दि.२१ आक्टोंबर २०२४
चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपुर या गावाचा व परिसरातील समस्यांवर संरपच हृदय बाला, युवकवर्ग व महिलांनी पदाधिकारी यांनी आपल्या समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यांचा छोटा खाणी चर्चा दरम्यान आढावा बैठक घेत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती चे अशोक जी नेते बोलतांना म्हणाले, मि माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत वडसा गडचिरोली रेल्वे,जिल्ह्यात रेल्वेचे जाळे, मेडिकल कॉलेज,कोटगल, चीचडोह बँरेजेस,सुरजागड लोह प्रकल्प,नँशनल हाँयवे,रस्त्याची कामे असे अनेक प्रश्न लोकसभेत मांडून जनतेच्या सेवेसाठी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहे.यापुढेही मी जनतेच्या सेवेत तत्पर राहील.जनतेच्या अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.असे मत मा.खा.नेते यांनी या छोट्या खाणी बैठकी दरम्यान केले.
पुढे बोलतांना आपले भाजपाचे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव पाठीशी आहे.आपले सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे.प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी स्वतः जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे खोलुन मोफत अर्ज भरण्यासाठी आपण सुविधा उपलब्ध करून दिले.व या माध्यमातून विविध शिबिरांचे आयोजन करत विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिला भगिनींना मिळालेला आहे याचे समाधान वाटते.तसेच युवकांना कौशल्य विकास अंतर्गत रोजगार उपलब्ध निर्माण होत आहे.येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच आपला सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,सरपंच हृदय जी बाला, ग्रा.प.सदस्या चंदना किशोर घरामी,किशोर घरामी,रामेंद्र रेपती बाला,विचारण हालदार,संजय बारई,सूरज मिस्त्री,राजू घरामी,राजकुमार सरकार,आदित्य मिर्धा,निलेश मंडल, देवव्रत मिस्त्री ,कौशिक गोल्डर तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली -
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (मुंबई) या प्रसिद्ध संस्थेतर्फे 'राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा' आयोजित करुन विजेत्या साहित्यिकांना श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावर्षी राज्यभरातील एकूण ३५९ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील एकूण १४ साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची निवड करण्यात आली. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ' या नाट्यकृतीची नाट्यलेखनाच्या प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यावेळी सरस्वती साहित्य पुरस्काराने सन्मानित व दलित साहित्य चळवळीत अग्रक्रमी मानाचे स्थान असलेले,'अक्करमाशी' 'उपल्या' इ. साहित्याने संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे हस्ते, ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त व प्रसिद्ध साहित्यिक दा. कृ. सोमण, अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांचे उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या " धरती आबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकाचे लेखनासाठी "श्रीस्थानक साहित्य पुरस्कार -२०२३" या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने साहित्य परीक्षक महादेव गायकवाड, किरण बर्डे, संजीव फडके, निर्मोही फडके, सदाशिव टेटविलकर, शुभांगी गान, र. म. शेजवलकर, निशीकांत महाकाळ, दा.कृ. सोमण, वृंदा दाभोळकर, मानसी जोशी, अस्मिता चौधरी, वृषाली राजे, प्रतिभा चांदूरकर, दुर्गेश आकुरकर, चांगदेव काळे (कार्याध्यक्ष) इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माहे फरवरीमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सौ. तारा भवाळकर यांचेसह विजेते साहित्यिक झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे, प्रतिभा सराफ, गीतेश शिंदे, ऋषिकेश गुप्ते, अंजली जोशी, डॉ.उदय निरगुडकर, गजानन देवधर, पांडुरंग बलकवडे, डॉ. पद्माकर गोरे, श्रीधर दीक्षित, डॉ. गिरीश पिंगळे, शुभदा सुरंगे, लक्ष्मीकांत धोंड इ. साहित्यिकांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्ध साहित्यिका निर्मोही फडके यांनी केले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या नाटकाला यापूर्वी साहित्य प्रज्ञामंच, पुणे या संस्थेचेही नाट्यलेखनाचे प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, डॉ. प्रा. श्याम मोहरकर, डॉ.प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ.प्रा. योगीराज नगराळे, डॉ. प्रा. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, प्रा. यादव गहाणे, मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), आदिवासी साहित्यिक प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, व नंदकिशोर नैताम, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, तसेच इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.
गडचिरोली दि.21:-भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 22 ऑक्टोबर ते दिनाक 29 ऑक्टोबर 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंतची मुदत असून, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजनी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ला होईल.
वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
गडचिरोली दि.२१ :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अधिकारी व कर्मचारी यांना सोपविलेल्या विविध जवाबदाऱ्या विहित वेळेत अचुक पार पाडण्याचे निर्देश 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी यांनी आज दिले.
निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्रीमती मानसी यांच्या अध्यक्षतेखाली आज सांस्कृतीक भवन नगर परीषद देसाईगंज येथे निवडणूक कर्तव्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधीत बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
मतदान पथके, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदानयंत्र व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका, निवडणुक कार्य प्रमाणपत्र, आदर्श आचारसंहिता, एक खिडकी योजना, चिन्हांकित मतदार यादी बनवणे इत्यांदी विविध विषयावर मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. भामरागडमधील कोपरीच्या जंगलात ही चकमक झाली आहे. या भागात अनेक नक्षलवादी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात कारवाई केली. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झालेत.
गडचिरोलीत पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटच्या जंगल परिसर आहे. या भागात सध्या चकमक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याचा गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या जंगलात ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. सी. सिक्सटी पोलीस पथकाचे तुकड्या वाढवण्यात येत आहेत.
धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धर्माराव आत्राम आज भामरागड दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांच्या सुरक्षेसाठी वाहनांच्या ताफा येण्यास सुरुवात झालीय. आत्राम यांना पोलिसांच्या मोठा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री आत्राम हे भामरागड तालुक्याला सकाळी गेले. त्यानंतर ते आता गडचिरोलीत विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरणार आहेत. अशातच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
गडचिरोली:- आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी आदिवासी परधान समाज मंदीर, गांधी वार्ड क्रं,११ गडचिरोली येथे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, सुरज शेडमाके, गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह,गडचिरोली, नंदू मडावी, विनोद सुरपाम, महेंद्र मसराम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी युवा सदस्य अजय सुरपाम, रुपेश सलामे, विजय सुरपाम,आकाश कुळमेथे, अंकित कुळमेथे,नंदकिशोर कुंभारे, सुरज गेडाम, यश खोब्रागडे, महादेव कांबळे, आदित्य केळझरकर,सुधीर मसराम, नेहाल मेश्राम,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन,अंकुश बारसागडे, विक्की मसराम,महिला सदस्य शालू सुरपाम, गंगा सलामे उपस्थित होते.
गडचिरोली:- राज्य परिवहन महामंडळ आगार गडचिरोली येथे क्रांती वीर शहीद बाबुराव शेडमाके शहीद दिन निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आगार व्यवस्थापक श्री राकडे साहेब.बस स्थानक प्रमुख रामटेके साहेब,प्रमुख पाहुणे गुलाबराव मडावी,अरूनभाऊ पेंदाम वा.निरी.पूजा सहारे.नितेश मडावी,भास्कर आत्राम,तुळशीराम मेश्राम,विष्णुदास कुमरे,सुधीर मेश्राम,रामचंद्र सोयाम,गणेश कोडापे,जयभारत मेश्राम,सुरेश सिडाम,सुरेश कोवे,नामदेव मेश्राम, पवन वनकर,अशोक सुत्रपवर,प्रकाश मडावी, स.वा. निरी. धाडसे,नरड मॅडम,गीता मेश्राम,सुलोचना जुमनाके,माणिकशाह मडावी,दीपक मांडवे,अशोक नैताम,राजू मडावी,सुनील कुंभमवार उपस्थित होते.
कुरखेडा : शेतातील चवळीच्या शेंगांचीतोडणी करीत असताना शेतकऱ्याला विषारी सापाने दंश केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तालुक्याच्या पलसगड येथे घडली.
मोहन आत्राम (६१) रा. पलसगड, असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहन आत्राम यांच्या शेतातील धान कापणी व बांधणीचे काम पूर्ण झालेले आहे. त्यांच्या शेतातच चवळीचे वेल आहेत. येथे लागलेल्या शेंगा ते तोडता असताना त्यांच्या पायाला
विषारी सापाने दंश केला. त्यांच्या पायाला काहीतरी रुतल्याचा भास झाला. त्यांनी लक्ष दिले नाही. गावापासून खूप लांब अंतरावर शेत आहे. त्यामुळे त्यांना घरी परत येण्यासाठी बराच उशीर झाला. तोपर्यंत त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान, त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड आहेत.
आरोपीला पीसीआर : मुलचेरातील प्रकार
मुलचेरा तालुक्याच्या लभानतांडा येथील २० वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धानोरा येथील बँक व्यवस्थापकावर मुलचेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्यानंतर सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
विजय सदानंद राठीपिटने (३६, रामटेक, जिल्हा नागपूर), असे आरोपीचे नाव आहे. विजय राठीपिटने हा २०२३ रोजी मुलचेरा येथील विदर्भ कोकण बँकेत व्यवस्थापकपदी कार्यरत होता. तेव्हा लभाणतांडा येथील युवती ही बँकेत ये जा करायची. दरम्यान, दोघांचाही परिचय झाला. 'तुला शिक्षणासाठी मदत करतो व अधिकारी बनवतो व लग्न करतो' असे आमिष आरोपी विजय राठीपिटने याने युवतीला दिले. त्यानंतर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, मुलीने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला तेव्हा 'तू वाईट प्रवृत्तीची मुलगी असून माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत' अशी दमदाटी देत लग्नास नकार दिला. झालेल्या मानसिक त्रासामुळे मुलीने मुलचेरा पोलिस स्टेशनमध्ये १५ ऑक्टोबरला शारीरिक शोषणाची तक्रार नोंदवली. सदर तक्रारीवरून आरोपीला अटक करून गुन्हा नोंद करीत न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश विधाते व पीएसआय ऋतुजा खाते करत आहेत.
बालाघाट जिला के लालबर्रा जनपद पंचायत क्षेत्र अंतर्गत सांसद श्रीमती भारती पारधी एवं जिला पंचायत सदस्य व सभापति झामसिंह नागेश्वर के ग्रह ग्राम पंचायत अतरी में अनियमितता व भ्रष्टाचार की बू। ग्राम पंचायत अतरी के पूर्व सरपंच लवकुश पांचे सहित ग्रामीण जनों ने सरपंच श्रीमती अंजु हुकुमचंद पंचेश्वर पर बिना कार्य पूर्ण किए शासकीय राशि आहरण कर अनियमितता बरतते हुए भ्रष्टाचार करने का आरोप लगाया है। मेन रोड़ से शांति धाम तक सीसी सड़क निर्माण कार्य में कई महीनों पहले बगैर कार्य के फर्जी बिल लगाकर राशि का आहरण कर लिया गया है एवं आज दिनांक तक निर्माण कार्य नहीं करवाया गया है एवं राशि निकालकर हेरा फेरी कर ली गई है जिसकी उच्च स्तरीय जांच करवाई जावे। पंचायत के लिए क्रय की गई सामग्री फर्नीचर कुर्सी टेबल अलमारी की खरीदी लगभग 1 वर्ष पूर्व की गई, जिसमें भारी अनियमितता की गई है। उपलब्ध सामग्री एवं बिल में दर्शाई गई सामग्री में अंतर है। बिल में दर्शाई गई सामग्री आज तक उपलब्ध नहीं है। अतः इसकी जांच की जावे।
मुख्य मार्ग से आमाटोला पहुंच मार्ग सीसी सड़क निर्माण कार्य में गुणवत्ता पूर्वक कार्य नहीं करवाया गया है, जिससे सड़क बीच से फट गई है एवं कई जगह से क्षतिग्रस्त हो चुकी है। उक्त सीसी सड़क की जांच करवाई जावे। पंचायत द्वारा नाली मरम्मत का फर्जी बिल लगाकर राशि का भुगतान किया गया जबकि किसी भी नाली का मरम्मत कार्य नहीं करवाया गया है फर्जी बिल लगाकर राशि की हेराफेरी की गई, जिसकी जांच की जावे। ओमप्रकाश के घर से नाला तक सायफन पुल तक नाली निर्माण कार्य में मई जून 2024 में करवाए गए कार्य के लिए मस्टर रोल नहीं निकाले गए बगैर मस्टर रोल से मजदूरी का कार्य करवाया लिया गया। जिससे उन्हें आज तक मजदूरी नहीं मिली। जिसकी जांच करवाया जावे। पंचायत क्षेत्र में पंचायत के संरक्षण में नदी नाला एवं शासकीय भूमि से रेत व मिट्टी का अवैध उत्खनन किया जा रहा है, जिससे सरकारी संपत्ति को नुकसान पहुंच रहा है, जिसकी जांच कर उचित कार्रवाई की जावे।
"ग्राम पंचायत अतरी में 15वां वित्त आयोग से निर्मित मेन रोड़ से शांति धाम तक सीसी रोड़ निर्माण लागत 13 लाख 80 हजार रुपए, जिसकी प्रशासकी स्वीकृति क्रमांक 18 व दिनांक 25 अक्टूबर 2021 और तकनीकी स्वीकृति क्रमांक 17 व दिनांक 28 अक्टूबर 2021 है, जिसे ग्राम पंचायत सरपंच द्वारा 500 मीटर सीसी सड़क बनाया जाना था जिसे 2 वर्ष पूर्व सिर्फ 80 मीटर सड़क बनाकर कार्य अधूरा छोड़ दिया गया जिसकी लगभग 9 लाख 47 हजार 864 रुपए की राशि 2 वर्ष पूर्व ही आहरण कर ली गई है, जिसकी पूर्व सरपंच सहित ग्रामीण जनों ने 27 अगस्त 2024 को जनपद पंचायत लालबर्रा व जिला पंचायत बालाघाट कार्यालय एवं सांसद व विधायक को शिकायत की है। शिकायत के बाद सरपंच द्वारा 100 मीटर की सीसी सड़क फिर बना दी गई, 500 मीटर में से कुल 180 मीटर सड़क बनाई गई है और उससे अधिक की शासकीय राशि आहरण कर ली गई है। जिस संबंध में 14 अक्टूबर सोमवार 2024 को पंचायत भवन में जांच करने जांच अधिकारी जनपद पंचायत लालबर्रा से एसडीओ संतोष नागेश पहुंचे थे जिन्होंने दोनों पक्षों की बात सुनी और मौका स्थल का निरीक्षण भी किया, जिसके बाद उन्होंने कोई भी पंचनामा तैयार नहीं किया और शिकायत करने वाले पक्ष को समझाईश देते हुए कि उक्त सीसी सड़क बन जाएगी, बना दिया जाएगा कहकर मामले को शांत कर सरपंच के भ्रष्टाचार के कारनामे को छुपाने का प्रयास किया जा रहा है। जिम्मेदार जांच अधिकारी उक्त सीसी सड़क मामले की निष्पक्ष जांच कर विधिवत नियमानुसार कार्रवाई करें। सरपंच द्वारा बिना सीसी सड़क का कार्य पूर्ण किए ही शासकीय राशि का आहरण कर अपने निजी काम में उपयोग कर अपने पद का दुरुपयोग किया गया है, ऐसे सरपंच पर धारा 40 की कार्रवाई प्रस्तावित किया जाना उचित एवं न्याय संगत होगा ग्रामीण जनों ने यह मांग रखी है, जिससे कि कोई भी सरपंच अपने पद का दुरुपयोग ना कर सके और शासकीय राशि का बंदरबांट न हो सके।
शिकायतकर्ता पूर्व सरपंच लवकुश पांचे सहित ग्रामीण जनों ने यदि इस मामले की निष्पक्ष जांच नहीं हुई एवं सरपंच पर कार्रवाई नहीं हुई तो और भी जिम्मेदार उच्च अधिकारियों को शिकायत करने व न्यायालय का दरवाजा खटखटाने की बात कही है। शिकायत करने वालों में यह ग्रामीण शामिल हैं- पूर्व सरपंच व वार्ड नंबर 8 के पंच लवकुश पांचे, देवीदयाल राहंगडाले, हसीना हुमनेकर, उर्मिला कावरे, तेजलाल उईके, हंसराम देशमुख, ज्ञानीराम पंचेश्वर, सुरेंद्र पाचे, दिलीप पंचेश्वर, मुन्नालाल पंचेश्वर, मनोज देशमुख, उमाशंकर कावडे, विक्रांत मानेश्वर, दीपक देशमुख, फागूलाल, विनीत हुमनेकर, महिपाल ढोमने, कान्तिलाल मेश्राम, जगनलाल बरले, उदेलाल, निकेश हुमनेकर, शेषराम पंचेश्वर, कसलनाथ पाचे, महेंद्र मात्रे, मनीष पंचेश्वर, ओमप्रकाश सहारे, साबुलाल मर्सकोले, साहेबलाल मर्सकोले, केवलराम अमलेवार, इंद्रकुमार कावरे, संतलाल पंचेश्वर व अन्य ग्रामीण जन शामिल हैं।
गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवडणुक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्री दैने यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सावजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.
निवडणूकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेले कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, यांची दक्षता संबंधीत कार्यालय प्रमुखांनी घ्यावी यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे.
जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे मात्र ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज करावे व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी 100 टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. वाहनाचा वापर, प्रचार सभा, लावूडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबत त्यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती दिली.
बँकर्सनी संदिग्ध व्यवहाराची माहिती कळवावी
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: १० लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
प्रिटींग प्रेसला सूचना
राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.
गडचिरोली :- लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान गडचिरोलीतून झाले होते याचा उल्लेख भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रकार परिषदेतही केला होता. आता विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रशासनाद्वारे ८० टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दैने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील देतांना निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २२ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्राची छाननी ३० ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर, मतदान २० नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने काल जाहिर केले असल्याचे सांगितले. तेव्हापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघातील 972 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी सुमारे 8 लाख 19 हजार 570 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 7 हजार कर्मचारी कर्तव्यावर राहणार आहेत.
मतदान केंद्र : मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक मतदार संघात 8 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 24 मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. यात आरमोरी विधानसभा क्षेत्रात 310, गडचिरोली क्षेत्रात 362 तर अहेरी क्षेत्रात 300 असे एकूण 972 मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली
जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या : जिल्ह्यात एकूण 8 लाख 19 हजार 570 मतदार असून यात पुरुष मतदार 4 लाख 11 हजार 384, स्त्री मतदार 4 लाख 8 हजार 132, इतर मतदार 9 यांचा समावेश आहे. आरमेारी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 130820, स्त्री मतदार – 131347, इतर -1, एकूण -262168), गडचिरोली विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार –154284, स्त्री मतदार – 152086, इतर -2, एकूण -306417), अहेरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 126280, स्त्री मतदार – 124699, इतर-6, एकूण -250985) . जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या- पुरूष 9639, स्त्री 7549 व इतर 1 अशी एकूण 17 हजार 189 इतकी आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 6012 इतकी आहे. मतदार नोंदणी प्रक्रीया नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.
उमेदवारास खर्चाची मर्यादा : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे.
सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल
सोशल मीडियावर लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
पोलिस विभागाची माहिती देतांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी सांगितले की विविध दलाचे सुमारे 17 हजार सुरक्षा कर्मचारी निवडणूक शांततने पार पाडण्यासाठी तैनात राहणार आहेत. यादरम्यान 750 कि.मी. रोड ओपनिंग करण्यात येणार असून संवेदनशील क्षेत्रात मतदान कर्मचारी व साहित्य पोहोचविण्यासाठी ५ हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्यसिमेवर 11 तपासणी नाके कार्यान्वित राहणारअसल्याचे त्यांनी सांगितले
००००००
CSC (Common Service Centres) ने ग्रामीण और शहरी क्षेत्रों के लोगों तक सरकारी और डिजिटल सेवाओं की पहुंच को आसान बनाने के लिए कई नई अपडेट्स और सेवाओं की शुरुआत की है। इस आर्टिकल में, हम आपको CSC की नवीनतम सेवाओं और योजनाओं के बारे में विस्तृत जानकारी देंगे, जो आपके लिए महत्वपूर्ण हो सकती हैं।
1. Tele-Law Services: मुफ्त कानूनी सलाह
CSC ने ग्रामीण और दूरदराज़ के इलाकों में कानूनी सलाह की पहुंच को और बेहतर बनाने के लिए Tele-Law Service शुरू की है। इसके तहत लोग अब वकीलों से मुफ्त या कम शुल्क में कानूनी परामर्श ले सकते हैं। यह सेवा भारत सरकार के न्याय विभाग द्वारा CSC के माध्यम से चलाई जा रही है।
2. PM Vishwakarma Scheme: कारीगरों के लिए विशेष योजना
PM Vishwakarma Yojana का उद्देश्य पारंपरिक कारीगरों और दस्तकारों को लाभ पहुंचाना है। इसके तहत CSC केंद्रों से जुड़कर कारीगरों को डिजिटलीकरण, प्रशिक्षण, और आर्थिक सहायता प्रदान की जा रही है। इससे कारीगरों के व्यवसाय को आधुनिक बनाने और उनकी आय बढ़ाने में मदद मिलेगी।
3. DigiPay सेवाओं का विस्तार: आसान और सुरक्षित डिजिटल भुगतान
ग्रामीण क्षेत्रों में DigiPay सेवाओं का विस्तार किया गया है, जिससे लोग आसानी से डिजिटल भुगतान कर सकते हैं। आधार-आधारित पेमेंट सिस्टम से अब नकदी रहित लेनदेन संभव हो रहा है। DigiPay के माध्यम से लोग बैंकिंग सेवाओं, मोबाइल रिचार्ज, और बिल भुगतान की सुविधाओं का लाभ उठा सकते हैं।
4. स्वास्थ्य सेवाएं: टेलीमेडिसिन और आयुष्मान भारत
CSC के माध्यम से अब टेलीमेडिसिन सेवाओं का लाभ उठाया जा सकता है, जिससे लोग दूर से ही डॉक्टर्स से परामर्श ले सकते हैं। इसके अलावा, आयुष्मान भारत योजना और अन्य स्वास्थ्य बीमा योजनाओं का पंजीकरण भी CSC के माध्यम से किया जा रहा है, जिससे ग्रामीण इलाकों के लोग स्वास्थ्य संबंधी सेवाओं का आसानी से लाभ उठा सकें।
5. किसान और शिक्षा सेवाएं
CSC ने किसानों के लिए एक विशेष पोर्टल लॉन्च किया है, जिसमें कृषि संबंधित परामर्श और सेवाएं प्रदान की जाती हैं। इसके साथ ही शिक्षा सेवाओं में भी CSC ने कदम बढ़ाया है, जिससे छात्र डिजिटल लर्निंग और सर्टिफिकेट कोर्स का लाभ उठा सकते हैं।
6. कौशल विकास कार्यक्रम
CSC के कौशल विकास पहल के तहत युवाओं को डिजिटल मार्केटिंग, कोडिंग, और अन्य तकनीकी प्रशिक्षण प्रदान किया जा रहा है। इससे युवा पीढ़ी को रोजगार के बेहतर अवसर मिल रहे हैं।
CSC सेवाओं का लाभ कैसे लें?
यदि आप इन सेवाओं का लाभ उठाना चाहते हैं, तो अपने नजदीकी CSC केंद्र पर जाकर या CSC के आधिकारिक पोर्टल digitalseva.csc.gov.in पर रजिस्ट्रेशन कर सकते हैं।
निष्कर्ष
CSC की ये नई सेवाएं और योजनाएं ग्रामीण और शहरी क्षेत्रों में डिजिटल सशक्तिकरण के लिए एक बड़ा कदम हैं। चाहे कानूनी सलाह हो, स्वास्थ्य सेवाएं, या डिजिटल भुगतान, CSC ने हर क्षेत्र में सुधार और सुविधा को बढ़ावा दिया है।
CSC की नवीनतम अपडेट्स के बारे में अधिक जानने के लिए, हमारे ब्लॉग को सब्सक्राइब करें और अपने नजदीकी CSC केंद्र से संपर्क करें।
वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात चक्क बिबट्याने घरात शिरुन महिलेवर केला हल्ला
चंद्रपूर :- . वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात आता चक्क घरात शिरून बिबट्याने महिलेस जखमी केले असल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे काल शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याने चक्क घरात शिरून हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. वंदना परशुराम निमगडे वय ४८, रा. शिवापूर चक, असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मूल तालुक्यातील मौजा- शिवापूर चक येथे परशुराम आबाजी निमगडे आपल्या कुटुंबीयासह राहतात. घराला लागूनच बगिचा तसेच काही अंतरावर बफर क्षेत्राचे जंगल आहे. निमगडे यांचे कुटुंबीय रात्री झोपेत असताना शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात शिरून वंदना परशुराम निमगडेवर हल्ला केला. काही अंतरावर असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याला बघून भुंकण्याचा आवाज केल्याने निमगडे कुटुंबीय जागे झाले. दरम्यान,बिबटया वंदनावर हल्ला करीत असल्याचे दृश्य बघुन इतरांनी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केल्याने बिबट पळुन गेला. मात्र, बिबट्याच्या हल्यात वंदना निमगडे ही जखमी झाली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी वंदना निमगडे हिला मूल येथील उपजिल्हा रूग्णलयात उपचारार्थ दाखल केले. वनविभागाने पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.
मुल तालुका हा बल्लारपूर मतदार संघात येतो. या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असल्याने चक्क वनमंत्र्याच्या गृहक्षेत्रातच वन्यप्राण्यांची एवढी दहशत निर्माण झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. वनमंत्र्यांनी विधानसभा क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे.
तलावात नेले देवी विसर्जनाला मात्र खड्ड्यात पडून 3 तरुणांना झाली जलसमाधी
गोंदिया : देवी विसर्जन दरम्यान तलावात खोदलेल्या खड्ड्यात तोल गेल्याने तीन तरुणांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सावरी टोला (रावणवाडी) येथील संकुलात शनिवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली.
आशीष फागुलाल दमाहे वय, 22 वर्ष, अंकेश फागुलाल दमाहे वय, 19 वर्ष, यश गंगाधर हिरापुरे वय, 19 वर्ष तिघे रा. सावरी ता. गोंदिया असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावातील तलावात रस्त्याच्या कामासाठी मे 2024 मध्ये खोदण्यात आलेल्या खड्ड्यात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना तीन तरुणांचा तोल जाऊन खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सावरी येथे घडली.
12 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्री 3 तास तलावात मृतदेह शोधून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आणि दुसरा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आणि एक उपचारासाठी घेवून जात असताना तिसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.
शनिवारी सावरी गावातील इतर रहिवासी दुर्गा देवी मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाले होते. अंतिम टप्प्यात सावरी टोला येथील तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गावातील 9 तरुण देवीची मूर्ती घेऊन तलावाकडे गेले असता.
यश हिरापुरे, आशिष दमाहे, अंकेश दमाहे आणि मागून मूर्ती धरून बसलेला आणखी एक युवक पुढे आला. तलावात खोदलेल्या खड्ड्यात तीन तरुणांची जलसमाधी झाली आणि दुसऱ्या तरुणाने कशी तरी वरून मूर्ती हलवून त्यांचे प्राण वाचवले.
या घटनेत मृत्यू झालेल्या आशिष दमाहे या तरुणांची नुकतीच लष्करात निवड झाली होती आणि काही प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो सरकारी सेवेत रुजू होणार होता.
तलावाच्या खोल खड्ड्यात बुडून या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हृदय द्रावक घटनेमुळे रावणवाडी, सावरी, सावरीटोला परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रावणवाडी पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.