पोलिस स्टेशन शेगाव (बू) येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांचा अनोखा सामाजिक उपक्रम
प्रमोद राऊत खडसंगी :-
पोलिस स्टेशन शेगाव (बू) येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान करून आदरांजली वाहिली. ठाणेदार अविनाश मेश्राम हे नेहमीच सामाजिक उपक्रम शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत राबवित असतात. बहुजन समाजातील मुल शिकून पुढे मोठया पदावर गेली पाहिजेत हा उद्देश नेहमी ठाणेदार अविनाश मेश्राम हे डोळ्यासमोर ठेऊन वेगवेगळे सामाजिक अनोखे उपक्रम राबवित असतात आज सुद्धा महात्मा फुले यांची पुणयतिथी असून या दिनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
यावेळी श्रीकांत येकुडे यांनी आधुनिक शेती करून उत्पन्न कसे वाढवावे यावर मार्गदर्शन केले. त्यांनी भारत हा कृषिप्रधान देश असून 75% लोक हे शेतीवर अवलंबून आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारल्या शिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. शेतकरी यांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहावे, स्वतःची बाजारपेठ तयार करावी, एक पीक पद्धती न राबवता बहु पीक पद्धती राबवावी जणे करून एक पिकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकामुळे नुकसान भरून काढता येईल. पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करावी, सोबतच शिकणाचे महत्व सांगून शेती बद्दल वाचन करून सरकारी योजना चा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले.
प्रा संजय बोधे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती बद्दल काय विचार होते, त्यानी शेतकरीसाठी त्यांचे लिखाणात लिहून ठेवलेले याबदल सर्विस्तर माहिती दिली. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समज आणि गैरसमज या वर मार्गदर्शन करून बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत देशातील लोकांसाठी कसे कार्य केले यावर मार्गदर्शन केले. तर ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी फुले शाहू आंबेडकर यांचे कार्य अनमोल असून त्यांचे विचाराने आपण आपली प्रगती करून समाजाची सुध्दा सेवा करू शकते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पाटील कोटबाळा येथील नीभ्रट यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलिस पाटील राळेगाव थुल यांनी मानले. कार्यक्रम चे आयोजन पोलिस स्टेशन शेगाव बु, सर्व पोलिस पाटील शेगाव बू, शांतता कमिटी शेगाव बू यांनी केले