चिमूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एका रुपयात पीक विमा काढला मात्र नुकसान होऊन अजून पर्यत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता अनेक शेतकरी लाभापासून वंचित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार पीक विमा काढला. परंतु यंदा अतिवृष्टीमुळे कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठे नुकसान झाले. अनेकांची शेती पिके खरडून गेली. त्यामुळे यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली. यानंतर पीकविमा प्रतिनिधी कडून नुकसनाची पाहणी देखिल केली होती. शेतकऱ्यांना विम्याचा त्याचा लाभ मिळण्यात यावे. यासाठी शेतकरी नेते विनोद उमरे हे सत्तत पाठपुरावा करत आहेत. त्याची प्रशासने दखल घेत चंद्रपूर जिल्हातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे असे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी सांगितले आहे.