ProfileImage
125

Post

3

Followers

0

Following

PostImage

खबरदार महाराष्ट्र

April 18, 2024

PostImage

कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट.या घोषवाक्यासह भामरागड तालुक्यात मतदान जनजागृती.


कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट.या घोषवाक्यासह भामरागड तालुक्यात मतदान जनजागृती.


            भामरागड ता.१८- तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मतदार, मतदानापासून वंचित राहू नये.त्यांना मतांचे महत्त्व कळावे या उदात्त हेतूने सांज मल्टी अॅक्टीव्हीटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरीया,बिनागुंडा स्थीत भामरागड या सामाजिक संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष कुमार रुपलाल मारोती गोंगले या अवलियांनी सायकलवर मतदान जनजागृतीचे फलक लावून व साऊंड सिस्टिम बांधून गावागावात मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने करित आहे.
     "मत आपका अधिकार है, अपने अधिकारपर गर्व करे, मतदान करे."
     "अंगुलीपर लगीन स्याहीका निशान सिर्फ निशानही नही,आपकी शान है, लोकतंत्र की जान है."
       " कभी ना दूंगा उसको वोट,जो बाटेगा दारु और नोट".अशा आशयाचे घोषणा देत गत आठ दिवसांपासून  रुपलाल गोंगले या अवलियांनी मतदान जनजागृतीचे कार्य स्वखर्चाने चालविले आहे.त्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

April 2, 2024

PostImage

भाजप ची तालुकाध्यक्ष प्रशांतभाऊ आत्राम यांच्या उपस्तिथीत बूथ सभा व प्रचार सभा संपन्न


भारतीय जनता पार्टी एटापल्ली च्या वतीने मा.श्रीमंत  राजे अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली बुथ सभा व प्रचार सभा सम्पन्न,                                                                                 भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी साहेब यांना तिसऱ्यादा प्रधानमंत्री बनविणे आहे,व मा.अशोक भाऊ नेते लाडके लोकप्रिय खासदार तथा लोकसभा उमेदवार

 गडचिरोली चिमुर क्षेत्र यांच्या निवडणुक  प्रचारार्थ मोदी की गॅरंटी जनसंवाद कार्यक्रम, गाव चलो अभियान राबविण्यात आले असुन एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती क्षेत्रातील निवडणुक प्रचार नियोजन बद्ध कार्यक्रम पंचायत समिती क्षेत्र,                1) जारावंडी,(जारावंडी)   2) कसनसुर (घोटसुर)                     या क्षेत्रातील निवडणुक बैठक सभा घेतांना.  रवि भाऊ ओल्लालवार जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी गडचिरोली,

मा. प्रशांत भाऊ आत्राम तालुकाध्यक्ष एटापल्ली, मा मोहन भाऊ नामेवार तालुका महामंत्री,सम्मा जेट्टी तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी, योगेश कुमरे तालुका सचिव,मा संजय पोहनेकर सर,मा दामोदर नरोटे जिल्हा महामंत्री ,सुभम मुनरत्तिवार सदस्य ,मा सुनिल मडावी माजी सरपंच ,मा देवीदास मोहुर्ले , राजु गुरनुले ,  मा. महागुराम उसेंडी ,मा .देवु गावडे,व पंचायत समिती जारावंडी - कसनसुर या क्षेत्रातील बुथ प्रमुख बुथ पालक व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी एटापल्ली.चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 17, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील अकराव्या सत्रात चरणदास वैरागडे विजयी


 


  गडचिरोली: -स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने  "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे अकरावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २४ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात नागपूर येथील ज्येष्ठ कवी  चरणदास वैरागडे या कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  "मोगरा " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       चरणदास वैरागडे हे नागपूर येथील ज्येष्ठ कवी असून त्यांच्या 'नाद पैंजनांचा' हा कवितासंग्रह व 'आर्त कथांची सार्थकता' हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात.  ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.  
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या अकराव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  जयराम घोंगडे, प्रशांत गणवीर , माधुरी अमृतकर, पुरुषोत्तम लेनगुरे, विलास जेंगठे , गणेश रामदास निकम,  भारत झाडे, संजय बन्सल, चरणदास वैरागडे, उपेंद्र रोहनकर, हरिष नैताम, गजानन गेडाम, संतोष कपाले, बाबाजी व्ही. हुले, प्रभाकर दुर्गे, रेखा दिक्षित, ज्योत्स्ना बन्सोड, तुळशीराम उंदीरवाडे, सुजाता अवचट, सौ. प्रतिभा सुर्याराव  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
 
     


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 17, 2024

PostImage

ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत "माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी" प्रशिक्षण संपन्न:


 

ब्रह्मपुरी;-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जुलै 29,2020.पासून लागू करण्यात आलेले आहे. शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे नियोजन राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि तालुकास्तर असे करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने ब्रह्मपुरी तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी व अनुदानित शाळांतील शिक्षकांचे" शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण" पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत गटशिक्षणाधिकारी वैभवजी खांडरे साहेब यांचे मार्गदर्शनात व नियोजनात दिनांक 11 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 दरम्यान दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले.
         प्रशिक्षणा दरम्यान इयत्ता बारावी व दहावी च्या बोर्ड परीक्षा सुरू असल्यामुळे व त्यात अनेक शिक्षकांच्या केंद्र संचालक, मॉडरेटर, रनर तसेच पेपर तपासणीची कामे असल्यामुळे, शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात आलेले होते.यामध्ये पहिल्या टप्प्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील खाजगी व अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील ,वरील कामातून मुक्त असलेल्या 120 शिक्षकांची निवड करण्यात आलेली होती.सदर शिक्षकांना दिनांक 11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 130 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात आले व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
           दिनांक 16 मार्च 2024  रोज शनिवारला प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभवजी खांडरे साहेब त्याचप्रमाणे मुख्याध्यापक संघ जिल्हा चंद्रपूरचे सचिव श्री.संजयजी हटवार सर त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून   नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रणदिवे सर; लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.धोंगडे सर; सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चे मुख्याध्यापक श्री .नगराळे सर व महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव चे मुख्याध्यापक श्री.ओमप्रकाश बघमारे सर प्रामुख्याने उपस्थित होते.
             नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्याला वैश्विक बनवण्याच्या दृष्टिकोनाचा मार्गपथ असून त्यानुसार शिक्षकांनी मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज व्हावे; असे परखड मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभवजी खांडरे यांनी प्रदर्शित केले. सोबतच प्रशिक्षणाकरता निवजाबाई हितकारणी एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी सचिव अशोक भैया यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
           दरम्यान दिनांक 11 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 या कालावधीत चाललेल्या दोन्ही टप्प्यात विषय तज्ञ म्हणून भूमिका बजावलेल्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ओमप्रकाश बघमारे सर; संजय हटवार सर ,राजेंद्र हटवार सर, विजय धांडे सर, आशय पोफळी सर, प्रा.नाशिक गेडाम सर, विषय तज्ञ नरेश रामटेके सर ,पद्माकर रामटेके सर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पद्माकर रामटेके सर यांनी तर आभार विषय तज्ञ नरेश रामटेके सर यांनी मानले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 17, 2024

PostImage

किष्टापूर येथील आत्राम परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची  उपस्थिती


 

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन आत्राम कुटुंबियांची सांत्वन
        
अहेरी : तालुक्यातील किष्टापूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती,माजी सरपंच भगवान आत्राम यांचे वडील कलमशाई आत्राम यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते.

या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून आत्राम कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी  माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सह उमेशभाऊ मोहूर्ले उपसरपंच वेलगुर,साईनाथजी नागोसे,आविस सल्लागार हरिदास आत्राम,ग्रामपंचायत सदस्य वामनजी मडावी,अनिल दब्बा,पोलीस पाटील महेश अर्का,राजू येरमे,विनायक बोरूले, शरद मोहूर्ले,संजय चटारे,विजय शेंडे,आनंदराव चहाकाटे,प्रविण रेषे,विनोद कावेरी,जुलेख शेख,माजी सरपंच विजय कुसनाके सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 15, 2024

PostImage

निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे:भाग्यश्री ताई आत्राम


 

स्व.राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धा

आलापल्ली: क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी नैपुण्य प्राप्त केले ते यशस्वी झाल्याची दिसून येत आहे. खेळाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता आपल्याला गतिमान चातुर्य टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करायचे असेल तर कठोर परिश्रमाची गरज आहे. जे अडचणीवर मात करून पुढची पायरी शोधतात तेच यशस्वी होतात.त्यामुळे निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथील क्रीडा संकुल मैदानात स्व.राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ एकता व्हॉलीबॉल क्लब,आलापल्ली तर्फे आयोजित भव्य रात्र कालीन व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह उद्घाटक म्हणून माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर मेश्राम, उपसरंच विनोद अक्कनपल्लीवार, माजी जि प सदस्य लैजा चालुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, ग्रा.प.सदस्य पुष्पा अलोने,मनोज बोलूवार,सोमेश्वर रामटेके,स्वप्नील श्रीरामवार,छाया सप्पीडवार, प्रतिष्ठित नागरिक तथा राकॉचे वासुदेव पेद्दीवार,नागेपल्लीचे ग्रा प मलरेड्डी येमनूरवार,सदस्य कैलास कोरेत, सांबय्या करपेत,बालाजी गावडे,पराग पांढरे,सुचिता खोब्रागडे,इरफान शेख,संजय मडावी,इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आपल्या भागात विविध खेळ खेळले जातात.काही खेळाडू विविध खेळात सातत्य ठेवतात तर काही खेळाडू केवळ स्पर्धा असलं की खेळतात.कुठल्याही खेळात नियमित सराव आवश्यक असते.उत्कृष्ट खेळाडूंना आता चांगली संधी उपलब्ध झाली आहे.व्हॉलीबॉल,कबड्डी आणि क्रिकेट सारख्या खेळांना विशेष महत्त्व आहे.प्रो कबड्डी आणि आयपीएल मुळे खेड्यापाड्यातील खेळाडू समोर येत आहेत.त्यामुळे कुठलही खेळ असो नियमित सराव करा आणि मिळालेल्या संधीचा सोनं करा असे आवाहन भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉल चमुंनी सहभाग घेतला.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व्हॉलीबॉल खेळत मैदान गजविले.दरम्यान पाहुण्यांचा क्रीडा संकुल येथे आगमन होताच एकता व्हॉलीबॉल क्लब तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आयोजकांनी चांगलं नियोजन केले होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले कोडसेपल्ली येथील नागरिकांची समस्या


 

अहेरी : तालुक्यातील कोडसेपल्ली येथील नागरिकांचा समस्या जाणून घेण्यासाठी रात्री ठिक 11 वाजता आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पोहचले कोडसेपल्ली गावात.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नालीसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले.असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.तसेच त्यावेळी येणाऱ्या आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकी बाबत सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.

त्यावेळी चर्चा दरम्यान महिला वर्गांनी सांगितले की'नवरात्री - बतकम्मा तथा शारदा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येते.या'उत्सहात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी घेऊन DJ बॉक्स लावून सामूहिक नूत्य करतात.मात्र येथील डीजे सिस्टम उपलब्ध नसल्यामुळे नवरात्री उत्सहात मोठा अडचण निर्माण होते आहे म्हणून सांगितले.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हंटले की"आपल्या महिला वर्गांना लवकरत लवकर डिजे सिस्टम उपलब्ध करून देण्यात येईल.तसेच येथील प्रत्येक समस्या सोडवण्यात येईल अशी कोडसेपल्ली ग्रामस्थांना आश्वासन दिले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शैलेश कोंडागुर्ले,पुष्पा आत्राम,रमेश गावडे,मालू तलांडी,सुनीता आत्राम,भिमराव कुंभारे,राजू आत्राम,महेंद्र मडावी,बिजा तलांदी,सूरज तलांडी,राजू आत्राम,बाजीराव तलाडी,इरपा तलांडी,भगवान गोंगले,कारे वेलाडी,रमा आत्राम,मासा आत्राम,चिंना तलांडी,मालू आत्राम,सचीन पांचर्या,चिंटू,सह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

शेवारी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचे भूमिपूजन भाग्यश्री ताई आत्राम यांनी दिलेलं शब्द पाळला


 

एटापल्ली:- तालुक्यातील शेवारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

शेवारी गावात मागील काही महिन्यांपूर्वी भाग्यश्री ताई आत्राम यांनी चावडी सभा घेतली होती.या सभेत या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या व विकास कामांची त्यांनी यादीच तयार केली होती. नागरिकांच्या मागण्यानुसार त्यांनी त्या त्या गावात आवश्यक ती विकास कामे केली जाणार असल्याचे ग्वाही दिली होती.अखेर त्यांनी दिलेलं शब्द पाळला आहे.

शेवारी ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट बासागुडा, कुकेली आणि शेवारी येथे लाखोंच्या निधीतून विविध विकास कामे केली जाणार असून नुकतेच त्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळताच भाग्यश्री ताई आत्राम यांनी विकास कामांचे भूमिपूजन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी जि प सदास्य ज्ञानकुमारी कौशी,साई नामेवार,कुकेलीचे पाटील महादू कोवासे, पंकज गावतुरे,भूमिया मोहन कोमटी, सीता झुरे, रावजी झुरे, सुधाकर गोटा,सुधाकर पडो,मंगलु नैताम, बैजू कोवासे, साईनाथ चटारे, महारु पोटावी, सावजी झुरे, साधू नरोटे,जीवन वड्डे, शिवकुमार लोहंबडे आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

श्री श्री  कालिमाता व वासंती माता मंदिर च्या भव्य देवी गृहप्रवेश कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती


 

श्री श्री सार्वजनिक कालिमाता व वासंती माता मंदिर कमेटी गणेशनगर कडून कार्यक्रमाचे आयोजन

मूलचेरा : मूलचेरा तालुक्यात बंगाली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून तालुक्यातील प्रत्येक गावात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.धार्मिक कार्यक्रम साजरा करण्याकरिता सुंदर वास्तू ची आवश्यकता असते म्हणून गणेशनगर येथे श्री श्री श्री कालिमाता मंदिर कमेटी च्या पुढाकाराने लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम करण्यात आले,त्या मंदिराच्या गृहप्रवेशच्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून विधीवत पूजा करून बंगाली समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
       
 श्री श्री कालिमाता व वासंती माता मंदिर च्या भव्य देवी गृहप्रवेशच्या कार्यक्रमाला वेलगुर ग्रामपचायत चे उपसरपंच उमेश मोहुर्ले,युधिष्टीर बिस्वास माजी सभापती जिल्हा परिषद, गडचिरोली,बादलजी शाह,भूपती सरदार मंदिर कमेटी अध्यक्ष,विकास घरामी मंदिर कमेटी उपाध्यक्ष,सौ. बसोंना मंडल अध्यक्ष,सौ.इतिका मंडल उपाध्यक्ष,सौ.निकिता मंडल,सौ.अलका सरदार,सौ.कविता बाईनं,सौ.शुभद्रा मिस्त्री,विष्णुपद सरदार,हिरापद मिस्त्री,दिलीप मुजुमदार,प्रमोद बैरागी,वली मंडल,सुबोल मंडल,सुजित मिस्त्री,गुरुपत माल,सुकुमार माल,प्रभास मिस्त्री,जुलेख शेख,विनोद कावेरी,प्रवीण रेषे,संदीप बडगे,अंकुश दुर्गे सह तालुक्यातील बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले कोंदावाही येथील नागरिकांची समस्या


 

एटापल्ली : तालुक्यातील कोंदावाही येथील आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कोंदावाही येथील दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली,लाईन इलेक्ट्रिक,वण जमीनपट्टेसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले.असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.तसेच त्यावेळी येणाऱ्या आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकीबाबत पण चर्चा करण्यात आली आहे.

या चर्चा दरम्यान कोंदावाही येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद पडली आहे.सदर
विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे कोंदावाही गावातील ग्रामस्थांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.गावात विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील पिण्याची पाण्याची समस्या,वृद्ध आणि लहान मुला-मुलींना नानाविध त्रास सहन करावा लागत आहे म्हणून अजयभाऊंना सांगण्यात आली आहे.तात्काळ अजयभाऊंनी समंधित अधिकाऱ्यांनी दूरद्वानी द्वारे येथील समस्या सांगून लवकर लवकर कोंदावाही येते नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावी म्हणून सांगितले आहे.त्यावेळी अजयभाऊंची समस्त नागरिक आभार मानले.

यावेळी चर्चा दरम्यान महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वल नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शंकर आत्राम,चींना आत्राम,मारू तलांदे,साईनु सिडाम,रामजी पुंगाती,रामजी कुड्येती,रुपेश मडावी,मधुकर तलंदी,राजू उसेंडी,संजय आत्राम,बाजू तलंडी,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह स्थानिक आविसं काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार येरामणार येथे नवीन वर्गखोलीचे लोकार्पण सोहळा संपन्न 


 

अहेरी : तालुक्यातील येरामणार येथील जिल्हा परिषद शाळेचं नवीन वर्गखोलीचे लोकार्पण आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.येरामणार येथील काही वर्षा पासून मुलांना शाळेत बसण्यासाठी त्रास होत होते.

ही बाब शिक्षक वर्ग व पालक वर्ग तसेच गावांतील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडलवार यांना माहिती दिले असता.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले.सदर बांधकाम पूर्ण झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी पालक व विद्यार्थी गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरला होता व पालकवर्गानी या कामाप्रति अजयभाऊंची आभार म्हणले.

यावेळी कैलाश झाडे,मेघा झाडे ग्रा.प सदस्य,राजू मडावी.पो. पा,मडावी साहेब,पठाण सर,अर्का मॅडम,नागोराव मडावी,प्रवीण दुर्गे, जानवं दुर्गे,दोगे आत्राम,रेखा झाडे,निलेश वेलादी.सरपंच मेडपल्ली,दिवाकर तलांडी,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सचिन पांचर्या,चिंटू,सुधाकर तिमा,कवडूजी चल्हावारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

एटापल्ली : तालुक्यातील पिडींगुडाम येथील जय माँ काटी वेली पिंडीगुडम तर्फे प्रोढ ग्रामीण व्हॉलीबॉल व कब्बडी स्पर्धेचे आयोजित केली आहे.सदर या स्पर्धेची आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा - शहीद क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके - माता सरस्वती प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गावातील आगमन होतच येथील स्थानिक नागरिक विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली.

या कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते प्रज्वलभाऊ नागूलवार - पिडींगुडाम गाव पाटील वंजा तलांडी - कुले तलांडी - जि.प.प्राथमिक व्यवस्थापक पिडींगुडाम जोगेश गावडे होते.

यावेळी उपस्थित महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वलभाऊ नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार.सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम,उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिकभाऊ तोगम,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

ग्लासफोर्डपेठा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


 

    
जय भिम सी,सी, क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा भव्य स्वागत करण्यात आला


सिरोंचा : तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे जय भिम सी,सी, क्रिकेट मंडळाकडून आयोजित  भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.श्री. मदन मस्के साहेब (प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन बामणी) व मा.श्री. दांडे साहेब (PSI उप पोलीस स्टेशन बामणी ) तर प्रमुख पाहुणे म्हणून मादाराम ग्राम पंचायत चे सरपंच दिवाकर कोरेत,मादाराम ग्राम पंचायत चे माजी सरपंच इरपा मडावी,माजी ग्राम पंचायत उपसरपंच वेंकटस्वामी कार्सपल्ली, आविस सल्लागार तिरुपती वाईल, आविस सल्लागार विजय रेपालवार,आविस सल्लागार ईश्वरजी कोटा,आविस सल्लागार गणपतजी वेलादी, वेंकटस्वामी रामटेके, सुधाकर कोंडागुर्ले, रवी रामटेके, महेश दुर्गम, जुलेख शेख, विनोद कावेरी, चंद्रमोगली माडेम, रवी बारसागांडी, राहुल कुमरम, करण मडावी, महेश मडावी, सूर्यकांत कुमरम, नवीन गुरनुले, श्रीकांत मडे, संतोष मंदाळे, विजय टाकरे, रोहित आत्राम, श्रावण मडावी,  सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी  आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

भव्य टेनिस बॉल क्रिकेट  सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक जय भिम क्रिकेट क्लब मंडळ ग्लासफोर्डपेठा यांच्या कडून असे एकूण तीन पुरस्कार ठेवण्यात आले.

*जय भीम क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राणाप्रताप मेडी, यांनी मानले.या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे  उदघाटनीय सोहळ्याला बामणी,ग्लासफोर्डपेठा,वेंकटापूर  सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी देवराज अल्लूरी, तिरुपती गग्गुरी, राणाप्रताप मेडी, शेखर अल्लूरी, सदानंदम अल्लूरी, मनोहर तलांडी, प्रवीण सोदारी, राजेन्द्र कावरे, सारय्या गंगानबोईना, राम येदासुला, हरीश येदासुला, राजकुमार जूनगरी, सुधीर कावरे सह जय भीम क्रिकेट क्लब ग्लासफोर्डपेठा मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.*


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 14, 2024

PostImage

वांगेझरी येथे होणार समाज मंदिर बांधकाम;भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न


 

एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल वांगेझरी येथे सुसज्ज समाज मंदिराचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

वांगेझरी येथील नागरिकांनी गावात समाज मंदिर बांधकाम करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने सुसज्ज असा समाज मंदिर बांधकामासाठी तब्बल दहा लाखांची निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपलब्ध करून दिली आहे. या निधीतून गावात सुसज्ज समाज मंदिर बांधकाम केले जाणार आहे. गावकऱ्यांची बरेच दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नेत्या भाग्यश्रीताई आत्राम यांचे आभार मानले.

नुकतेच वांगेझरी गावात भेट देऊन भाग्यश्री ताई आत्राम यांनी या कामाचे भूमिपूजन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, भूमिया झुरू झोरे, गणेश झोरे, ज्योती झोरे, मंगलदास शेंडे, सरिता शेंडे,वीणाबाई गेडाम,मनोज कोवासे, शालिक शेंडे, गणेश झुरे, सुरेश शेंडे, जितेंद्र मोहूर्ले, तसेच आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 12, 2024

PostImage

कन्नमवार विद्यालय आर्वी येथे नारी शक्तीचा जागर


 

 


जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून स्थानिक कन्नमवार विद्यालय आर्वी येथे विद्यार्थ्यांनी निरनिराळे थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, वीर क्रांतिकारक, उत्कृष्ट क्रीडापटू, यांचे वेश परिधान करून मुली सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागे नव्हत्या व राहणार नाही असा संदेश कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, रजिया सुलतान, चांदबिबी, इंदिरा गांधी, मदर टेरेसा, मेरी कोम, इत्यादींच्या भूमिका सादर करून उत्कृष्ट सादरीकरण केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक कपिल ठाकूर, सनराइज् इंग्लिश स्कूलचे संचालक प्रशांत कांडलकर, पालक प्रतिनिधी महेश भांड, ज्येष्ठ शिक्षक विलास बोरगमवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका वृंदा करंदीकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमात अतिशय उत्कृष्ट नियोजन पद्धतीने केल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक श्री हिराचंद रेवतकर यांनी कौतुक केले


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 12, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून राजन्ना कूम्मरी यांना आर्थिक मदत


 

सिरोंचा:तालुक्यातील गर्कापेठा येथील राजन्ना कूम्मरी आपल्या कुटुंबियासहीत शिवरात्री च्या दिवशी नदीवर गंगास्नान करण्यास गेले असता त्यांचा मुलगा नागराज कुम्मरी हा आपल्या मित्रांसोबत खोल पाण्यात आंगोळीसाठी गेला होता मात्र अचानक तो पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन त्याला जलसमाधी मिळाली ही बाब सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना स्थानिक पदाधिकारी मार्फत माहिती दिल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी गर्कापेठा येथे राजन्ना कुम्मरी यांच्या घरी भेट देऊन त्यांना सांत्वन करून आर्थिक मदत दिले.


  आर्थिक मदत देतेवेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत मादाराम ग्रामपंचायत चे सरपंच दिवाकर कोरेत,माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली,आवीस सल्लागार ईश्वरजी कोटा,आविस सल्लागार विजय रेपालवार,गणपतजी वेलादी,समय्या कोंडागोर्ला,रवी रामटेके,अशोक मडावी,सुधाकर दुर्गम,नागेश कुम्मरी,शंकर दुर्गम,मलय्या सडमेक,बन्नी कोंडागोर्ला,अंकुलु दिकोंडा,व्यंकटस्वामी रामटेके,जुलेख शेख,विनोद कावेरी,चंद्रमोगली मोडेम,समीर कोटरंगे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 8, 2024

PostImage

अतिदुर्गम भागात भाग्यश्री ताईंच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


 

अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम अश्या छत्तीसगड सीमेवरील गावांत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते लाखो रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

अहेरी तालुका विस्ताराने मोठा असून या तालुक्याला छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्याची सीमा लागून आहे.तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रयत्न सुरु असून कोट्यवधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिली आहे.नुकतेच देचली,वेडमपल्ली,कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावांत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यात सिमेंट रस्ते,नाली बांधकाम,सभा मंडप आदी कामांचा समावेश आहे.

छत्तीसगड सीमेवरील विविध गावांत विकास कामासाठी मोठी निधी उपलब्ध झाल्याने या परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 7, 2024

PostImage

तालुकाध्यक्ष प्रशांतभाऊ आत्राम यांच्या नेतृत्वात मोदी की गॅरंटी जनसंवाद कार्यक्रम संपन्न


 


एटापल्ली;-                                                                        अम्र्बिशराव माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या नेतृत्वात, जिल्हा अध्यक्ष मा प्रशांत भाऊ वाघरे,व  तालुका अध्यक्ष श्री प्रशांत आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी एटापल्ली चे तालुका उपाध्यक्ष श्री. सुरेश आतलामी,व उपाध्यक्ष आदिवासी आघाडी मोर्चा श्री साईनाथ वड्डे, श्री मंगेश नव्हडी सदस्य भाजपा, श्री देवेंद्र गोटा सदस्य भाजपा यांच्या वतीने मौजा गट्टा, वांगेतुरी, गर्देवाडा, मोडस्के, जांबिया या गावात जाऊन मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्या योजनेचा लाभ घ्यावा असे विनंती करण्यात आली व भारतीय जनता पार्टी एटापल्ली चे कॅलेंडर वितरण करण्यात आले आहे,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

महागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती


 

गडचिरोली:-मागील बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहेरी तालुक्यातील देवलमरी आणि महागाव-गेर्रा त्यासोबतच गडचिरोली तालुक्यातील पोर्ला उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

अहेरी उपविभागात बारमाही वाहणारे नद्या आहेत.मात्र, येथील शेतकऱ्यांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. परिसरातील नागरिकांना  या बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करून शेती करता यावं या उदात्त हेतूने मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे गेल्या अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजना आणण्यासाठी प्रयत्नात होते.शिवाय सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी देखील होती.

राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यावर धर्मराव बाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली.मागील बरेच वर्षांपासून रखडलेल्या जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला.अखेर मागील महिन्यात सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर नुकतेच झालेल्या बैठकीत महागाव/गेर्रा,देवलमरी आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला या तीन उपसा सिंचन योजनेला मंत्रालय स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे.

विशेष म्हणजे देवलमरी आणि महागाव/गेर्रा ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर असून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहेत.या दोन्ही ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्याने या परिसरातील अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होऊन परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

बॉक्स--
आपल्या जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांवर उपसा सिंचन योजना आणल्यास त्या पाण्याचा उपयोग येथील शेतीसाठी होईल त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात होतो. जिल्ह्यातील रखडलेल्या उपसा सिंचन योजनेचा वारंवार पाठपुरावा केल्याने यश मिळालं आहे.सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका,रेगुंठा, अहेरी तालुक्यातील देवलमरी,महागाव/गेर्रा आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरातील शेकडो गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. विशेष म्हणजे रोजगार,शिक्षण आणि सिंचन यावर आपला भर असून जिल्ह्यातील रखडलेले पूर्ण काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-धर्मराव बाबा आत्राम
मंत्री अन्न व औषध प्रशासन म.रा.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

वाढदिवस च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती


 

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुधाकरजी जंबोजवार यांच्या नातूच्या प्रथम वाढदिवसचा कार्यक्रम आलापल्ली येथील दुर्गा मंदिर येथे आयोजित केले होते.
 

 

या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सोबत माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून चिमुकल्या बाळाला भेट वस्तू देऊन आशीर्वाद दिले.

    यावेळी सौरभजी जंबोजवार,सूचित जंबोजवार,अंकुश दुर्गे,संदीप बडगे,जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कूसनाके उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

माझी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.


 

नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद.

मूलचेरा:तालुक्यातील श्रीरामपूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुखरंजन माझी यांची मुलगी चि. सौ.का.उजाला यांचा विवाह सपन मंडल यांचा मुलगा चि. मिथुन यांच्याशी श्रीरामपूर येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
 
   या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रवीजी शहा,गोमणी सरपंच उमेश भाऊ कडते,श्रीनगर येथील प्रतिष्ठित व्यक्ती लालूजी बिस्वास,हरीपदजी पांडे माजी सरपंच गोमणी,कर्मकारजी काका,आविस सल्लागार कमलजी बाला,परीतोष राय,सत्यवान बोदलवार,साईनाथ चौधरी,गोकुल बेपारी,नरेन घरामी,तपस मिस्त्री,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,विनोद कावेरी,मिलिंद अलोने,संदिप बडगे,प्रवीण रेषे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

March 6, 2024

PostImage

सरकार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.


सरकार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.

*नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद.एटापल्ली:तालुक्यातील आलेंगा येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस चे सल्लागार खोकन सरकार यांची मुलगी चि. सौ.का.प्रियंका यांचा विवाह बिकास बर यांचा मुलगा चि. विशाल यांच्याशी आलेंगा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
 
  या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले

  यावेळी आविस तालुका सचिव नानेश गावडे,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आलेंगा पोलीस पाटील नानसु मत्तामी,मनोज मत्तामी,मिरवा मत्तामी,बाबुराव बोगामी,बाबुराव गावडे,देवाजी बोगामी,परबल टोप्पो,ननकु लकडा,नंदू लेकामी,सतू कतलामी,राकेश बोगामी,किशोर बोगामी, माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,विनोद कावेरी,संदिप बडगे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 19, 2024

PostImage

कोरेगाव येथे मोठय़ा उत्साहात शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली शेकडो च्या संख्येने गावातील नागरिक जयंतीस एकवटले


 

देसाईगंज //. तालुक्यातील कोरेगाव येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवार ला राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्याने ग्रा. प. चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून, हार घालून व बहुसंख्येने उपस्थित नागरिकांनी समक्ष शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती च्या कार्यक्रमात उपस्थित सौ. कुंदाताई गायकवाड सरपंच ग्राम पंचायत कोरेगाव, शाम जी उईके पोलिस पाटील कोरेगाव, तसेच सर्व ग्राम पंचायत चे पदाधिकारी, गावचे प्रतिष्ठित नागरिक, प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी नगर येथील सर्व युवक मंडळी, उपस्थित झाले आणि हा जयंती चा कार्यक्रम पार पडला.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 19, 2024

PostImage

मोयाबिनपेठा येथील उत्कृष्ट खेळाडू घडतील:दिपकदादा आत्राम


 

शिव भिम सेना, क्रिकेट क्लब मोयाबिनपेठा द्वारा ग्रामीण भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

*अहेरी:-* अहेरी विधानसभा क्षेत्रातील मोयाबिनपेठा सह विविध गावात व्हॅलीबॉल व क्रिकेट खेळाचा मोठा क्रेज आहे.मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही खेळांना विशेष महत्व देत दरवर्षीच याठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रात तर क्रिकेट स्पर्धेची गेली अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असून या विधानसभा क्षेत्रातून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडतील असा आशावाद मा. बि.आर.एस. नेते, माजी आमदार, अहेरी विधानसभा क्षेत्र तथा विभागीय अध्यक्ष आविस दिपकदादा आत्राम यांनी व्यक्त केल्या.

१७ फेब्रुवारी रोजी मोयाबीनपेठा येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरजी रत्नम उपसरपंच मोयाबीनपेठा, प्रमुख पाहुणे म्हणून ‌सिरकोंडा ग्राम पंचायत चे सरपंच लक्ष्मणजी गावडे, नरसय्यापल्ली चे उपसरपंच व्येंकटी दुर्गम, आवलमरी-व्येकटापुरचे माजी सरपंच व्येंकन्नाजी कोंडापे, मोयाबीनपेठा चे माजी उप सरपंच व्येंकन्नाजी तोडसाम, आवीस सल्लागार वाईल तिरुपतीजी, विजय रेपालवार, समय्या दुर्गे, स्वामी जाकावार, व्येंकन्नाजी जाकावार, इंदाराम ग्राम पंचायतचे सदस्य शाकिर शेख, आवीस कार्यकर्ते व्यंकटस्वामी रामटेके, आनंदरावजी, अशोक तलाडे, गणपत डुकरे, गायकवाडजी, रमेश अन्ना, आनंद कोटा, मिलिंद अलोने, जुलेख शेख, विनोद कावेरी, रुपेश दुर्गे, रवी कुम्मरी, महेश बोरकुट, सागर दुर्गे, राजेश कावरे, रुपेश बोरे, तसेच भारत राष्ट्र समिती व आविसचे कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

पुढे बोलताना मोयाबीनपेठा असो अथवा अहेरी विधानसभा क्षेत्रातील कुठल्याही खेळांचे आयोजन असू द्या लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून चांगले खेळाडू सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ दाखवतात.त्यामुळे येथील खेळाडूंना त्याचा मोठा फायदा होतो.त्यामुळे असे मोठे स्पर्धा आयोजन केले पाहिजे.त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे दरवर्षी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरजी रत्नम उपसरपंच मोयाबीनपेठा यांनी उत्तम असे मार्गदर्शन करून खेळाडूंसोबतच आयोजकांनाही होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३0 हजार १0१ रुपये,व द्वितीय पारितोषिक 20 हजार १0१ रुपये तर तृतीय पारितोषिक हे,१0,हजार १0१ रुपये अशी रोख रक्कम दिले,आणि आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या उदघाटनिय सामन्यात दिपकदादा आत्राम यांनी स्वतः मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि युवा खेळाडू मध्ये स्फूर्ती निर्माण केली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 17, 2024

PostImage

माजी पालकमंत्री आत्राम यांनी घेतली आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या घरी दिली भेट


माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आज आलापल्ली दौऱ्यावर गेले असतांना सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर यांचे मातोश्रीचे तब्बेत ठीक

 नसल्याची बातमी कळताच त्यांचे घरी सदिच्छा भेट देऊन प्रकृतीची आस्थेने विचारपूस केले!


यावेळी ताटीकोंडावर कुटुंबीय व स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते!


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 16, 2024

PostImage

भानापेठ येथील वोडाफोन - आयडिया आउटलेट व हवेली गार्डन येथील २ मालमत्ता मनपाद्वारे सील


 

चंद्रपूर १६ फेब्रुवारी - १,३३,५०१ रुपयांची थकबाकी असणाऱ्या भानापेठ येथील वोडाफोन - आयडिया आउटलेट व नानुसेठ यांच्या मालकीच्या हवेली गार्डन,अपेक्षा नगर येथील प्रत्येक ५४ हजार थकबाकी असणाऱ्या २ मालमत्तांना मनपा कर वसुली पथकाने सील केले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.    
   सील केलेल्या मालमत्ताधारकांना यापुर्वी अनेकदा कर भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे जप्तीपूर्वीची नोटीस सुद्धा देण्यात आली होती. त्यानंतरही मोठी मुदत मिळूनही त्यांच्याद्वारे कराचा भरणा करण्यात आला नव्हता. कर भरणा करण्याची जबाबदारी टाळल्यामुळे या मालमत्तांना टाळे ठोकण्यात येत आहे.
    चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
     www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येतो त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येत आहे. सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,पथक प्रमुख अतुल भसारकर,फारुख शेख,मुकेश जीवने,श्रीकांत होकाम यांनी केली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 16, 2024

PostImage

समाज मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत  मलेझरी येथे होणार आदिवासी गोवारी समाजासाठी भव्य समाज मंदिर


 

मूलचेरा: मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथे आदिवासी गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे,समाजाची प्रगती करायची असेल तर समाज बांधव एकत्र येऊन चर्चा करण्यास स्वतःची हक्काची एक समाजमंदिर असायला हवी अशी समाजातील जेष्ठ व्यक्तींनी बैठक घेऊन समाजमंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्याचे ठरविले.*
       
  आदिवासी गोवारी समाजमंदिर बांधकामाची माहिती आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना माहिती देताच आलापल्ली येथील निवासस्थानी समाज बांधवांना बोलावून मलेझरी येथे आदिवासी गोवारी समाजबांधवासाठी भव्य समाजमंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत दिले.व भविष्यात आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यासाठी मी मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले.
      *समाजमंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याने आदिवासी गोवारी समाजबांधवांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले. या वेळी गोवारी समाज अध्यक्ष विलासजी राऊत,आविस सल्लागार रामचंद्रजी शेडमाके,रामदास कोसनकार,आकाश नागोसे,सचिन राऊत,राहुल लोहट,आकाश राऊत,लक्ष्मण राऊत,राम राऊत,तुळशीदास नेवारे,गणेश नेव्हारे,शरद ठाकूर,मारोती नेवारे,निफुल गायकवाड,शंकर खंडारे,सुरेंद्र नागोसे,प्रणय शेडमाके,शेखर पोरेते,स्वप्नील सुरपाम सह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 12, 2024

PostImage

बोरकूट परिवारातील पुण्यानुमोदन कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन बोरकूट कुटुंबियांची सांत्वन



        
 सिरोंचातालुक्यातील कोटापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती,बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष शंकर बोरकूट यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते.

 या निमित्य पुण्यानुमोदन चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित राहून बोरकूट कुटुंबियांचे सांत्वन केले.

        यावेळी  माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत झोडे सर,माजी प.स. सदस्या शकुंतलाताई झोडे,गणपत तावाडे,चांगदेव शेंडे ( बसपा नागपूर ),धारने सर,व्यंकटस्वामी कावरे,व्यंकटी दुर्गम,शंकर रत्नम,सादिक भाई,सुरेश कावरे,महेश डुकरे,सत्यम कुम्मरी,शंकर कावरे,दिवाकर बेडकी,दामोधर रत्नागिरी,व्यंकटी कोडागोला॔,सुरेश तोगम,अशोक गोदारी,जुलेख शेख,मिलिंद अलोने,विनोद कावेरी सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 8, 2024

PostImage

रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजीक क्रांती गतीमान करण्याची गरज;वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे 


 

गडचिरोली,;-माता रमाबाई आंबेडकर यांना स्वत:च्या संसारापेक्षा करोडो दिन दलीत लोकांच्या संसाराची चिंता होती, चार-चार पोटच्या लेकरांचे बलिदान दिले, अनेक प्रकारच्या मरणयातना भोगल्या, गरिबीचे चटके सोसले परंतु  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्येच्या भूकेत खंड पडू दिला नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला नाही या रमाईच्या त्यागातूनच निर्माण झालेल्या सामाजीक क्रांतीला अधिक गतीमान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी आंबोली येथिल रमाई जयंती महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
         बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशिल बौद्ध विहाराच्या प्रांगणात रमाई जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात आले यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नामदेव मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप बेलखेडे, अशोक उंदिरवाडे, जयाप्रदा रामटेके, करिश्मा गोडबोले आदि उपस्थित होते.
       यावेळी पुढे बोलतांना टेंभुर्णे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत तर रमाबाई या आमच्या आई आहेत यांनी निर्माण केलेलं राजगृह हेच आमच्या सामाजीक, धार्मिक, राजकिय चळवळीचे माहेरघर आहे त्यालाच केंद्रबिंदू मानणारे कार्यकर्तेच चळवळ जीवंत ठेऊ शकतात असेही ते म्हणाले.
         यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा समायोचीत भाषण करून रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक रविंद्र काटकर यांनी तर आभार शारदा चुनारकर यांनी मानले. 
       कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाखा चुनारकर, तेजाबाई उंदिरवाडे, ललिता मेश्राम, कैलास दुर्गे, भास्कर रामटेके यांनी परिश्रम घेतले.

 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 8, 2024

PostImage

हिद्दूरजवळ पोलिसांवरती केली नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार


काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर - नारायणपूर - गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत 
     त्यावरून मा अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री.यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक  हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 19:00 वाजता जोरदार नक्षल्यांकडून गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता - पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 7, 2024

PostImage

शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या केंद्रप्रमुखांची तक्रार मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रणय खुणे यांचा पुढाकार


 

गडचिरोल्ली;-आदिवासी विभागामार्फत आदिवासी महामंडळातर्फे शेतकऱ्यांकडून अतिरिक्त धान खरेदी होत असल्याबाबत चौकशी करण्यासाठी.


थेट मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असो नई दिली प्रदेशअध्यक्ष प्रणय खुणे यांनी निवेदन दिला आहे
सदर निवेदनात अशे म्हटले आहे की

 

आदिवासी महामंडळ मार्फत चालू असलेल्या प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली अंतर्गत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक केली जात आहे. 

या बाबत जर कोणी शासनाच्या परिपत्रकाची गोष्ट केली तर केंद्र बंद करण्याची केंद्रप्रमुख शेतकऱ्यांना धमकी देतात. शासनाच्या


 परिपत्रकानुसार प्रति बारदाना ४० किलो ६०० ग्राम खरेदी करावे असे सांगितले आहे तसेच धानाची खरेदी करताना प्रति बारदाना हमाली सुद्धा शासन देणार हे सांगितले आहे.

परंतु आदिवासी महामंडळच्या अभिकर्त्या मार्फत शेतकऱ्यांकडून प्रति बोरा ४१.६०० किलोने खरेदी सुरू आहे. तसेच प्रति बारदाना ६ ते ८ रुपये इतकी हमाली सुद्धा शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जात आहे. आमचे शेतकरी मेहनत करून अगोदर नोंदणी केले

 परंतु अभिकर्त्या मार्फल अगोदर व्यापाऱ्याचा धान खरेदी केला जात आहे त्यामुळे शेतकन्यांचे धान घरी जागा नसल्याने बाहेर उंदीर, घूस यांच्याकडून नासधूस केली जात आहे.


आमचा शेतकरी आक्रमक नसल्याने यांच्या विरोधात जाण्यस घाबरतो कारण आपण जर तक्रार केली तर आपला धान खरेदी केला जाणार नाही. त्यामुळे मा. ना. मुख्यमंत्री साहेब आपण या अश्या खरेदी केंद्रांची आपल्या यंत्रणे मार्फत नियंत्रण ठेवून आमच्या शेतकरी बांधवाना न्याय द्याल हि अशी निवेदनातून विनंती केली आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 6, 2024

PostImage

तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम यांच्या प्रमुख उपस्तिथीत हालेवारासह अनेक गावात भाजपची गाव चलो अभियान 


 

                                                                                            एटापल्ली;-अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या नेतृत्वात तथा ( अहेरी विधानसभा प्रमुख),जिल्हाध्यक्ष मा. श्री प्रशांत  वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हालेवारा, वट्टेगट्टा, पुन्नुर,जवेली बु, कसनसुर टोला, कसनसुर या गावात जाऊन कमळ चिन्ह वॉल पेंटींग व मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी एटापल्ली च्या तालुकाध्यक्ष प्रशांत  आत्राम व तालुका महामंत्री मोहन नामेवार, अध्यक्ष आदिवासी आघाडी मा.सम्मा जेट्टी, तालुका सचिव दिलिप लेकामी, तालुका उपाध्यक्ष योगेश कुमरे,रंजीत उसेंडी,कोषाध्यक्ष मा लिंगु वेळदा यांनी सहकार्य केले व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते,


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 6, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून भापडा येथील नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट.



        
  एटापल्ली;-तालुक्यातील भापडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व सुधाकर नाईक यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.
        या दुःखद घटनेची माहिती भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मिळताच स्व सुधाकर नाईक यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वन केले व नाईक परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.
       
      स्व सुधाकर नाईक हे सन 2002 मध्ये माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वात जारावंडी क्षेत्रातून जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते.

        यावेळी नाईक कुटुंबीय सह बीआरएस व आविस पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 4, 2024

PostImage

अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन : नगराध्यक्षा - उपाध्यक्ष - नगरसेवकांचे हस्ते भूमिपूजन संपन्न


 

अहेरी : नगरपंचायत क्षेत्रातील नगराध्यक्षा - उपाध्यक्ष - नगरसेवकांचा हस्ते लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.त्यावेळी येथील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.वार्डातील समस्त नागरिक नगराध्यक्षा - उपाध्यक्ष नगरसेवकांचे आभार मानले.

आज अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा - उपाध्यक्ष - नगरसेवकांचा हस्ते अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील वॉर्ड नंबर 13 येथील सीसी रोड आणि नाली बांधकाम - वॉर्ड नंबर 10 येथील नाली बांधकाम - सीसी रोड - स्लॅबड्रेन - नाली कवरसह येथील अनेक लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,बालकल्याण सभापती मिना ओंडरे,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गालबाले,नगरसेविका नौरस शेख,नगरसेविका ज्योती सडमेक,श्याम ओंडरे,दीपक संगमवार,अनुराग जाकूजवार कंत्राटदार,मुकेश रतनावारसह क्षेत्राती आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 4, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेत नवोदित कवयित्रींची बाजी.  पाचव्या सत्रात कवयित्री 'प्रतिभा सुर्याराव' विजयी


  गडचिरोली :  स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात *"आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे पाचवे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील  कवयित्री *प्रतिभा प्रविण सुर्याराव* यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  *"डोळे भरून आले तरी'* या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       सौ. प्रतिभा सुर्याराव या नवोदित  कवयित्री असून त्या अंबरनाथ (पुर्व) जिल्हा - ठाणे येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना राज्यस्तरीय काव्यरत्न व काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. 
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या पाचव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  पुरुषोत्तम लेनगुरे, लीना देगलूरकर, सुनील मंगर , कु. तनुजा भोयर, प्रभाकर दुर्गे, हरिष नैताम, जितू निलेकार, प्रशांत गणवीर, संगीता रामटेके, मुर्लीधर खोटेले, अनुराग मुळे -, प्रतिभा सुर्यराव, कृष्णा कुंभारे, पी. डी. काटकर , ज्योत्स्ना बन्सोड, बाबाजी व्ही.हुले, प्रब्रम्हानंद मडावी, अंगुलीमाल मायाबाई उराडे, वंदना मडावी, प्रेमिला अलोने, मनोहर दुधबावरे, तुळशीराम उंदीरवाडे, संजय बन्सल, सत्तू भांडेकर , चरणदास वैरागडे , संगीता ठलाल, उपेंद्र रोहनकर, राजरत्न पेटकर, मिलिंद खोब्रागडे, प्रिती चहांदे, सुजाता अवचट, लता शेंद्रे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
        या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

भापडा येथील नाईक यांच्या अंतिम संस्कार कार्यक्रमाला माजी जी प अध्यक्ष कंकडालवार यांची उपस्तिथी


 

एटापल्ली : तालुक्यातील भापडा ( जारावांडी ) येथील रहिवासी आणि गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दामजी नाईक (४४) यांचे काल २ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हृदविकराच्या झटक्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले होते.                               त्यांच्या पश्चात पत्नी - दोन मुली - आई - वडील - एकभाऊ - एक बहिण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता भापडा येथील बांदीया नदिजवळील स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले.आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कुटुंबियांना मोठ्या आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी काँग्रेसचे नेते व गडचिरोली विधानसभाचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी,गडचिरोली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक हनमंतूजी मडावी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान,जिल्हाअध्यक्ष अनुसूचित जाती सेल काँग्रेस रजनीकांत मोटघरे,उपसरपंच सुधाकर टेकांम,काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश गंपावार,पंस. सदस्य मंगेश हलामि,काँग्रेस नेते आविस तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागुलवार,न.सेवक निजाम पेंदाम,न.सेवक किसन हिचामी,न.सेवक नामदेव हिचामी,लोकेश गावडे,ग्राप सदस्य अंतुभाऊ नरोटे,भामरागड काँग्रेस नेते आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तीम्मा,काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,दासरवार भाऊ,स्वप्निल कनमवार,सचिन पांचर्या,प्रमोद गोडशेलवारसह जिल्हातील काँग्रेस कार्यकर्ते आविस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते पार पडले “गडचिरोली महोत्सव 2024” चे उद्घाटन


 

●    दोन दिवस उत्सवात रंगणार महाराष्ट्राच्या प्रसिध्द कलाकारांच्या कला व रेला नृत्य स्पर्धा.
●    जिल्हयातील अतिदुर्गम भागातील खेळाडु दाखविणार आपल्या अद्भुत खेळाचे प्रदर्शन
●    महोत्सवात मिळणार जिल्ह्रातील हस्तकलाकारांना व्यासपीठ
●    कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूब च्यामाध्यमातून

        
गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, माओवादग्रस्त व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातुन विविध शासकिय योजना मिळवुन देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने दिनांक 01/02/2024 ते 03/02/2024 या काळात गडचिरोली पोलीस दलामार्फत “गडचिरोली महोत्सव” व दि. 04/02/2024 रोजी “महामॅरेथॉन 2024” चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले असुन, काल दिनांक 02/02/2024 रोजी गडचिरोली महोत्सवाचे उद्घाटन मा. अन्न व औषध प्रशासन मंत्री, म. रा. मंुबई. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते पार पडले.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गडचिरोली महोत्सव हा तीन दिवस चालणार असुन, या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समुह नृत्य स्पर्धा, विर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असुन दुर्गम व अतिदुर्गम भागातुन आलेल्या संघामध्ये हया स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.  तसेच गडचिरोली जिल्हयातील विविध बचत गट आणि विविध संस्था आपल्या उत्पादनाचे व वस्तुंचे स्टॉल लावणार आहेत.  यासोबतच हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरीकांरीता उपलब्ध असणार आहेत.  तसेच दि. 02 व 03 फेब्राुवारी रोजी सायंकाळी 06 वा. च्या नंतर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमास महाराष्ट्रातील प्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार असून गडचिरोली जिल्हयातील स्थानिक कलाकरांनी सुद्धा यात सहभाग घेतलेला आहे.  यासोबतच आयोजीत करण्यात आलेल्या महामॅरेथॉन 2024 या स्पर्धेत जिल्हयातील अतिदुर्गम भागातील 13000 हुन अधिक स्पर्धक सहभागी होणार आहे. सदर स्पर्धेत वेगवेगळया वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असुन त्यामध्ये 21 किमी, 10 किमी, 05 किमी, 03 किमी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. अन्न व औषध प्रशासन मंत्री, म. रा. मुंबई. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गडचिरोली पोलीस दलाचे वतीने गडचिरोली महोत्सव प्रारंभ होत असल्याबाबतची घोषणा करुन ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातुन गडचिरोली महोत्सवाकरीता अथक परीश्रम घेत असलेले मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली व त्यांच्या संपुर्ण टीमचे मन:पुर्वक व भरभरुन कौतुक केले.  दरवर्षी अशाच प्रकारे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली महोत्सव आयोजीत करावे, जेणेकरुन जिल्हयातील सर्व खेळाडुंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळु शकेल असे सागिंतले.
         या गडचिरोली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मा. अन्न व औषध प्रशासन मंत्री, म.रा. मंुबई. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम,  मा. जिल्हाधिकारी श्री. संजय मीणा सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा, मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. मयुर भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप तसेच गडचिरोली पोलीस दलातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व शाखेतील अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व  सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार अथक परिश्रम घेत आहेत


 गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन हा पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत उपक्रमाचा एक अविभाज्य भाग असून, या महोत्सवातून गडचिरोलीतील दुर्गम-अतिदुर्गम भागातील हस्तकलाकार व खेळाडूंना एक  व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा मनोदय आहे. तसेच या महोत्सवातून गडचिरोली जिल्ह्राचे वैशिष्ट¬ असलेल्या रेला नृत्यास राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यास निश्चीतच मदत होईल. गडचिरोली महोत्सव व महा मॅरेथॉनमधील सहभागी सर्व खेळाडु व कलाकारांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरीता सर्व नागरीकांनी या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
श्री. नीलोत्पल,
पोलीस अधीक्षक, गडचिरोली

 

गडचिरोली पोलीस दल आयोजीत गडचिरोली  महोत्सव व महा मॅरेथॉन 2024 हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, याद्वारे गडचिरोलीतील युवक-युवतींना व हस्तकलाकारांना आपल्या खेळाचे व कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.  या महोत्सवास गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला या करीता मी त्यांचे अभिनंदन करतो व आव्हान करतो की.    
श्री. संजय मीणा,
जिल्हाधिकारी, गडचिरोली


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची:भाग्यश्री ताई आत्राम एटापल्ली येथे तालुका स्तरीय बाल कला व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन


 

एटापल्ली: विद्यार्थ्याजन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभवतांना विद्यार्थ्यावर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत.त्यामुळे भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

एटापल्ली तालुका मुख्यालयातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे,प्रमुख पाहुणे माजी पंचायत समिती सभापती बेबीताई नरोटी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,नगर पंचायतीचे गटनेता जितेंद्र टिकले,येमलीचे सरपंच ललिता मडावी,सहाय्यक प्रशासन अधिकारी टी बी मडावी,सामाजिक कार्यकर्ते राकॉचे शहर अध्यक्ष प्रसाद राजकोंडावार, गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे, मुख्याध्यापक संदीप सुखदेवे,प्राचार्य विनय चव्हाण, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो, त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्तगुण हेरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायचा असतो. विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मात्र कौशल्याने त्यांच्या मुळाशी प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.तेंव्हाच विध्यार्थ्यांना कुठल्याही स्पर्धेत टिकणे शक्य होणार असल्याचे मत मांडताना होणाऱ्या तालुका स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे यांनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 186 शाळा असून जवळपास 725 विध्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.तीन दिवस चालणाऱ्या बाल कला व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन अगदी थाटात झाले असून विध्यार्थी आणि शिक्षकांनी मान्यवरांचे जंगी स्वागत केले.तर बाल गोपालांनी झांकीद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन


 

आरमोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांचा अभूतपूर्व सन्मान मेळावा संपन्न

आरमोरी:- पूर्वीच्या काळाप्रमाणे आता आधुनिक युगात महिला ही चूल आणि मूल या पुरती मर्यादित न राहता महिलांनी शासनाच्या विविध महिलांच्या योजनेचा उपयोग करून सामाजिक व आर्थिक क्षेत्रात महिलांनी आपली प्रगती साधावी व सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केमिस्ट्री भवन येथे महिलांचा सन्मान मेळावा १ फेब्रुवारी २०२५४ रोजी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख किशोर तलमले, माजी प्रदेश संघटन सचिव युनिस शेख, गडचिरोलीच्या युवती शहराध्यक्ष श्रेया कोष्टी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, आरमोरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अमिन लालानी कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, आरमोरी महिला तालुका अध्यक्षा वृषाली भोयर, महिला शहर अध्यक्ष संगीता मेश्राम, सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष दीपक बैस, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष देवानंद बोरकर, वडसा तालुका अध्यक्ष संजय साळवे, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याला मार्गदर्शन करतांना राजे धर्मराव बाबा आत्राम पुढे म्हणाले, महिलाचे सशक्ति करण्याचा शुभारंभ खास महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यातून म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आला आहे. महायुतीचे सरकार यांनी हा महिलांचा सन्मान करण्याचा मेळावा सुरू केला. या माध्यमातून महिलांचे विविध योजना त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करणे त्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना व मदतीस यांना आता स्मार्टफोन म्हणजे मोबाईल वाटपाचे धोरण सुद्धा हाती घेतलेले आहेत. महिलांच्या योजनांसाठी पुढील काळात आपण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे मेळावे तयार करणार असून महिलांना सर्वतोपरी आरक्षण देण्याचे कार्य आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केलेले आहे महिलांसाठी विविध योजना त्यांनी सुरुवात केलेल्या असून आत्ताच नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेला आहे आजपर्यंतच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा हा आरमोरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा अभूतपूर्व महिला मेळावा झालेला असल्याचे राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या महिलांसाठी मेळावा जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देण्यात येईल सर्व महिलांना घरघर पाणी व्यवस्था कशी करण्यात येईल लखपती योजना ही दोन कोटी वरून तीन कोटी पर्यंत सरकारने केलेले आहेत तसेच जिल्ह्यात अतिक्रमण धारकांना वनपट्टे देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले कार्यक्रमाला मार्गदर्शन नानाभाऊ नाकाडे यांनी केले त्यावेळी त्यांनी शासनाच्या महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष सुनील नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक वृषाली भोयर महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष प्रदीप हजारे यांनी मानले या मेळाव्यात प्रामुख्याने अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये पौर्णिमा राचमलवार, मंगला हजारे, देवका दुमाने, सारिका बांबोळे तसेच राकेश बेहेरे व्सराफा असोसिएशनचे सदस्य यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी हेमराज प्रधान, राजू आकरे, सुरेंद्र बावणकर, योगाजी थोराक, नरेश ढोरे, प्रफुल राचमलवार, सुनील ढोरे, रवींद्र दुमाने, गणेश मंगरे, उदाराम दिघोरे, अनिल अलबनकर, उज्वला मंगरे, जयश्री भोयर, उर्मिला हर्षे, नलू आत्राम, गायत्री भोयर, अरुणा भोयर, कोकिळा गरफडे, मंजुषा हूड, इंदिरा हूड, गीता सपाटे, सारिका बांबोळे, डिम्पल बांबोळे, प्रमिला भोयर यांनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर


 

एटापल्ली:महिला ही अबला नसून सबला आहे.आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीच्या बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे. संक्रांतीच्या शुभेच्छा देत नारिशक्तीचा जागर व्हावा म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

ते 2 फेब्रुवारी रोजी एटापल्ली येथे संक्रांती निमित्त आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदीकुंकूचा वाण देण्यात आला. यावेळी लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणी बक्षीस देण्यात आले.तर काही महिलांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचे नाणे आणि पैठणी देण्यात आले.विशेष म्हणजे विधवा स्त्रियांचा हळदी कुंकू आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात शेकडो महिलांनी हजेरी लावली होती.कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी गोंडी गाण्यावर ठेका धरला यावेळी महिलांच्या आग्रहास्तव भाग्यश्री ताईंनी देखील गोंडी गाण्यावर ठेका धरत महिलांचा उत्साह द्विगुणित केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवतींनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून ठाकरे कुटूंबाला उपचारास आर्थिक मदत.


 

  अहेरी:-अहेरी येथील कु. काजल सुनील ठाकरे ही किडनी आजाराने ग्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे.
   ही बाब कार्यकर्त्याद्वारे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात आणून दिल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उपचारासाठी आर्थिक मदत करून सहकार्य केले.
    या वेळी मेघा मारोती मडावी,मंगला शंकर आत्राम,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,विनोद कावेरी,जुलेख शेख,संदीप बडगे,सुधाकर कोरेत उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Feb. 3, 2024

PostImage

वाशीम जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याने सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार यांनी दिल्या वाघमारे यांना शुभेच्छा


 

अहेरी:-येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांचे वाशीम जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांची प्रकल्प कार्यालय येथे भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून वैभव वाघमारे यांनी जवळपास 6 महिने कामकाज सांभाळली.या दरम्यान त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देत विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचविली.

अल्प कालावधीतच त्यांची नियुक्ती वाशीम जिल्ह्यात करण्यात आली असून आता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण जिल्हा सांभाळायचा आहे.अहेरी सारख्या अतिदुर्गम भागात केलेल्या कामाचा अनुभव त्यांना वाशीम जिल्यात कामी येणार असून नक्कीच याही जिल्ह्यात ते उत्तम अशी कामगिरी करतील आणि जनतेचे प्रश्न सोडवतील असा आशावाद व्यक्त करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 31, 2024

PostImage

तुमरगुंडा महादेवमंदिर क्रॉसिंग जवळ ट्रॅक्टर आणि दुचाकींचा अपघात दुचाकीस्वार जागीच ठार


 

 


एटापल्ली ;- एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळ 11 वाजता ट्रॅक्टर व दुचाकीचे अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात इतका जबर होता की

 दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा  झालं व दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गंभीर रित्या जखमी झाली 


सदर ट्रॅक्टर ही सिमेंट पोत्याने लादलेली व लोखंडी पोल नी भरली होती बातमी लिहीत पर्यंत मृत व्यक्तीचे 

नाव व कुठला पता चालले नाही जमा झालेल्या नागरिकांना 108 क्रमांकाचा अपघाताची माहिती दिली 

मृत व्यक्तीचे नाव व गाव माहिती होताच सविस्तर बातमी दिली जाईल


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 29, 2024

PostImage

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची सिरोंचा येथील वल्ली हैदर शाह उर्स उत्सवाला भेट,चादर चढवून घेतले दर्शन


 

सिरोंचा:राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी होत असलेल्या हजरत वली हैदर शाह उर्स व कव्वाली कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन चादर चढवत दर्शन घेतले.

सिरोंचा तालुक्यात दरवर्षी उर्स महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.येथे होणाऱ्या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणूनही या उर्स कडे पाहिले जाते.यानिमित्ताने होणाऱ्या उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आदी कार्यक्रम व कव्वाली पाहण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात.

२८ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी मंत्री धर्मराव बाबा आत्राम,माजी जि प अध्यक्ष भाग्याश्री ताई आत्राम आणि युवानेते ऋतुराज हलगेकर यांनी भेट घेऊन चादर चढवत समस्त जनतेला सुख-शांती,समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वल्ली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केली.

दरम्यान मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी तर्फे पाहुण्यांचे भले मोठे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

गडचिरोलीतील दारूबंदीची समीक्षा का नको  - 'एमटीबीपीए'चा सवाल, जनमत चाचणीची मागणी 


 

 


गडचिरोली : गेल्यास तीस वर्षांपासून गडचिरोलीत असलेली दारूबंदी केवळ कागदावर असून अवैध तस्करी आणि बनावट दारूमुळे अनेकांचा जीव गेला. ही दारूबंदी म्हणजे काही लोकांच्या सुपीक डोक्यातून निघालेले षडयंत्र आहे. म्हणून ते समीक्षेच्या विरोधात आहे. त्यामुळे शासनाने दारूबंदीवर जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पीपल्स ॲक्शन समितीने (एमटीबीपीए) निवेदनाद्वारे केली आहे.

'एमटीबीपीए'ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरीब, मागासवर्गीय आदिवासींच्या आरोग्याचे कारण पुढे करून तीस वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. परंतु या काळात बंदीची अवस्था काय, हे तपासणे आता गरजेचे झाले आहे. आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूतस्करी सुरू आहे. काही तस्कर बनावट दारूचीही तस्करी करीत आहेत. यामुळे मागील काही वर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबाची वाताहत झाली. त्यामुळे बंदीचा उद्देश खरंच पूर्ण झाला का, याची चर्चा होणे गरजेचे आहे. आणि ज्या जिल्ह्यात दारूबंदी नाही, त्या जिल्ह्यातील सामाजिक आणि आरोग्य स्थिती काय. याचेही एकत्रित समीक्षण झाले पाहिजे. पण याला जिल्ह्यातील काही लोक विरोध करीत आहेत. ज्यांचे जिल्ह्याच्या विकासात कुठलेही योगदान नाही. दारूबंदीमुळे जिल्ह्यात काय बदल झाला हे सुध्दा त्यांना सांगता येत नाही. उलट शेकडोचा रोजगार बुडला. मोहफुलातून मिळणारे उत्पन्न व त्यावर आधारित उद्योगातून मिळणारा रोजगार हिरावला गेला. यातून नफा केवळ काही समाजसेवकांचा झाला. दारूबंदीनंतरही दरवर्षी व्यसनमुक्तीच्या नावावर शेकडो कोटीचा निधी पदरात पाडून घेतला जातो. त्यामुळे दारूबंदीची समीक्षा करून जनमत चाचणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पीपल्स ॲक्शन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे व सदस्य संतोष ताटीकोंडावार अन्वर शेख ऍड संजय गुरु अनिल मेश्राम पुरुषोत्तम भागडकर यांनी केली आहे.

.
ग्रामसभेचे ते ठराव संशयास्पद 
दारूबंदीच्या समर्थनार्थ काही समाजसेवकांनी शासनास ग्रामसभेचे जे ठराव पाठविले ते संशयास्पद आहे. ग्रामसभा घेण्याचे शासन नियम असून त्याआधी पंधरा दिवस आधी नोटीस काढावी लागते. ग्रामसभेच्या ठरावासोबतच, व्हिडीओ शुटींग, सभेकरीता पाठविलेल्या नोटिसची प्रत जोडलेली आहे का? याची शासनाने अभ्यास करून चौकशी करणे आवश्यक आहे. ही सर्व भोंदूगिरी असून आदिवासींच्या शोषणाकरीता वापरलेले सुपीक डोक्यातून निघालेले हे कारस्थान असल्याने शासनाने त्वरीत यावर अभ्यास समिती व समीक्षा समिती नेमून जनमत चाचणी करावी, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 'एमटीबीपीए'ने प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
..............


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या:भाग्यश्री ताई आत्राम अतिदुर्गम तांबडा येथे ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामने


 

एटापल्ली:आदीवासीबहुल भागातील तरुण,तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा कौशल्य असून आयोजित विविध स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या,असे आवाहन माजी जि प अध्यक्ष तथा विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

 गेदा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तांबडा येथे पहिल्यांदाच तरुण आणि तरुणींसाठी आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे बेबीताई नरोटी,सह उदघाटक तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,अध्यक्ष म्हणून गेदा चे सरपंच रीना मडावी,प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर,उपसरपंच दसरू मट्टामी, अजय पदा, लक्ष्मण नरोटे,संभाजी हिचामी, जितेंद्र टिकले,शिक्षक कुळमेथे,गणेश धुर्वा, भूमिया, गावपाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील विध्यार्थी शालेय जीवनात विविध स्पर्धेत भाग घेऊन राज्यपातळीवर तालुक्याचा नावलौकिक करीत आहेत.असे अनेक माजी विद्यार्थीही गावागावात आहेत.त्यांच्यासाठी अश्या स्पर्धेची गरज आहे.क्रीडा क्षेत्रातील तरुणांसाठी आपण नेहमीच पुढाकार घेत आहोत.येथील तरुणांमधील क्रीडा कौशल्य आणि कला गुण बघून तालुका मुख्यालयात क्रीडा संकुल साठी मोठी निधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आणि त्याचे बांधकामही पूर्ण झाले आहे. याठिकाणी नियमित सराव करून खेळांमध्ये सातत्य ठेवा,असे आवाहन त्यांनी केले.

विशेष म्हणजे तरुण आणि तरुणींसाठी एकाच मैदानावर सामने आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेसाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात चमुंनी सहभाग घेतला आहे.गावातच खेळण्याची संधी उपलब्ध झाल्याने महिला व पुरुषही मैदान गाजवणार आहेत.या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात पारितोषिक ठेवण्यात आले आहे.दरम्यान क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनासाठी गावात आगमन होताच मुंगराज क्रीडा मंडळ तांबडाच्या वतीने गावकऱ्यांनी  मान्यवरांचे आदिवासी पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजनरस्ते बांधकामासाठी कोट्यवधींची निधी


 

अहेरी:तालुक्यातील मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणासह सुधारणा करण्यासाठी कोट्यवधींची निधी मंजूर झाले असून नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यामध्ये बोटलाचेरू फाट्यापासून आलापल्लीकडे पुढे ४ किलोमीटरचे काम केले जाणार असून यासाठी १९९.३७ लक्ष रुपयांची निधी मंजूर झाली आहे.दुसरे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नवेगाव ते आपापल्ली ते चिंतलपेठ ९.४० किलोमीटर पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून यासाठी तब्बल ५९०.०० लक्ष रुपयांची निधी मंजूर झाली आहे.तर याच परिसरात तिसरे काम ९७.८० लक्ष रुपयांच्या निधीतून नवेगाव ते किष्टापूर (१.७९ किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण काम केले जाणार आहे.सर्व कामांचे टेंडर पूर्ण झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

कोट्यवधींच्या निधीतून नवेगाव,किष्टापूर आणि वेलगुर या तिन्ही गावातील मुख्य रस्ते गुळगुळीत होणार आहे.सदर रस्ते विकास कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला असून भूमिपूजन निमित्य मंत्री धर्मराव बाबा परिसरात दाखल होताच गावातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, किष्टापूरचे उपसरपंच पवन आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,जेष्ठ नागरिक श्रीकांत मद्दीवार, मनीषा सडमेक,वेलगुर टोल्याचे, सडमेक महाराज ग्रा.सदस्य रोहित गलबले,जेष्ठ नागरिक राजेश्वर उत्तरवार,ग्रा प सदस्य वामन मडावी,आशण्णा दुधी,आदिल पठाण,अरविंद खोब्रागडे,बाबुराव सोनूले,आलापल्लीचे ग्रा प सदस्य मनोज बोल्लूवार,ग्रा प सदस्य पुष्पा अलोने,ग्रा प सदस्य सोमेश्वर रामटेके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी तसेच नवेगाव,किष्टापूर आणि वेलगुर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 28, 2024

PostImage

 नाट्यश्री कविता स्पर्धेच्या चौथ्या सत्रात कवयित्री 'वंदना मडावी' विजयी


 

 



  स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता" हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  गडचिरोली येथील  कवयित्री वंदना मडावी यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  "ज्ञान तुकोबांचे' या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       कवयित्री वंदना मडावी या झाडीपट्टीतील नवोदित कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. ते विविध विषयांवर कवितांचे लेखन करतात. आजवर त्यांनी पन्नास च्या जवळपास कवितांचे लेखन केले असून विविध दैनिकातून त्यांचे लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या चौथ्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  राहूल शेंडे, गजानन गेडाम, प्रभाकर दुर्गे, स्वप्निल बांबोळे, मुर्लीधर खोटेले, पी . डी. काटकर , कृष्णा कुंभारे, प्रब्रम्हानंद मडावी,  सुनील मंगर,  वंदना मडावी,  बाबाजी व्ही. हुले, वसंत चापले,  प्रतिभा प्रविण सुर्याराव, मनिषा हिडको, लता शेंद्रे, माधुरी अमृतकर,
संगीता ठलाल, मनोहर दुधबावरे, पुरुषोत्तम लेनगुरे, संजय बन्सल, 
चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के, ज्योत्स्ना बन्सोड, कु. विधी बन्सोड, सत्तू भांडेकर  इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
        या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 27, 2024

PostImage

प्रावीन्यप्राप्त विदयार्थ्यांचा माजी जी प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार


 

एटापल्ली:तालुका मुख्यालयातील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय येथे माजी जि प अध्यक्ष तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.

तालुक्यातील आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी 1992 मध्ये येथे भगवंतराव आश्रम शाळेची स्थापना केली.10 वी आणि 12 वी चे शिक्षण झाल्यावर येथील गोरगरीब विध्यार्थ्यांना बाहेर जावे लागत होते.येथील विध्यार्थ्यांना तालुका मुख्यालयातच पुढील शिक्षण उपलब्ध व्हावं या उदात्त हेतून कला आणि विज्ञान महाविद्यालय सुद्धा सुरू केली.तालुक्यातील नामांकित महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

1992 ला लावलेलं छोटंसं रोपट्याचा आज वटवृक्ष झाले असून तालुक्यातील हजारो विध्यार्थी याठिकाणी घडले आहेत.उच्च शिक्षण घेऊन येथील आदिवासी विध्यार्थी आज विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.एवढेच नव्हेतर येथील अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहेत.दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेत येथील अनेक विद्यार्थी राज्य स्तरावर चमकतात.याही वर्षी अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न होताच भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ तसेच भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यात दिक्षा वाळके,गायत्री बुद्धावार,नीलिमा मेश्राम,मोनिका मडावी,सगुणा कंगाली आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प स सभापती बेबीताई नरोटे,जेष्ठ नागरिक दत्तात्रय राजकोंडावार,पौर्णिमा श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर,प्राचार्य डॉ बूटे,मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 27, 2024

PostImage

शालेय पोषण आहार कर्मचारीच्या मेळाव्याला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती


 

शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन कडून आलापल्ली येथे मेळाव्याचे आयोजन

अहेरी:आलापल्ली येथील ग्राम पंचायत च्या सभागृहात शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन कडून विविध मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून शालेय पोषण आहार कर्मचारी यांना वेतनवाढ,पदोन्नती,आरोग्यविमा व सेवा निवृत्तीवेतन या विषयांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व शासन दरबारी आपल्या समस्या मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
         या मेळाव्याला युनियन राज्य सचिव विनोद जोडगे,जिल्हा संघटक सचिन मोतकूरवर,सूरज जक्कुलवार, जुबेदा शेख,आकाश तेलकुंटलवर,गणेश चापले सह अहेरी उपविभातील शेकडो शालेय आहार पोषण कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 25, 2024

PostImage

तो गाव आजही वाघाच्या दहशधीत


 

मूलचेरा;-गुरुवार हा दिवस कोळीगाव वासीयांसाठी भीतीचे वातावरण घेऊन निघाला वेळ सकाळी ठीक 7 वाजता कोळीगाव हे गाव धुरीने वेधलेला माणूस माणसाला दिसेना अश्यातच

कोळीगाव येथील पियुष आत्राम हा आपल्या घरून शेजारचा मित्र अनिकेत मडावी याच्या घरी विस्त शेकायला म्हणून गेला 

काही वेळाने त्याचा मित्र अनिकेत आनी पियुष हे दोघे मिळून दुकानात गेले 

व पियुष च्या आईला लक्षात आले की आपला मुलगा हा खूप वेळेपासून घरी नाही
मनात शंका घेऊन पियुष ची आई त्याला घरा शेजारी शोधत होती परंतु पियुष कुठेच आढळला नाही आजूबाजूच्या लोकांना विचारले असता लोकांनी त्याला बघितले नाही अशे सागल्यानंतर पियुष च्या आईच्या

मनात पुन्हा भीती निर्माण झाली व जंगलाच्या दिशेने आपल्या मुलाला शोधण्यासाठी आरडा ओरडा करत 

निघाली परंतु काही दूर जंगल परिसरात शोध घेउणंही तो मिळेना 

अश्यातच पियुषच्या आईचे धैर्य सुटले व ती रडायला लागली तिचे रडणे ऐकून शेजारी जमा झाले व त्याला शोधण्यासाठी सुरुवात केली 

जणू काही क्षणासाठी पियुषच्या आईला वाटले की माझ्या मुलाला वाघाने तर उचलले नाही परंतु 

काही क्षणात पियुष आणि अनिकेत हे  दुकानातून परत आले

पियुष आपल्या घरी गेला व अनिकेत जमा झालेल्या लोकांकडे गेला व अनिकेत नी जमा झालेली लोकांना विचारणा केली असता पियुष 

लापता अशे सांगितले तेंव्हा हसून अनिकेत नी उत्तर दिले की तो घरी आले तेव्हा पियुषच्या आईच्या प्राणात प्राण आले व आपल्या मुलाला जाऊन मिठी मारली

पियुष भेटला असला तरी काही वेळ कोळीगाव येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले वनविभागाने जाहीर केले की वाघाला जेरबंद केले तरी संपूर्ण गाव भीतीच्या वातावरणात जगत आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 24, 2024

PostImage

आल्लापल्ली चाणक्यनिवासी मतिमंद विधालय शाळेत फळ व बिस्कीट वाटप


 

 


अहेरी;-शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार 23 जानेवारी रोजी आल्लापल्ली शिवसेनेचा वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम चाणक्य निवासी मतिमंद विद्यालय शिवसेना तालुका प्रमुख अक्षय करपे यांच्या नेतृत्वात फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले याप्रसंगी आल्लापल्ली येथे वृक्षरोपणही करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हा प्रमुख अंकुश मंडलवार,विभाग प्रमुख प्रकाश गदलवार,युवासेना शहर प्रमुख अनिश सानप, शिवसेना शाखा प्रमुख राकेश धोबे, पापा तिवाडे, वेदू अनमूलवार, मयूर त्रिनगरीवार,अमन मेश्राम, संकेत मेश्राम  दिनेश भुसकाटे सर, हंसराज आटे सर, खिलेश जुमनाके, प्रभाकर बावणे व शिवसैनिक उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 21, 2024

PostImage

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही;-सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार


 

 

गडचिरोल्ली;-जिल्ह्यात शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर सर्रार लूट केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना निदर्शनात येताच त्यांनी  

प्रसिद्धी पत्रक जाहीर केले व प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर होणारी लूट कदापि सहन करणार नाही सविस्तर अशे की

 

अविका संस्था व फेडरेशन हमीभावाणे धान खरेदी करतात 

आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटीशर्ती नुसार हमीभाव धान खरेदी कारावे लागते

शासनाच्या नियमाप्रमाणे 40.600 घ्यायचे धोरण आहे परंतु सर्रार शेतकऱ्यांकडून 41.600  किव्हा 42 केजी घेतले जाते

जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग अशिक्षित असल्यावायून धान खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल करून पिळवणूक केलीजाते व क्विंटलच्या मागे अडीचते तीन किलोची लूट केली जाते


या मुळे शाशन धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसत नी उलट

शेतकऱ्यांचे नुकसान होतांना दिसते 
याच पिळवणुकीला 


थाम्बविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की 

एखाद्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असेल त्याबाबत चा जाब व्यवस्थापक किव्हा सचिवांना विचारावा


त्याच क्षणी संबंधित तुम्ही तुमच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला त्या सचिवावर स्वतःही तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करू शकता.

 किव्हा धान खरेदी केंद्रावर काटा करताना खरेदी वजनाचे फोटो की व्हिडीओ 

9405645963 या नंबर वर पाठवावे किव्हा आम्हाला संपर्क करावे आम्ही तुमची बाजू शासन दरबारी मांडूव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवू


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 20, 2024

PostImage

अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत पूजन करत घेतले आशीर्वाद


 

भगतनगर व परिसरातील गावकऱ्यांशी चर्चा करत जाणून घेतल्या स्थानिक समस्या


मूलचेरा:-तालुक्यातील भगत नगर येथील सार्वजनिक श्री श्री राधागोविंद भजन मंदिर येथे आयोजित अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.

मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील विविध गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगत नगर येथे अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दिनांक 18 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित कार्यक्रमास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मंदिरास भेट देऊन विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.
       
          यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष मनोमली बिस्वास,संजय बॅनर्जी, पुलोक तालूकदार,परिमल मंडल,सुनील मंडल, तपोष गांगुली,रामपदो मिस्त्री,सुधीर तालुकदार,सुनील कर्णधार,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,विनोद कावेरी,प्रवीण रेषे सह बीआरएस व आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 20, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून नवेगाव येथील नितेश शेंडे यांना उपचारास आर्थिक मदत.


 

    अहेरी;-तालुक्यातील नवेगाव येथील नितेश बाबुराव शेंडे हा युवक  गंभीर आजाराने त्रस्त असून तो त्यांचा घरी कमावता एकुलता एक असल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे.ही बाब नवेगाव येथील पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात आणून दिले.माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना कळताच लगेच नितेश शेंडे यांच्या आईला घरी बोलावून तब्बेतीची विचारपूस करून पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केले.
    या वेळी श्रीमती वंदना बाबुराव शेंडे,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,प्रवीण रेषे,विनोद कावेरी,सुधाकर कोरेत,तुकडोजी शेंडे उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 20, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार


 

अहेरी : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आले.सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आविसं - अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नुकतेच भारत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केले.

या निमित्य अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथील अजय कंकडालवार यांना भेट घेऊन शाल श्रीफळ - पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आगाराती कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 19, 2024

PostImage

गरुडझेप बहुउद्देशीय संस्था आर्वी नगरपालिका हद्दीतील आर्वी पुलगांव रोडवरील कडु लिंबाची वृक्षतोड थांबविण्याबाबत विनंती


 


उपरोक्त विषयान्वये मी आपणांस सविनयपुर्वक अर्ज सादर करतो की, आर्वी शहरात जवळपास १०० ते १५० वर्षे जुनी ८० ते १०० मोठी कडु लिंबाची वृक्ष आहेत. त्यापासुन आर्वीकरांना पर्यावरणाचा फायदा आहे. तसेच या झाडांवर हजारोच्या संख्येत पक्षी (उदा. पोपट, कावळे, बगळे, चिमण्या ) इ. चे घरटे व माकडांचे आवागमन आहे. आपण आपल्या स्वार्थापोटी पक्षांचे घरटे उध्वस्त करीत असल्याचे दिसुन येत आहे. आपल्या कार्यात अतिशय अडथळा निर्माण होत असल्यास आपण नविन वृक्ष लागवड करून वृक्ष जगविण्याची हमी लेखी स्वरूपात द्यावी अन्यथा आपण ही वृक्षतोड थांबवावी अन्यथा आमच्या संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी ही विनंती. करिता आपल्या सेवेशी नम्र अर्ज सादर. निवेदन देताना गरुडझेप बहुउद्देशीय संस्थेचे संचालक तुषार साबळे अध्यक्ष रमण मेंढे उपाध्यक्ष रवी शिंपेकर सचिव मिलिंद मसराम व सदस्य ओम पारिसे विकी मसराम आशिष मोहेकर रवी आत्राम आशिष डंबारे यश पवार वैभव मेंढे पवन मोकलकर अनिकेत टिपले आयुष अजमिरे शैलेश मेश्राम विशाल उईके हरीश शेंडे लकी कंगाले हे उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 19, 2024

PostImage

बोरी केंद्रावर प्रतिबारदाना एक किलोची लूट


 

कोरची;-आदिवासी विकास महामंडळ उपअभिकर्ता म्हणून जिल्ह्यातील आविका संस्था हमीभावाने धान खरेदी करतात. आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटी, शर्तीनुसार हमीभावाने धान खरेदी करावी लागते. कोरची तालुक्यातील बोरी येथे ४० किलोंवर १ किलो अधिक धानाची भरती घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

आविका संस्था बोरी केंद्रावर अनेक गावांतील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते

 शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून  हमीभाव केंद्रावर भेट दिली. असता नियमानुसार बारदाना गृहीत धरून ४०.६०० किलो एवढे धान मोजायला पाहिजे. मात्र, एका शेतकऱ्याचे धान मोजत असताना नोंद केली असता एका बारदाण्यात ४१.६०० किलो धान खरेदी केली जात असल्याचे दिसून आले. म्हणजेच एका क्विंटलमागे अडीच किलो धान अधिक घेतले जात आहेत. शेतकऱ्यांची मागील अनेक दिवसांपासून तक्रार होती; पण व्यवस्थापकाविरुद्ध कोणी बोलायला तयार नव्हते. याबाबत आता शेतकरी बोलत आहेत.

 कोरची उपप्रादेशिक व्यवस्थापक राजुरे यांना

याबाबत सदर केंद्राची  माहिती मागण्याकरिता फोन  संपर्क केला असता केंद्रावर अधिकची धान घेतले जात आहे याबाबत आपण का लक्ष देत नाही असा विचारताच  फोन कट केला l  पुन्हा आम्ही सम्पर्क केल्या नंतर काय करायच आहे ते तुम्ही करुण टाका अशे उत्तर मिळाले ll व्यवस्थेचे पदाधिकारी आनी कर्मचारिच अरेरावी ची भाषा पत्रकारांशी वापरत आहेत तर दुर्गम भागातील अश्या किती शेतकरी यांच्या भ्रस्टाचारला बळी पड़त असेल


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 18, 2024

PostImage

नवेगाव येथील उपचार ग्रस्ताला माजी पालकमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी केली उपचारासाठी आर्थिक मदत


 

 

अहेरी;-नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे माजी पालकमंत्री आंबरिशराव यांनी पुन्हा एकदा उपचाराग्रस्तला केली आर्थिक मदत

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे वेलगुर नवेगाव येथील बाबुराव शेंडे यांचा मुलाचे चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती आहे 

व त्यांच्या घरची परिस्तिथी हलाकीची आहे

ही बाब नवेगाव येथील बूथ प्रमुख सुरेश शेंडे यांनी आलापल्ली येथील भाजप पदधिकारी

 भाजप सचिव सतीश गोटमवार, अभिजित शेंडे आनंदराव रालबंडीवार अंकुश शेंडे दीपक तोगरवार यांच्या निदर्शनात आणून दिली असता सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री आत्राम यांच्या शी संपर्क साधून परिस्तिथी कळवली या वेळी वेळेचा विलंब न करता माजी पालकमंत्र्यांनी आर्थिक मदत केली

व समोर काही अडचणी पडल्यास समोरची मदत करणार अशी ग्वाही दिली


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 15, 2024

PostImage

शिवसेना शिंदे गटात इंनकमिंग चालू अनेक युवकांनी केला पक्षात प्रवेश


 

 

 

गडचिरोल्ली;- कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.लक्ष्मणजी (भाई) ज.तांडेल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या वाढदिवसच्या निमित्ताने

 

,दिनांक 14 जानेवारी 2024 रोज रविवारला,अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागातील मौजा खमनचेरू तालुका अहेरी येथे, शिवसेना कामगार संघटना जिल्हा गडचिरोली च्या वतीने,कामगार उपजिल्हा प्रमुख श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे,

 

अंकुश मंडलवार अहेरी व एटापल्ली शिवसेना कामगार तालुका प्रमुख,श्री.अविनाशजी पूच्छलवार शिवसेना कामगार चामोर्शी तालुका प्रमुख यांच्या शुभहस्ते

 

 आणि त्यांचे प्रमुख उपस्तितीत,मौजा खमनचेरू येथील आणि परिसरातील युवक आणि नागरिकांनी शेकडोच्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश केला.या कार्यक्रमाला श्री. प्रकाश गड्डलवार या शिवसैनिकाने विशेष परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 15, 2024

PostImage

अहेरी तालुक्यातील किष्टापुर (वेल) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


 

    
 जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळ किष्टापुर (वेल) कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन

 अहेरी;-:तालुक्यातील किष्टापुर (वेल) येथे जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

       या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून वेलगुर ग्रामपंचायत चे सरपंच किशोर आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून वेलगुर ग्रामपंचायत चे उपसरपंच उमेश मोहूर्ले,किष्टापुर ग्रामपंचायत चे उपसरपंच जीवन आत्राम,पोलीस पाटील महेश अर्का,माजी सरपंच भगवान आत्राम,हरिदास आत्राम,काशिनाथ दब्बा,अनिल दब्बा,मधुकर सडमेक,अजय मडावी,ग्रामपंचायत सदस्य रोहित गलबले,बंडुजी नागोसे,साईनाथ नागोसे,जुलेख शेख,प्रवीण रेषे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

            यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

           टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी जि.प.सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम तसेच तृतीय पुरस्कार सरपंच किशोर आत्राम व उपसरपंच उमेश मोहूर्ले यांच्या कडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

           जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हरिदास आत्राम यांनी मानले.या टेनिस बॉल सामन्याचे  उदघाटनीय सोहळ्याला किष्टापुर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
    सामन्याच्या यशस्वीतेसाठी केतन मडावी,गौतम गावडे,प्रकाश दब्बा,रोहित अर्का,कमलेश अर्का,जीवन आत्राम,भगत आत्राम,अनिकेत सडमेक,यश दब्बा,आदर्श आत्राम,करण दब्बा सह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 13, 2024

PostImage

बोरी येथील भोई समाज बांधवांना मिळणार सुसज्ज सभा मंडप माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न


 

अहेरी:तालुक्यातील बोरी येथील भोई समाज बांधवांसाठी सुसज्ज सभा मंडप बांधकाम होणार असून शुक्रवार (12 जानेवारी) रोजी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

बोरी येथे मोठ्या प्रमाणात भोई समाजबांधव वास्तव्याने आहेत. समाजाचा कुठलही कार्यक्रम घेण्यासाठी सभा मंडप नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील लोकांनी सभा मंडपाची मागणी केली होती.भोई बांधवांची अडचण लक्षात घेऊन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी रेटून धरली. अखेर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 7 लाख 50 हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली असून येथे सुसज्ज सभा मंडप बांधकाम केले जाणार आहे.

नुकतेच शुक्रवारी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी राकॉचे तालुका अध्यक्ष  श्रीनिवास विरगोनवार,महेश बाकीवार,साईनाथ अलवलवार,नागेश पुल्लीवार,अशोक वासेकर,विजय कोकीरवार, गव्वा कपेलवार,शंकर सुर्लावार,पोचम बाकीवार,संजय येल्लेलावार,भिमराव कपेलावार,सुरेश बाकीवार,राजन्ना सगांर्तीवार,रामन्ना गन्लावार,सिनू कपेलावार,संजय येल्लावार,पोचम मंचर्लावार,मल्ला कपेलावार तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

येचली रेती प्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावणार - संतोष ताटीकोंडावार यांचा 'अल्टीमेटम'




भामरागड;- तालुक्यातील येचली घाटातून रेती वाहतूकीसाठी केलेल्या करारनाम्यानुसार रेतीचे उत्खनन न करताच प्रशासकीय अधिका-यांशी संगनमत करुन तिथूनच रेतीचा उपसा केल्याचे दाखवून हजारो ब्रास रेतीची अफरातफर करुन कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावर तक्रार, निवेदन सादर करुनही वर्षाचा कालावधी लोटूनही या प्रकरणी कोणतीच कारवाई न करता संबंधितांना अभय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. येत्या तीन दिवसात तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यास थेट न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनातून दिला आहे.
    सन 2021-22 साठी येचली रेती घाट उपसा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागांतर्गत जीएसडी इंडस्ट्रीज भामरागड यांचेसोबत करारनामा करण्यात आला होता. मात्र संबंधित कंत्राटदाराने सदर रेती घाटातून रेतीचे उत्खनन करताच प्रशासकीय अधिका-यांना हाताशी धरुन बनावट वाहतूकीचा परवाना तयार करुन 2115 ब्रास रेतीची वाहतूक केल्याचे दाखविण्यात आले. करारनाम्याचे भंग झाल्याचे तसेच रेती प्रकरणात कंत्राटदाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने ताटीकोंडावार यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतरही भामरागडचे तहसिलदार यांनी संबंधित अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. तर कंत्राटदारावर केवळ 563 ब्रास रेती परवानावर 1 कोटी 19 लाख रक्कमेचा दंड आकारला. मात्र उर्वरित बेकायदेशीर रेतीवर दंड आकारला नाही. यासंदर्भात सप्टेंबर 2023 व डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्ज केला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही कार्यालयाद्वारे कंत्राटदारासह संबंधित अधिका-यांवर कार्यवाही करण्यात आली नाही.
    गैरप्रकार करणा-या कंत्राटदासह संबंधित अधिकारीवर कारवाई करण्यास बराच विलंब होत असल्याचा आरोप करीत तक्रार संतोष ताटीकोंडावार यांनी आज, गुरुवारी जिल्हाधिका-यांनी निवेदन सादर केले आहे. येत्या तीन दिवसात संबंधित कार्यवाही न झाल्यास मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल करुन प्रकरणाच्या चौकशीकरिता दाद मागणार असल्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

गांधी चौकातील डॉ कुंभारे यांच्या निवस्थानी कुत्तरमारे यांचे स्वागत


गडचिरोल्ली;-.सौं.वर्षाताई जितेंद्र मोरे (कुंभारे) शिवसेना महिला संपर्क प्रमुख यांची, दिनांक 10 जानेवारी 2024 रोज बुधवारला,श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी गडचिरोली येथे सदिच्छा भेट घेतली,"शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे" महाराष्ट्र अध्यक्ष मा.लक्ष्मण (भाई)ज.तांडेल साहेब यांचेवतीने, "शिवसेना गडचिरोली कामगार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख" पदी श्री. सत्यपाल परशुराम कुत्तरमारे यांची निवड झाल्याबद्दल,पुष्पागुछ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर श्री.सत्यपाल कुत्तरमारे यांनी मा.सौं. मोरे (कुंभारे ) मॅडमचे मनःपूर्वक आभार मानले.यावेळी श्री.प्रभाकर सातार चामोर्शी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

विद्यार्थ्यांनी जीवनात एक तरी कला जोपासली पाहिजे;सामाजिक कार्यकर्ते साई चंदंखेडे 



                
अहेरी;-अभ्यासाबरोबरच आपणास ज्या कलेविषयी आवड आहे; ती जोपासणे महत्त्वाचे आहे. त्यामधून तुम्हाला आनंद तर मिळेलच, परंतु त्याचबरोबरच त्या कलेत नैपुण्य मिळविले तर करिअर ही करता येऊ शकते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते साई चंदनखेडे यांनी  काल १० जानेवारी २०२४ आलापल्ली येथे तालुका पत्रकार संघेटने तर्फे राणी दुर्गावती विद्यालयात विद्यार्थी सत्कार समारंभात विद्यार्थांना व्यक्त करत असताना गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार भाग हा महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक कला जोपासण्याची आज गरज आहे. मला लहानपणापासूनच नाटकाची आवड असल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. भूमिका समजून अभिनय करण्यात खरा आनंद आहे अशे सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 11, 2024

PostImage

"पत्रकारांची सामाजिक बांधिलकी" - समाज प्रगतीचे लक्षण अति. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मत.


 

पेरमिली;-पत्रकार" समाज विकासाचा अविभाज्य अंग आहे. तालुका पत्रकार संघटना अहेरी येथील पत्रकारांनी 19 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप,बारा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्काराने सामाजिक बांधिलकी घट्ट केली. यानेच समाजाची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांनी उद्घाटनीय स्थानावरून केले.
       आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयात आयोजित पत्रकार दिनाच्या औचित्याने अध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका पत्रकार संघटना अहेरीच्या वतीने तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा गुणवंतांचा  व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार काल आयोजित करण्यात आला .
      अध्यक्ष म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुहास वसावे, प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, प्राचार्य लोणबले उपस्थित होते.
     विचारमंचावर सत्कारमूर्ती म्हणून जिल्ह्यातील विविध गरजूंना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा  मानवाधिकार संघटनाचे प्रदेश अध्यक्ष प्रणयभाऊ खुणे, तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश मोहुरले तथा गुड्डीगुड्डमचे उपसरपंच प्रफुल्ल नागुलवार यांचा शाल, श्रीफळ देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
     तालुका पत्रकार संघटनेने तालुक्यातील पेरमिली व देवलमारी केंद्रातील 19 जिल्हा परिषद शाळांमधील 912 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुक, पेन व कंपासचे वाटप केले होते. त्यानंतर तालुक्यातील सर्व बारा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याची जिद्द निर्माण व्हावी म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा १हजार ७८२   विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली .कार्यक्रमाला शाळेतील वर्ग ५ते १२ विचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, प्राध्यापक,मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते ,प्रत्येक केंद्रावरील शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होतें. स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातून प्रथम राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरीची विद्यार्थिनी अर्पिता मंचालवार, द्वितीय राजे धर्मराव क. महाविद्यालय आलापल्लीची समीक्षा मडावी तर तृतीय सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आलापलीची विद्यार्थ्यांनी मिताली दिवटीवार यांनी क्रमांक पटकाविला. सर्व बाराही परीक्षा केंद्रावरील प्रत्येक केंद्र प्रावीण्यप्राप्तकांना सुद्धा शिल्ड, प्रशस्तीपत्र, रोख व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
    कार्यक्रमावेळी मंचावर मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ते ज्ञानेंद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, गौतम मेश्राम, ओम चूनारकर उपस्थित होते.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ पठाण, कोषाध्यक्ष नीलिमा  बंडमवार, सहसचिव मुकुंदा दुर्गे, सल्लागार सदाशिव माकडे, डॉ. शंकर दुर्गे, उमेश पेंड्याला, बबलू सडमेक, राहुल दुर्गे, शहाजी रत्नम , व्यंकटेश चालूरकर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच प्रशांत ठेपाले, अनिल गुरणुले, मुन्ना कांबळे, श्रीधर दुगिरालापाठी, दिपक चूनारकर, संजय गज्जलवार, साहिल वाळके, बोम्मावर , गांग्रेडिवर व ईतर पत्रकार बंधुनीही सहकार्य केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे, संचालन संघटनेचे सचिव रमेश बामणकर तर आभार संघटक साई चंदनखेडे यांनी मानले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 10, 2024

PostImage

प्रशासनच नियमांचे उलंघन करणार असेल, तर आता नोटीस कुणाला बजावणार जिल्ह्यात कलम 37 ( 1 ) लागू असूनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सभा


 

गडचिरोल्ली;-मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 2 जानेवारी पासून 16 जानेवारी 2024 पर्यंत, महाराष्ट्र पोलीस अधिनयम 1951 चे कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे, त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोक जमणे, जाहीर सभा घेणे सारख्या अनेक गोष्टीवर बंदी लावण्यात आलेली आहे. विरोधी पक्षातील लोकांनी मोर्चा, आंदोलन किंवा सभा घायचे झाल्यास प्रशासनाकडून कायम विरोधकांना नोटीसी बजावल्या जाते, मात्र आता जिल्ह्यात कलम 37 लागू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची जाहीर सभा जिल्ह्यात घेतली जात आहे?

प्रशासनाकडून प्रशासकीय कायद्याची पायमल्ली केल्या जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे आपले गाहाने मांडावे? की फक्त विरोधकांचा आवाज दाबण्याकरीता प्रशासनाच्या वतीने अश्या पद्धतीचे नोटीस दिल्या जात आहे, असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित केला आहे. हे लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न असून राज्यातील आणि केंद्रातील सरकार हुकूमशाह प्रमाणे वागत असून सार्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केल्या जात आहे.


बॉक्स


दिनांक 2 ते 16 पर्यंत जिल्ह्यात कलम 37 ( 1) लागू होती त्या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोक जमणे किव्हा जाहीर सभा घेणे याच्यावर बंदी होती तरीही जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची काल सभा झाली त्यात हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्तिथी लावली हे नियम सत्तेत असणाऱ्यांना लागू नाही का विरोधी पक्षात असलेल्यांना नोटीस बजावता हे सरासरी लोकशाहीची हत्या आहे 

 

    महेंद्र ब्राम्हणवाडे
काँग्रेस कमिटी गडचिरोल्ली
जिल्हाध्यक्ष 

    


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 10, 2024

PostImage

किष्टापुर (दौड) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


 

    
 जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळ किष्टापुर (दौड) कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आला

 अहेरी:तालुक्यातील किष्टापुर (दौड) येथे जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.क्रिकेट सामन्याच्या उदघाटन पूर्वी गावात ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काडून राष्ट्रीय शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा जन्मगाव असलेले किष्टापुर येथे त्यांच्या पूतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

       या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ग्रामसेवक सुधीर मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच जयवंत मडावी,ग्राप सदस्या वनिता मडावी,माजी ग्राप सदस्य ईश्वर कोटा,आविस सल्लागार किशोर मडावी,सुधाकर मडावी,रमेश वेलादी,कारे मडावी,मदना येलाम,पेंटा तलांडी,अनिल मडावी,वंगाराम मडावी,रमेश मडावी,कारे वेलादी,बंडू तलांडी,इर्शाद शेख,आविस सल्लागार माधव कुडमेथे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी  उपस्थित होते.

            यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील ज्वलंत समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

           टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार व द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

           जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमेश वेलादी यांनी मानले.या टेनिस बॉल सामन्याचे  उदघाटनीय सोहळ्याला किष्टापुर,दोडगेर,पत्तीगाव सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी चिना वेलादी,संतोष सिडाम,राहुल मडावी,अशोक सिडाम,संतोष मडावी,बापू मडावी,विनोद मडावी,मोहीम शेख,मोनू सय्यद,आसिफ सय्यद यांनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 9, 2024

PostImage

एटापल्ली शिवसेना शिंदे गट कामगार तालुका प्रमुख पदि अंकुश मंडलवार यांची नियुक्ती


 

 

शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे... 
तर अहेरी आणि एटापल्ली शिवसेना कामगार तालुका प्रमुख पदी श्री.अंकुशजी मंडलवार,तसेच
 चामोर्शी तालुका प्रमुख पदी श्री.अविनाश पुच्छलवार यांची वर्णी... 
प.
     शिवसेना पक्षाचा प्रमुख घटक (पाया) असलेल्या,"भारतीय कामगार संघटनेची" पक्षात महत्त्वाची भुमिका आहे.हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुरूवातीला,कामगारांना भेडसावणाऱ्या ज्वलंत  प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन, महाराष्ट्रभर पक्षाची पाळेमुळे रोवली.त्याला महाराष्ट्रातील कामगारांची अभुतपूर्व साथ मिळाली. 
         पुढे वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असतांना,महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील,कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून,ना.शिंदे सरकार सतत कामगारांच्या कल्याणासाठी,त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे.
   गडचिरोली जिल्ह्यासह, चामोर्शी तालुक्यात,शिवसेना पक्षासाठी श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे या शिवसैनिकाने केलेल्या अविरत कार्याची दखल घेऊन,शिवदुत तयार करणे,शिवसेना सदस्य नोंदणी,शिवसेना संघटनात्मक कार्यकारिणी तयार करणे,आनंद दिघे साहेब रुग्णालय शिबीर,भव्य रक्तदान शिबीर यासारखे उपक्रम राबविण्यात आले,या कार्याची दखल घेऊन,शिवसेना भारतीय कामगार संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) तांडेल साहेब यांनी श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे या शिवसैनिकाची,भारतीय कामगार संघटना महाराष्ट्राच्या,गडचिरोली जिल्ह्याचे कामगार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी म्हणून दिनांक ०६ जानेवारी २०२४ रोज शनिवारला,निवड करण्यात आली,या निवडीचे शिवसेना जनसंपर्क अधिकारी मा.गौरवजी नागपूरकर आणि मा.महेश कुथे सरांनी सुभेच्छा दिल्या तसेच जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि कामगारांनी आनंंद व्यक्त केला आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 9, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

 

 

अहेरी : तालुक्यातील किष्ठापूर ( वेल ) येथील जय सेवा व्हाॅलीबाॅल क्लब किष्ठापूर ( वेल ) तर्फे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक आविसं - काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत किष्ठापूर ( वेल ) यांच्या कडून देण्यात येत आहे.

रोहित गलबले ग्रामपंचायत सदस्य वेलगुर,शैलू मडावी ग्रामपंचायत सरपंच खमनचेरू,वामन मडावी,स्वप्नील मडावी,गीताताई चालुरकर पं.स अहेरी माजी उपसभापती,प्रगवानजी आत्राम,महेशजी अर्का पोलीस पाटील,पवनकुमार आत्राम ग्रामपंचायत उपसरपंच किष्टपुर,नरेश मडावी ग्रामपंचायत सदस्य किष्टापुर,हरिष आत्राम,विस्तारी दब्बा, कासीनाथ दब्बा,माजी ग्रामपंचायत सरपंच,सोमाजी आत्राम,निलाबाई मडावी,मायाबाई आत्राम,राधाबाई आत्राम विजय मडावी,पापय्या पोरतेट,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंचसह आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 8, 2024

PostImage

दामरंचा ते दुब्बागुडम रस्त्याचे कंत्राटदाराकडून काम बळजबरीने


 

 

 


अहेरी ;-अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील दामरंचा ते दुब्बागुडम रस्त्यावर जुण्या सर्व्ह नुसार शेतकऱ्यांच्या शेतात


जाण्याकरीता व इतर कामा करीता पांदनरस्ता पुर्वी पासुन आहे. व त्या रस्त्यावर 7 ते 10 मीटर नविन रस्ता बांधकाम सदर कंत्राटदारा कडून बळजबरीने सुरु आहे. 


सदर पांदन रस्त्याचे रुपांतर नविन राज्य महामार्ग तयार करण्यासाठी शासनाने त्यांच्या स्तरावर व ग्राम सभेच्या सहमतीने असे अनिवार्य असतांना


पांदण रस्त्याचे रुपांतर राज्य महामार्गाने झाल्याने 20 ते 25 शेतकऱ्यांचे शेत जमीन जात असुन सदर कंत्राटदाराने व संबंधीत विभागाने शेतकऱ्यांच्या जमीनीतील कोणतेही सर्व्हे न करता 


शेतकऱ्यांना कसलीही नुकसान भरपाई न करता बळजबरीने काम सुरु आहे. सदर काम अतितात्काळ थांबवुन चौकशी करुन चौकशी अंती शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई केल्यानंतर 


नियमानुसार परवानंगी घेउन सदर काम करण्यात यावे अशी मागनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार  यांनी केले आहे

 

 अन्यथा अन्यायगस्त शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभे करावे लागेल असेही म्हटले आहे


सदर निवेदनाची प्रत तहसीलदार तहसील कार्यालय अहेरी

 


प्रतीलीपी :-1) मा. श्री डी.व्ही. गवई, संस्थापक अध्यक्ष जन कल्याण समाजोन्न्ती अन्याय, भ्रष्टाचारनिवारण समीती, महाराष्ट्र राज्य. मुंबई

2) मा. जिल्हाधीकारी साहेब गडचिरोली 

3) मा. पोलीस अधीक्षक साहेब गडचिरोली 

4) मा. उपविभागीय पोलीस अधीकारी जिमलगट्टा 

5) मा. उपपोलीस स्टेशन दामरंचा उपविभाग जिमलगट्टा 

वरील अधिकाऱ्यांना सादर केले आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 8, 2024

PostImage

चिंतलपेठ येथील वाघाच्या हल्ल्याची घटना दुःखद वनविभागाणे तातडीने आर्थिक मदत करावे ;सा.का.ताटीकोंडावार


 


अहेरी;-तालुक्यातील चिंतलपेठ येथे महिलेला वाघाने ठार केल्याची घटना काल सकाळी दिनांक 7/1/2024 रोजी रविवार ला घडली 


या वेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दुःख व्यक्त करत 
मनोगक्त व्यक्त केले की अहेरी विधानसभेत घडलेली घटना ही दुःख मन हेलावून टाकणारी आहे 


गेल्या काही महिन्यापासून गडचिरोल्ली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे मागील हप्त्यात महिला सरपण गोडा करण्यासाठी गेली


असता वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले इतक्यातच पुन्हा एकदा अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसर भीतीच्या वातावरणात आहे 

तरी या वाघांचा बंदोबस्त करून ठार झालेल्या महिलेला वन विभाग आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष तातीकोंडावार यांनी केली आहे 

जर का तातडीने या वरती उपाययोजना केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 8, 2024

PostImage

जमिनी वाचविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांची आमदारांकडे भावनिक साद.मुधोली चक न.२ येथील सभेत आमदारांना साकडे.


 

 


चक न 2;- "मला दोन एकर जमीन आहे माझे दोन मुलं आहेत एक मुलगा अपंग आहे.आम्हाला जमीन द्यायची नाही आहे. जमीन आहे तर जमिनीच्या भरोषावर आम्ही आमचे पोट भरू शकतो.पैसा आज आहे उद्या नाही.साहेब तुम्हाला कितीही पगार असला तरी पण तुम्ही पैसा खात नाही शेवटी भातच खाता...."अशी भावनिक साद घालत विद्या कष्टी नावाच्या शेतकरी महिलेसह परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या वेदना आमदरांपुढे मांडल्या.
      ७ जानेवारी रोजी मुधोली चक नं.२ येथे भूमि अधिग्रहणाच्या बाबतीत पीडित असलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी आले असता मुधोली चक नं.२,जयरामपूर, सोमनपल्ली, गणपुर, मुधोली तुकूम लक्ष्मणपुर येथील शेतकऱ्यांनी आमदारांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत  जमिनी  देणार नाही असे म्हणत सरकारकडे आमचे मुद्दे मांडा असे निवेदन देत वेगवेगळ्या मागण्या केल्या.
 *प्रमुख मागण्या*
१)शेतकरी कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहण करणारा आदेश रद्द करावा.
२) शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी शासनाचे जे अधिकारी येत आहेत त्यांना तात्काळ थांबवा.
३) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा वेळोवेळी धाक सांगत पोलीस निरीक्षक परिसरातल्या गावकऱ्यांवर जमावबंदीचा आदेश काढतात,हे लोकशाही असलेल्या देशात घातक आहे ज्यामुळे परिसरातल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे,कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क डावलले जात आहे त्यासाठी पोलीस प्रशासननाला सूचना कराव्या..
४)आजपर्यंत चर्चा,निवेदन आणि अर्ज यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आमचे हक्क हिरावून घेऊ.
   यावेळी परिसरातले शेकडो शेतकरी महिला पुरुष उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते उद्घाटन 


 

गडचिरोली:शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे ६ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान ६९ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा पुरुष व महिला २०२३-२४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या स्पर्धेचे उद्घाटन ७ जानेवारी २०२४ रोज रविवारला महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभाचे अध्यक्ष शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली, वाय राजाराम महासचिव बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, प्रशांत दोंदल जिल्हा क्रीडा अधिकारी, लीलाधर भराडकर जिल्हा नियोजन समिती सदस्य, डॉक्टर पि.के. पोटाला अध्यक्ष महाराष्ट्र दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन, डी. एस गोसावी कार्याध्यक्ष, अतुल इंगळे महासचिव आणि डॉक्टर सुरज येओतिकर संचालक क्रीडा विभाग, डॉक्टर दर्शना येवतीकर जिजामाता पुरस्कार प्राप्त, राजेंद्र भांडारकर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, युनूस शेख, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया चे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्वप्रथम भारतातून आलेल्या ३० पुरुष २४ महिला संघातील खेळाडू प्रशिक्षण व्यवस्थापक यांच्या अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रात बॉल बॅडमिंटन खेळाला ५ टक्के आरक्षणात समावेश करून संघटनेच्या अडचणी सोडून पुन्हा गत वैभव मिळवून देण्याच्या आश्वासन उपस्थित खेळाडूंना दिले.

याप्रसंगी समस्त राज्याच्या संघाने गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या बँड सोबत सुंदर पथसंचालन करून सर्व क्रीडारसिकांचे लक्ष वेधले तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या खेळाडू आशिष निजाम यांनी मशाल घेऊन मैदानाला वंदन केले. तसेच या स्पर्धेला यशस्वी आयोजनासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी आयोजन समिती अध्यक्ष रशिकांत पापळकर, सचिव अतुल इंगळे, बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडकिलचे अध्यक्ष ओम प्रकाश संग्रामे, प्राध्यापक रूपाली पापडकर, आशिष निजाम, कपिल बागडे, प्रशांत मशाखेत्री, प्रवीण पोयाम, संजय मानकर इत्यादींचे विशेष कौतुक केले. उद्घाटन समारंभाचे संचालन डॉक्टर श्रीराम पवार ठाणे व रमण गागापुरवार प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर पि.के. पटेल तर आभार राजेंद्र भंडारकर यांनी मांडले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी"या"घटना स्थाळी धाव


 

अहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील आज कापसाच्या शेतात काम करत असताना वाघाच्या हल्यात मृतक सुषमा देवदास मंडल यांची जागीच ठार झाले आहे.प्राप्त माहिती नुसार सदर महिला मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून.

मागील 30 ते 35 वर्षीपासून अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येते स्थायी झाली आहे.त्यांच्या घरी एक किराणा दुकान असून चिंतलपेठ गावात त्यांची शेती पण आहे.सुषमा देवदास मंडल यांनी आज सकाळी शेतात कापूस वेचणी करतांना.अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केली वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार झाली.मंडल परिवारावार दुःखाचे डोंगर कोसळले आहे.ही माहिती स्थानिक आविसं - काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच अजयभाऊंनी घटना स्थळी धाव घेतली.

घटनास्थळी असलेल्या नागरिक आणि त्यांचे नातेवाईकांनी 10 मिनिट समोर वनविभागचे कर्मचाऱ्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येते पोस्ट मोडम साठी हलवण्यात आली म्हणून सांगितल्याने.माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार तीतून लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते जाऊन मंडल परिवाराचा नातेवाईकांना भेट घेतली. फ़ॉरेस्ट विभागाचे अधिकारी मा.उपवनक्षक साहेबांना ब्रह्मणद्वणी द्वारे नरभक्षक वाघाला त्वरित जरबंद करण्याची विनंती केली.

यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली मा.हनमंतूजी मडावी,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगर सेवक,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन भाऊसह आदी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची मागणी


 

उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मंडल कुटुंबियांची घेतली भेट

अहेरी: तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल या महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला ही अत्यंत दुःखद घटना असून यानंतर असे दुःखद घटना टाळण्यासाठी वन विभागाने त्या नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम केली आहे.

चिंतलपेठ येथे आज सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनांमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. एवढेच नव्हे तर सध्या शेतीचे काम सुरू असून या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे पुढे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.शेतीचे कामे खोळंबणार असून याचा फटका थेट सर्वसाधारण शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे वनविभागाने या गंभीर घटनेची दखल घेऊन त्वरित त्या नरभक्षक वाघाला जेर बंद करावा अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे.

दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंडल कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत धीर दिला.उपस्थित वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेची माहिती घेऊन प्रस्ताव तयार करून वारसांना त्वरित अर्थसाहाय्य द्यावे अशी मागणी केली.

थेट फोन करून दिले निर्देश

उपजिल्हा रुग्णालय येथे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी थेट उपवनसंरक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात घडणाऱ्या वन्य प्राण्यांच्या घटनेमुळे अनेकांना यात जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वन विभागाची तात्पुरती मदत

वन विभागातर्फे सध्या तात्पुरत्या स्वरूपात मंडल कुटुंबियांना तीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी ही रक्कम माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते देण्यात आली.!


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून डोळ्याच्या ऑपरेशन साठी आर्थिक मदत


 

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत किस्टापुर ( दो )अंतर्गत येत असलेल्या दोडगिर येथील रहिवासी संतोष सम्मा वेलादी यांना डोळ्याच त्रास असल्यामुळे यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जाण्याकरीता व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी उपचाराकरिता त्यांची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना डोळ्याच्या ऑपरेशन साठी अडचण भासत होती.

ही अडचण आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देचलीपेठा दोऱ्यावर असताना त्यांचे नातेवाईक व स्वता आजारी असलेले संतोष वेलादि यांनी आपली समस्या सांगताच अजयभाऊ यांनी रुग्णांस अहेरी जनसंपर्क कार्यालय येते बोलवून संपुर्ण उपचारकरिता आर्थिक मदत केली.त्यावेळी अजयभाऊ त्या नातेवाईकांना सांगितले की पुढील उपचारा दरम्यान काही अडचण भासल्यास संपर्क करण्यात यावी म्हणून सांगितले . वेलादी परिवारातील  सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी उपस्थित प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,नरेश गर्गम,सन्नी वेलादि,संमा वेलादी,प्रकाश दुर्गे कुमार गुरनुलेसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 7, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्याकडून भोगापूर येथील सिडम कुटुंबाला आर्थिक मदत


 

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर अंतर्गत येत असलेल्या भोगापूर येथील रहिवासी नागेश सिडम यांच्या काही दिवसांपूर्वी अल्प आजराने निधन झाले होते."ही"माहिती आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मिळताच लगेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठवून सांत्वन करून आर्थिक मदत केली.

यावेळी नारायणपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक हरी,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगिली,संपत कडेकरी,वेंकटेश हरी,संतोष नीलम,साई नीलम,गड्डाम राजू,संपत हरी,येलाय्या इंगिली,कडेकरी गट्टू,साई नौसेट्टी,संपत दादा,अशोक इंगिळी,वेंकटेश इंगिली,पोचम गोमासी,येल्लय्या नौसेट्टी,सदानंद कडेकरीसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 6, 2024

PostImage

पोलिसांनी पकडली 42 ओल्या गांजाची झाडे हिंगणघाट पोलिसांची कारवाही


 

 

वर्धा;-दिनांक 05/01/2024 रोजी मुखबीर कडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाने जगन्नाथ वार्ड हिंगणघाट येथे राहणारा आरोपी नामे आकीब शेख सलाम वय 31 वर्ष यांचे घराचे छतावर गांजा अमली पदार्थ चे हिरवे ओले दोन ते अडीच फूट उंचीचे 42 झाडे मिळून आल्याने खालीलप्रमाणे गांजा अमली पदार्थ चे हिरवे ओले दोन ते अडीच फूट उंचीचे 42 झाडे वजन 369 ग्रम जूमला कि. 4500 रू. चा माल मिळून आल्याने एन डी पी एस कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात असून आरोपीस अटक करण्यात आली. पूढील तपास पोउपनि/रमेश मिश्रा पो.स्टे. हिगणघाट करीत आहे.                                                                                                                      
    सदरची कार्यवाही श्री. नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. डाँ. सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. रोशन पंडित उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. मारुती मुळुक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोउपनि/रमेश मिश्रा पो.हवा. प्रविण देशमुख,  सुनील माळणकर पोना/ नरेंद्र आरेकर, दिपक हाके, विजय हरणुर, सागर सांगोळे,यांनी केली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 6, 2024

PostImage

शव स्वगावी नेण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत


 

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत पेरमिली येथील रंजु रामू मडावी वय 35 वर्षे यांची आकस्मित मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह पेरमिली वरून उपजिल्हा रुग्णालय अहेरी पोस्टमोडम करण्यासाठी घरच्या कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.सदर माहिती आविसंचे माजी सरपंच प्रमोद आत्राम यांनी दूरध्वनी द्वारे त्यांचेपरिस्थिती आविसं - राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळवताच त्यांनी एका क्षनांचा सुद्धा विलंब न करता मृतकांचे मृतदेह हे पेरमिली ला नेण्यासाठी अहेरी येथील शववाईका बोलेरो वाहन उपलब्ध करून देत आर्थिक मदत केली आहे.

यावेळी अहेरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गेसह आविसं राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 5, 2024

PostImage

भ्रष्ट अधिका-याला घडली अद्दल;-संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते


 

 

अहेरी;-अतिदुर्गम, संवेदनशील क्षेत्रात आधीच विकासाच्या नावे बोंब आहे. अशास्थितीत काही धाडसी कंत्राटदार नक्षल प्रभावीत जीव मुठीत घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशास्थितीत वनविभागाने कंत्राटदाराने नियमानुसार कंत्राटदारांना सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र प्रमोद जेनेकर यांचेसारखे भ्रष्ट अधिकारी पदाचा दुरुपयोग करुन खंडणी वसूल करीत विकास कामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुर्गम भागात विकास कामे करणा-या कंत्राटदारांना त्रास देणा-या भ्रष्टाचारी वनाधिका-यांविरोधात आमचा लढा सुरु राहणार आहे. लाच प्रकरणी अटकेतील आरएफओ प्रमोद जेनेकर यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामाची चौकशी करण्यात येऊन तपासाअंती त्याचेवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 5, 2024

PostImage

अखेर तो सेटिंगबाज वनपरिक्षेत्र अधिकारी जेणेकर फसला एसीबीच्या जाळ्यात 10 लाखाची केली होती मागणी 


 

 

अहेरी;_आलापल्ली वनविभागा अंतर्गत येत असलेल्या पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक करण्यात आली आहे

सदर वनपरिक्षेत्र अधिकारी हा सेटिंगच्या कामात वस्तात होता 

गोरगरिबांना लुटमार करणारा या नावाने क्षेत्रात त्याचे नाव प्रसिद्ध होते 

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की प्रमोद जेणेकर नामक वनपरिक्षेत्र अधिकारी हा तुमीरगुंडा कासमपल्ली रस्त्याच्या कामावरील काही वाहने पकडली होती व त्यावर आकारलेलं दंड कमी करन्यासाठी जेणेकर याने संबंधित कंत्राटदाराला 10 लाखाची मागणी केली होती अनंता 5 लाखात सेटिंग फिक्स झाली परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा न्हवती 

व तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली 

त्या अनुशंगाने सापडा रचून दिनांक 4/1/2024 रोजी  पेरमिली येथे रात्र 5 लाख रुपये स्वीकारताना प्रमोद जेनेकर याला रंगेहात पकडले


या वेळेवर लाच लुचपत विभागातील संपूर्ण कर्मचारी उपस्तीत होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन


 

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील जय गंगा माता क्रिकेट क्रीडा मंडळ येल्ला यांच्या वतीने भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.सदर स्पर्धेचे उदघाटन आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांचे हस्ते करण्यात आली आहे.

या क्रिकेट स्पर्धेचे सहउदघाटक म्हणून येल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम - कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येल्ला ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 21001/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद शाळा येल्ला - सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम यांच्या कडून 15001/- देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक विमलाताई ओल्लालवार शाळा - येल्ला येथील ग्रामसेवक प्रदीप गेडाम - प्र.ना.लिंगाजी टेकुलवार - प्र.ना.साईनाथ पानेमवार यांच्या कडून देण्यात येत आहे.

यावेळी आविसं - काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक - मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

लाहेरी येथील गुरांच्या गोट्याचे पैशे मिळवून देण्याकरिता लाभार्थ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी 


 

भामरागड : नरेगा अंतर्गत गुरांचे गोट्याचे पैसे मागील चार वर्षे पासुन ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थीना मिळत असल्याने आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

"सदर निवेदनात अशे म्हटले आहे की..!

भामरागड पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थींना नरेगा अंतर्गत मागील चार वर्ष पासून गुरांचे गोठयाचे पैसे देण्यास टाळटाळ करत आहे.मागील चार वर्ष पासून पंचायत समिती भामरागड ला येण्या जन्य करीता अंदाजे 20.000 हजार रुपये खर्च झाले तरी पण आमच्या कडे नरेगा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार या योजनेचे अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाही.तरी कृपया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आम्ही तुम्हास विनंती करतो की आमच्या हक्काचे पैशे मिळवून देण्यास मदत करावे अशे म्हटले आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

अल्लापल्ली येथील वाहन चालक संघटनेचे वतीने केंद्र सरकारच्या जाहीर निषेध


 

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निषेध सभेला भेट देत पाठिंबा दिले

आलापल्ली : केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा पारित केला असुन या कायद्यामुळे
99 अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे.अपघात घडल्यास जखमीना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे.

त्यामुळे कोणताही वाहन चालक अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात.परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे
मारण्याचा प्रयत्नही केला जातो.त्यामुळे स्वत:च्या संरक्षना करीता काही वाहन चालक
घटनास्थळावरून पळ काढतात.त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना“हिट अँड रन”कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे.असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे.हा कायदा केन्द्र सरकारने तात्काळ रद्द करावा या करीता अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटना अहेरी - आलापल्लीच्या वतिने मौजा आलापल्ली येथील विर बाबुराव सडमेक चौकात काल पासुन केन्द्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले.

लोकशाहीच्या मार्गाने काही काळ रस्ता रोको करुन केन्द्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले.जर का केन्द्र सरकारने हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द न केल्यास येत्या काळा तिव्र आंदोलन करणार असल्याचे वाहन चालकांनी
सांगीतले.त्यावेळी निषेध सभेला आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी भेट घेऊन वाहन चालकांची समस्या जाणून घेऊन जाहीर पाठिंबा दिले.

त्यावेळी आविसं काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक - असंख्य वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

नायलॉन मांजाची विक्री भोवणार मनपा भरारी पथकांची नजर कडक कारवाईचे निर्देश


 

 

 

चंद्रपूर;- राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात.त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
      मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग,मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असुन दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे. दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभराआधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. नायलॉन धागा वापरण्यास बंदी असतांना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळुन येते. याच्या वापराने पशु - पक्षी तसेच नागरिकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  
      महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये व नागरीकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 4, 2024

PostImage

देसाईगंज तालुक्यात बूथ कमेंट्या स्थापित करून पक्ष संघटन मजबूत करा; जिल्हाअध्यक्ष रवी वासेकर


 


देसाईगंज;-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या रूपाने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व प्राप्त झाले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री यांच्या सारखे कर्तृत्वान, जिल्ह्याच्या विकाशा साठी सदैव तत्पर असणारे, जिल्ह्यामध्ये विविध उद्योग आणणारे असे नेतृव आपल्या जिल्ह्याला प्राप्त झाले अश्या नेत्यांचा फायदा घेऊन कार्यकऱ्यांनी तालुक्यात पक्ष मजबूत करण्या करता गावा गावात बूथ कमेंट्या तयार करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर यांनी केले आहे.
       स्थानिक विश्राम गृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देसाईगंज तालुका व शहर कार्यकरणीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी. जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर होते. प्रमुख उपस्थिती प्रदेश संघटन सचिव युनूसभाई शेख,जिल्हा परिषदेचे माजी सभापती केशरी पाटील उसेंडी, अल्पसंख्यांक चे जिल्हा अध्यक्ष आरिफ भाई पटेल,तालुका अध्यक्ष संजय साळवे, शहर अध्यक्ष लतीफ भाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, जिल्हा संघटन सचिव मनोज तलमले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोटवार, सेवादलचे जिल्हा अध्यक्ष. पायधन, जिल्हा संघटन सचिव प्रल्हाद वाघारे, जिल्हा डाकराम वाघमारे, जिल्हा संघटक सचिव हंसराज लांडगे अंबादास कांबळी, युवक चे विधानसभा अध्यक्ष समीर पठाण, तालुका अध्यक्ष चिराग भागडकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, विलासभाऊ ठाकरे, सुरेंद्र नाकाडे, नामदेव मेश्राम रामचंद्र ठाकरे यादवजी भुरले, लीलाधर भर्रे, ममिता आळे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 3, 2024

PostImage

बाबलाई माता वार्षिक पुजा व पारंपरिक इलाका समिति ग्रामसभा यात्रा संपन्न


 

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या कडून बाबलाई माता वार्षिक पुजा व पारंपारिक संमेलनासाठी मदत


भामरागड तालुक्यातील बेजुर या गावाला लागून असलेल्या बेजुर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेच्या मंदिर आहे.
 
  येथे दर वर्षी आदिवासी व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजान करत असतात जल जंगल जमीन याच्या वर आधारित असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाच्या अतुरतेने वाट बघत असतात.

  १ जानेवारी ते ३ जानेवारी पर्यंत बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.

   माता बाबलाई ही आदिवासी बांधवांचे प्रमुख देवता आहे. शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्रा येत असतात. क्षेत्रात जानेवारी महिन्यात धान कापणी संपलेली असते आणि नवीन धान खायला सुरुवात व्हायची असते. आदिवासी समुदाया मध्ये कोणत्याही नवीन वस्तु खाण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पंडूम म्हणजे पुजा केली जाते. धान हा इथला महत्त्वाचा पीक आहे. म्हणून लोक नवीन धान खायला सुरुवात करण्यापूर्वी पिंडी पंडूम करतात.

  या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी व गैर आदिवासी एकत्र येतात व बाबलाई मातेच्या पुजा करतात आज या बाबलाई माता वार्षिक पुजा व सांस्कतिक संम्मेलनात उपस्थित दर्शवून मातेच दर्शन घेऊन या पूजासाठी मदत केली

 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 3, 2024

PostImage

शिक्षण हे चारित्र्य घडविण्याचे एक साधन - डॉ. नामदेव किरसान.


 


   देसाईगंज;- मौजा कुरुड ता. वडसा जि. गडचिरोली  येथे   जानकाबाई कोल्हे कॉन्व्हेंट कुरुड यांच्या वतीने " शालेय सांस्कृतिक कार्यक्रम " उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना सांगितले की, ज्या शिक्षणामुळे चारित्र्य घडविता येते तेच खरे शिक्षण. पालकांनी आपल्या मुलांसमोर चालतांना बोलताना, वागताना काळजी घ्यावी. मुलांमध्ये संस्कारी आईवडिलांपासूनच घडत असतात. मुलांसमोर आई वडील खोटं बोलले तर मुलं ही खोटं बोलायला शिकतात. शिक्षणाविना प्रगती शक्य नाही त्यामुळे आपल्या पाल्यांना योग्य प्रकारचे शिक्षण प्रत्येक पालकांनी द्यावे. असे त्यांनी स्पष्ट केले.
               यावेळी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे,  जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी वामनरावजी सावसाकडे, प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी मनोजभाऊ ढोरे,  प्रदीपभाऊ उरकुडे, सरपंच प्रशालाताई गेडाम,  माजी सरपंच मनोहरभाऊ निमजे, अविनाश गेडाम, पो. पा.मंगेश मडावी, रमेशभाऊ ठाकरे, विजय कुंभलवार, विलासभाऊ गोटेफोडे, पिंटूजी दिघोरे, हरिभाऊ ढोरे, मा.पो.पा. रघुनाथजी खरकाटे, नकटुजी सोनकुसरे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने पालक प्रेषक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 2, 2024

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

एटापल्ली : तालुक्यातील नारानूर व रेंगावाही येथील जय महादाखंडी क्रीडा मंडळ नारानूर - रेंगावाही यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले असता.सदर या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पुरस्कार देण्यात येत आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांची गावात आगमन होताच नागरिकांनी आदिवासी रेला नूत्य करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे.कंकडालवार यांनी प्रथम सप्तरंगी ध्वजाचा ध्वजारोहन करून.आदिवासीचे जंननायक बिरसा मुंडा आणि स्त्री शिक्षणाचे जनणी- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

या स्पर्धेचे उदघाटक आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी व आविसं तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी होते.सहउदघाटक आविस तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार व ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरागडे होते.

यावेळी उपस्थित मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,चिंटू आत्रामसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक - मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 2, 2024

PostImage

अय्यापा स्वामी कमिटीचे पदाधिकारी - सदस्यांनी घेतली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट


 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील अय्यापा स्वामी कमिटीचे पदाधिकारी - सदस्यांनी आज आविसं - काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील भेट घेतले.

या भेटीदरम्यान अय्यपा स्वामी कमिटीचे पदाधिकारी - सदस्यांनी आपल्या अडचणी अवगत करून दिल्या.लगेचच माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.व त्यांना आश्वासन दिले की मंदिरात पुढील होणाऱ्या कार्यक्रमा करिता.अडचण पडल्यास मी सदैव मदत करीन.यावेळेस मंदिर कमिटीचे पदाधिकारी - सदस्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मंदिरात दर्शनासाठी विनंती केली

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेकसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंदिर कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 2, 2024

PostImage

अहेरी विधानसभेच्या समस्येवर तोडगा काढणारा समाजसेवक संतोष ताटीकोंडावार


 


अहेरी;-गडचिरोल्ली जिल्ह्यातील अति मागासलेला विधानसभा क्षेत्र म्हणून ओळख असलेला अहेरी विधानसभा क्षेत्र या विधानसभा क्षेत्रामध्ये अहेरी,भामरागड,एटापल्ली,सिरोंचा,मूलचेरा तालुके येतात 

यात अहेरी तालुका सोडले तर चार तालुक्यात अजूनही काही काही भागात वीज रस्ते आरोग्य अश्या अनेक समस्यांना ग्रासलेला आहे 

या समस्यांना सोडवण्याची जवाबदारी ही लोकप्रतिनिधींची असते परंतु ना कोणत्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही लोकप्रतिनिधी हे क्रिकेट व्हॅलीबाल कबड्डी उदघाटन करण्यात व्यस्त भुमीपूजनात व्यस्त 

कुणीतरी आमच्या भागाचा विकास करेल अश्या आशेवर नागरिकांचे जीवन चालले 

यातस एक चेहरा समोर येतो संतोष ताटीकोंडावार या नावाने ताटीकोंडावार हे मूळचे कामलापूर येथील गेल्या पाच वर्षापासून समाज सेवेत अग्रेसर अनेक मोठ्या मोठ्या समस्यांना भ्रष्टाचाराला उघड्यावर पाडले रस्त्याचे प्रश्न असो की आरोग्याचे प्रश्न असो किंवा पाण्याचे प्रश्न असो त्यांनी शासन दरबारी मांडले व मार्गही निघाला व नागरिकांना ताचा फायदा ही घेता आला 

संतोष ताटीकोंडावार यांच्या मुळे शासनाला कोटयवधी रुपयांचा फायदा ही झाला चोरट्या मार्गांनी काम करणाऱ्याचे धाबे दणाणले

वन्य प्राणी प्रेमी या नात्याने.. महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प कमलापूर येथील हत्ती कॅम्प मधील हत्तींना सरकारने डाव साधून रिलायन्स कंपनीच्या खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवण्याचे आदेश काढले होते. त्यांच्या विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल करून स्थगिती आणली व महाराष्ट्राची शान राखले.

 तीन-चार वर्ष आधी राष्ट्रीय महामार्ग 353 सी सिरोंच्या आलापल्ली या महामार्गाच्या कामाबद्दल झालेले भ्रष्टाचार उघड करण्यासाठी  उच्च न्यायालयात दाद मागत जनहित याचिका सुद्धा दाखल केली.

  भामरागड तालुक्यातील येचिली रेती घाटा. मध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आणून एक कोटी एकोणवीस लाख रुपये दंडही ठोठावत शासनाला लाभ पोहोचविले


सिरोंचा वनविभागातील अवैध वृक्षतोड प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या वृक्षतोडामध्ये त्या कर्मचाऱ्यांवर पंचवीस लाखाची रिकवरी सुद्धा बसविली


सन 2023 मध्ये सिरोंच्या वनविभागात अवध्य वृक्षतोड प्रकरणी कंत्राटदाराला बगल देत संबंधित वन कर्मचाऱ्यांनी 84 मजुरावर वन गुन्हे  दाखल केले होते. त्याप्रकरणी  सदर गुन्हे मागे घेण्यासाठी. 

सदर 84 मजुरांना घेऊन थेट वनमंत्री कडे धाव घेऊन गुन्हे मागे घेण्यासाठी दगादा लावले व साध्य केले


कोरोना काळात देशासह राज्यातील व जिल्ह्यात महामारीचे संकट असताना मानव सेवा हीच ईश्वर सेवा करत. 

आपले स्वतःचे वाहन लोकांना व रुग्णाला निशुल्क सेवा पुरवत शासनाला सहा महिने शासनाला वाहन पुरविले

कोरोना काळात निस्वार्थ सेवा केल्या कारणाने अहेरी चे तहसीलदार यांच्या तर्फे संतोष ताटीकोंडावार यांचा जिमलगटा येथे शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आले

महत्वाचा मुद्धा म्हटले की आलापल्ली सिरोंचा 353c या मार्गाची दयनीय अवस्था झाली होती याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता शाळकरी मुलांपासून तर गरोदर

मतांपर्यंत या सर्वांना वेदना सहन कराव्या लागत होत्या त्या महामार्गावर कित्येक अपघात व अनेकांना आपला जीव गमवावा लागला या महामार्गाच्या समस्यांचे अनेक निवेदन संबंधित विभागाला संतोष ताटीकोंडावार

यांनी दिले परंतु संबंधित विभाग या कडे दुर्लक्ष करत असे


सामाजिक कार्यकर्ते याना लक्षात येताच की आश्वासनाने ही लोक जागी होणार नाही 

त्यांनी 9 नोव्हेम्बर ला रेपणपल्ली येथे नागरिकांना घेऊन आलापल्ली सिरोंचा 353c महामार्गाच्या कामासाठी चक्का जाम आंदोलन पुकारले सदर आंदोलन हे पाच तास चालले संपूर्ण 

वाहतूक ठप्प झाली अखेर संबंधित विभागाच्या प्रतिनिधीला आंदोलन स्थडी यावे लागले 

सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार यांच्या नेतृत्वात आंदोलक पोलीस विभाग व संबंधित विभागातील प्रतिनिधींमध्ये

जवळपास एक तास वार्तालाब करून पोलिसांच्या माध्यस्तीने व संबंधित विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व जवळ

जवळ 15 दिवसाच्या आत 353c महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली 
या कामाला सुरुवातिचे श्रेय हे 

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना जातो हे विशेष

शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून तर  सुरजागड प्रकल्पाचे मुद्धे उचलले आहे

अश्या अनेक समस्यांसाठी शाशन दरबारी व न्यायालयात हजेरी लावली


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 2, 2024

PostImage

ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथील बुध्द मुर्ती तोडफोड विरोधात बौध्द जनतेचा जनआक्रोश  भिक्खु संघाचे घटानास्थळावर  धरणे




भद्रावती :- येथील ऐतिहासिक विज्जासन बुध्दा लेणीच्या माथ्यावरील भव्य बुध्द मुर्ती धम्मद्वेष्ट्या समाज कंटकांनी 31डिसेंबरच्या रात्री फोडुन टाकली . 
     ही वार्ता सकाळी 1 जानेवारीला भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यास सज्ज झालेल्या बौध्द बांधवांना कळताच सर्वांनी घटनस्ळाकडे धाव घेतली . पाहता पाहता हजारोच्या संख्येने बौध्द समाज बुध्द लेणी परिसरात गोळा झाला. 
    घटनास्थळावर आधीच दाखल झालेल्या पोलीस प्रशासनाने कपड्याने झाकुन ठेवालेली तथागत भगवान बुध्दाची विशाल मुर्ती खंडित झालेली पाहुन समाजात संतापाची लाट पसरली आणी तिथुनच बौध्द समाज बांधवांनी मोर्चा आणी भद्रावती बंद च्या आंदोलनास सुरवात केली . 
    ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथुन भद्रावती बंद चे आव्हान करीत मोर्चा नागपुर - चंद्रपुर महामार्गावर आला . तिथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले . तिथेच मा. तहसिलदार भद्रावती यांना बौध्द समाजा तर्फे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले . 
     या घटनेची वार्ता समजताच   भिक्खु संघ भद्रावतीत दाखल झाला . संपुर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर भिक्खु संघाने लेणीच्या माथ्यावर घटनास्थळीच धरणे आंदोलनास सुरवात केली . भिक्खु संघाच्या सोबत शेकडो उपासक - उपासिका  धरणे आंदोलनात सहभागी झाले.  
 मागण्या :- 1) मुर्ती तोडुन खंडित करणाऱ्या समाज कंटकांना 24 तासात शोधुन कठोर कारवाई करावी . 
2) फोडण्या आलेल्या बुध्द मुर्तीच्या ठिकाणी  त्वरीत दुसरी बुध्द मुर्ती बसवुन देण्यात यावी. 
3) बुध्द लेणी परिसरात CCTV कॕमेरे बसविण्यात यावे . 
4) परिसरात  लाईटची चोख व्यवस्था करण्यात यावी . 
5)  रात्रपाळीस  चौकीदाराची व्यवस्था करावी . 
     इत्यादी मागण्या पुर्ण होईपर्यंत हे  आंदोलन सुरुच राहणार आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Jan. 1, 2024

PostImage

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन अपघातग्रस्त युवकास आर्थिक मदत


 


   मूलचेरा : मलेझरी येथील भगीरथ जुनघरे यांची घरची परिस्थिती हलाकीची असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते दरवर्षी बाहेर गावी जाऊन मोलमजुरी करून आपला घर चालवायचे,असच मोल मजुरी करण्यासाठी ते बाहेर राज्यात गेले असता त्यांचा अपघात झाला.त्या अपघातात त्यांचा एक पाय कापावा लागला,एक पाय कापल्यामुळे त्यांचा कुटुंब संकटात सापडला आहे ही बाब मलेझरी येथील पदाधिकाऱ्यानी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना माहिती देताच त्यांनी अपघात ग्रस्ताच्या घरी जाऊन आस्तेने विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत दिले
      
आर्थिक मदत करते वेळी सेवानिवृत्त तहसीलदार कुबडे साहेब,वेलगुर ग्राप उपसरपंच उमेश मोहूर्ले,डॉ अंकित झाडे,ग्रा.प.सदस्य विजय मांदाळे,ग्रा.प.सदस्य संदीप चौधरी,ग्रा.प.सदस्य विनोद झाडे,आविस जेष्ठ सल्लागार रामचंद्र शेडमाके,आविस जेष्ठ सल्लागार भगीरथ गायकवाड,साईनाथ नागोसे,किशोर नेवारे,रामदास सिडाम,वामनराव कंन्नाके,रामदासजी कोसनकर,किसन येलमुले,बंडू चांदेकर,तुफिन गायकवाड, आकाश नागोसे,दिपक शेडमाके,मारोती मडावी,प्रणय शेडमाके सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 31, 2023

PostImage

काँग्रेसचे नेते हनमंतु जी.मडावी यांच्या निवस्थानी आलापल्ली येथील नागरिकांनी घेतली भेट


 

आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरामधील बिरसा मुंडा चौकातील नागरिकांनी आज सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँग्रेसचे नेते हनमंतु जी.मडावी यांची भेट घेतली.व त्यांच्यासोबत विविध विषयांवरती चर्चा केली हनमंतु जी.मडावी मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व स्वयमी शांत निर्मल स्वभावाचे हनमंतु मडावी"हे"आविसं - काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांच्या नेतृत्वात आलापल्ली येथे त्यांनी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.

अहेरी विधानसभेत समोर 2024 निवळणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस कडून उमेदवार म्हणून उभे राहणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.अहेरी विधानसभेत नवीन चेहरा रिंगणात उतरेल अशी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.आलापल्ली शहरातील बिरासामुंडा चौकातील नागरिकांनी सेवा निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँग्रेसचे नेते हनमंतु जी.मडावी यांच्या घरी भेट घेऊन.त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्यावर विश्वास ठेवून समोर च्या निवळणुकीत तुम्ही हमखास निवळून याला अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे.अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकास कराल अशी अपेक्षा ठेवली

यावेळी काँग्रेसचे नेते हनमंतु मडावी यांनी नागरिकांना विश्वास दिला.की जर मला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात मला उमेदवारी मिळेल तर नागरिकांची सेवा करण्याचे मला वाट मिळेल.तर मी समस्त जनतेच्या विश्वासावार खरा उतरणार अशे आश्वासन हनुमंतु जी.मडावी यांनी दिले

यावेळी चर्चा दरम्यान रमेश मडावी,तूईलवार सर,व्येकटी मडावी,योगेश सडमेक,महेश मडावी,रितेश सडमेक,संजव जूनधारे,राहुल चौधरी,अतुल शेंडे,अतुल ठाकरे,लोकेश शेंडे,विमलबाई कोरेत,जीवेद पाठन,स्वप्नील मडावी,चिंटू आत्राम,रिंकू आत्राम,दिगविजय आत्राम,सचिन,सुशीला मडावी,कुसुम सडमेक,अनिता सडमेक,तुंडूलवार मॅडम,सर्दीय सडमेक,सुगना गेडाम,कमल मडावी,वनिता वेलदी,मडावीबाई,मनिष सडमेक,शेवंता मडावी,कविता आत्रामसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 30, 2023

PostImage

हालेवार येथे धान खरेदी केंद्र सुरु करा - अन्यथा टी.डी.सी.कार्यालय समोर आंदोलन करणार


 

 माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थित हालेवारा येथील शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापक यांना निवेदन देऊन मागण

 

अहेरी : तालुक्यातील हालेवारा येथील शेतकऱ्यांनी निवेदनात म्हंटले"कि"अनेक वर्षी पासून धान खरेदी केंद्र सुरु होते.मात्र धान खरेदी केंद्र आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था हालेवारा चालवीत होते.संस्थेला मागील अनेक वर्षीपासून खरेदी कमिशन हमाली रक्कम ना मिळाल्याने मालाची उचल वेळेवर न केल्याने येणाऱ्या अवाजवी घटी तुटीस आल्यास संस्थेला जबाबदार धरून कार्यवाही कारवाई करण्यात येते.

संस्थेला कमिशन दिल्या जात नाही.तसेच संस्थेला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिल्या जात नाही.हागामी 2023-24मध्ये संस्था खरेदी करण्यास तयार पण नाही आहे.असे संस्थेने व संस्था कर्मचारी - पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आपल्या कार्यालयाला लेखी कळविले आहे.

आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय अंतर्गत खरेदी करणाऱ्या असल्याचे सांगितले होते.परंतु आज पर्यंत हालेवारा येथील खरेदी केंद्र सूरू झालेले नाही.तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन करण्यासाठी या वर्षी खूपच अडचण भासत आहे.शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करिता खरेदी केंद्र कसनसुरु सांगायचं"कि"खरेदी केंद्र एटापल्ली सांगायचे तर कधी खरेदी केंद्र तोडसा येते जाऊन नोंदणी करण्याकरिता सांगायचे.

शेतकऱ्यांना वारंवार त्रास देणे सुरु आहे.वारंवार ऑनलाईन नोंदणी करिता वारंवार चक्कर मारा लागत आहे.शासनाकडून ऑनलाईन नोंदणी निशुल्क असून सुद्धा प्रति शेतकऱ्यांना ऑनलाईन साठी 50/- ते 100 रुपये घेण्यात येत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणे सुरु आहे.

त्रासला कंटाळून काही शेतकऱ्यांना आज पर्यंत ऑनलाईन केलेले नाही.कस्ताकरांना अडचणीत असून सुद्धा शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे.

तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी व कार्यवाही करून.हालेवारा येथील धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावी.अन्याय आविसं काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात सर्व शेतकऱ्यांनी टी.डी.सी.कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी सदर निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी निवेदन देतांना मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गणेश दासरवर,चामृजी उसेंडी,चांदुजी नरोटे,स्वप्नील कांनालवर,सुरेश मट्टामी,सुधाकर पुडो,सुखरूजी पुडो,पांडू गावडे,गोशू लेकामी,चंदू मट्टामी,नरेश गर्गमसह हालेवारा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 30, 2023

PostImage

मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथील भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन


 

    
  आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना व गावकरी यांच्या तर्फे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा आदिवासी पारंपारिक वाद्याच्या गजरात स्वागत करण्यात आले.

 मूलचेरा :तालुक्यातील  मलेझरी येथे आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना यांच्या कडून आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कबड्डी सामन्या चा उदघाटन पूर्वी गावात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा आदिवासी पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढून राष्ट्रीय शहीद विरबाबुराव शेडमाके,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर मैदानात जाऊन उदघाटन करण्यात आले.

       या उदघाटन सोहळ्याला सह उदघाटक म्हणून माजी जि.प.सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार कुबडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून मूलचेरा नगरपंचायत च्या नगरसेविका सौ सुनीताताई रमेश कुसनाके,पोलीस पाटील सौ मारियाताई कोरडे,वेलगुर ग्राप उपसरपंच उमेश मोहूर्ले,डॉ अंकित झाडे,ग्रा.प.सदस्य विजय मांदाळे,ग्रा.प.सदस्य संदीप चौधरी,ग्रा.प.सदस्य विनोद झाडे,आविस जेष्ठ सल्लागार रामचंद्र शेडमाके,आविस जेष्ठ सल्लागार भगीरथ गायकवाड,साईनाथ नागोसे,किशोर नेवारे,रामदास सिडाम,वामनराव कंन्नाके,रामदासजी कोसनकर,किसन येलमुले,बंडू चांदेकर,हिरामण चौधरी,शिवदास झाडे,सुखदेव दुधे,दिलीप चल्लावार,तंटामुक्त अध्यक्ष धर्मपाल गोंगले, राहुल दुधे,संजय शेडमाके,गौतम चांदेकर,दिगंबर परचाके,रमेश मडावी,तुफिन गायकवाड,प्रवीण रेषे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी  उपस्थित होते.

            यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी कबड्डी खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

            कबड्डी सामन्यात दोन गट ठेवले असून गट अ साठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर गट ब साठी प्रथम पुरस्कार सौ अनिताताई दिपकदादा आत्राम माजी जि.प.सदस्या यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.

                 आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना  यांच्या कडून आयोजित भव्य कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बंडुजी बावणे यांनी मानले.या कबड्डी सामन्याचे  उदघाटनीय सोहळ्याला मलेझरी, अडपल्ली सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी दिपक शेडमाके,आकाश नागोसे,मारोती मडावी,जितेंद्र परचाके,सचिन राऊत,राहुल कोहट,प्रणय शेडमाके,आकाश राऊत,शेखर पोरेते,स्वप्नील सुरपाम,मयूर बावणे यांनी परिश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 29, 2023

PostImage

अजितदादा पवार विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची नागरिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक


 

 


उपविभागीय अभियंता गायधने यांच्याशी आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांची चर्चा


चुकीचे बिल माफ करा-पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन खंडीत केल्यास उग्र आंदोलन करू 


नागरिकांवर भुर्दंड नको -आता पासून नियमित भरणा करू
आर्वी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर, रो. व स्व रो.जिल्हाध्यक्षा सौं रेखा वानखडे, सा. न्या. वि. स अध्यक्षा अर्चना धवणे, ता अध्यक्षा माधुरी सपकाळ, शुभांगी कलोडे यांच्या सह रा. कॉ पा. पदाधिकारी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आणि प्रत्येक माणसाच्या जीवनात अति आवश्यक असलेले पिण्याचे व वापरण्याच्या पाण्याच्या विषयाला अनुसरून आर्वी शहरातील नागरिकांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून अन्यायत्मक भूमिका घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे असून यामुळे सरकार ची प्रतिमा मलिन होत आहे,
काही वर्षांपूर्वी आर्वी शहरात नगर पालिका पाणी पुरवठा करत होती आणि तेंव्हा शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कडीत होता परिणामी न प, पाणी पुरवठा विभागाकडून अनियोजन व अनियमित कारभार असल्याची ओरड होती, नंतर कालांतराने पाणी पुरवठा नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे गेलं आणि त्या काळात नगरपालिकेकडून चुकीची व सदोष यादी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ला पुरवली, गेली ज्याची तपासणी कधीच महाराष्ट्र जिवन प्राधिकरण नी केली नाही दिलेल्या चुकीच्या यादीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा बिल लादत गेले,जेंव्हा की शहरात पाणी पुरवठा सुरळीत च नव्हता प्रचंड त्रास आर्वीकर नागरिकांना होता, याच कारणामुळे, नुकतीच माजीप्र कडून नवीन क्षमतेची पाण्याची टाकी शहरात तय्यार केली असून याच काळात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली मात्र नागरिकांना जाणीवपूर्वक खूप जुन्या वर्षांपूर्वी च्या तारखे चे बिल पाठवल्या जात असून त्यावर जीव घेणे व्याज सुद्धा आकारलं आहे तरी, जेंव्हा आर्वी शहरात नवीन पाणी टाकी आता निर्माण झाली पाईप लाईन आता टाकली तर  जुन्या चूकीच्या बिलाच्या वसुलीच्या नावावर,कनेक्शन कापण्याची नोटीस बाजावून जीवनावश्यक पिण्याच्या पाण्यापासून वंचित करणे व  कोणताही विचार न करता पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन कापल्या जाईल असे नोटीस पाठवणे अन्यायकारक असून, कोणत्याही नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित करण्याचा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होऊ देणार नाही अशी भूमिका घेत पीडित नागरिकांसह म.जी. प्रा कार्यालयावर धडकले यावेळी नागरिकांच्या व पदाधिकारी यांच्या संतप्त भावना म. जि. प्रा चे उपविभागीय अभियंता गायधने यांनी ऐकून घेतल्या व सर्व बाजू वरिष्ठ पातळीवर ठेवणार असल्याचे सकारात्मक उत्तर दिले यावेळी, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर तालुका अध्यक्ष अरुणराव उमरे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर कमलेश चिंधेकर, अशपाक शेख, जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे ज्योती हत्तीमारे, ज्योती डौलकर, आशा भुरके, माधुरी श्रीनाथे, ललिता नासने, माधुरी नासणे अशोकराव पातोडे, प्रभाकर भुरके, पुंडलिकराव भुरके, श्रीकांत कलोडे, दिलीपराव डौलकर, रामकिसन श्रीनाथे,घनश्याम तरोणे, लिलाबाई बरडे दिलीप नासने वासुदेव सपकाळ भीमराव वसू उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 29, 2023

PostImage

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आल्लापल्ली येथील अपघातग्रस्त चालकाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत


 


अहेरी : आल्लापल्ली येथील खाजगी वाहनाचे चालक संदीप गाडगे हे काल भाजीपाला आणण्यासाठी चंद्रपूर ला जाऊन आपल्या वाहनात भाजीपाला भरून आल्लापल्ली ला परत येत असतांना मुलचेरा जवळ  गाडी अचानक पालटल्याने यात चालक संदीप गाडगे हे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना तात्काळ उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आला.

डॉक्टरांनी वाहनचालक संदीप गाडगे यांच्यावर उपचार केले.या अपघातात  वाहन चालकाच्या  हाताला तीन ठिकाणी फॅक्चर झाली आहे. यावर खाजगी दवाखान्यात औषध उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे.त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण भासत आहे.

या अपघातग्रस्त चालकाची माहिती आविसं काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी  चालक संदीप गाडगे यांची नातेवाईकांना अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलवून घेऊन त्यांचे आर्थिक अडचण जाणून घेतले. यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी  अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप गाडगे यांना पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी गाडगे परिवारातील सर्व सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.

अपघातग्रस्त चालक संदीप गाडगे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करतांना माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,स्वप्नील मडावी,नरेंद्र गर्गम,तिरुपती गड्डमवार,सुरज दुर्गे,हितेश्र्वर मडावी,आकाश गेडाम,हणमंतू जंगमवार,प्रकाश दुर्गेसह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 29, 2023

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची हैं तयार हम काँग्रेस महासभेला उपस्थित


 

गडचिरोली - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्म भूमी नागपूर येते 28 डिसेंबर रोजी कांग्रेस पक्षाचे है तयार हम"या"विशाल सभेला आदिवासी विध्यार्थी संघा - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी हजेरी लावली.

देशभरात वेगाने वाढत असलेल्या बेरोजगारी, महागाई,भ्रष्टाचार विरुद्ध लडा घालण्यासाठी कांग्रेस पक्षाचे नेते श्री.राहुल गांधी यांची नेतृत्वात येत्या जानेवारी पाऊस संपूर्ण देशभरातील 84 जिल्ह्यात पुन्हा है तयार हम! या निनाधाने पदयात्त्रे आपल्या समोर येत असल्याचा या सभेत ऑल इंडिया कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.मालिकार्जून खर्गे यांनी सांगितले तसेच देशात धर्मा धर्मात आणि जाती जातीत थेट निर्माण करण्याचे काम भाजपा करत आहे.

त्यावर लडा घालण्याची वेळ आली आहे.तरी येत्या लोकसभा विधानसभा निवडणूकित कांग्रेस पक्षाला मत देऊन भारताचे संविधान वाचवन्यात मदत करन्यात यावे असे सांगितले. त्यावेळी महाराष्ट्रचे जेष्ठ नेतेघन व इंडिया अलायन्सचे नेते अनेक राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यामंत्री,मंत्रीघन,माजी मंत्रीघण,खासदार,आमदार आणि विविध राज्याचे प्रदेशअध्यक्ष उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 29, 2023

PostImage

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना साहित्य वाटप - जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पुढाकार


 

गडचिरोली : उद्योगविरहीत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे.त्यामुळे बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार युवक हाताला काम मिळावा म्हणून मेहनत घेत आहेत.

असेच काही अहेरी तालुक्यातील युवकांनी पोलीस शिपाई भरतीची तयारी करीत असून या युवकांना आविसं काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पोलीस भरतीसाठी लागणारे साहित्य वितरीत करून त्या युवकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.

अहेरी येथील अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी (२९ डिसेंबर) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना गोळा तसेच विविध साहित्य वाटप केले.याप्रसंगी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी युवकांच्या समस्या जाणून घेत त्यांना पोलीस भरतीत निवड होण्यासाठी जिद्द चिकाटीने परिश्रम घेण्याचे आवाहन केले.काही मदत लागल्यास निसंकोचपणे माझ्याकडे"या"अशी ग्वाही दिली.दरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांच्या या मदत व प्रोत्साहनामुळे युवकांच्या अंगी नवचेतना निर्माण झाली असून युवकांनी त्यांचे आभार मानले.

 यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीत चालूरकार,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,अखिल जंगम,कैलाश मडावी,करणं शेंडे,जोश कन्नाके,अमन येलमुले,जय गावडे,नागेश पुरमवार,नंदू मडवी,अक्षय राऊत,अनिल मडावी,रवी अत्राम,पियूष कोंदगुरले,प्रशांत पवार,प्राशिक येवले,उदय गुरणुळे,रोहित गुरनुळे,विजय गावत्रे,राहुल मडावी,आरुषी पवार,शृष्ठी कोडापे,लता मडावी,नंदिनी मडावी,निकिता मडावी,रोशनी राऊत,कोमल उरेत,पायल वेलादी,विद्या वेलदीसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 29, 2023

PostImage

आर्वी शहर व परिसरातील सामाजिक व लोक हिताचे विषय प्रभावीपणे शासन दरबारी मांडण्याकरिता संघर्ष समितीची स्थापना


 

 

आर्वी शहर व परीसरातील सामाजिक व लोकहिताचे विषय प्रभाविपने शासन दरबारी तथा प्रशासनासमोर माडन्याचा प्रामाणिक हेतु डोळयासमोर ठेवुन आर्वी शहरात सर्वसमावेश सर्वानुमते संघर्ष समीतीची स्थापना करन्यात यावी ही सर्व आर्वीकराची अनेक दिवसापासुची ईच्छा कालच्या बैठकीतुन पुर्ण त्वांस गेली
   विश्रामगृह आर्वी येथे शहरातील सामाजिक संघटना,राजकीय पक्ष व सर्व-सामान्य जनतेच्या उपस्थित बैठक पार पडली याच बैठकीमधे संघर्ष समीती आर्वी ची स्थापना करून सर्वानुमते निलेश मधुकरराव देशमुख याची अध्यक्ष,विजुभाऊ वाघमारे याची उपाध्यक्ष व हेमंत काळे याची संघर्ष समितिच्या सचिव या पदावर नियुक्यत्या करनयात आल्या त्याच बरोबर संघर्ष समीती च्या प्रसिध्दी प्रमुख पदाची जवाबदारी  आर्वी नगरपालिकेचे माझी उपाध्यक्ष पुरुषोत्तम नागपुरे यांचे कडे देनयात आली तसेच शहरातील प्रसिद्ध डॉ. रिपल राने,राजुभाऊ गीरधर व प्रशातंजी सव्वालाखे याची मार्गदर्शक म्हणून नियुक्ति करनयात आली
संघर्ष समीती आर्वी च्या माध्यमातुन शहर व परीसरातील सामाजिक व लोकहिताचे विषय सोडविनयासाठी वेळोवेळी संघर्ष उभा केला जाईल
  संघर्ष समीती आर्वी च्या वतीने पहीला लोकहितार्थ व शहराच्या विकासाठी महत्वपूर्ण असलेला राष्ट्रीय महामार्ग ३४७-अ आर्वी-तळेगाव या महामार्गाचे आर्वी शहरातील ४ किलोमीटर या चार पदरी रोड बाधकामाची रूंदी नियमानुसार ३५ मीटर घेणयात यावी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजा  च्या मागचया बाजुचा रोड हा आर्वी देऊरवाडा रोड ला जोडणयात यावा जर असे झाले नाही तर संघर्ष समीतीच्या माध्यमातुन या मागनिसाठी एक संघर्ष उभा करनयाचा निर्णय बैठकीत  घेण्यात आला


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 28, 2023

PostImage

पोलीस मुख्यालयात स्तुडेंट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


 

• श्वान पथकाकडून प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली माहिती

• विविध स्पर्धामधुन विद्यार्थ्यांनी दाखविले कौशल्य

राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारा सन २०१८ पासुन राष्ट्रीय स्तरावर

“स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम" राबविला जात असल्याने या उपक्रमांतर्गत इयत्ता ०८ वी व ०९ वी मधील विद्यार्थ्यांकरीता आंतरवर्ग, बाह्यवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजीत करुन विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व व नितीमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असून त्यांच्यात सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन व्यक्तीगत हिताईतकेच सामाजिक जबाबदारीचे भान वाढीस लागत आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नितीमुल्यांचे महत्व शिकविले जात असून समाजातील भ्रष्टाचार आणि वाईट चालीरितींचा मुकाबला करण्यासाठी तयार केले जात आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन इ. नैतिक प्रामाणिकपणा मुल्यांची जडणघडण होण्यासाठी व त्याच्या सर्वांगीन विकासात भर पडावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक २६/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ पर्यंत एनसीसीचे धर्तीवर पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय "निवासी प्रशिक्षण शिबीराचे" आयोजन करण्यात आले आहे.

या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज तिसरा दिवस असून, आज दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी योगा व शारीरिक कवायत घेऊन पथसंचलन सराव घेण्यात आले. त्यानंतर पोउपनि, रामदास ढोके व त्यांच्या पथकाकडुन श्वान पथकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये बॉम्ब शोध व गुन्ह्याच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात बघतांना विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. त्यानंतर नितीतत्वे, संयम, सहनशिलता, संवेदना, सहानुभुती, वडीलधाऱ्यांचा आदर या विषयावर सपोनि. सदाशिव देशमुख, शिस्त संघभावना, दृष्टीकोन या विषयावर शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर, भ्रष्टाचार विरोधी लढा या विषयावर ला. लु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि. राठोड तसेच महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना या विषयावर स्था. गु.शा. चे पोनि. उल्हास भुसारी व कम्युनिटी पोलीसींग या विषयावर मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) तथा सदस्य सचिव एस.पी.सी गडचिरोली श्री. कुमार चिंता सा. यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर १०० मीटर धावण्याची स्पर्धा, ४०० मीटर ४ X १०० रीले स्पर्धा, कबड्डी व व्हालीबॉल स्पर्धा इ. सांघीक खेळ घेण्यात आले. यानंतर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.

आजच्या कार्यक्रमप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., ला.लु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि. राठोड, स्था.गु.शा.चे पोनि. उल्हास भुसारी तसेच शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. श्री. धनंजय पाटील, पोउपनि. भारत निकाळजे तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 28, 2023

PostImage

सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचे जिमलगटा येथे शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून तहसीलदार सौदाने यांनी केले स्वागत


अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून. अहेरी तालुक्याचे माननीय तहसीलदार. श्री सुनील सौंदाणे साहेब यांनी दक्षिण भागातील सुजाण नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व या भागातील ज्वलंत प्रश्न शासनापुढे मांडणारे. सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष भाऊ ताटीकोंडावार यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. त्याप्रसंगी माननीय तहसीलदार साहेब यांनी संतोष भाऊ यांना म्हणाले की  आपल्या या धडपडीमुळे अनेक जनतेचे प्रश्न शासनापुढे मांडले व काही प्रमाणात लोकांना न्याय सुद्धा मिळाला असे अनेक प्रकरणामुळे कौतुक होत आहे. व यापुढेही आपण सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहाल. हे इच्छा व्यक्त करत. संतोष भाऊंचे स्वागतासह कौतिकही केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 28, 2023

PostImage

पोस्टे देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट


 

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे देसाईगंज हद्यीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील एकुण किंमत १६,००,०००/- रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी नष्ट करण्यात आला.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्हयातील जप्त मुद्येमाल नष्ट करण्यात आला. ज्यामध्ये १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६९५० बाटल्या, २) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या, ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या, ४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या, ५) ५०० मिली बियरच्या ३० टिनाचे कॅन असे एकुण ३७,९९४ बाटलाचे मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १० X १० चा खोल खड्डा खोदुन रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या फावड्यांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. तसेच खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख

सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी श्री. किरण रासकर व सर्व अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 28, 2023

PostImage

तालुका मुख्यलयातील आदिवासी विविध सहकारी धान खरेदी केंद्राचे शुभारंभ माजी जी प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते संपन्न


 

सिरोंचा:-तालुका मुख्यालयातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थे मार्फत चालविल्या जाणाऱ्या धान खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सतीश गांजिवर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती रिकुला कृष्णमूर्ति,संचालक रवी राल्लाबंडीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष एम. डी. शानु,संचालक बानय्या मंचार्ला,सत्यम चीलकामारी, मादेशी मदनय्या, रवी सुलतान,देवा येंगांदुला,सिदिक भाई,आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भाग्यश्री ताई आत्राम यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामातील धान खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपले धान केंद्रावर विक्रीस आणून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा दणका अखेर 353c राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात


 


सिरोंचा;- आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353c अखेर या मार्गाचे कामाला सुरुवात झाली असून या मार्गासाठी एक मेव सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटिकोंडावार यांनी लढा दिला होता अखेर त्यांच्या प्रयत्नात यश आले असून आता प्रवास सुखमय होणार आहे


सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353c या मार्गाची दयनीय अवस्था झाली होती कित्येक अपघात या मार्गवर झाले होते या मार्गावर प्रवास करणे अवघड झाले होते शाळकरी मुलांपासून तर गरोदर मतांपर्यंत या लोकांना वेदना सहन करावा लागत होते

ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी रेपणपल्ली येथे चक्का जाम आंदोलन केले होते तबल आंदोलन हे पाच तास चालले या आंदोलनात आलापल्ली सिरोंचा मार्गावर यातायात ठप्प झाली होती 

 पोलीस प्रशासनाला मध्यस्ती करावी लागली संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व अखेर काही दिवसात या कामाला सुरुवात झाली 

लोकांच्या समस्यांसाठी नेहमीच झटणाने सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथील जय जगदंबा क्रीडा मंडळ गेदा यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर या कब्बड्डी - व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आवीस काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.

सदर"या"कब्बड्डी व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघ- काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी - सहउदघाटक म्हणून आविसं एटापल्ली तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार आणि गेदा ग्रामपंचायतचे सदस्य रमेशभाऊ वैरागडे होते.

यावेळी उपस्थित अनिल करमरकर बाजार समिती संचालक,रमेश वैरागडे ग्रा.पं सदस्य गेदा,सौ.सरिता मट्टामी ग्रामपंचायत सदस्य गेदा,हरीश पदा माजी ग्रा.पं सरपंच गेदा,हरीश गावडे उपसरपंच देवलमरी,महेश लेकुर ग्रा.पं.सदस्य देवलमरी, प्रशांत तेलकुंटवार सचिव आ.वि.का.सह.संस्था गेदा,सोमजी गावडे,धर्मा मट्टामी,श्रीनिवास राऊत,नरेंद्र गर्गम,मुकेश पदा पो.पा. गेदा दसरू पदा गाव भुमिया,जगन्नाथ मडावी माजी उपसरपंच देवलमरी,मिलिंद भांडेकर,अरविंद गव्हारे, मंडळाचे अध्यक्ष संतोष कोरामी, उपाध्यक्ष अजय गावडे,सचिव अरूण पदा,चैतू पुंगाटी,शंकू पदा,कोषाध्यक्ष सादुजी पदा,अजय गुंदरू,कैलास पुंगाटी,दिनेश नरोटे,महेंद्र गोटा,दिवाकर कुळ्येटी,मंडळ : सर्वश्री - रवि कोंदामी,कालिदास कोंदामी,आकाश कोंदामी,नरेश गुंडरू,नानेश नरोटे,नामदेव गुंडरू,नितेश हलामी,सुरज नरोटे,राहूल गोटा,अनिल पदा,उमेश पदा,अशोक गावडे,रमेश गावडे, निखिल पुंगाटी,अजय बा.वडे,नागेश पदा,स्वराज पुंगाटी,संदिप गावडे,जाकेश गावडे,किशोर पुंगाटी,विजू गावडे,योगेश कुळयेटी,संतोष कुळयेटी,ईश्वर गावडे,अनिल पदा,सदाशिव पदा,रंजीत पुंगाटी,मंगेश गोटा,नानेश कोरामी,रोहीत कुळयेटी,राम कोरामी,रिखी कुळयेटी,रोशन पदा,निलेश पदा,करण पदा,राजू पदा,रोहीत पदा,सुरेश आलाम,रंजित गुंडरु,अंकुश गुंडरू,कुशवंत हलामी, प्रविण गुंडरू,दिनेश हलामी,महेंद्र मडावी,विक्की पुंगाटी,रोशन पदा,अंकुश पदा,आकाश पदा,विशाल पदा,अशोक गुंडरू,प्रविण गुंडरू,आशिष गोटा,राहूल पदा,अजय पदा,साईनाथ गावडे,गणेश गोटा,मोरेश्वर पुंगाटी,सम्मा हलामी,टिबु पुंगाटी,करण पदा,गुलशन भांडेकर,गणेश कुनघाडकर,अनिकेत कुंकलवार,अजय भांडेकर,उपेश नरताम,चंद्रकांत भांडेकरसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

गेदा येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार!!


 

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात - टी.डी.सी.कार्यालय समोर आंदोलन करणार : ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे यांचा इशारा

एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथे यावर्षी वरून ईश्वरा कृपेने मोठ्या प्रमाणात पाऊस पडला धानाची कटाई व मळणी सुरू झाली आहे.मात्र टी.डी.सी. अंतर्गत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपले मेहनतीने पिकविलेल्या धान खाजगी व्यापारीना कवडीमोल भावात विकावे लागत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागतो.त्यामुळे शासनाने तत्काळ धान खरेदी केंद्र सुरु करावे.अशी गेदा ग्रामपंचायतचे सदस्य रमेश वैरागाडे यांनी मागणी केली.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी धान पिकांची कापणी व मळणी जोमात सुरू केली आहे.पण धान खरेदी केंद्रचा काहीच पत्ता नाही ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.कारण कि"या"भागात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आहेत.त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

दरवर्षी धान उत्पादक शेतकरी अनेक संकटात सापडतो यावर्षी तर पुरपरिस्थती व अनेक रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर झाला.तरी देखील शेती मशागतीकरिता खाजगी,सरकारी बँककडुन पिक कर्ज-सोने तारण व उसने-उधार करून शेतकरी शेती करतो.एवढे करून सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे व हक्काचे धान विक्री करण्यासाठी शासकीय  आधारभूत धान खरेदी केंद्र उपलब्ध नसतील तर धान कुणाला विकावा असा गंभीर प्रश्न धान उत्पादक शेतकरी बांधवांना पडला आहे.

त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगी व्यापारीना कवडीमोल भावाने धान विक्री करावा लागतो.तसेच कसनसुर गेदा या भागातील सातबारा ऑनलाइन करण्यासाठी प्रती शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपये घेण्यात येत आहे.त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

धानाची कटाई व मळणी जोमात सुरू असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे जेणेकरून धान उत्पादक शेतकरी बांधवांना  खाजगी व्यापाऱ्या कडुण होणारी पिळवणुक व आर्थिक लुट थांबवावी या करिता.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरगाडे यांनी केले आहे.

लवकरात लवकर धान खरेदी सुरु ना झाल्यासं आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्य वैरागडे यांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवाणा घेऊन.टी.डी.सी.कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल.ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरागडे यांनी सांगण्यात येत आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अंगूवार कुटुंबियांना आर्थिक मदत


 

 कंकडालवार परिवारकडून अडचणी कुटुंबियांना नेहमी मदतीचा हात

अहेरी : तालुक्यातील चेरपाल्ली येथील नागरिक नागेश अंगूवार यांची पत्नी यशोदा नागेश अंगूवार हिला काही दिवशी पूर्वी ऑपरेशन झाल्याने.हिला आता वर्धा ( Warda )जिल्ह्यात सवांगी येथील त्यांच्या उपचार सुरु आहे.नागेश अंगूवार यांच्या घरचा ( Home )परिस्थिती हलखीची असल्याने त्यांना पुढील औषध उपचारासाठी अडचण बसत होती.

हि अडचण आदिवासी विध्यार्थी संघा - काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच.रुग्णांचे पती ( husband )नागेश अंगूवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील बोलवून त्यांचे अडचण जाणून घेऊन.त्यांना पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

त्यावेळी अजयभाऊ म्हणले"कि"तुम्हाला तिकडे कोणत्याही अडचण आले तर मला संपर्क करण्यात यावी म्हणून अंगूवार परिवाराचे प्रमुख नागेश अंगूवार यांना सांगण्यात आली आहे.त्यावेळी त्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी मदत करतांना मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,विनोद रामटेकेसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अंगूवार परिवाराची नातेवाईक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन


 

चामोर्शी : तालुक्यातील येडानूर येथील नवयुवक क्रीडा मंडळ येडानूर यांच्या सौजन्याने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चषक 2023 कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर या स्पर्धेचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघा काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी होते.

हा स्पर्धेसाठी काँग्रेसचे नेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 30,001/- देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक 22,001/- तर तृतीय पारितोषिक दिलीप उडम आणि रुपेश लेनगुरे यांच्या कडून 15,001/- देण्यात येत आहे.

यावेळी रजनीलई उसेंडी सरपंच,संतोष पदा,जिवन पोटावी,रवि कुळमेथ,बालाजी पोटावी,पांडुरंग उसेंडी,मुरलीधर कुभ्भावार,पत्रू पोटावी,विनोद संतोषवार,टि.डी हरडे ग्रामसेवक,पवन पवार,कोमलताई पोटावी,रामसिंग राठोड,शुभम जाधव ग्रा.स,उमेश पोटावी,बंडू कुंभ्भावार,आकाक्षाताई पोटावी,उमाताई पोटावी,राजेश दुर्गे ग्रं.स,प्रमोद गोडसेलवारसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

आविसं काँग्रेसचे नेते - माजी जि.प.अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या मार्फतीने सामाजिक कार्यकर्ते चालेवार काकाजी यांच्या हस्ते भव्य व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


 

मुलचेरा : तालुक्यातील मुखडीटोला ( मछली ) येथील शहिद विर बाबुराव शेडमाके मुखडीटोला ( मछली ) यांच्या वतीने भव्य खुले व ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर उदघाटन सामाजिक कार्यकर्ते चालेवार काकाजी - गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य गणेश तलांडे - अंबटपाल्ली ग्रामपंचायत सरपंच उमेश कडते - ग्रापं.सदस्य शुभम शेंडे यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन पार पाडले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंबाटपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच उमेश कडते - गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य शुभम शेंडे होते.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं - काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.

उदघाटन वेळी सचिव ग्रामपंचायत गोमणी उमेश ढोडरे,गणेश तलांडे,हलमी सर,तलाठी कार्यालय गोमणी चिंतामवार सर,पोलीस पाटील मुखडी टोल शंकर मडावी,गोमणी ग्रामपंचायतचे सरपंच जिजाबाई मडावी,यशवंतराव मॅडम,गोमणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिनशे उरतेसह आविसं - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते गावातील समस्त नागरिक तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

डॉ.गणेश लाडस्कर यांना प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी येथे परत नियुक्ती करा


 

काँग्रेसचे नेते - माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्फतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

अहेरी : तालुक्यातील देवलमारी येथील समस्त नागरिक सदर निवेदनात अशे म्हटले आहे.की आमच्या गावातील प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी येथील डॉ.गणेश लाडस्कर सर यांची बदली झाली आहे.असे कळताच गावातील नागरीक तसेच प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी यांच्या अंतर्गत येणारे उपकेन्द्र आजुबाजुच्या गावक-यांनी अतिशय भावुक पणे आपणास विनंती अर्ज सादर करित आहोत.

याचे कारण असे की,आमचे गाव Cut off Village मध्ये येत असल्यामुळे पावसाळयात रस्ते बंद राहतात.त्यावेळेस गावकऱ्यांना तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते अशा वेळी प्राथमिक आरोग्य पथक देवलमरीतील डॉ. लाडस्कर सर यांचे मोलाचे योगदान आहे.वेळ काळ न पाहता रूग्नांची सेवा करणे.कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता निस्वार्थ पणे उपचार देणे.प्रत्येक रूग्नांना जवळकीने जिव लावणे असे अनेक सेवा त्यांच्या हातातुन गावकऱ्याना लाभलेले आहे.असे डॉ.आमच्या पासुन दुर व्हायला नाही पाहिजे करिता आम्ही गावकरी आपणास विनंती अर्ज सादर करित आहोत.कृपया आमच्या विनंती अर्जाचा विचार करण्यात यावे.अशे म्हटले आहे

यावेळी सरपंच लक्ष्मण कन्नके,सदस्य मोनिका तोकला,सदस्य महेश लेकूर,सदस्य संजूबाई आत्राम,प्रतिष्ठित नागरिक विनोद वारगंटीवार,तंटामुक्ती अध्यक्ष बय्याक्का तुमवार,प्रतिष्ठित नागरिक संजय गोंडेवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 27, 2023

PostImage

सत्तर वर्षाचा उमदा तरुण पुन्हा रणांगणात 



राज्यासाठी स्वतः चे प्राण पणाला लाऊन तेलंगाणाचे राज्य मिळवले दहा वर्षात आत्महत्यांचा प्रदेश असलेली ओळख पुसुन शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रदेश म्हणुन ओळख मिळवली .साठ मिटरवरचे पाणी सहाशे मीटर उंचीवर वळवुन शेतीला पाणी पुरवले वीज पुरवली एकरी दहा हजार रु दिले . 
पण शेवटी म्हणतात ना जात नाही ती जात .
 तेलंगाणाच्या निवडणूकीत स्वतः ला सेक्युलर म्हणवणाऱ्या कॉंग्रेस ने जातीवादी प्रचार करत केसीआर हे कुणबी जातीचे आहेत असा प्रचार केला . भारताच्या एकात्मतेला बाधा पोहचवत केसीआर यांचे पुर्वज बिहारी असल्याचा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनात दुहीचे विष पसरवले . जातीय दुष्प्रचाराला बळी  पडुन धर्म व जातीत अडकल्याने फक्त दिड टक्के मतदारांनी जात धर्म व पैशाला पाहून मतदान केले .
श्री केसीआर यांच सरकार दिड टक्के मतांनी पडले.एवढेच नाही तर विकास कामावर विश्वास ठेऊन सुरक्षित मतदार संघ सोडुन विकास कामांची परीक्षा घेण्यासाठी दुसऱ्या मतदार संघात उभे राहिलेल्या श्री केसीआर यांना मतदारांनी धार्मिक भावनेवर हरवले. हेच कमी होते की काय म्हणुन श्री केसीआर हे घरात पाय घसरुन पडले .मोठी गंभीर दुखापत झाली


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 26, 2023

PostImage

इथल्या कंत्राटदार, अभियंत्यांवर विश्वास नाही का?मंत्री संजय राठोड यांना निवेदन  - बंधा-याची कामे औरंगाबाद महामंडळातील कंत्राटदाराना देण्याचा घाट



गडचिरोली ;-जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग गडचिरोली यांनी जिल्ह्यातील साठवण बंधारे बांधण्याकरिता ई निविदा काढली आहे. या निविदेतील काही अटी, शर्ती बघता यात नमूद महामंडळ औरंगाबाद व पीडब्ल्यूडी अंतर्गत औरंगाबाद महामंडळात नोंदणी असलेल्या कंत्राटदारांनाच लाभ पोहचविण्याचा घाट संबंधित विभागाने घातला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाला येथील कंत्राटदार व अभियंत्यांच्या कामावर विश्वासच नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी उापस्थित करीत सदर निविदेतील अटी, शर्थी रद्द करण्याची मागणी केली आहे.
    ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात अनेक अनुभवी नोंदणीकृत, खासगी, सरकारी कंत्राटदार आहेत. त्यांना कामाचा चांगला अनुभव असून जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव आहे. असे असतांना जिल्ह्यातील साठवण बंधारे बांधकाकामाकरिता औरंगाबाद महामंडळात नोंदणी असलेल्याच कंत्राटदाराला यात सहभागी करुन घेण्याचा विभागाचे षडयंत्र असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर कंत्राटदार काम करणा-या संबंधित विभागातील अधिका-यांच्या जवळचे असल्याने त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी येथील अधिकारी काम करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात अनेक अनुभवी, कंत्राटदार, अभियंते कामाचा योग्य दर्जा सांभाळत काम करणारे असतांना स्थानिकांना प्राधान्य न देता बाहेरच्या मंडळीना इथे काम देण्याचे प्रयोजन न समजणार असे आहे. संबंधित विभागाला येथील कंत्राटदार, अभियंत्याच्या कामावर विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित करीत निविदेतील अटी, शर्थी रद्द करुन स्थानिकांना काम करण्याची संधी द्यावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
बॉक्ससाठी...
जिल्ह्यातील कंत्राटदारावरील अन्याय खपवून घेणार नाही
जलसंधारण विभागाद्वारे औरंगाबाद येथील कंत्राटदारांना जिल्ह्यातील बंधाराचे काम देऊन येथील कंत्राटदारांवर अविश्वास दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील कंत्राटदारांना कामापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. स्थानिक कंत्राटदारावर होणारा हा अन्याय कदापीही खपूवून घेणार नाही. वेळप्रसंगी त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरु. या अन्यायकारक निविदेसंदर्भात जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांना निवेदन सादर केले आहे.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Dec. 25, 2023

PostImage

पंदेवाही येथील अपघातग्रस्ताला स्वराज्य फाउंडेशन नी दिला मदतीचा हात


 

एटापल्ली;-सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की दलसू मासा मडावी वय 38 वर्ष व भीमा घिसू आत्राम राहणार पंदेवाही हे आपल्या नातेवाईक राहणार रामयापेठा येथे आले होते व रात्र काही कामानिमित्य आलापल्ली यायला निघाले आलापल्ली पासून दोन किमी अंतरावर रोड साईड ला उभे झाले व त्याच वेळेवर एका भर धाव चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले  यात दलसू मासा मडावी हे जागीच ठार झाले व भीमा घिसू आत्राम राहणार पंदेवाही हे गंभीर जखमी झाले व जखमी अवस्थेत पडून होते नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला व स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच एकाही क्षणाचा विलंब न करता रुग्णवाहिका घेऊन घटना स्थडी दाखल झाले व जागीच ठार झालेल्या दलसू व जखमी अवस्थेत असलेल्या भीमा आत्राम ला उपजिल्हा रुग्णालय नेले  परंतु दुर्दैवाने जखमी असलेल्या भीमा घिसू आत्राम यांना गुप्त मार जास्ती असल्याने नेता नेता त्याचाही मृत्यू झाला


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Aug. 4, 2023

PostImage

राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती काँग्रेसमध्ये आनंदोत्सव


 

गडचिरोली:: काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी शेतकऱी, कष्टकरी, सर्वसामान्य गोरगरीब जनेतपासून तर समाजातील इतर घटकाच्या समस्यांना घेऊन विशेषता  अदानीच्या घोटाळ्याला घेऊन नेहमी आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबन्याकरिता गुजरात येथे भाजप सरकारच्या दबावाखाली मानहानीचे खोटे खटले चालवून भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही, मनमानी व सुडबुद्धीच्या राजकारणातून मा. राहुलजी यांना शिक्षा झाली होती. खोट्या तक्रारीच्या माध्यमातून भाजपाने हे षडयंत्र रचले होते. पण देशात अजून न्याय व्यवस्था आहे, या न्यायव्यवस्थेनेच भाजपा व मोदी सरकारचे मनसुबे उधळून लावले आहेत. मा. सुप्रीम कोर्टाने शिक्षेला दिलेली स्थगिती हा सत्याचा विजय असून राहुल गांधी यांना मिळालेल्या शिक्षेच्या स्थगितीबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात आतिषबाजी करून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉक्टर नामदेव किरसान, रोजगार सेल जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, सहकार सेल जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई पंजवाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, ग्राहक सेल अध्यक्ष भारत यरमे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंतराव राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,  नेताजी गावतुरे, दिलीप घोडाम, माजी नगरसेवक रमेश चौधरी, गुलाब मडावी, शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी मोरे, सह संपर्कप्रमुख विलास कोडापे, शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावर, सुरेश भांडेकर, सुभाष धाईत, बंडोपंत चिटमलवार, भैय्याजी मुद्दमवार, धिवरु मेश्राम,  फिरोज हुद्दा, प्रफुल आंबोरकर, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, जावेद खान, सदाशिव कोडापे, अविनाश श्रीरामवार, विवेक बारशिंगे सह मोठ्या संख्येने काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Aug. 4, 2023

PostImage

खासदार नेते यांची पंतप्रधानांसोबत थेट चर्चा सिंचन प्रकल्पांसह सुरजागड, कोनसरीतील लोहप्रकल्पाच्या उद्घाटनाची निमंत्रण


 


दि.०४ ऑगस्ट २०२३

गडचिरोली ः देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मार्गी लागलेली कामे आणि प्रलंबित कामांबद्दल आज दि.०४ ऑगस्ट  शुक्रवार रोजी खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधानांनी दिली. यावेळी जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या सुरजागड, कोनसरी येथील लोहप्रकल्पाचे आणि चिचडोह बॅरेजचे उद्घाटन करण्यासाठी आणि प्रस्तावित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण खा.नेते यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

भाजपच्या जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार म्हणून नेते यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करतांना आपल्या क्षेत्रात झालेल्या कामांची माहिती दिली. तसेच प्रस्तावित गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी, तसेच छत्तीसगड आणि तेलंगणाला रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी पुढील प्रक्रिया मार्गी लावण्याकडे जातीने लक्ष देऊन संबंधितांना निर्देश देण्याची मागणी यावेळी खा.नेते यांनी केले.

यासोबत उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीवर, तसेच वनांवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी या जिल्ह्यात उद्योगांना विशेष सवलती देण्याची आग्रही मागणी खा.नेते यांनी केली. याशिवाय लोकसभा क्षेत्रातील इतरही प्रश्नांबाबत त्यांनी पंतप्रधानांना निवेदन दिले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा मागासलेपणाचा ठप्पा मिटवून या क्षेत्राला विकासाकडे वेगाने नेण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असा विश्वास खा.नेते यांना दिला.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Aug. 4, 2023

PostImage

खासदार अशोक नेते सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला



दि.०४ ऑगस्ट २०२३
गडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहपरिवार भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत त्यांच्यासोबत पत्नी अर्चना, मुली अक्षिता आणि अशिता तथा मुलगा अर्णव उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुलींना शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलींनी सक्षम होऊन भविष्यातील जबाबदाऱ्या स्वीकारत देशासाठी योगदान द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

देशातच नाही तर जगात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना भेटून खूप आनंद झाल्याची भावना यावेळी अक्षिता आणि अशिता नेते यांनी व्यक्त केली.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

Aug. 4, 2023

PostImage

अखेर जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात


 

भाग्यश्री ताई आत्राम यांच्या उपस्थितीत शुभारंभ

आलापल्लीकरांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळणार

अहेरी:-कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर आलापल्ली येथील नागरिकांच्या मालमत्तेबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून पुनर्रचौकशी करून जमीन मोजणीच्या कामाला शुभारंभ करण्यात आले आहे.1 ऑगस्ट रोजी आलापल्लीतील बजरंग चौक येथून जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात करण्यात आले असून मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आलापल्लीकरांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम,आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी,पेसा सचिव प्रीती इष्टाम,ग्रा प सदस्य सोमेश्वर रामटेके, ग्रा प सदस्य मनोज बोल्लूवार,पराग पांढरे उपस्थित होते.

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन) पुणे यांच्याशी संपर्क साधून अहेरी तालुक्यातील आलापल्लीवासीयांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते.त्याअनुषंगाने विष्णु शिंदे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश नागपूर आणि नंदा आंबेकर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज अंभोरे, शिरस्तेदार तसेच सर्वेयर समय्या बोमनवार यांच्याकडून पुनर्रचौकशी तसेच जमीन मोजणीचे काम केले जात आहे.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

July 31, 2023

PostImage

आरोग्य हीच संपत्ती,आपले आरोग्य जोपासावेत:- खासदार श्री. अशोकजी ‌नेते.यांचे प्रतिपादन




चंद्रपुर:-विकासपुरूष,लोकनेते मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस येथे भव्य मोफत रोग निदान,शस्त्रक्रिया,चष्मे वाटप व महाआरोग्य शिबीराचे आयोजीत करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिराला खासदार अशोकजी ‌नेते यांनी बोलतांना आजचा काळ हा स्पर्धेचा काळ म्हणावा लागेल, जिथे सर्वजण एका वेगळ्याच धावपळीत गुंग आहेत. अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टींकडे लक्ष असते. परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे लक्ष आपण देत असतो याचा विचार केला पाहिजे. आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे.
आजचे दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो खर्चही सहन करतो. अशातच त्यात जाणारा वेळही खूप असतो.यासाठी अशा शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे.

पुढे बोलतांना अशोकजी ‌नेते यांनी म्हणाले जनतेच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन,जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे व्रत जोपासणारे एकमेव विकासपुरुष, लोकनेते, मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार च  आहेत.त्यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मोफत रोग निदान, शस्त्रक्रिया,चष्मे वाटप व महाआरोग्य शिबिर अतिशय चांगला, कौतुकास्पद,  स्तुतीमय कार्यक्रम आयोजित केला.अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जनतेचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. 
आरोग्य हीच संपत्ती आहे,आपले आरोग्य जोपासावेत आरोग्यम् धनसंपदा,जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
जनतेचे आरोग्य लक्षात घेत महा आरोग्य शिबिर राबविण्यात आले त्यामुळे  आजचा वाढदिवस आनंददायी, आरोग्यदायी, आशीर्वाद रूपाने साजरा झाला. याकरिता मी मान.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनापासून हृदयातून, अंतकरणातून, मनःपूर्वक उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांचे जीवन सुख समृद्ध,आरोग्यदायी, आनंदमय जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी आरोग्य शिबिर या कार्यक्रमा प्रसंगी केले.

यावेळी मंचावर खासदार रामदास तडस वर्धा लोकसभा क्षेत्र, खासदार सुनिल जी मेंढे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र डॉक्टर अभ्युदय मेघे,अनिल जी गुप्ता,कार्यक्रमाचे आयोजक देवरावजी भोंगडे, जिल्हाधिकारी विनय गौडा,पोलीस अधिक्षक परदेशी साहेब, गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,डॉ. गहलोतजी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,संजय जी कुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, शिबिराला आरोग्य स्टाफ कर्मचारीवर्ग, शिबिराचा लाभ घेणारे नागरिक,जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

खबरदार महाराष्ट्र

July 30, 2023

PostImage

भाजपा युवा मोर्चा व शहर पदाधिकारी युवकांनी उत्स्फूर्त प्रभावीपणे कामे करुन पक्ष संघटना वाढवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा:- खासदार अशोक नेते



----------------------------------------
दिं.२९ जुलै २०२३

गडचिरोली:- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची जिल्हा बैठक व शहरातील पदाधिकाऱ्यांची  भाजपा संघटना बैठक विश्रामभवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली.

या बैठकीला प्रामुख्याने अध्यक्षीय स्थानी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी ‌नेते यांच्या नेतृत्वात व नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी आमदार डॉ.देवरावजी होळी,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,युवा मोर्चा चे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे,  प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाशजी गेडाम,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा जेष्ठ नेते सुधाकर येनंगदलवार,माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,नगरसेवक तथा ओबिसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, माजी  जि.प. सभापती रंजिता कोडापे, भाजपा महिला जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, माजी. जि. प. सदस्या  लताताई पुगांटी, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे, जेष्ठ नेत्या वचछला मुनघाटे,पुष्पा करकाडे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार,केशव निंबोड,भाजपा कार्यकर्ते संजय पंदिलवार,संजय बारापात्रे, वासुदेव बट्टे, गोवर्धनजी चव्हाण, अविनाश विश्रोजवार, युवा.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिपक सातपुते, शहर महामंत्री हर्षल गेडाम, ग्रामिण तालुका अध्यक्ष आकाश निकोडे, नगरसेवक विलास पारधी, युवा आशिष कोडापे,शहर उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते,शहर उपाध्यक्ष विवेक बैस,शहर कारागीर आघाडी चे नरेश बावणे, देवाजी लाटकर, उराडे सर, दतुभाऊ माकोडे, अनिल करपे,सौरभ केदार,उपस्थिती होते.
 
या बैठकीत खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानी उपस्थित युवा मोर्चा व शहरातील पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतांना सर्वप्रथम मी सुद्धा एक युवा कार्यकर्ता म्हणून भाजपात आलोय याआदी माझा भोजनालय हॉटेल होता बरेच अनेक कार्यकर्ते गावाच्या  दुरवरुन येत होते मि त्यांना आपुलकीन विचारायचा जेवन झालं का?कोणताही कार्यकर्ता जेवन करून जायचा त्यावेळी तृप्ती भोजनालय, सावजी भोजनालय होता,पण मी जिल्हाभर  बाहेर च पक्ष संघटनेत लक्ष केंद्रित केल,त्यामुळे माझा हॉटेल वरचा लक्ष उडाला,  मी हळुहळु संघटनेचा काम करुन बाहेर गावी जायचे संघटन वाढवला, नंतर युवा तालुकाध्यक्ष झालोय,असे अनेक पद भुषविले, हळूहळू माझा परिचय वाढत गेला व मी मागेपुढे न पाहता कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समेत पक्ष संघटनेचं काम प्रामाणिकपणाने करित गेलो.
गावतील नागरीकांचे प्रश्न हे तालुका स्तरावरील असतात. श्रावण बाळ निराधार योजना, घरकुल, आरोग्य योजना इत्यादी शासकीय योजनांची माहिती भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी नागरीकांना पटवून दिले पाहिजे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या सुविंधाची माहिती देने. आता नवीन मतदार नोंदणी सुरू आहे प्रत्येक ज्या मुला- मुलिंचे वय १८ वर्ष झाले असा नव मतदारांचे फार्म भरून बी.एल.ओ.यांच्या कडे जमा करून नवीन मतदार वाढविणे.आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणे समजावुन सांगावे असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

पुढे बोलतांना खासदार महोदयांनी ज्यावेळी नवयुवक १८ वर्षाचा युवा प्रशांत होता त्यावेळी आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते प्रशांत ला भेटायला घरी गेलो,त्यांनी आमच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली होती.प्रशांत हा जुडो कराटे चा  पैलू होता.आम्ही मारहाण केल्या संबंधांने समजावण्यासाठी गेलो होतो.  भलेही मारहाण करणारा असेल हा जर कार्यकर्ता आपल्या पक्षात आला तर चांगला राहील.तेव्हा तो लगेचच आमच्या पक्षात आला. आल्याबरोबर युवा मोर्चाची त्यांना जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांना युवा मोर्चाचे शहराध्यक्ष,युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष,जिल्हा महामंत्री नंतर मागेपुढे न बघता त्यांनी पक्ष संघटनेचे काम चालू केलं,पक्ष संघटना मजबूत केलं त्याच आधारावर,त्यांच्या कार्याला व कारकीर्दीला पक्षाने ओबीसीचा नवा चेहरा म्हणुन जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती केली.
 नवनियुक्त जिल्हाध्यक्ष झाल्याची पहिलीच बैठक घेतली.त्यामुळे मी पुढील भविष्याच्या वाटचालीच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
या देशाचे लाडके लोकप्रिय प्रंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सर्व सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू माणून सर्वसामान्याच्या,तळागाळापर्यं योजना पोहोचविल्या त्याच अनुषंगाने नव मतदार नोंदणीचा आपल्या जिल्ह्यात टार्गेट दिला आहे तो पूर्ण करावा.जे विद्यार्थी बारावी पास झाले आहे त्यांच्यापर्यंत जाऊन नव मतदार नोंदणी करावे. सर्वात जास्त आपल्या जिल्ह्यात नोंदणी झाले पाहिजे असे आवाहन याप्रसंगी केले.यावेळी उद्या होणाऱ्या ३० जुलै ला मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक मंडलावर, बुथावर, आयोजित करून ,सरल ॲप, नमो अँपवर फोटो डाऊनलोड करावा असे आव्हान यावेळी सुद्धा खासदार अशोकजी ‌नेते यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता यांना केले.

 

 


PostImage

खबरदार महाराष्ट्र

July 30, 2023

PostImage

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची मन की बात कार्यक्रम आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन


 

दि. 30/07/2023 चामोर्शी

याप्रसंगी आ. डॉ. देवरावजी होळी, तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, नीरज रामानुजमवार, नरेंद्र अलसावार , युमो अध्यक्ष प्रतिक राठी, युमो महामंत्री लोमेश  युमो महामंत्री, रामचंद्र वरवाडे, प्रकाश सरकार, बादल शहा, निरंजन बच्याड, नरेंद्र पोरटे, विशेष दोषी, रविंदू सरकार, विनोद दुर्गे, नितीन बाछाड, राजकुमार देवतळे, बंडू बारसागडे, गोमाजी कुळमेथे, श्यामल रॉय, सुरेंद्र नरनवरे, समीर रॉय, बिपुल हालदार, संजित अमलदार, गिरीश सरकार, ज्योतिमय मिस्त्री, लक्ष्मी कोडापे, सुंदराबाई आलाम, महेश बोदलकर उपस्थित होते


PostImage

खबरदार महाराष्ट्र

July 30, 2023

PostImage

संपर्क ते समर्थन अभियानाअंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी नेताजीनगर येथे साधला नागरिकांशी संवाद


 

शेतकऱ्यांशी सवांद साधत योग्य दराने खतपुरवठा करा अन्यथा वाढीव दराने खत पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचा दिला इशारा

    *हर घर मोदी संपर्क ते समर्थन अभियानाअंतर्गत गडचिरोली विधानसभा आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर येथे भेट देऊन नागरिकांशी सवांद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे सांगत आ. डॉ. देवराव होळी यांनी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत रक्कम खात्यात जमा झाल्याची खातरजमा केली. व नागरिकांची आस्थेंवाईकपणे चौकशी केली. शेतकऱ्यानी व्यापारी नॅनो युरिया खरेदी करण्यासाठीं शेतकऱ्यांना बाध्य करत असल्याची तसेच वाढीव दराने युरिया मिळत असल्याची तक्रार केली यावर डॉ. होळी यांनी या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणारं असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. होळी यांनी राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली असून त्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यानी घ्यावा असे आवाहन केले. अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा व नुकसान भरपाई तात्काळ देण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी माजी सरपंच अनिता रॉय, बुधाराम बीश्वास, अजय घोष, तरुण कर्मकार, गोपाल हलधर, रविन चक्रवर्ती, अमीन घोष, दिलीप गाईन, गौतम दास, मलिन डे, सबोध पाल, दिलीप सिकदार, शेखर बैद्य, शांती बारई आदि उपस्थित होते*


PostImage

खबरदार महाराष्ट्र

July 30, 2023

PostImage

एटापल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ता ची  बैठक


 

एटापल्ली:- दिनांक 27 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा एटापल्लीचे वतीने हनुमान मंदिर एटापल्ली येथे श्री संतोष खापने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीचे मार्गदर्शक श्री डॉ. बी डी.कोंगरे, प्रा.सी एन. घोंगळे हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.शरद पाटिल, प्रा.एस डी.मंद , डॉ एस. बी. वळसकर, श्री किशोर मलेवार, प्रा .बारसांगडे सर हे होते.
     प्रा.सी एन घोंगळें यांनी आपले मार्गदर्शनात ओबीसी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, राजकिय व आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता आरक्षण महत्त्वाचे भूमिका बजावते असे आपले मार्गदर्शनात सांगितले. तर डॉ. शरद पाटील यांनी ओबीसी समाजाचे घटनात्मक अधिकार यावर मार्गदर्शन करताना ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यानकरीता वसतिगृह लवकरात लवकर सुरू झाले तर या शैक्षणिक विद्यार्थ्याना लाभ मिळण्यास सोईस्कर होईल  यावर चर्चात्मक मार्गदर्शन केले. व आजच्या बैठकीत तिरुपती येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघचे महाअधिवेशनात प्रमुख मागण्या जातीनिहाय जनगणना, केंद्रात ओबीसी चे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे व नॉन क्रोमिलेयर ची अट रद्द करण्यात यावे ही मागणी पूर्ण करण्याकरीता  ओबीसी समाज बांधवांनी सहभागी होणे गरजेचे आहे याकरिता बैठकीत नियोजन करण्यात आलें. तसेच एटापल्ली तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांचे समस्या व अडचणी यावर चर्चा करण्यात आलेत.  राष्ट्रीय ओबीसी महासंघ ची बैठक यशस्वी करण्याकरिता श्री नागराज चीमटपवार तालुका उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा एटापल्ली, श्री वासुदेव चंनकापुरे तालुका सचिव , श्री राकेशभाऊ मुकेरवार तालुका कोषाध्यक्ष, श्री श्रीकांतभाऊ तेलकुंठवार तालुका सदस्य, श्री बजरंगभाऊ मार्गोनवार सदस्य, श्री नाजुकराव निकोडे सदस्य, श्री अतुल वसाके यांनी अथक परिश्रम घेतले. आजच्या बैठकीत गणमान्य ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे संचालन श्री किशोर मलेवार यांनी केले तर उपस्थीत मान्यवरांचे आभार प्रा. सी एन. घोंगळे यांनी मानले.