ProfileImage
93

Post

0

Followers

1

Following

PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024

PostImage

१३० अभियंता संवर्गातील अन्यायग्रस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा शासन परिपत्रकानुसार मागणी पूर्ण न झाल्याने पुकारला असहकार आंदोलन व लेखणी बंद बेमुदत आंदोलन.


 

      १३० अभियंता संवर्गातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मागण्यावर कार्यवाही न झाल्याने असहकार व लेखणी बंद बेमुदत आंदोलनाला बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला.- मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली     

 

 

गडचिरोली/ दिनांक,06 :- गडचिरोली जिल्ह्यातील अभियंता संवर्गातील मागण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील दिड वर्षांपासून अवगत करून सुद्धा हेतुपुरस्सर दुर्लक्ष व या संवर्गाची हेळसांड होत आहे. सेवा विषयक मागण्यांवर वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न होणे हि बाब अतिशय असंवेदनशील व अमानवीय आहे.     संदर्भ क्रं 14 मध्ये नमूद मागण्यांवर मा.अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिनांक 21/08/2024 रोजी संघटनेचे पदाधिकार्यांची बैठक घेतली ‌. परंतु सभेत आमच्या मागण्यांवर कोणताही सकारात्मक दृष्टिकोन दिसुन आला नाही.निवेदनातील मागण्या सदस्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा व रास्त आहेत. परंतु आपले प्रशासन एकतर्फी विचार करून शासन निर्णयाला बगल देऊन अभियंता संवर्गाची दिशाभूल करीत असल्याची माहिती दिली.                                                    जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाला अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया, चंद्रपूर येथील जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची शासन परिपत्रकानुसार लाभ दिलेले आहेत तसेच सेंट्रलच्या पाटबंधारे विभागाने तेथील अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लाभ दिलेले आहे या सर्वांचे सभेत दाखले दिल्यानंतरही सभेतील चर्चैनंतर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे दिनांक 04/09/2024 पासून असहकार आंदोलन व लेखणी बंद बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे. या संबंधीत आंदोलनाला बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी 06/09/2024 ला भेट देऊन अभियंता संवर्गाच्या मागण्या रास्त असुन गोंदिया, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेले आहे . आणि शासन परिपत्रकानुसार लाभ देणे आहे असे चर्चेत व त्यांच्या कडे असलेल्या कागदपत्रावरुन दिसुन येते. आणि खरोखरंच या 130 अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. तरी जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची पूर्तता करण्याची बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी केली. यावेळी मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी गडचिरोली, मा. मंदीप भाऊ गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली,  मा.नरेश महाडोळे, जेष्ठ पदाधिकारी, सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली,  तसेच जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इंजिन. के एस. ढवळे, जिल्हा सचिव इंजि. पी.बी.झापे , कार्याध्यक्ष इंजि. इ.वाय. सिडाम, जिल्हा उपाध्यक्ष इंजि. एम.टी.रामटेके, इंजि. एस.एम. दुर्गे, इंजि. के. आर. सलामे, कोषाध्यक्ष इंजि. बी. व्ही. शेन्डे, इंजि. जी.के शिरपुरकर, इंजि. ए.एम. अगळे, इंजि. एम.पी.कावळे, इत्यादी 50 ते 60. अभियंता संवर्गाची आंदोलनात सहभागी होते.              1) एक स्तर योजने अंतर्गत कनिष्ठ अभियंता यांना उप अभियंता पदाचे वेतन देण्यात यावे. २) आज घडीला फक्त बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे प्रवास देयके रु. 57.00 लक्ष प्रलंबित आहेत. सदर प्रवास देयकाची प्रतिपुर्ती वेळिच होणे गरजेचे आहे. जो पर्यंत प्रलंबित प्रवास देयकाची प्रतिपुर्ती होत नाही.तो पर्यंत कोणीही सदस्य स्वतः चे वाहनाने दौरा करणार नाहीत. कार्यालयाकडून वाहन किंवा आग्रिम देण्यात आल्यास बांधकामावर दौरा करण्यात येईल. 3) बांधकामात अनियमितता झाल्यास फक्त कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील सर्व जसे कंत्राटदार, उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना सम प्रमाणात जबाबदार धरण्यात यावे. 4) कनिष्ठ अभियंता यांनी झालेल्या बांधकामांचे देयक सादर केल्यानंतर उप विभाग स्तरावर उप अभियंता यांची 100 टक्के व वरिष्ठ सहाय्यक यांचे कडून गणीतीय तपासणी होवुन, संबंधित विभागास सादर करण्यात येतात, त्यानंतर विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर उप विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर वित्त व लेखा विभागात पुनश्च लेखा व वित्त विषयक तपासणी करून भुगतान केल्या जाते. यानंतरही लेखा आक्षेप निकाली काढण्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करावी. यापुढे या कामांकरिता कनिष्ठ अभियंते सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे नाहक मानसिक त्रास देवु नये. 5) जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व जिल्हा परिषदेकडे लहान परंतु विखुरलेली स्वरुपाची कामे असल्याने प्रस्तावित बांधकामांचे अंदाज पत्रक तयार करणे, वारंवार भेटी देवून कामावर नियंत्रण ठेवणे, कामे करवून घेणे झालेल्या बांधकामांचे मापे घेणे/नोंदविणे, देयक तयार करणे इ काम करण्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावे लागते. शासनाने या सर्व कामांकरिता जिल्हा परिषदेला संगणीकृत प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रणालीचा लागु करण्यास कळविलेले आहे. सर्व विभागांना पि.एम‌.एस. प्रणाली तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 6) पदवी/पदविका, अर्हता धारक कनिष्ठ अभियंता यांना 3/5 वर्षे सेवेनंतर सहाय्यक/ शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. तसेच अर्हतारहित कनिष्ठ अभियंता 7/10 वर्षे सेवेनंतर शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. 7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना घरकुलाचे कामातुन मुक्त करावे. इत्यादी मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024

PostImage

मुजोच्या गटाला दिलेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करा कारवाई न झाल्यास प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा - सैनिक समाज पार्टीची मुख्यमंत्र्यांना निवेदन.


 

 

     

   

      गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४:-   येथील प्रतिष्ठित, लाचार  होऊन  पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला  विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे  प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे,  विभागीय  युवा अध्यक्ष  निरज कांबळे ,  महिला प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पाटील ,  महासचिव ईश्वर मोरे , कार्याध्यक्ष एच.बी उराडे ,  गडचिरोली विधानसभा प्रमुख पुरुषोत्तम सलामे, यांनी मुख्यमंत्री ,  उपमुख्यमंत्री , जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे . .
  या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुकुंद जोशी यांनी.... स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून SNCU अंतर्गत २०१२ ते २०१८  मध्ये  जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यस्त्रोतांने  कर्मचारी पुरवठा करण्याचे काम केलेले आहे.  तसेच गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात  २०१९ पासून २०२४  पर्यंत काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ, ईएसआयसी आणि करारानुसार बॅंक खात्यात पैसे जमा केले नाही.   नियमानुसार ई टेंडर प्रक्रिया करणे आवश्यक होते . परंतु केवळ कोटेशनवर  लाखो रुपयांचे कंत्राट देण्याचे काम संबंधित प्रशासकिय अधिकारी आणि  लिपीक  यांनी केले आले.   संबंधित व्यक्तीला धोबीचेही कंत्राट  विना टेंडर दिले आहे  . प्रत्यक्षात काम न करता  जिल्हा  सामान्य रुग्णालयातील  तसेच महिला व बाल रुग्णालयातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या  डोळ्यात धुळ झोकून स्वताच्या स्वार्थासाठी लाखो रुपयांची उचल करून  शासनाला  लाखो रुपयांचा चुना लावला आहे .  विना टेंडर सतत काम  देणाऱ्या   प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपीकावर  उचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य संचालक, आरोग्य सचिव ,  जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी,  उपसंचालक आरोग्य सेवा संचालनालय नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे केली आहे. अशी माहिती गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024

PostImage

उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर


उप मुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्यात

 

 

गडचिरोली / दि.5: उप मुख्यमंत्री अजित पवार 06 सप्टेंबर 2024 रोजी  गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरी येथे आगमन. सकाळी 11.15 वा. राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम. सकाळी 11.45 वा. सावरकर चौक, आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. वन विभागाचे मैदान, आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा- शेतकरी व लाडक्या बहिणींशी संवाद. दुपारी 2.15 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. दुपारी 3.20 वाजता नागपूरकडे प्रयाण.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024

PostImage

जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांसाठी मंजूर निधी तत्परतेने खर्च करण्याचे निर्देश - जिल्हाधिकारी संजय दैने



          जिल्हा नियोजनच्या खर्चाचा आढावाा.
100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना.

 

     

      गडचिरोली/ दि.5: जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने विकास कामांसाठी मंजूर केलेला निधी तत्परतेने खर्च करावा तसेच दुर्गम भागात विजेची समस्या निकाली काढण्यासाठी विद्युत विभागाने जिल्हा नियोजनच्या निधीतून किमान 100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन अंतर्गत 2023-24 च्या खर्चाचा व 2024-25 च्या विकास कामांचा आढावा श्री दैने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय सचीव विद्याधर महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी दैने यांनी पुढे सांगितले की गडचिरोली हा जंगलव्याप्त आणि दुर्गम भाग असल्याने येथे विजपुरवठाच्या अनेक समस्या आहेत. वीज उपलब्ध करण्यासाठी वीद्युत निर्मिती संच उभारणे, दुर्गम भागात दुरवर वीजपुरवठ्याची लाईन टाकणे, बांधकाम करणे, वनक्षेत्राकरिता परवानग्या व इतर अडचणी सोडवणे, त्याची देखभाल दुरूस्तीसाठी कायम मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे, सार्वजनिक वीज वापरासाठी रकमेची तजवीज करणे या सर्व बाबींवर सौर विद्युत यंत्रणा हा सर्वोत्तम पर्याय असून त्याच्या वापरारतून ज्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहचली नाही किंवा वीजपूरठ्यासाठी नेहमीच समस्या उदभवतात त्या सोडवण्यासाठी सौर यंत्रणा टप्प्याटप्प्यात बसवून दुर्गम भागातील वीजपुरवठ्याचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 
पालकमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री यांची सदैव आग्रही भूमिका असल्याचे त्यासाठी पालकमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधांचे निर्माण करणे, प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही कॅमेरे लावणे, टेक्नोसेवी व डिजिटल शाळा तयार करणे, शालेय क्रिडांगणाचा विकास करणे, कौशल्य विकास विभागाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना सक्षम करणे, जिल्ह्यात पर्यटनला चालना देण्यासाठी वन विभागाने विश्रामगृह बांधून पर्यटकांच्या राहण्याची सोय करणे आदी सूचना दिल्या. एटापल्ली वनविभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन रस्ते बांधकामासंबंधी तक्रारी न करता नागरिकांची सोय लक्षात घेवून समोपचाराने मार्ग काढण्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नरसिंहपल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत बांधकामाची आवश्यकता असल्याचे सांगून निवासस्थानाऐवजी दवाखाना बांधण्याकरिता प्राधाण्याने निधी वाढवून देण्याची विनंती केली.
    यावेळी कृषी, आरोग्य, वन, जलसंधारण, शिक्षण, नगरविकास, महिला व बालकल्याण, आदी विविध यंत्रणेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत 340 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा सर्व निधी 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. तर 2024-25 साठी 406 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून 135 कोटी 32 लाख रुपये निधी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध झाल्याचे व त्यातील 54 कोटी 75 लाख निधी 31 ऑगस्टपर्यंत यंत्रणांना वितरीत केला असल्याचे आणि त्यापैकी 19 कोटी 66 लाख रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी सादर केली. 
    बैठकीला जिल्ह्यातील सर्व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024

PostImage

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधुन अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती - डॉ आयुषि सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली


 

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधून अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती

 

 

      गडचिरोली/दिनांक,5: जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अतर्गत सन २०२३ मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण २५१ उमेदवारांचा अंतिम जेष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती. या कार्यालयाचे पत्र दिनांक २२ ऑगस्ट २०२४ राजा प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यतच्या अनुकंपाधारक उमेदवारांचे दस्ताऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार याव्दारे आवाहन करण्यात येते की. दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. तरी प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांसह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे. 
प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येत असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला / भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024

PostImage

दिल्ली राष्ट्रपती भवनात गडचिरोली, एटापल्ली तालुक्यातील मा. मंतैया बेडके, शिक्षकांना रजत पदक व 50 हजार रोख देऊन राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.


 

 

        दिल्ली/06:- गडचिरोली आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जाजावंडी गावातील  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली येथे गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला.  श्री बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगाची चित्रफीत.

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.

 


PostImage

P10NEWS

Sept. 4, 2024

PostImage

पोस्टे अहेरी पोलिसांनी देशी व विदेशी दारूसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.


   
                                                             


 

  गडचिरोली/ दिनांक, 03 :-  गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये व पोस्टे हद्दीत अवैधरित्या चालणा­या धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 02/09/2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली तालुका अहेरी येथील आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवड्र्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण 9,35,500/- (अक्षरी नऊ लाख पसतीस हजार पाचशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने, पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादीवरुन पाहिजे असलेले आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम, वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट, वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार, वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तालुका अहेरी, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, पोहवा/1850 निलकंठ पेंदाम, नापोअं/5337 हेमराज वाघाडे, पोअं/5373 शंकर दहीफळे, मपोअं/8064 राणी कुसनाके, चापोहवा/2796 दादाराव सिडाम यांनी पार पाडली.


PostImage

P10NEWS

Sept. 4, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन.


 

 

 

             गडचिरोली दि.३: जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज व निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी तळमजल्यावर दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी संजय दैने यांनी  दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून सदर कक्ष  स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या लिफ्ट मशीनचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होईपर्यंत दिव्यांग अभ्यागत कक्ष तळमजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या समोरील कक्षात स्थापन करण्यात आला असून या कक्षाचे नोडल अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार अमोल गव्हारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

 

 

 


PostImage

P10NEWS

Sept. 3, 2024

PostImage

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती करिता अल्पसंख्याक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित. P10NEWS


 

       सन 2024-2025 परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 

        गडचिरोली/ दि.02: अल्पसंख्यांक विकास विभाग अंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२०२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेच्या अटी व शर्ती- विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदयातील व महाराष्ट्र राज्याया रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. पदव्युत्तर पदवीसाठी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत २ वर्षापेक्षा कमी नसावा. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल. एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटूंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतीम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटूंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा, परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्या करीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बांधकामे) कार्यासनामार्फत दि.३०.१०.२०२३ रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि.९.११.२०२३ रोजी शासन शुध्दीपत्रक निर्गमित केलेले आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांस पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२३.११.२०२३ मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन पुरकपत्र क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२०.६.२०२४मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन निर्णय क्र.सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दि.२५.७.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील. अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिराती प्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील. सदरील वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. ०६/०९/२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यास त्याबाबत माहिती देण्यात येईल. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.
योजनेतील लाभाचे स्वरुप - परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी Economy Class विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शूल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. तपासून विदयार्थ्याच्या बैंक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल.  विदयार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी USD१५४०० तर युकेसाठी GBP९९०० इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विदयार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तीक खात्यामध्ये जमा केला जाईल.  विद्यार्थ्यास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु.एस. ए. व इतर देशांसाठी (यु.के वगळून) १५०० यु. एस. डॉलर आणि यु.के. साठी १,१०० जी.बी.पी इतका निर्वाह भत्ता/ इतर खर्च/आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 2, 2024

PostImage

पोषण आहारात अभिमानास्पद कामगिरी करा. - महिला बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे



   

          राज्यस्तरीय पोषण माह शुभारंभ.
    नवीन पीढी घडविण्यात अंगणवाडी सेविकांचा महत्वाचा वाटा
    लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे नियमित सुरू राहील

 

           गडचिरोली दि.1 : प्रत्येक बालक हा सुदृढ व्हावा या उद्दिष्टातून गरोदर व स्तनदा मातांपर्यंत योग्य पोषण आहार पोहचूवन अभिमानास्पद कामगिरी करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना केले.
महिला व बाल विकास विभागाच्या पोषण अभियाअंतर्गत राज्यस्तरीय पोषण माह चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त संगिता लोंढे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीतून सुदृढ नवीन पिढी घडविण्यात महत्वाचा वाटा अंगणवाडी सेविकांचा माध्यमातून होत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बाराही महिने नियमितपणे चांगले काम करत असल्याचे सांगतांना कोविड कालावधीत केलेले काम आणि मुख्यमंत्री योजनेत सर्वाधिक अर्ज नोंदणी केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे निरंतर सुरू राहणार असून त्याला कोणतीही मुदत ठरवून दिलेली नाही. अर्ज भरण्यासाठीचा देय भत्ता ऑक्टोबर महिण्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
महिलांचा सन्मान व्हावा म्हणून बालकाच्या नावापुढे प्रथम त्याच्या आईचं नाव मग वडिलांचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय मे-2024 मध्ये देशात सर्वप्रथम महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुपोषणमुक्तीसाठी चांगले उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे विशेष अभिनंदन केले. पोषण माहांमध्ये पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा नंबर आणावा यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नावीन्यपूर्ण काम करण्याचे त्यांनी सांगितले.  दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना खनिकर्म निधीतून सायकल मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी महिलांना सक्षम करणे ही शासनाची भूमिका असून यासाठी विविध क्रांतीकारक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांना मोफत उच्च शिक्षण आदि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ आहार आरोग्यासाठी महत्व आणि फोर्टीफाईड फुड योजनेबाबत त्यांनी माहिती दिली.
आयुक्त कैलास पगारे यांनीही सुपोषीत बालक संकल्पनेवर शासनाच्या योजनांची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून पोषण आहार योजना व कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी विविध योजनेंतर्गत लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.
*नवेगाव अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन*
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नवेगाव अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. इतकी सुसज्ज इमारत राज्यात प्रथमच पाहत असल्याचे सांगून त्यांनी अंगणवाडी इमारतीचे कौतुक केले.


PostImage

P10NEWS

Aug. 31, 2024

PostImage

NAXAL NEWS:- एका जहाल माओवाद्यांने केले गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण.



                                                                        
                


.    शासनाने जाहिर केले होते एकुण 06 लाख रूपयांचे बक्षिस.

 

 

   

        गडचिरोली/ 30:- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 673 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम, एरिया कमिटी सदस्य, टेकनिकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरो, वय 42 वर्ष, रा. कोसमी नं. - 1 ता. धानोरा, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

1)    केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम
    दलममधील कार्यकाळ

.    सन 2002 ते 2007 पर्यंत टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत. 
.    2007 ते 2012 टेकनिकल टिम नॉर्थ गडचिरोली डिव्हीजन मध्ये कार्यरत.
.    2012 ते 2020 पर्यंत प्लाटुन 15 (टिपागड एरिया) येथे कार्यरत.
.       2020 मध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली तेव्हापासुन आतापर्यंत 
   टेकनिकल टिम-वेस्ट सब झोनल ब्युरो येथे कार्यरत.  
 
    कार्यकाळात केलेले गुन्हे

    चकमक- 18 
.    सन-2004 मध्ये मौजा मानेवारा व मौजा बंदुर अशा दोन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. 
.    सन -2014 मध्ये मौजा बोटेझरी जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता
.    सन -2016 मध्ये मौजा दराची जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
.    सन-2019 मध्ये मौजा गांगीन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
.    सन-2020 मध्ये मौजा किसनेली जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
.    सन-2021 मध्ये मौजा कोडुर (माड एरीया) (छ. ग.)जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
    जाळपोळ -02, खुन:-08, ईतर-06 एकुण-34

 


    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

    गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे. 
    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. 
    वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
    वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
    गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

 

    शासनाने जाहिर केलेले बक्षिस. 


    महाराष्ट्र शासनाने केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याचेवर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

    आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

    आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 25 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. जसवीर ंिसंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी पोमके सावरगाव यांनी ही कामगिरी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

P10NEWS

Aug. 29, 2024

PostImage

स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर घर झडती दरम्यान आरोपींकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केले.


 

           

           एक लोखंडी धारदार तलवार जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने गोपनीय सापळा कारवाई करत आरोपीकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केले

 

    चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक  28/08/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने  पोलीस स्टेशन रामनगर अपराधी क्र.   834/24 कलम 4 ,25 भा.ह.का. चे गुन्ह्यात गोपिनीय माहिती वरुन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती मध्ये एक लोखंडी धारदार व टोकदार तलवार जप्त केले. 


आरोपीचे नाव राहुल उर्फ अजय गिरिधर मादणकर वय 22 रा. राजीव गांधी वार्ड, रयतवारी ,चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर यांच्या येथे  एक नग लोखंडी धारदार व टोकदार तलवार कि. 500/- रू  वर नमूद ताब्यातील  आरोपीस व मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामनगर चे ताब्यात देण्यात आले. कारवाई   पोउपनि. विनोद भूरले , नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, प्रफुल घारघाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर

 


PostImage

P10NEWS

Aug. 27, 2024

PostImage

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे* -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन


 

   

 

      मुंबई, दि.२६ : आदिवासी बांधवांना  मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केले.

 आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनविणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे या विषयाबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवन येथे बैठक झाली.

या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे,आदिवासी विकास वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारुड, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे, पद्मश्री पोपटराव पवार, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, राज्यात आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. या गावांमध्ये रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. ही आदर्श गावे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्याबरोबरच आदिवासी बांधवांच्या सबलीकरणाबरोबरच आत्मविश्वास वाढवताना मानक म्हणून काम करतील. आदिवासी बांधवांच्या  सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

     आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्तम शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विद्यार्थ्यांसाठी 'के जी टू पी जी' पर्यंतचे उत्तम शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा देऊन आदिवासी विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत. आदिवासी बांधवात शाश्वत शेती व व्यावसायिक प्रशिक्षण याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी. यासाठी विविध विभागाचे सचिव आणि सामाजिक संस्थांचे  सहकार्य मोलाचे असणार आहे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

    दरम्यान 'प्रधानमंत्री जनमन योजने'च्या राज्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतला. यासोबतच आदिवासी बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता यावा या बांधवांकडे ओळख दर्शविणारे कागदपत्रे वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी दिले.

 


PostImage

P10NEWS

Aug. 27, 2024

PostImage

बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीकरिता बालकांनो, संकटकाळात टोलफ्री क्रमांक 1098 ची मदत घ्या.


 

    


          गडचिरोली/ दि.26: आपल्या आजुबाजुला बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत मदत कुठुन मिळवून देता येईल, याकरिता कोठे संपर्क करावा, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशा संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरीता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत/ संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईनसेवा 1098 संपुर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. ही हेल्पलाईन सेवा दररोज २४ तास उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर दूरध्वनीद्वारे गरजू बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाद्वारे करण्यात आले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 25, 2024

PostImage

NAXAL NEWS : कापेवंचा येथील निरपराध इसमाच्या खुनात पाहिजे असलेल्या  एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ यांनी केली अटक.  


 

   

    गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 89 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.  
   

महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस.

 

       

       गडचिरोली/२१:- गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या व मौजा कापेवंचा ता. अहेरी येथील निरपराध इसम नामे रामजी आत्राम याचे खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 20/08/2024 रोजी अटक केली. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 89 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.  
सविस्तर वृत्त असे आहे की, काल दि.20/08/2024 रोजी उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा  जंगल परिसरामध्ये उप-पोस्टे दामरंचा पोलीस पथक व सीआरपीएफ जी-9 बटा. चे जवान माओवाद विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळुन आल्याने पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांनंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव प्रमोद मधुकर कोडापे, वय 37 वर्षे, रा. भंगारामपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मागील वर्षी दि. 24/11/2023 रोजी मौजा कापेवंचा येथील इसम नामे रामजी आत्राम रा. कापेवंचा ता. अहेरी जि. गडचिरोली याचा माओवादयांकडुन खुन करण्यात आला होता. त्यावरुन उप-पोस्टे राजाराम खां. येथे दाखल अप. क्र. 411/2023 कलम 302, 120(ब), 147, 148, 149, भादवि, सह कलम 3/27 भाहका मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास प्रभारी अधिकारी उप-पोस्टे राजाराम खां. यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.


अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती
    
     नामे प्रमोद मधुकर कोडापे

-    दलममधील कार्यकाळ

.    सन 2017 पासून जनमिलिशीया सदस्य म्हणुन काम करीत होता.
.    सन 2017 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, इतर साहित्य पुरविणे सेंट्री ड¬ुटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.

-    कार्यकाळात केलेले गुन्हे 

-    खुन – 01

-    मौजा कापेवंचा येथील रामजी आत्राम नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

-    शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

-    महाराष्ट्र शासनाने प्रमोद मधुकर कोडापे याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, कमांण्डट जी-09 बटा. सिआरपीएफ श्री. शंभु कुमार,. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. शशिकांत दासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी- 09 बटा. सिआरपीएफ श्री. अविनाश सोनी, प्रभारी अधिकारी उप-पोस्टे दामरंचा पोउपनि गणेश शिंदे, प्रभारी अधिकारी राजाराम खां. पोउपनि सचिन चौधरी व अंमलदार तसेच सिआरपीएफच्या जवानांनी पार पाडली.  तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

 


PostImage

P10NEWS

Aug. 24, 2024

PostImage

चकमकीतील मृतांच्या नातेवाईकांनी सुनावणीस उपस्थित रहावे.- मा. आदित्य जिवने उपविभागीय दंडाधिकारी एट्टापल्ली.


 

         

          गडचिरोली/ दि.22: पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबीया) अंतर्गत मौजा हिकेर जंगल परिसरात दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी झालेल्या पोलीस - नक्षल चकमकी दरम्यान एक पुरुष मृतदेह सापडला होता. घटनेतील मृत व्यक्तीच्या मृत्युच्या कारणांची खात्री करणे व त्यासोबत मृतकाचे नावतेवाईक यांचे आक्षेप/हरकती अथवा त्यांच्या बाजु मांडण्यास संधी देण्याकरीता सदर प्रकरणात उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली योचेकडे चौकशी सुरु आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी सुनावणीस उपस्थित रहावे अथवा त्यांचे काही आक्षेप नाही असे गृहीत धरुन प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपविभागीय दंडाधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.

 


PostImage

P10NEWS

Aug. 24, 2024

PostImage

रोजगार हमी योजनेतून २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिन रोजगार निर्मिती -जिल्हाधिकारी संजय दैने


 
      मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण
     १०९ अमृत सरोवर पुनरूज्जीवीत

 

       गडचिरोली दि. २४ :  जिल्ह्यात चालु आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली आहे. वित्तीय वर्ष 2024 - 2025 साठी 1 लक्ष 32 हजार नोंदणीकृत मजुरांकरिता 28 लक्ष14 हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यातुलनेत ९०.६९ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतरावरही नियंत्रण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे.
    रोजगार हमी योजनेतून 70 कोटी 92 लक्ष 51 हजार रुपये मजुरीचे वाटप बँक व पोष्टखात्यातून करण्यात आले आहे.एकूण रोजगार निर्मितीतून 8.96 टक्के अनुसुचित जमाती आणी 37.01टक्के  अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे तर महीलांकरीता 48.60 टक्के मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे. एकूण झालेल्या कामांपैकी 30.62 टक्के इतका खर्च कृषि व कृष‍ि आधारीत कामावर करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीचे स्वरुप पाहता आगामी कालावधीत महाराष्ट्र गा्रमीण रोजगार हमी योजनेवर मजुरांचे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गृहित धरुन त्यानुसार वार्षीक नियोजन करण्यात आलेले आहे. अकुशल हातांना कामे देण्याबरोबरच कायम स्वरुपी मत्ता निर्मीतीचे देखील लक्ष ठेवण्यात आलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त 75 अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिलेले होते. गडचिरोली जिल्ह्याने 109 अमृत सरोवर पुनरुज्जिवनाचे काम पुर्ण केलेले आहे. जिल्ह्याने पुर्ण झालेल्या अमृत सरोवर स्थळी 1 मे, 2024 व 15 ऑगष्ट, 2024 रोजी विविध कार्यक्रम राबविण्यासह ध्वजारोहण करण्यात आले. 21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस सुध्दा अमृत सरोवरांवर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक अमृत सरोवर टिकाऊ व दिर्घकालीन संपत्ती निर्मीतीचे मानाचे प्रतिक मानल्या जाईल. प्रत्येक अमृत सरोवर हे परीपक्व व अनंतकाळ टिकणारे असल्यामुळे भविष्यात पाणी सिंचन, मत्स्यपालन, जलपर्यटन आणि इतर कामांसाठी वापरुन उदर निर्वाहाचे साधन असेल त्या परीसरातील सामाजिक सम्मेलन बिंदू म्हणुनही आदर्शाचे ठिकाण असेल.
जिल्ह्यात "मेरी मिट्टी मेरा देश" उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त देशी झाडांची लागवड करण्यासह शिलाफलक तयार करुन पंचप्रण शपथ घेण्यात आली. "एक पेड माँ के नाम" अभियान सुध्दा जिल्ह्यात जनसहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी कळविले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 22, 2024

PostImage

MUKHYAMANTRI YOJANA : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज 46 हजार 261 अर्ज मंजूर, मंजुरीत गडचिरोली राज्यात आघाडीवर


 

   

       मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज मंजुरीत गडचिरोली राज्यात आघाडीवर
46 हजार 261 अर्ज मंजूर

 

           गडचिरोली दि. 21 : मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत 46 हजार 261 अर्ज मंजूर करून गडचिरोली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा (53 हजार) आहे. 
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 46 हजार 261 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यात गडचिरोली तालुक्यात 2736, मुलचेरा-2605, आरमोरी-4301, धानोरा-2075, भामरागड-1546, एटापल्ली-4261, चामोर्शी-6445, देसाईगंज-6146, अहेरी-3274, सिरोंचा-8857, कुरखेडा-2421, कोरची-1594 अर्ज मंजूर करण्यात आली आहे.
दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे.
योजनेचे स्वरुप: ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. या योजनेकरिता राज्य शासनातर्फे १०० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपयांच्या लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसें राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष: ज्या नागरिकांची ३१ डिसेंबर २०२३ अखेर वयाची ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधारकार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तऐवजही ग्राह्य धरण्यात येणार येईल.
लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करावे. निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असणार आहे. अर्जदारांने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे आदीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे २ छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे.
६५ वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. चौक या पत्त्यावर सादर करावे, तसेच तालुका स्तरावर पंचायत समिती मध्येही अर्ज करता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे. 


PostImage

P10NEWS

Aug. 22, 2024

PostImage

बहुजन समाज पार्टीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहन कुमारी मायावती जी यांच्या आदेशानुसार 21 ऑगस्टला 2024  संपूर्ण "गडचिरोली जिल्हा बंद" करून महामहीम राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन दिले.


 

       बहुजन समाज पार्टीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहन कुमारी मायावती जी यांच्या आदेशानुसार 21 ऑगस्टला 2024  संपूर्ण "भारत बंद" च्या हाकेला साथ देण्यासाठी गडचिरोली जिल्हा कडकडीत बंद केला.

      एसी एसटी समाजाने एकत्रित गडचिरोली जिल्हा बंद करून प्रस्थापित सरकारला येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे दाखवून दिले. अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवुन एकजुटीची ताकद दाखवणार.

 

      गडचिरोली/21:- एसी एसटी समाजाच्या आरक्षणात उपवर्गीकरण व क्रिमीलेयर लागु करण्याचे षडयंत्र सुप्रीम कोर्टाने केला त्याचा विरोधात बहुजन समाज पार्टीने कडकडीत बंद करून आपला विरोध करुन न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केले. भारत सरकारने 9 सुची मध्ये संसदेत ठराव पारित करून एसी एसटी च्या आरक्षणाला सुरक्षित करण्याची मागणी व एसी एसटी समाजाच्या आरक्षणात उपवर्गीकरण व क्रिमीलेयर लागु करु नये असे निवेदन महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत देण्यात आले. यापूर्वी  एससी एसटी आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात भारत बंद . गडचिरोली - एससी. एसटी आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात वतीने गडचिरोली शहर कडकडीत बंद पाडण्यात आला. सकाळी ९ वाजता पासुन शहरातील सर्व दुकाने , शाळा महाविद्यालय
 बंद पाळण्यात आल्यानंतर गांधी चौकात आदिवासी समाजाचे नेते माधव गावढ यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली, यांनी बहन कुमारी मायावती जी यांच्या "भारत बंद" ला जिल्ह्यातील आदिवासी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  मा मंदीप गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, यांनी उपवर्गीकरण व क्रिमीलेयर यावर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाची मागणी नसतानासुद्धा आदिवासी समाजाची उपवर्गीकरण व क्रिमीलेयर का लागु करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मा. रमेश मडावी प्रदेश सचिव बसपा गडचिरोली, यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप घेतला व सविस्तर भारत बंद विषयी माहिती दिली. प्रा. मुनिश्वर बोरकर ' एडव्होकेट राम मेश्राम , माजी आमदार डॉ. नामदेव उसेडी,प्रा ' भाष्कर मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली भोजराज कानेकर विलास कोडाप, यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली. यात ॲड . राम मेश्राम म्हणाले की ' आमचा लढा हा राजकीय नसुन सामाजीक आहे. समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे त्यासाठी राजकीय बाजु दुर ठेवून s C / s T सामाजाच्या लोकांनी एकत्र आले पाहीजे. माजी आमदार डॉ. नामदेव  म्हणाले की मी राजकीय पदासाठी भांडत नसुन मला माझ्या समाजाचे हित लक्षात घेऊन संविधानाचे उल्लंघन होवू नये बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कठीबद्ध आहे असे त्यांनी म्हटले याप्रसंगी माधवराव गावढ यांनी मार्गदर्शनात वर्गवारी करणे हि असंविधानिक आहे. जाती जाती मधे भेद निर्माण करून फोडा आणि राज्य करा हि रणनितीआहे. परंतु हि रणनिती एससी एसटी समाजाने ओळखून जागृत झाले पाहिजे याप्रसंगी विलास कोडाप संदानद ताराम प्रा. भाष्कर मेश्राम गुलाबराव मडावी, रमेश मडावी ,हंसराज उंदिरवाडे तुलाराम राऊत गौतम मेश्राम प्रशांत मडावी मारोती भैसारे मंदिप गोरडवार बसपा विधानसभा अध्यक्ष, धर्मानंद मेश्राम , ज्ञानेश्वर मुजुमकर तुळसिराम सहारे मालती पुडो मनोहर पोटावी आदिने मनोगत व्यक्त केले . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन भोजराज कानेकर यांनी तर कार्याक्रमाचे आयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यकमास कुसमताई आलाम , मिलिंद बाबोळे, दुष्यांत चांदेकर साहेब बसपा नेते,  सुरेखा बारसागडे सुधिर वालदे प्रेमदास रामटेके जिवन मेश्राम रोशन उके अमर खंडारे ' सुरेश कन्नमवार साईनाथ पुगाटी वनिता पदा, मायाताई मोहुर्ले, वेणुताई खोब्रागडे सुमन क-हाडे, हेमंत रामटेके, कैलास खोब्रागडे, अनिल साखरे, फुलझेले, मारोती वनकर, ज्ञानेश्वर वाडके, दुधे साहेब, इत्यादी बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते, आदि सहीत ग्रामसभा परिसर पोटेगाव बांधवा सहीत बहुसंख कार्यकर्ते आदिवासी व बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Aug. 20, 2024

PostImage

भामरागड घोटाळ्यातील आय.ए.एस.शुभम गुप्ता यांच्यावर " ॲट्रॉसिटी " अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करिता आदिवासी संघटनेची आक्रमक भूमिका.


 

    आय.ए.एस.शुभम गुप्ता यांच्यावर " ॲट्रॉसिटी " अंतर्गत गुन्हा दाखल करा.

 असंवेदनशील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या या प्रयत्नांना हरताळ फासल्या जात आहे.

 

 

गडचिरोली : दुधाळ गाय वाटप घोटाळ्यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता हे दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर गडचिरोलीतील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गुप्ता यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.१९ ऑगस्ट रोजी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यालय परिसरात शुभम गुप्ता यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड येथे २०२१ ते २०२३ या कार्यकाळात झालेल्या दुधाळ गाय वाटप घोटाळ्यात प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता हे दोषी असल्याचे आदिवासी विभागाच्या अपर आयुक्तांनी केलेल्या चौकशीत आढळून आले.त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून या ‘आयएएस’ अधिकाऱ्याच्या कारनाम्यांची प्रशासकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे. 

गडचिरोलीतील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि पोलीस बॉईज असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, मागास आणि आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन शेकडो कोटी रुपये खर्च करीत असते. मात्र, काही असंवेदनशील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या या प्रयत्नांना हरताळ फासल्या जात आहे

.प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी गाय वाटप योजनेमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला. या प्रकरणाची अपर आयुक्तांनी चौकशी केल्यानंतर गुप्ता दोषी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सोबतच या अहवालात लाभार्थी आणि त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. 

गडचिरोलीत कार्यरत राहून कोट्यवधीचा भ्रष्टाचार करणे, आदिवासी समाजातील लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावणे हा सर्व प्रकार गंभीर आहे. सध्या सांगली येथे महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शुभम गुप्ता यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. सोबतच त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

सात दिवसांत मागण्यांचा विचार न झाल्यास आदिवासी संघटनांनी मिळून देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष,कुणाल कोवे,पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष कोरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, उमेश उईके,अक्षय मडावी,आरती कोल्हे,विद्या दुगा,मालती पुडो, बादल मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Aug. 20, 2024

PostImage

मुल तालुक्यातील चिचाळा गावच्या जंगलात एका गुरे राखणाऱ्या इसमाचा वाघाने घेतला बळी.


 

   मुल तालुक्यातील चिचाळा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार.

 

मुल : मुल शहराला लागून असलेल्या जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केला असता गुराखी मूनिम गुरलावर (४५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वाघाचे हल्ले वाढले असल्याने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुल तालुक्यातील चिचाळा येथील रहिवाशी असलेल्या मुनिम गुरलावार हा गुराखी रविवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी २५ शेळ्या घेऊन मुल शहराला लागून असलेल्या जंगलात गेला होता. सायंकाळी २४ शेळ्या घरी परतल्या. मात्र मुनिम व एक शेळी घरी परत आली नाही. त्यामुळे काही अनुचित घटना घडली असावी असा संशय ग्रामस्थांना आला.

याची माहिती संध्याकाळीच वन विभागाला देण्यात आली. दरम्यान संध्याकाळी ३० ते ४० ग्रामस्थ जंगलात गुराखी मुनिम याचा शोध घेण्यासाठी गेले. तिथे ग्रामस्थांना रक्त सांडलेले दिसले. रात्र भरपूर झाली असल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे ग्रामस्थ गावाला परत आले.

त्यानंतर आज सोमवार सकाळी वन विभागाच्या अधिकारी, पथकाने व ग्रामस्थांनी जंगलात जावून बघितले आता कक्ष क्रमांक ७५२ मध्ये गुराखी मुनिम याचा मृतदेह आढळला. दरम्यान गुरख्याच्या मृत्यूने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या भागात मानव वन्य जीव संघर्ष वाढला आहे. तेव्हा वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मृतक गुराखी मुनिम याचे मागे आई, पत्नी, दोन मुल, बहिण व बराच मोठा परिवार आहे. वन विभागाच्या वतीने मृतक मुनिम याचे कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत दिली आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 19, 2024

PostImage

गडचिरोली बहुजन समाज पक्षाने गांधी चौकात कलकत्ता व बिहार बलात्कार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करुन केला जाहीर निषेध.


 

        बहुजन समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात बिहार मुजफ्फरनगरला दलित मासुम मुलगी व पं. बंगालमधील कोलकत्ता येथील ट्रेनि महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली.              

     

       गडचिरोली/19:- बहुजन समाज पार्टी गडचिरोली येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौक येथे भारतातील बिहार राज्यातील मुजफ्फरनगर येथील रुपा कुमारी 14 वर्षीय दलित मासुम मुलीला रात्रो घरातुन उचलून नेवुन सामुहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता मधील ट्रेनी महिला डॉक्टर वय 31 वर्षे ही रात्रो कर्तव्यावर असताना आरोपींनी सामुहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केली. ही देशाला काळीमा फासणारी घटना असुन या दोन्ही घटनेचा बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने इंदिरा गांधी चौकात जाहीर धिक्कार करून जाहीर निषेध केला. या घटनेतील दोन्ही आरोपींना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला निवेदनाद्वारे दिला. यावेळी मा भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली, मा. मंदीप एम गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, मा. गुलाबराव मडावी, मा. सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली, नरेश महाडोळे, पुरुषोत्तमा रामटेके,प्रेमदास रामटेके, लवकुश भैसारे, ज्ञानेश्वर वाडके, सुमन क-हाडे, वेणुताई खोब्रागडे शहर अध्यक्ष बसपा गडचिरोली, आरती कोल्हे, विद्या दुग्गा, मालता पुडो, वनिता पदा, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Aug. 19, 2024

PostImage

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्यावर लादू पाहत आहेत.याविरुद्ध शिर्डी येथे पेन्शन राज्य महाअधिवेशनाचे आयोजन.


     

शिर्डी येथे पेन्शन राज्य महाअधिवेशनाचे आयोजन.

   चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो राज्य शासकीय कर्मचारी सहभागी होणार.

 

सावली : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना २०१५ पासून ०१ नोव्हेंबर २००५  व त्यानंतरच्या सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी म्हणून ०९ वर्ष झाली अविरत कार्य करीत आहेत.या लढ्याला यश म्हणून ०१ नोव्हेंबर २००५ व त्यानंतरच्या सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना मृत्युनंतर ची फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युइटी, रुग्णता पेन्शन व सेवानिवृत्ती नंतरची graduty लागू झाली. पण काही धूर्त लोक एनपीएस सारखीच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्यावर लादू पाहत आहेत.

पण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना १९८२/८४ च्या जुन्या पेन्शन योजनेवर ठाम आहेत.मुजोर शासनास वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पेन्शन राज्य महाअधिवेशन १५ सप्टेंबर २०२४ ला शिर्डी येथे आयोजन केले आहे. या अधिवेशनास जुन्या पेन्शनपासून वंचित १८ लाख कर्मचारी उपस्थित राहून सरकारला जो जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान करू म्हणजेच Vote for OPS चा इशारा देणार आहेत या राज्यअधिवेशनात शासनाने उपस्थित राहून जुनी पेन्शनची मागणी पूर्ण न केल्यास सरकार बदलण्याचा १८ लाख कर्मचारी संकल्प करणार आहेत.

सत्ताधाऱ्यानी १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास या सत्ताधाऱ्याना व्होट फॉर ओपीएस च्या माध्यमातून घरी बसविण्याचा संकल्प कर्मचारी यांना केला आहे. - श्री.विपीन धाबेकर,जिल्हाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर)

1982/84 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी होत असलेल्या शिर्डी येथील पेन्शन राज्य महाअधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार राज्य शासकीय कर्मचारी उपस्थित राहणार. - श्री.लखन साखरे,जिल्हा सचिव (महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर)


PostImage

P10NEWS

Aug. 19, 2024

PostImage

BHARAT BANDH :- बहुजन समाज पक्ष महाराष्ट्राच्या वतीने बहन कुमारी मायावती जी यांच्या आदेशानुसार 21 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात भारत बंदचे आंदोलनाची घोषणा.


एसी एसटी समाजाच्या सर्व सामा. संघटना व महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरवादी राजकीय पक्षांनी या सामाजिक आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

              मुंबई/18:- भारत बंद : महाराष्ट्र बसपा सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विरुद्ध 
आपणा सर्वांना सूचित करण्यात येते की, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय  बहन कु. मायावतीजी यांचे दिशा निर्देशनुसार देशातील, इंजि. रामजी गौतम साहेब राज्यसभा सांसद तथा प्रदेश प्रभारी यांच्या मार्गदर्शनात व ऍड. सुनील डोंगरे साहेब प्रदेश अध्यक्ष यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील बसपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व हितचिंतकांना आवाहन,
🎤आवाहन करण्यात येते की, सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC, ST मध्ये वर्गीकरण व क्रिमीलियर लागू करण्या संदर्भात असंवैधानिक निर्णय दिला आहे. तो रद्द करण्या करिता व आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याकरिता  बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सक्रियपणे सहभागी होत आहे. 
✍️त्या संदर्भात आज सोमवार दि.19 ऑगस्ट ला सायंकाळी नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जाईल. आपण आप-आपल्या जिल्ह्यात झंडे, बॅनर घेऊन भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे. आंदोलन शांततापूर्ण व संविधानिक पद्धतीने करून जिल्हाधिकारी, तहसीलदार ह्यांच्या मार्फत पक्षातर्फे मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठवावे.
👫आप आपल्या जिल्ह्यात बसपाच्या वतीने भारत बंदचे आंदोलन आहे .


PostImage

P10NEWS

Aug. 18, 2024

PostImage

RAILWAY TRACK: लोकसभा निवडणुकीवेळी विमानतळाची घोषणा.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रेल्वेची घोषणा.गडचिरोली ते बचेली(छतिसगड) रेल्वे मार्ग मंजुरी,सुरजागड प्रकल्प व जिल्ह्याच्या विकासाला चालना.    


     

    गडचिरोली ते बचेली(छतिसगड) रेल्वे सर्वेक्षणाला मंजुरी  सुरजागड प्रकल्प व जिल्ह्याच्या विकासाला चालना.

   

   गडचिरोली : मागास भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीसह छत्तीसगड राज्यात रेल्वेचे जाळे विणून या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यात माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केलेल्या मागणीनुसार गडचिरोली ते बचेली (छत्तीसगड) मार्गे विजापूर या नवीन रेल्वेमार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गासह कोरबा ते अंबिकापूर या मार्गाच्या अंतिम सर्व्हेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

गडचिरोली ते बचेली (मार्गे विजापूर) या 490 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी अंतिम सर्व्हेक्षण आणि डीपीआर तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 16.75 कोटी रुपये मंजूर केले असून या मार्गामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मधील सीमावर्ती भागांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढेल. त्यातून या भागातील विकासात्मक कामांना चालना मिळेल, असा विश्वास मा.खा. अशोक नेते यांनी व्यक्त केला.

कोरबा ते अंबिकापूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने छत्तीसगडच्या उत्तरेकडील दोन प्रमुख शहरे, एनर्जी सिटी कोरबा आणि सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अंबिकापूर शहर, तसेच त्याच्या आजुबाजूच्या भागांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. ज्यामुळे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीला चालना मिळेल. गडचिरोली ते बचेली (मार्गे-विजापूर) हा नवीन रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील दुर्गम भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडेल. त्यामुळे या भागांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळेल. यासोबत रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

या दोन्ही प्रकल्पांच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने आता या भागातील सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होणार असून, त्याआधारे पुढील योजना आखण्यात येणार आहेत. प्रादेशिक विकास आणि एकूणच आर्थिक प्रगतीसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.


PostImage

P10NEWS

Aug. 17, 2024

PostImage

GOVERNMENT HOSPITAL GADCHIROLI : गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक पदी आदरणीय डॉ. माधुरी किलनाके मॅडम यांची नियुक्ती


 

   

     गडचिरोली/16:- गडचिरोली जिल्ह्यातील अखेर वादानंतर व भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर डॉ अनिल रुडे यांची हकालपट्टी. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला होता. गडचिरोली जिल्ह्यातील डॉ माधुरी किलनाके यांच्या विषयी जनमानसात चांगली प्रतिमा आहे. आणि अनेक वर्षांपासून त्यांची नियुक्तीची प्रतिक्षा होती. परंतु अखेर गडचिरोली जिल्ह्याच्या  जिल्हा शल्य  चिकित्सक पदी आदरणीय   डॉ. माधुरी किलनाके मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल गडचिरोली जिल्हाभरातुन सर्व नागरिकांकडून हार्दिक शुभेच्छाचे वर्षाव होत आहे. 


PostImage

P10NEWS

Aug. 16, 2024

PostImage

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने आत्मसमर्पित महिला माओवादी अडकली लग्नबंधनात


 

 

.  गडचिरोली/16:-   सर्वसामान्य गडचिरोलीकर तरुणाने घेतला आत्मसमर्पित महिला माओवादीसोबत लग्नगाठ बांधण्याचा धाडसी निर्णय
.    पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडला.

सविस्तर वृत्त असे आहे की, शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर जे माओवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करत असते. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 16/08/2024 रोजी मागील वर्षी आत्मसमर्पित झालेली जहाल महिला माओवादी नामे रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी याचेसोबत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने विवाह संपन्न झाला.

सलग 14 वर्षे माओवाद्यांच्या विविध सशस्त्र माओवादी दलममध्ये कार्यरत राहून एरीया कमिटी मेंबर पदापर्यत पोहचलेली जहाल महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, वय 28 वर्ष रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविल्या जाणा­या योजना व सामाजिक उपक्रमांच्या प्रभावशाली अंमलबजावणीमुळे तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या तीव्र माओवादीविरोधी अभियानांमुळे व हिंसाचाराच्या जिवनाला कंटाळून मागील वर्षी दिनांक 07/10/2023 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. रजनी हिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकुण 11 लाख रुपयंाचे इनाम घोषित होते.

आत्मसमर्पण केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल करुन घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नीशिल असते. गडचिरोली जिल्ह्रातील शेती करुन सर्व सामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी, वय 26 वर्षे, रा. एलाराम, पोस्ट-पेठा (देचलीपेठा), तह. अहेरी जि. गडचिरोली याने व रजनी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याकरिता आज दिनांक 16/08/2024 रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थिती आणि पाठींब्याने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला. सदर विवाह सोहळ्याप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

सदरचा विवाह संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी, नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.


PostImage

P10NEWS

Aug. 16, 2024

PostImage

सुरजगड आयरन माईन्स, जे M/s लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.


 

         विविध इन-हाऊस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना "बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       

गडचिरोली/15:- गडचिरोली जिल्ह्यातील सुरजगड आयरन माईन्स, जे M/s लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित आहेत, येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लॉयड्स मेटल्स आणि M/s थ्रिवेनी अर्थमूवर्स प्रा. लि. चे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री. के. सथी राव यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभाने झाली. श्री. आर. आर. साठपथी, कार्यकारी संचालक (बेनिफिकेशन) यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी युनिट हेड श्री. सुभासिस बोस (उपाध्यक्ष - माईनिंग), श्री. एल. साईकुमार (एव्हीपी - कॉर्पोरेट अफेअर्स) Mr Arun Rawat AVP HR & Admin इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या उत्सवामध्ये कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाचा समारोप आनंदाने पारितोषिक वितरण समारंभाने झाला. विविध इन-हाऊस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच विभागीय स्तरावर ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर’ म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पण, शिस्त आणि उपस्थितीबद्दल सन्मानित करण्यात आले.


PostImage

P10NEWS

Aug. 15, 2024

PostImage

गडचिरोली कंत्राटी तत्वावर नियुक्ती करिता 171 सेवानिवृत्त शिक्षकांना दस्तऐवजासहित जि. प. सभागृहात उपस्थित राहण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश.      


               

     

        गडचिरोली/ 14:- गडचिरोली जिल्ह्यातील पेसा संवर्गातील जिल्हा परिषदांच्या गडचिरोली शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी शासन परिपत्रक 15/ 07/2024 नुसार या कार्यालयास अर्ज सादर केलेल्या पात्र सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देऊन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे उपस्थितीत समुपदेशाने पदस्थापना देण्याचे निश्चित केलेले आहे. तरी आपले पंचायत समितीस अर्ज सादर केलेल्या सोबतच्या यादीतील सेवानिवृत्त शिक्षकांना दिनांक 16/08/2024 रोजी सकाळी 10:00 वाजता विर बाबुराव शेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली येथे न चुकता संपूर्ण मुळ दस्तावेजासहित उपस्थित राहण्यास आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे. तसेच तालुक्या अंतर्गत पेसा क्षेत्रातील शाळांतील माहे जून 2024 अखेर रिक्त पदांचे माहितीसह आपण स्वतः न चुकता उपस्थित राहावे.                             प्रतिनिधी पाठवु नये. 


PostImage

P10NEWS

Aug. 15, 2024

PostImage

गडचिरोली जिले में कुरखेडा तहसील के चिखली गाव के नवयुवक जितेश की हत्या हुई, घटना पे घरवालोंने की CBI चौकशी मांग.



     CRIME MURDER:  गडचिरोली जिले में कुरखेडा तहसील के चिखली गाव के नामे जितेश युवक की हत्या हुई, कुरखेडा तहसील के पोलिस अंमलदार ने घरवालों के तक्रार के बावजुद कोई कारवाई नहीं की गई इसलिए घरवालों CBI द्वारा चौकशी की गयी मांग.                

     

     गडचिरोली/13:-   गडचिरोली जिला आदिवासी  और नक्षलवादी से प्रभावित जिला है, कुरखेडा तहसील अतिदुर्गम भाग है, यहा के पास ही में चिखली गाव में नामे- जितेश भजनदास पगडवार उम्र 28 वर्षे ,  घर में मॉ-बाप और एक बडा भाई, भाभी ऐसा छोटासा परिवार था, भवनदास साहेबदास पगडवार उम्र 54 वर्षे (पिता), पुष्पाबाई भवनदास पगडवार वय 48 वर्षे ,  मिथुन उम्र 31 वर्षे, भाभी निलम उम्र 24 वर्षे, ऐसा छोटासा परिवार था! दिनांक08/08/2024 रोज सुबह को जितेश गाव में घुमकर घर आया, और उसका मोबाईल में कुछ बिघाड होने कारण वो अपने पिताजी से 3000/- रुपये लेकर कुरखेडा के लिये घर से निकला, लेकीन मोबाईल दुरुस्ती नही होने के कारण वो कुरखेडा तहसील से अपने घर को वापस आ गया! फिर वह दोपहर को 2:00 बजे के समय मेरे समक्ष जंगल में नंदु लिल्लारे के साथ रानभाजी सात्या लाने के लिये नंदु के मोटारसायकल से गया! उस वक्त दिनभर में घर को टि. व्ही. देख रहा था, शाम होने को आयी लेकीन जितेश घर नहीं आने के कारण में नंदु लिल्लारे इनके घर में पुछताच करने गया, तो उनके घर में कोई नही था, घर में टाला लगाकर था, फिर में भवनदास पगडवार (पिता) घर में वापस आ गया, मेरा बडा बेटा मिथुन घर में रात 08:00 बजे तक काम व्यस्त था, रात सब घर के सो गये, उसके बाद 09/08/2024 को रात में अंदाजे 01.59 में बडे लडको को गाव के पोलिस पाटील नामे पोर्णिमा सोनटक्के,ने कॉल करके बताया की तुम्हारा भाई जितेश चिखली गाव के वडेगाव रोड पे जखमी अवस्था में पडा है, ऐसा पोलिस पाटील के कहने पर मेरा बडा लडका मुझे जगाकर पोलिस पाटील के घर गया, मिथुन के साथ चाचा लडका कोमल हरिदास बसीना गया, तब मेरा छोटा लडका जितेश शेगाव रस्ते पे चिखली गाव से 60 ते 70 कि. मीटर पे जखमी अवस्था में पडा था, उसके सिर, पिठ और मनके पे धारदार शस्त्र से वार किया गया, उसकी हत्या के आठ दिन पहिले चिखली गाव के अमन्न मुन्ना पठाण, व जितु गुल्लु  पासोरे, ये दोनो मेरे घर आकर मेरे छोटे लडके के ऊपर मोबाईल चोरी का आरोप करके तुम्हे काटकर फेक देंगे ऐसी धमकी देकर चले गये,
 कुरखेडा पोलिस के अंमलदार ने चौकशी करने के बाद हत्यारा अमन्न मुन्ना पठाण के घर से सब्बल, चाकु, टुव्हिलर का शॉकअप राळ, ऐसे धारदार शस्त्र से मेरे लडके पर वार किये गये सभी शस्त्र मिलने के बावजुद सिर्फ एका लोखंडी रॉड दिखाया गया, और वह दोनो आरोपी को बचाने की कोशिश की जा रही है, इसलिये हमारे परिवार की अपील है की इस हत्याकांड का उच्चस्तरीय CBI के द्वारा चौकशी करने की मांग पोलिस प्रशासन और महाराष्ट्र शासन से किया गया !


PostImage

P10NEWS

Aug. 14, 2024

PostImage

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.05 वाजता.जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण


 

     गडचिरोली,/दि.13: गुरूवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेत सकाळी 8.05 वाजता ध्वजारोहण
    जिल्हा परिषद येथे सकाळी 8.05 वाजता प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 9, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा तिरंगा रॅलीने दुमदुमला.


 

     

      गडचिरोली/ दिनांक ९ : हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आज ठिक-ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली. यात शाळकरी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रभक्तीचे नारे देवून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

तिरंगा रॅली कार्यक्रमाचे शहरी भागातील समन्वयन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी तर ग्रामीण भागातील कार्यक्रमाचे समन्वय जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कणसे यांनी केले

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील दोन वर्षापासून राज्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत आहे . यावर्षी देखील राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात  येणार आहेत.  नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची आवाहन जिल्हाधिकारी संजय दैनै व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 9, 2024

PostImage

महसूल पंधरवडानिमित्त कृषी विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.


 

गडचिरोली दि.8 : महसूल पंधरवडा निमित्त कृषी विभागामार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यात 6ऑगस्ट रोजी देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनी कोंढाळा तालुका वडसा, जिल्हा गडचिरोली येथे  महसूल पंधरवडा आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने कृषी विभाग, आत्मा व स्मार्ट  मार्फत  वृक्षारोपण लागवड व वित्तीय सल्ला कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी एकूण 150 फळझाडे लावण्यात आले.
सदर कार्यक्रमात आमदार कृष्णाजी गजबे, सुनील पारधी अध्यक्ष देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनी कोंढाळा यांच्या अध्यक्षतेखाली प्रज्ञा गोळघाटे नोडल अधिकारी विभागीय अमलबजावणी कक्ष स्मार्ट नागपूर,  बसवराज मास्तोळी प्रमुख ,जिल्हा अमलबजावणी कक्ष स्मार्ट गडचिरोली, श्री सर्वेश,  रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर रिजनचे व्यवस्थापक श्री सौरभ, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्टच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे, श्री बलगमवार,श्री डेहनकर, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्री परांजपे, तालुका कृषी अधिकारी श्री खंडारे, कृषी पर्यवेक्षक श्री देशमुख, कृषी सहाय्यक श्री तुळसकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री रहांगडाले, जिल्हा अमलबजावणी कक्ष स्मार्ट गडचिरोली चे अर्थशास्त्रज्ञ श्री शहारे तसेच सलाम किसान कंपनीचे प्रतिनिधी दोन पायलट यांचे प्रमूख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात 70-80 शेतकरी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Aug. 8, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील एका आमदाराचा व राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी बांधकाम अधिकाऱ्यांना बिलाकरिता देतोय दम. करोडोंची काम घेऊन जमवली लाखोची माया. 


गडचिरोली जिल्ह्यातील एका आमदाराचा व राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी बांधकाम अधिकाऱ्यांना बिलाकरिता देतोय दम. करोडोंची काम घेऊन जमवली लाखोची माया. 

   गडचिरोली/08 :- जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दुर्लक्ष.  ग्रामपंचायत, उपविभागीय बांधकाम , बांधकाम विभाग ते वित्त विभाग पर्यंत बिल रजिस्टर, बांधकामांचे इस्टिमेंट, बांधकामांचे ठराव या संपूर्ण फाईल घेऊन जाण्याचे काम विभागातील कर्मचारी व उपअभियंता व इतर अधिकाऱ्यांचा काम असताना सुद्धा विभाग प्रमुख तालुका व ग्रामपंचायत पासुन सर्व फाईली कंत्राटदाराचा हातात देऊन मोकळे होतात. शासकीय नियमांची सरासपणे पायमल्ली होताना दिसत आहे. यामध्ये बांधकामांवरील मिळणाऱ्या टक्केवारी करिता अधिकारी व कर्मचारी कंत्राटदाराना झुकता माप देत असल्याचे निदर्शनास येत आहे. आणि खुलेआम जिल्हा परिषद गडचिरोली येथे शासकीय फाईली खाजगी व्यक्तींच्या हातात दिसत असतात. परंतु कोणताही अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. 

         आणि यामध्ये अधिकाऱ्यांच्या कार्योलयात येऊन राजकीय पक्षांचे पदाधिकारी अधिकाऱ्यांना माझे कामे आहेत. ते मंजुर झाले पाहिजे. बिलाकरिता येऊन दमदाटी देतात आणि अधिकारी सुद्धा मुकाट्याने ऐकुन घेतात. यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने विचार करुन कार्यवाही करण्याची गरज आहे. शासकीय फाईली खाजगी व्यक्तींच्या हातात पण प्रशासन कारवाई का? करित नाही. 


PostImage

P10NEWS

Aug. 7, 2024

PostImage

EDUCATION NEWS :- सरकारी व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठिवर वय व वजनापेक्षा जास्तीचे ओझे. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष. शासन परिपत्रक धुळखात अंमलबजावणी शुन्य. जागे व्हा!                


.                                         

   गडचिरोली/07:-    गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळेतील पहिली व सातवीत शिकणारी विद्यार्थ्यांच्या पाठिवर वयापेक्षा व वजनापेक्षा जास्तीचे ओझं घेऊन शाळेत जात असताना निर्देशनात येत आहे. याकडे संपूर्ण शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. ती चिमुकली मुलं भीती पोटी कितीही दमछाक झाली तरी तक्रार करित नाही. पण त्यांची जनावरासारखं ओझ वाहुन ठकलेली चेहरे सर्व सांगुन जातात आणि घरी गेल्यानंतर आई-वडीलांचा अभ्यासासाठी सतत पाठिमागे लागलेली रि यामुळे मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो आणि त्याला क्षणभरही शाळेत किंवा घरी स्वतंत्र खेळण्याचा क्षण भेटण्याची वाट पाहात राहतो. पण तेही कधी संधी मिळत नसल्यामुळे तो अंतरमनार न्युनगंड ठेवुन मनातल्या मनात कुरघडत असतो. अशा प्रकारे त्या चिमुकल्यांची खूप दमछाक होते. मध्यंतरी शासनाकडून परिपत्रक काढून धडक मोहीम राबविण्यात आली होती. परंतु कालांतराने ती मोहीम बंद झालेली दिसत आहे. परंतु झोपलेल्या शिक्षण विभागाने जागे होऊन त्या चिमुकल्यांच्या मदतीला धावून येईल काय ? 


PostImage

P10NEWS

Aug. 7, 2024

PostImage

HELTH CAMP :- जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे ओकाड फाऊडेंशन व एच पी कॉर्पोरेशन च्या माध्यमातुन भव्य आरोग्य शिबीर संपन्न..


 

 

चंद्रपूर,कोरपना/:-  जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे मा ना श्री हंसराजजी अहिर ओ बि सी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माझी केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार यांच्या पुढाकारातुन ओकाड फाऊडेंशन व एच पी कार्पोरेशन च्या माध्यमातुन जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात करन्यात आले या शिबीराचा लाभ 118 विद्यार्थी,विध्यर्थीनींनी घेतला या विद्यार्थ्याची निशुल्क तपासनी करुण गोळ्या औषधी देवुन उपचार करन्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा मा शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव शेलोकर एस पी ओ,श्री डॉ निखिल शेरकी,श्री रविकुमार बंडीवार औषध निर्माता,श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर,नवले सर,श्री डोहे सर,श्री मडावि सर,सौ मडावी मॅडम,जिवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनसेवा हिच ईश्वर सेवा असून याच माध्यमातुन जनतेची सेवा करन्याची संधी मिळाली हे सौभाग्य मा ना हंसराजजी अहिर यांच्या सहकार्याने आमच्या तालुक्याला फिरते रुग्णालय मिळाले या माध्यमातुन गावागावात, घराघरात पोहचुन गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळत आहे या मुळे गावातील नागरिकांना आपले आरोग्य निशुल्क तपासून,गोळ्या,औषध मिळत आहे या मुळ गोरगरीब जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे मनोगत व्यक्त केले तसेच ईतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विध्यर्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच संचालन शुक्ला सर यांनी केले तर आभार नवले सर यांनी मानले


PostImage

P10NEWS

Aug. 7, 2024

PostImage

पेंशन मेळावा तसेच ई-पीपीओ  कार्यशाळेचे आयोजन - अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्तीवेतन, गडचिरोली


 

गडचिरोली,/दि.05: जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारक तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे करिता दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 12.30 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, गडचिरोली येथे पेंशन मेळावा व ई-पीपीओ बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. संबंधितांनी सदर मेळाव्याला व कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्तीवेतन, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 6, 2024

PostImage

प्रारुप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी होणार प्रसिद्ध . हरकती सादर करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत



  गडचिरोली,/दि.05: दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसऱ्या)अंतर्गत सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहे. यानुसार प्रारुप मतदार यादी दिनांक 06ऑगस्ट 2024 (मंगळवार) रोजी प्रसिद्ध होणार आहे.
    त्यानंतर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी दिनांक 06 ऑगस्ट 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट 2024 असेल. दाखल दावे व हरकती दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजीपर्यत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून निकाली काढल्या जातील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मतदारांनी व सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 5, 2024

PostImage

बहनकुमारी मायावती जी ने सुप्रीम कोर्ट के आरक्षण निर्णय से उपवर्गीकरण से अनुसूचित जाती एवं जनजाती के आरक्षण कैसा खत्म होगा इसपर विस्तार से अपने प्रेस वार्ता में बताया ! - बहनकुमारी मायावती जी बसपा


   

 

        उत्तरप्रदेश/लखनऊ(04) :-  बहनकुमारी मायावती जी ने सुप्रीम कोर्ट के निर्णय से उपवर्गीकरण से अनुसूचित जाती एवं जनजाती के आरक्षण कैसा खत्म होगा इसपर विस्तार से अपने प्रेस वार्ता में बताया! बहनजीने २००४ में उपवर्गीकरण पे सुप्रीम कोर्टने आंध्र प्रदेश लिये निर्णय को वापस लिया था! उस वक्त आंध्रप्रदेश में मतभेद निर्माण हो गये थे! क्योंकी देश में सुप्रीम कोर्ट के निर्णय से सभी राज्य के सरकार अपनी अपनी राजनिती से उपवर्गीकरण के आदेश का इस्तमाल करेंगे और जिस समाज, जाती से उन्हे चुनाव फायदा होगा उन्हे ही उपवर्गीकरण का लाभ देंगे इससे कही अनुसुचित जाती एवं जनजाती के लोंगो पर अन्याय हो शकता है, और इससे मतभेद निर्माण होगें, इस तरह अनुसुचित जाती एवं जनजाती का आरक्षण खत्म हो जाएगा! यह आरक्षण सामाजिक,आर्थिक उत्पीडन नष्ट करने के लिए बनाया गया था! सभी अनुसूचित जाती एवं जनजाती में दुर्बल लोंग है, उनके उपर अन्याय हो शकता हैं! सुप्रीम कोर्ट नॉन क्रिमिनल पे इस निर्णय को लागु करने के पहिले  खास अध्ययन नही किया गया!
        रविवार को पार्टी प्रदेश कार्यालय में उन्होंने पत्रकारों से कहा कि सुप्रीम कोर्ट द्वारा आरक्षण में बंटवारे का फैसला असंवैधानिक और अनुचित है! इसका इस्तमाल राज्य सरकारें राजनैतिक हत्यारे के रुप में करेंगी! इस तरह एससी -एसटी को मिलने वाला आरक्षण का लाभ समाप्त हो जाएगा! सरकारी नौकरीयों और शिक्षण संस्थाओं में इनके कोटें की सिटे रिक्त जाएंगी! कोर्ट के इस फैसले से असंतोष बढेगा! उन्होंने एससी-एसटी समुदाय से अपील की कि वह राजनैतिक दलों पर इसे बदलने का दबाव डालें! हालाकी उन्होनें इसके विरोध में बसपा द्वारा कोई आंदोलन या अभियान सुरू करने से इन्कार कर दिया! बसपा सुप्रीमो ने कहा कि एनडीए और इंडिया एलायंस की सरकरों की यदी नियत ठिक होती तो सुप्रीम कोर्ट में मजबूत पैरवी की जाती! उन्हे उन्हो दोनों से जनता के सामने अपना पक्ष रखने को भी कहा! हालांकी बसपा सुप्रीमो ने क्रीमीलेयर को आरक्षण दिए जाने पर कहा कि भले एससी-एसटी वर्ग के 10 फिसदी लोंगो को क्रीमीलेयर मानकर आरक्षण नहीं मिले, लेकीन बाकींयों को इसमें वंचित भी नहीं किया जाए!  आज भी इस लोंगों को समुह ही माना जाना चाहिए!


PostImage

P10NEWS

Aug. 4, 2024

PostImage

पावसामुळे क्षतीग्रस्त रस्त्यांची दुरूस्ती प्राधान्याने करा. -    अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम


 
      कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावे
      रस्ते, आरोग्य व शिक्षण या त्रिसुत्रीच्या विकासावर अधिक भर.                                                                        अहेरीत ब्लडबँकेच्या इमारतीकरिता १ कोटी ७० लाख निधी मंजूर

   

     गडचिरोली दि. २ : जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ते दुरूस्त करावे. तसेच रस्ते बांधकामाची मंजूरी असतांनाही ज्या कंत्राटदारांनी विहित मुदतीत कामे पूर्ण केली नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करून अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज दिले.
अहेरी मतदार संघातील विकास कामांचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. जिल्हाधिकारी संजय दैने, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अहेरी उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी श्री पाचकवडे यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात नुकतेच मोठ्या प्रमाणात झालेल्या पाऊस व पूरामुळे रस्ते व पूल क्षतीग्रस्त झाले आहेत, त्यांची तातडीने दुरूस्ती करावी. आलापल्ली, लगाम, मार्कंडा, खमनपूर, आष्टी, भामरागड, सिरोंचा, रेपणपल्ली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो, त्यामुळे तातडीने या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे. लगान ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला वनविभागाचीही परवानगी मिळाली आहे, त्यामुळे कोणतीही कारणे न देता येथील रस्ते बांधकामाची कामांना सुरवात करावी. अपूर्ण रस्ते बांधकामांमुळे जिल्ह्याची नाहक बदनामी होत असून याबाबतीत कोणताही निष्काळजीपणे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री आत्राम यांनी दिला.
अहेरी येथे ब्लडबँकेच्या इमारतीकरिता १ कोटी ७० लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याने इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून ब्लडबँक सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
रस्ते, आरोग्य व शिक्षण या त्रिसुत्रीच्या विकासावर अधिक भर देण्याचे सांगतांना पेसा क्षेत्रातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करणे, माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन देण्याचे व शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत: दुर्गम भागात भेट देवून याची तपासणी करण्याचे, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची भरती करणे, पाणीपुरवठा योजनेच्या बंद पडलेल्या सोलर प्रणाली प्राधाण्याने दुरूस्त करणे, सिरोंचा येथील खताचा 1200 मे.टन बफर साठा शेतकऱ्यांसाठी खुला करणे, पाऊस व पूरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करणे आदी सूचना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्या. 
    जिल्हाधिकारी संजय दैने यांनी रस्ते बांधकामाची कामे करतांना तांत्रीक बाबी तपासून गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना दिल्या.
    बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा पूरवठा अधिकारी प्रकाश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री साखरवाडे, श्री रामटेके, तसेच विद्युत विभाग, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, अहेरी विधानसभा मतदान क्षेत्रातील तालुकास्तरीय अधिकारी, तसेच भाग्यश्री आत्राम, रविंद्र वासेकर, लीलाधर भरडकर आदि उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Aug. 2, 2024

PostImage

समता समाज संघर्ष संघटना गडचिरोली युनिट तर्फे बळीराजा पॅलेस गडचिरोली येथे मा.प्रा.रामराव नन्नावरे सेवानिवृत्त निमित्ताने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


 

           

           गडचिरोली/01:-    १ आगष्ट २०२४ रोज गुरुवार ला १२ वाजता: 'बळीराजा पॅलेस' चामोर्शी रोड, गडचिरोली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना  महाराष्ट्र राज्य चे वतीने लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे 
अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी संघटने तर्फे अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचा जन्म 01 ऑगष्ट 19920 मध्ये सांगली जिल्हा येथील वाटेगाव या गावात झाला. त्यांचे जीवन खुप हालाखीचे व दु:खात गेले.                                                                                  कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आयु वर्षा लाटेवार यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी रशियाला गेलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व रशियाचे अध्यक्ष यांनी अण्णा भाऊ विषयी झालेली चर्चेचा प्रसंग सांगितला.  *"देश की जनता भुकी है, ये देश की आझादी झुठी है"* अशा अनेक त्यांच्या जीवनातील गोष्टींना उजाळा दिला.                                                   तसेच अतिथी स्थानावरून मा. रामराव नन्नावरे सरांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महत्त्व पटवून दिले. तसेच राजेश कलगटीवार, मायाताई मोहुर्ले जिल्हाध्यक्ष यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर संभाषण केले. अण्णा भाऊ साठे महामंडळाचे महत्व व महामंडळाद्वारे मिळणाऱ्या योजना विषयी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती दिली. अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये समाविष्ट करण्यासाठी समाजातील अनेक लोकांनी संघर्ष केल्याची आठवण केली. कार्यक्रमाच्या शेवटी ३१ ऑगस्टला निवृत्त झालेल्या मा. प्रा. रामराव नन्नावरे साहेबांचे संघटने तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी
 * कार्यक्रमाचे अध्यक्ष 
आयु. वर्षाताई लाटेलवार , उद्घाटक 
आयु. मायाताई मोहुर्ले प्रदेश अध्यक्षा समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, 
आयु. राधा नांदगाये, 
आयु. संघमित्रा मेश्राम, 
प्रवृती वाळके मॅडम 
स्वागताध्यक्ष 
आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेब, सामाजिक कार्यकर्ता 
मुख्य मार्ग दरशक 
आयु.दिगांबर लाटेलवार साहेब ग्राम विकास अधिकारी 
आयु.रामराव नन्नावरे से. नि. प्राध्यापक धर्मानंद मेश्राम,से. नि. शिक्षण विस्तार अधिकारी 
आयु.राजेश कलगटिवार सामाजिक कार्यकर्ता 
आयु .राज बंसोड साहेब आंबेडकरी, युवा कार्यकर्ता 
आयु विजय देवतळे   प्रदेश उपअध्यक्ष समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य
आयु.किशोर नरुले प्रदेश सह सचिव समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आयु.संदीप येंनगंटिवार युवा कार्यकरता समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आयु. मंदिप गोरडवार साहेब 
नागसेन खोब्रागडे साहेब, आयु.ज्ञानदेव वाकडे,
आयु. प्रवृती वाळके मॅडम 
आयु.वंदना अलोणे,
आयु.किरण बांबोळे,
आयु.अर्चना उमरे,
आयु.अनिता ताकसांडे,
 तसेच 
आयु.कैलास सलामे, 
आयु शुभम लाटेलवार, 
आयु. प्रमोद देवतळे, 
आयु. मदन उराडे,
 आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन विजय देवतळे तर, आभार प्रदर्शन संदीप येंनगंटिवार यांनी मानले समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.


PostImage

P10NEWS

Aug. 2, 2024

PostImage

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज संकेतस्थळावर भरावे  – मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह


 

 

       गडचिरोली दि. 1 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup  हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले असून लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.  
या योजनेसाठी 31 जुलैअखेरपर्यंत 1 लाख 52 हजार 327 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 37 हजार 564 अर्ज मंजूर झाले असून 1 लाख 11 हजार 692 अर्ज तपासणीमध्ये आहेत.95 अर्ज नामंजूर झाले असून 3564 अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात आले आहेत. अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी लाभार्थी महिलांना मोबाईवर संदेश पाठविण्यात येत आहे. त्रुटीचा संदेश प्राप्त होताच संबंधीत महिलांनी आवश्यक त्रुटीची पुर्तता करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही संधी एकवेळेसाठीच मिळणार असल्याने त्रुटीची पुर्तता काळजीपुर्वक करावी.
ज्या इच्छुक पात्र लाभार्थीनी अद्याप अर्ज भरले नसल्यास त्यांनी  https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup या संकेतस्थळावर क्रियेट अकांउंट वर क्लीक करून आपले अर्ज भरावेत. ज्यांना स्वत: अर्ज भरणे जमणार नाही त्यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षीका, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, नगरपालिका/नगरपंचायतीचे मदत केंद्र, अशा वर्कर, बचत गटाचे समुहसाधन व्यक्ती या शासनाच्या अधिकृत प्रतिनिधींकडून /केंद्रावरून अर्ज भरून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत या ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रीया लाभार्थ्यांसाठी मोफत असल्याने त्यासाठी कोणालाही पैसे देवू नये असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.


PostImage

P10NEWS

Aug. 2, 2024

PostImage

समता समाज संघर्ष संघटना गडचिरोली युनिट तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे बळीराजा पॅलेस गडचिरोली येथे जयंतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


 

गडचिरोली/01:-    १ आगष्ट २०२४ रोज गुरुवार ला १२ वाजता: 'बळीराजा पॅलेस' चामोर्शी रोड, गडचिरोली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना  महाराष्ट्र राज्य चे वतीने लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे 
अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी संघटने तर्फे अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचा जन्म 01 ऑगष्ट 19920 मध्ये सांगली जिल्हा येथील वाटेगाव या गावात झाला. त्यांचे जीवन खुप हालाखीचे व दु:खात गेले.                                                                                  कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आयु वर्षा लाटेवार यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी रशियाला गेलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व रशियाचे अध्यक्ष यांनी अण्णा भाऊ विषयी झालेली चर्चेचा प्रसंग सांगितला.  *"देश की जनता भुकी है, ये देश की आझादी झुठी है"* अशा अनेक त्यांच्या जीवनातील गोष्टींना उजाळा दिला.                                                   तसेच अतिथी स्थानावरून मा. रामराव नन्नावरे सरांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महत्त्व पटवून दिले. तसेच राजेश कलगटीवार, मायाताई मोहुर्ले जिल्हाध्यक्ष यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर संभाषण केले. अण्णा भाऊ साठे महामंडळाचे महत्व व महामंडळाद्वारे मिळणाऱ्या योजना विषयी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती दिली. अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये समाविष्ट करण्यासाठी समाजातील अनेक लोकांनी संघर्ष केल्याची आठवण केली. कार्यक्रमाच्या शेवटी ३१ ऑगस्टला निवृत्त झालेल्या मा. प्रा. रामराव नन्नावरे साहेबांचे संघटने तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी
 * कार्यक्रमाचे अध्यक्ष 
आयु. वर्षाताई लाटेलवार , उद्घाटक 
आयु. मायाताई मोहुर्ले प्रदेश अध्यक्षा समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, 
आयु. राधा नांदगाये, 
आयु. संघमित्रा मेश्राम, 
प्रवृती वाळके मॅडम 
स्वागताध्यक्ष 
आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेब, सामाजिक कार्यकर्ता 
मुख्य मार्ग दरशक 
आयु.दिगांबर लाटेलवार साहेब ग्राम विकास अधिकारी 
आयु.रामराव नन्नावरे से. नि. प्राध्यापक धर्मानंद मेश्राम,से. नि. शिक्षण विस्तार अधिकारी 
आयु.राजेश कलगटिवार सामाजिक कार्यकर्ता 
आयु .राज बंसोड साहेब आंबेडकरी, युवा कार्यकर्ता 
आयु विजय देवतळे   प्रदेश उपअध्यक्ष समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य
आयु.किशोर नरुले प्रदेश सह सचिव समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आयु.संदीप येंनगंटिवार युवा कार्यकरता समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आयु. मंदिप गोरडवार साहेब 
नागसेन खोब्रागडे साहेब, आयु.ज्ञानदेव वाकडे,
आयु. प्रवृती वाळके मॅडम 
आयु.वंदना अलोणे,
आयु.किरण बांबोळे,
आयु.अर्चना उमरे,
आयु.अनिता ताकसांडे,
 तसेच 
आयु.कैलास सलामे, 
आयु शुभम लाटेलवार, 
आयु. प्रमोद देवतळे, 
आयु. मदन उराडे,
 आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन विजय देवतळे तर, आभार प्रदर्शन संदीप येंनगंटिवार यांनी मानले समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.


PostImage

P10NEWS

July 31, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात 05 ऑगस्टला लोकशाही दिनाचे आयोजन. - निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी


 

       लोकशाही दिन 05 ऑगस्टला नागरिकांनी तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाची करण्याचे आवाहन.

     गडचिरोली/ दि.31 : माहे ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
     सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील. आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी कळविले आहे.


PostImage

P10NEWS

July 31, 2024

PostImage

हिपॅटायटीस आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार तपासणी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन.


 

गडचिरोली दि. २९ : जिल्हयातील हिपॅटायटीस बी व सी च्या रुग्णांनी घाबरण्याची अजिबात गरज नसून या आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांच्या नातवाईकांनी तपासणी करावे व उपचार नियमित घ्यावे जेणेकरुन पुढील गुंतागुत जसे यकृत पुर्णपणे खराब होणे, यकृताचे कॅन्सर होणे थांबविता येईल करीता दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी रक्त तपासणी करावी व या आजारांचे लसीकरण करुन घ्यावे असे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सर्व जिल्हामध्ये सुरु करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत राज्यात ४ आदर्श उपचार केद्रं व २२ उपचार केद्रं यांची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर केद्रामार्फत रुग्णाची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हिपॅटायटीस या आजाराबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी २८ जुलै रोजी जागतीक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी हिपॅटायटीस दिनाचे  “It Time for Action” घोषवाक्य प्रसिध्द केलेले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित पंधरवाडा २२ जुलै ते ३ ऑगष्ट या दरम्यान साजरा करण्याबाबत सूचित केले आहे.
या अनुषंगाणे गडचिरोली  जिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस पंधरवाडा निमित्त 29 जुलै रोजी डायलेसिस विभागातील डायलेसिस रुग्ण व त्यांचे नातेवाईक, डायलेसिस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.
सदर शिबीरामध्ये रुग्ण व नातेवाईक व कर्मचारी यांचे रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य्‍ अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिशकुमार सोळंके, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी, डॉ.प्रफुल हुलके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे, भिषक (वर्ग-1) डॉ. मनिष मेश्राम आदी उपस्थित होते.
सदर शिबीर आयोजीत करण्याकरीता RBSK & NVHCP जिल्हा समन्वयक, औषधी निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, HIV-AIDS विभाग, रक्तपेढी विभाग तसेच कार्यालयातील कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरीचारीका इत्यादीनी परिश्रम घेतले.


PostImage

P10NEWS

July 30, 2024

PostImage

बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभा तर्फे पक्ष संघटन बैठक व आरक्षण दिन कार्यक्रम उमरेड येथे सपंन्न


 

         उमरेड/29:- बहुजन समाज पार्टी उमरेड   विधानसभेत    पक्ष संघटन वाढविन्याबाबत व पुढे होणारी विधानसभा निवडणूक संर्दभात विचारविनीमय करणेसाठी  *29–07–2024 (सोमवार) ला  11.०० वाजता साने गुरुजी जेष्ट नागरीक सभागृह उमरेड*  येथे मा योगेशभाऊ लांजेवार अध्यक्ष नागपुर जिल्हा बसपा,मा ई.गोपाळजी खांबाळकर माजी कोषाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश बसपा, मा .ए आर मेश्राम सर, मा .डी ठी रामटेके साहेब,,विधानसभा कमेटी,उमरेड ,भिवापूर कुही ,तालूका कमेटी ,तीनही शहर कमेटी, सेक्टर प्रभारी, बुथ अध्यक्ष आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ता  हीतचिंतक यांचे उपस्थित महापुरूषाचें प्रतिमेला माल्यार्पन करुण व  अभिवादन करुन 
26जुलै आरक्षण दिवस साजरा करन्यात आला मा जिल्हा अध्यक्ष यांनी  सर्व पदाधिकारी कडून  पक्षाचे उमरेड विधानसभेतील कामाविषयी माहीती जानूण घेतली, मा पूनेश्वर मोटघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा यांनी विस्तृत माहीती सांगीतली सेक्टर वाईज बाईक रॉली काढून जनजागृती करन्याची सूचना देन्यात आली  विधानसभा निवडनूक लढन्यासाठी ईछ्यूक  कार्यकर्ता कडून दी 5/8/24पर्यंत पक्षाकडे उमेदवारी मागणी करन्यासंबधी सूचना देन्यात आल्या ,पक्ष सदश्य नोंदनी करने बाबत सागंन्यात आले मा ई खांबाळकर साहेब यांनी कार्यकर्तांना प्रशिक्षण दिले,यावेळी पुढील प्रमाने पदाधिकारी नियुक्त  ,मा.बोधिस्तवशेंडे अध्यक्ष उमरेड तालुका,मा.अमोल गोळघाटे बेला झोन अध्यक्ष, सुबोध गजभिये प्रभारी राजोला सेक्टर,उत्तम ढोणे मकरधोकडा सेक्टर प्रभारी,सौ मिनाताई शेंडे उपाध्यक्ष महीला आघाडी उमरेड विधानसभा,सविता मुळे अध्यक्ष महीला आघाडी उमरेड शहर,पुंडलीक पडोळे अध्यक्ष वेलतूर सेक्टर,मनोज खराबे प्रभारी सिल्ली सेक्टर,सौ सुरेखा वासनीक अध्यक्ष भिवापुर ता महीला आघाडी, मा धम्मा मेश्राम सहसचीव उमरेड विधानसभा,ईश्वर रामटेके भागेबोरी  सेक्टर प्रभारी ,शिवाभाऊ कांबळे शेडेश्वर सेक्टर प्रभारी,परमानंद बोरकर तीतुर सेक्टर प्रभारी,बाबुलाल गजभिये महालगावं सेक्टरप्रभारी,सेवक फुलझेले उदासा सेक्टर प्रभारी,यांची वरील पदावर नियुक्ती करन्यात आली,मा शशिकांत मेश्राम प्रभारी उमरेड विधानसभा यांनी माहीती दीली, ईजिं भिमराव गजभीये यांनी बामसेफ बाबत माहीती दिली, शूभंम खोब्रागडे अध्यक्ष कुही ता,व श्रिकृष्ण खोब्रागडे अध्यक्ष भिवापुर ता,यांनी पक्ष संघटन काम करीत असतांना होत असलेल्या अडचणी सांगितल्या, प्रियाताई गोंठाने मा कोषाध्यक्ष ना.जि.,राजकुमार लोखंडे माजी सभापती उमरेड,
,राजु शुर्यवंशी कोष्धयक्ष उमरेड वि,दीलीप काबंळे प्रभारी उमरेड वि, अभय गायकवाड महासचिव उमरेड वि,उमाकांत रामटेके,जगदीस सोनट्टके, सचिन मानवटकर, मान्यवर उपस्तित होते .मा प्रदीप चव्हाण उपाध्यक्ष उमरेड विधानसभा यांनी रर्वांचे आभार मानले  यावेळी उमरेड,भिवापूर ,कुही,बेला या चारही झोन मधून युवक,महीला,मोट्या सखेंने उपस्थिती होती          सर्व बसपा कार्यकर्ते, बामसेफ व हितचिंतक उपस्थित होते

 


PostImage

P10NEWS

July 30, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत बहुजन समाज पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली.


   गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हाधिकारी संजय दैने गडचिरोली यांच्या मार्फत मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या कडे बहुजन समाज पक्ष विधानसभा गडचिरोली पदाधिकार्यांनी केली.

      गडचिरोली/२९:- गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्फतीने मा  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले हेक्टरी 50000/ रूपये शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई द्यावी. तसेच जिल्ह्यातील पुरामुळे  सामान्य नागरिकांचे जीवनमान उद्धवस्त झाल्यामुळे तात्काळ पंचनामा करून त्यांना प्रती कुटुंब दोन लाख रुपये भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी मा. रामराव नन्नावरे, जिल्हा संयोजक बामसेफ गडचिरोली, मा सुधीर वालदे प्रभारी अध्यक्ष गडचिरोली, मा. नरेश महाडोळे जेष्ठ पदाधिकारी, सुमन क-हाडे जेष्ठ महीला पदाधिकारी,  वेणुताई खोब्रागडे शहर अध्यक्ष गडचिरोली, कांता कांबळे जेष्ठ महीला पदाधिकारी अहेरी क्रांती जुमडे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 30, 2024

PostImage

मा.कांशिराम साहेब,यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी बहुजन समाज पार्टी विधानसभा गडचिरोली पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फतीने राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली.


 

     मा.कांशिराम साहेब, आणि सामजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तथा आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी बहुजन समाज पार्टी विधानसभा गडचिरोली पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फतीने राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली.   

         गडचिरोली/(29):- बहुजन समाज पार्टी विधानसभा गडचिरोली पदाधिकार्यांनी बहुजनांचे नायक मा. कांशीराम साहेब DS4, bamsef, bsp, संस्थापक तसेच देशात एसी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व राजकीय,सामाजिक , आर्थिक स्तरावर अहोरात्र मेहनत करून क्रांती घडवून आमुलाग्र परिवर्तन घडवून आणणारे मा कांशीराम साहेब, सामजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तथा आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. अशी मागणी मा. जिल्हाधिकारी संजय दैने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात मार्फतीने मा. द्रौपदीजी मुर्मु राष्ट्रपती व मा. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार नव्वी दिल्ली यांच्या कडे करण्यात आली. 

         यावेळी मा. मंदीप एम गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, मा. रामराव नन्नावरे जिल्हा संयोजक बामसेफ गडचिरोली, मा. सुधीर वालदे प्रभारी वि. स. गडचिरोली, मा. नरेश महाडोळे जेष्ठ पदाधिकारी, मा सुमन क-हाडे जेष्ठ महीला पदाधिकारी, मा. वेणुताई खोब्रागडे शहर अध्यक्ष बसपा गडचिरोली,मा.कांता कांबळे, मा.क्रांती जुमडे अहेरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 29, 2024

PostImage

आता मोबाईलवर मिळणार नवीन ई-रेशनकार्ड; 5 मिनिटात करा ऑनलाइन अर्ज ,इथे पहा सर्व माहिती


 


रेशन कार्ड प्रसिद्धी पत्रक
E-Ration Card साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा..?
हे सुद्धा नक्की वाचा:- माझी लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात; अर्थ विभागाने घेतलेळे आक्षेप कोणते..? इथे पहा
रेशन कार्ड प्रसिद्धी पत्रक
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना, उत्पन्न दाखले, शाळा-कॉलेज प्रवेश, रुग्णालये, महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना यांसारख्या ठिकाणी शिधापत्रिकेची आवश्यकता असते. पूर्वी नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागत असे आणि आर्थिक ताणही येत असे. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ही सुविधा सुरू केली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राथमिकता कुटुंब योजना (पीएचएच) शिधापत्रिकाधारक, राज्य योजना (एपीएल) शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेबाहेरील (एनपीएच), एपीएल शेतकरीबाहेरील आणि एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा सर्वांना ही ई-शिधापत्रिका मोफत मिळणार आहे. अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची तपासणी होईल आणि पात्र ठरणाऱ्यांना योजना प्रकारानुसार ई-शिधापत्रिका दिली जाईल.

E-Ration Card साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा..?

e ration: ई-शिधापत्रिका मिळवण्यासाठी नागरिकांनी https://rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, होमपेजवर लॉग इन करावे, आवश्यक माहिती भरावी, आणि आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करावेत. याद्वारे नवीन शिधापत्रिका, पत्ता बदलणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा सर्व सेवा ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत उपलब्ध आहेत. या सुविधांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे विजय गुप्ता यांनी पत्रकात नमूद केले आहे.


PostImage

P10NEWS

July 29, 2024

PostImage

GADCHIROLI POLICE BHARTI :  एकुण 6711 उमेदवारांमधून 6657 उमेदवारांनी दिली लेखी परिक्षा. महिला उमेदवारांची 100 टक्के उपस्थिती.


 


     प्रचंड पावसातही 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा


     महिला उमेदवारांची 100 टक्के उपस्थिती.
      पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढुन त्यांना परिक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले.
    एकुण 6711 उमेदवारांमधून 6657 उमेदवारांनी दिली लेखी परिक्षा.

 

गडचिरोली/(28): गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रत्यक्ष भरती 2024 च्या 912 जागांसाठी आज दिनांक 28/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलामार्फत पार पाडण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी ही दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती.  सदर मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांसाठी लेखी परीक्षा ही आज दिनांक 28/07/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. आयोजीत करण्यात आलेली होती.  यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 वा. दरम्यान घेण्यात आला.  सदरची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), 3) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, 4) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, 5) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, 8) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण 11 केंद्रावर घेण्यात आली. सर्व 11 परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. बंदोबस्ताकरीता 800 चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. सदर लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांपैकी 6657 पुरुष व महिला उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली.  सदर लेखी परिक्षेपासुन कोणतेही पात्र उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. यासोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्राभरात पुरपरिस्थिती निर्माण झालेली असतांना सुद्धा पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले व त्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचविण्यात आले. त्यामुळे लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांपैकी 100 टक्के महिलांसह 99 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावली. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. तसेच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची व पाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली होती.
सदर लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश, यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.


PostImage

P10NEWS

July 28, 2024

PostImage

LOKADALAT : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १८२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली. १ कोटी ९ लाख रुपये नुकसान भरपाई वसूल 


 


   

गडचिरोली दि.२८ : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील ९० प्रलंबित आणि ९२ दाखलपूर्व असे एकूण १८२ खटले आपसात तडजोडीने निकाली निघाले असून  एकुण १ कोटी ०९ लाख ३५ हजार ७२९ रुपये नुकसान भरपाई वसुली करण्यात आली. तसेच. किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ३१ प्रकरणे गुन्हा कबूलीद्वारे निकाली निघाले आहे.

  जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दिनांक २७ जुलै, २०२४ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेशाबाबतची कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे असे न्यायालयात प्रलंबीत दावे व दाखलपूर्व वाद प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकाची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे, ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे, घरकुल अनुदान वसुली प्रकरणे तसेच ग्राहक न्यायालयातील प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे ठेवण्यात आली होती.  जिल्हयात एकुण १० पॅनल ठेवण्यात आले होते. 

श्री. व्ही. एस. कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,
गडचिरोली व  श्री. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे देखरेखीखाली
लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
 श्री. एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांनी पॅनल
क्र. ०१ वर काम पाहीले, पॅनल क्र. ०२ वर  श्री. सी. पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली, पॅनल क्र. ०३ वर  श्रीमती व्ही. आर. मालोदे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांनी काम पाहिले.
 दिनांक २७/०७/२०२४ रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषीत करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.
प्र. सं. कलम २५६, २५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता श्रीमती एन. ए. पठाण तृतिय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांचे न्यायालय कार्यरत होते.
तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून  श्री. गौतम दयाराम डांगे, सामाजिक कार्यकर्ता पॅनल
क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून श्री. मनोहर माधवराव हेपट, सामाजिक कार्यकर्ता, पॅनल क्रमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून कु. अर्चना लहुजी चुधरी, सामाजिक कार्यकर्ता यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद,
न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

P10NEWS

July 27, 2024

PostImage

NAXAL SURRENDER : एका वरिष्ठ जहाल महिला माओवादीने केला गडचिरोली पोलिस आणि सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण. शासनाचे 08 लाखाचे बक्षीस होते.



                                                              
                
नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला, एका वरिष्ठ जहाल महिला माओवादी कॅडरने केले गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण


  शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयाचे बक्षिस.
  माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 671 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 जूलै 2024 रोजी  जहाल महिला माओवादी नामे 1) रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, गडचिरोली डिव्हीसी, वय 36 वर्ष, रा. बोटनफंुडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल महिला माओवादी सदस्याबाबत माहिती
  
1)    रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता
     दलममधील कार्यकाळ

    सन 2007 पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणुन काम करण्यास सुरुवात.
     सन 2007-2008 मध्ये शिवणकला, कापड कटींंग व शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. 
     सन 2008-14 मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.
     सन 2014 मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत कार्यरत

    कार्यकाळात केलेले गुन्हे
     चकमक -01
    सन 2020 मध्ये मौजा पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

     खून -01
     सन 2019 मध्ये मौजा नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
    वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
    दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. 
    गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.
    खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
    चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.  
    नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
    गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

    शासनाने जाहिर केलेले बक्षिस. 

   महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

  आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 23 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. शंभु कुमार, कमांण्डट 09 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

P10NEWS

July 27, 2024

PostImage

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन. बारावी पास 6 हजार, आयटीआयसाठी 8 हजार, पदवीधर,पदव्युत्तर 10 हजार रूपये विद्यावेतनाची सुविधा


 

 

 

     बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतनासह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी.

▪️मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

 जिल्ह्यात आतापर्यंत 510 मनुष्यबळाची मागणी तर 350 युवक-युवतींची नोंदणी

      बारावी पास 6 हजार, आयटीआयसाठी 8 हजार, पदवीधर,पदव्युत्तर 10 हजार रूपये विद्यावेतन.

 

 

गडचिरोली,दि. २७: शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत युवकांना विद्यावेतनासह नोकरीचा अनुभव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

 

उमेदवारांनी विविध शासकीय , निमशासकीय कार्यालयातील तसेच उद्योजकाकडील विविध पदावररील कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सहा महिन्याकरिता इंटर्नशीप म्हणून ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर,ज्युनिअर इंजिनिअर,ज्युनिअर क्लर्क, असिस्टंट अकाऊंट आफिसर,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,डाटा एन्ट्री ऑपरेटर, संगणक ऑपरेटर या पदाकरिता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे.

 

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना दहा हजार असे भरघोस विद्यावेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा राज्य शासनाकडून अदा केले जाईल. याव्यतिरिक्त उद्योगांकडूनही प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा असेल. प्रशिक्षणार्थी एका ‍ महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त ‍दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिले जाणार नाही. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के तर शासनाच्या शासकीय/निमशासकीय या आस्थापना/उद्योग/ महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत विविध आस्थापनांकडून ५१० मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आली आहे तर ३५० उमेदवारांनी योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावर अर्ज केले आहेत.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग, बॅरेक क्रमांक 2, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, गडचिरोली येथे संपर्क साधावा असे कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी कळविले आहे. 


PostImage

P10NEWS

July 27, 2024

PostImage

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या निरपराध इसमाची पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन माओवादयांनी हत्या केली.


भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या निरपराध इसमाची पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन माओवादयांनी हत्या केली.
         गडचिरोली/(26): गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे व त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे सन 2007 पासुन भामरागड दलममध्ये सदस्य म्हणुन काम करीत होते. माओवादयांच्या तकलादु आणि खोटया क्रांतीची या दोघांना कल्पना आल्याने दोघांनी एकत्रीतपणे 07 जुलै 2017 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. आणि हिंसेचा मार्ग सोडुन स्वत:च्या प्रगतीचा मार्ग स्विकारला होता. हे दाम्पत्य माओवादयांचा हिंसेचा खोटा आणि विनाशकारी मार्ग सोडुन शांततेचा मार्ग स्विकारत शेती करून आयुष्य जगत होते. 
         काल दि. 25 जुलै 2024 रोजी ते दिनांक 26 जुलै 2024 चे मध्यरात्री  माओवादयांनी जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे याची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC जवळ पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन हत्या केली. सदर हत्येप्रकरणी पोस्टे भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.तसेच भामरागड परिसरात माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे


PostImage

P10NEWS

July 26, 2024

PostImage

महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद 2 दिवसांत 2 लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिली भेट


 

'महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद
 2 दिवसांत 2 लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिली भेट
 गरजू विद्यार्थ्यांनी विविध योजनांची जाणून घेतली माहिती

 गडचिरोली,दि.(26): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. महाज्योती द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे.
राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. महाज्योतीच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले यास्कॅनर कोडवर असलेल्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/schemes/ 2 लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे महाज्योतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती ही एक क्लिक वर प्राप्त व्हावी याकरिता स्कॅनर कोड तयार करण्यात आले असून दोन दिवसांत 2 लाखांचा टप्पा संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी गाठला आहे. यामुळे महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आज उत्सूकतेने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत तयार केलेल्या स्कॅनर कोड द्वारे संकेतस्थळाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
                                                                     


PostImage

P10NEWS

July 26, 2024

PostImage

गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये ऑनलाईन 9867 व ऑफलाईन 23228 यशस्वीपणे अर्ज भरून लाडक्या बहिणीला केली मदत.


 

गडचिरोली पंचायत प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन लाडक्या बहिणीच्या मदतीला
 

   गडचिरोली/ (27):- गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  विभाग अंतर्गत "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने" यशस्वी आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन केली लाडक्या बहिणीच्या मदतीला
6 बिट आणि दोन सुपरवासझर सांभाडतात काम
 अतिश्रम काम करताना दिसत आहेत. अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲप द्वारे अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ब-याच ठिकाणी नेटवर्कची समस्या येत आहे. यामुळे पंचायत समिती गडचिरोली  
सौ एस व्ही गाडगे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  पंचायत समिती गडचिरोली श्रीमती आशा वरंघटे विस्तार अधिकारी , श्री मस्के शिपाई इत्यादी कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे.
[7/26, 2:56 PM] Mandeep Goradwar: गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये ऑनलाईन 9867 व ऑफलाईन 23228  यशस्वीपणे अर्ज भरून लाडक्या बहिणीला केली मदत.


PostImage

P10NEWS

July 26, 2024

PostImage

SOCIAL MOVEMENTS: नाल्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या तिघांचे जीवाचा धोका पत्करून तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी गावकऱ्यांनी वाचवले प्राण. 


 

 शॉर्टकटने ओढवले संकट

पाणी वाहत असताना पुलावरून वाहन टाकू नये-जिल्हाधिकारी यांचे पुन्हा आवाहन*

गडचिरोली दि. २५ : नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना गडचिरोलीहून नागपूरला जाणाऱ्या  तिघांवर प्राण गमावण्याची वेळ आली होती. परंतु ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळताच त्यांनी तत्परता दाखवून संबंधित तीघांचे प्राण वाचवले. याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे.

आज दिनांक 25 जुलै ला मौजा चुरचुरा माल येथे  चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नालावरील पाणी वाहत असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे वय 32वर्ष, आशा किशोर मेंढे वय 65 व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे वय 12 वर्ष  हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोली वरून नागपूर ला जाताना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून काही अंतरावर वाहत गेले. त्याच वेळी त्यांनी गावातील जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी *यांनी जीवाची पर्वा न करता* त्या तिघांचे प्राण वाचविले. त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे  यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, CHO, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत  त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना  गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

 ही घटना मौजा  आज सायंकाळच्या सुमारास 7 ते 8 दरम्यान घडली.  यात मोटरसायकल पुरात वाहून गेली आहे.

पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

July 25, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातुन मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’चे दोन लाख अर्ज प्राप्त.


 

     

      गडचिरोली, दि.२५ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत  गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत २ लाख ६५९ महिलांनी अर्ज सादर केले आहे. 

 या योजनेसाठी ग्रामीण भागातून १ लाख ७९ हजार ७३१ तर शहरी भागातून २० हजार ९२८ अर्ज प्राप्त झाले आहेत.   तालुकानिहाय अर्ज नोंदणीची संख्या  पुढीलप्रमाणे आहे. अहेरी-१०७०३, आरमोरी-११३१२, भामरागड-६६०५, चार्मोशी-३८००४, देसाईगंज-१२९३६, धानोरा-२२७८६, एटापल्ली-१६३७२, गडचिरोली-२९२४२, कोरची-९७४२, कुरखेडा-१६३१३, मुलचेरा-१२४११, सिरोंचा-१४२३३. 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

 


PostImage

P10NEWS

July 25, 2024

PostImage

गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी 10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन .  


गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी 

    विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी
    10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन
  
       गडचिरोली/नागपूर दि.25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.  
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. 
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
    धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. 
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे. 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. 
00000


PostImage

P10NEWS

July 25, 2024

PostImage

POLICE BHARTI : गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-23 (प्रत्यक्ष भरती-2024) 28 जुलै रोजी गडचिरोली शहरातील 11 परिक्षा केंद्रावर होणार लेखी परिक्षा


 


गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-23 (प्रत्यक्ष भरती-2024) लेखी परीक्षा संबंधीत सुचना


    28 जुलै रोजी गडचिरोली शहरातील 11 परिक्षा केंद्रावर होणार लेखी परिक्षा

 

गडचिरोली/25 :   गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदासंबंधीत मैदानी परीक्षा ही दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती.  मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक 28/07/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. आयोजीत करण्यात आलेली आहे.  यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 वा. दरम्यान घेण्यात येणार आहे.  
  सदर पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), 3) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, 4) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, 5) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, 8) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण 11 केंद्रावर घेण्यात येणार आहे.  तसेच उमेदवारांनी आपआपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 08.00 वा. उपस्थित राहणे आवश्यक राहील.  
सदर पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तरी, सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र  https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या लेखी परिक्षेची तारिख तसेच जिल्हायातील पावसाची परिस्थिती लक्षात ठेऊन लेखी परिक्षेसाठी लागणा-­या अत्यावश्यक कागदपत्रानिशी परिक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे.  तसेच सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. सोबतच परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, उमेदवारांसाठी पेन व पॅड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सोबतच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये कुणीही बॅग, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सोबत बाळगणार नाहीत व कोणताही गैरप्रकार करणार नाही.  उमेदवाराला सोबत फक्त ओळखपत्र व प्रवेशपत्र घेऊन जाण्याची मुभा राहील. कोणताही उमेदवार गैरप्रकार किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनीक साधनांचा वापर करतांना आढळुन आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी व तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये व कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. 8806312100 यावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी केलेले आहे. 


PostImage

P10NEWS

July 25, 2024

PostImage

ZP TEACHER BHARTI : पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती. 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करा - सिईऒ आयुषी सिंह


 

गडचिरोली दि. २३ : जिल्हयातील पेसा क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या  शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निवृत्त शिक्षकांकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागवुन घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गटशिक्षणाधिका-यांना दिले आहेत.

जुलै महिन्यात शाळा नियमित सुरु झाल्या मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात
रिक्त असल्याने विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने पवित्र प्रणालीमार्फत नियमित
शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण
संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवा निवृत शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा
परिषद शाळांतील पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकीय पदे  भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे.
त्यानुसार  निवृत्ती वेतन घेत असलेल्या अथवा  संबंधित तालुक्यात कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक / पदविधर शिक्षक / उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे कंत्राटी तत्वावर अध्यापन करण्यास इच्छूक असल्यास त्यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांमधून पदे उपलब्ध न झाल्यास अहर्ताप्राप्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांमधून हे पदे भरण्यात येतील. अर्जाचा नमुना जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध असल्याचे  त्यांनी कळविले आहे.


PostImage

P10NEWS

July 24, 2024

PostImage

NAXAL SURRENDER : भामरागड दलमच्या लच्चु करीया ताडो या जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण



                

 

   शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयाचे बक्षिस.

         

गडचिरोली/भामरागड (24) : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 24 जूलै 2024 रोजी  जहाल माओवादी नामे 1) लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, वय 45 वर्षे, रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती
    

1)    लच्चु करीया ताडो
    दलममधील कार्यकाळ

श्व्    सन 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड¬ुटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.

श्व्    सन 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत. 

      कार्यकाळात केलेले गुन्हे
  जाळपोळ -01
श्व्    सन 2022 मध्ये मौजा ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    इतर - 01
श्व्    सन 2023 मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

    गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे. 
    दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.
    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात.  प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात.  जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. 
    वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
    वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
    गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

    शासनाने जाहिर केलेले बक्षिस. 

    महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

    आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

    आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा. 

 


PostImage

P10NEWS

July 24, 2024

PostImage

HOME GUARD BHARTI 2024 : चंद्रपूर होमगार्ड भरती 82 जागेकरिता दिनांक 10/08/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन ! युवकांना रोजगाराची संधी! 


 

   

       चंद्रपूर/(24) : चंद्रपूर जिल्हा होमगार्ड मधील असलेल्या 82 होमगार्ड सदस्य अनुषेश  भरणे करिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 22/08/2024 पासुन जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथे केलेले आहे.या करिता दिनांक 10/08/2024 अखेर आँनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक नियम व अटी बाबत विस्तृत माहिती  https:// Maharashtradhg.gov.in/mahahg/loginl.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड चंद्रपूर यांना राहिल . तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक रिना यादवरावजी जनबंधु यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

July 24, 2024

PostImage

बहनकुमारी मायावती जी : ने कहा कुछ मुठ्ठी भर अमीर व धन्नासेठों को छोडकर देश के 125 करोड से अधिक कमजोर बहुजनों के त्रस्त जीवन मुक्ती हेतू , 'अच्छे दिन' की उम्मीदों वाला कम , मायुस करने वाला ज्यादा!   


 

       दिल्ली/(22) : संसद में आज पेश केंद्रीय बजट अपने पुराने ढर्रे पर कुछ मुठ्ठी भर अमीर व धन्नासेठों को छोडकर, देश के गरीबों, बेरोजगारों,किसानों,महिलांना,मेहनतकशों,वंचितों व उपेक्षित बहुजनों के त्रस्त जीवन से मुक्ति हेतु 'अच्छे दिन' की उम्मीदों वाला कम बल्कि उन्हे मायुस करने वाला ज्यादा!                          देश में छाई जबरदस्त गरीबी, बेरोजगारी,महंगाई पिछडा़पन तथा यहा के 125 करोड से अधिक कमजोर तबकों के उत्थान व उनके लिए जरुरी बुनियादी सुविधाओं के प्रति इस नई सरकार में भी अपेक्षित सुधारवादी नीति व नीयत का अभाव! बजट में ऐसे प्रावधानों से क्या लोगों का जीवन खुश व खुशहाल हो पाएगा ?                                                                           देश का विकास व लोगों का उत्थान ऑकड़ों के भुल भुलैया वाला न हो , बल्कि लोंगों को त्रस्त जीवन से मुक्ति के लिए रोजगार के अवसर जेब में खर्च के लिए पैसे/आमदनी जैसी बुनियादी तरक्की सभी को मिलकर महसुस भी हो! रेलवे का विकास भी अति - जरुरी ! सरकार बीएसपी सरकार की तरह हर हाथ को काम दे !


PostImage

P10NEWS

July 24, 2024

PostImage

तेलंगणा राज्यातील २० वर्षाच्या गर्भवती कलावती महिलेला रात्रो पोटात दुखायला लागल्याने स्थानिक महसूल/आरोग्य विभाग पथकाने वेळीच सिरोंचा टेकडा PHC मध्ये मध्यरात्री भरती केल्यानंतर नार्मल प्रसुती.




      गडचिरोली/सिरोंचा (24) :- श्रीमती कलावती, वय 20 ह्या मूळच्या आशिफाबाद, राज्य तेलंगणा येथील असून मौजा, चिक्याला, ता. सिरोंचा येथे नातेवाईक कडे वास्तव्यास आले असता रात्रौ पोटात दुखायला लागले असता स्थानिक महसूल/आरोग्य पथकाने वेळीच चिक्याला ते परसेवाडा व PHC टेकडा येथे भरती करून मध्यरात्री 1.45 वाजता नॉर्मल प्रसूती झालेली आहे.

(शेरा : जिल्ह्यातील बाधीत/दुर्गम भागातील गर्भवती स्त्रियांची यादी मान्सूनपूर्व तयार करून त्यानुसार नियमित पाठपुरावा सुरू आहे तथापि सदर महिला ह्या परराज्यातील असून संबंधित भागातील PHC अंतर्गत नियमित नोंदणीकृत नसल्याने माहिती नव्हती. तथापि माहिती प्राप्त होताच तात्काळ उपचार करण्यात आले.) 

दिनांक : 24/07/2024
-------------
श्रीमती कल्पना सचिन परसे वय 32 रा. माडेमूल, ता. गडचिरोली यांना आज सकाळी सर्पदंश झालेच्या संशयवरून जिल्हा पथक/SDRF/पोलिस/महसूल/आरोग्य/आपदा मित्र च्या टीम ने सुरक्षित रित्या बाहेर काढले. सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार सुरू असून महिला सुरक्षित आहे.

2⃣ श्रीमती पायल गावडे, वय 23 वर्ष, मौजा वेंगणुर, ता.  मूलचेरा इथे एका गर्भवती स्त्री ह्यांना छातीत दुखण्याबाबत स्थानिक आशा वर्कर ह्यांच्याकडून कळले नंतर सदर  महिलेला स्थानिक मूलचेरा/एटापल्ली येथील सयूंक्त आरोग्य/महसूल पथकाद्वारे सुखरुपरित्या बाहेर काढुन पुढील उपचारार्थ PHC रेगडी ह्या सरकारी इस्पितळात भरती करण्यात आले आहे.

3⃣ गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर पाल नदीवर पुलावरील पाण्यात पाण्याचे अंदाज न आल्याने एक ट्रकचालक वाहनासह अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार/पोलीस निरीक्षक गडचिरोली, SDRF/पोलीस पथक ह्यांच्या साहाय्याने सदर वाहनचालक श्री राजकुमार कृष्णमूर्थी, जिल्हा एलियार, राज्य तामिळनाडू ह्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले.


PostImage

P10NEWS

July 23, 2024

PostImage

MUKHYMANTRY SACHIVALAYA : मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 'एकुण निर्णय - 6'


 

सार्वजनिक आरोग्य 

 आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 
यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल.  सध्या ७५ हजार ५७८ अशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात.  हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

पशुसंवर्धन विभाग                                                        

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार.मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा.राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरु होती.  या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली.  या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या 29 कोटी 55 लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल.  पशुधन खरेदीच्या बाबतीत 75 टक्के अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल.  तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील. 

सामान्य प्रशासन विभाग (साविस)

 दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू.

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये 4 टक्के आरक्षण 30 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल.  30 जून 2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल.  पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी 30 जून 2016 नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पद संख्येनुसार आणि 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणणा करावी.  तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरशी नुसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असे देखील ठरले. 

मदत व पुनर्वसन विभाग

 शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार.

शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही प्रणाली सुरु होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल. 

१ जुलै २०२४ रोजी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणांप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय झाला होता. 

सामान्य प्रशासन विभाग

 बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका.

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

माझगाव येथील पारिजात इमारतीत १६, केदार इमारतीतील ३ अशा १९ न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने ३२ अशा ५१ सदनिका ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात येतील. एका सदनिकेचे १ महिन्याचे कमाल भाडे १ लाख २० हजार असून त्यामुळे ५१ सदनिकेसाठी एका वर्षाच्या ७ कोटी ३४ लाख ४० हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली.                     

महसूल विभाग

 नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एमआयडीसीसाठी
१६ हेक्टर शासकीय जमीन

नाशिक जिल्ह्यातील मौ.अंबड येथे एमआयडीसीला विस्तारीकरणासाठी १६ हेक्टर शासकीय जमीन विनामुल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या जमिनीची किंमत २४ कोटी २ लाख ४० हजार इतकी असून ती विनामुल्य एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात येईल.  
-----०----- 

 


PostImage

P10NEWS

July 23, 2024

PostImage

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचेकडून पूरपरिस्थितीची पाहणी..


 

गडचिरोली दि.२३ : शुक्रवारपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी आज हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यांनी गोदावरी व प्राणहिता नदी व त्यावरील धर्मपूरी पूलाची पाहणी केली. 
    जिल्हाधिकारी दैने यांनी पुरपरिस्थिती ओसरल्यानंतर करावयाच्या उपाययोजनासंबंधी तहसिल कार्यालय, सिरोंचा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. साथरोग पसरू नये याची काळजी घेणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत विहित पद्धतीने स्वच्छ करणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गर्दी करण्यापासून परावृत्त करणे, नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना गरजेनुसार शेल्टर होम मध्ये स्थलांतरित करण्यासाठी तत्पर राहणे, वीजा चमकत असतांना झाडाखाली आश्रय न घेण्याबाबत जनजागृती करणे आदी बाबींवर जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला सूचना दिल्या.
    याप्रसंगी जिल्हा आपत्ती सल्लागार कृष्णा रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक, गटविकास अधिकारी अनिलकुमार पटले, तहसीलदार श्री तोटावार तसेच तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 23, 2024

PostImage

BREAKING NEWS : केंद्रीय बजट में आंध्र प्रदेश व बिहार को बड़ा तोहफा,जानें यहां टैक्स की नई दरें


 

 

 

नई दिल्ली-23 जुलाई.वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने मोदी 3.0 सरकार का पहला आम बजट मंगलवार को पेश किया। केंद्र सरकार के बजट से मिडल क्लास को इनकम टैक्स स्लैब में छूट की आस थी, लेकिन वह पूरी नहीं हुई. हां नई रिजीम वालों के लिए स्टैंडर्ड डिडक्शन की सीमा 50 हजार रुपये से बढ़ाकर 75 हजार कर दी गई. सीतारमण ने बजट 2024-25 में पेंशनभोगियों के लिए पारिवारिक पेंशन  कर कटौती को 15,000 रुपये से बढ़ाकर 25,000 रुपये करने का प्रस्ताव किया है.
न्यू टैक्स रिजीम में नए टैक्स स्लैब का ऐलान. तीन लाख रुपये तक की सालाना आय पर कोई टैक्स नहीं. 3-7 लाख रुपये आय पर 5% टैक्स, 7-10 लाख तक आय पर 10% टैक्स. 10-12 पर लाख पर 15% टैक्स, 12-15 लाख पर 20% टैक्स और 15 लाख से ऊपर 30% टैक्स वसूला जाएगा.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण ने लोकसभा में पेश किए गए अपने सातवें वित्तीय बजट में कई बड़े ऐलान किए हैं। वित्त मंत्री ने युवाओं को स्किल दिलाने से लेकर विकास परियोजनाओं को लेकर कई बड़ी सौगातें दी है। वहीं MSME यानी लघु उद्योगों को 100 करोड़ तक के लोन के मामले में भी बड़ी राहत दी है, जो कि मध्यम वर्ग के लिए अहम हो सकता है। खास बात ये भी है कि वित्त मंत्री ने बिहार और आंध्र प्रदेश, दोनों ही राज्यों के लिए अहम प्रोजेक्ट्स की घोषणाएं की हैं, जो कि दोनों के ही बेसिक इनफ्रास्ट्रक्चर के लिहाज से अहम साबित हो सकती है।
केंद्र सरकार ने एनपीएस के लिए नियोक्ता के अंशदान पर कटौती की सीमा 10 प्रतिशत से बढ़ाकर 14 प्रतिशत की. वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा, ‘वित्तीय घाटा 2024-25 तक सकल घरेलू उत्पाद का 4.9% रहने का अनुमान है. लक्ष्य घाटे को 4.5% से नीचे पहुंचाना है.
वित्त मंत्री ने कहा महिलाओं और बालिकाओं को
लाभ पहुंचाने वाली योजनाओं के लिए सरकार ने तीन लाख करोड़ रुपये से अधिक का बजट एलोकेशन किया गया है। औद्योगिक कामगारों को डॉरमेटरी आवास की सुविधा मिलेगी। आंध्र प्रदेश के तीन जिलों को पिछड़ा क्षेत्र अनुदान प्रदान किया जाएगा। केंद्र ने मंगलवार को बिहार में विभिन्न सड़क परियोजनाओं के लिए 26,000 करोड़ रुपये के परिव्यय का प्रस्ताव रखा है।वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने 2024-25 के अपने बजट में कहा कि केंद्र सरकार बहुपक्षीय विकास एजेंसियों की सहायता के माध्यम से बिहार को वित्तीय सहायता की व्यवस्था करेगी। वित्त मंत्री ने कहा कि सरकार बिहार में हवाईअड्डे, मेडिकल कॉलेज और खेल संबंधी बुनियादी ढांचा भी स्थापित करेगी। केंद्र बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा और आंध्र प्रदेश के सर्वांगीण विकास के लिए पूर्वोदय योजना भी लाएगा।


PostImage

P10NEWS

July 23, 2024

PostImage

RBI ZERO BALENCE NO PENALTY: बैंक खाते में मिनिमम बैलेंस को लेकर आरबीआई ने जारी की नई गाइडलाइंस


 

   आरबीआई के नए दिशानिर्देश बैंक में न्यूनतम शेष राशि: 

यदि आपका भी बैंक खाता (बैंक खाता) है तो यह खबर आपके लिए बहुत जरूरी है। बता दें कि अभी हाल ही में आरबीआई की ओर से बैंक अकाउंट में मिनिमम बैलेंस (न्यूनतम बैलेंस) लेकर एक नई गाइडलाइंस जारी की गई है। तो आइए आपको बताते हैं जीरो होने का बैलेंस, अब आपकी पेनल्टी नहीं रहेगी।

 

बैंक खाता शून्य शेष

 

नेटवर्क से जुड़े ज्यादातर काम इन दिनों फोन से हीहोते हैं ऐसे में लोग अब यूपीआई ऐप या फिर नेट नेटवर्क का इस्तेमाल भी सबसे ज्यादा करते हैं। हालाँकि जब भी कोई बड़ी चीज फास्ट होती है तो बैंक जाने की जरूरत होती है। कई बार लोगों के एक से ज्यादा बैंक खाते होते हैं तो कुछ खाते में मिनिमम बैलेंस भी होता है जो खाते में नहीं कर पाते हैं और खाते में वह डूब जाते हैं।


ऐसे में जब भी आपका बैंक से अकाउंट बंद करने के लिए कहा जाता है तो कई बार आपके कंसल्टेंसी में पैसे चुकाने के लिए कहा जाता है। आज हम आपको बताएंगे कि इसे लेकर भारतीय रिजर्व बैंक ऑफ इंडिया में आरबीआई के नियम क्या हैं?                                                                                   

 बैंक से पैसा नहीं बसूल हो सकता है

बता दें कि अगर आपका भी बैंक खाता है और आपके बैंक खाते में बैलेंस मेंटेन नहीं है तो आपका बैलेंस जीरो हो सकता है। लेकिन मूल्य निर्धारण नहीं किया जा सका। कई बार हमारे बैंक में बैलेंस शीट दिखाई देती है। लेकिन बैंक से यह पैसा नहीं निकल सकता। यह नहीं कहा जा सकता कि आपने जो पैसा खरीदा है वह आपको पहले चुकाना होगा।


ये भी पढ़ें>>>  10 रुपए का सिक्का बेचें: ₹10 के माता वैष्णो देवी वाले सिक्के को बेचकर कमाएं लाखों रुपए और करें गरीबी दूर।।

RBI बैंक खाते में जीरो बैलेंस क्या है?

आरबीआई को लेकर एक दिशानिर्देश है जिसमें कहा गया है कि अगर आपके बैंक खाते में पैसा (बैंक खाता न्यूनतम शेष) दिखाया जा रहा है तो इस सूरत में एक भी रुपया बैंक को नहीं देना होगा। यानी आप बिल्कुल मुफ्त में अपना बैंक खाता बंद (Bank Account Ban) करा सकते हैं। बैंक ने आपसे कोई भी चार्ज नहीं लिया है।


ये भी पढ़ें>>>   एमपी किसान समाचार: बड़ी खबर! मध्य प्रदेश के 6 लाख किसानों को नहीं मिलेगी किसान सम्मान निधि की राशि, जानें वजह।

अगर बैंक में असाइन चार्ज बसूलता है तो आप शिकायत कर सकते हैं
यदि किसी बैंक में आपके बैंक खाते में साइन इन किया गया है और खाता बंद करने के लिए मेनिस बैलेंस (बैंक खाता न्यूनतम शेष) का भुगतान किया गया है, तो आप अपनी याचिका के लिए बैंक ऑफ इंडिया में रजिस्ट्रेशन कर सकते हैं, इसके लिए आप Bankingombudsman.rbi.org.in पर जा सकते हैं। जाना होगा और अपनी शिकायत दर्ज करनी होगी। इसके अलावा आप आरबीआई के नाम दर्ज नंबर के खिलाफ भी शिकायत कर सकते हैं, इसके बाद बैंक के खिलाफ कार्रवाई भी की जा सकती है, साथ ही आपको कोई पैसा भी नहीं भरना होगा।


PostImage

P10NEWS

July 22, 2024

PostImage

COLLECTOR SANJAY DAINE : मंगळवार २२ जुलै उद्या चार दिवस मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्था शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली.


 

 

गडचिरोली/२२:- गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने  यांनी २३ जुलै रोजी मंगळवारला हवामान खात्याच्या सुचना व जिल्ह्यातील सततच्या चार दिवस मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पुर परिस्थिती आढावा आपत्ती व्यवस्थापन समिती द्वारे घेतला असता जिल्ह्यातील वैनगंगा, इंद्रावती, गोदावरी , प्राणहिता,बांडिया इ. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असून पाणलोट क्षेत्र व नाल्यांना पुर आल्याने ३३ मार्ग बंद आहे. तसेच गोसिखुर्द धरणाचं विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्था शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. २३ जुलै रोजी मंगळवारला सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.


PostImage

P10NEWS

July 22, 2024

PostImage

SOCIAL WORK : खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी जनतेच्या निवेदनावर तहसीलदार व मुख्यकार्यपालन अधिकारी नगर परिषद वडसा यांना निर्देश देऊन जनतेच्या समस्यांचे निवारण केले.     


 

 

   

   वडसा (देसाईगंज) जि. गडचीरोली
 शासकीय विश्रामगृह येथे खासदार गडचिरोली-चीमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी निवेदन स्वीकारून उपस्थित तहसीलदार व मुख्यकार्यपालन अधिकारी नगर परिषद वडसा यांना निर्देश देऊन जनतेच्या समस्यांचे निवारण केले.     
           यावेळी माजी आमदार आनंदरावजी गेडाम, जिल् हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तहसीलदार प्रीती दूधदलकर, सी.वो.महेश रामटेके, काँग्रेस कार्यकर्ता रामदास मसराम, जेसाभाई मोटवानी, डॉ. निलु चिमुरकर, आरतीताई लहरी, पिंकू बावणे, मोहित अत्रे, लीलाधर भरे, विमल मेश्राम, पुष्पा कोहपरे, मंगला पेंदाम, भारती कोसरे, रजनी आत्राम, गीता नाकाडे, वैष्णवी आखरे, मालता गेडाम, मनीषा टेटे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 22, 2024

PostImage

IAS PUJA KHEDEKAR : पुजा खेडेकर ने फर्जी कागदपत्रे बनवाकर, ओबिसी प्रमाणपत्र और दिव्यांग प्रमाणपत्र जैसे फर्जीवाडा कागदपत्रों से बनी कलेक्टर UPSC घोटाळा


 

 

नई दिल्ली (IAS Puja Khedkar). ट्रेनी IAS पूजा खेडकर कंट्रोवर्सी में बड़ा अपडेट सामने आ रहा है. यूपीएससी ने पूजा खेडकर के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है. बता दें कि एक के बाद एक विवाद सामने आने पर यूपीएससी ने हाल ही में महाराष्ट्र सरकार को पत्र लिखकर पूजा खेडकर के सभी सर्टिफिकेट व अन्य दस्तावेज मांगे थे. इससे पहले पूजा खेडकर की प्रोबेशनरी ट्रेनिंग रद्द कर दी गई थी और उन्हें 23 जुलाई तक लाल बहादुर शास्त्री प्रशासन ट्रेनिंग एकेडमी पहुंचने के लिए कहा था.


इतना एक्शन लेने के बाद अब आखिरकार यूपीएससी यानी संघ लोक सेवा आयोग ने सख्त कदम उठाते हुए ट्रेनी आईएएस पूजा खेडकर के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है (Pooja Khedkar IAS). बता दें कि पूजा खेडकर महाराष्ट्र कैडर की ट्रेनी आईएएस अफसर हैं. उनकी फील्ड ट्रेनिंग शुरू होते ही उन पर कई विवाद खड़े हो गए. उन्होंने पुणे कलेक्टर ऑफिस में कुछ सुविधाएं मांगी थीं. डीएम की शिकायत के बाद उनका तबादला वाशिम कर दिया गया था.

 

IAS पूजा खेडकर चर्चा में क्यों हैं?आगे देखें…
IAS पूजा खेडकर चर्चा में क्यों हैं?
संबंधित खबरें

लद्दाख में सेना की पहली महिला अधिकारी कौन हैं? UPSC में पूछे जाते हैं ऐसे सवाल


IAS पूजा जैसे 2 और मामले... महाराष्ट्र में मची खलबली, CM ने मांगी जानकारी

UPSC में रिजर्वेशन का खेल कैसे होता है? सरकारी नौकरी के लिए लगता है ऐसा गणित

ISRO में साइंटिस्ट, UPSC में 4 बार सफल, फिर भी नहीं मिली कोई सर्विस

यूपीएससी ने एक्शन क्यों लिया?
यूपीएससी ने प्रेस रिलीज जारी कर पूजा खेडकर के खिलाफ एफआईआर होने की जानकारी दी है. पूजा खेडकर ने 2022 में सिविल सर्विस परीक्षा पास की थी. यूपीएससी ने ट्रेनी आईएएस अफसर पूजा खेडकर पर लगे आरोपों की जांच करवाई थी. उस पड़ताल में सामने आया कि पूजा ने गलत तरीकों से परीक्षा में दी जाने वाली छूट का फायदा उठाया. उन्होंने अपने नाम के साथ ही माता-पिता का नाम, फोटो, ईमेल आईडी, हस्ताक्षर, मोबाइल नंबर और एड्रेस बदलकर पहचान छिपाने की कोशिश की.


यह भी पढ़ें- ट्रेनी आईएएस पूजा खेडकर की ट्रेनिंग रद्द, पुलिस हिरासत में मां, अब तक क्‍या-क्‍या हुआ, 10 पॉइंट्स में जानें

यूपीएससी ने जारी किया कारण बताओ नोटिस
संघ लोक सेवा आयोग ने आईएएस पूजा खेडकर पर एफआईआर करने के साथ ही कारण बताओ यानी शो कॉज नोटिस भी जारी किया है (UPSC Show Cause Notice). सिविल सर्विस परीक्षा के लिए बनाए गए नियमों के आधार पर ही उनके खिलाफ एक्शन लिया जा रहा है. सीएसई 2022 में उनका कैंडिडेचर रद्द किया जा रहा है और भविष्य में किसी भी प्रतियोगी परीक्षा या सरकारी नौकरी के लिए भी उन्हें अयोग्य घोषित करते हुए उन पर रोक लगाई जा रही है.

यह भी पढ़ें- पूजा खेडकर के बाद इस महिला IAS पर उठे सवाल, कहा-फर्जी सर्टिफिकेट का…

 

 


PostImage

P10NEWS

July 22, 2024

PostImage

COLLECTOR SANJAY DAINE : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी शाळांना २२ जुलै रोजी सोमवारला सतत मुसळधार पावसामुळे सुट्टी जाहीर !            


            

 

 

 गडचिरोली/(२१) :- गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आपल्या आपत्ती व्यवस्थापन समिती द्वारे क्र १व क्रं. २ अधिककराचा वापर करून जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे एकुण ३७ मार्ग बंद असल्यामुळे व गोसिखुर्द धरणाचं विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे धोक्याची परिस्थिती पाहता दिनांक २२ जुलै रोजी सोमवारला जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा,महाविद्यालय सर्व शासकीय व निमशासकीय संस्था, शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जाहीर केले आहे. तरी सर्व पालक व विद्यार्थी, संस्थापक व प्राचार्य यांनी दक्षता घ्यावी.


PostImage

P10NEWS

July 21, 2024

PostImage

Breaking: मंडी कुल्लू NH-03 पर पहाड़ी से चलती बस पर गिरे पत्थर, नहीं कोई जानी नुकसान


 

मंडी-21जुलाई. मंडी-कुल्लू नेशनल हाईवे-03 पर बीती रात 9 मील के पास HRTC चलती बस पर पहाड़ी से एक बड़ी चट्टान आकर टकरा गई। इस हादसे में 3 सवारियों को हल्की चोटें पहुंची हैं। गनीमत यह रही कि इस चट्टान का एक कोना बस के अगले हिस्से से टकराया। यदि यह चट्टान पूरी बस पर गिर जाती तो बहुत बड़ा हादसा हो जाता। केलांग डिपो की यह बस मनाली से शिमला जा रही थी।
जानकारी के मुताबिक हिमाचल परिवहन की बस HP-42-3164 पत्थरों की चपेट में आ गई। बस अपने निर्धारित रूट केलांग से शिमला जा रही थी कि अचानक एक पत्थर आकर बस के अगले हिस्से पर गिर गया। इस हादसे में कुछ यात्रियों व बस स्टाफ को भी चोटें पहुंची हैं।
मण्डी से पण्डोह की सड़क पर यात्रा करना खतरे से खाली नहीं है।


PostImage

P10NEWS

July 21, 2024

PostImage

MUKHYAMANTRI EKNATH SHINDE : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांची सुचना


 

  नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी .    हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे.

मुंबई, दि. 21 : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका
आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले आहे.

 


PostImage

P10NEWS

July 21, 2024

PostImage

COLLECTOR SANJAY DAINE : पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड नागरिकांशी संवाद 


 

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड
•    नागरिकांशी संवाद 
•    प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

 

गडचिरोली दि. २० : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, वडसा, कुरखेडा तालुक्यात भेट दिली.  त्यांनी यावेळी नागरिक व शाळकरी मुलांशी संवाद साधला. नागरिकांनी काळजी घ्यावी, पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये, विजा चमकत असतांना झाडाखाली उभे राहू नये, मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला परिस्थितीवर बारीक नजर ठेवून अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना नियमितपणे राबविण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात कालपासून तीन दिवसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तसेच गोसेखुर्द धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची सूचना मिळाली होती. यासोबतच कालपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले, काही ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले तर काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली.
जिल्हाधिकारी संजय दैने यांचेसमवेत उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, संबंधीत तहसिलदार, पोलिस अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक आपदा मित्र व नागरिक मदत कार्यासाठी उपस्थित होते. 
००००


PostImage

P10NEWS

July 20, 2024

PostImage

CORRUPT CONSTRUCTION : भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे..!


 

        कंत्राटदारांची चौकशी करण्याची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची माहिती!

अहेरी : विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच पावसात पूल वाहून गेले.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते  व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे. 

भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे.मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यापूर्वी बांधण्यात आले.सदर पूल पहिलाच पावसात वाहून गेल्याचे दिसत आहे.सदर पूला लगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलेला आहे त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे. 

पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने सदर पुलाचे काम कितपत चांगले आहे सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येत आहे. सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.


PostImage

P10NEWS

July 20, 2024

PostImage

AAROGYA SUVIDHA PROBLEM : भामरागड तालुक्यातील गर्भवती महिलेला जेसीबीच्या सहाय्याने नाला पाल करावा लागतो. पण "महाराष्ट्र शासन लाडक्या बहिण योजनेत मग्न"


 

    अपर्ण पुलाचे बांधकाम रस्ता गेला वाहून लाडकी गर्भवती बहिण समस्येत चक्क जेसीबीच्या सहाय्याने नाला पार !

गडचिरोली/ 20 : राज्यभरात 'लाडकी बहीण योजने'चा उदोउदो सुरु असतांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून एका गर्भवती महिलेचा धक्कदायक व्हिडीओ समोर आला आहे. रस्ता वाहून गेला,आलापल्ली-भामरागड रस्त्यावरील कुडकेली जवळून वाहणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तेथे वळणरस्ता देण्यात आला होता. मात्र, सध्या पावसामुळे नाल्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने कंत्राटदारांनी बनवलेला वळणमार्ग वाहून गेला..येथील महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्याने तिला दवाखान्यात भरती करण्याची गरज होती पण रस्ता नसल्याने महिलेला जेसीबीच्या बकेटमधन नाला पार करावा लागला...👆


PostImage

P10NEWS

July 20, 2024

PostImage

WATER FLOWING : पर्लकोटा नंदी भामरागड. पुलावरून पाणी वाहने सुरु झाले आहे. भामरागड ते एटापल्ली मार्ग वाहतूकसाठी बंद झाला असून नदीवर पोलीस बंदोबस्त आणि बेरी्केटिंग करण्यात आलेले आहे..


पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.20.7.2024

 

1) आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
2) अहेरी मोयाबिनपेठा  रस्ता वट्रा नाला ता. अहेरी 
3) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता. कुरखेडा
4) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता. अहेरी
5.)  जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा
6) पोर्ला वडधा रस्ता ता. कुरखेडा
7) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा
8) कुरखेडा वैरागड ता. कुरखेडा 
9) करवाफा पोटेगाव रस्ता
10)मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता ता. कुरखेडा 
11,) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा 
12) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज
13) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला
14)आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)

पूर परिस्थिती संदर्भातील अहवाल
जिल्हा- गडचिरोली
दिनांक 20.07.2024, वेळ सकाळी 10.00 वा.
-----
 अ) पर्जन्यमान (मि.मी.) मध्ये:
आज दि. 20 जुलै, 2024 चे सकाळी 8.30 वाजता  Manual rain gauge station चे नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण  सरासरी 79.2 मि.मी.  पाऊस झालेला आहे,  40 पैकी 23 मंडळामध्ये अतिवृष्टी ची नोंद झालेली असुन धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मंडळमध्ये सर्वाधिक 156.4 मि.मी. पावसाची नोंद आहे.
    
 ब) धरण पाणी साठा व विसर्ग :
 1. वैनगंगा नदी :
🟠•     गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 27 गेट उघडलेले असुन 3,033 क्युमेक्स (1,07,114 क्युसेक्स) विसर्ग आहे. 
•    चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 3,804 क्युमेक्स (1,34,345 क्युसेक्स) आहे. गोसीखुर्द धरणातील विसर्ग 5,000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.
•    वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली  आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

 2. वर्धा नदी :
•    निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी सर्व 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे. 
•    बामणी (बल्हारशा) व सिरपूर टाऊन या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

 3. प्राणहिता नदी :
•    दिना प्रकल्प 85 टक्के भरलेला असून सांडव्यावरुन विसर्ग निरंक आहे.
•    महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

 4. गोदावरी नदी :
•    श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 62 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
•      लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा)  चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 10,576 क्युमेक्स (3,73,500 क्युसेक्स) आहे. बॅरेज ची पाणी पातळी 93.00 मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या 7.00 मी. ने खाली आहे.   
🟠•    कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या 3.0 मीटरने खाली आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

  5. इंद्रावती नदी :
🟠•    जगदलपूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या 0.10 मीटरने खाली  आहे. 
•    चिंदनार, तुमनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.
•    पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सकाळी 9.30 वाजताच्या नोंदीनुसार  इशारा पातळीच्या खाली  आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.
     ---  
  🔴इशारा :
           नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नद्या व नाले, तसेच वैनगंगा, प्राणहिता, वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची *पाणी पातळी वाढण्याची शक्यता* आहे. तसेच हवामान विभागातर्फे जिल्हयात काही ठिकाणी *फ्लॅश फ्लड रिस्क* चे संकेत दिलेले असल्याने नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करु नये. 
--- 
 🔴हवामान संदेश :
           भारतीय हवामान विभागाचे नागपूर, भोपाल, रायपूर व हैद्राबाद केंद्र यांचे दिनांक 19.07.2024 रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी या उपखोऱ्यातील काही भागात पुढील 24 तासाकरीता *मुसळधार ते अतिमुसळधार* स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे. 
🟠तसेच गडचिरोली जिल्हयात 24 तासाकरीता पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट  दिलेला असून काही ठिकाणी 🔴फ्लॅश फ्लड रिस्क चे संकेत दिलेले असल्याने कृपया उचित दक्षता घ्यावी.


PostImage

P10NEWS

July 20, 2024

PostImage

FOREST CORRUPTION: चातगाव वनपरिक्षेत्रातील रोपवन व इतर कामातील गैरव्यवहाराची चौकशी वरिष्ठ स्तरावर तक्रारीची दखल घेतली.


 

गडचिरोली : गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी वनमंत्री आणि वनखात्याच्या प्रधान सचिवांकडेही तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान संबंधित आरएफओने वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खरवडे यांनी केली आहे.

रोपवन लागवड, खोदतळे, साहित्य खरेदी, टिसीएमची कामे, कामावरील मजुर, मजुरांचे व्हाऊचर, त्यांचे बँक खाते पुस्तिका तपासून घेऊन अन्य कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी खरवडे यांनी केली होती. यादरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची विचारणा न करता चातगावचे वनपाल परशुराम मोहुर्ले यांनी चातगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी.पडवे यांच्या सांगण्यावरून 10 हजार रुपये आपल्या मुलाच्या अकाऊंटला पाठविले, असे खरवडे यांनी सांगितले. एवढेच नाही तर पैसे मिळाले का, अशी विचारणाही त्यांनी फोनवरून केली.

अशा पद्धतीने लाच देण्याचा प्रयत्न हा गुन्हा असल्याने त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी खरवडे यांनी केली. तसेच चातगाव वनपरिक्षेत्रात 2021 ते 2024 पर्यंतच्या कामांची व त्यावरील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी विजय खरवडे यांनी केली आहे.


PostImage

P10NEWS

July 19, 2024

PostImage

माननीय. सांसद रामजी गौतम बसपा के महान मिशनरी नेता का संवाद :


 

THE GREAT LEDAR MP RAMJI GAUTAM (BSP) :-  महिने में दो दिन और साल के चौबीस दिन घर जाते है, और साल के 341 दिन और रात बीएसपी मिशन के लिए कड़ी मेहनत करनेवाला मिशनरी नेता ! 

मुंबई/17:- माननीय. सांसद रामजी गौतम बसपा के महान मिशनरी नेता: बलिदानी नेता जो महीने में दो दिन और साल में केवल चौबीस दिन घर जाते हैं! बसपा नेतृत्व के भरोसेमंद साथी, वह सात राज्यों के प्रभारी हैं, उन्हें 2024-25 के लोकसभा चुनावों के बाद महाराष्ट्र राज्य का प्रभारी बनाया गया है! महाराष्ट्र राज्य में बसपा की चालीस वर्षों की राजनीतिक स्थिति से बसपा नेतृत्व में भारी निराशा है, भले ही फुले शाहू अम्बेडकर आंदोलन का उद्गम स्थल बसपा ही क्यों न हो, राजनीतिक सत्ता से दूर रहने के कारणों पर गहन मंथन के बाद बीएसपी, मा. सांसद रामजी गौतम को महाराष्ट्र की जिम्मेदारी दी गई है, पहले सात राज्यों की जिम्मेदारी दी गई है! इसके कारण उन्हें अपने निजी पारिवारिक जीवन में काफी परेशानियों का सामना करना पड़ता है, घर के लोग उनकी व्यस्त जिंदगी से नाराजगी दिखाते हैं, इस कारण मेरा बच्चा बात नहीं करता उन्हें अपने बच्चों को स्कूल से दूर देखने स्कूल के बाहार खड्डा रखना पडता है,इस के लिए दो दिनों के लिए घर जाना पड़ता है । निजी जिवन मैनें खो दिया, उन्होंने ऐसा जीवन फुले शाहू अम्बेडकर जिन्होंने मिशन मिशन में काम करने के लिए अपना निस्वार्थ जीवन बिताया। सांसद रामजी गौतम साहब कहते हैं जब मैं अपने समुदाय के लोगों को देखता हूं तो उन्हें मान सम्मान नहीं मिलता है, हमारी महिलाओं और लड़कियों के साथ बलात्कार होते है, हाल ही में महाराष्ट्र के सोलापुर जिले में! कितने लोग जानते हैं, नौवीं कक्षा की एक दलित लड़की के साथ बलात्कार किया गया और उसकी जगह काटकर उसे प्रताड़ित किया गया! लेकिन आज भी हर दिन  हमारे समाज पर अन्याय अत्याचार होते रहते है, हम जैसे लोग इसके लिए नहीं लड़ेंगे, कौन लड़ेगा और हमारी बहनजी कहती है कि निराश मत हो, राजनीति नहीं चलती, सत्ता नहीं आती, लेकिन हमारे समाज के लिए काम करते रहना हैं. फुले - शाहू- अंबेडकर-कांशीराम मिशन रुकनी नहीं चाहिए, फिर से हम सब भूलकर काम में लग जाते हैं!    सात राज्यों में काम करने के लिए मुझे प्रभारी बनाके  भेजा गया ! लेकिन जब मुझे महाराष्ट्र की धरती पर भेजा गया और बहनजी ने मुझे महाराष्ट्र का प्रभारी बना दिया! तब मुझे बहुत गर्व महसूस हुआ, कि डॉ. बाबासाहेब अम्बेडकर साहब की कर्म भूमि पर काम करने का मौका मिला और हमारी प्रेरणा श्रीमान कांशीराम साहब की भी कर्म भूमि मानी जाती है, ऐसी भूमि पर मुझे का करने का मौका मिला है मुझे खुद पर गर्व महसूस हो रहा है, कुछ करने का मौका मिला है! और मैं मेरा काम अपनी पूरी ताकत से  करूंगा! 40 साल में जो नहीं हुआ वो इतिहास बनेगा, अगर आप महाराष्ट्र की जनता का साथ चाहिए और उन पर भरोसा दिखायेंगे तो मैं जरूर पूरी कोशिश करूंगा, अगर मुझपर मेरे कामपर विश्वास नहीं है तो अभी बताओ, मैं महाराष्ट्र छोड़ दूंगा आजतक महाराष्ट्र लोकसभा चुनाव और महाराष्ट्र के अबतक की घटनाओं मेरा कोई योगदान नहीं था! क्योंकी अबतक यहा काम करनेवाले प्रभारी दुसरे लोग थे, एकपल ऐसा लगा की सब छोडकर चला जाऊ लेकीन सामने पढ़ी किताब में मा‌ कांशीराम साहाब का सायकल स्वार फोटो देखा नहीं मुझे संघर्ष करना है, लेकीन आप बताये और अपनी बहनजी  से कहूंगा कि महाराष्ट्र का युनिट बंद कर दे! क्या ये आप चाहते है, इसपर महाराष्ट्र प्रदेश के सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने रामजी गौतम साहब का समर्थन करके यह विश्वास दिया कि हम उनके साथ हैं, माननीय. सांसद रामजी गौतम साहब के फुले - शाहू - अंबेडकर- कांशीराम मिशन के जुनुन को देखने के बाद सभी पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं में जोश बढ़ गया!  और उनके प्रति सम्मान बढ़ गया! ऐसा निस्वार्थ नेतृत्व और निस्वार्थ नेता जो महिने में दो दिन और साल के चौबीस दिन घर जाता है, और साल के 341 दिन और रात बीएसपी मिशन के लिए कड़ी मेहनत करता है! इसलिए हमारे बुज़ुर्ग कह गए, कि घटनाएँ चाहे जो भी हों, भविष्य में इतिहास बन जाती हैं!                                                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                            (EDITOR IN CHIEF)


PostImage

P10NEWS

July 19, 2024

PostImage

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" अधिकृत केंद्रावरीलच अर्ज ग्राह्य


 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
अधिकृत केंद्रावरीलच अर्ज ग्राह्य.                                                   

राजकीय व सामाजिक संघटना द्वारे आयोजित केलेले कॅम्प ग्राहित धरले जाणार नाही. अशा ठिकाणी केलेले अर्ज रद्द झाल्यास प्रशासनाची जबाबदारी नाही. 

गडचिरोली दि. १८ : जिल्ह्यातील काही राजकीय व सामाजिक संघटना कॅम्प आयोजित करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरून घेत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अर्ज भरून देण्यासाठी सदर संघटनांकडून पैशाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चुकीचा अर्ज भरल्यास अथवा अर्ज शासनाकडे सबमिट न झाल्यास संबंधित पात्र महिला लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्वाकांक्षी योजनांबाबत आढावा बैठक आज घेण्यात आली. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित क्षेत्रीय अधिकारी आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. गडचिरोली येथून जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग व संबंधीत अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पात्र महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आपले अर्ज शासनाने प्राधिकृत केलेल्या अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) तसेच ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र, नगरपालिका/नगरपंचायतीचे मदत केंद्र या अधिकृत केंद्रावरच भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. या योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला-भगिनींची अडवणूक होता कामा नये अशा सूचना देतांनाच अर्जासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


PostImage

P10NEWS

July 18, 2024

PostImage

नाल्याच्या पुरामुळे शेतामध्ये अडकलेल्या ५ शेतकऱ्यांचा आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे सुखरूप बचाव करण्यात आला.


 

5  पथकाद्वारे बचाव करण्याFARMERS HELP :-  नाल्याच्या पूरामुळे शेतामध्ये अडकलेल्या 5 व्यक्तींचा आपत्ती व्यवस्थापनत आला.

 

       गडचिरोली/ दिनांक 17.07.2024 रोजी दुपारी 3.00 वाजता गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा ते कुंभी दरम्यान शेतात कामावर गेलेले 5 व्यक्ती जोरदार झालेल्या पावसामुळे स्थानिक नाल्याला आलेल्या पूरामुळे नदी व नाल्याचे मध्ये अडकले असल्याचे तहसील कार्यालय गडचिरोली द्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये सुचना मिळतात तात्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे पथकास घटना स्थळी रवाना करण्यात आले. सदरचे पथकांनी तातडीने बोटीचे तसेच शोध व बचावाचे सहाय्याने सर्व अडकलेले व्यक्तींना सायंकाळी 5.00 वाजता सुरक्षित नाल्याचे पाण्याबाहेर काढून बचाव करण्यात आला.अडकलेल्या व्यक्तीची नावे प्रमोद श्रावण बोबाटे वय 38 रा.गुरवळा,शेखर उईके वय 48 रा.गडचिरोली,सतिश चुधरी वय 38 रा.विहीरगाव,संजय बोरकुटे वय 45 रा.विहीरगाव,कुणाल बर्डे वय 21 रा.लेखामेंढा यांचा  सुरक्षित बचाव करण्यात आला. सदरचे बचाव कार्य जिल्हाधिकारी  संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी  सुनिल सुर्यवंशी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर टीम क्रमांक 2 चे पोलिस निरीक्षक  डि.जे.दाते यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस उपनिरीक्षक  एस.डी.कराळे व त्यांचे पथक यांचे नेतृत्वामध्ये तसेच जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांचे उपस्थितीमध्ये सदरची बचाव मोहीम राबविण्यात आली या वेळी जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अक्षय भांनारकर, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार,कल्पक चौधरी,अजित नरोटे तसेच स्थानिक गुरवळा गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 18, 2024

PostImage

गडचिरोली पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक, १२ माओवाद्यांना कंठस्नान !


 

NAXAL ATTACK :   गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक.
 

 12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश .
 अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त.
 

     गडचिरोली/१७:- छत्तीसगढ सीमेजवळील  वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये Dy SP Ops च्या नेतृत्वाखाली सात C-60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.


त्यावेळी सदर परिसरात  दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 06 तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता.  त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात  आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.  तसेच आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.  मृत माओवाद्यांपैकी एक ओळख पटली असून तो टिपागड दलमचा  प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम @ विशाल आत्राम,असल्याची माहिती मिळाली माओवाद्यांची पुढील ओळख आणि परिसरात शोध सुरू आहे.

 C-60 चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले  आहेत .  ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

माननीय श्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री गडचिरोली यांनी वरील यशस्वी मोठ्या अभियानासाठी  C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.


PostImage

P10NEWS

July 16, 2024

PostImage

गडचिरोली येथे १७ जुलै रोजी सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे.


गडचिरोली येथे १७ जुलै रोजी सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे.

 गडचिरोली/ 16 :- विदर्भातील औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ जुलै रोजी गडचिरोली येथील सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.  हा महत्त्वाकांक्षी उपक्रम, 10,000 कोटी, असून ह्या प्रकल्पामुळे प्रत्येक्ष व  अप्रत्यक्षरीत्या 7,000 पेक्षा जास्त जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार निर्माण करणे अपेक्षित आहे.

 आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, आम्ही गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यातील वडलापेठ गावातील भागात एकात्मिक स्टील प्लांटची स्थापना करून या दृष्टीकोनात योगदान देत आहोत. या स्टील प्लांट ची निर्मिती एकूण  350 एकर क्षेत्रात होणार आहे. 

 सूरजगड इस्पात प्रा. लिमिटेड प्रकल्प आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि नक्षलग्रस्त भागात भरीव रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या गुंतवणुकीचे प्रतिनिधित्व करतो.

 स्टील प्लांट प्रकल्पाचे भूमिपूजन १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील;  उदय सामंत, उद्योगमंत्री   आणि डॉ. धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री. सोबतच या महत्त्वाच्या सोहळ्याला अनेक शासकीय अधिकारीही उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

 सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष सुनील जोशी यांनी सांगितले की, "आम्ही १.६ एमटीपीए बेनिफिशेशन प्लांट, १.२ एमटीपीए पेलेट प्लांट आणि ४ x ६५० टीपीडीचा स्पंज आयर्न प्लांट स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहोत.  इंडक्शन फर्नेस (0.75 MTPA), रोलिंग मिल (0.75 MTPA), आणि 120 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट 2026 मध्ये सुरू होणार आहे, संपूर्ण प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आमची भविष्यातील योजना आहे.  एकात्मिक स्टील प्लांटची क्षमता वार्षिक 2 दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे."

 सूरजगड इस्पातची संकल्पना प्रा. लि.चा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू झाला, भूसंपादनासाठी 8 ते 10 महिने लागले.  या प्रकल्पाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सरकारसोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला.

 शेवटी, सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प औद्योगिक वाढ आणि प्रादेशिक विकासासाठी महाराष्ट्राच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.  हा उपक्रम केवळ आर्थिक फायद्यांचे आश्वासन देत नाही तर गडचिरोलीच्या विकासात एक नवीन अध्याय चिन्हांकित करून अत्यावश्यक सेवा आणि रोजगार उपलब्ध करून देऊन स्थानिक समुदायांचे उत्थान करण्याचे उद्दिष्टही आहे.


PostImage

P10NEWS

July 16, 2024

PostImage

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ


 

 PMFBY :  पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई, दि.१५ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.                     सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः  पाठपुरावा करत होते.

            त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगवरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

July 14, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023  (प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी चाचणी संपन्न. P10NEWS


   GROUND REPORT : गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023 
(प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी चाचणी संपन्न

 

, गडचिरोली/:- गडचिरोली पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 10 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती  2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 912 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणी ही दिनांक 19/06/2024 सुरु होऊन आज दिनांक 13/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झालेली आहे.  

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली चालक पोलीस शिपाईच्या 10 पदाकरिता 2258 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी 1561 पुरुष व 267 महिला उमेदवार शारिरीक चाचणी करीता हजर आले व त्यापैकी 1363 पुरुष व 176 महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली.  यासोबतच सदर उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एम.आय.डी.सी. मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली (आरटीओ) यांच्या समक्ष पार पडली. तसेच पोलीस शिपाईच्या 912 पदाकरिता एकुण 24570 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 13342 पुरुष उमेदवार व 6400 महिला उमेदवार हजर आले व त्यापैकी 11826 पुरुष व 5308 महिला उमेदवार यांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. 

सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात आली असून यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test  तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) Based Technology  चा वापर करण्यात आले. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology  चा वापर करण्यात आले. यासोबतच उमेदवारांना मैदानी चाचणी दरम्यान काही दुखापत झाल्यास तात्काळ उपचार होण्याकरीता मैदानातचं रुग्णालयाची सोय करण्यात आली. तसेच  इतर काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण मा. पोलीस अधीक्षक यांचे समक्ष प्रत्यक्षरित्या करण्यात आले. यासोबतच आज रोजी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व पत्रकार बंधुना बोलावून त्यांना पोलीस भरती मैदानी शारिरीक चाचणीमध्ये वापरण्यात आलेल्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 
तसेच मैदानी चाचणी दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणतालीकेची यादी व लेखीपरिक्षेकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी तसेच लेखीपरिक्षेचा दिनांक लवकरच गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे असे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी सांगितले आहे. 


PostImage

P10NEWS

July 12, 2024

PostImage

BSP MISSION MEMBERSHIP : बसपा आजी माजी पदाधिकार्यांनी मोठ्या उत्साहात सदस्य नोंदणी केली.


बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. सुनीलजी डोंगरे यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात नवीन सदस्य नोंदणी मोहीमेला सुरुवात।                                                                   

गडचिरोली/11:- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुनील डोंगरे साहेब महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. यादरम्यान आज दिनांक 11/07/2024 ला दुपारी 12:00 वाजता बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी सर्व आजी माजी  पदाधिकारी व कार्यकर्त्याचे मनोगत घेतले आणि लोकसभा निवडणुकीचा अहवाल घेतला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. तसेच बहुजन समाज पक्षाच्या वतीने नविन सदस्य नोंदणी करण्यासाठी 50/- रुपये सदस्य नोंदणी पावती असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील लोकांपर्यंत पदाधिकारी, व कार्यकर्ता संपर्क मोहीम राबविण्यात यावी असे मार्गदर्शन केले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव श्री. रमेश मडावी, माजी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, दुष्यांत चांदेकर साहेब, मंदीप गोरडवार विधानसभा अध्यक्ष गडचिरोली, सुधीर वालदे, डॉ.सुनील बागडे, कैलास खोब्रागडे, सोनटक्के साहेब, नरेश महाडोळे, लडु वाडके, सुमन क-हाडे, वेणुताई खोब्रागडे, भावना खोब्रागडे, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


PostImage

P10NEWS

July 11, 2024

PostImage

कॅबिनेट मंत्री धर्मेरावबाबा आत्राम यांचे कट्टर समर्थकांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश!


कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे कट्टर समर्थकांनी काँग्रेस पक्षात पक्षाप्रवेश !                                                 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे व कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला नेत्यांनी तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पाक्ष प्रवेश केली.त्यावेळी पक्षाप्रवेश ग्रामपंचायत सदस्य सौ.माया प्रकाश कोरेत,सौं.शाहीजीदार रुस्तमाखाॅ पठाण,किशोर सडमेक,प्रकाश कोरेत,सतीश कोरेत,संजू आत्राम,जागपती सडमेक,साईनाथ उरेते,तिरुपती सडमेक,पत्रू पोच्या आत्राम,सुरेश आलम,दिलीप आत्राम,दौलत उरेते,अमोल आत्राम,मनोज सडमेक,प्रभाकर आत्राम,बबूराव मडावीसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करीत.महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान साहेबांचा नेतृत्वावर - काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले.सदर पक्षाप्रवेश कार्यक्रम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील निवास्थानी घेण्यात आली आहे.काँग्रेस पक्षात पक्षाप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची ना.विजयभाऊ वडेट्टीवार,खासदार डॉ.नामदेव किरसान साहेब,काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार,जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते शाल व पक्षाचे दुप्पटा टाकून पक्षात स्वागत केले आहे.यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील समस्त काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 11, 2024

PostImage

LOYLD METAL SOCIAL WORK : नगरपंचायत एटापल्ली येथे बस व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न


SOCIAL NEWS : नगरपंचायत एटापल्ली येथे बस व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न.

गडचिरोली/10 :- लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील शाळकरी विद्यार्थ्यांन करिता दिलेले बस व एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना वेळीच उपचार मिळण्याकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा नगरपंचायत एटापल्ली तर्फे नगरपंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.सदर बस व रुग्णवाहिकेचे लोकार्पण मा.दिपयंती पेंदाम नगराध्यक्षा नगरपंचायत एटापल्ली व मा.एस.व्यंकटेश्वर व्यवस्थापकीय संचालक लॉयड मेटल्स कंपनी यांच्या हस्ते झाले.लोकार्पण सोहळ्या नंतर उपस्तीत प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.एस.व्यंकटेश्वर व्यवस्थापकीय संचालक लॉयड मेटल्स कंपनी यांनी उपस्तीत नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले आम्ही एटापल्लीच्या शाळकरी विद्यार्थ्यांना बस दिले,रुग्णांना वेळीच उपचार मिळावा याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले,लायड मेटल्स कंपनीचे प्रेम एटापल्ली करांवर आहे हे यामुळे शक्य झाले असे त्यांनी म्हणाले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.जितेंद्र टिकले नगरसेवक यांनी लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे व उपस्तीत प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली,मा.घागुर्डे साहेब तहसीलदार एटापल्ली, मा.आदीनाथ आंधळे गटविकास अधिकारी एटापल्ली, मा.निलिमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली, मा.ऋषिकेश बुरडकर गटशिक्षण अधिकारी, मा.साईकुमार सर, मा.बलराम सोमनानी, मा.राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली, मा.नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती, जितेंद्र टिकले नगरसेवक, राहुल कुळमेथे नगरसेवक, निजान पेंदाम नगरसेवक, निर्मला कोंडबत्तुलवार नगरसेविका, निर्मला हिचामी नगरसेविका तसेच विद्यार्थ्यांचे पालकवर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.


PostImage

P10NEWS

July 10, 2024

PostImage

 ‘पीपीपी’ पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती - अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम


 भेसळयुक्त अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी

 ‘पीपीपी’ पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती

- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

            मुंबई, दि. १० : भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, प्रयोगशाळांची अन्न नमुने तपासण्याची मर्यादीत क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्ल‍िक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

              सदस्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

             मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुत्ता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे 2024 दरम्यान 6 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 610.5 किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे.

               भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात 196 दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 25 हजार 338 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून 13 लाख 44 हजार 406 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी 20 अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.   भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाया वाढल्या आहेत, असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

 


PostImage

P10NEWS

July 10, 2024

PostImage

POLITICAL GAME: क्या मोदी का चेहरा हरा, पांच साल तक रहेगा नीतीश कुमार के हाथ ! 


नीतीश कुमार एनडीए गठबंधन सरकार से ओबीसी जाति जनगणना की मांग पूरी कर पायेंगे! क्या देश में फिर से दोबारा लोकसभा चुनाव की संभावना है!

    दिल्ली/ (11) :- नीतीश कुमार की छवि अपने क्षेत्र में ओबीसी आरक्षण और जातीय जनगणना कराकर बिहार की राजनीति और राष्ट्रीय राजनीति में सुधार लाई, जिसका नतीजा उन्हें कांग्रेस चुनाव में मिला। लेकिन अब उनकी सबसे बड़ी जिम्मेदारी भारत सरकार के साथ गठबंधन सरकार बनाना और भाजपा और गठबंधन सरकार के साथ जल्द से जल्द ओबीसी समुदाय की जातीय जनगणना की मांग को पूरी करना होगा, अगर ऐसा नहीं किया गया तो बिहार क्षेत्र में उनकी राजनीति खत्म हो सकती है। और पूरे देश में उनकी छवि को भी नुकसान हो सकता है और पांच साल बाद ओबीसी जनगणना को लेकर बिहार की जनता और विपक्ष उनसे घिरा भी हो सकता है, अगर मांग पूरी नहीं हुई तो क्या नीतीश कुमार की ओबीसी जाति जनगणना की मांग पूरी होगी भारत से समर्थन वापस लेंगे, क्या भारत गठबंधन में शामिल होगा,

अगर भारत में ओबीसी गठबंधन भी जाति आधारित जनगणना नहीं करता है? अगर नीतीश भारत गठबंधन में शामिल नहीं हुए, तो संभावना है कि एक या दो साल में फिर से एक बार कांग्रेस चुनाव होने की संभावना है! अगर ऐसा कुछ नहीं हुआ तो क्या नीतीश कुमार के लिए बिहार की राजनीति पर ग्रहण लगना संभव है, क्योंकि क्या नीतीश कुमार देश और बिहार के ओबीसी लोगों की जातीय जनगणना की मांग को पूरा कर पाएंगे, ये तो वक्त ही बताएगा कि राजनीति का तरीका कब और कैसे बदलेगा, नीतीश कुमार की हर एक दाव पर देश की राजनीति का भविष्य जुड़ा है!


PostImage

P10NEWS

July 10, 2024

PostImage

बसपा पदाधिकार्यांनी विद्यापीठाच्या प्र - कुलगुरुंना धरले धारेवर


PH.D CORRUPTION : बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील Ph. D. घोटाळा व विद्यार्थीयांच्या समस्या वर प्र-कुलगुरु श्रीराम कावळे यांना धरले धारेवर 

            गडचिरोली/ 08:- बहुजन समाज पार्टी गडचिरोली विधानसभा श्रेत्रामधील कार्यकरते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील प्र-कुलगुरु श्रीराम कावळे यांची भेट घेतली,यावेळी चर्चेमध्ये विद्यापीठ मधील दोन विद्यार्थीयांचे थिसिस जमा केल्यानंतर RRC द्वारा अवैध कार्य झाल्याचा मुद्दा उचलला.महाराष्ट्र सार्वजनिक कायद्याचे उल्लंघन समितिने केलेले आहे.तरी या प्रकरण चौकसी करूंन कार्यवाही करावी आणि त्या दोन Ph.D. विद्यार्थी यांना लवकरात लवकर न्याय द्यावा.तसेच विद्यापीठात वस्तिगृहात मूलभूत सुविधाचा अभावा आहे.विद्यार्थीना तत्काळ सुविधा प्रदान कराव्या, विद्यार्थीना त्रास होवु नए ,तसेच बदल्यांमध्ये विशिष्ट माणसाला तोड़ पाहुन  बदली देतात त्या मुळे काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यान्ना नाहक त्रास होवू नये. यानंतर असे झाल्यास  बहुजन समाज पार्टी, गडचिरोली आंदोलनात्मक भूमिका स्विकारेल याची विद्यापीठने दक्षता घ्यावी ,अशी तंबी दिली. यावेली विधानसभा अध्यक्ष श्री. मंदीप एम गोरडवार, बहुजन समाज पार्टी विधानसभा गडचिरोली, मा.रमेश मडावी माजी प्रदेश सचिव बनें, मायाताई मोहुर्ले, जिला अध्यक्ष महिला बनें गडचिरोली, कांता कंबळे, सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली, नरेश महाडोळे सामाजिक कार्यकर्ता, सूरज खोबरागड़े गडचिरोली, जॉनी सोमणकर, विलास मशाखेत्री , महाशय चामोर्शी, दामाजी सातपुते चामोर्शी, तसेच इतर कार्यकरते उपस्थित होते।

                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)