नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
06-05-2024
पत्रकारांची मुस्कुटदाबी, लोकशाहीचा खून.
निपक्ष,स्वच्छ निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांच्या पासेस नाकारल्या.
दोशींचे निलंबन,पासेसचे वाटप करण्याची मागणी.
स्वच्छ आणि निपक्ष निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांची मुस्कुटदाबी होत असल्याची गंभीर बाब बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. असंख्य पत्रकारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी, परवानगी पासेस नाकारण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. तर या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.निवेदन, तक्रार दिले. तरीही अद्याप कोणतेही पास वाटप वगळलेल्या पत्रकारांना केली नाही. तर पासेस नाकारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सूद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतीच एक ऑनलाइन बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या हुकूमशाहीचा निषेध नोंदविला. तर संबंधित दोषी अधिकारी यांना तत्काळ निलंबित करावे. शेवटच्या पत्रकाराला सुद्धा पासेस वाटप करावे.अशी भूमिका या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आली.
निपक्ष आणि स्वच्छ प्रशासनात पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी आणि देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही. परंतु गलथाण आणि भ्रष्ट प्रशासनामध्ये पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.तरीही माहिती मिळेल असे नाही. उलट पक्षी पत्रकारांची मुस्कुट दाबी करून त्यांना बदनाम केल्या जाते. त्यांना बनावट गुन्ह्यात अटकविण्यात येते. परंतु पत्रकारांची एकताच अधिकारांचे सार्वभौमत्व आबाधीत ठेवत असते. याकडे काही पत्रकार बांधवांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वतंत्र्यावर गधा. ही हुकूमशाहीची नांदी आहे. जोपर्यंत पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. निर्भीड पत्रकार जिवंत आहे. तोपर्यंतच लोकशाही जिवंत आहे.तोपर्यंत समाजाच्या हितासाठी लिहिणारे, बोलणारे आणि लढणारे कोणीतरी आहे. अन्यथा सामान्य व्यक्ती या हुकूमशाही विरोधात, पुढे येण्यासही धजावत नाही. परंतु जनसामान्यांनी पत्रकारांच्या या अधिकारासाठी कमीत कमी आवाज उचलला पाहिजे. पत्रकार समाजासाठी आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा समाजाची आहे. स्वच्छ शासन प्रशासनासाठी जनहितार्थ लेखनी झिजवणाऱ्या पत्रकारांना आपण तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे.तरच लोकशाही जिवंत राहील, आणि हुकूमशाहीचा अंत होईल.
तर पत्रकारांनीही सौजन्यशीलतेने, आपल्या जबाबदारीचे भान ठेवत जनतेसाठी सर्वस्वपनाला लावले पाहिजे.जाहिराती मिळतील नाही मिळतील. परंतु आपल्यातील पत्रकार जिवंत राहिला पाहिजे. जाहिराती मिळाल्यावरही जर काही आक्षेपार्य चुकीचे आढळल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्यावरच भोळ्या भाबड्या सामान्य जनतेचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही. यासाठी पत्रकारांनी सदसदवेकबुद्धी जिवंत ठेवीत जनसामान्यांच्या हितासाठी लेखणी झिजवली पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारिता आदर्श आहे. याच जिल्ह्यातील पत्रकारितेने सरकार सूद्धा पाडले आहे. सरकारचे मोठमोठे निर्णय बदलले. असंख्य योजना पत्रकारांच्या लेखणीतून उदयास आल्या. त्याच योजना नंतर संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारल्या. पत्रकारांनी या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ही निवडले आहे. तर भल्या भल्यांना जमीन दोस्त करण्याची ताकदही पत्रकारांच्या लेखणीने दाखवली आहे.ही क्षमता बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांची आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेच्या इतिहासाची सद्यस्थितीतील हुकूमशाही सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आठवण करून देण्याची वेळ आली आहे.
जर निवडणूक प्रक्रिया निपक्ष आहे. स्वच्छ प्रशासनाचा कार्यभार आहे.तर मग पत्रकारांच्या उपस्थितीस मज्जाव का.❓त्यांची मुस्कुटदाबी का..?कोणाच्या सांगण्यावरून. असे असंख्य प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. जिल्हा प्रशासन सुज्ञ आहे. लवकर निर्णय घेईल, दोषींवर त्वरीत कारवाई करेल. हीच माफक अपेक्षा जिल्ह्यातील पत्रकार आणि नागरिकांची आहे.
तूर्तास एवढेच.
पुढील विश्लेषणात. स्वच्छ निपक्ष निवडणूक प्रक्रिया.
10.03 टक्केवारी कोणाच्या पथ्यावर.
प्रतापराव तुपकर की, खेडेकर.
शेळके शाह कूणाला गारद करणार.
_____________________
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments