CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
23-06-2024
पालकमंत्र्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे... - महेंद्र ब्राह्मणवाडे
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्याचा विकास होईल, जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील, असे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना असताना. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पोरके केले आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले आणि प्रशासनाची गुप्त बैठक घेऊन निघून गेले. मात्र या संदर्भात पालकमंत्री जिल्हा दौरा करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक समस्या प्रलंबित आहे. शेतीला नियमित वीज पुरवठा होत नाही, पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. जिल्हा रुग्णालयात अत्यावशक सोयी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना नागपूर किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते. पोलीस भरतीच्या युवकांचे प्रश्न आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यात आलेले नाही. शेतकरी, महिला, युवक यांच्या समस्यांना घेऊन जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटायचे होते व आपले म्हणणे मांडायचे होते. मात्र पालकमंत्री सुरक्षेचा कारण दाखवून दौरा गुप्त ठेवल्याचे सांगतात. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटल्यामुळे पालकमंत्र्यांना आपल्या जीवाला धोखा वाटत असेल तर खुशाल त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व सक्रिय असा पालकमंत्री जिल्ह्याला द्यावा जेणे करून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकारण होऊन शकेल, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments