ProfileImage
75

Post

4

Followers

0

Following

PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Aug. 21, 2024

PostImage

मौजा खुर्सा येथे "शहीद नरेंद्र दाभोळकर" यांच्या स्मृतिदिन मोठ्या थाटामाटात साजरा


आजचा युवक हा भरकटलेला आहे. तो जुन्याच आडवाटेने प्रवास करतो आहे.त्याला बदलाची गरज आहे ती वाट जर सरळ आणि निश्चित ध्येयाकडे जाणारी निवडल्यास यश तुमचेच आहे. महा.अनिसच्या खुर्सा शाखेने घेतलेल्या शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रा. तिलेश मोहुर्ले,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुर्सा येथील सरपंचा मंजुळाबाई पदा ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे प्रशांत रामटेके पोलीस पाटील,मा. विलास निंभोरकर राज्य सहकार्य वैज्ञानिक जाणीवा व शिक्षण प्रकल्प महा.अनिस, प्रा. विलास पारखी सर्पतज्ञ, विठ्ठलराव कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष .पत्रकार सोपानदेव म्हशाखेत्री उपस्थित होते.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उपेंद्र रोहनकर.यांनी केले प्रथमतः शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय पाहुण्यांनी फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर अनिस चळवळीची भूमिका व समाजात होऊन गेलेल्या संत विचारांची परंपरा मांडताना विलास निंभोरकर यांनी सांगितले की लोकांनी प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.समाजात बुवा बाबाची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली आहे.त्याला भोळाभाबडा समाज फसत असतो.त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकामध्ये विवेकवादी विचार असले पाहिजेत.तर प्रा. पारखी सरांनी पावसाळ्यात सापापासून कोणती काळजी घ्यायची. साप हा आपला शत्रू नसून आपला मित्र आहे. हे लोकांना पटवून दिले.

             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश झंजाळ,रवींद्र बावणे, दामोदर मेश्राम, रामचंद्र निलेकार, जाणू धुळसे, अविनाश सालोडकर, तुळशीराम दाणे, उद्धव रामटेके, विशाल मेश्राम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार संदीप आंबोरकर ह्यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठया संख्येनी उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Aug. 20, 2024

PostImage

देवरावा "कुणबी स्वप्नात आले गा"


सदसद विवेक बुद्धीने आणि देशातील लोकशाही मार्गाने पार पडणाऱ्या निवडणुका शेवटी शेवटी जातीपाती वरच येऊन ठेपतात.मग ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत आणि ज्या सार्वत्रिक निवडणुका जातीपातीवर पार पडत असतील तर तो लोकशाहीच्या हिताचा नाही तर लोकशाहीला घातक आहे.वेळीच खोलवर रुजलेले जातीपातीचे मुळे संपुष्ट नष्ट केल्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.

निवडणुका जवळ आल्या की राजकारनी जातीपातीच्या राजकारणांकडे वळतात.अगदी त्याचप्रमाणे गडचिरोली विधानसभेचे वर्तमान आमदार आता गडचिरोली येथे कुणबी मेळाव्याचे आयोजन केले आहेत. त्याला आपला अजिबात विरोध नाही,तो त्यांचा प्रश्न आहे.

परंतु सांगायचे इतकेच आहे की गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे वर्तमान आमदार माननीय डॉ. देवराव होळी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात कुणबी समाजाचे किती मिळावे घेतले ? वेळोवेळी मदत करणारा कुणबी समाजाची आमदार होळी साहेबांना झालेली झालेली आठवण माझ्या ऐकिवात नाही.

 भेंडाळा परिसरात कृषी पंप धारकांच्या पंपावर भारनियमन लागू आहे.कित्येक निवेदन देऊन जन आंदोलन देखील उभारण्यात आला होता आणि त्यावेळी सुद्धा आंदोलन करणारे बऱ्याच प्रमाणात कुणबी होते मग त्यावेळी होळी साहेबांच्या मनात विचार आले नसतील का ? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरच आहे.

मेळावे घ्यायलाच पाहिजे.जनतेचे प्रश्न हिरोरीने सोडवायलाच पाहिजे यातच राज्यकर्त्यांचं भला आहे.परंतु ज्या कुणबी समाजाचा मेळावा घेऊन निवडणुकीत रंग भरविण्याच्या प्रयत्न करत आहात,मग त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.परंतु तसं होत नाही गरज सरो आणि वैद्य मरो,ही पुढाऱ्यांची भावना बदलायला पाहिजे.

निवडणुका येतात जातात कोणी जिंकतो तर कोणी हारतो हा मोठा विषय नाही परंतु ज्या समाजाने भरभरून मदत केली त्या समाजाविषयी जागरूकतेची भावना असायला पाहिजे ही एवढीच कळकळीची विनंती समाज बांधवांच्या वतीने आमदार महोदयांना करतो.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Aug. 9, 2024

PostImage

हिंदू धर्माची महती सांगत मुरलीधर महाराजांनी साजरा केला प्रगट दिन


हरणघाट (पारडी) पिठाचे मठाधिवती संत श्री मुरलीधर महाराज यांचा आज ९ ऑगस्ट रोजी प्रगट दिनाचे औचित्य साधून बांगलादेशात हिंदू समाजावर जे अन्याय अत्याचार चालू आहे,त्याविषयी दुःख व्यक्त करीत हिंदू धर्माची संपूर्ण महती बाबत ने आपल्या भाविक भक्तांसमोर व्यक्त केली.

धर्म कोणताही असो परंतु कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ नये आणि आपण सर्व एकच आईचे लेकर आहोत,सर्वांनी गुण्यागोविंदाने एकमेकांत मिळून मिसळून वागावे हाच खरा मानवधर्म आहे,असेही मत बाबांनी व्यक्त केले.

संत मुरलीधर महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात हरणघाट पारडी मठात बाबांचे भाविक भक्त बाबाला आशीर्वाद देण्याकरिता एकत्र जमले होते.नागपंचमीचा सण असून सुद्धा बऱ्याच प्रमाणात महिला वर्ग देखील सामील झाला होता.

आपल्या घरी जन्मदिवस साजरा करताना मेणबत्तीचा वापर करून त्याला फुंकर मारून विंजविण्यापेक्षा,आपल्याच घरातील मातीच्या दिवलनीचा दिवा लावून प्रगट दिन साजरा करा आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी एक झाड लावा जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि वातावरण देखील शुद्ध राहील,असा मोलाचा सल्ला संत मुरलीधर महाराज यांनी आपल्या प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या भाविक भक्तांना दिला.भाविक भक्तांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचा संदेश आत्मसात केला आणि सुग्रास भोजन करून भाविक भक्त बाबांनी दिलेला मोलाचा संदेश यांची शिधोरी बांधून आप आपल्या गावाकडे रवाना झाले.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 29, 2024

PostImage

घरकुल योजना व रोजगार हमी योजनेचे थकीत हप्ते लाभार्थ्यांना लवकर वितरित करा, बि.डि.ओ. कडे रमेश चौखुंडे ची मागणी


ग्रामीण तथा शहरी भागात सरकारने घरकुल मंजूर करून गरिबांना हक्काचं घर दिलय यांचं खूप खूप स्वागत आहे.परंतु पावसाळ्याचे दिवस आले असून सगळीकडे धो-धो पाऊस पडून नदी नाल्यांना पूर आला,पण गोरगरिबांचे घर बांधायचे स्वप्न अधुरेच राहिले.कारण काय ? तर सरकारने घरकुल लाभार्थ्यांना निधीचा वाटप केल्या गेला नाही. त्यामुळे गरिबांचे घर अर्ध्यावरील डाव मोडीला,असं म्हटलं तर नवल वाटणार नाही.

 अपूर्ण घर आणि गोरगरिबांचा उकिरड्यावरचा संसार सांभाळताना किती तारेवरची पसरत करावी लागतं हे जर सरकारच्या ध्यानी येत नसेल तर नवलच म्हणावं लागेल.सरकार कदाचित गोरगरिबांची ठट्टा करीत असेल किंवा घरकुल निधी वाटप करायचे आहे याच्या विसर पडलेला असेल.

 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा माहे जून 2024 चा निधी अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.म्हणजे सरकार गोरगरिबांची मस्करी करीत आहे,असा अंदाज आता सामान्य जनता व्यक्त करताना दिसतो आहे.म्हणून हा निधी लवकरात लवकर वितरित करावा ही मागणी घेऊन रमेश चौखुंडे यांच्या नेतृत्वात तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले.निवेदन देते वेळी स्वप्निल मंडल,दामाजी सातपुते भेंडाळा.विनायक पाटील पोरटे वाघोली.तोताजी आभारे,कबीर आभारे घारगाव.मुखरेश्वर चुदरी, केशव चुदरी,सतीश पुटकमवार दोटकुळी.प्रदीप भोय, सतीश पाल एकोडी. मुखरुजी कोहपरे,अनिल वाडगुरे नवेगाव आणि परिसरातील बरेच नागरिक उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 25, 2024

PostImage

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा ! तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी


राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून धानाचे परे आणि केलेली रोवनी वाहून गेली तसेच कित्येक शेतकऱ्यांचे बांधीचे पाळ सुद्धा अती पावसामुळे फुटून वाहून गेली आहेत.असे अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर आवर्जून उभी आहेत.आता बांधीचे पाळ नसल्याने तयार करायचे म्हटले तर माती कुठून आणायची ? हा खरा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.आणि अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांकडे आता ताकद उरली नसून,ती शासनाने लवकरात लवकर शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामे करून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी जेणेकरून अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेला शेतकरी जोमाने उभा राहील.

जी परिस्थिती धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेली आहे तसीच गत कापूस किंवा सोयाबीन शेतकऱ्यांचे सुद्धा झालेली आहे.अतिवृष्टीमुळे एका महिन्यांपासून मशागत करायला वेळ मिळाले नाही आहे.आणि अशा कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून दिलासा द्यावा,ही मागणी घेऊन शेतकरी एकता पॅनलच्या वतीने तहसीलदार चामोर्शी यांना निवेदन देऊन,शेतकऱ्यांचे व्यथा मांडल्या गेली.त्यावेळी रमेश चौखुंडे,प्रदीप भाकरे सगनापूर.प्रदीप जगन भोयर,भाऊराव पाल,प्रदीप सयाम एकोडी.हेमंत खेडेकर,सत्यवान कुत्ते कानोह्ली.देवानंद तुंबळे,किशोर लाळ कळमगाव.देविदास देशमुख वेलतुर तुकूम.विकास पोटे,विलास धोंगडे वाघोली. मुखरेश्वर चुदरी,सतीश पुटकमवार,केशव चुदरी,अनिल कुमरे डोटकुली. तोता पाटील आभारे,कबीर आभारे घारगाव l.भैय्याजी कुनघाडरकर,उमाकांत सातपुते,कोकावर सर,प्रमोद डांगे भेंडाळा आणि परिसरातील बरेच शेतकरी उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 8, 2024

PostImage

घरकुलाचे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत शासनाला मात्र जाग येईना !


शहरी असो किंवा ग्रामीण भागात शासनाने गरीब व अत्यंत गरजू लोकांनच्या डोक्यावर निवारा असावा या हेतूने घरकुल वाटप केलेले आहे.परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला काही लोकांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून किंवा इतरांकडून उसणवार करून घरकुल बांधून घेतले,परंतु 90% गरीब लोकांच्या डोक्यावर निवारा बांधून झालाच नाही.

कारण काय शासनाने पहिला आणि दुसरा हप्ता नित्यनियमाने दिल्या गेला परंतु तिसरा हप्ता मात्र लाभार्थ्यांना मिळाला नाही आणि कित्येक गरिबांचे संसार उघड्यावरच पसरले आहेत.म्हणजे नवीन घरकुलाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहेत.कारण जोपर्यंत तिसरा आणि चौथा हप्ता मिळणार नाही तोपर्यंत लाभार्थ्यांच्या डोक्यावर छत होणारच नाही.

 ऐन पावसाळ्याच्या दिवसात घरकुल अपूर्णच आहे तर मग विचार करा गरीब माणसाचा संसार उघड्यावरच आहे आणि म्हणून शासनाने उदाशीन अवलंबिल्या गेलेले धोरण थांबवून गरीब व गरजू लोकांच्या डोक्यावर निवारा लवकरात लवकर तयार होईल याचा विचार करावा.

 गरीब लाभार्थ्यांच्या आशा आकांक्षा घरकुलावरच अवलंबून आहे. त्याकरिता गरीब व गरजवंतांची थट्टा न करता तिसरा व चौथा हप्ता लवकर उपलब्ध करून द्यावा,म्हणजे गरीबांना हक्काचं घर मिळेल आणि उघड्यावर पडलेला संसार सावरायला मदत होईल.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 4, 2024

PostImage

लाडकी बहिण योजने पासून वंचित राहू नये असे वाटत असेल तर जाचक अटी शितील करा,राज्य सरकारला रमेश चौखूंडेची विनंती


सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.राज्यातील भगिनींचा विचार केला तर खूपच सुंदर योजना आहे.अशी योजना या आधीच सुरू व्हायला पाहिजे होती परंतु उशिरा का होईना परंतु छान योजना आहे.

 मात्र काही जाचक अटी लादल्या गेल्या आहेत.जसे की अधिवास प्रमाणपत्र,पंधरा वर्षांपूर्वीचा शिधापत्रिका,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,हे या योजनेमध्ये नको आहेत.कारण राज्यात अशा कितीतरी लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जन्माचा दाखला या जन्मी तर मिळणार नाहीच परंतु पुढच्या जन्मी सुद्धा मिळणार नाही,असं म्हणायला हरकत नाही आणि याच जाचक अटिंमुळे राज्यात कितीतरी लाडक्या बहिणी वंचित राहू शकतात.

 किंवा पंधरा वर्षांपूर्वीची शिधापत्रिका हि सुद्धा जाचक अट आहे.कारण ज्यांच्या लग्नाला 14 वर्षे झालेली आहेत किंवा 10 ते 12 वर्षे लग्न होवून झाले आहेत,अशा कितीतरी लाडक्या बहिणी आहेत.म्हणजे आजचा विचार करायला गेला तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अशा पद्धतीमुळे राज्यातील लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहू शकतात आणि म्हणून राज्यातील एकही लाडकी बहिण या योजनेपासून वंचित राहू नये,असे वाटत असेल तर वरील सर्व अटी शिथिल करावे अशी विनंती रमेश चौखंडे यांनी राज्य सरकारकडे विनंती करतो आहे.

 खरं म्हणजे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी योजनेकडे मोठ्या कुतुहलाने पाहत आहेत.सगळीकडे एकच चर्चा मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण.म्हणून राज्यातील सर्वच लाडक्या बहिणीला याचा लाभ मिळायलाच पाहिजे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 3, 2024

PostImage

कृषी पंप धारकाचे थकित विज बिल माफ ! तर मग अंमलबजावणी कधी


महाराष्ट्र सरकारने कृषी पंप धारकांचे थकीत वीज बिल माफ करण्याचे पावसाळी अधिवेशनात घोषणा केली.हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे.राज्यातील शेतकऱ्यांना आनंदच झाला आहे परंतु सरकारने जशी थकीत वीज बिल माफीची घोषणा केली,हे जरी खरं असलं तरी,त्या घोषणेची अंमलबजावणी होणे हेही तितकच महत्त्वाची बाब आहे.

राज्यातील सरकारचे धोरण जनतेला माहित आहे आणि आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने दाखवून दिले आहे आणि त्यामुळेच उशिरा का होईना पण सरकारला सूध जावून बुध आली,असं म्हणायला काहीही हरकत नाही.

पण काही का ? असेना.राज्यातील कृषी पंप धारकांची एवढीच अपेक्षा आहे की थकीत विज बिल माफीचा जी.आर. काढून लवकरात लवकर अंमलबजावणी व्हायला पाहिजे हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

वीज बिलाचा भरणा केलेला नाही म्हणून कित्येक शेतकऱ्यांची लाईट कापल्या गेली आहे.विज बिल भरू शकत नाही,एवढी बिकट अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची आहे.म्हणून लवकरात लवकर अंमलबजावणी झाली तर आपली कापल्या गेलेली कनेक्शन जोडल्या जाईल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 14, 2024

PostImage

स्मार्ट प्रीपेड मीटर योजना म्हणजे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री ! ती त्वरित बंद व्हायला पाहिजे


महाराष्ट्रात विजेचा प्रश्न गंभीर आहे.ग्रामीण भागात भारणीयमनाचा आधीच फटका बसतोय,वेळोवेळी लाईट ये जा करिता राहते अशा अनेक अडचणींना तोंड देता-देता नाकीनव येते आणि अशाही परिस्थितीत स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचे काम खाजगी कंपन्यांना दिले गेले आहे,म्हणजे एकावं ते नवलचं.

 स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यामुळे त्याचा भार वीज ग्राहकांनाच सोसावा लागणार आहे.त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर (मोबाईल) रिचार्ज योजना त्वरित बंद व्हायला पाहिजे आणि जनतेने सुद्धा सरकारचे असे मनसुबे हाणून पाडायला पाहिजे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने संपूर्ण राज्यात ग्राहकाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विज गळती रोखण्यासाठी राज्यभर वीज मीटर बसविण्याची तयारी सुरू केली आहे.केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या योजने अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर बसविण्याचा कार्यक्रम 17 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार जाहीर केला आहे.त्यामुळे ग्राहकाच्या खिशाला हमखास कात्री लागणार आहे,म्हणजे यामुळे ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेमुळे ग्राहकांना पूर्वीसारखी वीज मिळणे कठीण आहे.असल्या प्रकारामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढणार आहे. वीज ग्राहकांना आतापर्यंत वीज मीटर प्रमाणे बिल भरावे लागत होते परंतु आता मोबाईल रिचार्ज प्रमाणे आगाऊ पैसे मोजावे लागतील. तेव्हा कुठं वीज वापरता येणार नाही.

 खिशाला कात्री लागणाऱ्या योजना वेळीच बंद पडायला पाहिजे नाहीतर अशा योजनांमुळे सामान्य माणूस पूर्णपणे नागडा झाल्याशिवाय राहणार नाही.आधीच महागाईने जीवन जगणं कठीण होऊन गेलाय म्हणून वीज ग्राहकांना माझी कळकळीची विनंती आहे वेळेत सावध व्हा,सारा-सार विचार करा आणि सरकारचे असले मनसुबे हाणून पाडा नाहीतर ही सरकार नावाची जमात सामान्य माणसाला बोकळल्या शिवाय राहणार नाही,म्हणून आजच सावध व्हा.

||जागो ग्राहक जागो||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 12, 2024

PostImage

संत मुरलीधर महाराजांच्या पुढाकाराने खासदार नामदेवराव किरसान यांनी घेतली मार्कंडादेव येथे मंदिराची आढावा बैठक


विदर्भाचे काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडा नगरी येथे संत मुरलीधर महाराज हरणघाट पीठ यांनी मार्कंडेश्वराचे जीर्णोदवाराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केले होते आणि थातूर-मातूर आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले.

 तेव्हापासून आज तागायत 2 टक्के सुद्धा जीर्णोद्वाराचे बांधकाम झालेले नाही.करीता ही गोष्ट नवनिर्वाचित खासदार माननीय नामदेवरावजी किरसाण यांच्या लक्षात आणून देताच खासदारांनी ताबडतोब पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित करीत आज दिनांक 12/6/2024 रोजी आढावा बैठक घेतली.

 मंदिराचे बंद पडलेले काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी सूचना देण्यात आली.या कार्यक्रमाला माजी खासदार मारोतरावजी कोवासे,डॉ. नामदेवराव किरसान,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,विश्वजीत कोबासे आणि संत मुरलीधर महाराज व परिसरातील 200-300 बाबांचे भक्त उपस्थित होते.

आम्हाला एक महिन्याची मुदत द्या नंतर आम्ही बांधकाम पूर्ण होईपर्यंत काम बंद पडू देणार नाही,अशी ग्वाही पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्री मलिक साहेब यांनी विनंती केली.पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या विनंतीला मान देत एक महिन्याची मुदत देण्यात आली मात्र एक महिन्यात कामाला सुरुवात झाली नाही तर मी माझा देह त्याग करायला मागेपुढे पाहणार नाही,असा इशारा संत मुरलीधर महाराजांनी दिला.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 9, 2024

PostImage

देशात तिसऱ्यांदा मोदी पर्व सुरू !


देशात आज राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7:15 ला 8000 महोदयांच्या साक्षीने नरेंद्र मोदी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. 

भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ सांभाळनारे नरेंद्र मोदी हे देशात दुसरे नेते म्हणून उदयास आले,ही एक अभीमानाची चाहूल आहे.असं म्हणायला काहीही हरकत नाही.

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा बहुमान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लाभणे म्हणजे न भूतो न भविष्यती असं समजायला काहीच हरकत नसावी.संसदेत सरकार चालविण्यासाठी बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचा आहे परंतु देश चालवायला संपूर्ण भारतवासीयांची गरज आहे,असं आपल्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या भाषणात नरेंद्र मोदींनी हे गौरोदगर काढले होते,हे मात्र विशेष. 

देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतवासी जनतेच्या इच्छा भरपूर प्रमाणात आहेत आणि असायलाच पाहिजे यात काहीही दुमत नाही.

महागाईने भारतीय जनता होळपळत आहे यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे आणि ही भारतवासी जनतेची पहिली अपेक्षा आहे. शेतकरी शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं जेणेकरून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मूलभूत आधार मिळेल.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 8, 2024

PostImage

नवनिर्वाचित खासदार आणि त्यांच्या पुढील आव्हाने !


देशात 18 वी लोकसभा निवडणूक संपून त्याचे परिणाम सुद्धा घोषित झाले व गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार म्हणून माननीय डॉ.नामदेवराव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.गडचिरोली जिल्हा हा उद्योगहीन जिल्हा म्हणून परिचित आहे. आदिवासी बाहुल जिल्हा म्हणून नावारूपास आलेला जिल्हा आहे.शेतीवर आणि रोजीरोटी वर संसाराचा गाडा हाकलने एवढेच जिल्ह्यातील जनतेचा रोजगार आहे आणि रोजगारहीन जिल्हा असल्यामुळे बेरोजगारांची संख्या जरा जास्तच आहे.

सर्वप्रथम जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे याला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज मागील काही वर्षांपासून शोभेची वास्तू बनलेला आहे त्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांध्यांपर्यंत येण्याच्या नियोजन केलं तर चामोर्शी तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल.जेणेकरून तालुक्यातील भगिनी आंध्र प्रदेश सारख्या बाहेर राज्यात जाऊन काम करतात ती नामुष्की त्यांच्यावर येणार नाही.

गडचिरोली जिल्ह्यात काही मोजक्याच ठिकाणी जसे चामोर्शी तालुका आहे आणि आरमोरी व कुरखेडा तालुका या ठिकाणी काही फिडर वर भारनीयमनाचा बडगा उभारल्या गेला आहे.कृषी पंप धारकांना जीव धोक्यात घालून शेतीला पाणी पुरविण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि हा प्रश्न फार गंभीर आहे.त्यावर चिंतन करणे गरजेचे आहे.

जयरामपूर,कोणसरी, मुधोली,गणपुर,विठ्ठलपूर अशा बऱ्याच गावात भूसंपादनाचा कायदा आणून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,त्यावर सुद्धा प्रतिबंब आणंने गरजेचे आहे.  जिल्ह्यात उद्योग निर्माण व्हायलाच पाहिजे परंतु शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर नाही तर फॉरेस्टच्या जमिनीवर उद्योग उभे व्हायला पाहिजे. जेणेकरून बेरोजगारांना काम मिळेल आणि सुपीक जमिनीवर शेती करून शेतकरी सुद्धा आत्मनिर्भर बनेल.अशी व्यवस्था या जिल्ह्यात उभी व्हायला पाहिजे.

जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाची सोय व्हायला पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्ह्यातील कॉलेजात डिग्रीचे शिक्षण घेऊन जिल्ह्यातच सेवा करेल आणि संपूर्ण जिल्ह्याला आत्मनिर्भर करण्यास तो समर्थ असेल.अशा अनेक आव्हाने जिल्ह्यात आवर्जून उभी आहेत त्याची पूर्तता व्हायला पाहिजे हीच अपेक्षा.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 6, 2024

PostImage

वैदर्भीय जनतेने भाजपाला का झिडकारलं ? आत्मचिंतन करणे गरजेचे


2024 सालातील लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाला आत्मचिंतन करण्याला भाग पडलेली आहे,आणि तेही खास विदर्भाची.आजपर्यंत विदर्भातील जनता भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान करताना दिसून येत होती परंतु 2024 साली वैदर्भीय जनतेने भाजपाला का झिडकारलं ? भाजपापासून का दूर गेली ? हा एक न उघडणारा कोड आहे.आज याची प्रचिती भाजपाला आलेली आहे पण वेळ आजच्या घडीला कोसोदूर गेलेले आहे.

भारतीय जनता पक्षाने आज पर्यंत विदर्भातील जनतेची घोर उपेक्षा केली.विदर्भातील शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळाला नाही ,सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम दिलं नाही,कामगार लोकांच्या हाताला काम शिल्लक राहिलं नाही आणि महत्त्वाचे विषय म्हणजे सतत वाढणारे महागाई आणि भारनियमनाच्या विळख्यात सापडलेला विदर्भाचा शेतकरी.

या वरील सर्व बाबींकडे सरकारने विदर्भाला सावत्रपणाची वागणूक दिली. विदर्भातील जनतेने आज पर्यंत भाजपावर विश्वास दाखवून भरभरून मदत करताना दिसत होती परंतु वेळोवेळी वैदर्भीय जनतेची घोर निराशास झाली.सहन करण्याची मर्यादा असते आणि आता ती संपली होती.ज्या पक्षाला वैदर्भीय जनतेने भरभरून दिलं तो पक्ष धनधाडग्यांच्या झाला,ही गोष्ट वैदर्भातील जनतेच्या पचनी पडलेली नाही.असंतोष उफाळून आला आणि जनतेच्या मनातील आक्रोश मतपेटींच्या रूपाने जनतेने दाखवून दिला.विरोधी पक्षांना नामी संधी मिळाली त्याचे त्यांनी सोनं केलं.

विदर्भातील जनतेने केलेला त्या भाजपाला आत्ताच ओळखणे गरजेचे आहे कारण अजूनही वेळ गेलेली नाही निवडणूक येतात जातात परंतु वेळीस सावध व्हा कारण विदर्भातील जनता गरीब आहे भोळी आहे त्यांच्यात निरंतर विचार करण्याची क्षमता आहे आणि असंच जर चालत राहिलं तर पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा धोक्याची घंटा वाजू शकते आणि जनतेने दिलेला कौल राजकारण्यांना मान्य करावेच लागेल नाहीतर पश्चातापाशिवाय दुसरा काहीच हाती लागणार नाही परंतु आजच्या घडीला भाजपाला  विदर्भा विषयी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 5, 2024

PostImage

राज्याचे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा ! योग्य की अयोग्य ?


काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या.म्हणजे विरोधी पक्षाने चारी मुंड्या चित करीत भाजपाच्या नाकावर लिंबू पिळून दणदणीत विजय मिळविला.म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,तो योग्य की अयोग्य ?

माझ्या मते तो योग्यच आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आज नाही तर कालच राजीनामा द्यायला पाहिजे होता.कारण राज्यात भारतीय जनता पक्ष हा नंबर एकचा पक्ष आहे,परंतु देवेंद्र फडणवीस सारख्या हेकेखोर माणसामुळे पक्षाला वाईट दिवस अनुभवायला मिळत आहेत आणि राज्यातील नेतृत्व जर का फडणवीसाकडे राहिले तर भविष्यात वाटण्याच्या अक्षदा लावायला सुद्धा भाजपा शिल्लक राहणार नाही,म्हणून हा राजीनामा योग्यच आहे.

देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचा राज्यातील नंबर १ एक चा नेता.बुद्धीने हुशार आहे, चाणाक्ष आहे याबद्दल दुमत नाही परंतु त्यांच्या अंगी कूटनीती ठासून भरलेली आहे.सुळीचे राजकारण करण्यात अग्रेसर आहे आणि ज्या ओबीसी बांधवांच्या भरोशावर पक्ष मोठा झालेला आहे त्याच ओबीसी नेत्यांची कदर करीत नाही.म्हणून पक्षाला मरगडीचे दिवस आलेले आहेत,म्हणून हा राजीनामा योग्यच आहे.

देवेंद्र फडणवीसांन कडे जेव्हापासून पक्षाने जबाबदारी दिली त्या दिवसापासून तर आजपर्यंत पक्षाला नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणजे पक्षाला वाईट दिवसांचा सामना करावा लागतो आहे,म्हणून राज्याची जबाबदारी दुसऱ्या वजनदार माणसाकडे सोपवावी जेणेकरून पक्षाला सुखाचे दिवस येतील आणि त्यासाठी हा राजीनामा योग्यच आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 4, 2024

PostImage

अटीतटीच्या लढतीत देशात तिसऱ्यांदा फुलला कमळ


अवघ्या देशाला लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता लाभली होती आणि आज उत्सुकता पूर्णत्वास आली. अबकी बार 400 पारचा नारा देत पंतप्रधानांनी संपूर्ण देश पिंजून काढला.विरोधकांना चारी मुंड्या चीत करीत निर्विवाद बहुमताचा आकडा गाठून सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

 देशातील विरोधी पक्ष इंडिया आघाडीने मोदीच्या NDA ला जादुई आकडा ओलांडू द्यायचाच नाही,असं चंग बांधला होता.मोदी विरोधी पक्षांना एक छत्र छायी खाली येऊन मोदीचा विजय रथ रोखण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला परंतु विरोधी पक्षाचे मनसुबे उधळत लावून मोदी ने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले.

महत्त्वाचे राज्य मोदीच्या हातातून हिसकविण्याचा प्रयत्न केल्या गेला हे सत्य नाकारू शकत नाही परंतु मोदीने निर्विवाद वर्चस्व शाबूत राखले,हे तितकंच महत्त्वाचे आहे.म्हणजे देशात पुन्हा एकदा मोदी नंबर वन आहे,असं म्हणायला काहीही हरकत नाही.

 निवडणुका म्हटल्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे काही नवीन नाही परंतु विकासाच्या मुद्द्यांपासून तर थेट जाती धर्मा पर्यंत पोहोचलेली लोकसभा निवडणूक कोण जिंकली याची खात्री नसताना देखील बहुमताचा आकडा पार करीत मोदीने अटीतटीच्या लढतीत देशात तिसऱ्यांदा कमळ फुलवून विरोधकांना आश्चर्याचा सुखद धक्का देत तिसऱ्यांदा सत्तेची चाबी मिळवण्यात यश संपादन केले.

 नरेंद्र मोदीच्या भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता नाही आलं तरी परंतु मित्र पक्षांच्या मदतीने जादुई आकडा पार करीत निर्विवाद यश संपादन केले हे सुद्धा तितकच महत्त्वाचा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीची हवा संपुष्टात येईल की काय ? याची भीती मोदीच्या कार्यकर्त्यांना देखील होती परंतु निर्विवाद यश संपादन केल्यामुळे ती भीती आता दुरापस्थ झाली असं म्हणायला काहीही हरकत नाही.

तिसरी बार मोदी सरकार


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 3, 2024

PostImage

वेलतुर तुकूम परिसरात वाघाचा वावर ! जनतेला सावध राहण्याचा इशारा


वैनगंगा नदीकाठी असलेला वेलतुर-तूकूम,वेलतूर रिठ व एकोडी परिसरात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर दिसून आलेला आहे.म्हणजे सांगायचं झाल्यास मागील काही दिवसात एकोडी परिसरात पट्टेदार वाघाने म्हशीचा रेडा सुद्धा ठार केलेला होता आणि काल दिनांक २/०६/२०२४ रोजी सोमनाथ परशुराम मंगर मु.वेलतूर रीठ येथील शेतकऱ्याच्या शेळीच्या बकरा ठार करून पट्टेदार वाघाने आपली उपजीवीका भागविण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.

ग्रामपंचायत वेलतुर तुकूमचे उपसरपंच दिगंबर काशिनाथ धानोरकर यांनी ही माहिती वन विभागाला मोबाईल फोन द्वारे कळवून झालेल्या घटनेचा पंचनामा करायला भाग पाडले.

वन विभागाचे वनरक्षक यांच्या नेतृत्वात अनिल नैताम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला.त्यावेळी वेलतुर रिठ परिसरातील 30 ते 35 नवयुवक हातात लाठी घेऊन पट्टेदार वाघाला हाकलून लावण्यासाठी वन विभागाला सहकार्य केले.

 विशेष म्हणजे वेलतुर रिठ परिसरात वावरणाऱ्या पत्तेदार वाघाच्या चौकशीसाठी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता.याच परिसरात वाघाचा वावर आहे हे वन विभागाने सिद्ध केलेले आहे.

परंतु मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातल्यामुळे या परिसरातील एकोडि,सगनापूर,वाघोली,वेलतूर रिठ,कळमगाव व परिसरातील लोक भयभीत झाली असून.वेळीच पट्टीदार वाघाच्या बंदोबस्त करावा अशी परिसरातील जनतेने वनविभागाकडे मागणी केलेली आहे.

या परिसरात कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून वनविभागाचे अधिकारी श्री गोवर्धन साहेब आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री हिनवंत साहेब चामोर्शी यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले आहेत.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 1, 2024

PostImage

नवरदेव गुडग्याला बाशिंग बांधून सज्ज,मात्र वरात निघायला तीन दिवसांची अवधी


एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून विकासाच्या कामांपासून तर जाती धर्मा पर्यंत या वर्षीची लोकसभा निवडणूक जाऊन पोहोचली.आपणच विजयाचे शिल्पकार आहोत किंवा आपलाच पक्ष कसा वर चढ आहे,हे दाखवून देण्याच्या केविलवाना प्रयत्न करताना राजकीय पुढारी आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहोत आणि एकदाची देशाची लोकसभा निवडणूक पार पडली.

आता राजकीय पुढारी उमेदवार आणि देशातील जनता मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे,ती म्हणजे निवडणुकीच्या निकालांची आणि हे वावंगच आहे.उत्सुकता असायलाच पाहिजे कारण आपण आपल्या अधिकाराचा मत मतपेटीत टाकून जनतेच्या प्रतिनिधी ठरवत असतो. निकाल चार दिवसांवर येऊन पोहोचला आहे परंतु कित्येक राजकारणी लोकांना कदाचित असाही वाटत असेल की चार दिवस म्हणजे खूप दूर आहेत,आजच असता तर बरं झालं असतं.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे परंतु निकालाची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच आहे.ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत म्हणजे चाय टपरी पासून तर पेट्रोल पंपापर्यंत.

 कित्येक उमेदवारांचे छातीचे ठोके धडधडायला सुरुवात झाली आहे आणि जो स्पर्धेत आहे,जिथे काटेरी लढत आहे तिथल्या उमेदवारांचे जरा जास्तच धडधड चालू आहे.उमेदवारांचे तर आहेतच परंतु त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचे तर उमेदवारांपेक्षाही जास्तच धडधड चालू आहे.

यावर्षी उन्हाच्या तडाख्याने जनतेचा जीव कासाविसा होऊन गेलाय आणि देशातील जनता रोहिनीच्या पावसाची जशी आतुरतेने वाट पाहत आहे अगदी तसंच राजकीय पुढारी लोकसभा निवडणुकींच्या निकालाची वाट पाहत आहोत,एवढं मात्र नक्की आहे.

लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार उभे आहेत त्यांची परीक्षा संपली आता वाट फक्त निकालांची आहे परंतु चिंता करू नका जास्त दिवस संपले आहेत आणि तीन दिवसांनी निकाल लागणार आहे. म्हणजे एखदाच सोक्षमक्ष जनतेसमोर येणार आहे कोण कितीने पाणी मे है ? चार जूनला माहित होणारच आहे. म्हणजे आज गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारा नवरदेवांची तीन दिवसानंतर वाजत गाजत वरात निघणार आहे,हे मात्र नक्की.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

April 14, 2024

PostImage

एकोडी शेतशिवारात वाघाची दहशत.माणसांवर होणारा हल्ला,रेडयांवर झालं !


एकोडी शेतशिवारात वाघाची दहशत.माणसांवर होणारा हल्ला रेडयांवर झाला.भेंडाळा परीसरात एकोडी हा लहानसा लोक वस्ती असलेला गाव आहे.आणि वैनगंगा नदी या गावाच्या काही अंतरावर आहे त्यामुळे येथील शेतकरी कृषी पंपाच्या सहाय्याने दुबार पेरणी करून धान्य व मका असे पिके घेतात.

एकोडी ते बोरघाट रस्त्यावर शेतकरी येणं जाणं करीत असतांना काही शेतकऱ्यांनी पट्टे दार वाघ बघीतला आणि गावातील लोकांना माहिती सांगितली परंतु गावातील लोकांनी हि अफवा आहे,असे समजून त्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.पण या गेल्या शनिवारी पट्टे दार वाघाचे दर्शन सुध्दा झाले आणि त्याच दिवशी म्हशींचा रेडा अंदाजे एक ते दिड वर्षांचा असेल त्याला वाघाने ठार मारून आपली दिनचर्या भागविली.

रविवारी सायंकाळी शेळ्या चारणारे शेरकी यांच्या ही वस्तु नजरेस पडल्या नंतर पुर्ण पणे विस्वास बसला.वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.आणि लगेचच वनसंरक्ष विनोद नैताम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.हि शिकार वाघाणेच केली हे त्यांनी पंचासमक्ष कबुल केली.

सदर पंचनामा करताना रमेश चौखुंडे,प्रदिप जगन भोयर,भोजराज पाल,गुणाजी पिठाले,गिरीश धोटे,पुरूषोत्तम रोहणकर,राजुभाऊ पाल, योगेश्वर पाल,उद्धव निकुरे,सतिश पाल आणि कमलाकर भोयर,कुमार निकुरे आणि एकोडी गावातील बरेच नागरिक उपस्थित होते परंतु एकोडी गावात व आजुबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे.

वाघाने हल्ला केलेला रेडा कुणाच्या मालकीचा आहे अजून पर्यंत समजलेला नाही आहे.ज्या कुणाचं असेल त्यानं आप आपल्या जनावरांची चौकशी करून वनविभागाला सहकार्य करावे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

April 12, 2024

PostImage

अपक्ष उमेदवार विनोद मडावी ने उडवीली राष्ट्रीय पक्षांची झोप,यंग लढेंगे जंग चा नारा देत प्रचारात घेतली भरारी


गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसा तसा रंग चढायला सुरुवात होताना दिसतो आहे.अपक्ष उमेदवार विनोद गुरुदास मडावी हा चळवळीतून समोर आलेला चेहरा.अगदी उमदा तरून वय 32 वर्षे आणि गरिबाचा मुलगा,निशाणी (चिन्ह) अंगठी घेऊन लोकसभेवर पोहोचण्याचा निर्धाराने निवडणुकीत उडी घेतली.

यंग लढेंगे जंग,चा नारा देत प्रचारात भरारी घेताना दिसतो आहे आणि 32 वर्षांचा तरुण आणि गरीब शेतकऱ्यांचा आदिवासी पोर निवडणूक लढतोय, म्हणून जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.काँग्रेस आणि भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षांनाजनता देखील कंटाळलेली आहे,आणि तसंच स्वतः मतदार देखील बोलताना दिसतो आहे.

विनोद मडावे हा 32 वर्षांच्या तरुण लोकसभा निवडणूक लढत आहेत.अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रणांगणावर आपले अस्तित्व पणाला लावून राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची झोप उडवणारी ठरू शकते.कारण तसं जनतेच्या प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

 अपक्ष उमेदवार विनोद मडावी हा लोकसभा निवडणूक जिंकणार नाही,हे जरी खरं असेल पण प्रस्थापितांचे अस्तित्व पणाला लावू शकतो,हे मात्र नक्की आहे.आजपर्यंत जरी प्रस्थापित पक्षांनी अंगठी कडे नजर अंदाज केलेले असेल,परंतु जशी जशी निवडणूक जवळ येत आहे,तसा तसा अंगठी,पंजा आणि कमळ या चिन्हांचे डोकेदुखी वाढत आहे. अपक्ष उमेदवार प्रस्थापितांना येणाऱ्या निवडणुकीत कुणाचे अस्तित्व मिटवेल,हे मात्र निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

April 5, 2024

PostImage

निवडणुकीच्या तोंडावर सरड्यासारखे रंग बदलविणारे राजकीय पुढारी


देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकारणात रंग यायला सुरुवात झाली.अगदी चाय टपरी पासून तर पेट्रोल पंपापर्यंत नुसता राजकारणावरच बोललं जातंय.आपल्या क्षेत्राचे तिकीट कुणाला मिळाली ? पासून तर कोण बाजी मारणार ? इथपर्यंत.

प्रश्न बाजी कोण मारणार याचा नाही,परंतु सारासार विचार करायला गेलं तर राजकारणाच्या भ्रष्ट आणि स्वार्थीपणाचा विचार करावा लागेल.कारण सरडा जसा आपला रंग बदलवितो अगदी त्याचप्रमाणे राजकीय पुढारी निवडणुका डोळ्यासमोर आल्या की पक्ष बदलवितांना दिसतात.

एखाद्या राजकीय पुढार्‍याला पक्षांन टिकीट नकारलं तर बिघडलं कुठं ? कुणालातरी पक्ष संधी देतो आहे,त्याला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करा आणि समोरच्या उमेदवाराला निवडून आणा,पण असं होताना दिसत नाही.आपल्याच पक्षातील नेत्यावर कुरघोडी करून त्याच्या विरोधात काड्या करण्याचा काम सुरू असतो पण हे चुकीचा आहे.

कारण निवडणुका येतात जातात सत्ता बदलत राहते आणि बदलत राहायलाच पाहिजे असं जाणकार मतदाराला सुद्धा वाटतं.पक्षांना एखाद्या व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट नाकारलं तर त्याचे दोन कारणे असतात,एक म्हणजे पक्ष नवीन चेहऱ्याला संधी देत असेल किंवा दुसरं कारण म्हणजे हा उमेदवार त्या पदाच्या लायकीचा नसेल हे दोनच कारणे असू शकतात.

परंतु यात वाईट मानून घेण्याची काहीही गरज नाही,फक्त गरज आहे ती म्हणजे आत्मचिंतन करण्याचे परंतु नेताजी आत्मचिंतन करण्याच्या मनस्थितीत नसतात ते दुसरं पक्ष शोधतात आणि उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्न करतात.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 31, 2024

PostImage

येत्या लोकसभा निवडणुकीवर कृषीपंप धारकांचा मतदानावर बहिष्कार


गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारक शेतकरी 24 तास वीज मिळविण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून वारंवार मागणी करून देखील,जिल्ह्यातील कृषीपंप धारकांवर भारनियमनाचा बडगा उभारून शासनाने जिल्ह्यातील कृषीपंप धारकांवर सतत अन्याय केलेला आहे.

 जिल्ह्यातील कृषीपंप धारक कित्येकदा रस्त्यावर उतरून सरकार विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.वारंवार निवेदने सुद्धा दिल्या गेली.इतकेच नव्हे तर राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सुद्धा देण्यात आले.ऊर्जामंत्र्यांनी कृषी पंप धारकांच्या शिष्टमंडळासोबत 12 तास विज उपलब्ध करून दिल्या जाईल, असा पोकळ आश्वासन देखील दिला आणि त्या आश्वासनाची पूर्तता केल्या गेलीच नाही.म्हणजे ऊर्जामंत्री त्यावेळी अक्षरशः खोटे बोललेत.

राज्यातील राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची घोरनिराशा केली.अन हाताशी आलेला पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत निस्तनाबूत झाला.राज्यातील सत्याधारी पक्ष कृषी पंप धारका सोबत सावत्र पणाची वागणूक दिल्ली,परंतु राज्यातील विरोधी पक्षाने सुद्धा कृषी पंप धारकांची बाजू समजून घेण्यात कमजोर पडले.म्हणजे त्यांनी सुद्धा कृषी पंप धारकांचे अश्रू पूसू शकले नाहीत.

संकटाच्या काळात आम्हाला राज्यकारण्यांनी वाऱ्यावर सोडले तर अशा लोकांना निवडून देण्यात काहीच अर्थ नाही,असं जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कृषी पंप धारकांचा म्हणणं आहे.म्हणून राज्यातील सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे उमेदवार असोत,जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी भारनियमन लागू आहे त्या त्या भागातील कृषी पंप धारक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता मतदानावर बहिष्कार करण्याच्या तयारीत आहेत.तशा प्रकारचे निवेदन सुद्धा निवडणूक अधिकारी व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येणार आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 29, 2024

PostImage

देशातील विरोधी पक्ष कमकुवत !


देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या,मतदानाची वेळ काही दिवसांवर येऊन ठेपले तरी पण विरोधी पक्षांच्या जागा वाटपाच्या तिढा अजून सुटताना दिसत नाही,वेळ फार कमी आहे अशा परिस्थितीत जागावाटप करून वेगाने प्रचाराच्या कामाला लागायला पाहिजे होते परंतु तसं होताना दिसत नाही.पाणी कुठं मुरतंय,हेच कळला मार्ग नाही.

विरोधी पक्ष कमकुवत होत तर नाही ना ? अशी शंकेची पाल मनात चुकचुकते आणि आजच्या वातावरणावरून तसंच होताना दिसतो आहे.कारण जागा वाटपात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा,आपापसात आरोप करताना दिसतो आहे.वंचित पक्षाचे मा.प्रकाश आंबेडकरांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांवर करीत आहे.आधीच वाचाळ बोलण्यात मातब्बर असणारे राऊत यांच्यावर आंबेडकर प्रत्यारोप करताना दिसून येत आहे.

 वास्तविक ही वेळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नसून एकमेकांना समजून घेण्याची वेळ आहे.एकाथी जागेचा तिढा सुटत नसेल तर जिद्दू करण्यापेक्षा सोडून देऊन मोकळे व्हायला पाहिजे,परंतु तसं न करता हे महाशय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात रममान होताना दिसतो आहेत.

खरं सांगायचं झालं तर विरोधी पक्ष मोदीच्या झंजाविताला घाबरला आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. मोदी पुढे आपण टिकू शकणार नाही कदाचित अशी भीती सुद्धा विरोधकांना सतावत असेल,असं म्हणायला काहीही हरकत नाही.

 देशातील आजचा वातावरण पाहता विरोधकांच्या हाती भरपूर मुद्दे आहेत. ही वेळ सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची वेळ आहे आणि आजचा मतदार जागृत असल्यामुळे विरोधकांना जास्त समजावून सांगण्याची गरज नव्हते,परंतु आजच्या घडीला विरोधकांचेच लक्षण ठीक वाटत नाही, हे यावरून स्पष्ट होताना दिसतो आहे.

देशातील सत्ताधारी पक्ष काय करतात हे म्हणण्यापेक्षा,देशातील विरोधी पक्ष काय करतात हे समजून घेणं महत्त्वाचे आहे परंतु तसं होताना दिसत नाही.कदाचित विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधल्या गेले असतील किंवा मोदीच्या झंजावातीला घाबरले असतील,असं म्हणायला हरकत नाही.

|| केल्याने होत आहे रे,पण अधिक केलीच पाहिजे ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 28, 2024

PostImage

मोदी तेरे राज मे !


देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या राजवटीला दहा वर्ष पूर्ण होऊन गेले आणि पुढेही सुद्धा त्यांच्याच हातात देशाची धुरा राहणार आहे,असं म्हणायला काहीही हरकत नाही.कारण अब की बार 400 पार म्हटल्यावर देशाची धुरा मोदीजीच सांभाळणार.

मोदी साहेब आज पर्यंतच्या पंतप्रधानांपैकी सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत,असं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात.मला एक प्रश्न पडतो की,मोदीजी एक यशस्वी पंतप्रधान आहेत तर यशस्वी पंतप्रधानाच्या राजवटीत सामान्य माणूस किती भरडला जातोय याची काळजी यशस्वी पंतप्रधानाला वाटत नसेल तर नवल वाटण्यासारखीच बाब आहे.

महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले.देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही.कृषी पंप धारकांना 24 तास वीज मिळत नाही.बेरोजगाराच्या हाताला काम नाही,तरी परंतु मोदी साहेब स्वतःला यशस्वी पंतप्रधान समजतात,म्हणजे एकावे ते नवलंच,असं म्हणण्याची वेळ जनतेवर आलेली आहे.आंधळ दळतोय अन कुत्र पिठ खातोय,अशी अवस्था सामान्य जनतेची होऊन गेलेली आहे.

मोदी साहेब एखाद्या वेळी रोजी रोटी करणाऱ्या कुटुंबाकडे बारीक नजरेने आणि सद्सद विवेक बुद्धीने डोकावून पहा एका वेळेच्या जेवणाची सोय राहत नाही,असे कितीतरी कुटुंब देशात वास्तव्यास आहेत.गरीब शेतकरी दिवसभर आपल्या संसाराच्या गाडा चालविण्यासाठी शेतात राबराब राबतात परंतु भारनियमना मुळे शेतीची नापिकी होऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ येतोय त्यांच्याकडे जरा गांभीर्याने पहा.कितीतरी उच्चशिक्षित तरून रोजगार नाही म्हणून दिवसभर रस्त्याने फिरताना दिसतात,असे कितीतरी उदाहरणे देता येतील जरा याची सुद्धा जाणीव असू द्या.

देशाचे पंतप्रधान आपकी बार 400 पार चा नारा देत आहेत.मी म्हणतोय मोदी साहेब 400 नाही,547 जागा तुम्ही जिंका.आमचा काही एक आक्षेप राहणार नाही,परंतु सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी महागाई कमी करा,शेतमाला योग्य भाव द्या,कृषी पंप धारकांचे भारनियमन बंद करा आणि बेरोजगाराच्या हाताला काम द्या जेणेकरून त्यांच्या कपाळावर लागलेला बेरोजगारीचा कलंक पुसल्या जाईल आणि देशाचा युवक अभिमानाने सांगेल,मोदी है तो मुमकिन है,नाहीतर

|| आले या भोगाशी असावे सादर,देवावरी भार ठेवूनीया ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 27, 2024

PostImage

भाऊंचे अस्तित्व पणाला ! अख्या महाराष्ट्राची नजर एकाच क्षेत्राकडे


देशात निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राजकारण्यांपासून तर सामान्य माणसांमध्ये चर्चेला जाणारा विषय म्हणजे विजयी होणार कोण ?

संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा आणि ती म्हणजे चंद्रपूर लोकसभा निर्वाचीन क्षेत्राची,अन् कारणही तसंच आहे.राज्याचे वनमंत्री आणि विकासाचे महामेरू मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार म्हटल्यावर विषयच नाही,असं म्हणायला काहीच हरकत नाही.

आणि त्याच क्षेत्रात इंडिया आघाडीचे प्रतिनिधित्व करीत आहे. रणरागिणी विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर.हे दोन्ही मातब्बर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्या कारणाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष याच लोकसभा क्षेत्राकडे लागले आहेत,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भाजपाचा बालेकिल्ला म्हणजे चंद्रपूर लोकसभा क्षेत्र आणि त्याच बालेकिल्ल्यात मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी भाजपाला चारही मुंड्या चित करून आपले वर्चस्व प्रस्थापित करून,आपले नाव लौकिक केला. कारण संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला एकच जागा जिंकता आली आणि तेही भाजपाच्या बालेकिल्यात आणि त्यांच्या निधनानंतर ह्याच क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून धानोरकरांच्या अर्धांगिनीने आता दंड थोपटल्या आहेत.

एकीकडे सुधीर भाऊंना भाजपाचे गड परत आणणे आणि देशाच्या संसदेत आपला आवाज बुलंद करणे,असा दुहेरी प्रवास करताना भाऊंसाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे.

काँग्रेस उमेदवारांची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही,पतीच्या निधनानंतर लोकसभेचे नेतृत्व रणरागिणीकडे आल्यामुळे अस्तित्व पणाला लावणे भाग आहे.मे मेरी झांशी नही दूंगी, असंच म्हणण्याची वेळ आता प्रतिभाताईंवर आलेली आहे.

दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे कोण विजयी होणार ,हे येणारा काळ सांगेल.परंतु चंद्रपूर लोकसभा क्षेत्राकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे,हे मात्र नक्की.

||जगण्याचा पाया | चालण्याचे बळ | 

विचारांचे कळ | तुकाराम ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 27, 2024

PostImage

भाऊंचे अस्तित्व पणाला ! अख्या महाराष्ट्राची नजर एकाच क्षेत्राकडे


देशात निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राजकारण्यांपासून तर सामान्य माणसांमध्ये चर्चेला जाणारा विषय म्हणजे विजयी होणार कोण ?

संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा आणि ती म्हणजे चंद्रपूर लोकसभा निर्वाचीन क्षेत्राची,अन् कारणही तसंच आहे.राज्याचे वनमंत्री आणि विकासाचे महामेरू मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार म्हटल्यावर विषयच नाही,असं म्हणायला काहीच हरकत नाही.

आणि त्याच क्षेत्रात इंडिया आघाडीचे प्रतिनिधित्व करीत आहे. रणरागिणी विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर.हे दोन्ही मातब्बर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्या कारणाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष याच लोकसभा क्षेत्राकडे लागले आहेत,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भाजपाचा बालेकिल्ला म्हणजे चंद्रपूर लोकसभा क्षेत्र आणि त्याच बालेकिल्ल्यात मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी भाजपाला चारही मुंड्या चित करून आपले वर्चस्व प्रस्थापित करून,आपले नाव लौकिक केला. कारण संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला एकच जागा जिंकता आली आणि तेही भाजपाच्या बालेकिल्यात आणि त्यांच्या निधनानंतर ह्याच क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून धानोरकरांच्या अर्धांगिनीने आता दंड थोपटल्या आहेत.

एकीकडे सुधीर भाऊंना भाजपाचे गड परत आणणे आणि देशाच्या संसदेत आपला आवाज बुलंद करणे,असा दुहेरी प्रवास करताना भाऊंसाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे.

काँग्रेस उमेदवारांची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही,पतीच्या निधनानंतर लोकसभेचे नेतृत्व रणरागिणीकडे आल्यामुळे अस्तित्व पणाला लावणे भाग आहे.मे मेरी झांशी नही दूंगी, असंच म्हणण्याची वेळ आता प्रतिभाताईंवर आलेली आहे.

दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे कोण विजयी होणार ,हे येणारा काळ सांगेल.परंतु चंद्रपूर लोकसभा क्षेत्राकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे,हे मात्र नक्की.

||जगण्याचा पाया | चालण्याचे बळ | 

विचारांचे कळ | तुकाराम ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 26, 2024

PostImage

काँग्रेस पक्षाची गटातटाची मरगळ दूर सारल्या गेली तर,गतवैभव मिळवता येऊ शकतो


गडचिरोली चिमूर लोकसभे करिता देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी कितीही वलग्ना करीत असले तरी परंतु गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील भाजपाच्या विद्यमान खासदाराचे कार्य पाहता.भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री नामदेवजी किरसान यांच्या रूपाने गतवैभव मिळवता येऊ शकतो.परंतु सर्वप्रथम काँग्रेस पक्षांमधील गटातटाचे राजकारना यावर अवलंबून न राहता किंवा मनात द्वेषाची भावना जरा बाजूला सारल्या गेली तर भाजपाच्या ताब्यात असलेला गड काबीज करून निर्विवाद यश संपादन करता येऊ शकतो.

कारण भाजपाचे विद्यमान खासदार श्री अशोक नेते यांनी लोकसभेवर दोनदा निवडून गेले परंतु जिल्ह्यात नेते साहेबांचे कार्य शून्यात असून काहीही विकास केलेला नाही.त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराबद्दल जनतेमध्ये नाराजी आहे आणि ती या निवडणुकीला दिसून येणारच आहे.आणि जनमानसात तशीच चर्चा देखील सुरू झालेली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार उच्चशिक्षित असून शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व ही त्यांची जमेची बाजू असून त्यांना विजयश्री खेचून आणायला कारणीभूत ठरू शकते. आणि जनतेला देखील बदलावा हवा आहे आणि तो होणारच आहे, ही आजची परिस्थिती आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 400 पार चा नारा देत असले तरी परंतु विद्यामन खासदाराच्या निष्काळजीपणामुळे ही निवडणूक भाजपाला डोकेदुखी ठरणार आहे.कारण विद्यमान खासदारांचा जिल्ह्यातील जनतेशी फारसा संबंध राहिलेला नाही किंवा ते टिकवू शकले नाही,हेच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते आणि जिथं खासदार महोदयांचा संबंधच तूटला असेल,तर तिथली परिस्थिती कशी असेल हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्याची गरज पडणार नाही.

काँग्रेस पक्षासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा वातावरण अनुकूल असून त्याचा फायदा कसं करून घ्यायचं हे मात्र काँग्रेस नेत्यांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.हे मात्र सत्य आहे,कारण आजपर्यंतचा इतिहास बघितला तर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीमुळे उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि हे सत्य काँग्रेसचे नेते मंडळी सुद्धा नाकारू शकणार नाही.

भाजपाचा गड रोखायचा असेल तर सर्वप्रथम आपसातील वैर आणि गटागटातील मरगळ बाजूला फेकल्या गेली तर काँग्रेस पक्षाला गत वैभव प्राप्त करता येऊ शकतो अन्यथा भाजपा भाजी मारल्याशिवाय राहणार नाही.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 9, 2024

PostImage

अंनिस आणि महिला समूह बचत गटाच्या अथक परिश्रमाने जागतिक महिला दिन साजरा


संपूर्ण भारतभर काल दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्याच प्रकारे मौजा खुर्सा ता. जि. गडचिरोली या लहानस्या गावी सुद्धा जागतिक महिला दिन मोठ्या गुण्या गोविंदाने थाटामाटात साजरा करण्यात आला.

अगदी जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अनुराधा महिला समूह बचत गट,संघर्ष महिला समूह बचत गट,एकता महिला समूह बचत गट,जय गणेशा महिला समूह बचत गट खूर्सा यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकेशना जनबंधू होत्या.तसेच कुसुम नाकाडे,नीलकंठ धानोरकर ग्रामसेवक खूर्सा हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ धानोरकर यांनी केले तर सूत्रसंचालन वंशिका आकाश लाडवे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिस प्रधान सचिव संदीप नामदेवराव आंभोरकर यांनी केले.

वैशाली संतोष आंभोरकर,सविता मोडघरे,लता आंभोरकर,नीता मोटघरे,गीता राऊत, किरण डोंगरे,कुसुम भगत,पिंगला कुडवे,तारकचंद मेश्राम ग्रामपंचायत सदस्य,रोहित मेश्राम,नरेश किनेकर आणि समस्त गावकरी खूर्सा यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रमाला रंगत आली. 

विशेष म्हणजे खूर्सा सारख्या लहानस्या गावात महिला दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.या गावकऱ्यांची जिद्द आणि एकी यामुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला त्याबद्दल खूर्सा या गावाचा मी माझ्या तर्फे अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालींना शुभेच्छा देतो.भविष्यात असे कार्यक्रम गावात गुण्या गोविंदाने साजरे व्हावेत.

एवढ्या लहानशा खूर्सा गावात असे कार्यक्रम साजरे करून स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन स्त्री सक्षमीकरणाचा मूलमंत्र जपता येतो.त्याचप्रमाणे इथल्या महिला बचत गटाने जे कार्य केले ते खरोखर व्याख्यान जोग असून असा आदर्श गावागावात निर्माण करता येऊ शकतो.इतकेच नव्हे तर अशा कार्यक्रमा मुळे महिला सक्षमीकरणाला बळकटपणा मिळतो.अशा रनरागिनीला मानाचा मुजरा.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 7, 2024

PostImage

महाशिवरात्रीच्या महापूजेचा संत मुरलीधर महाराज यांना मिळाला बहुमान


विदर्भाचे काशी म्हणून ओळखलं जाणारा तीर्थक्षेत्र मार्कंडादेव येथे हेमांड पंथी मार्कंडेश्वराची महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे ४.०० वाजता हरणघाट पारडी पिठाचे पिठाधिश श्री मुरलीधर महाराज यांच्या हस्ते महापूजेचा कार्यक्रम होणार आहे, म्हणजे ही एक अभीमानाची गोष्ट आहे.

 खास म्हणजे मार्कंडेश्वराच्या जिर्णोद्वाराचे बांधकाम पूर्ण करावे ही मागणी घेऊन संत मुरलीधर महाराज 14 दिवसापासून मार्कंडा देव येथे आंदोलन करीत आहे.श्री राम प्रभू रामचंद्र यांनी जसा १४ वर्षे वनवास भोगला त्याचप्रमाणे बाबांनी 14 दिवस आंदोलन करून जिर्णोद्वाराचे बांधकाम पूर्ण करण्यास शासनाला भाग पाडले.श्री संत मुरलीधर महाराज यांना महापूजेचा मान मिळणे स्वाभाविक आहे.

त्यायोगी पुरुषाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला देह परमेश्वराच्या स्वाधीन करण्याच्या महान कार्य संत मुरलीधर महाराजांनी करून सुस्थावलेल्या प्रशासनाला जागे केले, अशा त्यागी संत पुरुषाच्या वर्णन मी शब्दात करू शकत नाही इतके माहान कार्य बाबांनी केले.

अरे माझा बाप इथे उघड्यावर पडलाय तर मी स्वस्थ कसा बसेल,हे ब्रीदवाक्य बाबांनी घेवून जिर्णोद्वाराच्या बांधकामाला सुरुवात करायला शासनाला भाग पाडले.

महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव येथे लाखो भक्त मार्कंडेश्वराच्या दर्शनाकरिता ये जा करत असतात अशा भक्तिमय वातावरणात,भक्तीत दंग होऊन,भक्त न्याहून जातात,अशा भक्तिमय वातावरणात मार्कंडेश्वराच्या महापूजेचा मान आज संत मुरलीधर महाराज यांना मिळतो आहे,ही अभिमानाची गोष्ट आहे.बाबा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 6, 2024

PostImage

निवडणुकीच्या रणधुमाळीत पुढाऱ्यांच्या पायघड्या उचलण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा !


देशातील लोकसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. निवडणुकांचे वारे वाहायला लागले,अशा परिस्थितीत पुढार्‍यांची मर्जी सांभाळणे आणि आपल्या जीवाची पर्वा न करता उमेदवाराच्या प्रचाराच्या रणधुमाळीत स्वतःला झोकून देणे आणि पुढाऱ्यांच्या सभेकरिता त्यांच्या पायघड्या उचलण्याकरिता तळागाळातील कार्यकर्त्यांनो,आता सज्ज व्हा कारण,ये समय नही सोने का.

तसं पाहायला गेल तर तळागाळातील कार्यकर्ता हा नेहमीच आपल्यातील तत्परता दाखविण्यासाठी सदा सर्वदा तयारच असतो,परंतु निवडणुकीची जाहीर प्रचार सभा म्हटल्यावर तो अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतो,तो काही विषय नाही. कारण निवडणुका जाहीर व्हायच्या असल्या तरी निवडणुकांची जास्त खुशी ही तळागाळातील कार्यकर्त्यांना जास्त असते आणि खेड्यापाड्यात तर सर्वत्र निवडणुकांच्या चर्चा रंगू लागतात.

एकदाची ज्यांना निवडणूक लढायचे आहे त्यांना जेवढा इंटरेस्ट नाही, त्यापेक्षाही दुप्पट इंटरेस्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना असतो आणि ही वस्तुस्थिती आहे.पुढे होणाऱ्या निवडणुकांच्या आपल्या क्षेत्रातील उमेदवार कोण असेल ? यापासून तर तो उमेदवार निवडून येईपर्यंत याचे भाकीत रोजच्या रोज वर्तविण्यापासून स्वतःला वाहून घेतो.

पुढार्‍यांची सभा असली की कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस चकरा मारताना दिसतो आहे आणि पायघड्या उचलण्या पलीकडे या सामान्य कार्यकर्त्यांचे काहीच काम नसतो,तरीपण तळागाळातील कार्यकर्ता पुढार्‍यांच्या पायघड्या उचलण्यातच स्वतःला धन्य समजतो.

 अरे बाबांनो आता तरी डोळे उघडा वेळेत सावधान सावध व्हा आणि पुढाऱ्यांच्या पायघड्या उचलणे बंद करा,यातच आपलं भलं आहे. पायघड्या उचलून आपला काहीच फायदा होत नाही.राजकीय पुढारी आपला फायदा करून घेण्यासाठी निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतात आणि आम्ही आपला कामधंदा सोडून पुढार्‍यांच्या नादात आपलं जीवन बरबाद करतो आहोत,हे सर्वप्रथम लक्षात घ्या.पायघड्या उचलणे बंद करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.

 || ओळख लहान असली तरी चालेल पण,ती स्वतःच्या कर्तुत्वाची असायला पाहिजे ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 5, 2024

PostImage

शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर व्याज घेतल्या जाते,क्यूकी ये मोदी की गॅरंटी है


भारतीय शेतकरी हा देशाच्या कणा आहे .शेतकरी देशाचा बळीराजा आहे आणि शेतकरी देशाच्या पोशिंदा आहे.अशी मोठमोठी आभूषणे शेतकऱ्यांच्या नावावर लागून शेतकऱ्यांचे अर्धेअधिक कंबरडे सरकारने आधीच मोडीत काढले,अन आता शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करू अशी पोकळ वलग्ना करून सरकारने शेतकऱ्यांना भिकेच्या प्रवाहात खेचण्याच्या प्रयत्न होताना दिसतो आहे आणि तसेच होणार आहे,क्युकी ये मोदी की गॅरंटी है.

आधी शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावर मुदती आधी भरण केल्यावर बिनव्याजी कर्ज मिळत होते,आता जग बदलत चाललंय त्याचप्रमाणे शेतकऱ्यांविषयी सरकारचे धोरणं देखील बदलत चाललेयं,म्हणून पीक कर्जावर सरकारने सरसकट व्याज वसूल करणे सुरू केलेली आहे कारण हे मोदी के गॅरंटी है.

 देशात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही,दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली भरडला जात आहे,शेतीचा व्यवसाय डब्घाईला येण्याच्या मार्गावर आहे,शेती व्यवसाय हा न परवडणारा व्यवसाय म्हणून कित्येक शेतकरी बांधवांनी आपली जीवन यात्रा संपवून मोकळे झाले आहेत.कित्येक शेतकऱ्यांचे संसार आज उघड्यावर पडले आहेत.शेती नापीक होताना दिसतो आहे आणि अशा नापीक होणाऱ्या शेती व्यवसायावर आता शेतकऱ्यांच्या विश्वास बसेनासा झाला आहे आणि याला जबाबदार सरकारचे धोरण आहेत,तरी पण देशाचे पंतप्रधान सांगत फिरत आहेत की ये मोदी की गॅरंटी है.

देशातील शेतकरी सरकारच्या धोरणांविषयी कंटाळून गेलेला आहे आणि शेतकऱ्यांविषयी सरकारकडून काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि सरकारकडे सुद्धा शेतकऱ्यांविषयी ठोस असा कार्यक्रम नाही.निवडणुका आल्या की थातूर-मातूर योजना सांगून मत पदरात पाडून घेणे एवढेच सरकारचा कार्यक्रम असून,निव्वळ भूलथापा आहेत अन एखदा मत पदरात पडलं की जैसे थे अशी परिस्थिती आहे,तरी पण देशाचे पंतप्रधान दम न घेता भोळ्याभाबड्या जनतेला सांगत फिरत आहे की ये मोदी की गॅरंटी है.

 

आणखी वाचा : आमदार साहेब पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करा

 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे सरकार शेतातील कृषीपंप धारकांवर भारनीयमनाचा बडगा उभारून शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.भारनीयमनामुळे कित्येक शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झालेली असताना,अपुऱ्या विजेमुळे दुबार पीके देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,त्यांच्या मागणीकडे सरकार जाणून-बुजून कानाडोळा करताना दिसतो आहे.म्हणजे शेतकरी मरणाच्या दारात आला तरी सरकारला काहीच सोयर सुतक नाही.इकडे शेतकरी मरतो आहे तरी पण ये मोदी की गॅरंटी है.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 29, 2024

PostImage

निवडणुका पाहून राज्यातील विरोधी पक्षाला आली जाग,म्हणे कापसाला 14 हजार रुपये भाव द्या


राज्यातील विरोधी पक्ष आजपर्यंत गाड झोपेत होते.निद्रावलेल्या अवस्थेत असलेले विरोधक आता डोळ्यासमोर निवडणुका दिसायला लागल्या अन् आता जागे झाले आहेत.

राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणुका पाहून आता शेतकऱ्यांबद्दल कळवळ वाटू लागली आणि आता बोंब मारत सुटले आहेत की,कापसाला 14 हजार रुपये भाव द्या.अरे कापसाला 14 हजार रुपये भाव मागणाऱ्यांनो आज पर्यंत कुठे गेला होतात ? शेतकऱ्यांचा कापूस कधीचाच विकून झालाया.आधी का नाही तुटून पडलात सत्याधाऱ्यांवर की.

शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे मग आत्ताच कशी काय शेतकऱ्यांची आठवण आली.कारण समोरून निवडणुका आहेत म्हणूनच ना.शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असती तर एवढे दिवस झोपेचे सोंग घेऊन गप्प का बसला होतात.वास्तविक राज्यातील सरकारची कामगिरी पाहता किंवा सरकारच्या उदाशीन धोरणामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं होतं,सरकार विरोधी रान पेटवून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवता आली असती.परंतु तसं न करता विरोधी पक्ष मुंग गिळून गप्प होते.आता समोर निवडणुका दिसायला लागल्या,अन हे लोक आपल्या तुंनतून वाजवायला सुरुवात करायला लागले.परंतु आता वेळ निघून गेली कितीही सहानुभूती दाखविण्याचे प्रयत्न केले तरी पण विरोधकांच्या हातात काहीही लागणार नाही आणि हे सत्य आहे.

कारण गडचिरोली जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी भारनियमन सुरू आहे आणि कित्येक शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारनियमना विरोधात दोन दा मोर्चा काढून शासना विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला,तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे काम जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे होते.परंतु हे पक्ष देखील कृषी पंप धारकांच्या अब्रूचे दिंडवडे पाहण्यातच स्वतःला धन्य मानत (समजत) होते, 

मग तेव्हा का नाही आली शेतकऱ्यांची आठवण फक्त निवडणुका आल्या की शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवायचे आणि निवडणुका संपल्या की तुझा माझा काहीही संबंध येत नाही म्हणून हात वर करायचे.परंतु हा राज्यकर्त्यांच्या फाजीलपणा असून तोच त्यांच्या मानगुटीवर बसणार आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आजपर्यंत सत्ता उपभोगले आणि सत्ता मिळाली की त्याच शेतकऱ्यांना केरकचरा समजायला लागलात,तोच शेतकरी आता सुज्ञ झालेला आहे. शेतकरी तुमचे पूर्ण सोंग ओळखून आहे आणि तुमच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही तर तुम्हाला तुम्हची जागा दाखवायला सज्ज झाला आहे.

 

 आणखी वाचा : शासन आपल्या दारी,हा नारा देत शासनाने उभारले कृषी पंप धारकांवर कुऱ्हाड

 

विरोधी पक्षातील पुढार्‍यांना आजपर्यंत आपाआपली पक्ष टिकवून ठेवण्यातच स्वतःला धन्य समजत गेले.जनतेचे काही सोयर सुतकच यांना नव्हते आता निवडणूक दिसायला लागल्या आणि आता त्यांना जागा आली म्हणजे आता बाबुराव जागा झाला,अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 28, 2024

PostImage

संत मुरलीधर महाराज यांच्या साखळी उपोषणामुळे,सुधरायला गाव सारे लोक लागले


विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडादेव येथील हेमांडपंथी मार्कंडा शहराच्या जीर्णोद्वारासाठी हरनघाट पिठाचे पिठाधिकारी संत मुरलीधर महाराज यांनी गेल्या 16 तारखेपासून साखळी उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत जिर्णोद्वाराच्या बांधकामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुद्धा सुरू राहणार,अशी भूमिका घेतली आहे आणि खास म्हणजे संत मुरलीधर महाराज यांच्या साखळी उपोषणाला त्यांच्या भाविक भक्ताने भरभरून साथ देताना दिसून येत आहे.

 बाबा जरी साखळी उपोषण करीत असले तरी त्यांच्या भाविक भक्तांच्या पाठिंब्यावर उपोषणाला खरी रंगत आली,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्कंडा गावातील लोकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.त्यामुळे आणखीनच साखळी उपोषणाची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतो आहे आणि आजच्या घडीला बाबांची ताकद जास्तच वाढली आहे.कारण गावकरी जे करणार,ते राव करणार नाही,अशी प्रचिती दिसायला लागली आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी उपोषण करणारे कदाचित जगातले पहिलेच संत म्हणून मुरलीधर महाराजांची ख्याती सांगताना मन भरून येतो. कारण तिथलं दृश्य तिथली परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली आणि अनुभवली सुद्धा आहे. ते दृश्य बघतांना एकीकडे दुःख होतो तर दुसरीकडे आनंदही वाटतो.स्वतःच्या जीवाची परवा न करता बाबांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल बाबांचे मी त्रिवार स्वागत करतो आणि अभिमानाने सांगतो की आजच्या युगात,असा संत होणे नाही.

मुरलीधर महाराज यांनी पुकारलेला साखळी उपोषण वैनगंगेच्या पाण्यासारखं पवित्र आणि निर्मळ आहे.कारण भक्तिमय वातावरणात सुरू असलेला आंदोलन बोध घेण्यासारखा आहे.अखंड हरिनामाचा स्मरण करून अखंड होम यज्ञाच्या साक्षीने भजन कीर्तनात रंगून जाऊन भक्तांनी भान हरपल्याचे नजरेस पडताना दिसतो आहे.बाबांच्या साखळी उपोषणामुळे भाविक भक्तांच्या मनात देखील नवचैतन्य निर्माण झाल्याचा भास होतो आहे.इतके मनोहर दृश्य आहे.

||जन्मो जन्मो आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली|| असं बाबांच्या सहवासात राहत असल्यामुळे मला त्याची प्रचीती यायला लागली.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 26, 2024

PostImage

मार्कंडेश्र्वर देवस्थानाच्या बांधकामासाठी बाबांचे उपोषण सुरूच,उपोषण संपल्याचे राजकीय नेत्यांचे स्टंट !


आमचा हा उपोषण आमरण नसून हा साखळी उपोषण होता पण मी ईश्वरनामा तल्लीन होऊन उपवास सुरू केलं होतं म्हणजे मी आहार घेत नव्हतो हा माझा व्यक्तिगत विचार होता ही गोष्ट माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला मी कळवलं होतं पण.

काल 24 फरवरी ला अकरा वाजता माझ्या प्रकृती दुपारी प्रकृतीत बिघाड आला व माझी बीपी लो झाली तशातच आमुची तहसील दार व चामुर्शी पोलीस निरीक्षक साहेब हे मला एक मंदिराचे बांधकाम सुरू होण्या  संबंधित भारतीय पुरातत्त्व विभाग यांचे पत्र आणून दिले व मला प्राचारू लागले की आपण उपोषण मागे घ्या पण मी कसाबसा त्यांच्याशी चर्चा केलो त्यावेळेस माझा शिष्टमंडळ हजर नसल्याने मी त्यांना नाकारले त्याच वेळे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी मला भेट देण्याकरता उपोषणाच्या पेंढार मध्ये येऊन पोहोचले त्यावेळेस माझी प्रकृती गंभीर असल्याने मला त्यात काही समजले नाही.मला त्यांनी समजावण्याचे प्रयत्न केले.त्यात त्यांनी मला पाठिंबा देत असेही शब्द बोलले की,एक तारखेला काम सुरू झालं नाही तर मी पण आपल्या सोबत आमरण उपोषणाला बसेल,असे वचन देतो पण तुम्ही आता अन्न त्याग करू नका,साखळी पोषण करा येत्या एक तारखेपर्यंत तुमचा साखळी उपोषण राहू द्या असं मला प्रचारण केले हे सत्य आहे पण मी हा उपोषण मागे घेतलेला नाही.

 कारण माझा प्रण आहे,हे मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी मला फारसमजूत घातली आणि त्यांनी मला शरबत पाजला होय,मी साखळी उपोषणाची मला काहीच माहिती नव्हती,हे सगळं काही खाऊन करावं लागतं व मी एक संत असल्यामुळे मी स्वतःच उपासमार केला यात माझा शिष्टमंडळ किंवा स्वयंसेवक यांची काही गलती नाही,हा माझ्या भक्ती व भगवंता मधला खेळ आहे पण या खेळाचा कुणीही राजकारणी किंवा राजकारण करू नका हा साकळी उपोषण येत्या मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत सुरू राहील असे मी आपल्याला विनंती करतो तसेच मला आपल्या पोटाशी घेऊन जे लिंबू शरबत पाजले माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांना मी धन्यवाद देतो पण अशी बातमी पूर्ण देशभर पसरवू नका की माझा उपोषण सुटला.

यामुळे ईश्वर कार्याला अडचण पडेल मी समजू शकतो.आपल्याला माझी काळजी आहे पण जे माझे प्राण आहे ते पण समाप्त होईल असेही होऊ शकते ज्यामध्ये मी मार्कंडे विषय जागृती केली ते तिथेच संपून जाईल म्हणून मला माफ करा मी आपला शब्द पाडला आहे.

 मी फळ फ्रुट इतर काही आता घेत आहे पण माझा हा साखळी उपोषण सुरूच आहे मी असा व्यक्त करतो व आपणही मला विनवणी करताना साखळी उपोषण सुरू ठेवा,असं सांगितलं मी श्री संत मुरलीधर स्वामी महाराज आपल्याशी बोलत आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करतो की या देव कार्याला सुख स्वरूपाने व माझ्या मार्कंडेश्वराच्या मंदिराला होण्याकरता पाठिंबा जास्तीत जास्त द्यावं पण राजकारण करून किंवा याचा कुठलाही छळ करू नका. माझी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना,माझा आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद मी सत्य बोलतोय आणि हे तितकाच सत्य आहे.मला यातला कुठलाही राजकारण किंवा कुठलाही उपोषणात कधीच मी बसलेला नाही त्यामुळे माझ्या आत्महून झाली असेल.

 

आणखी वाचा : मार्कंडेश्वर जीर्णद्धाराच्या बांधकामासाठी बाबांचे भक्त उतरले रस्त्यावर

 

मी आपल्या सर्वांना समजतो आणि प्रार्थना करतो की वृत्तपत्र माध्यमातून लोकापर्यंत जो मेसेज जात आहे की महाराजांना उपोषण सोडला याचा मला दुःख होतो कारण माझा साखळी उपोषण पहिले पासून आताही सुरूच आहे म्हणजेच १६ फरवरी ते 29 फरवरी पर्यंत मंदिराचे काम सुरू न झाल्यास माझा आमरण उपोषण सुरू करण्याचा संकल्प होता आणि तो तितकाच सत्य व कटू आहे.मी सगळ्या वृत्तपत्रिका ना विनंती करतो की आपण माझी प्रार्थना ऐकावा आणि मार्कंडेश्वराच्या मंदिराला आपण सहकार्य करावा यात माझी एवढी चूक समजतो की मी साखळी पोषण न करता मी स्वतंत्र उपवास गेलो होतो त्यामुळे ही घटना घडली त्यात कुठलाही कोणताही राजकारण करू नये ही विनंती जय मार्कंडा जय मार्कंडा.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 22, 2024

PostImage

चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर


 

              साहित्य नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील साहित्य प्रज्ञामंच या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा  आयोजित करण्यात येतात. यंदा आयोजित करण्यात आलेल्या  "साहित्य प्रज्ञामंच पुरस्कार - २०२३"  मध्ये  झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास नाट्यविभागात नाट्यलेखनाचे द्वितीय क्रमांकाचे   पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे "साहित्य प्रज्ञामंच च्या" अध्यक्षा सौ. लिना देगलूरकर यांनी कळविले आहे. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सौ. वंदना घाणेकर व मकरंद घाणेकर यांनी काम पाहिले.
     

या  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे  गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवात १८ तारखेला या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे. 
             

चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.  आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

 

आणखी वाचा : महाराष्ट्र घडतोय की बिघडतोय ?
         

चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, दै. लोकमतचे संजय तिपाले, दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, प्रा. एस. एस. जगताप, प्रा. डॉ. माधव कांडणगीरे, प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), लक्ष्मीकमल गेडाम (साहित्यिका) , मधुश्री प्रकाशनचे प्रा. पराग लोणकर (प्रकाशक) , डॉ. एस. एन.पठाण, डॉ. परशुराम खुणे, प्रमोद बोरसरे, कुसूमताई आलाम (साहित्यिका), हिरामण लांजे (साहित्यिक), प्रा. प्रब्रम्हानंद मडावी,प्रा. डॉ. बावनकुळे, पुंडलिक भांडेकर (पत्रकार) व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 16, 2024

PostImage

मार्कंडेश्वर जीर्णद्धाराच्या बांधकामासाठी बाबांचे भक्त उतरले रस्त्यावर


मार्कंडेश्वर जीर्णद्धाराच्या बांधकामासाठी बाबांचे भक्त उतरले रस्त्यावर,आता नाही तर कधी नाही ही मागणी घेऊन जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन

विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेश्वराची नगरी मार्कंडा येथील जीर्णोद्वाराचे बांधकाम पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या आठ-दहा वर्षांपासून रेंगाळत आहे आणि त्या बांधकामाकडे प्रशासनाचे तसेच शासनाचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच हीच मागणी घेऊन हरणघाट पारडी देवस्थानाचे पिठाधिकारी संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भर उन्हात आपल्या असंख्य भक्तांच्या साक्षीने सार्वजनिक विभागाच्या विश्रामगृहापासून पायी पायी अंतर कापत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हर हर महादेवाच्या घोषणा देत धडक मारली.

 हजारो भक्तांनी बाबांच्या आंदोलनाला निस्वार्थपणे पाठिंबा दर्शवित केला शासनाचा धिकार. मुख्य कारण म्हणजे आज लोक वर्गणी गोळा करून आपाआपल्या पद्धतीने बाबांचे भक्त गडचिरोली येथे पोहोचले आणि हजारो भक्तांच्या साक्षीने गडचिरोली शहर दुमदुमले.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अडीच वर्षात पूर्ण होऊ शकतो तर मग मार्कंडादेव येथील मार्कंडा देवस्थानाचे बांधकाम मागील दहा वर्षांपासून का रेंगाळत आहे.त्याला कारणीभूत कोण ? असा सवाल संत मुरलीधर महाराज यांनी उपस्थित केला.या मागणीला बाबांच्या आंदोलनात जमलेल्या भक्तांनी टाळी वाजवीत बाबांचे समर्थन केले.

आत्ता नाही तर कधीच नाही याची जाणीव बाबाला आहे आणि बाबाच्या भाविक भक्तगणांना सुद्धा आहे म्हणून बाबाच्या आंदोलना मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.

नंतर संत मुरलीधर महाराज यांच्यासोबत अनेक संत आणि महाराज सुद्धा उपस्थीत होते खास म्हणजे आजच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी श्रीराम प्रभूची नगरी आयोध्या येथील संत हे सुद्धा उपस्थित होते.

संत मुरलीधर महाराज यांचे आज विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारी मार्कंडेश्वराची नगरी मार्कंडा येथे सायंकाळी ४ वाजता पासून साखळी उपोषणाची सुरुवात करणार असून.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात परवानगी घेतलेली आहे हे साखळी उपोषण सात दिवस चालू चालणार असून,जर का जिर्णोद्वाराचे बांधकाम सुरू झाले नाही तर स्वतः मुरलीधर महाराज यांनी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी आता माघार घेणार नाही असं बाबांनी जाहीरपणे आव्हान आधीच केलेला आहे.मार्कंडेश्वर येथील साखळी उपोषणाला बाबांच्या भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा जाहीर केलेला असून संपूर्ण विदर्भाची नजर या आंदोलनाकडे लागणार आहे,हे मात्र सत्य आहे.

 

आणखी वाचा : महाराष्ट्र घडतोय की बिघडतोय ?

 

 बाबाच्या या आंदोलनामुळे प्रशासन तसेच शासन सुद्धा गंभीरपणे दखल घेण्यासाठी सज्ज झालेला आहे.आंदोलनाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शविला आहे आणि आंदोलन सुरू होता त्यावेळेस खासदार अशोक नेते सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या भेटीला आले होते. म्हणून मार्कंडेेश्वराच्या बांधकाम सुरू व्हायला उशीर होणार नाही असं म्हणायला काहीही हरकत नाही.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 15, 2024

PostImage

24 तास वीज मिळालीच पाहिजे ही मागणी घेऊन कृषीपंप धारक तहशीलवर धडकला


भेंडाळा सब स्टेशन अंतर्गत येणारे कळमगाव व घारगाव असे मिळून दोन पीडर अस्तित्वात झाले आणि जिल्हाभरातून नेमके हेच दोन फीडर आहेत की तिथे भारनियमन सुरू आहे. कृषीपंप धारकांनी मागे कित्येक निवेदने दिलेत ,नंतर महावितरण कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या नेतृत्वात जन आंदोलन उभे केल्या गेले.

त्यावर काही दिवसांसाठी ८ तासाचे भारनियमन १२ तासांवर सुरू झाले आणि १२ तास वीज होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी दुबार पिकाची लागवड केली.नेमकं तिथंच सरकारने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेलं आणि बारा तासाची वीज आठ तासांवर आणून सरकारने शेतकऱ्यांना मोठं पारितोषिक दिलं.

 एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करू,अशी पोकळ आश्वासने देतो आहे आणि दुसरीकडे भारनीयमनाचा बडगा उगारून शेतकऱ्यांच्या केसाने गळा कापतो आहे.असे राज्यातील सरकार शेतकऱ्यांसोबत सावत्र वागणूक करतो आहे,म्हणून अशा फसव्या सरकारला जाब विचारण्यासाठी कृषी पंप धारक शेतकरी आज रस्त्यावर उतरून सरकारचा जाहीर निषेध करतो आहे.

साधूबाबा कुटी ते तहसील कार्यालय जवळपास दोन किलोमीटरचा अंतर कापत सरकार विरोधात घोषणा देत शेतकरी रस्त्यावरची लढाई लढतो आहे, म्हणजे यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणतं अशी वेळ कृषी पंप धारकांवर आलेली आहे.शासन आपल्या दारी असा नारा देत सरकार जर शेतकऱ्यांची घोर निराशा करीत असेल तर अशा सरकारला मुळासकट उपडून फेकल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही,असं भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

भारनियमन लागू करायचं असेल तर संपूर्ण जिल्हाभर आधी लागू करा आणि जोपर्यंत जिल्ह्यावर असे आदेश लागू होत नाही तोपर्यंत भेंडाळा सब स्टेशनची भारणीयमन लागू करू नका, हीच अपेक्षा कळमगाव व घारगाव फिडरच्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

दुपारचे एक वाजता कृषी पंप धारकांच्या मोर्चाला सुरुवात झाली सरकार विरोधी घोषणा देत अतिशय शांतपणे कृषी पंप धारक शेतकरी तहसील कार्यालयावर धडकला व आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्री वैध यांचेकडे सुपूर्द करून आपली मागणी शासन स्तरावर योग्य प्रकारे पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली.

 तुमच्या मागण्याची दखल योग्य पद्धतीने घेतली जाईल अशा पद्धतीने आश्वासन येऊन मोर्चाची सांगता करण्यात आली जवळपास दोनशेच्या वर कृषी पंप धारकांनी आपली उपस्थिती या मोर्चाला दर्शविली होती.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 11, 2024

PostImage

महाराष्ट्र घडतोय की बिघडतोय ?


महाराष्ट्राच्या इतिहासात दोन स्थानिक राजकीय पक्षांचे अस्तित्व मिटवण्यासाठी भाजप ने जी ताकद लावली होती, त्यास अखेर यश मिळत गेले. अनेक यंत्रणा मदतीला असल्यामुळे त्यात व्यत्यय येणेदेखील अशक्य होते. भारतीय जनता पक्षाला कमालीचा आनंद वाटत असला, तरी जनतेला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. कारण पक्षाचे फक्त चिन्ह गेले, तरी विचारांचे अस्तित्व आणि सामर्थ्य जात नसते.

 विश्वासघातकी, बेईमानी आणि संधीसाधू राजकारणाची त्रिसूत्री सध्याच्या राजकारणात दिसते. पण 'नॅनो 'वर 'बीएमडब्ल्यू'चा लोगो लावला की, 'नॅनो' 'बीएमडब्ल्यू' होत नाही, हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे. सध्या या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे किंबहुना या देशांमध्ये काय चाललंय, हे पाहून नवी पिढी राजकारणात येईल की नाही शंकाच आहे. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे कल्याण करण्याची संधी समोर असताना सुडाच्या राजकारणाचे सुरुंग पेरले गेले आहेत. राज्यातले राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवर आणून ठेवले आहे. सत्तेची महत्त्वाकांक्षा आणि आभाळाला भिडलेला अहंकार राज्याची वाट लावतोय!

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर मराठा समाजाचा एकमेव सामाजिक राजकीय प्रतिमा असलेला नेता म्हणजेच शरद पवार. शिवसेनेबरोबर आता त्यांचाही पक्ष गायब करून टाकण्यात आला. सामान्य जनतेला हा प्रकार आवडला की नाही हे मतपेटीतूनच कळेल. देशामधील लोकशाहीची मूल्य आणि संविधानामधील विविध प्रकारच्या तरतुदी पायदळी तुडवल्या गेल्या आहेत हे मात्र नक्की.

 

  • अजितदादांची तरी काय चूक?

दादांनी पक्ष पळवला व भाजपसोबत गेले. त्यांची तरी काय चूक? विरोधात राहून चौकशीचा ससेमिरा मागे लावून घेऊन निरर्थक दोन-तीन वर्षाकरिता जेलवारी करण्यापेक्षा सत्तेत राहून क्लिनचिट मिळणार असेल, तर मग कसले काका अन् कसले काकांचे उपकार? शेवटी या वयात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसारखे एक दिड वर्ष जेलमध्ये जाण्यापेक्षा सत्तेतील दिवस काय वाईट? बहुदा हाच प्रॅक्टिकल विचार अजितदादांनी केला असेल. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दोष देण्यापेक्षा या सर्वामागचे कर्ते-करविते ओळखले पाहिजेत. ज्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच सर्व आरोपांसहित महाराष्ट्रातील सत्तेत सामील करत मोठ्या दिमाखात व जोशात महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यामुळे कसले आले तत्त्व आणि कसले आले विचार. सत्ता हाच पुढे जाण्याचा व विकासाचा सोपा मार्ग आहे, हे लक्षात आले.

 

  • निकाल काय लागणार सर्वांनाच कल्पना !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्हावर अजितदादा पवार गटाचा दावा मान्य करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या विरोधात निकाल दिला. शिवसेनेचा घटनाबाह्य निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचा निकाल काय लागणार? याचा अंदाज मुरब्बी नेत्यांना आधीच आलेला होता. सध्या घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. सरकार किंवा विधिमंडळ यांचा थेट संघर्ष सर्वोच्च न्यायालयाबरोबर होत आहे. संविधानाला वाचवायची जबाबदारी आता सर्वोच्च न्यायालय व शेवटी जनतेलाच करावी लागणार आहे. राजकारणात, समाजकारणात विकृती प्रस्थापित होताना दिसते आहे. महाराष्ट्राची सामाजिक व राजकीय घडी विस्कटली आहे. जिथं फुलं वेचली तिथं गोवऱ्या वेचायची वेळ आली आहे. जो महाराष्ट्र अनेक चळवळींनी, समाजसुधारकांच्या त्यागाने, संताच्या शिकवणीने घडला आहे, तो उद्ध्वस्त होतो की काय? अशी शंका येत आहे.

 

आणखी वाचा : आमदार होळी साहेब तुमच्या राज्यात चाललंय कायं ?

 

त्यामुळे उरलेल्या भ्रष्ट व सुमार नेत्यांच्यात फडणवीस मोठे दिसू लागलेत. निरंकुश सत्ता हातात असल्याने विरोधी पक्षातले भ्रष्ट नेते त्यांच्यासमोर वाकू लागलेत. भाजपासह विरोधी पक्षातले नेतेही फडणवीसांना शरण जाऊ लागले.त्यामुळे आता यांचा निकाल ही जनताच करेल.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 11, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे विजयी* 


 

 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात *"आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

      या उपक्रमाचे सहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून गडचिरोली येथील नवोदित कवी *पुरुषोत्तम लेनगुरे* यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या *"रमाई'* या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

       पुरुषोत्तम लेनगुरे हे झाडीपट्टीतील नवोदित कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रानगर्भ फुलत आहे ' मध्ये त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.

        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

आणखी वाचा : आमदार होळी साहेब तुमच्या राज्यात चाललंय काय ?

        या सहाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संगीता रामटेके, पुरुषोत्तम लेनगुरे, कृष्णा कुंभारे, तुळशीराम उंदीरवाडे, सुनील मंगर, प्रतिभा सुर्याराव, मनिषा हिडको, संजय बन्सल, चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के, वंदना मडावी, सुजाता अवचट , प्रब्रम्हानंद मडावी, उपेंद्र रोहनकर, प्रेमिला अलोने, ज्योत्स्ना बन्सोड , बाबाजी हुले, प्रभाकर दुर्गे, दिनेश देशमुख, मधुकर दुफारे, अनुराग मुळे, प्रशांत गणवीर, राजरत्न पेटकर , मुर्लीधर खोटेले , खुशाल म्हशाखेत्री, प्रमोद बोरसरे ,मिलिंद खोब्रागडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

        या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 10, 2024

PostImage

शासनाच्या उदाशीन धोरणा विरोधात शेतकऱ्यांनो रस्त्यावरची लढाई लढायला शिका रमेश चौखुंडे यांचे आवाहन


देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांकरिता राबविल्या जाणाऱ्या योजना शेतकऱ्यांच्या काहीच फायद्याची नसून शेतकऱ्यांची नुसती दिशाभूल करणारी असून,अशाने शेतकरी देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही,म्हणून अशा फसव्या सरकार पासून वेळेस सावधान होणे गरजेचे आहे.

हे सरकार शेतकऱ्यांना निस्तानाबुत करण्याचे धोरण अवलंबिले असून.सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही.त्यामुळे अशा फसव्या सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावरची लढाई लढणे गरजेचे आहे असे आवाहन रमेश चौखुंडे यांनी केलेले आहे.

कृषी पंप धारक शेतकऱ्यांना भारनियमन लागू करून शेतकऱ्यांच्या जिवावर उठण्याचा प्रकार आहे.भारनियमनामुळे भात पिकाचे उत्पन्न अर्ध्यावर आले जेव्हा शेतात भरपूर पाण्याची गरज होती तेव्हा ८ तास वीज मिळत होती,जसे भात पिकाची कापणी सुरू झाली आणि त्यानंतर १२ तास वेळ सुरू झाली.१२ तास विज म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा पिकाची लागवड सुरू झाली आणि शेतात पिक बहरत असताना किंवा शेतीला भरपूर पाण्याची गरज असताना परत ८ तासांवर वीज आली म्हणजे हे सरकार शेतकरी विरोधी आहे असं समजायला काहीच हरकत नाही.

 कोणसरी परिसरात जयरामपूर,मुधोली,सोमनपल्ली,गणपुर,विठ्ठलपूर भागातील अतिसुपीक जमिनीवर एमआयडीसी (MIDC) स्थापन करून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कारखानदार यांच्या हवाली करण्याचा प्रयत्न सुरू आहे.सुपीक जमिनीवर उत्पन्न घेणारा शेतकरी मेला तरी चालेल परंतु कारखानदार जगला पाहिजे,अशी विचारसरणी सरकारची आहे तर अशा सरकारला शेतकरी विरोधी सरकार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं.

एमआयडीसी निर्माण करून जमिनी कारखानदाराच्या घशात गेली तर सर्वप्रथम शेतकरी नावाची जात शिल्लक राहणार नाही म्हणून शेतकरी जिवंत ठेवायचं असेल तर वेळेत सावधान होऊन रस्त्यावरची लढाई लढणे गरजेचे आहे.

 

आणखी वाचा : जीव गेला तरी जमीन देणार नाही 

 

शेतकऱ्यांना माझी नम्रपणे एकच विनंती आहे सर्व शेतकरी बंधू एकत्र या संघर्ष करा आणि आपली रास्त मागणी पदरात पाडून घ्या. अन्यथा देशातील व राज्यातील सरकार धनदांड्ग्याचे,भांडवलदारांचे सरकार आहे.शेतकऱ्यांना कधी गिळंकृत करेल याचा अंदाज नाही कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही गोष्ट शक्य होणार नाही असं बाबासाहेबांची शिकवण आहे त्यांचे आचरण करा आणि अशा लबाड लांडग्यांपासून सावध राहा.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 9, 2024

PostImage

मार्कंडेेश्वराच्या जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी मार्कंडा देव येथे बैठक घेऊन आंदोलनाविषयी जाणून घेतल्या भक्तांच्या भावना


मार्कंडा देव येथील जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती,तसे निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते.आणि पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत जिर्णोद्वाराचा बांधकाम सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल,असा इशारा दिला होता आणि त्या आंदोलनाची रूपरेषा आखण्याकरिता मार्कंडादेव येथे एक बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीला स्वतः मुरलीधर महाराज यांच्या सोबत पिपरे महाराज,इस्कॉनचे प्रमुख संत परमेश्वर दास महाराज उपस्थित होते. गडचिरोली येथील श्री गोविंद सारडा,बाबुरावजी कोहळे,रमेश बारसागडे आणि सावली तालुक्यातील व चामोर्शी तालुक्यातील बाबांचे भक्तगन पुरुष व महिला सकट मार्कंडा देव येथील नागरिक सुद्धा आपाआपले दुकान बंद ठेवून उपस्थित होते.

मार्कंडा देव येथील जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आजही त्या आंदोलनावर बाबा ठाम आहेत.

असंख्य भक्तगणांनी बाबांना अन्नत्याग आंदोलन करू नका,तुम्हीच आमचे आधारस्तंभ आहात,अशी विनवणी बाबाला आपल्या भक्तांनी व्यक्त केली.

अरे माझा बाप इथे उघड्यावर उभा आहे.त्यांच्या डोक्यावर छत नाही तर मी कसा स्वस्त बसेल,अशी भावना संत मुरलीधर महाराज यांनी बोलून दाखवली.मी अन्नत्याग आंदोलन करणार म्हणजे करणार या भूमिकेवर बाबा ठाम राहिले.

बाबा अन्नत्याग आंदोलन करू नका वेळ आली तर सात दिवसांचा साखळी उपोषण करू अन आपल्या मागण्या मान्य नाही झाली तर मात्र अन्नत्याग आंदोलन करू,अशी विनंती बाबांच्या असंख्य भक्तांनी व्यक्त करीत बाबांची मनधरणी सुरूच ठेवले.

त्यानंतर बाबांनी आपल्या लेकरांचा विचार करून साखळी उपोषणाला तयार झाले.असंख्य भक्तांच्या साक्षीने येत्या १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाखोंच्या संख्येने मोर्चा नेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊ व त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता पासून विदर्भाची काशी मार्कंडा देव येथे मंदिराच्या समोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचा,इशारा भाविक भक्तांनी व्यक्त केला.

 

आणखी वाचा : मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम सुरू करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू,संत मुरलीधर महाराज यांचा इशार

 

आजच्या कार्यक्रमाला गडचिरोली, चामोर्शी व सावली तालुक्यातील २०० ते ३०० बाबांचे भक्तगण महिला सहित उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 8, 2024

PostImage

शासन आपल्या दारी,हा नारा देत शासनाने उभारले कृषी पंप धारकांवर कुऱ्हाड


शासन आपल्या दारी,हा नारा देत शासनाने उभारले कृषी पंप धारकांवर कुऱ्हाड, १२ तासांची वीज आता ८ तासांवर

शासन आपल्या दारी हा नारा देत महाराष्ट्र शासनाने कितीही पोकळ वलग्ना करीत असेल तरी पण हे सरकार शेतकऱ्यांना निस्तनाबुत करून सोडणारे आहे,हे आजच्या भारनियमना वरून दिसून येत आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोटावर मापन्या एवढ्या भागात भारनियमन सुरू करून.शासनाने कृषीपंप धारक शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. हे सरकार शेतकऱ्यांविरोधी आहे,हे यावरून स्पष्ट होताना दिसतो आहे.

 शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदारनिर्वाह करण्यासाठी काहीही रोजगार नसल्यामुळे नाईलाजाने शेतीचा व्यवसाय करतो आहे परंतु महाराष्ट्रातील सरकार जाणून-बुजून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण सुरू केलेलं आहे.

भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाला फटका बसून उत्पन्नात घट झाली आणि सरकारने भारनियमन लादून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे.

कित्येकदा निवेदन देण्यात आले कित्येक ठिकाणी कृषीपंप धारक आपल्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या धान पीक शेतात डोलत होता तेव्हा आठ तास विज मिळत होती त्यामुळे धान पीक नष्ट झाले. जशी धान पिकाची सीजन संपली तेव्हा शासनाने बारा तास वीज सुरू केली आणि पुन्हा पेरणी करून शेतात पिक भरत असताना बारा तासांवरून परत आठ तास वीज देऊन शासनाने कृषी पंप शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली,हे यावरून सिद्ध होत आहे.

 

आणखी वाचा : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविसांच्या अलगर्जी पणामुळे कृषिपंप धारक शेतकऱ्यांवर ओढावला संकट

 

कृषी पंप शेतकऱ्यांनवर भारनियमन लादून हे सरकार शेतकऱ्यांना निस्तनाबूत करण्याचा षडयंत्र करीत नाही ना ? अशी भावना शेतकरी करताना दिसून येतोय आणि हे जर असंच राहत असेल तर येणाऱ्या निवडणुकीत सरकारचा खरा चेहरा शेतकरी बदलवून टाकल्याशिवाय राहणार नाही,हे तितकेच खरं आहे. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे, अशा सरकारला मुळासकट उपडून फेकल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शेतकऱ्यांसमोर उरणार नाही.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 6, 2024

PostImage

हे होणार देशाचे नवे पंतप्रधान ? संजय राऊत यांचे भाकीत


राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे भारताचे पंतप्रधान होणार आहे आणि ते गुण त्यांच्या अंगी आहेत,असं शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे भाकित आहे.पाहूया पुढे काय होतं ते.

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि स्वतःला बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक समजणारे संजय राऊत,काही ना काही वाचाळ वक्तव्य करण्यात तरबेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैकी ते एक आहेत.जेव्हा संजय राऊत तुरुंगात गेले होते तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते,आता सकाळचा भोंगा बंद झालाय आणि ते सत्य होते.

संजय राऊत स्वतःला बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक समजतात पण शरद पवाराचा स्वतःला चेला सुद्धा समजतात असा दुटप्पी धोरणाचे आचरण करणारा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होऊच शकत नाही,ही वस्तुस्थिती आहे.

 उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात आणि ते गुण त्यांच्या अंगी आहेत,हे सच्चा शिवसैनिक संजय राऊत यांचे म्हणणं आहे.परंतु ते घातांत खोटे आहे.कारण उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचे काहीही उरलं नाही आणि राज्यात सुद्धा उद्धव सेनेचे किती आमदार निवडून येतील यांचा अंदाज आजच्या घडीला उद्धव ठाकरे कडेच दिसत नाही.एवढे बेकार दिवस उद्धव सेनेचे आले आहेत.

कदाचित उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार हे जरी काही वेळापूर्ती आपण गृहीत धरलं तर इंडिया आघाडीत सत्राशे साठ पक्ष सहभागी झाले आहेत.त्यांना उद्धव ठाकरे मान्य होतील का ? हा प्रश्न न समजण्या पलीकडे आहे.

 

आणखी वाचा : राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून हे नाव जाहीर,लवकरच होणार शपथविधी

 

 उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडनुकिला समोर जायला पाहिजे होते.भलेही दोनच आमदार निवडून आले असते तरी चालले असते.कारण स्वतःचे अस्तित्व सिद्ध करता आले असते.कोण आपले अन कोन परखे याची शहानिशा करता आली असती.

 उद्धव ठाकरे बद्दल राज्यातील जनतेला कळवळा आजही कायम आहे परंतु तो काँग्रेस पक्षाचा बाऊला बनलेला आहे आणि हे जनतेला कडून चुकलेल आहे.ते आता देशाचे पंतप्रधान तर होणार नाहीत कारण,दिल्ली बहुत दूर है परंतु राज्यात सुद्धा काय हाल होणार आहेत हे आता न सांगितलेले बरे.एवढी बिकट अवस्था उभाठा शिवसेनेची झालेली आहे.

उद्धव सेनेची एवढी बिकट अवस्था व्हायला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत आणि शिवसेना संपवायला ते निघालेले आहेत. कारण ते शरद पवारांचे चेले आहेत.शरद पवार म्हटले तर संजय राऊत भूकणार आणि नाही म्हटले तर गुपचूप बसणार,अशी गत संजय रावतांची झाली आहे आणि सर्वात जास्त उद्धवचा विश्वास म्हणून संजय राऊत आहे


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 4, 2024

PostImage

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मार्कंडेश्वर जीर्णोद्वार बांधकामासाठी तातडीची आढावा बैठक,संत मुरलीधर महाराजांच्या कार्याला यश,भाविकांनी व्यक्त केली भावना


मार्कंडा देव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्वार बांधकामासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत,एक तातडीची बैठक बोलावून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

 या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे आणि जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या सोबतच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

मार्कंडेश्वर हेमांडपंथी मंदिराचे जीर्णोदवार खोलून आठ ते दहा वर्ष झाले असून ते काम मात्र,आजही जैसे थे आहे.विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन उत्तर वाहिणी मार्कंडेय मार्कंडेश्वराचे जिर्णोदवार लवकरात लवकर बांधण्यात यावे,अशी मागणी घेऊन हरनघाट-पारडी देवस्थानाचे पिठादिश संत मुरलीधर महाराज यांनी 29 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना आपल्या असंख्य भक्तानां सोबत घेऊन प्रत्यक्ष निवेदन दिले.

मार्कंडेेश्वराच्या जिर्णोद्वाराचे बांधकाम पंधरा दिवसात सुरू करण्यात यावे आणि जर का जिर्णोद्वाराचे काम सुरू झाले नाही,तर मी माझ्या असंख्य भक्तांच्या साक्षीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करेन,असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आणि मार्कंडा देव परिसरातील भाविक भक्तांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला.

 संत मुरलीधर महाराज यांनी पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता.त्यांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीर्णोदवार बांधकामासाठी घेतलेली तातडीची बैठक,यावरून संत मुरलीधर महाराज यांच्या कार्याला यश आला असं बाबाच्या भाविक भक्तांनी भावना व्यक्त केली.

खास म्हणजे आढावा बैठक संपल्यानंतर संत मुरलीधर महाराज यांनी स्वतः पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि मार्कंडेश्वर जीर्णोद्वाराचे बांधकाम लवकर सुरू करावे,अशी कळकळीची विनंती करताना बाबा अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडले,हे उल्लेखनीय आहे.

 

आणखी वाचा : मार्कंडेश्वर मंदिराचे जीर्णोदवार बांधकाम तात्काळ सुरू करा, अन्यथा आमरण उपोषण 

 

 आज मार्कंडा देव येथे सावली,पारडी,कवठी,घारगाव, रामाळा, मोहूर्ली,फराडा,भेंडाळा,वाघोली, नवेगाव,मुरखळा,सगणापूर,कानोह्ली, एकोडी,कळमगाव,शंकरपूर हेटी,आष्ठी,अनखोडा,उमरी,कढोली, जैरामपूर,मूधोली,घोट तसेच चामोर्शी व सावली तालुक्यातील बरेच गावातून बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 2, 2024

PostImage

नातवाचं वाढदिवस अन मुख्यमंत्री दवाखान्यात दाखल


 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा वाढदिवस साजरा होत असताना,दुसरीकडे आजोबा दवाखान्यात दाखल झाले.प्रकृती स्थिर आहे चिंता करण्याची गरज नाही,असं डॉक्टरांचा म्हणणं आहे.

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मुलगा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात सुरू होता. अन्न त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणेतील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ यांच्या दवाखान्यात दाखल झाले.

त्यांना डोळ्याचा खूप दिवसांपासून त्रास होता आणि चष्म्याचा नंबर सुद्धा वाढला होता परंतु राज्याच्या राजकारणा पलीकडे आपल्या तब्येतीला जपले नसताना.आता मात्र जास्त त्रास होऊ लागल्यामुळे,आपले आजचे सर्व कार्यक्रमांना स्थगिती देत,थेट दवाखान्याचा मार्ग पत्करला,हे मात्र विशेष.

जे बोलतो ते करतो या विचाराचे असून.मी दिलेल्या शब्दाला जगणारा माणूस आहे, अशी प्रतिक्रिया स्वतः मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा आंदोलनावेळी व्यक्त केली होते.राज्याच्या वाढत्या कामाचा व्याप यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत यशस्वीपणे आपले कामगिरी पाडण्यात ते दक्ष आहेत,हे यावरून दिसून येतोय.

 

नातवांचा जिव्हाळा,नातवांच कौतुक करणं हे प्रत्येक आजोबाचे कर्तव्य आणि अधिकार आहे. परंतु आज परिस्थिती त्याच पद्धतीचा असल्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची नातवापेक्षा जास्त काळजी घेणं महत्त्वाचं आहे,हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येतोय.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या डोळ्याचे उपचार करून घेण्यासाठी आज दवाखान्यात दाखल झाले असून.त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असून यात चिंता करण्यासारखं काहीही नाही,असं डॉक्टरांच म्हणणं आहे.

 

णखी वाचा : "एकनाथाने" मांडिले दुकान

 

विशेष म्हणजे याच महिन्यात ९ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून,त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वाढदिवसाची उत्सुकता लागली असून ठिकठिकाणी तसे बॅनर देखील झळकताना दिसत आहे.साहेब लवकर बरे होऊन घरी या,अशी आर्त हाक मुख्यमंत्र्यांच्या चाहत्यांनी बोलून दाखवली असून.साहेब लवकरच घरी परत येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 1, 2024

PostImage

राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून हे नाव जाहीर


झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने चंपाई सोरेन यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीच्या अटकेनंतर राजीनामा दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

चंपाई सोरेन हेमंत सोरेन यांचे जवळची नातेवाईक आहेत. ते JMM च्या सरायकेला विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते हेमंत सोरेन सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळत होत्या.

चंपाई सोरेन यांना 2005 मध्ये झारखंड विधानसभेवर प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये ते आमदारही झाल्या. सप्टेंबर 2010 ते जानेवारी 2013 या काळात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, कामगार आणि गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते जुलै 2013 ते डिसेंबर 2014 या काळात अन्न व नागरी पुरवठा आणि परिवहन मंत्री होत्या.

 

 

काल बुधवारी इडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा प्रकरणी अटक केली.हेमंत सोरेन यांच्यावर 77 करोड रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप आहे. हेमंत सोरेनच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन हे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा चालू होती परंतु झारखंड मुक्ती मोर्चा ने चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचे कारभार सोपवले.

 

आणखी वाचा : विजय वडे्टीवार उपमुख्यमंत्री होणार?

 

चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून निवडल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे एक मोठे आव्हान आहे. मी राज्याच्या विकासासाठी कठोर परिश्रम करेन.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 31, 2024

PostImage

विहीर अनुदान चार लाख रुपये,प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा


महाराष्ट्र सरकारने सिंचनाची सोय व्हावी म्हणून मागेल त्याला विहीर या धर्तीवर योजना राबविणे सुरू केलेले आहे.तरी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची विनंती रमेश चौखुंडे यांनी केलेली आहे.

मागेल त्याला शेततळा याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये अनुदानावर विहीर योजना सुरू केलेली आहे.आणि ह्या योजनेचा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे,कारण शेती आणि पाणी हा एक सामायिक कार्यक्रम असल्यामुळे.शेतकऱ्यांनी आपाआपल्या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम करून आपाआपली शेती अधिक बळकट करावी,हीच अपेक्षा.

प्रत्येक ग्रामपंचायतीकडून किमान 15 लाभार्थी निवडणे,असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले आहे.तरी पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका ग्रामपंचायतीकडून 15 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो,तरी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची विनंती रमेश चौखुंडे यांनी शेतकऱ्यांना केलेली आहे.

या योजनेचा लाभ ग्रामपंचायत सचिवाकडे किंवा आपल्या स्वतःच्या शेतामधून ऑनलाइन पद्धतीने करू शकता आणि याचा लाभ तीन टप्प्यांमध्ये मिळवता येते तरी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त पद्धतीने याचा लाभ घेऊ शकतो.

 

 

  •  या योजनेचा लाभ खालील प्रमाणे मिळतो

 १) पहिला अनुदान विहीर खोदकामापूर्वी 

 २) दुसरा अनुदान विहीर खोदकाम 30 ते 60 टक्के झालेले असताना .

 ३)  तिसरा अनुदान खोदाई पूर्ण झाल्यावर पूर्ण अनुदान दिले जाईल.

ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये ऑनलाईन करता येत नसेल तर ग्रामपंचायती सचीवाकडे आपल्या नावाची नोंदणी करता येऊ शकते.फक्त शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करू इच्छितो की,विहीर खोदकामाचा आदेश येईपर्यंत विहिरीचे खोदकाम करूनये.अन्यथा विहिरीचे अनुदान ना मंजूर होऊ शकते,याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.

प्रत्येक ग्रामपंचायतमधील रोजगार सेवक यांच्याकडे सविस्तर माहिती उपलब्ध आहे त्यांच्याशी संपर्क साधावा.

 

  • विहीर खोदकामाला लागणारे कागदपत्र 

शेतकऱ्यांचा सातबारा,नमुना आठ अ व जॉब कार्ड इत्यादी कागदपत्रे घेऊन अपलोड करू शकता किंवा ग्रामपंचायतकडे स्वतः जाऊन जमा करू शकता.

 

आणखी वाचा : भूसंपादनामूळे कोनसरी परिसरातील शेतकरी उद्वस्थ होणार

 

ज्या जागेवर विहिरीचे बांधकाम करायचे आहे त्या जागेची पाहणी लघु पाटबंधारे शाखा अभियंता कडून किंवा उपअभियंताकडून सर्वप्रथम जागेची तपासणी केल्या जाईल आणि त्यानंतर विहीर अनुदानाला स्वरूप प्राप्त होईल.तरी शेतकरी बांधवांनी कसल्याही प्रकारची शंका कुशंका उपस्थित न करता सदर योजनेचा लाभ घ्यावा,अशी विनंती राज्यातील तमाम शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 31, 2024

PostImage

मार्कंडेश्वर देवस्थानचे प्रलंबित जिर्णोद्धार काम तात्काळ सुरू करा,अन्यथा उपोषण,परमपूज्य संत श्री कार्तिक स्वामी महाराज यांच्या शिस्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी 


 

    चामोर्शी :-विदर्भाची काशी म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओळख असलेले चामोर्शि तालुका मुख्याल्यापासून अगदी जवळ असलेल्या वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनी स्थळी वसलेले हेमांडपंथी मार्कंडेश्वर देवस्थान असून.ह्या देवस्थानचे जिर्णोद्धारचे काम गेल्या आठ वर्षांपासून बंद असल्याने,या स्थळी येणाऱ्या भाविकांमध्ये शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात रोष व्यक्त केले जात आहे. त्यासाठी जीर्णोद्धारचे काम मार्गी लावा अन्यथा १५ फरवरी पासून उपोषणाला बसणार असल्याचे हरंनघाट येथील परमपूज्य श्री कार्तिक स्वामी महाराज यांच्या शिस्टमंडळाने गडचिरोली जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

    चांमोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कडेश्वर देवस्थान या धार्मिक स्थळी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त दहा - पंधरा दिवस यात्रा भरत असते या यात्रेला महाराष्ट्र, व बाहेर राज्यातील येणाऱ्या भाविकांना गेल्या दहा वर्षांपासून मार्कंडेश्र्वर मंदिराचा गाभारा जीर्णोदधाराच्या कामा मुळे बंद असल्याने भाविकांना शिव पिंडीचे दुरूनच दर्शन घ्यावे लागत आहे त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. 

 

 

मंदिर जिर्णोद्धार चे काम सुरू करण्यास या अगोदर देवस्थान ट्रस्ट यासह अनेक संस्था, संघटना भाविक आदींनी शासनाकडे , भारतीय पुरातत्व विभाग, मंत्री ,खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी कडे सतत पाठपुरावा केला पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिर्णोद्धारचे काम रेंगाळले आहे.त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत,त्यांसाठी त्यांच्या भावना लक्षात घेऊन देवस्थानचे प्रलंबित जिर्णोद्धार काम तात्काळ सुरू करण्यासाठी आपल्या स्तरावरून दखल घ्यावी अन्यथा मंदिरासमोर १५ फरवरी पासून उपोषनावर नाइलाजाने बसनार असल्याची. अशी मागणी हरणघाट पार्डी चे परमपूज्य श्री संत मुर्लिधर महाराज , इस्कॉनचे परमेश्वर दास महाराज, राधा श्यामसुंदर दास, नीलकंठ कोहळे, सूरज बोरकुटे,सुनील दीक्षित,रितेश पालारपवार, रमेश चौखूंडे,शामराव धोबे,अक्षय पोरटे, भावराव पाल,गुणाजी पिटाळे, हेमंत खेडेकर, मुकतेश्र्वर चुधरी, तोताजी आभारे,देविदास देशमुख,अशोक डायकी, भैयाजी कुनघाडकर,अविज पोरटे,किशोर महशाखेत्री, मेघराज पोरटे,

 

आणखी वाचा : आमदार होळी साहेब, तुमच्या राज्यात चाललंय काय?

 

रवींद्र अग्लोपवार, सुनील बोमनवार , भास्कर बुरे, शेषराव कोहळे, निरज रामानुजमवार, सेवकराम बोरकुटे, उमेश पिटाले, अतुल निरकुरवार, रुपेश पित्तलवार, गोविंद सारडा, गजानन ढोले, श्रीकांत बेहेर, विनोद भोयर, नरेंद्र जक्कुलवार, मारोती उमलवार, सुशील, प्रशिक घोगरे आदीच्या शिस्टमंडळाने निवेदन गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी केली करत निवेदनाच्या प्रती गडचिरोली पोलिस अधीक्षक, चमोर्शीं तहसीलदार, पोलिस निरीक्षक व खासदार, आमदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 30, 2024

PostImage

मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम त्वरित सुरू करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू,संत मुरलीधर महाराजांचा इशारा


मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराचे मंदिर बांधकाम पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू पणामुळे तब्बल आठ वर्षांपासून रखडलेल असून ते त्वरित सुरू करावे अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू असा, गर्भित इशारा हरणघाट पारडी येथील मठाधिपती संत मुरलीधर महाराज यांनी जिल्हाधिकारी यांना निवेद्वारा द्वारे कळविण्यात आले.

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचे मंदिर आहे आणि त्या मंदिराचे जीर्णोद्वार खोलून पुरातत्व विभागाने नवीन जीर्णोद्वार निर्माण करण्याचे कार्य हाती घेऊन, आजच्या घडीला आठ वर्षे पूर्ण झाले. परंतु मंदिराचे बांधकाम जैसे थे,अशा परिस्थितीतच आहे.

पुरातत्त्व विभागाने मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे,या मागणीसाठी संत मुरलीधर महाराज यांनी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन मागणी केली.या निवेदनात 15 दिवसाची मुदत देण्यात आली असून.काम सुरू झालं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन करू,असा इशारा देण्यात आला.

आपले वडील मरण पावले तर त्यांची असती विसर्जन आम्ही विदर्भाचे काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या गंगकोटी विसर्जित करतो मग अशा पवित्र ठिकाणी माझा बाबा (देव) जर उघड्यावर असेल तर ते मी नाही सहन करू शकत.मंदिर बांधकामासाठी मी माझा देह अर्पण केलेला आहे,आता याता माझा जीव गेला तरी मी मागे फिरणार नाही,असा गर्भित इशारा संत मुरलीधर महाराज यांनी व्यक्त केला.

 

आणखी वाचा : पाडवा गोड झाला

 

आता जीव गेला तरी मागे फिरणार नाही.जोपर्यंत मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,अशी भीष्मप्रतिज्ञा संत मुरलीधर महाराज यांनी बोलून दाखवली.ही मागणी रास्त असून मंदिर निर्माण झालाच पाहिजे, अशी मार्कंडा परिसरातील भक्तांची मागणी असून या आंदोलनात बरेच भाविक सहभागी होणार आहेत, हे मात्र सत्य आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 30, 2024

PostImage

आमदार होळी साहेब,तुमच्या राज्यात चाललंय काय ?


आमदार होळी ज्या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत,त्याच क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यात समस्यांचे महापूर असून.आमदार होळी अनभिज्ञ आहेत की काय ? अशी चर्चा जनमानसात सुरू आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदारांचा बळकिल्ला म्हणून ओळखला जाणारा चामोर्शी तालुका. परंतु याच तालुक्यात आमदार साहेब समस्या मिटविण्यास कमकुवत आमदार,म्हणून आता जनमानसात सर्वत्र चर्चा असून,सगळीकडे नाराजीचे सूर उमटतांना दिसतो आहे.

 

  • गणपुर गावात मृत्यूचे तांडव

23/1/2024 रोजी गणपूर गावातील ७ महिला मिरची तोडण्यासाठी नदी ओलांडून नावेवर जात असताना,त्यांना जलसमाधी मिळाली.म्हणजे नाव उलटून तब्बल सहा महिला मृत्यूमुखी पडल्या असून.गणपूर गावावर शोककळा पसरली होती.परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या गेली.

ज्या महिला मृत्युमुखी पडल्या त्या नदीचा जलस्तर वाढला म्हणून असला प्रकार घडला आणि हे सत्य हे आहे.पण याला जबाबदार शासन आहे की प्रशासन याचाही विचार व्हायला पाहिजे.

 

  • कोणसरी परिसरात भूसंपादन

चामोर्शी तालुक्यात कोणसरी व इतर परिसरातील जमिनी भूसंपादन करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रकार सुरू असून.त्या विरोधात शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करून 18/1/2024 रोजी चामोर्शी एस.डि.ओ.ऑफिसवर भव्य मोर्चा निघाला व शासनाविरोधात व स्थानिक आमदार विरोधात जन आक्रोश व्यक्त करण्यात आला.

 

  • मार्कंडादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण करा

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देव येथील मंदिर पुरातत्व विभागाकडून पाडण्यात आला.आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी पण मंदिरांचा काम पूर्ण झाला नाही.

आता 26 तारखेला मार्कंडा येथे मुरलीधर महाराज यांनी बैठक घेऊन,गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मंदिराचा काम त्वरित सुरू करावा अन्यथा भाविकांमार्फत जन आंदोलन उभे करू,असा पवित्रा घेतला आणि परिसरातील भाविक आंदोलनाच्या तयारीत असून,त्यांचा रोष स्थानिक आमदारावरच असल्याचा दिसून येत आहे.

 

आणखी वाचा : आमदार साहेब पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन उभे करा

  • कृषीपंप धारकांची नाराजी

भेंडाळा परिसरातील कृषीपंपधारक शेतकरी भारनियमनामुळेच आमदारावर नाराज आहेत,हे सर्वधूत आहे.

एकंदरीत चामोर्शी तालुक्याच्या विचार करायला गेला तर पुढील निवडणूक आमदार साहेबांना जड जाणार आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 28, 2024

PostImage

मराठ्यांनी काय केलं ? ओबीसींचा नुकसान करून,ब्राह्मणांना बळ दिलय !


मराठा समाजाने आंदोलन करून सरकारला आरक्षण द्यायला भाग पाडले, हे जरी सत्य असेल.पण मराठा समाजाने समस्त ओबीसी समाजाच नुकसान केलं आणि ओपन मध्ये स्वतः नष्ट होऊन ब्राह्मण समाजाना बळ दिलय.

मराठा मराठा समाजाने जो आंदोलन उभं केलं तो खरोखर व्याखान्या जोग होता.आंदोलन असंच व्हायला पाहिजे मग तो कोणत्याही समाजाचा असो, म्हणजे सरकार वाटणीवर यायला पाहिजे.परंतु मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला पाहिजे तसं काहीच मिळालं नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे,अशी मराठ्यांची गत झाली.

मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सर्वात जास्त नुकसान मराठा समाजाचा झालं कारण १०% टक्के EWS चे आरक्षण मिळत होते. सरकारी आकड्यांप्रमाणे EWS मध्ये आरक्षण घेणारे ८५% टक्के मराठा जातीचे होते,ते आरक्षणा आता मिळणार नाही,हा पहिला मुद्दा आहे. 

मराठा आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडल्या गेल्या,हे जरी सत्य असेल,तरी पण यामध्ये ओबीसी समाजाचा फार मोठे नुकसान झाला आहे.मराठा समाज विजयाचा खूप मोठा गाजावाजा करीत आहे,परंतु विजयी होऊन मिळालं काय ? १७% ओबीसी मधून आरक्षण तेही 363 जातींच्या उमेदवारांशी स्पर्धा करून. यात मात्र मूळच्या ओबीसी समाजाचा वाटा कमी होईल.

हम तो डुबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे, यात मराठा समाजाचा खूप मोठा नुकसान झालंच आहे पण यामध्ये ओबीसी समाजाचा ही खूप मोठं नुकसान करून ठेवलं.म्हणजे मराठीत एक म्हण आहे,गव्हा सोबत सोंड्याची पीसाई,याप्रमाणे ओबीसी समाजाचे नुकसान करून ठेवलंय.

आणखी वाचा : सगे सोयरे संपत्तीचे लोकं 

मराठा समाज आज आनंद उत्सव साजरा करीत असेल पण खरा आनंद उत्सव ब्राह्मण,सिंधी,जैन आणि मारवाडी समाजाने साजरा करणे आवश्यक आहे.कारण त्यांच्या 48% खुल्या जागांमध्ये संख्येने ५ ते ७ टक्के असलेले तेच शिल्लक राहिले.संख्येने 40% असलेले मराठी पूर्णपणे बाद झाले.म्हणजे कायमचे बाहेर फेकल्या गेले,हे मराठा समाजाने आधी समजून घेणे गरजेचे आहे.

याला म्हणतात ब्राह्मणाचे डोकं,हजारो वर्षांपासून आपल्या देशावर राज्य करीत आहे,हे समजून घेणे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांच्या संख्येचे सुद्धा भान ठेवा.अल्पविद्या परी गर्व शिरोमणी अन मज हून ज्ञानी कोण आहे,अशी आपली पद्धत आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 27, 2024

PostImage

सगे सोयरे संपत्तीचे लोकं


मराठा समाजाला ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे,अशा लोकांना जात प्रमाणपत्र देण्यात येईल.असा आश्वासन महाराष्ट्र सरकारने जाहीर केले.सगे सोयरे या नावाखाली योजना राबविणे,हा उद्देश्य.

 संपूर्ण महाराष्ट्रात ज्या आंदोलनाचा गाजावाजा झाला आहे तो आंदोलन म्हणजे मराठा आंदोलन.एकीचे बळ या छताखाली आंदोलनाची सुरुवात झाली आणि स्वतः महाराष्ट्र सरकारला खळबळून जागे व्हावे लागले.

समाज म्हटला तर त्याला आरक्षण मिळालाच पाहिजे.आम्ही सुद्धा वरील बाबीचा अभिनंदन करतो.फक्त मुद्दा हा आहे,की जातींचा आरक्षण देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही,याची खबरदारी घेणं महत्त्वाचं.

 

 

सगे सोयरे या मथळ्याखाली महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर केले.सगे सोयरे म्हणजे लाभार्थ्यांचे पूर्व वंशज आणि रक्ताचे नाते,अशा लोकांना महाराष्ट्र सरकारने आरक्षण देण्याचा जाहीर केले.

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या लोकांकडे काही ठिकाणी कुणबी नोंदी आढळून आल्या,अशा मराठा समाजातील लोकांना सरकार जातीचे दाखले देण्याचे ठरविले आहे.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये,अशी तमाम ओबीसी समाजाची मागणी होती आणि त्या मागणीचा विचार करून सरकार कुणबी समाजावर अन्याय करू नये,हीच समस्त कुणबी बांधवांची,महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती.

मतासाठी नाहीतर गोरगरिबांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आहे,असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवले.दसरा मेळावा झाला त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देणारच म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि ती पूर्ण केली,असे मत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले.

|| सगे सोयरे संपत्तीचे लोक,निदानाचा एक पांडुरंग ||,असे तुकोबारायांनी म्हटले होते.त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सगे सोयरे,म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केलाय. 

 

आणखी वाचा : उडाला भडका आरक्षणाचा

आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळत असेल तर विदर्भातील कुणबी समाजावर अन्याय होईल,असं म्हणायला हरकत नाही.म्हणून सरकारने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे,एवढीच कळकळीची विनंती.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 26, 2024

PostImage

मार्कंडेेश्वराच्या बांधकामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष,मुरलीधर महाराज यांनी वेधले लक्ष


 

विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडेेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकडे पुरातत्त्व विभागाने आठ वर्षापासून मंदिर खोलून,आजपर्यंत त्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहेत ? यासाठी हरणघाट मंदिराचे मुरलीधर महाराज यांनी मार्कंडा देव येथे बैठक घेऊन अडचणी जाणून घेतल्या.

चामोर्शी तालुक्यापासून अवघ्या आठ किमी अंतरावर मार्कंडेश्वराचा देवस्थान आहे.परंतु पुरातत्व विभागाकडून मंदिराचे बांधकाम करण्यासाठी तयार असलेले मंदिर खोलल्या जाऊन आज आठ वर्षे पूर्ण होऊन गेले,तरीपण अजूनही मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होऊन सुद्धा,आठ वर्षांपासून हा बांधकाम का रोखल्या गेले आहे ?, हे आजही गुलदस्त्यात आहे,असं म्हणायला काहीही हरकत नाही.

पुढे दोन महिने गेले की मार्कंडा देव येथे मार्कंडेश्वराची खूप मोठी जत्रा भरते आणि संपूर्ण विदर्भातून भाविक दर्शनासाठी येतात,मग विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिराकडे पुरातत्त्व विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे की, काय ? असा प्रश्न निर्माण होतोय.

हरणघाट मंदिराचे मुरलीधर महाराज याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत,मार्कंडा परिसरातील भाविकांची बैठक बोलावून मंदिराचे काम का बंद आहे,याची चौकशी केली.मंदिरातील ट्रस्टचे पदाधिकारी थातूर-मातूर उत्तरे देऊन, आपाआपले अंग काढून घेण्याचे प्रयत्न केरीत होते.

मार्कंडेश्वराचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी,मी माझ्या परीने प्रयत्न करेन आणि जोपर्यंत मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार नाही, तोपर्यंत मार्कंडा देवस्थान या नगरीत पाय ठेवणार नाही,अशी भीष्म प्रतिज्ञा मुरलीधर महाराज यांनी बोलून दाखवली.

 

आणखी वाचा : विदर्भाची काशी विकासाच्या प्रतीक्षेत..

या बैठकीसाठी मार्कंडा, फोकुर्डी,रामाळा,फराडा,भेंडाळा, सगणापुर, चामोर्शी,शंकरपूर हेटी,चांदापूर,पारडी,दोटकूली व बऱ्याच गावचे भावीक उपस्थित होते. पुरातत्व विभाग कानाडोळा करीत असेल तर आम्ही वर्गणी गोळा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण करू,असा निर्धार भाविकांनी व्यक्त केला.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 23, 2024

PostImage

पाडवा गोड झाला


 

मर्यादा पुरुषोत्तमाची काल प्राणप्रतिष्ठेचा मोठा वाजत गाजत व मोठ्या भक्ती भावाने अयोध्या नगरीत पार पडला.भाविकांना रामलल्ला चे दर्शन घेता यावे,म्हणून भक्तांसाठी मंदिर खुला केल्या गेला,म्हणजे पाडवा गोड झाला,असंच म्हणावं लागेल.

22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदाने अन भक्तीभावाने आनंदी उत्सवात साजरा करण्यात आला.

संपूर्ण भारत देशासोबतच परदेशात सुद्धा मोठा खुशी माहोल म्हणजे आनंदाची दिवाळी साजरी केल्या गेली. प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा म्हणजे आनंद द्विगुणीत होणारच,यात काही शंका नाही.

अयोध्या नगरीत काल आमंत्रित निमंत्रित 8000 पाहुण्यांसोबतच अनेक श्री रामप्रभू चे भक्त रामनगरीत प्रवेश केले होते.काल झालेल्या कार्यक्रमाला जरी उपस्थित राहता नाही आलं असेल तरी परंतु भाविकांना श्री रामप्रभू चे दर्शन घेता यावे,यासाठी भक्तांना आजपासून राम दरबार भाविकांसाठी खुले करण्यात आले. आणि मर्यादा पुरुषोत्तमाचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य समजत भक्तीभावाने पूजा अर्चा केल्या गेली.

ज्या भाविकांनी आज श्रीराम प्रभू चे दर्शन घेतले त्यांनी स्वतःला धन्य समजत,काल जरी दर्शन घेता आले नाही तरीपण आज दर्शन घेऊन आनंद साजरा केला आणि श्रीराम प्रभू चे दर्शन घेतल्यानंतर पाडवा गोड झाला, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.

22 जानेवारी हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिल्या जावा,अशी आशा व्यक्त करून संपूर्ण भारतवासी प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात तन-मन-धनाने आपली शब्दरूपी उपस्थिती दर्शवली,हे कालच्या आनंदावरून दिसून आले.

 

आणखी वाचा : प्रभू आले मंदिरी

श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीत पार पडली पण देशातील प्रत्येक गावागावात आनंदाची दिवाळी म्हणून साजरी केल्या गेली.अंगणात सडा टाकून रांगोळी काढण्यात आली नंतर मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात रामभक्तित नागरिक तल्लीन होऊन गेले होते.

माय माऊलीच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण झळकत होते.म्हणजे संपूर्ण भारतात जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद साजरा करून मर्यादा पुरुषोत्तमा कडून आशीर्वाद मागून घेत होते.म्हणजे विचार न केलेला बरा,एवढा आनंद व्यक्त केला जात होता.

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 22, 2024

PostImage

गटागटात विखुरलेली काँग्रेस आणि त्यापुढील आव्हान!


गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी संपूर्ण महाराष्ट्रातून नंबर एक वर काँग्रेस असलेली पार्टी होती.परंतु मागील एक दशकापासून मागासलेल्या छत्रछायात वावरताना दिसून येतोय,कारण जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी गटागटात विखुरलेली असून,त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी मागील एक दशकांपासून नुसत्या गटा गटातील राजकारणामुळे मागासले पणाच्या छत्रछायेत वावरताना दिसून येत आहे,असं म्हणण्याची वेळ सामान्य कार्यकर्त्यांवर आली आहे.

जेव्हा गडचिरोली लोकसभा क्षेत्र निर्माण झाला,तेव्हा प्रथम खासदार होण्याचा बहुमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मिळाला कारण काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून मारोतीराव कोवासे यांनी विजयश्री खेचून आणली. परंतु त्यानंतर काँग्रेसवर मात करीत भाजपाने दोन वेळा धुळ चारून विजय संपादन केला.

कदाचित जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी गटागटात विखुरली नसती तर गड जिंकणे भाजपाला कठीण झाले असते. परंतु तसं न होता गटबाजीमुळे काँग्रेस मधील अदृश्य शक्ती भाजपा बरोबर हात मिळवनी करून स्वपक्षातील उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केल्या गेला आणि त्याचा फायदा भाजपाला मिळाला.

 काँग्रेससाठी जिल्ह्यातील वातावरण आजही अनुकूल आहे.जे काही जिल्ह्यातील मतदार आहेत ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ पणाने काम करायला तयार देखील आहेत,फक्त अडचण समोर येते ती म्हणजे गटागटांची.लोकसभेची उमेदवारी कोणालाही मिळो परंतु एकमेकांचे मतभेद बाजूला सारून विश्वासाची मोट एक बांधल्या गेली तर काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.

गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर मोदी फॅक्टर फेल आहे आणि जनतेला आता बदल हवा आहे. यासाठी काँग्रेस पक्षातील नेते एकमेकांचे पाय धरून खाली ओढण्यापेक्षा,एकमेकांचे हात धरून येणाऱ्या निवडणुकांना समोर कसं जाता येईल याचे चिंतन करणे गरजेचे आहे.अन्यथा गटागटात विखरलेली काँग्रेस पार्टी भाजपाचा विजयी रथ रोखून जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करता येणार नाही.

 

आणखी वाचा : पराभवाची मरगळ दूर सारून,कॉंग्रेस भरू पाहते कार्यकर्त्यानं मध्ये जोश

आता नाही तर कधीच नाही,या विचाराचा मूलमंत्र घेऊन काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी सज्ज व्हायला पाहिजे,जेणेकरून जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल किंवा भाजपाचे आव्हान स्वीकारल्याचा सिद्ध होईल.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 20, 2024

PostImage

सुप्त गुणात लपलंय आयुष्य..


नुकत्याच झालेल्या केंद्रीय क्रीडा संमेलनावरून आठवलं की,ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील कमी नाहीत, हे त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले.परंतु ग्रामीण भागातील बालकलाकारांचे सुप्त गुण त्यांच्या आयुष्यात लपलंय कारण पुढे त्या सुप्त गुणाला काहीही वाव मिळताना दिसत नाही.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचं केंद्रीय क्रीडा संमेलन आयोजित करून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मध्ये सूप्त गुणांना वाव मिळावा,हा यामागील उद्देश.आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून जीवाची परवा न करता खेळात इतका रमून गेला की,स्वतःचा भान विसरून गेलाय.खेळात इतका गर्क झाला की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बेधुंद होऊन गेलाय की त्याच्यापुढे फक्त एकच ध्येय ते म्हणजे विजय संपादन करणं.

ग्रामीण भागातील विद्यार्थी नुसते मैदानी खेळातच तरबेज आहेत असं नाही,अनेक कला त्यांच्या अंगी पाहायला मिळतात आणि युवती बद्दल तर न बोललेलं बरं,असं म्हणायला काहीच हरकत नाही.कारण मैदानी खेळ खेळायला त्या तरबेज आहेतच पण सांस्कृतिक कार्यक्रमात देखील पाहुण्यांना मंत्रमुग्ध करीत रसिकांच्या देखील मनाला भुरळ पाडण्यात यशस्वी झाल्या,असे म्हणायला काही हरकत नाही.

सांस्कृतिक कार्यक्रमात बेधुंद होऊन नाचताना डोळ्याचे पारणे फिटतात इतका सुंदर कार्यक्रम.शहरी भागा पाठोपाठ आता ग्रामीण भागातील देखील युवती आता पुढे सरसावताना दिसून येतोय.आपल्या नाजूक पावलांनी स्वतःला सावरत आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे,हेच तिच्या कृतीतून दिसून येतोय.

 

आणखी वाचा : युवकांचा कल उलट्या प्रवाहाने वाहतोय

 

चिंता इतकेच वाटते की ग्रामीण भागातील युवक युवती आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी धडपड करतो,परंतु तिची ती धडपड पुढे जाऊन लोप पावते.कारण पुढे तिच्या कलागुणांना काहीच वाव मिळताना दिसत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 15, 2024

PostImage

विदर्भाची काशी विकासाच्या प्रतीक्षेत..


चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयांपासून अवघ्या ८ किमी च्या दुरिवर विदर्भाची काशी म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळख आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर मार्कंडा देवस्थान,म्हणजे पुरातन मंदिर असून,दरवर्षी माहाशिवरात्रीला मार्कंडेश्वराची मोठी जत्रा भरते,परंतु विदर्भाची काशी अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत असून,त्या कडे कुणीही डोळे उघडून पाहत नाही,अशी अवस्था मार्कंडेश्वराची झालेली आहे. 

 

गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मार्कंडेश्वराचे पुरातत्व मंदिराकडे जातीने लक्ष घातले असते तर कदाचित मार्कंडेश्वर देवस्थानची अशी अवस्था राहिली नसती. परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित पणामुळे मार्कंडेश्वराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होतांना दिसते आहे. 

माहाशिवरात्री निमित्य मार्कंडा येथे मार्कंडेश्वराची खूप मोठी जत्रा भरते,अन नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि बऱ्याच जिल्ह्यामधून भाविक लोक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात,परंतु स्वताची गैरसोय करून परत जातात आणि पुन्हा पुढच्या वर्षी दर्शनाला येतात,एवढी श्रद्धा भविकाच्या मनात ठासून भरली आहे. 

 

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या मंदिराचा विकास झाला असता,तर मंदीरा पाठोपाठ मार्कंडा गावाचा देखील विकास होतांना दिसून आला असता. मार्कंडा गावातील किंवा सभोवतालच्या परिसरातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधि उपलब्ध झाल्या असत्या. रोजगारहीन असलेल्या या परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता आणि त्या बेरोजगार युवकांचा विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना दिसला असता. म्हणजे एक कदम प्रगती की ओर,हा नारा सभोवतालच्या परिसरातील गावांगावत गुंजताना दिसला असता. युवकांना रोजगाराच्या संधि उपलब्ध करून आत्मनिर्भरते कडे युवकाचा कल दिसला असता. स्वताचा रोजगार निर्माण करून कुटूंबाला हातभार लावण्यात महत्वाचा वाटा राहिला असता.रोजगारहीन युवक रिकाम्या हाताला काम नाही म्हणण्या पेक्षा स्वताच्या पायांवर उभा राहून संसाराची विस्कटलेली घडी मार्गावर आण्यात,सिंहाचा वाटेकरी होतांना दिसला असता.मार्कंडा देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा मिळाला असता तर युवकाच्या कपाळावर लागलेला बेरोजगारचा कलंक पुसला जाऊन,आत्मनिर्भरते कडे युवकांची वाटचाल होतांना दिसून आली असती.

 

आणखी वाचा : राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे चिचडोह बॅरेज बनलाय शोभेची वस्तु

 चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या ८ किमी अंतरावर मार्कंडा देवस्थान असून. महत्वाचं वैशिष्ट म्हणजे वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेलं पुरातत्व देवस्थान असून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्य म्हणजे जे भाविक माहाशिवरात्रीला दर्शनासाठी येतात,त्यांची भरपूर प्रमाणात गैरसोय होत असून,कुठलीही व्यवस्था आजच्या घडीला उपलब्ध नाही,असं खेदानेच म्हणावं लागतो. म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या देवस्थानाकडे दुर्लक्ष न करता तन-मन-धनाने मन लावून योग्य नियोजन करून व्यवस्था करावी,अशी आशा परिसरातील जनता व्यकत करीत आहे.     

 

                                                    लेखक : रमेश चौखुंडे 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 13, 2024

PostImage

मराठी माणूस म्हणून,नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ?


2024 मधील लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून,त्याचे वारे व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आणि जर केंद्रात भाजपाचे सत्ता आली तर भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.नितीनजी गडकरी हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.

भारत देशाची लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून देशात 2024 मधील निवडणुकींचे वारे वायला सुरुवात देखील झालेली आहे आणि समजा या निवडणुकीत जर भाजपाने पूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन करू शकले तर विदर्भातील उपनगरीचे खासदार म्हणून निवडून आले तर नितीनजी गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात

देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, आजच्या घडीला 73 वर्षाचे झालेले आहेत.आणि मोदीजी आता पंतप्रधान पदाचे उमेदवार न होता पक्षाचे प्रमुख प्रचारक बनवून मोलाची भूमिका पार पाडावे,असे महाराष्ट्रातील जनतेचे मत असून.मोदी साहेबांनी त्या मागणीची स्वीकार करावे,अशी जनतेची मागणी आहे.

 

नितीन गडकरी हे उत्तम नेते असून.एक मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तर,महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस या निर्णयाचा स्वागत करेल. भाजपामध्ये नितीन गडकरी चे कार्य आजपर्यंत मोलाचे ठरले असून,तसा ठसा देखील त्यांनी उमटविला आहे,असं त्यांच्या कार्यामधून दिसून येते.

उत्तम वक्ता आणि रोखठोक विचार मांडण्याचे कार्यशैली हे त्यांच्या कार्यपद्धतीचा आकर्षण असून.तळगाळातील जनतेचे कार्य करणारा नेता,अशी त्यांची ओळख आहे.म्हणून केंद्रात जर भाजपाची सत्ता आलीस तर देशाचे पंतप्रधान म्हणून झालेली निवड सार्थ ठरवित जनतेच्या आशा,आकांक्षाचे पालन करण्यात गटकरी सक्षम ठरतील.

 

आणखी वाचा : विजय वडे्टीवार उपमुख्यमंत्री होणार?

 

सीनियर सिटीजन नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयस्कर नेते ठरू शकतात.त्यामुळे त्यांनी ऐच्छिक निवृत्ती स्वतःहून जाहीर करायला पाहिजे,कारण त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री पदभूषण, देशाचे पंतप्रधान पद देखील भूषविलेले आहेत.म्हणूनच स्वखुशीने,आपली जबाबदारी पक्षातील वजनदार नेते आणि मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राला एखदा संधी द्यावी आणि विदर्भ नगरीचे नेते म्हणून नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी आरूड करावे.

 

आज पर्यंत भाजपाला मराठी माणसाने भरभरून साथ दिली आहे.म्हणून मराठी माणसाला एक संधी देऊन मराठी माणसातले गुण-सदगुण आणि मराठी परंपरा आत्मसात करायला वाव मिळेल आणि नितीन गडकरी उत्तम पर्याय भाजपा समोर आहे,त्यांनी तो पर्याय निवडावं.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 12, 2024

PostImage

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री !


काल झालेल्या आमदार अपात्रतेबाबत विचार करायचा झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर खूप मोठा अन्याय झाला,असंच म्हणावं लागेल.कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र व्हायला पाहिजे, परंतु तसं न होता ते सर्व आमदार पात्र ठरविण्यात आले.परंतु उद्धव ठाकरे यांच्या घरात देर हे पर,अंधेर नही. आज तर राज्याच्या निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार.

काल-परवा जो महाराष्ट्रामध्ये आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल,उभ्या देशाला अचंबित करणारा ठरला.कारण राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेचा गट म्हणजे ते १६ आमदार अपात्र होतील हीच, आशा संपूर्ण महाराष्ट्राला होती.परंतु जी अशा महाराष्ट्रातील जनतेला होती आणि ती चकणाचूर झाली.कारण जे अपात्र होते तेच पात्र ठरले.म्हणजे नापास होणारेच पास झाले,असंच म्हणायची वेळ आली.

वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे १६आमदार पात्र ठरवून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटांवर खूप मोठा अन्याय झाला आहे.कारण उभ्या महाराष्ट्राला अचंबित करणारा निकाल विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील कायदे तज्ञ सुद्धा विचारात पडले आहे,अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.परंतु हा निर्णय चुकीचा आहे.सत्ता येते सत्ता जाते पण असला घाणेरडा राजकारण कोणीही करू नये,कारण अशा प्रकारामुळे महाराष्ट्राची आन-बान,शान धुळीस मिळू शकते.महाराष्ट्र संतांची भूमी आहे छत्रपती शिवरायांची विचारधारा जोपासणारा महाराष्ट्र आहे.

या निकालामुळे उद्धव ठाकरे यांचा पराजय झाला,असं राज्यातील सत्ताधार्यांना वाटत असेल तर तो चुकीचा अंदाज आहे.कारण या निकालामुळे विजय उद्धव ठाकरेंचा झालेला असून,सत्ताधारी यांचा पराजय झालेला आहे.कारण दुसऱ्यांचे मन दुखवून जो आनंद मिळतो तो काय कामाचा ? आनंदाची उधळण जरूर करा,परंतु राज्यातील फोडाफोडीचे राजकारण आधी संपुष्टात आणा आणि मगच आनंद व्यक्त करा,कालच्या निकालामुळे काही वेळासाठी उद्धव ठाकरे व्यतीत झाले असतील,

आणखी वाचा : महाराष्ट्र सरकार आणि १६ आमदार

परंतु समोर जास्त काळासाठी आनंदी होतील आणि उभा महाराष्ट्र बघत राहील,कारण या निकालामुळे उद्धव ठाकरे ची प्रतिष्ठा,मान,सन्मान दुप्पट झालेला आहे आणि आजच्या घडीला जरी निवडणुका घ्यायची वेळ आली तरी परंतु उद्धव ठाकरेच बाजी मारणार आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार.ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात तो माणूस आजच्या घडीला उद्धव ठाकरे सोबत आहे,म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 10, 2024

PostImage

ईव्हीएमचा घोळ,झालाय देशाचा बट्ट्याबोळ


मागील महिन्यात छत्तीसगड,मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेला घवघवीत यश याचा जर सारासार विचार केला तर,हळूचपणे डोक्यात कल्पना तरंगायला सुरुवात होते.हा सर्व प्रकार ईव्हीएम मशीनचाच आहे बाकी सर्व काही नाही आणि समोरच्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व अशाच प्रकारे होणार,असे मत देशातील अनेक राजकीय पुढारी व्यकत करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ज्या काही निवडणुकाजिंकल्या त्या सर्वच्या सर्वच ईव्हीएम मशीनमुळे जिंकल्या,असे म्हणता येणार नाही. ज्यावेळी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीची जबरदस्त हवा निर्माण झाली होती आणि आधीच्या सरकारला जनता देखील कंटाळली होती,हेही तितकच खरं आहे.परंतु आता मोदी लाट वगैरे काहीच नाही तरी परंतु भाजपाने जो निर्विवाद यश संपादन केला त्यावरून असं लक्षात येते की,दाल में कुछ काला है.

मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान या राज्याच्या निवडणुका पार पडल्या यांत भाजपाने या तीनही राज्यांमध्ये भरभरून यश संपादन करून काँग्रेस पक्षाला चारी मुंड्या चित करण्यात, भाजप वरचढ ठरला. राजस्थानमध्ये परिवर्तन होणार होता,हे सांगायची गरज नाही आणि तेच झाले इथपर्यंत ठीक आहे परंतु मध्य प्रदेश,छत्तीसगड राज्यांचा विचार करायला गेलो तर या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येईल,असा अंदाज होता आणि त्या राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षाच्या बाजूने होता परंतु या दोन्ही राज्यांमध्ये माशी एकाच वेळी शिंकली आणि होत्याच नव्हतं झालं.

आता काही दिवस गेले की लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील देशातील सर्वच राजकीय पक्ष आपाआपली ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करतील,यात काही शंकाच नाही परंतु देशात ज्या काही राजकीय घडामोडी निर्माण होत आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे होऊन गेला आहे.खरोखर ईव्हीएम मशीन मध्ये जर घोळ निर्माण झाला असेल तर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा विजय संपादन करू शकतात आणि एकदा जर पुन्हा मोदीनी विजय संपादन केले तर विरोधी पक्ष पुन्हा एकदा चारही मुंड्या चीत.

नरेंद्र मोदी यांची पूर्वीसारखी अनुकूल परिस्थिती आजच्या घडीला उरलेली नाही आणि या गोष्टीला स्वतः नरेंद्र मोदी नाकारू शकत नाही.कारण त्यांनी कितीही विकासाच्या वलग्ना करीत असतील तरी पण सामान्य जनता महागाईने हवालदिल झालेली आहे आणि आजच्या घडीला परिवर्तनाची लाट असल्याचा वातावरण निर्माण झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती स्वतः भाजपाचे राजकीय पुढारी सुद्धा नाकारू शकत नाही.तरीपण भाजपाने आत्ताच जाहीर करून टाकलंय,आबकी बार चारसौ के पार,म्हणजे विचार करा किती आत्मविश्वास मनात निर्माण झाला असेल.

 

आणखी वाचा : सेमिफायनल भाजप जिंकले,फायनल आम्हीच जिंकू, कॉँग्रेसचा निर्धार

राम मंदिर आस्थेचा मुद्दा आहे आणि सर्वांना तो ठाऊक आहे.जो तो आप आपल्या जाती धर्माचा अभिमान बाळगतो आणि बाळगायलाच पाहिजे.परंतु देशातील गोरगरीब जनता महागाईने होरपळतो आहे,याचे सोयरसुतक केंद्रातील सत्ताधारी पक्षाला आहेच नाही.तरीपण चारसौ के पार चा नारा देण्यात सरकार मग्न आहे. म्हणूनच मनात शंका निर्माण होतात,कही ईव्हीएम मशीन की तो चाल नही है.पुढील निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न होता बॅलेट पेपर नीच घ्यायला पाहिजे,अशी जनतेची मागणी आहे.

लेखक : रमेश चौखूंडे 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 9, 2024

PostImage

"एकनाथाने" मांडिले दुकान


आज गडचिरोली येथे महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या जाहीर सभेचे भव्य-दिव्य देखावे आयोजित करून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजविण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात आला.सकाळी 10.00 वाजताचा कार्यक्रम 3.30 वाजता पार पडला,मात्र सकाळपासून उपाशी आलेल्या माझ्या भगिनीला नाश्ता व जेवन दिले आणि त्यासोबतच प्रत्येकी एक साडी देऊन महिलेला सशक्त करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री साडी वाटप कार्यक्रम हाती घेऊन, गडचिरोली शहरात एकनाथाने एक प्रकारे दुकान मांडण्याचा प्रयत्न केला.

आज दिनांक ९ जानेवारी रोजी गडचिरोली येथील एमआयडीसी ग्राउंड वर,राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांची भव्य जाहीर सभा सकाळी १० वाजता होणार होती परंतु तब्बल ५.३० तास उशिरा म्हणजे ३.३० वाजता जाहीर सभेला सुरुवात झाली.पुढे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजविणे हाच मुख्य उद्देश,परंतु महिला सशक्तीकरणाच्या नारा देत महिलांच्या रूपाने सभेला गर्दी खेचण्याचा प्रयत्न होता.

उद्देश कोणताही असो पण जाहीर सभा लोकसभेच्या निवडणुकीचीच होती हे,जाहीरपणे कोणी बोलायला तयार नसेल तरी पण सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. चामोर्शी तालुक्याच्या जरी विचार करायचं झाल्यास तब्बल ८८ बस गाड्यांचे व्यवस्था करून महिलांची गर्दी खेचण्यात राज्य सरकार यशस्वी झाली,असा तूर्तास म्हणायला हरकत नाही.

 

सकाळी ९ वाजता ज्या त्या गावावरून बसेस सोडण्यात आल्या आणि उपाशी तापाशी माझ्या भगिनी जाहीर सभेची तयारी म्हणून रवाना झाल्या.नाश्ता व जेवणाची जरी व्यवस्था करण्यात आली,ही गोष्ट जरी सत्य असली तरी कार्यक्रमाचा वेळ बघता दिवसभर ताटकळत बसलेली माझी भगिनी ची काय अवस्था झाली असेल याचा विचार ना आयोजकाला आहे अन ना राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाला आहे.म्हणजे आंधळा दळतय आणि कुत्रं पीठ खातय ,अशी अवस्था ताटकळत बसलेल्या महिलेची झाली आहे आणि हे वास्तव्य आहे.

गडचिरोली येथील कार्यक्रम शासनाचा आणि शासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महिलांना साडी वाटप कूणी केला ? लायल मेटल कंपनीचे मालक प्रभाकरने.म्हणजे विचार करा कार्यक्रम शासनाचा उपस्थिती मुख्यमंत्र्यांची आणि साडी वाटप कंपनी करतंय,म्हणजे कथा कूणाची अन व्यथा कूणाला,अशी परिस्थिती असल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक कोण ? हे सांगण्याची गरज नाही,असा याचा अर्थ होतो.

वास्तविक शासनाचा उपक्रम चांगला आहे,हेतू स्पष्ट आहे,समोर लोकसभेच्या निवडणुका आहेत सभेला उपस्थित महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आहे. नाश्ता,जेवण मिळाला,सर्व ऑल्-वेल असलं तरी,दिवसभर जी महिला ताटकळत कार्यक्रमात उपस्थित आहे,जरा तिच्या सुद्धा विचार व्हायला पाहिजे.जो आनंद चेहऱ्यावर घेऊन सकाळी सात वाजता घरून बाहेर पडली आणि आता तिच्या चेहऱ्याकडे एकदा डोकावून बघा म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा लक्षात येईल.तिचे मनोगत एकदा ऐकून बघा, जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता तो केव्हाचाच निघून गेला आहे,तिच्या आनंदावर नुसता विरजण पडलाय आणि ती कशासाठी आली ? आपली फसगत झाली याची जाणीव होऊ लागली.

आणखी वाचा : कायदा माझ्या खिशात हिच सरकारची नीती

दिवसभर ताटकळत राहण्याच्या सार्थ अभिमान उराशी बाळगून मिळालेल्या साडीचा जरी विचार केला असेल तरी पण गडचिरोली शहरात एकनाथाने दुकान मांडला,याची जाणीव झाली आणि कंटाळलेल्या मनाला धीर देत गावाकडे येण्यासाठी नाजूक पावलाला सावरत गावाच्या दिशेने निघाली.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 6, 2024

PostImage

वाघांचा वावर गावाच्या दिशेने,उपाययोजना करणे गरजेचे !


गडचिरोली जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी तसेच जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून. निरपराध लोकांचा नाहक बळी जाताना दिसतो आहे.वनविभागाकडून थातूर-मातूर चौकशी करून मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना पैसे मोजून आपले हात झटकण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे परंतु असं न होता,ही बाब गंभीर पणे हाताळून महाराष्ट्र सरकारने उपाय योजना आखून वेळीच अमलात आणायला पाहिजे.वाघांचा वावर गावाच्या दिशेने का वळतो आहे ? याचा आत्मचिंतन व्हायला पाहिजे जेणेकरून निरपराध लोकांचा बळी जाणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शंकरपूर येथील महिलेचा जंगली हत्तीने बळी घेतलेली घटना असो किंवा गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील महिलेचा वाघाने घेतलेला बळी असो परंतु या प्रकारामुळे जिल्ह्यातील जनता भयभीत झालेली आहे हे,मात्र खरं आहे.२०१९ पासून ते २०२३ चा जरी विचार करायला गेलो तर जिल्ह्यात आजपर्यंत जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे 64 निरपराध लोकांना आपला जीव गमावण्याची नामुष्की ओढावल्या गेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आकडेवारी यांचा विचार करायला गेला तर तो खालील प्रमाणे आहे. 

वडसा विभाग : आरमोरी ९, देलनवाडी १

गडचिरोली विभाग : चातगांव ८,गडचिरोली ५,कूणघाडा १,       मुरूमगाव १,घोट २,चौडमपल्ली १,  सिरोंचा २, एटापल्ली ४, आरमोरी ३,

2019 पासून ते 2023 पर्यंतचे गडचिरोली जिल्ह्याची परिस्थितीचा  प्रकार खूपच गंभीर आहे.जंगली प्राण्यांच्या वावर खेड्यापाड्यांकडे का वळता झाला ?  याचा सरकारने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. वास्तविक या बाबींकडे महाराष्ट्र सरकार गांभीर्याने बघायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही.जंगली प्राण्यांनी केलेली शिकारीचे थातूर-मातूर वनविभागाकडून चौकशी झाली आणि सरकार हातवर करून सरकार जनतेच्या किती कैवारी आहेत,हे दाखविण्याच्या केविलवाना प्रयत्न करीत आहे परंतु प्रश्न पैशांचा नाही प्रश्न आहे तो म्हणजे निरपराध लोकांचा बळी जाण्यांचा.सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की यावर आत्मचिंतन व्हायला पाहिजे जनतेने असे प्रश्न सरकारकडे लावून धरायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही. शेळी जाते जीवनाशी अन खाणारा म्हणतोय वातळ आहे,अशी परिस्थिती जनतेची आहे.

राहिला प्रश्न जंगली प्राण्यांचे लोंढे खेड्यापाड्याकडे का येत आहेत ? याचा सुद्धा सरकारने विचार करून उपाय योजना अमलात आणायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही कारण आज पर्यंत सरकार या बाबींकडे जाणून बुजून कानाडोळा करीत आहे.दिवसेंदिवस जंगली प्राण्यांची संख्या वाढत आहे याला आमचा अजिबात विरोध नाही वाढत्या संख्येवर आळा लावा असेही आम्हाला म्हणायचं नाही परंतु निरपराध लोकांचे जीव जात आहे, त्यावर सरकार गांभीर्याने विचार करायला पाहिजे परंतु जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे या बाबींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या जात आहे,असा सरळ सरळ अर्थ आहे. राज्य सरकारला एवढेच विनंती आहे हा प्रश्न गंभीर आहे याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे,यामुळे कितीतरी निरपराध लोकांचे बळी जाण्यापासून वाचविता येईल आणि जिल्ह्यातील जनता शांतपणे जीवन जगू शकेल.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 5, 2024

PostImage

राम नामाचा उदो-उदो


500 हून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर, आता अखेर आपल्या श्री रामांचे अयोध्येत राम मंदिर बनते आहे. कायदेशीर आणि राजकीय लढाई नंतर राम मंदिर अखेर पूर्णत्वास येते आहे. न भूतो न भविष्यती असे नागर शैलीतील राम मंदिर पुढील 800 ते 1000 वर्षांपर्यंत टिकणार आहे. देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले जात आहे. 

कोणार्क मंदिराप्रमाणे राम मंदिराची रचना असणार आहे, कोणत्याही स्वरूपाचं स्टील अथवा सिमेंट मंदिराच्या बांधकामात वापरले गेले नाही.राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी 12 वाजता प्रभू श्री रामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे.

  • राम मंदिर हे नागर शैलीत बांधले आहे.
  • मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 380 फूट आणि रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.
  • मंदिर 3 मजली आहे, प्रत्येक मजला 20 फुटांचा आहे. 
  • मंदिराला 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत.
  • भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालमुर्ती स्थित आहे, प्रथमतल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे.
    नृत्य मंडप, रंग मंडप, गूढ मंडप (सभा मंडप), प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण 5 मंडप आहेत.
    खांबावर तसेच भिंतीवर विविध देवीदेवतांचे तसेच देवांगणांच्या मुर्त्या आहेत.
  • मंदिरात 32 पायऱ्या चढून (16.5 फूट उंच) पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल.
  • दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
  • मंदिराच्या चहूबाजूस आयताकृती प्राकार आहे, त्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे.
  • प्राकाराच्या चारही कोपऱ्यात चार मंदिरे आहेत. त्यामध्ये भगवान सूर्य, भगवान शंकर, गणपती, देवी भागवती तसेच दक्षिण बाजूस प्रभू श्री हनुमान आणि उत्तरेस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे.
  • राम मंदिराजवळ पौराणिक काळातील सिताकुप आहे.
  • श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, निषदराज गुह, माता शबरी आणि देवी अहिल्या माता यांची मंदिरे प्रस्तावित आहेत. (पुढील काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल)
  • सोबतच मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर टीला येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच रामभक्त श्री जटायू यांची स्थापना देखील करण्यात येणार आहे.

राम मंदिराचा मुद्दा हा लोकांच्या आशेचा मुद्दा होवून गेलाय आणि करोडो भाविक आजपासूनच राम नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलाय,असं म्हणायला काहीच हरकत नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जयजयकार करत अवघा भारत देश दुमदुमून गेलाय,इतका भक्तिमय वातावरण देशाच्या गल्लो-गल्लीत निनादत असेल तर श्रीरामाच्या अयोध्येत कसं वातावरण असेल. 

२२ जानेवारी देशाच्या इतिहासातील महत्वाचा दिवसांपैकी हा एक दिवस म्हणजे अवघा रंग एक झाला,याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही. या दिवशी देशात दिवाळी साजरी होणार,यात काही शंका नाही. इतका भक्तिमय वातावरण देशात निर्माण होत आहे. हा दिवस म्हणजे आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे आणि संपूर्ण देश तयारीला लागला आहे. रामनामची धुन जरी कानावर एकू आली तरी मन तल्लीन होवून जातं आणि प्रत्यक्षात अयोध्येला जावून जर रामनामाच्या जपात सामील झालो तर आनंद गगनात मावेनासा होईल. 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 5, 2024

PostImage

मूळ लाभार्थी वंचित,निधी मात्र फस्त...


 

दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटूंबसाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबविण्यात येत आहे,मात्र या योजनांचा लाभ संबंधित गोरगरिबांना खरच मिळतोय का ? हा प्रश्न आहे. अनेक सधन कुटूंबांची नावे दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत,त्यामुळे अनेक सधन मंडळी या योजनांचा लाभ घेत आले आहेत,आश्चर्याची बाब म्हणजे ज्या कुटूंबांसाठी या योजना तयार करण्यात येतात त्यांना याचा फायदाच घेता येत नाही किंवा त्यांना या सर्व योजनांचा फायदा मिळतच नाही,परंतु याकरिता जबाबदार कोण ? 

  • योजनेचा उदिष्ट

निराधार,वृद्ध,अंध,अपंग,विधवा,अनाथ बालके यांचेसह गोरगरीब जनतेचे जीवनमान सुधारावे या उदेशने शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत,यातिल काही योजना राज्य तर काही योजना केंद्र शासनाच्या मदतीने राबविल्या जातात मात्र या योजनांचा ८० टक्के लाभ गोरगरिबांना मिळतच नाही,प्रत्येक योजनेत लाभार्थी म्हणू शासनाकडे हजारोंच्या संख्येने अर्ज येतात,निधीही फस्त होतो,मात्र प्रत्यक्षात गरीब गरीबच राहत आहे,

  • योजनेचा लाभ गरजवंतानपर्यंत पोहचत नाही. 

२००५ साली दारिद्रय रेषेखालील कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले,जिल्ह्यात १ लाख १ हजार ३०२ दारिद्रय रेषेखालील असून ते अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत,या कुटूंबासाठी विविध योजना राबविल्या जात आहे,यामध्ये स्वस्त धान्य मोफत आरोग्य,शिक्षण,विमा तसेच इतर योजनांचा लाभ मिळतो यासाठी काही अट ठेवण्यात आली आहे,मात्र कुटूंबाकडे मोबाइल,पक्के घर,फ्रीज यासारख्या वस्तु असतील तर असे कुटूंब श्रीमंत म्हणून गणले जातात,मात्र २००५ पासून सर्वेक्षण झालेच नाही,१९ वर्षांनंतर या कुटूंबाच्या उत्पन्नात बदल होऊ शकतो,मात्र सर्वेक्षणा अभावी दारिद्रयातील कुटूंबाची स्थिति निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे.

 

जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी,गडचिरोली या भागातील लोकांचे दारडोई उत्पन्न बऱ्यापैकी आहे तर अहेरी,चामोर्शी,मूलचेरा,सिरोंचा,भामरागाड,एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील लोकांना त्या सर्वेक्षण केले नाही. जुन्याचनुसार प्रशासनाचे कामकाज योजना आहे,ज्याने दारिद्रय रेषेखाली कुटूंब सर्वेक्षण उचल्याने निश्चित दारिद्रय रेषेखाली कुटूंबाची नोंदणी नाही.

काही वर्षांपासून महागाई वाढली असल्याने अनेकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे,त्यामुळे अनेक कुटूंबे गरिबीच्या खाईत लोटली जात आहेत त्यामुळे नव्याने सर्वेक्षण होणार असा उपस्थित होत आहे. सोयसुविधा नाहीत त्यामुळे येथील कुटूंब दारिद्रयात जीवन व्यथित करत आहेत,या लोकांच्या कल्याणासाठी दरवर्षी निधी येतो,मात्र त्याचा योग्य जागी उपयोग होतांना दिसत नाही.

  • प्रधानमंत्री आवास योजना 

प्रधानमंत्री आवास योजना,ही केंद्र सरकार ची योजना आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने २०१५ मध्ये सुरू केली,योजना सुरू करण्याच्या वेळी,मोदीजिनी खूप मोठी-मोठी आश्वासणे दिली,२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला स्वताच घर मिळेल अशी घोषणा सुद्धा करून टाकली,परंतु आता २०२२ तर गेलीच पण आता २०२३ सुद्धा संपत आलेला आहे परंतु अजूनही पंतप्रधानांचे आश्वासण पूर्ण झालेले नाही,सध्या ह्या योजनेची वैधता वाढवण्यात आलेली आहे,सुरुवातीला योजनेची अंतिम मुदत ही ३१ मार्च २०२१ होती त्या वरून आता योजनेची मुदत वाढवून ३१ मार्च २०२४ करण्यात आली आहे.२०२१ मध्ये जेव्हा योजनेची वैधता वाढवली गेली तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाने २.९५ कोटी घरे बांधण्याचे उधीशत ठेवण्यात आले. परंतु आतापर्यंत केवळ ६१.७७ लाख घरेच पूर्ण झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात १४ लाख ७१ हजार ३५९ घरांचे उदिष्ट ठेवण्यात आले त्यामधून आतापर्यंत १० लाख २८ हजार ८४७ घरे घरकुला साठी मंजूर करण्यात आली आहे.

शासन जेव्हा कुठलीही योजना सुरू करते तर ती जनतेच्या गोर गरिबाच्या फायद्यासाठीच असते परंतु त्याची योग्य रीतीने अमलबजावणी करण्यात सरकार दुर्लक्ष करते,उदा. घरकुल योजनेसाठी जि कुटूंबाची पात्रता आहे ती २००५ च्या सर्वेक्षणा नुसारच आहे परंतु गेल्या १९ वर्षांमध्ये कुटूंबाच उत्पन्न वाढल असेल तर काय ? मला असं वाटत की शासनान कोणतीही योजना सुरू करण्याच्या पूर्वी योग्य तो सर्वेक्षण करायला पाहिजे व ज्यांना अत्यंत गरज आहे त्या लाभार्थयांनपर्यंत योजनेचा लाभ पोहचवायला पाहिजे,तेव्हा कुठं जावून गोरगरीब जनतेचे अच्छे दिन येणार.

 

 

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 5, 2024

PostImage

विजय वडे्टीवार उपमुख्यमंत्री होणार?


 

 

आज्च्या घडीला महाराष्ट्र राज्याचा राजकारण या विषयावर चर्चा करावी किंवा त्याच्याकडे गांभीर्याने बघ्त्च राह्व अस राजकारण आपल्या महाराष्ट्र राज्यात घडला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आणि महाराष्ट्र विधानसभेचा विरोधीपक्षनेता कोण यांच्या चर्चा करायला गेल तर चर्चा संपायाच्या आधीच मुख्यमंत्री बदलेला आप्ल्याला पहायाला मिळाल आहे.

 

 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधिपक्षनेते देवेन्द्र फडणवीस होते एक आठवड्याला कालाविधि संपला आणि मुख्यमंत्री बद्लाचे वारे सुरू झाले आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि विरोधीपक्षनेते असलेले फडणवीस उपुख्यमंत्री झाले आणि लगेच उपुख्यमंत्री असलेले अजित पवार विरोधीपक्षनेते झाले.

 
 

काही दिवसांचा कालावीधी संपला आणि पुन्हा अजित पवार उमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि आता विरोधीपक्षनेते विजय वडे्टीवार झाले. परंतू मनात अशी शंका येते, महाराष्ट्र राज्याच सर्व राजकारण विरोधीपक्षनेता या पदावर अवलंबून राहिला आहे. राज्याचं राजकारण या एकाच पदावर घोंघावत आहे म्हणून मनातील कुजबुज सांगायला लागली की आजचे विरोधीपक्षनेते कदाचित उद्याचे उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे ही सांगता येणार नाही. एवढी पॉवर आज विरोधीपक्षनेते या पदावर आहे आणि हा राजकारण आहे काहिही होवू शकतो. बघत राहा सुखी राहा एवढीच शुभेच्या महाराष्ट्रातील जनतेला.

                                                   

 

 

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 3, 2024

PostImage

शेतकयांच्या पोरा तु लढायला शिक। भुमी अधिग्रहितांना रमेश चौखुंडेचे आवाहन


 

कोणसरी परीसरातील जैरामपूर, मुधोली चक नं. १. मुधोली चक्क नं. २. सोमनपल्ली, गणपूर, विठ्ठलपूर या गावात महाराष्ट्र सरकारने एमआयडीसी स्थापन करून या परीसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी कारखानदाराच्या घशात घालण्याचा प्रकार असून याला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध आहे. शासनाच्या अशा प्रयत्नांमूळे या परीसरातील शेतकरी सर्वप्रथम नष्ठ होईल. महाराष्ट्र सरकारच्या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाविरोधात आवाज उङ्गवायला सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. कोणसरी परीसरातील जैरामपूर, मुधोली चक नं. १, मुधोली चक नं. २. सोमनपल्ली, गणपूर, विठ्ठलपूर या गावाच्या हद्दीतील एकूण ८९८.८४२२ हेक्टर जमिनीवर महाराष्ट्र सरकार एमआयडीसी स्थापन करून जमिनी कारखानदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू याला परीसरातील शेतक-यांचा विरोध आहे. जीव गेला तरी जमीन देणार नाही. अशी शेतकऱ्यांची भुमीका आहे. तसा प्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये नाहरकत पारीत करून शासनाला कळविले आहे.

जल, जंगल, जमीन या उपक्रमाद्वारे जमिन टिकवून ठेवणे हा शेतकऱ्यांसमोर आजच्या घडीला ज्वलंत प्रश्न आहे. गावागावात जनजागृती करून सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची माहिती समजावून सांगणे गरजेचे आहे. कारण ग्रामिण भागातील माझा शेतकरी बांधव निरक्षर आहे. स्वाभिमानी आहे पण भित्रा आहे. त्यामुळे त्याला जनजागृतीची गरज असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलाने (युवा पिढीने) एकत्र येऊन सरकारच्या दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरून लढा द्यायला पाहिजे. महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन शेतकरी प्रामाणिक पणाने व

 

स्वकष्टाने शेतातील मातीशी आपली नाळ जुळवून दिवसभर राबराब राबून उत्पन्न घेतो आणि आपल्या हक्काच्या काळ्या माऊलीवर सरकार दडपशाही करून त्या काळी माऊलीला अधिग्रहित करण्यात प्रयत्न करीत असेल तर ते सरकारचे प्रयत्न हाणून पाडल्या शिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा कोणताच पर्याय उरणार नाही. हे सरकारला दरडाऊन सांगणे आजच्या घडीला आवश्यक आहे. म्हणून कोनसरी परिसरातील भूसंपादन शेतकऱ्यांच्या युवा पिढीलाअशी विनंती करतो की, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात गावागावांत जाऊन जनजागृती करावी अन् शासनाच्या दडपशाहीविरोधात रस्त्यारस्त्यांवर लढाई लढण्याकरीता

 

आणखी वाचा : युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता,नववर्षाचे स्वागत करावे

अशी लढाई आम्ही डोळ्यांनी बघितली आहे. रस्त्यावरची लढाई मी पण लढलो आहे. परंतू लढाई लढतांना युवक पिढी पूढे न येता आपली जबाबदारी आपल्या बापाच्या माथी मारून मला महत्वाचा काम आहे म्हणून निघून जातात. परंतु असे न करता युवकांनी स्वतःला झोकून द्यावे आणि सरकारविरोधी संघर्ष उभा करावा.

 

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 2, 2024

PostImage

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार ? पंपावर लागली लंबी लाईन


 

हिट अँड रन कायदा केंद्र सरकारने नव्याने लागू केला असून,यामुळे खाजगी वाहन चालकांवर अन्याय करणारा कायदा असून.त्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी किंवा असा कायदा रद्द व्हावा, अशा प्रकारची मागणी घेऊन खाजगी वाहन चालकांनी वाहतूक बंद करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार अवलंबल्या गेल्यामुळे संपूर्ण राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल,डिझेलचा तुटवडा असल्याकारणामुळे पेट्रोल,डिझेल मिळणे आता कठीण झाले आहे.

हिट अँड रन या कायद्यामुळे खाजगी वाहन चालक सर्वात आधी अडचणीत येत असल्यामुळे,त्यांनी असा बंद पुकारला आहे. या कायद्यात अशी तरतूद केल्या गेली आहे की,खाजगी वाहन चालकांच्या हाताने एखादा अपघात झाला तर ड्रायव्हर वर सात लाख रुपयांचा जुर्माना अन्न दहा वर्षांचा कारावास अशी तरतूद केल्या गेली आहे. ही आम्हाला मालकाकडून पगारच दहा ते बारा हजार रुपये मिळतो आहे,तर आम्ही सात लाख रुपये कोणत्या भरोशावर जुर्माना भरू, अशी खंत खाजगी वाहन चालक बोलून दाखवत आहेत. तूटपूंज्या पगारावर आम्ही काटकसरी करून कसातरी संसाराच्या गाडा चालवतोय ,त्यातल्या त्यात असा नवीन कायदा आम्हाला जगू देणार नाही,अशी खंत खाजगी वाहन चालकांनी बोलून दाखवली. 

 

आणखी वाचा : १२०१ आजारांवर मोफत उपचार;'आयुष्मान'चे ई-कार्ड काढले का?

 

त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची परिस्थिती दिसून येत असल्यामुळे,पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या रांगाच्या रांगा लागल्या असून जनतेचे हाल होताना दिसून येत आहेत.मुख्य म्हणजे आता पंपावर पेट्रोल मिळणे हे देखील बंद होणार आहे कारण राज्यातील बरेच पेट्रोल पंप रिकामे झाले असून आता पेट्रोल मिळणे सुद्धा बंद झाले आहे.धकाधकीच्या काळात वाहनांची संख्या वाढली असल्यामुळे जनतेचे हाल होताना दिसून येत आहे.असा जीवांवर उठणारा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत गाड्यांची वाहतूक सुरु होणार नाही,असा खाजगी वाहन चालक वर्गाचा म्हणणं आहे.

 जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी फक्त आजच्या दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा उपलब्ध असल्यामुळे,उद्यापासून जनतेचे जास्त हाल होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.तरी परंतु ग्रामीण भागातील टू व्हीलर बांधवांना अशी विनंती करतो की,अशा पेट्रोल महागाईच्या काळात शक्यतोवर खूपच आवश्यक आहे अशाच ठिकाणी मोटार सायकलवर जाण्याचा विचार करावा हीच आग्रहाची विनंती


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 1, 2024

PostImage

मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका संपावर


 

 

राज्यातील अंगणवाडी सेविकांना कर्मचारी ऑफ ग्रॅज्युईटी अ‍ॅक्ट नुसार ग्रॅज्युईटी मिळण्यास पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देवून दीड वर्षे होऊन देखील राज्य शासनामार्फत अत्यंत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविकांना काम करावे लागत असून मानधन वाढ करण्यात यावी, राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घेणे, सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना अर्ध्या मानधनाइतकी पेन्शन सुरू करणे, अंगणवाडीमध्ये शिजविल्या जाणार्‍या पोषण आहारासाठी लागणार्‍या साहित्यासाठी येणारा खर्च महागाईमुळे वाढत असून देण्यात येणार्‍या रकमेत आणखी वाढ करण्यात यावी, अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजाकरिता मोबाईल संच देण्यात यावेत, सर्व मिनी अंगणवाड्या नियामित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे, अंगणवाडी कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचार्‍यावरील सक्ती बंद करावी, 30 दिवसांची भरपगारी रजा देण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना मुख्यसेविका पदाकरीता पात्र करण्यात यावी अशा मागण्या घेवून अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

 

 

अंगणवाडी कर्मचारी 1975 पासून एबाविसे योजनेमध्ये पुर्णवेळ लहान बालक, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेऊन, पुढची पिढी घडविण्याचे कर्तव्य बजावत आहे. अंगणवाडी कर्मचारी पुरक पोषण आहार, आरोग्य, पुर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, गृहभेटी व इतर संदर्भीय सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देत आहे.

आणखी वाचा : आजच्या युगातील स्वावलंबी स्त्री

 अंगणवाडी कर्मचार्‍यांना दिवसभर काम करुनही अनेक व्यवसायाच्या किमान वेतनापेक्षाही अत्यंत तुटंपुजे मानधन मिळत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये शासनाने जी मानधन वाढ केली होती, ती अत्यंत कमी होती. अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळणारे मानधन हे विविध योजनेंतर्गत तत्सम काम करणार्‍या कर्मचार्‍यांपेक्षा खुप कमी आहे. सध्याच्या महागाईमध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनात काम करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांना जीवन जगणे कठीण होत असल्याच्या भावना शासनाकडे मांडून सेविकांनी सदर संप पुकारला असल्याचे यावेळी सांगण्यातआले.

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 31, 2023

PostImage

युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता,नववर्षाचे स्वागत करावे


आजच्या युगात वावरताना आपले पाऊल योग्य ठिकाणी पडले पाहिजे याची वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झालेले आहे.कारण आजचे युवक संगतीच्या परिणामांना किंवा स्वयं विचाराने म्हणा परंतु व्यसनाच्या आहारी गेलेला दिसून येतो.सुंदर आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या व्यसनावर आवर घालणे नितांत गरजेचे आहे.कारण व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण निरोगी जीवन जगूच शकत नाही ,हे मी ठामपणे सांगू शकतो.

वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई याचा सारासार विचार करून आपल्या खिशाला कात्री लागू नये याची वेळीच काळजी घेणे नितांत गरजेची आहे.येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हायचे असेल,तर काही बाबींचा विचार करणे सुद्धा तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे युवकांनी संगत करताना सावधानता बाळगणे मोलाचे ठरणार असल्याकारणाने,पुढचं पाऊल टाकताना जरा जपून टाकावे,कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते संगत न करना ऐसी जिसमे हो ऐसी तैसी.

नववर्षाचे स्वागत नक्की करा,कारण की येणारे नववर्ष आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा असू शकतो हे सुद्धा निरखून पाहणे गरजेचे आहे.आपले भवितव्य येणाऱ्या नववर्षावरच असेल हेही ओळखता आले पाहिजे,परंतु त्याकरिता आपण स्वतः व्यसनी राहून चालणार नाही तर निर्व्यसनी असणे नितांत गरजेचे आहे. कारण आजचा युवक उद्याच्या भविष्य आहे हे सांगायला कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही.वाढती महागाई अन रिकाम्या हाताला नसणार काम या गोष्टी सर्वप्रथम स्वतःच्या मनावर बिंबवणे गरजेचे झाले आहे आणि यातच आपले भविष्य दडले आहेत,याचे सुद्धा चिंतन-मनन करणे गरजेचे आहे,कारण काय तर आधीच रिकाम्या हाताला काम नाही आणि दुसरीकडे अल्पवयात जडलेला व्यसन या दुहेरी चक्रव्यूहात आजचा तरुण जास्त घोरपटलेला दिसतो आहे.म्हणून अशा चक्रव्यूहातून बाहेर पडणे काळाची गरज आहे.

जुन्या वर्षाला निरोप द्यायचा आहे,म्हणजे दारू कोंबडा या अन मित्रांसोबत पार्टी हा एक सामायिक समीकरण होऊन गेलाय,तो सर्वप्रथम आपल्या डोक्यातून काढून बाहेर फेका. आपल्या आईने घरीच सुग्रास जेवण तयार करून ठेवलेला आहे.त्याच मनसोक्त आस्वाद घ्या, कारण त्यात आईच प्रेम दडलेला आहे.आईच्या हाताची चव कोणत्याच खानावळीत मिळणार नाही,हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.

जुन्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत नक्की करा कारण काय तर जीवनात प्रत्येक गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे आणि हाच निरोगी जीवनाचा मूळमंत्र आहे.परंतु जीवनाचा आनंद घेत असताना त्यावर दुःखाचे विर्जन पडू नये याची सुद्धा तितकेच काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

आणखी वाचा : ग्रामीण भागांतील युवक अन त्याच्या सामोरील आव्हाने

आज आपण समाजात जीवन जगताना पाहतो आहोत की कित्येक तरुण संगतीच्या परिणामाने मना किंवा स्वतःच्या दूरबुद्धीने मना व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या जीवनाचा खेळ खंडोबा करून घेतलाय,हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.परंतु त्याचा सोयर सुतक व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाला नसतं.थोर मोठ्यांचे भान,मान मर्यादा हरपून गेला आहे,याचा मोठा दुःख वाटतं,म्हणून जुन्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत निर्व्यसनी बाणा जागृत ठेवून करावे,एवढेच विनंती माझ्या युवक मंडळींना नववर्षानिमित्त करतो आहे आणि यातच आपले सौख्य सामावले आहेत.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 29, 2023

PostImage

वेगळा विदर्भ या मागणीसाठी लोक चळवळ उभी करू, गडचिरोली रास्ता रोको आंदोलकांचा इशारा


 

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या मागणीसाठी येथील इंदिरा गांधी चौकात आज २९ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करून राज्य सरकारला गर्भीत इशारा देण्यात आला. भर उन्हामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता शेकडो कार्यकर्ते चौकात उभे राहून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत, हीे मागणी कीती महत्वाची आहे हे यावरून सिध्द होते. राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे जनतेला भर रस्त्यावर उतरण्याची वेळ येते हे वैदर्भीय जनतेचे दुदैव आहे.

विदर्भाची मागणी रास्त असून सरकार जाणून बुजून या मागणीकडे काना-डोळा करीत आहे. परंतू ‘आता नाही तर, कधीच नाही’ ही अशा घेऊन जनता रस्त्यावर उतरून विदर्भाचा आवाज बुलंद करतांना दिसत आहेत. विदर्भ राज्य आमची हक्काची मागणी असून ती मिळविण्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हिच भावना आंदोलन कर्त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. आयुष्यभर राज्यांवर सत्तेचे अधिराज्य तुम्हीच अबादीत राखा पण आम्हाला वेगळा विदर्भ द्या! अशी आर्त हाक गडचिरोलीच्या रास्ता रोको आंदोलनकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत होते. आम्हाला भिऊ नको वेगळा विदर्भ हवा. हेच राज्यातील राज्यकर्त्यांना सांगत होते.

विदर्भ वेगळा झालाच पाहीजे. ही मागणी घेऊन विदर्भातील जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधी आक्रोश प्रगट करीत आहे. निवडणूक आली की, राज्यातील राज्यकर्ते विदर्भातील जनतेला अनेक प्रलोभने दाखवून भोळ्या-बाभळ्या जनतेची फसवणूक करून मते पदरात पाडून घेतात. आणि निवडणूका संपल्या की, तो मी नव्हेच! अशी भावना निर्माण करून वेळ निभावून नेतात. हीच पध्दत देशातील सर्वच राजकीय पक्षांची झालेली असून याला विदर्भातील जनता बळी पडत आहे. परंतू विविध आश्वासने ऐकून जनता देखील कंटाळून गेली आहे. महत्वाचे म्हणजे वेगळा विदर्भ का आवश्यक आहे. हे विदर्भातील जनतेला कळून चुकलेला आहे. म्हणून आता ‘आश्वासने नको तर कृती हवी’ ही मागणी घेऊन विदर्भातील जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करत आहे. हेच आजच्या गडचिरोली रास्ता रोको आंदोलनावरून दिसून येते.

आणखी वाचा : वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, ही मागणी अधिक जोमाने लढावी लागेल

  • भाजपाचा जाहीरनामा 

आम्ही सत्तेत परत आलो की, विदर्भाची मागणी पूर्ण करून म्हणजे वेगळा विदर्भ करून असे भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात लिहीले होते. परंतू सत्ता मिळताच सरड्या सारखे रंग बदलून विदर्भाच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या गेले. भाजपाने वेगळा विदर्भ केला नाही. भाजपाच्या सत्तेत विदर्भ विकासापासून कोसो दूर गेलाय अशी म्हणण्याची वेळ आता विदर्भातील जनतेवर आलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या विदर्भाचा विकास तर झालाच नाही. परुतू सत्ताधार्‍यांनी विदर्भावर सतत अन्याय करतांना दिसून येत आहे. भाजपाचे सरकार विदर्भातील जनतेबद्दल सावत्रपनाची भावना निर्माण करीत आहेत हेच यावरून लक्षात येते. विदर्भातील जनतेवर सातत्याने होणारा अन्याय आता असह्य होऊ लागला आहे. म्हणून विदर्भातील जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात विदर्भ वेगळा झालाच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. आणि विदर्भ राज्य आंदोलन आता जनचळवळ म्हणून उभी करू असा इशारा सरकारला देण्यात येत आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 27, 2023

PostImage

जिव गेला तरी,जमीन देणार नाही,कोनसरी परिसरातील भु.संपादन शेतकऱ्यांचा इशारा


 

महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली या गावच्या हद्दीतील एकूण ८९८.८४२२ हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला असून यामुळे परिसरातील शेतकरी डुबगाईस आल्या शिवाय राहणार नाही,अशी परिस्थितीत कोनसरी परिसरातील शेतकऱ्यांची झालेली आहे.

 

  •  भूमी अधिग्रहण जमीनिबाबत कोनसरी येथील जनतेचा ग्रामसभेत ठराव नामंजूर

महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कंपनीने हडपण्याचा प्रकार असून याबाबत जनतेने ग्रामसभेत ठराव नामंजूर करण्यात आला,त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबर २०२३ रोजी चामोर्शी औधोगीक क्षेत्राबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी कोनसरी परिसरातील गावांमध्ये चामोर्शी औधोगीक क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहणा बाबत ना हरकत ठराव घेण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. कोनसरी परिसरातील ग्रामपंच्यातीने ५ डिसेंबर २०२३ पर्यंत विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामसभेत ना हरकत ठराव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्यात अशा सूचना दिलेल्या होत्या.

 

शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रकार लक्षात येताच कोनसरी गावात ५ डिसेंबरला नोटिस काढून गाव बंद ठेवून कोनसरी येथील ग्रामपंचायत भवनात ग्रामसभा घेण्यात आली,या ग्रामसभेला गावातील प्रत्येक व्यक्ति उपस्थित होऊन मोठ्या संख्येनी गावकरी उपस्थित होते. या ग्रामसभेला गावातील शेतकरी,शेतमजूर व कामकरी वर्ग असे सर्वच व्यक्ति उपस्थित होते. चामोर्शी औधोगीक क्षेत्र जमीन हस्तांतरित करण्यात कोनसरी परिसरातील जमीन देण्यास जनतेनी तीव्र विरोध दर्शविला आणि या सर्व प्रकारामुळे शेतकरी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

 

  •  राज्याचे अन्न व औषधी मंत्री ना.धर्मराव आत्राम यांनानिवेदन

महाराष्ट्र शासनाने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली या गावच्या हद्दीतील एकूण ८९८.८४२२ हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढण्यात आलेला आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे उदवस्थ होण्याचा प्रकार असल्यामुळे सदर आदेश रद्द करण्यात यावा,अशी मागणी सरपंच यांच्या वतीने राज्याचे अन्न व औषधी मंत्री  ना. धर्मराव आत्राम यांना निवेदन देवून आपली व्यथा मंत्री महोदय यांच्या समोर बोलून दर्शवली.
कोनसरी परिसरातील ८९८.८४२२ हेक्टर जमीन कंपनीला हस्तांतरित करण्यात येणार असून शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रकार आहे आणि यामुळे परिसरातील शेतकरी संकटात आल्याशिवाय राहणार नाही,हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे तरी या प्रकाराची चौकशी करून भु. संपादन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

 

  • शेतकरी उदवस्थ व्हावा,हिच सरकारची नीती

महाराष्ट्र सरकारने चामोर्शी औधोगीक क्षेत्रातील कोनसरी परिसरातील ८९८.८४२२ हेक्टर जमिनीला भु. संपादित करण्याचा जो धाट घातला आहे यामुळे परिसरातील शेतकरी सर्वप्रथम नेस्तनाबूत होणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव असून याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार कारणीभूत आहे.अशा प्रकल्पानमुळे औधोगीक क्रांति घडून येणार असल्याची खोटी बतावणी सरकार करीत असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना संपविण्याचा धाट घातला जात आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.

 

आणखी वाचा : पालकमंत्री गेले कुणीकडे,जिल्ह्यातील जनता शोधात..... 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू,अशी पोकळ वल्गना एकीकडे सरकार करतो आहे आणि औधोगीक क्षेत्राला जमीन हस्तांतरित करून शेतकऱ्यांना संपविण्याचा धाट घातला जात आहे,म्हणजे विचार करा,सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवीत असून,अशा सरकारी नितीला शेतकऱ्यांनी मिक न घालता एकीचे बळ म्हणजे एकता निर्माण करून सरकार विरोधात आवाज उठवायला पाहिजे,प्रसंगी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची तयारी ठेवायला पाहिजे,हे दणकट माझे बाहू या प्रमाणे सरकार विरोधात संघर्ष करायला पाहिजे.

जमीन हस्तांतरित करून त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील परंतु प्रश्न पैश्यांचा नाही. शेतकरी आधीच डबगाईला आलेला आहे आणि असल्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून पूर्णपणे नेस्तनाबूत होईल. अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांची जात च जीवंत राहणार नाही. जिल्ह्यात औधोगीक क्रांति घडून येईल अशी खोटी बतापणी राजकीय पुढारी करीत असेल तरी यात शेतकरी भरडला जात आहे,हे राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षातच येत नाही,असला प्रकार आहे. जिल्ह्यात औधोगीक क्रांति घडून येईल हे आपण ग्राहित धरू परंतु या औधोगीक क्रांतिमुळे किती बेरोजगारांना रोजगार मिळेल ? याची शाश्वती सरकारने द्यावी. पण सरकार याची शाश्वती देणार नाही कारण ही औधोगीक क्रांति ओट घटकेची ठरणार असून,यामुळे कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२,पारडीदेव,सोमनपल्ली व इतर गावांतील शेतकरी मात्र पूर्णपणे संपून गेल्या शिवाय राहणार नाही.

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 26, 2023

PostImage

भूसंपादणामुळे कोनसरी परिसरातील शेतकरी उदवस्थ होणार..!


महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२ ,सोमनपल्ली,गणपूर,विठ्ठलपूर या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला असून.यामुळे या परिसरातील शेतकरी डबघााईस येणार असून,या विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी मौजा जैरामपूर येथे आक्रोश सभा घेण्यात आली होती,एक इंचभर सुद्धा जमीन देणार नाही,असा निर्धार परिसरातील शेतकऱ्यांनी केला. 

महाराष्ट्र शासन आपली फसवणूक करीत असून आपल्या कुटुंबाला भूमिहीन करण्याचा सरकारचा विचार आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरुद्ध पेटून उठल्याशिवाय किंवा शेतकरी बांधवांची वज्र मूठ घट्ट केल्याशिवाय कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२ ,सोमनपल्ली,गणपूर,विठ्ठलपूर या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना दुसरा पर्याय दिसत नाही.म्हणूनच हा लढा अधिक तीव्र करून एकीची भावना साधने गरजेचे आहे.एकमेकांचे हात धरून चला म्हणजे कुणाची पाय धरायची गरज पडणार नाही,ही एकच आणि कळकळीची  विनंती माझ्या शेतकरी बांधवांना करीत आहे.

महाराष्ट्र शासन कोनसरी परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन हडपण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकमेकांसोबत मिळून मिसळून एकमेकांचे विचार-आचार समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असून.आजच्या घडीला यातच शेतकऱ्यांचे सुख सामावले आहे,अन्यथा तलावातील पाणी निघून गेल्यावर पाळ  बांधून काहीच अर्थ उरणार नाही,अगदी तशीच गत माझ्या शेतकरी बांधवांची झाल्याशिवाय राहणार नाही,हे मात्र सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे.

 

आणखी वाचा : खासदार अशोक नेते घेणार मंत्रिपदाची शपथ ?

कोनसरी परिसरातील शेतकऱ्यांची शेती म्हणजे त्यांच्या काळजाचा तुकडा आहे आणि आपल्या कुटुंबाचा पोट भरण्याचा एकमेव साधन आहे आणि तोच जर का हिरावल्या गेला तर परिसरातील शेतकरी संपल्याशिवाय राहणार नाही,म्हणून शेतकरी बांधवांनी सतर्क राहून,फसव्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहणे काळाची गरज आहे आणि यातच परिसरातील शेतकऱ्यांचे हित सामावले आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 25, 2023

PostImage

भूमी अधिग्रहित शेतकऱ्यांचा आक्रोश इंचभर जमीन देणार नाही जैरामपूर सभेत निर्धार


महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२ ,सोमनपल्ली,गणपूर,विठ्ठलपूर या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला असून.यामुळे या परिसरातील शेतकरी डबघााईस येणार असून,या विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी मौजा जैरामपूर येथे आक्रोश सभा घेऊन.एक इंचभर सुद्धा जमीन देणार नाही,असा निर्धार परिसरातील शेतकऱ्यांनी केला विशेष म्हणजे या सभेला महिलांची उपस्थिती पुरुषांपेक्षा जास्त होती.

महाराष्ट्र शासनाने चामोर्शी औद्योगिक क्षेत्रातील कोनसरी परिसरातील 898.8422 हेक्टर जमिनीला भूसंपादित करण्याचा जो घाट घातला जात आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकरी सर्वप्रथम नेस्तनाबूत होणार आहे.म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे संपविण्याचा डाव असून,याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे.अशा प्रकल्पामुळे औद्योगिक क्रांती घडून येणार असल्याची खोटी बतावणी सरकार करीत असून,या प्रकारामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना संपविण्याचा घाट घातला जात आहे आणि,हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.

 

 

 

परंतु महाराष्ट्र शासन आपली फसवणूक करीत असून आपल्याला भूमिहीन करण्याच्या मनस्थितीत असून आपल्याला कंगाल केल्याशिवाय सोडणार नाही याची पूर्ण कल्पना कोणसरी परिसरातील शेतकऱ्यांना असल्यामुळे.आज दिनांक २५-१२-२०२३ रोजी मौजा जैरामपूर  येथे ग्रामपंचायत पटांगणावर आक्रोश सभेचे आयोजन करून,शासनाविरोधात आपला रोष प्रगट केला.मुख्य म्हणजे आज जैरामपूर येथे झालेल्या सभेला भूमी अधिग्रहित परिसरातील महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त संखेत उपस्थित होत्या,हे इथे आवर्जून प्रगट करावेसे वाटते.

 

 

आणखी वाचा : शेतकऱ्यांविषयी सरकारचे उदाशिन धोरण !

 

 ज्या सभेला महिलांची उपस्थिती जास्त प्रमाणात असते ती सभा,तो निर्धार कधीच वाया जात नाही,हेच यावरून सिद्ध होतंय. कोनसरी परिसरातील भोळ्या भाबड्या महिला आपल्या जमिनीचा तुकडा सरकारच्या माथी लागू नये याकरिता शेतातील कामधंदा सोडून शासनाविरोधात आपला आक्रोश प्रगट करताना दिसत होत्या.म्हणजे विचार करा शासनाविरोधात या भगिनींच्या मनात किती चीड निर्माण झाली होती,ही स्पष्ट त्या महिलांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले हे विदारक दृश्य आहे.

 एक इंच भर सुद्धा जमीन शासनाला देणार नाही असा निर्धार त्या महिला व्यक्त करीत होत्या.आजच्या जैरामपूर  येथील सभेला कोणसरी परिसरातील जवळपास 3 हजाराच्या वर अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित असून सरकारचा निषेध केला जात होता.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 22, 2023

PostImage

आजच्या युगातील स्वावलंबी स्त्री


आधीच्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल एवढीच जबाबदारी होती परंतु आज जग बदलला,तसा स्त्रीयांमध्ये मोकळोकता निर्माण झाली आणि बरेचशी प्रगती होऊन आजच्या स्त्रिया स्वावलंबी होऊन जगाला दाखवून दिल्या की,हम भी कुछ कम नही आणि हे सत्य आहे. जमाण्यानुसार बदल व्हायलाच पाहिजे होता आणि तो झाला. 

 

  • मुलगी शिकली प्रगती झाली 

 

शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेत स्त्रियांनी प्रगती साधली हा मुख्य कारण आहे. शिक्षणामुळे आजची स्त्री स्वताच्या पायांवर उभी आहे याचा सार्थ अभिमान आहे. स्त्री ही तिहेरी भूमिका चांगल्या प्रकारे सांभाळून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यापासून तर रोजगार पर्यंत उंच भरारी घेत स्वताचा नाव लौकिक केलं आणि स्त्री ही एक अबला नसून ती रणरागिनी आहे हे सिद्ध करून दाखिवलं. म्हतवाच म्हणजे चूल आणि मूल या घोषवाक्यावर मर्यादित न राहता स्वताच कर्तुत्व सिद्ध करीत जगात आपली ओळख निर्माण करुण दाखवली आणि इतकी प्रगती शिक्षणाच्या भरोश्यावर झाली. जर स्त्री शिकलीच नसती तर प्रगती अशक्य तर होतीच परंतु तिला समाजात जीवन जगणं देखील अशक्य होऊन गेलं असतं. शिक्षण वाघिणीचं दूध आहे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि शिक्षणामुळेच स्त्री ही वाघिन झाली आहे,हे सत्य कुणीही नकारू शकत नाही,म्हणून शिक्षण काळाची गरज आहे. 

 

 

  • स्त्री संसार आणि रोजगार 

 

स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे,हे अगदी बरोबर आहे. घराला घरपण हा स्त्रीमुळे टिकून आहे,ज्या घरात स्त्री नाही त्या घरात थोडसं डोकावून बघा म्हणजे सहज लक्षात येते. आजची स्त्री शिक्षणाच्या भरोशयावर एवढी प्रगती केली,स्वताचा संसार सांभाळून नौकरी वर्गात आणि व्यवसायात स्वताचा दबदबा निर्माण करीत आपल्या नाजुक पायाला धीर देत स्वताला सावरण्याचा प्रयत्न केला आणि पाय सावरीत स्वताच्या पायांवर उभी झाली,ही सर्वात अभिमानास्पद बाब आहे. स्त्री ने उत्तम रित्या संसाराची जबाबदारी पेलून आदर्श निर्माण केला आहे. ज्या समाजात संसाराची जबाबदारी आहे,त्या समाजाला भिकेची डोहाळो कधीच लागणार नाहीत हे मी ठामपणे सांगू इच्छितो . उत्तम रित्या संसार सांभाळीत नौकरी क्षेत्रात सुद्धा आपला चाणाक्ष बुद्धीचा वापर करून आपला टेबल उत्तम रित्या सांभाळून पुरुषांवर मात केलेली आहे. नौकरी क्षेत्रात कलेक्टर पासून तर साध्या शिपाई पदापर्यंत आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे. 

 

  • स्त्री आणि बचत गट 

     

शहरी भागापाटोपाट ग्रामीण भागात सुद्धा स्त्रिया बचत गटात उतूंग भरारी घेत आर्थिक प्रगती साध्य करीत देशाला मजबूत करण्याचा प्रयत्न केली,तेही उत्तम रित्या. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागांतील स्त्री सुद्धा महत्वाचा कणा बनून बँकिंक व्यवहार चांगल्या प्रकारे हाताळत आहे. आज प्रत्येक खेड्यापाड्यात महिला बचत गटाची स्थापना करून चोख व्यवहाराच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत सामील होत आहेत. जि स्त्री चूल आणि मूल सांभाळत होती ती अभागी महिला आज बँकेत जाऊन आपला व्यहवार चोख सांभाळीत आहेत आणि पुरुषाच्या बचत गटापेक्षा महिलांचे बचत गट सक्षम करून आर्थिक प्रगती साधलेली आहे,बचत गटाच्या माध्यमातून भारतात कितीतरी महिला आपला रोजगारनिर्माण केला आहे.

 

 

  • स्त्री आणि शिक्षण 

 

शिक्षण क्षेत्रात सुद्धा पुरुषांपेक्षा महिला कितीतरी पटीने समोर आहेत. शिक्षणात प्रगती साधून महत्वाच्या पदांपर्यंत मजल मारत स्त्री ने आपला दबदबा निर्माण केला आहे आणि तेही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. मुलगी शिकली प्रगती झाली,याप्रमाणे स्त्री शिक्षणामुळे आत्मनिर्भर बनली आणि म्हणूनच उत्तम रित्या चूल आणि मूल सांभाळून तिने संसार सुद्धा उत्तम रित्या सांभाळला त्या नंतर शिक्षणामुळे योग्य पद्धतीने नौकरी सांभाळत आहे. कलेक्टर पासून शिपाई पदांपर्यंत आणि शिक्षणामुळे उत्तम पणे स्वताचा व्यवसाय सुद्धा सांभाळतांना तिचा नाजुक पाऊल नव्या दिशांकडे वळतांना दिसतो आहे. नवनवीन कार्य करण्याची आवड आणि जिद्ध ही स्त्री कडे आहे आणि याच कार्यामुळे एक स्त्री स्वताचा कर्तुत्व सिद्ध करण्यास पात्र ठरली आहे. जि स्त्री चूल आणि मूल सांभाळत होती ती आज हवाई जहाज,विमान चालवितांना दिसते आहे.

आणखी वाचा : बहुजनांची कन्या घेऊ पाहतेय गगन भरारी

आणि महत्वाचा म्हणजे देशाचं राष्ट्रपति पद सुद्धा सांभाळीत आहे. शिक्षण क्षेत्रात आज मुली कितीतरी पटीने मुलांपेक्षा सरस आहेत. माध्यमिक शाळांत परीक्षे पासून ते u.p.s.c. पर्यंत अशी अनेक उदाहरण देखत स्त्री पुरुषांच्या बरोबरीने कार्य करतांना दिसते आहे म्हणजे विचार करा चूल आणि मूल सांभाळणारी एक स्त्री आज कितीतरी पद्धतीने जिद्ध आणि चिकाटी यांच्या भरोश्यावर संसारात,नौकरीत आणि व्यवसायात आपला नाजुक पायाने प्रवेश करून यश संपादन केले हे यावरून सिद्ध होते.         

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 22, 2023

PostImage

ग्रामीण भागांतील युवक अन त्याच्या सामोरील आव्हाने


शहरी भागा पाटोपाट आता ग्रामीण भागातील युवक सुद्धा उंच अशी गगन भरारी घेण्याच्या मानसिकतेत आहेत पण शहरी भागांतील युवकांप्रमाणे ग्रामीण भागातील युवकांना सोय सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने ग्रामीण युवकाला अनेक अडचनिंना तोंड द्यावे लागते,हिच महत्वाची कमतरता असून ग्रामीण युवकांना संधीपासून कोसो दूर राहावं लागत असून मिळालेल्या संधीचा सोनं करण्यात अपयशी ठरतात. 

 

  • ग्रामीण भागांतील युवकानं समोरील आव्हाने 

     

जग इंटेरनेटच्या भरोश्यावर आकाशापर्यंत जाऊन पोहचला असतांना ग्रामीण भागांतील युवकांन मनाव तसं यश मिळवण्यात माघार घ्यावी लागतं कारण जिथं कव्हरेजच मिळत नाही,तिथली बिकट अवस्था न सांगितलेली बरी. ग्रामीण भागांतील युवकांना चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन मिळत नाही. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध राहत नाही,दळणवळणाच्या वेळेवर सोयी उपलब्ध राहत नाही आणि घरातील वडीलधारी मंडळी अशिक्षित असल्यामुळे त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही,अशी कितीतरी उदाहरण देता येतील. इंटेरनेटमुळे जगात प्रगती झाली,या गोष्टी मान्य आहेत परंतु ह्या सुविधा ग्रामीण भागात मिळवण्यासाठी युवकांची दमछाक होते किंवा त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणि या मुख्य कारणांमुळे ग्रामीण भागांतील युवकाला शहरी भागांतील युवकांसोबत स्पर्धा करण्याकरिता अडचण भासते. 

 

  • अपयश जिवारी लागतो 

     

ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण कव्हरेजची असल्यामुळे ग्रामीण भागांतील युवक स्पर्धेत टिकू शकत नाही आणि अपयश मरणाहून वोखटे यामुळे लाख प्रयत्न करून अपयश आला तर तो जिव्हारी लागतो. मानसिकता खचली जाते आणि एखदा मानसिकता खचली की,कधी कधी  होत्याचं नव्हतं होतं परंतु माझी ग्रामीण युवकाला विनंती आहे,या अडचणींना तोंड देत ध्येय कसं साधता येईल याचा विचार करा आणि यश मिळवा जिद्ध आणि चिकाटीच्या भरोश्यावर यश संपादन करण्याचा प्रयत्न करा. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पायांने चालणारा व्यक्ति फक्त अंतर कापतो आणि डोक्यानं चालणारा ध्येयापर्यंत जाऊन पोहचतो,हे प्रथम आपल्या मनावर बिंबवावं. 

अडचणी कितीही आपल्या समोर अवासून उभ्या असतील तरी परंतु त्याचा प्रतिकार करीत यश संपादन करावं लागेल. कठोर परिश्रमाशीवे या जगात कोणतीही गोष्ट शक्य होणार नाही,हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,ते प्रथम मनात रुजवावे लागेल,जीवनाच्या चक्रव्यूहात तोच यशस्वी होतो,जो धैर्याशी संघर्ष करतो,असे कितीतरी अडचणी ग्रामीण भागातील युवकांसमोर उभ्या आहेत आणि स्पर्धेत सातत्य टिकवून ठेवायचं असेल तर अडचणींना तोंड देत यश संपादन करता येतो. 

 

  • प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळेल 


 
मनाची तयारी असेल तर अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करू शकतो आणि आपल मन साथ देत नसेल तर नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था होईल. मी आत्मविश्वासाने सांगतो ग्रामीण भागातील युवक मागे नाही. ध्येय गाठण्याची क्षमता ग्रामीण युवकांमध्ये आहे. ऊन,वारा,पाऊसाचे चटके सोसून संकटांवर मात करण्याची सवय त्यांच्या मध्ये आहेत आणि हे दणकट माझे बाहू याप्रमाणे तो स्पर्धेत टिकून राहील आणि यशाचं किनारा शोधत जिद्ध आणि चिकाटी च्या जोरावर संकटांनचा सामना करीत यश संपादन करेल,यात दुमत नाही. 

आणखी वाचा : शेतकऱ्यांच्या पोरा तू लढायला शिक

ग्रामीण भागांतील युवक शहरी भागातील युवकांच्या बुद्धीने तलख असून थोर मोठ्यांचा मान पान राखण्यात सरस आहेत,फरक इतकाच आहे की,तो शहरात जन्माला आला आणि खेड्यात जन्माला आला,शहरी भागांतील युवकांना सुविधा लवकर उपलब्ध होत गेल्या आणि ग्रामीण भागांतील युवकांना त्या मुळातच मिळाल्या नाही तरीपण स्पर्धेत टिकून रहा न्याचा प्रयत्न करतो म्हणजे खुपकाही करतो असंच म्हणावं लागेल,तरी पण अश्या परिस्थितीवर मात करून यश संपादन करूनच परत येईल,एवढं मात्र सत्य आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Dec. 21, 2023

PostImage

आमदार साहेब पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन उभे करा 


चामोर्शी मुल मार्गावरील रस्ता इतका खराब झाला आहे की रस्त्यावरून गाडी चालवणे तर कठीण झाले आहे परंतु साधं चालत जाणं येणं करतांना  सुद्धा माणसाला दुरावस्त झालं आहे.जीव धोक्यात घालून अशा रस्त्यांवर मार्गक्रमण चालू असून,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी साहेबांनी याआधी रस्ता दुरुस्ती करण होण्यासाठी भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते,परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.म्हणून पुन्हा भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही,अशी विनंती आमदार साहेबांना करण्यात येत आहे.

 

  • मूल चामोर्शी मार्गाची दुरावस्था 

मुल चामोर्शी मार्ग इतका खराब होऊन गेला आहे की त्या रस्त्याने जाणं-येणं करणं भयंकर कठीण होऊन गेला आहे.जीव धोक्यात घालून प्रवासी या रस्त्याने मार्गक्रमण करतात.वास्तविक या रस्त्यांचे दुरुस्ती करण याआधीच व्हायला पाहिजे होतं परंतु माशी कुठं शिंकली,हे  अजूनही गुलदस्त्यात आहे. मूल चामोर्शी मार्गाचं काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी स्वतः आमदार साहेब भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते आणि त्या घटनेला तीन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही,याचा अर्थ आमदार साहेबांच्या रास्ता रोको आंदोलनाला फारसा यश मिळालेला नाही,हे यावरून सिद्ध होतंय.

 

  • पुन्हा एकदा आंदोलन उभे करा,आमदारांना विनंती 

मुल चामोर्शी मार्ग क्रमांक 353C तसं दोन्ही जिल्ह्यांना म्हणजेच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोडणारा रस्ता असून या रस्त्यांवर जाणं येणं करण्याचा प्रवाश्यांची वर्दळ बऱ्याच प्रमाणात असून,मार्ग जरी खराब असला तरी जीवाची आटापिटा अन जीव धोक्यात घालून नाईलाजाने प्रवाश्यांना प्रवास करणे आवश्यक आहे. इतका वर्दळीचा रस्ता खराब झाला असून किंवा स्वतः या क्षेत्राचे आमदार रास्ता रोको आंदोलन करून मुख्य रस्त्याचे काम सुरू होत नसेल तर सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असेल किंवा आमचे आमदार साहेब कुठे तरी कमी पडत असतील,असा अंदाज वर्तविण्यात काहीच हरकत नाही,हे यावरून सिद्ध होतंय. 

मुल चामोर्शी मार्गाचे काम सुरू झालेच पाहिजे,याकरिता गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून देवराव होळी साहेबांनी पुन्हा रस्त्यासाठी आंदोलन उभे करायला पाहिजे आणि आंदोलन उभे करून सरकारला गर्भित इशारा द्यायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र सरकार सुद्धा तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करेल आणि प्रवाशांना मार्गक्रमण करताना कुठल्याही प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.

आणखी वाचा : आमदार साहेब तुम्हचा मोर्चा तुम्हचे सरकार अन तुम्हचाच पर्चा....

  • सामान्य जनतेचेच हेलपाटे 

मूल चामोर्शी मार्ग हा मुख्य मार्ग असून,इतका खराब होऊन गेला आहे की या रस्त्याने प्रवास करण्याचा सामान्य प्रवाशांना किती हाल अपेष्टा सहन करून प्रवास करावा लागत असेल याचा सोयरसुतक महाराष्ट्र सरकारला नाही किंवा संबंधित प्रशासनालाही नाही.म्हणजे विचार करा की जनतेचे किती हाल होत असतील याचा विचार न केलेला बरा. ज्या जनतेच्या भरोशावर राज्यातील सरकार टिकून आहे आणि तीच जनता अशा जीव घेण्या रस्त्यावर आपलं जीव मुठीत घालून प्रवास करत आहेत,म्हणजे कथा कुणाची अन व्यथा कुणाला अशी म्हणण्याची वेळ मात्र सामान्य जनतेवर आलेली आहे.