PostImage

सुपर फास्ट बातमी

April 17, 2024   

PostImage

हातावरची मेहंदी पुसण्याआधी विवाहितेने संपविले जीवन,


 

 

 

 

आरमोरी: लग्नानंतर अकराव्या दिवशीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिवणी (बुज) येथे मंगळवारी घडली. मोनाली जगदीश ढोरे (वय २२ वर्षे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

 

 

शिवणी येथील जगदीश ढोरे यांचा विवाह भंडारा जिल्ह्यातील गौराळायेथील मोनाली संजय शहारे हिच्याशी ५ एप्रिलला झाला होता. शिवणी येथे जगदीशच्याच घरी दोघांनी आप्त स्वकियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. विवाह समारंभ आटोपल्यानंतर मोनाली ही माहेरवरून सासरी शिवणी येथे नांदायला आली.

 

सुखी संसाराचे स्वप्न रंगवून दोघांनीही आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. मात्र, १६ रोजी पहाटे मोनाली हिने घरातील आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण कळू शकले नाही.

 

आरमोरी पोलिसांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 31, 2024   

PostImage

प्रा. अभिषेक दुर्गे यांची पर्यावरण सेंद्रिय रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान या …


रुमदेव सहारे सहसंपादक

आरमोरी :-

चामोर्शी येथील रहिवासी प्रा.अभिषेक ईश्वर दुर्गे यांची 'पर्यावरण सेंद्रिय रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान' या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.  ही परिषद एप्रिल 2024 मध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे सात दिवस चालणार आहे. 9 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान मुंबई येथे झालेल्या 'आंतरराष्ट्रीय रसायन विज्ञान आणि शिक्षण परिषदे'मध्ये सहभागी होऊन संपूर्ण टीमचे लक्ष वेधून घेतले.  त्यांचे शोधनिबंध प्रदर्शित करणे.  या परिषदेनंतर त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद व्हावी यासाठी एप्रिल महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

 प्रा.अभिषेक दुर्गे हे मूळचे चामोर्शीचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण मुलचेरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.  गडचिरोली जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे इयत्ता 5 वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण आणि 6 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.  पुढील शिक्षण नागपुरात बी.एस्सी.  आणि पुढे 2021 मध्ये रसायनशास्त्रात एम. एस्सी 2022 मध्ये NET आणि 2023 मध्ये SET उत्तीर्ण होऊन संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठात वयाच्या 25 व्या वर्षी पदव्युत्तर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.  सध्या प्रा.अभिषेक दुर्गे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

 त्यांनी केलेल्या सर्व कार्याचे श्रेय त्यांचे पालक, मुख्याध्यापक आणि सर्व सहाय्यक कर्मचारी आणि मित्रांना देत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 31, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेत …


रुमदेव सहारे सहसंपादक 

गडचिरोली :- लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व लहान वयातच विद्यार्थी खेळांच्या  प्रवाहात येऊन  मजबुत व्हावे यासाठी दरवर्षी महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होत असते ज्यामध्ये ८,१० व  १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांना अँथलेटिक्स क्रीडाप्रकारातील रनिंग,लांबउडी ,गोळाफेक ऊंचउडी या खेळात आवळ निर्माण व्हावी व त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या देशाचे भावी स्टार खेळाडू बनावे ही बाब ओळखुन  अँथलेटिक्स सारख्या खेळात तालुका, जिल्हा, राज्य व  देशाचे प्रतिनिधित्व करून आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत दि.९ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला सांगली येथे राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेची निवड चाचणी दि.२८ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स क्षेत्रातील सेमान बायपास रोड स्थित संजीवनी ग्राउंड येथे सकाळी ९:०० वाजता गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे पार पडली या  राज्यस्तरीय सबज्युनिअर निवड चाचणीत ८ वर्षाआतील मुलांच्या गटात ५० व १०० मीटर रनिंग मध्ये प्रथम देवदीप जुआरे तर ५०मीटर रनिंग मध्ये  सत्यम करोडकर दुतीय व १०० मीटर रनिंग मध्ये  अथांग दुर्गम हा दुतीय , स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये  निखिल चौके प्रथम तर सूर्यांश म्हशाखेत्री  दुतीय, बॉल थ्रो मध्ये इंद्रावर्धन असमवार प्रथम तर युवराज देशमुख दुतीय ८ वर्षाआतील मुलिंच्या गटात ५०मीटर रनिंग मध्ये दिशा कालबांध्ये प्रथम तर अनन्या नैताम दुतीय ,१०० मीटर रनिंग मध्ये अनवी चौके प्रथम तर संबोधी पिपरे दुतीय स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये दिशा कालबांध्ये प्रथम चेतना जुआरे दुतीय तर १० वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये आदित्य ठेंगरी प्रथम देवांश देशमुख दुतीय ,१०० मीटर रनिंग मध्ये सारंग केळझलकर प्रथम तर प्रथमेश कुकडकर दुतीय  स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये मैत्रेय टेंम्बुर्णे प्रथम तर सारंग केळझलकर दुतीय, गोळाफेक मध्ये तिवान पोहनकर प्रथम तर आदित्य ठेंगरी दुतीय १० वर्षाआतील मुलींच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये हार्दीकी माने प्रथम तर प्रहा गेडाम दुतीय १०० मीटर रनिंग मध्ये रितिका गरमळे प्रथम तर सारा करावते दुतीय ,स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये सारा करावते प्रथम तर अधवी नागुलवर दुतीय गोळाफेक मध्ये प्रहा गेडाम प्रथम तर गिजिरी माने दुतीय तर १२ वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये जितेंद्र आत्राम प्रथम तर अनय मडावी दुतीय ,३०० मीटर रनिंग मध्ये अंशु गडपल्लीवार प्रथम तर जितेंद्र आत्राम दुतीय,लांबउडी मध्ये चिराग नासकोल प्रथम तर चिराग पारधी दुतीय ,उंचउडी मध्ये चेतस भांडेकर प्रथम तर मोहित गेडाम दुतीय  गोळाफेक मध्ये जितेंद्र आत्राम प्रथम तर  रोहित आत्राम दुतीय तर १२ वर्षाआतील मुलींच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये रुचिता राऊत प्रथम तर सनाया करोडकर 

दुतीय तर ३०० मीटर रनिंग मध्ये संघवी कापकर प्रथम तर युक्ती सोरते दुतीय लांबउडी मध्ये दिशीता माने प्रथम तर टीना नैताम दुतीय उंचउडी मध्ये टीना नैताम प्रथम तर सारा बोकडे दुतीय तर गोळाफेक मध्ये संघवी कापकर प्रथम तर दिशा सलामे दुतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनात क्रीडा समन्वयक म्हणून राहुल जुआरे सर ,मृणाली सराफ मॅडम यांनी सहकार्य केले याप्रसंगी शेकडो पालक उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 29, 2024   

PostImage

खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद


रुमदेव सहारे सहसंपादक

वैरागड - दि. 25 जानेवारी 2024 रोज गुरुवारला श्री किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथे " राष्ट्रीय मतदान दिन व गणराज्य दिनाच्या पूर्वसंधेचे औचित्य साधून " वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रम " घेण्यात आले.

  या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य धर्मेंद्र जनबंधू सर, तर प्रमुख अतिथी म्हणून  प्रा. डाँ. विलास मेश्राम, प्रा. धारगावे सर, प्राचार्य विवेक हलमारे, प्रा. एस. पी. बन्सोड, प्रा. प्रकाश म्हशाखेत्री, प्रा. महेश बोदेले, प्रा. बर्वे, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले  तसेच स्वागत गीताने पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. " राष्ट्रीय मतदान दिन " निमित्त विध्यार्थ्याकडून शपथ घेण्यात आली.  वार्षिक स्नेह संमेलन हे विध्यार्थ्यांचे सुप्त कलागुणांनातील  एक आदर्श व्यासपीठ होय असे उप प्राचार्य  धर्मेंद्र जनबंधू यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन  प्रा. मनिष राऊत, तर प्रास्ताविक प्रा. अमोल नैताम  तर प्रा. नरेश लाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.तसेच विध्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी  दयानंद कुमरे, व  शिवशंकर पाटील यांनी सहकार्य केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024   

PostImage

बाळशास्त्री जांभेकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करावी:-भाग्यवानजी खोब्रागडे यांचे …


रुमदेव सहारे सहसंपादक

आरमोरी:-      

          मराठी  पत्रकारितेतील जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सर्वप्रथम दर्पण हे वृत्तपत्र काढून वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून नाव मिळविले  त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी आजही पत्रकारितेच्या क्षेत्रात चांगले कार्य करावे आणि पत्रकारांविषयीची आस्था आहे ती समाजाला दिशादर्शक ठरावी असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री भाग्यवानजी खोब्रागडे यांनी केले                                         दिनांक 6 जानेवारी रोजी आरमोरी येथे वनविभागाच्या विश्रामगृहात तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या सोहळ्याला अध्यक्ष स्थानावरून बोलत होते सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा सोहळा पत्रकार दिन म्हणून सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साजरा केला जातो. समाजातील अन्याय अत्याचार घडणाऱ्या घडामोडी ह्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे खरे कार्य हे पत्रकार करीत असतात त्यांना खूपच  अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाऊन आपली लेखणी धारदार ठेवून लिखाण करीत असतात त्यामुळे वंचित व सर्वसामान्य नागरिकांना त्या माध्यमातून न्याय मिळतो त्यामुळेच आजही  पत्रकारितेचे अस्तित्व या देशात टिकून आहे असेही भाग्यवानजी खोब्रागडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले
           या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप मंडलिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आमिष जी निमजे  आणि आरमोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अनिल सोमनकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत धोटे, संचालन प्रशांत झिमटे तर आभार आकाश चिलबुले  यांनी मानले.
            या पत्रकार दिनाचे औचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रमुख अतिथींनी प्रकाश टाकला. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला आरमोरी तालुका पत्रकार संघाचे सदस्य श्री. हरेंद्रजी मडावी, रूपेश गजपुरे, अमरदीप मेश्राम, महेंद्र रामटेके, सुनील नंदनवार, विलासजी गोंधळे, प्रवीण रहाटे,  रूमदेव सहारे आदी पत्रकार मंडळी उपस्थित होते


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 3, 2024   

PostImage

महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरीच्या ग्रामोन्नती करिता युवक संकल्पनेच्या शिबिराचे उदघाटन


रुमदेव सहारे सहसंपादक 

आरमोरी :-

           गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली  अंतर्गत महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.प.वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन जि. प. माध्य. केंद्र शाळा जोगीसाखरा येथे संपन्न झाला.
             ग्रामोन्नती करिता युवक व अंधश्रद्धा निर्मूलन संकल्पना स्वीकारून आठ दिवशीय रा. से. यो. शिबीर दि 03 जानेवारीला बालिका दिनाच्या औचित्याने रा. से. यो. शिबाराचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोजभाऊ वनमाली, उदघाटक सरपंच संदीपभाऊ ठाकूर, प्रमुख पाहुणे मा. हरिरामजी वरखडे माजी आमदार, दिलीप घोडाम अध्यक्ष गुरुदेव जंगल कामगार संस्था जोगीसाखरा उपस्थित होते.
         शिबिराचे सूत्र संचालन प्रा. कु. नागदेवे, प्रास्ताविक प्राचार्य खालसा  व आभार रा. से. यो अधिकारी प्रा.सोनटक्के यांनी केले.


PostImage

Rushi Sahare

Oct. 20, 2023   

PostImage

Armori News : बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम


 

आरमोरी -
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन, दिल्ली आणि अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील २५ गावांमध्ये १६ आक्टोंबर बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून  शपथ देणे, रॅली काढणे तसेच गावातील महिला, युवक, युवती यांचे सहकार्याने कॅंडल मार्च काढणे, जेणेकरून गावातील लोकांना बाल विवाहाचे दुष्परिणाम काय आहेत, मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी करू नये तसेच मुलाचे लग्न २१ वर्षांपूर्वी करू नये याची माहिती व्हावी व बाल विवाह प्रथेला आळा बसावा. बाल विवाह मुक्त भारत अभियानात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,पेसा मोबिलायझर, उमेद प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन अकिल शेख सचिव-अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्ये निकेश ताडाम,  प्रेमिला कुमोटी, मंदिरा किरंगे यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Archana Dhoble

Sept. 29, 2023   

PostImage

कुत्रा चावल्यावर काय करावे


 

कुत्रा चावल्यावर काय करावे

कुत्रा चावणे हा एक सामान्य आघात आहे जो कोणालाही होऊ शकतो. कुत्रा चावल्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून ते रेबीजसारख्या गंभीर आजारांपर्यंत विविध समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, कुत्रा चावल्यास योग्य प्रथमोपचार घेणे महत्त्वाचे आहे.

कुत्रा चावल्यानंतर प्रथमोपचार

कुत्रा चावल्यानंतर खालील प्रथमोपचार घ्या:

जखम स्वच्छ करा. जखमेवरून कुत्र्याचे रक्त आणि लाळ धुण्यासाठी साबण आणि स्वच्छ पाणी वापरा. जखम चांगली धुतल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव होतो.

रक्तस्त्राव थांबवा. जर जखमातून रक्त वाहत असेल तर ते थांबवण्यासाठी दाब द्या. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तुम्ही बर्फ किंवा टॉवेलचा वापर करू शकता.

जखमेवर बॅंडेज लावा. जखमेवर बॅंडेज लावल्याने जखमेला संसर्ग होण्यापासून रोखते.

डॉक्टरांशी संपर्क साधा. कुत्रा चावल्यानंतर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टर जखमेची तपासणी करतील आणि आवश्यक असल्यास औषधे किंवा लस देतात.

कुत्रा चावल्यानंतरचे अतिरिक्त उपाय

कुत्रा चावल्यानंतर खालील अतिरिक्त उपाय देखील करू शकता:

जखमेवर अँटीसेप्टिक लावा. जखमेवर अँटीसेप्टिक लावल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव होतो.

जखमेवर वेदनाशामक औषधे घ्या. जर जखमांमुळे तुम्हाला वेदना होत असतील तर वेदनाशामक औषधे घ्या.

जखमेवर ऍलोवेरा जेल लावा. ऍलोवेरा जेलमुळे जखम बरी होण्यास मदत होते.

कुत्रा चावल्यानंतर काय करू नये

कुत्रा चावल्यानंतर खालील गोष्टी करू नका:

जखमेवर दाब देऊ नका. जखमेवर दाब देऊ नका कारण यामुळे रक्तस्त्राव वाढू शकतो.

जखमेवर मलमपट्टी लावू नका. जखमेवर मलमपट्टी लावल्याने जखम खराब होऊ शकते.

जखमेवर गरम पाण्याचा लेप लावू नका. गरम पाण्याचा लेप लावल्याने जखमातून रक्तस्त्राव वाढू शकतो.

कुत्रा चावण्यापासून बचाव

कुत्रा चावण्यापासून बचाव करण्यासाठी खालील गोष्टी करू शकता:

जर कुत्रा तुम्हाला चावायला आला तर शांत राहा आणि जवळपासून पळून जा.

निष्कर्ष

कुत्रा चावणे हा एक गंभीर आघात आहे. योग्य प्रथमोपचार घेतल्यास कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या धोक्यापासून बचाव होऊ शकतो.


PostImage

Archana Dhoble

Sept. 27, 2023   

PostImage

मी माझ्या पाळीव प्राण्यांचे रेबीजपासून संरक्षण कसे करू शकतो?


 
 
मी माझ्या पाळीव प्राण्यांचे रेबीजपासून संरक्षण कसे करू शकतो?

रेबीज हा एक जीवघेणा संसर्गजन्य रोग आहे जो प्राण्यांपासून मनुष्यांमध्ये आणि मनुष्यांपासून प्राण्यांमध्ये पसरू शकतो. रेबीज विषाणूमुळे होतो जो प्राण्यांच्या तोंडात किंवा नाकात असलेल्या लाळेद्वारे प्रसारित होतो. रेबीज झालेल्या प्राण्याने चावल्यास किंवा खरोखर चावल्यास रोग होऊ शकतो.

आपल्या पाळीव प्राण्यांचे रेबीजपासून संरक्षण करण्यासाठी आपण खालील गोष्टी करू शकता:

आपल्या पाळीव प्राण्याला रेबीज लसीकरण करून घ्या. रेबीज लसीकरण हे रेबीजपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. लसीकरण सहसा पाळीव प्राण्याला तीन महिन्याच्या वयात सुरू होते आणि नंतर प्रत्येक वर्षी पुन्हा केले जाते.
आपल्या पाळीव प्राण्याला बाहेर जाताना देखरेखीखाली ठेवा. आपल्या पाळीव प्राण्याला अज्ञात प्राण्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
जर आपल्या पाळीव प्राण्याला चावले गेले असेल, तर ताबडतोब पशुवैद्याशी संपर्क साधा. पशुवैद्य आपल्या पाळीव प्राण्याला रेबीजचा उपचार देऊ शकतो किंवा त्याला रेबीज लस देऊ शकतो.
रेबीजपासून संरक्षण करण्यासाठी आपण खालील गोष्टी देखील करू शकता:

आपल्या पाळीव प्राण्याला इतर पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा जे रेबीज झाले असल्याचे निदान झाले आहे.
आपल्या पाळीव प्राण्याला रस्त्यावर कधीही सोडू नका.
जर आपल्याला रस्त्यावर रेबीज झालेल्या प्राण्याचा सामना करावा लागला तर त्यापासून दूर राहा.
रेबीज हा एक गंभीर रोग आहे, परंतु योग्य खबरदारी घेऊन आपण आपल्या पाळीव प्राण्यांना आणि स्वतःला यापासून संरक्षित करू शकता.

येथे काही अतिरिक्त टिपा आहेत ज्या आपल्याला आपल्या पाळीव प्राण्यांचे रेबीजपासून संरक्षण करण्यात मदत करू शकतात:

आपल्या पाळीव प्राण्याला दररोज शारीरिक तपासणी करा. जर तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यामध्ये कोणतीही असामान्य लक्षणे दिसली, तर ताबडतोब पशुवैद्याशी संपर्क साधा.
आपल्या पाळीव प्राण्याला नियमितपणे पशुवैद्यकीय तपासणीसाठी घ्या. पशुवैद्य तुमच्या पाळीव प्राण्याला रेबीज लसीकरणाची आवश्यकता आहे की नाही याची तपासणी करू शकतो.
आपल्या समुदायातील रेबीजच्या प्रकरणांबद्दल जागरूक राहा. जर आपल्या समुदायात रेबीजचा प्रसार होत असेल, तर आपल्या पाळीव प्राण्याला अधिक काळजीपूर्वक पाळा.
रेबीजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आपल्या पशुवैद्याशी किंवा स्थानिक सार्वजनिक आरोग्य विभागाशी संपर्क साधा.


PostImage

Archana Dhoble

Sept. 27, 2023   

PostImage

केस झटपट वाढवण्यासाठी उपाय



केस हे आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहेत. केस सुंदर, मऊ आणि घनदाट असल्यास ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला निखार घालतात. मात्र, आजकाल केस गळणे, केस तुटणे, केस पांढरे होणे इत्यादी केसांच्या समस्यांशी अनेक लोक त्रस्त आहेत. या समस्यांमागील कारणे वेगवेगळी असू शकतात, जसे की

  1. अनुवंशिकता
    2. ताणतणाव
    3.हार्मोनल असंतुलन
    4.पोषणाचा अभाव
    5.औषधांचे दुष्परिणाम
    6.खराब जीवनशैली
    7.प्रदूषण इत्यादी.
  2. केसांच्या समस्यांवर मात करून केसांची वाढ कशी वाढवायची हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम या समस्यांमागील कारणे शोधणे महत्त्वाचे आहे. एकदा कारण निश्चित झाल्यानंतर त्यावर योग्य उपचार करू शकतो.

केसांची वाढ वाढविण्यासाठी काही घरेलू उपाय खालीलप्रमाणे आहेत

आहारात पोषणयुक्त पदार्थ समाविष्ट करा: केसांच्या वाढीसाठी प्रोटीन, बायोटिन, आयर्न, जिंक, व्हिटॅमिन सी आणि ई इत्यादी पोषक घटकांची आवश्यकता असते. म्हणूनच आहारात दूध, दही, चीज, अंडी, मांस, मासे, हिरव्या भाज्या, फळे इत्यादी पोषणयुक्त पदार्थ समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे.
केसांना नियमित तेल लावून मसाज करा: केसांना तेल लावून मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि रक्तप्रवाह वाढतो. यामुळे केसांची वाढ चांगली होते. केसांना नारळ तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा तुम्हाला आवडणारे कोणतेही तेल लावून मसाज करू शकता.
केसांना आठवड्यातून दोन ते तीन वेळाच धुवा: केस अधूनमधून धुतल्याने केसांच्या नैसर्गिक तेलाचे संतुलन राखले जाते आणि केसांची वाढ चांगली होते. केस धुण्यासाठी सल्फेट-फ्री शॅम्पू आणि कंडीशनर वापरा.
केसांना उष्णतेपासून वाचवा: केसांना उष्णतेपासून वाचवल्याने केस तुटणे आणि गळणे कमी होते. म्हणूनच केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर कमी करा आणि केसांना हवा लागू द्या.
केसांना नियमित ट्रिम करा: केसांना नियमित ट्रिम केल्याने केसांच्या मुळ्यांना पोषण मिळते आणि केसांची वाढ चांगली होते.
वरील उपाय केल्याने तुमच्या केसांची वाढ चांगली होईल आणि केस सुंदर, मऊ आणि घनदाट बनतील. मात्र, केसांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.


PostImage

Archana Dhoble

Sept. 17, 2023   

PostImage

लव्हबर्डस - प्रेमाचे पक्षी


लव्हबर्ड्स - प्रेमाचे पक्षी

लव्हबर्ड्स (Lovebirds) हे पोपटाच्या (Parrot) प्रजातीचे पक्षी आहेत. ते आफ्रिकेतील मूळ आहेत. लव्हबर्ड्स हे त्यांच्या प्रेमळ आणि सामाजिक वर्तनासाठी ओळखले जातात. ते लहान, रंगीबेरंगी पक्षी असून त्यांच्या जोडीदारांशी खूप एकनिष्ठ असतात. लव्हबर्ड्सची जोडी एकदा तयार झाली की, ते आयुष्यभर एकत्र राहतात.

लव्हबर्ड्स हे अत्यंत बुद्धिमान पक्षी असून ते विविध युक्त्या शिकू शकतात आणि भाषणाची नक्कल देखील करू शकतात. ते खूप प्रेमळ असतात आणि त्यांना त्यांच्या जोडीदारांना आलिंगन देणे आणि चोंच करणे आवडते. लव्हबर्ड्स देखील अत्यंत चंचल पक्षी असतात आणि त्यांना त्यांच्या पिंजरात विविध खेळणी देणे आवडते.

लव्हबर्ड्स हे पाळण्यासाठी अतिशय लोकप्रिय पक्षी आहेत. त्यांचे लहान आकार, आकर्षक स्वरूप आणि प्रेमळ व्यक्तिमत्व यामुळे ते पाळीव पक्ष्यांमध्ये सर्वाधिक मागणी असणारे पक्षी आहेत.

लव्हबर्ड्सची काळजी घेणे फारसे कठीण नाही. त्यांना त्यांच्या पिंजरात भरपूर जागा देणे आवश्यक आहे. त्यांचा पिंजरा स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. लव्हबर्ड्सला विविध प्रकारचे बी, फळे आणि भाज्या खायला द्याव्यात. त्यांना त्यांच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे बदल करणे देखील आवश्यक आहे.

लव्हबर्ड्स हे अत्यंत सुंदर आणि प्रेमळ पक्षी आहेत. जर तुम्हाला पाळीव पक्षी पाळायचा असेल तर लव्हबर्ड्स हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

 

लव्हबर्ड्स पाळण्याचे फायदे.

 1] लव्हबर्ड्स हे अत्यंत सुंदर आणि आकर्षक पक्षी आहेत. ते तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद घेऊन येतात.

 2] लव्हबर्ड्स हे अत्यंत बुद्धिमान आणि चंचल पक्षी आहेत. ते तुम्हाला त्यांच्या विविध युक्त्या आणि खेळांनी मनोरंजित करतील.

 3] लव्हबर्ड्स हे अत्यंत प्रेमळ आणि सामाजिक पक्षी आहेत. ते तुमच्या कुटुंबातील एक सदस्य बनतील आणि तुम्हाला त्यांच्या प्रेमळ वर्तनाने खूष करतील.

4] लव्हबर्ड्सची काळजी घेणे फारसे कठीण नाही. ते लहान असल्यामुळे त्यांना जास्त जागेची गरज नसते. त्यांचा पिंजरा स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवणे आणि त्यांना योग्य आहार देणे हेच त्यांच्या काळजीचे मुख्य घटक आहेत.

लव्हबर्ड्स पाळण्याची काळजी

1] लव्हबर्ड्सला एक स्वच्छ आणि सुव्यवस्थित पिंजरा देणे आवश्यक आहे. त्यांचा पिंजरा नियमितपणे साफ करा आणि त्यांच्या पाण्यात नियमितपणे बदल करा.

2] लव्हबर्ड्सला त्यांच्या पिंजरात भरपूर जागा देणे आवश्यक आहे. त्यांच्या पिंजरात विविध खेळणी आणि पर्चे देणे देखील महत्त्वाचे आहे.

 3] लव्हबर्ड्सला विविध प्रकारचे बी, फळे आणि भाज्या खायला द्याव्यात. त्यांच्या आहारात कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांची पूरकता असणे देखील महत्त्वाचे आहे.

 


PostImage

Archana Dhoble

Sept. 15, 2023   

PostImage

सुनेचा आधार


👳‍♀️ आधार-सुनेचा👳‍♂️

 मी व माझी पत्नी दुपारी बसून चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारला, " मला सांगा, माणसाची मुलगी की मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार असतो?"

मी म्हणालो- हा प्रश्न न विचारलेलाच बरा. पण ती आग्रह करू लागली म्हणून सविस्तर सांगावे लागले.

      मी म्हणालो *म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून "सून" असते.*

           मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे, म्हणूनच लोकांना आपल्या आयुष्यात *"मुलगा आणि मुलगी"* हवी असे वाटत असते. जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडावे.ही गोष्ट सुद्धा खरी आहे *कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो.* सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो आणि मग सून ही सासू व सासऱ्याच्या म्हातारपणाची काठी बनते.

    होय! माझा विश्वास आहे की ती सूनच आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात.

सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते. कधी आणि कोणता चहा द्यायचा, नाश्त्याला काय द्यायचे, जेवण काय बनवायचे,कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी बनवायचे. सायंकाळी झोपताना दूध द्यायचे. पायाला तेल लावायला द्यायचे.सासू-सासरे आजारी पडले तर सून मनापासून त्यांची काळजी घेत असते.

           सून एक दिवस आजारी पडली किंवा माहेरी निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते.सून नसताना सासू-सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्यांना दुसरे कोणी विचारत नसतात. जावई व मुलगी फक्त पाहुणचार करू शकतात. कारण पाहुण्याच्यात येणारे अनुभव वेगळे असतात. सगळे स्वार्थाचे धनी असतात.

      सूनच खरी जबाबदारी पार पाडत असते.कारण मुलाकडे वेळ नसतो आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकत नाही. कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आई बाबांना काय द्यावे हेच कळत नाही? मुलगा फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडू शकतो.

मुलगा फक्त विचारतो.जसे "आई बाबांनी जेवण केले आहे का?" "चहा प्यायला का?" "नाश्ता केला का?" पण ते काय खातात? कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच करत नाही? ही जवळपास सगळ्या घरांची परिस्थिती आहे.

सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सूनबाई मी अनेक पाहिल्या आहेत. अशा महिलांना मनापासून धन्यवाद देतो. *सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो*. *पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हालासुद्धा समज असायला हवी की सदैव "माझा राजा बेटा!" "माझी राणी मुलगी!" चा जप सोडा. "माझी चांगली सून!" सुद्धा अंतर्भूत केले पाहिजे.*

          म्हणून, आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका, तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा. सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा

*मुलगा आणि मुलगीच्या आधी सुनेला स्वतःचे समजा* आणि "माझी मुलगी - माझा अभिमान" "माझा मुलगा - माझा अभिमान" म्हणणे थांबवा...

*अभिमानाने म्हणा माझी सून, माझा अभिमान..*

(सामाजिक व वैचारिक परिवर्तनासाठी सर्वत्र फॉरवर्ड करा.)

🙏💐🙏💐🙏💐🙏💐


PostImage

Archana Dhoble

Sept. 14, 2023   

PostImage

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा


 

पोळा

पोळा हा महाराष्ट्रात साजरा होणारा एक कृषि-उपजताचा सण आहे. हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतात आणि त्यांना गोडधोड खाऊ घालतात. बैलांना सजवले जाते आणि त्यांच्यासाठी मिरवणूक काढली जाते.

पोळा हा बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. बैल शेतीच्या कामात शेतकऱ्यांची मोठी मदत करतात. ते तीळ, भात, गहू यासारख्या पिकांची पेरणी करतात, ते बैलगाडी ओढतात आणि शेतीची मशागत करतात. पोळा हा बैलांना आराम देण्याचा आणि त्यांना सन्मान देण्याचा दिवस आहे.

पोळा हा एक प्राचीन सण आहे. या सणाची सुरुवात कधी झाली याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही, परंतु असे मानले जाते की हा सण हजारो वर्षांपासून साजरा केला जात आहे.

पोळा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण आहे. हा सण महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये साजरा केला जातो, परंतु विदर्भात हा सण विशेषतः मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

पोळा हा एक आनंददायी आणि उत्साहपूर्ण सण आहे. या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलांना खूप प्रेम आणि काळजी देतात. बैलांना सजवले जाते, त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते आणि त्यांना मिरवणूक काढली जाते. पोळा हा शेतकऱ्यांसाठी एक विशेष दिवस आहे आणि ते या दिवशी आनंद आणि उत्साहाने साजरा करतात.

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा


PostImage

Archana Dhoble

Sept. 12, 2023   

PostImage

सात दिवसात मिळवा उजळ त्वचा


 

चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय

चमकदार त्वचेसाठी अनेक लोक वेगवेगळ्या क्रिम किंवा सिरमचा वापर करतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की काही घरगुती उपायांनीही तुम्ही तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या चमक देऊ शकता?

येथे काही घरगुती उपाय आहेत जे तुम्ही चमकदार त्वचेसाठी करू शकता

बेसन आणि हळद

बेसन आणि हळद दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते आणि हळद त्वचेला चमक देते. या दोन्ही घटकांपासून एक फेसपॅक तयार करून तुम्ही तुमच्या त्वचेला चमक देऊ शकता.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल त्वचेला मॉइस्चराइज करते आणि त्वचेला चमकदार बनवते. तुम्ही ऑलिव्ह ऑईल चेहऱ्यावर लावू शकता किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये बेसन मिसळून फेसपॅक तयार करू शकता

टोमॅटो

टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे त्वचेला मुक्त र radicalsाडापासून वाचवतात आणि त्वचेला चमकदार बनवतात. तुम्ही टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावू शकता किंवा टोमॅटोच्या रसाने बनवलेला फेसपॅक लावू शकता.

दही

दही त्वचेला मॉइस्चराइज करते आणि त्वचेला चमकदार बनवते. तुम्ही दही चेहऱ्यावर लावू शकता किंवा दह्यामध्ये हळद किंवा मध मिसळून फेसपॅक तयार करू शकता.

गुलाबजल

गुलाबजल त्वचेला शांत करते आणि त्वचेला चमकदार बनवते. तुम्ही गुलाबजल चेहऱ्यावर लावू शकता किंवा गुलाबजलमध्ये चंदन पावडर मिसळून फेसपॅक तयार करू शकता.

पपई

पपईमध्ये पपैन नावाचा एंजाइम असतो जो त्वचेला एक्सफोलिएट करतो आणि त्वचेला चमकदार बनवतो. तुम्ही पपईचा रस चेहऱ्यावर लावू शकता किंवा पपईच्या पेस्टने फेसपॅक तयार करू शकता

सुंदरत्वचे साठी घरगुती उपाय

हळदी

हल्दी दूध त्वचेला चमकदार बनवते आणि त्वचेला निरोगी ठेवते. तुम्ही हल्दी दूध चेहऱ्यावर लावू शकता किंवा हल्दी दूध पिऊ शकता.

नींबू

लिंबूमध्ये विटामिन सी असते जे त्वचेला चमकदार बनवते . तुम्ही लिंबूचा रस चेहऱ्यावर लावू शकता किंवा लिंबूच्या रसाने बनवलेला फेसपॅक लावू शकता.

शीतपेय

भरपूर पाणी पिणे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेला चमकदार बनवते. तुम्ही भरपूर पाणी प्यावे किंवा फळांचे रस प्यावे.

याव्यतिरिक्त, आपण या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी काही सवयी देखील बदलू शकता:

* धूम्रपान करणे टाळा.

* मद्यपान करणे टाळा.

* जास्त तणाव घेऊ नका.

* भरपूर झोपा.

* स्वच्छ आणि पौष्टिक आहार घ्या.

या घरगुती उपाय आणि सवयींमुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकदार त्वचे मिळेल.