CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
17-10-2023
उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा
सर्व समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन भंते धम्मचेती यांनी केले आहे
चिमूर प्रतिनिधी :-
उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ ऑक्टोंबर २०२३ ला दुपारी १२ ते ५ वाजेपर्यत मोर्चा प्रारंभ होणार असून, सदर मोर्चा संविधान चौक, नविन पोलीस स्टेशन जवळून निघणार असून, या मोर्च्या चे मार्गदर्शक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य यांच्या मार्गदर्शनात निघणार आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, अल्पसंख्यांक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार व शासकीय निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेतील सर्व कर्मचारी सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी "ईव्हीएम हटाव, संविधान बचाव'" या विषयावर भव्य मोर्चाचे चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले आहे. तरी मोर्चाला संविधान मानणाऱ्यांना लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य व भंते डॉ. धम्मचेती यांनी केले आहे.
*या मोर्चाचे प्रमुख मागण्या*
भारतीय निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. तीन पिढ्यांची अट रद्द करून जबरानजोत धारक शेतकन्यांचे तात्काळ पट्टे वाटप करावे. के.जी. ते पि.जी. शिक्षण मोफत करण्यात यावे. ६२ हजार शासकीय शाळांचे खाजगीकरण रद्द करावे. सर्व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटीकरणाच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे खाजगीकरण बंद करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्या. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनेतील नियमित कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. शेतकन्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही सुरु करावे. दुष्काळग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व देण्यात यावी. गोंडवाना विद्यापीठात झालेली बोगस प्राध्यापक भरती रद करावी. चिमूर तालुक्यातील अपात्र झालेल्या घरकुलांच्या याद्या तात्काळ जाहीर कराव्या. शेतकयांच्या कापसाला रू. १५०००/- हमीभाव द्यावा. चिमूर तालुक्यातील शेतातील पांदणरस्ते तात्काळ मंजूर करावेत. शेतकयांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करावे. धान उत्पादन शेतकऱ्यांना रू. ५०००/- प्रति किंटल देण्यात यावे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे थकित हमे त्वरीत देण्यात यावे. असे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक भदंत धम्मचेती संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य असून सर्व समाजबांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments