भोजराज नागपुरे मोब. ९४२२८२५५९७
देसाईगंज /- राज्यात सद्यास्थितीत महायुती सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचाराला वैतागून तसेच महागाई, बेरोजगारी या मुद्द्याला घेऊन असंतोष उफाळून येऊ लागला आहे. भाजपाच्या लोकसभेतील उमेदवारांनी चक्क ४०० पार झाल्यास संविधान बदलण्याची जाहिर व्याख्याने केल्याने एकवटलेल्या बहुजन समाजाने काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. नामदेव किरसान यांना तब्बल दिड लाखाच्या फरकाने निवडून आणले. मात्र काँग्रेसचा खासदार निवडून येताच काँग्रेसीत हवा शिरल्याने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तसेच पक्षासाठी कुठलेही योगदान नसलेल्या रामदास मसराम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे पक्षासाठी खपलेला एक नाराज गट एकत्र येऊन उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने बंडखोरीचा मसराम यांना जबर फटका बसणार असून मसराम यांची ही राजकीय आत्महत्या असल्याचे बोलल्या जाऊ लागल्याने राजकीय खळबळ माजली आहे
आरमोरी विधानसभा क्षेत्रा करीता काँग्रेस कडुन रामदास मसराम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मसराम हे काँग्रेस पक्षाची वाताहत करण्यासाठी वाड्यावरून सोडलेले दलालांच्या माध्यमातून राजकीय स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यांच्या भोवताली असलेल्या सक्रिय दलालांमुळे कट्टर काँग्रेसीत असंतोष उफाळून आला असून मसराम यांना विरोध नसला तरी दलालांनी वारंवार पक्षाच्या प्रामाणिक व सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्याने व दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतिने काढण्यात आलेल्या जनसंवाद परिवर्तन यात्राही हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. केवळ पक्षाची तिकीट मिळावी या उद्देशाने आठ महिण्यापुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे खिसे भरून पक्षात दावेदारीचे वातावरण निर्माण केले. दरम्यान काँग्रेसच्या इतर पदाधिकारी कार्यकत्यांनी पक्ष वाढीसाठी
विविध आंदोलन करून, महायुती सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले. मात्र मसराम अँड होऊ कंपनिने इतरांना डावलून प्रसंगी खोटे व्हिडिओ व्हायरल करून पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांना आहे. बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तोंडावर दरम्यान जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांना विश्वासात घेऊन यावर तोडगा काढायला गंभीर पाहिजे होता. मात्र ज्यांच्या सहकायनि जिल्हाध्यक्ष बनलेल्या महेंद्र ब्राम्हणवाडे स्थितीत यांनी त्यांचेच पंख छाटून मसराम यांची तसेच एकतर्फी बाजु घेतल्याने पक्षात त्याचक्षणी दुफळी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवार एकोप्याने निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे असतांना ब्राम्हणवाडे यांनी जेष्ठ स्वप्न पदाधिकाऱ्यांना डावलून जाहिरातीसाठी कित्येकांना लाखो रुपये खर्च करवून तसेच यामुळे परिवर्तन यात्रेसाठी संभाव्य उमेदवारांकडून वाताहत वसुली करण्यात आल्याने सर्वांना समान येऊ न्यायाने वागवून पैकी एका उमेदवारावर प्रश्न लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. मात्र असे
करण्यात न आल्याने मसराम यांना समोर समोर करून इतरांचे पंख छाटले ज्याचा रोष घातलेल्या निवडणुकीत व्यक्त होणार असल्याचे यामुळे स्पष्ट समोर येऊ लागले विशेष म्हणजे ऐन निवडणुकीच्या मसराम यांचा जमिन विक्रीतून आपल्याच नातेवाईकाच्या फसवणूकीची बाब चव्हाट्यावर आल्याने आदिवासी समाजही मसराम यांना झटका देण्याच्या असल्याचे सांगीतले जात आहे. समोरचा उमेदवार तगडा आणि संघटितपणे निवडणुक लढणारा असल्याने ऐन निवडणुकीत असंतोष गट एकवटून आपला उभा करणार असल्याने उभा केलेल्या बैलोबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री होण्याचे रंगविणाऱ्याला हा चांगलाच झटका असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे. पक्षाचा जनाधार असुनही काँग्रेसची होणार असल्याचे यावरून समोर लागल्याने यास जबाबदार कोण? असा आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे
गडचिरोली : आझाद समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन काटेंगे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत मंगलवार दिनांक २९ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आझाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषी सहारे, जिल्हा संघटक हंसराज उराडे, विधानसभा प्रभारी धनराज दामले,तालुका अध्यक्ष आरमोरी ॲड नर्गिस पठाण, आरमोरी तालुका प्रभारी गोवर्धन धोटे, तालुका महासचिव ॲड राज सुखदेवे, शहर अध्यक्ष नागसेन खोब्रागडे, तालुका सचिव सुरेंद्र वासनिक, शहर अध्यक्ष नितीन भोवते, युवा आघाडी तालुका अध्यक्ष आरमोरी शुभम पाटील, मीडिया प्रमुख सतीश दूर्गमवार , तालुका संघटक रोहिदास बोदेले, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, रमेश तुलावी, सोमाजी काटेंगे, रमेश तुलावी, बारशू तुलावी, रेवणाथ मारगाये, देविदास कुमरे, कुरखेडा तालुका अध्यक्ष सावन चीखराम,युवा आघाडी अध्यक्ष रोहित कोडवते, विधानसभा उपाध्यक्ष सोनुभाऊ चौधरी, भूपेंद्र बनसोड, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अंकुश कोकोडे, महिला तालुका अध्यक्ष वडसा संगीता मोटघरे, तालुका सचिव करण डोंगरे, महिला आघाडी सचिव शिला सहारे,किशोर कावळे वडसा, तालुका अध्यक्ष वडसा बबन रामटेके, गजानन केलझळकर कुरुड, सचिन गेडाम,
यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.द्र बनसोड, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अंकुश कोकोडे, महिला तालुका अध्यक्ष वडसा संगीता मोटघरे, तालुका सचिव करण डोंगरे, महिला आघाडी सचिव शिला सहारे,किशोर कावळे वडसा, तालुका अध्यक्ष वडसा बबन रामटेके, गजानन केलझळकर कुरुड, सचिन गेडाम,
यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने सावली तालुक्यात सर्वात मोठी कामगिरी तरुणांच्या हाती दिली.
भारतीय जनता पार्टीने मोठमोठे पद त्यामध्ये युवा तालुका अध्यक्षपदी नितीन कारडे यांना नियुक्त करून तालुक्याची सर्व धुरा यांच्या हाती सोपवल्या असून भारतीय जनता युवा मोर्चा तालुका महामंत्री पदी विशाल करंडे आणि भारतीय जनता युवा मोर्चा तालुका महामंत्री पदी अंकुश भोपये यांची नियुक्ती करून जनतेचा आणि युवकांचा कल वाढवण्याचे काम केले आहे.
युवा कार्यकर्त्यांच्या संपर्कांनी येत्या निवडणुकीमध्ये सर्व सूत्रे युवा कार्यकर्त्यांकडे देण्यात आली आहे. म्हणून सर्वत्र चर्चा सुरू आहे तसेच युवा सदस्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मुंबईवरून गडचिरोली येथे प्रथमच आगमन केलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय मी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेईन याविषयी माहिती दिली.
आमदार डॉक्टर देवराव होळी पुढे म्हणाले जिल्ह्यातील निवडणुकीत हार खालेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली.आपल्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवून आपली उमेदवारी रद्द केली. त्यामुळे आपण अतिशय दुःखी झालो आहोत.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक लौकिक भिवापूरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विवेक ब्राह्मणवाडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे , भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, भाजपाच्या शहराच्या अध्यक्ष कविता उरकुडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
अहेरी:- आपल्या अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांची झालेली अधोगती,वाढलेली बेरोजगारी,रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी मी लढणार असल्याचं संकल्प करीत माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
२८ ऑक्टोबर रोजी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी हजारोंच्या उपस्थितीत राणी रुख्मिनी महल येथून भव्य रॅली काढत 'हम भी किसींसे कम नहीं' हे दाखवून दिले. सुरुवातीला त्यांनी कै. राजे सत्यवानराव महाराज यांच्या स्मृती समाधी स्थळाला अभिवादन केले.त्यानंतर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करत त्याच चौकात उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.यावेळी राजामाता राणी रुख्मिणी देवी,युवा नेते अवधेशराव बाबा आत्राम,विक्की बाबा आत्राम,राजे समर्थक आणि पाचही तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यावर तोफ डागली.गेल्या पाच वर्षात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यात टाकून मला तिकीट मिळू नये म्हणून बाप लेकीने मोठा गेम केला.पैशाने तिकीट विकत घेऊन पैश्याची उधळण करत ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असले तरी ही निवडणूक आता जनतेनी हातात घेतली आहे.त्यामुळे तिकीट मिळाल्याच्या आनंदात तुम्ही कितीही फटाके फोडा २३ तारखेला आम्ही फटाके फोडणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.एका खाजगी कंपनीच्या मांडीवर बसून पैशाने आणि माझ्या कार्यकर्त्यांना धमकावून ही निवडणूक जिंकणार असे तुम्हाला वाटत असेल तर जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकवणार आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी असून तुमच्यासाठीच मी ही निवडणूक लढवणार आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी विरोधकांना योग्य धडा शिकवा असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंचा भाषण ऐकून त्यांच्या समर्थनार्थ एकच जल्लोष केला.
दरम्यान कै.राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातून ढोल ताश्यांच्या गजरात आणि आदिवासी पारंपरिक नृत्याने भव्य शक्ती प्रदर्शन करत पोलीस स्टेशन समोर पर्यंत रॅली काढण्यात आली.त्यांनतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात जल्लोषाने 'राजे साहब आगे बढो हम तुम्हारे साथ है' चे नारे देत समर्थन जाहीर केले.
*जनता हीच माझी तिकीट*
मला पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत.माझ्यासाठी कुठलाही पक्ष नको आणि पक्षाचा चिन्हही नको.माझी जनता हीच माझी तिकीट आहे.जनता आशीर्वाद दिल्यास मला विधिमंडळ गाठता येणार आहे.विद्यमान मंत्र्यांनी कितीही पैसा, पॉवर,कार्यकर्त्यांना धमक्या देऊन मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी
'मै झुकेगा नही साला' असा डायलॉग मारून त्यांनी विरोधकांना एक प्रकारचा चॅलेंज दिला आहे.!
गडचिरोली, (जिमाका) दि.28: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 साठी गडचिरोली जिल्ह्यात आज 10 उमेदवारांकडून एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले यात कृष्णा दामाजी गजबे (भारतीय जनता पार्टी) यांनी दोन तर प्रा. रमेश गोविंदा मानागडे (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला आहे.
68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यात भरत मंगरूजी येरमे (वंचित बहुजन आघाडी) यांनी दोन अर्ज दाखल केले तर बाळकृष्ण वंगणुजी सावसाकडे (अपक्ष), डॉ. मिलिंद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), जयश्री विजय वेळदा (भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष), मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात आज चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यात हनमंतू गंगाराम मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन नामनिर्देशनअर्ज भरले. तसेच आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट) व राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत 15 उमेदवारांकडून एकूण 19 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
आज 28 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 12 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 2 व्यक्तींनी 5 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 9 व्यक्तींकडून 10 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत (28 ऑक्टोबर) एकूण 213 नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
000
गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सरचिटणीस संजय दुधबळे, आझाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, चामोर्शी तालुकाध्यक्ष रघुनाथ वासेकर, शेकापच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, पोर्णिमा खेवले, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवित्र दास, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शर्मिश वासनिक, भाई अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयापासून लाल - निळे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली.
यावेळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली:- पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मुंबईवरून गडचिरोली येथे प्रथमच आगमन केलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय मी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेईन याविषयी माहिती दिली.
आमदार डॉक्टर देवराव होळी पुढे म्हणाले जिल्ह्यातील निवडणुकीत हार खालेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली.आपल्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवून आपली उमेदवारी रद्द केली. त्यामुळे आपण अतिशय दुःखी झालो आहोत.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक लौकिक भिवापूरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विवेक ब्राह्मणवाडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे , भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, भाजपाच्या शहराच्या अध्यक्ष कविता उरकुडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
गडचिरोली:- विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात विश्वजीत मारोतराव कोवासे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी नाकारल्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आपली लढाई लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्या दिनांक २९ ऑक्टोबरला नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला नामांकन अर्ज सादर करणार आहेत.
अहेरी:-आज अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार च्या उमेदवार भाग्यश्री ताई अत्राम यांनी आपले नामांकन दाखल केले. इंडियन फंक्शन हॉल, भुजंगरावपेठा, अहेरी येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित रॅलीला मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाने प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये अहेरीतील नागरिकांनी भाग्यश्री ताई अत्राम यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्यांना प्रचंड आशीर्वाद दिला.
भाग्यश्री ताई अत्राम यांनी या अद्भुत प्रेमासाठी आणि मिळालेल्या समर्थनासाठी जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अहेरी समृद्धी, विकास, आणि आनंदाच्या नव्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. या बदलाच्या नव्या विचारांना त्यांनी सलाम केला आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली चौथी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत शरद पवारांनी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 76 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच आता आणखी 9 उमेदवारांची घोषणा करण्याता आली आहे.
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी
माण- प्रभाकर घार्गे
काटोल- सलील अनिल देशमुख
खानापूर- वैभव पाटील
वाई- अरूणादेवी पिसाळ
दौंड- रमेश थोरात
पुसद- शरद मैंद
सिंदखेडा- संदीप बेडसे
दिं.२८ आक्टोंबर
गडचिरोली -६८, विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मान.श्री. डॉ. मिलिंद जी नरोटे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी माजी खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली ते तहसील कार्यालय, पर्यंत आयोजित ‛भव्य नामांकन फार्म भरण्यासाठी महारॅली’ त माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे गडचिरोलीत नामांकन दाखल करण्यासाठी पुष्पगुच्छाने स्वागत व विजयी भव असे अभिनंदन करत भाजपा महायुतीच्या काढलेल्या महारँलीत प्रचंड जनसमुदायात सहभागी व उपस्थित झाले.
यावेळी विधान परिषदेचे आमदार मान.डॉ. परिणयजी फुके, जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र जी ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणयजी खुणे,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रविंद्र जी वासेकर,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,समन्वयक प्रमोदजी पिपरे, राष्ट्रवादी युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भरडकर,जेष्ठ नेते सुधाकरराव येंनगदलवार,जिल्हा सचिव रंजिताताई कोडापे, नंदकिशोर काबरा,कीर्तीकुमार मासुरकर तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली :- काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा आरमोरी विधानसभा क्षेत्राकडे लागलेल्या दिसून येत होत्या. अशातच आता काही वेळापूर्वी काँग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १४ उमेदवारांचे नाव पुढे आले आहेत. १४ उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या वतीने आरमोरी विधानसभा मतदारसंघाकरीता रामदास मसराम यांना तिकीट देण्यात आली आहे. यावेळेस आरमोरी विधानसभा मदारसंघात नवीन चेहरा देण्यात आल्याने चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. त्यामुळे 'जूनं की नवं' असा महासंग्राम दिसून येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेसच्या १४ उमेदवारांची यादी
अमळनेर - डॉ. अनिल नाथु शिंदे
उमरेड - संजय नारायणराव मेश्राम
आरमोरी - रामदास मसराम
चंद्रपूर - प्रवीण नानाजी पडवेकर
बल्लारपूर - संतोषसिंग रावत
वरोरा - प्रवीण काकडे
नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
औरंगाबाद पूर्व - लहू शेवाळे
नालासोपारा - संदीप पांडे
अंधेरी पश्चिम - अशोक जाधव
शिवाजीनगर - दत्तात्रेय बहिरत
पुणे छावणी - रमेश बागवे
सोलापूर दक्षिण - दिलीप माने
पंढरपूर - भागीरथ भालके
मनोहर पोरेटी यांची गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणुक लढविण्याची पूर्वतयारी नव्हती त्यांची इच्छा आरमोरी मतदार संघातून निवडणूक लढविण्याची होती त्यांनी आरमोरी क्षेत्रात जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली मात्र आरमोरी क्षेत्रात काँग्रेसकडून इच्छुकांची भाऊगर्दी बघता त्यांनी निवडणुक तीन ते चार महिने बाकी असताना आपला मोर्चा गडचिरोली विधानसभा क्षेत्राकडे वळविला. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या भाजप प्रवेशानंतर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे हाच चेहरा काँग्रेस समोर होता विश्वजित कोवासे यांनी विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क वाढवून मतदार संघ पिंजून काढला... आणि निवडणुकीची तयारी सुरु केली... मात्र काँग्रेस च्या गटबाजीच्या राजकारणामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विश्वजित कोवासे यांच्याविरुद्ध पक्षात डॉ सोनल कोवे, यांना शब्द देवून प्रतिस्पर्धी निर्माण केले दुसरीकडे ते मनोहर पोरेटी यांच्यासाठीही अनुकूल होतें.... गडचिरोलीची जागा विश्वजित कोवासे यांना जाणार अशी स्थिती होती.. विजय वडेट्टीवार यांचा विरोध असला तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पाठिंबा असल्याने विश्वजित कोवासे यांना उमेदवारीची आशा होती मात्र विजय वडेट्टीवार यांच्या तीव्र विरोधामुळे मनोहर पोरेटी यांना उमेदवारीची लॉटरी लागली..... ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. तुळशीराम पाटील पोरेटी यांचे पुत्र असून त्यांच्या वडिलांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणुक लढविली होती.. मनोहर पोरेटी यांनी गडचिरोली जिल्हापरिषदेचे उपाध्यक्षपदही भूषविले असून आता.... भाजपचे उमेदवार डॉ मिलिंद नरोटे, काँग्रसचे मनोहर पोरेटी, व अपक्षउमेदवार माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्यात सामना रंगणार असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल
गडचिरोली : येथील विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना भाजपा पक्षाने उमेदवारी नाकारल्याने संपूर्ण क्षेत्रात भाजपा कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये नाराजीचा सूर असून विधानसभा क्षेत्रातील अनेक भाजपा पक्षाचे पदाधिकारी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे रविवार (२७ ऑक्टोबर) रोजी राजीनामे देणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या अंतर्गत पोटात एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गडचिरोली क्षेत्राची उमेदवारी डॉ. मिलिंद नरोटे यांना जाहीर केली. मात्र, गेल्या दहा वर्षात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी
या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विविध विकासात्मक कामे केल्याने त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा झाला होता. शेवटपर्यंत त्यांना भाजपाची तिकीट मिळेल असेच बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी भाजपाकडून गुरुवारी १० ते १२ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता. विशेष म्हणजे आ. डॉ. देवराव होळी यांच्या सोबतीला उमेदवारी अर्ज सादर करताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ त्यांना एबी फॉर्मची वाट होती, अशातच
आजच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच नाराजीचा सूर दिसून आला, याचा प्रत्यय म्हणून भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली असून या बैठकीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांसह अनेक भाजपा पक्षाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख हे सुद्धा भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पूर्णपणे आ. डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. विद्यमान आमदारांची तिकिट कापल्याने भाजपातील डॉ. होळी समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मुंबई:-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार
वाशिम कारंजा – ज्ञायक पाटणी
चिंचवड – राहुल कलाटे
माजलगाव – मोहन जगताप
परळी – राजेसाहेब देशमुख
हिंगणा – रमेश बंग
अणुशक्तीनगर – फहद अहमद
मोहोळ – सिद्धी कदम
भोसरी – अजित गव्हाणे
हिंगणघाट – अतुल वांदिले