PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 24, 2024   

PostImage

पत्रकारांचे संरक्षण झालेच पाहिजे : उच्च न्यायालय


 

कोलकाता : पत्रकारांना आपले काम धाडसाने करण्याचे सर्व प्रयत्न करण्यासाठी त्यांचे संरक्षण झालेच पाहिजे. पत्रकार आणि माध्यमांचे स्वातंत्र्य लोकशाहीसाठी अपरिहार्य आहे, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

 

रणजीत दास ऊर्फ मोहन दास हे एबीपी आनंदा टीव्ही चॅनलचे पत्रकार आहेत. त्यांनी अवैध गौण खनिज उत्खननाची व्हिडीओग्राफी केली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एकामागून एक गुन्हे दाखल होत आहेत. खोट्या गुन्ह्यांत गुंतवून त्यांना अडकवले जातआहे म्हणत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला.सरकारी वकिलांनी जामीन देण्यास विरोध करताना रणजित दास हे परिसरातील वेगवेगळ्या व्यक्तींकडून पैसे उकळत आहेत, असा युक्तिवाद केला. कोर्टाने जामीन मंजूर करताना पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

 

पत्रकारांना धाक दाखवून वृत्तपत्रस्वातंत्र्य राखले जाऊ शकत नाही. पत्रकार हा माध्यमाचाच भाग असतो आणि पत्रकारितेचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे.

 

- देबांगसू बसाक आणि मो. शब्बर रशिदी, न्यायमूर्ती