PostImage

Vaingangavarta19

Sept. 5, 2024   

PostImage

कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मंगळवेढा -; मंगळवेढा पंचायत समिती मार्फत सन २०२४-२५ मध्ये दिले जाणारे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील शिक्षिका श्रीमती कविता महादेव वाघमारे यांच्या सह २१ जणांना जाहीर झाले असून आज शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड वरील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे शानदार समारंभात आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी  रूपाली भावसार या भूषविणार असून गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी  बिभिषण रणदिवे, शिक्षणविस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड व शामराव सरगर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 3, 2024   

PostImage

जोवर मुख्यमंत्री -शिक्षणमंत्र्याशी कॉन्फरेन्स नाही, तोवर माघार नाही.. -शिक्षकदिनी बेरोजगार …


गडचिरोली : जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये CTET व TET च्या नावाखाली जिल्ह्यातील बेरोजगार डीएड, बिएड धारकांना डावलून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्यात आले असून प्रसिद्ध झालेल्या यादीत 70 ते 80 टक्के बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देण्यात आल्याचे दिसून येते, हा जिल्ह्यातील बेरोजगारांवर पुन्हा एकदा अन्याय होत असल्याचा आरोप बेरोजगार संगठना व आझाद समाज पार्टी च्या वतीने करण्यात आला आहे. हा अन्याय जर थांबला नाही तर बेरोजगार संघटना निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरणार असेही यावेळी सांगितले. 

 

त्यामुळे शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व खासदार हे कुणीही बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलत नसल्याने यांचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे. जो पर्यंत शिक्षणमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचेशी कॉन्फरेन्स वर बोलणे होणार नाही तो पर्यंत जिल्हा परिषदेच्या दरवाजातून हटणार नाही असा इशारा निवेदनातून सीईओ ना देण्यात आला. 

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, जिल्ह्यातील अनेक जण पात्र असून सुद्धा भोंगळ कारभारामुळे अपात्र यादीत नाव आले त्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील बेरोजगारांना घेऊन आझाद समाज पार्टी लढा देणार असे आवाहन करत, 5 सप्टेंबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने जनतेने सहभागी होण्याचे आवाहन बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी ने केले.

 

यावेळी निवेदन देताना उपस्थित बेरोजगार युवकांसोबत आसपाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रवक्ते प्रितेश अंबादे, शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे. आदी उपस्थित होते..

-------------------

दि. 02 सप्टेंबर 2024

 

*राज बन्सोड* 

जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी 

गडचिरोली

8806757873


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 1, 2024   

PostImage

शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड दिल्यास मोठे यश - आमदार डॉ. देवराव …


शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड दिल्यास मोठे यश - आमदार डॉक्टर देवरावजी होळी

दिनांक ३१ ऑगस्ट गडचिरोली

विद्यार्थी ,युवक युवतिंनी  आपल्या  जीवनामध्ये  ज्ञानार्जना सोबतच विद्येची  देवता माता सरस्वती  व आध्यात्मिकतेला आदर्श ठेवून विद्यार्जन केल्यास शिक्षणात तसेच जीवनात  नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना मार्गदर्शन करताना केले.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री शेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे आयोजीत करण्यात झाला. आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी या समारंभाला उपस्थित राहून सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.

 यावेळी ते म्हणाले की, आजची पिढी वाईट व चुकीच्या दिशेने जात असल्याचे आपणाला दिसून येत आहे. ही पिढी केवळ भौतिक वादाला महत्त्व देत आहे. त्यामूळे  विद्यार्थी  युवक तरुण तरुणी चुकीच्या मार्गाला जात आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिकतेचे महत्त्व समजावून सांगने आवश्यक आहे. त्यांना शिक्षणासोबतच अध्यात्मिकतेची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे.  करिता आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण सर्वाँनी आध्यात्मिकतेला महत्व  द्यावे असे  आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना केले.


PostImage

KABIR NETWORK

Aug. 28, 2024   

PostImage

Gadchiroli News: विहान फाऊंडेशनच्या तरुणांनी महाराष्ट्र गडचिरोली पोलीस भरती जिंकली


Gadchiroli News: जुलै 2024 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीसाठी रणजीत सर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आणि विहान फाऊंडेशन संचलित स्वराज व वीरांगना अकादमीने 450 उमेदवारांना मोफत शारीरिक शिक्षण व शिकवणी दिली. या विशेष योजनेचा लाभ घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींनी पोलीस भरतीमध्ये उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.

 

नवीन महाराष्ट्र पोलिसांची निवड

या शिक्षण व प्रशिक्षणामुळे 150 पेक्षा जास्त उमेदवारांची महाराष्ट्र पोलिसांत निवड झाली आहे. त्यांच्या यशस्वीतेचा उत्सव 18 ऑगस्ट 2024 रोजी सेमना हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गडचिरोली नगरपरिषदेचे माननीय मुख्याधिकारी सूर्यकांत पिंडुरकर, चेअरमन कबीर यशोदा धर्माजी निकुरे, रणजीत सर, आकाश संगनवार, दिनेश देशमुख, मेनीराम सर आणि विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

 

विहान बहुउद्देशीय संस्थेचा योगदान

विहान बहुउद्देशीय संस्था गरीब, सुशिक्षित, बेरोजगार आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी विविध योजना राबवत आहे. संस्थेच्या पहिल्या टप्प्यात पोलीस भरतीसाठी 450 मुला-मुलींना मोफत शिक्षण दिले गेले. याचा परिणाम म्हणून 150+ नवीन महाराष्ट्र पोलिसांची निवड झाली आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील यश: एक आदर्श उदाहरण

हे यश गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी केलेल्या कठोर परिश्रमांचे आणि विहान बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांचे प्रमाण आहे. यामुळे स्थानिक युवक-युवतींना उत्तम संधी मिळाल्या आहेत आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक आदर्श उदाहरण स्थापन झाले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 28, 2024   

PostImage

डीएड-बिएड बेरोजगार शिक्षक दिनी निवृत्त शिक्षकासह सरकारचा करणार निषेध..


 

 

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा 

 

गडचिरोली : जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद शिक्षक भरतीवर जिल्ह्यातील डीएड -बिएड झालेले बेरोजगार प्रचंड नाराज असून आज दि. 27 ऑगस्ट रोजी गडचिरोली येथील संविधान सभागृहात बेरोजगारांच्या वतीने सहविचार बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अध्यक्ष म्हणून निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्मानंद मेश्राम होते तर अतिथी म्हणून युवा कार्यकर्ते राज बन्सोड, विनोद मडावी, पत्रकार रेमाचंद निकुरे, अंकुश कोकोडे उपस्थित होते.

 

सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीविषयी बेरोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून गडचिरोली जिल्हा हा मागास जिल्हा आहेचं पण रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा दुर्मिळ आहे. अशात शिक्षक भरतीमध्ये बेरोजगाराना डावलून सरकार निवृत्त लोकांना घेत आहे आणि इतर जिल्ह्यातील अर्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याने जिल्ह्यातील युवकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बेरोजगार आता आक्रमक झाले असून जिल्हा भरातून बेरोजगार मुले एकत्रित येऊन डीएड -बिएड बेरोजगार संघटनेची स्थापना करून महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या विरोधात 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनी डोळ्यावर काळ्या फिती बांधून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरु करणार आहेत. बैठकीत निवृत्त शिक्षकांना रुजू न होऊ देण्यासाठी गावागावात जाऊन ग्रामसभा व ग्रामपंचायतला ठराव घेण्यासाठी युवक आवाहन करणार असून विशेष मागास जिल्हा म्हणून भरती प्रक्रियेत ctet व tet परीक्षेची अट शिथिल करून जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य द्यावे, बाहेरचे उमेदवार घेऊ नये याकरिता लक्षवेधी लढा उभा करण्यात येईल असे ठरविण्यात आले. 

जर जिल्ह्यातील बेरोजगारांचा विचार न करता बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना घेण्यात आले आणि सेवानिवृत्त शिक्षक भरती रद्द करण्यात नाही आली तर, आगामी निवडणुकीत बेरोजगार युवक प्रस्थापित भाजपा आणि काँग्रेस ला मतदान करणार नाही व वेळ आल्यास निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. 

     जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांना 5 सप्टेंबर च्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्यातील विविध तालुक्यातील बेरोजगार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

 


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 27, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


 

  एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भाग असलेल्या महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील जाजावंडी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक मांत्तय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यात बेंडके सरांचा समावेश आहे.. कायम नक्षल्यांच्या वावर असलेल्या या गावातील शाळेत खुप कमी पटसंख्या होती.. मात्र बेंडके सरांनी या गावातील व लगतच्या गावातील पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली व शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली.. दिवसभर जंगलात हुंदडायची सवय असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून शाळेत नियमित येण्याची सवय रुजविली.. व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण केली... आज त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.. त्याबद्दल त्यांचें अभिनंदन


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 27, 2024   

PostImage

नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी जनसंवाद


  •  आगळा वेगळा कार्यक्रम - प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तरे आमदारांची
  • पासष्ठ विद्यार्थ्यांनी विचारले प्रश्न  

          चिमूर -   

            नेहरू विद्यालय व  कनीष्ठ महाविद्यालयाच्या वतीने  महाविद्यालयात २७ ऑगस्ट मंगळवार ला प्रश्न विद्यार्थ्यांची उत्तरे आमदारांची एक आगळा वेगळा कार्यक्रमा अंतर्गत  महाविद्यालयील विद्यार्थ्यांशी आमदारांचा जनसंवाद पार पडला. यात महाविद्यालयातील पासष्ठ विद्यार्थ्यांनी आमदार बंटी भांगडीया यांना प्रश्न विचारले.

    विद्यार्थ्यांनी चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांना शिक्षण, आरोग्य, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील जनतेशी निगडित न कंटाळता तब्बल चार तास विद्यार्थ्यांनी बसून प्रश्न विचारले असता हसत खेळत आमदारांनी विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे दिली. एका विद्यार्थीनीने चिमूर क्रांती भुमी विषयी  आपले स्वप्न काय आहे असा प्रश्न विचारला असता आमदार बंटी भांगडिया यांनी उत्तर देत सांगितले की प्रथम चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे, कांपा चिमूर वरोरा रेल्वे मार्ग,चिमूर ला जलमार्ग हब हेच स्वप्न असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घालून मोठे व्हावे अश्या शुभेच्छा दिल्या.
       यावेळी मंचावर प्राचार्य निशिकांत मेहरकुरे उपस्थित होते. संचालन लोंढे तर आभार वाघधरे यांनी व्यक्त केले. दरम्यान भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,जेष्ठ नेते घनश्याम डुकरे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे, किशोर मुंगले, जयंत गौरकर,श्रेयस लाखे, अमित जुमडे, गोलू मालोदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली होती.


PostImage

Sujata Awachat

Aug. 18, 2024   

PostImage

Gadchiroli News: पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या समीर बनपूरकर चा ऐतिहासिक …


Gadchiroli News: समीर मनोज बनपुरकर, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी येथील दहावीचा विद्यार्थी, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रेरणा उत्सवात जिल्ह्यातील सर्वोत्तम ठरला आहे. जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे आयोजित या स्पर्धेत समीरने पहिला क्रमांक मिळवून, आपल्या कौशल्याचा ठसा उमठवला आहे. या यशामुळे त्याला दिल्ली आणि वडनगर येथे विशेष प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली.

 

दिल्लीतील लाल किल्ल्यावर सहभाग 

समीरला १५ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले. या ऐतिहासिक कार्यक्रमात, त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सहभाग घेतला. यानंतर, १६ ऑगस्ट २०२४ रोजी समीरला प्रेरणा उपक्रमाच्या अंतर्गत नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्यातून त्याला विविध विषयांवर चर्चा करण्याची आणि प्रेरणा मिळवण्याची अनमोल संधी प्राप्त झाली.

हे देखील वाचा : Kids Tips: सावधान ! मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची गती होत आहे कमी

 

समीरचे यश : शाळा पालक आणि जिल्ह्याचे अभिमान 

समीरच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, आणि शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्याच्या या यशामुळे आरमोरी तालुका आणि गडचिरोली जिल्हा  गौरवशाली बनला आहे. समीरने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद 

  • शिक्षण मंत्रालयाच्या प्रेरणा उत्सवातील यश: समीरने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.
  • लाल किल्ल्यावर सहभाग: ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात समीरचा सहभाग.
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद: प्रेरणा उपक्रमाच्या अंतर्गत समीरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी.

समीरचा हा प्रवास एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जो फक्त त्याच्यासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी गौरवशाली ठरला आहे.

हे देखील वाचा : ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये फसवणुकीचा धोका: हे App तुमचे बँक अकाउंट करणार खाली, जाणून घ्या माहिती


PostImage

P10NEWS

Aug. 15, 2024   

PostImage

गडचिरोली कंत्राटी तत्वावर नियुक्ती करिता 171 सेवानिवृत्त शिक्षकांना दस्तऐवजासहित जि. …


               

     

        गडचिरोली/ 14:- गडचिरोली जिल्ह्यातील पेसा संवर्गातील जिल्हा परिषदांच्या गडचिरोली शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी शासन परिपत्रक 15/ 07/2024 नुसार या कार्यालयास अर्ज सादर केलेल्या पात्र सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देऊन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे उपस्थितीत समुपदेशाने पदस्थापना देण्याचे निश्चित केलेले आहे. तरी आपले पंचायत समितीस अर्ज सादर केलेल्या सोबतच्या यादीतील सेवानिवृत्त शिक्षकांना दिनांक 16/08/2024 रोजी सकाळी 10:00 वाजता विर बाबुराव शेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली येथे न चुकता संपूर्ण मुळ दस्तावेजासहित उपस्थित राहण्यास आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे. तसेच तालुक्या अंतर्गत पेसा क्षेत्रातील शाळांतील माहे जून 2024 अखेर रिक्त पदांचे माहितीसह आपण स्वतः न चुकता उपस्थित राहावे.                             प्रतिनिधी पाठवु नये. 


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 13, 2024   

PostImage

डोळसं व्हायचं समाजाला परिवर्तनाची दिशा देणारा काव्यसंग्रह ठरणार - रोहणकर-


 

     जर मनुष्याचा खऱ्या अर्थाने बौद्धिक विकास झाला तरच त्याचा सर्वांगीण विकास होवू शकतो. समाजात काही असेही काळजीवाहू साहित्यिक आहेत की ते त्यांच्या साहित्य कृतींतून समाजाचे कल्याण करू पाहतात. एक जागरूक नागरिक या नात्याने आपला आजूबाजूचा परिसर व तेथील लोकं यांचे ते बारकाईने निरीक्षण करीत असतात. ते निरीक्षण करतांना समाजातील काही अनिष्ट चालीरीती, परंपरा, प्रथा, अंधश्रद्धा यात गुरफटलेल्या जनतेला उपदेश करून त्यांचे खरे हित कशात आहे हे सांगण्यासाठी वेळोवेळी त्यांना सचेत करून त्यांना चांगल्या मार्गाकडे नेण्याचे कार्य काही 'डोळस' साहित्यिक करीत असतात. साहित्यिकाला समाजाचे भान असणे आवश्यक आहे. समाजातील वास्तविक परिस्थिती दर्शविणारे आणि अन्यायाला वाचा फोडणारे साहित्यच उत्तम दर्जाचे साहित्य ठरू शकते. 
           गडचिरोली  येथील निवृत्त शिक्षक श्री. उपेंद्र रोहनकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते आहेत. नुकताच त्यांचा "डोळस व्हायचं" हा कवितासंग्रह "झाडीबोली साहित्य मंडळाच्या" साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. समाजाचे अवलोकन करतांना समाजातील अनेक घटनांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. समाजात दिसून येत असलेली अंधश्रद्धा ही कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. त्याने समाजाची प्रगती साधली जाऊ शकत नाही. आजची तरुण पिढी दारू, खर्रा, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अंमली पदार्थ याच्या जीवघेण्या भोवऱ्यात गटांगळ्या खात आहे. त्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले तरच ते यातून बचाव करू शकतील अन्यथा पुढची पिढी आजच नष्ट होऊन जाईल. अनेक परंपरांच्या विळख्यात सापडलेल्या भगिनींना त्यातून बाहेर काढायचे असेल तर त्यांना विज्ञानाचा मार्ग दाखवून डोळस बनवावे लागेल. बुवाबाजी व कर्मकांडापासून त्यांना परावृत्त करावे लागेल. या दृष्टीकोनातून साकारलेल्या कवी उपेंद्र रोहनकर यांच्या कविता खरोखरच नवी परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या आहेत. व्यभिचार, बलात्कार, ग्रामीण समस्या, शिक्षण, शेती, इ. समस्यांवर देखील त्यांनी कवितांतून प्रकाश टाकला आहे. महिलांचे अज्ञान दूर करण्यासाठी साकारलेल्या कविता या विशेष उल्लेखनीय म्हणाव्या लागतील. 
         राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.नरेंद्र दाभोलकर अशा कितीतरी महान समाजसुधारकांनी समाजाला 'डोळस' बनविण्यासाठी प्रयत्न केले परंतु आताच्या आधुनिक युगातही समाजाची पाहिजे तशी वैज्ञानिक व वैचारिक प्रगती झाली नाही ही येथील शोकांतिका आहे. भारतीय समाज जागृत झाला नाही तर तो कायमच अंधाऱ्या गुहेत भटकत राहील. 
        अतिशय चिंतन मनन करून लिहिलेल्या कविता कवीचे संवेदनशील अंतर्मन दाखवते. समाजाबद्दलची कळकळ व तळमळ अनेक कवितांतून प्रकर्षाने जाणवते. "डोळस व्हायचं"  हा कविता संग्रह खरोखरच प्रशंसनीय असून वाचणारा प्रत्येक व्यक्ती हा 'डोळस' झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते.

सौ. सुनिता तागवान
कवयित्री, लेखिका, समीक्षिका, सामाजिक कार्यकर्ती
संस्थापिका, रचना प्रकाशन संस्था
आरमोरी जिल्हा गडचिरोली.


PostImage

Anirudha Career Academy Gadchiroli

Aug. 11, 2024   

PostImage

Gadchiroli News: गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फाऊन्डेशनचा शालेय साहित्य वितरण उपक्रम: …


Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी फाऊन्डेशनने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला, फाऊन्डेशनच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येते. या उपक्रमामुळे मुलांना आवश्यक शिक्षणसाहित्य मिळते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाची गती वाढते आणि पालकांवरील आर्थिक भार कमी होतो.

 

एटापल्ली तालुक्यातील शाळांमध्ये शालेय साहित्य वितरण

2024-2025 या शैक्षणिक सत्रात, फाऊन्डेशनने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील टेका, कोहका, कोकोबंडा, आणि जवेली बुजूर्ग या आदिवासी खेड्यांमधील जिल्हा परिषद शाळांमधील 119 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्कुल बॅग, नोटबुक्स, पाटी, पेन्सील, पेन, स्केल, शार्पनर, खोडरबर अशा आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक मदत

फाऊन्डेशनचा हा उपक्रम वस्तू व सेवाकर (GST) कार्यालय, पुणे येथे कार्यरत असिस्टंट कमिशनर्स, तसेच श्रीमती नयना मांडके, कर सल्लागार, दादर मुंबई यांच्या आर्थिक मदतीने राबवला गेला. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची साधने उपलब्ध झाली, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात मोठी प्रगती झाली आहे.

 

9 शाळांतील 309 विद्यार्थ्यांना लाभ

या शैक्षणिक सत्रात फाऊन्डेशनने 9 शाळांमधील एकूण 309 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील शिक्षणाबद्दलची आवड वाढली आहे आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.


फाऊन्डेशनच्या या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्वल होण्याची आशा आहे. यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या सर्व सन्मानीय व्यक्तींचे फाऊन्डेशनच्या वतीने आभार मानले आहेत. समाजातील अशा उपक्रमांमुळे शिक्षणाची नवी दिशा मिळत असून, यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उज्ज्वल भविष्याची संधी मिळत आहे.


PostImage

MK CREATION

Aug. 9, 2024   

PostImage

Chandrapur News: कु.कल्याणी राष्ट्रपती सोनुले चंद्रपूर जिल्ह्यातून महिला उमेदवारांमध्ये द्वितीय …


Chandrapur News: चंद्रपूर: निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्र, गडचिरोलीची विद्यार्थिनी कु. कल्याणी राष्ट्रपती सोनुले, मु.ताडाळा , तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर, यांनी पोलीस शिपाई भरतीत महिला उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे, निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्राचे नाव आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

हे देखील वाचा : Success Story : Uday Krishna Reddy की UPSC 2023 में सफलता की दिल छूने वाली कहानी

कु.कल्याणी राष्ट्रपती सोनुले यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि शिक्षणाच्या पाठिंब्यावर हा मान प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक व मार्गदर्शक श्री.सूरज गोर्लावार सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Chandrapur News कु.कल्याणी राष्ट्रपती सोनुले चंद्रपूर जिल्ह्यातून महिला उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून झाल्या पोलीस शिपाई

हे देखील वाचा : Success Story: घर-घर जा कर बेचती थी चाकू-छुरी, आज चलाती हैं BMW, करोड़ों की कंपनी की है मालकिन!

या यशामुळे जिल्ह्यातील अन्य महिला उमेदवारांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. कु. कल्याणी राष्ट्रपती सोनुले यांनी आपल्या कुटुंबीयांचे, मित्रांचे आणि शिक्षकांचे आभार मानले आहेत. त्यांच्या संघर्ष आणि समर्पणामुळे त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण स्थापन केले आहे.

 


PostImage

News mh33 live

Aug. 7, 2024   

PostImage

कुनघाडा रैय्यतवारी जि. प. शाळेत शिक्षण परिषद संपन्न केंद्राच्या गुणवत्ता …


कुनघाडा रैय्यतवारी जि. प. शाळेत शिक्षण परिषद संपन्न

 

केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले

 

दिनांक-०७/०८/२०२४ रोज बुधवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै.) येथे केंद्रस्तरीय 'शिक्षण परिषद' पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते होते , तर कार्यक्रमाचे उद्‌घाटक केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कु. शेंडे मॅडम, सुत्रसंचालन प्रमोद बोरसरे, तर आभार प्रदर्शन दुधबावरे सर यांनी केले. या परिषदेची सुरुवात फुलोरा परीपाठाने करण्यात आली. सुलभक निमाई मंडल यांनी बाबळेवाडीचा अनुभव सांगीतला तर अध्ययन स्तर विश्लेषण, कृतिकार्यक्रम व नियोजन व अंमलबजावणी रोषण बागडे व टिकेश ढवळे, शिष्यवृत्ती सद्यस्थिती व आढावा विजय दुधबावरे व निमाई मंडल, PAT विद्या समिक्षा केंद्र विद्याप्रवेश - आशिष येलेवार व उमेश जेंगठे, निपुण भारत ध्येय आणि क्षेत्र प्रफुल सिडाम, पुरुकातील कोऱ्या पानाचा प्रभावी वापर, आनंददायी शनिवार येलेवार सर यांनी सुलभक म्हणून मार्गदर्शन केले.

        केंद्रप्रमुख गोमासे यांनी केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन व सर्व शंकाचे समाधान केले. या शिक्षण परिषदेत शिक्षकांना पडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण सुलभकाकडून करण्यात आले.

     'श्रावणमासी हर्षमानसी

       हिरवळ दाटे चोहिकडे'

अशा उत्साहपूर्ण व निसर्गरम्य वातावरणात केंद्राची पहिली शिक्षण परिषद पार पडली.


PostImage

P10NEWS

Aug. 7, 2024   

PostImage

EDUCATION NEWS :- सरकारी व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठिवर वय …


.                                         

   गडचिरोली/07:-    गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळेतील पहिली व सातवीत शिकणारी विद्यार्थ्यांच्या पाठिवर वयापेक्षा व वजनापेक्षा जास्तीचे ओझं घेऊन शाळेत जात असताना निर्देशनात येत आहे. याकडे संपूर्ण शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. ती चिमुकली मुलं भीती पोटी कितीही दमछाक झाली तरी तक्रार करित नाही. पण त्यांची जनावरासारखं ओझ वाहुन ठकलेली चेहरे सर्व सांगुन जातात आणि घरी गेल्यानंतर आई-वडीलांचा अभ्यासासाठी सतत पाठिमागे लागलेली रि यामुळे मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो आणि त्याला क्षणभरही शाळेत किंवा घरी स्वतंत्र खेळण्याचा क्षण भेटण्याची वाट पाहात राहतो. पण तेही कधी संधी मिळत नसल्यामुळे तो अंतरमनार न्युनगंड ठेवुन मनातल्या मनात कुरघडत असतो. अशा प्रकारे त्या चिमुकल्यांची खूप दमछाक होते. मध्यंतरी शासनाकडून परिपत्रक काढून धडक मोहीम राबविण्यात आली होती. परंतु कालांतराने ती मोहीम बंद झालेली दिसत आहे. परंतु झोपलेल्या शिक्षण विभागाने जागे होऊन त्या चिमुकल्यांच्या मदतीला धावून येईल काय ? 


PostImage

Chandrawar Media Service

Aug. 2, 2024   

PostImage

मध्यप्रदेश कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स ने शिक्षा मंत्री को सौपा ज्ञापन, कंप्यूटर …


 मध्यप्रदेश कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स ने शिक्षा मंत्री को ICT @ SCHOOL परियोजना में हो रही अनियमितता को लेकर सौपा ज्ञापन 

शिक्षा मंत्री को ज्ञापन सौंपकर कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स ने ICT @ SCHOOL परियोजना को सफल बनाने के लिए जल्द से जल्द निर्णय लेने का किया आग्रह

 भोपाल /बालाघाट।  मध्यप्रदेश कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स 
बालाघाट जिले के दर्जनों युवाओं ने 27 जुलाई को भोपाल में शिक्षा मंत्री उदयप्रताप सिंह को एक लिखित ज्ञापन सौंपकर कंप्यूटर इंस्ट्रक्टर कि रीजॉइनिंग में हो रही देरी के विषय में लिखित ज्ञापन सौंपा है। सौंपे हुए ज्ञापन मे यह उल्लेख किया गया है की समग्र शिक्षा अभियान अंतर्गत संचालित ICT@SCHOOL परियोजना में प्रदेश के विद्यालयों में स्थापित कंप्यूटर लैब को क्रियाशील रखने तथा ग्रीष्मावकाश में भी विद्यार्थियों को कंप्यूटर सम्बन्धी प्रशिक्षण देने के उद्देश्य से विद्यालयों में समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कंप्यूटर इंस्ट्रक्टर की ज्वाइनिंग करायी गयी थी जिसके तहत कंप्यूटर इंस्ट्रक्टर का मानदेय अतिथि शिक्षक SSS-2 के निर्धारित मानदेय के अनुसार, मानदेय देय होगा जिसका भुगतान समग्र शिक्षा अभियान के अंतर्गत विद्यालय को जारी किया जाना था ऐसा सबंधित आदेश में उल्लेख है। जहां कंप्यूटर इंस्ट्रक्टर का मानदेय अतिथि शिक्षक SSS-2 के निर्धारित मानदेय 14000/-(चौदह हज़ार रुपये) देय होना था वहां कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स द्वारा 10000/-(दस हज़ार रुपये मात्र/-) पर अपनी सेवाओं, कर्तव्यों एवं दायित्वों का निर्वहन पूर्ण निष्ठा एवं ईमानदारी से किया जा रहा था । जिस उद्देश्य से कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स को रखा गया उन्हें हटाए जाने के कारण ग्रीष्मावकाश में विद्यार्थी कंप्यूटर प्रशिक्षण से वंचित रह गए । ग्रीष्मावकाश में लैब पूरी तरह से बंद रहने के कारण कई विद्यालयों में कंप्यूटर, प्रिंटर, इन्वर्टर बैटरी खराब हो गए अथवा बंद हो गए। आई.सी.टी. इंस्ट्रक्टर कि सेवाएँ दिनांक 31 मार्च 2024 तक लिए जाने के निर्देश दिए गए थे। जो की प्रथम आदेश में उल्लेखित कंप्यूटर इंस्ट्रक्टर के प्रावधान के ठीक विपरीत था। वित्तीय वर्ष 2024-2025 की वार्षिक कार्ययोजना की स्वीकृति भारत सरकार से प्राप्त होने के पश्चात् आई.सी.टी. इंस्ट्रक्टर के आमंत्रण के संबंध में निर्देश पृथक से जारी किये जायेंगे ऐसा आदेश में कहा गया था लेकिन वर्तमान दिनांक तक कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स की रीजाइनिंग विद्यालयों में नहीं करायी गयी है, जिसकी वजह से विद्यार्थी कंप्यूटर शिक्षा से दूर होते जा रहे है। जो खुशी और ललक हम कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स ने बच्चो के चेहरों पर देखी थी वो धूमिल होते जा रही है। जंहा आई.सी.टी. कंप्यूटर इंस्ट्रक्टर अपने कार्यों को लेकर प्रतिबद्ध रहे वही उनका वेतन कुछ जिलों में 1 वर्ष, 6 माह, 3-4 माह, और मार्च माह का वर्तमान दिनांक तक नहीं प्राप्त नहीं हो पाया है।
        प्रदेश के अन्य जिलो से कंप्यूटर इंस्ट्रक्टर द्वारा जिला शिक्षा अधिकारी, कलेक्टर महोदय, लोक शिक्षण संचालनालय भोपाल को पूर्व में ही ज्ञापन पत्र सौंपकर निवेदन किया जा चुका है। किन्तु कहीं से भी आज वर्तमान दिनांक तक हमारे पक्ष में किसी भी तरह का कोई भी निर्णय नहीं लिया गया है।
         माननीय मंत्री जी से मिलकर कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स ने निवेदन किया कि इन विषयों को संज्ञान में लेकर वर्ष 2024-2025 हेतु आई.सी.टी. इंस्ट्रक्टर (कंप्यूटर इंस्ट्रक्टर्स) की रीजोइनिंग में, वर्ष 2023-2024 में अपनी सेवा दे चुके प्रशिक्षित आई.सी.टी. इंस्ट्रक्टर को उनके अनुभव के आधार पर प्राथमिकता देकर उन्हें ही नवीन सत्र के लिए सेवाएँ देने हेतु शीघ्र अतिशीघ्र अवसर प्रदान करने का कष्ट  करे ताकि विद्यार्थियों को पुनः कंप्यूटर शिक्षा क लाभ मिल सके एवं डिजिटल इंडिया के सपने को पूरा करने की मूलधारा से उन्हें जोड़ा जा सके। इस दौरान प्रमुख रुप से  विक्रांत चौधरी, कुलदीप धानेश्वर, रजत भुजाडे, दिशा, रजनी मोहारे, अजहर खान, आदर्श वाहने, क्षीतिज उपवंशी, शहनवाज शेख सहित अन्य शामिल रहें। 


PostImage

Chandrawar Media Service

Aug. 2, 2024   

PostImage

निरिक्षण के दौरान बल्हारपूर हायर सेकेण्डरी स्कूल की अव्यवस्थित प्रयोगशाला …


जब तक प्रयोगशाला व्यवस्थित नहीं होगी तब तक बच्चे विज्ञान की प्रायोगिक शिक्षा कैसे ग्रहण करेंगे - श्रीमति मुंजारे 

लालबर्रा के बिरसोला, निलजी व बल्हारपुर विद्यालयों का किया आकस्मिक निरीक्षण 

बालाघाट । शुक्रवार को बालाघाट विधायक श्रीमती अनुभा मुंजारे ने लालबर्रा विकासखण्ड की तीन हॉयर सेकेण्डरी स्कूल जिनमें बिरसोला, निलजी और बल्हारपुर का आकस्मिक निरिक्षण कर वस्तुस्तिथि का जायजा लेकर बेहतर सुविधाएं मुहैया कराने हेतु उच्चाधिकारियो को निर्देशित किया।

      निरिक्षण के दौरान सर्वप्रथम शासकीय हॉयर सेकेण्डरी स्कूल बिरसोला के छात्र-छात्राओं से वार्तालाप किया एवं उनकी समस्याओं को सुना साथ ही मध्यान भोजन किचन रूम का भी निरीक्षण किया गया जहाँ पर तैयार मध्यान भोजन की गुणवत्ता भी देखी गई। 

       इसी क्रम में ग्राम निलजी के उच्चतर माध्यमिक शाला व माध्यमिक शाला का भी विस्तृत निरीक्षण किया तथा विद्यालय के छात्र- छात्राओं एवं शिक्षकगणों के साथ मध्यान भोजन भी किया गया जिसके बाद विद्यालय की भवन संबंधी समस्याओं को भी देखा और पौधा रोपण कर पर्यावरण के संरक्षण में एक और कदम बढ़ाया गया।

       जिसके बाद ग्राम बल्हारपूर स्तिथ एक शाला एक परिसर विद्यालय का निरीक्षण किया गया जहां पर छात्र-छात्राओं एवं शिक्षकगणों से विद्यालय के विषय में चर्चा हुई जहां पर अत्यंत अनियमितता के साथ ही शाला भवन की जर्जर स्थिति भी देखने को मिली।

विज्ञान कोई थ्योरी का विषय नहीं है विज्ञान प्रयोग का विषय होता है - अनुभा 

प्रेस से चर्चा मे बालाघाट विधायक श्रीमती अनुभा मुंजारे ने बताया की मैंने लालबर्रा क्षेत्र के आज तीन स्कूलों का निरिक्षण किया जिसमें पहला बिरसोला हॉयर सेकेण्डरी स्कूल था जहां की व्यवस्थायें कुछ हद तक संतोषप्रद मैंने पाई बच्चों की बैठक व्यवस्था, मध्यान भोजन की व्यवस्था, बच्चों ने कुछ समस्याओं से अवगत कराया जिनमें निराकरण के लिए मैं प्रयास करूंगी। जिसके बाद निलजी हाईस्कूल, माध्यमिक स्कूल गईं कुछ अव्यवस्थाओ को देखा और प्राचार्य एवं प्रधान पाठकों को निर्देशित किया गया है की अव्यवस्थाओं को शीघ्र ही सुधार करें ताकि छात्र-छात्राओं को भविष्य उज्जवल हो सके।

जिसके बाद बल्हारपुर ग्राम पंचायत है जहां हायर सेकेण्डरी स्कूल संचलित है जिसमे एक परिसर मे केजी 1 से हॉयर सेकेण्डरी तक कक्षाएं लगती है यहां भी कुछ अवस्थाएं देखने में आई जिसमे पुस्तकालय का कक्ष है लेकिन पुस्तकालय व्यवस्थित नहीं है, प्रयोगशाला तो है विज्ञान के छात्र भी है जिन्होंने बायोलाजी, मैथ्स भी लिया है लेकिन प्रयोगशाला संचालित नहीं है, प्रयोगशाला में ताला लगा हुआ है।प्राचार्य को निर्देशित किया गया है की प्रयोगशाला को तत्काल व्यवस्थित करें और बच्चों को प्रायोगिक शिक्षा देना है विज्ञान कोई थ्योरी का विषय नहीं है विज्ञान प्रयोग का विषय होता जब तक प्रयोगशाला व्यवस्थित नहीं होगी तब तक बच्चे विज्ञान की प्रायोगिक शिक्षा कैसे ग्रहण करेंगे यह सारी समस्याओं से जिला कलेक्टर एवं शिक्षा विभाग मध्य प्रदेश शासन तक इन समस्याओं को लेकर जाऊंगी जिससे 

 छात्र-छात्राओं को यथोचित सुविधा मिलेगी तो वे अच्छे से शिक्षा के क्षेत्र में आगे बढ़कर देश का और अपना नाम रौशन करेंगे। उन्होंने यह भी कहा की निरीक्षण के माध्यम से विभिन्न विद्यालयों में व्याप्त समस्याओं को समझकर उसे दूर करने के लिए प्रतिबद्ध है ताकि देश के भविष्य छात्र हमारे देश के निर्माण में अपना बहुमूल्य योगदान दे सके ।