रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
05-03-2024
भारतीय शेतकरी हा देशाच्या कणा आहे .शेतकरी देशाचा बळीराजा आहे आणि शेतकरी देशाच्या पोशिंदा आहे.अशी मोठमोठी आभूषणे शेतकऱ्यांच्या नावावर लागून शेतकऱ्यांचे अर्धेअधिक कंबरडे सरकारने आधीच मोडीत काढले,अन आता शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करू अशी पोकळ वलग्ना करून सरकारने शेतकऱ्यांना भिकेच्या प्रवाहात खेचण्याच्या प्रयत्न होताना दिसतो आहे आणि तसेच होणार आहे,क्युकी ये मोदी की गॅरंटी है.
आधी शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावर मुदती आधी भरण केल्यावर बिनव्याजी कर्ज मिळत होते,आता जग बदलत चाललंय त्याचप्रमाणे शेतकऱ्यांविषयी सरकारचे धोरणं देखील बदलत चाललेयं,म्हणून पीक कर्जावर सरकारने सरसकट व्याज वसूल करणे सुरू केलेली आहे कारण हे मोदी के गॅरंटी है.
देशात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही,दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली भरडला जात आहे,शेतीचा व्यवसाय डब्घाईला येण्याच्या मार्गावर आहे,शेती व्यवसाय हा न परवडणारा व्यवसाय म्हणून कित्येक शेतकरी बांधवांनी आपली जीवन यात्रा संपवून मोकळे झाले आहेत.कित्येक शेतकऱ्यांचे संसार आज उघड्यावर पडले आहेत.शेती नापीक होताना दिसतो आहे आणि अशा नापीक होणाऱ्या शेती व्यवसायावर आता शेतकऱ्यांच्या विश्वास बसेनासा झाला आहे आणि याला जबाबदार सरकारचे धोरण आहेत,तरी पण देशाचे पंतप्रधान सांगत फिरत आहेत की ये मोदी की गॅरंटी है.
देशातील शेतकरी सरकारच्या धोरणांविषयी कंटाळून गेलेला आहे आणि शेतकऱ्यांविषयी सरकारकडून काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि सरकारकडे सुद्धा शेतकऱ्यांविषयी ठोस असा कार्यक्रम नाही.निवडणुका आल्या की थातूर-मातूर योजना सांगून मत पदरात पाडून घेणे एवढेच सरकारचा कार्यक्रम असून,निव्वळ भूलथापा आहेत अन एखदा मत पदरात पडलं की जैसे थे अशी परिस्थिती आहे,तरी पण देशाचे पंतप्रधान दम न घेता भोळ्याभाबड्या जनतेला सांगत फिरत आहे की ये मोदी की गॅरंटी है.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे सरकार शेतातील कृषीपंप धारकांवर भारनीयमनाचा बडगा उभारून शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.भारनीयमनामुळे कित्येक शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झालेली असताना,अपुऱ्या विजेमुळे दुबार पीके देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,त्यांच्या मागणीकडे सरकार जाणून-बुजून कानाडोळा करताना दिसतो आहे.म्हणजे शेतकरी मरणाच्या दारात आला तरी सरकारला काहीच सोयर सुतक नाही.इकडे शेतकरी मरतो आहे तरी पण ये मोदी की गॅरंटी है.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments