ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
24-08-2024
जिल्ह्यातील अल्पवयीन मुली व महिला नेमक्या जातात कुठे?
दर महिन्याला दोन तक्रारी, सोशल मीडियाचा होतोय गैरवापर
गडचिरोली : मोबाईल व इंटरनेटमुळे जग अतिशय वेगाने बदलत असताना महिला व अल्पयीन मुली गायब होत असल्याच्या तक्रारी त्यांचे पालक किंवा पती पोलिस स्टेशनमध्ये करतात. त्यामुळे या महिला किंवा अल्पयीन मुली जातात कुठे असा प्रश्न सहजच पोलिस व सामान्य नागरिकांना निर्माण होते. शहरातील पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येक महिन्याला दोन तरी तक्रारी अशा स्वरूपाच्या असतात. आजच्या युगात कोणताही व्यक्ती हरवणे शक्यच नाही. सोशल मिडियाच्या वापरामुळे प्रेमसंबंध निर्माण होतात. पुढे हे प्रेम टिकवण्यासाठी मुलगा व मुलगी पळून जातात. इकडे मुलींचा पालक मुलगी गायब असल्याची तक्रार दाखल करते.
पालकांनी काय करावे?
पालकांनी आपल्या मुलांसोबत मित्रत्त्वाचे संबंध निर्माण करावे. त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना प्रेम द्यावे. जेणेकरून ते बाहेर प्रेमाच्या शोधात पडणार नाही.
मोबाईलमध्ये आपली मुलगी किंवा मुलगा नेमका काय? बघते यावर लक्ष ठेवावे.
गहाळ बेपत्ता होण्याची कारणे
लग्नाचे आमीष : काही मुलीना पैशाचे आमीष दाखवले जाते. गरीब स्थितीतील मुली या आमिषाला बळी पडतात. काही वेळेला लग्नाचे आमीष दाखवले जाते. त्यांचे शारीरिक शोषण केले जाते. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल करते.
पालकांसोबत पटत नाही : काही मुली अतिशय हेकेखोर असतात. त्या पालकाची अजिबात मानण्यास तयार नसतात. आपल्या मर्जीनुसार त्या कुठेतरी पळून जातात, मात्र पालकांना याची माहिती राहत नसल्याने ते जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतात.
मुलगी जर अल्पवयीन असेल तर मात्र प्रियकराविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल होते. यात सहजासहजी जामीन मिळत नाही. कारागृहात जावे लागते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments