लालपरी’च्या प्रवासात 15 % वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार, शासणाचा निर्णय
मुंबई:-
सर्वसामान्याचा आधार असलेल्या लालपरी अर्थात एसटी बसचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही भाडेवाढ लागू होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.एसटी बससह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी पासून दोन्ही वाहनांच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे एसटी बसने लांब पल्ल्याचा आणि रिक्षा किंवा टॅक्सीने जवळचा प्रवास करणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
भाडेवाढीच्या वृत्ताला परिवन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्य परिवहन प्राधिकरणाची गुरुवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एसटीसोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ प्रत्येक वर्षी होणे अपेक्षित असते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून एसटीची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित 14.97 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. ही भाडेवाढ आजपासूनच लागू होईल. यासह रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून 1 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.
दरम्यान, आगामी काळामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा होत आहेत. त्याआधी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्याने गावखेड्यातून परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचे किमान भाडे 23 वरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 वरून 31 रुपये होणार आहे.
दि. १५ जानेवारी गडचिरोली शहरापासून ५ किमी अंतरावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवारी रात्री १० वाजता चे सुमारास एका कारने मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला आहे. मयुर विलास भुरसे (२५) रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, विकास मधुकर धुडसे, (२५) रा. डोगरसावंगी, ता. आरमोरी अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार मृतक मयुर विलास भुरसे हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३३ वाय २५१३ ने गडचिरोली वरुन ठाणेगाव कडे १० वाजताचे दरम्यान त्याचा मित्र विकास मधुकर धुळसे सह जात असतांना एक पांढऱ्या रंगाच्या रेनाल्ड कॉप्टर वाहन क्रमांक एम. एच. ३३ व्ही ४३३३ चा चालक आशीष माणीक एंचिलवार, रा. देऊळगाव, ता. आरमोरी याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन हयगयीने व भरधाव वेगाने व रस्त्याच्या परीस्थीतीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालवुन वाहनास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही मोटरसायकल स्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे नातेवाईक कार्तीक श्रीकृष्ण कुनघाडकर वय २० वर्ष, रा. तळोधी मोकासा ता. चामोर्शी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
मोहझरी: प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोहझरी येथील नीलकंठ सोनुले अंदाजे वय 45 हे कढोली येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने गेले होते .
आज सायंकाळी अंदाजे पाच वाजता सुमारास कढोलीवरून वैरागड मार्गे येत असताना कढोली जवळ असलेल्या पूलाच्या जवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्या धडकेमध्ये त्यांचा पाय मोडल्याचे घटनास्थळी दिसत आहे.
सदर अपघात ट्रकच्या धडकेमुळे झाल्याचे माहिती मिळालेली आहे .कारण या मार्गावर सतत ट्रकची वर्दळ असते त्यामुळे ट्रकमुळेच अपघात सांगितले जात आहे .या घटनेची माहिती तात्काळ नागरिकांना मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती.
नीलकंठ सोनुले यांना कुरखेडा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते पण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा वरून त्यांना पुढील उपचाराकरीता गडचिरोली येथील शासकीय रुग्णात हलविण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे अशा अपघात करणाऱ्या ट्रक चालकावर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील काही मजूर कामासाठी तेलंगणात गेलेले आहेत. तेथे त्यांच्या जीपला अपघात झाला. यात एक महिला ठार झाली, तर १५ जण जखमी झाले. १ जानेवारीला तेलंगणातील सिरसिल्लाजवळ हा अपघात झाला.
कांताबाई सूर्यभान मराठे (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. नववर्षानिमित्त देवदर्शनासाठी मजूर वेमूलवाडा येथे जीपने जात होते. सिरसिल्लाजवळ जीपचा अपघात झाला. यात कांताबाई मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.
आनंदराव मराठे, गंगुबाई मराठे, कविता पालोजवार, रेखा गाताडे, लक्ष्मी मंडरे, वनिता सातारे, भिकू सातारे, उषा मराठे, सुनंदा राऊत, माया मराठे, ज्योती मराठे, विमल मराठे, निर्मलामंडरे, सुधाकर गदेकर, सुरेखा गदेकर यांचा जखमींत समावेश आहे.सर्व जखमींना करीमनगर दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.
नातेवाईकांना मदतीचा हात
दरम्यान, कांताबाई मराठे यांच्या नातेवाईकांना तेलंगणाला जाण्यासाठी पैशांची अडचण होती. याबाबत माहिती मिळाल्यावर जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नातेवाईकांना प्रवास खर्च तसेच उपचारासाठी आर्थिक साहाय्य केले. नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.
गडचिरोली : दोन दुचाकींचीसमोरासमोर धडक बसल्याने दुचाकीस्वार तिघे जखमी झाल्याची घटना गडचिरोलीपासून दोन किमी अंतरावर कठाणी नदीपुलाजवळ सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
धनराज बोलिवार (५२) रा. उपरी, रवी वासेकर (४८), मोहन वाकुडकर (४८) दोघेही रा. भान्सी, ता. सावली जिल्हा चंद्रपूर अशी जखमींची नावे आहेत. यातील मोहन वाकुडकर हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही दुचाकीने मिरची तोडण्यासाठी मजूर गोळा करण्यासाठी गोगावकडे जात होते.तिघेही दारू पिऊन तर्र होते.
दरम्यान, चालक धनराज बोलिवार याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत तिघेही जमिनीवर कोसळले. यात तिघांच्याही डोक्याला मारला लागला. मोहन हा बेशुद्ध पडला
होता. नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेने तिघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
गडचिरोली-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्याने जखमींना बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
अहेरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना व्यंकटरावपेठा येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. किशोर चंदुरसाई तलांडे (२५, रा. इंदाराम, तालुका अहेरी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
किशोर तलांडे हा इंदारामकडे जात असताना समोरून येणाऱ्या एका वाहनाने धडक दिली. त्यात किशोर याच्या डोक्याला जोरदार मार लागला. या घटनेत किशोर हा रस्त्यावर पडला तर दुचाकी दुसऱ्या बाजूला फेकली गेली. किशोरच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. किशोरच्या दुचाकीला कोणत्या वाहनाने धडक दिली याबाबत कळू शकले नाही. मात्र, त्याच्या दुचाकी ट्रॅक्टरने धडक दिली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, जवळपास १ तास उशिराने पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, मागील १० दिवसांत अहेरी उपविभागात जवळपास पाच ते सहा अपघात झाले. अपघाताचे हे सत्र सुरूच आहे.
हर्ष साखरे सुपर फास्ट बातमी संपादक
आरमोरी : दुचाकीवरून सासरवाडीला जाताना वाटेत अपघात होऊन जावयाचा मृत्यू झाला. १० डिसेंबरला घडलेल्या या घटनेत १६ रोजी कार चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
इंद्रजीत दुलाल मंडल (३४, रा. सुभाषग्राम ता.चामोर्शी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. १० रोजी ते दुचाकीवरून (एमएच ३३ एक्स ७६९६) अरुणनगर येथे सासरवाडीला जात होते. वाटेत आरमोरी येथे एका लॉन्ससमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने (एमएच ३४ जे-११५३) जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमीझाले. त्यांना आरमोरी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यानंतर, ब्रह्मपुरी येथे उपचारादरम्यान १३ डिसेंबरला उपचारादरम्यान इंद्रजीत यांची प्राणज्योत मालवली.
याबाबत दुलाल मंडल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास हवालदार प्रेमानंद लाडे करत आहेत.
धाबा : छत्तीसगड राज्यातून हैदराबादकडे जात असताना भरधाव ट्रॅव्हल्स उलटल्याने २० मजूर जखमी झाले. यातील नऊ मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. १५) रात्री गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथे घडली. कविता मलगाम, माया चौधरी, निरंजन हुसवा, देवेंद्र उईके, गंजुराम मडावी, संगीता टेकाम, बिदेश मरकाम, फागेलाल धुर्वे, नरेंद्र उमरे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
छत्तीसगड राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथील मजूर हैदराबाद येथील एका कंपनीत काम करण्यासाठी ट्रॅव्हल्सने जात होते. या ट्रॅव्हल्समध्ये ३० ते ३५ मजूर बसले होते. गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथे रात्री ही ट्रॅव्हल्स आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. दरम्यान, ट्रॅव्हल्स उलटल्याने २० मजूर जखमी झाले. त्यातील विता मलगाम, माया चौधरी, निरंजन हुसवा, देंवेंद्र उईके, गंजुराम मडावी, संगीता टेकाम, बिदेश मरकाम, फागेलाल धुर्वे, नरेंद्र उमरे यांची प्रकृती गंभीर असल्याने रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात ट्रॅव्हल्स चालकही जखमी झाला, अशी माहिती धाबा पोलिसांनी दिली.
दोघे जण जखमी वेगाने केला घात : बोडधाजवळची घटना
वडधा : दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एक जण ठार तर दोघेजण गंभीर झाले. ही घटना बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास वडधा पोर्ला
मार्गावरील बोडधा गावाजवळ घडली. या अपघातात प्रशांत रामलाल डोंगरे (वय, ३३ रा. तेली मोहल्ला गडचिरोली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी तर एकजण किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रशांत डोंगरे व अन्य एकजण पोर्ला- वडधा मार्गावरून वडधाकडे येत होते. तर बोरीचक येथील २ युवक वडधाकडून पोर्लाकडे जात होते. दरम्यान, दोन्ही भरधाव दुचाकींची बोडधा येथे समोरासमोर धडक बसली. यात तीघेजण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
यापैकी प्रशांत डोंगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. तर एक जण किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी (दि.२९) दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास २० फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल होत मदत कार्याला सुरुवात केली आहे. जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
मुख्यमंत्र्यांनी घेतली अपघाताची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया-काेहमारा मार्गावर डव्वा जवळ झालेल्या अपघाताची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडून घेतली. तसेच प्रशासनाला त्वरित आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे.
घटनास्थळावर रक्ताचा सडादुचाकीला ओव्हरटेक करताना भरधाव शिवशाही बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार तर २९ प्रवासी जखमी झाले. बसचा वेग अधिक असल्याने ती रस्त्यावर जवळपास २० फूट घासत गेली. त्यामुळे काही प्रवासी बसखाली दबले होते असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. तर घटनास्थळावर रक्ताचा सडा पडल्याचे चित्र होते.
बसमध्ये चाळीस प्रवासी
भंडारा-गोंदिया या शिवशाही बस क्रमांक एम.एच.०९, एम १२७३ ही भंडाराहून गोंदियाकडे येत असताना गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Indian Railways News: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! 1 डिसेंबरपासून होणाऱ्या बदलांमुळे प्रवाशांना नवीन सुविधा मिळण्याची शक्यता आहे. एका व्हायरल झालेल्या बातमीनुसार, भारतीय रेल्वेने सामान्य तिकिट असलेल्या प्रवाशांसाठी मोठे बदल करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांच्या निवेदनानुसार, रेल्वे मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये किमान चार सामान्य डबे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. हा बदल प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात येत असून, जनरल कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल आहे, पण रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. प्रवाशांनी अधिकृत माहितीची वाट पाहावी आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने सुधारणा करत असते, आणि ही योजना त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. अधिकृत घोषणेसाठी रेल्वेच्या वेबसाइट आणि बातम्यांवर लक्ष ठेवा.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
देसाईगंज : देसाईगंज ते लाखांदूर मार्गावरील कार्मेल कॉन्व्हेंटजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना १३ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. अनिकेत ईश्वर आदे (२१, रा. नवीन लाडज, ता. देसाईगंज) असे मयताचे नाव आहे. तो देसाईगंजवरून दुचाकीने गावी परतत होता. ट्रकने (सीजी ०४ एलएस- २४५८) त्यास धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. दरम्यान, लाखांदूरकडून दुचाकीवरून येणाऱ्या शैलेश शालिक मेश्राम (२३, रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा) यास दुचाकीने हुलकावणी दिली. दुचाकी घसरून तो कोसळला. रुग्णालयात नेताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.
बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अहेरी : आलापल्लीवरून पेरमिलीकडे जाणाऱ्या दुचाकीला एस.टी. बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याची ओळख अद्याप पटली नाही. त्याच वाचविताना बस रस्त्याच्या खाली उतरली. वाहकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना १४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडाजवळ घडली. अहेरी आगाराची बस (एमएच ४० एक्यू ६०९४) सकाळी ७:४५ वाजता अहेरी आगारातून लाहेरीमार्गे सुटली. त्याच वेळी दुचाकी (एम.एच. ३३ पी. ८६८२) आलापल्लीवरून पेरमिलीमार्गे जात होता.
Kurkheda news: दि. 14 : मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास उराडी येथील कुथे पाटील हायस्कूल जवळ घडली. ट्रॅक्टर चालक रोहीत नरोटे (वय 30) रा. तूलतूली ता. आरमोरी व दुचाकीस्वार महेंद्र दूगा (वय 30) रा. काकडयेली (दूधमाळा) ता. धानोरा असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एमएच 33 एफ 3280 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने मोठे दगड वाहतूक करीत होता तर एमएच 33 वाय 5453 क्रमांकाच्या दुचाकीने दुचाकीने दोघेजण जात असताना दुचाकी व ट्रॅक्टरची उराडी येथील कूथे पाटील हायस्कूल नजीक समोरासमोर जबर धडक बसली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी झाली.
सोनसरी येथील डोंगरावरून चव्हेला डॅमच्या बांधकामाकरीता मोठ्या दगडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर कूथे पाटील हायस्कूल उराडी जवळ मुख्यरस्त्यावर काही शेतकऱ्यांनी धान पीक वाळविण्याकरीता धानाची रास पसरवलेली होती या धानाचा राशीवरून घसरत ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होत हा अपघात झाल्याची माहीती आहे.
अपघात घडला यावेळी ट्रॅक्टर इंजन वरुन उडी मारत असताना पलटत असलेल्या ट्राली मधील मोठे दगड ट्रॅक्टर चालकाला लागल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यु झाला तर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीसानी घटणास्थळावर पोहचत प्रेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे पाठविले.
धानोरा : गडचिरोलीवरून धानोराकडे निघालेली भरधाव कार चातगावजवळ उलटली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता घडली. गडचिरोली येथून कार (एमएच १० सीएन- ३८८३) धानोराकडे जात होती.
चातगावजवळ वळणावर गतिरोधक न दिसल्याने चालकाने जोरात ब्रेक दाबले. यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही. धानोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
Driving Licence: सुप्रीम कोर्ट ने ड्राइविंग लाइसेंस के मामले में वाहन चालकों के पक्ष में एक महत्वपूर्ण फैसला सुनाया है। शीर्ष अदालत ने अपने 2017 के निर्णय को बरकरार रखते हुए स्पष्ट किया है कि लाइट मोटर व्हीकल (LMV) लाइसेंस धारक भी हल्के ट्रांसपोर्ट वाहन चला सकते हैं। इसके तहत ऐसे लाइसेंस धारक 7500 किलोग्राम से कम वजन के ट्रांसपोर्ट वाहन चला सकेंगे।
मुख्य न्यायाधीश डी.वाई. चंद्रचूड़ की अध्यक्षता में पांच सदस्यीय संविधान पीठ ने यह फैसला सुनाया है। इसमें न्यायमूर्ति हृषिकेश रॉय, पी एस नरसिम्हा, पंकज मिथल और मनोज मिश्रा भी शामिल थे। पीठ ने कहा कि ऐसा कोई साक्ष्य नहीं है जो यह सिद्ध कर सके कि एलएमवी लाइसेंस धारकों ने सड़क दुर्घटनाओं में वृद्धि की है।
सुप्रीम कोर्ट के इस निर्णय से बीमा कंपनियों को झटका लगा है, क्योंकि पहले बीमा कंपनियां उन मामलों में दावों को खारिज कर देती थीं जिनमें दुर्घटनाओं में शामिल वाहन चलाने वाले के पास ट्रांसपोर्ट लाइसेंस नहीं होता था। इस फैसले के बाद, अब बीमा कंपनियों को ऐसे दावों का निपटारा करना पड़ेगा, जहां हल्के ट्रांसपोर्ट वाहन चलाने वाले के पास केवल एलएमवी लाइसेंस हो।
यह फैसला उन ट्रांसपोर्ट ड्राइवरों के पक्ष में है जो एलएमवी लाइसेंस के तहत हल्के ट्रांसपोर्ट वाहन चलाते हैं। सुप्रीम कोर्ट ने मामले की सुनवाई करते हुए यह स्पष्ट कर दिया कि एलएमवी लाइसेंस धारक भी हल्के ट्रांसपोर्ट वाहनों का संचालन कर सकते हैं।
Traveling: ट्रेन में बैग छूट जाए तो क्या करें? ट्रेन से यात्रा करते समय सामान का ख्याल रखना जरूरी है. हालांकि, कभी-कभी भीड़ के दौरान कोई यात्री ट्रेन में बैग या अन्य सामान छोड़ देता है तो बड़ी उलझन पैदा हो जाती है। बैग में नकदी, कीमती सामान हो तो यात्री और भी घबरा जाते हैं। हालांकि, ऐसे मामले में बिना घबराए तुरंत रेलवे पुलिस को सूचना देने से आपका सामान सुरक्षित वापस मिलने में मदद मिलती है। ऐसे कई रेलवे जंक्शन पर कई यात्रियों को उनके बैग वापस दिए गए हैं। शिकायत न करने के बावजूद कई लोगों को उनके बैग वापस कर दिए गए।
यदि ट्रेन में बैग या अन्य सामग्री छूट जाती है, तो आपको उसी रेलवे स्टेशन पर आरपीएफ को रिपोर्ट करनी चाहिए जहां आप उतरे थे।
यदि बैग ट्रेन में खो जाने की सूचना नहीं दी गई है, लेकिन बैग बोगी में पाया गया है, तो बैग के मालिक की तलाश लिया जाता है।
अगर सामान ट्रेन में छूट जाता है तो सामान रेलवे स्टाफ स्टेशन भेज दिया जाएगा गुरु के समक्ष प्रस्तुत किया गया।
यदि सामान में सोने के आभूषण हों तो उसे 24 घंटे के लिए स्टेशन मास्टर के कार्यालय में रखा जाता है। फिर माल को जोनल कार्यालय भेज दिया जाता है, ट्रेन में मिले सामान को लेकर रेलवे के अलग-अलग नियम हैं।