नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
23-10-2023
शेतकऱ्याचे ऐन हंगामात नुकसान
चिमूर प्रतिनिधी :-
चिमूर तालुक्यातील आंबोली येथील पांडुरंग कवडू ठाकरे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील गोठ्यात 22 ऑक्टोबरच्या रात्री वाघ शिरला व गोठ्यात बांधून असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. त्यात बैल ठार झाला. वाघाने बैलाचे बरेच मांस खाल्ले व निघून गेला. 23 ऑक्टोबरला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पांडुरंग ठाकरे शेतात गेल्यावर ही घटना उघडकीस आली.
भिसी उपवन क्षेत्राचे वनरक्षक भानुदास बोरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाघाने पाळीव जनावरांना ठार केल्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आंबोली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पांडुरंग ठाकरे यांचा पन्नास हजार रु. किमतीचा बैल ऐन हंगामात वाघाने मारला. त्यामुळे वन विभागाने तत्काळ पांडुरंग ठाकरे यांना नुकसान भरपाई द्यावी व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरे यांनी केली आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments