ProfileImage
646

Post

11

Followers

0

Following

PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 25, 2024

PostImage

युवा संकल्प ने गढ़चिरौली जिला कृषि अधीक्षक से पीएमकिसान ऑनलाइन दस्तावेज़ अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाने की मांग की।


युवा संकल्प ने गढ़चिरौली जिला कृषि अधीक्षक से पीएमकिसान ऑनलाइन दस्तावेज़ अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाने की मांग की।

गढ़चिरौली : पी.एम.  किसान योजना के तहत कई नागरिकों ने अपना ऑनलाइन पंजीकरण कराया है।  चूंकि पार्टू ऑनलाइन डॉक्यूमेंट में पीडीएफ को 200 केबी में अपलोड करना है।  इस बिंदु पर दस्तावेज़ स्पष्ट रूप से दिखाई नहीं दे रहा है.  इतने सारे नागरिकों के फॉर्म रद्द कर दिए गए हैं.  और ऑफिस में उन्हें अक्सर भागदौड़ करनी पड़ती है।  दस्तावेज़ अपलोड की अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए।  2KB में परिवर्तन रजिस्टर एवं पति-पत्नी का आधार कार्ड एवं 16 वर्ष से कम उम्र के बच्चे का आधार कार्ड अपर्याप्त दस्तावेज हैं।  सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए, इसके लिए उप निदेशक श्री सतीश पवार साहब से अनुरोध किया गया था, जिसमें राहुल भांडेकर, महेंद्र लठारे, रमेश कोठारे, तेजस कोंडेकर, राहुल वैरागड़े और अन्य उपस्थित थे।


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 16, 2024

PostImage

दिव्यांग वृद्धाचा गळा चिरून खून; घराला कुलूप लावून पळाले आरोपी  चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घटना


दिव्यांग वृद्धाचा गळा चिरून खून; घराला कुलूप लावून पळाले आरोपी 

 

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घटना 

 

आष्टी,

 

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे किरायाने वास्तव्यास असलेले रशीद अहमद शेख ,वय ६० वर्षे याचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना दिनांक १५ ला उघडकीस आली. रशिदने आपल्या नातेवाईकांना चार पाच दिवसांपूर्वी दूरध्वनी द्वारे मी गावाकडे येणार अशी माहिती दिली होती.त्यांनतर चार पाच दिवस होऊनही तो न आल्यामुळे व त्याचा फोन न लागत असल्यामुळे नातलगांना शंका येऊन ते स्वतः नागपूर येथून आष्टीत दाखल झाले व त्याचा फोटो दाखवून सदर व्यक्ती कुठे असतो अशी विचारणा केली.तेव्हा काही चौकातील लोकांनी चामोर्शी मार्गावर असलेल्या खुशाल कुकुडकर यांच्या घरी किरयाने रहात असल्याचे समजले तेव्हा ते त्याठिकाणी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावून दिसले तेव्हा खिडकी मधून डोकावून पाहले असता त्यांना आत रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला दिसला तेव्हा नातलगांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली.तेव्हा लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व कुलूप तोडून आतमध्ये बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसून दुर्गंधी पसरलेली होती.त्यानंतर पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाचारण केले . त्यांनतर उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी घराच्या सभोवताल फिरुन चौकशी करण्याकरिता उघडलेल्या दारामधून घरात गेले व त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने ही घटना चार पाच दिवसांपूर्वीची असावी असे बोलले जात आहे. सदर व्यक्तीचा खुन का करण्यात आला व कुणी केला याचा तपास पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांची चमू करीत आहे. अजूनपर्यंत पूर्ण माहिती कळू शकली नाही.

 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 14, 2024

PostImage

 ग्रामीण भागात वेळेवर बस फेऱ्या केव्हा येणार ; बस आगार व्यवस्थापकडे राहुल वैरागडे यांची मागणी


 ग्रामीण भागात वेळेवर बस फेऱ्या केव्हा येणार ; बस आगार व्यवस्थापकडे राहुल वैरागडे यांची मागणी. 

 

चामोर्शी : तालुक्यात गडचिरोली आगारातील बसेस वाघोली, कळमगाव,घारगाव फराळा, वेलतूर तुकूम, बस वेळेत येत नसल्याने. विद्यार्थ्यांचे/विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुस्कान होत असल्याने सदरची बस वेळेत व नियमित लिहावी.याकरिता आग्रा व्यवस्थापक गडचिरोली यांना निवेदनातून म्हटले आहे. महामंडळाच्या बसेस सायंकाळच्या वेळेस उशिरा पोहोचत असतात. मुले विद्यार्थी हे सायकलीने घरी निघून जातात. मुली विद्यार्थिनी ही बसची वाट पाहत असतात. विद्यार्थ्यांची शाळा ही ५:०० सुट्टी होते किंवा शाळेकडून बाहेरगावच्या विद्यार्थिनींना ३० मिनिट पहिले सोडले जाते. तरीपण मुली विद्यार्थिनींना ७:०० वाजेपर्यंत वाट पहावी लागते महामंडळ बसेसच्या वेळापत्रकामध्ये उशीर होत. विद्यार्थिनींना बसेसची वाट पहावी लागते. उचित प्रकार केव्हाही नाकारता येत नाही. 

बसेस महामंडळाकडून नियोजित वेळेत सोडावे याकरिता निवेदनातून मागणी करण्यात आली. उपस्थित तेजस कोंडेकर, ओमप्रकाश चौधरी, गंगाधर शेरमाके, राहुल वैरागडे,राहुल भांडेकर, राहुल गुरनुले, महिंद्रा लॉटरी, कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 12, 2024

PostImage

देसाईगंज : दुर्मिळ जखमी घुबडाला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले जीवदान


देसाईगंज : दुर्मिळ जखमी घुबडाला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले जीवदान 

 

भास्कर फरकडे/ संपादक गडचिरोली वार्ता न्युज 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज येथील वैनगंगा नदीच्या पुलावर ११ डिसेंबरच्या रात्री १० वाजता दुर्मिळ प्रजातीचे घुबड आढळून आले. सुमारे २.३ किलो वजनाचे घुबड नदीच्या पुलावर जखमी अवस्थेत कुरतडत असताना दुर्मिळ प्रजातीचा पक्षी जखमी अवस्थेत दिसला, तेव्हा आम आदमी पार्टीचे तालुकाप्रमुख भरत दयलानी व त्यांचे मित्र परवेज पठाण यांच्यासमवेत घेऊन आले. जखमी घुबड रात्रीचे 10 वाजले होते, त्यामुळे वनविभागाचे कार्यालय बंद होते. घुबडाचा एक पंख पूर्णपणे जखमी झाला होता.

रात्रीचे 10 वाजले होते त्यामुळे वनविभागाचे कार्यालय बंद असल्याने वनविभागाचे धांडे साहेब यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांना सकाळी घेऊन येण्यास सांगण्यात आले घुबडाचा एक पंख पूर्णपणे जखमी झाला होता.

घुबडाला उडता येत नसल्याने आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत दयलानी मित्र परवेज पठाण व जावेद कुरेशी यांनी हे घुबड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 12, 2024

PostImage

शालेय क्रीडा स्पर्धेत मार्कंडा कंन्सोबा चे माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयी


शालेय क्रीडा स्पर्धेत मार्कंडा कंन्सोबा चे माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयी 

 

आष्टी,

 

चामोर्शी तालुक्यातील आष्टी केंद्रांतर्गत चौडमपल्ली येथे घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत देयदीपम्यान कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. या केंद्र स्तरीय झालेल्या व्हाॅलीबाॅल सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून मार्कंडा कंन्सोबा शाळे च्या विध्यार्थ्यानी यशाला गवसणी घातली. चौडमपल्ली येथे दिनांक 10 ते 11 डिसेंबर रोजी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा येथील माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयावर नाव कोरले हा सामना ११ डिसेंबर रोजी झाला चुरशीच्या लढतीत विजय मिळविला

शालेय स्तरावर या क्रीडा स्पर्धांना महत्व असते. विध्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असतात त्यात मार्कंडा कंन्सोबा शाळेने दमदार कामगिरी बजावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा चौडमपल्ली येथे घेण्यात आल्या.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या विजयी चमूने गावात विजयी रॅली काढून आनंद व्यक्त केला व शाळे च्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. चमू शिक्षक कु. नितीन बहिरेवार, मुरमुरवार, यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्याध्यापक बि. टी. घोडाम यांनी अभिनंदन करून मुलांचा उत्साह वाढविला

 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 12, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात नाकावर टिच्चून उभारले मदत केंद्र   


.गडचिरोली पोलीसांनी नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात नाकावर टिच्चून उभारले मदत केंद्र                   

 

उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

 

भामरागड: 1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र विशेष पोलीस महानिरीक्षक, पश्चिम क्षेत्र, सिआरपीएफचे टी. विक्रम, विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, 113 बटा. सिआरपीएफचे कमांडण्ट जसवीर सिंग व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन पेनगुंडा गावातील ग्रामस्थांनी नुकतीच माओवाद्यांना गावबंदी केली आहे. नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल… पोलीस अधीक्षक नीलोत्पल गर्देवाडा नंतर या वर्षातील अति-दुर्गम भागातील हे दुसरे नवीन पोलीस मदत केंद्र अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक 11/12/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. भामरागड पासून 15 किमी., धोडराज पासुन 10 किमी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 03 किमी. अंतरावर असलेल्या अति-दुर्गम पेनगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र पेनगुंडा मैलाचा दगड ठरेल.

सदर पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 10 ट्रेलर, 04 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली.  

 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 11, 2024

PostImage

महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचा आणि त्यांच्यासाठी लढा उभारण्याचा संकल्प!


महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचा आणि त्यांच्यासाठी लढा उभारण्याचा संकल्प!-

महेश पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना

डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (म,प्र)

दिनांक 10 डिसेंबर 2024 राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा चंद्रपूर, गडचिरोली चे वतीने आंतरराष्ट्रीय 10 डिसेंबर आतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त चंद्रपूर येथील हॉटेल सिद्धार्थ येथे भव्य राष्ट्रीय मानवाधिकार संघठन चे 18 वे स्थापना दिवस व भव्य अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात राष्ट्रीय संमेलन तथा प्रतिभा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वअनेक महत्त्वपूर्ण चर्चा करुन ठराव घेण्यात आले या आयोजित अधिवेशनात कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन,
प्रमुख पाहुणे मुनीश्वर चतुर्वेदी, डॉ, विजय वाणी, प्रवीण भाऊ पडवेकर , गोपाल भाऊ अमृतकर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे , डॉ मंजू ठाकूर ,एस के सिंह , श्रीमती सविता मालवीय आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र मिश्रा ,सुरज श्रीवास्तव यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवर यांचे हस्ते चंद्रपूर ,गडचिरोली भंडारा गोंदिया , नागपुर जिल्ह्यतील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उत्कृष्ट कार्य करणारे संघटनचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले व कार्यक्रमात प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे व उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील तमाम जिल्ह्यातील सर्वसामान्य गोर गरीब अन्याय अत्याचार ग्रस्त नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कार्य करेल व सर्वांना आपला मानवाधिकार देण्यासाठी व ज्या ठिकाणी मानवाधिकारचा हनन होईल त्या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुढाकार घेईल व मानवाधिकारचा हणन होऊ देणार नाही? असे प्रतिपादन केले,यावेळी चंद्रपूर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास,विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद , गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीषा ताई मडावी, अहेरी येथील मानवाधिकार संघटना पदाधिकारी महेश अलोणे, सुरेश दुर्गे व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष काशिनाथ बोरकर , पदाधिकारी,अजित भडके, राष्ट्रपाल बुटले, प्रवीण नेल्लुरी अमोल कुरेकर, विजय पोहनकर, सुनील रामटेके ,राघोबा आलाम अशोक ताटकंठीवार ,प्रवीण बोधे ईश्वर चंदे व चंद्रपूर जिल्ह्यतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 11, 2024

PostImage

न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाच्या स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने मृत्यू 


न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाच्या स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने मृत्यू 

 

 

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोहवा /2752 उमाजी होळी, नेमणूक - पोलीस मुख्यालय गडचिरोली, हे आज दि 11/12/2024 रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर होते. दुपारी 02:55 वा चे सुमारास होळी हे जिल्हा न्यायालय गडचिरोलीचे आवारात गाडीत बसलेले असताना त्यांचे स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केलेले आहे.

 प्रथमदर्शनी होळी यांचेकडून अनावधानाने गोळी झाडली गेल्याचे दिसून येते आहे. 

पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल व इतर वरीष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन घटनेची अधिक माहिती घेतली आहे. मयत होळी यांचे कुटुंबीयांना गडचिरोली पोलीस दलाकडून सर्व सहायता देण्यात येत आहे. उद्या दि. 12/12/2024 रोजी उमाजी होळी यांचा अंत्यविधी त्यांचे स्वगाव मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली येथे सर्व सन्मानात करण्यात येणार आहे. 

पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत .

 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 11, 2024

PostImage

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी


 

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी

गडचिरोली,(जिमाका),दि.11:  जिल्ह्यात दिनांक 25 डिसेंबर 2024 या कालावधीत ख्रिसमस नाताळ जिल्हयात सर्वत्र  साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु होणार आहे .याशिवाय काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांनी संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 12 डिसेंबर 2024 ते दिनांक 26 डिसेंबर 2024 चे मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु  करण्यात आलेले आहे.
       सदर कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
     व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 11, 2024

PostImage

कुनघाडा (रैयत्तवारी) केंद्रातील नवतळा (तूकुम) येथे केंद्र स्तरीय बाल क्रीडा व कला सम्मेलन


कुनघाडा (रैयत्तवारी) केंद्रातील नवतळा (तूकुम) येथे केंद्र स्तरीय बाल क्रीडा व कला सम्मेलन

 

 

 

चामोर्शी : पंचायत समिती अंतर्गत कुनघाडा (रैयत्तवारी.) केंद्रातील जि. प. प्राथमिक शाळा नवतळा (तुकुम.) येथे केंद्रस्तरिय बाल क्रीडा व कला सम्मेलन दि. 10, 11 आणि 12 डिसेंबर 2024 ला आयोजित केला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत लेझीम आणि बँड पथकाचे समूहाणे मोठ्या उत्साहात करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मशाल पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कुनघाडा केंद्रातील सर्व शाळेतील टीम मान्यवरांना सलामी दिली. स्वागतगीत आणि नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला उदघाटक भाडभीडी ग्रामपंचायतचे सरपंचा सौ. अर्चना रवींद्र मेश्राम, सहउदघाटक जि. प. माजी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चामोर्शी पं. स. माजी सभापती आनंद भांडेकर विशेष अतिथी पं. स. गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे, शि. वि. अधिकारी राजेश कोत्तावार, माजी उपसभापती पं. सं. चामोर्शी बंडू चिळंगे, काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे, शा. व्य. स. अध्यक्ष खुशाल कुकडकर नवतळा, पोलीस पाटील सौ मनीषा कुनघाडकर व केंद्रातर्गत येणाऱ्या सर्व जि. प. शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावातील गावकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 11, 2024

PostImage

नवजात शिशुच्या जौविक पालक व नातेवाईकांनी भेटण्याचे आवाहन


नवजात शिशुच्या जौविक पालक व नातेवाईकांनी भेटण्याचे आवाहन 

गडचिरोली,(जिमाका),दि.10: दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी अंदाजे वय 01 दिवस, मौजा, खरपुंडी ते आकरटोली कडे जाणारा रस्ता ता. गडचिरोली जिल्हा. गडचिरोली येथे बालक आढळुन आलेला असता मा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली जि. गडचिरोली येथे सदर बालकांची तक्रार नोंद करण्यात आली असून त्या अनुषंगाने दिनांक 21 ऑक्टोबर 2024  रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी सदर बालकाला मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या समक्ष सादर केले असता, मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये सदर बालकाला लोक कल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, व्दारा संचालीत गडचिरोली, पंचवटी वॉर्ड, बजरंग नगर, हनुमाण मंदिराच्या पाठीमागे जि. गडचिरोली या विशेष दत्तक संस्था येथे दाखल करण्यात आलेले आहेत. 
करिता सदर बालकांचे जैविक माता-पिता व नातेवाईक यांनी बालकांचा ताबा मिळणेकरिता बातमी प्रकाशीत झाल्यापासुन 15 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय बॅरेक क्रमांक 01, खोली क्रमांक 26, 27 कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली मोबाईल क्रमांक- 9403704834, दुरध्वनी क्रमांक:-07132-222645 यावर संपर्क साधावा व जर मुदतीत दिलेल्या तारखेस संपर्क साधला नाही तर केंद्रिय दत्तक प्रधिकरण (CARA) नवी दिल्ली यांचे अधिसुचना नुसार दत्तक प्रक्रिये करिता सदर बालकास मा.बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये दत्तकाकरिता विधी मुक्त करुन सदर बालकांची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन श्री. अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे. 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 11, 2024

PostImage

बेपत्ता अरुणा काकडेचा सापडला मृत्यूदेह.. गळा दाबून केले ठार


बेपत्ता अरुणा काकडेचा सापडला मृत्यूदेह.. गळा दाबून केले ठार

 

 

 

   चिमूर :   मागील 15 दिवसापासून चिमूर तालुक्यातील बेपत्ता असलेल्या व्यापारी महिलेचा मृतदेह आज नागपुरातील बेसा येथील निर्जन स्थळी आढळला, या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले यांना अटक केली.

         देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका 37 वर्षीय अरुणा अभय काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. इतवारी भंडारा मार्गावरील बाटा शोरूम समोरून त्या हरवल्या, अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र विचारपूस केली मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक फुलेकर. पोलिस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी अजय चौधरी व पोलिसांनी शोध मोहीम राबवली मात्र अरुणा काकडे यांचा पत्ता काही लागला नव्हता. अखेर चिमूर पोलिसांना सिम रिचार्ज वरून आरोपींना शोधण्यात सफलता मिळाली काकडे या चिमूर व्यापारी संघटनेच्या सदस्या असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले.

           पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला. शहर पोलिसांनी पथके तयार करीत तपासाच्या विविध बाजू तपासल्या, चौकशी दरम्यान पोलिसांना अखेर आरोपी गवसला आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले होता. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली, त्याने सांगितले की 26 नोव्हेंबर रोजी अरुणा काकडे मला भेटली होती, अरुणा ही माझी वर्गमैत्रिण होती, त्यामुळे आमची चांगली ओळख होती. आम्ही दिवसभर सोबत होतो, त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला, मी यावेळी रागाच्या भरात अरुणा चा गळा आवळून खून केला व त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणा चा मृतदेह टाकत बेसा येथील निर्जन स्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात तिचा मृतदेह टाकला व तिथून निघून गेलो.

        वर्ष 2023 मध्ये नरेश डाहूले हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता, त्यावेळी शहरात अनेक घरफोडीच्या घटना घडल्या, त्या प्रकरणात मुख्य आरोपी नरेश डाहूले ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस विभागाने नरेश डाहूले ला बडतर्फ केले. चिमूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 10, 2024

PostImage

ऑल इंडिया किसान सभेचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश : मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाचे आश्वासन


ऑल इंडिया किसान सभेचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश : मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

 9 डिसेंबर 2024 रोजी अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन यशस्वीपणे पार पडले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक मा. बरगमकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, हेडरी येथे धान खरेदी केंद्र येत्या दिवसांत मंजूर करून खरेदी सुरू करण्यात येईल, तसेच गर्देवाडा केंद्रातील मागील हंगामातील धान उचल तातडीने करण्यात येईल.

 

आंदोलनात प्रमुख नेते ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्र राज्यकार्यध्यक्ष म्हणून कॉ.डॉ महेश कोपुलवार, कॉ सुरेश चवळे जिल्हा सचिव, सचिन मोतकुरवार (अहेरी विधानसभा प्रमुख, किसान सभा), कॉ. रमेश कवडो (तालुका अध्यक्ष, किसान सभा), मा सैनुजी गोटा (माजी जिल्हा परिषद सदस्य ), मा कन्ना गोटा गाव पाटील गट्टा, मा दोडगेजी गोटा माजी सरपंच, मा महारु लेकामी उपसरपंच गट्टा, मा महादू कवडो गाव पाटील रेकलमेट्टा, मा रामसू नरोटी पाटील वांगेतूरी, मा दानू हिचामी रेकणार, मा विशाल पुजालवार, राजेश मुजुमदार, रितेश जोई, रामलू गोटा,पत्तू पोटावी,धर्मा तिम्मा पाटील मेड्री तसेच स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

या आंदोलनाने अहेरी विधानसभेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळवून दिले आहे. विशेषतः, धान खरेदी केंद्रांसाठी हेडरी, गट्टा, गर्देवाडा यांसारख्या ठिकाणी गोडाऊन मंजूर करणे, मागील हंगामातील धान उचल पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे या मुद्द्यांवर लोकाभिमुख लढा उभारला गेला.

 

अलीकडच्या काळात अहेरी विधानसभेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित असा व्यापक आंदोलन पहिल्यांदाच पाहायला मिळाला. ऑल इंडिया किसान सभेच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सभेने पुन्हा एकदा आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.

 

- ऑल इंडिया किसान सभा

(अहेरी विधानसभा क्षेत्र )


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Dec. 10, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करुन दिला माणूसकीचा परिचय


माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करुन दिला माणूसकीचा परिचय 

           

अहेरी : तालुक्यातील कोडसेलगुडम येथील रहिवाशी करुणा नेर्ला हिने घरच्या काही अडचणीमुळे रासायनिक औषध  प्राशन केल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला कामलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते नंतर तिला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे रेफर केले अहेरी येथील रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी मृत्यू घोषीत केले
कोडसेलगुडम येथील युवतीच्या या दुःखद घटनेची स्थानिक कार्यकर्त्यानी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना माहिती दिली 
विशेष म्हणजे अजय कंकडालवार या घटनेच्या वेळी बाहेर गावी दौऱ्यावर असतांना त्यांनी अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांना रुग्णालयात पाठवून मृतक युवतीच्या नेर्ला कुटुंबाला आर्थिक मदत पाठवून आपल्या सामाजिक बांधलीकीचे परत एकदा परिचय करून दिला.
या मदतीबद्दल मृतक युवतीच्या कुटुंबानी कंकडालवार यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 7, 2024

PostImage

कुनघाडा रैय्यतवारी जि. प. शाळेत शिक्षण परिषद संपन्न केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले


कुनघाडा रैय्यतवारी जि. प. शाळेत शिक्षण परिषद संपन्न

 

केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले

 

दिनांक-०७/०८/२०२४ रोज बुधवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै.) येथे केंद्रस्तरीय 'शिक्षण परिषद' पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते होते , तर कार्यक्रमाचे उद्‌घाटक केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कु. शेंडे मॅडम, सुत्रसंचालन प्रमोद बोरसरे, तर आभार प्रदर्शन दुधबावरे सर यांनी केले. या परिषदेची सुरुवात फुलोरा परीपाठाने करण्यात आली. सुलभक निमाई मंडल यांनी बाबळेवाडीचा अनुभव सांगीतला तर अध्ययन स्तर विश्लेषण, कृतिकार्यक्रम व नियोजन व अंमलबजावणी रोषण बागडे व टिकेश ढवळे, शिष्यवृत्ती सद्यस्थिती व आढावा विजय दुधबावरे व निमाई मंडल, PAT विद्या समिक्षा केंद्र विद्याप्रवेश - आशिष येलेवार व उमेश जेंगठे, निपुण भारत ध्येय आणि क्षेत्र प्रफुल सिडाम, पुरुकातील कोऱ्या पानाचा प्रभावी वापर, आनंददायी शनिवार येलेवार सर यांनी सुलभक म्हणून मार्गदर्शन केले.

        केंद्रप्रमुख गोमासे यांनी केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन व सर्व शंकाचे समाधान केले. या शिक्षण परिषदेत शिक्षकांना पडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण सुलभकाकडून करण्यात आले.

     'श्रावणमासी हर्षमानसी

       हिरवळ दाटे चोहिकडे'

अशा उत्साहपूर्ण व निसर्गरम्य वातावरणात केंद्राची पहिली शिक्षण परिषद पार पडली.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 7, 2024

PostImage

ट्रक -दुचाकीच्या अपघातात वृत्तपत्र विक्रेत्याचा जागीच मृत्यू भद्रावती शहरातील घटना


 

ट्रक -दुचाकीच्या अपघातात वृत्तपत्र विक्रेत्याचा जागीच मृत्यू भद्रावती शहरातील घटना

 

 

भद्रावती :- आपल्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असताना ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहरातील एका वृत्तपत्र विक्रेत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 रोज बुधवार ला सकाळी 9.15 वाजता शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. ज्ञानेश्वर एकनाथ इंगोले, वय 50 वर्ष, राहणार शास्त्रीनगर, भद्रावती असे या मृत वृत्तपत्र विक्रेत्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर मृतक हा गेल्या वीस वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक हा नेहमीप्रमाणे आपल्या एम एच 34 सीसी 7030 या क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरण करीत असताना उडान पुलाजवळ सी जी 04 पी एफ 14 97 या क्रमांकाच्या नागपूर वरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या केमिकल भरलेल्या ट्रकने दुचाकी ला जबर धडक दिली. यात ज्ञानेश्वर इंगोले यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 7, 2024

PostImage

खासदार डॉ. किरसान यांनी घेतली केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट


खासदार डॉ. किरसान यांनी घेतली केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

 

1980 च्या वनकायद्यात शिथिलता आणून रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला गती देण्याची केली मागणी

 

गडचिरोली : खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री श्री भूपेंदर यादव यांची दिल्ली येते भेट घेतली व वन कायाद्यामुळे रखडलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कारवाफा, डुमीनाला, डरकानगुडा, पिपरी रिठ, पुलखल, तुलतुली, चेन्ना हे वनबाधित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वन संवरक्षण कायदा 1980 शिथिल करुन मंजुरी देण्याची विनंती केली. तसेच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात सतत होणारा वाघांचा व रानटी हतींचा धुमाकूळ बंद करुन होणारी जिवीत हानी रोखण्यासाठी या हिंस्त्र रानटी प्राण्यांना इतर ठिकाणी हलवून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची विनंती केली सोबतच पिकाची नासाडी करनाऱ्या व जीवितला धोका निर्माण करनाऱ्या रानटी डुकरांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 7, 2024

PostImage

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 99.8 टक्के अर्जांची छाननी पूर्ण यादी अंतिम करण्यसाठी विधानसभानिहाय समिती गठीत


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 99.8 टक्के अर्जांची छाननी पूर्ण
यादी अंतिम करण्यसाठी विधानसभानिहाय समिती गठीत

गडचिरोली दि. 7 : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 1 लाख 56 हजार 267 अर्जांपैकी 1 लाख 55 हजार 928 अर्जांची पडताळणी करण्यात आली असून हे प्रमाण 99.8 टक्के आहे. तर मंजूर करण्यात आलेल्या अर्जाची संख्या 1 लाख 50 हजार 185 इतकी आहे. राज्य शासनाने या योजने अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup हे संकेत स्थळ सुरु केले असून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.  
अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी ज्या महिलांना मोबाईवर संदेश प्राप्त झाले आहेत, त्यांनी त्रुटीची पुर्तता तात्काळ करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
*यादी अंतिम करण्यसाठी विधानसभानिहाय समिती गठीत*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पडताळणी करून पात्र यादी अंतिम करण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय संबंधीत मतदार संघाचे आमदार यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलेल्या अशासकीय सदस्यांची निवड या समितीमध्ये करण्यात आली आहे. 
    विधानसभानिहाय समिती अशी आहे :
अहेरी विधानसभा मतदार संघ क्षेत्र : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (अध्यक्ष), रवी ओल्लेवार, विनोद आकलपल्लीवार हे अशासकीय सदस्य तर अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व मुलचेरा तालुक्याचे चे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे सदस्य आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव/समन्वयक म्हणून काम पाहतील.
गडचिरोली विधानसभा मतदार संघ : आमदार डॉ. देवराव होळी (अध्यक्ष), प्रशांत वाघधरे, संगीता हिंगे हे अशासकीय सदस्य तर गडचिरोली, चामोर्शी व धानोरा चे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे सदस्य आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव/समन्वयक म्हणून काम पाहतील.
    आरमोरी विधानसभा मतदार संघ क्षेत्र : आमदार कृष्णा गजबे (अध्यक्ष),  किसन नागदेवे, चांगदेव फाये हे अशासकीय सदस्य तर आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्याचे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी सदस्य व बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे सचिव/समन्वयक म्हणून काम पाहतील.
    यानुसार समितीमार्फत आजपर्यंत गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्रातून प्राप्त 60 हजार 680 अर्जापैकी 59 हजार 660 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तसेच आरमोरी क्षेत्रातून 56 हजार 307 पैकी 54 हजार 921 आणि अहेरी मतदार संघातून 39 हजार 280 प्राप्त अर्जापैकी 35 हजार 604 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. समितीमार्फत पात्र लाभार्थींची यादी अंतिम करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेमार्फत सदर अर्ज मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
 000


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 7, 2024

PostImage

रस्त्यावर खड्डे पडून साचलेल्या पाण्यात लोकहित संघर्ष समिती तर्फे धान रोवणी


रस्त्यावर खड्डे पडून साचलेल्या पाण्यात लोकहित संघर्ष समिती तर्फे धान रोवणी.

 

 

आरमोरी:- शहरातील बाजारपेठ वॉर्डातील जिल्हा परिषद शाळा व आंगणवाडी समोर खूप मोठया प्रमाणात खडे पडलेले असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे व या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची निर्मिती होऊन डेंगू, मलेरिया यासारख्या आजारांच्या निर्मितीला चालना मिळत आहे तसेच या मार्गावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना सातत्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर खड्डे हे जिल्हा परिषद शाळा व आरोग्य केंद्र समोर असल्याने या ठिकाणी नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांची मार्गक्रमण सुरु असते त्यामूळे अपघात होण्याची शक्यता बळावलेली आहे कित्येकदा किरकोळ अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झालेले आहेत ही गंभीर बाब ओळखून गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक म्हणुन खड्डात साचलेल्या पाण्यात धानरोवणी करून प्रशासनाचा निषेध आज दिनांक ७/८/२०२४ ला दुपारी ३:०० वाजता करण्यात आला सातत्याने लोकहित संघर्ष समिती तर्फे आरमोरी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडूजी करण्याबाबत मागणी होत असून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे संबंधित खड्ड्याची डागडूजी करण्यात यावी अन्यथा लोकहित संघर्ष समिती ,आरमोरी तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलेला आहे याप्रसंगी लोकहित संघर्ष समितीचे पदाधिकारी देवानंद दुमाने, राहुल जुआरे ,सारंग जांभुळे ,आशुतोष गिरडकर, महेंद्र शेंडे, महादेव कोपूलवार, मनोज गेडाम ,डॉ. आशिष कोरेटी , नीलकंठ गोहने, श्रीकांत आतला ,पंकज इंदुरकर ,लीलाधर मेश्राम ,गोपाल नारनवरे , रोहित बावनकर,सुरेश मेश्राम, विभाताई बोबाटे,सुमित खेडकर, सुरज ठाकरे ,श्रीराम ठाकरे ,विशाल चौके उपस्थित होते .


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 7, 2024

PostImage

गडचिरोली जिल्यातील शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय निर्माण करुन देण्यास प्रयत्नशील.माजी खा.अशोक नेते


गडचिरोली जिल्यातील शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय निर्माण करुन देण्यास प्रयत्नशील.माजी खा.अशोक नेते

दिं. ०७ ऑगस्ट २०२४

धानोरा:- देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या कल्पनेतील धोरणाला प्रतिसाद देत प्रायोगिक तत्त्वांवर सांसदीय संकुल विकास परियोजना द्वारे गडचिरोली जिल्ह्यात मुख्य व्यवसाय म्हणून शेती हा आहे.या शेतीवर धान्य उत्पादनांच्या व्यतिरिक्त कोणतेही उत्पादन घेतले जात नाही.

यासाठी शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास व्हावा व शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्यासाठी पूरक व्यवसाय निर्माण करण्यासाठी धानोरा तालुक्यातील चातगांव परिक्षेत्रातील पंचविस गावातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून , चातगांव परिक्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांना 25 पंचवीस गावे ही दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सांसदीय संकुल विकास परियोजने अंतर्गत एकतीस करोड, सत्त्यानशी लाख 31,87,00000 रुपये माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांच्या विशेष प्रयत्नाने व पुढाकाराने मंजूर करून जवळजवळ अडीच हजार (2500) लाभार्थ्यांना दुधाळ दोन गाई प्रमाणे पाच हजार (5000)गायी वाटप होणार याकरिता आज दिंनाक ०७ ऑगस्ट २०२४ रोज बुधवारी धानोरा येथील पंचायत समिती सभागृहात मा.खा.अशोक जी नेते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

 

या आढाव्यात सांसदीय संकुल विकास परियोजनेद्वारे चातगांव परिक्षेत्राचा पंचेविस गावातील आदिवासी शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय निर्माण करुन लाभ मिळावा यासाठी मा.खा.अशोक नेते यांनी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. 

 

यावेळी संवर्ग विकास अधिकारी (BDO) सतीशजी टिचकुले, विस्तार अधिकारी ए‌. बी. ठाकरे,विस्तार अधिकारी के. पी. रामटेके,संसदीय संकुल वि. परि.गडचिरोली प्रमुख व मीडिया प्रमुख महाराष्ट्र प्रदेश भा ज पा अनुसुचित जमाती मोर्चाचे अक्षयजी उईके, अमोलजी चकनलवार, ता.महामंत्री धानोरा विजय कुमरे,शहराध्यक्ष सारंग साळवे तसेच या आढाव्याला प्रामुख्याने मोठ्या संख्येने ग्रामसेवक वर्ग उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 7, 2024

PostImage

ओबीसीच्या न्याय हक्कासाठी पोंभूर्ण्यात दाखल झाली ओबीसी मंडल यात्रा


ओबीसीच्या न्याय हक्कासाठी पोंभूर्ण्यात दाखल झाली ओबीसी मंडल यात्रा 

 

-भारतीय ओबीसी महापरिषद पोंभूर्णा तालुका आयोजन समीतीचा पुढाकार

 

 

पोंभूर्णा : - ओबीसी युवा अधिकार मंचच्या वतीने जातीनिहाय जनगणनेसाठी ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान विदर्भातील सात जिल्ह्यातून काढण्यात येणारी मंडल यात्रा दि.५ ऑगस्ट सोमवारला पोंभूर्णा येथील बस स्टँड परिसरातील सावित्रीबाई फुले चौकात दाखल झाली.या यात्रेचे जंगी स्वागत भारतीय ओबीसी महापरिषद पोंभूर्णा तालुका आयोजन समीतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

 

            

७ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जातीनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा विषय घेऊन दि ३ ऑगस्ट पासून मंडल यात्रा काढण्यात आले आहे.ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे.मात्र केंद्र तथा राज्य शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के होती.परंतु १९३१ पासून तर आजपर्यंत जातीनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे लोकसंख्येसह सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती समजून येत नाही. जर भारताला महासत्ता बनायचे असेल तर सर्व घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.

विकासाच्या दृष्टीने धोरण ठरविण्यासाठी भारत सरकारकडे डेटा असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने भारताची जातीनिहाय जनगणना करावी.यासाठी ओबीसी, एस.सी., एस.टी. समाजात जनजागरण झाले पाहिजे या उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .

ओबीसी मंडळ यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी उमेश कोर्राम,डॉ.संजय घाटे,सतीश मालेकर,ॲड.पुरुषोत्तम सातपुते, प्रकाश पाटील मारकवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी यात्रेचे स्वागत करण्यासाठी भुजंग ढोले,सद्गुरू ढोले, राहुल सोमनकर,प्रदीप दिवसे,रुषी कोटरंगे, चरणदास गुरुनुले,जगन कोहळे, नंदकिशोर बुरांडे,कालिदास मोहुर्ले,विकास ठाकरे,नंदा कोटरंगे, आनंदराव पातळे, विनोद धोडरे,गुरूदास गुरनुले,गौरव गुरनुले, आदींची उपस्थिती होती.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 6, 2024

PostImage

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे - राष्ट्रीय अध्यक्ष : श्री गणेश कचकलवार


युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे - राष्ट्रीय अध्यक्ष : श्री गणेश कचकलवार 

 

समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा दि. 18.08.2024 रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे युवा ग्रामीण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले. अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्र भरात जिल्हा, तालुका व सर्कल नुसार आज युवा ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करून जिथे छोट्या - मोठ्या, ग्रामीण आणी शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने त्यांनी जि संकल्पना करून पूर्ण महाराष्ट्र भरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेद नं करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा जो विडा उचलेला आहे त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळाले आणी याचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला सर्वतोपारी मदत होत असल्याने या संघटने मध्ये राष्ट्रभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणी एवढेच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 6, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी परिवाराला उपचारासाठी आर्थिक मदत..!


माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी परिवाराला उपचारासाठी आर्थिक मदत..!

 

अहेरी : तालुक्यातील नैनेर येथील रहिवासी मेंगा मडावी यांची पत्नी सौ.राजी मेंगा मडावी यांना प्रकृती ठिक नसल्याने काही दिवशी अगोदर अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते भर्ती करण्यात आली.मात्र डाक्टरांनी त्यांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होती.

 

मेंगा मडावी यांच्या घरचा आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने मडावी कुटुंबियांना औषध आणि इतर खर्चासाठी अडचण भासत होती.सदर माहिती काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्या मडावी परिवाराला आर्थिक मदत करण्यात आले.

 

दरम्यान कंकडालवार म्हणले की'यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून मडावी कुटुंबियांना मोठा धीर दिला.त्यावेळी समस्त मडावी परिवारातील सदस्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले आहे.

 

मदत करतांना वेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,नरेंद्र गर्गम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शंकर सिडाम,सतिश पोरतेट,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 6, 2024

PostImage

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिर परिसरात कबुतर चोरल्याचा आरोप ठेऊन एका युवकाचा चिमुकल्यांना अमानुषपाने लाथा बुक्याने मारतानाचा व्हिडिओ समोर


देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिर परिसरात कबुतर चोरल्याचा आरोप ठेऊन एका युवकाचा चिमुकल्यांना अमानुषपाने लाथा बुक्याने मारतानाचा व्हिडिओ समोर

देसाईगंज :
मनाला हेलावणारी घटना, सदर युवकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी नागरिकांची मागणी

चिमुकल्यांना उचलून फेकले लोखंडी सळाखीत


गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे कबुतर चोरल्याचा आरोप ठेऊन देसाईगंज येथील आयुष अर्जुन स्वर्णकार (18) या युवकाने अमानुषपाने 4 चिमुकल्यांना लाथा बुक्याने मारतानाचा व्हिडिओ समोर आला असून सदर युवकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आमगाव येथील बालकांची नावे  आर्यन नरेश  बगमारे - 9 वर्षे, तन्मय विनोद नागमोती वय - 10 वर्षे, रुषभ विनोद नागमोती  वय - 9 वर्षे, डेव्हिड मदन ठाकरे वय - 12 वर्षे हे खेळत असताना तुम्ही माझे कबुतर चोरले असा आरोप करत या चारही चिमुकल्यांना लाथा बुक्यांनी मारून अक्षरशः लोखंडी सळाखीत उचलून फेकले.

आयुष स्वर्णकार या युवकाच्या वडलांचे रक्त तपासणी लॅब असून सदर युवक हा देसाईगंज येथील कस्तुरबा वॉर्ड येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 6, 2024

PostImage

काल जखमी केलेल्या घोडीला आज वाघाने केली फस्त


काल जखमी केलेल्या घोडीला आज वाघाने केली फस्त

 

चिमूर तालुक्यातील खडसंगी बीट परिसरात शेतातील पाळीव गरोदर घोडीची शिकार वाघाने रोज सोमवारी केली होती. परंतु ती गोडी जखमी अवस्थेत असताना तिला रस्त्या अभावी घरी आणता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास त्या जखमी घोडीला वाघाने फस्त केले. त्यामुळे शेतकरी हेमंत इसनकर यांचे वाघाच्या भीतीने शेतकाम थांबून झालेले नुकसान व घोडीचे नुकसान असे एकूण 1,00,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. 

                हेमंत इसनकर यांचे शेत मुरपार रीठ खापरी पिंजारी येथे असून रस्त्या अभावी या शेतात मालाची व मजुराची ने आण करण्याकरता त्यांनी घोडी पाळलेली होती. दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान शेताच्या बांधावर चरण्यासाठी बांधलेल्या गरोदर घोडीवर वाघाने हल्ला करून शिकार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात घोडी गंभीर जखमी झाली होती रस्त्या अभावी या घोडीला बैलबंडी किंवा इतर वाहनाने मांडून घरी आणता आले नाही. त्यामुळे ती घोडी त्याच ठिकाणी पडून होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच वाघाने डबल हल्ला करून घोडीला फस्त केले. शेतीचे कामे करण्यासाठी वरदळी करता या घोडी चा उपयोग करीत असल्याने त्यांचे शेतीचे सर्व काम ठप्प पडले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील वाघाने याच शिवारात याच घोडीच्या नवजात शिंगरू (पिल्लू) ची शिकार केली होती, त्यामुळे देखील त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.

         या परिसरात वाघाने घोडीची शिकार केल्याची चर्चा सर्व परिसरात पसरली असून त्यांच्या शेतात कोणताही मजूर सध्या घडीला काम करण्यासाठी येण्यास तयार नाही. हा कालावधी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून काही भागात भाताची पेरणी शिल्लक आहे. तसेच इतर पिकांची मशागत देखील करणे आवश्यक आहे. मात्र वाघाच्या भीतीने मजूर शेतात येण्यास तयार नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

       त्यामुळे नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांनी झालेली नुकसान एक लाख रुपये लवकरात लवकर मिळण्यात यावी व वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना केली आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

Aug. 6, 2024

PostImage

आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी भाई रामदास जराते  भाई शामसुंदर उराडे यांची मध्यवर्ती समीती सदस्यपदी नियुक्ती


 

आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी भाई रामदास जराते 

 

भाई शामसुंदर उराडे यांची मध्यवर्ती समीती सदस्यपदी नियुक्ती

 

गडचिरोली : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्य २ व ३ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे १९ वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात पुढिल ४ वर्षांकरीता पक्षाच्या नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे यांची पक्षाच्या मध्यवर्ती समितीवर सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

मागिल अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय राहून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा लढणारे भाई रामदास जराते यांच्या कार्याची दखल घेवून पक्ष सभासदांनी सलग दुसऱ्यांदा मध्यवर्ती समितीवर निवड केली. मध्यवर्ती समितीनेही त्यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या चिटणीस मंडळावर संधी दिली. अनुसूचित क्षेत्रातील कायदे आणि आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास व त्यासाठी त्यांनी चालविलेला संघर्ष लक्षात घेत पक्षाच्या चिटणीस मंडळाने आता भाई रामदास जराते यांची आदिवासी, भटक्या - विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती आहे.

 

आदिवासी, भटक्या - विमुक्त आघाडीची पक्षाने आपल्यावर जबाबदारी सोपविल्याने अनुसूचित क्षेत्रातील कायदेभंग, बळजबरी प्रकल्प आणि आदिवासी, भटक्या - विमुक्तांवरील अन्याय अत्याचारा विरोधात राज्यभरात आवाज बुलंद करु, अशी प्रतिक्रीया भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

 

भाई रामदास जराते व भाई शामसुंदर उराडे यांच्या निवडी बद्दल पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, जेष्ठ नेते माजी आमदार संपतबापू पवार पाटील, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, सहचिटणीस बाबासाहेब देवकर, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, प्रा.एस.व्ही. जाधव, प्रा. बाबुराव लगारे, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, बाबासाहेब देशमुख, मोहन गुंड, जयश्रीताई जराते आणि जिल्ह्यातील शेकापच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिलेल्या आहेत.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 6, 2024

PostImage

 भयावह : पिता - पुत्रांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करत खून केला


 भयावह : पिता - पुत्रांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करत खून केला

 

मूल (चंद्रपूर) :- मूल तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी गावामध्ये आज, शनिवार दिनांक- ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास भयावह घटना घडली. घराशेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर राजू बोदलकर यांनी पिपरे यांना केबल बाजूला करा असे सांगितले, मात्र केबल बाजूला कर असे का म्हटले म्हणून पिता-पुत्रांनी राजू यांच्यावर हल्ला केला. गुरुदास पिपरे व त्यांचा २१ वर्षीय मुलगा सूरज गुरुदास पिपरे यांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय राजू शेषराव बोदलकर यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला. या हल्ल्यात बोदलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

 

दरम्यान, घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांचा राग अनावर झाल्याने ते आरोपींना पकडण्यासाठी जमले. यावेळी आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागले असते तर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार गावात घडला असता. मात्र मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी बाप-लेकाला ताब्यात घेतले


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 6, 2024

PostImage

नक्षलविरोधी अभियान राबवून पोलिस परत येत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणला आय डी स्फोट


नक्षलविरोधी अभियान राबवून पोलिस परत येत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणला आय डी स्फोट 

 

भामरागड: धोडराज येथून अभियानावरून परत येत असलेल्या C60 जवानांवर माओवाद्यांनी IED स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. 

 

 C60 चे जवान रस्त्यावर शोध अभियान करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोर ने स्फोट केला. 

 

 दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 6, 2024

PostImage

अखेर शहराच्या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा


अखेर शहराच्या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु

 

काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

 

देसाईगंज-

    अतिदुर्गम,आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ व व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने पावसाच्या दिवसात वाहनांना अपघात होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही गंभीर बाब लक्षात घेता शहराच्या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे यथाशिघ्र बुजविण्यात यावेत,अन्यथा बेशरमाची झाडे लावुन तीव्र निषेध करण्याचा इशारा काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांना दिला असता अखेर खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

     देसाईगंज शहर हे लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. देसाईगंज वरून अलिकडे सुरजागड लोह खनिजाची वाहतुक वाढल्याने तसेच व्यापार नगरी असल्याने खरेदीसाठी लगतच्या जिल्ह्यातुन येणारांचा मोठा ओघ आहे.सद्या पावसाळ्याचे दिवस असुन पडलेल्या खड्ड्यात पाणी साचुन राहात असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही.यामुळे वाहनांना अपघात घडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली होती.

     जड वाहनांची वर्दळ त्यातच बारमाही जड वाहतुक होत असल्याने एकदा डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराला सदर मार्गाची देखभाल दुरस्ती करणे आवश्यक आहे.मात्र डांबरीकरण करतांना आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याने डांबरीकरण उखडून मुख्य मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत.यात नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रमुख मार्गासह राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश असल्याने व सदर बाब नगर प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्याने मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन यथाशिघ्र खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावावेत,अन्यथा विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतिने पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी बेशरमाची झाडे लावून तीव्र निषेध करण्याचा इशारा डाॅ.चिमुरकर यांनी संबंधितांना दिला होता.याची दखल घेत मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला असुन डाॅ.शिलु चिमुरकर यांचे आभार मानले आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 5, 2024

PostImage

विषबाधाग्रस्त रुग्णांची परिस्थिती धोक्याबाहेर


विषबाधाग्रस्त रुग्णांची परिस्थिती धोक्याबाहेर


 गडचिरोली,दि.05(जिमाका): धानोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरी अंतर्गत रुपिनगट्टा या गावामध्ये सुमारे 2.30 वा. बारश्याचे कार्यक्रमाकरिता सामुहिक भोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये सुमारे 70 लोक उपस्थित होते. सदर भोजनामुळे अन्न विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. पहिल्या पंगतीमध्ये भोजनाकरीता बसलेल्या सुमारे 30 लोकांमध्ये उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसुन आल्यानंतर जेवण थांबविण्यात आले. प्रथम प्रा. आ. केंद्र, पेंढरी येथे उपचार करुन पुढील उपचाराकरीता रुग्णवाहिकेने सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास 6 रुग्ण सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले. भरती रुग्णांमध्ये उलटी, मळमळ, पोटदुखी व डोकेदुखी अशी लक्षणे आढळुन आली. त्यापैकी साहिल सत्तू पदा वय 5 वर्ष याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटरवर घेवून उपचार सुरु करण्यात आले. व अन्य रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर रात्री 11.00 वा. दरम्यान 14 रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व सर्वावर उपचार सुरु करण्यात आले. सदर रुग्णांमध्ये 18 पुरुष व 2 मूले यांचा समावेश आहे. 2 मूलांपैकी 1 मुलाला महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सदर्भित करण्यात आले. सद्य:स्थितीत 1 रुग्ण व्हेंटीलेटरवर असून इतर सर्व रुग्णाची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. 6 रुग्ण हे छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे उपचाराकरीता गेले असल्याचे रुग्णाकडून माहिती मिळाली. अन्न पदार्थाचे नमूने तपासणी करीता नागपूर येथे पाठविण्यात आलेले आहे. त्या अहवालानुसार नेमके कोणते विष मिश्रीत करण्यात आले याबाबत माहिती उपलब्ध होईल.
    डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली यांनी प्रा.आ. केंद्र पेंढरी येथे भेट देवून रुग्णांची विचारपूस केली व त्यांना वेळीच संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली. प्रा. आ. केंद्र पेंढरी येथे तालुका आरोग्य अधिकारी, धानोरा डॉ. अविनाश दहिवले, डॉ. सखाराम हिचामी, डॉ. रुपेश पेंदाम, साथरोग अधिकारी, जि.प. गडचिरोली , डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली हे उपस्थित होते.
    रुग्णाच्या व्यवस्थापना करीता जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सतिशकुमार सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धूर्वे, भिषक डॉ. अशिष खुणे, श्वसन विकार तज्ञ डॉ. मनिष मेश्राम, डॉ.अनुपम महेशगौरी वरीष्ठ सल्लागार यांनी चमूद्वारे रुग्णसेवा पुरविण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करुन रुग्णाचे प्राण वाचविले असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 5, 2024

PostImage

खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार


खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार

 

 

आष्टी: खड्डा चुकवितांना नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल झाडावर आदळून एक जागीच ठार झाल्याची घटना मार्कंडा कंन्सोबा - घोट मार्गावरील बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दिनांक ५ जूलै रोजी सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली. मानवेंद्र नरेंद्रनाथ राॅय वय (३८) रा. गांधीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

मानवेंद्र नरेंद्रनाथ राॅय हे आपल्या दुचाकीने दुचाकी क्रमांक (एम.एच. ३३ एल ५७५१) या दुचाकीने दिनांक ५ जूलै रोजी सकाळी ७:४५ वाजताच्या दरम्यान गांधीनगर येथून घरून आपल्या मुलास आष्टी जवळील तारसा येथील कारमेल अकाडमीला सोडून परत गावाकडे येत असताना बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने सरळ मोटारसायकल झाडाला आदळून मानवेंद्र हे जागीच ठार झाले.

मुलगा विवाहित असून १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा‌ त्यांच्या पश्चात आप्तपरिवार आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 5, 2024

PostImage

कामाच्या चौकशीसाठी उपोषणावर बसलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतले उपोषण मागे!


कामाच्या चौकशीसाठी उपोषणावर बसलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतले उपोषण मागे!

 

उपोषण मंडपाला निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सांळूखे यांची भेट!

 

गडचिरोली : अहेरीला जिल्हास्थानाचा दर्जा देण्यात आला असला तरी अद्याप या ठिकाणी असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांचे अधिकार प्रदान करण्यात आले नाही.याशिवाय अहेरी शहरात ले-आऊट संदर्भात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कामे करण्यात आली असून या कामांच्या चौकशीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तारीखेला बसले अखेर आज निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सांळूखे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली व सदर मागण्या चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज उपोषण मागे घेतले.

 

अहेरी शहरात नगररचनाकार,महसूल विभाग,तलाठी कार्यालय व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या संगणमताने अनधिकृत ले-आऊटला परवानगी देण्यात आली आहे.अनेक ले-ऑउटला ओपन स्पेस नाही.तर अनेक ले-आऊट हे पुरग्रस्त क्षेत्रात येत असतानाही अशा ले-आऊटची अहेरी शहरात सर्रास विक्री सुरु आहे. देण्यात आलेल्या प्रापर्टी कार्ड संदर्भातही त्यांनी आक्षेप नोंदविला आहे.यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने अखेर कंकडालवार यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. 

 

अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-ऑऊटच्या कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली होती 

 

अहेरी येथील एका जमिनीला अकृषक करण्यासाठी (एनएपी-34) मृत व्यक्तीला जीवंत दाखविण्यात आले.तर आदिवासीची जमिनी गैर आदिवासींना विक्री करताना कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता विक्री करण्यात आली आहे.या प्रकरणातील सर्व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली आहे.जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही.तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचा इशाराही अजय कंकडालवार यांनी दिला होता अखेर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आज कंकडालवार यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ता अजय कंकडालवार यांची उपोषण मागे घेतले.

 

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षा नेते मा.श्री.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेशी दूरद्वानी द्वारे सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.सदर बाबी लक्षत घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली सामोरील अमरण उपोषण थांबवण्यात आली आहे.

 

यावेळी हणमंतू मडावी सेवा निवृत्त वन संवरक्षक व आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गडचिरोली,रोजा ताई करपेत नगर पंचायत नगर अध्यक्ष अहेरी,प्रशांत भाऊ गोडसेलवार नगर पंचायत नगर सेवक अहेरी ,हसन गीलानी माजी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गडचिरोली , सतीश भाऊ विधाते ,रुपेश टिकले परिवहन सेलचे काँग्रेस अध्यक्ष गडचिरोली,मनोहर भाऊ पोरेट्टी माजी जी.प उपाध्यक्ष, गोरव येनपरेड्डीवार, अण्णा जेट्टीवा, निकेश गद्देवार, संमया पसुला माजी जी. प अध्यक्ष,, ,कार्तिक भाऊ तोगम माजी उप सरपंच,सुनीता ताई कुस्नाके माजी जी. प.सदस्य,सुरेखा ताई आलम माजी सभापती प. स.अहेरी, गीता चालुरकर माजी उपसभापती अहेरी,अजय नैताम माजी जी. प सदस्य ,स्वप्नील दादा मडावी, अशोक येलमुले ,सां.का,राजू दुर्गे , कवडू चलावार, हनीप शेख,तस्सू भैय्या,राकेश सडमेक,सचिन पांचार्या,प्रकाश दुर्गे,दिवाकर आलम,संदीप कोरेत,शिवराम पुल्लुरीसह आदी उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 5, 2024

PostImage

१८ ते २० वर्षाच्या बहिणी सरकारच्या बहीणी नाहीत का?


१८ ते २० वर्षाच्या बहिणी सरकारच्या बहीणी नाहीत का?

 

माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांचा सवाल 

 

चामोर्शी : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावी करण्यात आली.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. 

मग १८ वर्षे पूर्ण झालेल्या बहिणी मतदान नोंदणी करून मतदान करतात मग या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ का नाही? मग मतदान करणारी ही सरकारची लाडकी बहिण नाही का? असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी उपस्थित केला आहे. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे त्याकरिता १८ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात यावा अशीही मागणी रुपाली पंदिलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 4, 2024

PostImage

महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये


महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये

 

बहिणी खूष पण भाऊजी नाराज ?

 

 

चामोर्शी : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत फार्म भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे तर एकमेकींना महिला तू लाडकी बहिणचा फार्म भरली का ? असे विचारत आहेत तर आष्टी शहरात व परिसरात सलून दुकानात, पानटपरीवर पुरुषांमध्ये वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. पुरुष वर्ग एकमेकांना म्हणतात की सरकार लाडकी बहिण योजना चांगली काढली आहे माझी बायको तर मला सरकार माझा भाऊ मला महिन्याला १५०० रुपये देणार आहे म्हणून मस्त खुष आहे म्हणून सांगतो आहे तर दुसरा पुरुष म्हणतो की सरकार भाऊ बहिणीसाठी चांगली योजना काढली पण आम्हाला (भाऊजी) म्हणून एक योजना काढायला पाहिजे अशी खमंग चर्चा सुरू आहे या होणाऱ्या चर्चेवरून सरकारच्या बहीण सरकार भाऊ वर खुष आहेत आणि भाऊजी मात्र नाराज आहेत यावरून असे दिसून येत आहे

आता तर दाखल्यांचे अटी सुद्धा कमी करण्यात आल्याचे ना.अजीत पवार यांनी विधिमंडळात सांगितले आहे व कोणताही अधिकारी या कामात कुचराई केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व सदर योजनेचा फार्म भरण्यासाठी मुद्दत वाढविण्यात आली आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 3, 2024

PostImage

लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे


लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे 

 

आष्टी दि. ३ (प्रतिनिधी) शिंदे सरकारने राज्यातील महीलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामुळे २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी शासन दरवर्षी ४६००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तरी लाभास पात्र - असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरताना महिलांचे आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता दखल संबंधितांनी घ्यावी असे आवाहन व इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे यांनी दिला आहे. शिंदे सरकारच्या माध्यमातून युवा, शेतकरी, दुर्बल - महिला अशा विविध घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे त्याचा प्रचार व प्रसार वेगाने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 2, 2024

PostImage

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रस्त्याचे लोकार्पण,आरेंदा फाटा ते ताडगुडा रस्ता ,ग्रामस्थांना रस्ता सुलभ झाले


मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रस्त्याचे लोकार्पण,आरेंदा फाटा ते ताडगुडा रस्ता ,ग्रामस्थांना रस्ता सुलभ झाले

अहेरी:- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते नुकतेच पेरमिली मुख्य रोडवरील आरेंदा फाटा ते ताडगुडा गावातील सहा किलो मिटर डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सदर रस्त्याचे काम करण्यात आले असून आता आरेंदा व ताडगुडा येथील गावकऱ्यांना रस्ता सुलभ झाल्याने रस्त्याचे त्रास व अडचण दूर झाले आहे.

     या प्रसंगी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी , गावाच्या विकासासाठी रस्ते व दळणवळणाची सोय अत्यावश्यक असून गाव खेड्यातील रस्ते मुख्य मार्गांना जोडण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू असून बहुतांश ग्रामीण भागातील रस्ते बनविण्यात आले असून शिल्लक व उर्वरित रस्ते बनविण्यासाठी आमचे प्रयत्न व शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे आवर्जुन सांगितले.तत्पूर्वी फित कापून डांबरीकरण रस्त्याचे उत्साहात लोकार्पण केले.

     यावेळी प्रामुख्याने अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, येरमणार ग्राम पंचायतीचे माजी सरपंच बालाजी गावडे, आरेंदा ग्रा.पंचायतीचे सरपंच व्यंकटेश तलांडी, उपसरपंच बुज्जी आत्राम, ग्रां. पं.सदस्य मुरा आत्राम, मांतया आत्राम, सुरेंद्र अलोणे, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, साधू आत्राम, राजू तलांडी, मादी आत्राम आदी व आरेंदा येथील गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 2, 2024

PostImage

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना,महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज


‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना,महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज

          

 गडचिरोली दि. 2 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी 15 जुलै पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

             ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला टप्प्यात १ ते १५ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी पात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर होतील. तसेच, ज्या महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे.

 

योजनेचा उद्देश : 1) महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2) त्यांचे आर्थिक - सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

 

लाभार्थी पात्रता : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

 

अपात्रता : 1) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, 2) सरकारी नोकरी, 3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, 6) चार चाकी गाडी असणारे.

 

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल. लाभार्थ्याला स्वत: ‘नारी शक्ती दूत’ हे ॲपवर अर्ज करता येईल. 

 

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

 

 अडचणी असल्यास येथे करा संपर्क : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे. 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 2, 2024

PostImage

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे उपोषणाला का बसले,पहा


माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे उपोषणाला का बसले,पहा 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अनेक गंभीर समस्या घेऊन आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मागण्या काय आहेत पाहुया.

 

१) १/४/२०१० मध्ये अहेरी जिल्हा निर्मीतीचा निर्णय शासन दरबारी झालेला आहे. अहेरी जिल्हांतर्गत अप्पर जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार अहेरी, भामरागड,सिरोंचा,एटापल्ली या चार तालुक्याकरीता देण्यात यावे

 

२) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-आऊट मध्ये केलेल्या कामाचा निधी,ले-आऊट धारकांकडून वसुली करण्यात यावा व अहेरी-चेरपल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणात नियमबाह्य झालेल्या कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

 

३) मौजा-अहेरी येथील सर्व्हे क्र. २०७ च्या जमिनीचे मालकी हक्कदारांच्या मय्यतीनंतर खोटे संमती दाखवुन पोट हिस्सा केलेल्या प्रकरणाची व सदर मृत व्यक्तीला जिवंत दाखवुन एनएपी-३४ करीता मागणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. 

 

४) अहेरी नगरपंचायत हद्दीतील मा. उपविभागीय अधिकारी साहेबांनी दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघण करुन ले-आऊट धारकांनी केलेल्या अनधिकृत प्लॉट खरेदी केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आदेश रद्द करण्यात यावे.

 

५) ले-आऊट मध्ये केलेल्या कामांची शासकीय निधी ले-आऊट धारकांकडून वसुल करण्यात यावे.

 

६) प्रापर्टी कार्ड क्र. १४०९, सिट क्र. ०९ ची कायदेशीर चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.

 

७) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्यरित्या केलेले डांबरीकरण कामांची चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी.

 

८) एन.जी. पठाण, उप-अधिक्षक भूमी अभिलेख,अहेरी यांच्या कार्यकाळात झालेले संपूर्ण फेरफार व संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड तसेच गावठाण अहेरी,आलापल्ली,नागेपल्ली,वांगेपल्ली येथील एनएपी- ३४ च्या सर्व जामिनीचे चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

 

९) प्रापर्टी कार्ड क्र.१४०९ सिट क्र. ०९ मध्ये आदिवासी प्रापर्टी कार्ड गैर आदिवासी यांच्याशी खरेदी विक्री करण्यात आले असुन आदिवासी प्रापर्टी गैर आदिवासी खरेदी-विक्रीची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.

 

१०) अहेरी साजा क्र. ०१ मध्ये अतिक्रमण नोंदवहीत खोडतोड व हेतुपरस्पर चढविण्यात आलेले नावांची सखोल चौकशी करुन तसेच उप अधिक्षत भूमी अभिलेख अहेरी येथील अतिक्रमण नोंदवहीची संपूर्ण चौकशी करुन दोषर्षीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. 

 

११) उप अधिक्षक कार्यालय अहेरी येथे जुने प्रापर्टी कार्ड ऑनलाईन करण्यात आले असुन,त्यांचे जुने प्रापर्टी कार्ड नुसार ऑनलाईन प्रापर्टीकार्ड करण्यात आले नाही याची चौकशी करण्यात यावी. 

 

१२) अहेरी गावठाण येथील सन २०२१-२२ मध्ये सर्व नकाशात ग्रामपंचायत रस्ते म्हणून ७/१२ मध्ये नोंद असलेल्या सन १९७४-७५ मध्ये झालेल्या सर्वेनुसार गावठाण नकाशात ते रस्ते नसल्याचे दिसून येत आहे. सन १९७४-७५ मध्ये झालेले सर्वे मध्ये रस्ते गायब असल्याची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.

 

१३) दुय्यम निबंधक कार्यालय अहेरी यांच्या कार्यकाळात झालेल्या खरेदी-विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.

 

१४) वांगेपल्ली व चिचगुडी ग्रामपंचायत हद्दीतील ले-आऊट उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेशानुसार विक्री न करता परस्पर संपूर्ण प्लॉट विक्री करण्यात आले असुन,साहेबांच्या आदेशाचे पालन न करता ज्यांनी ज्यांनी विक्री केले त्या प्लॉटची चौकशी करुन आदेश रद्द करण्यात आदि मागण्यांना घेऊन अजय कंकडालवार यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केले आहे.जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 2, 2024

PostImage

प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : अन्यथा आंदोलन!


प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : अन्यथा आंदोलन!

 

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांना अजय कंकडालवार यांनी दिले निवेदन..!

 

अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत सुरू असलेल्या आलापल्ली रोड वरील प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्त्याला सुरुवात होऊन भरपुर कालावधी झालेला आहे.सदर काम कासव गतिने सुरू असल्यामुळे या रस्त्याने शाळेत जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात असलेले अधिकारी/कर्मचारी व नागरिक दररोज दुचाकी व चारचाकी तसेच बसणे ये-जा करीत असतात. सदर वाहनधारकांना अपूर्ण व कासव गतिने सुरू असलेल्या कामामुळे नाहक त्रास सहन करावे लागत असुन रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकुन असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सदर रस्त्याचे चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे.नियमानुसार सदर रस्त्याचे काम ७-८ दिवसात पूर्ण करण्यात यावे.अन्यथा दिनांक ०९/०७/२०२४ रोजी आदोलन उभारण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनातून दिला आहे.

 

सदर निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,कार्यकारी अभियंता,अप्पर जिल्हाधिकारी अहेरी,यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 2, 2024

PostImage

भगिनींनो तातडीने गोळा करा कागदपत्रे ! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी हालचाली सुरू


भगिनींनो तातडीने गोळा करा कागदपत्रे !

 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी हालचाली सुरू

 

 

गडचिरोली, दि. १ (प्रतिनिधी) राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भगिनींना तातडीने कागदपत्रे गोळा करण्याची गरज आहे.

सोमवार १ जुलैपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ ही आहे. मुदत संपल्यानंतर या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची पाळी येऊ शकते, असे बोलले जात आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. पात्र महिलेला स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १, ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या महिलांना लाभ मिळेल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट आहे.

 

असे आहे वेळापत्रक अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात

 

जुलै, २०२४, अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक १५ जुलै. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक १६ जुलै. तात्पुरत्या यादीवरील तक्रार / हरकती प्राप्त करण्याचा कालावधी १६ जुलै ते २० जुलै. तक्रार/ हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी २१ जुलै ते ३० जुलै.

 

या कागदपत्रांची गरज

 

उत्पन्नाचा दाखला सन २०२५ पर्यंत वैध असणारा असावा, जन्माचा दाखला, टि. सी झेरॉक्स, डोमेसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, लाभार्थी नावाने बैंक पासबुक झेरॉक्स. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १,५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. राज्यातील २१ ते६० यावर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यत्तत्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहतील.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 2, 2024

PostImage

नव्या कायद्याच्या जनजागृतीसाठी आष्टी पोलीस ठाणे सरसावले


नव्या कायद्याच्या जनजागृतीसाठी आष्टी पोलीस ठाणे सरसावले

 

चामोर्शी: ब्रिटीश काळी शासनास केंद्रस्थानी ठेवुन भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रीया संहिता-१९७३ तसेच भारतीय पुरावा कायदा-१८७२ यांची निर्मीती करण्यात आली होती. काळानुसार व बदलत्या परिस्थितीनुसार कायद्यात बदल होत गेले. मागील काळात भारतातील समाजिक जीवनात आमुलाग्र बदल झाल्याने तसेच भारतीय व्यक्ती हा केंद्रस्थानी आल्याने कायद्यात मोठा बदल करणे केंद्रशासनास अंत्यत महत्वाचे वाटत होते. याच कारणांने केंद्रशासनाने व्यक्ती केंद्रस्थानी ठेवुन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रीया संहिता व भारतीय पुरावा कायद्यात आमुलाग्र बदल करुन अनुक्रमे भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम- २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ तयार करण्यात आले असुन सदर कायद्याची अंमलबजावणी दिनांक ०१/०७/२०२४ रोजीपासुन पुर्ण भारत देशात लागु करण्यात आले.

 

नवीन कायद्याची भारतीय नागरीकांना माहीती व्हावी या उद्देशाने दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत पोलीस स्टेशन आष्टी येथे अजय कोकाटे उपविभिागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चासत्रकरीता पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील प्रतीष्ठीत नागरीक, व्यापारी, समाजसेवक, पोलीस पाटील, विद्यार्थी, सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार व परीसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवीली. भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम-२०२३ व भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ च्या चर्चासत्राकरीता उपस्थितांना अजय कोकाटे उपविभिागीय पोलीस अधिकारी अहेरी, विशाल काळे पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांनी मार्गदर्शन करुन नवीन व जुन्या कायद्यातील बदल सोप्या भाषेत समजावुन सांगितले. पोलीस स्टेशन आष्टी येथे आयोजीत चर्चासत्राला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 1, 2024

PostImage

लखमापूर बोरी येथे बस स्थानकातच केली जाते खुलेआम ताडी विक्री,स्थानिक प्रशासनाचा ताडीविक्रीवर कानाडोळा


लखमापूर बोरी येथे बस स्थानकातच केली जाते खुलेआम ताडी विक्री,स्थानिक प्रशासनाचा ताडीविक्रीवर कानाडोळा. 

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी येथे मागील सहा-सात वर्षा पासून उन्हाळ्यातील दिवसात खुलेआम अवैध नशीली ताडी विक्री केली जात आहे. मात्र ह्या वर्षी पावसाळा ऋतू ला सुरुवात झाली तरी मात्र ताडी विक्री सुरूच आहे, एवढेच नाहीं तर विक्रेता शासकीय इमारतीत म्हणजेच बसस्थानकातच आपला डेरा मांडून खुलेआम ताडी विकताना दिसत आहे.

ताडाच्या झाडापासून निघणारा ताडी अर्क आटून गेला मात्र यांच्या डबक्यात ताडी आपोआप तयार होत असते. याचे कारण ताडी ही रासायनिक पावडर किंवा इतर द्रवापासून तयार केली जातं असावी.

ताडी पिणाऱ्याची संख्या कितीही वाढली तरी मात्र विक्रेत्याची ताडी कधीच संपत नाहीं. जणू ह्या लोकांना ताडीचा झरा सापडला असावा. याच बसस्थानकात लहान मुले मोठ्या व्यक्तीला ताडी पिताना बघून ताडी पिऊ लागले व एकदा ताडीची सवय लागली की काही मुलांना दारू ची पण लत लागू शकते. त्यामुळे असं खुलेआम निर्भीड होऊन ताडी विकणे किती धोक्याचे आहे हे स्पष्ट दिसूण येते. 

 सदर ताडी विक्रेता बाहेर राज्यातून आपल्या गावात येऊन ताडी विक्री करत आहे आणि गावात अश्याप्रकारे निर्भीड होऊन ताडी विकत असतो, हे पाहून विक्रेता हा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या छत्रछायेखाली अवैध नशिली ताडी विकत तर नसावा किंवा काही लोक ताडी विक्री विरोधात बोलल्यानंतर ताडी विक्री दोन तीन दिवस बंद राहते व परत विक्री सुरु होते तर यांच्या मागे कोण असावा असा प्रश्न गावकऱ्यांना पडू लागला आहे व गावातून ताडी व दारू विक्री कायम बंद व्हावी अशी मागणी गावकरी स्थानिक प्रशासनाला करू लागले आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 1, 2024

PostImage

दोटकुली गावात कृषी दिवस साजरा कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन


दोटकुली गावात कृषी दिवस साजरा कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन

केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी यांच्या तर्फे ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेतील विद्यार्थ्यांतर्फे ०१ जुलै २०२४ ला दोटकुली येथे कृषी दिवस आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. आदित्य कदम तसेच श्री. छबिल दुधबळे, श्री. प्रलय झाडे निकीता येलमुले मॅडम यांच्या मार्गदर्शनात अनुज हिंगाने, यश काले ,अजिंक्य केमये , अनुप लोणारे , गोपाल मंडल यांच्या द्वारे उत्तम रित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे चे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस १ जुलै हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरी केली जाते. अशी माहिती कृषी विद्यार्थ्यांनी दिली व कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाप्रसंगी गावातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा दोटकुली मुखध्यापक . घोडमारे सर, टेकाम सर, गव्हारे सर, नंदाताई चौधरी आणि .गावकरी मंडळी व लहान बालगोपाल उपस्थित होते. आणि कार्यक्रम सहजरीत्या पार पडला.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 1, 2024

PostImage

अवघ्या दोन तासात मागण्या पूर्ण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मागे...!


अवघ्या दोन तासात मागण्या पूर्ण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मागे...!

 

 

सिरोंचा तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) विभागाकडुन गेल्या दोन वर्षापासून तळ्यात - मळ्यात नेटवर्क येणे-जाणे सुरू आहे, सिरोंचा तालुका मुख्यालयसह ग्रामीण भागात बी.एस.एन.एल. टॉवर उभारून अनेक वर्ष होत आहे, तरीपण बी,एस,एन,एल नेटवर्कच्या प्रतिक्षेत मोबाईल धारकांची वाट सुरूच आहे.

तालुका मुख्यालयात ग्रामीण भागातून नागरिक विविध कार्यालयातील कामासाठी प्रत्येक दिवशी येत असतात अशातच तालुका मुख्यालयात बीएसएनएल नेटवर्क येना - जाणा सुरू असल्याने अनेक नागरिकांचे कार्यालयातील कामे करणे मोठी समस्या निर्माण झाले आहे,

तसेच तेलंगाना राज्यातुन येणा-या बि.एस.एन.एल. नेटवर्क लवकरात लवकर जोडण्यात यावे किंवा सिरोंचा येथे स्वतंत्र बि.एस.एन.एल. नेटवर्क फायबर रिस्टोर टीम (FRT) नियुक्त करण्यात यावे,अशी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार, जिल्हा सरचिटणीस - चोक्कामवर, तालुका अध्यक्ष - फाजिल पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला आणि पदाधिकारी व कार्यकर्ते १ जुलै २०२४ रोजी तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आली आहे,

 आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अवघ्या दोन तासात बी ,एस,एन, एल, विभागाचे अधिकारी - कुमारस्वामी, तहसिलदार - तोटावर, नायब तहसीलदार- काडबाजीवार,सामाजिक कार्यकर्ता - श्रीकांत सुगरवार 

यांनी उपोषण स्थळी भेट देऊन येत्या १५ दिवसात बी,एस,एन,एल नेटवर्क सुरळीत सुरू होईल आणि लोकांची समस्या दुर होईल असे आश्वासन पत्र दिले आहे,

         आश्वासन पत्र दिल्याप्रमाणे बेमुदत साखळी उपोषण मागे घेण्यात आली आहे,

          त्यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी मीडिया समोर बोलत येत्या पंधरा दिवसात नेटवर्क समस्या दुर न झाल्यास बी,एस,एन,एल कार्यालयावर धडक मार्च काडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यानी दिला आहे,

          त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

पक्षाचे पदाधिकारी - सलाम सय्यद, शहर अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - राजकुमार मूलकला, गणेश संड्रा, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते,


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

July 1, 2024

PostImage

जिल्हा परिषद केंद्र शाळा कुनघाडा रै येथे शाळापूर्व तयारी मेळावा दोन संपन्न


जिल्हा परिषद केंद्र शाळा कुनघाडा रै येथे शाळापूर्व तयारी मेळावा दोन संपन्न

 

 

चामोर्शी: पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे दिन जुलैला स्टार प्रकल्प अंतर्गत शाम पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन मोठ्या थाटात संपन्न झाला

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु गीता शेंड ह्या होत्या उद्घाटन केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख आतिशी म्हणून भुजंगराव कोडाप ज्योतीताई कोसमशिले साधनव्यक्ती घनश्याम वांढरे आदि मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक वर्ष2024-25 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी हा मेळावा आयोजित केला जातो यात निरनिराळ्या सात स्टॉल्सवर भरती पात्र विद्यार्थ्यांचा भावनिक सामाजिक बौद्धीक गणन भाषिक शारिरीक व मानसिक विकसन याक्षमता प्रामुख्याने तपासल्या गेल्या पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले यावेळी भरती पात्र विद्यार्थ्यांना आनंद व्हावा म्हणून रंगीत टोप्या देण्यात आल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना फुगा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पालकांनीही यात उत्स्फुर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दुधबावरे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रमोद बोरसरे यांनी केले

याप्रसंगी पालकांसाठी अल्पोपहार विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक बिस्किटांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदास सोनटक्के अभिषेक लोखंडे अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 30, 2024

PostImage

आष्टी परिसरातील त्रस्त नागरिकांनी महावितरण विरोधात करणार रास्ता रोको आंदोलन


आष्टी परिसरातील त्रस्त नागरिकांनी महावितरण विरोधात करणार रास्ता रोको आंदोलन 

 

पोलीस स्टेशन आष्टी येथे त्रस्त नागरिकांनी दिले निवेदन 

 

आष्टी: परिसरातील महावितरण विभागाची लाईट वारंवार जात असल्यामुळे ४ दिवसात लाईनची व्यवस्था सुरळीत न केल्यास महावितरण विभागाला ताळे ठोकणार व चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे आष्टी येथील त्रस्त नागरिकानी पोलिस स्टेशन आष्टी येथील ठाणेदार विशाल काळे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील महावितरण विभागाच्या वतीने मागच्या वर्षी आष्टी येथील लाईट वारंवार जात असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. लाईट येण्या जाण्यामुळे काही नागरीकांच्या घरातील टि.व्ही. फ्रीज, कुलर, एसी. लाईट येण्या जाण्यामुळे बिघडल्या व नादुरुस्त झाल्या आणि त्यानंतर नागरिकांची नुकसान व होत असलेला त्रास पाहून महावितरण विभागाने आष्टी येथे ३० ते ४० लाख रुपये खर्च करुन सेपरेट फीडर बसविण्यात आले. आणि सेपरेट फीडर बसविल्याने २ महिने लाईट सुरळीत होती. मात्र आता पावसाळा सुरु झाल्यानंतर आता पाऊस आला की २ तास, 3 तास, ४ तास रोज लाईट येणे जाणे करीत आहे. याचा आष्टीवासीयांना फटका बसुन राहीला आहे. आणि महावितरण विभागाचे अधिकारी बाहेरुन येणे जाणे करीत आहे. नावापुरते आष्टी येथे छोटीसी रुम घेऊन दाखविण्याकरीता ठेवलेली आहे.

तरी ४ दिवसात आष्टीची लाईट व्यवस्था सुरळीत न झाल्यास महावितरण विभागाला ताळे ठोकण्यात येईल व दि. ०५/०७/२०२४ रोज शुक्रवारला आष्टी येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आष्टी वासियांनी निवेदनातून दिला आहे तरी वरीष्ठ आधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे असेही निवेदनात म्हटले आहे तसे निवेदन देवेंद्रजी फडणविस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी गडचिरोली,पोलीस अधिक्षक गडचिरोली,अधिक्षक अभियंता,गडचिरोली,तहसिलदार,चामोर्शी,उपकार्यकारी अभियंता चामोर्शी यांना पाठविण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना निवेदन देताना आष्टी शहरातील विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 29, 2024

PostImage

सफाई कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करणा-या मुकडदमवर गुन्हा दाखल करून कारवाई करा


सफाई कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करणा-या मुकडदमवर गुन्हा दाखल करून कारवाई करा

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा शल्य चिकीत्सकाकडे मागणी करून पोलिसात तक्रार 

 

गडचिरोली : मनुष्यबळ पुरविणा-या एमव्हीजी कंपनी अंतर्गत गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुगणालयात मागिल तिन वर्षापासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या २७ कामगारांची गेल्या आठ-  दहा महिण्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुकडदम मनोहर सांडेकर हे छळणूक, पिळवणूक व शोषण करीत असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा शल्य चिकीत्सकाकंडे करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सफाई कामगार म्हणून असलेल्या सर्व २७ कामगारांना  मुकडदम सांडेकर आठ तासाच्या व्यतिरीक्त  दोन -तिन सास ज्यादा काम करवून घेतात, स्वत:च्या घरचे काम करायला लावतात,  नास्ता करायला सुद्धा वेळ देत नाही एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तर दोन तिन दिवसाची अपसेंटी लावतात आणि या सर्व बाबीचा कामगारांनी  विरोध केला किंवा मनाई केले तर महिला कामगारांना अश्लिल शिवीगाड करतात, मुलांनाही अश्र्लिल शिवीगाळ करतात व ईतकेच नाही तर कामावरून काढण्याची धमकी देतात, व शिवीगाळकरून धाकदपटाव करतात त्यामूळे या सर्व कामगांराची छळवणूक, पिळवणूक व शोषण होत आहे.

एमव्हीजी कपनीत तुम्हाला  काम मिळवून देतो म्हणून अनेक  सफाई कामगार कामगारांकडून एक लाख, सत्तर हजार, पन्नास हजार, तिस हजार प्रमाणे पैसे उकळलेले आहेत, त्यावरही समाधान झाले नसल्याने दर वर्षाला या सर्व कामगारांकडून  मुकडदम सांडेकर हे पंधरा - विस हजार उकळण्याचा तगादा लावत आहेत त्यामूळे सर्व कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करीत आहेत.
सदर प्रकरणाच्या संबंधाने सर्व कामगारांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क करून हकिकत सांगितल्यामूळे वंचितच्या बाळू टेंभुर्णे, जी के बारसिंगे, कवडू दुधे यांच्या नेतृत्वात सर्व कामगारांना न्याय मिळण्यासाठी व मुकडदमवर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक व पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे. संबंधीतांनी कामगारांना  तात्काळ न्याय देण्याचे करावे व मुकडदम सांडेकरवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्याचा ईशारा बाळू टेंभुर्णे यांनी दिला आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 29, 2024

PostImage

आरोग्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आवश्यक,कर्मचाऱ्यांची बडतर्फी हा उपाय नाही... सामाजिक कार्यकर्ते सुरज कोडापे यांचे पत्रकातून आवाहन..


आरोग्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आवश्यक,कर्मचाऱ्यांची बडतर्फी हा उपाय नाही...

 

सामाजिक कार्यकर्ते सुरज कोडापे यांचे पत्रकातून आवाहन..

 

 

गडचिरोली : रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कार्यकारी अधिकाऱ्यांनी सबंधित डॉक्टरांना निलंबित केले.पण गडचिरोली जिल्ह्यात आधीच डॉक्टरांची कमतरता आहे आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डॉक्टरांना निलंबित करणे हा पर्याय नाहीच.त्याऐवजी कारणांची चौकशी करून चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे हे जास्त हितावह ठरेल.

         निवेदनात सादर केलेले बाकीचे मुद्दे प्रशासन किती गांभीर्याने हाताळते ते बघणे महत्वाचे आहे.कारण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनाने तडकाफडकी संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याला बडतर्फ केले मात्र हे न्याय्य नसून आरोग्य सुविधांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.

       विशेष म्हणजे एकंदरीत जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था ही वरिष्ठांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गांभीर्याने तपासणी आणि उपचार केले जात नाही शिवाय रुग्णवाहिका सुविधाही दिल्या जात नाही याबरोबरच स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना कागदोपत्री,शासनाचे अनावश्यक योजना प्रक्रिया आणि ऑनलाईन कामाचा भडिमार केला जातोय त्यामुळे मूळ सुविधा लोकांपर्यंत पोहचविणे हे आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी ह्यावर पर्याय काढून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

     आरोग्य व्यवस्थेत मूलभूत बदल होऊन जिल्ह्यातल्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात जेणेकरून जिल्ह्यातला कोणताही व्यक्ती आरोग्य मिळण्याच्या हक्कापासून वंचित राहणार नाही.जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनात दिलेल्या मुद्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी,असे आवाहन सुरज कोडापे यांनी केले.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 29, 2024

PostImage

महिला आणि मुलींसाठी सरकारने उघडली तिजोरी; आर्थिक मदतीसह शिक्षण होणार मोफत


महिला आणि मुलींसाठी सरकारने उघडली तिजोरी; आर्थिक मदतीसह शिक्षण होणार मोफत

 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी विशेष योजनांचा वर्षाव दिसून आला आहे. यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणासह पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये निधी देण्याचाही सामावेश आहे.

महिला आणि मुलींसाठी खास योजना

महिलांसाठी विविध योजना

 

-सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये -‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी

-दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक

-पिंक ई रिक्षा - 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - 80 कोटी रुपयांचा निधी

-"शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये

-राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये

-रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका

-जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर

-‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- 51 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ

-लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ

-महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट

-महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन

-‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती

-मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती

-या निर्णयाचा अंदाजे 2 लाख 5 हजार 499 मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 27, 2024

PostImage

मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर योगाजी कुडवे यांचे ठिय्या आंदोलन


मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर योगाजी कुडवे यांचे ठिय्या आंदोलन

वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्याची योगाजी कुडवे यांची मागणी

गडचिरोली : वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगल परिसरात नदी मध्ये मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन झालेले आहे, यास जबाबदार वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणी साठी आज दिनांक.27/06/2024 पासुन मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलनाला सुरू केले आहेत वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगलव्याप्त परिसरात नदी असून मागील काही महिन्यापासून या नदी पात्रातून अंदाजे हजारो ब्रास रेतीची अवैधरित्या चोरी, सुरजागड उतखनन करणारी कंपनी रेतीची खुलेआम चोरी करीत होती तरीसुद्धा वनरक्षक,वनपाल, वनपरीक्षेत्रअधिकारी, हे बघ्याची भूमिका घेतात. पगार शासनाचा घेतात, चुना शासनालाच लावतात. करोडो रुपयाची अवैध रित्या रेतीची चोरी वनविभागाच्या अधिकारी यांच्या संगणमतानेच झालेली आहे,यात वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी देवाण -घेवाण करून हजारो ब्रास रेती उपसा करू दिल्याचे दिसून येत आहे. एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयं अंतर्गत येत असलेल्या अधिकाऱ्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते, त्यामुळें यास सर्व जबाबदार वनरक्षक, वनपाल वन परीक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांचे कडून अवैध रेती उत्तखंनंन ची रक्कम या सर्वांच्या सेवा पुस्तकात नोंद करून पगारातून वसुल करावेत व या सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, महसूल विभागाच्या रेट नुसार ५ पट दंड आकारून संबंधित कंत्राटदार यांचे कडून तात्काळ रक्कम वसूल करण्यात यावे, या मागणी साठी आज दिनांक.27/06/2024 पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत तसे निवेदन योगाजी कुडवे अध्यक्ष आदर्श समाज विकास सेवा संस्था /सामाजिक कार्यकर्ता यांनी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य. ,उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,सुधीर मुनगंटीवार वनमंत्री म .रा. यांना पाठविले आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 26, 2024

PostImage

I, Dr. नामदेव किरसान, म्हणत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ


I, Dr. नामदेव किरसान, म्हणत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

 

गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून इंग्रजी मध्ये सदस्यत्वाची शपथ घेणारे पहिलेच खासदार 

 

गडचिरोली :: 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला दिल्ली येते सुरुवात झाली असून, नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नवी दिल्ली येथील संसदेत लोकसभेच्या सभागृहात पार पडले. 

I, Dr. नामदेव किरसान, म्हणत 12 - गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. 

 प्रोटेम स्पीकर महताब भरतूहारी यांनी लोकसभेतील सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. विशेष बाब म्हणजे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून इंग्रजी मध्ये सदस्यत्वाची शपथ घेणारे आणि इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेवर चांगला प्रभूत्व असणारे डॉ. नामदेव किरसान हे पहिलेच खासदार आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 26, 2024

PostImage

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी यांची फेरनियुक्ती


काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी यांची फेरनियुक्ती

 

गडचिरोली: आल्लापल्ली येथील सेवाभावी ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सेवानिवृत्त वन अधिकारी हनमंतु गंगाराम मडावी यांची काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी 22 जून रोजी केली आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मडावी यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेसमवेत काँग्रेसचे युवा नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर विश्वास दाखल करून आपल्या समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केले होते.काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर पक्षाचे  हायकमांडने कंकडालवार यांची अहेरी विधानसभा समन्वयक म्हणून तर मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केले होते.

अजयभाऊ कंकडालवार व हनमंतु मडावी या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश व नियुक्तीचे फलित लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात मविआ व काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरसान यांना मिळालेल्या भारी लीडमधून सगळ्यांनाच पाहायला मिळाली.असे असतांना सुद्धा पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून दुसऱ्या एका कार्यकर्त्यांची निवड झाल्याची माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने याबद्दल मडावी समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.

एकाच पदाचे दोन दोन जिल्हाध्यक्ष निवडीबद्दलची तक्रार राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्या कानावर पडताच त्यांनी लगेच याविषयी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून परत आल्लापल्ली येथील हनमंतु गंगाराम मडावी यांच्या नावाने आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती करायला भाग पाडले.

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेर नियुक्ती झाल्याबद्दल हनमंतु मडावी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार, आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर,जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,ऍड.राम मेश्राम,ज्येष्ठ नेते हसनभाई गिलानीसह  पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 26, 2024

PostImage

जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत सुरू असलेले बंधाऱ्यांचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली चौकशी मागणी


जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत सुरू असलेले बंधाऱ्यांचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली चौकशी मागणी 

 

गडचिरोली : जिल्ह्यात पाटबंधारे विभागाअंतर्गत  सुरू असलेले बंधाऱ्याचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या या बांधकामाबाबत काही नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले. कंकडालवार यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची शहानिशा केली असून या कामांची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

 

झालेल्या कामापैकी अनेक कामे तीन वर्षांपूर्वीची आहेत. त्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. तीन वर्षापूर्वी बांधलेले काही बंधारे पहिल्याच पावसात वाहून घेले तर काही बंधारे क्रॅक झाले आहे. प्रशासनाचे यावर कोणतेही लक्ष नाही. त्याकरिता तीन वर्षापूर्वी झालेले सर्व बंधाऱ्यांच्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बंधाऱ्यांच्या बांधकामांची संपूर्ण चौकशी करावी, अन्यथा पाटबंधारे कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजय कंकडालवार यांनी दिला आहे. 

 

पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या कोट्यवधीच्या बंधाऱ्यांच्या कामांचा नित्कृष्ट दर्जा आहे. शासनाच्या नियमानुसार बरोबर खोलीकरण होत नाही. जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

पत्रकार संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी सावली तालुक्यातील पत्रकार संघातर्फे निषेध


पत्रकार संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी

 

सावली तालुक्यातील पत्रकार संघातर्फे निषेध

 

‘त्या‘कॉंग्रेस नेत्याविरूदध कारवाई करा - मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर

 

 

मूल येथील तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य आणि दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी,व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना कॉंग्रेसच्या एका नेत्याने जीवे मारण्याची आणि परिवाराला संपविण्याची धमकी देण्यात आली.त्या घटनेचा सावली तालुक्यातील सर्व पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला. याबाबत तीनही पत्रकार संघाची तातडीची सभा घेण्यात आली.त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला. आणि धमकी देणारे कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांच्या विरूदध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. या मागणीचे निवेदन सावली येथील तहसिलदार आणि पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले. पुण्यनगरी मध्ये प्रसिदध झालेल्या एका बातमीच्या संदर्भात कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे हे आपल्या कर्तव्यावर असताना भ्रमणध्वनी वरून जीवे मारण्याची धमकी आणि परिवाराला संपविण्याची भाषा वापरली. एखादया बातमीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे. प्रत्येक बातमीदाराला आपआपल्या प्रकारे लिखाणाचे स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.हे अशोभनीय कृत्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे,अशा आशयाचा ठराव तीनही पत्रकार संघातर्फे घेण्यात आला.व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा का असेना त्याचा निषेध झालाच पाहिजे असे मत उपस्थित पदाधिका-यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले. या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरूदध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागणीचे एक निवेदन सावलीचे तहसिलदार प्रांजली चीरडे आणि पोलिस निरिक्षक जीवन राजगुरू यांना देण्यात आले. निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार , व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रवीण झोडे,ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले,प्रा.शेखर प्यारमवार,प्रा.विजय गायकवाड,चंद्रकांत गेडाम, डॉ.कवठे,गोपाल रायपुरे,विजय कोरेवार,नासीर अन्सारी, गिरीश चीमुरकर,सुजित भसारकर,सौरव गोहने,प्रवीण गेडाम इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.

 

बॉक्स

 

पत्रकार संजय पडोळे यांनी सावली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.याबाबत चौकशी सुरू झालेली असून या बाबत दोन्ही पक्षा कडून त्यांचे बयान नोंदविलेले असून याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती ठाणेदार राजगुरू यांनी शिष्टमंडळाला दिली


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

घरोघरी भेटी देवून मतदार यादीची तपासणी करणार मतदारांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी – जिल्हाधिकारी


*मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित*

 

घरोघरी भेटी देवून मतदार यादीची तपासणी करणार

 

मतदारांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी – जिल्हाधिकारी

 

गडचिरोली, दि. 25 - भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) 25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहे. जे मतदार 18 वर्षाचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र.6 भरुन नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरीत झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटया दूर करण्यात येणार आहे. 

 

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्यात बदल करुन घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6. 7 आणि 8 स्वीकारतील व दि. 19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 

 

तरी मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रासह नमुना क्र. 6 भरुन विहीत मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

सिरोंचात BSNL नेटवर्क समस्या तात्काळ दुर करा ; अन्यथा रस्त्यावर उतरू...!  सागर मूलकला यांनी दिला आंदोलनाचा इशारा...!


 

सिरोंचात BSNL नेटवर्क समस्या तात्काळ दुर करा ; अन्यथा रस्त्यावर उतरू...!

 

 सागर मूलकला यांनी दिला आंदोलनाचा इशारा...!

 

 

सिरोंचा - तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड ( BSNL) विभागाकडून गेल्या अनेक महिन्यापासून तळ्यात - मळ्यात नेटवर्क येण्या - जाणं सुरू आहे, 

         सिरोंचा तालुक्यातील मुख्यालयसह ग्रामीण भागात बी,एस,एन,एल, टॉवर उभारून अनेक वर्षे होत आहे, तरीपण बीएसएनएल नेटवर्कची प्रतिक्षेत मोबाईल धारकांची वाट सुरूच आहे,

               तालुका मुख्यालयात ग्रामीण भागातून नागरिक विविध कार्यालयातील कामासाठी प्रत्येक दिवशी येत असतात अशातच तालुका मुख्यालयात बी,एस,एन,एल नेटवर्क तळ्यात- मळ्यात नेटवर्क सुरू असल्याने अनेक नागरिकांचे कार्यालयातील कामे करणे मोठी समस्या निर्माण होत आहे, 

मुख्यालयातील बँक ऑफ इंडिया, को-ऑपरेटिव्ह बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, असे विविध बँकेत नेटवर्क नसल्याने बँकेतील कामे करणे नागरिकांना मोठी समस्या निर्माण होत आहे,

             तालुक्यातील नागरिकांनी बीएसएनएल विभागाला अनेकदा या समस्येबाबत तक्रार करूनही तालुक्यात बीएसएनएल नेटवर्क

समस्या दूर होत नाही,

नेटवर्क नसल्याने जवळच्या तेलंगाना राज्यात जाऊन ऑनलाईनचे अनेक कामे करावा लागत आहे, ही तालुक्यासाठी गंभीर आणि अन्यायकारक आहेत,नेटवर्क समस्येमुळे तालुक्यातील नागरिकांसह शाळेकरी विद्यार्थ्यांनाही मोठी नुकसान होत आहे आहे, 

बी,एस,एन,एल नेटवर्क समस्या बाबत संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी तात्काळ तळ्यात- मळ्यात वारंवार येण्या - जाण्या करणाऱ्या नेटवर्क समस्या दूर करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर भाऊ मुलकला यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून इशारा देण्यात आला आहे,


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

  बोटीला कोणतेही नुकसान नाही गोसीखुर्द जलाशय भूमिपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तुस्थिती



 
बोटीला कोणतेही नुकसान नाही
गोसीखुर्द जलाशय भूमिपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तुस्थिती
  
 
भंडारा, दि. २४ : भंडारा जिल्हा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसीखुर्द या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री श्री.शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. तर दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकार होते. या बोटीचे वाहक गोविंद खवणेकर होते.

बोट सफर करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री बोट चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व पत्रकारांचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडासा पाण्यात गेला. बोट एका बाजूला गेल्यामुळे बोटीतील बसण्याचा भाग जो बोटीला स्क्रूने फिट केलेला असतो तो ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. घटनेमध्ये प्रसंगावधान राखून बोटीचे चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोटमध्ये बसवले आणि बोट पूर्ववत झाली.

त्यादरम्यान या कार्यक्रमासाठी महामंडळाद्वारे सुरक्षेसाठी जेटस्की आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम तैनात केली होती. ते सर्व काही क्षणात आले आणि पत्रकारांना कार्यक्रमस्थळी नेले. या घटनेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः घटनाग्रस्त बोटीकडे गेले आणि त्यांनी निश्चित केले की बोट आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही. बोटीला कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त ‘बोटीचे तुकडे झाले, बोट बुडाली’ हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे डॉ.सारंग कुलकर्णी, महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक, एमटीडीसी यांनी कळवले आहे.

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

माओवाद्यांच्या अस्तित्वाला खिंडार… उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील पाच (05) गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी


 

माओवाद्यांच्या अस्तित्वाला खिंडार…

 

उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील पाच (05) गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी 

 

 

 गडचिरोली:माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे यापूर्वी दिनांक 14/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये हद्दीतील परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात (07) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे धोडराज यांना सादर केला होता. त्यानंतर मौजा भटपार गावक­यांनीही माओवाद्यांना गावबंदी करुन कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू, वायर, बॅटर व सलाखी (Spikes) पोस्टे धोडराज येथे दिनांक 20/06/2024 रोजी जमा केल्या होत्या. त्यात आणखी एक भर म्हणून गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी व सचिव, जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने सहपत्नी ललीता चैतु उसेंडी (डिव्हीसीएम भामरागड दलम) सह दिनांक 22/06/2024 रोजी मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे समोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे माओवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा­या भामरागड व अबुझमाड जंगल परिसरातच त्यांच्या अस्तित्वाला खिंडार पडले आहे.

 

सविस्तर वृत्त असे आहे की, माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे आज दिनांक 24/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच (05) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी उपपोस्टे लाहेरी यांना सादर केला.  

 

वरील पाच ही गावे गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावक­यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावक­यांचा विश्वास दृढ झाला. यासोबतच माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे केलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलीस खब­या असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावक­यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावक­यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून आज दिनांक 24/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील वरील पाच (05) गावातील गावक­यांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट¬ प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले. यावेळी वरील पाचही गावातील नागरिकांनी माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले पाच भरमार बंदूक तसेच जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी 200 ते 300 सलाखे  काढून आणून पोलीस दलाकडे सुपूर्द केली.

यासोबतच पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावातील नागरिकांनी दिनांक 14/06/2024 रोजी गावात नक्षल गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता. त्यामुळे आज येथील गावक­यांनी पोस्टे धोडराज हद्दीत सुरक्षा रक्षक दलांना नूकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले 450 सलाखे व कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू पोस्टे धोडराज येथे जमा केले.

सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते, उपपोस्टे लाहेरी येथील प्रभारी अधिकारी श्री. संतोष काजळे, पोउपनि. प्रशांत डगवार, पोउपनि. सचिन सरकटे, पोउपनि. आकाश पुयड व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी श्री. शरद काकळीज, पोउपनि. अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणा­या पाच गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट¬ा प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी विविध ठिकाणच्या कार्यवाहित केला अवैध दारुसह एकुण 32,95,170/- रुपयांचा मुद्देमाल जप्त


 

गडचिरोली पोलीसांनी विविध ठिकाणच्या कार्यवाहित केला अवैध दारुसह एकुण 32,95,170/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता (अहेरी) यांच्या संयुक्त कार्यवाहित अतिसंवेदनशिल नैनगुंडम गावात अवैध दारुसह एकुण 12,26,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त 

पोस्टे अहेरी पथकाने केला वाहनासह एकुण 10,76,000/- अवैध दारुचा मुद्देमाल जप्त

अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पथकाने दोन विविध ठिकाणच्या कार्यवाहीत केला 9,93,170/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा जप्त

चार विविध गुन्ह्रात एकुण 05 आरोपीतांना घटनास्थळावरुन घेतले ताब्यात 

 

 

गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथील दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नविन क्लृप्त्या करीत असतात. माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशिल गावात दारु माफिया हे गोर गरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करुन तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांचे राहते घरात दारुची अवैध साठवणुक करुन ठेवत असल्याचा प्रकार गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आल्याने गडचिरोली पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेत चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत वाहनासह अवैध दारुचा एकुण 33,22,980/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

सविस्तर वृत्त असे आहे की, अहेरी तालुक्यातील उपपोस्टे दामरंचा हद्दीतील माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशिल नैनगुंडम या गावात काल दिनांक 23/06/2024 रोजी दुपारी 15.00 वा. दरम्यान गोपनिय बातमीदारांकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापुर येथे राहणारा ईसम नामे पुरुषोत्तम हनमलवार याने मौजा नैनगुंडम गावातील आपले साथीदार संतोष भिमा सिडाम व गणेश सालय्या आलाम यांच्या मदतीने संतोष सिडाम याचे राहते घरी अवैधरित्या मोठ¬ा प्रमाणात देशी दारु व काळ्या गुळाची साठवणुक करुन ठेवली असल्याबाबतची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. सदर माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस पथकाचे दोन टिम व प्राणहीता अहेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करुन गोपनियरित्या प्रोव्ही रेड कार्यवाही करीता रवाना केले. सदर पोलीस पथकांनी मौजा नैनगु्ंडम गावातील संतोष सिडाम याचे राहते घरी जावुन प्रोव्ही रेड केली असता, त्याचे घरात देशी दारुच्या 142 पेट¬ा - किंमत 11,36,000 रुपये, काळ्या गुळाच्या 75 पेट¬ा - किंमत 90,000 रुपये, असा एकुण 12,26,000/- रुपयांचा अवैध मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. तसेच ईसम नामे संतोष सिडाम व गणेश आलाम यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्रातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम हनमलवार हा कार्यवाहीची चाहुल लागल्याने फरार झाल्याचे आढळुन आले. पोलीस पथकाद्वारे त्याचा शोध घेणे सुरु आहे.

यासोबतच चंद्रपूर जिल्ह्रातून पोस्टे अहेरी हद्दीत अवैधरित्या दारु तस्करी होत असल्याबाबच्या गोपनिय माहितीवरुन काल दिनांक 23/06/2024 रोजी अहेरी पोलीसांनी मौजा बोटलाचेरु गावाजवळ सापळा रचून संशयीत वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता, त्यात रॉयल स्टॅग विदेशी दारुच्या 06 पेट¬ा (विक्री किंमत 1,08,000/- रु.) रॉकेट संत्रा देशी दारुच्या 04 पेट¬ा (विक्री किंमत 32,000/-) रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. वाहन चालक नामे मोहम्मद इलीयास शेख रा. बालाजी वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने किशोर सुर्यभान डांगरे रा. आलापल्ली यास दारुचा पुरवठा करित असल्याचे सांगितले. आरोपींकडुन देशी विदेशी दारु, मोबाईल व टाटा व्हीस्टा वाहन क्र. एच एच 33 ए 3793 वाहनासह एकुण 4,10,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपीविरुद्ध दारुबंदी कायद्यांन्वये पोस्टे अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

 

 

 

तसेच आज दिनांक 24/06/2024 च्या रात्री पोस्टे अहेरी येथील पोलीस पथक नाईट गस्त ड¬ुटी करित असतांना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका संशयित महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम एच 38 एक्स 3055 वाहनाजवळ जाऊन विचारपूस केली असता, वाहनातील चालक हा पोलीसांना पाहून पळुन गेला. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट संत्रा देशी दारुच्या 68 पेट¬ा (विक्री किंमत 4,76,000/- रु.) मिळून आल्याने वाहनासह एकुण 10,76,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोस्टे अहेरी येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

तसेच आज दिनांक 24/06/2024 रोजी गोपनिय बातमिदाराकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा लिंगमपल्ली गावाजवळील लिंगमपल्ली टोला येथे अवैध दारु विक्री होत असल्याबाबतच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, 1) गंगाराम बकय्या नेरला व 2) नागेश सोमा नेरला दोघेही रा. लिंगमपल्ली तह. अहेरी हे अवैध दारु विक्री करित असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून आयएमएफएल (क्ष्ग्क़ख्र्) विदेशी दारुचे 38 बॉक्स व देशी दारुच्या 20 पेट¬ा असे एकुण 58 बॉक्स अंदाजे किंमत 5,83,170/- रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला व दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अशा चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत गडचिरोली पोलीस दलाने वाहनासह अवैध दारुचा एकुण 33,22,980/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

 

 सदरच्या विविध कारवाया पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, पोनि. स्थागुशा श्री. उल्हास भुसारी, पोस्टे अहेरी प्रभारी अधिकारी पोनि. दशरथ वाघमोडे, सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि. राजू गवळी, पोउपनि. विजय सपकाळ, मपोउपनि. सरीता मरकाम, मपोउपनि. करुणा मोरे, परिपोउपनि. संकेत सानप व त्यांच्या पथकातील पोलीस जवानांनी केलेली आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

अहेरी येथे 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन अहेरी व परिसरातील विजेची समस्या दूर होणार


अहेरी येथे 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

अहेरी व परिसरातील विजेची समस्या दूर होणार

ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

अहेरी:- येथील पॉवर हाऊस कॉलनीत 33 के. व्ही. रोहित्र उपकेंद्राचे भूमिपूजन शनिवार 22 जून रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

     यावेळी मंचावर मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम, महाराष्ट्र राज्य वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धराव बाबा आत्राम, माजी सरपंच गंगाराम कोडापे, नगर सेवक अमोल मुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते.

     मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी कुदाळी मारून व फलकाचे फित कापून विधिवत व रीतसर 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन केले.

     या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलताना ना.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, अहेरी आणि परिसरातील विजेची समस्या लक्षात घेता मागील अनेक वर्षापासून अहेरी येथे 33 के. व्ही. विजेचे उपकेंद्र व्हावे ही नागरिकांची मागणी होती. विजेची समस्या दूर व्हावे यासाठी आटोकाट प्रयत्न होते, त्यासाठी अहेरी व तालुक्यातील पेरमिली येथे 33 के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी भरीव निधी मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले असून आता अहेरी आणि पेरमिली भागातील असंख्य गावांना सुरळीत वीज मिळणार असून वीजेची समस्या कायमस्वरूपी मिटणार असल्याचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणत माझे मिशनच शिक्षण, सिंचन, आरोग्य, वीज, रस्ते असल्याचे आवर्जुन उल्लेख केले.

     प्रास्ताविकातून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ यांनी, विजेची समस्या लक्षात घेता मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर व उपलब्ध करण्यात आले असून आता आपल्या भागात विजेची समस्या व प्रश्न मिटणार असल्याचे आवर्जुन सांगितले.

      सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र अलोणे यांनी केले.यावेळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी , प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 25, 2024

PostImage

सोसायटीला दिलेल्या कामांची चौकशी करा बांधकामच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन


सोसायटीला दिलेल्या कामांची चौकशी करा बांधकामच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन

 

 

गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबरीकरणाची कामे चुकीच्या मार्गाने सोसायटीला व ठेकेदाराला टक्केवारी घेऊन बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने देण्यात आली आहेत. या कामांचा दर्जा अत्यंत नित्कृष्ट दर्जाचा असल्यामुळे पावसाळा आला की डांबर वाहून जात आहे. या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आदर्श विकास समाज सेवा संस्थेमार्फत बांधकाम विभागाचे नागपूर येथील मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एका कामाचे २०० मीटरचे तुकडे पाडून प्रत्येकी १० लाख रुपये निधी मंजूर करून कामे करण्यात आली आहेत . ही चुकीची पद्धत असून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामे केली जात आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास अधिकारी व लोकप्रतिनिधी करत आहेत. अशा भ्रष्ट लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकारी यांचेवर तत्काळ कारवाही करावी, अन्यथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांचे कार्यालयासमोर २६ जूनपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर कोणता निर्णय घेतला जाते, याकडे लक्ष लागले आहे. निवेदन देताना आदर्श विकास समाज सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष योगाजी कुडवे, रवींद्र सेलोटे उपस्थित होते


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 24, 2024

PostImage

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास ,इंडिया आघाडीत घटक पक्षांना संपविण्याचे कटकारस्थान


लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास ,इंडिया आघाडीत घटक पक्षांना संपविण्याचे कटकारस्थान 

 

(उबाठा) शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांचा आरोप

 

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातून इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा बहुमताने विजय झाला. या विजयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास , इंडिया आघाडीत घटक पक्षांना संपविण्याचे कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी पत्रकातून केला आहे.

रियाज शेख यांनी पत्रकात म्हटले आहे की काँग्रेस पक्षाकडून विजयी उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात सत्कार कार्यक्रमाच्या रूपाने अभियान सुरू आहे. यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बाजूला सारून काँग्रेसच्या मोठ्या पदाधिकाऱ्याकडून या लोकसभा क्षेत्रात घटक पक्षांचे अस्तित्व काय आहे? अशा प्रकारे बोलले जात असल्याने याचा मी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून जाहीर निषेध करतो असे रियाज शेख यांनी म्हटले आहे. अहेरी नगरात काँग्रेस पक्षाकडून विजयी उमेदवार सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात इंडिया महाविकास आघाडीचा एक साधा बॅनर नाही. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रणाचा साधा फोन नाही . यामुळे जनतेमध्ये संभ्रम व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाकडून घटक पक्षांचा अपमान सातत्याने सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहन करणार नाही असाही ईशारा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी दिला आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 24, 2024

PostImage

नवंनिर्वाचित खासदार डॉ, नामदेवराव किरसाण यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन


नवंनिर्वाचित खासदार डॉ, नामदेवराव किरसाण यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन

 

गावकऱ्यांचा वतीने सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले यांनी परिसरातील मांडल्या समस्या 

 

 

 गडचिरोली: अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला )परिसरातील अनेक गावे विकासापासून कोसोदूर आहेत. करीता आपल्या मार्फतीने राजाराम खांदला परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी राजाराम खांदला परिसरातील नागरिकांच्या मार्फतीने सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले यांनी नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसाण यांना अहेरी येथील सत्कार सोहळ्यात निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,

राजाराम येथील प्राथमिक आरोग्य पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यात यावा.व रुग्णवहीका उपलब्ध करून विविध रिक्तपदे भरण्यात यावी

राजाराम परिसरात जवळपास आठ ते नऊ गावे येत असून काही गावामध्ये पक्के रस्तेसुद्धा नाहीत.राजाराम येते आरोग्य पथक असून या परिसरात या ठिकाणी रुग्णवाहीका सुद्धा नाही.कोरेपल्ली पासून पक्के रस्ता नसून मोठमोठे दगडातून प्रवास करावा लागत असतो,व त्यामुळे एखाद्यावेळी प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नायचे झाले तर रस्त्यावर दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही,

कमलापूर येते आरोग्य केंद्र आहे पण ते कोरेपल्ली पासून २० ते २५ किमीचा प्रवास करात जावा लागत असतो. आणि कोरेपल्ली येते लाखो रुपये खर्च करून उपकेंद्र बांधकाम करण्यात आले परंतु या ठिकाणी परिचारिका मुख्यालयी राहत नसून दहा पंधरा दिवसातून एक दोनदा येत असते.

राजाराम येते राष्टीयकृत बँकेची स्थापना करण्यात यावी राजाराम ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी. तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्यात यावे. शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 23, 2024

PostImage

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' ,  ,जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय


 

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' ,  ,जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय 

 

गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि तयारी संबंधात शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषदेचे गठन, हर हर जोडो अभियान, बुथ रचना आणि व्यापक जनसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आणि जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. युवक, बेरोजगार, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांना घेवून शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरणार असून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करण्यासाठी पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ऑगस्ट पासून संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

 

जिल्हा समीतीच्या या बैठकीला जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, महिला नेत्या व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार जयश्रीताई जराते, जिल्हा समीतीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, डंबाजी भोयर, एकनाथ मेश्राम, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 23, 2024

PostImage

संकटाच्या भयानक शांततेत कर्तृत्वाचे रक्तदानाचा मुद्दा गावात गावात मांडण्याचा प्रयत्न करणारी युवा संकल्प..!


संकटाच्या भयानक शांततेत कर्तृत्वाचे रक्तदानाचा मुद्दा गावात गावात मांडण्याचा प्रयत्न करणारी युवा संकल्प..!

 

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

 

 

गडचिरोली : योग दिनाचे औचित्य साधून नवेगाव (माल) येथे युवा संकल्प संस्थेच्या मार्गदर्शनातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी गावातील विविध मंडळाच्या वतीने युवकांनी रक्तदान केले या सामाजिक कार्यात सहभाग घेत. 

१४ युवक आणि रक्तदान केले. याप्रसंगी युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे, नागेश मादेशी,चेतन कोकावार, तेजस कोंडेकर, पंकज डायकी,वसंत रामटेके, संस्थेचे सर्व पदाधिकारी गावकरी उपस्थित होते होम फाउंडेशन सिरोचा, सार्वजनिक वाचनालय नवेगाव माल सर्व सदस्य, युवा संकल संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 23, 2024

PostImage

पालकमंत्र्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे... - महेंद्र ब्राह्मणवाडे


पालकमंत्र्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे... - महेंद्र ब्राह्मणवाडे 

 

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्याचा विकास होईल, जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील, असे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना असताना. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पोरके केले आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले आणि प्रशासनाची गुप्त बैठक घेऊन निघून गेले. मात्र या संदर्भात पालकमंत्री जिल्हा दौरा करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक समस्या प्रलंबित आहे. शेतीला नियमित वीज पुरवठा होत नाही, पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. जिल्हा रुग्णालयात अत्यावशक सोयी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना नागपूर किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते. पोलीस भरतीच्या युवकांचे प्रश्न आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यात आलेले नाही. शेतकरी, महिला, युवक यांच्या समस्यांना घेऊन जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटायचे होते व आपले म्हणणे मांडायचे होते. मात्र पालकमंत्री सुरक्षेचा कारण दाखवून दौरा गुप्त ठेवल्याचे सांगतात. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटल्यामुळे पालकमंत्र्यांना आपल्या जीवाला धोखा वाटत असेल तर खुशाल त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व सक्रिय असा पालकमंत्री जिल्ह्याला द्यावा जेणे करून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकारण होऊन शकेल, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 23, 2024

PostImage

विरोधी पक्षा नेते विजय वडेट्टीवार व नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांचे जंगी स्वागत ,निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला  - वडेट्टीवार


विरोधी पक्षा नेते विजय वडेट्टीवार व नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांचे जंगी स्वागत ,निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला  - वडेट्टीवार

 

काँग्रेसनेते,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवारसह काँग्रेस पदाधिकारी - कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार!

 

अहेरी : येथे काल 22 जून रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.या सत्कार सोहळा कार्यक्रमला काँग्रेस पक्षाचे नेते,माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्षा नेते विजय वडेट्टीवार व नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांचे जंगी स्वागत करण्यात आले 

 

विजयभाऊ वडेट्टीवार काल जिल्हा दौऱ्यावर आले होते.दौऱ्यात अहेरी येथे वडेट्टीवार व खासदार किरसान यांच्या आगमन होतच गावकरी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरत,फटक्यांचा आतषबाजी करत जंगी स्वागत करत गडचिरोली लोकसभा निवडणुक विजयोत्सव रैली काढण्यात आली आहे.तसेच वडेट्टीवार आणि डॉ.किरासन यांनी विविध विभागाचे आढावा बैठक घेतले 

तालुक्यातील रस्त्यांची बकाल अवस्था,महसूल विभागाच्या अटी व शर्तींना न जुमानता होणारे अवैध उत्खनन,वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणी होणारी अवैध कामे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त मागास अहेरी कडे स्थानिक लोकप्रतिनिधीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून सुद्धा अहेरीकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे येथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेऊन निर्देश दिले.

 

त्यावेळी गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणुकीत डॉ.नामदेवराव किरसान यांनी भाजपाचे उमेदवार नेतेंचा पराभव करत जवळपास 1लाख 40 हजार मतांनी प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल अहेरी येथील गांधी चौकात 'येथे विरोधी पक्षानेते विजयभाऊ वडेट्टीवार आणि नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केले.आविसं,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवारसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हस्ते वडेट्टीवार नवनिवार्चित खासदार डॉ.किरसान यांच्या सत्कार करण्यात आली.

 

सत्कार सोहळावेळी गडचिरोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय हा कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाने झाला आहे.या निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला अशी वडेट्टीवार म्हणाले

 

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 23, 2024

PostImage

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार


मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार

 

विद्युत उपकेंद्राचे मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन

 

अहेरी:-तालुक्यातील पेरमिली परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडविण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र मंजुर करण्यात आले.नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते ३३/११ केव्ही नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.त्यामुळे पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव कायमचा थांबणार आहे.

 

सध्या पेरमिली परिसरातील ४० ते ४५ गावांना भामरागड उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे.भामरागड ते पेरमिली पर्यंत येणारी वीज वाहिनी जवळपास दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त आणि घनदाट जंगलातुन आल्याने नेहमीच या परिसरात विजेचा लपंडाव होत असतो.कमी दाबाचा वीज पुरवठ्याची समस्या तर कायमचीच आहे.पावसाळ्यात तर नेहमीच बत्तीगुल होत असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पेरमिली येथे आदिवासी उपाययोजने अंतर्गत ३३/११ के व्ही मंजूर करण्यात आले.

 

२६.७४ कोटी रुपयांच्या निधीतून या ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम केले जाणार आहे त्यासाठी भूखंड क्र.५४/१/१ ही जागा वन विभागाने मंजूर केले आहे.या उपकेंद्राची क्षमता ५ एम व्ही ए राहणार असून या उपकेंद्रातून ११ केव्ही चे ३ वीज वाहिनी राहतील.विशेष म्हणजे या उपकेंद्राकरिता १३२ केव्ही आलापल्ली उपकेंद्रातून आणि ६६ केव्ही उपकेंद्रातून असे दोन ३३ केव्ही वीज वाहिन्या प्रस्तावित केलेले आहे.सदर काम पूर्णत्वास आल्यास या परिसरातील बहुतांश गावातील विजेची समस्या सुटणार आहे. एवढेच नव्हे तर भामरागड उपकेंद्रावरील भार देखील कमी होणार आहे. त्यामुळे पेरमिली परिसरातील गावांसह भामरागडला देखील मोठा दिलासा मिळणार.

 

३३ केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,मुख्य अभियंता सुधीर हेडाऊ, गाव पाटील विठ्ठल मेश्राम, सत्यनारायण येगोलपवार, देवाजी सडमेक,बालाजी गावडे तसेच पेरमिली पट्टीतील बहुतांश नागरिक तसेच महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 22, 2024

PostImage

गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस


गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस

 

जहाल मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसर्पण

 

गडचिरोली, 22 जून : गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्या समजल्या जाणार्‍या गिरधरने आज पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले. श्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. एका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नक्षली दाम्पत्याला 25 लाख रुपयांची मदत पुनर्वसनासाठी करण्यात आली. 

आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा व माओवाद्यांच्या कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले होते. आमदार देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर याचेवर 25 लाखांचे बक्षीस होते, तर त्याच्या पत्नीवर 16 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ नक्षली कमांड असलेल्या या दोन्ही नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना मोठा हादरा बसला आहे. माओवादी गतिविधीचे प्रमुख म्हणून या दोघांकडे पाहिले जायचे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 4 वर्षांत जिल्ह्यातील एकही व्यक्ती नक्षली कारवायात सहभागी झाला नाही, हे यश आमच्या पोलिस दलाने मिळविले आहे. सी-60 पथकाने आपला दरारा असा निर्माण केला की, एकतर त्यांना शरणागती पत्करावी लागेल किंवा बंदुकीचा सामना करावा लागेल. ते या पथकाचे मोठे यश आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाचे कंबरडे मोडले आणि दुसरीकडे सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. अंतिम माणसाच्या विकासाचाच हा प्रयत्न आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचू नये, हाच प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. पण, आज तो विकास पोहोचतो आहे, हे मला अनेक दुर्गम भागात जाऊन पाहता आले आहे. गडचिरोली हा आमच्यासाठी महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. म्हणून या जिल्ह्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्योग, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण यासाठी मोठा प्रयत्न हाती घेण्यात आला आहे. मोठी गुंतवणूक या जिल्ह्यात येत आहे. कालही काही प्रकल्पांबाबत मी बैठक घेतली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आदिम जमातींसाठी 24,000 कोटींची योजना, आदिवासी संस्कृतीचे जतन, देशातील प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती अशा अनेक घटना या आदिवासींना बळ देणार्‍या आहेत. शिस्त आणि संवेदना एकत्र झाल्यानेच गडचिरोली पोलिसांबद्दल आदराची भावना आहे, असेही गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

पोलिस भरतीला स्थगिती दिली तर 17,000 पदांची भरती विधानसभांची आचारसंहिता लागणार असल्याने पुढच्या वर्षावर जाईल. त्यानंतर आणखी 9000 पोलिस भरती करायची असल्याने आणखी एक वर्ष लांबणीवर जाईल. त्यामुळे जेथे पाऊस आहे, तेथे दुसरी तारीख देऊन पदभरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आज गडचिरोलीत तर आपण केवळ स्थानिकांचीच भरती करतो आहोत. 1000 पदांसाठी गडचिरोलीतील 28,000 युवकांनी अर्ज भरले आहेत. त्यांचे वयाचे नुकसान होऊ नये, असे सांगून वेळेतच पोलिस भरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. एकीकडे नक्षली दलात एकही व्यक्ती भरती होत नाही व पोलिस दलात भरतीसाठी २८ हजार अर्ज यातून नागरिकांचा संविधानाप्रती व्यक्त विश्वास दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसार माध्यमांनी देखील गडचिरोलीची प्रतिमा उंचावण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांनी माध्यमांना धन्यवाद दिले.

 नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल यांनी केंद्र व राज्य शासनाकडून नक्षलविरोधासाठी कायम सहकार्य व मदत मिळत असल्याचे सांगितले तर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून नक्षलविरोधी कार्याची माहिती दिली. 

0

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 22, 2024

PostImage

व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित


व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

 गडचिरोली दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत सन 2024-25 या सत्राकरीता व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून 15 जुलै 2024 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

 तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत नविन व्यायामशाळा बांधकाम करणे या साठी अनुदान देण्यात येते. तसेच व्यायाम साहित्य (इनडोअर) व ओपन जिम (खुले व्यायाम साहित्य) साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.

क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मीटरचा धावणमार्ग तयार करणे, विविध खेळाची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती भिंतीचे अथवा तारेचे कुंपन करणे इत्यादी बाबी तयार करण्याकरीता संबंधित शाळा / संस्थेस अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. 

सदर अनुदानाचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, महविद्यालये याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन सुविधा निर्माण करण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव 15 जुलै 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा. विशेषत: गावातील नागरीकांना शारीरिक कवायतीकरीता लाभ पोहचावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने खुली व्यायामशाळा (ओपन जिम) चे साहित्य प्राप्त करुन घेण्याचे दृष्टीने विनाविलंब प्रस्ताव सादर करावा. 

 या योजने संदर्भात अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी इच्छुक शाळा/संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 22, 2024

PostImage

कुरखेडा ते कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल


कुरखेडा ते कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल

 

गडचिरोली दि. 22 : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ वरील कुरखेडा ते कोरची दरम्यान सती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नसून सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण मार्गावरुन वळती करण्यात आले आहे. परंतु हा वळणमार्ग पावसामुळे क्षतीग्रस्त होवू शकतो किंवा पूराच्या पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक २९ जून पासून ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

 पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा तसेच जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र. ३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

अंमलबजावणी न करणाऱ्‍या वाहतुकदार किंवा व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 22, 2024

PostImage

फुस लाऊन केले अल्पवयीन मुलीचे अपहरण ,आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी युवकाला केली अटक


फुस लाऊन केले अल्पवयीन मुलीचे अपहरण ,आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी युवकाला केली अटक

 

 

 

बल्लारपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केरला एक्स्प्रेसमधून बिहारकडे नेत असताना आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर युवकाला अटक केली. मोहम्मद मिया सलीम (३८) रा. बेलवा बिहार असे आरोपीचे नाव आहे.

२१ जुन ला नियंत्रण कक्ष, लोहमार्ग नागपूर येथुन फोनव्दारे जीआरपी पोलीस तसेच आरपीएफ माहिती मिळाली की केरला एक्स्प्रेस ने नाबलिक बालिकेला अपहरण करून बिहार ला घेऊन जात आहे. आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक यांनी दोन पथक तयार केले. त्यामध्ये शासकीय रेल्वे पोलीस, रेल्वे चाइल्ड लाईनचे क्षेत्रीय कार्यकर्ते व रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त कार्यवाहीने, ट्रेन नं १२६२५ केरला एक्सप्रेसने अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात असलेली बालिका फरांना (नाव बदलेले ) (१२) रा.दुबीलीया, कुरवा माथीया जि. पश्चिम चंपारण (बिहार) हिला एक इसम अपहरण करून नेत असल्याची माहिती मिळाली. 

नमुद ट्रेन मपोशि किर्ती मिश्रा, पोशि निलेश निकोडे, भास्कर ठाकूर, बबिता लोहकरे, चाईल्ड लाईन टीम, आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक व त्यांचे सहकारी तपास सुरू केला असता रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र. ३ वर ट्रेन आल्याने पुढील जनरल कोच मध्ये सदर बालिका मिळून आल्याने बालिकेस रे.पो. चौकी बल्हारशाह येथे आणुन हजर केले. विचारपूस केली असता बालिकेसंदर्भात पो स्टे. अंबलापुझा केरला येथे तक्रार दाखल असुन सदरचे पो.स्टे चा पोलीस स्टॉफ त्या मुलीला ताब्यात घेण्याकरीता येत आहे. 

बाल कल्याण समिती, चंद्रपूर येथे दाखल करणे असल्याने नमुद बालिकेची वैद्यकिय तपासणी करून सदर बालिके विषयी माहिती तात्काळ अजय साखरकर, बाल संरक्षण अधिकारी आणि बाल कल्याण समिती, अध्यक्षा ऍड. क्षमा बासरकार यांना दिली व त्यांच्या मौखिक आदेशाने बालिकेला तात्पुता निवारा करिता सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर येथे ठेवण्यात आले असून आरोपीविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 22, 2024

PostImage

दोन ट्रकच्या‌ समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार


दोन ट्रकच्या‌ समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार

 

आष्टी :‌ गडचिरोली महामार्गावर दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक ट्रकचालक जागीच ठार झाल्याची घटना २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी- गडचिरोली महामार्गावर कोणसरी प्रकल्पाच्या समोर घडली. विकास कुमार बिंद (२४) जिल्हा आदिलाबाद असे मृतकाचे नांव आहे. दुसरा ट्रक चालक जितेंद्र कुमार पटेल (२९) हा किरकोळ जखमी आहे. अपघाताची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विशाल काळे घटनास्थळी पोहोचले आणि मृत

व्यक्तीला ट्रकमधून बाहेर काढले त्यानंतर त्याचे प्रेत पोस्टमार्टम करिता आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 22, 2024

PostImage

तुमरगुंडा रस्त्याच्या बाजूला वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट


तुमरगुंडा रस्त्याच्या बाजूला वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट 

 

 

 

एटापल्ली: गेल्या तीन चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथील गांडा दोहे वड्डे यांचे एटापल्ली - तुमरगुंडा रोडवर रोडच्या बाजूला वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १९ जून रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास घडली आहे. अचानक ढग काळवंडून आल्याने पावसाच्या दृष्टीने झाडाचा आसरा घेण्यासाठी झाडाखाली बैलजोडी थांबली होती अशातच‌ सोसाट्याच्या वाऱ्याने रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. झाडाखाली असलेल्या बैलावर अचानक वीज पडली आणि या बैलजोडीचा जागेवरच मृत्यू झाला सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. अश्यातच बैल जोडी गेल्याने गांडा वड्डे यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जिवापाड प्रेम असणारी ही बैलाची जोडी मृत्यमुखी पडल्याने त्यांना शोक अनावर झाला आहे.

घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक २० जून रोजी सकाळी घटनास्थळी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी गहाणे यांना पाचारण करून दोन्ही बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर बैल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे व आता शेतीचे काम असल्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यात यावी जेणेकरून लवकरात लवकर मदत मिळाल्यास दुसरी बैलजोडी घेऊन शेतीचे काम करता येईल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 21, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात चिखल फेक आंदोलन


गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात चिखल फेक आंदोलन

 

महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन.

 

गडचिरोली : राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. 

महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी भाजप सरकार विरोधात, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येते भाजप सरकारच्या प्रतिकृती पुतळ्यावर चिखल फेक करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,सचिव,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कवासे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत,अ. जा. जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत,उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली शंकरराव सालोटकर,शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली दत्तात्रय खरवडे, जिल्हासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली सुनील चडगुलवार,महासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली देवाजी सोनटक्के, सोशलमीडिया जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली संजय चन्ने, रवी मेश्राम,दिवाकर निसार, पुष्पलताताई कुमरे, अपर्णाताई खेवले, आशाताई मेश्राम, ममताताई मेश्राम, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, कुसुमताई आलाम, छायाताई कोव्हे, पांडुरंग घोटेकर, प्रफुल आंबोरकर,काशिनाथ भडके, श्रीनिवास तडपल्लीवार, सुरज भांडेकर, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, घनश्याम मुरवतकर, चारुदत्त पोहाणे, माजीत भाऊ, ओमप्रकाश डोंगरे, राजेंद्र कुकडकर, बाबुराव गडसूलवार, उमेश उईके, सुरज मडावी,प्रशांत कापकर, अनुप सिकंदर,भरत येरमे, नंदू वाईलकर,हंसराज उराडे, दिगंबर धानोरकर, कल्पक मोप्पीडवार, चंद्रकांत मडावी, सुदर्शन उंदीरवाडे, भैय्याजी मुद्दमवार, नीलकंठ भांडेकर, लतीफ तोरे, टय्या खान, जावेद खान, अविनाश श्रीरामवार सह जिल्ह्यातील काँग्रेस सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 21, 2024

PostImage

जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या


जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या

 

चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील नागभीड Naghbhid तालुक्यातील मौशी गावात जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समोल आला आहे. आसाराम दोनाडकर (वय 67) असं मृत वृद्धाचे नाव आहे. 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील झाली.

 

ही मारहाण ते बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी Hospital रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड Police officer पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी संतोष जयघोष मैंद (वय 26), श्रीकांत जयघोष मैंद (वय 24), रुपेश देशमुख (वय 32) या संशियतांना Arrest अटक केली.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 21, 2024

PostImage

बहुजनांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार!


बहुजनांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार!

 

नवनिर्वाचित खासदार डाॅ.नामदेव किरसान यांचे प्रतिपादन

 

देसाईगंज-

     देशात लोकशाही विरोधी शक्ती डोके वर काढुन बहुजनांचे अबाधित अधिकार संपवण्याच्या मार्गावर होते. यामुळे संविधान धोक्यात येण्याची शक्यता बळावली असतांना बहुजनांनी पार पडलेली लोकसभा निवडणुक आपल्या हातात घेऊन बहुजनांच्या अधिकारांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून भरघोस मताने निवडून दिलात.तो टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डाॅ.नामदेव किरसान यांनी केले.

    ते देसाईगंज येथील गोंडवाना गोटूल भुमी समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजच्या वतिने आयोजित सत्कार संभारंभाला उत्तर देतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजचे अध्यक्ष किशोर कुंमरे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,काँग्रेस कार्यकर्ते रामदास मसराम,मनोहर पोरेटी,छगन शेडमाके,पिंकु बावणे,संजय करंकर,लिलाधर भर्रे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

    दरम्यान डाॅ.किरसान पुढे बोलतांना म्हणाले की आदिवासी संस्कृती ही जगातील आदर्श संस्कृती असुन देशातील जल,जंगल जमिनीचे संरक्षण व संवर्धन करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे.मात्र वर्तमान स्थितीत आदिवासींच्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न केल्या जात असुन संविधानीक मिळालेल्या ७.५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणे तर दूरच आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासूनच रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्याच धर्तीवर ओबीसींना देखील डावलण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.हा संभाव्य धोका ओळखून समस्त बहुजनांनी एकवटू आपल्या न्याय हक्काची लढाई स्वत: लढली,त्याचाच परिणाम म्हणून लोकप्रतिनीधी पदी वर्णी लागली असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

    कार्यक्रमाचे संचालन रतन सलामे यांनी,प्रास्ताविक अनिल मडावी यांनी तर आभार धिरजशाह मडावी यांनी मानले.कार्यक्रमाला आदिवासीच्या एकुण १७ विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 21, 2024

PostImage

लॉयड्स मेटल सुरजागडच्या वतीने हेडरी येथे जागतिक योगा दिवस साजरा


लॉयड्स मेटल सुरजागडच्या वतीने हेडरी येथे जागतिक योगा दिवस साजरा.

 

लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन,लोह खनिज खाण सुरजागड च्या वतीने मौजा हेडरी येथील निसर्गरम्य वातावरणात अससेल्या परिसरातील पटांगणात जागतिक योगा दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. के.सत्या राव सर, श्री. साई कुमार सर, श्री अरुण रावत सर, शेट्टी सर , राज्या सर यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमाला लोकांना ने-आन करण्या करिता बस सेवा पुरविण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रशिक्षक संगीता मॅडम सदर कार्यक्रमाला 1200 च्या अधिक लोक या कार्यक्रमात सहभाग घेवुन जागतिक योगा दिवसाचे आनंद घेतले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकरिता नाष्टा, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केलेली होती.

सर्वांना आजच्या योगा दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होवून आनंद झाल्याने सर्वांनी आयोजक लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी योगा प्रशिक्षक मा. संगीता मॅडम, सहाय्यक प्रशिक्षक अरविंद सर सर यांचं शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन,लोह खनिज खाण सुरजागड च्या टीम नी भरपूर मेहनत घेत कार्यक्रमाला यशस्वी केली. सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 20, 2024

PostImage

उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील आणखी एका गावाने केली माओवाद्यांना गावबंदी


उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील आणखी एका गावाने केली माओवाद्यांना गावबंदी

 

पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा भटपार येथील नागरिकांनी स्वत:हून पोस्टे येथे कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश्य वस्तू, वायर, बॅटरी व सलाखी (Spikes) केले जमा

 

नुकतीच पोस्टे धोडराज हद्दीतील सात गावातील नागरिकांनी केली होती माओवाद्यांना गावबंदी

 

 गडचिरोली जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो. 

 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने पोलीस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी माओवाद्यांनी आय.ई.डी. हल्ले आणि क्लेमोर माईन्स मोठ¬ा प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले होते. परंतू गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावक­यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावक­यांचा विश्वास दृढ झाला. त्यामुळे माओवाद्यांचा सुरक्षा रक्षक दलास नुकसान पोहचविण्याचा व घातपात करण्याचा कोणताही मनसूबा यशस्वी होऊ शकला नाही. 

 

आज दिनांक 20/06/2024 रोजी पोलीस स्टेशन धोडराज हद्दीतील मौजा भटपार गाव जंगल परिसरातील घोटपाडी पहाडी जवळ माओवाद्यांनी सुरक्षा रक्षक दलास नुकसान व घातपात करण्याच्या उद्देशाने खडा बनवून त्यात लावण्यात आलेल्या लोखंडी टोकदार सलाखी (Spikes) तसेच कुकर मध्ये ठेवलेले आयडी सदृश वस्तू, वायर व बॅटरी मौजा भटपार गावातील नागरिकांनी स्वतःहून पोलीस स्टेशन ला येऊन जमा केल्या व यासोबतच तेथील गावक­यांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज प्रभारी अधिकारी यांचेकडे सुपुर्द केला. यापुर्वीही दिनांक 14/06/2024 रोजी पोस्टे धोडराज हद्दीतील सात गावातील नागरिकांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता.

 

सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी श्री. अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणा­या मौजा भरपार येथील नागरिकांचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अतिदुर्गम भागातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट¬ा प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. 

------------।।।--------------


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 20, 2024

PostImage

आंदोलनादरम्यान अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या ९ आंदोलकाविरुद्ध  पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल


आंदोलनादरम्यान अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या ९ आंदोलकाविरुद्ध  पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल

 

भद्रावती :- कर्नाटका-एम्टा कंपनीच्या खुल्या कोळसा खाणीच्या विरोधात बुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या ९ आंदोलकाविरुद्ध भद्रावती पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

दि.१९ जून रोज बुधवारला बरांज येथील कर्नाटका एम्टा कंपनीत काँग्रेस तर्फे प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व या मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले होते. आंदोलनादरम्यान कर्नाटका- एम्टा कंपनीचे मुख्य अधीक्षक अभियंता यश शिवाप्रसाद यांना खासदारांचे बंधू प्रवीण काकडे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण का केल्या नाही असा प्रश्न विचारत शिवीगाळ केली. याचवेळी एका आंदोलकाने शिवाप्रसाद यांच्या श्रीमुखात लगावली. याप्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री ८ वाजता तक्रार देण्यात आली. त्यानुसार प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांच्या विरोधात भा.दं.वि.१४३, १४७, १४९, ३५३, २९४, ५०६, ३३२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. 

 

बरांज येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या घेऊन काँग्रेस तर्फे खा.प्रतीभा धानोरकर यांच्या नेतृत्वात सदर कंपनी परिसरात आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनादरम्यान खासदार प्रतीभा धानोरकर यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांविषयी कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आंदोलनकर्ते आक्रमक झाले व त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत कंपनीचे मुख्य अधीक्षक अभियंता यश शिवाप्रसाद यांना थापड मारली. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार यश शिवाप्रसाद यांनी भद्रावती पोलिसात केली. त्यानुसार सदर आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 20, 2024

PostImage

दिव्यांग-अव्यंग जोडप्यास विवाह प्रोत्साहन लाभ वितरीत दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे - आयुषी सिंह


दिव्यांग-अव्यंग जोडप्यास विवाह प्रोत्साहन लाभ वितरीत

दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे - आयुषी सिंह

 

गडचिरोली दि. २० : दिव्यांग व्यक्तींकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या 10 जोडप्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रती जोडपे 50 हजार याप्रमाणे बचत प्रमाणपत्र, धनादेश व भेटवस्तू देण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून, दिव्यांग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरीता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते, त्याप्रमाणे दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या विवाहीत जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती श्रीमती सिंह यांनी दिली. 

किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास योजनेचा लाभ दिला जातो. वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा अशी पात्रतेची अट आहे. 

 या योजनेंतर्गत प्रत्येक जोडप्यास रुपये २५ हजार चे बचत प्रमाणपत्र, रुपये २० हजार रोख स्वरुपात व रुपये ४ हजार ५०० चे संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल. तर रुपये ५०० स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येतात.

कार्यक्रमाला गायत्री सोनकुसरे, पुष्पा पारसे, रतन शेंडे, निलेश तोरे, निखील उरकुडे, माया गायकवाड व समाज कल्याण विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 20, 2024

PostImage

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन


महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

गडचिरोली, दि.20 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या बाबीकरीता शेतकऱ्‍यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात चामोर्शी, अहेरी व सिरोंचा या तालुक्यात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंअंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस करीता अर्ज करण्याचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत आहे. 

 

 वरील निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खाते या बाब अंतर्गत शेतकऱ्‍यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.


PostImage

GADCHIROLLI VARTA NEWS

June 20, 2024

PostImage

जिल्ह्याला मिळाले 19 वैद्यकीय अधिकारी ,या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी


जिल्ह्याला मिळाले 19 वैद्यकीय अधिकारी ,या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी

जिल्हा निवड समितीमार्फत शिघ्रतेने पदभरती

           गडचिरोली दि. 19 : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांची निकड लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष विजय भाकरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह व समितीने शिघ्रतेने कार्यवाही करत दोन दिवसातच 80 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखत घेवून लगेचच 19 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. 

जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक असल्याने सदरची नियुक्ती प्रक्रिया तातडीने राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिली. ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह अनेक दिवसांपासून आग्रही होत्या. 

                जिल्हा परिषद,गडचिरोली आरोग्य विभाग अतंर्गत सहा एम.बी.बी.एस.व 13 बी.ए.एम.एस अहर्ता धारक वैद्यकीय अधिक-यांच्या रिक्त पदाकरिता थेट मुलाखत दिनांक 18 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. याकरिता वृत्तपत्रात जाहिरात तसेच एन.आय.सी. व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशीत करण्यात आलेली होती. या पदभरतीकरिता गडचिरेाली, गोदिया, चंद्रपुर, नागपुर, भंडारा, अमरावती, यवतमाळ या जिह्यातील एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. शैक्षणीक अहर्ता धारक उमेदवार उपस्थीत होते. विशेष म्हणजे 19 जागांकरिता 80 अर्ज प्राप्त झाले होते. जिल्ह्यात आरोग्य सेवेत काम करण्यासाठी प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाला.

या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी

: येनाापूर, कारवाफा, पेंढरी, अडपल्ली, कसनसुर, रांगी, सावंगी, वैरागड, देवूळगाव, आमगाव, गट्टा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, कमलापूर, कसनसुर, आरेवाडा, अंगारा, लगाम व फिरते आरोग्य पथक कोरची या 19 प्राथमिक आरोग्य केंद्रावर नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

             नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात दिवसात रूजू व्हावे अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, अशा सूचना नियुक्ती आदेशात देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.