PostImage

pramod abhiman raut

Sept. 12, 2023   

PostImage

आता हि काही महत्वाची पदे भरली जाणार कंत्राटी पद्धतीने... जाणून …


राज्य सरकारचा मोठा निर्णय....

चिमूर प्रतिनिधी :-

       राज्य सरकारने सर्वच महत्त्वाच्या पदांवरील भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ९ कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील काही कंपन्या राज्याबाहेरच्या आहेत आणि यात आरक्षणाला थेट कात्री लावण्यात आली आहे.

       सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी आत्तापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. पण आता सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत होते. 

       दोन कंपन्याना हे काम देण्यात आले होते. यामध्ये शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ पदांचा यामध्ये समावेश होता. आता मात्र याची व्यापकता वाढवली आहे. 

       त्यानुसार यामध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. प्रत्येक पदाचा पगार निश्चित करण्यात आला असून तो सरकार देणार आहे. त्यातील पंधरा टक्के कमिशन कंपन्यांना मिळणार आहे.

       त्यामुळे सरकारी कार्यालयात आता अधिकारी ते शिपायापर्यंत सर्वच कंत्राटी पदे असणार आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖