ProfileImage
620

Post

11

Followers

0

Following

PostImage

Gadchiroli Varta News

July 6, 2024

PostImage

 भयावह : पिता - पुत्रांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करत खून केला


 भयावह : पिता - पुत्रांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करत खून केला

 

मूल (चंद्रपूर) :- मूल तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी गावामध्ये आज, शनिवार दिनांक- ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास भयावह घटना घडली. घराशेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर राजू बोदलकर यांनी पिपरे यांना केबल बाजूला करा असे सांगितले, मात्र केबल बाजूला कर असे का म्हटले म्हणून पिता-पुत्रांनी राजू यांच्यावर हल्ला केला. गुरुदास पिपरे व त्यांचा २१ वर्षीय मुलगा सूरज गुरुदास पिपरे यांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय राजू शेषराव बोदलकर यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला. या हल्ल्यात बोदलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

 

दरम्यान, घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांचा राग अनावर झाल्याने ते आरोपींना पकडण्यासाठी जमले. यावेळी आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागले असते तर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार गावात घडला असता. मात्र मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी बाप-लेकाला ताब्यात घेतले


PostImage

Gadchiroli Varta News

July 6, 2024

PostImage

नक्षलविरोधी अभियान राबवून पोलिस परत येत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणला आय डी स्फोट


नक्षलविरोधी अभियान राबवून पोलिस परत येत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणला आय डी स्फोट 

 

भामरागड: धोडराज येथून अभियानावरून परत येत असलेल्या C60 जवानांवर माओवाद्यांनी IED स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. 

 

 C60 चे जवान रस्त्यावर शोध अभियान करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोर ने स्फोट केला. 

 

 दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 6, 2024

PostImage

अखेर शहराच्या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा


अखेर शहराच्या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु

 

काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

 

देसाईगंज-

    अतिदुर्गम,आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ व व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने पावसाच्या दिवसात वाहनांना अपघात होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही गंभीर बाब लक्षात घेता शहराच्या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे यथाशिघ्र बुजविण्यात यावेत,अन्यथा बेशरमाची झाडे लावुन तीव्र निषेध करण्याचा इशारा काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांना दिला असता अखेर खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

     देसाईगंज शहर हे लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. देसाईगंज वरून अलिकडे सुरजागड लोह खनिजाची वाहतुक वाढल्याने तसेच व्यापार नगरी असल्याने खरेदीसाठी लगतच्या जिल्ह्यातुन येणारांचा मोठा ओघ आहे.सद्या पावसाळ्याचे दिवस असुन पडलेल्या खड्ड्यात पाणी साचुन राहात असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही.यामुळे वाहनांना अपघात घडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली होती.

     जड वाहनांची वर्दळ त्यातच बारमाही जड वाहतुक होत असल्याने एकदा डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराला सदर मार्गाची देखभाल दुरस्ती करणे आवश्यक आहे.मात्र डांबरीकरण करतांना आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याने डांबरीकरण उखडून मुख्य मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत.यात नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रमुख मार्गासह राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश असल्याने व सदर बाब नगर प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्याने मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन यथाशिघ्र खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावावेत,अन्यथा विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतिने पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी बेशरमाची झाडे लावून तीव्र निषेध करण्याचा इशारा डाॅ.चिमुरकर यांनी संबंधितांना दिला होता.याची दखल घेत मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला असुन डाॅ.शिलु चिमुरकर यांचे आभार मानले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 5, 2024

PostImage

विषबाधाग्रस्त रुग्णांची परिस्थिती धोक्याबाहेर


विषबाधाग्रस्त रुग्णांची परिस्थिती धोक्याबाहेर


 गडचिरोली,दि.05(जिमाका): धानोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरी अंतर्गत रुपिनगट्टा या गावामध्ये सुमारे 2.30 वा. बारश्याचे कार्यक्रमाकरिता सामुहिक भोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये सुमारे 70 लोक उपस्थित होते. सदर भोजनामुळे अन्न विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. पहिल्या पंगतीमध्ये भोजनाकरीता बसलेल्या सुमारे 30 लोकांमध्ये उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसुन आल्यानंतर जेवण थांबविण्यात आले. प्रथम प्रा. आ. केंद्र, पेंढरी येथे उपचार करुन पुढील उपचाराकरीता रुग्णवाहिकेने सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास 6 रुग्ण सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले. भरती रुग्णांमध्ये उलटी, मळमळ, पोटदुखी व डोकेदुखी अशी लक्षणे आढळुन आली. त्यापैकी साहिल सत्तू पदा वय 5 वर्ष याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटरवर घेवून उपचार सुरु करण्यात आले. व अन्य रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर रात्री 11.00 वा. दरम्यान 14 रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व सर्वावर उपचार सुरु करण्यात आले. सदर रुग्णांमध्ये 18 पुरुष व 2 मूले यांचा समावेश आहे. 2 मूलांपैकी 1 मुलाला महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सदर्भित करण्यात आले. सद्य:स्थितीत 1 रुग्ण व्हेंटीलेटरवर असून इतर सर्व रुग्णाची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. 6 रुग्ण हे छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे उपचाराकरीता गेले असल्याचे रुग्णाकडून माहिती मिळाली. अन्न पदार्थाचे नमूने तपासणी करीता नागपूर येथे पाठविण्यात आलेले आहे. त्या अहवालानुसार नेमके कोणते विष मिश्रीत करण्यात आले याबाबत माहिती उपलब्ध होईल.
    डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली यांनी प्रा.आ. केंद्र पेंढरी येथे भेट देवून रुग्णांची विचारपूस केली व त्यांना वेळीच संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली. प्रा. आ. केंद्र पेंढरी येथे तालुका आरोग्य अधिकारी, धानोरा डॉ. अविनाश दहिवले, डॉ. सखाराम हिचामी, डॉ. रुपेश पेंदाम, साथरोग अधिकारी, जि.प. गडचिरोली , डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली हे उपस्थित होते.
    रुग्णाच्या व्यवस्थापना करीता जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सतिशकुमार सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धूर्वे, भिषक डॉ. अशिष खुणे, श्वसन विकार तज्ञ डॉ. मनिष मेश्राम, डॉ.अनुपम महेशगौरी वरीष्ठ सल्लागार यांनी चमूद्वारे रुग्णसेवा पुरविण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करुन रुग्णाचे प्राण वाचविले असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 5, 2024

PostImage

खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार


खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार

 

 

आष्टी: खड्डा चुकवितांना नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल झाडावर आदळून एक जागीच ठार झाल्याची घटना मार्कंडा कंन्सोबा - घोट मार्गावरील बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दिनांक ५ जूलै रोजी सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली. मानवेंद्र नरेंद्रनाथ राॅय वय (३८) रा. गांधीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

मानवेंद्र नरेंद्रनाथ राॅय हे आपल्या दुचाकीने दुचाकी क्रमांक (एम.एच. ३३ एल ५७५१) या दुचाकीने दिनांक ५ जूलै रोजी सकाळी ७:४५ वाजताच्या दरम्यान गांधीनगर येथून घरून आपल्या मुलास आष्टी जवळील तारसा येथील कारमेल अकाडमीला सोडून परत गावाकडे येत असताना बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने सरळ मोटारसायकल झाडाला आदळून मानवेंद्र हे जागीच ठार झाले.

मुलगा विवाहित असून १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा‌ त्यांच्या पश्चात आप्तपरिवार आहे


PostImage

Gadchiroli Varta News

July 5, 2024

PostImage

कामाच्या चौकशीसाठी उपोषणावर बसलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतले उपोषण मागे!


कामाच्या चौकशीसाठी उपोषणावर बसलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतले उपोषण मागे!

 

उपोषण मंडपाला निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सांळूखे यांची भेट!

 

गडचिरोली : अहेरीला जिल्हास्थानाचा दर्जा देण्यात आला असला तरी अद्याप या ठिकाणी असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांचे अधिकार प्रदान करण्यात आले नाही.याशिवाय अहेरी शहरात ले-आऊट संदर्भात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कामे करण्यात आली असून या कामांच्या चौकशीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तारीखेला बसले अखेर आज निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सांळूखे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली व सदर मागण्या चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज उपोषण मागे घेतले.

 

अहेरी शहरात नगररचनाकार,महसूल विभाग,तलाठी कार्यालय व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या संगणमताने अनधिकृत ले-आऊटला परवानगी देण्यात आली आहे.अनेक ले-ऑउटला ओपन स्पेस नाही.तर अनेक ले-आऊट हे पुरग्रस्त क्षेत्रात येत असतानाही अशा ले-आऊटची अहेरी शहरात सर्रास विक्री सुरु आहे. देण्यात आलेल्या प्रापर्टी कार्ड संदर्भातही त्यांनी आक्षेप नोंदविला आहे.यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने अखेर कंकडालवार यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. 

 

अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-ऑऊटच्या कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली होती 

 

अहेरी येथील एका जमिनीला अकृषक करण्यासाठी (एनएपी-34) मृत व्यक्तीला जीवंत दाखविण्यात आले.तर आदिवासीची जमिनी गैर आदिवासींना विक्री करताना कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता विक्री करण्यात आली आहे.या प्रकरणातील सर्व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली आहे.जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही.तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचा इशाराही अजय कंकडालवार यांनी दिला होता अखेर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आज कंकडालवार यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ता अजय कंकडालवार यांची उपोषण मागे घेतले.

 

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षा नेते मा.श्री.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेशी दूरद्वानी द्वारे सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.सदर बाबी लक्षत घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली सामोरील अमरण उपोषण थांबवण्यात आली आहे.

 

यावेळी हणमंतू मडावी सेवा निवृत्त वन संवरक्षक व आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गडचिरोली,रोजा ताई करपेत नगर पंचायत नगर अध्यक्ष अहेरी,प्रशांत भाऊ गोडसेलवार नगर पंचायत नगर सेवक अहेरी ,हसन गीलानी माजी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गडचिरोली , सतीश भाऊ विधाते ,रुपेश टिकले परिवहन सेलचे काँग्रेस अध्यक्ष गडचिरोली,मनोहर भाऊ पोरेट्टी माजी जी.प उपाध्यक्ष, गोरव येनपरेड्डीवार, अण्णा जेट्टीवा, निकेश गद्देवार, संमया पसुला माजी जी. प अध्यक्ष,, ,कार्तिक भाऊ तोगम माजी उप सरपंच,सुनीता ताई कुस्नाके माजी जी. प.सदस्य,सुरेखा ताई आलम माजी सभापती प. स.अहेरी, गीता चालुरकर माजी उपसभापती अहेरी,अजय नैताम माजी जी. प सदस्य ,स्वप्नील दादा मडावी, अशोक येलमुले ,सां.का,राजू दुर्गे , कवडू चलावार, हनीप शेख,तस्सू भैय्या,राकेश सडमेक,सचिन पांचार्या,प्रकाश दुर्गे,दिवाकर आलम,संदीप कोरेत,शिवराम पुल्लुरीसह आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

July 5, 2024

PostImage

१८ ते २० वर्षाच्या बहिणी सरकारच्या बहीणी नाहीत का?


१८ ते २० वर्षाच्या बहिणी सरकारच्या बहीणी नाहीत का?

 

माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांचा सवाल 

 

चामोर्शी : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावी करण्यात आली.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. 

मग १८ वर्षे पूर्ण झालेल्या बहिणी मतदान नोंदणी करून मतदान करतात मग या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ का नाही? मग मतदान करणारी ही सरकारची लाडकी बहिण नाही का? असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी उपस्थित केला आहे. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे त्याकरिता १८ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात यावा अशीही मागणी रुपाली पंदिलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

July 4, 2024

PostImage

महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये


महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये

 

बहिणी खूष पण भाऊजी नाराज ?

 

 

चामोर्शी : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत फार्म भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे तर एकमेकींना महिला तू लाडकी बहिणचा फार्म भरली का ? असे विचारत आहेत तर आष्टी शहरात व परिसरात सलून दुकानात, पानटपरीवर पुरुषांमध्ये वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. पुरुष वर्ग एकमेकांना म्हणतात की सरकार लाडकी बहिण योजना चांगली काढली आहे माझी बायको तर मला सरकार माझा भाऊ मला महिन्याला १५०० रुपये देणार आहे म्हणून मस्त खुष आहे म्हणून सांगतो आहे तर दुसरा पुरुष म्हणतो की सरकार भाऊ बहिणीसाठी चांगली योजना काढली पण आम्हाला (भाऊजी) म्हणून एक योजना काढायला पाहिजे अशी खमंग चर्चा सुरू आहे या होणाऱ्या चर्चेवरून सरकारच्या बहीण सरकार भाऊ वर खुष आहेत आणि भाऊजी मात्र नाराज आहेत यावरून असे दिसून येत आहे

आता तर दाखल्यांचे अटी सुद्धा कमी करण्यात आल्याचे ना.अजीत पवार यांनी विधिमंडळात सांगितले आहे व कोणताही अधिकारी या कामात कुचराई केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व सदर योजनेचा फार्म भरण्यासाठी मुद्दत वाढविण्यात आली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

July 3, 2024

PostImage

लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे


लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे 

 

आष्टी दि. ३ (प्रतिनिधी) शिंदे सरकारने राज्यातील महीलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामुळे २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी शासन दरवर्षी ४६००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तरी लाभास पात्र - असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरताना महिलांचे आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता दखल संबंधितांनी घ्यावी असे आवाहन व इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे यांनी दिला आहे. शिंदे सरकारच्या माध्यमातून युवा, शेतकरी, दुर्बल - महिला अशा विविध घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे त्याचा प्रचार व प्रसार वेगाने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या.


PostImage

Gadchiroli Varta News

July 2, 2024

PostImage

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रस्त्याचे लोकार्पण,आरेंदा फाटा ते ताडगुडा रस्ता ,ग्रामस्थांना रस्ता सुलभ झाले


मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रस्त्याचे लोकार्पण,आरेंदा फाटा ते ताडगुडा रस्ता ,ग्रामस्थांना रस्ता सुलभ झाले

अहेरी:- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते नुकतेच पेरमिली मुख्य रोडवरील आरेंदा फाटा ते ताडगुडा गावातील सहा किलो मिटर डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सदर रस्त्याचे काम करण्यात आले असून आता आरेंदा व ताडगुडा येथील गावकऱ्यांना रस्ता सुलभ झाल्याने रस्त्याचे त्रास व अडचण दूर झाले आहे.

     या प्रसंगी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी , गावाच्या विकासासाठी रस्ते व दळणवळणाची सोय अत्यावश्यक असून गाव खेड्यातील रस्ते मुख्य मार्गांना जोडण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू असून बहुतांश ग्रामीण भागातील रस्ते बनविण्यात आले असून शिल्लक व उर्वरित रस्ते बनविण्यासाठी आमचे प्रयत्न व शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे आवर्जुन सांगितले.तत्पूर्वी फित कापून डांबरीकरण रस्त्याचे उत्साहात लोकार्पण केले.

     यावेळी प्रामुख्याने अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, येरमणार ग्राम पंचायतीचे माजी सरपंच बालाजी गावडे, आरेंदा ग्रा.पंचायतीचे सरपंच व्यंकटेश तलांडी, उपसरपंच बुज्जी आत्राम, ग्रां. पं.सदस्य मुरा आत्राम, मांतया आत्राम, सुरेंद्र अलोणे, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, साधू आत्राम, राजू तलांडी, मादी आत्राम आदी व आरेंदा येथील गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

July 2, 2024

PostImage

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना,महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज


‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना,महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज

          

 गडचिरोली दि. 2 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी 15 जुलै पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

             ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला टप्प्यात १ ते १५ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी पात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर होतील. तसेच, ज्या महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे.

 

योजनेचा उद्देश : 1) महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2) त्यांचे आर्थिक - सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

 

लाभार्थी पात्रता : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

 

अपात्रता : 1) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, 2) सरकारी नोकरी, 3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, 6) चार चाकी गाडी असणारे.

 

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल. लाभार्थ्याला स्वत: ‘नारी शक्ती दूत’ हे ॲपवर अर्ज करता येईल. 

 

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

 

 अडचणी असल्यास येथे करा संपर्क : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

July 2, 2024

PostImage

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे उपोषणाला का बसले,पहा


माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे उपोषणाला का बसले,पहा 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अनेक गंभीर समस्या घेऊन आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मागण्या काय आहेत पाहुया.

 

१) १/४/२०१० मध्ये अहेरी जिल्हा निर्मीतीचा निर्णय शासन दरबारी झालेला आहे. अहेरी जिल्हांतर्गत अप्पर जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार अहेरी, भामरागड,सिरोंचा,एटापल्ली या चार तालुक्याकरीता देण्यात यावे

 

२) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-आऊट मध्ये केलेल्या कामाचा निधी,ले-आऊट धारकांकडून वसुली करण्यात यावा व अहेरी-चेरपल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणात नियमबाह्य झालेल्या कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

 

३) मौजा-अहेरी येथील सर्व्हे क्र. २०७ च्या जमिनीचे मालकी हक्कदारांच्या मय्यतीनंतर खोटे संमती दाखवुन पोट हिस्सा केलेल्या प्रकरणाची व सदर मृत व्यक्तीला जिवंत दाखवुन एनएपी-३४ करीता मागणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. 

 

४) अहेरी नगरपंचायत हद्दीतील मा. उपविभागीय अधिकारी साहेबांनी दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघण करुन ले-आऊट धारकांनी केलेल्या अनधिकृत प्लॉट खरेदी केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आदेश रद्द करण्यात यावे.

 

५) ले-आऊट मध्ये केलेल्या कामांची शासकीय निधी ले-आऊट धारकांकडून वसुल करण्यात यावे.

 

६) प्रापर्टी कार्ड क्र. १४०९, सिट क्र. ०९ ची कायदेशीर चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.

 

७) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्यरित्या केलेले डांबरीकरण कामांची चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी.

 

८) एन.जी. पठाण, उप-अधिक्षक भूमी अभिलेख,अहेरी यांच्या कार्यकाळात झालेले संपूर्ण फेरफार व संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड तसेच गावठाण अहेरी,आलापल्ली,नागेपल्ली,वांगेपल्ली येथील एनएपी- ३४ च्या सर्व जामिनीचे चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

 

९) प्रापर्टी कार्ड क्र.१४०९ सिट क्र. ०९ मध्ये आदिवासी प्रापर्टी कार्ड गैर आदिवासी यांच्याशी खरेदी विक्री करण्यात आले असुन आदिवासी प्रापर्टी गैर आदिवासी खरेदी-विक्रीची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.

 

१०) अहेरी साजा क्र. ०१ मध्ये अतिक्रमण नोंदवहीत खोडतोड व हेतुपरस्पर चढविण्यात आलेले नावांची सखोल चौकशी करुन तसेच उप अधिक्षत भूमी अभिलेख अहेरी येथील अतिक्रमण नोंदवहीची संपूर्ण चौकशी करुन दोषर्षीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. 

 

११) उप अधिक्षक कार्यालय अहेरी येथे जुने प्रापर्टी कार्ड ऑनलाईन करण्यात आले असुन,त्यांचे जुने प्रापर्टी कार्ड नुसार ऑनलाईन प्रापर्टीकार्ड करण्यात आले नाही याची चौकशी करण्यात यावी. 

 

१२) अहेरी गावठाण येथील सन २०२१-२२ मध्ये सर्व नकाशात ग्रामपंचायत रस्ते म्हणून ७/१२ मध्ये नोंद असलेल्या सन १९७४-७५ मध्ये झालेल्या सर्वेनुसार गावठाण नकाशात ते रस्ते नसल्याचे दिसून येत आहे. सन १९७४-७५ मध्ये झालेले सर्वे मध्ये रस्ते गायब असल्याची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.

 

१३) दुय्यम निबंधक कार्यालय अहेरी यांच्या कार्यकाळात झालेल्या खरेदी-विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.

 

१४) वांगेपल्ली व चिचगुडी ग्रामपंचायत हद्दीतील ले-आऊट उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेशानुसार विक्री न करता परस्पर संपूर्ण प्लॉट विक्री करण्यात आले असुन,साहेबांच्या आदेशाचे पालन न करता ज्यांनी ज्यांनी विक्री केले त्या प्लॉटची चौकशी करुन आदेश रद्द करण्यात आदि मागण्यांना घेऊन अजय कंकडालवार यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केले आहे.जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 2, 2024

PostImage

प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : अन्यथा आंदोलन!


प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : अन्यथा आंदोलन!

 

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांना अजय कंकडालवार यांनी दिले निवेदन..!

 

अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत सुरू असलेल्या आलापल्ली रोड वरील प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्त्याला सुरुवात होऊन भरपुर कालावधी झालेला आहे.सदर काम कासव गतिने सुरू असल्यामुळे या रस्त्याने शाळेत जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात असलेले अधिकारी/कर्मचारी व नागरिक दररोज दुचाकी व चारचाकी तसेच बसणे ये-जा करीत असतात. सदर वाहनधारकांना अपूर्ण व कासव गतिने सुरू असलेल्या कामामुळे नाहक त्रास सहन करावे लागत असुन रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकुन असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सदर रस्त्याचे चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे.नियमानुसार सदर रस्त्याचे काम ७-८ दिवसात पूर्ण करण्यात यावे.अन्यथा दिनांक ०९/०७/२०२४ रोजी आदोलन उभारण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनातून दिला आहे.

 

सदर निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,कार्यकारी अभियंता,अप्पर जिल्हाधिकारी अहेरी,यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 2, 2024

PostImage

भगिनींनो तातडीने गोळा करा कागदपत्रे ! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी हालचाली सुरू


भगिनींनो तातडीने गोळा करा कागदपत्रे !

 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी हालचाली सुरू

 

 

गडचिरोली, दि. १ (प्रतिनिधी) राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भगिनींना तातडीने कागदपत्रे गोळा करण्याची गरज आहे.

सोमवार १ जुलैपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ ही आहे. मुदत संपल्यानंतर या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची पाळी येऊ शकते, असे बोलले जात आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. पात्र महिलेला स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १, ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या महिलांना लाभ मिळेल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट आहे.

 

असे आहे वेळापत्रक अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात

 

जुलै, २०२४, अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक १५ जुलै. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक १६ जुलै. तात्पुरत्या यादीवरील तक्रार / हरकती प्राप्त करण्याचा कालावधी १६ जुलै ते २० जुलै. तक्रार/ हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी २१ जुलै ते ३० जुलै.

 

या कागदपत्रांची गरज

 

उत्पन्नाचा दाखला सन २०२५ पर्यंत वैध असणारा असावा, जन्माचा दाखला, टि. सी झेरॉक्स, डोमेसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, लाभार्थी नावाने बैंक पासबुक झेरॉक्स. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १,५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. राज्यातील २१ ते६० यावर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यत्तत्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहतील.


PostImage

Gadchiroli Varta News

July 2, 2024

PostImage

नव्या कायद्याच्या जनजागृतीसाठी आष्टी पोलीस ठाणे सरसावले


नव्या कायद्याच्या जनजागृतीसाठी आष्टी पोलीस ठाणे सरसावले

 

चामोर्शी: ब्रिटीश काळी शासनास केंद्रस्थानी ठेवुन भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रीया संहिता-१९७३ तसेच भारतीय पुरावा कायदा-१८७२ यांची निर्मीती करण्यात आली होती. काळानुसार व बदलत्या परिस्थितीनुसार कायद्यात बदल होत गेले. मागील काळात भारतातील समाजिक जीवनात आमुलाग्र बदल झाल्याने तसेच भारतीय व्यक्ती हा केंद्रस्थानी आल्याने कायद्यात मोठा बदल करणे केंद्रशासनास अंत्यत महत्वाचे वाटत होते. याच कारणांने केंद्रशासनाने व्यक्ती केंद्रस्थानी ठेवुन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रीया संहिता व भारतीय पुरावा कायद्यात आमुलाग्र बदल करुन अनुक्रमे भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम- २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ तयार करण्यात आले असुन सदर कायद्याची अंमलबजावणी दिनांक ०१/०७/२०२४ रोजीपासुन पुर्ण भारत देशात लागु करण्यात आले.

 

नवीन कायद्याची भारतीय नागरीकांना माहीती व्हावी या उद्देशाने दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत पोलीस स्टेशन आष्टी येथे अजय कोकाटे उपविभिागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चासत्रकरीता पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील प्रतीष्ठीत नागरीक, व्यापारी, समाजसेवक, पोलीस पाटील, विद्यार्थी, सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार व परीसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवीली. भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम-२०२३ व भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ च्या चर्चासत्राकरीता उपस्थितांना अजय कोकाटे उपविभिागीय पोलीस अधिकारी अहेरी, विशाल काळे पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांनी मार्गदर्शन करुन नवीन व जुन्या कायद्यातील बदल सोप्या भाषेत समजावुन सांगितले. पोलीस स्टेशन आष्टी येथे आयोजीत चर्चासत्राला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला.


PostImage

Gadchiroli Varta News

July 1, 2024

PostImage

लखमापूर बोरी येथे बस स्थानकातच केली जाते खुलेआम ताडी विक्री,स्थानिक प्रशासनाचा ताडीविक्रीवर कानाडोळा


लखमापूर बोरी येथे बस स्थानकातच केली जाते खुलेआम ताडी विक्री,स्थानिक प्रशासनाचा ताडीविक्रीवर कानाडोळा. 

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी येथे मागील सहा-सात वर्षा पासून उन्हाळ्यातील दिवसात खुलेआम अवैध नशीली ताडी विक्री केली जात आहे. मात्र ह्या वर्षी पावसाळा ऋतू ला सुरुवात झाली तरी मात्र ताडी विक्री सुरूच आहे, एवढेच नाहीं तर विक्रेता शासकीय इमारतीत म्हणजेच बसस्थानकातच आपला डेरा मांडून खुलेआम ताडी विकताना दिसत आहे.

ताडाच्या झाडापासून निघणारा ताडी अर्क आटून गेला मात्र यांच्या डबक्यात ताडी आपोआप तयार होत असते. याचे कारण ताडी ही रासायनिक पावडर किंवा इतर द्रवापासून तयार केली जातं असावी.

ताडी पिणाऱ्याची संख्या कितीही वाढली तरी मात्र विक्रेत्याची ताडी कधीच संपत नाहीं. जणू ह्या लोकांना ताडीचा झरा सापडला असावा. याच बसस्थानकात लहान मुले मोठ्या व्यक्तीला ताडी पिताना बघून ताडी पिऊ लागले व एकदा ताडीची सवय लागली की काही मुलांना दारू ची पण लत लागू शकते. त्यामुळे असं खुलेआम निर्भीड होऊन ताडी विकणे किती धोक्याचे आहे हे स्पष्ट दिसूण येते. 

 सदर ताडी विक्रेता बाहेर राज्यातून आपल्या गावात येऊन ताडी विक्री करत आहे आणि गावात अश्याप्रकारे निर्भीड होऊन ताडी विकत असतो, हे पाहून विक्रेता हा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या छत्रछायेखाली अवैध नशिली ताडी विकत तर नसावा किंवा काही लोक ताडी विक्री विरोधात बोलल्यानंतर ताडी विक्री दोन तीन दिवस बंद राहते व परत विक्री सुरु होते तर यांच्या मागे कोण असावा असा प्रश्न गावकऱ्यांना पडू लागला आहे व गावातून ताडी व दारू विक्री कायम बंद व्हावी अशी मागणी गावकरी स्थानिक प्रशासनाला करू लागले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 1, 2024

PostImage

दोटकुली गावात कृषी दिवस साजरा कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन


दोटकुली गावात कृषी दिवस साजरा कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन

केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी यांच्या तर्फे ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेतील विद्यार्थ्यांतर्फे ०१ जुलै २०२४ ला दोटकुली येथे कृषी दिवस आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. आदित्य कदम तसेच श्री. छबिल दुधबळे, श्री. प्रलय झाडे निकीता येलमुले मॅडम यांच्या मार्गदर्शनात अनुज हिंगाने, यश काले ,अजिंक्य केमये , अनुप लोणारे , गोपाल मंडल यांच्या द्वारे उत्तम रित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे चे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस १ जुलै हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरी केली जाते. अशी माहिती कृषी विद्यार्थ्यांनी दिली व कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाप्रसंगी गावातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा दोटकुली मुखध्यापक . घोडमारे सर, टेकाम सर, गव्हारे सर, नंदाताई चौधरी आणि .गावकरी मंडळी व लहान बालगोपाल उपस्थित होते. आणि कार्यक्रम सहजरीत्या पार पडला.


PostImage

Gadchiroli Varta News

July 1, 2024

PostImage

अवघ्या दोन तासात मागण्या पूर्ण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मागे...!


अवघ्या दोन तासात मागण्या पूर्ण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मागे...!

 

 

सिरोंचा तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) विभागाकडुन गेल्या दोन वर्षापासून तळ्यात - मळ्यात नेटवर्क येणे-जाणे सुरू आहे, सिरोंचा तालुका मुख्यालयसह ग्रामीण भागात बी.एस.एन.एल. टॉवर उभारून अनेक वर्ष होत आहे, तरीपण बी,एस,एन,एल नेटवर्कच्या प्रतिक्षेत मोबाईल धारकांची वाट सुरूच आहे.

तालुका मुख्यालयात ग्रामीण भागातून नागरिक विविध कार्यालयातील कामासाठी प्रत्येक दिवशी येत असतात अशातच तालुका मुख्यालयात बीएसएनएल नेटवर्क येना - जाणा सुरू असल्याने अनेक नागरिकांचे कार्यालयातील कामे करणे मोठी समस्या निर्माण झाले आहे,

तसेच तेलंगाना राज्यातुन येणा-या बि.एस.एन.एल. नेटवर्क लवकरात लवकर जोडण्यात यावे किंवा सिरोंचा येथे स्वतंत्र बि.एस.एन.एल. नेटवर्क फायबर रिस्टोर टीम (FRT) नियुक्त करण्यात यावे,अशी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार, जिल्हा सरचिटणीस - चोक्कामवर, तालुका अध्यक्ष - फाजिल पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला आणि पदाधिकारी व कार्यकर्ते १ जुलै २०२४ रोजी तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आली आहे,

 आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अवघ्या दोन तासात बी ,एस,एन, एल, विभागाचे अधिकारी - कुमारस्वामी, तहसिलदार - तोटावर, नायब तहसीलदार- काडबाजीवार,सामाजिक कार्यकर्ता - श्रीकांत सुगरवार 

यांनी उपोषण स्थळी भेट देऊन येत्या १५ दिवसात बी,एस,एन,एल नेटवर्क सुरळीत सुरू होईल आणि लोकांची समस्या दुर होईल असे आश्वासन पत्र दिले आहे,

         आश्वासन पत्र दिल्याप्रमाणे बेमुदत साखळी उपोषण मागे घेण्यात आली आहे,

          त्यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी मीडिया समोर बोलत येत्या पंधरा दिवसात नेटवर्क समस्या दुर न झाल्यास बी,एस,एन,एल कार्यालयावर धडक मार्च काडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यानी दिला आहे,

          त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

पक्षाचे पदाधिकारी - सलाम सय्यद, शहर अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - राजकुमार मूलकला, गणेश संड्रा, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते,


PostImage

Gadchiroli Varta News

July 1, 2024

PostImage

जिल्हा परिषद केंद्र शाळा कुनघाडा रै येथे शाळापूर्व तयारी मेळावा दोन संपन्न


जिल्हा परिषद केंद्र शाळा कुनघाडा रै येथे शाळापूर्व तयारी मेळावा दोन संपन्न

 

 

चामोर्शी: पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे दिन जुलैला स्टार प्रकल्प अंतर्गत शाम पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन मोठ्या थाटात संपन्न झाला

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु गीता शेंड ह्या होत्या उद्घाटन केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख आतिशी म्हणून भुजंगराव कोडाप ज्योतीताई कोसमशिले साधनव्यक्ती घनश्याम वांढरे आदि मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक वर्ष2024-25 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी हा मेळावा आयोजित केला जातो यात निरनिराळ्या सात स्टॉल्सवर भरती पात्र विद्यार्थ्यांचा भावनिक सामाजिक बौद्धीक गणन भाषिक शारिरीक व मानसिक विकसन याक्षमता प्रामुख्याने तपासल्या गेल्या पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले यावेळी भरती पात्र विद्यार्थ्यांना आनंद व्हावा म्हणून रंगीत टोप्या देण्यात आल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना फुगा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पालकांनीही यात उत्स्फुर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दुधबावरे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रमोद बोरसरे यांनी केले

याप्रसंगी पालकांसाठी अल्पोपहार विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक बिस्किटांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदास सोनटक्के अभिषेक लोखंडे अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले


PostImage

Gadchiroli Varta News

June 30, 2024

PostImage

आष्टी परिसरातील त्रस्त नागरिकांनी महावितरण विरोधात करणार रास्ता रोको आंदोलन


आष्टी परिसरातील त्रस्त नागरिकांनी महावितरण विरोधात करणार रास्ता रोको आंदोलन 

 

पोलीस स्टेशन आष्टी येथे त्रस्त नागरिकांनी दिले निवेदन 

 

आष्टी: परिसरातील महावितरण विभागाची लाईट वारंवार जात असल्यामुळे ४ दिवसात लाईनची व्यवस्था सुरळीत न केल्यास महावितरण विभागाला ताळे ठोकणार व चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे आष्टी येथील त्रस्त नागरिकानी पोलिस स्टेशन आष्टी येथील ठाणेदार विशाल काळे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील महावितरण विभागाच्या वतीने मागच्या वर्षी आष्टी येथील लाईट वारंवार जात असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. लाईट येण्या जाण्यामुळे काही नागरीकांच्या घरातील टि.व्ही. फ्रीज, कुलर, एसी. लाईट येण्या जाण्यामुळे बिघडल्या व नादुरुस्त झाल्या आणि त्यानंतर नागरिकांची नुकसान व होत असलेला त्रास पाहून महावितरण विभागाने आष्टी येथे ३० ते ४० लाख रुपये खर्च करुन सेपरेट फीडर बसविण्यात आले. आणि सेपरेट फीडर बसविल्याने २ महिने लाईट सुरळीत होती. मात्र आता पावसाळा सुरु झाल्यानंतर आता पाऊस आला की २ तास, 3 तास, ४ तास रोज लाईट येणे जाणे करीत आहे. याचा आष्टीवासीयांना फटका बसुन राहीला आहे. आणि महावितरण विभागाचे अधिकारी बाहेरुन येणे जाणे करीत आहे. नावापुरते आष्टी येथे छोटीसी रुम घेऊन दाखविण्याकरीता ठेवलेली आहे.

तरी ४ दिवसात आष्टीची लाईट व्यवस्था सुरळीत न झाल्यास महावितरण विभागाला ताळे ठोकण्यात येईल व दि. ०५/०७/२०२४ रोज शुक्रवारला आष्टी येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आष्टी वासियांनी निवेदनातून दिला आहे तरी वरीष्ठ आधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे असेही निवेदनात म्हटले आहे तसे निवेदन देवेंद्रजी फडणविस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी गडचिरोली,पोलीस अधिक्षक गडचिरोली,अधिक्षक अभियंता,गडचिरोली,तहसिलदार,चामोर्शी,उपकार्यकारी अभियंता चामोर्शी यांना पाठविण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना निवेदन देताना आष्टी शहरातील विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते 


PostImage

Gadchiroli Varta News

June 29, 2024

PostImage

सफाई कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करणा-या मुकडदमवर गुन्हा दाखल करून कारवाई करा


सफाई कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करणा-या मुकडदमवर गुन्हा दाखल करून कारवाई करा

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा शल्य चिकीत्सकाकडे मागणी करून पोलिसात तक्रार 

 

गडचिरोली : मनुष्यबळ पुरविणा-या एमव्हीजी कंपनी अंतर्गत गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुगणालयात मागिल तिन वर्षापासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या २७ कामगारांची गेल्या आठ-  दहा महिण्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुकडदम मनोहर सांडेकर हे छळणूक, पिळवणूक व शोषण करीत असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा शल्य चिकीत्सकाकंडे करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सफाई कामगार म्हणून असलेल्या सर्व २७ कामगारांना  मुकडदम सांडेकर आठ तासाच्या व्यतिरीक्त  दोन -तिन सास ज्यादा काम करवून घेतात, स्वत:च्या घरचे काम करायला लावतात,  नास्ता करायला सुद्धा वेळ देत नाही एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तर दोन तिन दिवसाची अपसेंटी लावतात आणि या सर्व बाबीचा कामगारांनी  विरोध केला किंवा मनाई केले तर महिला कामगारांना अश्लिल शिवीगाड करतात, मुलांनाही अश्र्लिल शिवीगाळ करतात व ईतकेच नाही तर कामावरून काढण्याची धमकी देतात, व शिवीगाळकरून धाकदपटाव करतात त्यामूळे या सर्व कामगांराची छळवणूक, पिळवणूक व शोषण होत आहे.

एमव्हीजी कपनीत तुम्हाला  काम मिळवून देतो म्हणून अनेक  सफाई कामगार कामगारांकडून एक लाख, सत्तर हजार, पन्नास हजार, तिस हजार प्रमाणे पैसे उकळलेले आहेत, त्यावरही समाधान झाले नसल्याने दर वर्षाला या सर्व कामगारांकडून  मुकडदम सांडेकर हे पंधरा - विस हजार उकळण्याचा तगादा लावत आहेत त्यामूळे सर्व कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करीत आहेत.
सदर प्रकरणाच्या संबंधाने सर्व कामगारांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क करून हकिकत सांगितल्यामूळे वंचितच्या बाळू टेंभुर्णे, जी के बारसिंगे, कवडू दुधे यांच्या नेतृत्वात सर्व कामगारांना न्याय मिळण्यासाठी व मुकडदमवर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक व पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे. संबंधीतांनी कामगारांना  तात्काळ न्याय देण्याचे करावे व मुकडदम सांडेकरवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्याचा ईशारा बाळू टेंभुर्णे यांनी दिला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 29, 2024

PostImage

आरोग्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आवश्यक,कर्मचाऱ्यांची बडतर्फी हा उपाय नाही... सामाजिक कार्यकर्ते सुरज कोडापे यांचे पत्रकातून आवाहन..


आरोग्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आवश्यक,कर्मचाऱ्यांची बडतर्फी हा उपाय नाही...

 

सामाजिक कार्यकर्ते सुरज कोडापे यांचे पत्रकातून आवाहन..

 

 

गडचिरोली : रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कार्यकारी अधिकाऱ्यांनी सबंधित डॉक्टरांना निलंबित केले.पण गडचिरोली जिल्ह्यात आधीच डॉक्टरांची कमतरता आहे आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डॉक्टरांना निलंबित करणे हा पर्याय नाहीच.त्याऐवजी कारणांची चौकशी करून चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे हे जास्त हितावह ठरेल.

         निवेदनात सादर केलेले बाकीचे मुद्दे प्रशासन किती गांभीर्याने हाताळते ते बघणे महत्वाचे आहे.कारण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनाने तडकाफडकी संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याला बडतर्फ केले मात्र हे न्याय्य नसून आरोग्य सुविधांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.

       विशेष म्हणजे एकंदरीत जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था ही वरिष्ठांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गांभीर्याने तपासणी आणि उपचार केले जात नाही शिवाय रुग्णवाहिका सुविधाही दिल्या जात नाही याबरोबरच स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना कागदोपत्री,शासनाचे अनावश्यक योजना प्रक्रिया आणि ऑनलाईन कामाचा भडिमार केला जातोय त्यामुळे मूळ सुविधा लोकांपर्यंत पोहचविणे हे आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी ह्यावर पर्याय काढून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

     आरोग्य व्यवस्थेत मूलभूत बदल होऊन जिल्ह्यातल्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात जेणेकरून जिल्ह्यातला कोणताही व्यक्ती आरोग्य मिळण्याच्या हक्कापासून वंचित राहणार नाही.जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनात दिलेल्या मुद्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी,असे आवाहन सुरज कोडापे यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

June 29, 2024

PostImage

महिला आणि मुलींसाठी सरकारने उघडली तिजोरी; आर्थिक मदतीसह शिक्षण होणार मोफत


महिला आणि मुलींसाठी सरकारने उघडली तिजोरी; आर्थिक मदतीसह शिक्षण होणार मोफत

 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी विशेष योजनांचा वर्षाव दिसून आला आहे. यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणासह पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये निधी देण्याचाही सामावेश आहे.

महिला आणि मुलींसाठी खास योजना

महिलांसाठी विविध योजना

 

-सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये -‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी

-दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक

-पिंक ई रिक्षा - 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - 80 कोटी रुपयांचा निधी

-"शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये

-राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये

-रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका

-जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर

-‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- 51 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ

-लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ

-महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट

-महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन

-‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती

-मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती

-या निर्णयाचा अंदाजे 2 लाख 5 हजार 499 मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार


PostImage

Gadchiroli Varta News

June 27, 2024

PostImage

मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर योगाजी कुडवे यांचे ठिय्या आंदोलन


मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर योगाजी कुडवे यांचे ठिय्या आंदोलन

वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्याची योगाजी कुडवे यांची मागणी

गडचिरोली : वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगल परिसरात नदी मध्ये मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन झालेले आहे, यास जबाबदार वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणी साठी आज दिनांक.27/06/2024 पासुन मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलनाला सुरू केले आहेत वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगलव्याप्त परिसरात नदी असून मागील काही महिन्यापासून या नदी पात्रातून अंदाजे हजारो ब्रास रेतीची अवैधरित्या चोरी, सुरजागड उतखनन करणारी कंपनी रेतीची खुलेआम चोरी करीत होती तरीसुद्धा वनरक्षक,वनपाल, वनपरीक्षेत्रअधिकारी, हे बघ्याची भूमिका घेतात. पगार शासनाचा घेतात, चुना शासनालाच लावतात. करोडो रुपयाची अवैध रित्या रेतीची चोरी वनविभागाच्या अधिकारी यांच्या संगणमतानेच झालेली आहे,यात वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी देवाण -घेवाण करून हजारो ब्रास रेती उपसा करू दिल्याचे दिसून येत आहे. एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयं अंतर्गत येत असलेल्या अधिकाऱ्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते, त्यामुळें यास सर्व जबाबदार वनरक्षक, वनपाल वन परीक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांचे कडून अवैध रेती उत्तखंनंन ची रक्कम या सर्वांच्या सेवा पुस्तकात नोंद करून पगारातून वसुल करावेत व या सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, महसूल विभागाच्या रेट नुसार ५ पट दंड आकारून संबंधित कंत्राटदार यांचे कडून तात्काळ रक्कम वसूल करण्यात यावे, या मागणी साठी आज दिनांक.27/06/2024 पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत तसे निवेदन योगाजी कुडवे अध्यक्ष आदर्श समाज विकास सेवा संस्था /सामाजिक कार्यकर्ता यांनी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य. ,उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,सुधीर मुनगंटीवार वनमंत्री म .रा. यांना पाठविले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 26, 2024

PostImage

I, Dr. नामदेव किरसान, म्हणत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ


I, Dr. नामदेव किरसान, म्हणत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

 

गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून इंग्रजी मध्ये सदस्यत्वाची शपथ घेणारे पहिलेच खासदार 

 

गडचिरोली :: 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला दिल्ली येते सुरुवात झाली असून, नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नवी दिल्ली येथील संसदेत लोकसभेच्या सभागृहात पार पडले. 

I, Dr. नामदेव किरसान, म्हणत 12 - गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. 

 प्रोटेम स्पीकर महताब भरतूहारी यांनी लोकसभेतील सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. विशेष बाब म्हणजे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून इंग्रजी मध्ये सदस्यत्वाची शपथ घेणारे आणि इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेवर चांगला प्रभूत्व असणारे डॉ. नामदेव किरसान हे पहिलेच खासदार आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 26, 2024

PostImage

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी यांची फेरनियुक्ती


काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी यांची फेरनियुक्ती

 

गडचिरोली: आल्लापल्ली येथील सेवाभावी ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सेवानिवृत्त वन अधिकारी हनमंतु गंगाराम मडावी यांची काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी 22 जून रोजी केली आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मडावी यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेसमवेत काँग्रेसचे युवा नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर विश्वास दाखल करून आपल्या समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केले होते.काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर पक्षाचे  हायकमांडने कंकडालवार यांची अहेरी विधानसभा समन्वयक म्हणून तर मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केले होते.

अजयभाऊ कंकडालवार व हनमंतु मडावी या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश व नियुक्तीचे फलित लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात मविआ व काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरसान यांना मिळालेल्या भारी लीडमधून सगळ्यांनाच पाहायला मिळाली.असे असतांना सुद्धा पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून दुसऱ्या एका कार्यकर्त्यांची निवड झाल्याची माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने याबद्दल मडावी समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.

एकाच पदाचे दोन दोन जिल्हाध्यक्ष निवडीबद्दलची तक्रार राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्या कानावर पडताच त्यांनी लगेच याविषयी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून परत आल्लापल्ली येथील हनमंतु गंगाराम मडावी यांच्या नावाने आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती करायला भाग पाडले.

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेर नियुक्ती झाल्याबद्दल हनमंतु मडावी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार, आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर,जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,ऍड.राम मेश्राम,ज्येष्ठ नेते हसनभाई गिलानीसह  पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.


PostImage

Gadchiroli Varta News

June 26, 2024

PostImage

जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत सुरू असलेले बंधाऱ्यांचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली चौकशी मागणी


जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत सुरू असलेले बंधाऱ्यांचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली चौकशी मागणी 

 

गडचिरोली : जिल्ह्यात पाटबंधारे विभागाअंतर्गत  सुरू असलेले बंधाऱ्याचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या या बांधकामाबाबत काही नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले. कंकडालवार यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची शहानिशा केली असून या कामांची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

 

झालेल्या कामापैकी अनेक कामे तीन वर्षांपूर्वीची आहेत. त्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. तीन वर्षापूर्वी बांधलेले काही बंधारे पहिल्याच पावसात वाहून घेले तर काही बंधारे क्रॅक झाले आहे. प्रशासनाचे यावर कोणतेही लक्ष नाही. त्याकरिता तीन वर्षापूर्वी झालेले सर्व बंधाऱ्यांच्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बंधाऱ्यांच्या बांधकामांची संपूर्ण चौकशी करावी, अन्यथा पाटबंधारे कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजय कंकडालवार यांनी दिला आहे. 

 

पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या कोट्यवधीच्या बंधाऱ्यांच्या कामांचा नित्कृष्ट दर्जा आहे. शासनाच्या नियमानुसार बरोबर खोलीकरण होत नाही. जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

पत्रकार संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी सावली तालुक्यातील पत्रकार संघातर्फे निषेध


पत्रकार संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी

 

सावली तालुक्यातील पत्रकार संघातर्फे निषेध

 

‘त्या‘कॉंग्रेस नेत्याविरूदध कारवाई करा - मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर

 

 

मूल येथील तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य आणि दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी,व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना कॉंग्रेसच्या एका नेत्याने जीवे मारण्याची आणि परिवाराला संपविण्याची धमकी देण्यात आली.त्या घटनेचा सावली तालुक्यातील सर्व पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला. याबाबत तीनही पत्रकार संघाची तातडीची सभा घेण्यात आली.त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला. आणि धमकी देणारे कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांच्या विरूदध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. या मागणीचे निवेदन सावली येथील तहसिलदार आणि पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले. पुण्यनगरी मध्ये प्रसिदध झालेल्या एका बातमीच्या संदर्भात कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे हे आपल्या कर्तव्यावर असताना भ्रमणध्वनी वरून जीवे मारण्याची धमकी आणि परिवाराला संपविण्याची भाषा वापरली. एखादया बातमीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे. प्रत्येक बातमीदाराला आपआपल्या प्रकारे लिखाणाचे स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.हे अशोभनीय कृत्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे,अशा आशयाचा ठराव तीनही पत्रकार संघातर्फे घेण्यात आला.व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा का असेना त्याचा निषेध झालाच पाहिजे असे मत उपस्थित पदाधिका-यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले. या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरूदध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागणीचे एक निवेदन सावलीचे तहसिलदार प्रांजली चीरडे आणि पोलिस निरिक्षक जीवन राजगुरू यांना देण्यात आले. निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार , व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रवीण झोडे,ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले,प्रा.शेखर प्यारमवार,प्रा.विजय गायकवाड,चंद्रकांत गेडाम, डॉ.कवठे,गोपाल रायपुरे,विजय कोरेवार,नासीर अन्सारी, गिरीश चीमुरकर,सुजित भसारकर,सौरव गोहने,प्रवीण गेडाम इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.

 

बॉक्स

 

पत्रकार संजय पडोळे यांनी सावली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.याबाबत चौकशी सुरू झालेली असून या बाबत दोन्ही पक्षा कडून त्यांचे बयान नोंदविलेले असून याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती ठाणेदार राजगुरू यांनी शिष्टमंडळाला दिली


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

घरोघरी भेटी देवून मतदार यादीची तपासणी करणार मतदारांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी – जिल्हाधिकारी


*मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित*

 

घरोघरी भेटी देवून मतदार यादीची तपासणी करणार

 

मतदारांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी – जिल्हाधिकारी

 

गडचिरोली, दि. 25 - भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) 25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहे. जे मतदार 18 वर्षाचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र.6 भरुन नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरीत झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटया दूर करण्यात येणार आहे. 

 

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्यात बदल करुन घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6. 7 आणि 8 स्वीकारतील व दि. 19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 

 

तरी मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रासह नमुना क्र. 6 भरुन विहीत मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

सिरोंचात BSNL नेटवर्क समस्या तात्काळ दुर करा ; अन्यथा रस्त्यावर उतरू...!  सागर मूलकला यांनी दिला आंदोलनाचा इशारा...!


 

सिरोंचात BSNL नेटवर्क समस्या तात्काळ दुर करा ; अन्यथा रस्त्यावर उतरू...!

 

 सागर मूलकला यांनी दिला आंदोलनाचा इशारा...!

 

 

सिरोंचा - तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड ( BSNL) विभागाकडून गेल्या अनेक महिन्यापासून तळ्यात - मळ्यात नेटवर्क येण्या - जाणं सुरू आहे, 

         सिरोंचा तालुक्यातील मुख्यालयसह ग्रामीण भागात बी,एस,एन,एल, टॉवर उभारून अनेक वर्षे होत आहे, तरीपण बीएसएनएल नेटवर्कची प्रतिक्षेत मोबाईल धारकांची वाट सुरूच आहे,

               तालुका मुख्यालयात ग्रामीण भागातून नागरिक विविध कार्यालयातील कामासाठी प्रत्येक दिवशी येत असतात अशातच तालुका मुख्यालयात बी,एस,एन,एल नेटवर्क तळ्यात- मळ्यात नेटवर्क सुरू असल्याने अनेक नागरिकांचे कार्यालयातील कामे करणे मोठी समस्या निर्माण होत आहे, 

मुख्यालयातील बँक ऑफ इंडिया, को-ऑपरेटिव्ह बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, असे विविध बँकेत नेटवर्क नसल्याने बँकेतील कामे करणे नागरिकांना मोठी समस्या निर्माण होत आहे,

             तालुक्यातील नागरिकांनी बीएसएनएल विभागाला अनेकदा या समस्येबाबत तक्रार करूनही तालुक्यात बीएसएनएल नेटवर्क

समस्या दूर होत नाही,

नेटवर्क नसल्याने जवळच्या तेलंगाना राज्यात जाऊन ऑनलाईनचे अनेक कामे करावा लागत आहे, ही तालुक्यासाठी गंभीर आणि अन्यायकारक आहेत,नेटवर्क समस्येमुळे तालुक्यातील नागरिकांसह शाळेकरी विद्यार्थ्यांनाही मोठी नुकसान होत आहे आहे, 

बी,एस,एन,एल नेटवर्क समस्या बाबत संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी तात्काळ तळ्यात- मळ्यात वारंवार येण्या - जाण्या करणाऱ्या नेटवर्क समस्या दूर करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर भाऊ मुलकला यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून इशारा देण्यात आला आहे,


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

  बोटीला कोणतेही नुकसान नाही गोसीखुर्द जलाशय भूमिपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तुस्थिती



 
बोटीला कोणतेही नुकसान नाही
गोसीखुर्द जलाशय भूमिपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तुस्थिती
  
 
भंडारा, दि. २४ : भंडारा जिल्हा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसीखुर्द या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री श्री.शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. तर दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकार होते. या बोटीचे वाहक गोविंद खवणेकर होते.

बोट सफर करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री बोट चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व पत्रकारांचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडासा पाण्यात गेला. बोट एका बाजूला गेल्यामुळे बोटीतील बसण्याचा भाग जो बोटीला स्क्रूने फिट केलेला असतो तो ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. घटनेमध्ये प्रसंगावधान राखून बोटीचे चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोटमध्ये बसवले आणि बोट पूर्ववत झाली.

त्यादरम्यान या कार्यक्रमासाठी महामंडळाद्वारे सुरक्षेसाठी जेटस्की आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम तैनात केली होती. ते सर्व काही क्षणात आले आणि पत्रकारांना कार्यक्रमस्थळी नेले. या घटनेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः घटनाग्रस्त बोटीकडे गेले आणि त्यांनी निश्चित केले की बोट आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही. बोटीला कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त ‘बोटीचे तुकडे झाले, बोट बुडाली’ हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे डॉ.सारंग कुलकर्णी, महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक, एमटीडीसी यांनी कळवले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

माओवाद्यांच्या अस्तित्वाला खिंडार… उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील पाच (05) गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी


 

माओवाद्यांच्या अस्तित्वाला खिंडार…

 

उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील पाच (05) गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी 

 

 

 गडचिरोली:माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे यापूर्वी दिनांक 14/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये हद्दीतील परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात (07) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे धोडराज यांना सादर केला होता. त्यानंतर मौजा भटपार गावक­यांनीही माओवाद्यांना गावबंदी करुन कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू, वायर, बॅटर व सलाखी (Spikes) पोस्टे धोडराज येथे दिनांक 20/06/2024 रोजी जमा केल्या होत्या. त्यात आणखी एक भर म्हणून गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी व सचिव, जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने सहपत्नी ललीता चैतु उसेंडी (डिव्हीसीएम भामरागड दलम) सह दिनांक 22/06/2024 रोजी मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे समोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे माओवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा­या भामरागड व अबुझमाड जंगल परिसरातच त्यांच्या अस्तित्वाला खिंडार पडले आहे.

 

सविस्तर वृत्त असे आहे की, माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे आज दिनांक 24/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच (05) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी उपपोस्टे लाहेरी यांना सादर केला.  

 

वरील पाच ही गावे गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावक­यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावक­यांचा विश्वास दृढ झाला. यासोबतच माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे केलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलीस खब­या असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावक­यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावक­यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून आज दिनांक 24/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील वरील पाच (05) गावातील गावक­यांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट¬ प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले. यावेळी वरील पाचही गावातील नागरिकांनी माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले पाच भरमार बंदूक तसेच जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी 200 ते 300 सलाखे  काढून आणून पोलीस दलाकडे सुपूर्द केली.

यासोबतच पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावातील नागरिकांनी दिनांक 14/06/2024 रोजी गावात नक्षल गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता. त्यामुळे आज येथील गावक­यांनी पोस्टे धोडराज हद्दीत सुरक्षा रक्षक दलांना नूकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले 450 सलाखे व कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू पोस्टे धोडराज येथे जमा केले.

सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते, उपपोस्टे लाहेरी येथील प्रभारी अधिकारी श्री. संतोष काजळे, पोउपनि. प्रशांत डगवार, पोउपनि. सचिन सरकटे, पोउपनि. आकाश पुयड व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी श्री. शरद काकळीज, पोउपनि. अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणा­या पाच गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट¬ा प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी विविध ठिकाणच्या कार्यवाहित केला अवैध दारुसह एकुण 32,95,170/- रुपयांचा मुद्देमाल जप्त


 

गडचिरोली पोलीसांनी विविध ठिकाणच्या कार्यवाहित केला अवैध दारुसह एकुण 32,95,170/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता (अहेरी) यांच्या संयुक्त कार्यवाहित अतिसंवेदनशिल नैनगुंडम गावात अवैध दारुसह एकुण 12,26,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त 

पोस्टे अहेरी पथकाने केला वाहनासह एकुण 10,76,000/- अवैध दारुचा मुद्देमाल जप्त

अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पथकाने दोन विविध ठिकाणच्या कार्यवाहीत केला 9,93,170/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा जप्त

चार विविध गुन्ह्रात एकुण 05 आरोपीतांना घटनास्थळावरुन घेतले ताब्यात 

 

 

गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथील दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नविन क्लृप्त्या करीत असतात. माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशिल गावात दारु माफिया हे गोर गरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करुन तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांचे राहते घरात दारुची अवैध साठवणुक करुन ठेवत असल्याचा प्रकार गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आल्याने गडचिरोली पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेत चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत वाहनासह अवैध दारुचा एकुण 33,22,980/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

सविस्तर वृत्त असे आहे की, अहेरी तालुक्यातील उपपोस्टे दामरंचा हद्दीतील माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशिल नैनगुंडम या गावात काल दिनांक 23/06/2024 रोजी दुपारी 15.00 वा. दरम्यान गोपनिय बातमीदारांकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापुर येथे राहणारा ईसम नामे पुरुषोत्तम हनमलवार याने मौजा नैनगुंडम गावातील आपले साथीदार संतोष भिमा सिडाम व गणेश सालय्या आलाम यांच्या मदतीने संतोष सिडाम याचे राहते घरी अवैधरित्या मोठ¬ा प्रमाणात देशी दारु व काळ्या गुळाची साठवणुक करुन ठेवली असल्याबाबतची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. सदर माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस पथकाचे दोन टिम व प्राणहीता अहेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करुन गोपनियरित्या प्रोव्ही रेड कार्यवाही करीता रवाना केले. सदर पोलीस पथकांनी मौजा नैनगु्ंडम गावातील संतोष सिडाम याचे राहते घरी जावुन प्रोव्ही रेड केली असता, त्याचे घरात देशी दारुच्या 142 पेट¬ा - किंमत 11,36,000 रुपये, काळ्या गुळाच्या 75 पेट¬ा - किंमत 90,000 रुपये, असा एकुण 12,26,000/- रुपयांचा अवैध मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. तसेच ईसम नामे संतोष सिडाम व गणेश आलाम यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्रातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम हनमलवार हा कार्यवाहीची चाहुल लागल्याने फरार झाल्याचे आढळुन आले. पोलीस पथकाद्वारे त्याचा शोध घेणे सुरु आहे.

यासोबतच चंद्रपूर जिल्ह्रातून पोस्टे अहेरी हद्दीत अवैधरित्या दारु तस्करी होत असल्याबाबच्या गोपनिय माहितीवरुन काल दिनांक 23/06/2024 रोजी अहेरी पोलीसांनी मौजा बोटलाचेरु गावाजवळ सापळा रचून संशयीत वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता, त्यात रॉयल स्टॅग विदेशी दारुच्या 06 पेट¬ा (विक्री किंमत 1,08,000/- रु.) रॉकेट संत्रा देशी दारुच्या 04 पेट¬ा (विक्री किंमत 32,000/-) रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. वाहन चालक नामे मोहम्मद इलीयास शेख रा. बालाजी वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने किशोर सुर्यभान डांगरे रा. आलापल्ली यास दारुचा पुरवठा करित असल्याचे सांगितले. आरोपींकडुन देशी विदेशी दारु, मोबाईल व टाटा व्हीस्टा वाहन क्र. एच एच 33 ए 3793 वाहनासह एकुण 4,10,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपीविरुद्ध दारुबंदी कायद्यांन्वये पोस्टे अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

 

 

 

तसेच आज दिनांक 24/06/2024 च्या रात्री पोस्टे अहेरी येथील पोलीस पथक नाईट गस्त ड¬ुटी करित असतांना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका संशयित महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम एच 38 एक्स 3055 वाहनाजवळ जाऊन विचारपूस केली असता, वाहनातील चालक हा पोलीसांना पाहून पळुन गेला. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट संत्रा देशी दारुच्या 68 पेट¬ा (विक्री किंमत 4,76,000/- रु.) मिळून आल्याने वाहनासह एकुण 10,76,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोस्टे अहेरी येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

तसेच आज दिनांक 24/06/2024 रोजी गोपनिय बातमिदाराकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा लिंगमपल्ली गावाजवळील लिंगमपल्ली टोला येथे अवैध दारु विक्री होत असल्याबाबतच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, 1) गंगाराम बकय्या नेरला व 2) नागेश सोमा नेरला दोघेही रा. लिंगमपल्ली तह. अहेरी हे अवैध दारु विक्री करित असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून आयएमएफएल (क्ष्ग्क़ख्र्) विदेशी दारुचे 38 बॉक्स व देशी दारुच्या 20 पेट¬ा असे एकुण 58 बॉक्स अंदाजे किंमत 5,83,170/- रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला व दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अशा चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत गडचिरोली पोलीस दलाने वाहनासह अवैध दारुचा एकुण 33,22,980/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

 

 सदरच्या विविध कारवाया पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, पोनि. स्थागुशा श्री. उल्हास भुसारी, पोस्टे अहेरी प्रभारी अधिकारी पोनि. दशरथ वाघमोडे, सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि. राजू गवळी, पोउपनि. विजय सपकाळ, मपोउपनि. सरीता मरकाम, मपोउपनि. करुणा मोरे, परिपोउपनि. संकेत सानप व त्यांच्या पथकातील पोलीस जवानांनी केलेली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

अहेरी येथे 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन अहेरी व परिसरातील विजेची समस्या दूर होणार


अहेरी येथे 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

अहेरी व परिसरातील विजेची समस्या दूर होणार

ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

अहेरी:- येथील पॉवर हाऊस कॉलनीत 33 के. व्ही. रोहित्र उपकेंद्राचे भूमिपूजन शनिवार 22 जून रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

     यावेळी मंचावर मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम, महाराष्ट्र राज्य वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धराव बाबा आत्राम, माजी सरपंच गंगाराम कोडापे, नगर सेवक अमोल मुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते.

     मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी कुदाळी मारून व फलकाचे फित कापून विधिवत व रीतसर 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन केले.

     या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलताना ना.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, अहेरी आणि परिसरातील विजेची समस्या लक्षात घेता मागील अनेक वर्षापासून अहेरी येथे 33 के. व्ही. विजेचे उपकेंद्र व्हावे ही नागरिकांची मागणी होती. विजेची समस्या दूर व्हावे यासाठी आटोकाट प्रयत्न होते, त्यासाठी अहेरी व तालुक्यातील पेरमिली येथे 33 के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी भरीव निधी मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले असून आता अहेरी आणि पेरमिली भागातील असंख्य गावांना सुरळीत वीज मिळणार असून वीजेची समस्या कायमस्वरूपी मिटणार असल्याचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणत माझे मिशनच शिक्षण, सिंचन, आरोग्य, वीज, रस्ते असल्याचे आवर्जुन उल्लेख केले.

     प्रास्ताविकातून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ यांनी, विजेची समस्या लक्षात घेता मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर व उपलब्ध करण्यात आले असून आता आपल्या भागात विजेची समस्या व प्रश्न मिटणार असल्याचे आवर्जुन सांगितले.

      सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र अलोणे यांनी केले.यावेळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी , प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 25, 2024

PostImage

सोसायटीला दिलेल्या कामांची चौकशी करा बांधकामच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन


सोसायटीला दिलेल्या कामांची चौकशी करा बांधकामच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन

 

 

गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबरीकरणाची कामे चुकीच्या मार्गाने सोसायटीला व ठेकेदाराला टक्केवारी घेऊन बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने देण्यात आली आहेत. या कामांचा दर्जा अत्यंत नित्कृष्ट दर्जाचा असल्यामुळे पावसाळा आला की डांबर वाहून जात आहे. या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आदर्श विकास समाज सेवा संस्थेमार्फत बांधकाम विभागाचे नागपूर येथील मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एका कामाचे २०० मीटरचे तुकडे पाडून प्रत्येकी १० लाख रुपये निधी मंजूर करून कामे करण्यात आली आहेत . ही चुकीची पद्धत असून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामे केली जात आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास अधिकारी व लोकप्रतिनिधी करत आहेत. अशा भ्रष्ट लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकारी यांचेवर तत्काळ कारवाही करावी, अन्यथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांचे कार्यालयासमोर २६ जूनपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर कोणता निर्णय घेतला जाते, याकडे लक्ष लागले आहे. निवेदन देताना आदर्श विकास समाज सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष योगाजी कुडवे, रवींद्र सेलोटे उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

June 24, 2024

PostImage

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास ,इंडिया आघाडीत घटक पक्षांना संपविण्याचे कटकारस्थान


लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास ,इंडिया आघाडीत घटक पक्षांना संपविण्याचे कटकारस्थान 

 

(उबाठा) शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांचा आरोप

 

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातून इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा बहुमताने विजय झाला. या विजयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास , इंडिया आघाडीत घटक पक्षांना संपविण्याचे कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी पत्रकातून केला आहे.

रियाज शेख यांनी पत्रकात म्हटले आहे की काँग्रेस पक्षाकडून विजयी उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात सत्कार कार्यक्रमाच्या रूपाने अभियान सुरू आहे. यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बाजूला सारून काँग्रेसच्या मोठ्या पदाधिकाऱ्याकडून या लोकसभा क्षेत्रात घटक पक्षांचे अस्तित्व काय आहे? अशा प्रकारे बोलले जात असल्याने याचा मी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून जाहीर निषेध करतो असे रियाज शेख यांनी म्हटले आहे. अहेरी नगरात काँग्रेस पक्षाकडून विजयी उमेदवार सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात इंडिया महाविकास आघाडीचा एक साधा बॅनर नाही. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रणाचा साधा फोन नाही . यामुळे जनतेमध्ये संभ्रम व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाकडून घटक पक्षांचा अपमान सातत्याने सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहन करणार नाही असाही ईशारा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी दिला आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 24, 2024

PostImage

नवंनिर्वाचित खासदार डॉ, नामदेवराव किरसाण यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन


नवंनिर्वाचित खासदार डॉ, नामदेवराव किरसाण यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन

 

गावकऱ्यांचा वतीने सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले यांनी परिसरातील मांडल्या समस्या 

 

 

 गडचिरोली: अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला )परिसरातील अनेक गावे विकासापासून कोसोदूर आहेत. करीता आपल्या मार्फतीने राजाराम खांदला परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी राजाराम खांदला परिसरातील नागरिकांच्या मार्फतीने सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले यांनी नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसाण यांना अहेरी येथील सत्कार सोहळ्यात निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,

राजाराम येथील प्राथमिक आरोग्य पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यात यावा.व रुग्णवहीका उपलब्ध करून विविध रिक्तपदे भरण्यात यावी

राजाराम परिसरात जवळपास आठ ते नऊ गावे येत असून काही गावामध्ये पक्के रस्तेसुद्धा नाहीत.राजाराम येते आरोग्य पथक असून या परिसरात या ठिकाणी रुग्णवाहीका सुद्धा नाही.कोरेपल्ली पासून पक्के रस्ता नसून मोठमोठे दगडातून प्रवास करावा लागत असतो,व त्यामुळे एखाद्यावेळी प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नायचे झाले तर रस्त्यावर दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही,

कमलापूर येते आरोग्य केंद्र आहे पण ते कोरेपल्ली पासून २० ते २५ किमीचा प्रवास करात जावा लागत असतो. आणि कोरेपल्ली येते लाखो रुपये खर्च करून उपकेंद्र बांधकाम करण्यात आले परंतु या ठिकाणी परिचारिका मुख्यालयी राहत नसून दहा पंधरा दिवसातून एक दोनदा येत असते.

राजाराम येते राष्टीयकृत बँकेची स्थापना करण्यात यावी राजाराम ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी. तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्यात यावे. शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले


PostImage

Gadchiroli Varta News

June 23, 2024

PostImage

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' ,  ,जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय


 

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' ,  ,जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय 

 

गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि तयारी संबंधात शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषदेचे गठन, हर हर जोडो अभियान, बुथ रचना आणि व्यापक जनसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आणि जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. युवक, बेरोजगार, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांना घेवून शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरणार असून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करण्यासाठी पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ऑगस्ट पासून संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

 

जिल्हा समीतीच्या या बैठकीला जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, महिला नेत्या व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार जयश्रीताई जराते, जिल्हा समीतीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, डंबाजी भोयर, एकनाथ मेश्राम, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 23, 2024

PostImage

संकटाच्या भयानक शांततेत कर्तृत्वाचे रक्तदानाचा मुद्दा गावात गावात मांडण्याचा प्रयत्न करणारी युवा संकल्प..!


संकटाच्या भयानक शांततेत कर्तृत्वाचे रक्तदानाचा मुद्दा गावात गावात मांडण्याचा प्रयत्न करणारी युवा संकल्प..!

 

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

 

 

गडचिरोली : योग दिनाचे औचित्य साधून नवेगाव (माल) येथे युवा संकल्प संस्थेच्या मार्गदर्शनातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी गावातील विविध मंडळाच्या वतीने युवकांनी रक्तदान केले या सामाजिक कार्यात सहभाग घेत. 

१४ युवक आणि रक्तदान केले. याप्रसंगी युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे, नागेश मादेशी,चेतन कोकावार, तेजस कोंडेकर, पंकज डायकी,वसंत रामटेके, संस्थेचे सर्व पदाधिकारी गावकरी उपस्थित होते होम फाउंडेशन सिरोचा, सार्वजनिक वाचनालय नवेगाव माल सर्व सदस्य, युवा संकल संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले


PostImage

Gadchiroli Varta News

June 23, 2024

PostImage

पालकमंत्र्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे... - महेंद्र ब्राह्मणवाडे


पालकमंत्र्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे... - महेंद्र ब्राह्मणवाडे 

 

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्याचा विकास होईल, जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील, असे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना असताना. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पोरके केले आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले आणि प्रशासनाची गुप्त बैठक घेऊन निघून गेले. मात्र या संदर्भात पालकमंत्री जिल्हा दौरा करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक समस्या प्रलंबित आहे. शेतीला नियमित वीज पुरवठा होत नाही, पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. जिल्हा रुग्णालयात अत्यावशक सोयी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना नागपूर किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते. पोलीस भरतीच्या युवकांचे प्रश्न आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यात आलेले नाही. शेतकरी, महिला, युवक यांच्या समस्यांना घेऊन जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटायचे होते व आपले म्हणणे मांडायचे होते. मात्र पालकमंत्री सुरक्षेचा कारण दाखवून दौरा गुप्त ठेवल्याचे सांगतात. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटल्यामुळे पालकमंत्र्यांना आपल्या जीवाला धोखा वाटत असेल तर खुशाल त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व सक्रिय असा पालकमंत्री जिल्ह्याला द्यावा जेणे करून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकारण होऊन शकेल, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 23, 2024

PostImage

विरोधी पक्षा नेते विजय वडेट्टीवार व नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांचे जंगी स्वागत ,निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला  - वडेट्टीवार


विरोधी पक्षा नेते विजय वडेट्टीवार व नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांचे जंगी स्वागत ,निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला  - वडेट्टीवार

 

काँग्रेसनेते,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवारसह काँग्रेस पदाधिकारी - कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार!

 

अहेरी : येथे काल 22 जून रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.या सत्कार सोहळा कार्यक्रमला काँग्रेस पक्षाचे नेते,माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्षा नेते विजय वडेट्टीवार व नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांचे जंगी स्वागत करण्यात आले 

 

विजयभाऊ वडेट्टीवार काल जिल्हा दौऱ्यावर आले होते.दौऱ्यात अहेरी येथे वडेट्टीवार व खासदार किरसान यांच्या आगमन होतच गावकरी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरत,फटक्यांचा आतषबाजी करत जंगी स्वागत करत गडचिरोली लोकसभा निवडणुक विजयोत्सव रैली काढण्यात आली आहे.तसेच वडेट्टीवार आणि डॉ.किरासन यांनी विविध विभागाचे आढावा बैठक घेतले 

तालुक्यातील रस्त्यांची बकाल अवस्था,महसूल विभागाच्या अटी व शर्तींना न जुमानता होणारे अवैध उत्खनन,वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणी होणारी अवैध कामे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त मागास अहेरी कडे स्थानिक लोकप्रतिनिधीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून सुद्धा अहेरीकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे येथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेऊन निर्देश दिले.

 

त्यावेळी गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणुकीत डॉ.नामदेवराव किरसान यांनी भाजपाचे उमेदवार नेतेंचा पराभव करत जवळपास 1लाख 40 हजार मतांनी प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल अहेरी येथील गांधी चौकात 'येथे विरोधी पक्षानेते विजयभाऊ वडेट्टीवार आणि नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केले.आविसं,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवारसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हस्ते वडेट्टीवार नवनिवार्चित खासदार डॉ.किरसान यांच्या सत्कार करण्यात आली.

 

सत्कार सोहळावेळी गडचिरोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय हा कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाने झाला आहे.या निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला अशी वडेट्टीवार म्हणाले

 

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 23, 2024

PostImage

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार


मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार

 

विद्युत उपकेंद्राचे मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन

 

अहेरी:-तालुक्यातील पेरमिली परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडविण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र मंजुर करण्यात आले.नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते ३३/११ केव्ही नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.त्यामुळे पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव कायमचा थांबणार आहे.

 

सध्या पेरमिली परिसरातील ४० ते ४५ गावांना भामरागड उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे.भामरागड ते पेरमिली पर्यंत येणारी वीज वाहिनी जवळपास दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त आणि घनदाट जंगलातुन आल्याने नेहमीच या परिसरात विजेचा लपंडाव होत असतो.कमी दाबाचा वीज पुरवठ्याची समस्या तर कायमचीच आहे.पावसाळ्यात तर नेहमीच बत्तीगुल होत असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पेरमिली येथे आदिवासी उपाययोजने अंतर्गत ३३/११ के व्ही मंजूर करण्यात आले.

 

२६.७४ कोटी रुपयांच्या निधीतून या ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम केले जाणार आहे त्यासाठी भूखंड क्र.५४/१/१ ही जागा वन विभागाने मंजूर केले आहे.या उपकेंद्राची क्षमता ५ एम व्ही ए राहणार असून या उपकेंद्रातून ११ केव्ही चे ३ वीज वाहिनी राहतील.विशेष म्हणजे या उपकेंद्राकरिता १३२ केव्ही आलापल्ली उपकेंद्रातून आणि ६६ केव्ही उपकेंद्रातून असे दोन ३३ केव्ही वीज वाहिन्या प्रस्तावित केलेले आहे.सदर काम पूर्णत्वास आल्यास या परिसरातील बहुतांश गावातील विजेची समस्या सुटणार आहे. एवढेच नव्हे तर भामरागड उपकेंद्रावरील भार देखील कमी होणार आहे. त्यामुळे पेरमिली परिसरातील गावांसह भामरागडला देखील मोठा दिलासा मिळणार.

 

३३ केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,मुख्य अभियंता सुधीर हेडाऊ, गाव पाटील विठ्ठल मेश्राम, सत्यनारायण येगोलपवार, देवाजी सडमेक,बालाजी गावडे तसेच पेरमिली पट्टीतील बहुतांश नागरिक तसेच महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 22, 2024

PostImage

गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस


गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस

 

जहाल मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसर्पण

 

गडचिरोली, 22 जून : गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्या समजल्या जाणार्‍या गिरधरने आज पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले. श्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. एका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नक्षली दाम्पत्याला 25 लाख रुपयांची मदत पुनर्वसनासाठी करण्यात आली. 

आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा व माओवाद्यांच्या कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले होते. आमदार देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर याचेवर 25 लाखांचे बक्षीस होते, तर त्याच्या पत्नीवर 16 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ नक्षली कमांड असलेल्या या दोन्ही नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना मोठा हादरा बसला आहे. माओवादी गतिविधीचे प्रमुख म्हणून या दोघांकडे पाहिले जायचे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 4 वर्षांत जिल्ह्यातील एकही व्यक्ती नक्षली कारवायात सहभागी झाला नाही, हे यश आमच्या पोलिस दलाने मिळविले आहे. सी-60 पथकाने आपला दरारा असा निर्माण केला की, एकतर त्यांना शरणागती पत्करावी लागेल किंवा बंदुकीचा सामना करावा लागेल. ते या पथकाचे मोठे यश आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाचे कंबरडे मोडले आणि दुसरीकडे सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. अंतिम माणसाच्या विकासाचाच हा प्रयत्न आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचू नये, हाच प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. पण, आज तो विकास पोहोचतो आहे, हे मला अनेक दुर्गम भागात जाऊन पाहता आले आहे. गडचिरोली हा आमच्यासाठी महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. म्हणून या जिल्ह्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्योग, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण यासाठी मोठा प्रयत्न हाती घेण्यात आला आहे. मोठी गुंतवणूक या जिल्ह्यात येत आहे. कालही काही प्रकल्पांबाबत मी बैठक घेतली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आदिम जमातींसाठी 24,000 कोटींची योजना, आदिवासी संस्कृतीचे जतन, देशातील प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती अशा अनेक घटना या आदिवासींना बळ देणार्‍या आहेत. शिस्त आणि संवेदना एकत्र झाल्यानेच गडचिरोली पोलिसांबद्दल आदराची भावना आहे, असेही गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

पोलिस भरतीला स्थगिती दिली तर 17,000 पदांची भरती विधानसभांची आचारसंहिता लागणार असल्याने पुढच्या वर्षावर जाईल. त्यानंतर आणखी 9000 पोलिस भरती करायची असल्याने आणखी एक वर्ष लांबणीवर जाईल. त्यामुळे जेथे पाऊस आहे, तेथे दुसरी तारीख देऊन पदभरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आज गडचिरोलीत तर आपण केवळ स्थानिकांचीच भरती करतो आहोत. 1000 पदांसाठी गडचिरोलीतील 28,000 युवकांनी अर्ज भरले आहेत. त्यांचे वयाचे नुकसान होऊ नये, असे सांगून वेळेतच पोलिस भरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. एकीकडे नक्षली दलात एकही व्यक्ती भरती होत नाही व पोलिस दलात भरतीसाठी २८ हजार अर्ज यातून नागरिकांचा संविधानाप्रती व्यक्त विश्वास दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसार माध्यमांनी देखील गडचिरोलीची प्रतिमा उंचावण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांनी माध्यमांना धन्यवाद दिले.

 नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल यांनी केंद्र व राज्य शासनाकडून नक्षलविरोधासाठी कायम सहकार्य व मदत मिळत असल्याचे सांगितले तर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून नक्षलविरोधी कार्याची माहिती दिली. 

0

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 22, 2024

PostImage

व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित


व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

 गडचिरोली दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत सन 2024-25 या सत्राकरीता व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून 15 जुलै 2024 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

 तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत नविन व्यायामशाळा बांधकाम करणे या साठी अनुदान देण्यात येते. तसेच व्यायाम साहित्य (इनडोअर) व ओपन जिम (खुले व्यायाम साहित्य) साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.

क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मीटरचा धावणमार्ग तयार करणे, विविध खेळाची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती भिंतीचे अथवा तारेचे कुंपन करणे इत्यादी बाबी तयार करण्याकरीता संबंधित शाळा / संस्थेस अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. 

सदर अनुदानाचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, महविद्यालये याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन सुविधा निर्माण करण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव 15 जुलै 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा. विशेषत: गावातील नागरीकांना शारीरिक कवायतीकरीता लाभ पोहचावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने खुली व्यायामशाळा (ओपन जिम) चे साहित्य प्राप्त करुन घेण्याचे दृष्टीने विनाविलंब प्रस्ताव सादर करावा. 

 या योजने संदर्भात अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी इच्छुक शाळा/संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 22, 2024

PostImage

कुरखेडा ते कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल


कुरखेडा ते कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल

 

गडचिरोली दि. 22 : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ वरील कुरखेडा ते कोरची दरम्यान सती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नसून सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण मार्गावरुन वळती करण्यात आले आहे. परंतु हा वळणमार्ग पावसामुळे क्षतीग्रस्त होवू शकतो किंवा पूराच्या पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक २९ जून पासून ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

 पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा तसेच जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र. ३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

अंमलबजावणी न करणाऱ्‍या वाहतुकदार किंवा व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 22, 2024

PostImage

फुस लाऊन केले अल्पवयीन मुलीचे अपहरण ,आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी युवकाला केली अटक


फुस लाऊन केले अल्पवयीन मुलीचे अपहरण ,आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी युवकाला केली अटक

 

 

 

बल्लारपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केरला एक्स्प्रेसमधून बिहारकडे नेत असताना आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर युवकाला अटक केली. मोहम्मद मिया सलीम (३८) रा. बेलवा बिहार असे आरोपीचे नाव आहे.

२१ जुन ला नियंत्रण कक्ष, लोहमार्ग नागपूर येथुन फोनव्दारे जीआरपी पोलीस तसेच आरपीएफ माहिती मिळाली की केरला एक्स्प्रेस ने नाबलिक बालिकेला अपहरण करून बिहार ला घेऊन जात आहे. आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक यांनी दोन पथक तयार केले. त्यामध्ये शासकीय रेल्वे पोलीस, रेल्वे चाइल्ड लाईनचे क्षेत्रीय कार्यकर्ते व रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त कार्यवाहीने, ट्रेन नं १२६२५ केरला एक्सप्रेसने अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात असलेली बालिका फरांना (नाव बदलेले ) (१२) रा.दुबीलीया, कुरवा माथीया जि. पश्चिम चंपारण (बिहार) हिला एक इसम अपहरण करून नेत असल्याची माहिती मिळाली. 

नमुद ट्रेन मपोशि किर्ती मिश्रा, पोशि निलेश निकोडे, भास्कर ठाकूर, बबिता लोहकरे, चाईल्ड लाईन टीम, आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक व त्यांचे सहकारी तपास सुरू केला असता रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र. ३ वर ट्रेन आल्याने पुढील जनरल कोच मध्ये सदर बालिका मिळून आल्याने बालिकेस रे.पो. चौकी बल्हारशाह येथे आणुन हजर केले. विचारपूस केली असता बालिकेसंदर्भात पो स्टे. अंबलापुझा केरला येथे तक्रार दाखल असुन सदरचे पो.स्टे चा पोलीस स्टॉफ त्या मुलीला ताब्यात घेण्याकरीता येत आहे. 

बाल कल्याण समिती, चंद्रपूर येथे दाखल करणे असल्याने नमुद बालिकेची वैद्यकिय तपासणी करून सदर बालिके विषयी माहिती तात्काळ अजय साखरकर, बाल संरक्षण अधिकारी आणि बाल कल्याण समिती, अध्यक्षा ऍड. क्षमा बासरकार यांना दिली व त्यांच्या मौखिक आदेशाने बालिकेला तात्पुता निवारा करिता सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर येथे ठेवण्यात आले असून आरोपीविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 22, 2024

PostImage

दोन ट्रकच्या‌ समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार


दोन ट्रकच्या‌ समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार

 

आष्टी :‌ गडचिरोली महामार्गावर दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक ट्रकचालक जागीच ठार झाल्याची घटना २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी- गडचिरोली महामार्गावर कोणसरी प्रकल्पाच्या समोर घडली. विकास कुमार बिंद (२४) जिल्हा आदिलाबाद असे मृतकाचे नांव आहे. दुसरा ट्रक चालक जितेंद्र कुमार पटेल (२९) हा किरकोळ जखमी आहे. अपघाताची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विशाल काळे घटनास्थळी पोहोचले आणि मृत

व्यक्तीला ट्रकमधून बाहेर काढले त्यानंतर त्याचे प्रेत पोस्टमार्टम करिता आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

June 22, 2024

PostImage

तुमरगुंडा रस्त्याच्या बाजूला वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट


तुमरगुंडा रस्त्याच्या बाजूला वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट 

 

 

 

एटापल्ली: गेल्या तीन चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथील गांडा दोहे वड्डे यांचे एटापल्ली - तुमरगुंडा रोडवर रोडच्या बाजूला वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १९ जून रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास घडली आहे. अचानक ढग काळवंडून आल्याने पावसाच्या दृष्टीने झाडाचा आसरा घेण्यासाठी झाडाखाली बैलजोडी थांबली होती अशातच‌ सोसाट्याच्या वाऱ्याने रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. झाडाखाली असलेल्या बैलावर अचानक वीज पडली आणि या बैलजोडीचा जागेवरच मृत्यू झाला सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. अश्यातच बैल जोडी गेल्याने गांडा वड्डे यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जिवापाड प्रेम असणारी ही बैलाची जोडी मृत्यमुखी पडल्याने त्यांना शोक अनावर झाला आहे.

घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक २० जून रोजी सकाळी घटनास्थळी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी गहाणे यांना पाचारण करून दोन्ही बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर बैल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे व आता शेतीचे काम असल्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यात यावी जेणेकरून लवकरात लवकर मदत मिळाल्यास दुसरी बैलजोडी घेऊन शेतीचे काम करता येईल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले


PostImage

Gadchiroli Varta News

June 21, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात चिखल फेक आंदोलन


गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात चिखल फेक आंदोलन

 

महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन.

 

गडचिरोली : राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. 

महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी भाजप सरकार विरोधात, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येते भाजप सरकारच्या प्रतिकृती पुतळ्यावर चिखल फेक करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,सचिव,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कवासे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत,अ. जा. जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत,उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली शंकरराव सालोटकर,शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली दत्तात्रय खरवडे, जिल्हासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली सुनील चडगुलवार,महासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली देवाजी सोनटक्के, सोशलमीडिया जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली संजय चन्ने, रवी मेश्राम,दिवाकर निसार, पुष्पलताताई कुमरे, अपर्णाताई खेवले, आशाताई मेश्राम, ममताताई मेश्राम, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, कुसुमताई आलाम, छायाताई कोव्हे, पांडुरंग घोटेकर, प्रफुल आंबोरकर,काशिनाथ भडके, श्रीनिवास तडपल्लीवार, सुरज भांडेकर, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, घनश्याम मुरवतकर, चारुदत्त पोहाणे, माजीत भाऊ, ओमप्रकाश डोंगरे, राजेंद्र कुकडकर, बाबुराव गडसूलवार, उमेश उईके, सुरज मडावी,प्रशांत कापकर, अनुप सिकंदर,भरत येरमे, नंदू वाईलकर,हंसराज उराडे, दिगंबर धानोरकर, कल्पक मोप्पीडवार, चंद्रकांत मडावी, सुदर्शन उंदीरवाडे, भैय्याजी मुद्दमवार, नीलकंठ भांडेकर, लतीफ तोरे, टय्या खान, जावेद खान, अविनाश श्रीरामवार सह जिल्ह्यातील काँग्रेस सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 21, 2024

PostImage

जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या


जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या

 

चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील नागभीड Naghbhid तालुक्यातील मौशी गावात जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समोल आला आहे. आसाराम दोनाडकर (वय 67) असं मृत वृद्धाचे नाव आहे. 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील झाली.

 

ही मारहाण ते बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी Hospital रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड Police officer पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी संतोष जयघोष मैंद (वय 26), श्रीकांत जयघोष मैंद (वय 24), रुपेश देशमुख (वय 32) या संशियतांना Arrest अटक केली.


PostImage

Gadchiroli Varta News

June 21, 2024

PostImage

बहुजनांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार!


बहुजनांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार!

 

नवनिर्वाचित खासदार डाॅ.नामदेव किरसान यांचे प्रतिपादन

 

देसाईगंज-

     देशात लोकशाही विरोधी शक्ती डोके वर काढुन बहुजनांचे अबाधित अधिकार संपवण्याच्या मार्गावर होते. यामुळे संविधान धोक्यात येण्याची शक्यता बळावली असतांना बहुजनांनी पार पडलेली लोकसभा निवडणुक आपल्या हातात घेऊन बहुजनांच्या अधिकारांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून भरघोस मताने निवडून दिलात.तो टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डाॅ.नामदेव किरसान यांनी केले.

    ते देसाईगंज येथील गोंडवाना गोटूल भुमी समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजच्या वतिने आयोजित सत्कार संभारंभाला उत्तर देतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजचे अध्यक्ष किशोर कुंमरे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,काँग्रेस कार्यकर्ते रामदास मसराम,मनोहर पोरेटी,छगन शेडमाके,पिंकु बावणे,संजय करंकर,लिलाधर भर्रे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

    दरम्यान डाॅ.किरसान पुढे बोलतांना म्हणाले की आदिवासी संस्कृती ही जगातील आदर्श संस्कृती असुन देशातील जल,जंगल जमिनीचे संरक्षण व संवर्धन करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे.मात्र वर्तमान स्थितीत आदिवासींच्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न केल्या जात असुन संविधानीक मिळालेल्या ७.५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणे तर दूरच आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासूनच रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्याच धर्तीवर ओबीसींना देखील डावलण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.हा संभाव्य धोका ओळखून समस्त बहुजनांनी एकवटू आपल्या न्याय हक्काची लढाई स्वत: लढली,त्याचाच परिणाम म्हणून लोकप्रतिनीधी पदी वर्णी लागली असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

    कार्यक्रमाचे संचालन रतन सलामे यांनी,प्रास्ताविक अनिल मडावी यांनी तर आभार धिरजशाह मडावी यांनी मानले.कार्यक्रमाला आदिवासीच्या एकुण १७ विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 21, 2024

PostImage

लॉयड्स मेटल सुरजागडच्या वतीने हेडरी येथे जागतिक योगा दिवस साजरा


लॉयड्स मेटल सुरजागडच्या वतीने हेडरी येथे जागतिक योगा दिवस साजरा.

 

लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन,लोह खनिज खाण सुरजागड च्या वतीने मौजा हेडरी येथील निसर्गरम्य वातावरणात अससेल्या परिसरातील पटांगणात जागतिक योगा दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. के.सत्या राव सर, श्री. साई कुमार सर, श्री अरुण रावत सर, शेट्टी सर , राज्या सर यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमाला लोकांना ने-आन करण्या करिता बस सेवा पुरविण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रशिक्षक संगीता मॅडम सदर कार्यक्रमाला 1200 च्या अधिक लोक या कार्यक्रमात सहभाग घेवुन जागतिक योगा दिवसाचे आनंद घेतले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकरिता नाष्टा, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केलेली होती.

सर्वांना आजच्या योगा दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होवून आनंद झाल्याने सर्वांनी आयोजक लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी योगा प्रशिक्षक मा. संगीता मॅडम, सहाय्यक प्रशिक्षक अरविंद सर सर यांचं शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन,लोह खनिज खाण सुरजागड च्या टीम नी भरपूर मेहनत घेत कार्यक्रमाला यशस्वी केली. सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 20, 2024

PostImage

उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील आणखी एका गावाने केली माओवाद्यांना गावबंदी


उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील आणखी एका गावाने केली माओवाद्यांना गावबंदी

 

पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा भटपार येथील नागरिकांनी स्वत:हून पोस्टे येथे कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश्य वस्तू, वायर, बॅटरी व सलाखी (Spikes) केले जमा

 

नुकतीच पोस्टे धोडराज हद्दीतील सात गावातील नागरिकांनी केली होती माओवाद्यांना गावबंदी

 

 गडचिरोली जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो. 

 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने पोलीस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी माओवाद्यांनी आय.ई.डी. हल्ले आणि क्लेमोर माईन्स मोठ¬ा प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले होते. परंतू गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावक­यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावक­यांचा विश्वास दृढ झाला. त्यामुळे माओवाद्यांचा सुरक्षा रक्षक दलास नुकसान पोहचविण्याचा व घातपात करण्याचा कोणताही मनसूबा यशस्वी होऊ शकला नाही. 

 

आज दिनांक 20/06/2024 रोजी पोलीस स्टेशन धोडराज हद्दीतील मौजा भटपार गाव जंगल परिसरातील घोटपाडी पहाडी जवळ माओवाद्यांनी सुरक्षा रक्षक दलास नुकसान व घातपात करण्याच्या उद्देशाने खडा बनवून त्यात लावण्यात आलेल्या लोखंडी टोकदार सलाखी (Spikes) तसेच कुकर मध्ये ठेवलेले आयडी सदृश वस्तू, वायर व बॅटरी मौजा भटपार गावातील नागरिकांनी स्वतःहून पोलीस स्टेशन ला येऊन जमा केल्या व यासोबतच तेथील गावक­यांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज प्रभारी अधिकारी यांचेकडे सुपुर्द केला. यापुर्वीही दिनांक 14/06/2024 रोजी पोस्टे धोडराज हद्दीतील सात गावातील नागरिकांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता.

 

सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी श्री. अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणा­या मौजा भरपार येथील नागरिकांचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अतिदुर्गम भागातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट¬ा प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. 

------------।।।--------------


PostImage

Gadchiroli Varta News

June 20, 2024

PostImage

आंदोलनादरम्यान अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या ९ आंदोलकाविरुद्ध  पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल


आंदोलनादरम्यान अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या ९ आंदोलकाविरुद्ध  पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल

 

भद्रावती :- कर्नाटका-एम्टा कंपनीच्या खुल्या कोळसा खाणीच्या विरोधात बुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या ९ आंदोलकाविरुद्ध भद्रावती पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

दि.१९ जून रोज बुधवारला बरांज येथील कर्नाटका एम्टा कंपनीत काँग्रेस तर्फे प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व या मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले होते. आंदोलनादरम्यान कर्नाटका- एम्टा कंपनीचे मुख्य अधीक्षक अभियंता यश शिवाप्रसाद यांना खासदारांचे बंधू प्रवीण काकडे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण का केल्या नाही असा प्रश्न विचारत शिवीगाळ केली. याचवेळी एका आंदोलकाने शिवाप्रसाद यांच्या श्रीमुखात लगावली. याप्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री ८ वाजता तक्रार देण्यात आली. त्यानुसार प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांच्या विरोधात भा.दं.वि.१४३, १४७, १४९, ३५३, २९४, ५०६, ३३२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. 

 

बरांज येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या घेऊन काँग्रेस तर्फे खा.प्रतीभा धानोरकर यांच्या नेतृत्वात सदर कंपनी परिसरात आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनादरम्यान खासदार प्रतीभा धानोरकर यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांविषयी कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आंदोलनकर्ते आक्रमक झाले व त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत कंपनीचे मुख्य अधीक्षक अभियंता यश शिवाप्रसाद यांना थापड मारली. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार यश शिवाप्रसाद यांनी भद्रावती पोलिसात केली. त्यानुसार सदर आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

June 20, 2024

PostImage

दिव्यांग-अव्यंग जोडप्यास विवाह प्रोत्साहन लाभ वितरीत दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे - आयुषी सिंह


दिव्यांग-अव्यंग जोडप्यास विवाह प्रोत्साहन लाभ वितरीत

दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे - आयुषी सिंह

 

गडचिरोली दि. २० : दिव्यांग व्यक्तींकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या 10 जोडप्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रती जोडपे 50 हजार याप्रमाणे बचत प्रमाणपत्र, धनादेश व भेटवस्तू देण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून, दिव्यांग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरीता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते, त्याप्रमाणे दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या विवाहीत जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती श्रीमती सिंह यांनी दिली. 

किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास योजनेचा लाभ दिला जातो. वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा अशी पात्रतेची अट आहे. 

 या योजनेंतर्गत प्रत्येक जोडप्यास रुपये २५ हजार चे बचत प्रमाणपत्र, रुपये २० हजार रोख स्वरुपात व रुपये ४ हजार ५०० चे संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल. तर रुपये ५०० स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येतात.

कार्यक्रमाला गायत्री सोनकुसरे, पुष्पा पारसे, रतन शेंडे, निलेश तोरे, निखील उरकुडे, माया गायकवाड व समाज कल्याण विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 20, 2024

PostImage

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन


महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

गडचिरोली, दि.20 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या बाबीकरीता शेतकऱ्‍यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात चामोर्शी, अहेरी व सिरोंचा या तालुक्यात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंअंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस करीता अर्ज करण्याचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत आहे. 

 

 वरील निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खाते या बाब अंतर्गत शेतकऱ्‍यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 20, 2024

PostImage

जिल्ह्याला मिळाले 19 वैद्यकीय अधिकारी ,या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी


जिल्ह्याला मिळाले 19 वैद्यकीय अधिकारी ,या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी

जिल्हा निवड समितीमार्फत शिघ्रतेने पदभरती

           गडचिरोली दि. 19 : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांची निकड लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष विजय भाकरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह व समितीने शिघ्रतेने कार्यवाही करत दोन दिवसातच 80 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखत घेवून लगेचच 19 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. 

जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक असल्याने सदरची नियुक्ती प्रक्रिया तातडीने राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिली. ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह अनेक दिवसांपासून आग्रही होत्या. 

                जिल्हा परिषद,गडचिरोली आरोग्य विभाग अतंर्गत सहा एम.बी.बी.एस.व 13 बी.ए.एम.एस अहर्ता धारक वैद्यकीय अधिक-यांच्या रिक्त पदाकरिता थेट मुलाखत दिनांक 18 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. याकरिता वृत्तपत्रात जाहिरात तसेच एन.आय.सी. व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशीत करण्यात आलेली होती. या पदभरतीकरिता गडचिरेाली, गोदिया, चंद्रपुर, नागपुर, भंडारा, अमरावती, यवतमाळ या जिह्यातील एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. शैक्षणीक अहर्ता धारक उमेदवार उपस्थीत होते. विशेष म्हणजे 19 जागांकरिता 80 अर्ज प्राप्त झाले होते. जिल्ह्यात आरोग्य सेवेत काम करण्यासाठी प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाला.

या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी

: येनाापूर, कारवाफा, पेंढरी, अडपल्ली, कसनसुर, रांगी, सावंगी, वैरागड, देवूळगाव, आमगाव, गट्टा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, कमलापूर, कसनसुर, आरेवाडा, अंगारा, लगाम व फिरते आरोग्य पथक कोरची या 19 प्राथमिक आरोग्य केंद्रावर नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

             नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात दिवसात रूजू व्हावे अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, अशा सूचना नियुक्ती आदेशात देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 20, 2024

PostImage

विज पडण्याची सूचना देणार ‘दामिनी’, मोबाईल ॲप वापरून पडणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन


विज पडण्याची सूचना देणार ‘दामिनी’,

मोबाईल ॲप वापरून पडणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

 

गडचिरोली,(जिमाका) दि.20 : मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. विज पडून जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी ” अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणारआहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सदरचे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा व इतरांनाही दामिनी ॲप वापरण्यास प्रवृत्त करावे.

सदरचे अॅप जीपीएस लोकेशन ने काम करीत असून त्यात विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी सूचना देण्यात येते. सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 20, 2024

PostImage

बेकायदेशीरपणे मंजूर लेआऊट तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी


 

बेकायदेशीरपणे मंजूर लेआऊट तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी 

 

गडचिरोलीत दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार 

 

गडचिरोली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने शेतजमिनी अकृषक करून लेआऊटांना मंजूरी देवून २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नगर रचना व मुल्यांकन अधिकारी आणि भूमाफियांनी केला असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी शहानिशा करून सक्तवसुली संचालनालय आणि शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सध्या गाजत असलेल्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांडातील आरोपी असलेल्या गडचिरोली येथील नगर रचना व मुल्यांकन अधिकारी सौ. अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) यांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे पुरग्रस्त, शासकीय व भूदान यज्ञ वाटप आणि गोसेखुर्द, कोटगल, चिचडोह बॅरेज तसेच अन्य सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनी ग्रिन बेल्ट मध्ये असतांनाही त्या जमीनी अर्थपूर्ण व्यवहार करुन अकृषक करण्यात आल्या व त्यावर लेआऊट मंजूर करुन २ हजार कोटी रुपयांहून अधिकचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे.

 

सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणी पुरग्रस्त, शासकीय व भूदान यज्ञ वाटप आणि गोसेखुर्द, कोटगल, चिचडोह बॅरेज तसेच अन्य सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनी ग्रिन बेल्ट मध्ये असतांनाही त्या जमीनी बेकायदेशीरपणे अकृषक करण्यात सौ. अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) संबंधित लेआऊट धारकांसह अन्य कोणकोणाचा सहभाग आहे व त्यातून किती कोटींची संपत्ती संबंधितांनी लाटली याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असेही भाई रामदास जराते यांनी लक्षात आणून दिले आहे.

 

नगर रचना व मुल्यांकन अधिकारी सौ.अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) यांच्या कार्यकाळात पुरग्रस्त, शासकीय व भूदान यज्ञ वाटप आणि गोसेखुर्द, कोटगल, चिचडोह बॅरेज तसेच अन्य सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील व शेतजमिनी ग्रिन बेल्ट मध्ये असतांनाही त्या जमीनी बेकायदेशीरपणे अकृषक करून लेआऊट मंजूर करण्याच्या प्रकरणांची शहानिशा करून सदर अकृषक प्रकरणांची व लेआऊटची मंजुरी कायमस्वरूपी रद्द करण्यात येवून दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी सक्तवसुली संचालनालय, मुंबई (E.D.) आणि शासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा करावा अशी विनंतीही शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 19, 2024

PostImage

देसाईगंज आय.टी.आय. मध्ये 21 जून ला रोजगार मेळावा


देसाईगंज आय.टी.आय. मध्ये 21 जून ला रोजगार मेळावा

 

गडचिरोली,दि.19(जिमाका): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे” आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर मेळाव्याचे उद्घाटन आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथि म्हणून तहसिलदार प्रीती डुडूलकर, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, भारतीय स्टेट बँक वडसाचे प्रबंधक राजू एम. मुंडे तसेच आफताब आलम खान, प्रा. लालसिंग खालसा, प्रा. दामोधर शिंगाडे प्राचार्य, संजय कुथे, इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या मेळाव्यात दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र, आयटीआय तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, उच्च शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार व शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जांच्या विविध योजनेविषयी बँकेचे अधिकारी सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी आणि पोलिस भरती व अग्निवीर योजनेविषयी माहिती दिली जाणार आहे. 

सदर संधीचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी घेण्याचे आवाहन योगेंद्र शेंडे सहा. आयुक्त कौशल्य विकास व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार आणि कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी केले आहे.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 19, 2024

PostImage

सिकल सेल रुग्णाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ आणणे हेच आपले ध्येय ; मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह


सिकल सेल रुग्णाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ आणणे हेच आपले ध्येय ; मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

जागतिक सिकलसेल दिन जनजागृती रॅलीने साजरा

 

गडचिरोली दि 19 : जिल्हयात सुरु असलेल्या "मुस्कान" एक वाटचाल.. सिकल सेल मुक्त गडचिरोली कडे… हा कार्यक्रम 6 ते 19 वर्ष वयोगट शालेय तसेच शाळा बाह्य सर्वच विद्यार्थ्यांचे सिकल सेल तपासणी, आजाराबाबत आणि लग्नापूर्वीचे समुपदेशन, आजारी विद्यार्थ्यांना नियमित औषध व पाठपुरावा तसेच शासनाच्या योजनेचे लाभ मिळवून देत आहे. ‘मुस्कान’ कार्यक्रमाच्या माध्यमाने सर्व सिकल सेल रुग्णाच्या चेहऱ्यावर मुस्कान आणणे हेच आपले ध्येय असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आज सांगितले.

जागतिक सिकल सेल दिनानिमित्त आज इंदिरा गांधीचौक ते महिला व बाल रुग्णालय पर्यंत जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रशांत आखाडे, सहायक संचालक हत्तीरोग डॉ सचिन हेमके, जिल्हा साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ रुपेश पेंदाम यावेळी उपस्थित होते.

ऑक्टों 2023 पासून जिल्ह्यात एकूण 1530 गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात अली आहे. त्या पैकी 54 स्त्रिया या सिकल सेल वाहक म्हणुन व 17 जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले व अश्या सर्व 17 स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात आली आहे. लग्नापुर्वी सर्वानीच सिकलसेल तपासणी करावी. उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप हे स्थापन करण्यात यावे जेणेकरून सर्व सिकलसेल वाहक आणि रुग्ण व्यक्तीचा नियमित औषधी व आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा घेण्यात येईल. जिल्ह्यात सिकलसेल चे नवीन रुग्ण होऊन नये व आहेत त्या रुग्णांना नियमित आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य विभाग हे तत्पर आहे. हे कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रांसाठी पाथ ही संस्था आरोग्य विभागासोबत कार्यरत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.

 

 यावेळी प्राचार्य उत्तम खंते,श्रीमती नेहा ओलाख ,जिल्हा नोडल अधिकारी डॉ पंकज हेमके,पाथ संस्था प्रकल्प अधिकारीडॉ नरेंद्र कुंभारे,सिकलसेल कोऑडीर्रनेटर रचना फुलझेले उपस्थित होते. रॅली मध्ये श्री साईइंस्टीटयुट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स चे बीएससी व जीएनएम चे विद्यार्थी आणि सामान्य रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थीनी,आशा स्वयंसेविका यांनी सिकलसेल विषयी बॅनर , पोस्टर व्दारे जनजागृती करुन शोभा वाढवली,यामध्ये सिकलसेल विषयी निदान ,उपचार समुपदेशन याविषयी चे पोस्टर,बॅनर लोकांचे लक्ष वेधुन घेत होते, त्यांनी सिकलसेल कार्यक्रमाविषयी समर्पक अशी प्रसिध्दी केली त्याबदृल सर्व जिल्हा स्तरीय अधिका-यांनी त्यांचे कौतुक केले. जनजागृती मध्ये रॅली चे महत्व उपस्थितांना सांगितले. डॉ.प्रशांत आखाडे, वैद्यकिय अधिक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णांलय गडचिरोली यांनी उपस्थित सर्वाना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले. 

 कार्यक्रमात एकुण 31 सिकलसेल रुग्णांची CBC, LFT, KFT या तपासण्या करुन त्यांना हायड्राक्सीयुरीया हे औषध सुरु करण्यात आले व सिकलसेल आजाराबाबत समुपदेशन करण्यात आले. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 19, 2024

PostImage

एक रुपयात पीक विमा : योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैची मुदत


एक रुपयात पीक विमा : योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैची मुदत 

 

 

गडचिरोली, दि.19 : खरीप हंगाम 2024 करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. केवळ एक रुपया प्रती अर्ज एवढी रक्कम भरुन पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करण्याचे आवाहन, कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

 

     राज्यात खरीप हंगाम 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राज्यात ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी 2025-26 हंगाम या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी वीमा क्षेत्र घटक धरुन ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. 

 

विमा कंपन्यांचे नाव व टोल फ्री क्रमांक

 

गडचिरोली जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001024088 हा टोल फ्री क्रमांक आहे.

 

*पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश*

 

हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पेरणी पासून काढणी पर्यंतच्या  

कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत समावेश करण्यात आला आहे.

 

       आधारकार्ड, 7/12 उतारा, 8 अ, आधार संलग्न बॅक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बॅक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे.  

           


PostImage

Gadchiroli Varta News

June 19, 2024

PostImage

जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांना लवकरच मिळणार नवीन आधार केंद्र जनसंवादातून सुशासनाकडे’ कार्यक्रमाचा परिणाम


जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांना लवकरच मिळणार नवीन आधार केंद्र

जनसंवादातून सुशासनाकडे’ कार्यक्रमाचा परिणाम

नागरिकांच्या समस्येची तात्काळ दखल

गडचिरोली दि. 19 : शासनाच्या बहुतांश योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना आधार कार्ड बनवने सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारे प्रत्येक नवीन महसूल मंडळात आधार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. 

जिल्हा प्रशासनाने नुकतेच ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ हा दूरदृष्‍यप्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांशी संवादाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात दिनांक 13 जून रोजी झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात दुर्गम भागातील अनेक लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने ते शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या होत्या. याची तात्काळ दखल घेवून प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आधारकार्ड समस्येबाबत पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत चौकशी केली. आधार कार्डमुळे शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहू नये आणि सर्वांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व महसूल मंडळ स्तरावर आधार केंद्र स्थापण करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार राज्य शासनाकडे नवीन 20 आधार संच मिळण्याची मागणी प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे. 

शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांकडे आधार कार्ड असणे व ते अद्यावत असणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त, अतिदुर्गम व भौगोलिक क्षेत्राने मोठा असून उपलब्ध आधार नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने अतिरिक्त 20 आधार नोंदणी संच पुरवठा करण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे केली आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात एकूण 59 महसूल मंडळ आहेत. यात जुने 40 व 19 नवीन स्थापण झालेले महसूल मंडळ आहेत. या 19 नवीन महसूल मंडळात कुरखेडा तालुक्यातील कढोली, कोरची तालुक्यातील बेडगाव, कोटगूल व बसेली, गडचिरोली तालुक्यात येवली, पोर्ला, पोटेगाव, धानोरा तालुक्यात चातगाव, सुरसुंडी, रांगी, मुलचेरामध्ये लगाम माल, एटापल्लीतील कोटमी, बुर्गी, हालेवारा व तोडसा, भामरागड तालुक्यातील लाहेरी व ताडगाव तसेच सिरोंचा तालुक्यातील बाम्हणी यांचा समावेश आहे. या नवीन महसूल मंडळाचे ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालकातून नवीन आधार केंद्र चालकांची निवड करण्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचनाही प्रभारी जिल्हाधिकारी भाकरे यांनी संबंधीत तहसिलदार यांना दिल्या आहेत.

000


PostImage

Gadchiroli Varta News

June 19, 2024

PostImage

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चारा उपचाराचे प्रात्यक्षिक


कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चारा उपचाराचे प्रात्यक्षिक

 

चामोर्शी 

         तालुक्यातील फोकूर्डी इथे १९ जुन रोजी केवळरामजी हर्डे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चारा उपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखवले. युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार करण्याच्या प्रात्यक्षिकात एक लिटर पाण्यात ५०० ग्रा. गूळ, ५० ग्रा. मीठ व ९ ग्रा. युरिया एकजीव करून एक किलो वाळलेला चारा वर शिंपडून त्याचे मिश्रण केले आणि हा चारा २१ दिवसांनी गुरांना खायला देण्याचा सल्ला कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिला.

 फायदे - 1) चाऱ्याच्या पोषक घटकांमध्ये वाढ होते, 

2)त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनातदेखील वाढ होते.

3)जनावराची शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता ही सुरळीत राखली जाते.

4(अगदी कमी खर्चात व कमी वेळात जनावरांना पौष्टिक, सकस आहार उपलब्ध करून देता येतो. 

यावेळी डॉ. आदित्य कदम, प्रा. छबिल दुधबळे,प्रा. पवन बुद्धबावरे,प्रा. निकिता येलमूले, प्रा.प्रलय झाडे यांनी मार्गदर्शन केले.

सदर प्रत्यक्षिकाच्या वेळी विद्यार्थी   

तन्मय झाडे, अनिकेत येनुरकर, हर्ष थुटे, प्रज्योत उराडे, रजी पोठीया आणि शेतकरी आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 19, 2024

PostImage

चिचडोह बॅरेजच्या 38 दरवाज्यातून उद्या पाणी सोडणार‌; गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन


चिचडोह बॅरेजच्या 38 दरवाज्यातून उद्या पाणी सोडणार‌; गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

 

 

गडचिरोली,दि.19 : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे सर्व 38 दरवाजातून 190.23 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे या नदीकाठाने राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

गोसीखुर्द धरणातून 40 घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने दिनांक 29 जून 2024 पर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा 179.800 मी. पर्यंत वाढेल, त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

 वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी 691 मीटर असून त्यावर 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. चिचडोह बॅरेजमध्ये दिनांक 18 जून 2024 रोजी पाणी पातळी 178.90 मी. व पाणीसाठा 11.285 द.ल.घ.मी. इतका आहे. 

*या गावांनी आहे धोका* : गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपूरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनकोडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी,साखरा, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा,विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ.

वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.  

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 18, 2024

PostImage

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा; बँकर्स आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा; बँकर्स आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

गडचिरोली दि 18: शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे तसेच कीटकनाशकांची उपलब्धता वेळेवर व्हावी याकरिता खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी बँकाना दिले. तसेच शेतकऱ्यांनी देखील कर्ज मागणीसाठी बँकेकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 श्री भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्जाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच घेण्यात आला, यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत घोंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नारायण पौणीकर, भारतीय रिझर्व बँकेचे क्षेत्रीय अधिकारी श्री गणवीर, आरसेटीचे संचालक कैलास बोलगमवार, युवराज टेंभुर्णे, तसेच विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     श्री भाकरे यांनी पुढे सांगितले की पाऊस पडायला सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांकरिता पुढील तीन-चार आठवडे महत्वाचे असून बँकानी त्यापुर्वी विशेष मोहिम राबवून खरीप पिक कर्ज वाटप पुर्ण करावे. राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांतर्फे पीककर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्जासोबतच बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांतर्गत प्राधान्यक्रम क्षेत्रात (कृषी, कृषी संलग्न व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, गृह कर्ज, शिक्षण, वनीकरण इत्यादी ) कर्जवाटपाचे जास्तीत काम करण्याचे व चालु आर्थिक वर्षासाठी मागील वर्षीपेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवण्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षात एकूण 1770 कोटी वार्षिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी कृषीसाठी एकूण 650 कोटी त्यात खरीप पीक कर्जासाठी३३५ कोटी व रब्बी साठी 50 कोटी व कृषी मुदत कर्जासाठी 265 कोटीचे उद्दीष्ट आहे. याशिवाय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमइ) 420 कोटी, इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 150 कोटी व प्राथमिक क्षेत्र वगळून 550 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात 31 मे 2024 पर्यंत 76 कोटीचे खरिप पीक कर्ज वाटप झाले आहे. 

मागील आर्थिक वर्षात एकूण 1675 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते यात जिल्ह्याने 1941.17 कोटीचे कर्जवाटप करून चांगली कामगिरी करत 115.89 टक्के उद्द‍िष्ट साध्य केले. त्यात पीक कर्जासाठी 375 कोटीच्या उद्दिष्टापैकी 189 कोटी 63 लाख खरिप व 14 कोटी 7 लाख रब्बीसाठी असे एकूण 203 कोटी 70 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सादर केली.

खत वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर नको

खत वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर पडू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यासाठी रामागुंडम येथील नॅशनल फर्टीलायझर कंपनीद्वारे जिल्ह्याभरात रोड वाहतूक द्वारे खत उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित कंपनीस पत्र देण्याचे तसेच वडसा रेल्वे स्टेशनवरील खतरॅकपॉईंटला पावसापासून बचावासाठी छत बांधून बंदिस्त खोली वाढविण्याकरिता विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांना सुद्धा पत्र देण्याच्या सूचना श्री भाकरे यांनी दिल्या. 

तक्रार निवारण कक्ष सक्रीय ठेवा

बी-बीयाणे, खते, किटकनाशक व पीककर्जाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी स्थापण करण्यात आलेले तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष सक्रीयपणे कार्यरत राहण्याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांची कर्ज प्रकरणे, आरसेटी अंतर्गत प्रशिक्षणाच्या कामकाजाचा तिमाही आढावा घेतला.

बैठकीला संबंधीत अधिकारी व विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 18, 2024

PostImage

कोपरअल्ली येथील आत्राम कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती!


कोपरअल्ली येथील आत्राम कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती!

 

मुलचेरा : तालुक्यातील कोपरअल्ली येथील आदिवासी विद्यार्थी संघ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष आत्राम यांच्या मुलांचा नवस कार्यक्रम कोपरअल्ली येथे त्यांच्या राहते घरी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाची निमंत्रण आत्राम कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.

 

यावेळी अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आविस काँग्रेस जेष्ठ कार्यकर्ते कवडू चल्लावार,रवी झाडे,चौधरी साहेब,सुबल मंडल,नंदीभाऊ,नरेश गर्गम,विनोद रामटेकेसह समस्त आविसं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 18, 2024

PostImage

तब्बल तीन महिन्यानंतर वृद्धाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला सांगाडा


तब्बल तीन महिन्यानंतर वृद्धाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला सांगाडा.

 

 

 गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज.

 

 भद्रावती - शहरातील हनुमान नगर भद्रावती येथील वृद्ध तीन महिन्यापूर्वी घरून निघून गेले होते त्यांचा हाडाचा सांगाडा पिपर बोडी येथील जंगलात झाडाला लटकून असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. कपडे व गळ्यातील माळ यावरून मृतदेहाची ओळख पटली. ही घटना दिनांक १५ रोज शनिवारला उघडकीस आली. प्रभाकर दादाजी नक्षीने वय ७२ वर्ष राहणार हनुमान नगर असे मृतकाचे नाव आहे.

 प्रभाकर हे दिनांक २६ मार्च पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुंटूबियानी इतर शोधाशोध केली परंतु ते मिळाले नाही. त्यानंतर त्यांची बेपत्ता असल्याबाबतची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली गेल्या तीन दिवसांपूर्वी भद्रावती येथील बिअर बार मध्ये काही नागरिक पिपर बोडीच्या जंगलात लटकलेल्या अवस्थेत सांगाडा असल्याची चर्चा करत होते ही माहिती ठाणेदार बिपिन इंगळे यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांनी पिपर बोडी गावापासून सहा किमी अंतरापर्यंत जंगल शोधून काढले असता त्यांना एका झाडावर अंगावर कपडे असलेला सांगाडा दिसला अंगात असलेले कपडे, गळ्यातील माळ व चप्पल यावरून बेपत्ता असलेल्या तक्रारीचा शोध घेण्यात आला. सचिन नक्षीने याचे वडील असल्याची माहिती मिळाली गळ्याला दोर बांधून गकफास घेतल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. ही घटना तीन महिन्यापूर्वी असल्याने शरीरावरील संपूर्ण मास गळून पडले होते. वृद्धाचा सांगाडा हा फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासीसाठी पाठविला असून आत्महत्या की घातपात याचा शोध भद्रावती पोलीस घेत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 17, 2024

PostImage

रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात ना. विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते प्रश्न उपस्थित करणार


 

 रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात ना. विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते प्रश्न उपस्थित करणार 

 

 शिष्टमंडळाला नामदार विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

 

नामदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन देतांना प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आरिफ कनोजे

 

 

गडचिरोली: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अधिनियमान्वये प्रत्येक वयस्क नागरिकास वर्षभरात १०० (शभर) दिवस अकुशल कामाद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आली आहे. एखाद्या नागरिकाने कामाची मागणी केल्यास त्यास १५ दिवसांच्या आत त्याच्या निवासस्थानापासून ५ किलोमीटर अंतरावर काम उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.

 

परंतु गडचिरोली जिल्ह्यात मनरेगाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. मजुरांना ६० टक्के अकुशल कामे उपलब्ध करुन दिल्यानंतरच ४० टक्के कुशल कामे करावीत, असेही मनरेगा अधिनियमात नमूद आहे. मात्र, अकुशल कामांपेक्षा कुशल कामे अधिक करण्यात आली आहेत. एखाद्या गावात कोणते काम करायचे आहे, त्याविषयी ग्रामपंचायत प्रस्ताव पाठवित असते. परंतु येथे थेट मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला आदेश येतो, त्यानंतर जिल्हा प्रशासन संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास कामाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश देतो आणि पुढे खासगी एजंसीचा शहं’शाह’ आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटप करतो, असा विचित्र प्रकार गडचिरोली जिल्ह्यात सुरु आहे.

 

हा प्रकार येथेच थांबत नाही; तर हा शहं’शाह’ कामाच्या देयकातून ४० टक्के रक्कम वजा करुन संबधित कंत्राटदाराला उर्वरित रक्कम देतो. जेथे ४० टक्के रक्कम वजा होत असेल, तेथे कामाची गुणवत्ता किती ढासळली असेल, याचा अंदाज येऊ शकतो. या अफलातून प्रकाराबाबत मनरेगा यंत्रणेचा कोणताही अधिकारी बोलावयास तयार नाही.

 

एकूणच मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याची शंका आहे. त्यामुळे २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात झालेल्या संपूर्ण कामांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आपण विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन सरकारला जाब विचारावा, अशी विनंती पेंदोरकर यांनी निवेदनातून केलेली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 17, 2024

PostImage

अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी २३५ कोटी दंड आकारणी ;जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात तहसीलदार गडचिरोली कार्यालयाकडून धडक कारवाई


अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी २३५ कोटी दंड आकारणी ;जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात तहसीलदार गडचिरोली कार्यालयाकडून धडक कारवाई

 

 

 

 गडचिरोली दि.१७ : रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात मागील तीन दिवसापासून मोठ्या क्षेत्राची तांत्रिक मोजणीची कार्यवाही सुरू होती. आज ती पूर्ण झाली असून संबंधित जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस तब्बल २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध उत्खननाकरिता २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम का आकारणी करू नये, याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तहसीलदार संजय पवार यांच्या निगराणीखाली ही कारवाई केली गेली. तहसिलदार हेमंत मोहरे यांनी दंड आकारणीच्या नोटीसा बजावल्या . सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय भांडारकर, कनिष्ठ अभियंता श्री इंदुरकर, शाखा अभियंता अभिजीत शिनगारे, भूमी अभिलेखचे अभिलेखापाल व्हि. एल. सांगळे व त्यांच्या चमूने अवैध उत्खननाची तांत्रिक मोजणी करून तहसीलदार गडचिरोली यांच्याकडे अहवाल सादर केला त्यानुसार पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे.

 

अहवालानुसार खरपुंडी येथे सर्व्हे क्रमांक ५३/२/अ आणि ५४ मध्ये १३ हजार २५७ ब्रास मुरूम उत्खननाकरिता ११ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये, लांजेडा स.क्र. १४/२६ आणि २४० मध्ये ९ हजार ६९९ ब्रास करिता ८ कोटी ३४ लाख११ हजार ४०० रुपये, माडेतुकूम स.क्र.१८ मध्ये १८ हजार ३५८ ब्रास करिता १५ कोटी ७८लाख ७८ हजार ८०० रुपये, गोगाव स.क्र.१८ मध्ये २० हजार ७७५ ब्रास करिता १७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये, अडपल्ली स.क्र.१८ मध्ये ५० हजार १७६ ब्रास करिता ४३ कोटी १५ लाख१३ हजार ६०० रुपये, काटली स.क्र. १४५ आणि २७९मध्ये ५४ हजार ५७५ ब्रास करिता ४६ कोटी ९३ लाख ४५ हजार रुपये, मोहझरी स.क्र. २५, ३२,२१,९व १५ मध्ये ६२ हजार ६१७ ब्रास करिता ५३ कोटी ८५ लाख ६ हजार २०० रुपये आणि साखरा येथे स.क्र. १०२ व १५२ मध्ये ४३ हजार ८९४ ब्रास करिता ३७ कोटी ७४ लाख ८८ हजार ४०० रुपये असे एकूण २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची गणना करण्यात आली आहे. याविषयी तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 17, 2024

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्रात कंकडालवार यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसची ताकत वाढली


अहेरी विधानसभा क्षेत्रात कंकडालवार यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसची ताकत वाढली!

अहेरी विधानसभेकरीता काँग्रेसकडून हनमंतु मडावी यांना उमेदवारीची आश्वासन...

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभेची लढत बघायला मिळणार आहे.यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातही विधानसभेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सरसावले आहेत.यात संभाव्य उमेदवार म्हणून ना.धर्मराव बाबा आत्राम व त्यांची कन्या जि.प.माजी अध्यक्ष भाग्यश्री हलगेकर(आत्राम),माजी राज्यमंत्री अंबरिश्रराव आत्राम,माजी आमदार दिपक दादा आत्राम,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनुमंत मडावी,संदिपभाऊ कोरेत आदी नावांची चर्चा सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसने लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे..‘आविस’चे अजयभाऊ कंकडालवार यांचा आलापल्ली येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम लोकसभा निवडणुक पूर्वी झाला होता.कंकडालवार यांचेसोबत सेवानिवृत्त वन अधिकारी हनमंतू मडावी यांनी सुद्धा आपल्या समर्थकासंमवेत प्रवेश केले होते.या दोन्ही नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत.गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदार संघात अहेरी विधानसभा क्षेत्रातून इंडिया आघाडी व काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांना तब्बल बारा हजाराची लीड मिळाली होती.डॉ.किरसान यांना लीड मिळवून देण्यामागे अजयभाऊ कंकडालवार व हनमंतू मडावी या दोघांची पराकाष्टा आहे.यात कोणालाही शंका असू नये.इंडिया आघाडी व काँग्रेसचे उमेदवारांसाठी सकारात्मक वातावरण निर्मितीसह मताधिक्य मिळवून देण्यामागे कंकडालवारांची याक्षेत्रात सुरू असलेल्या निरंतर निःस्वार्थ सामाजिक कार्य मुख्य कारणीभूत ठरली आहेत.

आविसचे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ  कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील आपल्या हजारो समर्थांकासोबत लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपापेक्षा काँग्रेसचे डॉ नामदेव किरसान यांना महायुतीचे उमेद्वारांपेक्षा अहेरी विधानसभेतून बारा हजारांची अधिक मते मिळाली आहे.काँग्रेस पक्षात प्रवेशापुर्वी आल्लापल्ली येथील हनमंतू मडावी यांना राज्याचे विरोधी पक्षनेते ना.वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभेची उमेदवारीची ठोस आश्वासन दिल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे.त्यामुळे आता अहेरी विधानसभा निवडणुकीत अजय कंकडालवार हे कांग्रेस पक्षाची धुरा सांभाळत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचे त्यांचे दैनंदिन दौरा कार्यक्रमावरून दिसून येत आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला चार महिने बाकी असले तरी आतापासूनच अहेरी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार ? यावर सर्वत्र चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.पण गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला सुगीचे दिवस आल्याने यावेळी अहेरीच्या जागेसाठी काँग्रेसकडून ना.विजय वडेट्टीवार व अजय कंकडालवार हे दोन्ही ताकतवर नेते आपली ताकत पणाला लावण्यार असल्याची माहिती आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 17, 2024

PostImage

आष्टी पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह २२,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त


आष्टी पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह २२,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त 

 

दोन आरोपीतांवर गुन्हा दाखल 

 

आष्टी (चामोर्शी) : आज दिनांक १७/०६/२०२४ रोजी गोपनिय सुत्राद्वारे मौजा चंद्रपुर ते आष्टी रोडनी एका कथ्या रंगाच्या आयशर वाहन क्रमांक एम.एच. ४० वाय. १९०५ या वाहनाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये देशी दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनिय बातमीदारंकडुन खात्रीशिर खबर मिळाल्याने पोलीस स्टेशन आष्टीचे पोस्टे स्टॉफ. नी पंचासह फॉरेस्ट नाका आष्टी येथे नाकाबंदी करीता रवाना होवुन फॉरेस्ट नाका आष्टी येथे नाकाबंदी करीत असतांना वाहन क्रमांक एम.एच. ४० वाय. १९०५ या वाहनास थांबवुन वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये खाकी रंगाच्या १५० खर्थ्याच्या बाक्समध्ये रॉकेट देशी दारु संत्रा प्रवरा डिस्टीलरी एकुण १५,००० नग रॉकेट संत्रा देशी दारुच्या निपा असा एकुण १२,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल व देशी दारुची वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन क्रमांक एम.एच. ४० वाय. १९०५ किंमत अंदाजे १०,००,०००/- रुपये असा एकुण २२,००,०००/- रुपयांचा मद्देमाल चालक नामे १) राजेश फुलनसिंग यादव, वय २७ वर्ष, धंदा चालक रा. पानीगांव, जसरथपुर पो. जखाई ता. जि. फिरोजाबाद (राज्य उत्तर प्रदेश) (ह. मु. जिमलगट्टा ता. अहेरी जि. गडचिरोली) २) अमोल बाजीराव मैस्कर वय ३५ वर्ष, धंदा मजुरी रा. गोंडबोरी ता. भिवापुर जि. नागपुर, (ह.मु. सावरकर चौक आलापल्ली ता. अहेरी, जि. गडचिरोली) यांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला असुन त्यांच्याविरुध्द् पोलीस स्टेशन आष्टी येथे अपराध क्रमांक ८७/२०२४ कलम ६५ (अ), ९८ (२),८३ मदाका. अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीतांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.

 

नमुद कारवाई निलोत्पाल पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली, एम. रमेश. अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय अहेरी, कोकोटे उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. काळे सा. पोस्टे आष्टी यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी श पोउपनि मानकर सायांनी तसेच त्यांचे सहकारी टीम परि.पोउपनी पवार, मपोउपनि/वणवे, पोहवा/ मडावी, पोहवा/ करमे, पोना/ सडमेक, पोशि/ डोंगरे, पोशि/ तोडासे, पोशि/ राजुरकर, पोशि/ मेदाळे,, पोशि रायशिडाम, यांनी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 17, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023 (प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी चाचणी जाहिर


 

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023 (प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी चाचणी जाहिर

दिनाकं:- 19 जुन पासुन पोलीस शिपाई चालक पदभरतीस प्रारंभ . दिनाकं. 21 जुन पासुन पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ

 

 

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई चालक भरती – 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 10 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती – 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 912 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणीची तारिख जाहिर झालेली असून ती दिनांक 19/06/2024 ते 12/07/2024 या कालावधीत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे.

 

 

 

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक सर प्रसिद्धी माध्यमांशी संबोधित करताना

 

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली पोलीस शिपाई चालकच्या 10 पदाकरिता 2258 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असुन त्यापैकी 1967 पुरुष उमेदवार व 291 महिला उमेदवार यांचे आहेत. तसेच पोलीस शिपाईच्या 912 पदाकरिता एकुण 24570 उमेदवारांनी अर्ज सादर केले असुन त्यापैकी 16803 पुरुष उमेदवार व 7767 महिला उमेदवार यांचे आहेत. पोलीेस शिपाई चालक पदाच्या एकुण 10 जागांपैकी अनुसुचित जाति- 01, अनुसुचित जमाति-02, भज(ब)-01, भज(क)- 01, इमाव-02, एसईबीसी-01, इडब्ल्युएस-01, अराखीव-01 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती दि.19/06/2024 ते 20/06/2024 या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच पोलीस शिपाई पदाच्या एकुण 912 जागांपैकी अनुसुचित जाति-121, अनुसुचित जमाति-210, विज(अ)-54, भज (ब)-50, भज (क)- 57, भज (ड)-46, विमाप्र-46, इमाव-158, एसईबीसी-50, इडब्ल्युएस-50, अराखीव-70 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती दि.21/06/2024 ते 12/07/2024 या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. पोलीस शिपाई चालक पदाकरीता दरदिवशी सरासरी 1000 उमेदवारांची व पोलीस शिपाई पदाकरीता दरदिवशी सरासरी 1300 उमेदवारांची शारिरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाच्या मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी, सर्व उमेदवारांनी आपले मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org https://policerecruitment2024.mahait.orgया वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी (शारिरीक) चाचणी परिक्षेची तारिख लक्षात घेऊन मैदानी (शारिरीक) चाचणी करीता आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहणेबाबत गडचिरोली पोलीस दलामार्फत कळविण्यात येत आहे.

सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार असुन यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) Based Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात येणार आहे. मैदानी (शारिरीक) चाचणीमध्ये उत्तीर्ण होवुन लेखीपरीक्षेकरीता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी घेवुन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवुन शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली अश्या उमेदवारांना दुसरी तारिख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. सदर पदभरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा वापर करु नये, असे करतांना आढळुन आल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करुन त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र.8806312100 यावर तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे माहिती द्यावी.


PostImage

Gadchiroli Varta News

June 17, 2024

PostImage

गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत


गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत

 

अहेरी विधानसभा क्षेत्रात कंकडालवार यांच्या काँग्रेस प्रवेशाने कांग्रेसची ताकद वाढली!

 

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेची लढत बघायला मिळणार आहे.यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातही विधानसभेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सरसावले आहेत.राज्याचे अन्न पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुकन्या भाग्यश्री आत्राम यांनी विविध कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्या विधानसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. लोकसभेची उमेदवारी आपल्याला दिली तर विरोधकांचे पानीपत करू, असे विधान त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितले होते.भाग्यश्री आत्राम या गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत.त्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्या सिनेट सदस्य आहेत.गेल्या काही दिवसांपासून त्यांनी विशेषत अहेरी विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचा धडाका लावला आहे.अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भाग्यश्री आपल्या वडिलांसोबत सक्रिय सहभाग घेत आहेत. धर्मरावबाबा आत्राम हे आता चौथ्यांदा अहेरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहे. विशेष म्हणजे त्यांना चारही वेळेस मंत्रिपद मिळाले आहे. 

 

अशात यावेळी आपल्या कन्येला विधानसभेची उमेदावारी देऊन ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले होते पण लोकसभेची तिकीट न मिळाल्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम हेही विधानसभा निवडणुक लढवू शकतात असेही बोलले जात आहे.अहेरी विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची लाइन लागली आहे.अनेक जण आमदारकीचे बाशिंग बांधून तयार आहेत.यात भाजपचे राजे अंबरीश आत्राम,दीपक आत्राम,हनमंतू मडावी यांचाही समावेश आहे.सध्या राज्यात भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार आहे.अशात अहेरी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी कुणाच्या वाट्याला येणार यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.

 

काँग्रेसनेही गडचिरोली जिल्ह्यात लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे.गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे गावोगावी जाऊन बुथनिहाय कार्यक्रम घेत आहेत.‘आविस’चे अजय कंकडालवार यांचा आलापल्ली येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम नुकातच झाला होता.कंकडालवार यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी देऊन आपली वाटचाल लोकसभेकडे करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम सज्ज झाले होते.यासाठी त्यांनी वरिष्ठस्तरावरून फिल्डिंग लावली होती.पण अखेर भाजपाचे खासदार अशोक नेते यांना लोकसभेची तिकीट दिली पण लोकसभेत खासदार अशोक नेते यांचा पराभव झाला.

 

सध्या गडचिरोलीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे.अशात याठिकाणच्या जागांच्या वाटाघाटीत भाजपचा वरचष्मा राहणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.अजय कंकडालवार काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपापेक्षा काँग्रेसचे डॉ नामदेव किरसान यांना या अहेरी विधानसभेतून अधिक मते मिळाली आहे.त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजय कंकडालवार हे कांग्रेस पक्षाची धुरा सांभाळत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याचे बोलले जात आहे हे विधानसभा निवडणुकीनंतर कोण बाजी मारतील समजेल.पण गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस आले आणि भाजपचे मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत असल्याचे मतदारांना कडून बोलले जात आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 17, 2024

PostImage

वीज खांबाला बांधून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण


वीज खांबाला बांधून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

 

 

 

महावितरणच्या कर्मचाऱ्याला वीज खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घुग्घुस शहरात उघडकीस आला. महावितरणच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार घुग्घुस पोलिस ठाण्यात सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

घुग्घुस येथील महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या गावांचा प्रभार आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी परचाके उसगावला निघाले होते.

 

मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बांदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनीजवळ अडविले. बांदुरकर यांनी त्यांना डीपीजवळ काम असल्याचे सांगून नकोड्याला घेऊन गेले. नकोड्याला गेल्यावर त्यांनी महावितरण कर्मचारी परचाके यांना त्यांच्याच दुपट्ट्याने वीज खांबाला बांधले. त्यानंतर गावकऱ्यांना गोळा केले. साधारणतः दोन तास त्यांनी कर्मचाऱ्याला बांधून ठेवले. यामध्ये मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. नयन भटारकर यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले.


PostImage

Gadchiroli Varta News

June 16, 2024

PostImage

पोलीस भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकला


पोलीस भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकला


पोलीस भरतीत उतरलेल्या  विद्यार्थ्यांचे आ.कृष्णा गजबे यांना निवेदन


 आरमोरी-पोलीस भरती (२०२३-२४) शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसामुळे पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी पोलीस भरतीत उतरणाऱ्या विद्यार्थ्यांनी आ.कृष्णा गजबे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   
  विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोलीस भरती (२०२३-२४) शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दि. १९ जून २०२४ पासून सुरू होणार असल्याने ही शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी. वरील शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळ्यात घेतल्यास जिल्ह्यात मुलांचे  नुकसान होण्याची शक्यता आहे.
   पावसात भरतीच्या ठिकाणी एक दिवस अगोदर जाणाऱ्या मुलांना झोपण्यासाठी जागा मिळणार नाही. कारण भरतीचे मुलं बॅनर टाकून रोडवरच आपली रात्र काढतात. गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम भागातील उमेदवारांना अतीवृष्टीमुळे येण्याजाण्याचे सर्व रस्ते व मार्ग बंद होतात. तसेच दळणवळणाचे साधन पुर्णपणे बंद असतात. १०० मीटर रनिंग चा सराव वर्षभर ग्राऊंडवर केल्यावर चाचणी परीक्षा रोडवर घेतल्यास परिणामी पाय गुंतून गुडघ्याला व पायाला कायमस्वरूपी दुखापत होऊ शकते.पावसात गोळा फेक करतांना गोळा कोरडा/सुखा राहणार नाही. परीणामी गोळा हातातून निसटेल किंवा दुखापत ही होऊ शकते.कधी पाऊस असेल तर कधी नसेल यामुळे मुलांना समान संधी मिळणार नाही. भेदभाव होईल आणि मार्क कमी जास्त येतील.तसेच
मैदानी चाचणी पावसात घेतल्यास मैदानावर चिखल झाल्यास १६०० मीटर रनिंग व १०० मीटर रनिंग धावणे जमणार नाही.
तसेच मैदानी चाचणी तयारी नुसार येणाऱ्या मार्कपेक्षा पावसात घेतल्यामुळे मुलांना खुप कमी मार्क येतील. तरी हा मुलांवर अन्याय असून पोलीस भरती सन २०२३-२४ ची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी. 

विद्यार्थ्यांनी निवेदन दिल्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचेशी संपर्क करून या महत्त्वाच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढून देण्याचे आश्वासन दिले. 

आ.कृष्णा गजबे यांना निवेदन देताना मंगेश पाटील, स्वप्नील हजारे,अक्षय मारभते, सौरभ गोंदोळे,पूरणानंद सोमजाल, अक्षय मोतेकर, धमेंद रामटेके,प्रशांत सोरते,आदीत्य ठवकर,निशाद वैरागडे,पवन लाकडे,मिथुन कांदोर,पंकज मडावी,सौरभ श्रीरामे,रामू जुरी,इक्सेन नॉनजाल,साहिल मने,अमोल मने,सौरभ सारवे,कुणाल सारवे,आशुतोष सारवे, पंकज सपाटे,संदीप हेडावू,राहुल हेडावू,रोशन मने,जयश्री सुपारे,पायल चौधरी,कल्याणी मेश्राम, सोनाली चंदनखेडे आत्माराम सोरते, रतन गोधोळे,यासहित शेकडो पोलीस भरतीत उतरलेले विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 16, 2024

PostImage

अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता जिल्हास्तरीय भरारी पथक गठीत


अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता जिल्हास्तरीय भरारी पथक गठीत

 

 

 

 

 

 

 

गडचिरोली दि. १६ : जिल्ह्यातील नदीपात्रातून व इतर ठिकाणाहून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता व शासकीय महसूलाचे नुकसान टाळण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हास्तरीय भरारी पथकाची नेमणूक केली आहे.

 

 

 

या भरारी पथकात तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी आणि महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे.

 

 

 

या भरारी पथकाला अवैध गौण खनिज उत्खनन बाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करणे, संबंधीत ठिकाणी भेट देवून मौका पंचनामा, जप्तीनामा करणे, उपस्थितांचे जवाब घेणे व उत्खनन झालेल्या ठिकाणाची संबंधीत तालुक्याचे तहसिलदार, उपअधिक्षक भूमी

 

अभिलेख यांचे उपस्थितीमध्ये मोजणी करुन पंचनामे तयार करणे, कारवाईच्या वेळेस आवश्यकता वाटल्यास पोलीस संरक्षण घेणे, केलेल्या कार्यावाहीच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल अभिप्रायासह व अभिलेख जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करणे, प्राप्त तक्रारी व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विहित नोंदवहीत नोंदी ठेवणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संपूर्ण कार्यवाही दरम्यान गोपनियता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 16, 2024

PostImage

लोकसहभागातून प्रगतीची नांदी..... बालेकिल्यातच माओवाद्यांना गावबंदी


लोकसहभागातून प्रगतीची नांदी.....
बालेकिल्यातच माओवाद्यांना गावबंदी

 उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील सात (07) गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी 

 

गडचिरोली: जिल्ह्यातील  माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते.  सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे.  या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे दिनांक 14/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये हद्दीतील परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात (07) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे धोडराज यांना सादर केला. 

वरील सात ही गावे गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावक­यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावक­यांचा विश्वास दृढ झाला. यासोबतच अलीकडील काळात या परिसरात ईरपनार येथील मोबाईल टॉवरची उभारणी करण्याकरिता आलेल्या कर्मचा­यांच्या वाहणांची माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे कलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलीस खब­या असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावक­यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावक­यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून दिनांक 14/06/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये वरील सात (07) गावातील गावक­यांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट्या प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले. यावेळी मिळदापल्ली येथील गावक­ऱ्यांनी माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी सलाखे (च्द्रत्त्त्ड्ढद्म) काढून आणून पोलीस दलाकडे सुपूर्द केली.
    
सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड  अमर मोहिते व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी श्री. शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणा­ऱ्या सात गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

June 14, 2024

PostImage

आदिवासी खातेदारांना जमीन तारण ठेवण्यासाठी परवानगीची गरज नाही


आदिवासी खातेदारांना जमीन तारण ठेवण्यासाठी परवानगीची गरज नाही

एका तक्रारीवर सर्वांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे परिपत्रक

गडचिरोली दि. 14 : आदिवासी खातेदारांना कर्ज घेतांना जमीन अथवा शेती गहाण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याने वित्तीय संस्थांनी त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे परिपत्रक प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी निर्गमित केले आहे. विशेष म्हणजे केवळ एक तक्रार अर्जावरील निकालाचा जिल्ह्यातील सर्व आदिवासी खातेदारांना लाभ होणार आहे. 
कोटगल येथील तुळशिराम नरोटे यांनी याबाबत बँकेकडून नाहक त्रास दिल्या जात असल्याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचे प्रकरण निकाली काढतांना या बाबीचा इतरांनाही  अडचण येत असल्याची जाणवल्याने ठोस उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी भाकरे यांनी सर्वांना याला लाभा व्हावा म्हणून परिपत्रक निर्गमित करून जमीन तारणाबाबत शासनाच्या महसूल संहितेकडे वित्तीय संस्थांचे लक्ष वेधले आहे.
*पुर्वस्थिती* : बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्था, तसेच राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधिल नविन कलम 36- अ कडे लक्ष वेधुन अनुसुचित जमातीतील व्यक्तींना कर्जासाठी जमीन तारण द्यावयाची झाल्यास, त्याकरीता जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी आवश्यक असल्याचे जाचक अट कळवितात. त्यामुळे आदिवासी खातेदारास शासन, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी संस्था यांचेकडुन पिककर्ज तसेच इतर कर्ज घेण्यास नाहक त्रास सहन करावे लागतो व विनाकारण जिल्हा मुख्यालयात पुर्व परवानगी मिळणेसाठी फेऱ्या माराव्या लागतात. 
*वस्तुस्थिती* :  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मध्ये सन 1971 च्या 36 व्या अधिनियमाने सुधारणा केल्यानंतर कलम 36 (4) मधील तरतुदीनुसार, आदिवासी किंवा इतर कर्जदार वर्ग-2 म्हणजे ज्या जमीनीच्या हस्तांतरणावर निर्बंध आहेत, अशा जमीन धारकाबाबत महसुल संहितेत अगर इतर अधिनियमात कोणत्याही तरतुदी असल्या तरी सुध्दा त्यांना शासन, सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका इत्यादीकडुन कर्ज मिळण्यासाठी जमीन तारण, गहाण ठेवावयाची झाल्यास, त्यासाठी जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


*यांना होणार लाभ :* गडचिरोली जिल्हाची आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व शेतीप्रधान जिल्हा म्हणुन ओळख आहे. सन 2011 चे जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील अनुसुचित जमातीची लोकसंख्या 4 लाख 15 हजार 306 असुन, एकुण लोकसंख्येच्या 38.71 टक्के आहे. तसेच, जिल्ह्यात एकुण 1 लाख 78 हजार 903 अनुसुचित जमातीचे खातेदार आहेत. जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, धानोरा, अहेरी, सिरोंचा, कुरखेडा व कोरची या तालुक्यात अनुसुचित जमातीचे खातेदाराची संख्या साधारणत: 85 टक्के आहे. या सर्वांना या परिपत्रकाचा लाभ होवून त्यांना विनाकारण जिल्हाधिकारी कार्यालयात फेरे मारावे लागणार नाही.
000


PostImage

Gadchiroli Varta News

June 14, 2024

PostImage

वनजमीनीवरील प्रलंबित सहा पूल व 33 केव्ही उपकेंद्र बांधकामाचा मार्ग मोकळा


वनजमीनीवरील प्रलंबित सहा पूल व 33 केव्ही उपकेंद्र बांधकामाचा मार्ग मोकळा

जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

 7 वनपट्टे मंजूर

गडचिरोली दि. 14 : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील दुब्बागुडा-दामरंचा रस्त्यामधील बांडीया नदीवर पूल व जोड रस्ता बांधकाम तसेच भाडभिडी-घोट-रेगडी-कसनसुर-गट्ट- कोठी-आरेवाडा-भामरागड ते राज्य सीमा रस्त्यावरील 5 लहान पुलाचे बांधकाम तसेच पिरमिली येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रच्या बांधकामाला जिल्हास्तरीय वनक्क समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मंजूरी दिली. यामुळे वनकायद्यामुळे प्रलंबित या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 जिल्हास्तरी वनहक्क समितीची सभा काल श्री भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, पूनम पाटे तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी 6 नवीन व अपील प्रकरणातील 1 वनहक्काचे दावे मंजूर करण्यात आले तर 2 नवीन व 7 अपील प्रकरणातील दावे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले. यासोबतच 46 वनहक्कधारकांच्या सुधारित वनहक्क पट्टे तयार करण्यास मान्यता देण्यात आली.

 बैठकीत वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 14, 2024

PostImage

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा


अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा

गडचिरोली,दि.14(जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 13 मुलांचे व 8 मुलींचे असे एकुण 21  शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यांची एकुण इमारत प्रवेश क्षमता 2115असुन त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचे एक असे एकुण तीन वसतीगृह आहेत. गडचिरोली वसतीगृहात इयत्ता 11 वी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच गडचिरोलीचे तीन वसतीगृह वगळता उर्वरीत अठरा वसतीगृहात इयत्ता 8 वी पासुन पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करावे तसेच सदरील सुचनेनुसार कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी.वसतीगृहातील जुने प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अर्ज रिन्यूव हे ऑप्शन निवडुन भरावे. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे असे समजुन त्याचेजागी नविन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन कागदपत्रांसह हार्ड कॉपी संबंधीत वसतीगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावी. वसतीगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता दिनांक 31 जुलै 2024 पर्यत व व्यावसायीक अभ्यासक्रमा करीता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू राहील त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. तसेच प्रवेशाबाबतच्या लोकप्रतिनिधी शिफारशी दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रकल्प कार्यालयात सादर करावे, असे सहायक प्रकल्प अधिकारी धनराज डबले यांनी कळविले आहे.
000


PostImage

Gadchiroli Varta News

June 14, 2024

PostImage

सतीनदीचा पूलाचे संतगती बांधकाम,ग्रामस्थांचा तालूक्याशी संपर्क तूटणार!?


सतीनदीचा पूलाचे संतगती बांधकाम,ग्रामस्थांचा तालूक्याशी संपर्क तूटणार!?

 

सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यानी केली बांधकामाची पाहणी

 

 

कूरखेडा

 तालूका मूख्यालयाशी मालेवाडा,कढोली पूराडा सह कूरखेडा -कोरची या राज्य महामार्गाला जोडणारा सतीनदीचा जूना पूलाला तोडत नविन पूलाचे बांधकाम सूरू करण्यात आले आहे मात्र संतगतीने सूरू असलेले या बांधकामामूळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प पडत ग्रामस्थांचा तालुका मूख्यालयाशी संपर्क तूटण्याचा धोका निर्माण झाला आहे या बांधकामाला यूद्ध स्तरावर गती प्रदान करण्याची व नागरीकाना दिलासा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यानी केली आहे 

           राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत ब्रम्हपूरी ते देवरी या महामार्गाचा बांधकामाला टप्या टप्याने सूरवात करण्यात आलेली आहे यावेळी महामार्ग दरम्यान असलेले नदी नाल्यावरील पूलांची क्षमता वृद्धि करीता जून्या लहान किंवा जिर्ण पूलाना तोडत नविन पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे या अंतर्गत कूरखेडा जवळून वाहणार्या जून्या पूलाला तोडत नविन पूलाचे बांधकाम मागील ६ महिण्यापूर्वी सूरू करण्यात आले आहे मात्र संबंधित विभाग व कंत्राटदाराचा नियोजन शून्यते मूळे बांधकामाला गती नाही मागे काही तांत्रिक अडचणीमूळे अनेक दिवस बांधकामच ठप्प होते सद्या पूलाचा बाजूने कच्चा रपटा तयार करीत येथून वाहतूक सूरू आहे मात्र पावसाळ्यात हा रपटा पूराचा पाण्यात तग धरू शकणार नाही व या मार्गावरील वाहतूकच ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे या मार्गावरील वाहतूक बंद पडल्यास सतीनदीचा पलीकडील तालूक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुका मूख्यालयाशी तूटणार आहे, विद्यार्थाना तालुका मूख्यालयात असलेल्या शाळा महाविद्यालयात पोहचणे कठीन ठरणार आहे तसेच ग्रामस्थाना बाजारपेठ व कार्यालयीन कामाकरीता संपर्क तूटल्याने मोठी अडचण होणार आहे या मार्गावरील बस वाहतूक सूद्धा ठप्प पडणार आहे या मार्गाला पर्यायी असलेला मार्ग सूद्धा लांब अंतराचा व अरूंद असल्याने त्या मार्गाने जड वाहतूक शक्य होणार नाही त्यामूळे येथून कोरची व पूढे देवरी तसेच छत्तीसगढ़ कडे जाणारी वाहतूक सूद्धा ठप्प बंद होणार आहे या पूलाचा बांधकाम स्थळाला आज सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा माजी जि प उपाध्यक्ष जिवन पाटील नाट वडसा माजी प.स. सभापती परसराम टिकले यूवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम यानी भेट देत पाहणी केली यावेळी येथे मोजक्या मजूराकडून संतगतीने बांधकाम सूरू असल्याचे निदर्शनात आले त्यामूळे संबंधित विभागाने बांधकामाला गती देत यूद्ध स्तरावर बांधकाम करावे व संभाव्य उदभवणार्या परीस्थीतून तालूका वासीयाना दिलासा द्यावा अशी मागणी त्यानी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 14, 2024

PostImage

धक्कादायक : अडथळा दूर करण्यासाठी अपंग पतीचा विहिरीत ढकलून केला खून !


धक्कादायक : अडथळा दूर करण्यासाठी अपंग पतीचा विहिरीत ढकलून केला खून !

 

धरणगाव : तालुक्यातील भवरखेडा येथील एका अपंग असलेल्या पतीला २ जून रोजी दुपारी १ वाजता शेतात नेऊन विहिरीत ढकलून खून केला होता. हा धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी उघडकीस आला आहे. हा खून पत्नीनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने खून केल्याचे तिने कबुली दिली आहे या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) वय ३६ वर्ष रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मयताचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, प्रकाश धोबी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश धोबी यांच्यासोबत वास्तव्याला होता. २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी हिने पती प्रकाश धोबी यांना तिच्या मार्गातील अडथळा दुर करण्याच्या उद्देशाने पतीला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात गेली. नंतर पतीचा अपंगत्वाचा फायदा घेवुन त्याला विहिरीत ढकलुन देवून मारुन टाकले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार बुधवार 12 जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी ज्योती धोबी च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

मार्कडेश्र्वर मंदिराचे रघडलेले जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करा - खासदार डॉ नामदेव किरसान


मार्कडेश्र्वर मंदिराचे रघडलेले जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करा - खासदार डॉ नामदेव किरसान 

 

भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत निर्देश

 

आढावा बैठकीला संत मुरलीधर महाराज यांची उपस्थिती 

 

 

 

चामोर्शी:-

विदर्भाचे काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडा नगरी येथे संत मुरलीधर महाराज हरणघाट पीठ यांनी मार्कंडेश्वराचे जीर्णोदवाराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे या मागणीसाठी उपोषण केले होते आणि थातूर-मातूर आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले. तेव्हापासून आत्तापर्यंत दोन टक्के सुद्धा जीर्णोद्वाराचे बांधकाम झालेले नाही.ही माहिती नवनिर्वाचित खासदार नामदेवराव किरसाण यांच्या लक्षात आणून देताच खासदारांनी त्वरित पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थितीत १२ जून रोजी मार्कडा आढावा बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत खासदार डॉ नामदेव किरसान यांनी पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत त्वरित जिर्णोद्धार काम सुरू करण्याचे निर्देश दिले 

१२ जून रोजी मार्क डा येथे खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला माजी खासदार मारोतराव कोवासे,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, संत मुरलीधर महाराज, महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव विश्वजीत कोवांसे , राजेश ठाकुर,नगरसेवक नितीन वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, माजी जी.प.सदस्य कविता भगत, नगर सेवक सुमेध तुरे , जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,, अशोक पोरेडीवांर, कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, संजय वडेट्टीवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले अमर मोगरे, चंदू मस्ककोले, तेजस कोंडेकर, माजी प.स. सदस्य धर्मशिला साहारे, मुखरू शेंडे ,मनोज हेजीब यांच्यासह व परिसरातील बाबांचे भक्त गण आणि भारतीय पुरातत्व खात्याचे अधिक्षण पुरतस्तविध अरुण मल्लिक , संरक्षण सहाय्यक शुभम कोरे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ नामदेव किरसान यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जिर्णोद्धार बांधकाम बंद का पडले, ते सुरू केव्हा करणार आदी विविध प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कार्यप्रणालीवर नापसंती व्यक्त करत हे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले 

 त्यावेळी एक महिन्याची मुदत द्या आम्ही बांधकाम पूर्ण होई पर्यंत काम बंद पडू देणार नाही, असे आश्वासन पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी दिली


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

विधानसभेच्या अध्यक्षांकडे प्रतिभा धानोरकरांनी सुपूर्द केला राजीनामा


विधानसभेच्या अध्यक्षांकडे प्रतिभा धानोरकरांनी सुपूर्द केला राजीनामा 

 

वरोरा-भद्रावती विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. 2019 ते 2024 या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करुन विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
अलिकडेच लोकसभा निवडणूक पार पडून त्यामध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदांची धुरा प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आली. खासदार पदी निवडून आल्याने आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल स्तुतीसुमने उधळली.

याप्रसंगी प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांवर चर्चेसाठी संधी दिल्याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले. तसेच विधानसभा सचिवालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले व जनतेने ठेवलेल्या विश्वासाबद्दल कायमची ऋणी राहीन व विधानसभेत विविध आयुधांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर केलेल्या चर्चेच्या अनुभवनातून लोकसभेत नव्या दमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत याप्रसंगी खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

दिवंगत खासदार बाळू धानोरकर व मला विधानसभेचा कालावधी पूर्ण करता आला नाही, पण जनतेच्या आशिर्वादाने आम्हाला खासदार म्हणून जनतेने दिलेली संधी माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. या निवडणूकीत जनतेने भरभरुन दिलेले आशिर्वाद मी विकास कार्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मतदेखील यावेळी व्यक्त केले. भविष्यात देखील जनतेच्या कामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

विरोधी पक्षनते वडेट्टीवारांच्या आश्वासनानंतर सरपंचाचे उपोषण मागे


विरोधी पक्षनते वडेट्टीवारांच्या आश्वासनानंतर सरपंचाचे उपोषण मागे

 

 

 

सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप बाबुराव ठाकरे यांनी गावगुंडाकडून ग्रामपंचायतीच्या कचरा कुंड्या मालमत्तेची तोडफोड, वारंवार धमक्या व झालेले हल्ले या विरोधात पोलिसात तसेच पंचायत समिती स्तरावर लिखित तक्रार देऊनही  कारवाई न झाल्याने दि.12 जून पासून आमरण उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना तात्काळ चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. सदर आश्वासनानंतर सरपंच ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नींबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

 

आपले गाव स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी राहावे याकरिता सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप ठाकरे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावात कचराकुंड्या तयार केल्या. मात्र गावातील काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केली. सोबतच गावातील मुख्य पानंद रस्त्यावरुन वाळू वाहतूक करणारे अवजड वाहने जाऊन रस्त्याची दुर्दशा करण्यात आली. तरी या विरोधात आवाज उठवणाऱ्या सरपंच संदीप ठाकरे यांचे वर सलग दोनदा हल्ला झाला. याची वारंवार तक्रार पंचायत समिती स्तरावर तसेच पोलिसात देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने व गाव गुंडांकडून जीविताचा संभावित असल्याने अखेर न्यायासाठी सरपंच ठाकरे यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यांनी कालपासून सिंदेवाही पंचायत समिती तथा तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतदार संघातील दौरा दरम्यान थेट उपोषण मंडपाला भेट दिली व सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत सदर मागण्यांची सखोल चौकशी करून खड्डेमय मार्गांची दुरुस्ती, व संपूर्ण मागण्यांची पूर्तता करावी असे वेळीच निर्देश दिले. यावर समाधान व्यक्त करीत मरेगाव (तुकुम )सरपंच संदीप ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

 

याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही तहसीलदार पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, पंचायत समिती विभागाचे अधिकारी, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, तालुका सरपंच संघटना अध्यक्ष राहुल बोडने, कृउबा संचालक नरेंद्र भैसारे, जानकीराम वाघमारे, सचिन नाडमवार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

खा. डॉ. नामदेव किरसान यांनी केले वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबाचे सांत्वन व आर्थिक मदत


खा. डॉ. नामदेव किरसान यांनी केले वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबाचे सांत्वन व आर्थिक मदत

 

 चामोर्शी तालुक्यातील गोवर्धन कुनघाडा रै येथील रहिवाशी गुरुदास मनिराम गेडाम यांचा तळोधी वरून एक किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटावर वीज पडून मृत्यू झाला होता. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिढीत कुटुंबाचे सांत्वन केले व स्वतःकडून आर्थिक मदत दिली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे, काँग्रेसचे महासचिव विश्वजित कोवासे, शंकरराव सालोटकर, रजनीकांत मोटघरे, काँगेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, रुपेश टिकले, माजी सरपंच अविनाश चलाख, नदीम नाथानी, विपुल ऐलावार, गौरव येंनगंटीवार , माजी जि प सदस्य पितांबर वासेकर, काँग्रसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, राजेश ठाकूर, दिलीप उडाण, विठ्ठल दुधबळे, हरिभाऊ चापडे, अरुण किरमे, वसंत कुनघाडकर, प्रकाश पिपरे, साहिल वडेट्टीवार, रघुनाथ दुधे व कुनघाडा रै क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते 

मृत गुरुदास गेडाम हे नाव तयार करून दुरुस्त करणे व मच्छीमारी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते 6 जून रोजी ते नातेवाईकाची बिघाड झालेली नाव दुरुस्त करण्यासाठी तळोधी वरून एक किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदिघाटावर गेले होते अचानक वादळी पाऊस गारपीट विजांचा लखलखाट होऊन गुरुदास गेडाम व नीलकंठ भोयर यांच्या अंगावर वीज कोसळली गुरुदास हे जागीच गतप्राण झाले तर नीलकंठ हा जख्मी आहे मृत गुरुदास गेडाम यांना पत्नी व दोन मुले आहेत त्यापैकी एक मतिमंद आहे. पिढीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन खा डॉ नामदेव किरसान यांनी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

११ जुन रोजी वादळी पावसाने छत हिरवले ; छगन शेडमाकेंनी अस्मानी संकटात सापडलेल्या कुटुंबाला सावरले


११ जुन रोजी वादळी पावसाने छत हिरवले ; छगन शेडमाकेंनी अस्मानी संकटात सापडलेल्या कुटुंबाला सावरले

 

देसाईगंज-

     तालुक्यातील अनेक गावांत ११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने अनेकांच्या डोक्यावरचे छत हिरावले. याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोका चौकशी करून अस्मानी संकटात सापडलेल्या अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या कुटंबियांच्या डोक्यावरील छत टाकुन देत कुटुंबीयांना सावरल्याने परिसरात शेडमाके एकच चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.

     देसाईगंज तालुक्यातील चिखली(रिठ)येथील विनोद विठ्ठल दुमाने या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या गरीबाचे ११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने छत हिरावले. घरावरील संपुर्ण कवेलु उडाल्याने दुमाने कुटुंबियांना रात्र काढण्यासाठी दुसऱ्याच्या घराचा आधार घ्यावा लागला. देसाईगंज तालुक्यात विहीरगाव,पिंपळगाव,चिखली (रिठ)या परिसरातील घरांना वादळी वाऱ्यासह पावसाचा जबर तडाखा बसल्याचे निदर्शनास येताच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या गावांकडे धाव घेऊन मोका चौकशी केली मात्र ठोस उपाययोजनेवर भर दिला नसल्याने राहायचे कुठे?असा गंभीर प्रश्न दुमाने कुटुंबीयांसमोर उभा ठाकला होता.

     दरम्यान देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतिने मोका चौकशी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.मात्र दुमाने कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था होईस्तोवर दुसऱ्याच्या घराचा आधार घेऊन राहावे लागेल,ही बाब गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली. चौकशीत सदर कुटुंब अतिशय हलाखीचे जीवन जगत असल्याचे निदर्शनास येताच शेडमाके यांनी तत्काळ घरावर छत टाकुन देण्याची संपुर्ण व्यवस्था करून दिली.यामुळे शेडमाके परिसरात एकच चर्चेचा विषय ठरू लागले असुन नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावून आल्याने भारावलेल्या कुटुंबियांनी शेडमाके यांचे आभार व्यक्त केले.यावेळी विनोद दुमाने, वत्सलाबाई पर्वते,बळीराम बादशाह,भुमेश शिंगाडे, हरिदास बगमारे,अजय मेश्राम आदी चिखली येथील नागरिक उपस्थित होते.

 

शेडमाकेंनी यापूर्वीही अनेकांना केली मदत

     कुठलाही राजकीय वारसा लाभला नसलेले छगन शेडमाके सामाजिक बांधिलकी जोपासण्यात सदैव अग्रेसर राहात असुन त्यांनी यापुर्वी अनेकांना नगद रोख रक्कम आर्थिक मदत देऊन नैसर्गिक संकटात धाऊन जाण्यात मौलिक भुमिका बजावली आहे.समाज व्यवस्था बळकट करण्यात काँग्रेसच सक्षम असल्याचा ठाम विश्वास असल्याने पक्षाची विचारधारा सोबतीला घेऊन शेडमाके आपली जबाबदारी ओळखून अनेकांना मदतीचा हात देत आहेत.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

ब्रम्हपुरी तालुक्यातील विकासकामे तातडीने पुर्ण करा. - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


ब्रम्हपुरी तालुक्यातील विकासकामे तातडीने पुर्ण करा. - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 

 आढावा बैठकीत विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 

 लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी मतदार संघातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक विकास कामे ठप्प होती. या विकास कामांना शीघ्र गतीने पुर्ण करुन जनतेच्या समस्या तातडीने सोडवा असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. 

 

आयोजित आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, तहसीलदार उषा चौधरी, नगरपरिषद मुख्याधिकारी अर्शिया जुही, काँग्रेस नेते प्राचार्य देविदास जगनाडे, काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत व सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

यावेळी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते योजना, घरकुल योजना, अंगणवाडी व शालेय वर्ग खोल्या बांधकाम, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत भवन बांधकाम याची इतंभुत माहिती घेतली. पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन योजना मध्ये एकाच कंत्राटदाराला बहुतांश कामे दिल्याने अपूर्ण व सुरु न झालेल्या पाणीपुरवठा योजना कामे त्वरित करण्यात यावी अन्यथा संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका पदांची भरती, जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग , जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,भूमी अभिलेख विभागा अंतर्गत सावली शहरातील मोजणी, महसूल विभाग,तालुका क्रीडा संकुल, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, कंत्राटदारांनी केलेल्या चुका, झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तथा अन्य योजनांचा विस्तृत आढावा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला.

 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुक काळात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे विकास कामे ठप्प पडली होती. येणारा हंगाम हा पावसाळी हंगाम असुन यातुन ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक यांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविण्यात याव्या. तसेच विकास कामांचा दर्जा उत्तम ठेवून कामे तातडीने पुर्ण करावे. तसेच विकास कामांत हयगय व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी असो अथवा कंत्राटदार यांची गय केल्या जाणार नाही अशी तंबी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी प्रामुख्याने संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

फादर्स डे च्या निमित्ताने. ... न उमगलेला बाप. ....


फादर्स डे च्या निमित्ताने. ...

 

न उमगलेला बाप. ....

 

 

बाप हा विषय आपल्यासाठी ब-यापैकी दुर्लक्षितच असलेला विषय.आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व.पण या घराच्या अस्तित्वाला खरंच कधी आपण समजून घेतलं आहे का.?बापाला महत्त्व असूनही त्याच्याविषयी जास्त बोललं जात नाही.संत महात्म्यांनी सुद्धा आईचेच महत्व सांगितलेले आहे.देवांनी सुद्धा आईची तोंडभरून स्तुती केलेली आहे.चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते,पण बापाविषयी मात्र कुठेच बोलले जात नाही.काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही खूप तापट,व्यसनी, मारझोड करणारा.समाजात एक-दोन टक्के बाप तसे असतीलही पण चांगल्या बापाबद्दल काय..?

             आईकडे अश्रूचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात.आई रडून मोकळी होते, पण सांत्वन करायला मात्र बापच लागतो.आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो.रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते,पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप मात्र आमच्या कधीच लक्षात राहत नाही.निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती प्रेमाने जवळ घेते म्हणून,पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही.आईला वाटलं तेव्हा ती मन मोकळं करून रडते पण बापाला मात्र रडता येत नाही.स्वतःचा बाप मेला तरी त्याला अश्रू डोळ्यातच ठेवावे लागतात कारण त्याच्यावर जबाबदा-या असतात म्हणून.

बाप माणसाला सुद्धा काही भावना असतात त्यालाही आपल्याशी बोलायचं असतं हे आपण सोयीस्करपणे विसरतो.आपण आपल्या वडिलांसोबत कितीदा मनमोकळ्या गप्पा मारल्यात, आपल्यापैकी कोणालातरी आठवते का?बापाचं महत्त्व काय असते हे मुलं कधीच समजू शकत नाही.काही मुले समजून सुद्धा घेत असतीलही पण तेही अगदी बोटावर मोजण्याइतकेच.

      ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणाची वाईट नजरेने बघायची हिंमत सुद्धा होत नाही.कारण घरातला कर्ता माणूस म्हणजेच बाप जिवंत असतो.मुलगा त्याची कर्तव्य विसरू शकतो, पण बापाला बाप होणं कधीच टाळता येत नाही.आईच्या असण्याला किंवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.प्रत्येक मुलाला बापाचं अस्तित्व जाणवायला हवं त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व अपूर्ण आहे अशी जाणीव व्हायला हवी.

           आपल्याला जर उशीर झाला तर रागावणारा बाप आपल्याला दिसतो पण त्या रागावण्यामागची काळजी मात्र कुणालाच दिसत नाही,का बरं असं होत असेल याचा विचार एकदा तरी नक्कीच करायला हवा..?

  बाप जिवंत असताना त्याची किंमत कळायला हवी .बाप नावाच्या माणसाचा आपल्याला किती आधार असतो हे बाप गेल्यावर कळते. बाप नसल्यावर किती हालअपेष्टा होते हे त्या लेकाला विचारा, ज्याचा बाप या जगात नाही.बाप गेल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात त्यावेळी त्याच्या डोळ्यातून बरसणारे अश्रू सतत बापाची आठवण करून देत असते.एकेका वस्तूसाठी त्याला प्रत्येक वेळी तरसत रहावे लागते.दुस-यांचा बाप बघितलं की,मग त्यालाही आठवतो त्याचा बाप...ज्या बापाने अचानकपणे या जगातून एक्झिट घेतलेली असते.काय असतील त्या लेकाच्या वेदना.?.किती यातना होत असतील त्याच्या मनाला. .?विचाराच एकदा तरी त्याला..तुमचं सुद्धा मन हेलावून जाईल..

        प्रत्येक मुलानी आपल्या बापाचं अस्तित्व आणि महत्व समजून जगायला पाहिजे.झाड कितीही मोठ्ठं झालं तरी, त्याची मूळे कापली तर ते टिकू शकत नाही‌.जीवनाचं गणितही असच असते,ते ज्याचे त्याने ओळखून जगायला पाहिजे.त्या देव माणसाला कधीतरी सांगायला हवं. ..बाबा मला तुझा अभिमान वाटतो म्हणून.

आजकालची मुलं तर सदानकदा बापावर चिडत असतात की,तुम्ही आमच्यासाठी काय केलय म्हणून, त्यावेळी काय वाटत असेल त्या बापाला. ..विचार करा एकदा? ?

  एकएक पैसा काटकसर करून बाहेरगावी शिकणा-या मुलाला बाप पैसा पाठवतो.आणि हाच मुलगा तिकडे पैशाची उधळपट्टी करतो. ..पटतयं का बघा तुमच्या मनाला? 

    म्हणूनच संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा हा बापच असतो.संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा हा बापच असतो.बाप जिवंत असेपर्यंत तरी बापाची किंमत तुम्हाला कळू द्या,एवढीच कळकळीची विनंती...शेवटी एवढच म्हणावसं वाटते..

     लई अवघड हाय गड्या 

        समजाया बाप रं.....

 

 

वृंदा पगडपल्लीवार शिक्षिका 

9421720175


PostImage

Gadchiroli Varta News

June 13, 2024

PostImage

दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार


दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार

 

एटापल्ली : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना एटापल्ली पासून 5 किमी अंतरावरील जिवनगट्टा ते डोड्डी गावादरम्यान बुधवारी (दि. 12) घडली. मैनू चैतू बोगामी (वय 17) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मैनू बोगामी हा अल्पवयीन मुलगा बुधवारी दुपारी उडेरावरून एमएच 33 एक्स 7154 क्रमांकाच्या दुचाकीने डोड्डी गावाकडे जात

होता. दरम्यान, त्याचवेळी डोड्डी गावाकडून येणाऱ्या दुचाकीची चैतूच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. यात मैनू याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी अपघात घडताच 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होताच, मैनूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पाठविण्यात आला. अधिक तपास एटापल्ली पोलिस करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

अहेरी नगरपंचायत येथील नियमबाह्य कामांची चौकशी करून कारवाई करा.- जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदानाद्वरे मागणी


अहेरी नगरपंचायत येथील नियमबाह्य कामांची चौकशी करून कारवाई करा.- जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदानाद्वरे मागणी

 

जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात अहेरी नगरसेवक व शिष्टमंडळ यांचे जिल्हाधिकारी मा.विजयजी भाकरे यांना निवेदन

 

 

गडचिरोली :-मागील अडीच वर्षापासुन नगरपंचायत अहेरीत नियमबाध्य व अवैद्य पध्दतीने कारभार सुरु आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी लोकसंख्यानिहाय व प्रलंबीत महत्वाच्या समस्यांना निराकरणासाठी न वापरता केवळ विशिष्ठ क्षेत्रातच कोट्यावधीचा निधी खर्ची घालत आहेत आणि ऊर्वरीत भागातील समस्या अडीच वर्षांपासुन जैसे थे अवस्थेत आहे. त्याभागातील कर भरणाऱ्या नागरीकांवर हा अन्याय आहे.

 

आजवरच्या प्रत्येक अवैद्रय निविदा प्रक्रीयेची कंत्राटदार संघटना तथा विविध संस्थांमार्फत तक्रारी झालेल्या आहेत. आणि बरेचदा जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करून सुधारणा करावी लागली तर काहीं निविदा कार्यारंभ आदेश दिल्याननंतर सुध्दा प्रक्रीया रद्द करण्याची वेळ सुध्दा प्रशासनावर आलेली आहे. त्यानंतरही नगर पंचायत प्रशासन वारंवार शासकिय नियमांना व मार्गदर्शक तत्वांना डावलून मनमानी पध्दतीने मर्जीतल्या कंत्राटदारांच्या हितासाठी पायघड्या घालत असते. दोन महीण्यापूर्वी निविदा प्रक्रीयेची कागदोपत्री पुराव्यासह आपणाकडे तक्रार देण्यात आलेली होती परंतु निवडणुक प्रक्रीयेच्या व्यस्तते आडून बेकायदेशीर पध्दतीने विकासकामे घाईघाईने आटोपण्यात आली परंतू तक्रारीला न्याय मिळालाच नाही.

 

नगर पंचायत अहेरी मार्फत बेकायदेशीर ठराव सुध्दा घेण्यात आलेला असुन त्या विरुध्द आपणाकड़े अधिनियम 44 (¡) नुसार अनर्हतेचे प्रकरण सुध्दा आपणाकडे न्यायप्रविष्ट आहेच तरी या सर्व गंभीर प्रकरणांचा तेवढ्‌याध गांभिर्याने विचार करुन लवकरात लवकर न्याय द्यावा व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी विजयजी भाकरे यांना देण्यात आले.

 

त्याप्रसंगी नगरपंचायत गटनेत्या तथा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री भाजपा शालिनीताई पोहनेकर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मुकेशजी नामेवार, तालुकाध्यक्ष संतोषजी मध्दीवार, नगरसेवक विकास उईक, संजयजी पोहनेकर, जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा भास्करजी बुरे उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा


विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

 

गडचिरोली,दि.12(जिमाका):विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे. 

ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेवुन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास यादीसह सादर करावे. 

विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी. त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे, या उददेशाने राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच धनगर समाज भटक्या जमाती-क प्रवर्गाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे.

 

ग्रामीण भागात किमान 10 कुटुंबासाठी सामुहिक वसाहत योजना राबवुन अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यासाठी सक्षम अधिका-यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लाख पेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे 100 रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर, भुखंड असल्याचा पुरावा, नमुना-8 किंवा 7-12 उतारा दस्त नोंदणीची प्रत, घराचे सद्यास्थितीचे छायाचित्र, ग्रामसभेचा ठराव, अर्जदाराचे आधार ओळखपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, जॉबकार्ड, घरकर पावती आदी कागदपत्रासह अर्ज संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे. अधिक माहितीकरीता 07132-222192 या क्रमांकावर संपर्क साधावा असे समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

 पोलिसांनी २४ तासाचा आत दुचाकी चोरी आणि घरफोडी आरोपीच्या मुसक्या आवळल्या


 पोलिसांनी २४ तासाचा आत दुचाकी चोरी आणि घरफोडी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

 

बल्लारपूर : बल्लारपूर पोलीसांनी २४ तासाचा आत दुचाकी चोरी आणि घरफोडीचे आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून तीन आरोपींना अटक केले आहे.
८ जुन रोजी येथील नवीन बस स्टँड वरून रविंद्र कवडू शिडाम यांची दुचाकी क्र. MH ३४ BW ८७९३ चोरी गेली होती. त्यांनी १० जुन रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. 
याची दखल घेत पोलीसांनी पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात चक्र फिरवून आरोपी किशोर श्यामराव त्रिसुलवार (२८) रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर याच्या मुसक्या आवळल्या. तसेच विद्या नगर येथील राजू महादेव पिंपळकर आपल्या परिवार सोबत बाहेर गावी गेले असता त्यांचा घरी अज्ञात चोराने घरच्या दरवाजाची कुंराजु पिंपळकर यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या वरून पोलीसांनी गुन्हा नोंद केले.
पोलीसांनी तक्रार ची नोंद घेत आरोपी तिरूपती उर्फ लड्या अशोक दासरवार (२७) रा. गौरक्षन वार्ड व ऋतिक विठ्ठल उपरे याला अटक करून मुद्देमाल जप्त केले.
     सदर कारवाई कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, सफौ गजानन डोईफोडे, पोहया. सुनिल कामटकर, पोहवा, संतोष दंडेवार, पोहवा, रणविजय ठाकूर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, वशिष्ट रंगारी, सरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माथनकर, श्रिनिवास वाभिटकर यांनी केली आहे. कुंडी तोडून एक ग्राम सोन्याची नथ, ३ चांदीचे शिक्के, १० ग्राम चांदीचे कुयरी व ६ हजार रुपये नगदी चोरी केले होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

अमरावती येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन ;माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते शुभारंभ


अमरावती येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन ;माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते शुभारंभ

 

सिरोंचा : तालुका मुख्यालय पासून १० किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

 

      यावेळी त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचाचे सभापती संतीश गंजीवार, अमरावती अविकाचे अध्यक्ष मल्लय्या गावडे, उपाध्यक्ष इंगली नानय्या किष्टयया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी,संस्थेचे सचिव सुधाकर भंडारी, बाजार समितीचे संचालक रवि राल्लाबंडीवार, राकॉचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक जगदीश राल्लाबंडीवार, नगरसेवक सतीश राचर्लावार, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक रंजीत गागापूरपूवार, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

सिरोंचा-आलापल्ली मार्गावर जडवाहतूकीस बंदी; पर्यायी मार्गचा अवलंब करण्याच्या सूचना


सिरोंचा-आलापल्ली मार्गावर जडवाहतूकीस बंदी;
पर्यायी मार्गचा अवलंब करण्याच्या सूचना


गडचिरोली दि. 12 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर सातत्याने सुरु असलेल्या जड वाहतुकीमुळे व निर्माणाधिन महामार्गाचे कामामुळे पावसाळ्यात सदरील मार्गावर मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावरील दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतूकीस प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी निर्गमित केले आहे.
यानुसार सदर महामार्गावर 19 जुन च्या मध्यरात्रीपासून ते 31 आक्टोबर 2024 पर्यत जड वाहतुकीस मनाई करण्यात आली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर येणाऱ्या वाहनांकरिता सिरोंचा मंचेरियाल राजुरा बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. तर आलापल्ली हून मंचेरियाल मार्गे जाणाऱ्या मार्गासाठी आलापल्ली आष्टी- बल्लारपूर-मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. आदेशाचे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहतुकदारावर भारतीय दंडसंहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
आपातकालीन सेवा, प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न-औषध-पुरवठा, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती व आरोग्य विभाग संदर्भातील वाहनांना सदर आदेश लागू राहणार नाही.


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते रूग्ण वाहीकेचे लोकार्पण


नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते रूग्ण वाहीकेचे लोकार्पण

 

अहेरी :राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते शुक्रवार ७ जून रोजी अहेरी येथील हकीम लॉन मध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रमात सुविधायुक्त रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

 

लोकार्पण सोहळ्यात मंचावर सिनेअभिनेत्री ईशा कोप्पीकर, मध्य प्रदेश येथील जनजाती कल्याण मंत्री ना. विजय शहा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राजेश पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ठाणे येथील मेयर ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या अग्ग्रगण्य औषध उत्पादक कंपनीने सीएसआर कार्यक्रमा अंतर्गत शुभम बहुद्देशीय शिक्षण संस्था या संस्थेला रुग्णवाहिका प्रदान केली असून सदर संस्थेने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे रुग्णवाहिका हस्तांतरीत केले आहे. अहेरी व ग्रामीण भागातील रुग्णांना सेवेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आले असून मेयरच्या या स्तुत्यप्रिय उपक्रमामुळे उत्तम आरोग्य सेवा व ग्रामीण भागाला याचा लाभ मिळणार आहे. 

        मेयर ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेश तावडे यांनीही मार्गदर्शन केले. या रूग्णवाहीकेमुळे आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी साथ व लाभ मिळणार आहे.

 

ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा पोहचविणार - ना आत्राम

 

या प्रसंगी ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची योग्य सोय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमची धडपड असून सुसज्ज व सुविधा युक्त नवीन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होत असल्याने मेयर कंपनीचे आभार मानून आणि प्रत्येक कंपनीने सीएसआर मार्फत आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष घालण्याचे आवाहन केले.


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

मालतीच्या कविता आदिवासी जीवनाच्या वेध घेणाऱ्या-ना.गो. थुटे


मालतीच्या कविता आदिवासी जीवनाच्या वेध घेणाऱ्या-ना.गो. थुटे

 

 

गडचिरोली : झाडी बोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने मालती सेमले यांच्या 'पाना तोडणीच्या मोसमात' या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ .निलकांत कुलसंगे ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी उपनिर्देशक गीत व नाट्य, केंद्रीय सांस्कृतिक विभाग दिल्ली यांचे हस्ते तर 'गोष्टी रान पाखरांच्या' या बाल कथा संग्रहाचे प्रकाशन वरोऱा येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा झाडी बोली चळवळीचे आधारवड ना.गो. थुटे यांचे हस्ते पत्रकार भवन गडचिरोली येथे थाटात पार पडले. मालती सेमले यांच्या कविता आदिवासी जीवन दर्शन घडविणाऱ्याच नसून त्या समाजाला दिशा दर्शक आहेत आहेत असा सर्वसाधारण सूर मान्यवरांच्या भाषणातून या प्रसंगी व्यक्त झाला.

   या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे यांनी भुषविले होते.त्यांनी मालती यांनी संग्रहात बालपणातील आदिवासी संस्कृतीचे जगलेले संपूर्ण जीवन मांडलेले असून तेच आजच्या समाजाला पोषक आहे. असे प्रतिपादन केले.

तर मालतीच्या स्त्री जीवनावरील आदिवासी कवितांची दखल सर्वत्र घेतली जाईल. इतका सखोल मतितार्थ त्यांच्या कविता व कथेत आहे. असा आशावाद डॉ. निलकांत कुलसंगे यांनी प्रगट केला. 'पाना तोडणीच्या मोसमात' या कवितासंग्रहावर कवी मोहन शिरसाट , वाशिम यांनी भाष्य केले तर गोष्टी रान पाखरांच्या या बालकथा संग्रहावर कवी प्रदीप देशमुख यांनी भाष्य केले. या प्रसंगी व्यासपीठावर चंद्रपूरचे कवी इरफान शेख ,३१वे झाडी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे , गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती मारोतरावजी इचोडकर, नाटककार चुडाराम बल्लारपुरे प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान होते.या पाहुण्यांनी मनोगतातून दोन्ही संग्रहास शुभेच्छा दिल्या.कवयित्री मालती सेमले यांनी सुध्दा मनोगतातून दोन्ही संग्रहाच्या निर्मिती बद्यल माहिती दिली.प्रास्ताविकेतून सचिव कमलेश झाडे यांनी मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन संजीव बोरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपेंद्र रोहणकर यांनी मानले. याच कार्यक्रमात मंडळाचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून संजीव बोरकर,संग्रहाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ रेखाटणारे भारत सलाम, सुदर्शन बारापात्रे यांना 

स्मृतीचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.,कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर सेमले,डॉ. सागर सेमले,पराग सेमले, आणि मंडळाचे प्रा. विनायक धानोरकर, मारोती आरेवार, जितेंद्र रायपुरे, पुरूषोत्तम ठाकरे, डॉ. प्रविण किलनाके,वर्षा पडघन,

प्रतिक्षा कोडापे,प्रेमिला अलोने ईत्यादीनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला वरोरा, चंद्रपूर , भद्रावती येथील झाडीबोली मंडळाचे कवी तसेच स्थानिक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

बोगस बियाणे आढळल्यास करा कॉल ;तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष व भरारी पथकाची नियुक्ती


बोगस बियाणे आढळल्यास करा कॉल ;तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष व भरारी पथकाची नियुक्ती 

 

गडचिरोली : खरीप हंगामात खते, बियाणे व कीटकनाशके तसेच पीक कर्जासंबंधी तक्रारींसाठी कृषी विभागाकडून तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष व भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाते. तसेच खते व कीटकनाशकांची किमतीपेक्षा अधिक भावात विक्री काही कृषी केंद्र चालकांकडून केली जाते. यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह त्यांची आर्थिक लूटही केली जाते. या प्रकाराला आळा बसावा यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तक्रार निवारण कक्ष व भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंचायत समिती स्तरावर यांचे भरारी पथक -

पंचायत समिती स्तरावर गडचिरोली व मुलचेरा येथे प्रल्हाद पदा, धानोरा यादव पदा, आरमोरी व चामोर्शी येथे के. जी. दोनाडकर, वडसा येथे जितेंद तोडासे, कुरखेडा जितेंद्र गेडाम, कोरची येथे रेणू दुधे, अहेरी व भामरागड येथे मनीषा राजनहिरे, एटापल्ली येथे तुषार पवार व सिरोंचा येथे डेविड मेश्राम यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात बाराही तालुक्यांत कृषी विभागाच्या पथकांची करडी नजर राहणार आहे.

येथे साधावा संपर्क -

जिल्हा भरारी पथकाला संपर्क करण्यासाठी कृषी विकास अधिकारी ९९२२३२०११६, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक ८६९८३८९७७३ तसेच जिल्हा तक्रार निवारण कक्षात ८२७५६९०१६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ०७१३२-२२२५९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 12, 2024

PostImage

धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; साळ्याला वाचविताना भाऊजीचाही मृत्यू


धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; साळ्याला वाचविताना भाऊजीचाही मृत्यू 

 

भामरागड : लग्नानंतर भामरागड (Bhamragad ) तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी व इतर नातेवाईकांसाेबत फिरायला आलेल्या नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविताना भाउजीचाही मृत्यू झाल्याची घटना ११ जून राेजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.नवनीत राजेंद्र धात्रक (२७) रा. चंद्रपूर असे साळ्याचे तर बादल श्यामराव हेमके (३९) रा. आरमाेरी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

 

नवनीत यांचे ७ जून राेजी लग्न झाले. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक हाेते. ते भामरागड येथे राहत हाेते. हेमके व धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले हाेते. नवनीत हा धबधब्यात आंघाेळ करत असताना खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेसुद्धा पाण्यात उरतले. मात्र दाेघांनाही पाेहता येत नसल्याने दाेघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती लाहेरी पाेलिस मदत केंद्राला देण्यात आली. दाेघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. 

मेहंदी मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यूलग्नाला अगदी चार दिवस झाले हाेते. नवनीत व त्यांची पत्नी दाेघेही फिरण्यासाठी बिनागुंडा येथे आले हाेते. दाेघांनीही सुखी संसाराचे स्वप्न बघितले हाेते. मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले. अवघ्या चार दिवसांतच नवनीतने जगाचा निराेप घेतला. त्यामुळे नवविवाहितेवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

मृतक नवनीतला पाेहता येत नव्हते. तरीही ताे खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न बादल यांनी केला. बादल यांनाही पाेहता येत नव्हते. साळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भाऊजीचासुद्धा मृत्यू झाला. एकाच नात्यातील दाेघांचा मृत्यू झाला. हेमके व धात्रक कुटुंबावर शाेककळा पसरली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 11, 2024

PostImage

आपसी समन्वयातून शासकीय योजनेचे लाभ नागरिकांपर्यत पोहोचावा – जिल्हाधिकारी


आपसी समन्वयातून शासकीय योजनेचे लाभ नागरिकांपर्यत पोहोचावा – जिल्हाधिकारी

 

 आरोग्य यंत्रणेचा समग्र आढावा

प्रत्येकाचे आधार कार्ड व बँक खाते काढण्‍यासाठी विशेष मोहिम

 

गडचिरोली दि. 11 : प्रत्येक व्यक्तीचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून शासनामार्फत नागरिकांकरिता विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती त्यांचेपर्यंत पोहोचवून योजनेचा लाभ दुर्गम व अतिदुर्गम भागातील गरजूंना मिळावा यासाठी सर्व विभागाच्या तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय यंत्रणेने आपसात समन्वय राखून एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिल्या. 

 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोळंके प्रामुख्याने उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की लोकांना सक्षम करणे हाच शाश्वत विकासाचा मार्ग असून यासाठी नागरिकांना त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची जनजागृतीद्वारे जाणीव करून द्यावी. आरोग्य विभागाकडे असलेल्या संसाधने व उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 शासनाच्या विविध योजना या आधार संलग्न असल्याने आधार कार्ड व केवायसी झालेले बँक खाते प्रत्येक नागरिकाकडे असणे आवश्यक आहे. त्याअभावी कोणीही शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून विशेष मोहिम राबवून 100 टक्के नागरिकांचे आधार कार्ड व बँक खाते काढावे, यासाठी गावनिहाय सर्व्हेक्षण करण्यासाठी सूचनाही श्री भाकरे यांनी दिल्या. 

 मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी पावसाळ्यात आरोग्य विभाग व महसूल विभागात समन्वय राहावा यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची यादी महसूल विभागाला उपलब्ध करून देण्याचे सांगितले. ग्रामीण भागातून रूग्णाला जिल्हा मुख्यालयात पाठविण्याची शिफारस करतांना त्याबाबत उपचारासाठी पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांना तातडीने पूर्वसूचना देण्याचे निर्देशही श्रीमती सिंह यांनी तालुका आरोग्य यंत्रणेला दिले. पावसाळा कालावधीत दुर्गम भागातील प्रसुती होणार असलेल्या गरोदर महिला यांच्या नियमित संपर्कात राहणे, सर्व महिलांची प्रसुती दवाखाण्यातच होईल याबाबत अलर्ट राहणे, गरोदर मातांना तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून परावृत्त करणे, बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर मातांना योग्य आहार मिळतो का याची खातरजमा करणे आदी सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, नियमित लसिकरण कार्यक्रम, वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य, गाभा समिती, साथरोग सर्वेक्षण, क्षयरोग दुरीकरण आदि विषयांतर्गत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणेची माहिती सादर केली.

बैठकीला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, बाल विकास अधिकारी व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

000


PostImage

Gadchiroli Varta News

June 11, 2024

PostImage

75 वर्षीय वृद्ध शेतकरी करणार उपोषण ; कारण काय पहा


75 वर्षीय वृद्ध शेतकरी करणार उपोषण ; कारण काय पहा 

 

गडचिरोली:-

 

येथील आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा. गडचिरोली यांच्या नावे गडचिरोली येथील जुना

सर्वे नंबर 548/2,549/2 (0.60) हेक्टर आर ही शेती 1995 पासून आहे. त्यांना फेरफार क्रमांक 912,913 असून शेतीवर न विचारता व साधा पत्रही न देता भूमी अभिलेख कार्यालयाने पुनर मोजणी च्या नावाखाली नवीन सातबारा नंबर 513/1 (0.36) व 528/1 (0.24) मुळ मालकाच्या नावाने बनवले. त्यामुळे अजूनही त्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.सदर शेतकऱ्याला कार्यालयाचे कुठलेही हेलपाटे न मारता त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता माजी खासदार अशोक नेते यांनी दोन पत्र कार्यलयाला पाठवले त्याचप्रमाणे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी तीन पत्र दिले परंतु अधिकारी त्यांच्या पत्राकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून आले आहे.

 

सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आली व काही त्रुटी पूर्ण करुन 8 दिवसात प्रकरण सादर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली ला उपविभागीय कार्यालयाने अवगत केले मात्र कार्यालयाने अजूनही कुठलीही त्रुटी पूर्ण न करता प्रकरण सादर केला. सातबारा दुरुस्ती च्या नावाखाली होणाऱ्या विलंबास जबाबदार कोण ? व माझ्या नावे नवीन सातबारा केव्हा तयार करून देणार ? या मागणीसाठी त्रस्त वृद्ध शेतकरी आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा.

 

गडचिरोली हे नाइलाजास्तव 24 जून 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याची माहिती उपोषणाच्या पत्रातून दिली आहे. तसेच जो पर्यंत माझा सातबारा भूमी अभिलेख कार्यालयातून सुधारणा होऊन येत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम राहणार आहे व माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास सर्व जिम्मेदारी भूमी अभिलेख कार्यालयाची राहील असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर गंभीर प्रकरणाकडे प्रशासन काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागले असून 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला केवळ सातबारा साठी उपोषणाला बसावे लागत असल्याची वेळ आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. सातबारा साठी वृद्ध शेतकरी उपोषणाला बसणार असल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष्यही लागले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 11, 2024

PostImage

तपासा संबंधाने बोलावले ; अन सूज येई पर्यंत सोलून काढले


तपासा संबंधाने बोलावले ; अन सूज येई पर्यंत सोलून काढले. 

 

कोरपना ठाणेदाराचा प्रताप ; पोलीस अधीक्षकाकडे तक्रार

 

 

कोरपना – मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे. त्या संबंधाने बोलवून ठाणेदारानी पट्ट्या- पट्ट्या ने झोडपून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणीची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांना करण्यात आली आहे.

दिलेल्या तक्रारीत, शुक्रवार दिनांक ७ जून रोजी संध्याकाळी सात वाजता कोरपनाचे ठाणेदार , एक वाहतूक पोलीस कर्मचारी, एक महिला पोलीस कर्मचारी यांना घेऊन तांडा ( धानोली ) येथे आले. येथील रमेश सिंगटराव मूनावत यांचे घरी अवध दारू साठा आहे. म्हणून घराची झाडाझडती घेतली. तेव्हा त्यांची लहान मुलगी उपस्थित होती त्या दरम्यान रमेश मुनावत यांचे पुतणे तक्रारदार

विपुल देविदास मुणावत यांनी घरात कुणीही नाही म्हणून सांगितले . तेव्हा ठानेदारानी शासकीय कामात अडथळा आणू नको बजावले. त्यांच्या काकाचे घर तपासल्यानंतर त्यांचे घर कुठे आहेम्हणून विचारले. असता त्यांनी ते सुद्धा दाखवले. तपासात घरात काहीच मिळून आले नाही. तेव्हा ठाणेदार यांनी मागील गुन्ह्याचा तपास आहे. म्हणून दिनांक ८ जूनला बोलावले. ठाण्याच्या आवारात पोहचताच विपुल मुनावत यांनी मोबाईल मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. ठाणेदारानी केबिनमध्ये बोलवले. त्याचबरोबर एका शिपायाला पट्टा घेऊन बोलवून याला पन्नास पट्टे मार म्हणत, त्या अगोदर शिवीगाळ केली. अर्धा तास पट्ट्यांनी सूज येई पर्यंत चोप दिल्यानंतर ठाणेदारांनी बहिण व आई विषयी अश्लील शिवीगाळ केली. दवाखान्यात गेल्यास पुन्हा चोप देतो अशी धमकी देऊन गावाला परत पाठविले. गावकऱ्यांनी त्यानंतर दवाखान्यात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून घेत डॉक्टर करवी उपचार केले . या अनुषंगाने झालेल्या प्रकरणाची चौकशी करून ठाणेदार व पोलीस शिपायास कारवाई करून तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी अन्यायग्रस्त व तक्रारदार विपुल मुनावत यांनी केली आहे.

—————————–

आरोपीवर काही महिन्या अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संबंधित माहिती विचारण्याकरिता त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले मात्र आरोपीने जो आरोप केला त्यात कसलेही तथ्य नाही असे मत व्यक्त केले कोरपणा ठाणेदार संदीप एकाडे


PostImage

Gadchiroli Varta News

June 10, 2024

PostImage

जिल्हाधिकारी पदाचा प्रभार श्री विजय भाकरे यांच्याकडे


जिल्हाधिकारी पदाचा प्रभार श्री विजय भाकरे यांच्याकडे

 

 लोकाभिमुख प्रशासनावर भर देणार

 

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचे निर्देश

 

गडचिरोली दि.१०: जिल्हाधिकारी श्री संजय दैने २० जून पर्यंत रजेवर असल्याने जिल्हाधिकारी पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री विजय भाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

श्री विजय भाकरे यांनी आज दिनांक १० जून रोजी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. 

 

जिल्हाधिकारी श्री भाकरे यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खरीप पिक कर्ज वाटप, तसेच बियाणे, खते व फवारणी औषध उपलब्धतेचा आढावा घेतला. 

     शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री भाकरे यांनी दिले असून तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तक्रार निवारणाची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

००००


PostImage

Gadchiroli Varta News

June 10, 2024

PostImage

मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) कार्यालयासमोर सलग पाचव्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू


मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) कार्यालयासमोर सलग पाचव्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू.

 

 

 

गडचिरोली (दि.१० ):- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधील रस्ता बांधकामादरम्यान अवैध मुरुम, माती उत्खनन करुन वाहतूक व वापर केल्याने संबंधित कंत्राटदाराला व त्यास सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी यासाठी मागील ५ दिवसांपासून सदर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

      आज ५ दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही.कार्यवाही करण्या संबंधित उपवनसंरक्षक यांनी यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात मात्र यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.

     आज ५ व्या दिवसी सदर आंदोलनास श्रीकृष्णा वाघाडे, मुकुंद जोशी , रेखाताई वंजारी, मनोहर नाडमवार बसलेले आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

June 10, 2024

PostImage

शेतकऱ्यांना ३१ जुलै पुर्वी पिक कर्जाचे वाटप करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी


शेतकऱ्यांना ३१ जुलै पुर्वी पिक कर्जाचे वाटप करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी 

 

 

गडचिरोली : जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती दुर्गम असल्याने शेतकऱ्यांना पिक कर्जाकरीता मोठ्या अडचणी येत असल्याने शासनाच्या पिक कर्ज योजने पासून हजारो शेतकरी वंचित राहतात. त्यामुळे कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ करून ३१ जुलै पुर्वी शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कोणताही इच्छुक व पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि सर्व सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मागिल अनुभव लक्षात घेता, जिल्ह्यातील अनेक बँका या शासनाने दिलेल्या लक्षांकाप्रमाणे पिक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप न करता वेगवेगळी कारणे देवून टाळाटाळ करतात. त्यामुळे रोवण्याचा हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारावर उभे राहावे लागते. 

 

सदरचा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि बँकांनी पिक कर्ज वेळेत आणि सुलभ प्रक्रीया राबवून तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधीत बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 8, 2024

PostImage

धान खरेदी अपहार प्रकरणात आणखी एका आरोपीतास अटक आरोपीतांची संख्या झाली 03


धान खरेदी अपहार प्रकरणात आणखी एका आरोपीतास अटक

 

आरोपीतांची संख्या झाली 03

 

विपनन निरीक्षकास दिनांक 15 जून 2024 पर्यंत पोलीस कोठडी 

 

 

 

 गडचिरोली : जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2022-2023 या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापुर्वी दोन आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांना दिनांक 15/06/2024 पावेतो पोलीस कोठडी मिळालेली आहे. 

 

 सदर गुन्ह्राचे तपासात दिनांक 06/06/2024 रोजी राकेश सहदेव मडावी, वय 34 वर्षे, व्यवसाय – नोकरी (प्रतवारीकार तथा विपनन निरीक्षक आदिवासी विकास महामंडळ, घोट) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याचा गुन्ह्रातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक 06/06/2024 रोजी अटक करुन दिनांक 07/06/2024 रोजी मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय, चामोर्शी येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दिनांक 15/06/2024 पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरचे प्रकरण धान खरेदी घोटाळ्याशी संबंधित असल्याने आणखी काही आरोपीतांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व मा. अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि सरीता मरकाम, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 7, 2024

PostImage

अवैद्य दारु विक्री ने शहरवासीय त्रस्त


अवैद्य दारु विक्री ने शहरवासीय त्रस्त 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड बौद्ध समाजाची निवेदनातून मागणी 

 

आष्टी: चामोर्शी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात सर्रास देशी दारु, इंग्लीश दारु, मोहफुलाची दारु विक्री केल्या जात आहे. तसेच बोद्ध विहाराच्या मागे आणि पुढे दारु विक्री जोमात चालु आहे आणि बौद्ध विहाराच्या आवारात दारुचा बाटला पडुन राहतात. आणि वंदनेसाठी गेलेल्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बाहेरगावचे लोक आणि इतर वार्डाचे दारु पिण्याकरिता लोक या वार्डात येतात आणि दारु पिणाऱ्या व्यक्तीकडून अतिशय त्रास होत आहे आणि दारु पिऊन वार्डामध्ये दारु प्राशन करून अश्लिल शब्दात शिवीगाळ करित असतात दारु पिऊन पडुन राहत असल्याने वार्डातील लोकांना दारु विक्रेत्यांकडुन त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वार्डातील अवैद्य दारु विक्री थांबविण्याची विनंती चामोर्शी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डातील त्रस्त महिला व पुरुषांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी केली आहे गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असताना देशी विदेशी दारू येते कुठून आणि अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांना निवेदन देऊन मागणी करण्याची वेळ येत आहे तर संबंधित विभाग अवैध दारू विक्रेत्यांना पाठिशी घालत आहे का? असा सवाल तालुक्यातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे 

 

 

कराल अशी आशा बाळगुन सेवेशी अर्ज सादर करित आहोत ही नम्र विनंती येत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 7, 2024

PostImage

येत्या आठ दिवसात 33. केवी उपकेंद्राचे उद्घाटन करून बांधकाम सुरू करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू


येत्या आठ दिवसात 33. केवी उपकेंद्राचे उद्घाटन करून बांधकाम सुरू करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू 

 जिल्हाधिकारि यांना 

देण्यात आले निवेदन 

 पेर मिली.. पेर मिली येथे 33. केवी उपकेंद्राचे बांधकाम करण्यासाठी माहे जानेवारी 2024 रोजी उद्घाटन करणार होते परंतु आज सहा महिन्याच्या कालावधी लोटूनही बांधकाम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे त्रासलेले वीज ग्राहकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली आणि पेर मिली व पेर मिली परिसरात वीज ग्राहक आणि सांगितले की भामरागड वरून पेर मिली परिसरात वीज पुरवठा होतो परंतु हे विज पुरवठा जंगलातूनच असल्यामुळे वीट पुरवठा वारंवार खंडित होत राहते परिणामी वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे येत्या आठ दिवसात 33 केवी उपकेंद्राचे उद्घाटन न केल्यास 19 जून 2024 रोजी प्रेम म्हणजे मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून विविध ग्राहक केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

June 4, 2024

PostImage

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी


12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी

        

 

गडचिरोली,दि.4: 12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6 लाख 17 हजार 792 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी उपस्थित होत्या.

शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते - अशोक नेते, भारतीय जनता पार्टी (476096), योगेश गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (19055), धीरज शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (2174), बारीकराव मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (2555), सुहास कुमरे,भीमसेना (2872), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (15922), करण सयाम, अपक्ष (2789), विलास कोडापे, अपक्ष(4402), विनोद मडावी, अपक्ष (6126), नोटा (16714). एकूण वैध मते 11 लाख 66 हजार 497.

000


PostImage

Gadchiroli Varta News

June 2, 2024

PostImage

रात्रीचे सुमारास गाढ झोपेमधे असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले


रात्रीचे सुमारास गाढ झोपेमधे असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले

 

अहेरी: सध्याच्या घडीला उकाळा वाढल्याने अंगणात खाट टाकून झोपून असलेल्या इसमावर अज्ञात वेक्तीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक तेवढीच खळबळजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे 2 जून रोजी उघडकीस आली. चरणदास गजानन चांदेकर (वय 48) असे जळालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात येथे उपचार सुरु असल्याची माहिती. मिळाली आहे.

 

वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. याची झळ जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातही पडतांना दिसत असून ग्रामीण भागात रात्रोच्या सुमारास आपल्या अंगणात नागरिक झोपत असतात. अश्यातच अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील चरणदास चांदेकर हे सुद्धा घरासमोरील अंगणात खाटेवर निवांतपणे झोपलेले होते. दरम्यान रात्रीचे सुमारास गाढ झोपेमधे अज्ञात व्यक्तीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले व तिथून काढता पाय घेतला. यावेळी त्यांच्या बाजूला झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना लक्षात येताच आग विझविली मात्र तोपर्यंत चरणदास हे आगीत गंभीर जखमी झाले होते लागलीच चंद्रपूर येथे त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु असल्याचे कळते. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

June 2, 2024

PostImage

कोरची दरोडा प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत उलगडा 03 सराईत आरोपी जेरबंद


 

कोरची दरोडा प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत उलगडा 03 सराईत आरोपी जेरबंद 

 

  दिनांक 25/05/2024 रोजी नवेगांव बांध, जि. भंडारा येथील व्यापारी देवेश पटेल यांनी सोपान पेशने, रा. केशोरी यांचे ईर्टीगा चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 35 ए.जी. 7001 ही भाड¬ाने घेवून वाहन चालकासह छत्तीसगड येथील वासडी येथे जावून सुगंधीत तंबाखु गडचिरोली मार्गे गोंदिया येथे नेत असतांना पोलीस स्टेशन, कोरची हद्दीतील मौजा मसेली जंगल परिसरात अज्ञात ईसमांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना अग्नीशस्त्राचा व इतर शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना बंदी करून त्यांच्या डोळ्यावर पट्टीवर बांधून त्यांना स्वत:च्या वाहनात बसवून दुस­या स्थळी हलविले. त्यानंतर सुगंधीत तंबाखु असणारी ईर्टीगा वाहन दुसरीकडे नेवून त्यातील संगंधीत तंबाखु जबरीने चोरून नेवून सदरचे वाहन कोरचीजवळ नेवून पेटवून दिले. अशा फिर्यादवरून पोलीस स्टेशन, कोरची येथे दरोडा व जाळपोळीचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला. 

 

  पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी प्रकरणाचे गांभीर्य बघून तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळ भेट देवून गुन्हा निष्पन्न करण्याबाबत आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची स्वतंत्र 03 पथके तयार करून संपुर्ण परिसर पिंजून काढून, त्यांचे गोपनिय बातमीदारांचे जाळे कार्यान्वीत करून माहिती घेतली असता सदर परिसरात मागील 2-3 वर्षात याचसारख्या 2 ते 3 घटना घडलेल्या असून त्यात काही लोकांना मारहाण देखिल झाल्याची माहिती मिळाली. परंतु, संबंधीत फिर्यादी हे अवैद्य व्यवसायाशी निगडीत असल्याने व आरोपींची दहशत असल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली नाही. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे धागे एकत्र करून माहिती संकलीत केली असता गडचिरोली-गोंदिया सिमावर्ती भागातील मौजा राजोली, जि. गोंदिया येथील सुगंधीत तंबाखुची तस्करी करणारा शोएब वकिल सय्यद हा त्याचे साथीदारांसह त्याचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी यांच्यात त्याची दहशत राहावी या उद्देशाने गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली. 

 

  दिनांक 01/06/2024 रोजी मौजा राजोली येथे जावून, सापळा रचून ईजराईल हकिम शेख, लोकेश हंसराज नगारे व प्रशांत मोहन सांगोळे यांना ताब्यात घेवून कसून विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्राची कबुली देवून त्यांचेसह आणखी साथीदार असल्याचे सांगीतल्याने नमूद तिन्ही आरोपीतांना सदर गुन्ह्राचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. रविंद्र भोसले यांचे ताब्यात पुढिल तपासकामी देण्यात आले. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे. 

 

 यासारखा प्रकार अथवा घटना इतर कोणासोबत घडली असल्यास त्यांनी नि:संकोच व निर्भीडपणे पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार द्यावी. त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात येईल. असे आवाहन पोलीस अधीक्षक, गडचिरोली, श्री. नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व जनतेला केलेले आहे.

 

  सदर कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक, उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, म.पोलीस उपनिरीक्षक, सरीता मरकाम, पोहवा राकेश सोनटक्के, देवेंद्र बांबोळे, अकबरशहा पोयाम, मपोहवा पुष्पा कन्नाके, पो.ना शुक्राचारी गवई, पंकज भगत, माणिक निसार, पोशि माणिक दुधबळे, रोहन जोशी, सुनिल पुठ्ठावार, सचिन घुबडे, संजु कांबळे, क्रिष्णा परचाके, प्रशांत गरफळे, दिपक लोणारे, विनोद चापले, मपोशि सोनम जांभुळकर, फोटोग्राफर देवेंद्र पिदुरकर, सर्व नेमणुक स्थागुशा, गडचिरोली व सायबर पोलीस स्टेशनचे पोउपनि निलेशकुमार वाघ व नापोशि श्रिनिवास संगोजी तसेच पोलीस स्टेशन, गडचिरोली चे पोउपनि बालाजी सोनुने व चापोहवा शंकर अरवेल्लीवार, मोपवि गडचिरोली यांनी अथक परिश्रम घेवून गुन्हा उघडकिस आणला.

 

---000---


PostImage

Gadchiroli Varta News

May 29, 2024

PostImage

कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून पतीने आपल्या पत्नीचे मुंडके केले धडावेगळे


कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून पतीने आपल्या पत्नीचे मुंडके केले धडावेगळे

 

 

4 मुलींचे संसार आले उघड्यावर

 

 

*कोरची* :- तालुका मुख्यालयापासून 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे रात्री 3 वाजताच्या दरम्यान पत्नी आणि 5 वर्षाची मुलगी झोपेत असताना पती रोहिदास बंजार याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून धडापासून मान वेगळी करून टाकली ही सर्व घटना 5 वर्षाची मुलगी बघत असताना तिला सुद्धा धमकावल्याची माहिती प्राप्त झाली असून आरोपी रोहिदास राऊत बंजार याला पोलिसांनी अटक केलेली आहे.

 

मृतक अमरोतीन बंझार (वय 33) आणि रोहिदास बंजार (वय 38) यांचे 2009 ला लग्न झाले व त्यांना 4 मुली असून नवव्या वर्गात असलेली सर्वात मोठी मुलगी ही घटनेवेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती व दोन मझव्या मुली हे आपल्या आजी कडे झोपून होते तर लहान मुलगी आरोपी रोहिदास व आपल्या आई सोबत झोपून होती.

 

यापूर्वी सुद्धा रोहिदास आपल्या पत्नीला मारझोड करतो म्हणून 4 वर्षापूर्वी बेतकाठी येथे गावात बैठक घेऊन त्याची समझूत सुद्धा काढण्यात आली होती परंतु कुठला तरी राग मनात धरून त्या नराधमाने आज आपल्या पत्नीला लहानश्या चिमुकलीच्या समोर अक्षरशः संपवून टाकल्यामुळे या 4 लहान मुलींचे संसार आता उघड्यावर आले असल्याचे दिसून येत आहे. 

 

घटनेनंतर आरोपी यांनी आपली कुऱ्हाड लपविली होती ती कुऱ्हाड कुठे लपविली ती त्या लहान चिमुकलीने पोलिसांना सांगितले व पोलिसांनी आरोपी रोहिदास यास अटक केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कोरची चे प्रभारी अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

काही महिन्यापूर्वी आरोपी हा बोअर चे काम करण्याकरिता दुसऱ्या जिल्ह्यात गेला होता तिथ त्याने आपल्याच मालकाला सुद्धा मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 26, 2024

PostImage

गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई २५ लाखाचे चोर बिटी बियाने जप्त


*गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई २५ लाखाचे चोर बिटी बियाने जप्त*

 

 

 

गोंडपिपरी :-

 

गोंडपिंपरी येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने दि 23 गुरुवारी रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला २५ लाखाचे चोर बिटी बियाणे वाहतूक करताना बियाणे जप्त केले. 

अनाधिकृत चोरबीटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही .कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते.शेतकऱ्यांना चोर बिटि विक्री करून फसवणूक केली जात आहे.या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग,पोलीस विभाग हे अलर्ट आहेत.ठाणेदार रमेश हत्तिगोटे व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना दि.२३ रात्री १२ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत वय (24) रा.अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे गाडी क्रमांक MH 34 एम 8635 वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे 12.90 क्विंटल 25.80 लक्ष रुपये किमतीचे बियाणे सापडले. संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.दि. (24)शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली. ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत,विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय,जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,मुख्य गुणवंत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख,कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत,उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी,कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पंचायत समिती कृषिअधिकरी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे,श्रावण बोढे,विवेक उमरे,पोहवा देविदास सुरपाम,मनोहर मत्ते,शांताराम पाल, प्रशांत नैताम,पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली. चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण 30 लाख 86 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


PostImage

Gadchiroli Varta News

May 22, 2024

PostImage

तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक  सापडले एसीबीच्या जाळ्यात


तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक  सापडले एसीबीच्या जाळ्यात 

 

 

 

आष्टी:-

तहसिल कार्यालय मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील पुरवठा निरीक्षक राहूल भाउजी डोंगरे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे

 

  राहुल भाऊजी डोंगरे वय ४० वर्षे रा. आष्टी हे मुलचेरा तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यानी आपल्या पदाचा फायदा घेण्यासाठी राशन कार्ड धारकांना नेहमीच सतावून लाचेची मागणी करीत होते व महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ५०० रुपये खर्च येतो ते तुम्ही द्या नाहीतर तुमचे काम होणार नाही असे सांगून हात झटकून टाकीत होते 

त्यामुळे त्रस्त झालेल्या वर्षा गुरुदास गेडाम यांनी एसीबीच्या अधिकारी यांना माहिती दिली त्यावरून प्रत्यक्ष शाहनिशा करुन मुलचेरा तहसील कार्यालयात सापळा रचला असता राहुल भाऊजी डोंगरे ५०० रुपये लाच घेताना साक्षीदार यांच्या समक्ष मिळूण आले 

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मु. मुखडी टोला पो. गोविंदपुर ता. मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराची आई नामे जिवनकला गेडाम हिचे नावे असलेला शिधापत्रिका मध्ये वडील, मजवा भाऊ, वहीणी व भावाची मुलगी यांची नावे होती. तक्रारदार यांचे मजवा भाऊ गुरुदास यांच्या कुंटूबाचे नविन शिधापत्रिका वहीनी नामे वर्षा गुरुदास गेडाम यांचे नावे दि. ३०/०१/२०२४ रोजी तयार करण्यात आले. परंतू स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडे थम मशीनवर नाव न आल्याने शासनाच्या योजनेचे राशन मिळत नसल्याचे वहीनी वर्षा यांनी सांगीतले. तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे यांना माहिती दिली तेव्हा महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता ५००/-रू. लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली कॅम्प मुलचेरा येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली.

 

पोलीस उपअधीक्षक, श्रीमती अनामिका मिर्झापुरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळ कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने, महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता आरोपी राहूल भाऊजी डोंगरे, पद-पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली यांनी ५००/- रूपयाची पंच साक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी करून ५००/- रू. लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे. मुलचेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी डोंगरे यांचे आष्टी येथील निवासस्थानाची ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चम्मु कडुन झडती घेण्यात आली.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, श्री राहुल माकणीकर, ॲन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो. नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जोंजारकर, पोष्टि संदिप उडाण, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 22, 2024

PostImage

हत्याकांडातील तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा


 

मौजा कोंढाळा ता. देसाईगंज येथील हत्याकांडातील तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व एकुण 2 लाख 75,000 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली

* मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दि. 24/08/2017 रोजी सायंकाळी तान्हापोळ्याच्या दिवशी 07.30 वा. ते 07.45 वा. च्या सुमारास मयत दिनेश दिगांबर झिलपे, वय 37 वर्षे रा. कोंढाळा याचा भर चौकात आरोपी शामराव सोमा अलोने त्याचा मुलगा आरोपी विनायक शामराव अलोने व आरोपी राजु ढोरे सर्व राहणार कोंढाळा यांनी गोपाल कसारे यांच्या पानठेल्याजवळ लोखंडी रॉड व पावड्याने मारुन निर्घुणपणे हत्या करुन मयताचे प्रेत हे कोंढाळा ते रवि रोडवर जंगलामध्ये फेकुन दिले. याबाबत मयताचे वडील दिगंाबर झिलपे यांनी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अप.क्र. 367/2017 कलम 302, 201, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना दि. 27/08/2017 रोजी अटक करण्यात आली. तपासामध्ये असे निदर्शनास आले की, मयत दिनेश यास दारुचे व्यसन होते. आरोपी शामराव अलोने याने त्याच्या दुकानासमोर एक वर्षापुर्वी मयत दिनेश याच्या पायावर व डोक्यावर कु­हाडीने वार केला होता. परंतु त्याच्या उपचाराचा खर्च हा आरोपी शामराव याने खर्च केला होता. त्यामुळे त्याबाबतची रिपोर्ट पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती. परंतु काही दिवसाने आरोपी शामराव व त्याचा मुलगा विनायक हे पैशाची मागणी मयताकडे करु लागले. त्यावरुन जुन्या रागावरुन सदरचे हत्याकांड घडुन आले. घटनेच्या दिवशी मयताची पत्नी निता दिनेश झिलपे ही मयताला चौकातुन घरी आणण्यासाठी गेली असता, तिला मयताला तिन्ही आरोपी यांनी पावड्याने व लोखंडी रॉडने मारहाण करीत असल्याचे दिसले. त्याबाबत तिने तिचे सासरे दिगांबर झिलपे यांना माहिती दिली.

 

त्यावरुन फोनद्वारे पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनास्थळावर मयताचे प्रेत आढळुन आले नाही. परंतु मयताचे चप्पल, मोबाईल व रक्ताने माखलेली जागा दिसुन आली. तपासादरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर मयताचे प्रेत आरोपी शामराव यांनी लपवुन ठेवलेली जागा दाखविली व मयताचे प्रेत ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळुन आले. तसेच लोखंडी रॉड व पावड्यावर रक्ताचे डाग आढळुन आले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल व ईतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. त्यावरुन सेशन केस क्र. 87/2017 नुसार खटला न्यायालयात दाखल करण्यात आला. मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांनी सर्व बाबींचा व सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा योग्य व न्यायोचित ग्राह्य धरुन आज दिनांक 21/05/2024 रोजी आरोपी शामराव अलोने, वय 57 वर्षे व राजु ढोरे, वय 36 वर्षे दोन्ही रा. कोंढाळा यांना कलम 302, 201, 34 भादवी अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 1 लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी विनायक अलोने, वय 37 वर्षे, यास कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेप व 75,000 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रु. 2 लाख 75,000 हजार मयताची विधवा पत्नी निता दिनेश झिलपे हिला देण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला.

 

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. अनिल एस. प्रधान व सहा. सरकारी वकील निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. शैलेश काळे, सपोनि./अतुल श्रावन तवाडे, पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.


PostImage

Gadchiroli Varta News

May 21, 2024

PostImage

कोंढाळा येथील इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू.


कोंढाळा येथील इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू...

- देसाईगंज तालुक्यातील घटना...

 

 

देसाईगंज :- आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका ६४ वर्षीय इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक- २० मे रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे घडली.तुळशीदास शेंडे असे मृताचे नाव आहे.

आज,सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तुळशीदास शेंडे व इतर दोघेजण शेतावर आंबे तोडण्यासाठी गेले होते.तुळशीदास हे आंबे तोडण्यासाठी झाडावर चढले असता; झाडावरून पाय घसरून पडले.त्यात त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव तसेच शरीरावर जबर मार लागल्याने जखमी झाले.जखमी अवस्थेत त्यांना सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घरी आणण्यात आले.त्यानंतर तुळशीदास यांचे स्वास्थ्य बिघडू लागल्याने त्यांना उपचाराकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर उपचार करतेवेळी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान तुळशीदास शेंडे यांची प्राणज्योत रुग्णालयातच मावळली.तुळशीदास यांच्या पश्चात मुलगा,सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.तुळशीदास शेंडे यांच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 17, 2024

PostImage

पाणीपूरवठ्याची कामे मूदतीत पूर्ण न करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करणार -जिल्हाधिकारी


पाणीपूरवठ्याची कामे मूदतीत पूर्ण न करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करणार -जिल्हाधिकारी

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

 

गडचिरोली,दि.17(जिमाका): पाणीपूरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून जिल्ह्यात पाणी पूरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या व निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले. यासोबतच कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास कंत्राटदारांसोबतच संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत गंभीर दखल घेण्याच्या सूचना श्री दैने यांनी दिल्या.

जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक काल जिल्हाधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील, वरिष्ट भूवैज्ञानिक अभिजीत धाराशीवकर उपस्थित होते.

नागरिकांना तातडीने पाणी मिळावे यासाठी कोणत्याही परिस्थितीत योजनेच्या कामांना उशीर होवू नये. ग्रामीण व दुर्गम भागात पावसाळ्यातही कामे बंद पडू नये याची दक्षता घेवून रेती, गिट्टी, सिमेंट आदी साहित्यसाठा आताच उपलब्ध करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवावे व संबधीत विहिरींवर उंच कठडे व जाळी लावून ते सुरक्षीत केली असल्याची खात्री करून घेण्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी जिल्ह्यातील पाणीपूरवठा योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 1082 मंजूर पाणीपूरवठा योजनांपैकी 929 पुर्ण तर 153 प्रगतीपथावर आहेत. तसेच आदीम जमातीसाठीच्या पीएमजनमन योजनेतील 126 पैकी 44 पूर्ण तर 82 योजना प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. 

बैठकीला जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे संबंधीत अधिकारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.

000


PostImage

Gadchiroli Varta News

May 17, 2024

PostImage

आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने कायम अलर्ट असावे - जिल्हाधिकारी संजय दैने


आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने कायम अलर्ट असावे

- जिल्हाधिकारी संजय दैने 

*आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा*

गडचिरोली दि. 16 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या व धरणाचा पाणीसाठा आहे. आपल्याकडे पाऊस असला किंवा नसला तरी इतर जिल्ह्यातील धरणाच्या विसर्गाचे पाणी नदीद्वारे जिल्ह्यात येवून पूर परिस्थतीत उद्भवू शकते. यामुळे मान्सून कालावधीत कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक श्री दैने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह. सहायक जिल्हाधिकारी सर्वश्री राहुल मीना, आदित्य जीवने, श्रीमती मानसी, अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.

आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आतापासूनच राबविण्याचे व दुर्घटनेस कारणीभूत ठरणाऱ्या मानवी चुका टाळण्यावर विशेष भर देण्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी नद्या व पुर्वीची पूर परिस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अभ्यासाव्या. आपल्या भागातील जेसीबी चालक पोकलँन्ड, खोल पाण्यात पोहणारे तैराक, बचाव पथकातील तरूण, यांची यादी तयार ठेवावी. वेळोवेळी तुटलेली झाडे उचलणे, मलबा हटवणे, गाव-खेड्यातील नदीनाल्यांवरील छोटे पूल दुरुस्त करून घेणे, पाणी सुरळीत जाण्यासाठी त्यांची साफसफाई करणे, यात्रेच्या ठिकाणी रस्ते मोकळे राहतील व अतिक्रमण होणार नाही याबाबत दक्षता घेणे, धोकादायक म्हणून प्रमाणित केलेल्या इमारती तसेच बंद व वापरात नसलेल्या जुन्या शासकीय इमारती तातडीने पाडाव्यात. सामुदायिक आरोग्य केंद्रात सर्प चावल्यानंतर द्यावयाची औषधी उपलब्ध ठेवावी.  

ग्रामपंचायतींनी पाण्याची पाण्याच्या स्रोताची स्वच्छता तसेच नालेसफाई करून घ्याव. हॅन्डपंप, विहीर मध्ये ब्लिचिंग पावडर टाकावे. पिण्याच्या पाण्याजवळ सांडपाण्याचे डबके साचू नये व असल्यास तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी श्री दैने यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 47 गावे नदीकिनाऱ्यावर असून 112 गावांमध्ये दोन महिन्यासाठी तर 67 गावे दोन आठवड्यांपर्यंत वाहतूक संपर्कात नसतात. त्यामुळे अशा गावांमध्ये किमान चार महिन्याचे राशन व औषध साठा तातडीने उपलब्ध करावा व सदर धान्यसाठा पोहचला की नाही याची खात्री करावी. यासोबतच या गावातील पुढील चार महिन्यात प्रसुतीची तारीख असलेल्या गर्भवती महिलांना इतर जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी तसेच त्यांच्या सोबतच्या महिला व बालकांना देखील रिक्त वार्डात राहण्याची जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

 

मान्सून कालावधीत तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय पाण्यात बोट, होडी, डोंगा नेता येणार नाही. रस्त्यावरून पुलाचे पुराचे पाणी जात असताना गाडी टाकू नये. मेंदूज्वर, मलेरिया, गॅस्ट्रो आदी दूषीत पाणी व डासांमुळे होणारे रोग टाळण्यासाठी गावागावात बैठक घेऊन स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करावी. वीज पडून जीवीत हाणी होऊ नये यासाठी जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभारण्याचे त्यांनी सांगितले. तसेच पावसात झाडाखाली आसरा न घेण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सांगितले 

*अवैध होर्डिगवर कारवाई करा*

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध होर्डिंग बाबत नगर परिषदेने काय कारवाई केली याबाबत जिल्हाधिकारी यांनी विचारणा केली. शासकीय कार्यालयाच्या परिक्षेत्रात शासकीय होर्डिंग शिवाय दुसरे कोणतेही होर्डिंग असू नये. आपल्या हद्दितीलअवैध होर्डिंग तातडीने काढावे. दुर्घटना घडल्यास संबंधित परीक्षेत्रातील अधिकाऱ्याला यासाठी जबाबदार ठरवून कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी, सिंचन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, विद्युत विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000


PostImage

Gadchiroli Varta News

May 15, 2024

PostImage

*दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह*


*दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह*

*हिवताप चाचणी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन*

 

गडचिरोली,दि.14 (जिमाका): हिवताप प्रतिबंध विशेष कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकाऱ्यांकरिता मलेरिया मायक्रोस्कोपी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल करण्यात आले. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण असून त्यामुळे हिवताप आजाराचे त्वरित निदान व त्वरित उपचार करणे सोइचे होईल, असे श्रीमती आयुषी सिंह यांनी सांगितले. 

 

राष्ट्रीय मलेरिया अनुसंधान संस्थान, दिल्ली यांचेतर्फे श्री. साई इंन्स्टीटयूड ऑफ नर्सिंग मेडिकल सायन्स गडचिरोली येथे दिनांक 13 मे ते 18 मे 2024 पर्यत प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. प्रशिक्षणात हिवतापाची लागण झालेल्या रुग्णावर योग्य उपचार करण्यासाठी रक्ताची चाचणी करून हिवतापाचे परजीवी व त्यांचे प्रजाती निश्चित करणे, हिवतापाचे परजीवी मानवी शरीरातील विकासाचे टप्पे व त्यांचे जीवनचक्र तसेच हिवतापाचे जलद निदान व आर.डी.के. चाचन्यांची गुणवत्ता याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मुलभूत प्रशिक्षण प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी यांना दिले जाणार आहे. 

 

प्रशिक्षण सत्र शुभारंभप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार,केंद्र स्तरीय प्रशिक्षक श्री. नसीम,टेकनिकल ऑफिसर, श्री. हरीओम,टेकनिकलअसिस्टंट राष्ट्रीय मलेरिया अनुसंधान संस्थान, दिल्ली,राज्य स्तरीय प्रशिक्षक डॉ. संजय कार्लेकर, कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, श्री. भास्कर सूर्यवंशी, श्री. कृष्णा अवधूत, आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर, श्री. सचिन डोंगरे, प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी, हिवताप कार्यालय अकोला उपस्थित होते.

000


PostImage

Gadchiroli Varta News

May 12, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदा नियुक्ती झाल्याबद्दल शंकर ढोलगे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव !


गडचिरोली जिल्हा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदा नियुक्ती झाल्याबद्दल शंकर ढोलगे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव !

 

 

 जिल्ह्यातील अतिशय मागासलेल्या आल्लापल्ली सारख्या दुर्गम , अतिदुर्गम, अति संवेदनशील भागात स्वतःचा जीव ओतून अनेक आंदोलनात व सामाजिक चळवळीमध्ये हिरारीने पुढाकार घेवून , अनेक गोर,गरीब,आदिवासी बांधवांना मदतीचा हात देवून, व त्यांच्या प्रत्येक सुख दुःखाला धावून जाणारे , शंकर ढोलगे या संघर्षशील नवतरुणाच्या, कार्यकर्तृत्वाची , त्यांचात असलेल्या त्यागमय, सेवाभावी वृत्तीची दखल घेवून ,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी दुर्गम ,अतिदुर्गम भागातील अन्यायग्रस्त आदिवासी व इतर समुहातील गोर,गरिबांना न्याय मिळावा , त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी व जिल्ह्यात दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या खांद्यावर फारमोठी जबाबदारी टाकून त्यांची गडचिरोली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना जिल्हा स्तरावर काम करण्याची नवीसंधी दिली आहे 

त्यांच्या नवनियुक्ततीने परिचित त्याचे अनेक चाहते , व सामाजिक चळवळ मध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचेवर अभिनंदचा वर्षाव करून त्यांच्या नव नियुक्तीचे स्वागत सुद्धा केलेले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 12, 2024

PostImage

आष्टी पोलीसांनी चारचाकी वाहनासह पकडली लाखो रुपयाची दारु


आष्टी पोलीसांनी चारचाकी वाहनासह पकडली लाखो रुपयाची दारु

दिनांक. ११/०५/२०२४ रोजी गोपनिय सुआव्दारे माहिती प्राप्त झाली की मौजा गोडंपिपरी ते घाटकुर मार्गानी एक चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. ३२ ए.एच.५५५६ स्कॉरपिओ या वाहनाने देशी व विदेशी दारूची वाहतुक करणार असल्याची गोपनिय बातमीदाराकडुन खावीशिर खबर मिळाल्याने पोस्टे स्टॉफ यांनी नमुद वाहनास मौजा आष्टी जवळील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय च्या समोरील रोडवर आष्टीते आलापल्ली कडे जाणा-या मार्गावर पाळत ठेवून बसलो असता एक चारचाकी वाहन संशयीतरित्या भरधाव वेगाने येताना दिसल्याने सदर वाहनास हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालक यांनी जाणीवपूर्वक सदरचे वाहन नाकेबंदी करीत असलेल्या कर्मचा-याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न कर्मचा-यास दुखापत करुन शिताफीने आपले ताब्यातील वाहन मागे वळवुन मौजा आष्टी येथील आंबेडकर चौकातून वळवुन चामोर्शी मार्गे निसटून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोस्टे आष्टी येथील अधिकारी व कर्मचा- यानी सदर वाहनाचा शिताफीने पाठलाग करून सदर वाहनास मौजा चामोर्शी येथील सार्वजनीक बांधकाम विभाग चामोशीं यांचे कार्यालया समोरील महामार्ग क्रमांक ३५३ सी. या वरती सदर वाहनास चामोर्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाठलाग करीत असलेले पोस्टे आष्टी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर वाहनास थांबवून चेक केले असता १) पांढ-या रंगाच्या खर्डाचे ०८ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ०२ लिटर मापाच्या इम्पेरियल ब्लु कंपनिच्या ०६ बॉटल असे एकुण ४८ बॉटला प्रती बॉटल विक्री किमंत २,०००/- रुपये प्रमाणे एकुण किंमत ९६,०००/- रुपयाचा मुद्देमाल २) खाकी रंगाच्या खांचे ४० बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ९० मि.ली. मापाच्या रॉकेट देशीदारु संत्रा कंपनिच्या १०० निपा एकुण ४००० निपा प्रतिनिप विक्री किमंत ८०/- रुपये प्रमाणे एकूण किंमत ३,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल ३) एक जुनी वापरती पांढ-या रंगाची स्कॉरपिओ वाहन क्रमांक एम.एच. ३२ ए.एच.५५५६ एकुण किंमत १५,०००,००/- ४) दोन वापरते जुने विचो कंपनिचे मोचाईल एकूण किंमत १००००/- रुपये असा एकूण १९,२६,०००/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला. सदर चाहनातील इसम नामे १) नितेश वशिष्ट चंदनखेडे वय ३४ वर्ष व्यवसाय चालक रा. नागसेननगर भद्रावती ता. भद्रावती जि. चंद्रपुर २) निखील राजु क्षिरसागर वय २१ वर्ष, व्यवसाय मजुरी रा. गवराळा गणपती वार्ड भद्रावती ता. भद्रावती जि. चंद्रपुर या विरुध्द पोलीस स्टेशन आष्टी अप क्रमांक ७२/२०२४ कलम ३०७,३४ भादवी, सहकलम ६५ (अ),८३ मदाका, १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखलकरुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे पोस्टे आष्टी हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल साो. गडचिरोली मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. चिंता साो. गडचिरोली मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश साो. अहेरी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमर मोहीते सा. अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक श्री. विशाल प्र. काळे यांचे नेतृत्यात पोलीस उपनिरीक्षक श्री. दयाल मंडल, पोउपनि अतुल तराळे पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास मानकर, पोशि/३४१२ अतुलतोडासे, पोशि/३३१५ संतोष नागुलवार, पोशि/५६६१ मुनेश रायसिडाम, पोशि/५८४६ पराग राजुरकर, पोशि/ ५६७५ मेदाळे यांनी सदर कामगीरी यशस्वीरीत्या पार पाडली


PostImage

Gadchiroli Varta News

May 7, 2024

PostImage

चपराळा येथे पुरातन महादेव मुर्तीचे पुनर्स्थापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न


चपराळा येथे पुरातन महादेव मुर्तीचे पुनर्स्थापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

 

पंदिलवार दाम्पत्यांनी केली आर्थिक मदत 

 

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे पुरातन महादेव मुर्तीचे पुनर्स्थापना सोहळा सोमवारी (दि. ०६ ) उत्साहात करण्यात आला. त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई पंदिलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी महादेव मुर्ती पुनर्स्थापना करीता आर्थिक मदत करुन मदतीचा हात दिला. प. पु.संत कार्तिक स्वामी मुरलीधर महाराज यांच्या हस्ते महादेव मुर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली व सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी साडेसात पासून रात्री पर्यंत अभिषेक,हवन,पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद, ्भजन, असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. चपराळा हे पुर्वीपासुनचे धार्मिक स्थळ म्हणून परराज्यात सुद्धा ओळखला जातो चपराळा विषयी फार पुरातन काळापासून फार मोठी लोकवस्ती असल्याचे बोलले जाते अशी आख्यायिका आहे की बैल पोळ्याच्या दिवशी हरवलेला बैल परत दुसऱ्या पोळ्याच्या दिवशी मालकाला मिळाला असे जुने प्रोढ व्यक्ती सांगतात सध्याच्या लोकवस्तीच्या दोन किमी परिसरात अनेक पुरातन अवशेष सापडतात तसेच जंगल परिसरात बोळ्या, तलाव आजही आहे यावरून ह्या परिसरात फार मोठी लोकवस्ती असल्याचे निष्पन्न होते.

वैनगंगा - वर्धा नदिच्या पवित्र संगमावर प्राणहिता नदिच्या काठावर कार्तिक स्वामी महाराजांचे हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा हे पवित्र स्थळ असले तरी गाव शेजारी अनेक स्थळी देव देवतांचे मुर्ती त्यातीलच एका स्थळाचे महादेव मंदिर म्हणून ती मुर्ती उघड्यावर होती आणि गावातीलच लोकांच्या आर्थिक सहकार्यातून पाच सात वर्षांपूर्वी मंदिर उभे झाले परंतु मंदिरात पुरातन मुर्तीचे स्थापना होऊ शकले नाही परंतु हल्ली कार्तिक स्वामी महादेव मंडळ व गावकरी च्या वतीने मुर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त चपराळा परिसरातील अनेक आबालवृद्ध, माता भगिनी,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

May 6, 2024

PostImage

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना विश्रांती घेण्याचा डॅाक्टरांचा सल्ला


मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना विश्रांती घेण्याचा डॅाक्टरांचा सल्ला

( बॅकपेनमुळे बेडरेस्ट, मुंबईत उपचार सुरू)

 

गडचिरोली - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पाठ व कंबर दुखापतीच्या आजारामुळे डॅाक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांनी विश्रांती न घेतल्यास त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागू शकते, असा ईशाराही डॅाक्टरांनी दिला आहे. 

सविस्तर असे की, मंत्री आत्राम यांना पाठ व कंबर दुखीचा आजार काही महिन्यापासून सुरू होता, मात्र त्यांनी या दुखापतीकडे दुर्लक्ष करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. कंबरेला पट्टा बांधून ते संपूर्ण लोकसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरले, तब्येतीकडे त्यांचे झालेले दुर्लक्षच आता त्यांच्या दुखापतीसाठी कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी आता त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगीतले आहे. आज ते मुंबईहून गडचिरोलीला परत येणार होते मात्र त्यांना प्रवास करण्यासाठी सुद्धा डॅाक्टरांनी मनाई केल्याचे सांगीतल्या जात आहे.  

त्यांनी विश्रांती घेतल्यास ते लवकर बरे होतील असेही डॅाक्टरांनी म्हटले आहे. 

——————-


PostImage

Gadchiroli Varta News

May 6, 2024

PostImage

नक्षल्यांचा घातपाताचा कट फसला; पोलिसांकडून स्फोटके नष्ट


नक्षल्यांचा घातपाताचा कट फसला; पोलिसांकडून स्फोटके नष्ट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 दरम्यान आय.ई.डी. हल्ले करण्याच्या योजनेत माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवली असल्याबाबतची विश्वासार्ह माहिती प्राप्त झाल्याने कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 साठी त्या भागात क्षेत्राचे शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलांची जोरदार तैनाती करण्यात आली होती, ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स / स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे काल टिपागड परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकीस आले जिथे डोंगरावर ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आले होते.

     मा. पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 02 बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी - 60 चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविणेकामी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आला. आज सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले 03 क्लेमोर पाईप्स देखील सापडले. उर्वरित 3 क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. एकुण 9 आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले.

तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. पोलीस मदत केंद्रामध्ये आल्यानंतर गुन्हा नोदविण्याची तजवीज ठेवली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 5, 2024

PostImage

नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार


नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार

 

तालुका प्रतिनिधी चामोर्शी -

पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै. येथील 2 विद्यार्थ्यांची नुकत्याच पार पडलेल्या नवोदय प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये निवड झाली आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात 8 विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. याचेच औचित्य साधून दिनांक 04 -05-2024 रोज सोमवारला जि.प. केंद्र शाळा कुनघाडा रै. येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोतम सातपुते उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून आदरणीय रा. णा. सातपुते सर, केंद्रप्रमुख गोमासे सर, किरण कुकडे, रोशन दुधबळे, गिरीधर कुनघाडकर मुख्याध्यापक तावाडे सर, प. शि. कु. गीता शेंडे, जगदीश वैरागडे, कविता कुनघाडकर, वीणा दुधे व लर्निंग लिंक फाऊंडेशन चे कार्यकर्ते उज्ज्वल गोरे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नवोदय विद्यालय येथील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल यश संदिप बारसागडे, हिमांशू नितीन कुनघाडकर, या दोन विदयार्थ्यांचा भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परिक्षेत बाजी मारणाऱ्या यश संदीप बारसागडे, हिमांशू नितीन कुनघाडकर, संघर्ष अशोक दुधे, आयुष पुरुषोतम सातपुते, गोविंद किरण कुकडे , वेदांत गिरीधर कुनघाडकर , निरंजन सत्यविजय भांडेकर, आदित्य रमेश वासेकर या विद्यार्थ्यांचा भेटवसू व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी मार्गदर्शन करतांना सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रा.णा. सर यांनी कुनघाडा येथील शाळेतील शिक्षक, शा. व्य. सामिती, पालक यांचे योगदान फार महत्वपूर्ण आहे, म्हणूनच आज जिल्हयात जास्तीत - जास्त येथील विद्यार्था गुणवंत ठरले आहेत. केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे म्हणाले कि, छोट्या छोट्या प्रयत्नांतूनच यशाची वाट चाल करता येते, विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधीच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, अभ्यासातील सातत्य सोडू नये हा बोध आपण सर्व विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्यातून घ्यावा. अभ्यासाचे आणि कष्टाचे फळ गोड असते. असेच प्रयत्न करीत राहावे. याप्रसंगी मुख्याध्यापक तावाडे किरण कुकडे यांनी समयोचित भाषणे झाली. नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षा चे मार्गदर्शक शिक्षक गुरुदास सोनटक्के, विजय दुधबावरे, कु. गीता शेंडे या शिक्षकांचाही शाळेतर्फे तसेच पालकांतर्फे भेटवस्तू-वस्त्र पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या देखण्या सोहळ्याचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षिका कु.गीता शेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक प्रमोद बोरसरे यांनी केले. याप्रसंगी बहुसंख्य पालक माताभगिनी विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

May 5, 2024

PostImage

कुनघाडा (रै.) जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेचा सत्कार


कुनघाडा (रै.) जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेचा सत्कार

 

*मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केला गौरव.

* यश हे परिश्रमपूर्वक वांरवार केलेल्या छोट्या प्रयत्नांचे परिणाम आहे - 

आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिपादन

 

 

तालुका प्रतिनिधी चामोर्शी: 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकाच शाळेचे 8 विद्यार्थी पात्र होऊन मिळालेल्या यशाबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै.) शाळेचा सत्कार करण्यात आला. 2 मे 2024 रोजी मुख्याध्यापक आढावा तथा प्रेरणा कार्यशाळा गडचिरोली येथील कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आयुषी सिंह, डायट प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी (माध्य.) भुसे साहेब, उपशिक्षणाधिकारी ( प्राथ) विवेक नाकाडे, उप.माध्य. शिक्षणाधिकारी अमसिंग गेडाम साहेब, निरंतर शिक्षणाधिकारी गोंगले साहेब, डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता विनीत मत्ते, गडचिरोली पं. स. गटशिक्षणाधिकारी परसा मॅडम, गटशिक्षणाधिकारी चामोर्शी पं.स. गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के व चामोर्शी व मुलचेरा पं.स. अंतर्गत शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत केंद्रशाळा कुनघाडा रै. च्या वतीने केंद्रप्रमुख गुरदास गोमासे व पदवीधर शिक्षिका कु. गीता शेंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरात इयत्ता पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा कुनघाडा (रै.) येथील एकाच शाळेतील ८ विद्यार्थी पात्र ठरून जिल्ह्यात आपल्या नावाची मोहर उमटवली. शाळेच्या यशामध्ये मुख्याध्यापक नवराज तावडे, पदवीधर शिक्षिका गीता शेंडे वर्गशिक्षक गुरुदास सोनटक्के, मार्गदर्शक शिक्षक विजय दुधबावरे, विषय शिक्षक प्रमोद बोरसरे,प्राथ शिक्षक अनिल दुर्गे, अंजली तंगडपल्लीवार, अभिषेक लोखंडे यांचे सहकार्य आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम सातपूते, गटविकास अधिकारी सागर पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे यांनी शाळेचे अभिनंदन व कौतुक केले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 5, 2024

PostImage

चौडमपल्ली - सिंगणपल्ली रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करा गावकऱ्यांची मागणी


चौडमपल्ली - सिंगणपल्ली रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करा गावकऱ्यांची मागणी 

 

आष्टी: चामोर्शी तालुक्यातील सिंगणपल्ली या गावाला एकमेव पोचमार्ग असून तो पूर्णपणे उखडून गेला असल्याने गावकर्‍यांना ये - जा करण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सिंगणपल्ली हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्यात असल्यामुळे रस्ता बनविण्यास अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे पण हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्यात असलेतरी ये - जा करण्याकरिता पक्का रस्ता नाही पाहिजे का? असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत 

चौडमपल्लीपासून 4 किमी असलेल्या सिंगणपल्ली या गावाला जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्याचा सत्यानाश झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचे जाणे येणे, वैद्यकीय सुविधा, अशा अनेक मूलभूत गरजांसाठी असहाय गावकर्‍यांची ओरड आहे 

लोकप्रतिनिधी हा रस्ता लक्ष देऊन बनवून देतील का? याकडे गावकरी आस लावून बसले आहेत. निवडणूकीच्यावेळी लोकप्रतिनिधी गावात येऊन मोठ मोठे आश्वासन देतात आणि निवडणूक झाली की विसरून जातात आमची जाण्यायेण्याची अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करून रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

May 4, 2024

PostImage

लोखंडी सळाख भरलेल्या उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची जबर धडक ;ट्रक चालक जखमी


लोखंडी सळाख भरलेल्या उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची जबर धडक ;ट्रक चालक जखमी 

 

महाकाली पेट्रोल पंपाजवळील घटना 

 

 

 

आष्टी : परीसरात अपघातांच्या सत्रात वाढ झाली असून एक दिवसाआड अपघातांची मालिका सुरूच आहे. आष्टी चामोर्शी मार्गावर उभ्या ट्रक ला मागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने जबर धडक दिल्याने ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 4 मे शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

 

शुभाष मेश्राम रा. डोंगरगाव ता. अर्जुनी जिल्हा गोंदिया असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे.

आष्टी चामोर्शी मार्गावरील महाकाली पेट्रोलपंपच्या समोर CG 07 BK 4515 क्रमांकाचा ट्रक लोखंडी सळाखी भरलेला ट्रक उभा होता या या ट्रक ला CG 04LP 4429 या क्रमांकाच्या सळाखी भरलेल्या ट्रकने मागून जबर धडक दिली. यावेळी क्लिनर हा ट्रक चालवीत होता तर ट्रकचालक डाव्या बाजूला होता. या धडकेत ट्रकचालकाचा एक पाय तुटला. तर वाहन चालवीत असणारा क्लिनर मात्र सुखरूप आहे. घटनेची माहीती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


PostImage

Gadchiroli Varta News

May 4, 2024

PostImage

धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित


धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित

 

मुंबई, : - १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ह्या विदर्भातील जिल्ह्या पैकी एक असलेल्या गडचिरोलीतील लोकांचा लाडका नेता कसा बनला, ह्या जीवन संघर्षाची कहाणी यावेळी स्टेजवर अत्राम यांनी सांगितली. ते म्हणाले नक्षलवाद्यांनी मला 17 दिवस कसे ओलीस ठेवले होते. यात नवसंजीवनी मिळाली असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. यावेळी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी 1400 किलोमीटरचा प्रवास केला.

 

 हा सन्मान मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. त्यांनी गडचिरोलीतील पाच हजार कुटुंबांना खाणकामात रोजगार उपलब्ध करून दिला असून भविष्यातही ते आपल्या गावातील लोकांच्या कल्याणासाठी व रोजगारासाठी कार्यरत राहणार आहेत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात 16 व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. वैदेही तामन तर्फे आयोजित या कार्यक्रमात धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक कर्तृत्ववान यांचा गौरव करण्यात आला.ह्या महान नेत्याच्या चरित्रावरील "धर्मरावबाबा आत्राम - दिलो का राजा" हा चित्रपटही तयार झाला आहे, हे 17 दिवस नक्षलवाद्यांच्या तावडीत घालवणे त्यांना किती कठीण गेले असावे, या संपूर्ण प्रवासाचे चित्रण ह्या चित्रपटात करण्यात आले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 4, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी सहकारी संस्थांनी खरेदी केलेल्या धानाची उचल करा


गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी सहकारी संस्थांनी खरेदी केलेल्या धानाची उचल करा

 

 सामजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांनी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे मागणी

 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत आदिवासीं विविध सहकारी संस्था मार्फत 2023-24 या खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची दोन महीने उलटूनही अजूनपर्यंत उचल केली गेली नाही . आदिवासीं विकास महामंडळामार्फत धान खरेदी करताना संस्थांना शासन निर्णयानुसार धान खरेदी करण्यास सांगितले जाते. त्यापेक्षा जास्त धान खरेदी केल्यास संस्थांवर कारवाई केली जाते. मात्र दोन महिन्यात उचल करा असा शासन निर्णय असताना मात्र उचल केली जात नाही यामुळे धानाचे वजन घटल्या मुळे संस्थांना तोटा सहन करावा लागतो. चालू हंगामात गडचिरोली जिल्ह्यात आठ लाख पंचावन्न हजार क्विंटल धान खरेदी संस्थामार्फत केल्या गेली मात्र आजपर्यंत केवळ तीन हजार क्विंटल धानाची उचल केल्या गेली. बहुतांश सहकारी संस्थाकडे गोदामांची पुरेशी व्यवस्था नाक्याने धान उघड्यावर आहे यामुळे वजनात दोन ते तीन किलोची तफावत येते त्यामुळे लवकरात लवकर या धानाची उचल करावी अन्यथा पुढील हंगामात संस्था धान खरेदी वेळेवर सुरू करनार नाही त्यामुळें शेतकऱ्यांची खुप मोठी गैरसोय होणार तसेच व्यापाऱ्या कडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यात यावी अशी मागणी समजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांनी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

May 3, 2024

PostImage

पिकअप वाहनाला सुरजागडच्या मालवाहू ट्रकने दिली धडक, तीन जखमी


पिकअप वाहनाला सुरजागडच्या मालवाहू ट्रकने दिली धडक, तीन जखमी,

 

 

सुरजागडच्या मालवाहू वाहनाची अपघातांची मालिका सुरूच

 

आष्टी : ३ मे :- गडचिरोलीतल्या जीवघेण्या सुरजागड प्रकल्पामुळे आणखी एक अपघात झाला आहे. सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पिकअपला धडक दिली या धडकेत तीन इसम गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना दिनांक ३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 

पिक अप वाहन हे अहेरी कडे जात होते समोरुन येणाऱ्या सुरजागडच्या मालवाहू ट्रकने जब्बर धडक दिल्याने सागर चुक्कावार पिकअपचा वाहनचालक गंभीर असून चंदा राजन्ना कडरला, राजन्ना कडरला श्रीनिवास जखमी आहेत या जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे 

आष्टी – आल्लापली महामार्गावरील महाकाली मंदिराच्या वळणाच्या समोर हा अपघात घडला. दिनांक २ मे रोजी आष्टी जवळील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाजवळ एका इसमाने आपली दुचाकी सोडून दिल्याने त्या इसमाचा जीव वाचला त्या इसमाची दुचाकी ट्रकमध्ये घुसल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेला आणि नागरिकांच्या संतापाचे कारण असलेला गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील सुरजागड या प्रकल्पामुळे रोजच काहीना काही दुर्घटना घडत असतात.

सुरजागड लोह प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर नेहमीच अपघात होत असून सामान्य नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. शिवाय प्रचंड धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. यामुळे या सर्व बाबीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अपघाताचे निमित्त मिळताच सुरजागड प्रकल्पाला असलेल्या विरोधाचा उद्रेक होताना दिसून येत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

May 3, 2024

PostImage

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार, तीन जखमी


दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार,

तीन जखमी 

 

आष्टी येथील को - आपरेटिव्ह बॅंक समोरील घटना

आष्टी:-

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 3 मे शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली.

 

अमोल रोहणकर वय 28 वर्ष रा. किष्टापुर ता. चामोर्शी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

 

मृत अमोल रोहणकर हा लग्न समारंभात राळापेठ येथे गेला होता कार्यक्रम आटोपून आपली दुचाकी क्र एम एच ३३झेड १०२८ ने तो परत किष्ठापूर आपल्या स्वगावाकडे जात असताना आष्टी - चामोर्शी मार्गावरील को -ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर अनखोडा येथुन येत असलेल्या दुचाकी क्र एम एच ३३झेड ००३४ या दुचाकीस्वाराला समोरासमोर जबर धडक दिली यात अमोल रोहणकर याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये सागर दुर्गे वय २३ रा. अनखोडा , गुलचंद दुर्गे वय १४, वंश दुर्गे वय १२ दोन्ही रा. छल्लेवाडा ता अहेरी असे नावे आहेत

घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटना स्थळी दाखल झाले व मृतकाला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे


PostImage

Gadchiroli Varta News

May 3, 2024

PostImage

जंगली हत्ती पासून सावध राहा‌,वन विभागाकडून नागरिकांना सूचना


जंगली हत्ती पासून सावध राहा‌,वन विभागाकडून नागरिकांना सूचना

 

 

गडचिरोली,दि.03 (जिमाका): भामरागड वन परिक्षेत्रातील जंगली हत्ती पुढे छत्तीसगढ राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता असून त्यांचे द्वारे कोणतीही जिवीत हानी होवु नये म्हणुन गावकऱ्यांनी घराच्या बाहेर एकटे रात्री अपरात्री निघू नये व हत्ती दिसल्यास त्याची छेडखानी न करता त्याबाबत तात्काळ वन विभागास कळवावे, असे उपवनसरंक्षक भामरागड वन विभाग यांनी कळविले आहे.

 

दिनांक २५ एप्रिल रोजी वन परिक्षेत्र गट्टाचे कार्यक्षेत्रात वन्य प्राणी हत्तीचा वावर असल्याची सुचना मिळाल्यावर त्या वन परिक्षेत्रातील वन परिक्षेत्र अधिकारी, गट्टा, यागेश शेरेकर व क्षेत्रीय कर्मचारी यांचे मदतीने त्या हत्तीच्या हालचालीवर देखरेख ठेवत होते. त्याच दिवशी हत्ती जंगलाकडे जात असतांना सांयकाळी ०४.३० वाजता कक्ष क्रमांक ५२८ नियतक्षेत्र कियर, उपक्षेत्र नांरगुडा परिक्षेत्र गट्टा येथे जंगलात मोहाफुले व चारोळी गोळा करणे करिता गेलेले श्री गोगलु रामा तेलामी, रा. कियर ता. भामरागड जिल्हा- गडचिरोली वय ३८ वर्षे यांचेवर वन्य प्राणी हत्तीने हल्ला करून त्यांना ठार केले. सदरचे माहिती वन विभागाला मिळताच भामरागड वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पवार, व ईतर अधिकारी / कर्मचारी सह घटनास्थळी भेट देवुन घटनेचा पंचनामा करून श्री गोगलु रामा तेलामी यांचे शव विच्छेदनासाठी भामरागड रूग्णालयात पाठविले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. 

सदर जंगली हत्ती रात्री गट्टा वन परिक्षेत्रातुन भामरागड वन परिक्षेत्रात जात असतांना हिदुर गावात कक्ष क्रमांक ६९२ नियतक्षेत्र कृष्णारचे नजीक असलेल्या माता मंदीरात लग्न संभारभाकरिता पुजा आटोपुन परत येत असतांना हिदुर ता. भामरागड जिल्हा गडचिरोली, या गावातील तीन महिला सौ. राजे कोपा हलामी (वय ५५ वर्षे) सौ वंजे झुरू पुंगाटी (वय ५५ वर्षे) व सौ.महारी देवु वड्डे, वय ४७ वर्ष यांचेवर हत्तीने हल्ला केला त्यात सौ. राजे कोपा हलामी, वय ५५ वर्षे यांचा मृत्यु झालेला असुन ईतर दोन महिलांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

सदर घटनेची माहीती प्राप्त होताच दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक शैलेष मीना, घटनास्थळी पोहचले व त्यांनी उपस्थित वन परिक्षेत्र अधिकारी, भामरागड अमर भिसे, व ईतर वन विभागाचे कर्मचारी यांना हत्तीला छत्तीसगड राज्याच्या जंगलात हुसकावुन लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचना दिल्या. त्या जंगली हत्तीला गावापासुन दुर जंगलात हाकलण्यासाठी व त्याचे हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी हुल्ला टिम व ड्रोन च्या सहयाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यासह सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांचे नियंत्रणात तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, गट्टा, यागेश शेरेकर व वन परिक्षेत्र अधिकारी, भामरागड अमर भिसे, यांच्या नेतृत्वात संयुक्त गस्ती पथक निर्माण करून पुढील कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनी सावध राहावे अशा सूचना वन प्रशासनाने दिल्या आहेत.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

May 3, 2024

PostImage

जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेसह दोघांना जिवंत जाळणा­या 15 आरोपींना गडचिरोली पोलीसांनी कले जेरबंद


 

जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेसह दोघांना जिवंत जाळणा­या 15 आरोपींना गडचिरोली पोलीसांनी कले जेरबंद

 

 सर्व 15 आरोपींना 05 दिवसांची पोलीस कोठडी 

 

01 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बरसेवाडा गावामध्ये जादुटोन्याच्या संशयावरुन महिलेसह दोन व्यक्तींची गावाक­यांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 02-05-2024 रोजी पोस्टे एटापल्ली येथे दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 01-05-2024 रोजी एटापल्ली तालुक्यातील मौजा बरसेवाडा येथील नामे 1) जमनी देवाजी तेलामी वय 52 वर्षे व 2) देवु कटिया अतलामी वय 57 वर्षे या दोघांना गावातील काही इसम एकत्र येवुन गावात पंचायत बोलावुन हे दोघे जादुटोना करतात कु. आरोही बंडु तेलामी वय 3.5 वर्ष रा. बरसेवाडा हिचा मृत्यु जादुटोना केल्यामुळे झाला असा आरोप या दोघावरती करुन यांना अंत्यत निघृनपणे मारहाण करुन अंगावरती पेट्रोल टाकुन जिवंत जाळले. मृतक जमनी देवाजी तेलामी हिचा भाऊ सादु मासा मुहोंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एटापल्ली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

 या घटनेची समाजातील सर्व स्तरातुन खेद व्यक्त करुन मारेक­यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरीता मागणी करण्यात आली. घटनेची गांभीर्य व तीव्रता लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी श्री. चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली व श्री. निलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली यांना तपास पथकासह सदरच्या प्रकरणाचा छडा लावुन आरोपींना जेरबंद करण्याबाबत निर्देशीत केल्याने वरील अधिकारी व सहकारी अधिकारी यांनी अंमलदारासह बारसेवाडा येथे जावुन घडलेल्या घटनेची घटनास्थळ पाहणी करुन सखोल चौकशी अंती 15 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये 1) अजय बापु तेलामी, 2) भाऊजी शत्रु तेलामी, 3) अमित समा मडावी, 4) मिरवा तेलामी, 5) बापु कंदरु तेलामी, 6) सोमजी कंदरु तेलामी, 7) दिनेश कोलु तेलामी, 8) श्रीहरी बीरजा तेलामी, 9) मधुकर देवु पोई, 10) अमित ऊर्फ नागेश रामजी तेलामी, 11) गणेश बाजु हेडो, 12) मधुकर शत्रु तेलामी, 13) देवाजी मुहोंदा तेलामी, 14) दिवाकर देवाजी तेलामी, 15) बिरजा तेलामी सर्व रा. बारसेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांना पोस्टे एटापल्ली अप. क्र. 24/2024 मधील कलम 302, 307, 201, 143, 147, 149, भादवी, सहकलम 3 (2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अन्वये दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. सर्व आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायालय, अहेरी येथे हजर केले असता सर्व आरोपींना 05 दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली. 

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा., यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. चैतन्य कदम सा यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री. निलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोउपनि नागरगोजे, पोउपनि म्हेत्रे, मपोउपनि गिरवलकर, व इतर सर्व अंमलदार यांनी मेहनत घेवुन गुन्हा उडकीस आणला.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

May 3, 2024

PostImage

आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­यांवर देसाईगंज पोलिसांची मोठी कारवार्ई


 

आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­यांवर देसाईगंज पोलिसांची मोठी कारवार्ई

 

           मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत. 

         त्या पाश्वभुमिवर दि.01/05/2024 रोजी पोस्टे देसांईगंज हद्दीत आयपीएल सट्टा खेळवणारे इसमाबाबत खात्रीशिर माहीती मिळाल्याने प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. अजय जगताप यांचे आदेशान्वये पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं/ विलेश ढोके, संतोष सराटे व विलास बालमवार यांनी देसाईगंज शहरातील विर्शि टी. पाँईट चौक येथे सापळा रचुन नाकाबंदी केली असता नाकाबंदीदरम्यान टोयोटा कंपनीेचे हायराईडर मॉडेल चारचाकी वाहन क्र. एमएच 33 एसी 5443 येत असल्याचे पाहून सदर वाहन चालकास थांबण्याचे इशारा देवुन वाहन थांबविले असता, पंचा समक्ष चालकाचे नाव व गाव विचारले असता त्यांनी चेतन पुरूपोत्तम मस्के रा. कोरेगांव ता.देसाईगंज असे सांगितले. तेव्हा सदर वाहनाची झडती घेतली त्यामध्ये वाहन चालकाकडे जुनी वापरते दोन मोबाईल व वाहनामध्ये 3,66,900/- रोख रक्कम मिळून आल्याने सदर ईसमास विचारणा केली असता त्यांनी सर्च इंजीनच्या साहाय्याने वेबसाईटचा वापर करुन युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयपीएलवर सट्टा खेळत असून आज रोजी चालू असलेल्या क्च्ख़् विरुध्द घ्एख़्च् यावर सट्टा लावल्याचे निदर्शणास आले.

         तेव्हा पंचासमक्ष आरोपीस ताब्यात घेवून त्यांच्याकडून रुपये 3,66,900/- रोख रक्कम व दोन जुने वापरते मोबाईल तसेच टोयोटा कंपनीेची हायराईडर मॉडेल चारचाकी वाहन असे एकुण 16,31,900/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीने हा ऑनलाईन सटटा अन्य एका साथीदाराच्या मदतीने चालु असल्याचे सांगीतले यावरुन पहिजे आरोपी नामे नवीश नरळ रा. शेगांव ता. वरोरा जिल्हा. चंद्रपूर या दोघाविरुध्द पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा नोंद केला आहे.

  सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले सा. यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे देसाईगंज. श्री अजय जगताप, पोउपनि ज्ञानेश्वर धनगर हे दाखल गुन्हयाचा पुढिल तपास करीत आहेत. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

May 3, 2024

PostImage

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर  जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक


 

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर 

जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक

 

 महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस.

 

 

माहे फेब्राुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या दरम्यान गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास आज दिनांक 03/05/2024 रोजी अटक केले आहे.

 

आज दिनांक 03/05/2024 रोजी 19 मार्च 2024 ला उप-पोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मोदुमडगु जंगल परीसरात झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने उप-पोस्टे रेपनपल्ली येथे दाखल अप. क्र. 01/2024 कलम 307, 353, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, कलम 135 मपोका, 3, 25, 5, 27 भाहका, कलम 3,4,5 भास्फोका, कलम 13, 16, 18, 20, 23, युएपीए अधिनियम मधील जहाल माओवादी नामे शंकर वंगा कुडयाम, वय-34 वर्षे, रा. कांडलापारती, पो. तह. भोपालपट्टनम, जि. बिजापुर (छ.ग.) यास सिरोंचा पोस्ट पार्टी व विशेष अभियान पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम (तेलगंणा) जाणा­या रोडवर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली.

 

अधिक तपासात असे दिसून आले की, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे, स्फोटके लावने अशी कामे तो करीत होता.

 

 

 

 

 

 

अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती

1) नाव- शंकर वंगा कुडयाम

 

 दलममधील कार्यकाळ

 सन 2015 पासुन नॅशनल एरिया कमिटीमध्ये भरती होवुन आजपर्यत माओवादी चळवळीतील कामे करत होता. 

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

 चकमक - 04

 सन 2022 मध्ये मोरमेड-चिंतलपल्ली (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 सन 2023 मध्ये बडा-काकलेर (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 सन 2023 मध्ये झालेल्या डम्मुर-बारेगुडा (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 सन 2024 मध्ये झालेल्या लिंगमपल्ली-मोदुमडगु (म.रा.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता. ज्यामध्ये 04 माओवादयांना ठार करण्यात सुरक्षा दलास यश आले होते.

  

 खुन - 03

 सन 2024 मध्ये मौजा कोरंजेड येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 सन 2024 मध्ये मौजा कचलेर येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 भोपालपट्टनम (छ.ग.) येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

 

 

 महाराष्ट्र शासनाने शंकर वंगा कुडयाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 79 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. 

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

May 2, 2024

PostImage

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न


गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

 

  गडचिरोली :: नुकताच पार पडलेल्या गडचिरोली -चिमूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024, च्या अनुषंगाने आढावा घेण्याकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र काँग्रेस (इंडिया आघाडी) चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, शंकरराव सालोटकर, परसराम टिकले, शहर अध्यक्ष सतीश विधाते, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतू मडावी, काशिनाथ भडके, दामदेव मंडलवार, मिलिंद खोब्रागडे, रमेश गंपावार, वसंत राऊत, मनोज अग्रवाल, पपु हकीम, राजेंद्र बुल्ले, प्रशांत कोराम, सतीश जवाजी, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, जयंत हरडे, प्रभाकर तुलावी, गिरीधर तीतराम, रामदास मसराम, सुमेध तुरे, वैभव भिवापूरे, गुरुदेव सातपुते, हरबाजी मोरे, रकजनीकांत मोटघरे,रुपेश टिकले, पुष्पलता कुमरे, मंगला कोवे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, पिंकू बावणे, दिलीप फुलबांधे,बीजन सरदार, रमेश कोडापे, प्रफुल बारसागडे, गौरव पेटकर, हेमंतकुमार कुमरे, श्रीनिवास ताटपल्लीवार, लीलाधर भरो, अनिल किरमे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, सुरेश भांडेकर, नाजूकजी वालके, नितीन शेंडे, पुरुषोत्तम अर्कपटलावार, नीलकंठ गोहने, रुपेश जंजालकर, सुरेश येरेवार, घनश्याम मुरवतकर, माजीत सय्यद, सुरज मडावी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल, ज्ञानेश्वर पोरटे, उत्तम ठाकरे, सोनू अलाम, प्रतीक बारसिंगे, नरेंद्र गजपुरे, मिलिंद बारसागडे, सुरेश मेश्राम, के. डी. मेश्राम, गणेश कोवे, हेमंत मोहितकर सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

May 2, 2024

PostImage

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणा-यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई


 

 महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणा-यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हयात शेजारील छत्तीसगड राज्यातुन मोठया प्रमाणात सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणा­यावर अंकुश बसावा या उद्देशाने मा. पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी गडचिरोली जिल्हयातील प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर रेड करुन प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जवाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेली जवाबदारी पार पाडत असतांना दि. 02/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास गोपनिय सुत्राकडुन माहिती मिळाली की, मौजा ठाणेगाव येथील ईसम नामे गंगाधर चिचघरे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड राज्यातुन मौजा कुरखेडा - वैरागड मार्गे मोठया प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक करुन आरमोरी हद्दीतील चिल्लर तंबाखु विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याबाबात खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, स्था.गु.शा. गडचिरोली यांना देवुन त्यांचे नेतृत्वात योग्य ते नियोजन करुन पोलीस पथक मौजा वैरागड टी-पार्इंट करीता रवाना करण्यात आले.

मौजा वैरागड टि-पार्इंट चौकात पोलीस पथकातील अंमलदार यांनी सापळा रचुन खबरेतील दोन संशयीत चार चाकी वाहन येत असतांना दिसुन आल्याने सदर वाहनांना तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबवुन वाहनाची तपासनी केली असता दोन्ही वाहनात एकुण 18,27,000/- रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु आरोपी नामे 1) गंगाधर भाष्कर चिचघरे, वय 39 वर्ष, 2) महेश सुधाकर भुरसे, वय 34, 3) सोमेश्वर भाष्कर चिचघरे, वय 36, 4) अमोल अनिल भुरसे, वय 29 सर्व रा. ठाणेगाव ता. आरमोरी, जि. गडचिरोली हे आपल्या ताब्यात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व प्रशासन विभाग, गडचिरोली यांचे ताब्यात देण्यात आले.

 सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, स्था.गु.शा. गडचिरोली यांच्या नेतृत्वात सहा.फौ. नरेश सहारे, पोहवा/अकबरशहा पोयाम, पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/श्रीकृष्ण परचाके, पोअं/श्रीकांत बोइना, चापोअं/दिपक लोनारे यांनी पार पाडली.


PostImage

Gadchiroli Varta News

May 2, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात एस. टि. बसच्या वाहतुकीचे वाजले तीन तेरा


गडचिरोली जिल्ह्यात एस. टि. बसच्या वाहतुकीचे वाजले तीन तेरा

 

नव्या बसेस उपलब्ध करून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

 

गडचिरोली

                   गडचिरोली जिल्हयात एस. टी. वाहतुकीचे तीन तेरा वाजले असुन अपुऱ्या व भंगार बसेसमुळे नागरिकांना प्रवास करताना गैरसोय व मनस्ताप सहन करावा लागत आहे , जिह्यातील मुलचेरा, भामरागड, सिरोंचा असरअल्ली, कुरखेडा या दुर्गम भागात अजूनही बससेवा नियमित पणे पोहोचली नाही.गडचिरोली आगारातून प्रवशाना जाण्यासाठी चार तास वाट पहावी लागते, भंगार बसेस मुळे अनेकदा बस अर्ध्या रस्त्यातच अडकून पडल्याच्या घटना रोजच होत आहे त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कॉल सेंटर बंद असल्यामुळें प्रवाशांना बस किती वाजता सुटणार आहे याची माहिती सुध्दा मिळत नाही. बस सोडण्याचे नियोजन खाजगी वाहने सोडल्या प्रमाणे करण्यात येत आहे याबाबत आगार प्रमुखांना कळविले तर ते नादुरुस्त बस, व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याची गाऱ्हाणे सांगतात.मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व असताना जिल्ह्याला विकसित करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी असल्याने त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोलमडलेल्या एस टी बसेस ची समस्या दुर करुन गडचिरोली जिह्यातील नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांनी मुख्यमंत्री व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

May 2, 2024

PostImage

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची ऐतिहासिक कारवाई. (गडचांदूर हद्दीत 150 जनावरे,1 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त.)


चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची ऐतिहासिक कारवाई.

(गडचांदूर हद्दीत 150 जनावरे,1 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त.)

 

गडचांदूर:-

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथके नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.याच श्रेणीत 1 मे महाराष्ट्र दिनी एका गोपनिय बातमीदाराकडून पोलीस स्टेशन गडचांदूर हद्दीतील मौजा हिरापूर येथील अब्दुल अजीज अब्दुल रा.गडचांदूर,हा आपला भाऊ अब्दूल अनीस रा.गडचांदूर,याच्या शेतात गाई-बैल(गोवंश)गोळा करून एका ट्रकमध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात कोंबून अवैधरीत्या वाहतूक करून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेणार आहेत.अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा हिरापुर शेतशिवारात धाड मारून पाहणी केली असता,सदर शेत शिवारात अशोक लेलॅन्ड कंपनीचा आयचर ट्रक, टाटा कंपंनीचा पिकअप,असे एकूण सात वाहने थांबून दिसली.

 

     सदर वाहनांची पाहणी केली असता,त्यामध्ये अवैधरीत्या जानावरांना कृतेने हात,पाय, तोंड बांधुन चारा पाण्याची व्यवस्था न करता, वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल(गोवंश)यांना आखूड दोराने कचकचून दाटीने भरून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी अपप्रेरीत करून,डांबून भरून, तेलंगणा राज्यात घेवून जाण्याचे समजले.सदर सातही वाहनातील एकूण 150 जनावरे व वाहने किंमत एकुण 1 कोटी,30 लाख रूपयेचा माल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपींना घटनास्थळा वरून ताब्यात घेवून गडचांदूर पोलीस येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तसेच वाहनांतील गोवंशाना राजुरा-नांदाफाटा नगरपालिकाच्या कोंडवाड्यात जमा करण्यात आले.

 

        सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू,यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत सपोनि हर्षल ओकरे,पोउपनि विनोद भुरले,पोहवा धनराज,स्वामीदास,अजय, प्रकाश,नागरे,नितीन,सुभाष,सतीश,किशोर,रजनिकांत,दिनेश,संतोष,पोशि प्रशांत,मिलींद स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

May 2, 2024

PostImage

रानटी हत्तीच्या हल्ल्यातील मृतक कुटुंबीयांना भाग्यश्री आत्राम यांनी केली आर्थिक मदत


रानटी हत्तीच्या हल्ल्यातील मृतक कुटुंबीयांना भाग्यश्री आत्राम यांनी केली आर्थिक मदत

 

भामरागड तालुक्यातील कियर व हिदूर गावाला दिली भेट

 

भामरागड:-रानटी हत्तींच्या कळपातून भरकटलेल्या एका हत्तीने भामरागड तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घालून तीन निष्पाप लोकांचा बळी घेतला. तालुक्यातील कियर व हिदूर या गावात अक्षरशा दुःखाचा डोंगर कोसळला होता. याची माहिती मिळताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी दोन्ही गावातील मृतक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट देऊन आर्थिक मदत केले.

 

२५ एप्रिल रोजी रानटी हत्तीने कियर येथील गोंगलु रामा तेलामी या इसमावर हल्ला करत जीव घेतला होता. त्याच्यानंतर त्याच हत्तीने रात्रीच्या सुमारास हिदूर गावात प्रवेश करत पूजेसाठी गावाबाहेर असलेल्या माता मंदिर ला जाऊन परत येणाऱ्या लोकांवर हल्ला केले.त्यात राजे कोपा आलामी, महारी देऊ वड्डे आणि वंजे झुरू पुंगाटी या तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना नागपूर येथे हलविले. 

 

यातील राजे कोपा आलामीने २६ एप्रिल रोजी तर महारी देऊ वड्डे या महिलेने २८ एप्रिल रोजी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.तिसरी महिला वंजे झुरु पुंगाटी हिच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. मागील ३ एप्रिल पासून तर २६ एप्रिल पर्यंत या रानटी हत्तीने तेलंगाना सह महाराष्ट्रात धुमाकूळ घालत पाच बळी घेतले.भामरागड तालुक्यातील इतरही भागात या हत्तीने शेतीसह गरांची ही नुकसान केले आहे. या सर्व लोकांची भेट घेऊन ताईंनी शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहे.

 

आई वडिलांचा छत्रछाया हरपलेल्या चिमुकल्यांना मिळणार मायेची ऊब

कियर येथील गोंगलू रामा तेलामी यांच्यावर रानटी हत्तीने हल्ला करत ठार केले.गोंगलू यांना एक मुलगा आणि दोन मुली असे तीन अपत्य आहेत.त्या मुलांची आई अगोदरच वारल्याने तिन्ही मुलं सध्या आपल्या आपले मामा कोमटी पेका कुळयेटी यांच्याकडे आहेत. त्या रानटी हत्तीच्या हल्ल्यात वडिलांच्या मृत्यूनंतर तिन्ही मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांची छत्रछाया हरपली आहे.आता या तिन्ही मुलांची जबाबदारी भाग्यश्री ताई आत्राम यांनी स्वीकारली असून दोन मुलींना भामरागड येथील आपल्या आश्रम शाळेत आणि मुलाला गोंडवाना सैनिक विद्यालय,गडचिरोली येथे दाखल करण्याची ग्वाही ताईंनी दिली आहे.आता यापुढील शिक्षण ताई स्व खर्चातून उचलणार आहे. आता त्या चिमुकल्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

May 1, 2024

PostImage

शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा कुनघाडा रै येथील 8 विद्यार्थ्यांची गरुडझेप


शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा कुनघाडा रै येथील 8 विद्यार्थ्यांची गरुडझेप

 

 

चामोर्शी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा कुनघाडा रै. येथील 8 विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. यामध्ये यश संदिप बारसागडे, हिमाशू नितिन कुनघाडकर, आयुष पुरुषोत्तम सातपुते, गोविंद किरण कुकडे, संघर्ष अशोक दुधे, वेदांत गिरिधर कुनघाडकर, निरंजन सत्यविजय भांडेकर, आदित्य रमेश वासेकर याच समावेश आहे. केंद्र शाळेने २०१९ पासून नवोदय परीक्षेप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेतही उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. सत्राच्या सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी, ज्यादा सराव, रात्र कालीन वर्ग , गृहभेटी, पुरक मार्गदर्शन, प्रत्येक आठवड्यात चाचणी, प्रत्येक आठवड्यात सराव परीक्षा, विविध शैक्षणिक व्हिडिओ, माता पालकांचे मार्गदर्शन इत्यादी उपक्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय उच्च श्रेणी मुख्याध्यापक तावडे सर, मार्गदर्शक शिक्षक विजय दुधबावरे, गुरुदास सोनटक्के, कु. गीता शेंडे, प्रमोद बोरसरे, अनिल दुर्गे, अंजली तंगडपल्लीवार, अभिषेक लोखंडे सर यांना दिले आहे. गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, सर्व पदाधिकारी व पालकांनी मुलांच्या यशाचे भरभरून कौतुक केले.


PostImage

Gadchiroli Varta News

May 1, 2024

PostImage

पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या संकल्पनेतून आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या संकल्पनेतून आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 

 

५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

 

आष्टी: पोलिसांनी १ मे रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.पोलीस अधिक्षक गडचिरोल निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली (अभियान) यतीश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) कुमार चिंता,अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी एम रमेश, यांचे प्रेरणेने व उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अजय कोकाटे,यांच्या मार्गदर्शनात, दिनांक ०१/०५/२०२४ रोजी महाराष्ट्र दिना निमित्य सकाळी ०७:१५ वा. झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक विशाल प्र. काळे यांच्या संकल्पनेतून सकाळी १०:०० वा. गडचिरोली पोलीस दला अंतर्गत ०१ मे २०१९ रोजी जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटात पंधरा जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ पोलीस स्टेशन आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून पोस्टे आष्टी हद्दीतील समाविष्ट असलेल्या गावांमध्ये स्वतःहा जाऊन नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा असे आव्हान केले. सदर रक्तदान शिबिरा मध्ये नागरिकांनी स्वतःहा सहभाग घेऊन पोलीस स्टेशन आष्टी येथे रक्तदान करून ०१ मे २०१९ रोजी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरामध्ये एकूण- ५२ नागरिकांनी तसेच पोलीस स्टेशन आष्टी येथील अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशन आष्टी येथील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वृंद हजर होते.


PostImage

Gadchiroli Varta News

May 1, 2024

PostImage

खरीप पिक विमा सन २०२३-२०२४ या वित्त वर्षांचा लाभ द्या 


खरीप पिक विमा सन २०२३-२०२४ या वित्त वर्षांचा लाभ द्या 

 

भेंडाळा येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली विनंती 

 

 

 

चामोर्शी: तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकऱ्यांनी माहे २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंम्बर २०२३ दरम्यान भात पिकाची नुकसान झालेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले की, आम्ही खालील सही करणारे सर्व शेतकरी बांधव प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पिक शेतीचा (भात पिक) पिक विमा काढलेला होता.

माहे २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंम्बर २०२३ दरम्यान आमच्य पिकाची धान कापनी झालेली होती त्या वेळेस २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंम्बर २०२३ दरम्यान अवकाळी पाऊस आल्याने आमच्या पिकाची नुकसान झाले. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी रिलांयन्स पिक विमा कंपनीकडे पिकाची नुकसान बद्दल तक्रार दाखल केली त्यानंतर पिक विमा कंपनीचे अधिकारी हे १ महिण्या नंतर पंचनामा करण्यासाठी आले. पंरतु त्यावेळेस त्याठिकाणी त्यांना कुठलीही नुकसान दिसलेली नाही. कारण आमचे धानाचे कापन बांधन आपआपल्या परीने धान सुकवुन जमा करुण झालेले होते. तेव्हा आमच्या शेतक-यांचे धान पिकाची ८०% नुकसान झालेली असुन अंजुन पंर्यंत आम्हाला पिक विमाचे लाभ मिळालेले नाही. तरी सुध्दा रिलायन्स पिक विमा कंपनीने आम्हाला मौजा भेडाळा येथील नुकसान झालेले सर्व शेतक-यांची योग्य चौकशी करुण प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे लाभ मिळवुन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून विनंती करण्यात आली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

May 1, 2024

PostImage

नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास प्रेरणादायी - जिल्हाधिकारी संजय दैने


नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास प्रेरणादायी

- जिल्हाधिकारी संजय दैने

*महाराष्ट्र स्थापना दिन साजरा*

गडचिरोली दि.१ मे : लोकसभा निवडणूकीत गडचिरोलीचे विक्रमी 72 टक्के मतदान हे जिल्ह्यातील नागरिकांचा लोकशाहीवर दृढ विश्वास दर्शवित असून गडचिरोलीकरांचा प्रतिकूल परिस्थितीतही मतदानाप्रती असलेला दृढ संकल्प देशभरातील नागरिकांना लोकशाहीची भावना जपण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले.

 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64 वा वर्धापन दिन आज जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री दैने बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मिना, उपवनसंरक्षक मितेश शर्मा याप्रसंगी उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना तसेच जिल्ह्यातील शहिदांच्या पावन स्मृतीस जिल्हाधिकारी यांनी अभिवादन केले. तसेच शहीदांचे कुटूंबिय, स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शेतकरी-बांधव, ज्येष्ठ नागरिक, सर्व जिल्हावासी आणि पत्रकार यांना महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगिरी बजावलेले आमगावचे तलाठी कोंडीबा चाटे, पोलिस उपनिरीक्षक नथ्याबा बोडरे, पोलिस नायक सर्वश्री रावजी हिचामी, रूषी विडपी, रुपेश म्हशाखेत्री सत्कार करण्यात आला यांचा समावेश होता. सुरवातीला परेड कमांडर धर्मेंद्र मडावी व सेकंड कमांडर सुरेश मडावी यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. कमांडो सी-60, महिला पोलिस, पोलिस मुख्यालय, गृहरक्षक दल, बँड, डॉग स्कॉड, बिडीडीएम आदि पथकांनी संचलन करून मानवंदना दिली.  

यावेळी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी एस.आर.टेंभुर्णे यांचेसह जिल्हा व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 30, 2024

PostImage

स्कुटीला दिली ट्रॅक्टर ने धडक एक ठार,दुसरा गंभीर


स्कुटीला दिली ट्रॅक्टर ने धडक एक ठार,दुसरा गंभीर 

 

आष्टी:-

स्कुटीला ट्रॉक्टर ने धडक दिल्याने एक मुलगी जागीच ठार झाली तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज दि ३० एप्रिल ला सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली

मृतक मुलीचे नाव सोनाली समरेश मिस्त्री वय 10 वर्षे रा.राममोहनपुर तर गंभीर जखमीचे नाव अमुल्य प्रभात मिस्त्री वय २६ रा.राममोहनपूर असे असून अमुल्य हा आपल्या पुतनीला सोबत घेऊन स्कुटी क्र एम एच ३३ एक जी १३५८ ने आष्टी कडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॉक्टर क्र एम एच ३३ व्ही ६१३७ ने जब्बर धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही खाली कोसळले तेव्हा सोनाली हिचे डोक्यावरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने तीचा जागीच करुन अंत झाला तर तीचा काका हा गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना आनंदग्राम ते अडपल्ली चे मुख्य मार्गावर घडली 

अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला तर सदर ट्राक्टर महेश मृणाल साणा सुभाषग्राम यांच्या मालकिची असल्याचे सांगितले जाते आहे 

घटनेची माहिती मिळताच 

आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला

तर गंभीर जखमीला उपचारासाठी नागपूर ला हलविण्यात आले आहे

अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी, पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चंद्रप्रकाश निमसरकार हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 29, 2024

PostImage

सलाम! खाकी वर्दीचा रक्तदानासाठी पुढाकार; महाराष्ट्र दिनी शिबिराचं आयोजन


सलाम! खाकी वर्दीचा रक्तदानासाठी पुढाकार; महाराष्ट्र दिनी शिबिराचं आयोजन

 

आष्टी : 'पोलीस' म्हटलं की समाजाच्या संरक्षणासाठी दिवसरात्र राबणारी यंत्रणा, विना परवाना व्यावसायाला निर्बंध घालून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्पर असणारी यंत्रणा अशी सर्वसाधारण ओळख आहे. पण त्यापलीकडे ही आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून गडचिरोली पोलिस दलाच्या माध्यमातून आष्टी पोलिसांनी पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तात्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची दखल घेत गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून दिनांक १ मे रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना भविष्यात रुग्णालयात रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले तसेच आष्टी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवावा असे आवाहनही पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आष्टी पोलिसांशी संपर्क साधून रक्तदात्यांनी आपले नाव नोंदणी करून घेण्याचे पोलिस स्टेशन आष्टी कडून आवाहन करण्यात आले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 29, 2024

PostImage

आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­ऱ्यांवर अहेरी पोलिसांची मोठी कारवार्ई


आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­ऱ्यांवर अहेरी पोलिसांची मोठी कारवार्ई

 

 

गडचिरोली : पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.

त्या पाश्र्वभुमीवर दि. 27/04/2024 रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा खेळवणारे इसम बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे सा., पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी व पोलीस स्टॉफ सह विशेष मोहिम राबवुन मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी अॅप nice.7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले. घटनास्थळावरुन नामे निखील दुर्गेे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख 9,420/- रु असा मुद्देमाल मिळुन आला. 

 नमुद दोन्ही आरोपींना विश्वासात घेवुन विचारपुस करुन अधिक चौकशीत असे निष्पन्न झाले की,

नामे इरफान ईकबाल शेख रा. अहेरी याचे अप्पर लाईनला संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असुन सदर बेकायदेशिर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा जुगार चालविणारे निखील दुर्गेे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात तसेच त्यांचे (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आय. पी. एल. सट्टयामध्ये एजंट चे काम करतात.

गुन्हयातील आरोपी नामे 1) निखील मल्लया दुर्गेे, 2)आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम गोगीवार, 4) निखील गुंडावार, 5) प्रणित श्रीरामवार, 6)अक्षय गनमुकलवार, 7)फरमान शेख, 8)फरदिन पठाण, 9)इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, 10) संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन). कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा.यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. दशरथ वाघमोडे, पोउपनि जनार्धन काळे, पोउपनि गवळी, पोहवा/काबंळे, पोहवा/संजय बोलीवार,पोहवा/पठाण, पोहवा/मडावी, पोहवा/शेन्डे, पोअं/केंद्रे, पोअं/देवेंंद्र दुर्गेे, पोअं/सुरज करपे, पोअं/दहिफळे व चापोना भंडे यांनी पार पाडली. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.

                         ------------।।।--------------


PostImage

Gadchiroli Varta News

April 29, 2024

PostImage

अंगाला हळद लागण्यापूर्वीच नववधूने घेतला जगाचा निरोप


अंगाला हळद लागण्यापूर्वीच नववधूने घेतला जगाचा निरोप

 

 

बल्लारपूर : जो आवडत होता त्याच्याशी तिचे लग्न जुळले. भावी आयुष्याचे स्वप्न ती रंगवत होती. एक दिवसा नंतर तिचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. २८ एप्रिल रविवारला तिची हळद होती परंतु निर्दयी काळाने तिच्या बापावर तिचे सरण रचण्याची वेळ आणली निशब्द होवून वडील व भावी पती तिच्या शवाकडे एकटक पाहतच होते. हे पाहून गावकऱ्यांचे सुद्धा डोळे पाणावले. ही दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडली. तिच्या उपचाराच्या खर्चासाठी गावकऱ्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली होती. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिचा उपचारादरम्यान नागपूर येथील एम्स रुग्णालयात २७ एप्रिल शनिवारला सायंकाळी ८ वाजता मृत्यू झाला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली महादेव गेडाम (२४) असे मृत पावलेल्या भावीवधूचे नाव आहे. वैशालीचा विवाह तिला आवडत असलेल्या गावातीलच जय टेकाम या युवकासोबत २९ एप्रिल २०२४ ला विसापूर येथे होणार होता. आठ दिवसापूर्वी तिचे पोट खूप दुखत होते अचानक जास्त अस्वस्थता वाटत असल्याने तिला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.

चार दिवस तिच्यावर उपचार झाल्यावरही प्रकृतीत पाहिजे तशी सुधारणा झाली नसल्याने डॉक्टरांनी तिला कावीळ सदृश आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचां सल्ला दिला. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार चालला होता. परंतु प्रकृती आणखीनच खालवत होती २७ एप्रिल शनिवारला सायंकाळी तिची प्रकृती खूपच गंभीर झाली ही बाब गावकऱ्यांना माहीत झाल्यावर तिच्या उपचारासाठी सर्वांनी यथाशक्तीने आर्थिक मदत केली. परंतु त्याचा मदतीचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर शनिवारी सायंकाळी ८ वाजता उपचाराला दाद देणे तिने बंद केले. आणि तिची प्राणज्योत मावळली.  

शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा आपण तिला वाचवू शकलो नाही या विवंचनेत तिचा वडील व भावी पती निशब्द होवून तिच्या कडे एकटक पाहत होते. ज्या दिवशी तिची हळद होती त्या दिवशी तिचे सरण रचण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे पाहून परिसरातील नागरिकांचे डोळे सुद्धा पाणावले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 28, 2024

PostImage

रोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा : शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश 


रोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा : शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश 

 

 

गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध कामे हातात घेण्यात आली असून मागील चार महिन्यांपासून या कामावरील मजूरांना मजूरी मिळाली नसल्याने होळीसारखा महत्वाचा सण अंधारात गेला आहे. त्यामुळे आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून रोजगार हमी योजनेच्या मजूरांची मजूरी तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या पाठपुराव्यामुळे जिल्हाभरातील रोजगार हमीच्या कामावरील मजूरांची थकीत असलेली ३० कोटींहून अधिकची मजूरी रक्कम मजूरांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १२ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, सध्या लग्नसराई चे दिवस सुरू झालेले आहेत. मात्र रोजगार हमीच्या कामावर राबून चार महिने झाल्यानंतरही मजूरीचा रुपयाही मजूरांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोजगार हमीच्या मजूरांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. त्यामुळे आपण प्राधान्याने याकडे लक्ष द्यावे. व दर आठवड्याला मजूरी देणे बंधनकारक असतांनाही चार महिण्यांचा विलंब झाल्याच्या कारणास्तव अतिरिक्त रक्कमेसह तातडीने जिल्ह्यातील सर्व मजूरांची थकीत मजूरी वाटप करावी. याबाबत प्रशासनाने दखल घेत १४ एप्रिल पर्यंतची संपूर्ण मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा करणे सुरू केले आहे.

 

थकीत मजूरी मिळाल्याने जिल्हाभरातील रोजगार हमी योजनेच्या मजूरांनी शेतकरी कामगार पक्ष आणि जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आभार मानले आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

April 27, 2024

PostImage

'त्या' रानटी हत्तीचा बंदोबस्त करा; अन्यथा आंदोलन करु स्वराज्य फाऊंडेशनचा वनविभागाला इशारा


'त्या' रानटी हत्तीचा बंदोबस्त करा; अन्यथा आंदोलन करु

 

स्वराज्य फाऊंडेशनचा वनविभागाला इशारा 

 

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा, आलापल्ली नंतर आता भामरागड वनविभागात रानटी हत्तीने एन्ट्री केला असून धुमाकूळ माजवला आहे. त्यामुळे परिसरात रानटी हत्तीची दहशत निर्माण झाली आहे.पुन्हा कोणतीही अनुचित घटना घडण्याच्या पूर्वी वनविभागाने रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वराज फाऊंडेशन जिल्हा गडचिरोली पदाधिकाऱ्यांनी केली आहे. रानटी हत्तीचा बंदोबस्त न झाल्यास वनविभाग कार्यलयासमोर आंदोलन करु असा इशाराही दिला आहे.

 

23 एप्रिल ला रात्रोच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगूडा गावात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास त्या रानटी हत्तीने शेतातील घराचे नुकसान केले. 25 एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कियर गावात एका एसमाचा रानटी हत्तीने पायाने तुडवून ठार केले आणि हिदुर येथील तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे त्यातील एका जखमी महिलेचा मृत्यू झाला आहे गावालगतच्या जंगलात त्या रानटी हत्तीचा मुक्तसंचार सुरु असून याही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 गावाच्या अगदी नजीक रानटी हत्ती आला असल्याने नागरिक भयभीत झाले असून पुन्हा कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने दखल घेत रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वराज फाऊंडेशन जिल्हा गडचिरोली पदाधिकाऱ्यांनी केली असून तसे न झाल्यास वनविभाग कार्यलयासमोर तीव्र आंदोलन करु असा इशाराही दिला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 27, 2024

PostImage

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भाग्यश्री ताई आत्राम यांची आर्थिक मदत


नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भाग्यश्री ताई आत्राम यांची आर्थिक मदत

 

कोरेली येथे रानटी हत्तीने घराचे केले नुकसान

 

अहेरी:तेलंगाणा राज्यात दोन बळी घेऊन परत आलेल्या रानटी हत्तीने अहेरी तालुक्यातील कोरेली येथील दस्सा कोहला मडावी या शेतकऱ्याच्या घराचा नुकसान केल्याने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अतिदुर्गम कोरेली गाठत त्यांना आर्थिक मदत केले. 

 

६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून भामरागड तालुक्यात गेलेल्या रानटी हत्तीने रेपणपल्ली वनपरिक्षेत्रात तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकून बाहेर पडताच अहेरी तालुक्यातील चिरेपल्ली, कोत्तागुडम, ताडगूडा,कोरेली आदी गावात पिकांसह घरांचेही नुकसान केले.त्यानंतर सदर रानटी हत्ती भामरागड तालुक्यात दाखल झाले.या दरम्यान त्या रानटी हत्तीने या भागातील नागरिकांचा अतोनात नुकसान केले.

 

रानटी हत्तीने २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आरेंदा जंगलातून पेरमेली गावातील तलावाजवळून कोरेली जंगलात प्रवेश केला. येथील शेतातील घरावर हत्तीने हल्ला करून पाडले. त्या घरात ७५ वर्षाची आजारी म्हातारी झोपून होती. सुरुवातीला हत्तीने म्हातारी झोपून असलेल्या घरावर हल्ला केला व त्यानंतर बाहेर झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी वेळीच गावाकडे धाव घेतल्याने ते सुदैवाने बचावले. दरम्यान कवेलूचे छत मातारीचा अंगावर कोसळले. ती म्हातारी रात्रभर तिथेच बसून होती. काही वेळाने गावातील नागरिकांनी धाव घेऊन म्हातारीला बाहेर काढले.मात्र तेंव्हापर्यंत रानटी हत्तीने घराचे छत,कवेलू, साहित्य, भांडी, मोहा, धानाची नासधूस केली.

 

याची माहिती मिळताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी कोरली गाव गाठून नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी आस्थेने संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत करत शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 26, 2024

PostImage

रानटी हत्तीचा हल्ल्यात मूत्यू झालेल्या तेलामी परिवाराला काँग्रेस नेते कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत


रानटी हत्तीचा हल्ल्यात मूत्यू झालेल्या तेलामी परिवाराला काँग्रेस नेते कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

 

भामरागड : जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरु झाला आहे. तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने काल दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात गोंगलू रामा तेलामी (४६) या शेतकऱ्याला पायाखाली चिरडले. यामुळे असहाय्य झालेल्या तेलामी कुटुंबाला जि.प.चे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत दिली.

 

दोन आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परतला. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर २४ एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला.

 

या जंगलाला चिकटून गोंगलू तेलामी या शेतकऱ्याची जमीन आहे. २५ मे रोजी ते शेतात काम करत असताना रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आपटले. त्यानंतर पायाखाली चिरडले. रानटी हत्तीच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या तेलामी यांच्या कुटुंबियांना काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली.

 

यावेळी सुधाकर तिम्मा, सुखराम मडावी, दल्लू कुडयेटी, सोवा बोगामी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 26, 2024

PostImage

अवैध वाळूची वाहतूक करताना टीप्पर व ट्रॅक्टर जप्त


अवैध वाळूची वाहतूक करताना टीप्पर व ट्रॅक्टर जप्त

 

 

बल्लारपूर : अवैध वाळूची ची वाहतूक करणारे टिप्पर व ट्रॅक्टर जप्त केले. असून तहसील कार्यालय परिसरात जमा केले आहे. टिप्पर मध्ये अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मंडळ निरीक्षकांना मिळताच, त्यांनी बामणी फाट्यावर टिप्परची तपासणी केली.

     यावेळी टिप्पर चालकाकडे वाळूची वाहतूक परवाना आढळून आला नाही. तसेच नांदगाव पोडे येथील ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक करीत असताना त्याची चौकशी करून तसेच दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेला टिप्पर क्रमांक एमएच ३४ बीजी ६२४७ असून ते राजुरा येथील एम. चौधरी यांच्या मालकीचा आहे.टिप्परमध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. तर ट्रॅक्टर नांदगाव पोडे येथील श्रीकांत देऊळकर यांच्या मालकीचा आहे. दोन्ही वाहनांवर बल्लारपूर तालुका मंडळ निरीक्षक प्रकाश सुर्वे यांनी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांत प्रचंड दहशत पसरली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 26, 2024

PostImage

परिस्थितीचा बाऊ न करता प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश शक्य  नवोदय विद्यालयात विज्ञान ज्योती योजना शुभारंभ...


परिस्थितीचा बाऊ न करता प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश शक्य

 नवोदय विद्यालयात विज्ञान ज्योती योजना शुभारंभ...

 माजी विद्यार्थी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक सुरज कोडापे यांचाही ह्यावेळी सत्कार.

        नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तहसील अंतर्गत घोट येथे केंद्र सरकारचे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. या शाळेत होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे जवाहर नवोदय विद्यालयात विज्ञान ज्योती योजना सुरू करण्यात आली आहे. 

      यावेळी नुकतेच एमपीएससी परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी सूरज कोडापे यांचाही ह्यावेळी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

       जे ई ई आणि नीट सह आता मुला मुलींना इतरही क्षेत्रात अनेक मार्ग मोकळे झाले आहेत.स्पर्धा परीक्षेत देखील अलीकडच्या काळात मुली ह्या अग्रेसर ठरत आहेत.त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून आपले स्वप्न साकार करावे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती सूरज कोडापे यांनी केले.

      विज्ञान ज्योती योजनेंतर्गत ज्या विद्यार्थिनी गरीब आहेत,आर्थिक अडचणीमुळे मुलींना डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक ठिकाणी संघर्ष करावे लागत आहे अशा विद्यार्थिनींसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. ही योजना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलींसाठी आहे. या योजनेचा शुभारंभ गुरुवारी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य राजन गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले. 

        यावेळी ह्या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते नीट आणि जेईईची संदर्भ ग्रंथे वाटप करण्यात आली.

यावेळी उपप्राचार्य विजय इंदुरकर, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक कोहाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

सिमरन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 26, 2024

PostImage

परत गेलेले हत्ती आक्रमक होऊन परतले,घेतला एकाचा बळी, ब्राह्मणवाडे, कंकडालवार म्हणाले, तातडीने बंदोबस्त करा 


परत गेलेले हत्ती आक्रमक होऊन परतले,घेतला एकाचा बळी, ब्राह्मणवाडे, कंकडालवार म्हणाले, तातडीने बंदोबस्त करा 

 

 

 

गडचिरोली :

गेल्या वर्षभरापासून गडचिरोली जिल्हयात हत्तींनी धुमाकूळ माजविला आहे. गावागावातील शेतपिकांचे, घरांचे नुकसान करून तेलंगणात गेलेले हत्ती पुन्हा एकदा गडचिरोलीत दाखल झाले आहेत. आल्या आल्या त्यांनी एकाचा बळी घेतला. याप्रकारामुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागात कमालीची धास्ती पसरली आहे. तेंदुपत्ताचा हंगाम तोंडावर आहे. अशात हत्तीच्या आगमनाने आता कस होणार, हि चिंता नागरिकांत आहे. दरम्यान कॉग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

मागील वर्षापासून गडचिरोली जिल्हयात मानव वन्यजीव संघर्ष कमालीचा वाढला आहे. वाघांनी अनेकांचा बळी घेतल्यानंतर रानटी हत्तीच्या एन्ट्रीने नागरिकांत कमालीची धास्ती पसरली. ओडिशातून छत्तीसगड मार्ग जिल्हयात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाने गडचिरोलीत मोठया प्रमाणावर नुकसान केली. अनेक दिवस मुक्काम ठोकल्यानंतर ते तेलंगणात गेले. यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तेलंगणात गेल्यांनतर त्यांनी तिथे अक्षरश रौद्र रूप धारण केल. दोघांचा बळी घेतला. अनं पुन्हा ते गडचिरोलीतील सिरोंचा वनविभागात दाखल झाले. ता. २५ ला एका नर हत्तीने भामरागड तालुक्यातील कियर येथील गोंगलू तेलामी यांचा बळी घेतला. या घटनेनंतर आता गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिकांत कमालीची धास्ती पसरली आहे

मागील वर्षापासून वाघांच्या हल्ल्यात अनेकांना आपले जिव गमवावे लागले होते. यानंतर हत्तीच्या धुमाकूळाने यात मोठी भर पडली. जिल्हयात यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची ठिणगी पेटली आहे. पण अशा स्थितीत वनविभागाला याबाबत कुठलीच उपाययोजना करता आली नाही. हा मुददा घेत कॉग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी केली. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे याबाबत त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पण या गंभीर प्रश्नाकडे ते देखिल दुर्लक्ष करित आहेत. असा आरोप विरोधक करित आहेत.

दरम्यान आता कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काॅंग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी या मुद्द्याला घेत आक्रमक पावित्रा घेतला आहे. तेंदूपत्ता हंगाम सुरू होण्यावर आहे. जिल्हयातील शेकडो गावातील हजारो नागरिकांना यामाध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. पण ऐनवेळी आता हत्तीनी धुमाकूळ घातल्याने तेंदूपत्ता हंगामावर भितीचे मोठे सावट आहे. अशा स्थितीत त्या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे, अजय कंकडालवार यांनी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 25, 2024

PostImage

रानटी हत्तीचा बंदोबस्त करा----महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी


रानटी हत्तीचा बंदोबस्त करा----महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी 

 

गडचिरोली :: मागील 2 वर्षांपासून रानटी हत्तीनी जिल्ह्यात हौदास माजवला असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. काही महिन्यापासून या रानटी हत्तीच्या हालचाली कमी झाल्या होत्या मात्र मागील 2-4 दिवसात या रानटी हत्तीच्या हालचली परत चालू झाल्याने व यात काही नागरिकांचा जिवही गेल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अस्वस्थतेचा वातावरण निर्माण झाले आहे. सद्या मोहफूल गोळा करण्यापासून तर तेंदपुत्ता संकलनाची सीजन सुरु झाली असल्याने नागरिकांना जंगलात जावे लागेल, अश्या या रानटी हत्तीच्या वाढत्या हल्याने नागरिक भयभीत झालेले आहे. 

त्यामुळे वन प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाय करून रानटी हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 24, 2024

PostImage

ट्रकच्या व दुचाकीच्या अपघातात आजोबा गंभीर तर नातवंड  जखमी


ट्रकच्या व दुचाकीच्या अपघातात आजोबा गंभीर तर नातवंड  जखमी 

 

 

सुरक्षा रक्षकांची बघ्याची भूमिका 

 

आष्टी:-

एका दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना मार्कंडा (कं) क्रासींगवर आज दि.२४ एप्रिल ला ४.३० वाजताचे सुमारास घडली

एम एच ३४ बि जी ४२२४ हा ट्रक आष्टी कडून मार्कंडा (कं)कडे भरधाव वेगाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्र एम एच ३३ के २१४५ ला जब्बर धडक दिल्याने दुचाकी समोरील चाकात फसली दुचाकीवरील आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी जखमी झाले आहेत गंभीर इसमाचे नाव प्रभाकर लोणारे वय ५२ वर्षं रा.मार्कंडा (कं) तर जखमी नातवंडाची नावे रिदांश कैलास लोणारे वय ७ वर्ष,सिदांश कैलास लोणारे वय ५ वर्ष असे आहेत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, प्रभाकर लोणारे ची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे दोन नातवंडावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत 

मार्कंडा (कं) च्या क्रासींगवर सुरजागड लोह प्रकल्पाचे तीन सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत मात्र ते एकाच ठिकाणी बसून बघ्याची भूमिका घेत आहेत असे असेल त्या सुरक्षारक्षकांचे काम तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे

या ठिकाणी क्रासींग असल्याने मार्कंडा (कं) कडून येणाऱ्या वाहनांना आष्टी कडून येणारे वाहन दिसून येत नाहीत तेव्हा सदर सुरक्षा रक्षकांनी त्याच वळणावर दोन्ही बाजूला तत्परतेने नजर ठेवल्यास असे अपघात टाळण्यासाठी मदत होते यावर संबंधीतांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 24, 2024

PostImage

पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकास हार्टअटॅकमुळे आपला जीव गमवावा लागला


गडचिरोली :- आजकाल युवामध्येही हार्टअटॅकचा धोका वाढला असुन पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकास हार्टअटॅकमुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल २३ एप्रिल रोजी गडचिरोली येथे घडली.

 

सूरज सुरेश निकुरे (२४) रा. भिकारमौशी ता. गडचिरोली असे मृत युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सूरज हा गडचिरोली येथे किरायाची खोली करून राहत होता. सकाळी ६ वाजता तो नियमित जिल्हा क्रीडांगणावर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी जात होता. दरम्यान, काल मंगळवारी सकाळी सराव करताना काही अंतर धावल्यानंतर त्याच्या छातीत दुखणे सुरू झाले.

 

त्यानंतर तो मित्रांसोबत शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये औषधी घेण्यासाठी गेला. मात्र, त्याच ठिकाणी तो चक्कर येऊन पडला. त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरज हा पोलीस खात्यात भरती होऊन सुखी जिवनाची स्वप्ने रंगवित होता. मात्र त्याला नियतिने गाठल्याने त्याच्या कुटूंबावर संकट कोसळले आहे. या संदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. सूरजच्या निधनाने गावात शोककळा पसरली 


PostImage

Gadchiroli Varta News

April 23, 2024

PostImage

बजरंगबली श्रीहनुमान भव्य शोभायात्रेत काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती..!


बजरंगबली श्रीहनुमान भव्य शोभायात्रेत काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती..!

 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील श्रीभगवान हनुमान जयंती निमित्त बजरंग चौक येथील युवक - टायगर ग्रुपच्या पदाधिकारी तर्फे दरवर्षी प्रमाणे या'वर्षी सुद्धा भव्य शोभायात्रा काढण्यात आले आहे.

 

त्यावेळी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पवनसुता हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेत सहभागी होऊन भगवान हनुमान भक्तांच्या आनंद द्विगुणीत केले.

 

 यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,टायगर ग्रुपचे पदाधिकारी साई तूलसीगीरी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,बबलू शेख,विनोद रामटेकेसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच टायगर ग्रुपचे पदाधिकारी सदस्य - हजारोंच्या संख्येने आलापल्ली नगरवासी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 23, 2024

PostImage

इंदाराम येथील राकेश गौरारप यांच्या दुःख निधन,मयत राकेश गौरारप यांच्या कुटुंबियांचे काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केले स्वांत्वन व आर्थिक मदत..!


इंदाराम येथील राकेश गौरारप यांच्या दुःख निधन,मयत राकेश गौरारप यांच्या कुटुंबियांचे काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केले स्वांत्वन व आर्थिक मदत..!

 

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील राकेश गौरारप यांच्या आज अचानक दुःख निधन झाला

या दुःख निधन चे वार्ता मिळतच आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेच विलंब न करता इंदाराम येथील गौरारप कुंटूबियांचे भेट घेऊन त्यांच्या आस्थेने विचारपूस केली व अंत्यविधी कार्यक्रमासाठी गौराराप कुंटूबियांना आर्थिक मदत केल.

 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद पेंदाम,प्रल्हाद पेंदाम,प्रकाश कोसरे,बोडा येडगम,बाबूराव पानेम,निलेश आत्राम,कांताराव आत्राम,बंडू गेडाम,रामुलु कुळसंगे,विलास पानेम लक्ष्मण आत्रामसह आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 23, 2024

PostImage

कुनघाडा रै. जि प केंद्र शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न


कुनघाडा रै. जि प केंद्र शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

 

पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे शाळापूर्व तयारी मेळावा विविध उपक्रम पूर्वक आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री तावाडे सर, उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जयश्रीताई टिकले उपस्थित होते.

तर प्रमुख अतिथी महणून उमेश गझलपेल्लीवार , भुजंग कोडाप कु. शेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी नावनोंदणी शारिरिक विकास बौद्धीक विकास सामाजिक व भावनिक विकास गणन विकास भाषाविकास समुपदेशन व मार्गदर्शन असे विविध स्टॉलची योजना करण्यात आली. प्रत्येक स्टॉलवर भरती पात्र विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. भरती यात्र विद्यार्थी आनंदाने चाचणी देऊ शकतात असे आनंददायी वातावरण सभागृहात निर्माण केले होते.

प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करण्यात आले. पुष्प, रंगीत फुगा देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी विदयार्थ्याचे पालक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दुधबावरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद बोरसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक लोखंडे गुरुदास सोनटक्के अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्गे राहुल वडेट्टीवार यांनी मोलाचे सहकार्य केले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 23, 2024

PostImage

धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट.. सुदैवाने जीवितहानी टळली


धावत्या ट्रकने अचनक घेतला पेट..

कोरपना तालुक्यातील घटना.

 

कोरपना:-

कोरपना तालुक्यातील आसन गावाजवळ ओव्हरलोड गिट्टी भरलेल्या एका धावत्या हायवा ट्रकने अचानकपणे पेट घेतल्याची घटना आज 22 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास घडली.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून ट्रक मात्र पुर्णपणे जळाला.यवतमाळ जिल्ह्यातील मोहदावरून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना मागच्या टायरने अचानक पेट घेतला.टायर पेटत असल्याची माहिती रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी चालकाला दिली असता तो वाहन थांबवून लगेच खाली उतरला.वाहनात कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने तो आग विझवण्यात अपयशी ठरला आणि पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. 

         राजुरा,गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मार्गाच्या कामावर असलेल्या पाणी टँकरच्या पाईपने सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न झाला.मात्र,आग नियंत्रणात आली नाही.दरम्यान घटनेच्या अर्धा तासानंतर गडचांदूर नगर परिषद व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन आले व आगीवर नियंत्रण मिळवले.तोवर हायवा ट्रक पुर्णपणे जळाला होता.आगीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व वाटसरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 22, 2024

PostImage

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, बळीराजा आर्थिक संकटात


खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, बळीराजा आर्थिक संकटात

 

गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळीवाऱ्याने 

घरांचे छत गेले उडून 

 

 

गडचिरोली ता. २२:-

 

गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवार व सोमवारला (ता.२१/२२) झालेल्या विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे तर चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे विज कोसळल्याने एक मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे

आणि अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत खांदला अंतर्गत येत असलेल्या रायगट्टा येथे काही ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्याने घरांवरील छत उडाले आहेत 

 रविवारी दिनांक (२१) ला तालुक्यातील कढोली येथे आपल्या घराच्या दारात उभी असताना त्यांच्याच नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने एका १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.

 या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व विज कोसळून जखमी झालेल्या मुलीला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांनी केली आहे 

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. यातच रविवारी सकाळपासूनच शहर व ग्रामीण भागासह जिल्हाभरात ढग दाटून आले. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.आष्टी परिसरातील व तालुक्यातील परिसरात शेतकऱ्यांचे रब्बी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. या भागामध्ये गारांचा पाऊस देखील झाला आहे.

जिल्ह्यातच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला या पिकांबरोबरच आंबा, फळबागा व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय कढोली येथे वीज पडून १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटनाही घडली आहे. काही दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेकडो क्षेत्रावरील शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्याबद्दल माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असतानाच त्यातच २१, २२ एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान क्षेत्रात आता वाढ झाली आहे. त्यामुळे याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी केली आहे

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठवडाभर उष्णतेच्या पार्‍याने उच्चांक गाठला होता. उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, रविवारी व सोमवारी पाऊस पडल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 22, 2024

PostImage

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक


विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक

 

महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस.

 

 

गडचिरोली: माहे फेब्राुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 21/04/2024 रोजी अटक केले.

काल दिनांक 21/04/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड सा. यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळुन आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम वय 34 वर्षे, रा. नेलगंुडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 22/03/2023 रोजी नेलगंुडा जंगल परिसरात 01 क्लेमोर व 02 कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120(ब) भादवि, सह कलम 4,5 भास्फोका, वाढीवकलम कलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/04/2024 रोजी सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.

 

अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती

 

1) नामे दिलीप मोतीराम पेंदाम

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे -01

 

 

 

 सन 2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरात नेलगंुडा – गोंगवाडा व नेलगुंडा – महाकापाडी जाणा­या पायवाटेवर 01 क्लेमोर व 02 कुकुर बॉम स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. व माओवादयांच्या हिंसक कार्यवायांच्या अनुषंगाने इतर दाखल गुन्हयात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 

 

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

 

 महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 22, 2024

PostImage

विषप्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा


विषप्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा.

कोरपना तालुक्यातील धक्कादायक घटना.

 

कोरपना:-

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील 'पिपर्डा' गाव येथे एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 एप्रिल रोजी समोर आली आहे.खुशाल राठोड वयवर्ष अंदाजे 62,असे मृत शेतकऱ्याचे नाव असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली सदर घटना सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

 

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर असे की,मृत शेतकरी खुशाल राठोड यांनी मागील सन 1993-94 मध्ये बियाणे,रासायनिक खते व औषधी खरेदीसाठी एका सावकाराकडून 50 हजारांचे कर्ज घेतले होते.सदर रक्कम टप्प्या-टप्प्याने त्यांनी 1997 मध्येच परत केली.असे असताना मात्र,त्या सावकाराने लाखो रुपयांचे कर्ज दाखवून राठोडकडे वसुलीचा तगादा लावला.याविषयी राठोड यांनी स्वतः त्याची भेट घेऊन सांगितले होते की,माझ्याकडे कर्ज नसताना तुम्ही मला कसे काय नोटीस पाठवता.'तू मला दिलेल्या पैशांच्या पावत्या दाखव,अन्यथा तुझ्यावर मी कोर्टात दावा दाखल करतो’ असा दम सावकाराने दिल्याचे कळते.या कारणाने राठोड सतत चिंतेत रहायचं. 

 

दरम्यान 4 दिवसापुर्वीच कारणे दाखवण्यासाठी न्यायालयाने त्याला 20 एप्रिल रोजी न्यायालाया समोर हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले होते.त्यामुळे पुन्हा राठोडच्या चिंतेत भर पडली. त्याने 19 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावून 'मी कर्जापाई त्रस्त आहो,तो माझा जीव घेत आहे'असे रात्रभर बडबडत होता अशी माहिती आहे.20 एप्रिल रोजी कुटुंबातील सर्व जण शेताकडे जात असताना, 'मी कोर्टात जाणार आहे,तुम्ही शेताकडे जा.' असे राठोड यांनी त्यांना सांगितले.यामुळे घरचे सर्व शेताकडे निघून गेले.आणि त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषप्राशन केले व उलट्या करतानाचे चित्र पाहून घरी असलेला नातू रडू लागला.हे ऐकून इंदल राठोड या शेजाऱ्याने राठोडच्या घराकडे धावा घेत पाहिले तर,त्याची प्रकृती खराब दिसली.त्याला तातडीने कोरपना ग्रामीण रुग्णालयात भरती केले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. दुर्दैवाने त्याचा प्रवासा दरम्यान मृत्यू झाला.

 

न्यायालयाचा आधार घेऊन त्या सावकाराच्या अशा पद्धतीच्या वसुलीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाल्याचे बोलले जात असून याच्या अशा कारभारामुळे कर्जदार शेतकरी मोठ्या प्रमाणात दहशतीत असल्याची चर्चा आहे. खुशाल राठोडच्या मृत्यूला तोच व्यक्ती जबाबदार असल्याचे आरोप करत याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी त्याच्या पत्नी व मुलाने केली आहे. तसेच शासनाने तातडीने राठोडच्या परिवाराला मदत करावी व सावकारावर ताबडतोब कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस(अजीत दादा गट)प्रदेश सहसचिव सैय्यद आबीद अली, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष उत्तम पेचे व इतरांनी कुटुंबाच्या भेटी दरम्यान केली आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 22, 2024

PostImage

पोलीस उपनिरीक्षक म्हणून नुकतीच निवड झालेल्या सुरज कोडापे यांचा आमदार होळी यांच्याकडून सत्कार


पोलीस उपनिरीक्षक म्हणून नुकतीच निवड झालेल्या सुरज कोडापे यांचा आमदार होळी यांच्याकडून सत्कार

 

    पोलीस उपनिरीक्षक म्हणून नुकतीच निवड झालेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं. 2 या गावच्या तरुणाने एमपीएससी मधून पोलीस उपनिरीक्षक पद मिळवत जिल्ह्याचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रामुख्याने सुरज कोडापे यांची अनु. जमाती प्रवर्गातून राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.याचे औचित्य साधून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सुरज कोडापे यांच्या घरी जाऊन त्यांचे सत्कार केले.

         काही दिवसांपूर्वी एमपीएससीने पोलीस उपनिरीक्षक २०२१ पदाचा निकाल जाहीर केला होता.सुरज कोडापे यांची ह्यामध्ये निवड झाली होती.विशेष म्हणजे सुरज सामाजिक चळवळीत काम करत असल्यामुळे जिल्ह्यात ह्याविषयी कौतुकाचे वातावरण तयार झाले होते.

      सुरज यांच्या गावातील घरी जाऊन डॉ.होळी यांनी त्यांचे कौतुक करत शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व फुलहार गळ्यात टाकत त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा सत्कार केला व पुढील प्रशासकीय सेवेच्या काळासाठी शुभेच्छा दिल्यात.ह्यावेळी त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणी प्रियांका देवतळे,कल्याणी दुर्गे उपस्थित होत्या.

      ह्यावेळी प्रामुख्याने भाजपाचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, रोशन कुमरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक राठी,सोनू कुमरे,सौरव गौरकर, कृष्णा नैताम, संतोष चीचघरे इत्यादी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 22, 2024

PostImage

वीज कोसळली.. मात्र नशीब बलवत्तर म्हणून नंदिनी बचावली


वीज कोसळली.. मात्र नशीब बलवत्तर म्हणून नंदिनी बचावली

 

घटनेची माहिती कळताच चामोर्शी चे तहसीलदार प्रशांत घोरुडे तात्काळ घटनास्थळी दाखल

 

 

 

चामोर्शी : तालुक्यातील कढोली येथे 15 वर्षीय मुलीवर विज कोसळल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 21 एप्रिल रविवारी संध्याकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली.

 

नंदिनी भारत घ्यार वय 15 वर्ष रा. कढोली ता. चामोर्शी असे जखमी मुलीचे नाव आहे.

21 एप्रिलच्या संध्याकाळी आष्टी परीसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊसाला सुरवात झाली. नंदिनी ही आपल्या घरासमोरील अंगणात असताना तिथे असलेल्या नारळाच्या झाडावर विज कोसळली. ती झाडाच्या अगदी जवळच असल्याने विजेच्या धक्क्याने ती खाली कोसळली तीला त्वरित आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती चामोर्शी चे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना मिळताच क्षणाचाही विलंब न लावता तहसीलदार प्रशांत घोरुडे तातडीने आष्टी येथील रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन तातडीने कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दीले. व कुटुंबीयांना धीर दिला. नंदिनी ही नवव्या वर्गात शिकत असून नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. विज कोसळल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. त्यामुळे वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला मात्र लवकरच हि आग आटोक्यात आल्याने धोका टळला


PostImage

Gadchiroli Varta News

April 22, 2024

PostImage

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : १४ दलालांना अटक


रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : १४ दलालांना अटक

 

 

 

बल्लारपूर : नागपूर विभागांतर्गत आरपीएफ चंद्रपूर व नागपूरच्या पथकाने एकाच दिवसात १४ दलालांना अटक करून रेल्वे आरक्षण ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालावर कारवाई केली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे गाड्यांमधील गर्दी सातत्याने वाढत आहे, त्याचा फायदा घेत एकीकडे रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांमुळे सर्वसामान्यांना तिकिटे उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे, असे दलाल गरजू प्रवाशांकडून मनमानी कमिशन वसूल करण्यास सुरुवात करतात, या संदर्भात माहिती मिळताच आरपीएफ नागपूरचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांनी आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूरचे निरीक्षक के.एन. राय आणि अखुशा नागपूरचे निरीक्षक एन.पी.सिंग यांना अशा दलालांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. वरील सूचनांवरून आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या हद्दीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या कारवायांवर पाळत ठेवण्यात आली. रेकी केल्यानंतर अशा दलालांवर कारवाई करण्यासाठी आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूर, अखुषा नागपूर आणि विभागीय मुख्यालय यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि 20.04.2024 रोजी सदर पथकाची 5 भागात विभागणी करून वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी रेल्वे कायद्यांतर्गत छापे टाकण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अचानक छापे टाकण्यात आल्याने दलालांना सावध होण्याची संधी मिळाली नाही. या छाप्यात चंद्रपूर शहरात 5 दलाल, घुग्गुस 5, वणी येथे 2, भद्रावती 1 आणि माजरी 1 असे 14 दलाल पकडले असून,त्यांच्या कडून 61तिकीट 132047/- रुपयांची, व 378434/- किंमतीची 210 तिकिटे जप्त करण्यात आली, अशा प्रकारे एकूण 5,10,481/- रुपयांची एकूण 271 तिकिटे जप्त करण्यात आली असून सर्व 14 एजंटांवर कारवाई करण्यात आली आहे. 

       सदर कारवाई मनोज कुमार वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ निरीक्षक के. एन. रॉय, एन पी सिंह, उप निरीक्षक आर के यादव, हरवंश सिंह, प्रियांका सिंह, सचिन नागपुरे, एन पी वासनिक, आर के भारती, मुकेश राठोड, आश्विन पवार, विपिंन दातार, सागर भगत, वासुदेव, सुमित, शिरीन, सागर लाखे, वी एस यादव, हरविंदर, विकास, महीलाल यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 16, 2024

PostImage

अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त,अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई


अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त,अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई

 

 मागील वर्षात 2 कोटी 61 लाख दंड आकारणी

 घरकुल योजनांसाठी गावालगतच्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

 

गडचिरोली दि.16 : जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावर अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने काल जिल्हा भरारी पथकाने जप्त केली आहेत. अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री बर्डे, मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे, तलाठी सुधीर बाविस्कर यांच्या पथकाने निवडणुकीच्या व्यस्त कामातही ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या चारही वाहने ट्रॅक्टर असून चालक गणेश यशवंत वार, भारत राऊत, सुभाष मंढरे आणि सचिन राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जिल्हयात मागील वित्तीय वर्षात 172 वाहन जप्त करण्यात येवून त्यातील 248 प्रकरणात 2 कोटी 61 लाख रुपये दंड आकारण्यात आला होता, त्यापैकी 1 कोटी 39 लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

जिल्हयात इंदिरा घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल योजने अंतर्गंत दुर्बल घटकातील लोकांना मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी 5 ब्रास पर्यंत रेती विना मुल्य उपलब्ध करुन देणेसाठी जिल्हयातील आमगांव, (ता. चामोर्शी), थुटेबोडी व वैरागड (ता. आरमोरी), चोप (ता. देसाईगंज) नगरम-1 (ता. सिरोंचा) या रेती घाटांमधून रेती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र सदर घाटावरुन प्रत्यक्ष बांधकामाचे ठिकाणी रेती वाहतूक करणे खर्चीक ठरत असल्याने गावालगतच्या रेती उपलब्ध असलेल्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेती उपलब्ध करुन देण्या साठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे संयुक्त स्वाक्षरीने गावालगत उपलब्ध नदी-नाल्यांचे प्रस्ताव दिनांक 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिले आहेत.

00


PostImage

Gadchiroli Varta News

April 16, 2024

PostImage

शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात


शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात

 

 

 

 

कोरपना तालुक्यातील नारांडा मधील राजेश मोहूले हा राजुरा येथे एका छोट्याशा दुकानात नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता हा युवक रमान नगर राजुरा येथे स्थायी झालात त्यांचे विवाह भुरकुंडा येथील एका पूजा शेंडे या युवतीशी जुडला मात्र त्यांनी आपला हा विवाह हा समाजाला एक आदर्श ठरणार असावा व जुन्या रूढी परंपरेनुसार विवाह करण्याचे ठरविले तेव्हा एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने घोड्यावरून नव्हे तर चक्क बैल गाडीतून वरात काढली. या वरातीची चर्चा राजुरा शहरात व तालुक्यात सुरू आहे.

 एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने चक्क बैलगाडीतून वरात काढली. यावेळी बैलगाडीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे बैलगाडीतून वरात काढण्यात आली तेव्हा डफळे देखील लावण्यात आले . वऱ्हाडी मंडळी डफडेच्या तालावर चांगलेच थिरकताना दिसते. या आगळ्या -वेगळ्या वरातीची तालुक्यात चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. ग्रामस्थांकडून नवरदेवाचे कौतुक करण्यात येत आहे.

अनेक राजकीय मंडळींनी त्या विवाह ला भेटी दिल्या त्यांचाच मोठे बंधू संतोष मोहुर्ले एका राजकीय (भाजपा)पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या या लग्नात अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावली


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

विदर्भातील 12 तेली समाज संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा


विदर्भातील 12 तेली समाज संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

 

 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडे सोपविले पाठिंब्याचे पत्र

 

गडचिरोली -: केंद्रातील भाजपा सरकार हे ओबीसी विरोधी सरकार असून तेली समाज ओबीसी प्रवर्गात येत असताना आजवर या समाजावर सरकारकडून अन्याय करण्यात आला आहे. तर हुकूमशाही धोरणाने चालणाऱ्या भाजपा सरकारमुळे देशातील संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. ती अबाधित राखण्याकरिता आज विदर्भातील 12 तेली समाज संघटनांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली येथील निवासस्थानी भेट घेऊन इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व चंद्रपूर- वनी - आर्णी लोकसभा उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांना लेखी पत्रातून पाठिंबा जाहीर केला.

याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ तेली महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष धनराज मुंगले, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान , तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर तसेच पाठिंबा दर्शविणारे तेली समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या तेली समाजाला आजवर केंद्र सरकारने कुठल्याही कल्याणकारी योजनांचा लाभ दिलेला नाही. तर केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकारकडून तेली समाजाची आजवर अवहेलनाच होत आली आहे. देशात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ हुकूमशाही धोरण राबवून बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचे कार्य करीत आहे. यामुळे देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आल्याची परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. देशाचे सर्वांना समान हक्क देणारे संविधान कायमस्वरूपी टिकावे व देशातील लोकशाही अबाधित राहावी याकरिता विदर्भातील तेली समाजाच्या 12 संघटनांनी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी यांची हात बळकट करण्यासाठी आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली निवासस्थानी भेट घेऊन लेखी पत्रातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

अवैधपणे दारु विक्री करणा­या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व 25,000/- रु. द्रव्य दंडाची शिक्षा


 

अवैधपणे दारु विक्री करणा­या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व 25,000/- रु. द्रव्य दंडाची शिक्षा

 

चामोर्शी येथील मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, श्री. एन. डी. मेश्राम यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 23/10/2020 रोजी तापस दिनेश मल्लीक रा. नवग्राम तह. चामोर्शी जि. गडचिरोली हा आपल्या राहते घरी हात भट्टी मोह फुलाची दारु विक्री करीत आहे. अशा गोपनिय माहितीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी पोस्टे चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलीस पथकाने आरोपी यांचे घराची झडती घेतली असता, घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये अवैध रित्या दहा लिटर मोह फुलांची दारु मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पोस्टे चामोर्शी येथे अप क्र. 589/2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपासाअंती आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने आरोपी विरुद्ध प्रभारी अधिकारी पोस्टे चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोहवा/आर. डी. पिल्लेवान यांनी आरोपीविरुद्ध कलम 65 (ई) महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अन्वये दोषारोपपत्र तयार करुन न्यायालयात दाखल केले.

 

फिर्यादी व ईतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद मा. न्यायालयाने ऐकल्यानंतर दिनांक 05/04/2024 रोजी आरोपी नामे तापस दिनेश मल्लीक याला तीन वर्षे सश्रम कारावास व 25,000/- रु. द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. एस. एम. सलामे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. तसेच पोअं/4188 श्री. टी. आर. भोगाडे यांनी सरकार पक्षास कोर्ट पैरवी म्हणून मदत केली व कामकाज पाहिले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

लोकसभा निवडणूक 2024 गडचिरोली जिल्ह्यासाठी 2613 शाईच्या बाटल्या


लोकसभा निवडणूक 2024
गडचिरोली जिल्ह्यासाठी 2613 शाईच्या बाटल्या

महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

               गडचिरोली, दि. 13 : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता 2613 बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. तर महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघाकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. 
जिल्ह्यात आरमोरी , गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 950 मतदान केंद्र आहेत.  प्रत्येक मतदान केंद्रासाठी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे एकूण १९०० शाईच्या बाटल्यांची आवश्यकता होती, त्यासोबतच अतिरिक्त ७१३ मिळून एकूण २६१३ शाईच्या बाटल्या जिल्ह्याकरिता मिळाल्या आहेत. मतदानासाठी आवश्यक साहित्यासोबतच शाईच्या बाटल्या मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेमार्फत पोहोचत्या करण्यात येणार आहेत. 
मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.
            मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.
            मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.
००००


PostImage

Gadchiroli Varta News

April 13, 2024

PostImage

पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटर आष्टीला सदिच्छा भेट


पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटर आष्टीला सदिच्छा भेट

 

भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथील जिल्हयात नावलौकिकास आलेल्या धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटरला भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खुणे यांची खेलो इंडिया सेंटर आष्टी येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास भेट घेऊन सेंटर बद्दल सविस्तर माहिती घेऊन धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी यावेळी तुलाराम सीताराम नखाते साहित्यिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले सर तथा धनुर्विद्या मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे व महाविद्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

April 12, 2024

PostImage

नवं जन्म घेण्यासाठी सचिन मागतो आहे आर्थिक मदत   कुटुंबीयांचे आवहान


नवं जन्म घेण्यासाठी सचिन मागतो आहे आर्थिक मदत

  कुटुंबीयांचे आवहान 

 

लखमापूर बोरी (वा.)

                चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील 28 वर्षीय युवक सचिन घनश्याम वैरागडे , याला कुठलेही व्यसन नसताना सुद्धा चार वर्षा पासून लिव्हर ऑफ सिरोसिस या रोगाने त्रस्त असून लिव्हर कायमचा निकामी (खराब) झाला आहे, त्याला लिव्हर ट्रान्स्फर करण्यासाठी २५ लाखाचा खर्च आहे त्यासाठी त्याला आर्थिक मदतीचा हात पुढे करत मदत करावी असे आवाहन कुटुंबियांकडून केले आहे 

 

 त्याला झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिंनेशन सेंटर, (ZTCC) – नागपूर , NOTTOM ID – R240068155, या संस्थे मार्फत लिव्हर (LIVER TRANSPLANT) देऊन त्याला नवीन जीवनदान देण्यात येणार आहे. परंतु, ऑपरेशन साठी साधारणतः 25 ते 30 लाख इतका खर्च येणार आहे. त्याच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या असून ऍलेक्सिस हॉस्पिटल मानकापूर, नागपूर. येथे ऑपरेशन करणार आहोत. परंतु मागच्याच वर्षी माझ्या वडीलाच्या दीर्घ आजारावर 15 लाख रु पर्यत खर्च करून सुद्धा ते अखेर मरण पावले व माझ्या उपचारासाठी सुद्धा 2020 पासून 18 लाख रु पेक्षा जास्त खर्च झाला आहे त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची झाली असल्यामुळे आम्ही एवढी मोठी रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्व, मित्र - मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीचे व अनोळखी अशा सर्वाना सहकार्यासाठी विनंती करतो कि तुमच्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा... अशी त्यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे.

तुमची छोटी मोठी मदत सुद्धा सचिनला जगण्याची नवी उम्मीद मिळू शकते त्यासाठी 

सचिन मोबाईल नं. वं

फोन पे नं. 8390145784

गूगल पे नं 8390145784.

अधिक माहिती साठी वरील नं वर संपर्क करून आर्थिक मदत करावी असे आवाहन कुटुंबियांकडून केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 12, 2024

PostImage

दुचाकी अपघातातील एका इसमाचा जागीच मूत्यू, तर महिला गंभीर जखमी..!


दुचाकी अपघातातील एका इसमाचा जागीच मूत्यू, तर महिला गंभीर जखमी..!

 

 काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांच्या कडून येगडी कुटुंबियांना मदतीचा हात..!

 

अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथील तुषार येगडी आणि त्यांची पत्नी भावनी या,दामपात्यांनी काल काही कामानिमित्त माड्रा येते जात असतांना माड्रा - दामरांचा जंगल परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडून असलेल्या झाडाला धडक दिल्याने दुचाकी खाली कोसडून अपघात घडल्याने या अपघातात तुषार येगडीचा जागीच मूत्यू झालं आहे.भावनिला डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

 

याअपघाता बाबत स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णांची प्रकृतीची आस्थेने विचारपूस केले.अपघातात मूत्यू झालेल्या तुषार येगडी यांच्या पोस्ट माडम होई पर्यंत उपस्थित राहत शव घरी पोचण्यासाठी घाडी उपलब्ध करून दिले.तसेच होणाऱ्या कार्यक्रमासाठी येगडी परिवारातील नातेवाईकांना आर्थिक मदत केली आहे.

 

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गणेश नागपूर,राजू दुर्गे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गेस,प्रमोद गोडसेलवार सह येगडी परिवारातील नातेवाईक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके


लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके

गडचिरोली दि. 11 : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाच्या संपुर्ण तपासणी नाक्यावर 24 तास नाकाबंदी सुरु ठेवावी व दारु, अवैद्य रकम, आणि अंमली पदार्थाची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी वन विभागाला दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन होणेसाठी व निवडणूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व वन विभाग यांच्यात समन्वय राखणेबाबत काल जिल्हाधिकारी यांचे अध्यक्ष्यतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री दैने बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपवनसंरक्षक मितेश शर्मा (गडचिरोली), राहुल टोलीया (आलापल्ली), शैलेश मीना(भामरागड), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.

पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे.आता या मोहिमेत वनविभागाच्या तपासणी नाक्यांचीही मदत होणार आहे.

 तपासणीदरम्यान गैरप्रकार किंवा संशयीत प्रकार आढल्यास वनविभागाच्या तपासणी पथकाने नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांचेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 

दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त

जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात 55 हजार 285 लिटर दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 95 लाख 47 हजार रुपये आहे. तसेच एक कोटी 25 लाख किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 1205 गृहमतदारांनी केले मतदान


गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 1205 गृहमतदारांनी केले मतदान

 

शंभर वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक

 

गडचिरोली दि.11: - महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं मतदान केलं. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल 107 किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले. दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनियता बाळगून नोंदविले. 

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कालपर्यंत 85 वर्षावरील 923 मतदार आणि 282 दिव्यांग अशा एकूण 1205 मतदारांनी आतापर्यंत गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 

संपूर्ण मतदार संघातून 85 वर्षावरील 1037 व 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले 338 असे 1375 मतदारांचे गृह मतदानासाठीचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री दैने यांनी मंजूर केले आहेत. 

विधानसभा मतदार संघनिहाय 85 वर्षावरील मतदार व झालेले मतदान आणि दिव्यांग मतदार व झालेल्या मतदानाची (कंसात) माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव- 133 पैकी 127(दीव्यांग-38 पैकी 38), आरमोरी -88 पैकी निरंक (दीव्यांग-53 पैकी निरंक), गडचिरोली -132 पैकी 132 (दीव्यांग-70 पैकी 70), अहेरी 23 पैकी 21 (दीव्यांग-13 पैकी 10), ब्रम्हपुरी 224 पैकी 224 (दीव्यांग-63 पैकी 63), चिमुर 437 पैकी 419 (दीव्यांग-101 पैकी 101). याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील 28 मतदारांचेही अर्ज गृहमतदानासाठी मंजूर करण्यात आले आहे.

सिरोंचा येथील 100 वर्षीय किष्टय्या आशालू मादरबोईना आणि किष्टय्या लसमय्या कोमेरा (वय 86) यांचे मतदान नोंदविण्यासाठी नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, क्षेत्रीय अधिकारी सागर भरसट, केंद्राध्यक्ष प्रमोद करपते, सहाय्यक मतदान अधिकारी सुरज आत्राम, पोलीस शिपाई प्रशांत मिसरी, प्रमोद तोटापल्लीवार या मतदान अधिकाऱ्यांनी गृह मतदान घेण्याची कार्यवाही पूर्ण केली असल्याचे अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.

00


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

मार्कंडा कंन्सोबा येथे श्री संत कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत


मार्कंडा कंन्सोबा येथे श्री संत कार्तिक स्वामी महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत 

 

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील प्रशांत घाम हनुमान मंदीर येथून प्रारंभ होऊन श्री संत कार्तिक स्वामी महाराजांची पालखी सोहळा रामनगट्टा मार्गे तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे दिनांक १० एप्रिल रोजी आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या देवस्थानाचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी स्वतः पालखी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे सारथ्य केले. तसेच पंदिलवार यांनी स्वागत केल्यानंतर भजनाचा आनंद लुटला. ते वारकऱ्यां समवेत भजन करीत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

 

पालखी सोहळ्याचे मार्कंडा कंन्सोबा येथील वनविभागाच्या नाक्याजवळ आगमन होताच गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल पंदिलवार, माजी सरपंच गंगाधर पोटवार, सेवानिवृत्त वनरक्षक आत्माराम मस्के यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी स्वागत केले. यावेळी प्रभाकर बावणे, प्रभाकर लोणारे,‌वसंत बावणे, रवी बुग्गावार आदींसह देखील स्वागत केले. टाळ मृदंगाच्या गजरात अभंगाच्या जयघोषात संपूर्ण मार्कंडा कंन्सोबा परिसर दुमदुमून गेला होता. दुपारपासून रखरखत्या उन्हात पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहणारे भाविक सायंकाळी पालखीचे दर्शन होताच भक्तीरसात तल्लीन झाले होते. मार्कंडा कंन्सोबा येथील पंदिलवार परिवाराच्या निवासस्थानी पालखी सोहळा पोहचताच प्रमुख व विश्वस्तांचे स्वागत पंदिलवार परिवाराच्या वतीने करण्यात आले. दरम्यान अबाल वृद्धांसह भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मार्कंडा कंन्सोबा गावातील संजय पंदिलवार यांनी वैयक्तिक स्वरूपात वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली.यानंतर पालखी सोहळा चंदनखेडी (खर्डी ) या ठिकाणी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; जिवीतहानी टळली


 सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; जिवीतहानी टळली 

आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  आष्टी - आलापल्ली महामार्गावरील Ashti ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी येथील चौकातून येत असलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हि घटना दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही ट्रक चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे 
ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ३६८३ हा  आष्टी येथील चौकातून आलापल्ली कडे जात होता व ट्रक क्रमांक एम एच ३४बी झेड ३९७३ हा ट्रक सूरजागड येथून लोहखनिजाचा कच्च्या माल घेऊन येत होता  या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे आष्टी कडून येणाऱ्या ट्रक चालकाने त्या वाहनाचा सुसाट वेग पाहून आपले वाहन उभे ठेवले तरी या उभा ठेवलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे 
या घटनेची आष्टी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या महामार्गावर सूरजागड लोहखनिजाची कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रका मोठ्या सुसाट वेगाने धावत असतात या महामार्गावर तर दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या महामार्गावर नेहमी अपघात होतच असतात आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत तरी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे ट्रक चालक हे कोणाच्याच बापाला घाबरत नाही आहेत असे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर एका सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे तरी याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 11, 2024

PostImage

मुधोली चक येथील सुरज कोडापे बनलाय फौजदार


मुधोली चक येथील सुरज कोडापे बनलाय फौजदार.

अनु.जमाती मधून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.

 

        महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक २०२१ परीक्षेत चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र.२ या गावातील सुरज वनिता रमेशजी कोडापे यांनी हे यश मिळवत आपल्या गावासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

        .

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(एम.पी.एस.सी)

२०२१ साली संबंधित पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३७६ पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. यासाठी पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली.मुख्य परीक्षा जुलै २०२२ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये शारीरिक चाचणी मुंबई येथे पोलीस मुख्यालयात पार पडली.या पदाची मुलाखत मार्च २०२४ मध्ये पार पडली.मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे अंतिम निकाल लागण्यासाठी बराच काळ प्रतीक्षेत गेला. मोठ्या प्रतीक्षेनंतर हा निकाल जाहीर झाल्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

      

 *शैक्षणिक पार्श्वभूमी* 

सुरज यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले,पुढे जा.कृ.बोमनवार विद्यालय चामोर्शी,विश्वशांती विद्यालय भेंडाळा,जवाहर नवोदय विद्यालय घोट या महाविद्यालयांचा सुरज माजी विद्यार्थी राहिला आहे.विशेष म्हणजे इयत्ता १२ वी जवाहर नवोदय विद्यालय,घोट येथून भूगोल ह्या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळाल्यामुळे सूरजला उत्कृष्ट विद्यार्थी सन्मान (Excellent Student Award), भूगोल विषयाच्या मेरिटसह तत्कालीन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवनात सत्कार करण्यात आला.त्यावेळेस देशातील १२० विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी ह्यांनी हितगुज साधले त्यापैकी सुरज एक होता.सूरजने पुढील शिक्षण पुण्यातून राज्यशास्त्र ह्या विषयात घेतले.विशेष म्हणजे सुरजचे नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेत मास्टरदेखील झाले आहे. 

 

 *सामाजिक पार्श्वभूमी* 

   वडीलांच्या पुरोगामी आणि आईच्या आंबेडकरी विचारात सुरजचे बालपण गेले.त्यामुळे लहानपणापासून सूरजला सामाजिक चळवळीत काम करायची ओढ लागली.सुरजने स्थानिक पत्रकार म्हणून एक वर्ष काम केले.फुले,शाहू आंबेडकर चळवळीतील लोकांसोबत मिळून त्यांनी संविधान जागृतीसह,विद्यार्थ्यांना मोफत शिकविणे,रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम घेतले.मागील काही वर्षात जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक आंदोलनात सुरज अग्रस्थानी राहिला आहे.

     विशेष म्हणजे शिक्षणाचे महत्व केवळ नोकरीपुरते मर्यादित न ठेवता शिक्षणाची व्यापकता त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करत पोलीस वर्दी घालण्याचे त्याने आपले स्वप्न पूर्ण केले.त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते,शिक्षक, मित्रपरिवाराकडून सुरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

        

 

 प्रतिक्रिया

   २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. आईवडील तसेच मित्रांचा कायमच पाठिंबा आणि विश्वास होता.हे यश केवळ माझे नसून माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या माझ्या प्रत्येक समाज बांधवांचे व गुरुवर्य,मित्रपरिवाराचे आहे.यापुढे सुद्धा अभ्यास सुरू ठेवून यापेक्षा चांगल्या पदासाठी तयारी करणार आहे.हा क्षण माझ्याबरोबरच जिल्ह्यातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चैतन्याचा आहे.संयमाने सातत्य ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

 

सुरज वनिता रमेश कोडापे

पोलीस उपनिरीक्षक


PostImage

Gadchiroli Varta News

April 10, 2024

PostImage

देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 

 प्रचार सभेत नेते हटाव... गडचिरोली बचावचा नारा

 

 हुकुमशाहीतून देश व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधन्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

 

 

देशांतील महत्त्वपूर्ण प्रकल्प विकले गेले असुन दोन विकणारे व दोन घेणाऱ्यांनी देशाला उधवस्त करण्याचें कार्य चालविले आहे. देशांत प्रचंड महागाई, व बेरोजगारी यात जनता भरडली जात असताना देशावर वाढलेले कर्ज, देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले वाटोळे यावरून जनतेचे लक्ष विचलित करीत धर्मांधता व जाती -जाती मध्ये विष पेरून भांडणे व दंगलीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. या हुकुमशाही भाजप कडून आता देशाच्या लोकशाहीचे संरक्षण कवच असलेल्या पवित्र संविधानाला आता समूळ नष्ट करण्याच्या हेतूने षडयंत्र चालविले जात असून मतदारांनो तुम्ही गाफील राहिल्यास पुढील काळात आपण सर्व बहुजन बांधवांना गुलाम म्हणून जगावे लागेल.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली जिल्हयातील चित्तरंजनपूर (येणापुर) येथे इंडिया आघाडी प्रणित, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस मार्गदर्शन बोलतं होते. 

आयोजित सभेस माजी खासदार मारोतराव कोवासे, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट), महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, भारिप जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, युवक काँग्रेस नेते विश्वजित कोवासे, प्रमोद भगत, बिजम सरकार, के. डी. मेश्राम, अश्विनी कुंभरे, रतन अक्केवार, सुधाकर गद्दे, प्रेमानंद मल्लिक, विकास पोतराजवार, स्वाती टेकाम, नीलकंठ निखाडे, निकेश गद्देवार, निनाद देठेकर, रुपाली निखाडे तसेच महाविकास आघडीचे व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.

पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षा पूर्वी सत्तेत आल्यावर भाजपने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड दरवाढ करून अर्थिक शोषणातून जनतेला लुटण्याचे काम केले. देशांत महीला अत्याचार, गुन्हेगारी यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. व्यापारी हित जोपासणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगराखाली दाबून बड्या व्यापाऱ्यांना कर्ज माफी दिली. तर स्थानिक उद्योगांमध्येही भूमिपुत्रांची अवहेलना केली. देश बुडविनाऱ्यांनी आता अब की बार 400 पार नारा देऊन देशाचे संविधान बदलाविण्याचा घाट रचला आहे. मतदारांनो आता देश वाचविण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच एकमेव पर्याय उरला असून इंडीया आघाडीच्या डॉ. नामदेव किरसान यांना विजयाचा आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

सलग 10 वर्षे खासदार म्हणुन संधी मिळूनही संसदेत मौन धारण करून क्षेत्रातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे, महिलांचे, युवा- युवतींचे प्रश्न सोडविण्यात सपेशल अपयशी ठरणाऱ्या निष्क्रिय खासदाराचा जनतेला काय उपयोग..? असा सवाल उपस्थित करीत इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या वर निशाणा साधला.तर संविधानावर घाला घालुन मनुस्मृति विचारांचे हुकुमशाही सरकार चालवू पाहणाऱ्यांना व त्यांना साथ देणाऱ्यांना समाजाने बहिष्कृत करून महाविकास आघाडीलाच संविधान वाचविण्यासाठी अमूल्य मत द्या. असे आवाहन भारिप जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत व रीपाई नेते ॲड. राम मेश्राम यांनी केले.तर महागाईने गरिबांचे रक्त शोषणाऱ्या सरकारला पाय उतार करा.असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) अतुल गण्यारपवार यांनी केले. या प्रसंगी चित्तरंजनपूर (येनापुर) व परिसरातील महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख, व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


PostImage

Gadchiroli Varta News

April 10, 2024

PostImage

दिव्यांगाच्या एका मतासाठी पोहचली यंत्रणा दुर्गम गावात,गृहमतदानातून नोंदविले मत


दिव्यांगाच्या एका मतासाठी पोहचली यंत्रणा दुर्गम गावात,गृहमतदानातून नोंदविले मत

 

महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत

 

 

चंद्रपूर :- चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका… त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव….गावातील एकूण मतदार 281…..आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद.

 

 

 

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.8) अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला.

 

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12 – डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. 8) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले अमुल्य मत नोंदविले. सुरेखा ह्या पूर्णपणे दिव्यांग असून त्या एका क्षणासाठीसुध्दा उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिका-यांकडे सुपूर्द केली.

 

यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय 90), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृध्द नागरिकांचेही गृह मतदानाद्वारे मत नोंदविले. या टीममध्ये मतदान अधिकारी नंदकिशोर उपासणी, नागेश उरकुडे, सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्झव्हर) शिवशंकर उपरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप लंगडे, विलास वानखेडे, पोलिस अंमलदार कौमुद मडावी आणि छायाचित्रकार प्रफुल गिरसावडे उपस्थित होते.

 

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

April 9, 2024

PostImage

गुढीपाडव्याच्या दिवशी एका स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जवान ठार


गुढीपाडव्याच्या दिवशी एका स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जवान ठार

 

 

अहेरी:-

जवळील गेर्रा महागाव रोडवर एका स्कॉर्पीओने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाल्याची घटना दि. ९ एप्रिल ला दुपारी १२.३० वा.चे दरम्यान घडली

 पोलीस शिपाई चिन्ना विडपी वय ४० रा.अहेरी असे मृतकाचे नाव असून चिन्ना हे वांगेपल्ली कडून आपल्या दुचाकीने येत असतांना अहेरी कडून महागाव कडे जात असलेल्या एम एच ३२ ए एच ४०५४ स्कॉर्पिओ ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस जवान ठार झाले 

घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चिन्ना विडपी यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

चिन्ना विडपी यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई,वडील असा परिवार आहे

त्यांच्या अकाली निधनाने मित्र मंडळ व परीवारात शोककळा पसरली आहे

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 9, 2024

PostImage

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.


 

 

आपल्या मित्राला दुरध्वनी ने केला फोन आणि सांगीतले की मी आत्महत्या करतोय

 

 आलापल्ली:+

 असे काय झाले की, त्याला टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करावी लागली हे कोडे आता पोलीसच उलगडणार असे चित्र दिसत आहे

मी आत्महत्या करत आहे, असा कॉल मित्रांना करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ एप्रिल रोजी रात्री येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन मोहुर्ले वय ३०, रा.रंगयापल्ली असे मृताचे नाव आहे. अहेरी येथील त्याची सासुरवाडी आहे. त्यामुळे तो अहेरीतच भाड्याने खोली घेऊन पत्नीसह राहत होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. दरम्यान, कौटुंबिक कारणावरून मोहन मोहुर्ले

त्याचा पत्नीशी वाद होत असे. ७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता तो घराबाहेर पडला. गावालगतच्या शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळील एका झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

 

तत्पूर्वी त्याने एका मित्राला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला व तु कुठे आहेस असे विचारले असता मात्र त्याचे म्हणने न ऐकताच फोन कट केला मित्रांनी रात्री सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच आढळला नाही व आठ एप्रिल ला सकाळी महाविद्यालय जवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले 

मोहन मोहुर्ले याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.

 

 आत्महत्येची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 8, 2024

PostImage

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण


ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण

गडचिरोली दि.8: लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक अनिमेश कुमार पराशर यांच्या हस्ते व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी समोर आज पूर्ण करण्यात आली. यातून ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची निश्‍चिती झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम ची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. सदर सरमिसळ करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी संजय दैने यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार विधानसभा मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या क्रमांकाचे कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट वापरली जाईल, याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर सरमिसळ प्रक्रिया उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष करण्यात आली आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी निश्चित झाल्या.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 1891 असून यासाठी 2330 बॅलेट युनिट (बीयू), 2330 कंट्रोल युनीट(सीयू) आणि 2517 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार आमगाव विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रासाठी (बीयू – 404, सीयू – 404 आणि व्हीव्हीपॅट - 435), आरमोरी विधानसभा मतदारसंघातील 302 मतदान केंद्रासाठी (बीयू – 362, सीयू – 362 आणि व्हीव्हीपॅट - 392), गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील 356 मतदान केंद्रासाठी (बीयू – 427, सीयू – 427 आणि व्हीव्हीपॅट - 462), अहेरी विधानसभा मतदारसंघातील 292 मतदान केंद्रासाठी (बीयू – 350, सीयू – 350 आणि व्हीव्हीपॅट - 379), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील 316 मतदान केंद्रासाठी (बीयू – 395, सीयू – 395 आणि व्हीव्हीपॅट - 426) आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील 314 मतदान केंद्रासाठी (बीयू – 392, सीयू – 392 आणि व्हीव्हीपॅट - 423) ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट निश्चित झाल्या आहेत.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी संजय त्रिपाठी, तहसिलदार रविंद्र होळी उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री करण सयाम, राजेंद्र कोडापे, भारत खटी, गोपाळ खानवळकर, दत्तात्रय खरवडे, मिलिंद लांडे, रोशन कोडापे व श्री शेंडे आदी उपस्थित होते.

०००००


PostImage

Gadchiroli Varta News

April 8, 2024

PostImage

अहेरी विधानसभेत दिपक दादा आत्राम ठरणार गेमचेंजर! पाठिंबा कोणाला?


अहेरी विधानसभेत दिपक दादा आत्राम ठरणार गेमचेंजर! पाठिंबा कोणाला?

 

 

गडचिरोली - चिमूर मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांच्यात आहे.

 सध्या या दोन्ही उमेदवारांची विविध संघटना, संस्था, छोटे पक्ष यांच्याकडून पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.

कार्यकर्ते ठरवतील त्याच उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता दिपक दादा आत्राम कोणाकडे झुकते माप देतील, अशोक नेतेंना की किरसानना समर्थन मिळेल हा सस्पेन्स कायम असून जि. प. निवडणुकीप्रमाणे आताही आताही “गेम चेंजर” ठरू शकतात अशी चर्चा आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणारा प्रत्येक पक्ष किंवा उमेदवार इतर घटकपक्ष, संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी वणवण फिरत आहे. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातही हीच स्थिती आहे. समर्थन मिळविण्यासाठी उमेदवार अनेकांचे हातपाय जोडत आहेत. त्यातही ज्यांचा राजकीय प्रभाव किंवा वजन जास्त त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी तर उमेदवार किंवा पक्षश्रेष्ठी त्यांच्यापुढे अक्षरशः लोटांगण घालत आहेत. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची अहेरी विधानसभा क्षेत्रात असलेली लोकप्रियता बघता उमेदवारांनी त्यांच्याकडे समर्थनासाठी साकडे घातले आहे. त्यांचे समर्थन मिळाल्यास मतांच्या बेरजेत मोठा फरक पडू शकतो हे माहिती असल्याने भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार त्यांना गळ घालत आहेत. मात्र दिपक दादा आत्राम यांनी सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे दिपक दादा आत्राम यांच्या पाठिंब्यासाठी भाजप उमेदवार मनधरणी करीत आहेत. दिपक दादा आत्राम यांच्या समर्थांनामुळेच आविसंला जिल्हा परिषदेत सत्ता प्रस्थापित करता आली होती. पण आत्राम भारत राष्ट्र समितीत गेले .मात्र, भारत राष्ट्र समितीचे काम महाराष्ट्रात बंद झाल्यानंतर खचून न जाता त्यांचे सर्व आविसं कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले.असे असले तरी दिपक दादा आत्राम यांचा प्रभाव पाहता या निवडणुकीत त्यांना डावलणे उमेदवारांना परवडणारे नाही. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने पुन्हा दिपक दादा आत्राम यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पाठिंबा कुणाला द्यायचा हे आता माझे कार्यकर्तेच ठरवतील अशी दिपक दादा आत्राम यांनी स्पष्ट केली


PostImage

Gadchiroli Varta News

April 8, 2024

PostImage

राजकारणात खळबळ ,एकनाथ शिंदे उबाठा गटात


राजकारणात खळबळ ,एकनाथ शिंदे उबाठा गटात

 

 

चंद्रपूर

लोकसभा निवडणुकीची रंगतदार लढत आता सुरु झाली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातून इनकमिंग, आऊटगोइंग चे सत्र सुरु झालंय.अशात नुकतीच एक मोठी बातमी हाती आली आहे.एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर रित्या प्रवेश केलाय.तुम्हालाही धक्का बसेल पण हि बातमी खरी आहे. शिंदे यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील घाटकुळ येथे एका अतिशय सामान्य कार्यक्रमात शिवसेना उबाठात प्रवेश करीत अनेकांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर आता एकच एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. उबाठात प्रवेश करणारे एकनाथ शिंदे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नसून ते चंद्रपूरातील घाटकुळ या गावातील रहिवासी आहेत.

 

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. अनेक आमदाराना हाताशी घेत त्यांनी भाजपशी हातमिळविनी केली. भाजपने त्यांना “रिटर्न गिफ्ट”दिलय. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता.यानंतर राज्यात खोके, गद्दार, मिंधे अशा विविध उपमांच राजकारण सुरु झालं. शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह गेलं.आमदार गेले, चिन्हही गेलं. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेन आता चांगलाच बदला घेतला आहे.

होय आज रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचा उबाठात सार्वजनिक रित्या प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रपूरातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ यां गावात हा कार्यक्रम संपन्न झाला. पण उबाठात प्रवेश घेणारे हे एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री नसून ते घाटकुळ येथील रहिवासी आहेत. एकनाथ रावजी शिंदे असे त्यांचे पूर्ण नाव आहे आज यां एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना उबाठात प्रवेश घेतला. या शिंदेच्या प्रवेशाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.संदीप गिऱ्हे, सुरज माडुरवार, आशिष कावटवार यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

एकुण साडे पाच लाख बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला माओवादी व एका जनमिलिशीयास गडचिरोली पोलीस दलाने केले अटक


 

एकुण साडे पाच लाख बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला माओवादी व एका जनमिलिशीयास गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

 

 महाराष्ट्र शासनाने जाहिर केले होते एकुण 5.50 लाख रुपयांचे बक्षिस

 

 

 

माहे फेब्राुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यास व टिटोळा गावच्या पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशीयास आज दिनांक 07/04/2024 रोजी अटक केले. 

सविस्तर वृत्त असे आहे की, आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पाश्र्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला माओवादी नामे 1) काजल ऊर्फ सिंधू गावडे, वय 28 वर्षे, रा. कचलेर तह. एटापल्ली, जि. गडचिरोली व 2) गीता ऊर्फ सुकली कोरचा, वय 31 वर्षे, रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली ह्रा गडचिरोली-कांकेर (छ.ग.) सिमेवरील पोस्टे पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगल परिसरात संशयितरित्या फिरत आहेत. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, पोस्टे पिपली बुर्गी पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल जी -192 बटा. च्या जवानांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपासात असे दिसून आले की, सन 2020 साली मौजा कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलीस - माओवादी चकमक झाली ज्यात गडचिरोली पोलीस दलातील एक अधिकारी व एक जवान शहिद झाले होते. सदर चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 19/2020 कलम 302, 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सहकलम 5/27, 5/28 भाहका, 3,4 भास्फोका मध्ये अटक करण्यात आलेली आहे. 

 

यासोबतच मागील वर्षी सन 2023 मध्ये मौजा टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या माहे नोव्हेंबर 2023 मध्ये टिटोळा पोलीस पाटीलाच्या हत्येच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल गुन्ह्रातील पाहिजे असलेला आरोपी जनमिलिशीया नामे पिसा पांडू नरोटे, रा. झारेवाडा, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोस्टे गट्टा (जां.) पोस्ट पार्टी व केंद्रीय राखीव पोलीस बल ई -191 बटा. च्या जवानांनी विशेष अभियान राबवून त्यास पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. 76/2023 कलम 302, 364, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25 भाहका, 135 मपोका या गुन्ह्रामध्ये आज रोजी ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया चालु आहे.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

 “बॅनर” लावण्यास मनाई करीत भाजपच्या नेत्यांना हाकलले……!‌ जिल्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसंपादनाचा मुद्दा पेटला


 “बॅनर” लावण्यास मनाई करीत भाजपच्या नेत्यांना हाकलले……!

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसंपादनाचा मुद्दा पेटला

 

Loksabha elections gadchirolli

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली आहे. गडचिरोली मतदारसंघात काँग्रेस व भाजपात थेट लढाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांना संधी मिळाली. तर शेवटच्या क्षणी अशोक नेते यांना भाजपच तिकीट देण्यात आलं. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात भूसंपादनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गावाकऱ्यात या मुद्द्याला घेत रोष पसरला आहे.अशातच chamorshi चामोर्शी तालुक्यातील काही गावात “बॅनर” लावण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.त्यांनी भाजपचे बॅनर तर लाऊ दिले नाही. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना परत पाठविले. गावागावात विरोध वाढत असल्याने भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

 

गडचिरोली मतदारसंघात मित्रपक्षाची BJP भाजपला पाहिजे तशी साथ मिळत नसल्याची चर्चा आहे.तब्बल दोनदा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळुनही अशोक नेते यांना लोकांची मन जिंकता आली नाही.अशात आता चामोर्शी तालुक्यात भूसंपादनाचा मुद्दा ऐरनीवर आला आहे.जवळपास 25 गावातील जमीन शासनाने संपादित करण्याचे नियोजन केले आहे. परंतु गावकरी याला विरोध करीत आहेत. या मुद्द्याला घेत दोनदा मोर्चा देखील काढण्यात आला.यामुळं सत्ताधाऱ्यांसह अशोक नेते यांच्यावरही गावकर्यांचा संताप आहे.

 

आता लोकसभा निवडूकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. काँग्रेस, भाजप व इतर पक्षांचे उमेदवार प्रचाराला लागले आहेत. अशातच भाजपचे काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत मुधोलीचक व जयरामपूर या गावात प्रचाराला गेले होते.यावेळी संतप्त गावकर्यांनी त्यांना अक्षरशः हाकलून लावले. एवढेच नव्हे तर त्यांना बॅनर बांधण्यास मनाई करण्यात आली. तुमचे खासदार कुठे आहेत. असे खडे बोल गावकऱ्यांनी सुनावले. हा प्रकार समोर येताच आता भाजप गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आधीच मित्रपक्षांची साथ मिळेनाशी झालीय, दुसरीकडे स्वपक्षियातील नेत्यांची सक्रिय भूमिका नसल्याने अशोक नेते यांचं टेंशन वाढलं आहे. अशातच आता गावकरी आपला जाहिररित्या रोष व्यक्त करू लागले आहेत.चामोर्शी तालुक्यातील २५ गावातील गावकरी आता एक बैठक घेऊन आपली पुढील भूमिका घेणार आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

प्रिंट मिडीयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक, मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात


प्रिंट मिडीयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक,
मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात

 2 दिवस आधी अर्ज सादर करावा


गडचिरोली, दि. 6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम पूर्व प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) स्थापन करण्यात आली. मतदानापुर्वीचा एक दिवस (18 एप्रिल) आणि मतदानाच्या दिवशी (19 एप्रिल) मुद्रीत माध्यमाद्वारे (प्रिंट मिडीया) प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अशा जाहिरातींबाबतचे अर्ज, जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवसापूर्वी समितीकडे सादर करावे, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिल्या आहेत.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट मिडीयातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभुल करणा-या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहे.
कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य / जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणीत केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये. मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यायची झाल्यास अर्जदारांना सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी समितीकडे अर्ज सादर करावा लागेल. भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे राज्याचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी  यांनी त्यांच्या दिनांक 5 एप्रिल 2024 च्या पत्रान्वये कळविले आहे.
०००००


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

देवरीत महायुतीचा भरगच्च महिला मेळावा


देवरीत महायुतीचा भरगच्च महिला मेळावा !

 

पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, उमेदवार अशोक नेते यांची उपस्थिती !!

 

गडचिरोली :-भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य आणि महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी शनिवार, 6 एप्रिल रोजी भव्य प्रचारसभा, तसेच महायुतीचा महिला मेळावा देवरीच्या छत्रपती शिवाजी संकुलात आयोजित केला होता. ना.धर्मरावबाबा आत्राम, महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात महिलांच्या सन्मानासाठी भाजप सरकारने राबविलेल्या योजनांचा उहापोह करण्यात आला.

 

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महिलांना मोठा सन्मान मिळाला आहे. महिला‌ सशक्तीकरण, तीन तलाक, नारी शक्ती वंदन अधिनियम, मातृवंदना, सौभाग्यवती, सुकन्या योजना, महिला प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना अशा अनेक योजना महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित जीवनासाठी कार्यान्वित करण्यात आल्या. महिलांच्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

 

केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33 टक्के करून महिलांचा सन्मान केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांचा सन्मान करणाऱ्या सरकारला पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी येत्या १९ एप्रिलला भाजपला कौल देऊन महायुतीला विजयी करावा, अशी विनंती यावेळी खा.नेते यांनी मेळाव्याला उपस्थित महिलावर्गाला केली.

 

*पालकमंत्री म्हणून विकासकामे मार्गी लावली- ना.धर्मरावबाबा आत्राम*

 

गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले, महायुतीच्या नेतृत्वातील राज्य शासनसुद्धा महिलांच्या सन्मानासाठी कटीबद्ध आहे. लेक लाडकी ही योजना अतिशय चांगली योजना आहे. याचा अनेकांना फायदा होत आहे. महिला सशक्तिकरण व मेळावे सुद्धा शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी आयोजित केले गेले. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सहा पुलांचे उद्घाटन केले आहे. याचबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते सुद्धा सोडवले आहेत. महायुतीच्या सरकारचा दृष्टिकोन विकासात्मक आहे. त्यामुळे या सरकारला संधी दिल्यास आणखी कामे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी मंचावर प्रामुख्याने महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष अॅड.येशूलाल उपराडे, संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, प्रदेश उपाध्यक्ष शालिनी डोंगरे, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स.सभापती अंबिका बंजार, नगराध्यक्ष संजय उईके, तालुकाध्यक्ष प्रवीण दहीकर, जेष्ठ नेते तथा कृषी ऊबास सभापती प्रमोद संगीडवार, उपनगराध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण तसेच मेळाव्याला महायुतीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

April 7, 2024

PostImage

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकुलता एक मुलगा ठार


दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकुलता एक मुलगा ठार

 

 चामोर्शी तालुक्यातील येणापूर जवळील देशबंधू हिंदी हायस्कूल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन एक युवक ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.आयुष सुरेश चोखारे (१८, रा. लक्ष्मणपूर) असे मृतकाचे नाव आहे. आयुष हा आपल्या दुचाकीने येणापूरकडून चामोर्शीकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. अपघात होताच शेजारच्या लोकांनी आयुषला येणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पकती चिंताजनक असल्याने

त्याला चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आयुष हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. शनिवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच टाहो फोडला.


PostImage

Gadchiroli Varta News

April 6, 2024

PostImage

दुचाकीच्या धडकेत एक ठार, २ जखमी


दुचाकीच्या धडकेत एक ठार, २ जखमी

 

अमिर्झा लगतच्या मौशीचक फाट्यालगतची घटना

 

 अमिर्झा - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज ५ एप्रिल रोजी अमिर्झा लगतच्या मौशीचक फाट्यावर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

 

नामदेव सेलोटे (७०) रा. मौशी चक असे मृतकाचे नांव आहे. तर जखमीमध्ये सुधीर सेलोटे (३५) रा. मौशी चक, अनिल निलेकार (३६) रा. अमिर्झा यांचा समावेश आहे. नामदेव सेलोटे व

 

 

नातू सुधीर सेलोटे हे अमिर्झा येथील कार्यक्रम आटोपून दुचाकीने स्वगावी मौशीचककडे जात होते तर मौशी वरून अमिर्झाला अनिल निलेकार हा आपल्या दुचाकीने जात असतांना दोन्ही दुचाकींनी एकमेकांना धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.

 

दोघे गंभीर जखमी झाल्याने अमिर्झा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

April 4, 2024

PostImage

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गडचिरोली,दि.4:- सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (१९ एप्रिल २०२४) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे. 

        12 गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात, सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता 19 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 4, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक


गडचिरोली पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक

पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांनी ०१ एप्रिल २०२४ रोजी माहिती दिली की, मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी येथे दोन इसमांचे मोबाईल व पैसे जबरीे हिसकावुन चोरुन नेले. अशा मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारावर सपोनि. आगरकर व पोस्टे स्टाफ यांचे एक पथक तात्काळ महादेव पहाडी पळसगांव येथे गेले असता, तिथे फिर्यादी नामे जय सहदेव दोनाडकर रा. बरडकीन्ही तह. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांनी सांगीतले की, जय व त्याचा मित्र हर्षल पहाडी चढत असतांना हर्षल यास दम आल्याने तो थोडा वेळ थांबला असता, हर्षलजवळ दोन अनोळखी पगडी बांधुन असलेले सरदार त्यांचेजवळ येतांना दिसुन आल्याने फिर्यादी जय हा हर्षलजवळ आले असता, पगडी बांधून असलेल्या दोन्ही इसमांनी त्यांना मारण्याची धमकी देऊन तुमच्याकडे असलेले पैस आम्हाला द्या असे धमकावल्याने फिर्यादी जय याने नकार दर्शविल्याने त्यापैकी एक मजबूत बांधा असलेल्या इसमाने फिर्यादी जय यांचे कॉलर पकडुन तुला मारुन टाकीन असे म्हणुन खिशात हात टाकुन खिशातील पॉकीटमध्ये असलेले ९५० रु. हिसकावुन घेतले. तसेच हर्षलकडे असलेले एक रिअल मी ७-१ कंपनीचे मोबाईल किंमत अंदाजे १३ हजार ५०० रु. हिसकावुन घेतले. त्यानंतर तिथे लोकं मदतीला येत असतांना पाहून, ते दोन्ही इसम पैसे व मोबाईल घेऊन पहाडीवर पळून गेले.

 

 

असे फिर्यादीने सांगितल्याने, सपोनि. आगरकर व त्यांच्या पोलीस स्टाफ यांनी फिर्यादीस सोबत घेऊन महादेव पहाडी वरील झुडपी जंगलात शोध घेतला असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना पाहताच पळ काढला. सदर पळुन जाणाऱ्या दोन अनोळखी इसमांना पोलीस पथकांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, सदर संशयित इसमांची नावे १) बादलसिंग नैतरसिंग टाक (३२) व २) अनमोलसिंग निर्मलसिंग टाक (२८) दोघेही रा. अर्जुनी मोरगाव सिंगलटोली वार्ड नं. २, तह. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया असे असून फिर्यादी व इतर प्रथमदर्शी साक्षीदार यांचेकडे प्राथमिक तपास करुन तसेच आरोपीतांकडुन गुन्ह्रात जबरीने चोरुन नेलेला एकुण १४ हजार ४५० रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोस्टे देसाईगंज येथे अप क्र. १०८/२०२४ कलम ३९२, ३४ भादंवि अन्यये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. आगरकर करीत असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप, सपोनि. संदिप आगरकर, पोअं/५५३८ विलेश ढोके, पोअं/३७५५ शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

April 3, 2024

PostImage

ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध


ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

 

 

            गडचिरोली, दि. 3 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

 

       राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

April 2, 2024

PostImage

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एक कोटी 63 लाखाची दारू व इतर साहित्य जप्त


निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एक कोटी 63 लाखाची दारू व इतर साहित्य जप्त

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारसंघात 88 पथके

गडचिरोली दि. २ : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत दारू, अमली पदार्थ व इतर मौल्यवान एवज जप्त करण्यात आला असून याची एकूण किंमत एक कोटी 63 लाख 45 हजार रुपये इतकी आहे.

 जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिस विभागामार्फत 46 हजार 318 लिटर दारू व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 3 हजार 975 लिटर अशी एकूण 50 हजार 293 लिटर दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 79 लाख 94 हजार रुपये आहे. तसेच 83 लाख 50 हजार किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश आहे. अमली पदार्थांच्या विक्रीवरही पोलिसांचे बारीक लक्ष असून या कारवाईत 93 ग्रॅम तंबाखुजन्य अमली पदार्थ जप्त केले आहेत 

जिल्ह्यात 42 तर लोकसभा मतदार संघात 88 पथके नेमण्यात आली आहेत. यात व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी) २९, भरारी पथक (एफएसटी) 24, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) 29 व 6 श्राव्य पथक(अेटी) पथकांचा समावेश आहे. याशिवाय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष यांचेमार्फतही निवडणूक गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक कालावधीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरण्यात येणारी रोख रक्कम, मद्य आणि अन्य प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबतच्या घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, जाहिरातींचे पुर्वप्रमाणिकरण करणे, नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करणे आदी कामे या पथकांच्या माध्यमातून केली जात आहे

याशिवाय आचारसंहिता भंग बाबत सिव्हीजिल ॲपवर एक तक्रार नोंदविण्यात आली आहे तर अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलिस स्टेशनला एक अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सीव्हिजिल ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांतच कार्यवाही केली जात असल्याने, निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सीव्हिजिल ॲपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

000


PostImage

Gadchiroli Varta News

April 2, 2024

PostImage

पाऊस आला रे आला... लखमापूर बोरी येथील नाल्यात वाहतात दारूच्या बाटल्या 


पाऊस आला रे आला... लखमापूर बोरी येथील नाल्यात वाहतात दारूच्या बाटल्या 

 

लखमापूर बोरी :- 

         गडचिरोली जिल्ह्यात कठोर दारू बंदी असताना चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी इथे जवळपास प्रत्येक गटर नाल्यात मोठ्या संख्येने दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून येत असतात.

      अचानक अवकाळी मुसळधार पाऊस आला रे आला की या सर्व रिकाम्या बाटला गावच्या खाल उतार भागाकडे जाणाऱ्या नालीच्या दिशेने म्हणजेच ग्रा.पं. कार्यालय जवळच्या परिसरात प्लास्टिक घन कचऱ्याच्या स्वरूपात जमा होतात.

पोलीस प्रशासनाचे गावाकडे नेहमी लक्ष्य असताना गावात एवढी अफाट दारू कोण विकत असावी , ही दारू बाहेर गावातून आपल्या गावात येत तर नसेल, प्रत्येक नाल्यातून असंख्य दारूच्या रिकाम्या बाटला पोहताना बघून असे ना-ना प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात.

ग्रा.पं. कार्यालयाकडे अचानक शासकीय कर्मचारी किंवा इतर पाहुणे भेट द्यायला गेले की त्यांना कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात किंवा परिसरात असे असंख्य दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसल्यास पाहुणे आपल्या गावाबद्दल चांगले विचार करतील की वाईट विचार करतील...?  गावात दारू बंदी असून एवढ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या येतात कुठून असा प्रश्न महिला वर्गाकडून केला जात आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 2, 2024

PostImage

पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई


पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई

 

दारसह ३,९६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

 

आष्टी: आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढुन कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्रगस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची एम.एच ३४ ए.व्हि २१३६ हे वाहन संशयित रित्या फिरतांना दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ९० एम.एल मापाच्या ९६,०००/-रुपयाची देशी दारु व ०३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण ३,९६,००० (तिन लाख छयानव हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीतां विरुध्द पौस्टे आष्टी अप क्र.५२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मंडल करीत आहेत.

 

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) चिंता,अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळे,यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंडल, जगताप, पोलिस शिपाई राउत, मेंदाळे, येनगंटीवार,यांनी पार पाडली.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणा­ऱ्या दोन महिला आरोपीस 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षा


 

शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणा­ऱ्या दोन महिला आरोपीस 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षा ठोठावण्यात आली

 

गडचिरोली येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. आशुतोष नि. करमरकर यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन देसाईगंज येथील फिर्यादी नामे - मपोउपनि. सोनम नाईक हे आपले हद्दीतील मपोउपनि. सुजाता भोपळे व पोस्टे स्टाफसह प्रोव्ही रेड कामी दिनांक 27/10/2021 रोजी देसाईगंज शहरात पेट्रोलींग करीत असतांना गांधीवार्ड देसाईगंज येथील आरोपी क्र. 1) नामे रजनी रामचंद्र आत्राम, वय 47 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज ही तीचे राहते घरी अवैधरीत्या देशी विदेशी दारुची विक्री करते अशी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाल्याने पंचांना प्रोव्ही रेड बाबत माहिती देऊन, पंचांसमक्ष आरोपी नामे रजनी आत्राम यांचे घराची झ्डती घेत असतांना आरोपी क्र. 2) नामे शितल रामचंद्र आत्राम, वय 26 वर्षे रा. गांधीवार्ड, देसाईगंज हिने माझ्या आईला दोन मुली पोसायचे आहेत म्हणुन माझी आई दारु विकते, हे माझे घर आहे तुमचे पोलीस स्टेशन नाही असे म्हणून एकाएकी फिर्यादीचे अंगावार येऊन दोन्ही हात पकडुन शोकेस आलमारीकडे ढकलत नेले व मान खाली दाबुन मानेवर बुक्यांनी मारले. त्यावेळी सोबत असलेली मपोउपनि. सुजाता भोपळे यांचे दोन्ही हात पकडुन खाली ढकलुन दिले. तेव्हा पोलीस स्टाफ व पंचांनी समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आरोपी क्र. 1 व आरोपी क्र. 2 यांनी आरडाओरड करुन अश्लिल शब्दात शिवीगाळ केली.

 असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दिनांक 27/10/2021 रोजी अप क्र. 579/2021 अन्वये कलम 353,332,504,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीस दिनांक 28/10/2021 रोजी 14.02 वा अटक करुन, तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 38/2022 नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवून, फिर्यादी पंच व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 01/04/2024 रोजी आरोपी क्र. 1) नामे रजनी आत्राम, वय 47 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज व आरोपी क्र. 2) नामे शितल रामचंद्र आत्राम, वय 26 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली या दोघींना मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. आशुतोष नि. करमरकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 353, 34 भादवी मध्ये दोषी ठरवून 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंड व दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षेची तरतुद करण्यात आली.

 सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. सचिन यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्राचा प्रथम तपास सपोनि. राजेश गावडे पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबंधीत साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहिले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

चितळाची शिकार प्रकरणी चार आरोपींना‌ वनविभागाने केली अटक...


चितळाची शिकार प्रकरणी चार आरोपींना‌ वनविभागाने केली अटक...

 

कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत गिलगाव परिसरात चितळाची शिकार करून मांसाची वाटणी झाली व ते शिजवले असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी १: १५ वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी गिलगाव येथील संशयित आरोपी पंकज शंकर पिंपळवार यांच्या घराची पाहणी केली असता त्याच्या घरून, वन्यप्राण्याचे कापून तुकडे केलेले मांस आढळून आले. त्यावरून त्यांची चौकशी करून मांस, ताब्यात घेऊन पंचासमक्ष जप्तीनामा व पंचनामा केला.

 

     प्राप्त माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात चितळाची शिकार करून मांस घरी नेवून शिजवित असल्याची गोपनीय माहिती वनअधिकारी यांना मिळताच वनअधिकार्यांनी मोठ्या शिताफीने "त्या" आरोपींना त्यांच्या घरी शिजविलेल्या मांसासह घरून ताब्यात घेत शनिवार ३० मार्च रोजी गिलगाव (जमीनदारी) येथे चार आरोपीना अटक करण्यात वन विभागाला यश आले.

या मध्ये आरोपी पंकज पिंपळवार याला कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून चौकशी करून त्याचा कबुली जबाब नोंदविला. यावेळी त्याने अरुण विठ्ठल भोयर, रोहिदास शंकर मडावी दोघेही रा. गिलगाव (जमीनदारी) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना आदींचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. इतर सर्व कार्यवाही पूर्ण करून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यातील पंकज, अरूण व रोहिदास यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी तर विलास बोदलकर यास एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.

 

या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली वन विभागाचे सहायक वनसंरक्षक धीरज ढेंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी एम. एम. तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे, वनरक्षक के. एम. मडावी हे करीत आहेत. या कारवाईसाठी अन्य वन कर्मचारी व वनाधिकान्यांचे सहकार्य लाभले.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड


पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

 

गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रे) येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी दरवर्षी केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे पुढील शिक्षणासाठी निवड होत असतो. अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील रहिवासी असलेली कन्या ही चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा (रे) येथील जि.प.उच्च.प्रा.कन्या शाळा येथे इयत्ता ५ वी त शिकणारी विद्यार्थ्यांनी क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार हिने नवोदय विद्यालयाचे परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याने हीचा गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणा करिता निवड झालेली आहे. 

यावेळी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के,केंद्रप्रमुख गोमासे आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.

या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी 

मुख्याध्यापक गोटामी,वर्गशिक्षक

निमाई मंडल,रोशन बागडे,गौतम गेडाम,वर्षा गौरकर,रेखा हटनागर,

प्रीती नवघडे,विलास मेश्राम,आई वडील आणि आजी आजोबा

यांना दिले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

नवोदय प्रवेश परीक्षेत कुनघाडा कन्या शाळेतील 5 विद्यार्थिनींची गरुडझेप


नवोदय प्रवेश परीक्षेत कुनघाडा कन्या शाळेतील 5 विद्यार्थिनींची गरुडझेप

 

 

चामोर्शी:-नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेच्या निकालात चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्रा.कन्या शाळा कुनघाडा(रै) येथील विद्यार्थिनींनी सलग 4 च्या यशस्वी हॅट्रिक नंतर यावर्षी 5 विद्यार्थिनींनी नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित केलेला आहे. 

त्यामध्ये

*1)क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार*

*2)आराध्या प्रवेश मेश्राम*

*3)खुशी नीलकंठ टिकले*

*4)समृद्धी रवींद्र कुनघाडकर*

*5)अक्षरा विजय दूधबावले*

इत्यादींची निवड झालेली आहे.

 

 

*पाच वर्षापासून सुरू असलेली यशाची परंपरा यावर्षीही कायम*

 

संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे

2019 पासून नव्या जोमाने आणि नव्या जोशाने सुरू झालेली यशाची परंपरा या वर्षीही कायम असून मागील सलग चार वर्ष चार विद्यार्थिनींची हॅट्रिक आणि या वर्षी आपलाच विक्रम मोडून 5 विद्यार्थिनींची निवड झालेली आहें हे विशेष .....

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के,

केंद्रप्रमुख गोमासे आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.

या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी 

मुख्याध्यापक गोटामी,वर्गशिक्षक

निमाई मंडल,रोशन बागडे,गौतम गेडाम,वर्षा गौरकर,रेखा हटनागर,

प्रीती नवघडे,विलास मेश्राम

यांना दिले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!


 

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ?

 

दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार!

 

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा - वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने शेतकरी कामगार पक्षाने वेगळी भूमिका घेत आता योग्य उमेदवारासाठी काम करण्यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हा समीतीची बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

 

उल्लेखनीय कि, जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर लोह खाणींना स्थानिक ग्रामसभांच्या असलेल्या खदान विरोधी भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने सुरुवाती पासूनच समर्थन देवून नेतृत्व केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ग्रामसभा सोबत दगाबाजी करत वेळोवेळी रोजगार मिळण्याच्या नावाखाली प्रकल्प आणि खाणींचे समर्थन केले आहे. ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न, पेसा - वनाधिकार, पाचवी अनुसूची, रेती तस्करी, बळजबरी भूसंपादन याबाबत जिल्ह्यात भाजपची जी भूमिका आहे, तिच भूमिका काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची असल्याने जिल्हावासीयांची दिशाभूल होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

तसेच काही उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्ष आपल्यासाठी काम करणार असल्याचे गृहीत धरले असून न विचारता बॅनर, पोस्टर वर पक्षाच्या नावाचा उल्लेख करण्याचा खोडसाळपणा करीत आहेत. मात्र शेतकरी कामगार पक्ष खदानसमर्थक व ग्रामसभा विरोधी भूमिका असणाऱ्यांच्या सोबतीला जाणार नसून योग्य उमेदवारासाठी काम करण्याबाबत जिल्हा बैठक आयोजित करुन सर्व संमतीने निर्णय घेण्यात येईल असे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, जिल्हा सह चिटणीस भाई रोहिदास कुमरे, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा सचिव देवेंद्र भोयर यांनी कळविले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

April 1, 2024

PostImage

दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना अटक


दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना अटक

 

बल्लारपूर : येथील गांधी कॉम्प्लेक्स येथून मोपेड दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना बल्लारपूर पोलीस स्टेशन गुन्हे शाखेने अटक केले.

येथील जूना बस स्टँड गांधी कॉम्प्लेक्स येथे २७ मार्च रोजी विशाल दिलीप पिसुडे रा. शिवाजी वार्ड बल्लारपूर यांनी आपली मोपेड वाहन क्र. एमएच ३४ एयु ७९४४ ठेवून कॉम्प्लेक्स मध्ये गेले होते. काही वेळा नंतर ते येऊन बघितल्यास त्यांना आपले गाडी दिसले नाही. त्यांनी शोधाशोध केले. पण त्यांना गाडी मिळाली नाही. त्यांनी दुसऱ्या दिवसी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिले. त्यावरून डी. बी. चे पोहवा सत्यवान कोटनाके, पोहवा रणविजय ठाकूर, पोशि श्रीनिवास वाभीटकर यांना माहिती मिळाली की तीन युवक कारवा रोड कडे मोपेड गाडी घेऊन फिरत आहे.

त्यावरून त्यांना विचारपूस केले असता ती चोरीची वाहन होते. गुलशन मनमित सिंग दलवेद (१९) शिव नगर बल्लारपूर, प्रेम राजेंद्र ढवस (१९) दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर, आतिफ मुमताज अली (१९) दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर यांना अटक केले. सदर आरोपी वर रामनगर चंद्रपूर तसेच सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. ते नुकतेच २० मार्च रोजी सुटून आले होते. 

पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सत्यवान कोटनाके करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 31, 2024

PostImage

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश


गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश

 

दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) तळ ठोकून आहेत. 

 

यावरून अपर पोलीस अधीक्षक (अभियान )श्री.यतीश देशमुख नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकच्या जवानांद्वारे सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. अभियान पथक काल सकाळी 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले त्यावेळी माओवादी हे नुकतेच सदर ठिकाणहून निघाले होते.सदर डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठा आश्रयस्थान आणि छावणी सापडली ती अभियान पथका द्वारे नष्ट करण्यात आली.सदर जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

      यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटऱ्या, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक इत्यादींचा मोठ्या प्रमाणात माओवादी सामान आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

March 30, 2024

PostImage

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवारांमध्ये लढत,दोन उमेदवारांची माघार


गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवारांमध्ये लढत,दोन उमेदवारांची माघार

 

 

गडचिरोली दि. 30 (जि.मा.का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली. 

 

हे उमेदवार आहेत रिंगणात :

  नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.  

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती).

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).

इतर उमेदवार : करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी, अपक्ष ( अंगठी)

 


PostImage

Gadchiroli Varta News

March 30, 2024

PostImage

नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या


नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या

    

     

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर काल पहाटे ही घटना उघडकीस आली. अशोक तलांडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ताडगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर अशोक तलांडेचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकले असून, अशोक तलांडे पोलिसांचा खबऱ्‍या असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. अशोक तलांडे हा मागील काही दिवसांपासून ताडगाव येथे वास्तव्य करीत होता. मोलमजुरी करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, नक्षल्यांनी  त्याची हत्या केली. दरम्यान, अशोक हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. मागील आठवड्यात गडचिरोली पोलिसांनी ४ नक्षल्यांना ठार केले होते. त्यामुळे नक्षल्यांनी पोलिस खबरे असल्याच्या संशयावरुन सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूक सुरु असताना ही हत्या झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 30, 2024

PostImage

अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद


अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद

 

 

देसाईगंज (वडसा) पोलीसांची अट्टल गुन्हेगारावर कारवाई 

 

देसाईगंज (गडचिरोली) :-

 अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी अटक केली आहे देसाईगंज (वडसा )पोलीस प्रशासनाने गस्ती दरम्यान देसाईगंज ब्रम्हपुरी रोड वरील विर्षी वार्ड जवळ एका संशयित इसमास विचारपूस करून ताब्यात घेतले; विचारपूस करित असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावरून संशय अधिक बळकट झाल्याने त्याचा पाठलाग करुन सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अधिक विचारपूस केली असता, सदर इसम हा अनेक घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे कळले. सदर आरोपीचे नाव व्यंकटी रामा घोडमारे वय ३८ वर्ष राहणार विर्षी वार्ड देसाईगंज असे आरोपीचे नाव आहे.

 

सदर आरोपी हा नुकताच दोन महिन्याआधी जळगाव जेल मधून सुटला असल्याची माहिती आरोपीने दिली. सदर आरोपी वर जळगाव, भुसावळ, चंद्रपूर, भंडारा, नाशिक, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यात घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत. तसेच नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घरफोडी चा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला देसाईगंज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन देसाईगंज येथील अनेक घरफोडी संदर्भात विचारपूस करण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. सदर तपास देसाईगंज पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

लखमापूर बोरी इथे व्यसनाच्या विचाराची पेटविली होळी


लखमापूर बोरी इथे व्यसनाच्या विचाराची पेटविली होळी

 

 

 

 

  चामोर्शी : लखमापूर बोरी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नेहरू युवा केंद्र प्रेरित शिवछत्रपती युवक मंडळातर्फे होळी सणाचे औचित्य साधून व्यसनांची करूया होळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील वॉर्ड क्रं. 01 मध्ये सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सर्वांना नशामुक्ती चे माहिती पत्रक हातात देऊन विद्यार्थी, युवकांच्या व बालगोपालांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे घातक व्यसन करणार नाही व दुसर्यांना पण करू देणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणार व व्यसनाचे विचार याच होळीत जाळनार अशी प्रतिज्ञा केली. 

    यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव दिलखुश बोदलकर यांनी मनोगताद्वारे उपस्थिताना मार्गदर्शन केले. तरुणांमध्ये विविध कारणांनी गुटका, बार, तंबाखू तसेच अन्य व्यसनी पदार्थ बिडी, सिगारेट यांचे सेवन व्यसनांमध्ये रूपांतरित होते. तसेच आजकाल बिअर दारू पिणे ही फॅशन बनली आहे. भविष्यात आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या या व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन मंगलताई मेश्राम व उज्वला शेंडे यांनी केले तसेच होळी - रंगपंचमी या सणामुळे समाज परिसरातील सर्व जातीधर्मात , प्रत्येक घरात व मित्र नातेवाईकांत आपुलकीची भावना निर्माण होत असून सर्वजण हे सण आनंदात साजरा करतात त्यामुळे कोणीही भेदभाव न करता सण साजरा करावे असे पण सांगितले. 

    यावेळेस अंनिस शाखा लखमापूर बोरी चे कोषाध्यक्ष टिकाराम शेंडे शिक्षक तसेच कालिदास मेश्राम, कविता केशव बोदलकर, बाबूराव नैताम, कपिल मडावी, दीपक मेश्राम, सुरज बांगरे, चंद्रहार बोदलकर, स्नेहा बोदलकर, देवाजी वासेकर, वैशाली सोनटक्के, उमेश सोनटक्के तसेच महिला व बालकवर्ग आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

दोन दुचाकी वाहनांची एकमेंकांना समोरासमोर धडक! संपूर्ण जखमी


दोन दुचाकी वाहनांची एकमेंकांना समोरासमोर धडक! संपूर्ण जखमी 

 

सिंदेवाही : एकीकडे संपूर्ण तालुक्यात धुलिनंदन साजरा होत असतांना सायंकाळ च्या सुमारास मौजा मेंढा (माल ) च्या समोर दोन दुचाकी एकमेकांना आदलळ्या त्या त्यामध्ये दोन्ही दुचाकी वरील सहा जण जखमी झाले, जखमी मध्ये ३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे,मिळालेल्या माहिती नुसार मौजा कोळसा (पांगडी) येथील रहिवासी सचिन शेडमाके वय वर्ष अंदाजे ३५ वर्ष हा आपल्या पत्नी व ३ वर्षाच्या मुलीला घेऊन नागभीड इथे आपल्या दुचाकी वाहन क्रं MH 34 CC 2011याने जात होता, तर विरुद्ध दिशेने मौजा पळसगाव (जाट ) कडून आपल्या स्कुटी या क्रं MH 34 CC 9623

या वाहनाने ट्रिप्पल सीट वैष्णवी अशोक सावसाकडे वय वर्ष २२ हेटी वॉर्ड सिंदेवाही,डिम्पल गुरनुले २० वर्ष सिंदेवाही ख़ुशी कृपा उंदीरवाडे वय १९ ह्या तीन मुली येत होत्या मौजा मेंढा(माल) च्या समोर गाडीवरून नियंत्रण सुटल्याने एकमेंकांना जाऊन धडकल्या,त्या मध्ये ३ वर्ष्याच्या मुलींसह सर्व च जखमी झाले आहेत वृत्त लिहत पर्यंत गंभीर जखमी असल्याने सर्वाना चंद्रपूर ला रेफर केले होते,

*सिंदेवाही पोलीस विभागाची कर्तव्यदक्षता*

या अपघाताची माहिती मिळताची पी एस आय सागर महल्ले,सहकारी 

 रणधीर मंदारे, विनोद बावणे व इतर कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन जखमी ना रुग्णवाहिकेची वाट न बघता आपल्या गाडीत आणून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही मध्ये भरती केले, पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सतत तालुक्यात पेट्रोलिंग करून कुठेही अनुचित प्रकार घडू नये या साठी सकाळ पासून दुचाकी वर ट्रिप्पल सीट जाणाऱ्या च्या दुचाकी पोलीस स्टेशन ला जमा करीत होते तरी पण पोलीस प्रशासन न व कायाद्याला न जुमानता भरधाव वेगाने गाडी चालवून अपघात ला आमंत्रण दिले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

 पोलिसांनी दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त


 पोलिसांनी दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

 

 

गडचिरोली: दि 25/03/2024

गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 24/03/2024 रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी 1) जुगल लखन दास, 2) देवदास किसन मंडल, 3) सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सळवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत आहेत, अशी गोपनिय बातमीदारंाकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले.

पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.त्यानंतर सदर जागेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन पोस्टे चामोर्शी येथे आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत.

 

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पुल्लरवार यांचे नेतृत्वात मपोउपनि. राधिका शिंदे, पोहवा/व्यंकटेश येलल्ला, पोअं/संदिप भिवणकर, मपोअं/मनिषा चिताडे, मपोअं/शिल्पा पोटे, चापोअं/सिंधराम यांनी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 25, 2024

PostImage

राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनातून युवकांनी केली पशु पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था, झाडावर बांधले पानवटे


राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनातून युवकांनी केली पशु पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था, झाडावर बांधले पानवटे

 

 

 

आष्टी - सध्या दिवसेंदिवस तापमान वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पशु पक्षांचे हाल होत आहेत. पशु पक्षांचे होणारे हे हाल लक्षात घेऊन चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव चेतन कोकावार यांनी पुढाकार घेऊन येथील युवकांनी गावातील झाडांना पानवटे बांधून पशु पक्षांच्या पाण्याची सोय केली आहे.

 

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे पक्षु पक्षी व वन्य प्राणी यांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन भेंडाळा येथील तरुणांनी एकत्र येऊन पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदात्य हेतुने झाडांना पानवटे बांधून पक्षांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळेल असे योग्य नियोजन करूण गावांतील झाडावर बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थानीही या उपक्रमाला साथ देत नियमित या पानवट्यात पाणी भरून ठेवत आहेत. युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी पक्षांसाठी घरासमोर पाणी भरून ठेवावे असे आवाहन करीत आहेत. दरवर्षी भेंडाळा येथील तरुणांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.राहुल वैरागडे मार्गदर्शनातून गेल्या सहा वर्षापासून जिल्ह्याच्या विविध भागात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार ,आरोग्य,पर्यावरण ,क्रीडा ,मनोरंजन, असे उपक्रम जीवन वासेकर,कृष्णा चलाख, सुबिर मिस्त्री, भूषण नंदगिरीवार, विहान सातपुते, अर्जित दास, यश गुरु, यश, साहिल वासेकर,भैरव चलाख, कार्तिक बोरकुंटवार, अनिकेत वैरागडे, लक्ष्मण चलाख, कुशल मडावी, रोहन वैरागडे , कृष्णा पाटील, सागर जुवारे, कृष्णा कंकलवार, हे उपक्रम घेत असतात.


PostImage

Gadchiroli Varta News

March 24, 2024

PostImage

ऑटो ला ट्रक ची धडक ; ऑटो चकनाचूर


ऑटो ला ट्रक ची धडक ; ऑटो चकनाचूर

 

 

 

बल्लारपूर : येथील किल्ला वार्ड मध्ये एका ट्रक ने उभ्या असलेल्या ऑटो ला मागून धडक दिल्याने ऑटो चकनाचुर झाला आहे.

२१ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ऑटो ला ट्रक ने मागून धडक दिले. ऑटो चालक मालक उमेश दूपारे हा ऑटो क्र एमएच ३४ डी ६२५६ चा धंदा करून रात्री आपल्या घरा समोर ऑटो ठेवले. रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रक क्र. एमएच ४० सीएम ५६२७ ने मागून धडक दिली. ट्रक मध्ये सामान भरून आहे. ते ट्रक बंगलोर ला जाणार होता अशी माहिती मिळाली. जेव्हा तो ट्रक बंगलोर ला जाणार होता, तर त्या १५ फूट चा गल्ली मध्ये कसा गेला. तेथील नागरिकांनी सांगितले की ट्रक चालक हा दारू पिऊन होता तसेच तो विसापुर मार्गाने आला. ऑटो चे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 24, 2024

PostImage

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी घेतला ताब्यात


अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी घेतला ताब्यात 

 

 

पोंभूर्णा : - अंधारी नदी भिवकुंड घाटातून अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर बुधवार दि.२० मार्चच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास पोंभूर्णा एमएसईबी ऑफीसजवळ तहसीलदारांनी पकडून तहसिल कार्यालयात जमा केले.

 

तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झालेले नाही व या दिवसात रेती उपसा पूर्णपणे बंद आहे. असे असताना रेती माफिया अंधाराचा फायदा घेत अवैध रेती वाहतूकीचा सपाटा लावला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदी भिवकुंड घाटातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी कदम यांना मिळताच बुधवार दि.२० मार्चला मध्यरात्रीनंतर दिड वाजताच्या सुमारास रुपेश चन्नावार यांच्या मालकीची अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर क्र. एमएच ३४ बीएफ-१७७५ व ट्राली क्र. एमएच ३४ बीव्ही ७३७७ पकडुन तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात जमा केली.महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७)व (८)अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 21, 2024

PostImage

चामोर्शी:आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई, विस दिवसात १४ लाखांची अवैध दारू जप्त 


चामोर्शी:आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई, विस दिवसात १४ लाखांची अवैध दारू जप्त 

 

अवैध दारू विक्रेत्यांचे दणाणले धाबे, नवनियुक्त ठाणेदार विशाल काळेंची धडक मोहीम 

 

    

आष्टी : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या काळात मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था ढासळू नये, म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अहेरी, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी यांनी अवैध धंद्यांवर वेळोवेळी धाडी टाकून त्यांचे विरूद्ध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस पथकाने दिनांक १मार्च २०२४ ते २० मार्च २०२४ पर्यंत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारूविक्रेत्यांवर धडक कारवाई करत दारुबंदी कायद्यान्वये १७ गुन्ह्याची नोंद असुन १८ आरोपी विरुद्ध गुन्हे नोंद आहेत व एकूण १४,३१,०२०/- रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे नजिकच्या काळात अवैध धंदे करणारे इसमांविरुद्ध भरपूर प्रमाणात कार्यवाही होत असल्याने पोलिस स्टेशन आष्टी हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्या इसमांचे धाबे दणाणले आहेत 

 लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असल्याने, पोलिस यंत्रणेकडून रेकॉर्डवरील आरोपींना हद्दपार करणे, फरार आरोपींचा शोध घेणे, अशा मोहिमा राबवण्यात येत आहेत. त्यात आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक भागांमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याने, अशा दारूविक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. यात दिनांक २० मार्चला वसंतपूर जंगल परिसरात छुप्या पद्धतीने अवैध गावठी दारू गाळण्यासाठी गुळा मोहाचा सडवा तयार करून ठेवला असल्याची माहिती आष्टी पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करत एकूण १,२०,०००/- एक लाख विस हजार रुपये किमतीची १२०० लिटर प्लॅस्टिक ड्रममध्ये ठेवलेला गुळ मोहाचा सडवा जप्त करण्यात आला आहे. व एक होंडा शाईन कंपनीची दुचाकी वाहन किंमत अंदाजे ४०,००० रुपये व ०६ प्लॅस्टिक ड्रम असा एकूण १,६३,०००/- मुद्देमाल अवैधरित्या पोलिसांना मिळून आल्याने या कारवाईत तालुक्यातील वसंतपूर येथील इंद्रजित शितल मंडल व पारीतोष प्रफुल्ल मिस्त्री यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन आष्टी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी दिली


PostImage

Gadchiroli Varta News

March 20, 2024

PostImage

हत्या करून मृतदेह झाडाला वटकावला; पोलिसांनी ४८ तासात घटनेचा उलगडा केला


हत्या करून मृतदेह झाडाला वटकावला; पोलिसांनी ४८ तासात घटनेचा उलगडा केला

 

एटापल्ली : उसने घेतलेले ७ हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला. ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले. १९ मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

 

 

माहितीनुसार, संपत लुला दुर्वा (३२) रा.पेठा ता. एटापल्ली असे मयताचे नाव आहे. आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी सर्व रा. पेठा यांचा आरोपींत समावेश आहे. तिघेही ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करायचा. १७ मार्चला तो काही कामानिमित्य पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता, पण सायंकाळी घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला होता. त्यामुळे घातपाताचा अंदाज होता. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे फिरवली. पो.नि. नीळकंठ कुकडे, उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे, शुभम म्हेत्रे, रोहिणी गिरवलकर, हवालदार हिरामण मारटकर, कालेश पुपरेडीवार, पोलिस शिपाई प्रभाकर नाईक, मोहन शिंदे, पोलीस शिपाई, पंडीत मुंडे, श्रीकांत दुर्गे, कविता एलमुले, प्रकाश गडकर, जोगी मडावी, प्रियंका तुलावी यांच्या पथकाने ४८ तासांत गुन्ह्याची उकल केली.


PostImage

Gadchiroli Varta News

March 20, 2024

PostImage

इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : काॅ. अमोल मारकवार


 

इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : काॅ. अमोल मारकवार 

 

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष हा जनहितविरोधी पक्ष आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपाच्या राजवटी जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढ झाली आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी उध्वस्त झाला आहे. भाजपाने निवडणूक रोखे व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा करुन घेतला. त्या बदल्यात उद्योगपतींचे पंधरा लाख रुपये माफ केले. त्यामुळे देश कर्जबाजारी झालेला आहे.

भाजपा हा संविधान विरोधी,लोकशाही विरोधी असल्याने त्यांचा पराभव करने हे कम्युनिस्टांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भाजप विरोधातील इंडिया आघाडीच्या वतीने जो उमेदवार देण्यात येईल, त्या उमेदवाराच्या प्रचारात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताकदीने पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा सांभाळण्यात येणार आहे .

आरमोरी तालुक्यात मार्क्सवादी कमुनिष्ट पक्षातर्फे स्वतः निवडणूक प्रचार कार्यालय उभारुन काम करणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी सांगितले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

पुनर्वापरातून पाण्याची बचत करा –विवेक साळुंखे


पुनर्वापरातून पाण्याची बचत करा –विवेक साळुंखे

जल जागृती सप्ताहाचे उद्घाटन

75 हजार विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा

गडचिरोली दि. 16 : पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असून पुनर्वापरातून पाण्याची बचत करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे यांनी आज केले.

जल जागृती सप्ताहानिमित्त जलसंपदा विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलजागृती अभियाना चा शुभारंभ श्री. विवेक साळुंखे यांच्या हस्ते गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. इंगोले, शिक्षणाधिकारी वासूदेव भुसे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव पाटील, जलसंवर्धन सामाजिक कार्यकर्त प्रकाश अर्जुनवार, मनोहर हेपट, लायड्स मेटलचे संचालक विक्रम मेहता, बँक ऑफ इंडिया मुख्य प्रबंधक मयुर कडबे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मोरघडे यांनी प्रस्ताविकातून जल जागृती सप्ताहाचा उद्देश व जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत रुपरेषा सादर केली. जल जागृती सप्ताहच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्व, पाण्याचे संवर्धन, जल प्रदुषण, पाण्याची गुणवत्ता राखणे या विषयी जागृती निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकरीता जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये जल प्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येत असुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हास्तरावर आज 16 मार्च रोजी सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतल्याचे माहिती त्यांनी दिली. जल जागृती अभियान अंतर्गत जिल्हा, तालुका व गावपातळीवर जलप्रतिज्ञा, चर्चासत्र, वेबिनार, चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा, जलदिंडी, प्रभातफेरी, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची प्रकल्पस्थळी भेटी इत्यादी जल जागृती करण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. मास्तोळी, श्री. इंगोले, श्री. भूसे, श्री. अर्जुनवार, श्री. हेपट, श्री. मेहता यांनी, तसेच उपकार्यकारी अभियंता कु. पानतावणे यांनी जल जागृती विषयी प्रबोधन केले. कनिष्ठ अभियंता श्री. मंदमुले यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन श्री. भांडेकर व आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले.

सर्व उपस्थितांनी उद्घाटन समारंभ प्रसंगी सामुहिक जल प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला जलसंपदा व पाटबंधारे विभागचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले


सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले

 

 

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला, निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला

 

 

जवळपास 40 वेळा सर्वोच्च न्यायालयांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विश्वास व्यक्त केला आहे

 

 

भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. 19 लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना, माननीय न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे व हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- INCP ने अशी भीती व्यक्त केली की, 2016-19 दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या कोठडीतून गहाळ झालेल्या 19 लाख ईव्हीएमचा वापर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 मध्ये फेरफार करण्यासाठी केला गेला असता.

 

 

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 61A बाजूला सारुन बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातील आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देताना मा. न्यायमूर्ती खन्ना यांनी निरीक्षण नोंदविले की ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर 10 हून अधिक प्रकरणे तपासण्यात आली आहेत. मा.न्यायालयाने वेळोवेळी याचिका फेटाळताना ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर नेहमीच विश्वास दर्शविला आहे.

 

 

गेल्या दशकात आणि सुमारे 40 निकालांमध्ये, मा.सर्वोच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोग EVM आणि या संबंधांतील पारदर्शक प्रक्रिया आणि कठोर प्रशासकीय कार्यप्रणालीवर त्यांची श्रध्दा आणि विश्वास कायम ठेवला आहे, त्यामुळे भारतात EVM च्या बाजूने मिळत असलेल्या न्यायाला प्रचंड मूल्य आणि सामर्थ्य मिळाले आहे. 

 

 

मा.सर्वोच्च न्यायालयाचे नवीनतम निर्णय, मा. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या आदेशांच्या मजबूत आणि वाढत्या प्रतिमेमध्ये आणखीच भर घालतात, ज्यांनी विविध ईव्हीएम प्रकरणांची तपासणी केली आहे आणि भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच हेही लक्षात घ्यावे की अलीकडील एका प्रकरणात (मध्य प्रदेश जन विकास पक्ष विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग, विशेष रजा याचिका (सिव्हिल) 16870/ 2022, सप्टेंबर, 2022), माननीय सर्वोच्च न्यायालयाने अर्जदारास 50,000 रुपये एवढा दंड ठोठावला आहे. याचिकाकर्त्याने असे निरीक्षण नोंदवले की, देशात अनेक दशकांपासून ईव्हीएमचा वापर केला जात आहे, परंतु वेळोवेळी उपस्थित केलेले मुद्दे खोडण्यात आले आहेत. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने देखील अशाच एका याचिकेवर (सी. आर. जया सुकीन विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग आणि इतर, रिट याचिका (सिव्हिल) 6635/2021, ऑगस्ट 2021) रु.10,000 चा दंड ठोठावला होता. ज्यामध्ये ईव्हीएमचा वापर थांबवण्यास सांगून आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि त्याऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचे अर्जदाराने नमूद केले होते.

तत्पूर्वी, दिल्लीच्या माननीय उच्च न्यायालयाने, दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी लोकसभा निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटसाठी सुरू असलेली प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) प्रक्रिया संपुष्टात आणण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली होती. 

 

 

एनसीआर न्यायालयाने, आपल्या निकालात, विद्यमान कार्यपद्धतीच्या मजबूती आणि पारदर्शकतेवर जोर दिला आणि याचिकाकर्त्यांचे दावे खोडून काढले.

ईव्हीएम मॅन्युअल, स्टेटस पेपर, ईव्हीएम प्रेझेंटेशन, ईव्हीएमच्या 40 वर्षांच्या प्रवासावरील प्रगतीपुस्तक, ईव्हीएमचा कायदेशीर इतिहास यासारख्या प्रकाशनांच्या स्वरूपात ईव्हीएमशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा उपायांची माहिती सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आणि सतत अद्ययावत केलेले EVM प्रश्नावलीबाबत भारत निवडणूक आयोग नेहमीच आघाडीवर आहे.

000


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

योग्य उमेदवारासाठी काम करणार : शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ठराव 


 

योग्य उमेदवारासाठी काम करणार : शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ठराव 

 

गडचिरोली : प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीसह शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीत सहभागी असून आघाडीने योग्य उमेदवार दिल्यास जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी काम करण्याचा ठराव पक्षाच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला.

 

जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सभागृहात शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. भाई रामदास जराते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघठनेचा आढावा घेण्यात आला. गाव शाखांचा विस्तार, बुथ रचना आणि पक्ष सभासदांसाठी सहकारी संस्थांच्या स्थापनेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. तसेच इंडिया आघाडीच्या वतीने गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढविण्याची शक्यता असल्याने काॅंग्रेस ने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत विषय असला तरी गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपविरोधी खिंड लढविणाऱ्या आणि माडिया- गोंड समाजातील प्रगल्भ नेतृत्व असलेल्या डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने काम करतील असा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला. 

 

यावेळी जिल्हा सरचिटणीस भाई रोहिदास कुमरे, जयश्रीताई जराते, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, क्रीष्णा नैताम, दामोदर रोहनकर, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, निशा आयतुलवार, विजया मेश्राम, चिरंजीव पेंदाम, देवेंद्र भोयर, गणेश हुलके, आत्माराम मुनघाटे, बाळकृष्ण मेश्राम, डंबाजी भोयर, रामदास अलाम, मुर्लीधर गोटा, प्रकाश मडावी, देवानंद साखरे, घनश्याम मडावी, लक्ष्मण शेंडे, हरिदास सिडाम, गायताराम हजारे, आकाश आत्राम, सुरज ठाकरे, रोहिणी ऊईके, कल्पना टिंगूसले, निरुताई उंदिरवाडे, काजल पिपरे, छाया भोयर, वेणू लाटकर, मनिषा हजारे, रिना शेंडे, खुशाली बावणे, सुमन सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष,समूह शाळे विरोधात भर उन्हात पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांचे धरणे आंदोलन....


जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष,समूह शाळे विरोधात भर उन्हात पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांचे धरणे आंदोलन....

 

 

जिल्हा परिषद शाळेत २० पैकी कमी पटसंख्या असलेल्या ६२,००० शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.यात गोंडपीपरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.२० पैकी कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याच्या शासनाचे विचाराधीन आहे.यात तालुक्यातील विठ्ठलवाडा या शाळेचा समावेश आहे.येनबोथला,कोरंबी,चेक विठ्ठलवाडा,तारसा (बुज),नांदगाव,नवेगाव या जिल्हा परिषद शाळांचा समावेश असून समूह शाळेचा निर्णय रद्द करण्यात यावा याकरिता ६ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (दि.१५) रोजी पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर भरउन्हात शाळा वाचविण्यासाठी धरणे आंदोलन केलीत.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका गॉडपिपरी अंतर्गत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला तर दुसरीकडे विठ्ठलवाडा येथे समूह शाळा सुरू करण्यात येत असून 

या सहाही गावचे पालक,शेतकरी, शेतमजूर व कामगार असून या गावातील शाळा बंद झाल्यास इयत्ता १ ते ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेली वर्ष ६ ते १० या वयोगटातील मुले विठ्ठलवाडा येथे ये-जा करू शकत नाही किंवा शेतीवाडीचे कामे सोडून मुलांना दररोज ६ ते ७ किमी.उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूत ने-आण करू शकत नाही.पर्यायाने आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच कोरंबी व चकविठ्ठलवाडा हि दोन गावे विठ्ठलवाडा जिथे की समूह शाळा नियोजित आहे.या गावामधून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.सदर महामार्गावरून सुरजागड लोहप्रकल्पाचे कच्च्या माल वाहतुकीचे अनेक हायवा ट्रक ये-जा करतात.यापूर्वी या महामार्गावर विद्यार्थ्यांचे अनेक अपघात झालेले आहे.तेव्हा आमच्या गावची शाळा बंद करून विठ्ठलवाडा येथे आमची ग्रामीण भागातील मुले पाठविणे पूर्णता गैरसोयीचे आहे.तेव्हा गाव तिथे शाळा या तत्वाला अननुसरुन आमची शाळा बंद करु नये व आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित करू नये.अशा विषयाचे निवेदन गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांना देण्यात आले.शिक्षणाबाबतचे जनहित विरुद्ध धोरण तात्काळ रद्द करावे म्हणून सकाळी ११ वाजता गटविकास अधिकारी,पंचायत समिती गोंडपिपरी यांच्या कार्यालयासमोर पालक व विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले.यावर प्रशासनाने काही दखल न घेतल्यास सर्व पालक व विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.चंद्रपूर यांच्या कार्यालय समोर धरणे आंदोलने करणार असल्याचे पालकांनी सांगितले.यावेळी

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम उराडे ,दिपक ठेंगणे , शारदा मांडवगडे ,अंतकला निकोडे , कालिदास सातार ,शरद मेश्राम, अड.वामनराव चटप,शलिक माऊलीकर, मोरेश्वर सूरकर,सोनी दिवसे,अशोक कुडे, यासह अनेकांची उपस्थिती होती.


PostImage

Gadchiroli Varta News

March 16, 2024

PostImage

देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास  पकडले, 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त


देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास  पकडले, 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त

 गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

 


अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गोंडपिपरी  पोलीस स्टेशन चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळाली.पोलिसांनी गोंडपिपरी शहरातील मुख्य मार्गावर नाकाबंदी केली. दरम्यान शिवाजी चौक गोंडपिपरी येथे एका वाहंनाला अडवून तपासणी केली असता त्या वाहनात  दारू सापडली. अवैध दारू सह 4,52,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपी प्रकाश विजय बोरकर रा. सिद्धार्थ नगर दुर्गापूर यांच्या वर मदाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
        गडचिरोली जिल्हयाची सीमा गोंडपिपरी तालुक्याला लागून आहे. गोंडपिपरी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू पुरविली जाते. चंद्रपूर येथून चारचाकी वाहनाने अवैध दारू येतं असल्याची माहिती ठाणेदाराना मिळाली. लागलीच सापळा रचून वाहन क्र. एम. एच.05 सी. एच.1699 या वाहनांची तपासणी केली असता देशी  दारू आढळली. 
 निळ्या रंगाच्या आठ मोठ्या  प्लॅस्टिक पिशवी  मध्ये रॉकेट संत्रा देशी दारूचे प्रत्येकी ९० एम एल चे ज्यावर आर .व्ही .बिन ४२४ फेब २०२४ असे बॅच नंबर लिहून असलेले एकूण १५०० नग प्रत्येकी किंमत ३५ रुपये प्रमाणे ५२,५०० रुपये व पांढरा रंगाची हुडाई कंपनीची चारचाकी वाहन  किंमत चार लक्ष रुपये असा एकूण ४,५२,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीस ताब्यात घेतले.  आरोपीचे नाव प्रकाश विजय बोरकर असे आहे. आरोपीची  चौकशी केली असता सदर दारू हि शैलेश वानखेडे रा. तुकुम, चंद्रपूर यांची असून त्यांनी लगामबोरी येथे नेण्यास सांगितले अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपी विरुद्ध  कलम ६५ (अ) मदाका अंतर्गत गून्हा नोंद करन्यात आला आहे.
सदरची कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे , पी.एस.आय. मोगरे , वागदरकर, गौरकार, चालक पवार यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 15, 2024

PostImage

.‘त्या’ नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या,जारावंडी येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण


...‘त्या’ नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या,जारावंडी येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण

    

एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी येथील एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला. ही बाब घृणास्पद व मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी नराधम संतोष नागोबा कोंढेकर (50) रा. भेंडाळा यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडितेच्या उपचारात हयगय करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांवरही योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन (नारी शक्ती) यासह विविध आदिवासी सामाजिक संघटनेने आज आयोजित पत्रपरिषदेतून केली आहे.

त्यांनी म्हटले की, आरोपी संतोष कोंढेकर हा जारावंडी येथील आरोग्य केंद्रात कर्मचारी असून तो पीडित बालिकेच्या शेजारी असलेल्या शासकीय वसाहतीस राहत होता. आरोपीने शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहतीते बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडित बालिकेला वेळेवर उपचारही मिळाले नाही. त्यामुळे तिच्या उपचारातही हयगय झाली. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे. तसेच आरोपी संतोष कोंढेकर यास भा.द.वि. कलम 376 व अन्य पोट कलम आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्ष अधिनियम 2012 (पोस्को) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार अपराध नोंद करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच सदर पीडित मुलीच्या पुढील शिक्षण व तिच्या घरच्या एकाला शासकीय नोकरीत घेण्यात यावे, अशीही मागणी संघटनेने यावेळी केली आहे. पत्रपरिषदेला जयश्री येरमे, रेखा तोडासे, भरत येरमे, विद्या दुग्गा, शामला घोडाम, मंजूषा आत्राम, पुष्पलता कुमरे, वासुदेव शेडमाके, सुनील पोरेड्डीवार, सुनील पोरेड्डीवार, कालिदास गेडाम, अरुण शेडमाके, अमोल कुळमेथे आदी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

March 15, 2024

PostImage

चार मुलींनीच वडिलांना खांदा देत केले अंत्यसंस्कार,मुलगा-मुलगी भेद करणार्‍यांना दिली चपराक


चार मुलींनीच वडिलांना खांदा देत केले अंत्यसंस्कार,मुलगा-मुलगी भेद करणार्‍यांना दिली चपराक

   

     

आरमोरी : मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणार्‍यांना एक चपराक देणारी घटना चिखली गावात घडली आहे. मुलगा नसलेल्या वडिलांना चारही मुलींनीच खांदा देत अंत्यसंस्कार केले आहे. अलिकडे मुलगी हे परक्याचे धन समजले जात असल्याने दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र देसाईगंज तालुक्यातील चिखली रीठ येथील बाबुराव मडावी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या चार मुली पुढे सरसावल्या. त्यांनी मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. मुलींनी आपल्या आईचाही सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी घेतली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. आजही जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलानेच खांदा देण्याची भारतात प्रथा आहे. मात्र या प्रथेला छेद देणारी घटना देसाईगंज तालुक्यातील चिखली गावात घडली.

 

 चिखली रीठ येथील रहिवासी बाबुराव आणि केमाबाई याचा सर्वसाधारण परिवार. काबाडकष्ट करणार्‍या बाबुराव यांनी उत्तरा, अनुताई, ललीता, आणि निराशा या चार मुलींना मोठं करून शिक्षण व संगोपण केले. एका एकर जबरान शेती कसुन चारही मुलीचे लग्न केले. मात्र कष्ट झेपत नसल्याने 80 पार केलेल्या आपल्या आई-वडीलांचा सांभाळ या चारही मुली करीत होत्या. गेल्या एक वर्षापासून आजारी वडीलांची अत्यंत गरीब परिस्थिती अशाच परिस्थितीत चार मुलीच्या लग्नाचा कर्जाचा बोजा देतादेता पुणता दिवाळा उडत असताना घराची संपूर्ण जबाबदारी आता या चारही मुलींच्याच खांद्यावर होती. दरम्यान वयाच्या 80 व्या वर्षी बाबूराव यांचे आजारपणामुळे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अखेर मुलींनीच तिरडीला खांदा देऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून लोकांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. या घटनेनेने मुलगा, मुलगी असा भेद करणार्‍यांना मात्र चांगलाच चपराक बसली आहे. याची माहिती होताच श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्यावतीने मृतक बाबुराव मडावी यांच्या कुटूंबीयांना अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष शेषराव कुमरे, सचिव गिरीधर नेवारे, संचालक धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे, दिवाकर राऊत उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 15, 2024

PostImage

घरकुलाच्या यादीत माझ्या जवळच्या लोकांची नावे समाविष्ट करा,नाहीतर तुम्हाला जगणे मुश्किल करेल!


घरकुलाच्या यादीत माझ्या जवळच्या लोकांची नावे समाविष्ट करा,नाहीतर तुम्हाला जगणे मुश्किल करेल!

 

ग्रामपंचायत सदस्यानी दिली धमकी.

 

या प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

 

यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दारव्हा तालुक्यातील तरोडा येथील ग्रामपंचायत मध्ये घडलेला प्रकारामुळे महाराष्ट्रात खडबड उडाली आहे. माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की, दारवा तालुक्यातील तरोडा येथील ग्रामपंचायत मध्ये आपरेटर म्हणून कार्यरत असलेले जया लाभशेटवार यांना तेथील ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या शासनाच्या अनेक योजनेचे कागद शासनाच्या नियमानुसार व सरपंच व ग्रामसेवकांच्या आदेशावरून तयार करावे लागत असतात.असेच मी घरकुलाच्या नावाची यादी तयार करत असताना, तळोदा ग्रामपंचायतचे सदस्य प्रल्हाद बरडे व वर्षा बरर्डे माझ्याकडे घेऊन मला त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांचे नावे समाविष्ट करण्यास सांगितली. ती नावे अवैध असल्यामुळे मी ती नावे या घरकुलाच्या नावांच्या यादित समाविष्ट न केल्याने या ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रल्हाद बरडे व त्यांची पत्नी वर्षा बरडे यांनी मला निश्चितच त्रास देणे सुरू केला. त्यांच्या या त्रासाला न जूमानता मी धाडसीने माझे काम सुरूच ठेवले.परंतू माझा सूड घ्यावा या उदात्त्य हेतूने त्यांनी त्यांच्या जवळील लोकांना सह्या घेऊन 26 जानेवारीला मी महामानवाच्या फोटोला चपला घालून माल्या अर्पण केली असा आरोप करून मला त्रास देणे सुरू केले.आता या त्रासाला कंटाळून मी दारव्हा येथे जाऊन तेथील पोलीस स्टेशनला तक्रार दिली. परंतु दारव्हा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी न केल्यामुळे त्यांचे हैसले बुलंद झाल्यामुळे, येणाऱ्या काळात माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असे जया लाभसेटवार यांनी मागणी केली. सदर घटनेची चौकशी न झाल्यास यापुढे तिव्र भुमिका घेण्याच्या इशारा जया लाभसेटवार यांनी दिला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 13, 2024

PostImage

अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर


अखंडित विद्यूत पूरवठ्याचा मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर

कूरखेडा-

           कृषीपंप तसेच घरगूती विद्यूत वाहीणीवर मागील काही दिवसापासून सूरू करण्यात आलेले भारनियमनामूळे त्रस्त येथील हजारोचा संख्येत उपस्थीत शेतकर्यानी आज गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथे शाशन व विद्यूत कंपनी विरोधात गगणभेदी घोषणाबाजी करीत मोर्चा काढला व कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सूरू केले.

           तालूक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी पद्धतीने विद्यूत विभागाचा वतीने भारनियमन सूरू आहे घोषित भारनियमन कालावधी होऊनही अनेक ठिकाणी वारंवार होणार्या विद्यूत बिघाडामूळे सूद्धा विद्यूत पूरवठा बंद असतो त्यामूळे‌ विद्यूत कृषी पंप बंद पडत रब्बी धान हंगाम धोक्यात आला आहे त्यामूळे संतप्त शेतकर्यानी आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कांग्रेस व शिवसेना (उबाठा) कडून पूकारण्यात आलेल्या मोर्चा व ठिय्या आंदोलनात हजारोचा संख्येत सहभागी होत उपविभागीय कार्यालय समोर आयोजित ठिय्या आंदोलनात विज वितरण कंपनी व शाशनाचा विरोधात तिव्र शब्दात रोष प्रकट केला यावेळी मोर्चेकरूंचे निवेदन स्वीकारण्याकरीता आंदोलन स्थळी आलेले गडचिरोली येथील विद्यूत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मेश्राम याना रोषाचा सामना करावा लागला कूरखेडा येथील उपविभागीय विद्यूत अभियंता मिथून मूरकूटे व कढोली येथील शाखा अभियंता झोडापे यांच्या विरोधात तिव्र रोष होता मात्र ते आंदोलन स्थळी फिरकलेच नाही त्यामूळे अनूचीत प्रसंग टळला यावेळी पूर्ववत येथील विद्यूत पूरवठा अखंडित ठेवण्याचा मागणी करीता मोर्चेकरू अडून बसले होते व‌ विद्यूत विभाग व शाशनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला होता अखेर उपस्थीत कार्यकारी अभियंता यांचाशी भ्रमनध्वनीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यानी मोर्चेकरूंचा समक्षच संपर्क साधला व कार्यकारी अभियंता मेश्राम यानी तालूक्यात भारनियमन संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात येणार नाही तसेच दिवसाफक्त ४ तास कृषी पंपावर भारनियमन करण्यात येईल अशी लिखीत घोषणा केल्यावर शेतकर्यांचे समाधान होत आंदोलन मागे घेण्यात आले मोर्चाचे नेतृत्व विधान परिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे , शिवसेनाप्रमुख सुरेंद्र चंदेल, प्रदेश महासचिव डॉ नामदेव कीरसान माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम,माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर कांग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष आशिष काळे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापती गिरीधर तितराम महिला कांग्रेस ता अध्यक्ष आशाताई तूलावी कांग्रेस अनूसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे माजी सभापती परसराम टिकले शेतकरी नेते शाम मस्के आदि हजर होते


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

लैंगिक अत्याचार प्रकरणी सईओ पोहचल्या जारावंडीला,जाणून घेतल्या समस्या,दोषींवर करणार कारवाही


लैंगिक अत्याचार प्रकरणी सईओ पोहचल्या जारावंडीला,जाणून घेतल्या समस्या,दोषींवर करणार कारवाही

 

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला होता व जारावंडीकरांनी जणआक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

 

या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती.

 

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) याने ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, कूकर्म करताना एका मुलाने पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे मुलीवर तत्काळ उपचार मिळाले नसल्याने तिला सरड गडचिरोलीला आणावे लागले त्यामुळे त्या पीडितेची हेळसांड झाली व तिला वेळीच प्राथमिक उपचार मिळालं नाही हे सर्व कृत्य येथील आरोग्य केंद्राच्या हलगर्जी पणामुळे झालं असल्याने जारावंडी व परिसरातील नागरिकांनी आरोग्य केंद्रांला टाळे ठोकले त्यामुळे आरोग्य विभाग जग उठून बसला दरम्यान ही माहिती कळताच तात्काळ तालुक्याचे आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली परंतु येथील संतप्त नागरिकांनी रात्रोभर तालुका आरोग्य अधिकाऱ्याला त्याच आरोग्य केंद्रात डांबून ठेवले हि माहिती कळताच सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी,व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जारावंडी ला भेट देऊन संतप्त नागरिकांना समजावत येत्या पाच दिवसात सर्व समस्यांचा निराकरण करणार आधी ग्वाही देत टाळे ठोकलेल्या आरोग्य केंद्राला सुरू करण्यात आलं

 

 

 दोषींवर होणार निलंबनाची कारवाही

 

 

जारावंडी गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकतर याने ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे मुलीवर तत्काळ उपचार मिळाले नसल्याने तिला प्राथमिक उपचार मिळाले नाही त्यामुळे येथील सर्वच कर्मचारी याला दोषी आहेत असे म्हणत येथील दोषी कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात येईल असे सईओ यांनी सांगितले

 

 

तिसऱ्या दिवशी पोहचले प्रशासन

 

जारावंडी गावात ९ मार्च रोजी एका नराधामाणे ५ वर्षांच्या मुलीला प्राथमिक आरोग्य पथकाच्या शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. दरम्यान, पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते त्यामुळे संतप्त नागरिकांनी येथील आरोग्य केंद्राला टाळे ठोकले आणि संपूर्ण गावात ताणतणाव निर्माण झाला होता परंतु याची दखल प्रशासणांनी घेतली नव्हती परंतु संतप्त नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला डांबून ठेवल्याने प्रशासनात खळबळ माजली व सलग तिसऱ्या दिवशी प्रशासन गंभीर घेत जारावंडी गाठले यात गंभीर घटना घडून तीन दिवस लोटून सुध्दा प्रशासन गंभीर दखल घेत नाही अशा घटनांबद्दल प्रशासन किती गंभीर आहे असा सवाल करत येथील संतप्त नागरिकांनी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला धारेवर धरले


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटावा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी


 

सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटावा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

 

गडचिरोली : शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वीस रोडचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद हद्दीतील बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

गडचिरोली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या सर्वीस रोडच्या जागेवर राष्ट्रीय महामार्गालगत प्रस्थापितांनी व व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पक्के बांधकाम केलेले आहेत. यामुळे शहरात महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतरही नागरिकांकरीता सर्वीस रोडचे बांधकाम होवू शकलेले. तसेच मोठे व्यापारी व प्रस्थापितांच्या दबावामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

 

शहरातील महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येवून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषद हद्दीतील सर्वीस रोड व इतर आरक्षित जागांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविणे गरजेचे असतांनाही त्याठिकाणी बेकायदेशीरपणे जाहिरात फलक, होर्डींग्ज आणि अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून आरक्षित आणि सर्वीस रोडवरील जागांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डींग्ज व इतर सर्व प्रकारचे अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी


संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी

 

 

गडचिरोली - येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली झाली असून त्याच्या जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची नियुक्ती झाली. ११ मार्च रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले.

 

लोकसभा तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, संजय मीणा हे ऑगस्ट २०२१ मध्ये गडचिरोलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते कायम राहतील, अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती, परंतु ११ मार्चला अचानकच त्यांच्या बदलीचे आदेश धडकले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 19 निर्णय


शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 19 निर्णय

.

 

कॅबिनेट मिटिंग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

 

बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार

 

बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार

 

एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी

 

मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र

 

जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

 

राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद

 

एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने

 

विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना

 

राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प

 

अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड

 

 

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

 

मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार

 

शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक

 

उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ

 

६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता

 

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

 

राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता

 

राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता

 

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियात नावासमोर आईचंही नाव लावण्याचा प्रघात सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली होती. यासंदर्भात सोमवारी राज्य शासनाने निर्णय घेऊन शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं अनिवार्य केलं आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 12, 2024

PostImage

'त्या' नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन


 

'त्या' नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन 

 

पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर

 

 

गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ आज (साेमवार) ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज जारावंडीकरांनी आक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता. 

या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच जारावंडीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठान व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.

आजच्या माेर्चात महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदविला. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करत जारावंडी सह परिसर दणाणून साेडला.

दरम्यान महामहीम राष्ट्रपती,मुख्यमंत्री ,राज्यपाल, महाराष्ट्र शासन गृहमंत्री ,पोलीस महासंचालक ,पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक याना निवेदन देऊन कठोर शिक्षेची मागणी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 11, 2024

PostImage

जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार : शेकापच्या जयश्रीताई जराते यांचा इशारा


 

जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार : शेकापच्या जयश्रीताई जराते यांचा इशारा

 

पुलखल येथील बेकायदेशीर रेती वाहतूक प्रकरण

 

गडचिरोली : पुलखल येथील ग्रामसभेने रेतीघाट संबंधात २०२१ - २२ मध्ये प्रशासनाने केलेल्या रेतीघाट लिलावाला विरोध करुन कंत्राटदाराने उत्खनन करून साठवणूक केलेली रेती जप्त करुन ग्रामसभेला नुकसान भरपाई वसूल करुन द्यावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. असे असतांनाही जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी पाचव्या अनुसूचित क्षेत्रातील कायद्यांना धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने कंत्राटदाराला रेती वाहतूकीची परवानगी देवून ग्रामसभेच्या वैधानिक अधिकारावर घाला घालण्याचे काम केले असून जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा पुलखल येथील ग्रामस्थ आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी दिला आहे.

 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामसभेने कोणताही ठराव केलेला नसतांनाही सन २०२१ - २२ मध्ये प्रशासनाने रेती घाटाचा लिलाव केला होता. १२ मे २०२२ रोजीच्या ग्रामसभेत या लिलाव प्रक्रियेविरोधात ठराव मंजूर करण्यात येवून दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कारवाई करुन कंत्राटदारांकडून दंडासह वसुली करुन रक्कम ग्रामसभेकडे जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर २०२२ - २३ वर्षाच्या लिलाव संबंधाने प्रशासनाने ठराव करण्यासाठी दबाव निर्माण केला असता पुलखल ग्रामसभेच्या वतीने आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. ग्रामसभेचा निर्णय हा अंतिम असल्याचा निवाडा उच्च न्यायालयाने दिला होता. असे असतांनाही जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी पुलखल ग्रामसभेच्या १२ मे २०२२ आणि २३ ऑगस्ट २०२२ च्या ठरावानुसार कंत्राटदाराकडून बेकायदेशीर उत्खननाबद्दल दंड वसुली न करता उलट पदाचा दुरुपयोग वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी कंत्राटदार विवाण ट्रेडर्स यांना रेती वाहतूकीची परवानगी दिली होती असा आरोपही जयश्रीताई जराते यांनी केला आहे.

 

संजय मिणा गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाल्यापासून लोह खाणी, रेती तस्करी तसेच शेतकरी व आदिवासी विरोधी वातावरण निर्माण झाला होता. याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने वेळोवेळी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी, पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून दबाव निर्माण करण्याचे काम केले होते. नव्या लोह खाणींसाठीच्या जनसूनावण्या तसेच भुमी संपादनाची जुलमी पध्दतही राबवली गेली होती. मात्र आता त्यांच्या बदली नंतर पुलखल रेती घाट, अवैध लोहखाणींसाठीच्या जनसुनावण्या, बळजबरी भूमी संपादन आणि अनुसूचित क्षेत्रातील कायद्यांना धाब्यावर बसवून संवैधानीक तरतूदींची वासलात लावल्याबद्दल जिल्हाधिकारी संजय मिणा यांना वैक्तीश : जबाबदार धरून त्यांच्या विरोधात उच्च न्यायालय आणि मा. राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्यात येणार असल्याची माहितीही शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी दिला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 11, 2024

PostImage

लोकसभेची उमेदवारी स्थानिकांनाच द्या,महाविकास आघाडीतील जिल्हा पक्षप्रमुखांची बैठक


लोकसभेची उमेदवारी स्थानिकांनाच द्या,महाविकास आघाडीतील जिल्हा पक्षप्रमुखांची बैठक

 

देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन बांधणी आणि प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांच्या जिल्हा पक्षप्रमुखांनी बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून स्थानिक व्यक्तीलाच तिकीट देण्याबाबत ठराव घेण्यात आला. तसा ठराव केंद्रीय कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि संभाजी ब्रिगेड आदि पक्ष पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असताना महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बाळूभाऊ धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसने विजय मिळवला. मागील काळात त्यांचे दुखद निधन झाले. त्यांनी केलेला संकल्प आणि त्यांचा विकासाचा ध्यास पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या भागामध्ये त्यांच्या प्रति अत्यंत चांगली प्रतिमा आणि उत्साही लाट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला मोठा लाभ होऊ शकतो.  

 

बैठकीला शहर (जिल्हा )काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक जयस्वाल, शिवसेना (उध्द्वव बाळासाहेब ठाकरे गटा)चे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेता सुनील मुसळे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष सोयल शेख, संभाजी बिग्रेडचे शहर अध्यक्ष विनोद थेरे उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 11, 2024

PostImage

जिल्हा हादरला! चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार


जिल्हा हादरला! चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार

 

 

गडचिरोली:-जिल्ह्यातील चारवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद व मन हेलावून टाकणारी घटना जारावंडी येथे घडली आहे ,या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिसांनी दिली. संतोष नागोबा कोंढेकर वय ५० असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.

 

सविस्तर वृत्त असे की आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची,

यात आरोपी शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहत येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला,अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली दरम्यान पीडित बालिकेला गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने नागपूरला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे.आरोपी वयस्क असून त्यास दोन मुलेही आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

March 10, 2024

PostImage

दुर्लक्षित आरमोरीकर स्वच्छता दूतांचा सत्कार,सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांचा पुढाकार


दुर्लक्षित आरमोरीकर स्वच्छता दूतांचा सत्कार,सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांचा पुढाकार

 

सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले

 

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक बांधिलकी जोपासून सतत सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरमोरी क्षेत्रातील दुर्लक्षित महिला स्वच्छता दूतांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन स्थानिक गाढवी नदीच्या तीरावरील शिवमंदिर येथे सहृदय सत्कार केला.

 

सर्व प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांचे हस्ते करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून समाजसेवा क्षेत्रातील अग्रणी महिला भगिणी ज्योती बगमारे,उमा कोंडापे, आशा बोळणे, स्मिता उईके, सीमा मडावी,अल्का पेटकुले,रोशनी झिमटे, लता लोणारे, स्नेहा मडावी,रोहिनी सहारे, स्नेहा बगमारे, लक्ष्मी कोडापे आरती लठ्ठेआदी मान्यवर उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमात जयमाला पिंपळकर, शशीकला सपाटे,जयश्री कांबळे,लता खेडकर, यशोदा रामटेके, निर्मला कांबळे,उषा हेमके, सिंधू नारनवरे,मिरा बेहरे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी आरमोरी शहरातील स्वच्छतेचे काम करून आरमोरीकरांना निरोगी व सुदृढ आरोग्य प्रदान करणारे घटक हे नेहमी दुर्लक्षित असतात.त्यांच्यांकडे सामान्यजण हे फक्त हिणकस नजरेने पाहत असतात.स्वच्छतेचे काम झाले की त्यांच्याकडे कुणीही आस्थेने विचारपूसही करीत नाही.अशा दुर्लक्षित परंतु बहुमूल्य असणाऱ्या एक-एक महिलांची निवड सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 'हिरकणी'ने म्हणजेच विभाताईने केली.आता उरला प्रश्न त्यांच्या मानसन्मानाचा!तर त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वागत समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करून सर्व महिला भगिणींचा यथोचित गौरव केला.त्यावेळी 

उपस्थित सत्कारमूर्ती महिला गदगदल्या.सर्व सत्कारमूर्ती महिलांचे डोळे पाणावले.'आमच्यासारख्या उपेक्षित, दुर्लक्षित स्वच्छता दूतांचा मानपान करून केलेला सन्मान आम्ही जिवंत असेपर्यंत विसरणार नाही.समाजसेवा करणारेही भरपूर आहेत.परंतु वंचित, दुर्लक्षित घटकांकडे आस्थेने पाहणारे डोळे व दातृत्वाचे हात मात्र कमी होत आहेत.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.' सत्काररुपी मानसन्मानाने सा-या महिला गदगदून गेल्या व आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मान्यवर महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

March 9, 2024

PostImage

नेहरू युवा केंद्र, गडचिरोली च्या वतीने नारीशक्ती फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन ; तरुण युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद


नेहरू युवा केंद्र, गडचिरोली च्या वतीने नारीशक्ती फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन ; तरुण युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

गडचिरोली :: 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रा सह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत. परिवारिक जबाबदारी सह इतर जबाबदाऱ्या महिला पार पाडत असताना अश्या परिस्थितीत त्यांचे आरोग्य सुद्धा सुदृढ रहाने अत्यन्त महत्वाचे आहे. त्याकरिता नेहरू युवा केंद्र संघटन गडचिरोली च्या वतीने, जिल्हा युवा अधिकारी अमीत पुंडे यांच्या मार्गदर्शनात, जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून, नारी शक्ती अभियाना अंतर्गत "फिटनेस रन" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 50 पेक्षा अधिक मुलींनी रनिंग स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविले.  प्रथम क्रमांक ख़ुशी एडलावार, द्वितीय गौरी चौधरी, तृतीय पल्लवी कुमरे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना टीशर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्र समन्वयक अनुप कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पूजा नींदेकर, इशिका देठेकर, गुरुकुल अकॅडमि गडचिरोली चे संचालक पुष्कर सेलोकर, अश्विन दुर्गे, अमित सुरजागडे, सुदर्शन जाणकी, प्रज्वल बोधनकर आणि संपूर्ण गुरुकुल अकॅडमि गडचिरोली च्या समूहने मिळून सहकार्य केले.


PostImage

Gadchiroli Varta News

March 9, 2024

PostImage

कुलथा यात्रा महोत्सवाला गेलेला युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू


कुलथा यात्रा महोत्सवाला गेलेला युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

    

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. कुलथा येथे दोन नद्यांचा संगम असून मोठ्या प्रमाणात नदीवर आंघोळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते अशातच आज दि ९ शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. 

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा हनुमान मंदिर येथे सर्व धर्म समभावाचे दर्शन पाहायला मिळते.हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन घेणारे हजारो भक्त शिवरात्री,आषाढी एकादशीनिमित्त कुलथा यात्रा महोत्सवाला येतात हजारो भक्त दर्शनासाठी धार्मिक भावनेतून रांग लावतात.यावेळी हनुमानजीची मूर्ती त्यांचे दुःख दूर करतात हा तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा आत्मविश्वास आहे.

कुलथा हे गाव गोंडपिपरी - मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर आहे.अंधारी व वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेले कुलथा गाव आहे.

महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते. दि.७ गुरुवार पासून यात्रा महोत्सवाला सूरवात झाली असून ही यात्रा १२ तारखेपर्यंत असते तालुक्यातील धानापुर येथील आकाश अशोक शेडमाके वय २३ याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुळुन मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनास्थळी गोंडपिंपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे दाखल होऊन पंचनामा करत प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 9, 2024

PostImage

विसापूर फाट्यावर अवैधरित्या वाहतूक करीत असलेली नगदी २४,७५०००/- रोकड जप्त


विसापूर फाट्यावर अवैधरित्या वाहतूक करीत असलेली नगदी २४,७५०००/- रोकड जप्त

 

बल्लारपूर /- दि. 07/03/2024 रोजी गोपनिय माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली की, बल्लारशाह कडून चंद्रपूरकडे एक इसम दुचाकीवर काळया बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेवून येणार आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोडावार यांनी स.पो.नि. हर्षल एकरे, पो.उपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो. कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे याचे पथक कारवाई करीता नेमून आदेशीत केले.

       सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे बल्लारशाह रोडवरील विसापूर टोलनाक्या समोरील वळणार सापळा रचला असता खबरे प्रमाणे दुचाकीवर एक इसम पाठीवर बैंग लटकवून दुचाकीवर येताना दिसता त्यास थांबवून त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे यय 34 वर्षे व्यवसाय आयुर्वेदीक शॉप रा.112 ईडब्युएस नंदनवन सदभावना नगर प्लॉट नं.112 नागपूर असे सांगीतले. त्यास थांबविण्याचे कारण सांगून आमची पोलीस असल्याची ओळख करून देवून त्यास आमचे ओळखपत्र दाखवून त्याचे जवळील काळया रंगाचे कॉलेज बॅगची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे बॅगमध्ये नोटाचे बंडल दिसून आले. ते पंचासमक्ष बॅगमधुन काढून पाहणी केली असता 22.26,000/-रु. ज्यात 500/-रु.च्या 4652 नोटा, 1,49,000/-रु. ज्यात 200/-रु.च्या 745 नोटा असा एकूण 24,75,000/-रू नगदी रक्कम मिळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नगदी रोकड मिळून आली सदर रोकड त्याने चोरी किंवा अवैध्य मार्गाने प्राप्त केली असा संशय आल्याने कलम 41 (1) (ड) दं.प्र.सं. अन्वये सदर रोकड ताब्यात घेण्यात आली.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि.हर्षल एकरे, पो.उपनि.विनोद मुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे मदतीने केली असुन सदर रोकड बाबतचा तपास पोउपनि विनोद भूरले, स्था.गु.शा. चंद्रपूर हे करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

चपराळात महाशिवरात्री यात्रा ११ मार्च पर्यंत चालणार, तिर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती 


चपराळात महाशिवरात्री यात्रा ११ मार्च पर्यंत चालणार, तिर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती 

 

 

 

आष्टी येथून १२ किमी अंतरावरील वर्धा व वैनगंगा नदीच्या संगमावरील निसर्गाच्या सानिध्यातील श्री हनुमान मंदिर प्रशांतधाम चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार, ८ मार्चपासून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे यात्रा महोत्सव ११ मार्चपर्यंत चालणार असून याठिकाणी भाविकांची गर्दी उसळणार आहे.

 

महाशिवरात्र महोत्सवादरम्यान घटस्थापना, अभिषेक, ब्रह्मलीन परमपूज्य संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या समाधीचे पूजन, स्थानिक भजन मंडळांद्वारे भजन, कीर्तन, भागवत कथा व धार्मिक प्रवचन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांतधाम तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष संजय पंदीलवार यांनी दिली आहे. यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुविधेसाठी आष्टी, चामोर्शी, गोंडपिपरी, अहेरी येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. सोबतच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, दर्शन रांगेसाठी सेवकांची व्यवस्था, यात्रा परिसरात वीजपुरवठा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी नदीवर स्नान करताना, जीवंत विद्युत तारेच्या जवळ फिरताना सतर्कता बाळगावी. तसेच आपत्ती क्षणी पोलीस, विश्वस्त मंडळाला माहिती द्यावी. ११ मार्च रोजी दुपारी वाजता आरती व गोपालकाला तसेच १.३० वाजता मुंबई येथील कल्पना नायर व नायर परिवाराकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण


प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण

 

नवनियुक्त ठाणेदार काळे यांचा पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने करण्यात आला सत्कार 

 

आष्टी/ प्रतिनिधी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टी याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर बाहेर गावाहून येणाऱ्या यात्रेकरूंना आष्टी येथील चौकात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

 

महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे, माजी पोलीस पाटील शंकर पाटील मारशेट्टीवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प.पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी शंकर पाटील मारशेट्टीवार यांनी भगवान शिवशंकर (महादेव)व रयतेचे राजे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कोणत्याही संघटना चालवत असताना कसल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्या अडचणींना जो सामोर जातो तो जीवनामध्ये यश संपादन करतो.या चौकात गेल्या ३ वर्षापासून सुरू आहेत हे पुढे सुरळीत चालू ठेवावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात नवनियुक्त ठाणेदार काळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक व आभार प्रदर्शन प .पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे प्रसार व प्रचार प्रमुख सुरेश औतकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारीऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.



 
 
 
कुरुड गावातील निर्घून हत्येचा पर्दाफाश
(गडचिरोली पोलीसांनी केले आरोपीस जेरबंद)
   
  
  
  
  
  
गडचिरोली : 8 फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने मृतक प्रदिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार, (30) रा. कुरुड (ता. देसाईगंज), यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यानुषंगाने देसाईगंज पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक 04/2024 कलम 174 जाफौ. अन्वये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करुन मय्यत प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार यांना ठार मारणा­ऱ्या अज्ञात आरोपीविरुध्द पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे 28/02/2024 रोजी अप क्र. 065/2024 कलम 302 भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीय आणून आरोपीस अटक करण्याकरीता कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांनी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणाखाली एक तपास पथक नियुक्त केले. त्याप्रमाणे तपास पथकाने कुरुड गावातील लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, साक्षीदारांचे बयाणावरुन व पोलिस उपनिरीक्षक धनगर, पोलिस अंमालदार ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयीत इसम विकास जनार्दन बोरकर (50) रा. कुरुड (ता. देसाईगंज याची गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करुन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यास सदर गुन्ह्रामध्ये 6/03/2024 रोज सायंकाळी 5 वाजता अटक करण्यात आली.
 
अधिक तपासात असे दिसून आले की, मय्यत हा आरोपीची पत्नी व मुलगी यांच्याकडे वाईट नजरेने बघायचा व त्यांना वाईट वाईट कमेंट करायचा तसेच त्यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मय्यत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते. दरम्यान, 8/02/2024 रोजी रात्रो 10 वाजताच्या दरम्यान मय्यताने आरोपीस अश्लील भाषेत वाईट वाईट शिवीगाळ केल्याने आरोपीने मय्यताचे डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची माहिती समोर आली.
 

 
सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांचे बयाणावरुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करुन अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले. आरोपीला देसाईगंज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस 7 ते 11 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर, पोना/राऊत, पोअं/ढोके, पोअं/ कुमोटी, पोअं/ सराटे व पोअं/शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

ओबीसी साखळी उपोषनाची सांगता ; मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच करणार तीव्र आंदोलन


ओबीसी साखळी उपोषनाची सांगता ; मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच करणार तीव्र आंदोलन

 

 

गडचिरोली :: ओबीसी समाजातील विविध मागण्यांना घेऊन ओबीसी समाज संघटनेतील युवक 4 मार्च पासून साखळी उपोषनावर होते. आज दि.8मार्च रोजी, राज्याचे अन्न व औषधं प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम आणि राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांनी दिनांक 8 मार्च रोजी, ओबीसी युवा समाज संघटना च्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषनास भेट दिली, व उपोषणकर्त्या युवकांशी चर्चा केली. यावेळी ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषण समाप्त केले. शासन ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या बाबत मा. मुख्यमंत्री व ओबीसी कल्याण मंत्री यांच्याशी सोमवारी चर्चा करून मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले.

 राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी युवकांना आश्वसत करून त्यांच्या रास्त असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व साखळी उपोषण मागे घेण्याकरिता विनंती केली असता राज्याच्या दोन प्रमुख नेत्याने आश्वासन दिल्या मुळे ओबीसी युवा समाज संघटनेच्या वतीने साखळी उपोषण मागे घेतले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे मोठे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

 उपोषण कर्ते राहुल भांडेकर, अनुप कोहळे, पंकज खोबे, पदंम भुरसे, संतोषी सुत्रपवार, अजय सोमनकर, नयन कुनघाडकर, महेंद्र लटारे सह यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सुरेश भांडेकर, मंगला कारेकर, नम्रता कुत्तरमारे, वंदना चपले, चंद्रकांत शिवणकर, दादाजी चापले, प्रभाकर वासेकर,आकाश आंबोरकर, बादल गडपायले, रोशन कोहळे, प्रफुल आंबोरकर, साहिल धोडरे, सचिन पिपरे, सत्यवान पिपरे, मोरेश्वर चौधरी, अमित सुरजगाडे, नंदकिशोर भांडेकर, आकाश भोवरे, स्नेहल कुनघाडकर, नितेश कुंनघाडकर, निलेश कुंनघाडकर, पवन बरसागडे, पंकज सातपुते, अक्षय कोठारे, प्राणिल सातपुते , अभिषेक कुंनघाडकर, दीप सातपुते, सुरज कुनघाडकर, मनोरंजन गव्हारे, नरेश आभारे, आकाश सातपुते, आकाश सोनटक्के, रोशन सातपुते, सुहास पिपरे, अक्षय भांडेकर, योगीराज सुरजगाडे, योगेश बरसागडे, नवलेश्व वैरागडे, रमेश मेश्राम, मेघराज वसेकर, विजू उरकुडे, मधुकर नैताम, खोजेंद्र सातपुते, आदी बहुसंख्येने ओबीसी युवा वर्ग उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

चपराळा येथील यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू


चपराळा येथील यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

 

आष्टी: चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरता बंदोबस्तासाठी तैनात सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे कर्तव्यावर असताना मृत्यु झाल्याची घटना दिनांक आठ मार्च ला सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.

 

भैय्याजी पत्रू नैताम वय 52 वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरल्ली ता. मुलचेरा असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे.

 

उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले.आठ मार्च ला चार वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी कोपरल्ली येथे पाठविण्यात आले आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

दुर्दैवी घटना :नाल्यात कोसळलेल्या कारने घेतला पेट; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू


दुर्दैवी घटना :नाल्यात कोसळलेल्या कारने घेतला पेट; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू

 

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर प्रवास करीत असताना एक मारूती इग्नेश कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळी आणि तिने अचानकपणे पेट घेतला. या आगीत होरपळून कार चालकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना 8 मार्च रोजी सकाळी अंदाजे 7 च्या सुमारास भद्रावती शहरा जवळील कोंढा नाल्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला.

 

बातमी लिहिस्तोवर सदर घटनेतील मृत चालकाची ओळख पटलेली नव्हती. सदर कार मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरवरून चंद्रपूरकडे येत असताना ती कोंढा नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. कोसळल्यानंतर कारने पेट घेतला. चालकाने कार मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, त्याला बाहेर निघता न आल्यामुळे कारला लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. असे अंदाज वर्तविले जात आहे. घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

खासदार अशोक नेते यांची महाशिवरात्री निमित्ताने चपराळा देवस्थान ला सदिच्छा भेट..


 

खासदार अशोक नेते यांची महाशिवरात्री निमित्ताने चपराळा देवस्थान ला सदिच्छा भेट..

(आष्टी)

दि.०८ मार्च २०२४

आष्टी:- खासदार अशोक नेते यांनी महाशिवरात्री निमित्ताने चपराळा येथे पं.पुज्य संत श्री. कार्तिक स्वामी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन व हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येथे विधीवत पुजा अर्चना करत सदिच्छा भेट दिली.

 

याप्रसंगी चपराळा देवस्थान च्या भाविक भक्तांसाठी खासदार अशोक नेते यांच्या विकास निधीतून २० लक्ष (विस लक्ष रूपये) स्वच्छतागृह मंजूर करण्याचे आश्ववासित केले.

 

 चपराळा देवस्थान मंदिराच्या कमेटीने खासदार अशोक नेते व खा.नेते यांच्या अर्धांगिनी सौ.अर्चना अ.नेते यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मानसन्माने स्वागत केले.

 

यावेळी खा.नेते यांनी चपराळा देवस्थानात येणाऱ्या समस्त जनतेला भाविक भक्तांना महाशिवरात्री यात्रा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

या प्रसंगी सोबत लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, चपराळा देवस्थान समिती चे अध्यक्ष संजय पंदिलवार,अर्चना अ.नेते, पुष्पाताई लाडवे तसेच मोठ्या संख्येने चपराळा मंदिरातील भाविक भक्त बंधू भगिनीं उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 8, 2024

PostImage

4 हजाराची लाच घेताना महिला तलाठी अडकल्या एसीबीच्या जाळ्यात


4 हजाराची लाच घेताना महिला तलाठी अडकल्या एसीबीच्या जाळ्यात

 

चंद्रपूर - महिला तलाठी ला 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी मौजा सिदूर पिपरी येथील शेती पत्नी व मुलांच्या नावे बक्षिस पत्र करून दिले होते, बक्षीस पत्राच्या आधारे शेतीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता मौजा नागाळा येथील तलाठी कार्यालयात जात तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुडूंरवार यांच्याकडे अर्ज केला, काही दिवस झाल्यावर अर्जाचे काय झाले याबाबत फिर्यादी हे तलाठी कार्यालयात गेले, त्यांनी तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी फेरफार व सातबारा तयार करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली.

फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली, 7 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील सापळा रचला, त्यावेळी तलाठी प्रणाली तुडूंरवार यांनी तडजोडीअंती 4 हजाराची लाच मागितली.

तलाठी कार्यालय नागाळा येथे प्रणाली तुडूंरवार यांना 4 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली..तलाठी तुडूंरवार यांना शासनाची सेवा करताना अंदाजे 40 हजार रुपये पगार मिळतो तरी त्यांनी शेतक-याला 4 हजाराची लाच मागितली हे विशेष.

सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, हिवराज नेवारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.


PostImage

Gadchiroli Varta News

March 7, 2024

PostImage

ओबीसी युवकांच्या उपोषणास गडचिरोली जिल्हा काँग्रेस चा जाहीर पाठिंबा


ओबीसी युवकांच्या उपोषणास गडचिरोली जिल्हा काँग्रेस चा जाहीर पाठिंबा.

 

गडचिरोली :: ओबीसींची जातनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचे बांधकाम  जिल्ह्यातील ओबीसींच्या कमी झालेले आरक्षण इत्यादी मागण्याकरिता ओबीसी युवा समाज संघटना गडचिरोली कडून दिनांक ४ मार्च पासून साखळी उपोषण सुरु आहे वरील सर्व मागण्या रास्त असून त्या मंजुरीकरिता शासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. परंतु केंद्र व राज्य सरकार वरील मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने आपल्या जाहीरनाम्यात ओबीसीची जातनिहाय जनगणना, ओबीसीसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय, या प्रमुख मागण्यासह दहा मागण्या समाविष्ट केलेल्या आहेत. 

     या निमित्ताने केंद्र  व राज्य शासनाला विनंती आहे की, ओबीसी युवकांचा पुन्हा अधिक अंत न पाहता त्यांच्या रास्त मागण्या तात्काळ मंजूर कराव्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, ओबीसी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी,  जि. प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे,ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, शंकरराव सालोटकर, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष अपर्णाताई राऊत, पुरुषोत्तम बावणे, आकाश निकोडे  सोनालीताई नागापुरे, योगेंद्र झंजाळ, जितेंद्र मुनघाटे, तेजस मडावी, जितेंद्र मुनघाटे,  सुरेश भांडेकर, चारुदत्त पोहने, कपिल पेंदाम , उत्तम ठाकरे, जावेद खान सह इतर काँग्रेस पदाधिकारी सह राहुल भांडेकर, अनुप कोहळे, पदम भुरसे, प्रफुल आंबोरकर सह मोठ्या संख्येने उपोषणकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 6, 2024

PostImage

महागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती


महागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती

 

गडचिरोली:-मागील बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहेरी तालुक्यातील देवलमरी आणि महागाव-गेर्रा त्यासोबतच गडचिरोली तालुक्यातील पोर्ला उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

 

अहेरी उपविभागात बारमाही वाहणारे नद्या आहेत.मात्र, येथील शेतकऱ्यांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. परिसरातील नागरिकांना या बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करून शेती करता यावं या उदात्त हेतूने मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे गेल्या अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजना आणण्यासाठी प्रयत्नात होते.शिवाय सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी देखील होती.

 

राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यावर धर्मराव बाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली.मागील बरेच वर्षांपासून रखडलेल्या जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला.अखेर मागील महिन्यात सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर नुकतेच झालेल्या बैठकीत महागाव/गेर्रा,देवलमरी आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला या तीन उपसा सिंचन योजनेला मंत्रालय स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे.

 

विशेष म्हणजे देवलमरी आणि महागाव/गेर्रा ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर असून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहेत.या दोन्ही ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्याने या परिसरातील अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होऊन परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

 

बॉक्स--

आपल्या जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांवर उपसा सिंचन योजना आणल्यास त्या पाण्याचा उपयोग येथील शेतीसाठी होईल त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात होतो. जिल्ह्यातील रखडलेल्या उपसा सिंचन योजनेचा वारंवार पाठपुरावा केल्याने यश मिळालं आहे.सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका,रेगुंठा, अहेरी तालुक्यातील देवलमरी,महागाव/गेर्रा आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरातील शेकडो गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. विशेष म्हणजे रोजगार,शिक्षण आणि सिंचन यावर आपला भर असून जिल्ह्यातील रखडलेले पूर्ण काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

-धर्मराव बाबा आत्राम

मंत्री अन्न व औषध प्रशासन म.रा.


PostImage

Gadchiroli Varta News

March 6, 2024

PostImage

ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा जाहीर पाठिंबा


ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा जाहीर पाठिंबा.

 

गडचिरोली :: ओबीसी समाजातील विविध मागण्यांना घेऊन 4 मार्च 2024 पासून, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी युवक साखळी उपोषनावर आहेत. उपोषनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष गडचिरोली जिल्हा च्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार , प्रदेश सचिव ऍड. संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस प्रदीप चुधरी, जिल्हा उपाध्यक्ष नहीम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, उपाध्यक्ष चंद्रकांत शिवणकर, सुजित राऊत,छत्रपती टेंबरे, तुलाराम मायकलवार ,सुधाकर गद्दे, रमेश भुसारकर ,माधव परसोडे, पंकज बारसागडे खुशाल ठाकरे आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.

ओबीसींच्या सर्व मागण्या आमच्या पक्षांच्या मागण्या आहेत आम्ही पक्षाच्या वतीने ओबीसी मागण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास खंबीर आहोत. पक्षाच्या वतीने हा अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी याप्रसंगी सांगितले.

 

*ओबीसी साखळी उपोषनातील या आहेत प्रमुख मागण्या*

 

१) बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आणि देशात जातीनिहाय जणगणना करण्यात यावी.

 

२) मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देवू नये.

 

३) २७ डिसेंबर २०२३ आणि २६ जानेवारी २०२४, रोजी सामाजिक न्याय विभागाने काढलेली सगे सोयऱ्याची अधिसूचना रद्द करण्यात यावी.

 

४) ओबीसी विद्यार्थ्यासाठी मंजूर करण्यात आलेले, वस्तीगृह तात्काळ सुरु करून वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांकरिता विनाविलंब आधार योजना लागू करण्यात यावी.

 

५) ओबीसी विद्यार्थ्यांना फ्रीशिप, परदेशी शिष्यवृत्ती, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळामार्फत शैक्षनिक कर्ज व्याज परतावा योजना इत्यादींचा लाभ मिळन्यासाठी ८ लाखाची उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र असणाऱ्या विदयार्थ्यांना लाभ देण्याचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा.

 

६) गडचिरोली जिल्ह्यात पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीमध्ये आदिवासी उमेदवाराला १००% आरक्षण असल्यामुळे गैरआदिवासी प्रवर्गातील नोकरभरती मधील आरक्षण शून्य टक्के झाले आहे, हा गैरआदिवासीवर खूप मोठा अन्याय असून तो तात्काळ दूर करण्यात यावा.

 

७) पेसा क्षेत्रात ज्या गावातील गैरआदिवासींची लोकसंख्या ५०% च्या वर आहेत,अशी गावे पेसा क्षेत्रातून वगळण्यात यावी.

 

८) ओबीसी, एससी, एसटी,विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी.

 

९) गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे.

 

१०) शेतकऱ्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या.

 

११) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात नव्या 200 बसेस देण्यात याव्या.

 

१२) सुरजागड व कोनसरी प्रकल्पात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे.

 

१३) ओबीसी शेतकर्यांच्या वनहक्क पट्ट्यासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.

 

१४) राज्याच्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजाला देण्यात आलेला निधी अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी.

 

15) सारथी च्या माध्यमातून सुरु असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तत्काळ सुरु करण्यात याव्यात.

 

16) महाज्योतीला दरवर्षी १००० कोटीचे अनुदान देण्यात यावे,तसेच विभागीय व जिल्हा स्तरावर महाज्योतीचे कार्यालये सुरु करण्यात यावे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 4, 2024

PostImage

महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग ; लाखो रुपयांचे नुकसान


 महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

 

शहरासह काही ग्रागीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत 

 

 

अहमदपूर येथील महावितरण उपविभागातील शहरासह ग्रामीण भागास विद्युत पुरवठा करणारा एक पॉवर ट्रान्सफार्मरला दि ३ मार्च रोजी दुपारी ३ : ३० वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागुन जळुन खाक होऊन लाखोचे नुकसान झाल्याची घटना घडली असुन शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे

 

याविषयी सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत महावितरण उपविभाग अहमदपूर शहरातील कार्यालयाच्या परिसरातील अर्ध्या शहराला विद्युत पुरवठा करणारा पॉवर ट्रान्सफार्मरला दि ३ मार्च रोजी दुपारी उन्हाच्या कडाक्यात अंदाजे ३ : ३० वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागुन जळुन खाक होऊन लाखोचे नुकसान झाले असुन अहमदपूर शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागातील गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याची माहीती समजते 

           या संदर्भात संबंधीत विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडे विचारपुस केला असता आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही . एक तर रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते यापैकीच एका अधिकाऱ्याने नगरपालिका अग्नीशमन दलास पाचारण करून बोलावुन घेतल्याने अग्नीशमन दलातील कर्मचारी सोनकांबळे कैलास, लाळे अजित , जाधव प्रकाश, गायकवाड प्रशांत यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली

परंतु सदरील जळुन खाक झालेला पॉवर ट्रान्सफार्मर दुरूस्त होण्यासाठी अयोग्य असल्याने नविन ट्रान्सफार्मर बसवण्यात किती वेळ लागेल याची चिंता शहर वासीयांना भेडसावत आहे .

 विशेष म्हणजे या आगीमुळे ट्रान्सफार्मरमधील ऑईलचे फवारे उडून महावितरण कार्यालयाच्या परिसरातील गवतासही आग लागल्यामुळे थोडा वेळ परिसरात भितीचे वातावरण पसरले होते आग इतकी भिषण होती की शहरात सर्वत्र काळ्या काळ्या धुराचे लोट पसरल्याने शहरातील नागरीकांनी आग बघण्यासाठी महावितरण परिसरात एकच गर्दी केली होती 

   या संदर्भात महावितरणचे उप- कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, पॉवर ट्रान्सफार्मरला आग कश्यामुळे लागली आहे हे तपासणी पथकाने तपासणी केल्यानंतरच स्पष्ट कारण समजेल लवकरच काही भाग वगळता खंडीत केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली 

  

घटनास्थळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव 

शिवसेना ( उबाठा ) जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी भेट देऊन विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या


PostImage

Gadchiroli Varta News

March 4, 2024

PostImage

ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर


ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर

सोनापूर क्रांसिंग जवळ  झाला अपघात 

चामोर्शी :- 

एका ट्रकने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एका ईसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चामोर्शी जवळील सोनापूर फाट्यावर घडली चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला असून,  सुरेश महादेव दुधबावरे, रा - सोनापूर हे आपल्या काही कामा निमित्य MH33 Z 6877 या दुचाकीने चामोर्शीला गेले होते  वापस येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७,BG५५९७ ने बाईकला जब्बर  धडक दिली हा अपघात एवढा भयानक होता की इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला . तर लुकेश रामभाऊ दुधबावरे हे गंभीर जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

March 4, 2024

PostImage

ओबीसी समाजाच्या विविध मागन्यांना घेऊन ओबीसी युवक बेमुदत साखळी उपोषणावर


ओबीसी समाजाच्या विविध मागन्यांना घेऊन ओबीसी युवक बेमुदत साखळी उपोषणावर

 

मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ओबीसी बांधवानी उपोषनात सहभागी होण्याचे तरुणाकडून आवाहन

 

गडचिरोली ::  ओबीसीची जातनिहाय जनगनणा करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील असंख्य युवक दिनांक 4 मार्च 2024 पासून, गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात, बेमुदत साखळी उपोषणावर बसले आहे.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, विदर्भ विभागीय प्रसिद्धी प्रमुख पंकज खोबे, ओबीसी सेवा संघ जिल्हाध्यक्ष पदंम भुरसे, अनुप कोहळे, ओबीसी नेते सुरेश भांडेकर, सुनील चड

गुलवार, संतोषी सुत्रपवार, अजय सोमनकर, आकाश आंबोरकर, बादल गडपायले, रोशन कोहळे, प्रफुल आंबोरकर, साहिल धोडरे, सचिन पिपरे, सत्यवान पिपरे, मोरेश्वर चौधरी, अमित सुरजगाडे, नंदकिशोर भांडेकर, आकाश भोवरे, स्नेहल कुनघाडकर, नितेश कुंनघाडकर, निलेश कुंनघाडकर, पवन बरसागडे, पंकज सातपुते, अक्षय कोठारे, प्राणिल सातपुते , अभिषेक कुंनघाडकर, दीप सातपुते, सुरज कुनघाडकर, मनोरंजन गव्हारे, नरेश आभारे, आकाश सातपुते, आकाश सोनटक्के, रोशन सातपुते, सुहास पिपरे, अक्षय भांडेकर, योगीराज सुरजगाडे, योगेश बरसागडे, नवलेश्व वैरागडे, रमेश मेश्राम, मेघराज वसेकर, विजू उरकुडे, मधुकर नैताम, खोजेंद्र सातपुते, आदी बहुसंख्येने ओबीसी युवा वर्ग उपस्थित होते.

 

*उपोषणातील या आहेत प्रमुख मागण्या*

 

१) बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आणि देशात जातीनिहाय जणगणना करण्यात यावी.

२) मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देवू नये.

३) ओबीसी विद्यार्थ्यासाठी मंजूर करण्यात आलेले, वस्तीगृह तत्काळ सुरु करण्यात यावे, व वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना लागू करण्यात यावी.

४) ओबीसी, SC, ST विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी.

५) गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी चे कमी झालेले आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे.

६) शेतकऱ्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या.

7) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दडनवडनाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात नव्या 200 बसेस देण्यात याव्या.

८) सुरजागड व कोनसरी प्रकल्पात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे.

९) ओबीसी शेतकर्यांच्या वनहक्क पट्यासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.

१०) राज्याच्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजाला देण्यात आलेला निधी अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी.

११) सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.

१२) ओबीसी विद्यार्थ्यांना फ्रीशिप, परदेशी शिष्यवृत्ती, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना इत्यादींचा लाभ मिळण्यासाठी 8 लाखाची उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा.

१३) सारथी च्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तात्काळ सुरू करण्यात याव्यात.

१४) महाज्योतीला दरवर्षी 1000 कोटीचे अनुदान देण्यात यावे. तसेच विभागीय व जिल्हा स्तरावर महाज्योतीचे कार्यालये सुरू करण्यात यावीत.


PostImage

Gadchiroli Varta News

March 4, 2024

PostImage

वडेट्टीवारांच्या उपस्थितीत लिलाधर भर्रेचा काँग्रेस पक्ष प्रवेश!


वडेट्टीवारांच्या उपस्थितीत लिलाधर भर्रेचा काँग्रेस पक्ष प्रवेश!

 

देसाईगंज-

      तालुक्यातील कुरुड येथील रहिवाशी असलेले व गडचिरोली जिल्हा सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख लिलाधर दादाजी भर्रे यांनी राज्याचे विरोधीपक्षनेता आ. विजय वडेट्टीवार हे देसाईगंज येथे आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य चाहत्यांसह वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

     देसाईगंज येथील शासकीय विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रमात पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डाॅ.नामदेव किरसान,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकु बावणे,मिडीया प्रमुख मोहित अत्रे तसेच भर्रे यांचे असंख्य चाहते कार्यकर्ते उपस्थित होते. भर्रे यांच्या पक्षप्रवेशाने तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 3, 2024

PostImage

शुल्लक कारणावरून आरोपीने केली आपल्या पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या....


शुल्लक कारणावरून आरोपीने केली आपल्या पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या....

नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना.

ब्रह्मपुरी:  घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा व दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडवीणारी घटना नागभीड तालुक्यातील मौशी या गावात घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. पत्नी अल्का तलमले(वय 40), मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजस्विनी तलमले (वय 18)असे मृतांची नावे आहेत.यामध्ये मुलगा अनिकेत बचावला आहे.  संशयित आरोपी पती अंबादास लक्ष्मण तलमले (वय 50)याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.
.            नागभीड पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मौशी येथे अंबादास  तलमले कुटुंबासह राहत होते. पत्नी अल्का, मोठी मुलगी प्रणाली, लहान मुलगी तेजस्विनी व मुलगा अनिकेत असे त्याचे कुटुंब होते. अंबादास व त्याची पत्नी अल्का शेतमजुरीचे काम करीत होते. रविवार ३ फेब्रुवारीला  पहाटेच्या सुमारास मुलगा अनिकेत गावातीलच एका हॉटेलात कामाकरिता गेला.यावेळी पत्नी व मुली झोपेत होत्या. मुलगा कामाकरिता बाहेर गेल्याची संधी साधून आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास अंबादासने एका पाठोपाठ एक पत्नी अल्का मुलगी प्रणाली व तेजस्विनी या तिघींवर सपासप कुऱ्हाडीने वार करून जीवाणीशी ठार मारले.
.       सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. संशयित आरोपी अंबादास तलमले याला पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करीत आहेत. हत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे

आरोपी दोन -तीन महिन्यांपासून सोबत कुऱ्हाड घेऊन झोपत होता. गावात दारू पिऊन धिंगाणा घालीत होता. तसेच गावातील शेजारच्या एका व्यक्तीचे घरातील टीव्ही व आलमारीची तोडफोड सुद्धा केली असल्याचे गावाकऱ्यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी मृतक एकाच खोलीत झोपलेल्या होत्या. तर आरोपी शेजारच्या खोलीत झोपला होता, घटनेनंतर आरोपीने दाराची कडी आतून लावून पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपला सकाळी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या भावास बाहेर कुणी न दिल्याने त्यांनी लोकांना बोलविले यावेळी खिडकीतून डोकावून पाहिले असता आरोपीची पत्नी व दोन्हीमुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या विशेष म्हणजे तेजस्विनीची बारावीची परीक्षा असल्याने तिच्या खाटेखाली अभ्यासक्रमाचे पुस्तके आढळून आली.


PostImage

Gadchiroli Varta News

March 2, 2024

PostImage

जिद्द आणि चिकाटीने संघर्ष करा, यश नक्की मिळेल..... महेंद्र ब्राह्मणवाडे


जिद्द आणि चिकाटीने संघर्ष करा, यश नक्की मिळेल..... महेंद्र ब्राह्मणवाडे

 

खरपुंडी येते कबड्डी स्पर्धेचा समरोप ; जपतलाई संघ विजेता

 

गडचिरोली :: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी ठेवून सातत्याने संघर्ष करा असा मुलमंत्र गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवकांना दिले.

गडचिरोली तालुक्यातील मौजा खरपुंडी येते कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले सद्याचा काळ हा संघर्षाचा आहे. सहज आणि आयते कोणालाच मिळत नाही, क्षेत्र कोणतेही असले तरी स्पर्धेत टिकायचे असल्यास सातत्याने प्रयत्न करावेच लागेल. आयुष्यात यश अपयश मिळत असते मात्र अपयशाला खचून न जाता, परत जिद्दीने पुढील कार्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

 खरपुंडी विरुद्ध जपतलाई संघात झालेल्या अंतिम सामन्यात जपतलाई संघ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. विजेत्या संघाला रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी,  जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, ढिवरू मेश्राम, सुधीर बांबोळे, जेष्ठ नाटककार राज ठाकरे, कमलेश खोब्रागडे सह मोठ्या संख्येने मान्यवर, सहभागी खेळाडू आणि गावातील क्रीडाप्रेमी युवक, महिला, पुरुष उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

March 1, 2024

PostImage

मुलचेरा - घोट मार्गावर भर जंगलात धावत्या एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी सुखरूप 


मुलचेरा - घोट मार्गावर भर जंगलात धावत्या एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी सुखरूप 

 

 

आष्टी प्रतिनिधी/

गडचिरोली जिल्हयात अगोदरच एसटी महामंडळाच्या भंगार बस सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आणखी एक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास घोट जवळील निकतवाडा गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाश्यांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली.त्यानंतर वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले आहे.

 

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची एसटी बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्रो मुक्कामाणे असते ती बस दररोज पहाटे ६ वाजता मुलचेरा वरून घोट-चामोर्शी भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जाते.शुक्रवार (१ मार्च) रोजी एम एच- ०७ सी-९३१६ क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे पहाटे ६ वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती.घोट पासून 3 किलोमीटर जंगलात अचानक बसने पेट घेतल्याने या बस मध्ये असलेले प्रवासी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तातळीने बसमधून खाली उतरले. जवळपास ८ प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती समोर येत असून सर्वजण सुखरूप आहेत.

 

एसटी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटरीऱ्यामध्ये शार्ट सर्कीटने आग लागत असल्याने प्रसंगावधान साधून चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाश्यांना खाली उतावरले आणि स्वतःही आपला सामानसुमान घेऊन खाली उतरले.त्यानंतर लगेच बसने पेट घेतला.या बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे झाले.तर चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

 

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसवर दारमदार असल्याने बस मध्ये तांत्रिक बिघाड होणे,भर रस्त्यावर बस बंद पडणे,आग लागणे अश्या घटना हे नित्याचेच झाले आहे.शुक्रवारी सकाळच्या सुमारास तर बसने पेट घेतल्याने प्रवासी चांगलेच भयभीत होऊन धाव घेतली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापक राखडे यांना विचारले असता बसमध्ये असलेल्या बॅटऱ्या जळाले असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

March 1, 2024

PostImage

सेवानिवृत्त तहसीलदार के. डी. मेश्राम यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश


सेवानिवृत्त तहसीलदार के. डी. मेश्राम यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

 

गडचिरोली :: आयुष्याची बरीच वर्ष प्रशासकीय सेवेत, तहसीलदार म्हुणुन सेवा दिल्या नंत्तर सेवानिवृत्त्तीपर के. डी. मेश्राम यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केले.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार प्रशासकीय यंत्रनाना घेऊन, दडपशाहिचे राजकारण करीत आहे, हे लोकशाही विरुद्ध कृत्य असून लोकशाही संपुष्ठात आणण्याचा भाजपाचा डाव असल्याने, लोकशाही मूल्यांच्या रक्षणाकरिता  काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे के. डी. मेश्राम यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. पेंटारामजी तलांडी,  प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, काँग्रेस जेष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार, जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, सगुणताई तलांडी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंतू मडावी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, बंगाली सेल अध्यक्ष बिजन सरदार, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष रमेश कोडापे, मिलिंद खोब्रागडे, सह इतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 29, 2024

PostImage

सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करनाऱ्या भाजप ला घरचा आहेर दाखवा----डॉ. नामदेव किरसान


टेकडामोटला ता. सिरोंचा येथील असंख्य युवक -युवती आणि नागरिकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

 

सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करनाऱ्या भाजप ला घरचा आहेर दाखवा----डॉ. नामदेव किरसान

 

गडचिरोली :: टेकडामोटला ता. सिरोंचा येथे काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. वाढती महागाई - बेरीजगारी,भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण या सारख्या असंख्य भाजपच्या हुकूमशाही धोरणाला कंटाळुन, काँग्रेस पक्ष श्रेष्ठीवर विश्वास ठेवून आगामी काळात जिल्ह्यात, राज्यात आणि देशात काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्याकरिता टेकडामोटला (असरअल्ली ) येथील असंख्य युवक - युवती आणि नागरिकांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार पेंटारामा तलांडी, काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्व्यक तथा माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, माजी समाज कल्याण सभापती सौ. सगुनाताई तलांडी, बनय्या जंगम, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमन्त मडावी, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, महिला काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिंरोचा सतीश जवाजी, उपसरपंच रामचंद्र गोगल, राजेश पडला गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी, महिला युवकांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवून घरचा आहेर दाखवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणातून केले.

 राज पागे, धनंजय पागे, सुमन गोगुला, समय्या मोरला, नागेश गोगुला, चालपत जाडी, आनंदराव गोगुला, व्यंकटेश गोगुला, सडवली आईला, श्रीधर अंगाला, बापू जाडी, मनोहर गोगुला, नागेश अंबाला, समय्या गोगुला, अंबाला बनाय्या सह असंख्य नागरिकांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 29, 2024

PostImage

जिल्हयात 84 हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट, 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम


जिल्हयात 84 हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट,

3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

गडचिरोली, दि. 29 : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील 84 हजार 181 बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी एक लाख पोलिओ डोस उपलब्ध करून घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे यांनी आज दिली. 

भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची फेरी दिनांक 3 मार्च 2024 रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलिओ लस पाजण्यात येणार आहे व 100 टक्के बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात 2145 तर शहरी भागात 49 अशी एकूण 2194 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठीकाणी प्रवासात असलेल्या किंवा स्थलांतरीत होत बालकांकरिता ग्रामीण भागात 111 व शहरी भागात 20 अशा एकूण 131 ट्रान्झिट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच अस्थायी निवास असलेल्या, विटभट्टी, लहान पाडे आदि ठिकाणीसुध्दा लसीकरणासाठी 184 मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे. 

*पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही पात्र बालक वंचित राहता कामा नये. स्थलांतरीत तसेच रस्त्यांवरील बालकांच्या लसिकरणाकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या आहेत. तर योग्य समन्वयातून लसीकरण मोहिमे 100 टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केले*


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 29, 2024

PostImage

निवडणूकीची कामे जबाबदारीपूर्वक पूर्ण करा – जिल्हाधिकारी


निवडणूकीची कामे जबाबदारीपूर्वक पूर्ण करा – जिल्हाधिकारी

निवडणूक यंत्रणेचा आढावा

गडचिरोली, दि.29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेमून दिलेली कामे नियमांचे पालन करून जबाबदारीपूर्वक व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी आज दिले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी व सहाय्यक यांना नेमून दिलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने श्री संजय मीणा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा सूचना अधिकारी एस.आर. टेंभुर्णे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, तहसिलदार प्रीती डुडुलकर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणूकीचे कामकाज टप्पेनिहाय पार पाडण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेची माहिती देण्यात आली. कामकाज करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कामे नेमून दिलेल्या विषय समितीने कोणकोणती कामे करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  

निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी मीणा यांनी विविध शाखानिहाय समन्वयक व सहाय्यक अधिकारी कर्मचारी नेमले आहेत. यात पत्रव्यवहार, नामनिर्देशन, आय.टी.सेल, वाहतूक व्यवस्था, मतपत्रिका, निवडणूक साहित्य, आदर्श आचार संहिता, मतदार यादी, प्रसिद्धी, इ.व्ही.एम. सुरक्षा कक्ष, निवडणूक खर्च, मतदार मदत केंद्र, मनुष्यबळ व्यवस्थापन आदि 27 शाखांचा समावेश आहे. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 29, 2024

PostImage

राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे बॅरिकेड्स त्वरीत हटवा, सरपंच निलकंठ निखाडे यांची मागणी


राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे बॅरिकेड्स त्वरीत हटवा, सरपंच निलकंठ निखाडे यांची मागणी

बॅरिकेड्सला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

आष्टी - चामोर्शी या 353C या मार्गावरील येनापुर येथे बॅरिकेड्स ला दुचाकीची जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली

प्रवीण आत्राम वय 30 वर्ष रा. राजगोपालपूर ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

प्रवीण हा आपल्या दुचाकीने आष्टी कडून राजगोपालपूर कडे जात असताना येनापुर मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स ला दुचाकींची समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटमुळे डोळे दिपल्याने जबर धडक दिली यात प्रवीण गंभीर जखमी झाला. त्याला येणापूर येथील रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड्स लावण्याची कोणताही परवानगी नसतानाही आष्टी चामोर्शी महामार्गावर विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले हे बॅरिकेड्स जीवघेणे ठरत असताना ते कुणाच्या वरदहस्ताने लावण्यात आले, राष्ट्रीय महामार्गावरील या बॅरिकेड्स मुळे अपघातास आमंत्रण मिळत असुन नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गांवरील हे बॅरीकेड्स त्वरित हटविण्यात यावे व कुणाच्या परवानगीने हे बॅरिकेड्स लावण्यात आले याची चौकशी करण्यात यावी व यामुळे अपघात झालेल्या दुचाकीस्वारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सोमनपल्लीचे सरपंच व सरपंच ग्राम संवाद संघाचे तालुका अध्यक्ष नीलकंठ निखाडे यांनी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 26, 2024

PostImage

आजाराने ग्रस्त असलेल्या शालेय विद्यार्थ्यिनीना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दिला मदतीचा हात 


आजाराने ग्रस्त असलेल्या शालेय विद्यार्थ्यिनीना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दिला मदतीचा हात 

 

 

आष्टी प्रतिनिधी :‌ मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील शालेय विद्यार्थ्यिनीं जयंती दास ही गंभीर आजाराने ग्रासले असल्याने सदर माहिती सुंदरनगर येथील भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकारीऱ्यांनी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता दिपक आत्राम यांना दिली लगेच जयंती दास यांच्या कुटुंबीयांना घरी बोलावून तब्बेतीची विचारपूस करून मुलीचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आर्थिक मदत करून रुग्णालयात जाण्यास मदत केल्याने मोठा आधार मिळाला आहे.

दास कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हलाखीचे जीवन जगत असताना त्यांच्या मुलीला गंभीर आजाराने ग्रासल्याने जेमतेम परिस्थिती असतानाही मुलीच्या आजारासाठी खाजगी रुग्णालयात वाटेल ते खर्च करून आजार दूर होईल यासाठी प्रयत्न केले. मात्र आजार दूर न झाल्याने आणि आपल्या परिवाराचा प्रपंच चालवण्यासाठी आजारामुळे आर्थिक चणचणीत आलेल्या कुटुंबाला जणू देवदूतच मिळाले. मुलीच्या प्रकृतीसाठी कोणी मदतीचा हात समोर करत नसताना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी संकट समयी मदतीचा हात समोर करून मुलीला गंभीर आजारातून दूर करण्यासाठी आर्थिक मदत करून रुग्णालयास तात्काळ घेऊन जाण्यास सांगितले.

त्यामुळे परिवाराला कठीण समयी देवदूतच उतरले असून आम्हाला मोठ्या संकटातून काढण्यासाठी मदत झाल्याने दास परिवाराकडून दिपक दादा आत्राम यांचे कौतुक केले. यावेळी बिनोता दास,रामेन सरकार, आविसं पदाधिकारी दिनेश बहादुर,वेलगुरचे सरपंच उमेश मोहूर्ले,जुलेख शेख, प्रवीण रेषे, विनोद कावेरी, सुधाकर कोरेत,संदीप बडगे उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 23, 2024

PostImage

ज्या परिक्षा केंद्रावर काॅपी आढळून येईल त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र रोष व्यक्त करेल निवेदनातून दिला इशारा


ज्या परिक्षा केंद्रावर काॅपी आढळून येईल त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र रोष व्यक्त करेल निवेदनातून दिला इशारा 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे जगातील सगळ्यात मोठे विद्यार्थी संघटन आहे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी व शैक्षणिक भ्रष्टाचार रोखण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उपक्रम अभियान राबवीत असते, त्याच अनुषंगाने  बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, बोर्डाच्या परीक्षेवेळी अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी सारखे प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढतो. याला थांबवण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे राबवित आहे. यामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळून येईल त्या ठिकाणी अभाविप तीव्र रोष व्यक्त करेल, सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्याकरिता आपण आपल्या स्तरावरून विशेष प्रयत्न करावे, व ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकार आढळून येईल अशा परीक्षा केंद्राला शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ वेळीच योग्य ती कारवाई करावी व यामध्ये पूर्णतः पारदर्शकता असावी अशी मागणी करत..अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अहेरी जिल्हा द्वारा कॉपी मुक्त परीक्षा केंद्र याकरिता अहेरी नायब तहसीलदार .कल्पना स्वपम , गटविकास अधिकारी मा. श्री.कांबळे सर,अहेरी सहाय्यक पोलीस निरीक्षक  बालाजी सोनुने  तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी.सुहास वसावे सर..यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आलापल्ली नगर मंत्री व प्रांत कार्यकारिणी सदस्य रोहित व्ही. मुक्कावार,अहेरी नगरसह मंत्री आयुष मामिडवार,अहेरी नगर कार्यकर्ता संजय तिम्मा, करण मारशेट्टीवार,अजित पोदादी उपस्थिती होती..

 


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 23, 2024

PostImage

आष्टी पोलिसांची धडक कारवाई  देशी दारूची अवैध वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले ; २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !


आष्टी पोलिसांची धडक कारवाई

 

 देशी दारूची अवैध वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले ; २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !

 

चामोर्शी : गडचीरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणत देशी - विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून येत आहे. 

  दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गोंडपिपरी हून आष्टी मार्ग गडचीरोली जिल्ह्यात देशी दारूची वाहतूक करणारे वाहन आष्टी पोलिसांनी पकडले त्यामुळे अवैध देशी दारूची तस्करी करणारे मोठे रॅकेट असल्याची दाट शक्यता आहे.

 

 गोंडपिपरी -आष्टी मार्गावर एका चारचाकी वाहनाने अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांना मिळाली असता पोलीस सहकाऱ्यांना घेवून आष्टी आलापल्ली मार्गावर चौडामपल्ली रस्त्यावर पोलिस तैनात केले. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असताना एम एच ३४ ए ए ५३६८ क्रमांकाची चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसताच अडवून तपासणी केली असतासदर वाहनात खाकी खरड्याच्या बॉक्स मध्ये २ पेट्या देशी दारूच्या सापडल्या ज्यावर रॉकेट देशी संत्रा प्रवरानगर डीस्टीलरी असे लाल रंगाने लिहलेले होते. खोक्यात ९० मिली मापाचे १०० टिल्लू दिसून आले. दोन खोक्यात मिळून एकूण २०० निपा सापडले. प्रति निप ज्याची अवैध किंमत ८० रुपये दराने १६००० रुपये व पांढऱ्या रंगाच्या चार चुंगडी मध्ये देशी दारूच्या २०० नीपा सापडल्या असे एकूण ८०० निपा प्रति नीपची अवैध किंमत ८० रू प्रमाणे ६४,००० रुपये असा एकूण ८० हजार रुपये व चारचाकी वाहनांची किंमत २ लाख रुपये असा एकूण २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त करत आरोपी सागर विलासराव चर्लावार वय ४२ वर्ष रा. गोंडपीपरी जी.चंद्रपूर यावर कलम( ६५ अ )महाराष्ट्र दारू कायदा नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक चिंता सर, उपविभागीय पोलिस अधिकारी कोकोटे, 

यतिश देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे,राजू येंनगंटीवार,अतुल तोडासे ,राजूरकर,संतोष नागुलवार यांनी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 23, 2024

PostImage

 पोलीस दलाकडुन 13 गुन्हयातील एकुण 407 किलो जप्त अंमली पदार्थ (गांजा) नाश


 

 पोलीस दलाकडुन 13 गुन्हयातील एकुण 407 किलो जप्त अंमली पदार्थ (गांजा) नाश

 

  गडचिरोली :  दिनांक 22.02.2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणा­या विविध पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या विविध 13 गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ (गांजा) मुद्देमाल शासनाने निर्गमीत केलेल्या कारवाई प्रमाणे नाश केला.

 सदर कारवाई दरम्यान पोस्टे गडचिरोली येथील 4 गुन्हे, पोस्टे असरअल्ली येथील 2 गुन्हे, पोस्टे अहेरी येथील 3 गुन्हे, पोस्टे चामोर्शी, धानोरा, मुलचेरा, उपपोस्टे रेपनपल्ली येथील प्रत्येकी 1 गुन्हे असे एकुण 13 गुन्ह्रातील एकुण 407.095 कि.ग्रॅ. अंमली पदार्थ (गांजा) नाश करण्यात आला. 

अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., सदस्य अपर पोलीस अधीक्षक (अभियान). श्री. यतिश देशमुख सा., प्र. पोलीस उप अधीक्षक (मुख्या.) गडचिरोली श्री. विश्वास जाधव, तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली. श्री. उल्हास पी. भुसारी, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर येथील सहा. रासायनिक विश्लेषक, श्री. विलास शिवाजी ठानगे, वजन मापे विभागाचे प्रतिनिधी निरीक्षक श्री. प्रकाश ऊके, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच श्री. लाचुलु मडावी, श्री. अक्षय राऊत यांचे उपस्थितीत गडचिरोली घटकातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण 13 गुन्ह्रातील अंमली पदार्थ (गांजा) नाश करण्यात आला. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मा. श्री. यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी, मपोउपनि सरीता मरकाम, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार नरेश सहारे, दिपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, शुक्राचारी गवई, राकेश सोनटक्के, हेमंम गेडाम, सुनिल पुठ्ठावार, माणिक दुधबळे, उमेश जगदाळे, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनीे पार पाडली. 

-


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 23, 2024

PostImage

आई दोन महिन्याच्या तान्हुल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर तयार केला पाळणा


 

आई दोन महिन्याच्या तान्हुल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर तयार केला पाळणा

 

गोंडपिपरी, ता. २१ : बारावीचा पहिला पेपर नवरा कामावर गेला अन् सोबतीला दोन महिन्याचे चिमुकल बाळ. घरी सांभाळ करणारे कुणीच नाही. दुसरीकडे पेपर सोडविणेही महत्वाचे होते. अशात ती आई दोन महिन्याच्या तान्हुल्याला घेत परीक्षा केंद्रावर पोहचली. केंद्राबाहेर एका झाडाखाली झुला तयार केला. त्यात तान्हुल्याला झोपवित ती परीक्षा देण्यासाठी सज्ज झाली. एका आईचे ममत्व, शिक्षणाप्रती गोडी बघून सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलिसाने आपले कर्तव्य जोपासत त्या तान्हुल्याचा तीन तास सांभाळ केला अन् आपल्या संवेदनशीलतेचाही परिचय दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील जनता विद्यालयात हा प्रकार बघून उपस्थितांनाही भारावून गेले.

 

भाग्यश्री रोहित सोनुने या कोठारी येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन महिन्याचे बाळ आहे. पती रोजीरोटी करून आपल्या संसाराचे रहाटगाडगे कसबसे चालवितात. भाग्यश्रीला शिक्षण घेण्याची इच्छा होती. तिने बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पतीनेही तिला साथ देत प्रोत्साहन दिले. आजपासून बारावीची परिक्षा सुरू झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. पती नेहमीप्रमाणे कामावर गेले. आता परीक्षा तर द्यायची पण घरी बाळाचा सांभाळ करण्यासाठी कुणीच नाही. अशास्थितीत काय करायचे, असा प्रश्न तिच्यासमोर पडला.

अशात दोन महिन्याच्या बाळाला घेत ती परीक्षा केंद्रावर पोहचली. केंद्रालगत असलेल्या एका झाडाला तिने पाळणा बांधला, बाळाला या पाळण्यात झोपवित ती पेपरला गेली. पेपर सोडविताना अधुनमधून ती बाळाला बघायला बाहेर यायची. याचवेळी परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका महिला पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आला. तिने भाग्यश्रीला तू पेपर सोडव मी त्याच्याकडे लक्ष देते असे सांगितले. त्यानंतर संपूर्ण पेपर होईपर्यंत त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने बाळाकडे विशेष लक्ष दिले. एकदाचे पेपर संपला अन् भाग्यश्रीच्या जिवात जिव आला. हा प्रंसग बघताना उपस्थित भारावून गेले. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यांचा हा संदेश कोट्यवधी भारतीयांसाठी नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 22, 2024

PostImage

युवकांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे युवकांना आवाहन


युवकांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे युवकांना आवाहन

 

हिरापूर येते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न

 

गडचिरोली :: गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येते, युवा क्रीडा कबड्डी मंडळाच्या वतीने भव्य डे - नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते पार पडले.

वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करू असे खोटे आश्वासन देऊन 10 वर्षा आधी भाजपा सरकार सत्तेत आली, मात्र तेव्हा पासून रोजगार निर्मिती तर सोडा पण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे, बेरोजगारीचा दर उच्चाॅंक गाठत असताना, जे काही थोड्या फार परिक्षा झाल्या त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार केल्या जात आहे, मागच्या रस्त्याने काहीना प्रवेश दिला जात आहे, ही सर्वसामान्य बहुजन तरुणांची दिशाभूल असून येणाऱ्या निवडणुकीत तरुणांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला युवकांनी धडा शिकवीला पाहिजे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपल्या उदघाट्नीय भाषणातून केले. पुढे बोलतांना ते म्हणाले भाजप ची नीती म्हणजे खोटे बोला - पण रेटून बोला अशी असून, केंद्रातील नेत्यांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी देखील साफ खोटे बोलतात, ग्रामपंचायत निवडूनुक बिनविरोध केल्यास गावाला बक्षीस देऊ असे स्थानिक आमदार बोलले मात्र, हिरापूर ग्रामपंचायतला 3-4 वर्षाचा कालावधी झालेला असताना देखील अद्याप कुठल्याही प्रकारचा बक्षीस किंवा निधी आमदारांनी दिलेल नाही, त्यामुळे अश्या खोटारड्या लोकप्रतिनिधी ला येणाऱ्या काळात हिरापूरवाशी नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाला युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, जिल्हाउपाध्यक्ष नेताजी गावतुरे,सरपंच शालिनीताई कुमरे, ढिवरू मेश्राम, जावेद खान, मुख्याध्यापक प्रद्या साखरे, सह मोठ्या संख्येने गावकरी, जेष्ठ नागरिक, युवा खेळाडू आणि मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 21, 2024

PostImage

अनखोडा येथील एका तरुणाने 'मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ' इव्हीएम हटाओ असे बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ


अनखोडा येथील एका तरुणाने 'मोदी सरकार को हटाओ भारत सरकार को बचाओ' इव्हीएम हटाओ असे बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ 

 

 

आष्टी प्रतिनिधी : केंद्राची कुठलीही योजना ही करदात्याच्या पैशाने राबविली जाते. त्यामुळे ती भारत सरकारची हमी अशी असायला हवी. मात्र असे न होता ती 'मोदी सरकारची हमी' अशा नावाने भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी असे प्रश्न बऱ्याच तरुणांना पडले आहेत त्याच अनुषंगाने चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावातील संतोष तिमाडे या युवकाने गावातील आपल्या एका छोट्याशा दुकानासमोर मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ व इव्हिएम हटाव देश बचाओ अशाप्रकारे बॅनर लावण्यात आले असल्याने आष्टी परिसरात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सदर बॅनर हे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या गावात हे बॅनर लावण्यात आले आहे भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. असे काही पोस्टर्स भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर या बॅनर्सवर भारत सरकार व्दारा राबविलेल्या जाणाऱ्या योजनांविषयी अतिशय नगण्य माहिती आहे. सोबतच शासकीय योजना ह्या मोदी सरकारची हमी असा उल्लेख त्यावर केला केलेला आहे.या योजना कोणासाठी? याचे निकष काय? लाभासाठी कोणाला संपर्क साधायचा? अशी कोणतीही कामाची माहिती या बॅनर्समध्ये नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही.

भारत लोकशाही राष्ट्र असून देशाचा कारभार हा पंतप्रधान मार्फत चालविल्या जातो. मात्र, शासनाच्या जाहीरातीत व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख कधीच केल्याचे पाहण्यात आले नाही परंतु शासनाच्या योजना या भारत सरकारच्या योजना असतांना मोदी सरकारच्या योजना असा उल्लेख करणे उचित नाही. त्‍यामुळे मोदी सरकारची हमी असा उल्लेख असलेले बॅनर्स लावून भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर लावून गावोगावी मोदी सरकारची हमी अशे या बॅनर मधून दाखविले जात आहे मग मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी हे कळायला मार्ग नसल्याने मोदी सरकार होऊ नये म्हणून मी भारत सरकार वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ असे माझ्या दुकानासमोर लावले मी कोणत्या राजकीय पक्षांच्या वतीने लावले नसून संविधान वाचविण्यासाठी हे बॅनर लावले असल्याचे संतोष तिमाडे यांनी सांगितले


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 20, 2024

PostImage

जय भवानी-जय शिवाजी या घोषणांच्या निनादात आष्टी शहरात शिवजयंती उत्साहात साजरी


जय भवानी-जय शिवाजी या घोषणांच्या निनादात आष्टी शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

 

चामोर्शी (आष्टी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि.१९ फेब्रुवारी रोजी जय भवानी-जय शिवाजी या घोषणांच्या निनादात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

आष्टी शहरातील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या वतीने दि.१८ ते १९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व दिनांक १८ रोजी ह.भ.प.नागापूरे महाराजांचे किर्तन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धेचे उद्घघाटन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात कार्यक्रम घेण्यात आले सकाळी आष्टी - अनखोडा - उमरी - पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीत आमदार डॉ देवराव होळी हे या रॅलीत सहभागी झाले होते व सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरातील प्रमुख ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांची म्युझिकल बॅंड,,ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला काढलेल्या मिरवणुकीमुळे वातावरण शिवमय झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचे आगमन होताच खासदार अशोक नेते उपस्थित झाले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खासदार अशोक नेते यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी भाजपा पदाधिकारी संजय पंदिलवार, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर कुंदोजवार, विठ्ठल आवारी,पांडे, तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते 

या मिरवणुकीदरम्यान पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 19, 2024

PostImage

छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती विश्वव्यापी - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती विश्वव्यापी - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 

 शिवरायांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण - मुरमाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

 

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे व रयतेचे राजे होते. आपल्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला व प्रजेतील प्रत्येक व्यक्तीच्या व्यथा जाणणारे सहहृदयी व समान न्याय देणारे कर्तव्यनिष्ठ थोर नायक होते. अश्या शिवरायांचा इतिहास जगातील शंभराहून अधिक देशातील विद्यापीठात शिकविल्या जात असून छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती ही विश्वव्यापी आहे.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली जिल्ह्यातील मुरमाडी येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.

 

गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी या छोट्याश्या गावी संपूर्ण ग्राम वासियांकडून दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदाचे वर्षी शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अध्यक्ष म्हणून गडचिरोली शिवसेनेचे नेते अरविंद कात्रटवार, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, ॲड. राम मेश्राम, डॉ. नितीन कोडवते, माजी जिल्हा अध्यक्ष हसन गिलानी, प्रभाकर वासेकर, विश्वजित कोवासे, मोटघरे,अतुल मल्लेलवार, संदीप भुरसे, यादव लोहांबरे, गावतुरे, बनपुरकर यावेळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात तीनही बाजूने विरोधकांनी वेढा घातला असताना आपल्या प्राणाची बाजी पणाला लावून सुराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोकड्या मावळ्यांना घेवुन आपल्या पराक्रम वृत्तीने शत्रूंवर विजय मिळवला.पर स्त्री माते समान महिला मानून त्यांची अब्रू लुटणाऱ्यांचे हात पाय छाटले. राज्यातील प्रजेच्या हिताचे निर्णय घेणे व प्रजेसाठी लोकशाही राज्य चालविणे हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला.

 

मात्र सध्या देशात व राज्यात लोकशाहीला व लोकशाहीची नीतिमूल्ये रुजविनाऱ्या संविधानाला समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले जात आहे. तर राज्यात स्त्री संरक्षण कायद्याचे मनोविकृतांकडून धिंडवडे काढले जात असताना शासन अपयशी ठरत आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढत असून यात जनता होरपळली जात आहे. केवळ धर्मांधता पसरवून जनतेची दिशाभूल केली जाते. अश्या धर्मांधतेला बळी न पडता शिक्षण व गाव एकोप्याने भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोबतच मुरमाडी येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारणार असेही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. या नंतर गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुण तरुणीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 आंबेशिवणी, राजगाटा व चुरमुरा येथे शिवजयंती कार्यक्रमात सहभाग

 

गडचिरोली तालुक्यातील आंबे शिवणी येथे शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित होऊन उपस्थित गावकरिंना मार्गदर्शन केले.तर राजगाटा येथे ग्राम विकास फाऊंडेशन तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. सोबतच शिवजयंती कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्द व त्यांनी रयतेसाठीकेलेल्या महान कार्याची इतिहासाची महती आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिली.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 19, 2024

PostImage

छत्रपतींचे नाव घेवून सत्ता मिळवू पाहणाऱ्यांपासून सावध राहा शेकाप नेते भाई रामदास जराते यांचे आवाहन


 

छत्रपतींचे नाव घेवून सत्ता मिळवू पाहणाऱ्यांपासून सावध राहा

 

शेकाप नेते भाई रामदास जराते यांचे आवाहन

 

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. मात्र आज जाती धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण करणारे छत्रपतींचे नाव घेवून पुन्हा सत्ता मिळवू पाहत असून शिवप्रेमी जनतेने येणाऱ्या काळात सावध राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

 

तालुक्यातील राजोली येथील स्वराज्य युवा मंडळाने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, रामराज्यांचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी देशातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार आणि युवक बेरोजगारांना उध्वस्त करणारे धोरणं लादण्याचे काम केले आहे. एवढेच नाही तर देशात धार्मिक उन्माद पसरविण्याचे काम भारतीय जनता पक्षाने चालविले असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते विनोद मडावी, प्रतिक डांगे, सतिश दुर्गमवार, राजोली च्या सरपंच कांता हलामी, उपसरपंच पंकज कन्नाके, जमगावचे सरपंच देवीदास मडावी, तंटामुक्त समितीचे संजय तुंकलवार, तलाठी वासनिक, ऊसेंडी, नागवेलीचे शिक्षक दुर्गे, वनरक्षक गोडवे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

कार्यक्रमा दरम्यान पोटेगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी कांबळे यांनी भेट देवून आयोजकांचे कौतुक केले.प्रास्ताविक विलास दामले यांनी तर संचालन किर्ती बावणे यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 18, 2024

PostImage

श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्याची साफसफाई करून सामाजिक बांधिलकी जोपासली


श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्याची साफसफाई करून सामाजिक बांधिलकी जोपासली 

 

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था ही नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी चौक येथील मुख्य रस्त्याची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे 

आष्टी येथे श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे या शिवजयंतीच्या उत्सवाला येणाऱ्या शिवभक्तांना पाहून श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष पवन रामगिरकार यांच्या नेतृत्वात ही स्वच्छता मोहीम राबवली आहे 

 श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेच्या वतीने रांगोळी स्पर्धा, किर्तन यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

या स्वच्छाता मोहीमेत श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष पवन रामगीरकार,सचिव संदीप तीवाडे, उपाध्यक्ष संदीप लोड्डेलीवार, रीतिक पांढरमिसे,प्रतिक रहाटे,देवा बोरकुठे ,आशिष झगडमवार,केतन कोकेरवार,आदित्य सिरपूरवार, गणेश कलाश्रपवार,लाला चावरे,द्रुप पेरकावार,रुपेश येलमुले यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 17, 2024

PostImage

गर्भवती महिलेचा आकस्मिक मृत्यू! चार वर्षीय चिमुकली झाली आईविना पोरकी ,दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर। आज होणार अंत्य संस्कार


गर्भवती महिलेचा आकस्मिक मृत्यू! चार वर्षीय चिमुकली झाली आईविना पोरकी ,दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर। आज होणार अंत्य संस्कार

 

 

पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील एका गर्भवती महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे चार वर्षीय चिमुकली आईविना पोरकी झाली आहे.

 

घोसरी येथील महेश गुणशेटीवार यांची पत्नी सौ. दिपाली वय 26 वर्ष ही काल अचानक आजारी झाली. तात्काळ तिला उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान दुर्दैवाने तिच्या मृत्यू झाला. एका जीवा सोबत उदरात असलेला दुसराही जीव देवाला प्रिय झाला. त्यामुळे परिसरात आणि गावात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

त्यांचेवर आज दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 17, 2024

PostImage

पप्पा चालाना घरी,जेवण नाही करत का.? चिमुकल्याची हृदयस्पर्शी विनवणी


पप्पा चालाना घरी,जेवण नाही करत का.? चिमुकल्याची हृदयस्पर्शी विनवणी.

'कांबळें'च्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस,दखल नाही.

गडचांदूर :-

दि सेंच्युरी लिमिटेडच्या अल्ट्राटेक युनिट क्रमांक 2,माणिकगड सिमेंट कंपनीने या शहराची वाट लावली आहे.गडचांदूर शहराच्या जवळपास 50 हजार लोकसंख्येतून 50 टक्के लोक आजारी पडत आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळ याठिकाणी कार्यरत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण मंडळ फक्त कंपनीची डिपॉझीट जप्त करून,जर कारवाई केल्याचे दाखवत असेल तर,ती केवळ तोंडाला पाने पुसण्याची बाब आहे.ज्या कंपनीमुळे या गावचे जल,जंगल,जमीन,नष्ठ होत आहे,लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,ऐवढेच नाही तर याठिकाणी बेरोजगारांची फौज उभी झालेली आहे.या बेरोजगारांच्या हाताला काम नाही,मग काय चोऱ्या करायच्या का ? अशी विचारणा तरूण करताना दिसत आहे.शिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने कित्येक शिक्षित तरूण वाम मार्गाने जाऊन आपले भविष्य अंधारात टाकत असल्याचे दिसून येत आहे.काही अपवाद वगळता माणिकगड सिमेंट कंपनीने स्थानिकांच्या नावाखाली केवळ परप्रांतीयांचा भरण करून स्थानिक पात्र शिक्षित तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचे संतापजनक आरोप होत आहे.

    एकीकडे बेरोजगारीची समस्या बिकट असतानाच दुसरीकडे या कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे गडचांदूर व परिसरातील नागरीकांचे जीव धोक्यात आले आहे.दमा,फुफ्फुस,हृदयाचे विकार,शरीरावर खाज,खुजली,खोकला,इतर जीवघेण्या रोगांची लागन होत आहे.यासर्व जीवघेणा समस्यांवर उपाययोजना सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मनसे कोरपना तालुकाध्यक्ष 'सुरेश कांबळे' यांनी गडचांदूर येथे गेल्या 14 फेब्रुवारी पासून 'अन्नत्याग आंदोन' सुरू केले आहे.आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून शासन-प्रशासन,लोकप्रतिनिधी,कंपनी प्रशासन,यापैकी कुणीही याची दखल घेतली नसल्याने आश्चर्ययुक्त खंत व्यक्त होत आहे.दरम्यान आंदोलनकर्ते 'सुरेश कांबळे' गेल्या चार दिवसापासून आपल्या घरी न गेल्याने त्यांचा साडे तीन वर्षाचा मुलगा आंदोलनस्थळी येऊन कांबळेंच्या जवळबसून "पप्पा घरी चालना,जेवण नाही करत का ?" अशी विनवणी करत होता.चिमुकल्याच्या या हृदयस्पर्शी विनवणी ऐकून आंदोलन मंडपात उपस्थित लोकांचे मन हेलावून गेले होते.

        माणिकगड{अल्ट्राटेक}सिमेंट कंपनीकडून दैनंदिन होत असलेल्या डस्ट प्रदूषणामुळे शहरातील जनता मोठ्या प्रमाणात त्वचा रोग,किडनी विकार,दमा,असे गंभीर आजाराने त्रस्त आहे.यावर संबंधित कंपनीवर कठोर कार्यवाही व्हावी,कंपनीने दत्तक घेतलेल्या गावांचा सीएसआर फंडातून विकास करावा,दत्तक घेतलेल्या गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना पॅकिंग प्लांट व सप्लाय वेजबोर्ड नुसार कामावर सामावून घ्यावे व स्थानिकांना प्राधान्य द्यावे,कंपनीतील ट्रान्सपोर्ट वाहने नो-पार्किंग झोन मधील व शहराच्या परिसरात उभे केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करून रस्ता मोकळा करावा व इतर जनहिताच्या मागण्या घेऊन कांबळे यांनी सदर आंदोलन सुरू केले आहे.ह्या सर्व मागण्या मार्गी लागल्याशिवाय आता माघार नाहीच ! या भूमीकेवर कांबळे ठाम असून समर्थकांमध्ये कंपनी विरोधात रोष व्यक्त होत आहे.गोवारीगुडा,बांबेझरी,नोकारी,मानोली,पुगडीपठार,जामनी,थुट्रा व परिसरातील इतर गावातील तरूणांची उपस्थिती होती.आता सदर आंदोलनाचे पुढे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 17, 2024

PostImage

बिबट्याचा बंदोबस्त करा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वंचित बहुजन युवा आघाडी ची मागणी


बिबट्याचा बंदोबस्त करा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वंचित बहुजन युवा आघाडी ची मागणी

 

बल्लारपूर : पेपर मिल न्यू कॉलनी परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी ने केले आहे.

बल्लारपूर पेपर मिलच्या स्लज गार्डन परिसरात तसेच पेपर मिल बांबू डेपो व चंद्रपूर ते बल्लारशा मुख्य मार्गावर बिबट्या वावरत आहे. त्यामुळे तिथून येणारे पेपर मिल कर्मचारी तसेच शाळेकरी मुले व चंद्रपूरला कामाकरिता जाणा येणारे व्यक्तींना भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे कधी कोणत्या वेळेला व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता होऊ शकते. वन विभागाने या वन प्राण्यांचे लवकरात लवकर पिंजरा लावून जेरबंद कण्याची मागणी केली आहे.जर कोणत्याही सामान्य व्यक्तीचा जीवितहानी झाल्यास त्याचे जिम्मेदार वनविभाग राहणार व काही जीवितहानी झाल्यास वन विभाग जबाबदार राहणार, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांना संविधान ची प्रत देण्यात आले.

सदर निवेदन नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांना दिले. यावेळी अभिलाष चूनारकर, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर, सरोज झाडे, सम्यक रामटेके, राहुल वाळके, सोहन वनकर, प्रज्योत करमणकर, अंकित अहिरवार, सुहास दुबे,अंशू पाटील सह युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 17, 2024

PostImage

....अखेर संजय चरडुके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकलाय गळ्यात


....अखेर संजय चरडुके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकलाय गळ्यात 

 

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले स्वागत

 

एटापल्ली:गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चरडुके यांनी अनेक कार्यकर्त्यांसह राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य पटांगणात पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,माजी जि प सदस्य नाना नाकाडे,राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी प स सभापती बेबीताई नरोटे,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,राकॉचे कार्याध्यक्ष संभाजी हिचामी, नगरसेवक जितेंद्र टिकले, लक्ष्मण नरोटी,राजू नरोटी,अभि नागुलवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मागील अनेक दिवसांपासून संजय चरडुके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यावर असल्याची चर्चा होती.अखेर शुक्रवारी त्यांनी जाहीर प्रवेश करत या चर्चांना पूर्ण विराम दिला.त्यांच्या सोबत एटापल्लीचे माजी पंचायत समिती सभापती जनार्धन नल्लावार तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देत सर्वांचे स्वागत केले.

 

दरम्यान एटापल्ली तालुक्यात आगमन होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे ढोल,ताशांच्या गजरात,रेला नृत्य करत फटाक्यांचा आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध भागातून आलेले हजारो नागरिक उपस्थित होते.

 

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास-संजय चरडुके

 

आदिवासी विध्यार्थी संघटनेत फूट पडली असून अंतर्गत वाद चवाट्यावर आला आहे.शिवाय दोन नेते दोन बाजूला गेले आहेत.आपल्या भागाचा विकास करायचा असेल विकासाचा दृष्टिकोन असलेल्या नेत्या सोबत राहणे आवश्यक आहे.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा विकासासाठी धडपड सुरू आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असून त्यांच्या छत्रछायेत काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 17, 2024

PostImage

पोलिसांनी ३,८०,०००/- रूपयाच्या मुद्देमाल केला जप्त 


पोलिसांनी ३,८०,०००/- रूपयाच्या मुद्देमाल केला जप्त 

 

अहेरी: १६ फरवरी रोजी दुपारी ०३ वाजताचे सुमारास अहेरी वरून आलापल्लीमागनि एटापल्ली कडे जाणारी चारचाकी पीकअप वाहन क एम एच ३४ ए.व्हि २०७१ या वाहनाने देशी दारूची तस्करी करीत असल्याची माहीती मीळाल्याने पोलीस पथकाने मौजा आलापल्ली एटापल्ली रोडवर येथे सापळा रचुन सदर वाहनास थांबवुन सदर वाहणाची पंचा समक्ष पाहणी केली असता सदर वाहनाच्या डाल्यामध्ये खाकी रंगाच्या बाॅक्समध्ये रॉकेट देशी दारू संत्रा प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर असे लिहीलेले किंमत २,८०,०००/- रूपये किमतीच्या दारू व १,००,०००/- रू किमतीची चारचाकी पिकअप वाहन असा एकुन ३,८०,०००/-रू किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने पोस्टे अहेरी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे सदर गुन्हयाच्या तपास पोहवा/ सत्यमकुमार लोहबरे पोस्टे अहेरी हे करीत आहे.

 

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश सा,अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधीकारी अजय कोकाटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे साहेब यांचे नेतृत्वात पोहवा/मनोज शेन्डे, पोना/ हेमराज वाघाडे, पोशी/ आशीष भारतसागर पोशी / शंकर दहीफळे पोस्टे अहेरी यांनी पार पाडली असुन अवैदयरित्या तस्करी होणारी देशी दारू पोलीसांनी जप्त केली असुन गुन्हयातील आरोपींस ताब्यात घेतले असुन इतर साथीदारांच्या शोध घेत असुन गुन्हयाच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा / सत्यमकुमार लोहंबडे पोस्टे अहेरी यांनी करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 17, 2024

PostImage

ऑस्ट्रियाची युवती झाली दाबगाव मौशीची सून! बैलबंडीतून वरात


ऑस्ट्रियाची युवती झाली दाबगाव मौशीची सून! बैलबंडीतून वरात

 

विदेशी पाहुणे भारतीय पध्दतीने साजरे होणारे लग्न बघून आनंदीत झाले.

 

चंद्रपूर : सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील उच्चशिक्षित युवकाचा युरोपातील ऑस्ट्रिया देशातील युवतीशी प्रेमविवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. युवतीला थेट गावात आणून बैलबंडीतून वरात काढत अतिशय साध्या पद्धतीने विवाह केला. या अनोख्या प्रेमविवाह सोहळ्याची जिल्ह्यातभरात चर्चा होत असून चित्रफिती समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्याला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट सहभागी झाले होते.

 

 

आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सुकरू पाटील आभारे यांचा एकुलता एक मुलगा हेमंत उच्च शिक्षित असून विदेशातील एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याचे ऑस्ट्रिया देशातील युडीश हरमायनी प्रित्झ, रा. बियेना ऑस्ट्रिया या युवतीशी प्रेमसंबंध जुळून आले. दरम्यान, दोघांनीही लग्न करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी थेट आपले गाव गाठले. आईवडिलांच्या परवानगीनंतर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. मात्र, गावात समारंभ युक्त सभागृह नसल्याने थेट स्वतःच्या शेतातच लग्न करण्याचे ठरले. कोणताही मंडप किंवा बडेजावपणा न करता शेतातील एका झाडाखाली लग्नविधी सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडण्यात आला. आधुनिक युगात नावीन्यपूर्ण आणि दिखाऊपणाचा बाज न आणता जुन्या पद्धतीच्या बैलबंडीने वाजतगाजत वरात काढण्यात आली होती. या समारंभाला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट उपस्थित होते.

 

 

बैलबंडीने निघालेल्या वरातीत विदेशातून दाखल झालेल्या पाहुण्यांनी डिजे, बॅन्डच्या तालावर नृत्यृ, डान्स केला. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील युवकांने थेट युरोपातील आस्ट्रिया येथील विवाह केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून या विवाह सोहळ्याच्या चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली आहे. जागतिक प्रेमदिनाच्या दोन दिवस पूर्वीच हा विवाह सोहळा अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. लग्नपत्रिकेपासून तर मंगलाष्टके, हळद, संगीत व विवाह समारंभातील सर्व आवश्यक कार्यक्रम भारतीय पध्दतीने येथे पार पडले. विदेशी पाहुणे भारतीय पध्दतीने साजरे होणारे लग्न बघून आनंदीत झाले.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 16, 2024

PostImage

झोपेत असताना पत्नीची कुऱ्हाडीने पतीनेच केली निर्घृण हत्या


 

झोपेत असताना पत्नीची कुऱ्हाडीने पतीनेच केली निर्घृण हत्या

गोंडपिपरी तालुक्यातील खळबळजनक घटना

मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही मुले गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी कापसाची गाडी भरायला गेली असता झोपेत असलेल्या वेडगाव येथील लता दामोदर धुडसे( वय ४० वर्ष ) यांच्यावर पतीनेच वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनगक घटना दि.(१६) शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता घडली.
गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी मृतक लता धूडसे यांचे दोन्ही मुले कापूस भरण्यासाठी गेली व मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घरी काम आटपून परतले असता त्यांची आई ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली बाजूला कुऱ्हाड देखील होती. आणि वडीलांचा शोध घेतला असता कुठेच आढळले नाही. फरार असल्याचे निदर्शनास आले.पत्नीवर आरोपी दामोधर मारोती धुडसे यांनी कुऱ्हाडीने  वार करून निरघुण हत्या केल्याचां अंदाज असून घडलेली माहिती गावकऱ्यांनी लाठी पोलिसांना दिली सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. आरोपीचा शोध लाठी पोलीस घेत आहे.हत्तेचे कारण गुलदस्त्यात असून पोलीस तपास करत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 13, 2024

PostImage

भामरागड;- मणेराजाराम अविका धान खरेदी केंद्रावर अखेर सामाजीक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या पुढाकाराने पोलिसात तक्रार दाखल केली


अखेर मनेराजाराम येथील धान खरेदी केंद्राविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

 

भामरागड;- मणेराजाराम अविका धान खरेदी केंद्रावर अखेर सामाजीक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या पुढाकाराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे 

 

 

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की सामाजिक कार्यकर्ते यांनी 21 जानेवारी 2024 रोजी परिपत्रकाद्वारे जनतेला धान खरेदी केंद्रावर लूट झाल्यास काळविण्याचे आव्हान केले होते त्या अनुषंगाने मणेराजाराम येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार यांच्या कडे आपली व्यथा मांडली व परिसरातील नागरिकांच्या विनंतीला  अनुसरून ताटिकोंडावार यांनी आपली टीम घेऊन मणेराजाराम गाव गाठले व नागरिकांना विचारणा केली असता तेथील नागरिकांनी निडरपने सांगितले की आपली खरेदी केंद्रावर लूट होत आहे आम्ही अनेकवेळा व्यवस्थापकाला विचारणा केली असता आम्हाला उडवाउडवीची उत्तर मिळत होते 

 

ही समस्या ऐकून ताटिकोंडावार धान खरेदि केंद्रावर जाऊन संबंधितांना विचारणा केली की कश्या पद्धतीने धान खरेदी करता या वर संबंधितांनी आम्ही शासनाच्या धोरणाप्रमाणे 40.600 घेतो अशे उत्तर दिले

 

परंतु ताटिकोंडावार यांनी स्वत काही पोत्यांचे वजन केले असता 41.900 व 42.250 अशी शेतकऱ्यांची महालूट आढळून आली यावरून शेतकऱ्यांची गोणी मागे दोन ते अडीच किलो लूट दिसून आली म्हणजे सरासरी क्विंटलमागे 5 किलो संबंधिताला या विषय विचारणा केली असता कोणतेही उत्तर न मिळाले व सरपंच गाव पाटील व नागरिकांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले व पोलीस स्टेशन मध्ये मनेराजाराम अविका धान खरेदी विरुद्ध तक्रार दाखल करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांनी केली आहे 

 

पोलीस स्टेशननला तक्रार करताना सरपंच शारदा कोरेत इंदरशाह मडावी समवेत मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्तीत होते

 

 

बॉक्स

 

शासन खरेदी केंद्र किंवा अभिकर्ता संस्थांकडून ओलाव्याची तुट गृहित धरुन ३८ किलो ५०० ग्रॅम वजन धानाचीच उचल करीत असल्याने शेतकऱ्यांकडून 41 ते 42.250 किलो प्रती गोणी (पोते) वजनाने केली जात असलेली खरेदी ही शुध्द लुट आहे.

 

*सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार*


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 13, 2024

PostImage

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक


निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक

 

 

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि एकूणच राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले या संदर्भात ठोस आणि निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची महत्वाची बैठक 21 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात होणार असल्याची घोषणा एस.एम.देशमुख यांनी केली..

 

निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात निदर्शने करण्यात आली.. यावेळी मुंबईतील सर्व प्रमुख पत्रकार संघटना सहभागी झाल्या होत्या..

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला म्हणजे माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे..या विरोधात सर्व पत्रकार संघटनांनी एकजूट कायम ठेवण्याची गरज सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.. निखिल वागळे यांच्या प्रमाणेच राज्यात गेल्या सहा महिन्यात 36 पत्रकारांवर हल्ले झाले असून निवडणुकांच्या काळात असे हल्ले वाढणार आहेत.. या विरोधात केवळ निषेध करून चालणार नाही तर काही ठोस भूमिका घ्यावी लागेल अशी सूचना बहुतेक वक्त्यांनी केली.. त्यानुसार विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची २१ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात बैठक घेण्यात येणार आहे..या बेठकीत आंदोलनाचा पुढील दिशा ठरविली जाईल.. 

आजच्या निदर्शने आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.. या आंदोलनात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, बृहन्मुंबई महापालिका पत्रकार संघाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते..यावेळी काही सामाजिक संघटना,कामगार संघटनानी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शविला.. निदर्शकांनी गगनभेदी घोषणा दिल्या..

एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निषेध सभेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीरसिंग, जतीन देसाई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रवीण पुरो, मुंबई क्राईम रिपोर्टर असो.चे शाहिद अन्सारी, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, मुंबई महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू सोनावणे तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, युवराज मोहिते, संजीव साबडे,संजय परब, एनडीटीव्हीचे मिश्रा आदिंनी निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.. हे आंदोलन दोन तास चालले.. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार संघटनांनी आंदोलनं करून निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे..आजच्या निदर्शनात अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर,(रायगड) मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर आणि विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 13, 2024

PostImage

सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती उठली नाही, आई च्या जवळ गेला असता ती मृत अवस्थेत होती


सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती उठली नाही, आई च्या जवळ गेला असता ती मृत अवस्थेत होती

 

 

ब्रह्मपुरीं पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक

 

 

 

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील पाच किमी अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे 12 फेब्रुवारीला सकाळी हत्येची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. 

 

मालडोंगरी येथे राहणारे जयदेव पिल्लेवान व त्याची पत्नी हिरकण्या यांच्यामध्ये मागील 3 दिवसापासून भांडण होत होते, 11 फेब्रुवारीला रात्री 11 वाजताच्या सुमारास पती-पत्नी मध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी मुलगा जॉकीस हा उपस्थित होता, मात्र नेहमीच होत असलेला हा प्रकार बघून त्याने लक्ष दिले नाही. 

 

सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती उठली नाही, आई च्या जवळ गेला असता ती मृत अवस्थेत होती, मृतक हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा होत्या.

 

मृतक हिरकण्या यांनी पती जयदेव ला शिवीगाळ केल्याने त्यांनी हिरकण्या ला हाथ-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्या मारहाणीत हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मार लागला त्या मारहाणीत हिरकण्या यांचा मृत्यू झाला होता.

 

मुलगा जॉकीस याने याबाबत ब्रह्मपुरीं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत आरोपी जयदेव ला अटक केली. पुढील तपास ब्रह्मपुरीं पोलीस करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 11, 2024

PostImage

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे धाकटे बंधू युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचे नाव गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र उमेदवारीसाठी चर्चेत!


माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे धाकटे बंधू युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचे नाव गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र उमेदवारीसाठी चर्चेत!

 

भावी खासदार म्हणून अहेरी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी!

 

 

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने युवा नेतृत्वाला संधी देण्याचे संकेत दिले असल्याने गडचिरोली लोकसभा मतदारसघांतून कार्यकर्त्यांकडून अहेरी राजपरीवाराचे कुमार अवधेशराव बाबा यांचे नाव चर्चेत आले असून.सर्वांच्या आवडीचे आणि धडाडीचे जिल्ह्याचे नेतृत्व असलेले श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे धाकटे बंधू असून.जनमानसांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर,संवेदनशील, संस्कारी आणि निर्णयक्षमता असलेले व्येक्तीमत्व म्हणजे कुमार अवधेशराव बाबा हे होय.

 

आपल्या ज्येष्ठ बंधू म्हणजेच राजे साहेब सोबत मतदारसंघात स्वतः उपस्थित राहून लोकांच्या समस्या शी परिचित तर आहेत.त्याच बरोबर राजे साहेब पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात त्यांची ओळख असून पंतप्रधान मोदी साहेबांचे विचार व काम करण्याची पद्धतनी प्रभावित असलेले युवा नेते कुमार अवधेश बाबांना लोकसभेसाठी संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असून,एक नवा धडाडीचा चेहरा पुढे यावे ही कार्यकर्ता व सामान्य जनतेची इच्छा जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.राजे साहेबांच्या प्रचाराच्या धडाडीने लोकसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते सोबत नेत्यांसोबत,पदाधिकारी सोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 11, 2024

PostImage

लोकशाही टिकवण्याची ही शेवटची लढाई---महेंद्र ब्राह्मणवाडे


लोकशाही टिकवण्याची ही शेवटची लढाई---महेंद्र ब्राह्मणवाडे

 

वडसा तालुका काँग्रेस बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न

 

गडचिरोली :: केंद्रातील भाजप सरकार ज्या हुकूमशाही पद्धतीने वागत आहे, त्याअर्थी देशालतील लोकशाही संपुष्ठात आणून हुकूमशाही प्रस्तापित करण्याचा त्यांचा डाव आहे, सरकार विरोधात जो कोणी बोलेल त्यांच्यावर खोटे आरोप लावायचे, त्यांना त्रास द्यायचा, पक्ष फोडायचे, समाजा समाजात आरक्षनाच्या मुद्याना घेऊन असो किंवा मग जातीय असो की धार्मिक मुद्याना घेऊन तेढ निर्माण करायचा अश्या नितीचा वापर करून आपली सत्ता अबाधित ठेवणे हेच भाजपचे लक्ष आहे. त्यामुळे  आगामी काळात भाजप सत्तेत आल्यास लोकशाही अस्तिवात असेल काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो, म्हुणुन ही लोकशाही च्या रक्षणाची शेवटची लढाई असून काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लोकशाही टिकविण्यासाठी पूर्ण ताकतीने कार्य करावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.

महाशिवरात्री निमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छूक: संतोष किराणा स्टोअर्स अनखोडा
Caption

 

वडसा तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित बूथ पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवत, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी प. स. सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, रामदास मसाराम, भीमराव नगराळे, NSUI जिल्हाध्यक्ष निशांत वनमाळी, हरबाजी मोरे, राजाराम ठाकरे, महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई कोहपरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, संजय करणकर, दुस्यन्त वाटगुरे, नरेंद्र गजपुरे, मनोहर निमजे, हरीश मोठवानी, सुरेश मेश्राम, जयमाला पेंदाम, रजनी आत्राम, यामिना कोसरे, महेंद्र खरकाटे, जगदीश शेंद्रे, महादेव कुमरे, गीता नाकाडे, टिकाराम सहारे, धर्मराज घोरमोडे, मनोहर खरकटे, रुपलता बोदेले, गीता धांडे, सुरेश खरकाटे,मनोज ढोरे, भूमेश्वर सिंघडे, प्रमोद पत्रे, मोहित अत्रे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि बूथ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 11, 2024

PostImage

कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या ३२ जनावरांची सुटका  सात जणांना अटक


कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या ३२ जनावरांची सुटका 

 

सात जणांना अटक : गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

 

गोवंशीय जनावरांची पायदळ तस्करी करणाऱ्या आरोपींना गोंडपिपरी पोलिसांनी दि.(९) शुक्रवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान ३२ जनावरांची सुटका केली तीन लाख वीस हजाराचा माल जप्त करत याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली .

 

तेलंगणा राज्याची सीमा गोडपिपरी तालुक्याला लागून असल्याने छुप्या मार्गाने वाहनात कोंबून तर कधी पायदळ जनावरांची नेहमीच कत्तलीसाठी तस्करी होत असते.अशातच नव्याने रुजू झालेले ठाणेदार हत्तीगोटे यांना तस्करीची माहिती मिळताच सहकारी मनोहर मत्ते,गणेश पोदाळी,विलास कोवे,संजय कोंडेकर,विजय पवार या पोलिसांसह वढोली गाठून आरोपींना ताब्यात घेत जनावरांची सुटका केली.त्यानंतर १६ जनावरांना बोरगाव येथील कोंडवाड्यात तर उर्वरित १६ जनावरांना धाबा येथील कोंडवाड्यात पाठवण्यात आले.

 

मूल - वढोली विठ्ठलवाडा मार्गे गोवंशीय जनावरांची पायदळ वाहतूक करून आरोपी हे नंदवर्धन नदीघातातून जनावरांना डोंग्याला बांधून प्रवास करत तेलंगणात तस्करी करतात. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा प्राणी अधिनियम १९९५ च्या विविध कलमानुसार गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 11, 2024

PostImage

उच्च शिक्षीत तरूणाकडून 4 चोरीच्या मोटारसायकल पोलिसांनी केले हस्तगत


उच्च शिक्षीत तरूणाकडून 4 चोरीच्या मोटारसायकल पोलिसांनी केले हस्तगत

 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आढळुन आल्याने नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला संबंधित चोरीच्या प्रकाराला पायबंद घालण्याचे विशेष निर्देश देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार ह्यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथक तयार करुन मोटार सायकल चोरीचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार शोध मोहीम सुरू केली.

 

दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना पथकाला एक इसम विना कागदपत्राची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने जिल्हा स्टेडिअम परिसरात सापळा रचून 25 वर्षीय आशिष शालिकराम रहांगडाले, रा. अष्टभुजा वार्ड, रमाबाई नगर, एकता चौक, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर ह्या दुचाकी स्वराला ताब्यात घेवुन त्याचे कडुन पांढऱ्या रंगाची अक्टिवा मोपेड गाडी क्र MH34 BU-7349, सिमेंट रंगाची अ क्टिवा मोपेड गाडी क्र MH 29 AG 4781, काळ्या व निळ्या रंगाची स्प्लेंडर क्र MH 32 S 1335, काळ्या व लाल रंगाची एच एफ डिलक्स क्र MH. 34. BJ.5773 अशी एकुण चार वाहने अंदाजित किंमत रु.1,45,000/-हस्तगत केली. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी 3 दुचाकी चंद्रपूर येथिल रामनगर पोलीस ठाण्याच्या तर 1 दुचाकी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विशेष म्हणजे चोरीतील आरोपी हा उच्चशिक्षित असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळुन आले.

 

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंदपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात, पो.उप. नि. विनोद मुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. नितीन रायपुरे यांनी केली.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 10, 2024

PostImage

सावित्रीच्या लेकींना महात्मा ज्योतिबा.फुले आष्टी येधे सायकलचे वाटप


सावित्रीच्या लेकींना महात्मा ज्योतिबा.फुले आष्टी येधे सायकलचे वाटप

  महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी सावित्रींच्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले. मानव विकास मिशन योजनेअंतर्गत या विद्यार्थिनींना बाहेरगाव वरून ये-जा करण्याकरिता सुविधा उपलब्ध व्हावी व त्यांचे शिक्षण सुकर व्हावे या उदात्त हेतुने महाराष्ट्र राज्य मानव विकास योजना अंतर्गत विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी वन वैभव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बबलूभैया हकीम त्यांच्या सहचारिणी नागपूर विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शाहीनभाभी हकीम,आष्टी येथील सरपंच बेबीताई बुरांडे, मार्कंडा (कंसोबा) येथील सरपंच वनश्री चापले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य शैलेंद्र खराती, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले,पर्यवेक्षक किशोरसिंह बैस, पालक तथा कला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी एकूण 124 सायकली विद्यार्थिनींना वाटण्यात आल्या. सायकल मिळाल्याचा आनंद विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. शाहीन भाभी हकीम यांनी विद्यार्थ्यांसोबत परीक्षेबाबत त्यांना मार्गदर्शन केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 10, 2024

PostImage

गडचिरोली शहरात हर घर जोडो अभियान, शेतकरी कामगार पक्ष सभासद नोंदणी करणार


 

गडचिरोली शहरात हर घर जोडो अभियान, शेतकरी कामगार पक्ष सभासद नोंदणी करणार 

 

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील प्रत्येक वाॅर्डात पक्ष शाखांची स्थापना करण्यात येणार असून १३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हर घर जोडो अभियान राबविणार आहे. या अभियाना अंतर्गत विद्यार्थी, युवक, महिला व पुरुषांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्ष सभासद नोंदणी करण्यात येणार आहे.

 

याबाबत शेतकरी कामगार पक्षाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ८० कोटी लोकांना ५ किलो मोफत राशन दिल्याचा आणि २५ कोटी जनतेला गरिबीतून मुक्त केल्याचा दावा अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी २०२४ दरम्यान केला आहे. हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा देशातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक, बेरोजगार, छोटे दुकानदार, नोकरदारांची, गळचेपी करणारा आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव, आरोग्य, शिक्षणावरील कमी केलेली तरतूद, गरिबांना आणखी गरिबीच्या खाईत लोटणार आहे. सर्व क्षेत्रातील पराकोटीचे खाजगीकरण येणाऱ्या पिढ्यांच्या उरावर बसणार असून गरिबांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार मिळणे बंद होणार आहे.

Caption

 

या संपूर्ण अराजकतेविरुद्ध देशातील प्रमुख विरोधी असलेला काँग्रेस पक्ष जनतेसोबत लढा उभारायचा सोडून ईडी-सीबीआय च्या धाकाने मिळमिळीत भूमिका घेऊन शांत बसलेला आहे. शिवसेना - राष्ट्रवादी यांनाही पक्ष फुटीने ग्रासलेले असून जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या अस्तित्वाच्या संघर्षात गुरफटले आहे. देशापातळीवरील या परिस्थितीमुळे आपल्या गडचिरोली शहरातही त्याची झळ बसणार असून दुकानांमध्ये काम करणारे नोकरदार, कामगार, मजूर, छोटे दुकानदार, व्यापारी, गृहिणी, युवक, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नसल्याची टिका शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

 

शहरातील फुटपाथ दुकाने, घरकुल, अतिक्रमणे कायम करून प्रॉपर्टी कार्ड मिळणे, रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या समस्यांचे निवारण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सत्तेच्या राजकारणापेक्षा भांडवलदार, कारखानदारां विरोधात सरकारशी सामान्य माणसांसाठी विधिमंडळात आणि रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली एकत्र येऊन आवाज बुलंद करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यासाठी गडचिरोली शहरातील गरीब सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, छोटे दुकानदार, नोकरदार, महिला, विद्यार्थी - बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने आपापल्या वार्ड शाखेचे मोठ्या संख्येने सभासद होऊन एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम, छाया भोयर, रजनी खैरे, शुल्का बोबाटे, संगिता बोदलकर, अस्मिता लाटकर, धारा बन्सोड, कुसूम नैताम, पुष्पा कोतवालीवाले, योगेश चापले, भीमदेव मानकर, राजकुमार प्रधान, बाबुलाल रामटेके, विनोद उराडे, अंकुश मारभते, भूषण चिंचोलकर यांनी केले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 10, 2024

PostImage

फसवणूक व विश्वासघात प्रकरणी संजो कॉन्व्हेंटच्या शिक्षकास अटक,विद्यार्थ्यांसह पालकांची लाखो रुपयांने केली फसवणूक


फसवणूक व विश्वासघात प्रकरणी संजो कॉन्व्हेंटच्या शिक्षकास अटक,विद्यार्थ्यांसह पालकांची लाखो रुपयांने केली फसवणूक

 

गोंडपीपरी: शहरातील संजो कॉन्व्हेंट मध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने मावशीची तब्येत बरी नसल्याने उपचारासाठी पैशाची नितातं गरज असल्याचे सांगून त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासह पालकांकडून पैसे मागितले. एका विद्यार्थीनीने तब्बल सहा तोळे सोने शिक्षकाला दिले.

 काही दिवसांनी दिलेले सोने परत मागितले असता शिक्षकाने सोने देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच विद्यार्थींनीने पालकाच्या सोबतीने गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीचे नाव अखिल रोहणकर रा.वडसा असे आहे.

 

 

गोंडपीपरी येथील संजो कॉन्व्हेंट ही सिबीएससी पॅटर्न ची शाळा आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलांच्या उज्जल भविष्यासाठी शहरातील मोठे अधिकारी , विविध विभागातील कर्मचारी , लहान-मोठे व्यावसायिक यासह सधन शेतकऱ्यांची मुले या कॉन्व्हेट मधून शिक्षण घेत आहेत . वडसा येथील अखिल रोहणकर यांची संगीत शिक्षक म्हणून संजो कॉन्व्हेंट मध्ये नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह पालकात सुद्धा चांगली ओळख झाली. नामांकित शाळेत शिक्षक असल्याचा फायदा घेत रोहनकर यांनी मावशीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने पैशाची नितांत गरज असल्याचे एका विद्यार्थीनिला सांगीतले . घरच्यांना काहीही न सांगता तब्बल सहा तोटे सोने विद्यार्थीनीने शिक्षकाकडे आणून दिले. दरम्यान लवकरच सोने परत करणार असल्याचा विश्वास शिक्षकाने दाखविला. काही दिवसांनी विद्यार्थीनीने शिक्षकाला दिलेले सोने परत मागितले असता सोने देण्यास शिक्षकाने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे समजून येताच विद्यार्थिनीने सदर बाब आई वडिलांना सांगितली. लागलीच गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून शिक्षका विरोधात फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. तात्काळ गोंडपीपरी पोलिसांनी आरोपीस अटक केली. सदर बाब गोंडपीपरी शहरात पसरताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही दिवसापूर्वी असेच कारण पुढे करीत सदर शिक्षकाने अनेक पालकांच्या घरी जाऊन पैसे मागितले.

 अडचणीत एकमेकांना मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक पालकांनी आपल्या क्षमतेनुसार पाच हजार, दहा हजार, विस हजार तर काहींनी ५० हजार पर्यंतची रक्कम त्या शिक्षकाला दिल्याचे चर्चतून समोर आले आहे. फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी

गोंडपीपरी पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांकडून ओरोपीची कसून चौकशी व्हावी करीता न्यायालयाने एक दिवसासाठी पीसीआर (पोलीस कस्टडी रिमांड) दिला आहे. 

पुढील तपास गोंडपीपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगरे करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 9, 2024

PostImage

वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महिलांचा घटस्थळीच मृत्यू  तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली


वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महिलांचा घटस्थळीच मृत्यू  तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली 

 

ब्रम्हपुरी :- शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील मौजा माहेर येथून वर्धा जिल्ह्यात चना कापायला गेलेल्या 17 महिला काम आटोपून सुमो या वाहनाने परत येत असताना आज दिनाक 8 ला सायंकाळी 7.30 दरम्यान उमरेड तालुक्यातील सिर्सी जवळ वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महीलांचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मारन पावली वाहनाच्या चालकासह 13 महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

ब्रम्हपुरी शहराजवळील माहेर येथील 17 महिला या मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चना कापणीच्या कामाला जात होत्या. एक सुमो रोज त्यांना चना कापणी करता घेऊन जात असे व सायंकाळी परत वापस माहेर येथे आणून देत असे रात्रौ चालक वाहनं सोबत माहेर येथे मुक्कामी राहत होता.

 

मागील काही दिवसा प्रमाणे माहेर येथील 17 महिला आज दिनाक 8 ला पहाटे सुमो या वाहनात बसून पिंपरी या गावी चना कापणीला गेल्या होत्या. सायंकाळी 7.30 वाजता परत येत असताना उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ त्यांच्या वाहनं पलटून गंभीर अपघात झाला. वृत्त लिहे पर्यंत प्राप्त माहिती नुसार अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सोनाबाई सिद्दुके ही नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली जखमी तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत अडकिने, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे

मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजुरकर यांना होताच यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुगणवाहिकेतून तीन महीलाचे शव उमरेड येथे पाठवण्यात आले. उर्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुरकर जखमी सोबत नागपूरला गेले असून सर्व घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. घटनेची माहिती माहेर येथे होताच सर्व गावात शोककळा पसरली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 9, 2024

PostImage

जखमी वाघावर प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे होणार उपचार


 जखमी वाघावर प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे होणार उपचार

 

गडचिरोली:-

दिनांक ०५/०२/२०२४ रोजी रात्रो ९.०० वाजेदरम्यान एम. एन. चव्हान, सहाय्यक वनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांना भ्रम्हणध्वनीव्दारे एक वाघ जखमी असल्याचा माहीती मिळाल्या नंतर वनपरिक्षेत्र अधिकरी वडसा व सहाय्यक वनसंरक्षक वडसा यांनी रात्रो शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यावर जावुन पहाणी केली असता वडसा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवराजपुरचे कक्ष. क्रमांक. ९३ मधे वनक्षेत्रात रस्ता क्रास करूण एक जखमी वाघ लंगडत शिवराजपुर लगतचे शेतशिवारात गेल्याचे माहीती मिळाली तसेच सदर वाघ रस्ता ओलांडत असत्यांनाचा व्हिडिओ ची पाहणी केली असता एक जखमी वाघ ज्याच्या समोरच्या उजव्या पायाला जखम असुन लंगडत चालत असल्याचे दिसुन आले त्यानुसार रात्रो ११.३० वाजता ड्रोन कॉमेरा बोलावुन पहाणी केली असता ड्रोनमध्ये शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यापासुन अंदाजे २०० मीटर अंतरावर शेतात झोपलेल्या अवस्थेत दिसुन आला. तेव्हा रात्रोभर सदर वाघावर क्षेत्रीय कर्मचा-या कडुन पाळत ठेवण्यात आली. व जवळील गांवाना सर्तक करण्यात आले.

 

दिनांक ०६/०२/२०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता ड्रोन व्दारे शेतशिवारात पहाणी केली असता सदर वाघ मिळाला नाही. तेव्हा वडसा, आरमोरी व कुरखेडा येथील वनकर्मचारी मिळुन पाई संयुक्त गस्त केली असता सदर वाघ शिवराजपुर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ९३ मधील मिश्र रोपवनात १५.०० हेक्टर चे पश्चिम दिशेला चेनलिंग फेनसिंगचे आतमध्ये २० मीटर अंतरावर पडलेल्या अवस्थेत दिसला. प्रथमदर्शनी पाहता सदर वाघाचे उजव्या पायाला जखम असल्याचे दिसून आले.

 

दिनांक ०६.०२.२०२४ ते दिनांक ०८.०२.२०२४ पर्यत सदर वाघ त्याच परिसरात होता व तो कोणत्याही प्रकारची शिकार करण्यांस असर्मथ असल्यामुळे दिनांक ०८.०२.२०२४ रोजी सायंकाळी ३.४७ वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख, अजय मराठे शुटर RRT TATR व त्यांची RRT TATR चमु यांनी सदर वाघास बेशुध्दीचे इंजेक्शन देवुन त्यास पकडले. सदर जखमी वाघास डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता त्याला मा. बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.

 

सदरची कार्यवाही धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक (प्रा) वडसा, यांचे मार्गदर्शनाखाली पवनकुमार जोंग (भा.व.से.) परिविक्षाधिन अधिकारी, मनोज चव्हाण उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा, विजय धांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा, यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी कराडे, तिजारे क्षेत्रसहाय्यक व गजभिये, वनरक्षक तसेच RRT TATR सदस्य योगेश लाकडे, वसीम शेख, प्रफुल वाडगुरे, गुरुनानक ढोरे, विकास ताजणे, दिपेश टेंभुर्णे, वाहन चालक (RRT), श्री अक्षय दांडेकर, अमोल कोरपे, वाहन चालक मनन शेख, वाहन चालक, वडसा वनविभाग वडसा यांचे सहकार्याने पार पडली


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 9, 2024

PostImage

पालकांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून


पालकांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून 

 

महाराष्ट्र शाळा: बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे लहान मुलांच्या शाळेच्या वेळेत शैक्षणिक वर्षापासून यामध्ये बदल  केला जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी केली आहे.

 

 

सकाळी मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे शाळेमध्ये काही मुले झोपतात तर काही कंटाळवाणी देखील होतात त्यामुळे मुलांचे मन शिक्षक शिकवत आहे त्याकडे देखील लागत नाही, त्यामुळे लहान मुलांच्या शाळेचा टाईम बदलणे ही पालकांसाठी एक आनंदाची व चांगली गोष्ट आहे.

 

मुलांची झोप जर पूर्ण झाली तर ते दिवसभर ऍक्टिव्ह राहतात कंटाळवाणी होत नाहीत त्यामुळे हा निर्णय अतिशय पालकाच्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील योग्य आहे.

महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी (Maharashtra Education Department) भरतात तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात माध्यमिक शाळा मधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षाच्या पुढे तर प्राथमिक शाळा मधील मुलांचे वय 03 ते 10 वर्षे असते त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात अशी सूचना देखील शिक्षण मंत्र्यांनी केलेली आहे.

 

चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलली यामुळे आता या शाळेच्या वेळामध्ये बदल होणार आहे, आता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी उशिरा भरवण्यात येणार आहे तर इतर वर्गाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे दीपक केसकर सरांनी यावेळी सांगितलेले आहे.

शाळांची वेळ बदलनार असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे, बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागातील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरा उशिरापर्यंत जागी असतात, त्यामुळे मुले ही रात्री उशिरापर्यंत जागीच असतात या कारणांनी मुलांची झोप पूर्ण होत नाही.

सध्या सकाळच्या सत्रातील शाळा 07 वाजताच्या आसपास भरत असल्यामुळे कमीत कमी ही वेळ 9.00 पर्यंत पुढे नेल्यास किमान मुलांची झोप पूर्णपणे होऊ शकते तसेच पालकांची देखील धावपळ कमी होते त्यामुळे हा जो निर्णय आहे तो अत्यंत योग्य आहे.

 

त्यामुळे शाळा ही उशिरा सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावे असे देखील राज्यपालांनी अलीकडे सुचविले होते याबाबत अंतिम निर्णय हा लवकरच घेतला जाईल असे देखील दीपक केसकर यांनी म्हटले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 8, 2024

PostImage

लोकशाहीच्या रक्षनाकरिता आगामी निवडणुकीला सामोरे जा - महेंद्र ब्राह्मणवाडे, यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन


फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल - आमदार अभिजीत वंजारी

 

लोकशाहीच्या रक्षनाकरिता आगामी निवडणुकीला सामोरे जा - महेंद्र ब्राह्मणवाडे, यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

 

चामोर्शी तालुका काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न

 

 

गडचिरोली :: ED - CBI सारख्या इतर स्वयत्त संस्थांना हाताशी घेऊन फोडाफोडीचे राजकारण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असणाऱ्याना सर्वसामान्य जनता आता धडा शिकवणार आहे. तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघ होऊन बूथ चे सूक्ष्म नियोजन करा व आपला बूथ मजबुत करण्याचा प्रयत्न करा अश्या सूचना आमदार अभिजीत वंजारी यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित बूथ पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते.

लोकशाही मूल्य संपविन्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आगामी काळात देशातील लोकशाही आबाधित ठेवायची असेल तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवणुकीलला पूर्ण ताकतीने सामोरे जाऊन काँग्रेस पक्षाची सत्ता आणावी लागेल असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जि. प्र. डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. आंनदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, LDM लताताई पेदापल्ली, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, नगराध्यक्ष जयश्रीताई वायललवार, उप नगराध्यक्ष लोमेश बुरांडे, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, बंगाली सेल अध्यक्ष बिजन सरदार, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नगरसेवक सुमेध तुरे, स्नेहाताई सातपुते, वर्षाताई भिवापूरे, माजी जि. प. सदस्य कविताताई भगत, प्रभाकर वासेकर, अनिल कोठारे, नीलकंट निखाडे, रमेश कोडापे, गुरुदेव सातपुते, हरबाजी मोरे, महिला तालुकाध्यक्ष रजनी तम्मीवार, निकेश गद्देवार, प्रफुल बारसागडे, सरपंच जोत्सना गव्हारे, गौराबाई गावडे, अरुण मडावी, विनोद मडावी, निकेश जुवारे, संदीप कोपूलवार, वसंत कोहळे, काशिनाथ चीचघरे, दिगंबर धानोरकर, मुन्ना गोंगले, अमर मगरे, उमाजी जुनघरे, अनुप शिकदर, अविनाश चलाख, तेजस कोंडावार, पंकज खोबे, नेहाल आभारे, रोशन कोहळे, लीलाधर सुरजागडे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 8, 2024

PostImage

गावकऱ्यांनी माता मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याची केली मागणी,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन


पंदेवाही येथे माता मंदिर संवरक्षण भिंत आणि सिमेंट रस्त्याचे होणार बांधकाम

गावकऱ्यांनी माता मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याची केली मागणी,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन

 

एटापल्ली:तालुक्यातील गुरुपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट पंदेवाही येथील माता मंदिर परिसरात संवरक्षण भिंत आणि सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जाणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

 

पंदेवाही येथील नागरिकांनी गावात मातामंदिर परिसरात संवरक्षण भिंत आणि मंदिराकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता बांधकाम करून देण्याची मागणी केली होती.त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

 

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोठी निधी उपलब्ध करून दिल्याने येथील संवरक्षण भिंत आणि माता मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे.नुकतेच भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते सदर दोन्ही कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून गावकऱ्यांनी ताईंचे आभार मानले.

 

भूमिपूजन प्रसंगी माजी प स सभापती बेबीताई नरोटी,येमली चे सरपंच ललिता मडावी,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,नगर पंचायतचे गट नेता जितेंद्र टिकले,लक्ष्मण नरोटी,राजू नरोटी,संभाजी हीचामी,ग्रा प सदस्य मालू पाटील,माजी प स सदस्य बालाजी आत्राम,मनोज गावडे,पोलीस पाटील वडु आत्राम, भूमिया धानु आत्राम,ज्ञानेश गावडे,विलास तलांडे,समना कोटावार,मलेश पुलगम,वनिता तलांडे आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 8, 2024

PostImage

वांगेतुरीच्या जंगलात पोलिस नक्षल चकमक,नक्षली साहित्य जप्त


वांगेतुरीच्या जंगलात पोलिस नक्षल चकमक,नक्षली साहित्य जप्त

 

गडचिरोली:- सीमावर्ती व अतिसंवेदनशील भागात नव्याने उभारणी करण्यात आलेल्या वांगेतुरी पोलिस मदत केंद्रापासून पूर्वेस सात किलोमिटर अंतरावर जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दल आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक झाली यावेळी नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. पोलिस दलानी घटनास्थळावरून नक्षली साहित्य जप्त केले. ही घटना दिनांक सात फेब्रुवारी बुधवारी घडली.

 

काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर - नारायणपूर - गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिदूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे. वांगेतुरी आणि पो.म. के. गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत

 

त्यावरून मा अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री. यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्त्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक हिदूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 19:00 वाजता जोरदार नक्षल्यांकडून गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता - पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 8, 2024

PostImage

महिलांच्या मदतीला पोलीस यंत्रणा! कॉल करा पोलीस हजर


महिलांच्या मदतीला पोलीस यंत्रणा! कॉल करा पोलीस हजर

सिंदेवाही /लाडबोरी: जिच्या हाथी पाळण्याची दोरी,तिच जगाचा उद्धार करी,आज मौजा लाडबोरी मधील महिलांनी गावा पासून अवैध दारू ला हद्दपार करायचे आणी एकही थेंब गावात येणार नाही या साठी गावात वॉर्डा वार्डात गट तयार करीत रात्रभर पहारा देत आहेत,याचं माय माहुल्या साठी आत्ता पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण सुद्धा सरसावले असून कोणत्याही वेळी व मदत करण्याचे आश्वासन दिले, व त्यानुसार कृती करत आहेत,सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या हद्दीत 90 गावे येतात या गावाच्या लोख्यसंख्येनुसार पोलीस स्टेशन मधील कर्मचारी वर्गाची संख्या कमी आहे,तरी पण दिवस रात्र आपले कर्तव्ये पूर्ण करण्यास कधीही तत्पर असतात,गावात रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग सुद्धा करत आहेत,त्या मुळे महिलांना सुद्धा अधिकच बळ मिळालं आहे,महिलांच्या व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गावात शांतता व सुवस्था सध्या तरी प्रस्थापित झाली आहे,या महिला स्वतःच्या बळावर गावाचे रक्षण करीत आहेत,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही,विशेष म्हणजे 

शासनाकडून मानधन घेऊन रात्रीच्या सुमारास पोलीस पाटलाचे कोणतेच सहकार्य या महिलांना मिळत नाही ,आत्ता पर्यंत पोलीस पाटला विषयी खूप तक्रारी शासन दरबारी झाल्या आहेत पण प्रशासनाकडून कोणतीही कारवाही न झाल्याने आत्ता पण काही होणार नाही अशी मनधारणा पोलीस पाटलाची झाली आहे, पण जर या महिला फक्त सध्या शासन स्तरावरून पोलीस पाटलावर काय करावाही होणार याची वाट बघत आहे जर प्रशासनाने वेळेत योग्य कारवाही केली नाही तर या महिला संविधानिक मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही मग कायदा व सुवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासानाची असेल असा इशारा या महिलां कडून देण्यात आला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 8, 2024

PostImage

अवैध माती उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबी सह आरोपींना वन विभागाने घेतला ताब्यात


अवैध माती उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबी सह आरोपींना वन विभागाने घेतला ताब्यात

 

               कोरची तालुक्यातील नाडेकल रस्त्यावर अवैधपणे माती व मुरूम उत्खनन करून जेसीबी या यंत्राच्या साह्याने दिनांक ७ फेब्रुवारी रोज बुधवार ला रोडवर टाकतांना वनरक्षक गडेली पी एम मगरे व क्षेत्र सहाय्यक बेडगाव एस एन राठोड यांना दिसले. यावेळी वन अधिकारी रोडावर गस्तीवर असताना कक्ष क्रमांक 457 मधील राखीव वनात अवैधपणे जेसीपी यंत्राच्या साह्याने माती व मुरूम खोदकाम करीत होते तसेच या रस्त्यालगतच्या झाडांची अवैधरित्या कत्तल केली होती. त्यामुळे दोन जेसीबी जप्त करून जेसबी मालक व प्रतिनिधी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

        दरम्यान सर्रासपणे जेसीबी ही चालू अवस्थेत असताना सदर काम कोणाचे परवानगीने चालू आहे तसेच सदर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे कागदपत्र दाखविण्याबाबत विचारपूस केली असता कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दाखवले नाही त्यामुळे या दोन्ही जेसीबी वर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) व वन संवर्धन कायदा 1980 चे उल्लंघन केल्याची दिसून आले त्यामुळे सदर कामावरील दोन जेसीबी आणि आरोपी १) लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूर, २) कलाम उल्ला हाफिज उल्ला खान (प्रतिनिधी) यांच्यावर कारवाई करून जेसीबी जप्त करून बेडगाव वनविभागाच्या कार्यालयापुढील पोलीस मदत केंद्र बेडगाव याच्या बाजूला लावण्यात आले आहे.    

           सदर कारवाई वडसा उपवनसंरक्षक धर्मवीरसाल विठ्ठल तसेच सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) मनोज कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एल एम ठाकरे व बेडगाव क्षेत्र सहाय्यक एस एन राठोड, गडेली नियत वनरक्षक पी. एम. मगरे पुढील तपास करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 8, 2024

PostImage

योगाजी कुडवे यांनी सुरू केले ठिय्या आंदोलन


योगाजी कुडवे यांनी सुरू केले ठिय्या आंदोलन 

 

भामरागड : वनविभागांतर्गत गट्टा वनपरिक्षेत्रात रस्तेबांधणीचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी गिट्टी,आणि माती इत्यादी वन विभागाच्या जागेवरून वापर केला जात आहे. याला वनविभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी स्थानिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात मुख्य वनसंरक्षक तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वनमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. कुडवे म्हणाले की, भामरागड वनविभागाच्या गट्टा वनपरिक्षेत्रांतर्गत मेढरी ते गट्टा या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खडी खोदाई सुरू झाली आहे. मेढरी, वांगेतुरी, गर्देवाडा जंगलात व रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने खोदाईचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सदरील माती, खडी रस्त्यावर टाकली जात आहे. असे असतानाही वनविभागाच्या एकाही अधिकाऱ्याने कोणतीही कारवाई न करून ठेकेदाराला मोकळीक दिली असून, त्यामुळे वनसंपत्तीला धोका निर्माण झाला आहे. जंगलात 20/25 ठिकाणी मोठमोठे खड्डे करून हजारो ब्रास खोदण्यात आले आहेत. असे असतानाही वनरक्षक, वनपाल, वन परिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक, उप वनसंरक्षक भामरागड यांनी कोणतीही कारवाई न केल्याने वनविभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

वरील मागणीबाबत सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर दिनांक ०७ फेब्रुवारी पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम, नीळकंठ संदोकार, आकाश मट्टामी, धनंजय डोईजड, रघुनाथ सिडाम, ईश्वर तिवाडे, राजू गडपायले, विलास भानारकर, आशिष नक्षीने, अरविंद देशमुख आदी उपस्थित आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 8, 2024

PostImage

अवैध रेती भरलेला ट्रक पकडला महसूल विभागाची रेती तस्करावर धडाकेबाज कारवाई


अवैध रेती भरलेला ट्रक पकडला महसूल विभागाची रेती तस्करावर धडाकेबाज कारवाई महादापेठ येथे ट्रकवर कारवाई

 

मारेगाव तालुक्यातील अवैध मार्गाने रेतीची तस्करी करीत असलेल्या ट्रकवर महादापेठ येथे महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली.असून रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मारेगाव तालुक्याला समृद्ध असा वर्धा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या वर्धा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर रेतीची तस्करी होत असते.आजपर्यँत अनेक रेती तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु रेतीची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच दि. 6/2/2024 रोज मंगळवारला रात्री 8-30 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रक वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याचे सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर होते.

 

रात्री तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेला ट्रक बोरी गदाजी ते करणवाडी मार्गाने रेती भरून येणारा हायवा (MH-36 1675) हे अवैध वाहन महादापेठ येथे पकडण्यात आले. पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला ट्रक तहसील कार्यालयात येथे जमा करण्यात आल्याची माहिती आहे. ही कार्यवाही उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव,भगत नायब तहसीलदार,रघुनाथ खंडाळकर मंडळ अधिकारी आणि विजय कनाके वाहन चालक यांनी केली.

 

परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हाणूण पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार,मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 7, 2024

PostImage

भामरागड येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार


भामरागड येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार

 

भामरागड:मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी भामरागड तालुका मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आले.

 

 कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात मनोरंजनात्मक खेळ व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. 

 

यावेळी आयोजित विविध स्पर्धां मधील विजेत्या महिलांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदी कुंकूचा वाण देण्यात आला. लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणी बक्षीस देण्यात आले. तर काही महिलांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचे नाणे आणि पैठणी देण्यात आले. विशेष म्हणजे विधवा स्त्रियांचा देखील हळदीकुंकू आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी,मुलचेरा, एटापल्ली आणि सिरोंचा नंतर भामरागड तालुक्यात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले.पाचही तालुक्यात शेकडो महिलांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती हे विशेष.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 7, 2024

PostImage

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

 

 

धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..!

Caption

 

 

 

अहेरी :- विद्यार्थ्यांनी पुस्तकाला आपला मित्र बनवुन,आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा असे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे अहेरी येथील स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

 

पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना जीवनात मोठे ध्येय संपादन करण्यासाठी कठोर मेहनत,जिद्द आणि चिकाटी असणे महत्त्वाची असते,जास्तीत-जास्त पुस्तक वाचन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि आपलं ध्येय लवकर गाठता येते असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

 

धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार अवधेशरावबाबा आत्राम,प्राचार्य अनिल भोंगळे,माजी प्राचार्य प्रमोद दोतुलवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.

 

यावेळी सर्व मान्यवराचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.स्नेहसवर्धनोत्सव निमित्ताने विविध कला,समूह नृत्य,क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूह नृत्याच सुदर सादरीकरण केल.

कार्यक्रमाचे संचालन दिनेश ठिकरे यांनी तर आभार प्रा.उरकुडे यांनी मानले.

 

यावेळी स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रमाला पालक वर्ग,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 6, 2024

PostImage

देशाची हुकूमशाही आणि आरमोरी विधानसभेची सावकारशाही संपवून सर्वसामान्यांची सत्ता प्रस्तापीत करण्यासाठी प्रयत्न करा--- महेंद्र ब्राह्मणवाडे


देशाची हुकूमशाही आणि आरमोरी विधानसभेची सावकारशाही संपवून सर्वसामान्यांची सत्ता प्रस्तापीत करण्यासाठी प्रयत्न करा--- महेंद्र ब्राह्मणवाडे

 

आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी बूथ प्रशिक्षण मेळावा संपन्न

 

गडचिरोली :: देशात वाढत चाललेल्या महागाई मुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. पेट्रोल -गँस- डिझेल सह इतरही जीवनवश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले असताना  केंद्र आणि राज्यातील हुकूमशाही भाजप सरकारला कवडीचाही फरक पडलेला नाही, तर दुसरीकडे आरमोरी विधानसभेतील सावकारशाही पुढे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधीनी आपले गुडघे टेकले असल्याने जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि युवकांच्या समस्यांविषयी  लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ओबीसीच्या हक्कासाठी काही लोक भाजपात गेले, मात्र 10 वर्षे झाला भाजप सत्तेत असतांना देखील सावकारी वृत्तीच्या लोकांनी ओबीसी च्या हक्कासाठी कुठलीही ठोस मागणी केलेली नाही, ते ओबीसी च्या नाही तर स्वतःच्या विकासाकरिता सत्ता बदल केले आणि आता सर्वसमान्य ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे, आता अश्या हकूमशाही आणि सावकारशाही वृतीच्या लोकांना धडा शिकवून सर्वसामान्य नागरिकांची सत्ता प्रस्थापित करण्याकरिता काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाता कामाला लागा अश्या सुचना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केल्या आहे.

आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित तालुकास्तरीय बूथ मेळावा व प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, LDM प्रमुख लता पेदापल्ली, प्रशिक्षक प्रणित जांभुळे, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, युवक काँग्रेस अध्यक्ष लारेन्स गेडाम, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, असंघटित कामगार सेल अध्यक्ष छगन शेडमाके, रामदास मसराम, माजी जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, NSUI जिल्हाध्यक्ष निशांत वनमाळी, मुकेश वाघाडे, शालिक पत्रे, अनिल किरमे, वृंदा गजभिये, मंगला कोवे, नीलकंट गोहने, दिगेश्वर धाइत, विश्वेश्वर दरो, रोशनी बैस, मोहन भुते, अतुल आकरे, अंकुश गाडवे, दुर्गा लोणारे, भीमराव बारसागदे, मधुकर दोनाडकर, मुन्ना चंदेल, प्रवीण राहाटे, विजय सूपारे, सूरज भोयर, विनोद बावनकर, बेबीताई सोरटे, अर्चना मडावी, राज नंदरधने, खेमराज प्रधान, नानाजी राऊत, अण्णाजि लिंगायत, राजू नैताम, अरविंद फटाले, वामन धरली, अतुल आखरे, गुड्डू हारगुडे, रवींद्र बनकर, संतोष लाकडे, योजना मेश्राम, सूरज भोयर, रुपेश जोंजलकर, साबीर शेख, आनंदराव राऊत, जावेद शेक, सह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 6, 2024

PostImage

अव्वल  कारकुन लाच घेतांना अडकला एन्टी करप्शन ब्यूरोच्या जाळ्यात


अव्वल  कारकुन लाच घेतांना अडकला एन्टी करप्शन ब्यूरोच्या जाळ्यात

 

०६/०२/२०२४ कूरखेडा:- उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथील अव्वल कारकुन श्री नागसेन प्रेमदास वैध्य वय ४६ यांनी १३०००/- हजार रुपयाची लाच नगद रक्कम स्वीकारतांना एन्टी करप्शन ब्यूरो च्या पथकाने दी.०५/०२/२०२४ ला रंगेहाथ पकडले

तकरारदार यास आदिवासी ते आदिवासी जमिन विक्री करण्याकरिता परवानगी आदेश तयार करुण दिल्याचा मोबादला म्हणून आरोपी वैद्य यांनी तक्रारदार यांच्या कड़े मागणी केली त्याला लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत विभाग गड़चिरोलि येथे भेटून तक्रार नोंदविली l पोलिस अधीक्षक श्रीमति अनामिका मिर्झापुरे ला.लू.वी. गड़चिरोलि यांच्या पर्यवेक्षनात पो.नि. श्रीधर भोसले यांनी तक्रार गोपनीय ठेवत सहानिशा करित कार्यवाही करिता सापळा कार्यवाहीचे आयोजन केले, आरोपी कारकुन ने तक्रारकर्त्यला १५०००/- रुपायाची मागणी केली असता, तक्रार कर्त्याने १३०००/- रुपये देण्याची सहमति दर्षावित व दोघांत तडजोड झाल्यावर लाचेची उप विभागीय कार्यालय येथील स्वताच्या कक्षात् रक्कम् स्वीकारतान्ना रंगे हाथ मिळून आल्याने आरोपी वैध्य त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन कूरखेडा येथे गुन्हा दाखल आला, त्या नंतर आरोपी नागसेन वैध्य यांच्या निवास स्थान वडसा येथे A.C.B च्या अधिकारी यांनी चमुकडून झड़ती घेण्यात आली, 

या सर्व प्रकरनाची कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री राहुल माकनिकर. एन्टी करप्शन ब्यूरो नागपुर, श्री सचिन कदम पोलिस अधीक्षक ला. प्र.वि. नागपुर, संजय पुरन्दरे अप्पर पोलिस अधीक्षक ला. प्र. वि. नागपुर यांचे मार्गदर्षणात व पोलिस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पदमगीरीवार, संदीप उडाल, प्रफुल डोरलिकर, लाच लुचपत प्रतिबंध विभाग गड़चिरोलि यांनी केली


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 6, 2024

PostImage

आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांचे येथील नागरिकांकडून सत्कार!!


आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांचे येथील नागरिकांकडून सत्कार!!

 

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील न्युस्टार व्हाॅलीबाॅल मंडळ देवलमरी द्वारा भव्य खुले व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले असता.या व्हाॅलीबाॅल स्पर्धे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.या कार्यक्रमा दरम्यान हणमंतू मडावी यांना नुकतेच आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने येथील नागरिक हणमंतू मडावी यांना अभिनंदन करत सत्कार केली.तसेच पुढील राजकीय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

 

त्यावेळी नागरिकांनी म्हणले की"आज पर्यंत तुम्ही सरकारी नोकरीत असून सुद्धा अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीबांना मदत केली आहे.तसेच तुम्ही या राजकीय क्षेत्रात प्रवेश केले याचा आम्हाला खूप आनंद झालं आहे.

 

यावेळी आविसं काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडलवार,देवलमरीचे माजी सरपंच पेंटूबाई पोरतेट,ग्रामपंचायत देवलमरीचे उपसरपंच हरीश गावडे,ग्रामपंचायत सदस्य विद्याताई राऊत,ग्रामपंचायत सदस्य संजूबाई आत्राम,ग्रामपंचायत सदस्य विमलाताई कुर्री,ग्रामपंचायत सदस्य महेश लेकुर,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पठाण,माजी ग्राप सरपंच गुलाबराव सोयाम,वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी,माजी ग्राप सदस्य अरूण मज्जरवार,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,नरेंद्र गर्गम, लक्ष्मण आत्राम,श्रीनिवास राऊत,संतोष परसा, सुधाकर लेकुर,शंकर आत्राम,सुधीर बामणकर,सदाशिव बामणकर,नागेश राऊत,संजय गोंडेवार,रमेश मेशिन,संदीप दुर्गे,सचिन पांचार्यासह देवलमरी परिसरातील नागरिक आविसं काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 6, 2024

PostImage

 एका विवाहितेने मध्यरात्री स्वतःला गळफास घेऊन जीवन संपविला


 एका विवाहितेने मध्यरात्री स्वतःला गळफास घेऊन जीवन संपविला

 

               कोरची येथील ग्राहक सेवा केंद्र चालकाच्या पत्नीने मध्यरात्री सांसारीक जीवनाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस झाली आहे. अर्चना रंजीत सरजारे वय ३६ वर्षे रा.कोरची असे मृतक पत्नीचे नाव आहे.

         रविवारी सायंकाळी मृतक पत्नी अर्चना, पती रंजीत सरजारे आणि त्यांची एक मुलगी न्यान्सी ५ वर्ष व मुलगा अरमान २ वर्षे हे कोरची शहरातील परिचित व्यक्तीच्या कार्यक्रमातून जेवण करून राहत असलेल्या किरायाच्या खोलीमधील घरात येऊन रात्रीला सर्व मिळून झोपले. तेव्हा मध्यरात्री पत्नी अर्चना झोपेतून उठून एक चिठ्ठीत "मी जे काही करत आहे त्याला फक्त मी जबाबदार आहे याच्यात कुणाचाही हात नाही, मी या जीवनाला कंटाळली आहे. मी गेल्यावर माझा परिवार सुखात राहील ही अपेक्षा आहे. पतीदेवला मी क्षमा मांगते मी तुम्हाला सोडून जात आहे. लेकरांना चांगलं सांभाळाल ही अपेक्षा आहे त्यांना माझी कमी वाटेल. आईचा प्रेम अधुरा राहील तो पूर्ण करून घ्याल प्लीज मला माफ कराल." असे लिहून राहत्या घरातील खोली मधल्या सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केली आहे.

         पती रंजीत झोपेतून पहाटे तीन वाजता उठल्यानंतर बघते तर काय पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने तात्काळ परिसरातील लोकांना व घरमालकाला बोलावून घटनेची माहिती दिली यावेळी दोन्ही मुलांना पकडून पती रंजीत ढसा-ढसा रडायला लागले. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली घटनेची माहिती कोरची पोलीस स्टेशन येथे देण्यात आली पहाटे पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून चौकशी सुरू केली. यानंतर मृतक पत्नीचे शव कोरची ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद करून दुपारी तीन वाजता कोचिणारा स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आले.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 6, 2024

PostImage

सर्वांसाठी घरकुल योजनेच्या धर्तीवर 'मॉ फातिमा' आवास योजना लागू करा - आबीद अली


सर्वांसाठी घरकुल योजनेच्या धर्तीवर 'मॉ फातिमा' आवास योजना लागू करा - आबीद अली

 

कोरपना :-

     'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अख्ख्या देशात साजरा होत असतानाच गेल्या जवळपास 5 दशकांपासून 'गरीबी हटाओ'चा नारा देत 1980 पासून बेघर कुटुंबाना,घरे देण्यासाठी 'इंदिरा आवास योजना,राजीव गांधी निवारा योजना' टप्पा 1 टप्पा 2, 'कोलाम वस्ती निवारा योजना' 2014 पर्यंत राबविण्यात आल्या.देशात 'सबका साथ,सबका विकास' नारा देत सर्वांसाठी घरे व योजनेची व्याप्ती वाढवीत वेगवेगळ्या घरांसाठी सामाजिक,आर्थिक,भूमिहीन भटक्या- जमातीसाठी वेगवेगळ्या योजना तयार करून,पात्र घटकांसाठी निवारा योजना तयार करून त्याचा लाभ देण्यात येत आहे.तरी मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासनाच्या इतर योजनांच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठी केंद्र व राज्याच्या निधीतून मुस्लीम समाजाच्या प्रथम शिक्षिका 'मॉ फातिमा' यांच्या नावाने आवास योजना लागू करून मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा,योजना मंजूर करावी, मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा देवून अन्याय दूर करावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस{दादा} प्रदेश सहसचिव सैय्यद आबीद अली,यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,अल्पसंख्याक कल्याणमंत्री अब्दुल सत्तार,यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

   वास्तविक पाहता मुस्लीम समाजाची शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक बाजू हलाखीची असून झोपडपट्टी वसाहतीत अत्यंत दैनीय निवारा व्यवस्था असल्याने तसेच या समाजातील अनेक कुटुंब सर्वसाधारण घटकात मोडत असल्याने यांना निवारा हक्कापासून व विकासाच्या प्रवाहातून बाहेर टाकले जात असून नाममात्र कुटुंबांना लाभ मिळत असल्याने आजही अनेक कुटुंब लाभापासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कित्येकांना हक्काचा निवारा प्राप्त झाला नसल्याची विदारक परिस्थिती असताना मायबाप सरकार केंद्र व राज्याच्या माध्यमातून अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना, कोलाम वस्ती विकास योजना,अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना,विमुक्त,भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण सामुहिक निवारा योजना,इतर मागासवर्गीय कुटुंबांसाठी मोदी आवास योजना,सर्वांसाठी निवारा योजना राबवित असतानाच राज्यात अल्पसंख्यांक मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र आवास योजना,शहरी व ग्रामीण भागासाठी लागू करण्याची मागणी गेल्या जवळपास 10 ते 15 वर्षापासून केली जात आहे.

      मात्र,शासनाकडून न्या.सच्चर समिती,डॉ. महेमूदूर रहेमान समिती,अहवालात अल्पसंख्यांक मुस्लीम समाजात सोयी-सुविधा निवारा,शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक क्षेत्रात पिछाडीवर व दैनीय अवस्थेचा आराखडा सादर करूनही मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेतला जात नाही आहे.यासाठी शासनाच्या इतर योजनांच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठी केंद्र राज्याच्या निधीतून 'मॉ फातिमा' यांच्या नावाने मुस्लीम समाजासाठी आवास योजना लागू करून मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा,योजना मंजूर करावी,मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा देवून अन्याय दूर करावा,अशी मागणी अली यांनी केली आहे.आता मायबाप सरकार मागणीला सकारात्मक प्रतिसाद देतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 6, 2024

PostImage

(बँड)वाद्य वाजवणाऱ्या शाम जिलेला टीमला मिळाला आधार, माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत


माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून सिरोंचा येथील मुलांना (बँड) या वाद्याची खरेदी करण्यासाठी केली आर्थिक मदत.

 

 

(बँड)वाद्य वाजवणाऱ्या शाम जिलेला टीमला मिळाला आधार, माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत 

 

 

सिरोंचा:- स्थानिक नगरपंचायत क्षेत्रातील शाम जिलेला यांची टीम लग्न सोहळे,स्वागत समारंभ,उद्घाटन सोहळे,रैली अशा अनेक कार्यक्रमात ढोल व ताशा (बँड) वाद्य वाजवून आपला उदरनिर्वाह चालवत असे.पण आर्थिक अडचणी मुळे यांच्या समोर नवीन ढोल व ताशा (बँड) हे वाद्य विकत घेण्यासाठी प्रश्न निर्माण ? झाला,त्यामुळे शाम जिलेला यांच्या टीमच्या हाताला काम नसल्याने त्यामुळे ते सर्व चिंतेत होते.

 

स्थानिक कार्यकर्ते यांनी ही माहिती अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज आत्राम यांना लक्षात आणून दिली.त्यावेळी राजे साहेबांनी स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून *65000/-(पासष्ट हजार* *रुपये)* किंमतीचे ढोल व ताशा (बँड) हे वाद्य खरेदी करून शाम जिलेला यांच्या संपूर्ण टीमला दिली.यामुळे शाम जिलेला यांच्या टीमला अनेक कार्यक्रमात ढोल व ताशा (बँड) ही वाद्य वाजवून आपली रोजंदारी मिळवण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आधार मिळाला.

शाम जिलेला टीमने यावेळी राजे साहेबांचे हृदयातून आभार मानले..!

 

त्यांचा ढोल व ताशा (बँड) वाद्य वाजविण्याची कला बघून यावेळी राजे साहेबांनी आनंद व्यक्त केला.

 

त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शाम जिलेला यांच्या टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते..!!


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 5, 2024

PostImage

शेकडो कार्यकर्त्यांचा ईव्हीएम विरोधात उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकला!


शेकडो कार्यकर्त्यांचा ईव्हीएम विरोधात उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकला!

 

येत्या सर्व निवडणूका निष्पक्ष होण्यासाठी बॅलेट पेपरने घेण्याची मागणी,अन्यथा ईव्हीएम मशिन फोडणार

 

आंदोलन कार्यकर्त्यांचा निवेदनातून निवडणूक आयोगाला इशारा

 

देसाईगंज-

     देशात पार पाडल्या जात असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत होत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आढळून येत असुन याबाबत निवडणूक आयोगाकडे सबळ पुराव्यासह तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने विशिष्ट एका पक्षाला लाभ पोहचत आहे. यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून नागरीकांचे मुलभूत अधिकार हिरावले जात आहेत.ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेता येत्या सर्व निवडणूका निष्पक्ष होण्यासाठी बॅलेट पेपर घेण्याच्या मागणीला घेऊन देसाईगंज तालुक्यातील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जनआक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.दरम्यान या गंभीर बाबीची निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास ईव्हीएम मशिन फोडण्याचा इशारा ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीच्या वतीने देसाईगंज उपविभागीय कार्यालया मार्फत केन्द्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आला.

       देसाईगंज शहराच्या फव्वारा चौकातुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून हा धडक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.यात देसाईगंज तालुक्यातील ओबीसी समाज संघटना, शिवसेना(उबाठा),समाजवादी पार्टी,गोटुल भुमी राणी दुर्गावती महिला मंडळ, समता सैनिक दल,मुस्लिम एकता, आर्यसत्य बौद्ध विहार,मिलिंद बौद्ध विहार,बौद्ध समाज कोअर कमिटी,भारत मुक्ती मोर्चा,आदिवासी विद्यार्थी संघाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

     दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केन्द्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ च्या ईव्हीएमने निवडणूका घेण्यासंदर्भात स्पष्ट निकाल दिला असुन ईलेक्ट्रानीक व्होटिंग मशिनने पारदर्श निवडणूका पार पाडल्या जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. असे असतांनाही घेण्यात आलेल्या निवडणूकांत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत कुठेच जुळवाजुळव होत नसताना निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन अद्यापही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.यावरून देशात एका विशिष्ट पक्षाला निवडुन आणण्यासाठी षडयंत्र रचले जात असुन यामुळे देशातील नागरीकांचे संविधानीक अधिकार धोक्यात आले आहेत.एवढेच नव्हे तर ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत सत्ताधारी भाजपाच्या चार अधिकाऱ्यांचे नाव आढळून आल्याने हेतुपुरस्सर सत्तेसाठी ईव्हीएमचा वापर होत असल्याचे चव्हाटय़ावर येऊ लागले आहे.ही अतिशय गंभीर बाब असल्याने निवडणूक आयोगाने जनभावना लक्षात घेता ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने निवडणूका घ्याव्यात,अन्यथा ईव्हीएम मशिन फोडण्याचा ईशारा जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

      मोर्चाचे नेतृत्व ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचे अध्यक्ष पिंकु बावणे व सचिव सागर वाढई यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम,छगन शेडमाके,इलास खान सुरेंद्र चंदेल,अविनाश गेडाम,कैलास वानखेडे,नंदु नरोटे,सुभोध मेश्राम मनोहर निमजे, ,नंदु चावला,पवन गेडाम,प्रदिप लाडे,साजन मेश्राम,जावेद शेख,आरिफभाई शेख,सुमेध मेश्राम,संतोष बहादुरे,आशिष घुटके, दिपक मेश्राम,धनंजय बांडे,प्रविण रामटेके,विजय पिल्लेवान,अनिल मडावी,दुष्यांत वाटगुरे,भिमराव नगराळे,कैलास वानखेडे,शंकर बेद्रे,दिपक मेश्राम, नरेश लिंगायत,शमा खान, मोहित अत्रे,रजनी आत्राम,पुजा ढवळे,मंदा उईके,मिना कोडापे आदी विविध पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जनआक्रोश मोर्चात सहभाग झाले होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 5, 2024

PostImage

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याकरिता मेरा बूथ सबसे मजबुत अभियान राबवा; महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना


आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याकरिता मेरा बूथ सबसे मजबुत अभियान राबवा; महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

 

गडचिरोली तालुका काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न

 

गडचिरोली :: आगामी लोकसभा निवडनुक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची आहे, धनशक्तीला हरवून जनशक्तीची ताकत दाखवून देण्याकरिता "मेरा बुत सबसे मजबूत अभियान राबवा",  अश्या सूचना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. भाजप सरकारणे मागील दहा वर्षांपासून शेतकरी, महिला, युवकासह समाजातील प्रत्येक घटकाचा शोषण करण्याचा काम केला आहे, समाजा- समाजात तेढ निर्माण करून ओबीसी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर असा संघर्ष लावून ठेवलेला आहे, अश्या या भाजप सरकारचा समाजघातक चेहरा जनेतेसमोर आणा अश्याही सुचना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित तालुकास्तरीय बूथ मेळावा व प्रशिक्षण शिबिरा निमित्त ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जि. प्र. डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, बूथ प्रशिक्षक डॉ. प्रणितकुमार जांभुळे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, शँकरराव सालोटकर, रजनीकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, नेताजी गावतुरे, रमेश चौधरी, रुपेश टिकले, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, श्रीकांत कथोटे, रामभाऊ ननावरे, दिवाकर निसार, दत्तात्र्यय खरवडे, भारत येरमे, प्रशांत कोराम, मनोहर नवघडे, चोखाजी भांडेकर, राकेश रत्नावार, राजाराम ठाकरे, योगेंद्र झंजाळ, राजाभाऊ कुकडकर, भैय्याजी कत्रोजवार,प्रतिक बारसिंगे, श्रीनिवास ताटपल्लीवार, शिवाजी नरोटे, सुभाष धाईत, बंडोपंत चिटमलवार, निकेश कामीडवार, चारुदत्त पोहने, पुष्पलता कुमरे, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, पौर्णिमा भडके, नीलिमा मडके,लता मुरकुटे, आशा मेश्राम, रोहिणी मसराम, दर्शना लोणारे, दर्शना मेश्राम, मालता पुडो, सुनीता रायपुरे, लीनाताई उंदीरवाडे, वर्षा गुलदेवकर, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 4, 2024

PostImage

स्वराज्य फाउंडेशन जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा केला सत्कार


स्वराज्य फाउंडेशन जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा केला सत्कार

 

आलापल्ली:-

महाराष्ट्रातील गडचिरोली या शहरात नुकत्याच झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील खेळाडू चमकले.

स्वराज्य फाउंडेशन अल्लापल्लीचे सदस्य रुपेशभाऊ श्रीरामवार , दशरथभाऊ, त्रिशूल डांगरे मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. निकिता मडावी (5 km) प्रथम क्रमांक पटकावला व तसेच अंकिता मडावी (5km) द्वितीय क्रमांक पटकावला.

आलापल्ली गावातील खेळाडू उत्तम कामगिरी करून गावाचे नाव जिल्हास्तरावर नेले म्हणून स्वराज्य फाउंडेशन तर्फे सगळ्या खेळाडू व प्रशिक्षक यांचे सत्कार करण्यात आले.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 4, 2024

PostImage

सुरजागडच्या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले तिघांचा जागीच मृत्यू


सुरजागडच्या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले तिघांचा जागीच मृत्यू

 

 आकसापुर मार्गावरील घटना

 

 

 

दोन दुचाकी गोंडपिपरी मार्गे चंद्रपूरला जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूर वरून सुरजागडला लोह खनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींना जबर धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि (४) रविवारी दुपारी बारा वाजता दरम्यान घडली आहे.

 

 

अहेरी चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र लोह खनिजाच्या कच्चा मालाची वाहतूक सुरू आहे. याआधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना अपंगत्व आले.  

अहेरी-चंद्रपुर राष्ट्रीय मार्गावरील

 आक्सापूर येथील मंदिरासमोर MH 33 K 6739,MH 34 AG 3224 या दोन दुचाकींना आज रविवारला दुपारच्या सुमारास हायवाने जबर धडक दिली.दरण्यांन दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अन्य एका दुचाकीला जबर धडक बसली यात एकाच गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली.घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 अपघाती हायवा वाहनाचा क्रमांक एम एच 40 सी एम 3233 असून 

शैलेंद्र कालिप्तराय वय 63 वर्ष रा.विजनगर मुलचेरा, जी.गडचिरोली,अमृतोष सुनील सरकार 34 कालीनगर,

मनोज निर्मल सरदार 43 विजयनगर असे मृतकाची नावे आहेत. मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी बल्लारशाह येथील रुग्णालयात नेण्यात आले असून 

पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहे.

 घटना घडताच हायवा चालकानी घटनास्थळावरून पोबारा केला असून पोलिसाकडून चालकाचा शोध सुरू आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 3, 2024

PostImage

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या कोणत्या क्षेत्राला काय मिळाले?


अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या कोणत्या क्षेत्राला काय मिळाले?

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  गुरुवारी संसदेत मोदी सरकारच्या  दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिले होते. त्यामुळे नेमके या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला काय मिळाले ते जाणून घेऊयात.

   
यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने कृषी क्षेत्रावर भर टाकल्याचे दिसून आले. या अर्थसंकल्पात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी केली आहे. पीएम किसान योजनेतून ११.८ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामण यांनी दिली. तर ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आले असून ३९० कृषी विद्यापीठं सरकारने सुरु केल्याचे सीतारमण म्हणाल्या. याशिवाय तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असून सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामण यांनी केली. तसेच मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेसाठी देखील यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली असून तीन नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जाणार असल्याचे सीतारामण यांनी म्हटले. हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील. या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. यामुळे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल आणि गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल. यासाठी ४० हजार सामान्य रेल्वे बोगी वंदे भारत मानकात रूपांतरित केल्या जातील. तर २०२३ च्या एकूण ४५ लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रेल्वेचा वाटा २.४ लाख कोटी रुपये होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद सातत्याने वाढली आहे.

तर महिलांसाठी देखील अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली असून लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सीतारमण म्हणाल्या की, आतापर्यंत देशातील १ कोटी महिलांना 'लखपती दीदी योजने'चा लाभ मिळाला आहे. सुरुवातीला २ कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते आता 3 कोटी करण्यात आले आहे. या योजनेत अशा महिलांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत महिला बचत गटांना एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग, ड्रोन दुरुस्ती आदी तांत्रिक कामे शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले जाणार आहे.


तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी लसीकरण करण्यात आले आहे. तर मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जाणार असून, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तर ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण केले जाणार आहे. तसेच आशा सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासोबतच तेलबियांवरील संशोधनाला चालना मिळणार असून दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात देखील यंदाच्या अर्थसंकल्पात मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये तीन हजार नव्या आयटीआयची स्थापन करण्यात येणार आहे, स्किल इंडिया अंतर्गत १.८ कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ५४ लाख उमेदवारांना को री- स्किल आणि अप स्किल करण्यात आले आहे. देशात १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. यासोबतच उच्च शिक्षण क्षेत्रासाठी सात आयआयआयटी, सात आययआयएम, १६ एम्स आणि ३९० विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार आहे.शिक्षण क्षेत्रासाठी यावर्षी १,१२,८९८.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच अर्थसंकल्पात कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात आला असून कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या कररचनेत सात लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ, रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या २.४ टक्क्यांनी वाढली. यासोबतच मोदी सरकारकडून संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण बजेट ११.१ टक्कांनी वाढवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संरक्षण बजेट ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपये झाला आहे. जो जीडीपीच्या ३.४ टक्के असेल. सरकारने संरक्षण बजेटसाठी ६.२ लाख कोटी रुपये दिले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत तो ०.२७ लाख कोटी जास्त आहे. सरकारने मागच्या वर्षी संऱक्षण क्षेत्रासाठी ५.९३ लाख कोटी रुपये दिले होते. २०२४-२५ च्या एकूण बजेटपैकी ८ टक्के संरक्षण क्षेत्रावर खर्च करण्यात आला आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 3, 2024

PostImage

अवैध दारू विक्री च्या विरोधात महिलांनी कसली कंबर!


अवैध दारू विक्री च्या विरोधात महिलांनी कसली कंबर! 

 

सिंदेवाही /लाडबोरी:सिंदेवाही तालुक्यातील मौजा लाडबोरी मधील महिलांनी अवैध दारू विक्री च्या विरोधात कंबर कसली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना इशारा दिला आहे,गावातील संपूर्ण महिला एकजूट पणाने रणरागिणी बनून अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्या साठी सज्ज झाल्या आहेत,या साठी मा.तहसीलदार संदीप पामनंद व मान.पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांना निवेदन देत सहकार्य करण्याची विनंती केली आहे,महिलां च्या 

 भूमिकेला ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांनी पाठिंबा दिला आहे, गावातील महिलांनी वॉर्ड वार्डात समिती तयार केल्या असून सकाळी 5 वाजता पासून पहारा देत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 3, 2024

PostImage

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पती व सासु-सासऱ्याला अटक


सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पती व सासु-सासऱ्याला अटक

 

पिंपरी : नवीन फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहुन पैसे आणाण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. सासरच्या छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सांगवी पोलिसांनी पती व सासु-सासऱ्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पिंपळे निलख येथील पंचशिलनगर येथे घडली. 

 

गायत्री किरण माने (वय-26 रा. मुद्रा हाईट्स, पंचशिलनगर, पिंपळे निलख) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत गायत्री यांचे वडिल खंडु उत्तम जाधव (वय-49 रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सासु, सासरे परशुराम दिनकर माने, पती किरण परशुराम माने, नणंद यांच्यावर आयपीसी 306, 498 (अ), 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती, सास-सासऱ्याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 26 वर्षीय मुलीचे आरोपी किरण याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन गायत्री हिने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख आणावेत यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित केले. तसेच तिला क्रुरपणे व हिनतेची वागणूक दिली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गुरुवारी (दि.1) राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासु-सासऱ्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 3, 2024

PostImage

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या 

 

 

गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने ३० जानेवारीला जारी केले. यात नक्षलप्रभावित गडचिरोलीमधील १० अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या जागी नवे अधिकारी येणार आहेत.

 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वजिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती मागवली होती. यानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी १३० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

 

गडचिरोली पोलिस दलात कार्यरत पोलिस निरीक्षक संदीप पाटील, अमोल फडतारे यांची पिंपरी चिंचवड, प्रमोद बनबळे, अरविंदकुमार कतलाम यांची वर्धा, कपिल गेडाम राज्य गुप्त वार्ता विभाग, कुमारसिंग राठोड छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), कुंदन गावडे सोलापूर शहर, संदीप मंडलिक नाशिक, श्याम गव्हाणे चंद्रपूर तसेच वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.

 

रिक्त झालेल्या १० अधिकाऱ्यांच्या जागी नवे १० अधिकारी येणार आहेत. नागपूर शहर येथील अनिरुद्ध पुरी, विशाल काळे, रवींद्र नाईकवाड, विनोद रहांगडळे, विश्वास पुल्लारवार, छत्रपती संभाजीनगर शहर येथील चंद्रकांत सलगरकर, सोलापूर शहरचे विनोद वाबळे, अजय जगताप, पिंपरी चिंचवड येथील दशरथ वाघमोडे, ठाणे शहरचे अतुल लंबे यांना गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 3, 2024

PostImage

भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार,चालक वाहन घेऊन पसार


भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार,चालक वाहन घेऊन पसार 

 

चामोर्शी - दिनांक ३/२/२०२४ आष्टी आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत 60 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.

 

महादेव मडावी वय 60 वर्ष रा. चौडमपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृत ईसमाचे नाव आहे.

 

शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास आष्टीकडून आलापल्ली कडे जाणाऱ्या पिक अप वाहनाने चौडमपल्ली येथे पायी रस्त्याने जात असलेल्या महादेव मडावी यांना जबर धडक दिली. यात महादेव मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पिक अप चालक वाहन घेऊन पसार झाला असून घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी पोहोचले. व मृतकाला शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 2, 2024

PostImage

फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या नादात ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू


 

आरमोरी:- शेतीकाम करण्यास जात असलेला ट्रॅक्टर शेतात चिखलात फसल्याने, फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या नादात ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात घडली. सूरेश दुधराम लठ्ठे (वय ५० वर्षे) रा. ठाणेगाव असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळी जात पोलिसांना घटनेची माहिती दिली. या माहितीवरून आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल होत इंजिनखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला शशविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला.घटनेचा अधिक तपास आरमोरी पोलीस करीत आहेत

 प्राप्त माहितीनुसार मृतक सुरेश लठ्ठे हा दुपारच्या सुमारास ठाणेगाव शेतशिवारातील शेतीकाम करण्यासाठी जात होता दरम्यान ऋषिजी नैताम रा. ठानेगाव यांच्या शेतात अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर फसला. त्यावेळी मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरखाली चिखलात दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 2, 2024

PostImage

महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन


महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन

 

आरमोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांचा अभूतपूर्व सन्मान मेळावा संपन्न

 

*आरमोरी:-* पूर्वीच्या काळाप्रमाणे आता आधुनिक युगात महिला ही चूल आणि मूल या पुरती मर्यादित न राहता महिलांनी शासनाच्या विविध महिलांच्या योजनेचा उपयोग करून सामाजिक व आर्थिक क्षेत्रात महिलांनी आपली प्रगती साधावी व सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केमिस्ट्री भवन येथे महिलांचा सन्मान मेळावा १ फेब्रुवारी २०२५४ रोजी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख किशोर तलमले, माजी प्रदेश संघटन सचिव युनिस शेख, गडचिरोलीच्या युवती शहराध्यक्ष श्रेया कोष्टी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, आरमोरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अमिन लालानी कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, आरमोरी महिला तालुका अध्यक्षा वृषाली भोयर, महिला शहर अध्यक्ष संगीता मेश्राम, सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष दीपक बैस, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष देवानंद बोरकर, वडसा तालुका अध्यक्ष संजय साळवे, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

 

मेळाव्याला मार्गदर्शन करतांना राजे धर्मराव बाबा आत्राम पुढे म्हणाले, महिलाचे सशक्ति करण्याचा शुभारंभ खास महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यातून म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आला आहे. महायुतीचे सरकार यांनी हा महिलांचा सन्मान करण्याचा मेळावा सुरू केला. या माध्यमातून महिलांचे विविध योजना त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करणे त्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना व मदतीस यांना आता स्मार्टफोन म्हणजे मोबाईल वाटपाचे धोरण सुद्धा हाती घेतलेले आहेत. महिलांच्या योजनांसाठी पुढील काळात आपण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे मेळावे तयार करणार असून महिलांना सर्वतोपरी आरक्षण देण्याचे कार्य आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केलेले आहे महिलांसाठी विविध योजना त्यांनी सुरुवात केलेल्या असून आत्ताच नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेला आहे आजपर्यंतच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा हा आरमोरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा अभूतपूर्व महिला मेळावा झालेला असल्याचे राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या महिलांसाठी मेळावा जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देण्यात येईल सर्व महिलांना घरघर पाणी व्यवस्था कशी करण्यात येईल लखपती योजना ही दोन कोटी वरून तीन कोटी पर्यंत सरकारने केलेले आहेत तसेच जिल्ह्यात अतिक्रमण धारकांना वनपट्टे देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले कार्यक्रमाला मार्गदर्शन नानाभाऊ नाकाडे यांनी केले त्यावेळी त्यांनी शासनाच्या महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

 

कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष सुनील नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक वृषाली भोयर महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष प्रदीप हजारे यांनी मानले या मेळाव्यात प्रामुख्याने अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये पौर्णिमा राचमलवार, मंगला हजारे, देवका दुमाने, सारिका बांबोळे तसेच राकेश बेहेरे व्सराफा असोसिएशनचे सदस्य यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

 

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी हेमराज प्रधान, राजू आकरे, सुरेंद्र बावणकर, योगाजी थोराक, नरेश ढोरे, प्रफुल राचमलवार, सुनील ढोरे, रवींद्र दुमाने, गणेश मंगरे, उदाराम दिघोरे, अनिल अलबनकर, उज्वला मंगरे, जयश्री भोयर, उर्मिला हर्षे, नलू आत्राम, गायत्री भोयर, अरुणा भोयर, कोकिळा गरफडे, मंजुषा हूड, इंदिरा हूड, गीता सपाटे, सारिका बांबोळे, डिम्पल बांबोळे, प्रमिला भोयर यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 2, 2024

PostImage

सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम --  माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांचे प्रतिपादन ,  सांस्कृतिक कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी व पालकांचा झाला सत्कार


सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम --  माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांचे प्रतिपादन ,  सांस्कृतिक कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी व पालकांचा झाला सत्कार :

राजे धर्मराव हायस्कूल चा उपक्रम  

आष्टी (प्रतिनिधी) प्रतिकूल परिस्थितीत शाळेचा विकास घडवून शाळेला नावलौकिक प्राप्त झाला .स्नेहसंमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्हावा.शाळा हे सुसंकृत पिढी घडविण्याचे माध्यम आहे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांनी केले.                                    राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.      अध्यक्षस्थानी आष्टी च्या सरपंच बेबी बुरांडे या होत्या तर
 तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य अर्जुन दाते ,सेवानिवृत्त प्राचार्य महादेव उरकुडे ,माजी पोलीस पाटील शंकर मारशेट्टीवार , माजी उपसरपंच सुंदरदास उंदिरवाडे , प्राचार्य एन.एस.बोरकुटे , मुख्याध्यापक केशव खेवले , प्राचार्य डी.डी.रॉय  , प्रभारी प्राचार्य रमण पडिशालवार , गोसावी गोंगले आदी उपस्थित होते.  
सुरवातीला धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज ,स्व.राजे सत्यवानराव महाराज , माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
पुढे बोलतांना प्राचार्य दोंतुलवार म्हणाले या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर , इंजिनिअर झाले आहेत.विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन यश प्राप्त करावे.        

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी प्राचार्य दाते म्हणाले नागरिकांनी इंग्रजी शाळेच्या मागे न लागता मराठी शाळेतूनच मुलांना शिक्षण द्यावे .या शाळेतील बरेच विद्यार्थी उच्च पदावर पोहचले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी प्राचार्य उरकुडे म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेऊन चांगला विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा. सांस्कृतिक कार्यक्रमात आपली छाप उमटवून  व शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर पोहचून शाळेचा  नावलौकिक करावे. 
याप्रसंगी वर्षभर शाळेमध्ये राबविलेल्या स्पर्धेतील  वाचन स्पर्धा , वर्ग सजावट , भाषण स्पर्धा , निबंध स्पर्धा , प्रश्नमंजुषा स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , आदर्श वर्ग स्पर्धा , आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.डी.रॉय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिता नलोडे व प्रा.नारायण सालूरकर यांनी केले 
तर आभार प्रदर्शन सुधीर फरकाडे यांनी केले.
कार्यक्रमाला पालक ,गावातील नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बॉक्स -- यांचा झाला सत्कार          

 सेवानिवृत्त कर्मचारी --पर्यवेक्षक अरुण नागुलवार ,  शिक्षक कृष्णाजी पारखी , शिक्षिका छाया नागुलवार , शिक्षक बाबुराव कत्रोजवार , किशोर गोविंदवार , शिक्षक मंडल , लिपिक बंडोपंत मलेलवार , लिपिक गेडाम , शिपाई बंडोपंत अमलपुरीवार


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 1, 2024

PostImage

राजुरा पोलीसांची मोठी कारवाई,गोवंश वाहतूक करणारा ट्रक जप्त 


राजुरा पोलीसांची मोठी कारवाई,गोवंश वाहतूक करणारा ट्रक जप्त 

  दिनांक 31/01/2024 रोजी 03.00 वा. एका ट्रक मधून रात्री अवैध गोवंश वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली असता सापळा रचून संशयित ट्रकचा पाठलाग करून गौरव पेट्रोलपंप कापनगावजवळ थांबवून ट्रक क्र.MH-40-Y-0696 ची झडती घेतली असता त्यामध्ये 57 गोवंश जनावरे क्रूरपणे ट्रक मधे बांधलेले दिसून आले.

आरोपी ट्रक सोडून पडून गेलेत.

मिळून आलेले 57 जनावरे की 6 लाख ज व दहा चाकी ट्रक किंमत 10 लाख रु असा एकूण 16,00,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींवर संबंधित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक सा. रविंद् परदेशी. अप्पर पोलीस अधिक्षक सा. रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सा. दिपक साखरे, राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सा.योगेश पारधी यांचे मार्गदर्शनात ओमप्रकाश गेडाम पोलीस उपनिरीक्षक, पो.ना.संपत्ती बंडी, आकाश पिपरे, दिनेश देव्हाडे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन राजुरा जि.चंद्रपुर


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 1, 2024

PostImage

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते 


 

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते 

 

गडचिरोली : येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे.

३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून शेती उत्पादनाला हमीभाव, शिक्षण, नोकरी, रोजगार यासह ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी पायाभूत सुविधांसाठी तोकडी तरतूद करुन गरिबांना गरीब करणारा अर्थसंकल्प मांडला गेला असून या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनतेसाठी अत्यंत निराशाजनक आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 1, 2024

PostImage

खोटे आश्वासन दाखविणारा अर्थसंकल्प -- डॉ. नामदेव किरसान


खोटे आश्वासन दाखविणारा अर्थसंकल्प -- डॉ. नामदेव किरसान

 

केंद्र सरकारने मागील 10 वर्षाच्या कारकिर्दीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत, नागरिकांचे उत्पन्न वाढवले नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. जनतेच्या उत्पन्नात फक्त 1% वाढ झाली. महागाई - बेरोजगारी कमी झाली नाही. या अर्थसंकल्पाने कमी होईल असेही आता वाटतं नाही, अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईस आलेली आहे, श्रीमंताच्या व पुंजीपतीच्या उत्पन्नात वाढ झाली. त्याआधारावर देशाची अर्थव्यवस्था गणली जात असेल तर ते धोकादायक आहे.

सरकार वास्तविकता लपवून अर्थव्यवस्था बळकट असल्याचे व ती आणखी बळकट होण्याचे स्वप्न दाखवीत आहे. एकंदरीत बजेट वास्तविकतेला धरून नाही.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 1, 2024

PostImage

शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प --- महेंद्र ब्राह्मणवाडे


शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प --- महेंद्र ब्राह्मणवाडे

 

गडचिरोली :: केंद्र सरकारने आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला हा अर्थसंकल्प असून, यातून सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसण्याचा काम करण्यात आलेला आहे. 2047 च्या विकासाचा स्वप्न दाखविल्या जात आहे, मात्र वर्तमानातील सम्यावर दुर्लक्ष केल्या जात आहे. सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांना शासनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोळ झाला आहे, यातून कुठलाही मोठा फायदा मिळणार नसून ही फक्त आकड्यांची दिशाभूल आहे. रोजगार निर्मिती होईल म्हुणुन फक्त घोषणा केल्या जात आहे मात्र आतापर्यंत किती रोजगार दिले सांगितल्या जात नाही. एकीकडे अर्थमंत्री ग्रामीण भागातील नागरीकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे स्वतः च 80 करोड नागरीकांना अन्नधान्य पुरवत असल्याचे सांगत आहे. यावरुन केंद्र सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर येत आहे. भविष्यात आवास योजना अस्तित्वात आणू हे सांगून गरीब नागरिकांना गाजर दाखवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या अर्थसंकल्पनातून अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतःची व सरकारची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 1, 2024

PostImage

वळणावर ट्रॅकटर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात बापलेक ठार


वळणावर ट्रॅकटर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात बापलेक ठार 

एटापल्ली : 

 स्वतःच्या गावावरुन दुचाकीवर एटापल्ली येथे कामानिमित्त येत असताना बापलेकीचा ट्रॅकटरच्या दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

 सदर घटना एटापल्ली गटा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी

11 वाजताच्या दरम्यान घडली.

अपघातात राजू झुरु आत्राम वय 49 व करिश्मा आत्राम वय 20 मुक्काम देवपहाडी असे आहे.

अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकीस्वराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला.व दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गँभीर जखमी झाली.तिला गडचिरोली येथील रुग्णालयात नेत असतांना ती वाटेतच मरण पावली.सदर ट्रॅकटर ही सिमेंट व लोखंडी पोल घेऊन एटापल्ली वरून गटा मार्गे जात होती.दोन्ही वाहनांची महादेव मंदिराच्या वळणावर धडक झाली


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 1, 2024

PostImage

विद्यार्थी शिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात आपलं नाव मोठं करून आपलं भविष्य उज्वल करू शकतो-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


विद्यार्थी शिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात आपलं नाव मोठं करून आपलं भविष्य उज्वल करू शकतो-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.

 

मन्नेराजाराम येथे पालक मेळावा तथा वार्षिक स्नेह संमेलन संपन्न..!

 

*भामरागड* :-विद्यार्थी शिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात आपलं नाव मोठं करून आपलं भविष्य उज्वल करू शकतो माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळेत पालक मेळावा तथा वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करत राजे साहेबांचे स्वागत केले.

 

पुढे बोलतांना ते म्हणाले पालकांनी मुलांना घरच्या कामात न लावता शाळेत पाठवलं पाहिजे.मुलं शाळेत येईल तेव्हाच ते आपलं भविष्य घडवेल आणि स्वतःच नाव व गावाचं नाव मोठं करू शकेल.विद्यार्थ्यांना तसेच पालकांना कोणतीही समस्या असतील तर मला भेटू शकता,मी सदैव तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहो.आपल्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी स्व.श्रीमंत राजे विश्र्वेश्वरराव महाराजांनी अतीदुर्गम भागात निवासी आश्रम शाळेची स्थापना केली आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

 

तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,गणवेश आणि क्रीडा साहित्य व बक्षीस यावेळी राजे साहेबांच्या हस्ते देण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते अवधेशराव आत्राम,सरपंच ग्रापंचायत मन्नेराजाराम कु.शारदाताई कोरेत,उपसरपंच कू.मनीषा मडावी,माजी जी.प.सदस्य.सौ. शारदाताई येगोलपवार,सामाजिक कार्यकर्ते सितारामजी मडावी जिंजगाव,माजी सरपंच पोच्याजी मडावी,पोलिस पाटील कृष्णा सिडाम,बाजीराव मडावी गोरणुर,मल्लेश मडावी पो.पा.गोरनुर, तसेच 20 ते 25 गावातील पालक वर्ग व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!


PostImage

Gadchiroli Varta News

Feb. 1, 2024

PostImage

हैदराबाद मध्ये चमकले उप्परवाही शाळेचे विद्यार्थी


हैदराबाद मध्ये चमकले उप्परवाही शाळेचे विद्यार्थी.

(कराटे स्पर्धेत घवघवीत यश,अंबुजा फाउंडेशनचे सहकार्य.!)

गडचांदूर:-

     अंबुजा सिमेंट फाउंडेशन विद्यार्थ्यांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असताना नुकतेच 'हैद्राबाद' येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत 'अंबुजा सिमेंट फाउंडेशन' यांच्या सहकार्याने 'जी.प.उच्च प्राथ.शाळा उप्परवाही' येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

    मागील 3 महिन्यापासून उप्परवाही येथील विद्यार्थ्यांना अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या वतीने 'प्रशिक्षक प्रवीण मंगरूळकर' यांच्या माध्यमातून 'मोफत कराटे मार्गदर्शन' देण्यात आले.दरम्यान विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,बेल्ट व ड्रेस देत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.हैद्राबाद येथे नुकतेच दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन 'वर्ल्ड नाकायामा शुटोकॉन' या संस्थेमार्फत करण्यात आले होते.सदर स्पर्धेत 15 राज्याचे एकूण 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये उप्परवाहीतील 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत,एक विद्यार्थी सुवर्ण पदक,5 रौप्य पदक,तर 7 विद्यार्थ्यांनी कांस्यपदक जिंकून यश प्राप्त केले आहे.

   विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, अंबुजा सिमेंट फाउंडेशन विभागीय व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे,कार्यक्रम समन्वयक सरोज अंबागडे,शा.व्य.समिती अध्यक्ष अशोक तलांडे,मुख्याध्यापक विनोद बेले,क्रीडा शिक्षक उमेश आडे,गिरिधर पानघाटे,कराटे प्रशिक्षक प्रवीण मंगरूळकर, चैताली कन्नाके,अनिकेत दुर्गे यांना दिले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 31, 2024

PostImage

आष्टी पोलीस ठाण्यातील धडाकेबाज पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली


आष्टी पोलीस ठाण्यातील धडाकेबाज पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली 

 

अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करणारे यशस्वी ठाणेदार म्हणून विशेष ओळख.

 

 

चामोर्शी : आष्टी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार कुंदन गावडे यांचा ठरलेला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करीत सोलापूर येथे बदली झाली आहे. गेल्या दोन महिन्याभरापासून बदलीची चर्चा सुरु होती. 

दि. ३० जानेवारी रोजी मंगळवारी या संदर्भातील आदेश आले आणि कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली करण्यात आली.

आष्टी पोलीस ठाण्यात धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती गेल्या दोन वर्षापूर्वी आष्टी ठाण्यात आलेले पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आष्टी परिसरात अत्यंत कुशल आणि बंधुभाव जोपासत वचक बसविला. पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आष्टी ठाण्याचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने हाताळला. तपास यंत्रणा कार्यक्षम ठेवत गुन्हे आटोक्यात आणले. त्या प्रमाणेच घडलेल्या अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले. हत्या, चोरी आणि अन्य गुन्ह्यातील आरोपींना शिताफीने ताब्यात घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. अनेक मोठ मोठ्या गुन्हातील आरोपींचा मुसक्या दाबल्या . ठाणेदार कुंदन गावडे यांनी वेळोवेळी तपास कौशल्य दाखवून "गुन्ह्यांना माफी नाही" हे देखिल सिद्ध करून दाखविले.

 

आष्टी ठाण्यात विविध समाजाच्या बैठका घेऊन सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली.गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करीत सामान्य माणसाला जवळ करून त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी बाळगली. प्रत्येक घटकसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. कार्यकाळ खरच वाखाणण्याजोगा असून ज्या दिवशी पासून आष्टी येथे सेवेवर रूजू झाले तेव्हापासून आष्टी हद्दीत आमुलाग्र बदल घडून आला होता, सर्व सामुदायिक कार्यक्रम असो सांकृतिक असो, कायदेविषयक शिबीर असो त्यांचा मोलाचा सहभाग असायचा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर त्यांचा जबरदस्त दरारा होता, त्यांच्या कारकिर्दीत त्यांचा चमूनेही चांगले प्रकारे कामगिरी केली. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी समान वागणूक देवून कधीच, भेदभाव केला नाही. 

तसेच तालुक्यातील सर्वच तक्रार कर्त्यांचे समाधान करून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला. सामान्यांना कधीच त्रास होऊ दिला नाही तर, गुन्हेगारांची गय सुध्दा केली नाही. त्यांच्या कार्यकाळात सर्वच धर्मियांच्या भावनेचा आदर करत त्यांनी आष्टी ठाण्यात अत्यंत कुशाग्र बुध्दीने आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचा बदलीने आदेश येताच आष्टी ठाण्यात समस्त पोलीस कर्मचारीही भावूक झाले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 31, 2024

PostImage

कंपनीच्या आवारातच टाकल्या पंगती. (शिवानी ताईंनी पंगतीत बसून घेतला जेवणाचा आस्वाद.)


कंपनीच्या आवारातच टाकल्या पंगती.

(शिवानी ताईंनी पंगतीत बसून घेतला जेवणाचा आस्वाद.)

 

गडचांदूर :-

     कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा,आवाळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगारांनी त्यांच्या वेतनवाढी सोबतच इतर मागण्याला घेऊन 'विजयक्रांती कामगार संघटने'च्या नेतृत्वात 29 जानेवारीपासून आंदोलन सुरू करण्यात आले असून उत्पादन अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.आंदोलनाचा आज दुसरा दिवस लोटला असून विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार कालपासूनच अंबुजा कंपनीत तंबू ठोकून बसल्या आहेत. आंदोलक कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी आंदोलनास्थळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.कंपनीच्या आवारातच कामगारांनी पंगत टाकली असून शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा कामगारासोबतच पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला आहे.ताईंचा हा साधेपणा आमच्या हिमतीला बळ देणारा असून उत्साह द्विगुणीत झाल्याची भावना कामगार वर्गातून व्यक्त होत आहे. 

     मार्गदर्शन करताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की,आपली कामगारांची एकजूटता,व्यवस्थापनाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.आंदोलनाला 24 तासाचा काळ उलटूनही अडेलतट्टूपणा व मुजोर धोरणामुळे कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नाही.यामुळेच कामगारांवर सातत्याने अन्याय होत आहेत.आज आमचे आदर्श स्व.महात्मा गांधी{बापू}यांची पुण्यतिथी असून कामगारांच्या हिमतीपुढे त्यांचे अनेक शस्त्र बिनकामाचे असून गांधी मार्गाने अहिंसा व शांततेने आंदोलन सुरू राहणार असल्याचे यावेळी शिवानी वड्डेट्टिवार यांनी स्पष्ट केले.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त चोख असून पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून अविरत कर्तव्य बजावत असल्याचे पहायला मिळत आहे.आता हे आंदोलनाचे पुढे काय होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 30, 2024

PostImage

जिमलगट्टा वासियांना मिळणार शुद्ध पाणी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते जलशुद्धीकरण संयंत्र केंद्राचे झाले लोकार्पण


जिमलगट्टा वासियांना मिळणार शुद्ध पाणी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते जलशुद्धीकरण संयंत्र केंद्राचे झाले लोकार्पण

 

अहेरी:तालुक्यातील जिमलगट्टा येथील

 जलशुद्धीकरण संयंत्र केंद्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम,युवा नेते ऋतुराज हलगेकर,सरपंच पंकज तलांडी, उपसरपंच वेंकटेश मेडी, ग्रा प सदस्य रुपाली तलांडी, किरण जणघरे, रक्षीका पोरतेट तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

 

जिमलगट्टा येथील नागरिकांच्या दृष्टिकोनातून पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत तर्फे गावातच जलशुद्धीकरण संयंत्र केंद्र उभारण्यात आले.यासाठी मोठी निधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी उपलब्ध करून दिली होती.नुकतेच जलशुद्धीकरण संयंत्र केंद्राचे काम पूर्ण झाले असून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

 

ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे समस्या मांडल्याने त्यांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिली.अखेर जिमलगट्टा वासीयांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था झाली असून येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 29, 2024

PostImage

ढिवर समाजावरील अन्याय दूर करा : जिल्हा भोई ढिवर समाज संघटनेची मागासवर्ग आयोगाकडे मागणी


 

ढिवर समाजावरील अन्याय दूर करा : जिल्हा भोई ढिवर समाज संघटनेची मागासवर्ग आयोगाकडे मागणी 

 

गडचिरोली : भोई , ढिवर आणि तत्सम समाजाच्या अनेक समस्या असल्यामुळे हा समाज शैक्षणीक, आर्थीक, सामाजीक दृष्टया अप्रगत असून या समाजाला न्याय देण्यासाठी आपण व्यक्तिशः प्रयत्न करावे अशी मागणी करणारे निवेदन गडचिरोली जिल्हा भोई,ढिवर आणि तत्सम जाती समाज संघटनेचे वतीने राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना देण्यात आले.

 

जातीय जनगणना करुन आमच्या समाजाला हक्काचे आरक्षण,विमुक्त व भटक्या जमातीचे अ,ब,क,ड, गट रद्द करून सर्वांना समान न्याय, समाज अशिक्षीत असून शैक्षणीक प्रगती व्हावी व समाजाचे जिवनमान उंचावण्यासाठी मुलांना विशेष शैक्षणिक योजना लागू करावी. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील जाचक अटी कमी करून समाजाला घरकुल देण्यात यावे.

पारंपारीक व्यवसाय असलेल्या आमच्या मच्छीमार बांधवांना तलाव व मच्छीमार सोसायटीवर हक्क व अधिकार देण्यात यावेत.

 

मच्छीमारी व्यवसाय करण्याऱ्या बांधवांना शासनाकडून १० टक्के व्याजदराने आर्थिक मदत देण्यात यावी व जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्यात याव्या.

या मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा भोई ढिवर व तत्सम जाती समाज संघटनेच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा भोई, ढिवर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

 

यावेळी जिल्हा भोई ढिवर समाज संघटनेचे संयोजक कृष्णा मंचलवार, सल्लागार रामदास जराते, जिल्हाध्यक्ष भाग्यवान मेश्राम, कार्याध्यक्ष सुनील बावणे, जिल्हा सचिव किशोर बावणे, कोषाध्यक्ष दुधराम सहारे, प्रभाकर बावणे, जयश्रीताई जराते, किशोर गेडाम, पंकज राऊत, पितांबर मानकर यांचे सह समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 29, 2024

PostImage

नागपूर येथील हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलीस दलाच्या ताब्यात


 

नागपूर येथील हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलीस दलाच्या ताब्यात

 

 

* आरोपीतांमध्ये 01 पत्रकार व 01 पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश

 

 दिनांक 29/01/2024 रोजी पोस्टे गडचिरोली येथील एक शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिल्याने फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावुन त्यांच्याकडुन पैशाची मागणी केली. तसेच घटनाक्रमाचे दरम्यान आरोपी सुशील गवई (पोलीस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास 28,000/- रुपये तसेच 2 ते 3 लाख रुपये नगदी पेड केले असल्याचे भासविले असता, सर्व आरोपीतांनी संगणमताने बेकायेदेशिरित्या गुन्हेगारी स्वरुपाचा कट कारस्थान रचुन फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोधर राहीली आहे असा खोटा आरोप लावुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालुन हे प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपये पैशांची मागणी करुन पैसे देण्यास फिर्यादीवर जबरदस्ती केली असल्याच्या तोंडी रिपोर्ट वरुन अप क्र. 60/2024 कलम 384, 389, 120 (ब) भादवि अन्वये पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला. 

 सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल सा. यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले असता, गुन्हा दाखल होऊन अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने गोपनिय सुत्रधारांकडुन खात्रीशिर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन गुन्ह्रातील आरोपी नामे 1) सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, 2) रवीकांत कांबळे रा. नागपूर, 3) रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर 4) ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाईस्तव पोलीस स्टेशन गडचिरोली यांचे ताब्यात दिले. तसेच एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे. वरील सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली आहे. सदर गुन्ह्राचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे हे करत आहेत. . 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. मयुर भुजबळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुन फेगडे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. गडचिरोलीचे सपोनि. राहुल आव्हाड, पोहवा./अकबर पोयाम, मपोहवा/लक्ष्मी विश्वास, मपोअं/वालदे, पोअं/बोईनार, पोअं/परचाके, पोअं/प्रशांत गरुफडे, चापोहवा/1681 मनोहर तोगरवार चापोना/माणिक निसार, चापोअं/दिपक लोणारे यांनी पार पाडली.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 29, 2024

PostImage

अंबुजा सिमेंट कंपनीत कामगारांचे काम बंद आंदोलन : आमदार सुभाष धोटेंनी दिला पाठिंबा, युनियन आणि कंपनी प्रशासन यांच्यातील मागणी पत्रावर द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याची कामगारांची मागणी


अंबुजा सिमेंट कंपनीत कामगारांचे काम बंद आंदोलन : आमदार सुभाष धोटेंनी दिला पाठिंबा, युनियन आणि कंपनी प्रशासन यांच्यातील मागणी पत्रावर द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याची कामगारांची मागणी. 

 

अंबूजा  सिमेंट कंपनी उपरवाही येथील विजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या पुढाकारातून कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करुन काम बंद पाडले. कंपनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत धरणे देत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आमदार सुभाष धोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. कामगारांच्या मागण्या तातडीने निकाली काढाव्या अन्यता कामगार आंदोलन मागे घेणार नाहीत अशी सूचना आमदार सुभाष धोटे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या आहेत. यावेळी अंबुजा सिमेंट कंपनीचे कमर्शियल हेड सुब्बू लक्ष्मण, एच. आर. अनिल वर्मा, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे, गडचंदुरचे ठाणेदार शिंदे 

उपस्तीत होते. 

       आंदोलक कामगारांच्या मते मागील तीन वर्षांचा किमान वेतन वाढीचा करार ३१ मार्च २०२३ रोजी संपला आहे. या कंत्राटी मजुरीच्या विविध अडचणी सोडविण्यासंदर्भात द्विपक्षीय चर्चा आयोजित करून तोडगा काढण्यात यावा या प्रमुख मागणीसह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे, तांत्रिक शिक्षणासह कंत्राटी कामगार आणि पात्रतेनुसार २० वर्षांचा कामाचा अनुभव कायमस्वरूपी नोकरीत (सिमेंट वेज बोर्ड अवॉर्ड नुसार) समाविष्ट करावे, कंपनी च्या कामावर येताना-जाताना कंत्राटी मजुराचा अपघात झाला आणि त्या मजुराचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाला कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, वरील पेमेंट व्यतिरिक्त १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना रु. २१०००/- मासिक पगार मिळावा, कंत्राटी कामगारांच्या मुलांना कंपनीच्या शाळेत कमीत कमी फी मध्ये शिक्षण मिळावे, कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या ७ दिवस आधी दरवर्षी २०% (रु. १६८००) बोनस मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 29, 2024

PostImage

मुलचेराचे तहसीलदार यांची उत्कृष्ट कामगिरी,तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव


मुलचेराचे तहसीलदार यांची उत्कृष्ट कामगिरी,तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव

 

मुलचेरा : तालुक्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेरा चे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले. लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले होते. त्यास अनुसरून सन २०२३ मधील मतदार यादीतील तक्रारीचे निवारण, अद्यावतिकरण, मतदार यादीत नवीन मतदारांचे नाव नोंदणी करिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या कामगिरी बद्दल मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता. राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला डॉ परशुराम खुणे, प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपजिल्हाधिकारी निवळणुक अधिकारी प्रसेंजित प्रधान, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 28, 2024

PostImage

सावधान! ऑनलाईन ताडोबा सफारी बुकींगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणुक, एका आरोपीस अटक


सावधान! ऑनलाईन ताडोबा सफारी बुकींगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणुक, एका आरोपीस अटक 

 

चंद्रपूर : ताडोबाला पर्यटनाला यायचे असेल तर ऑनलाईन बुकिंग करून यावे लागते. परंतू ऑनलाईन बुकींग मध्ये पर्यटकांची फसवणुक होत आहे. असाच ऑनलाईन ताडोबा सफारी बुकींगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणुक झाल्याचा प्रकरण समोर आलां असून गून्हा उघडकिस आल्याने एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. केयुज दत्ता कडुकर असे आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२७ जानेवारी २०२४) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील फिर्यादी मनिष प्रभाकर बावसकर, यांनी, पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे येवून आपली फसवणुक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांनी, त्यांचे परिवार व नातेवाईकसह ताडोबा सफारी करीता आरोपी एजंट केयुज दत्ता कडुकर रा. चंद्रपुर याचे मोबाईल नंबर वरून फोनद्वारे १८ लोकांचे ऑनलाईन तिकीट बुकींग केली. आरोपीने सांगितल्याप्रमाने फिर्यादी यांनी २५ मार्च २०२३ रोजी सफारी बुकींगकरीता २५ हजार ५०० रूपये, २७ मार्च २०२३ रोजी ३ हजार रू. व १४ एप्रिल २०२३ रोजी १० हजार ४०० रू. असे एकुण ३८ हजार ९०० रू. फोन पे द्वारे पाठवुन माहे जुन २०२३ रोजीची ताडोबा पर्यटन सफारी बुकींग कम्फर्म केली. परंतु ते काही कारणास्तव सफारी करीता येवु शकले नाही. सदर रक्कम केयुज कडुकर यांचेकडे जमा होती. परत फिर्यादिने आरोपीस ताडोबा सफारी बुकींग करीता १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गुगल पे द्वारे ५००० रूपये पाठवून २७ जानेवारी २०२४ रोजी ची ताडोबा सफारी बुकींग कम्फर्म केली.

 शनिवारी फिर्यादी व त्याचे नातेवाईक ताडोबा सफारी करीता मोहुर्ली गेट येथे पोहचून ऑनलाईन बुकींग केलेली तिकीट दाखविली असता सदर तिकीट बोगस असल्याबाबत वनविभाग कर्मचारी यांनी फिर्यादी यांना सांगितले. तसेच आरोपी केयुज दत्ता कडुकर यांने राकेशकुमार मोतीलाल वाजपेयी रा.उदयगिरी अनुशक्ती नगर मुंबई यांचे ६ जानेवारी २०२४ रोजी ताडोबा सफारी करीता ०४ ऑनलाईन तिकीट बुक करून त्यांचेकडुन सुध्दा गुगल पे द्वारे २२ हजार ५०० रू. घेवुन फिर्यादी व राकेशकुमार वाजपेयी या दोघांकडून घेवून एकुण ६६,४०० रू. ची ताडोबा सफारी बुकींगच्या नावाखाली फसवणुक केल्याने पोलिस स्टेशन दुर्गापुर येथे तक्रार दाखल केली. आरोपी विरोधात कलम ४२० भादवि सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी कडूकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

पोलिश अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली पुलिस निरीक्षक लता वाडीवे, पोउपनि गिरीष मोहतुरे, स.फौ. खुशाल खेडेकर, पो. हवा योगेश शार्दुल, नापोशि योगराज काळसर्प, पो. शि. प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव, मंगेश शेंडे, संपत पुलीपाका यांनी कारवाई केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 27, 2024

PostImage

 गावामागील जंगलात सुरू असलेल्या एका जुगारावर पोलिसांनी धाड टाकीत जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात


 

 गावामागील जंगलात सुरू असलेल्या एका जुगारावर पोलिसांनी धाड टाकीत जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात 

भद्रावती :-

तालुक्यातील तांडा गावामागील जंगलात सुरू असलेल्या एका जुगारावर भद्रावती पोलिसांनी धाड टाकीत जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती भद्रावती पोलिसां तर्फे देण्यात आली. सदर कारवाई 26 जानेवारीला तांडा गावाजवळील जंगलात करण्यात आली. सदर घटनेत चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गोपनीय माहिती द्वारे तांडा गावाच्या मागच्या भागातील जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक कारवाईसाठी घटनास्थळी रवाना केले. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांपैकी काही जुगारी जंगलात पळून गेले तर आठ जुगारी पोलिसांच्या हाती लागले. या कारवाई जुगारातील पैसे व आठ मोटरसायकली असा चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. सदर आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे, कोल्हे तथा इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 27, 2024

PostImage

उच्च शिक्षित मुलीकडून ध्वजारोहन,सरपंच कन्नाके यांची नवी संकल्पना, गावकऱ्यांनी सरपंचाचे केले कौतुक


उच्च शिक्षित मुलीकडून ध्वजारोहन,सरपंच कन्नाके यांची नवी संकल्पना, गावकऱ्यांनी सरपंचाचे केले कौतुक 

      

   २६ जानेवारीला ग्राम पंचायत देवलमरी येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात स्त्री शिक्षणाला प्राधान्य व प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सरपंच लक्ष्मण मधूकर कन्नाके यांनी एक नवी संकल्पना निर्माण करुन ग्राम पंचायत हद्दीतील उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीच्या शूभ हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरविले होते.

त्याकरिता कु.रजिता नागेश राऊत या विद्यार्थिनीचे निवड करून २६ जानेवारी २०२४ ला ग्राम पंचायत कार्यालय देवलमरी येथील ध्वजारोहण करण्यात आले .

    सरपंचांच्या या संकल्पनेला सलाम करुन  गावकरी मंडळीनी त्यांचे कौतुक करायला लागले.

    तसेच ध्वजारोहण केलेल्या विद्यार्थिनीने सुध्दा आपली ध्वजारोहण करण्याची संधी तिला दिल्यामुळे सरपंच साहेबांचे आभार व्यक्त केली.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 27, 2024

PostImage

जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली भेट


जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली भेट

 

*गडचिरोली :* २६ जानेवारी२०२४ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास ना. धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी कृषि महोत्सव कार्यक्रमात आयोजीत विवीध दालनांस भेट देऊन स्टॉलधारकांकडुन माहिती जाणून घेतली.

 

जिल्हाधिकारी संजय मीना गडचिरोली, श्रीमती आयुपी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली, कुमार चिंता, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन), गडचिरोली, यतिश देशमुख, अपर पोलिस अधिक्षक (प्राणहिता), गडचिरोली, धनाजी पाटिल, अतिरीक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कृषि महोत्सवातील विवीध दालनांस भेट दिली. तसेच पंढरी डाखळे, प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली, बसवराज मास्तोळो, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, प्रशांत शिके, प्रकल्प संचालक, ग्रामीण बिकास यंत्रणा, गडचिरोली, विष्णूपंत झाडे, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आबासाहेच धापते, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, गडचिरोली, श्रीमती अर्चना राऊत, नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प, गडचिरोली, प्रफुल भोपये, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, गडचिरोली हे उपस्थित होते.

 

डॉ. नितीन दुधे, पशुधन विकास अधिकारी, गडचिरोली यांनी रेबीज या रोगाविषयी तो कसा टाळता येईल याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती प्रतिभा चौधरी जिजामाता पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी गडचिरोली यांनी कार्यक्रमास उपस्थित महिला शेतक-यांना मार्गदर्शन केले. डॉ. पवन पाबडे, पशुधन विकास अधिकारी, पं.स. अहेरी यांनी मुक्त संचार गोठा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, डॉ. प्रसाद भामरे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पं.स. कुरखेडा यांनी मुक्त संचार फॉवडी पालन याविषयी मार्गदर्शन केले. प्रशांत एरोगवार, व्यावसायीक, मी अनुसया डेअरी संस्था, कोटगाल, ता. गडचिरोली यांनी आपल्या दुग्धव्यवसाय, दुग्ध संकलन, प्रक्रिया व विपनन विषयी आपले अनुभव व्यक्त केले. डॉ. यशवंत उमरदंड, पशुवैद्यकीय अधिकारी, अहेरी यांनी शेळीपालन विषयी मार्गदर्शन केले.

 

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृनधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टीक तृनधान्य पाककला स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेत १० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेऊन आपल्या पाककला प्रदर्शित केल्या. कृषि महोत्सवातील जेव प्रात्यक्षिके, दालने व कार्यशाळेस मोठ्या संखेने शेतकरी, महिला, विद्यार्थी व स्थानीक नागरीकांनी भेट दिली.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 27, 2024

PostImage

क्रिडा व कला संमेलनातून विद्यार्थ्यांनी नाव लौकीक करावे, माजी जि प सदस्य सैनुजी गोटा यांचे प्रतिपादन


क्रिडा व कला संमेलनातून विद्यार्थ्यांनी नाव लौकीक करावे,

माजी जि प सदस्य सैनुजी गोटा यांचे प्रतिपादन

 

आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात मात्र व्यासपीठ अभावी त्यांच्यातील सुप्त गुणांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास होत नाही शालेय स्तरावर क्रीडा व कला संमेलन घेतले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होत असते विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुणांचा विकास करून नाव लोकिक करावे असे प्रतिपादन माजी जि प सदस्य सैनुजी गोटा यांनी केले पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या केंद्र गट्टा च्या वतीने क्रेंदस्तरीय बाल क्रिडा व कला संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुभाषचंद्र बोस विद्यालय गट्टा येथे पार पडला त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते संमेलन अध्यक्षस्थानी सरपंच पूनम लेखामी ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून माजी पं स सदस्या शिलाताई सैनु गोटा, पोलीस पाटील कन्नाजी गोटा, वैद्यकीय अधिकारी डॉ वड्डे, ग्रामसेवक मनोज मेश्राम, माजी सरपंच दोडगे गोटा, वनहक्क समितीचे अध्यक्ष तानेंद्र लेखामी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शहा, उपाध्यक्ष दिलीप दहागावकर , भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सहप्रमुख सूरज जक्कुलवार , विशाल पुजलवार , केंद्रप्रमुख एम सी बेडके, गाव भुमिया कोलू गोटा, ग्रा प सदस्य मिरावा लेखामि, ग्रा प सदस्य संजय गोटा, आरोग्य सेवक नामदेव वासेकर, सचिन मोतकुरवार, कैलाश गोरडवार आदी मान्यवर उपस्थित होते क्रीडा ही शारीरिक क्रिया आहे विद्यार्थ्यांनी खेळात स्वतःला हार मानून घेऊ नये , हरणे चुकीचे नसून प्रयत्न न करता हार मानने चुकीचे आहे असे मार्गदर्शन डॉ वड्डे यांनी विद्यार्थ्यांना केले

क्रीडा संमेलनात कबड्डी, खोखो, मॅरॅथॉन स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख एम सी बेडके यांनी केले, संचालन व आभार वाळवी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी केले संमेलनाचे व्यवस्थापन गट्टा शाळेचे मुख्याध्यापक एल एम मारटकर यांनी केले क्रीडा व कला संमेलन यशस्वी करण्यासाठी डी पी ओंढरे, वसंत मडावी, संजय घुबडे, एच जे वेलादी, डी पी हलामी, वामन नवलू, पी एस कुडे, पतनीत सातपुते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 26, 2024

PostImage

महादेव कोळी, डोंगर कोळी मल्हार कोळी ढोर, टोकरे कोळी या अनुसूचित जमातीचे जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन


महादेव कोळी, डोंगर कोळी मल्हार कोळी ढोर, टोकरे कोळी या अनुसूचित जमातीचे जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन

 

आंदोलनाला बंजारा क्रांतीदलाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जाधव यांची भेट व जाहीर पाठिंबा

 

चंद्रपूर:आदिवासी कोळी, महादेव कोळी मल्हार, कोळी ढोल, टोकरे कोळी, इत्यादी जमातीचा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधव दिनांक 23 जानेवारी 2023 पासून राज्यस्तरीय महाआंदोलन समिती महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमातीच्या अस्तित्वासाठी व संविधानिक हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलनं राज्यस्तरीय महाआंदोलन समितीच्या नेतृत्वात शेकडोच्या संख्येने समाविष्ट झालेले आहेत, आदिवासी कोळी महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर टोकरे कोळी, त्यांच्या खालील थोडक्या प्रमुख मागण्या आहेत, *मागण्या* क्र 1 केंद्र सरकारचा 1976 च्या कायद्यानुसार कोळी ही जमात अनुसूचित जमाती एसटीमध्ये आहे राज्य सरकारने बेकायदेशीररित्या कोळी जातीचा समावेश 1995 एस बी सी विशेष मागास प्रवर्गात केला राज्य सरकारने तात्काळ 1976 चा केंद्र सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी जशीच्या तशी करावी, 2 कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर या जातीना जात प्रमाणपत्र देताना उपविभागीय अधिकारी एस डी ओ साहेब बेकायदेशीर वागून आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर याची छळवणूक करतात वडिलांचे जात प्रमाणपत्र असताना मुलाला जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात तो प्रमाणपत्र देण्यात यावा दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस पासून जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आंदोलनाला महादेव कोळी डोंगर कोळी मल्हार कोळी ढोर कोकरे कोळी बसलेले आहेत आंदोलन करते ज्ञानोबा बाळू एके वाढ शिवाजी केरबा भोईनेवाड किरण गणेश तलवार लक्ष्मण नरसिंग येथे वाढ भागीरथाबाई येथे वाढ संभाजी पुरे वाड बालाजी धंदेतेवाढ बळीराम सबबरवाड बालाजी येरेवाड मारुती भुईनेवाड अमृताबाई यारेवाढ गयाबाई गिरेवाड जनाबाई रेनेवाड पांडुरंग येथेवाढ विश्वनाथ पेचेवाड अंकुश मोरेवाड महादू मरेवाड किशोर भुईनवाड बळीराम मरेवाड खंडू रेनेवाड अंबादास महादेवसवाड कल्पनाबाई भोईनवाड शंकर मरेवाड वैजनता कर्जवाट आधीची महिला पुरुष 26 आंदोलन करते आंदोलनाला बसलेले आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 26, 2024

PostImage

चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला, ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला


चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला, ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला 

 

 

 

किल्लेधारूर : ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालक बसलेल्या सिटाखाली साप निघाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाले . झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर केज रोडवर घडली. बळीराम रघुनाथ नाईकवाडे वय २७ वर्षे रा.घागरवाडा असे मयत चालकाचे नाव आहे .

 

 

तालुक्यातील घागरवाडा येथील बळीराम नाईकवाडे हे स्वतःचा ऊस एम एच . १९ ए आर या ट्रॅक्टरच्या माध्यमातून येडेश्वरी कारखान्यास नेहण्यात येत होता . सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर हजारी पेट्रोल पंपाजवळ चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला . साप दिसतात चालक गोंधळून गेल्यामुळे त्याचा स्टेरिंगवरील ताबा सुटला . यावेळी उसासह ट्रॅक्टर पलटी झाला . चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर हेड पडले . यात डोक्याला गंभीर मार लागला होता . या अपघातात चालक बळीराम नाईकवाडे यांचा जागीच मृत्यू झाला . यावेळी साप मात्र त्या ठिकाणी होता . घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना साप दिसल्यानंतर त्यास मारण्यात आले . अपघातामुळे ऊस रस्त्यावर पडला होता . पोलिसांनी पंचनामा करून वाहतुकीला अडथळा येत असल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला . चालकाची नंतर उत्तरीय तपासणीसाठी शव ग्रामीण रुग्णालयात पाठण्यात आले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 26, 2024

PostImage

शिवसेना युवासेना शहर प्रमुखची धारदार शस्त्राने हत्या


शिवसेना युवासेना शहर प्रमुखची धारदार शस्त्राने हत्या

 

चंद्रपूर, 25 जानेवारी 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर यांची आज रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला करण्यात आली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझरकर हे आज रात्री 9:00 वाजताच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला उभे होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात वझरकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

वझरकर यांची हत्या नेमकी का करण्यात आली याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

 

वझरकर हे चंद्रपूर शहरातील शिवसेना युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. ते शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होते. त्यांच्या हत्येने चंद्रपूर शहरात खळबळ माजली आहे.

 

चंद्रपूर शहरात उबाठा युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या उघडकीस आली आहे. उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली. 30 वर्षीय वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय. घटनेनंतर वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची जोरदार मोडतोड केली. पोलिस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आलाय. उबाठा गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मित्रांशी झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाजवर्तविण्यात येत आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अभियान सुरू केले आहे. उबाठा गटाने आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस 5 वर्ष कारावास व 5000/- रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास 6 महिने वाढीव शिक्षा ठोठाविण्यात आली


 

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस 5 वर्ष कारावास व 5000/- रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास 6 महिने वाढीव शिक्षा ठोठाविण्यात आली.

 

• गडचिरोली येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन धानोरा (पोमकें येरकड) हद्दीतील चुडीयाल गावात फिर्यादी नामे हिरामण सावजी ताडाम, वय ५५ वर्ष, रा. चुडीयाल, ता. धानोरा येथे पत्नी व दोन मुलांसोबत राहतात. तसेच फिर्यादी यांचे मजवी मुलगी नामे सौ. सपना हिचे लग्न तिन वर्षापुर्वी मौजा सिदेसुर येथे आरोपी नामे - वैभव सखाराम गावडे, रा. सिदेसुर याचे सोबत आदिवासी रितिरीवाजाप्रमाणे झाले. आरोपी हा दारु पिण्याचे सवयीचा असल्याने नेहमी दोघांमध्ये भांडण होत होते. भांडण झाल्यावर गावपातळीवर पंचायत करुन भांडणे अनेकवेळा मिटवण्यात आले. तरीही आरोपी याचे मध्ये काहीही सुधारणा न झाल्याने फिर्यादीने आपली मुलगी सपना व तिच्या दोन मुलांना स्वत: च्या माहेरी आणले असता दिनांक १२/०९/२०२० रोजी फिर्यादी रात्री जेवन करुन झोपलेले असतांना सुमारे ०९.३० वा. दरम्यान आरोपी दारुच्या नशेत येवुन मुलीला झोपेतून उठवुन व त्यांना मौजा सिंदेसुर येथे घेवून जातो असे म्हणत असतांना फिर्यादी याने उद्या सकाळी घेऊन जा असे म्हटले असता फिर्यादीला तुला माझ्या पत्नीला व मुलांना ठेवण्याचा काही अधिकार नाही असे उध्दट बोलुन आरोपीने आपले खिशातुन धारदार चाकु काढला व फिर्यादीच्या गळ्यावर चाकुने वार केला तेव्हा फिर्यादीने बाजुला ढकलुन आरडाओरडा केला असता तिथुन आरोपी पळून गेला, असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

 

फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन धानोरा येथे दिनांक १४/०९/२०२० रोजी अप क्र. ६५/२०२० अन्वये कलम ३०७, ५०४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस दिनांक १६/०९/२०२० रोजी रात्रो ०९.५२ वा. अटक करून, तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करुन सेशन केस क्र. २६/२०२१ नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन, फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक २५/०१/२०२४ रोजी वैभव सखाराम गावडे रा. सिदेसुर, पो. येरकड, ता. धानोरा जि. गडचिरोली यास मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. आशुतोष नि. करमरकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम ३०७ भा.द.वी. मध्ये दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा व ५०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने वाढीव शिक्षा सुनावली आहे.

 

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा प्रथम तपास पोउपनि प्रशांत आर, कुंभार व अंतिम तपास पोनि विवेक बाबुराव अहिरे पोस्टे धानोरा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहीले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

 विविध गुन्ह्रातील एकुण 75,93,720/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट


 विविध गुन्ह्रातील एकुण 75,93,720/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

 

 गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे आरमोरी हद्यीतील अवैध दारु विक्री करणा­यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे आरमोरी येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये सन 2018 ते ऑगस्ट 2023 पर्यत प्रलंबित असलेला 247 गुन्ह्यातील देशी/विदेशी दारुचा एकुण मुद्येमाल मा. प्रथम श्रेणी न्यायालय आरमोरी यांचे आदेशाने व मा. अधीक्षक, राज्य उत्पादक शुक्ल गडचिरोली यांचे मार्फतीने त्यांचे समक्ष योग्य ती काळजी घेवुन नगर परिषद आरमोरी यांनी नेमुन दिलेल्या जागेवर काल दिनांक 24/01/2024 रोजी सुरक्षीत रित्या एकुण 75,93,720/- रुपय किंमतीचा देशी/विदेशी दारुचा मुद्देमाल जे. सि. बी. च्या सहाय्याने 12 न् 12 लांबी, रुंदी खोल खड्डा खोदुन रोडरोलर च्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवुन काचेच्या व प्लास्टीकच्या बॉटल चुरा करण्यात आला व काचेचा चुरा योग्य काळजी घेवुन खड्यात टाकुन खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली. 

  तसेच पोस्टे आरमोरी येथे 2005 ते 2021 पर्यंतच्या विविध गुन्हयासंबंधीत जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनाचे लिलाव करण्यासाठी मा. उपविभागीय दंंडाधिकारी सा. वडसा यांचे आदेशाने व श्री. वाय आर. मोडक सा. मोटार वाहन निरिक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय. गडचिरोली यांचे कडुन वाहनाची किंमत निश्चित करुन श्री. एच. एन. दोनाटकर, नायब तहसिलदार सा. आरमोरी यांचे अध्यक्षतेखाली स्थापीत समितीने लिलाव प्रक्रियेस सुरुवात केली या लिलावामध्ये बोली लावण्याकरीता नागपुर, यवतमाळ, गडचिरोली, आरमोरी येथील 37 लायन्सस धारक भंगार खरेदी करणारे ट्रेडर्स सहभागी झाले होते. निकाली लागलेल्या गुन्ह्यातील एकुण 40 नग मोटार सायकल 1,58,000/- रु. किंमत व चारचाकी 06 वाहणे 2,33,100/- रु. अशी एकुण 3,91,100/- रुपयाचे लिलावात वाहनांची विक्री करण्यात आली. सदर वाहन वाहतुकीकरीता रोडवर वापरण्यात येणार नाही याबाबत योग्य समज देण्यात आली व सर्व वाहने क्रॅश करुन घेण्यास परवानगी देण्यात आली. सदर लिलावातुन प्राप्त झालेली एकुण रक्कम 3,91,100/- रुपये शासन खात्यात जमा करण्यात आली आहे. 

सदरची कारवाई मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. मयुर भुजबळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलिक यांचे नेतृत्वात व हेड मोहर्र पोहवा/1035 रघुनाथ तलांडे व सर्व पोस्टेतील अंमलदार यांच्या उपस्थीतीत पार पडली.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक व 01 अंमलदार यांना “गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक” जाहीर


 

गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक व 01 अंमलदार यांना “गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक” जाहीर

 

देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट व शौर्यपुर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” व 01 “गुणवत्तापुर्ण सेवासाठी पदक” जाहीर झाले आहे. संपूर्ण देशभरात एकुण 275 पोलीस शौर्य पदक व 753 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 18 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहेत. ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच सन 2023 या वर्षामध्ये 62 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. सन 2024 मध्ये एकुण 19 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार, 1) श्री. सोमय विनायक मुंढे, भा.पो.से. पोलीस अधीक्षक लातुर, 2) श्री. संकेत सतीश गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करवीर जि. कोल्हापुर, 3) पोहवा/3078 मोहन लच्छु उसेंडी, 4) पोहवा/873 देवेंद्र पुरोषत्तम आत्राम (2ND BAR to PMG,)), 5) पोहवा/2734 जीवन बुधाजी नरोटे, 6) पोहवा/2612 माधव कोरके मडावी, 7) पोहवा/2474 संजय वत्ते वाचामी (1ST BAR to PMG,) 8) पोहवा/3029 मुंशी मासा मडावी 9) पोहवा/3047 गुरुदेव महारुराम धुर्वे, 10) पोनाअं/3729 कमलेश निखेल नैताम, 11) पोनाअं/3743 शंकर पोचम बाचलवार, 12) पोनाअं/3026 विनोद मोतीराम मडावी, 13) पोनाअं/4136 दुर्गेश देविदास मेश्राम, 14) पोअं/3718 विजय बाबुराव वडेट्टीवार, 15) पोअं/5488 कैलाश श्रवण गेडाम, 16) पोअं/4497 हिराजी पिताबंर नेवारे, 17) पोअं/5697 ज्योतीराम बापु वेलादी, 18) पोअं/1156 सुरज देवीदास चुधरी यांना पदक मिळाले असुन 01) सहा.फौ/3248 देवाजी कोट्टु कोवासे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असुन, त्याबद्दल मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. या सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

दुर्दैवी घटनेतील पाच महिलांचे मृत्तदेह सापडले,एका बेपत्ता महिलेचा शोध सुरू


दुर्दैवी घटनेतील पाच महिलांचे मृत्तदेह सापडले,एका बेपत्ता महिलेचा शोध सुरू 

 

चामोर्शी : तालुक्यातील गणपूर येथील सहा महिलांचा वैनगंगा नदीत नाव बुडून 23 जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यु झाला. या सहा महीलापैकी मिळालेल्या मृतदेहांची संख्या पाच झाली असून एका बेपत्ता महिलेचा शोध सुरू आहे

 

25 जानेवारीच्या दुपारी साडे बारा वाजता सुषमा सचिन राऊत वय 25 वर्ष व साडे तीन च्या सुमारास बुधाबाई देवाजी राऊत वय 55 वर्ष हीचा मृतदेह जैरामपूर नदीघाटावर आढळून आला. तर मायाबाई राउत या बेपत्ता महिलेचा शोध अद्यापही सुरूच आहे. यासाठी एन डी आर एफ चे पथक शोध घेत असून यासाठी गावकरी सुध्दा परिश्रम घेत आहेत.

 

सहा मृत महीलापैकी आतापर्यंत जिजाबाई राऊत, पुष्पा झाडे रेवंता झाडे, सुषमा राउत, बुधाबाई राऊत, यांचे मृतदेह सापडले असून माया बाई राऊत हीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

गणपूर वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबास शासनातर्फे आर्थिक मदत


गणपूर वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबास शासनातर्फे आर्थिक मदत

 

जिल्हाधिकारी संजय मीणा यांची माहिती

 

 चामोर्शी दि. 25 : तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदीपात्रात नाव उलटुन 7 महिला व 1 नावी वाहुन गेल्याची दुर्देवी घटना 23 जानेवारी रोजी घडली. या घटनेची शासनाच्या वतीने गंभीर दखल घेतली असून मृतकाच्या कुटुंबास प्रत्येकी 4 लाख रूपये आर्थीक मदत केली आहे. याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दिली आहे.

 

चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदीपात्रातुन काही महिला नावेच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्हयातील देवटोक येथे मिरची तोडणीसाठी जात होत्या. नदीपात्रातील पाण्याची पातडी वाढल्याने काही अंतरावर नाव गेल्यानंतर उलटल्याची दुर्घटना घडली. त्यापैकी एका महिलेस व नावीकास वाचविण्यात यश आले होते. काल 24 जानेवारी पर्यंत तिन महिलांचा मृतदेह हाती लागला त्यात पुष्पाबाई मुक्तेश्वर झाडे, रेवंता हरिचंद्र झाडे, जिजाबाई दादाजी राऊत यांचा समावेश असुन त्यांना प्रत्येकी चाल लाख रुपायांचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

विसापूर येथील अखेर त्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक


विसापूर येथील अखेर त्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक

 

 

बल्लारपूर : २३ जानेवारी ला विसापुर येथील सचीन वंगणे वय ४० वर्ष याला अज्ञात इसमाने धारदार हत्याराने मारून हत्या केली होती. त्याचा भाऊ रमेश वंगणे याचा रिपोर्टवरून पो.ठाणे बल्लारपूर अप क्र ८१ / २०२४ कलम ३०२, ४५२ भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता रविंद्र सिंह परदेशी पोलीस अधिक्षक, रिना जनबंधू अप्पर पोलीस अधिक्षक व दीपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट देवून सदर घटनास्थळी तळ ठोकुन गुन्ह्याचे संबंधाने उपयुक्त मार्गदर्शन करून पो.ठाणे बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखा, चंद्रपुर असे दोन पथक तयार केले.

     पो.ठाणे बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखेचा पथकाने आरोपीबाबत कोणताही सुगावा नसताना अतिशय कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीबाबत गोपनीय माहिती काढुन २४ तासाचे आत आरोपी यास निष्पन्न करून आरोपी नामे विठ्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे वय ३७ वर्ष रा.वार्ड क्र १ विसापुर ता.बल्लारपूर यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार (स्थागुशा), सपोनी रमेश तळी, सपोनी विकास गायकवाड (स्थागुशा), सपोनी प्राची राजुरकर, पोउपनि वर्षा नैताम, पो.हवा रनविजय ठाकुर, यशवंत कुमरे, बाबा नैताम, संतोष दंडेवार, अनुप डांगे, मिलींद चव्हान, जमीर पठान, नितेश महात्मे (स्थागुशा), पो.अं श्रीनीवास वाभीटकर, प्रसंनजित डोर्लीकर, प्रकाश मडावी, प्रसाद घुलगंडे यांनी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

वैनगंगा नदीत नाव उलटून मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना शासनाकडून भरघोस मदत द्या, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन


वैनगंगा नदीत नाव उलटून मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना शासनाकडून भरघोस मदत द्या, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन 

 

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील तरुण, महीला, पुरुष व युवा वर्ग पोटासाठी इतरत्र दुसऱ्या जिल्ह्यात व राज्यात कामे करण्यासाठी जात असतात. अशातच चामोर्शी तालुक्यातील गणपुर येथील महीला आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी काही महीला मजूर महाकाय वैनगंगा नदी पार करून मिरची तोडायला चंद्रपूर जिल्ह्यातील देवटोक या भागाकडे जात असताना सहा महिलांना नदीच्या पाण्यात आपला जीव गमवावा लागला. 

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धावाधाव करत संबंधित विभागालाही माहिती दिली. त्यातच शोधमोहीम सुरू केले असता, सहा पैकी तीन महिलांचा शोध घेता आला. यामध्ये शोध लागलेल्या तीन महिलांचा पार्थिवावर आज दि २४ जानेवारी रोजी अंतिम संस्कार करण्यात आले.या अंत्यविधीला महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन सांत्वन करत दिवस भर वैनगंगा नदीच्या अंत्यविधी स्थळी उपस्थित होते. यावेळी मृतकांच्या कुटुंबीयाला शासनाने भरघोस मदत करावी अशी मागणीही माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केले आहे.

 याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे प्रभाकर वासेकर, चामोर्शी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निकेश गद्देवार आदी हजारोच्या संख्येने शोककुल उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

दुर्दैवी घटना !आई व आजीचे एकाच वेळी निधन,दिड वर्षे व नऊ महिन्याच्या चिमुकल्यांना आता सचिन कसा सांभाळणार


दुर्दैवी घटना !आई व आजीचे एकाच वेळी निधन,दिड वर्षे व नऊ महिन्याच्या चिमुकल्यांना आता सचिन कसा सांभाळणार 

 

चामोर्शी : तालुक्यातील गणपूर येथील सात महीला मिर्ची तोडण्यासाठी शेजारी चंद्रपूर जिल्ह्यातील गावात जाण्यासाठी दिनांक 23 जानेवारी मंगळवारी सकाळी वैनगंगा नदीतून नावेने जाण्यासाठी निघाल्या. मात्र नावेत क्षमतेपेक्षा जास्त जण झाल्याने नाव नदीत उलटली यात सहा महिलांना जलसमाधी मिळाली तर एका महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. नावाडी मात्र सुखरूप बाहेर आला. या घटनेने गणपुर गावावर शोककळा पसरली असुन तिन महिलांचे मृतदेह हाती लागले असून तीन महिलांचा शोध घेणे सूरू आहे.

 

या दुर्दैवी घटनेत गणपुर येथिल राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सासू मायाबाई राऊत वय 45 वर्ष सून सुषमा राऊत वय 25 वर्ष या दोघींचाही करुण अंत झाला. माया राउत या सुखरूप बचावल्या होत्या मात्र सुनेला वाचविण्यासाठी हात देत असतानाच पाण्याच्या प्रवाहात त्याही वाहून गेल्या. सचिन राऊत यांच्यावर आई आणि पत्नी यांच्या निधनानं दुहेरी संकट कोसळले असुन सुषमा हीला नऊ महिन्यांचा व दीड वर्षाचा अशी दोन मुल आहे. आता ही लहानगी मुले आजी आणि आईच्या प्रेमाला पोरखी झाली आहेत. या घटनेची माहिती कळताच सचिन हा सैरभर होवुन नदीच्या दिशेने सुसाट निघाला पण आई अणि पत्नीला वैनगंगेने आपल्या कुशीत घेतल्याने त्याच्या दुःखाला पारावार उरला नाही. नदीकिनाऱ्यावरील शोकमग्न वातावरण पाहून उपस्थितांची मन गहिवरून आली होती. गाव शोकसागरात बुडाले तर नातेवाईकांनी गणपुरच्या दिशेने धाव घेतली. आतापर्यंत जिजाबाई राऊत, पुष्पा झाडे, आणि रेवांता झाडे या तीन महिलांचे मृतदेह हाती लागले अन्य तीन महिलांच्या शोधासाठी पोलिसांनी नावेच्या सहायाने शोधमोहीम युद्धपातळीवर राबवित असुन मृतकांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडल्याने सारे गाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 25, 2024

PostImage

त्या दुर्दैवी घटनेतील अजुनही तिघींचा शोध सुरूच


चामोर्शी : दिनांक २३ जानेवारी रोजी वैनगंगा नदीत बोट उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाली. यापैकी दोघींचे मृतदेह २३ जानेवारी रोजी तर एकीचा मृतदेह आज २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आढळला

 

. रेवंता हरीचंद्र झाडे असे आज मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. मायाबाई अशोक राऊत, सुषमा सचिन राऊत, बुधाबाई देवाजी राऊत या बेपत्ताच आहेत.

 

पुष्पा मुक्तेश्वर झाडे व जिजाबाई दादाजी राऊत यांचे प्रेत कालच हाती लागले होते. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले. तर आज २४ जानेवारी रोजी रेवंता हरीचंद्र झाडे यांचा मृतदेह आढळून आला. या तिघींवर आज गणपूर (रै.) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरीत तिघींचा शोध अद्यापही सुरूच आहे.

 

माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी शोक व्यक्त केला

 

 गणपूर रै. येथील सात महिला नावेच्या सहाय्याने नदी ओलांडुन मिरची तोडाईच्या कामासाठी जात असतांना नाव नदीपात्रात बुडाल्याची दुदैवी घटना काल 23 जानेवारी रोजी घडली. नदीत बुडालेल्या सहा महिलांपैकी तिघींचे मृतदेह सापडले. या दुदैवी घटनेबद्दल गडचिरोली विधासभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडीं यांनी शोक व्यक्त केला असून आज बुधवारी गणपूर गावाला भेट देउन तीन महिलांच्या आज दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराला उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 24, 2024

PostImage

शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न,18 वर्षांनंतर जुन्या वर्गमित्रांची झाली गाठभेट


शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न,18 वर्षांनंतर जुन्या वर्गमित्रांची झाली गाठभेट

 

      शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालय अहेरी येथील सत्र 2004 ते 2006 या शैक्षणिक सत्रात बिए चे शिक्षण घेणाऱ्या वर्ग मित्रांचा 18 वर्षांनंतर स्नेहमिलन सोहळा त्रिशूल विला इंदाळा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.

     आपल्या कॉलेज जीवनात अनेक रंगीन स्वप्न बघणारा युवावर्ग प्रत्यक्ष जीवनात आपले स्वप्नपूर्ती करीत आपल्या खासगी जिवनात रममाण झालेला परंतु आपल्या जिवलग वर्गमित्रांची भेट घेण्यास आसुरलेला, जीवनातील खडसर प्रसंग, अनेक सामान्यांवर मात करीत विविध प्रसंगावधानेतून वाटचाल करत शिक्षण पूर्ण करीत अनेक मार्गांवर विखुरलेला जिवनात यशस्वी झालेला मित्र वर्ग पुन्हा एकदा एकत्र येत आपल्या सुख:दुःखाची देवाण-घेवाण करण्यासाठी 18 वर्षांनी एकत्र आला.

   

      या स्नेहमिलन सोहळ्यात प्रत्येकानी एकमेकांचे मोठ्या जिव्हाळ्याने स्वागत केले. अनुषंगाने कॉलेज जीवनातील विविध प्रसंग आठवून एकमेकांत रममाण झाले, संगीत, डान्सिंग विविध चॅलेंजिंग गेम खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाण घेवाण केली. अनेक वर्षांनी एकमेकांत रममाण होताना भारावून गेले.

  सदर स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन नागेश गावडे यांनी अथक परिश्रम घेवून केल्याबदल त्यांचे सर्वांनी कौतुक केले व आभार मानले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 24, 2024

PostImage

कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदभरती घोटाळ्याचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांची पाठिंबा ...!


कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदभरती घोटाळ्याचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांची पाठिंबा ...!

 

 

 

 

सिरोंचा :- कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा कडून २१ जानेवरी रोजी झालेल्या पदभरती परिक्षेत मोठी घोटाळा देखील झाली आहे. 

           या पदभरती घोटाळा होण्याची शक्यत पूर्वीपासूनच असल्यामुळे या बाबतचे निवेदन दि.१७/०१/२०२४ चा रोजी तालुका कांग्रेस कडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते, तरी त्यावर कसलीही कारवाई झाली नाही.ज्याप्रकारे परिक्षा घेण्यात आली, तीसुध्दा संशयास्पद होती, प्रश्न पत्रिका सीलबंद नव्हत्या, उत्तरपत्रिकाही सुमार दर्जेची होत्या, व विद्यार्थ्यांना ओ.एम.आर. कॉपी शिट पुरवण्यात आली नाही, पर्यवेक्षांकडे कसलेही ओळखपत्र नव्हते, या सर्व बाबींना लक्षात घेउन विद्यार्थ्यांनी २१ जानेवरी २०२४ रोजी परिक्षा झाल्यानंतर देखील उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सादर झालेल्या पेपरची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आले होते,

              दिनांक २३/०१/२०२४ रोजी विद्यार्थ्यांची गुणसुची कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथील सूचना फलक येथे प्रसिध्द करण्यात आली आहे, 

         त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथील पदाधिकाऱ्याचे निकटवर्तीय व नातेवाईक यांनाच सर्वात जास्त गुण आहेत, त्यावर नवासहित यादी जाहीर करण्यात आली नाही,पदाधिकारी यांचे संबंधितांची बाजार समितीत विविध पदावर नियुक्त झाली आहे, 

         यात गरीब व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाली आहे, त्यामध्ये जे विद्यार्थी नियुक्त झाली आहे, त्यांची व परिक्षा घेणाऱ्या संस्थेची देखील चौकशी झाली पाहिजे,

             करिता जो पर्यंत घोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत बाधित परीक्षार्थींनी तालुका कांग्रेस पक्षातर्फे तहसील कार्यालय समोर आंदोलन सुरू केले आहे,

              त्या आंदोलनाला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार) पक्षातर्फे उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे,


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 23, 2024

PostImage

विसापूरातील युवकाची निर्घुन पणे केली हत्या बल्लारपूर तालुक्यातील खळबळजनक घटना


विसापूरातील युवकाची निर्घुन पणे केली हत्या बल्लारपूर तालुक्यातील खळबळजनक घटना

 

 

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर गावात सोमवारी अयोध्या येथील प्रभू रामचंद्र मूर्तीची प्रतिष्ठापनानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. तो रात्री पंढरीनाथ देवस्थान जवळ आयोजित महाप्रसाद रात्री ९ वाजता दरम्यान घेतला. त्यानंतर तो घरी गेला.दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याचेवर अज्ञातांनी चाकूने वार करून त्याची निर्घून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात एकच खळबळ माजली आहे.सचिन भाऊजी वंगणे (३७) रा.विसापूर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

सचिन वंगणे हा चालकाचे काम करत होता. त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी व मुलगा त्याचे जवळ राहत नव्हते. त्याची वृद्ध आई मीराबाई वंगणे हिच त्याचा आधार होती. मात्र आई देखील त्याच्या व्यसनाला कंटाळून शेजारी झोपण्यासाठी जात होती.

काल सोमवारी सचिन हा दारू प्यायला. काही वेळ तो मिरवणुकीत देखील सहभागी झाला होता. रात्री ९ वाजता दरम्यान महाप्रसादाचे जेवण करून घरी दरवाजा समोर झोपी गेला. त्यावेळी आई मीराबाईने त्याला विचारपूस केली. तेव्हा त्याने आई तु मला सकाळी लवकर जागे कर. मला गाडी घेऊन जायचे आहे. म्हणून सांगितले. मंगळवारी सकाळी सचिनची आई त्याला जागे करण्यास गेली असता, तो घरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून आई मीराबाईने हंबरडा फोडला. दारूच्या व्यसनामुळे त्याचा नाहक अज्ञात मारेकऱ्यांनी जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती विसापूर चौकीचे कर्मचारी दुष्यंत गोडबोले, जीवन पाल व घनश्याम साखरकर यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वरिष्ठाना कळविले. चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन पोलीस निरीक्षक महेश कोंडवार,पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उप अधीक्षक दीपक साखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड आदीने घटनास्थळी येऊन शासकीय कर्मचाऱ्यासमक्ष पंचनामा केला. या प्रकरणी विसापूर येथील तिघाना संशयीत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

दारूच्या व्यसनाने केला घात 

सचिन वंगणे याला दारूचे व्यसन जडले. यामुळे पत्नी पपीता ही त्याला सोडून मुलासह माहेरी पोंभुर्णा तालुक्यातील फुटाणा येथे १० वर्षांपासून राहत होती. घरी सचिन हाच वृद्ध आई मीराबाईचा आधार होता. मात्र तो दारू पिऊन आल्यावर आईला देखील शिवीगाळ करत होता. मात्र आईचे ममत्व सचिन हाच आधार होता. अचानक सोमवारी अज्ञात मारेकऱ्यांनी डाव साधला. त्याचा पोटावर, पाठीच्या मागे व जबरदस्त मारहाण करून सचिनचा जीव घेतल्यामुळे वृद्ध आईचे अवसान गळाले आहे. काही वर्षांपूर्वी लहान मुलाने देखील रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली होती.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 23, 2024

PostImage

वैनगंगा नदीत नाव उलटून सहा महिला बुडाल्या, शोधमोहीम वेगात सुरू आहे


वैनगंगा नदीत नाव उलटून सहा महिला बुडाल्या, शोधमोहीम वेगात सुरू आहे 

 

 

 

गडचिरोली : वैनगंगा नदीच्या गणपूर (रै.) घाटावरून निघालेली डोंगा पाण्यात बुडाल्याने ६ महिला वाहून गेल्याची घटना आज २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.या घटनेत एका महिलेचे मृतदेह मिळालेले असून अद्याप ५ महिला बेपत्ता आहेत. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे.

 

सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील गावात डोंग्याने सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे सहा महिला आणि नावाडी बुडाले. नावाडी पोहून बाहेर निघाला व एका महिलेला वाचविण्यात आले. चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 22, 2024

PostImage

गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला अवैध दारुसह 3,62,400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त


 

गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला अवैध दारुसह 3,62,400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

 

     दिनांक 21/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे गोपनिय माहिती मिळाली कीे, पोलीस स्टेशन, गडचिरोली हद्यीतील दारु तस्कर गोपाल बावणे, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय विश्राम भवन, गडचिरोली जवळ दिनांक 22/01/2023 रोजीच्या रात्रो दरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता, मिळालेल्या गोपनिय माहितीतील संशयीत पांढ-या रंंगाचे मारोती सुझुकी कंपनीचे अल्टो वाहन हे येताना दिसले असता पोलीसांनी त्यास थंाबविण्याकरीता ईशारा दिला. परंतू वाहन चालकानी पोलीसांच्या इशा-यास न जुमानता वाहनासह पळ काढला. त्यानंतर पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्यांचे ताब्यातील वाहन गडचिरोली शहराच्या दिशेने नेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर वाहनास अडवीले असता वाहन चालक व त्याचा साथीदार अनुक्रमे नामे 1) प्रफुल टिंगुसले, रा. गोकुळनगर, गडचिरोली व 2) गणेश टिंगुसले, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचाही पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरच्या दारुच्या अवैध वाहतुकीत सहभागी असलेला ईसम नामे गोपाल बावणे हा ही कार्यवाही सुरु असतांना अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी वाहनाने फरार झाला. 

 

त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारुच्या 14 पेट्या, विदेशी दारुच्या 02 पेट्या, बिअरच्या 02 पेट्या व 2 लिटर क्षमतेचे विदेशी दारुचे 06 बंपर दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले मारुती सुझुकी कंपनीचे अॅल्टो वाहन असे एकुण 3,62,400/- रुपयाचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 98 (2), 83 महा. दा. का. अन्वये आरोपी नामे गोपाल बावणे, गणेश टिंगुसले व प्रफुल टिंगुसले यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

सदर कार्यवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. राहुल आव्हाड, पोअं/प्रशांत गरुफडे, श्रीकृष्ण परचाके व चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 22, 2024

PostImage

फुले महाविद्यालयाचे विशेष शिबिर चपराळा येथे संपन्न


फुले महाविद्यालयाचे विशेष शिबिर चपराळा येथे संपन्न

 

आष्टी:गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पंचप्राण व उन्नत भारताकरिता युवाशक्ती या संकल्पनेवरील विशेष श्रम संस्कार शिबिर दिनांक 9 ते 15 जानेवारी दरम्यान चपराळा येथे संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटक वनविभागातील क्षेत्र सहाय्यक मा.संजय जुनघरे यांनी वन विभागाविषयी माहिती देत शिबिरार्थींना श्रमप्रतिष्ठा जोपासण्या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनीश्रम संस्कार शिबिरात शिबिरार्थी स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे,व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता हे शिबिर महत्वपूर्ण ठरेल असे विचार मांडले .उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी व पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

शिबिरात पशू चिकित्सा शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत पशुधन पर्यवेक्षक प्रमोद निमसरकार, रुपेश कळंबे,ममता भैसारे यांनी गावातील गुरांची तपासणी केली. गावातील विविध गुरांचे लसीकरणही करण्यात आले .यावेळी पशुधन पर्यवेक्षक प्रमोद निमसरकार यांनी पशुधनाची घ्यावयाची काळजी, विविध आजार व त्यावरील निदान याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. चपला या गावातील एकूण ४२ परिवारांचा पशुपालन हा व्यवसाय असल्यामुळे या गावातील गायींची संख्या 120 , म्ह्शी ५३ एकूण १७३पाळीव प्राणी व शेळ्या आहेत. त्या अनुषंगाने पशूचिकित्सा शिबिर उपयुक्त ठरले.

आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. खुशबू करंगम, आरोग्य सेविका छाया बीटपल्लीवार, पुष्पा बोटावाऱ यांनी ग्रामस्थांच्या आजाराची तपासणी करून निदान केले.

बौद्धिक कार्यक्रमांतर्गत 'सरी वरंबा पद्धत आणि शेती 'या विषयावर प्रा. बी. के. राठोड यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तत्रज्ञानपद्धती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इतिहासाचे सिंहावलोकन व पंचप्रण या विषयावर प्रा. ज्योती बोबाटे यांनी मार्गदर्शन केले .भारतीय परंपरांचा अभिमान बाळगत ,विविध जखमांना पुसून टाकत देदिप्यमान भारताच्या वाटचालीकरिता स्वयंसेवकांनी कर्तृत्व गाजवयाविषयीचे आवहान मान्यवरांनी केले. राजमाता जिजाऊ या विषयावर सुषमा कुलसंगे यांनी तर स्वामी विवेकानंद व युवा जागर या विषयावर प्रा.राजकुमार मुसने व शुभम पुन्नेलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .'आपत्ती व्यवस्थापन 'या विषयावर चान्सलर ब्रिगेडियर प्रशिक्षणार्थी शुभम गंधारे यांनी मार्गदर्शन केले .मतदार जागृती संदर्भात डॉ. गणेश खुणे यांनी मार्गदर्शन केले. 'व्यक्तिमत्व विकास 'या विषयावर प्रा.धनश्री चिताडे यांनी तर 'जागर जाणिवेचा' विषयावर केंद्रप्रमुख दिलीप बारसागडे यांनी मार्गदर्शन केले. मानवाधिकार ,उन्नत भारत व स्त्रीशक्ती, जल व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या विषयावर राजकुमार मुसणे यांनी मार्गदर्शन केले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या महामानवाची दिंडी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात काढण्यात आली. याकरिता प्रीतम , प्रज्ञा व रोहित या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले ,राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांची वेशभूषा धारण केली होती. महामानवांच्या प्रतिमा आणि महामानवांच्या वेशभूषेतील स्वयंसेवक या आकर्षणाने दिंडीला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. दिंडीच्या आयोजनाकरिता तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साईनाथ गुरनुले, उपसरपंच दयानाथ कोकेरवार, व्यंकंना बंटीवार व प्रवीण कावळे यांनी सहकार्य केले. गावातील महिलांनी विविध गीते सादर करत व भजनांच्या माध्यमातून दिंडीला रंगत आणली.

दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम योग नृत्य, श्रमदान , दुपारी बौद्धिक कार्यक्रम व रात्रौ प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे शिबिराचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. प्रेरणा गीते ,आदिवासी नृत्य ,लावणी ,विविध नृत्यांच्या तालावर तरुणाई थिरकली. प्रबोधनपर नाट्याने जनजागृती करण्यात आली. चपराळा येथे होणाऱ्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात विविध खेळाचे मैदान स्वयंसेवकांच्या सहकार्याने तयार करण्यात आले. चपराळा हे गाव मुख्य मार्गापासून आडवळणाचे असूनही या गावातील गुणवत्तावान खेळाडू

शैलेश दयानाथ कोकेरवार याने 

600 मीटर धावणे व उंच उडी राज्यस्तरीय स्पर्धेत क्रमांक पटकाविल्याबद्दल व प्रीती राजू गुरनूले

उंच उडी जिल्ह्यातून प्रथम गोळा फेक प्रथम क्रमांक पटविल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करून भावी वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

समारोपीय कार्यक्रमात उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करीत शिबिरादरम्यान गावातील वातावरण संस्कारक्षम झाल्याचे स्पष्ट केले. समारोपीय कार्यक्रमास उपसरपंच दयानाथ कोकेरवार,सुशांत परमनिक,देवाजी आदे,सविता पिपलशेंडे ,निता आदे , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. उरेते उपस्थित होते.

वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा.बबलुभैया हकीम, सामाजिक कार्यकर्त्या शहीन भाभीजी हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली व महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या दिशादर्शनाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .राजकुमार मुसने यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या शिबिराकरिता महाविद्यालयातील प्रा . ज्योती बोबाटे, प्रा. भारत पांडे, डॉ.गणेश खुणे,प्रा रवी शास्त्रकार, प्रा.रवी गजभिये, शिक्षकेतर कर्मचारी राजू लखमापुरे, निलेश नाकाडे, संतोष बारापात्रे, सुजित बाच्याळ, विनोद तोरे, मुस्ताक शेख, सवयंसेवक हिमांशू उराडे ,निगम वेलादी, स्नेहल बट्टे, ग्रामपंचायतचे सचिव वसंतजी बारसागडे,अशोकजी कावडे, छायाताई आदे,मुख्याध्यापक पी.आर. उरेते ,सविता आदे ,प्रवीण कावळे यांनी सहकार्य केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 22, 2024

PostImage

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने मार्कंडा कंन्सोबा येथे गोपाळकाला


अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने मार्कंडा कंन्सोबा येथे गोपाळकाला 

 

मार्कंडा कंन्सोबा गावात भक्तीमय वातावरण

 

 

चामोर्शी : अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्ताने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील कंन्सोबा देवस्थान येथे आज दिनांक २२ जानेवारी सार्वजनिक गोपाळकाला करण्यात आला. 

गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल पंदिलवार, विजय बहिरेवार, श्रावण चापले, नितीन बहिरेवार, गजानन बिटल्लीवार, काशीनाथ तोरे, निलकंठ आलाम यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. 

या गोपालकाला उत्सवात सहभागी प्रत्येकाचा उत्साह होता.अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मुर्तीच्या प्रतिष्ठापणा सोहळा निमित्ताने गावातील कंन्सोबा देवस्थान येथे गोपाळकाला करण्याचे नियोजन अगोदरच करण्यात आले होते.

नियोजनाप्रमाणे दिनांक २१ जानेवारी रोजी कंन्सोबा मंदिर येथे घटस्थापना करण्यात आली व आज गोपाळकाला करण्यात आले.

रात्री गावातीलच जगन्नाथ बाबा भजन मंडळाच्या वतीने भजन करण्यात आले.

गावातील स्थानिक नागरिकांकडून लोकवर्गणी गोळा करण्यात आली याच लोकवर्गणीतून मंदिराची सजावट व गोपाळकाला करण्यात आला.

सर्व गावातील महिला, पुरुषांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 22, 2024

PostImage

सात गावाचं पाणी बंद, विज बिल थकलं, महिला सरपंचाची त्यागाची भूमिका


सात गावाचं पाणी बंद, विज बिल थकलं, महिला सरपंचाची त्यागाची भूमिका

 

 

 गोंडपिपरी: विद्युत देयकाची भरणा केली नसल्याने सात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सात गावातील हजारो नागरिकांवर जल संकट कोसळलं. पाण्यासाठी दाही दिशा नागरिक भटकत होते. या कठीण परिस्थितीत सरपंच दापत्य गावाच्या मदतीला धावून आलेत. स्वतःच्या शेतीचा बळी दिला आणि गावाची तहान भागविली. सरपंच सौ अपर्णा अशोक रेचनकर व ग्रा. प. सदस्य अशोक रेचनकार असे दांपत्याचे नावे आहेत.

      गोंडपिपरी उपविभागातील पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. वीज बिलाचे सहा लाख 13 हजार 807 रुपयांचे देयक न भरल्याने महावितरण कंपनीने ही कारवाई केली आहे. या पाचही योजनेतून तालुक्यातील 30 गावांचा पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे एन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या गावातील नागरिकांवर ओढवली आहे. च्या पाच योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला त्यात चेकबापूर, , हेटीनांदगावं, सकमूर, चेकनांदगावं, कुडेनांदगावं, टोलेनांदगावं, गुजरी या गावांचा समावेश आहे. या सात गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाही पाणीपुरवठा बंद असल्याने सात गावातील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढवली या बिकट स्थितीत सरपंच सौ अपर्णा रेचनकर व ग्रा.प. सदस्य अशोक रेचनकर यांनी सात गावाची तहान भागवण्यासाठी धावून आलेत. वर्धा नदीच्या पात्रात योजनेची विहीर आहे तिथून पाणीपुरवठा केला जातो. आणि तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या काही अंतरावर रेचन कर यांच्या मालकीची दहा एकर शेती आहे शेतात मिरची, वांगे,टमाटर असे पीक उभे आहेत. रोज शेतीला पाणी करावे लागते. मात्र गावाची तहान भागवण्यासाठी रेचनकर दापत्य यांनी शेतीच्या सिंचनासाठी असलेला विद्युत पुरवठा योजनेचा मोटार पंपाकडे वळता केला. यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद झाला आहे परिणामी शेतीला मोठा फटका बसला असून शेत कोरडे पडले आहे. पीक करपत असून गावासाठी शेतीचा बळी देणाऱ्या रेचनकर दांपत्य त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 22, 2024

PostImage

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 24 ते 31 जानेवारी या कालावधीत घरोघरी सर्व्हेक्षण


मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी

24 ते 31 जानेवारी या कालावधीत घरोघरी सर्व्हेक्षण

 

गडचिरोली,(जिमाका)दि.22: मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 24 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घरोघरी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. 

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इंपिरीयल डाटा गोळा करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने करावयाच्या सर्व्हेक्षणासाठी निकष निश्चित केले असून त्याबाबतची प्रश्नावली अंतिम केली आहे. या सर्व्हेक्षणाच्या कामासाठी व प्रश्नावलीच्या संबंधाने संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून तर नायब तहसीलदार यांना सहायक नोडल अधिकारी व एका शासकीय कर्मचा-याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचा-यांकडून सर्व्हेक्षणासाठी तालुक्यात नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक यांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने 24 जानेवारी 2024 पासून प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाला सुरवात होणार आहे.

सदर सर्व्हेक्षण विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने 24 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत सर्व्हेक्षणासाठी आपल्या घरी आलेल्या प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊन प्रगणकाला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे. 

 

अशी माहिती आज दिनांक २२ जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 20, 2024

PostImage

ACCIBIS Hotel online Rating कंपनीने वर्क फ्राम होम'च्या नावाखाली गडचिरोली करांना ऑनलाइन लाखो रुपयांचा घातला गंडा


ACCIBIS Hotel online Rating कंपनीने वर्क फ्राम होम'च्या नावाखाली गडचिरोली करांना ऑनलाइन लाखो रुपयांचा घातला गंडा

 

 

 

गडचिरोली : वर्क फ्राम होमच्या नावाखाली जिल्ह्यातील नागरिकांना एका ऑनलाइन कंपनीने गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील नागरिक चिंतेत पडले आहेत 

एकमेकांना व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून ACCIBIS Hotel online Rating या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळेल असे आमिष दाखविले.

 

ही नेटवर्क कंपनी असून, स्वत:च्या आयडी अंतर्गत अन्य लोकांना कंपनीशी जुळविल्यास अतिरिक्त बोनस मिळेल असे सांगण्यात आले. सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. यानंतर रिटर्न पैसे मिळू लागले. यानंतर काही जणांनी आपल्या स्वत:च्या आई, बहिणीसह काही मित्र, मैत्रिणींनाही या कंपनीशी जोडले. यानंतर नेटवर्क वाढत जाऊन शेकडो जणांचे हे नेटवर्क झाले. सुरुवातीला रिटर्न मिळाल्याने पुन्हा हजारो रुपये यात गुंतविले होते. यानंतर अनेकांनी दहा ते २० हजार तर काही ५० हजारापर्यंत रक्कम या कंपनीत गुंतविली आहे.

 

सुरुवातीला कंपनीने रिटर्न दिले. मात्र, मागील काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना रिटर्न येणे बंद झाले. गुंतवणूकदारांच्या आभासी आयडीवर रकमा जमा होत होत्या. मात्र, ते पैसे काढता येत नव्हते. काही गुंतवणूकदारांनी कंपनीला संपर्क साधला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद दाखविला जात आहे. कोणताही संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.

या कंपनी मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांपासून तर सर्वसामान्य माणसाला या कंपनीने गंडा घातला आहे करीता अशा फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांपासून सावध राहण्याची गरज आहे एकमेकांच्या सांगण्यावरून पैसे गूंतवण्यात आले पण हि कंपनी अधिकृत आहे काय याची चौकशी कोणी केली नाही


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 20, 2024

PostImage

एका बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला,धड आढळले असून शिर गायब आहे


एका बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला,धड आढळले असून शिर गायब आहे

 

गडचिरोली, दि. 20 : जिल्ह्यातील रेंगेवाही उपक्षेत्रातील जंगल परिसरात एका बेपत्ता असलेल्या इसमाचा धडावेगळा मृतदेह आढळल्याची घटना 20 जानेवारी रोजी उघडकीस आली. सदर घटनेने खळबळ उडाली असून घातपात की वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. बापूजी नानाजी आत्राम (45) रा. लोहारा ता. मूलचेरा असे मृतकाचे नाव असल्याचे कळते.

 

 

 

मृतक हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता असे कळते. जिल्ह्यात व्याघ्र हल्ले वाढले असून सदर घटनेच्या परिसरातून दोन दिवसापूर्वीच महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आले. तर याच जंगल परिसरात आत्राम यांचा मृतदेह धडावेगळा आढळून आला आहे. घटनास्थळी घड आहे तर शीर नाही अशी माहिती असून या घटनेमागे घातपात की व्याघ्र हल्ला असे विविध तर्क लावण्यात येत असून पोलिसांच्या तापसानंतरच ते कळणार आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 20, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार!!


माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार!!

 

अहेरी : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आले.सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आविसं - अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नुकतेच भारत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केले.

 

या निमित्य अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथील अजय कंकडालवार यांना भेट घेऊन शाल श्रीफळ - पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

 

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आगाराती कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 20, 2024

PostImage

पत्नीने गुपचूप मोबाईल तपासला, तेव्हा भांडाफोड झाला, त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले


पत्नीने गुपचूप मोबाईल तपासला, तेव्हा भांडाफोड झाला, त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले 

 

 

मुलचेरा :अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गशिक्षकानेच अत्याचार केला. १९ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. पतीची संशयास्पद वागणूक पाहून पत्नीने गुपचूप मोबाइल तपासला, तेव्हा भंडाफोड झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून शिक्षकास अटक केली.

 

 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, विश्वजित मिस्त्री (३८,रा. कालीनगर, ह.मु. विवेकानंदपूर ता. मुलचेरा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी मुलचेरा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. विश्वजित मिस्त्री हा तिचा वर्गशिक्षक आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले.

 

 

दरम्यान, पतीचे वागणे संशयास्पद वाटल्याने पत्नीने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले, तसेच मोबाइल तपासला तेव्हा या मुलीसोबतची चॅटींग उघडकीस आली. यानंतर तिने पतीला जाब विचारला असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरुन शिक्षक विश्वजित मिस्त्रीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी लागलीच त्यास ताब्यात घेतले. पो.नि. अशोक भापकर हे अधिक तपास करत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 20, 2024

PostImage

ACCIBIS Hotel online Rating सावधान!वर्क फ्राम होम'च्या नावाखाली साडे चारशेवर नागरिकांना ऑनलाइन कोट्यवधी रुपयांचा गंडा


ACCIBIS Hotel online Rating

सावधान!वर्क फ्राम होम'च्या नावाखाली साडे चारशेवर नागरिकांना ऑनलाइन कोट्यवधी रुपयांचा गंडा

 

 

 

चंद्रपूर : वर्क फ्राम होमच्या नावाखाली घुग्घूस येथील मायलेकीसह जिल्हाभरातील साडेचारशेवर नागरिकांना एका ऑनलाइन कंपनीने गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित युवतीने घुग्घूस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित युवती आणि भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घूस येथील शुभांगी जीवने ही युवती रोजगाराच्या शोधात होती. तिने गुगलवर रोजगारासंदर्भात शोध घेतला. इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा वापरही तिने रोजगार शोधण्यासाठी केला. दरम्यान, काही दिवसानंतर तिच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक आली. ACCIBIS Hotel online Rating या कंपनीचा संचालक असल्याचे सांगत चंदर सिंग नामक भामट्याने युवतीशी संपर्क करून संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळले असे आमिष दाखविले.

 

ही नेटवर्क कंपनी असून, स्वत:च्या आयडी अंतर्गत अन्य लोकांना कंपनीशी जुळविल्यास अतिरिक्त बोनस मिळेल असे सांगण्यात आले. युवतीने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. यानंतर तिला रिटर्न पैसे मिळू लागले. यानंतर तिने स्वत:ची आई, बहिणीसह काही मित्र, मैत्रिणींनाही या कंपनीशी जोडले. यानंतर नेटवर्क वाढत जाऊन साडेचारशे जणांचे हे नेटवर्क झाले. पीडित युवतीला सुरुवातीला दीड लाखापर्यंत तर तिच्या आईला एक लाखापर्यंतचे रिटर्न मिळाल्याने पीडितेने साडे सात लाख रुपये यात गुंतविले होते. यानंतर अनेकांनी दहा ते २० हजार तर काही ५० हजारापर्यंत रक्कम या कंपनीत गुंतविली आहे.

 

सुरुवातीला कंपनीने रिटर्न दिले. मात्र, मागील काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना रिटर्न येणे बंद झाले. गुंतवणूकदारांच्या आभासी आयडीवर रकमा जमा होत होत्या. मात्र, ते पैसे काढता येत नव्हते. पीडितेसह काही गुंतवणूकदारांनी चंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद दाखविला जात आहे. कोणताही संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने घुग्घूस पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. परंतु, घुग्घूस पोलिसांनी चंद्रपुरातील सायबर गुन्हे शाखेत तक्रार देण्यास सांगितले. यानंतर शुक्रवारी त्यांनी सायबर गुन्हे शाखा गाठून तेथेही तक्रार दिली. परंतु, सायबर गुन्हे शाखेने परत त्यांना संबंधित पोलीस ठाण्यातच तक्रार देण्यास सांगितल्याने न्याय कुणाकडे मागयचा असा प्रश्न पीडितेसह गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे.

 

ऑनलाइन फसवणुकीच्या संदर्भात देशात कोणतेही कठोर कायदे नाही. याचाच फायदा भामटे घेत असून, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून रोज लाखो लोकांना ऑनलाइन गंडविले जात आहे. अशा प्रकारासाठी केंद्र सरकार जबाबदार असून, देशात ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध कठोर कायदे करण्याची आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी भूषण फुसे आणि पीडित गुंतवणूकदारांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. 

या चंद्रपूर येथील पिडीतीने आपली फसवणूक झाल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली असल्याची एका न्युज ३४ पोर्रोटल मध्ये बातमी प्रकाशित झाली असल्याने गडचिरोली जिल्ह्यात अशाच प्रकारची फसवणूक झाली आहे का याबाबत जिल्ह्यात चौकशी केली असता गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची सुद्धा या कंपनीत फसवणूक झाली आहे. या मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांपासून तर सर्वसामान्य माणसाला या कंपनीने गंडा घातला असल्याची माहिती मिळाली करीता अशा फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांपासून सावध राहण्याची गरज आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 19, 2024

PostImage

भारतीय गौरवी परंपराचा अभिमान बाळगत पंचप्रणाचा अंगीकार करा -    बौध्दीक कार्यक्रमांत मार्गदर्शन


भारतीय गौरवी परंपराचा अभिमान बाळगत पंचप्रणाचा अंगीकार करा -   

 

बौध्दीक कार्यक्रमांत मार्गदर्शन

 

आष्टी:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना पंचप्राण विकसित करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारच्यां पंचप्राण संकल्पनेनुसार प्र एकूण पाच उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे .प्रामुख्याने पंचप्रण अंतर्गत विकसित भारताचे ध्येय ,गुलामगिरीतून मुक्तता, आपल्या गौरवी परंपरांचा अभिमान, एकता आणि नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना हे उद्दिष्टे पंचप्राण संकल्पनेत अंतर्भूत आहेत. पंचप्रणच्या माध्यमातुन स्वातंत्र्याची भावना रुजविण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीचा वेग वाढविण्याची आवड प्रत्येकामध्ये विकसित करावयाचे आहे. तरी प्रत्येकानी पंचप्रण आत्मसात करून देशसेवेच्या कार्यात उत्तरदायित्व निभावण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन प्रा. ज्योती बोबाटे यांनी केले.

त्या वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरातील बौद्धिक कार्यक्रमप्रसंगी पंचप्रण या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा राजकुमार मुसळे होते तर यावेळेस केंद्रप्रमुख दिलीप बारसागडे माजी विद्यार्थी जगदीश कपाट उपस्थित होते. प्रा . डॉ.राजकुमार मुसने यांनी भारताचा इतिहास हा गौरवी आहे. येथील क्रांतीकारकांचे हौतातम्य युवा पिढीच्या मनात रुजविले गेले पाहिजे .आजच्या युवकांनी आपल्या क्रांतिकारकांच्या कार्याची जाणीव ठेवत पंचप्राण अंगिकारावे असे मार्गदर्शन केले. बौद्धिक कार्यक्रमाचे संचालन माधुरी गावडे हिने तर उपस्थितांचे आभार अक्षय नागपुरे यांनी मानले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 19, 2024

PostImage

जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशन वर धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन एका 40 वर्षीय इसमाची आत्महत्या


 

जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशन वर धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन एका 40 वर्षीय इसमाची आत्महत्या.

 

ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान..

 

 

 

Ancher- आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7;40 च्या दरम्यान धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना रेल्वे स्थानकावरून मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस ही आपल्या ठरवलेल्या वेळेप्रमाणे मार्गस्थ झाली त्याचवेळी या अनोळखी इसामाने प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेल्या मराठवाडा एक्सप्रेस समोर उडी घेत आपली जीवन यात्रा संपवण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे , या घटनेची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह रेल्वे रुळावरून बाजूला करून तपासणी केली असता या मताच्या खिशात कुठल्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा आढळून आला नाही मात्र या इसामाने आत्महत्या का केली या हिसामाचे नाव काय हे शोधणे आता रेल्वे पोलीस व पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे तरी जे कोणी या व्यक्तीला ओळखत असेल त्यांनी जालना रेल्वे पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 18, 2024

PostImage

बल्लारपूर ते हैदराबाद पॅसेंजर व एक्सप्रेस ट्रेन लवकर सुरू करा. -तेलुगू वारी फाऊंडेशन


 

बल्लारपूर ते हैदराबाद पॅसेंजर व एक्सप्रेस ट्रेन लवकर सुरू करा. -तेलुगू वारी फाऊंडेशन

 

बल्लारपूर 

बुधवार दि-17/01/2024

- बल्लारपूर शहरात तेलगू भाषिकांची संख्या 37% च्या जवळपास आहे. हा भाग तेलंगाना व महाराष्ट्राच्या सीमेच्या जवळपास आहे व बल्लारशा रेल्वे जंक्शन असल्याने याठिकाणी प्रवाशांची नेहमीच अधिक गर्दी असते. कौटुंबिक , व्यावसायिक व इतर कारणांसाठी तेलगू भाषिक प्रवासी महाराष्ट्र-तेलंगाना असा सतत प्रवास करीत असतात परंतु रामगिरी पॅसेंजर व भाग्यनगरी एक्स्प्रेस बंद झाल्यानंतर इथल्या तेलगू भाषिकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन शहरातील तेलुगू वारी फाऊंडेशन ने यासंदर्भात रेल्वे प्रशासनास निवेदन देऊन बल्लारपूर-काजीपेट तसेच हैदराबाद साठी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची मंगणी केली. जर असे झाले नाही तर तेलूगू भाषिकांच्या हितासाठी आक्रमक भुमिका घेण्याचे ही आव्हान देखील करण्यात आले. यावेळेस तेलुगू वारी फाऊंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष- रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष- आनंद महाकाली, सचिव- प्रा. नागेश्वर गंडलेवार, कोषाध्यक्ष- उमेश कोलावार, संजय मुपीड़वार, श्रीनिवास आऊला, गणेश सिलगमवार, मलेश येल्लावार, श्रीनिवासन तौटवार आणि इत्यादी संस्थेचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 17, 2024

PostImage

अंगणवाडी महिला कर्मचार्यानी केली शासनाच्या आदेशाची होळी.


अंगणवाडी महिला कर्मचार्यानी केली शासनाच्या आदेशाची होळी.

आंदोलनाला 44 दिवस होऊनही कोनत्याही मागण्या पूर्ण न करता आंदोलन करनार्या अंगणवाडी सेविका व मदतनीसावर कार्यवाही करनारे परीपत्रक काढल्या मुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी त्या पत्राची महिला व बाल विकास कार्यालया एटापल्ली समोर होळी करुन शासनाचा जाहिर निषेध केला.

किमान 26 हजार मानधन देण्यात यावे,गैज्युट्री देन्यात यावि , पाच हजार पेन्शन देण्यात यावि या साठी महाराष्ट्रात दोन लाख अंगणवाडी महिला 4 डिसेंबर पासुन बेमुदत संपावर आहेत.या मुळे महाराष्ट्रात कुपोषण वाढत असल्याने सरकार अडचणीत आलेला आहे .अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता त्याच्यावर कार्यवाही करुन सरकार हिटलर शाहीने वागत असलेल्याचा आरोप कॉ.अमोल मारकवार यांनी केला.

जो पर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत कोनत्याही परिस्थिती आंदोलन मागे घेतले जानार नाही असे संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी ठरवुन आंदोलन पुन्हा तेज करण्याचे ठरवले. व या बाबत तहसीलदार साहेबाना निवेदन दिले.

या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, छायाताई कागदेलवार, सुनंदाताई बावने, मायाताई नौनुरवार,विटाबाई भट,

मोनी बिस्वास,वच्छला तलांडे,बबिता मडावी,कविता मुरमुरे,मंगला दुगा,राजेश्वरी खोब्रागडे,संगिता बांबोळे,तारा वैरागडे,सुमन चालुरकर,प्रेमिला झाडे यांनी केल तसेच एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील 500 महिला सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात कॉग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. अजयभाऊ कंकडालवार आंदोलनात भाकपाचे कॉ.सचिन मोटकूलवार व कॉ. सुरज जक्कुलवार यांनी सुध्दा पाठिंबा दिला.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 17, 2024

PostImage

चोरट्यांनी दिवसाढवळ्या मारला डल्ला, आष्टी येथील घटना 


चोरट्यांनी दिवसाढवळ्या मारला डल्ला, आष्टी येथील घटना 

 

आष्टी:-

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना दि १६ जानेवारी रोजी घडली.

आष्टी येथील नथ्थुजी नन्नावरे हे लिटिल हार्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या जवळच वास्तव्यास स्वतःचे घरी राहतात दि १६ जानेवारी ला ते मंजुरीसाठी कामावर ८.४५ वा.गेले त्यानंतर काही वेळातच त्यांची पत्नी व मुलगा घराला कुलूप लावून बाहेर गावी निघून गेले  

सायंकाळी कामावरून नथ्थुजी नन्नावरे घरी ५.३० वाजताचे दरम्यान घरी परत आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडले दिसले घरात प्रवेश करुन पाहिले असता कपाट खुला दिसला व कपाटातील एक ड्राप पलंगावर ठेवलेला दिसला व एक स्टीलचा डब्बा किचन च्या ओट्यावर खुल्या अवस्थेत दिसून आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला.

लागलीच त्यांनी पत्नीला फोन करुन विचारले असता डब्यात अर्धा तोडा सोन्याची अंगठी होती व ड्रापमध्ये पंधरा हजार रुपये होते असे सांगितले तेव्हा पोलीस स्टेशन आष्टी येथे तक्रार दाखल केली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता चोरट्यांनी कुलुप कशाच्या तरी साह्याने तोडून घरात प्रवेश केला आहे

हे चोरटे गावातीलच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 16, 2024

PostImage

विकसित भारत संकल्प यात्रेच्या शिबिरात सामाजिक कार्यकर्त्याने विचारला जाब


विकसित भारत संकल्प यात्रेच्या शिबिरात सामाजिक कार्यकर्त्याने विचारला जाब

 

चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील अनुभव : सरकार भारताचे की मोदींचे अशा प्रश्नांचा भडिमार

 

चामोर्शी : तालुक्यातील अनखोडा गावात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन दिनांक १५ जानेवारी रोजी करण्यात आले व ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनानुसार विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावात आला आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि अनखोडा येथील ग्रामपंचायतीचे सचिव संभाषण करीत असताना गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष तिमाडे यांनी भारत की मोदींचे सरकार, शासकीय खर्चातून मोदी आणि भाजपचा प्रचार का, अशा प्रश्नांचा भडिमार करत शिबिरात ग्रामसेवक बारसागडे यांना चांगलेच धारेवर धरले. ते निरूत्तर झाले.

तिमाडे यांनी यात्रेच्या उद्देशावरच गंभीर असे प्रश्न उपस्थित केला. या घटनेचा व्हिडीओही दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

 

केंद्र शासन राज्य शासनाच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवत आहे. या मोहिमेची सुरुवात तालुक्यात झाली आहे. यात्रेचा प्रचार रथ सोमवारी अनखोडा येथे पोहोचला. तेथील ग्रामसेवकांनी निमंत्रित केलेल्या ग्रामस्थांच्या हातात हिरवे झेंडे आहेत ते व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत 

यावर तिमाडे यांनी जोरदार आक्षेप घेतला. योजना भारत सरकारच्या की मोदींच्या असा प्रश्न त्यांनी ग्रामसेवक बारसागडे यांना विचारला


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 16, 2024

PostImage

घराजवळ वाघाने हल्ला करून आणखीन एका महिलेला केले ठार


घराजवळ वाघाने हल्ला करून आणखीन एका महिलेला केले ठार

 

मुलचेरा: तालुक्यातील कोडसापुर येथील रमाबाई शंकर मंजूमकर या आपल्या शेतात कापूस वेचणी करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केला असल्याची घटना आज दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली

 

मिळालेल्या माहितीनुसार रमाबाई या आपल्या शेतात कापूस वेचणी करीत होत्या सांयकाळ होऊनही घरी परतल्या नसल्याने घरच्यांनी शेतात जाऊन आवाज दिले पण आवाज देऊनही काहीच पत्ता लागला नाही नंतर शेतात शोध घेऊन पाहिले असता रक्त सांडले असल्याचे दिसून आले.

वाघानेच हल्ला केला असल्याचे समजून याची माहिती गावकऱ्यांना दिली व लगेच मार्कंडा कंन्सोबा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती दिली  

गावाजवळील जंगलात गावकऱ्यांनी व मार्कंडा कंन्सोबा वनविभागाच्या चमूसह शोध घेतले असता गावाजवळील जंगलात रमाबाईचा मृत्तदेह आढळून आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 15, 2024

PostImage

वन विभागाची धडाकेबाज कारवाई.. विनापरवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही.


वन विभागाची धडाकेबाज कारवाई..

 

विनापरवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही..

 

लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागांनी केला जप्त..

 

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात अवैधरित्य लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.

गुप्त बातमी वरून वन विभागाचे वनपाल राऊत आणि वनरक्षक घुगे यांना माहिती मिळाली होती की, मंठा रोड वरून लाकडाचा अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत आहे. या माहितीच्या आधारावर वन अधिकाऱ्यांनी तात्काळ मंठा चौफुली परिसरात सापळा लावला असता,थोड्याच वेळात मंठा चौफुली परिसरातील अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आला. त्यांनी ट्रॕक्टरा ला थांबवून वाहतुकीच्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे ट्रॅक्टर ड्रायव्हरने सांगीतले. यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रॕक्टर ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र ऊद्यानात लावले,

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरील कारवाई जालन्याचे वनपाल राऊत वनरक्षक घुगे यांनी केली.

जिल्ह्यात लाकडाची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर यापुढे ही कारवाई सुरु राहणार असून जालना शहाराच्या चार ही बाजूने असलेल्या बायपास रोडवर वन विभागाच्या वतीने फिल्डिंग लावलेली असून अवैध रित्या लाकडाची वाहतूक करणारे वाहन आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल,असा ईशारा वन विभागाच्या आधिकांऱ्याच्या वतीने देण्यात आला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 14, 2024

PostImage

लाचखोर विज तंत्रज्ञ अडकला एसीबीच्या जाळ्यात, रंगेहाथ पकडले


लाचखोर विज तंत्रज्ञ अडकला एसीबीच्या जाळ्यात, रंगेहाथ पकडले 

 

आरमोरी – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमी. आरमोरी (ग्रामीण) ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र डोमाजी बगडे, वय ३६ वर्षे (वर्ग-३) यांना १,५०० रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार हे मु. पो. वैरागड ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तकारदार यांचे मौजा सोनपूर सर्व्हे क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता पोलचे सर्व्हे करुन चार विद्युत पोल बसत असून ते कमी करुन ३ पोल केल्याचा मोबदला म्हणून आरोपी महेंद्र डोमाजी बगडे यांनी तकारीस ५,०००/- रुपयांची मागणी केली. तकारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.

 

         पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान मौजा सोनपूर सव्हें क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता विद्युत पोलचे सर्व्हे करुन चार विद्युत पोल बसत असतांना ते ३ पर्यंत कमी करुन दिल्याच्या मोबदला म्हणून आरोपी महेंद्र डोमाजी बगडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमी. आरमोरी (ग्रामीण), कार्यालय आरमोरी यांनी ५,०००/- रुपयांची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व तडजोडीअंती १,५००/- रुपये स्विकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोस्टे, आरमोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी बगडे यांचे आरमोरी येथील निवासस्थानाची अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चम्मुकडून झडती घेण्यात आली.

 

       सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूर यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जौंजारकर, पोशि संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके व चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 14, 2024

PostImage

हायवा ट्रकच्या मागील चाकात आल्याने एका वृद्धाचा झाला चेंदामेंदा


हायवा ट्रकच्या मागील चाकात आल्याने एका वृद्धाचा झाला चेंदामेंदा 

 

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील शितल रेष्टारंट च्या पुढे

एका हायवा ट्रकच्या अपघातात ईसमाचा चेंदामेंदा झाला.मृतकाचे नाव कालीपद राजेन्द्र विश्वास वय ८० रा. आष्टी असेअसून हायवा ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ७४७४ असे आहे सविस्तर असे की, हायवा ट्रक हा शितल रेष्टारंट च्या पुढे उभा ठेवण्यात आला होता. ट्रक चालक नितीन सुधाकर कन्नाके वय ३० रा. मार्कंडा (कं) याने आपल्या ताब्यात असलेला ट्रक घेऊन आंबेडकर चौकाकडे जाण्यासाठी निघाला मात्र मृतक म्हातारा मागील चाकात आल्याने त्याचा चेंदामेंदा झाला हि घटना आज दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन गावडे व सहकारी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ट्रक व चालक यास ताब्यात घेतले आहे .अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे व पोलीस करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 14, 2024

PostImage

चामोर्शी पोलिसांच्या पुढाकारातून बेपत्ता बाप लेकाची दीड वर्षांनी भेट


चामोर्शी पोलिसांच्या पुढाकारातून बेपत्ता बाप लेकाची दीड वर्षांनी भेट

चामोर्शी -दिनांक 11/01/2024 रोजी मौजाभिक्षी तालुका चामुर्शी या गावांमध्ये रात्र च्या वेळी साधारण पन्नास वर्षाचा वेडसर इसम आला होता. सदर इसम हा रस्ता भटकून फिरत होता. सदर बाबतची माहिती गावचे पोलीस पाटील श्रीमती सविता भूपती वाळके यांनी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी तात्काळ बिक्शी चे बीट जमादार सहाय्यक फौजदार श्री धनंजय मेश्राम, चालक पोलीस हवालदार ईश्वर मडावी व पोलीस अंमलदार  देवराम पटले यांना रवाना केले आणि चौकशी सुरू केली. यावरून वाट भटकलेल्या इसमाने त्याचे नाव मुनेश्वर किसन यादव वय 50 वर्ष रा मेसा तालुका झुंजारपूर जिल्हा मधुबनी (बिहार) असे सांगितले व या व्यतिरिक्त कोणतेही माहिती सांगितली नाही. त्यानंतर पोलिसांनी चौकशीची चक्रे वेगाने फिरवून त्याचा मुलगा नामे आमोद कुमार मुनेश्वर यादव यांच्याशी संपर्क केला असता त्याने धक्कादायक माहिती दिली की, अमोल कुमार यादव व त्याचे वडील हे दोघे कामाच्या शोधात जुलै 2022 मध्ये मुंबई येथे आले होते. काम शोधत असताना जुलै 2022 मध्ये त्याचे वडील मुंबई येथे हरवले त्यानंतर भरपूर शोध घेऊन ते मिळाले नाहीत. वडील मिळून न आल्याने मुलगा त्याच्या मूळ गावी बिहार येथे परतला होता त्यांनी पूर्ण आशा सोडून दिली होती. परंतु चामोर्शी पोलिसांनी संपर्क केल्यानंतर आपल्या वडिलांना घेऊन जाण्यासाठी मुलगा व त्याचे नातेवाईक बिहार येथून गडचिरोली येथे येण्यासाठी निघाले दरम्यान हरवलेल्या इसम मुनेश्वर किसन यादव यांची दोन दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था पोलीस पाटील श्रीमती सविता वाळके व सरपंच अंजुबाई मोटघरे यांनी केली. नातेवाईक आल्यानंतर पोलिसांनी मुनेश्वर यांना नवीन कपडे देऊन आनंदाने मुलाच्या स्वाधीन केले. त्यावेळी मुनेश्वर किसन यादव व मुलगा अमोदकुमार मुनेश्वर यादव व सर्व गावकरी यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. पोलिसांच्या सतर्कतेने व प्रयत्नाने तब्बल दीड वर्षांनी पिता पुत्रांची भेट झाल्याने चामोर्शी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 13, 2024

PostImage

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे समाजसेवेचे उत्तम साधन : प्राचार्य डॉ. बी.व्ही. धोटे


राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे समाजसेवेचे उत्तम साधन : प्राचार्य डॉ. बी.व्ही. धोटे

 

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अंतर्गत शरद पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मौजा चाकलपेठ येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळा मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्षाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जातीपातीच्या पलीकडे जाऊन गाव विकासाठी झटले पाहिजे. समाजातील सर्व प्रकारच्या जातीभेद मिटून आपण एक आहोत ही भावना जनमानसात रुजली पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात येतो. गावागावात स्वच्छ्ता,आरोग्य, पर्यावरण संवर्धन यांसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्य करणे, हेच या शिबिराचे खरे फलित आहे. मी माझ्या गावाला आदर्श करू शकतो, या भावनेतून मानवतावादी विचारांना चालना देणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.व्ही. धोटे यानी केले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्नित हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शि द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिर चाकलपेठ ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. लोकशाही- मताधिकार, युवक, ,आरोग्य स्वछता,पर्यावरण,मतदार जनजागृती युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन १२ जानेवारीला जि. प. उच्च प्राथमिक शाळा चाकलपेठ येथे पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन चाकलपेठ येथील प्रतिष्ठित नागरिक तथा चामोर्शी खरेदी विक्री संघाचे संचालक नामदेव पाटील किनेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य भाऊ गण्यारपवार प्रतिनिधी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,चामोर्शी. या गावचे सरपंच गिताताई रायसीडाम, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून माणूस घडविता येतो असे प्रतिपादन मार्गदर्शक राकेश भाऊ पोरटे यांनी केले संतोष किनेकर, सौ. ज्योती मडावी, सौ. वर्षा किनेकर, मुख्याध्यापक उंदीरवाडे सर, मेश्राम सर, प्रकाश पाटील रामगिगिनवार, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा. से. यो. समन्वयक प्रा. झाडे सर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. नितेश सावसाकडे सर तर आभार प्रा. कृणाल आंबोरकर सर यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 12, 2024

PostImage

ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले: समीक्षाचा जागीच मृत्यू


ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले: समीक्षाचा जागीच मृत्यू  

बाजार समितीच्या गाळ्यां जवळील कॉर्नरवरील घटना....
ब्रह्मपुरी... येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात  अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अंगावरून ट्रक गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १२जानेवारी२०२४ रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या दरम्यान नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ घडली.
समीक्षा संतोष चहांदे वय (१७)वर्ष असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती मालडोंगरी येथील रहिवासी होती.
  समीक्षा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती आज शाळेत जात होती. ट्रक येत असल्याचे पाहून ती बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता अरुंद रस्ता व रस्त्यावर खड्डे असल्यामुळे रस्त्यावरून बाजूला होण्याच्या नादात तिची सायकल स्लिप होऊन ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली. त्यातच हा अपघात घडला असल्याचे अंदाज वर्तविला जात आहे.प्रतीक्षाच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती चिरडली गेली. व घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी  गर्दी केली. व काही क्षणातच पोलिसांना प्राचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रक व  ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 11, 2024

PostImage

श्रमदानाबरोबरच समाजसेवेसाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा - क्षेत्र सहाय्यक संजयजी जुनघरे यांचे प्रतिपादन


श्रमदानाबरोबरच समाजसेवेसाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा -

क्षेत्र सहाय्यक संजयजी जुनघरे यांचे प्रतिपादन

 

 फुले महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे थाटात उद्घाटन

 

आष्टी - महात्मा फुले महाविद्यालयाचे एनएसएस शिबिर चपराळा या आडवळणाच्या पण नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध गावात आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे मनापासून कौतुक.

 विद्यार्थी मित्रांनो 1911 मध्ये स्थापना झालेले चपराळा येथील पुरातन विश्रामगृह प्राणहिता नदीकाठावर जंगलाच्या सानिध्यात निसर्ग समृद्धीने नटलेले आहे. आपण विश्रामगृहाला अवश्य भेट द्या. तिथून सूर्यास्ताचे अवलोकन करा आनंद मिळेल.25 फेब्रवारी 1986 ला चपराळा या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली.134.78 चौरस मीटर वनक्षेत्रात वन्यजीवांचं वास्तव्य व वनसंपदेमुळे लौकिक आहे. इथल्या निसर्गाचा आनंद घेत स्वयंसेवकांनी श्रमदानाबरोबरच समाजसेवेसाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन क्षेत्र सहाय्यक वन अधिकारी संजय जुनघरे यांनी केले. ते गोंडवाना विद्यापीठाची संलग्नित वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय फुलझेले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप, उपसरपंच दयानाथ कोकेरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकन्ना बंटीवार ,छायाताई बीटपल्लीवार, मुख्याध्यापक पी. आर. उरेते, शुभम पुन्नेलवार, सुषमा कुलसंगे, सुरेश कोकेरवार , भारत पांडे ज्योती बोभाटे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ .राजकुमार मुसणे उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप यांनी विद्यार्थी जीवनातील श्रमसेवेचे महत्व पटवून देत विविध अंधश्रद्धा ,रुढी-परंपराचे उच्चाटन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी स्वयंसेवकांनी गावाच्या समस्या समजून घेऊन त्या अनुषंगाने कार्य करण्याविषयी आवहान केले. प्राचार्य संजय फुलझेले लेयांनी शिबिराला शुभेच्छा देताना स्वयंसेवकाने जबाबदारीने श्रमनिष्ठा जोपासत विविध उपक्रम राबविण्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सहकार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती बोबाटे यांनी तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राजकुमार मुसणे यांनी उपस्थितांचे आभार स्नेहल बट्टे हिने मानले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 11, 2024

PostImage

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश


विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

 

भाग्यश्री ताई आत्राम यांनी दुपट्टा टाकून केले स्वागत

 

सिरोंचा:- तालुक्यातील आसरअली येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.

 

मागील दोन दिवसांपासून भाग्यश्री ताई आत्राम सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांच्या आसरअली येथील एका सभेत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.यावेळी ताईंनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत केले. यावेळी राकॉ चे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रवी रालाबंडीवार,गणेश बोधनवार,विजय रंगुवार आदी उपस्थित होते.

 

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तरुण वर्गाचा समावेश असून त्यांनी महिला आणि तरुण नेतृत्वावर विश्वास असल्याचे मत व्यक्त केले.एकाच गावातील जवळपास वीस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने विविध पक्षांना मोठा धक्का बसला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 11, 2024

PostImage

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान अविस्मरणीय - डॉ. नामदेव किरसान


महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान अविस्मरणीय - डॉ. नामदेव किरसान.

 

फुले दाम्पत्यांचे समाजासाठी योगदान अविस्मरणीय आहे, त्यांचे कार्य लोकहितार्थ असून त्या काळच्या हिशोबाने इतिहासिक आणि साहसी होते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात महिलांसाठी शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वजनिक जयंती उत्सव सारखे निर्णय आज विचार केला तर सोप्पे वाटतात पण त्या काळी केलेले हे कार्य आज आपल्याला समाजाला वेगळी दिशा देणारे आहेतं. त्यांचे जीवनातील संघर्ष आत्मसात करत समाजकारण करणाऱ्यांना काहीशी अपयश लाभणार नाही. असे प्रतिपादन नामदेव किरसान यांनी व्यक्त केले. ते ९ जानेवारी रोजी मौजा दिभना (माल) ता. जि. गडचिरोली येथे माळी समाज संघटना, दिभना (माल) यांच्या वतीने "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती महोत्सव व आई सावित्रीमाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती स्मारकाचे लोकार्पण सोहळा" या कार्यक्रमाच्यां उद्घाटन प्रसंगी बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती अविस्मरणीय असून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार हा स्त्री पुरुष समानतेचा प्रतीक असल्याचे सांगून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून लावून पुण्याला भिडे वाड्यात पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली. स्त्रियांना शिक्षित सुशिक्षित करणं हे धर्मविरोधी असून ते पाप असल्याचे सनातनी धर्म मार्तंडांनी ठरविल्यावर व त्यांच्यावर शेणाचा चिखलाचा व घाणीचा मारा करून त्यांना अनन्यप्रकारे त्रास दिल्यावर सुद्धा त्यांनी स्त्री शिक्षणाचे व्रत सोडले नाही. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजात समतेचे बीज रोवण्याचे काम केले. सर्वांना समान संधी, समान न्याय व समान वागणूक मिळवून देण्यासाठी अत्यंत टोकाची विषमता असलेल्या समाजात समता रुजविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. शेतकऱ्यांची व्यथा समजून घेण्यासाठी "शेतकऱ्याचे आसूड" हा ग्रंथ लिहिला. तसेच समाजात रुजविण्यात आलेली असमानता व भेदभाव दृष्टींगत करण्यासाठी व तो झुगारून लावण्यासाठी "गुलामगिरी" हा ग्रंथ लिहिला. करिता फुले दांपत्यांचे समाजासाठी केलेले योगदान हे अत्यंत मोलाचे असून ते अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

              दिभना माल येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे लोकार्पण शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या हस्ते व अनावरण कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर नामदेव किरसान, प्रमुख अतिथी भाजप जिल्हा सचिव विलासजी देशमुखे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, माळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय मगर यांचे हस्ते पार पडले.

      यावेळी सामाजिक कार्यकर्ता उत्तमजी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता देवप्रेम लोणबले, योगेश सोनुले, सरपंच दिभना सुरेश गुरनुले, सौ. संगीताताई मांदाळे, वनरक्षक सिडाम मॅडम, देवानंद चलाख, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होत.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 10, 2024

PostImage

येत्या २३ तारखेच्या आत आखिव पत्रिका द्या,अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण


येत्या २३ तारखेच्या आत आखिव पत्रिका द्या,अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण

 

माजी शहर अध्यक्ष पिंकु बावणेचे भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

 

देसाईगंज-

      अतिदुर्गम, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याची सर्वात जुनी नगर परिषद असलेल्या देसाईगंज शहरात वास्तव्यास असलेल्या नागरीकांना मागील अनेक वर्षांपासून आश्वासनांच्या खैरातीत पिसल्या जात आहे.शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करण्यासाठी नगर परिषदेने देय रक्कम अदा करूनही अद्याप रहिवाशांना आखीव पत्रिका देण्यात न आल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता येत्या २३ जानेवारी पर्यंत आखीव पत्रिका देण्यात यावी अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा अल्टिमेटम देसाईगंज शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष पिंकु बावणे यांनी भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला असल्याने संबंधित विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.

      दिलेल्या निवेदनात बावणे यांनी नमुद केले आहे की देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील रहिवाशांना अद्यापही आखीव पत्रिका देण्यात न आल्याने शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजना,रमाई घरकुल आवास योजना तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

    शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करण्यासाठी देसाईगंज नगर परिषद यांनी भुमिअभिलेख कार्यालय देसाईगंज यांना आवश्यक प्रमाणात रक्कम अदा केलेली आहे.असे असताना भुमिअभिलेख कार्यालयाने देसाईगंज नगर भूमापनाचे काम पुर्ण करून सिमा निश्चित करून नगर परिषदेला आखीव पत्रिका उपलब्ध करून देणे आवश्यक होते.मात्र असे न करण्यात आल्याने शहरातील अनेक गोरगरीबांना झोपडीवजा तंबुत राहावे लागत आहे.ही अतिशय गंभीर बाब असुन शासन निर्णयाला हरताळ फासण्यासारखे आहे.

     केन्द्र व राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी पक्के मकान उपलब्ध व्हावे करीता विविध योजना जाहीर केल्या आहेत.मात्र प्रशासनाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांवर उघड्यावर संसार थाटावे लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता येत्या नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी

 २३ जानेवारीच्या आत आखिव पत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी,अन्यथा विरोधात भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

     निवेदन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी.लोंढे यांना देखील देण्यात आले असुन यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे,सेवादल अध्यक्ष भिमराव नगराळे,युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ता पंकज चहांदे, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आरती लहरी,युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष 

विजय पिल्लेवान,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे,राजू राऊत,महिला काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रजनी आत्राम,महिला ओबीसी सेल तालुकाध्यक्ष यामिनी कोसरे,सेवादल तालुकाध्यक्ष दुशांत वाटगुरे,सागर बन्सोड, दुधराम हर्षे,विमल मेश्राम, नरेश लिंगायत,ओमकार कामठे,विशाल मेंढे,भाग्यवान शिवूरकर,सोनी कोहचाळे, वनिता सिडाम,रंजना बागडे, कुंदा लिंगायत,बबिता शंभरकर,सिंधु खोब्रागडे, शारदा सिडाम,इंदू खोब्रागडे, कांताबाई शेन्डे,आशा सोंडवले, सुमंत माटे,रंजना शिवूरकर, सुमित्रा सिडाम आदी पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 9, 2024

PostImage

क्रीडा संकुलाच्या निर्मिती करीता, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन


क्रीडा संकुलाच्या निर्मिती करीता, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन

 

गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची (पोलीस, वनरक्षक भरती ) तयारी करणाऱ्या युवकांना अत्याधुनिक जिल्हा क्रीडा संकुल असावे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना, भरीव निधी देऊन क्रीडा संकुलच्या कामास सुरुवात करण्यात आली, मात्र शिंदे - भाजप सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा स्टेडियम च्या कामास नियमित निधी दिल्या् जात नसल्याने क्रीडा स्टेडियम चे काम रखडले आहे, त्याचा अनेक खेळाडू आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवकांना त्रास होत आहे, त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलच्या कामाला लवकरात लवकर भरीव निधी देऊन सरकारने तातडीने क्रीडा संकुलाचे काम करावे या मागणीला घेऊन, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा स्टेडियम, गडचिरोली येते "भिख मांगो आंदोलन" करण्यात आले.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जि. प. सदस्य नंदू नरोटे, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, प्रभाकर कुबडे, सुरेश भांडेकर, दीपक रामने, आय. बी. शेख, ढिवरू मेश्राम, सुभाष धाईत, योगेंद्र झंजाळ, उत्तम ठाकरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ज्ञानेश्वर पोरटे, रामटेके, माजिद सय्यद, जावेद खान, प्रफुल आंबोरकर, मयूर गावतुरे, हेमंत कुमरे, सुदर्शन उंदीरवाडे, सीताराम सहारे, नेताजी गुरनुले सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यक्रते आणि युवक यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

  नमो चषक च्या नावाने लोकप्रतिनिधी कडून लाखो रुपयाची उधळन करून क्रीडा संमेलन घेतल्या जात आहे, ईडी सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा संकुलाच्या कामास निधी मिळत नसल्याने अनेक कामे खोडंबून पडली आहे, तरीही शासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असून, जिल्हा स्टेडियम चे मैदान पूर्ण अस्तव्यस्त पडले असल्याने त्याचा खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करनाऱ्या युवकांना नाहक त्रास करावा लागत आहे असा आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 8, 2024

PostImage

जमिनी वाचविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांची आमदारांकडे भावनिक साद


जमिनी वाचविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांची आमदारांकडे भावनिक साद...

मुधोली चक न.२ येथील सभेत आमदारांना साकडे.

"मला दोन एकर जमीन आहे माझे दोन मुलं आहेत एक मुलगा अपंग आहे.आम्हाला जमीन द्यायची नाही आहे. जमीन आहे तर जमिनीच्या भरोषावर आम्ही आमचे पोट भरू शकतो.पैसा आज आहे उद्या नाही.साहेब तुम्हाला कितीही पगार असला तरी पण तुम्ही पैसा खात नाही शेवटी भातच खाता...."अशी भावनिक साद घालत विद्या कष्टी नावाच्या शेतकरी महिलेसह परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या वेदना आमदरांपुढे मांडल्या.

      ७ जानेवारी रोजी मुधोली चक नं.२ येथे भूमि अधिग्रहणाच्या बाबतीत पीडित असलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी आले असता मुधोली चक नं.२,जयरामपूर, सोमनपल्ली, गणपुर, मुधोली तुकूम लक्ष्मणपुर येथील शेतकऱ्यांनी आमदारांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही असे म्हणत सरकारकडे आमचे मुद्दे मांडा असे निवेदन देत वेगवेगळ्या मागण्या केल्या.

 *प्रमुख मागण्या*

१)शेतकरी कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहण करणारा आदेश रद्द करावा.

२) शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी शासनाचे जे अधिकारी येत आहेत त्यांना तात्काळ थांबवा.

३) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा वेळोवेळी धाक सांगत पोलीस निरीक्षक परिसरातल्या गावकऱ्यांवर जमावबंदीचा आदेश काढतात,हे लोकशाही असलेल्या देशात घातक आहे ज्यामुळे परिसरातल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे,कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क डावलले जात आहे त्यासाठी पोलीस प्रशासननाला सूचना कराव्या..

४)आजपर्यंत चर्चा,निवेदन आणि अर्ज यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आमचे हक्क हिरावून घेऊ.

   यावेळी परिसरातले शेकडो शेतकरी महिला पुरुष उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 7, 2024

PostImage

वाघाचा हल्ल्यात इसम ठार : कारवा जंगल येथील घटना


वाघाचा हल्ल्यात इसम ठार : कारवा जंगल येथील घटना

 

 

 

बल्लारपूर : कारवा जंगलात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना आज ७ जानेवारीला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

माहितीनुसार, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये बल्हारपुर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड मधील शामराव रामचंद्र तिडसुरवार (६३) वर्ष सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन जागीच ठार मारल्याबाबत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. 

याबाबत माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत तात्काळ घटना स्थळी पोहचले.

मौकयावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात शामराव रामचंद्र तिडसुरबार यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरता आर्थिक मदत पंचवीस हजार रुपये देण्यात आले.

सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 6, 2024

PostImage

जनतेच्या समस्यांची जनप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही - डॉ. नामदेव किरसान


जनतेच्या समस्यांची जनप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही - डॉ. नामदेव किरसान. 

          दि.०४/०१/२०२४ रोजी मौजा वडेगांव (मेंढा) ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे जय हनुमान प्रासादिक नाट्य कला मंडळ, वडेगांव (मेंढा) यांच्या वतीने *" थैमान"* या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी प्रेक्षकांना सद्य वस्तुस्थिती अवगत करून देऊन सांगितले की, जनतेच्या महागाई बेरोजगारी व इतर स्थानिक समस्यांबद्दल तसेच रानटी हत्यांचा व नरभक्षी वाघांचा बंदोबस करण्याबद्दल जनप्रतिनिधी कोणतीही दहल घेत नसतील, समस्यांच्या सोडवणुकीसाठी शासनाकडे पाठपुरावा करीत नसतील किंवा संसदेत व विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत नसतील तर अशा निष्क्रिय जनप्रतिनिधींना पुन्हा निवडून न आणता परिवर्तन घडवून आणा असे आवाहन त्यांनी केले 

            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.रामकृष्णजी मडावी, उद्घाटक माजी आमदार हरीरामजी वरखडे, सह उद्घाटक माजी आमदार आनंदरावजी गेडाम, सरपंच सौ.शारदाताई मडावी , माजी सरपंच विनायक मडावी, माजी सरपंच विश्वेश्वरजी दरो, सरपंच टिकेश कुंभरे, भोवते सर,अक्षय भोवते, पुरुषोत्तम कुंभरे, सुभाष हर्षे, गेडाम साहेब, सौ. सुलचना कळाम, दत्तूजी सोमनकर, सुनील बांगरे, टेंभुर्णे साहेब, आशिष चौधरी, तामराज मडावी, रोहिदास मडावी, कीर्तीवाण मसराम, मिलिंद कोडापे, पो.पा. लतेश गेडाम, प्रल्हाद गेडाम, धनराज मडावी, पदाजी, पुरुषोत्तम किरमे, भाऊराव कुळशिंगे, नाजूक उसेंडी, इंद्रपाल उईके, सूर्यभान गेडाम, धनराजजी गेडाम, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेषक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 5, 2024

PostImage

अंगनवाडी सेविकांचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे साकडे


मागण्या मंजुर करण्यासाठी आम्हाला पाठबळ द्या.!!

 

अंगनवाडी सेविकांचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे साकडे.

 

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पाठींबा देत, शक्तीनिशी पाठपुरावा करण्याचा दिला आश्वासन!

 

अतिशय तटपुंज्या मानधनावर राज्यातील अंगनवाडी सेवीका आणि मदतनीस काम करत आहेत.गत ४० वर्षांपासुन योग्य मोबदल्यासाठी अंगनवाडी सेविकांचा लढा सुरु आहे.यावेळेस पुन्हा राज्यभर संप पुकारण्यात आला आहे.मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु असुन सर्व प्रमुख नेत्यांना निवेदने देऊन त्यांच्या मागण्यांना समर्थन वाढविण्याचा प्रयत्न संघटनांमार्फत सुरु आहे.

 

शेकडो अंगनवाडी सेविकांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची भेट घेतली व राजे साहेबांच्या कार्यक्षमतेवर पुर्ण विश्वास असुन त्यांनी मागण्या मंजुर होण्यासाठी जोर लावावा अशी विनंती केली व आयटक संघटनेमार्फत सर्वोच्च्य न्यायालयाच्या ग्रज्युईटी देण्याबाबतच्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी.शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी लागु करावी अथवा मानधनात मोठी वाढ करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन राजे साहेबांना सादर केले त्यावर राजे साहेबांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला व शासणाकडे पुर्ण शक्तीनिशी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.!


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 5, 2024

PostImage

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तसेच  NDRF पथक पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पूरासंबधी टेबल टाँप एक्सरसाईज तसेच पूराचे माँक एक्सरसाईज संबंधी कार्यक्रम


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तसेच 

NDRF पथक पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पूरासंबधी टेबल टाँप एक्सरसाईज तसेच पूराचे माँक एक्सरसाईज संबंधी कार्यक्रम

 दिनांक ०४.०१.२०२४ रोजी जिल्हा कार्यालय मध्ये नियोजन समिती चे सभागृह सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला तसेच वैनगंगा नदी वरील कोटगल बँरेज येथे दुपारी २.०० वाजता पूराचे रंगीत तालीम कार्यक्रम संपन्न झालेला आहे.सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय मीणा ,अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमामध्ये आपत्ती व्यवस्थापन सल्लागार क्रिष्णा रेड्डी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे ,एनडीआरएफ चे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर, टीम कमांडर धर्मेंद्र सेवदा, इन्स्पेक्टर पंकज चौधरी, इन्स्पेक्टर ईश्वर दास मते,इन्स्पेक्टर सुशांत सेठी यांचे उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला.सदर पूराचे रंगीत तालीम मध्ये नदीमध्ये पूराचे वेळी अडकलेल्या लोकांना बोटीचे सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले, तसेच पाण्यामध्ये बुडालेल्या लोकांना बोटीच्या सहाय्याने बचाव कसा करायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले.सदर कार्यक्रमामध्ये एनडीआरएफ पथकाद्वारे पोहण्याचे प्रकार ,डिप डायव्हिंग तंत्र, डायरेक्ट काँन्टँक्ट तंत्र, इनडायरेक्ट काँन्टँक्ट तंत्र , बचाव तंत्र, इत्यादी महत्वपूर्ण बाबींची माहिती उपस्थित विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आपदा मित्रांना देण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता एनडीआरएफ पथकातील२९ जवानांनी सहभाग नोंदविला तसेच कार्यक्रमाला पोलिस विभागाचे मोटार परिवहन विभागाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पोचमपल्लीवार, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाकरीता आपत्ती व्यवस्थापन मध्ये महत्वपूर्ण भूमिका असणारे पोलिस विभाग,पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद अग्निशमन दल, आपदा मित्र तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 5, 2024

PostImage

देशाला कर्जाच्या खाईत लोटणारी भाजप प्रणित मोदी सरकार - डॉ. नामदेव किरसान


देशाला कर्जाच्या खाईत लोटणारी भाजप प्रणित मोदी सरकार - डॉ. नामदेव किरसान

भाजप सरकार म्हणजे महागाईचा भस्मासूर - डॉ. नामदेव किरसान 

 

काँग्रेस सत्तेत असताना महागाई वाढली म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे गेले ? त्यांना वाढती महागाई आता दिसत नाही असा सवाल डॉ. नामदेव किरसान यांनी उचलत भाजप पक्षावर निशाणा साधला. महागाई वाढत असताना आता भाजपच्या नेत्यांना मात्र ती महागाई दिसत नाही. केवळ राजकारणासाठी विरोध करून जनतेला भूलथापा देण्याचे कार्य भाजप कडून केले जात आहे. जनतेच्या हितासाठी कधीतरी भाजपने कार्य केलेले मला दिसत नाही याउलट केवळ धर्माचे राजकारण करत जतिजातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य भाजप कडून केले जात आहे, असे विधान डॉ नामदेव किरसान यांनी व्यक्त केले. ते ३ जानेवारी रोजी कुरखेडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त, माळी समाज संघटना, ओबीसी समाज संघटना व सर्व मागासवर्गीय समाज संघटना तालुका कुरखेडा यांच्या वतीने "वनवा पेटला क्रांतीचा" या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना मोदी सरकारचा समाचार घेत पुढच्या पिढीसाठी आपण काय राखून ठेवलेलं आहे याची काळजी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, देशाची साधन संपत्ती सार्वजनिक उपक्रम सर्व विक्री करून मूठभर पूजीपतींच्या हवाली केले जात आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सन 2014 पर्यंत म्हणजेच एकूण 70 वर्षात 55 लक्ष कोटीचे असलेले कर्ज मोदी सरकारच्या कारकिर्दीत फक्त नऊ वर्षात 100 लक्ष कोटीने वाढलेले असून आता एकूण कर्जाची राशी 155 लक्ष कोटी झालेली आहे. करिता सावध राहायची गरज असल्याचे आव्हान त्यांनी केले.

              यावेळी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी वामनराव सावसाकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, खुशाल मोहुर्ले, राम लांजेवार, माधव निरंकारी, नगराध्यक्ष अनिता बोरकर, रवींद्र गोटेफाटे, नगरसेविका आशाताई तुलावी, रामभाऊ वैद्य, केवळराम नाट, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 5, 2024

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक

 

कोरची :- आज दिनांक ४/१/२०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरची तर्फे संघटनात्मक आढावा बैठक मा. रविन्द्रजी वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.मा.धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करण्यासाठी तालुक्यात बुथ समिती गठित करणे, राष्ट्रवादी फ्रंटचे व सेलचे कार्यकारीणी तयार करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले. यावेळी मा.जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर यांच्या हस्ते झाडूराम हलामी यांची कार्यकारी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदि नियुक्ती करण्यात आली. 

          यावेळी आढावा बैठकीत मा. युनुसभाऊ शेख प्रदेश संघटक सचिव, मा. केसरी पाटील उसेंडी माजी सभापती, मा. योगेश नांदगाये जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर पायघन जिल्हाध्यक्ष सेवादल, दिपक बैस जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया, सियाराम हलामी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,स्वप्निल कराडे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,विजय उईके तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भारत नरोटे, भानसिंग नुरुटी,रुपेश नंदेश्वर सचिव राष्ट्रवादी काँग्रेस,सुभाष नैताम,नरेन्द्र बावणे, झाडूराम हलामी व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 4, 2024

PostImage

आष्टी पोलीस स्टेशन तर्फे रेझिंग डे सप्ताह चे आयोजन


आज दि. 0४/01/2024 रोजी पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून व पोलीस - जनता संबंध दृढ करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलामार्फत, पोलीस दादा लोरा खिडकी उपक्रमांतर्गत दि.02/01/2024 ते 08/01/2024 या कालावधीत रेझिंग डे सप्ताह चे आयोजन पोलीस स्टेशन आष्टी येथे करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज पोलीस स्टेशन आष्टी येथे कार्यक्रम घेण्यात आला.

        

आज रोजी रेझिंग डे सप्ताह च्या अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले या शाळेतील विद्यार्थ्यांची "रस्ता सुरक्षा ,व्यसनमुक्ती तसेच महिला सुरक्षा" या विषयांवर आधारित महात्मा जोतिबा फुले हायस्कूल आणि महाविद्यालय,आष्टी या शाळेपासून ते आंबेडकर चौकातून पोलीस स्टेशन आष्टी पर्यंत सर्व प्रथम रॅली काढण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशन ची ओळख करून देण्यासाठी पोलीस स्टेशन आष्टी येथे *पोलीस स्टेशन मधील विविध कक्षाची ओळख रस्ता सुरक्षा मार्गदर्शन, " शस्त्र प्रदर्शन" व शस्त्र पाहणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, परी.मपो.उप. भाग्यश्री जगताप, परी. मपो.उप.प्रतिक्षा वणवे , पो.उप.मंडल व सर्व अंमलदार तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय ,आष्टी येथील 375ते 400 विद्यार्थी व सोबत शिक्षक वृंद उपस्थित होते. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी यांनी त्यांचे प्रश्ण मांडून त्याचे निरसन करून घेतले व पोलीस दलाने राबविलेल्या कार्यक्रम बद्दल विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला. 

         

 

         


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 4, 2024

PostImage

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील धनुर्धर याला दोन सुवर्ण पदकप्राप्त


महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील धनुर्धर याला दोन सुवर्ण पदकप्राप्त

बीए प्रथम वर्ष विद्यार्थी सुरेंद्र आग्रे यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली धनुर्विद्या संघात निवड झाली व त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे व गोंडवाना विद्यापीठ यांचे नावलौकिक करत गुरु काशी विद्यापीठ भटिंडा (पंजाब) येथे दिनांक 19 ते 22 डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या वेस्ट झोन धनुर्विद्या स्पर्धांमध्ये इंडियन खेळ प्रकारामध्ये ३० मी . एक सुवर्ण व ओवर ऑल मध्ये एक सुवर्णपदक पटकावले आहे. एकदरीत दोन सुवर्णपदक प्राप्त करून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयआष्टी तथा गडचिरोली वासियांसाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे विद्यापीठ व महाविद्यालयाचे नावलौकिक केल्याबद्दल माननीय प्राचार्य डॉ. संजय फुलझेले महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी तसेच वन वैभव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय बबलू भैय्या हकीम तसेच शाहीनभाभी हकीम यांनी सुद्धा सुरेंद्र यांचे अभिनंदन करून कौतुक केले व त्याला आशीर्वाद दिला .व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत सत्कार व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्राप्त झालेल्या या यशाचे श्रेय आई वडील व डॉ. श्याम कोरडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी यांना दिलेले आहे तसेच 

सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुरेन्द्र ला खूप खूप अभिनंदन केले क्रीडा शिक्षक सुशील अवसरमोल, रोशन सोळंके,कौमुदी श्रीरामवार, नितेश डोके, पूजा डोर्लिकर यांनी सुद्धा त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलें. वरील सर्वांनी सुरेंद्र वर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे व भविष्यासाठी तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 4, 2024

PostImage

जाजावंडी शाळेत मुख्यमंत्री, आमची शाळा सुंदर शाळा अभियानाला सुरुवात


जाजावंडी शाळेत मुख्यमंत्री, आमची शाळा सुंदर शाळा अभियानाला सुरुवात

 

एटापल्ली:-महाराष्ट्र शासनाने नुकतेच सुरू केलेले मुख्यमंत्री,आमची शाळा सुंदर शाळा अभियानाला 1 जानेवारी 2024 पासून सुरुवात झालेला आहे,राज्यातील सर्वच शाळा या उपक्रमात भाग घेणार आहे, या अभियानात भाग घेऊन स्पर्धा जिंकणाऱ्या शाळा विविध पुरस्कार शासनाने जाहीर केलेला आहे,

दिनांक 1 जानेवारी 2024 पासून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी या शाळेत मुख्यमंत्री आमची शाळा सुंदर शाळा या अभियानाला सुरुवात झालेला आहे,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री,लालू राजू लेकामी यांच्या हस्ते उदघाटन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली,

या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे चमू याना आमंत्रित करण्यात आले,शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली,

या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सहकार्य लाभले,


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 4, 2024

PostImage

बाबलाई माता वार्षिक पुजा - पारंपरिक इलाका समिति ग्रामसभा यात्रा संपन्न, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत


बाबलाई माता वार्षिक पुजा - पारंपरिक इलाका समिति ग्रामसभा यात्रा संपन्न, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत 

 

 माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून बाबलाई माता वार्षिक पुजा - पारंपारिक संमेलनासाठी आर्थिक मदत

 

भामरागड : तालुक्यातील बेजुर"या"गावाला लागून असलेल्या बेजुर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेच्या मंदिर आहे.येथील दर वर्षी आदिवासी व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजान करत असतात.जल जंगल जमीन याच्या वर आधारित असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाच्या अतुरतेने वाट बघत असतात.

 

१ जानेवारी ते ३ जानेवारी पर्यंत बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.माता बाबलाई"ही"आदिवासी बांधवांचे प्रमुख देवता आहे.शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्रा येत असतात.

 

क्षेत्रात जानेवारी महिन्यात धान कापणी संपलेली असते आणि नवीन धान खायला सुरुवात व्हायची असते.आदिवासी समुदाया मध्ये कोणत्याही नवीन वस्तु खाण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पंडूम म्हणजे पुजा केली जाते.धान हा इथला महत्त्वाचा पीक आहे.म्हणून लोक नवीन धान खायला सुरुवात करण्यापूर्वी पिंडी पंडूम करतात.

 

या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी व गैर आदिवासी एकत्र येतात व बाबलाई मातेच्या पुजा करतात.आज या बाबलाई माता वार्षिक पुजा - सांस्कतिक संम्मेलानात आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी उपस्थित दर्शवून मातेच दर्शन घेऊन"या"पूजासाठी आर्थिक मदत केली आहे.

 

यावेळी सुधाकर तिम्मा तालुका अध्यक्ष आविसं भामरागड,बालूभाऊ बोगामी तालुका अध्यक्ष काँग्रेस भामरागड,तेजस्विनी मडावी बालकल्याण सभापती भामरागड,कविता येतमवार स्वच्छता सभापती भामरागड,शशीरेखा आत्राम माजी पाणीपुरवठा सभापती भामरागड,लालसू आत्राम माजी पंचायत समिती सभापती भामरागड,विष्णू मडावी नगर उपाध्यक्ष भामरागड,प्रमोद आत्राम माजी सरपंच ग्रामपंचायत पेरमिली,राजू बड्डे माजी नगराध्यक्षा,रामाजी पुंगाटी,शुक्रम मडावी,श्यामराव येरकलवार,संतोष बडगेसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 3, 2024

PostImage

अपघातात जखमी झालेल्या इसमास मूलकाला फाउंडेशनने तात्काळ रुग्णालयात केले दाखल, कुटुंबियांनी मानले आभार


अपघातात जखमी झालेल्या इसमास मूलकाला फाउंडेशनने तात्काळ रुग्णालयात केले दाखल 

 

सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील आज रोजी दुपारी 02 वाजताच्या दरम्यान सिरोंचा मुख्यालयपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या फरेस्ट गार्डन जवळ महामार्गावर दुचाकीस्वराच्या नियंत्रण सुटून अपघाताची घटना घडली आहे, अपघात सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात नोकरी करणाऱ्या इसम - चंद्रय्या करकरी,राहा - अंकीसा गावाचे असल्याचे सांगितले आहे,

 घटना घडताच त्या महामार्गावर जाणाऱ्या प्रवासानी मूलकला फाउंडेशनला माहिती देताच  विलंब न करता त्वरित घटनास्थळी धाव घेत जखमीना उपचारासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,

 त्यावेळी मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख - सागर भाऊ मूलकला, राजकुमार मूलकला, राजम मूलकला, उदय मूलकला यांची उपस्थिती होते,


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 3, 2024

PostImage

मुलाने बापाला काठीने मारुण‌ केले ठार, अल्पवयीन मुलाला अटक.


मुलाने बापाला काठीने मारुण‌ केले ठार, अल्पवयीन मुलाला अटक.

 

नागभीड---नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वासाळा (मेंढा )येथील दामोधर केशव गावतुरे वय ५३ वर्षे धंदा शेती असून त्याचांच मुलगा प्रफुल गावतुरे वय १७ वर्षे याने स्वतःचे वडिलांस काठीने वार करून ठार केल्याची घटना दिनांक १ जानेवारी 2024 रोजी घडली. मृतक दामोधर गावतुरे, मुलगा प्रफुल आणि पत्नी वंदना गावतुरे एकाच घरी राहत असताना पत्नी बाहेर गावी कामानिमित्य गेली असताना बाप आणि मुलगा घरी असताना बापाला दारूचे व्यसन असताना मुलाचे आणि बापाचे काय? भांडण झाले की काय? हे गुलादस्यतात असताना मुलाने काठीने मारून ठार केले, असल्याचे त्याने सरपंच यांना सांगितले. त्या नंतर सरपंच यांनी पोलीस पाटील यांना ही घटना नागभीड पोलीस स्टेशन ला कळविण्यात आली, पोलीस टाॅप घटना स्थळी दाखल होऊन पोलिसांनी मारेकरी मुलगा प्रफुल दामोदर गावतुरे यास ताब्यात घेतले. मृतक दामोधर यास ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे आणण्यात आले. पोलीस स्टेशन नागभीड येथे मर्ग दाखल करून पोलीस उप विभागीय अधिकारी दिनेश ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईक यांना सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 2, 2024

PostImage

पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या पुढाकाराने ‘दारू नाही, दूध प्या’ म्हणत आष्टीत पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांसह काढली व्यसनमुक्ती रॅली


पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या पुढाकाराने ‘दारू नाही, दूध प्या’ म्हणत आष्टीत पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांसह काढली व्यसनमुक्ती रॅली

 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जनजागृती

 

 

आष्टी : तरुणाईला व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आष्टी पोलिसांनी नववर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त सोमवारी विशेष जनजागृती करणारी व्यसनमुक्ती रॅली काढली. यावेळी ‘दारू नाही, दूध प्या’ असा संदेश देत आंबेडकर चौकात सर्वाना दुधाचे वाटप करण्यात आले.

 

आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमात राजे धर्मराव हायस्कूल आष्टी, महात्मा ज्योतिबा फुले शाळा आष्टी, तसेच सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील विद्यार्थी व शिक्षकवृंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

 

या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात कशाप्रकारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला पाहुया

 

 

ही रॅली आंबेडकर चौक, शिवाजी चौक, हनुमान मंदिर ते पोलिस स्टेशन येथे पोहोचली. तिथे वर्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बेबीताई बुरांडे आणि डी.डी.रॅाय उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुंदन गावडे होते.

 

वर्क्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा रोहित चटपालवार, द्वितीय कल्याणी आत्राम, तर तृतीय क्रमांक राजे धर्मराव स्कूलच्या तन्वी वागदरकर हिने पटकावला.त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

 

सदर विशेष जनजागृती अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती रॅली व वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता अप्पर पोलीस अधिक्षक (अभियान) यतीश देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक एम. रमेश सारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार जिमलगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 2, 2024

PostImage

लॉयड्स मेटलस लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिटी फॉउंडेशन तर्फे बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन


एटापल्ली : येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यात तालुक्यातील 32 संघांनी सहभाग घेतला तर अंतिम दुहेरी सामन्यात राहुल घोष व मनीष ढाली संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद अमित सोनी व प्रशांत कुलयेटी ह्यांना मिळाले.

तसेच पुरुष (सिंगल) सामन्यात राहुल घोष याने विजेतेपद पटकावले व प्रशांत कुळयेटी ह्यांना उपविजेतेपद पटकावले.

 

सदर स्पर्धेचे आयोजन मनीष ढाली व लॉयड्स मेटलस लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिटी फॉउंडेशन ह्यांनी केले.

लॉईड स्टील मेटल्स यांच्या वतीने पुरुष (सिंगल )व पुरुष (डब्ब्ल) प्रथम बक्षीस म्हणून १० हजार, ८ हजार, ६ हजार असे अनुक्रमे पारितोषिक देण्यात आले.

 

ह्या सर्धेत प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप सर, राजा सर,राज विलन सर पि. एस. आय. शुभम म्हेत्रे सर, मेजर मुंडे सर, प्रा. राहुल ढबाले, प्रा. भारत सोनकांबळे, पापा पुण्यमुर्तीवार, प्रसाद नामेवार, बंटी आसुटकर आदी उपस्थित होते.

ह्या स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रा. राहुल ढबाले ह्यांनी केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष ढाली,राहुल घोष, प्रशांत कुळयेटी,अमित सोनी, अनुप सरकार, बादल सोनी, प्रेम मजुमदार, प्रीतम दत्ता, जोजो बेपारी,ह्यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 1, 2024

PostImage

आष्टी येथील हनुमान मंदीर येथे शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन


आष्टी येथील हनुमान मंदीर येथे शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

    

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे आज शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे नवीन वर्षानिमित्त हनुमान मंदीर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सरपंचा बेबीताई बुरांडे, पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे गोंडपिपरी तालुका अध्यक्ष गणपती चौधरी गुरुजी, शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टीचे अध्यक्ष अंकलू पेरकावार, सुरेश औतकार यांच्यासह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वत्र नवीन वर्षाचं स्वागत अतिशय धुमधडाक्यात केलं जातंय. काल रात्री उशीरा अनेकांनी पार्टी करुन नवीन वर्षाचं स्वागत केलं. तसंच रात्री झोपताना अनेकांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी संकल्पही केला असेल. इकडे, आष्टीत नवीन वर्षानिमित्त व्यसनाला दूर लोटूया म्हणत व्यसनमुक्ती संघटनेकडून नवीन वर्षात दारु नाही तर दुध प्या म्हणत दुधाचं वाटप केलं गेलं.

नवीन वर्षात दारू सोडण्याचा संकल्प करा. दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, असा संदेश देत व्यसनमुक्ती संघटनेने आज दुधाचे वाटप केले. प.पु. शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्ती संघटनेतर्फे आष्टी शहरात ठिकठिकाणी दूध बिस्कीट वाटप केले.शहरात शेषराव महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणूकीतून दारू सोडा संसार जोडा असा संदेश देण्यात आला


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 1, 2024

PostImage

सुरजागडच्या ठाकुरदेव यात्रेकरीता बसेस सोडा, शेतकरी कामगार पक्षाची मागणी


 

सुरजागडच्या ठाकुरदेव यात्रेकरीता बसेस सोडा, शेतकरी कामगार पक्षाची मागणी 

 

गडचिरोली : एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील ठाकुरदेव यात्रेकरीता गडचिरोली आगारातून सुरजागड करीता यात्रा विशेष बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

 

गडचिरोलीच्या आगार प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील माडीया आदिवासी जमातीचे दैवत असलेल्या ठाकूरदेवाची यात्रा पुर्वापारपणे दरवर्षी ५,६ आणि ७ जानेवारी रोजी भरत असते. या यात्रेला गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगाणा या राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. गडचिरोली जिल्हा मुख्यालय ठिकाणाहुनही मोठ्या संख्येने भाविक ठाकुरदेव यात्रेला हजेरी लावतात. मात्र गडचिरोली ते सुरजागड अशी प्रवासाची सक्षम व्यवस्था नसल्याने भाविकांची गैरसोय होते.

 

त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय आणि सुरजागडच्या ठाकुरदेव यात्रेचे महत्व लक्षात घेवून गडचिरोली आगारातून सुरजागड यात्रेकरीता दिनांक ५,६ आणि ७ जानेवारी रोजी विशेष बसेस सकाळी ७.०० वाजता पासून साडण्यात याव्यात, अशी मागणी भाई रामदास जराते यांनी केली आहे.

 

विशेष म्हणजे दरवर्षी होणाऱ्या ठाकुरदेव यात्रेदरम्यान ढोल - मांजऱ्यासह पारंपारिक रेला नृत्य आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन ठाकुरदेव यात्रेदरम्यान होत असते. तसेच अधिकार संम्मेलन आणि पारंपारिक प्रमुखांच्या बैठकीत विविध प्रश्नांवर सामुहिक चर्चा करून ठरावही केले जातात. खदान विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलिकडच्या काळात सुरजागडच्या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 1, 2024

PostImage

वाहन चालक धडकले तहसीलवर , हिट एण्ड रन कायदा रद्द करण्याच्या मागणी करीता निवेदन


वाहन चालक धडकले तहसीलवर , हिट एण्ड रन कायदा रद्द करण्याच्या मागणी करीता निवेदन

०१/०१/२०२४:-कूरखेडा-

वाहन चालकावर अन्याय करणारा हिट अॅन्ड रन हा काळा कायदा रद्द करण्याचा मागणी करीता आज १ जानेवारी रोजी जय संघर्ष वाहन चालक संघटनेचा वतीने येथील बाजार चौकातून तहसील कार्यालयावर मागण्या संदर्भात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार मार्फत शाशनाला निवेदन पाठविण्यात आले 

 शाशनाने रस्ते अपघात संदर्भात हिट अॅन्ड रन हा कठोर कायदा अमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत रस्ते अपघातात अनावधानाने कूणी दगावल्यास वाहन चालकाला १० वर्षाची शिक्षा व ७ लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे या अन्यायकारक कायद्या विरोधात वाहन चालकानी राज्यव्यापी बंद पूकारलेला आहे तालूका संघटनेने सूद्धा सदर बंद आंदोलनात सहभागी होत आज आपले सर्व प्रवासी मालवाहतूक खाजगी वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झाले.

      हा कायदा अत्यंत कठोर असून जेमतेम मिळकतीवर कूटूंबाचा उदरनिर्वाह करणार्या गरीब वाहन चालकांचे व त्यांचा कूटूंबाचे जिवनच उध्वस्त करणारा आहे या कायद्याचा फेरविचार करण्यात यावा याकरीता आज तहसीलदार ओमकार पवार यांचा मार्फत शाशनाला निवेदन पाठविण्यात आले मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल तालूका प्रमुख आशिष काळे यानी केले याप्रसंगी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे तालूका अध्यक्ष भारत गावळ सचिव जावेद शेख उपाध्यक्ष शाम थोटे सचीन पंडित कैलाश उईके आशिष हिळको,अनिल ठाकरे,इंन्द्रजीत ताराम, चिंतामन सहारे, हेमंत घोगरे,दिपक मेश्राम,छगन मडावी,प्रदीप मानकर, नासीर शेख,प्रीतम वालदे, हेमंत चंदनखेडे, जयचंद सहारे, रोहिदास निकूरे,रूतीक आकरे, प्रल्हाद मानकर शिवदयाल परिहार तसेच मोठ्या संख्येत वाहन चालक हजर होते

 

( गडचिरोली जिल्हा वाहन चालक संघटनेचा न्याय मागणी करीता पूकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला जिल्हा शिवसेना (उबाठा) गटाचा पूर्ण पाठींबा असून प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलनात सहभागी होणार अशी माहिती शिवसेना ( उबाठा) जिल्हा प्रमुख सूरेंन्द्रसिंह चंदेल यानी दिली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 1, 2024

PostImage

रानटी म्हसीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ; राॅकाॅचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला ...!


रानटी म्हसीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ; राॅकाॅचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला ...!

 

रानटी म्हसीमुळे शेतकरी व शेतमजुरांना हानी होऊ नये,याची दक्षता वन विभागाकडून घ्यावी ; पत्रकार परिषदेतून मागणी ...!

 

 

 

सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील अंकीसा परिसरातील असलेल्या चिंतरेवाला गावाचे शेतात शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी, दुपारी 4 वाजता, जंगलातील रानटी म्हैस कापसाच्या शेतात वावरताना येथील शेतकरी व शेतमजुरांना दिसली आहे,

चिंतरेवाला गावात सध्या कापूस वेचणीची हंगामा सुरू आहे, चिंतरेवाला गावाचे शेतकरी बांधव रात्रंदिवस एकटे - दुकटे शेतात कामासाठी जातात, रानटी म्हैसमुळे येथील शेतकरी आणि शेतमजुरांना मोठी धोका असल्याचे दिसून येत आहे,

   

रानटी म्हैस येतील चिंतरेवालासह परिसरातील शेतातील कापुसांची मोठी नुकसान ही केली जात आहे,

रानटी म्हैसामुळे शेतकरी बांधवांना कोणत्याही हानी होऊ नये याची वन विभागाच्या वतीने उपाय योजना करावी,

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतीतील कापुसांची पंचनामे करून नुकसान भरपाईही देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष :- अतुल गण्यारपवार तसेच सिरोंचा तालुका अध्यक्ष - फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांनी पत्रकार परिषदेतून मागणी केली आहे,

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद नायडू,व कार्यकर्ते - राजम मूलकला, राजकुमार मूलकला,उदय मूलकला, आनंद सोनारी,गणेश सॅन्ड्रा यांची उपस्थित होते,


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 1, 2024

PostImage

जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात गडचिरोली तर महिला गटात विकासपल्लीची बाजी !


जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात गडचिरोली तर महिला गटात विकासपल्लीची बाजी !

 

तीन दिवसीय जिल्हास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेचा लायड्ंस मेटल ॲंड एनर्जी येथील क्रीडा मैदानावर समारोप !

 

एटापल्ली: लायड्ंस मेटल ॲंड एनर्जी लिमिटेडच्या वतीने क्रीडा मैदानावर दिनांक २९ डिसेंबर ते ३१डिसेंबर या तीन दिवसीय आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पुरुष गटात गडचिरोली तर महिला गटात विकासपल्ली बाजी मारली आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील ३६ पुरुष संघानी सहभाग घेतला तर १५ पेक्षा जास्त महिला संघ सहभागी झाले होते 

गडचिरोली पुरुष संघाला व चौडमपल्ली महिला संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले सदर स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात लायड्ंस मेटल ॲंड एनर्जी लिमिटेडचे कर्मचारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते


PostImage

Gadchiroli Varta News

Jan. 1, 2024

PostImage

शेतकऱ्याने फिरवला मिरचीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर


शेतकऱ्याने फिरवला मिरचीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर.


कोरपना : कापूस व सोयाबीन उत्पन्नात सतत घट होत आहे.त्यातच बाजारभाव गडगडल्याने बळीराजा चिंतातूर असून सततची नापिकी व कर्जपणामुळे अक्षरशः हतबल झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर आपल्या शेतीमध्ये पिकाची फेर पालट करावी म्हणून कोरपना तालुक्यातील जैतापूर येथील 50 वर्षीय पुरुषोत्तम महादेव गोनेवार,यांनी 2 एकर मिरची लागवड करण्याचे ठरविले.ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात मिरची लागवड ही केली.अशातच अतिवृष्टी,गारपिटीने झोडपले व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.असे असताना नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने मिरची पिकावर चुरडा,करपा,पाणे खाणारी अळी,काला मावा,तुळतुळे,बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला.महागड्या कीटकनाशक औषधांचा वापर करून सुद्धा,पीक नियंत्रणात न आल्यामुळे अखेर हतबल होऊन सदर शेतकऱ्याने आपल्या 2 एकर मिरचीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 31, 2023

PostImage

विकसित संकल्प भारत यात्रेचा कोंडेखल येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा, संकल्प यात्रेस  जिल्हाधिकारी यांची उपस्थिती


विकसित संकल्प भारत यात्रेचा कोंडेखल येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा, संकल्प यात्रेस  जिल्हाधिकारी यांची उपस्थिती

 

पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मौजा कोंडेखल येथे  दि.30/12/2023 रोजी विकसित संकल्प यात्रेचे आगमन झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सरला कोटांगले सरपंच कोंडेखल कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा.विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी विविध योजनेची माहिती देत उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन केलं, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परिक्षीत पाटील तहसीलदार सावली, त्याच प्रमाणे पंचायत समिती सावली चे गट विकास अधिकारी मा. मधुकर वासनिक साहेब, मा. बबन बावनवाडे उपसरपंच कोंडेखल , जिल्हा कृषी अधिकारी मा.ठाकरे साहेब,तालुका वैदयकीय अधिकारी सावली, बाल विकास प्रकल्प अधिकारी सावली, गट शिक्षाधिकारी सावली, तालुक्यातील विविध अधिकारी,कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला वर्ग तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

          कार्यक्रमात केंद्र शानामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजणा बाबत उपसथितांना सविस्तर माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड, मोदी आवास योजनेचे मंजुरी आदेश, म.ग्रा. रो. ह.योजने अंतर्गत विहरीचे प्रशासकीय आदेश तसेच विविध प्रमाणपत्रे देण्यात आली.

           कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला बचत गटांतर्फे विविध स्टॉल लावण्यात आले, आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

          सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर वासनिक गट विकास अधिकारी यांनी केले तर आभार परिक्षीत पाटील तहसीलदार साहेब सावली यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 30, 2023

PostImage

बापरे! भर दुपारीच बाजारासाठी आलेल्या तरुणाची दुचाकी वाहन चोरट्यांनी पळविली


बापरे! भर दुपारीच बाजारासाठी आलेल्या तरुणाची दुचाकी वाहन चोरट्यांनी पळविली 

 

आष्टि शहरातील घटना

 

 

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील आठवडी बाजाराकरीता आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील येनबोथला येथील अक्षय गोंगले या तरुणाची ज्युपीटर झेड एक्स कंपनीची एम. एच ३४ सि जी ४७९० क्रमांकाची नवीकोरी दुचाकी चोरट्यानी भर दुपारला बाजारातून पळवून नेल्याची घटना घटली.

 

तालुक्यातील आष्टी येथे दर आठवड्याला शुक्रवारी मोठी बाजारपेठ भरते या बाजारपेठेत चंद्रपूर जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिक या बाजारपेठेत येत असतात अक्षय गोंगले याचे भाऊ सचिन गोंगले हे आपल्या मित्रासोबत शुक्रवारला दुपारच्या सुमारास आष्टी येथे बाजाराकरीता आले अन बाजार परिसरातिल रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नवी कोरी दुचाकी ठेवून दोघेजण बाजार करण्याकरिता बाजारात गेले आपला बाजार आटोपून संध्याकाळी ४:३० वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीकडे आले असता ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी न दिसल्याने दोघानाही धक्का बसला. दुचाकीचा इकडे तिकडे शोध घेतला पण दुचाकीचा शोध काही लागला नाही . आपली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याचे लक्ष्यात येताच सायंकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात देण्यात आली . चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध आष्टी पोलीस घेत आहेत

अक्षय गोंगले या युवकाने फायनान्स करुन दुचाकी घेतली .एका महिन्यांतच दुचाकी चोरीला गेल्याने या दुचाकीचे हप्ते कसे भरायचे हा मोठा प्रश्न या युवकापुढे पडला आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेऊन दुचाकी चोरट्यास शिक्षा द्यावी अशी मागणी सचिन गोंगले व अक्षय गोंगले यां भावंडाने केली आहे..


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 30, 2023

PostImage

लक्ष्मण येरावार यांना सामाजिक कार्यासाठी गौरविण्यात आले,प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट,उपविभागीय कार्यालय अहेरी तर्फे


लक्ष्मण येरावार यांना सामाजिक कार्यासाठी गौरविण्यात आले,प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट,उपविभागीय कार्यालय अहेरी तर्फे

अहेरी:- लगतच्या आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण येरावार हे सदैव गोरगरिबांच्या सेवेसाठी धडपडत असतात त्यांच्या कार्याची 'दखल' घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन लक्ष्मण येरावार यांना गौरविले.

    लक्ष्मण येरावार हे मागील अनेक वर्षांपासून निःस्वार्थ भावनेतून निरंतर व अविश्रांत सामाजिक कार्य करीत असून कार्याची दखल घेऊन गत 26 डिसेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या एका समारंभात लक्ष्मण येरावार यांना गौरवून सन्मान करण्यात आले.

     उल्लेखनीय म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी निरंजन सुधांशू कार्यरत असताना अहेरी येथे जनजागरण मेळावा घेण्यात यावे आणि अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील जनतेचे रेंगाळलेली व थंडबस्त्यात असलेले कामे शिघ्रगतीने मार्गी लागावे यासाठी लक्ष्मण येरावार यांची आग्रही भूमिका होती आणि अहेरी येथे प्रथमतः जनजागरण मेळावा घेण्यात आले. मुळात तशी संकल्पना लक्ष्मण येरावार यांची होती असे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी निरंजन सुधांशू यांनी अहेरी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात बोलून दाखविले होते.

      लक्ष्मण येरावार हे पत्रकारित्या सोबतच मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली निरंतर व अविश्रांत सामाजिक कार्य करीत आहेत.

    खास करून संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, घरकुल, वनजमिनीचे पट्टे आदी व शासनाच्या अन्य विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाचे व योजनेचे लाभ लाभार्थ्यांना प्राप्त व्हावे यासाठी ते तळमळीने पुढाकार घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असतात.

      त्यांच्या कार्याची सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी दखल व कामाची पावती म्हणून प्रशस्ती पत्र व 'ऐंज अ मॅन थिंक' पुस्तक प्रदान करून गौरविले. या बद्दल लक्ष्मण येरावार यांनी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम, उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 30, 2023

PostImage

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे या अपघात ग्रस्तांला उपचाराकरिता केली अर्थिक मदत..!


माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे या अपघात ग्रस्तांला उपचाराकरिता केली अर्थिक मदत..!

 

 

 

अहेरी- आलापल्ली येथील रहिवासी असलेला खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे हा नेहमी प्रमाणे आपल्या गाडीने चंद्रपुर येथून भाजीपाला गाडीत भरून परत आलापल्ली येथे येत असताना मूलचेरा गावाजवळ त्याची वाहन पलटी झाल्याने वाहन चालक संदीप गाडगे गंभीर जखमी झाले आणि यात त्यांच्या हाताला तीन ठिकाणी फॅक्चर झाली आहे. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पण उपचारासाठी खर्च कसा करायचा ? हा प्रश्न आणि घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली.

ही संदीप गाडगे यांची आर्थिक अडचण माहीत होताच माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तात्काळ वाहन चालक संदीप गाडगे यांच्या कुटूंबालातील सदस्य यांना बोलावून त्यांच्या उपचारासाठी 10000(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.

आपण पुन्हा सर्वतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन खाजगी वाहन चालक संदीप गाडगे यांच्या कुटूंबाला दिले.

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील कॅन्सर ग्रस्त,अपघात ग्रस्त,आणि आर्थिक अडचणीत असल्याने प्रत्येक व्यक्तीला मदत करत असतात.त्यांनी आतापर्यंत अनेकांना आर्थिक मदत केली आहे.

यावेळी वाहन चालक संदीप गाडगे यांचे कुटुंबातील सदस्य व मित्र मंडळ उपस्थित होते..!


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 30, 2023

PostImage

हत्तीच्या हल्ल्यामध्ये आरमोरी तालुक्यातील शंकर नगर येथील महिला ठार, परिसरात दहशत दहशतीचे वातावरण


हत्तीच्या हल्ल्यामध्ये आरमोरी तालुक्यातील शंकर नगर येथील महिला ठार, परिसरात दहशत दहशतीचे वातावरण

 (फाईल फोटो)

आरमोरी तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शंकर नगर येथे दिनांक 29 -12 -2023 रोजी रात्रीच्या सुमारास साडेदहा वाजेच्या दरम्यान कौशल्या राधाकांत मंडल राहणार शंकर नगर अंदाजे वय 61 वर्ष हे आपल्या परिवारासह शेतामध्ये घरी असताना शेतामध्ये अचानक हत्ती आल्याने मुलगा महात्मा मंडल याला हाती आल्याचे कळाल्याने त्यांनी शेतातून गावाकडे जाण्याकरिता पत्नी वडील आणि आई यांना सोबत घेऊन निघाले असता हत्तीने आपला मोर्चा या तिघाकडे वळवून कौशल्या राधाकांत मंडल या महिलेवर हल्ला केला आणि महिलेला ठार केले .यामुळे शंकर नगर परिसरात हत्तीच्या दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. सदर घडलेली घटना वन क्षेत्र जोगीसाखरा उपक्षेत्र पळसगाव परीक्षेत्र आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे घडली. परिसरात असलेल्या हत्तीचा तात्काळ बंदोबस्त लावावा अशी मागणी परिसरातील जनतेकडून जोर धरू लागली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 30, 2023

PostImage

मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथील भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथील भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

 

    

आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना व गावकरी यांच्या तर्फे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा आदिवासी पारंपारिक वाद्याच्या गजरात स्वागत करण्यात आले.

 

 मूलचेरा :तालुक्यातील मलेझरी येथे आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना यांच्या कडून आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कबड्डी सामन्या चा उदघाटन पूर्वी गावात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा आदिवासी पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढून राष्ट्रीय शहीद विरबाबुराव शेडमाके,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर मैदानात जाऊन उदघाटन करण्यात आले.

 

 या उदघाटन सोहळ्याला सह उदघाटक म्हणून माजी जि.प.सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार कुबडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून मूलचेरा नगरपंचायत च्या नगरसेविका सौ सुनीताताई रमेश कुसनाके,पोलीस पाटील सौ मारियाताई कोरडे,वेलगुर ग्राप उपसरपंच उमेश मोहूर्ले,डॉ अंकित झाडे,ग्रा.प.सदस्य विजय मांदाळे,ग्रा.प.सदस्य संदीप चौधरी,ग्रा.प.सदस्य विनोद झाडे,आविस जेष्ठ सल्लागार रामचंद्र शेडमाके,आविस जेष्ठ सल्लागार भगीरथ गायकवाड,साईनाथ नागोसे,किशोर नेवारे,रामदास सिडाम,वामनराव कंन्नाके,रामदासजी कोसनकर,किसन येलमुले,बंडू चांदेकर,हिरामण चौधरी,शिवदास झाडे,सुखदेव दुधे,दिलीप चल्लावार,तंटामुक्त अध्यक्ष धर्मपाल गोंगले, राहुल दुधे,संजय शेडमाके,गौतम चांदेकर,दिगंबर परचाके,रमेश मडावी,तुफिन गायकवाड,प्रवीण रेषे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी कबड्डी खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

  कबड्डी सामन्यात दोन गट ठेवले असून गट अ साठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर गट ब साठी प्रथम पुरस्कार सौ अनिताताई दिपकदादा आत्राम माजी जि.प.सदस्या यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

 

 आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना यांच्या कडून आयोजित भव्य कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बंडुजी बावणे यांनी मानले.या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला मलेझरी, अडपल्ली सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी दिपक शेडमाके,आकाश नागोसे,मारोती मडावी,जितेंद्र परचाके,सचिन राऊत,राहुल कोहट,प्रणय शेडमाके,आकाश राऊत,शेखर पोरेते,स्वप्नील सुरपाम,मयूर बावणे यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते श्री जगन्नाथ एच पी गॅस सर्व्हिस अहेरी (ग्रामीण) तर्फे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना वितरण सोहळा संपन्न


माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते श्री जगन्नाथ एच पी गॅस सर्व्हिस अहेरी (ग्रामीण) तर्फे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना वितरण सोहळा संपन्न.

 

अहेरी येथील स्थानिक स्व. राजे विश्र्वेशराव महाराज चौकातील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री जगन्नाथ एच पी गॅस सर्व्हिस अहेरी (ग्रामीण) तर्फे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना वितरण सोहळा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी राजे अम्ब्रिशराव आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन राहूलवार मंचावर उपस्थित होते.

 

सरकारच्या नवीनतम योजनापैकी प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY)ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साल २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेली सरकारी योजना आहे. दारिद्र्यरेषेखालील महिलांना तब्बल ५० दशलक्ष एलपीजी कनेक्शनचे वितरण करण्याची कल्पना या योजनेमार्फत करण्यात आली होती. मार्च २०२० पर्यंत या योजनेमार्फत आठ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दीष्ट सरकाने ठरवले होते.या वेळी राजे अम्ब्रिशराव महाराज उज्ज्वला गॅस योजनेचा वाटप सोहळाच्या निमित्याने सांगितले की, या उज्ज्वला योजनेचा उद्दिष्ट हे महिलाचे कष्ट दूर करणे व त्यांना सक्षमीकरणास चालना देणे, या योजनेद्वारे स्वयंपाकासाठी इंधन पुरवणे, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे खेड्यातील लोकांना विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवु लागतात. त्या टाळणे हे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा उद्दिष्ट असून आपण या योजनेचा जास्तीत जास्त महिला वर्गांनी घ्यावी आणि काही अडचण येत असल्यास आमच्या भाजपा कार्यकर्ता ची मदत घ्यावी. 

 

या वितरण सोहळ्याला भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समितीचे सर्व सदस्य तसेच ग्रामीण महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

शासकीय इमारतीचा सज्जा तुटल्याने पेंटरचा मृत्यू


शासकीय इमारतीचा सज्जा तुटल्याने पेंटरचा मृत्यू

 

कोरची तालुक्यातील बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय इमारतीवरील नाम फलक लिहीत असतांना कोरची येथील पेंटर सुरेश तुकाराम कराडे वय ५५ वर्ष यांचा इमारती खाली पडून मृत्यू झाला. 

२८ डिसेंबर ला गुरुवारी बोटेकसा येथे दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान आरोग्य इमारतीवर आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नाम फलक लिहीत असताना अचानक सज्जा तुटल्यामुळे पेंटर सुरेश कराडे हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागून दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टर राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून डोक्यावर गंभीर मार असल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. गडचिरोली जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी आहे अस बराच मोठा कराडे परिवार आहे. शुक्रवारी सुरेश कराडे यांच्या मूळ गावी कोचीनारा येथे दुपारी दोन वाजता त्यांचे अंत्यविधी करण्यात आली.

            सध्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने सर्व आरोग्य विभागातील इमारतीवर जुने नाव बदलून नवीन नाव लिहिण्याचे आदेश काढलेले आहे पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र असे नाव होते ते बदलून त्या ठिकाणी आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नाव लिहिणे सुरू केले आहे हे नाव लिहिण्यासाठी कोरची येथील पेंटर सुरेश कराडे यांना बोटेकसा आरोग्य विभागाकडून ६० रुपये स्केअर फूट नुसार काम दिला होता याच कामावर नाव लिहीत असताना इमारतीचा सजा तुटल्याने खाली पडून कराडे यांचा मृत्यू झाला. सदर इमारत अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून येत आहे.

 बोटकसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील इमारतीचे बांधकाम सण २०१६ या वर्षी करण्यात आले परंतु या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यावेळी येथील अधिकारी इमारतीचा ताबा घेण्यास नकार दिला होता. यावरून असे समजते की या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने येथील दर्शनी भागातील इमारतीचा सज्जा तुटला आणि पेंटर सुरेश कराडे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पेंटर कराडे यांच्या नातेवाईकांनी कोरची पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन बोटेकसा प्रा.आ.केंद्र या शासकीय इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अभियंता यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे म्हणून लेखी तक्रार दिली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आल्लापल्ली येथील अपघातग्रस्त चालकाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत!


जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आल्लापल्ली येथील अपघातग्रस्त चालकाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत!

 

 

अहेरी : आल्लापल्ली येथील खाजगी वाहनाचे चालक संदीप गाडगे हे काल भाजीपाला आणण्यासाठी चंद्रपूर ला जाऊन आपल्या वाहनात भाजीपाला भरून आल्लापल्ली ला परत येत असतांना मुलचेरा जवळ गाडी अचानक पालटल्याने यात चालक संदीप गाडगे हे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना तात्काळ उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आला.

 

डॉक्टरांनी वाहनचालक संदीप गाडगे यांच्यावर उपचार केले.या अपघातात वाहन चालकाच्या हाताला तीन ठिकाणी फॅक्चर झाली आहे. यावर खाजगी दवाखान्यात औषध उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे.त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण भासत आहे.

 

या अपघातग्रस्त चालकाची माहिती आविसं काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी चालक संदीप गाडगे यांची नातेवाईकांना अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलवून घेऊन त्यांचे आर्थिक अडचण जाणून घेतले. यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप गाडगे यांना पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी गाडगे परिवारातील सर्व सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.

 

अपघातग्रस्त चालक संदीप गाडगे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करतांना माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,स्वप्नील मडावी,नरेंद्र गर्गम,तिरुपती गड्डमवार,सुरज दुर्गे,हितेश्र्वर मडावी,आकाश गेडाम,हणमंतू जंगमवार,प्रकाश दुर्गेसह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

आष्टी येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमात भारावल्या परिसरातील महिला,सांस्कृतिक कार्यक्रमातही उत्फूर्त सहभाग


आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन 

 

 

आष्टी येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमात भारावल्या परिसरातील महिला,सांस्कृतिक कार्यक्रमातही उत्फूर्त सहभाग

 

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालयाच्या वतीने केले जात आहे. २९ डिसेंबर रोजी आष्टी येथे सदर कार्यक्रम पार पडला. यात शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व विशेषत: महिलांसाठी सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळाल्याने आष्टी परिसरातील महिला अक्षरश: भारावून गेल्या.

 

राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचा बेबीताई बुरांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रशांत घोरुडे,संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार,ठाकरी च्या सरपंचा नंदा कुळसंगे, मार्कंडा कंन्सोबा च्या सरपंचा वनश्री चापले, प्राचार्य डी.डी.राॅय, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, पोलिस उपनिरीक्षक बनवे आदी मंचावर उपस्थित होते.

 

याप्रसंगी बोलतांना उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम म्हणाले शासनातर्फे महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या योजना महिलांपर्यंत पोहचल्या पाहिजे यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.बचतगट तसेच गृह उद्योग करणाऱ्या महिलांनी शासनाच्या योजनेचा फायदा या शिबिरातुन घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते . तत्पूर्वी संकल्प रथाचे स्वागत करण्यात आले. जि.प.उच्च प्राथमिक शाळा व राजे धर्मराव हायस्कूल च्या विद्यार्थीनिनी विविध नृत्य सादर करुन उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. सदर शिबिरामध्ये आष्टी मंडळांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने नागरीकांना द्यावयाचे विविध दाखले, पंचायत समिती व ग्रा.पं.च्या वतीने तसेच महिला व कार्यालयाच्या वतीने द्यावयाच्या विविध लाभाच्या योजना एकाच छताखाली देण्यात आल्या. यात पंचायत समिती चामोर्शी चे ४५०० दाखले वाटप महसूल विभाग ६४३०,गट अभियान व्यवस्थापक उमेद - ३६०, कृषी अधिकारी ६००, सहायक आयुक्त पशू चिकित्सक ४००, तालुका आरोग्य अधिकारी १६००, एकात्मिक बाल विकास प्रकल्प ११०, वीज मंडळ चामोर्शी ३५, गटशिक्षणाधिकारी चामोर्शी २००, भूमी अभिलेख १४०, गडचिरोली कोपरेटीव्ह बॅंक चामोर्शी २००, स्टेट बँक १०, वनपरिक्षेत्र चामोर्शी ५ वितरण करण्यात आले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना साहित्य वाटप - जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पुढाकार!!


पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना साहित्य वाटप - जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पुढाकार!!

 

गडचिरोली : उद्योगविरहीत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे.त्यामुळे बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार युवक हाताला काम मिळावा म्हणून मेहनत घेत आहेत.

 

असेच काही अहेरी तालुक्यातील युवकांनी पोलीस शिपाई भरतीची तयारी करीत असून या युवकांना आविसं काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पोलीस भरतीसाठी लागणारे साहित्य वितरीत करून त्या युवकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.

 

अहेरी येथील अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी (२९ डिसेंबर) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना गोळा तसेच विविध साहित्य वाटप केले.याप्रसंगी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी युवकांच्या समस्या जाणून घेत त्यांना पोलीस भरतीत निवड होण्यासाठी जिद्द चिकाटीने परिश्रम घेण्याचे आवाहन केले.काही मदत लागल्यास निसंकोचपणे माझ्याकडे"या"अशी ग्वाही दिली.दरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांच्या या मदत व प्रोत्साहनामुळे युवकांच्या अंगी नवचेतना निर्माण झाली असून युवकांनी त्यांचे आभार मानले.

 

 यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीत चालूरकार,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,अखिल जंगम,कैलाश मडावी,करणं शेंडे,जोश कन्नाके,अमन येलमुले,जय गावडे,नागेश पुरमवार,नंदू मडवी,अक्षय राऊत,अनिल मडावी,रवी अत्राम,पियूष कोंदगुरले,प्रशांत पवार,प्राशिक येवले,उदय गुरणुळे,रोहित गुरनुळे,विजय गावत्रे,राहुल मडावी,आरुषी पवार,शृष्ठी कोडापे,लता मडावी,नंदिनी मडावी,निकिता मडावी,रोशनी राऊत,कोमल उरेत,पायल वेलादी,विद्या वेलदीसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे


 

 

देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे 

 

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतची शुक्रवारला सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे यांनी सात विरुद्ध दोन अशी आघाडी घेवून सरपंच पदाची निवडणूक जिंकली.

 

देलनवाडी, नागरवाही, कोसरी या तीन गावांची गट ग्रामपंचायत असलेल्या नऊ सदस्यीय देलनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त होते. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रियंका रोहिदास कुमरे यांना ग्रामपंचायत सदस्य इना मेश्राम, मुनिचंद मडावी, शुभांगी मसराम, राजेंद्र पोटावी, त्रिलोक गावतुरे, अश्विनी गरमळे या सात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

 

प्रियंका कुमरे या देलनवाडीच्या सरपंच झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, डॉ. गुरुदास सेमस्कर, क्रीष्णा नैताम, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गंगाधर बोमनवार, दामोदर रोहनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड. नर्गिस पठाण, निशा आयतूलवार, कविता ठाकरे, सुनिता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

मद्यपींचा जुगाड पाहून पोलीस चक्रावले,पोलिसांनी पेट्रोलचा टँक तपासला तर त्यातून दारुच्या बाटल्या निघाल्या


मद्यपींचा जुगाड पाहून पोलीस चक्रावले,पोलिसांनी पेट्रोलचा टँक तपासला तर त्यातून दारुच्या बाटल्या निघाल्या

 

गडचिरोली : दारुबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये दारुची वाहतूक छुप्या मार्गाने केली जाते. अनेकदा दारु वाहतुकीसाठी वेगवेगळी शक्कल लढवण्यात येते. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. गडचिरोलीत दारुची वाहतूक करण्यासाठी दोन तरुणांनी चक्क पेट्रोलच्या टाकीचा वापर केल्याचं समोर आलं. पेट्रोलच्या टाकीत तरुणांनी अनेक बाटल्या लपवल्या होत्या.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दारुबंदी असूनही दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चामोर्शी इथं दोन तरुण मोटारसायकलने दारुची वाहतूक करत होते. तेव्हा पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी जुन्या आदिवासी मुलींच्या वसतीगृहाजवळ सापळा लावत दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोलचा टँक तपासला तर त्यातून दारुच्या बाटल्या निघाल्या. दरम्यान, टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, मग गाडी कशी चालवली असा प्रश्न उपस्थित असलेल्यांना पडला.

 

पोलिसांनी जेव्हा गाडीच्या पेट्रोल टाकीत जर दारू आहे तर गाडी चालते कशी असं विचारलं तेव्हा तरुणांनी जे सांगितलं त्याने धक्काच बसला. पेट्रोल टँक गाडीला मॉडीफाय करून डिक्कीत बनवण्यात आले होते. पेट्रोल पुरवण्यासाठी जोडण्यात येणारी पाइप तिथून इंजिनला जोडली होती. तरुणांनी केलेला जुगाड पाहून पोलीससुद्धा चक्रावले. अवैध दारु वाहतूक प्रकरणी बाईक आणि दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघांवर गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने पार पाडली.

आता ३१ डिसेंबर जवळ आल्याने दारूची अनधिकृत वाहतूक वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात चामोर्शी पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करणाऱ्यांचे मनसुबे साध्य होऊ नये यासाठी पोलिस दलाने देखील त्यांचे गोपनीय बातमीदार सक्रिय केले असल्याचे चामोर्शी ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत निवासी प्रशिक्षण शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी घेतला प्रात्यक्षिकांचा अनुभव


स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत निवासी प्रशिक्षण शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी घेतला प्रात्यक्षिकांचा अनुभव

 

श्वान पथकाकडून प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली माहिती विविध स्पर्धामधुन विद्यार्थ्यांनी दाखविले कौशल्य

 

राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारा सन २०१८ पासुन राष्ट्रीय स्तरावर "स्टुडंट पोलीस कैडेट प्रोग्राम" राबफिला जात असल्याने या उपक्रमांतर्गत इयत्ता ०८ वी प ०९ यी मधील विद्यार्थ्यांकरीता आंतरवर्ग, बाह्यवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजीत करुन विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व व नितीमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्याथ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळत असून त्यांच्यात सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन व्यक्तीगत हिताईतकेच सामाजिक जबाबदारीचे भान वाढीस लागत आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नितीमुल्यांचे महत्य शिकविले जात असून समाजातील भ्रष्टाचार आणि वाईट चालीरितींचा मुकावला करण्यासाठी तयार केले जात आहे. पासोचतच विद्याथ्यांमध्ये संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन इ. नैतिक प्रामाणिकपणा मुल्यांची जडणघडण होण्यासाठी व त्याच्या सर्वांगीन विकासात भर पडावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक २६/१२/२०२३ ते २०/१२/२०२३ पर्यंत एनसीसीचे धर्तीवर पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय "निवासी प्रशिक्षण शिचीराचे" आयोजन करण्यात आले आहे.

 

या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज तिसरा दिवस असून, आज दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी योगा व शारीरिक कवायत घेऊन पथसंचलन सराच घेण्यात आले. त्यानंतर पोउपनि रामदास ढोके व त्यांच्या पथकाकडून श्वान पथकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये बॉम्ब शोध व गुन्ह्याच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे बाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात बघतांना विद्याध्यर्थ्यांनी आनंद लुटला. त्यानंतर नितीतत्वे, संयम, सहनशिलता, संवेदना, सहानुभूती, वडीलधा-यांचा आदर या विषयावर सपोनि, सदाशिव देशमुख, शिस्त संघभावना, दृष्टीकोन या विषयावर शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर, भ्रष्टाचार विरोधी लढा या विषयावर ला.सु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि, राठोड तसेच महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना या विषयावर स्था.गु.शा. चे पोनि, उल्हास भुसारी व कम्यूनिटी पोलीसींग या विषयावर मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) तथा सदस्य सचिव एस.पी.सी गडचिरोली  कुमार चिता सा. यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर १०० मीटर धावण्याची स्पर्धा, ४०० मीटर ४ ४ १०० रीले स्पर्धा, कयद्दी व प्हालीवॉल स्पर्धा है. सांधीक खेळ घेण्यात आले, यानंतर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.

 

आजच्या कार्यक्रमप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली . अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) . कुमार थिता , ला.लु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि. राठोड, स्था. गु.शा.चे पोनि, उल्हास मुसारी तसेच शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.

 

सदर कार्यक्रमाच्या परास्यितेकरीता नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि, धनंजय पाटील, पोउपनि, भारत निकाळजे तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 29, 2023

PostImage

विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट


पोस्टे देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

 

गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक  निलोत्पल यांचे आदेशान्वये पोस्टे देसाईगंज हद्दीतील अप्रैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील एकूण किमत १६,००,०००/-  रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी नष्ट करण्यात आला.

 

सविस्तर वृत्त पाप्रमाणे आहे की, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने दिनांक २७/१२/२०१३ रोजी पोस्टे देसाईगंज बेधील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक  किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गढ़चिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक  चं. पि. भगत पांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुरोमाल नष्ट करण्यात आला. ज्यामध्ये १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६९५० बाटल्या, २) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या, ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या, ४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या, ५) ५०० मिली वियरच्या ३० टिनाचे कैन असे एकुण ३७,९९४ मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १० X १० चा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कड़क व मुरमाड जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बाटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीचीच्या फावडपांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. तसेच खड्डा पुर्ववत बुजवण्यात आला. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली,

 

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख

अपर पोलीस अधीक्षक अहेरी, एम. रमेश. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी फुरखेडा. साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी किरण रासकर व सर्व अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 28, 2023

PostImage

सिरोंचा बस स्थानक बाजूला शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण हटवून नगर पंचायतीने बेरोजगारांसाठी जागा उपलब्ध करून द्या :- सागर मूलकला...!


सिरोंचा बस स्थानक बाजूला शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण हटवून नगर पंचायतीने बेरोजगारांसाठी जागा उपलब्ध करून द्या :- सागर मूलकला...!

 

 

 

 सिरोंचा :- नगर पंचायत हद्दीतील सिरोंचा रैयत भूमापन क्र.58 च्या भूखंडावर 2007 पूर्वी 52 कमर्शियल प्लाटचे लेआऊट टाकण्यात आले. 

     त्यापैकी अंदाजे 20 प्लाट शासन नियमानुसार लिलाव करून विक्रीहि करण्यात आले आहे ,

    उर्वरित 32 प्लॉट्स चे लिलाव आज पर्यंत करण्यात आले नाही, 2007 नंतर पासून आज पर्यंत लिलाव आणि विक्री न केलेले उर्वरित प्लॉट्स पडीत अवस्थेत आहेत,

सदर प्लॉट्सची लिलाव पद्धतीने विक्री केल्यास शासनाला कोट्यावधी रुपये महसूल जमा होईल,

शहरातील युवकांनी रोजगार करिता तेलंगणा राज्यात जाऊन रोजगार करीत आहेत,

तसेच बेरोजगार युवकांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध मिळतील करिता सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील सिरोंचा रैयत स.न 58 मंजूर लेआऊट मधील उपलब्ध असलेले 32 प्लाट सुशिक्षित बेरोजगारांना मोफत वाटप करण्यात यावे ,किंवा शासकीय दराने लिलाव करून बेरोजगारांना प्राधान्याने देण्यात यावे,असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष - फाजील पाशा यांचा मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष - सागर मूलकला यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्थानिक तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 28, 2023

PostImage

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने 'मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली' द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याच उदघाटन संपन्न.!


माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने 'मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली' द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याच उदघाटन संपन्न.!

 

 

 

*मुलचेरा* :- तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत कोलपल्ली येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने 'मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली ''यांच्या सौजन्याने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे जिल्हा परिषद गडचिरोली हे होते.तर या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून श्री.संतोषभाऊ उरेते सामाजिक कार्यकर्ते अहेरी हे होते.त्यावेळी गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.बासू मुजुमदार उपसभापती पंचायत समिती मूलचेरा,प्रमुख पाहुणे म्हणून भाजप तालुका अध्यक्ष संजीव सरकार,भाजपा तालुका महामंत्री मारोती पेंदाम,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,भाजपा महामंत्री विजय बिश्वास,प्रतिष्ठित नागरिक सुरेश कुसनाके,दिलीप सिडाम सर,वैष्णव ठाकूर,अर्जुन आत्राम,महादेव चौधरी,शामराव पोरतेट,कवडू चौधरी हे होते.तसेच उद्घाटन सोहळ्या दरम्यान लहान मुलींनी सुंदर रेला नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

 

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेला हजरी लावली होती.

 

या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 31001-/रु पुरस्कार माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार 21001-/रु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार 11001-/ रु माजी समाजकल्याण सभापती सौ.माधुरीताई संतोष उरेते यांच्या कडून देण्यात आला.

 

यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी कोलपल्ली येथील गावकरी,युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.!


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 28, 2023

PostImage

सिरोंचा येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन


सिरोंचा येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन

 

*सिरोंचा:-* तालुका मुख्यालयातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थे मार्फत चालविल्या जाणाऱ्या धान खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.

 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सतीश गांजिवर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती रिकुला कृष्णमूर्ति,संचालक रवी राल्लाबंडीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष एम. डी. शानु,संचालक बानय्या मंचार्ला,सत्यम चीलकामारी, मादेशी मदनय्या, रवी सुलतान,देवा येंगांदुला,सिदिक भाई,आदी उपस्थित होते.

 

याप्रसंगी भाग्यश्री ताई आत्राम यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामातील धान खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपले धान केंद्रावर विक्रीस आणून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 27, 2023

PostImage

18 लाखाहून अधिक किमतीचा दारू जप्ती मुद्देमालावर आष्टी पोलिसांनी फिरवला बुलडोझर


18 लाखाहून अधिक किमतीचा दारू जप्ती मुद्देमालावर आष्टी पोलिसांनी फिरवला बुलडोझर.

 

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी पोलिसांनी 31 डिसेंबर च्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी कायद्यान्वये तीव्र कारवाई सुरू करण्यात आली असून याच मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 26 /12/ 2023 रोजी सन 2016 ते 2021 या कालावधीत आष्टी पोलिसांनी वेळोवेळी धाडी टाकून विविध गुन्ह्यात जप्त केलेला 18 लाखाहून अधिक किमतीची दारू मुद्देमाल मा. न्यायदंडाधिकारी सा. चामोर्शी यांच्या आदेशान्वये व उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांच्या परवानगीने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पाल सा .गडचिरोली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री एम. रमेश सा. अहेरी , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुदर्शन राठोड सा.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन तू.गावडे पोलीस स्टेशन आष्टी यांच्या उपस्थितीत निर्जन व सुरक्षित स्थळी सदर जप्त प्रो.वी.चा मुद्देमालावर बुलडोजर चालवून नाश करून त्याचा विल्हेवाट लावण्यात आला. 

  भविष्यात पोस्टे आष्टी हद्दीतील अवैध दारू विक्रेते व अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमांवर वेळोवेळी धाडी टाकून कार्यवाही करण्यात येत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 27, 2023

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन!!


माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन!!

 

एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथील जय जगदंबा क्रीडा मंडळ गेदा यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आवीस काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.

 

सदर"या"कब्बड्डी व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघ- काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी - सहउदघाटक म्हणून आविसं एटापल्ली तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार आणि गेदा ग्रामपंचायतचे सदस्य रमेशभाऊ वैरागडे होते.

 

यावेळी उपस्थित अनिल करमरकर बाजार समिती संचालक,रमेश वैरागडे ग्रा.पं सदस्य गेदा,सौ.सरिता मट्टामी ग्रामपंचायत सदस्य गेदा,हरीश पदा माजी ग्रा.पं सरपंच गेदा,हरीश गावडे उपसरपंच देवलमरी,महेश लेकुर ग्रा.पं.सदस्य देवलमरी, प्रशांत तेलकुंटवार सचिव आ.वि.का.सह.संस्था गेदा,सोमजी गावडे,धर्मा मट्टामी,श्रीनिवास राऊत,नरेंद्र गर्गम,मुकेश पदा पो.पा. गेदा दसरू पदा गाव भुमिया,जगन्नाथ मडावी माजी उपसरपंच देवलमरी,मिलिंद भांडेकर,अरविंद गव्हारे, मंडळाचे अध्यक्ष संतोष कोरामी, उपाध्यक्ष अजय गावडे,सचिव अरूण पदा,चैतू पुंगाटी,शंकू पदा,कोषाध्यक्ष सादुजी पदा,अजय गुंदरू,कैलास पुंगाटी,दिनेश नरोटे,महेंद्र गोटा,दिवाकर कुळ्येटी,मंडळ : सर्वश्री - रवि कोंदामी,कालिदास कोंदामी,आकाश कोंदामी,नरेश गुंडरू,नानेश नरोटे,नामदेव गुंडरू,नितेश हलामी,सुरज नरोटे,राहूल गोटा,अनिल पदा,उमेश पदा,अशोक गावडे,रमेश गावडे, निखिल पुंगाटी,अजय बा.वडे,नागेश पदा,स्वराज पुंगाटी,संदिप गावडे,जाकेश गावडे,किशोर पुंगाटी,विजू गावडे,योगेश कुळयेटी,संतोष कुळयेटी,ईश्वर गावडे,अनिल पदा,सदाशिव पदा,रंजीत पुंगाटी,मंगेश गोटा,नानेश कोरामी,रोहीत कुळयेटी,राम कोरामी,रिखी कुळयेटी,रोशन पदा,निलेश पदा,करण पदा,राजू पदा,रोहीत पदा,सुरेश आलाम,रंजित गुंडरु,अंकुश गुंडरू,कुशवंत हलामी, प्रविण गुंडरू,दिनेश हलामी,महेंद्र मडावी,विक्की पुंगाटी,रोशन पदा,अंकुश पदा,आकाश पदा,विशाल पदा,अशोक गुंडरू,प्रविण गुंडरू,आशिष गोटा,राहूल पदा,अजय पदा,साईनाथ गावडे,गणेश गोटा,मोरेश्वर पुंगाटी,सम्मा हलामी,टिबु पुंगाटी,करण पदा,गुलशन भांडेकर,गणेश कुनघाडकर,अनिकेत कुंकलवार,अजय भांडेकर,उपेश नरताम,चंद्रकांत भांडेकरसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 27, 2023

PostImage

फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचाराचे विद्यार्थी घडल्यास समाजाचा विकास शक्य : माजी आ.दिपकदादा आत्राम


फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचाराचे विद्यार्थी घडल्यास समाजाचा विकास शक्य : माजी आ.दिपकदादा आत्राम

 

 सिरोंचा येथे दोन दिवसीय वार्षिक महोत्सव संपन्न.

 

सिरोंचा :फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचाराचे विद्यार्थी घडल्यास समाजाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आ. दिपकदादा आत्राम यांनी केले.सिरोंचा येथे मिलिंद बहुद्देशीय विकास संस्था व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजीत सांस्कृतिक परिवर्तन दिनानिमित्याने फुले-शाहू-आंबेडकर वार्षिक महोत्सव निमित्त तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील नाटकाच्या उद्घाटनीय भाषणातून बोलत होते.

 

या वेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष जोडे सर,एससी संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकर बोरकूट,मादाराम ग्रामपंचायत सरपंच दिवाकर कोरते,आविस सल्लागार विजय रेपालवार,बामणी चे माजी सरपंच व्यंकटी कारसपल्ली, मादाराम ग्रा प चे माजी सरपंच इरपा मडावी,चिंतलपल्ली चे माजी सरपंच जानकी श्रीनिवास,रवी बोंगोणी,वेलगुर ग्राप चे उपसरपंच उमेश मोहूर्ले, जिमलगट्टा ग्रामपंचायतचे माजी सदस्य ईश्वर कोटा,जितेंद्र गड्डमवार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,चंद्रमोगली माडेम,एदुरू समय्या,आविस सल्लागार वाईल तिरुपती,नारायण मुडीमडगेला,व्यंकटस्वामी रामटेके, सुधाकर कोरते सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

पुढे बोलतांना माजी आ.दिपकदादा आत्राम यांनी सांगितले की दरवर्षी या कार्यक्रमनिमित्त महाराष्ट्र,तेलंगाणा व छत्तीसगड येथील बहुजन समाज बांधव एकत्र येतात.या दोन दिवसीय संमेलनात प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळते.त्यामुळे थोर महात्म्यांनी समाजासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कामाची माहिती युवा वर्गाला मिळते आणि त्यातूनच युवापिढीत फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार रुजतात.

 

सांस्कृतिक परिवर्तन दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जाते.कमिटी तर्फे मला नेहमीच आवर्जून निमंत्रण दिले जाते.मी नेहमीच अश्या समाजहिताच्या कार्यक्रमांना मदत करत आलो आहे आणि पुढे पण मदत करत राहणार असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले.यानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 27, 2023

PostImage

वेकोलि वसाहतीच्या सुभाषनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण सुरु,माजी सरपंच संतोष नुने यांच्या मागणीला यश


वेकोलि वसाहतीच्या सुभाषनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण सुरु,माजी सरपंच संतोष नुने यांच्या मागणीला यश

 

घुग्घुस येथील वेकोलि वसाहतीच्या सुभाषनगर आणि गांधीनगरच्या रस्त्याचे डांबरीकरण रविवार, २४ डिसेंबर पासून वेकोलितर्फे सुरु करण्यात आले आहे.

 

वेकोलि वसाहतीच्या सुभाषनगर आणि गांधीनगरच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना घुग्घुसचे माजी सरपंच संतोष नुने यांनी दिले होते. त्याअनुषंगाने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिकडे पाठपुरावा केला होता.

 

त्यामुळे वेकोलितर्फे सुभाषनगर आणि गांधीनगर येथील रस्त्याचे डांबरीकरण्यात येत असल्याने घुग्घुसचे माजी सरपंच संतोष नुने यांच्या मागणीला यश आले आहे.

 

रविवारला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे आणि घुग्घुसचे माजी सरपंच संतोष नुने यांनी कामाची पाहणी केली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 27, 2023

PostImage

ट्रैक्टर ट्राली मे दबकर युवक की मौत


ट्रैक्टर से दबकर युवक की मौत

 नागभिड, २६ दिसंबर- तहसील के मौजा इरव्हा निवासी लोकमन यादव (२०) की ट्रैक्टर ट्राली में दबकर मौत हो गई। घटना इरव्हा रोड की बतायी गई है। जहां धान के भरडाई हेतु राईस मिल पर ट्रैक्टर से धान लाया गया था।

धान की भरडाई कर दोपहर ३ के करीब इरव्हा टेकडी गांव दिशा में जाने दौरान मोड पर ट्रैक्टर की ट्रॉली पलट गई। इस घटना में लोकमन ट्रैक्टर के निचे दब गया जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। लोकमन के शव का पोस्टमार्टम हेतु ग्रामीण भिजवाया अस्पताल गया। इरव्हा टेकडी परिसर स्थित स्मशानभूमी में उसका संस्कार किया गया।


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 27, 2023

PostImage

अल्पवयीन युवतीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन केली आत्महत्या,आत्महत्येमागील कारण वृत्तलिहीपर्यंत कळू शकले नाही


सावली :- एका अल्पवयीन युवतीने गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना खेडी येथे घडली चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी येथे गेल्या तीन महिन्यापासून किरायाने राहत असलेली पुनम राजकुमार शर्मा (१६) रा. बाबूपेठ या अल्पवयीन युवतीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

 

२५ डिसेंबरला सदर घटनेची माहिती पोलीस पाटील कृपाल दुधे यांनी सावली पोलिसांना दिली. त्यानंतर सावली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले सदर प्रकरण नेमके काय आहे याची चौकशी करीता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे, पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व तपास सुरु असून तरूणीच्या आत्महत्येमागील कारण वृत्तलिहीपर्यंत कळू शकले नाही


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

सामाजिक कार्याची परंपरा जोपासावी,खासदार अशोक नेते


सामाजिक कार्याची परंपरा जोपासावी,खासदार अशोक नेते

 

"यशवंतराव चव्हाण" आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना मदत...

 

दि. २६ डिसेंबर २०२३

गडचिरोली:-आज भगवान दतात्रेय ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या अवताराने दत्त जयंतीचे औचित्य साधुन दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या वतीने "यशवंतराव चव्हाण" आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार प्राप्त मान.आमदार कृष्णाजी गजबे यांचे अभिनंदनपर व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटूंबियांना मदतीचा हात या कार्यक्रमाचे आयोजन दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले.

 

कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना पोरड़्डीवार परिवार हा नेहमीच सामाजिक कार्याचे उपक्रम घेत असतो. सामाजिक कार्याची जाणीव ठेवून सामाजिक कार्याची परंपरा जोपासून हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचा अभिनंदन करून कौतुक करतो. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना एक मदतीचा आधार व त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांचा दुःख हलके करण्याचा व वाटून घेत त्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली.अतिशय चांगला कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच संयमी, शांत प्रेमळ स्वभावाचे धनी,चांगले व्यक्तिमत्व असलेले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी गजबे यांना यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी , पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचंही सुद्धा याप्रसंगी अभिनंदन करतो.आज प्रंचित सा.पोरड़्डीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व समस्त जनतेला दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

  

यावेळी मंचावर प्रामुख्याने मान.आमदार श्री.रामदासजी आंबटकर वि.प.सदस्य,सहकार महर्षी अरविंद साव.पोरेड़्डीवार, सहकार नेते प्रकाश साव. पोरेड़्डीवार,आमदार कृष्णाजी गजबे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, अध्यक्ष GDCC बँक गडचिरोली चे प्रंचित साव. पोरेड़्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार,मानद सचिव अनंत साळवे,नगराध्यक्ष पवन नारनवरे,कृ.उ.बा.स. आरमोरी सभापती ईश्वर पासेवार, कृ.उ.बा.स.गडचिरोली सभापती शशिकांत साळवे, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,डाॅ.अप्पलवार तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

चामोर्शी- अनेक गावांचा एकच निर्धार/ जमीनाधिग्रहणाला करणार हद्दपार


चामोर्शी- अनेक गावांचा एकच निर्धार/ जमीनाधिग्रहणाला करणार हद्दपार

 

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील 900 हेक्टर जमीन midc/अनेक कंपन्यासाठी अधिग्रहण करण्याचे अध्यादेश काढण्यात आले आहे... यमुळं गावकर्यांमध्ये एकच असंतोष पसरलेला आहे...आपल्या जमीनींच्या रक्षणासाठी हजारो गावकरी धळपळायला लालगले आहेत... प्रशासनाकडे दाद मागणे, उच्च न्यायालयात petition दाखल करणे आदी करतच दि. 25.12. 2023 ला चामोर्शी भूमिधिग्रहण बचाव कृती समिती स्थापन करून अनेक गावांच्या संयुक्त विद्यमाने जयरामपूर गावी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभे ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून cpi(m), citu व किसान सभेचे अध्यक्ष कॉ. रमेशचंद्र दहिवडे, राज्य कौन्सिल किसनसभाचे अमोल मारकवार, कॉ. अरुण भेलके, पत्रकार चौखुंडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. दीपाली सोयाम, सरपंच जयरामपूर, मुकुंदाजी पावडे, त. मु. स. अध्यक्ष जयरामपूर, श्रीकांत पावडे, सरपंच कोनसरी, रतनजी आल्केवर उपसरपंच, कोनसरी, सौ. डेकाटेताई, सरपंच मुधोली चक 1, विजय गौरकर, पो. पा. जयरामपूर, श्री. निकेशजी गद्देवार, अड्याळ, सुधाकर गद्देवार, सरपंच गणपूर, दादाजी निखाळे, लक्ष्मणपूर, सुरज कोडाप, मुधोली चक 2 होते. महा स्त्रीपुरुषांच्या प्रतिमाना मालार्पण करुन भूमिअधिग्रहनाच्या अध्यादेशाचे दहन करुन सभेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता हरीश निखाळे, सतीश ताजने, प्रकाश गौरकार, वैभव गौरकार, पवन गौरकार, शालिक गेडाम, विजय पावडे, एवनाथ गेडाम, बालाजी कटी, संतोष गौरकार, गुरूदास आभारे, अतुल फरकडे, वासुदेव दिवसे, सौ. रोशनी काळे, सौ. साधना गौरकार, सौ. शारदा गौरकार, कौशल्य कुसराम, चारूलता आदींनी परिश्रम घेतले. विषयावर विस्तारणे मार्गदर्शन करण्यात आले व एक इन्चही जमीन न देण्याचा निर्धार उपस्थित 3000 गावकर्यांनी एकदिलाने केले. भुमातेच्या रक्षणासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकल्प शेतकऱ्यांनी व्यक्त केले...

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

कन्नमवारवार्ड येथील चांदशावली दरगाह समोरील अनाधिकृत अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करा - दरगाह कमेटीने नगर पालिकेला दिले निवेदन ..


कन्नमवारवार्ड येथील चांदशावली दरगाह समोरील अनाधिकृत अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करा - दरगाह कमेटीने नगर पालिकेला दिले निवेदन ..

 

देसाईगंज - - देसाईगंज कन्नमवार वार्ड या ठिकाणी अनेक पिढ्यान् पासून हजरत चांदशा वली ( सूफी संत ) यांची दरगाह आहे , हिंदू मुस्लिम अनेक लोकांच्या श्रध्दा ह्यां दर्ग्यासोबत जुडलेली आहे सदर दरगाह समोर कन्नमवार वार्ड येथील रहिवासी लक्ष्मण नावाच्या व्यक्तीने अनाधिकृत रीत्या दर्ग्याह समोर सिमेंट चे कॉलम टाकून पक्के बांधकाम सुरू केले आहे तसेच दर्ग्याह ला चक्क लागून अनाधिकृत रीत्या विना परवानगी अतिक्रमण केकेले आहे .या अतिक्रमनाने दरगाह ला जाणारा मार्ग पूर्णतहा बंद झालेला आहे .प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ मौका चौकशी करून रस्ता मोकळा करून देण्यात यावा अन्यथा दरगाह कमेटी तर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन आज चांदशावली दरगाह कमेटी तर्फे देसाईगंज नगर पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले .

निवेदन देतांना चांदशावली दरगाह कमेटीचे अध्यक्ष अब्दुल सगिर शेख ,उपाध्यक्ष इलियास खान ,सचिव अब्दुल लतीफ रिज़वि,सहसचिव प्रीतम जणबंधू , कोषाध्यक्ष जब्बार शेख,सल्लाह्गार अब्दुल सत्तार ताजी , अब्दुल जब्बार मोतीवाला (लड्डू भाइ ),नजीर यासिनि ,सदस्य - नरेश वासनिक ,अस्लम साहेबअली शेख ,आदी उपस्थित होते ...


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

 माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीच्या फोटोला पुष्पहार घालून अटल जयंती साजरी..!!


 माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीच्या फोटोला पुष्पहार घालून अटल जयंती साजरी..!!

 

ये परंपरा का प्रवाह है कभी न खंडित होगा,

पुत्रों के बल पर ही मां का मस्तक मंडित होगा!!

- श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींच्या या वाक्याची स्मरण करून भारतीय राजकारणातील सुशासनाचे प्रणेते, अत्यंत प्रभावी आणि मुत्सद्दी नेतृत्व, करोडो भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक, माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन करीत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सिरोचां येथील मुख्य चौकात अटल जयंती साजरा केले.भाजपाच्या सर्व पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले.

 

यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

डॉ.गणेश लाडस्कर यांना प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी येथे परत नियुक्ती करा,काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांच्या मार्फतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन


डॉ.गणेश लाडस्कर यांना प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी येथे परत नियुक्ती करा,काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांच्या मार्फतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

 

अहेरी : तालुक्यातील देवलमारी येथील समस्त नागरिक सदर निवेदनात अशे म्हटले आहे.की आमच्या गावातील प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी येथील डॉ.गणेश लाडस्कर सर यांची बदली झाली आहे.असे कळताच गावातील नागरीक तसेच प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी यांच्या अंतर्गत येणारे उपकेन्द्र आजुबाजुच्या गावक-यांनी अतिशय भावुक पणे आपणास विनंती अर्ज सादर करित आहोत.

 

याचे कारण असे की,आमचे गाव Cut off Village मध्ये येत असल्यामुळे पावसाळयात रस्ते बंद राहतात.त्यावेळेस गावकऱ्यांना तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते अशा वेळी प्राथमिक आरोग्य पथक देवलमरीतील डॉ. लाडस्कर सर यांचे मोलाचे योगदान आहे.वेळ काळ न पाहता रूग्नांची सेवा करणे.कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता निस्वार्थ पणे उपचार देणे.प्रत्येक रूग्नांना जवळकीने जिव लावणे असे अनेक सेवा त्यांच्या हातातुन गावकऱ्याना लाभलेले आहे.असे डॉ.आमच्या पासुन दुर व्हायला नाही पाहिजे करिता आम्ही गावकरी आपणास विनंती अर्ज सादर करित आहोत.कृपया आमच्या विनंती अर्जाचा विचार करण्यात यावे.अशे म्हटले आहे

 

यावेळी सरपंच लक्ष्मण कन्नके,सदस्य मोनिका तोकला,सदस्य महेश लेकूर,सदस्य संजूबाई आत्राम,प्रतिष्ठित नागरिक विनोद वारगंटीवार,तंटामुक्ती अध्यक्ष बय्याक्का तुमवार,प्रतिष्ठित नागरिक संजय गोंडेवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालय म्हणून दर्जा द्या; राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांची मागणी


सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालय म्हणून दर्जा द्या; राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांची मागणी  

 

 

 

 सिरोंचा :- सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक गरीब रुग्ण येत असतात. 

मागील अनेक वर्षांपासून या ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून याची फटका येथील रुग्णांना बसत आहे. 

 गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुका हे शेवटचं टोक असून येथील आरोग्य सुविधा मात्र रुग्णांसाठी कुचकामी ठरत आहे. 

सध्याचा परिस्थितीत सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात क्ष किरण यंत्राचे तंत्रज्ञ नाहीत.यामुळे सर्वसामान्य रुग्णासह गरोदर मातांना अनेक त्रास सहन करावे लागत आहे. तसेच येथील महिलांसाठी स्कॅनिगचे डॉक्टर नाही.या रुग्णालयातील अनेक पद रिक्त असल्याने तालुक्यातील रुग्णांना जीव वाचविण्यासाठी तेलंगाणा राज्यात धाव घ्यावं लागतं आहे.परिणामी तालुक्यातील रुग्णांची आर्थिक व मानसिक शोषण होत आहे.

 सिरोंचा ग्रामीण रुगणालायतील रिक्त असलेल्या पदे तात्काळ भरून ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जा द्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष - अतुल भाऊ गण्यारपवार तसेच सिरोंचा तालुका अध्यक्ष - फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील स्थानिक तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आली आहे, त्यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव - विनोद नायडू, अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ता-गणेश सॅन्ड्रा, यांची उपस्थित होते,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

प्रबोधन सभेतून जमीन न विकण्याचा गावकऱ्यांचा संकल्प,जयरामपूर येथे भूमी अधिग्रहण विरोधी प्रबोधन सभा


प्रबोधन सभेतून जमीन न विकण्याचा गावकऱ्यांचा संकल्प,जयरामपूर येथे भूमी अधिग्रहण विरोधी प्रबोधन सभा...

 

चामोर्शी: सध्या संपूर्ण जिल्ह्यामधे चर्चेचा विषय असणाऱ्या कोनसरी नजीकच्या ४ गावांची शेतकऱ्यांची सुपीक जमीन महाराष्ट्र शासन उद्योग उभे करून काही खाजगी कंपन्यांना फायदा पोहचवून देण्याच्या उद्देशाने जमीन अधिग्रहण करण्याची बळजबरी करत असताना स्थानिक लोकांनीही जमीन न देण्याचा संकल्प प्रबोधन सभेतून केला आहे.

 जयरामपूर येथे २५ डिसेंबर या दिवशी प्रबोधन सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत मुधोली चक न.२,सोमणपल्ली, कोणसरी,मुधोली तुकुम, गणपुर या गावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.विशेष म्हणजे या सभेला उपस्थित राहण्यासाठी एक दिवस काम बंद ठेवून महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

प्रबोधन सभेमध्ये प्रामुख्याने जल,जंगल आणि जमीन बचाव, पेसा नियम व अधिकार कायदा,भूमी अधिग्रहण कायदा,शेतकरी आणि शेतमजूर यांचे हक्क या वेगवेगळ्या मुद्यावर मार्गदर्शक म्हणून रमेशचंद्र दहिवडे, अरुण भेलके, किशोर जामदार, अमोल मारकवार, रमेश पिंजारकर, नीकेश गद्देवार,सरपंच श्रीकांत पावडे यांनी मार्गदर्शन केले.

 शेकडो शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी बळकावून त्यांना उपेक्षित ठेवून सरकार कोणत्या प्रकारचा विकास करू पाहत आहे?कायद्याचा भंग करून जिल्हाधिकारी देखील शेतकऱ्यांसोबत उपऱ्यासारखा व्यवहार करत आहेत हे बेकायदेशीर आहे.पेसा अधिनियमाच्या अंतर्गत असलेल्या गावांच्या जमिनी ग्रामसभेच्या परवानगीशिवाय घेणे म्हणजे कायद्याचा आणि संविधानाचा भंगच आहे,असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मार्गदर्शक मान्यवरांनी केले.

 या कार्यक्रमात परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती,ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्य सहभागी झाले या कार्यक्रमाचे आयोजन जल,जंगल,जमीन बचाव कृती समिती जयरामपूर यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या तिकीटवर लढू इच्छिणाऱ्या माजी आ.दीपक आत्राम यांना आपली लढाई एकाकीपणे लढावी लागणार


येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या तिकीटवर लढू इच्छिणाऱ्या माजी आ.दीपक आत्राम यांना आपली लढाई एकाकीपणे लढावी लागणार

ना.वडेट्टीवारांचे नेतृत्व स्वीकारत माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार काँग्रेसचा पकडला हात 

 

अहेरी : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आदिवासी विद्यार्थी संघाच्या बॅनरखाली अनेक वर्षांपासून राजकारण करत असलेले अजय कंकडालवार आपल्या कार्यकर्त्यांसह अखेर रविवारी काँग्रेसवासी झाले. विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आलापल्ली येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेसचा हात पकडला. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या तिकीटवर लढू इच्छिणाऱ्या माजी आ.दीपक आत्राम यांना आपली लढाई एकाकीपणे लढावी लागणार आहे.

 

ना.वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, लोकसभा प्रभारी डॅा.नामदेव किरसान यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कंकडालवार यांच्यासोबत आतापर्यंत आविसं मध्ये काम करत असलेले पाचही तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही काँग्रेसवासी झाले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे आतापर्यंत अहेरी विधानसभा मतदार संघाकडे काँग्रेस पक्षाचे दुर्लक्ष होते. परंतू नवीन समीकरणात ना.धर्मरावबाबा आत्राम सत्तारूढ झाल्यामुळे या मतदार संघातून पुन्हा काँग्रेस आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेस कोणाला आपला उमेदवार म्हणून पुढे करणार आणि काँग्रेस या मतदार संघात आपले पाय कितपत स्थिरावू शकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचा जनसंपर्क माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या इतकाच आहे पण आविसं सोबत मिळून असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी काॅंग्रेसचा हात पकडल्याने आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या तिकीटवर लढू इच्छिणाऱ्या माजी आ.दीपक आत्राम यांना आपली लढाई एकाकीपणे लढावी लागणार आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

मार्कंडा देवस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाला लवकरच होणार सुरूवात


 

मार्कंडा देवस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाला लवकरच होणार सुरूवात

पुरातत्व विभागासोबत खा.नेते यांची चर्चा

 

गडचिरोली : पुरातत्व विभागातील तांत्रिक अडचणीमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले मार्कंडा देवस्थानच्या पुनर्बांधणीचे काम पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली. खा.नेते यांची दिल्लीत पुरातत्व विभागाचे उपमहानिर्देशक तसेच बांधकाम विभागाच्या निर्देशकांसोबत यासंदर्भात अधिवेशनादरम्यान महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत मटेरियल व लेबर या दोन टेंडरसंदर्भात चर्चा करण्यात आली.

 

दरम्यान मटेरियल टेंडरची प्रक्रिया पूर्ण झालेली असून लेबर टेंडरची प्रक्रिया अवघ्या १५ ते २० दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती दिल्लीवरून पुरातत्त्व विभागाने पत्राद्वारे आता खासदार अशोक नेते यांना देण्यात आली. त्यामुळे अवघ्या एक महिन्यातच मार्कंडा देवस्थानच्या विकास कामाचे भूमिपूजन होऊ शकते, अशी माहिती खासदार नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 26, 2023

PostImage

जगली हत्त्तींनी केली पाच नागरीकांचे घरे उद्ध्वस्त, जिवितहानी टळली,वनविभागाची हुला पार्टी सज्ज


जगली हत्त्तींनी केली पाच नागरीकांचे घरे उद्ध्वस्त, जिवितहानी टळली,वनविभागाची हुला पार्टी सज्ज 

 

आरमोरी

गेल्या तिन महिन्यापुवीच्या ओडिसा राज्यातील जंगली हत्ती मजेवाडा शंकरनगर पाथरगोटा परीसरात येऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केली व सहाय्यक उपवनसंरक्षकाच्या चालकाला दबाधरुण बसलेल्या जगली हत्तीने ठार केल्याची घटना जात असताना अजुन जंगली हत्तीनी आपला मोर्चा देसाईगंज तालुक्यातील शकरपुर मागें आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावाकडे वळवृन रात्रो पाथरगोटा येथील पांच नागरीकांच्या घराचे सोडाने पाडुन पुणता उद्भवत करुण तादुळ धानाची नासधूस करून नागरीकांना अन्न वस्त्र निवारे पासून बेघर केले तसेच शेतातील मका तुर बरबटी धानाच्या रोपटेची नासधूस केल्याने वारंवार नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने आज महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष शेषराव कुमरे यांना माहिती मिळताच पाथरगोटा गावातील नागरीकांच्या घराच्या नुकसानीची पाहणी करुन आरमोरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता क्षेत्र सहाय्यक किनेकर वनरक्षक अतकरे शिऊरकर यांनी पचमाने करुन या परीसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाच्या वतीने गस्ती हुला पाटी सज्ज आहे.

 

गेल्या तिनं महिन्यांपूर्वी आरमोरी तालुक्यातील मजेवाडा शंकरनगर पाथरगोटा भगवानपूर या भागात गेल्या काही दिवसापासून ओडिशा राज्यातील हत्तीचा कळप छत्तीसगड राज्यमार्गे धानोरा कोरची कुरखेडा तालुक्यातील ऊराडी आरमोरी तालुक्यातील कुलकुली मानापुर परत देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव चिखली परत कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर त्यानंतर दिनांक 8 सप्टेंबर पासून आरमोरी तालुक्यातील पळसगाव पाथरगोटा शंकर नगर मजेवाडा परिसरात हत्यांचा कळप वास्तव्यास असल्यामुळे शेतकऱ्यांचे धान व इतर पिकांचे व साहित्यांचे नासधूस करून सर्वात जास्त शंकरनगर मजेवाडा येथील दोनशे शेतकऱ्यांची मोठी नुकसान केली व दिनांक 15 सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शंकर नगर येथील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी जंगली हत्तींचे कळप हाकलून लावण्यासाठी जात असताना शंकर नगर येथील एक शेतकरी विश्वजीत परीमल मंडल वय 36 धावत असताना झाडाला आदळल्याने दुखापत झाल्याने वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी व वनपरिक्षेत्र एफडिसिम देसाईगंज विभाचे अधिकारी यांनी साहानुभुती दाखवून दुखापत झालेल्या शेतकऱ्याला स्वतः उचलून आपल्या वनविभागाच्या गाडीने आणून त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात केले ही घटना जात असताना अजुन जगली हत्ती शंकर नगर वरुण पाथरगोटा जगलत शेतीची रात्रो नुकसान करुन आज दोन ते तिनच्चा दरम्यान पळसगाव डोंगरगाव मधोमध डांबरी करण रस्त्यालगत बदारेवर बसले होते परंतु चार वाजताच्या सुमारास रस्तेवर अचानक येऊन नागरीकांवर धावले असता सहाय्यक वनसरक्षक यांच्या गाडीचे वाहन चालक रस्त्हयावर हत्ती पाहताना सुधाकर बाबुराव आत्राम वय ४५ यांच्या वर जगली   हत्यानी धाऊन हला करुन ठार करून जगली हत्तीने आपला मोर्चा गडचिरोली तालुक्यात वळविला होता या घटनेला तिन चे चार महिने होत असताना अजुन काल

 जंगली हत्तीनी आपला मोर्चा देसाईगंज तालुक्यातील शकरपुर मागें शेतकऱ्यांच्या शेतीचे धान पिक शेतीत नसल्यामुळे शेत जमिनी पुर्णता कोरड्या असल्यामुळे जंगली हत्तीनी आपला मोर्चा काल रात्रो एक वाजताच्या सुमारास पाथरगोटा गावाकडे वळवून येथील पाच नागरीकांच्या यात अशोक राऊत सुरज दिघोरे मंगल प्रधान चंद्रशेखर बगमारे दुर्गादास बगमारे यांच्या घराचे सोडाने पाडुन पुणता उद्धवस्त करुण तांदुळ मोटारसायकल अन्नधान्याची नासधूस करून नागरीकांना अन्न वस्त्र निवारे पासून बेघर केले परंतु नागरीक घरातुन कशिबसी सुटका केल्यामुळे लहान मुलांसह नागरीकांची जिवीतहानी टळली तसेच शेतातील मका तुर बरबटी धानाच्या रोपटेची नासधूस केल्याने वारंवार नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने आज महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष शेषराव कुमरे यांना माहिती मिळताच पाथरगोटा गावातील नागरीकांच्या घराच्या नुकसानीची पाहणी करुन आरमोरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता क्षेत्र सहाय्यक किनेकर वनरक्षक अतकरे शिऊरकर यांनी पचमाने करुन या परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाच्या वतीने गस्ती हुला पाटी सज्ज आहे.

 

पंचनामे करते वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम क्षेत्र सहाय्यक किनेकर महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा संस्था पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम वनरक्षक उपाध्यक्ष शेषराव कुमरे ग्रामपंचायत सदस्य शंकर लठ्ठे अतकरे वनरक्षक शिऊरकर एफडिसिएम क्षेत्र सहाय्यक अनिता लट्टाये वनरक्षक पंढरी तेलंग वनरक्षक गजानन ठगे सुधाकर राठोड यासह वनविभाचे कर्मचारी उपस्थित होते

यात महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा राज्य पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम व पदाधिकाऱ्यांनी राज्यांचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या कडे जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्याची मागणी निवेदनातून केली आहे,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 25, 2023

PostImage

१३ वर्षांनंतर जुने मित्र आले एका छताखाली,भगवंतराव शिक्षण महािद्यालय विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न


,भगवंतराव शिक्षण महािद्यालय विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 

१३ वर्षांनंतर जुने मित्र आले एका छताखाली

 

    भगवंतराव शिक्षण महाविदयालय अहेरी सत्र २०१० मध्ये बी.एड पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या वर्ग मित्रांचा १३ वर्षांनंतर स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला.

      सध्या धकाधकीच्या जीवनात आयुष्याचं अनेक स्वप्नपूर्ती करण्यास प्रत्येक व्यक्तीला मोठ्या तारेवरची कसरत करावी लागते. त्यातीलच एक भाग म्हणजे बी एड पदविका अभ्यासक्रम घेणारे शिक्षक विविध शालेय संस्था मध्ये अनेक वर्ष राबराब राबून कुठ जीवनात यशस्वी झालेले शिक्षक भावी पिढीना ज्ञानदान देत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी सदैव तत्पर असणारा वर्ग म्हणजे शिक्षक, अश्या परिस्थितीत स्वतःला विसरून आदर्श समाज घडविण्यासाठी धावपळ करत असताना स्वतः कडे दुर्लक्ष करीत जीवनाची वाटचाल करत जगणारा परंतु भावी पिढीला यश संपादन करण्याचे धडे देणारा समाजसेवक, ज्यांची थोडक्यात महत्ती देता येत नाही असा वर्ग, अवघ्या १३ वर्षा अगोदर भगवंतराव शिक्षणं महाविद्यालय अहेरी येथे एकवटलेला परंतु शिक्षण पूर्ण करीत अनेक मार्गांवर विखुरलेला मित्र वर्ग पुन्हा एकदा एकत्र येत आपल्या सुख:दुःखाची देवाण-घेवाण करण्यासाठी १३ वर्षांनी एकत्र आला.

   

      या स्नेहमिलन सोहळ्यात प्रत्येकानी एकमेकांचे स्वागत करीत सुरवात केली. अनुषंगाने कॉलेज जीवनातील विविध प्रसंग आठवून रममाण झाले, संगीत, डान्सिंग विविध चॅलेंजिंग गेम खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाण घेवाण केली. आयोजकांनी surprise भेटवस्तू बहाल केली.

  सदर स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन मा. विजया देरकर (लोन गाडगे) यांनी अथक परिश्रम घेवून केल्याबदल तिचे सर्वांनी कौतुक केले व आभार मानले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 25, 2023

PostImage

आविसंचे माजी जिप.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारसह हजारो कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये प्रवेश


आविसंचे माजी जिप.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारसह हजारो कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये प्रवेश 

आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे प्रमुख तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा,भामरागड,एटापल्ली"या"पाच तालुक्यातील आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पाच तालुक्याचे आविसं अध्यक्ष, सरपंच, नगर पंचायत अध्यक्ष आणि माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील हजारो आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने 24 डिसेंबर रोजी आलापल्ली येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले असून अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह आविसं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजपाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता तथा ब्रम्हपुरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत सर्वांनी आलापल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

आदिवासी विध्यार्थी संघटनेचे अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नेते-कार्यकर्त्यांचं पक्षांतर झाल्यामुळे या विषयी एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणावरून आविसं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढल्याची चिन्ह आहेत.
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कंधेसमर्थक व कट्टर म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व सिरोंचा आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसं चे कट्टर समर्थक समजले जाणारे आणि त्यांचे कुटुंबीय आदिवासी विध्यार्थी संघटना पक्षामधून राजकारण करत होते.
अखेर,आदिवासी विध्यार्थी संघटनेचे माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील आविसं चे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक सरपंच व उपसरपंचसह आविसंला सोडचिठ्ठी दिली. 24 डिसेंबर रोजी भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची घोषणा त्यांनी केली.त्यानुसार 24 डिसेंबरला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश पार पडला.

आपल्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत माहिती देताना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले, “अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही काम करत असून अजूनही काम करायचे आहे.महाविकास सरकार असताना त्यासाठी निधी व योजनांना मंजूरी दिली आहे.आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेता विजयभाऊ वड्डेटीवार यांनी आपल्याला मदत केल्याची आठवण अजयभाऊ कंकडालवार यांनी केली.

आविसंचे अजयभाऊ कंकडालवार व पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वाटेवर उघडपणे होते:

विशेष म्हणजे अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व त्यांचे पत्नी माजी पंचायत समिती उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार आणि इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार आहेत.

“मी आणि माझा सर्व परिवार हा पिढीजात आविसंचे आहेत आणि होतो. पूर्वी आविसंचे पुढारी हे छोट्या मोठ्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असत आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील काम करीत असत पण मध्यंतरी काळातील पुढारी मात्र पक्ष वाढीसाठी नव्हे तर पक्ष संपवण्यासाठी काम करताय.आम्ही अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकासासाठी अनेकदा आविसंच्या माजी आमदाराना अनेकदा जाऊन भेटलो पण काही उपयोग झाला नसून अहेरी विधानसभा क्षेत्राकडे त्यांचे लक्ष नसल्याचे,” आरोप माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालावर यांनी केलेत.

याविषयी बोलताना आदिवासी विध्यार्थी संघटनेचे एटापली तालुका अध्यक्ष मट्टमी म्हणाले, “आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत होतो आणि आजही लढू अजयभाऊ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तम निर्णय घेतले असून विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या माध्यमाने आपल्या समस्या सोडवू आणि आपण जोमाने काम करणार.

आगामी निवडणुकीत माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना बसणार धक्का:
माजी आमदार दीपकदादा आत्राम यांचे कंधे समर्थक असलेले माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व सिरोंचा तालुका अविसं अध्यक्ष बानय्या जनगाम आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अहेरी विधासभेत काँग्रेसचे फारडे जड झाले असून अहेरी विधासभेत माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना येणाऱ्या 2024 वर्षात येणाऱ्या निवडणुकीत धक्का बसणार असून काँग्रेसला नक्कीच फायदा होणार अशी चर्चा सुरु आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 25, 2023

PostImage

लोक बिरादरी प्रकल्प,हेमलकसा च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती


लोक बिरादरी प्रकल्प,हेमलकसा च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती

 

जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांची शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले अभिनंदन

 

भामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथे 23 डिसेंबर 1973 रोजी जगप्रसिद्ध समाजसेवक मा. बाबा आमटे यांनी माडिया व गोंड समाज यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु केले. ते कार्य अविरत पणे पुढे जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांनी सेवा करत त्या सेवे चे 23 डिसेंबर 2023 रोजी 50 वर्ष पूर्ण केले त्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन च्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांची शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या निरोगी आरोग्य तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले

  या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला डॉ विकास आमटे,डॉ दिगंत आमटे,प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांच्या सह अनेक डॉक्टर, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 25, 2023

PostImage

एटापल्ली : शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी…


एटापल्ली : शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी…

 

एटापल्ली: भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.

एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे वनिता कोरामी सरपंच, प्रशांत आत्राम उपसरपंच, डॉ.नागोसे,रैजू गावडे ग्रामपंचायत सदस्य,सुनिता पुंगाटी, विनोद नरोटे, गणेश दुर्वा,बासू गावडे,नंदू नरोटे, श्रीमती डॉ,लाड, उसेंडी,गिरासे, गेडाम,वाचामी यांच्या उपस्थितीत २४ डिसेंबर 2023 रोजी या विकसित संकल्प यात्रेचा शुभारंभ एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे करण्यात आला.

केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या 17 योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.

 आदिवासी भागासाठी सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन कार्यक्रम, आदींबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. तर शहरी भागात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, मुद्रा कर्ज, स्वच्छ भारत अभियान (शहरी), पीएम आवास योजना, पीएम ईबस सेवा, खेलो इंडिया, सौभाग्य योजना, वंदे भारत रेल्वे, उडान आदी विविध योजनांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

 

माहिती प्रसाराद्वारे शासकीय योजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीदेखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे. 

 शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेती व मृदा आरोग्य पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या महिला आणि खेळाडूंचा सत्कार हेदेखील या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि किसान क्रेडीट कार्ड नोंदणी करण्यात येत आहे.

या यात्रेदरम्यान प्रत्येक ठिकाणी महसूल, जिल्हा परिषद तसेच महापालिका, नगरपालिका प्रशासनासह इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करीत असून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. या यात्रेला भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश तिम्मा, रमेश तिम्मा, नामदेव दुर्गे, कुंदन दुर्गे, निलेश चांदेकर,देवाजी गावडे,शांताताई वेडदा,गोलू वेडदा यांनी सहकार्य केले


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 24, 2023

PostImage

गोंडवाना विद्यापीठातिल विद्यार्थी अंकित दिलीप चलाख याचे सुयश आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड


 

 

गड़चिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात द्वितीय वर्षात शिकणारा अंकित दिलीप चलाख यांचा यांची नेपाल येथे 29 डिसेंबर ते 2 जनवरी दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून हा संघ दी.27 डिसेंबर रोजी नागपूर वरून नेपाल साठी रवाना होत आहे.

 

क्रिकेट सारखा खेळात अनेक खेळाडू सहभाग घेत असतात पण यामध्ये मला यश प्राप्त करने माझे मोठ भाऊ व माझ्या पाठीशी नेहमी खंभीरपणे ऊभा राहणारा मार्गदर्शक मा.सचिन भाऊ विनायकजी रोहणकर यांचा मार्गदर्शन व वारंवार मदती मुळे शक्य झाले

 मला माझ्या आई वडिलानी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमी साथ दिली मला या प्रवसात कोणत्या वस्तु ची कमी भासु दिली नाही माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिल सौ. वर्षाताई दिलीपजी चलाख यांना देतो

 केवळ रामजी महाविद्यालयात क्रीडा प्रशिक्षक माझे प्रा डॉ महेश जोशी सर यांच्या प्रशिक्षणात आज पर्यंत विविध विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारामध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे.*

हिमाचल प्रदेश येथे सम्पन्न झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात स्थान प्राप्त केले

 या विद्यार्थ्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागामुळे क्रिकेट खेळ गडचिरोली सारख्या ग्रामीण भागात प्रचलित होण्यास मदत मिळेल असा विश्वास संजय सर मानकर यानी यांनी व्यक्त केला.

 

 या विद्यार्थ्याच्या निवडीबद्दल.राजकुमार कैटवास सचिव (VTBCA) मा.विक्की पेटकर सर सहसचिव (VTBCA)(मा.अनिल जी तिळके अध्यक्ष (GTBCA) आणि मा.संजय सर मानकर सचिव (GTBCA) व चलाख, रोहणकर व KHM परिवार व सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 23, 2023

PostImage

जिवंत विजेच्या तारांचा शॉक लागून 33 वर्षीय युवकाचा मृत्यू


जिवंत विजेच्या तारांचा शॉक लागून 33 वर्षीय युवकाचा मृत्यू 

 

मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील घटना,घराचे बांधकामासाठी लोखंडी सलाख उचलत असतांना जिवंत विजेचा शॉक लागून एका बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दिनांक 23 डिसेंबर 2023 रोज शनिवारला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली.मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव प्रफुल विठ्ठल तिवाडे,33, रा. मांगरूळ असे आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव शहरातील वार्ड क्र.6 मध्ये एका घराचे काम सुरु होते. प्रफुल हा नेहमी प्रमाणे मारेगाव येथे मिस्त्री काम करण्यासाठी आला असून. सायंकाळी 5-30 दरम्यान काम करत असताना अचानक त्याचे हातातील लोखंडी रॉडचा जिवंत 11 केव्ही विद्युत ताराला स्पर्श होऊन प्रफुलला जोरदार शॉक लागला.शॉक लागुन तो खाली कोसळला. ही घटना जवळच्या नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली व त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले पण येथील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रफुल हा रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रफुलच्या पश्चात आई, वडील,पत्नी, एक भाऊ,एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरीवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 23, 2023

PostImage

चारचाकी वाहनाने धान भरलेल्या उभ्या ट्रकला दिली धडक, दोघेजण किरकोळ जखमी


चारचाकी वाहनाने धान भरलेल्या उभ्या ट्रकला दिली धडक, दोघेजण किरकोळ जखमी 

 

धानोरा : तालुक्यातील रांगी बायपास रोडवर भ्रमनध्वनि मनोऱ्या समोर धान भरून उभ्या असलेल्या ट्रक ला चारचाकी वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले तर गाडी छतिग्रस्त झाल्याची घटना आज दिनांक 22/12/2023ला दुपारी 12.00 वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की,मोहलि येथुन धान भरलेले मिनी ट्रक क्रमांक MH40Y3201 रांगी वरुण आरमोरीला जात होते.जात असताना रांगी बायपास रोडवरील भ्रमणध्वनी मनोरा समोर तिनं धान्य भरलेले ट्रक उभे होते.त्यापैकी समोर असलेले ट्रक क्रमांक MH40Y3201ला समोरुन येणारे चारचाकी वाहन( बलेनो) पांढरा रंगाची गाडी क्रमांक. MH33V1946 ने धडक दिल्याने चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र किरकोळ जखमी झालेल्या व्यक्ती मधे सौ.अंजली स्पार्टा शेन्डे अंदाजे वय ३५वर्ष (ब्रम्हपुरी)आणि ड्रायव्हर सुरेद्र नैताम वय ३०वर्ष (ठाणेगाव) आहे.त्यांना रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करन्यात आले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 23, 2023

PostImage

स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात निर्घृण हत्या केलेल्या आरोपीस केले जेरबंद


स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात निर्घृण हत्या केलेल्या आरोपीस केले जेरबंद 

 

 (Gadchiroli) : २१ डिसेंबर २०२३ ला पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

 

 

सदर घटनास्थळ हे पोर्ला गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील असल्याने व घटनास्थळावरील परिस्थीतीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीस दलासमोर होते. प्रकरणाची तिव्रता लक्षात घेवून तात्काळ अपर पोलीस अधिक्षक, कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली. श्वान पथक तसेच अंगुलीमुद्रा विभागातील अधिकारी यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकिस आणण्याची विशेष जबाबदारी सोपविली.

 

सदर परिसरातील त्याचप्रमाणे संपूर्ण गडचिरोली य गडचिरोली लगत जिल्ह्यातील त्यांचे बातमीदारांना कार्यान्वीत करून माहिती घेत असतांना गडचिरोली शहरातील एका गोपनिय बातमीदाराने माहिती दिली की, एक मुलगी वय अंदाजे (१९) वर्ष, रा. चंद्रपूर २० डिसेंबर २०२३ रोजी पासून चंद्रपूर येथून बेपता आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पोलीस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथून माहिती घेतली असता सदर मुली संदर्भात मिसींग क्रमांक १७८/२०२३ अन्वये नोंद आहे. त्यावरून तात्काळ मुलीचे नातेवाईकांना विश्वासात घेवून मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृतक मुलगी ही त्यांचीच मुलगी असल्याची नातेवाईकांकडून खात्री पटली.

 

संबंधीत मिसींग कोठे व कशी झाली तसेच ती शेवटी कोनासोबत होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने माहिती घेतली असता सदर मुलीचे निखिल मोहले, रा. वैरागड याचेशी प्रेमसबंध असून तिला भेटण्याकरीता निखील मोहुर्ले मूल येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

 

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वैरागड येथून निखील मोहुले यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने प्रकरणाबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी निखील मोहले यांस पुढिल तपासकामी गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात दिले.

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार वाघ, श्रिकांत बोईना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दिपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधबळे, सतिष कतीवार, मनोहर तोगरवार तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, मपोउपनि विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर व इतर अंमलदार यांनी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 22, 2023

PostImage

मंजूर असलेले एटापल्ली ते चोखेवाडा रोड त्वरित पूर्ण करा, व्यापारी संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


 

एटापल्ली : तालुक्यातील एटापल्ली ते चोखेवाडा रोड मागील ५ ते ६ वर्षापासून मंजूर असून आजपर्यंत सदर बांधकाम पूर्ण झालेले नाही काम अपूर्ण आहे. एटापल्ली येथिल मुख्य मार्गावर प्रतिदिवस शेकडो गाड्या चालतात त्यामुळे मुख्य मार्गावर अनेक खड्डे पडलेले असून गाड्यांच्या वाहतुकीमुळे सदर रोडवरील धूळीमुळे नागरिकांना अनेक प्रकारचे रोग होत आहेत.

 

तसेच मुख्य मार्गावर प्रतिदिवस शेकडो गाड्या चालत असल्याने वारंवार अपघात सुद्धा होत आहेत. या बाबत व्यापारी संघटनेकडून दिनांक ३०/११/२०२३ रोजी बाजारपेठ बंद करून शासनाला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून यावर कोणतीही दखल घेण्यात आलेलेली नाही.

 

करिता सदर मंजूर असलेले एटापल्ली ते चोखेवाडा रोड ७ दिवसात सुरु करण्यात यावे. अन्यथा व्यापारी संघटनेकडून व एटापल्लीतील नागरिकांकडून तीव्र आंदोलन व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय एटापल्ली ला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला निवेदन देताना एटापल्ली तालुक्याचे व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश फुल्लुरवर सचिव संदीप सेलवटकर सदस्य दिलीप उपरेड्डीवार महेश कंकणालवार शरीफ शेख यावेळी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 22, 2023

PostImage

गाव सोडून गेलेले बौद्ध बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर


 

 नवरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा फलक पुनस्र्स्थापित करून फलक हटविणाऱ्यावर कारवाई करा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन 

 

 

चामोर्शी : तालुक्यातील नवरगाव येथील बौद्ध समाजाच्या लोकांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये ग्रामसभेच्या ठरावानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा फलक बौद्ध वस्तीत लावला होता परंतु ग्रामपंचायत नवरगाव ने दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रचंड पोलीस बंदोबस्तात सदर फलक काढून टाकला. हा फलक काढल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा घोर अपमान झालेला असून समस्त आंबेडकरी अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही घटना संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी व बौद्ध समाजाच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे.या घटनेबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा नाम फलक जुन्याच जागी पुनर्स्थापित करण्यात यावा. हा फलक हटविणाऱ्या ग्रामपंचायत नवरगाव येथील संपूर्ण पदाधिकारी, सदस्यावर कारवाई करण्यात यावी,हा फलक हटविणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात यावे,ही अमानवीय घटना घडल्यानंतर नवरगाव येथील बौद्ध समाजाच्या ५६ कुटुंबातील सुमारे २३२ लोकांनी दि २१ डिसेंबर ला आपल्या मुलाबाळांना घेऊन गाव सोडले व ते काल सायंकाळी शिवणी नाल्याच्या जवळ मुक्कामी थांबले ही माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांना कळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या जवळ जावून आस्थेने चौकशी केली व त्यांच्या समवेत थांबले आज सकाळची त्याच्या जेवनाची व्यवस्था डॉ सहारे यांनी केली आहे त्यानंतर ते गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आले असल्याने त्यांची मालमत्ता (घरे, गुरे ढोरे, पिके इत्यादी असुरक्षित झाली आहेत. तरी बौद्ध समाजांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात यावे. या प्रकरणात नामफलक हटविणाऱ्या वर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात यावी. भविष्यात बौद्ध समाजावर अशा प्रकारचे अत्याचार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच भविष्यात बौद्ध समाज नवरगाव यांचेवर कोणत्याही प्रकारचा छळ अथवा इजा पोहोचणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन दिनांक २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले असून या गाव सोडून आलेल्या बौद्ध बांधवांना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष गडचिरोली केंद्रीय उपाध्यक्ष रोहीदास राऊत ,बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी राज बन्सोड, गडचिरोली,शेतकरी कामगार पक्ष रामदास जराते गडचिरोली, मुव्हमेंट फॉर जस्टीस प्रतिक डांगे ,गौतम डांगे गडचिरोली, तुलाराम राऊत भारतीय बौद्ध महासभा गडचिरोली,गौतम मेश्राम संविधान फौंडेशन गडचिरोली, हंसराज उंदिरवाडे सम्यक समाज मंडळ गोकुळनगर सुखदेव वासनिक पंचशील बोद्ध समाज मंडळ, रामनगर, गडचिरोली, संपत गोडबोले सम्यक जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था गडचिरोली, अमरकुमार खंडारे प्रबुद्ध बौद्ध मंडळ, विवेकानंदनगर, गडचिरोली, संविधान उत्सव समिती, गडचिरोली, अलोणे प्रबुद्ध विचार मंच, गडचिरोली, विनोद मडावी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद गडचिरोली, बाळकृष्ण सावसाकडे आम आद‌मी पार्टी, गडचिरोली विलास निंबोरकर महा अच्छा मिलन समिती, डॉ. महेश कोपुलवार भारतीय कॉमुनीष्ठ पार्टी,हरिदास कोटरंगे माळी समाज संघटना , कविता माहोरकर महीला जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय कोचे, सुरेंद्र रायपुरे भीम आर्मी, केशव आलाम पारंपारिक आदिवासी परिषद, अमोल मारकवार भारतीय कॉमुनीष्ठ पार्टी ( मार्क्स), चक्रधर मेश्राम सैनिक समाज पार्टी,पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य,ओबीसी आघाडी, शोभा खोब्रागडे,यांच्या सह एकुण एकोनतीस संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे व निवेदनात त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 22, 2023

PostImage

खूप दिवसापासून च्या प्रलंबित मागणीला सालेकसा या रेल्वे स्टेशनवर स्टॉपेजेस (थांबा ) मंजूर. खासदार अशोक नेते यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश.._


 

15231/32 गोंदिया बारोंनी एक्सप्रेस सालेकसा रेल्वे स्टेशन थांबा मंजूर...

 

लवकरच हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ होईल.

 

दिं. २२ डिसेंबर २०२३

 

सालेकसा:- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील अती दुर्गम, मागास म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. या सालेकसा तालुक्यात अनेक दिवसापासून ची विद्यार्थ्यांची, नागरिक जनतेची, शेतकऱ्यांची दुपारच्या नंतर रेल्वे स्टेशनवर स्टापेजेस थांब्याची प्रलंबित मागणी होती. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देण्यात येत होते.यासाठी प्रयत्न सुद्धा केल्या जात होता. या केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येऊन सालेकसा रेल्वे स्टेशनला 15231/32 गोंदिया बारोंनी एक्सप्रेस सालेकसा रेल्वे स्टेशन थांबा मंजूर.दुपारनंतर स्टापेजेस थांबा देण्याची मागणी मान्य केली असून लवकरच हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ होईल अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. या स्टापेजेस थांब्यामुळे निश्चितच या क्षेत्रात विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, जनतेला,प्रवाशांना याचा फायदा होईल.

असे वक्तव्य व आनंद खासदार अशोक नेते यांनी करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व हार्दिक अभिनंदन केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 22, 2023

PostImage

18 कोटींच्या निधीतून होणार पुलाची उभारणी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न


18 कोटींच्या निधीतून होणार पुलाची उभारणी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

 

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

 

मुलचेरा:-तालुक्यातील देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी शासनाने १८ रुपयांची निधी मंजूर केले असून गुरुवार (२१ डिसेंबर ) रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते ऋतुराज हलगेकर,देवदाचे सरपंच केसरी पाटील,तहसीलदार चेतन पाटील,बिडीओ एल बी जुवारे, सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता श्रीमती नीता ठाकरे,नितीन वायलालवार, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,मुलचेरा नगरपंचायत चे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, भाजपच्या बंगाली सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,रेगडीचे सरपंच, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ गडचिरोलीचे इतरही अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मुलचेरा आणि चामोर्शी या दोन तालुक्यांना विभागणाऱ्या दीना नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना जीव धोक्यात टाकून जल प्रवास करावा लागत होता.या नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून मागील अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती. बरेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या नाल्यावर पुलाचे बांधकाम होऊ शकले नाही.मात्र, महायुती सरकार मधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार डॉ देवराव होळी यांनी या भागातील नागरिकांची अडचण लक्षात आणून देत पूल बांधकामासाठी निधी मंजूर करावे ही मागणी रेठून धरली.

 

अखेर देवदा येथील दिना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी शासनाने तब्बल १८ कोटी रुपयांची निधी मंजूर केली. त्वरित या नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून टेंडर काढले.मेसर्स,प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी,गडचिरोली यांना टेंडर मिळाले असून गुरुवारी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत विलंब न लावता दिलेल्या कालावधीत सुसज्ज असे पुलाचे बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले.

 

तीन तालुक्यातील नागरिकांना दिलासा

जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना हा अत्यंत शॉर्टकट रस्ता आहे.एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिक बारमाही याच रस्त्याचा वापर करतात.एटापल्ली वासीयांना जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी जवळपास ७० किलोमीटर अंतर कमी पडते.एवढेच नव्हे तर गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातून ये जा करणारे कर्मचारी आणि इतर कामासाठी येणारे नागरिक सुद्धा याच मार्गाचा वापर करतात.पावसाळ्यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता या नदीवर पुलाचे बांधकाम होत असल्याने मुलचेरा, एटापल्ली आणि चामोर्शी या तीन तालुक्यातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 22, 2023

PostImage

संसदेतील खासदार निलंबनाचा निषेध,गडचिरोलीत इंडिया आघाडीचे तीव्र निदर्शने


 

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीने खासदार निलंबनाची अतिरेकी कारवाई केली असून या देशात अघोषित आणिबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. देशातील लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेत असल्याच्या निषेधार्थ गडचिरोलीतील गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.

 

भाजपच्या या दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीने गडचिरोली येथील गांधी चौकात केलेल्या जाहीर निदर्शनास इंडिया आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ( उबाठा ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद सहभागी झाले होते.

 

निलंबित करण्यात आलेल्या १४१ खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकसभेतून एकूण ९५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे, तर ४६ सदस्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. हा आरोप बिनबुडाचा आहे.त्यामुळे निलंबित सर्व खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येवून देशात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्ट हेतू उधळून लावून भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे संरक्षण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

याप्रसंगी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ.महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जयश्रीताई वेळदा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार, आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी यांनी यावेळी आपल्या भाषणादरम्यान भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

 

यावेळी हेमंत डोर्लीकर, हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, गौतम मेश्राम, केशवराव सामृतवार, सुरेखाताई बारसागडे, प्रतिक डांगे, शेकाप खजिनदार भाई शामसुंदर उराडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, आकाश आत्राम, भाकपचे संजय वाकडे, आपचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष कोटकर, हेमराज हस्ते, भूपेश सावसाकडे, संजय जिवतोडे, शाम धोपटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष प्रेमीला रामटेके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 22, 2023

PostImage

महिला सशक्तीकरण हा शासनाचा अभिनव उपक्रम:भाग्यश्रीताई आत्राम,योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी


 

बामणी येथे महिला सशक्तीकरण अभियान संपन्न

 

योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी

 

सिरोंचा:- पुरुषांसोबत महिलाही सक्षम व्हावे,त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे.महिलांना याचा मोठा फायदा होत असून केंद्र व राज्य सरकारचा महिला सशक्तीकरण हा अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केले.

 

सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम बामणी येथे (गुरुवार) २१ डिसेंबर रोजी महिला सशक्तीकरण अभियान घेण्यात आले,यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पटले,तालुका कृषी अधिकारी बोबडे,वैद्यकीय अधिकारी मडावी,उप अभियंता नरवडे,ठाणेदार दांडे,माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार,सत्यम पिडगू,समय्या कुळमेथे,मदनय्या मादेशी, रामकृष्ण नीलम,वेंकटापूर चे सरपंच अजय आत्राम,जाफराबाद चे सरपंच निर्मला कुळमेथे,गर्कापेठाचे सरपंच सूरज गावडे,जाफराबाद चे उपसरपंच स्वामी गोदारी आदी उपस्थित होते.

 

पुढे बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी दुर्गम भागातील महिलांना तालुका मुख्यालय जाऊन योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही,त्यामुळे शासन आपल्या दारावर आल्याने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे.त्यामुळे असे अभियानात महिलांनी पुढे येऊन पुरेपूर लाभ घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना जितेंद्र शिकतोडे यांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.ज्या महिलांकडे योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची अडचण भासत असेल तर त्यांनी थेट संपर्क करावा असे आवाहन केले.

 

बामणी येथील अभियानात विविध विभागाकडून स्टॉल लावण्यात आले होते.अभियानात बोरमपल्ली,कंबालपेठा, सिरकोंडा, जर्जपेठा, रोमपल्ली,वेनलाया, कोटापल्ली,झेंडा,दरशेवाडा, बोगटागुडम,बॉंड्रॉ, रेगुंठा,विठ्ठलरावपेठा, नरसिंहपल्ली,पर्सेवाडा,गर्कापेठा,बामणी आदी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 22, 2023

PostImage

धक्कादायक: डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे नामफलक काढल्याने नवरगांव वासीय बौद्ध बांधवांनी सोडले गाव


धक्कादायक: डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे नामफलक काढल्याने नवरगांव वासीय बौद्ध बांधवांनी सोडले गाव 

 

 

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील धक्कादायक घटना 

 

 गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुनघाडा ) येथील बौध्द बांधवांनी गेल्या दोन वर्षापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक आंबेडकर वार्डातील चौकात नव्हे त्याच्या बाजुला गावठाण जमीनीवर , दुर्गे यांच्या घरासमोर लावला होता. तशा प्रकारचे ग्रामसभेचा ठरावही झालेला असुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी S D P O गडचिरोली यांना वारंवार तक्रार करून सदर नामफलक २० डिसेंबर रोजी पोलीसांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीनी नामफलक काढले त्यामुळे दि. २१ डिसेंबरला नवरगाव गावातील संपूर्ण बौध्द बांधवानी आपल्या मुला बाळा सहीत नाव सोडून बैलबंडी ने जात आहेत. कुठे जात आहेत हे अजुनही समजू शकते नाही. परंतु जातीयवाघ्याच्या जाचाला कंटाळून संविधान कर्त्याच्या नावाला विरोध करण्याऱ्या लोकांचा निषेध करून बौध्द बांधव गाव सोडून जात आहेत. सदर घटना हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 21, 2023

PostImage

आष्टी येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते उद्घाटन संपन्न


आष्टी येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

 

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आष्टीत आगमन होताच मोठ्या थाटात करण्यात आले स्वागत 

 

चामोर्शी: तालुक्यातील आष्टी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कबड्डी मंडळ आष्टी यांच्या वतीने कबड्डीप्रेमिंसाठी भगतसिंग वार्डातील भव्य पटांगणात ग्रामीण रात्रकालीन खुल्ले कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.

 

या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आज दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडला. कार्यक्रमाचे सह उद्धघाटक म्हणून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस प्रणय बुर्ले उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा पुष्पा बुर्ले, सामाजिक कार्यकर्ते संतोष सोयाम, जिल्हा संघटन सचिव डॉ हेमंत भाकरे,सागर जांपलवार, पुरुषोत्तम खेडेकर,बंडू मेश्राम व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असलेला हा खेळ, या खेळाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. ही परंपरा कायमस्वरूपी पुढे चालू ठेवावी. आष्टी मधे कबड्डी स्पर्धा भरवल्याने मनापासून आनंद झाला आहे. तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनवणे हा अश्या स्पर्धांचा मुख्य उद्देश असला पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.हि स्पर्धा दिनांक २१डिसेंबर ते २३ डिसेंबर पर्यंत होणार आहे. या रात्रकालीन कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास बक्षीस दिली जाणार आहे यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आष्टीत आगमन होताच आष्टी परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारीऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 21, 2023

PostImage

आरडा गावाजवळ महामार्गावर अपघात ; जखमींच्या मदातींसाठी मूलकला फाउंडेशनकडून धाव ...!


आरडा गावाजवळ महामार्गावर अपघात ; जखमींच्या मदातींसाठी मूलकला फाउंडेशनकडून धाव ...!

 

 

 सिरोंचा:- सिरोंचा तालुका मुख्यालयपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा - आसरअल्ली महामार्गावर आरडा टर्निंग येथे दुचाकीच्या अपघातेची घटना घडली आहे,

या घटनेत तेलंगाणा राज्यातील गोदावरीखाणी येथील इसम देखील गंभीर जखमी झाला आहे,

या घटनेची माहिती येथील प्रवासाकडून सिरोंचा तालुक्यातील नेहमी मदतीसाठी धावून येणारा मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष - सागर भाऊ मूलकला यांना मिळतच घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या इसमाना तात्काळ सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,

त्या जखमी इसमाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तेलंगाणा राज्यात हलविण्यात आले,जखमी झालेल्या इसमाचे अत्यंत गोर गरीब कुटुंब असून सिरोंचा येथून उपचारासाठी तेलंगाणा राज्यातील मांचिरल येथे नेण्यास सामाजिक कार्यकर्ते - सागर मूलकला, विनोद नायडू यांनी कुटुंबियांपर्यत पोचविण्यास सहकार्य केली आहे,त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष - सागर मूलकला, सदस्य - विनोद नायडू, सलमान शेख, राजकुमार मूलकला, कल्याण मूलकला, यांची उपस्थिती होते,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 21, 2023

PostImage

शासकीय मुलींच्या वस्तीगृहात विषबाधा,डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट.


शासकीय मुलींच्या वस्तीगृहात विषबाधा,डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट.

 

 

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींवर विषबाधा झाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा व सोडे येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहास भेट देऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली व विषबाधा झालेल्या मुलींच्या प्रकृती संदर्भात चौकशी करून विचारणा केली.

वसतिगृहात अनेक बाबींची कमतरता आहे. शुद्ध पाण्याचे आर. ओ. खराब झाले असून वसतिगृह अधीक्षकांनी मागणी केल्यावर सुद्धा दुरुस्ती किंवा नवीन आर. ओ. चा पुरवठा करण्यात आलेला नाही. पूर्णवेळ प्रशिक्षित परिचारिकाची नियुक्ती नाही. वसतिगृहात क्षमतेपेक्षा जास्त विध्यार्थी आहेत. प्रशासनाने संबंधित प्रकरनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन असे प्रकार पुढे घडू नये यासाठी ठोस पावले उचलावी व तात्काळ वसतिगृहात नियमित सेवा देणारी निवासी परिचारिका व वेळोवेळी सेवा देणारे तज्ञ डॉक्टर, प्राथमिक उपचाराकरिता औषधी पुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याकरीता अत्याधुनिक RO लावावे व क्षमतेपेक्षा अधिक मुली असल्यामुळे नवीन इमारत सुद्धा लवकरात लवकर बनवण्यात यावी अशी मागणी डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.

 यावेळी सोबत माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, पत्रकार हेमंत डोरलीकर, सरपंच पुनमताई किरंगे, शेवंताबाई हलामी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 21, 2023

PostImage

लोक बिरादरी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल


 

भामरागड ता.२०- हेमलकसा येथील प्रसिद्ध समाजसेवाकेंद्र तथा जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांची कर्मभूमी ' लोक बिरादरी प्रकल्पाला ' २३ डिसेंबर २०२३ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे लोक बिरादरी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त २० ते २६ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.आज (ता.२०)ला भामरागड परिसरातील आदिवासी बांधवांच्या विविध स्पर्धा पार पडल्या.

          सर्वप्रथम ढोल -गजरांच्या तालावर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांसमोर द्विप प्रज्ज्वलित करुन वंदन करण्यात आले.यावेळी जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सीताराम मडावी, मुख्याध्यापक श्रीराम झोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तद्नंतर सांस्कृतिक खाद्य महोत्सव व मनोरंजन जत्रा पार पडली यांमध्ये बोत्ते जब्बा,येमिलजब्बा,लुमाजब्बा,तैमुलजब्बा,जेराजब्बा इत्यादी पारंपरिक आदिवासी पालेभाज्या व त्यांपासून बनविलेले विविध पदार्थ.गुंडेमाटी,कायामाटी,गोंदेमाटी, कोड्डेमाटी इत्यादी कंद व त्यांपासून बनविलेले विविध पदार्थ.इरपू,चिचू मिरया,आरकू,गोर्रा,कक्कु,कुहकु इत्यादी पारंपरिक आदिवासी वस्तूंपासून बनविलेले विविध पदार्थांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.यामध्ये सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता समुह राणीपोडूर-प्रथम,महिला बचतगट हिनभट्टी-द्वितीय, महिला बचतगट होडरी - तृतीय क्रमांक पटकावला.महिला बचत गट हलवेर,बेजूर,खंडीनैनवाडी,बोटनफुंडी,हेमलकसा येथील महिला गटांनी सहभाग घेतला होता.

       आदिवासी बांधवांसाठी गुलेल स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा,पावड्या स्पर्धा घेण्यात आली.त्यानंतर गीतगायन स्पर्धा झाली.रात्री ७.३० ते १०.३०पर्यंत पारंपरिक नृत्य स्पर्धा व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.तद्नंतर उलगुलान नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हॉस्पिटलची चमूंनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 21, 2023

PostImage

गोवंशाचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी - खासदार अशोक नेते


 

हळदा येथील गोविंद गोशाळा (गोनिवास) शेडचे लोकार्पण..

 

गडचिरोली / ब्रह्मपुरी : आधुनिक तंत्रज्ञानात गोवंशांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. गाईच्या दुधापासून तर गोमूत्र आणि शेणापर्यंत सर्वच गोष्टींचे मानवी जीवनात अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी ठरते, असे प्रतिपादन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे उभारण्यात आलेल्या गोविंद गोशाळा (गोनिवास )शेडच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

 

विदर्भ प्रांत संघचालक दीपकराव तामशेट्टीवर यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबई गो-आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या शुभहस्ते झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांची प्रमुख उपस्थिती.

 

दिनदयाल बहुउद्देशीय सेवा संस्थेद्वारा संचालित गोविंद गोशाळा, हळदा येथे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोनिवास शेडचे बांधकाम करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा दिनांक १९ डिसेंबरला झाला.

 

 

यावेळी जयंत खरवडे,ब्रम्हपुरी/ चंद्रपूर विभाग संघचालक रा. स्व. संघ, सुनिलजी मानसिंहका, सदस्य भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड भारत सरकार, सुनिलजी सूर्यवंशी, सदस्य महाराष्ट्र शासन गोसेवा आयोग, सनत गुप्ता, सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग, प्रशांत तितरे, विदर्भ प्रदेश मंत्री विश्च हिदू परिषद, नागपूर यांच्यासह डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, चंद्रपूर, उमेश हिरुडकर, जिल्हा पशुसंरक्षक अधिकारी चंद्रपूर, दौलत गरमळे, सरपंच ग्राम पंचायत हळदा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

 

यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, हिंदू धर्मात गाय ही केवळ एक प्राणी म्हणून नाही, तर तिचे महत्व आईसारखे आहे म्हणून तिला गोमाता म्हटले जाते.गोवंशाचे संवर्धन, संरक्षण,करणे हि सर्वांची जबाबदारी असुन काळाची गरज आहे. गाईचे दूध, शेण, गोमूत्र पवित्रच नाही तर त्यातील औषधी गुणधर्मामुळे मनुष्याचे जीवन आरोग्यदायी ठरते. परंतु अनेक शेतकऱ्यांना परिस्थिती मुळे आपल्या गाई कसायांना विकाव्या लागतात. कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या गाई कसायाला न देता गोशाळेमध्ये त्या द्याव्यात असे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 21, 2023

PostImage

शासकीय आश्रमशाळेतील १०५ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा; ७३ विद्यार्थींनीची प्रकृती गंभीर


 

 धानोरा तालुक्यातील (Dhanora, gadchirolli) सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील १०५ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थींनींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील १५ ते २० मुलींना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली तर ७३ विद्यार्थ्यांनींची प्रकृती गंभीर असल्यामुळे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आदिवासी विकास प्रकल्पांमधील आश्रमशाळेतील व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हि घटना २० डिसेंबर रोजी उघडकीस आली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोडे येथील मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बटाटा-कोबीची भाजी, वरण आणि भात असे जेवण देण्यात आले. हे जेवण जेवल्यानंतर काही वेळाने मुलींना उलट्या आणि हगवण सुरू झाली. तेव्हा तेथील शिक्षकांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सहा ते सात मुलींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच आणखी मुलींना मळमळ, उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. त्यांना सुद्धा रुग्णालयात दाखवणे सुरू झाले. सायंकाळपर्यंत १०५ मुलींना विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळजवळ १५ मुलींना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून ७५ विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

सध्या सर्व विद्यार्थीनींची तब्येत धोक्याबाहेर असली तरी मुली अतिशय घाबरलेल्या असल्यामुळे त्यांना गंभीर म्हणून (District hospital gadchirolli) जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दरम्यान गडचिरोलीचे सिव्हिल सर्जन डॉ. खंडाते आपल्या वैद्यकीय चमूसह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गडचिरोलीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल मीना हे स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून आढावा घेत आहेत.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

फसवणुक करणा-या तिन आरोपींना विविध कलमान्वये ७ वर्ष सश्रम कारावास व (बावीस लाख पन्नास हजार रुपये) द्रव्यदंडाची शिक्षा


फसवणुक करणा-या तिन आरोपींना विविध कलमान्वये ७ वर्ष सश्रम कारावास व (बावीस लाख पन्नास हजार रुपये) द्रव्यदंडाची शिक्षा

 

 गडचिरोली येथील मा. मुख्य न्यायदंडाधिकारी सा. यांचा न्यायनिर्णय दिनांक १९/१२/२०२३.

सवित्तर वृत्त असे आहे की, दिनांक १८/१०/२०१४ रोजी यातील फिर्यादी नामे वासुदेव गणुजी आलाम रा. रामनगर यांनी आरोपी नामे शचाना जावेद पठाण रा. रामनगर गडचिरोली व ईतर ०७ यांनी फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०, भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी मा. पोलीस निरीक्षक सा. गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली करुन आरोपीतांविरुध्द भरपूर व सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपत्र दाखल केले असता, आर. सी. सी. नं. १५/२०१४ नुसार मा. श्री. स. पू. सदाफळे, मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब गडचिरोली यांचे न्यायालयात खटला चालवून सहाय्यक अभियोक्ता यांचे युक्तीवाद ग्राह्य धरुन काल दिनांक १९/१२/२०२३ रोजी मा. श्री. स. पू. सदाफळे, मुख्य न्यायदंडाधिकारी सा. यांचे न्यायालयाने आरोपी नामे १) शबाना जावेद पठाण २) जावेद मेहमुदाँ पठाण ३) दयानंद गोपाळाजी निलेकर यांना कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भा.द.वी. अन्वये दोषी धरुन तिन्ही आरोपींना ०७ वर्ष सश्रम कारावास व २२,५०,०००/- (बावीस लाख पन्नास हजार रु.) दंडाची शिक्षा सुनावली. सदर तिन्ही आरोपीतांची चंद्रपुर कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. अमर फुलझेले तसेच कोर्ट पैरवी पोहवा/२२७७ दिनकर मेश्राम, कोर्ट मोहरर पोर्भ/३३९१ हेमराज बोधनकर यांनी आरोपीस शिक्षा होणेस कामकाज पाहीले व सहकार्य केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

दोड्डी येथील भव्य ग्रामीण कब्बडी व व्हॉलीबाल सामन्याचे प्रशांत आत्राम उपसरपंच यांच्या हस्ते उद्घाटन


 

जय पवनपुत्र क्रीडा मंडळ दोड्डी यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बडी व व्हॉलीबाल सामन्याचे आयोजन करण्यात आले.

दिनांक २० डिसेंबर २०२३ ते अंतिम सामन्यापर्यत सामने राहणार आहे.श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पुढाकाराने हे भव्य ग्रामीण कब्बडी व व्हॉलीबॉल सामने आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रा.प.तोडसा यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष वनिता कोरामी सरपंच ग्रा.प.तोडसा हे होते.मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यांनतर वनिता कोरामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती न.प.एटापल्ली,आर.एस. कोडापे ग्रामसेवक तोडसा,मोहन नामेवार,गजानन खापणे,राजु गाऊतुरे,उषन्ना मेडीवार,विनोद नरोटे सदस्य ग्रा.प.तोडसा,सम्मा जेट्टी,दुलसा पुंगाटी,महेंद्र सुल्वावार हे मंचावर उपस्थित होते.

व दोड्डी येथील गावकरी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सागर मूलकला यांनी केली जखमी झालेल्या वृद्ध महिलेला मदत ...!


सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकीसा गावाजवळील अंकीसा- आसरअल्ली महामार्गावर एका वृद्ध महिला महामार्गावर बेशुद्ध अवस्थेत पडून होती,ह्या महामार्गवर आज रोजी सिरोंचा येथून कामानिमित्त मूलकला फाउंडेशचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता - सागर भाऊ मूलकला यांनी आसरअल्ली गावाकडे जात असताना रस्त्यावर अंकीसा जवळ बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले,

त्वरित बेशुद्ध अवस्थेत पडून असलेल्या वृद्ध महिलेला पाहिले असता तोंडावरून रक्त निघून जखमी झाल्याचे दिसून आले,

या विषयांची जखमी झालेल्या वृद्ध महिलेची कुटुंबियांना माहिती देऊन सामाजिक कार्य केली आहे,त्यावेळी मूलकला फाउंडेशन अध्यक्ष - सागर भाऊ मूलकला यांच्यासह सदस्य - विनोद नायडू, राजकुमार मूलकला, उदय मूलकला, राजम मूलकला यांची उपस्थिती होती,सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे सामाजिक कार्यकर्ता सागर मूलकला आणि यांचे टीम सदस्यांना सिरोंचा तालुक्यातील जनतेकडून कौतुक केले जात आहे ,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

राज्यव्यापी संपा अंतर्गत अंगणवाडी महिलांचे सीटुच्या नेतृत्वात अहेरीत भव्य मोर्चा व सभा


राज्यव्यापी संपा अंतर्गत अंगणवाडी महिलांचे सीटुच्या नेतृत्वात अहेरीत भव्य मोर्चा व सभा

 

  किमान वेतन ,ग्रेज्युटि व पेन्शन मिळविन्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर पासून सीटु च्या नेतृत्वात राज्य व्यापी संप पुकारलेले आहे. या संपा अंतर्गत हजोरो अंगणवाडीना टाळे लावुन महिला आंदोलन करीत आहेत.

याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज दिनांक 20 डिसेंबर ला अहेरी,मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील सर्व प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी अहेरी तहसील कार्यालय पासुन रैली काढुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला व सरकारच्या विरोधात नारे देऊन निवेदन दिले

या मोर्चात अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दिला व संबोधन केले .उपविभागीय अधिकारी श्री. वाघमारे साहेबांनी स्वता मोर्चा स्थळी येऊन मागण्याचे निवेदन स्विकारले.

या मोर्चाचे नेतृत्व कॉ.रमेशचंद्र दहिवडे,कॉ.राजेश पिंजरकर कॉ.किशोर जामदार, कॉ.अमोल मारकवार, कॉ.अरुण भेलके यांनी केले.या मोर्चात मायाताई नवनुरवार,विठाबाई भट,छाया कागदेलवार,सुनंदा बावने, मोनी विश्वास, मुन्नी शेख,संगिता वडलाकोंडावार,वच्छला तलांडे ,जयश्री शेरेकर,सुमनताई तोकलवार,मंगला दुग्गा,निर्मला नलगुडावार,कल्पना कुमरे ईत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाले होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

२१ व्या शतकातील कौशल्ये विद्यार्थ्यांनमध्ये विकसित व्हावीत


२१ व्या शतकातील कौशल्ये विद्यार्थ्यांनमध्ये विकसित व्हावीत

 

कोरची:-

     भविष्यवेधी शालेय शिक्षण, शैक्षणिक व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष हे मूल्यमान चे शिक्षकांसाठी सुरु काम असलेल्या प्रशिक्षण साठी पारबताबाई विद्यालय कोरची येथिल सहायक शिक्षक सुरज हेमके ,प्रकाश चिलबुले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचीनारा ,व किशोर मेश्राम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगावघाट येथील उपक्रमशील, कृतिशील सहशिक्षक हे सुलभक देता म्हणून काम करीत आहे. या बद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले काय कि प्रत्येक मुलाला जागतिक स्वीकार्यता मिळावी. प्रत्येक मुल भविष्यासाठी तयार व्हावे शंभर टक्के मुलांच्या शंभर क्षमतांचा विकास व्हावा, यासाठी प्रामुख्याने मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना शिकण्यास आव्हान देणे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे. मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग., मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती तिप्पट करणे, या पायऱ्यावर आधारित हे प्रशिक्षण असेल. आपल्या शाळेतूनही जागतिक दर्जाचे भविष्य शिक्षण प्रत्येक शिक्षकाला देता व लर्निंग टू लर्न ( शिकायचे कसे शिकणे) या महत्वपूर्ण कौशल्यावर प्रत्येक शाळेतून झाले तर वरील आयाम पूर्ण होतील. या प्रशिक्षनात शिकलेल्या बाबीमुळे शिक्षकांना अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाही शिकवण्यास वेळ मिळत नाही ही शिक्षकांची खंत असते यावर काय करता येईल जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिकणे थांबणार नाही. ,तोंडाला फेस येई पर्यंत शिकवूनही मुलं शिकत नाहीत. खूप श्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अश्या एक न अनेक प्रश्नांची शिक्षकांना शंभर टक्के मिळते. या प्रशिक्षणानंतर शिक्षकांचे श्रम निमपट , परिणाम दुप्पट मिळतील व तिप्पट मिळेल याची शंभर टक्के व प्रत्येक्ष अनुभव हे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला येईल. असे सुलभकानी सदर प्रशिक्षणातून सांगितले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

नक्षलवाद्यांनी केली वाहनाची जाळपोळ, संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान


नक्षलवाद्यांनी केली वाहनाची जाळपोळ, संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान

गडचिरोली, दि. 20 :- जिल्हयातील अतिदुर्गम भागातील भामरागड तालुक्यातील रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना आज 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

 

मागील काही दिवसांपासून हिदुर-दोबुर-पोयरकोटी या रस्त्याचे बांधकाम सुरु होते. दरम्यान या रस्ता कामावरील वाहने नेहमीप्रमाणे हिदुर गावात ठेवली असता काल 19 डिसेंबर रोजी रात्रो नक्षली त्या ठिकाणी पोहचले व वाहनांची जाळपोळ केली. यात तीन ट्राक्टर आणि एक जेसीबीचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हयात नक्षल्यांचे तांडव सुरुच असुन भामरागड तालुक्यात रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याने संबंधित कत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रकेही टाकली असुन 22 डिसेंबर रोजी भारत बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत- मंत्री सुधीर मुनगंटीवार


वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत- मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि १९ : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळसा उत्खनन केल्यास किमान ५ रोपे लावावीत. तसेच खाणी जवळील गावांमधील वीज आणि पाण्याची बिले कंपनीने भरावीत, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

 

नागपूर येथे वेस्टर्न कोल फिल्डविषयी विधानभवनात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी वेस्टर्न कोल फील्डचे अधिकारी, जमीन अधिग्रहित होणाऱ्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

राज्य शासन आणि स्थानिक नागरिक कंपनीला सहकार्य करत असल्याचे सांगून वन मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले , ज्या गावांमधील जमीन कंपनी घेत आहे, तेथील जमीन अधिग्रहणाबाबत तहसीलदार यांचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कोळसा मंत्री, केंद्रीय कोळसा सचिव आणि कोल इंडिया यांना पाठवावा. या अहवालातून अधिग्रहणाविषयीचे गावांचे प्रश्न मार्गी लागतील


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. १९ : राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुयोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. या दृष्टीने उपग्रह तंत्रज्ञानाची मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत विविध प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितिन करीर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपत्तीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असून त्यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव सादर केले जावेत असे सांगितले.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मदतकार्यात वापरण्यात येणारी यंत्रसामग्री सुस्थितीत राहण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. यासह ही यंत्रणा राज्यातील आपत्तीग्रस्त भागात वेळेत पोहोचण्यासाठी नियोजन असावे.

 

या बैठकीत आपत्ती व्यवस्थानाशी संबंधित विविध यंत्रणा व विभागांद्वारे सादर केलेल्या नियोजन व खर्चांच्या मागण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये आपत्ती प्रसंगी मदतकार्यामध्ये सहभागी होणाऱ्या सैन्यदल तसेच केंद्र शासनाच्या एनडीआरएफसह राज्य शासनाच्या एसडीआरएफ, नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभाग यासह अग्नीशमन यंत्रणाद्वारे मागणी केलेल्या विविध बाबींवर चर्चा झाली. याप्रसंगी मदतकार्य व आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असून त्या दृष्टीने विविध यंत्रसामग्री व प्रणालींची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

 

आपत्तीमुळे ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या व्यक्तींचे अचूक स्थान सांगणारे रेस्क्यूसेल व्हेइकल, सॅटेलाईटबेस कम्युनिकेशन सिस्टिम यासह अनेक महत्वपूर्ण प्रणालींची माहिती यावेळी सादर करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

एकविसाव्या शतकात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वाचे – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार


एकविसाव्या शतकात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वाचे – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि.१९: एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, धीरज घाटे आदी उपस्थित होते.

 

श्री. मुनगंटीवार यांनी पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून या भव्य आयोजनाबद्दल कौतुक केले. त्यांनी श्री.पांडे यांच्याकडून महोत्सवात झालेल्या विश्वविक्रमाची माहिती घेतली.

 

विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तके मार्गदर्शक ठरतात आणि मुलांना पुस्तकापर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे आयोजन महत्वाचे आहे, असे नमूद करून त्यांनी संयोजनात सहभागी व्यक्ती आणि संस्थांचे अभिनंदन केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषद लक्षवेधी


 

शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषद लक्षवेधी    

 

नागपूर, दि. 19 – अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती, देणगी स्वीकारण्याची पद्धत, इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम 2018 या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा दिनांक निश्चित करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

 

सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही माहिती दिली. सदस्य सर्वश्री अनिल परब, कपिल पाटील, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, प्रसाद लाड आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.

 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शनैश्वर देवस्थानच्या संदर्भातील सदस्यांनी मांडलेले विषय गंभीर आहेत. आवश्यक नसताना 1800 जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येते. देवस्थानमध्ये कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली नाही. तसेच देणगी गोळा करण्यासंदर्भातही तक्रारी असून या यासंदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आहे. मात्र, ही चौकशी पुरेशा प्रमाणात करण्यात आली नाही. तसेच या चौकशीत विसंगती आहे. त्यामुळे शनैश्वर देवस्थानचे विशेष लेखापरीक्षणनंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.

 

शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानसंदर्भातही सन २०१८ मध्ये कायदा करण्यात आला. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो लागू करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 20, 2023

PostImage

मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 

मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 नागपूर, दि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या मागण्यांबाबत आज विधानभवनाथ बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ गुंडिले, डॉ. रमेश गजबे, बाळासाहेब साळुंके, दिनानाथ पडोळे, वसंतराव शिंदे आदी उपस्थित होते.         

 

यावेळी प्रामुख्याने वैद्यकीय उपचारांचा खर्च व मुंबई येथे कामासाठी आल्यानंतर तात्पुरत्या निवासाच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

सिरोंचा - कलेश्वर महामार्गावर अपघातात जखमी युवकांना मूलकला फाउंडेशनकडून मदतीचा हात ...!


सिरोंचा - कलेश्वर महामार्गावर अपघातात जखमी युवकांना मूलकला फाउंडेशनकडून मदतीचा हात ...!

 

 

 

सिरोंचा :- सिरोंचा तालुका मुख्यालयपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा - कलेश्वर महामार्गावर असलेल्या फुलावर अपघातेची घटना घडली आहे,

            या घटनेत तालुक्यातील चिंतालपल्ली गावाचे राजू मानेटी या युवकांची गंभीर जखमी झाली आहे,

           या घटनेची माहिती येथील प्रवासांकडून सिरोंचा तालुक्यातील नेहमी मदतीसाठी धावून येणारा मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष - सागर भाऊ मूलकला यांना मिळतच घटनास्थळी धाव घेत जखमी युवकांना तात्काळ सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,

           त्या जखमी युवकांची उपचार सुरू असून त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष - सागर मूलकला, सदस्य - विनोद नायडू, सलमान शेख, राजकुमार मूलकला, उदय मूलकला, कल्याण मूलकला यांची उपस्थिती होते,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

विशेष निधी उपलब्ध होण्याबाबत नागपूर येथे आढावा

 

चंद्रपूर, दि. 19 : स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मूल येथे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा संकल्प केला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हे महाविद्यालय राज्यातील सर्वोत्कृष्ट राहणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

 

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी वनजमीन वळतीकरण करण्यासंदर्भात तसेच विशेष निधी उपलब्ध होण्यासाठी वनामती (नागपूर) येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूरचे पालकसचिव अनुपकुमार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य संरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, कुलसचिव सुधीर राठोड, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले आदी उपस्थित होते.

 

शेतात राबणारा शेतकरी अन्न पिकवितो, त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कृषी आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. कृषी क्षेत्राचे बजेट 4 हजार कोटींवरून किमान 10 हजार कोटी असणे आवश्यक आहे, त्यासाठी हा विषय मंत्रिमंडळात ठेवला जाईल.

 

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात शासकीय व खाजगी जागा येत्या 10 दिवसांत शोधून निर्णय घ्यावा. बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्यास मूल येथील कृषी महाविद्यालयासाठी वनविभागाची जमीन वळती करण्यासाठी 13 कोटी 48 लक्ष रुपये विशेष निधी भरण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास 28 फेब्रुवारी 2019 मध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत 35 कोटी एवढे अनुदान विद्यापीठास वितरीत करण्यात आले आहे. मूल-मारोडा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या उपलब्ध इमारतीमध्ये सन 2019-20 या सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून मॉडेल स्कूल, मूल येथे सदर महाविद्यालय भाडेतत्वावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. सन 2023-24 या कृषी शैक्षणिक सत्रात बी.एस.सी. (ऑनर्स) चे एकूण 189 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

 

भविष्यात कृषी महाविद्यालयात वाढणारी विद्यार्थी संख्या व त्या अनुषंगाने लागणारे प्रक्षेत्र, विविध युनीट, क्रीडांगण, नवीन इमारतीचे बांधकाम, विविध कार्यालये, वर्ग खोल्या, 17 कृषी विषयाच्या विविध प्रयोगशाळा, मुला-मुलींचे वसतीगृह, रोजगार निर्मिती केंद्र, शेती प्रयोगाकरीता प्रक्षेत्र, प्रक्षेत्रावरील गोडवून आदींसाठी कृषी महाविद्यालयासाठी 40 हे. आर. मर्यादीत म्हणजे 39.50 हे. आर जमीन प्रस्तावित केलेली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

विधानपरिषद प्रश्नोत्तरे मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूर, दि. १९ : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

 

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

 

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो. न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

00000

 

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

——————–

 

मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूर, दि. 19 : धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

 

धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता.

 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि चालढकल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाईल.

 

00000

 

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

————————

 

बाबरगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करणार– मंत्री संजय राठोड

 

नागपूर दि.19 : मौजे बाबरगाव ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर येथील बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली.

 

यासंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. राठोड बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

 

यावेळी श्री राठोड म्हणाले, मौजे बाबरगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील शिवना नदीवर 2015-16 मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामामुळे बंधाऱ्यात समाधानकारक पाणी अडविल्याने परिसरातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. सप्टेंबर 2021 मध्ये पावसाच्या पुरामुळे हा बंधारा वाहून गेल्याने परिसरातील सिंचन क्षेत्र कमी झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यासाठी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येईल


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची दि. २०, २१ व २२ डिसेंबरला मुलाखत


‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची दि. २०, २१ व २२ डिसेंबरला मुलाखत

मुंबई, दि. १९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

राज्यशासनामार्फत रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये बालस्नेही बस, फिरते पथक शाळा, सखी वन स्टॉप सेंटर, हिरकणी कक्ष आणि जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी राबविण्यात आलेली विशेष मोहीम यांची अंमलबजावणी याबाबत महिला व बालविकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. गायकवाड यांची मुलाखत बुधवार दि. २०, गुरुवार दि.२१, आणि शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत आकाशवाणीची सर्व केंद्र व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

 ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक – निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग


 

 ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक – निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग

नवी दिल्ली, १९: ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज केले.

 

महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत श्री. सिंग यांनी येथे मांडले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात, दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच प्रधान सचिव श्री. रुपिंदर सिंग यांच्या हस्ते झाले. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. सिंग यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 

दिवाळी हा भारतीयांचा प्रमुख सण म्हणून देशभर साजरा होता. महाराष्ट्रात दिवाळी निमित्त प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथूनही विशेषांक प्रकाशित केले जातात.

 

महाराष्ट्रात १९०९ पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषकांची सुरु झाली. दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणून आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच विषयांवर दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही श्री. सिंग यावेळी म्हणाले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन येथील वाचकांसाठी पर्वणी असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सिंग यांनी यावेळी केले.

 

प्रदर्शनात १२० दिवाळी अंकांची मेजवानी

 

 या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज, मिळून साऱ्याजणी, चारचौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दीपोत्सव, साप्ताहिक सकाळ, झी मराठी, धनंजय, साधना, सामना, अक्षरधारा, प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, आदी दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आजपासून सुरू झाले असून, सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत शुक्रवार दि. २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

 श्री वर्धराज स्वामी मंडळा कडून भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन


 श्री वर्धराज स्वामी मंडळा कडून भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन 

 

अहेरी :तालुक्यातील बोरी येथे श्री वर्धराज स्वामी मंडळाकडून आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून बोरी उपसरपंच पराग ओल्लालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आविस सल्लागार तथा राजपुर पॅच माजी सरपंच रामलू कुडमेथे,शांतिग्राम उपसरपंच श्रीकांत समतदार,कमल बाला,लिंगाजी दुर्गे,जंपलवार काका,साई मडावी,साईनाथ गड्डमवार,पत्रकार अखिल कोलपाकवार, दौलत मडावी,रमेश आलाम,पुल्लीवर जी,ठवरे मॅडम,अंकित दुर्गे,संजय तलांडे,विनोद कावेरी,जुलेख शेख सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी व्हॉलीबॉल खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

व्हॉलीबॉल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

 

श्री वर्धराज स्वामी मंडळा कडून आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंकित दुर्गे यांनी मानले.या व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला बोरी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी प्रेमसागर आत्राम,मनोज आलाम,प्रवीण सोयाम,लवकुश आत्राम,अक्षय मडावी,अंकित दुर्गे,संजय तलांडे यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

जय सेवा क्रीडा मंडळा कडून भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे आयोजन, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन


जय सेवा क्रीडा मंडळा कडून भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे आयोजन, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन 

 

एटापल्ली :तालुक्यातील जारावंडी येथे जय सेवा क्रीडा मंडळाकडून आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून जारावंडी ग्राम पंचायत च्या सरपंचा सपनाताई कोडापे तर प्रमुख पाहुणे म्हणून जारावंडी उपसरपंच सुधाकर टेकाम,माजी सरपंच हरिदासजी टेकाम,वासुदेवजी कोडापे,दयारामजी सिडाम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,सरखेडा उपसरपंच रमेश दुग्गा,ग्रामसेवक मडावी साहेब,भूमिया मोतीराम मडावी,सिरपूर पोलीस पाटील उईकेजी,वंदनाताई मोहूर्ले संचालिका आविका संस्था,कांदळी पोलीस पाटील नारायण मडावी,प्रतिष्ठित नागरिक रामाजी टेकाम,प्रतिष्ठित नागरिक बाजीराव वेळदा,नरेंद्र कुमोटी ग्रामसभा अध्यक्ष वडसा खुर्द,नरोटेजी पोलिस पाटील इरपण पायली,दुग्गा जी पोलिस पाटील कुमरवाडा,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,प्रा.राजेश हजारे,मानकु नरोटे,वनरक्षक पंढरे जी सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी कबड्डी खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

कबड्डी सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम व सौ अनिताताई दिपकदादा आत्राम माजी जि.प.सदस्या यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

 

जय सेवा क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेवानिवृत्त शिक्षिका तोडासे मॅडम यांनी मानले.या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला जारावंडी, कांदळी सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी प्रशांत टेकाम,युवराज मडावी,सुमित टेकाम,वेदांत कोडापे,संदीप मडावी,मोहित मडावी,आदित्य मडावी रोहित मडावी,सुरोजीत मंडल,चंदू पोटावी यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आणा,तोडसा येथील धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ


शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आणा,तोडसा येथील धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ 

                                                                                      आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथे तानाजी दुर्वा सभापती आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था,उपसरपंच प्रशांत आत्राम ग्रामपंचायत तोडसा, केंद्र सचिव नानेश गावडे, केंद्र ग्रेडर मडावी,गाव पाटील श्री रैजु डी गावडे, सदस्य सुरेश बिरमवार, अशोक गावडे, केशव दुर्गे, दस्सा कोरामी पोलिस पाटील पेठा, रामु तिम्मा, बाबुराव गावडे, रमेश दुर्वा,व तोडसा परिसरातील शेतकरी उपस्थित होते तसेच धान खरेदी करणे सुरू झाले आहे, कृपया शेतकऱ्यांना विनंती आहे की सातबारा ऑनलाईन करून लवकर धान मळणी करावी व शेतकरी यांनी आपले धान्य खरेदी केंद्रात आणावी असे पदाधिकारी यांनी सांगितले आहे ,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

सूर्यापाल्ली येथील व्हाॅलीबाॅल सामन्याचे -  पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण..!


सूर्यापाल्ली येथील व्हाॅलीबाॅल सामन्याचे -  पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण..!

 

अहेरी : तालुक्यातील राजाराम अंतर्गत येत असलेल्या सूर्यापाल्ली येथील जय रावण व्हाॅलीबाॅल क्लब तर्फे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे."या"स्पर्धेसाठी पहिला - दुसरा - तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली आहे.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यातर्फे विजय संघानां अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

 

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोनीवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,संजीव पोरतेटसह परिसरातील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 19, 2023

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील ४१ गिरणी मालकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी ठोकला २.६८ कोटींचा‌ दंड


गडचिरोली जिल्ह्यातील ४१ गिरणी मालकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी ठोकला २.६८ कोटींचा‌ दंड

 

गडचिरोली : -

बहुचर्चित धान घोटाळ्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील ४१ गिरणी मालकांवर जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी २.६८ कोटींचा दंड ठोठावल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधारभूत खरेदी योजनेंतर्गत भरडाई करिता उचल केलेल्या धानाची जिल्ह्याबाहेर परस्पर विक्री करुन त्याऐवजी बाजारातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ खरेदी करुन शासकीय गोदामात जमा करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका या गिरणी मालकांवर ठेवण्यात आला आहे.

 

आधारभूत खरेदी योजनेत आर्थिक गैरव्यवहार करुन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी चौकशी समिती नेमून ४१ राईस मिल मालकांकडे उपलब्ध दस्त ऐवजांची तपासणी केली होती. त्यावेळी या राईस मिल मालकांनी संगनमत करुन गंभीर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर संचालकांनी आधारभूत खरेदी योजनेत आर्थिक गैरव्यवहार करुन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी चौकशी समिती नेमून ४१ राईस मिल मालकांकडे उपलब्ध दस्तऐवजांची तपासणी केली होती. त्यावेळी या राईस मिल मालकांनी संगनमत करुन गंभीर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित राईस मिल मालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय या प्रकरणी गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाच्या तत्कालिन व्यवस्थापकास निलंबितही करण्यात आले होते 

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित राईस मिल मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. परंतु राईस मिल मालकांनी सादर केलेले स्पष्टीकरण असमाधानकारक होते. शिवाय पुराव्यादाखल त्यांनी कोणेतेही दस्तऐवज सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर दंड ठोठावला आहे. हा दंड एकरकमी वसूल करण्यात येणार आहे. एकूण २ कोटी ६७ लाख ५२४ रुपये एवढी दंडाची रक्कम आहे. हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर राईस मिल मालकांच्या लॉबीने मोठमोठ्या राजकीय नेत्यांची भेट घेऊन प्रकरण शांत करण्याचा बराच आटापिटा केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे आता दंड भरण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. दरम्यान या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

ग्रामपंचायत स्तरावरील विविध संघटनांच्या आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग - ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनची माहिती


ग्रामपंचायत स्तरावरील विविध संघटनांच्या आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग

- ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनची माहिती

प्रतिनिधी/चामोर्शी: ग्रामपंचायत स्तरावरील विविध न्यायीक मागण्यांसाठी ग्रामपंायत स्तरावरील ग्रामसेवक युनियन, संगणक परिचालक संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना, ग्रा.पं. कर्मचारी संघटना आदींनी 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत कामबंद आंदोलन पुकारला आहे. या आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील ग्रामंचायतींचा सहभाग असून तिन दिवस कोणत्याही कामकाजात सहभागी होणार नाही, असा निर्णय ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनने चामोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून घेतला आहे.

ग्रामपंचायतती आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढ व कराचंी परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकास विभागाने तातडीने बैठक घेऊन अनेक निर्णय घ्यावेत, आमदार निधीप्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य निधी असावा, थकीत असलेला ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच, उपसरपंच मानधन अदा करावे, त्यात भरीव वाढ करावी, दरमहा न मागता मानधन देण्यात यावे, 100 टक्के रक्कम शासनानेच द्यावी, विमा संरक्षण द्यावे, शासकीय कमिटीमध्ये स्थान देण्यात यावे, शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवास व्यवस्था व्हावी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा, शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे राज्याच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावेत, जिल्हा परिषदांमध्ये सरपंच कक्ष तर मुंबईत निवा व्यवस्था, वाचनालाय, काॅन्फरन्स हाॅल असे सरपंच भवन असावे, या व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

निवेदन देतांना ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे चामोर्शी तालुकाध्यक्ष निलकंठ पा. निखाडे, सरचिटणीस शेषराव कोहळे, सुनिल कन्नाके, दिगाबर धानोरकर विवेक भगत सुधाकर गद्दे नंदा कुलसंगे अश्विनी कुमरे आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

गडचिरोलीच्या कोर्ट चौकाला आद्य क्रांतिकारक कुमराम भीम यांचे नाव,खा.अशोक नेते यांच्या हस्ते फलकाचे अनावरण


गडचिरोलीच्या कोर्ट चौकाला आद्य क्रांतिकारक कुमराम भीम यांचे नाव,खा.अशोक नेते यांच्या हस्ते फलकाचे अनावरण

 

गडचिरोली : शहरातील कॅाम्प्लेक्स भागात असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या चौकाला थोर आद्य क्रांतिकारक, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली ते स्वातंत्र्य सेनानी कुमराम भीम यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते चौकाच्या या नवीन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या प्रतिमेचे व थोर महापुरुषांचे विधिवत पूजन करून फलकाची फित कापण्यात आली.

 

कुमराम भीम यांच्या लढ्यावर नुकताच आर.आर.आर.(RRR) हा चित्रपट तयार झाला आहे. त्यांच्या योगदानाचा इतिहास गडचिरोली जिल्हावासियांना माहित व्हावा आणि त्यांचे स्मरण प्रेरणादायी ठरावे यासाठी चौकाचे हे नामकरण करण्यात आले. दि.१७ डिसेंबर रोजी आदिवासी युवकांनी एकत्रित येऊन या सोहळ्याचे आयोजन केले होते.

 

यावेळी खासदार अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, जिल्हा न्यायालयाच्या परिसरात जिल्हाभरातील नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या चौकाचे नामकरण आद्य क्रांतिकारक कुमराम भीम या नावाने केल्यामुळे त्यांचे नाव सर्वांपर्यंत पोहोचेल. त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी दिलेल्या योगदानाचे महत्व सर्वांना कळेल, असा विश्वास व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कुमराम भीम अमर रहे... असा जयघोषही करण्यात आला.

 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मेश्राम सर,सतिशदादा कुसराम व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे,चंद्रपुर युवा जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे,पोलीस बॉइज असोसिएशन चे गिरीश कोरामी,भाजपाचे युवा नेते आशिष कोडापे, आकाश ढाली,प्रांतोश विश्वास,अक्षय मडावी,डेवीड पेंद्राम,उदय नरोटे,सचिन भलावी,हसीना कांदो,शिवानी तलांडे,महाराष्ट्र सोशल मिडिया सेलचे आनंद खजांजी आदी मोठया संख्येने आदिवासी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

युवकांच्या सुदृढ आरोग्या साठी खेळ महत्वाचे - माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन


युवकांच्या सुदृढ आरोग्या साठी खेळ महत्वाचे - माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

 

अहेरी बाजार समिती सभापती कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बाॅल सामनेचे उदघाटन!!

 

भामरागड : स्व.श्री.सीताराम हरिदास सडमेक(कामगार)स्मृती प्रित्यर्थ जय श्रीराम युवा क्रिकेट मंडळ भामरागड द्वारा आयोजित येथे भव्य टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज या स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.

 

या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व भामरागडचे न.पं.नगराध्यक्षा सौ.रामबाई कोमटी महाका यांच्या कडून प्रथम पारितोषिक 71,000/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक मा.सर्व अधिकारी वर्ग भामरागड तर्फे 51,000/- तृतीय पारितोषिक जय श्रीराम युवा क्रिकेट मंडळ भामरागड तर्फे कडून 21,000/-असे या स्पर्धेसाठी तीन पारितोषिक देण्यात येत आहे.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भामरागडचे न.पं.नगराध्यक्षा सौ.रामबाई कोमटी महाका,नरोटी साहेब,कृ.उ.बा.स. संचालक दादू भैय्या, श्री.दिलीप उईकेनगरसेवक भामरागड,बालूभाऊ बोगामी कॉग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड,तपेश हलदार,आशिष सुपी,शामराव येरकलवार,मलेश तलांडी सरपंच मडवेली,नंदूभाऊ सरपंच पारायनार,मज्जी माजी सरपंच पल्ली,बाळूभाऊ पोरेड्डीवार,कु.हीचामी ताई सरपंच आरेवाडा, डोलेश मडावी माजी सरपंच कंदोळी,किशोर कडंगा सरपंच होड्री,नगरसेवक,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,अहेरी प्रशांत गोडसेलवार राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

गोरगरिबांच्या विकासाचा संकल्प पुर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा-पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार


गोरगरिबांच्या विकासाचा संकल्प पुर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा-पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार

 

 संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान

 

*चंद्रपूर, दि. 17* : ‘जिल्ह्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कार्य सुरू आहे. अशा विविध योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवून विकासाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा,’ असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला केले.

 

नियोजन भवन सभागृह येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप कांबळे, महाराष्ट्र भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भाजपा महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी भाजपा महानगराचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, रवी आसवानी, सूरज पेदुलवार,संजय कंचर्लावार,विशाल निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 

निराधार योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘संजय गांधी निराधार योजनेची बैठक मी आग्रहाने घ्यायचो. निराधार, विधवा, परितक्त्या घटस्फोटीत व ज्यांना सहकार्याची गरज आहे अशा श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्परतेने कार्य केले आहे. 2 एप्रिल 2010 ला राज्याचा प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा ‘गरीबो के सन्मान में, भाजपा मैदान मे’ या घोषणेनुसार स्वतःला कामात झोकून दिले. गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान 600 रुपयांवरून 1200 रुपये करण्याचे सौभाग्य लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1200 रुपयांचे अनुदान 1500 रुपये केले. 

 

ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले,’ राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटूंब प्रमुखांचा (स्त्री/पुरुष) अचानकपणे मृत्यू झाल्यास 2013 च्या अगोदर त्याचे अनुदान 10 हजार रुपये होते. हा प्रश्न केंद्र शासनाशी संबंधित होता. मात्र, केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार करून ही मदत 10 हजारांवरून 20 हजार रुपयांवर नेली. गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करीत आहेत. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणारे जगातील एकमात्र नेते देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत. कोविडच्या संकटात संपूर्ण देश संकटात होता. त्यावेळी देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र काम करत होते. जगातील श्रीमंत देशांना जे शक्य झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणले आणि कोरोना नियंत्रित करण्यासाठी निःशुल्क लस उपलब्ध करुन दिली. 

 

गरिबांसाठी 10 हजार घरे

चंद्रपूर येथील म्हाडामध्ये गरिबांसाठी 10 हजार घरे बांधण्याची मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून गरिबांना अतिशय अल्प दरात घरे उपलब्ध होणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. 

 

नागरिकांच्या सेवेसाठी तीन निर्णय

गरिबांची सेवा करण्यासाठी तीन निर्णय घेण्यात आले आहेत. आर्थिक अडचण व पैशांअभावी गरिबांची नेत्रचिकित्सा होत नाही. याचा विचार करून चंद्रपूर आणि बल्लारपूर येथे फिल्म सिटीच्या माध्यमातून आय हॉस्पिटल ऑन व्हिल तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून वस्त्यांमध्ये नागरिकांच्या दारात पोहोचून निःशुल्क नेत्रचिकित्सा केली जाणार आहे. गेल्या वर्षी मुबंईच्या फोर्टीस हॉस्पिटलला लहान मुलांच्या हृदयावर निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच यावर्षी 25 लहान बालके ऑपरेशनसाठी मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलला पाठविण्यात आली आहेत. निश्चितपणे हे पुण्य कमविण्याचे भाग्य लाभले, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.  

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्प यात्रा

गरिबांसाठी असलेल्या योजना व त्या योजनांची माहिती गरिबांपर्यंत पोहोचावी यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसीत भारत संकल्प यात्रा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात 12 कोटी शौचालये येत्या नऊ वर्षात बांधून पूर्ण झालीत. 2009 ते 2014 मध्ये सरकार नसताना राजीव गांधी घरकुल योजनेतून 1 लक्ष 50 हजार घरांना मंजुरी दिली होती आणि महाराष्ट्रात फक्त 4 हजार घरे पूर्ण झाली. आज देशामध्ये 4 कोटी घरे मंजूर केली आणि साधारणतः 3 कोटींपेक्षा जास्त घरे बांधून पूर्ण झाली याचा अभिमान आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

 

महिलांसाठी उज्वला योजना

देशात 2014 पर्यंत घरगुती सिलेंडरचा वापर करणारे देशात फक्त 14 कोटी कुटुंब होते. आता उज्वला योजनेच्या माध्यमातुन 32 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.

 

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग

दहा वर्षांत दिव्यांगाना 600 ते 700 तीन चाकी सायकल वितरीत करण्यात आले तर चार वर्षांमध्ये 1000 बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल देण्यात आल्या. दिव्यांगांसाठी मोठी योजना करण्यात येत असून या योजनेचा लाभ गोरगरीब दिव्यांग बंधू-भगिनींना होणार आहे. लवकरच ही योजना प्रस्तावित करण्यात येईल. या संदर्भात शासनाने स्वतंत्र दिव्यांग विभाग तयार केला आहे. या माध्यमातून दिव्यांगाच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, त्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे यादृष्टीने कार्य केले जाईल, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.  

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

भामरागड़ तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षनाचा पहिला टप्पा उत्साहात संपन्न


भामरागड़ तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षनाचा पहिला टप्पा उत्साहात संपन्न

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद,गडचिरोली अंतर्गत गट साधन केंद्र, पंचायत समिती,भामरागड तालुक्यात श्री.जनार्दन वडलाकोंडा गटशिक्षणाधिकारी भामरागड़ यांच्या मार्गदर्शनात पहिला टप्पा दि 13/12/2023 ते 17/12/2023 या कालावधीत घेण्यात आली . या पहिल्या टप्प्यातील नाविन्यपूर्ण प्रशिक्षणास भामरागड़ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीय आदिवासी आश्रम शाळा,खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता १ ते ५ वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग,मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे, मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे,सेल्फ़ी विथ सक्सेस, मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे,मुलांना शिकण्यास आव्हाने देणे,भविष्यातील शिक्षण या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.

या तालुकास्तरीय प्रशिक्षणास मार्गदर्शक तथा नियंत्रक म्हणून श्री जनार्दन वडलाकोंडा गटशिक्षणाधिकारी, भामरागड तर प्रशिक्षण तालुका समन्वयक म्हणून श्री. धनीराम तुलावी, गट समन्वयक आणि सुलभक म्हणून श्री.वाचामी केंद्रप्रमुख भामरागड़,श्री.मच्छिंद्रनाथ बरडे केंद्रप्रमुख गोंगवाडा,श्री.संदीप जोरगलवार ताडगाव,कु.शितल साळवे मल्लमपोडूर,श्री,किशोर मोदक भामरागड़,श्री.संतोष बंडावार कोठी,श्री.नामदेव तुमरेटी गेर्रा,श्री.महेंद्र हरदुले लाहेरी,गजानन राठोड बोळंगे यानी काम पाहिले. प्रशिक्षण कालावधीत चहा आणि भोजन व्यवस्था करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

 अशोक किरनळी कृषी सह संचालक यांची भामरागड तालुक्याला भेट


 अशोक किरनळी कृषी सह संचालक यांची भामरागड तालुक्याला भेट.

 

भामरागड

 अशोक किरनळी सर कृषी सह संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे तसेच मा. खंडेराव सराफ सर कृषी उप संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान भामरागड तालुक्याला भेट दिली. दिनांक 16/12/2023 ते 17/12/2023 सदर भेटी दरम्यान सरांनी भामरागड तालुक्यातील आंबा व काजु फळपीक लागवड बघितली. व यशस्वी फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले. सदर भेटी दरम्यान सन्माननीय मान्यवरांनी भामरागड तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना फळबाग लागवड करुन आपले जीवनमान उंचवावे याबद्दल मार्गदर्शन केले. सदर भेटी दरम्यान श्री .मंगेश भावे तालुका कृषी अधिकारी भामरागड,  प्रदीप कडबाने कृषी पर्यवेक्षक  गिरीष तुलावी कृषी सहाय्यक  नीतू पेंदाम, सुरज राऊत पिक विमा प्रतिनिधी इ. मान्यवर उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

गडचिरोली नगरित सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन,खासदार अशोक नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत


गडचिरोली नगरित सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन,खासदार अशोक नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत 

 

दि.१७ डिसेंबर २०२३

 

गडचिरोली:-आर्य वैश्य समाज आयोजित श्री.माता कन्यका परमेश्वरी मंदिर भूमिपूजन व कोनशिला समारंभ प्रसंगी शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे मान.सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने व सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य यांचे गडचिरोली नगरित आगमना निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करतांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते.सोबत आमदार डॉ.देवराव होळी व मोठया संख्येने युवा मोर्चा चे भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 18, 2023

PostImage

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे  उत्साहात स्वागत


विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे  उत्साहात स्वागत 

 

दिनांक: १७ डिसेंबर २०२३

 

कुरखेडा/येंगलखेडा:

       'विकसित भारत संकल्प यात्रा' या कार्यक्रमाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कुरखेडा तालुक्यातील मौजा येंगलखेडा येथे दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. 

    देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थींशी प्रेरणादायी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविता यावा यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आमदार कृष्णा गजबे यांनी आवाहन केले. 

      याप्रसंगी विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, शेतकरी, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 17, 2023

PostImage

खेळाडूंनी शांततापुर्ण व आनंदायी वातावरणात खेळ खेळावे,खासदार अशोक नेते प्रतिपादन


खेळाडूंनी शांततापुर्ण व आनंदायी वातावरणात खेळ खेळावे,खासदार अशोक नेते प्रतिपादन 

जय वाल्मीकी बहुउद्देशीय ढिवर समाज मंडळ,व वीर शिवाजी कबड्डी क्लब तळोधी (मो.)ता.चामोर्शी जि. गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य डे नाईट (वजन) कबड्डी स्पर्धा..

 

या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार अशोक नेते.यांच्या शुभहस्ते संपन्न...

दि.१६ डिसेंबर २०२३

 

गडचिरोली:-नववर्ष आगमनाने व सलग तीन वर्षाची परंपरा कायम ठेवीत मोठया आनंदाने उत्साहाने युवा वर्ग मैदानी कबड्डी खेळ स्पर्धा जय वाल्मीकी बहुउद्देशीय ढिवर समाज मंडळ,व वीर शिवाजी कबड्डी क्लब तळोधी (मो.)ता.चामोर्शी जि.गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य डे नाईट (वजन) कबड्डी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रथम मोठ्या संख्येनी युवा वर्ग, व गावातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात खासदार अशोक नेते यांचे आनंदाने गावात फेरी काढून स्वागत केले.

 

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना कबड्डी हा सांघिक खेळ असुन भावनेला प्रोत्साहन देणारा हा खेळ आहे. हा खेळ आठ दहा दिवस चालतो.या कबड्डी स्पर्धेत परिसरातून एकुण बाविस टीम च्या चमूंनी सहभाग दर्शविला असून पंचाचा निर्णय योग्य रीतीने मानूनच खेळ खेळतांना युवक खेळाडूंनी शांततापुर्ण व आनंदायी वातावरणात खेळ खेळावे.कबड्डी या खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिक दुष्टया चांगले राहण्यासाठी खेळ खेळावे.असे प्रतिपादन या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

 

पुढे बोलतांना खासदार अशोक नेते यांनी म्हटले या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक गावा संबंधित समस्या, व काहि अडीअडचणी, सांगीतल्या यावर विचार विनिमयाचे निराकरण नक्की होईल असा विश्वास देतोय.या खेळाच्या निमित्ताने बरेच दिवसापासून आपल्या गावातील लोकांशी भेट झाली.यात मला सुद्धा आनंद झाला. असे यावेळी खासदार अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त केले. 

 

यावेळी स्पंदन फाउंडेशनचे डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, प्रणय खुणे,यांनी सुद्धा चांगले युवकांना मार्गदर्शन केले.

 

या प्रसंगी प्रामुख्याने उद्घाटक खासदार अशोक नेते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,स्पंदन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. मिलिंद नरोटे सर,प्र.सरपंच मनोहर बोदलकर,अतुल सुरजागडे, से.नि.उपनिरीक्षक कान्होजी लोहबंरे, प्रमोद आसुटकर, ग्रा.प.सदस्या तृप्ती चिळांगे, ज्योती बारसागडे,लता वासेकर,प्रतिक चिचघरे,गुरू गेडाम, किशोर गटकोजवार, मांदाळे जी,अनिल कोठारे,सुभाष वासेकर,किशोर कुनघाडकर, विनोद सातपुते, अमित शेरकी, गोलु भोयर,सूरज भोयर,प्रविण मेश्राम,काशिनाथ ठाकुर, तसेच गावातील नागरिक बंधू भगिनीं व युवा वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 17, 2023

PostImage

काँग्रेसची अहेरी विधानसभा आढावा बैठक संपन्न, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती


काँग्रेसची अहेरी विधानसभा आढावा बैठक संपन्न, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती 

 

गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक आलापल्ली येते पार पडली.

 सदर बैठकीत संघटनात्मक बाबींवर, बूथ सशक्तीकरन, BLA आणि ग्रामकमिटीच्या नियुक्त्या संदर्भात व येणाऱ्या काळात, 24 डिसेंबर रोजी अहेरी विधानसभा कार्यकर्ता मेळावा व 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या नागपूर येते काँग्रेस स्थापना दीनानिमित्त कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्या संदर्भात बैठक संपन्न झाली.

 

अहेरी विधानसभा हे काँग्रेस च्या पारंपरिक मतदारांचे गड आहे, मध्यंतरी अहेरी विधानसभा काँग्रेस पक्षाने युती मधील मित्र पक्षासाठी सोडली होती मात्र वर्तमानात परिस्थिती बदली आहे, सुरजगाड खदाणीमुळे व इथे चालणाऱ्या गाड्यांमुळे अनेक लोकांचा जीव जात आहे, शेतकरण्याच्या शेतीचे, घराचे नुकसान होत आहे, महिला भगिनींवर अत्याचार वाढत आहे मात्र या भागातील लोकप्रतिनिधी सुस्त बसले आहे, त्यामुळे स्थानिक जनता अश्या सुस्त लोकप्रतिनिधीना घरी बसवण्यास उत्सुक आहे, करीता आता विधानसभेतील काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी अधिक जोमाने कामाला लागा अश्या सूचना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी बूथ सशक्त करणे अत्यन्त महत्वाचे असून मेरा बूथ सबसे मजबूत अभियान राबवून तत्परतेने कार्य करा अश्या सुचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

 

या बैठकीस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली -चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसाण, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ. पप्पू हकीम, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रमोद गोटेवार, एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार, भामरागड तालुकाध्यक्ष लक्षमिकांत बोगामी, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, रजाक पठाण, नगरसेवक निजान पेंदाम, लोकेश गावडे, सपना नैताम, अज्जू भाई पठाण, नामदेव आत्राम, वंदना सीडाम, सपना नेताम, वैशाली येरावर, मनीषा काटलावार, सतीश मुप्पलवार, संदीप मारगोनवार, विकास राऊत, राहुल गोरडवार, राघोबा गोरकार, विनोद मडावी, संजय वेळदा, बंडू ढोरपटी, सुरेश दुर्गे, गजानन झाडे, श्रीकांत तेलकुंटलवार, भीमराव करतरकर, नामदेव भांडारकर, रुपेश कंदेकर, निलेश पारधी, गणेश तलांडे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 17, 2023

PostImage

नागपूर दुर्घटना :मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी,विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी


नागपूर दुर्घटना :मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी,विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर,१७

नागपुरात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत स्फोट झाला असून या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे.

 

विजय वडेट्टीवार यांनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी 

नागपूर येथील कंपनी सोलार इंडस्ट्रीज मध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. दुर्घटनेतील मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे.

 

कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा अश्या घटना सदर कंपनीत घडल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच कंपनीमुळे परिसरातील पर्यावरणाचे होत असलेले नुकसान ही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. 

सरकारने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन एसआयटी स्थापन करावी आणि दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 17, 2023

PostImage

....अखेर त्या अतिक्रमित जमिनींच्या मोजणीला सुरुवात


.....अखेर त्या अतिक्रमित जमिनींच्या मोजणीला सुरुवात

 

भाग्यश्री ताई आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश,शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

 

अहेरी:-तालुक्यातील पेरमिली परिसरातील शेतकऱ्यांची अतिक्रमित जमिनीला मालकी हक्क मिळाला नसल्याने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेतल्याने अखेर अतिक्रमित शेत जमीन मोजणीला सुरुवात झाली आहे.

 

अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील शेतकरी २००५ पूर्वी पासून वनजमिनिवर अतिक्रमण करून शेती करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मालकी हक्क मिळाला नसल्याने त्यांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला.मात्र,त्यांना अपयश आल्याने येथील शेतकऱ्यांनी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शेतजमिनी मोजमाफ करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे.नुकतेच या परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमित शेतजमिनीच्या मोजमाफ कामाला सुरूवात करण्यात आले आहे. वनहक्क समिती,महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी स्वतः संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोजमाफ कामकाजाची पाहणी केली तर आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना या कामात मदत करण्याचे निर्देश दिले.त्यामुळे शेतजमिनी मोजमाफच्या कामाला अधिक गती मिळाली.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, तलाठी कु.पुजा मडावी,वनरक्षक देव लेकामी,कोतवाल वासुदेव कोडापे,वारलु आत्राम,वन कर्मचारी संतोष मेश्राम,वन हक्क समितीचे अध्यक्ष देवराव मडावी,वन हक्क समितीचे सचिव शंकर कुंभारे तसेच सत्यनारायण येगोलोपवार, देवाजी सडमेक, बंडु दहागावकर,महेश चांदेकर, नारायण मडावी, संतोष मडावी, तिरुपती कोसरे, रुपेश हजारे, सुरेश हजारे, कारू दहागावकर, माधव दहागावकर, रुसी चांदेकर, प्रणय दहागावकर, रामचंद्र चांदेकर, गोपाळ पोटदुखे, सदु सडमेक, गणपत आतकुलवार, बापु औतकर, ललिता चांदेकर, कोंडू दहागावकर, विश्वनाथ हजारे, विलास दहागावकर, लक्ष्मण मडावी, राजु आत्राम इत्यादी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

एकाच छताखालील विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या,माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे आवाहन


एकाच छताखालील विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या,माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे आवाहन

 

मलमपोडुर येथे महिला सशक्तीकरण अभियान

 

भामरागड: केंद्र व राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी,विकसित भारत संकल्प तसेच महिला सशक्तीकरण अभियानातून नागरिकांना विविध लोककल्याणकारी याजनांचा लाभ देण्याचा काम केले जात आहे.महिला सशक्तीकरण अभियानात खास करून प्रत्येक वयोगटातील महिलांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली असून एकाच छताखालील विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

 

भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथे महिला सशक्तीकरण अभियानाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार प्रकाश पुप्पलवार विशेष अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे,जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक बस्वराज मास्तोडी,प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम,गटशिक्षणाधिकारी वडलाकोंडा,मलमपोडूर चे सरपंच रोशन वड्डे,सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा अलोणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, आदिवासी सेवक सब्बर बेग मोगल,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बोगामी, ग्राम पंचायत सदस्य नीला तिम्मा, अरुणा वेलादी,सुधाकर तिम्मा,रतन दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी खेड्यापाड्यात अजूनही बरेच जणांचे आधार अपडेट झालेले नाहीत.त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तालुक्यात आधार केंद्र वाढवून नागरिकांच्या आधार कार्ड बाबत असलेल्या अडचणी दूर करावा असेही त्यांनी प्रशासनाला आवाहन केले.

 

विशेष अतिथी म्हणून बोलताना विजय भाकरे यांनी महिलांना साध्या आणि सोप्या भाषेत विविध शासकीय योजनांची माहिती दिली आणि दुर्गम भागात त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.एवढेच नव्हेतर शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना ह्या आपल्यासाठीच असून त्या सर्व योजना आपल्या हक्काचे आहेत.त्यामुळे प्रत्येक स्टाल वरून योग्य माहिती घेऊन 'यात आमच्यासाठी काय ?' असा सवाल लाभार्थ्यांनी केले पाहिजे.तेंव्हाच विविध योजनांची माहिती आपल्याला मिळेल आणि त्याचा लाभ घेता येणार.असे त्यांनी आवाहन केले.

 

मलमपोडुर येथील अभियानात विविध विभागाच्या माध्यमातून स्टॉल लावण्यात आले होते. लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाहेरी, ईरपणार, हिंदेवाडा, बंगाडी, पुंगासुर, कुकामेटा, लष्कर, होडरी, मुरंगल, भुसेवाडा,पेरमलभट्टी, गोपणार, धीरंगी, हालदंडी आदी गावातून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी महेंद्र वटी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

ब्रेकिंग न्यूज... वाघाच्या हल्ल्यात गोविंदपूर येथील माया धर्माजी सातपुते यांचा मृत्यू ....


ब्रेकिंग न्यूज...
वाघाच्या हल्ल्यात गोविंदपूर येथील माया धर्माजी सातपुते यांचा मृत्यू ....




गडचिरोली :- आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ दुपारी १२:३० ते १ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मौजा - गोविंदपुर येथील माया धर्माजी सातपुते रा. गोविंदपुर ता. जि. गडचिरोली वय (५५ - ६० ) येथील रहिवासी असून सदर महिला सरपण गोळा करण्यासाठी गावाच्या जवळच गेली असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केलं आहे..

या सदर घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून वनविभागाची टीम रवाना झाली आहे.

या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सातपुते परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी.आणि या परिसरात वावरत असलेल्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी , व परिसरातील जनतेनी केली आहे..


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

घरफोडी प्रकरणातील आरोपीला २४ तासात पोलिसांनी केली अटक


2 लाख 78 हजारांच्या घरफोडी प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक

 

कोरची तालुक्यातील तेकाबेदड गावातील रहिवासी महिला नीलिमा अंतराम मेश्राम यांच्या घरी 11 डिसेंबर च्या रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान कपाटातील 3 तोळे सोना, 20 तोळे चांदी व 14000 हजार रोख रक्कम असे एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली त्यानंतर कोरची पोलीस स्टेशन येथे 12 डिसेंबरच्या रात्री तक्रार दाखल करण्यात आली कोरची पोलिसांनी 24 तासातच संशयित आरोपीला छत्तीसगड वरून अटक केली देवेंद्र रामलाल बंसोड 28 वर्ष राहणार सिंगायटोला तालुका मोहला मानपुर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

नीलिमा मेश्राम यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे 2 गोप, तीन अंगठी, तीन जोड कानातले असे साडेतीन तोडा सोना तर चांदीच्या हात कढा दोन चांदीचे शिक्के व 14 हजार रुपये रक्कम चोरी करून आरोपी पसार झाला होता कोरची पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात 380,457 कलमान्वये गुन्हा दाखल करून 24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आली पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी आरोपी देवेंद्र बनसोड याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे

 आरोपीकडून चोरीतील 3 तोडे सोने, 20 तोडे चांदी आणि 4800 रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे सदर प्रकरणातील गुन्ह्याच्या तपास कुरखेडा उपविभागीय अधिकारी साहिल झरकर पोलीस कोरची पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार हे करीत आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उतरणार रस्त्यावर


सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा...!

 

 रुग्णालयातील आरोग्य समस्या तात्काळ सोडवा ; अन्यथा तीव्र आंदोलन करणार ; सागर मूलकला ...!

 

 

 

 सिरोंचा :- सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक गरीब रुग्ण येत असतात. मागील अनेक वर्षांपासून या ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून याची फटका येथील रुग्णांना बसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुका हे शेवटचं टोक असून येथील आरोग्य सुविधा मात्र रुग्णांसाठी कुचकामी ठरत आहे. सध्याचा परिस्थितीत सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात क्ष किरण यंत्राचे तंत्रज्ञ नाहीत.यामुळे सर्वसामान्य रुग्णासह गरोदर मातांना अनेक त्रास सहन करावे लागत आहे. तसेच येथील महिलांसाठी स्कॅनिगचे डॉक्टर नाही.या रुग्णालयातील अनेक पद रिक्त असल्याने तालुक्यातील रुग्णांना जीव वाचविण्यासाठी तेलंगाणा राज्यात धाव घ्यावं लागतं आहे.परिणामी तालुक्यातील रुग्णांची आर्थिक व मानसिक शोषण होत आहे. सिरोंचा ग्रामीण रुगणालायतील रिक्त असलेल्या पदे तात्काळ भरून येत्या १५ (पंधरा )दिवसाचे आत समस्यांची सोडवणूक करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष - अतुल भाऊ गण्यारपवार तसेच सिरोंचा तालुका अध्यक्ष - फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील स्थानिक तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आली आहे,त्यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव - विनोद नायडू, सहसचिव - सडवली मेडीझर्ला, कार्यकर्ता - अंकुलू अतकुरी,अडपा मलय्या,गणेश सॅन्ड्रा,नरेश कडार्ला यांच्यासह तालुक्यातील नागरिकांची उपस्थित होते,


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन


सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन

        गडचिरोली (Gadchiroli )दि.१४:-रोजगार हमीचे काम ग्रामपंचायत मार्फत होत असताना ग्रामपंचायत नियोजन आराखड्यात मंजूर केलेली कामे ग्रामपंचायत स्तरावर मंजूर असताना ग्रामपंचायतच्या मजुरांना रोजगार मिळू नये व ठेकेदाराकडून लाखो रुपयाची लाच मिळावी यासाठी ग्रामपंचायत स्तराची मंजूर कामे तहसीलदार यंत्रणेच्या मार्फत केली जात आहेत. सदर कामे ही बांधकाम विभागाकडून केली जात आहे. ही कामे करतांना ६०/४० च्या प्रमाणात कामे करण्याची ग्रामपंचायत ना सूचना दिल्या जातात. परंतु बांधकाम विभागाने कोणतेही प्रकारचे मातीकाम उपलब्ध करून न देता १००% कुशल खर्च असणारी कामे बांधकाम विभाग करीत आहे.

            शासनाने प्रत्येक कामाचे इस्टिमेट बनवतांना कोणते इस्टिमेट किती प्रमाणात दिलेले आहे तसेच सीसी रोडचे काम २८% अकुशल व कुशल ७२% असायला पाहिजे. त्या कामाचे अंदाजपत्रक बनवताना संबंधित अभियंत्याने १००% कामापैकी ९९.५% कुशल खर्च व ०.५% मजुरांचे नवापूर ते अंदाजपत्रक तयार करून शासनाचे नियम धाब्यावर बसवले आहेत.

          या योजनेतील ग्रामपंचायत स्तरावरील मजुरांना गाव पातळीवर रोजगार निर्माण व्हावा म्हणून शासनाने सदर योजना आणली होती परंतु गडचिरोली जिल्ह्यात कर्मचारी व कंत्राटदार मिळून या योजनेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून डल्ला मारला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील मजुरांना मजुरीसाठी परप्रांतात कुटुंबातील लहान मुलांना सोडून जावे लागत आहे.

          या सर्व प्रकरणाची निवेदन श्री योगाजी कुडवे यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री साहेब यांना व मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.परंतू आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कार्यवाही करण्यात आली नाही.त्यामुळे त्यांनी १४ डिसेंबरला बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचे सांगितले परंतु त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले.

      त्यामुळे याप्रकरणातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित व बडतर्फ करण्यात यावे यासाठी आज १४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन .योगाजी कुडवे सामाजिक कार्यकर्ते , रविंद्र सेलोटे व इतर सहकारी यांनी सुरू केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

दांडगा जनसंपर्क, लोकप्रियता असलेला नेता आता पकडणार काॅंग्रेसचा हात  कार्यकर्त्यांसमोर पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव मांडणारा पहिलाच नेता...


दांडगा जनसंपर्क, लोकप्रियता असलेला नेता आता पकडणार काॅंग्रेसचा हात

 

 कार्यकर्त्यांसमोर पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव मांडणारा पहिलाच नेता...

 

सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या उज्वल भविष्यासाठीच आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असून माझा या निर्णयाला आपण सगळ्यांनी एकमताने सहमती दर्शवतील व आपण सर्वांनी माझे सोबत पक्ष प्रवेश करतील या दृढविश्वासाने मी आज आपल्यापर्यंत आल्याचे आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.

 

सिरोंचा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आयोजित आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजयभाऊ कंकडालवार यांनी वरील निर्णय जाहीर केले.

 

सिरोंचा येथे आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मांडलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रवेशाचे निर्णयाला उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने सहमती दर्शवित या निर्णयाला दुजोरा दिले.

 

"या"बैठकीत अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढे बोलतांना म्हणाले कि,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हायकमांड कडून आपल्याला व आपल्या सर्वांना त्यांच्या पक्षात प्रवेश देण्याचे सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले असून येत्या 24 डिसेंबर रविवारला आल्लापल्ली येथे पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असल्याने या पक्षप्रवेश कार्यक्रमात माझेसोबत आपण सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे विनंती केले.

 

सिरोंचा येथे आयोजित बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर,बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव,माजी सरपंच ताल्ला वेंकण्णा,असरअल्ली ग्रा.पं.चे सरपंच रमेश मेकला,सिरोंचा नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा, बाजार समितीचे संचालक नागराज इंगीली,उपसरपंच अशोक हरी,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,संतोष पडाला,नगरपंचायत सभापती भवानी गणपुरपू,बामणीचे सरपंच अजय आत्राम,गर्कपेठा सरपंच सुरज गावडे,किरणकुमार वेमुला,रामचंद्रम गोगुला,गादे सोमय्या,जोडे तिरुपती आदी उपस्थित होते.

 

तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकीला नगरसेवक नरेश अलोने,इम्तियाज खान ,राजेश बंदेला, नागेश दुग्याला,सतीश भंडारी,लक्ष्मण येलेला,प्रशांत गोडशेलवार,नारायण मुडमडगेला,माजी उपसरपंच दुर्गम तिरुपती,महेंद्र दुर्गम,अशोक इंगीली,उपसरपंच दासरी व्येंकटी,महेश तलांडी,संपत हरी,वासू सपाट,श्रीनिवास दुर्गम,आनंद आशा,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,रवी बरसगांडी,सागर कोठारी,राजू पडाला,गणेश रच्चावार,लवण पागे,लक्ष्मण बोल्ले,महेश तलांडे,सुरेश पेगडपल्ली,सडवली सेग्गम,राकेश सडमेक,सागर कोटारी,श्रीकांत अंतर्गमसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

नगरपरिषद तर्फे शहरात लावलेले वॉटर ए.टी.एम. मशीन बनली शोभेची वस्तु


नगरपरिषद तर्फे शहरात लावलेले वॉटर ए.टी.एम. मशीन बनली शोभेची वस्तु.

 

 

आरमोरी :- शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व निर्मळ पाणी मिळावे यासाठी नगर परिषद, आरमोरी तर्फे  टिळक चौक मधील दुर्गा मंदिर समोर वॉटर ए.टी.एम. मशीन लावण्यात आली मात्र सदर 

वॉटर ए.टी.एम. मशीन दीड ते दोन  महिन्यापासून शोभेची वस्तू बनलेली आहे त्यातच नगर परिषद आरमोरी तर्फे शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न करता  दर १ दिवस आळ पिण्याचे पाणी नागरिकांना मिळते त्यामुळे सदर वॉटर ए.टी.एम. मशीन लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना शुद्ध व निर्मळ पाणी नगर परिषद तर्फे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी तर्फे करण्यात आली याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे ,युवारंग चे संघटक रणजित बनकर, आशुतोष गिरडकर , सदस्य चंदाताई राऊत ,विभाताई बोबाटे ,सुरेश मेश्राम उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 15, 2023

PostImage

15 जवानांना शहीद करणाऱ्या खतरनाक नक्षलवाद्याचा खात्मा, गडचिरोली पोलिसांनी घेतला बदला


15 जवानांना शहीद करणाऱ्या खतरनाक नक्षलवाद्याचा खात्मा, गडचिरोली पोलिसांनी घेतला बदला

 

 गडचिरोली (Gadchiroli) (दि .१४): पोलीस स्टेशन गोडलवही पासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील मोहल्ला- मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलीस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासींना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे सदर परिसरात पोलीस दलाकडून तातडीने शोधमोहीम राबविण्यात आले.

 

 

पोलीस दल परिसरात शोध घेत असतांना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पोलीस दलाने प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास गोळीबार सुरू होता. त्यानंतर परिसरात झडती घेतली. त्यावेळी एक AK47 आणि एक SLR शस्त्र सह दोन पुरुष माओवादी यांचे मृतदेह सापडले आहेत.

 

त्यापैकी एक कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी हा २०१९ मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. ज्यामध्ये गडचिरोली पोलिसांचे १५ पोलीस कर्मचारी शहीद झाले होते.

सदर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. अशी माहिती पोलसांनी दिली


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 14, 2023

PostImage

महिलांना व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे:भाग्यश्री ताई आत्राम कालीनगर येथे महिला सशक्तीकरण अभियान


महिलांना व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे:भाग्यश्री ताई आत्राम

कालीनगर येथे महिला सशक्तीकरण अभियान

 

मुलचेरा: समाजात वावरतांना आणि इतर विविध व्यवसाय करतांना महिलांना अनेक समस्या जाणवतात मात्र,त्यावर मात करून महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे, असे मत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केले.

मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिला सशक्तीकरण अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी अभियानाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार चेतन पाटील,विशेष अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बस्वराज मस्तोडी,जिल्हा पशू संवर्धन अधिकारी कुमरे,प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी एल बी जुवारे,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, कालीनगर चे सरपंच आकुल मंडल,सुंदरनगर चे सरपंच जया मंडल,गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम,ग्रा प सदस्य मीना हलदार,वनिता बसू, पोलिस पाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महिला उद्योजकांच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करायला हवा. महिलांकडून विकसित केले जाणारे व्यवसाय देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचप्रमाणे महिला स्वतःचा विकास करून इतर महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यास हातभार लावू शकतात. महिलांना सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने महिला सशक्तीकरण सारखे अभियान हाती घेतले आहे. शासन आणि प्रशासनाने पुढाकार घेतला असून आता महिलांनी देखील एक पाऊल पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथे घेण्यात आलेले हे दुसरे महिला सशक्तीकरण अभियान असून कालीनगर आणि अडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत लक्ष्मीपूर, विजयनगर,गांधीनगर,अडपल्ली माल आणि चेक अंतर्गत समाविष्ट गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महसूल विभाग,तालुका कृषी अधिकारी विभाग,पंचायत विभाग,वन विभाग,महिला व बाल कल्याण विभाग,शिक्षण विभाग,भूमी अभिलेख विभाग,आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग,उमेद बचत गट,बँक विभाग तसेच संजय गांधी योजना,सेतू व निवडणूक विभागाने स्टॉल लावून विविध योजनांची जनजागृती केली तसेच गरजूंना लाभ दिले.

उपस्थित मान्यवरांनी देखील महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी वाय पी भांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन तलाठी रितेश चींदम यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 14, 2023

PostImage

माता - शिशू मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून जेल मध्ये टाका


माता - शिशू मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून जेल मध्ये टाका 

 

शिवसेना पदाधिकारीऱ्यांची माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याकडे मागणी 

 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालयात गेल्या पाच महिन्यात प्रसृतीदरम्यान माता - शिशू मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करुन त्यांना जेलमध्ये टाका अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकारीऱ्यांनी माजी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्याकडे केली 

धानोरा तालुक्यातील कारवाफा येथील  साधना संजय जराते यांचेवर कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रीया करतांना डाॅक्टरांनी हलगर्जीपणा केला. त्यानंतर जिल्हा महिला रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करतांना साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी रुपेश वलके सोशल मीडिया जिल्हा प्रमुख तथा शिवसेना शहर संघटक यांनी शिवसेना पदाधिकारीऱ्यांसह माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याकडे केली 

माजी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्याकडे केलेल्या तक्रारीत शिवसेना पदाधिकारीऱ्यांनी यांनी म्हटले आहे की,  ८ डिसेंबरला डॉ. धीरज मडावी आणि त्यांच्या पथकाच्या हलगर्जीपणामुळे तब्बेत खालावल्याने साधनावर १० डिसेंबरला शासकीय महिला रूग्णालय,गडचिरोली येथे डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा शस्त्रक्रिया करताना साधना जराते या २३ वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यु झाला. व त्यांची १ आणि ४ वर्षाची मुले पोरकी झालीत. असे असतांनाही डॉ. माधुरी किलनाके यांनी नातेवाईकांना जवळपास अडीच तास या बाबतची माहिती दिली नाही. तसेच मृत्यूची घटना उघडकीस येवूनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दोषी डॉक्टरांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. दावल साळवे यांच्या कार्यकाळात शेकडो बालमृत्यू आणि मातामृत्यू झाल्याची प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यात केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेली असून त्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बेजबाबदार कार्यपध्दी कारणीभूत आहे. साधना संजय जराते हिच्या मृत्यूस कारणीभूत असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा महिला रूग्णालयाच्या डॉ. माधुरी किलनाके, शस्त्रक्रीया करणारे डॉ. धीरज मडावी यांना शासनाने तडकाफडकी निलंबीत करून त्यांचेवर हत्येचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि मृतक साधना जराते हिच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही आपण केली असल्याचे रुपेश वलके सोशल मीडिया जिल्हा प्रमुख तथा शिवसेना शहर संघटक यांनी दिली


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 14, 2023

PostImage

'त्या' तिहेरी निघृण हत्याकांडाचा पर्दाफाश,पोलीसांनी केले नऊ आरोपी जेरबंद


'त्या' तिहेरी निघृण हत्याकांडाचा पर्दाफाश,पोलीसांनी केले नऊ आरोपी जेरबंद

 

भामरागड : तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत दिनांक 06/12/2023 रोजी रात्रो देवु कुमोटी, वय 60 वर्षे, सौ. बिच्चे देवु कुमोटी, वय 55 वर्षे, कु. अर्चना तलांडी, वय 10 वर्षे या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापुन हत्या केल्याची बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

एकाच रात्री अज्ञात ईसमांनी तिघांचीही निघृन हत्या केल्याने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्या हादरला समाजातील सर्वच स्तरातुन सदर घटनेबाबत खेद व्यक्त करुन मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरीता मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य व तिव्रता लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल यांनी हा गुन्हा जलद गतीने उघड करण्याकरीता गुन्ह्राचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.  त्यावरुन नव्याने अपर पोलीस अधिक्षक अहेरी या पदाचा पदभार स्विकारणारे श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी, श्री. बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांनी त्यांचे तपास पथकासह पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे तळ ठोकुन सदरच्या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावुन आऱोपींना जेरबंद करण्याबाबत निर्देशीत केल्याने वरिल सर्व अधिकारी हे त्यांचे सहकारी अधिकारी व अंमलदारांसह पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे एकत्रीत येवुन अपर पोलीस अधिक्षक श्री. एम. रमेश यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पाच तपास पथक गठीत करण्यात आले. सदर पाचही तपास पथकांना गुन्ह्याशी निगडीत सर्व बाबींचा सखोल तपास होण्याकरीता वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली.

तपासादरम्यान फिर्यादीने रिपोर्ट देतेवेळी कोणावरही संशय अथवा त्याचे वडीलांचा वाद असल्याबाबतचे नमुद केले नाही परंतु फिर्यादी व त्याचा भाऊ शेतातुन परत येत असतांना अनोळखी दोन ईसमांनी त्याचे परिवारास घातपात करणार असल्याची घटनेच्या दोन दिवस पुर्वी धमकी दिली होती असे  रिपोर्ट दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी माहीती दिली. सदर बाब अत्यंत महत्वपुर्ण असतांना देखील फिर्यादी किंवा त्याचे कुटु्ंबीयांनी ही बाब लपवुन ठेवल्याने पोलीसांची संशयाची सुई फिर्यादी व मृतकांच्या कुटुंबीयाकडे वळली. मौजा गुंडापुरी येथील पोलीसांच्या गुप्त बातमीदारां मार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, मृतक देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी असुन तो जादु टोना करुन अनेक लोकांना आजारी पाडत असल्याने त्या लोकांचा पुढे मृत्यु होतो असा संशय मौजा गुंडापुरीतील व त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता परंतु पोलीसांच्या तपासात दिसुन आले की, नजिकच्या काळात या परिसरात जे व्यक्ती मृत्युमुखी पडले ते कँन्सर व अन्य गंभीर आजारांनी  ग्रस्त असतांना देखील त्यांचे नातेवाईकांनी त्यांना वैदयकिय उपचार न देता वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे नेल्याने त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड होवुन ते मृत्युमुखी पडले परंतु त्या मृतकांच्या नातेवाईकांचा मृतक देवु कुमोटी हा जादु टोना करीत असल्याची धारना असल्याने त्याचे बद्दल प्रचंड प्रमाणात रोष होता त्या संदर्भात गावात यापुर्वी दोन ते तिन वेळा पंचायत बोलावुन त्या पंचायत दरम्यान मृतक देवु कुमोटी यास त्याचेच नातेवाईक असलेल्या परिवाराकडुन समज  देण्यात आली होती.

लोकांच्या आजारपणास देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन मृतकाचे मुले 1) रमेश कुमोटी, 2) विनु कुमोटी (फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक 3) जोगा कुमोटी, 4) गुना कुमोटी, 5) राजु आत्राम (येमला), 6) नागेश उर्फ गोलु येमला, 7) सुधा येमला, 8) कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी, तसेच मृतकाचा जावई 9) तानाजी कंगाली, रा. विसामुंडी, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली यांनी कट रचुन मृतक देवु कुमोटी याचे डोक्यावर हातोडीने  जोरदार प्रहार करुन व मृतकाची पत्नी बिच्चे कुमोटी हिचा धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केली. घटनेच्या दिवशी मृतकाची नात कु. अर्चना तलांडी, रा. मरकल ही मृतकांसोबत असल्याने ती आपल्याला ओळखुन पोलीसांना माहीती देईल या भितीने आरोपींनी मागचा पुढचा विचार न करता तिचा देखील धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न होताच वरिल नमुद नऊ आरोपींना पोलीसांना अत्यंत शिताफीने जेरबंद केले.

सदर घटना आरोपींनी अत्यंत योजनाबध्द रित्या व थंड डोक्याने केली असुन घटनेतील आरोपी हे मृतकाचे जवळचे नातेवाईक असल्याने त्यांचेवर संशय घेवुन पोलीस तपास करीत असल्याने गावकऱ्यांनी देखील पोलीस यंत्रनेवर सुरवातीस नाराजी व्यक्त केली परंतु पोलीसांनी त्यांचा संयम न सोडता आरोपीतांच्या सर्व बारीक सारीक हालचालींवर पाळत ठेवुन वारंवार संशयतांकडे सखोल विचारपुस सुरु ठेवली त्यावरुन त्यांचेमध्ये बरीच मोठी तफावत दिसुन आल्याने पोलीस यंत्रनेकडुन सर्व गुंडापुरी वासीयांची बैठक घेवुन त्यांना संशयीत आरोपी कसे खोटे बोलुन पोलीसांची व गावकऱ्यांची दिशाभुल करीत आहेत हे पटवुन दिले. आरोपी वेळोवेळी वेगवेगळी माहीती देत असल्याने ते खोटे बोलत असल्याची गावकऱ्यांची देखील खात्री पटली अखेरीस सर्व संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन पोलीसांनी गुन्ह्यासंदर्भाने सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्ह्या केल्याचे निष्पन्न झाले.

सदर गंभीर व क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्ह्यात पोलीसांनी अत्यंत संयमाने व सातत्याने तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन नऊ आरोपींना जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 14, 2023

PostImage

जिल्ह्रातील नागरिकांनी केल्या 46 भरमार बंदुका पोलीस दलाच्या स्वाधिन


जिल्ह्रातील नागरिकांनी केल्या 46 भरमार बंदुका पोलीस दलाच्या स्वाधिन

 

पीएलजीए सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांकडून पोलीस दलाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद

 

 

दिनांक 02 ते 08 डिसेंबर दरम्यान माओवाद्यांकडुन राबविल्या जाणा­या पीएलजीए सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांचे नेतृत्वात माओवाद विरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून, या सप्ताहादरम्यान जिल्ह्रातील सर्व उपविभागांतर्गत पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या एकुण 46 भरमार बंदूका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्रात मोठ¬ा प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असत.  शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत.  अशा प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत.  दुर्गम-अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबींचा फायदा घेवून, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात.  याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने गडचिरोली पोलीस दलाकडे स्वाधिन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग कुरखेडा हद्दीतील 08, उपविभाग भामरागड हद्दीतील 03, उपविभाग पेंढरी कॅम्प कारवाफा हद्दीतील 02, उपविभाग सिरोंचा हद्दीतील 05, उपविभाग जिमलगट्टा हद्दीतील 02, उपविभाग अहेरी हद्दीतील 04, उपविभाग एटापल्ली हद्दीतील 07 व उपविभाग धानोरा हद्दीतील 15 अशा एकुण 46 भरमार बंदुका गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष उपविभागातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर स्वाधिन केल्या.  तसेच मागील वर्षी सन 2022 मध्ये एकुण 73 भरमार बंदुका जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष स्वाधीन केलेल्या होत्या.

याकरिता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 13, 2023

PostImage

संजय गांधी, आवण बाळ, विधवा परितक्या, अपंगत्व नागरीकांना लागणारी उत्पन्न मर्यादा २१,०००/- वरुन कमीतकमी ५०,०००/- करा


 संजय गांधी, आवण बाळ, विधवा परितक्या, अपंगत्व  नागरीकांना लागणारी उत्पन्न मर्यादा २१,०००/- वरुन कमीतकमी ५०,०००/- करा 

 

दीपक सावंत माजी आरोग्य मंत्री तथा पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्याकडे रुपेश वलके, शहर संघटक तथा सोशल मिडीया जिव्हा प्रमुख शिवसेना यांची निवेदनातून मागणी 

 

गडचिरोली: जिल्ह्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, अपंगत्व, विधवा परितक्या पात्र लाभार्थ्यांचे जननी सुरक्षा योजनेचे मार्च २०१२ पासून आतापर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे.

 संजय गांधी, श्रावण बाळ, विधवा परितक्या मध्ये पात्र लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा २१०००/- वरुन ५०,०००/- पर्यंत वाढवूर्ण लाभ देण्यात यावा. उपरोक्त सर्व लाभार्थ्यांना अंत्योदय साठी पात्र करून सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी  दीपक सावंत माजी आरोग्य मंत्री तथा पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्याकडे रुपेश वलके शहर संघटक तथा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवसेना यांनी निवेदनातून केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 13, 2023

PostImage

पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे लाक्षणिक उपोषण सुरू, राज्यभरातील शेकडो पत्रकारांचा सहभाग


पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे लाक्षणिक उपोषण सुरू, राज्यभरातील शेकडो पत्रकारांचा सहभाग

 

नागपूर : पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेल्या या उपोषणात राज्यभरातील पत्रकार सहभागी झाले आहेत.

पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळावी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्यात यावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० घरांची निर्मिती करण्यात यावी, दहा वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, यासह विविध १५  मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर उपोषण करण्यात येत आहे.

व्हॉईस आॕफ मीडिया" चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय कार्यकारीणी पदाधिकारी यांचे मार्गदर्शनात पत्रकार हल्लाविरोधी समितीचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन, व्हॉईस आॕफ मीडिया वर्धा जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, देवळी तालुकाध्यक्ष गणेश शेंडे, सेलु तालुकाध्यक्ष सचिन धानकुटे, किरण राऊत, मंगेश काळे, अनिल वांदीले यांचेसह व्हाॕईस आॕफ मीडियाचे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील  पदाधिकारी लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन दररोज लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. 

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी उपोषणकर्त्याचे स्वागत करून मागण्यांच्या पूर्तेतेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

आ. सत्यजित तांबे, आ. सुधाकर अडबाले, प्रकाश पोहरे यांची भेट

 

दरम्यान आज दिवसभरात नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, देशोंनातीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, व्हींडीएनएचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपोषण मंडपाला सदिच्छा भेट देत पाठिंबा दर्शविला. पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा केली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 13, 2023

PostImage

साधना जराते च्या मृत्यू प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा,‌ आमदार भाई जयंत पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी


साधना जराते च्या मृत्यू प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा,‌ आमदार भाई जयंत पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी 

 

 

गडचिरोली :  धानोरा तालुक्यातील मौजा कारवाफा येथील ढिवर समाजाच्या साधना संजय जराते यांचेवर कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रीया करतांना डाॅक्टरांनी हलगर्जीपणा केला. त्यानंतर जिल्हा महिला रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करतांना साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.

आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे केलेल्या तक्रारीत आमदार भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,  ८ डिसेंबरला डॉ. धीरज मडावी आणि त्यांच्या पथकाच्या हलगर्जीपणामुळे तब्बेत खालावल्याने साधनावर १० डिसेंबरला शासकीय महिला रूग्णालय,गडचिरोली येथे डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा शस्त्रक्रिया करताना साधना जराते या २३ वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यु झाला. व त्यांची १ आणि ४ वर्षाची मुले पोरकी झालीत. असे असतांनाही डॉ. माधुरी किलनाके यांनी नातेवाईकांना जवळपास अडीच तास या बाबतची माहिती दिली नाही. तसेच मृत्यूची घटना उघडकीस येवूनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दोषी डॉक्टरांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. दावल साळवे यांच्या कार्यकाळात शेकडो बालमृत्यू आणि मातामृत्यू झाल्याची प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यात केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेली असून त्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बेजबाबदार कार्यपध्दी कारणीभूत आहे. साधना संजय जराते हिच्या त्यामुळे ते सुद्धा मृत्यूस कारणीभूत असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा महिला रूग्णालयाच्या डॉ. माधुरी किलनाके, शस्त्रक्रीया करणारे डॉ. धीरज मडावी यांना शासनाने तडकाफडकी निलंबीत करून त्यांचेवर हत्येचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि मृतक साधना जराते हिच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 13, 2023

PostImage

गडचिरोलीत आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सह काँग्रेस नेत्यांनी घेतली आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट


गडचिरोलीत आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सह काँग्रेस नेत्यांनी घेतली आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट

 

 

नागपूर :: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर ४८ तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील जिल्ह्यातील समस्या आणि विकासकामाकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे पद रिक्त असून ते भरल्या जात नाही, औषधींचा योग्य साठा नाही, शस्त्रक्रियेसाठी साधन नाही अशा परिस्थितीत सरकारच्या निष्काळजी मुळे अशा घटना  जिल्ह्यात घडत आहे. 

 या संदर्भात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या कानावर माहिती घातली असता नाना पटोले यांनी तात्काळ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली व गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्याकडे विशेष प्राधान्याने लक्ष देऊन यावर तात्काळ  उपाय योजना करण्यात यावे अशी मागणी आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या कडे केली. 

यावेळी आमदार अभिजित वंजारी, आमदार धीरज लिंगाडे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते.

सोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर घेऊन, आरोग्य विभागात खाली असणाऱ्या पदाची तातडीने भरती करण्यात यावी, नियमित औषधी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील  करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 13, 2023

PostImage

कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली महाराष्ट्र महिला केसरी.…


कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली महाराष्ट्र महिला केसरी.…

 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय वडेट्टीवार मित्र परिवार व तालुका कुस्तीगिर संघ ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रम्हपुरी येथे तीन दिवसीय महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली.

आयोजित स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून 600 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी या कुस्ती स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त  महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना चांगलाच रंगला. यात कोल्हापूरची अमृता पुजारी हिने सामन्याच्या अंतीम क्षणी सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हीचा पराभव करीत महाराष्ट्र केसरीचा (दुसरा) किताबाची माळ आपल्या गळ्यात घातली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी किरण विजय वडेट्टीवार यांचेसह विजेत्यांचा सपत्नीक चांदीची गदा, रोख पारितोषिके, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

याप्रसंगी प्रामुख्याने किरण ताई वडेट्टीवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, ॲड. राम मेश्राम, डॉ. नामदेव किरसान, प्राचार्य जगनाडे, ब्रम्हपुरी नगराध्यक्ष रिता उराडे

काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, न. प. गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ.नितीन उराडे, कृउबा सभापति प्रभाकर सेलोकर तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी चे सर्व पदाधिकारी, कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 13, 2023

PostImage

जारावंडी ग्रामपंचायतीच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द,ग्राम पंचायतचे काम करणे पडले महागात,गमावले पद


जारावंडी ग्रामपंचायतीच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द,ग्राम पंचायतचे काम करणे पडले महागात,गमावले पद

 

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्याकरिता भावाचे ट्रॅक्टर लावून स्वतःच्या नावे धनादेश घेतला. त्यावर  ग्रामपंचायत सदस्याने आक्षेप घेतला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन संबंधित ग्रामपंचायत सदस्यास अपात्र केले.

दिलीप जीवन दास असे अपात्र ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. जारावंडी ग्राम पंचायत च्या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासह बाजारात गाळ भरण्यासाठी आपल्या भाऊ निर्मल जीवन दास यांचे ट्रॅक्टर (सीजी ०५ जी- ३२५३) किरायाने घेतले होते. एकूण ३५ हजार ५० रुपये इतक्या किरायाची
रक्कम सरपंच व सचिव यांनी दिलीप जीवन दास यांना धनादेशाद्वारे वितरित केली.

स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना व ट्रॅक्टर मालकीचे नसतानाही धनादेश उचलल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य मुकेश कावळे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली ग्रामपंचायत सदस्य दिलीप दास यांचा खुलास अमान्य करत त्यांना अपात्र केले.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जारी केले. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये नातेवाइकांच्या नावाखाली कामे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दणका बसला आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 13, 2023

PostImage

लोककल्याणकारी योजनांची माहिती घेऊन पुरेपूर लाभ घ्या: भाग्यश्री ताई आत्राम


लोककल्याणकारी योजनांची माहिती घेऊन पुरेपूर लाभ घ्या: भाग्यश्री ताई आत्राम

 

सिरोंचा नागरपंचयात तर्फे महिला सक्षमीकरण अभियान

 

सिरोंचा:महिलांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांचे सशक्तीकरण व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.केंद्र व राज्यसरकरच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती घेऊन महिलांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.१२ डिसेंबर रोजी सिरोंचा नागरपंचयात तर्फे महिला सक्षमीकरण अभियान घेण्यात आले.यावेळी या अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी नागराध्यक्ष फरजाना शेख,उपाध्यक्ष बबलू पाशा,नायब तहसीलदार जनक काळबाजीवार,संवर्ग विकास अधिकारी विलास घोडे,पोलीस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी, एमएससीईबी चे कार्यकारी अभियंता नरवडे,सभापती भवानी गनपूरपू,नगरसेविका पदमा भोगे, सपना तोकला,महेश्वरी पेद्दापल्ली,जगदीश रालाबंडीवार,सतीश भोगे,रंजित गागापूरवार,नरेश अलोने,इम्तिहाज शेख,राजू पेद्दापल्ली,वेंकटलक्ष्मी आरवेली,करुणा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पुरुषांसोबत महिलांनाही समान हक्क देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहे.त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले.भविष्यात प्रत्येक क्षेत्रात महिलांना समसमान हक्क असणार आहे.आपला परिसर आदिवासीबहुल भाग असल्याने विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपने राबविण्यात येत आहेत.मात्र,बरेच लोकांना या योजनांची विस्तृत माहिती नाही.त्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता विविध विभागाशी संपर्क करून त्या प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

सिरोंचा नागरपंचयात अंतर्गत एकूण १७ प्रभाग असून या प्रभागातील विविध गटातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण अभियान घेण्यात आले.या अभियानात उपस्थित मान्यवरांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.सदर अभियानात प्रत्येक विभागाकडून स्टॅल लावण्यात आले होते.आपापल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करून जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आले.या अभियानात १७ प्रभागातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड खान यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 12, 2023

PostImage

आष्टी येथील प.पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे नवीन वर्षात दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या.


आष्टी येथील प.पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे नवीन वर्षात दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या.

 

जास्तीत जास्त संख्येने भक्तगण उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्या - प. पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना अध्यक्ष अंकलू पेरकावार 

 

चामोर्शी (आष्टी) : नवीन वर्षात दारू सोडण्याचा संकल्प करा. दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, असा संदेश देत आष्टी येथील प .पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे आष्टी येथे दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी दुधाचे वाटप केले‌ जाणार आहे. 

आष्टी येथे नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर 'दारू सोडा संसार जोडा ' हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून दुध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प.पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष अंकलू पेरकावार यांनी केले आहे.

सर्वत्र नवीन वर्षाचं स्वागत अतिशय धुमधडाक्यात केलं जातंय. रात्री उशीरा अनेकांनी पार्टी करुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. तसंच रात्री झोपताना अनेकांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी संकल्पही करीत असतात. इकडे, आष्टीत नवीन वर्षानिमित्त व्यसनाला दूर लोटूया म्हणत व्यसनमुक्ती संघटनेकडून नवीन वर्षात दारु नाही तर दुध प्या म्हणत दुधाचं वाटप केलं जाणार आहे.

नवीन वर्षात दारू सोडण्याचा संकल्प करा. दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, असा संदेश देत व्यसनमुक्ती संघटनेतर्फे दुधाचे वाटप केले जाणार आहे. प.पु. शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्ती संघटनेतर्फे आष्टी शहरातील हनुमान मंदीर येथे दूध वाटप केले जाणार आहे असे प. पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष अंकलू पेरकावार यांनी सांगितले.

आष्टी शहरात प. पु. शेषराव महाराजांची पालखी काढण्यात येणार असल्याची माहिती प.पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष अंकलू पेरकावार यांनी दिली 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 12, 2023

PostImage

काळया रंगाची म्हैस दिसते लाल,म्हशीचा रंग पाहून लोकांना वाटते आश्चर्य


काळया रंगाची म्हैस दिसते लाल,म्हशीचा रंग पाहून लोकांना वाटते आश्चर्य

 

गडचिरोली जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित झालेली. फॅक्टरी म्हणजे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प. सुरजागड येथून कच्चामाल नेऊन विक्री होत आहे. रस्त्यावर लालच लाल जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचा धूळ लोकांच्या जीवाशी  खेळ खेळत आहे. आपल्या जीवाशी खेड चालू असताना असत्ताना आपण कपडे बदलवून अंगावरचे शरीरावरचे लाल भुकटीचा कलर  पुसून स्वच्छ करीत आहेत. मात्र, आज आपण मुक्या प्राण्यांनासुद्धा कलरिंग पहावयास मिळत असून, रस्त्याने जात असलेल्या म्हशीचा रंग लाल झाल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.
सुरजागड येथील एका म्हशीची फोटो ही त्या म्हशीला पकडून सर्वत्र ट्रोल केल्या जात आहे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या म्हशीला आणि सुरजागडमधील मार्गावर घरावर पडत असलेला धूड पडून लोकांना ऑक्सिजनचा त्रास होत आहे. लाल डस्ट नागरिकांचा नाका-तोंडात जात आहे. त्याकरिता पाण्याचा मारा केल्या जात आहे. पाणी भरपूर मारण्यात येत आहे. मात्र, आज मुके जनावर म्हशीचा रंग लाल झालेला दिसत आहे. काळ्या रंगाची म्हैस आज लाल रंगात दिसू लागलेली आहे. इकडे तिकडे चोहीकडे लालच लाल कलर दिसून येत आहे. हीच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील शोकांतिका काय असा ? प्रश्न आम जनता करीत आहे.या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लालच लाल कलरचा पाणी दिसून येत आहे. तसेच पावसाळा गेल्यानंतर सुद्धा कंपनीच्या वतीने पाणी मारण्यात येत आहे. पाणी जास्त झाल्याने काळ्या रंगाची म्हश लाल दिसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 12, 2023

PostImage

श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समिति गढ़चिरौली की ओर राहुल वैरागडे इनका सत्कार..!


श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समिति गढ़चिरौली की ओर  राहुल वैरागडे इनका सत्कार..!

 

श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समिति गढ़चिरौली ने राहुल वैरागडे का अभिनंदन किया..!

 

गढ़चिरौली - युवा संकल्प संस्था के माध्यम से जिले भर में खेल क्षेत्र को बढ़ावा देने के लिए गतिविधियों का कार्यान्वयन, समाज में स्वच्छता अभियान के तहत नागरिकों को जागृत करना, छात्रों को शिक्षा का दायरा बढ़ाने के लिए विभिन्न गतिविधियों के माध्यम से मार्गदर्शन करना, उल्लेखनीय छात्रों को अवसर देना, विभिन्न समस्याओं को उठाने के लिए काम करना प्रशासन के समक्ष किसानों की, सरकार की विभिन्न योजनाओं का लाभ नागरिकों तक पहुंचाना, स्वास्थ्य क्षेत्र में रक्तदान शिविर का आयोजन करना और युवाओं को रक्तदान के बारे में मार्गदर्शन करना, कोरोना काल में विभिन्न स्वास्थ्य क्लीनिकों के सामने हरी माचिस की तीलियाँ लगाना, सृजन कर नागरिकों का मार्गदर्शन करना लस्सी के बारे में जागरूकता, पीपीटी प्रोजेक्ट के माध्यम से जागरूकता, महिला सशक्तिकरण के बारे में। गांव और समाज में जागरूकता पैदा करना और महिलाओं को मौका देना,

कोलर्शिप के सन्दर्भ में छात्र के कई सवाल प्रशासन के सामने रखते हुए।

माता-पिता की मृत्यु किस कारण से हुई?

विद्यार्थियों को थकान से बचाने के लिए शिक्षा को बढ़ावा देने, अतिदुर्ग नक्सल प्रभावित जिले में विभिन्न गतिविधियों को क्रियान्वित करने के लिए गढ़चिरौली जिले में सदैव अग्रणी रहने वाली संस्था के अध्यक्ष श्री. श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समिति जिला गढ़चिरौली द्वारा आयोजित समाज प्रबोधन एवं कीर्तन कार्यक्रम में सत्यपाल महाराज के शिष्य समाज प्रबोधनकार कार्यक्रम से लाभान्वित हुए श्री दीपक महाराज भांडेकर (वर्धा)

10/12/2023 को सम्मान चिन्ह और फूलों का गुलदस्ता देकर सम्मानित किया गया।


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 12, 2023

PostImage

"त्या" गुन्हातील आरोपी अटकेत


"त्या" गुन्हातील आरोपी अटकेत

 

ब्रह्मपुरी:-  खेडमक्ता रोडवर वखार महामंडळाच्या गोदामासमोर एका मुलाचा मृतदेह आढळून आला.

सदर घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलिस निरीक्षक

अनिल जिट्टावार हे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले .

पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेले.

शवविच्छेदन अहवालानुसार मृतकाच्या गुप्तांगावर , छातीवर , व पोटावर  मार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी साक्षीदारांच्या नोंदविलेल्या बयानावरून व परिस्थितीजन्य पुराव्यावरून मृतकाचा मित्र रवी उर्फ रेवनाथ नानाजी सहारे याला अटक करून त्याचावर अप.क्र ६१२/२०२३ नुसार भांदवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटना ही दारू पिण्याच्या कारणांवरून घडली असून आरोपीने पवन धोटे याला जिवानिशी ठार मारून त्यास ओढत नेऊन रोडचे खाली नेऊन टाकले व तिथून निघून गेल्याचे कबूलीजबाबात सांगितले .

आरोपी रवी उर्फ रेवनाथ सहारे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर भांदवी कलम ३५३ आणि भांदवी कलम ३२४ सारखे गुन्हे दाखल आहेत .  

आरोपीला आज ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस.डी.चक्कर यांनी आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव कोडवते करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 12, 2023

PostImage

महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध


महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध 

 

प्रेक्षकांची अलोट गर्दी - दुसऱ्या दिवशी रंगला 224 लढतींचा महासंग्राम

 

ब्रह्मपुरी..

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ पर्वावर विजय वडेट्टीवार मित्र परिवार ब्रह्मपुरी व तालुका कुस्तीगीर संघ ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी येथे सुरू असलेल्या कुस्ती सामन्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 600 हून महिला कुस्तीपटूंनी  विद्यानगरी ब्रह्मपुरी गाठत आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला. तीन दिवसीय आयोजित स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एकूण 224 महासंग्राम चांगलाच रंगला. यात सहभागी स्पर्धकांनी आपला अनुभव व संपूर्ण ताकदीनिशी सामन्यात रंगत आणली. कुस्तीपटूंच्या विविध डावपेचांचा थरार उपस्थित दर्शकांनी अनुभवला. व ब्रह्मपुरीकर नागरिक मंत्रमुग्ध झाले.

आज सकाळपासूनच आयोजकांमार्फत नियोजित वेळापत्रकानुसार कुस्ती सामन्यांच्या लढती वयोगटांनुसार घेण्यात आल्या. यात 50 किलो 

सीनियर गटात 50 ते 72 किलो महिला महाराष्ट्र केसरी गटात 65 ते 76 किलो वजन गटात 132 लढती झाल्या. आयोजित स्पर्धेत बंकट यादव स्पर्धा प्रमुख तांत्रिक समिती, पंचप्रमुख नवनाथ ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेत न्याय दानाचे काम करत आहेत.

आज सकाळपासूनच महिला कुस्तीपटूंचे सामने बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 11, 2023

PostImage

आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी उमेश दुमाने


आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी उमेश दुमाने 

 

आरमोरी  शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश दुमाने  यांची आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरमोरी विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  (अजित पवार गट) पक्षाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी कृषी सभापती  जिल्हा परिषद गडचिरोली नानाभाऊ नाकाडे,यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा अध्यक्ष अनुज घोसे, तालुकाध्यक्ष दिवाकर गराडे यांच्या हस्ते उमेश दुमाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे दुमाने यांनी सांगितले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 11, 2023

PostImage

मोहफुलांपासून इथेनॉल निर्मिती करा : आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी


मोहफुलांपासून इथेनॉल निर्मिती करा : आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी 

 

 

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलापासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे उद्घाटन झाले. यावरून आज  औचित्याचा मुद्दा सभागृहासमोर चर्चिला जात असताना आमदार भाई जयंत पाटील यांनी मोहफुलापासून इथेनॉलची निर्मिती होत असेल तर शासनाने याचा विचार करावा, तसेच मोहफुलाचा व्यापार बाहेरील जिल्ह्यात करून तेथील आदिवासी बांधवाना आर्थिक उत्पन्न मिळवून द्यावे व तेथील नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून रोजगाराची स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी सभागृहात  केली.

राज्याचे उपमुख्य आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भाई जयंत पाटील यांच्या मागणीचे समर्थन करत यादृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त सबसिडीसह मोहफुलांवरील इथेनॉल निर्मिती उद्योगांना गडचिरोली जिल्ह्यात चालना देण्यात येईल असे आश्वासन दिले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 11, 2023

PostImage

रुपयासाठी बाबासाहेबांनी ब्रिटिशांना धारेवर धरले:भाग्यश्री ताई आत्राम


रुपयासाठी बाबासाहेबांनी ब्रिटिशांना धारेवर धरले:भाग्यश्री ताई आत्राम

 

भारतीय अर्थव्यवस्थेत डॉ बाबा साहेबांचे अर्थशास्त्रीय योगदान या विषयावर चर्चासत्र

 

अहेरी :- खडतर परिस्थितीत शिक्षण घेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाची समस्या हा प्रबंध सादर केला. लंडन मध्ये वास्तव्य करून ब्रिटिशांवर बोचरी टीका करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रबंध सादर केला. भारतीय रुपयासाठी ब्रिटिशांना धारेवर धरणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते असे मत माजी जि प अध्यक्ष व सिनेट सदस्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केले. 

एम्प्लॉइज फॉर पीपल्स अँड स्टूडेंट अहेरी कडून आयोजीत चर्चासत्रात त्या बोलत होत्या. भगवंतराव शिक्षण महाविद्यालय अहेरी येथे डा बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेत अर्थशास्त्रीय योगदान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विष्णू सोनवणे होते. प्रमुख वक्ते डा वामन गवई अमरावती, बाबाराव गायकवाड अमरावती होते. प्रमुख उपस्थिती मलय्या दुर्गे, देवाजी अलोणे यांची होते.महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

पुढे बोलताना बाबासाहेबांचा अर्थशास्त्रीय व्यासंग खूप मोठा आहे. म्हणूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. मुद्रे संदर्भात निर्णय घ्यायला एक स्वायत्त संस्था असावी अशी आग्रही भूमिका त्यांनी रुपयाची समस्या या ग्रंथात मांडली. आणि त्यातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची निर्मिति झाली हे कुणीही विसरू शकत नाही असे त्या म्हणाल्या. 

आयोजीत कार्यक्रमाचे संचालन महेश मडावी यांनी केले. प्रास्ताविकातून संघटनेची भूमिका आणि विषयाचे महत्व प्रा किशोर बुरबुरे यांनी समजावून सांगितले. आभार प्रा नामदेव पेंदाम यांनी मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य रतन दुर्गे,सुरेंद्र आलोने, संदीप सुखदेवें, आनंद आलोणे, अड पंकज दहागवकर इत्यादींनी घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 11, 2023

PostImage

क्रिकेट पिचवर भाग्यश्री ताई आत्राम यांची तुफान फटकेबाजी ,कुमरगुडा येथे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन


क्रिकेट पिचवर भाग्यश्री ताई आत्राम यांची तुफान फटकेबाजी ,कुमरगुडा येथे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन 

 

भामरागड:- सतत जनतेच्या संपर्कात राहून राजकीय मैदान गाजवणारे माजी जि प अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठचे विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली. आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यात क्रिकेटच्या मैदानात भाग्यश्री आत्राम उतरले. यावेळी समोर कोण गोलंदाज आहे ? हे न पाहता चौकार, षटकार मारले.

भामरागड तालुक्यात टेकला ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट अतिदुर्गम कुमरगुडा येथे नवयुवक क्रीडा मंडळ द्वारा आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे 10 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आश्रम यांनी क्रिकेट पिचवर तुफान फटकेबाजी करून युवा वर्गात उत्साह निर्माण केले.

दरम्यान गावात आगमन होताच गावकऱ्यांनी भाग्यश्री ताईंचे जल्लोषात स्वागत केले.या स्पर्धेसाठी दुर्गम भागातील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.कुमरगुडा येथे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार,सरपंच काजल धुर्वा,दाऊ मडावी,बोदी पुंगाटी, गोंगलु लेकामी,पदमा मेंगनवार आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 11, 2023

PostImage

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेवर कोनसरी परिसरातील ग्रामपंचायतीचा बहिष्कार


विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेवर ग्रा. पं. सोमनपल्ली, ग्रा. पं. कोनसरी, ग्रा.पं. जैरामपुर, ग्रा.पं. मुधोली तुकुम, ग्रा.पं. मुधोली चक नं.२.ग्रा.पं. दुर्गापुर, ग्रा. पं. अडयाळ, ग्रा. पं. गणपुर, या ग्रामपंचायतीचा बहिष्कार 

 

तहसीलदार यांना सरपंचांनी दिले निवेदन

भारत सरकारच्या योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राम स्वराज्य अभियान तसेच विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सरकारने केले आहे. संकल्प यात्रा विविध ग्रामपंचायत मध्ये येणार असुन त्याचे नियोजन करण्याचे पत्र शासनाने काढले आहे.

परंतु चामोर्शी तालुक्यातील ग्रा. पं. सोमनपल्ली, प्रा. पं. कोनसरी, ग्र. पं. जैरामपुर, ग्रा. पं. मुधलुो तुकुम, ग्रा.पं. मुधोली चक नं. २.ग्रा. पं. दुर्गापुर, ग्रा.पं. अडयाळ, ग्रा. पं. गणपुर, या ग्रामपंचायतीचे किंवा ग्रामस्थांचे कोणत्येही मत जाणून न घेता शेतक-यांची शेतजमिन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केले. जमीन अधिग्रहन करण्याबाबत शासन निर्णय पारित केला. यामुळे वरील ग्रामपंचायती मधील येणाऱ्या ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांचे या शासन निर्णयाला विरोध आहे. या प्रकरणाबाबत शासन ग्रामपंचायतीचे म्हणणं ऐकुन घेण्यास तयार नाही. यामुळे शासन प्रतिनिधी किंवा शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही असा निर्णय घेत आहेत.

तरी येत्या १३ डिसेंबर २०२३ पासून परिसरात येत असलेल्या मुख्यमंत्री महिला संशक्तीकरण व विकसित भारत संकल्प यात्रेत सर्व ग्रामपंचायती मधील नागरीक सहभागी होणार नाही. स्वागत करणार नाही. तसेच कसल्याही प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे निवेदन 

निलकंठ निखाडे सरपंच ग्रा.पं. सौमनपल्ली,श्रीकांत पावडे सरपंच ग्रा. पं. कोनसरी यांच्यासह परिसरातील सरपंचांनी दिले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 10, 2023

PostImage

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले निकाली


राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले निकाली

 

 

गडचिरोली,(जिमाका)दि.10 : न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा विचार करता. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी मामल्याकरीता राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 104 प्रलंबित आणि 196 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले आणि रुपये 3,14,53,699/- वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरुपाच्या प्रकरणामध्ये एकुण 76 प्रकरणे गुन्हा कबूली द्वारे निकाली काढण्यात आले. 
मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणापैकी एकुण 197 प्रकरणे निकाली व रक्कम 1,19,580 /- वसुली करण्यात आली.
    एका वैवाहिक वादाच्या प्रकरणात पती-पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख व  सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल यांनी समस्त न्यायाधिश वृंद यांचे उपस्थितीत उभयतांचा साडी-चोडी व शेला देवून सत्कार केला. जिल्हा व सत्र न्यायाधिश  तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यु.बी. शुक्ल व  सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते..
त्याचप्रमाणे मोटार अपघात नुकसान भरपाई च्या एका प्रकरणातील अर्जदार ही मयत इसमाची वयोवृध्द आई  होती.त्यांना त्यांचे नातेवाईक वाहनाने न्यायालयात घेवून आले होते. परंतु त्यांना चालता येत नसल्याने न्यायालयात पहिल्या मजल्यावरील पॅनल समोर उपस्थित राहता येत नव्हेते.त्यावर जिल्हा न्यायाधिश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश तथा पॅनल प्रमुख मुधोळकर  यांनी स्वत:न्यायालयाबाहेर येवून त्या वाहनाजवळ जावून सदर अर्जदार महिलेस तडजोडीचे मुद्दे समजावून सांगितले व पडताळणी केली.मा.न्यायाधिश या संवेदनशीलतेबाबत पक्षकारांनी व उपस्थितांनी समाधान व्यकत केले व न्याय आपल्या दारी या उक्तीचा सर्वाना प्रत्यय आला.
अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर.आर.पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. 
    जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांनी पॅनल क्र01 वर काम पाहिले, पॅनल क्र02 वर एस.पी सदाफळे , दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी, पॅनल क्र.03 वर सहदिवाणी न्यायाधिश (क-स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) सी.पी. रघुवंशी यांनी काम पाहिले.
    दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषित करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.प्र.सं.कलम 256, 258 अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता श्रीमती.एन.सी.सोरते, तृतीय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायादंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांचे न्यायालयात कार्यरत होते.
    तसेच पॅनल क्रमांक 01 मध्ये सदस्य म्हणून विधी स्वयंसवक नरेंद्र मोटघरे, पॅनल 02 मध्ये सदस्य म्हणून विधी स्वयंसवक लुकेश सोमनकर, ,पॅनल क्रमांक 3 मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वंयसेविका स्नेहल चरडूके  यांनी काम केले.
    सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली च्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
00000


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 10, 2023

PostImage

दिव्यागांसाठी आहेरीत भरला वधु-वर परिचय मेळावा ,भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले उदघाटन


दिव्यागांसाठी आहेरीत भरला वधु-वर परिचय मेळावा ,भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले उदघाटन

 

अहेरी: वधु-वर परिचय मेळावा हे आपण नेहमीच ऐकले असेल. मात्र, आहेत नगरीत एका आगळा-वेगळा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा वधू-वर परिचय मेळावा तुमच्या- आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी नव्हता तर हा होता दिव्यांग बांधवांसाठी. आस्था बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट,वरोरा द्वारा संचालित स्व.गौरव बाबू पुगलिया दिव्यांग उपवर-वधू सूचक केंद्र वरोरा, दिव्यांगन एकता संघटना अहेरी तर्फे १० डिसेंबर रोजी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या वधू-वर परिचय मेळाव्याचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अमोल मुक्कावार,प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष धार्मिक भगत,भोयर व राकेश कारेंगुलवार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपवर-वधू परिचय मेळाव्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग मुलं-मुलींनी परिचय दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या रेशीमगाठी जुळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.सर्वसामान्य व्यक्ती त्याचा साथीदार शोधण्यासाठी दूरवर जाऊ शकतो, समाजातील इतर लोकही त्यांना साथीदार मिळवून देण्यासाठी मदत करतात. मात्र, आमच्यासारख्या उपेक्षित दिव्यांगांना त्यांचा साथीदार शोधण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे अशा आयोजनाची नितांत गरज असल्याचे मत दिव्यांग मुलं-मुलींनी व्यक्त केला.

*माता कन्यका परमेश्वरी मंदिरात आयोजन*

आस्था बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ही संघटना दरवर्षी दिव्यांगांसाठी वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करते. या वर्षी माता कन्यका परमेश्वरी देवस्थान,अहेरी येथे या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते.या परिचय मेळाव्यातून लग्नगाठ जुळत असल्याने दिव्यांग मुलं-मुली मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 10, 2023

PostImage

ग्रामीण भागातील खेळाडूंना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल किट दिली भेट!!


ग्रामीण भागातील खेळाडूंना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल किट दिली भेट!!

 

एटापल्ली : तालुक्यातील मैजा येथील युवकांना क्रिकेट, बॅडमिंटन,फुटबॉल,टेनिससह आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत.त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना 

क्रिकेट,बॅडमिंटन,फुटबॉल,टेनिस सह आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत.त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना नाहीच नाही.त्यामुळेच गुणवत्ता असूनही केवळ पैसा नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू मागे राहतात.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना परवडेल असा खेळ खेळण्यास भाग पाडणे आवश्यक आहे.

अशा"या"खेळाडूंना परवडणारा व्हॉलीबॉल हा खेळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.मुंबईत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक व्हॉलीबॉल स्पध्रेत हीच मुले-मुली आपले कौशल्य दाखवत आहेत.या"निमित्ताने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी व्हॉलीबॉल किट भेट देण्यात आली.

जिल्ह्यातील खेळाडू खेळामध्ये मागे नाहीत मात्र खेळ शिकण्यासाठी खेळाचे साहित्य आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना खेळाचे साहित्य नसल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग खेळामध्ये मागे आहेत.प्रत्येक युवकांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे.याहेतूने व्हाॅलीबाॅल किट भेट देण्यात आल्याचे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 10, 2023

PostImage

मृदा जलसंधारण मंत्रालय मुंबई चे सचिव सुनील चव्हान यांनी दिली मार्कंडादेव मंदिर समुहाला भेट


 

मृदा जलसंधारण मंत्रालय मुंबई चे सचिव सुनील चव्हान यांनी दिली मार्कंडादेव मंदिर समुहाला भेट

 

मार्कंडादेव:- चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव तेथील मार्कंडादेव मंदिर समुहाला मंत्रालयातील मृदा जलसंधारण सचिव मा.सुनील चव्हाण यांनी काल शणीवारी भेट दिली त्यांना मार्कंडादेव मंदिरा बद्दल मार्कंडादेव येथी छबिलदास सुरपाम यांनी मंदिर समुहाची संपुर्ण माहीती दिली त्यांच्या सोबत मृदा जलसंधारण चे अधिक्षक अंभीयता नितीन धुसाने,जिला जलसंधारण अधिकार पि.एम.ईगोले, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी विभाग महेश कारेंगुलवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी पुल्लावार,उपविभागीय जलसंधारण अधिकारी चामोर्शी मडावी व जलसंधारण अधिकारी अंकुश दहेलकर,आदि मान्यवर यावेळी ऊपस्थीत होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 10, 2023

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी युनियनचे आमदार भाई जयंत पाटील यांना निवेदन


 

गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी युनियनचे आमदार भाई जयंत पाटील यांना निवेदन.

 

 

 गडचिरोली दि.९:- महाराष्ट्र प्रादेशीक पक्षाच्या वतीने गडचिरोली येथे उलगुलान महासभेचे आयोजन केले होते.या सभेकरीता शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील गडचिरोलीत आले होते.

   सध्या महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील मागण्याचे निवेदन आमदार भाई जयंत पाटील यांना देण्यात आले.या विषयावर विधानपरिषद बोलण्याचे आश्वासन आमदार भाई जयंत पाटील यांनी दिले.

निवेदन देताना युनियनचे सदस्य व कर्मचारी  भारती रामटेके, मनीषा जुमरे, वेणुताई खोब्रागडे, विशाखा उराडे, दिपा मेश्राम, सुशीला खोब्रागडे, ममता धकाते,जयश्री मेश्राम, वैशाली कांबळे, अल्का देशमुख, मनीषा रासेटीवार,निर्मळ खोळवे इत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस होत्या.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 10, 2023

PostImage

सिरोंचा: टेकडातल्ला येथे सोनिया गांधी यांचा वाढदिवस चिमुकल्यांसह केक कापून साजरा


सिरोंचा: टेकडातल्ला येथे सोनिया गांधी यांचा वाढदिवस चिमुकल्यांसह केक कापून साजरा

 

गांधी कुटुंबीयांनी देशाची सेवा स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन केली आहे - रवी बारसांगडी सामाजिक कार्यकर्ता

 

सिरोंचा: तालुक्यातील जाफराबाद येथे रवि बारसांगडी यांनी आपल्या स्वतःच्या घरी दिनांक ९ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीचा टेकडाल्ला गावातील सर्व चिमुकल्यांसह केक कापून साजरा केला. यावेळी चिमुकल्यांना अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी बोलताना बारसांगडी म्हणाल्या, गांधी कुटुंबीयांनी देशाची सेवा स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन केली आहे. सोनिया गांधी यांच्या त्यागाची भूमिका ही खूपच मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आज सोनिया गांधी यांचा वाढदिवस हा गावातील चिमुकल्यांसह साजरा करण्याचा माझा मानस होता. जाफराबाद येथील आपल्या स्वतःच्या घरी  सर्व गावातील चिमुकल्यांसह केक कापून वाढदिवस साजरा केला.

यावेळी या सर्व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा होता.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीने सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा केला.

त्यामुळे या सर्व चिमुकल्यांचा आशीर्वाद सोनिया गांधी यांना मिळणार आहेत.

माझ्याकडून देखील सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते,

असे मनोगत बारसांगडी यांनी व्यक्त केले.

यावेळी ए बि के न्युजचे वार्ताहर साईनाथ दुर्गम, आर्टिकल न्युजचे संपादक आनंदराव अशा,टेकडात्ला येथील देशोन्नतीचे वार्ताहर शेखर तानीर आणि गावातील चिमुकल्यांसह गावकरी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 9, 2023

PostImage

अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढत राहू: आमदार भाई जयंत पाटील


अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढत राहू: आमदार भाई जयंत पाटील

 

गडचिरोली,ता.९: बेकायदेशीर लोहखाणींचा विरोध करणाऱ्या आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, तुम्ही किती लोकांवर गोळ्या झाडणार आहात, असा सवाल करीत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला.

प्रागतिक पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीतर्फे आज गडचिरोली येथील अभिनव लॉनवर आयोजित उलगुलान सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ भाकप नेते कॉ.तुकाराम भस्मे, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, माकप नेते कॉ.अमोल मारकवार, कॉ.देवराव चवळे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, रोहिदास राऊत, अशोक निमगडे, बीआरएसपीचे प्रदेश सचिव विजय  श्रुंगारे, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शेकापच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शिला गोटा उपस्थित होते.

आदिवासींनीच जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण केल्याने तोच नैसर्गिक संसाधनांचा मालक आहे. परंतु कुठलाही प्रकल्प उभारताना किमान ३५ टक्के जंगल राखीव ठेवण्याचे बंधन संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक बँकेने घालून दिले असताना गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशीर लोहखाणी निर्माण केल्या जात आहेत. शिवाय या माध्यमातून आदिवासींचे उपजीविकेचे साधन हिरावले जात आहे. मात्र, या विरोधात आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविले जाते. हे आता खपवून घेणार नाही, असा इशारा आ.जयंत पाटील यांनी दिला. आदिवासी, दलित आणि ओबीसींच्या समस्या आपण विधिमंडळात मांडू, असेही त्यांनी सांगितले.

भाकप नेते कॉ.तुकाराम भस्मे म्हणाले की, पीक विमा कंपन्या हजारो कोटींनी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. परंतु सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हे सरकार भांडवलदारांची बाजू घेणारे सरकार असून,ते गोरगरिबांची बाजू घेईल, या भ्रमात राहायला नको.सरकार हीच आमची समस्या झाली आहे, अशी टीका भस्मे यांनी केली.

याप्रसंगी शेकाप नेते रामदास जराते, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, माकप नेते अमोल मारकवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रवीण खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते हरीश उईके यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन हेमंत डोर्लीकर, तर आभार प्रदर्शन विनोद मडावी यांनी केले.

महामोर्चाला परवानगी नाकाली, तरीही सभेला गर्दी

प्रागतिक पक्षांच्या आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार होता. परंतु प्रशासनाने या महामोर्चाला परवानगी नाकारुन केवळ सभेला परवानगी दिली. असे असतानाही ठिकठिकाणातून शेकडो महिला आणि पुरुषांनी सभेला हजेरी लावली होती.

………………………….


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 9, 2023

PostImage

शहरातील दुकानदारांनी मराठी पाट्यांचे बोर्ड लावा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगर पंचायत चामोर्शी येथील दुकानावर व आस्थापणावर मराठी भाषेतील पाट्या लावण्याबाबत निवेदन देण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 25/11/2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दुकान व आस्थापणावर मराठी पाट्या लावणे बंधनकारक असताना सुद्धा चामोर्शी शहरात अनेक दुकानावर व आस्थापनावर ठडक मराठी भाषेत  पाट्या लागलेले नाही हे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान व मराठी भाषेचा अवमान आहे...त्या अनुषंगाने जर येत्या 3-4 दिवसा मध्ये नगर पंचायत चामोर्शी तर्फे अश्या दुकानदारांवर कोणती कडक कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे जनआंदोलन उभे करू असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले....यावेळी चंद्रकांत पिपरे (चामोर्शी तालुका अध्यक्ष),अंकुश संतोषवार,शुभम भांडेकर(तालुका उपाध्यक्ष), शुभम भांडेकर(शहर अध्यक्ष),आकाश नेवारे(शहर उपाध्यक्ष),अभिषेक कोत्तावार(तालुका संघटक),सारंग भांडेकर(मनविसे तालुका अध्यक्ष),संतोष राजकोंडावर व ईतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते…


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 9, 2023

PostImage

आश्रम शाळा पूर्वत सुरू करा; विध्यार्थांचे शैक्षणिक नुकसान, निवेदनातून मागणी


आश्रम शाळा  पूर्वत सुरू करा; विध्यार्थांचे शैक्षणिक नुकसान, निवेदनातून मागणी 

 

"माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्मंडळानी समस्या बाबत सविस्तर पणे चर्चा

 

अहेरी : तालुक्यातील व्येंकटापूर येथील शासकीय आश्रम शाळा येथील इयत्ता 1 ते 4 वर्ग सन 2016 ला बंद झाले होते.येथील शाळा बंद झाल्याने त्या परिसरातील गावातील आदिवासी विध्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती नुकसान होत आहे.

इयत्ता 1 ते 4 म्हणजे लहान मुली मुलांचे प्रगतीचे पहिले पाऊल असलेल्या जर बंद असल्यास त्या परिसरातील लोकांची सुद्धा फसवणूक होत आहे.

इयत्ता 5 ते 10 वर्गांची शैक्षणिक परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती आहे.शासकीय आश्रम शाळा व्येंकटापूर शाळा पूर्ण पणे बंद आहे.याची कारण हजर विध्यार्थ्यांचे योग्य लक्ष न देणे.विशेष म्हणजे त्या शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी हे मुलांना शिवीगाळ करणे व तेथील शिक्षक वर्ग नेहमी गैर हजर राहणे.शाळांना शनिवारला शाळा सोडून घरी जाणे.परत मंगळवारला येणे.व विध्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे.अशा कारणाने शाळेची पटसंख्या कमी होत गेली.

या सर्व कारनाणे त्या शाळेतील मुख्याध्यापक - शिक्षक - कर्मचारी'' त्यांच्यावर योग्य' कार्यवाही करून' शाळा' पुर्ववत सुरू करावी.पट संख्यात वाढ करण्यासाठी  गावकऱ्यामार्फत आश्वासन देत  गावकरी व सरपंच, पोलिस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिका १००%टक्के योगदान देतील.व ग्राम पंचयतीमध्ये ठारव घेण्यात येईल असे सांगितले.

आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तालुका दंड अधिकारी तथा सहायक प्रकल्प अधिकारी श्री.वाघमरे साहेब आदिवासी विकास विभाग यांची भेट घेवून चर्चा केली.

 

यावेळी अहेरीचे माजी सभापती भास्कर तलांडे,जि.प.माजी सदस्य अजय नैताम,सरपंच अक्षय पोरतेट,उपसरंपच चिरंजीव चीलवेलवार,माजी सरपंच मारोती मडावी,माजी सरपंच अशोक येलमुले,वासुदेव सिडामसह आदी उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 8, 2023

PostImage

गुंडापुरीत आजी, आजोबा,नात यांची अज्ञातांनी केली हत्या


गुंडापुरीत आजी, आजोबा,नात यांची अज्ञातांनी केली हत्या 

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गुंडापुरी या दुर्गम गावात आजी-आजोबासह त्यांच्या १० वर्षीय नातीची हातोड्यासारख्या वस्तूने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना‌ ७ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृत पती-पत्नी धान कापणीच्या कामासाठी सध्या शेतातच राहायला आले होते. त्यांची १० वर्षीय नात आजी-आजोबांना भेटण्यासाठी आली होती. हे तिघेही मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस मदत केंद्र येमली बुर्गी अंतर्गत गुंडापुरी गावातील शेतात देऊ दसरू कुमोती (60 वर्ष), त्यांची पत्नी बिच्छे देऊ कुमोती (55 वर्ष) आणि त्यांची नात अर्चना रमेश तलांडी (10 वर्ष) हे शेतातील झोपडीत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले.

या तिहेरी हत्याकांडाचा नक्षलवाद्यांशी संबंध असण्याची शक्यता नसून नात्यांमधील वादातून हे हत्याकांड घडले असण्याची शक्यता पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केली.

कुमोती दाम्पत्य धान कापणी आणि मळणीच्या कामासाठी सध्या त्यांच्या शेतातच राहात होते. त्यांचे मृतदेह पोलिस मदत केंद्र येमली बुर्गी येथे आणण्यात आले असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत. लवकरच आरोपींना अटक होण्याचीही शक्यता आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 6, 2023

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इंकमिंग सुरूच,विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे भाग्यश्री ताई यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून केले स्वागत


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इंकमिंग सुरूच,विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे भाग्यश्री ताई यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून केले स्वागत

 

सिरोंचा:कॅबिनेट मंत्री यांच्या विकास कामांचा धडाका आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा जनसंपर्क बघून अहेरी विधानसभेतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इंकमिंग सुरु आहे.नुकतेच सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले.

 

धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश आला आहे.विशेष करून अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात त्यांचा विशेष लक्ष असून विकास कामांचा धडाकाच लावला आहे.सोबत या भागातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भाग्यश्री ताई आत्राम सतत धडपडत असून त्यांनी अहेरी विधानसभेवर चांगलीच पकड तयार केली आहे.नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा प्रत्यय सुद्धा आला.पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली त्यात त्यांना चांगलं यश सुद्धा मिळालं.

 

सध्या अहेरी विधानसभेत भाग्यश्री ताई यांची जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी ताईंनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत केले.यावेळी राकॉचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी तसेच आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 5, 2023

PostImage

अहेरी येथून विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेला प्रारंभ; आष्टीत जल्लोषात स्वागत


अहेरी येथून विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेला प्रारंभ; आष्टीत जल्लोषात स्वागत 

 

चामोर्शी: अहेरी येथून स्वतंत्र विदर्भ राज्य विदर्भ मिशन 2023 अंतर्गत ‘विदर्भ मिळवू औंदा’ विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेला स्व. राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज चौकाततून प्रारंभ करण्यात आला. यावेळी सर्व विदर्भ प्रेमी एकत्रित होऊन विठ्ठल रखुमाई मंदिर आवारात असलेल्या स्व. राजे विश्‍वेश्‍वरराव महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून वेगळ विदर्भ राज्य मिळविणारच अशी घोषणा देऊन संकल्प यात्रेच्या रथाला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. व तालुक्यातील आष्टी येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती जनजागरण यात्रेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

स्व. राजे विश्‍वेश्‍वरराव महाराजांचा वेगळ्या विदर्भाचा स्वप्न होता. त्यासाठी मरेपर्यंत त्यांनी नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात लढा दिला. त्यांच्या निधनानंतर ही त्यांची प्रेरणा घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुढचा विडा उचलला आहे. विकास, निधी, विदर्भातील तरुणांच्या हाताला रोजगार, शेतकर्‍यांना सिंचन व विजेची हमी, रस्ते व हक्काच्या नोकर्‍यांवर अधिकार मिळवून विदर्भाचे मागासलेपण नवीन विदर्भ राज्य निर्मितीमुळे दूर होऊ शकते. त्यामुळेच विदर्भाच्या स्थायी विकासासाठी एकमेव पर्याय म्हणजे वेगळा विदर्भ राज्य निर्मिती असल्याचे माजी आमदार वामनराव चटप यांनी यावेळी सांगितले.

 

 नागपूर करारानुसार महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर विदर्भाच्या जनतेला विकासाच्या मूलभूत सोयी व निधी पाहिजे त्या प्रमाणात न मिळाल्याने 19 ऑक्टोबर 1957 ला धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज यांनी नाग विदर्भ आंदोलन समिती काढून वेगळ्या विदर्भाची ज्योत लावली होती. याची धग आता पेटली असून 31 डिसेंबरपर्यंत ’विदर्भ घेऊ किंवा जेल जाऊ’ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार निर्मिती घेऊन बेरोजगारांचे स्थलांतर थांबवू अशी भूमिका घेऊन विदर्भ जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह अहेरीतून संकल्प यात्रेला शुभारंभ करून रणसिंग फुंकले आहे. 

यावेळी समितीच्या महिला अध्यक्ष रंजना मामुर्डे, समितीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर गेडाम, जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, दिवाकर कुंदोजवार ग्रामपंचायत सदस्य आष्टी,शंकर पाटील मारशेट्टीवार, सेवानिवृत्त मंडळधिकारी सत्यवान भडके, शेखर खर्डीवार, महेंद्र बाबा आत्राम,अरुण शेडमाके, विजय खर्डीवार, साईनाथ अप्पनवार, विजय बहिरेवार,यासह नागरिक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 5, 2023

PostImage

कोनसरी परिसरातील जमिनींचे भूमी अधिग्रहण रद्द करा - परिसरातील सरपंचांचे ना. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन


कोनसरी परिसरातील जमिनींचे भूमी अधिग्रहण रद्द करा

- परिसरातील सरपंचांचे ना. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन

प्रतिनधी/ चामोर्शी: महाराष्ट्र शासनाने कोनसरी परिसरातील कोनसरी, जैरामपूर, मुधोली चक नं. 1, मुधोली चक नं. 2, पारडीदेव आणि सोमनपल्ली या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमिन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र भुमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी संकटात येणार असल्यामुळे सदर भूमी अधिग्रहण रद्द करण्यात यावे, अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाने भूमि अधिग्रहणाचा आदेश काढलेला असून 898.8422 हेक्टर आर जमिनीपैकी काही क्षेत्र लाॅयड्स मेटल कंपनी आणि काही क्षेत्र वरात इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमध्ये विभागणी करून देण्यात येणार आहे. परंतु अधिग्रहीत करण्यात येत असलेली जमिन ही या परिसरातील शेतकÚयांच्या चरितार्थाचे एकमेव साधन आहे. या निर्णयामुळे सबंधित शेतकरी संकटात सापडणार आहेत. यामुळे शासनस्तरावर या प्रकरणाची चैकशी करून अधिग्रहण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतांना ग्रा.पं. कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, सोमनपल्ली ग्रा.पं. चे सरपंच तथा ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे चामोर्शी तालुका अध्यक्ष निलकंठ पा. निखाडे, उपसरपंच निलेश मडावी, मुधोली चक नं. 2 च्या सरपंचा अश्विनी रोशन कुमरे, उपसरपंच किशोर खामनकर, जैरामपूर ग्रा.पं. च्या सरपंचा दिपाली सुधीर सोयाम, उपसरपंचा छाया सिताराम भोयर, मुधोली चक नं. 1 च्या सरपंचा शकुंतला रवींद्र डेकोटे, उपसरपंच दिलीप वर्धलवार, सोमनपल्ली ग्रा.पं. चे सदस्य निनाद देठेकर, अरूण बंडावार, दिलीप मानापुरे, सचिन बारसागडे, प्रशांत पावडे, संजय कुमरे, बापुजी भोगेकर, रविंद्र कावडे, लक्ष्मण मोहुर्ले, राजु चनेकार, बंडु गुरनुले, दशरथ पोतराजवार, दुर्गा चनेकार आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 5, 2023

PostImage

ग्रामस्थ आक्रमक, भूमी अधिग्रहणाच्या विरोधात गावात प्रवेश बंदीचे लागले बॅनर - सोमनपल्लीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा


ग्रामस्थ आक्रमक, भूमी अधिग्रहणाच्या विरोधात गावात प्रवेश बंदीचे लागले बॅनर

- सोमनपल्लीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

प्रतिनधी/ चामोर्शी: महाराष्ट्र शासनाने कोनसरी परिसरातील कोनसरी, जैरामपूर, मुधोली चक नं. 1, मुधोली चक नं. 2, पारडीदेव आणि सोमनपल्ली या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमिन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र भुमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला आहे. या विरोधात बाधित गावातील नागरीक आक्रमक पवित्रा घेत असून गावांमध्ये शासनाचे प्रतिनिधी व कंपनीच्या प्रतिनिधींना प्रवेश निषिध्द असल्याचे बॅनर लावले आहे. 

आज 5 डिसेंबर रोजी सोमनपल्ली येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी या भूमी अधिग्रहणाला तिव्र विरोध केला. या विषयावर आम्हाला कोणतीही चर्चा नको, कोणताही प्रकल्प नको यामुळे शासनाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी किंवा कंपनीच्या प्रतिनिधींना गावात प्रवेश नाही अशी भूमीका ग्रामस्थांनी घेतलेली आहे.

सोमनपल्ली सह कोनसरी, मुधोली चक नं. 2, मुधोली तुकूम, जैरामपूर या गावांनी आपआपल्या गावातील मुख्य रस्त्यांवर बॅनर लावून सदर प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष वेधून घेतले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 5, 2023

PostImage

भविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार:मंत्री धर्मराव बाबा आत्राम, लगाम येथे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जाहीर सत्कार


भविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार:मंत्री धर्मराव बाबा आत्राम,

 

लगाम येथे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जाहीर सत्कार

 

मुलचेरा:महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले.विशेष म्हणजे राज्याला देवेन्द्र फडणवीस, अजित पवार सारखे अनुभवी नेते लाभले आहे.त्यामुळे महराष्ट्रात न भूतो न भविष्य असा विकास कामांचा सपाटाच सुरू आहे.राज्य सरकारचा गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष असून भविष्यात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

 

मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम दरम्यान ते बोलत होते.यावेळी माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,राकॉ चे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,श्रीनिवास गोडशेलवार,राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार,लगामचे सरपंच दीपक मडावी,येल्लाचे उपसरपंच दिवाकर उराडे, माजी प स सभापती नामदेव कुसनाके,प्राचार्य शैलेंद्र खराती,ग्रा प सद्स्य सुशील खराती,जेष्ठ कार्यकर्ते जोगदास कुसनाके,महादेव सिडाम,ग्रा प सदस्य रीना मुजुमदार,उमा आत्राम,वेदिका गनलावार,राजू पम्बालवार तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पुढे बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण जगात भारत देशाचा डंका वाजत आहे.येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे याही पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.रोजगार,शिक्षण आणि सिंचन हे माझे स्वप्न असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.एवढेच नव्हेतर होणाऱ्या विविध विकास कामांचे कुणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला ते चांगल्याप्रकारे कळते असा विरोधकांना टोलाही लगावला.

 

धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर विदर्भातील विविध भागात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन खाते व गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व असल्यामुळे सध्या ते व्यस्त आहेत.मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते ४ डिसेंबर रोजी मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील जाहीर सत्कार कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारले.

 

फटाक्यांचा आतषबाजी करत जल्लोषात स्वागत

जाहीर सत्कार कार्यक्रम प्रसंगी लगाम येथे आगमन होताच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांचा आतषबाजी करत ना.धर्मराव बाबा आत्राम यांचा जंगी स्वागत केले. तर,मंचावर भला मोठा हार गळ्यात टाकून "धर्मराव बाबा आगे बढो हम तुम्हारे साथ है" अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 5, 2023

PostImage

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने 'नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर'' द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन संपन्न.!!


माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने 'नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर'' द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन संपन्न.!!

 

 

*मुलचेरा* :- तालुक्यातील शांतिग्राम ग्रामपंचायत अंतर्गत कांचनपूर येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ''नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर''यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे जिल्हा परिषद गडचिरोली हे होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.

 

या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून श्री.खेवले सर मुख्याध्यापक राजे धर्मराव हायस्कूल लगाम,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.बासू मुजुमदार उपसभापती पंचायत समिती मूलचेरा,प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,वैष्णव ठाकूर,शुभास सरकार,दयाल मंडल,निताई सरकार ,सरजित मंडल,सुशांत समदार,सपन मजुमदार,संजय रॉय,प्रश्नजीत रॉय,असीम मजुमदार,रत्नेस्वर बाईन,पिंकू मंडल,चंदन मिस्त्री हे होते.

 

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेला हजरी लावली होती.

 

या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 20001-/रु पुरस्कार माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार 15001-/रु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार 10001-/ रु माजी समाजकल्याण सभापती सौ. माधुरीताई संतोष उरेते यांच्या कडून देण्यात आला.

 

यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी कांचनपूर येथील गावकरी,युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.!👇


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 5, 2023

PostImage

लॉयड्स इनफिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे ३ दत्तक शाळांच्या नूतनीकरणाचे काम सुरू


लॉयड्स इनफिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे ३ दत्तक शाळांच्या नूतनीकरणाचे काम सुरू

 

 

चंद्रपूर: येथील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस, इंदिरा गांधी विद्यालय पडोली व न्यू इंग्लिश हायस्कुल पांढरकवडा येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वरील तिन्ही शाळे मध्ये आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत शाळा नूतनीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये शाळांच्या गरजेनुसार पेवर ब्लॉक,

 दरवाजे व काचेच्या खिडक्या,विद्युत जोडणी व साहित्यांची पूर्तता, शाळेतील छताच्या नूतनीकरणाचे काम,वर्ग खोल्यामधील फरशी चे काम,विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून वॉटर कुलर,वॉटर फिल्टरची पूर्तता इत्यादी काम चालू करण्यात आले आहेत.

सत्राच्या सुरुवातीलाच तिन्ही शाळांमध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष देण्यात आलेले आहे. सोबतच इयत्ता ८ वी ते १० वीच्या सर्व विध्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे.हे काम प्रकल्पाच्या व्यवस्थापिका कांचन थोरवे,प्रकल्प समन्वयक मुकेश भोयर व लॉयड्सच्या सीएसआर विभागाच्या नम्रपाली गोंडाने यांच्या नियंत्रणात चालू आहे. विध्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा व प्रसन्न वातावरण मिळावे व विध्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण होऊन विध्यार्थ्यानी उत्साहाने शिक्षण घ्यावे हा आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 5, 2023

PostImage

मुलचेरात विविध पक्षांना खिंडार;अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधला घड्याळ मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले स्वागत


मुलचेरात विविध पक्षांना खिंडार;अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधला घड्याळ

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले स्वागत
 
मुलचेरा:- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकतेच मूलचेरा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्री पदाची शपथ घेताच विकास कामांचा धडाका लावला आहे.जिल्ह्यात विविध तालुक्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणताना दिसत आहेत.जिल्ह्यात विकास कामांसोबतच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौजफाटा उभी केली आहे.

मुलचेरा तालुक्यात सुरू असलेले विकास कामे, कुशल नेतृत्व आणि काही मंत्रालय स्तरावरील कामांसाठी ना.धर्मराव बाबा आत्राम यांचा सुरू असलेला पाठपुरावा या विविध कारणांनी तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होतांना दिसत आहेत.नुकतेच लगाम येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात गीताली आणि कांचनपूर येथील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाच्या दुपट्टा गळ्यात टाकून सर्वांचा पक्षात स्वागत केले.

यावेळी माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर,श्रीनिवास गोडशेलवार,अमित मुजुमदार,सरपंच दीपक मडावी,उपसरपंच दिवाकर उराडे, माजी प.स.सभापती नामदेव कुसनाके,शैलेंद्र खराती,सुशील खराती,जोगदास कुसनाके,महादेव सिडाम,रीना मुजुमदार,उमा आत्राम, वेदिका गनलावार,राजू पम्बालवार आदी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 4, 2023

PostImage

आविसं इनकमिंग जोरात; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत नागरिकांचा पक्ष प्रवेश


आविसं इनकमिंग जोरात; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत नागरिकांचा पक्ष प्रवेश

 

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले रा.कॉ.कार्यकर्त्यांचे आविसं मध्ये स्वागत

 

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ना.आत्राम गट)शेकडो कार्यकर्त्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखल करून आविस व अजयभाऊ मित्र परिवारात काल प्रवेश केले.

   

काल येल्ला येथे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता."या"पक्ष प्रवेश कार्यक्रमाला आविस व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी माजी अहेरी बाजार समिती सभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनिता कुसनाके,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,नगरपंचायत अहेरीचे नगर अध्यक्ष रोजा करपेत,नगर सेविका सुरेखाताई गोडशेलवार,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,वेलगुर माजी सरपंच अशोक येलमुले,इंदाराम माजी सरपंच गुलाब सोयांम,पेरमेली माजी सरपंच प्रमोद आत्राम,महागाव ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,धनुर ग्रा.प.सदस्य कालिदास कुसणाके,बोरीचे माजी सरपंच महेश सडमेक,खमनचेरू माजी सरपंच रमेश पेंदाम,वांगेपली सरपंच दिलीप मडावी,खमनचेरू सरपंच शायलू मडावी,उपसरपंच इंदाराम वैभव कंकडालवार,काशिनाथ मडावी,ग्रामपंचायत सदस्य येला संध्याताई मडावी,ग्रामपचायत सदस्य आशाताई उराडे नरेंद्र गर्गम, दिनेश मडावी,अजय नैताम राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवारसह आदि उपस्थित होते.

 

यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचा अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

आविसं व अजयभाऊ मित्र परिवारात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अशोक आत्राम, नामदेव आत्राम, राजेश कोडापे, राकेश आलम, हिरामण आलम, संतोष हजारे, नानाजी आत्राम, साईनाथ आलम, मारोती आलम, सुनील आलम, किशोर आलम,रवी आत्राम, गजू रामटेके, नितीन बोमावार, चंद्रया आलम, कपिल सेडमाके, प्रभाकर सेडमाके, यशवंत कोडपे, गंगा आलम, भीम आत्राम, संतोष आत्राम, ईश्वर कोडपे, दिवाकर आत्राम, साईनाथ आलम, पापाया मडावी, सुधाकर आत्राम, गंगा टेकाम, अडकु आत्राम, श्रीनिवास मोडेम, मनोज कोडापे, प्रकाश मडावी, मलेश कुसनाके, चंद्रा कोडापे, जितेंद्र कोडापे,देवाजी कोडापे, शामराव कोडापे,साईनाथ कोडापे, लक्ष्मण नैताम, संतोष सेडमेक, गजानन आलम, मोतीराम आत्राम, प्रभाकर आलम, राम आलम, पोच्या आलम, लक्ष्मण कोडापे, दिलीप आत्राम, संजय आत्राम, प्रफुल कोडापे, शंकर आत्राम, प्रवीण आलम, गुरूदास कोडापे, मधुकर आलम, सुभाष आलम, बाबूराव आलम, दिपक आलम, येंका आत्राम बाना आलम, छोटू रामटेके, महेंद्र रामटेके, सरदिप आत्राम, उमेश आत्राम, चिना आलम, यशवंत आत्राम, राजू कोडापे, निर्मला आत्राम, विलास फरखडे, श्रीराम हजारे, प्रवीण कोलापुर, विनोद रामटेके, नामदेव रामटेके, अनुसया आत्राम, कविता आलम, कविता आलम, संगिता आत्राम, अनिता कोडापे, सरिता कोडापे, अनिता सडमेक, सविता आत्राम, छाया आत्राम, अंजना आत्राम, सरोजना आलम, अरुणा आलम, लचुबाई आत्राम, प्रेमिला आत्राम, अल्का कोडापे, कांता कोडापे, ललिता कोडापे, सालक्का आत्राम, संगीता रामटेके, लक्ष्मी आलम, पुजा आलम, उज्वला आलम, शेवंता आलम, कल्याणी आत्रामसह आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समवेश आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 4, 2023

PostImage

येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनविरोधी लोकांना पाडण्यासाठी कामाला लागा भाई रामदास जराते यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


 

येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनविरोधी लोकांना पाडण्यासाठी कामाला लागा

 

भाई रामदास जराते यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

 

गडचिरोली :- बेकायदेशीर लोहखाणी, बळजबरी भूसंपादन, रस्ते अपघात, पीक नुकसान, आरक्षण, शिक्षण, नोकरी, नोकरदार अशा विविध प्रश्नांवर जनविरोधी भूमिका घेवून दलाली काम करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्थानिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाने आपली स्वतःची फळी निर्माण केली असून प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेवून येणाऱ्या निवडणुका लढण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी आपण जिंकून येवू शकत नाही, त्या ठिकाणी जनविरोधी कामे करणाऱ्यांना हरवू शकू एवढी ताकद प्रागतिक पक्षांची असल्याने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

 

या बैठकीला पक्षाचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्री जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे सदस्य क्रीष्णा नैताम, गंगाधर बोमनवार, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम यांचेसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

 

पक्षसंघटना बांधणी आणि ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या उलगुलान महामोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लोकांनी सहभागी होण्यासाठीही यावेळी नियोजन करण्यात आले.

 

तुकाराम गेडाम, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, डॉ. भाऊराव चौधरी, पवित्र दास, देविदास संघर्तीवार, देवराव शेंडे, मारोती आगरे, चिरंजीव पेंदाम, देवानंद साखरे, विलास अडेंगवार, देविदास मडावी, रामदास आलाम, अनिल आगरे, तितिक्षा डोईजड, निशा आयतूलवार,जया मंकटवार, कविता ठाकरे, निर्मला सुरपाम, विजया मेश्राम, सुनिता पदा, छाया भोयर,गिता प्रधान, कुसूम नैताम, हिराचंद कोटगले, रेवनाथ मेश्राम, प्रकाश पाल, शरद कोसमशिले, बाळकृष्ण मेश्राम, रामदास दाणे, माणिक गावळे, विजय गावतुरे, ओमप्रकाश चौधरी, राजकुमार प्रधान, महेंद्र जराते यांचेसह शेकडो कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 4, 2023

PostImage

जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी महिला रस्त्यावर,बेमुदत संप


जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी महिला रस्त्यावर,बेमुदत संप

 

गडचिरोली : अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांला घेउन अंगणवाडी कृती समितीचे वतीने ८ डीसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील लोन लाख अंगणवाडी महिला या संपात सहभागी होतील. अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा दया, तो पर्यंत किमान वेतन २६,००० रुपये देण्यात यावे, आश्वासन दिल्या नुसार अंगणवाडी महिलांना मानधनाचे निम्मे पेंशन तथा ग्रज्युटी देण्यात यावी. या प्रमुख मागणीला घेउन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या निमित्ताने जिल्हा परीषदे समोर संघटनेच्या वतीने धरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एक हजाराहून जास्त अंगणवाडी महिला या धरणा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. संघर्ष हमारा नारा है भावी इतिहास हमारा है अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहीजे, अंगणवाडी महिलांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालंच पाहीजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागू करा, मानधनाचे निम्मे पेंशन मिळालेच पाहीजे, आदि घोषणा देण्यात आल्या. मार्गदर्शनपर भाषणात प्रा. दहीवडे म्हणाले जनतेने निवडून दिलेल्या आमदार खासदाराच्या भविष्याचा विचार करुन त्यांना पेंशन दिली जाते. तर हेच आमदार जनतेच्या भविष्याचा विचार का करीत नाही. केवळ आश्वासन देतात परंतु त्यांची अंमलबजावणी केल्या जात नाही. पेंशन तथा ग्रॅज्युटी देण्यात येईल. असे आश्वासन विधान सभेत देण्यात आले आठ महिण्याचा कार्यकाल लोटण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी झाली पाहीजे याच मागणीला घेऊन हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. अमोल मारकवार म्हणाले कामगाराला संघर्षा शिवाय काहीच मिळत नाही. देशात लोकशाही असली तरी या लोकशाहीचे भांडवलशाहीत रुपांतर झाले आहे. आणि म्हणूनच गरीब दिवसेन दिवस गरीब होतांना पहावयास मिळते. तर भांडवलदार अती श्रीमंत होत आहे. गोरगरीब जनतेवरील अन्याय सतत वाढत आहे. आणी अन्यायाचा विरोध केला तर तो दुर करण्याऐवजी सरकारची दडपशाही दिवसें दिवस वाढत आहे. या दडपशाहीचा संघटीतरीत्या आपण प्रतिकार केला पाहीजे. प्रमोद गोडघाटे, अरुण भेलके, राजेश पिंजरकर यांचे ही मार्गदर्शनपर भाषणे झाली. उज्चला उंदीरवाडे यांचे आभारप्रदर्शना नंतर धरणा कार्यक्रम संपला. धरणा कार्यकम यशस्वी करण्याकरीता भारती रामटेके, कौशल्या गौरकार, ज्योती बेंजकीवार, छाया कागदेलवार, सुशिला कार, सुनंदा बावणे, सुमन तोकलवार, सुनंदा उईके, योगीता मुनघाटे, यांनी विशेष परीश्रम घेतले.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 4, 2023

PostImage

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितिच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी मनोज उराडे यांची नियुक्ती


माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितिच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी मनोज उराडे यांची नियुक्ती

 

सामाजिक कार्याची आवड तसेच गोर गरिबासाठी त्यांच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी नेहमी तत्पर असणारा , सलग ११वर्ष आरोग्य विभागात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत जिल्हा पर्यवेक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माहिती तंत्रज्ञानामध्ये प्राविण्य असलेला, उच्च शिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले मनोज उराडे यांच्या सामाजिक कार्य तसेच रुग्णसेवा यांची दखल घेऊन मा. महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितिच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

 तसेच मा. महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, गायकवाड साहेब,किशोर थेरकर जिल्हा संघटक, श्री.संगेश निमसरकर चामोर्शी तालुका अध्यक्ष आदींनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्या दिल्या.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 4, 2023

PostImage

येल्ला येथील भोई समाजाच्या ग्रामस्थांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी समजावून सांगितले इतिहास


भोई समाजाची उत्पत्ती व स्थिती भोई समाजाची उत्पत्ती त्रेता युगापासून असल्याची बसमाहिती प्राचीन ग्रंथातून आढळते - अजय कंकडालवार

 

येल्ला येथील भोई समाजाच्या ग्रामस्थांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी समजावून सांगितले इतिहास

 

मूलचेरा: तालुक्यातील येल्ला येथील भोई समाजाच्या माता मंदिराला भेट देऊन विधिवत पूजा करून मातेचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शन घेतले व येल्ला येथील भोई समाजाच्या ग्रामस्थांनी माजी जि.प. तथा अहेरी बाजार समिती सभापती कंकडालवार यांनी गावात पोहचताच ग्रामस्थांनी कंकडालवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

भोई समाज बांधवांनी आपल्या समस्या कंकडालवार यांच्या समोर मांडल्या.अजय कंकडालवार यांनी भोई समाज बांधवांच्या समस्या ऐकून घेऊन ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे उपस्थित भोई समाज बांधवांना सांगितले.त्याचबरोबर उपस्थितांना भोई समाजाचा इतिहास समजावून सांगितले 

भोई समाजाची उत्पत्ती व स्थिती भोई समाजाची उत्पत्ती त्रेता युगापासून असल्याची बसमाहिती प्राचीन ग्रंथातून आढळते.

 

भगवान रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा शरयु नदी किनारी तऱ्याचे काम करणारा भोई ज्याला उत्तर प्रदेशात केवट म्हणतात."या"भोयाने रामचंद्राना पैलतीरी उतरविले.त्यानंतर व्दापार युगात मत्यसगंधा जी सत्यवती या नावाने ओळखली जाते तिच्यापासून व्यास ऋषी,पांडव व कौरव यांची उत्पत्ती झाली.ती मत्स्यगंधा ही भोई समाजातील होती.

 

त्यानंतर कलियुगात अनेक राजे राजवाडे यांच्या दरबारी पालख्या वाहणारे,मेणे वाहणारे अशा प्रकारे या समाजाचा उल्लेख ग्रंथातून आहेच.पण इतिहाराकारानी सुध्दा भोई समाजाची नोंद इतिहासात केलेली आहे.

 

"या"समाजातील लोकांची मुख्य कामे म्हणजे प्रवाशांना नदीपलीकडे नेणे-आणणे राजदरबारी पालख्या - मेणे - डोल्या वाहाणे व उपजिविकेचे साधन म्हणून मत्यसमारी करणे.

 

यादेशात अनेक सत्तांतरे होऊन गेली.मोगलाई - शिवशाही - पेशवाई या सर्व राज्यांच्या पदरी भोयांसाठी राखीव स्थान होते. इंग्रजांनी या देशावर दीडशे वर्षे राज्य केले.स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांचे तनखे बंद झाले.आणि तेव्हापासून भोई समाजाचा राजाश्रय संपला व जैविक गरजा भागविण्यासाठी मिळेल तिथे नोकरी करणे या शिवाय या समाजाला पर्याय उरला नाही.

 

स्वातंत्र्य पूर्व काळात अन्न धान्य व जीवनाश्यक सर्व मालाची ने-आण गलबताने केली जात असे.अशा गलबतावर खलाशाची नोकरी करणे याला मुसूमखंडया असे संबोधिले जाई.मुंबई सारख्या जागतिक किर्तीच्या बंदरामध्ये परदेशातून आलेला माल उतरविण्यासाठी पडाव यांचा उपयोग केला जाई.या पडाव किंवा बाजीवर खलाशाचे काम करणे हे भोई समाजाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन बनले होते. काळाच्या गतीनुसार गलबते पडावे संपली आधुनिक करणाच्या अजगराने आपले तोंड उघडले त्यामुळे पारंपरिक धंदे संपुष्टात आले.

 

मात्र आजही काही प्रमाणात भोई समाजातील माणसे मुंबई सारख्या बंदरात खलाश्याचे काम करीत आहेत.भोई समाजाची वैशिष्टये पुर्वीच्या काळी होडीतून,डोली,मेण्यातून श्रीमंतांच्या मुली, सुना,आया बहिणींची ने-आण अत्यंत काळजीपूर्वक व प्रामाणिकपणे करणे तसेच मालाची ने-आण नेकीने व निस्वार्थीपणे करणे असा हा सेवाभावी भोई समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.

 

तालुक्यातील येल्ला येथील भोई समाज माता मंदिराला भेट मातेचे दर्शन घेतले व भोई समाजाच्या नागरिकांशी संवाद साधताना आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी इतिहास समजावून सांगितले.

 

तसेच भोई समाज बांधवांशी विविध विषयावर चर्चा केली व आपल समाज हा एकजुटीने राहावे आणि माझ्याकडून जे काही मदत लागेल ति मदत करण्यास आपण तयार आहोत असे आश्वासन अजयभाऊंनी दिली.

 

यावेळी वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,येला ग्रामपंचायत सदस्य सौ.संध्याताई मडावी, येला ग्राम पंचायत सदस्य सौ आशाताई उराडे,नरेंद्र गर्गम, भिमाना,दिनेश मडावी,अजय नैताम,येला गावातील समस्त भोई समाज बांधव व महिला भगिणी तसेच गावचे प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 3, 2023

PostImage

आमदार कृष्णा गजबे यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित


आमदार कृष्णा गजबे यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित

 

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या सरपंच परिषदेने केला सत्कार

 

देसाईगंज-

     स्थानिक पातळीवर जनतेचे हित जपण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सरपंच परिषद मुंबईच्या वतिने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कृष्णा दामाजी गजबे यांचा पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी बाणेर रोड येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे,पद्मश्री पोपट पवार,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

     ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू (अचलपूर),आमदार अभिमन्यू दत्तात्रय पवार (औसा),सुमन आर.आर.आबा पाटील (कौठे महांकाळ), आमदार सुनील शंकरराव शेळके (मावळ)यांचाही सत्कार करण्यात आला.


PostImage

Gadchiroli Varta News

Nov. 5, 2023

PostImage

आष्टी पोलीसांनी चोरीस गेलेली पल्सर गाडी २४ तासाच्या आत काढली शोधुन


 

 आष्टी पोलीसांनी चोरीस गेलेली पल्सर गाडी २४ तासाच्या आत काढली शोधुन 

पोंभुर्णा तालुक्यातील सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक

 

 चामोर्शी: दि. ०२/११/२०२३ रोजी फिर्यादी नामे बंडु निलकठ गुरूनुले वय ३९ वर्ष रा.कोनसरी हे सकाळी ०६/०० ते १४/०० वाजेपर्यंत त्याची डयुटी लॉयड मेटल अॅन्ड एनर्जी कंपनी कोनसरी येथे असल्याने त्यांनी आपली दुचाकी पल्सर गाडी क्र. एम.एच.३३ ए. ए. ३२११ कंपनीच्या वाहन पार्कींगच्या ठिकाणी लावुन डयुटीवर गेले. व दुपारी ०२/०० वाजता त्यांची डयुटी संपल्याने ते आपले वाहन घेण्याकरीता वाहना जवळ आले असता सदर वाहन

ठेवलेल्या ठिकाणी दिसुन न आल्याने सदर वाहनाची शोधा शोध करू लागले परंतु सदर वाहन मिळुन न आल्याने चोरीची तक्रार पोलीस ठाणे येथे दिली. त्यानंतर लागलीच पोलिसांनी लॉयड मेटल कंपनीची सि.सि.टि.व्ही. फुटेज चेक केले असता एक अनोळखी इसम सदर चे वाहन चोरून घेवुन जात असताना दिसले तेव्हा

पोलीस ठाणे आष्टी चे ठाणेदार पोलीस निरीक्षक कुदंन तु. गावडे यांनी व त्यांचे स्टाफ यांनी तत्परता साधुन आपली गोपनीय यंत्रना पोस्टे हददीत कार्यान्वीत करून सदर संशयित इसम व वाहनाचा पोस्टे हददीत शोध घेतला इसम

फॉरेस्ट नाका आष्टी येथे मिळुन आला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने

आपले नाव पंकज भाडुजी कोडापे रा. देवई ता.पोभुर्णा जि. चंद्रपुर असे सांगीतले सदर इसमास विश्वासात घेवुन चोरीस गेलेल्या वाहना बददल त्यास विचापुस केले असता त्यानेच सदर वाहन चोरून फॉरेस्ट नाका आष्टी येथे ठेवलेले आहे असे सांगून सदर दुचाकी वाहन आरोपी कडून जप्त करण्यात आले आहे. 

 सदर गुन्ह्य़ातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द पोभुर्णा, कोठारी, गोडपिपरी पोलीस स्टेशन ला चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आल्याने सदर आरोपीस पोस्टे आष्टी यथे दि. ०३/११/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. 

सदर गुन्हयाचा तपास पो. हवा. शामराव मडावी व त्यांचे सहकारी रवी सडमेक हे करीत असून सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल सर., मा. अप्पर पोलीस अधिक्षक  चिंता ,  यतीश देशमुख  उपविभागीय

पोलीस अधिकारी  सुदर्शन राठोड. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुदंन तु. गावडे यांचे नेतृत्वात पोलीस हवालदार शामराव मडावी, पो. ना. रवी सडमेक, पोशि/अतुल तोडासे, पोशि/ रायसिडाम, पोशि/ संतोष नागुलवार यांनी पार पाडली.


PostImage

Gadchiroli Varta News

Nov. 5, 2023

PostImage

वाघाच्या हल्यात गाय ठार,हे व्याघ्र हल्ले कधी थांबणार?


फाईल फोटो 

गडचिरोली : जिल्ह्यात दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा जीव जात आहे. दररोज शेतशिवार परिसरात वाघ हल्ले होत आहेत. कधी गाय डोर जनावरे यात हल्ला तर कधी मनुष्यहानीही होत आहे. हे व्याघ्र हल्ले कधी थांबणार, असा प्रश्न आता परिसरातील शेतकरी विचारू लागले आहेत. असाच आज एक प्रकार आमिर्झा बिटातील कंपार्टमेंट नंबर 415 मध्ये वाघाने गायचा शिकार केला आहे. जिल्ह्यातील आमिर्झा परिसरात जनावरांवर हल्ले करणाऱ्या वाघाने आपला मोर्चा चालूच ठेवला आहे. अभिझा परिसरात अशी चर्चा नागरिकांत केली जात आहे. वनपरिक्षेत्र चातगांव येथील आमिर्झा नियतक्षेत्रातील भिकारमौशी येथील दिवाकर निलेकर यांच्या गायीवर दिनांक ०४/११/२०२३ रोजी सायंकाळी चार पाच वाजताच्या दरम्यान कंपार्टमेंट नंबर 415 मध्ये वाघाने गायीवर वर हल्ला चढविला यात गाय जागीच मृत्यू झाला. त्याबाबतची माहिती गावकरी व माझी पोलीस पाटील दिवाकर निलेकर यांनी वनरक्षक आंबेडारे तसेच क्षेत्रसहाय्यक तांबे अभिझा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी चातगांव यांना माहिती दिली. लगेच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी करून गावकऱ्यांसमक्ष मोका पंचनामा करण्यात आला. यावेळी मोक्याच्या दक्षिण दिशेला शेतीकडे वाघाच्या पाऊलखुणा स्पष्टपणे आढळून आले त्यामुळे वाघानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेचा पंचासमक्ष पंचनामा करण्यात आले. सदर गाय हि माझी पोलीस पाटील दिवाकर निलेकर रा. भिकारमौशी यांची असून वनविभागाकडून नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असे वनविभाच्या वतीने सांगण्यात आले.

 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Nov. 5, 2023

PostImage

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने लवकर निकाली काढावे - माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार


राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने लवकर निकाली काढावे - माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार

"जिल्ह्यातील रुग्णांचे होत आहेत हाल!!


गडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपाल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसूकपाल्ली येथील आयुष्यमान भारत कार्यालय दहा बारा दिवसा पासून बंद असल्याने"या"नागरिकांना अडचण निर्माण होत आहे.लवकरत लवकर कर्मचाऱ्यांची मागणी निकाल काढावे म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सरकारकडे मागणी करत आहे.

कायम सेवेत समायोजन करावे, या मुख्य मागणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेले सुमारे ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २५ ऑक्टोबरपासून विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन पुकारले आहे.राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात दोन दिवस राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध प्रवर्गांत कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात आली आहे.अनेक कर्मचारी १० ते १५ वर्षांहून अधिक कालावधी पासून काम करत आहेत.कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा,मुलाखत अशा विहित पद्धतीने निवड करण्यात आली आहे.

सध्या राज्यभरात ४० हजारांहून अधिक जागा रिक्त असून या रिक्तपदी एनएचएम अंतर्गत काम करत असलेल्या कर्मचार्‍यांचे समायोजन करावे,अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
२००९ पासून कंत्राटी कर्मचारी संवैधानिक मार्गाने आपल्या विविध मागण्या मांडत आहेत. देशातील राजस्थान,मध्य प्रदेश,ओडीसा,गोवा,मणिपूर"या"राज्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना समान वेतनश्रेणी,रजा अधिनियम,नियत निवृत्तीपर्यंत सेवा हमी अशा प्रकारच्या सुविधा लागू केल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रश्नी लक्ष घालून कंत्राटी कर्मचार्‍यांना न्याय द्यावा.अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने लवकर निकाली काढावा अशी मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.

"या"आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळित झाली आहे.प्रसृतीसाठी आलेल्या गर्भवतींना त्वरित सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.गरिब,सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत."या"सर्व समस्या शासनाने लक्षात घेऊन या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर निकाली काढण्यात यावी म्हणून माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी राज्या सरकारकडे मागणी करत आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Nov. 4, 2023

PostImage

खा.अशोक नेते यांच्या गाडीला नागपूरजवळ किरकोळ अपघात, सर्वजण सुरक्षित ट्रकने अचानक वळण घेतल्याने झाली धडक


खा.अशोक नेते यांच्या गाडीला नागपूरजवळ किरकोळ अपघात, सर्वजण सुरक्षित ट्रकने अचानक वळण घेतल्याने झाली धडक

 

दि.०४ नोव्हेंबर २०२३

 

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले.

 

खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या सुमारास नागपूरला पोहोचल्यानंतर सकाळी ते आपल्या वाहनाने (एमएच ३३, एए ९९९०) गडचिरोलीकडे निघाले होते. सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगांवजवळ समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खा.नेते यांच्या वाहनचालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू न देता तातडीने ब्रेक लावले. पण त्या प्रयत्नात ट्रकच्या एका कॅार्नरला मागून हलकीशी धडक बसली. त्यात खा.नेते यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झाले. मात्र नेते यांच्यासह त्यांच्या वाहनातील कोणालाही इजा झाली नाही,

 

यानंतर दुसऱ्या वाहनाने खा.नेते गडचिरोलीकडे निघाले. गडचिरोलीत पोहोचल्यानंतर ते आपल्या मतदार संघातील नियोजित दौऱ्यासाठीही रवाना झाले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खा.नेते यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ईश्वरी कृपेने कोणालाही दुखापत झालेली नाही, असे खा.नेते यांनी सांगितले.

लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रेम व आपुलकी जिव्हाळा सदैव माझ्या पाठीशी आहेच.जनतेनी दिलेल प्रेम माझ्या हृदयात असून आपुलकीची भावना मी या प्रसंगी व्यक्त केले 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 29, 2023

PostImage

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या मागणीला यश


अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या मागणीला यश

 

 अखेर 'त्या' हत्येचा पोलिसांनी केला उलगडा

 

मुलचेरा :- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ट मोहूर्ली गावात १८ सप्टेंबर रोजी गावालगत आसलेल्या बिएसएनएल टॉवर जवळ खड्ड्यातील पाण्यात रामूलू अलाम वय (४०) या इसमाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची योग्य चौकशी करुन कारवाई करा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेराच्या वतीने करण्यात आली होती या मागणीला यश मिळाले आहे. या घटनेने संपूर्ण गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. हि घटना आत्महत्या नसुन हत्या करण्यात आले असे संशय गावातील नागरिक करीत असुन सदर घटनेची तात्काळ योग्य चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या वतीने तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट, सचिव उमाकांत आत्राम, ग्रामसभा अध्यक्ष दिवाकर गावडे, मुन्नाजी नैताम, रविंद्र वनकर, वासुदेव मडावी, किर्तिमराम आलाम, वासुदेव ची. मडावी, गिरीदास आलाम, दिलिप आलाम, अनिल मेकलावार, ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर मरापे, चंद्रशेखर आत्राम, तालुका संघटक महेंद्र आत्राम, तालुका उपाध्यक्ष संदिप तोरे, चंद्रशेखर नैताम, संतोष आलाम, सचिन सिडाम, सुनंदा सिडाम, ग्रामपंचायत सदस्य दिक्षा नैताम, कल्पना दुर्गे, सुमन मारकवार, सुनिता मडावी, छाया आलाम, माया दुर्गे यांनी मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन, मुलचेरा यांच्याकडे निवेदाद्वारे केली होती. 

गावात याबाबत कोणी बोलण्यासाठी तयार नसल्याने व 

हातात शवविच्छेदन अहवाल नसल्याने पोलिसांपुढे हत्या की आत्महत्या या घटनेचा छडा लावणे कठीण झाले होते. मात्र तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका महिन्यात पोलीसांनी त्या घटनेचा उलगडा केला असुन एकाच कुटुंबातील पाच जणांना व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करनाऱ्या एकाला असे तब्बल सहा आरोपींना मुलचेरा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असुन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या मागणीला यश मिळाले आहे.

 संतोष अंकुलु मोगीलवार (वय ३२), कविता संतोष मोगीलवार (वय ३०), गट्टू अंकुलू मोगीलवार(वय३५),चंद्रय्या मोंडी मोगिलवार (वय३५), श्यामराव चंद्रय्या मोगीलवार आणि शरद गिरमाजी मडावी (वय ३८) सर्व रा. मोहूर्ली ता. मुलचेरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

 

सदर घटना अशी की, रामुलू अलाम हा मागील काही दिवसांपासून संतोष मोगीलवार यांच्याकडे शेळी राखण्याचा काम करीत होता. संतोष मोगीलवार हा शेतीसोबतच हातभट्टीवर दारू गाळून आपल्या घरी चोरी मार्गाने विक्री करायचा. पोलिसांचे दारू पकडण्याचे धाडसत्र सुरु असल्याने भीतीपोटी त्याने दारू आपल्या घरी न ठेवता शेतात ठेवण्यासाठी मृतक रामुलू आलाम याला सांगितले. मात्र त्याने ती दारू पिल्याने रागाच्या भरात संतोषची पत्नी कविता मोगीलवार हिने रामुलू आलाम याला त्याचा घरी जाऊन १७ सप्टेंबर रोजी काठीने मारहाण केली . त्याच दिवशी संध्याकाळी रामुलू आलाम याला आरोपी संतोष मोगीलवार आणि त्याच्या पत्नीने आपल्या घरी बोलावून पून्हा बेदम मारहाण केली. त्याचा डोक्याला मागील बाजूला मार लागल्याने तो खाली पडला . रागाच्या भरात त्यांनी त्याचा गळा दाबून हत्या केली. यासाठी संतोषचा भाऊ गट्टू अंकुलू मोगीलवार, काका चंद्रय्या मोंडी मोगिलवार , चुलत भाऊ (काका चंद्रय्याचा मुलगा )श्यामराव मोगीलवार यांनी मदत केली होती. तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शरद गिरमाजी मडावी यांनी मदत केली. या सर्वांना मुलचेरा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रात्रीच्या सुमारास आपल्या घरी जाताना शरद गिरमाजी मडावी हा संतोष मोगीलवार याचा घरी दारू पिण्यास गेला होता. संतोषने त्याला दारू दिली. मात्र तो गडबडीत पैसे न घेतल्याने शरद हा संतोषला पैसे देण्यासाठी घरात शिरला. पैसे देऊन घराबाहेर निघताना संतोषने शरदला या घटनेची माहिती मिळाली समजून त्याची कॉलर पकडून 'या' घटनेची माहिती बाहेर सांगितल्यास तुला पण जिवानिशी मारणार , अशी धमकी देत मदत करण्यास सांगीतले. मात्र त्याला याबाबत काहीच माहीत नव्हते. तो घाबरून मदत करण्यास तयार झाला.

घटनेचा तपास मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संदिप साखरे, महिला पोलिस उप निरीक्षक दिपाली कांबळे, महिला पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा खापे, पोलीस हवालदार विष्णू चव्हाण, चरणदास कुकुडकर, रोशन पोहनकर आदींनी केला.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 25, 2023

PostImage

चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले


चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

 

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद

 

*चंद्रपूर, दि. २४* : चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.

 

विदर्भातील या तीन जिल्ह्यांना दोन महिन्यांसाठी सलग वीजपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली. कृषी पंपाना सध्या नियमित विजेची गरज आहे. आता शेतात धान उभा आहे आणि बाकी पिकांना ही पाण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. याशिवाय उत्सवाचे दिवस आहे.

 

गडचिरोली हा नक्षल प्रभावी जिल्हा असल्याने शेतीसाठी व उत्सवाच्या काळात या जिल्ह्याला सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे ही बाब ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जा मंत्रांच्या लक्षात आणून दिली. चंद्रपूर आणि वर्धा हे दोन्ही जिल्हे विदर्भातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पिकाच्या दृष्टीने व नागरिकांना उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा होणे, गरजेचे असल्याची बाब या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. दोन महिने या तीनही जिल्ह्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील या तीन जिल्ह्यांना सुरळीत वीज पुरवठा कसा करता येईल, या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 25, 2023

PostImage

देसाईगंज पोलीसांनी छत्तीसगड जाणाऱ्या अवैध दारू तस्कराचे आवळल्या मुसक्या 


देसाईगंज पोलीसांनी छत्तीसगड जाणाऱ्या अवैध दारू तस्कराचे आवळल्या मुसक्या 

 

 

गडचिरोली जिल्हयामध्ये सुरू असलेल्या नवरात्रेत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल, यांचे अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक २४/१०/२०२३ रोजी पोलीस अंमलदार संतोष सराटे पो.स्टे देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने एक इसम लाखांदूर येथून देसाईगंज करखेडा मार्गे छत्तीसगड येथे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, विलेश ढोके, संतोष सराटे, नरेश कुमोटी यांनी सापळा रचून इसम नामे अश्विन भागवत मँडे वय - २३ वर्षे रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली यास पकडले व त्यांचे ताब्यातून १) अॅक्टीव्हा निळ्या रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ३३ यु ४७५६ किं. ७०००० /- रू. २) रॉयल स्टैग कंपनीचे डिलक्स व्हिस्की १८० मि.ली. मापाच्या दोन खरड्या रंगाचे बॉक्स ९६ नग सिलबंद निपा किं.अं. २८,८००/- रू. असा एकूण ९८,८००/- रु. किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, संतोष सराटे, विलेश ढोके, नरेश कुमोटी यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश राऊत हे करित आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 8, 2023

PostImage

शहिद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने उपपोस्टे लाहेरी येथे उभारले शहिद स्मारक


शहिद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने उपपोस्टे लाहेरी येथे उभारले शहिद स्मारक

 

– पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते करण्यात आले अनावरण

 

 (Gadchiroli) : गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून २०० किलोमीटर दुर व छत्तीसगड सिमेलगत असलेल्या अतिदुर्गम अशा उपपोस्टे लाहेरी हद्दीमध्ये ०८ ऑक्टोंबर २००९ रोजी माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस अधिकारी व १६ जवान शहिद झाले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून तसेच त्यांचे महान कार्य व देशासाठी केलेले बलिदान इतर पोलीसांपर्यंत व जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच त्यांच्या कार्याला सतत आठवणीत ठेवून इतर अधिकारी/जवानांना प्रेरणा देण्याकरीता उपपोस्टे लाहेरी येथे शहिद स्मारक उभारण्यात आला. सदर शौर्यस्थळ व शहिद स्मारकाचा अनावरण सोहळा आज ०८ ऑक्टोंबर २०२३ रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पार पडला.

 

 

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते शौर्य स्थळ व शहिद स्मृती स्मारकाचे रिबीन कापून व दीप प्रज्वलन करुन अनावरण करण्यात आले. त्यानंतर सर्व जमलेल्या मान्यवरांनी शहिद स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आम्ही आत्मसमर्पण करणा­या माओवाद्यांचे स्वागत करत आहोत तसेच जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल व माओवाद्यांच्या जाचाला आता घाबरण्याची गरज नसून, गडचिरोली पोलीस दल तुमच्या संरक्षणासाठी व विकासासाठी सदैव तत्पर आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल आपल्या सर्व अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करेल. यासोबतच प्रभारी अधिकारी लाहेरी व त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

 

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख, सीआरपीएफ बटा. ३७ चे कमांडंट खोब्राागडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितीन गणापूरे व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, आश्रम शाळा लाहेरी येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी, येरकलवार गुरुजी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपपोस्टे लाहेरीचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पोउपनि. प्रशांत डगवार, पोउपनि. अभिजीत काळे, पोउपनि. सचिन सरकटे व सर्व अंमलदार, सिआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अशोक कुमार, पोनि. शीतला प्रसाद तसेच एसआरपीएफ ग्रुप ०७ चे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 8, 2023

PostImage

महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी:भाग्यश्री आत्राम,संकल्प सप्ताह-समृद्धी दिवस साजरा


महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी:भाग्यश्री आत्राम,संकल्प सप्ताह-समृद्धी दिवस साजरा

 

आलापल्ली: ग्रामीण भागातील महिलांची शाश्वत उपजीविका वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान या प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत शेती, पशूपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग याकरिता व्यक्तिगत व सामुहिक उपजीविका उपक्रमाच्या विकासातून उत्पन्न वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन व अर्थसहाय्य करण्यात येते.त्या माध्यमातून महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

 

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती अहेरी अंतर्गत जननी महिला प्रभाग संघ आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत भवण येथे संकल्प सप्ताह-समृद्धी दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जननी महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष वंदना राजेश आत्राम,प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक सतीश उमरे,ग्रा प सदस्य पुष्पा अलोने, माजी सरपंच सुगंधा मडावी,शकुंतला दुर्गम,प्रभाग समन्वयक शालिनी लोणारे,प्रतिमा गावतुरे,प्रियांका गोंगले,गीता कविराजवार,लक्ष्मी रामटेके,राजश्री जनकर,लैजा बोरूले, अनुशा करपे आदी उपस्थित होते.

 

पुढे बोलताना गाव स्तरावर उपजीविकेचे विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्राम संघ व प्रभाग संघ, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना अर्थसहाय्य व कृतीसंगमच्या माध्यमातून शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शनातून संकलन केंद्र उभारणे ,शेती अवजार बँक स्थापन करणे,महिला शेतकऱ्यांची शेती शाळा घेणे ,विविध संस्थाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांकरिता तांत्रिक प्रशिक्षणासाठी नियोजन करणे असे विविध उपक्रम राबविले जातात. महिला बचत गट अधिकाधिक प्रगतीपथावर गेल्यास महिला सक्षम होईल. या माध्यमातून अन्य महिलांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले.आयोजित कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश उमरे,संचालन मनीषा जंबेवार तर आभार मनीषा दुर्गे यांनी मानले.

 

बचत गटांना धनादेश वाटप

बचत गटाच्या महिलांच्या उद्योगधंद्यात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून ८ गटांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आले. संकल्प सप्ताह निमित्ताने १७ महिलांचे वयक्तिक बँक खाते उघडण्यात आले.तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा,प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा अंतर्गत १४८ महिलांचे विमा काढण्यात आले.

 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची दिली माहिती

ग्राम संघांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत त्यांना ५ टक्के व्याजदरात तीन लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते.त्यात पहिला हप्ता १लाख,दुसरा हप्ता २ लाख आणि तिसरा हप्ता ३ लाख अश्या प्रकारे काही प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना देण्यात येतो.या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 8, 2023

PostImage

चामोर्शी -मुल राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावे,चामोर्शी येथील शिष्टमंडळाचे नितीन गडकरी यांना निवेदन


चामोर्शी -मुल राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावे,चामोर्शी येथील शिष्टमंडळाचे नितीन गडकरी यांना निवेदन

चामोर्शी - चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याना जोडणारा चामोर्शी हरणंघाट मुल राज्य मार्ग क्र.३७० क हा मार्ग चंद्रपूर- गडचिरोली- राजनांदगाव महामार्ग क्रमांक ९३० आणि साकोली गडचिरोली सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ क यांना चामोर्शीला जोडतो.  

चामोर्शी ते मुल हे २८ किलोमीटर अंतर हा राज्यमार्ग आहे . हा राज्यमार्ग अतिशय खराब झाल्यामुळे

या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून मार्गाची दुरस्त्ती करणे गरजेचे झाले आहे. 

याच मार्गावरून सूरजागडवरून लोहखनिज वाहतूक करणारे हजारो ट्रक केलझर मालधक्कावर ये जा करीत असतात .

 गोसीखुर्द धरणाच्या पुरामुळे हा मार्ग पावसाळ्यात तीन चार दिवस बंद राहतो.

 चामोर्शी तालुका धान पिकासाठी प्रसिद्ध आहे व संपूर्ण तालुक्यात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे धानाचा व्यापार सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो, धानावर आधारित राईस मिल मोठ्या प्रमाणात आहेत, परिसरातील धानाचे मोठे केंद्र चामोर्शी आहे त्यामुळे मुल चामोशी हरणघाट मार्गे मोठ्या प्रमाणात धानाची ने आण होते .

तसेच मुल, सिंदेवाही ,सावली , तळोधी ,(बाळापुर ) या ठिकाणी सुद्धा येथील धान्याची उलाढाल मोठया प्रमाणात केल्या जाते त्यामुळे मुल - चामोशी- हरणघाट मार्ग मजबूत होणे गरजेचे आहे.

 तसेच चामोशी येथील लोकांचे रोटी बेटीचे संबध मूल , पोंभ्रूना तालुक्यातील लोकांशी आहे. त्यामूळे नागरिकांची नेहमी वरदळ या मार्गावर सुरू असते. 

 चंद्रपूर जिल्हा विभाजित होऊन गडचिरोली जिल्हा झाला असल्यामुळे येथील नागरिकांचे देवाणघेवाणीचे व्यवहार सतत चालू असतात. त्यामुळे मूल- हरणघाट- चामोशी रोडला अतिशय महत्त्व आहे.

 तसेच मूल- हरणघाट- चामोशी मार्गावर विदर्भाची काशी असलेले मार्कंडा देवस्थान त्या देवस्थानात दरवर्षी होणारी महाशिवरात्रीची यात्रा बारमाही चालणारे अनेक धार्मिक विधी त्यामुळे पर्यटक सुद्धा नेहमी मार्कंड्याला मोठ्या प्रमाणात येत असतात म्हणून मूल चामोशी हरणघाट मार्ग मजबूत होणे गरजेचे आहे परंतु हा मार्ग अतिशय खराब असल्यामुळे चंद्रपूरला जाणाऱ्या रुग्णांना ,प्रवाशांना ,भाविकांना प्रवास अतिशय खडतर असा वाटू लागला आहे.

या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना उत्तम दळनवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी,अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळामध्ये विजय कोमेरवार प्रदेश सदस्य शिक्षक आघाडी भाजपा,दीलीप चलाख जील्हा सचीव भाजपा,साईनाथ बुरांडे जील्हा सचीव भाजपा अमोल आईंचवार सामाजीक कार्यकर्ते,भोजराज भगत,प्रतीक राठी रामचंद्र वरवाडे उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 8, 2023

PostImage

दूचाकीने सूगंधीत तंबाकूची तस्करी, आरोपी विरोधात गून्हा दाखल


दूचाकीने सूगंधीत तंबाकूची तस्करी, आरोपी विरोधात गून्हा दाखल

कूरखेडा -

           कोरची कडून कूरखेडा मार्गे प्रतिबंधित असलेला सूगंधीत तंबाकूची वाहतूक करताना एका दूचाकी चालकाची गोठणगांव नाक्यावर तपासणी करीत दोन चूंगळीत भरलेले ४०० पाकेट सूगंधीत तंबाकू जप्त करीत आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला

          छत्तीसगढ़ व कोरची परीसरातून मोठ्या प्रमाणात अवैध सूगंधीत तंबाकूची वाहतूक तालूक्यात करण्यात येते या गोपनीय माहिती वरून कूरखेडा पोलीस चमूने गोठणगांव नाक्यावर काल रात्रि चा सूमारास सापळा रचला यावेळी एक दूचाकी क्र एम एच ३३-५३५१ या वाहनाने एक इसम दोन चूंगळीत काही तरी वस्तू घेऊन संशयास्पद रीत्या येताना दिसून आला या वाहनाला थांबवत झडती घेण्यात आली यावेळी चूंगळीत प्रतिबंधित सूगंधीत तंबाकूचे ४०० नग पाकेट किमंत ६५ हजार ६०० रू व दूचाकी कीमत ९० हजार असा एकूण १ लाख ५५ हजार ६०० रूपयाचा मूद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी विरोधात भादंवि २७२,२७३,१८८ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही ठाणेदार संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक आनंदराव डोकरमारे पोलीस हवालदार भास्कर किरंगे, संदेश भैसारे यांचा चमूने केली


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 8, 2023

PostImage

वैनगंगा नदीवरील खड्ड्यांमुळे दुचाकीसह बाप -लेक पडले नदीपात्रात, बापाला वाचविण्यात यश मुलगा गेला वाहून 


*ब्रेकिंग*

 

वैनगंगा नदीवरील खड्ड्यांमुळे दुचाकीसह बाप -लेक पडले नदीपात्रात, बापाला वाचविण्यात यश मुलगा गेला वाहून 

 

 

 आष्टी जवळील वैनगंगा नदी पुलावरील घटना

 

 

 

अहेरी - चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू आहे. अश्यातच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोह प्रकल्पातून लोह खनिजांच्या कच्चा मालाची वाहतूक जड वाहनांने सुरु आहे. 

जड वाहतुकीमुळे रस्त्यासह नदी पुलावर अगणित खड्डे पडले असून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डया हे कळायला मार्ग नाही.या आधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहेत.अनेकांना जीवास मुकावे लागले. काहींना अपंगत्व आले आहे असे असतानाच आज दि.८ ऑक्टोबर रोज रविवारला दुपारच्या सुमारास गोंडपीपरी कडून स्वगावी दुचांकीने येत असताना आष्टि जवळील वैनगंगा नदीपुलावर जड वाहनांच्या गर्दी मुळे खड्डा चुकीविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकीसह दोघे जण नदीपात्रात पडले व अन्य एक जण पुलावरील रस्त्यावरच कोसळला. त्यात किशोर गणपती वासेकर हा नदीतिल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. गणपती येराजी वासेकर यास नदीतून बाहेर काढण्यात आले . शुभम बोलगडवार हा सुखरूप आहे.

 

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेली

आष्टि जवळील वैनगंगा 

 नदीवरील पूल जीर्ण झाला असुन आहे.जड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडले आहेत. खड्डा चुकीविण्याच्या नादात अपघात घडला.यात एक जण नदीपात्रात वाहून गेला. घटनेची माहिती पोलीसांना कळताच आष्टि- गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मात्र नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सदर इसम वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पुलावरील खड्डे जीवघेने ठरत असल्याने काही महिन्यांपूर्वी पुलावरील खड्डे बुजवीण्याची मागणी भाजपाचे नेते संजय पंदिलवार यांनी केली होती. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही .त्यामुळे सदर अपघात घडल्याचे बोलले जात असून

आता तरी प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 8, 2023

PostImage

अवैध रेती वाहतूक करणारा पकडले ट्रॅक्टर ; चालक गेला पळून


अवैध रेती वाहतूक करणारा पकडले ट्रॅक्टर ; चालक गेला पळून 

 

धानोरा नायब तहसीलदारांची धडक कारवाई 

 

 

धानोरा : तालुक्यातील चिचोली घाट येथून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तालुक्यातील सालेभट्टी येथे सदर ट्रॅक्टर अडवून पाहणी केली असता सदर ट्रॅक्टरमध्ये अवैध रेती भरून असल्याचे निदर्शनास आले असता धानोराचे नायब तहसीलदार डी.के. वाळके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दिनांक ०७ ऑगस्टच्या रात्री दिड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी ट्रॅक्टर चालक पळून गेला यावेळी सदर ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३३ - २२६६ असून सुधाकर भूपटवार यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले अवैध रेतीने भरलेला ट्रॅक्टर‌ जप्त करून पंचनामा करण्यात आला हि तालुक्यातील सालेभट्टी येथे नायब तहसीलदार डी के वाळके, मंडळ अधिकारी धाईत, नितीन नंदावार, साईनाथ कुमरे, कोतवाल मुकेश यांनी केली या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 8, 2023

PostImage

कुरखेडा पोलीसांनी केले अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन जप्त


कुरखेडा पोलीसांनी केले अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन जप्त 

 

 02 ट्रक व 22 गोवंशीय जनावरांसह एकुण 21,54,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. 

 

     गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दिनांक 06/10/2023 रोजी मौजा आंधळी रोडणे मालवाहु वाहनामध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपणीय बातमीदारांकडु न मिळालेल्या माहितीच्या आधारे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखे डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/बाबुराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यल्गडे व मनोज राऊत असे पोस्टे कुरखेडा हद्दीतील आंधळी गावासमोर थांबले असता, थोड्या वेळात नमुद संशयित वाहन येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना हात दाखवुन थांबविले असता, दुरुनच पोलीसांना पाहुन वाहन चालक वाहन सोडुन पळून गेले. त्यानंतर मालवाहु वाहनाजवळ जावुन बघीतले असता, सदरचे मालवाहु वाहन हे एकुण 02 मालवाहु ट्रक असल्याचे दिसुन आल्याने वाहनामध्ये काय आहे ? याबाबत तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतीशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर मालवाहू ट्रक क्र. एम एच-40-सी डी-1545 व एम एच-34-ए बी-9001 या दोन्ही वाहनामध्ये एकुण 22 गोवंश अंदाजे किंमत प्रत्येकी 7,000/- रुपये प्रमाणे एकुण किंमत 1,54,000/- रुपये व दोन मालवाहू ट्रक अंदाजे किंमत प्रत्येकी 10,00,000/- रुपये प्रमाणे एकुण 20,00,000/- असा एकुण 21,54,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन, कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

 

     सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहिल झरकर सा. यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 7, 2023

PostImage

फुले महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह संपन्न वन्यजीवांचे रक्षण करा- वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांचे आवाहन


फुले महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह संपन्न

वन्यजीवांचे रक्षण करा- वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांचे आवाहन

 

आष्टी -

वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मार्कंडा( कनसोबा) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी मा.भारती राऊत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वन्य जीवनाचे रक्षण करा ,मोफत शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी वने सुरक्षित राहणे आवश्यक आहे.वन्यजीवांचे अस्तित्व हे मानवी जीवनास लाभदायकच आहे. भूतलावर मानवाप्रमाणेच प्रत्येक जीवाश्मला जगण्याचा अधिकार असल्यामुळे आपण सर्वांनी मिळून वन्यजीवाची काळजी घेण्याचे आवाहन भारती राऊत केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.राजकुमार मुसणे, डॉ.गणेश खुणे,प्रा ज्योती बोबाटे, डॉ .भारत पांडे , डॉ.रवी शास्त्रकार ,डॉ.भारत पांडे, डॉ .रवी गजभिये, प्रा . श्याम कोरडे तथा वन क्षेत्र सहाय्यक श्री.नरेंद्र वडेट्टीवार, श्री .ईश्वर मांडवकर, प्रकाश भंडारवार ,वनरक्षक श्री हजारे, कोकनरे , श्री.आखाडे, श्री .दंडिकवार , श्री.गोवर्धन, श्री . बारर्शिंगे ,क्षेत्रीय लिपिक कोवे प्रिया नागापुरे आदी उपस्थित होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वन्यजीवनाच्या संरक्षणाकरिता जनजागृती करण्यासाठी जनजागृती रॅलीचे ही आयोजन करण्यात आले. सदर रॅलीत पोलीस निरीक्षक माननीय कुंदनजी गावडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, प्रा .राजकुमार मुसणे, प्रा . ज्योती बोबाटे तथा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. जनजागृती रॅलीतून नागरिकांना वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी सर्व नागरिकांनी वन्यजीवांचे रक्षण करण्याविषयी आवाहन केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 7, 2023

PostImage

खासदार संजय सिंह यांना ईडीने सूडबुद्धीने अटक केल्यामुळे, आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली केंद्र सरकारचा निषेध


खासदार संजय सिंह यांना ईडीने सूडबुद्धीने अटक केल्यामुळे, आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली केंद्र सरकारचा निषेध

 

अंमलबजावणी संचालनालयाने सकाळी 7 च्या सुमारास आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापेमारी केली. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणासंदर्भात चौकशीसाठी हा छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर सलग 10 तास संजय सिंह यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. 

 

संजय सिंह यांच्या घरातील वस्तू ईडी कडून अक्षरशा कचऱ्या सारख्या फेकून देण्यात आल्या, संजय सिंह यांच्या परिवाराला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही अटक म्हणजे नरेंद्र मोदीनी ईडीला पुढे करून बदला घेण्याची चुकीची मानसिक प्रवृत्ती होय, दिवसेंदिवस आम आदमी पार्टीच्या प्रामाणिक लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो घाट मोदी सरकारने घातला आहे तो लोकशाही विरोधी आहे.

 

 

ईडी फक्त नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून काम करीत आहे, त्यांनी आपली स्वायत्तता सोडून मोदींची गुलामगिरी पत्करली आहे, अशा संस्थेबद्दल जनतेला आता कुठलाही विश्वास उरलेला नाही कारण ईडी ही आपले काम सोडून सांग काम्यासारखी झालेली आहे.

 

आम आदमी पार्टी वेगाने वाढत असल्यामुळे त्यांच्या शीर्ष नेत्यांना जेलमध्ये टाकून पार्टी कमजोर करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सतत करीत आहेत, कुठलेही भरभक्कम पुरावे नसताना आम आदमी पार्टीच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची ही पद्धत म्हणजे मोदींची राजकीय अपरिपक्वता आणि खुनशी प्रवृत्ती दिसते आहे.

 

या अटकेविरोधात आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली केंद्र सरकारची इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे 

 केंद्र सरकार आणि ईडी विरोधात घोषणा देत जाहीर निषेध नोंदविला आला आहे, यावेळी सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती त्यावेळी आप चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे ,जिल्हा सचिव भास्कर इंगळे , ओबीसी आघाडी संतोष कोटकर ,संघटनमंत्री संजय जीवतोडे ,महिला आघाडी मीनाक्षी खरवडे ,युवा महिला आघाडी सोनल ननावरे,महिला संघटनमंत्री दीपिका गोवर्धन ,सेवानिवृत्त आघाडी दिवाकर साखरे,आर टी आय आघाडी चोखजी ढवळे ,शहर प्रमुख नामदेव पोले , शहर संघटनमंत्री रुपेश सावसाकडे, युवा आघाडी प्रमुख साहिल बोधले, महिला शहर प्रमुख रेखा निकुरे,मीडिया प्रमुख अनिल बाळेकरमकर,नितीन नैताम ,महेश बोरकर , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 7, 2023

PostImage

आरमोरी रोड वरील प्लॅटिनम ज्युबली शाळेसमोर ११ फूट अजगर सापाला पकडून दिले जीवदान


आरमोरी रोड वरील प्लॅटिनम ज्युबली शाळेसमोर ११ फूट अजगर सापाला पकडून दिले जीवदान 

 

 

 

१ ते ७ ऑक्टोंबर दिवस वन्यजीव सप्ताह साजरा करून लोकांमध्ये वन्यजीवांन बद्दल जनजागृती करण्याचे काम वन विभागा तर्फे सुरू आहे. अशातच काल रात्री आरमोरी रोड वरील प्लॅटिनम ज्युबली शाळेसमोर अजगर साप असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली.

 

हा साप ११ फूट लांब व १७ किलो. ५०० ग्राम वजन इतका होता. प्लॅटिनम ज्युबली शाळे कडील परिसर हा शेताला लागून व कठाणी नदी जवळ असल्यामुळे हा साप चुकून रोड कडे आला होता मात्र लोकांच्या मागणी मुळे या सापाला पकडुन दुसऱ्या दिवशी उप वनसंरक्षक मीलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनात सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, वणपाल श्रीकांत नवघरे, जनबंधू, वनरक्षक भारत राठोड, सर्पमित्र अजय कुकडकर, सौरभ सातपुते, मकसुद सय्यद, पंकज फरकाडे, प्राशिक झाडे, योगेश हजारे, निखिल लडके उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 7, 2023

PostImage

११ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८,रा.ईरूपगट्टा ता.भोपालपट्टनम जि.बिजापूर, छत्तीसगड) हिने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले


 

११ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८,रा.ईरूपगट्टा ता.भोपालपट्टनम जि.बिजापूर, छत्तीसगड) हिने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

 

 

 

सरपंचाच्या खुनासह पोलिसांसोबतच्या चार चकमकींमध्ये ती सहभागी होती

 

गडचिरोली : ११ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८,रा.ईरूपगट्टा ता.भोपालपट्टनम जि.बिजापूर, छत्तीसगड) हिने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सरपंचाच्या खुनासह पोलिसांसोबतच्या चार चकमकींमध्ये ती सहभागी होती.

 

रजनी वेलादी ही ऑगस्ट २००९ मध्ये फरसेगड दलममध्ये सदस्य म्हणून नक्षली चळवळीत सामील झाली. २०१० पर्यंत ती सक्रिय होती. २०१० मध्ये ओरच्छा दलममध्ये बदली होऊन २०१३ पर्यंत ती कार्यरत राहिली. २०१३ मध्ये नॅशनल पार्क एरिया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन तिची एरिया कमिटी मेंबर म्हणून पदोन्नती झाली. २०१५ पर्यंत ती कार्यरत होती. त्यानंतर तिची सांड्रा दलममध्ये बदली झाली व तेव्हापासून ती या दलममध्येच कार्यरत आहे. २०२०- २१ मध्ये उपराल (छत्तीसगड) येथील एका सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय २०१५ मध्ये गुंडम येथील पोलीस चकमकीत ती सहभागी होती.

 

२०१७ मध्ये बेज्जी- येर्रागुफा मार्गावरीील चकमकीत छत्तीसगडचे १२ जवान शहीद झाले होते. यात देखील ती सहभागी होती. २०१८ मध्ये मारेवाडा व २०१९ मध्ये बोरामज्जी जंगलातील चकमकीतही रजनी वेलादीचा सहभाग होता.२०१८ मध्ये बेद्रे रोडवर शासकीय वाहन पेटवून दिले होते, यामध्येही ती सामील होती. दरम्यान, तिच्यावर छत्तीसगड सरकारने ६ तर महाराष्ट्र शासनाने ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. जिल्ह्यात मागील पावणे दोन वर्षांत १३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 5, 2023

PostImage

जिल्ह्यात 144 कलम लागू


जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली,(जिमाका)दि.17 : जिल्हा परिषद अंतर्गत गट –क या संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती परिक्षा दिनांक 07, 08, 10 व 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील गॅलक्सी इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी, कॅम्प एरिया, माता मंदिर जवळ, धानोरा रोड, गडचिरोली या उपकेंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. 

सर्व केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी संजय मिना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये परिक्षा केंद्राच्या 200 मिटरच्या परिसरात पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. 

केंद्र परिसरात झेरॉक्स मशीन, फॅक्स केंद्र, एस टी डी बुथ, परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता, येणार नाही. 

परिक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी. सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या आदेशात नमुद आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 5, 2023

PostImage

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू


जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

गडचिरोली,(जिमाका)दि.5: जिल्ह्यात दिनांक 2 ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मस्कऱ्या गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणूक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात 4 ते 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे. 

त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. 

व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर उपरोक्त कालावधीत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश 4 ऑक्टोबर रात्री 12.01 वाजतापासून 18 ऑक्टोबर च्या 24 वाजेपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील, असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 5, 2023

PostImage

जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

गडचिरोली, (जिमाका) दि.05 : जिल्ह्यातील सार्वत्रिक / पोट निवडणूक असलेल्या एकूण 111 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्य 3 ऑक्टोबर 2023 च्या आदेशान्वये माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे.      

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 6 ऑक्टोबर 2023 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी ) 16 ऑक्टोबर (सोमवार) ते 20 ऑक्टोबर 2023 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी) 23 ऑक्टोबर (सोमवार) रोजी सकाळी 11 वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ 25 ऑक्टोबर (बुधवार) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ 25 ऑक्टोबर (बुधवार ) दुपारी 3 वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) (गडचिरोली जिल्हयासांठी स.7.30 वा.पासून ते सायंकाळी 5.30 वा.पर्यंत) आणि मतमोजणीचा 7 नोव्हेंबर 2023 (मंगळवार) रोजी होईल. 

तरी वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदारांनी/नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडून आवाहन करण्यात येत असल्याचे निवडणूक विभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे.

*अशी आहे निवडणूक होणा-या (सार्वत्रिक / पोट) ग्रामपंचायतींची संख्या* : कोरची – 17 ग्रामपंचायती, कुरखेडा – 4, देसाईगंज – 1, आरमोरी – 1, गडचिरोली – 6, धानोरा – 26, चामोर्शी – 7, मुलचेरा –4, अहेरी - 6, ऐटापल्ली – 13, भामरागड – 14 आणि सिरोंचा तालुक्यातील 12 अशा एकूण 111 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक / पोट निवडणूक होणार आहे.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 5, 2023

PostImage

हजारोंच्या संख्येने भजन करीत शांततेत निघाला कुणबी महामोर्चा, हजारो कुणबी बांधव सहभागी, विविध संघटनेचा पाठिंबा


 

गुरुवार, दि. ५ ऑक्टोबर २०२३

 

शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन करीत शांततेत कुणबी समाज बांधवांचा मोर्चा निघाला मराठ्यांचा आरक्षणाचा लढा १९९३ पासून सुरू आहे. मराठा समाज मागासलेपणाच्या निकषात बसत नसल्याने न्यायमूर्ती खत्री आयोग (१९९५) व न्यायमूर्ती बापट आयोग (२००७) यांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारले. त्यानंतर नारायण राणे कमिटीने कुणबी व मराठा एकच असून ते सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहे असा अहवाल जून २०१४ रोजी महाराष्ट्र शासनास सादर केला. या अहवालानुसार तत्कालीन सरकारने मराठ्यांना नोकरीत १६ टक्के व मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण लागू केले होते पण तेही आरक्षण उच्च व सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर न्यायमूर्ती गायकवाड आयोग (२०१८) च्या शिफारशीनुसार मराठ्यांना शिक्षणात १२ टक्के व नौकरी १३ टक्के आरक्षण लागू केले पण हे सुद्धा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने असंविधानिक ठरवून अपवादात्मक परिस्थितीच्या कारणास्तव सुद्धा या समाजाला ५०% चे वरील आरक्षण देता येत नाही. अशा प्रकारचे स्पष्टीकरण ५ मे २०२१ च्या निकालात नोंदविले आहे. तरीही राज्य सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाला बळी पडून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू पाहत असेल तर तो ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल.

तरी राज्यशासनाने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या व इतर प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर कुणब्यांचा महामोर्चा भजन करीत शांततेत काढण्यात आला, या मोर्चात कुणबी / ओबीसी बांधव व भगिनीं, युवक व युवती हजारोंच्या संख्येने सामील झाले 

 

यावेळी करण्यात आलेल्या ओबीसी बांधवांचे प्रमुख मागण्या

 

बिहारच्या धर्तीवर राज्यात सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,महामहिम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यासह इतर १२ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ओबीसींचे १७ संवर्गीय पदाचे आरक्षण शून्य झाले असून हे असंविधानिक आहे. हा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय असून तो तात्काळ दूर करण्यात यावा,गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे,सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात येऊन सरकारी शाळा कार्पोरेट समूहाला देण्यात येऊ नये,सारथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तात्काळ सुरू करण्यात याव्यात,अल्पसंख्यांक संस्थांना त्यांच्या आस्थापनेतील रिक्त पदभरतीसाठी देण्यात आलेली सूट, बहुजन समाजातील संस्थांना सुद्धा देण्यात यावी,राज्यात ओबीसींसाठी मंजूर असलेले ७२ वसतिगृह तत्काळ सुरू करण्यात यावे व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावे,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा तात्काळ लागू कराव्यात,धानाला प्रती क्विंटल रु. ४,०००/- हमी भाव द्यावा, कुणबी समाजाला अॅट्रसिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे,कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी कुणबी समाज बांधवांनी महामोर्चा काढला


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 5, 2023

PostImage

तेलगांना विधानसभा निवडणूक संबंधित भाजपाची हैद्राबाद येथे दोन दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबीराला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती


 

दि.०५ ऑक्टोंबर २०२३

तेलगांना राज्यात विधानसभा निवडणूक संबंधित भारतीय जनता पार्टी च्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबीर आयोजन भाजपा कार्यालय हैद्राबाद येथे करण्यात आले.

या कार्यशाळा ला राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे तथा खासदार अशोक नेते यांना तेलगांना राज्यातील निरमल जिल्हा प्रभारी म्हणून खानपुर,निरमल,मुधोली या क्षेत्राची महत्वाची जबाबदारी देण्यात आली.

 

या प्रशिक्षण शिबीराला प्रामुख्याने राष्ट्रीय संघटन महामंत्री बि.एल. संतोषजी,तेलगांना प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री किसन रेड्डी जी,प्रकाश जावडेकरजी, प्रविणजी दरेकर, डि.के. अरुणाजी,तसेच अन्य मंत्री महोदय व पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 5, 2023

PostImage

लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : ना. सुधीर मुनगंटीवार


लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : ना. सुधीर मुनगंटीवार 

 

पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत

 

भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला स्वागत आणि अभिनंदन सोहळा !

 

 

लंडन, दि. ४: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक करोड कोहिनूर ओवाळून टाकावे असा राजा होय. जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात येते, क्रुरता आपली सिमा ओलांडते तेव्हा एक तर देव अवतार घेतो किंवा शिवबा अवतार घेतात;

छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव जरी नसतील तरीही देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत, या महानायकाचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमित उभारण्यासाठी मी आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, तुम्ही पुढाकार घ्या मी पुतळा देईन अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

विजापूरचा मुगल सरदार अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी महाराजांनी बाहेर काढला ती वाघनखे परत मिळविण्यासाठी ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर ना. मुनगंटीवार यांचा लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी भव्य समारंभ आयोजित करुन सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते.

ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, मला जेव्हा सूचना केली की लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा उभा करावा, तेव्हा मला अतिशय आनंद झाला; मी लगेच संमती दिली. यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठिशी उभे राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी विचार विश्वात पोहचावा अशी आमची अपेक्षा आहे. हा विचार जगातील प्रत्येक देशापर्यंत, देशातील प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावांपर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक आई-बहिणी पर्यंत, पोहचविण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने केला आहॆ. यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.

लंडनच्या मराठी बांधवांचे आभार मानताना ना. मुनगंटीवार म्हणाले,

आयुष्यामध्ये अनेक आनंदाचे क्षण येतात त्यापैकी आजचा एक आनंदाचा क्षण आहे. तुमच्या सर्वांची भेट घेताना, तुमच्याशी संवाद साधताना, तुमचं दर्शन घेताना मलाही मनापासून आनंद होतोय. जगातील १९३ देशात देशांत सर्वांत श्रेष्ठ भारत असून त्यात आमचा महाराष्ट्र महान आहे .

ते म्हणाले मी भाग्यवान आहे, सांस्कृतिक मंत्री म्हणून शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली. हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या अफजलखानाची कंबर उखडून टाकण्याचे सौभाग्य मला मिळाले; त्याचे उदात्तीकरण आम्ही सहन करु शकत नाही. आग्र्याच्या किल्यात जेथे महाराजांचा अपमान झाला तेथेच भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करुन अभिवादन केले, राज्यात ठीकठिकाणी जाणता राजा महानाटय़ाचे प्रयोग असे कितीतरी उपक्रम राबविण्याची संधी मिळाली. आमचा राजा शूर होता, वीर होता, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक होता; त्यामुळे मराठी मातीशी नाळ जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात फक्त शिवबाच असावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामंजस्य करार करण्यास ना. सुधीर मुनगंटीवार लंडनला येणार हे कळल्यापासूनच स्थानिक शिवप्रेमी मराठी बांधव उत्साहित होते. मंगळवारी दुपारी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्तुझियम जवळ ना. मुनगंटीवार पोहोचताच पारंपरिक मराठमोळ्या वेषात, ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत या महाराष्ट्र मंडळाने केले. सामंजस्य करार झाल्यानंतर अतिशय देखणा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला; स्फुर्तीगीत, पोवाडा, पारंपरिक नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग अशा विविध छटांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 5, 2023

PostImage

अहेरी चेरपल्ली रस्त्याचा मायबाप कोणी आहे का..?


अहेरी चेरपल्ली रस्त्याचा मायबाप कोणी आहे का..?

 

अहेरी:- उपविभागातील अहेरी शहर हा पाचही तालुक्यांना जोळणारा तालुका आहे त्यामुळे या अहेरी शहरात नेहमीच नागरिकांची रहदारी असते. त्यातच विद्यार्थी, गरोदर महिला, शेतकरी वर्गातील सामान्य नागरिक, छोटेखानी व्यावसायिकांची नेहमीच येजा असते. 

          नागरिकांना या अहेरी शहरात येतांना येथील रस्त्यांवरून वर्दळ करतांना जीव घेऊन जायचं तरी कसं..? असा सवाल त्याच्या मनात आधी येते, मग तो अनेकदा विचार करतो कधी कुठे माझं अपघात होऊन माझं जीव या प्रवासात जाईल का..?

         अहेरी तालुक्यातील नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 17 गडबामनी, व 16 चेरपल्ली या शहरातील गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची मागील 2 वर्षांपासून अती दुरवस्था झाली आहे त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात झालेले आहेत. तसेच अनेक वर्षांपासून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही हे विशेष.

 

कोड:-

             आपला गाव ग्रामिण मध्ये होता तर ग्रामिण मध्येच राहायचं होत पण काही राजकिय हलकट लोकप्रतिनिधीनी आपल्या गावाला शहरी भागात समाविष्ट करुन आपल्याला व आपल्या गावातील नागरिकांना रस्तेच नवे तर अनेक समस्या पासून वंचित ठेवल आहे याला कारण आधी आपण आहोत आपल्या गावातील नागरिक आहेत म्हणून येत्या निवडणूकीला माझं जाहिर निषेध आणि बहिष्कार आहे

- विनोद रामटेके

चेरपल्ली रहिवासी

 

कोड:-

या रस्त्या संदर्भात वारंवार निवेदन देऊन शासन व प्रशासनाकडे मागणी करूनही याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने आज या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघातास आमंत्रण मिळत आहे म्हणून या अहेरी चेरपल्ली रस्त्याचा कोणी बायबाप आहे का..?

- आशिष सुनतकर

ग्रामीण चेरपल्ली रहिवासी व सामजिक कार्यकर्ता


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

जिल्हयात पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिटचे उदघाटन


 

गडचिरोली, (जिमाका) दि.04 : जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील जन्मजात बालके/विद्यार्थी यांच्यामध्ये जन्मता असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक विलंब, वाढीतील दोष तसेच इतर बालपणातील आजारांची तपासणी, निदान निश्चिती, थेरपी व उपचार आपल्या जिल्ह्यामध्येच उपलब्ध असावे, यासाठी जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत ‘पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट’ जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील पेडीऑट्रीक विभाग सुरू करण्यात आले आहे.

या फिजिओथेरपी युनिटचे उद्घाटन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किलनाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ धुर्वे आदी उपस्थित होते. 

डीईआयसी येथील उपलब्ध जागेमध्ये ‘पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट’ बनविण्यात आले असून बालकांसाठी आकर्षित रंगरंगोटी अंतर्गत सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्यांना खेळीमेळीचा सहवास लाभावा तसेच बालकांची मानसिक आरोग्यस्थिती व्यवस्थित व्हावी व थेरेपी करिता अनुकूल वातावरण मिळावे, हा यामागील हेतू आहे. फिजिओथेरेपीकरिता येथे बालकांच्या विकासात्मक वाढीसाठी आवश्यक वेगवेगळे साहित्य/उपकरणे उपलब्ध करण्यात आले आहे. 

नियमित फिजिओथेरेपीमुळे बालकांमध्ये आत्मविश्वास परत मिळण्यास मदत होऊ शकते. थेरेपी स्नायुमधील बदलांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते. जसे की स्नायू कडक होणे, स्नायूंची ताकद, लवचिकता, पोश्चर, गतिशीलता, दैनंदिन जीवनातील कार्यात्मक स्वातंत्र आणि एकूण जीवनाच्या गुणवत्तेत बदल होण्यास मदत मिळते. अनेकदा स्पेशल एज्युकेशन, स्पिच थेरेपी आणि आकुपेशनल थेरेपीचे एकत्रीकरण जीवन कौशल्यामध्ये प्रगती करते.

प्रत्यक्षात फिजिओथेरेपीचे कौशल्य अनेक आहेत, ते कोणत्याही स्थितीवर उपचार करू शकतात. ज्यामुळे हालचाल, संतुलन किंवा समन्वय, हाताची पकड, बसणे, खेळतांना हाताचा वापर, स्ट्रेचिंग व्यायाम, संतुलित व्यायाम तसेच सामाजिक परस्पर संवादाच्या संधी, आर्थोपेडिक किंवा क्रीडा दुखापतीचे वैद्यकीयदृष्ट्या निदान ई समाविष्ट आहेत. तसेच बाळ उशिरा चालणे, उशिरा मान धरणे, वेळेत न रांगणे, हाता-पायाची कमी हालचाल, बाळाला उभे राहण्यास अडचण, सरळ चालण्यास अडचण ई गोष्टी बालकाच्या वयानुरुप नसल्यास बालरोग फिजिओथेरेपीची आवश्यकता आहे. 

यासाठी नागपूर येथील ज्येष्ठ बालरोग फिजिओथेरेपीस्ट तथा पुनर्वसन सल्लागार डॉ. मिनाक्षी वानखेडे इतर थेरेपिस्टसह दर महिन्याच्या पहिल्या व तिस-या आठवड्यातील शुक्रवारला पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट, डीईआयसी येथे उपलब्ध राहणार आहेत. दरम्यान बालकांची तपासणी, मुल्यांकन, गरजेनुसार थेरेपिचे नियोजन, थेरेपीमधील अल्प-दीर्घ उदिष्टे ठरविणे व बरेच काही बाबींचा नियोजन आहे. तसेच दर सोमवार-मंगळवार-बुधवार प्रशिक्षित थेरेपीस्टकडून नियमित फिजिओथेरेपी सत्रे असणार आहेत. 

सांधे घट्ट होणे, चालायला उशीर, मोटर विलंब (ग्रास आणि फाईन), आकलनाच्या समस्या, स्नायू कमकुवत होणे, डीले माईलस्टोन, मेंदूचा पक्षाघात, डाऊनसिंड्रोम, अतिचंचलता (एडीएचडी), स्वमग्न (ऑटीझम), आर्थोसमस्या, वाढीतील दोष, विकासात्मक विलंब व इतर शारीरिक समस्या असलेल्या बालकांना ‘पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट’ साठी संदर्भित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. 

 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेचा जिल्हा परिषद गडचिरोली समोर मोर्चा..!


 

 

 

 दि.०४:- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्यखाते आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेमार्फत आज गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक महिला यांनी आपल्याला दरवर्षी दिवाळी बोनस रु.१० हजार मिळावे ,किमान वेतन लागू करावे,आरोग्य खात्यातील ५०% रिक्त जागा पात्रतेनुसार आशा स्वयंसेविकेतून भरावे,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ,गडचिरोली यांच्या आदेशानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ग्राम निधी व वित्त निधीतून दरमहा रु.१००० इतका मानधन देण्यात यावे तसेच प्रसूती रजा ६ महिने व आजारी रजा १ महिन्याची देण्यात याव्या.ह्या सर्व मागण्या धरून आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेमार्फत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

            या मोर्च्यातील आशावर्कर व गटप्रवर्तक महिला द्वारे मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री,मा.आरोग्यमंत्री,मा.आयुक्त NRHM यांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंग यांच्या द्वारे निवेदन देण्यात आले व १५ ऑक्टो-२०२३ पर्यंत सर्व मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा १६ ऑक्टोबर पासून सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक राज्यव्यापी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

वाघनख भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी , तमाम शिवप्रेमींसाठी, ऐतिहासिक क्षण : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे


 

 

शिवबाच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान : ना. सुधीर मुनगंटीवार

 

लंडन, दिनांक ४ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज केले.

 

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याच्या संकल्प राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता; त्यानुसार वाघनखे आणण्याचा सामंजस्य करार मंगळवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून बोलत होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री ना उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, पुरातत्व विभागाचे संचालक श्री. तेजस गर्गे, मंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.अमोल जाधव, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट, भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  

शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग असून शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत. असेही ना. एकनाथ शिंदे म्हणाले.शिवराज्याभिषेकाच्या निमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं हा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.

 

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आयुष्यातील महत्वाच्या आणि संस्मरणीय प्रसंगापैकी एक असा आजचा हा प्रसंग आहे. रयतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या दाढेत स्वतःला झोकून ज्या क्रूर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला ती वाघनखं माझ्या शिवबाच्या मातृभूमीत, महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय हा अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नव्हते तरी आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत; ते आमचा स्वाभिमान आहेत, ती आमची प्रेरणा आहे, ती आमची ऊर्जा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्ष्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलेला संकल्प मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात पूर्णत्वाकडे जातोय याचा अतिशय आनंद होतोय असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ना. मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट म्यूझियम यांच्या दरम्यान जो MOU झाला, त्यानुसार ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे. 

 

ना. श्री सुधीर मुनगंटीवार करारासाठी संग्रहालयात जाण्यापूर्वी त्यांचे लंडन येथील मराठी बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले; त्यानंतर संग्रहालयातील इतर सर्व वस्तू बघत असताना शिवकालीन तसेच भारतातील इतर वस्तूंची त्यांनी कुतूहलाने माहीती जाणून घेतली. त्यानंतर स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

गुरवळाच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव संमत


गुरवळाच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव संमत

 

 

गडचिरोली : तालुक्यातील गुरवळा येथील सरपंच दर्शना धनराज भोये यांचे विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावावर तहसीलदारांनी बोलाविलेल्या सभेत मंगळवार (ता. ३) प्रस्ताव ६ विरुद्ध १ असा संमत झाला. त्यामुळे सरपंच दर्शना भोपये यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पॅनेलने गुरवळा ग्रामपंचायतीवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दर्शना धनराज भोपये या सरपंच झाल्या होत्या. मात्र त्यांना मिळालेल्या संधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी न करता काही कंत्राटदारांशी संगनमताने अनेक विकासकामांत आणि गावातील नागरिकांच्या समस्यांबाबत मनमानी कारभार चालविला होता. त्यामुळे पायउतार व्हावे लागले.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

दोन नवजात बालकानंतर तिसरा बालक आईविना झाला पोरका,गडचिरोली येथील महिला रुग्णालयात प्रसूती झालेल्या तिसऱ्या मातेचा झाला मृत्यू


 

 गडचिरोली येथील महीला व बाल रुग्णालयात 24 सप्टेंबर रोजी झालेल्या सिझेरियन प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यु झाल्यानंतर तिन ऑक्टोंबर मंगळवारी नागपूर येथील मेडिकल रूग्णालयात भरती असलेल्या मातेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने आता त्या सिझेरियन प्रसुतीनंतर मृत मातांची संख्या तीन झाली आहे.

 

वैशाली सत्यवान मेश्राम वय 25 वर्ष रा. आष्टी. ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली मेश्राम हीला मुलगी झाली होती.

 

25 सप्टेंबर रोजी गडचिरोली येथिल महीला व बाल रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीनंतर उज्वला बुरे, रजनी शेडमाके, वैशाली श्रम आणि अन्य महीला यांची प्रकृती खालावली. यात रजनी शेडमाके हीचा गडचिरोली येथील रुग्णालयातच तर उज्वला बुरे हिला नागपूर येथे नेताना वाटेतच मृत्यु झाला. तर वैशाली मेश्राम हिच्यावर नागपूर येथील मेडिकल रूग्णालयात उपचार सुरू असताना 3 ऑक्टोंबर रोजी मृत्यु झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे च या मातांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून यामध्ये तीन नवजात बालके आपल्या आईविना पोरकी झाली आहे. या घटनेनंतर गडचिरोली येथिल महीला रुग्णालयाच्या आरोग्यव्यवस्थेवर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन मृत महिलांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात येत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

कुणबी महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची होर्डिंगबाजी,अनेक ठिकाणी वेधतात लक्ष


कुणबी महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची होर्डिंगबाजी,अनेक ठिकाणी वेधतात लक्ष

 

 

 

 

गडचिरोली : राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविण्यासह इतर मागण्यांसाठी ५ ऑक्टोबरला गडचिरोलीत कुणबी समाजाच्या वतीने महामोर्चा काढल्या जाणार आहे. या महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते सरसावले आहेत. शहरातील मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात आणि शहरातील प्रमुख मार्गांवर मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. सर्व आमदार आणि खासदारांसह इतरही नेत्यांनी आपापले होर्डिंग लावल्याने जणूकाही कोणाचे होर्डिंग मोठे आहे, याची स्पर्धाच लागली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात वाटा देण्याला विरोध दर्शविण्यासाठी, तसेच ओबीसी संवर्गाच्या इतर मागण्यांसाठी 5 ऑक्टोबरच्या मोर्चाला कलार समाज संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. एवढेच नाही तर जिल्हाभरातील कलार समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असाही निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे देण्यात आले. त्यावर जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार, विदर्भ उपाध्यक्ष निरंजन वासेकर, रविंद्र वासेकर, श्रीनिवास दुल्लमवार, दामोधर मांडवे, दिलीप मेश्राम, सदाशिव मंडावार, किशोर गडपल्लीवार, कुणाल पडलवार, प्रभाकर मंडावार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये या मुख्य मागणीसह ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, गडचिरोलीमध्ये ओबीसींना 19 टक्के आरक्षण पूर्वरत करावे, शासकीय शाळांना कॉर्पोरेट समूहाला विकण्याचा निर्णय आणि सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशा विविध मागण्यांसाठी 5 ला महामोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा कुणबी समाजाचा असला तरीही हा लढा न्यायाचा व जनसामन्यांच्या हिताचा, संवैधानिक लढा असल्याने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने सर्वानुमते या मोर्चाला पाठींबा दिला आहे. तसेच बहुजन समाजाने या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.


 

अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.

 

 

 गडचिरोली:- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत पूर्वी झालेल्या व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कार्यवाही

करण्यात यावी; यासाठी सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज (वडसा) येथे दोनदा आमरण उपोषण केला होते. दोनदा आमरण उपोषण करूनही कुठल्याही प्रकारची चौकशी वा संबंधितांवर कार्यवाही करण्यात आली नसल्याने परत तिसऱ्यांदा आमरण उपोषणाचा मार्ग सत्यवान रामटेके यांनी अवलंबिला आहे.

 

 

त्यानुसार त्यांनी २५ सप्टेंबर २०२३ पासून मुख्य वनसंरक्षक वनवृत्त कार्यालय गडचिरोली कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केला आहे. आजचा नववा दिवस असून सदर गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे यांना आमरण उपोषण कर्त्याशी कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते मागण्यांकडे दुर्लक्ष करून रामटेके यांच्या मृत्यूची वाट बघत असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.

 

एवढे दिवस लोटूनही मागण्या मान्य न करणे म्हणजे काही तरी झांगडगुत्ता असल्याचे वाटत आहे. वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार करूनही दोषींवर कार्यवाही न करता; त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय वा दिलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

धर्मपुरी गावातील महामार्गावर तेलंगाणा राज्याच्या महामार्गावर जखमी झालेल्या इसमाला मूलकला फाउंडेशनचे प्रमुख सागर मूलकला यांचे कडून मदातींच्या हात ...


धर्मपुरी गावातील महामार्गावर तेलंगाणा राज्याच्या महामार्गावर जखमी झालेल्या इसमाला मूलकला फाउंडेशनचे प्रमुख सागर मूलकला यांचे कडून मदातींच्या हात ...

 

 

 

 

 सिरोंचा :- सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या धर्मपुरी गावात महामार्गावर एका तेलंगाणा राज्यातील तीलवाई गावातील येमुर्ला पोचम यांचे अपघात होऊन रस्त्यावर पडून होते,

       ही माहिती धर्मपुरी गावातील सागर भाऊ मूलकला यांचे मित्रपरिवार कडून मिळताच त्यांनी वेळेचे विलंब न करता धर्मपुरी येथे घटनास्थळी रात्री 8 वाजता पोहोचून रस्त्यावर पडून असलेल्या जखमी इसम येमुर्ला पोचम यांना आपल्या दुचाकीने घेऊन सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,

        त्यांचे उपचार सुरू असून सागर भाऊ मूलकला यांनी जखमी येमुर्ला पोचम यांचे कुटुंबियांना विषयाची माहिती देण्यात आली आहे,

           सामाजिक कार्यत नेहमी दिवस / रात्र अग्रेसर राहणारे मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख - सागर मूलकला, आणि मित्रमंडळी - नवीन दिकोंड यांचे तालुक्यातील जनतेकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे,


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 4, 2023

PostImage

लाहेरी येथे जनआरोग्य शिबिराचे आयोजन


लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील आरोग्य केंद्रात जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ९ उपकेंद्र आणि ४४ गावातील गरोदरमाता व लहान बालकांची तसेच वयोवृद्ध नागरिकांचीसुध्दा तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील ५०० तालुके व गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, सिरोंचा या तालुक्यातील आहेत. या अभियानात गरोदरमातांची नोंदणी व १२ आठवड्याच्या आत नोंदणी करणे, संस्थात्मक प्रसूती १०० टक्के करणे व बालकांचे वजन २.५०० च्या वर आणणे व कुपोषणमुक्त करणे, क्षय रुग्णांची तपासणी करून उपचार करणे, ३० वर्षांवरील नागरिकांचे रक्तदाब व मधुमेह तपासणी करून उपचार करणे आदी उपक्रम घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी गरोदर मातांची नोदणी करून त्यांना आम्ही 'माहेर घर' या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी त्यांना दोन वेळ जेवण, नाश्ता व मातेसोबत राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा भोजन, राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या भागात मलेरियाचे प्रमाण अधिक असून आशासेविकांना रक्ताचे नमुने घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  

या कार्यक्रमात उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे, उपनिरीक्षक सचिन सरकटे, प्रशांत डगवाल, अभिजित काळे, जमदाडे, मुणाल उसेंडी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी प्रगती टाक, सरपंच राजेश्वरी बोगामी, आरोग्य साहाय्यिका पेंदाम, आशासेविका वैशाली मोगरे, आरोग्यसेवक सुनील सिडाम, आरोग्य साहाय्यक पी. पी. सिडाम, धोटे, सूरज येगोलपवार तसेच लाहेरी परिसरातील आशा, अंगणावाडीसेविका, आरोग्यसेविका व गरोदरमाता, गावकरी उपस्थित होते.

 


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 3, 2023

PostImage

संजय गांधी निराधारांचे थकीत असलेले अनुदान तात्काळ मिळवून द्या :- रा.कॉ.चे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांची मागणी


 

 सिरोंचाचे तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर .

 

 

सिरोंचा :- तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान मागील जून महिन्यापासून थकीत आहे, 

ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही करिता थकीत असलेले अनुदान तात्काळ लाभार्त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी केली आहे.

                सिरोंचा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या वतीने त्यांनी सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.

 

        सिरोंचा तालुक्यात गोरगरीब, वृद्ध, अपंग, विधवा,अनात मुले /मुली ,दुर्धर आजार,असे निराधारांचे देय असलेलं संजय गांधी निराधार योजनेचा अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावी,मागील जून महिन्यांपासून लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांच्या कुटुंबावर उपास मारीची पाळी आली आहे,

   सदर अनुदान हे एकूणच महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांचे थकीत असल्याची माहिती आहे ,अशात महाराष्ट्रातील लक्षावधी लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नसल्याचे सर्व लाभार्थ्यांची गैरसोय होत असताना दिसून येत आहे, 

    यावर शासनाने गंभीरतेने लक्ष घालून संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्यांना तात्काळ देय असलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी ,अशी मागणी शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल गण्यारपवार ,तालुका अध्यक्ष फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला, याचासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

             सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस - चोक्कामवार, तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला,राष्ट्रवादी कार्यकर्ते सडवली मेडीजेर्ला,विनोद नायडू,राजू मूलकला,अंकुलू मेडीजेर्ला यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 3, 2023

PostImage

अविकसित व अतिसंवेदनशील भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी कडून छोटीशी भेट


अविकसित व अतिसंवेदनशील भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी कडून छोटीशी भेट

भामरागड 

पोलीस स्टेशन धोडराज येथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांनी ग्राम भेट एस.आर. पी. व सी.आर.पी.हद्दीतील अविकसित अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट देत असतात. व शाळेतील गरजू गरीब विद्यार्थ्यान सोबत नेहमी संपर्क करतात. व तेथील शिक्षकांशी समन्वय साधून आपण विद्यार्थ्यांकरिता काय करू शकतो या संदर्भात वार्तालाप करत असतात. त्यामध्ये शाळेत विद्यार्थी ज्ञान घेत आहेत परंतु त्यांना दप्तर,नोटबुक, शाळेत नाही याची खंत पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी नेहमी सतावत होती. म्हणून त्यांनी निश्चय केला की विद्यार्थ्यांना भेट म्हणून दप्तर व नोटबुक द्यायचे. म्हणून धोडराज पोलीस स्टेशन हद्दीतील भटपर,बोळगे,गोंगवाडा, मर्दमालेंगा,परायणार,व मिडदा पल्ली, या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 60 दप्तर 120 नोटबुक व 150 शालेय साहित्याचे स्वखर्चाने वाटप केले.

               अशा प्रकारे अतिसंवेदनशील भागात कर्तव्य करून गरीब विद्यार्थ्यांकरिता जीव ओतून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच पालकांनी व शिक्षकांनी सुद्धा व गावकऱ्यांनी आभार मानले. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडी-अडचणी व लागणाऱ्या साहित्याची पूर्तता करून देण्याची हमी दिली.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 3, 2023

PostImage

पेंटींपाका ग्रा.पं.ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश


पेंटींपाका ग्रा.पं.ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश

 

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी B.R.S पक्षाची दुपट्टा टाकून पक्षात केला स्वागत

 

अहेरी:सिरोंचा तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ना.धर्मराव बाबा आत्राम गट) सरपंच बालक्का सडवली रेड्डी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करीत भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वावर आणि कामावर विश्वास ठेवत भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्या.यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी सरपंच बालक्का सडवली रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षाची दुपट्टा टाकून त्यांच्या पक्षात स्वागत केले.सदर पक्षप्रवेश हे आल्लापल्ली येथे माजी आमदार आत्राम यांच्या निवासस्थानी पार पडला.

 

               श्रीमती बालक्का सडवली रेड्डी यांचा बी.आर.एस.पक्ष प्रवेशामुळे पेंटींपाका सह परिसरातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे,ज्या पक्षात राहतात त्या पक्षात सक्रिय राहून व पक्ष वाढीसाठी काम करीत असतात.

 

             सरपंच बालक्का सडवली रेड्डी हे सर्वपरिचित चेहरा असून पेंटींपाका गावासह परिसरातील गावांमध्ये त्यांच्या ओळखीसह दांडगा जनसंपर्क आहे.

 

     पेंटींपाका ग्राम पंचायत सरपंच बालक्का रेड्डी यांच्या पक्ष प्रवेशावेळी आल्लापल्ली येथे पेंटींपाका ग्रामपंचायतचे सदस्या दुर्गम सुदीष्णा अंतर्गम मोनिका,सुदुला गट्टू,आविस नेते वासू सपाट,सिरोंचा शहर प्रमुख गणेश रच्चावार,सारली दुर्गम,श्रीनिवास दुर्गम,अंतर्गम श्रीकांत,विजय बंदेला,आलापल्ली ग्राम पंचायतचे माजी सरपंच विजय कुसनाके,विनोद कावेरी,संदीप बडगे,अनिल नैताम,हरिदास ठोंबरे सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 3, 2023

PostImage

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना केली मदत..!


 

सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 (चौतीस) विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप.!!

 

 

गडचिरोली जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती,पण आर्थिक प्रश्न ? निर्माण असल्याने तेथील विद्यार्थी चिंतेत होते,पण ही बाब सिरोंचा येथील जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांना कळताच त्यानी विद्यार्थ्यांनची भेट घेतली व विद्यार्थ्यांची त्यांची समस्या जाणून घेतली.

 

 

जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी ही विद्यार्थ्यांनची समस्या माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत पोहचवली,तेव्हा राजे साहेबानी विद्यार्थ्यांनची समस्या जाणून घेत, सिरोंच्या येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34(चौतीस)विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देण्यात आले, त्यामध्ये, टी-शर्ट, व्हॉलीबॉल, नेट आणि इतर काही वस्तू वाटप केले, त्यावेळी विद्यार्थ्यांनाच्या चेहऱ्यावरीला आनंद पाहण्यासारखा होता.

 

 

अहेरी इस्टेट चे राजे व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नेहमी मदत करत असतात आणि क्रिडा क्षेत्रात जाऊन विद्यार्थी आपलं आयुष्य घडवतील यासाठी प्रेरणा देत असतात.

 

 

यावेळी जगदंब फाउंडेशन सिरोंचा अध्यक्ष हरीश कोत्तावडला ,उपाध्यक्ष दिनेश सुनकरी, सचिव नागराजू मेडारपु, कोषाध्यक्ष शेखर मंबु,भाजप ज्येष्ठ नेते बापन्नाजी रंगूवार भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप सेनिगारपू, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार,सितापती गट्टू ,मुरली मार्गोनी,रवींद्र आकुदरी, राजेश सुनकरी ,शिरीष बेहेरी, रोहन तोटा,रवी कुमार पेयाला हे उपस्थित होते..!


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 3, 2023

PostImage

पत्रकारांनी समाजासाठी चांगले काम करीत असताना समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करावे - आ. प्रतिभाताई धानोरकर


 

मुल येथे व्हाॅईस ऑफ मीडिया चंद्रपूर - गडचिरोली संघटने तर्फे पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा 

 

चंद्रपूर (मुल) : व्हॉइस ऑफ मिडिया चंद्रपूर, गडचिरोली संघटनेची कार्यशाळा मूल येथील स्वर्गीय मा.सा.कन्नमवार सभागृहात २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाघाटिका आमदार प्रतिभाताई धानोरकर या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे संस्थापक तथा संपादक संदीप काळे,हे होते विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, शेतकरी नेते रविकांत तुपकर ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनूले, राज्य संघटक सुनील कुहिकर,आनंद आंबेकर,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे ,कार्यशाळेचे संयोजक गुरु गुरनूले, रोहिदास राऊत, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुडूमवार, प्रकाश कथले, विजय सिद्धावार,जितेंद्र जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी निधी जंबूलवार हिने गणेश वंदनपर नृत्य सादर केले.तसेच कला निकेतनच्या चमूने वैष्णव जन तो... हे भजन सादर केले. मान्यवरांचं कुमकुम तिलक करून स्वागत करण्यात आले. उद्धघाटनी भाषणातून आमदार प्रतिभाताई धानोरकर या बोलताना पत्रकारांनी समाजासाठी चांगले काम करीत असताना समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले

यावेळी बोलताना आ. प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा चौकीदार आहे. संघटनात्मक बांधणी करताना पत्रकारांनी अतिशय दक्ष असले पाहिजे. नेतृत्व आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे. व्हाईस ऑफ मीडिया आपल्या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती करीत राहो अशी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. पत्रकारांनी जमिनीवर राहून काम करावे. त्यांनी आपले ध्येय आकाशासारखं उंच ठेवले पाहिजे. संघटना हेच आपलं कुटुंब आहे. या संघटनेमध्ये काम करीत असताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या सोबत राहीनं अशा पद्धतीचा एक आशावाद प्रतिभाताई धानोरकर यांनी व्हाईस ऑफ मिडीया ला दिला. संघटनेना उच्च शिखर गाठो अशीही शुभेच्छा त्यांनी यावेळी दिली

 

व्हाॅईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे यांनी 

माध्यमांनी गुलामगिरीची सवय आता मोडून काढली पाहिजे. त्यासाठी रविष कुमार यांना पत्रकारांचे आयकॉन म्हणून ओळखले पाहिजे. अभिव्यक्तीची गळचेपी होणार नाही याविषयी सगळ्यांनी दक्ष असणे गरजेचे असल्याचे मत व्हाईस आफ मीडीयाचे राष्टीय कार्याध्यक्ष संजय आवटे यांनी व्यक्त केले .

मूल येथे दि. 2 आक्टोबर रोजी आयोजित एक दिवशीय पत्रकारांची कार्यशाळा व मान्यवरांचा गौरव सोहळा या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

पुढे बोलताना संजय आवटे म्हणाले की, देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण आणि जातीय दंगली घडवण्याचे काम सुरू आहे.समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. अशावेळी पत्रकारांनी आपली ठोकपणे भूमिका निभावली पाहिजे. पत्रकारांनी वास्तविकता सांगावी. जातीय सलोखा आणि सोहार्द टिकवण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केलं पाहिजे. आजच्या जगामध्ये खरी पत्रकारिता करण्याचं खरे आव्हान उभे राहिलं आहे. पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज निर्माण केला पाहिजे. त्यांचा विश्वास त्यांनी कायम ठेवला पाहिजे. सकारात्मक पत्रकारिता माध्यमकर्मीणी केली पाहिजे. बदलणारे जग माध्यमांना कळलं पाहिजे, अशी रोखठोक भूमिका संजय आवटे यांनी मांडली. लोकशाही धोक्यात येते तेव्हा पत्रकारांचा कस लागतो असेही संजय आवटे पुढे म्हणाले.

 व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप काळे यावेळी बोलताना म्हणाले की, पत्रकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. सकारात्मक पत्रिकारितेमध्ये खूप मोठी ताकद असते. आपल्या कार्यामध्ये सर्वांनी जीव ओतून काम केलं पाहिजे. यासाठी त्यांनी मूल येथील जिलेबी विकणाऱ्या एका हरियाणातील माणसाचे उदाहरण त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्हाईस ऑफ मीडिया तर्फे एक कृतीशील कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असल्याचे संदीप काळे यांनी यावेळी सांगितले. देणेकरी म्हणून आपण काय काय देऊ शकतो, या विचारांसाठी बारामती येथे एक अधिवेशन होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.केंद्राकडे आपण पत्रकार महामंडळ स्थापन करावे अशा पद्धतीची मागणी करण्यात आल्याचे संदीप काळे यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी 200 कोटी रुपये मिळावे अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. तळमळीने काम करून व्हाईस ऑफ मीडिया चा झेंडा देशात सगळीकडे फडकला पाहिजे. अशा पद्धतीचं एक आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जो प्रामाणिक पणे काम करतो त्याला निश्चितच यश मिळते, असाही विश्वास संदीप काळे यांनी बोलून दाखविला. त्यांनी यावेळी रविकांत तुपकर यांची राष्ट्रीय संचालक म्हणून नियुक्ती केली. आजपासून ते पूर्णवेळ काम करतील असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सुनील कुहिकर म्हणाले, लेखणीची ताकद समाज हितासाठी वापरणे गरजेचे आहे. कारण पत्रकारांमध्ये समाज परिवर्तनाचे काम आहे. पत्रकारितेचा उपयोग समाज हितासाठी केला पाहिजे असे सुनील कुहिकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांनी केले.यावेळी विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक यांनी आपले मनोगत सादर केले. उद्घाटन सत्राचे संचालन प्राध्यापिका राज्यश्री मार्कंडेवार यांनी केले. तर आभार नासिर हासमी यांनी केले.


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 3, 2023

PostImage

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा


आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

गडचिरोली, (जिमाका) दि. 3 : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

बुधवार, दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 7 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. गुरुवार, दि. 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा.गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण. सकाळी 8 वा.चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा.चामोर्शी येथून भाडभिडी, ता. मुलचेराकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा.भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन. दुपारी 12.30 वा. मुलचेरा येथुन नागपूरकडे प्रयाण.

००००००


PostImage

Gadchiroli Varta News

Oct. 3, 2023

PostImage

संयुक्त किसान मोर्चाने साजरा केला काळा दिवस ,केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध


 

संयुक्त किसान मोर्चाने साजरा केला काळा दिवस ,केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध

 

गडचिरोली : शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी लखीमपूर खिरी येथे आयोजित आंदोलना दरम्यान तीन शेतकरी आणि एका पत्रकाराला आपल्या गाडीने चिरडून मारणाऱ्या अजयसिंग टोनी मिश्रा यांच्या मुलावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने संयुक्त किसान मोर्चातर्फे स्थानिक गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आले.

 

यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. मोदी सरकार मुर्दाबाद, शिंदे सरकार मुर्दाबाद, शेतकरी हत्यारा मंत्रीपुत्र आशिष मिश्रा याला अटक करा, केंद्रीय गृहमंत्री अजयसिंग मिश्रा यांना पदावरून दूर करा, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

 

यादरम्यान काॅ. महेश कोपूलवार, रोहिदास राऊत, भाई रामदास जराते, काॅ. देवराव चवळे, राज बन्सोड, काॅ. अमोल मारकवार यांनी मार्गदर्शन केले. निषेध निदर्शने कार्यक्रमानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. केंद्र सरकारने तीन काळे कायदे आणले ते परत घ्यावे व शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव द्यावा, केंद्र सरकारने आणलेला वीज बिल विधेयक परत घ्यावा , शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू वर आकारण्यात येणारा १८ टक्के जीएसटी रद्द करावा, शेतकरी, शेतमजूर यांना वयाच्या साठ वर्षानंतर ५ हजार रुपये पेन्शन मिळण्याचा कायदा करावा या मागण्याही करण्यात या निवेदनात करण्यात आल्या.

 

निषेध आंदोलना वेळी प्रा. प्रकाश दुधे, भाई शामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, जयश्रीताई वेळदा, हंसराज उंदीरवाडे, भाई अक्षय कोसनकर, प्रतिक डांगे, केशवराव सामृतवार, अशोक खोब्रागडे प्रकाश खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, संजय वाकडे, केवळराम नागोसे, सचिन जंबेवार, सुजित आखाडे, निता सहारे, विजय देवतळे, तुळशीदास भैसारे, देवेंद्र भोयर, विश्वनाथ म्हशाखेत्री, रेवनाथ मेश्राम, अशोक किरंगे, भास्कर ठाकरे, राजकुमार प्रधान, विनोद गेडाम, उमाजी मुनघाटे, ज्योती उंदीरवाडे, सुरेश फुकटे, हरिदास सिडाम, महेंद्र जराते, आकाश आत्राम, विनोद उराडे यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 24, 2023

PostImage

लढा धनगर समाज आरक्षणाचा लेखन:प्रा.डाॅ.सुधीर अग्रवाल


लढा धनगर समाज आरक्षणाचा

लेखन:प्रा.डाॅ.सुधीर अग्रवाल

 

राज्यात सध्या एकाचवेळी मराठा, कुणबी, ओबीसी, धनगर आरक्षणावरून आंदोलनाची धग पेटली आहे. मराठवाड्यात मराठा-कुणबी, विदर्भात ओबीसी तर उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात धनगर आरक्षणाची तीव्रता मोठी आहे. नगर जिल्ह्यात चौंडी इथे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

 

दरम्यान,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपोषणाची आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. तसेच, ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला. अखेर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपले. पण, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी संघर्षाचे हत्यार उपसले. दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठीही नगरच्या चौंडी येथे उपोषण करण्यात येत आहे. तर, शासनाच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात राज्यातील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.मराठा आरक्षणावरून सरकार कात्रीत सापडलेले असतानाच दुसरीकडे आता धनगर समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय.

 

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये(एसटी) समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाचे उपोषण सुरू असून राज्यभर आंदोलन, मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने धनगर समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलणीही सुरू केली आहेत. धनगर समाजाला ‘एसटी’ दर्जा देण्यात आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे. या मुद्दय़ावर आदिवासी समाजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. सर्वच समाजघटकांतून आरक्षणाची मागणी वाढू लागली असताना काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

 

नागपुर मधील.संविधान चौकात भव्य ओबीसी मोर्चा काढण्यात आला. डोक्यावर लाल रंगाची पगडी, हातात पिवळा झेंडा आणि दुसऱ्या हातात ‘आम्ही ओबीसी आरक्षणाचे रक्षक” असे फलक घेऊन ओबीसी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशा लेखी आश्वासनाची मागणी या मोर्चात करण्यात आली.

 

धनगर आरक्षणाच्या मागणीचा इतिहास

धनगर समाजाला सध्या NT प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण आहे. मात्र आम्हाला ST प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण मिळावे अशी धनगर समाजाची मागणी आहे. 1985-86 साली यशवंत सेनेच्या माध्यमातून श्री. कोकरे यांनी धनगर समाजाला ST मधून धनगर आरक्षणाची मागणी केली. केंद्र सरकारच्या सूचीमध्ये धनगड नावाच्या जातीला ST प्रवर्गातून आरक्षणाची तरतूद आहे. मात्र धनगड आणि धनगर या शब्दावरून सध्या महाराष्ट्रातील धनगर आरक्षण रखडलं आहे. धनगर समाजाच्या मते धनगड आणि धनगर हे एकच असून अधिकाऱ्यांच्या चुकीने आणि शब्दाच्या अपभ्रंश झाल्याने धनगड हे नाव लागलंय. महाराष्ट्रातील 338 तहसील कार्यालयाने पत्र दिलं की, धनगड जातीचा दाखला आजपर्यंत दिलेला नाही. या पत्राचा आधार घेत धनगड ही जात अस्तित्वात नसल्याचा दावा धनगर समाज करतोय.

 

याबाबत 2015-16 साली महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच, मुंबई यांच्यातर्फे हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनगर आणि धनगड हे एकच आहेत. मात्र हिंदी भाषिक लोकांमुळे त्याचा अपभ्रश झाल्याचा दावा अहिल्यादेवी प्रबोधन मंचने केलाय. मात्र याला विरोध दर्शवत आदिवासी समाजाच्या संघटनेने या मागणी विरोधात कोर्टात धाव घेतली होती. “आपण धनगड आहात का? धनगर असाल तरच तुम्ही याचिका दाखल करू शकता, असे म्हणत हायकोर्टाने त्यांची मागणी फेटाळली. त्यानंतर 2018 साली पंढरपूरमध्ये धनगर समाजाचे उपोषण झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले की धनगर आणि धनगड हे एकच आहेत. परंतु त्यानंतर त्याबाबत कोर्टामध्ये सुनावणी झाली नाही. पुढे 2 वर्षे कोरोनामुळे ही केस पेंडिंग पडली.

 

पुन्हा शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर 2 महिन्यापूर्वी याबाबत अंतिम सुनावणी होती. मात्र काही आदिवासी आमदारांच्या दबावामुळे सरकारने या केसमधील सरकार पक्षाचे महाअधिवक्ता यांना बदलले. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. याबाबत पुढील सुनावणीची तारीख काय आहे याबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही. धनगर समाजाच्या मते आमची मुळ मागणी ST प्रवर्गात होती. मात्र आम्हाला NT प्रवर्गातून 3.5% आरक्षण दिले. त्यातही NT प्रवर्गातून दिलेल्या आरक्षणात 17 जाती समाविष्ट केल्या. त्यामुळे धनगर समाजाला त्याचा लाभ मिळत नाही. मेंढपाळ समाजाला विविध राज्यात वेगवेगळी नावे आहेत. कर्नाटकासह दक्षिण भारतात कुर्बा म्हणतात तर उत्तर भारतात पाल, बघेल, गडेरिया अशी नावे आहेत. तत्कालीन लोकांनी केलेल्या चुका सुधारत, राज्य सरकारने दोन्ही सभागृहात एकमताने प्रस्ताव मंजूर करून तो प्रस्ताव लोकसभेकडे पाठवावा अशी धनगर समाजाची मागणी आहे.

 

९५६१५९४३०६


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 24, 2023

PostImage

विलय सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला


 

 

- माओवाद्यांनी पूरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य केले हस्तगत.

 

 

प्रतिनिधी / गडचिरोली : २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. याच विलय सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला.    

 

काल २३ सप्टेंबर २०२३ रोजीचे ११:४५ वा. चे दरम्यान उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात पोस्टे पुराडा पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना कोरची व टिपागड दलमच्या माओवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे पुराडा पोलीस पथकासोबत असलेले डिएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असतांना, एक संशयित जागा मिळून आल्याने त्याबाबतची माहिती अपर पोलीस अधिक्षक (अभियान) गडचिरोली यांना दिली. तसेच वरिष्ठांच्या आदेशाने गडचिरोली येथुन बीडीडीएस पथक घटनेच्या ठिकाणी बोलावून घेतले व त्यांचे सहाय्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिढ ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढ­या मळकट रंगाचे पाऊच ४ नग मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये ११.८ किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.  

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा साहिल झरकर यांच्या नेतृत्वात पोस्टे पुराडाचे प्रभारी अधिकारी सपोनि. भूषण पवार व जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 23, 2023

PostImage

अतिवृष्टीमुळे जयरामपुर येथील सोयाबिन मातीमोल,पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी


 

 

चामोर्शी तालुक्यातील - जयरामपुर या गावातील सोयाबीन पिकावर मोठया प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने सोयाबिनपिक मातीमोल झाले आहे. यामुळे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

 

जयरामपूर येथील शेती बारमाही उत्पन्न देणारी आहे. अति पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून कितीही वेळा रोगावर फवारणी करून सुद्धां प्रामुख्याने रोगावर नियंत्रण येत नाही. यामुळे सोयाबीन पिक आपल्याला होणार किंवा नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सोयाबीनचे उत्पन्न होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा बजेट विस्कळीत झालेला आहे. आता शेतकऱ्याकडे आत्महत्या केल्याशिवाय एकही पर्याय राहिलेला नसल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.

 

मोठया प्रमाणात किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरीवर्ग दुविधेत सापडला असून नेमके

 

करावे तरी काय अशी विवंचना त्याला लागली आहे. बिजाईचा खर्च, खताचा खर्च करून सुद्धा आपल्याला निराशाच पदरी पडेल असे शेतकऱ्यांना वाटु लागले आहे. शेतकऱ्याला योग्य ती सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परीसरातील सर्व शेतकरी तसेच शेतकऱ्याच्या पाटील शेतकऱ्याच्या पाठीशी असलेले जैरामपुर या आहे. गावातील माजी उपसरपंच हरेश निखाडे करीत

 

आहेत. शेतकरी उत्कृष्ट गट जैरामपुर येथील अध्यक्ष संतोष एकनाथ गौरकर, सचिव अनिल गौरकर व सर्व सदस्य शेतकरी यांनी गावातील सोयाबीन या मालाची नुकसान भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा माजी सरपंच निखाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 23, 2023

PostImage

जि. प. शिक्षिका मंदा आवारी सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


 

            गडचिरोली जिल्ह्यापासून अंदाजे 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोचीणारा येथील मंदा आवारी (उके) यांना सन 2022- 23 या वर्षाच्या सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते देण्यात आला. मागील दहा वर्षा पासून कोचिनारा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या मंदा आवारी यांनी प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून पण पदभार सांभाळला तसेच फुलोरा मध्ये सर्वत्र उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली असून कोचीनारा गावामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवून व सर्व पालकांशी संपर्क साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असतात. तसेच त्यांच्या शाळेमधून काही विद्यार्थी नवोदय साठी सुद्धा पात्र झाले व शिष्यवृत्तीसाठी सुद्धा विद्यार्थी पात्र झाले व त्यांची शाळा नेहमी क्रीडा स्पर्धेमध्ये अग्रेसर राहते व त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता दरवर्षी निवड होत असते. तसेच कोचिनारा येथे वाचनालयाची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये मंदा आवारी यांचे सुद्धा खूप मोठे योगदान आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजाविली आहे. सन 2022- 23 या वर्षाच्या सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कोरची तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 22, 2023

PostImage

घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेऊन आष्टी पोलिसांनी ट्रक चालक व ट्रकला केले जेरबंद


 पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी पोलीसांनी बजावली म्हत्वाची भुमिका

 

चामोर्शी (आष्टी):- दिनांक १६/०९/२०२३ रोजी पोलीस अंमलदार- प्रणय ताराचंद वाळके, वय-२९ वर्ष, रा. मुधोली चक. ०२. ता. चामोशी, जि. गडचिरोली हे आपले ताब्यातील दुचाकी क्रमांक एम. एच. ३३ एन. ०१५९ या वाहनाने डोक्याला हेल्मेट लावुन गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे कर्तव्यावर येनापुर ते गडचिरोली या मार्गे जात असतांना मौजा अड्याळ पासुन ०२ किमी अंतरावर मुख्य डांबरी रस्त्यावर कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे, बेदरकारपणे, हयगयीने uttereree स्थितीत वाहन चालवुन यातील पोलीस अंमलदार हा चालवीत असलेल्या दुचाकीला जबर धडक देवून त्याचे मरणास कारणीभुत होवुन घटनास्थळावर पसार झाल्याने अज्ञात वाहन चालकाविरुध्द पोस्टे आष्टी २४३/२०२३ कलम २७९,३३७, ३३८,३०४(अ) भादवि सहकलम १३४ (अ) (ब) १८४ मोवाका अन्यये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर दाखल गुन्हयात अपघात घडवून घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनाचा कोणत्याही प्रकारची माहीती नसतांना पोलीसांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन अज्ञात आरोपीचा शोध करीता लागलीच घडल्या विकाणापासून आष्टी पर्यंत संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तसेच महत्वाचे साक्षीदार यांना गुन्हा तपासून सदर गुन्हयात ट्रक क्रमांक- CG-08-1-3211 चे चालक नामे शुभम समीर माझी वय ३२ वर्ष, धंदा ट्रकचालक, रा.ता. पंखाजुर जि.कांकेर राज्य छत्तीसगड यांनी सदरचा अपघात घडवुन आणून पोलीस अंमलदार- प्रणय ताराचंद वाळके, वय-२९ वर्ष, रा. मुधोली चक.०२ ता. चामोशी, जि. गडचिरोली यांचे मृत्युस कारणीभूत ठरल्याचे तपासात निष्पन्न करुन आरोपी - शुभम समीर माझी वय ३२ वर्ष, धंदा ट्रकचालक, रा.ता. पंखाजुर जि.कांकेर राज्य छत्तीसगड पोस्टे आष्टी येथे दिनांक १९/०९/२०२३ रोजी २०/५० वा. अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस अधीक्षक निलोत्पाल गडचिरोली अप्पर पोलीस अधिक्षक देशमुख अहेरी, उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोस्टे आष्टी यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोउपनी मानकर यांनी तसेच त्यांचे सहकारी टीम मपोउपनी / वणवे, मपोउपनी / जगताप, पोशि/ ५६७५ मेदाळे पोशि/ ५६९० पंचफुलीवार, पोशि/ ५६६१ रायशिडाम, पोशि ^ गोडबोले यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 22, 2023

PostImage

प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे आयुष्यमान भव भारत योजना चे डिजीटल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सम्पन्न


 

ग्रामपंचायत तोडसा व प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन आ भा कार्ड ऑनलाईन कसे काढावे व आपला आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करुन आयुष्यमान भारत कार्ड चे ऑनलाईन डिजीटल डाऊनलोड करून प्रिंट काढणे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व या कार्ड महत्व समजावून सांगण्यात आले आहे,उपस्थित मान्यवर कु वनिता कोरामी सरपंच ग्रामपंचायत तोडसा,मा. श्री प्रशांत भाऊ आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, श्री रामचंद्र कोडापे ग्रामसेवक ग्रामपंचायत तोडसा,डॉ नागोसे सर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सदस्य विनोद नरोटे, सदस्या सौ ललिता सुधीर तलांडे, व गावातील नागरिक दिनेश तिम्मा, नामदेव दुर्गे, प्रविण दुर्गे, सौ पिल्ली बाई वैदे , सौ माया बाई गावडे,तसेच दवाखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,*


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 22, 2023

PostImage

धान खरेदीची नवी व्यवस्था तयार करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी


 

 

हजार कोटींच्या भ्रष्टाचाराने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडल्याचा आरोप

 

 गडचिरोली: आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात दरवर्षी करण्यात येत असलेल्या धान खरेदीमध्ये गेल्या दहा वर्षांत हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसला असल्याने आधारभूत धान खरेदी केंद्रांची व्यवस्था नव्याने निर्माण करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे केली आहे.

 

शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याच्या कारणाने जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचे महामंडळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून धानाची खरेदी दरवर्षी मोठ्या प्रमाणात करत असते. मात्र मागिल १० वर्षांचा अभ्यास केल्यावर आमच्या निदर्शनास आले आहे की, या धान खरेदीमुळे सामान्य शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून आर्थिक नुकसान सहन करावी लागत असल्याचा आरोपही भाई रामदास जराते यांनी केला आहे.

 

सध्याची धान खरेदी व्यवस्था वरवर पाहता सोईची दिसत असली तरी या व्यवस्थेत शेतकऱ्यांची निव्वड लुट दडलेली आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था नावाला शेतकऱ्यांच्या आहेत, त्यांचे संपुर्ण चालक मालक सध्या निबंधक कार्यालये असून त्यांच्या मदतीने नेमलेले व्यस्थापक हेच मनमानी कारभार करत असून त्यांचे आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून सदर सहकारी संस्थांच्या स्थापनेच्या उद्देशालाच हरताळ फासल्या गेले आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात मागिल १० वर्षात १ हजार कोटी पेक्षा अधिकचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा शुल्लक नमुना म्हणून गडचिरोलीच्या उप प्रादेशिक व्यवस्थापक श्री. गजानन कोटलवार यांना शासनाने धान खरेदी घोटाळा प्रकरणी निलंबित करावे लागल्याचे उदाहरण घेता येईल. एवढेच नाही तर मुरुमगांव संस्थेत गुन्हा दाखल करावा लागल्याचे प्रकरण हे केवळ त्या एकाच खरेदी केंद्रात वा संस्थेत घडलेले नसून ते जिल्ह्यातील संपूर्ण ९१ ठिकाणीही घडलेले आहे. मात्र धान खरेदीची ही संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी ठरल्याने आणि काही जणांच्या आर्थिक मलाईचे स्त्रोत ठरलेले असल्याने हे हजारो कोटींचे प्रकरण वरुन खालपर्यंत अत्यंत पध्दतशिरपणे नेहमीच दडपले जात आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत असल्याचेही भाई रामदास जराते यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

दरवर्षी लाखो क्विंटल धानाची खरेदी आणि हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार संस्था म्हणूनही पात्र ठरत नाहीत याचे काय कारण असावे, हे शोधण्याचे कामही शासनाने करण्याची अत्यावश्यकता असल्याचे त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून शासनास निदर्शनास आणून दिले आहे.

 

गोदाम बांधकासाठीचे शासनाचे धोरण असतांना आणि त्यासाठी मोठा निधी अर्थसंकल्पीत केला जात असतांनाही या संस्थांकडे स्वता:चे आवश्यक त्या क्षमतांचे गोदाम उभारण्याचे काम होवू शकलेले नाही. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीमध्ये निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची तुट ही केवळ धान पावसाने भिजल्यामुळे होते. नेमका याचाच गैरफायदा खरेदी केंद्रांचे वा संस्थेचे व्यवस्थापक घेवून मोठी कृत्रिमरित्या तुट निर्माण करतात परिणामी शेतकऱ्यांच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे योग्य ते कमीशन संस्थांना मिळत नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या स्वता:च्या हक्काच्या असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था असूनही लगतच्या छत्तीसगड, तेलंगाणा राज्यातून कमी दर्जाचा लाखो क्विंटल धान या व्यवस्थेत लबाडीने विकल्या जावून खऱ्या शेतकरी सभासदांचे धान शासनाच्या टार्गेट अभावी खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने दरवर्षी विकावे लागत असल्याने सदरची खरेदी केंद्रे आणि खरेदी व्यवस्था असण्याचा सामान्य शेतकऱ्यांना फायदा काय, असा संताप दरवर्षी शेतकरी व्यक्त करतात, असेही भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.

 

एकंदरीत काही लोकांचे आर्थिक स्त्रोत बनलेली, हजारो कोटींचा भ्रष्टाचाराला जबाबदार आणि सामान्य शेतकऱ्यांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सोसायला लावणारी धान खरेदी शासनाने तातडीने बंद करुन जिल्ह्यातील शासकीय धान खरेदीचे केंद्र ग्रामसभा निहाय करण्यात येवून ग्रामसभांनी हमीभावाने खरेदी केलेला धान व शक्य त्या ग्रामसभांकडून थेट तांदूळ खरेदीची नवी व्यवस्था शासनाने अस्तित्वात आणावी अशी मागणी भाई रामदास जराते यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

Sept. 22, 2023

PostImage

पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द करून पुनः घ्यावी - अन्याग्रस्त उमेदवाराची पत्रकारपरिषदेत मागणी


पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द करून पुनः घ्यावी -

अन्याग्रस्त उमेदवाराची पत्रकारपरिषदेत मागणी

 

 

चामोर्शी:- येथील उपविभागा अंतर्गत ( महसूल) तालुक्यातील काही गावात रिक्त असलेल्या पोलिस पाटील करिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती , त्यानुसार पोलिस पाटील पदाच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षामध्ये परीक्षा केंद्रावर प्रश्न पत्रिका पकिटाचे सिल उघडले असल्याचे निदर्शनास आल्याने त्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अगोदरच प्रश्न पत्रिका लीक झाली असावी असा संशय व्यक्त केला जात असून त्यासाठी सदर परीक्षा रद्द करून नव्याने पुनः पारदर्शक पणे घेण्याची मागणी जनार्दन चलाख रामपूर , पूनाजी पीपरे , राजेश मंडल सिमुलतळा, अभिजित हाजरा, प्रभात बिस्वास, जयंत प्रमाणित, शरद कुनघाडकर, गणेश पिपरे, दिपंकर दास, नितीश मंडल जयनगार , गणेश बाढई विजयनगर, देवाशिस मंडल आदी या उमेदवारांनी केली आहे.

         पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, तालुक्यातील काही गावात रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली त्यानुसार मोठ्या प्रमाणात गावा गावातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यानुसार ०२ सप्टेंबर रोजी येथील शिवाजी हायस्कूल व बोमनवार हायस्कूलच्या केंद्रावर उमेदवार लेखी परीक्षे करिता दाखल झाले होते. परीक्षा सुरू होण्याअगोदर शिवाजी हायस्कूलच्या खोली क्र.०५ मध्ये दोन उमेदवारांना प्रश्न पत्रिका पाकीट खोलण्याकरिता बोलावण्यात आले तेव्हा पाकीटचे सिल उघडले असल्याचे निदर्शनास आले असता त्याचवेळी पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून दिले मात्र त्यांनी दखल न प घेता उलट दबाव निर्माण करून परीक्षा देण्यास भाग पाडले. असल्याचे पत्रकार परिषदेत सांगत ,पुढे सांगितले की ऐका गावातील ऐका उमेदवाराला परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षेत येणाऱ्या प्रश्नानाची सर्व माहिती देण्यात आली होती. कारण तो उमेदवार परीक्षा सुरू होण्या अगोदर हे प्रश्न येणार म्हणून सांगत होता, आणि तेच प्रश्न परीक्षेत आलेले होते तर पर्यवेक्षक इअर लाऊन फोनवर बोलत नेहमी परीक्षा खोली मध्ये येरझाऱ्या घालत होते त्यामुळे पेपर फुटल्याचा संशय व्यक्त होत असून ०४ सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयात मेरिट लिस्ट लावण्यात आली परंतु लिस्ट मध्ये उमेदवाराचे मार्क दाखविण्यात आले नाही. त्यामुळे संशय अधिकच वाढला दरम्यान ०३ सप्टेंबर रोजी सिमुलतला येथील उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल केली त्यामुळे त्यांची मौखिक परीक्षा रद्द केली मात्र प्रश्न पत्रिका ऐकच असताना सुध्दा उर्वरित उमेदवाराची मौखिक परीक्षा घेण्यात आली. हे विसंगती निर्माण करणारा निर्णय घेण्यात आला असून शिवाजी शाळेतील खोली क्रं.०४ मधील ऐक उमेदवार आपल्या हातावर सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून आणल्याचे प्रत्यक्ष पाहल्याचे ऐका उमेदवाराने सांगितले आहे .तर त्याच खोलीतील ऐका परीक्षार्थी उमेदवाराने मला काही प्रश्न सांगितले तेच प्रश्न परीक्षेत आलेले आहे असल्याचेही दुसऱ्या उमेदवाराने सांगितले.त्यामुळे हे प्रश्न पत्रिका लीक झाली असावी ते प्रश्न दोन्ही केंद्रावर परीक्षे पूर्वी गेले त्यामुळे सदर परीक्षा रद्द करून सीसीटीव्ही खोलीत बसवून नव्याने परीक्षा घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली असून न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा अण्यायग्रस्त उमेदवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

      या प्रकरणी येथील उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसांम याना विचारले असता त्यांनी, आपल्या कार्यालयातून प्रश्न पत्रिकेचे बंद लिफाफे केंद्रावर पाठवले होते. तसेच केंद्र प्रमुख गजानन भांडेकर यांना सुध्या सिल बंद लिफाफे देण्यात आले होतेतसेच त्यांनी त्याची रीतसर पावती दिली होती त्यामुळे या परीक्षेत कोणताच प्रकारचा घोळ झालेला नाही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात आली असल्याचे सांगितले.


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 16, 2023

PostImage

मोहर्ली येथे सेव्हन डायमेंशन थिएटर बनविण्याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना


 

 

चंद्रपूर, दि.16 : वाघ हा अभिमानाचा विषय असून वाघाची गती आणि शक्ती हे पराक्रमाचे प्रतिक मानले जाते. जगात 14 देशात वाघ असून त्यापैकी 65 टक्के वाघ हे भारतात आहे आणि जगातील सर्वाधिक वाघ हे एकट्या चंद्रपुरात आहे. येथे येणारा देश– विदेशातील पर्यटक आनंद, ज्ञान, उर्जा, उत्साह घेऊन जाईल. पण आपल्या चुकीच्या आचरणाने ताडोबाच्या नावाचा अपप्रचार होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. येथे मिळालेली सन्मानाची वागणूक पर्यटकाला आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे, असे आचरण ठेवून ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकावी, अशी अपेक्षा राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

मोहर्ली येथे निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभिकरण कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, राजस्थान येथील वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनिता कातकर, हरीष शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, संध्या गुरुनुले, छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू आदी उपस्थित होते. 

 

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली येथे 7.42 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या पर्यटन गेटच्या कामाचे भुमिपूजन झाले, अशी घोषणा करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वाघ हा सामर्थ्याचे प्रतिक आहे.जगातील सर्वाधिक वाघ आपल्या चंद्रपुरात आहे. म्हणूनच विदर्भाला जगाची टायगर कॅपिटल म्हटले जाते. जगातील अनेक मान्यवरांची पाऊले ताडोबाकडे वळतात. त्यामुळे येथे येणा-या प्रत्येक पर्यटकाला सन्मानाची वागणूक द्यावी. 

 

वाघासोबतच वाघासारखी माणसेसुध्दा जगली पाहिजे, यासाठी आपण सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करीत आहोत. मानवी जीवन अनमोल आहे. उपजिविकेसाठी जे जंगलात जातात, त्यांच्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला होण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाययोजना म्हणून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून आपण गावांना निधी उपलब्ध करून देत आहोत. वन विभाग हा केवळ एक शासकीय विभाग नसून तो एक परिवार आहे. ताडोबाचे नाव जगात अधिक चांगले होण्यासाठी अधिकारी कर्मचा-यांनी मनापासून काम करावे. जीवनाच्या पहिल्या श्वासापासून शुध्द ऑक्सीजन हे चांगल्या पर्यावरणामुळेच मिळते तर मनुष्याच्या शेवटच्या प्रवासातही अग्नी देण्यासाठी लाकडाचाच वापर होतो, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

*मोहर्ली गाव पर्यटकीय सेवा केंद्र होणार* : ताडोबाचे मुख्य आकर्षण असलेल्या मोहर्ली गावांत सर्वंकष सुंदरता आणण्यासाठी आराखडा तयार केला जाईल. मोहर्ली गावासाठीसुध्दा आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येईल. गावात पायाभुत सुविधांसोबतच आर्किटेक्टच्या माध्यमातून गावातील भिंती रंगविणे, आकर्षक मुर्त्या लावणे आदी बाबींमधून पर्यटकीय सेवा केंद्र म्हणून मोहर्ली नावारुपास येईल.

 

*ताडोबातील वाघांची स्थलांतर प्रक्रिया* : चंद्रपूरात वाघांची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे स्थलांतर करण्यात येत आहे. ताडोबातील दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठविण्यात आले. तर पुढे आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी भारत सरकाची परवानगी मागितली आहे.

 

*ताडोबावर आधारीत उत्कृष्ट फिल्मची निर्मिती* : प्रसिध्द छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थु यांनी अतिशय मेहनत घेऊन माया वाघीण आणि तिच्या बछड्यांवर आधारीत आई-मुलाचे प्रेम दर्शविणारी सुंदर शॉर्टफिल्म तयार केली आहे. मुथ्थु यांनी ताडोबावर आधारीत दर्जेदार 30 – 35 मिनिटांची आकर्षक फिल्म तयार करावी. ही फिल्म मुंबईच्या चित्रपटनगरीत दाखविण्यात येईल. तसेच वाघांची माहिती देणा-या केंद्रासोबातच मोहर्ली येथे सात डायमेंशनयुक्त थिएटर तयार करावे. जेणेकरून वाघांप्रमाणेच येथील थिएटर प्रसिध्द झाले पाहिजे.  

 

*राज्यातील व्याघ्र प्रकल्पाला उत्तम दर्जा* : देशातील सहा व्याघ्र प्रकल्पाला उत्तम मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे या सहापैकी तीन व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील आहे. वन विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांसोबतच गावक-यांनीसुध्दा जंगलांचे संवर्धन, संरक्षण केले आहे आणि त्रासही सहन केल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

 

तत्पूर्वी वनमंत्र्यांच्या हस्ते मराठी व्याघ्र गीताचे अनावरण करण्यात आले. तसेच माया वाघिणीवर आधारीत चित्रफितचे सुध्दा यावेळी लोकार्पण झाले. मोहर्ली पर्यटन गेटच्या सुशोभिकरणासोबतच येथे पर्यटकांसाठी वाताणुकूलीत प्रतिक्षालय, उपहार गृह, व्याघ्र प्रकल्पाची सचित्र माहिती देणारे केंद्र, प्रसादन गृहे, भेटवस्तू विक्री केंद्र, पार्किंग व्यवस्था आदी विकसीत करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी मानले. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 16, 2023

PostImage

वृत्तपञ हे सामाजिक जागृतीचे प्रभावी माध्यम : माजी जि.प.अध्यक्ष अजय कांकडालवार यांचे प्रतिपादन


 

गडचिरोली : स्वातंत्र्यपूर्वी काळापासुन लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच अनेक महापुरुषांनी आपल्या लेखनी च्या प्रभावातुन तसेच वृत्तपञाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन व समाज जागृती चे कार्य केले त्यामुळेच देश स्वातंत्र्य झाला.समाजातील अनिष्ठ रुढी परंपरावर आळा बसला आज समाजातील शैक्षनिक सामाजिक राजकिय बद्दल घडवुन आणण्यासाठी वृत्तपञ मोलाची कामगिरी बजावत असल्याचे प्रतिपादन आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व गडचिरोली जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी केले.

 

देसाईगंज येथे आविसंचे सरसेनापती नंदुभाऊ नरोटे यांनी प्रकाशित केलेल्या साप्ताहिक गडचिरोली टाईम्स या वृत्तपञाचे विमोचन करतांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी म्हणाले.की स्वात्ञ्योत्त काळात ही देश्यात अनेक अनिष्ठ रुढी परंपरा सुरु असुन प्रस्थापित समाज व्यवस्थे कडुन दलित पिडित शोषित समाजावर आजही अन्याय अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत हिंसाचार बलात्कार भ्रष्टाचार आर्थिक फसवनुक असे अनेक प्रकार देशातील विविध भागात घडतांना दिसतात या सर्व समस्यांना वाचा फोडण्याचे काम समाजमाध्यम व वृत्तपञाच्या माध्यमातुन दररोज होत असतांना आपणास पहावयास मिळते शासन प्रशासन न्यायव्यवस्था यांचे काम सुरळीतपणे सुरु आहे.किंवा नाही याची मिमांसा करण्याचे काम वृत्तपञ करते म्हनुण देशाचा चौथा आधारस्तंभ म्हनुण वृत्तपञाची ओळख निर्माण झाली आहे.

 

सरसेनापती नंदुभाऊ नरोटे समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात शैक्षणिक अवस्थेतुन त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन उभे करुन विद्यार्थ्यांच्या व तळागळातिल जनसमुदायाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनेक आंदोलने केली प्रशासनाच्या विरोधात मोर्चे काढले वस्तिगृहे सुरु करुन विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी यासाठी नेहमीच पाठपुरावा केला आज जिल्ह्यामध्ये वस्तिगृहे सुरळित सुरु आहे हे नंदुभाऊंच्या संघटनेचे फलित आहे साप्ताहिक गडचिरोली टाईम्स या वृत्तपञाच्या माध्यमातुन नवी चळवळ उभी करुन या जिल्ह्यातिल कृषी क्षेञातिल समस्यांसह बेरोजगारींच्या व सामाजिक धार्मिक राजकिय व शैक्षणिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम नंदुभाऊ नरोटे यांच्या वृत्तपञाच्या माध्यमातुन आपणास पहावयास मिळेल. अशा अजयभाऊ कांकडालवार यांनी या प्रसंगी व्यक्त केला.या प्रकाशन सोहळ्याला अ्ड संजय गुरु यांनीही शुभेच्छा दिल्या

 

यावेळी आरमोरी विधानसभाचे आमदार कृष्णा गजबे,प्रसंगी प्रेसक्लब अध्यक्ष प्रकाश दुबे,कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेन्द्र बुल्ले,जितेन्द्र परसवानी,धनपाल मिसार,प्रमोद करपते विस्तार अधिकारी भामरागड,रुपलता बोदेले सरपंच आमगाव,नितीन राऊत,राऊत मॅडम सरपंच संघटना जि.अध्यक्ष,मोहन पुराम सरपंच भटेगांव तथा अध्यक्ष महाग्रामसभा,सदाराम काटिंगे पञकार,पुरुषोत्तम भागडकर,पिंकु बावने मनोज ढोरे,शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष बालाजी ठाकरे,राजु बुल्ले माजी सरपंच सावंगी,सागर वाढई माजी नगराध्यक्ष,जेसाभाऊ मोटवानी नगरपंचायत माजी उपाध्यक्ष,मोतिलाल कुकरेजा,मनिषा नरोटे,रॉबिन्स नरोटे,शिवराम पुल्लूरी,नरेश गर्गम, मिथुन देवगडे, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार व नंदुभाऊ नरोटे मिञ परिवार तसेच काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 16, 2023

PostImage

जिल्ह्यातील ९३९ पोलीस झाले हवालदार, तर ३८५ हवालदार झाले एएसआय


 

८७ होमगार्ड जवानांनाही पदोन्नती

 

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात नाईक पदावर कार्यरत असलेल्या ५५४ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार या पदावर तर पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेल्या ३८५ अंमलदारांना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

नेमणुकीच्या ठिकाणी असताना उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ही पदोन्नती देण्यात आली. याशिवाय गेल्या १० वर्षांपासून रखडलेली होमगार्डस् ची पदोन्नतीही मार्गी लावत ८७ होमगार्ड जवानांना पदोन्नत करण्यात आले. होमगार्ड महासमादेशकांच्या आदेशान्वये जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यासाठी पुढाकार घेतला. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या होमगार्डच्या जवानांसाठी ही मोठी भेट ठरली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 16, 2023

PostImage

पुरामुळे गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार


 

गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. गडचिरोलीच्या इतिहासात कोठी कोरनार या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच वरिष्ठ लोकप्रतिनिधी ठरले आहेत. कोठी कोरणार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे छत्तीसगड राज्य तसेच 17 गावांना जोडण्यात येत आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

सुरजागड येथे आयोजित कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉर्ड्स मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते.

 

गडचिरोलीत 20 हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे . त्यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खनिज वाहतूक आराखड्याला मान्यता देण्यात येईल. वाहतुकीचा एक चांगला कॉरिडॉर जिल्ह्यात उभा करण्याचा आपला प्रयत्न आहे. सुरजागड येथून निघणाऱ्या खनिजावर पहिला हक्क गडचिरोलीचा असून उद्योग उभारणी संदर्भात सर्वात पहिले जिल्ह्याचा व नंतर विदर्भाचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

अहेरी येथे जिल्हा पोलीस संकुलात कॅन्टीन, वाचनालय, उद्यान आदींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस जवानांचा त्यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 16, 2023

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींचा नवा लोहप्रकल्प होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील पोलीस ठाण्याची नवीन प्रशासकीय इमारत आणि शिपायांच्या निवासस्थानांचे लोकार्पण करण्यात आले.


आपण मुख्यमंत्री असताना सुरजागड प्रकल्पाची सुरुवात झाली. शिवाय कोनसरी येथील लोहप्रकल्पाचे भूमिपूजनही झाले होते. आता तेथे २० हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प होणार असून, सुमारे ३० हजार नागरिकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होईल. लोहखनिज वाहतुकीसाठी लोहखाण पट्टा (मायनिंग कोरिडोर) प्रस्तावित असून त्यास महिनाभरात मंजुरी देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस नक्षल्यांशी शौर्याने लढत असून, नक्षलवाद बऱ्याच अंशी कमी झाला आहे. यामुळेच राष्ट्रपतींचे पोलीस शौर्यपदक गडचिरोली पोलिसांना मिळाले आहेत. सरकार पोलिसांच्या पाठीशी असून, त्यांना काहीही कमी पडू देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,खासदार अशोक नेते, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

पिपली बुर्गी येथील इमारत आणि पुलाचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी येथील पोलीस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचे आणि कोठी-कोयणार या पुलाचे लोकार्पण केले


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 7, 2023

PostImage

मी हे आनंदाने जाहीर करु शकतो - मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव


 

 तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी सांगितले की, सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) पुढील विधानसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा सात ते आठ जागा अधिक मिळवून सत्तेत परत येईल. तेलंगणातील सर्वांगीण विकासावर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान राव यांनी काँग्रेस नेत्यांवर त्यांच्या राजवटीत हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'गेल्या निवडणुकीपेक्षा सात आठ जागा जास्त मिळतील, असे मी हमीभावाने सांगू शकतो. जिंकणार यात शंका नाही." बीआरएसच्या काळात तेलंगणातील वीज क्षमता वाढल्याचा संदर्भ देत, ते म्हणाले की राज्याची स्थापित वीज क्षमता 18,756 मेगावॅट आहे, लवकरच 25,000 मेगावॅटपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. राव यांनी आरोप केला की नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ला आंध्र प्रदेश पुनर्गठन कायद्यांतर्गत राज्यात 4,000 मेगावॅटचा प्रकल्प उभारणे बंधनकारक होते, परंतु आतापर्यंत केवळ 1,600 मेगावॅटची स्थापना केली आहे

ते म्हणाले की, दरडोई वीज वापराच्या बाबतीत तेलंगणा प्रथम क्रमांकावर आहे आणि राष्ट्रीय सरासरी राज्याच्या जवळपासही नाही. मुख्यमंत्री म्हणाले, "आज आम्ही 18,756 मेगावॅटवर पोहोचलो आहोत. 25,000 मेगावॅटपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट लवकरच गाठले जाईल. 4,000 मेगावॅटच्या दमराचरला औष्णिक वीज प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन केले जाईल... 6,400 मेगावॅटची स्थापित क्षमता (विद्यमान क्षमतेत)" स्थापित क्षमतेचे 25,000 मेगावॅटचे उद्दिष्ट गाठले जाईल.मी हे आनंदाने जाहीर करू शकतो असे मुख्यमंत्री राव म्हणाले 


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 4, 2023

PostImage

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकऱ्यांना दिली भेट, पीक कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपये जाहीर केले


 

 

तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पीक कर्जमाफीची प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी प्रगती भवन येथे उच्चस्तरीय आढावा बैठकीत हा निर्णय घेतला. पीक कर्जमाफी योजनेंतर्गत प्रलंबित हप्त्यांसाठी कर्जदार बँकांना 19,000 कोटी रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

शेतकर्‍यांचे कल्याण आणि कृषी क्षेत्राचा विकास हा राज्य सरकारच्या अजेंड्यावर असेल, असा पुनरुच्चार करून, कर्जमाफीची प्रक्रिया गुरुवारीच पुन्हा सुरू करून दीड महिन्यात पूर्ण व्हावी, अशी त्यांची इच्छा होती

कर्जमाफीची औपचारिकता 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे, जे मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीबाबत दिलेल्या आश्वासनाची 100 टक्के पूर्तता दर्शवते. पीक कर्जमाफी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत पाच हप्त्यांमध्ये दिलासा देणे हे होते.

 

सीएम केसीआर यांनी निदर्शनास आणून दिले की केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या परिणामामुळे आलेली मंदी, कोविड-19 साथीच्या रोगासारखे त्रास, केंद्राची पक्षपाती वृत्ती आणि राज्याला मिळालेला एफ आरबीएम निधी कमी करण्याच्या उद्देशाने एकतर्फी पावले यामुळे काहीसा विलंब झाला.

 

मात्र, राज्य सरकार रयथू बंधू, रायथू विमा, मोफत वीज आणि सिंचन सुविधांचा विस्तार यासारख्या शेतकरी हिताच्या योजना यशस्वीपणे आणि प्रामाणिकपणे सुरू ठेवत आहे. अडचणी आणि तोट्याचा विचार न करता, कल्याणकारी कार्यक्रम राबविण्याच्या आपल्या वचनबद्धतेपासून राज्य मागे हटले नाही

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, राज्य सरकार शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी आणखी कार्यक्रम सुरू करेल आणि कृषी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया युनिट्सची स्थापना केली जात आहे. जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत, तोपर्यंत सरकार शांत बसणार नाही


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 2, 2023

PostImage

जिल्ह्याच्या प्रगतीत महसूल विभागाचा वाटा मोठा- जिल्हाधिकारी मीना


 

 

महसूल दिन उत्साहात, सप्ताहाचा शुभारंभ

 

 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील गावपातळीवरील महसूल कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. माणसाच्या जन्मापासून तर मृत्युपर्यंतच्या नोंदी ठेवण्यासाठी उपयोगी पडणारा महसूल विभाग प्रशासनाचा एक प्रमुख भाग आहे. म्हणूनच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा जिल्ह्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी फार मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी कणसे, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, तहसीलदार मोहन टिकले, सुनील सौदाने, नियोजन अधिकारी खडतकर, तहसीलदार संजय रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार डी.एस. ठाकरे, सेवानिवृत्त तहसीलदार संजय रामटेके, मंडळ अधिकारी आर.एस. गोरेवार, अव्वल कारकून ममता शेंडे, स्विय सहाय्यक प्रवीण गुज्जनवार, नायब तहसीलदार अमोल गवारे, सी.एच. चिमलवार यांचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या हस्ते नागरिकांना रेशन कार्डचे वितरण, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांतर्गत लाभार्थ्यांना मासिक अनुदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन डी.एम.दहीकर यांनी तर आभार अमोल गव्हारे यांनी मानले.

 

संपूर्ण राज्यात आजपासून महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला आहे. 2 ऑगस्टला युवासंवाद, 3 ऑगस्टला एक हात मदतीचा, 4 ला जनसंवाद महसूल अदालतचे आयेजन, 5 ला सैनिकहो तुमच्यासाठी, 6 ला महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्तांचा संवाद कार्यक्रम आणि 7 ऑगस्टला महसूल सप्ताहाचा समारोप होणार आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 1, 2023

PostImage

कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड


 

 

मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. मात्र, आमदारांच्या संख्याबळाची संख्या पाहता हे पद काँग्रेसकडे गेले.

 

काँग्रेसने प्रदीर्घ खल केल्यानंतर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वडेट्टीवार यांच्या रुपात राज्याला विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात यांच्या निवडीबद्दल कांग्रेस कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 1, 2023

PostImage

भारत राष्ट्र समितीच्या (बी आर एस ) च्या राज्य स्तरिय सुकाणू समिती वर अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांची निवड


 

अहेरी:- भारत राष्ट्र समितीच्या (बी आर एस ) च्या राज्य स्तरिय सुकाणू समिती वर अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांची निवड करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली समितीत 15 सदस्यांचा समावेश आहे. बी आर एस चे राष्ट्रीय सचिव हिमांशू तिवारी यांनी घोषणा केली आहे. या सोबतच महाराष्ट्र प्रभारी म्हणून के.वम श्रीधर राव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

माजी आ. दीपक आत्राम यांच्या निवडीचे गडचिरोली भारत राष्ट्र समिती व आ.वि.स च्या सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी अभिनंदन केले आहे


PostImage

Gadchiroli Varta News

Aug. 1, 2023

PostImage

अखेर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ३ आगस्ट पर्यंत वाढली :अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांची शासनाचे मानले आभार


 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत होती..जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते . केवळ एक रुपयात पिक विमा निघत असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल असा शासनाचा हेतू आहे आणि सदर हेतू उत्तम आहे..

 गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे शिवाय पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक लोकांना सुविधा केंद्र पर्यंत जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विम्याची मुदत ही पुन्हा एक महिना वाढवून देण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाला विनंती केली होती.. राज्याच्या विविध भागातूनही तशी मागणी प्रशासनाला केली केली होती त्यामुळे सदर मागणीची दखल घेऊन आज तीन ऑगस्टपर्यंत पिक विम्याची मुदत वाढली आहे. सदर निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 30, 2023

PostImage

सावंगी नदीपात्रात चिखलाने माखलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह


 

 

 

 

देसाईगंज  :- तालुक्यातील सावंगी येथिल शांतीनगर जवळील नदी पात्रात चिखलाने माखलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. नदी पात्रात असल्याची माहिती आज गावातील लोकांना कळताच बघण्याकरीता मोठी गर्दी केली. याबाबत लगेच देसाईगंज पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळ गाठून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविले. मृतकाची अद्याप ओळख पटली नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.


PostImage

Gadchiroli Varta News

July 30, 2023

PostImage

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडेंविरोधात काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक


 

 

ब्रम्हपुरी काॅंग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

 

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करून त्यांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल टीकाटिप्पणी करतो ही गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, पण ही ओळख पुसण्याचा संभाजी भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे. असा आरोप करीत ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी येथील शिवाजी महाराज चौकात भिडेंविरोधात घोषणाबाजी करीत भिडेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, अॅड. गोविंदराव भेंडारकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, बाजार समितीच्या उपसभापती सुनिताताई तिडके, नगरसेविका निलीमाताई सावरकर, बाजार समितीचे संचालक अरुण अलोने, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, माजी सरपंच राजेश पारधी, बाजार समितीचे माजी संचालक वामन मिसार, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, वकार खान, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डि.के. मेश्राम, प्रा. चंद्रशेखर गणवीर, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष सतीश डांगे, सुधाकर पोपटे, उपसरपंच गुरुदेव वाघरे, उपसरपंच संदीप बगमारे, सोमेश्वर उपासे, गुड्डु बगमारे, सरपंच सुरेश दुनेदार, विलास धोटे, दत्तात्रय टिकले, मंगला टिकले, माजी नगरसेविका जया कन्नाके, कल्पना तुपट, वंदना ऊईके, पल्लवी मेहेर यांसह अन्य काॅंग्रेस कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.


PostImage

Gadchiroli Varta News

July 30, 2023

PostImage

लॉयल मेटल कंपनीतर्फे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाचे बांधकाम तात्काळ थांबवा


 

 

किष्टापूर (वेल) ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील किष्टापुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवगोच ते तनबोडी या रस्त्याचे याच महिन्यात शासकीय निधीतून डांबरीकरणाचे काम करण्यात आले.सदर रस्त्याचे बांधकामही पूर्ण झालेला आहे.परंतु या रस्त्याचे रुंदीकरनाचे काम लॉयड मेटल कंपनीकडून करण्यात येत असून या कामासाठी संबंधित कंपनीने ग्रामपंचायतीची कोणत्याही पूर्व परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र न घेता करीत असल्याने सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम हे अवैध व नियमबाह्य असल्याने सदर काम तात्काळ थांबविण्याची मागणी येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.किष्टापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात लॉयड मेटल कंपनीकडून सुरू असलेल्या लोह खनिज वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य समस्या उद्भवत असून पर्यावरणाची ऱ्हास होत आहे.सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विध्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या जडवाहनामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेतीची दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.असे अनेक समस्यांची निवेदनात नमूद असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित निवेदनाची दखल घेऊन वरील नियमबाह्य रस्त्याचे रुंदीकरणाचे काम तात्काळ थांबविण्याण्याची मागणी केली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 30, 2023

PostImage

 आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने शहरातील रोडवरील खड्यात झाडे लावून केले आंदोलन...


गडचिरोली : शहरातील नगर परिषद अंतर्गत येत असलेले रोड अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे जुलै महिन्यातील मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी मूळे रहदारीच्या रोडवर मोठे,मोठे खड्डे पडलेले आहेत कॅम्प एरिया , संविधान चौक ते चामोर्शी रोड ,व शहरातील इतर वॉर्डातील खड्याचे सर्वेक्षण आप चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली रोडची पाहणी करून आंदोलन करण्यात आले त्यामुळे पाणी साचले असल्याने रस्त्यावर जाताना नागरिकाना त्रास सहन करावे लागत आहे वाहने चालविणे अवघड होतं आहे.

अपघात होवून जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याला जबाबदार कोण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्यातील पाण्यात डोंगा सोडुन झाडे लावून नगर परिषद , राज्य शासन निषेध नोंदवन्यात आले मागणीची दखल घेवून खड्डे दुरुस्ती करण्यात यावे नाही तर सात दिवसात नगर परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असं इशारा देण्यात आले त्यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे ,जिल्हा सचिव भास्कर इंगळे ,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, महिला युवा आघाडी अध्यक्ष सोनल ननावरे, शहर प्रमुख नामदेव पोले,कामगार आघाडी प्रमुख हितेंद्र गेडाम,क्रिडा सेल अध्यक्ष खेमराज हस्ते, दिवाकर साखरे , अभियंता साहिल बोदेले, युवा आघाडी सेल अनिल बाळेकरमकर ,सुधीर मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते

 


PostImage

Gadchiroli Varta News

July 30, 2023

PostImage

रोडवर रोवणी करून ग्रामपंचायत चा केला ग्रामस्थांनी निषेध


 आष्टी चामोर्शी:  तालुक्यातील सोमनपल्ली गट ग्रामपंचायत येथील सोमनपल्ली च्या महिलांनी गावातील रोडवर रोवणी करून ग्रामपंचायत चा निषेध करण्यात आला.

 

 सोमणपल्ली येथील ग्रामपंचायत ते शेंडे यांच्या घरापर्यंत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे तेव्हा ग्रामस्थांनी सरपंच निलकंठ निखाडे व ग्रामसेवक राकेश अलोणे उपसरपंच निलेश मडावी यांना वारंवार माहिती दिली परंतू त्यांनी या बाबतीत लक्ष न देता सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत व प्रत्येक कामासाठी चिखल तुडवत जावे लागत आहे .

 एवढे दिवस चिखल तुडवून झाले म्हणून धानाची रोपटे आणून महिलांनी त्या चिखलात रोवणी केली व खत सुद्धा टाकले असे अनोखे आंदोलन करुन त्यांनी पदाधिकारऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे या रोवणीचे काम ललीता मडावी ,दिक्षा कस्तूरे, शेवंता कस्तूरे, इंदिरा मोहुर्ले, सुनंदा कस्तूरे,बेबी कस्तूरे, संगीता आत्राम,अश्वीनी मोहुर्ले,रोशन कस्तूरे, सचिन गुडेकर,अमोल मोहुर्ले आदींनी केली 

अशा निगरगठ्ठ पदाधिकाऱ्यांनी आता तरी लक्ष देउन त्या रोडची विल्हेवाट लावावी अशीही मागणी त्यांनी केली आहे


PostImage

Gadchiroli Varta News

July 28, 2023

PostImage

अवैधरित्या कत्तली करीता गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करणारे चार आयसर व एक पिकअप वाहन ताब्यात घेवुन आष्टी पोलीस ठाणे यांनी केली मोठी कारवाई


 

गडचिरोली (आष्टी): पोलिस अधिक्षक निलोत्पल सा. यांच्या आदेशाने अवैध व्यवसाय करणा-या व्यक्तीवर आष्टी पोलीस स्टेशन च्या माध्यमातुन कारवाई करण्यात येत असुन त्याअनुषंगाने दिनांक २७/०७/२०२३ रोजी गोपनिय माहीतीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, चार आयसर व एक पिकअप वाहना मध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीनें भरून तेलंगाना राज्यात कत्तली करीता कोनसरी ते जैरामपुर मार्गे घेवुन जाणार असल्याची माहीती पोलीस निरीक्षक कुदंन गावडे यांना मिळाल्याने सदर माहीतीच्या अनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कोनसरी ते जैरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी करून चार आयसर व एक पिकअप वाहन ताब्यात घेतली. त्यावेळी त्यातील काही आरोपी जंगल परिसराचा फायदा घेवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांचा चार ते पाच किलो मिटर अंतर पाठलाग करून पकडण्यात आले आहे..

 

सदर कारवाईत एकुण ५८,००,०००/- रू. (अठठावन लाख रू.) किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्यामध्ये ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन व त्यामध्ये एकुण १०४ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईत १ ) शेख अब्दुल शेख बक्शु २) शेख मोबीन शेख ३) शेख आशीफ शेख नझीर ४) शेख आरीफ शेख बाबा ५) चंद्रशेखकर गाधाम या आरोपींताना ताब्यात घेण्यात आले असुन इतर ३ असे एकुण ८ आरोपीतांनवर आष्टी पोलीस ठाणे येथे गुन्हा क. १८७ / २०२३ कलम ४२९, ३४ भादवी, सहकलम ५(अ), (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ (सुधारणा) तसेच सहकलम ३,११ (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० तसेच सहकलम ११९९ महा.पोलीस अधिनियम १९५१ तसेच सहकलम १३० / १७७ मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोउपनि अजयकुमार राठोड हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक निलोत्पल सर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सर, मा.अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी) यतीश देशमुख सर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुदंन गावडे, पोउपनिरीक्षक अजय राठेड, गणेश जंगले, श्रेणी पोउपनि येनगंटीवार, आणि पोलिस कर्मचारी देवतळे, मडावी, जाधव, सुरवाडे, नागुलवार, रायसिडाम, पोतराजे, मेदांळे यांनी पार पाडली आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 28, 2023

PostImage

पोंभूर्णा - आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्यावर पुल ओलांडताना वाहून गेली कारपोंभूर्णा - आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्यावर पुल ओलांडताना वाहून गेली कार


कारचालक अजूनही बेपत्ता

गोंडपिपरी पोंभुर्णा : आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असताना कार चालविणे चांगलेच महागात पडले असून या पुरात कार वाहून गेली आहे, तर कारचालक अजूनही बेपत्ता आहे.

               अमित गेडाम असे या बेपत्ता कारचालकाचे नाव असून ते पोंभूर्णा तहसिल कार्यालयात पुरवठा सहायक या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे गोंडपिपरी येथिल शासकिय अन्न पुरवठा गोदामाचा प्रभार होता. ते सकाळी सुमारास पोंभूर्णा येथून गोंडपिपरीकडे जाण्यासाठी कार ने निघाले असता मुसळधार पाऊसामुळे बेरडी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत होते. या पाण्यातून त्यांनी कार टाकली परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने कार नाल्यात वाहून गेली. ही कार नाल्यापासून एक किलोमीटर अंतरावर सापडली असून कारचालक अमित गेडाम मात्र अजूनही सापडले नाहीं. घटनेची माहिती कळताच पोंभूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन ते बेपत्ता कार चालक अमित गेडाम यांचा शोध घेत आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 28, 2023

PostImage

सिरोंचा तालुक्यातील 334 पूरपिडीत लोकांचे शेल्टर होममध्ये स्थलांतर


सिरोंचा तालुक्यातील 334 पूरपिडीत लोकांचे शेल्टर होममध्ये स्थलांतर

जिल्हा प्रशासनाद्वारे 58 शेल्टर होमची निर्मिती

निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा

  गडचिरोली, (जिमाका) दि.28 : दि. 27 जुलै 2023 रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या पूरात अडकलेल्या व पुरामुळे धोका होऊ नये, अशा संभाव्य गावातील लोकांसाठी जिल्हा प्रशासनाने शेल्टर होम तयार केले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पूरपिडीत 334 लोकांना या शेल्टर होममध्ये स्थलांतरीत केले असून त्यांच्यासाठी निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे. 

सिरोंचा तालुक्यात एकूण 58 शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शेल्टर होममध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरपंच व उपसरपंच याप्रमाणे 58 पथक तयार करण्यात आले आहेत. दिनांक 27 जुलै 2023 ला सिरोंचा तालुक्यातील नगरम, मुगापूर, जानमपल्ली व सिरोंचा (रै.) येथील पुरबाधित लोकांना शेल्टर होममध्ये हलविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरम येथील 240 लोकांना शासकीय आश्रम शाळा, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये, मुगापूर व जानमपल्ली येथील 90 लोकांना कॉरमेल हायस्कुल राजीवनगर, सिरोंचा येथे तर सिरोंचा (रै.) येथील 4 लोकांना जिल्हा परिषद हायस्कुल, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये आणण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे नागरिकांच्या निवासाची, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येत आहे.

याशिवाय तालुक्यात एस.डी.आर.एफ. चे एक पथक आणि सी.आर.पी.एफ. चे 50 जवान मौक्यावर तैनात आहेत. तसेच लाइफ जॅकेट, लाईफ बोट, मेगाफोन व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व पूरबाधित गावांमध्ये आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने कळविले आहे.

०००००


PostImage

Gadchiroli Varta News

July 28, 2023

PostImage

वन जमिनीवरील म्हाडा ची घरे बांधण्यास दिरंगाई करणाऱ्या "डीबी रियालिटीस" ची निविदा रद्द करण्याची शिफारस करणार


वन जमिनीवरील म्हाडा ची घरे बांधण्यास दिरंगाई करणाऱ्या "डीबी रियालिटीस" ची निविदा रद्द करण्याची शिफारस करणार

 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत घोषणा

 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील दिंडोशीच्या घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आमदारांची समिती स्थापन करण्याचा निर्णय

 

मुंबई, दि 28: वन जमिनीवरील म्हाडाची घरे पूर्ण करण्यासाठी अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या आणि घरकुल लाभार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या डीबी रियालिटीस या कंपनी ची निविदा शर्ती-अटी तपासून तात्काळ रद्द करण्याच्या सूचना व शिफारस वन विभाग झोपडपट्टी पुनर्विकास विभागाला देईल अशी घोषणा वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील दिंडोशी येथील वन जमिनीवर घरे मिळण्यापासून अनेक कुटुंब वंचित असल्यासंदर्भात आ. राजहंस सिंह आणि आ. प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता; त्या प्रश्नाला ना. मुनगंटीवार यांनी सविस्तर उत्तर दिले.

 

ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की , गरजूंना हक्काचे घर मिळावे हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे. पण दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष होत॑ गेले त्याचा परिणाम अतिक्रमण वाढणे यात होतो. ही बाब लक्षात घेवूनच पंतप्रधान विश्वगौरव श्री नरेंद्र मोदी यांनी देशात ३ कोटी २२ लक्ष घरे बांधली; नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी बांधवांसाठी १० लक्ष घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार गरिबांना घरे देण्याच्या बाबतीत गंभीर आहे; परंतु वन विभाग हा घरे बांधण्याचे काम करीत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. वन जमिनीवर अतिक्रमण करणे किंवा अनुमती देणे याला न्यायालयाची परवानगी नाही हे आवर्जुन लक्षात ठेवले पाहिजे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या पुनर्विलोकन समितीला राज्य सरकार कडून काही ज्यांची घरे आहेत त्यांना पट्टे देता येतील का अशी सूचना किंवा मागणी करण्यात येईल असे ना सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले.

 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दिंडोशी च्या घराचा प्रश्न खूप जुना आहे. तेथील पुर्वसनाचा पहिला टप्पा सुमेर कार्पोरेशन या कंपनीने २६/११/२००२ ला काम पूर्ण करुन ११ हजार ३८५ घरे वाटण्यात आली. दुसऱ्या टप्याचे काम डीबी रियालिटीस या कंपनीला "झोपू" ने दिले. परंतु गेल्या १५ वर्षांपासून हे काम पूर्ण झाले नसून अनेक कुटुंब चिंतेत आहेत ही बाब गंभीर असून या कंपनीकडून झालेले दुर्लक्ष, अनियमितता लक्षात घेवून निविदा रद्द करता येईल का अशी सूचना वन विभाग करेल असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

 

या संदर्भातील इतर महत्वाचे विषय ज्यामध्ये नगरी सुविधा त्या कुटुंबांना मिळाव्यात व तत्सम बाबींना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यासह विधानसभा व विधान परिषद सदस्यांची एक बैठक घेण्याचे तसेच समिती स्थापन करुन सूचना मागवून हा प्रश्न कायम संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


PostImage

Gadchiroli Varta News

July 28, 2023

PostImage

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण


माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

 

मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांच्या २०० कार्यकर्ते यांचा भाजप पक्ष प्रवेश

 

मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते 206 शालेय विद्यार्थीना सायलक वाटप

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात काल माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता तेथील कार्यकर्ते व स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात जंग्गी स्वागत केला,तसेच जगदंब फाऊंडेशन सिरोंचा यांचा कडून रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे होते,अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले सिरोंचा हा तालुका गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असल्याने येथील जनतेला रुग्णालयात रूग्णांना ने-आन करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या त्यामुळे येथील जनतेला रुग्णवाहिकेची अत्यंत गरज होती ही बाब लक्षात घेऊन जगदंब फाऊंडेशन सिरोंचा यांना एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे आणि जगदंब फाऊंडेशन सिरोंचा यांच्या माध्यमातून येथील जनतेला रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना ने-आन करण्यासाठी याची मदत होईल,पुढे बोलताना ते म्हणाले आजच्या युवा वर्गानी सामाजिक कार्यात समोर यावे मी आपल्या सोबत आहो,पुढे ते म्हणाले मी आपल्या क्षेत्रातील जनतेच्या प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी सदैव तत्पर आहो,

 

तसेच त्यावेळी सिरोंच्या तालुक्यातील विविध पक्षाच्या 200 च्या वर कार्यकर्ते यांनी मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात *राजे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है!* अश्या घोषणा दिल्या त्यावेळी तेथील वातावरण घोषनेने दुमदुमून गेले,

 

आणि मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्थानिक राजे धर्मराव हायस्कूल सिरोंच्या येथे भेट दिली आणि तेथील शालेय विद्यार्थीना 206 सायकली त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या,

 

 सिरोंच्या येथील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या आणि आस्थेने त्यांची विचारपूस केली,तसेच

सिरोंच्या तालुक्यातील भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यां यांच्या सोबत येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आणि समोर येणाऱ्या निवडणूकित जोमाने कामाला लागा अशा सूचना दिल्या

कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,अहेरी भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार, शिक्षक प्रकोष्ट अध्यक्ष संतोष पडालवार, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, शहराध्यक्ष सीतापती गट्ट, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश मुंगीवार, जिल्हा

युवा मोर्चा उपाध्यक्ष सतीश पद्मार्टिटी जिल्हा युवा मोर्चा सचिव दिलीप शेनिगारपू जिल्हा अल्पसंख्याक महामंत्री कलाम हुसेन, ज्येष्ठ नेते रंग बापू जगदंब फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच किरण कुलसंगे, माहेश्वरी गड्डम रेखा तिपट्टी, गजानन कलाक्षपवार चंद्रन्ना सदनपू देवेंद्र रंगू बेडके तिरुपती, रवी चकिनारपू, चिडेंद्र लंगारी सत्यनारायण जिडी, नागेश ताडबोईन, हे उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

July 28, 2023

PostImage

शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा युवक आघाडी जाहीर अक्षय कोसनकर जिल्हाध्यक्ष तर देवेंद्र भोयर जिल्हा सचिव


शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा युवक आघाडी जाहीर

 

अक्षय कोसनकर जिल्हाध्यक्ष तर देवेंद्र भोयर जिल्हा सचिव 

 

 

गडचिरोली :- शेतकरी कामगार पक्षाच्या युवक आघाडी असलेल्या पुरोगामी युवक संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी अक्षय कोसनकर यांची तर गडचिरोली तालुक्यातील काटली ग्रामपंचायतीचे सदस्य देवेंद्र भोयर यांची यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. सगणापूर (चामोर्शी ) येथील राजू केळझरकर, पोर्ला (गडचिरोली) येथील यशवंत मुरकुटे यांची जिल्हा उपाध्यक्ष तर वडसा तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत गुरनूले, धन्नूर (मुलचेरा) येथील चिरंजीव पेंदाम यांची जिल्हा सहचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी येथील नितीन मेश्राम यांची सोशल मीडिया जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 मंगेश येनप्रेड्डीवार, फराडा (चामोर्शी), विनोद उराडे, गडचिरोली, महेंद्र जराते, पुलखल (गडचिरोली), विठ्ठल पिपरे, बोदली (गडचिरोली), बाबुलाल रामटेके, कुरखेडा, आविष्कार गड्डमवार, एट्टापल्ली, सुरज ठाकरे, आरमोरी, रवि चेर्लावार, आलापल्ली (अहेरी), प्रल्हाद पोरेटी, पांढरसडा ( धानोरा), महेश आभारे, मारोडा (चामोर्शी), अंकुश मारभते, गडचिरोली, हिराचंद कोटगले, नगरी (गडचिरोली), नरेश कोसरे, धानोरा, भूषण चिंचोलकर, गडचिरोली यांची जिल्हा युवक आघाडी कार्यकारिणी सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

 

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, रोहिदास कुमरे, जिल्हा समिती सदस्य तुकाराम गेडाम, डॉ.गुरुदास सेमस्कर, रमेश चौखुंडे, गंगाधर बोमनवार, श्रीकृष्ण नैताम, अशोक किरंगे, दामोदर रोहनकर, सुधाकर आभारे, तुळशीदास भैसारे, बाजीराव आत्राम, पांडुरंग गव्हारे, वसंत लोहाट, प्रविण दुर्गे, सरपंच सावित्री गेडाम, सरपंच दर्शना भोपये, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, योगाजी चापले, डंबाजी भोयर, प्रदिप आभारे, रोशन नरुले, अनिमेश बिश्वास,देवराव शेंडे, दिपक मिस्त्री, पवित्र दास, मारोती आगरे, रेवनाथ मेश्राम, गजानन आभारे, रमेश यम्पलवार, अनिल आगरे, भोजराज भोयर, गुलाब ठाकूर, प्रदिप पाल, रमेश ठाकरे, विलास अडेंगवार, रविंद्र बोदलकर, वसंत चौधरी, देवानंद साखरे, अमोल शेरकी यांचेसह अनेकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


PostImage

Gadchiroli Varta News

July 28, 2023

PostImage

102 रुग्णवाहिका चालकांचे वेतन त्वरित द्या*  *कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदन


102 रुग्णवाहिका चालकांचे वेतन त्वरित द्या

 कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदन

जिल्हाधिकारी यांनी विषयांचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा शक्य चिकित्सक यांना वेतन तात्काळ देण्याचे आदेश दिले.

गडचिरोली- 

 गडचिरोलीच जिल्हातील 102 रुग्णवाहिकांचे वाहन चालक यांचे मागील 4 महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यांना स्वतःच उदरनिर्वाह करण्यात मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्व वाहन चालक महिला बाल रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे 24 तास निरंतर सेवा देत आहेत. मे. राजश्री शाहू नागरी सेवा संस्था पालघर जील्हा ठाणे या कंपनी मार्फत सण 2022 पासून कार्यरत आहेत. रुग्ण नेणे आणि आणणे या व्यतिरिक्त रुग्णालयातील कामे वाहन चालक पदावर असून सुद्धा करीत आहेत. परंतु कंपनी त्यांना वेतन वेळेवर देत नाही. त्यामुळे त्यांचे मुलांचे शिक्षण, आरोग्य , कुटुंब चालवणे कठीण झाले आहे याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मागील 4 महिन्याचे वेतन कंपनी मार्फत केले नसून आज उपासमारीची वेळ वाहन चालकांवर आलेली आहे. शासकीय नियमानुसार कंपनीने वेतन इ,पी,एफ,वेळेवर देने भरणे अपेक्षित आहे पण असे कंपनी मार्फत होत नाही.कंपनी कडे भंडारा, वर्धा ठाणे व अकोला या पाच जिल्ह्यांचे टेंडर आहे. बाकी जिल्हातील वाहन चालकांचे वेतन 10 तारखेच्या आत होत आहेत. फक्त गडचिरोली येथील वाहन चालकांचे वेतन 4 महिन्यापासून होत नाही आहेत. 

      तरी गडचिरोली येथील वाहन चालकांवर होणारा अन्याय दूर करावा उद्या वाहन चालक संपावर गेल्यास रुग्णाची हेळसांड होईल. वेतन वेळेवर न मिळाल्यास काम बंद च इशारा वाहन चालकांनी दिलेले होते. परंतु जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विषयांचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते याना दूरध्वनी वरून वाहन चालकांचे तात्काळ वेतन देण्याचे आदेश दिले.

त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, मोरेश्वर मंदिरकर, ब्रम्हानंद गोरडवार, एजाज शेख, मुकुंदा नागरे, महेश गडसुलवार, यांच्यासह इतर वाहन चालक उपस्थित होते.