नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
05-06-2024
काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या.म्हणजे विरोधी पक्षाने चारी मुंड्या चित करीत भाजपाच्या नाकावर लिंबू पिळून दणदणीत विजय मिळविला.म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,तो योग्य की अयोग्य ?
माझ्या मते तो योग्यच आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आज नाही तर कालच राजीनामा द्यायला पाहिजे होता.कारण राज्यात भारतीय जनता पक्ष हा नंबर एकचा पक्ष आहे,परंतु देवेंद्र फडणवीस सारख्या हेकेखोर माणसामुळे पक्षाला वाईट दिवस अनुभवायला मिळत आहेत आणि राज्यातील नेतृत्व जर का फडणवीसाकडे राहिले तर भविष्यात वाटण्याच्या अक्षदा लावायला सुद्धा भाजपा शिल्लक राहणार नाही,म्हणून हा राजीनामा योग्यच आहे.
देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचा राज्यातील नंबर १ एक चा नेता.बुद्धीने हुशार आहे, चाणाक्ष आहे याबद्दल दुमत नाही परंतु त्यांच्या अंगी कूटनीती ठासून भरलेली आहे.सुळीचे राजकारण करण्यात अग्रेसर आहे आणि ज्या ओबीसी बांधवांच्या भरोशावर पक्ष मोठा झालेला आहे त्याच ओबीसी नेत्यांची कदर करीत नाही.म्हणून पक्षाला मरगडीचे दिवस आलेले आहेत,म्हणून हा राजीनामा योग्यच आहे.
देवेंद्र फडणवीसांन कडे जेव्हापासून पक्षाने जबाबदारी दिली त्या दिवसापासून तर आजपर्यंत पक्षाला नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणजे पक्षाला वाईट दिवसांचा सामना करावा लागतो आहे,म्हणून राज्याची जबाबदारी दुसऱ्या वजनदार माणसाकडे सोपवावी जेणेकरून पक्षाला सुखाचे दिवस येतील आणि त्यासाठी हा राजीनामा योग्यच आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments