ProfileImage
61

Post

0

Followers

0

Following

PostImage

MH 33 NEWS

July 23, 2024

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या!                 आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची मागणी..!


 

अहेरी : मागील  ५-६ दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.अतिवृष्टीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासनाकडे केली आहे.अहेरी तालुक्यातील अतिवृष्टीने अनेक मार्ग ठप्प पडले होते.

काहींच्या घरात तर काहींच्या दुकानात पाणी शिरले,तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.याची दखल घेत आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024

PostImage

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्या              काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांची  मागणी 



    
अहेरी : मागील चार - पाच  दिवसांपासून सगळीकडे संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने याची फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात बसले असून संततधार पाऊस व पूरजन्य परिसथितीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील अनेक  नागरिकांचे घरांचे पडझड झाली असून तसेच शेतकऱ्यांचे सुध्दा अतोनात नुकसान झाली असून सरकार व  संबंधित विभागाने नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी काँगेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आह.
  
संततधार पावसामुळे नुकसान झालेल्यांची आणि पूरजन्य परिस्थितीत अडकलेल्यांची अजयभाऊ कांकडलवार यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेटी देत आपल्यापरीने मदत कार्याला सुरुवात केली आहे.तसेच त्यांनी नागरिकांसाठी आपल्या स्वतःची चोवीस तास हेल्पलाईन सेवा सुध्दा सुरू केली आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नागरिकांची अडीअडचणी जाणून घेतले.तसेच अनेक नुकसान ग्रस्तांना आपल्यापरीने आर्थिक मदतीचे हात दिले.

पूरग्रस्त गावांची पाहणी दरम्यान कंकडालवार यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदारमचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी


 

अहेरी : मुसळधार पावसाने जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच अहेरी तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीचे पाहणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली. 

आहेरी तालुक्यात मागील पाच-सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे देवलमरी - मोद्दूमतूरसह अनेक मुख्य रस्ते बंद आहेत.बंद रस्त्याने नागरिकांना आवागमन करण्यास नागरिकांना अडचण निर्माण होत आहे.माजी जि.प.अध्यक्ष अजय कांकडलवर यांनी सदर पूर्वग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली व सतर्क राहण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024

PostImage

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे  - लहुजी क्रांती मोर्चाची मागणी.


 

गडचिरोली :- लहुजी क्रांती मोर्चा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने   जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री  यांना निवेदन देण्यात आले . हे निवेदन महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे .देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत  त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे साहित्य जगातील २७ भाषेमध्ये प्रकाशित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी साता समुद्रापलीकडे गायन केला आहे .त्यामुळे १ ऑगस्टला त्यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावे . १ ऑगस्टला सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावे .अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी  निधी उपलब्ध करून देण्यात यावे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारांसाठी जाचक अटी शिथिल करावे. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर निकाली काढावे .मातंग व तत्सम जातीवरील होत असलेले अन्याय व अत्याचाराच्या घटनाचा तपास एसआयटीकडे देऊन खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवावे.
   या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले. निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर बावणे , भोजराज काणेकर , प्रमोद बांबोळे ,प्राध्यापक राजेंद्र लांजेकर ,आनंद अलोणे, यज्ञराज जनबंधू उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 20, 2024

PostImage

जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची भेट आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचीही उपस्थिती


जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे स


गडचिरोली ::  जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व कामाचा आढावा घेतले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुसी सिंग, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, नदीम नाथानी योगेंद्र झंजाळ उपस्थित होते. 
बैठकी दरम्यान आस्टी -सिरोंचा महामार्गाचे काम जलद गतीने करने, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता नियमित बससेवा पूरविणे 
या सारख्या इतर विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणि मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापण च्या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सुविधा तातकाळ पूरविण्याच्या सूचना केल्या.


PostImage

MH 33 NEWS

July 20, 2024

PostImage

बहुजन मुक्ती पार्टीची जिल्हा कार्यकारिणी गठित


 

गडचिरोली:- बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ  यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली .पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी करण्यात आली.
डोमा गेडाम जिल्हा प्रभारी, जनार्दन ताकसांडे सहाय्यक जिल्हा प्रभारी, प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी, अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष, खेमचंद इंदूरकर महासचिव , रमेश उईके सचिव, ज्ञानेश्वर मुंजमकर संघटक ,शंकर आलोने उपाध्यक्ष , मनोहर पोटावी उपाध्यक्ष ,श्रावण झाडे सहसचिव, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी , तुळशीराम सहारे कार्यकारी अध्यक्ष , किशोर मेश्राम सदस्य अशा प्रकारे  कार्यकारिणी गठित करण्यात आली .तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी शंकु   पोटावी , डॉक्टर कन्नाके , इंजिनीयर सुरेश मडावी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रमेश उईके  यांची नावे पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी पुढे आली आहेत. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष यांनी केले.बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ  यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली .पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी करण्यात आली.
डोमा गेडाम जिल्हा प्रभारी, जनार्दन ताकसांडे सहाय्यक जिल्हा प्रभारी, प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी, अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष, खेमचंद इंदूरकर महासचिव , रमेश उईके सचिव, ज्ञानेश्वर मुंजमकर संघटक ,शंकर आलोने उपाध्यक्ष , मनोहर पोटावी उपाध्यक्ष ,श्रावण झाडे सहसचिव, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी , तुळशीराम सहारे कार्यकारी अध्यक्ष , किशोर मेश्राम सदस्य अशा प्रकारे  कार्यकारिणी गठित करण्यात आली .तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी शंकु   पोटावी , डॉक्टर कन्नाके , इंजिनीयर सुरेश मडावी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रमेश उईके  यांची नावे पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी पुढे आली आहेत. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष यांनी केले.


PostImage

MH 33 NEWS

July 19, 2024

PostImage

भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे..!         कंत्राटदारांची चौकशी करण्याची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी!


 

अहेरी : विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच पावसात पूल वाहून गेले.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते  व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे. 

भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे.मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यापूर्वी बांधण्यात आले.सदर पूल पहिलाच पावसात वाहून गेल्याचे दिसत आहे.सदर पूला लगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलेला आहे त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे. 

पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने सदर पुलाचे काम कितपत चांगले आहे सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येत आहे. सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

July 17, 2024

PostImage

आदिवासी काँग्रेस सेलचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी यांनी मोहरम कार्यक्रमाला उपस्थित!


अहेरी :- तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लालशाहा / ईमामे कासिम सार्वजनिक मोहरम कमिटी पुनागुडम तर्फे आलापल्ली येथे मोहरम कार्यक्रम आयोजित केली आहे.आयोजित मोहरम कार्यक्रमला काँग्रेसनेते व आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवले.दरम्यान मडावी साहेबांनी कमिटी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कार्यक्रमा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  
यावेळी कमिटी सदस्य चिंटू आत्राम,जावेद पठाण,रिंकू आत्राम,बबलू आत्राम,दिलीप सिडाम,सीताराम कोरेत,नाना कोरेत,महेश सल्लम,पिट्टू अर्का,अमन गंजीवर,श्रीकांत आत्राम,गणेश आलाम,अमोल सडमेक,रोहित अर्का,आकाश येरकलवार,आकाश सिडाम,योगेश सडमेक,योगेश कोत्तावार,सुरज आत्राम,दिग्विजय आत्राम,जिम्मी आत्राम,रचित अर्का,पंकज गेडाम,विक्की बडगेल,स्वप्निल सारकेवार,अज्जुभाऊ पठाण मा.सरपंच ,स्वप्नील मडावी ,सचिन पंचाऱ्या,आशिष तलांडेसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कमिटी पदाधिकारी - सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

July 17, 2024

PostImage

शासकीय आदिवासी मुले व मुलीच्या वस्तीगृहात बि.एड व एम.ए च्या विद्यार्थी व विद्यार्थीना प्रवेश देण्यात यावा*   *अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांची मागणी


 

अहेरी :- शासकीय आदिवासी मुले व मुलीच्या वस्तीगृहात बि.एड व एम.ए च्या विद्यार्थी व विद्यार्थीना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी मा. डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत  निवेदनातून केली आहे.

 एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प अहेरी अंतर्गत येत असलेल्या शा आश्राम शाळेतील मुले मुलीचे वस्तीगृह अहेरी आलापल्ली हे मुलचेरा सिरोंचा, भामरागड, एटापल्ली अहेरी या मार्गाच्या मध्यभागी असून उच्च शिक्षण घेण्यातील
पाचही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी येथे येत असतात. 
परंतू शा. आदिवासी वस्तीगृह इयत्ता ८ ते १२ वी पर्यंत वस्तीगृह उर्वरित ५०% जागेसाठी बि.ए बि.कॉम बि.एस.सी २ ते ३ एम.ए. साठी प्रवेश देवून ५०% कोटा पूर्ण करतात.
बि.एड व एम.ए. साठी सर्वाधिक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशित असून सुद्धा वस्तीगृहाला प्रवेश मिळत नाही तसेच आदिवासी विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या शासकीय आश्रमशाळा अनुदाणित आश्रम शाळा एकलव्य आश्रम शाळा नामांकीत शाळा १ ते १२ पर्यंत असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्रवेश देवून उच्च शिक्षण घेण्याच्या बि.ए., बि.कॉम, बि.एस.सी. एम.ए. बि.एड शिक्षण घेण्या-या विद्यार्थाना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे.
 या पाचही तालुक्यामध्ये अहेरीला एकमेव बि.एड महाविद्यालय असून १० ते १५ वर्षात एकही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाही.

 तसे दिनदयाल उपाध्यय स्वयम योजना तालुक्याच्या ठिकाणी लागु होत नाही म्हणून लाभ देत नसल्याने या भागातील नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त, डोंगर-दऱ्यात राहणारे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित विकासापासून कोसो दूर जात आहेत.
 त्यामुळे या भागातील आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ८ ते १२ च्या विद्यार्थाच्या प्रवेश प्रक्रिया राबवून किंवा वस्तीगृहात प्रवेश क्षमता वाढवून बि.ए. बि.कॉम, बि.एस.सी, एम.ए. बि.एड करण्या-या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकिया पूर्ण करून तात्काळ प्रवेश देण्यात यावी अन्यथा प्रकल्प कार्यालय अहेरी समोर धरणे आंदोलण करण्यात येईल.
असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.


PostImage

MH 33 NEWS

July 15, 2024

PostImage

खा.डॉ.नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम! माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार,आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित.!


 

अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते व गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा वाढदिवस निमित्त काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडले.

दरम्यान अहेरी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या प्रमुख उपस्थित अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप,नागेपल्ली सेवासदन दवाखान्यात रुग्णांना फळ,बिस्केट वाटप तसेच अहेरी शाळेतील विध्यार्थी - विध्यार्थींना पेन बुक चॉकलेट,कंकडालवार,मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब जनतेला साडी वाटप तसेच काही जनतेला आर्थिक मदत सुद्धा करण्यात आले.

यावेळी रज्जाक खान पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,स्वप्नील मडावी,चंद्रशेखर बेज्जलवार,बग्यश्रीताई बेज्जलवार ग्रामपंचायत सदस्य आलापल्ली,हनिप शेख,मधुकर सडमेक अहेरी विधानसभा एस.टी.सेल,सतीश कोरेत,जगताप कोरेत,किशोर सडमेक माजी पेसा अध्यक्ष,जावेद शेख,सतीश मडावी,विनोद मडावी,कोशोर सडमेक,जगपती सडमेक,संतोष येनगंटीवार,सचिन पंचार्य,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गेसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

July 14, 2024

PostImage

आदिवासी एकता युवा समिती तर्फे वृक्षारोपण व फळवाटप


 


गडचिरोली- आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य स्थानिक बिरसा मुंडा चौकात वृक्षारोपण व वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना फळवाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने वृद्धाश्रमातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन आदिवासी एकता युवा समिती चे अध्यक्ष उमेश उईके यांनी संस्थेस दिले. याप्रसंगी समितीचे सचिव प्रदिप कुलसंगे, माजी जिप सदस्य कुसुम अलाम, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, एम्प्लॉईज फेडरेशन चे रुषी होळी सर, समितीचे सल्लागार मुकूंदा मेश्राम सर, वृद्धाश्रमाचे लिपीक लोणारे साहेब,  प्रा. किरकीरे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री मुकुंदा सर यांनी वृद्धाश्रमास १००० रु देणगी स्वरूपात दिले. यानंतर समितीच्या वतीने पेसा भरतीमधील युवकांची पेसा भरती संदर्भात बैठक घेण्यात आली. पेसा भरतीतील युवकांची बैठक घेऊन रडखडलेली पेसा भरती कशा प्रकारे सुरू करण्यात येईल यासंदर्भात मा. धिरज मडावी सर, मा. सदानंद ताराम सर यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला.  व पेसा भरती व रडखडलेली पदभरती संदर्भात आंदोलनात्मक भुमिका घेण्याची भुमिका ठरवण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता समितीचे कार्याध्यक्ष संजय मसराम, सुरज मडावी, स्वप्नील मडावी, मयुर कोडापे, बादल मडावी, अक्षय वाढई, सुमित कुमरे, स्वप्नील मडावी, प्रफुल कोडाप, संजय भोयर, डेव्हिड पेंदाम, कृपाली दुर्वा, नुतन वड्डे, सुनिता उसेंडी, समिर उसेंडी, खुशाल हुर्रा, गिरीश उईके, आदि युवक युवतीं उपस्थित होते,


PostImage

MH 33 NEWS

July 14, 2024

PostImage

सार्वत्रिक बहुउद्देशीय  संस्था, नवेगाव तर्फे पोलीस भरती उमेदवारांना समारोप


 

गडचिरोली:-सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव तर्फे पोलीस भरती मैदानी चाचणी करिता येणाऱ्या दुर्गम भागातील उमेदवारांना  निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिनांक १८जून  ते १३ जुलै  पर्यंत प्रति दिन ७० ते ८० असे एकूण १६५० विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. सृष्टी सेलिब्रेशन हॉल सेमाना रोड नवेगाव या ठिकाणी सदर सेवा संस्थेच्या वतीने मोफत देण्यात आली. या सेवाकार्याला सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव यांनी हॉल उपलब्ध करून देऊन मुला -मुलींची निवास व्यवस्था   केली होती.
यासोबतच एक वेळच्या जेवणाकरिता सुरज कोडापे यांनी विशेष प्रयत्न केले महेंद्रजी ब्राह्मणवाडे ,डॉक्टर मिलिंद नरोटे, श्री लीलाधर भरडकर डॉक्टर कोवे यांनी यात सहकार्य केले . 
सुरज कोडापे यांनी अनेकांशी समन्वय साधून प्रत्येक संध्याकाळी उमेदवारांना भरती विषयीक आवश्यक मार्गदर्शन करून सर्वांचे मनोधैर्य वाढवून स्पर्धेमध्ये यश मिळवण्याचे सूत्र सांगितले.
 कोडापे यांची  पोलिस विभागात PSI या पदावर निवड झालेली आहे, त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या सेवा कार्यात संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच इतर सामाजिक संघटनांनी पाठबळ दिले. त्याचप्रमाणे अजब गजब फुडीज चे संचालक सतिश भाऊ , लक्षवेध अकॅडमी संचालक राजीव सर, उमेश उईके, कुणाल कोवे , वनिशाम येरमे,  भरत येरमे, अमरसिंग गेडाम,  मुकुंदा मेश्राम सुरेश बारसागडे , पुंडलिक शेंडे, जालिंदर भोयर, अमृत किनेकार ,रेवनाथ निकुरे  यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले तर सतीश कुसराम यांनी उमेदवारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सहकार्य केले..
या सेवा कार्याकरिता आर्थिक सहकार्य देणाऱ्या तसेच या सेवाकार्यात प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष   सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. 

दिनांक   28 जुलै 2024 ला गडचिरोली येथे होणाऱ्या पोलीस भरती लेखी चाचणी करिता दुर्गम भागातून   येणाऱ्या उमेदवारांकरिता  एक दिवस निवासाची व भोजनाची मोफत सेवा देण्यात येईल.
यापुढेही वरील दुर्गम भागातून कार्यालयीन काम करिता व शालेय कामाकरिता येणाऱ्या  गरजू विद्यार्थ्यांना व पालकांना एक दिवसीय निवास व भोजनाची मोफत सेवा देण्याचा व अशा प्रकारचे उपक्रम निरंतर  राबविण्याचा संस्थेचा  मानस आहे.. संपर्क क्रमांक- ज्योती मॅडम ९४०५८७२३९७ दुर्गे सर ९७६६५८३१६१, सतीश सर ७४९८४५२०७९.


PostImage

MH 33 NEWS

July 12, 2024

PostImage

महागाव येथील येरोजवार कुटुंबाला जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत!


 

अहेरी :  तालुक्यातील महागाव येथील सुरेखा येरोजवार यांची काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने ते चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत आहे.येरोजवार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना बाहेरची औषध व इतर कमांसाठी आर्थिक अडचण भासत होती. 

सदर बाब काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यां कडून कळताच त्यांनी चंद्रपूर गाठून नातेवाईकांना भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली तसेच रुग्ण सुरेखा येरोजवार यांना तब्येतीची आस्थेने विचारपूस करून येरोजवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली.

दरम्यान यावेळी कंकडालवार म्हणले कि यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य ते मदत करेन म्हणून येरोजवार कुटुंबियांना मोठा धीर दिला. या आर्थिक मदतीविषयी महागाव येथील येरोजवार कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.


PostImage

MH 33 NEWS

July 1, 2024

PostImage

लाडकी बहीण योजनेच्या कालावधीत वाढ करा. - खासदार प्रतिभा धानोरकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे मागणी.


 

गडचिरोली:- महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेची नुकतीच पावसाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. सदर योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी फक्त 15 दिवस असल्याने व त्या कालावधी आवश्यक कागदपत्राची पुर्तता होत नसल्याने सदर योजनेच्या अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.

महाराष्ट्र शासनाने आगामी विधानसभा निवडणूका डोळîासमोर ठेवून मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सदर योजनेचा अर्ज भरण्याची दि. 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यत असून या करीता अनेक शासकीय कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्या  मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र व रहीवासी दाखल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या दोन शासकीय कागदपत्रांसाठी शासनाकडे किमान पंधरा दिवस लागतात. अशा वेळेस या योजनेचा लाभ कमीत कमी महीलांना मिळावा हा तर शासनाचा हेतू नाही ना? अशी शंका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केली. त्यामुळे सदर योजना खरचं तळागळातील महिलांपर्यंत पोहचवायची असल्यास या योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी किमान 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

मा. खा.अशोक नेते यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा होणार...


 

पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे आयोजन

गडचिरोली : भाजपच्या अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा.श्री अशोक जी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या १ जुलै रोजी सोमवारी काही सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात सकाळी ९ वाजता सेमाना देवस्थान मंदिरात पूजाअर्चा व वृक्षारोपण, त्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम चामोर्शी रोड, गडचिरोली येथे ब्लँकेटचे वाटप व वृक्षारोपण, 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत अशोक नेते यांच्या निवासस्थानामागील खुल्या जागेत, तसेच कॅम्प एरियामधील हनुमान मंदिराजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी १ वा ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे फळ वाटप, दुपारी ४ वाजता ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे वृक्षारोपण व फळ वाटप, तर सायंकाळी ७ वाजता भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. 

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराने या कार्यक्रमांला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

ग्रंथालय चळवळीने वाचन संस्कृती समृद्ध केली - आ. किशोर जोरगेवार


 

 


चंद्रपूर :- वाचन हे ज्ञानाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. पुस्तकांमधून आपल्याला विविध विषयांवरील माहिती मिळते. ग्रंथालय चळवळीने ही वाचन संस्कृती समृद्ध केली असून ग्रंथालयीन चळवळीचे प्रश्न सोडविण्याकरिता मी विधीमंडळामध्ये संसदीय आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
दि. ३० जून २०२४ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनच्या सहयोगाने श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा संचालित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय, चंद्रपूर तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात आ. किशोर जोरगेवार बोलत होते.


या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवार, सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर, डॉ. सुधीर आष्टूंकर, डॉ. संजय भुत्तमवार, रत्नाकर नलावडे, प्राचार्य संतोष शिंदे आदीची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असलो तरी वाचन नियमित केल्याने आपली त्या-त्या क्षेत्रात विशेष प्रगती होते. आपण मतदार संघात ११ सुसज्ज अभ्यासिका तयार करत असून हा ग्रंथालय चळवळीचा भाग आहे. वाचनामुळे आपल्या विचारशक्तीला धार येते. आपल्याला विविध लेखकांच्या विचारसरणीचे आणि तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते. त्यामुळे आपल्या तर्कशक्तीमध्ये वाढ होते. वाचनामुळे आपल्या भाषेचा विकास होतो. नवीन शब्द, वाक्यरचना आणि व्याकरणाच्या नियमांचे ज्ञान आपल्याला यातून मिळते. वाचन हे मानसिक स्वास्थ्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. वाचनामुळे आपल्याला विविध समाजांची, संस्कृतींची आणि परंपरांची माहिती मिळते. यामुळे आपली सामाजिक जाणीव वाढते, असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये अनिल बोरगमवार यांनी ग्रंथालयाची समृद्ध वाटचाल व तिच्या समस्यांविषयी भाष्य केले. तर वाचनामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन उन्नत समाजाची निर्मिती होते, असे मत कवयित्री पद्मरेखा धनकर यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष शिंदे यांनी केले. संचालन प्राध्यापक श्रीकांत साव यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. दीपाली दांडेकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक वृंद, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

🏆गड आला पण दोन्ही सिंह गेले!


 

⭕विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माचीही निवृत्तीची घोषणा

 

मुंबई:- टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेला हरवून 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. बार्बाडोस येथे झालेल्या फायनल सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून विजय मिळवला. यामुळे तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आले. या ऐतिहासिक कामगिरी नंतर कॅप्टन रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने फलंदाजी करून साऊथ आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावांचे आव्हान दिले होते. मात्र साऊथ आफ्रिका विजयाचे टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली. ज्यामुळे टीम इंडियाने 7 धावांनी हा सामान जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे

फायनल सामन्यात विराटने 59 बॉलमध्ये 76 धावांची कामगिरी केली. यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना विराटने आपला हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप आहे असे जाहीर करून यानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.


PostImage

MH 33 NEWS

June 30, 2024

PostImage

गडचिरोलीत रूग्णवाहिका न मिळाल्याने बालकाचा मृत्यू गडचिरोलीत आरोग्य विभागाचे धिंडवडे गडचिरोलीत आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत:- विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


*गडचिरोलीत रूग्णवाहिका न मिळाल्याने बालकाचा मृत्यू*

 

*गडचिरोलीत आरोग्य विभागाचे धिंडवडे*

 

*गडचिरोलीत आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत*

*विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

मुंबई दि.29:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कोरोली या गावातील आर्यन अंकित तलांडी या चार वर्षाच्या बाळाला रूग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी वेळेत रूग्णालयात पोहचविता आले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. 

वेळेत रूग्णवाहिका मिळाली असती तर मुलाचा जीव वाचला असता. या घटनेची माहिती घेतली असता. गडचिरोलीत आरोग्य विभागाची 70 टक्के पदे रिक्त आहेत अशी माहिती मिळाली. ही पदे रिक्त असल्याने डॉक्टर उपस्थित राहत नाही. रूग्णांना योग्य ती सेवा मिळत नाहीत. रूग्णवाहिकेच्या वाहन चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे असे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत अशी मागणी  श्री. वडेट्टीवार यांनी  केली आहे.


PostImage

MH 33 NEWS

June 29, 2024

PostImage

जिल्हा परिषद -नगर परिषद निवडणुका फक्त जिंकण्यासाठी लढणार - कार्यकर्त्यांचा संकल्प 


 

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय स्तरावर फुले आंबेडकरी चळवळीची स्थिती आणि भविष्यातील राजकीय भूमिकेवर स्थानिक सर्किट हाऊस येथे बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी राज बन्सोड हे होते. विशेष अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम, ॲड. मेश्राम, विनोद मडावी  उपस्थित होते.

जिल्ह्यात बिरसा फुले आंबेडकर चळवळ राजकीय स्तरावर मजबूत करायची असेल आणि अस्तित्व निर्माण करायचे असल्यास आंबेडकरी पक्षांनी आगामी जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुका केवळ पक्षाचे अस्तित्व ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविल्या पाहिजेत अशी भूमिका ठेवत उपस्थित सर्वांनी एकमताने ॲड. चंद्रशेखर आझाद रावण यांच्या नेतृत्वात आझाद समाज पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी जनसंपर्क व जन आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, नागरिक सोयी सुविधा या प्रमुख मुद्यावर काम करणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी ठरविले.

नुकताच लोकसभेमध्ये इंडिया किंवा महायुती मध्ये सामील न होता *चंद्रशेखर आझाद रावण* यांनी स्वतंत्र निवडणूक लढवून सुद्धा 1 लाख 51 हजार मताधिक्याने विजय मिळविला असून गेल्या 10 वर्षात जन आंदोलनातून आंबेडकरी राजकारणात देशभरात एक तरुण नेतृत्व म्हणून लोकप्रियता मिळविली. कांशीरामजी नंतर देशभरात संघर्षातून व आंदोलनातून तयार झालेला युवा नेतृत्व म्हणून खासदार रावण नावरूपास येत आहेत. त्यामुळे BRSP तुन बाहेर पडलेले सर्व पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच नविन लोकांना सोबत घेऊन आझाद समाज पार्टी मध्ये प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या उपस्थितीत 13 जुलै रोजी पक्ष प्रवेश करणार असून लवकरच चंद्रशेखर आझाद गडचिरोली मध्ये जाहीर सभा होणार असल्याचे राज बन्सोड यांनी सांगितले. पक्षात काम करायची इच्छा असणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. संचालन पुरुषोत्तम रामटेके तर आभार प्रितेश अंबादे यांनी केले. यावेळी जितेंद्र बांबोळे, नागसेन खोब्रागडे, हेमंत रामटेके, तारका जांभुळकर, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, किशोर नरुले, घनश्याम खोब्रागडे, प्रकाश बन्सोड, पवन माटे, राजपाल खोब्रागडे, प्रणय दरडे, राहुल मेश्राम, मंगेश कांबळे, प्रतीक डांगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

 


PostImage

MH 33 NEWS

June 28, 2024

PostImage

लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरीता निधी उपलब्ध करुन द्या.- खासदार प्रतिभा धानोरकर


 

रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट.

 

चंद्रपूर:-चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.

 

चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे मा.श्री. नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तात्काळ पुर्ण व्हावा याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली. तसेच चंद्रपूर जिल्हातील भद्रावती तालुक्यातील कोंढा-माजरी-पाटाळा-मणगांव-थोराणा-वरोरा-मोहबाळा या कामांकरीता 70 कोटी रुपये त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील माजरी-पळसगांव-नंदोरी-भटाळी-चोरा-चंदनखेडा या रस्त्याकरीता 40 कोटी रुपये, वरोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 371 ते पिंपळगांव(सिंगरु) ते तुमगांव वाही या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाकरीता 50 कोटी रुपये, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा-जुनाळा रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरीता 75 कोटी रुपये तसेच राजुरा तालुक्यातील वरुर-विरुर धानोरा-आर्वी रस्त्याकरीता 46 कोटी रुपये तसेच सास्ती-कोलगांव-कढोली-चढी-निरली-धिंडसी-मार्डा या रस्त्याकरीता 13 कोटी रुपयांची मागणी करुन निधी उपलब्ध करुण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात आली. यासंदर्भात मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.

 

 

--


PostImage

MH 33 NEWS

June 28, 2024

PostImage

संस्थाचालक ,शासन व प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांचे शोषण  करु नये --      प्रोटानची मागणी


संस्थाचालक ,शासन व प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांचे शोषण  करु नये --      प्रोटानची मागणी


गडचिरोली:-राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची शाखा प्रोटानच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना कर्मचाऱ्यांवरील होणारे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी निवेदन देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रातील अनेक संस्थाचालक संविधानिक मार्गाने संस्था न  चालविता शासकीय नियमांचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारे छळ करतात . त्यांचे आर्थिक ,मानसिक, शारीरिक शोषण करतात . यामध्ये कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर निलंबन करणे ,  कमी वेतनात जास्त काळ  राबवून घेणे , नोकरीतून काढून देणे , नोकरीतून काढून देणे अशा प्रकारचे कर्मचाऱ्यांमध्ये भीती व दहशत निर्माण करतात.
        संस्थाचालक नेमणूक पत्र न देता अनेक वर्षे अतिशय तुटपुंज्या पगारावर राबवून घेतात . पूर्वसूचना न देता बेकायदेशीर पद्धतीने बडतर्फ करतात .अपमानास्पद वागणूक व अशैक्षणिक कामे करून घेतात. दीर्घकालीन सुट्ट्या दिल्या जात नाही .मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ करतात. त्यामुळे अशा संस्थाचालकावर कारवाई करावी व त्यांच्या  शाळांची मान्यता रद्द करावे.
या निवेदनात अनेक मागण्या मांडण्यात आले आहेत . महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील २००५ नंतर व केंद्र शासनाच्या एक जानेवारी २००४ नंतरच्या सरकारी , निमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावे .नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे खाजगीकरण व उदारीकरणावर आधारित असून बहुजन समाजाला गुलाम करणाऱ्या आहेत . त्यामुळे हे धोरण महाराष्ट्रात लागू करू नये .नवीन चार काळे कायदे हे भांडवलदारांच्या हिताचे आहेत .त्यामुळे हे कायदे लागू करू नये . २००१ पूर्वीच्या ७८ महाविद्यालयांना अनुदान द्यावे. कर्मचारी भरती शंभर टक्के करावे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदावर नेमणूक करावे. मनुस्मृतीचा अभ्यासक्रम हा नवीन शैक्षणिक धोरणात लागू करू नये.
        या मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने चार चरणात चरणबद्ध आंदोलन करण्यात येईल .निवेदन देतेवेळी बामसेफचे पूर्व विदर्भ प्रभारी प्रमोद बांबोळे ,प्रोटांचे कोषाध्यक्ष यज्ञराज जनबंधू, सचिव नरेश बांबोळे ,बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अशोक वंजारी ,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन ताकसांडे इत्यादी उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

June 26, 2024

PostImage

सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था नवेगावच्या वतीने पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी करिता येणाऱ्या मुलांची राहण्याची व भोजनाची सोय


 

गडचिरोली:-सृष्टी सिलेब्रेशन सभागृह येथे सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था नवेगाव  (मुरखेडा) च्या वतीने पोलीस भरतीचे मैदानी चाचणी२०२४ करिता उपस्थित राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना मुप्त जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या जिल्ह्यात गरीब आणि होतकरू असलेले तरुण यांना आर्थिक परिस्थितीमुळे गडचिरोलीमध्ये राहण्याची गैरसोय असताना या संस्थेने ही व्यवस्था केली आहे .
या संस्थेचे अध्यक्ष ज्योती जुमनाके ,सचिव एस .एम. दुर्गे ,कोषाध्यक्ष डी.जे . जुमनाके  , समाज सेवक सुरज कोडापे  , सामाजिक कार्यकर्ते सतीश कुसराम व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे .या ठिकाणी दररोज ५० ते ६० सुशिक्षित बेरोजगार उमेदवार येऊन या संधीचा फायदा घेतात . असाच फायदा इतर उमेदवारांनी घ्यावा असे संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे . हा उपक्रम पोलीस भरती प्रक्रिया २०२४ ची मैदानी चाचणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहील असे कळविण्यात येत आहे.


PostImage

MH 33 NEWS

June 26, 2024

PostImage

देशभरातील मुस्लिमांवरील   होणारी माबलींचिंग  व हत्या थांबवा -- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा ची मागणी


गडचिरोली --  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने निवेदन देण्यात आले की , मुस्लिमांवरील होणारे माबलींचींग व हत्या त्वरित थांबवण्यात यावे .अन्यथा भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला. मागील दहा वर्षापासून मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणात हत्या  होत आहेत . कधी माबलिंचींच्या नावावर , कधी गोहत्या च्या नावावर , कधी लव-जिहादच्या नावावर तर कधी पोलीस कष्टडी मध्ये  तर कधी धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून हत्या केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी त्यांची दुकाने, मकाने तर कधी त्यांच्या वस्तीमधून बुलडोजर चालविले जात आहे . 19जून ला उत्तर प्रदेशात प्रदेशातील अलिगड येथील मोहम्मद फरीद वय 35 वर्षे याला रात्री दहा वाजता रस्त्यात पकडून हत्या करण्यात आली .7 जूनला रायपूर येथील गुड्डू खान ,चांद  खान, सय्यद कुरेशी यांची गोरक्षक हत्या च्या नावावर हत्या करण्यात आली  .8 जूनला उत्तर प्रदेश मध्ये सोनपूर गावातील मौलाना फारुख यांची हत्या करण्यात आली .अशाप्रकारे भारतभर अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या हत्या करण्यात येत आहे. हे त्वरित थांबवण्यात यावे. असे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा या संघटनेद्वारे कळविण्यात आले.  दोषींवर फास्टट्रॅक कोर्ट मध्ये मुकदमा चालवण्यात यावे . दोषींना फाशी किंवा आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात यावी. पिडीत कुटुंबांना प्रत्येकी एक करोड रुपये व नोकरी देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. अशा विविध मागण्या मागण्यात आल्या . या मागण्या पूर्ण न झाल्यास यानंतर भारतभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले.
      निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , पुर्व विदर्भ प्रभारी  प्रमोद बांबोळे ,एमएन टीव्ही चे प्रमोद राऊत , आरएमबीकेएसचे 
 प्राध्यापक अशोक वंजारी , प्रोटानचे नरेश बांबोळे , बामसेफचे कोषाध्यक्ष यज्ञराज जनबंधू , बहुजन मुक्ती पार्टीचे डोमाजी गेडाम उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

June 22, 2024

PostImage

आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली च्या वतीने नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा सत्कार...


 

गडचिरोली:-आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली च्या वतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी संघटनेच्या वतीने पेसा भरती, MPSC, UPSC करणार्या विद्यार्थ्यांना पुर्ण वेळ मार्गदर्शक, ६ जून २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या १२५०० हजार पद भरती करण्याबरोबरच गोंडवाना विद्यापीठातील समस्ये संदर्भात व अन्य समस्यांन संदर्भात चर्चा करण्यात आली.


 यावेळेस संघटनेचे अध्यक्ष उमेश उईके, उपाध्यक्ष सुधिर मसराम, सचिव प्रदिप कुलसंगे, कार्याध्यक्ष संजय मसराम, मुकूंदा मेश्राम, आकाश कोडाप, स्वनिल मडावी, माया पेंदोर, भारत आराम, विक्रांत आतला, सुरज मडावी, आदि उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

June 9, 2024

PostImage

 जननायक बिरसा मुंडा चौकात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन



गडचिरोली- स्थानिय गडचिरोली येथील जननायक बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी एकता युवा समिती च्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांच्या १२४ वा शहिद दिन साजरा करण्यात आला.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक कुसूम अलाम, माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, नायब तहसिलदार वनिश्याम येरमे हे होते.

सर्व प्रथम मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या संघर्ष लक्षात घेऊन समाज एकजुटीचा प्रयत्न करावा असे आव्हान उपस्थित समाज बांधवांना केले.

 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी एकता युवा समिती चे अध्यक्ष उमेश उईके यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव प्रदिप कुलसंगे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय मसराम, अमोल कुळमेथे, आकाश कोडाप, कुणाल कोवे, सतिश कुसराम, देवराव अलाम, डॉ. मसराम व समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

April 17, 2024

PostImage

*लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली शहरात काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन*


 

 *रॅलीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी नृत्यात भाग घेतला*

*उन्हाच्या तडाख्यात देखील काँग्रेसचा धडाक्यात प्रचार*

 

 *गडचिरोली* -: 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण गडचिरोली शहरातून पाच किमी रॅली काढण्यात आली. उन्हाच्या कडक्यात पण काँग्रेसने धडाक्यात प्रचार केला. यात शहरातील अभिनव लॉन, आठवडी बाजार,हनुमान मंदिर,भडांगे मोहोल्ला,भोई, माळी व वंजारी समाज मोहोल्ला,राममंदिर,इंदिरा गांधी चौक,शिवाजी महाराज विद्यालय ते अभिनव लॉन अशी पदयात्रा रॅली काढण्यात आली.

या पदयात्रा रॅलीचे नेतृत्व राजाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले..रॅलीत गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होत मांदरी वाद्य वाजवले. हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी रॅलीची सुरुवात केली.इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना साथ दिली, त्यांनी देखील पक्षाचा झेंडा घेऊन नृत्यात भाग घेतला.


जिल्हाध्यक्ष काँग्रेस महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भाऊ कात्राटवार, आरपीआय नेते ॲड. राम मेश्राम, रोहिदासजी राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस महिला आघाडी काँग्रेस  इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीचे तथा घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते ,पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने रॅली सहभागी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातून रॅली जात असताना जागोजागी नागरिकांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅली मार्गस्थ होताना नागरिकांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडी उमेदवार डॉ. किरसान यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या रॅलीची सांगता अभिनव लॉन येथे सभा घेऊन करण्यात आली. सांगता सभेत डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, भाजपची आता पायाखालची जमीन सरकली असून सर्वत्र जनतेत आक्रोश आहे. कार्यकर्त्यांनी आता गाफील न राहता येत्या 19 एप्रिल रोजी मतदान करावे.   रॅलीच्या सांगता सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला, नागरिकांनी सावधानता बाळगावी. आता हे भाजपवाले विविध आमिषे दाखवून तुमचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करतील आपण मात्र जागरूक राहून इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.


PostImage

MH 33 NEWS

April 4, 2024

PostImage

राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात*


 

'या' ठिकाणी होणार जाहीर सभा*


नागपूर:- काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि चंद्रपूर येथे प्रचारसभा होत आहे. राहुल गांधी साकोली येथे १३ एप्रिलला आणि प्रियंका गांधी यांची चंद्रपूला १५ एप्रिलला सभा होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक येथे १९ एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विधानसभासंघ साकोली आहे. काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द राहुल गांधी येत आहेत.

तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी चंद्रपूर येथे सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचार समिती आणि इथर समित्यांची बुधवारी बैठक झाली. यावेळी या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या पूर्व विदर्भात सभा घेऊन वातावरण निमिर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.


PostImage

MH 33 NEWS

April 4, 2024

PostImage

*विरोधकांना संपवून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव  - विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार* 


 

 *दडपशाही धोरणातून भाजपला सत्तेची लालसा - डॉ. अविनाश वारजुरकर* 

 *लोकशाही वाचविण्यासाठी जागरूक रहा - डॉ. नामदेव किरसान* 

 *नागभिड येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व सभेचे आयोजन*

 

नागभिड:-देशांतील प्रत्येक नागरिकांला समान हक्क व जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. माञ सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशांतील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणुन जगावे लागेल.हि अंतीम निवडणुक समजून हुकूमशाही आणू पाहणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून हद्दपार करा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ नागभिड येथे आयोजीत सभेत बोलत होते.

आयोजीत प्रचार सभेस प्रमूख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर , इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव गावंडे, काँग्रेस अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, हसन गिलानी,,काँग्रेसचे चीमुर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजुरकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले,   ॲड. गोविंद भेंडारकर, नरेंद्र हेमने, डॉ.कावळे , मंगेश सोणकुसरे, भास्कर शिंदे, डॉ. रघुनाथ बोरकर, विनोद बोरकर, खोजराम मरस्कोल्हे, साहिस वारजुरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशांतील शेतकरी, कामगार, युवक नोकरदार वर्ग व सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असुन आता विरोध करणार्या विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ व जीएसटी च्या माध्यमातून जनतेची लूट केल्या जात आहे. अश्या निष्ठूर सरकार विरुद्ध आता पेटून उठून देशातील संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. देश सुरक्षित नाही, देशांतील महीला सुरक्षित नाही, महीला खेळाळूचे शोषण करणारे मोकाट फिरत आहे. अशी अवस्था देशाची झाली आहे.तर विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अश्या मौनी बाबाला उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार देतात हि हास्यास्पद बाब असल्याची टीका विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.तर
देशातील भाजप सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक विरोधी सरकार असुन देशाच्या शेतकऱ्यांना आजवर हमीभाव दिला नाही. . देशांत तानाशाही सुरु असुन पक्ष  फोडल्या जात असल्याचे माजी आ. डॉ. अविनाश वारजुरकर यांनी यावेळी सांगितले. देशात सत्तापीपासून्नी  बहुजनांना धर्म जातीमध्ये विभागून तसेच स्वतःचा पराभव दिसताना पुलवामा सारखे कांड घडवून निष्पाप सैनिकांचा बळी घेतल्याचे व त्यातून सत्ता काबीज केल्याचे पाप केले गेले आहे. अशा निष्ठावर निर्णय सरकारला अर्ज पार करण्यासाठी मला सेवेची संधी द्यावी असे प्रतिपादन इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांनी केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली - चिमूर लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.  या प्रसंगी नागभिड  तालुक्यांतील व परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.


PostImage

MH 33 NEWS

March 26, 2024

PostImage

*तरुणाने केली विहिरीत उडी मारून आत्महत्या*


*तरुणाने केली विहिरीत उडी मारून आत्महत्या*

गडचिरोली दि,२६ मार्च :- गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतर असलेल्या नवेगाव, मुरखळा येथील शेत शिवारातील विहिरीत २४ वर्षीय तरुणाचे प्रेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक मनोज सुधाकर जेंगठे (वय २४ वर्ष) हा तरुण होळी च्या दिवसापासून बेपत्ता होता,दि,२६ मार्च ला विहिरीच्या समोर चप्पल आढळून आल्याने त्याचा शोध घेतला असता विहिरीत त्याचा मृतदेह मिळाला. मृतक हा अविवाहित होता.मृतक हा वाहन चालवण्याचे काम करीत होता.

पोलीस पंचनाम्यानंतर शवउत्तरीय तपासणी करीता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आला आहे.पुढील तपास गडचिरोली पोलीस निरीक्षक अरुण फेंगडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 22, 2024

PostImage

बिआरएसपी कडून विनोद मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल



बिआरएसपी कडून विनोद मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

 

गडचिरोली :-(दि,२२ मार्च)
लोकसभा  निवडणूक २०२४ गडचिरोली-चिमूर या क्षेत्रात १९ एप्रिल ला पहिल्या टप्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी आज गडचिरोली-चिमूर (अ. ज.)मतदारसंघात आज दोन नावनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले.

लोकशाही विरोधी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीतर्फे कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्याने आणि बहुजन – आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण नसल्याने बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज उभा करण्याच्या विचाराने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षातर्फे गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघा करीता आज युवा नेते विनोद गुरुदास मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, प्रफुल्ल रायपुरे, महिला शहर अध्यक्ष विद्या वाळके, रेखा कुंभारे, शोभा खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सतिश दुर्गमवार, सरपंच देवीदास मडावी, धनराज दामले, प्रतिभा दामले, प्रकाश मडावी, सुरज ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 19, 2024

PostImage

*उद्यापासून गडचिरोली- चिमूर मतदार संघाचा नामनिर्देशनास होणार सुरुवात* 


 

गडचिरोली, (जिमाका) दि.19:भारत निवडणूक आयोगाने 12- गडचिरोली-चिमुर (अज) लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार लोकसभा निवडणूकीची सुचना दिनांक 20 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून दिनांक 20 मार्च 2024 ते दिनांक 27 मार्च 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, 12- गडचिरोली-चिमुर (अज) मतदार संघ, जिल्हा नियंत्रण कक्ष, पहिला मजला (जुने नियोजन भवन), जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 28 मार्च 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची वेळ दिनांक 30 मार्च 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत असून दिनांक 19 एप्रिल 2024 ला मतदान घेण्यात येईल. मतदानाची वेळ पुढीलप्रमाणे राहील.
 66-आमगांव (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 67- आरमोरी (अज) वि.स.नि.क्षेत्र- सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 68- गडचिरोली (अज) वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 69- अहेरी (अज) वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत, 73- ब्रम्हपूरी वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते सायं. 06.00 पर्यंत, 74-चिमुर वि.स.नि.क्षेत्र – सकाळी 07.00 ते सायं. 06.00 पर्यंत, मतमोजनी दिनांक 04 जून 2024 ला होईल.
 वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 19, 2024

PostImage

*गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत*  *चार जहाल माओवादी ठार*


 

 आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला 

दोन डीव्हीसिएम (Divisional Commitee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश
महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस
 गडचिरोल्ली;-दिनांक 16/03/2024 रोजी पासुन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. याच निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला आलेले आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवान हे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्ली पासून दक्षिण-पूर्व 05 कि.मी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 19/03/2024 रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.  त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.  

      चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 04 पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले.  त्यांची प्राथमिक ओळख पटविली असता, 1) डीव्हीसीएम व्हर्गिस, वय 28 वर्षे, जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य, कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती 2) डीव्हीसीएम पोडीयम पांडु ऊर्फ मंगुलू, वय 32 वर्षे, रा. कोटराम, भैरमगड जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती 3) कुरसंग राजू, प्लाटून सदस्य 4) कुडीमेट्टा व्यंकटेश, प्लाटुन सदस्य अशी नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण 36 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.  यासोबतच घटनास्थळावरुन 01 नग एके 47 रायफल, 01 नग कार्बाइन रायफल, 02 नग देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुस व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.  

      सदर अभियान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल सा., मा. पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. जगदीश मीणा सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम. रमेश सा. व पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे.  तसेच सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 18, 2024

PostImage

*गोंडवाणा गणतंत्र पार्टी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार:- प्रशांत  मडावी* 


*गोंडवाणा गणतंत्र पार्टी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार:- प्रशांत  मडावी* 


गडचिरोली- गोंडवाना गणतंत्र पार्टी येणाऱ्या निवडणूका स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही अशी माहीती गो.ग.पा जिल्हाअध्यक्ष प्रशांत भाऊ मडावी यांनी दिली. आज दि.१८/०३/२०२४ रोजी गो.ग.पार्टी ची कोर कमिटीची बैठक पार पडली, सदर बैठकीत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र हे गो.ग.पा स्वबळावर लढवणार आहेत हे सर्वानुमते ठरवण्यात आले या बैठकीत.
गो.ग.पा जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ मडावी,जि. उपाध्यक्ष डॉ. साईनाथ कोडापे,जि. महामंत्री किशोर मात्लामी,जि. महासचिव रमेश कोरचा सर,सतीश कुसराम,  कुणाल भाऊ कोवे जिल्हाध्यक्ष अ.भा.आ.वि.परिषद, तथा गो.ग.पा तालुकाध्यक्ष वडसा क्रिष्णा उईके, धाणोरा ता. अध्यक्ष तुमरेटी, ता.उपाध्यक्ष धाणोरा नारायण सयाम, अमीत शेख ता. संघटक धाणोरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 17, 2024

PostImage

*जिबगांव येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत*


*जिबगांव येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत*

 

सावली :- तालुक्यातील मौजा.जिबगांव येथे दोन कॅन्सरग्रस्त रुग्णांना राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कर्करोग, अपघातात गंभीर जखमी झालेल्या तसेच इतर रुग्णांना विविध प्रसंगी आर्थिक मदत देणे सुरू ठेवले आहे,त्यांचे जनसेवा हिच ईश्वर सेवेचे व्रत सर्वांना प्रेरणादायी आहेत विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही नागरिक असो विजय वडेट्टीवार त्यांना नेहमी सहकार्य करतात त्याच माध्यमातून जिबगांव येथिल कॅन्सरग्रस्त रुग्ण सौ.मालताबाई शेंडे वय ५६ वर्षे व शारदाताई बारसागडे वय ३४ वर्षे यांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, सौ.मालताबाई शेंडे व शारदाताई बारसागडे हे दोन्ही रुग्ण राहणार जिबगांव अत्यंत गरिब कुटुंबातील व्यक्ती आहेत मागील बऱ्याच दिवसापासून प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्राथमिक उपचार घेत होते, उपचारा दरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. स्व.शारदाताई बारसागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सौ.मालताबाई शेंडे यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत पाहिजे असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली,त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.

  आर्थिक मदत देताना जिबगावचे सरपंच मा.पुरषोत्तम चुदरी, उपसरपंच सौ.मोनीताई उंदीरवाडे,ग्रामपंचायत सदस्या सौ.इंदिरा भोयर,सौ.लिलाबाई भोयर,सौ.दिक्षाताई भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 16, 2024

PostImage

*हिरापूर येथे २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे  भूमिपूजन संपन्न.*


*हिरापूर येथे २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे  भूमिपूजन संपन्न.*  

 

 

दिनांक :- १६ मार्च २०२४ 
                  
सावली :- सावली तालुक्यातील मौजा. हिरापूर येथे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून २५ लक्ष रुपयाच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे काम मंजूर झालेले आहे. त्या कामाचे भूमिपूजन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व हिरापुरचे सरपंच्या सौ.प्रीतीताई गोहने यांच्या हस्ते पार पडले.

हिरापुर येथे सामाजिक सभागृहाची कित्येक वर्षांपासूनची मागणी होती, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांच्या सतत पाठपुराव्यामुळे २५१५ अंतर्गत विरोधी पक्षनेते तथा सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून आज ते साकार झाले. राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसंदर्भात संदर्भाधिन क्र. २ ते ८ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

या प्रसंगी हिरापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा.शरद कन्नाके,बोथलीचे उपसरपंच मा.विजय गड्डमवार,ग्रामपंचायत सदस्य हिरापूर मा.रुमाजी कोरडे,माधुरीताई आत्राम,निताताई मुनघाटे,सरिताताई भोयर,मा.आशिष पुण्यपवार आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 13, 2024

PostImage

*मान्यता न घेताच घेतली पदभरती कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा यांचा प्रताप - काँग्रेस तालुका अध्यक्ष सिरोंचा श्री. सतीश जवाजी यांचा आरोप* 


*मान्यता न घेताच घेतली पदभरती कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा यांचा प्रताप - काँग्रेस तालुका अध्यक्ष सिरोंचा श्री. सतीश जवाजी यांचा आरोप* 

सिरोंचा; दिनांक 21जानेवारी रोजी 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा तर्फे  विविध पदांसाठी परीक्षा घेण्याचे कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. परंतु हे कंत्राट मान्यतेशिवाय देण्यात आले ही बाब आता समोर आली आहे. पदभरती सरळ सेवेने करण्याअगोदर मा. जिल्हा उपनिबंधक यांची पूर्वपरवानगी घेऊनच पुढची कारवाई कारवाई करावी लागते परंतु बाजार समिती द्वारा अशी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांनी पत्रकार परिषदेत केला. दि. 13/02/2024 रोजी विश्राम गृह सिरोंचा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच ज्या एजन्सीने परीक्षा घेतली ती शासनमान्य नसून अशा प्रकारे परीक्षा घेण्याकरिता नियमानुसार एजन्सीला शासनमान्यता असणे अनिवार्य असते असे त्यांनी सांगितले व त्याविषयी पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले.
मुळात कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथील पदभरती पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे या पूर्विदेखील 2021 सा झालेल्या परीक्षेत गैरप्रकार होऊन एका विद्यार्थ्यावर गुन्हादाखल  देखील झाला होता परंतु त्याच विद्यार्थ्याची निवड यावेळी देखील झाल्यामुळे या पदभरतीवरच प्रश्नचिन्ह आहे. 
अशा प्रकारे परीक्षेत गैरप्रकार करून आपल्या निकटवर्तीयांनी निवड करने हा बाजार समिती संचालक मंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे ही संपूर्ण पदभरती अवैध असून ती रद्द करण्यात यावी व संबंधितांची व परीक्षा घेतलेल्या एजन्सीची पोलिस विभागाद्वारे कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.


PostImage

MH 33 NEWS

March 13, 2024

PostImage

अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर


अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर
कूरखेडा-
           कृषीपंप तसेच घरगूती विद्यूत वाहीणीवर मागील काही दिवसापासून सूरू करण्यात आलेले भारनियमनामूळे त्रस्त येथील हजारोचा संख्येत उपस्थीत शेतकर्यानी आज गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथे शाशन व विद्यूत कंपनी विरोधात गगणभेदी घोषणाबाजी करीत मोर्चा काढला व कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सूरू केले.
           तालूक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी पद्धतीने विद्यूत विभागाचा वतीने भारनियमन सूरू आहे घोषित भारनियमन कालावधी होऊनही अनेक ठिकाणी वारंवार होणार्या विद्यूत बिघाडामूळे सूद्धा विद्यूत पूरवठा बंद असतो त्यामूळे‌ विद्यूत कृषी पंप बंद पडत रब्बी धान हंगाम धोक्यात आला आहे त्यामूळे संतप्त शेतकर्यानी आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कांग्रेस व शिवसेना (उबाठा) कडून पूकारण्यात आलेल्या मोर्चा व ठिय्या आंदोलनात हजारोचा संख्येत सहभागी होत उपविभागीय कार्यालय समोर आयोजित ठिय्या आंदोलनात  विज वितरण कंपनी व शाशनाचा विरोधात तिव्र शब्दात रोष प्रकट केला यावेळी मोर्चेकरूंचे निवेदन स्वीकारण्याकरीता आंदोलन स्थळी आलेले गडचिरोली येथील विद्यूत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मेश्राम याना रोषाचा सामना करावा लागला  कूरखेडा येथील उपविभागीय विद्यूत अभियंता मिथून मूरकूटे व कढोली येथील शाखा अभियंता झोडापे यांच्या विरोधात तिव्र रोष होता मात्र ते आंदोलन स्थळी फिरकलेच नाही त्यामूळे अनूचीत प्रसंग टळला यावेळी पूर्ववत येथील विद्यूत पूरवठा अखंडित ठेवण्याचा मागणी करीता मोर्चेकरू अडून बसले होते व‌ विद्यूत विभाग व शाशनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला होता अखेर उपस्थीत कार्यकारी अभियंता यांचाशी भ्रमनध्वनीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यानी मोर्चेकरूंचा समक्षच संपर्क साधला व कार्यकारी अभियंता मेश्राम यानी तालूक्यात भारनियमन संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात येणार नाही तसेच दिवसाफक्त ४ तास कृषी पंपावर भारनियमन करण्यात येईल अशी लिखीत घोषणा केल्यावर शेतकर्यांचे समाधान होत आंदोलन मागे घेण्यात आले मोर्चाचे नेतृत्व विधान परिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे , शिवसेनाप्रमुख सुरेंद्र  चंदेल, प्रदेश महासचिव डॉ नामदेव कीरसान माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम,माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर कांग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष आशिष काळे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापती गिरीधर तितराम महिला कांग्रेस ता अध्यक्ष आशाताई तूलावी कांग्रेस अनूसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे माजी सभापती परसराम टिकले शेतकरी नेते शाम मस्के आदि हजर होते


PostImage

MH 33 NEWS

March 13, 2024

PostImage

*कुमराम भीम चौक येथे राष्ट्रीय शहीद बाबुरावजी शेडमाके  यांची जयंती साजरी* 


*कुमराम भीम चौक येथे राष्ट्रीय शहीद बाबुरावजी शेडमाके  यांची जयंती साजरी* 

 


गडचिरोली:-  कुमराम भिम चौक जिल्हा न्यायालय परिसर येथे आदिवासी समाज बांधवा तर्फे १८५७ चे शहीद योद्धा क्रांतिवर बाबुरावजी  पूलेसुर सडमेक यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधीर मसराम यांनी केले. प्रियदर्शन मडावी सर यांनी बाबुरावजींचा ऐतिहासिक वारसा समाजाला कसा दिला याबद्दल मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.


 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश नैताम,देवरावजी कोवे, प्रवीण तलांडे,संजय मेश्राम, रुपेश सलामे, गिरीश उईके, निलेश कोडापे समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 12, 2024

PostImage

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश. 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय.


आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.
61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय.

चंद्रपूर:-समाजातील विविध क्षेत्रातील नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदार प्रतिभा धानोरकर सतत करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विभागाअंतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये श्रेणी वाढ व्हावी या करीता आमदार प्रतिभा धानोरकर प्रयत्नशील होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सोमवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आदिवासी विभागाच्या 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुला-मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांनी परिपुर्ण शिक्षक घ्यावे या करीता त्यांना जिथे शिक्षण घेत आहेत त्याच ठिकाणी समोरील शिक्षणाची संधी निर्माण व्हावी या करीता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तथा विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित साहेब वारंवार भेटून आदिवासी अनुदानित आश्रम शाळेत श्रेणी वाढ व्हावी अशी मागणी केली होती. त्यासोबतच अधिवेशनादरम्यान श्रेणी वाढ चा मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच या संदर्भात शासन निर्णय जारी होईल. 17 उच्च प्राथमिक शाळांना माध्यमिक चा वर्ग जोडण्यात येईल तसेच 44 माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक चा वर्ग जोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनुदानित आश्रम शाळा संस्था चालकांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 12, 2024

PostImage

*मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा नागपूर / चंद्रपूर / मुंबई जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.*


 

*मंगळवार, दिनांक १२ मार्च, २०२४.*

*सकाळी ११.०० वा.*
*डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, पोंभुर्णा यांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.*
*स्थळ: डॉ श्यामाप्रसाद वाचनालय, पोंभुर्णा, जि. चंद्रपूर.*

*सकाळी ११.१५ ते १२.३० पर्यंत*
*खालील लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.*
*१) आदिवासी मुली व मुले यांच्या शासकीय वसतीगृहाचे भूमीपूजन.*
*२) पोंभुर्णा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ०८ पुलांचे भूमिपूजन.*
*३) भूमी अभिलेख कार्यालय, पोंभुर्णा याचे लोकार्पण.*
*४) दुय्यम निबंधक कार्यालय, पोंभुर्णा याचे लोकार्पण.*
*स्थळ: तहसिल कार्यालय, पोंभुर्णा, जि. चंद्रपूर*

*दुपारी १२.३० ते १.३०वा.*
*जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित पोंभुर्णा तालुक्यातील महिला मेळाव्यास उपस्थिती.*
*स्थळ: आबाजी पाटील बुरांडे यांच्या खुल्या प्रांगणात, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर.*

*सायं. ०६.१५ वा.*
*फिरते जनसंपर्क कार्यालय उदघाटन समारंभास उपस्थिती.*
*स्थळ: बॉटनिकल गार्डन जवळ, विसापूर, जि. चंद्रपूर.*

*सायं. ०६.३०वा.*
*श्रध्देय अटलबिहारी वाजपेय बॉटनिकल गार्डन, विसापूर पाहणी.*

*सायं. ०७.०० वा.*
*मा. मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत खालील उदघाटन/भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.*
*१) श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी जैवविविधता उद्यान उदघाटन समारंभ.*
*२) श्री. नाथीबाई ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठ, मुंबई संचलित महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या भूमीपूजन कार्यक्रम.*
*३) अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकाच्या मलनि:स्सरण प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रम.*
*४) अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकाच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम.*
*स्थळ: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) उपकेंद्राची नियोजित जागा, बॉटनिकल गार्डनजवळ, विसापूर, जि. चंद्रपूर.*

*रात्री मुंबई येथे मुक्काम*


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

*तारका जांभुळकर यांची बिआरएसपी महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी निवड...*


 

गडचिरोली:-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड व जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याची महिला आघाडी कार्यकारिणी नुकतीच नियुक्त करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्यां तारका जांभुळकर यांची निवड करण्यात आली आहे.

जांभुळकर ह्या सामाजिक क्षेत्रात जिकरीने कार्यरत असणाऱ्या मूलनिवासी महिला संघ जिल्हाध्यक्ष नंतर महिला मैत्री संघ संयोजक असा प्रवास करत आता राजकीय स्तरावर आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याच्या उद्देशाने BRSP जिल्हाध्यक्ष पदी त्या विराजमान झाल्या.
त्याचप्रमाणे महिला आघाडी जिल्हा सचिव म्हणून शोभा खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी विभा उमरे व करुणा खोब्रागडे, जिल्हा संघटक पदी प्रीती इंगळे यांची निवड करण्यात आली.

लवकरच महिला आघाडीच्या वतीने भव्य महिला क्रांती मेळावा गडचिरोली मध्ये आयोजित करणार असून, आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांना सक्रिय होण्याचे आवाहन यावेळी तारका जांभुळकर यांनी  प्रसिद्धी पत्रकातून केले.

पक्षाचे विदर्भ महिला सह संयोजक डॉ. पूनम घोनमोडे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

*नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित नारीशक्ती फिटनेस स्पर्धेत धावल्या नारी* 


 

गडचिरोली : 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रासह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत. परिवारिक जबाबदाऱ्यांसह इतर जबाबदाऱ्या महिला पार पाडत असताना त्यांचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याकरिता नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन केले होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती अभियानांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात 50 पेक्षा जास्त मुलींसह काही युवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक ख़ुशी एडलावार, द्वितीय गौरी चौधरी, तृतीय पल्लवी कुमरे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना टी-शर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्र समन्वयक अनुप कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पुजा निंदेकर, इशिका देठेकर, गुरुकुल अकॅडमी गडचिरोलीचे संचालक पुष्कर सेलोकर, अश्विन दुर्गे, अमित सुरजागडे, सुदर्शन जाणकी, प्रज्वल बोधनकर आणि संपूर्ण गुरुकुल अकॅडमीच्या समुहाने मिळून केले.


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

चार वर्षीय चिमुरडीवर पन्नास वर्षीय नारधमाकडून लैंगिक अत्याचार...


 

 

जारावंडी येथील घटना, परिसरात हळहळ व्यक्त 

                                    

जारावंडी:- चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद व मन हेलावून टाककणारी घटना जारावंडी येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिसांनी दिली. संतोष नागोबा कोंढेकर (५०) असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.

 

सदर आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे. दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची, यात आरोपी शनिवारी सायंकाळी ४ ते५ च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहत येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला. अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, दरम्यान पीडित बालिकेला गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला, परंतु प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने नागपूर ला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.

 

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे. आरोपी वयस्क असून त्यास दोन मुलेही आहेत.


PostImage

MH 33 NEWS

March 11, 2024

PostImage

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मार्कंडेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेला भेट*


मुलचेरा : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील नवनिर्मित मार्कंडेश्वर देवस्थान यात्रेला आविसं काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँगेसच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी यांनी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चना भगवान मार्कंडेश्वरांचे दर्शन घेतले.

खुदीरामपल्ली येथील नवनिर्मित मार्कंडेश्वर देवस्थान येथील माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी यांनी महाशिवरात्री निमित्त भेट दिली.मार्कंडेश्वर च्या मूर्तीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चना केली.

महाशिवरात्री निमित्त खुदीरामपल्ली येथील मार्कंडेश्वर देवस्थानच्या यात्रेत भक्ती भावाने आलेल्या भक्तगणांशी सवांद साधला.यावेळी त्यांनी मंदीर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यात्रेत केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आभार व्यक्त करीत मंदीर व्यवस्थापनाला आर्थिक मदतही केली.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,विजय विस्वास,रविन बैरागी,सुभाष दास,अशोक मदक,हरिपद दास,सुकमार दास,मिथुन बमेन,समीर दास,प्रदीप दास,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य तसेच गावातील नागरिक – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

*देवदर्शनासाठी गेलेल्या भक्ताचा नदीपात्रात बुडून मृत्यू* 


 

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त अंधारी व वैनगंगा नद्यांचा संगमात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. ९ दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. आकाश अशोक शेडमाके (२३, रा. धानापूर) असे मृताचे नाव आहे.

कुलथा येथील हनुमान मंदिर परिसरात महाशिवरात्र व आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरते. कुलथा हे गाव गोंडपिपरी-मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर अंधारी व वैनगंगा नद्यांच्या मधोमध वसलेले आहे. धानापूर येथील आकाश शेडमाके हा युवक आंघाेळीसाठी नदी पात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. कुलथा येथील यात्रा मंगळवार (दि. १२) पर्यंत सुरू राहणार असल्याने या घटनेनंतर पोलिसांनी नदी पात्रात चोख बंदोबस्त लावला आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

*कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी यांना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थीक मदत.!*


*कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी यांना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थीक मदत.!*

*अहेरी:-* कन्नेपल्ली येथील वासुदेव मडावी हे झाडाची छाटणी करायला चढले असता पडल्याने मणक्यांमध्ये गंभीर दुखापत झाली.किष्ट व गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याने नागपुरला रुग्णालयात भरती करण्यात आले.हलाखीची परिस्थिती असल्याने ऊपचाराचा खर्च झेपणारा नव्हता.माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी कुटूंबीयांना मोठी आर्थीक मदत करुन सहारा दिला व पुढेही पुर्णपणे सहकार्य करण्याचे शब्द देवून आश्वस्त केले.कूटूंबीयांनी तसेच गावकर्‍यांनी राजे साहेबांचे मनःपुर्वक आभार मानले.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

*व्याहाड खुर्द येथे कलार समाज मेळावा संपन्न*


 

*महाराष्ट्र राज्याचे माजी खनीकर्म महामंडळाचे अध्यक्ष तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस मा. आ. डॉ. अविनाश बारजुकर यांची उपस्थिती*

सावली:-सावली तालुका सर्व कलार समाजाच्या वतीने उपवधू-वर परिचय मेळावा व जेष्ठ नागरीक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी राज्य मंत्री तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजुकर उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर प्रकाश मारकवार,विशेष अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष कलार समाज चंद्रपूर श्रीमती चित्राताई डांगे,
माजी सभापती जि.प. चंद्रपूर श्री.विनोद अहिरकर,से. नि. शिक्षक श्री. तुकारामजी बोमनवार श्री. चंदू पा. मारकवार उपसरपंच राजगड,विजय शेंडे,श्री. दिनेश पा. चिटनूरवार  श्री. दामदेवजी मंडलवार मा. पो. निरीक्षक, श्री. राजू पा. मारकवार, श्री. राधाकिसनजी एगोलपवार, श्री. नारायण गौड सिलेवार, वि. अध्यक्ष कलार समाज, श्री. विठ्ठल गौड गुरमवार, जि. अध्यक्ष कलार समाज, श्री. प्रशांत समर्थ मूल अध्यक्ष कलार समाज, श्री. निरंजन पा. वासेकर, श्री. आशिष जयस्वाल, श्री. शांत पा. चिटनूरवार, संचालक कृ. बा.स. सावली श्री. नरसिंग गणवेनवार, श्री. प्रकाश नंदाराम,श्री.अनंत चिटनूरवार,श्री.रवींद्र वासेकर, से. नि. तहसीलदार श्री. सुनील चडगूलवार,श्री.दिलीप गडपल्लीवार, व समस्त समाज बांधव उपस्थित होते


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

बाबुपेठ रेल्वे गेट जवळ धुळीचे सम्राज्य


चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की कित्येक वर्षाच्या कालावधी नंतर कित्येक लोकांचे उपोषण, आंदोलन, मोर्चे व बाबुपेठ वासियांच्या प्रयत्नाने बाबुपेठ उडानपुलाचे गेल्या चार वर्षांपासून काम सुरु ते आज ही काम सुरूच आहे आणि याच कामाच्या दरम्यान तिसऱ्या रेल पटरी चे काम देखील सुरु आहे आणि याच तिसऱ्या रेल पटरी च्या कामासाठी म्हणून jcb लावून खुदाई चे काम सुरु आहे आणि खुदाई ची माती आठ ते 10 डम्पर (ट्रक ) ने ती माती महाकाली कॉलरी दिशेने रेल्वे च्या कामासाठी नेण्यात येते या दरम्यान जे आठ ते दहा डम्पर (ट्रक ) जे माती नेण्यासाठी आहेत ते रेल्वे गेट जवळील टरनिंग वर मोठया प्रमाणात धुळ निर्माण होते आणि रेल्वे गेट जे पाच पाच मिनिटांनी बंद होते आणि गेट बंद असल्यामुळे तेथे जी लोकांची अफाट गर्दी होते व तेथे जमा झालेल्या अफाट विषारी धुळी मुळे कित्येक लोकांची तबेत खराब होत या परिसरात राहणाऱ्या लोकांची व येथील व्यापारी, लहान मोठे दुकानदाची सुद्धा तबेत खराब होऊन राहिली आहे आणि लोकांच्या तबेती खराब व्हायला नको म्हणून रेल्वे गेट जवळील लोकांनी तेथील सुपरवाईजर ला कित्येकदा त्या धुळी साठी पाणी मारण्याची विनंती देखील केली परंतु त्या सुपरवाईजर ने आज उदया करून अजून ही पाणी मारून राहिला नाही आणि लोकांच्या गोष्टी कडे कानाडोळा करत आहे आणि आता तर ती संपूर्ण धूळ रोडवर आली आहे त्यामुळे अपघाताला निमंत्रण सुद्धा मिळाले आहे काही दिवसापूर्वी तर एक बाईक वरून एक तरुण व तरुणी डम्पर च्या चाकाखाली येता येता वाचले त्याची टू व्हीलर बाईक चा सायलेंसर पूर्ण तुटण्याच्या अवस्थेत झाला होता रोडवर पडणाऱ्या धुळी मुळे कित्येक लोकांच्या टू व्हीलर बाईक स्लिप होऊन लोक त्या ठिकाणी पडत आहेत पण त्या कंत्राट दाराला व त्यांच्या सुपरवाईजर काही एक लेणंदेणं राहील नाही ते आपलं काम सर्रास व जोरात करत आहेत त्यांना लोकांच्या जीवाशी काही फरक पडत नाही असच दिसून येत आहे.
या परिसरातील लोकांना तर त्या धुळीमुळे जीवावर चे झाले आहे या परिसरातील लोकांच्या घस्यात या धुळी मुळे आवाज बदलून दुखायला पण लागले आहे जर लवकरात लवकर या धुलीचा विल्हेवाट लवण्यात आले नाही तर या परिसरातील लोकांना धुळी मुळे जीव गमवावा लागेल यात शंकाच नाही.
या बातमी च्या माध्यमातून प्रशासनाला व महानगर पालिका आयुक्त साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या कंत्राटदार चे काम बंद करावे जोपर्यंत त्या रोडवरील धूळ साफ व तेथे दिवसातून तीन वेळा टँकर ने पाणी मारणार नाही तोपर्यंत व या धुळी साठी काही तरी उपाय योजना केल्या शिवाय कामाची परवानगी देऊ नये अशी या परिसरातील जनता निवेदनातून मागणी करणार आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

दुर्लक्षित आरमोरीकर स्वच्छता दुतांचा सत्कार


आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक बांधिलकी जोपासून सतत सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरमोरी क्षेत्रातील दुर्लक्षित महिला स्वच्छता दूतांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन स्थानिक गाढवी नदीच्या तीरावरील शिवमंदिर येथे सहृदय सत्कार केला.

 

सर्व प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांचे हस्ते करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून समाजसेवा क्षेत्रातील अग्रणी महिला भगिणी ज्योती बगमारे,उमा कोंडापे, आशा बोळणे, स्मिता उईके, सीमा मडावी,अल्का पेटकुले,रोशनी झिमटे, लता लोणारे, स्नेहा मडावी,रोहिनी सहारे, स्नेहा बगमारे, लक्ष्मी कोडापे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमात जयमाला पिंपळकर, शशीकला सपाटे,जयश्री कांबळे,लता खेडकर, यशोदा रामटेके, निर्मला कांबळे,उषा हेमके, सिंधू नारनवरे,मिरा बेहरे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी आरमोरी शहरातील स्वच्छतेचे काम करून आरमोरीकरांना निरोगी व सुदृढ आरोग्य प्रदान करणारे घटक हे नेहमी दुर्लक्षित असतात.त्यांच्यांकडे सामान्यजण हे फक्त हिणकस नजरेने पाहत असतात.स्वच्छतेचे काम झाले की त्यांच्याकडे कुणीही आस्थेने विचारपूसही करीत नाही.अशा दुर्लक्षित परंतु बहुमूल्य असणाऱ्या एक-एक महिलांची निवड सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ‘हिरकणी’ने म्हणजेच विभाताईने केली.आता उरला प्रश्न त्यांच्या मानसन्मानाचा!तर त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वागत समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करून सर्व महिला भगिणींचा यथोचित गौरव केला.त्यावेळी 

उपस्थित सत्कारमूर्ती महिला गदगदल्या.सर्व सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले.’आमच्यासारख्या उपेक्षित, दुर्लक्षित स्वच्छता दूतांचा मानपान करून केलेला सन्मान आम्ही जिवंत असेपर्यंत विसरणार नाही.समाजसेवा करणारेही भरपूर आहेत.परंतु वंचित, दुर्लक्षित घटकांकडे आस्थेने पाहणारे डोळे व दातृत्वाचे हात मात्र कमी होत आहेत.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.’ सत्काररुपी मानसन्मानाने सा-या महिला गदगदून गेल्या व आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

मान्यवर महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


PostImage

MH 33 NEWS

March 10, 2024

PostImage

अंगणवाडी सेविकांनी घेतले जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रक्षिक्षन....


गडचिरोली:-
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकां साठी जादूटोणाविरोधी कायद्याचे व अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रशिक्षण कार्यक्रम नागपुर पंचायत समिती च्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते .
त्यासाठी शासनाने महा.अनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांना जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांना क्रमाक्रमाने प्रशिक्षण देऊन समाजात अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात जनजागृती करण्याचे लेखी आवाहन केले आहे . त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाला अंगणवाडी सेविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुर दुरच्या खेड्या पाड्यातून आलेल्या तब्बल 139 अंगणवाडी सेविकांनी सभागृह खचाखच भरलेला होता.या प्रशिक्षण कार्यक्रमा च्या अध्यक्षा बाल विकास प्रकल्प अधिकारी मा. उज्वला ढोके या होत्या .जिल्हा विविध उपक्रम कार्यवाह चंद्रशेखर मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करुन कार्यक्रमाची शुरुवात केली. जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.देवानंद बडगे यांनी चळवळीचे 'हिच अमुची प्रार्थना' हे गीत सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली .या प्रसंगी जादुटोणा विरोधी कायदा म्हणजे काय,तो कसा लागू होतो, कायद्याचे प्रावधान व त्याची कलमें कोणती  याचे सविस्तर प्रशिक्षण चित्र पोस्टर सहीत जिल्हा प्रधान सचिव डॉ प्रा सुनील भगत यांनी समजावून सांगितले.
त्यानंतर जादुटोणा चे प्रत्यक्ष चमत्कार सादरीकरण उत्तर नागपुर शाखेचे कार्याध्यक्ष देवानंद बडगे व रामभाऊ डोंगरे यांनी संयुक्तपणे सादर केले ,तेव्हा अंगणवाडी सेविका अक्षरशः भारावून गेल्या होत्या. प्रत्येकांनी सदर प्रयोगा मागील खरं विज्ञान समजून घेतलं व आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा निर्धार केला. अंधश्रद्धा निर्मूलना बाबतीत उपस्थितांच्या सर्व  प्रश्नांचे निराकरण रामभाऊ डोंगरे यांनी केले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षिका शर्मिला जाधव व त्यांची पुर्ण टीम उपस्थित होती. संचालन चित्तरंजन चौरे यांनी तर  आभार पर्यवेक्षिका तारा बोराडे यांनी मानले.


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

जिल्ह्यातील कायदा व सुवस्था सुधारण्यावर भर द्या. - आमदार प्रतिभा धानोरकर


 

चंद्रपूर जिल्हा तसा शांत जिल्हा म्हणून महारष्ट्रात ओळखला जातो. परंतू अलिकडे सतत होत असलेल्या हत्यांमुळे नविन ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा करण्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृह मंत्री तथा उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे.

 

मागील दोन महिन्यांच्या काळात विविध कारणातून जवळपास 15 जणांच्या हत्या झाल्या आहेत. यापैकी काही गुन्हे हे कौटुंबिक वादातून तर इतर गुन्हे वेगवेगळ्या कारणातून झाले आहे. कौटुंबिक वादातून घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी पोलिस स्टेशन मधे समुपदेशन कक्ष उभारल्यास होणाऱ्या घटना टाळता येईल, असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या सोबतच कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता अवैध धंद्यावर आळा बसविणे गरजेचे आहे. कारण यातूनही अनेक गुन्हे घडतांना दिसुन येत आहे. युवकांना देखील गुन्ह्यापासून दुर करण्याकरीता योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. महाविद्यालयीन स्तरावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून युवकांना योग्य असे मार्गदर्शन झाल्यास भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालता येईल यासाठी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याना भेटणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी महीला सुरक्षतेच्या संदर्भाने देखील चर्चा करणार असल्याचे सांगितले.


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!  


 
 
 
 
उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
 

  
  
  
  
  

 
Sugarcane Juice उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. उसाचा रस आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.  रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उसाचा रस प्या. उसाचा रस रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो. अनेकदा कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आपण आजारांना सहज बळी पडतो. अशा परिस्थितीत उसाचा रस प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे आपण स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.

 
 
 
 
उसाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी Sugarcane Juice तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्ही सर्दी आणि फ्लूसारख्या विषाणूजन्य संसर्गापासून सुरक्षित राहू शकता. वाढत्या वयाबरोबर हाडेही कमकुवत होऊ लागतात, अशा वेळी उसाचा रस प्यायल्यास हाडे मजबूत होतात. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि हाडांशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

अशक्तपणा आणि सुस्ती जाणवत असताना एक ग्लास उसाचा रस प्यायल्यास फायदा होतो. कारण उसामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स दिवसभर शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. वाढलेले वजन अनेक आजारांना जन्म देऊ शकते, अशा परिस्थितीत जर तुम्ही उसाचा रस प्यायल्यास त्यात असलेले फायबर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 
 
 
हा उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

यात्रेत बंदोबस्त तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यु


चामोर्शी;- तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरता बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे कर्तव्यावर असताना मृत्यु झाल्याची घटना दिनांक 8 मार्च ला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडली.भैय्याजी पत्रू नैताम वय 52 वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरल्ली ता.मुलचेरा असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे.उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले 8 मार्च ला 4:30 वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे.मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी कोपरल्ली येथे पाठविण्यात आले आहे.मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 9, 2024

PostImage

कुरखेडा:- अवैधरीत्या गोवंश तस्करी, पाच ट्रकसह ५७ लाखाचा मुद्देमाल जप्त


कोरची तालुक्यामधून ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंशाना अमानुषपणे एकावर एक लादत तेलंगनाकडे वाहतूक करतांना सापळा रचत कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व  पथकाने कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच ट्रकसह ५७ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवार ६ मार्च रोजी केली.दरम्यान ट्रकमध्ये अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या १४३ नग गौवंशांची सुटका केली. मात्र यातील आरोपी हे घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाले आहेत,
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा-कोरची मार्गावरून अवैधपणे गोवंशाची तस्करी करण्यात येत असल्याच्या माहितीवरून बुधवारी रात्रो गोठणगांव नाक्यावर पोलीसानी सापळा रचला होता. मात्र तस्कराना याची पूर्वीच कुणकुण लागल्याने ते आड मार्गाने तेलंगानाकडे पळून‌ जाण्याचा प्रयत्नात असताना पोलीसानी त्यांचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्याना अटकाव केला यावेळी तस्करानी सर्व ट्रकचे वायर तोडत ट्रक तिथेच ठेवत पळ‌ काढला. पोलिसांनी सर्व जप्त ट्रक पोलीस ठाण्यात जमा करत ट्रकमध्ये अमानुषपणे पाय बांधून एकावर एक ठेवलेले १४३ गोवंशाची सुटका करण्यातआली . यातील ४ गोवंश दगावली होती. लगेच जनावराना गोशाळेत पाठविण्याकरीता भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील गोशाळा व्यवस्थापकांशी संपर्क करीत त्यांचाच वाहनाने जिवंत असलेले सर्व जनावराना तिथे पाठविण्यात आले मात्र यावेळी पाठविण्यात आलेले अनेक जनावरे ही सूद्धा मरनासन्न अवस्थेत असल्याने गोशाळेत पोहचे पर्यंत सूद्धा अनेक जनावरे दगावली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यानी दिली आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 7, 2024

PostImage

आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील प्राध्यापक डॉ. नोमेश मेश्राम यांच्या कविता संग्रहास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित


गडचिरोली _
विदर्भातील प्रसिद्ध कवी व गझलकार प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम यांच्या राजहंस प्रकाशन पुणे या महाराष्ट्रातील मातब्बर प्रकाशन संस्थेतर्फे जुलै २०२३ मध्ये प्रकाशित 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांकडून आजपावेतो उत्कृष्ट साहित्यकृती अंतर्गत १२ राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ब्रम्हपुरी येथे वास्तव्यास असलेले प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम हे आरमोरीच्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्या 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला शेगाव येथील स्व.बाबुराव पेटकर काव्य सन्मान,नागपूर येथील साहित्यविहार संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,मुक्ताईनगर जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार,आर्वी येथील देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठ जुन्नर, अॅग्रोन्यूज साहित्य संस्था फलटण,साहित्य प्रज्ञा मंच पुणे, कृतिशील शिक्षक संघटना ठाणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई,सूर्योदय साहित्य पुरस्कार जळगाव, डॉ.शिवाजीराव चव्हाण ग्रंथमित्र राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार हे महाराष्ट्रातील विविध भागातील प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्याबद्दल त्यांचे राजहंस प्रकाशन पुणे,मित्रपरिवार व अनेक साहित्यिकांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

MH 33 NEWS

March 7, 2024

PostImage

दही खाण्याचे ' हे ' आहेत फायदे..


Health tips:-सध्याच्या काळात फिट (Health) राहणं फार गरजेचं झालं आहे. यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करून पाहतात. तुम्हाला देखील तुमच्या दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने करायची आहे? तर दह्याशिवाय (Curd) चांगला पर्याय नाही. तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे. दही खाण्याचे नेमके फायदे कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

 *जाणून घ्या सकाळी दही खाण्याचे फायदे* 

 *1* . दही हा पोषक तत्वांचा खजिना आहे. हे कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन बी 12, बी 2 पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे. हे पोषक तत्त्वे हाडांच्या आरोग्यास मजबूती देतात, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
 *2* . प्रोबायोटिक्स दह्यामध्ये आढळतात. हे प्रोबायोटिक्स फायदेशीर बॅक्टेरिया आहेत जे निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला प्रोत्साहन देतात. हे पचनास मदत करतात आणि पोषक तत्व सुधारतात. प्रोबायोटिक युक्त दह्याने तुमचा दिवस सुरू केल्याने पचनसंस्था संतुलित राहण्यास आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

3. ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा काही इंच कमी करायचे आहे त्यांच्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये असलेले उच्च प्रथिन घटक तुम्हाला दीर्घ काळासाठी पोट भरून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दुपारचे जेवण करण्याची इच्छा कमी होते. दिवसभर खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास प्रोत्साहन देते.

 *4* . दह्याचा वापर आहारात तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. तुम्ही दही साधेही खाऊ शकता किंवा ग्रॅनोला सारख्या टॉपिंगसह खाऊ शकता. दही तुमच्या चव आणि आरोग्यानुसार असंख्य फायदे देऊ शकते.

 *5* . अनेकांना व्यस्त जीवनशैलीतून सकाळचा नाश्ता करणं फारसं जमत नाही. अशा वेळी तुम्ही दही खाऊ शकता. यासाठी दह्याबरोबर वेगेवळ्या प्रकारचे टॉपिंग करून तुम्ही दही अगदी सहज खाऊ शकता. यामुळे तुमची टेस्टी रेसिपीही तयार होईल आणि तुम्ही हेल्दीही राहाल.

टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही होणार प्रकाशन*


*छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही होणार प्रकाशन*

*चंद्रपूर, दि.०६*- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या दि.०७ मार्च (गुरुवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण होणार आहे. चंद्रपूरमधील प्रियदर्शनी सभागृहात सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष राज्य सरकारच्या वतीने साजरे केले जात आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण होणार आहे. याशिवाय मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड-१, ब्रेल लिपीमध्ये मुद्रित छत्रपती शिवाजी महाराज, ‘महाराष्ट्र - गोंड समुदाय’ हे महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर यांचेही प्रकाशन या सोहळ्यामध्ये होणार आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, माँ जिजाऊ यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचे प्रकाशन झालेले आहे. याशिवाय ना. मुनगंटीवार यांनी अधिवेशनात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर होण्यासाठी तत्कालीन सरकारसमोर मागणी लावून त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी कार्य पूर्णत्वास येणार असल्याची भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

*राज्याभिषेक सोहळा अन् अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविले!*
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे ऐतिसाहिक वारसा आणि परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे करताना सांस्कृतिक कार्यक्रमांसह ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी पुढाकार घेतला. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. ५ नोव्हेंबर २०२२ ला हे अतिक्रमण हटविण्यात आले. आग्रा येथील किल्ल्यामध्ये १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय दिमाखात साजरी करण्यात आली. २ जून २०२३ ला रायगडावर साजरा झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्याची जिद्द त्यांनी बाळगली. सातत्याने पाठपुरावा करून ब्रिटन सरकारसोबत त्यांनी सामंजस्य करार देखील केला. यासोबतच जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे मराठा इन्फन्ट्री सैन्य दलाच्या सहकार्याने ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार धरलेल्या पुतळ्याचे देखील काही दिवसांपूर्वी अनावरण झाले.


*आणि दांडपट्टा ‘राज्यशस्त्र’ झाले!*
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. १९ फेब्रुवारी २०२४ ला पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच घोषित केला. याशिवाय रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर आदी कल्पक कामे ना.सुधीर मुनगंटीवार पुढाकाराने करण्यात आली.


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित मडवेल्ली येते आगामी लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा..!*


 

भामरागड : तालुक्यातील मडवेल्ली येते काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी मडवेल्ली येथील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांन सोबत आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुक बाबत चर्चा करण्यात आली आहे.

 

त्यावेळी अजयभाऊंनी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितले की"आविसं काँग्रेस पक्षा सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.मडवेल्लीसह जिल्ह्यातील तसेच परिसरातील गावांच्या विकासासाठी आविसं काँग्रेस पक्षा कटिबद्ध आहे.

 

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा - विधानसभा निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी आविसं काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आव्हान आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.तसेच त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतले.

 

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,भामरागड तालुका काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मीकांत बोगामि,आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा,भामरागड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्षा राजू वड्डे,मेडपली ग्रापसरपंच निलेश वेलादी,कोठारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सडमेक भाऊ,मडवेली ग्रापसरपंच मलेश तलांडे,उपसरपंच परमेश मडावी,ग्रामपंचायत सदस्य कुसुम वेलादी,ग्रामपंचायत सदस्य महेश मडावी,सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,सामाजिक कार्यकर्ते चिनू सडमेक,सामाजिक कार्यकर्ते दिनेश जुमडे,पोलीस पाटील रावजी येरमा,बिरजू तेलामी,श्रीहरी मडावी,सामाजिक कार्यकर्ते शामराव सडमेक,धीरज वेलादी,काशिनाथ मडावी,संदिप वेलादी,साईनाथ इष्टाम,सागर वेलादी,चंद्रकांत मडावी,विश्वनाथ सोयांम,अजय वेलादी,देवाजी मडावी,ताणू सोयाम,शिवलाल सोयाम,दोलत मडावी,दसरथ मडावी,देसू सडमेक,बाजीराव सडमेक,प्रदीप तलांडे,विजय सडमेक,विशाल सोयाम,श्रीनिवास वेलादी,भास्कर सडमेकसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार?


काँग्रेसचे नेते राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवणार असल्याचा दावा अमेठी जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे. नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीनंतर परतलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी बुधवारी सांगितलं की, राहुल गांधी अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार असतील, यासंबंधित घोषणा लवकरच केली जाईल.

प्रदीप सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडण्याची तयारी केली आहे. राहुल गांधी 2002 ते 2019 पर्यंत अमेठीचे खासदार होते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राहुल गांधी सध्या केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत.

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. शाजापूरमध्ये राहुल गांधी म्हणाले की," पूर्वी देशातील तरुण जेव्हा सैन्यात भरती व्हायचे तेव्हा लष्कर त्यांच्या संरक्षणाची हमी देत ​​असे. सैनिक शहीद झाला तर त्याला शहीद दर्जा मिळतो. आता मोदी सरकारने अग्निवीरला सैन्यात आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे."

"...आता सर्व मार्ग बंद झालेत, दीड लाख तरुणांची काय चूक होती?"

"कोरोनाच्या वेळी देशातील दीड लाख तरुणांची सैन्यात निवड झाली, मात्र तीन वर्षांनंतरही ते रुजू झालेले नाहीत. आता त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अखेर या दीड लाख तरुणांची चूक काय होती?" असा सवाल देखील विचारला आहे.  शेतकऱ्यांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ." मध्य प्रदेशात राहुल गांधी म्हणाले आहेत की, "देशात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक वर्गातील सुमारे 90% लोक आहेत."

"गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले”

"देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात तुम्हाला ओबीसी, दलित किंवा आदिवासी समाजातील एकही व्यक्ती सापडणार नाही. हा सामाजिक अन्याय आहे, जो देशातील जवळपास प्रत्येक संस्थेत होत आहे. गरिबांची मुले अनेक वर्षे मेहनतीने अभ्यास करतात. पण पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाताच तिथल्या श्रीमंतांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आधीच पेपर असतो. परीक्षेचा पेपर फुटतो. म्हणजे आज गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत."


PostImage

MH 33 NEWS

March 6, 2024

PostImage

*प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार*


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या संड्रा येथील गोल्डन सी.सी.क्रिकेट क्लब संड्रा द्वारे ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेची उदघाटन काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समीर सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

त्यावेळी उदघाटन करतांना अजयभाऊ मानले की'आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबरच खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचा व क्षेत्राचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

या क्रिकेट स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी - नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे - उपसरपंच शानगोंडावार कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक कंत्राटदार विशाल रापेल्लीवार - कंत्राटदार महादेव लंगारी कडून देण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गावात आगमन होतच विविध नूत्या करत ढोल तशाने फटाकेची अतिशय बाजी करत जंगी स्वागत केली.उदघाटन संपलेवार येथील नागरिकांची संवाद साधात येथील समस्या जाणून घेतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.सहउदघाटक म्हणून नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे होते.कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच रमेश शानगोंडावार - सामाजिक कार्यकर्ते पोशालू चौधरी - ग्रामपंचायत सदस्य राकेश कुळमेथे - सदस्य मंजुषा गावडे होते.

यावेळी अहेरी काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम,विशाल रापेल्लीवार,लक्ष्मण कोडापे,रमेश शानगोंडावार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गुलाबराव सोयाम,राकेश कुळमेथे,बि.जी.गावडे सर,पोशालू चौधरी,अशोक गावडे,चिन्ना गावडे,सुदेव पेंदाम,विनोद सडमेक,विनोद येरमा,गणपती गावडे,अंजना पेंदाम,मंजुषा गावडे,बीमनपल्लीवार सर,पास्पूनुरवार वनरक्षक व्येकाटरावपेठा,बंदेला सर,कुमरे वनरक्षक इंदाराम,दोतरे वनरक्षक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळातील पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

MH 33 NEWS

March 5, 2024

PostImage

नोकरीच्या मुलाखतीत घालण्यासाठी सर्वोत्तम पोशाख कोणता आहे?


नोकरीच्या मुलाखतीत घालण्यासाठी सर्वोत्तम पोशाख कोणता आहे?

तुम्ही ज्या नोकरी आणि कंपनीची मुलाखत घेत आहात त्यानुसार उत्तर बदलू शकते.

 

तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम छाप पाडण्यासाठी पोशाख करणे आवश्यक आहे, परंतु तुम्ही निवडलेला पोशाख तुम्ही औपचारिक ड्रेस कोड असलेल्या कंपनीमध्ये मुलाखत घेत आहात, कॅज्युअल स्टार्ट-अप किंवा तात्पुरती नोकरी करत आहात यावर अवलंबून असते.

योग्य कपडे घालणे महत्त्वाचे आहे, कारण मुलाखत घेणारा पहिला निर्णय तुम्ही कसा दिसतो आणि तुम्ही काय परिधान करता यावर आधारित असेल.

समजा तुम्ही अशा कंपनीत मुलाखतीला जात आहात जिथे कोणीही सूट घालत नाही – अगदी CEO देखील नाही.

आपण अद्याप या प्रसंगी औपचारिकपणे कपडे घालावे, किंवा आपण जागेच्या बाहेर पहाल?

आणि जर तुम्ही अधिक कॅज्युअल लूकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर तुम्ही अजूनही व्यावसायिक आणि आदरणीय दिसत आहात याची खात्री कशी कराल?

व्यावसायिक / व्यवसाय मुलाखत पोशाख

सामान्यतः, नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला व्यावसायिक किंवा व्यावसायिक पोशाख घालण्याची आवश्यकता असते.

तुम्ही तुमच्या आउटफिटमध्ये काही आधुनिक स्टाईल ट्रेंड देखील समाविष्ट करू शकता.

मुलाखतीचा पोशाख निवडताना तुम्ही रंगाचा विचार केला पाहिजे आणि कामावर घेणाऱ्या व्यवस्थापकाचे लक्ष विचलित करणारी कोणतीही गोष्ट खूप चमकदार किंवा चमकदार परिधान करणे टाळावे.

जेव्हा शंका असेल तेव्हा थोडे कपडे घाला

ड्रेस कोड बदलतात.

उदाहरणार्थ, एक टेक स्टार्ट-अप अशा एखाद्या व्यक्तीला घाबरवू शकते जो खूप औपचारिक कपडे घालतो, तर फॉर्च्यून 500 कंपनी अशा एखाद्या व्यक्तीला घाबरवू शकते जो खूप अनौपचारिक कपडे घालतो.

तुमचा पोशाख योग्य आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही मुलाखतीला जाण्यापूर्वी कॉर्पोरेट संस्कृतीची जाणीव करून घेणे महत्त्वाचे आहे.

तथापि, कंपनीतील इतर सर्वांनी काय परिधान केले आहे याची पर्वा न करता, नोकरीच्या मुलाखतीदरम्यान आपल्या देखाव्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. छान साधा शर्ट आणि टाय घातलेला माणूस, किंवा छान पोशाख आणि कमी टाच घातलेली मुलगी, जीन्स आणि फ्लिप-फ्लॉप घातलेल्या उमेदवारांपेक्षा अधिक चांगली छाप पाडेल.

कोणत्याही परिस्थितीत, स्वच्छ, अविच्छिन्न कपड्यांसह सुसज्ज असणे नेहमीच आवश्यक असते.

पुरुषांच्या मुलाखतीचा पोशाख

कॉर्पोरेट जगतातील पुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट मुलाखत पोशाख हे पुराणमतवादी असतात. पुरुषांनी नेहमी नीटनेटके, तयार केलेला शर्ट आणि पँट परिधान करणे आवश्यक आहे. सर्व कपडे चांगले बसले पाहिजेत आणि डागांपासून मुक्त असावेत. लक्षात घेण्यासारख्या इतर गोष्टी आहेत,

नेव्ही, काळा किंवा गडद राखाडी किंवा तपकिरी यासारख्या ठोस रंगांना कॉर्पोरेट पसंती देतात
पांढरा किंवा साधा रंगाचा लांब बाही असलेला शर्ट आणि जुळणारी पँट
फॉर्मल लेदर बेल्ट आणि एक टाय जो खूप मजेदार नाही
गडद मोजे आणि पुराणमतवादी लेदर शूज
थोडे किंवा नाही दागिने
एक औपचारिक घड्याळ
व्यवस्थित, व्यावसायिक केशरचना
आफ्टरशेव्हची मर्यादित रक्कम - जबरदस्त परफ्यूम नाहीत
सुबकपणे सुव्यवस्थित नखे
पोर्टफोलिओ
शक्य असल्यास, तुमचे टॅटू झाकून टाका – असल्यास
महिलांच्या मुलाखतीचा पोशाख

सर्वसाधारणपणे, कॉर्पोरेट नोकऱ्यांमधील महिलांसाठी मुलाखतीची फॅशन पुरुषांपेक्षा अधिक क्लिष्ट आणि वैविध्यपूर्ण असते.

वाढलेल्या पर्यायांमुळे मुलाखतीचा पोशाख एकत्र करणे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी थोडे अधिक आव्हानात्मक बनते.
महिलांनीही मुलाखतीच्या सामानाचा विचार करून योग्य पर्स निवडणे आवश्यक आहे. सर्वोत्कृष्ट इंटरव्ह्यू बॅग अशा आहेत ज्या व्यावसायिक आहेत आणि रेझ्युमे बसवण्याइतपत मोठ्या आहेत परंतु चमकदार नसतात.

व्यावसायिक मुलाखतीसाठी महिलांनी काय परिधान करावे याचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स येथे आहेत:

एक व्यवस्थित फिट ड्रेस जो खूप ट्रेंडी किंवा चमकदार नाही
कंझर्व्हेटिव्ह शूज नाहीत किंवा कमी टाच
अत्यंत मर्यादित दागिने
एक औपचारिक घड्याळ
व्यावसायिक केशरचना
हलका मेकअप आणि मर्यादित प्रमाणात परफ्यूम
स्वच्छ, सुबकपणे मॅनिक्युअर केलेले नखे
पोर्टफोलिओ
शक्य असल्यास, तुमचे टॅटू झाकून टाका – असल्यास
मुलाखतीला काय आणायचे?

आदल्या रात्री तुमच्या मुलाखतीसाठी तयार होण्याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्यासोबत काय आणायचे आहे ते देखील गोळा करा:

मुलाखतीचे ठिकाण/दिशानिर्देश
तुम्ही भेटत असलेल्या व्यक्तीचे संपर्क नाव आणि नंबर
तुमची ओळख
नोटपॅड आणि पेन
तुमच्या रेझ्युमेच्या अतिरिक्त प्रती
संदर्भांची यादी (विचारल्यासच द्या)
तुमचे काम दाखवण्यासाठी लॅपटॉप किंवा टॅबलेट (नोकरीवर अवलंबून)
इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी वापरण्यासाठी ब्रेथ मिंट्स तुमच्यासोबत ठेवा
तुम्ही तुमचा स्मार्टफोन आणू शकता परंतु तुमच्या मुलाखतीदरम्यान तो निःशब्द आहे आणि कॅमेरा-लेन्स झाकलेला असल्याची खात्री करा. हे विचलित करणारा मोठा मजकूर अलर्ट किंवा मुलाखतीच्या मध्यावर फोन कॉल होण्याचा धोका टाळते.

मुलाखतीला काय आणू नये

नोकरीच्या मुलाखतीत तुम्ही काही गोष्टी आणू नयेत:

चघळण्याची गोळी
कॉफी किंवा सोडा
जर तुम्ही भरपूर दागिने घालत असाल तर त्यातील काही दागिने घरी ठेवण्याचा विचार करा (फक्त कानातले हा एक चांगला नियम आहे)

 

 

महत्वाचे मुद्दे

 

.तुमची मुलाखत घेण्यापूर्वी कॉर्पोरेट संस्कृती जाणून घ्या:

पारंपारिक उद्योग अधिक कॉर्पोरेट पोशाखांची मागणी करतात, तर स्टार्ट-अप्सना कॅज्युअल आरामदायक वाटू शकतात.

 

.ते स्वच्छ आणि दाबून ठेवा:

तुम्ही काहीही परिधान केले तरी ते नवीन किंवा चांगले दिसते याची खात्री करा. घट्ट फिट, जिम किंवा स्पोर्ट्सवेअर वगळा.

 

.तुमच्या ग्रूमिंगकडे लक्ष द्या:

तुमचे केस व्यवस्थित ठेवा आणि कोणत्याही ॲक्सेसरीज किंवा मेकअपला कमी लेखा.

 

लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या टॅलेंटला चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहात:

मुलाखतकाराने तुमची कौशल्ये आणि अनुभव लक्षात ठेवावे, तुमचा पोशाख नाही.