माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला संदेश दिला होता, 'जय जवान, जय किसान देशाचे रक्षण करायला जवानांची जितकी जास्त गरज आहे, तितकेच देशाचे पोषण करायला शेतकऱ्यांची गरज आहे, असा हा शेतकरी नसता तर... शेतकरी शेतात एकट्याने राबतो, घाम गाळून शेत पिकवतो, म्हणूनच आपण सर्वजण पोटभर अन्न खातो, शेतकर्यांनी शेतात धान्य पिकवलेच नाही, तर आपण काय खाल्ले असतो? आपली जमीन भाजुन काढतो, नागरतो, नंतर जमिनीत पेरतो, वेळोवेळी या जमिनीची तहान भागवतो, तिला पाणी देतो, म्हणूनच तर ती पीक देतो, शेतकरी नसेल तर या भूमीची सेवा कोण करणार? नुसती पेरणी करून शेतकऱ्यांचे काम संपत नाही, पिकावर करडे पडेल, रोगराई येईल, म्हणून तिची काळजी घ्यावी लागते,पीकाबरोबर वाढणारे तन त्याला काढून टाकावे लागतात, तेव्हाच पीक वाढू लागतात शेतकरी नसेल तर ही काळजी कोण घेणार? शेतकरी शेताबरोबर गुरेही सांभाळतात, बैल त्यांचे सहकारी असतात, त्यांच्या कष्टावरच शेत फुलत असते, त्यांच्या गोठ्यातील गाई -म्हशी दूध, दही,लोणी, देतात, शेतकरी त्याची काळजी घेतो, त्यांना चारा देतो, शेतकरी नसेल तर हे निष्पाप प्रेम कोण करील! 🙏🙏🙏🙏