PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

Armori news : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार


 गडचिरोली, ब्यूरो. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण आरमोरी येथे समोर आले आहे. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून लगतच्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.

यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल

मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणाभाकासुद्धा खाल्ल्या. मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा लावली.

 

 

मात्र, शुभमचा लग्नाला विरोध कायम होता. पीडित तरुणीने 24 जुलैला आरमोरी पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी शुभम सोरते याच्या विरोधात भादंवी कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून, आरमोरी पोलिसांद्वारे त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार विनोद रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता मसराम करीत आहेत.


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद 2 दिवसांत 2 …


 

'महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद
 2 दिवसांत 2 लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिली भेट
 गरजू विद्यार्थ्यांनी विविध योजनांची जाणून घेतली माहिती

 गडचिरोली,दि.(26): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. महाज्योती द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे.
राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. महाज्योतीच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले यास्कॅनर कोडवर असलेल्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/schemes/ 2 लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे महाज्योतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती ही एक क्लिक वर प्राप्त व्हावी याकरिता स्कॅनर कोड तयार करण्यात आले असून दोन दिवसांत 2 लाखांचा टप्पा संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी गाठला आहे. यामुळे महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आज उत्सूकतेने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत तयार केलेल्या स्कॅनर कोड द्वारे संकेतस्थळाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
                                                                     


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा …


 

गडचिरोली पंचायत प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन लाडक्या बहिणीच्या मदतीला
 

   गडचिरोली/ (27):- गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  विभाग अंतर्गत "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने" यशस्वी आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन केली लाडक्या बहिणीच्या मदतीला
6 बिट आणि दोन सुपरवासझर सांभाडतात काम
 अतिश्रम काम करताना दिसत आहेत. अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲप द्वारे अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ब-याच ठिकाणी नेटवर्कची समस्या येत आहे. यामुळे पंचायत समिती गडचिरोली  
सौ एस व्ही गाडगे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  पंचायत समिती गडचिरोली श्रीमती आशा वरंघटे विस्तार अधिकारी , श्री मस्के शिपाई इत्यादी कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे.
[7/26, 2:56 PM] Mandeep Goradwar: गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये ऑनलाईन 9867 व ऑफलाईन 23228  यशस्वीपणे अर्ज भरून लाडक्या बहिणीला केली मदत.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले


नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले 


 गडचिरोली - : गडचिरोली जिल्ह्यातील लागुनच असलेल्या नवरगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून जात असलेल्या तीन इसमास गावकऱ्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करीत वाचविल्याची घटना २५ जुलै रोजी घडली 

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे चारही बाजुला पुराचा वेढा आहे. त्यामुळे चारही मार्ग बंद आहेत . अश्यातच  चुरचुरा- नवरगांव मार्गावरून नवरगाव च्या पुर्वीच येणारा पुल त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पुर आलेला होता नवरगाव ला जाण्यासाठी नागपूर वरून येणारे तिन पाहुणे एक महिला, मुलगा व भाचा बाईक वरून नवरगांव पुलावरून पाणी असतांना सुद्धा पुलावर थोडे पाणी आहे आपण सहज पुल ओलांडू शकतो या हेतुने ते तिघेही नवरगाव फुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज चुकला व ते पुढे न जाता पुलाच्या खाली बाईक पडली तर दोघे जुझपाचा आधार घेवुन लटकले तर एकजन पुलावरच मध्यतरी थांबुन कढल्यांला धरून होते.  त्या ठिकाणी चुरचुरा गावकरी पोहचले असता भयावह स्थिती पाहून गडचिरोली पोलिसांना माहीती दिली गडचिरोली पोलीस त्या ठिकाणी पोहचले परंतु हतबल होवून  त्यांना आल्या पावली परत जावे लागले
 आता आप्पती व्यवस्थापन  DDRF पथक जाईल बोट च्या मदतीने त्या तिघांना काढण्याचा प्रयत्न होईल असे वाटत होते. 

मात्र सांयकाळचे ७ वाजले तरीही  काहीच हालचाली दिसत नव्हत्या तेव्हा चुरचुरा येथील अनिल गेडाम व वासुदेव गेडाम यांनी दोरांच्या सहाय्याने सदर स्थळी जावून त्यां निघांना  सुखरूप बाहेर काढले चुरचुरा व नवरगांव चे अख्खे गावकरी त्या ठिकाणी पोहचले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले 
आता सरकारी यंत्रणा चुरचुरा येथे त्यांना नेवून त्यांची चौकशी करीत आहेत. त्या तिघाचे नाव अजुनही कळले नाहीत


PostImage

Sanket dhoke

Yesterday   

PostImage

Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर …


Chandrapur :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी, कुठून समोर दिसणार, हे सांगणे अवघडच झालेले आहे. असाच एक काही होते जेंव्हा वाघाचे नाव  ग्रामस्थांचा ऐकतात आणि थरकाप उडतो,  तो अचानक समोर आला तर भीतीने बोलणेही बंद होते. 

असाच काही  प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आलेला आहे. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ आला आणि उभा राहिला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली. 

मात्र, त्याच वेळी तिथे ST महामंडळाची बस आली. बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. चालकाने समय सूचकता दाखवत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.

सध्या सर्वत्र मुसळधार, संततधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. गोविंदपूर येथील मंगरूड गावातील शेतामध्ये काम करण्यासाठी रामदास खांदेवे नामक शेतकरी सायकलने गेलेले होते. 

सायंकाळी ५:३० वजताच्या सुमारास काम पूर्ण झाल्यानंतर ते सायकलने गोविंदपूर या गावी परत येत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदेवे यांच्या पुढे अचानक वाघ उभा होता. 

वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमोर उभे, दोघांच्याही मागेपुढे कोणीच नव्हते. वाघ पाहून शेतकरी भयभीत झाला. दोघांची नजरानजर झाली. वाघ हालचाल करणारच एवढ्यात ST Bus  त्याच रस्त्याने आली. बसचालक नव्हे तर साक्षात देवदूतच शेतकऱ्यासाठी धाऊन आला.

शेतकरी आणि वाघाची नजर एमेकमेकांवर होती. तेवढ्यात मंगरुडहून गोविंदपूरकडे जाणारी ST Bus तेथे पोहोचली. बस चालकाने समय सूचकता दाखवत तत्काळ बस थांबवून वेळ न घालवता  शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसवले. त्याची सायकलही बसमध्ये घेतली. ST Bus मुळे वाघ लगेच जंगलाच्या दिशेने पळाला.

वाघ समोर असून प्राण वाचवले हा प्रकार शेतकऱ्याला एक जीवदान देणारा ठरला. ST Bus गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला या प्रकारे शेतकऱ्याचे प्राण वोचले. 

वाघाला आपल्या समोर उभा पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. ST Bus चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितला. वाघ आणि शेतकऱ्यामध्ये घडलेल्या या प्रकाराची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.


बिबट्या घरात शिरला अन्…

तळोधी बाळापूर वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) या गावांमध्ये घुसून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने सचिन रतिराम रंदे यांच्या घरात बांधून असलेल्या शेळ्यांवर हल्ला आणि त्यातील एका शेळीला ठार ही केले.

 त्यानंतर बिबट्याने त्यांच्याच घरात ठाण मांडले होते. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल सहा तास प्रयत्न करण्यात आले.

अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल

अधिक वाचा  :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल

अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

SOCIAL MOVEMENTS: नाल्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या तिघांचे जीवाचा धोका पत्करून …


 

 शॉर्टकटने ओढवले संकट

पाणी वाहत असताना पुलावरून वाहन टाकू नये-जिल्हाधिकारी यांचे पुन्हा आवाहन*

गडचिरोली दि. २५ : नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना गडचिरोलीहून नागपूरला जाणाऱ्या  तिघांवर प्राण गमावण्याची वेळ आली होती. परंतु ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळताच त्यांनी तत्परता दाखवून संबंधित तीघांचे प्राण वाचवले. याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे.

आज दिनांक 25 जुलै ला मौजा चुरचुरा माल येथे  चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नालावरील पाणी वाहत असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे वय 32वर्ष, आशा किशोर मेंढे वय 65 व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे वय 12 वर्ष  हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोली वरून नागपूर ला जाताना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून काही अंतरावर वाहत गेले. त्याच वेळी त्यांनी गावातील जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी *यांनी जीवाची पर्वा न करता* त्या तिघांचे प्राण वाचविले. त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे  यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, CHO, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत  त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना  गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

 ही घटना मौजा  आज सायंकाळच्या सुमारास 7 ते 8 दरम्यान घडली.  यात मोटरसायकल पुरात वाहून गेली आहे.

पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातुन मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’चे दोन लाख अर्ज …


 

     

      गडचिरोली, दि.२५ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत  गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत २ लाख ६५९ महिलांनी अर्ज सादर केले आहे. 

 या योजनेसाठी ग्रामीण भागातून १ लाख ७९ हजार ७३१ तर शहरी भागातून २० हजार ९२८ अर्ज प्राप्त झाले आहेत.   तालुकानिहाय अर्ज नोंदणीची संख्या  पुढीलप्रमाणे आहे. अहेरी-१०७०३, आरमोरी-११३१२, भामरागड-६६०५, चार्मोशी-३८००४, देसाईगंज-१२९३६, धानोरा-२२७८६, एटापल्ली-१६३७२, गडचिरोली-२९२४२, कोरची-९७४२, कुरखेडा-१६३१३, मुलचेरा-१२४११, सिरोंचा-१४२३३. 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

 


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून …


मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून खड्डे बुजविणार

 सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार यांची नगर पंचायत अहेरी च्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनातुन मागणी


अहेरी:- अहेरी नगर पंचायत हद्दीत व अहेरी शहरातील रस्त्यावर खड्डेच- खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर खड्डे पाण्याने भरून आहेत.खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा असल्याचे अंदाज येत नसल्याने अहेरी शहरात नागरिकांची व वाहनांची वर्दळ नेहमीच असते म्हणून पाणी भरलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची  शक्यता नाकारता येत नाही म्हणून अहेरी शहरातील व प्रभागातील खड्डे बुजवा अन्यथा अहेरी शहरात सामाजिक कार्यकर्ते वर्गणी गोळा करून सदर खड्डे बुजवण्याचे प्रावधान हाती घेतील  असे अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी व ईशारा दिला आहे.

अहेरी शहरात व्यापार व आठवडी बाजार आणि शासकीय कामे, रुग्णालयात उपचारासाठी, विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात असे विविध कामे घेऊन सामान्य जनता व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे मोठी  वर्दळ निर्माण होते
अहेरीतील रस्त्यावर खड्डे पाण्याने भरून आहेत भरलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचे दाट शक्यता आहे आणि ये-जा करणाऱ्या नागरीकांना व वाहन धारकांना वाहतुकीस कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.करिता खड्डे बुजवणे आवश्यक आहे.नगर पंचायत ने या समस्येचा गंभीरतेने विचार करून  सदर खड्डे बुजवा अन्यथा अहेरीत वर्गणी करून खड्डे बुजवणार  मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी व ईशारा देण्यात आले आहे. 

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार, सचिन येरोजवार युवक मंडळी उपस्थित होते


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 25, 2024   

PostImage

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर …


राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून धानाचे परे आणि केलेली रोवनी वाहून गेली तसेच कित्येक शेतकऱ्यांचे बांधीचे पाळ सुद्धा अती पावसामुळे फुटून वाहून गेली आहेत.असे अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर आवर्जून उभी आहेत.आता बांधीचे पाळ नसल्याने तयार करायचे म्हटले तर माती कुठून आणायची ? हा खरा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.आणि अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांकडे आता ताकद उरली नसून,ती शासनाने लवकरात लवकर शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामे करून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी जेणेकरून अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेला शेतकरी जोमाने उभा राहील.

जी परिस्थिती धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेली आहे तसीच गत कापूस किंवा सोयाबीन शेतकऱ्यांचे सुद्धा झालेली आहे.अतिवृष्टीमुळे एका महिन्यांपासून मशागत करायला वेळ मिळाले नाही आहे.आणि अशा कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून दिलासा द्यावा,ही मागणी घेऊन शेतकरी एकता पॅनलच्या वतीने तहसीलदार चामोर्शी यांना निवेदन देऊन,शेतकऱ्यांचे व्यथा मांडल्या गेली.त्यावेळी रमेश चौखुंडे,प्रदीप भाकरे सगनापूर.प्रदीप जगन भोयर,भाऊराव पाल,प्रदीप सयाम एकोडी.हेमंत खेडेकर,सत्यवान कुत्ते कानोह्ली.देवानंद तुंबळे,किशोर लाळ कळमगाव.देविदास देशमुख वेलतुर तुकूम.विकास पोटे,विलास धोंगडे वाघोली. मुखरेश्वर चुदरी,सतीश पुटकमवार,केशव चुदरी,अनिल कुमरे डोटकुली. तोता पाटील आभारे,कबीर आभारे घारगाव l.भैय्याजी कुनघाडरकर,उमाकांत सातपुते,कोकावर सर,प्रमोद डांगे भेंडाळा आणि परिसरातील बरेच शेतकरी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


अंगावर शहारे आणणारा योगायोग 

 

चंद्रपूर:- "वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता" याच म्हणी प्रमाणे वाघ अचानक समोर उभा झाल्याने एका शेतकऱ्यास जीव मुठीत धरून त्याचेकडे पहात राहावे लागत होते 
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप सुटतो  आणि तो अचानक समोर आला तर भीतीने  बोबळी वळून बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा राहिला.
सध्या सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. पाऊस असूनही शेतकरी आपल्या शेतात रोपे लावण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नावाचे शेतकरी मंगरूड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलवरून गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून ते सायकलवरून गोविंदपूर या गावी परतत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर अचानक वाघ जंगलातून बाहेर येऊन रस्त्यावर आला. दोघेही समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या मागे किंवा पुढे कोणीच नव्हते. शेतकऱ्याने समोर वाघ पाहून तो अवाक होऊन आता आपले काही खरे नाही असे त्याला मनोमन  वाटत होते
तेवढ्यात मंगरुड कडून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस तेथे पोहोचली. बस चालकाने तात्काळ बस थांबवून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी  वेळ वाया न घालवता एसटी बसमध्ये बसवून त्याची सायकलही बसमध्ये ठेवून एसटी बस रवाना केली तेव्हा वाघ ताबडतोब जंगलाच्या दिशेने निघून गेला 'वेळ आली होती, पण काळ आला नव्हता' या म्हणीच्या धर्तीवर शेतकऱ्याचा जीव वाचला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला. यावेळी वाघ यांना समोर पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितल्याने वाघ व शेतकऱ्याच्या समोरासमोर उभे टाकल्याच्या घटनेची गावात खमंग जोरदार चर्चा झाली.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप


गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप 


मुलचेरा:-
मुलचेरा तालुक्यातील गोमणी पासून तर विवेकानंदपूर पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने आता पावसाळ्यात त्या खड्डयांना तलावाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर मुलचेरा तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी शेकडो विध्यार्थी दररोज ये-जा करतात. विविध कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील तितकीच आहे. एवढेच नव्हेतर कर्मचारी आणि अधिकारी देखील याच रस्त्याने ये-जा करतात. या सर्वांना याचा जबर फटका बसत आहे.


मागील एक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने परिणामी खड्डयांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सदर रस्त्यावर दुचाकी चालविणे कठीण झाले असून एसटी बस आणि इतर खाजगी वाहनधारक कसा प्रवास करत असतील याचा विचार न केलेला बरा.

गेल्या पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नुकतेच चार दिवसांपूर्वी आंबटपल्ली आणि खुद्दीरामपल्ली दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला होता. पूर ओसरला असला तरी पुराच्या पाण्याने पुलावर साचलेला गाळ आणि कचरा साफ करण्यात आला नाही. एकीकडे कचरा साचला तर दुसरीकडे खड्यात पाणी साचला आहे. त्यामुळे या पुलावर देखील अपघाताची शक्यता बळावली आहे. मागील चार दिवसांपासून पुलावर कचरा पडून आहे मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही.

आलापल्ली ते आष्टी मार्गावर खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने खाजगी वाहनधारक मागील दोन वर्षांपासून आलापल्ली ते मुलचेरा याच मार्गाचा अवलंब करत आहेत. सध्या आलापल्ली ते आष्टी रस्त्यावरील दीना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने हाच एक पर्यायी मार्ग वापरण्यात आला. अश्या परिस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.


PostImage

P10NEWS

July 24, 2024   

PostImage

NAXAL SURRENDER : भामरागड दलमच्या लच्चु करीया ताडो या जहाल …



                

 

   शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयाचे बक्षिस.

         

गडचिरोली/भामरागड (24) : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 24 जूलै 2024 रोजी  जहाल माओवादी नामे 1) लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, वय 45 वर्षे, रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती
    

1)    लच्चु करीया ताडो
    दलममधील कार्यकाळ

श्व्    सन 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड¬ुटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.

श्व्    सन 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत. 

      कार्यकाळात केलेले गुन्हे
  जाळपोळ -01
श्व्    सन 2022 मध्ये मौजा ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    इतर - 01
श्व्    सन 2023 मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

    गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे. 
    दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.
    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात.  प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात.  जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. 
    वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
    वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
    गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

    शासनाने जाहिर केलेले बक्षिस. 

    महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

    आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

    आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा. 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 24, 2024   

PostImage

वैनगंगा नदीपात्रात गडचिरोली जिल्ह्यातील एका युवकाने घेतली उडी


 

 

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची सीमा असलेल्या वैनगंगा नदीच्या व्याहड बुज च्या मोठ्या पुलावरून नदीपात्रात गडचिरोली जिल्ह्यातील एका युवकाने उडी घेतल्याची माहिती सावली पोलिसांना प्राप्त होताच सावली चे ठाणेदार राजगुरु यांनी स्वतः घटनास्थळी जावून आपली यंत्रणा कामी लावली आहे.

 

तसेच बोट सुद्धा आणण्यात आलेली आहे. मात्र संततधर सुरु असलेल्या पावसामुळे व्यत्यय येत असून वैनगंगा नदी ही दुधळी भरून वाहत आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या शोधकार्यात अडथळा येत आहे. तरी नदी काठावर असलेल्या भागातील गावात सावली पोलिसांनी माहिती पोहचविली असल्याचे कळते. बातमी लिहेपर्यंत शोधकार्य जोमात सुरु आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर हल्ला करून जागीच …


शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर  हल्ला करून जागीच केले ठार

नागभीड : -
 आपल्या स्वतःच्या शेतात धान रोवणी करीत असताना एका शेतकऱ्यावर वाघोबाने हल्ला करून शेतकऱ्यास जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मींडाळा येथील कंपार्टमेंट नं ४२०/ ७५६ मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.  मृतक दोडकू झिंगर शेंदरे  वय(६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू होता. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला.  काही बांद्यामधील रोवलेले धान वाहून गेले होते त्या ठिकाणी  दोडकू धान रोवणी करीत होता. त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. ठार केल्यानंतर त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळपास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले. त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली. गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करुन  त्याचे शव
उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
त्वरित त्या गरीब शेतकऱ्याच्या परीवारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे


PostImage

Sanket dhoke

July 24, 2024   

PostImage

Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा …


Chandrapur News :-   नागभीड तालुक्यांतील मिंडाळा या गावात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवार २३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास घडली. मृताचे नाव दोडकु शेंदरे वय ६० वर्ष आहे.

दोडकू शेंदरे हे नित्यनियमाप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांचे शेत कोसंबी गवळी - वासाळा मक्ता या रस्त्यावर आहे.

सायंकाळी घराकडे परत येत असताना मार्गावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक दोडकु याचेवर व झडप घातली. वाघाने त्यांना काही अंतरावर ओढत नेले. इतर शेतकऱ्यांना दोडकु शेंदरे हे शेतात न दिसल्यामुळे शोधाशोध सुरु झाली.

त्यांना शोधत असताना काही अंतरावर वाघ आणि जमिनीवर पडलेला मृतदेह दिसला. लोकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी वनविभाग, पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी पोलिस व वनविभाग कर्मचारी पोहचले होते.

अधिक वाचा :- Today Horoscope :- २४ जुलै २०२४ ; नए कार्य की योजना बनाने के लिए आज का दिन अनुकूल है

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

अधिक वाचा :- Chandrapur News :- मुलानेच केली वडिलांची हत्या

अधिक वाचा  :- Today Horoscope :- २३ जुलै २०२४ ; धनलाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल

अधिक वाचा :- मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवून पोलीस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले

अधिक वाचा  :- SRK ने ४० कोटीचे गिफ्ट तर सलमानने १५ कोटीचे, तर इतर बॉलीवूड स्टार्सनी अनंत अंबानी-राधिका काय गिफ्ट केलं

अधिक वाचा :- Chimur News :- पुरात वाहून गेलेल्या दोन बँक कर्माऱ्यांनी झाडाला अडकून जीव वाचवला

ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?

अधिक वाचा :- रक्ताने भरलेले हात घेऊन पोलीसांना म्हणतो मी माझ्या ‘पत्नीला आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय’

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 24, 2024   

PostImage

धान रोवत असताना वाघाचा हल्ला,हल्ल्यात शेतकरी ठार


 

नागभीड : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा येथील कंपार्टमेंट नं ४२०/ ७५६ मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. दोडकू झिंगर शेंदरे (६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

 

नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू होती. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला. वाहून गेलेल्या धान्याच्या ठिकाणी दोडकू धान रोवत होता. त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. ठार केल्यानंतर

त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळ शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले. त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली. गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करण्यात आल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.