PostImage

P10NEWS

July 10, 2024   

PostImage

POLITICAL GAME: क्या मोदी का चेहरा हरा, पांच साल तक …


नीतीश कुमार एनडीए गठबंधन सरकार से ओबीसी जाति जनगणना की मांग पूरी कर पायेंगे! क्या देश में फिर से दोबारा लोकसभा चुनाव की संभावना है!

    दिल्ली/ (11) :- नीतीश कुमार की छवि अपने क्षेत्र में ओबीसी आरक्षण और जातीय जनगणना कराकर बिहार की राजनीति और राष्ट्रीय राजनीति में सुधार लाई, जिसका नतीजा उन्हें कांग्रेस चुनाव में मिला। लेकिन अब उनकी सबसे बड़ी जिम्मेदारी भारत सरकार के साथ गठबंधन सरकार बनाना और भाजपा और गठबंधन सरकार के साथ जल्द से जल्द ओबीसी समुदाय की जातीय जनगणना की मांग को पूरी करना होगा, अगर ऐसा नहीं किया गया तो बिहार क्षेत्र में उनकी राजनीति खत्म हो सकती है। और पूरे देश में उनकी छवि को भी नुकसान हो सकता है और पांच साल बाद ओबीसी जनगणना को लेकर बिहार की जनता और विपक्ष उनसे घिरा भी हो सकता है, अगर मांग पूरी नहीं हुई तो क्या नीतीश कुमार की ओबीसी जाति जनगणना की मांग पूरी होगी भारत से समर्थन वापस लेंगे, क्या भारत गठबंधन में शामिल होगा,

अगर भारत में ओबीसी गठबंधन भी जाति आधारित जनगणना नहीं करता है? अगर नीतीश भारत गठबंधन में शामिल नहीं हुए, तो संभावना है कि एक या दो साल में फिर से एक बार कांग्रेस चुनाव होने की संभावना है! अगर ऐसा कुछ नहीं हुआ तो क्या नीतीश कुमार के लिए बिहार की राजनीति पर ग्रहण लगना संभव है, क्योंकि क्या नीतीश कुमार देश और बिहार के ओबीसी लोगों की जातीय जनगणना की मांग को पूरा कर पाएंगे, ये तो वक्त ही बताएगा कि राजनीति का तरीका कब और कैसे बदलेगा, नीतीश कुमार की हर एक दाव पर देश की राजनीति का भविष्य जुड़ा है!


PostImage

pran

April 10, 2024   

PostImage

राज ठाकरेंची मोठी घोषणा, 'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा'


Raj Thackeray Speech: राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा ते एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते मनापासून करतात. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावे, असे 2014 मध्ये सांगणारे महाराष्ट्रातील ते पहिले नेते असल्याचे ते म्हणाले.

 

मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची मोठी घोषणा केली. आम्हाला राज्यसभा नको आहे आणि कोणत्याही प्रकारची तडजोडही नको आहे, असे राज ठाकरे म्हणाले. आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देऊ कारण आमचा पाठिंबा फक्त पंतप्रधान मोदींना आहे.

 

'मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही'

यासोबतच कोणाच्याही हाताखाली काम करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे हे विधान महत्त्वाचे आहे कारण नुकतेच त्यांच्या भाजपसोबतच्या युतीची चर्चा महाराष्ट्रात रंगली होती. ते म्हणाले, "आता मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रमुख होणार असल्याची बातमी आली. मला जर प्रमुख व्हायचे असते तर मी फार पूर्वीच प्रमुख झालो असतो. मी फक्त माझ्या पक्षाचा प्रमुख राहीन. मी निवडणूक लढवली तर मी सांगितल्यावर निवडणूक लढवीन.

 

अमित शहा यांची भेट घेऊन काय बोलले?

राज ठाकरे म्हणाले, "अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मला सांगत होते की आपण एकत्र यायचे आहे. पण कसे यावे हे मला समजत नव्हते. म्हणून मी अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली."

यासोबत ते म्हणाले की, "2014 मध्ये मी महाराष्ट्रातील पहिला नेता आहे ज्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असे सांगितले होते. जर मी कोणावर प्रेम करत असेल तर ते मी मनापासून करतो. 2014 मध्ये मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. 2019 मी विरोध केला कारण मी त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही."

 

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

आपल्या भाषणात मनसे प्रमुखांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टिप्पणी करतात ती माझी भाषा नाही. कारण मला सत्ता नको होती. पण उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी सर्व काही केले. सत्तेबाहेर फेकले गेले."

 

'विधानसभा निवडणुकीची तयारी करा'

विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की, एक चांगली संघटना निर्माण करा. तुम्ही विधानसभेची तयारी सुरू करा."

 


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 1, 2024   

PostImage

राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून हे नाव जाहीर


झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने चंपाई सोरेन यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीच्या अटकेनंतर राजीनामा दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

चंपाई सोरेन हेमंत सोरेन यांचे जवळची नातेवाईक आहेत. ते JMM च्या सरायकेला विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते हेमंत सोरेन सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळत होत्या.

चंपाई सोरेन यांना 2005 मध्ये झारखंड विधानसभेवर प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये ते आमदारही झाल्या. सप्टेंबर 2010 ते जानेवारी 2013 या काळात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, कामगार आणि गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते जुलै 2013 ते डिसेंबर 2014 या काळात अन्न व नागरी पुरवठा आणि परिवहन मंत्री होत्या.

 

 

काल बुधवारी इडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा प्रकरणी अटक केली.हेमंत सोरेन यांच्यावर 77 करोड रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप आहे. हेमंत सोरेनच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन हे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा चालू होती परंतु झारखंड मुक्ती मोर्चा ने चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचे कारभार सोपवले.

 

आणखी वाचा : विजय वडे्टीवार उपमुख्यमंत्री होणार?

 

चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून निवडल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे एक मोठे आव्हान आहे. मी राज्याच्या विकासासाठी कठोर परिश्रम करेन.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 13, 2024   

PostImage

मराठी माणूस म्हणून,नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ?


2024 मधील लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून,त्याचे वारे व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आणि जर केंद्रात भाजपाचे सत्ता आली तर भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.नितीनजी गडकरी हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.

भारत देशाची लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून देशात 2024 मधील निवडणुकींचे वारे वायला सुरुवात देखील झालेली आहे आणि समजा या निवडणुकीत जर भाजपाने पूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन करू शकले तर विदर्भातील उपनगरीचे खासदार म्हणून निवडून आले तर नितीनजी गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात

देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, आजच्या घडीला 73 वर्षाचे झालेले आहेत.आणि मोदीजी आता पंतप्रधान पदाचे उमेदवार न होता पक्षाचे प्रमुख प्रचारक बनवून मोलाची भूमिका पार पाडावे,असे महाराष्ट्रातील जनतेचे मत असून.मोदी साहेबांनी त्या मागणीची स्वीकार करावे,अशी जनतेची मागणी आहे.

 

नितीन गडकरी हे उत्तम नेते असून.एक मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तर,महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस या निर्णयाचा स्वागत करेल. भाजपामध्ये नितीन गडकरी चे कार्य आजपर्यंत मोलाचे ठरले असून,तसा ठसा देखील त्यांनी उमटविला आहे,असं त्यांच्या कार्यामधून दिसून येते.

उत्तम वक्ता आणि रोखठोक विचार मांडण्याचे कार्यशैली हे त्यांच्या कार्यपद्धतीचा आकर्षण असून.तळगाळातील जनतेचे कार्य करणारा नेता,अशी त्यांची ओळख आहे.म्हणून केंद्रात जर भाजपाची सत्ता आलीस तर देशाचे पंतप्रधान म्हणून झालेली निवड सार्थ ठरवित जनतेच्या आशा,आकांक्षाचे पालन करण्यात गटकरी सक्षम ठरतील.

 

आणखी वाचा : विजय वडे्टीवार उपमुख्यमंत्री होणार?

 

सीनियर सिटीजन नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयस्कर नेते ठरू शकतात.त्यामुळे त्यांनी ऐच्छिक निवृत्ती स्वतःहून जाहीर करायला पाहिजे,कारण त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री पदभूषण, देशाचे पंतप्रधान पद देखील भूषविलेले आहेत.म्हणूनच स्वखुशीने,आपली जबाबदारी पक्षातील वजनदार नेते आणि मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राला एखदा संधी द्यावी आणि विदर्भ नगरीचे नेते म्हणून नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी आरूड करावे.

 

आज पर्यंत भाजपाला मराठी माणसाने भरभरून साथ दिली आहे.म्हणून मराठी माणसाला एक संधी देऊन मराठी माणसातले गुण-सदगुण आणि मराठी परंपरा आत्मसात करायला वाव मिळेल आणि नितीन गडकरी उत्तम पर्याय भाजपा समोर आहे,त्यांनी तो पर्याय निवडावं.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 10, 2024   

PostImage

ईव्हीएमचा घोळ,झालाय देशाचा बट्ट्याबोळ


मागील महिन्यात छत्तीसगड,मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेला घवघवीत यश याचा जर सारासार विचार केला तर,हळूचपणे डोक्यात कल्पना तरंगायला सुरुवात होते.हा सर्व प्रकार ईव्हीएम मशीनचाच आहे बाकी सर्व काही नाही आणि समोरच्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व अशाच प्रकारे होणार,असे मत देशातील अनेक राजकीय पुढारी व्यकत करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ज्या काही निवडणुकाजिंकल्या त्या सर्वच्या सर्वच ईव्हीएम मशीनमुळे जिंकल्या,असे म्हणता येणार नाही. ज्यावेळी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीची जबरदस्त हवा निर्माण झाली होती आणि आधीच्या सरकारला जनता देखील कंटाळली होती,हेही तितकच खरं आहे.परंतु आता मोदी लाट वगैरे काहीच नाही तरी परंतु भाजपाने जो निर्विवाद यश संपादन केला त्यावरून असं लक्षात येते की,दाल में कुछ काला है.

मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान या राज्याच्या निवडणुका पार पडल्या यांत भाजपाने या तीनही राज्यांमध्ये भरभरून यश संपादन करून काँग्रेस पक्षाला चारी मुंड्या चित करण्यात, भाजप वरचढ ठरला. राजस्थानमध्ये परिवर्तन होणार होता,हे सांगायची गरज नाही आणि तेच झाले इथपर्यंत ठीक आहे परंतु मध्य प्रदेश,छत्तीसगड राज्यांचा विचार करायला गेलो तर या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येईल,असा अंदाज होता आणि त्या राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षाच्या बाजूने होता परंतु या दोन्ही राज्यांमध्ये माशी एकाच वेळी शिंकली आणि होत्याच नव्हतं झालं.

आता काही दिवस गेले की लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील देशातील सर्वच राजकीय पक्ष आपाआपली ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करतील,यात काही शंकाच नाही परंतु देशात ज्या काही राजकीय घडामोडी निर्माण होत आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे होऊन गेला आहे.खरोखर ईव्हीएम मशीन मध्ये जर घोळ निर्माण झाला असेल तर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा विजय संपादन करू शकतात आणि एकदा जर पुन्हा मोदीनी विजय संपादन केले तर विरोधी पक्ष पुन्हा एकदा चारही मुंड्या चीत.

नरेंद्र मोदी यांची पूर्वीसारखी अनुकूल परिस्थिती आजच्या घडीला उरलेली नाही आणि या गोष्टीला स्वतः नरेंद्र मोदी नाकारू शकत नाही.कारण त्यांनी कितीही विकासाच्या वलग्ना करीत असतील तरी पण सामान्य जनता महागाईने हवालदिल झालेली आहे आणि आजच्या घडीला परिवर्तनाची लाट असल्याचा वातावरण निर्माण झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती स्वतः भाजपाचे राजकीय पुढारी सुद्धा नाकारू शकत नाही.तरीपण भाजपाने आत्ताच जाहीर करून टाकलंय,आबकी बार चारसौ के पार,म्हणजे विचार करा किती आत्मविश्वास मनात निर्माण झाला असेल.

 

आणखी वाचा : सेमिफायनल भाजप जिंकले,फायनल आम्हीच जिंकू, कॉँग्रेसचा निर्धार

राम मंदिर आस्थेचा मुद्दा आहे आणि सर्वांना तो ठाऊक आहे.जो तो आप आपल्या जाती धर्माचा अभिमान बाळगतो आणि बाळगायलाच पाहिजे.परंतु देशातील गोरगरीब जनता महागाईने होरपळतो आहे,याचे सोयरसुतक केंद्रातील सत्ताधारी पक्षाला आहेच नाही.तरीपण चारसौ के पार चा नारा देण्यात सरकार मग्न आहे. म्हणूनच मनात शंका निर्माण होतात,कही ईव्हीएम मशीन की तो चाल नही है.पुढील निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न होता बॅलेट पेपर नीच घ्यायला पाहिजे,अशी जनतेची मागणी आहे.

लेखक : रमेश चौखूंडे 


PostImage

Shubham gawas

Nov. 22, 2023   

PostImage

चुनावी बॉन्ड मामला: 30 सितंबर 2023 तक राजनीतिक पार्टियों को …


नई दिल्ली: इलेक्टोरल बॉन्ड स्कीम (Electoral Bonds Case) मामले में 2 नवंबर को सुप्रीम कोर्ट (Supreme Court) में तीसरे दिन की सुनवाई हुई. इलेक्टोरल बॉन्ड से राजनीतिक चंदे (Political Parties Funding) को लेकर सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग से जानकारी मांगी है. अदालत ने कहा कि चुनाव आयोग सितंबर 2023 तक राजनीतिक पार्टियों को मिले चंदे का डेटा मुहैया कराए. सुप्रीम कोर्ट ने कहा कि चुनाव आयोग (Election Commission) SBI और राजनीतिक दलों से फंड का डेटा ले. शीर्ष अदालत ने चुनाव आयोग से पूछा कि आदेश के बावजूद 2019 के बाद कोई डेटा क्यों नहीं दाखिल किया गया? सुनवाई के बाद अदालत ने फैसला सुरक्षित रख लिया है.

अदालत ने चुनाव आयोग से हर राजनीतिक दलों को 30 सितंबर 2023 तक मिले फंड का डेटा मांगा है. सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग को याद दिलाया कि 2019 में एक आदेश पारित किया गया था, जिसके तहत चुनावी बांड के माध्यम से फंड लेने वाले सभी राजनीतिक दलों की डिटेल ECI को देने थी. सुनवाई के अंत में सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग (ECI) से पूछा कि आदेश के बावजूद 2019 के बाद कोई डेटा पेश क्यों नहीं किया गया?ECI पार्टियों या SBI से मांगे डेटा- SC

अदालत ने कहा कि हम 2023 तक चुनावी बांड के जरिए विभिन्न दलों को मिले डोनेशन के डेटा पर एक नज़र डालना चाहते हैं. जस्टिस संजीव खन्ना ने कहा कि आपके पास आज तक 2023 तक का डेटा होना चाहिए था. CJI ने चुनाव आयोग को जरूरत पड़ने पर भारतीय स्टेट बैंक (SBI) और राजनीतिक दलों से डेटा इकट्ठा करने के लिए कहाअदालत में क्या हुई बहस?

चुनाव आयोग के वकील अमित शर्मा ने कहा कि सारी जानकारी सीलबंद लिफाफे में है. हमने भी वो लिफाफा नहीं खोला है. आप ही उसे खोल सकते हैं. हम नहीं. हमने मंत्रालय को दो चिट्ठियां लिखी हैं. सॉलिसिटर जनरल ने भी कहा कि RBI और ECI के बीच बैठकें हुई हैं. उनमें सर्व सम्मत निर्णय लिए गए. 

 

इस पर जस्टिस खन्ना ने पूछा कि कितने बॉन्ड्स आए? इसकी जानकारी तो आपको होगी? इस पर अमित शर्मा ने हामी भरी. जस्टिस खन्ना ने पूछा कि मार्च 2023 तक का कोई आंकड़े आप हमें दे सकते हैं? अमित शर्मा ने कहा कि 2021 में सुप्रीम कोर्ट ने ही एक आदेश पारित किया गया था, क्योंकि कोर्ट ने ही कहा था कि रिकॉर्ड रखने की जरूरत नहीं है. लिहाजा हमारे पास वो आंकड़ा नहीं है. क्योंकि आयोग उसे मेंटेन नहीं करताजस्टिस खन्ना ने कहा कि आप जब कोर्ट आ रहे थे, तो आपके पास आंकड़ा होना चाहिए था. हमने भी ऑर्डर देखा है. हमें लगा था कि आप डेटा के साथ आएंगे. क्या आपके पास मार्च 2023 तक का कोई डेटा है? इसपर अमित शर्मा ने कहा कि डेटा तो नहीं दिया जा सकता, लेकिन पार्टियों द्वारा जमा कराए गए इकोनॉमिक और टैक्स रिकॉर्ड दिखाए जा सकते हैं. ये रिकॉर्ड्स पार्टियां वित्तीय वर्ष की समाप्ति के छह महीने बाद आयोग के पास भेजती हैं. हमारे पास तो इलेक्टोरल बॉन्ड्स की कुल बिक्री का हिसाब है. 

इसपर CJI ने कहा कि आपके पास हर पार्टी को मिलने वाले बॉन्ड्स और चंदे का हिसाब होना चाहिए. हमें इसका डेटा दीजिए. अब तो वित्तीय वर्ष खत्म हुए छह महीने हो चुके हैंकपिल सिब्बल ने भी रखी दलीलें

कपिल सिब्बल ने रिजॉइंडर में कहा कि कॉरपोरेट सत्तारूढ़ दल को बड़ा चंदा देते हैं. बाकी को मामूली. सरकार से वो फायदा उठाते हैं. पावर एंजॉय करते हैं. ये भी एक तरह का भ्रष्टाचार है. अगर भ्रष्टाचार खत्म करना है, तो उस स्कीम को फौरन बंद करना जरूरी है. वोट का अधिकार तो गुप्त है, लेकिन डोनर को जानकारी सबको होनी चाहिए. सत्तारूढ़ दल के साथ अन्य दलों को भीमामले में 4 याचिकाएं दायर

इस मामले की सुनवाई चीफ जस्टिस डीवाई चंद्रचूड़, जस्टिस संजीव खन्ना, जस्टिस बीआर गवई, जस्टिस जेबी पारदीवाला और जस्टिस मनोज मिश्रा की बेंच कर रही है. इस मामले में चार याचिकाएं दायर की गई हैं. इनमें कांग्रेस नेता जया ठाकुर और सीपीएम की पिटीशंस भी हैं... . 


PostImage

pramod abhiman raut

Oct. 21, 2023   

PostImage

Bhoomipujan was done for facilities, beautification and essential construction in …


 

चिमूर प्रतिनिधी :-


        कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील भिसी येथे वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजना सन - २०२२-२३ नगरपंचायत भिसी अंतर्गत असलेल्या स्मशानभूमी मध्ये सोयी-सुविधा, सौंदर्यीकरण आणि अत्यावश्यक बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. (कामाची किंमत: १९१.८१ लक्ष रुपये) यावेळी आमदार बंटीभाऊंनी भूमिपूजन स्थळी उपस्थित मान्यवरांसह कुदळ मारून व फलकाचे अनावरण करून बांधकामाचा शुभारंभ केला.
         या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा नेते गोपालभाऊ बलदुवा, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, ठोंबरे काका, गरिबाजी निमजे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी जि.प. सदस्या ममताताई डुकरे, माजी पं.स. सदस्य प्रदिप कामडी, भाजपा शहराध्यक्ष पंकज गाडीवार, लीलाधर बन्सोड, अभय मुंगले, रामू जाजू, राजू बानकर, रवि लोहकरे, विनोद खेडकर, किशोर नेरलवार, विनोद खवसे, बंडू तुंबेकर, प्रशांत जुमडे, आकाश ढबाले, अमोल कटारे, दीपाली बानकर, मंजुषा ठोंबरे, शोभाताई उघडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 21, 2023   

PostImage

Inauguration of Veterinary Hospital Category-II and Complex Building at Bhisi …


 

चिमूर प्रतिनिधी :-


        कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील भिसी येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-२ व संकुलाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. (कामाची किंमत - रूपये ६२.४५ लक्ष) यावेळी आमदार बंटी भांगडियानी सर्वप्रथम श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या आसनाचे व श्री संत गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांसह फीत कापून दवाखान्याच्या इमारतीचे लोकार्पण केले. दरम्यान, आमदार बंटीभाऊंचे विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
           या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. बांधकाम उपविभागीय अधिकारी माथनकर, पशुवैद्यकीय अधिकारी चिमूर एस. के. राऊत मॅडम, डॉ. एस. सी. देशमुख मॅडम, बिडीओ राठोड तसेच, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा नेते गोपालभाऊ बलदुवा, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, ठोंबरे काका, गरिबाजी निमजे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी जि.प. सदस्या ममताताई डुकरे, माजी पं.स. सदस्य प्रदिप कामडी, भाजपा शहराध्यक्ष पंकज गाडीवार, लीलाधर बन्सोड, अभय मुंगले, रामू जाजू, राजू बानकर, रवि लोहकरे, विनोद खेडकर, किशोर नेरलवार, विनोद खवसे, बंडू तुंबेकर, प्रशांत जुमडे, आकाश ढबाले, हर्षल डुकरे, अमोल कटारे, दीपाली बानकर, मंजुषा ठोंबरे, शोभाताई उघडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 17, 2023   

PostImage

Tomaro chimur Jan akrosh morcha; उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी …


उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा

सर्व समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन भंते धम्मचेती यांनी केले आहे

चिमूर प्रतिनिधी :-

        उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ ऑक्टोंबर २०२३ ला  दुपारी १२ ते ५ वाजेपर्यत मोर्चा प्रारंभ होणार असून, सदर मोर्चा संविधान चौक, नविन पोलीस स्टेशन जवळून निघणार असून, या मोर्च्या चे मार्गदर्शक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य यांच्या मार्गदर्शनात निघणार आहे.
        महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, अल्पसंख्यांक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार व शासकीय निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेतील सर्व कर्मचारी सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी "ईव्हीएम हटाव, संविधान बचाव'"  या विषयावर भव्य मोर्चाचे चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले आहे. तरी मोर्चाला संविधान मानणाऱ्यांना लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य व भंते डॉ. धम्मचेती यांनी केले आहे.
      *या मोर्चाचे प्रमुख मागण्या*
        भारतीय निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. तीन पिढ्यांची अट रद्द करून जबरानजोत धारक शेतकन्यांचे तात्काळ पट्टे वाटप करावे. के.जी. ते पि.जी. शिक्षण मोफत करण्यात यावे. ६२ हजार शासकीय शाळांचे खाजगीकरण रद्द करावे. सर्व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटीकरणाच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे खाजगीकरण बंद करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्या. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनेतील नियमित कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. शेतकन्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही सुरु करावे. दुष्काळग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व देण्यात यावी. गोंडवाना विद्यापीठात झालेली बोगस प्राध्यापक भरती रद करावी. चिमूर तालुक्यातील अपात्र झालेल्या घरकुलांच्या याद्या तात्काळ जाहीर कराव्या. शेतकयांच्या कापसाला रू. १५०००/- हमीभाव द्यावा. चिमूर तालुक्यातील शेतातील पांदणरस्ते तात्काळ मंजूर करावेत. शेतकयांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करावे. धान उत्पादन शेतकऱ्यांना रू. ५०००/- प्रति किंटल देण्यात यावे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे थकित हमे त्वरीत देण्यात यावे. असे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
       मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक  भदंत धम्मचेती संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य असून सर्व समाजबांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 29, 2023   

PostImage

गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा प्रावीण्यप्राप्तांचा सत्कार सोहळा …


चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त.....

चिमूर प्रतिनिधी :-

         चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राहुलजी गांधी यांच्या जनसंवाद यात्राचे ओीचित्य साधुन चिमूर शहरात  दि. 2 ऑक्टोबर 2023 रोज सोमवारला  इंदिरा गांधी चौक चिमूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाला बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा प्रावीण्यप्राप्तांचा प्रमुख  मान्यवरांचा उपस्थित सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
           या कार्यक्रम प्रसंगी देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम स्वप्नील बन्सोड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आवाज मुझिकल नाईट कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अविनाश वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे उद्घाटक  डॉ. नामदेव किरसान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे सहउद्घाटक डॉ. सतिश वारजुकर समन्वयक 74/ चिमूर विधानसभा श्रेत्र तर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी राम राऊत, सहसचिव सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, धनराज मुंगले संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, गजानन बुटके माजी जिल्हा परिषद सदस्य, किशोर घाडगे उपविभागीय अधिकारी चिमूर मनोज गभणे पोलीस  निरीक्षक चिमूर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विजय गावंडे पाटील अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर, माधवबापु बिरजे माजी सभापती कुर्षी उत्पन्न बाजार समिती, विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस कमिटी, संजय डोंगरे माजी अध्यक्ष जि. म. स. बैंक चिमूर, भिमरावजी ठावरी माजी शहराध्यक्ष तालुका काँग्रेस श्रीमती वनिता मगरे अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस किशोरबापु शिंगरे, अध्यक्ष तालुका काँग्रेस सेवादल, राजेंद्र लोणारे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस ओबीसी, माननीय  कदीरचाचा माजी बांधकाम सभापती तथा गटनेता नगर परिषद, गोपाल झाडे माजी अध्यक्ष नगर परिषद चिमूर, विलास डांगे अध्यक्ष तालुका काँग्रेस ओबीसी विभाग, साईश सतीश वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, प्रदीप तळवेकर अध्यक्ष तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग, आरिफभाई शेख अध्यक्ष तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, हेमंत उर्फ राजु कापसे अध्यक्ष तालुका काँग्रेस किसान सेल विभाग, लोकनाथ रामटेके अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु.जाती. भरत बंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे, सुधीर पोहनकर माजी सचिव तालुका काँग्रेस कमिटी डॉ. रहमान पठाण सचिन महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस, स्वप्निल मालके माजी उपसभापती प. स. चिमूर, बालाजी कोयचाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु .जमाती, नर्मदा रामटेके अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस अनु.जाती, राजू चौधरी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, राजू हिंगणकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, तर या कार्यक्रमाचे विनीत आहे. अविनाश अगडे,अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, गितांजली थुटे अध्यक्ष शहर महिला काँग्रेस कमिटी चिमूर, मोहम्मद शफिक शेख उर्फ पप्पूभाई मिडिया प्रमुख, धनराजजी मालके संपर्कप्रमुख चिमूर शहर, अमोल जुनघरे उपाध्यक्ष शहर काँग्रेस, विनोद ढाकुणकर, उपाध्यक्ष तालुका काँग्रेस, गौतम पाटील जिल्हा महासचिव युवक काँग्रेस , रोशन ढोक अध्यक्ष चिमूर विधानसभा युवक काँग्रेस, जावाभाई शेख अध्यक्ष ता .काँग्रेस अल्पसंख्यक विभाग,  प्रशांत डवले उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस ओबीसी विभाग, नागेंद्र चट्टे अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस, अक्षय लांजेवार संघटक तालुका युवक काँग्रेस, उमेश हिंगे माजी नगरसेवक, राकेश साटोने उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. असे आव्हान शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे. व शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 31, 2023   

PostImage

भिसी येथील युवकांचा ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मुंबई येथे …


 

चिमूर प्रतिनिधी :-

       भिसी येथील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस व भिसीचे माजी सरपंच अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

       राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या युवकात शुभम सहारे, चेतन पडोळे, अक्षय नागपुरे, शैलेश आजबलकर, शैलेश सतीबावणे, राहुल कामडी, फैयाज शेख, अक्षय सातपैसे, बबलू दिघोरे, सतीश शेंडे, आशुतोष भुते, आयुष तुरारे, रोहित गभणे यांचा समावेश आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, भिसी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष किशोर गभणे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अक्षय खवसे, कार्यकर्ते देवा घुटके, अमृत बन्सोड, जगत तांबे, पंकज रेवतकर, सौरभ कामडी, रोशन रेवतकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.