लखनौ, रात्रीच्या वेळी लग्न लावण्यास उशीर होत असल्यान नवरदेवाने मंडपातच भटजीला जोरदार मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार, मेरठ येथील रहिवास सोनू सिंह हा जाटव ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्याचा विवाह गुरुवारी रात्री निगोहा गावातील तरुणीशी करण्यात येत होता. भटर्ज विवेक शुक्ला यांच्याकडून रात्री 1 वाजता लग्नविधी सुरू झाले होते उशीर होत असल्याने सोनूने भटजीला लवकर लग्न लावण्यास सांगितले. परंतु, लग्नात सप्तपदी घेताना अनेक नियम आणि मंत्रोच्चा- असल्याचे सांगताच दोघांत जोरदार भांडण झाले.