April 6, 2025 Follow
कुलिंग मशिनच्या विद्युत तारेच्या झटक्याने अनखोडा येथील तरुणाचा मृत्यू
आष्टी -
पाणी थंड करणाऱ्या कुलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्याने अनखोडा येथील 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दिनांक 6एप्रिल रवीवारी संध्याकाळी चार ते साडे वाजताच्या सुमारास घडली
धीरज प्रमोद येलमुले वय 16 वर्ष रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे
मृतक धीरजच्या वडिलांचा अनखोडा येथे थंड पाणी कॅन वितरणाचा चा व्यवसाय आहे. त्यांच्या या व्यवसायात मुलगा धीरज मदत करत होता. रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास धीरज हा कुलिंग मशीन जवळ गेला असता कुलिंग मशीन च्या विद्युत तारेचा त्याला जोरदार झटका बसला. व तो जागेवरच कोसळला त्याला त्वरीत उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे
March 22, 2025 Follow
शासकीय रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुसज्ज करून आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने अधिक निधी खर्च करावा--- खा डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी
गडचिरोली :: केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाकरीता 95,957 कोटी रुपयाची तरतूद केली असून त्यापैकी 9,406 कोटी रुपयाची तरतूद फक्त आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत खाजगी रुग्णालयात होणाऱ्या उपचाराबद्दल अनेक वेळा अनियमितता आढळून आली आहे त्याचप्रमाणे महालेखाकारांच्या तपासणीत 300 कोटी रुपयाचा घोटाळा सुद्धा उघडकीस आला आहे. तसेच योजनेअंतर्गत केलेल्या 6.66 कोटी दाव्या पैकी 562.4 कोटी रुपयाचे 2.7 लक्ष दावे खोटे आढळले असल्यामुळे. अशा भ्रष्टाचारयुक्त योजनानवर व जाहिरातीवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा, शासकीय रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पात्र डॉक्टरांसह पायाभूत सुविधा व आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासन जास्तीत जास्त खर्च करणार का? जेणेकरून सर्वांना योग्य आरोग्य सेवा मिळण्यासाठी मदत होईल. असा प्रश्न व मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत प्रश्नकाल दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री जगत प्रकाश नड्डा यांचे कडे केली.
Feb. 26, 2025 Follow
मार्कंडा देव येथील वैनगंगा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू,
तर दोन जणांना वाचवण्यात यश
चामोर्शी :- मार्कंडा देव येथील महाशिवरात्री यात्रेनिमित्त आलेले 3 युवक वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेले असता नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले .
सदर घटना ही दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 12.30 दरम्यान घडली . सविस्तर असे की , अभिषेक संतोष मेश्राम वय 24 वर्षे , जितू राजेश्वर दुर्गे वय 20 वर्षे , खुशाल सुखराम सोनवने वय 18 वर्षे हे तीघेही रा. महाकाली वार्ड , लक्ष्मी बजाज शोरूम समोर चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत . हे तिन्ही युवक यात्रेनिमित्त मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला आले होते आणि ते आंघोळीला राखीव क्षेत्र ठेवलेल्या भागात आंघोळ न करता दुसऱ्या बाजूला आंघोळीला गेले परंतु त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही व अभिषेक संतोष मेश्राम वय 24 वर्षे याचा नदीत बुडून मृत्यू झाला . तर इतर लोकांच्या प्रयत्नांमुळे दोन युवकांना वाचविण्यात यश आले . सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल कातबाने आणि इतर पोलीस पथकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन मृतकाला शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठवण्यात आले .
Feb. 4, 2025 Follow
गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार...
गडचिरोली, ०४ फेब्रुवारी, २०२५::-
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, या जिल्ह्याबाबत वेगळ्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
यासोबतच यंत्रणेने रोजगाराला चालना देणाऱ्या व शाश्वत विकास साध्य करणाऱ्या योजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 चा प्रारुप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यादूरदृष्यप्रणालीद्वारे आज घेण्यात आले.या बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल तसेच गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, आ. डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 अंतर्गतगाभा क्षेत्रासाठी 212 कोटी, बिगर गाभा क्षेत्रासाठी 106 कोटी, आकांक्षित जिल्ह्यासाठी 25 टक्के अतिरिक्त निधील रुपये 83.69 कोटी आणि नाविन्यपूर्ण व इतर योजनांसाठी मिळून एकूण 418.45 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला आहे.तथापि, कार्यान्वयन यंत्रणेकडून 823 कोटी रुपयांची निधी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीत 404.56 कोटींची वाढीव मागणीसादर करण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गडचिरोली हा विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टावर भर देत विविध योजनांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रादेशिक विकास आराखड्याखेरीज मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर, पर्यटन आणि रोजगार निर्मितीस चालना देणाऱ्या योजनांवर भर, तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन लोकसहभागातून विकास आराखडा राबवावा, असेही ते म्हणाले. 2024-25 मध्ये मंजूर झालेला निधी अद्याप का खर्चझाला नाही, काय अडचण आहे,याबाबत विचारणा करून त्यांनी सदर निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारणी, शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली बसविणे आणि योजनेंतर्गत खरेदी साहित्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे यासारख्या सूचनाही त्यांनी केल्या.
भौगोलिक आव्हाने आणि विकास निधीची गरज - सहपालकमंत्री जयस्वाल.राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्ह्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र तसेच या जिल्ह्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल लक्षात घेता रस्ते, आरोग्य, शिक्षण व पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्याची मागणी केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि ग्रामीण दुर्गम भागातील रस्त्यांची अत्यंत खराब परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष निधी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कोणत्या विभागाला किती निधीची मागणी आहे आणि त्यातून कोणती विकासकामे केली जाणार आहेत याची सविस्तर माहिती सादर केली.
बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ सचिव आणि जिल्हा कार्यकारी यंत्रणांचेअधिकारी उपस्थित होते.
Jan. 28, 2025 Follow
दुचाकीची अनखोडा वळणावरील कठड्याला धडक,कोनसरीचा दुचाकीस्वार ठार
आष्टी (प्रतिनिधि) ## आष्टी येथून कोनसरीकडे दुचाकीने जात असताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अनखोडा वळणावर असलेल्या लोखंडी कठड्याला दुचकीची बसली धडक यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली.
मयत दुचाकीस्वाराचे नाव आशिष कुळमेथे , वय २५ वर्षे , रा. कोनसरी असे आहे.
मयत आशिष हा दुचाकी क्रं. एम.एच.३३ , ए बी ९५९८ ने आष्टी कडून आपल्या कोनसरी गावाकडे दुपारी निघाला होता. दरम्यान अनखोडा नाल्याजवळील वळणावर त्याचे गडीवरचे नियंत्रण सुटले व गाडी लोखंडी कठड्यावर आदळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करुन प्रेत शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविले.पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत
Aug. 6, 2024 Follow
चंद्रपूर वरुन डॉक्टरी उपचार करून आष्टी कडे येत असताना ३२ वर्षीय तरुण वाटेतच झाला बेपत्ता
अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी: - गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील एक युवक चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार करुन स्वगावी येत असतांना अचानक बसमधून बेपत्ता झाल्याने आई, वडील सुन्न झाले
हि घटना दि. २९/०७/२०२४ रोजी नामे चरनदास (हरी, दौलत), दादाजी चनकापूरे वय ३२ वर्ष हा पाच वर्षा पासुन मंदबुध्दीचा असल्याने त्याचा उपचार करण्यासाठी आई वडिलांनी मुलगा चरनदास यास असे तिघे मिळुन बसने चंद्रपूर येथे पोहचुन मुलगा चरनदास याचे डोक्याचे उपचार करण्यासाठी डॉ. सचिन वेधे यांच्या दवाखान्यात गेले. व मुलागा चरनदास याचेवर डॉक्टरांनी उपचार करून परत जाण्यास सांगीतल्याने, असता आई, वडील, मुलगा गावाकडे अनखोडाला जाण्यासाठी चंद्रपूर येथुन अहेरी बसमध्ये तिघेही येत असतांना एका सिटवर वडील व माझा मुलगा चरनदास व पुढच्या सिटवर आई हि बसुन होती. त्यानंतर वडीलाला बसमध्ये झोप लागल्याने बसमध्ये झोपी गेला आष्टीला बस थांबल्यावर आई, वडील दोघेही आष्टी बसस्थानकला उतरले असता, मुलगा चरनदास हा उतरला नाही तेव्हा आई वडीलांनी बसमध्ये शोध घेतले असता तो मिळुन आला नाही. तो कोठेतरी उतरला असावा सांयकाळी घरी येईल असे समजुन आई वडील आपल्या गावी अनखोडा आले सायंकाळ होवून सुध्दा तो घरी परत न आल्याने, त्याचा गावात व आजुबाजुच्या परीसरात शोध घेतले असता तो कोठेही मिळुन न आल्याने, नातेवाईकांकडे माझ्या मुला बाबत विचारले असता तो तिथे आला नसल्याचे सांगीतले. व आजपावेतो त्याचा शोध घेणे सुरू आहे.
चरनदास दादाजी चनकापूरे वय ३२ वर्ष, धंदा मजुरी, रा.अनखोडा, ता. चामोर्शी जि. गडचिरोली हा मंदबुध्दीचा असल्याने कोनाला काही न सांगता बस मधुन उतरून कोठे तरी गेला आहे. त्याचा आज पावेतो शोध घेवून सुध्दा मिळुन न आल्याने पोस्टेला मुलगा बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता ईसमाचे वर्णनः-१) वर्ण- गोरा, २) उंची १६४ सेमी ३) बांधा- मजबुत, ४) केस काळे ५ पेहराव-फिकट पिवळ्या रंगाचा फुलबाहयाचा शर्ट, कथ्या रंगाचा पन्हें ६) भाषा- मराठी असुन सदर युवक कोणालाही दिसून आल्यास दादाजी विठोबा चनकापूरे रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोल्ली मोबाईल क्रमांक ७४९८४३६२५७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चरनदासच्या वडीलांनी केले आहे व माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीसही देण्यात येईल असे वडीलांनी सांगितले
July 13, 2024 Follow
जिल्हा परिषद शाळेला आले दारु अड्डयाचे स्वरूप
धाबा:-
धाबा येथील जिल्हा परिषद ची शाळा दारुडे व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा सन 1888 मध्ये धाबा गावात उघडल्या गेली. एका इंग्रज अधिकाऱ्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेने अनेक अधिकारी घडविले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी या शाळेत शिकलेले विद्यार्थी एकत्र येतात. शाळेच्या इमारती समोर नतमस्तक होतात. आता मात्र या शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. कधी शिक्षणाचे माहेरघर असलेली ही शाळा आता दारुड्यांच्या आणि जुवारीचा अड्डा बनली आहे. शाळा परिसरात दारूचा रिकामा बाटलांच्या अक्षरस सडा पडलेला. ठीक ठिकाणी शौच केलेलं. शाळा सुरू व्हायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर इथं जुआरी एकत्र येतात. दारूंच्या घोटासोबतच पत्त्यांची अदलाबदली करतात. या शाळेतील शिक्षक चंद्रपूर येथून धाबा गावाला येतात.वेळेवर शिक्षक कधीच हजर होत नाही अशी पालकांची तक्रार. शिक्षक वेळेवर येत नाहीत. आलेच तर मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. शाळेला लागूनच लहान नाला आहे. या नाल्यात विद्यार्थी खेळायला जातात. त्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? या शाळेत गरिबांची मुलं शिकतात. त्यामुळे पालकांनी तक्रार केली, ओरड केली तरीही शिक्षण विभाग त्याकडे लक्ष देतच नाही असा अनुभव पालकांना आलेला आहे. ज्या शाळेला दैवत मानल्या जाते त्या शाळेची ही दयनीय अवस्था बघून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
July 13, 2023 Follow
राहुल खळदकर
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपावरून ३ मे रोजी अटक करण्यात आली. कुरुलकरांविरुद्ध राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतेच आरोपपत्र दाखल केले. त्यांनी सुरक्षाविषयक नियमावलीचे उल्लंघन करून शत्रुराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. कुरुलकर हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले आणि त्यांनी कोणती माहिती त्या यंत्रणेला पुरवली याविषयी…