चिमूर प्रतिनिधी :-
आज दि 16/11/2023 ला "वन परिक्षेत्र अधिकारी ( प्रादेशिक) कार्यालय चिमूर ब्रह्मपुरी वनविभाग" यांना खडसंगी परिसर मध्ये होत असलेल्या वन्यजीव व मनुष्यजीव , तसेच पाळीवप्राणी संघर्ष त्यामुळे होणारी जीवितहानी, वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान यावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच नुकत्याच वाहनगाव शेतशिवारात सुभाष दोडके यांच्या शेतात दोन वाघांच्या झुंजी मध्ये एक वाघ मृत पावला त्यामुळे त्या परिसरात दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या स्थितीत शेतात कापूस वेचणी सुरू आहे, खडसंगी परिक्षेत्र मध्ये बेंबडा गावात 8 दिवसा अगोदर ईश्वर हजारे हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात मरण पावला, मसळ परिसरातील विहीरगाव येथे पण वाघाच्या हल्ल्यात शेतकरी मृत पावले, तसेच बैल, मैस, गाय, शेळी नेहमीच वाघाच्या हल्ल्यात मारल्या जात आहे. याकडे वन विभागाने जातीने लक्ष देऊन अश्या घटना पुन्हा होणार नाही यासाठी विशेष बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली
यावेळी सुभाष दोडके, शंकर ननावरे, गौरव दोडके, निकेश मसराम, कान्हाजी सावसाकडे, राजू कुलमेटे, अविनाश दोडके, दशरथ सवसाकडं, रोशन गुळध्ये, संकर दडमल, गजानन गायकवाड