समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
06-03-2024
ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा जाहीर पाठिंबा.
गडचिरोली :: ओबीसी समाजातील विविध मागण्यांना घेऊन 4 मार्च 2024 पासून, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी युवक साखळी उपोषनावर आहेत. उपोषनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष गडचिरोली जिल्हा च्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार , प्रदेश सचिव ऍड. संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस प्रदीप चुधरी, जिल्हा उपाध्यक्ष नहीम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, उपाध्यक्ष चंद्रकांत शिवणकर, सुजित राऊत,छत्रपती टेंबरे, तुलाराम मायकलवार ,सुधाकर गद्दे, रमेश भुसारकर ,माधव परसोडे, पंकज बारसागडे खुशाल ठाकरे आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.
ओबीसींच्या सर्व मागण्या आमच्या पक्षांच्या मागण्या आहेत आम्ही पक्षाच्या वतीने ओबीसी मागण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास खंबीर आहोत. पक्षाच्या वतीने हा अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी याप्रसंगी सांगितले.
*ओबीसी साखळी उपोषनातील या आहेत प्रमुख मागण्या*
१) बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आणि देशात जातीनिहाय जणगणना करण्यात यावी.
२) मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देवू नये.
३) २७ डिसेंबर २०२३ आणि २६ जानेवारी २०२४, रोजी सामाजिक न्याय विभागाने काढलेली सगे सोयऱ्याची अधिसूचना रद्द करण्यात यावी.
४) ओबीसी विद्यार्थ्यासाठी मंजूर करण्यात आलेले, वस्तीगृह तात्काळ सुरु करून वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांकरिता विनाविलंब आधार योजना लागू करण्यात यावी.
५) ओबीसी विद्यार्थ्यांना फ्रीशिप, परदेशी शिष्यवृत्ती, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळामार्फत शैक्षनिक कर्ज व्याज परतावा योजना इत्यादींचा लाभ मिळन्यासाठी ८ लाखाची उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र असणाऱ्या विदयार्थ्यांना लाभ देण्याचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा.
६) गडचिरोली जिल्ह्यात पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीमध्ये आदिवासी उमेदवाराला १००% आरक्षण असल्यामुळे गैरआदिवासी प्रवर्गातील नोकरभरती मधील आरक्षण शून्य टक्के झाले आहे, हा गैरआदिवासीवर खूप मोठा अन्याय असून तो तात्काळ दूर करण्यात यावा.
७) पेसा क्षेत्रात ज्या गावातील गैरआदिवासींची लोकसंख्या ५०% च्या वर आहेत,अशी गावे पेसा क्षेत्रातून वगळण्यात यावी.
८) ओबीसी, एससी, एसटी,विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी.
९) गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे.
१०) शेतकऱ्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या.
११) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात नव्या 200 बसेस देण्यात याव्या.
१२) सुरजागड व कोनसरी प्रकल्पात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे.
१३) ओबीसी शेतकर्यांच्या वनहक्क पट्ट्यासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.
१४) राज्याच्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजाला देण्यात आलेला निधी अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी.
15) सारथी च्या माध्यमातून सुरु असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तत्काळ सुरु करण्यात याव्यात.
16) महाज्योतीला दरवर्षी १००० कोटीचे अनुदान देण्यात यावे,तसेच विभागीय व जिल्हा स्तरावर महाज्योतीचे कार्यालये सुरु करण्यात यावे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments