PostImage

VAINGANGA NEWS 24

July 28, 2023   

PostImage

पंचायत समितीच्या गैरकारभाराविरुद्ध भरपावसात नागरिकांचे धरणे आंदोलन


महेंद्र सुल्वावार वार्ताहर

एटापल्ली:  येथील पंचायत समिती प्रशासनातील अनागोंदी कारभार, पेट्रोल पंपवरील असुविधा व पेट्रोल, डिजल विक्री नफा रक्कमेतील भ्रष्टाचाराची चौकाशी करण्याच्या मागणी घेऊन भर पावसात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम व नागरिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार पी व्ही चौधरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
          पंचायत समिती मार्फत नागरीकांना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभाच्या योजना केवळ कागदावर पूर्ण झाल्याचे दाखवून विकास निधी हडप केल्याचा संशय आंदोलकांनी व्यक्त केला आहे, ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना, आदिम जमाती कल्याण योजना, दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा वार्षिक नियोजनाच्या योजना, पंचवीस, पंधरा वित्त आयोग योजना, पाच टक्के अबंध निधी योजना व रोजगार हमी सिंचन विहीर योजनांमधून झालेल्या कामांच्या अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, नोटशीट, मंजूर निधी व अदा केलेले बिले अशा दस्ताऐवजाची तपासणीची मागणी करण्यात आली असून विकास सर्व्हिस स्टेशन या नावाने गेली आठरा वर्षापासून चालविले जाणारे पेट्रोलपंपच्या पेट्रोल, डिजल विक्रीतुन झालेल्या नफा रक्कमेत घोळ करून भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोपही आंदोलकांनी निवेदनातून केला आहे. 


             त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाहीची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम, माजी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गंपावार, व्यापारी संघटना अध्यक्ष महेश पुल्लूरवार, भाकपा तालुका सचिव सचिन मोतकुलवार, रविंद्र रामगुंडेवार, लक्ष्मण नरोटे, तुलसीदास गुडमेलवार, श्रीनिवास कंबगौनीवार, उपेश सुरजगाडे, अनिल बुग्गावार, प्रा. विनोद पत्तीवार विशाल ओडपल्लीवार, विशाल बाला, कृष्णा उप्पलवार, प्रफुल आईलवार, शुभम वन्नमवार, भगवान चापले, रुपेश सोनी, दिलीप पुपरेड्डीवार, नरेश गाईन, बाबुराव मंडल, विजय नगराळे अमजतखा पठाण, महानंदा मंडल, रामप्रसाद बिश्वास, विनोद चव्हाण, रामदास नाडमवार, शिवचरण टोप्पो, निलेश गंपावार, मनोज मजुमदार, अजय बिश्वास, महानंदा मंडल, नरेश गाईन, चेतन दुर्गे, नित्यानंद दास, राजेंद्र सोनूले, भ्रिगु सरकार, संजय बिश्वास व आंदोलक नागरिकांनी निवेदनातू केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे,