दिनांक १४ सप्टेंबर 2024 शनिवारला झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली तालुका गडचिरोली तर्फे विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक झाडपट्टी रंगभूमीवरील दादा कोंडके नावाने प्रसिद्ध असलेले झाडीपट्टीच्या कलाकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सावसाकडे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक राजेश कात्रटवार शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, सुरेंद्र गोंगले गटविकास अधिकारी गडचिरोली, आबाजी सावकार समर्थ, प्रवीण भाऊ मुक्तावरण, देवा शेडमाके, नवनाथजी धाबेकर हे उपस्थित होते. झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सल्लागार दादा चुधरी ,संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय ,उपाध्यक्ष सुनील चडगुलवार यांना मानाचा स्थान देण्यात आले , उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय, उपाध्यक्ष सुनील चडगुलवार, सचिव राजेंद्र बोबाटे व झाडीपट्टी कलावंत संघटना तालुका गडचिरोलीचे सर्व सभासद सदस्य यांच्यावतीने मान्यवरां चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या , उद्घाटनिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन व सभासद आयशा अली यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सुनील चडगुलवार यांनी केले.
तर माणसात कला असावी, कलाकारांनी कलेसाठी जगाव व या कलेसाठी जगता जगता कलावंताने या कलेतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा असे प्रतिपादन प्रवीण भाऊ मुक्तावरण यांनी केले. झाडीपट्टीच्या रंगभूमीला दीडशे वर्षाचा इतिहास आहे पण झाडीपट्टीचा रंगभूमीला राज्यात फारसं महत्त्व दिले जात नाही. त्याला विविध कारणे आहेत तरी मला या झटपट्टीचा रंगभूमीने आकाशाला गवसनी घालून जिल्ह्याचे नाव लौकिक देशात करण्याची संधी दिली असली तरी मला वडील, काका, भाऊ यांच्याकडून पिढी जात कलावंताचा वारसा लाभला असला तरी मला सुर कधीच गवसला नाही. अशी खंत या गीत गायन स्पर्धेचे उद्घाटक पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांनी व्यक्त केली. पद्मश्री च्या हस्ते या गीत गायन स्पर्धेच्या मंचावर झाडीपट्टी जेष्ठ कलावंत दादा चुधरी, ज्येष्ठ कलावंत सुनील चडगुलवार, ज्येष्ठ लेखक चुडाराम बल्लारपुरे, ज्येष्ठ नाट्य निर्माता आबाजी सावकार समर्थ यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व गडचिरोली तालुका झाडीपट्टी कलावंत संघटना जिल्हा गडचिरोली तर्फे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गीत गायन स्पर्धा सुरू होण्याअगोदर दिलीप मेश्राम यांनी गायक स्पर्धकांनी नाट्य संगीतच सादर करावे असे सांगून स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत एकूण 43 स्पर्धकाची नोंद करण्यात आली आणि 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उत्कृष्ट संचालन सिद्धार्थ गोवर्धन, आयेशा अली, वर्षा गुरनुले, दिलीप मेश्राम यांनी केले या गीत गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिवाकर बारसागडे, केवलजी बगमारे व संगीत शिक्षक संजय धात्रक यांनी परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
प्रथम क्रमांक श्याम शिंदे यांना रोख 5000 रुपये व प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक अपर्णा दर्डे यांना रोख 3000 रुपये व प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक कार्तिक मसराम यांना रोख 2000 रुपये व प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रोत्साहन बक्षीस एकूण तीन होते यात योगेश्वरी देऊरमले, राजू ठाकूर व हर्ष घ्यार यांना सुद्धा प्रशस्तीपत्र व सन्मानचित्र चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर तिन्ही परीक्षकांचा मान सन्मानाने आदर करून त्यांना मंचावर स्थान देण्यात आला हा सर्व गीत गायनाचा कार्यक्रम सुरळीत चालण्यासाठी झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सर्व कार्यकारिणी सभासद पदाधिकारी सदस्य यांनी खूप मेहनत घेतली.
या कार्यक्रमात नोंदणी विभाग भगवान गेडाम, सदानंद उईके, हेमंत कावळे, उमाजी भरले यांनी सांभाळला. तसेच हे कार्यक्रम सुरळीत व्हावे म्हणून वर्षा गुरनुले, उषाताई मुळे, प्रकाश मेश्राम मेश्राम, तुळशीराम उंदीरवाडे, वसंत चापले, राजू चिलगिलवार, नवीन शेंडे, विवेक दांगट, महेंद्र ठाकरे, टीकाराम सालोटकर तसेच संस्थेसाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करण्याचे कार्य प्रकाश लाडे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक मुन यांनी केले.
आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे गडचिरोली तालुका झाडीपट्टी कलावंत संघटना संस्था गडचिरोली यांच्या वतीने सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोज शनिवारला विदर्भ स्तरीय गीत गायन स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या आहे त्यासंबंधी त्या गीतगायन समारंभाचा नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली या सभेमध्ये झाडीपट्टी कलावंत संघटना तालुका गडचिरोलीचे अध्यक्ष जितेंद्र वासुदेव उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. प्रथमता कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन यांनी आपले विचार मांडले. नियोजन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. त्यानंतर झाडीपट्टी कलावंत संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ चडगुलवार यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर अध्यक्षस्थानी असलेले जितु भाऊ यांनी सुद्धा कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल कोणाकडे कोणकोणती जबाबदार राहील ही माहिती त्यांनी दिली. गीत गायन स्पर्धेचे त्या दिवशी चे सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थ गोवर्धन व आयेशा अली यांच्यावर सोपविण्यात आली. नोंदणी विभागाची जबाबदारी श्री भगवान गेडाम व सदानंद उईके यांच्यावर सोपविण्यात आली. तसेच स्टेज मॅनेजमेंट यांची जबाबदारी उषा मुळे, वर्षा गुरूनुले दिलीप मेश्राम, प्रकाश मेश्राम आणि राजेंद्र बोभाटे यांच्याकडे सोपविण्यात आली. आभार प्रदर्शनाची जबाबदारी विवेक मून यांच्याकडे सोपविण्यात आली. पाहुण्यांचे नियोजन हे सुनील चडगुलवार व राजेंद्र चिलगिलवार यांच्यावर सोपविण्यात आली .तसेच भोजन व्यवस्था पाणी व्यवस्था व त्या कार्यक्रमास लागणारी जी काही व्यवस्था असेल ती जितेंद्र जी उपाध्याय व तुळशीरामजी उंदीरवाडे यांच्याकडे सोपविण्यात आली प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रकाश लाडे व वसंत चापले यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली व या कार्यक्रमास वेळेवर आलेली जबाबदारी त्याची व्यवस्था संपूर्ण झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली तालुका च्या सदस्य हे अचूक बजावतील असे ठरविण्यात आले या सभेला जितेंद्र वासुदेव उपाध्याय, सुनील चडगुलवार, दिलीप मेश्राम , राजेंद्र बोबाटे , विवेक मून , भगवान गेडाम, टिकाराम सालोटकर, सिद्धार्थ गोवर्धन , प्रकाश मेश्राम, तुळशीराम उदिरवाडे, सदानंद उईके, उषा मुळे आयेशा अली, वर्षा गुरनुले, अशोक सूत्रपवार ,राजेंद्र चिलगिलवार, वसंत चापले,आणी प्रकाश लाडे इत्यादी कलावंत बंधू हजर होते.
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने जिल्हा कार्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करून सेवा निवृत्त जेष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हूणन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे,काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, महासचिव देवाजी सोनटक्के, शिक्षक सेल दत्तात्र्यय खरवडे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस वामनराव सावसाकडे, नदीमभाऊ नाथानी, काशिनाथ भडके, शिक्षक सेल कार्याध्यक्ष दीपक रामने,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई नंदेश्वर, शंकरराव सालोटकर,सुनील चडगुलवार, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षन विभाग भरत येरमे, माधवराव गावड,जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे, शालिग्राम विधाते,मिथुन बबनवाडे , सरपंच नीलकंठ निखाडे,पुष्पलताताई कुमरे, डॉ. सोनलताई कोवे, अपर्णाताई खेवले,निवृत्ताताई राऊत, रिताताई गोवर्धन, पोर्णिमाताई भडके, संध्या रामने,संगीताताई बारसागडे, निर्मलाताई आदे, शोभाताई कापडे, उत्तम ठाकरे, अनिल डोग्रा, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने,छत्रपती मडावी, लहूकुमार रामटेके, प्रफुल आंबोरकर,चारुदत्त पोहाणे,दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, ढिवरू मेश्राम, रामदास टिपले,कवडू उंदीरवाडे, प्रभाकरराव वासेकर, नां. मो. ठाकरे, विलास म्हस्के,आय.बी.शेख, डी. एन. मडावी, प्रशांत राऊत, संदीप राऊत, अशोक बोहरे, जितू पोटे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत,करकाळे, पंकज कावळे,अशोक पेदापल्लीवार, परशुराम तलांडे, संजय कुमरे, सुनील करपते, संतोष पेदापल्लीवार, दिलीप झाडे, भारत मोहुर्ले, गजानन सोनटक्के, नाजूक कावडे, रमेश राणे, प्रकाश शिंदे, लोमेश म्हशाखेत्री, जालिंद भोयर, नारदेलवार, गुलाबराव मडावी, हंसराज उंदीरवाडे, ईश्वरदास राऊत, प्रदीप भैसारे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली -:
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध अध्यासन केंद्राचे काम सुरू झाले आहे.त्यांचेमार्फत नेहमी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.परंतू आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन झाले असुनही गोंडवाना विद्यापीठाला वारंवार पत्रव्यवहार करून,भेटी देऊन सुद्धा आदिवासींच्या व विशेषत महिलांच्या विकासासाठी अजुन कोणताही उपक्रम राबवलेला नाही.आदिवासी महिलांचे स्वतंत्र अध्यासनाची मागणी आदिवासी महिला संघटनांनी वारंवार केली.सतत भेटी चर्चा केल्या पण त्याकडे दूर्लक्ष केले जाते यावर महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली.आदिवासी महिला विकासासाठी कार्यक्रम घेऊन आदिवासी महिला अध्यासनाचे उद्घाटन व्हावे व आरोग्य शिक्षण रोजगार आर्थिक सामाजिक राजकीय स्थितीचे संशोधन व्हावे यासाठी मा कुलसचिव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रतिभाताई चौधरी, ज्योती मेश्राम महिला राजसत्ता आंदोलन समन्वयक, कुसुम ताई अलाम माजी जि प सदस्य तथा साहित्यिक, सुधाताई चौधरी, उपेंद्र रोहनकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती,आशा ताई वेलादी, सुनिता उसेंडी उपस्थित होते.
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पस्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ४१ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी पुरुषोत्तम दहिकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "जीवनाची संध्याकाळ " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुरुषोत्तम महादेव दहिकर हे गडचिरोली येथील रहिवासी असून सेवानिवृत्त बॅंक अधिकारी आहेत. ते
नवोदित कवी असून सेवानिवृत्तीनंतर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी कविता लेखनास सुरुवात केलेली आहे. आजवर त्यांनी १०० च्या वर कवितांचे लेखन केलेले असून व्हॉट्सॲप व फेसबुकवर सातत्याने ते कवितांचे सादरीकरण करीत असतात. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या पस्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संतोष कपाले, प्रा. पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे,पुनाजी कोटरंगे, रविंद्र गेडाम, संगीता ठलाल, पी. डी. काटकर, प्रेमिला अलोने, लता शेंद्रे, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, वसंत चापले, सुरज गोरंतवार, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, राजेंद्र यादवराव सोनटक्के, नरेंद्र गुंडेली, राजरत्न पेटकर, भिमानंद मेश्राम, मुरलीधर खोटेले, उकंडराव नारायण राऊत, वामनदादा गेडाम, सुभाष धाराशिवकर, रेखा दिक्षित, खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी, ज्योत्स्ना बन्सोड, सोनाली रायपुरे, हरिष नैताम, उत्तम प्र. गेडाम, मिलींद बी. खोब्रागडे, गजानन गेडाम, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम, विलास जेंगठे, मधुकर दुफारे, सुरेश गेडाम, केवळराम बगमारे, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे असे चुडाराम बल्हारपुरे यांनी कळवले आहे.
दिनांक 4 सप्टेंबर – चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची समिती गठीत करुन या कामास गती देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या. मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते. पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे; अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नाव मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला. मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.
गडचिरोली जिल्यात आरमोरी व कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तीनीं घातलेल्या धुमाकूळा बाबत मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांना अवगत करुन देऊन रानटी हतींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची कारवाई करावी याबाबत सूचना देतांना व तसे पत्र देतांना खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष कांग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, काँग्रेस कार्यकर्त्ता रामदास मसराम, नेताजी गावतुरे, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, नितीन राऊत पदाधिकारी व कार्यकर्ते.
गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर मध्ये सहभागी होहून मार्गदर्शन करतांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान उपस्थित होते तसेच यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई मोहरकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, शँकरराव सालोटकर, प्रा. राजेश कात्रटवार, रामदास मसराम, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष वडसा राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष चामोर्शी प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग अब्दुलभाई पंजवानी, जिल्हाध्यक्ष किसान विभाग वामनराव सावसाकडे, अ. जा. विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग संजय चन्ने, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार,शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे, परिवहन विभाग अध्यक्ष रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नितेश राठोड, जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी बिजन सरदार, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनिल कोठारे, देवाजी सोनटक्के, प्रभाकर वासेकर, परसराम टिकले, सुनिल चडगूलवार, घनश्याम वाढई, नेताजी गावतुरे, नंदू वाईलकर, हरबाजी मोरे, माधवराव गावड, काशिनाथ भडके, जयंत हरडे, लालाजी सातपुते, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, राकेश रत्नावार, मिथुन बाबनवाडे, उत्तम ठाकरे, गिरीधर तीतराम, योगेंद्र झंझाड, कल्पना नंदेशवर, पुष्पलताताई कुमरे, मंगलाताई कोवे, डॉ. सोनलताई कोवे, वर्षाताई आत्राम, कविताताई भगत, किशोर उईके, अमोल उंदीरवाडे, दिलीप घोडाम, कुमदेव गायकवाड, गोविंदा झरकर, दीपक उंदीरवाडे, अभिजीत उंदीरवाडे, जितेंद्र मुनघाटे, रोशन कोहळे , सुरज मडावी, प्रशांत कापकर, विलास रामटेके, उद्धवराज खोब्रागडे, प्रफुल आंबोरकर, रमेश कोठारे, सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड दिल्यास मोठे यश - आमदार डॉक्टर देवरावजी होळी
दिनांक ३१ ऑगस्ट गडचिरोली
विद्यार्थी ,युवक युवतिंनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानार्जना सोबतच विद्येची देवता माता सरस्वती व आध्यात्मिकतेला आदर्श ठेवून विद्यार्जन केल्यास शिक्षणात तसेच जीवनात नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना मार्गदर्शन करताना केले.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री शेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे आयोजीत करण्यात झाला. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या समारंभाला उपस्थित राहून सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.
यावेळी ते म्हणाले की, आजची पिढी वाईट व चुकीच्या दिशेने जात असल्याचे आपणाला दिसून येत आहे. ही पिढी केवळ भौतिक वादाला महत्त्व देत आहे. त्यामूळे विद्यार्थी युवक तरुण तरुणी चुकीच्या मार्गाला जात आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिकतेचे महत्त्व समजावून सांगने आवश्यक आहे. त्यांना शिक्षणासोबतच अध्यात्मिकतेची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे. करिता आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण सर्वाँनी आध्यात्मिकतेला महत्व द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना केले.
प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा..
'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची..
आज या दोघांचा यशोगाथा पाहू.. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... तो यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय.
घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं
एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी समाजातल्या बायकांचं हेच जगणं... सगळं आयुष्य वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यात... लग्न वगैरे काही भानगडच नाही... 'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळेची...
'कलेक्टर व्हायचंय....'
नगरमधली राजश्री काळे... लोककलेवर निरातिशय प्रेम करणारी, लोककला जगणारी... आणि लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवणारी... व्यवसायानं तमाशा कलावंत... तमाशाच्या याच वातावरणात तिचं पोर वाढलं... तमाशाच्या सुपारीसाठी गावोगाव फिरावं लागतं... त्यात पोराबाळांची परवड होते... शिक्षणाचा तर मागमूसही नसतो. अमित कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर त्याची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्रीनं काळजावर दगड ठेवत पोटच्या पोराला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं. अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं काही तिनं ताकदीनं पेलला. लहानपणापासून पोराला समजावलेलं, तुला कलेक्टर व्हायचंय... पोरानंही आईच्या कष्टांचं सोनं केलं... आज अमित यूपीएससी उत्तीर्ण झालाय. निकाल लागल्यापासून घर कसं आनंदानं गजबजून गेलंय.
यशात माऊलीचा हात...
अमित मारुतराव काळे... यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव... कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून कोसो दूर... पण पोटाला कितीही चिमटे बसले तरी आणि नाचता नाचता पायाला भेगा पडल्या तरी पोराला शिकवायचंच, हा या माऊलीचा निश्चय...
लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्री काळे यांचा गौरव झालाय... पण, आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी केला होता अट्टाहास... तिच्या कष्टांची आज फुलं झालीत...
देलोडा (बु) ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे जंगली हत्याचा धुमाकूळ घातला आहे व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले त्याची माहिती मिळताच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी या गावाला भेट देऊन नुकसान झालेले शेतकरी देवराव कोडाप, आबाजी कोवे, योगाजी कोवे, श्यामराव सरपे, एकनाथ सरपे यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. तसेच किशोर म्हशाखत्री यांच्या इथं दही काल्याला निमित्त उपस्थिती दर्शविली. त्याच प्रमाणे जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली व त्यांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारले.*
यावेळी जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी वामनराव सावसाकडे, माजी सभापती तुलारामजी गेडाम, माजी पंचायत समिती सदस्य देवरावजी कोडाप, काँग्रेस कार्यकर्ता उद्धवजी हुलके, उपसरपंच देलोड प्रभाकर भोयर, काँग्रेस कार्यकर्ता जगदीश ढोलणे, वामन राऊत, भुपेश कोलते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रपूर,दि.२८- जनआक्रोश संघटना समाजिक कार्यात अग्रणी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. या कार्यात कुठलीही अडचण येऊ नये याकरिता जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभा राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.*
जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा वरोरा येथे आयोजित स्नेहसंमेलन व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. जनआक्रोश संघटनेकडून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना ‘विकासरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री संत तुकाराम महाराजांची गाथा ना. मुनगंटीवार यांना देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्य संघटक अविनाश काकडे, संस्थापक ॲड. अमोल बावणे, नरेंद्र पडाल, भाजपा वरोरा विधानसभा प्रभारी रमेश राजूरकर,जिल्हाध्यक्ष विनोद काळे, जिल्हा सचिव राजेंद्र मुगले, संजय बोधे, राहुल दडमल, कल्पनाताई क्षीरसागर, योगिताताई लांडगे, विलास खोड, मायाताई पेंदोर, भूपेंद्र बुरीले,राजमाता जिजाऊ फॉउंडेशनचे महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कार स्वीकारताना जनआक्रोश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. संताजी जगनाडे महाराजांचे जन्मस्थळ सुदुंबरे हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे उद्गार ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. राजकारणात मिळालेल्या जनसेवेच्या संधीमुळे शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलो याचे समाधान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्याचा मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून मच्छीमार बांधवांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याचा उल्लेख ना. श्री. मुनगंटीवार यांनी केला. मच्छीमार बांधवांकरिता विकासाची कामे करतानाच त्यांच्या अडचणी सोडविणे, संकटाच्या काळात त्यांना आधार देण्याचे देखील कार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माणुसकीचे विचार सर्वदूर प्रवाहित व्हावेत या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्या-छोट्या गावांमध्ये सभागृहांची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधक विशेषत: काँग्रेसकडून सुरू असलेल्या अफवांचाही त्यांनी समाचार घेतला. पुढील काळात योजना अधिक विस्तारीत होईल, पण बंद होणार नाही, असा विश्वास ना.मुनगंटीवार यांनी दिला.
दिं. २७ ऑगस्ट २०२४
गडचिरोली:- गडचिरोली शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडचिरोली लांजेडा/इंदिरानगर यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव अभिनव लाँन चंद्रपूर रोड गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी उपस्थिती राहुन समस्त जनतेला व बालगोपालांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या...
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,विश्व हींदु परिषदेचे रामायणजी खटी,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी,पत्रकार तिलोत्तमा हाजरा,हर्षल गेडाम,बंटीभाऊ खडसे,तसेच मोठ्या संख्येने बालगोपाल व नागरिक जनता उपस्थित होते. तसेच
विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड गडचिरोली, विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस षष्ठी पुर्ती वर्ष निमित्ताने दहीहंडी उत्सव देवकुले पटांगणात भव्य दिव्याच्या रोषणाईत मोठ्या आनंदोत्सवाने आयोजित करण्यात आले होते.
या दहीहंडी कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी उपस्थिती राहुन समस्त जनतेला व बालगोपालांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या...
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.गिताताई हिंगे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, सिमा कन्नमवार,आशिष रोहनकर, आशिष कोडापे,विरेंद्र बोपचे,अनुप असाटी,बालाजी भांडेकर,धनंजय सहादेवकर, सरदार,तसेच मोठ्या संख्येनी बालगोपाल, युवावर्ग,नागरिक जनता उपस्थित होते.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भाग असलेल्या महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील जाजावंडी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक मांत्तय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यात बेंडके सरांचा समावेश आहे.. कायम नक्षल्यांच्या वावर असलेल्या या गावातील शाळेत खुप कमी पटसंख्या होती.. मात्र बेंडके सरांनी या गावातील व लगतच्या गावातील पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली व शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली.. दिवसभर जंगलात हुंदडायची सवय असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून शाळेत नियमित येण्याची सवय रुजविली.. व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण केली... आज त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.. त्याबद्दल त्यांचें अभिनंदन
दि.२७ ऑगस्ट २०२४
गडचिरोली:- गडचिरोली लोकसभेच्या प्रभारी म्हणून आलेले अनुसुचित जाती/जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष मान.श्री.फग्गनसिंहजी फुलस्ते यांचे गडचिरोली येथे आगमनाने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते तसेच सपत्नीक सौ.अर्चना नेते यांच्यासह निवासस्थानी त्यांचे औक्षवंत करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,अविनाश विश्रोजवार,महादेव पिंपळशेंडे,यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत उपस्थित होते.
याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध समस्या संबंधित निवेदन सादर करत चर्चा करण्यात आली.
गडचिरोली:
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चौत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३४ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी ॲड. पी. डी. काटकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "स्वप्नमय वास्तव" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुंडलिक धर्माजी काटकर हे गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी असून ते 'माणिकपूत्र' या टोपणनावाने कविता लिहीतात. त्यांचे 'मुल्य संस्कार गीते' व 'कळा या लागल्या जीवा' हे कवितासंग्रह प्रकाशित असून, 'असाही एक जोडीदार' कादंबरी, 'कथा आणि व्यथा' कथासंग्रह, व 'जीवनगाणी' हा काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या चौतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे, कृष्णा कुंभारे, प्रेमिला अलोने, मधुकर दुफारे, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर, राजेंद्र यादवराव सोनटक्के, वामनदादा गेडाम, पुनाजी कोटरंगे, तुळशीराम उंदीरवाडे, केवळराम बगमारे, अजय राऊत, ज्योत्स्ना बन्सोड, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, मुरलीधर खोटेले, माधुरी आमृतकर, पुरुषोत्तम दहिकर, कृष्णा कुंभारे, प्रिती ईश्वर चहांदे, वकिल शेख, रेखा दिक्षित, वसंत चापले, पी. डी. काटकर, डॉ. मंदा पडवेकर, वंदना सोरते, विलास टिकले, सुरेश गेडाम, सोनाली रायपुरे, उकंडराव नारायण राऊत, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम लेनगुरे, खुशाल म्हशाखेत्री, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. असे चुडारामजी बल्लारपूर यांनी कळवले आहे.
गडचिरोली:
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चौत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३४ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी ॲड. पी. डी. काटकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "स्वप्नमय वास्तव" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुंडलिक धर्माजी काटकर हे गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी असून ते 'माणिकपूत्र' या टोपणनावाने कविता लिहीतात. त्यांचे 'मुल्य संस्कार गीते' व 'कळा या लागल्या जीवा' हे कवितासंग्रह प्रकाशित असून, 'असाही एक जोडीदार' कादंबरी, 'कथा आणि व्यथा' कथासंग्रह, व 'जीवनगाणी' हा काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या चौतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे, कृष्णा कुंभारे, प्रेमिला अलोने, मधुकर दुफारे, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर, राजेंद्र यादवराव सोनटक्के, वामनदादा गेडाम, पुनाजी कोटरंगे, तुळशीराम उंदीरवाडे, केवळराम बगमारे, अजय राऊत, ज्योत्स्ना बन्सोड, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, मुरलीधर खोटेले, माधुरी आमृतकर, पुरुषोत्तम दहिकर, कृष्णा कुंभारे, प्रिती ईश्वर चहांदे, वकिल शेख, रेखा दिक्षित, वसंत चापले, पी. डी. काटकर, डॉ. मंदा पडवेकर, वंदना सोरते, विलास टिकले, सुरेश गेडाम, सोनाली रायपुरे, उकंडराव नारायण राऊत, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम लेनगुरे, खुशाल म्हशाखेत्री, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. असे चुडारामजी बल्लारपूर यांनी कळवले आहे.
देसाईगंज :- आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात एस सी एस टी ओबिसींच्या संवैधानिक अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी सातत्याने लढा उभारणाऱ्या प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना बळ देण्यासाठी सर्व समाज घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम यांनी केले. देसाईगंज येथिल सिंधु भवन येथे आरमोरी विधानसभा क्षेञातिल वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष बाळु टेंभुर्णे, विधानसभा प्रभारी तथा जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, जिल्हा संघटक भिमराव शेन्डे, जि. के. बारसिंगे, योगेन्द्र बांगरे, विलास केळझरकर, कवडु दुधे, नर्मदा मेश्राम, कोरची तालुका अध्यक्ष सुदाराम सहारे, अशोक कऱ्हाडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष तुळशिराम नंदेश्वर, आरमोरी तालुका अध्यक्ष जगदिश दामले, देसाईगंज तालुका अध्यक्ष विनोद मेश्राम, आशिष घुटके, एन. आर. रामटेके, उद्धवराव खोब्रागडे, नानाजी कऱ्हाडे, लक्ष्मण नागदेवते, प्रविन रामटेके, उमाकांत बन्सोड, जगन बन्सोड, अभिमन्यु बन्सोड, शिवाजी मेश्राम, विनोद लांजिकर, ज्योती दहिकर यांचेसह वंचित बहुजन आघाडिचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्याला संबोधित करतांना कुशलभाऊ मेश्राम म्हणाले की, कॉंग्रेस व भाजप सातत्याने एससी एसटी ओबिसींची दिशाभुल करुन आरक्षण संपविण्याचे काम करित आहे. लोकसभा निवडनुकित भाजप ने संविधाम बदलायचे आहे, असे वातावरण निर्माण केले तर कॉंग्रेस ने या देशाचे संविधान वाचवायची ही शेवटची संधी असल्याचा भ्रम निर्माण केला. आंबेडकरी समाजाने या देशाचे संविधान वाचवायचे आहे म्हनुण न मागता कॉंग्रेस ला मतदान केले, जेव्हा सर्वोच्छ न्यायालयाने एससी एसटी आरक्षणाचे वर्गिकरण करण्याचा व क्रिमिलेयर लावण्याचा निर्णय जाहिर केला त्याची अमलबजावणी कॉंग्रेस ची सत्ता असलेल्या कर्णाटक व तेलंगाना राज्य सरकारने केली मग कॉंग्रेस पक्ष एससी एसटीं चा हितचिंतक कसा असु शकतो असा सवालही या प्रसंगी उपस्थित केला.
वंचित बहुजनांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सातत्याने लढा उभारत असुन ओबिसींच्या आरक्षणात मराठ्यांनी ढवळाढवळ करु नये यासाठी ही लढा उभारत आहेत आरमोरी विधानसभा क्षेञात वंचित बहुन आघाडी चा आमदार निवडुन देऊन बाळासाहेब आंबेडकरांना बळ द्यावे असे आवाहन ही या प्रसंगी केले.
या कार्यक्रमात अनिल दहलानी सरिता भैसारे यांचेसह ३० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सोबतच आंबेडकरी चळवळित सतत कार्य करणाऱ्या ४० वयोव्रूद्ध कार्यकर्त्यांचा शाल श्रिफळ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक मेश्राम व आभार प्रदर्शन शिवदास बन्सोड यांनी केले.
आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 ला युनिव्हर्सल कॉन्व्हेंट ब्रह्मपुरी रोड वडसा येथे लेखकांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे ज्येष्ठ नाट्य कलावंत, प्राध्यापक सदानंद बोरकर, विशाल तराळ, मुकेश गेडाम हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सतीश पावडे, महेंद्र सुके, प्रेम कुमार खोब्रागडे, किशोर मेश्राम यावेळी उपस्थिती दर्शवली होती.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर अष्टपैलू कलावंत सुनील अष्टेकर यांना श्रद्धांजली वाहून मोन पाळुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदिका म्हणून ममता गोंगले ह्या होत्या तसेच सूत्रसंचालक म्हणून युवराज गोंगले यांनी कार्यभार पाहिला होता. या कार्यशाळेमध्ये संतोष बारसागडे, धनंजय ढवळे, किशोर भाग्यवान, जितू उपाध्याय, सुनील चडगुलवार, दादाजी चुधरी, वसंत चापले, उपेंद्र रोहणकर, प्रकाश लाडे, बाळकृष्ण ठाकूर त्याचबरोबर अनेक लेखकांनी या कार्यशाळेला उपस्थिती दर्शवली होती.
झाडीपट्टी लेखक असोसिएशन तर्फे लेखकांचे उद्बोधन होऊन त्यांच्यातील प्रतिभेला आणि लेखन शैलीला वेगळी एक भरारी मिळावी याकरिता आणि नाट्य लेखन करण्याच्या पद्धती मध्ये सुधारणा व्हावी तसेच ते राज्यस्तरावर घेऊन जाण्यात लेखक वर्गाचा मोलाचा वाटा असतो त्याकरिता लेखकांनी आपल्या पद्धतीने ते करावे असे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच लेखकांची कार्यशाळा आहे. असे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यावेळी आवर्जून सांगितले. नाट्य लेखन कसे करावे आणि नाट्यसंहिता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले.
गडचिरोली -: आजचा युवक हा भरकटलेला आहे. तो जुन्याच आडवाटेने प्रवास करतो आहे.बदलाची गरज ती वाट जर सरळ आणि निश्चित ध्येयाकडे जाणारी निवडल्यास यश तुमचेच आहे. महा.अनिसच्या खुर्सा शाखेने घेतलेल्या शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रा. तिलेश मोहुर्ले,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुर्सा येथील सरपंचा मंजुळाबाई पदा ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे प्रशांत रामटेके पोलीस पाटील,मा. विलास निंभोरकर राज्य सहकार्य वैज्ञानिक जाणीवा व शिक्षण प्रकल्प महा.अनिस, प्रा. विलास पारखी सर्पतज्ञ, विठ्ठलराव कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष .पत्रकार सोपानदेव म्हशाखेत्री उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उपेंद्र रोहनकर.यांनी केले प्रथमतः शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय पाहुण्यांनी फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर अनिस चळवळीची भूमिका व समाजात होऊन गेलेल्या संत विचारांची परंपरा मांडताना विलास निंभोरकर यांनी सांगितले की लोकांनी प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.समाजात बुवा बाबाची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली आहे.त्याला भोळाभाबडा समाज फसत असतो.त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकामध्ये विवेकवादी विचार असले पाहिजेत.तर प्रा. पारखी सरांनी पावसाळ्यात सापापासून कोणती काळजी घ्यायची. साप हा आपला शत्रू नसून आपला मित्र आहे. हे लोकांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश झंजाळ,रवींद्र बावणे, दामोदर मेश्राम, रामचंद्र निलेकार, जाणू धुळसे, अविनाश सालोडकर, तुळशीराम दाणे, उद्धव रामटेके, विशाल मेश्राम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार संदीप आंबोरकर ह्यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठया संख्येनी उपस्थित होते.
दिनांक २३ ऑगस्ट गडचिरोली
कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता हा आपल्या पक्षाला वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो परंतु तो जर प्रशिक्षित नसेल तर त्या पक्षाची वाढ होण्यास व पक्ष मोठा होण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे पक्षाला मोठे करण्यासाठी कार्यकर्त्याने प्रशिक्षित होण्याची आवश्यकता असून त्या प्रशिक्षणातूनच कार्यकर्त्यालाही मोठे होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या प्रास्ताविक प्रसंगी केली. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून पूर्व संघ प्रचारक प्रख्यात वक्ते अमोलजी पुसदकर तसेच भारतीय विचार मंचाचे क्षेत्र संयोजक पूर्व संघ प्रचारक सुनीलजी किटकरू प्रामुख्याने उपस्थित होते.
*यावेळी मंचावर लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे , भाजपा ज्येष्ठ नेते किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भूरसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्रजी ओलारवार, जिल्ह्याच्या महामंत्री सौ योगिताताई पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर, धानोरा तालुक्याच्या अध्यक्षा सौ लताताई पुंगाटी, प्रामुख्याने उपस्थित होते.