरा कोणता राम म्हणायचा, वाल्मिकी राम खरा म्हणायचा? वाल्मिकीच्या आधी मी आसाममध्ये एका समूदायाचं रामायण पाहिलं. त्या समूदायाचे आता 15 हजार लोकं राहिले आहेत. त्यांच्यातला राम वेगळा. त्यांच्यात सीता मुख्य, ती रामाला आज्ञा देत असते, रामाला शिव्या देत असते. तुला अक्कल नाही वगैरे असं. ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषेमध्ये”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

 

“थोडक्यात म्हणजे जैन धर्मीय लोकांचं रामायण का खरं नाही? आणि कंबनाचं रामायण का नाही खरं? सगळेच रामायण माहिती पाहिजेत. नुसतंच एक रामायण नाहीय. आणि तुवंडे रामायण लोकांना का वाचू देत नाही?”, असा प्रश्न भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 18, 2024

PostImage

Mul breking: घरी वाद झाला; रागाच्या भरात धावत्या रेल्वेसमोर उडी


मूल : कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलत एका विवाहित महिलेने चंद्रपूर-गोंदिया या धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी ३:३० वाजता मूल शहरातील रेल्वे फाटकाजवळ घडली. कृणाली नरेश कामडे (२६, रा. मूल) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

मूल शहरातील सिद्धिविनायक मंदिरासमोर नरेश कामडे हे चहाचे दुकान व लहानसे जनरल स्टोअर्स चालवतात. सकाळी पती नरेश आणि पत्नी कृणाली यांच्यात वाद झाला, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आले.

 

वादावरून रागाच्या भरात कृणालीने आत्महत्या करण्यासाठी मूल शहरातील रेल्वे फाटकाजवळ दुपारी ३:३० वाजेपर्यंत रेल्वेची वाट बघत होती. दरम्यान, चंद्रपूरवरून गोंदियाकडे जाणारी रेल्वे येताच तिने उडी घेतली. यात तिचा डावा पाय अर्धा तुटला, तर शरीराला गंभीर दुखापत झाल्याने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. तिला ८ वर्षांचा मुलगा व एक वर्षाची मुलगी आहे. कृणालीच्या दुर्दैवी मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 18, 2024

PostImage

कढोली केंद्रावर प्रतिबारदाणा एक किलोची लूट


 कढोली : आदिवासी विकास महामंडळ उपअभिकर्ता म्हणून जिल्ह्यातील आविका संस्था हमीभावाने धान खरेदी करतात. आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटी, शर्तीनुसार हमीभावाने धान खरेदी करावी लागते. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे ४० किलोंवर १ किलो अधिक धानाची भरती घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

 

आविका संस्था कढोली केंद्रावर सावलखेडा, भगवानपूर, वाढोना, कढोली, जांभळी, वासी, कोसी या गावांतील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते

धान कढोली येथे खरेदी केली जाते. त्यानंतर कढोली येथील शेड व गोदामातील भरती झाली की, सालवखेडा येथील पटाच्या जागेवरbधान खरेदी केली जाते.

 

 शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून 'लोकमत'ने हमीभाव केंद्रावर भेट दिली. नियमानुसार बारदाना गृहीत धरून ४०.६०० किलो एवढे धान मोजायला पाहिजे. मात्र, एका शेतकऱ्याचे धान मोजत असताना नोंद केली असता एका बारदाण्यात ४१.५०० किलो धान खरेदी केली जात असल्याचे दिसून आले. म्हणजेच एका क्विंटलमागे एक किलो धान अधिक घेतले जात आहेत. शेतकऱ्यांची मागील अनेक दिवसांपासून तक्रार होती; पण व्यवस्थापकाविरुद्ध कोणी बोलायला तयार नव्हते. याबाबत आता शेतकरी बोलत आहेत.

 

 

उपप्रादेशिक व्यवस्थापकांची चुप्पी

याबाबत उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे यांच्याशी संपर्क केला असता केंद्रावर अधिकची धान घेतले जाते का? याबाबत आपण विपणन निरीक्षक यांना विचारणा करून आपल्याला माहिती देतो, असे सांगितले पण त्यानंतर माहिती दिली नाही.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 18, 2024

PostImage

Korchi accident: दोन ट्रकची धडक, चालक ठार


कोरची : दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक चालक जागीच ठार झाला तर क्लीनर जखमी आहे. ही घटना १७ जानेवारीला मोहगावजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मृतदेह केबिनमध्ये अडकल्याने तो काढण्यासाठी कसरत करावी लागली.

 

राजूलाल मोहम्मद देवाण (५०,रा. खजुरिया, बिहार) असे मयताचे नाव आहे. तो छत्तीसगडहून आंध्र प्रदेशकडे ट्रकमध्ये (सीजी १० एटी-५४८२) - ताडपत्री घेऊन जात होता. समोरून अल्युमिनियमचे साहित्य घेऊन ट्रक - (केए ०१ एएम-४५२८) छत्तीसगडकडे - जात होता. चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्याने कोरचीपासून दोन

कीलोमीटर अंतरावरील मोहगावजवळ दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एक ट्रक उलटला. त्यातील चालक राजूलाल देवाण याचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर जखमी आहे.

 

 

 

दुसऱ्या ट्रकचा चालक फरार झाला, को मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कोरची पोलिसांनी धाव घेतली, अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 17, 2024

PostImage

Murder: लग्न करुन देत नसल्याच्या रागातून वडिलांची निर्घृण हत्या


जळगाव : लग्न लावून देत नसल्याच्यारागातून आईसमोर मुलानेच वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना यावल तालुक्यातील पिळोदा येथे घडली. रतन तानसिंग कोळी (वय ७३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे राहणारे वयोवृद्ध व्यक्ति रतन तानसिंग कोळी (वय ७३) हे आपल्या घरात झोपलेले असतांना १४ जानेवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा देवानंद रतन कोळी (वय-२८) यांने बडील बारंवार सांगुन देखील लग्न लावुन देत नाही किंवा लग्नासाठी पैसे देत नाही. याकारणाने लोखंडी कुन्हाडीने डोक्यात वार करून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी मुलगा देवानंद वडीलांकडे काही दिवसांपासून वारंवार माझे लग्न करून द्या, अशी मागणी करीत होता. मात्र याविषयाकडे वडिलांनी टाळाटाळ केल्याने संप्तत तरुणाने वडिलांचा लोखंडी कुन्हाडीने डोक्यावर वार करून खुन केल्याचे समोर आले आहे. याप्रकारामुळे पिळोदा गाव व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

आईच्या फिर्यादीवरून गुन्हा

 

याबाबत संशयित आरोपी मुलगा देवानंद कोळी याच्या विरुद्ध आई शुबाबाई रतन कोळी (वय ६०) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे की, १४ रोजी रात्रीचे जेवण करुन आम्ही झोपलो. घराचे पुढे ओसरीत पती रतन तानसिंग हे खाटेवर, मी घरात झोपले व दुस-या खोलीत मुलगा देवानंद झोपला. रात्री ११ वाजेचे सुमारास मी घरात खाटेवर झोपण्यासाठी पडलेली असताना, मुलगा देवानंद हा माझे समोर त्याचे हातात कुन्हाड

 

घेवुन घराबाहेर ओसरीत गेला व त्यांनी माझे समोर माझे पती रतन तानसिंग कोळी यांचे डोक्यात २ ते ३ कु-हाडीचे वार केले. त्यामुळे रतन तानसिंग यांचे डोके 'फुटले व मोठा प्रमाणात रक्त स्त्राव होवुन ते जागीच मयत झाले. मी मुलगा देवानंद यास थाबविण्याचा प्रयत्न केला, तो पर्यंत त्याने पतीचे डोके कु-हाडीने फोडले होते. त्यांनतर देवांनद हा बाहेर पळुन जात असताना, मी मोठ्याने आरडा ओरड केली. त्यामुळे शेजारी राहणारे संदीप जयसिंग कोळी, रविंद्र तानसिंग कोळी व जयसिंग तानसिंग कोळी हे आले व त्यांनी पतीना पाहीले. त्यांनी मुलगा देवानंदचा पाठलाग केला, असे म्हटले आहे. मयत रतन कोळी सोबत राहते व घरकाम करते.

 

रतन कोळीची पहिली पत्नी सुमारे ४० वर्षापुर्वी मयत झाली. त्यांनतर माझे त्यांच्याशी लग्न झाले आहे. त्यांना पहील्या पत्नी पासुन ३ मुली असुन त्यांची लग्न झालेली आहेत. त्या सासरी नांदत आहेत, पती रतन कोळी यांच्या पासुन मला २ मुले प्रविण (वय ३५ वर्ष) व लहान मुलगा देवांनद (वय २८) अशी दोन मुले आहेत. प्रविणचे लग्न झाले असुन तो पत्नी सौ. भावनासह जळगाव येथे राहतो. संशयित आरोपी लहान मुलगा देवानंद हा अविवाहीत असुन तो मजुरी करतो, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

पोलिसांकडून चौकशी सुरू

 

दरम्यान मयत रतन कोळी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या गुन्ह्यातील संशयित आरोपी देवानंद कोळी यास पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमदर्शनी वडील लग्न करुन देत नसल्याचे कारण समोर आले असले, तरी पोलीस या घटनेमागे आणखी दुसरा काही प्रकार आहे का? याविषयी चौकशी करीत आहेत. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरचे डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस पथकाने भेट देवून तपासचक्रे फिरवली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 17, 2024

PostImage

Tiger attack: वाघाच्या हल्ल्यात उंट ठार....


 पळसगाव (पि.): चिमूर तालुक्यातील नेरीजवळील बोथली शिवारात राजस्थानी मेंढपाळाच्या कळपातून भरकटलेल्या उंटावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता उघडकीस आली.

 

मागील काही दिवसांपूर्वी राजस्थानी मेंढपाळ मेंढ्या व उंट घेऊन बोथली-शिरपूर, लोहारा परिसरात निवास करीत आहेत. या मेंढपाळांनी शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्यांचा कळप बसवून काही दिवसांपूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेले. मात्र कळपातील एक उंट हा बोथली-सोनापूर जंगलात सैरभैर झाला. उंट न दिसल्याने मेंढपाळांनी काही दिवस शोधाशोध केली. मात्र कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे मेंढपाळांनी कळप घेऊन दुसऱ्या गावाकडे रवाना झाले. तेव्हापासून हा उंट झाडांची पानेखाऊन जंगलात राहत होता

 

 दरम्यान, बोथली शिवारातील तलावात पाणी पिऊन पुन्हा जंगलात जात असताना पट्टेदार वाघाने उंटावर हल्ला केला. या घटनेत वाघ आणि उंटात मोठी झटापट झाली असावी. या झटापटीत उंट ठार झाला. सोमवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता काही नागरिक व गुराखी तलाव परिसरात गेले असता ही घटना उघडकीस आली. या घटनेबाबत नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 17, 2024

PostImage

Sanjay Raut: शिंदे गटाचे नेते लफंगे, पळपुटे, गुलाम असून, ईडीला घाबरून पळालेले हे लोक सत्तेसाठी हपापलेले आणि डरपोक आहेत , आम्ही लढू आणि त्यांना गाढू - संजय राऊत


कराड: दिल्लीत मुजरे घालण्यात दीड वर्षे घालवणारे मुख्यमंत्री दिल्लीचा गुलाम माणूस. शिंदे गटाचे नेते लफंगे, पळपुटे, गुलाम असून, ईडीला घाबरून पळालेले हे लोक सत्तेसाठी हपापलेले आणि डरपोक आहेत , आम्ही लढू आणि त्यांना गाढू असा हल्लाबोल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चढवला.सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी राजनीदेवी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी संजय राऊत कराडमध्ये आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी तातडीने उपस्थित झालेल्या माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे व संजय शिरसाठ आदी नेत्यांनी केलेल्या बोचाऱ्या टिकेसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता खासदार राऊत यांनी टिकाकारांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकूणच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.

 

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांच्या टिकेला उत्तर देताना, होय. आम्ही गावोगावी जावून डोंबाऱ्याचाच खेळ करू आणि डोंबाऱ्याच्या चाबकाने (हंटर) शिंदे गटाच्या नेत्यांना फोडून काढू असा इशारा राऊत यांनी दिला.दादा भुसे यांच्या टीकेवर बोलताना कोण दादा भुसे? असा प्रश्न करून, त्यांचीच मान वाकडी होण्याची वेळ आल्याचा टोला राऊतांनी लगावला. आम्ही ताठ मानेचे आहोत. शिवसेना प्रमुखांनी ताठ मानेने जगायला शिकवलं. म्हणूनच शिवसेना ताठ मानेने जगणारी संघटना आहे. शिवसेना तुमच्यासारख्या लफंग्यांची टोळी नसून, तुम्ही सारे पळपुटे आहात, शिंदे गटाला माझी भीती वाटते, आणि ती वाटायलाचा पाहिजे, २०२४ हे वर्ष सुरु झाले असून, त्यातील निवडणुकात सत्य लवकरच कळेल असा घणाघात राऊतांनी केला. विधानसभेत शिंदे गटाचा एकही आमादार दिसणार नाही, लिहून ठेवा असा दावा इथेही खासदार राऊत यांनी बोलून दाखवला.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना, संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्याला काय गांभीर्याने घेताय? दिल्लीत मुजरे घालण्यात दीड वर्षे घालवणारा हा दिल्लीचा गुलाम माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, आचरण काय आहे का त्याच्याकडे? सवाल राऊत यांनी केला.भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आसलेल्या महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात विचारले असता, छत्रपती महायुतीचे नेते. त्यांनीं ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षाशी इमान राखले पाहिजे असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी काढला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 17, 2024

PostImage

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जवळपास १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्र लिहिले होते. या प्रतिज्ञापत्राच्या गाद्या करून निवडणूक आयोग त्यावर झोपलं आहे का? - उद्धव ठाकरे


शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोण हे ठरवण्यासाठी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यासाठी ठाकरे गटाकडून तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केली होती. या प्रतिज्ञापत्राचं काय केलंत असा प्रश्न विचारत निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घाणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. वरळीत आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, माझं राहुल नार्वेकरांना आव्हान आहे की नार्वेकरांनी आणि मिंध्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय यावं. मी ही तिथे सुरक्षेविना येईन. तिथंच तिथे नार्वेकरांनी सांगावं की शिवसेना कोणाची? मग जनतेचे ठरवावं की कोणाला पुरावा आणि कोणाला गाडावा. शिवसेना त्यांना विकली असेल तर ती काही विकावू वस्तू नाही. आज तर माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. लाखो जनता, शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असं ठाकरे म्हणाले.

 

 

ते पुढे म्हणाले की, आपण निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. कारण, त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जवळपास १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्र लिहिले होते. या प्रतिज्ञापत्राच्या गाद्या करून निवडणूक आयोग त्यावर झोपलं आहे का? एकतर हे प्रतिज्ञापत्र स्वीकारा. नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे. येथे शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. येथे कोणी दोन नंबरचे पैसे कमावणारे कोणी नाही. ईडीसुद्धा त्यांचाच नोकर आहे.

 

“हे मी उघडपणाने बोलत आहे. मला काय चिंता. तुम्ही येथे आहात सर्व. तुम्ही बघून घ्याल सर्व”, असंही ते म्हणाले.

 

राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं

राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं. तुमच्याबरोबर जर सगळं काही आहे, शिवसेना विकली असेल तर विकता येणार नाही हे लक्षात ठेवा. व्हीप तुमचा वगैरे आम्हाला लागू होणार नाही. व्हीपचा मराठी अर्थ चाबूक आहे. चाबूक आमच्या हातात शोभून दिसतो लाचारांच्या हातात नाही. जी काही थट्टा चाललेली आहे ती आज तुम्ही पाहिली.

 

“गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याशिवाय आता मढ्याला उपाव नाही” अशी सुरेश भटांची कविता आहे. राहुल नार्वेकर यांनी तसाच निर्णय घेतला आहे. गारद्यांच्या गर्दीत हे सामील झाले आहेत. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले. घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्याच मातीत ही अवदसा जन्माला आली आहे. लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत आणि त्यांना महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहीत नाही ही महाराष्ट्राची माती अशांना गाडून टाकते आणि संपवून टाकते. सगळा क्रम पाहिल्यानंतर जे काही पुरावे सादर केले ते सादर करणं आवश्यक होते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 16, 2024

PostImage

मायक्रोसॉफ्ट' बनली जगातील नंबर 1 कंपनी 'अॅपल'ला पछाडले,मायक्रोसॉफ्ट' बनली जगातील नंबर 1 कंपनी 'अॅपल'ला पछाडले


 

वॉशिंग्टन (ए). टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट अॅपल कंपनीला पिछाडीवर टाकत जगातील नंबर एक कंपनी बनली आहे. 11 जानेवारी रोजी कंपनीचे बाजार भांडवल हे अॅपलपेक्षा अधिक झाले. या दिवशी कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी वाढले. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 2,875 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले. याचवेळी अॅपलचे शेअरर्स 0.9 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे कंपनीचे बाजारमुल्य 2,871 ट्रिलियनवर आले. यावर्षी सुरुवातीच्या आठ दिवसांपासूनच अॅपलचे शेअर्स घसरण अनुभवत आहेत. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (एआय) आता मायक्रोसॉफ्टसाठी वरदान ठरत असल्याचे दिसते आहे. यामुळेच गुंतवणूकदार कंपनीला पसंत करत आहेत. 2021 नंतर प्रथमच अॅपलच्या शेअर्सचे मूल्यांकन मायक्रोसॉफ्टपेक्षा कमी झाले आहे. जानेवारी 2024 मध्ये गुरुवारपर्यंत अॅपलचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरले होते, तर मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये 1.8 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 16, 2024

PostImage

पिंपळगाव परिसरात रानटी हत्तींचा कळप ठाण मांडून


उन्हाळी धानाच्या पह्यांचे करताहेत नुकसान

 

 मोहटोला (किन्हाळा) : वाढोणा जंगल परिसरात एक जंगली हत्ती विद्युत शॉकमुळे गतप्राण झाला. ती हत्तीण होती. त्यानंतर हा कळप भगवानपूर जंगलमार्गे विहीरगाव- पिंपळगाव (ह.) जंगलव्याप्त भागातील भीमनखोजी येथील परिसरात स्थिरावला आहे. रात्रीच्या वेळेस शेतशिवारात चराईसाठी निघत असतो. पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. रब्बी पिकांकरिता दहा दिवसांपूर्वी

 

पन्हे टाकण्यात आले. आता पन्हे जमिनीच्या वर आली असून, हिरवीगार आहेत. हत्तींनी पन्ह्यांची नासधूस करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या चिंतित भर पडत आहे. बाजारातून विकत घेऊन आणलेली बिजाई आहे. आता परत पन्हे टाकले तर ते येणार कधी? आणि टाकून झाल्यानंतर पुन्हा हत्तींनी तुडविले तर रोवणी करायची नाही काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सुरुवातीलाच असे नुकसान होत असल्याने आता पुढे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

 

नुकसान होऊनही पंचनामा करण्यास वनविभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आम्हाला नुकसानभरपाई मिळत नसेल तर जंगलातील हत्तींचा कळप शेतशिवारात येणार नाही अशीउपाययोजना वनविभागाने करावी, अशी मागणी होत आहे. सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित सापडले आहेत.

 

क्षेत्र सहायक म्हणतात.. पन्हे पुन्हा येतात

 नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत शेतकरी वनक्षेत्र सहायक कैलास अंबादे यांना फोन करतात तेव्हा, हत्तींनी पायदळी तुडवलेले पन्हे पुन्हा मोठे होतील. पन्हे पायदळी तुडवल्याने कोणतेही नुकसान होत नाही. पिके दोन-तीन फुटांचे झाले असते तर पाहणी करून पंचनामा करता आला असता व नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असता. अशी प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 16, 2024

PostImage

Tiger news: पुन्हा वाघाचा हल्ला, हल्ल्यात महिला ठार


मुलचेरा, दि. 15 : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात आता वाघाने धुमाकुळ माजवलाअसून कापूस वेचत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना एक संक्रांतीच्या दिवशी 15 जानेवारी 2024 रोजा सायंकाळच्या सुमारास घडली. रमाबाई शंकर मुंजमकर रा. कोळसापुर (वय 55) असे महिलेचे नाव आहे.

 

मृतक रमाबाई ह्या घरलगत कापूस वेचणी करत होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करत नरडीचा घोट घेत ठार केले. वाघाने हल्ला करून रामबाईस फरफटत लगतच्या जंगल परिसरात सुमारे 200 फूट फरफटत नेल्याचे कळते. सुरुवातीला घटनेबाबत कोणालाही कळले नव्हते. मृतक चा मुलगा आठवडी बाजार करून घरी परतला असता घरात आई कुठेही दिसून न आल्याने लगतच्या कापसाच्या शेतात त्याने जाऊन बघितले असता रक्ताने माखलेली साडी दिसून आली. घटनेबाबत गावकऱ्यांना माहिती होताच परिसरात शोधाशोध करतांना मृतदेहच आढळून आला. याबाबत वनविभागाला कळवताच वन कर्मचारी व पोलीस दाखल झाले. सदर घटनेने परिसरात दहशत पसरली असून नागरिकांकडून रोष व्यक्त केले जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 15, 2024

PostImage

मंदार कृषी तंत्र विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : दिलीप अहिनवे

मुरबाड, दि. १५ : मुरबाड तालुक्यातील कोळींब गावात मंंदार कृषी तंत्र विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला . कल्याण मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ तसेच कट्टर शिवसैनिकांचे वाढदिवस देखील येथे केक कापून साजरे करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा व विविध उपक्रमात यश संपादन केले त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

          कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती बाळ हरदास, श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोटे, उपाध्यक्षा विजयाताई पोटे, पालघर जिल्ह्यातील ग्रामसेविका व शाळेची माजी विद्यार्थिनी जना माळी-तांबडे, संस्थेच्या प्राचार्या निलाक्षी शिंदे, स्थानिक सरपंच राजेश भोईर, उपसरपंच संंकेत पाठारे, बहुसंख्य ज्येष्ठ तसेच कट्टर शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

          श्री चैतन्य शिक्षण प्रसारक संस्था कल्याण संचालित, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यता प्राप्त मंदार कृषी तंत्र विद्यालय कोळींब येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व ज्येष्ठ तसेच कट्टर शिवसैनिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. आलेल्या पाहुण्यांचे प्रथम औक्षण करण्यात आले. बिगुलवर कडक सलामी देण्यात आली. लेझीम पथकाने पाहुण्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत वाजत गाजत आणले. पाहुण्यांची चहापानाची उत्तम व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. पाहुण्यांना कृषी विद्यालयाचा संपुर्ण परिसर फेरफटका मारुन दाखवण्यात आला.

          मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमधील विविध सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तमोत्तम कलाकृती सादर करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. चांगल्या कलाकृती सादर केलेल्या विद्यार्थ्यांना रसिकांनी रोख स्वरुपात बक्षिसे दिली. विद्यार्थ्यांनी १००% सहभाग नोंदवून मनमुराद आनंद लुटला. मागील महिन्यात क्रीडास्पर्धा आयोजित केल्या होत्या. १०० मी. धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रस्सी खेच व रिले या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा विजयाताई पोटे, शाळेच्या प्राचार्या निलाक्षी शिंदे, प्रशिक्षक संजय मुकणे, ओमकार चिमटे, मंगेश पवार, सुवर्णा गावित, श्रावणी जाधव, नेहा खरात, महेंद्र ढमाले, केदार गावडे, दिलीप अहिनवे व सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेतली. 

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या निलाक्षी शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन भरत दळवी यांनी तर शेवटी सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अरविंद पोटे यांनी मानले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 15, 2024

PostImage

Lakhandur news: प्रेमविरहात तरुणीची आत्महत्या


 लाखांदूर (वा), दोन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह लाखांदूर तालुक्यातील तई/बुज येथील विहिरीत आढळून आला. या घटनेने गावात खळबळ उडाली. तिने प्रेम विरहातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

 

प्रांजली शास्त्री कोल्हे रा. तई/ खुर्द असे मृत तरूणीचे नाव आहे. तई/खुर्द येथील रहिवासी असलेली प्रांजली कोल्हे ही 12 जानेवारीच्या रात्री आई झोपेत असल्याचे बघून रात्रीच घरून निघून गेली. आईने सकाळी उठून बघितले असता तिला प्रांजली आढळून आली नाही. 

 

दरम्यान, आईने व कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्यामुळे तिची गावात व इतरत्र शोधाशोध केली असता प्रांजली कुठेही आढळून आली नाही. अखेर पालांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पालांदूर पोलिसांनी बेपत्ता तरूणीचा शोध घेत असताना 14 जानेवारी रोजी

 

सकाळच्या सुमारास प्रांजलीचा मृतदेह तई/बुज येथील राम मंदिरालगतच्या विहिरीत तरंगतांना आढळून आला. त्यानंतर घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक चहांदे यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. दरम्यान प्रांजलीचे एका मुलावर प्रेम होते. मात्र प्रियकर मुलाचे काही दिवसांपूर्वी आजारामुळे निधन झाले. त्या प्रेमविरहात प्रांजलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 14, 2024

PostImage

Hariyana news: पत्नी 5 व्यांदा गर्भवती राहिल्यानंतर मेहुणीला तिच्या देखभालीसाठी घेऊन आला आणि तिलाच घेऊन फरार झाला


हरियाणामध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. एका चार मुलांच्या बापाने पाच मुलं असलेल्या विवाहीत मेहुणीसोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी त्यांची तक्रार पोलीस स्थानकात दिलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम असे तरुणाचे नाव आहे.आपल्या विवाहीत मेहुणीसोबत तो पळून गेला आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सगळेच थक्क झाले.आरोपी तरुणाला चार मुलं आहेत तर त्याच्या विवाहीत मेहुणीला पाच मुलं आहेत. कहर म्हणजे आरोपीची पत्नी गर्भवती आहे. पत्नी पाचव्यांदा गर्भवती राहिल्यानंतर मेहुणीला तिच्या देखभालीसाठी घेऊन आला आणि तिलाच घेऊन फरार झाला. फरार झाल्याच्या पाच दिवसानंतर घरच्या लोकांनी पोलीसात धाव घेतली आणि दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

पिडीत नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की,आरोपी उत्तर प्रदेशातील फरुखाबाद येथे राहणारा आहे.करनालच्या घरोडा गावात तो राहतो. त्याला चार मुलेअसून पत्नी पाचव्यांदा गर्भवती आहे. पत्नीच्या देखभालीसाठी तो मेहुणीला घेऊन आला होता. दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. जे कोणालाच माहित नव्हते. आता सहा ते सात दिवस झाले मात्र तरुण आणि त्याच्या मेहुणीचा काहीच पत्ता लागलेला नाही. पोलिसांसह नातेवाईकही दोघांचा शोध घेत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 14, 2024

PostImage

Armori news: आरमोरी येथिल वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र डोमाजी बगडे यास लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक


आरमोरी – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमी. आरमोरी (ग्रामीण) ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र डोमाजी बगडे, वय ३६ वर्षे (वर्ग-३) यांना १,५०० रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.

 

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार हे मु. पो. वैरागड ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तकारदार यांचे मौजा सोनपूर सर्व्हे क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता पोलचे सर्व्हे करुन चार विद्युत पोल बसत असून ते कमी करुन ३ पोल केल्याचा मोबदला म्हणून आरोपी महेंद्र डोमाजी बगडे यांनी तकारीस ५,०००/- रुपयांची मागणी केली. तकारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.

 

         पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान मौजा सोनपूर सव्हें क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता विद्युत पोलचे सर्व्हे करुन चार विद्युत पोल बसत असतांना ते ३ पर्यंत कमी करुन दिल्याच्या मोबदला म्हणून आरोपी महेंद्र डोमाजी बगडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमी. आरमोरी (ग्रामीण), कार्यालय आरमोरी यांनी ५,०००/- रुपयांची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व तडजोडीअंती १,५००/- रुपये स्विकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोस्टे, आरमोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी बगडे यांचे आरमोरी येथील निवासस्थानाची अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चम्मुकडून झडती घेण्यात आली.

 

       सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूर यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जौंजारकर, पोशि संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके व चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 14, 2024

PostImage

PM किसान सम्मान योजना अंतर्गत मिळणार 12 हजार रुपये...


नवी दिल्ली :- मोदी सरकारच्या शेवटच्या व अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करून १२ हजारांपर्यंत मदत निधी दिला जाणार असल्याची शक्यता आहे. तसा निर्णय घेतल्यास याचा लाभ ११ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणारआहे. सध्या पंतप्रधान किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६हजार रुपये दिले जातात. या निधीत दुपटीने म्हणजे, आणखी सहा हजार रुपये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात यानंतर थेट १२ हजार रुपये रक्कम जमा होईल; असे सूत्रांचे म्हणणे आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा करण्याची मोदी सरकारची योजना आहे. महिला शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे. महिला शेतकऱ्यांच्याखात्यात पीएम किसानअंतर्गत १० हजार ते १२ हजार रुपये जमा करण्याचेही सरकारच्या विचाराधीन आहे. २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती. तसेच धक्कातंत्र देण्याची मोदीसरकारची योजना आहे; असे सूत्रांचे म्हणणे आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 14, 2024

PostImage

जंगली हत्तींचा कळप पुन्हा झाला ॲक्टीव.....


विहिरगाव-पिपंळगाव शेतशिवारात धुडगूस

 गडचिरोली . कुरखेडा तालुक्यातील वाढोणा शेतशिवारात 31 डिसेंबर रोजी विद्युत शॉक लागल्याने एका मादीचा हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर जंगली हत्तींचा कळप शोकमग्न अवस्थेत होता. मागील 15 दिवस हत्तींचा कळपाकडून कोणतीही नुकसान झाल्याची घटना समोर आली नव्हती. दरम्यान, देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहिरगाव-पिंपळगाव शेतशिवारात हत्तींनी प्रवेश करून पिकांचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री उघडकीस आली आहे. पंधरा दिवस शांत असलेला कळप पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

 

पंधरा दिवसांपूर्वी 31 डिसेंबर रोजी वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी वाढोणा येथील शेतकऱ्यानेकुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याने या कुंपणाला स्पर्श झाल्याने कळपातील एका मादी हत्तीचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हत्तींचा कळप शांत झाला होता. त्यानंतर कुरखेडा व देसाईगंज तालुक्यात हत्तींकडून कोणतेही नुकसान झाले नव्हते. दरम्यान, शुक्रवारच्या रात्री हत्तींचा कळप देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहिरगाव- पिंपळगाव शेतशिवारात दाखल झाला. येथे दाखल होताच हत्तींनी रब्बी पिकाचे नुकसान केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हत्तींचा कळप पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून हत्तींच्या कळपावर देखरेख ठेवली जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 13, 2024

PostImage

गळफास लावून ग्रामसेवकाची आत्महत्या


गोंदिया, ब्युरो. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एका ग्रामसेवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. मोहन - हिंगे (वय 37 ) असे मृतग्रामसेवकाचे नाव आहे.

 

 

 

 मोहन हिंगे हे गोंदिया  जिल्ह्याच्या देवरी - तालुक्यातील डवकी येथे - ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ते गुरुवारी आपल्या गावी नवेगावबांधला गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांनीघरीच गळफास लावला. ही बाब लक्षात आल्यानंतर - घरच्या मंडळींनी त्यांना तातडीने नवेगावबांध येथील ग्रमीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी - तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी - आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून त्यांच्याआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे

 

.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 13, 2024

PostImage

Chandrapur news: चंद्रपुरात ब्राऊन शुगर विक्री, दोघांना अटक


चंद्रपूर : पोलीस येथील शहरपोलिस ठाण्याच्या हद्दीत ब्राऊन शुगर विक्री करीत असलेल्या दोन युवकांना शहर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींवर ३०/२४ क. ८ (सि), २१ (बी) एन.डि.पी.एस. अॅक्ट अन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यातील आरोपी सोहेल शेख हे चोरून लपुन ब्राउन शुगरची विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांचे पथकाने जुनी लालपेठ वस्तीमध्ये धाड टाकली. यावेळी सोहेल सलीम शेख (२३) रा. जुनी लालपेठ वस्ती चंद्रपुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचजवळ ११० रू., ओपो कंपनीचा मोबाईल १५,००० रू. चा, ७.१२ ग्रॅन वजनाचा ब्राउन शुगर किं. १७,८०० रू., विवो कंपनीचा मोबाईल किं. २५,००० रू. चा असा एकुण ५७,९१० रू. चा ऐवज मिळुन आला.

 

आरोपीकडून अधिक चौकशी केली असता, सदर मिळालेला ब्राउन शुगर हे आवेश कुरेशी रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर याचे करीता विक्री करतो, असे आरोपीने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सोहेल सलीम शेख (२३) रा. जुनी लालपेठ वस्ती चंद्रपुर, व आवेश शब्बीर कुरेशी (३८) रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर) या दोघांना अटक केली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, सपोनि. मंगेश भोंगाडे, रमीझ मुलानी, पोउपनि शरिफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो. अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते यांनी केलेली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 13, 2024

PostImage

Desaiganj news: चपलैचा हार टाकणाऱ्या सातही आरोपिंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


देसाईगंज: केन्द्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्या विरोधात ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासुन चालक-मालकांनी आपापली वाहने उभी करून आंदोलन सुरु केले असता आंदोलन कर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे सोडुन चक्क एसटी ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये जबरीने घुसुन ड्रायव्हरच्या गळ्यात चपलेचा हार टाकला. याप्रकरणी अटक केलेल्या ७ जणांना देसाईगंज न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असुन तुरुंगात रवानगी केली

 

आहे. दरम्यान एक आरोपी फरार असल्याने देसाईगंज पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याने आंदोलन कर्ते चांगलेच धास्तावले आहेत.

 

शेख रोशन शेख, 40, रु. भगतसिंग वार्ड देसाईगंज, मुज्जू उर्फ मुजशीरशब्बीर शेख (३३) देसाईगंज, तौफिक कदीर शेख (२२ वर्षे) रा. हनुमान वार्ड देसाईगंज, मुशिर खान नजीर खान (२६ वर्षे) रा कमलानगर देसाईगंज, अजय शिमुर्ती पांडे (३५ वर्षे) जलनगर वार्ड चंद्रपुर, हल्ली मुक्काम रा. साई दरबार ट्रान्सपोर्ट ब्रम्हपुरी रोड देसाईगंज, शिवेंद्र अनिल गुप्ता (२५ वर्षे) रा. चंद्रपुर, गुरुदेव बळीराम शिवुरकर (३७ वर्षे)रा . राजेंद्रवार्ड देसाईगंज या सात आरोपिंना ताब्यात घेऊन देसाईगंज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही जणांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने आरोपींची चंद्रपुरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान फरार असलेल्या एका आरोपिचा देसाईगंज पोलीस कसुन शोध घेत असल्याने आंदोलन कर्त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

 

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 11, 2024

PostImage

*राष्ट्रीय युवा महोत्सवात निखिल भडके ची निवड* 


 नाशिक येथे आयोजित करण्यात आले राष्ट्रीय युवा महोत्सव

चंद्रपूर :- 

चंद्रपूर मधील सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय येथील विद्यार्थी निखिल राजकपूर भडके यांची निवड नेहरू युवा केंद्र चंद्रपूर याने केली.

दिनांक 12 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत याचे आयोजन करण्यात आले आहे. आणि चंद्रपूर मधील श्री. निखिल भडके. कु. राधिका दोरखंडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि संपूर्ण देशभरातून 22 हजार विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत. दिनांक 12 जानेवारी ला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी या महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 

निखिल ची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जयश्री कापसे मॅडम आणि सर्व प्राध्यापक वृंद निखिल चे अभिनंदन करीत आहेत


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 11, 2024

PostImage

शेकडो नागरिकांनी घेतले निशुल्क आयुर्वेद शिबिराचे लाभ.


 

आरमोरी :- सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य गुरुवर्य कै. प्र. ता. जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा ब्रम्हपुरी महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी तथा युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क वातरोग, त्वचा रोग श्वसन रोग आयुर्वेद शिबिराचे दि.१० जानेवारी २०२४ ला ठीक १०:०० ते २:०० वाजेपर्यंत स्थळ:- महात्मा गांधी महाविद्यालय ,आरमोरी येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन शिक्षण महर्षी मा. भाग्यवानजी खोब्रागडे तर अध्यक्ष म्हणुन निमा संघटनेचे अध्यक्ष मा.डॉ.हिरालाल मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा सर , डॉ. महेश कोपुलवार मा. प्रा. डोर्लीकर ,

डॉ. शितल सुपारे सर उपस्थित होते याप्रसंगी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवारंग लोकहीत संघटनेचे अध्यक्ष राहुल जुआरे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य घडविणारे प्रा. सदानंद सोनटक्के सर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  

या शिबिरामध्ये आरमोरी तालुक्यातील शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला सर्व रुग्णाची तपासणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा ब्रम्हपुरी च्या तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते पार पडली ज्यामध्ये डॉ.नरेश देशमुख , डॉ.रमेश कारवट , डॉ. सुनील नाकाडे , डॉ.रामेश्वर राकडे , डॉ.गिरीश शेंडे , डॉ.रोहित चिलबुले , डॉ.सुप्रिया नाकाडे , डॉ. अंजू राऊत , डॉ.अर्पणा कन्नमवार , डॉ .श्वेता राखडे डॉ.प्रणय कोसे ,डॉ.हिरालाल मेश्राम डॉ. श्रुती दांडगे ,डॉ. शितल सुपारे डॉ. ओमप्रकाश नाकाडे ,डॉ.खोब्रागडे, डॉ. अनोले ,डॉ.सतीश निमजे ,डॉ .सुनिता देशमुख, डॉ. सोनम लीचडे या निशुल्क शिबिरामध्ये रुग्णांना तत्कालीन फायदा होण्याकरिता आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ज्यामध्ये अग्निकर्म विद्यकर्म, स्वेदन ,स्नेहन ,रक्तमोक्षण तत्काळ करून देण्यात आले व रुग्णांना ५ दिवसाचे औषध मोफत देण्यात आले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी क्लिनिक ब्रम्हपुरी चे कर्मचारी , युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी चे सदस्य व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले .


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

Budget 2024 : 10 लाखापर्यंत पगार असलेल्या लोकांना मिळणार खुशखबर?


 

अर्थसंकल्प पुढच्या महिन्यात सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण करदात्यांना कराच्या ओझ्यातून दिलासा देतील अशी आशा आहे. अर्थमंत्री यंदा बजेटमध्ये काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मध्यमवर्गीयांसाठी काही विशेष असणार आहे का, टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होऊ शकतात का? 2024 च्या अर्थसंकल्पात काही विशेष घडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कारण निवडणुकीपूर्वी हा अर्थसंकल्प होणार आहे. सध्या चर्चा आहे की 10 लाखांपर्यंत पगार असलेल्या लोकांना 2024 च्या बजेटमध्ये काही चांगली बातमी मिळू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी करदात्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल केला जाऊ शकतो. जुन्या कर प्रणालीनुसार, आयकराचे एकूण 5 स्लॅब आहेत.

 

2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त श्रेणीत येते.

 

2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर

 

5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर

 

10 लाख ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर

 

20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही 30 टक्के कर

 

नवीन कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतचा पगार करमुक्त कक्षेत येतो. यामध्ये मोठी सूट दिली जाऊ शकते. ते 10 लाख रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते. जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल होणार नाही. नवीन कर प्रणाली तर्कसंगत करण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते.

 

नवीन आयकर स्लॅबमध्ये काय असेल?

 

सूत्रांच्या माहितीनुसार 10 लाख रुपयांपर्यंतची वेतन रचना यंदाच्या बजेटमध्ये फोकसमध्ये असेल. सध्या 10 लाख रुपयांपर्यंतचा पगार दोन टॅक्स स्लॅबमध्ये येतो. पहिला 6 ते 9 लाख रुपये आहे, ज्यावर 10 टक्के कर आहे. तर 9 लाख ते 12 लाखांवर 15 टक्के कर आहे. अशा परिस्थितीत दोन टॅक्स स्लॅबचे रुपांतर 10 लाख रुपयांच्या एका स्लॅबमध्ये करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यावरही 10 टक्के कर लावण्याची योजना आहे. यामध्ये 6-9 लाख रुपयांचा स्लॅब बदलला जाऊ शकतो.

 

15 लाख उत्पन्न असलेल्या लोकांनाही फायदा होईल का?

 

सध्याच्या करप्रणालीमध्ये, 15 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर 20 टक्के कर आकारला जातो. याचा अर्थ, जर आपण 10 लाख रुपयांपर्यंत पाहिले तर 10 आणि 15 टक्के दराने कर आकारला जातो. त्याच वेळी, 15 लाख रुपयांवर 20 टक्के कर आहे. 15 टक्के स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे. 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर थेट आणि 10 ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जावू शकतो. अशा स्थितीत 10 ते 12 टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्यांवर कराचा बोजा वाढेल, मात्र 10 लाख रुपयांपर्यंत मोठा दिलासा मिळेल. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, स्लॅब तोडून जुन्या राजवटीच्या तुलनेत अधिक आकर्षक बनवण्याची योजना आहे. मात्र, यामध्ये इतर सवलती मिळणार नाहीत.

 

15 लाखांच्या वर पगार असेल तर दिलासा नाही

 

नवीन कर व्यवस्था असो किंवा जुनी कर व्यवस्था, दोन्ही संरचनेत, 15 लाखांपेक्षा जास्त पगार असलेल्या लोकांना 30 टक्के कर भरावा लागतो. आगामी काळातही हीच परिस्थिती राहणार आहे. या उत्पन्न गटाला विशेष सूट देण्याचा विचार नाही.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

Helth tips: कानदुखी, कावीळ आणि मधुमेहापासून मिळेल मुक्ती! चवी आहे कडू, पण ही वनस्पती खजिना..


आपल्या आजूबाजूला असलेल्या जी झाडे आणि वनस्पती दिसतात, त्यापैकी अनेकांमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. तसेच ते आपल्यासाठी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

यापैकीच एक म्हणजे कडुलिंबाचे झाड आहे. औषधी गुणधर्माने समृद्ध कडुलिंब अनेक आजारांवर उपयुक्त आहे.

 

उत्तराखंडच्या डेहराडून येथील रहिवासी आयुर्वेदिक डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत माहिती दिली. कडुलिंबाचे वनस्पतीशास्त्रीय नाव अजाडिरेक्टा इंडिका आहे. त्याचा रस कडू असतो. मात्र, तो जीवनरक्षक औषधी वनस्पतीपेक्षा कमी नसतो. कडुलिंबाच्या पानांचे सतत सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांचा हा आजार पूर्णपणे बरा होतो.

 

डॉक्टर जुगरान यांनी पुढे बोलताना सांगितले की, पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप प्रभावी आहेत. तसेच पोटातील जंत दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस मध आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने फायदा होईल. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने बद्धकोष्ठता आणि जुलाबातही फायदेशीर आहेत. कडुलिंबाची पाने सुकवून त्यात साखर मिसळून खाल्ल्यास अतिसारापासून आराम मिळतो. तसेच जर कोणी भाजले असेल तर जागेवर कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाची पाने ठेचून लावल्याने आराम मिळतो.

 

कान दुखण्यापासून मिळेल आराम -

 

डॉक्टर शालिनी जुगरान पुढे म्हणाल्या की, ज्या लोकांचे कान दुखत असतील किंवा कानातून स्त्राव होत असेल, त्यांनी कानात कडुलिंबाचे तेल टाकावे. असे केल्याने आराम मिळतो. याशिवाय कडुलिंब दातांसाठीही फायदेशीर आहे. तसेच कडुलिंबाची टूथपेस्ट नियमित वापरल्याने दातांतील जंतू नष्ट होतात, हिरड्या मजबूत होतात, तसेच दात चमकदार आणि निरोगी होतात.

 

कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म -

 

डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत बोलताना पुढे सांगितले की, कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म आढळतात. जर तुम्हाला फोड आणि पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्या असतील तर कडुलिंबाची पाने, साल आणि फळे एकसारखे बारीक करावे आणि ही पेस्ट त्वचेवर लावा. असे केल्याने फोड आणि जखमा लवकर बऱ्या होतात. तसेच पुरळपासूनही आराम मिळतो.

 

कडुलिंबाचा वापर काविळवरही फायदेशीर ठरतो. पित्त मूत्राशयातून आतड्यात पित्त पोहोचण्यात अडथळा आल्याने कावीळ होते. अशा स्थितीत रुग्णाला सुंठ पावडर कडुलिंबाच्या पानांच्या रसात मिसळून द्यावी. मूतखड्याच्या आजारापासून बचावासाठी सुमारे 150 ग्रॅम कडुलिंबाची पाने बारीक करून एक लिटर पाण्यात उकळावे. यानंतर हे पाणी थंड झाल्यावर प्यावे. असेल केल्याने मूतखडा निघू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

खदान विरोधी संघर्षात 'पद्मश्रीं' चा सहभाग का नाही?


सुरजागडच्या यात्रेत उपस्थितांचा सवाल

 

एट्टापल्ली : आदिवासींची सेवा केल्याच्या नावाखाली 'पद्मश्री' पुरस्कार मिळालेले व्यक्तीमत्व जिल्ह्यात असूनही आदिवासींचे अस्तित्व नष्ट करु पाहणाऱ्या लोह खदानींच्या विरोधातील संघर्षात या 'पद्मश्रीं' नी आजपर्यंत का सहभाग घेतला नाही. असा सवाल सुरजागड इलाख्यातील कार्यकर्त्यांनी देवाजी तोफा यांना केला. ठाकुरदेव यात्रेदरम्यान झालेल्या अधिकार संम्मेलनाच्या समारोपा दरम्यान देवाजी तोफा यांनी भेट दिली होती.

५ ते ७ जानेवारी ला संपन्न झालेल्या ठाकुरदेव यात्रेदरम्यान ६ जानेवारीला अधिकार संम्मेलन पार पडले यावेळी जिल्ह्यातील बेकायदेशीर लोहखाणी आणि त्या खाणी खोदण्यासाठी स्थानिक आदिवासींचे होणारे दमन याविरोधातील आंदोलनात सहभागी असलेल्या प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या नेत्यांनी यात्रेतील जनतेला मार्गदर्शन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरजागड इलाखा प्रमुख सैनू गोटा तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ.डॉ. महेश कोपूलवार, काॅ. अरुण वनकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, माजी पं.स.सदस्य शिलाताई गोटा, जयश्रीताई वेळदा, शामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, भाकप जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड.जगदिश मेश्राम, विनोद झोडगे, मिलिंद भनारे, आप चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, साहित्यिक कुसूम आलाम प्रामुख्याने उपस्थित होते.

 

रविवार दिनांक ७ जानेवारीला यात्रेचे समारोप प्रसंगी आदिवासी समाज सेवक देवाजी तोफा यांनी भेट दिली असता त्यांचेसोबत सुरजागड इलाख्यात कार्यकर्त्यांनी चर्चासत्र घडवून आणून जिल्ह्यातील 'पद्मश्री' आणि प्रशासना बद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. तसेच जे आमच्या संघर्षात नाही, आम्हीही त्यांच्या सोबत नाही. अशी भूमिका घेत डॉ. अभय बंग यांच्या दारुबंदी आणि दारुनिर्मिती कारखाना विरोधी भूमिकेला धुत्कारण्यात आले. उल्लेखनीय की, यावर्षी लोह खदानी संबंधात विरोधाची स्पष्ट भूमिका नसणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना अधिकार संम्मेलनाच्या मंचावर स्थान नाकारण्यात आले.

ठाकुरदेव यात्रा आणि पारंपरिक अधिकार संम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण नवडी, मंगेश होळी, पत्तू पोटावी, सैनू हिचामी, रमेश कवडो, सरपंच करुणा सडमेक, माजी सरपंच कल्पना आलाम, दारसू तिम्मा, शिवाजी गोटा व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

Gadchiroli news: भरधाव दुचाकीची समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर जबर धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण तरुण जागीच ठार


Gadchiroli news: गडचिरोली, दि.10 : भरधाव दुचाकीची समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर जबर धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण तरुण जागीच ठार झाल्याची घटना 9 जानेवारी रोजी रात्रो साडेनऊ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील मुरखळा गावानजीक घडली. अक्षय दसरथ पेंदाम (23), अजित रघू सडमेक (23), अमोल अशोक अर्का (20, सर्व रा. गोविंदगाव ता.अहेरी अशी मृत तरुणांची नावे आहेत.

 

प्राप्त माहितीनुसार, मृतक तिघेही हे रात्रोच्या सुमारास नव्या दुचाकीने गडचिरोली कडे येत होते. दरम्यान मुरखळा नजीकच्या वळणावर समोरून येत असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकली. दुचाकी भरधाव असल्याचे बोलल्या जात असून ट्रकला धडक बसताच तिघेहीजण जागीच गतप्राण झाले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती होताच नागरिकांनी धाव घेतली होती व पोलीसा कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ताब्यात घेऊन नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केले. सदर घेटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाई ची प्रक्रिया सुरु असल्याचे कळते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

अध्यात्मिकदृष्ट्या तीळ महत्त्वाचं


 

आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. अध्यात्मिकदृष्ट्या, तीळ आणि तिळाच्या तेलामध्ये सत्व शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता इतर कोणत्याही तेलापेक्षा अधिक असते. त्याचबरोबर नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे जर तिळाचे लाडू खाल्ले तर प्रत्येकाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

 

तिळाचे लाडू आरोग्यासाठी फायद्याचे (Benefits Of Sesame Seeds)

 

छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर असते. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. तिळात कॅल्शियम तर असतंच, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. दातांच्या मजबुतीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.

 

तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील तर तुम्ही रोज तीळ खाल्ले पाहिजेत. उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करते.

 

मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त (Makar Sankranti 2023 Date)

 

गेल्या दोन वर्षांनुसार यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मिथिला पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांती साजरा करण्यात येणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

Jawed akhtar news: अभिनेत्रींना लग्नाआधी अनेकांसोबत झोपायचं असतं!' म्हणत यश चोप्रांवर हे काय बोलले जावेद अख्तर?


जावेद अख्तर त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. ते वक्तव्य करताना अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. अनेकदा त्यांची वक्तव्य चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेमात महिलांना दिलेल्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे.

 

आत्तापर्यंत श्रीदेवी आणि माधुरी सारख्या अनेक प्रतिभावान अभिनेत्री बॉलिवूडमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र कधीही त्यांना मोठी भूमिका मिळाली नाही. याचबरोबर त्यांनी शाहरुखच्या जब तक है जान सिनेमावर देखील संताप व्यक्त केला आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा वेगवेगळ्या राष्ट्रीयतेच्या लोकांसोबत झोपण्याबद्दल बोलत आहे. यावर जावेद अख्तर म्हणाले की, 'आजकाल चित्रपट निर्मात्यांना सशक्त असणं काय असतं हेच कळत नाही, त्यामुळेच अशा भूमिका नायिका मिळत आहेत'

 

टॅलेंटेड एक्ट्रेसला नाही मिळत आयकॉनिक रोल

आजकाल सिनेमात महिला सशक्तिकरण ज्याप्रकारे दाखवलं जातं जावेद अख्तर त्यावर नाराज आहेत. एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर म्हणाले आहेत की, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित सारख्या अनेक प्रतिभावान अभिनेत्री येवून गेल्या. पण त्यांना कधीच मोठ्या भूमिका मिळाल्या नाही. मदर इंडिया, बंदिनी, सुजाता आणि साहिब बीवी और गुलाम सारख्या आयकॉनिक ठरलेल्या चित्रपटांच्या ऑफर त्यांना मिळाल्या नाहीत. यश चोप्रा यांनी फार चांगले नाही पण चांगले चित्रपट केले. संपूर्ण कारकिर्दीत कम्प्लीट मूवीज बनवले.

 

जावेद अख्तर पुढे म्हणाले, आजचे सिने निर्माते सशक्त महिलाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना कळत नाही की खरच सशक्त महिला कोण आहे? यश चोप्रांच्या चित्रपटाचे उदाहरण देताना ते म्हणाले, त्यांच्या जब तक है जान या चित्रपटाची नायिका म्हणते, 'शादी के पहले में पूरी दुनिया में अलग-अलग एक्सेंट वाले मर्दों के साथ सोऊंगी' असं ती म्हणते. एवढी मेहनत करायची काय गरज आहे?

 

जावेद अख्तर पुढे म्हणाले, सशक्त होण्यासाठी तुम्हाला इतकं हार्ड वर्क करण्याची गरज नाही. यात त्यांना मॉडर्न महिला दिसते. सशक्त महिला म्हणजे काय त्यांना माहित नाही. त्यामुळे महिलांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत. सिनेमात हिरो गाणं गातो, डान्स करतो किंवा अॅक्शन करतो तेव्हाच चित्रपट पूर्ण होतो, असं यावेळी जावेद अख्तर म्हणाले. चित्रपटात कोणताही कॉन्टेंट नसल्याचे त्यांनी सांगितलं चित्रपट निर्माते आणि लेखकांना कॉन्टेंट काय आहे हे समजत नाही कारण समाजच त्याबद्दल स्पष्ट नाही. लोकांना आवडेल अशा कॉन्टेंटवर चित्रपट बनवता येत नाही. असं जावेद अख्तर त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

Helth tips: जेवणात 'या' एका खास गोष्टीचा करा समावेश, कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी आणि गॅस


Helth tips: अनेकदा जेवण केल्यावर अ‍ॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे इत्यादी समस्या होऊ लागतात. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, चुकीची लाइफस्टाईल, भूकेपेक्षा जास्त जेवण करणे, स्पायसी किंवा फ्राइड फूडचं सेवन, वेळेवर जेवण न करणं, जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन करणं इत्यादी.

 

 

आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी या समस्या दूर करणारा एक उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी एका पदार्थाबाबत सांगितलं आहे जो तुम्ही रोज खात असलेल्या पदार्थांमध्ये टाकला तर पोटासंबंधी अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

 

डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी गॅस, पोट फुगणं, अ‍ॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून वाचण्यासाठी एक चिमुटभर हींग जेवण बनवताना त्यात टाकण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही अनेकदा हींगाचा वापर सुगंध आणि फ्लेवरसाठी केला असेल, पण याच्या फायद्यांबाबत तुम्हाला माहीत नसेल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

Gadchiroli news: साहेब, भूक लागली, पाणी तरी द्या जी; गर्दीत गैरसोय


गडचिरोली :  महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात ९ जानेवारी रोजी येथे झाली. यावेळी जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटर अंतरावरील सिरोंचा पर्यंतच्या महिलांना बोलावण्यात आले होते. पण, पाण्यावाचून विद्यार्थी, महिलांच्या घशाला कोरड पडली होती. चार तासांपेक्षा अधिक वेळ ताटकळत बसावे लागले, काहींना उन्हात रांगेत थांबावे लागले, त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 

 

मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. चारशे बस, शेकडो खासगी वाहनांतून हजारो महिलांना ९ जानेवारी रोजी शहरातील एमआयडीसी परिसरातील कोटगल रोड मैदानावर एकाच छताखाली एकत्रित आणले. मात्र, हजारोंच्या गर्दीत प्रशासनाचे नियोजन कोलमडले. सकाळी ११ वाजेच्यानियोजित कार्यक्रमासाठी १० वाजेपासून गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मान्यवरांचे आगमन दुपारी दोन वाजता झाले. त्यामुळे महिला-विद्यार्थी ताटकळून गेले होते. पाण्यासाठी महिला, विद्यार्थी आसन सोडून धावाधाव करताना दिसून आले. ओरड वाढल्यानंतर जार द्वारे पाण्याची व्यवस्था केली. पण, काही महिलांना पाणी मिळाले तर काहींना मिळाले नाही.

शाईच्या पेनाचीही पोलिसांनी घेतली धास्ती

 दरम्यान, कार्यक्रमस्थळी प्रवेश देताना पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली अडवणूक केल्याचे दिसून आले. अनेक महिलांच्या पर्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. • शाईफेकीच्या घटनांच्या धास्तीने अनेक जणांकडून पेन देखील काढून घेतले. काही महिला लहानग्यांना घेऊन आल्या होत्या, त्यांचेही हाल झाले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024

PostImage

Armori news: गळफास घेऊन इसमाची आत्महत्या


आरमोरी - आरमोरी-ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरीमार्गावर असलेल्या जीवानी राईस मिलच्या मागे असलेल्या सुबाभळीच्या झाडाला गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान आरमोरी येथील नागरिकांच्या निदर्शनास आली.

 

सदर आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव संदीप शामराव ठाकरे (३०) रा. आवळगाव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर असे आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा दोन- तीन दिवसापूर्वी गडचिरोली येथे काही कामानिमित्त गेलेला होता. काल रात्री ९ वाजताच्या दरम्यान सदर युवक हा गडचिरोली वरून आरमोरी येथे परत आला असल्याचे त्याच्या खिशात आढळुन आलेल्या एका ट्रॅव्हल्सच्या तिकीटवरून कळल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु सदर युवक हा आपल्या आवळगाव येथे न जाता आरमोरी - ब्रम्हपुरी रोडवरील जीवांनी राईस मिलच्या मागे असलेल्या सुबाभळीच्या झाडाजवळ जाऊन रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी ८ वाजता राइस मिल मधील काही काम करणाऱ्या कामगारांना त्याचे प्रेत झाडाला लोंबकळत असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी आरमोरी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरमोरी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

Accident news: पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


 पळसगाव (पि): चिमूर तालुक्यातील नेरी-मोटेगाव मार्गावर खुटाळाजवळ पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. ८ रोजी दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास घडली.

 

नितीन मेश्राम (२७) रा. येनोली माल ता. नागभीड असे मृतकाचे नाव आहे. मानेमोहाळी येथून येनोली मालकडे दुचाकीने (एमएच ३४ एके ७६६२) परत येत असताना मोटेगाव-खुटाळा मार्गावर अज्ञात पिकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नितीन मेश्राम या युवकाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात पिकअप वाहनचालक घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जांभळे आपल्या चमूसह घटनास्थळावर दाखल झाले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

Nagbhid news: कोतवालावर प्राणघातक हल्ला; एकाला अटक


नागभीड : बाळापूर येथील कोतवाल संजय गजानन राहाटे (४२) यांच्यावर रविवार दि. ७ रोजी सायंकाळी ७ वाजता धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली.

 

मंगेश नामदेव झाडे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राहाटे हा बाळापूर येथे कोतवाल आहे. कामकाज आटोपल्यानंतर तो नवानगर या आपल्या गावाकडे मोटारसायकलने परत येत असताना आरोपी मंगेश झाडे हा साथीदारासह मोटारसायकलने पाठीमागून आला आणि जोराजोराने हॉर्न वाजविला. या आवाजाने कोतवालाने आपली मोटारसायटलचा वेग कमी करत बाजूला नेली. 

 

नेमक्या याच वेळी आरोपीने धारदार शस्त्राने कोतवाल राहाटे याच्यावर पाठीमागून वार केला आणि पळून गेला. या हल्ल्यानंतर कोतवाल संजय राहाटे हा कसाबसा देवपायलीपर्यंत आला. देवपायलीच्या बसस्थानकावर असलेल्या लोकांना झालेला प्रकार सांगून उपचारासाठी नागभीडला नेण्याची विनंती केली. काही वेळातच जखमी कोतवालाला नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू गुजरातमध्ये चमकणार


गडचिरोली :- अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या अंतर्गत गुजरात मधील अहमदाबाद येथे दि.१६ ते १८ फेब्रुवारी २०२४ ला होणाऱ्या राष्ट्रीय NIDJAM स्पर्धेची निवड चाचणी गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन व लोयडस मेटल्स स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने  ७ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील  संजीवनी ग्राऊंड येथे सकाळी 

८:३० वाजता  NIDJAM च्या राष्ट्रीय निवड स्पर्धा पार पडल्या ज्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यामध्ये  ट्रायथलाँन A  या क्रीडाप्रकारात

१४ वर्षाआतील मुलांच्या गटात विजय पैका कोवाशी तर मुलींच्या गटात भाग्यश्री किशोर मुडमा हिने प्रथम क्रमांक पटकावला  तर ट्रायथलाँन B क्रीडाप्रकारात हर्षल राकेश मोहूर्ले  तर मुलींच्या गटात प्रीती राजू गुरनुले या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला तर

ट्रायथलाँन C या क्रीडाप्रकारात रुद्रा रमेश भोयर तर मुलींच्या गटात जान्हवी दिनेश आकरे या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला  तर १६ वर्षाआतील मुलांच्या गटात  ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत  गणेश संतोष जायारापवार तर  मुलींच्या गटात ६० मीटर धावणे स्पर्धेत रेश्मा राकेश मडावी या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला तर  ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निर्भय राहेंद्र सोमनकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटात ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रेश्मा राकेश मडावी हिने प्रथम क्रमांक पटकावला

८० मीटर हर्डल्स धावण्याच्या स्पर्धेत  गणेश संतोष जायारापवार तर उंचउडी क्रीडाप्रकारात राणी श्रीनिवास मडावी  , १६ वर्षाआतील मुलांच्या गटात  लांबउडी स्पर्धेत शैलेश दयानाथ कोकेरवार याने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटात सानिका संजय पिरशिंगुलवार हिने प्रथम क्रमांक पटकावला तर गोळाफेक स्पर्धेत पियुष तुकाराम मडकाम याने  प्रथम क्रमांक पटकावला तर भालाफेक स्पर्धेत राणी श्रीनिवास मडावी हिने प्रथम क्रमांक पटकावला व पेंटाथलाँन क्रीडा प्रकारात  निर्भय राहेंद्र सोमनकर याने प्रथम क्रमांक पटकावला  त्यानंतर लगेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मृणाली सराफ मॅडम ,भूपती सर ,दलसू सर , संदीप चापले , कापकर मॅडम, आयशा मॅडम ,नंदूजी बांबोळे सर ,सदानंद सुरणकर , महेंद्र भुरले सर , आकाश सर,गणेश सर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जुआरे यांनी केले तर आभार महेश वाढई यांनी मानले गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांच्या मार्गदर्शन  या स्पर्धेला पंच म्हणुन महेश वाढई सर राहुल जुआरे सर यांनी यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडली याप्रसंगी बहुसंख्येने खेळाडु पालक वर्ग उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

OBC students: ओबीसी विद्यार्थ्यांना शासन देणार 60000 रुपये..


शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी *"ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना"* सुरू केली आहे. त्या माध्यमातून SC आणि ST विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ आता OBC विद्यार्थ्यांना ही मिळणार आहे. 

 

 ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा SC आणि ST वर्गातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासनाकडून शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार योजनेअंतर्गत रोख मदत मिळायची. मात्र आता शासनाने *ओबीसी* विद्यार्थ्यांनाही आधार योजनेच्या माध्यमातून रोख मदत देण्याचे ठरविले आहे. 

 

 राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री *अतुल सावे* यांची ओबीसी संघटनांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे शासनाने त्या संदर्भातला जीआर ही आज काढला आहे.

 

 *ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजना कशी असेल?* 

▪️मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नवी मुंबई, नागपूर या शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षामागे 60 हजार रु मिळतील.

▪️ *संभाजीनगर,* नाशिक, कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 51 हजार रु मिळतील.

▪️जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना 43 हजार रु मिळतील..

▪️तालुक्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्याना 38 हजार रु मिळतील.

 

👆🏻 या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवडले जातील.

 

 *GR डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा..* 

                           👇🏻

 📃 *https://shorturl.at/beqz6* 

 

 

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा*


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

Job news: नोकरी : महावितरणमध्ये 5347 जागांसाठी मेगाभरती जाहीर..!


 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल...

 

 *एकूण रिक्त जागा :* 5347

 *पदाचे नाव:* विद्युत सहाय्यक

 

📖 *शैक्षणिक पात्रता:* 

(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) 

(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

 

 *वयोमर्यादा :* 29 डिसेंबर 2023 रोजी 

▪️जनरल : 18 ते 27 वर्षे 

▪️मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट

 

 *परीक्षा फी :* 

▪️खुला प्रवर्ग: ₹250/- 

▪️मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- 

 

 *परीक्षा (Online):* फेब्रुवारी/मार्च 2024

 

 *नोकरी ठिकाण:* संपूर्ण महाराष्ट्र

 *अर्ज करण्याची पद्धत :* ऑनलाईन

 

 *मूळ जाहिरात वाचा:* https://shorturl.at/cpH08

 

 *ऑनलाइन नोंदणी करा:* https://www.mahadiscom.in/en/latest-announcements/

 

कृपया या नोकरीची माहिती इतर ग्रुपवर शेअर करा; आपण केलेला एक शेअर एखाद्या गरजूला नोकरीची संधी देऊ शकतो..*


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

मोबाईल चोरीला गेल्यावर फोनपे, गुगल पे आणि पेटीएमचा UPI ID ब्लॉक करण्याची सर्व प्रोसेस जाणून घ्या!


 जर तुमचा फोन चोरी झाला किंवा हरवला तर अशावेळी तुमचे बँक खाते असुरक्षित असते. अशावेळी सगळ्यात आधी तुमचा युपीआय आयडी ब्लॉक करणेच शहाणपणाचे ठरते. मात्र, युपीआय आयडी ब्लॉक कसा करावा, हे जाणून घेऊया.

 

 *फोनपे युपीआय आयडी असा करा ब्लॉक*

● सगळ्यात पहिले 02268727374 किंवा 08068727374 नंबरवर कॉल करा

● ज्या मोबाइल नंबरहून यूपीआय आयडी लिंक आहे त्याविरोधात तक्रार दाखल करा.

● ओटीपी आल्यानंतर तुमचा सिम कार्ड व फोन हरवला गेला असल्याचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल

● त्यानंतर तुम्हाला कस्टमर केअरसोबत कनेक्ट केले जाईल. त्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती दिल्यानंतर युपीआय आयडी ब्लॉक करु शकतात.

 

 *PayTM UPI आयडी असा करा ब्लॉक*

● सगळ्यात आधी पेटीएम बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.

● त्यानंतर Lost Phone या पर्यायावर क्लिक करा

● त्यानंतर एक वेगळा नंबर टाकून त्यानंतर हरवलेला फोन नंबर टाका

● त्यानंतर लॉगआऊट फ्रॉम ऑल डिव्हाइस हे ऑप्शन सिलेक्ट करा. 

● या नंतर पेटीएम वेबसाइटवर जाऊन 24×7 हेल्प ऑप्शन सिलेक्ट करा

● अशा पद्धतीने तुम्ही Report a Fraud किंवा Message Us ऑप्शन सिलेक्ट करु शकतात

● त्यानंतर तुम्हाला पोलिस रिपोर्ट सह काही डिटेल्स द्यावे लागणार आहेत. त्यानंतर सर्व पडताळणी झाल्यानंतर पेटीएम अकाउंट तात्पुरते बंद केले जाईल. 

 

 *गुगल पे युपीआय आयडी असा करा ब्लॉक*

● सगळ्यात पहिले 18004190157 हा नंबर डायल करा 

● त्यानंतर कस्टमर केअरला पेटीएम अकाउंट ब्लॉक करण्याची माहिती द्या. 

● अँड्रोइड युजर्सना गुगल फाइंड माय फोन हा कोणत्या पीसी किंवा फोनवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर गुगल पेचा संपूर्ण डेटा रिमोटली डिलीट करावा लागेल. त्यानंतर तुमचे गुगल पे अकाउंट तात्पुरते ब्लॉक होऊन जाईल. 

● जर तुम्ही आयओएस युजर्स असाल तर find my app किंवा अन्य अॅपलच्या अधिकृत टूलमधून संपूर्ण डेटा डिलीट करुन गुगल पे अकाउंट ब्लॉक करु शकतात. 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

Gas booking : आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही गॅस सिलेंडर बुक करता येणार; कसे ते जाणून घ्या..


मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल.ज्या कंपनीकडून तुम्ही गॅस खरेदी करता त्या कंपनीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करा. 

 

 *हे तीन कंपन्यांचे नंबर आहेत.* 

▪️HP GAS- 9222201122, 

▪️Indane- 7588888824  

▪️भारत गॅस- 1800224344

 

✅ सर्वप्रथम तुम्हाला नंबर सेव्ह करून HI लिहावे लागेल. 

✅त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. 

✅ यानंतर, तुम्ही येथून गॅस बुक, नवीन कनेक्शन, कोणतीही तक्रार इत्यादी सर्व काही करू शकता.

यासह तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील ज्यामधून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.

 

 गॅस रिफिल बुकिंग केल्यानंतर काही तासांनी एक नवीन सिलिंडर तुमच्याकडे येईल. लक्षात ठेवा, सेवा क्षेत्रानुसार विलंब होऊ शकतो.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे योजना


 अनेक शेतकरी एका विशिष्ट वयापर्यंत शेती किंवा मजूर करून आपला उदरनिर्वाह करतात. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर, त्यांच्या जीवनात आर्थिक स्तरावर अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो.

 

 शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार *प्रधानमंत्री किसान मानधन योजना* योजना राबवत आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते.

 

 *कोण करू शकतो अर्ज?* 

या योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी भारत सरकारच्या पंतप्रधान किसान मानधन योजनेत अर्ज करू शकतात आणि गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. 

 

 जर शेतकऱ्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला. अशातच त्यांना या योजनेत दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तसेच जेव्हा गुंतवणूक करणारा शेतकरी 60 वर्षांचा होईल, त्यानंतर त्याला दरमहा 3,000 रुपये (वार्षिक 36,000 रुपये) पेन्शन मिळेल.

 

 या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला दरमहा 50 टक्के पेन्शन मिळते. शेतकरी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला दरमहा 1500 रुपये पेन्शन मिळेल.

 

 *तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता* 

किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्ही maandhan.in वर जा आणि त्यानंतर तुम्हाला तेथे सेल्फ एनरोलमेंट करावे लागेल. येथे तुमच्याकडून मोबाईल नंबर, OTP इत्यादी माहिती घेतली जाईल. सर्व माहिती ऑनलाइन फॉर्ममध्ये भरून सबमिट करावी लागेल. यासाठी तुम्हाला या योजनेसाठी अर्जदार मानले जाईल.

 

 *योजनेच्या अटी* 

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. भारत सरकारच्या या योजनेत देशभरातील अनेक शेतकरी अर्ज करत आहेत आणि गुंतवणूक करत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

जुन्या विहिरी दुरुस्तीपासून ते बोअरवेल, नवीन विहितींसाठीही 'या' योजनेंतर्गत मिळतंय अनुदान: असा करा ऑनलाइन अर्ज...


महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान देण्यासाठी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना* सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सिंचन संच (तुषार सिंचन व ठिबक सिंचन) पी व्ही सी पाईप, परसबाग इत्यादी गोष्टींवर अनुदान मिळणार असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सातारा, सांगली, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्हे वगळता राज्यातील बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये घेता येईल.

 

 *अनुदान रक्कम* 

▪️नवीन विहीर बांधण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये

▪️जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार रुपये

▪️इनवेल बोरिंग साठी 20 हजार रुपये

▪️पंप संच साठी 20 हजार रुपये.

▪️वीज जोडणी साठी 10 हजार रुपये

▪️शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये

▪️ठिबक सिंचन 50 हजार किंवा तुषार सिंचन करिता 25 हजार रुपये.

▪️पी व्ही सी पाईप साठी 30 हजार रुपये

▪️परसबाग करिता 500 रुपये

 

 *योजनेच्या लाभासाठी पात्रता:* 

✔️ शेतकरी अनुसूचित जातीचा असावा.

✔️ शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा सातबारा 8अ उतारा असावा.

✔️ शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपये असावे.

✔️ शेतकऱ्याची जमीन धारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असावी.

✔️ दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

✔️ अपंग किंवा महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.

 

*असा करा ऑनलाईन अर्ज* 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करायचा आहे. तसेच https://agriwell.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज देखील करता येईल. या योजनेमुळे अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरची होणार लगेच दुरुस्ती! 'इथे' नोंदवा तक्रार..


ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महावितरण'ला तसे निर्देश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी 'महावितरण'ने *१८००२१२३४३५* किंवा *१८००२३३३४३५* हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहे, शिवाय महावितरणच्या ॲपवरूनही तक्रार नोंदवता येणार आहे.

 

 'महावितरण'ला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर किमान तीन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बदलून तथा दुरुस्त करून दिला जात आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाल्याचे उशिराने समजल्यानंतर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास आणखी विलंब होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर तक्रार आल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करून दिली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना एक रुपयाही भरावा लागत नाही हे विशेष.

 

*ॲपवरून तक्रार अशी करा...* 

 

● सर्वप्रथम मोबाईलवर 'महावितरण' ॲप उघडा

● नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा त्या बटणावर

● ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर

● आपले कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मरला जोडले आहे, त्याचा नंबर, गाव, तालुका- जिल्ह्याची माहिती भरलेली दिसेल.

● ट्रान्सफॉर्मर जवळील खूण कोणती, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा

● संबंधीत ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा

● नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा

 

याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल आणि तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.

 

ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024

PostImage

B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद, आता लागू होणार चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम..!


बी.एड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024 - 2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाचे (RCI) सचिव विकास त्रिवेदी यांनी हे विशेष परिपत्रक जारी केले आहे.

 

 *काय आहे विशेष बीएड अभ्यासक्रम?* 

विशेष बीएड अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. ज्या संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक बीएड विशेष शिक्षण अभ्यासक्रम (एनसीटीईच्या चार वर्षांचा आयटीईपी अभ्यासक्रमासारखा) ऑफर करायचा असेल त्या पुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकतील असे आरसीआयने म्हटले आहे.

 

 एनसीटीई विशेष बीएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरसीआय हा अभ्यासक्रम राबवणार आहे. एनसीटीईचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तयार केला जात आहे. या संदर्भात डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठ, लखनौचे प्रवक्ते डॉ. यशवंत वीरोदय यांनी बीएड (विशेष शिक्षण) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या भवितव्याबाबतच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 8, 2024

PostImage

Car Tips: कार चालवताना स्टेअरिंग कसे धरायचे जाणून घ्या, बहुतेक लोक या चुका करतात


 

Car Tips: भारतात तसेच जगभरात सर्वाधिक अपघात कारवरील नियंत्रण सुटल्याने होतात. स्टीयरिंग व्हील कसे धरायचे हे बहुतेक लोकांना माहिती नसते. अनेक वेळा कारमधून प्रवास करताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो.

 

त्यामुळे मोठे अपघात होतात. असे लोक कार चालवणे एखाद्या खेळासारखे घेतात. तर असे केल्यानेच अपघात होतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कार चालवता तेव्हा ती पूर्ण जबाबदारीने आणि नियमांचे पालन करून चालवावी.

 

कार चालवताना स्टेअरिंगला कधीही खेळ समजू नये. असे केल्याने बहुतांश अपघात होतात. बरेच लोक एका हाताने गाडीचे स्टेअरिंग फिरवतात किंवा त्यावर छोटे चाक ठेवून एका हाताने स्टेअरिंग चालवतात. बरेच लोक स्टिअरिंगवर पकड बनवण्याऐवजी पकड सोडून हाताळत राहतात. काही लोक वरून गाडीचे स्टेअरिंग धरतात. या सर्व पद्धती चुकीच्या आहेत.

 

काय आहे पद्धत-

कार चालवताना स्टीयरिंग व्हील पकडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या हातांची स्थिती घड्याळाच्या चतुर्थांश ते नऊ वाजण्याच्या स्थितीत असावी. डावा हात 9 वाजलेल्या हातावर असावा आणि उजवा हात 3 वाजलेल्या हातानुसार स्टीयरिंगवर असावा. जर तुम्ही स्टीयरिंग व्हील अशा प्रकारे धरले तर तुमच्या लक्षात येईल की, तुमचे हात एका बाजूने दुसऱ्या बाजूने फिरू शकतील तेवढी कार वळते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 8, 2024

PostImage

रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


गडचिरोली : आरमोरी मार्गावरील मोहझरी गावालगत शुक्रवारी रुग्णवाहिकेने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली- आरमोरी मार्गावर मोहझरी गावाजवळ घडली.

 

परवेझ संजूर शहा (३६) रा. पोर्ला असे मृतकाचे नाव आहे. परवेझ याचे पोर्लाजवळ टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान आहे. तो रात्री काही कामानिमित्त मोहझरी येथे आला होता. काम आटोपून पोर्लाकडे परत जात असताना, समोरून येणाऱ्या एमएच टी२९९३ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली

 

 या धडकेत परवेझ हा जागीच ठार झाला. रुग्णवाहिका चालकाने परवेझला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली. रुग्णवाहिका चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाळून परवेझला रुग्णालयात दाखल केले असता, परवेजला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 8, 2024

PostImage

Kurkheda accident news: तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी


कुरखेडा : तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. ही घटना ५ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता कुरखेडा-मालेवाडा मार्गावर घडली. ललित शेडमाके, शुभम चाघाटे, प्रीतम मेश्राम (सर्व रा. खांबाडा), अरुण गावळी व नागेश कापुरी (दोघेही रा. चांदोणा) अशी जखमींची नावे आहेत. चिचेवाडानजीक तीन दुचाकी एकमेकांवर आदळल्या. यात पाचही जण जखमी झाले. त्यांना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. यातील तिघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 8, 2024

PostImage

Mulchera mahila polic: महिला पोलिसांची पेटवून घेत आत्महत्या


मुलचेरा तालुक्यातील कोपर अल्ली येथील घटना

 गडचिरोली : . तीन महिन्यांपूर्वी प्रसुती झालेल्या महिला पोलिस शिपाईने सासरी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना 4 जानेवारी रोजी मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली येथे घडली. वैशाली गुलशन आत्राम (30) रा. कोपअरल्ली ता. मुलचेरा, असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिस शिपायाचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार वैशाली आत्राम या अहेरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. त्यांचे पतीसुद्धा अहेरी प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात कार्यरत आहेत. त्या प्रसुती रेजवर होत्या. तीन महिन्यांपूर्वी वैशाली यांची प्रसुती झाली. त्यांना दुसरा मुलगा झाला. प्रसुतीनंतर त्या सासरी कोपअरल्ली येथे कुटुंबीयासोबत वास्तव्यास होत्या.प्रसुतीनंतर त्या दडपणात होत्या. यातून त्यांची मानसिक स्थिती बिघडली व त्यांनी गुरूवारी सायंकाळी घराच्या मागच्या खोलीत जाऊन स्वतःला पेटवून घेतले. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

कारण स्पष्ट झाले नाही

विशेष म्हणजे वैशाली यांचे वडीलही पोलिस विभागात कार्यरत होते, असे समजते. मुलचेरा पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असून माहेरच्या लोकांचे बयाण घेतल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान शुक्रवारी मृतक महिला पोलिस कर्मचारीवरअंत्यसंस्कार करण्यात आले

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 8, 2024

PostImage

Dhanora crime news: मित्राचा खुन करून पेटवूनही दिले अन् प्रेताजवळ रात्रभर केला जागर


 धानोरा तालुक्यातील खेडी येथील खळबळजनक घटना

 Dhanora crime news धानोरा- नवीन वर्षाची पार्टी करत असताना संबंधातील भावाभावातच वाद होऊन दारूच्या नशेत कुऱ्हाडीने वार करून ठार केल्यानंतर प्रेतावर तणस टाकुन पेटवून दिले. तसेच रात्रभर प्रेताजवळ जागरही केल्याची खळबळ जनक घटना धानोरा तालुक्यातील खेडी (रांगी) येथे काल शनिवारी ०६ जानेवारी रोजी रात्री ८वाजताच्या सुमारास घडली. मनोहर नत्थु आत्राम (६५) रा. कन्हाळगाव असे मृतकाचे नांव आहे. तर जयदेव कोल्हू हलामी (६०) रा. कन्हाळगाव असे आरोपीचे नांव आहे. 

 

प्राप्त माहितीनुसार दोघेही एकाच गावातील रहिवासी असून दोघेपण जवळच असलेल्या एक किलोमीटर अंतरावरील खेडी येथे आठ ते दहा दिवसापासून विटा बनविण्याचे काम करीत होते. ६ जानेवारीला नवीन वर्षाची पार्टी करू असे दोघाहीमित्रांनी ठरवून सायंकाळच्या सुमारास विटा बनविण्याच्या शेत शिवारात बसले. दोघेही दारू प्राशन केल्यानंतर मृतक मनोहर याने 'तू विटा कमी काढतोस, मी जास्त काढतो' असे जयदेवला बोलण्यास प्रारंभ केला. मित्र या नात्याने चापटी मारत असतांना अचानक जोराने मारले. त्यावेळी राग अनावर झाल्याने जयदेव याने जवळच असलेल्या कुन्हाडीच्या मागील भागाने मनोहर याच्यावर जोरदार प्रहार केला. यामध्ये मनोहर याचा मृत्यू झाला.

तणसीवर प्रेत ठेऊन पेटवूनही दिले

 मनोहर याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येताच जयदेव याची धुंदी उतरली. आता नेमके काय करायचे या विचारात असतांना त्याने झोपडीत असलेल्या तणसीवर मनोहर याचे प्रेत ठेऊन त्यावर ब्लॅकेट टाकले व पेटवून दिले. यामध्ये राहण्यासाठी बांधलेली झोपडी सुद्धा पेटली. दरम्यान आरोपी जयदेव रात्रभर तिथेच बसून राहिला. हा सर्व प्रकार आज सकाळी माहीत झाल्यानंतर पोलिस पाटलांनी धानोरा पोलिस ठाण्यात फोन करून सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयित आरोपी म्हणून जयदेव हलामी याला ताब्यात घेतले. पोलिसांकडून अधिक तपास केला असता त्याने पोलिसासमोर गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास धानोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशावरून धानोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 7, 2024

PostImage

भगिनींनो अन्यायाचा प्रतिकार करायला शिका - दलीतमित्र प्रा. डी.के. मेश्राम


 

चौगान: क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याईने आज महिलांची प्रगती झाली आपल्या ज्ञानामुळे तुम्ही सर्वच क्षेत्रात भरारी घेतली तुम्ही सक्षम झालात तेव्हा भगिनींनो आता देशातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध लढायला शिका अन्यायाचा प्रतिकार करायला शिका असे दलीत मित्र प्राचार्य डी. के. मेश्राम यांनी महिलांना आवाहन केले.

 

रमाई महिला मंडळ तथा बौध्द समाज चौगान द्वारा आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सव सोहळ्याच्या निमित्याने बौद्ध भीम गीते सांस्कृतीक कार्यक्रमाच्या उद्धघाटन प्रसंगी प्रा. डी. के. मेश्राम बोलत होते. ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष खेमराजभाऊ तिडके यांचा अध्यक्ष ते खाली जिल्हा परिषद चंद्रपूर चे माझी समाज कल्याण सभापती प्राचार्य डॉ. राजेश भाऊ कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सह उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद भाऊ मोटघरे आणि उपाध्यक्ष विजुभाऊ भागडकर उद्योजक मुंबई, ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सुनीता ताई तिडके मॅडम, रंजुबाई मेश्राम, व प्रमुख अतिथी म्हणून कृ. उ. बा. समिती चे संचालक किशोर राऊत हिरालाल बन्सोड सर, सुनील लिंगायत धनराज राहाटे आतिश बनसोड राजेंद्र गुनसेट्टीवर तसेच सरपंच उमेशभाऊ धोटे, अखीलभाऊ कांबळे, अरूनभाऊ गेडाम, राकेश लिंगायत सुविधा ताई मेश्राम मिनक्षिताई शिवणकर, पंकजभाऊ तिडके, दिवाकरजी मातेरे, किशोरभाऊ तिडके, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते प्रा. डॉ. कांबळे सर यांनी सांगितले की अजूनही सावित्री बाई फुले या घरा घरात पोहचल्या नाही त्या एका विशिष्ट समाजाच्या नसून देशातील समग्र महिलांच्या मार्गदर्शिका आहेत. त्यांच्याच पुण्याईने आज महिला ताठ मानेने जगत आहेत परंतु त्या काळातील सावित्रीबाई ची शाळा अजूनही उपेक्षित आहे. पुण्यातील जनतेला त्याची शाळा कुठ आहे हे अजूनही माहीत नसल्याची खंत कांबळे सरांनी व्यक्त केली. सुनीता ताई तिडके मॅडम नी सावित्री बाई चा इतिहास सांगितला धोटे सरपंच यांनी सुद्धा आपले विचार मांडले प्रमोद मोटघरे यांनी सुद्धा सावित्री बाई विषयी माहिती दिली आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष खमराज भाऊ तिडके यांनी विस्तृत मार्गदर्शनातून क्रांती सूर्य ज्योतीबांनी सावित्री बाई फुलेंना कसे सक्षम बनविले आणि त्यांनी त्या अत्यंत कठीण परिस्थितीत महीलांना कसे साक्षर केले या विषयी उदरणा सहित पठऊन दिले. सावित्री बाई फुलेंचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन तसे महिलांनी आचरान करावे असे अध्यक्ष भाषणातून आपले विचार व्यक्त केले.

 

रात्रौ बुद्ध भीम गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले बौध्द समाजाचे सहकार्य मिळाले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 6, 2024

PostImage

ARMORI news: आरमोरी तालुक्यातील मेंढा (वडेगाव) येथे दुचाकीवरून शेतात गेलेला शेतकरी मृतावस्थेत आढळला


वैरागड : आरमोरी तालुक्यातील मेंढा (वडेगाव) येथे दुचाकीवरून शेतात गेलेला शेतकरी मृतावस्थेत आढळून आला. ही घटना ४ जानेवारीला उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे.

 

🟪 *ED news : छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी

👇👇👇👇👇👇👇

https://mykhabar24.com/post/superfastbatmi/MK24post2479

ज्ञानेश्वर किसन शेंडे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ३ जानेवारीला ते दुचाकीवरून शेतात गेले होते. मात्र, सायंकाळी घरी परतलेच नाही. सर्वत्र शोधाशोध घेऊनही ते आढळले नाही. ४ जानेवारीला शेतात काही महिला गुरे चारण्यासाठी गेल्या असता त्यांना ज्ञानेश्वर शेंडे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी गावातील नागरिक गोळा झाले. पोलिस पाटलांनी धानोरा पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून सूचना दिली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला, धानोरा पोलिस तपास करीत आहेत.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 6, 2024

PostImage

ED news : छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या समर्थकांनी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यात दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. शिधावाटप (रेशन) घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील शाहजहान यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी अधिकारी आले होते. ईडीचे अधिकारी सकाळी संदेशखळी भागातील शेख यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा मोठ्या संख्येने तृणमूलच्या समर्थकांनी त्यांना घेराव घातला, अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्यासाठी अनेक वेळा शेख यांना बोलावले. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शेख यांच्या समर्थकांनी हल्ला केला. हल्ल्यात किमान दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

 

शेतकयांच्या खात्यात अवघे ४५० रुपये, तरी ईडीने पाठवली नोटीस

 

 

तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना खात्यात अवघे ४५० रुपये असताना ईडीची नोटीस मिळाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गदारोळ उडाला.

त्यानंतर ईडीने हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ जुलै २०२३ रोजी त्यांना नोटीस जारी करण्यात आली होती.

आम्ही तामिळनाडू वन विभागाने १२ जुलै २०२१ रोजी पाठवलेल्या पत्राच्या आधारे कन्नय्यान आणि कृष्णन यांच्या विरोधात मनी लॉड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. वन विभागाचा खटला दोन रानटी म्हशीच्या हत्येशी संबंधित होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 6, 2024

PostImage

Helth news: ब्रम्हपुरी येथे छाती रोग शिबिर आयोजित


छाती, रोग स्वसन व फुफुसा समस्या तपासणी व समुपदेशन मोफत शिबिर ब्रम्हपुरी सहिष्णू फाऊंडेशन ब्रम्हपुरी तर्फे स्व, डॉ. वासुदेवराव भांडारकर रोग निदान व समुपदेशन केंद्र

 

ठिकाण :- भेदे कॉम्प्लेक्स (नागभिड रोड) ब्रम्हपुरी येथे छाती रोग शिबिर आयोजित घेण्यात येत आहे.

 

दिनाक :- 7/01/2024 रविवार ला 1 ते 3 वाजे पर्यंत

 

डॉ. विक्रम राठी MBBS. MD. DNB. Chest Physician (नागपूर) यांच्या तर्फे शिबिर घेण्यात येत आहे.

 

छाती रोग, छातीचे आजार टीबी, छातीतड दुखणे, अस्थमा, दमा, सर्दी, एलर्जी, खराटे, निमोनिया, निद्रारोग, लंग कॅन्सर, कोरोना मूळे झालेला आजार या संबंधीत समस्या / तक्रारी असेल अशा रुग्णानी या शिबिराचा लाभ घ्यावा.

 

कृपया :- अधिक माहितीसाठी व शिबिरामध्ये सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या फोन न संपर्क साधावा 7768861116/9422135812

 

फक्त फोन करून नोंदणी केलेल्या रुग्णाना या शिबिराचा लाभ घेता येईल. तसेच आधीच्या असलेले रिपोर्ट किवा तपासणी पेपर / फाइल सोबत घेऊन यावे.

 

टीप :- या शिबिराची नोंदणी फी 50 / रु राहील.

 

आयोजक :- सहिष्णु फाउंडेशन भेडे कॉम्प्लेक्स ब्रम्हपुरी मोब. न. ९४२२१३५८१२


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

Gadchiroli forest news : पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक


Gadchiroli forest news: गडचिरोली: आलापल्ली वनविभाग अंतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकार्याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामावरील पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि दंड कमी करण्यासाठी त्याने १० लाख रुपयांची मागणी केली होती. प्रमोद आनंदराव जेनेकर असं लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (४ जानेवारी) रोजी रात्रीच्या सुमारास केली.तक्रारदार रस्त्याचे काम करतो. तुमरगुंडा ते कासमपल्लीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. त्या कामावर सुरू असलेले काही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी पकडली होती. ती वाहने सोडण्यासाठी व आकारलेले ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल १० लाखांची मागणी केली होती. तडजोड अंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या अनुषंगाने सापडा रचण्यात आला असता, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी ५ लाख रुपयांचा लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाचखोर प्रमोद आनंदराव जेनेकर यांच्या शासकीय निवासस्थानी झळती घेतले असता ८५ हजार रुपये रोख रक्कमही मिळाले.

 

सदर कारवाई पेरमीली येथे करण्यात आली असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणकीकर अँटी करप्शन ब्युरो नागपूर, सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सुनील पेद्दीवार, किशोर जंजारकर, संदीप घोरमोडे, संदीप उडान, नरेश कस्तुरवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

Aayukshaman yojna: आयुष्मान कार्डद्वारे कोणत्या दवाखान्यात आणि किती रक्कमेपर्यंत केले जातात उपचार? असे जाणून घ्या


Aayukshaman : प्रत्येकाला उपचार मिळणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. या योजनेंतर्गत देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना, कर्करोग, मूत्रपिंड, हृदय, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि हिप प्रत्यारोपण, वंध्यत्व, मोतीबिंदू आणि इतर ओळखल्या जाणाऱ्या गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. 

 

 आता कोणते हॉस्पिटल मोफत उपचार देते, हे कसे शोधालं?

● आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम https://shorturl.at/aiuV5 या लिंक वर क्लिक करा. 

● यानंतर, तुम्हाला तुमचा रोग, मोबाइल नंबर, तुम्ही कोणत्या भागात राहता यासारखे तपशील येथे भरावे लागतील. 

● यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल, जिथे रुग्णालयांची नावे आणि पत्ते दिले जातील.

 

 _जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर यासाठी तुम्ही तुमच्या घरातील जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊ शकता._ 

 ही आहे प्रक्रिया

● या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, त्याच्या अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर लॉग इन करा.

● तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा एंटर करा.

● तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो येथे टाका.

● तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. 

● यानंतर तुम्ही राज्य निवडा.

● नंतर नाव, मोबाईल नंबर, रेशन कार्ड आणि इतर तपशील भरा.

● तुम्ही उजव्या बाजूला फॅमिली मेंबर टॅब करा आणि सर्व लाभार्थ्यांची नावे जोडा.

 त्यानंतर सरकार तुम्हाला आयुष्मान कार्ड देईल. यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून नंतर कोणत्याही सरकारी रुग्णालयात वापरू शकता.

 

 *आयुष्मान भारत योजनेचे वैशिष्ट्ये* 

▪️PM-JAY कार्यक्रम, जगातील सर्वात व्यापक आरोग्य विमा/आश्वासन कार्यक्रम, संपूर्णपणे सरकारद्वारे निधी दिला जातो.

▪️PM-JAY लाभार्थींना आरोग्यसेवा सेवांसाठी कॅशलेस प्रवेश देते.

▪️दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीचा तीन दिवसांचा खर्च आणि दवाखान्यानंतरचा पंधरा दिवसांचा खर्च, औषध आणि निदान या दोन्हींचा समावेश आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

Maharashtra news : ते' सरकारी कर्मचारी खूश; जुन्या पेन्शनचा मिळणार लाभ; सरकारचा मोठा निर्णय


Maharashtra news महाराष्ट्र : जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यानुसार, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

 

सन २००५ पासून राज्यात नवी पेन्शन योजना लागू झाली. त्यामुळे २००५ नंतर शासकीय सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढला होता.

 

लाभासाठी द्यावा लागणार पर्याय

या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुना निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून ६ महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे. जे राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी या ६ महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना नवी पेन्शन योजना लागू राहील. तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहणार आहे.

 

...या असतील अटी

- जुनी निवृत्तीवेतन व अनुषांगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.

- हा कर्मचारी पात्र ठरल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत द्यावे.

- तसेच संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन पेन्शन योजनेचे खाते तत्काळ बंद केले जाईल.

- त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल आणि

सदर खात्यात नवीन पेन्शनच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल.

 

केवळ ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांनाच लाभ

शासकीय सेवेतील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होती. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा राज्यातील केवळ ४ ते ५ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना होणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

Chimur bhisi news : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


Chimur bhisi news चिमूर:  भिसी येथील वसंता विजय लोहकरे ( ३५) या शेतकऱ्यांने खाजगी बँक वा सावकारांकडून शेती च्या खर्चाकरिता लाखो रूपयाचे कर्ज घेतले होते. मात्र यावर्षी अतीवृष्टी व पिकांवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पन्न कमी व खर्च मोठ्या प्रमाणात झाल्याने मृतक शेतकरी चिंतेत होता. यामुळे वसंता विजय लोहकरे याने मागील आठवड्यात बुधवार ला सायंकाळी ५ वाजताचे सुमारास भिसी शहरालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यातविषारी औषध प्राशन केले होते. 

 

त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याचेवर पहिल्यांदा भिसी, उमरेड व नंतर नागपुर येथे वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र सोमवार च्या पहाटे वसंता लोहकरे विजय याची उपचारादरम्यान पाण ज्योत मालविली. मृतकाचे पश्चात आई- वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास भिसी चे ठाणेदार पकाश राऊत यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

तुटलेली काच जुळणार आपोआप


 

 

टोकियो. तुटलेल्या काचेचे तुकडे एकमेकांवर ठेवून केवळ दाबले तरी ते एकमेकांशी जुळतील, अशी काच जपानमधील र संशोधकांनी तयार केली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या , काचेमुळे सामान्य काचेचे आयुष्य तीनपट वाढेल, असा दावा न शास्त्रज्ञांनी केला आहे. टोकियो युनिव्हर्सिटीतील यू र यानागिसावा या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारची काच तयार र करण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे ओल्या न पृष्ठभागाला जोडणाऱ्या डिंकाचे संशोधन करताना ने अनपेक्षितपणे त्यांना ही पद्धत सापडली. यानागिसावा यांनी . त्यांच्या प्रयोगशाळेत एका काचेचे दोन तुकडे केले. त्यानंतर र त्यांनी दोन्ही तुकड्यांच्या तुटलेल्या बाजू एकमेकांवर ठेवून सुमारे 30 सेकंद दाबून ठेवले. तेव्हा हे तुकडे असे जुळले, की जणू ते कधी तुटलेच नव्हते. पॉलिथर थुयोरियस नावाच्या पदार्थापासून ही काच बनलेली असून ती खनिज काचेच्या तुलनेत अॅक्रिलिक काचेसारखी असते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

Tiger attack: झाडावर चढताना वाघाचा हल्ला


 

मुलचेरा : तालुक्यातील कोठारी  वाघाला पाहून एका गुराख्याने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, पण तरीही वाघाने गाठले व हल्ला केला. त्यानंतर गुराखी ओरडल्याने वाघाने धूम ठोकली. ३ जानेवारीला हा थरार घडला.

 

प्रवीण संन्याशी कडते (२७, रा. कोठारी) असे जखमीचे नाव आहे. शेळ्या चारण्यासाठी ते ३ जानेवारीला मार्कंडा (क.) वनपरिक्षेत्रात इतर काही गुराख्यांसमवेत गेले होते. दुपारी साडेचार वाजता अचानक वाघ दिसल्याने जीव वाचविण्यासाठी त्यांनी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, पण याचवेळी वाघाने प्रवीण यांच्यावर हल्ला चढवित जखमी केले. त्यांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. मात्र, यात ते गंभीररीत्या जखमी झाले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

Ram mandir: रामनामातून मतदारांना साद, प्रत्येक आमदाराला 'टार्गेट अयोध्या'; 5 हजार भाविकांना दर्शन


 

 अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरू असताना भाजपकडून वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोहळ्यानंतर रामनामातून मतदारांपर्यंत पोहोचत जनसंपर्क करण्याचे भाजपकडून नियोजन करण्यात आले आहे.

 

प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून कमीत कमी पाच हजार नागरिकांना अयोध्या मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आले आहेत.

 

नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी याबाबत सर्व आमदारांना माहिती दिली. अयोध्येतील राममंदिरासाठी विहिंप, संघासोबत भाजप नेत्यांनी देशभरात वातावरणनिर्मिती केली होती. या मुद्यावरून देशाच्या राजकारणाचे चित्रदेखील बदलले आणि सत्तेवर येण्यात भाजपला बराच फायदादेखील झाला. आता इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर राममंदिर साकारत असताना भाजपने देशपातळीवर त्या निमित्ताने वातावरण निर्मितीचे नियोजन केले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यात भाजपने हा पुढाकार घेतला आहे.

 

या अंतर्गत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पुढील काही महिन्यांत प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातील ५ हजार नागरिक अयोध्येला नेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकदा यादी तयार झाली की टप्प्याटप्प्याने नागरिकांना अयोध्येत पाठविण्यात येईल. अयोध्येत पक्षाकडून निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात नेणे इत्यादी बाबींची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल व काही महिने त्यांचा तेथेच मुक्काम असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही पदाधिकाऱ्यांनी अयोध्येत जाऊन एकूण व्यवस्थेचे नियोजनदेखील केले असून देशपातळीवरील मोहिमेचाच हा एक भाग असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

रेल्वेगाड्याच बुक करणार

 

राज्यातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेण्यात येणार आहे. विविध टप्प्यात हा प्रवास होईल. एकाच मार्गावरील मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्याच बुक करण्यात येणार आहेत. या गाड्यांना 'रामलल्ला दर्शन विशेष ट्रेन' असेच नाव देण्यात येणार आहे. नागरिकांचे रेल्वेगाड्यांत आरक्षण करता यावे यासाठी याद्या तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

खासदारांना २० हजारांचे लक्ष्य

आमदारांसोबतच भाजपने राज्यातील सर्व खासदारांनादेखील विशिष्ट लक्ष्य दिले आहे. त्यांना २० हजार नागरिकांना दर्शन करावयाचे आहे. यासोबतच जेथे भाजपचे आमदार, खासदार नाहीत तेथे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक प्रमुख अथवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

उसतोड मजुरांसाठी खूशखबर! उसतोडणी दरात ३४ टक्के वाढ


 

उसतोड कामगारांच्या तोडणी दरामध्ये वाढ करावी आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी उसतोड संघटना आणि कामगारांचे मागील अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू होते.

 

साखर महासंघ, सरकारी प्रतिनिधी आणि आंदोलकांच्या आजच्या बैठकीनंतर या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे.

 

दरम्यान, उसतोडणीसाठी उसतोड मजुरांना प्रतिटन २३८ रूपये मिळत होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून या दराच्या ३४ टक्के रक्कम वाढीव मिळणार आहे. त्याचबरोबर मुकदमांच्या कमिशनमध्ये १ टक्क्यानी वाढ करण्यात आली असून ते आता २० टक्के करण्यात आले आहे. या निर्णयामुळे उसतोड मजुरांना फायदा होणार असून आंदोलकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

 

उसतोड दरामध्ये ६० टक्के वाढ करण्यात यावी आणि मुकादमांचे कमिशन १९ टक्क्यावरून २५ टक्के करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली होती पण साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दांडेगावकर, शरद पवार, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील यांच्या बैठकीमध्ये अखेर तोडगा निघाला.

 

आंदोलक आणि साखर महासंघाच्या या प्रश्नात शरद पवार यांनी मध्यस्थी केली. ही दरवाढ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार असून कामगारांना त्याचे वाढीव पैसे मिळणार आहे. उसतोड मजुरांसाठी ही महत्त्वाची बाब असून वर्षाची सुरूवात त्यांच्यासाठी चांगली झाली आहे.

 

येणाऱ्या तीन वर्षांसाठी असतील हे दर

 

हा करार या वर्षीची हंगाम आणि येणाऱ्या दोन गळीत हंगामासाठी असणार आहे. त्यामुळे मजुरांना यंदाच्या गळीत हंगामाचे सुरूवातीपासून वाढीव दराने पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर साखर संघाकडून मुकादमांकडे किंवा कामगारांकडे राहणारे पैसे पोलिसांच्या कचाट्यात न सापडता द्यावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संघाने केलेल्या सूचना संघटनाने मान्य केला असून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 5, 2024

PostImage

Vitamin D : हिवाळ्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्याने व्हिटामिन डी साठी 6 गोष्टींचे करा सेवन


 

 हिवाळ्यात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात बदलत्या हवामानामुळे अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. उन्हाळ्यात उन्ह कमी पडत असल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता भासू शकते.

 

व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरण आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांना दिवसभर सूर्यप्रकाश मिळत नाही. अशा स्थितीत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा विशेषतः हाडांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत ही कमतरता भरून काढण्यासाठी काही पदार्थांना आहाराचा भाग बनवू शकता.

 

मशरूम

 

मशरूममधून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते. मशरुममुळे शरीराला व्हिटॅमिन डी 2 आणि व्हिटॅमिन डी 3 चांगल्या प्रमाणात मिळते. मशरूम सलाड, सँडविच आणि भाज्यांमध्ये घालूनही खाऊ शकता.

 

अंडी

 

संपूर्ण अंडे खालले तर त्यातून ही शरीराला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळते. व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, अंड्यांमध्ये निरोगी चरबी, प्रथिने आणि अमीनो अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात.

 

चीज

 

चीजमध्ये देखील तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते. चीजमध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. रोज काही प्रमाणात चीज खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळते.

 

सोया मिल्क

 

सोया दूध हा व्हिटॅमिन डीचा वनस्पती-आधारित स्त्रोत आहे. यातून शरीराला केवळ व्हिटॅमिन डीच नाही तर लोह, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रोटीनही मिळते. सोया दुधाशिवाय साध्या दुधातही काही प्रमाणात व्हिटॅमिन डी असते.

 

मासे

 

ट्यूना आणि सॅल्मन हे असे मासे आहेत जे शरीराला व्हिटॅमिन डी पुरवतात. या माशांना आहाराचा भाग बनवणे सोपे आहे आणि ते शरीराला व्हिटॅमिन डी तसेच ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वे प्रदान करतात.

 

व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड अन्न

 

व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड खरेदी करता येणारे अनेक खाद्यपदार्थ आहेत. व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड दूध, तृणधान्ये, रस आणि दलिया इत्यादी बाजारातून खरेदी करता येतात. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 3, 2024

PostImage

GAdchiroli news: कर्जाला कंटाळून कृउबास संचालकाची आत्महत्या


 

गडचिरोली : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे पोर्ला येथील संचालक मुकरू रावजी लाडवे (५५) यांनी सोमवारी दुपारी १ वाजता शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. यावर्षी शेतीतूनही फारसे उत्पादन झाले नाही. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते, अशी माहितीत्यांच्या नातेवाईकांनी दिली.

अजय चापले यांच्या शेतशिवारात विहीर आहे. लाडवे यांनी या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, ही पोलिसांना बाब आली. पोलिसांनी कळविण्यात घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. लाडवे यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा आप्त परिवार आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 3, 2024

PostImage

Nagpur news: दारूसाठी पैशांचा तगादा; संतप्त पत्नीने दगडाने ठेचून केली पतीची हत्या


 

नागपूरः दारू पिण्यासाठी पैशाच्या तगादा लावण्याच्या वादातून संतप्त पत्नीने दगडाने डोके ठेचून पतीची हत्या केली. ही थरारक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवंढी येथे उघडकीस आली. आनंद भदुजी पाटील (४५) असे मृतकाचे नाव आहे. अरुणा पाटील असे मारेकरी पत्नीचे नाव आहे. आनंद हा श्रमिक होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदला दारूचे व्यसन असल्याने ते भागविण्यासाठी तो पत्नीकडे नेहमी पैसे मागायचा.

 शनिवारी रात्रीही त्याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने आनंद हा झोपला. सतत वाद घालत असल्याने अरुणा संतापल्या. आनंद झोपेत असतानाच त्यांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला. रात्रभर त्या मृतदेहासोबत राहिल्या. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अरुणा यांनी घराला कुलूप लावले. थेट नवीन कामठी पोलीस ठाणे गाठले. पतीची हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांमध्ये काही काळ खळबळ उडाली. लगेच पोलिसांचा ताफा आवंढी येथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अरुणा यांना ताब्यात घेतले आहे. अरुणा यांना मयूर नावाचा मुलगा आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 3, 2024

PostImage

Gadchiroli accident news: दुचाकीस्वार जावयासह सह सासरा गंभीर जखमी


आष्टी - चामोर्शी मार्गावरील उमरी जवळ - दुचाकीची पुलाच्या लोखंडी कठडचाला जबर धडक

 

आष्टी - चामोर्शी तालुक्यातील आष्टी - चामोर्शी - मार्गावरील उमरी जवळील पुलाच्या लोखंडी कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली. यात दुचाकीस्वार जावयासह सासरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक २जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

 

संदिप तुळशीराम पोटे (४२) रा. मुरखळा ता. चामोर्शी, परशूराम बालाजी ठाकूर (६५) रा बल्लू ता. चामोर्शी अशी गंभीर जखमीची नावे आहेत. 

 

प्राप्त माहितीनुसार मुरखळा येथीलसंदीप पोटे हा आपले सासरे परशूराम ठाकूर यांना घेऊन दुचाकी क्रमांक MH 33 AB 0655 ने तेलंगणातील शीरपुर येथे शेतीची कीटकनाशके खरेदी करण्यासाठी गेले होते. तिथून गावाकडे परत जात असताना आष्टी-चामोर्शी मार्गावरील उमरी जवळील पुलाच्या लोखंडी कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली.

ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीस्वार जावई संदिप पोटे याचा एका पायाचा अर्धा तुकडाच पडला तर सासरे परशूराम ठाकूर यांचा एक पाय चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे, उपनिरिक्षक गणेश जंगले हे पोलिस पथकासह घटना स्थळी दाखल झाले व जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर दोन्हीं जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 3, 2024

PostImage

Dhanora news: जावयाच्या अंत्यविधीला आलेल्या सासऱ्याचा मृतदेहच आढळला


 

जेवलवाहीची घटना : गमछाने गळा आवळून खून केल्याचा संशय

धानोरा : जावयाच्या अंत्यविधीला आलेला सासरा अचानक बेपत्ता झाला, चार दिवसांनी गावालगत त्याचा मृतदेह आढळून आला. २ जानेवारीला तालुक्यातील जेवलवाही येथे ही घटना उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सासऱ्याच्या गळ्याभोवती गमछा गुंडाळलेला आढळला, त्यामुळे गळा आवळून हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

 

जनू घिसू पोरेट्टी (८४, रा. परसवाडी, ता. धानोरा), असे मयताचे नाव आहे. जनू पोरेट्टी यांना निर्मला कल्लो ही एकुलती एक मुलगी असून, ती जेवलवाही येथे राहते. जनू हे पुतण्याकडे गावी असायचे. २७ डिसेंबरला जनू पोरेट्टी यांचे जावई साहू कल्लो यांचे आजारपणामुळे निधन झाले.

 

जावयाचे निधन झाल्याचे कळल्यावर जनू पोरेट्टी हे नातेवाइकांसोबत जेवलवाहीला पोहोचले. २८ डिसेंबर रोजी अंत्यविधी होण्यापूर्वीच जनू पोरेट्टी गायब झाले.

 

अंत्यविधी उरकल्यावर त्यांचा शोध घेतला असता ते कोठेही मिळून आले नाहीत. परसवाडी ते जेवलवाही हे १७ किलोमीटर अंतर आहे त्यामुळे नातेवाइकांनी येरकड पोलिस मदत केंद्र ठाण गाठून ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, २ जानेवारी रोजी जेवलवाही गावापासून जवळच एका शेतालगत त्यांचा मृतदेह शेतीकाम करण्यासाठी गेलेल्या मजुरांनाआढळून आला.

 त्यांच्या गळ्यातील गमछा गळ्याला गुंडाळलेला असल्याचे निदर्शनास आले. येरकड मदत केंद्रातील पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धानोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यांचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज आहे.  या घटनेने खळबळ उडाली असून तपास पोलिस करीत आहेत.

लेकीवर दुहेरी आघात

दरम्यान, जनू पोरेट्टी यांची मुलगी निर्मला कल्लो हिच्यावर या घटनेने दुहेरी आघात झाला आहे. पतीच्या निधनाने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच बेपत्ता वडिलांचा मृतदेह आढळून आला. चार दिवसांच्या फरकाने पतीपाठोपाठ वडीलही गेल्याची बातमी कळल्यावर तिने एकच आक्रोश केला.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 3, 2024

PostImage

Kurkheda news: हत्ती मृत्यू प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी


 

गडचिरोली : . कुरखेडा तालुक्यातील वाढोणा येथील शेतशिवारात विजेच्या धक्क्याने रविवारला एका मादी हत्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी वनविभागाने शेतकरी रघुनाथ कृष्णा नारनवरे याला अटक केली होती. सोमवारला त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कुरखेडा तालुक्यातील शिरपूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाढोणा येथील शेतकरी रघुनाथ नारनवरे याने वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता कुंपणाला वीज प्रवाह जोडला होता. दरम्यान, रविवारला हत्तींच्या कळपातील एक मादी हत्ती कुंपणाजवळ जाताच तिला विजेचा जोरदार धक्का लागल्याने मादी हत्ती जागीच गतप्राण झाली. घटनेची माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळ गाठून चौकशीसाठी शेतकरी रघुनाथ नारनवरे याला ताब्यात घेतले. सोमवारला त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.तपास वनाधिकारी करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 3, 2024

PostImage

Armori news वनाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार.. उडाली एकच खळबळ


 

शंकरनगरातील घटनेने संताप : मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

 

गडचिरोली : आरमोरी वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा उपद्रव सुरू असून शंकरनगरात वृद्धेचा बळी गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वनाधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी १ जानेवारीला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

आरमोरीत गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा धुमाकूळसुरू आहे. पळसगाव, पाथरगोटात धुडगूस घातल्यानंतर हत्तींचा मोर्चा शंकरनगराकडे वळला, घरावर चाल करून आलेल्या हत्तींपासून जीव वाचावा म्हणून धावत सुटलेल्या कौशल्या राधाकांत मंडल या वृद्धेला गाठून हत्तींनी चिरडले. वनविभागाकडून हत्तींबाबत पूर्वकल्पना दिली जात नाही.

ठोस उपाय होत नाहीत, त्यामुळे हल्ल्यांचे सत्र सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवाणी यांनी आरमोरी ठाण्यात लेखी तक्रार देऊन कौशल्या मंडल यांच्या मृत्यूला जबाबदार धरून वनाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल मुखरू किनेकार व वनरक्षक बळीराम आतकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 3, 2024

PostImage

Hit and run case: ट्रकचालकांचा संप अखेर मागे .....


 

 मुंबई : हिट ॲण्ड रन कायद्यातील तरतुदी अद्याप लागू झालेल्या नाहीत. त्या लागू करण्यापूर्वी वाहतूकदारांच्या संघटनांशी चर्चा करू, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याने गेले दोन दिवस सुरू असलेला संप मालवाह मालवाहतूकदारांनी मंगळवारी रात्री मागे घेतला. याबाबत वाहनचालकांना कळविण्यात आले असून, त्यांनी लवकरात लवकर वाहने चालविण्यास सुरुवात करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठाही सुरळीत व्हावा, यासाठी टँकरची वाहतूकही तातडीने सुरू करण्यात येईल, असे मोटार ट्रान्सपोर्ट  काँग्रेसच्या प्रतिनिधींनी सांगितले

 

केंद्र सरकारने हिट ॲण्ड रन केसप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाखांच्या दंडाची तरतूद कायद्यात केली आहे. त्याच्याविरोधात सोमवारपासून मालवाहतूकदारांनी देशव्यापी संप सुरू केला होता. केंद्र सरकारतर्फे गृह सचिव अजय भल्ला यांनी मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींना आश्वासन दिल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.

 

संप मागे घेतला असला तरी वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेलभरण्यासाठी वाहनचालक पेट्रोल पंपावर धाव घेत होते. वरळी नाका, चेंबूर, सायन, बोरीवली, अंधेरी, माहीम परिसरात वाहतूककोंडी झाली होती.

 

केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. कायद्यातील तरतुदी लागू करण्यापूर्वी चर्चा केली जाणार आहे. आम्ही सदैव वाहनचालकांसोबत आहोत. चालकांनी आता चिंता करू नये. कामावर परतावे.

- बाल मालकीत सिंग,अध्यक्ष, कोअर कमिटी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस

 

.

वाहनचालकाने चुकून एखाद्या व्यक्त्तीला धडक दिल्यानंतर या अपघाताची माहिती त्याने पोलिसांना दिली, अपघातग्रस्ताला जवळच्या रुग्णालयात नेल्यास नव्या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

 

अपघातानंतर चालकाने पोलिसांना माहिती द्यावी किंवा त्याने आपत्कालीन मदतीसाठी १०८ या क्रमांकावर दूरध्वनी करावा व तपासात संपूर्ण सहकार्य करेल, असे त्यांना सांगावे, असे त्यांनी सांगितले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 2, 2024

PostImage

काय आहे नवा 'हिट अँड रन' कायदा ? - ज्याचा ट्रक आणि बस ड्रायव्हर्स करत आहेत विरोध


   

 

 तुम्हाला माहिती असेल, हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस होता. 

 

 त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

 

 मात्र हा 'हिट अँड रन' कायदा काय आहे ? हे अनेकांना माहिती नाही, दरम्यान या कायद्याविषयी सविस्तर माहिती आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 

 

 *काय आहे 'हिट अँड रन' नवीन कायदा ?*

 

 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी आयपीसी कलम 304A अंतर्गत वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास त्याला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. 

 

 मात्र आता केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. 

 

 यासोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा 

 

 आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली आहे. 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 1, 2024

PostImage

Sanjay Raut news: भाजपाकडून श्रीरामालाच उमेदवारी दिली जाईल


संजय राऊतांचा खोचक टोला

 

मुंबई. (ए). शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आता भाजपा श्रीरामालाच निवडणुकीसाठी उमेदवारी देईल, असे राऊत म्हणाले. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरील चर्चेवर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सांगितले, रामाच्या नावाने इतके राजकारण सुरू आहे की, आता फक्त एकच गोष्टी शिल्लक राहिली आहे ती म्हणजे भाजपा 22 जानेवारीला निवडणुकीत आपला उमेदवार म्हणून श्रीरामाच्या नावाचीच घोषणा करेल.

 

 दरम्यान, उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटन - सोहळ्यासाठी राम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण देण्यात आलेले नाही. हा भाजपाच्या राजकारणाचा भाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच बाबरी मशीद पाडली तेव्हा त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती तर भाजपावाल्यांनी हातवर केले होते, असा आरोपही राऊत सातत्याने भाजपावर करत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 1, 2024

PostImage

अन् मोदी सरकारचा रथ हाकलून दिला.


सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी काढण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सोलापूर जिल्ह्यात दोन गावांतून तीव्र विरोध करून प्रवेश नाकारण्यात आला. बार्शी व करमाळा तालुक्यात हा प्रकार घडला. त्यावेळी गावक-यांचा रोष दिसून आला.

 

बार्शी तालुक्यातील पांढरी गावात विकसित भारत यात्रेचा रथ आला असता तेथे गावकरी एकत्र आले. यावेळी तरूण आणि वयोवृध्द शेतक-यांनी प्रथम मोदी सरकार या नावाच हरकत घेतली. कांदा व इतर पिकांचे दर गडगडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले ? व्यापा-यांचे भले करण्यासाठी शेतक-यांच्या पिकांवर गाढवाचा नांगर फिरविण्यात आला आहे. वाढत्या महागाईत आमचे जागणेच मुश्किल झाले आहे, आशा शब्दांत गावक-यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काहीजणांनी हातात लाकडी दांडके घेऊन विकसित भारत संकल्प रथ गावातून हाकलून दिला.

 

करमाळा तालुक्यातील पुनवर गावातही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ प्रवेश न देता परत पाठविण्यात आला. रथासोबत सरकारी कर्मचा-यांसोबात भाजपचे कार्यकर्ते होते. परंतु गावक-यांनी शेतीमालाच्या घसरलेल्या भावासह वाढलेली महागाई, मोदी सरकारची धोरणे, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रश्नांची सरबत्ती करून विकसित भारत संकल्प रथाला गावात थांबू न देता परत पाठविला. यावेळी संबंधित सरकारी कर्मचारी व भाजप कार्यकर्त्यांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 1, 2024

PostImage

Online payment news: नवीन वर्षात फोन पे, गुगल पे ऑनलाईन पेमेंटमधे बदल


यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ प्रणालीचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला असून, सध्या आपल्या देशात सुमारे ४० कोटी लोक भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, ॲमेझॉन पे यांसारख्या ‘यूपीआय’ अॅपचा वापर करतात.

 

परिणामत: २०२३ या वर्षात १६ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार ‘यूपीआय’द्वारे झाले आहेत. ही प्रणाली आणखी ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ‘एनपीसीआय’ यात काही बदल करीत आहे व त्याची अंमलबजावणी एक जानेवारी २०१४ पासून होणार आहे.

 

‘यूपीआय’मधील बदल

१) आपल्या मोबाईलमधील ‘यूपीआय’ अॅपद्वारे एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत एकही व्यवहार झाला नसेल, तर आपले ‘यूपीआय’ अॅप सुरक्षिततेसाठी निलंबित केले जाईल.

 

२) एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. मात्र, हॉस्पिटल किंवा एखाद्या शैक्षिणिक संस्थेस जास्तीतजास्त पाच लाख रुपये इतके पेमेंट एका दिवसात करता येईल.

 

३) बँक खाते ज्याच्या नावाने असेल तेच नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे आपले वापरात नसलेले सीम कार्ड मोबाईल कंपनीने दुसऱ्या कोणास दिले, तरी त्याचा गैरवापर होणार नाही.

 

४) बँक खातेदाराचे आर्थिक व्यवहार व सिबिल स्कोअर विचारात घेऊन खातेदारास क्रेडिट लाईन देता येऊ शकेल. याचा वापर क्रेडिट कार्डसारखा करता येईल.

 

६) ‘एटीएम’वर क्यूआर कोड स्कॅन करून रोख रक्कम काढता येईल.

 

७) स्मार्टफोनमधील ‘एनएफसी’ (निअर फिल्ड कम्युनिकेशन) क्षमतेचा वापर करून ‘क्यूआर कोड’ स्कॅन न करता एकावेळी ५०० रुपयांपर्यंत परंतु, दिवसभरात चार हजार रुपयांइतके पेमेंट ‘यूपीआय’द्वारे करता येईल. संभाव्य बदल

 

या वर्षभरात ‘यूपीआय’चा वापर करून सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या रकमेचे गैरव्यवहार झाले आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे असे गैरव्यवहार टाळण्याच्या उद्देशाने काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्यांदा

 

एखाद्यास दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देणार असू, तर ती रक्कम हस्तांतर होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागेल. त्यापुढील व्यवहार लगेचच पूर्ण होतील. या बदलाबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. वरील बदलांमुळे ‘यूपीआय’ सुविधा नक्कीच अधिक ग्राहकाभिमुख होईल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

राशीभविष्य : ३१ डिसेंबर, कसा राहील तुमच्यासाठी २०२३ चा शेवटचा दिवस? जाणून घ्या... 


 

 *मेष :* 

मेष राशीसाठी करिअरबाबतीत हा दिवस अतिशय चांगला जाईल. वर्षाचा शेवटचा दिवस तुम्हाला मोठे यश देऊ जाईल. जमीन आणि मालमत्तासंबंधी विषयांत तुम्हाला उत्तम लाभ मिळेल,आणि तुमच्या सन्मानात वृद्धी होईल. तुमच्या संदर्भात विशेष आकर्षण निर्माण होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील. सायंकाळी काही काळासाठी कोणत्यातरी विषयामुळे त्रास होऊ शकतो. उशिरा रात्रीपर्यंत परिस्थिती सामान्य होईल.

 

🦬 *वृषभ :* 

वृषभ राशीला आज नशिबाची साथ असेल, आणि तुमच्या योजना वेळेत पूर्ण होतील. शत्रूपक्षापासून सावध राहा आणि तुमच्या गुप्त बातम्या कोणाला सांगू नका. आज तुम्ही निडर राहाला आणि खुलेपणाने तुमचे निर्णय घ्याल. तुमची कामे आज पूर्ण केली तर तुम्हाला आज लाभ होईल. जोडीदारासोबत आज नातेसंबंध मधुर राहतील आणि धनप्राप्ती होईल. आज प्रवास होईल.

 

👩‍❤️‍👨 *मिथुन :* 

मिथुन राशीने आज कोणतेही नवे काम सुरू करून नये. तुमचे मत काहींना वाईट वाटू शकते. आज कोणत्याही औपचारिकतेत अडकून पडू नका, अन्यथा नुकसान होईल. आज तुमचे अडकलेले पैसे येतील. आज विवेकबुद्धीने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. आज सायंकाळचा वेळ कुटुंबातील व्यक्तींसोबत घालवाल.

 

🦀 *कर्क :* 

कर्क राशीच्या लोकांना आज एखाद्या कारणामुळे त्रासाला तोंड द्यावे लागू शकते, तसेच असहकार्याचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या स्वभावाबद्दल तुम्ही गंभीर राहा, आणि कठोर मेहनतीने कामे यशस्वी करा. आज भौतिक सुखसुविधांवर पैसे खर्च कराल. आज शत्रू त्यांच्या षड़यंत्रात यशस्वी होणार नाही. तुमचा स्वभाव दिलखुलास असल्याने इतर लोक तुमच्याशी चांगल्यापैकी बोलतील. सायंकाळी आध्यात्मिक क्षेत्रातील थोर व्यक्तीची भेट होईल.

 

🦁 *सिंह :* 

सिंह राशीसाठी आजचा दिवस हा लाभाच दिवस असून आज तुमच्या परोपकाराची भावना जागी होईल. लोकांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील, आणि आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचा बराच वेळ धार्मिक बाबीत जाईल. आत्मविश्वासाने केलेले काम यशस्वी होईल आणि तुम्हाला आनंद होईल. जुनी अडलेली कामे थोडा पैसा खर्च करून पूर्ण करता येतील. नवीन योजनांवर आज काम सुरू करू शकता. शत्रू तुमचे यश पाहून हतबल होतील.

 

👧🏻 *कन्या :* 

कन्या राशीला आज आर्थिकबाबतीत लाभ होतील आणि भाग्याता वृद्धी होईल. काही दिवसांपासून एखादा शारीरिक त्रास असेल तर त्यात आज सुधारणा होईल. संततीकडून शुभ बातमी मिळण्याचे संकेत आहेत. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून सर्वप्रकारे मदत मिळेल, त्यातून तुम्हाला आनंद होईल. आज बोलण्यावर संयम ठेवा. स्वतःच्या कार्यकुशलतेने प्रत्यके क्षेत्रात यश मिळवाल.

 

⚖️ *तूळ :* 

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आज शैक्षणिक दिशेत बदल होईल. शिक्षणात तुमची रुची वाढेल. नवीन काम शिकण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मुद्द्यांना खरे सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. आईवडील, गुरुवर्य यांच्याबद्दलची निष्ठा वाढेल. सायंकाळी चोरी होण्याची भीती आहे, त्यामुळे सावध राहा. आज तुमची कामे नीट प्रकारे करा.

 

🦂 *वृश्चिक :* 

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज सावध राहाण्याची गरज आहे, आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची स्थिती आहे. आज मानसन्मानात वृद्धी होईल. आज तुम्ही धैर्य आणि तुमच्या प्रतिभेने शत्रूंवर विजय मिळवाल. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत तुमचे मन प्रसन्न राहील. आज भटकंती आणि मौजमस्तीत वेळ घालवाल.

 

🏹 *धनु:* 

धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे, आज तुमची बुद्धी आणि विद्येता वृद्धी होईल. आज तुम्ही परिश्रमातून प्रत्येक काम यशस्वी कराल. तुमच्या चांगल्या कामामुळे आज सन्मानित व्हाल. तुमचे मन आज धार्मिक कार्यात गुंतलेले असेल. आज सायंकाळचा वेळ धार्मिक विधीत घालवाल आणि तुम्हाला आज धनलाभ होईल. आज शुभकार्यात खर्च होईल आणि तुमची कीर्तीत वाढ होईल.

 

🦐 *मकर :* 

मकर राशीच्या लोकांना आज लाभ होईल आणि तुमचा सन्मान आज वाढेल. तंत्रमंत्र साधनेत तुमची आज रुची वाढेल. अनावश्यक कोणाला सल्ला देऊ नका, त्याचा उलट परिणाम होईल. रात्रीचा वेळ पूर्णकार्यात लावाल त्यामुळे मनप्रसन्न आणि शांत राहील. आज अर्थसंबंधित लाभ होतील.

 

🍯 *कुंभ :* 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून धनवृद्धी होईल. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि तुमचा सन्मान वाढेल. श्रेष्ठ मार्गाने धनप्राप्ती होईल, त्यामुळे धनसंचय होईल. भाग्याच्या बाजूने विचार केला तर आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला मित्रांचे सहकार्य मिळेल आणि नवीन मित्र ही मदतीला येतील. कुटुंबात एखाद्या शुभकार्यामुळे मन प्रसन्न राहील.

 

🦈 *मीन :* 

मीन राशीच्या लोकांसाठी आज नशिब साथ देईल आणि धनवृद्धी होईल. तुमच्या संपत्तीत आज वाढ होईल. आईकडील आजोळचे लोक तुमचा सन्मान करतील. तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला आज पूर्ण सहकार्य मिळणार आहे. नोकरीत गुप्तशत्रू चहाडी करतील, त्यामुळे सायंकाळी थोडा त्रास होईल. तुम्ही तुमच्या गुरूबद्दल आज पूर्ण आस्था ठेवावी. तुमच्या योजना यशस्वी होतील.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Home news: घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! - पॅन-आधार लिंक नसेल तर भरावा लागेल एवढा टॅक्स


 

 

 तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी खरेदी करता तेव्हा तुम्हाला काही टॅक्सही भरावा लागतो. मात्र जर पॅन-आधार लिंक केले नसेल, तर नवीन आयकर नियमांनुसार, तुम्हाला मोठा कर भरावा लागू शकतो. 

 

 अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप पॅन-आधार लिंक केले नसेल, तर घर खरेदी करणे महागात पडू शकते. 

 

🤷‍♀️ *किती टॅक्स भरवा लागणार*

 

✍️ नवीन आयकर नियमांनुसार, तुम्ही ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर १ टक्का टीडीएस भरावा लागेल. यामध्ये खरेदीदाराला १ टक्का टीडीएस केंद्र सरकारला आणि ९९ टक्के रक्कम विक्रेत्याला द्यावी लागते. 

 

🔗 मात्र, जर पॅन-आधार लिंक नसेल तर खरेदीदाराला १ टक्का टीडीएस ऐवजी २० टक्के टीडीएस भरावा लागेल. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून, 

 

📝 मुदत संपल्यानंतर आयकर विभागाने नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. ५० लाखांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात येत आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Kolhapur news: नववर्षाच्या सुरुवातीलाच रेशन दुकानदारांचा देशव्यापी बेमुदत बंद, कोल्हापूर जिल्ह्यातील १६७० दुकानदार सहभागी


 

कोल्हापूर : धान्यावरील कमिशनमध्ये वाढ, स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी साेमवारपासून (१ जानेवारी) रेशन दुकानदारांनी देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे.

 

यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ६७० दुकानदार सहभागी होत असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव व काेल्हापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

ते म्हणाले, दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबाचा खर्च भागत नाही. महागाईचा उच्चांक असताना अनेक वर्षे मागणी करूनही शासनाने कमिशन वाढविलेले नाही. कोरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून दुकानदारांनी नागरिकांपर्यंत धान्य पोहोचविले, काहीजणांचा मृत्यू झाला तरी शासनाला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. पॉस मशीनमध्ये वारंवार बिघाड होऊन दुकानदारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.

 

केरोसीन व्यवसाय बंद केल्याने ५५ हजारांवर व्यावसायिक रस्त्यावर आले. यापैकी कोणत्याही विषयात शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांची दखल घेतली नाही. देशपातळीवर झालेल्या संघटनेच्या निर्णयानुसार सोमवारपासून दुकाने बेमुदत बंद राहतील व १६ जानेवारीला रामलीला मैदान ते संसद भवनपर्यंत जाऊन पंतप्रधानांना निवेदन दिले जाईल.

 

यावेळी दीपक शिराळे, करवीर अध्यक्ष संदीप पाटील, नामदेव गावडे, गजानन हवालदार, राजेश मंडलिक, सुनील दावणे, सुरेश पाटील, नयन पाटील, सागर मेढे, श्रीपती पाटील, संदीप लाटकर,साताप्पा शेणवी उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

संभाजी ब्रिगेर्डसह वंचीतने उधळला मुक्त विद्यापीठातील कलश पूजनाचा कार्यक्रम  


 

अयोध्येतील राममंदिराकडे जाण्यासाठी निघालेल्या मंगल कलशाची पूजा होत असताना त्यासाठी यशवन्तराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित मंगल पूजनाचा कार्यक्रम वंचीत बहुजन आघाडीसह संभाजी ब्रिगेर्डच्या कार्यकर्यांनी उगळून लावला . 

रामाला आमचा विरोध नाही . मात्र विद्यापीठ शासकीय जागा असून त्या ठिकाणी हा कार्यक्रम कसा घेतला जातो याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले . 

नाशिकमध्ये येणाऱ्या या मंगल कलशाचे ठिकठिकाणी स्वागत करण्याचे कार्यक्रम शनिवारी नासिक शहरात आयोजित करण्यात आले होते . त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विंनती केल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यासाठी विद्यापीठाच्यावतीने सगळ्यांना आमंत्रणही पाठविण्यात आले होते . मंगल कलश ठेवल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी कांही अवधी शिल्लक असतानाच दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी येत या कार्यक्रमाला आक्षेप घेतला . त्यानंतर थोड्याच वेळात हा कार्यक्रम आवरण्यात आला . यासंर्भात विद्यापीठाच्यावतीने उशिरापर्यंत कोणतीही भूमिका मांडण्यात आली नव्हती . 

मंगल कलश अक्षदा कार्यक्रम धार्मिक असताना शासकीय जागेत त्याचा कार्यक्रम घेता येणार नाही अशी भूमिका घेत या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही , मात्र त्यासाठी जागा चुकीची आहे . जर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे त्यासाठी जागा नसेल तर आम्ही जागा उपल्ध करून देऊ . अशी भूमिका घेत त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला . त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे , संभाजी ब्रिगेर्डचे संतोष गायधनी यांसह पदाधिकारी उपस्थित होते . 

मुक्त विद्यापीठाची जागा प्रशासकीय आहे . भारतीय राज्यघटनेच्यता सूचनांनुसार अशा ठिकाणी धरणीक कार्यक्रम घेता येत नाही . विद्यापीठाने त्यासाठगी परिपत्रक कसे काढलं? यासंदर्भात तक्रार करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी आम्ही प्रयत्न करणार असून कुलगुरूंना राज्यघटनेची प्रथा देणार आहोत असे चेन गांगुर्डे यांनी सांगितले . 

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Bhandara news: अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ प्रवचनकारांचा मृत्यू चप्राड पहाडीजवळील घटनेमुळे शोककळा


 

लाखांदूर : नातलगाकडील कार्यक्रमआटोपून स्वगावी दुचाकीने परत येणारे ज्येष्ठ प्रवचनकार पांडुरंग इस्तारी राऊत (वय ७०, रा. मेंढा) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील चप्राड पहाडीनजीक हा अपघात घडला.

 

पोलिस सूत्रानुसार, शनिवारी सकाळी पांडुरंग राऊत आपल्या दुचाकीने नातलगाकडे कार्यक्रमासाठी तालुक्यातील किन्ही येथे गेले होते. नातलगाकडील कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास स्वगावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

 

या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात घडल्याचे पाहून अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती या मार्गावरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पांडुरंग यांना उपचारासाठी

 

लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी मृत घोषित केले.

 

या अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल मांदाळे, हवालदार संतोष चव्हाण, अंमलदार ओमकार सपाटे, वाहन चालक जितेंद्र खरकाटे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

 

घटनेतील मृतक पांडुरंग हे धार्मिक वृत्तीचे होते. तालुक्यात अनेक ठिकाणी आयोजित भागवत सप्ताहात पठण आणि प्रवचन करत असल्याने त्यांची महाराज म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती.यांच्या अपघाती निधनाचे वृत्त परिसरात पसरताच मेंढावासीयांसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Buldhana news: स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास बुलढाणा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.


बुलढाणा: स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास बुलढाणा न्यायालयाने आज, शनिवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात फिर्यादी आईसह साक्षीदार असलेले नातलग फितूर झाले असतानाही गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला कठोर शिक्षा मिळाली, हे विशेष.

 

बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग १) आर. एन. मेहेर यांनी आरोपी व फितुरी करणाऱ्यांना जरब बसविणारा हा निकाल दिला. रायपूर (ता. बुलढाणा) येथील रहिवासी गजानन सुखदेव वैदय याने तिच्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मागील १० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री राहत्या घरी ही घटना घडली. यावेळी गजानन याने पीडिता व तिच्या आईला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुरावे गोळा केले. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली. रायपूर पोलिसांनी आरोपी गजानन विरुद्ध भादवी कलम ३२३, ३७६(२)(एफ)(जे), ३७६( ३), ५०६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४,६,८,१०, १२ नुसार गुन्हा दाखल केला.

 

 

 

पीडितेसह नातलग फितूर!

हा खटला सुनावणीसाठी न्यायाधीश मेहेर यांच्या समक्ष आला. खटल्यात सरकारतर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र पीडिता, तिची आई, बहीण, भाऊ, दोन्ही आजी व आरोपीचा भाऊ हे फितूर झाले. त्यांनी सरकार पक्षाला मदत केली नाही. मात्र गुन्हा सिद्ध झाला. जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद करीत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायाधीश आर. एन. मेहेर यांनी नराधम पित्यास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी हवालदार बाबुसिंग बारवाल यांनी खटल्यात सहकार्य केले.

 

फितूर आईला नोटीस

या खटल्यात फिर्यादी आईने फितुरी केली. यामुळे न्यायाधीशानी ‘सीआरपीसी’च्या कलम ३४४ नुसार कारवाई केली असून तिला नोटीस बजावली आहे. तसेच पीडितेला मदतीसाठी निकाल जिल्हा विधि सेवा प्राधिकरण कडे वर्ग केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Wardha news: बलात्कार करणार होता पण आरोपीने काढता पाय घेत धूम ठोकली


वर्धा : गावकुसात पण विविध आमिष देत मुलींना फसविण्याचा प्रकार जोरात आहे. या घटनेत पण असेच झाले. एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परतत होती. बसला उशीर म्हणून तिने गावातून जाणाऱ्या एका दुचाकीस्वार इसमास लिफ्ट मागितली. आरोपी अक्षयने आपुलकी दाखवीत तिला दुचाकीवर स्वार केले. मात्र नंतर त्याची नियत बदलली.

 

 

 

मासोद गावालगत जंगल वाट आहे. या ठिकाणी गाडी थांबवून जबरीने मुलीला खेचत नेले. काय घडणार याचा अंदाज आलेल्या त्या मुलीने आरोपीच्या हाताचा कडकडून चावा घेतला. मात्र पळ काढताना ती पडली अन् आरोपीने डाव साधण्याचा प्रयत्न केला. तिला विवस्त्र केले. आता सुटका नाही याचे भान येताच तिने ओरड सुरू केली. किंकाळ्या ऐकून बाजूच्या शेतातील शेतकरी सतर्क झाले. हातात बॅटरी घेवून त्यांनी शोधाशोध सुरू केली. गावकरी येत असल्याचे पाहून मग आरोपीने काढता पाय घेत धूम ठोकली. हे गंभीर प्रकरण म्हणून मग पोलिसांकडे जाण्याचा निर्णय झाला. पीडित मुलीने खरांगणा पोलिसात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

माझे कार्टे कलेक्टर बनून काय दिवे लावणार आहे?


 

 

      कलेक्टरला खूप अधिकार आहेत.पण ते त्याचा वापर करीत नाहीत.त्यांना रेती माफियांचा राग नाही.जे त्यांचे ऐकत नाहीत,त्यांचा राग आहे.

    डंम्पर पकडले. अंगावर घातले.जिवे मारण्याचा प्रयत्न केला.जप्त केले.गुन्हा दाखल केला.दंड आकारला.दंड माफ केला.ही बातमी टेम्पो,रेपो रेट वाढवण्यासाठी असते.तो कारवाई चा भाग नसतो.तो वसुली चा भाग असतो.त्यासाठी असे अधूनमधून करावे लागते.केले जाते.या कामी पत्रकार,चैनेल मदत करतात.

   तलाठी, तहसीलदार, कलेक्टर ने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील अनेक रेती चोरांवर असे वाङमय निर्माण केले.परिणाम काय? वसुली.अधिकृत कमी आणि अनधिकृत जास्त.

      काही तथाकथित आरटीआय, सामाजिक कार्यकर्ते बिरूद मिरवणारी माणसे सुद्धा रेती, राशन ,दारू, सट्टा,घुटका बाबत तक्रारी करतात.त्यांचेही हेच नियोजन असते.तुम्ही इतके कमवता तर आमचे काय?

    महसूल, पोलिस, आरटीआय मंडळी असे मेवा खाण्याच्या कामाला सेवा म्हणतात.पेपरवाले सुद्धा त्यातून फुलाची पाकळी घेऊन बातमी छापतात.चोर आणि पोलिस चा असा खेळ चालू असतो.सामान्य जनता या खेळाला जास्त मनावर घेत नाहीत.उलट चीड निर्माण झाली आहे.उद्या खोटी बातमी आली.कलेक्टर ला रेती माफिया ने गोळ्या घालून हत्या केली.तर फक्त हितसंबंध असलेले लोक मेणबत्ती पेटवतील.श्रद्धांजली वाहतील.जसे एखादा बलात्कार झाला.तेंव्हा करतात,तसेच.आरोपी पकडला की, पुन्हा दुसऱ्या बलात्काराची वाट पाहातात.कारण बलात्काराची चीड येत नाही.उलट तो पैसा आणि प्रसिद्धीचा विषय बनतो.आतापर्यंत अनेक पोलिस आधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्या.काहींना आप्तेष्टांनी मारले.काहींना गुंडांनी मारले.असिटंट कलेक्टर पेटवून मारले.कोण कोण रडायला गेले?कोणी सुतक पाळले?कोणी श्राद्ध केले?

   नोकर आणि समाजसेवक यांची अशी मानसिकता विकसित झालेली आहे.यात कोण किती लक्ष देतो,हे वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून असते.आपल्यावर असलेल्या संस्कार वर अवलंबून असते.संस्कार म्हणजे टिळा,माळा,शेंडी,जानवे,दाढी नाही.आपली मानसिकता.

      जळगाव शहरातील, जिल्ह्यातील पेपर उघडला कि,रोज गुन्हेगारांचे भले मोठे फोटो छापून येतात.त्यातील आधिकतम भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुन्हेगारी रेकॉर्डवरील आहेत.तरीही फोटो झळकतोच.काहीतरी लागे बांधे, हितसंबंध, प्रेमसंबंध, ऋणानुबंध असेलच.

    जळगाव शहरातील रस्ते उखडलेले आहेत.तरीही त्याच रस्त्यावर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री,सेकंड मंत्री,थर्ड मंत्री, आमदार,खुनी बलात्कारी नगरसेवकाचा फोटो चौकाचौकात लावलेले आहेत.अयोध्येत रावणाचे कट आऊट.महिलांना, मुलांना, मुर्खांना वाटते हाच राम आहे .आपला तारणहार हाच आहे.याचा विपरीत परिणाम बाल बुद्धीवर होतो.पुढे ते सुद्धा हाच मार्ग पत्करतात.याचा अभ्यास अजित पवार यांनी बारकाईने केला होता.म्हणून ते विधानसभेत म्हणाले कि, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?मी म्हणतो,माझा मुलगा तहसीलदार बीडीओ सीईओ कलेक्टर फौजदार,एसपी बनून तरी काय दिवे लावणार आहे?त्याऐवजी मामा आणि भाऊ चा मार्ग काय वाईट?सबसे बडा रूपय्या!

    मी गावाकडील अनुभव सांगतो.माझ्या गावात दरवर्षी एकदा रात्री तमाशा होत असे.आम्ही आवर्जून पाहात असू.त्यातील राजा त्याच्या सिपाई ला खूप रागवत असे.कधीकधी तर चाबकाने वाजवत असे.मला वाटले, आता सिपाई ला राजाचा खूप राग आला असेल.तो सकाळी राजाला बदडणारच.पण पाहातो तर ते दोघे एकच लोटा घेऊन बाहेर गेले.एकच बीडी आळीपाळीने ओढत होते.कारण ते जिवलग मित्र होते.एकच व्यवसाय करून पोट भरत होते.कसला राग आणि कसला संताप?माझ्यासाठी तमाशा होता.त्यांचेसाठी नाटक होते.

 

... शिवराम पाटील

९२७०९६३१२२

महाराष्ट्र जागृत जनमंच

जळगाव


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

भिमा कोरेगांव सलामी १ ला वैनगंगा नदी किनाऱ्यावर...


 

गडचिरोली: शेड्युल कॉस्ट फडरेशन जिल्हा गडचिरोली चे वतीने भिमा कोरेगांव सलामी उत्सव १ जानेवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता वैनगंगा नदीघाट , गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेटयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे हे असुन उदघाटक मेश्राम डायरेक्टर रियलस्टार मार्केटिंग तर स्वागताध्यक्ष रिपाईचे जिल्हाधक्ष गोपाल रायपुरे चंद्रपूर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली , दिप प्रज्वलन लताताई लाकडे नगराध्यक्ष सावली तसेच प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अरुण फेगडे गडचिरोली , माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम , अँड. शांताराम उदिरवाडे , सामाजीक कार्यकर्ते मोहन ठाकरे , राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य रिंकु पापडकर , राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष लिलाधर भरडकर , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडीत मेश्राम , मिलिंद भानारकर , वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू ढेंभुर्णे , जि. के. बारसींगे , सहा. वनपरिक्षेत्र धिकारी जनबंधु , पिएसआय ठाकुरदास मेश्राम , प्रितम साखरे , मुख्याध्यापक निमगडे मारकबोडी , आदिची उपस्थिती लाभणार आहे. रात्रौ ८ वाजता महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका धम्मदिक्षा वाहुळे लातुर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. समता सैनिक दल सावली व गोकुळनगर च्या वतीने विजय स्तंभास सलामी देण्यात येणार असुन हजारोंचा संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन अरुण शेंन्डे , दिलीप गोवर्धन , रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम , एन पी. लाळे , शरद लोणारे , निळकंठ सिडाम , विनोद जांभुळकर , अमोल मेश्राम , चेतन सहारे , संघरत्न निमगडे , सुमित्रा राऊत आदिमी केलेले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Big breking: कुरखेडा तालुक्यातील वाढोना येथील शेतशिवारात करंट लागुन मादा हत्तीचा मृत्यु , उडाली खळबळ


गडचिरोली : जिल्हयात रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश करीत धुमाकुळ माजवला असुन कुरखेडा तालुक्यातील वाढोना येथील शेतशिवारात करंट लागुन मादा हत्तीचा मृत्यु झाल्याची घटना आज रविवार 31 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

 

छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्हयात प्रवेश केलेल्या रानटी हत्तीने धुकाकुळ माजवला आहे. अशातच हत्तीच्या हल्ल्यात वर्षभरात चार जणांचा बळी गेला आहे तसेच शेतक-यांच्या शेतमालाचे व घरांना नुकसान पोहचविले आहे. आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला हत्तीने तुडवुन ठार केल्याची घटना 29 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर हत्तीचा कळप हा कुरखेडा तालुक्यात दाखल झाला होता. दरम्यान तालुक्यातील वाढोणा येथे एका हत्तीचा करंट लागुन मृत्यु झाल्याची घटना रविवार 31 डिसेंबर रोजी उघकीस आली आहे. सदर घटनने वनविभागात खळबळ उडाली असुन वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळावरून विद्युत वायरचा बंडल आढळून आला असून शेतात वीजप्रवाह सोडण्यात आला होता त्यामुळे हत्तीचा मृत्यू झाल्याचे कळते. विजेचा प्रवाह सोडणाऱ्यास ताब्यात घेतले असून कारवाई करण्यात येईल अशी माहीती आहे.

 

घटनास्थळी नागरिकांचा आक्रोश

 

करंट लागुन हत्तीचा मृत्यु झाल्याची माहिती परिसरात पसरतात नागरिकांनी गर्दी केली होती. तर हत्तीनी केलेल्या नुकसानीपासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी परिसरात हत्तीच कळप वावरत असताना वनकर्मचारी भिरकूनही पाहत नसल्याचा आरोप करत वनविभागाप्रती संताप व्यक्त करतांना दिसुन येत होते. नागरिकाचा आक्रोश बघता पोलीसानाच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Ram mandir news : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा बाजारपेठेसाठीही चेतनादायी, देशभरात होणार ५० हजार कोटींची उलाढाल


 

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर निर्माणाधीन असून, तिथे २२ जानेवारीला श्रीरामाच्या बालरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा धार्मिक सोहळा असेल.

 

पुढील महिन्यात शहरवासीय 'दिवाळी' साजरी करण्यासाठी सज्ज झाले असून, हा सोहळा 'कॅश' करण्यासाठी व्यापारीही तयारीला लागले आहेत. २२ दिवसात बाजारपेठेत सुमारे ३०० कोटींची उलाढाल होईल, असा होरा व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

 

अयोध्येतील मंदिराच्या प्रतिकृतीपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आपल्या देवघरात पूजेसाठी भाविक खरेदी करणार आहेत. उत्तर प्रदेशात एमडीएफपासून तयार केलेल्या अयोध्या मंदिराचे थ्री डी मॉडले शहरात विक्रीसाठी आणण्याकरिता अनेक व्यापाऱ्यांनी ऑर्डर दिल्या आहेत. यात ४ इंच, ५.५ इंच, ८ इंच व १२ इंच असे ४ आकारांत श्रीरामाचे मंदिर आहे. याशिवाय जय श्रीरामाचे टी-शर्ट, शर्ट, कुर्ता, टोप्या, फेटे तसेच श्रीरामाचे व मंदिराचे छायाचित्र असलेले ध्वज, पताका, सजावटीचे साहित्य, केशरी फुगे, पणत्या, लाईटिंग, रांगोळी, गुलाल, पूजेचे साहित्य, याशिवाय शोभायात्रेसाठी बँडपथक, डीजे, साऊंड सिस्टिम, एलईडी, अश्वरथापर्यंत सर्वांना मागणी असणार आहे.

 

देशभरात ५० हजार कोटींची उलाढाल

देशभरातील सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना 'कॅट' (कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स)चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, कॅटच्या वतीने देशभरात 'हर शहर अयोध्या; घरघर अयोध्या' अभियान सुरू होईल. १ ते २२ जानेवारीदरम्यान व्यापारी आपली दुकाने श्रीराममय करतील. व्यापारी संघटनांचे पदाधिकारी प्रत्येक दुकानात जाऊन पत्रिका, अक्षता वाटप करणार आहेत. २२ दिवसात संपूर्ण देशात बाजारपेठेत ५० हजार कोटींची उलाढाल होणार आहे.

 

व्यापारी संघटनांची बैठक

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. व्यापारीही अभियान राबविणार असून, अशा धार्मिक सोहळ्याने देशात मोठी उलाढाल होणार आहे. शहरातही ३०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा बूश मिळणार आहे.

- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

PMO कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या विनेश फोगाटला अडवले;दोन्ही पुरस्कार तिथेच ठेऊन परतली!


 

 कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर आता महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे.

 

पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने पुरस्कार घेऊन जात असताना विनेश फोगाटला पोलिसांनी रोखले. त्यानंतर विनेश फोगाटने कर्तव्य मार्गावरील बॅरिकेड्सवर आपला पुरस्कार ठेऊन माघारी परतली.

 

पुरस्कार परत करण्यापूर्वी विनेश फोगट म्हणाली की, हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे, असं मतही व्यक्त केलं. विनेश फोगाट पुरस्कार परत करताना भावूक झाल्याचे देखील दिसून आले.

बजरंग पुनियाने नुकतेच पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्यानंतर आता विनेश फोगाट यांनी दोन पुरस्कार परत केले. २२ डिसेंबर रोजी बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. बजरंग पुनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत असल्याचे बजरंग पुनिया म्हणाला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Daru,helth news: लिव्हर खराब होईपर्यंत दारू कशाला पितो भाऊ?


 

Gadchiroli news : अलीकडच्या काळात बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. प्रामुख्याने मद्यपानामुळे लिव्हर अर्थात यकृत खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अति मद्यप्राशन केल्यामुळे शरीर अनेक रोगांना बळी पडत असल्याचेही दिसून येत आहे. प्रामुख्याने यकृतावर याचा सर्वाधिक परिणाम होतो, तसेच, किडनीवरही मद्य परिणामकारक ठरू शकते. नियमित मद्यपान करणे म्हणजे अकाली मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे मद्य प्राशन करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

 

रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

अलीकडच्या काळात तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. अति मद्यप्राशन केल्यामुळे अनेक आजारांना तरुण बळी पडत आहेत. प्रामुख्याने यकृतावर परिणाम होणे, हृदयविकाराचा धोकाही मद्यपानामुळे वाढू शकतो. अनेक वेळा मद्यपी रस्त्याच्या कडेला दिसून येतात. यामुळे इतरांनाही त्रास सहन करावा लागतो.

अल्कोहोलिक सिरोसिसची लक्षणे अल्कोहोलिक हेपेटायटीससारखीचअसतात, तसेच अल्कोहोलिक सिरोसिसमुळे यकृतामध्ये उच्च रक्तदाब, पोटात द्रव साचणे, रक्तातील विषाचे प्रमाण वाढल्याने मेंदूला नुकसान होणे, संसर्गाचा धोका वाढणे, किडनी निकामी होणे आणि यकृताचा कर्करोग असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

 

यकृत कशामुळे होते खराब?

मद्यप्राशनामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. अनेकजण यकृत खराब होईपर्यंत मद्य प्राशन करतात. त्यामुळे शेवटी शरीर अनेक आजारांना बळी पडलेले असते. अशा परिस्थितीत उपचारासही प्रतिसाद देत नाही.

 

यकृत खराब झाल्याची लक्षणे काय?

पायावर सूज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, आणखी पुढच्या टप्प्यात स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्त्ती नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.

 

अति मद्यप्राशनाने होतात हे आजार

अति मद्यप्राशन केल्यामुळे शरीर अनेक रोगांना बळी पडते. प्रामुख्याने यकृतावर याचा सर्वाधिक परिणाम होतो. तसेच, किडनीवरही मद्य परिणामकारक ठरू शकते. नियमित मद्यपान करणे म्हणजे अकाली मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, मेंदूचे नुकसान सोबतच यकृताच्या आजारासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Helth news: मिठाचे अतिसवेन; रक्तदाब, मधूमेहाला ठरते आमंत्रण


 

अतिसेवनामुळे आजारांचा धोका; नियंत्रण ठेवण्याचा डॉक्टरांचा सल्ला

 

 गडचिरोली . जिभेचे चोचले पुरविण्यासाठी अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तळलेल्या पदार्थांसह फास्ट फुडमध्ये आधीचे मिठाची मात्रा अधिक असते. मात्र अनेकजण वरुन मीठ खाण्याचे शौकीन असतात. आवश्यकतपेक्षा जास्त मिठाचे सेवन रक्तदाब, मधुमेहासोबतच हार्ट अटॅकसारख्या धोक्यांना आमंत्रण देणारे ठरते. म्हणून मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. अलीकडे बहुतांश नागरिक आरोग्याविषयी जागरुक झाले आहेत. मात्र, चटपटीत खाद्यपदार्थ खाण्याची वेळ आली तर अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतीत पदार्थावर ताव मारतात. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी विशेष करुन तळलेले पदार्थ, फास्ट फुड सेवनाचे प्रमाणत अधिक आहे. अशा पदार्थांमध्ये तेलासोबतच मिठाचे प्रमाणही अधिक असते. शिवाय, अनेकांना जेवतांना वरुन मीठ घेण्याची सवय असते. या सवयीमुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू लागते. परिणामी वजन वाढणे, रक्तदाबाची समस्या उद्भवते, त्यामुळे शरीरातीलकोलेस्ट्रॉल वाढून हार्ट अटॅकपॅरालिसीसचा अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. तसेच मधुमेहाचाही धोका नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक मीठ खाण्याची सवय बदलणे गरजेचे आहे, अन्यथा दवाखान्याच्या चकरा मारण्याची वेळ येऊ शकते.

 

दररोज 5 ग्रॅम सोडियमची गरज

मानवी शरीराला इतर घटकांसोबतच सोडियमचीदेखील गरज असते. साधरणतः दिवसाला 5 ते 7 ग्रॅम सोडियमची मानवी शरीराला गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कुठलेही मीट चांगलेच आहे. मात्र ते कसे व किती प्रमाणात सेवन करावे हे महत्वाचे आहे. अधिकचा वापर झाल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रमाणातच मिठ वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

 

अति मीठ, तेल आरोग्यास घातक

विशेषतः मसाल्याच्या भाज्या, लोणचे, फास्ट फुडच्या माध्यमातून मिठाचे अधिक सेवन केले जाते. या पदार्थामध्ये मिठासोबतच तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या दोन्ही पदार्थाचे अधिक सेवन आरोग्यासाठी घातक ठरते. जवळपास 80 टक्के लोक तेलकट व तिखट पदार्थ खातात. तर्रीयुक्त व मसालेदार भाजी बनविण्यावर भर असतो. मात्र अती मिठ व तेल माणसाच्या आरोग्यासाठी काही दिवसांनी धोकादायक ठरतो.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Dhanora accident news: पिकअप वाहन झाडाला धडकले- दोघे जखमी , चालकास डुलकी लागल्याने झाला अपघात


 

धानोरा : चालकास डुलकी लागल्याने पिकअप वाहन झाडाला धडकून चालकासह दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास धानोरा- गडचिरोली मार्गावरील गिरोला नजीक घडली. मात्र जखमींची नावे कळू शकली नाहीत.

 

प्राप्त माहितीनुसार चार चाकी क्रमांक MH 33-T २२०७ नेहमीप्रमाणे किराणा सामान व इतर वस्तू घेऊन धानोराकडे निघाले. नेहमीप्रमाणे ग्राहकांना सर्वसामान देऊन शिल्लक सामानासहित गडचिरोलीकडे जात असताना गिरोला या

 

गावाजवळ वाहन चालक (मालक) यांना डुलकी लागल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन येनाच्या झाडाला धडकले. धडक एवढी मोठी आहे की वाहनाचा पुढील भाग चेंदामेंदा झाला आहे.

अपघात झाल्याचे निदर्शनास येताच आवागमन करणाऱ्यांनी महामार्गावरून धावणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवून झालेल्या पलटी पिकप मधून वाहन चालक व वाहकास बाहेर काढून त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले. सदर वाहन हे गडचिरोली येथील एका व्यापाऱ्याचे असल्याचे सांगण्यात आले. दोघांपैकी एकाला खूप मार असून पाय मोडल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. वृत्तलिहीपर्यंत पोलिस विभाग किंवा संबंधित मालक घटनास्थळी आले नव्हते. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Gadchiroli news: चार पलट्या घेवुनही नशीब बलवत्तर म्हणून कारमधील चौघेही बचावले


 

गडचिरोली - गडचिरोली- - चामोर्शी मार्गावरील कुरूड नजीक कारला अपघात झाल्याने गडचिरोली येथील प्लॅटीनम स्कूल व वैभव हॉटेलचे संचालक अजीज नाथाणी जखमी झाले असून कारने चार पलट्या घेवूनही नशीब बलवत्तर म्हणुन कारमधील चौघेही सुरक्षित बचावले. सदर घटना काल २९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. अजीज नाथाणी यांच्यावर नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

प्राप्त माहितीनुसार अजीज नाथाणी हे आपल्या कारने शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, बंडू शनिवारे, इकबाल बुधवाणी यांच्यासह अहेरी वरून गडचिरोलीकडे येत होते. 

 

चामोर्शी येथून निघाल्यानंतर तळोधी ते कुरुडच्या मध्ये असलेल्या नदिवरील मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने नाथाणी यांनी आपली कार जुन्या पुलाच्या दिशेने वळविली. यावेळी रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने कार रस्त्याखाली उतरून कारने चार पलट्या घेतल्या. अपघात एवढा गंभीर होता की कार चकनाचूर झाली. 

 

 

यात अजीज नाथाणी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी तालुका शिवसेना प्रमुख पप्पी पठाण यांनी लागलीच घटनास्थळ गाठून चौघांनाही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. नाथाणी यांना जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार मधील उर्वरित तिघांनाही कोणतीही दुखापत झाली नसल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Happy new year party: आज थर्टी फर्स्टला होणार कोंबड्या, बकऱ्यांची कत्तल


 

गडचिरोली:  म्हणता म्हणता २०२३ हे वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असून रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण राहणार असून रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जात असल्याने कोंबड्या, बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 

आज ३० डिसेंबर रोजी शनीवारी शहरातील मटन व चिकन मार्केटमध्ये फेरफटका मारला असता विशेष गर्दी दिसुन आली नाही. मात्र ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असून याच दिवशी रविवारही आला असल्याने रविवारी मटन चिकन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी उसळणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जात असल्याने चिकन, मटन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या, बकऱ्या दुकानात आणुन ठेवल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

 

विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील चिकन, मटन बाजारपेठेत प्रतिकिलो २५० पॅरेट रूपये आहे. बायलर २०० रूपये प्रतिकिलो तर कॉकरेल १५० रूपये प्रतिकिलो आहे. गावठी कोंबडीचा दर ५५० रूपये प्रतिकिलो आहे. तसेच बकऱ्याच्या मटनाचा दर ७०० रूपये प्रतिकिलो आहे. यामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल होऊ शकतो.

 

मात्र हौसेला मोल नसल्याने डिसेंबरला मासाहार ३१ करणाऱ्यांची पावले चिकन, मटन मार्केटकडे वळतील असे बोलल्या जात आहे. यामुळे रविवारी या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होणार असल्याचे मटन, चिकन विक्रेत्यांची चांदी होणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Tiger attack : वाघाच्या हल्ल्यात सरपण गोळा करणारी महिला जखमी


 

गडचिरोली : गावापासून १ किमी अंतरावर सरपण गोळा करत असताना वाघाने महिलेवर हल्ला केला; परंतु सोबतच्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर तेथून वाघाने धूम ठोकली. मात्र महिला यात किरकोळ जखमी झाली, ही घटना तालुक्यातील बोदली येथे शनिवार ३० डिसेंबर रोजी घडली.

 

मंदाबाई बंडू कोठारे (५०) रा. बोदली असे जखमी महिलेचे नाव आहे. मंदाबाई ह्या इतर ८ ते १० महिलांसोबत गावापासून १ किमी अंतरावरील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी शनिवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेल्या. हा झुडपी जंगल परिसर प्राथमिक आरोग्य केंद्राला मागच्या बाजूने लागून आहे. सरपण गोळा करण्यात सर्व महिला व्यस्त असताना परिसरातच वाघ झुडपात दबा धरून बसला होता. सकाळी ११ वाजता संधी साधून वाघाने मंदाबाईवर हल्ला केला; परंतु सुदैवाने त्याचा वार हुकला. मंदाबाईवर वाघाने हल्ला करताच सोबतच्या महिलांनी आरडाओरड केली. तेव्हा वाघाने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023

PostImage

Marder news : प्रेयसीचा दुसऱ्याबरोबर लफडं; तरुणाने ५० वेळा चाकूने भोसकून केली हत्या!


प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाचा हकानाक बळी गेल्याची घटना दिल्लीत घडली आहे. इन्स्टाग्रामवरून झालेली मैत्री, मैत्रीचं प्रेमात झालेलं रुपांतर आणि मग प्रेमात झालेली फसवणूक यावरुन एका तरुणाने कथित प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. याप्रकरणी आता अरमान खान (१८) याला पोलिसांनी अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

 

अरमान खानची एका मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तसंच, या २१ वर्षीय तरुणीचा माहिर नावाचाही मित्र होता. एकदा माहिर तरुणीच्या घरी गेला असता त्याला ही तरुणी अरमानसह व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसली. याचा राग मनात येऊन माहिरने अरमानला शिवीगाळ केली. या वादात अरमानने तरुणीचा मोबाईल काढून घेतला.

 

मोबाईल देतो सांगून बोलावलं अन्

तरुणी दोघांना एकाच वेळी डेट करत होती. तसंच, तिला अरमानपेक्षा माहिर जास्त आवडत होता, हे समजल्यावर अरमान अधिक चिडला. त्यामुळे अरमानने तिचा मोबाईल काढून घेतला. हा मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने अरमानने माहिरला एका ठिकाणी भेटायला बोलावले. माहिर ठरलेल्या ठिकाणी येताच चिडलेल्या अरमानने माहिरवर हल्ला करायला सुरुवात केली. अरमानने त्याच्यावर ५० वेळा चाकूने वार केले. त्याच्याबरोबर फैजल (२१) आणि मोहम्मद समीर (१९) हे मित्रही होते. या हल्ल्यात माहिरचा जागीच मृत्यू झाला. हा मृतदेह त्यांनी भागीरथ विहारमध्ये रस्त्याच्या कडेला टाकून दिला.

 

 

 

पोलिसांना सापडला मृतदेह

पोलिसांना हा मृतदेह मिळाल्याने पुढील घटनेचा तपास लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिरच्या अंगावर चाकूच्या अनेक जखाम होत्या. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी एक चाकूही सापडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. माहिर मध्ये दिल्लीच्या पहाडगंजमध्ये फ्लेक्स बोर्ड बनवणाऱ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता.

 

कॉल रेकॉर्डिंगमुळे लागला छडा

तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसंच, माहिरचे कॉल रेकॉर्डिंगही तपासले. कॉल रेकॉर्डिंगमुळे पोलीस संबंधित तरुणीपर्यंत पोहोचले. तिने या दोघांमधील वादाबाबत माहिती दिली.

 

महिलेचा जबाब आणि घटनेच्या वेळी साक्षीदारांच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालायने न्यायालयीन कोठडी सुनावली असून लवकरच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

 

तिन्ही आरोपी हे भागीरथ विहार येथे राहणारे आहेत. १८ वर्षीय मुख्य आरोपी अरमान खानचं एक जनरल स्टोअर आहे. तर, २१ वर्षीय फैजल खान एलसीडी टीव्ही रिपेअरिंगचं काम करतो. तर, तिसरा आरोपी मोहम्मद समीर भंगार विक्रेता आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

कविवर्य मिलींद बी. खोब्रागडे रा गडचिरोली ह्यांना "अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार"


अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई संस्थेच्या वतीने एक दिवसीय वार्षिक पुरस्कार सोहळा देवाची आळंदी जिल्हा पुणे येथे नुकताच पार पडला. संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या अक्षरमंच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेच्या संस्थेत सलग सहभागी होऊन सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल मान. मिलींद बी खोब्रागडे, रा.गडचिरोली ह्यांना "अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार" देऊन सन्मानीत करण्यात आले.

             अनेक पुरस्काराचे मानकरी मान. मिलिंद बी.खोब्रागडे हे एक सामाजिक जाणिवेचे कवी, लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. कविता, लेख, कथा तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ, भावस्पर्शी क्रमांकाने गौरविण्यात आलेले आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२३ ला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान.मिलींद बी.खोब्रागडे रा.गडचिरोली ह्यांना अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

          संस्थेचे संस्थापक मा. शिवाजी खैरे सर व अनुसया खैरे मॅडम उपस्थितीत "देवाची आळंदी" जिल्हा पुणे ह्या संतांच्या भूमीत हा सोहळा दिनांक २४/१२/२०२३ रोजी संपन्न झाला. जागतिक किर्तीचे जेष्ठ साहित्यिक मा.डॉ. मधुसूधन घाणेकर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदरणीय श्री. शिवाजी किसन खैरे सर, मा.सौ.अनुसयाताई खैरे मॅडम मा.श्री अनंत बोरकर, मा.सौ.अलकाताई झरेकर, मा.श्री. विनोद गोल्हार या मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला. सर्व मान्यवर व अक्षरमंचचे सर्व कार्यकारी समिती तसेच अनेक राज्यभरातून आलेले सारस्वत, ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी मिलिंद बी.खोब्रागडे यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Eliphant news: हत्तीच्या हल्ल्यात महिला ठार , शंकरनगर येथील घटना


Armori news:  दिनांक 29/12/2023 रोजी रात्रो 10.30 वाजता दरम्यान सौ.कौशल्या राधाकांत मंडल रा. शंकरनगर वय 67 वर्ष हे आपल्या परिवारासह शेतातील घरी असताना, शेतात अचानक हत्ती आल्याचे मुलगा महात्मा राधाकांत मंडल यांना कळाले. तेव्हा त्यांनी शेतातून गावाकडे जाण्यासाठी पत्नी, वडील व आई यांना सोबत घेऊन निघाले असता हत्तीने सौ.कौशल्या राधाकांत मंडल त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले.

 

 सदरची घटना नियतक्षेत्र जोगीसाखरा उपक्षेत्र पळसगावपरिक्षेत्र आरमोरी ता.आरमोरी जि.गडचिरोली येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे तरी वन विभागाने या हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Brazil news: पतीला १५ वर्षांच्या भाचीसोबत शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडले, संतापलेल्या महिलेने पतीला बेडरूमध्ये बोलावून घेत त्याचे गुप्तांग कापले.


 

 ब्राझीलमध्ये एका महिलेने तिच्या पतीचे गुप्तांग कापून शौचालयात फ्लश केल्याची घटना उघडकीस आली.

या घटनेनंतर संबंधित महिलेने स्वत:ला पोलीसांच्या स्वाधिन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या पतीला १५ वर्षांच्या भाचीसोबत शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडले.

यानंतर संतापलेल्या महिलेने पतीला बेडरूमध्ये बोलावून घेत त्याचे गुप्तांग कापले.

यानंतर कापलेले गुप्तांग शौचालयात टाकले.

एवढेच नव्हेतर, या महिलेने पतीच्या कापलेल्या गुप्तांगाचे फोटो देखील काढल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.संबंधित महिला ३९ वर्षांची आहे.

या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या पतीला १५ वर्षांच्या भाजीसोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहिले.

यामुळे तिला राग अनावर झाला.

तिने पतीला बेडरुममध्ये बोलावून घेतले.

त्यानंतर बेडरुममधील पलंगाला त्याचे हात पाय बांधले.

नंतर वस्तऱ्याने त्याचे गुप्तांग कापले.

न्यू यॉर्क पोस्ट आणि डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने नवऱ्याच्या कापलेल्या गुप्तांगाचे फोटो काढले, त्यानंतर गुप्तांग शौचालयात टाकून प्लश केला.

ब्राझीलमध्ये लैंगिक संबंधासाठी संमतीचे वय १४ वर्षे आहे.दरम्यान, २०२१ मध्ये अशाच एका घटनेने ब्राझीलला हादरवले होते, जेव्हा साओ गोंकालो भागातील एका महिलेने आपल्या पतीचे गुप्तांग कापून आगीत भाजले.

दयाने क्रिस्टिना रॉड्रिग्ज मचाडो नावाच्या महिलेने आपल्या पती आंद्रेची हत्या केली होती.

त्यानंतर त्याने गुप्तांग कापून तेलात तळले होते.या वर्षाच्या सुरुवातीला एका इंडोनेशियन महिलेने तिच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची घटना उघडकीस आली.

कारण, त्याने तिच्यासोबत झोपण्यास नकार दिला.

तसेच त्यांची सेक्स टेप लीक करण्याची धमकी दिली.

तो आंघोळीसाठी जात असताना महिलेने त्याच्यावर हल्ला करून त्याचे गुप्तांग कापले होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Bihar Couple Viral News: ते दोघे घरात घुसले अन् गावकऱ्यांनी बाहेरून खोलीला कुलूप लावला


Bihar Couple Viral News: प्रेमात एखादी व्यक्ती कोणत्या थरापर्यंत जाईल, याचा काही नेम नाही.

बिहार येथे एक तरुण दीडशे किलोमीटर दूर राहणाऱ्या प्रेयसीला भेटायला गेला.

दोघेही गावातील एका बंद खोलीत असल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागली.

यानंतर गावकऱ्यांनी बाहेरून खोलीला टाळे लावले.

हे समजताच प्रियकर आणि प्रेयसी दोघांनेही गावकऱ्यांना खोलीतून बाहेर काढण्यासाठी विनवणी केली.

परंतु, दरवाजा उघडण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांच्यासोबत एक अट ठेवली, जी ऐकल्यानंतर दोघांनाही धक्काच बसला.

या प्रकरणाची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.जमुई जिल्ह्यातील जावतारी गावातील रहिवासी असलेल्या आरती कुमारीचे पाटणा जिल्ह्यातील पंडारक येथील रामसेवक याच्याशी प्रेमसंबंध होते.

रामसेवक यांनी सांगितले की, चार वर्षांपूर् एका अनोळखी नंबरवरून त्याला आरतीचा फोन आला.

राँग नंबर असतानाही दोघांमधील संवाद वाढला.

त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

दरम्यान, आरती आणि रामसेवक गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना भेटत राहिले.

दोघेही अनेकदा जमुई रेल्वे स्थानकावर एकमेकांना भेटायचे.

एवढेच नव्हेतर, रामसेवक कित्येकदा आरतीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला.

आरतीच्या आईला त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती होती, असे रामसेवकने सांगितले.रामसेवक हा पाटणा येथील एका कंपनीच्या मायक्रोफायनान्स कंपनीत नोकरी करतो.

नाताळची सुट्टी असल्याने तो आरतीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला.

यावेळी दोघेही एका खोलीत असल्याची गावकऱ्यांना माहिती मिळाली.

यानंतर गावकऱ्यांनी त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला.

आरती आणि रामसेवक यांनी खोलीतून बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांना विनंती करण्यास सुरुवात केली.

मात्र, त्यावेळी गावकऱ्यांनी दोघांसमोर एक अट ठेवली की, दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करावे लागेल, तरच त्यांना खोलीबाहेर काढले जाईल.अखेर रामसेवक आणि आरती यांना गावकऱ्यांची अट स्वीकारावी लागली.

गावकऱ्यांनी त्यांचे जागीच लग्न लावून दिले.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणाचीही चर्चा होत आहे.

मात्र, लग्नानंतर आरतीचे कुटुंब खूप आनंदी असून तिच्या आई-वडिलांनीही दोघांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Tecnology news: टेस्ला प्रकल्प उभारण्याबाबत टेस्ला जानेवारीत करणार घोषणा


 

 दिल्ली,  जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. जानेवारी 2024 मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे होणाऱ्या व्हायब्रेट गुजरात समिट' मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

गुजरातमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दरवर्षी गांधीनगरमध्ये हे जागतिक स्तरावरील समिट आयोजित करण्यात येत असते. यंदा याचे दहावे वर्ष आहे. गुजरातमधील माध्यमांनुसार टेस्ला कंपनीचे अधिकारी आणि गुजरात सरकार यांच्यातील चर्चा अखेरच्या टप्यात आली असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे स्वतः यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

एलॉन मस्क यांनी स्वतः दिले संकेत

 

टेस्ला कंपनीची आयात शुल्क कपात करण्याची मागणी केंद्र सरकारने पूर्ण न केल्यामुळे टेक्सासमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्लाने 2022 साली भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी अमेरिकेचा दौरा केला असताना टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Cripto carrancy : 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना नोटीस ,भारत सरकारने उचलले पाऊल


 

दिल्ली, . नोंदणीकृत नसलेल्या क्रिप्टो करन्सीचा वाढता वापर लक्षात घेता भारत सरकारने सुरुवातीपासूनच क्रिप्टोकरन्सीबाबत कठोर भूमिका कंपन्यांवर भारतात प्रचंड कर लादला जात आहे. आता अर्थ मंत्रालयाने 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लांड्रिंग कायद्यांतर्गत नोटीस बजावली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने गुरुवारी माहिती दिली आहे. मंत्रालयानुसार, या कंपन्यांना मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

नोटीस बजावलेल्या कंपन्यांमध्ये Bi- nance, KuCoin, Huobi, Kraken, Get.io, Bittrex, Bit stamp, MEXC Global आणि Bitfinex चा समावेश आहे. भारताच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने या सर्व 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसपाठवली आहे. क्रिप्टो कंपन्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये कोणतीही टाईमलाईन दिलेली नाही. याचा अर्थ कंपन्यांना कधी उत्तर द्यावे लागेल किंवा त्यांच्यावर कधी कारवाई केली जाईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतातील क्रिप्टो कंपन्यांवर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.

 

 

 

एफआययूमध्ये नोंदणी बंधनकारक

 

डिसेंबरच्या सुरुवातीला, सरकारने माहिती सांगितले होते की, 28 देशांतर्गत क्रिप्टो कंपन्यांनी फायनान्शियल इंटेलिजेन्स युनिटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे. आता अशा कंपन्यांची संख्या 31 झाली आहे. तसेच भारतात असलेल्या सर्व क्रिप्टो कंपन्यांना एफआययूमध्ये नोंदणी करणेबंधनकारक आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Chanda kochar news: चंदा कोचरसह 9 जणांविरुद्ध एफआयआर ,टोमॅटो पेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप


 

.

 

 दिल्ली, . आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. चंदा कोचर यांच्या विरोधात दिल्लीत एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात त्यांच्यासह इतर 9 जणांवर टोमॅटो पेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या लोकांमुळे 27 कोटींचे नुकसान झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 2009चे हे प्रकरण नुकतेच प्रकाशात आले. १ डिसेंबरला पतियाळा हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांना तपास सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 20 डिसेंबरला फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांचा हवाला देऊन एफआयआर नोंदवला. कोचर यांच्या व्हिडीओकॉन कर्ज - फसवणूक प्रकरणाची आधीच चौकशी सुरू आहे. एफआयआरमध्ये चंदा कोचर, संदीप बक्षी (सीईओ आणि एमडी  आयसीआयसीआय बँक), विजय झगडे (माजी व्यवस्थापक आयसीआयसीआयबँक), मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या ग्लोबल ट्रेड सर्व्हिसेस युनिटचे अनामित अधिकारी, अतुल कुमार गोयल (एमडी-सीईओ, पंजाब नॅशनल बँक) यांचा समावेश आहे. याशिवाय के. के. बोर्डिया (माजी जीएम, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स), अखिला सिन्हा (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख), मनोज सक्सेना (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख) आणि के.के. भाटिया (ओबीसीचे माजी मुख्य व्यवस्थापक) यांचीही नावे आहे.

 

 

पी अँड आर ओव्हरसीज कंपनीची तक्रार

 

पी अँड आर ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड (टोमॅटो मॅजिक) चे संचालक शम्मी अहलुवालिया यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी खरा दस्तऐवज म्हणून परदेशी बँकेकडून 'लेटर ऑफ क्रेडिट' (एलओसी) पास करण्याचा कट रचला होता. टोमॅटो पेस्टच्या निर्यात ऑर्डरसाठी महत्त्वाची एलओसी, रॉयल बैंक ऑफ स्कॉटलंड (आरबीएस) द्वारे जारी करण्यात आली होती; परंतु नंतर हे उघड झाले की, ते आरबीएस अलायन्स नावाच्या स्थानिक रशियन बँकेकडून जारी केले गेले होते, जे त्यांच्याखराब प्रतिष्ठेसाठी ओळखली जाते


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Gadchiroli news: महिलांनो सावधान ! गडचिरोली आगारात महिलांचे दागीने व पैसे लुटणारे चोरटे सक्रीय


 

आंबेशिवणीला जाणाऱ्या दोन महिलांचे बसमधून पिंपळाचे पदक व १४ हजार रूपये केले लंपास 

 

गडचिरोली एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्धे तिकीट केल्यापासून बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली. याच गर्दिचा फायदा घेत चोरट्यांनी आंबेशिवणी येथे जाणाऱ्या दोन महिलांचे १४ हजार रूपये व एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पिंपळाचे पदक लंपास केले आहे. सदर घटना २७ डिसेंबर रोजी गडचिरोली बसस्थानकात मौशिखांब बसमध्ये घडली.

 

येथील लता भैसारे या आपल्या बहिणीसह काही कामानिमित्त आंबेशिवणी येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. गडचिरोली आगारात त्या बसमध्ये चढतांना चोरट्यांनी १५ ग्रॅमचे पिंपळाचे पदक वदोन्ही बहिणींच्या पर्समधून १४ हजार रूपये लंपास केले. सदर चोरीबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

 

गडचिरोली आगारात महिलांचे दागीने व पैसे चोरणारी टोळी सक्रीय असल्याचे बोलल्या जात असून गर्दित बसमध्ये चढतांना व उतरतांना महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

GAdchiroli news: गुरवळा मार्गावर ट्रॅक्टर उलटले, सात मजूर जखमी


 

गडचिरोली - शहरापासून -पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली- गुरवळा (पोटेगाव) मार्गावर मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर उलटले. यात सातजण जखमी झाले. ही घटना २८ डिसेंबरला सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडली.

 

 

शहरातील एका ठेकेदाराचे गडचिरोली- गुरवळा (पोटेगाव)मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. यासाठी गोविंदपूर येथील मजुरांना घेऊन कामाच्या ठिकाणी एमएच ३३ एफ- ३१२१ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून नेले जात होते. गुरवळा मार्गे गडचिरोलीकडे येताना चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रॅक्टर गोलकर देवस्थानजवळ रस्त्याखाली उलटले. यात सात मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Nagpur news : बहीण सापडली लॉजवर मग भावाने केली दोघांची धुलाई


नागपूर : मित्राच्या घरी वारंवार येत असलेल्या युवकाची नजर त्याच्या बहिणीवर गेली. त्याने मित्राच्या बहिणीला जाळ्यात ओढून फिरायला नेण्याच्या बहाण्याने लॉजवर नेले. दरम्यान मुलीचा भाऊही त्याच लॉजवर गेला. एका खोलीत प्रियकरासोबत बहिण नको त्या अवस्थेत दिसली. त्यामुळे चिडलेल्या भावाने बहिणीसह तिच्या प्रियकराला चांगला चोप दिला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली. शुभम धजोडे (२४, केसोरी-कामठी) असे आरोपीचे नाव आहे.

 

पीडित १६ वर्षीय तरुणी संजना (काल्पनिक नाव) ही बारावीची विद्यार्थिनी आहे. तिचा मोठा भाऊ आणि आरोपी शुभम धजोडे हे दोघे बालपणापासून मित्र आहेत. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. संजना दहावीत असतानाच शुभमने तिच्याशी सलगी साधली. अल्पवयीन असलेली संजना शुभमच्या जाळ्यात अडकली. गेल्या दोन वर्षांपासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. दोघेही गावाच्या बाहेर जाऊन एकमेकांशी भेटत होते. मौदा बसस्थानकावर बहिण एकटी बसल्यामुळे भावाने तिला गाडीवर घरी सोडून देत होता. दरम्यान, शुभमचे अनेकदा फोन येत असल्याने तिच्या भावाला संशय आला. मात्र, त्याने बहिणीची समजूत घालून अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. संजना आता बारावीत असून शुभमने तिचा पिच्छा सोडला नाही. तिने भावाला प्रेमप्रकरणाची कुणकुण लागल्याचे सांगून संबंध तोडण्यास सांगितले. मात्र, शुभम काही ऐकत नव्हता. त्याने फिरायला जायचे असल्याचे सांगून कुही रोडवरीर ग्रीनलाईट हॉटेलवर नेले. तेथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या चार महिन्यांपासून संजना कॉलेजला जाण्याचा बहाणा करून शुभमसोबत लॉजवर जात होती.

 

 

मंगळवारी ती कॉलेजला जायचा बहाणा करून शुभमच्या दुचाकीवर बसून ग्रीनलाईट हॉटेलमध्ये गेली. दोघांनी रुम बूक केली आणि आतमध्ये गेले. तेवढ्यात संजनाचा भाऊसुद्धा त्याचा लॉजमध्ये आला. त्याने नोंदणी बुकवर बहिणीचे आणि शुभमचे नाव दिसले. त्याने रुमनंबर विचारून हॉटेल व्यवस्थापकाकडून दुसरी किल्ली घेऊन रुममध्ये गेला. तेथे बहिण मित्राच्या बाहुपाशात नको त्या अवस्थेत दिसली. त्यामुळे संतापलेल्या भावाने खोलीचा दार लावले आणि बहिणीसह तिच्या प्रियकराला चांगला चोप दिला. त्यानंतर बहिणीला मौदा पोलीस ठाण्यात घेऊन गेला. तेथे शुभमविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून शुभमवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Chandrapur news: रेती तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला


चंद्रपूर : रेती तस्करीसाठी जेसीबी व पोकलेन नदीघाटात टाकायला मनाई केल्याने गुंड प्रवृत्तीच्या रेती तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरपंचासह महिलांना मारहाण करण्यात आली असून तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे हे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना गोंडपिपरी तालुक्यातील ‘कुलथा’ रेती घाटावर रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह अनेक रेती घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे.

 

नदीपात्रात जेसीबी, हायवा, पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच, तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली असता, शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले. रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.तक्रारीनंतर पोलिसांनी जीवघेणा हल्ला, बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी तिंघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल सय्यद, वैभव पेचे रा. चंद्रपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले एक आरोपी फरार आहे. पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Rahul Gandhi news : दिवसभर मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम रिल् बघायचे आहेत तर मग मोदी सरकारला निवडून दया - राहूल गांधी


भारतातल्या युवकांची युवाशक्ती वाया घालवली जाते आहे. भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली आहे. भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतो असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे.

 

राहुल गांधी यांनी काय म्हटलं आहे?

आपला देश हा कोट्यवधी युवाशक्तीचा देश आहे. मात्र आज युवकांची ही शक्ती पूर्णपणे वाया घालवली जाते आहे. आजचे तरुण हे नोकरी करत नाहीत कारण त्यांच्यासाठी नोकऱ्याच नाहीत. या तरुणांचे दिवसातले सात ते आठ तास हे मोबाइल फोनवर इंस्टाग्राम आणि फेसबुक पाहण्यात जातात. हे भारतातलं वास्तव आहे. तरुणांची शक्ती वाया जाते आहे.

 

एकीकडे शेतकऱ्यांवर अन्याय, तरुणांवर अन्याय आणि दुसरीकडे भारतातल्या दोन ते तीन अरबपती व्यापाऱ्यांना देशातली संपत्ती दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे काही तरुण आले मला म्हणाले अग्निवीर योजनेच्या आधी आम्हाला लष्करात घेण्यात आलं होतं. दीड लाख तरुणांना भारताच्या लष्कराने आणि वायुसेनेने घेतलं होतं. या सगळ्यांनी शारिरीक चाचणी पूर्ण केली होती. त्यांच्या नोकरीला मंजुरीही मिळाली होती. मोदी सरकारने अग्निवीर योजना आणली आणि या दीड लाख तरुणांना नोकरीत घेतलंच नाही. देशप्रेमामुळे हे सगळे तरुण लष्करात आणि वायुसेनेत नोकरी करायला गेले होते. हे तरुण सांगत होते सरकारने आमची खिल्ली उडवली. आमच्या गावात आमची चेष्टा केली जाते. हा अनुभव राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात सांगितला. त्यांना अग्निवीर योजनेतूनही नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत थेट घरी पाठवलं. असाही आरोप राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं आहे.

 

मोदी सरकार जे काही करतं आहे त्यामुळे देशाचा काही फायदा होणार नाही. मी संसदेत भाजपाच्या लोकांना विचारलं त्यांना मी म्हटलं भारत ९० लोक चालवतात त्यात अधिकारीही आहेत. त्यातले ओबीसी किती आहेत, दलित किती आहेत, आदिवासी किती आहे? हे जरा सांगा, भाजपा खासदार मूग गिळून गप्प बसले असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023

PostImage

Nagpur news: अन् अमितने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.


नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या युवकाने तरुणीला घरी नेऊन वारंवार बलात्कार केला. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमित सुमित मालेवार (२९, बजाजनगर) असे आरोपीचे नाव आहे.

 

पीडित २५ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिची इंस्टाग्रामवरून अमित मालेवार याच्याशी ओळखी झाली. अमित हा मूळचा तुमसर-भंडारा येथील असून तो नागपुरात एका खासगी कंपनीत नोकरी करतो. दोघांचा नेहमी दुरध्वनीवरून संवाद होत होता. त्यानंतर दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. अमितने २१ डिसेंबर २०२१ ला तरुणीला वाढदिवस असल्याचे सांगून बजाजनगरातील भाड्याने घेतलेल्या घरी नेले. तेथे वाढदिवसासाठी गेल्यानंतर घरात कुणीच दिसले नाही. काही वेळातच अमितने बाहेरून जेवन बोलविले. त्यानंतर तरुणीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तरुणीने नकार दिला असता अमितने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तासाभरात तरुणी रागाच्या भरात घरी निघून गेली. काही दिवस दोघांचीही एकमेकांशी बोलचाल बंद होती.

 

 

२५ जानेवारीला अमित तरुणीच्या कार्यालयात गेला. तेथे तिची भेट घेऊन माफी मागितली. त्यानंतर तिला बाहेर फिरविण्यासाठी घेऊन गेला. काही दिवसात त्याने पुन्हा तिला घरी नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार देताच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याने लग्न करण्याची तयारी दर्शविल्यामुळे दोघेही वारंवार शारीरिक संबंध ठेवत होते. दिवाळीमध्ये तरुणीने अमितला लग्नाबाबत कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी बोलावले. मात्र, बहाणा करून टाळाटाळ केली. त्यानंतर तो लग्नास नकार देऊन लैंगिक शोषण करायला लागला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणीने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून लवकरच अटक करण्यात येणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Delnawadi news: देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे 


 

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतची शुक्रवारला सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे यांनी सात विरुद्ध दोन अशी आघाडी घेवून सरपंच पदाची निवडणूक जिंकली.

 

देलनवाडी, नागरवाही, कोसरी या तीन गावांची गट ग्रामपंचायत असलेल्या नऊ सदस्यीय देलनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त होते. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रियंका रोहिदास कुमरे यांना ग्रामपंचायत सदस्य इना मेश्राम, मुनिचंद मडावी, शुभांगी मसराम, राजेंद्र पोटावी, त्रिलोक गावतुरे, अश्विनी गरमळे या सात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

 

प्रियंका कुमरे या देलनवाडीच्या सरपंच झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, डॉ. गुरुदास सेमस्कर, क्रीष्णा नैताम, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गंगाधर बोमनवार, दामोदर रोहनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड. नर्गिस पठाण, निशा आयतूलवार, कविता ठाकरे, सुनिता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Chandrapur tiger news: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार


Chandrapur: शेती कामासाठी शेतावर गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून पार केल्याची घटना आज उघडकीस आली. सुभाष कडपे मु. जानाळा (४०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

ही घटना कक्ष क्रमांक 523 मध्ये घडली. या घटनेची माहिती आणि बघायला होतास त्यांनी पोलिसासह घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यास सुरू केले आहे.

सुभाष कडपे काल आपल्या शेतात शेतीकामाकरिता गेला होता मात्र तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता आज सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. वाघ आणि त्याचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले.

मृतक सुभाष चे मागे त्याची पत्नी व मुलगी असा परिवार आहे

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Karnatak news: मला BJP मधुन बाहेर काढले तर तुमचा कोरोनाचा 40 करोडचा घोटाळा बाहेर काढीन


Karnatak news: कर्नाटकमधील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी पक्षाविरोधातच बंड पुकारलं आहे. विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा यांनी पक्षाला जाहीर इशाराच दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर आपण त्या लोकांची नावं उघड करु ज्यांनी पैसे लुटले आणि संपत्ती कमावली अशी धमकीच त्यांनी दिली आहे. येदियुरप्पा यांचं सरकार असताना 40 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यांनी प्रत्येक करोना रुग्णाच्या नावे 8 ते 10 लाखांचं बिल बनवलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे. 

आपल्याच सरकारवर लावले आरोप

बसनगौडा पुढे म्हणाले आहेत की, "त्यावेळी आमचं सरकार होतं. पण सत्ता कोणाची होती याने काही फरक पडत नाही. शेवटी चोर हा चोरच असतो". येदियुरप्पा सरकारने 45 रुपयांचे मास्क 485 रुपयांत खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, "बंगळुरुत 10 हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी भाड्याने 10 हजार बेड्स मागवण्यात आले होते. जेव्हा मला कोविड झाला तेव्हा मणिपाल रुग्णालयाने 5 लाख 80 हजार रुपये मागितले होते. गरीब माणूस इतके पैसे कुठून आणणार?".

मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनीही दिली प्रतिक्रिया

भाजपा आमदाराने केलेल्या या आरोपांनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी म्हटलं की, "भाजपा आमदाराने आमचे सर्व आरोप आणि पुरावे खरे ठरवले आहेत". भाजपा सरकार 40 टक्के कमिशन सरकार होतं असाही आरोप त्यांनी केला आहे. "यत्नाल यांच्या आरोपांकडे पाहिल्यास भ्रष्टाचार आम्हाला वाटत होता त्याच्याही 10 टक्के जास्त आहे. भाजपा मंत्र्यांचा गट जो आमच्या आरोपांनंतर ओरडत बाहेर आला होता तो आता कुठे लपला आहे?," अशी विचारणा त्यांनी केली. 

'पंतप्रधान मोदींमुळे वाचला आहे देश'

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना बसनगौडा म्हणाले की, त्यांच्यामुळेच देश वाचला आहे. "त्यांनी मला नोटीस देऊन पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचा बुरखा फाडून टाकेन. जर प्रत्येकजण चोर झाला तर राज्य आणि देशाला कोण वाचवणार? देश पंतप्रधान मोदींमुळे वाचला आहे. या देशात भूतकाळात कोळसापासून ते 2 जीपर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत.".


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

RBI गव्हर्नरना पेन्शन का मिळत नाही? रघुराम राजन यांनी केला खुलासा


 

Raghuram Rajan on Pension: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच सांगितले की गव्हर्नर म्हणून त्यांचा पगार वर्षाला चार लाख रुपये होता. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरच्या सध्याच्या पगाराची माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले.

 

आरबीआय गव्हर्नर असताना त्यांना राहण्यासाठी मोठं घर नक्कीच मिळालं हेही ते म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे, RBI गव्हर्नरला मिळणारा पगार आणि पेन्शन बाबत रघुराम राजन यांनी काही गोष्टी सांगितल्या.

 

राज शमानी यांच्या "फिगरिंग आउट" पॉडकास्टवर बोलताना राजन म्हणाले की, गव्हर्नर होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना धीरूभाई अंबानी यांच्या घराच्या अगदी जवळ असलेल्या एका मोठ्या घरात राहायला मिळाले. राजन म्हणाले की, मला माहिती नाही की सध्या आरबीआय गव्हर्नरचा पगार किती आहे? पण माझ्या काळात हा पगार वर्षाला चार लाख रुपये असायचा. मुंबईतील मलबार हिलवरील धीरूभाई अंबानींच्या घरापासून काही अंतरावर राहण्यासाठी खूप मोठे घरही होते.

 

पेन्शनबद्दल काय म्हणाले?

 

६० वर्षीय रघुराम राजन यांनी 2013-2016 दरम्यान RBI गव्हर्नर म्हणून काम केले. त्यांचा पगार कॅबिनेट सेक्रेटरीएवढा असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. आपल्या कार्यकाळात आपल्याला वैद्यकीय सुविधाही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांना पेन्शन मिळाली नाही. राजन म्हणाले की, मला वाटते की त्यांचा पगार कॅबिनेट सेक्रेटरीएवढा होता. या सेवेत तुम्हाला इतर सुविधा मिळत नाहीत ज्या सरकारी अधिकाऱ्यांना मिळतात, तुम्हाला पेन्शन मिळत नाही. आरबीआयचे गव्हर्नर पेन्शनसाठी का पात्र नाहीत हे स्पष्ट करताना राजन म्हणाले की ते नागरी सेवेत आहेत. त्यांच्या नागरी सेवेतून पेन्शन मिळते. ते म्हणाले की बहुतेक आरबीआय गव्हर्नरना पेन्शन न मिळण्याचे कारण की ते नागरी सेवक होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नागरी सेवेतून आधीच पेन्शन मिळत होते. पण एक अधिकारी असाही होता जो सनदी अधिकारी नव्हता, मी त्याचे नाव घेणार नाही… पण RBI आणि सरकारच्या अनेक वर्षांच्या सेवेमुळे तो पेन्शनचा हकदार होता.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Rahul Gandhi news: भारत न्याय यात्रा: राहुल गांधी करणार 14 राज्यं आणि 6,200 किमीचा प्रवास


 

काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 20 मार्चपर्यंत सुरू राहील.

 

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी या यात्रेची घोषणा केली.

 

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वेणुगोपाल म्हणाले, "राहुल गांधींनी पूर्व ते पश्चिम अशी एक यात्रा काढावी असं मत काँग्रेस कार्यकारिणी समितीने 21 डिसेंबर रोजी मांडलं होतं.

 

"राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकारिणीचं मत मान्य करत ही यात्रा काढण्यास सहमती दर्शवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे," वेणुगोपाल यांनी सांगितलं.

65 दिवसांच्या या यात्रेत राहुल गांधी 6,200 किलोमीटर एवढं अंतर कापतील. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे.

 

यावेळी राहुल गांधी मणिपूर, मेघालय, नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

 

या काळात राहुल गांधी तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी चर्चा करतील असं काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं.

 

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पायीच पूर्ण केली होती. पण यावेळेसची भारत न्याय यात्रा बसमधून पूर्ण केली जाईल. वेणुगोपाल यांनी सांगितलं की, या बसमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या प्रवासात राहुल पायीही प्रवास करतील. मात्र लांबचं अंतर बसमधून पार केलं जाईल.

 

यात्रेचा उद्देश

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी 6 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा सलग 150 दिवस सुरू होती. या प्रवासात राहुल गांधींनी 4500 किलोमीटर इतका प्रवास पूर्ण केला होता. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींनी आणखीन एक यात्रा काढावी अशी विनंती काँग्रेस पक्षाने केली होती.

 

गेल्या आठवड्यात 21 डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यात राहुल गांधींनी दुसरी यात्रा काढावी असं ठरलं.

 

वेणुगोपाल म्हणाले की, 'सर्वांसाठी न्याय' मिळवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, "आम्हाला महिला, तरुण आणि सर्वसामान्यांसाठी न्याय हवा आहे. सध्या श्रीमंतांकडे सगळ्या गोष्टींचा ओघ सुरू आहे. त्यामुळे ही यात्रा गरीब लोकांची, तरुण शेतकरी आणि महिलांची आहे."

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त तेलंगणामध्येच विजय मिळवता आला. उर्वरित चार राज्यांमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

 

छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, पण दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा दौराही केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आलं नाही.

 

देशातील केवळ तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. यात कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

काँग्रेस पक्षातील संपर्क विभागाचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रा यातील फरक स्पष्ट केला आहे.

 

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, "भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तीन मुद्दे मांडले. यात आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही यांच्या विरोधात आवाज उठविण्यात आला. त्यांनी लोकांमध्ये जाऊन लोकांना या भयाण वास्तवाची जाणीव करून दिली. ही यात्रा कोणाच्याही भावना व्यक्त करण्यासाठी नव्हे तर लोकांविषयी असलेल्या काळजीपोटी काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या."

ते म्हणाले, "आता भारत न्याय यात्रा सुरू होईल. ती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी आहे. लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं आणि महागाईने होरपळणाऱ्या कोट्यवधी कुटुंबांमध्ये उज्ज्वल भविष्याचा आत्मविश्वास निर्माण करणं हा या यात्रेचा उद्देश आहे."

 

राहुल गांधींचा हा प्रवास अशा वेळी सुरू होणार आहे जेव्हा देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. दरम्यान, भारतातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीतही बैठका सुरू आहेत.

 

काँग्रेस नेतृत्वासोबात अनेक राज्यांतील स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी बिहार आणि उत्तरप्रदेश नंतर आंध्रप्रदेशातील नेत्यांची बैठक घेतली आहे.

 

यावर भाजप काय म्हणालं?

राहुल गांधींच्या नव्या यात्रेवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, "देशातील जनतेने भारत जोडो यात्रेची संकल्पना नाकारली होती. कारण काँग्रेस आणि राहुल गांधींच्या बोलण्या-वागण्यात फरक आहे. त्यांना आजही वाटतं की भारतातील जनतेला मूर्ख बनवता येतं. पण सत्यता तपासल्यावर कळेल की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार 2014 पासून खरा न्याय देत आहे."

 

कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय काँग्रेस नेते भारत जोडो यात्रेला देत आहेत.

इंडिया आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड हा देखील राहुल गांधींच्या यात्रेचा एक भाग आहे.

 

या भेटीबद्दल जेएमएमचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले, "राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेली भारत जोडो यात्रा सकारात्मक वातावरण निर्माण करणारी होती.

 

राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा तसा फायदाही झाला. राहुल गांधी ही व्यक्ती सामान्य माणसांशी जोडलेली वाटते, हे लोकांना पटलं. ते प्रेमाबद्दल बोलतात, दंगलीबद्दल बोलत नाही. आता पूर्व ते पश्चिम हा प्रवासही अभूतपूर्व असेल आणि संपूर्ण इंडिया आघाडीला त्याचा फायदा होईल."

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Health:कोरडा खोकला घरगुती उपाय


 

सध्या पुन्हा सुरू झालेल्या सर्दी, खोकला, तापाच्या साथीमध्ये पूर्वीपेक्षा काही वेगळी लक्षणे दिसत आहेत. रोज येणाऱया दहा रुग्णांपैकी किमान पाच तरी यापैकी काही त्रास घेऊन येत आहेत. यात दिसणारी वेगवेगळी लक्षणे आणि त्यावरील घरी करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊया.

 

 

काही महत्त्वाची किंवा दुर्लक्ष न करण्याची काही लक्षणे याप्रमाणे…

 

डोकेदुखी- कपाळ किंवा मुर्धा (टाळू, डोक्याचा वरचा भाग) दुखणे हे विशेष दिसत आहे. यासाठी नाकात साजूक तुपाचे पाच पाच थेंब सोडावेत. अर्ध्या तासात फरक दिसला नाही तर पुन्हा करावे. तरीही फरक दिसला नाही तर त्वरित वैद्याचा सल्ला घ्यावा.

 

जिभेला कात्रे पडणे किंवा तोंड येणे- पित्ताचे त्रास असलेल्यांना सर्दी-खोकल्यावरील औषधे घेतल्याने जिभेला कात्रे पडणे किंवा तोंड येणेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी तूप फ्रिजमधे ठेवून थिजवावे आणि थंड झालेले तूप तोंडाला आतून, जिभेला, हिरडय़ांना सर्वत्र लावावे. जेवणात तूप साखर एकत्र करून खावे.

 

ताप येणे- यामधे मंद ज्वर ते तीव्र ज्वर यापर्यंत त्रास होऊ शकतो. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम. सोबत बडीशेप, धणे जिरे यांचे पाण्यात उकळून केलेला काढा पित राहावे.

 

सर्दी होणे- यामधे कोरडय़ा खेकल्यासह सध्या एक तर नाकातून पाणी वाहणे ही तक्रार जास्त दिसत आहे किंवा कोरडय़ा खोकल्यानंतर नावाला थोडासा कफ पडला तर पडतो आहे अशी तक्रार रुग्ण करत आहेत. यासाठी वेगळे उपाय करण्याची गरज नाही. आधी सांगितलेले उपायच यावरही फायदा करतात. यावेळी थंडी आणि ढगाळ हवामान असे संमिश्र वातावरण सगळीकडे दिसत आहे. यामुळे होणारे त्रास टिकून राहतात. त्यामुळे सलग तीन ते सात दिवसपर्यंत उपाय करूनही फायदा होत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणे हाच उत्तम मार्ग असतो.

 

कोरडा खोकला- ज्येष्ठमध पाव चमचा आणि सब्जा बीज एक चमचा आणि पाणी एक कप एकत्र करून एक मिनिट उकळावे. गाळून गरम असतानाच घोट घोट प्यावे. दिवसातून तीन वेळ करावे.

 

खोकून खोकून घसा दुखणे- ज्येष्ठमध आणि सब्जाचे उकळून गाळलेले पाणी घेऊन त्यात आल्याचा रस एक चमचा मिसळावा आणि प्यावे. घसा दुखणे लगेच कमी होते. तोंड येण्याची सवय असेल त्यानी आले वापरू नये. त्यांनी ज्येष्ठमध चूर्ण पाव चमचा मिसळून प्यावे. दिवसातून तीन वेळ करावे.

 

खोकून खोकून छातीत दुखणे- हेच ज्येष्ठमध आणि सब्जाचे उकळून गाळलेले गरम पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तूप मिसळून घोट घोट प्यावे. रोज तीन वेळ करावे.

 

घशात तोठरा बसून श्वास अडकणे- ज्येष्ठमध चूर्ण पाव चमचा आणि तूप एक चमचा एकत्र करून चघळून खावे. त्यावर अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नये. रोज तीन वेळ करावे.

 

घसा कोरडा पडून खूप तहान लागणे- ज्येष्ठमध चूर्ण 1 चमचा, तूप 2 चमचे आणि गूळ एक चमचा एकत्र करून मटारच्या आकाराच्या गोळ्या बनवून दिवसभर चघळून खाणे.

 

खोकून कफासह किंवा नुसते रक्त पडणे- कोरडय़ा खोकल्याने खोकून खोकून कोर्डमुळे घशातील एखादी छोटीशी रक्तवाहिनी (पॅपिलरी) तात्पुरती फुटून एखादा थेंब रक्त कफासह किंवा नुसते पडू शकते. अशा वेळी ज्येष्ठमध चूर्ण एक चमचा आणि तूप एक चमचा एकत्र करून थेंब थेंब चघळून खावे आणि अर्धा तास लावून संपवावे. असे तीन वेळ केले तर थेंब भर रक्त पडणे वगैरे त्रास बंद होतो. यापेक्षा जास्त प्रमाणात रक्त वारंवार पडणे असेल तर मात्र घरी उपाय करत बसू नये. लगेच वैद्यकीय सल्ला आणि मदत घ्यावी हेच उत्तम.

 

उपाय करूनदेखील खोकला कमी होत नसेल तर- अशा वेळी जेवणापूर्वी अर्धा तास किंवा पित्ताचे त्रास असलेल्यांनी जेवणानंतर लगेच द्राक्षासव 60 मिलीपर्यंत एकावेळी घोट घोट प्यावे. इतर औषधे घेणे सुरू ठेवावे. एका दिवसात दोन ते वेळ करावे. तरीही फरक पडला नाही तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणेच उत्तम.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

इंग्रजी येत नसल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीचे केसच उपटले


 

मध्य प्रदेशाच्या बैतूल जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला इंग्रजी येत नसल्यामुळे मारहाण करून तिचे केसच उपटून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. पोलिस उपअधीक्षकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे आमला ब्लॉकमधील खेडली बाजार प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनीला पूर्णिमा साहू या शिक्षिकेने १५ डिसेंबर रोजी मारहाण करून तिचे केस बाहेर उपटले. 

 

शाळेतील इतर विद्यार्थिनींनीही शिक्षिका मारहाण करत असल्याची तक्रार केल्याचे मुलीचे वडील उमेश बामणे यांनी सांगितले. केस उपटल्यामुळे सध्या मुलीचे डोके दुखत आहे. मुलीचे केस ज्याप्रकारे उपटले गेले, ही गंभीर घटना आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे डीसीपी संजय श्रीवास्तव यांनी सांगितले,

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Rahul Gandhi news : काँग्रेस सत्तेत आल्यास सर्व प्रथम जातीगत जनगणना केली जाईल - राहूल गांधी


नागपूर - ‘देशात सर्वाधिक लोकसंख्या इतर मागास वर्गीयांची (ओबीसी) आहे. दलितांची १५ टक्के तर आदिवासींची संख्या १२ टक्के एवढे आहे. मात्र, देशातील सनदी अधिकाऱ्यांच्या यादीत फक्त दोन-चारच ओबीसी अधिकारी सापडतील. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही हेच चित्र दिसून येते.

 

या माध्यमातून भाजपला सामाजिक आरक्षण मोडीत आणायचे असल्याचे स्पष्ट होते. मात्र, काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल आणि लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला त्याचा वाटा दिला जाईल,’ अशी घोषणा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केली.

 

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपूरमधील दिघोरी येथील पटांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि देशभरातील सातशे आमदार आणि खासदार उपस्थित होते.

 

यात तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खु, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. काही कारणास्तव सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या.

 

राहुल गांधी म्हणाले, ‘नागपूर येथील कार्यकर्त्यांना आमचे विचार आणि संदेश लगेच समजताच. म्हणूनच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला कर्मभूमी केले होते.’ काँग्रेससाठी नागपूर व महाराष्ट्राचे स्थान विशेष असून, येथून सुरू केलेल्या परिवर्तनाच्या लाढाईत आम्ही नेहमी विजयी झालो आहोत, असे सांगत राहुल यांनी, आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच जिंकेल असे भाकीत वर्तविले.

 

‘राजेशाही आणेल’

 

राहुल गांधी म्हणाले, ‘स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसने ब्रिटिशांसोबत राजेशाही विरोधातही लढा दिला. काँग्रेसने संविधानाची निर्मिती करून गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल केला. प्रत्येकाच्या मताची किंमतही सारखीच ठेवली. मात्र, दहा वर्षांच्या काळात भाजपने लोकांचे हित आणि लोकशाही जपणाऱ्या सर्व संस्था बंद पाडण्याचे काम केले आहे. त्यांना पुन्हा या देशात राजेशाही आणायची आहे.’

 

आमचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद

 

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्‍न विचारला म्हणून त्यांना भाजपमधून बाहेर पडावे लागले, असे सांगत राहुल गांधी यांनी, काँग्रेसमध्ये मात्र प्रत्येक कार्यकर्ता आमच्याशी थेट बोलू शकतो, असे सांगितले. ते म्हणाले, ‘भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी कोणताही कार्यकर्ता थेट बोलू शकत नाही. काँग्रेसमध्ये मात्र प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला थेट प्रश्‍न विचारू शकतो. आमचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद असतो.’

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Bhandara news: 15 ट्रॅक्टर, सहा टिप्पर अन् एक जेसीबी जप्त , 2 कोटी 47 लाखांचा मुद्देमाल ताब्यात


 

पवनी : अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर पवनी पोलिसांनी मंगळवारी (२६ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात पोलिसांनी १५ ट्रॅक्टर, सहा टिप्पर व एक जेसीबी जप्त करत दोन कोटी ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

तालुक्यातील गुडेगाव रेतीघाटातून मंगळवारी (२६ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास नदीपात्रातील रेती उत्खनन करीत अवैधरीत्या रेतीसाठ्यावरून जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर व टिप्पर भरून रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांना माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे आपल्या सहकारी पोलिसांसोबत गुडेगाव घाटावर पोहोचले, घाटावर पोहोचताच त्यांना रेतीतस्कर जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर व टिप्परमध्ये अवैध रेती भरताना आढळले. यावेळी पथकाने १५ ट्रॅक्टर, सहा टिप्परसह एक जेसीबी जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाच्या चालक व मालकांविरोधात कलम ३७९, ५११, १०९अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे

 

दरम्यान, अवैध रेती वाहतूक प्रकरणातील बहुतांश ट्रॅक्टरवर नंबर प्लेट लागलेल्या आढळून न आल्यामुळे पोलिसांना कारवाई करताना इंजिन नंबर व चेसिस नंबरचा सहारा घ्यावा लागला. यात १५ ट्रॅक्टरपैकी ट्रैक्टर (क्र. एम. एच. ३६ झेड १६३४) या एकाच ट्रॅक्टरला नंबर प्लेट लागलेली होती, तर अन्य १४ ट्रॅक्टर विनानंबरचे आढळून आले. तसेच कारवाई केलेल्या टिप्परमध्ये (एम. एच. ४० ए के ६९२८), (एम. एच.४९ बो झेड ०९९३), (एम. एच. ४९ बी झेड ०२५६), (एम. एच. ४९ ए टी २३८७), (एम. एच. ४९ ए टी ०९९३), (एम. एच. ४० सी एम ८९९३) यांच्यासह एका जेसीबीचा समावेश आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे, पोलीस उपनिरीक्षक तिजारे, पोलीस हवालदार सत्यवान हेमणे, अजित वाहणे,नागदेव, बागडे, घरड, चालक कुर्लेकर, सुधीर शिवणकर यांनी केली, या घटनेचा पूढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील राऊत करीत आहेत.

 

पवनी पोलिसांची धडक कारवाई

अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेली वाहने एस.टी. डेपोत जमा ठेवण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र रेतीमाफियांकडून मागील दिवसांत डेपोमधील टिप्पर एस. टी. कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करून पळवून नेण्यात आले. याबाबत माहिती देऊन मदतीकरिता पोलिसांची मागणी करण्यात आली. मात्र तशी मदत पोलिसांकडून न मिळाल्यामुळे व डेपोतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवून, डेपोत टिप्पर व ट्रॅक्टर जमा असताना पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.

 

- कुंदन मिश्र, वाहतूक निरीक्षक, पवनी

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Lic news: एलआयसीने बाजारातून कमावले तब्बल २.२८ लाख कोटी रुपये


 

नवी दिल्ली: भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) यंदा शेअर बाजारात तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'एस इक्विटी'ने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विविध कंपन्यांमधील एलआयसीच्या एकूण शेअर होल्डिंगचे बाजार मूल्य ९.६१ लाख कोटी होते. ते आता वाढून ११.८९ लाख कोटी झाले आहे. सप्टेंबरअखेरीस एलआयसीचे एकूण शेअर होल्डिंग आणि विद्यमान बाजार मूल्य या आधारे ही किंमत काढण्यात आली आहे.

 

 

एलआयसीसाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ समभागांत कोल इंडिया, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. मागील वर्षात एलआयसीच्या लार्सन अँड टुब्रोमधील

 

हिस्सेदारीचे मूल्य ४६ टक्के वाढून ५२,७८६ कोटी झाले. कोल इंडियातील हिस्सेदारीचे मूल्य वाढून २४,०८७ कोटीवर पोहोचले तर एनटीपीसीतील एलआयसीच्या हिस्सेदारीचे मूल्य ८६ टक्के वाढून २,४०० कोटी रुपये झाले.

 

गुंतवणूकदारांना जबदरस्त परतावा

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहेच; पण ती सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे २६० कंपन्यांचे समभाग आहेत, या समभागांनी एलआयसीला जबरदस्त परतावा दिला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Pm Modi : दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे माझे स्वप्न : पंतप्रधान


 

भोपाळ: देशातील बचतगटांशी संबंधित दोन कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात सुरू असलेल्या 'विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध सरकारी कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान आभासी संवाद साधत होते.

मोदींनी रुबिना खान नावाच्या महिलेशी चर्चा केली. यावेळी मोदींनी महिलांना लखपती व्हायचे असल्यास हात वर करण्यास सांगितले, त्यानंतर सर्वांनी हात वर करत प्रतिसाद दिला. पंतप्रधान म्हणाले की, आमच्याकडे महिलांसाठी खूप काम आहे, अशा उपक्रमांमध्ये त्यांना पाठिंबा द्यायला हवा. त्यावर पंतप्रधानांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्व जण काम करतील, असे सर्वांनी उत्तर दिले.

 

मोदींनाही आश्चर्य...

 

रुबिना म्हणाल्या की, कोरोनामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि किट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून प्रत्येक महिलेने ६० ते ७० हजार रुपयांची कमाई केली. हे ऐकून मोदींनाही आश्चर्य वाटले. पंतप्रधानांनी रुबिनाला तिच्या मुलांबद्दल विचारले, ज्यावर तिने सांगितले की तिच्या दोन मुली दहावीपर्यंत शिकल्या आहेत आणि बेरोजगार मुलासाठी कार खरेदी केल्याचेही रुबिनाने सांगितले.

 

माझ्याकडे सायकलही नाही...

 

 रुबिनाने पंतप्रधानांना सांगितले की, बचत गटातून ५ हजारांचे कर्ज घेतले आणि पतीसोबत मोटरसायकलवर कपडे विकायला सुरुवात केली. जेव्हा तिचे काम वाढले तेव्हा तिने आणि तिच्या पतीने सेकडहँड मारुती व्हॅन घेण्याचे ठरवले.

 

यावर मोदी म्हणाले की, तुमच्याकडे मारुती व्हॅन आहे, तर माझ्याकडे सायकलही नाही. यावर महिला पुन्हा हसायला लागल्या. रुबिनाने सांगितले की, तिचा व्यवसाय वाढला असून तिने देवास येथे दुकान घेतले असून आता ती चांगले काम करत आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Armori news: आरमोरी शहरात चालतो खुलेआम सट्टा


 

 आरमोरी,  : शहर हे अवैध धंद्यांचे हब झाले असून शहरात व तालुक्यातून अवैध तंबाखू विक्री, दारू विक्री, सट्टा पट्टी, कोंबडे बाजार याला ऊत आले असतांना दिसत असून शहरात खुलेआम 'सट्टा' चालत असल्याची माहिती आहे. मात्र राजरोस खुलेआमपने चालत असलेल्या 'सट्टा' बाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ आहेत काय ? येथील सट्टा चालक हा या भागातील 'सट्टा किंग' म्हणून ओळखला जात असल्याचे कळत असून या 'सट्टा किंग' ला पाठबळ कुणाचे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदयांवर कारवाई करण्याचे निर्देशजिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन यांना दिलेआहे. आरमोरी शहरात दारू विक्री, तालुक्यातील कोंबडा बाजार,सट्टा पट्टी अशा अवैध धंद्यांना उत आले आहे. शहरातील दुर्गा मंदिरपरिसर, पंचायत समिती परिसर, नेहरू चौक काळागोटा परिसरात मोठया प्रमाणात खुलेआम अवैध सट्टा चालत असल्याची माहितीअसून अनेकजण आहारी जात असल्याने त्याचा परिणाम युवावर्गावरही होताना दिसत आहे. शहरात जिकडे तिकडे आकड्यांचेसंभाषणही ऐकायला मिळत असल्याचे कळते. "अरे काय आला,कोणता आकडा ओपन आणि कोणता क्लोज आला" अशा चर्चारंगतांना दिसत आहे. शहरात सट्टा चालवणारा सट्टा चालक हा त्यापरिसरातील 'सट्टा किंग' म्हणून ओळखल्या जात असल्याचे समजते. त्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही असे तो छातीठोकपणे सांगतो असे कळते त्यामुळे या सट्टा किंग लापाठबळ कुणाचे ? पोलीस प्रशासन यावर अंकुश लावणार काय याकडे लक्ष लागले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Bhandara news: दुचाकीस्वारावर वाघाचा हल्ला


दोन जण जखमी; पवनी-कहांडला मार्गावरील घटना

 

पवनी, (वा.). जंगलातून जात असलेल्या दुचाकीस्वारांवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना पवनी कऱ्हांडला मार्गावर घडली. हल्ला केल्यानंतर जवळच असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी दोघांना वाचविले. त्यानंतर वाघ हा जंगलाच्या दिशेन पळून गेला. राहुल हेमराज गेडाम (41) आणि रवींद्र मारुती वाघमारे (35) दोन्ही रा. खापरी असे जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच खापरीचे उपसरपंच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उमरेड-कहांडला- पवनी अभयारण्याअंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे

 

 या गावांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. जंगलातून ये-जा करणाऱ्यांवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. ग्रामस्थ भीतीने ये-जा करीत आहेत. जखमी राहूल गेडाम व रवींद्र वाघमारे हे पवनीवरून खापरी गावाकडे येत असताना जंगलातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेतली. यात दोघेही दुचाकीसह खाली पडले. 

 

वाघ त्यांच्यावर हल्ला करण्याच्या बेतात असताना वनकर्मचारी धावून आले आणि त्यांनी वाघाला पळवून लावले. यामुळे दोघांचे प्राण वाचले. वनरक्षकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रकरणाचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ठोकळ करीत आहेत. आमची शेती ही जंगलात असल्याने आम्ही तिथे पिके घेऊ शकतो. मात्र विकू शकत नाही. जनावरे पिकांची नासाडी करीत आहेत. शासन आमचे पुनर्वसन करीत नाही. आम्हाला मरायला सोडले आहे.

 

 

या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांचे हल्ले होत असतात. त्यामुळे ग्रामस्थ भीतीने या मार्गावरून ये-जा करतात. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष पहायला मिळत आहे. बांते, उपसरपंच खापरी  गावातील लोक ये-जा करताना गेटवर एण्ट्री करीत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांची मदत करता येत नाही. घटनेची संपूर्ण चौकशी करून जखमींना पूर्ण मदत केली जाईल.

- ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Dhan bonas: धान बोनसबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम


 

 

 चंद्रपूर, :. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनादरम्यान धानाला प्रतिहेक्टर 20 हजार रुपये बोनस जाहीर केला. पण याचा लाभ शासनाच्या एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्यांना मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो. 2021 पर्यंत शासनाकडून धानाला प्रति क्विंटलप्रमाणे बोनस जाहीर केला जात होता. पण मागील वर्षापासून शासनाने प्रति हेक्टर बोनस जाहीर करण्यास सुरूवात केली. मागील वर्षी शासनाने ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ दिला होता. यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री केली तरच बोनस मिळेल, असे सांगितले नव्हते.

 

मात्र, यंदा यासंदर्भात आदेश आला नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोनसची घोषणा केली. मात्र, याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. मागील वर्षीप्रमाणेच ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना बोनसचा लाभ मिळेल, असे सांगितले जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Sindewahi news: तलावातील शेकडो माशांचा अचानक मृत्यू


 

सिंदेवाही : सिंदेवाही येथील लेंडारा गावतलावात अचानक शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

 

शहराला लागूनच लेंडारा गावतलाव आहे. शहरातील स्थानिक आदर्श मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने व्यवसाय केला जातो. अचानक बुधवारी मासोळ्यांची दुर्गंधी पसरल्याने तलावाची पाहणी करीत असताना तलावाच्या काठावर अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. तलावातील मासे अज्ञात रोगाने मृत्युमुखी पडले की कुणी विषबाधा केली, याबाबत संशय आहे. या घटनेमुळे भोई समाज आर्थिक संकटात सापडला आहे. तलावातील मासे मृत्युमुखी कशामुळे पडले किंवा विषबाधा करण्यात आली काय, याचे कारण शोधून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भोई समाजाने केली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Chandrapur news: वाघाच्या हल्ल्यात बैल ठार


 

 

 पळसगाव (पि) नेरीवरून जवळ असलेल्या वडसी-वाघेडा मार्गावरील रिसॉर्ट बांधकामाच्या मागील बाजूस बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतात चरत असलेल्या बैलावर एका पट्टेदार वाघाने हल्ला करून जागेवरच ठार केले.

हा बैल हा वडसी येथील शेतकरी धनराज शिवदास मेश्राम यांच्या मालकीचा असून, त्यांचे यात हजारोंचे नुकसान झाले आहे. मेश्राम यांनी बुधवारी सकाळी या बैलाला शेतात चरायला सोडले, दुपारपर्यंत बैल शेतात चरत होता. मात्र काही वेळानंतर बैल दिसला नाही. मेश्राम त्या जागेवर गेले असता बैल मृतावस्थेत दिसला. वनविभागाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वाघाच्या हल्ल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

 

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क साधा 9518913059


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Tiger news: कोंढाळा परिसरात वाघांची पुन्हा 'एन्ट्री'!


 

 

 

 कुरूड : वडसा वन विभागात २० वाघांचा वावर आहे. या वाघांचे नागरिकांना अधूनमधून दर्शन होते. मागील पंधरवड्यापासून एकलपूर परिसरात वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना झाले होते. यात मागील आठवड्यात कोंढाळा जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलांना वाघ दिसून आला. त्यामुळे या जंगलात पुन्हा वाघांची एन्ट्री झाली आहे.

तालुक्याच्या फरी-झरी परिसरात टी-१४ वाघिणीने दहशत माजवली होती. या वाघिणीने फरी येथील महिलेचा बळी घेतला. तेव्हा जन आक्रोश निर्माण झाल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी त्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी निश्वास सोडला होता. परंतु मागील महिन्यापासून एकलपूरपरिसरात वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना अधूनमधून झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. तसेच गत आठवड्यात कोंढाळा येथील कक्ष क्रमांक ५९ मध्ये सरपण गोळा करणाऱ्या महिलांना वाघ दिसून आला. तेव्हा महिला भयभीत होऊन गावात परतल्या, वाघांचा वावर असल्याने जंगलात एकटे-दुकटे जाणे धोक्याचे ठरत आहे.

 

'ती' वाघीण गर्भवती

 

पावसाळ्यात शिवराजपूर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पाच वाघांची चित्रफित व्हायरल झाली होती. यामुळे या भागात हमखास वाघांचा वावर आहे, हे स्पष्ट झाले होते.

 

त्यापैकीच एक वाघीण गर्भवती असल्याचा प्रत्यक्षदर्शीचा कयास आहे. त्यामुळे या भागात भविष्यात वाघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023

PostImage

Gadchiroli news: बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या अनेक बाटल्या लपविल्या


गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशाच दोन बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या अनेक बाटल्या लपवल्याचे आढळले.

 

 

दोन आरोपी चामोर्शी येथे मोटरसायकलने दारूची वाहतूक करत होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी चामोर्शीतील जुन्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाजवळ सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले. बाईकच्या पेट्रोल टँकमधून एकामागोमाग एक दारूच्या बाटल्या निघतच असल्याने टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, आणि नसेल तर गाडी चालत कशी होती, असा प्रश्न उपस्थितांना पडला होता.

 

पोलिसांनी यासंदर्भात विचारले तेव्हा पेट्रोल टँक गाडीच्या डिक्कीत बनवण्यात आल्याचे दिसून आले. पेट्रोल पुरवठ्याचा पाईप तेथून इंजिनला जोडलेला होता. दारूची वाहतूक करण्यासाठी या बहाद्दरांनी लढविलेली ही शक्कल पाहून चामोर्शी ठाण्याचे पोलिसही चक्रावून गेले. बाईक आणि दारूच्या बाटल्या जप्त करून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

 

आता ३१ डिसेंबर जवळ आल्याने दारूची अनधिकृत वाहतूक वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात चामोर्शी पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करणाऱ्यांचे मनसुबे साध्य होऊ नये यासाठी पोलिस दलाने देखील त्यांचे गोपनीय बातमीदार सक्रिय केले आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 28, 2023

PostImage

Accident news: उभ्या बैलगाडीवर दुचाकी धडकून 1 ठार ,धानोरा तालुक्यातील रांगी येथील घटना


 

 धानोरा, (ता.प्र.). रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या बैलगाडीला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील रांगी येथे बुधवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. खट्या बोरुले (35) रा. मानापूर असे मृतकाचे तर राजू ठाकरे असे जखमी इसमाचे नाव आहे.

एम.एच. 33 ए.एफ. 7338 क्रमांकाच्या दुचाकीने खट्या बोरुले व राजू ठाकरे बायपास मार्गाने प्राथमिक आरोग्यकेंद्राकडून मानापूरला जात होते. दरम्यान, रांगी येथील संदीप ताडाम यांच्या घरासमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकामी बैलगाडीला जोरदार धडक बसली.

 

यात वाहन चालक खट्या बोरुले जागीच ठार झाला तर राजू ठाकरे गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला तत्काळ रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 27, 2023

PostImage

Kurkheda news: येंगलखेडा परीसरात आढळला मुलाचा मृतदेह


 

 

डॉन्स हंगामा पाहून परत येतांना घात की अपघात चर्चाना उधाण

 

 

 

कुरखेडा - तालुक्यातील येंगलखेडा येथील पांडव हायस्कूल जवळ गौरव दलपत महावी (१६) या विद्यार्थ्यांचा मृतदेह आज २६ डिसेंबर रोजी पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली असून या विद्यार्थी युवकाचा घात की अपघात या संदर्भात विविध चर्चाना ऊत आलेला आहे. सदर विद्यार्थी हा कुरखेडा शहरातील आर.जी.व्ही हायस्कूल येथे दाहव्या वर्गात शिकत होता. प्राप्त माहितीनुसार गौरव दलपत महावी हा कुरखेडा येथील राणा प्रताप वार्डात आई व ताई सोबत राहत होता. त्याचे वडील पोलिस खात्यात कार्यरत आहेत. तो काल येंगलखेडा येथे आपल्या मित्रासोबत मंडई निमित्ताने आयोजित डॉन्स हंगामा पाहण्यासाठी गेला होता.

 

काल उत्तररात्रीच्या सुमारास डॉन्स हंगामा पाहून थिएटर मधून बाहेर पडून गेल्यावर गौरत परत का आला नाही म्हणुन त्याच्या मित्रांनी शोध मोहीम राबविली असता पहाटे तीन वाजेच्या सुमारास पांडत हायस्कूल जवळ तो निपचितपडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या मित्रांनी व मित्राच्या पालकांनी त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पुराडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पवार हे करीत आहेत.

 

 

मंडई पाहुन येतांना दरवर्षी जातो बळी

 

येंगलखेडा येथील मंडईच्या दिवशी रात्रीच्या सुमारास आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर परत जातांना दरवर्षी कुणीणाकुणी मृत्यूमुखी पड़त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या ३ वर्षात ३ जणांचा अपघात झाला होता. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे पोलिस प्रशासनाने प्रकरणाची गांभिर्याने चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 27, 2023

PostImage

अन भिंतीवर बसला ठिय्या मारून वाघ, उडाली खळबळ


उत्तर प्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यातील वाघाच्या एन्ट्रीने अनेकांची झोड उडाली. या वाघाने जंगलातून थेट लोकवस्तीत प्रवेश केल्यामुळे स्थानिकांची चांगलीच भांबेरी उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्येय, येथील गुरुद्वाराच्या भिंतीवर वाघ आराम करताना दिसून येतो, तर भिंतीवर राजेशाही थाटात चालतानाही दिसून येत आहे. वाघाला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचंही व्हिडिओत दिसून येते. दरम्यान, वाघ भिंतीवर आराम करत असल्याचे पाहून तत्काळ वनविभागाने चारी बाजुंनी जाळी बांधली आहे.

पिलीभीत जिल्ह्याच्या कलीनगर तालुक्यातील ही घटना असून अटकोना गावात मध्यरात्री २ वाजता वाघाने शिरकाव केला. स्थानिकांनी वाघाला पाहिल्यानंतर तत्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर, वन विभागानेही घटनास्थळी धाव घेत चारही बाजुंनी जाळी बांधून वाघाला बंदिस्त केलं आहे. येथील एका गुरुद्वाराच्या भिंतीवर वाघ बसल्याचे स्थानिकांनी पाहताच, वाघाला पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली. विशेष म्हणजे सकाळपर्यंत वाघ त्याच भींतीवर दबा धरुन बसला होता, तेथेच टेहाळणी करत होता. त्यामुळे, सकाळी वाघाला पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. 

 

दरम्यान, वन विभागाचे पथक वाघाला पकडून अभयारण्यात नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, वाघ लोकवस्तीत असल्याने आणि लोकांची मोठी गर्दी असल्याने अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागत आहे. मात्र, पिलीभीत जिल्ह्यात वाघ लोकवस्तीत येण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे, स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.  


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 27, 2023

PostImage

Gondiya news: साक्षगंध समारंभानिमित्त वऱ्हाडी टवेरा वाहन पलटली, 4 ठार 5 जखमी


गोंदिया : तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे टवेरा वाहनाला अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व के. टी. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.

 

तिरोडा तालुक्यातील करटी बुुजूर्ग येथील साक्षगंध समारंभानिमित्त वऱ्हाडी हे टवेरा वाहनाने गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी येथे येत असतांना दांडेगावच्या चौकात ही घटना घडली. २६ डिसेंबर रोजी मौजा दांडेगाव येथे गोंदिया तिरोडा महामार्गावर तिरोडा करटी वरुण गोंदिया कड़े मजीतपुर येथे उइके कुटुंबीयच्या घरी साक्षगांधच्या कार्यक्रम निमित्त वरात घेऊन जात असता दांडेगाव येथे भरधाव वेगाने येत असलेल्या टवेरा वाहन (MH 40,A 4243) च्या ड्राइवर अतुल नानाजी पटले (२३) वर्ष राहणार अर्जुनी परसवाड़ा यांनी वेगात असलेल्या वाहनाचे एकदम ब्रेक लावल्यामुळे सदर वाहन हे दोन तीन पलट्या घेत राज्य महामार्गावरील दांडेगाव येथे डाव्या बाजूला लागून असलेल्या रोहिणी प्रसाद बिरणववार (रा. दांडेगाव) यांच्या घराच्या अंगणात विद्युत पोललगत असलेल्या विटांच्या ढिगाऱ्यावर जाउन आदळल्याने मोठा अपघात झाला. वाहनात चालकासह बारा लोक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

अपघात स्थळावर दोन महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छाया अशोक इनवाते (रा. करटी), अनुराधा हरिचंद कावळे (रा. करटी), तसेच एक पंधरा महिन्याच्या चिमुकल्याचा सामान्य रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मृताचे नाव कळू शकले नाही. या अपघातात गीता प्रितिचन्द इनवाते (५५ रा. करटी ता. तिरोडा), पदमा राजकुमार इनवाते (५० रा. भुराटोला तिरोडा), बिरजुला गुडन ठाकरे (३५ रा. आरम्भाघोटी जि. बालाघाट), अहिल्याबाई नामदेव कोडवाते (६२ रा. करटी तिरोडा), तसेच वाहन चालक अतुल नानाजी पटले (२३ रा. अर्जुनी परसवाड़ा) यांच्यावर के.टी.एस . जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी पोलिस पथकाकडून सुरु आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 27, 2023

PostImage

मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही,अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही”- प्रकाश आंबेडकर


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. परंतु, विविध पक्ष एकत्र आल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोण कुठून जागा लढवणार यावरून छुपे वाद सुरू आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे. जागा वाटपाचा विषय गांभीर्याने घेण्यापेक्षा मोदींविरोधात लढा उभा करायला हवा, असं प्रकाश आबंडेकरांनी सुचवलं आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

 

“कोणी म्हणतंय मी २३ जागा लढेन, कोणी म्हणतंय अमुक जागा लढवेन. आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे.

 

“मोदी घालवायचा असेल तर २-४ जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 27, 2023

PostImage

Haidrabad news: लग्नात जेवणात मटणाची नळी न मिळाल्याने वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी होऊन वरपक्षाने लग्न मोडला


(Haidrabad) हैद्राबाद: एका लग्नात जेवणात मटणाची नळी न मिळाल्याने वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी होऊन वरपक्षाने लग्न मोडल्याचा प्रकार घडला. तेलंगणात ही धक्कादायक घटना घडली.

 

तेलंगणा येथील निजामाबाद जिल्ह्यातील वधू आणि जगतियाल जिल्ह्यातील एका दोन कुटुंबात विवाह निश्चित झाला होता. वधू वराचा साखरपुडा देखील उरकला होता. वधूच्या कुटुंबीयांनी लग्नातील पाहुण्यांसाठी मांसाहाराची व्यवस्था केली होती. मांसाहारी थाळीत मटण दिले होते.

 

लग्नात सर्व काही सुरळीत चालले होते. पण अचानक माशी शिंकली. जेवणामध्ये मटणाच्या नळ्या नसल्याने लग्नातील पाहुणे नाराज झाले. वराच्या ताटात देखील मटणाच्या नळ्या दिल्या नसल्याने या गोष्टीचा वराला राग आला. ही बातमी वराच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. वराच्या कुटुंबीयांनी वधूच्या कुटुंबीयांकडे याबाबत तक्रार केली. यातून वाद वाढला. हा वाद एवढा वाढला की दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरु झाली. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले.

 

पोलिसांनीही दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण वर पक्ष मात्र, समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. मटणात नळ्या नसणे हा आमचा अपमान आहे, अशी भूमिका वर पक्षाने घेतली. तर मटणात नळ्या होत्या, असा पवित्रा वधू पक्षाने घेतला. मात्र, एकमत न झाल्याने शेवटी नाराज वर पक्षाने हे लग्नच मोडले. लग्न न करताच वरात परतली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर अत्याचार


पीडितेच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलसांत गुन्हा दाखल

पुसद, (ता.प्र.) तालुक्यातील वालतूर रेल्वे येथील तरुणाने गावातीलच 23 वर्षीय तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर वारंवार शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार दिल्याने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात वसंतनगर पोलिस ठाण्यात रविवारी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सूरज दिलीप धुळे (वय 30, रा. वालतूर रेल्वे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सूरजने गावातीलच 23 वर्षीय तरुणीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून काकाच्या घरी कुणी नसताना बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना फोटोही काढले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकी देत वारंवार बलात्कार करीत होता

बदनामीच्या भीतीने तरुणीदेखील त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. घटनेच्या दिवशीही तरुणाने शरीरसुखाची मागणी केली होती. अशात तरुणीने नकार दिल्याने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या तरुणीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर वसंतनगर पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगरचे ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आशिष झिमते व पोलिस कॉन्स्टेबल गजानन जाधव करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

Wadsa news: गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या


देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असल्याने गावात शंका-कुशंकेला उधाण आले आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील आमगाव-देसाईगंज मुख्य मार्गावरील बैद्यनाथ कारखाना नजिक असलेल्या धोडी नाला जवळच आज सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांना एक इसम झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे सदर घटना ही वाऱ्यासारखी पसरली व बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यानुसार गांधीनगर येथील चक्रधर बनकर यांनी नरेश नामदेव पारधी यांचे मोठे बंधू मारोती नामदेव पारधी यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानुसार मारोती पारधी यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास कळताच लगेच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला व मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करीत आहेत. सदर तरुणाने घेतलेला गळफास गुलदस्त्यात असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची चर्चा जनमाणसात सुरूआहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

आले रे आले पाथरगोटा हत्ती आले अन् पाच कुटुंब घर सोडून पळाले


गडचिरोली : काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेला रानटी हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला असून आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी धुडगूस घातला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळ काढावा लागला. हल्ल्यात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री २० ते २२ रानटी हत्ती आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावातील पाच घरांवर हल्ला केला. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराला धडक दिली.

 

हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळ काढला आणि मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावत सुटले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले, पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल मुखरु किनेकर ,वनरक्षक बाळू शिऊरकर , रुपा अत्करे , पंढरी तेलंग आदी दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले. हल्ल्यात घरांचे नुकसान झाले, पण जीवितहानी टळली.

 

 

 

पाच कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था करावी

हत्तीच्या हल्ल्यामुळे पाच कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे समोर जायचे कोठे, रहायचे कसे, खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यापूर्वी शंकरनगर येथे ९ सप्टेंबर रोजी हत्ती पहिल्यांदा दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यासह बोअरवेल, इलेक्ट्रिक साहित्यांचे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा या भागात हत्तींनी प्रवेश केल्याने शेतकरी दहशतीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

अन बहीनीच्या दिरासोबत तिचे सूत जुळले....


नागपूर : तरुणीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिच्यासोबत कुटुंबीयांनी संबंध तोडले. मात्र, तिच्या भेटीला लहान बहीण नेहमी जात होती. या दरम्यान बहिणीच्या दिरासोबत तिचे सूत जुळले. दोघेही एका शेतात चोरून भेटताना मुलीच्या वडिलांना दिसले. त्यांचे प्रेमसंबंध उघडकीस येताच मुलगी आणि वडील पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रोशन (२१, नाड) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

 

पीडित १६ वर्षीय मुलगी दहावीची विद्यार्थीनी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे रोशनच्या मोठ्या भावासोबत प्रेसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिच्या वडिलांनी लग्नास विरोध दर्शविला. दोघांचे प्रेमसंबंध तुटले होते. परंतु. मुलीने कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे चिडलेल्या वडिलांनी मोठ्या मुलीशी सर्वच प्रकारचे संबंध तोडले. तिला घरी येण्यास मनाई करण्यात आली. मात्र, मोठ्या बहिणीच्या मायेपोटी लहान बहीण लपून तिला भेटायला जात होती.

 

 

 

बहिणीच्या घरी नेहमी जात असल्यामुळे बहिणीचा दिराशी तिचे सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांच्याही प्रेमप्रकरणाला बहिणीनीने पाठिंबा दिला. १९ डिसेंबरला मुलगी घरातून बाहेर पडली आणि प्रियकराला भेटायला गेली. सलग तीन दिवस मुलगी घराबाहेर जात असल्यामुळे वडिलाने तिच्यावर पाळत ठेवली. २२ तारखेला मुलगी बाहेर पडल्यानंतर वडिलही तिच्या मागोमाग गेले. एका शेतात वाट बघत असलेल्या रोशनसोबत निघून गेली. काही अंतरावर दोघांनाही वडिलांनी पकडले आणि चांगला चोप दिला. मुलीला उमरेड पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तक्रारीवरून रोशनविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

Bhandara news: प्रेमात पडल्याच्या संशयावरून भावाने बहिणीची केली गळा आवळून हत्या


मोहाडी : पोलीस स्टेशन वरठी अंतर्गत येत असलेल्या सोनुली येथे प्रेमात पडल्याच्या संशयावरून भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान उघडकीस जाली, वरठी पोलिसांनी मोठ्या सीताफिने आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली तर अश्विनी गोपीचंद बावनकुळे (२०) असे मृतक बहिणीचे नाव आहे. बरठी जवळील सोनुली येथील गोपीचंद बावणकुळे हे मुळचे लाखनी येथील रहिवासी होते. काही वर्षाअगोदर ते सासरी सोनुली येथे आले होते. मृतक अश्विनी ही नागपूर येथे बिएससीचे शिक्षण घेत होती. 

 

दोन दिवसाअगोदर ती गावी आली होती. अश्विनी ही गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. याची कुणकुण भाऊ आशिष याला लागली होती. पाच कारणावरुन दोघा बहिण-भावात नेहमीच चारित्र्याच्या संशयावरुन खटके उडत होते. दि.२४ डिसेंबर रोजीनातेवाईकांकडे लग्न कार्यक्रम असल्यानेव डील हे कन्हान येथे गेले होते. तर आईल ग्न कार्यक्रमानिमित्त साकोलीकडे गेली होती. पटनेच्या दिवशी घरी कोणीच नसतांना प्रेमात पडल्याच्या संशयावरुन दोघा बहिण-भावात कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला जाऊन भाऊ आशिष याने तिचा गळा आवळून हत्या केली. कुटुंबियांनी नैसर्गिक मृत्यूचा बनाव करुन तिला वरठी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. अश्विनीचा मृत्यू संशयास्पद असल्याने याची माहिती वरठी पोलिसांना मिळताच ठाणेदार अभिजीत पाटील यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले. शवविच्छेदनाल अश्विनीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे निश्पत्र होताच पोलिसांनी या घटनेतील आरोपी नाऊ आशिष याला तत्काळ अटक केली, पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला, पोलिसांनी आरोपीला दि. २५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वरठी चे ठाणेदार अभिजीत पाटील करीत आहेत. गोपीचंद बावणकुळे यांच्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी होती. या घटनेत मुलीच्या मृत्यूने व मुलाच्या अटकेनेगोपीचंद बावणकुळे यांच्या कुटूंबावर मोठा आघात पोहचला आहे.

 

भावाचा मोबाईलवर स्टेट्स

 

आरोपी भाऊ आशिष याने आपल्या मोबाईलवर आज आमचेकडे अंत्यसंस्कार आहे. असा स्टेट्स ठेवला होता. मोबाईलवर स्टेट्स पाहुन गावातीलच मावशीचा मुलगा धावत आशिष याच्या घरी गेला. तेव्हा समोरील दार बंद होता. मात्र घरातून मोठ्याने गाण्याचा आवाज येत होता. दार ठोठावला असता प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने मागेहून दार उघडला. तेव्हा अश्विनीचे प्रेत पडलेले होते. तर आशिष गाणे ऐकत बसला होता.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

Tractor accident: ट्रॅक्टरखाली दबून युवकाचा मृत्यू


 

नागभीड : ट्रॅक्टरखाली दबून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पाहार्णीजवळ दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास घडली. लोकमन यादव मैंद (२०) असे मृतक युवकाचे नाव असून तो तालुक्यातील इरव्हा येथील रहिवासी आहे.

 

मृतक युवक ट्रॅक्टरवर धान दळण्यासाठी पाहार्णी येथील राईस मीलवर आला होता. धान दळून झाल्यानंतर तो त्याच ट्रॅक्टरने गावी परत निघाला होता. मात्र एका वळणावरट्रॅक्टरची ट्राली पलटी झाली आणि तो ट्रालीखाली दबला, आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली

पोलिसांनी पंचनामा केलाआहे. मृतकाचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी नागभीडच्या ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आला आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

Susaid: तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या


 

सावली:  तालुक्यातील खेडी येथे गेल्या तीन महिन्यापासून किरायाने राहत असलेली पुनम राजकुमार शर्मा (१६) रा. बाबूपेठ या मुलींनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

 

  २५डिसेंबरला सदर घटनेची माहिती पोलीस पाटील कृपाल दुधे यांनी सावली पोलिसांना दिली. त्यानंतर सावली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व

 

तपास सुरु केले आहे. सदर प्रकरण नेमके काय आहे याची चौकशी सकाळी ही पोलीस करणार आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व तपास सुरु असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. तरूणीच्या आत्महत्येमागील कारण वृत्तलिहीपर्यंत कळू शकले नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023

PostImage

जुगारी पळाले.. हाती लागल्या तीन दुचाकी आणि कोंबडा


 

राजुरा : तालुक्यातील सातरी शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर विरूर पोलिसांनी धाड टाकण्यापूर्वीच जुगारी पळून गेल्याची घटना सोमवारी (दि. २५) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळावर एक कोंबडा आणि तीन दुचाकी जप्त केल्या.

 

सातरी शिवारात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती विरूर पोलिसांना मिळाली. ठाणेदारासह पोलिस ताफा सातरी गावाकडे निघाला होता. मात्र, जुगाऱ्यांना भणक लागताच त्यांनी

 

पोबारा केला. घटनास्थळावर एक कोंबडा आणि तीन दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवर लाखोंचा जुगार खेळला जातो, महाराष्ट्र सीमेवर अनुर अंतरगाव, लक्कडकोट, गोंडपिपरी परिसर, राजुरा, वरुर रोड कोरपना तालुका या ठिकाणी क्लबची परवानगी मिळावी म्हणून लाखो रुपये मोजून जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत असल्याची माहिती आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Jayapur news: तीन पोलिसांनी वर्षभर केला १८ वर्षीय मुलीवर बलात्कार


भावाला खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी

जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका मुलीवर वर्षभराहून अधिक काळ बलात्कार केल्याप्रकरणी तीन पोलिस हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्वरचे पोलिस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, तरुणीने (१८) शनिवारी संध्याकाळी तीन पोलिसांविरुद्ध तक्रार दिली होती.

पीडितेने बलात्काराची तक्रार केल्यास तिच्या भावाला खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. आरोपीविरुद्ध रेणी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई म्हणाली...

कॉन्स्टेबलने मुलीला धमकावले आणि तुझ्या भावाला अटक करून तुरुंगात पाठवतो, असे सांगितले. माझी मुलगी अलवरमध्ये भाड्याने खोली घेऊन शिकते. एक वर्षापूर्वी कॉन्स्टेबल अविनाश मुलीच्या खोलीत गेला. तिला धमकावून आपल्या खोलीत नेले आणि तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. गेल्या महिन्यातही एक हवालदार घरी आले. तिला मागच्या खोलीत ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Gadchiroli news: शाळेचे अधीक्षक, मुख्याध्यापक निलंबित


 गडचिरोली, : . धानोरा तालुक्यातील सोडे येथे मुलींच्या शासकीय आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणात 23 डिसेंबरला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मुख्याध्यापक व अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश काढले. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. सोडे येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय चालविले जाते. याठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थिनी शिक्षण घेतात. सध्या 380 मुली व दहा मुले आश्रमशाळेत शिकतात. 20 डिसेंबर दुपारी जेवणानंतर मुलींना अचानक मळमळ,

 

उलटी, पोटदुखी असा त्रास सुरु झाला. दुसऱ्या दिवशीही 17 मुलींना सकाळच्या नाश्त्यानंतर त्रास जाणवल्याने धानोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची एकूण संख्या 126 वर पोहोचली. दरम्यान, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहूल कुमार मीणा यांनी सोडे

 

आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. आर. मंडलवार व वसतिगृह अधीक्षक राजेश लांडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 22 डिसेंबर रोजी त्यांचा खुलासा आला. तो अमान्य करीत 23 डिसेंबरला दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले, अशी माहिती राहुलकुमार मीणा यांनी दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Tiger news: गिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार


 

 

 वाढोणा, (वा.). ब्रम्हपुरी वन विभागाच्या तळोधी (बा.) वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गोविंदपूर उपक्षेत्रातील गिरगाव येथील आंबेघाटा तलावाच्या लगत असलेल्या परिसरात चरत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून बैलाला जागीच ठार केले. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे बैल मालक श्रीधर हनुजी मोहुर्ले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील श्रीधर हनुजी मोहुर्ले हे नेहमी प्रमाणे शनिवारी त्यांच्या मालकीच्या बैलांना व शेळ्यांना जंगलालगत असलेल्या गिरगाव येथील आंबेघाटा तलावा जवळील परिसरात जनावरे चारावयास घेऊन गेले होते. मात्र, तिथे तबा धरून बसलेल्या वाघाने शेळ्यांच्या

 

जवळ एकटा चरत असलेल्या बैलावर अचानक हल्ला करून त्याला जागीच ठार केले. मोहुर्ले यां नी आरडाओरड केली. तोपर्यंत वाघाच्या हल्यात बैल ठार झाला होता. यामुळे गरीब शेतकऱ्यांची मोठी आर्थिक नुकसान झालेली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैलाची किंमत जवळपास 40 हजार रुपये असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. दरम्यान सदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या गरीब परिस्थितीचा विचार करून वनविभागाने त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे येथील नागरिकांत वाघाची मोठी दहशत पसरली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Bhandara news: रेती तस्करांची तलाठ्याला धक्काबुक्की


मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल , चार आरोपी अटकेत

भंडारा:  रेती तस्कराकडून कारवाई दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केल्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. असाच प्रकार दि.२२ डिसेंबर रोजी रोहा- बेटाळा मार्गावर घडला. रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई दरम्यान रेती तस्करांनी कारवाई टाळण्यासाठी तलाठ्याला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला. तलाठ्याच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

तलाठी कार्तिक सिरसकर हे आपल्या पथकासह दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता रोहा- बेटाळा रस्त्यावर कारवाई मोहिमेदरम्यान कर्तव्यावर असताना टिप्पर क्र. एम एच ३६ एए २८४५ याटिप्परमध्ये रेती वाहतूक करताना दिसून आला. 

टिप्पर चालकाला परवानाबाबत विचारपूस केली असता परवाना नसल्याचे आढळून आले. सदर टिप्परवर कारवाईदरम्यान टिप्पर मालक यांनी अन्य दोन व्यक्तींसोबत त्याठिकाणी पोहचून आमच्या टिप्परवर कारवाई करायची नाही, असे बोलून तलाठी कार्तिक सिरसकर यांना धक्काबुक्की केली. तलाठ्याकडून टिप्परची चाबी हिसकावून टिप्पर चालकाला देवून टिप्पर पळवून नेले. आरोपिंनी शासकीय कामात अडथळा आणून तलाठ्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी मोहाडी पोलिसात तक्रार नोंदवून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची चारही आरोपिंना अटक केली असून टिप्पर व कार जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोनि. पुल्लरवार करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Tractor accident: ट्रॅक्टरच्या अपघातात चालकाचा मृत्यू


Tractor accident वरोरा : ट्रॅक्टरचे समोरचे एक चाक अचानक निघाल्यामुळे ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वरोरा घटना तालुक्यातील पावना- मोरवा या रस्त्यावर (दि.२२) घडली.

अतुल ज्ञानेश्वर पायघन, वय २८ वर्षे, राहणार मांगली असे या मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे मांगली गावात सर्वत्रशोककळा पसरली आहे.

सदर ट्रॅक्टर गिट्टी भरून मोरवा रस्त्याने जात असता पावणा गावाजवळ ट्रॅक्टरचे समोरील एक चाक निखळून पडले.

चाक निखळल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले. यात अतुल ज्ञानेश्वर पायघन याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथे पाठविला.

Tractor accident: ट्रॅक्टरच्या अपघातात चालकाचा मृत्यू


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Gadchiroli Amirza accident: नियंत्रण सुटल्याने दुचाकी- स्वार जागीच ठार


Gadchiroli Amirza accident अमिर्झा - नजीकच्या मरेगाव- चार्भाडा-वडधा मार्गावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी - स्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान घडली.

सरगम कोटांगले (२४) रा. नगरी ता. जि. गडचिरोली येथील रहिवासी असून चांभार्डा येथे नातेवाईकांकडे दुचाकीने अंत्यविधिसाठी गेला होता. मरेगाव येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीची भेट घेऊन परत येत असतांना स्वतःच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मरेगाव-चांभार्डा- वडधा मार्गावर घडली.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शवविच्छेदनासाठी आरमोरी येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

संधी मिळताच विनयभंग करायचे बृजभूषण


दिल्ली पोलिसांची न्यायालयात माहिती

दिल्ली : भाजपा खासदार बृजभूषण सिंह जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करायचा प्रयत्न करायचे, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना दिली. यासोबतच याविषयीचे आमच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचा दावादेखील पोलिसांनी केला. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटियन मॅजेस्ट्रेट हरजीत सिंग जसपाल यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद ऐकला.

पीडितेवर अन्याय हाच मुद्दा 

दिल्ली पोलिसांनी असेही सांगितले की, पीडित मुलीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा प्रश्नच मुळात नाहीये. लैंगिक अत्याचार तिच्यावर अन्याय झाला प्रकरण; हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अडचणीत वाढ एका महिला कुस्तीपटुच्या तक्रारीचे वर्णन करताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तजाकिस्तानमध्ये बुजभूषण यांनी त्या मुलीला खोलीत बोलवले. तिला जबरदस्तीने मिठी मारली. तिने विरोध केला असता आपण ही मिठी वडिलांप्रमाणे मारली असे सांगितले. यामुळे त्यांना आपण नक्की काय करत आहोत? हे हे माहीत होते, असा युक्तिवाद पोलिसांतर्फे करण्यात आला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

suicide News : तरुणीची आत्महत्या


नेरी : चिमूर तालुक्यातील डोमा येथील एका २० वर्षीय तरूणीने विष प्रशासन करून आत्महत्या केल्या घटना आत शनिवारला पहाटे घडली. प्राजंली सावसाकडे (२०) असे मृतक मुलीचे नाव आहे. सदर तरूणीने विष प्राशन केल्याची बाब कुटूंबियांच्या लक्षात येताच तातडीने तिला उपजील्हा रुग्णालय चिमूर येथे आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासनी करून चंद्रपुरला रेफर करण्यात आले मात्र तरूणीचा मृत्यु झाला. मृत्यु मागील कारण कळु शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Tiger Nagbhid news: विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू


नागभीड : तालुक्यातील गोविंदपूर येथे जंगलानजिक असलेल्या विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू झाला. ही वाघीन तीन वर्षाची आहे. ही वाघीन शुक्रवारी रात्री विहिरीत पडली असावी असा अंदाज आहे. सिंदेवाही तालुक्यात नुकताच विद्युत करंटने एका वाघाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर वनविभागाने गस्त सुरू केली आहे. या गस्तीत जंगल भागातील विद्युत लाईन व विहिरींची तपासणी करणे सुरू आहे. या तपासणीचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी गोविंदपूर बिटाचे वनरक्षक पी एम श्रीरामे हे तपासणी करीत असताना त्यांना विहिरीत एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Chimur neri accident: चिमूर - नेरी मार्गावरील पोल्ट्रीफॉर्मजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु, ११ किरकोळ जखमी


 

अंत्यसंस्काराला जात असतांना सुमो पटली

नेरी : शेगाव (बूज) येथील काही लोक टाटा सुमो (क्र. एम एच २६ एल १६६७) मय्यत साठी नागभीड तालुक्यातील सारंगगड येथे अत्यंसंस्काराला जात असतानी चिमूर - नेरी रोड च्या उमरे यांच्या पोल्ट्री फार्म जवळ टाटा सूमो चा टेंशन राड तुटल्याने वाहन चालकाचे नियंत्रण

 

सुटल्यामुळे सुमो पलटी झाली. यात १२ महिला - पुरुष मंडळी प्रवास करीत होते त्यात नानाजी शीवराम जिवतोडे वय ७० वर्ष हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नागपुर ला जात असतानी वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. असून ११ लोक किरकोळ जखमी झाले आहेत.

 

यामध्ये सुमो ड्रायवर गजानन बावणे ३५ वर्ष, विद्या जिवतोडे, रंजना जिवतोडे,शोभा जिवतोडे, शिला जिवतोडे, नागुबाई जिवतोडे, माधुरी जिवतोडे, विनायक जिवतोडे, गिरजाबाई जिवतोडे, समिक्षा दडमल हे किरकोड जखमी झाले आहेत.

चिमुर पोलीसांना माहीती मिळताच चिमुरचे ए. पि. आय. चौरे घटना स्थळावर येऊन जखमींना उपजील्हा रुग्णालय चिमुर येथे पाठवण्यात आले असुन पुढील उपचार सुरू आहे पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 25, 2023

PostImage

Ranti dukkar: रानटी डुकरांच्या हल्ल्यात शेतकरी ठार


 

 

गोंडपिपरी तालुक्यातील सोनेगाव (देशपांडे) गावातील घटना

तोहोगाव : शेत शिवारावर वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू असून शेताची पाहणी करण्याकरिता गेलेल्या ४२ वर्षीय शेतकऱ्यावर रानटी डुकराने हल्ला केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंडपीपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) या गावात २१ डिसेंबर ला घडली असून त्या शेतकऱ्याचे नाव नागेश भाऊराव चौधरीअसे आहे.

तोहोगाव परिसरात ऐका बाजूने वर्धा नदी तर दुसऱ्या बाजूने जगळव्याप्ती भाग असल्याने येथे उद्योगधंदे नाही.

अश्यात नागरिक शेती, शेतमजुरी किंवा मासेमारी करून आपले उदरनिर्वाह करीत शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळत अतिवृष्टी सारख्या संकटातून कसे बसे वाचले तर वन्यप्राणी पिके फस्त करीत आहे. तेलंगणा सीमेलगत धाबा वनपरिक्षेत्रात येत असलेले सोनापूर येथील शेतकऱ्यानेभाडे तत्वावर शेती केली होती.

सतत शिवरावर रानटी डुकर शेतातील पीक उदवस्त करीत  असल्याने नागेश गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतात गेला होता. सायंकाळी घरी परत न आल्याने घरच्या मंडळीने त्याच्या शोध घेण्यास सुरुवात केले पण तो रात्री न गवसल्याने शुक्रवारी सकाळ पासून त्याची शोधमोहीम सुरू करण्यात आल्याने अखेर शुक्रवारी दुपारी तो कापसाच्या शेतीमध्ये मृत अवस्थेत आदळला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 24, 2023

PostImage

Murder : एकमेकाजवळच तरूण तरुणीचा आढळला मृतदेह, उडाली खळबळ


गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम पुराडा गेडेवारटोला परिसरातील शेतामध्ये एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत व तिथूनच ५ ते सात फुटाच्या अंतरावर एका झाडाखाली युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही हत्या की आहे की आत्महत्या, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.

मृत तरुणाचे नाव श्रीकांत कापगते (२२) व मृत तरुणीचे नाव टिकेश्वरी मिरी असल्याचे ग्रामस्थांकडून पोलिसांना कळविण्यात आले आहे. सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. उत्तरीय तपासणीनंतरच ही हत्या की आत्महत्या, हे स्पष्ट होईल, अशी माहिती सालेकसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी बोलताना दिली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Gadchiroli Crime News: पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात अर्धनग्न तरुणीच्या हत्या प्रकरणी, तरुणास गुन्हे शाखेने 24 तासात केली अटक


गडचिरोली (Gadchiroli) : २१ डिसेंबर २०२३ ला पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर घटनास्थळ हे पोर्ला गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील असल्याने व घटनास्थळावरील परिस्थीतीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीस दलासमोर होते. प्रकरणाची तिव्रता लक्षात घेवून तात्काळ अपर पोलीस अधिक्षक, कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली. श्वान पथक तसेच अंगुलीमुद्रा विभागातील अधिकारी यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकिस आणण्याची विशेष जबाबदारी सोपविली.

सदर परिसरातील त्याचप्रमाणे संपूर्ण गडचिरोली य गडचिरोली लगत जिल्ह्यातील त्यांचे बातमीदारांना कार्यान्वीत करून माहिती घेत असतांना गडचिरोली शहरातील एका गोपनिय बातमीदाराने माहिती दिली की, एक मुलगी वय अंदाजे (१९) वर्ष, रा. चंद्रपूर २० डिसेंबर २०२३ रोजी पासून चंद्रपूर येथून बेपता आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पोलीस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथून माहिती घेतली असता सदर मुली संदर्भात मिसींग क्रमांक १७८/२०२३ अन्वये नोंद आहे. त्यावरून तात्काळ मुलीचे नातेवाईकांना विश्वासात घेवून मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृतक मुलगी ही त्यांचीच मुलगी असल्याची नातेवाईकांकडून खात्री पटली.

संबंधीत मिसींग कोठे व कशी झाली तसेच ती शेवटी कोनासोबत होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने माहिती घेतली असता सदर मुलीचे निखिल मोहुर्ले, रा. वैरागड याचेशी प्रेमसबंध असून तिला भेटण्याकरीता निखील मोहुर्ले मूल येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वैरागड येथून निखील मोहुर्ले यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने प्रकरणाबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी निखील मोहले यांस पुढिल तपासकामी गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार वाघ, श्रिकांत बोईना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दिपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधबळे, सतिष कतीवार, मनोहर तोगरवार तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, मपोउपनि विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर व इतर अंमलदार यांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Chandrapur News डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे कवच व देशातील लोकशाही टिकवण्यासाठी नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार -विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


Chandrapur News : संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच १४१ खासदारांचे निलंबन करून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे कवच व देशातील लोकशाही टिकवण्यासाठी नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा काँग्रेसचा मानस आहे. यासाठीच काँग्रेसचा स्थापना दिवस २८ डिसेंबर रोजी नागपुरात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थापना दिनानिमित्त आयोजित अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील २० हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली.

येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत आमदार प्रतिभा धानोरकर, शहराध्यक्ष रितेश तिवारी, विनोद दत्तात्रेय यांच्या उपस्थितीत वडेट्टीवार व धोटे यांनी नागपुरात होऊ घातलेल्या अधिवेशनाची सविस्तर माहिती दिली. या अधिवेशनाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, तीन राज्यांचे मुख्यमंत्री तथा सर्वच राज्यातील विरोधी पक्षनेते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी नागपुरात १९२० रोजी स्थापना दिवस साजरा झाला होता. त्यानंतर १९५६ मध्येही काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात झाले होते. आता हा तिसरा कार्यक्रम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून २० हजार कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची जबाबदारी वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. काँग्रेस स्थापनेला १३८ वर्ष पूर्ण झाल्याने १३८ रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा पक्षनिधी कार्यकर्त्यांकडून गोळा केला जात आहे. नागपुरात ५० एकरांत अधिवेशनाची तयारी सुरू आहे. देशातून ५०० प्रमुख नेते आणि १० लाख लोकांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार व धोटे यांनी दिली. यासाठी विदर्भाचीच निवड का? या प्रश्नाचे उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, भारताचे मध्यस्थान म्हणून विदर्भाची निवड केली आहे. वैदर्भीयांना स्थापना दिनाचे साक्षीदार होता यावे, अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे.

विदर्भावर चर्चा न करता राज्य सरकार पळाले

विदर्भावर चर्चा न करता नागपुरातील अधिवेशन गुंडाळण्यात आले व राज्य सरकार पळाले, असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला. या अधिवेशनात विरोधकांच्या दबावामुळेच कंत्राटी नोकर भरतीची निर्णय रद्द करण्यात आला. सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास भाग पाडले. पूर्वी केवळ ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते, मात्र त्यानंतर सरकारला १४१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे लागले. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ घोषणाच ठरते की खरच मदत देणार, हे येणारा काळच सांगेल. सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न विरोधकांनी लावून धरले. यापूर्वीच्या प्रत्येक अधिवेशात सरकार विदर्भाला एक पॅकेज देत असे. मात्र, या अधिवेशनात पॅकेजची घोषणा न करताच सरकार पळून गेले. एमआयडीसीत रामदेवबाबा यांना स्वस्त दरात जमीन देता, मग ‘आय.टी. हब’ला जमीन का देत नाही, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

नवरगांव प्रकरण डॉ. आंबेडकरांच्या नावाचे फलक,नवरगांव बौद्ध बाधवाचा कॉरवा मुंबईला निघताच जिल्हाधिकार्‍या कडुन तोडगा निघाला, फलकाला संविधान चौकाचे नाव


 गडचिरोली - चामोर्शी तालुक्यांतील नवरगांव येथे आंबेडकर चौकाजवळ भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक ग्रामसभेच्या ठरावानुसार लावण्यात आले होते. परंतु नवरगांव येथील जातीयवादी लोकांनी sD p 0 गडचिरोली व ठाणेदार चामोर्शी यांना फलक हटवा म्हणुन वारंवार तक्रार केल्यामुळे दि. २१ डिसेंबरला पोलिसांच्या सहकार्यांनी फलक हटविल्यामुळे नवरगांवातील संपूर्ण बौध्द बांधव आपल्या चिल्यापिल्या सोबत बैलबंडी व पायदळ प्रवासाने गाव सोडला. ज्या गावात आमचा वारंवार अपमान होतो संविधान कर्त्याच्या नावाच्या फालकाला विरोध होतो. त्या गावात आम्ही राहुन उपयोग काय ? म्हणुन बौद्ध बांधव गावसोडून निघाले. दि. २२ ला जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भेटून निवेदन देण्यात आले. परंतु तिथे काहीच तोडगा निघाला नाही. शेवटी आंदोलन कर्त्याचे मोरके मैदान सोडून पळाले. परंतु गेल्या दोन वर्षापासुन नवरगावची धुरा सांभाळणारे नेत्यांच्या सामजस्याने तोडगा काढण्याचे ठरविले. आणि बौद्ध बांधवाचा मुंबईच्या दिशेने निघालेला कॉरवा अखेर थाबला.

 

 

 

 

 जिल्हाधिकारी मिना साहेब गडचिरोली, जिल्हा पोलीस आधिक्षक निलोप्पल गडचिरोली यांनी तोडगा काढण्यासाठी नवरगांव वासीयांना पाचारण केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाच्या फलका ऐवजी संविधान चौक अस्या नावाचे फलक लावण्याचे सर्वानुमते ठरविले. बाबासाहेब आंबेडकराच्या नावाला विरोध का ? असे गावकर्‍यानी विचारले त्याच उतर अधिकार्‍या कडून मिळाले नाही. सदर बैठकीला अँड. विनय बांबोळे , वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू ठेभुर्णे , रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर ' वंचितचे जि. के. बारसीगे ' रिपाईचे गोपाल रायपूरे ,कविश्वर झाडे ' डायमंड वाकडे , उपसरपंच्या करिष्या वणीकर आदि उपस्थित होते


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Buldhana news: प्रेमी युगुलापाठोपाठ प्रियकराच्या वडिलांची आत्महत्या


Buldhana news: सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन या गावातील प्रेमियुगलाने साखरखेर्डा गावानजिक असलेल्या सूतगिरणी परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याला काही तास होत नाही तोच आज, शनिवारी प्रेमीच्या वडिलांनी आत्महत्या केली. यामुळे अवघा बुलढाणा जिल्हा हादरला.

समाधान खिल्लारे ( ५५) असे आज शनिवारी सकाळी आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब सकाळी उघडकीस आल्यावर साखर खेर्डा नगरीत व नंतर खिल्लारे यांचे मूळ गाव असलेल्या शेंदुर्जन गावात खळबळ उडाली.

शुक्रवारी सूतगिरणी परिसरात आत्महत्या करणाऱ्या गोपाळ खिल्लारे याचे ते वडील होत. २२ वर्षीय गोपाळ खिल्लारे व तेरा वर्षीय साक्षी संतोष अंभोरे यांनी शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ समाधान खिल्लारे यांनी आत्मघात करून घेतला. सामाजिक बदनामी व संभाव्य कारवाईच्या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Four Naxalites encounter in Sukma: पोलिस- नक्षली चकमतीत 4 नक्षली ठार


encounter in Sukma: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुकमा येथील गोगुंडा भागात सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांतील राखीव गट (DRG) आणि CRPF च्या 2ऱ्या आणि 111 व्या बटालियनने ही चकमक पार पाडली. गोगुंडा या भागात नियमित गस्त आणि शोध मोहीम राबवत असताना त्यांची नजर नक्षलवाद्यांवर पडली आणि त्यांच्याशी जोरदार गोळीबार झाला. सुकमाचे एसपी किरण चव्हाण आणि सीआरपीएफचे डीआयजी अरविंद राय यांनी सांगितले की, ते अजूनही सुरू असलेल्या चकमकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची भेट घेतली आणि त्याच दिवशी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. encounter in Sukma दरम्यान, शनिवारी सीएम साई यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांचे सरकार काय पावले उचलत आहेत याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अरुण साव आणि विजय शर्माही होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Dhanora Rangi Car Accident News: उभ्या ट्रकला कारची धडक


Dhanora Rangi Car Accident News: धानोरा तालुक्यातील रांगी येथे बाह्यवळण रस्त्यावर घरासमोर उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोराची धडक दिली. यात कारचालक किरकोळ जखमी झाला तर कारचे नुकसान झाले. ही घटना २२ डिसेंबरला दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

मोहली येथून धान वाहतूक करणारा ट्रक (एमएच ४० वाय-३२०१) रांगीमार्गे आरमोरीला जाताना बाह्य वळणरस्त्याच्या लगत उभा होता. समोरून येणाऱ्या कारचा (एमएच ३३ व्ही- १९४६) ताबा सुटला. त्यानंतर कार ट्रकवर आदळली. चालकास किरकोळ इजा झाली. कारचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला आहे. मोठी दुर्घटना टळली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

सरपंच व नागरिकामध्ये ' तुफान फ्री स्टाईल'!


तुमखेडा खुर्द येथील घटना : तक्रारीवरुन गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गोंदिया : ग्रामपंचायतमध्येच सरपंच आणि नागरिकांमध्ये वाद होऊन या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना गुरुवारी (दि.२१) दुपारी गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खूर्द येथे घडली, दरम्यान, सरपंचाने गोंदिया ग्रामीण पोलिसात केलेल्या तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे गावातील वातावरण काही काळ तापले होते. गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत येणाऱ्या तुमखेडा खुर्द

येथील सरपंच आशिष दुलीचंद हत्तीमारे (३५) हे गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतीमध्ये बसलेले होते. त्यावेळी आरोपी प्रेमलाल मोहन मेंढे (५२) यांनी ग्रामपंचायत बसलेल्या सरपंचांसोबत वाद घातला नंतर त्याने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान, ग्रामपंचायत बाहेर बसलेल्या इतर सदस्यांनी लगेच सतर्कता दाखविल्यामुळे हा चाकूहल्ला टाळता आला. इतरांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला, पण हा वाद अखेर ग्रामपंचायतीच्या आतमधूनबाहेरपर्यंत येऊन या दोघांमध्ये 'फ्री स्टाईल' ने हाणामारीत झाला.

यावेळी ग्रामपंचायतीत उपस्थितांनी घटनेचे चित्रण मोबाईल कॅमेरात केले असून समाजमाध्यमांवर पसरविले. त्यानंतर सरपंचांनी गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणातील आरोपी प्रेमलाल मेंढे विरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Gondiya accident: बहिणीच्या गावाहून परतताना अपघातात भावाचा झाला मृत्यू


 

 

 

 

 

 

अर्जुनी-मोरगाव:  तालुक्यातील बोंडगावदेवी ते चान्ना- बाक्टी दरम्यान पुलाजवळ १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेले विश्वनाथ विठोबा काळे (४८) रा. मुंगली यांचा १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मृत्यू झाला. ते मुर्झापार्टी येथे राहत असलेल्याबहिणीकडे गेले होते तेथून परतताना हा अपघात झाला.

 

 

 

विश्वनाथ विठोबा काळे हे त्यांच्या बहिणीकडे मोटारसायकल (एम.एच.३५ जे ८३२५) ने कामानिमित्त गेले होते. तेथून आपल्या मुंगली या गावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. 

 

 

 

त्यांच्यावर नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात आत्माराम जयराम कापगते (५२) यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बेहारे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Chandrapur Mul Accident: दोन दुचाकींची समोरासामोर धडक; युवक जागीच ठार


चंद्रपूर : दोन दुचाकींची समोरासामोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटाचौकी-मामला फाट्याजवळ दुपारी ४ याजताच्या सुमारास घडली. अशोक कमलाकर बोबडे (२४) रा. अहेरी खामोना, असे मृताचे नाव आहे. तर रितीक हनुमान पेंदोर (२५) रा. कळमना वणी, स्वप्निल वारलू ढोले (२८) रा. अहेरी खामोना हे गंभीर असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एमएच २९ बीझेड ५७६० व एमएच ३४ एक्यू ३३६६ या क्रमांकाच्या दुचाकीने अशोक बोबडे, स्वप्निल ढोले एक दुचाकीवर तररितीक पेंदोर एका दुचाकीने परस्पर विरोधी मागनि प्रवास करत होते. 

घंटाचौकी व मामला फाट्याच्या मधात आल्यानंतर या दोन्ही दुचाकींची समोरासामोर धडक बसली. धडक इतकी भीषण होते की, दोन्ही दुचाकीवरील तिघेही जण दुचाकीवरून फेकल्या गेले. रामनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश हिवरे तर चिचपल्ली चे एपीआय वसंत रायसिडाम, पोलिस शिपाई प्रफुल्ल उमाटे यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, यावेळी अशोकचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. रितीक व स्वप्निल गंभीर होते. त्या दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023

PostImage

Akola Crime News: विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर केला लैंगिक अत्याचार


Akola Crime News : शहरात एका विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २६ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी नराधमाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवासी आरोपी रणजीत मावळे (३४) याचे एका विवाहितेसोबत प्रेम प्रकरण सुरू होते.

रणजीत हा सुद्धा विवाहित असून, तो विवाहितेला ब्लॅकमेल करीत होता. विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण विवाहितेच्या पतीला लागली. त्यामुळे त्यांचे बिंग फुटले. या प्रकरणी विवाहितेने खदान पोलीस ठाण्यात रणजीत मावळे याच्याविरुद्ध तक्रार दिली. खदान पोलिसांनी आरोपी रणजीत याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, २ (एन) ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास खदान पोलीस करीत आहेत.