ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
16-03-2024
जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष,समूह शाळे विरोधात भर उन्हात पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांचे धरणे आंदोलन....
जिल्हा परिषद शाळेत २० पैकी कमी पटसंख्या असलेल्या ६२,००० शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.यात गोंडपीपरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.२० पैकी कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याच्या शासनाचे विचाराधीन आहे.यात तालुक्यातील विठ्ठलवाडा या शाळेचा समावेश आहे.येनबोथला,कोरंबी,चेक विठ्ठलवाडा,तारसा (बुज),नांदगाव,नवेगाव या जिल्हा परिषद शाळांचा समावेश असून समूह शाळेचा निर्णय रद्द करण्यात यावा याकरिता ६ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (दि.१५) रोजी पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर भरउन्हात शाळा वाचविण्यासाठी धरणे आंदोलन केलीत.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका गॉडपिपरी अंतर्गत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला तर दुसरीकडे विठ्ठलवाडा येथे समूह शाळा सुरू करण्यात येत असून
या सहाही गावचे पालक,शेतकरी, शेतमजूर व कामगार असून या गावातील शाळा बंद झाल्यास इयत्ता १ ते ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेली वर्ष ६ ते १० या वयोगटातील मुले विठ्ठलवाडा येथे ये-जा करू शकत नाही किंवा शेतीवाडीचे कामे सोडून मुलांना दररोज ६ ते ७ किमी.उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूत ने-आण करू शकत नाही.पर्यायाने आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच कोरंबी व चकविठ्ठलवाडा हि दोन गावे विठ्ठलवाडा जिथे की समूह शाळा नियोजित आहे.या गावामधून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.सदर महामार्गावरून सुरजागड लोहप्रकल्पाचे कच्च्या माल वाहतुकीचे अनेक हायवा ट्रक ये-जा करतात.यापूर्वी या महामार्गावर विद्यार्थ्यांचे अनेक अपघात झालेले आहे.तेव्हा आमच्या गावची शाळा बंद करून विठ्ठलवाडा येथे आमची ग्रामीण भागातील मुले पाठविणे पूर्णता गैरसोयीचे आहे.तेव्हा गाव तिथे शाळा या तत्वाला अननुसरुन आमची शाळा बंद करु नये व आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित करू नये.अशा विषयाचे निवेदन गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांना देण्यात आले.शिक्षणाबाबतचे जनहित विरुद्ध धोरण तात्काळ रद्द करावे म्हणून सकाळी ११ वाजता गटविकास अधिकारी,पंचायत समिती गोंडपिपरी यांच्या कार्यालयासमोर पालक व विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले.यावर प्रशासनाने काही दखल न घेतल्यास सर्व पालक व विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.चंद्रपूर यांच्या कार्यालय समोर धरणे आंदोलने करणार असल्याचे पालकांनी सांगितले.यावेळी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम उराडे ,दिपक ठेंगणे , शारदा मांडवगडे ,अंतकला निकोडे , कालिदास सातार ,शरद मेश्राम, अड.वामनराव चटप,शलिक माऊलीकर, मोरेश्वर सूरकर,सोनी दिवसे,अशोक कुडे, यासह अनेकांची उपस्थिती होती.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments