PostImage

सुपर फास्ट बातमी

March 6, 2024   

PostImage

ईव्हीएमविरोधात गोंडपिपरीत उतरले हजारो नागरिक रस्त्यावर


 

 

गोंडपिपरी : ईव्हीएम हटाव, देश बचाव म्हणत सोमवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी गोंडपिपरीमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर करू नये, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

गोंडपिपरी तालुक्यातील ओबीसी कृती समिती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना

 

गणतंत्र पार्टी, सीआयटीयू, एआयटीयू, भारतीय बौद्ध महासभा, निवृत्त कर्मचारी संघटना, शिक्षण रोजगार बचाव समिती, शासकीय कंत्राटी कर्मचारी संघ यांच्यासह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी या मोर्चासाठी पुढाकार घेतला. ईव्हीएम हटाव, जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, क्रीमिलेअरची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.