राजूर/जालना: भोकरदन तालुक्यातील राजूर येथून जवळच असलेल्या वसंतनगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत जालना येथून येणाऱ्या काळी पिवळी जीप मोटारसायकल स्वरास वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायवरचा ताबा सुटून कोसळली त्यात सात जण मृत्यूमुखी पडले.
ही घटना जालना-राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्यावरील खडेश्वरी बाबाजी यांच्या शिवशक्ती आश्रम असलेल्या बाजूच्या विहिरीजवळ गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. अपघातातील मृत हे पंढरपूर
यात्रेवरून गावाकडे परत येत असताना हा भीषण अपघात घडला. मृतामध्ये चनेगाव व तपोवन येथील नागरिकांचा समावेश होता. गाडीत एकूण १३ जण होते पैकी ५ जणांना वाचवण्यात गाडी ड्राइव्हर बाबुराव हिवाळे व वसंतनगर येथील स्थानिकांना यश मिळाले. तर ७ मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतामध्ये प्रल्हाद उत्तम महाजन (वय ६५), ताराबाई मालुसरे, नंदा बाळू तायडे (वय ३५), प्रल्हाद आनंद बिटले, नारायण किसण निहाळ (वय ४५), चंद्रभागा अंबादास घुगे (वय ४८) व एक महिला जिची ओळख पटली नाही यांचा समावेश आहे.
३ जण सुखरूप असून दोन जणांना शासकीय रुग्णालय जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दोन अग्निशमक पथकाने भेट देऊन बचावकार्य केल.
५ भाविकांना वाचविण्यात यश
घटनास्थळी क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. आणखी काही मृतदेह विहिरीत असण्याची शक्यता आणखी शोध सुरु आहे.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली.
Gadchiroli News : अहेरी तालुका के नक्सल प्रभावित चल्लेवाड़ा में 2 जून को एक चौंकाने वाली घटना घटी जब एक घर के सामने के आंगन में खाट पर सो रहे एक व्यक्ति को आग लगा दी गई. घायल का नाम चरणदास गजानन चांदेकर (उम्र 48) है और उनका चंद्रपुर में इलाज चल रहा है। इस भीषण हमले के पीछे का सटीक मकसद स्पष्ट नहीं है.
हे देखील वाचा : MSEB Recruitment 2024 : चंद्रपूर महावितरण मध्ये निघाली 127 पदांसाठी मोठी भरती
चरणदास चांदेकर गर्मी के कारण आंगन में खाट पर सो रहे थे. आधी रात को अज्ञात आरोपियों ने उन पर पेट्रोल डाला और लाठियों से आग लगा दी. इसके बाद वह भाग गया. यहीं पर चरणदास का शरीर आग में जल गया।
उसके चिल्लाने पर परिवार के अन्य सदस्यों ने आग बुझाई; लेकिन तब तक चरणदास आग से गंभीर रूप से घायल हो चुका था। उन्हें इलाज के लिए चंद्रपुर स्थानांतरित कर दिया गया है। उनकी हालत गंभीर है और उनका इलाज चल रहा है. इस घटना से इलाके में उत्तेजना है और दहशत का माहौल है. इस मामले में रेपनपल्ली थाने में हत्या के प्रयास का मामला दर्ज किया गया है.
हे देखील वाचा : ST Mahamandal Bharti 2024: एस टी महामंडळ MSRTC मध्ये निघाली इतक्या पदांसाठी भरती
संदिग्धों से पूछताछ की जा रही है
पुलिस ने उन संदिग्धों की जांच शुरू कर दी है जिन्होंने चरणदास को मारने की कोशिश की थी; लेकिन चरणदास का गांव में किसी से कोई विवाद नहीं था. इसलिए पुलिस के सामने यह पता लगाने की चुनौती है कि उन पर हमला किसने किया. रेपनपल्ली पुलिस ने बताया कि इस मामले में जांच जारी है.
best traveling places in india : दोस्तों मई महीना हाली में शुरू हुआ है। अप्रैल खतम होते ही गर्मी धीरे धीरे बढ़ने लगती है। मई महीने की शुआत में ही देश के अनेक राज्य में तापमान बहुत ज्यादा बढ़ता है। इसलिए इस कड़क गर्मी में राहत पाने के लिए और प्रकृति के सानिध्य मे शांति से समय बिताने के लिए बहुत सारे लोग घूमने जाते है।
दोस्तों इस वर्ष में मई महीने में आप भी बाहर घूमने जाने का सोच रहे होंगे तो आप भारत के कुछ राज्य में घूमने जा सकते है। दोस्तों आज हम इस आर्टिकल में कुछ खास जगह के बारे बताने जा रहे है। तो चलिए दोस्तों जानते है।
1. चेरापूंजी
मेघालय इस राज्य में सुप्रसिद्ध जगह का मतलब चेरापूंजी है। चेरापूंजी ये एक हिलस्टेशन है। इस जगह पर सबसे जा बारिश होती है। चेरापूंजी ये जगह घूमने के लिए एकदम बेस्ट जगह है। इस जगह का प्राकृतिक रूप देखकर आपका मन प्रसन्न हो जाएगा।
2. तवांग
अरुणाचल प्रदेश इस राज्य में तवांग ये जगह स्थित है। अगर आपको शांति से समय बिताना है तो आप तवांग घूमने के लिए जा सकते है। समुद्री तल से 10,000 मिटर पर स्थित है। ये शहर प्रकृति सौंदर्य और पहाड़ों से परिपूर्ण है यहां झरने नदी तवांग भट्टी नूरनांग देखने के लिए जा सांगते है। मई महीने में आपको इस जगह पर ठंडे वातावरण का अनुभव कर सकते है।
3. दार्जिलिंग
पश्चिम बंगाल इस राज्य में ये एक लोकप्रिय पर्यटन स्थल है। चायपत्ती के लिए ये जगह प्रसिद्ध है। इस जगह पर आने के बाद आप चायपत्ती बाग प्रेषणीय स्थल यहां की रेल्वे सब कुछ देख सकते हैं। भीड़ भाड़ से कहीं दूर घूमने जाने का सोच रहे होंगे तो दार्जिलिंग ये जगह आपके लिए बेस्ट है
एसटी बस महिला वाहकाने केली एका शिक्षकाची पोलीसात तक्रार
सदर शिक्षक करतो नेहमीच हुज्जतबाजी,याला आवर घालणार कोन?
हिंगणघाटः-
दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हिंगणघाट उमरेड या मार्गावर जाणाऱ्या बस वर महिला वाहक म्हणून सौ सुवर्णा साठोणे या कर्तव्यावर होत्या त्या वेळी बसमध्ये कही प्रवाशी प्रवास करीत होते. त्या दरम्यान हिंगणघाट येथून सिर्सी करीता एक शिक्षक नामे मोहन तिनगासे रा. हिंगणघाट हे सिर्सी या गावी जान्या करिता प्रवास करीत होते. त्यावेळी महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांनी तिकीट देण्याकरिता त्यांचे कडे गेली असता त्यांनी सिर्सी येथील तिकीट घेण्याकरिता दोनशे रुपयाची नोट महिला वाहकाला दिली. प्रवाशी संख्या कमी व पहिलीच सकाळची फेरी असल्यामुळे महिला वाहका जवळ सुटे पैसे नसल्यामुळे ६० रुपये तिकीटचे कापून १०० रुपये परत केले व उर्वरित ४० रुपये कर्तव्यप्रमाणे तिकीटच्या मागील बाजूस लिहून दिले व समोरील प्रवाशांना टिकट देण्यास निघून गेले असता मोहन तीनगासे या शिक्षकाने महिला वाहकाला अपमानस्पद शब्द वापरायला सुरुवात केली जेव्हा जेव्हा ती वाहक तिकिटे देत होती तेव्हा तेव्हा तो शिक्षक हुज्जतबाजी घालीत असल्याचे त्या महिला वाहकाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
शेवटी सिर्सी येथे उतरल्यानंतर महिला वाहकाने त्यांना उर्वरित ४० रुपये देण्याचा प्रयत्न केला असता मी तुला बघून घेईल, तू चोर आहेस, तू चोर आहेस असे मोठमोठ्याने ओरडून जणमाणसात त्या महिला वाहकाची बदनामी केली. आपल्या शिक्षकी पेश्याला काळिमा फसण्याचा प्रकार या शिक्षकाने केला. व पैसे नं घेता निघून गेला.परत आल्यानंतर त्या ४० रुपये लिहून असलेल्या तिकटावर एक शून्य वाढवून ४०० रुपये करून त्या महिला वाहकाची आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांचे कडे खोटी तक्रार केली. शिक्षकाला आपल्या शाळेच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना तो शिक्षक नेहमी ४० किलोमीटर हिंगणघाट वरून जाणे येणे करतो आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाहकाशी चालकांशी वाद घालतो अशी चर्चा बस स्थानकावर सुरु होती.
मोहन तिनगासे त्याची वागणूक त्या महिला वाहकाला सहन नं झाल्याने माझी कुठलीही चुकी नसताना व मला सर्व प्रवशासमोर बदनाम केले असल्याने त्याची तक्रार हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे दाखल केली व त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी बस आगारातील कामगार यांनी केली.यावेळी मोहन तीनगासे यांनी पण बसची महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांच्यावर गंभीर आरोप लावला असून त्याची तक्रार हिंगणघाट बस डेपो अधिकाऱ्याला केली आहे. आता या प्रकरणी पोलीस आणि बस डेपो अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
चिचडोह बॅरेजच्या पुलावरून होत होती अवैध दारु तस्करी म्हणून चारचाकी वाहनांचा झाला प्रवेश बंद
एलसीबी ने पकडली बारा लाख रुपयांची अवैध तस्करीतील दारु
गडचिरोली - चिचडोह बॅरेज, लोढोंली घाटावर दोन सुमोत भरलेली १२ लाखाची दारू LCB गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी पाठलॉग करून पकडली असता दारू तस्करांनी जिवाची पर्वा न करता चिचडोह बॅरेजच्या पुलावरुन पाण्यात उडी मारली असता त्याचा पायच फॉक्चर झाला. सदर घटनेमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल व पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी सदर पुलावरील रहदारीच बंद केली. दि. ५ एप्रिलच्या पहाटेला दारू तस्करांनी दोन सुमो गाड्यात दारूच्या पेट्या भरून लोंढोली वरून चामोर्शी मार्ग चिचडोह बरेंज वरून दारू तस्करी करीत असल्याचा सुगावा गडचिरोली LCB अधिकारी व कर्मचारी यांना लागताच त्यांनी दोन्ही गाड्याचा पाठलाग करून व चामोर्शी पोलीसांना माहीती देऊन चामोर्शी पोलीसांनी चामोर्शी कडील गेट बंद केला त्यामुळे दारू तस्करीच्या दोन्ही गाड्या चौकीदारांना न जुमानता सुसाट वेगाने जावून पुलाच्या मंध्यतरीच थांबल्या. त्यातील दारू तस्करीचा मोरक्या पुलावरून चक्क पाण्यात उडी घेतली तो पाण्याच्या खाली पडला. पाणी कमी होते परंतु अंदर खडक असल्यामुळे दारू तस्कराचा पाय मोडला त्यामुळे त्याला पळता आले नाही. सापडलेल्या दोन्ही गाड्यांत १२ लाखाची दारू सापडली. पोलीसांनी ती हस्तगत करून पाय मोडलेल्या दारू तस्कराला चामोर्शी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली व पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी गेट समोर प्रवेश बंदचा बोर्ड लावल्यामुळे आता रहद्दारीच बंद पडली. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीच्या गाड्या लग्नसराईतच बंद पडल्या आता त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर पुलावरून आवागमन करणाऱ्या सर्वच गाड्या दारूची तस्करी करणाऱ्या नसतात. लग्नसराईत जाणाऱ्या व दवाखाणात जाणाऱ्याना आता त्रास सहन करावा लागतो आहे. तेव्हा
जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दोन्ही बाजुला पोलीस चौकी बसवावी परंतु रहदारी बंद करू नये तसेच रात्रौ गेट बंद करणाच्या वेळेत ७ ऐवजी रात्रौ १० वाजता पर्यंत गेट सुरु ठेवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष गोपाल रायपूरे व रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी निवेदनाद्वारे आवागमन करणाऱ्या प्रवाशांना त्रास देऊ नये असेही निवेदनात म्हटले आहे
Celebration On wheels :- नागपूर : शहरातील चारही भागात मेट्रो सेवा सुरू असून मोठ्या संख्येने नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत. महामेट्रो 'सेलिब्रेशन ऑन व्हील्स' उपक्रम राबवत आहे.
महा मेट्रोने नागरिकांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे, सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत ते रविवारी संपूर्ण मेट्रो ट्रेन केवळ 3500 रुपयांमध्ये एका तासासाठी बुक करू शकतात.
अधिक वाचा :- Viral News ; - वेशभूषा बदलून ती सरकारी रुग्णालयात गेली, चेहरा बघितला तर अधिकाऱ्यांना फुटला घाम
ते रविवारी सकाळी ६ ते दुपारी १ पर्यंत आहे आणि इतर दिवस आणि इतर वेळेसाठी रु 5000/- आहे.
गेल्या काही दिवसांत सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत मोठ्या संख्येने नागरिक संपूर्ण मेट्रो ट्रेनचे बुकिंग करत आहेत आणि वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस इत्यादींचे आयोजन करत आहेत.
अधिक वाचा :- Clean Girl ; - एक तरुणी मध्य रात्री स्मानभूमी मध्ये जाते आणि ..., ते पाहून लोक संतापले
विशेष म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या नागपूर शहराच्या बाहेरील जिल्ह्यांतील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटीही सातत्याने येत असून हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अधिक वाचा :- Bhandara News ; - वादातून युवकाचा शस्त्राने वार करून खून; भंडारा शहरा मधील घटना
Today Horoscope : जाणून घ्या आजचा तुमचा दिवस कसा जाईल..., तुमची राशीचक्र काय सांगते...
Entertainment News ; नीता अंबानी ने शाहजहान यांचा 'हा' दागिना बाजूबंद म्हणून परिधान केला
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
एस.टी.ने घेतला पेट मात्र गाडीत अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने विझविली आग
आष्टी :-
एस टी ने घेतला पेट मात्र अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने आग विझविली हि घटना मुलचेरा - घोट मार्गावर भर जंगलात घडली प्रसंगावधान राखून प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.
गडचिरोली जिल्हयात अगोदरच एसटी महामंडळाच्या भंगार बस सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आणखी एक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास घोट जवळील निकतवाडा गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाश्यांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली.त्यानंतर वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले होते.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची एसटी बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्रो मुक्कामाणे असते ती बस दररोज पहाटे ६ वाजता मुलचेरा वरून घोट-चामोर्शी भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जाते.शुक्रवार (१ मार्च) रोजी एम एच- ०७ सी-९३१६ क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे पहाटे ६ वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती.घोट पासून 3 किलोमीटर जंगलात अचानक बसने पेट घेतल्याने या बस मध्ये असलेले प्रवासी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तातळीने बसमधून खाली उतरले. जवळपास ८ प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती समोर येत असून सर्वजण सुखरूप आहेत.
एसटी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटऱ्यामध्ये शार्ट सर्कीटने आग लागत असल्याने प्रसंगावधान साधून चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाश्यांना खाली उतावरले आणि स्वतःही आपला सामानसुमान घेऊन खाली उतरले.त्यानंतर लगेच बसने पेट घेतला.या बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे झाले.तर चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसवर दारमदार असल्याने बस मध्ये तांत्रिक बिघाड होणे,भर रस्त्यावर बस बंद पडणे,आग लागणे अश्या घटना हे नित्याचेच झाले आहे.शुक्रवारी सकाळच्या सुमारास तर बसने पेट घेतल्याने प्रवासी चांगलेच भयभीत होऊन धाव घेतली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापक राखडे यांना विचारले असता बसमध्ये असलेल्या बॅटऱ्या जळाले असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Nagpur Goa Highway :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या आगामी शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी जमीन सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे, अशी माहिती बुधवारी सह व्यवस्थापकीय संचालक कैलाश जाधव यांनी दिली.
लवकरच भूसंपादन आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू होईल, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा ; Young Generation ; आजकालच्या मुली म्हणतात आधी जॉब मग लग्न, देशात नवीन ट्रेंड सुरू
MSRDC नुसार, नवीन Nagpur Goa Highway एक्स्प्रेस वे दोन ठिकाणांदरम्यान थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ११ तासांपर्यंत कमी करेल.
नवीन एक्स्प्रेस वे Nagpur Goa दरम्यान १२ जिल्ह्यांमधून जाणारा ८०० किमी लांबीचा असेल
अधिक वाचा ; Mobile Hack ; तुमचा मोबाईल हॅक तर नाही झाला? असे चेक करा
एक्स्प्रेसवे दोन ज्योतिर्लिंगांसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रांना कव्हर करेल - एक परळी वैजनाथ आणि दुसरा हिंगोली जिल्ह्यातील औंध नागनाथ (नागेश्वर).
माहूरचे रेणू देवी मंदिर, तुळजापूरमधील तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि गोव्याचे पत्रादेवी मंदिर ही या दोन्ही राज्यांतील अन्य लोकप्रिय मंदिरे आहेत जी एक्स्प्रेस वे व्यापतील.
अधिक वाचा ; Mother Killed Her Son ; आईनेच केला पोटच्या मुलाचा खून
पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पासाठी ८६,००० कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हा संपूर्ण हरित क्षेत्र प्रकल्प आहे.
अधिक वाचा ; Divorce Case ; पत्नीला नाहीतर पतीला पोटगी देण्यात यावी कोर्टाने दिला आदेश
Nagpur News ; महिलेच्या खून झाल्याची खोटी माहिती देणे पडले महागात
Nagpur News ; बापलेकाने मिळून केली शेजारी रहणाऱ्या युवकाची हत्या
Chandrapur News ; लहान बाळाला घेऊन महिला गेली १२वी चा पेपर सोडवायला
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
भरधाव दुचाकीची झाडाला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
धानोरा :-
गोडलवाही येथून दुचाकी ने स्वगावी परत येत असताना भरधाव दुचाकीची झाडाला धडक लागून दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना 21 फेब्रुवारी ला रात्री सात वाजताच्या सुमारास घडली
देवाजी दसरू कोडाप 48 रा. कनारटोला ता. धानोरा जि . गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा 21 फेब्रुवारीला गोडलवाही येथे एकटाच कामानिमित्त नातेवाईकांकडे गेला होता काम आटोपून दुचाकीने परत येत असताना गोडलवाही पासून दीड किमी अंतरावर असलेल्या वळणावर त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसली यामध्ये त्याचे डोक्याला जबर मार लागल्याने व वेळेवर उपचार न मिळाल्याने तो जागीच ठार झाला घरी त्याची पत्नी व मुले तो येणार म्हणून वाट पाहत होती परंतु रात्र होऊनही पती घरी न पोहोचल्याने पत्नीने गोडलवही येथे त्यांचे नातेवाईकांना फोन करून विचारले असता तो त्यांचे घरून दुचाकीने गेला असल्याचे समजले तेव्हाच नातेवाईक त्याला पाहण्यासाठी गेले असता तो रस्त्याचे कडेला पडून असल्याचे दिसले घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली तेव्हा त्याला रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतू डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले.
चिमूर प्रतिनिधी :-
ग्रामपंचायत बोरगाव (शिवणफळ) अंतर्गत असलेल्या सिंदोळा गावात महिलांनी ग्रामसभा आयोजित केली सदर ग्रामसभेत गटग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गावातील घटस्फोटीत, विधवा, परितक्ता, प्रोढकुमारी यांची ऐकल म्हणून ग्रामपंचायतने स्वतंत्र नोंद वेगळ्या प्रोसेडींग बुकवर करावी तसेच ऐकल महिलाना ग्रामपंचायत हद्दीत व शालेय पोषण आहारामध्ये असणाऱ्या जागांसाठी ऐकल महिलांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी ग्रामसभेत निवेदन देवून करण्यात आली आहे.
यावेळी सदर ग्रामसभेला गटग्रामपंचायत बोरगाव (शि) चे सरपंच संतराज खुळसंगे, उपसरपंच अमिल झाडे, ग्रामसेवक रमेश एकूडे, ग्रामपंचायात सदस्य संगिता चौधरी, ताडू उपरे, उषा खडसंग, अशोक खंगार तसेच गावातील महिला बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आशा स्वयसेविका, आशा सुरेश मडावी, माजी ग्रा.प. सदस्य दिलीप कोंगरे, शाळा समितीचे अध्यक्ष कुंदा कचरू मडावी आदी गावातील मंडळी पुरुष व महीला मोठया प्रमाणात उपस्थित होते.
येनापूर येथे बस थांब्यावर शेडअभावी प्रवासी त्रस्त
निवारा शेड उभारण्यासाठी लोकप्रतिनिधीं लक्ष देणार काय?
आष्टी - :
येणापूर येथे बस थांब्यावर शेड अभावी प्रवासी त्रस्त झाले असून महामार्गाचे काम होऊनही प्रवासी निवारा बांधण्यात आलेला नाही त्यामुळे प्रवाशांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात गडचिरोली ते आष्टी महामार्गावरील येनापूर हे गाव महत्वाचा मानला जातो. चामोर्शी तालुक्यातील मध्यभागी असलेल्या येनापूर येथे लक्ष्मणपूर, वायगाव आष्टी, चामोर्शी जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना येथूनच जावे लागते. पंरतु महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत येनापूर येथे वाहनांची वाट बघणार्या प्रवाशांना प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वारा ,पाऊस, उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. वास्तविक पाहता महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ते शेड उभारून द्यायला पाहिजे होते परंतू असे झालेले नाही त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात तसेच सद्यपरिस्थितीत भंयकर अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशी वर्गाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या उन्हामध्ये वाहनांची वाट बघत राहणार्या अनेक प्रवाशांमध्ये चक्कर येऊन पडण्याची संख्या देखिल वाढलेली आहे. त्यामुळे येनापूर येथे प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर उमटत आहेत. त्यामुळे येनापूर येथील बसथांब्यावर प्रवासी निवारा बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे म्हणून परिसरातील जनतेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे
कोळसा वाहतुकीतून अवघ्या महिनाभरात मध्य रेल्वेने तब्बल ४१७.३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या शिवाय अन्य साहित्य, मालाची ने-आण करून रेल्वे प्रशासन मालामाल झाले.
गेल्या जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेने कोणकोणत्या साहित्याची, चिजवस्तूंची वाहतुक करून किती रुपयांची कमाई केली, त्याचा अहवाल प्रसिद्धीला दिला आहे. त्यानुसार, जानेवारी २०२४ या एका महिन्यात मध्य रेल्वेने तब्बल १०१५ रॅक कोळशाची वाहतूक केली. त्यातून रेल्वेला ४१७.३१ कोटी रुपयांचा घसघशीत महसुल मिळाला. गेल्या वर्षी याच महिन्यात मध्य रेल्वेने ९८४ रॅक कोळसा लोड करून ३९७.२८ कोटी रुपये मिळवले होते. त्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यांची कमाई ५ टक्के जास्त आहे.
कोळशाप्रमाणेच रेल्वेने गेल्या महिन्यात लोहखनिजाच्या ४६ रॅक लोड करून ३६. ६ कोटी रुपये मिळवले. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात ही कमाई केवळ १.५४ कोटी रुपये होती. सिमेंटच्या २३ रॅक लोड करून १८ . १ कोटी रुपये मिळवले तर क्लिंकरच्या २३ रॅकची वाहतूक करून १२.२ कोटीची कमाई केली आहे.
साखरेने दिले १.२३ कोटी
अशाच प्रकारे रेल्वेने डीओसी, डोलोमाईट, फ्लाय ॲश, फेरो मॅगनिज आणि लष्करासाठी लागणाऱ्या अन्य साहित्याची वाहतूक करून सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केली. साखरेच्या ४ रॅकची वाहतूक करून रेल्वेने १.२३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात रेल्वेने साखर वाहतुकीतून केवळ ४७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.
नागपूर : दोन वर्षांत जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून उभ्या राहिलेल्या अजनी रेल्वे स्थानकाची सध्याची इमारत पुढील आठवड्यात पाडण्यात येणार आहे. या इमारतीसोबतच अजनी मेट्रो स्टेशनच्या इमारतीचा २० टक्के भागही पाडण्यात येणार आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होईल.
अजनी स्थानकाच्या पश्चिमेकडील दुसऱ्या टर्मिनल इमारतीच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. फूट ओव्हर ब्रिजसाठी पायलिंगचे काम सुरू आहे. सध्या या इमारतीत एक तळघर आणि तीन मजले असतील. त्यावर भविष्यात आणखी सहा माळे चढवण्यात येणार आहेत. परिसरात उपविद्युत केंद्राचे कामही केले जाणार आहे. अजनी स्थानकात सध्या तीन प्लॅटफॉर्म आहेत. याशिवाय आणखी चार प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. दोन्ही इमारतींच्या बांधकामानंतर स्थानकाची प्रवासी क्षमता दररोज ४४ हजारांपर्यंत वाढणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम २०२३ मध्ये सुरू झाले होते आणि ते मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.
मेट्रो स्टेशन अजनीला जोडले जाईल
अजनी स्टेशनला मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी मेट्रोची इमारत पाडण्यात आली आहे. लिंक झाल्यानंतर प्रवाशांना नवीन स्टेशनवर उतरून चालत जाण्याऐवजी थेट मेट्रोने नवीन स्टेशन गाठता येणार आहे.
जुन्या कॉलनीच्या जागी नवीन फ्लॅट
या भागातील पश्चिम भागातील रेल्वे कर्मचाऱ्यांची जुनी वसाहतही पाडण्यात आली असून, त्या ठिकाणी २८ दिवसांची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. यापैकी एका इमारतीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पर्यावरणाचे भान ठेवून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले आहे.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या चॅनेल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
गोंदिया : रेल्वेमध्ये कोणतीही अडचण आल्यास घाबरण्याची गरज नसल्याचा दावा भारतीय रेल्वेने केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आता रेल्वे हेल्पलाइन क्रमांक एकत्रित केले आहेत. भारतीय रेल्वेने आता उपलब्ध सर्व हेल्पलाइन क्रमांकांच्या जागी १३९ या क्रमांक जारी केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणे आणि रेल्वेशी संपर्क अत्यंत सोपे होणार आहे.
रेल्वेचा वापर प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. अशा परिस्थितीत रात्रीच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होतो. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. गोंदिया जिल्ह्यातून धावणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांनाही या हेल्पलाइनची मदत मिळते. प्रवासात तुम्हाला नाश्ता किंवा जेवण हवे असल्यास, चालत्या ट्रेनमध्येही, तुम्ही हेल्पलाइनवरून ऑर्डर करू शकता.
हा नवीन क्रमांक रेल्वे वापरकर्त्यांसाठी एकात्मिक सेवा प्रदान करेल. सुरक्षा, तक्रारी, खानपान आणि दक्षता यासाठी प्रवासी 139 वर डायल करू शकतात.
सर्व मोबाईल धारक 139 या नंबरवर कॉल करू शकतात. या क्रमांकावर SMS पाठवून प्रवाशांना मूळ ट्रेन आणि आरक्षण संबंधित चौकशी जसे की पीएनआर स्थिती, तिकीट (सामान्य आणि तत्काळ) उपलब्धता, ट्रेनचे आगमन, प्रस्थान इत्यादी माहिती मिळू शकते.
१३९ हा हेल्पलाइन क्रमांक १६ भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे IVRS (इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) वर आधारित असून त्यात मराठी भाषेचा समावेश आहे.
प्रवासादरम्यान सर्व चौकशी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी १३९ चा वापर केला जातो. रेल्वेने जारी केलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, विभागीय रेल्वे १३९ व्यतिरिक्त कोणताही नवीन हेल्पलाइन क्रमांक किंवा तक्रार क्रमांक देणार नाही.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या चॅनेल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावसकर यांनी जून 2023 ला बावसकर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयुज कडुकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च महिन्यात केयुज कडुकर यांच्या फोन पे वर बावसकर यांनी तब्बल25 हजार 500 रुपये, 27 मार्च 3 हजार रुपये व14 एप्रिलला 10 हजार 400 रुपये असे एकूण 38हजार 900 रुपये पाठविले होते.काही अपरिहार्य कारणामुळे बावसकर हे ताडोबा सफारी साठी येऊ शकले नाही, बावसकर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडुकर यांच्यासोबत सम्पर्क साधला आधीचे पैसे कडुकर यांचेकडे जमा होते, त्यांनतर बावसकर यांनी नोव्हेंबर 2023 ला 5 हजार फोन पे द्वारे कडुकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024 ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली.27 जानेवारीला बावसकर कुटुंब हे सफारी साठी ताडोबा येथील मोहरली गेटजवळ आले असता त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बुकिंग चे तिकीट दाखविले असता कर्मचाऱ्यांनी ते बोगस असल्याचे सांगितले, आपली फसवणूक झाली असे बावसकर यांच्या लक्षात आले, त्यांनी तात्काळ याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
https://mykhabar24.com/login/MK24230709BtFrGIg6fY/
Nagpur News नागपूर : यावर्षी स्वतंत्र भारताचा 75 वा Republic Day 2023 आपण साजरा करणार आहोत. Republic Day च्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी police ची बारीक नजर राहणार आहे. दरवर्षी Futala Talav चौपाटी मार्गावर सकाळपासूनच तरुणाईची मोठी गर्दी उसळते. सोबतच त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 26 January फुटाळ्यात सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
फुटाळ्यावर वाहनांना 'नो एन्ट्री'
Republic Day असो Or मग Independence Day, Futala Talav चौपाटी ही तरुणाईची कायम आवडते ठिकाण राहिले आहे. राष्ट्रीय सणाला या मार्गावर दरवर्षी सकाळपासूनच तरुणाईची मोठी गर्दी उसळत असते. मात्र मधल्या काळात या रस्तावर काही अतिउत्साही तरूणांकडून नियमांचे उल्लंघन करत वाहनांनी स्टंट केल्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत अशा स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या. हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस आयुक्त शशिकांत सातव यांनी या मार्गावर सर्वच वाहनांना बंदी असल्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे 26 January ला सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांना फुटाळा तलाव परिसरात ‘NO ENTRY’ असेल.
असे असतील वाहतुक मार्गातील बदल
Futala talav कडून Ambazari कडे जाणारे वळण ते Futala talav टी-पॉईंटपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. सोबतच वाडी नाक्याकडून Futala talav मार्गे जाणारी वाहतूक जुना वाडी नाका ते रवीनगर या मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच भरतनगरकडून जाणारी वाहतूक अमरावती रोड / रवीनगर, महादेव मंदिर, वायुसेनानगर या मार्गे वळविण्यात येणार आहे. वायुसेना मार्ग ते फुटाळा तलाव ही वाहतूक महादेव मंदिर तेलंगखेडी मार्गे वळविण्यात येईल.
मेट्रो प्रवाशांना 30 टक्के सूट
उद्या Republic Day च्या निमित्ताने MAHA METRO NAGPUR कडून METRO प्रवाशांकरिता 30 टक्के सूट देण्यात आली आहे. Republic Day निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे Metro ने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना या सर्व कार्यक्रमात सहभागी होता यावे तसेच इतरत्र फिरणे अधिकच सोपे व्हावे, यासाठी Metro ने ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे Nagpur करांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.